icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

मुंबई ATS कवठेमहांकाळ में बिश्नोई गैंग से जुड़े मामले में चौकसी

Sangli, Maharashtra:बिश्नोई गँगशी संबंध असल्याच्या कारणावरून मुंबई ATS कडून कवठेमहांकाळ मध्ये चौकशी.. बिश्नोई गँगशी संबंध असल्याच्या कारणावरून मुंबई ATS कडून सांगलीच्या कवठेमहांकाळ मध्ये एकाची चौकशी करण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीकडुन बिश्नोनोईचे काही व्हिडिओ लाईक करण्यात आले होते. मूळचा नवी मुंबईच्या जवळील घनसोली येथील असलेला पण सध्या सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील एका गावात नातेवाईकाकडे संबंधित व्यक्ती राहण्यास आला होता, दरम्यान एटीएसकडुन सदर व्यक्तीची चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये तो व्यक्ती दिव्यांग असल्याचे आणि अनावधानाने काही व्हिडिओ लाईक केल्याचं तपासात समोर आल्याची माहिती काही पोलीस सूत्रांनी दिली आहे.
0
0
Report

अकोला में 197 खराब सोयाबीन बीज शिकायतें, किसान चिंतित; अमोल मिटकरी ने कार्रवाई की मांग

Akola, Maharashtra:राज्यात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी वाढत असल्याचं राजकीय पातळीवरही तापलं आहे. अकोला जिल्ह्यात कृषी विभागाकडे सोयाबीन न उगवल्याच्या तब्बल १९७ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यंदाच्या खरीप हंगामात अकोला जिल्ह्यात सर्वाधिक पेरणी सोयाबीनची झाली आहे, मात्र अनेक ठिकाणी सोयाबीन उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. या प्रकरणी अकोला जिल्ह्यात कृषी विभागाकडे १९७ तक्रारी प्राप्त झाल्या असून शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. हा मुद्दा विधिमंडळातही गाजला होता. मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी निकृष्ट बियाणे विकणाऱ्या ११ कंपन्यांवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संबंधित कंपन्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. मात्र आदेशानंतरही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करत अमोल मिटकरी यांनी कृषी अधीक्षक कार्यालयात आंदोलन छेडले. यावेळी संबंधित कंपन्यांवर तात्काळ कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच कृषिमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नसल्याची खंतही मिटकरी यांनी व्यक्त केली आहे. निकृष्ट बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर कारवाई होत नसेल, तर हे सरकार त्या कंपन्यांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
0
0
Report

केज में हत्या: विधायक पुत्र की गिरफ्तारी के लिए मोर्चा, मकोका लागू की मांग

Beed, Maharashtra:बीड - खासदार पुत्राला अटक करा, विलास घुले हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका लावा या मागणीसाठी केज शहरात मोर्चा. ANC- केज तालुक्यातील टाकळी येथील तरूण विलास घुले हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करा, पुरवणी जबाबात नाव दिले असुन खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाला अटक करा या मागणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला. खासदार पुत्राला वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, आरोपींना खासदाराकडून पाठीशी घातले जात आहे असा आरोप रमेश घुले यांनी केला. तर खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडून मुलाला वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठीच ते मुख्यमंत्र्यांना भेटले होते असाही आरोप मोर्चेकऱ्यांनी केला. बाईट- रमेश घुले (मयत विलास घुले यांचे बंधू) बाईट- बाळासाहेब सानप (मोर्चेकरी)
0
0
Report
Advertisement

बीड़ में विलास घुले हत्या मामले: सोनवणे पुत्र की गिरफ्तारी के लिए केज में मोर्चा

Beed, Maharashtra:बीड : विलास घुले खून प्रकरण; खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाला अटक करण्यासाठी केज मध्ये मोर्चा। बीडच्या टाकळी येथील विलास घुले खून प्रकरणाला 19 दिवस उलटले आहेत. पुरवणी जबाबात खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे याचेही नाव घेण्यात आले होते. मात्र अद्याप सौरभ याला अटक करण्यात आली नाही. त्याच पार्श्वभूमीवर आज केज मध्ये मोर्चा काढण्यात आला होता. सौरभ सोनवणे याला तत्काळ यावी.. या मागणीसाठी दीड तासांपासून तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेंद्रकुमार मुधोळकर यांनी....
0
0
Report

