icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

टाकळी में विलास घुले हत्या: 9 आरोपी गिरफ्तार, आंदोलन थमा

Beed, Maharashtra:आदिवासी तरुणाला वाचवताना गमावला जीव; विलास घुले हत्या प्रकरणात चार दिवसांनी आंदोलन मागे, अब सत्याचा शोध..! ग्राफिक्स - 20 जून रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हॉटेल गावकरी येथे कदमवाडी येथील नऊ ते दहा लोक आले. - अनैतिक संबंधातून एकाला मारहाण होत होती. त्यावेळी विलास घुले हा त्याला वाचवण्यासाठी मध्यस्थी झाला - त्याचवेळी आरोपींनी विलास याच्या पोटात चाकू खुपसला. - उपचारादरम्यान विलास चा मृत्यू झाला. - याप्रकरणी दीड दिवसानंतर नऊ आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला - केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला - सर्व आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला - दोन दिवसानंतर ही आरोपी अटक झाले नाहीत त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आंदोलन छेडले - दरम्यान पोलिसांनी फक्त तीन आरोपींना अटक केली - सर्व आरोपींना अटक करावी या मागणीसाठी चौथ्या दिवशी ग्रामस्थांनी केज शहरात ठिय्या आंदोलन घातले - दुपारपासून केज शहर बंद करण्यात आले - आमदार धनंजय मुंडे यांनी सभागृहात हा विषय हाती घेतला. - त्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आणि पुन्हा तीन आरोपींना अटक केली - या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपी अटकेत आहेत - कदमवाडी येथील आरोपी कदम कंपनी बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांच्या मुलाचे समर्थक असल्याचा ग्रामस्थांचा आरोप - खासदार पुत्र सौरभ सोनवणे याला आरोपी करण्याची मागणी - आठ तासापासून विलास घुले याचा मृतदेह पोलीस ठाण्याच्या बाहेर - आमदार धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे या दोघांचेही फोनवरून आंदोलनकर्त्यांना संवाद - लक्ष्मण हाके देखील घटनास्थळी पोहचले - खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाला आरोपी करा अन्यथा तीव्र आंदोलन छोडू लक्ष्मण हाके यांचा इशारा - संपूर्ण आरोपींना अटक होईपर्यंत ताब्यात घेणार नाही संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा - आरोपी अटक करण्याच्या मागणीसाठी मृतदेह चार दिवस ठेवण्यात आल्याचा बहुदा राज्यातली पहिलीच घटना - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोलिसांना सूचना - सौरभ सोनवणे याच्या विरोधात जबाब नोंदविल्यानंतर आंदोलन मध्यरात्री अखेर मागे - घटनेतील सर्वच 9 आरोपी पोलिसांकडून अटक *प्रकरणातील आरोपी बाबासाहेब गुरुबा कदम, मंगेश गोरख कदम, रामेश्वर गायकवाड , शुभम रामभाऊ गायकवाड, भैय्या साहेब गायकवाड, अजय उर्फ बंकट कदम, नवनाथ परसराम कदम, दिपक परसराम कदम आणि संतोष नरहरी कदम हे अटकेत आहेत.* ANC - बीड जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या टाकळी येथील विलास घुले हत्याप्रकरणात अखेर चार दिवसांनंतर आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. आदिवासी तरुणाला मारहाण होत असताना मध्यस्थी करणाऱ्या विलास घुले यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मुख्यमंत्री स्तरावर कारवाईचे आश्वासन, सर्व नऊ आरोपींची अटक आणि खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याच्याविरोधात पुरवणी जबाब नोंदविल्यानंतर आंदोलक शांत झाले. मात्र या हत्येमागील नेमकं सत्य काय, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. पाहूयात हा विशेष रिपोर्ट...
0
0
Report
Advertisement

