Back
लासलगावमध्ये ट्रकच्या धडकेत 65 वर्षीय महिलेचा मृत्यू, दोन जखमी!
Chandwad, Maharashtra
अँकर:-
लासलगाव येथून आपल्या नातेवाईकाचा कार्यक्रम आटोपून मालेगाव कडे परतणाऱ्या तीन महिलांना चांदवड शहराच्या चौफुलीवर एक मालवाहू ट्रक ने चिरडल्याने यातील गुणमाला श्रीपाद पहाडे वय 65 वर्ष (राहणार सोयगाव, मालेगाव ) या महिलेचा जागीच मृत्यू झाला असून सुशीला श्रीपालचंद पहाडे व अनिता विनोद पहाडे या दोन महिला जखमी झालेल्या आहेत. या अपघाताची नोंद पोलिसात करण्यात आले असून पुढील तपास चांदवड पोलीस करत आहेत
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Kalyan, Maharashtra:
डोंबिवली न्यूज फ्लश..
रेल्वे प्रवासात महिलांची सुरक्षितता धोक्यात
मद्यपी तरुणाचा महिलांच्या डब्यातून डोंबिवली ते मुंब्रा प्रवास
डोंबिवलीहून 10. 34 मिनिटांची सीएसटीएमला जाणाऱ्या एसी लोकल मधून मद्यपीचा प्रवास
महिलांनी विनंती करून देखील मद्यपीने दाद दिली नाही
व्हिडिओ व्हायरल,
0
Share
Report
Pandharpur, Maharashtra:
Anchor -- विठुरायाच्या २४ तास दर्शनाला आजपासून सुरुवात , देवाचा पलंग निघाला , देवाचे नवरात्र सुरू
विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरीची वाट चालू लागले असताना पंढरी देखील हजारो भाविकांच्या उपस्थितीने फुलून गेली आहे . आषाढी साठी येणाऱ्या लाखो भाविकांना देवाच्या दर्शन घेता यावे यासाठी आज देवाचा चांदीचा पलंग काढून दर्शनासाठी मंदिर २४ तास खुले करण्यात आले आहे . आज पासून विठुरायाचे नवरात्र सुरू होत असल्याने देवाच्या विश्रांतीचा चांदीचा पलंग या नवरात्री काळात काढण्याची परंपरा असल्याने आज विधिवत पूजा करून हे नवरात्र बसविण्यात आले .
आज सकाळी देवाच्या पूजे नंतर देवाच्या मागे आणि रुक्मिणी मातेच्या पाठीला मऊ कापसाचा लोड लावण्यात आला असून आता २४ तास दर्शनासाठी उभ्या असलेल्या विठुरायाला थकवा जाणवू नये यासाठि ही व्यवस्था करायची परंपरा आहे .
आज सकाळी देवाच्या शेजघरातील पलंग बाहेर काढण्यात आला . यावेळी या चांदीच्या पलंगावरील देवाच्या गाद्या गिरद्या देखील बाहेर काढून ठेवण्यात आल्या . देवाचे शेजघर मोकळे करून ठेवण्यात आले . आजपासून देवाचे सर्व राजोपचार बंद करून देव फक्त भाविकांच्या दर्शनासाठी सज्ज झाला आहे .
असे असतील विठुरायाचे नित्यक्रम -- पहाटे साडेचार वाजता देवाचे स्नान आणि नित्यपूजा करण्यात येईल या काळात फक्त १ तास दर्शन बंद असेल . यानंतर दुपारी महानैवेद्याला १५ मिनिटे आणि रात्री नऊ वाजता लिंबू पाणी देण्यासाठी १५ मिनिटे दर्शन थांबविण्यात येणार आहे . याशिवाय संपूर्ण दिवस रात्र विठुराया आपल्या लाडक्या भक्तांना दर्शन देत उभा असणार आहे .
देवाचे दर्शन २४ तास खुले केल्याने आता रोज पायावर ५० ते ६० हजार तर मुखदर्शनातून ५० ते ६० हजार भाविकांना दर्शन मिळू शकणार आहे . सध्या गर्दी वाढू लागल्याने मिनिटाला ४० भाविकांच्या दर्शनाचा वेग आता मंदिर समितीला वाढवावा लागणार असून मुखदर्शन रांगेत देखील जास्तीतजास्त भाविकांना दर्शन देता यावे यासाठी वेग वाढवावा लागणार आहे . आषाढी यात्रा काळात देवाचे दर्शन घेण्यास १८ ते २० तास अवधी लागत असल्याने सध्या रोज लाखभर भाविक दर्शनासाठी येथे येत असून सध्या ८ ते १० तासात देवाचे दर्शन मिळत आहे . आता आजपासून २४ तास दर्शन व्यवस्था सुरू झाल्याने हाच अवधी कमी होऊ शकणार आहे.
--------
Byte - गहिनीनाथ महाराज औसेकर
wkt सचिन कसबे
0
Share
Report
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 2606ZT_INDRAPURAAROGY
FILE 5
राज्य महिला आयोग व पुणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने आषाढी वारी काळात महिला वारकऱ्यांच्या स्वच्छ व सुरक्षित प्रवासासाठी आरोग्यवारीला सुरुवात. ...
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीत
क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या उपस्थित झाले आरोग्यावारीचे उद्घाटन
ANCHOR महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य वारीला आज पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावात उत्साहात सुरुवात झाली. या आरोग्यवारी अंतर्गत गावात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.आरोग्य वारी अंतर्गत महिलांच्या आरोग्य तपासण्या, जनजागृती कार्यक्रम, तसेच मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागात आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.
