445001
यवतमाळ : महिला बँक घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या बाबाजी दाते महिला बॅंकेत २४२ कोटींच्या अपहार प्रकरणात महिनाभराने अटकसत्र सुरू झाले आहे. पोलिसांनी शिवसेना नेते रमेश अगरवाल, व्यावसायिक प्रकाश पिसाळ आणि ठेकेदार प्रशांत पामपट्टीवार यांना अटक केली आहे. याआधी बँकेच्या CEO सुजाता महाजन, तिचा पती विलास महाजन, ॲड. वसंत मोहरेकर आणि नवलकिशोर मालाणी यांना अटक झाली होती. आता अटक केलेल्या आरोपींची संख्या सात झाली आहे. २०६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, ज्यामुळे संचालक व लेखा परीक्षक चिंतेत आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सोलापुर में आंधी-बारिश से 3000 पपीते के पेड़ उजाड़, किसानों में गहरा रोष
Solapur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे 3 हजार पपईची झाडे उध्वस्त - सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे शेतीपीकांचे मोठे नुकसान - दक्षिण सोलापूर तालुक्यातील साडेतीन एकरावरील 3 हजार पपईची झाडे उध्वस्त - पपईसह द्राक्षे, डाळिंब, शेवगा पिकांचेही मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल - नुकसान होऊन 48 तास उलटले तरी अद्यापपर्यंत कोणत्याच पद्धतीचे पंचनामे झाले नसल्याने शेतकऱ्यांमधून व्यक्त होतेय तीव्र नाराजी0
0
Report
जालना के वडिगोड्री किसान महावितरण के 11 केवी उपकेंद्र पर टाले, आपूर्ति बाधित
Jalna, Maharashtra:जालन्यातील वडीगोद्रीत शेतकरी आक्रमक, महावितरणच्या 11 केव्ही उपकेंद्राला ठोकले टाळे जालन्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील 11 केव्ही उपकेंद्राअंतर्गत नालेवाडी,रेणापूरी, गोंदी,शहागड,टाका या गावातील शेतीपंपाला होणारा वीज पुरवठा गेल्या 15 दिवसापासून खंडित करण्यात आलाय. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी वडीगोद्री येथील महावितरणच्या 11 केव्ही उपकेंद्राच्या कार्यालयाला टाळे ठोकले.. महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढून आक्रमक शेतकरी कार्यालयाच्या पायऱ्यावर बसलेले आहेत.दरम्यान जो पर्यंत वीज पुरवठा सुरळीत होत नाही तो पर्यंत आम्ही कार्यालय सुरू होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.0
0
Report
चंद्रपूर में भाजपा पदाधिकारियों के लिए दो दिवसीय प्रशिक्षण शिबिर शुरू
Chandrapur, Maharashtra:पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हा प्रशिक्षण महाआयोजन 2026 अंतर्गत चंद्रपूर महानगरात दोन दिवसांसाठी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित अँकर:-- पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हा प्रशिक्षण महाआयोजन 2026 अंतर्गत भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर महानगराने आयोजित केलेल्या दोन दिवसीय जिल्हा — महानगर प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले. आज या प्रशिक्षणाचा दुसरा दिवस आहे. उद्घाटनाच्या दिवशी प्रशिक्षणात संवादकौशल्य, पत्रकारांशी संवाद, प्रेस नोट लेखन आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर यावर मार्गदर्शन देण्यात आले. दुसऱ्या दिवशी कार्यालय व्यवस्थापन, डेटा व رپورٹिंग, कागदपत्रांची राखण आणि नियमित आढावा घेण्यासंबंधी सत्रे पार पडणार आहेत. याशिवाय निवडणूक व्यवस्थापनाच्या तयारीसाठी मतदार सूची पडताळणी, घराघर संपर्क आणि सातत्यपूर्ण सेवाभाव यांसारख्या गोष्टींवर व्यावहारिक सूचना देण्यात येणार आहेत. आयोजकांनी सांगितले की प्रशिक्षणानंतर कार्यकर्ते अधिक सक्षम, जबाबदार आणि आत्मविश्वासपूर्ण पद्धतीने कार्य करतील. या प्रशिक्षण कार्यक्रमात महानगराचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