कल्याण में 70 साल की वृद्ध महिला पर बेदम मारपीट, वीडियो वायरल

Kalyan, Maharashtra:कल्याण तालुक्यातील दहिवली गावात ७० वर्षीय वृद्ध महिलेला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. दोन महिन्यापूर्वी म्हणजेच १९ एप्रिलला बारकूबाई राऊत यांनाही मारहाण करण्यात आली होती. मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या प्रकरणी महिनाभरापूर्वीच टिटवाळा पोलीस ठाण्यात एनसी दाखल करण्यात आली आहे. शेतात जाणाऱ्या रस्त्याच्या वादातून बारकूबाई यांना ही मारहाण करण्यात आली होती. १९ एप्रिलच्या सकाळी बारकूबाई या शेतावर जात असताना शेजारी राहणाऱ्या बाबाजी चोरगे आणि त्यांच्या पत्नी कुसुम चोरगे यांच्यासोबत वाद झाला. या वादानंतर कुसुम आणि बाबाजी या पती पत्नीने बारकूबाई यांना मारहाण केली.यात बारकूबाई या जखमी झाल्या होत्या. त्यानंतर गावकऱ्यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला. मात्र दोन महिन्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलााय. आता मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
0
0
Report

भिवंडी-जासई कार रैली: एयरपोर्ट पर दि बा पाटील नाम की मांग

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यात यावं यासाठी आज भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांनी भिवंडी ते जासई कार रॅली काढली. दि बा पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त कार रॅली काढून दि बा पाटील यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी केंद्र सरकारने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देई पर्यंत आंदोलने सुरूच राहतील असा इशारा देत यामध्ये सत्ताधारी देखिल सहभागी होत असतील तर त्यांचेही स्वागत आहे अशी प्रतिक्रिया खासदार सुरेश म्हात्रे यांनी व्यक्त केलेय.
0
0
Report

यवतमाळ पहुंचेंगे उद्धव ठाकरे, संजय देशमुख के मामले पर पार्टी में उथलपुथल

Yavatmal, Maharashtra:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे फुटीर खासदार संजय देशमुख यांनी गद्दारी केली असून त्यांचा समाचार घेण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 26 जूनला यवतमाळमध्ये मुक्कामी येणार आहेत, 27 जूनला ते जाहीर सभा घेतील अशी माहिती संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी दिली आहे. देशमुख यानी केलेली गद्दारी आमच्या ज्वारी लागली असून त्याला तुडवणारच. पोलिसांची सुरक्षा बाजूला ठेवून त्यांनी पुढे यावे, त्याला धडा शिकवणारच असा इशारा देखील संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी दिला.
0
0
Report
Advertisement

जालना में ठाकरे गुट की शिवसेना आक्रामक, छह सांसदों के विरोध में भीख मांगो आंदोलन

Jalna, Maharashtra:जालन्यात ठाकरेंची शिवसेना आक्रमक,फुटलेल्या सहा खासदारांविरोधात भीक मांगो आंदोलन.. परभणीचे खासदार संजय जाधव दिसल्यास त्यांना तुडवणार, शिवसैनिक आक्रमक... जिल्हापमुखासह शहर प्रमुखांनी खोके आणि लोटा घेऊन मागितली भीक ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटलेल्या 6 खासदारांच्या विरोधात घोषणाबाजी करत केला जोरदार निषेध फुटलेल्या खासदारांना निधी म्हणून जालना शहरातील बस स्थानक आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांकडे भिक मागत केले आंदोलन अँकर : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटलेल्या 6 खासदारांच्या विरोधात आज जालन्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं,जालना शहरातील बस स्थानक परिसरात प्रवाशांकडून आणि नागरिकांकडून जिल्हाप्रमुख आणि शहर प्रमुखांनी एक एक रुपयांची भीक मागत हे अनोख केलं.शिवाय या सहाही खासदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा निषेधही नोंदवला. दरम्यान संजय राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे ऑपरेशन तुडवा आम्ही राबवणार असल्यासही पदाधिकाऱ्यांनी म्हटलय.
0
0
Report
Advertisement

