icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

परीक्षा पारदर्शिता के लिए समिति बनी, गिरफ्तारियां और SIT कार्रवाई तेज

Nashik, Maharashtra:सम्यक विद्यार्थी संघटनेमार्फत एक निवेदन देण्यात आलं होतं.. त्यांच्या मागण्यांचे प्रत्येक प्रश्नाचे लेखी उत्तर दिले आहे.. आजच्या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांचे समाधान झाले आहे.. परीक्षा पारदर्शक पद्धतीने कशा होतील यासाठी राज्याचे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.. आतापर्यंत सात ते आठ लोकांना अटक करण्यात आली आहे.. SIT मार्फत अनेक ठिकाणी चौकशी व कारवाया सुरू आहेत.. या प्रकरणाच्या खोलात जाऊन शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून कोठारात कठोर शिक्षा होईल अशा प्रकारच्या आदेश दिले आहेत.. प्रशांत बोराडे,वंचित प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष सम्यक विद्यार्थी संघटना पेपर फुटी नंतर राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणाहून आंदोलन झाली होती.. शिक्षण मंत्र्यांच्या घरावर आंदोलन केल्यानंतर बैठक घेतली होती.. मागील बैठकीत काही तोडगा निघाला नाही.. त्यानंतर आम्ही आठ दिवसाचा त्यांना अल्टीमेटम दिला होता.. आज त्यांनी भेटीसाठी बोलावल्याने आंदोलन थांबवलं.. थेट राज्याचे शिक्षण मंत्री बैठकीला उपस्थित असल्याने अनेक प्रश्न सुटले आणि काही प्रश्न सोडवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा करणार आहोत त्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले..
0
0
Report

पंढरपुर के तुळशीमाळा में चीन माळा घुसपैठ, वारकऱ्य से फर्जी माळा सावधान

Pandharpur, Maharashtra:विठ्ठलाच्या भक्तांच्या तुळशी माळेतही चायना माळांचा शिरकाव, पंढरपूर मधील तुळशी कारागिरांची संख्या घटली आषाढी वारीला आलेला विठ्ठलाचा भावीक आवर्जून तुळशीमाळ खरेदी करत असतो. मात्र सध्या चायना तुळशीमाळा विक्री होत असल्याने वारकऱ्यांची फसवणूक सुद्धा होत असते. त्यामुळे वारकऱ्यांनी असे माळा खरेदी करताना तपासून या खरेदी करण्याची गरज आहे. सध्या पंढरपूर मधील काशी कापडी समाज मोठ्या प्रमाणात तुळशी माळा बनवत आहे. गोल मनी, चक्री मणी, गुरु मणी, एक पदर , दोन पदर अशा पद्धतीने रचना असलेल्या माळा फक्त तुळशी लाकड वापरून तयार होतात. मात्र आता. चायना पद्धतीच्या सुद्धा तुळशी माळा बाजारात विक्री होत आहेत. त्यामुळे काशी कापडी समाजाच्या निम्मे कारागीर कमी झाले आहेत. तुळशीच्या लाकडा पासून तयार केलेली माळ छिद्र लहान असते, मण्यावर साल असते. तर चायना माळ चमक असते, त्याचे छिद्र मोठे असते. मणी मऊ असतात. या गोष्टींची काळजी घेऊन वारकऱ्यांनी माळा खरेदी कराव्या.
0
0
Report
Advertisement

