icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

दारू के नशे में दोस्ती के कारण पर्यटक अक्षय जाधव की हत्या

Satara, Maharashtra:सातारा: दारूच्या नशेत घरात डोकावल्याच्या कारणावरून महाबळेश्वर तालुक्यातील भोसे येथे भिगवणच्या अक्षय रमेश जाधव या पर्यटक युवकाची लाकडी दांडके आणि लाथाबुक्क्यांनी चिखलात तुडवून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मित्रांबरोबर पाचगणी परिसरात फिरण्यासाठी आलेल्या अक्षय याला मित्रांनी दारूच्या नशेत असल्याच्या कारणातून खोलीत कोंडून ठेवले असताना त्याने रूम बाहेर येऊन शेजारील एका घरात डोकावल्याने संबंधित मुलीच्या वडिलांनी आणि त्यांच्या साथीदारांनी त्याला जीवघेण्य मारहाण केली. गंभीर जखमी अक्षयचा बारामती येथे उपचारापूर्वीच मृत्यू झाला असून याप्रकरणी पाचगणी पोलिसांनी मुख्य संशयित सूर्यकांत गोळे याच्यासह वाई परिसरातील चार आरोपींना अटक केली है.
0
0
Report

अघोरी आरोपों की जांच तेज: फिरोज आदम शेख की गिरफ्तारी

Oras Bk., Maharashtra:माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुना गिरीजा गितेश राऊत यांनी केलेल्या कथित जादूटोणा आणि अघोरी प्रथांच्या आरोपानंतर या प्रकरणातील तपासाला वेग आला असून, सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील फिरोज आदम शेख याला ठाणे पोलिसांनी काल सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या कारवाईनंतर फिरोज आदम शेख यांचे मेहुणे अन्वर खाजा बाऊददीन यांनी माध्यमांशी बोलताना आरोप फेटाळून लावले आहेत. "आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे अघोरी कृत्य केले जात नाही. येथे कोणाचे केस काढणे किंवा अशा प्रकारचे विधी होत नाहीत. फिर्यादी आणि संबंधित कुटुंबामधील वैयक्तिक वाद काय आहेत, याची आम्हाला कोणतीही माहिती नाही. काल अचानक पोलीस आले आणि फिरोज आदम शेख यांना ताब्यात घेऊन गेले. ही कारवाई अन्यायकारक आहे," असा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणे पोलीस करत असून, आता पाहूया फिरोज आदम शेख यांचे मेहुणे अन्वर खाजा बाऊददीन यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली...
0
0
Report

विनायक राऊत के परिवार से जुड़े आरोपों की जांच तेज, फिरोज बाबा ताब्यात

Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग अँकर : माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने केलेल्या जादूटोणा आणि कथित अघोरी प्रथांच्या गंभीर आरोपांनंतर या प्रकरणातील तपासाला वेग आला आहे. या प्रकरणात नाव आलेल्या सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील फिरोज बाबा याला ठाणे पोलिसांनी शनिवारी दुपारी सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे. विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश राऊत यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली. फिरोज बाबा याच्यावर तक्रारदार महिलेने तिच्यावर कथित जादूटोणा आणि अघोरी विधी केल्याचा आरोप आपल्या फिर्यादीत केला आहे. त्यानंतर ठाणे पोलिसांचे पथक सावंतवाडीत दाखल झाले आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने कोलगाव येथून फिरोज बाबाला ताब्यात घेण्यात आले.
0
0
Report
Advertisement

नेरूळ स्टेशन परिसर में शराबी ने ड्यूटी पर तैनात पुलिसकर्मी पर धारदार हथियार से हमला करने की कोशिश

Navi Mumbai, Maharashtra:नेरूळ रेल्वे स्टेशन परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी एक धक्कादायक घटना भरदिवसा घडली आहे. नेरुळ स्टेशन परिसरात वर्दळीच्या ठिकाणी एका मद्यपीने थेट कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावरच धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. नेरुळ स्टेशन मध्ये असलेल्या वाईन शॉप मुळे मद्यपी थेट उघड्यावर मद्यपान करुन थिंगाणा घालत असतात. या हल्ल्याचे कारण अद्याप समोर आले नसले तरी पोलिसांवरच थेट हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अश्या मद्यपिंवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आलेय.
0
0
Report