धामणी के किसान आमरण अनशन, नियमित विद्युत कनेक्शन की मांग

Shirur, Maharashtra:आंबेगाव तालुक्यातील धामणी येथे उपसा सिंचन योजनांच्या शेतीपंपांना नियमित वीज जोडणी मिळावी, यासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू झाले आहे. माजी सरपंच सागर जाधव यांच्या नेतृत्वाखाली २५ शेतकरी गेल्या तीन दिवसांपासून ग्रामपंचायतीसमोर उपोषणाला बसले आहेत. धामणी आणि पहाडदरा परिसरातील शेतकऱ्यांनी सुमारे ७ कोटी रुपये खर्च करून डिंभे उजव्या कालव्यावर आधारित ९ उपसा सिंचन योजना उभारल्या आहेत. मात्र, महावितरणने नियमित वीज जोडणी न देता प्रायोगिक तत्त्वावर सौरऊर्जा प्रकल्प राबवला, जो पूर्णपणे अपयश ठरल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. कर्ज आणि दागिने गहाण ठेवून उभारलेल्या या योजनांसाठी तातडीने नियमित वीज जोडणी द्यावी, या मागणीवर शेतकरी ठाम असून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
0
0
Report

सोलापूर विश्वविद्यालय में कुलगुरु समेत अधिकारियों पर भंडारा, जत्था-आक्रोश चरम पर

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापूर विद्यापीठात कुलगुरुंसह अधिकाऱ्यांच्या अंगावर उधळला भंडारा सोलापूर विद्यापीठात कुलगुरुंसह अधिकाऱ्यांच्या अंगावर उधळला भंडारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातील अहिल्यादेवींच्या स्मारकाचे काम संथ गतीने सुरू असल्याने पदाधिकारी आक्रमक स्मारक समितीमधील पदाधिकारी शरणू हांडे यांनी हा भंडारा उधळला अहिल्यादेवी स्मारक समितीतील अधिकाऱ्यांना सुबुद्धी यावे यासाठी भंडारा उधळल्याचा दावा कुलगुरु प्रकाश महानवर यांच्यासह अधिकाऱ्यांच्या अंगावर भंडारा उधळल्यानंतर काळे वस्त्र दाखवत निषेध व्यक्त केला
0
0
Report

सांगली-सातारा: धैर्यशील कदम की जीत, 100 मतों के विवाद से गूंजे आरोप-प्रत्यारोप

Satara, Maharashtra:सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम विजयी झाले... मात्र विजयाच्या जल्लोषानंतर आता महायुतीतच आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला अपेक्षेपेक्षा तब्बल 100 मते अधिक मिळाल्याने ही मते नेमकी कुणाची फुटली, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी नाव न घेता पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांना 593 मते मिळाली, तर महाविकास आघाडीचे उमेदवार अभय जगताप यांना 292 मतांची साथ मिळाली. मात्र महाविकास आघाडीकडे केवळ 192 मतांचे संख्याबळ असताना अतिरिक्त 100 मते कुठून आली, हा आता चर्चेचा विषय ठरला आहे. याच मुद्द्यावरून मंत्री जयकुमार गोरे यांनी कराड येथे माध्यमांशी बोलताना महायुतीतील काही नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका केली. आम्ही हिशोबात पक्के आहोत, नक्की हिशोब करू, असे सांगत अनेकांच्या ओठात एक, मनात एक आणि कृतीत वेगळेच असल्याचा टोला त्यांनी लगावला. गोरे यांनी आपल्या प्रतिक्रियेत भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. मात्र मित्रपक्षातील बडे नेते शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांची नावे घेणे टाळल्याने राजकीय चर्चांना आणखी उधाण आले. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून सुरू असलेली महायुतीतील धुसफूस विधान परिषद निवडणुकीनंतरही कायम असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, मतदानापूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने धैर्यशील कदम यांना पाठिंबा जाहीर केला होता. तर भाजपने आपल्या मतदार सदस्यांची मते सुरक्षित राहावीत म्हणून त्यांना सहलीवरही पाठवले होते. तरीही 100 मतांचा घोळ नेमका कुठे झाला, यावरून संशयाचे वातावरण कायम आहे. महायुतीचा उमेदवार विजयी झाला असला तरी निकालानंतरचा वाद आता अधिक गडद होताना दिसत आहे. फुटलेल्या 100 मतांचा हिशोब नेमका काय, याचा शोध घेण्याची भाषा स्वतः मंत्री जयकुमार गोरे करत आहेत. त्यामुळे येत्या काळात सातारा जिल्ह्यातील महायुतीतील अंतर्गत संघर्ष आणखी उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही
0
0
Report
Advertisement

