icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अर्नाळा में तोड़फोड़ के विरोध में आक्रोश, आमदार राजन नाईक के घर पर मोर्चा

Vasai-Virar, Maharashtra:वैरार विरार? अर्नाळ्यात महसूल विभागाने केलेल्या तोडक कारवाईच्या विरोधात स्थानिक नागरिक आक्रमक झाले असून लालबावटा पक्षातर्फे आमदार राजन नाईक यांच्या निवासस्थानी मोर्चा काढण्यात आला. मात्र पोलिसांनी हा मोर्चा नाळा मच्छी मार्केट परिसरात अडविल्यानंतर आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. काही दिवसांपूर्वी महसूल विभागाने विरार येथीलअर्नाळा परिसरातील शासकीय जागेवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली होती. या कारवाईत अनेक आदिवासी,कातकरी कुटुुंबे बेघर झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर ही कारवाई करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आमदार राजन नाईक यांनी विधानसभेत अर्नाळा येथील जागेवर अतिक्रमणाबाबत मुद्दा उपस्थित केला होता त्यानंतर ही कारवाई करण्यात अायली गेली असल्याने आदिवासी बांधव संतप्त झाले.. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, ही कारवाई राजकीय दबावातून करण्यात आली असून काही ठराविक घरांनाच लक्ष्य करण्यात आले. तसेच बेघर झालेल्या कुटुंबांचे तात्काळ पुनर्वसन करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
0
0
Report

नागपुर के कोठीरोड महाल गोलीबारी में 3 आरोपी गिरफ्तार, छह के खिलाफ मामला दर्ज

Nagpur, Maharashtra:नागपूर कोठीरोड महाल य गोळीबार प्रकरणी 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. गंगा काकडे, खोब्रागडे आणि कदम असे गोळीबार प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोठी रोड महाल परिसरात रविवारी रात्री तीन बाईकवर आलेल्या सहा जणांनी गोळीबार केला होता. दोन गोळ्याझाडल्या होत्या त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी मुख्य आरोपी गंगाला पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले त्याच्यासह अजून दोन आरोपींनाही पोलिसांनी ताब्यात घेतली असून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. ड्रग तस्करी आणि वर्चस्वाच्या वादातून हा गोळीबार करण्यात आला.
0
0
Report

छत्रपती संभाजीनगर के ग्रामीण इलाकों में पेट्रोल टंचाई जारी, किसान लंबी कतारों में

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अजूनही पेट्रोल टंचाई कायम असल्याचे चित्र आहे. छत्रपती संभाजीनगर परिसरातील जावळे आडगाव येथील पेट्रोल पंपावर रात्री उशिरापर्यंत वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. आपला नंबर लावण्यासाठी ग्राहकांनी चक्क कॅन घेऊन रांगा लावल्या. यातील बहुतेक शेतकरी होते. पावसाळा तोंडावर असल्याने शेतात नांगरसह इतर कामे सुरू आहे. त्यामुळे ट्रॅक्टरला डिझेलची गरज असते. पण इंधन मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना पेट्रोल पंपावर अशा रांगा लावा लागत आहे.
0
0
Report
Advertisement

वार्धा बोर प्रकल्प में बाघ ने पाणवठे से प्लास्टिक बाहर फेंका; वीडियो वायरल

Wardha, Maharashtra:वर्धा बोर प्रकल्पात वाघोबाने प्लास्टिक पिशवी/बादली बाहेर टाकली तिचे दृश्य वाईल्ड लाईफ फोटोग्राफर अनुराग हजबे यांच्या कॅमेऱ्यात कैद झाले. या घटनेबद्दलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वन्यजीवांना जंगलात पाणवठे उभारून तहान भागवावी यासाठी वन विभागाकडून उपाययोजना केली जात आहेत; मात्र या घटनेची आठवण ताडोबातील नयनतारा वाघिणीच्या प्रसंगाशी झाली आहे. हा घटनाक्रम बोर व्याघ्र प्रकल्पातील असून, पाणवठ्यातील प्लास्टिकचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दरम्यान, जंगलात प्लास्टिक नको हा नियम जाहीर असून त्याची अंमलबजावणीची आवश्यकता उरत आहे.
0
0
Report

वाशीम कारंजा पुलिस ने चोरी की eight दोपहिया और एक एपे वाहन पकड़ा: तीन गिरफ्तार

Washim, Maharashtra:वाशीम: कारंजा शहर पोलिसांनी चोरीच्या वाहनांविरोधात मोठी कारवाई करत ८ दुचाकी आणि १ ॲपे वाहन जप्त केले. या कारवाईत ३लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच तीन जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी राहुल सोळंके, करण चव्हाण आणि चेतन पवार यांच्याकडून ही वाहने ताब्यात घेतली. वाहनेची कागदपत्रे आणि मालकीबाबत समाधानकारक माहिती न मिळाल्याने महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १२४ अंतर्गत कारवाई करण्यात आली. प्राथमिक तपासात काही वाहने अमरावती जिल्ह्यातील गुन्ह्यांशी संबंधित असल्याचे समोर आले असून पुढील तपास कारंजा शहर पोलीस करीत आहेत。
0
0
Report

