445001
यवतमाळ : महिला बँक घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या बाबाजी दाते महिला बॅंकेत २४२ कोटींच्या अपहार प्रकरणात महिनाभराने अटकसत्र सुरू झाले आहे. पोलिसांनी शिवसेना नेते रमेश अगरवाल, व्यावसायिक प्रकाश पिसाळ आणि ठेकेदार प्रशांत पामपट्टीवार यांना अटक केली आहे. याआधी बँकेच्या CEO सुजाता महाजन, तिचा पती विलास महाजन, ॲड. वसंत मोहरेकर आणि नवलकिशोर मालाणी यांना अटक झाली होती. आता अटक केलेल्या आरोपींची संख्या सात झाली आहे. २०६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, ज्यामुळे संचालक व लेखा परीक्षक चिंतेत आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
अकोला: जलरथ से पेड़ों को पानी देकर शहर को हरियाला बनाने का अनोखा प्रयास
Akola, Maharashtra:एकीकडे देशभरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबवले जात असताना दुसरीकडे लावलेल्या झाडांच्या संगोपनाकडे मात्र अनेकदा दुर्लक्ष होताना दिसते. अशा परिस्थितीत अकोल्यातील अकोला गार्डन क्लब या संस्थेने वृक्ष संवर्धनासाठी अनोखा पुढाकार घेतला आहे. गेल्या 52 वर्षांपासून पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या अकोला गार्डन क्लब तर्फे झाडांना पाणी देण्यासाठी फिरता ‘जलरथ’ तयार करण्यात आला आहे. अकोला शहरातील वाढते तापमान आणि उष्णतेची तीव्रता लक्षात घेता शहर पुन्हा हिरवेगार व्हावे, या उद्देशाने गार्डन क्लबचे सदस्य रस्त्याच्या कडेला, मोकळ्या मैदानात तसेच दुर्लक्षित ठिकाणी लावलेल्या झाडांचे संगोपन करत आहेत. पर्यावरणपूरक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या या विशेष रिक्षाच्या माध्यमातूनदररोज सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत शहरातील विविध भागांमध्ये जाऊन झाडांना पाणी दिले जाते.केवळ वृक्षारोपण न करता त्यांचे संवर्धन आणि जतन करण्यावर भर देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सध्या अकोल्यातील तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असताना “सर्वाधिक उष्ण शहर” अशी ओळख पुसून अकोल्याला हिरवे शहर बनवण्याचा निर्धार गार्डन क्लबने केला आहे.0
0
Report
भंडारा PWD कार्यालय में बिजली बचत के बैनर के बावजूद अधिकारी कुलर-फैन-लाइट चालू
Bhandara, Maharashtra:भंडारा PWD कार्यालयात “वीज जपून वापरा” फलकांचा फज्जा. अधिकारी खुर्चीवर नसतानाही कुलर, फॅन आणि लाईट सुरूच. सरकारी कार्यालयातच विजेची उधळपट्टी. प्रश्न विचारताच संबंधित अधिकाऱ्यांचे मौन. “खर्रा खाऊन थुंकू नये, खाण्यास मनाई नाही”; अधिकाऱ्यांचे अजब उत्तर. गुटखा बंदीच्या फलकांनंतरही कार्यालयात सर्रास खर्रा सेवन. एकीकडे भंडारा येथील PWD विभागात “वीज जपून वापरा” अशा सूचना देणाऱ्या पाट्या लावण्यात आल्या आहेत. मात्र दुसरीकडेमार कार्यालयातील अधिकारी आपल्याच खुर्चीवर नसतानाही कुलर, फॅन आणि लाईट सर्रास सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले. शासनाच्या वीज बचतीच्या आवाहनाला अधिकारी-कर्मचारीच हरताळ फासत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, एकीकडे सामान्य नागरिकांना वीज बचतीचे धडे दिले जात असताना सरकारी कार्यालयातच विजेची उधळपट्टी होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत संबंधित अधिकारी भैसारे यांना विचारणा केली असता त्यांनी हसत मौन बाळगणे पसंत केले. तर दुसरीकडे कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर “तंबाखू, गुटका खाऊन थुंकू नये” अशा सूचना लावण्यात आल्या आहेत. मात्र त्याच कार्यालयात अधिकारी सर्रास खर्रा खाताना दिसून येत आहेत. याबाबत विचारणा केली असता “खर्रा खाऊन थुंकू नये असे लिहिले आहे, खर्रा खाण्यास मनाई नाही” असे अजब उत्तर संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.0
