445001
यवतमाळ : महिला बँक घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या बाबाजी दाते महिला बॅंकेत २४२ कोटींच्या अपहार प्रकरणात महिनाभराने अटकसत्र सुरू झाले आहे. पोलिसांनी शिवसेना नेते रमेश अगरवाल, व्यावसायिक प्रकाश पिसाळ आणि ठेकेदार प्रशांत पामपट्टीवार यांना अटक केली आहे. याआधी बँकेच्या CEO सुजाता महाजन, तिचा पती विलास महाजन, ॲड. वसंत मोहरेकर आणि नवलकिशोर मालाणी यांना अटक झाली होती. आता अटक केलेल्या आरोपींची संख्या सात झाली आहे. २०६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, ज्यामुळे संचालक व लेखा परीक्षक चिंतेत आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
1200 करोड़ कर्ज के बीच महापौर समेत 4 पदाधिकारी ने इलेक्ट्रिक कारें मांगीं
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:अगोदरच १२०० कोटींपेक्षा अधिक कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला आता नव्या पदाधिकाऱ्यांच्या व्हीआयपी हट्टाचा फटका बसणार आहे. नियमानुसार केवळ महापौरांनाच शासकीय वाहनाचा अधिकार असताना, मनपातील इतर ४ पदाधिकाऱ्यांनीही आलिशान इलेक्ट्रिक कारची मागणी केली आहे. त्यासाठी ५ ईव्ही कार खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी आगामी सर्वसाधारण सभेत ठराव मांडण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, एका पदाधिकाऱ्याने तब्बल २५ ते ३० लाख रुपयांची कार पसंत केली आहे. यामुळे आधीच रिकामी असलेल्या मनपाच्या तिजोरीवर तत्काळ १ कोटी रुपयांपेक्षा अधिकचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.0
0
Report
Solapur police arrested interstate thief within 48 hours, seized goods worth 8.72 lakh
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - अंतरराज्य घरफोडी करणाऱ्या तेलंगणातील चोरट्याला अटक, कारवाईत 8 लाखांचा मुद्देमाल जप्त सोलापूर शहर पोलिसांची कारवाई, 35 घरफोडी करणाऱ्या चोरट्याला 48 तासात केलं अटक. सोलापूर शहर गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत आठ लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. याप्रकारण पोलिसांनी अंतरराज्य घरफोडी करणारा शिवप्रसाद आदिनारायण मंत्री उर्फ मंत्रीशंकर याला केलं आहे अटक गुन्हे शाखेच्या पथकाने मंत्रीशंकर यांच्याकडून आठ तोळ्याचे सोन्याचे दागिने, तीस तोळ्याचे चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली चारचाकी कार जप्त केली आहे.. मंत्रीशंकर याला चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे..0
0
Report
डिझेल दर में तीन रुपए की बढ़ोतरी से परिवहन महामंडल पर बढ़ा वित्तीय दबाव
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:डिझेलच्या दरात तीन रुपयांनी वाढ झाल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या आर्थिक ताळेबंदावर अतिरिक्त भार पडणार आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील एसटीला दररोज सुमारे १ लाख रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागणार आहे. डिझेलवरील खर्च ३० लाखांवरून ३१ लाख रुपयांपर्यंत जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुमारे ५०० एसटी बस धावतात. या बसमधून दररोज सुमारे ३० हजारांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांकडून एसटीला ६० लाख रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळतो. या बससाठी दररोज सुमारे ३० हजार लिटर डिझेल लागते. त्यासाठी जवळपास ३० लाख रुपयांचा खर्च येतो. नुकतीच डिझेलच्या दरात झालेली वाढ हा खर्च वाढवणारी आहे0
0
Report
Advertisement
40°C से ऊपर गर्मी में बाघों के लिए ठंडक उपाय अपनाए गए
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरात गेल्या आठवडाभरापासून तापमानाचा पारा सातत्याने ४० अंशांच्या पार जात आहे. या वाढत्या उष्म्याचा त्रास वन्यप्राण्यांनाही जाणवत असून, सिद्धार्थ उद्यानातील प्राण्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. वाघांना उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी प्राणिसंग्रहालय प्रशासनाने विविध उपाययोजना राबवल्या आहेत. खुल्या पिंजऱ्यातील कृत्रिम तलावात रोज ताजे पाणी सोडले जाते. अंगाची लाहीलाही कमी करण्यासाठी वाघ दिवसाचा बहुतांश वेळ या हौदात घालवत आहेत. मार्च महिन्यापासूनच प्रशासनाने हे नियोजन केले आहे. केवळ तलावच नाही, तर बंद आणि खुल्या पिंजऱ्यांच्या परिसरात सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा तीनही सत्रांत पाण्याचा सतत शिडकावा केला जातो. याशिवाय, पिंजऱ्यांमध्ये वाघांसाठी कूलरही बसवण्यात आले आहेत. उन्हाळ्यात पचनसंस्थेवर ताण येऊ नये म्हणून त्यांच्या आहाराचेही काटेकोर नियोजन करण्यात आले आहे0
0
Report
पडेगाव कचरा डिपो में आग 8 दिन से धुआं, नागरिक परेशान
