445001
यवतमाळ : महिला बँक घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या बाबाजी दाते महिला बॅंकेत २४२ कोटींच्या अपहार प्रकरणात महिनाभराने अटकसत्र सुरू झाले आहे. पोलिसांनी शिवसेना नेते रमेश अगरवाल, व्यावसायिक प्रकाश पिसाळ आणि ठेकेदार प्रशांत पामपट्टीवार यांना अटक केली आहे. याआधी बँकेच्या CEO सुजाता महाजन, तिचा पती विलास महाजन, ॲड. वसंत मोहरेकर आणि नवलकिशोर मालाणी यांना अटक झाली होती. आता अटक केलेल्या आरोपींची संख्या सात झाली आहे. २०६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, ज्यामुळे संचालक व लेखा परीक्षक चिंतेत आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
headline
Latur, Maharashtra:एमपीएससी पेपरफुटीच्या आरोपांवरून राजकीय वाद चिघळला; किल्लारीनंतर आता औशातही गुन्हा दाखल..... एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांची बदनामी केल्याप्रकरणी किल्लारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अल्या नंतर आता औसा पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून भाजपा आमदार अभिमन्यू पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यातील वाद आता पोलिसांपर्यंत पोहोचला आहे. महेबूब शेख यांनी आमदार अभिमन्यू पवार यांचा एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील आरोपीशी थेट संबंध असल्याचा आरोप केला होता. या आरोपांवरून आमदार अभिमन्यू पवार यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत, महेबूब शेख यांच्याविरोधात औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कुठलाही ठोस पुरावा नसताना बिनबुडाचे आरोप करून आमदार अभिमन्यू पवार यांची बदनामी केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीवरून औसा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे एकीकडे एमपीएससी पेपरफुटीचे आरोप... तर दुसरीकडे या आरोपांविरोधात पोलिसांत तक्रारी... आणि आता महेबूब शेख यांच्याविरोधात थेट गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.....0
0
Report
अहिल्यानगर गणेशोत्सव: ध्वनि प्रदूषण पर रोक, लेज़र-प्लाज़्मा लाइट पर बैन
Shirdi, Maharashtra:आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर Ahilyanagar जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत... गणेशोत्सवात लेझर आणि प्लाझ्मा लाईटचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली असून, ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्यात येणार आहे... जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी याबाबतची माहिती दिली आहे... आगामी गणेशोत्सव ध्वनी प्रदूषणमुक्त आणि शांततेत पार पडावा, यासाठी अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे... दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी सर्व संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत... गणेशोत्सवादरम्यान लेझर आणि प्लाझ्मा लाईटचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे... तसेच सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषणाबाबत निश्चित केलेल्या डेसिबल मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर आणि संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत...0
0
Report
साई बाबा मंदिर में कृष्ण जन्माष्टमी पारंपरिक तरीके से स्वागत, भक्तों की भीड़
Shirdi, Maharashtra:श्रद्धा आणी सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या मंदिरातही श्रीकृष्ण जन्माचे पारंपारीक पद्धतीने स्वागत करण्यात आले.. गोकुळाष्टmatik उत्सवानिमित्त साईबाबा समाधी मंदिरात रात्री 10 ते 12 वाजेपर्यंत ह.भ.प. राजेंद्र मांडेवाल यांचे श्रीकृष्णजन्म कीर्तन झाले आणी पाळणा गात श्रीकृष्ण जन्माचे स्वागत करण्यात आलेय.. या जन्मोत्सव सोहळ्यात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, गावकरी आणी मोठ्या संख्येने साईभक्त सामील झाले..0
0
Report
Advertisement
पंढरपूर के विठ्ठल मंदिर में कृष्ण जन्माष्टमी का मध्यरात्रि उत्सव सम्पन्न
Pandharpur, Maharashtra:श्री विठ्ठल हा कृष्णाचा अवतार असल्याने पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये मध्यरात्री कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा साजरा करण्यात आला. कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने मंदिराच्या सभामंडपामध्ये पाळण्यात बांधण्यात आला होता. भजन कीर्तन म्हणत पारंपारिक पद्धतीने यावेळी कृष्णजन्म सोहळा साजरा करण्यात आला. यानंतर विठुरायाला सुंदर असा पोशाख करण्यात आला होता विठुरायाच्या मस्तकावर 110 हात लांब लाल रंगाचे सुंदर पागोटे बांधण्यात आले. चांदीचे काठी असा कृष्ण रुपातला पोशाख देवाला करण्यात आला होता यानंतर उपस्थिताना सुंठवड्याचा प्रसाद वाटण्यात आला0
