445001
यवतमाळ : महिला बँक घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या बाबाजी दाते महिला बॅंकेत २४२ कोटींच्या अपहार प्रकरणात महिनाभराने अटकसत्र सुरू झाले आहे. पोलिसांनी शिवसेना नेते रमेश अगरवाल, व्यावसायिक प्रकाश पिसाळ आणि ठेकेदार प्रशांत पामपट्टीवार यांना अटक केली आहे. याआधी बँकेच्या CEO सुजाता महाजन, तिचा पती विलास महाजन, ॲड. वसंत मोहरेकर आणि नवलकिशोर मालाणी यांना अटक झाली होती. आता अटक केलेल्या आरोपींची संख्या सात झाली आहे. २०६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, ज्यामुळे संचालक व लेखा परीक्षक चिंतेत आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नवी मुंबई के खारघर सेक्टर 34 में लिफ्ट फंसे चार लोग, दमकल ने बचाया
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईच्या खारघर सेक्टर 34 मध्ये चौघेजण लिफ्ट मध्ये अडकल्याची घटना खारघर सेक्टर 34 मध्ये तुलीप को-ऑपरेटिव्ह सोसायटी मधील लिफ्ट मध्ये 4 जण अडकले. लिफ्ट मध्ये अडकलेल्या रहिवासीयांना सिडको अग्निशमन दलाने kआउटले बाहेर. रहिवासीयांनी मानले अग्निशमन दलाचे आभार。0
0
Report
मालेगांव ब्रेकिंग: नाबालिग लड़की के गर्भधारण और बच्चा बिक्री मामले में बड़ा मोड़
Nashik, Maharashtra:अल्पवयीन मुलीची प्रसूती व नवजात बाळ विक्री प्रकरणात मोठा ट्विस्ट. संदर्भित अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप असलेला अनिल कोळी आणि मुलीची आई यांना मालेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. हैदराबाद येथून अनिल कोळी व मुलीच्या आईला ताब्यात आणून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात मुलीची आई आणि अनिल कोळी यांच्यात विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही संशयितांना मालेगाव न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अल्पवयीन मुलीला गर्भधारणा झाल्याची घटना धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे घडल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. मुलीची आई आणि आरोपी अनिल कोळी हे दोघेही मूळचे शिरपूर (जि. धुळे) येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. प्रकरणाचा अधिक तपास मालेगाव पोलीस करत आहेत. याआधीच मालेगाव पोलिसांनी डॉ. डांगे यांच्यासह 8 जणांना ताब्यात घेतले आहे.0
0
Report
मिरारोड़ में 78 लाख के कोकेन के साथ नायजेरियन नागरिक गिरफ्तार
Mira Bhayandar, Maharashtra:मिरारोडमध्ये ७८ लाखांचे कोकेन जप्त, नायजेरियन नागरिकाला अटक मिरा-भाईंदरच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने नयानगर परिसरात ईशा वाईन शॉपसमोर गस्त घालत असताना एका नायजेरियन नागरिकाला रंगेहात पकडले. आरोपीकडून तब्बल २६१.५ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले असून, आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत सुमारे ७८ लाख ४५ हजार रुपये आहे. या प्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (NDPS) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास पोलीस करत आहेत.0
0
Report
Advertisement
कराड के शहापुर के शहीद अर्जुन जाधव का अंतिम संस्कार हजारों श्रद्धांजलि के साथ
Satara, Maharashtra:सातारा : देशसेवेत प्राणांची आहुती देणारे कराड तालुक्यातील शहापूर येथील शहीद वीर जवान अर्जुन राजेंद्र जाधव यांना आज हजारो नागरिकांच्या उपस्थितीत भावपूर्ण अखेरची मानवंदना देण्यात आली. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भारत माता की जय आणि वीर जवान अमर रहे अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये देशासाठी कर्तव्य बजावत असताना झालेल्या भीषण स्फोटात जवान अर्जुन जाधव यांना वीरमरण आले. त्यांच्या शौर्यपूर्ण बलिदानामुळे शहापूर गावासह संपूर्ण सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. अवघ्या काही दिवसांनंतर, १५ जून रोजी सुट्टीवर घरी येऊन आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. मात्र, देशसेवेच्या कर्तव्यात त्यांनी सर्वोच्च बलिदान दिल्याने हे स्वप्न अपूर्णच राहिले. शहीद अर्जुन जाधव यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यांच्या बलिदानाबद्दल उपस्थितांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.0
