icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

रत्नागिरी में बारिश नहीं, किसान बेहाल—फसलें करपने लगीं

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. पावसाची दडी.. पिके करपली.. लावणीच्या काळातच पावसाने पाठ फिरवल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी चिंतातूर.. कोकणात चिंतेचे ढग गडद झाले आहेत,पण ते पावसाचे नव्हे तर दुष्काळाच्या सावटाचे! मुसळधार पावसासाठी ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात यंदा वरुणराजाने दडी मारली आहे.. ऐन लावणीच्या (भात लागवडीच्या) महत्त्वाच्या काळातच पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी कमालीचा चिंतातूर झाला है.. कडक ऊन आणि पाण्याच्या अभावामुळे शेतातील कोवळी पिके आता करपून जाऊ लागली आहेत.. बियाणे,खते आणि मशागतीसाठी केलेला हजारो रुपयांचा खर्च वाया जाण्याच्या भीतीने जिल्ह्यातील बळीराजा हवालदिल झाला आहे.. पावसाने दडी मारल्याने आपल्या सुकलेल्या शेतात शेतकरी विहिरीच्या पाण्यावर आपल्या शेतात चिखल करून लावणी करत आहे.. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रविंद्र कोकाटे यांनी..
0
0
Report

सांगली नदी में मगरी के हमले से 61 वर्षीय व्यक्ति घायल

Sangli, Maharashtra:कृष्णा नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर मगरीने हल्ला केल्याची घटना सांगलीमधील घडली. जालिंदर शामराव साळुंखे (वय 61) हे मगरीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार झाले आहेत. साळुंखे नेहमीप्रमाणे शहरातील माई घाट येथे कृष्णा नदीत पोहत असताना मगरीने त्यांच्यावर हल्ला केला. मगरीच्या हल्ल्यानंतर भेदरलेल्या साळुंखेंनी आराडा-ओरडा सुरू केल्यानंतर आसपासच्या नागरिकांनी नदी धाव घेत मगरीच्या तावडीतून सुटका केली आहे. त्यामुळे साळुंखे हे बाल-बाल बचावले आहेत. घटनेनंतर जखमी झालेल्या साळुंखे यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलाय, मात्र या घटनेने शहरात भीतीच वातावरण निर्माण झाला असून नदीकाठी पोहण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी खबर द्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
0
0
Report

नागपुर: इथेनॉल और ई20 के आरोप पर चार सोशल मीडिया इन्फ्लुएंसर पर मामला

Nagpur, Maharashtra:नागपूर - ‘इथेनॉल’बाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबद्दल्ल गैरसमज पसरवल्याप्रकरणी चार सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरविरोधात गुन्हा - नागपूर सायबर पोलिसांत गुन्हा दाखल,बिहारसह देशातील चार इन्फ्लुएन्सर गुन्हा नोंद - मनिश कश्‍यप (रा.बिहार), देसी बॉयसर, हर्षित राठी आणि अंकलेश इन्वाटे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेय. - इथेनॉल आणि ई 20 विरोधात यूट्यूब-इन्स्टाग्रामवर दिशाभूल करणारे आणिबेकायदेशीर कृत्यांना प्रोत्साहन देणारे व्हिडिओ अपलोड केल्याचा आरोप - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या इथेनॉल धोरणाचा चुकीचा संदर्भ वापरल्याचा आरोप - भाजप सोशल मीडिया सेलच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल - 'या प्रकरणात नितीन गडकरी यांचा थेट संबंध नाही; त्यांच्या नावाचा केवळ संदर्भ वापरण्यात आला - नागपूर सायबरकडून व्हिडिओंची तपासणी सुरू पुढील चौकशी सायबर पोलिसांकडून सुरू आहे
0
0
Report
Advertisement

