icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अब Akola तक पहुँचा नीट पेपर फूट, कांग्रेस ने मंत्री इस्तीफे की माँग की

Akola, Maharashtra:देशभर गाजत असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणाचे पडसाद आता अकोल्यातही उमटताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने अकोल्यात आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे आमदार साजीदखान पठाण यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. देशभरात झालेल्या नीट पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरल्याची भावना व्यक्त करत काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वर्षभर परिश्रम घेऊन परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये या प्रकारामुळे तीव्र नाराजी आणि निराशेचे वातावरण निर्माण झाले असल्याचे आंदोलकांनी म्हटले. पेपर फुटीमुळे शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळलीत झाला असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांसह संबंधित सर्व दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली. तसेच या गंभीर प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. यावेळी काँग्रेस तर्फे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा फोटो जाळण्यात आला. पेپر खोटी प्रकरणात पोलिसांनी मोटेगावकर यांना अटक केली आहे तर मोटेगावकर यांचा काँग्रेसच्या व्यासपीठावरून एका भाषणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये आपण देशमुख परिवाराचा कुंकू लावला असल्याचं त्यांनी म्हटले आहे. तर गुन्हेगार कोणाचाही नातेवाईक असो कुणाचाही निकड वरती असो त्याला शिक्षा झालीच पाहिजे अशी भूमिका सुद्धा काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी मांडली आहे. या आंदोलनात काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
0
0
Report

पाबळ में घर में भीषण आग, शेड में मंडप और सामग्री जलकर खाक

Shirur, Maharashtra:शिरूर/पुणे पाबळमध्ये घराला भीषण आग, मंडपाच्या साहित्याचे मोठे नुकसान ANC..शिरूर तालुक्यातील पाबळ येथे राजू झोडगे यांच्या घराला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत शेडमध्ये ठेवलेले मंडपाचे साहित्य जळून खाक झाले असून मोठे आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अचानक घरातून धूर निघत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने शेडमधील मंडपाचे कापड, सजावटीचे साहित्य, प्लास्टिक साहित्य तसेच इतर वस्तूंना आग लागली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग परिसरात पसरून मोठी दुर्घटना होण्यापासून टळली. मात्र, आगीत मंडप व्यवसायासाठीचे मोठ्या प्रमाणात साहित्य जळून नुकसान झाले आहे. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
0
0
Report
Advertisement

चांदूर बाजार तहसील में किसानों का आक्रामक आंदोलन, पांदन रस्ते तुरंत बनाओ की मांग

Amravati, Maharashtra:अमरावतीच्या चांदूर बाजार तहसील कार्यालयात शेतकऱ्यांचे झोपा काढो आंदोलन; हंगामापूर्वी पांदण रस्ते तयार न झाल्याने महसूल प्रशासनाविरोधात तीव्र संताप अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तहसील कार्यालयात शेतकऱ्यांनी झोपा काढो आंदोलन सुरू केले असून महसूल प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पावसाळ्यापूर्वी पांदन रस्ते तयार करा या मागणीसाठी लोकविकास संघटनेने हे आंदोलन केले आहे. पावसाळा तोंडावर आलेला असतानाही ग्रामीण भागातील पांदन रस्त्यांची कामे सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून याच पार्श्वभूमीवर आज लोकविकास संघटनेच्या वतीने चांदूर बाजार तहसील कार्यालयात आक्रमक आंदोलन करण्यात आले. शेतकरी आंदोलक गोपाल भालेराव यांच्या नेतृत्वाखाली शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तहसील कार्यालयात झोपा काढो आंदोलन करण्यात आले असून आंदोलकांनी पावसाळ्यापूर्वी सर्व पांदन रस्ते तातडीने तयार करा अशी मागणी करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली आहे. पांदन रस्ते नसल्यामुळे शेतीमालाची वाहतूक, शेतात जाणे आणि कृषी कामे मोठ्या प्रमाणात प्रभावित होत आहे त्यामुळे आज शेतकरी आक्रमक झाले असून आंदोलनावेळी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल दिला इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
0
0
Report
Advertisement

