icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नागपुर हवाई अड्डे पर टैक्सी हड़ताल से यात्री भारी परेशान

Nagpur, Maharashtra:नागपूर विमानतळावर टॅक्सी संपामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास होतोय. नो पिकप नो ड्रॉप आंदोलनामुळे प्रवाशांचे जड सामान घेऊन लांब अंतर पायी चालावे लागत आहे. प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव पूर्णपणे दिसून येत आहे. टॅक्सी वाहन चालक -मालक संयुक्त कृती समितीने पुकारलेल्या बेमुदत संपामुळे नागपूर विमानतळावर प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. टॅक्सी सेवा पूर्णतः बंद असल्याने विमानतळावर उतरल्या प्रवाशांना लांब अंतर पायपीट करावी लागत आहे. नो पिकप नो ड्रॉप आंदोलनामुळे नागपूर विमानतळावरून येणाऱ्या ॲप आधारित इतर टॅक्सी सेवा बंद झाल्या आहेत. याचा सर्वाधिक फटका विमानाने बाहेरगाहून येणाऱ्या प्रवाशांना बसला आहे पर्यायी व्यवस्था नसल्याने अनेक प्रवाशांना आपले जड सामान घेऊन विमानतळा बाहेर मुख्य रस्त्यापर्यंत व मेट्रो सानकापर्यंत सुमारे एक किलोमीटर पायी जावे लागत आहे. बाईट टक्सी बंद करणे, ओला उबेरांचे दर निश्चित करणे, आणी रेल्वे स्थानक व विमानतळावर प्रीपेड बूथ सुरू करणे यासारख्या मागण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे.
0
0
Report

विटा में नेचर केयर पुरस्कार: 11 महिला किसानों को 51 हजार नकद इनाम

Sangli, Maharashtra:स्लग नहीं: शेती करणाऱ्या महिलांचा नेचर केअर पुरस्काराने सन्मान. नेचर केअर पुरस्कार: महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातील 77 शेतकऱ्यांमध्ये থেকে 11 महिला शेतकऱ्यांना 51 हजार रुपये नकद आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. हा सत्कार विटा, सांगली येथे आयोजित झाला. नेचर केअर फर्टीलायझर कंपनीच्या वतीने हा सम्मान करण्यात आला. कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ममता सिंधुताई सपकाळ, विटा के आमदार सुहास बाबर व अभिनेत्री भारती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला. व्हिश्वमुक्त शेतीसाठी नेचर केअर फर्टीलायझरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे; यातून महिलामंतृशेतकऱ्यांनाही प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या कार्याचा गौरव होईल या हेतूने हा पुरस्कार सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
0
0
Report

चंद्रपूर सीमा पर MEL वन नाका के पास दो चितळ पानी की तलाश में भटकते

Chandrapur, Maharashtra:पाण्याच्या शोधात चितळ गावात, चंद्रपूर शहराच्या सीमेवर असलेल्या MEL वन उपज तपासणी नाका परिसरात चितळांचा संचार पाण्याच्या शोधात वन्यजीव आता चंद्रपूर शहरात येऊ लागले आहेत. शहरातील स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या प्रकल्पासमोरील महामार्गावर दोन चितळ भटकताना दिसून आले. हा भाग शहराच्या सीमेवर असून, त्यानंतर जंगल आहे. या जंगलात पाण्याचे स्रोत नसल्याने वन्यजीव पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. त्यातूनच हे दोन चितळ शहरात आले. बराचवेळ ते चंद्रपूर- मूल महामार्गावर भटकत राहिले. नंतर लोकांनी त्यांना जंगलाच्या दिशेने पिटाळले。
0
0
Report
Advertisement

धाराशिव में गर्मी कहर: सरकारी अस्पताल में हीट स्ट्रेस कक्ष शुरू, 21 रोगी उपचारित

Dharashiv, Maharashtra:धाराशिव जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तापमानाने चाळीशी पार केल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयात विशेष ‘उष्माघात कक्ष’ सुरू केला आहे. या कक्षात आतापर्यंत 21 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य विभागाने तयारी केली आहे. शासकीय रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या उष्माघात कक्षात आवश्यक औषधे, थंडावा देणारी यंत्रणा आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या कक्षामुळे रुग्णांना तातडीने उपचार मिळत असून अनेकांना मोठा दिलासा मिळत आहे.
0
0
Report
Advertisement

उजनी में पाणीय आवर्तन कम होने के कारण किसानों के लिए अल निनो का असर: इस साल केवल एक आवर्तन

Pandharpur, Maharashtra:यंदा उन्हाळी हंगामामध्ये उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना दोन ऐवजी एकच पाण्याचा आवर्तन मिळणार अल निनो सक्रिय होणार असल्याने कमी पावसाची शक्यता आहे. यामुळे भविष्यात पाणीसाठा राखून ठेवण्यासाठी निर्णय पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती. उजनी धरणावर सोलापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती अवलंबून आहे. मात्र यंदा उन्हाळी हंगामात दोन ऐवजी एकच आवर्तन सोडले जाणार आहे. अल निनो सक्रिय होणार असल्यामुळे यावर्षी पावसाच्या प्रमाण कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. 2027 च्या जून पर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी पाणीसाठा वापरण्याचं आव्हान असणार आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य असल्यामुळे यावर्षी उन्हाळी हंगामासाठी फक्त एक आवर्तन सोडलं जाणार आहे. अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे.
0
0
Report
Advertisement

