445001
यवतमाळ : महिला बँक घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या बाबाजी दाते महिला बॅंकेत २४२ कोटींच्या अपहार प्रकरणात महिनाभराने अटकसत्र सुरू झाले आहे. पोलिसांनी शिवसेना नेते रमेश अगरवाल, व्यावसायिक प्रकाश पिसाळ आणि ठेकेदार प्रशांत पामपट्टीवार यांना अटक केली आहे. याआधी बँकेच्या CEO सुजाता महाजन, तिचा पती विलास महाजन, ॲड. वसंत मोहरेकर आणि नवलकिशोर मालाणी यांना अटक झाली होती. आता अटक केलेल्या आरोपींची संख्या सात झाली आहे. २०६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, ज्यामुळे संचालक व लेखा परीक्षक चिंतेत आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
मराठवाड़ा में किसानों की आत्महत्याओं का भयावह आंकड़ा; छह महीनों में 465 मौतें
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. १ जानेवारी ते ३० जून २०२६ या कालावधीत विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये एकूण ४६५ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी २१५ प्रकरणे मदतीसाठी पात्र, २६ प्रकरणे अपात्र, तर २२२ प्रकरणे चौकशी व निर्णयासाठी प्रलंबित आहेत. या आकडेवारीत छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांची नोंद झाल्याचे दिसून येते. अनेक प्रकरणे अद्याप चौकशी आणि निर्णयाच्या प्रतीक्षेत असल्याने शेतकरी कुुटुंबांना मदत मिळण्यात विलंब होत असल्याचेही या अहवालातून स्पष्ट झाले आहे. जिल्हानिहाय आकडेवारी : बीड – ९५ आत्महत्या छत्रपती संभाजीनगर – १०९ आत्महत्या नांदेड – ६१ आत्महत्या परभणी – ३४ आत्महत्या धाराशिव – ६५ आत्महत्या जालना – ४० आत्महत्या लातूर – २६ आत्महत्या हिंगोली – ३५ आत्महत्या0
0
Report
नागझिरा अभयारण्य में तेंदुए के हमले से ड्यूटी पर तैनात वनरक्षक की मौत
Bhandara, Maharashtra:नागझिरा अभयारण्यात उमरझरी गेट येथे कर्तव्यावर असलेल्या वनपालावर अस्वलाने अचानक हल्ला केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. श्यामू शरणागत असे मृत वनपालाचे नाव आहे. नेहमीप्रमाणे कर्तव्य बजावत असताना अचानक आलेल्या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मृत वनपालाच्या कुटुंबीयांना तातडीने मदत देण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. तसेच वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.0
0
Report
रत्नागिरी के पूर्व भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत का निधन, शोक की लहर
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे निधन; राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा. भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे कोल्हापूरहून रत्नागिरीला परतताना पाली येथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुर्दैवी निधन झाले. सावंत यांनी आपल्या अभ्यासू वृत्तीने आणि उत्तम संघटन कौशल्याने दक्षिण रत्नागिरीत भाजपची पक्षसंघटना मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आणि स्पष्टवक्तेपणा यामुळे लोकप्रिय असलेले एक अभ्यासू नेतृत्व हरपल्याने रत्नागिरीसह संपूर्ण कोकणातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात असून सर्वपक्षीय नेत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.0
0
Report
Advertisement
रणजितसिंह नाईक ने अमित शाह से रेल-बुलेट ट्रेन परियोजनाओं पर तेज़ी का भरोसा लिया