NEET पेपरफुटी मामले में अभिमन्यू पवार मुख्यमंत्री से मिलने की योजना

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज NEET पेपरफुटी प्रकरणाची sखोल चौकशी करा... आमदार अभिमन्यू पवार घेणार मुख्यमंत्री यांची भेट घेणार... NEET पेपरफुटी प्रकरणात आता राजकीय प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांनी गंभीर आरोप करत, शिवराज मोटेगावकर यांनी आपल्या मुलासाठीच पेपरफुटी केल्याचा दावा केला आहे. “बाप आहे... पुत्रप्रेमापोटी त्यांनी हे कृत्य केलं असावं,” अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली आहे. “मी एवढे डॉक्टर घडवतो आणि माझा स्वतःचा मुलगा डॉक्टर होणार नाही, या भावनेतून त्यांनी हे पाऊल उचललं असावं असंही ते म्हणाले. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करतानाच महाराष्ट्रातील खासगी कोचिंग क्लासेसवर कठोर नियंत्रण आणण्याची गरज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. यासाठी आपण मुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचंही अभिमन्यू पवार यांनी सांगितलं आहे. बायट - आमदार अभिमन्यू पवार
0
0
Report
Advertisement

टोल वसूली के खिलाफ रायगढ़ प्रेस क्लब ने सड़क पर उतरने की चेतावनी दी

Chendhare, Maharashtra:महामार्गावरील टोल वसुलीला पत्रकारांचा विरोध. टोल तातडीने बंद करा नाहीतर तीव्र आंदोलन करू. रायगड प्रेस क्लब चा इशारा... नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना पत्र. मुंबई गोवा महामार्गावरील टोलवसुली विरोधात रायगडातील पत्रकारदेखील आक्रमक झाले आहेत. महामार्गाच्या रुंदीकरणासाठी सातत्याने वेगवेगळ्या मार्गाने पाठपुरावा करणाऱ्या रायगड प्रेस क्लबने टोलवसुली थांबली नाही तर थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात रायगड प्रेस क्लब च्या पदाधिकाऱ्यांनी नॅशनल हायवे च्या कार्यालयात धडक देत लेखी निवेदनाद्वारे टोलनाका बंद करावा तसेच स्थानिकांच्या वाहनांना टोल आकारू नये अशी मागणी केली आहे.
0
0
Report

छत्रपति संभाजीनगर में तीव्र उष्ण लहर, तापमान 43.4°C तक पहुँचा, येलो अलर्ट जारी

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात १० मेपासून आठ दिवस जादा उष्णतेचे गेले. १ मेपासून १८ मेपर्यंत तीन वेळा कमाल तापमान ४३.४ अंश सेल्सिअसवर गेले. किमान तापमान २९.३ अंश सेल्सिअसवर राहिले. किमान तापमान वाढल्यामुळे हवा एकदम उष्ण होती. हवेत बाष्प धारण करण्याची क्षमता वाढल्यामुळे उन्हाच्या झळा एकदम कडक लागत होत्या. शहर व परिसरात उष्णतेच्या लाटेमुळे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रस्त्यांवरील वर्दळ मंदावली होती. पुढील तीन ते चार दिवसांसाठी हवामान खात्याने उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला असल्याने कमाल तापमानात वाढ अपेक्षित असल्याचे हवामान तज्ज्ञ सांगत आहेत.
0
0
Report
Advertisement

छत्रपती संभाजीनगर में सभी संपत्तियों का पुनः सर्वेक्षण, कर वसुली पर फैसला

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरातील मालमत्ता कर वसुलीतील मोठ्या तफावती, दुबार नोंदी आणि बेपत्ता मालमत्तांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने अखेर सर्व मालमत्तांचे पुन्हा सर्वेक्षण व फेरमूल्यांकन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. स्थायी समितीच्या सोमवारी पाच तासांच्या बैठकीत मालमत्ता कर वसुलीवर सखोल मंथन झाले आणि प्रशासनाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. शहरातील ६७ हजार मालमत्तांना १९८८-८९ मध्ये एक ते दीड हजार रुपये कर लावला होता. या मालमत्तांमध्ये चार दशकांत आमूलाग्र बदल झालेले आहेत. २७ हजार मालमत्ताधारकांची दोन वेळेस नोंद दिसून येते. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
0
0
Report

पंढरपुर के विठ्ठल–रुक्मिणी मंदिर दर्शन के वक्त भाजपा कार्यकर्ताओं की धक्का-मुक्की

