445001
यवतमाळ : महिला बँक घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या बाबाजी दाते महिला बॅंकेत २४२ कोटींच्या अपहार प्रकरणात महिनाभराने अटकसत्र सुरू झाले आहे. पोलिसांनी शिवसेना नेते रमेश अगरवाल, व्यावसायिक प्रकाश पिसाळ आणि ठेकेदार प्रशांत पामपट्टीवार यांना अटक केली आहे. याआधी बँकेच्या CEO सुजाता महाजन, तिचा पती विलास महाजन, ॲड. वसंत मोहरेकर आणि नवलकिशोर मालाणी यांना अटक झाली होती. आता अटक केलेल्या आरोपींची संख्या सात झाली आहे. २०६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, ज्यामुळे संचालक व लेखा परीक्षक चिंतेत आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
वाशीम में डीएपी खत की बिक्री में ऐतिहासिक उछाल; 1–9 अप्रैल में 555 टन
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात यंदा डीएपी खताच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. अवघ्या १ ते ९ एप्रिल या कालावधीत तब्बल ५५५ मेट्रिक टन खताचे वितरण झाले असून, मागील वर्षी याच कालावधीत केवळ १३ मेट्रिक टन विक्री झाली होती. यंदा खत विक्रीत सुमारे ४०३० टक्क्यांची प्रचंड वाढ नोंदवली गेली आहे. या असामान्य वाढीमुळे कृषी विभाग सतर्क झाला असून, संशयित व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. प्रशासनाने मात्र खरीप हंगामासाठी पुरेसा खतसाठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले असून, शेतकऱ्यांनी अनावश्यक साठेबाजी टाळावी, असे आवाहन केले आहे.0
0
Report
अकोला में पानी टंकी में बंदर की मौत, गर्मी से जल सुरक्षा पर सवाल
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील खिरपुरी बुद्रुक गावात पाण्याच्या टाकीत एका वानराचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे पाण्याच्या शोधात आलेल्या या वानराचा पाण्यात पडून मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीतील पाण्यातून गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधी येत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र समाधानकारक कारवाई न झाल्याने अखेर गावकऱ्यांनी स्वतः टाकीवर चढून पाहणी केली. त्यावेळी पाण्यात वानराचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून पाणी पुरवठ्याच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. संबंधित विभागाने तत्काळ टाकी स्वच्छ करून योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.0
0
Report
शरद पोंक्षे बोले: अकबर सेक्युलर था, इतिहास छुपाया गया
Nanded-Waghala, Maharashtra:एक लाख खरात एकत्र केले तर एक अकबर होईल अस वक्तव्य सिने अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले. नांदेड मध्ये भगवान परशुराम महाराज यांच्या जयंती निमित्त अखिल भारतीय ब्रह्मण महासंघा तर्फे आयोजित परशुराम तेजोत्सव कार्यक्रमा दरम्यान ते बोलत होते. यावेळी पोंक्षे यांनी मुगल ए आजम, जोधा अकबर, बाजीराव मस्तानी चित्रपटावर टीका केली. चित्रपटात खरा इतिहास लपवन्यात आला आणि अकबर कसा सेक्यूलर होता हे दाखवण्यात आले. एका वेळेला हजारो महिलांचे आयुष्य बर्बाद करणारा अकबर हा सेक्युलर कसा अस शरद पोंक्षे म्हणाले. आपलाच मराठी दिग्दर्शक जोधा अकबर बनवतो आणि तुम्ही हिंदू समाज तो हिट करता असेही पोंक्षे म्हणाले.0
0
Report
Advertisement
रायगड पर अमोल खुने का वायरल वीडियो: नार्को टेस्ट और SIT जांच क्यों चाहिए
