445001
यवतमाळ : महिला बँक घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या बाबाजी दाते महिला बॅंकेत २४२ कोटींच्या अपहार प्रकरणात महिनाभराने अटकसत्र सुरू झाले आहे. पोलिसांनी शिवसेना नेते रमेश अगरवाल, व्यावसायिक प्रकाश पिसाळ आणि ठेकेदार प्रशांत पामपट्टीवार यांना अटक केली आहे. याआधी बँकेच्या CEO सुजाता महाजन, तिचा पती विलास महाजन, ॲड. वसंत मोहरेकर आणि नवलकिशोर मालाणी यांना अटक झाली होती. आता अटक केलेल्या आरोपींची संख्या सात झाली आहे. २०६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, ज्यामुळे संचालक व लेखा परीक्षक चिंतेत आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नाशिक में गोकुळ गीते का स्पष्ट नकार, महायुती के उम्मीदवार को समर्थन नहीं
Nashik, Maharashtra:नाशिक ब्रेकिंग - *गोकुळ गीते निवडणूक लढण्यासाठी ठाम....* गोकुळ गीते exclusive - - पेठ येथे प्रचारांच्या गाठीभेटी घेत असताना गिरीश भाऊंचा फोन आला - गिरीश भाऊ यांनी दोन तासात नाशिकला पोहोचशील का अशी विचारणा केली - त्यानंतरच मंत्री उदय सामंत यांना मुंबईला जायचे होते यासाठीच एअरपोर्टला या असे फोन करून सांगितले - एअरपोर्टला लॉबीमध्ये गिरीश महाजन साहेब दादा भुसे उदय सामंत व मी आमच्याक मध्ये चर्चा झाली - चर्चेदरम्यान भाऊंनी प्रसाद हिरे याने दराडे यांना पाठिंबा दिला त्या प्रकारे तुम्ही देऊ शकाल का अशी विचारणा केली - मात्र मी त्या ठिकाणी त्यांना नकार दिल्याने माझ्या नाशिकला आल्यानंतर माझ्या गाठीभेटी पुन्हा सुरू केले आहेत - त्यांची विशेष अशी काही प्रतिक्रिया नव्हती त्यांचा आग्रह होता - संपूर्ण महाराष्ट्र मध्ये महायुती आहे आणि महायुतीमध्ये जळगाव आणि नाशिक मध्ये ही निवडणूक चुरशीशी होत आहे - मला जळगाव बद्दल काही माहिती नाही मात्र नाशिकमध्ये ही निवडणूक नक्कीच चुरशीची झाली आहे - प्रसाध हिऱ्यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे ही लढत फक्त आता गीते आणि दराड्यांमध्ये आहे - आणि पत्रकारांसोबत सगळ्यांनाच माहिती आहे की त्या उमेदवाराबद्दल कोणाची किती भावना आणि किती घोर निराशा त्यांच्याबद्दल आहेत - त्यामुळे त्यांच्या भावनांच्या उद्रेकाचा मला कितपत फायदा होतो हे मला पुढील दिवसांमध्ये समजेल - महाराष्ट्रात तरी असं राजकारण चालत नाही - यशवंतराव चव्हाण यांचा हा महाराष्ट्र आहे शरद पवारांचा हा महाराष्ट्र आहे आणि आपल्या राज्याचे प्रमुख देवेंद्र फडवणीस साहेब एक आदर्श मुख्यमंत्री म्हणून देशात गौरवले जातात म्हणून त्यामुळे मला असं काही वाटत नाही की असा दुसरा काही प्रकार होईल - आणि आम्ही काही चुकीचे काम केलेले नाहीत त्यामुळे मीही शंका घेण्यात काही जागा नाही0
0
Report
जालना: तहसीलदार विजय चौहान लाच मामले में गिरफ्तार, तक्रारकर्ता भी जेल में
Jalna, Maharashtra:जालना : अंबड तहसीलदाराच्या लाच प्रकरणात तक्रारदार अटकेत वर्षभरापूर्वी केलेल्या वाळू चोरीच्या दोन गुन्ह्यांमध्ये कारवाई अँकर :जालन्यातील अंबड येथील तहसीलदार विजय चव्हाण याने ६ लाख ४० हजारांची लाच घेतल्याने त्याला एसीबीने पकडले होते. या प्रकरणातील तक्रारदार सुयोग सोळंके याला गोंदी पोलिसांन अटक केली आहे. २०२५ मध्ये दाखल झालेल्या वाळू चोरीच्या दोन गुन्ह्यांमध्ये त्याच्यावर कारवाई करण्यात आली. अंबड न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने सोळंकेला २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या कारवाईमुळे लाचप्रकरणातील आरोपी आणि तक्रारदार एकाचवेळी पोलिस कोठडीत गेले. सोळंकेविरुद्ध अवैध वाळू उत्खनन, वाळू चोरी, मारहाण तसेच इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. शिवाय, यापूर्वी त्याच्यावर एमपीडीएअंतर्गत एक वर्षासाठी तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. मात्र, दोन महिन्यांपूर्वीच तो या कारवाईतून मुक्त झाला होता. यातच अंबडचे तहसीलदार चव्हाण यांना लाचप्रकरणात अटक झाल्यानंतर सोळुंकेचे नाव चर्चेत आले आहे. पोलिस कोठडीदरम्यान सोळुंकेकडून अवैध वाळू उत्खननाशी संबंधित इतर बाबींची माहिती घेतली जाणार आहे, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. मात्र, तहसीलदार लाचप्रकरणात अडकल्यानंतर पोलिसांनी तक्रारदारावर केलेली कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे. सोळुंके याच्यावर या आधी अटकेची कारवाई का करण्यात आली नाही असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.0
0
Report
राजगुरुनगर से शिरूर तक एसटी बस शिंदेवाडी में बार-बार बंद, यात्रियों में आक्रोश
Shirur, Maharashtra:राजगुरुनगर आगाराच्या भोंगळ कारभाराचा फटका आज प्रवाशांना बसला आहे. राजगुरुनगरहून शिरूरकडे जाणारी एसटी बस शिंदेवाडी येथे अचानक बंद पडली. विशेष म्हणजे, राजगुरुनगरपासून सुरू झालेला हा ४५ किलोमीटरचा प्रवास प्रवाशांसाठी अत्यंत मनस्तापाचा ठरला, कारण ही बस वाटेत तब्बल ५ ते ६ वेळा बंद पडली. शिंदेवाडी येथे बस पूर्णपणे बंद पडल्याने, भर उन्हात प्रवाशांवरच एसटीला धक्का मारण्याची वेळ आली. अष्टविनायक महामार्गावर प्रवाशांनी बस ढकलून सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र बस सुरू न झाल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. नियमित देखभाल आणि दुरुस्तीअभावी एसटी बसेस रस्त्यातच बंद पडण्याचे प्रमाण वाढले असून, प्रशासनाच्या या अनास्थेविरोधात प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.0
0
Report
Advertisement
डोडामार्ग के गांव में ओंकार हत्ती का जंगल छोड़ कर प्रवेश, भीड़ वीडियो वायरल
Oras Bk., Maharashtra:अँकर मागील काही दिवस जंगल भागात हैदोस घालणारा आणि काही महिन्यांपूर्वी वॉन्टेड आलेला ओंकार हत्ती आता चक्क दोडामार्ग तालुक्यातील एका गावात दाखल झालाय. दोडामार्ग येथील झोळंबे गावात ओंकार हत्तीने आपला मोर्चा वळविलाय. नेहमीच जंगल भागात किंवा बागायतीमध्ये दिसणारा ओंकार हत्ती आता थेट रस्त्यावर उतरलाय. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी ओंकार हत्तीला बघून ज्यांची थरकाप उडायची तेच दोडामार्गातील नागरिक आता ओंकारशी जवळीक साधत असल्याचे दिसून येतेय. झोळंबे गावातील बाजारात अगदी ऐटीत उभ्या असलेल्या ओंकार हत्तीला अगदी जवळून पाहण्यासाठी नागरिक गर्दी असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय..0
0
Report
सोलापूर के माढ्या उपळाई बुद्रुक क्षेत्र में आज शाम तेज बारिश, गर्मी से राहत मिली
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील माढ्याच्या उपळाई बुद्रुक परिसरामध्ये आज सायंकाळी पावसाची हजेरी, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आज सायंकाळी आलेल्या जोरदार पावसाच्या सरींनी दिलासा मिळाला वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस या परिसरामध्ये झाला0
0
Report