Pandharpur, Maharashtra:पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी जाताना भाजप कार्यकर्त्यांची धक्काबुक्की पाहायला मिळाली. भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक हे पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी आल्यानंतर त्यांच्यासोबत आपलंही दर्शन व्हावं आपलंही त्यांच्यासोबत जावं यासाठी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा प्रयत्न होता. मात्र मंदिर समितीकडून मर्यादित लोकांना आज सोडण्यात आले होते. त्यामुळे मंदिराच्या दरवाजा बाहेर उभ्या असणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी यावेळी धक्काबुक्की केल्याचं पाहायला मिळालं. मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाले होते. सर्वांना आत जाण्याची घाई होती. त्यामुळे हे धक्काबुक्की झाल्याचं समजतं
0
0
Report

छत्रपती संभाजीनगर में जलजीवन मिशन के घोटाले के आरोप, दो समितियाँ जांच हेतु गठित

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मध्ये जलजीवन मिशन आणि 'मनरेगा' अंतर्गत जिल्ह्यामध्ये बोगस कामे झाली असून लाखोंची बिले उचलण्याचे प्रकार घडले आहेत असा आरोप आहे, यासंदर्भात जि.प. स्थायी समितीने आता चौकशी साठी दोन वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्यांनी पुढील स्थायी समितीच्या बैठकीत अहवाल सादर करण्याची सूचना जि.प. अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी केली असून, दोषींबाबत त्याच बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. बैठकीत उपाध्यक्ष जितेंद्र जैस्वाल, राधाकृष्ण पठाडे, संजय निकम यांनी जलजीवनच्या कामांत गैरव्यवहाराचा आरोप केला. अनेक गावांत प्रत्यक्षात कामेच झालेली नाहीत. मात्र कामे पूर्ण झाल्याचे दाखविले आहे. काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे करून बिले उचलली आहेत. या सर्व कामांची चौकशी मागणी आहे...
0
0
Report
Advertisement

संभाजीनगर-जालना में भाजपा मजबूत दावेदारी, शिवसेना के खोने की आशंका

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर-जालना आणि परभणी-हिंगोली या दोन स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. छत्रपती संभाजीनगर-जालना ही जागा महायुतीत शिवसेनाच लढवणार असल्याचा दावा शिवसेनेकडून केल्या जातोय, या आधीही एकच शिवसेना असताना युतीच्या कोट्यात हि जागा शिवसेनेला होती मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात यंदा भाजपला घवघवीत यश मिळाले आहे संभाजी नगरात तर शिवसेनेला अत्यल्प जागा मिळाल्या आहेत त्यामुळं आता यावेळी जागेसाठी भाजप ही आग्रही झालाय, ही जागा भाजप लढवणार यावर ठाम आहे...
0
0
Report

रायगढ़ जिला परिषद में 15वां वित्त आयोग का आराखड़ा मंजूर; 52 करोड़ से स्वच्छता जलापूर्ति

Chendhare, Maharashtra:१५व्या वित्त आयोगांतर्गत अंतिम आराखड्यास मंजुरी. स्वच्छता आणि पाणीपुरवठा कामांवर विशेष भर. ५२ कोटींच्या निधीतून विकासकामांना गती. रायगड जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत १५व्या वित्त आयोगांतर्गत २०२५-२६ या वर्षासाठी तयार झालेले अंतिम आराखडा सोमवारी मंजूर देण्यात आला. या सभेत ५२ कोटी ७२ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला. यात ३० टक्के निधी स्वच्छता कामांसाठी, ३० टक्के निधी पाणीपुरवठा योजनांसाठी तर उर्वरित ४० टक्के निधी इतर मूलभूत सुविधांचा विकासासाठी खर्च करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
0
0
Report

छत्रपती संभाजी नगर में पेट्रोल-डिजल आपूर्ति में घबराहट, पंप खाली

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यात अचानक घट झाल्याने इंधनाची टंचाई निर्माण झाली आहे. शनिवारी मागणी केलेले टैंकर रविवारच्या सुटीमुळे आले नाहीत. साठा संपल्यामुळे सोमवारी शहरातील २२ पेट्रोल पंपासह वैजापूर, सिल्लोड, फुलंब्री आणि कन्नडमध्ये अनेक पेट्रोल पंप ड्राय झाले त्यामुळं ते बंद ठेवण्याची नामुष्की पंपचालकांवर आली आहे. ऐन कामाच्या दिवसांत इंधन मिळत नसल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे, इंधनाचा हा खेळखंडोबा गेली महिनाभर सुरू आहे, दरम्यान रात्री उशिरा इंधनाचे टँकर आले असल्याने आज पुरवठा सुरळीत राहील असे प्रशासनाने कळवले आहे...
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top