icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

कल्याण-डोंबिवली में 22 मई 2026 को 12 घंटे पानी आपूर्ति बंद

Kalyan, Maharashtra:कल्याण-डोंबिवलीत २२ मे २०२६ रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत १२ तास पाणीपुरवठा बंद; नागरिकांना पाणी साठवण्याचे आवाहन Anc..भारतीय हवामान खात्याने यावर्षी अलनिनो आणि आयओडीच्या प्रभावामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार राज्य शासनाने ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागासोबत झालेल्या बैठकीनंतर पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार कल्याण-डोंबिवली महानगरपालिकाेच्या बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा शुक्रवार दि. २२ मे २०२६ रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत, म्हणजेच १२ तास बंद राहणार आहे. या पाणी कपातीचा परिणाम कल्याण पूर्व-पश्चिम, डोंबिवली पूर्व-पश्चिम तसेच कल्याण ग्रामीण भागातील मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शाहाड, अटाळी आणि इतर गावांवर होणार आहे. महानगरपालिकेने नागरिकांना आवश्यक तेवढा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
0
0
Report

NEET पेपरफूट: CBI नागपूर-चंद्रपूर में परीक्षार्थी के घरों पर छापेमारी

Nagpur, Maharashtra:देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफूट प्रकरणाच्या तपासात आता विदर्भ कनेक्शन समोर येऊ लागले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) दिल्ली येथील विशेष पथकाने नागपूर आणि चंद्रपूर येथे तीन परीक्षार्थी उमेदवारांच्या घरांवर झडती घेतली . या कारवाईत नागपूर सीबीआय पथकानेही सहकार्य केले. तपास यंत्रणांच्या या हालचालींमुळे विदर्भातील शैक्षणिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, झडती घेण्यात आलेल्या तिघांपैकी दोन विद्यार्थीनी नागपूरमधील असून एक परीक्षार्थी उमेदवार चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. सीबीआयच्या पथकांनी या विद्यार्थ्यांच्या घरांची व मोबाईलची तपासणी केली. या विद्यार्थ्यांचे नीट परीक्षेदरम्यान काही संशयास्पद संपर्क, आर्थिक व्यवहार आणि परीक्षा प्रक्रियेशी संबंधित डिजिटल पुरावे तपासण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी संबंधित विद्यार्थ्यांच्या निवासस्थानी लॅपटॉप, मोबाईल फोन, काही दस्तऐवज तसेच ऑनलाईन व्यवहारांची माहिती तपासली. पेपरफूट रॅकेटशी संबंधित दलाल, कोचिंग नेटवर्क किंवा आर्थिक देवाणघेवाणीचा काही संबंध आहे का, याचाही तपास सुरू असल्याची माहिती आहे. अद्यापपर्यंत कुणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही.
0
0
Report

हिरकणी STR T6 वाघीणा का GPS कॉलर गायब, ट्रैप कैमरे में फिर कैद

Satara, Maharashtra:कोयना जलाशय से तारफ्य के जरिए सह्याद्री व्याघ्र प्रकल्प में छोड़ी गई 'हिरकणी' अर्थात STR T6 वाघीण को फिर से ट्रैप कैमरे में कैद किया गया है। पर गले में GPS कॉलर गायब दिखाई दे रहा है। पिछले पंद्रह दिनों से हिरकणी ट्रैक न होने के कारण वन विभाग चिंता में है। VO: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प की हिरकणी STR T6 को 7 फ़रवरी 2026 को कोयना जलाशय से जंगल क्षेत्र में भेजा गया था और उसके बाद GPS कॉलर के साथ निगरानी रखी जा रही थी। लेकिन पिछले पंद्रह दिनों से सिग्नल एक ही स्थान से आ रहा था, संभवतः कॉलर में तकनीकी खराबी या कॉलर गिर जाने जैसी स्थिति। वन विभाग ने खोज बढ़ाई, पर हिरकणी का ठिकाना नहीं मिला। इसके बाद ट्रैप कैमरों की संख्या बढ़ाकर विश्लेषण शुरू किया गया। इसी क्रम में कोयना जंगल के कोअर भाग में घूमती एक वाघीण ट्रैप कैमरे में कैद हुई, जिसके पट्टों के विश्लेषण से वही हिरकणी STR T6 स्पष्ट हुई, पर इस बार गले में GPS कॉलर नहीं दिखा। संभव है कि उसने पंजे से कॉलर निकाल लिया हो या तकनीकी कारण से वह गले से गिर गया हो, क्षेत्र संचालक तुषार चव्हाण ने बताया। बाइट - तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प। वीडियो 2-0 विश्लेषण के अनुसार कॉलर बीच-बीच में सिग्नल दे रहे हैं, अतः जंगल परिसर में वह कहीं गिरा हो सकता है। ट्रैप कैमरे में हिरकणी की फोटो/वीडियो स्पष्ट रूप से स्वस्थ दिख रही है और वजन बढ़ने की दिशा में संकेत भी मिले हैं। बाइट - मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे। हिरकणी वाघिणी के फोटोज़-वीडियो से तबीयत सुदृढ़ दिखी और अब वह सह्याद्री के वातावरण के अनुकूल प्रतीत हो रही है। वन्यजीव प्रेमी और प्रकल्प प्रशासन ने राहत की सांस ली है।
0
0
Report
Advertisement