मिरज पंचायत समिति की नूतन इमारत का दो बार उद्घाटन, टकराव दिखा

Sangli, Maharashtra:स्लग - एकाच प्रशासकीय इमारतीचं झालं दोनदा उद्घाटन.. मिरज पंचायत समिती नूतन इमारतीचे महाविकास आघाडी पाठोपाठ प्रशासनाकडुन उद्घाटन.. अँकर - उद्घाटन झालेल्या नूतन इमारतीचा पुन्हा उद्घाटन करण्यात आला आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सांगलीच्या मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचा उद्घाटन पार पडले आहे.मिरजेचे भाजप आमदार सुरेश खाडे,आमदार सदाभाऊ खोत,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र पंचायत समितीचे सभापती व सत्ताधारी हे अनुपस्थित होते.विशेष म्हणजे प्रशासनाच्या या उद्घाटनाच्या आदल्या दिवशीच महाविकास आघाडी व पंचायत समितीच्या सत्ताधाऱ्यांनी नूतन इमारतीचा उद्घाटनाचा कार्यक्रम उरकून घेतला आहे. त्यामुळे एकाच इमारतीचा दोनदा उद्घाटन झाल्याचा प्रकार घडल्याने प्रशासन,भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी व महायुतीचे मित्र पक्ष असा संघर्ष पाहायला मिळाला आहे.
0
0
Report
Advertisement

चंद्रपुर पुलिस का कड़ा संकेत: 198 जमानत पर बाहर आए आरोपियों की परेड

Chandrapur, Maharashtra:टायटल :--गुन्हेगारांवर चंद्रपूर पोलिसांचा कडक वचक , १९८ जामिनावरील आरोपींची ओळख परेड, अटी मोडल्यास जामीन रद्द करण्याचा इशारा अँकर :-- चंद्रपूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई केली आहे. दरोडा, जबरी चोरी आणि घरफोडीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये जामिनावर बाहेर आलेल्या तब्बल १९८ आरोपींची विशेष ओळख परेड घेण्यात आली. पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. या वेळी सर्व आरोपींना न्यायालयाने घालून दिलेल्या जामिनाच्या अटींचे काटेकोर पालन करण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या. अटींचा भंग केल्यास जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात प्रस्ताव पाठविण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही पोलिसांनी दिला आहे. याशिवाय, ज्या आरोपींवर यापूर्वी प्रतिबंधक कारवाई झाली नव्हती, त्यांच्यावर तातडीने प्रतिबंधक कारवाई करण्यात आली असून भविष्यात पुन्हा गुन्हेगारीकडे वळू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालींवर २४ तास नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येकावर कठोर कारवाई केली जाईल, असा ठाम संदेश चंद्रपूर पोलिसांनी या मोहिमेतून दिला आहे.
0
0
Report

चंद्रपूर पुलिस ने 66 लाख से अधिक मूल्य के नशे जलाकर नष्ट किए

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर पोलिसांकडून अंमली पदार्थांविरोधातील कारवाईत मोठे पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील ५१ गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले तब्बल ६६ लाख १४ हजार ८८६ रुपयांचे गांजा, एमडी पावडर आणि गर्द न्यायालय व संबंधित समितीच्या परवानगीनंतर नागपूर येथील अत्याधुनिक प्रकल्पात पर्यावरणपूरक पद्धतीने जाळून नष्ट करण्यात आले. या कारवाईत ३१० किलोहून अधिक गांजा, ४२० ग्रॅम एमडी आणि ७६ ग्रॅम गर्दचा समावेश असून, अमली पदार्थांविरोधातील कठोर मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे चंद्रपूर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
0
0
Report
Advertisement