Jalna, Maharashtra:जालना | मी जर दोषी असेल तर माझा समाजाने रायगडावरून कडेलोट करावा, अन्यथा मि दोषी नसेल तर जरांगेंचा करावा रायगडाच्या टकमक टोकावरून अमोल खुने यांनी बनवला व्हिडिओ माझ्या विरोधात एसपींना पत्र देणारे आमदार, खासदार कुठे हैती ? सरकारने तातडीने नार्को टेस्ट आणि एसआयटी चौकशी करावी मनोज जरांगे यांना धमकी दिल्याचा आरोप असलेल्या अमोल खुने यांची सरकारकडे मागणी अमोल खुने यांनी रायगडावर जाऊन घेतलं दर्शन अँकर-मी जर दोषी असेल तर माझा समाजाने रायगडावरून कडेलोट करावा, अन्यथा मनोज जरांगे यांचा करावा.. असा एक व्हिडिओ अमोल खुने यांनी रायगडाच्या टकमक टोकावरून बनवलाय.. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा आरोप अमोल खुने यांच्यावर आहे.. काही दिवसांपूर्वी अमोल खुने यांनी नार्को टेस्ट आणि एसआयटी चौकशी करण्याची मागणी जालना पोलीस अधीक्षकांकडे केली होती.. माझ्यावर कारवाई करण्यासाठी एसपींना पत्र देणारे आमदार खासदार आता कुठे आहेत.. मला विनाकारण या प्रकरणात अडकवण्यासाठी प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळं सरकारने तातडीने नार्को टेस्ट आणि एसआयटी चौकशी करावी. मी जर दोषी असलो तर समाजाने माझा टकमक टोकावरून कडेलोट करावा अन्यथा जरांगे यांचा करावा अशी मागणी अमोल खुने यांनी व्हिडिओत केली आहे. बाईट- अमोल खुने,जरांगे यांच्या हत्येचा कर रचण्याचा आरोप असलेला आरोपी0
0
Report
चंद्रपूर की शक्तीनगर बस्ती में भालू-बछड़ों के देखा जाना क्षेत्र में दहशत फैल गई
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुर शहर के पास सरकारी कोयला कंपनी वेस्टर्न कोल फील्ड्स लिमिटेड की शक्तीनगर बस्ती में अस्वल (भालू) अपने बछड़ों के साथ देखा गया। भालू रात के समय बस्ती क्षेत्र में खुले में घूम रहा था। मौसुम के कारण अस्वली की घूम-फिराह बढ़ी हुई हो सकती है, जिससे आसपास के लोगों के लिए खतरा हो सकता है। नागरिकों ने वनविभाग को सूचना दी है और यह वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो गया है।0
0
Report
माणगाव-इंदापुर बायपास में कोकण रेलवे बाधा, गडकरी से जल्द समाधान की मांग
Chendhare, Maharashtra:माणगाव आणि इंदापूर बायपास कामात कोकण रेल्वेचा अडथळा विद्युत खांब हलविण्याच्या कामात दिरंगाई गडकरी यांनी दिलेली डेडलाइन पुन्हा हुकणार सुनील तटकरे यांनी घेतली नितीन गडकरी यांची भेट मुंबई गोवा महामार्गाच्या कामातील महत्वाचा टप्पा असलेल्या माणगाव आणि इंदापूर येथील बायपासच्या कामात कोकण रेल्वेचा अडथळा आडमुठेपणा आडवा येतोय कोकण रेल्वेच्या सिग्नल यंत्रणा, विद्युत खांबामुळे बायपासवरील उड्डाण पुलाचे काम रखडले आहे यासंदर्भात रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि ही समस्या निदर्शनास आणून दिली यावर तातडीने मार्ग काढावा अशी विनंती गडकरी यांना केली मुंबई गोवा महामार्ग 31 मे पर्यंत पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला होईल असा शब्द काही दिवसांपूर्वीच दिला होता मात्र गडकरींच्या शब्दपूर्तीत कोकण रेल्वेचा अडथळा ठरतो आहे बायपासच्या कामातील समस्येचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी0
0
Report
Advertisement
शिरूर के किसानों के लिए हड़ताल: कृषि विक्रेताओं का अनिश्चित बंद
Shirur, Maharashtra:शिरूर पुणे... आधीच अवकाळी पाऊस और शेतीमालाचे बाजारभाव पडल्याने राज्यातील बळीराजा शेतकरी संकटात सापडलेला असताना आता शेतकऱ्यांच्या चिंता पुन्हा वाढणार आहे, राज्यातील कृषी विक्रेत्यांनी 27 एप्रिल पासून बेमुदत बंदची हाक दिलीय, या संदर्भात महाराष्ट्र फर्टीलायझर्स पेस्टिसाइट्स सीड्स डीलर्स असोसिएशन ने राज्याच्या कृषी आयुक्तांना पत्र दिलं असून आपल्या विविध मागण्यांसाठी ही बंदची हाक पुकारलीय.... कंपन्यांकडून रासायनिक खताचा पुरवठा होताना होत असलेले लिंकिंग बंद करणे, किरकोळ खत विक्रेत्यांवर लावलेल्या जातच नियमांच्या विरोधात, अनधिकृत एचटीबीटी बियाणे विक्रीच्या विरोधात यांसारख्या विविध मागण्यांसाठी हा बंद पुकारलाय0
0
Report
रत्नागिरी के चिपळूण में नर बिबटिये की संदिग्ध मौत, वन विभाग जांच कर रहा है
