icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

चंद्रपूर के सावली में 20 हाथियों का गांवों में प्रवेश, वन विभाग सतर्क

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात सावली तालुक्यातील करोली-आकापूर मार्गे चार पिल्लांसह २० हत्तींच्या कळपाने पुन्हा प्रवेश केल्याने सीमावर्ती गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्तींच्या सततच्या हालचालींमुळे वनविभागाची चिंता वाढली असून कळपावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. यापूर्वी हा कळप गडचिरोली जिल्ह्यातील पोर्ला परिसराच्या दिशेने परत गेल्याचे दिसून आले होते. मात्र, करोली-आकापूर मार्गे पुन्हा सावली तालुक्यात प्रवेश झाल्याने वनविभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या. सायखेडा परिसरातून हत्तींच्या कळपाला हुसकावून लावण्यात वन कर्मचाऱ्यांना यश आले असून त्यानंतर कळपाने जंगलाच्या दिशेने मार्गक्रमण केल्याचे सांगण्यात आले.
0
0
Report

पालघर- बोईसर में CNG किल्लत से रिक्षाचालक 3–4 घंटे लाइन में, प्रशासन से कदम उठाने की मांग

Palghar, Maharashtra:Anch - पालघर आणि बोईसर परिसरातील सीएनजी पंपांवर सध्या सीएनजीचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत असून यबोईसर एमआयडीसी येथील पेट्रोल पंपावर रिक्षांच्या लांबच लांब रांगा लागल्याच पाहायला मिळतात . गुजरात गॅस कडून होत असलेल्या अपुऱ्या सीएनजी पुरवठ्यामुळे सध्या सीएनजी वाहन चालकांना भर उन्हात तीन ते चार तास ताटकळत उभा रहावं लागत असल्याने वाहन चालकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय . शहरांमध्ये सीएनजी वर चालणाऱ्या रिक्षांच प्रमाण जास्त असल्याने या रिक्षा चालकांना आपला दिवसभराचा व्यवसाय बाजूला ठेऊन सीएनजी पंप बाहेर भर उन्हात रांगेत उभ राहावं लागत असल्याने व्यवसायावर मोठा परिणाम होतो . प्रशासनाने संबंधित सीएनजी पंप चालकांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी या रिक्षा चालकांकडून करण्यात येत आहे .
0
0
Report
Advertisement

सोलापुर में क्रिकेट पिच बनाने के दौरान रोलर से हादसा, 15 वर्षीय छात्र की मौत

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - क्रिकेटचा पीच तयार करताना रोलरखाली गेल्याने १५ वर्षीय मुलाचा मृत्यू अँकर - बार्शीतील शिवशक्ती मैदानावर आयोजित क्रिकेट समर कॅम्पमध्ये अत्यंत हृदयद्रावक घटना घडलीय.क्रिकेट पिच तयार करण्यासाठी वापरला जाणारा रोलर अंगावर जाऊन आरव ऊर्फ वीरेन योगीराज चौधरी (वय १५) या नववीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाल आहे.शनिवारी सकाळी ७ ते ७:३० च्या दरम्यान ही घटना घडली आहे. मृत आरवचे वडील योगीराज चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवशक्ती मैदानावर बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.फी भरून आरवला कॅम्पमध्ये प्रवेश दिला होता.कोच विवेक दुगम आणि अक्षय देबडवार हे मुलांना सराव देत होते. शनिवारी सकाळी सहा वाजता आरव नेहमीप्रमाणे सरावासाठी गेल्यावर ७ ते ७:३० च्या दरम्यान १२ ते १५ वर्षाच्या मुलांकडून कोचच्या सांगण्यावरून जड रोलर ओढून घेतला जात होता. त्यावेळी जवळ कोणताही प्रशिक्षक, तंत्रज्ञ किंवा मोठी व्यक्ती उपस्थित नव्हती. कोच लांब उभे होते,असे फिर्यादीत म्हटले आहे. रोलर ओढताना आरवचा तोल गेला आणि तो खाली पडला. पायापासून छातीपर्यंत रोलर अंगावरून गेल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.त्याला तत्काळ जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले;मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.बार्शी पोलीस पुढील तपास करत आहेत.
0
0
Report
0
0
Report

करंजी गरड में गन्दा पानी: डास-बीमारी का खतरा; ग्राम पंचायत की लापरवाही

Washim, Maharashtra:वाशीमच्या रिसोड तालुक्यातील करंजी गरड येथे ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे मुख्य रस्त्यावर अनेक महिन्यांपासून घाण पाणी साचले आहे. साचलेल्या पाणीात अळ्यांची उत्पत्ती होऊन डासांचे प्रमाण वाढल्याने संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. या समस्येबाबत वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधी, अस्वच्छता आणि आरोग्याच्या धोक्याचा सामना करावा लागत असून पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
0
0
Report
Advertisement

भंडारा में अवैध मोहफूल साठे पर पुलिस ने छापा, 9 लाख माल जब्त, 5 गिरफ्तार

Bhandara, Maharashtra:भंडारा तालुक्यातील जवाहरनगर पोलिस स्टेशनचे हद्दीत शहापूर परिसरात पोलिसांनी अवैध मोहफूल साठ्यावर धडक कारवाई करत तब्बल ९ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत आरोपी जितेंद्र युवराज थोटे याच्या ताब्यातून ८२ प्लास्टिक चुंगळ्यांमध्ये साठवलेले २,४६० किलो सडवा व मोहफूल जप्त करण्यात आले. याची बाजारमूल्य अंदाजे ६.९२ लाख रुपये आहे. तसेच मोहफूलापासून हातभट्टी दारू निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या २०० मन जळाऊ लाकडाचाही साठा जप्त करण्यात आला. एकूण ९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला, तसेच सूर नदीच्या किनारी अवैध दारू निर्माण करणारे तीन अड्डे उध्वस्त करण्यात आले, व पाच आरोपींना अटक करण्यात आली. मात्र ही कारवाई नागपूर एक्साईजच्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी भंडाऱ्यात येऊन केल्याने, जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला...
0
0
Report