0
Report
येवला कांदा लिलाव में भाव कम, किसान नाराज़, सरकारी खरीदी केंद्र की मांग तेज
Yeola, Maharashtra: कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे वांदे संपण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र येवला कृषी उत्पन्न बाजार समिती पाहण्यासाठी मिळत आहे. शासकीय कांदा खरेदी केंद्र अद्याप सुरू झालेले नसताना शासकीय कांदा खरेदी केंद्र पेक्षा बाजार समितीतील कांदा लिलावात कमी बाजार भाव मिळत आहे आज सकाळच्या कांदा लिलाव सत्रात 400 वाहनातून शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणला होता या कांद्याला जास्तीतजास्त 1470 रुपये, कमीतकमी 300 रुपये तर सरासरी 1000 ते 1100 रुपये दर मिळत आहे तर दुसरीकडे जिल्ह्यातील शासकीय कांदा खरेदी केंद्रावर 1580 रुपयांचा प्रति क्विंटलला दर मिळतो यामुळे येवला येथे नाफेड, एनसीसीएफ मार्फत शासकीय कांदा खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी...0
0
Report
पवार गुट के विलय पर चर्चा नहीं, शिंदे ने दिया स्पष्ट बयान
Satara, Maharashtra:सातारा - काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विलीनीकरणाची कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचा वर्धापन दिन कालच झालेला असताना जाणून-बुजून ही चर्चा घडवली जात असल्याचा आरोप देखील शिंदे यांनी केला आहे. आमच्या पक्षाची ध्येयधोरणे कालच ठरलेली असताना कोणीतरी हा विषय करतो याचं आश्चर्य वाटत असल्याचे शशिकांत शिंदे यांनी सांगितला आहे. संजय राऊत यांच्या म्हणण्याप्रमाणे इंडिया आघाडीला एकत्र करण्यासाठी शरद पवारांनी प्रयत्न करावेत. सगळ्यांनी एकत्र येत विरोधकांची फळी निर्माण करण्यासाठी शरद पवारांनी पाऊल उचलायला सुरुवात केली आहेत. विलीनीकरणाबाबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या चर्चा का होतात याबाबत मला आश्चर्य वाटतं. अजित पवारांच्या वेळी देखील आणि आता काँग्रेसच्या वेळी देखील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विलीनीकरणाचीच चर्चा केली जाते या कुठल्याही बातमीत तथ्य नसल्याचं शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केलंय.0
0
Report
Advertisement
अंबरनाथ में जीआईपी डैम से टँकर माफियाओं द्वारा पानी चोरी, कड़ी कार्रवाई की मांग
Ambernath, Maharashtra:अंबरनाथमध्ये रेल्वेच्या जीआयपी धरणातूनही टँकर माफियांची पाणीचोरी परवानगी नसतानाही टँकर भरून हजारो रुपयांना विक्री अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत जांभिवली पाडा गावालगत रेल्वेचं जीआयपी धरण आहे. या धरणाला लागून रेल नीरचा प्लँट असून धरणातलं पाणी या प्लँटसाठी वापरलं जातं. मात्र धरणाच्या भिंतीपलीकडे टँकर माफियांनी करामती केल्याचं समोर आलंय. धरणातलं पाणी बाहेर येण्यासाठी या टँकर माफियांनी करामती केल्याची चर्चा आहे. या टँकर माफियांवर तात्काळ कारवाई करून धरणाची गळती थांबवण्याची मागणी यानंतर केली जातेय.0
0
Report
निफ़ाड के नैताळे में अज्ञात चोरों ने लाखों के सोने की चोरी की
Niphad, Maharashtra:नाशिकच्या निफाड तालुक्यातील नैताळे येथील गाजरवाडी रोडवरील शेतकरी साहेबराव शिवराम तुपलोंढे यांच्या घरी मध्यरात्री पावणेतीन वाजेच्या सुमारास तीन ते चार अज्ञात चोरट्यानी जबरी चोरी केली 1 लाख 44 हजार रुपयाचे सोन्याचे दागिने व 7 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून पोबारा केला वृद्ध शेतकरी साहेबराव चोरांच्या मागे पळाले यांना दगड मारल्याने जखमी झाले आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरणात निर्माण झाले आहे या जबरी चोरीची माहिती निफाड पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरु केले चोरांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे0
0
Report
सक्षम हत्या के बाद आंचल का घर में रहने का दावा, प्रेम कहानी में मोड़