0
Report
भीमा नदी पर 14 बैरेज बनाकर पानी आपूर्ति सुनिश्िचित करने का नया प्रस्ताव
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीवर पाणी अडवण्यासाठी बॅरेज बांधा , अन्यथा जन आंदोलन उभं करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांनी दिला आहे. सध्या भिमा नदीतून शेती सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत नाही केवळ शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी पाणी सोडून त्या काळात वीज पुरवठा खंडित करण्याची पद्धत सुरु झाली आहे त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना शेती साठी पाणी उपलब्ध होत नाही. भीमा नदीवर 14 ठिकाणी बॅरेज बांधून घ्यावेत यामुळे शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल. पावसाळा शिवाय फक्त सोलापूर पंढरपूर शहरांना पिण्यासाठी पाणी नदीत सोडले जाते. इतर वेळी नदीत पाणी सोडले जात नाही. याचा फटका नदीकाठच्या शेतकऱ्यांना बसत आहे0
0
Report
Advertisement
नाशिक में अगले दो दिन गर्मी चरम पर, पारा 45 डिग्री के आसपास
Nashik, Maharashtra:नाशिक जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्णतेचा तडाखा कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा इशारा. मालेगाव तालुक्यात तापमानाचा पारा सर्वाधिक ४३.८ अंशांवर पोहोचल्याने नागरिक घामाघूम. नाशिक शहरात सलग दुसऱ्या दिवशी ४१.२ अंश सेल्सिअस तापमानाची विक्र्रमी नोंद. वाढत्या उन्हामुळे निफाडच्या द्राक्षपंढरीत पिकांचे नुकसान, जिल्ह्याचे जनजीवन विस्कळीत. दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हाचा कडाका जास्त असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन. जळगावमध्ये पारा ४५.५ अंशांवर, तर विदर्भातील अकोल्यात ४५.६ अंशांची नोंद0
0
Report
गोवा और महाराष्ट्र सीमा पर विदेशी शराब की अवैध ढुलाई पकड़ी, 1.47 करोड़ रुपये जप्त
Yeola, Maharashtra:गोवा राज्यात निर्मित व महाराष्ट्रात वाहतूक तसेच विक्रीस प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याच्या अवैध वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या येवला पथकाने धडक कारवाई केली. नंदुरबार जिल्ह्याकडे ट्रकमधून मोठ्या प्रमाणात मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर येवला विंचूर चौफुलीजवळ सापळा रचण्यात आला. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये सुमारे ५७ हजार ६०० प्लास्टिक विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. या कारवाईत वाहनासह विदेशी मद्यसाठा असा एकूण १ कोटी ४७ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतला आहे0
0
Report
सातारा के महामार्ग 965D के रुंदीकरण में शिरवळ-लोणंद के पास अवैध पेड़ काटने का आरोप
Satara, Maharashtra:सातारा : शिरवळ-लोणंद-सातारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ डीच्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान शिवथर ते वाढे फाटा परिसरात नियमबाह्य वृक्षतोड झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांनी केला आहे. रस्त्याच्या हद्दीबाहेरील अनेक जुनी झाडे तोडण्यात आल्याने संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. महामार्गासाठी आवश्यक झाडतोडीची پرवानगी असतानाही अडथळा नसलेली झाडेही तोडल्याचा आरोप आहे. संबंधित ठेकेदाराने “झाडांचे पुनर्जीवन करण्यात येईल” असे स्पष्टीकरण दिले असले तरी पर्यावरणप्रेमींनी त्यावर टीका केली आहे. नव्याने लावलेल्या झाडांची देखभाल होत नसल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.0