Pandharpur, Maharashtra:माढयाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लोकसभा अधिवेशन काळात नवी दिल्ली मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शासकीय दालनात भेट घेतली. यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि आगामी रणनीतीवर चर्चा केली. तसेच पंढरपूर – फलटण रेल्वे प्रकल्पाला गती देणे, मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प आणि फलटण शहरा लगतच्या बाणगंगा नदीचा नमामि गंगे योजनेमध्ये समावेश करणे आणि विविध विषयांवर चर्चा केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत या विषयावर सकारात्मक चर्चा झाली आहे. वरील प्रकल्प तातडीने मार्गी लागण्यासाठी मदत करण्याची भूमिका शाह यांनी घेतल्याची माहिती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली0
0
Report
भागवत अगस्त के अंत में अमेरिका दौरे पर, वैश्विक संपर्क अभियान का हिस्सा
Nagpur, Maharashtra:नागपूर ब्रेकिंग सरसंघचालक डॉ. मोहन भागवत ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस अमेरिका दौरा करणार संघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरसंघचालकांचा हा दौरा शताब्दी वर्षाच्या जागतिक संपर्क अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे. या दौऱ्यात अमेरिकेत एका शहरात ते संवादही साधणार आहे याशिवाय ते अजून एका शेजारील देशात जाण्याची शक्यता आहे हिंदू स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून सरसंघचालकांचचा हा दौरा आयोजित करण्यात आला आहे0
0
Report
नागपुर में सावजी समाज ने तुकाराम मुंढे से माफी मांगने के लिए प्रदर्शन किया
Nagpur, Maharashtra:तुकाराम मुंढे यांनी सावजी हलबा समाजाची माफी मागावी, त्यांनी एकदा तरी गोळीबार चौकात यावं, आमच्या घरी जेवण करावं, त्यानंतर बोलावे अशी शब्दात नागपूरात सावजी म्हणजेच हलबा समाजाने तुकाराम मुंढे यांना खुला चॅलेंज दिला आहे. सावجي समाज गेले अनेक वर्ष सावजी मसाल्याची निर्मिती करत आहे. सावजी पूर्णपणे घरगुती मसाला असून त्यात कुठल्याही प्रकारची भेसळ नाही. त्यामुळे सावजी मसाला आणि जेवणाबद्दल तुकाराम मुंढे यांचा वक्तव्य सावजी समाजाचा अवमान करणारे आहे. तुकाराम मुंढे यांनी बिनशर्त माफी मागावी अशी मागणी सावजी समाजाने केली आहे. आज नागपूरातील गोळीबार चौकावर सावजी समाजाच्या वतीने तुकाराम मुंढे यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी समाजातील तरुण कार्यकर्त्यांनी तुकाराम मुंढे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आमच्या आया बहिणींनी वर्षानुवर्षे मेहनत करून विकसित केलेलं सावजी मसाला तुकाराम मुंढे यांनी बदनाम केल्याचा आरोप केला. तुकाराम मुंढे यांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला. एवढंच नाही तर सावजी समाजाच्या वतीने नागपूरच्या तहसील पोलीस स्टेशनमध्ये तुकाराम मुंढे यांच्या विरोधात तक्रारही देण्यात येणार आहे.0
0
Report
Advertisement
माळशेज घाटात रात्री भीषण अपघात; कार पलटी, पाच जण गंभीर जखमी
Shirur, Maharashtra:माळशेज घाटात मध्यरात्री भीषण अपघात झाला. करंजाळे येथे रस्ता खचल्याने वाहतूक बंद करण्यासाठी टाकलेल्या खडीच्या ढिगावर कार पलटी होऊन पिकअप जीपला धडकली. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले. प्रतिनिधि हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे0
0
Report
पुणे-नाशिक महामार्ग पर भीषण ट्रक दुर्घटना, यातायात ठप्प; देखें क्या हुआ