रायगढ़ जिले में 15-30 जुलाई के दौरान स्कूल से बाहर बच्चों की विशेष खोज अभियान

Chendhare, Maharashtra:शुल्काबाह्य मुलांच्या शोधासाठी विशेष मोहीम 15 ते 30 जुलाई दरम्यान रायगढ़ जिल्हाभर सर्वेक्षण. स्थलांतरित विद्यार्थ्यांना मिळणार विशेष कार्ड. रायगढ़ जिल्ह्यातील 6 से 14 वर्षे आयु वर्ग के एक भी बच्चा शिक्षण से वंचित न रहे, इसके लिए रायगढ़ जिला परिषद के शिक्षा विभाग نے पहल की है. 15 से 30 जुलाई के दौरान स्कूल से बाहर बच्चों की विशेष खोज मोहीम चलाई जाएगी. इस अभियान में स्कूल से बाहर बच्चों को उनकी आयु के अनुसार समकक्ष कक्षा में प्रवेश दिया जाएगा. साथ ही स्थानांतरित बच्चों को शिक्षा में बाधा न हो इसका ध्यान रखते हुए उन्हें विशेष कार्ड दिया जाएगा.
0
0
Report
Advertisement

वाशीम में हल्दी के भाव एक हफ्ते में तेज़ बढ़े, रिकॉर्ड उछाल

Washim, Maharashtra:वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीतील हळदीच्या बाजारभावात एका आठवड्यात १ हजार ६२६ ते ३ हजार ५० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे हळदीच्या बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात हळद कांडीला १४ हजार २०० ते १५ हजार ८७५ रुपये, तर हळद गटुला १२ हजार ८५० ते १३ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. जिल्ह्यातील लिलावात हळद कांडीला १५ हजार ९०० ते १७ हजार ५०१ रुपये, तर हळद गटुला १५ हजार ते १६ हजार ७५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. बाजारात दर्जेदार हळदीला चांगली मागणी असल्याने दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
0
0
Report
Advertisement

नाशिक के जायकवाडी बांध में पानी की आवक 546 क्यूसेक, जलस्तर 1506.40 फुट तक

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील पावसात घट झाल्याने जायकवाडी धरणातील पाण्याची आवक मंदावली असली, तरी धरणात पाण्याची आवक सुरूच आहे. सोमवारी मागील २४ तासांत ५४६ क्युसेक पाण्याची आवक झाली असून धरणातील उपयुक्त पाणीसाठा ६८५.७८६ दलघमी म्हणजेच ३१.५९ टक्के इतका झाला आहे,  धरणाची पाणीपातळी १५०६.४० फूट (४५९.१५१ मीटर) इतकी नोंदविण्यात आली असून एकूण पाणीसाठा १४२३.८९२ दलघमी आहे. यंदाच्या मान्सून हंगामात १ जूनपासून धरणात आतापर्यंत ९६.१७३ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. रविवारी धरण परिसरात पावसाची नोंद झाली नसून आजचा पाऊस शून्य राहिला आहे。
0
0
Report

चिकलठाणा में प्लास्टिक गोदाम में भीषण आग, दमकल ने पाया काबू

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरातील चिकलठाणा परिसरातील भालगाव शिवारात रात्री एका प्लास्टिक गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच चिकलठाणा अग्निशमन केंद्राचे पथक तातडीने बंबासह घटनास्थळी रवाना झाले. अग्निशामक दलातील जवानानी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, गोदामात प्लास्टिक साहित्य असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते अखेर अथक परिश्रमाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे, सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
0
0
Report