चिपळूण-रत्नागिरी में जिल्हाध्यक्ष इस्तीफा: पक्ष में हलचल

Ratnagiri, Maharashtra:चिपळूण-रत्नागिरी.. जिल्हाध्यक्षांच्या पक्षविघातक कारभारामुळे तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा.. मुराद अडरेकर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या अकार्यक्षम,विस्कळीत आणि पक्षविघातक कारभारामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्यास त्या पदावर राहणे अशक्य झाले आहे.. जिल्हाध्यक्षांच्या कार्यपद्धतीमुळे पक्षात समन्वयाचा पूर्णता अभाव निर्माण झाला असून कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.. यामुळे आपण तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे मुरात आडरेकर यांनी सांगितले.. त्यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे,कोकण प्रभारी जितेंद्र आव्हाड आणि जिल्हानिरीक्षक विजय देसाई यांच्याकडे दिला आहे.. दिलेल्या राजीनाम्यात आडेकरांनी म्हटले आहे की चिपळूण तालुक्या अध्यक्ष म्हणून मी प्रामाणिकपणे व निष्ठेने पक्षासाठी काम केले आहे..मात्र जिल्हाध्यक्षांनी जाणीवपूर्वक गट-तट निर्माण करून पक्षाची एकजूट खिळखिळी केली आहे..त्यांच्या चुकीच्या आणि अहंकारी वर्तनामुळे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते व नेते वारंवार तक्रारी करूनही न्याय न मिळाल्याने पक्ष सोडून गेल्याचे त्यांनी म्हटले आहे..
0
0
Report

अमरावती में जिला परिषद के प्रवेशद्वार पर वृद्ध का शव, गर्मी से मौत का शक

Amravati, Maharashtra:अमरावतीत जिल्हा परिषदच्या प्रवेशद्वाराजवळ आढळला मृतदेह; उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय अँकर :- शहरातील जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ एका 65 वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे नाव किशोर वासनिक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काल अमरावतीचे तापमान 44 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. त्यामुळे उष्माघातामुळेच त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
0
0
Report

जिला अस्पताल में लाच माँग कर गिरफ्तार शिपाय, ACP ने बड़ी कार्रवाई की

Satara, Maharashtra:साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक केबिन बाहेरील शिपायाला 50 हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. आनंदा गोपाळ वाळवेकर असे लाच घेणाऱ्या शिपायाचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदाराचे हॉस्पिटल असून या हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी सेंटर, सरकार मान्य गर्भपात केंद्र कुटुंब नियोजन केंद्र या सुविधा चालू करण्यासाठी लागणारे परवाने मिळवण्यासाठी लागणाऱ्या परवाने मिळवण्यासाठी लाचची मागणी करण्यात आली होती. जिल्हा शासकीय रुग्णालयात सापळा रचून यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संबंधित शिपायाला अटक केली आहे.. याचा पूर्ण तपास सध्या लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे
0
0
Report
Advertisement

वाशीम में नेशनल हाईवे की सिमेंट सड़क धोकादायक; गड्ढे दुर्घटना का जोखिम बढ़ाते

Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील मालेगाव–रिसोड–हिंगोली ४६१ बी राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर ते वसारी दरम्यानचा सिमेंट रस्ता सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत आला आहे.या मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याच्या मधोमध खोल भेगा पडल्या असून,त्यामध्ये दुचाकींचे टायर अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, दुचाकीस्वारांसाठी अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.विशेषतः रात्रीच्या वेळी या भेगा स्पष्टपणे दिसत नसल्यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढतो. स्थानिक नागरिकांकडून आणि वाहन चालकांकडून याबाबत वारंवार तक्रारी करण्यात येत असतानाही अद्याप कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही.या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी,अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिकांकडून जोर धरत आहे.
0
0
Report

रत्नागिरी से कोकण तक: मुंबई-गोवा राजमार्ग पर वृक्ष काटकर सनसनी, सावली खो गई

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. मुंबई-गोवा महामार्गावर 'सावली' हरवली.. प्रशासनाचं वृक्षारोपणाचं आश्वासन केवळ कागदावरच!.. मुंबई-गोवा महामार्गाचा प्रवास आता प्रवाशांसाठी 'अग्निपरीक्षा' ठरू लागला आहे.एकीकडे महामार्गाचं रखडलेलं काम आधीच डोकेदुखी ठरत असताना, आता निसर्गरम्य कोकणच्या या महामार्गावरील 'सावली' देखील हरवली आहे.. महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी हजारो जुन्या आणि डेरेदार वृक्षांची कत्तल करण्यात आली. 'एक झाड कापल्यास दोन झाडे लावू' असं आश्वासन देणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा (NHAI) दावा आता फोल ठरला आहे.. रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण पट्ट्यात लावलेली शोभेची झाडे पाणी आणि देखभालीअभावी करपून गेली आहेत. पूर्वीच्या शीतल सावलीची जागा आता तापलेल्या सिमेंटच्या रस्त्यांनी घेतली आहे. वाढत्या पाऱ्यामुळे प्रवाशांना उन्हाच्या थेट झळा बसत असून प्रवासादरम्यान थंडाव्याचा लवलेशही उरलेला नाही.. प्रशासनाच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे हा महामार्ग भविष्यात अधिक 'उष्णतादायक' ठरण्याची भीती निर्माण झाली आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top