445001
यवतमाळ : महिला बँक घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या बाबाजी दाते महिला बॅंकेत २४२ कोटींच्या अपहार प्रकरणात महिनाभराने अटकसत्र सुरू झाले आहे. पोलिसांनी शिवसेना नेते रमेश अगरवाल, व्यावसायिक प्रकाश पिसाळ आणि ठेकेदार प्रशांत पामपट्टीवार यांना अटक केली आहे. याआधी बँकेच्या CEO सुजाता महाजन, तिचा पती विलास महाजन, ॲड. वसंत मोहरेकर आणि नवलकिशोर मालाणी यांना अटक झाली होती. आता अटक केलेल्या आरोपींची संख्या सात झाली आहे. २०६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, ज्यामुळे संचालक व लेखा परीक्षक चिंतेत आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
कोयना जलविद्युत परियोजना में पानी घटा, चारों केंद्र अस्थाई बंद, विद्युत संकट की संभावना
Satara, Maharashtra:सातारा - राज्यातील सर्वात मोठ्या जलविद्युत प्रकल्प असलेल्या कोयना धরণातील पाणीसाठा आता चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. धरणात केवळ 15 टीएमसी पाणी शिल्लक असून जिवंत पाणीसाठा 10 टीएमसीवर आला आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी कोयना प्रकल्पातील चारही वीज निर्मिती केंद्रे तात्पुरती बंद करण्यात आली आहेत. ज्या वेळी राज्याला गरज असेल त्याच वेळी कोयना धरणातून वीज निर्मिती केली जाणार आहे. विशेष म्हणजे, यंदा कोयना प्रकल्पातून 3 हजार 271 दशलक्ष युनिट इतकी विक्रमी वीज निर्मिती झाली असली तरी मात्र आता पाण्याअभावी वीज निर्मितीवर निर्बंध लावण्यात आले आहेत. अत्यावश्यक गरज असेल तेव्हाच वीज निर्मिती केली जात असून त्यानंतर केंद्रे पुन्हा बंद केली जात आहेत. अतिरिक्त पाण्यासाठी कृष्णा लवादाकडे मागणी करण्यात आली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास महाराष्ट्राला परराज्यातून वीज खरेदी करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे मान्सून लांबल्यास राज्यासमोर पुन्हा वीज संकट उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.0
0
Report
कोकण किनारपट्टी से 9 हजार करोड़ की उलाढाल, महाराष्ट्र ने सागरी उत्पादन में दबदबा बना लिया
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. मत्स्य उत्पादनात रत्नागिरी जिल्ह्याचा दबदबा.. कोकण किनारपट्टीवर 9 हजार कोटींची उलाढाल.. रत्नागिरी जिल्हा दुसऱ्या स्थानी.. युद्ध परिस्थिती आणि हवामान बदलामुळे निर्माण झालेली विविध आव्हाने यावर मात करत भारताच्या सागरी उत्पादनांच्या निर्य_exports_तने आर्थिक वर्ष 2025-26 यामध्ये 72 हजार 325.82 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे.. मरीन प्रोडक्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटीच्या आकडेवारीनुसार देशाच्या या यशात महाराष्ट्राच्या विशेषता कोकण किनारपट्टीचा सिंहाचा वाटा आहे.. राज्य मत्स्य व्यवसाय विभाग आणि सेंट्रल मरीन फिशरीष रिसर्च इन्स्टिट्यूट या अहवालानुसार महाराष्ट्राच्या सागरी नियर निर्यातीमुळे देशाच्या तिजोरी तब्बल 7 हजार 343 कोटी 41 लाख रुपयांचे परकीय चलन जमा झाले आहे.. या आर्थिक वर्षात महाराष्ट्राचे एकूण सागरी मत्स्य उत्पादन 3 लाख 10 हजार 777 मॅट्रिक टनांवर पोहोचले असून कोकणात सुमारे 8 हजार 500 ते 9 हजार कोटी रुपयांची भव्य आर्थिक उलाढाल झाली आहे..0
0
Report
रत्नागिरी में स्थानीय निकाय चुनाव: 12 आवेदन वैध, आख़िरी माघारण कल तय