0
Report
Advertisement
पालघर किसान-आंदोलन: जल-जंगल-ज़मीन के अधिकार के लिए बड़े मोर्चे की आवाज
Palghar, Maharashtra:पालघर कडक उष्णीची पर्वा न करता हजारो शेतकरी, आदिवासी, महिला आणि युवकांनी पालघरमध्ये जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी एल्गार पुकारला. माकप आणि अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली पालघर प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. लाल झेंडे आणि जोरदार घोषणांनी पालघर शहर दणाणून गेले. यावेळी वनपट्टे, गायरान आणि सरकारी जमिनी कसणाऱ्यांच्या नावावर करण्याची मागणी करण्यात आली. तसेच विराज प्रकल्पाच्या दूषित सांडपाण्याविरोधात आणि एमआयडी मधील प्रदूषण थांबवण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.0
0
Report
सोयाबीन पिक विमा प्रकरण: बीजेपी-शिवसेना में तीखी बहस, राठोड पर आरोप
Yavatmal, Maharashtra:सोयाबीन पिकाच्या विम्यापासून यवतमाळ जिल्ह्याला वगळल्याप्रकरणी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली आहे. भाजपने यासाठी शिवसेनेचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात टोकाची भूमिका घेत त्यांच्यावर टिकेची झोड उचलविली आहे. जिल्ह्यातील ३ लाख ६९ हजार ३६२ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २७ कोटी रुपये प्रीमियम भरला. यासोबतच केंद्र व राज्य सरकारने मिळून १०७ कोटी रुपयांचा हिस्सा अग्रिकल्चर इंशुरन्स कंपनी ऑफ इंडियााकडे जमा केला. मात्र एवढा मोठा निधी जमा होऊनही शेतकऱ्यांना फुटक्या कवडीचाही विमा लाभ मिळालेला नाही, ही अत्यंत गंभीर व संतापजनक बाब असून यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांच्या अक्षम्य दुर्लक्ष कारणीभूत आहे, ते उगाचच मुख्यमंत्री व केंद्र सरकारवर खापर फोडून शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत असा आरोप भाजप नेते देवानंद पवार यांनी केला आहे. पीक काढणी प्रयोगाच्या वेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी आवश्यक ती दक्षता घेतली नाही. त्यामुळे पालकमंत्री जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकारी हेच विमा न मिळण्यास कारणीभूत आहे. त्यांची भूमिका संशयास्पद असून या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी भाजपाने केली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने भाजपवर पलटवार केला. भाजप मध्ये आलेल्या उपऱ्या नेत्यांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रति द्वेषाचा चष्मा घातला आहे, भाजपला पिक विमा जाहीर होण्याची पद्धत समजत नाही, भाजपचे आरोप बघितले तर ते प्रधानमंत्री मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्र्यां विरोधातले आहे. त्यामुळे जाणून-बुजून पालकमंत्र्यांवर टीका कराल तर शिवसेना स्टाईल उत्तर मिळेल असा इशारा शिवसेनेचे संपर्कप्रमुख हरिहर लिंगनवार यांनी दिला आहे.0
0
Report
जालना के जिला अस्पताल में MRI सेवा शुरू, मरीजों को मिली राहत