वाशीम में 43°C तापमान, पेट्रोल-डिज़ेल की किल्लत से सड़कें उठी आपाधापी

Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात तापमान ४३ अंशांपर्यंत पोहोचल्याने नागरिक उष्णतेने त्रस्त झाले आहेत. त्यातच सलग चौथ्या दिवशी पेट्रोल डिझेल टंचाई कायम असल्याने वांधारकासह शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ज्या पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध होत आहे, तेथे मोठी गर्दी होत असून वाशिममधील दक्षता पेट्रोल पंपावर शेतकरी कॅन व वाहनांसह रांगेत उभे असल्याचे चित्र दिसून आले. भर उन्हात तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याने वाहनधारक हैराण झाले असून प्रशासनाने तातडीने इंधन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
0
0
Report

अंबराठ में सत्ता संघर्ष खत्म, बीजेपी ने हाई कोर्ट याचिका वापस ली

Ambernath, Maharashtra:अंबरनाथचा सत्तासंघर्ष : भाजपाकडून उच्च न्यायालयातील याचिका मागे शिवसेना भाजपा युती झाल्यानंतर निर्णय अंबरनाथ पालिकेतील सत्तासंघर्षाच्या राजकारणाला अखेर पूर्णविराम मिळाल्याचं चित्र समोर आलं आहे. भाजपाने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे. jिल्हाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा गट अधिकृत ठरवल्यानंतर भाजपाने या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, आता अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजपाची युती झाल्यानंतर भाजपाने आपली याचिका मागे घेतली आहे. यावेळी भाजपा गटनेते अभिजित करंजुले आणि शिवसेना गटनेते रवींद्र करंजुले हे दोन्ही मुंबई उच्च न्यायालयात उपस्थित होते. युतीनंतर दोन्ही पक्षांतील राजकीय संघर्ष संपुष्टात आल्याचं मानलं जात असून, आगामी काळात पालिकेतील सत्तासमीकरण यामुळे अधिक मजबूत होणार आहे。
0
0
Report

नीट पेपरफुटी के मामले में अकोला में मनसे ने मोतेगावकर के खिलाफ प्रदर्शन किया

Akola, Maharashtra:नीट पेपरफुटी प्रकरणाचे पडसाद आता राज्यभर उमटताना दिसत आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत इतर संबंधितांवरही कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, या प्रकरणात प्राध्यापक मोटेगावकर यांना अटक करण्यात आल्यानंतर अकोल्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अकोल्यातील मोटेगावकर यांच्या क्लासेससमोर मनसे सैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केले. संतप्त कार्यकर्त्यांनी मोटेगावकर यांच्या फोटोला काळे फासून परिसरातील बॅनर्सही फाडले. नीट पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ झाल्याचा आरोप करत मनसेने मोटेगावकर यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे.यावेळी विद्यार्थ्यांकडून घेतलेले पैसे तात्काळ परत करावेत, तसेच अकोल्यात मोटेगावकर यांचे एकही क्लास सुरू राहू देणार नाही, असा इशाराही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
0
0
Report
Advertisement