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या पडेगाव कचरा डेपो येथे मागील ८ दिवसांपासून कचरा पेटलेलाच आहे. परिणामी परिसरातील भीमनगर, पडेगाव, भावसिंगपुरा आदी भागांतील नागरिकांना धुराचा त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी मनपाच्या फायर बंबने मागील आठवड्यात तब्बल चार ते पाच वेळा आग नियंत्रणात आणण्याच प्रयत्न केला. मात्र आग अद्यापही धुमसत आहे. धुरामुळे आबालवृद्धांना श्वसनाचा त्रास होतोय, धूर पसरल्याने लहान मुले, वृद्ध, दम्याच्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. डोळे जळजळणे, घशात खवखव होण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत... यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होतेय...0
0
Report
हिंदी में क्लिक-बेट समाचार: मेडशी क्षेत्र में ट्रक-बाइक भिड़ंत, एक की मौत, दो घायल
Washim, Maharashtra:अकोला-नांदेड मार्गवरील मेडशी परिसरात ट्रक और दुचाकी میں भीषण अपघात हुआ। इस अपघात میں मालेगाव तालुक्यातील राजुरा येथील दुचाकीवरिल दोन युवक गंभीर जखमी झाले होते। त्याापैकी सत्तार पठाण यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला। तर दुसरे जखमी बबन राऊत यांच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत। घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे。0
0
Report
Advertisement
कोकण में OTT सेवा की जल्द शुरुआत, अनिकेत कदम ने प्रेस कॉन्फ्रस में दी जानकारी
Ratnagiri, Maharashtra:कोकणात लवकरच ओटीटी सेवांची एन्ट्री.. अँकर मुंबईमहानगरानंतर आता कोकणातील इंटरनेटवर आधारित ओटीटी सेवेची लवकरच सुरुवात होणार असून कोकणातील मनोरंजन क्षेत्रासाठी एक महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.. हातवे संलग्र हातवे साई स्टार डेटा कॉम प्रायव्हेट लिमिटेड च्या माध्यमातून कोकणवासीयांसाठी आधुनिक डिजिटल मनोरंजनाचे नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती कंपनीचे डायरेक्टर अनिकेत सदानंद कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली..0
0
Report
कर्जत कारशेड विवाद: सरकार के मध्यस्थी के बाद रेलवे काम रोके; बाढ़ सुरक्षा ठप्प
Karjat, Maharashtra:कर्जत कारशेड प्रकल्पात शासनाकडून मध्यस्थी. उपाययोजना होईपर्यंत रेल्वे काम बंद ठेवण्याचे प्रशासनाचे नागरिकांना लेखी आश्वासन. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात भिवपुरी कारशेड प्रकल्पाचे काम सुरू असून स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पासाठी होत असलेल्या मातीच्या भारावाला तीव्र विरोध करून कर्जत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. गावातील नैसर्गिक नाले,आणि पाण्याचा प्रवाह अडवला जात असल्याची भीती मनात बाळगून गावात यामुळे पूरपरिस्थिती उद्भवू शकते या कारणामुळे गावकऱ्यांनी भीतीपोटी गाव पाण्याखाली बुडून जाण्याच्या उद्देशाने कर्जत तहसील कार्यालयावर जोरदार धडक दिली मात्र स्थानिक प्रशासन, रेल्वे विभाग आणि पाटबंधारे विभाग यांनी गावकऱ्यांना विश्वासात घेत जो पर्यंत पूरपरिस्थिती रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना पूर्ण होत नाहीत तोपर्यंत रेल्वेच्या मातीच्या भरावाचे काम पूर्णतः बंद ठेवण्यात येईल अस लेखी आश्वासन दिलं. शिवाय सर्व उपाययोजना पूर्ण होत नाहीत तोपर्यंत काम बंद राहील असा निर्णय गावकऱ्यांनी एकमताने घेतला.0
0
Report
ओतूर लॉज में 31 वर्षीय महिला की संदिग्ध मौत, पुलिस जांच जारी
Barav, Maharashtra:जुन्नर/पुणे. जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे एका लॉज मध्ये ३१ वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्नेहल अमोल शिंदे (रा. अवसरी, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओतूर येथील वाघिरे महाविद्यालयासमोर असलेल्या अमृत लॉजमध्ये स्नेहल शिंदे या मयत अवस्थेत आढळून आल्या. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत प्राथमिक पाहणी केली. त्यानंतर त्यांना ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे ओतूर परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा मृत्यू नैसर्गिक आहे की अन्य काही कारणामुळे झाला, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. घटनास्थळावरील परिस्थिती, लॉजमधील नोंदी तसेच संबंधित व्यक्तींची चौकशी यावरून पुढील तपासाची दिशा निश्चित केली जाणार आहे. दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी ओतूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी में ईंधन टंचाई: लोगों को रातभर सड़क पर खड़ा रहना पड़ा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रिक्षा चालक वाहनधारक मेटाकुटीला.. रत्नागिरीतील इंधन टंचाईवर तोडगा नाही.. रिक्षा चालक जागवत आहेत रात्री.. अँकर जिल्ह्याचे मुख्य केंद्र असलेल्या रत्नागिरी शहरात सध्या इंधन टंचाईने उग्ररूप धारण केले आहे.. गेले पाच दिवस रत्नागिरीकर सीएनजी पेट्रोल आणि डिझेल साठी अक्षरशः वण-वण फिरत आहेत.. मात्र या गंभीर परिस्थितीकडे जिल्हा प्रशासनांनी पूर्णपणे डोळे झाक केल्याचे दिसून येत आहे.. वाढत्या उन्हाचा तडाका सहन करत रात्री अपरात्री दोन ते तीन किलोमीटरच्या रांगांमध्ये उभे राहण्याची वेळ वाहनधारकावर आली असून रत्नागिरी प्रशासन नावाची यंत्रणा खरंच अस्तित्वात आहे का असा संतप्त सवाल आता नागरिक विचारू लागलेले आहे..0