Nanded-Waghala, Maharashtra:प्रेयसीने मृतदेहाशी लग्नकेल्याने देशभर गाजलेल्या सक्षम - आंचल प्रेमप्रकरणात नवीन वळण आले आहे. सक्षमच्या मृत्युनंतर आपण आजन्म सक्षम बनून त्याच्या घरी राहणार असल्याचे आंचल ने जाहीरपणे सांगितले होते. पण आंचल सक्षमचे घर सोडून नातेवाईकाकडे निघून गेलीये. नांदेड शहरातील ही प्रेम कहाणी आहे. नोव्हेबर 2025 मध्ये सक्षम ताटे या तरुणाचा खूण करण्यात आला होता. Preyसीचा भाऊ, त्याचे साथीदार आणि वडिलांनी गोळ्या घालून आणि दगडाने ठेचून सक्षमचा खूण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मयत सक्षम आणि आंचलचा भाऊ हे मित्र होते. सक्षम आणि आंचलचे प्रेमप्रकरण माहित झाल्यावर आंचल च्या कुटुंबीयांकडून विरोध सुरु झाला होता. पण तरीही दोघांचे प्रेमसंबंध सुरु असल्याने सक्षमची हत्या करण्यात आली. हत्या करणारा आंचलचा भाऊ, त्याचे साथीदार आणि वडील हे गुन्हेगारी पाश्वभूमीचे आहेत. सक्षमवरही काही गुन्हे दाखल होते. सक्षमच्या हत्येच्या दुसऱ्या दिवशी अंतयात्रा निघण्यापूर्वी आंचल त्याच्या घरी पोहोचली आणि तिने टाहो फोडला. सक्षमच्या मृतदेहाला हळद कुंकू लाऊन आंचलला हळद कुंकू लाऊन मृतदेहासोबत लग्न लावन्यात आल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. देशभरात ही बातमी त्यावेळी गाजली होती. सक्षम गया तरी मी आजन्म सक्षम बनून त्याच्या घरीच राहणार असे सर्व माध्यमाना आंचल ने सांगितले होते. पण तीच आंचल सक्षमच्या घरून निघून गेल्याची माहिती आहे. मार्च महिन्यात आंचल तिच्या नातेवाईकांकडे गेल्याची माहिती आहे.0
0
Report
Advertisement
बीड़ में पेट्रोल भरवाने आए तीन युवकों ने पंप कर्मचारी की पिटाई CCTV में कैद
Beed, Maharashtra:माजलगाव शहरातील अशोक कुमार पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या तीन तरुणांनी कर्मचाऱ्याला अमानुष मारहाण केल्याची घटना घडली. संबंधित बाजूचे नोजल बंद असल्याने कर्मचाऱ्याने दुचाकी दुसऱ्या बाजूने आणण्यास सांगितले. याचा राग आल्याने तिघांनी कर्मचाऱ्याला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. ही संपूर्ण घटना पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.0
0
Report
मानसून पूर्व बरसात से खरीप तैयारी तेज; वाशिम के किसान पेरणी-पूर्व मशागती में व्यस्त
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसामुळे खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला असून शेतकरी पेरणीपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात पूर्ण करत आहेत. बी-बियाणे व रासायनिक खतांच्या खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे.यंदा जिल्ह्यात ३ लाख ९४ हजार १८० हेक्टर क्षेत्रावर विविध खरीप पिकांच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले असून त्यापैकी ३ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन लागवडीचे उद्दिष्ट आहे.सोयाबीनचे क्षेत्र मोठे असल्याने शेतकऱ्यांनी मान्सूनचा पाऊस सक्रिय झाल्याशिवाय घाई न करता ८० ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. तसेच जिल्ह्यात बी-बियाणे व खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.0
0
Report
रत्नागिरी में ड्रग्स नेटवर्क के दो तस्कर गिरफ्तार, चार जिलों से तड़ीपार
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्ह्यात अमली पदार्थ विक्री आणि गुन्हेगारीविरोधात पोलिसांनी आक्रमक पाऊल उचललं आहे. जिल्ह्यात ड्रग्जचे जाळे पसरवणाऱ्या आणि तरुणाईला विळख्यात ओढणाऱ्या दोन सराईत ड्रग्ज तस्करांवर प्रशासनाने तडीपारीचा मोठा हातोडा मारला आहे. उपविभागीय दंडाधिकारी जीवन देसाई यांनी या दोघांना रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि कोल्हापूर अशा तब्बल चार जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. मोहम्मद ताहिर इब्राहिम मस्तान आणि झahiर मेहमुद काझी अशी तडीपार करण्यात आलेल्या दोन कुख्यात गुन्हेगारांची नावे आहेत. या दोघांवर अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखĺल आहेत. या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील ड्रग्ज माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.0
0
Report
Advertisement
चाकण पुलिस ने अवैध शराब के अड्डे तोड़कर 4 आरोपी गिरफ्तार किए
