445001
यवतमाळ : महिला बँक घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या बाबाजी दाते महिला बॅंकेत २४२ कोटींच्या अपहार प्रकरणात महिनाभराने अटकसत्र सुरू झाले आहे. पोलिसांनी शिवसेना नेते रमेश अगरवाल, व्यावसायिक प्रकाश पिसाळ आणि ठेकेदार प्रशांत पामपट्टीवार यांना अटक केली आहे. याआधी बँकेच्या CEO सुजाता महाजन, तिचा पती विलास महाजन, ॲड. वसंत मोहरेकर आणि नवलकिशोर मालाणी यांना अटक झाली होती. आता अटक केलेल्या आरोपींची संख्या सात झाली आहे. २०६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, ज्यामुळे संचालक व लेखा परीक्षक चिंतेत आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
यवतमाळ में जिलाधिकारी ने पेट्रोल पंपों की निगरानी और किसानों को डीजल प्राथमिकता निर्देश दिए
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये जिल्हाधिकारी विकास मीना यांनी विविध पेट्रोल पंपांची पाहणी करून इंधन पुरवठा व साठा व्यवस्थेचा आढावा घेतला. पेट्रोल पंप कार्यालयातील नोंदवही, वर्षनिहाय इंधन पुरवठ्याची माहिती, संबंधित दस्तावेज तसेच सीसीटीव्ही यंत्रणेची तपासणी केली. इंधन वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याबरोबरच नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी शेतकऱ्यांना प्राधान्याने डिझेल उपलब्ध करून द्यावे, पेट्रोल पंपांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी योग्य नियोजन करावे, सीसीटीव्हीचा डेटा सुरक्षित ठेवावा तसेच इंधन साठ्याबाबतची माहिती दर्शनी भागात स्पष्टपणे प्रदर्शित करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी विकास मीना यांनी पेट्रोल पंप चालकांना दिल्या.0
0
Report
आउरंगाबाद-जालना निर्वाचन क्षेत्र में मतदान के दौरान कड़ी निषेधाज्ञा लागू
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Aurangabad-Jalna स्थानिक स्वराज्य मतदारसंघ निवडणूक पारदर्शक वातावरणात पाडण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात १८ मे २०२६ ते २५ जून २०२६ रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यत मनाई जमावबंदीचे व दोन्ही जिल्ह्यात पोस्टर्स, बॅनर्स लावण्यास बंदी असल्याचे आदेश दिले आहेत, निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी-कर्मचारी आणि मतदानासाठी रांगेत उभे असलेले मतदार वगळता, जिल्ह्यात पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात कोणत्याही व्यक्तीला, तसेच मतदान केंद्रातील मतदान प्रतिनिधींना मोबाइल फोन, कॉर्डलेस फोन, मेगा फोन, मायक्रोफोन किंवा वायरलेस सेट वापरण्यास आणि फोटो काढण्यास मनाई असेल. बंदोबस्तासाठी नेमलेले पोलिस अधिकारी व कर्मचारी वगळून इतर कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारची शस्त्रे बाळगता येणार नाहीत. तसेच, केवळ परवानगी दिलेल्या वाहनांनाच या परिसरात प्रवेश मिळेल असे आदेश काढण्यात आले आहेत...0
0
Report
शिवाजी नगर अंडरपास पर 3.4 मीटर ऊँची लोहे की चौखट, भारी वाहनों पर रोक से यातायात में कमी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या प्रवेशद्वारावर सार्वजनिक बांधकाम विभागाने ३.४ मीटर उंचीची मजबूत लोखंडी चौकट बसवली आहे. त्यामुळे, आता या मार्गातून जड वाहनांची ये- जा होऊ शकणार नाही. परिणामी वारंवार होणारी वाहतूक कोंडी टाळण्यास यामुळे मदत होणार आहे. ४ मे पासून सुरू असलेल्या कामानंतर तब्बल २२ दिवसांनी पूर्वीप्रमाणेच जाड स्वरूपाची लोखंडी चौकट याठिकाणी उभारण्यात आली. शिवाजीनगरच्या बाजूने लोखंडी चौकट नसल्याने मार्गात उंच वाहन अडकून वारंवार वाहतूक कोंडी होत होती. नव्याने बसविण्यात आलेल्या संबंधित चौकटीमुळे वाहनचालक आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासातून सुटका होईल.0