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीच्या चिपळूणमधील शिरवली-गौळवाडी परिसरात एका नर बिबट्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मानवी वस्तीच्या अगदी जवळ हा बिबट्या मृतावस्थेत सापडल्याने मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत चिपळूण, संगमेश्वर परिसरात वन्यप्राण्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने वन्यजीव प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला,याचा तपास आता वनविभाग करत आहे.0
0
Report
रत्नागिरी के गोविंदरावजी निकम कृषि महाविद्यालय ने कोकण विश्वविद्यालय में सुवर्ण पदक पाया
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी येथे कोकण कृषी विद्यापीठात गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाने ऐतिहासिक यश मिळवले आहे. नुकत्याच झालेल्या ४४ व्या पदवीदान समारंभात महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थिनींनी सुवर्णपदकांवर नाव कोरले. यात साक्षी थोरात हिने बीएससी (कृषी) मध्ये संपूर्ण विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला, तर समीक्षा बोने आणि वैष्णवी पाटील यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमात सुवर्णपदके मिळवली. कृषीभूषण डॉ.तानाजीराव चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील या विद्यार्थिनींनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.0
0
Report
Advertisement
निफाड के शिवडी में क्रेट गोदाम में भीषण आग, 700–800 प्लास्टिक क्रेट जलकर खाक
Niphad, Maharashtra:निफाड ब्रेक निफाड तालुक्यातील शिवडी येथे कॅरेटच्या गोडाऊनला भीषण आग द्राक्ष उत्पादक शेतकरी शिवाजी आव्हाड यांच्या मालकीच्या गोडाऊनला आग.. आगीत 700 ते 800 प्लास्टिक कॅरेट जळून खाक झाल्याचा अंदाज... परिसरातील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरचे ब्लोअर चालू करून आग आटोक्यात आणली... आगीचे कारण अद्याप अस्पष्ट....0
0
Report
धाराशिव में लेडी डॉन समेत परंडा के युवक पर बेल्ट-ऊस-लकड़ी से मारहाण, वीडियो वायरल
Dharashiv, Maharashtra:धाराशिवमध्ये तरुणाला बेल्ट, ऊस आणि लाकडाने अमानुष मारहाण; ‘लेडी डॉन’चा व्हिडिओ व्हायरल धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवी दिल्याच्या कारणावरून एका तरुणाला बेल्ट, ऊस आणि लाकडाने निर्दयीपणे मारहाण करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात एक महिला आणि तिचा भाऊ तरुणाला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. जखमी तरुण वेदनेने विव्हळत असतानाही मारहाण सुरूच असल्याचे या व्हिडिओत स्पष्ट दिसते. तरुणाला वाचवण्यासाठी त्याची आई आर्त विनवणी करत असल्याचेही हृदयद्रावक दृश्य समोर आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, मारहाण करणारी महिला परिसरात ‘लेडी डॉन’ म्हणून ओळखली जाते. वन विभागाच्या कामावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत परंडा पोलीस आणि धाराशिव पोलीसांनी तपास सुरू केला असून, संबंधितांवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.0
0
Report
जुन्नर के येणेरे पंचायत स्कूल बना मॉडल स्कूल, 10 लाख सुरक्षा बीमा समेत
Barav, Maharashtra:राज्यात आज एकीकडे मराठी शाळांची पटसंख्या घटतेय, पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमांकडे वाढतोय. पण पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील येणेरे गावाने हे चित्र पूर्णपणे पालटून टाकलंय. इथे जिल्हा परिषद शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी पालकांचा विद्यार्थांचा आग्रह दिसतोय! पण ही शाळा केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही, तर आपल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि पालकांच्या भविष्याचीही काळजी घेतेय. चक्क १० लाखांचा विमा देणारी ही राज्यातील पहिली शाळा ठरली आहे. पाहुयात आमचा हा खास रिपोर्ट... येणेरे गाव... आणि इथली कायापालट झालेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. जिथे प्रवेश घेण्यासाठी खासगी शाळा सोडून विद्यार्थी रांगा लावत आहेत. या शाळेने केवळ दर्जेदार शिक्षणच नाही, तर सुरक्षिततेचा एक असा आदर्श मॉडेल उभं केलंय, ज्याची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रात रंगली आहे. या शाळेने विद्यार्थ्यांसाठी २ लाख रुपयांचा आरोग्य व अपघाती विमा, तर कमावत्या पालकांसाठी तब्बल १० लाख रुपयांचा सुरक्षा विमा काढण्याचा उपक्रम राबविला आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि भारतीय पोस्ट विभागाच्या सहकार्याने राबवलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला एक भक्कम आधार देणारा ठरला आहे. केवळ विमाच नाही, तर आधुनिक तंत्रज्ञान आणि शिस्तीमुळे या शाळेने अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरलंय. पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत जिल्ह्यात द्वितीय, तर ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानात जुन्नर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून या शाळेने 'मॉडेल स्कूल'ची ओळख सार्थ ठरवली आहे. अशोक भुजबळ (सरपंच येणेरे) ... End VO: आजच्या काळात जिथे शिक्षणाचे बाजारीकरण होतंय, तिथे येणेरेची ही शाळा माणुसकी आणि जबाबदारीचं दर्शन घडवतेय. शिक्षणासोबतच जीवनाची हमी देणारी ही शाळा खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासाठी 'लाईटहाउस' ठरली आहे.0
0
Report
Advertisement
वाशीम में तेज गर्मी, तापमान 44°C; प्रशासन ने लोगों से सतर्क रहने की सलाह दी
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत आहे. काल वाशीमचे ४४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. हवामान खात्याने पुढील काही दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी केले आहे. दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळावे, शेतकऱ्यांनी शेतीची कामे सकाळी किंवा संध्याकाळी करावीत, असे त्यांनी सांगितले. तसेच भरपूर पाणी पिणे, डोक्यावर संरक्षण ठेवणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. लहान मुलांना उन्हात जाण्यापासून रोखावे, त्यांना पुरेसे द्रवपदार्थ द्यावेत. उष्माघाताची लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.0
0
Report
धाराशिव गैंग के तार चोरी: पाँच गिरफ्तार, 42 लाख का माल बरामद
Dharashiv, Maharashtra:धाराशिव जिले के पवनचक्की से तार चोरी करने वाले गिरोह के पांच आरोपियों को गिरफ्तार किया गया। लगभग 42 लाख रुपए के माल की बरामदी हुई और इस केस में 8 अपराध उजागर हुए। स्थानीय अपराध शाखा की टीम ने गोपनीय सूचना पर ढोकी कलंब रोड के गोविंदपुर पट्टी में घेराबंदी कर यह कार्रवाई की। गिरफ्तार पांचों आरोपियों के अलावा कुछ अन्य आरोपी फरार हैं। आरोपियों ने जिले के कई भागों में चोरी की बातचीत स्वीकार की है।0
0
Report
गणेश नाइक की आक्रामक पहल से MIDC ने झोपड़पट्टी पुनर्विकास टेंडर रद्द किया
Navi Mumbai, Maharashtra:एमआयडीसी विभागातील झोपडपट्टीचा पुनर्विकास करुन 300 चौरस फुटाची घरे देण्यासाठी एमआयडीसीने टेंडर काढले होते. या टेंडर प्रक्रियेला वनमंत्री गणेश नाईक यांनी कडाडून विरोध करत टेंडर रद्द न केल्यास मंत्रिपद सोडून रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता. यासाठी भाजपातर्फे झोपडपट्टी विभागात बैठका घेत जनजागृती करण्यात येत होती. अखेर गणेश नाईक यांच्या आक्रमकतेमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमआयडीसीने काढलेला टेंडर रद्द केलाय. याबद्दल भाजपच्या नगरसेवकांनी गणेश नाईकांचे आभार मानत झोपडपट्टी वासियांची दिशाभूल करण्यापेक्षा जीआर वाचून थोडा अभ्यास करावा अशी टीका शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांवर केलेय.0
0
Report
Advertisement
