icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

कोकण में प्रमोद जठार के दौरे: भाजपा कार्यकर्ता मोदी के आत्मनिर्भरता संदेश पर एकजुट

Ratnagiri, Maharashtra:भाजप आमदार प्रमोद जठार प्रेस पॉईंटर्स खेड - रत्नागिरी # केंद्रातील भाजप सरकार मजबूत सरकार # मोदींच्या पाठीशी देशाने उभे राहिले पाहिजे # नरेंद्र मोदी जे सांगतील तास आपण सगळ्यांनी वागलं पाहिजे # देश नाही तर संपूर्ण जग मोठ्या संकटात आहे # मोदी साहेबांनी सांगितलं तर आम्ही सर्व भाजप कार्यकर्ते समुद्रात सुद्धा उड्या मारू # नरेंद्र मोदी यांनी देशाला आत्म निर्भरतेचा आणि राष्ट्र भक्तीचा मार्ग दाखवला आहे. # अनेक देशांमध्ये लॉक डाऊन झालंय, पाकिस्तान मध्ये चार दिवसाचा आठवडा झालाय, # संकट दूर होतं नाही तो पर्यंत आपण आपल्या नेत्याचे ऐकलं पाहिले.. # नरेंद्र मोदी जगाला मदत करता करता देशाला पण करत आहेत. जनतेने पॅनिक होऊ नये, घाबर्जन जाऊ नये.सगळ्यांची काळजी घ्यायला मोदी साहेब सक्षम आहेत. ते सांगितील ते फॉलो करा... # *जगात जे युद्ध सुरु आहे ते एक ना एक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी थांबवतील असा आम्हाला विश्वास* # संपूर्ण कोकणात भाजपा पक्षवाढीची जबाबदारी आमदार प्रमोद जठार यांच्याकडे दिली आहे त्यानुसार संपूर्ण कोकणात त्यांचे दौरे सुरू आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मधील आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला
0
0
Report

मालेगांव किसानों ने पंचायत कार्यालय के सामने प्रदर्शन; पाणंद सड़क निधि वर्ष से लंबित

Malegaon, Maharashtra:शेतकऱ्यांनी शेतमालासह थेट गाठले पंचायत समितीचे कार्यालय... पाणंद रस्त्यासाठी शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन... निधी मंजूर मात्र दोन वर्षांपासून रखडले पाणंद रस्त्याचे काम... सरकारच्या पाणंड रस्त्याच्या योजना केवळ कागदावर.. शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांना होत आहे त्रास... मालेगाव तालुक्यातील हाताने येथील शेतकऱ्यांनी शेतमाल घेत पंचायत समिती समोर अनोखे आंदोलन केले. पाणंद रस्त्याला 2 वर्ष पासून निधी मंजूर आहे, त्यातील 70 हजार रुपये देखील काढले गेले. मात्र अद्याप रस्ता न झाल्याने येथील शेतकऱ्यांना आपला शेत माल, दूध वगैरे बाजारात विक्री साठी घेऊन जाण्यास त्रास होत आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना देखील याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने संबंधितांवर कारवाई करा आणि रस्त्याचं काम सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. *बाईट: शेतकरी 1,2,3*
0
0
Report
Advertisement
Advertisement

चिपळूण में मानसूनपूर्व तैयारी तेज, 17 दराड़ग्रस्त गांवों को हाई अलर्ट जारी

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूणमध्ये मान्सूनपूर्व तयारीला वेग.. संभाव्य १७ दरडग्रस्त गावांना प्रशासनाचा हायअलर्ट! नदीया,तलाव आणि खाणींच्या खोल पाण्यात उतरण्यास बंदी.. धोकादायक होर्डिंग्ज हटवण्याचे आदेश. अँकर मान्सूनच्या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुक्यात प्रशासनाने खबरदारीचे मोठे पाऊल उचलले आहे..उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मान्सूनपूर्व आढावा बैठक पार पडली.​या बैठकीत तालुक्यातील पेढे, परशुराम घाट,तिवरे,कोळकेवाडी, गोवळकोट यांसारख्या १७ संभाव्य दरडग्रस्त गावांना हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.. प्रशासानाने नद्या,तलाव,पर्यटन स्थळे आणि बंद खाणींच्या खोल पाण्यात जाण्यास गावकरी व पर्यटकांना सक्त मनाई करण्यात आली आहे.. धोकादायक होर्डिंग्ज तातडीने काढण्याचे आदेश पंचायत समितीला,तर धरणांच्या सुरक्षेबाबत जलसंपदा विभागाला निर्देश देण्यात आले आहेत... प्रत्येक दरडग्रस्त गावासाठी 'नोडल अधिकारी' आणि जनजागृती पथके तैनात करण्यात आली असून,नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्यासाठी नोटिसा देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.. पावसाळ्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी चिपळूण प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे..
0
0
Report
Advertisement