Jalna, Maharashtra:जालना : जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आता एमआरआय सेवा सुरू; रुग्णांना दिलासा. आमदार अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला शुभारंभ. अँकर : जालना जिल्हा रुग्णालयात मंगळवारपासून एमआरआय सेवा सुरू करण्यात आली आहे. शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सेवा सुरू करण्यात आली. या सेंटरचे उद्घाटन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न झाले. काही दिवसांपूर्वी मुंबई येथे आमदार अर्जुन खोतकर यांनी सार्वजनिक आरोग्य तसेच कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेतली होती. या बैठकीदरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे एमआरआय सेंटर उपलब्ध करून देणे, आधुनिक आरोग्य सुविधा वाढवणे तसेच नागरिकांना तातडीच्या वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली होती. या बैठकीनंतर तातडीने निर्णय घेत जिल्हा सामान्य रुग्णालयात आधुनिक एमआरआय मशीन मंजूर करण्यात आले. मंगळवारी या सेंटरचा शुभारंभ करण्यात आला.0
0
Report
Advertisement
जालना: बदनापूर के कनारा बैंक में 7 करोड़ 31 लाख के अपहरण जैसा मामला, 17 दिन बाद मुख्य आरोपी समेत 5 गिरफ्तार
Jalna, Maharashtra:जालना : बदनापूरच्या कॅनरा बॅंकेतील 7 कोटी 31 लाखांचं अपहार प्रकरण, 17 दिवसांनी मुख्य आरोपीसह 5 जणांना अटक जालना : बदनापूरच्या कॅनरा बँक शाखेत ७ कोटी ३१ लाख रुपयांचा अपहार झाला आहे. याप्रकरणी बदनापूर पोलिसांनी मुख्य आरोपी आसाराम डोंगरे याच्यासह पाच जणांना अटक केली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल १७ दिवसांनी मुख्य आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. बँकेचा व्यवस्थापक आणि सुवर्णकार यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. पोलिसांना सुगावा लागू नये म्हणून तो हॉटेलऐवजी किरायाने एक रूम घेऊन तेथे राहत होता, कॅनरा बँकेच्या बदनापूर शाखेत झालेल्या अपहार प्रकरणात २५ एप्रिल रोजी बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याच दिवशी बँकेचा व्यवस्थापक विजेंद्र पाटणकर आणि सुवर्ण मूल्यमापक प्रवीण बुहांडे यांना अटक केली होती. या प्रकरणात थेट बँकेच्या तिजोरीतून सोन्याची पाकिटे चोरल्याचा आरोप असलेला मुख्य संशयित आरोपी संजय आसाराम डोंगरे हा फरार होता. बदनापूर पोलिसांनी संजय डोंगरे याच्यासह सचिन सानप सार्थक जाधव, रघुनाथ शिंदे, आणि शिवाजी दराडे या पाचजणांना अटक केली आहे.0
0
Report
सिन्नर में फर्जी खातों से वित्तीय गड़बड़ी के आरोप, भोंदू अशोक खरात गिरफ्तार
Nashik, Maharashtra:न्यायालयीन कोठडीतून भोंदू अशोक खरातचा सिन्नर पोलिसांनी ताबा घेतला. जगदंबा पतसंस्थेतील फेक अकाउंट और आर्थिक व्यवहार प्रकरणी मोठी कारवाई. सिन्नरमध्ये दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी न्यायालयाकडून ताब्याला मंजुरी. उशिरा रात्री पोलिसांनी खरातला अधिकृत ताब्यात घेतले. बनावट खात्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहाराच तपास वेगात. उद्या सिन्नर न्यायालयात हजर करत पोलिस कोठडीची मागणी होणार. एका मागोमाग एक गुन्ह्यांनी खरातच्या अडचणी वाढतच चालल्या. भोंदूगिरीनंतर आता आर्थिक व्यवहारांचाही फास आवळू लागला0
0
Report
हिंगोली में जल संकट: 28 गाँवों के लिए नई बोरवेल-हाथपंप मंजूरी
Hingoli, Maharashtra:हिंगोली जिल्ह्यात जाणवणारी पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता हिंगोली जिल्ह्यातील 28 गावांमध्ये नवीन विहीर बोरवेल्स आणि हातपंप उभारणीच्या कामांना जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे हिंगोली जिल्ह्यातील वसमत सेनगाव हिंगोली 28 गावांमध्ये नव्या विहधन विहिरींना मंजुरी मिळाली आहे विहिरीसाठी 78 हजार 51 रुपये याप्रमाणे एकूण 17 लाख 95 हजार 173 रुपयांच्या मान्यता देण्यात आली आहे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्ह्यातील पाणीटंचाई करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे..0
0
Report
Advertisement