नाशिक में बारिश से भाजीपाला महँगा, कोथिंबीर के दाम रिकॉर्ड ऊँचे

Nashik, Maharashtra:गेल्या आठवड्यात संपूर्ण नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेतातील उभे पीक काही प्रमाणत नाशवंत झाल्याने कोथिंबीर मालाची आवक वाढली आहे. त्यातच परराज्यांतील बाजारपेठेत कोथिंबीर शेतमाल कमी पडला आणि परिणामी बाजारभाव तेजीत आले आहेत. काल नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर मालाला शेकडा २१ हजार रुपये (२१०) रुपये प्रति जुडी असा यंदा हंगामातील उच्चांकी दर मिळालाय. नाशिक मध्ये पावसामुळे नाशिकच्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याचा दिसून येत आहे जून महिन्यात पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या कसरतीने आपला भाजीपाला हा त्या ठिकाणी वाचवला. मात्र मागील आठवड्यात झालेल्या दोन दिवसांच्या पावसात शेतांमध्ये पाणी साचलेला उभं पीक ही खराब झाली आणि रोगांचा प्रादुर्भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढला. कोथिंबीरच्या जुडीला दोनशे रुपये भाव मिळत असून मेथी, पालक आणि वांगी, ढोबळी, फ्लावर, कोबी, शेवगा या पिकांच्या दरात देखील दुपटीने भाव वाढत झाले असून पुढील पंधरा दिवस त्याचा परिणाम बाजारपेठांवर कायम राहणार आहे मात्र नाशिकहून मुंबई गुजरात मधील सुरत अहमदाबाद या भागांमध्ये भाजीपाला जात असल्याने त्याचा परिणाम देखील इतर बाजारपेठांवर होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाजवी बजेटासाठी भाजीपाला भाव वाढल्याने घरातील बजेट कोलमडल असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिलीये. कोथिंबीर मी ती नाही तर सगळ्याच भाजीपाल्यांचे भाव हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. भाव वाढल्यामुळे घरात खायचं काय हाच मोठा प्रश्न उरला असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केलीये. भाव कमी झाले पाहिजे अशी मागणी नागरिकांनी केलीये. पुढील पंधरा दिवस त्याचा परिणाम बाजारपेठांवर कायम राहणार आहे मात्र नाशिकहून मुंबई गुजरात मधील सुरत अहमदाबाद या भागांमध्ये भाजीपाला जात असल्याने त्याचा परिणाम देखील इतर बाजारपेठांवर होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते.
0
0
Report

बीड के ऊसतोड़ मजदूरों के विद्यार्थियों के छात्रावास में गंदगी और सुविधाओं की कमी

Beed, Maharashtra:बीड: ऊसतोड मजुरांच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात गैरसोयींचा डोंगर; अस्वच्छता, अपुऱ्या सुविधा उघड ANC - सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या विद्यार्थ्यांच्या निवासी वसतिगृहात विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याचे पाहायला मिळाले. वसतिगृहात सर्वत्र अस्वच्छता असून, एका खोलीत चार ते पाच विद्यार्थ्यांना एकत्र राहावे लागत असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे, वसतिगृहात विद्यार्थ्यांसाठी पलंगांची व्यवस्था नसल्याने त्यांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. तसेच भोजनासाठी वापरल्या जाणाऱ्या अन्नाच्या भांड्यांवर माशा बसलेल्या दिसून आल्या, ज्यामुळे स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. याशिवाय, विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करण्यासाठी टेबल तसेच वैयक्तिक सामान ठेवण्यासाठी कपाटांचीही व्यवस्था नसल्याने त्यांना कपडे दोरीवर टांगून ठेवावे लागत आहेत. याचाच आढावा घेत विद्यार्थ्यांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी महेंद्रकुमार मुधोळकर यांनी...
0
0
Report
Advertisement

सुझय विक्हे के निरीक्षण से नगर-मनमाड महामार्ग पर ट्रैफिक सुधार की उम्मीद

Shirdi, Maharashtra:झी 24 तासाच्या बातमीचा इम्पॅक्ट , नगर मनमाडच्या सुरू असलेल्या कामाच्या पाहणीला सुजय विखे महामार्गावर... नगर–मनमाड महामार्गाच्या कामाची माजी खा.सुजय विखे कडून यांची पाहणी... खड्डेमय नगर मनमाड महामार्ग या झी 24 तासच्या बातमीनंतर सुजय विखेंकडून ठेकेदारांची कानउघाडणी... सावळीविहीर येथील उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम... कामात ठेकेदारांकडून त्रुटी झाल्याची सुजय विखेंनी स्पष्ट कबुली... अधिकारी आणि ठेकेदारांना तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश... पुढील तीन दिवसांत वाहतुकीची समस्या कमी होणार असल्याचा सुजय विखेंचा दावा... गुरु पौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी खुली करण्याचे नियोजन... महामार्गालगतची अतिक्रमणे हटविण्याबत प्रशासनाला सुजय विखेंच्या सूचना...
0
0
Report

अकोला में सोयाबीन बियाणे फेल: किसानों को भारी नुकसान, कंपनियों पर कड़ी कार्रवाई मांग

