445001
यवतमाळ : महिला बँक घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या बाबाजी दाते महिला बॅंकेत २४२ कोटींच्या अपहार प्रकरणात महिनाभराने अटकसत्र सुरू झाले आहे. पोलिसांनी शिवसेना नेते रमेश अगरवाल, व्यावसायिक प्रकाश पिसाळ आणि ठेकेदार प्रशांत पामपट्टीवार यांना अटक केली आहे. याआधी बँकेच्या CEO सुजाता महाजन, तिचा पती विलास महाजन, ॲड. वसंत मोहरेकर आणि नवलकिशोर मालाणी यांना अटक झाली होती. आता अटक केलेल्या आरोपींची संख्या सात झाली आहे. २०६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, ज्यामुळे संचालक व लेखा परीक्षक चिंतेत आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
राजापूर-लांजा में जनता दरबार: विधायक किरण सामंत ने जनता की समस्याओं को सुना
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. राजापूर और लांजामध्ये रंगला 'जनता दरबार'.. aमदार किरण सामंत यांनी समजून घेतले जनतेचे प्रश्न,समस्या.. अँकर आपला आवाज.. आपला हक्क..!या ब्रीदवाक्यासह राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) रवींद्र सामंत यांनी जनतेच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी आज उपविभागीय अधिकारी कार्यालय,छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह राजापूर येथे विशेष 'जनता दरबार' आयोजित केला. या उपक्रमाद्वारे प्रशासकीय अडचणींपासून ते वैयक्तिक तक्रारींपर्यंत सर्व विषयांवर चर्चा करून तातडीने मार्ग काढून त्यांची समस्या सोडवविण्यास प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगितले.. या जनता दरबारात मोठ्या संख्येने लांजा-राजापूर मतदारसंघातील नागरिक आपल्या प्रशासकीय कामातील समस्या, तक्रारी आणि प्रश्न, प्रलंबित विकास कामे आदी समस्यांचा पाढा घेऊन मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.. विविध विकास आणि लोकाभिमुख कारभारासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे...0
0
Report
लक्ष्मी ऑर्गेनिक के पी-फास रसायन के विरुद्ध नागरिकों ने मोर्चा खोला
Ratnagiri, Maharashtra:LAXMI ORGANIC विरोधात सह्यांची मोहीम.. रत्नागिरी लोटे एमआयडीसीतील लक्ष्मी ऑरगॅनिकमधील पी-फास रसायन उत्पादनाला नागरिकांचा विरोध; चिपळुणात सह्यांची मोहीम Anchor : रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसी परिसरातील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीच्या प्रस्तावित पी-फास या घातक रसायन उत्पादनाविरोधात नागरिक आक्रमक झाले आहेत. कोकण पर्यावरण संघर्ष समितीच्या वतीने चिपळूणमध्ये सुरू करण्यात आलेल्या सह्यांच्या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत असून, गेल्या तीन दिवसांत तब्बल साडेतीन हजार नागरिकांनी या प्रकल्पाविरोधात सह्या केल्या आहेत.0
0
Report
42°C तापमान में ज्वारी की कटाई मशीनों से तेज, किसान तनाव कम
Washim, Maharashtra:अँकर: वाशिम जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा परिणाम शेती कामांवर दिसून येत असून उन्हाळी ज्वारी काढणीला वेग आला आहे. तापमान 42 अंशांच्या पुढे जात असल्याने शेतकरी सकाळ आणि सायंकाळच्या वेळेतच काढणी करत आहेत. अनेक ठिकाणी हार्वेस्टरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर ज्वारी काढणी सुरू असून कमी वेळेत काम पूर्ण होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. तीव्र उन्हामुळे मजूरटंचाई वाढल्याने यांत्रिक काढणीला अधिक पसंती दिली जात आहे. हवामान विभागाने तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकरी पीक लवकर सुरक्षित करण्याच्या तयारीत आहेत.0
0
Report
Advertisement
दुबई गैंगस्टर से संपर्क के शक पर भंडारा के युवक ATS-IB ने हिरासत में लिया
Bhandara, Maharashtra:दुबईस्थित गँगस्टरशी संपर्काच्या संशयावरून युवक ताब्यात. भंडाऱ्यातील बडा बाजार परिसरात मोबाईल व्यवसाय करणाऱ्या संशयिताला एटीएस व आयबीच्या संयुक्त पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. दुबईस्थित गँगस्टर सहजाद भट्टी याच्याशी मोबाईलद्वारे संपर्क असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. संबंधित यंत्रणांकडून त्याची चौकशी सुरू असून, संपर्काचे स्वरूप आणि त्यामागील कारणांचा तपास केला जात आहे. अधिकृत स्तरावर मात्र याबद्दल अद्याप सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. रोहित शेंडे हा “आशीर्वाद मोबाईल” नावाचे भंडाऱ्यात दुकान चालवत असल्याची माहिती आहे.0