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक: सर्व १२ अर्ज वैध; गुरुवारी कोण माघार घेणार? रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठी घडामोड समोर आली आहे.. मंगळवारी झालेल्या छाननीत दाखल झालेले सर्व ६ उमेदवारांचे एकूण १२ अर्ज वैध ठरले आहेत,अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांनी दिली. आता सर्वांचे लक्ष उद्या,गुरुवार ४ जून या अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीकडे लागले आहे.त्यामुळे अखेरच्या दिवशी कोण माघार घेणार आणि निवडणुकीचे अंतिम चित्र काय असणार,याबाबत कोकणवासीयांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.0
0
Report
Advertisement
मान्चर में तूफानी बारिश से प्याज भंडारण ढहाव, किसान संघर्ष बढ़े
Shirur, Maharashtra:मान्चर क्षेत्र में पिछले कुछ दिनों से प्याज के बाजार भाव गड़बड़ रहने के कारण प्याज उत्पादक किसान कठिन परिस्थितियों में हैं। इस बीच राज्य भर में प्याज की कीमतों के बढ़ाने के लिए आंदोलन चल रहा है, ताकि किसानों को अच्छा मूल्य मिल सके। वादळी हवा और बारिश के कारण वखारी में रखे प्याज की हालत खराब होने लगी है। आंबेगाव तालुक्यात खड़की क्षेत्र में वादळी प्यसाच्या पावसाने प्याज चाळी के छप्पर उड़ने से लगभग 900 पिशवी प्याज भीग गए, जिससे किसानों के सामने आय और बच्चों की शिक्षा जैसी स्थानीय जरूरतों को लेकर चिंता बढ़ गई है। इस नुकसान की समीक्षा हमारे प्रतिनिधि Hemant Chapude ने की।0
0
Report
चांदवड के श्री रेणुकामाता मंदिर में अधिक महिनों में महिला-पुरुष भक्तों की भारी भीड़
Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील श्री रेणुका माता मंदिरात अधिक महिना अर्थात पुरुषोत्तम मासानिमित्त महिला भाविकांची मोठी गर्दी होत आहे हिंदू धर्मपरंपरेनुसार तीन वर्षांनी येणारा अधिक महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या महिन्यात विविध धार्मिक विधी, पूजाअर्चा, दानधर्म तसेच लेक-जावयाला घरी बोलावून पुरणपोळीचे जेवण देण्याची परंपरा आहे यावेळी लेक आणि जावयाला कपडे भेट देत तेहतीस बत्तासे किंवा अनारशांचे वाण देण्याची प्रथा देखील पाळली जाते याचबरोबर भाविक आपल्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी जाऊन देवीची ओटी भरतात आणि तेहतीस बत्तासे किंवा अनारशांचे वाण अर्पण करतात या पार्श्वभूमीवर चांदवड येथील श्री रेणुका माता मंदिरात महिला भाविकांसह पुरुष भाविकांचीही मोठी गर्दी होत देवीच्या चरणी नतमस्तक होऊन महिला भाविकांकडून ओटी भरणे, वाण अर्पण करणे आणि विशेष पूजाविधी करण्यात येत आहेत अधिक महिन्याच्या निमित्ताने दररोज सुमारे १० ते १५ हजार भाविक चांदवड येथील श्री रेणुका माता मंदिरात दर्शनासाठी येत असल्याने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे0
0
Report
सांगली-सातारा विधान परिषद: अभयसिंह जगताप महाविकास आघाडी के शरद पवार गुट के आधिकारिक उमेदवार
Sangli, Maharashtra:सांगली सातारा विधान परिषद निवडणूक - राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार असणार अभयसिंह जगताप.. बाळासाहेब पाटलांचा पक्षाचा अर्ज ठरला अवैध. सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार अब अभयसिंह जगताप असणार आहेत.राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून अभयसिंह जगतاپ आणि सांगलीच्या राष्ट्रवादीचे सरचिटणीस व जयंत पाटलांचे खाद्य समर्थक बाळासाहेब उर्फ प्रताप पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता,मात्र अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये बाळासाहेब पाटलांचा पक्षाचा अर्ज अवैध ठरला आहे,तर अपक्ष अर्ज वैध ठरला आहे,त्यामुळे आता सांगली सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीत अभयसिंह जगताप हे महाविकास आघाडीकडुन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार असणार आहेत,तर उद्या अर्ज माघार प्रक्रियेऊन त्यानंतरच निवडणुकीचा खरं चित्र स्पष्ट होणार आहे.0