Chakan, Maharashtra:पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला. नाशिककडून आलेला कंटेनर डिव्हायडर मोडून विरुद्ध दिशेला गेला आणि पुणेाच्या दिशेने येणाऱ्या ट्रकला धडकला. या भीषण धडकेत ट्रक खाली कोसळला आणि त्याखाली वेगन-आर कार दबली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. खेड तालुक्यातील वाकी जवळ हा अपघात सकाळी सव्वासहाच्या sुमारास झाला. कंटेनर पुणे लेनवर आल्याने पुण्याकडे येणारी वाहतूक तासाभरापासून ठप्प आहे; नाशिककडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. महामार्ग पोलीस क्रेन घेऊन घटनास्थळी पोहचले असून अपघातग्रस्त वाहनं बाजूला काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.0
0
Report
डॉ अनिल काकोडकर: कोकण के शिक्षण को देगा नया फ्रेमवर्क
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी: डॉ. अनिल काकोडकर पद्मविभूषण, अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर की भूमिका कोकण में शिक्षा के फ्रेमवर्क पर केंद्रित है। कोकणाला मोठा शैक्षणिक वारसा; रत्नागिरीने देशाला अनेक विचारवंत दिले – डॉ. अनिल काकोडकर श्री विठ्ठलराव जोशी विद्यापीठामुळे कोकणातील शिक्षणाला नवे फ्रेमवर्क – डॉ. काकोडकर कोकणातील विचार अधिक समृद्ध करण्यासाठी विद्यापीठ महत्त्वाचे ठरेल – डॉ. काकोडकर मानवी क्षमता आणि आकलन किती वाढले, याचे भान ठेवणे आवश्यक – डॉ. काकोडकर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पात प्रदूषणाचा मुद्दा नाही – डॉ. काकोडकर ‘न्यूक्लिअर एनर्जी इज अ क्लीन एनर्जी’ – डॉ. अनिल काकोडकर जैतापूर प्रकल्पातील फ्रेंच तंत्रज्ञानाची किंमत जास्त; विजेची किंमत आटोक्यात असणे आवश्यक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा परीक्षा पद्धतीत वापर झाल्यास पेपरफुटी रोखता येईल – डॉ. काकोडकर प्रगत तंत्रज्ञान परीक्षा पद्धतीत का वापरले जात नाही, हे कळत नाही – डॉ. काकोडकर ‘एज्युकेशन करायचंय की बिझनेस, हे आधी ठरवावं लागेल’ – डॉ. काकोडकर विद्यार्थ्यांनी किती आत्मसात केले, हे तपासण्यासाठी परीक्षा महत्त्वाची – डॉ. काकोडकर शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर चांगले असेल तर परीक्षणाबाबत प्राध्यापकांना निर्णय घेऊ द्यावा शिक्षण व्यवस्थेत विश्वास ठेवणे सर्वांत महत्त्वाचे – डॉ. अनिल काकोडकर0
0
Report
Advertisement
नागपुर में ऑनलाइन दोस्ती से नाबालिग के साथ गैंगरेप जैसी वारदात, आरोपी गिरफ्तार
Nagpur, Maharashtra:नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून दोन ऑगस्ट रोजी बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी अवस्थेत दिघोरी परिसरातील एका घरातून मिळाली आहे... तिच्या हातावर चाकूची गंभीर जखम असून शरीरावर गंभीर मारहाणीच्या खुणा ही आढळल्या आहे... पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील ठाण्यातील निर्भय उर्फ आकाश पाखरे या 19 वर्षीय तरुणाने मुलीला दिघोरी परिसरातील त्या खोलीत बोलावून जखमी केले आणि तिच्यासोबत बळजबरी ही केली... निर्भय पाखरेची पीडित अल्पवयीन मुली सोबत तीन वर्षापासून ऑनलाइन ओळख होती... त्याच ओळखीतून दोघांमध्ये मैत्री जुळली होती... दोन ऑगस्ट रोजी निर्भय पाखरेने पीडित मुलीला भेटायला बोलावले होते... दोन ऑगस्ट च्या संध्याकाळपर्यंत पीडित मुलगी मोबाईल द्वारे आपल्या कुटुंबीयांच्या संपर्कात होती आणि मी मैत्रिणीकडे आहे असे तिने कुटुंबीयांना सांगितले होते... मात्र 2 ऑगस्ट चे रात्री तिचा फोन स्विच ऑफ झाल्यानंतर कुटुबीयांची चिंता वाढली आणि त्यांनी दोन आणि तीन ऑगस्ट च्या मध्यरात्री हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली... बेपत्ता झालेली मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत शोध सुरू केलं... मोबाईल लोकेशन च्या आधारे आरोपी निर्भय पाखरे आणि पीडित मुलगी दिघोरी परिसरात असल्याचे पोलिसांना प्राथमिकरित्या कळले होते... पोलीस त्या भागात शोध घेत असताना एका झोमॅटो डिलिव्हरीवर