0
Report
एमआईएम नगरसेवक ने फर्जी जन्म प्रमाणपत्र दिखाकर चुनाव लड़ा, गिरफ्तार
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anchor : एमआयएम नगरसेवक मातीन पटेल याचे अनधिकृत बांधकाम महापालिकाे ने तोडले त्यातच एमआयएम च्या आणखी एक नगरसेवकांचा वेगळाच कारणामा आता पुढं आला आहे स्वतःचे 3 अपत्य असताना त्याने निवडणूक शपथपत्रात 2 अपत्य दाखवले त्यातून फसवणूक प्रकरणी नगरसेवक मेहराज खान याला अटक झालीं आहे पाहुयात काय आहे प्रकार नगरसेवक पदासाठी 3 अपत्य असताना दाखवले 3 अपत्य एमआयएम नगरसेवक मेहराज खान याचा कारणामा पोलिसांकडून फसवणूक केली म्हणून मेहराज ला अटक महापालिका निवडणुकीत नगरसेवकपद अबाधित ठेवण्यासाठी स्वतःच्या तिसऱ्या मुलाला सख्ख्या भावाचा मुलगा असल्याचे भासवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासाठी बनावट जन्मदाखला आणि शाळेचे खोटे बोनाफाइड सर्टिफिकेट तयार करून शासनाची, मनपाची फसवणूक केल्याप्रकरणी एमआयएमचे नगरसेवक मेहराज खान आणि शाळेचे खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या मुख्याध्यापक इलियास कदीर सिद्दिकी यांना अटक करण्यात आली असून, त्याशिवाय नगरसेवकाची पत्नी सह आणखी 4 लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय ... एक मानहानी च्या प्रकरणात चौकशी सुरू होती त्यात आरोपी नगरसेवक मेहराज खान यांच्या सोबत एक अल्पवयीन मुलगा होता. याअल्पवयीन मुलाच्या चौकशीतून या बनवेगिरीचे बिंग फुटले, असे पोलिसांनी सांगितले. काय आहे प्रकरण मेहराज खान जलील खान यांनी मनपा निवडणुकीत अर्जासोबत शपथपत्रात आपल्याला केवळ मुलगा आणि मुलगी अशी दोनच अपत्ये असल्याचे नमूद केले होते. तिसरे अपत्य असल्याचे समोर आले असते तर मेहराज खान हे दोनपेक्षा जास्त अपत्यांच्या नियमानुसार नगरसेवकपदासाठी अपात्र ठरले असते. स्वतःचे पद वाचवण्यासाठी आणि निवडणूक लढवण्यासाठी आरोपीने कुटुंबाशी आणि मुख्याध्यापकांशी संगनमत करून स्वतःच्या तिसऱ्या अपत्याला भावाचा मुलगा म्हणून कागदोपत्री दाखवले. या प्रकरणात सिटी चौक पोलिसब ठाण्यात ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. Byte पंकज अतुलकर, डीसीपी याबाबत एमआयएनने सावध भूमिका घेतली आहे ज्याने चूक केली त्यावर कारवाई करावीच अशी भूमिका एमआयएम नेता इम्तियाज जलील यांनी मांडली तर एमआयएम खोटरड्या लोकांचा पक्ष आहे ते असलीच खोटी काम करतात असा टोला पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी लावलाय.. याबाबत एमआयएम ने सावध भूमिका घेतली आहे ज्याने चूक केली त्यावर कारवाई करावीच अशी भूमिका एमआयएम नेता इम्तियाज जलील यांनी मांडली तर एमआयएम खोटरड्या लोकांचा पक्ष आहे ते असलीच खोटी काम करतात असा टोला पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी लावलाय.. एकाच दिवसात एमआयएम च्या 2 नगरसेवकांना आता दणका बसलाय, मातीन पटेल याचे घर अतिक्रमण मूळ पाडले तर अपत्य प्रकरणात मेहराज खान याला अटक झाली त्यामुळं महापालिकेत 33 नगरसेवकांचे संख्याबळ असलेली एमआयएम पार्टी मात्र आता चांगलीच अडचणीत आलीय...0
0
Report
नीट पेपर लीक: महाराष्ट्र में कार्रवाई तेज, धनंजय लोखंडे गिरफ्तार
Shirdi, Maharashtra:नीट परीक्षा पेपर लीक के बाद महाराष्ट्रात कारवाई सुरु झाली असून नाशिकच्या शुभम खैरनार याच्यानंतर दुसरा संशयित आरोपी धनंजय लोखंडे यास विशेष पथकाने ताब्यात घेतले आहे. मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील रहिवासी असलेला व सध्या पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे वास्तव्यास असणारा धनंजय लोखंडे याला विशेष पथकाने ताब्यात घेतले असून त्याला राहुरीतून ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. स्थानिक वरिष्ठ पोलिसांना मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती नाही. काल CBI पथकाने राहुरी तालुक्यातील महाडिक सेंटर या मूळ गाव चौकशी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.यानंतर मध्यरात्री कारवाई केल्याची प्राथमिक माहिती.. याबाबत कुटुंबीय सध्या कैमेरा समोर बोलण्यास तयार नाही.. मात्र धनंजय यांच्या वडिलांनी मुलाला राहुरीतून ताब्यात घेतले नसल्याचं सांगितले आहे.0