कल्याण पूर्वे के उद्यान में चार-पाँच युवकों ने जिम ट्रेनर तेजस चव्हाण को पीटा

Kalyan, Maharashtra:कल्याण पूर्वेत टवाळखोर तरुणांची दहशत पुन्हा एकदा समोर आली है. मध्यरात्रिच्या सुमारास केडीएमसी च्या ड प्रभाग कार्यालयाच्या आवारातील उद्यानात बसलेल्या तरुण-तरुणीला चार ते पाच टवाळखोर तरुणांनी बेदम मारहाण केलीये. या टवाळखोर तरुणांनी तरुणांच्या डोक्यात बियरच्या बाटल्या फोडल्या तरुणीला देखील लाथा बुक्क्यांनी मारले या प्रकरणी पोलीस या तरुणांचा शोध घेत आहेत. तेजस चव्हाण हा जिम ट्रेनर आहे काल मध्यरात्रीच्या सुमारास तो आपल्या मित्रिणी सोबत केडीएमसी च्या ड प्रभाग कार्यालयाच्या आवारातील उद्यानात गप्पा मारत बसला होता. याच दरम्यान चार ते पाच तरुण त्याच्याकडे आले .त्यांनी त्याचा मोबाईल घेतला . मोबाईल घेऊन निघून जात असताना तेजसने या चौघांना हटकले मोबाईल देण्यास सांगितले . संतापलेल्या या तरुणांनी मोबाईल दिला आणि तेथून निघून गेले . काही वेळातच पुन्हा ते चार ते पाच जण त्या ठिकाणी आले तेजसशी हुज्जत घालत त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली .यावेळी त्याच्यासोबत असलेल्या तरुणीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र या संतापलेल्या तरुणांनी या तरुणीला देखील लाथा बुक्क्यांनी मारहाण केली .इतकेच नव्हे तर तेजसच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडल्या . या मारहाणीत तेजसला गंभीर दुखापत झाली असून याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात त्याने तक्रार दाखल केली आहे या तक्रारीनुसार पोलिसांनी मारहाण करणाऱ्या चार ते पाच तरुणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला आहे.
0
0
Report

घाटकोपर के चिराग नगर में लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक के विरोध पर बुलडोजर

Mumbai, Maharashtra:लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कर्मभूमी असलेल्या घाटकोपर च्या चिराग नगर मध्ये त्यांचे भव्य स्मारक सरकारच्या वतीने उभारण्यात येणार आहे. मात्र इथल्या नागरिकांना इथेच घरे मिळावी अशी मागणी स्थानिकांची आहे. यासाठी त्यांनी मोठा विरोध दर्शविला होता. नेत्यांकडे प्रशासनाकडे मागणी केली होती, आता न्यायालयात ही धाव घेतली आहे. मात्र आज पासून इथल्या घरांवर हातोडा मारण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. या तणावाची स्थिती असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे आता इथले नागरिक हवालदिल झाले आहेत. घर तुटताना या नागरिकांना अश्रू अनावर झाले आहेत. मुख्यमंत्रीांनी आम्हाला इथेच घर देऊ असे आश्वासन दिलेले असताना आता आम्हाला बाहेर फेकले जात आहे, सरकारने आमचा विचार करावा अशी मागणी या रहिवाश्यांची आहे.
0
0
Report
Advertisement

शिवाजी महाराज चषक वॉर्डीबॉल: मुंबई-कोल्हापुर-पुणे-लातूर ने खिताब जीता

Ambernath, Maharashtra:छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा मुंबई, कोल्‍हापूर, पुणे, लातूरला विजेतेपद रात्री अडीच वाजेपर्यंत रंगला व्‍हॉलीबॉलचा थरार स्पर्धेला बदलापूरकरांचा उदंड प्रतिसाद Anchor बदलापूरमध्ये झालेल्या  छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुंबई, कोल्हापूर, पुणे, लातूर विभागाने विजेतेपद पटकावले. रात्री अडीच वाजेपर्यंत रंगलेल्‍या राज्‍य व्हॉलीबॉल स्पर्धेचा महासंग्राम पहाण्यासाठी बदलापूरकरांचा उदंड प्रतिसाद पहाण्यास मिळाला. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, कुळगाव-बदलापूर नगरपरिषद यांच्या संयुक्त्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. बदलापूर जिमखाना मैदानावर संपलेल्‍या राज्य व्हॉलीबॉल स्‍पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ आमदार किसन कथोरे आणि कुळगाव-बदलापूर नगरपरिषदच्‍या नगराध्यक्षा श्रीमती रूचिता घोरपडे यांच्‍या हस्‍ते झाला.  विद्युत प्रकाशझोतात रंगलेल्‍या स्‍पर्धेत १८ वर्षांखालील मुलांच्‍या गटात कोल्‍हापूरच्‍या संघ बाजीगर ठरला.तर २१ वर्षांखालील मुलींच्‍या गटात  पराभवानंतर सलग ३ सेट जिंकून मुंबईने नाशिकचा लोळवून विजेतेपदावर नाव कोरले.  चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top