कल्वण की आश्रमशाला में नाबालिग प्रसूति मामले पर भगरे ने कठोर कार्रवाई की मांग की

Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील शासकीय आश्रमशाळेत इयत्ता नववीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या प्रसूतीच्या धक्कादायक घटनेवर खासदार भास्कर भगरे यांनी तीव्र संताप व्यक्त करत अशा प्रकारची घटना अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर आहे या प्रकरणात ज्याने हे कृत्य केले आहे त्याच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई होणे आवश्यक असून, यासोबतच शाळेच्या व्यवस्थापनाची जबाबदारीही निश्चित करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशा सूचना प्रशासनाला दिल्याचे खासदार भगरे यांनी सांगितले。
0
0
Report
Advertisement

तेलंगणा में दुर्घटना: चंद्रपुर के चार मजदूरों की मौत, 27 घायल

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर के भात लावणी मजुरों के तेलंगणा में भीषण रस्ते दुर्घटना: 4 मजुरों की मृत्यु, 27 घायल. रामगुंडम में सिंडेवाही तालुक के पवना चक गांव के 4 मजुरों की दुर्दैवी मृत्यु हुई, 27 मजूर गंभीर रूप से घायल हुए हैं। वे हर वर्ष भात रोवणी के मौसम के लिए तेलंगणा गए थे। दुर्घटना के समय वे निवास स्थान वापस लौट रहे थे। मृतकों में अतुल वासुदेव सोनले (45), अर्चना जनार्धन सोनले (40), प्रभा सिताराम मोहर्ले (56) और रंजना प्रभाकर शेंडे (50) शामिल हैं। घायल मरीजों को रामगुंडम के अस्पताल में भर्ती कराया गया है और कुछ की स्थिति चिंताजनक बताई जा रही है। चंद्रपूर और गडचिरोली क्षेत्र के मजदूर हर साल रोजगार के लिए तेलंगणा जाते हैं; इस दुर्घटना ने क्षेत्र में शोक की लहर फैला दी है। स्थानीय प्रशासन मृतकों के परिवारों को सहायता और शवों के घर लाने के प्रयास कर रहा है।
0
0
Report

NHAI के चौपदरी मार्ग से वारक़ों को पंढरपुर तक चलना आसान

Pandharpur, Maharashtra:Anchor - आषाढी वारी साठी येणाऱ्या वारकऱ्यांना येणाऱ्या वारकऱ्यांना वाखरी पासून पंढरपूर पर्यंत NHAI ने तयार केलेल्या चौपदरी महामार्गावरून पायी चालत येता येणार आहे. मागील 3 वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प यावर्षी पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्हाधिकारी एस कार्तिकेएन यांच्या पाठपुराव्यानंतर NHAI प्रकल्प संचालक अभिजित औटी यांनी तातडीने पूर्ण करून घेतला आहे. वाखरी ते सरगम चौक या मार्गावर गर्दी मुळे होणारी कोंडी मधून वारकऱ्यांची सुटका होणार आहे. या रस्त्यामुळे वारकाऱ्याना चालण्यासाठी स्वतंत्र मार्गिका असणार आहे. त्यामुळे चिखल आणि खड्ड्यांमधून जाणारे वारकरी आता NHAI ने केलेल्या प्रशस्त रस्त्यावरून पंढरपूर मध्ये प्रवेश करतील.
0
0
Report

अजित पवार की याद में सुनील तटकरे भावुक, जन्मदिन पर फोन नहीं आया

Chendhare, Maharashtra:अजित पवारांच्या आठवणीनं सुनील तटकरे भावूक. आज पहिल्यांदाच अजित पवारांचा फोन आला नाही. सुनील तटकरे यांचा वाढदिवस सुतारवाडीत ... अँकर - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचा वाढदिवस आज सुतारवाडी येथील निवासस्थानी साजरा झाला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातील पदाधिकारी, हितचिंतक नागरिकांनी गर्दी केली होती. आज वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी सकाळी अजित पवार यांच्या फोनची वाट पाहात होतो परंतु फोन आला नाही हे सांगताना सुनील तटकरे भावूक झाले होते. यावेळी बोलताना तटकरे यांनी अजित पवारांच्या आठवणीना उजाळा दिला. सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी अजित पवार यांच्या आठवणी छायाचित्रांच्या रूपात मांडण्यात आल्या होत्या.
0
0
Report
Advertisement