कोल्हापुर में मगरी के अंडों से नौ पिल्लों का सफल जन्म, प्राकृतिक आवास में संरक्षण प्रयास

Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरच्या हातकणंगले वनपरिक्षेत्रातील कृष्णा नदीकाठावरील शेतात मगरीची अंडी आढळल्याचे ठरले. वन्यजीव संरक्षण संस्था इचलकरंजी यांनी ही माहिती वनविभागाला दिल्यानंतर अंडी नैसर्गिक अधिवासातच सुरक्षित ठेवून त्यांचे संवर्धन करण्यात आले. सुमारे दस दिवसांच्या देखरेखीनंतर तब्बल ९ मगरीची पिल्ले सुखरूप बाहेर आली. वनविभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर यांनी तपासणी करून पिल्लांना सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडले. कोलहापुरात प्रथमच नैसर्गिक अधिवासात मगरीची अंडी जतन करून यशस्वीरीत्या पिल्ले उबविण्याचा प्रयोग वनविभागाने केला आहे. नागरिकांनी मगरीची अंडी आढळल्यास वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0
0
Report
0
0
Report

लातूर में कोट्यवधी शिक्षण साम्राज्य पर नया विवाद: संपत्ति और जांच की मांग

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... कोट्यवधींचं शिक्षण साम्राज्य पुन्हा चर्चेत... मोटेगावकरच्या मालमत्तेवरून नवा वाद पेटला... खोपेगावातील कोट्यवधींची इमारत चर्चेत... चौकशीची केली मागणी... तासिकावरील शिक्षक ते कोट्यवधींचा मालक... लातूरजवळील कोट्यवधींच्या जागेवरून चर्चा... चौकशीची मागणी वाढली... तासिका तत्त्वावर शिक्षक म्हणून सुरू झालेला प्रवास... आणि पुढे जाऊन कोट्यवधी रुपयांचं शिक्षण साम्राज्य उभं करणारे प्रा. शिवराज मोटेगावकर सध्या पुन्हा चर्चेत आले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये क्लासेसचे नेटवर्क उभं करत त्यांनी मोठी आर्थिक उलाढाल निर्माण केली आहे. त्याची लातूर शहरात अनेक ठिकाणी कोट्यवधी रुपयांची प्रोपर्टी असल्याचं सांगीतलं जात आहे. दरम्यान, लातूरजवळील खोपेगाव परिसरातील त्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या इमारती आणि जागेवरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आता होत असून, यामुळे पुन्हा एकदा मोटेगावकर चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. याचच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी... वैभव बालकुंदे रिपोर्टर
0
0
Report
Advertisement
0
0
Report

भाईंदर में निर्माणाधीन इमारत से गिरकर 19 वर्षीय मजदूर की मौत, सुरक्षा चूक पर सवाल