संजय काकापाटील का भाजपा में घर वापसी: सांगली के राजनीतिक समीकरण बदले

Sangli, Maharashtra:संजय काकापाटील का भाजपा में घर वापसी: 30 जून को उनका भाजपा प्रवेश होगा। संजयकाकांच्या प्रवेशामुळे सांगली जिल्ह्यातलं राजकीय गणित बदलेलं जाणार असल्याची चर्चा आहे. गेल्या वर्षभर राजकीय वनवासात असलेल्या संजयकाकांचा पुन्हा जोरदार कमबॅक होण्याची शक्यता आहे. भाजपात पुन्हा प्रवेशासाठी त्यांनी प्रयत्न केले, परंतु internal विरोधामुळे काही अडथळे आले होते. 30 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश जाहीर होण्याची शक्यता आहे. संजयकाकांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यातलं राजकीय समीकरण ताकदवान होणार असून, तासगाव, कवठेमहांकाळ, नगरपालिकेसह पंचायत समितीवर भाजपामय वातावरण निर्माण होईल.
0
0
Report

अकोला में भारी बारिश से पानी घुसा; नाले साफ नहीं—नगर निगम पर सवाल

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात काल सायंकाळी झालेल्या धुवाधार पावसाने नगर परिषदेच्या नालेसफाई मोहिमेच्या दाव्यांची पोलखोल केली आहे. पहिल्याच जोरदार पावसात शहरातील अनेक नाल्या तुंबल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा न होता ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. त्यामुळे अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. अंजनगाव मार्गावरील धारोळी वेस, शेख कॉलनी, गजानन नगर आदी भागांमध्ये नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा साचल्यामुळे पाणी रस्त्यावरून वाहत घरांमध्ये घुसले. अचानक घरात पाणी शिरल्याने नागरिकांची धावपळ उडाली. घरातील फर्निचर, अन्नधान्य, कपडे, इलेक्ट्रॉनिक साहित्य तसेच इतर घरगुती वस्तूंचे नुकसान झाल्याचे नागरिकांनी सांगितले.दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केल्याचा दावा नगर परिषदेकडून केला जातो. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी नाल्यांची योग्य साफसफाई न झाल्याचे या पावसातून स्पष्ट झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. तुंबलेल्या नाल्यांमुळे साचलेल्या पाण्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून नाल्यांची संपूर्ण साफसफाई करावी, अशी मागणी होत आहे.
0
0
Report

पालखी आगमन से पहले वाशिम के मार्ग पर सड़क दुरुस्त, यातायात बाधित

Washim, Maharashtra:वाशिम: अँकर:श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे २८ जून रोजी वाशिम जिल्ह्यातील श्रीक्षेत्र शिरपूर येथे आगमन होणार असून हजारो वारकरी व भाविक या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. मात्र, पालखी मार्गावरील जिजाऊ चौक ते बसस्थानक हा मुख्य रस्ता खड्डेमय झाला असून पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. पालखी सोहळ्यात हजारो वारकरी याच मार्गाचा वापर करणार असल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक व भक्तांकडून होत आहे. ग्रामपंचायत आणि लोकवर्गणीच्या माध्यमातून आज या रस्त्याच्या तात्पुरत्या दुरुस्तीच्या कामास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत कडून देण्यात आली.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top