0
Report
Advertisement
छत्रपति संभाजीनगर में जलापूर्ति योजना: 12 जून से 50 एमएलडी, धीरे-धीरे 100 एमएलडी तक
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपाती संभाजी नगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे वाढीव पाणी सध्या अस्तित्वात असलेल्या योजनेतूनच दिले जाणार असून, शहरातील पाण्याचा गॅप कमी करण्याला प्रशासनाचे प्राधान्य राहील, अशी माहिती महापालिका आयुक्त यांनी दिली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १२ जूनला सुरुवातीला ५० एमएलडी वाढीव पाणी मिळेल व टप्याटप्याने ते १०० एमएलडीपर्यंत नेले जाईल. नवीन योजनेसाठी नक्षत्रवाडी डोंगरावर एमबीआर जलकुंभ उभारले असून, तेथून ११००, १५०० आणि २००० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिन्या जोडल्या आहेत. पाणीपुरवठा यापैकी प्रथम १५०० व त्यानंतर ४-५ दिवसांनी २००० मिलीमीटरची जलवाहिनी सुरू केली जाईल. यातून पाणी दिल्यानंतर, शिल्लक राहणारे वाढीव पाणी जुन्या योजनेतून वितरित करण्यात येईल अशी माहिती महापालिकेन दिलीय...0
0
Report
मानसून की आहट से नाणेघाट के आदिवासी किसान जल्दी कर रहे धान रोपण
Shirur, Maharashtra:राज्यात मान्सूनची चाहूल लागली असून सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील नाणेघाटात पावसाच्या सरी कोसळू लागल्यात, त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांची भात रोपे टाकण्याची लगबग सुरू झाली असून यंदा मे महिन्यात लवकरच शेतकऱ्यांनी भात रोपे टाकायला सुरुवात केलीय, मागील वर्षी भात रोपे टाकण्याच्या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांना भातरोपेच टाकता आली नाही त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी लवकर धुळवाफेवरतीच पहिल्या पावसानंतर भात रोपे टाकण्याला सुरुवात केलीय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी0
0
Report
शहर में आकाशीय तूफान और बारिश की चेतावनी: गरज के साथ आंधी-तूफान की संभावना
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरात उन्हाचा चटका कायम असतानाच आता हवामानात मोठा बदल होणार आहे. बुधवारीबकमाल तापमान ३९.६ सेल्सियस अंश आणि किमान तापमान २६.१ सेल्सियस अंश नोंदवले गेले असून, हवेत ६१% पर्यंत आर्द्रता होती. दरम्यान, हवामान विभागाने २८ मे ला शहरात वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गुरुवारी आकाश अंशतः ढगाळ राहील तसेच दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहतील, असा अंदाज आहे. २९ मे रोजी आकाश निरभ्र होऊन तापमान ४० सेल्सियस अंश होईल.0
0
Report
Advertisement
महाड में गोदाम आग: जानिए कैसे हुई घटना और क्या नुकसान हुआ
Chendhare, Maharashtra:महाड शहरातील जुने पोस्ट कार्यालय परिसरात असलेल्या गोदामाला रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच महाड नगर परिषदेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. गोदामात तेलाचा साठा असल्याने आगीची तीव्रता वाढण्याची शक्यता होती. मात्र आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं. खबरदारीचा उपाय म्हणून काहीकाळ परिसरातील विद्युत पुरवठा तात्काळ बंद करण्यात आला होता. आगीत मोठी वित्तहानी झाली आहे तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.0
0
Report
नाशिक में भीषण लू: 7 हजार खर्च कर गौशाला में फॉगर्स, दूध उत्पादन सुधरा