भास्कर भगरे: चर्चा महज मीडिया में, पवार गुट के सांसदों के बारे में ठोस कुछ नहीं

Yeola, Maharashtra:खासदार भास्कर भगरे 121 पॉइंटर खासदार भगरे ऑन सत्तेत जाण्याच्या चर्चा - ये चर्चा फक्त मीडियावरच ऐकायला मिळत... - मी स्वतः आठ खासदारांपैकी एक आहे... - केंद्रात किंवा राज्यांमध्ये अशा प्रकारच्या कुठल्याही बैठका पार्टीच्या मीटिंगमध्ये किंवा खासदारांच्या मीटिंगमध्ये झाल्या नाही... - या चर्चा सुरू आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचे तथ्य नाही असे मला वाटते... खासदार भास्कर भगरे ऑन पाच ते सहा खासदार अस्वस्थ - पृथ्वीराज चव्हाण - चव्हाण साहेब बोलत असतील तर त्यांनी तो तर्क लावलेला असेल शिवसेनेच्या बाबतीमध्ये असे झाले... - परंतु आठ खासदार आम्ही पवार साहेब किंवा सुप्रिया ताई बरोबर आमच्या बैठका होतात त्यावेळेस आम्ही सर्व एकत्र आहे - वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने जरी आणि मंत्र्यांना भेटतो... - याचा अर्थ असा होतो की लगेच हे बीजेपी बरोबर चालले की काँग्रेस बरोबर चालले... - खासदार म्हणून जनतेचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी वेगवेगळ्या नेते मंडळींना भेटत असतो... - काल,परवा जयंत पाटील साहेब हे विनोद तावडे साहेबांना भेटले... - अशा वेगवेगळ्या कामांसाठी भेटतो... - चव्हाण साहेबांनी जे सांगितले त्यात मला तरी तथ्य वाटत नाही... - कारण मी स्वतः त्यातला एक भाग आहे... - अशा कुठल्याही प्रकारच्या चर्चा पवार साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून... - त्यांनी उमेदवारी दिली म्हणून जनतेने माझ्यावर विश्वास नाही ठेवला तर पवार साहेबांवर विश्वास ठेवला... - त्यामुळे आम्ही सर्व खासदार पवार साहेबांच्या विश्वासाची बांधलेला आहोत... - सुप्रिया ताईंच्या विश्वासाची बांधलेले आहोत... - ज्या चर्चा चालले आहे ka चालले आहे मला ते कळत नाही... खासदार भास्कर भगरे ऑन एकनाथ शिंदे भेट, त्यांच्या दालना आमदार बैठक - पवार साहेब दिल्ली किंवा महाराष्ट्र मध्ये वेगवेगळी कामे मार्गी लावण्यासाठी कोणाला न बोलता स्वतः मंत्रालयात जातं हे तुम्ही काल बघितले... - कामाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे साहेब किंवा मुख्यमंत्री साहेबांना देखील ते भेटलेले... - त्यामुळे भेटणे पक्षप्रवेश अशा या गोष्टी उघड-उघड होत नाही... - उघड-उघड करतात तर त्याला पिण्याची काही गरज नाही... - जे करायची ते जनतेच्या समोर आहे... - माझ्या माहितीप्रमाणे जनतेचे प्रश्न घेऊन ते गेले होते... - योगायोग मंत्रालयात आल्यानंतर शिंदे साहेब कळालं असेल की साहेब आलेले म्हणून त्यांना त्या ठिकाणी बोलवले असेल... - एकमेकांच्या सुखदुःखाची विचारलं त्यानिमित्ताने झाली असेल असे मला वाटते...
0
0
Report

सुनील तटकरे दबदबे के बीच मनोज कुमार शिंदे ने राष्ट्रवादी काँग्रेस में प्रवेश किया