Shirur, Maharashtra:अवैध दारूविक्री आणि धंद्यांविरोधात पोलिसांनी कडक पावले उचलत मोठी कारवाई केली आहे. दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध रित्या थाटलेले दारूचे अड्डे जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात काही दिवसांपूर्वीच विषारी दारूमुळे २२ जणांचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी दक्षिण महाळुंगे पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. येथील शासकीय आणि एमआयडीसीच्या जागेवर अनधिकृत झोपड्या बांधून गावठी दारूची विक्री केली जात होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली असून, या मोहिमेत ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.0
0
Report
नंदूरबार में एम्बुलेंस सेवाएं बदहाल, अस्पतालों में समय पर इलाज मुश्किल
Dhule, Maharashtra:राज्यात सर्वात गरीब जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आरोग्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. जिल्ह्यातील अनेक सरकारी रुग्णवाहिका या मृत्यूशयेवर आहेत. रुग्णवाहिका सेवेचा बोजवारा जिल्ह्यात वाजला असताना, याकडे लक्ष द्यायला कुठलाही लोकप्रतिनिधी अथवा प्रशासनातील अधिकारीाला वेळ नाही ही परिस्थिती आहे. अचानक ॲम्बुलन्स बंद पडणं, बंद पडलेल्या ॲम्बुलन्स रुग्णालय परिसरांमध्ये धूळ खात बसणं हे चित्र जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य आहे. नंदुरबार जिल्ह्यातील रुग्णवाहिका सेवेची अवस्था दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. प्रशासनाकडून जिल्ह्यात पुरेशा रुग्णवाहिका उपलब्ध असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रे, तालुका रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयांमधील रुग्णवाहिका नादुरुस्त अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः १०८ रुग्णवाहिका सेवेबाबत अनेक तक्रारी समोर येत आहेत. काही रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी कार्यशाळेत पाठवण्यात आल्या आहेत, तर काहींची मुदत संपूनही त्या अद्याप रस्त्यावर धावत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेवर सेवा मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. तसेच ज्या ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध नसते, तेथे अन्य केंद्रांमधून रुग्णवाहिका पाठवण्यात येत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती पाहता हा दावा कितपत खरा आहे, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. जिल्ह्यातील रुग्णवाहिका सेवेची वस्तुस्थिती नेमकी काय आहे,0
0
Report
आहिल्यानगर में गर्भलिंग निदान अवैध गर्भपात रैकेट: 21 आरोपी गिरफ्तार
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुचर्चित गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात रॅकेटचा तपास दिवसेंदिवस अधिक खोलवर जात आहे. पोलिसांनी आणखी एक डॉक्टर आणि एजंटला अटक केली असून, या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता 21 वर पोहोचली आहे. लोणी पोलिसांनी सुरू केलेल्या तपासात पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या गर्भलिंग निदान रॅकेटचे मोठे जाळे समोर आले आहे. निफाड येथील डॉक्टर कुणाळ वलटे, मेडिकल चालक सागर उन्हाळ, घोगरगाव येथील मेडिकल चालक जालिंदर बोरुडे, एजंट राम पवार उर्फ तपोश शिबू सरकार तसेच पुण्यातील डॉ. अतुल जाधव यांना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान आरोपींकडून गर्भलिंग निदानासाठी वापरली जाणारी पाच सोनोग्राफी मशीन, चार चारचाकी वाहने आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या 21 आरोपींपैकी तब्बल 7 डॉक्टरांचा समावेश आहे. या रॅकेटचे आणखी धागेदोरे शोधण्यासाठी पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे. गर्भलिंग निदानासारख्या गंभीर गुन्ह्याच्या या प्रकरणात आणखी काही डॉक्टर आणि एजंट रडारवर असल्याची माहिती समोर येत असून, पोलिसांच्या तपासातून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.0
0
Report
Advertisement