0
Report
कल्वण के विसापुर आश्रम स्कूल में छात्रों की सेहत गंभीर, 8‑वर्षीय सृष्टी की मौत के बाद 24 से अधिक भर्ती
Nashik, Maharashtra:कळवण ( नाशिक ) : ब्रेकिंग.. - विसापूर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रकृतीचा प्रश्न गंभीर.. - ८ वर्षीय सृष्टी सूर्यवंशीच्या मृत्यूनंतर आणखी २४ विद्यार्थी रुग्णालयात दाखल... - विद्यार्थ्यांना उलटी, तापासह विविध सौम्य लक्षणे.. - केवळ खबरदारीचा उपाय म्हणून कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल.. कळवण तालुक्यातील विसापूर शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। ८ वर्षीय सृष्टी सूर्यवंशीच्या मृत्यूनंतर आश्रमशाळेतील आणखी २४ हून अधिक विद्यार्थ्यांना उलटी, तापासह विविध सौम्य लक्षणे असल्याने केवळ खबरदारीचा उपाय म्हणून कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी रुग्णालयात दाखल विद्यार्थ्यांच्या प्रकृतीचा आढावा घेतला आहे.. दरम्यान, आश्रम शाळेत इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या सृष्टी सूर्यवंशी हिचा मृत्यू झाल्यामुळे आश्रमशाळेतील आरोग्य सुविधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.0
0
Report
सोलापूर ब्रेकिंग: ठेकेदार 7 सितम्बर को जिलाधिकारी कार्यालय के बाहर आंदोलन करेंगे
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : राज्यातील सरकारी कंत्राटदारांचे 7 सप्टेंबरला राज्यभरात आंदोलन - राज्यातील सरकारी कंत्राटदार राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार - राज्यातील कंत्राटदारांच्या झालेल्या आत्महत्या संदर्भात राज्य कंत्राटदार महासंघाचा सरकारला इशारा. - राज्य शासनाकडे राज्यातील कंत्रादारांचे मागील अनेक वर्षांपासून 86 हजार कोटी रुपये बील थकीत आहेत. - त्यामुळे राज्यातील विविध भागात कंत्राटदारांनी आत्महत्या केलीय. - येत्या 7 सप्टेंबर रोजी सर्व शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येणार आहे. - राज्य कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांची माहिती.0
0
Report
Advertisement
वाशीम में पुलिस की भेष में लुटेरों ने लाखों का सोना चुरा लिया
Washim, Maharashtra:वाशीममें पुलिस होने की बतावणी करते नागरिकाला लुटणाऱ्या टोळीचा कारनामा समोर आला है। सोनखास रोड पर एका व्यक्तीला अडवून त्याच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेण्यात आले. हातचलाखीने दागिने बदलून आरोपींनी तब्बल साडेसहा लाख रुपयांचे सोने लंपास केले। तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने परळी वैजनाथ येथील हसन अली शेखु बेग याच्यापर्यंत धागा पोहोचवला। घरझडतीत चोरीची सोन्याची चैन आणि दोन अंगठ्या हस्तगत करण्यात आल्या। मात्र कारवाईची चाहूल लागताच हसन अली फरार झाला असून, पोलिसांकडून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.0
0
Report
गोकुळ दूध संघ के चुनाव: 5332 संस्थाओं की अंतिम मतदाता सूची प्रकाशित
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी निश्चित करण्यात आली आहे. या यादीमध्ये 5332 संस्थाांचा समावेश झाला आहे. निवडणूक कार्यक्रमापूर्वीच प्रत्येक टप्प्यावर चौकशी, सुनावणी आणि न्यायालयीन लढाई झाल्यामुळे नेमक्या किती संस्था पात्र होणार यासंदर्भात संभ्रम होता. पण अखेर मोठ्या न्यायालयीन लढ्यानंतर 5332 संस्था या मतदानासाठी पात्र झाल्या आहेत.0
0
Report
पुणे: दुचाकी से मंगलसूत्र चोरी करने वाले चोर गिरफ्तार; चार लाख रुपये का माल बरामद
Pune, Maharashtra:पुणे दुचाकी वर येऊन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवणाऱ्या चोरट्याला दरोडा आणि वाहन चोरी पथक युनिट दोन ने पाठलाग करून पकडले.. स्वप्निल सतीश आहेर राहणार पापडे वस्ती असं महिलांच्या गळ्यातील चोरी करणाऱ्या चोरट्यांचे नाव .आरोपी आहेर याने वडगाव शेरी मांजरी आणि इतर भागातून रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकी वरून येऊन ओरबाडून न्यायचा याबाबत आरोपी स्वप्निल आहेर यांच्या विरोधात चंदन नगर आणि मांजरी पोलिसात गुन्हे दाखल होते. या चोरीच्या घटनांचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता.. आरोपीची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात. आरोपी स्वप्नील आहेर यांच्याकडून पोलिसांनी तब्बल चार लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.0