0
Share
Report
Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी - समुद्राच्या उधाणाचा वेळास गावाला फटका
उधाणामुळे सर्व कचरा वेळास - बाणकोट मार्गावर
मोठ्या प्रमाणात कचरा रस्त्यावर आल्याने वाहतूकीस होतोय अडथळा
ग्रामस्थांना देखील इथून चालत जाताना करावी लागतेय कसरत
समुद्राला लागून असलेलं वेळास गाव कासवांच गाव म्हणून जगप्रसिद्ध ओळख
मोठ्या संख्येनं पर्यटकांची पावलं ही वेळास गावाकडे वळतात
कच-यामुळे होतेय गावाचे विद्रुपीकरण
धुपप्रतिबंधक बंधा-याची होतेय ग्रामस्थांकडून मागणी
0
Share
Report
Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Accident
Feed on - 2C
-----------------------------
Anchor - एस टी बस आणि ऑटोचा अपघात होऊन दहा प्रवासी जखमी झाले. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात काल हा अपघात घडला. देगलूर आगारातून बस उदगीरकडे जात होती. गोजेगाव येथून दहा प्रवासी घेऊन ऑटो देगलूरकडे जात होता. करडखेड वाय पॉईंटजवळ बसच्या एका बाजूला ऑटोची धडक बसली. या अपघातात ऑटोमधील दहा प्रवासी जखमी झाले. अपघातातील जखमीवर देगलूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. सुदैवाने अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही.
--------
0
Share
Report
Ratnagiri, Maharashtra:
लोकेशन - सावर्डे चिपळूण
मुंबई-गोवा महामार्गावरच्या चिपळूण नजिकच्या सावर्डे येथे कंटेनर आणि टू व्हीलर चा अपघात..
कंटेनरच्या धडकेने मोटरसायकल चालकाचा जागीच मृत्यू...
घटनास्थळी पोलीस दाखल..
0
Share
Report
Ambernath, Maharashtra:
उल्हासनगरात महिलेचा विनयभंग प्रकरणी डॉक्टरला अटक
दोन तासात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल
Ulh dr arrest
Anchor उल्हासनगर शहरात एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी डॉक्टर विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलंय,ह्या गुन्ह्यात उल्हासनगर पोलिसांनी दोन तासात आरोपीला अटक करत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलंय,शहाबुद्दीन शेख अस अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे,पीडित महिलेच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आलीय,गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ डॉक्टर शहाबुद्दीन ला ताब्यात घेत ,दोन तासात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलंय,
Byte शैलेश काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त
चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
0
Share
Report
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2706ZT_CHP_ROAD_DIGGING
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर शहरातील पठाणपुरा या वर्दळीच्या मार्गावर वीज वाहिन्यांसाठीच्या खोदकामामुळे नागरिक त्रस्त , अपघातांत झाली वाढ
अँकर:-- चंद्रपूर शहर खोदापूर झाले आहे. शहरातील विविध भागात या ना त्या विकासकामांमुळे खोदकामे होत आहेत. अशातच पठाणपुरा या वर्दळीच्या मार्गावर भूमिगत वीज वाहिन्यांसाठी खोदकाम सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सततच्या खोदकामामुळे वृद्ध- महिला व शालेय विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या भागात अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. शहरात भूमिगत मलनिस्सारण वाहिनी ,अमृत पाणीपुरवठा टप्पा दोन यासह आता भूमिगत वीज वाहिन्यांच्या कामासाठी देखील खोदकामे होत आहेत. ऐन पावसाळ्यात होणाऱ्या या कामांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला असून रस्ते देखील अरुंद झाले आहेत. हे काम तातडीने थांबवण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.
बाईट १),२) त्रस्त नागरिक
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn bhumre byte
Feed attached
माझ्या ड्रायव्हरने कुठली जमीन घेतली , वा मिळाली असेल तर त्याच्या वैयक्तिक जीवनाशी माझा काय संबंध आहे असा उलट सवाल आमदार विलास भुमरे यांनी केला आहे आम्ही राजकीय जीवनात आहोत आमच्यावर शिंतोडे उडवण्याची असे प्रयत्न होत राहतात आमच्या सोबत अनेक लोक फोटो काढतात नंतर चोऱ्या करतात तर मग काय ते चोऱ्या मध्ये आमचा हात आहे का असं विलास भुमरे म्हणाले आणि जमीनी सोबत आपला काहीही संबंध असल्याचा त्यांनी फेटाळून लावला..
Byte विलास भुमरे, आमदार
0
Share
Report
Beed, Maharashtra:
बीड : रस्ता नाही, तरीही भक्तीचा मार्ग थांबत नाही; पादुका डोक्यावर घेऊन वारकऱ्यांची पंढरीकडे वाटचाल!
Anc : श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड येथून निघालेल्या संत वामन भाऊ महाराज यांच्या पालखी सोहळ्याने पंढरपूरकडे प्रस्थान केलेय. दुसऱ्या दिवशीच्या मार्गात रस्ता नसल्यानं संतांच्या पादुका डोक्यावर घेत, टाळ-मृदंगाच्या गजरात वारकऱ्यांनी तब्बल सहा किलोमीटरचा प्रवास चक्क नदीपात्रातून, झाडाझुडपांतून पार केला. भक्तीचा उत्साह ओसंडून वाहत असताना, रस्ता नसण्याचं वास्तव मात्र खूप काही सांगून जातं. दरवर्षी हेच चित्र, पण प्रशासनाकडून सतत दुर्लक्ष होतेय. वारकऱ्यांची ही पंढरीची वाट केव्हा सुलभ होणार? हा प्रश्न मात्र गेल्या वर्षानुवर्ष अनुत्तरीतच आहे.
0
Share
Report