शोध पथकातील पोलिसांचा संशय बळावला... पोलिसांनी ती डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटो बॉय ला विश्वासात घेऊन घराचा पत्ता विचारल्यावर आरोपीचा मोबाईल नंबर मिळाला... झोमॅटो डिलिव्हरी बॉय च्या मदतीने पोलीस पथकाने जेव्हा त्या घराचा दार तोडून आत प्रवेश केले तेव्हा पीडित मुलगी गंभीर जखमी अवस्थेत होती... आरोपी तरुणाने तिच्या हातावर चाकूने गंभीर वार केल्याचे आणि गेल्या काही तासात वारंवार तिला मारहाण केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले... पोलिसांनी तातडीने पीडित मुलीला रुग्णालयात दाखल केले असून सध्या तिची प्रकृती धोक्या बाहेर आहे... पोलिसांनी आरोपी निर्भय पाखरेला अटक केली असून तो ठाण्यातील एका अत्यंत सुखवस्तू कुटुंबातील मुलगा असल्याचे समोर आले आहे... निर्भयने पीडित मुलीला जखमी करण्यासाठी वापरलेले चाकू आणि मारहाण करण्यासाठी वापरलेल्या इतर वस्तू ठाण्यातूनच सोबत आणल्या होत्या की नागपुरात आल्यानंतर खरेदी केल्या याचा तपास पोलीस करत आहे... एवढेच नाही तर कोणत्याही ओळखी शिवाय त्याने नागपुरात खोली भाड्यावर कशी घेतली याची चौकशीही पोलिसांकडून केली जात आहे...0
0
Report
सोलापुर में देवेंद्र फडणवीस को सोलापुरी चादरी से विशिष्ट सम्मान
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरी चादरीने करण्यात आला सन्मान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरी चादरीने करण्यात आला विशेष सन्मान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या विकासासंदर्भात घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय तसेच त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोलापूरकरांच्या वतीने अनोखी भेट. सोलापुरी चादरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो साकारत त्यांनी आजपर्यंत घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांचा करण्यात आला उल्लेख. आ. देवेंद्र कोठे यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्र्यांना अनोखी भेट. सोलापुरी चादर आणि त्यावरील कल्पकता पाहताच मुख्यमंत्र्यांनी केले समाधान व्यक्त0
0
Report
छत्रपती संभाजीनगर में CJP की कोर कमिटी बैठक शुरू, आंदोलन की रणनीति तय
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मध्ये आज पासून CJPच्या कोअर कमिटीची सीजेपीची २ दिवसीय बैठक आहे, या बैठकीत आंदोलनाची पुढील रणनीती ठरणार असल्याचे सांगण्यात येताय, अभिजीत दीपकेच्या घरी ही बैठक आयोजित करण्यात आलीय. या बैठकीसाठी सौरभ दास आणि CJP चे सहकारी संभाजीनगरमध्ये अभिजित दिपके यांच्या घरी रात्रीच दाखल झालेत. या बैठकीत CJPची पुढील दिशा, ध्येय-धोरणे आणि आंदोलनाबाबतची भूमिका निश्चित केली जाणार असल्याची माहिती आहे. सोबतच सीजेपीचे काही लोक देशभर दौरा करणारे या दौऱ्याची आखणी सुद्धा या बैठकीत होणार आहे दरम्यान ही सगळी लोकं अभिजीतच्या घरी गेल्यावर त्याच्या आईने औक्षण करून सगळ्यांचे स्वागत केले0
0
Report
Advertisement
ठाणे महापालिका के नौ विभाग अध्यक्ष निर्वाचित; मुंब्रा में भगत की जीत