Lasalgaon, Maharashtra:नाशिक जिल्ह्यासह राज्यामध्ये उष्णतेची लाट आल्याने उन्हाच्या कडाक्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे थंडीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातही यंदा कमाल तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिऑसच्या वरती कायम असून 43 अंश सेल्सिऑसपर्यंत पोहोचला असून दररोज 41 अंश सेल्सिऑस कमाल तापमान असल्याने या वाढत्या तापमानाचा परिणाम केवळ मनुष्यावरच नव्हे तर जनावरांवरही होत असल्याचे चित्र दिसून येत आहे लासलगाव येथील शेतकरी प्रमोद पाटील यांच्या गाईंची तब्येत उष्णतेमुळे खालावली होती त्यामुळे दुध उत्पादनातही घट झाली होती वाढत्या तापमानामुळे गोठ्यातील वातावरण अधिक गरम होत असल्याने त्यांनी गाईंसाठी विशेष उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला गोठ्यातील तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रमोद व महेंद्र पाटील या पाटील बंधूंनी सुमारे 7 हजार रुपये खर्च करून पाण्याचे 16 फॉगर (स्प्रे) बसवले आहेत या फॉगरमुळे गोठ्यात थंडावा निर्माण होत असून तापमान कमी ठेवण्यास मोठी मदत होत आहे त्यामुळे गाईंच्या तब्येतीत सुधारणा झाली असून दुध उत्पादनही पुन्हा वाढल्याचे ते सांगितले आहे त्यांचा हा अनोखा प्रयोग या निमित्ताने यशस्वी झाला आहे0
0
Report
रामदास आठवले: मुसलमान औरंगजेब के वंशज नहीं, धार्मिक भावनाएं न भड़काएं
Palghar, Maharashtra:मुसलमान हे काही औरंगजेब ची अवलाद नसून ते आपलेच आहेत त्यामुळे कोणी धार्मिक भावना भडकवू नये मग ते भाजपचे असतील की इतर कोणी असतील अस सांगत रामदास आठवले यांनी भाजपवरच टीका केल्याचं पाहायला मिळालं. रामदास आठवले पालघर जिल्हा दौऱ्यावर असून यावेळी पत्रकारांची बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं . धार्मिक भावना भडकवून संविधानाला छेद देण्याचा काम केलं जाऊ नये असं देखील आठवले यावेळी म्हणाले ।0
0
Report
Advertisement
पालघर में मोदी पर AI-generated वीडियो पोस्ट पर युवक गिरफ्तार
Palghar, Maharashtra:पालघर पंतप्रधान नरेंद्र मोदीबद्दल सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट आणि एआय जनरेट केलेलं वीडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणी पालघर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हरि शंकर जयस्वाल अस अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून तो उमरोळी गावातील राहणारा आहे. सदर व्यक्तीचे मोबाइल दुकान असून त्याने सौदी प्रिंसचे बूट घासताना पंतप्रधान नरेंद्र मोदीचे एआय जनरेट केलेले व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून वादग्रस्त टिप्पणी केली होती. हा प्रकार समजल्यावर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्या युवकाला पकडून पालघर पोलिसांना सुपूर्द केले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.0
0
Report
नागपुर में नौकरी के नाम पर दो ने छह लाख की धोखाधड़ी; हिंगोली पुलिस ने मामला दर्ज किया
Hingoli, Maharashtra:नागपूर येथील दोघांनी नोकरी लावण्याचे दाखवून सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार हिंगोलीत उघडकीस आला असून फसवणूक केल्याबद्दल हिंगोली शहर पोलिसात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे; आरोपींनी अनेक युवक-युवतींना नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले. मात्र पैसे घेतल्यानंतरही नोकरी न लावता टाळाटाळ केल्याने फसवणूक झाल्याचे समोर आले आहे..0
0
Report
जरांगे की प्रेस कांफ्रेंस: मराठा आंदोलन के तहत आमरण उपवास की संभावना