रत्नागिरी में मृग नक्षत्र के अवसर पर बारिश; अगले तीन दिन यलो अलर्ट जारी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. मृगाच्या मुहूर्तावर रत्नागिरीत वरुणराजाचे दमदार आगमन.. पुढील तीन दिवस 'यलो अलर्ट' अँकर रत्नागिरी जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर सोमवारी संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली आहे.. हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी पुढील तीन दिवस (८ ते १० जून) वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा 'यलो अलर्ट' जारी केला असून,नागरिकांना आणि शेतकरी बांधवांना सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.. ११ आणि १२ जून रोजी पावसाचा जोर ओसरून हवामान सामान्य होईल,असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.. दरम्यान,लांजा आणि राजापूरमध्येही पावसाच्या हलक्या ते दमदार सरी कोसळल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे..0
0
Report
Advertisement
नाशिक के निफाड में बिबटों का आतंक, ग्रामवासियों में भय फैल गया
Niphad, Maharashtra:नाशिकच्या निफाड तालुक्यात बिबट्यांचा वाढता वावर नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनला असून खडक माळेगाव येथील शिंदे वस्तीवर आज पुन्हा एकदा बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला शेतकरी रामेश्वर शिंदे यांच्या शेत परिसरात बिबट्या फिरत असल्याचे निदर्शनास येताच स्थानिक शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखत मोठ्या शिताफीने कांदा साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी जाळीच्या साहाय्याने बिबट्याला पकडून ठेवले या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले बिबट्याला सुरक्षितरीत्या पकडण्यासाठी आणि त्याला बेशुद्ध करण्यासाठी टीटीसी सेंटरच्या विशेष पथकाला पाचारण करण्यात आले आहे बिबट्याला कोणतीही इजा न देता त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत खडक माळेगाव आणि परिसरात बिबट्यांचा वावर सातत्याने वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या भागात बिबट्यांची संख्या मोठी असल्याचा दावा स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत असून वन विभागाने तातडीने उपाययोजना करून परिसर बिबटमुक्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली0
0
Report
वाघोली–ओव्हळवाडी रस्त्याच्या विकासासाठी 6 कोटी निधी मंजूर; आमदार कटके उपोषण पूर्ववत
Shirur, Maharashtra:सत्तेत भागीदार असूनही स्वतःच्या मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात उपोषणाला बसलेले शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर (माऊली) कटके यांनी अखेर आपले उपोषण मागे घेतले आहे. वाघोली ते ओव्हळवाडी रस्त्याच्या कामासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ६ कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर केला. निधी मंजुरीचे अधिकृत आश्वासन मिळाल्यानंतर आमदार कटकेंनी प्रशासनाच्या उपस्थितीत उपोषण सोडले. सत्तेतील आमदारालाच रस्त्यासाठी उपोषणाला बसावे लागल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली होती, मात्र निधीच्या मंजुरीनंतर या हायव्होल्टेज राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे.0
0
Report
अमरावती में धुवाधार बारिश से पेड़ गिरें, शहर में यातायात बाधित
Amravati, Maharashtra:अमरावतीत वादळी वाऱ्यासह धुवाधार पावसाची जोरदार बॅटिंग; शहरातील प्रत्येक प्रमुख रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतुकीची कोंडी, झाडे उचलण्याचे काम युद्ध स्तरावर सुरू. अमरावती शहरात वादळी वाऱ्यासह धुवाधार पावसाने जोरदार बॅटिंग केली असून अमरावती शहरातील प्रत्येक प्रमुख रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली असून संपूर्ण शहरात २० ते २५ पेक्षा जास्त झाडांची पडझड झाली असून मुख्य रस्त्यावर झाडे कोसळली असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी झाडे पडली असल्याने अनेक ठिकाणी अपघात झाले असल्याची माहिती आहे. दरम्यान शहरातील अनेक घरांवरील छपरे उडून गेली असून अनेकांच्या संसार उघड्यावर पडले आहे तर पोलीस पेट्रोल पंपा समोरील सिग्नलही तुटून पडले आहे या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला.0