Advertisement
आंबेनळी घाट में भयावह हादसा: तीन शव रोप से निकाले, पाँच अन्य नीचे
Chendhare, Maharashtra:आंबेनळी घाटातील भीषण अपघात ..... खोलदरीतुन मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकांसमोर अडचणी पंधराशे फुट खोलदरी आणि जंगल भागामुळे आंबेनळी स्कॉर्पिओ अपघातातील मृतदेह बाहेर काढण्याकामी रेस्क्यु टिमला आडचणी येत आहेत. दरीच्यावरील भागात असलेले तीन मृतदेह रोपच्या सहाय्याने खेचून वर काढण्यात आले आहेत तर उर्वरीत पाच मृतदेह दरीच्या खालच्या बाजून दाभिळ गावतुन पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात येणार आहेत. दरम्यान जंगल भागात असलेल्या मधमाशांच्या पोळ्यांमुळे रेस्क्यु टिमला अडचणीचा सामना करावा लागत आहे.0
0
Report
आहिल्यानगर पुलिस मुख्यालय में मॉक ड्रिल के दौरान हैंड ग्रेनाइट विस्फोट, चार घायल
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर फ्लॅश अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात हॅन्ड ग्रॅनाईड फुटले... सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली घटना.... चार प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी जखमी... शिवराज पवार, शुभम कावरे, गणेश मढे आणि योगेश सोळुंके हे चौघे प्रशिक्षणार्थी कर्मचारी जखमी... दोन जणांची बोटे गेली... दोन कर्मचारी किरकोळ जखमी.... मॉक ड्रिल हाताळण्याचे प्रशिक्षणा सुरू असताना हॅन्ड ग्रॅनाईट हातात फुटल्याने चार कर्मचारी जखमी; पोलीस मुख्यालयात घडली घटना बाबत माहिती देत असताना हातातच ग्रॅनाईटचा s्फोट.... जखमींना तात्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालय दाखल करण्यात आले आहे.0
0
Report
नागांव में विद्युत तार छूने से अडीच वर्षीय बच्ची की मौत, मालिक पर सवाल
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात असणाऱ्या नागाव मध्ये राजलक्ष्मी प्रताप निशाद या अडीच वर्षाच्या परप्रांतीय चिमुकलीचा विजेच्या तारेला स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, प्रताप निशाद हा मूळचा उत्तरप्रदेश येथील असून तो गेल्या वर्षभरापासून उदरनिर्वाह करण्यासाठी शिरोली एमआयडीसी येथे आला होता. तो नागाव येथील संभाजीनगर भागात कुमार साळोखे यांच्या खोलीमध्ये आपली पत्नी व दोन मुलासह राहत होता. आज सकाळी त्याची मुलगी राजलक्ष्मी ही आंबे खात होती. आंबे खात ती दारात खेळत असताना विजेच्या पोलचा ताण काढण्यासाठी असलेल्या तारेला तिचा स्पर्श झाला व तिला विजेचा जोराचा झटका बसला. यावेळी तिची आई धावत बाहेर येऊन तिला ओढली असता तिच्या आईला सुद्धा विजेचा धक्का लागला.यामध्ये या दोन्ही मायलेकी दूरवर फेकल्या गेल्या. यामध्ये दुर्देवाने अडीच वर्षाच्या राजलक्ष्मी या चिमुकलीचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच शेजारील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वीजपुरवठा खंडित केला. शिरोली एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर येथे पाठविला. घटनास्थळाची पाहणी केली असता या मध्ये खोली मालकाची चूक दिसून येते. खोलीच्या बरोबर समोर दारातच विजेचा पोल आहे. तसेच भिंतीवर मीटर ची पेटी अगदी कमी उंचीवर बसवली आहे.