0
Report
Advertisement
ई-केवाईसी अनिवार्य: 30 जून तक 5500+ किसान पेंडिंग, लाभ रोकना संभव
Washim, Maharashtra:वाशीम प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता मिळविण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य असतानाही वाशिम जिल्ह्यातील ५,५०० हून अधिक शेतकऱ्यांची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. ३० जून ही अंतिम मुदत असून ई-केवायसी न केल्यास संबंधित शेतकऱ्यांचा पुढील हप्ता अडकू शकतो. खरीप हंगाम तोंडावर असल्याने बियाणे,खते व इतर शेतीकामांसाठी या निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी पूर्ण करून योजनेचा लाभ कायम ठेवावा,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.0
0
Report
वाशीम पूस नदी पुल काम देरी से, मानसून से पहले पूरा करने की मांग
Washim, Maharashtra:अनसिंग ते वारा जहागीर मार्गावरील पूस नदीवरील पुलाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या कामाची गती अत्यंत संथ असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. सध्या वाहतूक सुरळीत सुरू असली तरी पावसाळ्यात पूस नदीला पूर आल्यानंतर हा मार्ग पूर्णपणे बंद होतो.त्यामुळे परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना १० ते १२ किलोमीटरचा अतिरिक्त फेरा मारून प्रवास करावा लागतो.शेतकरी,विद्यार्थी, रुग्ण तसेच नोकरदार वर्गाला याचा मोठा फटका बसतो. विशेषतःआपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याने पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम पूर्ण करण्याची मागणी जोर धरत आहे.0
0
Report
सोलापुर विधानपरिषद चुनाव: आदित्य फत्तेपुरकर का नामांकन खतरे में, दस्तखत पर जाँच होगी
Pandharpur, Maharashtra:विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपुरकर यांचा उमेदवारी अर्ज सूचकाच्या हरकतीमुळे बाद झाल्यानंतर आता काँग्रेस याबाबत न्यायालयात मागणार. काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जावर आपण सही केली नाही असे प्रतिज्ञापत्र सूचक नागेश भोसले यांनी दिले. त्यामुळे हा अर्ज बाद झाला.मात्र उमेदवारी अर्ज नागेश भोसले यांनी केलेली सही आणि नंतर प्रतिज्ञा पत्रावर केलेली सही या सारख्याच आहेत. यामध्ये कसलीही तफावत नाही त्यामुळे आता या दोन्ही सह्या एकच आहेत. हे सत्य समोर आणण्यासाठी न्यायालयात जाणार आहे. तसेच फॉरेन्सिक तपासणी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. नागेश भोसले यांनी दबावामुळे हा निर्णय घेतला हेही स्पष्ट होणार आहे. नागेश भोसले यांच्यासोबत काल भाजपचे आमदार नेते मंडळी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे संरक्षण होतं जर ते म्हणत असतील मी काँग्रेसचा नगरसेवक नसताना त्यांच्या अर्जावर सही का करू ? मग ते आता भाजपचे नगरसेवक आहेत का ? असा प्रश्न सुद्धा आदित्य फत्तेपूरकर यांनी उपस्थित केला आहे. भाजपच्या बद्दल सोलापुरातल्या लोकांमध्ये मोठा असंतोष आहे. तो असंतोष या विधान परिषदेच्या मतदानातून बाहेर येईल. अशी भिती भाजप नेत्यांना आहे त्यामुळेच त्यांनी काँग्रेस उमेदवारचा अर्ज कशातरी पद्धतीने बाद करण्यास षडयंत्र रचले आहे. वन टू वन - आदित्य फत्तेपूरकर0
0
Report
Advertisement
रत्नागिरी के गोपाळगड़ किले की सफाई, अफवाओं पर पुलिस का स्पष्ट संदेश
Ratnagiri, Maharashtra:गुहागर -रत्नागिरी.. रत्नागिरी पोलिसांकडून ऐतिहासिक गोपाळगड किल्ल्याची साफसफाई! अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन.. किल्ल्याच्या सद्यस्थितीबाबत शासन स्तरावर योग्य ती कार्यवाही सुरू असून,नागरिकांनी कोणत्याही अफवा किंवा दिशाभूल करणाऱ्या संदेशांवर विश्वास ठेवू नये,असे आवाहन पोलिसांनी केले आहे..0