जालना नगरपालिका के भाजप पार्षदों के बीच मारपीट, चेन छीना और जातिवादी गालियां
Jalna, Maharashtra:जालना : महापालिकेतील भाजप नगरसेवकां मधील राडा प्रकरण ,महावीर ढक्का यांच्या बाजूनेही गुन्हा दाखल, चेन हिसकावल्यासह जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार महापालिकेतील मारहाण प्रकरणी कुणालाच अटक नाही, फॉरेन्सिकने घेतले बोटांचे ठसे जालना महानगरपालिकेत स्थायी समितीचे सभापती अशोक पांगारकर आणि महावीर ढक्का यांच्यासह त्यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली। पांगारकर यांच्या बाजूने दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता। दरम्यान ढक्का यांचा भाचा आकाश दुलगज यांच्या फिर्यादीवरून मारहाण करणे, जातिवाचक शिवीगाळ करणे या कलमांखाली प्रतीक पांगारकर, लखन ठाकूर, अशोक अण्णा पांगारकर, विजू पांगारकर यांच्यासह इतर चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत सीसीटीव्ही घेतले। २४ तास उलटूनही कुणालाच अटक नाही। फॉरेन्सिक पथकाने बोटांचे ठसे व तसेच इतर पुरावे गोळा केले आहेत। आकाश दुलगज हे मनपात आले होते। महापौरांच्या केबिनजवळ प्रतीक पांगारकरसह अन्य मामा महावीर ढक्का यांना शिवीगाळ करीत होते। सोडवण्यासाठी गेलो असता प्रतीक पांगारकरने धारदार शस्त्राने वार करीत जखमी केले। इतरांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली। 12.5 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसकावून घेतली। तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या तक्रारीवरून पांगारकर यांच्यासह 8 ते 9 जणांविरुद्ध कदीम जालना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.0
0
Report
वन विभाग ने रानडुक्कर शिकारी का प्रयास नाकाम कर आठ गिरफ्तार
Bhandara, Maharashtra:रानडुक्करांच्या शिकारीचा प्रयत्न उधळला भंडारा वनविभागांतर्गत येणाऱ्या जांबकांद्री वनक्षेत्रातील सहवनक्षेत्र आंधळगाव नियतक्षेत्र हरदोली येथे रानडुक्कर पकडण्याचा प्रयत्न वनविभागाने उधळून लावत आठ जणांना अटक केली आहे. वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी जाळे लावून रानडुक्कांचा कळप पकडण्याचा डाव वन फसला अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे असून या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.0
0
Report
रत्नागिरी के कोकण में केरला-जसा जलपर्यटन, हाउसबोट सफारी से महिलाओं को रोजगार
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकणात आता ‘केरळ पॅटर्न’ जलपर्यटन! वाशिष्ठी खाडीत हाऊसबोट सफारी; महिलांना रोजगाराची संधी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये पर्यटनाला नवी दिशा देण्यासाठी वाशिष्ठी खाडीत हाऊसबोट सफारी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता पर्यटकांना कोकणातही केरळप्रमाणे जलपर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. स्थानिक अग्निपंख प्रभाग महिला बचत गटाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येत असून ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा परिषद आणि स्थानिक प्रशासनाच्या सिंधुरत्न योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेली ही वातानुकूलित आणि अत्याधुनिक हाऊसबोट भोजन व्यवस्था, तसेच मनोरंजनासाठी डेकसह सज्ज आहे. काही तासांपासून दिवसभरासाठी उपलब्ध असलेल्या या सफारीतून पर्यटकांना कोकणचं निसर्गसौंदर्य, कांदळवन, पक्षीवैभव आणि जलपर्यटनाचा अनोखा अनुभव मिळत आहे. त्यामुळे चिपळूणच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.0
0
Report
Advertisement