सिंधुदुर्ग के कासारटाका मंदिर पर लाखों भक्त, धार्मिक पर्यटन का संगम

Oras Bk., Maharashtra:वर्षा पर्यटन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो सिंधुदुर्ग जिल्हा आणि निसर्गाच्या सानिध्यात वाहणारे नयनरम्य धबधबे.. मात्र धार्मिकता आणि पर्यटन यांचा दुहेरी संगम असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळ म्हणजे कासारटाका.. मालवण तालुक्यात असलेले हे स्थळ नेहमीच भाविकांना आणि पर्यटकांना आकर्षित करत असत नवसाला पावणारे देवस्थान म्हणुन प्रसिद्ध असलेल्या कासार टाका येथे लाखोच्या संख्येने पर्यटक येत असतात. विशेषतः गोवा आणि कर्नाटक येथील पर्यटकांची संख्या जास्त असते. देवदर्शन आणि मंदिराच्या बाजूला असलेलीं छोटी मात्र मनमोहक नदी यामुळे धार्मिकते सोबत पर्यटणाची जोड असलेले ठिकाण म्हणुन कासारटाका प्रसिद्ध आहे.
0
0
Report

दिलचस्प headline हिंदी: मालेगांव में बिबट्या का आतंक, वीडियो में कैद हुआ हमला

Nashik, Maharashtra:मालेगाव ब्रेकिंग ( नाशिक ) दाभाडीत बिबट्याची दहशत! वासरावर हल्ला, घटना मोबाईलमध्ये कैद... मालेगाव तालुक्यातील दाभाडी गावात बिबट्याची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे. गावालगतच्या शेत परिसरात बिबट्याने एका वासरावर हल्ला केल्याची घटना घडली असून, ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, शेतकरी व नागरिकांनी रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळण्यास सुरुवात केली आहे. वन विभागाने तातडीने या भागात पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0
0
Report

पूर्णा नदी में डूबकर दो नाबालिगों की मौत, परिजन शोक में

Buldhana, Maharashtra:बुलढाण्यात पूर्णा नदीत बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू. नांदुरा - बुऱ्हानपूर मार्गावर असलेल्या मानेगाव येथील पूर्णा नदी पात्रात अंघोळीसाठी उतरले होते नदीत. प्रतीक वानखेडे (12) व कृष्णा भोपळे (14) असं मृत्यू झालेल्या मुलांची नाव असून दोघेही मुलं नांदुरा येथील रहिवाशी आहेत. आज शाळेला सुट्टी असल्याने मृतक दोघे आणि त्यांचा मित्र पूर्णा नदीत पोहायला गेले होते. मात्र दोघे अंघोळीसाठी उतरतांना पाण्यातील खोलीचा अंदाज आला नाही आणि ते बुडाले. तिसरा नदीच्या काठावर बसून होता. जवळपास कुणीही नसल्याने त्यांना वाचवण्यासाठी कुणीही आले नाही. मात्र दोन तासांच्या नंतर शेतकरी जाताना दिसले असता त्यांना माहिती मिळाली, तेव्हा दोघांचे मृतदेह नदीच्या बाहेर काढण्यात आले. जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे. या घटनेमुळे दोघांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
0
0
Report
Advertisement

संत समझदार काका के पालखी यात्रा आज सासवड़ से पंढरी के लिए प्रस्थान

Rui, Maharashtra:संत सोपान काकांच्या पालखीच पंढरीकडे प्रस्थान.....लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत पालखी सोहळ्याने ठेवलं प्रस्थान......संत सोपान काका माऊलींचे धाकटे बंधू.... संत ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू संत सोपान काका यांच्या पालखी सोहळ्याचं आज सासवड मधून पंढरीसाठी प्रस्थान झालं आहे. लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत हरिनामाच्या जयघोषात हा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने आज मार्गस्थ झालाय. या वेळी माजी आमदार संजय जगताप यांची ही उपस्थिती होती. संत सोपान काकांचे थोरले बंधू माऊली यांचा पालखी सोहळा काल सायंकाळी सासवड नगरीत विसावला आहे. आज या पालखी सोहळ्याचा सासवडमध्ये मुक्काम आहे. त्यामुळे संपूर्ण सासवड नगरी माऊलीमय झाली आहे. आज माऊलींचे धाकटे बंधू संत सोपान काकांच्या पालखी सोहळ्याच ही प्रस्थान झालय.यंदाच्या वर्षी तिथीचा एक क्षय आल्याने बारामती तालुक्यातील माळेगाव येथील मुक्काम रद्द करण्यात आला आहे. एकूण या पालखी सोहळ्याचा १४ दिवसांचा मुक्काम असणार आहे.असे सोहळा प्रमुख त्रिगुण गोसावी यांनी सांगितले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top