त्यामधून घेतलेल्या कनेक्शन च्या वायरी ठिकठिकाणी कट झालेल्या आहेत. त्या कट झालेल्या वायरीतून विद्युत प्रवाह पेटीत उतरला होता. त्या पेटीतून एक तार पोलच्या तारेला अडकवली आहे. त्यामुळे त्या पोलच्या तारेला स्पर्श होऊन विजेचा धक्का लागून चिमुकलीवर काळाने घाला घातला आहे. संबंधित घरमालकाने सुरक्षेची कोणतीही उपाययोजना न करता हलगर्जीपणा केल्यामुळे एका निष्पाप जीवाचा बळी गेला आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न सामान्य नागरिकांतून विचारला जात आहे.0
0
Report
Advertisement
कृष्णा नदी संगम पर 40 किलो का विशाल मछुआरा पकड़ा गया
Sangli, Maharashtra:स्लग - कृष्णा नदीत सापडला मच्छीमाराला तब्बल 40 किलोचा महाकाय मासा. अँकर - कृष्णा नदीत मासेमारी करताना सांगलीच्या हरिपूर येथे एका मच्छीमाराला तब्बल 40 किलो वजनाचा भला मोठा मासा सापडला आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या संगमावर छडीवर मासेमारी करत असताना आम्हाला मोठा मासा सापडला आहे. कटला प्रजातीचा हा मासा असून भल्या मोठ्या माशाला नदीतून बाहेर काढताना मच्छीमाराची चांगलीच दमछाक झाली. नदीतून हा भला मोठा मासा बाहेर काढल्यानंतर माशाला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती नदीमध्ये एवढ्या मोठ्या वजनाचा मासा मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.0
0
Report
मंदिर दानपेटी की चोरी: सेवेकरी के घर से 4 लाख रुपये बरामद
Pimpri-Chinchwad, Maharashtra:माऊलींच्या दानपेटीवर दरोडा; सेवेकऱ्याच्या घरात चोरीची तब्बल पावणे चार लाख रुपये जप्त झाले आहेत. kailas puri pune 25-5-26. Anchor - देवाच्या आळंदीतील माऊलींच्या दानपेटीवर सेवेकरीने डल्ला मारला. विशाल वारुळे नामक सेवेकरीच्या घरात रोकड सापडलीये. 10, 20, 50 आणि शंभर रुपयांच्या नोटांनी भरलेल्या पिशव्यांमध्ये तब्बल पावणे चार लाख रुपये जप्त झालेत. दानपेटीतील रक्कम जमा करताना विशाल हातचलाखी करायचा आणि एका पिशवीमध्ये नोटा भरायचा. गेल्या तीन महिन्यांपासून त्याचा हा उद्योग सुरु होता असा अंदाज वर्तवला जातो. ज्या दिवशी नोटांनी भरलेली पिशवी घरी घेऊन जायचा, त्या दिवशी विशाल मंदिरातील काही हार घरी घेऊन जातो. असं म्हणायचा आणि पिशवीत हार दिसतील असे ठेवायचा, खाली मात्र रोकड असायची. घरी आल्यावर रोकड मोजायचा आणि नंतर ती पिशवी आहे तशी बेडमध्ये ठेऊन द्यायचा. त्याचं पिशव्यांमध्ये पावणे तीन लाखांची ही रोकड आढळली. गेल्या तीन महिन्यांपासून तो दानपेटीतील रक्कम जमा करणे आणि ती मोजून ठेवणे, हे काम करत होता. बाईट-भीमा नरके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आळंदी0
0
Report
दौंड‑मनमाड रेललाइन के दुहेरीकरण से ट्रेनें अस्थाई रद्द
Amravati, Maharashtra:दौंड‑मनमाड रेल्वे मार्ग पर दुहेरीकरण का काम शुरू; अमरावती और नागपुर के बीच चलने वाली कुछ महत्त्वपूर्ण ट्रेनें अस्थायी रूप से रद्द कर दी गई हैं. पुणे मंडल के अनुसार विसापुर, रांजणगाव, सारोळा स्टेशन के बीच प्री नॉन इंटरलॉकिंग और नॉन इंटरलॉकिंग ब्लॉक लिया जाएगा. इससे पुणे, अमरावती और नागपुर के बीच प्रमुख गाड़ियाँ अस्थाई रद्द रहेंगी. हावड़ा पुणे एक्सप्रेस और अमरावती पुणे एक्सप्रेस के मार्ग बदले गए हैं; अमरावती‑पुणे एक्सप्रेस 27 और 28 मई 2026 को रद्द रहेगी. पुणे‑अमरावती एक्सप्रेस 28 और 30 मई 2026 को रद्द रहेगी. नागपुर‑पुणे और पुणे‑नागपुर विशेष गाड़ियाँ 27 और 28 मई 2026 को रद्द की गईं.0