0
Report
Advertisement
शिरूर हवेली विधायक ने सड़कों की खराब स्थिति के विरोध में भूख हड़ताल शुरू की
Shirur, Maharashtra:राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत भागीदार असतानाही, स्वतःच्याच मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांना थेट उपोषणाचे हत्यार उपसावे लागले आहे. वाघोली ते ओव्हळवाडी रस्त्याच्या दुरवस्थेकडे प्रशासकीय अधिकारी सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आमदारांनी केला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन ढिम्म राहिल्याने, संतप्त झालेल्या आमदार कटकेंनी अखेर आजपासून प्रत्यक्ष उपोषण सुरू केले आहे. सत्तेत असणाऱ्या आमदारावरच आपल्या भागातील कामासाठी उपोषणाला बसण्याची वेळ आल्याने आता राजकीय वर्तुळात आणि प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.0
0
Report
सीना नदी के रुंदीकरण के लिए 20 करोड़ की योजना
Ahilyanagar, Maharashtra:सीना नदी रुंदीकरण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज अहिल्यानगरच्या सीना नदी हद्द निश्चिती कामाची पाहाणी केली, या कामासाठी 20 कोटी रुपये निधी प्राप्त झाला असून सीना नदीच्या रुंदीकरण आणि सुशोभिकरण करण्यात येणार आहे. यात शहरातील नदीपत्राचे साधारणत: तीन किलोमीटरचे काम होणार आहे, सुरुवातीला 20 कोटी रुपये महानगरपालिकेच्या निधीतून हे काम होत असून जलसंपदा विभागाकडूनही निधी उपलब्ध करून हे काम पूर्ण करेल असं विखे पाटील म्हणाले.0
0
Report
इंदापुर में खरीफ की शुरुआत, कृषि विभाग ने हुमणी नियंत्रण व प्रशिक्षण कार्यक्रम शुरू किए
Rui, Maharashtra:पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात ह्यावर्षी खरीप हंगामाची कृषि विभागामार्फत सुरु झाली आहे. खरीप हंगाम 2026 मध्ये कृषी विभागामार्फत ऊस पिकासाठी हुमणी कीड नियंत्रण सापळे, बिजप्रक्रिया, उगवण क्षमता, महाविस्तार एआय अँप, माती परीक्षण अहवालानुसार खते देणे, पाऊस कमी असल्याने करावयाची उपाययोजना, प्रशिक्षण, शेतीशाळा ह्याचे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. म्हसोबावाडी येथे कृषि खरीप हंगाम शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले. शेतकऱ्यांना हुमणी कीड सापळे कसे तयार करावे, बिजप्रक्रिया, उगवण क्षमता प्रात्यक्षिक करून दाखविले. कृषि विभागाच्या योजनाची सविस्तर माहिती दिली.0
0
Report
Advertisement
रोहित पवार के अन्नत्याग आंदोलन पर विखे पाटील का बयान; जलसंपदा कार्यालय स्थानांतरण विवाद
Ahilyanagar, Maharashtra:राधिकाकृष्ण विखें पाटील के अनुसार रोहित पवार का अन्नत्याग आंदोलन केवल अपने अस्तित्व को बनाए रखने की कोशिश है। मुख्यमंत्री ने किसानों की कर्जमाफी की घोषणा की है और उसका आंदोलन के बिना भी संभव है, यह विखे पाटील ने कहा। रोहित पवार पंढरपूर में अन्नत्याग आंदोलन करेंगे। विरोधी अपने पक्ष की चिंता करें; NEET प्रकरण में सरकार ने कार्रवाई की है और क्लासेस पर निर्बंध लगाने की मांग भी उठ रही है। अहिल्यानगर में जलसंपदा विभाग के कार्यालय राहुरी और लोणी में स्थानांतरित होने पर भी मंत्री विखे पाटील ने सवाल उठाए कि अहिल्यानगर उत्तर जिले में है और कार्यालय दक्षिण जिलों में क्यों रखा जा रहा है।0
0
Report
मालेगांव केस: नाबालिग बच्ची की सिजेरियन प्रसूति और नवजात बिक्री पर BJP का हमला