0
Report
Advertisement
हिंगोली के जिल्हाधिकारी ने निरीक्षण किया: शिक्षा और स्वास्थ्य सेवाओं का सीधे आकलन
Hingoli, Maharashtra:अँकर - हिंगोली जिल्ह्यातील विकास कामे आणि नागरिकांना उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक व आरोग्य सुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्ह्यातील गोरेगाव सवना येथील आपले सरकार सेवा केंद्र, आयुष्मान केंद्र आणि जिल्हा परिषद शाळांच्या सुरू असलेल्या कामांची स्वतः जाऊन पाहणी केली आहे, जिल्हाधिकाऱ्यांच्या अचानक भेटीमुळे प्रशासकीय यंत्रणेत चांगलीच धावपळ उडाल्याच पाहायला मिळाल आहे.. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळेस नागरिकांशी संवाद देखील साधला आहे नागरिकांना काही अडचणी असतील तर थेट तक्रार नोंदवा तात्काळ कारवाई केली जाईल असा आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना दिले आहे..0
0
Report
अकोला में खरीफ फसलें संकटग्रस्त, सोयाबीन और कपास सूखने लगे
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामावर मोठे संकट ओढावले आहे. मुर्तीजापूर, बाळापूरसह जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये सोयाबीन आणि कपाशी या प्रमुख पिकांनी पावसाअभावी माना खाली टाकल्या आहेत. अनेक भागांमध्ये सोयाबीनचे पीक अक्षरशः सुकून चालले असून, तोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या महिनाभरापासून समाधानकारक पाऊस न झाल्याने जमिनीत ओलावा शिल्लक राहिलेला नाही. परिणामी, सोयाबीन आणि कपाशीच्या पिकांवर त्याचा मोठा विपरीत परिणाम दिसून येत आहे. विशेषतः सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यातच पावसाने दडी मारल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या खर्चातून बियाणे, खते आणि औषधांची फवारणी करत पिके जगविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता पावसाअभावी उभी पिके डोळ्यादेखत करपताना दिसत आहेत. काही भागांमध्ये सोयाबीनचे पीक पूर्णपणे सुकल्याची स्थिती असून कपाशीची वाढही खुंटली आहे. एकीकडे आधीच नैसर्गिक संकटे आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना, आता पावसाच्या प्रदीर्घ खंडाने त्याच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. आगामी काही दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर जिल्ह्यातील खरीप उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.दरम्यान, नुकसानग्रस्त भागांची शासनाने तातडीने पाहणी करून पिकांचे पंचनामे करावेत आणि परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत अकोला जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सध्या अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून, आता दमदार पाऊसच त्यांच्या उभ्या पिकांना जीवदान देऊ शकतो.0
0
Report
मुंबई पुलिस ने दहीहंडी उत्सव के लिए चौकसी कड़ी कर दी; ड्रोन-सीसीटीवी निगरानी
Mumbai, Maharashtra:मुंबई पोलीस दलातर्फे सर्व मुंबईकरांना दहीहंडी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून शहरात सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या बंदोबस्तामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपासून ते अतिरिक्त पोलीस आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होणार आहेत. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे, अशा संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणांवर मुंबई पोलीस विशेष लक्ष ठेवणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या माध्यमातून महत्त्वाच्या ठिकाणांवर बारकाईने नजर ठेवली जाणार असून, नियंत्रण कक्षातून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. सर्व दहीहंडी मंडळांनी मानवी मनोरे रचताना प्रशासनाने ठरवून दिलेल्या उंचीच्या मर्यादेचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच अल्पवयीन मुलांना मानवी मनोऱ्यांमध्ये सहभागी करून घेऊ नये. सर्व नागरिकांनी उत्सव साजरा करताना स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि डीजेचा वापर करू नये. कोणतीही अनुचित घटना घडल्यास तात्काळ पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी १०० किंवा ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ पोलिसांकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा.0
0
Report
Advertisement
अगले दस सालों में मुंबई झोपडपट्टी मुक्त, महायुती के सपनों पर मुख्यमंत्री का विश्वास