0
Report
Advertisement
ईंधन महंगाई से आम नागरिक परेशान, शिर्डी में पेट्रोल-डिजेल की कमी जारी
Shirdi, Maharashtra:Anc - सामान्य नागरिकांना पुन्हा महागाईचा झटका बसलाय... पेट्रोल तब्बल 3 रुपये 13 पैशांनी तर डिझेल 2 रुपये 80 पैशांनी महागलं आहे. काही दिवसांपूर्वीच दरवाढ झाल्यानंतर आता पुन्हा वाढ झाल्याने वाहनचालकांमध्ये संताप व्यक्त झालाय. अहिल्यानगर जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला जातोय मात्र जिल्ह्यातील अनेक पंप पेट्रोल डिझेल वाचून बंद आहेत. त्याचबरोबर वाढत्या दरांमुळे नागरिकांचं आर्थिक गणित बिघडताना दिसत आहे. डिझेल दरवाढीचा फटका वाहतूक क्षेत्रासह शेती आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवरही बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिर्डीला येणाऱ्या साईभक्तांना देखील पेट्रोल डिझेल मिळत नसल्याने पंप शोधावे लागत आहेत. विविध धार्मिक स्थळांवर पर्यटक आणि साईभक्तांना घेऊन जाणाऱ्या टुरिस्ट वाहन चालक आणि मालकांना डिझेल मिळत नसल्याने एका पंपावरून दुसऱ्या पंपावर भटकंती करण्याची वेळ आली आहे.. शिर्डी परिसरातील पाच ते सहा पंप बंद असल्याने साई भक्तांना पेट्रोल डिझेल साठी भटकंती करण्याची वेळ आलीये..त्यामुळे सरकारने पेट्रोल-डिझेलचा साठा मुबलक करावा आणि वाढते दर नियंत्रणात आणावेत, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांसह वाहन चालकांकडून केली जात आहे...0
0
Report
वादळी हवा-बारिश ने केलों की फसल को किया बर्बाद, किसान बेहाल
Shirur, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्याला वादळी वाय्राच्या पावसाने झोडपल्याने केळी पिकाचं प्रचंड नुकसान झालंय, लाखणगाव परिसरात उभ केळीचं पिक जमिनदोस्त झाल्याने शेतकय्रांच लाखो रूपयांच नुकसान झालंय, आधीत आखाती देशात सुरू असलेल्या महायुद्धामुळे केळीची निर्यात ठप्प झालाेल केळीला कवडीमोल बाजारभाव मिळत असताना त्यात आता वादळी वाऱ्याच्या पावसाने केळीचे पीकच उध्वस्त केल्याने शेतकरी हातबल झालाय याचाच केळीच्या शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी0
0
Report
MIDC क्षेत्र में गैर-औद्योगिक व्यवसाय बंद, क्लासेस-होस्टेल-खानावली तुरंत बंद करने का आदेश
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज ग्राउंड रिपोर्ट... एमआयडीसीतील बिगर औद्योगिक व्यवसायांवर प्रशासनाचा दणका... क्लासेस, हॉस्टेल, खानावळी, अभ्यासिका तात्काळ बंद करण्याचे आदेश... क्लासेस, हॉस्टेल, खानावळी, अभ्यासिकांवर कारवाईची टांगती तलवार... नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा... एमआयडीसी परिसरात उद्योगांव्यतिरिक्त सुरू असलेल्या व्यवसायांवर आता कारवाईची टांगती तलवार आली आहे. क्लासेस, हॉस्टेल, खानावळी, अभ्यासिका आणि इतर व्यावसायिक उपक्रम तात्काळ बंद करण्याचे आदेश जिल्हा उद्योग केंद्राने दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. औद्योगिक वसाहतीत बिगर औद्योगिक व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारीनंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला असून आदेशाचे पालन न केल्यास संबंधितांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला. ट्युशन एरिया मधून आढावा घेत त्या भागातील लोकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी..0
