icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

महाराष्ट्र विधानसभा सदस्य पेंशन नियमों पर खंडपीठ में याचिका—समान पेंशन की मांग

Nagpur, Maharashtra:नागपूर - ‘माजी आमदारांना आयुष्यभराची पेन्शन का?’ महाराष्ट्र विधानमंडळ सदस्य निवृत्ती वेतन कायद्याला नागपूर खंडपीठात आव्हान - विधानसभा या विधान परिषद सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर कोणतीही किमान सेवा न करताही दरमहा ५० हजार रुपये पेन्शन आमदार देण्याच्या तरतुदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले... - महाराष्ट्र विधानमंडळ सदस्य पेन्शन अधिनियम १९७६ मधील कलम ३(१) घटनाबाह्य आणि समानतेच्या अधिकाराचं उल्लंघन करणारे असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा - एक दिवस आमदार राहिलेल्या व्यक्तीला आणि पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या आमदाराला सुरुवातीला समान पेन्शन देणं हे तर्कसंगत नाही, असा याचिकेत युक्तिवाद - पाच वर्षांपेक्षा अधिक सेवेसाठी प्रत्येक अतिरिक्त पूर्ण वर्षाला २ हजार रुपये अतिरिक्त मासिक पेन्शन, मात्र पेन्शन मिळण्यासाठी किमान सेवा कालावधी नाही - राज्यात सध्या ६३० विधानसभा सदस्य पेन्शनधारकांना 3 कोटी 6९ लाख ९० हजार रुपये, तर १४४ विधान परिषद सदस्यांना ८३ लाख २३ हजार रुपये पेन्शन - ५९६ लाभार्थ्यांना कुटुंब पेन्शनपोटी 2 कोटी 38 लाख 40 हजार रुपये, पेन्शनवर सरकारचा एकूण वार्षिक खर्च 82 कोटी 98 लाख 36 हजार रुपये - पेन्शनसाठी वाजवी किमान सेवा कालावधी निश्चित करावा आणि सेवाकाळाच्या प्रमाणात पेन्शन ठरवावी, अशी पर्यायी मागणी याचिकेतून करण्यात आली.. - न्या. अनिल किलोर आणि न्या. रजनीश व्यास यांच्या खंडपीठासमोर सुनावणी; पुढील सुनावणी २३ सप्टेंबरला
0
0
Report
Advertisement

नागपूर साइबर पुलिस ने मल्टी-खाता रैकेट का पर्दाफाश; 90 करोड़ से अधिक फर्जी लेनदेन उजागर

Nagpur, Maharashtra:नागपूर सायबर पोलिसांनी म्युल अकाउंट रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर या प्रकरणातील फसवणुकीची व्याप्ती 90 कोटींच्या वर असल्याच आत्तापर्यंत झालेल्या तपासात पुढे आलेय..सायबर गुन्हेगारांना बँक खाती उपलब्ध करून देऊन फसवणुकीची रक्कम हस्तांतरित करणाऱ्या एका मोठ्या नेटवर्कचा नागपूर सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला होता . बनावट बँक खात्यांद्वारे 90 कोटी 25 लाख रुपयांच्या संशयित व्यवहारांचा खुलासा झाला आहे. या खात्यांसंदर्भात महाराष्ट्रासह देशभरात 104 तक्रारी नोंदवण्यात आल्याची माहिती समोर ली आहे. या प्रकरणात पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे. सायबर पोलिसांना माहिती मिळाली होती की काही लोक वेगवेगळ्या भागात नागरिकांकडून खाती विकत घेत आणि त्यांचा वापर सायबर गुन्हेांसाठी करत. यावर सायबर क्राईम अधिकाऱ्यांनी छापा टाकून 6 आरोपींना अटक केली. आरोपी जास्तीत जास्त ग्रामीण भागात जाऊन लोकांना पैसे देऊन खाती भाड्याने घ्यायचे आणि सायबर गुन्हे करणाऱ्यांना ही म्युल खाती द्यायचे. या खात्यांमध्ये सायबर फसवणुकीची रक्कम जमा करून ती पुढे ट्रान्सफर केली जायची. या म्युल अकाउंट फसवणूक प्रकरणी आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय सायबर टोळीशी जोडले असण्याचा संशय आहे. या दिशेनेही पोलिस तपास करत आहेत कारवाईदरम्यान पोलिसांना खालील साहित्य जप्त करण्यात आले: - 236 ATM कार्ड - 85 चेक बुक आणि 180 कोरे चेक - 45 वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांचे सिम कार्ड यांसह अनेक महत्त्वाचं साहित्य सापडला आहे
0
0
Report