Mira Bhayandar, Maharashtra:मिरा भाईंदर ब्रेक भाईंदरमध्ये एका निर्माणाधीन इमारतीवरून पडून 19 वर्षीय तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सेवेन इलेव्हन कोर्टयार्ड इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून पडल्याने हा अपघात घडला. ​भाईंदर येथील निर्माणाधीन इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून पडून फिरदोस आलम (वय 19) या मजुराचा जागीच मृत्यू झाला. ससकाळी साडेआठच्या सुमारास बांधकाम साईटवर पाणी मारण्यासाठी वर गेला असता, तो थेट खाली कोसळला आणि पत्र्याला छिद्र पडून जमिनीवर आदळला. बांधकाम कंत्राटदाराने बिल्डिंगच्या साईडला जाळी बांधलेली नसल्याने त्याचबरोबर मयत व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे सेफ्टी साहित्य न दिल्याने हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे नवघर पोलिसांनी या घटनेची दखल घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी डॉक्टर भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल केला असून अपमृत्यूची नोंद करून मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे.
0
0
Report
Advertisement
0
0
Report

वैभववाड़ी में ठाकरे गट का पेट्रोल-डिझेल बढ़ती कीमतों के खिलाफ विरोध प्रदर्शन

Oras Bk., Maharashtra:पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दराबाबत निषेध व्यक्त करत वैभववाडी तालुक्यात ठाकरे गटाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. ठाकरे गटाचे युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला यावेळी मोदी सरकार व फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी महागाईच्या विरोधात मोर्चा काढला या सरकारचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. अशी टीका करत असतानाच येत्या काळात पेट्रोल चा दर 100 रुपयांनी वाढणार असल्याची भीती देखील सुशांत नाईक यांनी व्यक्त केलीय
0
0
Report
Advertisement

यवतमाळ में महावितरण की धड़ाक अभियान: 50 लाख से अधिक बिजली चोरी पकड़ाई

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये महावितरण कडून वीज चोरी रोखण्यासाठी धडक मोहिम राबवली जात आहे. पांढरकवडा मार्गावरील गुलशन नगर, कोहिनूर सोसायटी यासह विविध भागात पंधरा पथकांद्वारे उच्चभ्रू नागरिकांच्या घरी थेट पडताळणी केली असता वीज मीटर मध्ये छेडछाड करून मोठ्या प्रमाणात वीज चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे वीज मीटर ला जामर लावणे, रिमोट कंट्रोल द्वारे मीटर फिरविणे, बायपास करणे, आकोडा टाकणे आदी सर्वच प्रकारे ही विजेची चोरी होत होती. वीज चोरट्यांमध्ये राजकीय क्षेत्रातील नेते मंडळींचा सुद्धा सहभाग उघडकीस आला आहे. एक ते दीड तासात तब्बल पन्नास लाखाहून अधिक रुपयांची वीज चोरी पकडल्या गेली आहे. दरम्यान या धडक मोहिमेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून अनेक लोकांनी घरादारांना कुलूप लावून पळ काढला आहे. यवतमाळ जिल्ह्यात 25% हून अधिक विजेची तूट होत असून वीज चोरीच्या बाबतीत जिल्हा बदनाम होऊ नये म्हणून वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणच्या अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांनी केले आहे.
0
0
Report

अमेरिका-इराण युद्ध के प्रभाव से पेट्रोल-डीजल कीमतों में अचानक बढ़ोतरी, शहरों में ईंधन संकट

Akola, Maharashtra:Anchor : अमेरिका-इराण युद्धाचा परिणाम आता देशातील इंधन बाजारावरही दिसून येत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याची परिस्थिती असताना गेल्या दोन दिवसांत इंधन दरात मोठी वाढ झाली आहे. काल पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आल्यानंतर मध्यरात्रीपासून पुन्हा पेट्रोल, डिझेल आणि पावर पेट्रोलच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना आर्थिक फटका बसत असून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. काल पेट्रोलचा दर 107 रुपये 24 पैसे होता, तो आज 108 रुपये 15 पैशांवर पोहोचला असून पेट्रोलमध्ये तब्बल 91 पैशांची वाढ झाली आहे. तर डिझेलचा दर 93 रुपये 78 पैशांवरून 94 रुपये 71 पैशांपर्यंत वाढला असून डिझेलमध्ये 93 पैशांची वाढ झाली आहे. याशिवाय पावर पेट्रोलचा दर 116 रुपये 98 पैशांवरून 117 रुपये 88 पैशांपर्यंत वाढला असून त्यातही 90 पैशांची वाढ नोंदवण्यात आली आहे.सतत वाढणाऱ्या इंधन दरांमुळे वाहनधारकांचे बजेट कोलमडत असून वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top