शिरूर पुलिस ने घरफोड़ करने वाले पति-पत्नी को गिरफ्तार किया; २४ लाख सोना-चांदी बरामद

Shirur, Maharashtra:शिरूर पोलिसांनी घरफोडीच्या एका मोठ्या गुन्ह्याचा छडा लावत धडाकेबाज कामगिरी केली आहे. शिरूरमधील एका नामांकित व्यावसायिकाच्या घरातून २४ लाख रुपयांचे सोने आणि चांदी चोरून पळालेल्या नोकर पती-पत्नीला पोलिसांनी परजिल्ह्यातून बेड्या ठोकल्या आहेत. शिरूर शहरातील आनंद सोसायटीत राहणारे व्यावसायिक नितीन मुथा यांच्याकडे घरकाम करणाऱ्या विलास खोसडे आणि सारजा खोसडे या पती-पत्नीने मालकाचा विश्वासघात केला. फेब्रुवारी महिन्यात या दोघांनी घरातून ७ किलोहून अधिक चांदी आणि ३६ ग्रॅम सोने लंपास केले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच शिरूर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास चक्र फिरवली. आरोपी त्यांच्या मूळ गावी म्हणजेच नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे असल्याची माहिती मिळताच, शिरूर पोलिसांनी तिथे जात सापळा रचला आणि आरोपींना शिताफीने जेरबंद केले. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीला गेलेला संपूर्ण २४ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे...
0
0
Report

वाशीम के काटेपूर्णा नदी के पुल का निर्माण अधूरा; बरसात में आवागमन का खतरा

Washim, Maharashtra:पावसाळा जवळ आला असतानाही वाशीमच्या जऊळका येथील काटेपूर्णा नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम अद्याप अपूर्ण आहे. नागपूर–छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील या महत्त्वाच्या मार्गावर वाहनचालकांना सध्या जुन्या व जीर्ण पुलावरूनच प्रवास करावा लागत आहे.पावसाळ्यात नदीला पूर आल्यास वाहतुकीस धोका निर्माण होण्याची शक्यता असून,दररोज हजारो वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गावर सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी नवीन पुलाचे काम पूर्ण करण्याची मागणी नागरिक व वाहनचालकांकडून होत आहे.
0
0
Report
Advertisement

वाशिम सहित कई मंडियों में सोयाबीन की भारी आवक, कीमतें 7000 रुपए से ऊपर

Washim, Maharashtra:वाशिमः सोयाबीनची मोठी आवक सुरू आहे. काल कारंजा व वाशीम बाजार समित्यांमध्ये मिळून 13,650 क्विंटल सोयाबीनची आवक नोंदवली गेली. दरात झालेल्या वाढीचा फायदा घेण्यासाठी शेतकरी साठवलेले सोयाबीन विक्रीस आणत आहेत. कारंजा बाजार समितीत 5,150 क्विंटल आवक झाली असून कमाल दर 7,325 रुपये प्रतिक्विंटल मिळाला. तर वाशीम बाजार समितीत 8,500 क्विंटल आवक झाली असून कमाल दर 7,200 रुपये प्रतिक्विंटल होता. रिसोड, मंगरूळपीर, मालेगावसह इतर बाजार समित्यांमध्येही सोयाबीनची जोरदार आवक सुरू असून बहुतेक ठिकाणी 7 हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळत आहेत.
0
0
Report

वसई-विरार समेत ग्रामीण क्षेत्रों में सुबह से बारिश, उमस घटी और ठंडक घुली

Vasai-Virar, Maharashtra:वसई-विरार शहरासह ग्रामीण भागात आज पहाटेपासून पावसाने हजेरी लावली. पहाटे सुरू झालेल्या पावसाच्या सरी सकाळी आठ वाजेपर्यंत अधूनमधून कायम असल्याने संपूर्ण परिसरात आल्हाददायक वातावरण निर्माण झाले. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र आजच्या पावसामुळे तापमानात घट झाली असून वातावरणात गारवा पसरला आहे. पावसामुळे रस्त्यांवर आणि परिसरातील झाडाझुडपांवर ताजेपणा दिसून आला. सकाळच्या वेळी कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनाही उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला. ग्रामीण भागातही शेतकरी आणि ग्रामस्थांनी या पावसाचे स्वागत केले. मान्सूनपूर्व पावसाच्या या सरींमुळे हवेतला कोरडेपणा कमी झाला असून आगामी पावसाळ्याची चाहूल लागल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
0
0
Report
Advertisement

163 gram panchayats' reservation process kicks off; special Gram Sabha June 12.

Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील मुदत संपलेल्या १६३ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेला आता वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला असून १२ जून रोजी विशेष ग्रामसभेत आरक्षण सोडत काढली जाणार आहे. सन २०२४,२०२५ तसेच २५,६ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा या प्रक्रियेत समावेश करण्यात आला आहे. ८जून रोजी विशेष ग्रामसभेची सूचना प्रसिद्ध होणार असून १९ जूनला प्रारूप आरक्षण जाहीर केले जाईल. त्यानंतर हरकती व सूचनांची प्रक्रिया पार पडणार असून १० जुलै रोजी अंतिम आरक्षण अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्याने गावपातळीवरील राजकीय हालचालींना वेग येण्याची चिन्हे आहेत.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top