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या तक्रारींमध्ये सातत्याने वाढ होत असून शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि दोषी बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी आज बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीनंतर भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी कृषी विभाग, गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा आणि संबंधित बियाणे कंपन्यांवर गंभीर आरोप केले आहेत. कृषी विभागाकडे शुक्रवारपर्यंत सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या एकूण 1,722 तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी सर्वाधिक म्हणजे सुमारे 1,000 तक्रारी मूर्तिजापूर तालुक्यातील असल्याचे पिंपळे यांनी सांगितले. बियाणे निकृष्ट निघाल्यामुळे हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून त्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी केली. या वेळी बोलताना पिंपळे यांनी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी आणि तालुका गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप केला. आतापर्यंत जिल्ह्यातील 183 बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी घेतलेल्या असल्याचे सांगत कृषी विभाग आणि गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेचे हे अपयश असल्याची टीका त्यांनी केली. दोषी बियाणे कंपन्यांवर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावे, तसेच पुढील वर्षी अशा कंपन्यांचे बियाणे विक्रीस परवानगी देऊ नये, असं इशारा त्यांनी दिला. याशिवाय शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी नियुक्त अधिकाऱ्यांनीच फसवणूक केल्याचा आरोप करत काही अधिकाऱ्यांचे कंपन्यांशी लागेबांधे असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांना तीन दिवसांच्या आत मदत जाहीर करावी, तसेच गुणवत्ता नियंत्रण अधिकारी आणि संबंधित कृषी अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही हरीश पिंपळे यांनी केली आहे.
0
0
Report
Advertisement

नवी मुंबई कृषि बाजार में कोथींबर 40–50 रुपये, पालेभाजी के दाम बढ़े

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई स्थित मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती में कोथींबीर तथा पालेभाजी के दाम बढ़े हैं। कोथंबीर 40 से 50 रुपये प्रति जुडी बिकली जा रही है, जबकि पालक, मेथी 30 रुपये, कांदा पत्ता, पुदीना 20 रुपये जुडी विकली जा रही है। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती में बेलगाव, गुजरात और कर्नाटक से कोथंबीर की आवक हुई है, जिससे मुंबई मार्केट में कोथंबीर दर 40 से 50 रुपये हैं, जबकि ये दर स्थानीय मार्केट जैसे पुणे, नाशिक में 100 रुपये जुडी है, परंतु मुंबई मार्केट में परराज्यातून माल आने के कारण पालेभाजी तथा कोथंबीर के दर स्थिर हैं।
0
0
Report

वारकऱ्यां में लावणी-भक्ति गीतों की जुगलबंदी, पालखी सोहळे में कलाकारों ने धूम मचाई

Rui, Maharashtra:जिथे चाळ और टाळ एकत्र येतात... घुंगराचा छनछनाट , टाळ मृदुंगाचा नाद...लावणी आणि भक्तीगीतांचा मिलाफ ..अशा भक्तीमय वातावरणात आज वारकऱ्यांना भक्ती आणि लावणीच्या जुगलबंदीचा अवीट नमुना अनुभवायला मिळाला ... जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज यवत हून वरवंडच्या दिशेने निघाला असताना केडगाव चौफुल्यावर या सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी येथील अंबिका सास्कृतिक कला केंद्राच्या नर्तीकानी आपल्या अदाकारीत भजन, भक्तीगींतांसह मराठी सिनेसृष्टीतील नृत्यावर चक्क वारकऱ्यांनी नाचण्याचा मनमुराद आनंद लुटला . त्यातील कला सादर करुन वारकऱ्यांना आपल्या कलाविष्काराने ठेका धरायला लावला . पायी चालत वारीत वारकऱ्यांनच्या सेवेसाठी कोणी अन्नदान करतंय तर कोणी अंथरूण देतेय तर कोणी पांघरून देतय...मात्र पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कला केंद्रातील नर्तिकानी आपल्या कलेचे सादरीकरण वारकऱ्यांसमोर करून आपलीही सेवा विठल चरणी पोहचविण्याचा सायास केलाय...या वेळी या नर्तीकानी एखादा विठुरायाच्या भक्ती गीतावर टाळ धरला तर लावणीही सादर करत जुगलबंदीचा एक नजराणा वारकऱ्यांसाठी सादर केला या जुगलबंदी मूळ जणू या वारकऱ्यांचा थकवाच दूर झाला... गेल्या 30 वर्षांपासून या कलाकेंद्राच्या नर्तका वारकऱ्यांसाठी आपली कला सादर करतात ही परंपरा त्यांनी आजही कायम जपलीय ...आज जगतगुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील सुमारे दहा हजार वारकऱ्यांना सुग्रास असे भोजन ही देण्यात आलेय याच बरोबर कलाही सादर करुन त्यांची सेवा केलीय ...
0
0
Report
Advertisement