0
Report
समृद्धी एक्सप्रेसवे पर 100-120 किमी/घंटा वेग सीमा CCTV से कड़ाई से लागू
Amravati, Maharashtra:समृद्धी महामार्गावर वेगमर्यादा नियंत्रणासाठी बसवण्यात आले सीसीटीव्ही कॅमेरे; वेगमर्यादा निश्चित करण्यासाठी उपक्रम समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघातांचे प्रमाण वाढले असल्यामुळे अपघात कमी करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. अमरावती जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर वेगमर्यादा नियंत्रणासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. महामार्गावर वाहनांची किमान 100 आणि कमाल वेगमर्यादा 120 किमी प्रतितास निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वाहने निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त वेगाने धावत असल्याचे निदर्शनास आले असून अपघातांची संख्या कमी करण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वेगावर सतत नजर ठेवली जाणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. त्यामुळे आता समृद्धी महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी होते ka याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
मंत्री ने ठेकेदारों की क्लास ली, अलिबाग-रोहा मार्ग के लिए एक करोड़ मंजूर
Chendhare, Maharashtra:मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी घेतली बैठक .... तातडीच्या दुरुस्तीसाठी एक कोटी रुपये मंजूर ....... मागील काही वर्षांपासून रखडलेल्या अलिबाग रोहा मार्गाच्या दुरवस्थेमुळं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी बैठक घेऊन अधिकारी और ठेकेदारांची चांगलीच खरडपट्टी काढली. हे काम तातडीने पूर्ण करावं असे निर्देश त्यांनी दिले. या रस्त्याच्या तात्पुरत्या दुरुस्तीसाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून पावसाळ्यापूर्वी ही दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी में अगले चार दिनों में तेज बारिश और भीषण गर्मी का अलर्ट जारी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. hवामान खात्याकडून जिल्ह्यात आज येलो अलर्ट.. वादळी पाऊस येणार.. 20 मे पर्यंत वादळी पाऊस आणि कडक उन्हाचा दुहेरी मारा कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुढील चार दिवसात हवामानात मोठे बदल होणार असून जिल्हावासियांना एकाच वेळी कडक उन्हाचा उखाडा आणि सोसायटीच्या वारसह वादळी पावसाचा सामना करावा लागणार आहे.. hवामान खात्याच्या अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी केला असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे..0
0
Report
शिरूर में अचानक बारिश से किसानों की फसल पर संकट, कांदा और फलों को बड़ा नुकसान
Shirur, Maharashtra:Anc: पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील अनेक गावांना अवकाळी पावसाने झोडपलं असून अचानक पडलेल्या या अवकाळी पावसाने काढणीला आलेला कांदा तसेच फळबागांना मोठा फटका बसणार आहे तर उकाड्याने हैरान झालेल्या नागरिकांना मात्र वातावरणात गारवा निर्माण झाल्याने अवकाळी च्या या पावसाने दिलासा मिळालाय प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे...0
0
Report
महाबळेश्वर में पर्यटकों की भारी भीड़, गर्मी में सैर-सपाटा जारी
Satara, Maharashtra:सातारा - सध्या राज्यात उन्हाचा तडाखा वाढतो आहे. असं असलं तरी थंड हवेचे ठिकाण असलेल्या आणि महाराष्ट्राचं मिनी कश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर मध्ये मात्र पर्यटकांची तुफान गर्दी होते आहे.उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी राज्यबरोबर देशातील पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. महाबळेश्वर मधील वेगवगेळ्या पॉईंट सोबत वेण्णा लेक परिसरात बोटींगचा, हॉर्स रायडिंग चा आनंद पर्यटक घेतायत.त्याच बरोबर वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आनंद देखील पर्यटक या ठिकाणी घेतायत. महाबळेश्वर मध्ये पर्यटकांचा ओघ वाढत असल्याने ट्राफिकच्या समस्येला पर्यटकांना सामोरे जावे लागत आहे. महाबळेश्वरच्या वेण्णा लेक परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी0
0
Report
Advertisement