0
Report
Advertisement
तिरोडा में BSF जवान की गोलीबारी, एक घायल; गिरफ्तार
Bhandara, Maharashtra:*Gondia Break.....* *गोंदियाच्या तिरोडामध्ये बीएसएफ जवानाने केला गोळीबार... एक व्यक्ती जखमी... बीएसएफ जवानाविरोधात तिरोडा पोलिसांत गुन्हा दाखल करत पोलिसांनी केली अटक.....* Anchor : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे गाडीला कट मारल्याच्या वादातून एका बीएसएफ जवानाने एका व्यक्तीवर गोळीबार केल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली... भूषण दिसले असे बीएसएफ जवानाचे नाव असून तो मूळचा नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील रहिवासी आहे... तो सध्या पंजाब येथे एका बटालियन मध्ये कार्यरत आहे... सुट्टीवर गोंदिया येथे नातेवाईकाकडे आला होता... दरम्यान महामार्गावरून जात असताना बीएसएफ जवान भुषण दिसले आणि जखमी स्वानंद पारधी मध्ये किरकोळ वाद झाला दरम्यान बीएसएफ जवानाने आपल्या जवळील बंदूक काढत दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने गोळी चालवली ती गोळी एका व्यक्तीला लागली घटनेनंतर स्थानिकांनी जखमीला तात्काळ रुग्णालयात दाखल केले सध्या जखमीची प्रक routine स्थिर असल्याची माहिती असून बीएसएफ जवानावर तिरोडा पोलिसात गुन्हा नोंद करत पोलिसांनी त्याला अटक केली आहे... या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे...0
0
Report
वाशिम में कांद्य की कीमत गिरने से किसान चिंतित, Nafed से खरीद की मांग
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील वारा जहागीर परिसरात मोठ्या प्रमाणात कांद्याची शेती केली जाते सध्या उन्हाळी कांदा काढणीचा हंगाम सुरू आहे. मात्र कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यामुळे शेतकरी चिंतेत sापडलेत. वाशिमच्या बाजारात कांद्याला प्रति किलो अवघा चार ते पाच रुपये दर मिळत असून उत्पादनासाठी मात्र दहा ते बारा रुपये खर्च आल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते त्यामुळे सरकारने तातडीने नाफेड मार्फत कांद्याची खरेदी करावी अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.0
0
Report
रत्नागिरी के सुवेली में उबाठा गुट शिवसेना में प्रवेश; मंत्री योगेश कदम ने किया स्वागत
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी के खेड तालुक्यातील सुवेली येथील उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा निर्णय घेतल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी मंत्री योगेश कदम यांनी नवप्रवेशितांचे स्वागत करत, गावाच्या विकासासाठी आणि सामान्यांच्या न्यायासाठी शिवसेना कटिबद्ध आहे, असे ग्वाही दिली.0
0
Report
Advertisement
सरकार ने आंबा-शेतकऱ्यांच्या मोर्चावर चर्चा के लिए आमंत्रण दे दिया
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी आंबा बागायतदारांना चर्चेसाठी सरकारचे निमंत्रण आंबा काजू शेतकऱ्यांच्या मोर्चावर सरकार सकारात्मक शेतकरी नेते राजू शेट्टी आणि आंबा उत्पादक शेतकरी यांचे प्रतिनिधी यांना सरकारच चर्चेसाठी निमंत्रण शेतकरी नेते राजू शेट्टी, ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव विनायक राऊत, काँग्रेसचे आमदार भाई जगताप, माजी आमदार बाळ माने यांना निमंत्रण आज दुपारी तीन वाजता होणार सरकार आणि आंबा बागायतदारांमध्ये होणार बैठक आंबा काजू शेतकऱ्य ंसाठी जाहीर करण्यात आलेल्या तुटपुंजा मदतीवरून आंबा शेतकरी होते आक्रमक 15 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी काढण्यात येणार होता मोर्चा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे, काँग्रेस यांनी दिला होता मोर्चाला पाठिंबा0
0
Report
पंढरपुर के पालखी मार्ग का निरीक्षण, गडकरी ठोस निर्णय की उम्मीद