चंद्रपुर कांग्रेस सांसद प्रतिभा धानोरकर: नगरसेवकों पर दबाव नहीं, व्यक्तिगत निर्णय

Chandrapur, Maharashtra:टायटल: कोणत्याही नगरसेवकावर गटात सामील होण्याचा दबाव नसल्याची चंद्रपूरच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर शहर मनपा गटनेते पदाच्या वादावर प्रतिक्रीया अँकर: कोणत्याही नगरसेवकावर गटात सामील होण्याचा दबाव नसल्याची प्रतिक्रिया चंद्रपूरच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर शहर मनपा गटनेते पदाच्या वादावर दिली आहे. 5 नगरसेवक दबावापोटी आले नसून, कुठलाच दबाव नाही शेवटी हा नगरसेवकांचा वैयक्तिक प्रश्न आहे की त्यांनी कुठल्या गटात सामील व्हायचं, नगरसेवक कुठेही गेले तरी ते शेवटी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचेच आहेत, आयुक्त मॅडम याबाबत अंतिम निर्णय देतील आणि त्यानंतर देखील काँग्रेसचे सर्व नगरसेवक एकजुटीने काम करतील, असेही खा. धानोरकर म्हणाल्या.
0
0
Report

पूरग्रस्तों को राहत: वसई-विरार में नुकसान-भरपाई के लिए पंचनामे तेज

Vasai-Virar, Maharashtra:वसई विरार : वसई-विरारमधील पूरग्रस्त नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुसळधार पावसामुळे ४८ तासांहून अधिक काळ घरांमध्ये पाणी साचून मोठे नुकसान झालेल्या नागरिकांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्यासाठी नुकसानग्रस्त भागातील पंचनामे करण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. नायब तहसीलदार राजाराम देवकाते यांनी स्वतः पूरग्रस्त भागाची पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेत असून चाळी , झोपट्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये विशेष लक्ष देण्यात येत आहे ...महसूल विभाग आणि वसई-विरार महानगरपालिका प्रशासनाच्या संयुक्त पथकांकडून पंचनाम्याचे काम सुरू असून, विविध भागांमध्ये विशेष कॅम्पही उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये नागरिकांकडून बँक खात्याचा तपशील, आवश्यक कागदपत्रे आणि इतर माहिती स्वीकारली जात आहे. पंचनामा पूर्ण झाल्यानंतर शासनाच्या नियमानुसार पात्र पूरग्रस्तांच्या बँक खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पूरग्रस्त नागरिकांना आता दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
0
0
Report

चंद्रपुर कांग्रेस के नगरसेवक संख्या पर आयुक्त के समक्ष दावे, 11 मौजूद

Nagpur, Maharashtra:नागपूर बाइट – राजेश अडूर बाइट. राजेश अडूर हे विजय वडेट्टीवार गटाचे आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात ते आपले संख्या बळ दाखवण्यासाठी पोहचले होते. त्यानंतर त्यांनी दिलेला बाइट. चंद्रपूरमध्ये काँग्रेसकडे 27 नगरसेवक आहेत; 16 नगरसेवक आपल्याकडे सोबत असल्याचा दावा अगोदरच यांनी केलाय. आज आमचे 11 नगरसेवक या ठिकाणी उपस्थित झाले होते. कोर्टाच्या निर्देशानुसार आम्ही आमचे सर्व नगरसेवक आज उपस्थित केले होते. गट नेता पदाचा निर्णय फक्त संख्याबळाच्या आधारावरच व्हावा, यापेक्षा काही तांत्रिक गोष्टीही विभागीय आयुक्तांनी पाहिल्या पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. न्यायालयाने विभागीय आयुक्तांच्या मागील निर्णयावर स्थगिती आदेश का दिला होता, याचाही विचार होण्याची गरज आहे. विनोद लभाने हे पूर्वी आमच्यासोबत होते मात्र आज ते या ठिकाणी आलेले नाही; अखेरीस ते काँग्रेस पक्षाचेच नगरसेवक आहेत आणि 27 नगरसेवकांमध्ये ते समाविष्ट आहेत. पुढे न्यायालयात जाणार का या प्रश्नावर, आधी विभागीय आयुक्तांना त्यांचा निर्णय देऊ द्या, त्यानंतर त्याबद्दल विचार करू.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top