Jalna, Maharashtra:जालना : मनोज जरांगे पाटील यांची आज सकाळी 10.30 वाजता पत्रकार परिषद, जरांगे कठोर उपोषणाची घोषणा करण्याची शक्यता भाजप आमदार प्रसाद लाडही उद्या जरांगेंसोबत चर्चेला येणार अँकर : मनोज जरांगे पाटील यांची आज पत्रकार परिषद होणार आहे. अंतर वाली सराटी येथे आज सकाळी 10.30 वाजता जरांगे यांची पत्रकार परिषद होणार आहे. जरांगे यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारला आजच्या तारखेपर्यंतचा अल्टीमेटम दिलेला आहे. जरांगे यांनी सरकारला दिलेली ही मुदत संपत आहे. मात्र राज्य सरकार कडून अद्याप मराठा समाजाच्या मागण्याबाबत जरांगे यांना कोणताही उत्तर देण्यात आलेल नाही त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत जरांगे कठोर आंदोलनाची घोषणा करणार असल्याची माहिती जरांगे यांनी दिली आहे. दरम्यान जरांगे यांच्याशी अंतर वाली सराटी येथे भाजप आमदार प्रसाद लाड यांनी चर्चा केल्यानंतर लाड पुन्हा उद्या दुपारी 12.30 वाजता जरांगे यांची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटी येथे जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे उद्याच्या चर्चेत जरांगे यांच्या 30 मे रोजीच्या आमरण उपोषणाबाबत काही तोडगा निघतोका याकडे देखील सर्वाचं लक्ष लागलेलं आहे.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी सहित 3 जिलों के 16 मतदान केंद्र, 1018 मतदाता मतदान करेंगे
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी 16 केंद्रांवर 1 हजार 18 बजावणार मतदानाचा हक्क विधान परिषद निवडणूक 18 जूनला बॅलेट पेपरवर मतदान अँकर विधान परिषदेच्या रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीची प्रशासनाकडून जय्यत तयारी केली आहे मतदानासाठी तिन्ही जिल्ह्यात 16 मतदार केंद्र असून त्यावर 1 हजार 18 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत जिल्हा परिषद,नगर परिषद सदस्यांसह नगराध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती हे निवडणुकीसाठी मतदार असणार आहेत बॅलेट पेपरवर 18 जूनला ही निवडणूक होणार आहे तर 22 जूनला रत्नागिरी कुवारबाव येथील सिंचन भवन येथे मतमोजणी होणार आहे0
0
Report
नाशिक के मालेगाव में अवैध ऑक्सीटोसिन की बड़ी खेप पकड़, सात लाख का माल बरामद
Nashik, Maharashtra:नाशिकच्या मालेगावात अवैध ऑक्सिटोसिन औषधांच्या साठ्यावर छापा... - सात लाखांचा मुद्देमाल जप्त.. - गुन्हे शाखेची कारवाई; दोन संशयित ताब्यात; एक महिला मात्र फरार Anc: मालेगाव शहरातील झांजेश्वर मंदिराजवळ उभ्या असलेल्या एका पिकअप वाहनामध्ये २६ खाकी रंगाच्या बॉक्समध्ये प्रत्येकी १०० मिलीच्यां ऑक्सिटोसिन औषधाच्या १९५ बाटल्या अशा एकूण ५,०७० बाटल्या जप्त करण्यात आल्या, या बाटल्यांवर कोणत्याही कंपनीचे नाव नसल्याचे निदर्शनास आले. जप्त औषधांची किंमत १ लाख ४ हजार रुपये असून, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली सहा लाख रुपये किमतीची पिकअप गाडीही जप्त करण्यात आली. असा एकूण ७ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हस्तगत केला. याप्रकरणी संशयित आदिल शेख अश्पाक (वय २०, रा. चाळीसगाव, जि. जळगाव) व आफताब आलम ईबन हसन (वय ४८, रा. हिरापुरा, मालेगाव) यांना पोलिसांनी अटक केली असून.... संशयित नूरजहाँ आफताब ही महिला घटनास्थळावरून फरार झाली0
0
Report
रत्नागिरी में तीन महीनों में 603 सर्पदंश, गर्मी-ठंड में भी घटनाएं बढ़ीं
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्ह्यात तीन महिन्यात 603 व्यक्तींना सर्पदंश.. सर्पदंशाच्या घटनांत वाढ.. रत्नागिरी शहर आणि जिल्हा सर्पदंशाचं प्रमाण वाढले असून सर्वाधिक पावसाळ्यात सर्पदंशचं प्रमाण सर्वाधिक असते. मात्र यंदा थंडी, उन्हाळ्यातही दंशाच्या घटना घडल्या आहेत. जानेवारी ते एप्रिल या दरम्यान तब्बल 603 जणांना सर्पदंशाच्या घटना घडल्या आहेत.. त्याचबरोबर 400 हundan अधिक जणांना विंचुदोष झाला आहे, याचबरोबर माकड, मांजर, कुत्रा यासह इतर प्राण्यांनी हजारो जणांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत..0
0
Report
Advertisement