0
Report
येवला-नांदगाव रोड पर इर्टिगा कार में आग, यात्री सुरक्षित बाहर निकलने में सफल
Yeola, Maharashtra:येवला तालुक्यातील येवला-नांदगाव रोडवरील सोमठाणा गावाजवळ रात्रीच्या सुमारास एका इर्टिगा कारला अचानक आग लागून वाहन पूर्णपणे जळून खाक झाले. कारमध्ये असलेल्या पाच ते सहा प्रवाशांनी प्रसंगावधान राखत तात्काळ बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच येवला अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. गाडीही येवल्याच्या दिशेने नांदगाव मार्गे मालेगाव कडे जात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.0
0
Report
रत्नागिरी में जलस्रोतों की गिरावट: पानी का स्तर 28.55% पर, एक माह में लगभग 15% कमी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यात जलसाठा घटला असून अठ्ठावीस टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. महिनाभरात पंधरा टक्के घट झाली आहे. अँकर, गेल्या काही दिवसांपासून हवामानात सततचे बदल, वाढता उष्मा आणि अनलिनोच्या प्रभावामुळे मानसून लांबवण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील जलस्त्रोत्रांमधील पाणीसाठा चिंतेचा विषय बनला आहे. जिल्ह्यातील नदी-नाले कोरडे पडले आहेत, धरणांमधील पाणीसाठाही झपाट्याने कमी झाला आहे. एप्रिल अखेर धरणांमध्ये 43.397% पाणी होते, मे महिन्यात ते थेट 28.55% वर आल्यामुळे महिनाभरात सुमारे 15% घट झाली आहे.0
0
Report
Advertisement
14 वर्षीय मामा ने आठ वर्ष की भतीजी के साथ लैंगिक अत्याचार, पालघर में मामला दर्ज
Palghar, Maharashtra:14 वर्षीय अल्पवयीन मुलाकडून आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार. पालघरच्या कासा पोलीस ठाणे हद्दीतील हळदपाडा येथील घटना. मामाकडे राहत असलेल्या आठ वर्षीय चिमुकलीवर 14 वर्षीय अल्पवयीन मुलगा लैंगिक अत्याचार केल्याची माहिती. राहत्या घराच्या बाजूला असलेल्या जुन्या घरात लैंगिक अत्याचार केल्याची माहिती. कासा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 64 आणि 65 अंतर्गत गुन्हा दाखल. लैंगिक अत्याचार करणारा 14 वर्षीय अल्पवयीन आरोपी पीडितेचा माम असल्याची माहिती.0
0
Report
रायगढ़ किले पर गैस-स्टोव पर रोक, शिवराज्याभिषेक के अवसर पर प्रशासन का निर्णय
Chendhare, Maharashtra:किल्ले रायगडावर गॅस, स्टोव्ह, चुलीच्या वापरावर बंदी. खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर या वस्तू वापरावर निर्बंध. शिवराज्याभिषेक सोहळ्या दरम्यान प्रशासनाचा निर्णय. अपघाताचा धोका टाळण्यासाठी दक्षता.0
0
Report
वेरुळ के श्री घृष्णेश्वर मंदिर में अधिकमास अभिषेक, 5–9 जून; गाभार दर्शन बंद
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिरात ५ ते ९ जून दरम्यान अधिकमासानिमित्त भव्य 'अतिरुद्र अभिषेक' सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा सलग २४ तास सुरू राहणार असल्याने, या पाच दिवसांच्या कालावधीत भाविकांना गाभाऱ्यातून दर्शन बंद राहील. देश-विदेशातून येणाऱ्या भक्तांना केवळ मुखदर्शनावरच समाधान मानावे लागणार आहे, श्री घृष्णेश्वर मंदिरात १९८५ पासून दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्यात विश्वशांतीसाठी अतिरुद्र अभिषेक करण्याची परंपरा आहे. यंदा देशभरातील ४०० ब्रह्मवृंदांचा सहभाग असेल. विशेष म्हणजे, हरिद्वार येथून आणलेल्या पवित्र गंगाजलाने हा महाअभिषेक पार पडणान असून, या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे..0
0
Report
Advertisement