Mumbai, Maharashtra:शिवसेना महाराष्ट्र राज्य प्रवक्ते अरुण सावंत. विषय : पुढील दहा वर्षात मुंबई झोपडपट्टी मुक्त होणार. मुंबई झोपडपट्टी मुक्त होणार म्हणजे प्रत्येक गोरगरीबाला झोपडपट्टीत राहणाऱ्याला सन्मानाचे सुरक्षित पक्के घर मिळणार. मुंबईकरांतर्फे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोरगरीब जनतेसाठी पुनर्विकासाची दिशा दिली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या परिवर्तनाचे लक्ष दिले आहे. पुढील दहा वर्षात मुंबई हे खरेखुरे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जागतिक दर्जाचे शहर झालेले पहावयास मिळेल. पुढील दहा वर्षे सुद्धा महाराष्ट्राची जनता महायुती सरकारवर विश्वास ठेवेल. त्यांच्याच हातात सत्तेच्या चाव्या असतील आणि जर का मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर केलं तर त्या पुढील दहा वर्षे सुद्धा महायुतीची सरकारच सत्तेमध्ये असेल असा मला ठाम विश्वास आहे.0
0
Report
750 से अधिक गोविंदा पथक, मागाठाणे में दहीहंडी महोत्सव भव्य तैयारी
Mumbai, Maharashtra:मुंबईच्या बोरीवली मागाठाणे विधानसभा मतदारसंघात उद्याच्या भव्य दहीहंडी महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. तारामती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने, आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेवक राज सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली या दहीहंडी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे यंदाच्या दहीहंडीच्या माध्यमातून मराठी शाळा वाचवण्याचा आणि मराठी भाषेच्या संवर्धनाचा संदेश देण्यात येणार आहे. दहीहंडी म्हटलं की मुंबईतील गोविंदा पथकांचा उत्साह, थरार आणि जल्लोष डोळ्यासमोर येतो. मागाठाणे विधानसभा मतदारसंघातही उद्याच्या दहीहंडी महोत्सवासाठी गोविंदा पथकांनी जोरदार सराव सुरू केला आहे. उंचच उंच मानवी मनोरे रचत हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकं सज्ज झाली आहेत. यंदाच्या महोत्सवात ७५० हून अधिक गोविंदा पथकं सहभागी होणार असून, यामध्ये तब्बल २० ते २५ महिला गोविंदा पथकांचाही सहभाग असणार आहे. मुंबई उपनगरातील मोठ्या दहीहंडी उत्सवांपैकी एक म्हणून मागाठाणे येथील दहीहंडी महोत्सवाकडे पाहिलं जातं. दरवर्षी हजारो गोविंदा आणि नागरिक या उत्सवाला उपस्थित राहत असतात. यंदाही दहीहंडीला मराठी कलाकार, अभिनेता, रील स्टार आणि विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींची उपस्थिती पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरही या महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. या संपूर्ण दहीहंडी महोत्सवासाठी तब्बल ८५ लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सहभागी गोविंदा पथकांना मानधनही देण्यात येणार आहे. मात्र यंदाच्या दहीहंडीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मराठी शाळा वाचवण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. दहीहंडीच्या माध्यमातून मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी शाळांच्या संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्नण्यात येत आहे. मागाठाणे विधानसभा मतदारसंघात उद्याच्या दहीहंडी महोत्सवासाठी सध्या जोरदार तयारी सुरू आहे. गोविंदा पथकांचा सराव अंतिम टप्प्यात आला असून, ७५० हून अधिक गोविंदा पथकं या महोत्सवात सहभागी होणार आहेत. महिला गोविंदा पथकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असणार आहे. त्यामुळे यंदाची दहीहंडी अधिक भव्य आणि आकर्षक ठरण्याची शक्यता आहे. एकूणच, गोविंदांचा थरार, ढोल-ताशांचा गजर, सेलिब्रिटींची उपस्थिती आणि मराठी शाळा वाचवण्याचा संदेश… या सर्वामुळे मागाठाण्यातील उद्याची दहीहंडी भव्यदिव्य ठरणार आहे.0
0
Report
गोरगांव वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे पर आरे मेट्रो स्टेशन के पास बस आग में जल गई
Mumbai, Maharashtra:गोरेगाव पूर्वेकडील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर आरे मेट्रो स्टेशनखाली धावत्या बसला अचानक भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. पाहता पाहता काही मिनिटांतच आगीने संपूर्ण बसला आपल्या कवेत घेतलं आणि बस जळून अक्षरशः खाक झाली. बसला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आगीची तीव्रता मोठी असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी शार्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र, बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. बसला नेमकी आग कशामुळे लागली, याचा तपास अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.0
0
Report
Advertisement