आदित्य ठाकरे का नाशिक दौरा: सड़कों की बदहाली पर खास रिपोर्टिंग

Nashik, Maharashtra:Nashik breaking - शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर - दौऱ्याची सुरुवात त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी करून करणार - पेगलवाडी गावातील रस्त्यांची दुरवस्था दाखवण्यासाठी दोन विद्यार्थ्यांनी स्वतः रिपोर्टिंग करत व्हिडिओ केला होता - विद्यार्थ्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात झाला होता व्हायरल - याच ठिकाणी जाऊन आदित्य ठाकरे करणार रस्त्याची पाहाणी - त्यानंतर नाशिक शहरातील खराब रस्त्यांचीही पाहणी करणार - नाशिक महापालिकेत पक्षातील नगरसेवकांची घेणार बैठक - बैठकीनंतर आदित्य ठाकरे घेणार पत्रकार परिषद - आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली विकासकामे आणि रस्त्यांची दुरवस्था यावर मांडणार भूमिका - नाशिकच्या रस्त्यांवरून आदित्य ठाकरे काय भूमिका मांडतात, याकडे लक्ष - कुंभमेळ्याच्या कामांबाबतही आदित्य ठाकरे काय बोलतात किंवा मागण्या करतात, हे पाहणे महत्त्वाचे
0
0
Report
Advertisement

दापोली शिवसेना शहरप्रमुख ने ऑडियो विवाद के चलते इस्तीफा दिया

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कथित ऑडिओ क्लिप प्रकरण: दापोली शिवसेना शहरप्रमुख प्रसाद रेळेकर यांचा राजीनामा.. अँकर ई-शिवाई बस कर्मचाऱ्याला धमकी दिल्याची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दापोली शिवसेनेचे शहरप्रमुख प्रसाद उर्फ पप्पू रेळेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या प्रकरणावरून दापोलीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.. ई-शिवाई इलेक्ट्रिक बसच्या चालकांच्या ड्युटी नियोजनावरून रेळेकर आणि कर्मचाऱ्यामध्ये वाद झाला होता.संभाषणादरम्यान कर्मचाऱ्याला धमकी दिल्याचा तसेच "माझा आदेश म्हणजे योगेश कदमांचा व शिवसेनेचा आदेश" असा दावा करण्यात आल्याचा आरोप आहे.. माजी मंत्री रामदास कदम यांनी फोन करून कानउघडणी केल्यानंतर पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आणि अखेर रेळेकर यांचा राजीनामा घेण्यात आला.. ​या राजीनाम्यानंतर आता दापोलीत नव्या शिवसेना शहरप्रमुखाच्या नियुक्तीसाठी पक्षांतर्गत हालचाली सुरू झाल्या आहेत..
0
0
Report

कोल्हापुर विधायक राजेश क्षीरसागर पर नैतिक जवाबदेही के तहत इस्तीफे की मांग

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी केली आहे. कोल्हापूर शहरातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवरून पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत आमदार क्षीरसागर यांच्यावर जोरदार आरोप केले. राजेश क्षीरसागर हे गेल्या बारा वर्षांपासून आमदार असून पाच वर्षांपासून राज्य नियोजन मंडळाच्या अध्यक्षपदावर कॅबिनेट मंत्रिपदाच्या दर्जाने कार्यरत आहेत. मात्र, शहरातील नागरिकांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात ते अपयशी ठरल्याचा आरोप संजय पवार यांनी केला. कोल्हापूर शहरातील शंभर कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित करत पवार यांनी आतापर्यंत किती निधी उपलब्ध झाला आणि प्रत्यक्षात रस्त्यांची सद्यस्थिती काय आहे, असा सवाल केला. शहरातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांचे समाधान करता येत नसेल, तर आमदार राजेश क्षीरसागर यांनी जनतेची माफी मागून नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि राजीनामा द्यावा अशी मागणी संजय पवार यांनी केली.
0
0
Report