Nashik, Maharashtra:- मालेगावात - १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी सिझेरियन प्रसूती व नवजात बालक विक्री प्रकरणात भाजप आक्रमक.. - तत्कालीन वैद्यकीय अधिकारी आणि आत्ताचे 11 आरोपींपैकी मुख्य असलेल्या हिराई हॉस्पीटलचे मालक डॉ. किशोर डांगे यांच्या प्रतीकात्मक फोटोवर जोडे मारत केला या घटनेचा निषेध... - मालेगाव शहरात असलेले बोगस डॉक्टर यांचा कॉम्बिंग ऑपरेशन करून शोध घ्यावा आणि डॉ.डांगे यांची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी.. - डॉ.डांगे शासकीय रुग्णालय अधीक्षक असतानाच्या सर्व प्रकरणांची चौकशीची मागणी करण्यात आली.. - मालेगावात बोगस डॉक्टरांमुळे आरोग्य सेवेचा खेळ सुरू असल्याचा आरोप देखील आंदोलन केला..0
0
Report
गडचिरोली में हाथियों की चाल की वैज्ञानिक निगरानी के लिए एक साल की अनुमति
Gadchiroli, Maharashtra:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यात वन्यजीव व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील हत्तींच्या हालचालींचे शास्त्रीय पद्धतीने निरीक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या वावरासंबंधी अचूक माहिती संकलित करण्यासाठी विशेष उपक्रमाला गती देण्यात आली आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र वन विभागाने ‘फार्मर्स फॉर फॉरेस्ट्स’ या संस्थेला गडचिरोली जिल्ह्यात हत्तींच्या हालचालींच्या निरीक्षणासाठी आणि संबंधित कार्यासाठी एक वर्षाची परवानगी प्रदान केली आहे. ही संस्था वन विभागाच्या समन्वयाने हत्तींच्या हालचालीची नोंद, दस्तावेजीकरण, भ्रमण मार्गांचे विश्लेषण तसेच क्षेत्रीय माहिती संकलनाचे कार्य करणार आहे. हत्तींच्या कळपांच्या हालचालांचे नियमित निरीक्षण करून त्यासंबंधीची माहिती वन विभागाला उपलब्ध करून दिली जाणार आहे. या उपक्रमांतर्गत विदर्भातील हत्तींची स्वतंत्र ओळख नोंदवही तयार करण्यात येणार असून त्यामध्ये हत्तींची छायाचित्रे, कळपांची रचना, वय-लिंग वर्गीकरण आणि वर्तनविषयक नोंदींचा समावेश असेल. यामुळे हत्तींच्या हालचालींचा अधिक अचूक अभ्यास करण्यास मदत होणार आहे. जीआयएस तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हत्तींच्या भ्रमण मार्गांचे नकाशे तयार करणे, विश्रांती स्थळे, रस्ते ओलांडण्याची ठिकाणे तसेच संभाव्य संघर्ष क्षेत्रांची ओळख पटविणे यावर विशेष भर दिला जाणार आहे. याशिवाय गावनिहाय घटनांची नोंद करून हत्तींच्या वावरासंबंधी माहितीचे विश्लेषण करण्यात येणार आहे. स्थानिक नागरिकांना हत्तींच्या हालचालींबाबत वेळेवर माहिती मिळावी यासाठी जनजागृती कार्यक्रम, गावस्तरीय बैठका आणि माहिती प्रसाराचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शाळांसाठी माहितीपर साहित्य तयार करण्यासोबतच वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक आणि स्थानिक समुदायासाठी प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत तिमाही प्रगती अहवाल, तांत्रिक नोंदी, नकाशे आणि क्षेत्रीय अभ्यास अहवाल वन विभागाकडे सादर करण्यात येणार असून त्याच्या आधारे भविष्यातील नियोजन आणि व्यवस्थापन अधिक परिणामकारकपणे करता येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात वाढत असलेल्या हत्तींच्या वावराच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेला हा उपक्रम वन विभागाला हत्तींच्या हालचालींबाबत अचूक आणि अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्यास मदत करणार असून वन्यजीव व्यवस्थापन अधिक वैज्ञानिक आणि प्रभावी करण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.0
0
Report
Advertisement