वायरल ऑडिओ क्लिप पर महाराष्ट्र मंत्री ने की जांच, साइबर व फॉरेन्सिक सत्यापन

Satara, Maharashtra:माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सध्या चर्चेत असलेल्या कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे."माझ्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात मी नेहमीच सर्व अधिकार्‍यांशी आणि लोकांशी आदराने आणि सौजन्याने संवाद साधला आहे, आणि हीच पद्धत पुढेही राहील. सध्या समोर आलेले प्रकार हे आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून तयार केलेले असू शकतात, असे सांगत त्यांनी या क्लिप्सच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी याची सखोल चौकशी केली जाईल, अशी माहिती दिली आहे. ऑडिओ क्लिपमधील आवाजाची सत्यता पडताळण्यासाठी आणि वास्तविक समोर आणण्यासाठी सायबर पोलिसांमार्फत तपास केला जाईल. गरज पडल्यास खा. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या आवाजाचे नमुने देखील घेऊन फॉरेन्सिक तपासणी केली जाईल, असे मंत्री गोरे यांनी स्पष्ट केले. क्लिपमध्ये कोणतीही छेडछाड झाली आहे का, तसेच संबंधित कर्मचाऱ्याला कोणी आणि का कोंडून ठेवले, त्याला कोणी मारहान केली, या सर्व बाबींचा छडा पोलीस यंत्रणा लावेल. "या संपूर्ण प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल, मग तो कितीही मोठा आणि वजनदार असला, तरी त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.असा इशारा मंत्री जयकुमार गोरे यांनी दिला आहे."
0
0
Report
Advertisement

संभाजीनगर में बाबा फर्जन रोहिला गली के वाडे पर पुलिस दबिश, कुछ नहीं मिला

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर सह सर्वत्र चर्चेत असलेल्या कामगार नेता, ९० च्या दशकात दबदबा राहिलेल्या बाबा फर्जनच्या रोहिला गल्लीतील जुन्या वाड्याची पोलिसांनी झडती घेतली. वर्षभरापूर्वी फर्जनने सोडलेला हा अलिशान, जुन्या धाटणीत बांधलेला वाडा सध्या 'खंडहर' झाला असून तिथे घाणीने वेढा घातला आहे , फर्जनचा मुंबईत खासगी नोकरी करणारा मुलगा शहरात आल्यानंतर, त्याच्या उपस्थितीत सहायक पोलिस निरीक्षक विवेक जाधव व इतर पोलिसांनी तीन तास वाडा पिंजून काढला मात्र केवल गंजलेले जुने साहित्य, कारखान्यातील यंत्राचे अवशेष याव्यतिरिक्त पोलिसांच्या हाती काहीच लागलें नाही...
0
0
Report

कोल्हापुर के अंबाबाई मंदिर की छत से सीमेंट उखड़ना, संवर्धन कार्य पर मचे बवाल

Kolhapur, Maharashtra:करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मंदिराला गळती लागल्याचा व्हिडिओ संध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. ज्या वेळी कोल्हापुरात सलग पाऊस कोसळत होता, त्यावेळीचा हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. मंदिर संवर्धनाचा भाग म्हणून अंबाबाई देवीच्या छतावरील सिमेंटचे भाग काढण्यात आले आहेत, दरम्यान शिखरांचेही संवर्धन प्रक्रिया राबवली जात आहे, पण ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचा आरोप काही नागरिक आणि संघटनांचा आहे. मंदिराचे संवर्धन करत असताना ग्रायंडरचा वापर केला जात असल्याचे देखील दिसून येत आहे. पुरातत्त्वीय नियमानुसार ही संवर्धन प्रक्रिया राबवली जात नसल्याचे देखील अनेक भक्तांचे म्हणणे आहे.
0
0
Report

वाशीम में मॉनसूनी देरी से फसल संकट, किसान बारिश का इंतजार कर रहे हैं

Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:वाशिम जिल्ह्यात यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाले. त्यानंतर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात खरिपाच्या ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या.मात्र,गेल्या दहा दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारल्याने पेरणी केलेली पिके करपू लागल्याने धोक्यात आली आहेत. पिकांच्या वाढीसाठी या टप्प्यावर पावसाची अत्यंत गरज आहे.ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे,ते पिके वाचवण्यासाठी विहिरी,बोअरवेल आणि तुषार सिंचनाद्वारे सिंचन करत आहेत.मात्र,सिंचनाची कोणतीही सोय नसलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या असून,दमदार पावसाची ते आतुरतेने वाट पाहत आहेत.याच परिस्थितीचा शेतकऱ्यांच्या बांधावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी...
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top