रोहित पवार: चाकण उद्योगों की बदहाली पर सरकार पर सवाल

Ahilyanagar, Maharashtra:रोहित पवार ऑन चाकण उद्योग चाकण येथील अनेक उद्योग राज्यातील दुसऱ्या एमआयडीसीमध्ये गेलेले पाहायला मिळत आहेत... एमआयडीसी साठी मिळणाऱ्या सुविधा मिळत नाहीत रस्त्यात खड्डे झाले आहेत... यासोबतच 36 हजार कामगारांचा आकडा असा आहे ज्यांच्या कंपन्या इतर राज्यात स्थलांतरित झाल्या आहेत हे घातक आहे... मात्र सरकार घोडेबाजार करण्यात पक्ष फोडण्यात व्यस्त आहे उद्योगांना काय हवं ते त्यांच्याकडून पाहिलं जात नाही हे मोठं दुर्दैवी आहे... सरकारकडून त्या ठिकाणी ए आय प्रकल्प उभारण्याचं सांगितलं जात आहे मात्र हे आहे प्रकल्पासाठी पाणी आणि वीज मोठ्या प्रमाणात लागते तुलनेने नोकऱ्या कमी मिळतात त्यामुळे सरकारने कुठले उद्योग आणायचे याचा विचार केला पाहिजे सोबतच आहेत हे उद्योग कसे टिकतील याचाही विचार केला पाहिजे अन्यथा या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही... रोहित पवार ऑन मराठी जीआर राज्यातील मराठी शाळा बंद होत चालल्या आहेत आदिवासी भागामध्ये शाळा नाहीत, मुलांना साप चावत आहेत याकडे सरकारचं लक्ष नाही मात्र मराठी अमराठी असा वाद निर्माण करून राजकारण करण्याचं काम सत्ताधाऱ्याकडून होत आहे आणि हे दुर्दैवी आहे... रोहित पवार ऑन सुप्रिया सुळे कडून हाताला धरून मोदी भेट सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती यांचा रिसेप्शन कार्यक्रमांमध्ये पवार कुटुंबातील एक सदस्य म्हणून आपण हजर होतो या कार्यक्रमांमध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचे स्वागत करणे हे कर्तव्य असल्याने मी समोर होतो यावेळी पारिवारिक फोटो काढण्याची वेळ आली त्यावेळी मला बाजूला पाहून सुप्रियाताईंनी मला मध्ये घेतलं सुप्रीया ताईंचे सर्वच नेत्यांची चांगली संबंध आहेत त्याचा फायदा मतदारसंघातील आणि राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी होतो... रोहित पवार ऑन घाटकोपर दरड कोसळली घाटकोपर येथे दरड कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला हे दुर्दैवी आहे... शासन आणि प्रशासनाचा अशा गोष्टींकडे पूर्ण दुर्लक्ष आहे... अशा गोष्टींसाठी जो निधी दिला जातो तो केवळ पेपर वरच वापरला पाहायला मिळत आहे... रोहित पवार ऑन नगर मनपा कर्मचारी मृत्यू ठिया आंदोलन गुन्हेगाराला जात नसते मात्र पोलिसांनी कारवाई करत यातील आरोपींना अटक केली आहे मात्र आरोपी अटक झाले नाहीत असं कोणाला वाटत असेल तर त्यांनी पोलिसांना माहिती द्यावी पोलिसांनी केलेल्या कारवाईवर विश्वास ठेवला पाहिजे अशा प्रकरणात जातीवाद किंवा राजकारण आणू नये... रोहित पवार ऑन राम शिंदे जिल्हा सहकारी बँक निवडणूक अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक सोपी नाही मात्र काही लोक (राम शिंदे) चर्चा करतात स्वतःला मदत प्राप्त करून घेतात आणि तडजोडी करतात रोहित पवार ऑन विलीनीकरणाला उशीर ज्येष्ठांकडून विलीनीकरणाला उशीर केला जात असल्याच्या चर्चेवर बोलताना आमची कसलीही चर्चा नसल्याचं रोहित पवारांनी म्हटला आहे... आम्ही निर्णय घेतलेला आहे आम्ही लोकांबरोबर राहून या सरकारच्या विरोधात लढणार आहोत... रोहित पवार ऑन जरांगे आंदोलन मला सरकारला या निमित्ताने सांगायचं आहे मराठा समाजाला असेल किंवा धनगर समाजाला असेल टिकणार आरक्षण द्यायचं असल्याने आपल्याला घटना दुरुस्ती करणे गरजेचे आहे आणि हे मुद्दे सर्व पंतप्रधानांच्या समोर मांडून हे काम करणं गरजेचं आहे रोहित पवार ऑन उषा चव्हाण उपमुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा जर एवढ्या मोठ्या कलाकाराच्या अडचणी सुटत नसतील तर सामान्य नागरिकांनी काय करायचं इथं कोणाचीच परिस्थिती चांगली नाहीये... रोहित पवार ऑन राधाकृष्ण विखे तलाठी भरती तलाठी भरती मध्ये भ्रष्टाचार झाल्याचं आम्ही सांगितल्यानंतर विखे पाटलांनी आमच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे म्हटला आहे आता या भरती भरती प्रक्रियेमध्ये 60 ते 62 लोकांची पेपर लिंक केल्याचं समोर येत आहे 20 तारखेपर्यंत याचा रिपोर्टही येणार आहे त्यानंतर आम्ही विखे पाटलांचा राजीनामा मागणार आहोत रोहित पवार ऑन गुन्हेगारी पालघर जिल्ह्यातील घटना त्याबरोबरच पुरंदर येथील दहा वर्षाच्या मुलीवरील अत्याचाराची घटना यावरून एक लक्षात येतं गृह विभागाचा धाक राहिलेला नाही त्यामुळेच पुण्यात तरुण देखील रस्त्यावर धूडगुस घालताना पाहायला मिळतात या सर्व गोष्टीचा वाईट वाटतं...
0
0
Report
Advertisement