Thane, Maharashtra:Thane flash ठाणे पालिकेच्या नऊ प्रभाग समित्यांवर अध्यक्ष विराजमान; मुंब्र्यात बिनविरोधची परंपरा खंडित,राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) दिपाली भगत विजयी... Anchor:- ठाणे महानगरपालिकेच्या नऊ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक मंगळवारी महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली. या निवडणुकीत आठ प्रभाग समित्यांवर अध्यक्षांची बिनविरोध निवड झाली असून, मुंब्रा प्रभाग समितीत झालेल्या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) दिपाली भगत विजयी झाल्या आहेत.ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. बिनविरोध निवडून आलेल्या अध्यक्षांमध्ये वागळे प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी एकता एकनाथ भोईर, लोकमान्य सावरकरनगर येथे निर्मला कणसे, नौपाडा-कोपरी येथे मिनल संख्ये, वर्तकनगर येथे जयश्री डेविड (गायकर), माजीवडा-मानपाडा येथे सिद्धार्थ ओवळेकर, उथळसर येथे नारायण पवार, कळवा येथे विजया लासे आणि दिवा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी दीपक जाधव यांचा समावेश आहे.मुंब्रा प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी 'एमआयएम'चे अन्साशी नफीस अहमद आणि 'राष्ट्रवादी'च्या (शरद पवार गट) दिपाली भगत यांच्यात लढत झाली. यात दिपाली भगत यांना १०, तर अन्सारी यांना ४ मते मिळाल्याने भगत यांना विजयी घोषित करण्यात आले. या सर्व नवनिर्वाचित अध्यक्षांचा महापौर शर्मिला पिंपळोलकर, आमदार रवींद्र फाटक, आमदार राजेश मोरे आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.0
0
Report
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील के निधन पर कोल्हापुर में राज ठाकरे ने श्रद्धांजलि दी
Kolhapur, Maharashtra:पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे आज कोल्हापुरातील त्यांच्या निवासस्थानी वयाच्या ९१वर्षी निधन झाले. राजकारण, समाजकारण आणि शिक्षण क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज कोल्हापूरातील कसबा बावडा येथील त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी त्यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली. तसेच काँग्रेस आमदार सतेज पाटील, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय पाटील आणि इतर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.0
0
Report
भेसळ दूध पर कार्रवाई से ग्रामीण अर्थव्यवस्था में उछाल
Kolhapur, Maharashtra:राज्यात भेसळयुक्त दुधाविरोधात सुरू झालेल्या कठोर कारवाईचा सर्वात मोठा सकारात्मक परिणाम आता ग्रामीण अर्थकारणावर दिसू लागलाय. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईनंतर ग्राहकांचा कल पुन्हा दर्जेदार आणि शुद्ध दुधाकडे वळला आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या दुधाची मागणी झपाट्याने वाढली आहे, इतकंच नाही तर दुधाळ म्हशी आणि गायींच्या किमतींमध्येही मोठी वाढ झाली आहे. भेसळीच्या दुधावर तुकाराम मुंढे याची कारवाई, शुद्ध दुधाची वाढली मागणी. दुधाळ जनावरांच्या किमतीत मोठी वाढ, दुग्ध व्यवसायाला नवी संजीवनी. मुऱ्हा आणि जाफराबादी म्हैशीच्या किमतीत तब्बल 40 ते 50 हजाराची वाढ. दुधाचे दर स्थिर राहिले आणि शुद्ध दुधाला अशीच मागणी कायम राहिली तर ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय पुन्हा एकदा फायदेशीर ठरू शकतो. अनेक तरुणही शेतीसोबत दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असल्याचं चित्र आहे. एका कारवाईमुळे फक्त भेसळ रोखली गेली असं नाही, तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेलाच नवं चैतन्य मिळालं आहे. पण त्याचा फारसा आर्थिक फायदा दूध उत्पादकांना होताना दिसत नाहीये, त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी दुधाला भाव वाढवून देण्याची मागणी करत आहेत. जनावरांच्या खरेदी-विक्रीपासून पशুখाद्य, औषधे, वाहतूक आणि दुग्ध संकलन केंद्रांपर्यंत संपूर्ण साखळीला याचा आर्थिक लाभ होत आहे. परंतु प्रत्यक्षात फायदा शुद्ध दुधाची निर्मिती करणाऱ्याला झालेला दिसत नाही.0
0
Report
Advertisement