0
Report
Advertisement
लातूर पेपरफुटी केस: पुराने वीडियो वायरल से राजनीति गरम, जांच तेज
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज पेपरफुटी करणाऱ्यांना मृत्युदंडाची मागणी करणाऱ्या मोटेगावकर याचा जुना व्हिडिओ व्हायरल.... नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआय कोठडीत असलेल्या मोटेगावकरच्या जुन्या वक्तव्याची चर्चा... लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण, मोटेगावकरांचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत... पेपरफुटीविरोधात कठोर भूमिका... आता व्हायरल व्हिडिओमुळे नव्या चर्चांना उधाण....0
0
Report
नागिना घाट पर गोदावरी नदी में डूबे दो युवक, दर्दनाक मौत
Nanded-Waghala, Maharashtra:नागिना घाट परिसरात गोदावरी नदीपात्रात बुडून दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 19 वर्षीय गणेश डोंगरे आणि 14 वर्षीय रणवीर शिंगाडे या दोघांचा मृत्यू झाला. दोघेही नांदेड शहरातील खोब्रागडे नगर येथील रहिवासी होते. गणेश व रणवीर हे नगीना घाट परिसरात गोदावरी नदीकाठी काल सायंकाळी गेले होते. नदीपात्रात उतरल्यावर पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्यात गेले आणि बुडाले. परिसरातील नागरिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.0
0
Report
चंदूर के युवाओं ने मोर्णा नदी की सफाई अभियान चला कर एकता की मिसाल दी
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील चांदूर गावातील युवकांनी नदी स्वच्छतेचा संकल्प केला आणि आज हे अभियान संपूर्ण गावासाठी प्रेरणादायी ठरत आहे. अकोला जिल्ह्यातील सुमारे दहा हजार लोकसंख्या असलेल्या चांदूर गावातून मोर्णा नदी वाहते. मात्र गेल्या काही वर्षांत नदीपात्रात वाढलेली घाण, झाडाझुडपे आणि अतिक्रमणामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले होते. पावसाळ्यात काटेरी झाडांमुळे पाण्याचा प्रवाह अडत असल्याने पूरस्थितीही निर्माण होत होती. ही परिस्थिती बदलण्यासाठी गावातील काही युवकांनी पुढाकार घेत “नदी पुनर्जीवन” अभियान सुरू केले. युवकांनी गावकऱ्यांसमोर नदी स्वच्छतेची संकल्पना मांडली आणि विशेष म्हणजे सर्व जाती-धर्म तसेच सर्व पक्षांचे लोक मतभेद विसरून या अभियानात सहभागी झाले. ग्रामपंचायतीच्या सहकार्याने नदी स्वच्छतेच्या कामाला सुरुवात करण्यात आली. गावकऱ्यांनी स्वेच्छेने देणग्या देत या उपक्रमाला हातभार लावला. नदीपात्रातील काटेरी झाडे हटवून नदीचा प्रवाह मोकळा करण्यात आला. तसेच नदीपात्र रुंद करण्यात आल्याने भविष्यातील पुराचा धोका कमी झाला आहे. विशेष म्हणजे आता गावकरी केवळ नदीच नव्हे तर गावातील रस्त्यांचीही श्रमदानातून स्वच्छता करत आहेत. जवळपास दोन किलोमीटर लांबीच्या मोर्णा नदीला नवसंजीवनी देण्यासाठी सुरू असलेले हे अभियान पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक एकतेचेही उत्तम उदाहरण ठरत आहे. चांदूर गावातील युवकांनी दाखवलेली ही सकारात्मक दिशा इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. Byte : मिलिंद पाटील.0
0
Report
Advertisement