नागपुर में SIT प्रक्रिया पर भाजप हस्तक्षेप का युवक कांग्रेस ने आरोप

Nagpur, Maharashtra:एस आय आर संदर्भातील कार्यालयांना भाजप कार्यालयाचे नाव देऊन टाका...एस आय आर प्रक्रियेत भाजपचे हस्तक्षेपाचा आरोप करत नागपुरात मुख्यमंत्री सचिवालय बाहेर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी... युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागपुरात मुख्यमंत्री सचिवालय समोर घोषणाबाजी करत "एसआयआर" प्रक्रिया संदर्भात आपला निषेध नोंदवला... मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रात एसआयआर प्रक्रियेत स्थानिक आमदार आणि भाजप पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप सुरू आहे... एसआयआर प्रक्रियेत बीएलओ आणि इतर अधिकारी भाजपच्या दबावात काम करत असून एसआयआर प्रक्रियेत कुठलीही पारदर्शकता राहिली नसल्याचा आरोपही युवक काँग्रेसने केला... एसआयआर प्रक्रियेत कार्यालयांना भाजप कार्यालयाचा नाव देऊन टाका अशी उपरोधिक मागणी ही युवक काँग्रेसने केली...
0
0
Report

गडचिरोली की अनुदानित आश्रम शाळा में छात्राओं की मौत, इस्तीफे की मांग तेज

Nagpur, Maharashtra:गडचिरोली में अनुदानित आश्रम शाळेत अत्यंत दुर्दैवी घटना घटी। तीन लड़कियों की मौत हो चुकी है; तीन उपचार में हैं। इनमें नागपूर मेडिकल में उपचाररत एक बच्ची के मिलने के लिए जाऊँगा, वहीं से गडचिरोली में शाळेला उपस्थित होऊँगा। 1992 से अनुदानित आश्रम शाळा चल रही है; अब तक लड़कियों के सोने के बिस्तर की व्यवस्था नहीं होने पर चिंता है। खासदार, राज्यमंत्री पदभार संभालने वाले आश्रम शाळा संचालकों को नैतिक जिम्मेदारी लेकर इस्तीफा देना चाहिए। 2017 में ट्रस्ट के माध्यम से एक सर्वे हुआ था, जिसमें सुविधाओं की कमी पर तीन महीने के भीतर कार्रवाई के निर्देश मुख्यमंत्री ने दिए थे। अनुदानित आश्रम शाळा में चूक के बाद प्रधानाचार्य और वार्डन को पकड़ा गया; आने वाले समय में संस्था संचालकों पर भी मुकदमा दाखिल होने की योजना है। प्रधानाचार्या/अधीक्षिका आश्रम शाळा में रहती हैं या नहीं यह देखने की जिम्मेदारी संस्था चालक की है। हमारी ओर से अनुदान मिला है, इसलिए संस्था चालकाओं को बच्चों को मिलने वाली सुविधाओं की देखरेख करनी चाहिए। राजीनामा माँगने की चर्चा चल रही है—वे हमारे मित्र हैं, समुदाय के नेता हैं। संस्था चालक कांग्रेस जिलाध्यक्ष भी हैं, इसलिए उनके घर के सामने मोर्चा निकालकर इस्तीफा माँगा जाए; मान्यता रद्द करने का प्रस्ताव मिला है और मुख्यमंत्री की सलाह पर उसे रद्द किया जाएगा। विद्यार्थियों को निकट सरकारी शाळाओं में भेजना और शिक्षकों की नियुक्ति देना उचित होगा। महाराष्ट्र के 553 आश्रम शाळाओं के संस्थागत चालकों से अनुरोध है कि विद्यार्थियों को सुविधाएं दें और गुणवत्तापूर्ण शिक्षण दें। आगामे दिनों में रुग्णालयों में भर्ती घटनाओं पर नियंत्रण और प्रशासनिक जवाबदेही सुनिश्चित करनी होगी।
0
0
Report