Chendhare, Maharashtra:आपल्या वाढदिवशी खासदार सुनील तटकरे यांनी मित्रपक्ष शिवसेनेला जोरदार धक्का दिलाय. शिवसेनेचे माजी रोहा तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे यांनी आज आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर मनोज कुमार शिंदे यांना अचानक तालुका प्रमुख पदाचा राजीनामा द्यावा लागला. तेंव्हापासून ते नाराज होते. आज अखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. सुनील तटकरे दबदबे के बीच मनोज कुमार शिंदे ने राष्ट्रवादी काँग्रेस में प्रवेश किया. सुनील तटकरे यांच्या कट्टर विरोधक असलेले शिंदे त्यांच्यासोबत गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
0
0
Report
Advertisement

मुंबई की भीषण बारिश में मैनहोल गिरकर दो युवक मृत्यु, चार-चार लाख सहायता घोषित

Mumbai, Maharashtra:मुम्बईत झालेल्या मुसळधार पावसात उघड्या मॅनहोल मध्ये पडून अस्लम शेख तर गोरेगाव आरे कॉलनी मध्ये झाड कोसळून हसन रझा जहांगीर सय्यद या तरुणाचा मृत्यू झाला होता. या दोन्ही मयतांचा कुटुंबांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने चार चार लाखाचा मदत निधी देण्यात आला. हे दोन्ही मयत व्यक्ती चांदिवली विधानसभेत, साकीनाका परिसरात राहतात. त्यामुळे चांदिवली चे आमदार दिलीप लांडे यांच्यासह हा मदतनिधी देण्यास ते या मयतांच्या घरी गेले. सरकारच्या वतीने हे कुटुंबांचे आमदारानी सांत्वन केले. राज्य शासनाच्या वतीने ही मदत आहे, त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी मिळायला हवी, पालिकेत सर्व पक्षीय दक्षता समिती तयार करायला हवी , याची मागणी आपण केली आहे.अशी प्रतिक्रिया या वेळी शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी दिली.
0
0
Report

मुलुंड में बस चालक की बदसलूकी: 20 मिनट रोककर यातायात जाम, शिकायत पर कार्रवाई

Mumbai, Maharashtra:मुलुंड मध्ये शेवपुरी साठी थांबवली बेस्टची बस जाब विचारणाऱ्या नागरिकांना चालकाची शिवीगाळ अखेर बेस्ट बस चालकावर कारवाई मुलुंडमधील एमजी रोडवर बेस्ट बसचालकाच्या बेजबाबदार वर्तनाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेवपुरीचे पार्सल घेण्यासाठी चालकाने भररस्त्यात बस तब्बल २० मिनिटांहून अधिक काळ उभी ठेवल्याने परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. नागरिकांनी जाब विचारल्यानंतर चालकाने शिवीगाळ केल्याचाही आरोप आहे. या घटनेची गंभीर दखल घेत मुलुंड आगार व्यवस्थापकाला संबंधित चालकाविरुद्ध योग्य कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती बेस्टच्या जनसंपर्क अधिकारी सुचेता उतळे यांनी दिली आहे.
0
0
Report

अमरावती में MD और गांजे के साथ तीन आरोपी गिरफ्तार; 3.75 लाख रुपये का माल जप्त

Amravati, Maharashtra:अमरावतीत एमडी आणि गांजासह तीन आरोपींना अटक; ३ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त गुन्हे शाखेने अंमली पदार्थांविरोधातील विशेष मोहिमेत मोठी कारवाई करत एमडी आणि गांजासह तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल ३ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नांदगाव पेठ ते वाळकी डॅम परिसरात तीन जण अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल वर आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून धडक कारवाई केली. या कारवाईत सॅम अली आसिफ अली, अवेजउद्दीन नासिरउद्दीन आणि मोहम्मद तौसिफ मोहम्मद जफर या तिघांना ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान आरोपींकडून २२.७ ग्रॅम एमडी आणि १ किलो १२४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. प्राथमिक चौकशीत आरोपी फरीदनगर परिसरात अंमली पदार्थांचा अवैध व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top