केमिस्ट-ड्रगिस्ट संघठन के विरोध में देशव्यापी हड़ताल, चंद्रपुर में भी दुकाने बंद

Chandrapur, Maharashtra:केंद्र शासनाच्या अन्यायकारक धोरणांविरोधात देशभर आयोजित करण्यात आलेल्या केमिस्ट- ड्रगिस्ट संघटनेच्या व्यापार बंदला चंद्रपुरातही मोठा प्रतिसाद, सर्वच भागातील औषध दुकाने सकाळपासून बंद. शहराच्या मुख्य चौकात संघटना सदस्यांनी हातात फलके घेऊन कायद्याप्रतीचा रोष व्यक्त केला. या 24 तासात रुग्णांच्या अत्यावश्यक सेवेसाठी मात्र संघटनेने हेल्पलाइन नंबर्स जारी करून सहकार्य केले आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करा, कार्पोरेट औषधे निर्मिती कंपन्या द्वारे अव्यावसायिक सवलती बंद करा, बनावट औषधी पासून देश वाचवा यासाठी हे बंदचे हत्यार उगारण्यात आले आहेत.
0
0
Report

वसई स्टेशन पश्चिम परिसर में फेरीवाल्य पर तेज मारपीट, वीडियो वायरल

Vasai-Virar, Maharashtra:पाहा वसई स्थानक परिसरातील धक्कादायक घटना… वसई स्थानक पश्चिम परिसरात एका फेरीवाल्याला भररस्त्यात बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही अज्ञात व्यक्तींनी फेरीवाल्यावर हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता समोर आला असून परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना १८ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५:३० वाजण्याच्या sुमारास वसई स्थानक पश्चिम येथे घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एक फेरीवाला नेहमीप्रमाणे आपला व्यवसाय करत उभा असताना काही लोक अचानक तेथे आले आणि त्यांनी त्याच्यावर बेदम मारहाण करण्यास सुर youths सुरु केली. हल्लेखोरांनी त्याला लाथाबुक्क्यांनी तसेच मारहाण करत गंभीर जखमी केले. या मारहाणीत फेरीवाल्याच्या अंगातून रक्तस्राव होत असल्याचेही दिसून आले. दरम्यान, परिसरातील काही नागरिकांनी पुढे येत जखमी फेरीवाल्याची सुटका करण्याचा प्रयत्न केला. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात संबंधित हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत आरोपींचा शोध घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
0
0
Report
Advertisement

अकोला में नकली जैविक खाद बनावट पर बड़ी कार्रवाई: 93 लाख का स्टॉक जब्त

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात बनावट जैविक खत उत्पादन आणि विक्रीप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली असून गुजरातमधील एग्रोनोटिक एशियन इंडस्ट्रीस या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या तपासात संबंधित कंपनीकडून Fertilizer (Inorganic, Organic or Mixed) Control Order 1985 च्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा समोर आले आहे. कृषी विकास अधिकारी आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या पथकाने MIDC-4 परिसरातील एका गोदामावर छापा टाकून तपासणी केली. यावेळी कंपनीकडून विविध जैविक उत्पादनांचे उत्पादन आणि साठवण करण्यात येत असल्याचे आढळले. तपासादरम्यान गोदामात मोठ्या प्रमाणावर जैविक खताचा साठा मिळून आला. एकूण 27 प्रकारची जैविक उत्पादने आणि हजारो लिटर द्रव स्वरूपातील खत जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे 93 लाख रुपयांमध्ये असल्याचे सांगण्यात आले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, संबंधित कंपनीकडे आवश्यक परवाने आणि कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्या. तसेच उत्पादनाच्या नोंदी आणि नमुन्यांमध्येही विसंगती असल्याचे निदर्शनास आले. यामुळे कृषी विभागाने ही कारवाई करत संबंधित कंपनीविरोधात खदानियंत्रण आदेश 1985 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई कृषी अधिकारी सुधाकर खंडारे, कृषी विकास अधिकारी तुषार जाधव आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report

मुंबई-गोवा हाईवे पर कार खाई में गिरी, एक की मौत, पांच घायल

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. मुंबई-गोवा महामार्गावर कार २५ फूट दरीत कोसळली.. एकाचा मृत्यू, ५ गंभीर जखमी!.. मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे मुंबईवरून चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या एका कार चालकाचे वालोपे येथील HP पंपाजवळ गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे ही कार थेट २५ ते ३० फूट खोल दरीत कोसळली.. या भीषण अपघाताची माहिती मिळताच चिपळूण शासकीय विश्रामगृहाजवळ तैनात असलेली 'जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी संस्थां'ची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली.. रुग्णवाहिकेच्या पथकाने तातडीने बचावकार्य सुरू करत सर्व जखमींना तात्काळ उपचारासाठी लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले.. या दुर्दैवी अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले असून,एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.. संजय जाधव असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते चिपळूणमधील मार्कंडी येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे... पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top