नाशिक में खड्डे के मुद्दे पर शिवसेना ठाकरे का महामोर्चा, 17 अगस्त को रैली

Nashik, Maharashtra:Nashik breaking - शहरातील खड्ड्यांच्या मुद्द्यावर काढण्यात येणाऱ्या मोर्चा संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक संपर्कप्रमुख रवींद्र मिरलेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली बैठक - शिवसेना ठाकरे गटाचा १७ ऑगस्टला महामोर्चा - खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये महामोर्चा - महापालिका आणि प्रशासनाच्या कारभाराविरोधात आंदोलन - शहरातील रस्त्यांची झालेली चाळण आणि त्यामुळे गेलेले ५ बळी यावरून उद्धवसेनेचा आक्रमक पवित्रा - शहराची अवस्था नांगरणी केलेल्या शेतासारखी झाली असल्याचा आरोप - ३८ हजार कोटी रुपयांच्या विकासकार्यांच्या खर्चाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी - आंदोलना पूर्वी आदित्य ठाकरे देखील नाशिक शहरातील सिमेंट रस्ते आणि खड्ड्यांची पाहणी करणार - सोमवार, १७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात - राजीव गांधी भवन येथे महापालिकेवर धडकणार महामोर्चा
0
0
Report
Advertisement

गटारी अमावस्या पर कोल्हापुर के मटन-फिश मार्केट में भीड़, मांसाहार की धूम

Kolhapur, Maharashtra:उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे... त्याआधी आज गटारी अमावस्या धुमधडाक्यात साजरी करण्याचा बेत कोल्हापूरकरांनी आखला आहे... त्यामुळेच कोल्हापुरच्या मटन मार्केट आणि फिश मार्केटमध्ये कोल्हापुरकरांनी गर्दी केली आहे...कोल्हापुर हे मांसाहारासाठी प्रसिद्ध असणारे शहर आहे...रविवार, बुधवार आणि शुक्रवार हा कोल्हापूरकरांचे मांसाहाराचे दिवस आहेत... त्यामध्ये आज बुधवार आणि त्यात गटारी अमावस्या त्यामुळे कोल्हापुरकरांनी सकाळपासून वेगवेगळ्या मटन चिकन फिश मार्केटमध्ये जाऊन खरेदी करत आहेत.. याचाच फिश मार्केट मधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.
0
0
Report

नाशिक: मल्टीनेशनल कंपनी मामले में मतीन पटेल की न्यायिक कोठड़ी फिर से

Nashik, Maharashtra:Nashik breaking - मल्टिनॅशनल कंपनीतील प्रकरणी अटकेत असलेल्या मतीन पटेल याला पुन्हा न्यायालयीन कोठडी - मल्टिनॅशनल कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, धार्मिक भावना दुखावणे व कथित धर्मांतराच्या प्रयत्नांप्रकरणी संशयित आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याच्या आरोपावरून एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल याला झाली आहे अटक - पोलिसांनी मतीन पटेल याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १७ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली - मल्टी नॅशनल कंपनी प्रकरणात शहर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून आयुक्तालयाच्या विशेष तपास पथकाकडून या प्रकरणाचा तपास सुरू - न्यायालयातील सुनावणीला नियमित हजर राहत नसल्याने न्यायालयाने पटेल याला केली होती अटक
0
0
Report

अकोला: बार्शीटाकळी के चेलका सेवानगर की 17 वर्षीय दिव्या सर्पदंश से मृत्यु

Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील चेलका सेवानगर येथील रहिवासी व साखरविरा येथील वसराम नाईक आडे उच्च माध्यमिक आश्रम शाळेत इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा सर्पदंश झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १० ऑगस्ट रोजी घडली. दिव्या गजानन राठोड (१७) असे मृतक विद्यार्थिनीचे नाव असून ती ९ ऑगस्ट रोजी चेलका सेवानगर शिवारातील आपल्या शेतामध्ये गेली होती. सोयाबीन पिकातून जात असताना तिला घोणस नावाच्या भयंकर विषारी सापाने चावा घेतला. तिने किंचाळल्या फोडल्यानंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी शेताकडे धाव घेऊन तिला त्वरित उपचारासाठी अकोला येथील जिल्हा रुग्णालयात आणले. उपचार सुरू असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top