Pandharpur, Maharashtra:भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडून शहरात बनवला जाणारा महामार्ग तीन वर्षांपासून रखडला, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उद्याच्या दौऱ्यात याबाबत ठोस निर्णय होणार का याची उत्सुकता पंढरपूर मध्ये वाखरी ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पर्यंत आठ किलोमीटर लांबीचा महामार्ग 84 कोटी रुपये खर्चून तयार होत आहे. ठेकेदार आणि एन एच ए आय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित पणाने हा महामार्ग रखडला आहे. उद्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी संपूर्ण पालखी महामार्गाची पाहणी करणार आहेत. यावेळी पंढरपूर शहराच्या महत्वाच्या टप्प्यातील महामार्ग बाबत केंद्रीय मंत्री काही ठोस निर्णय घेतील या याबाकड लक्ष आहे.0
0
Report
कागल के प्राथमिक स्वास्थ्य केंद्रों में वार-वार बेडशीट बदलने से मरीजों के भ्रम में कमी
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात असणाऱ्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमामध्ये प्रत्येक दिवशी पेशंट्सच्या बेडवर वारानुसार बेडशीट अंतरले जात. आता तुम्ही म्हणाल यात नवीन काय.. तर या बेडशीटवर ज्या त्या दिवसाचा वार नमूद केलेला आहे. यामुळे पेशंट असो किंवा नातेवाईक यांच्या मनात बेड वरील बेडशीट बदलला आहे की नाही, या संदर्भातला संभ्रम दूर होतोय. कागल तालुक्यातील कसबा सांगाव इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.0
0
Report
Advertisement
जंजिरा किल्ला ब्रेकवॉटर से पर्यटन बढ़ेगा, मोदी की पहल
Chendhare, Maharashtra:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला चालना देणारा प्रकल्प जंजिरा किल्ला इथल्या ब्रेक वॉटर आणि प्रवासी जेट्टीचे लोकार्पण मंत्री नितेश राणे आणि खा. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत झाले. १९२ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या ब्रेक वॉटर व जेट्टीचे लोकार्पण सागरमाला अंतर्गत पर्यटनाच्या सुविधांसाठी करण्यात आले. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना चढउतार करताना येणाऱ्या अडचणी दूर झाल्या असल्याचं नितेश राणे यांनी सांगितलं. या प्रकल्पामुळे पर्यटकांची संख्या वाढून स्थानिकांना रोजगार मिळेल असे सुनील तटकरे यांनी व्यक्त केलं. या कार्यक्रमात महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या अधिकारी आणि पर्यटक उपस्थित होते.0
0
Report
ई-बाइक से जिलाधिकारी कार्यालय पहुंचे गोपीचंद पडळकर, मोदी के ईंधन बचाओ आह्वान पर प्रतिक्रिया
Sangli, Maharashtra:ई-बाईक घेऊन गोपीचंद पडळकरांनी गाठले जिल्हाधिकारी कार्यालय.. अँकर - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन बचतीच्या केलेल्या आवाहनाला भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांकडुन प्रतिसाद देण्यात आला आहे. गोपीचंद पडळकरांनी ई-बाईकवरून सांगली शहरात प्रवास केला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकरांनी आपला वाहनांचा ताफा सर्किट हाऊस येथे सोडून स्वतः ई-बाईक चालवत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहानाकडे विरोधकांनी राजकीय दृष्ट्या न बघता राष्ट्रहिताच्या दृष्टीने बघितलं पाहिजे आणि इंधन वाचवले पाहिजे, असं मत यावेळी व्यक्त केले आहे. बाईट - गोपीचंद पडळकर - आमदार, भाजपा.0
0
Report
रत्नागिरी के राजापुर में उबाठा गुट के कार्यकर्ताओं ने शिवसेना में प्रवेश किया
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. राजापुरात 'उबाठा'ला मोठा धक्का.. ओशिवळेतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश!.. रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील ओशिवळे मसुरकरवाडी येथील उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी आज आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा निर्णय घेतल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी आमदार सामंत यांनी नवप्रवेशितांचे स्वागत करत, गावाच्या विकासासाठी आणि सामान्यांच्या न्यायासाठी शिवसेना कटिबद्ध आहे, असे ग्वाही दिली.. या पक्षप्रवेशामुळे राजापूर मतदारसंघात शिवसेनेची ताकद अधिक वाढली आहे..0
0
Report
Advertisement
