icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

तुमसर-रामटेक मार्ग पर भीषण सड़क हादसा; उपसरपंच भगवान आगाशे की मौत

Bhandara, Maharashtra:भंडारा जिल्ह्याच्या तुमसर - रामटेक मार्गावर काटेबाम्हणी गावाजवळ सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीस चिरडले. त्यात दुचाकीस्वार उपसरपंच भगवान आगाशे (४०) रा. काटेबाम्हणी यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री उशिरापर्यंत प्रेत उचलण्यात आले नव्हते. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता. मृतक कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी या मागणीला घेऊन गावकरी आक्रमक झाले होते. अखेर पोलिसांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणत मृतदेह स्वविछेदन करीता पाठविण्यात आले.
0
0
Report

मनोज जरांगे का आमरण उपवास जारी, सरकार से बातचीत के संकेत

Jalna, Maharashtra:जालना : मनोज जरांगे उपोषणावर ठाम,आज पुन्हा शिष्टमंडळ चर्चेला येणार. अँकर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून अंतर वाली सराटीत आमरण उपोषणाला बसणार आहेत.काल जरांगे यांची शिष्टमंडळासोबत चर्चा झाली मात्र या चर्चेत जरांगे यांचं समाधान झालं नाही.त्यामुळे जरांगे आमरण उपोषण करण्यावर ठाम आहेत.दरम्यान उपोषण सुरू केलं तरी राज्य सरकारला चर्चेसाठी दरवाजे खुले असल्याचं जरांगेांनी म्हटलंय.जरांगे यांच्या सोबत राधाकृष्ण विखे आणि प्रसाद लाड यांनी चर्चा केल्यानंतर विखे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्तांशी चर्चा केली. त्यानंतर जरांगे यांना मराठा समाजाच्या मागण्यांबाबत एक लेखी पत्र राज्य सरकार कडून सोपवण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे.मात्र या पत्रातील तपशील कळू शकलेला नाही.त्यामुळे जरांगे यांच्या आजच्या भूमिकेकडे सर्वाचं लक्ष लागले आहे.
0
0
Report
Advertisement

RPआई के नेतृत्व में सांगली में SC उपवर्गीकरण विरोधी प्रदर्शन; 59 जातियों के नेता

Sangli, Maharashtra:अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधासह विविध मागण्यांसाठी आरपीआयच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जाती-जमातीचे आंदोलन. अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात सांगलीमध्ये आरपीआयच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत उपवर्गीकरणाला विरोध करण्यात आला. आरपीआय आठवले गट युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यातल्या 59 जातीतील नेत्यांनी एकत्रित येत हे आंदोलन केले. महाराष्ट्ात अनुसूचित जाती उपवर्गीकरण लागू करू नये, राज्य सरकारने बिदर समितीचा अहवाल खुला करावा, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. बईट - श्वेतभैया कांबळे - जिल्हाध्यक्ष - युवक आघाडी आरपीआय,सांगली。
0
0
Report
Advertisement

केडीएमसी अस्पताल की लाइट चली गई, मरीज अंधरे में इलाज के लिए मजबूर

Kalyan, Maharashtra:Anchor- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाचे बत्ती गुल झालीय. त्यामुळे इथल्या रुग्णांना अंधारात उपचार घेण्याची वेळ आली आहे. Vo- या संदर्भाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला. गुरुवारी रात्रीच्या सुमारास रुग्णालयाची अचानक लाईट गेली .जवळ जवळ अर्धा तासापेक्षा जास्त वेळ ही लाईट गेली होती.मात्र रुग्णालय प्रशासनाकडे विजेचा कोणताही बॅकअप नव्हता. त्याच्यामुळे रुग्णांवर अंधारात उपचार घेण्याची वेळ आली. दरम्यान केडीएमसी प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जातोय.
0
0
Report

पंकजा मुंडे से मिलने के बाद PFAS विरोधी आंदोलन जारी; लोटे MIDC में घेराव

Ratnagiri, Maharashtra:खेड - रत्नागिरी..मंत्री पंकजाताई मुंडे एमआयडीसीत आंदोलकांनी घेरले. पंकजा मुंडेंना लोटे एमआयडीसीत आंदोलकांनी घेरले; मंत्रालयात बैठकीचे आश्वासन, पण कंपनी बंद होईपर्यन्त आंदोलन चालू ठेवण्याचा निर्धार.. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीमध्ये 'लक्ष्मी ऑरगॅनिक' कंपनीच्या घातक 'पिफास' (PFAS) उत्पादनाविरोधात कोकण नागरी संघर्ष समिती आणि ग्रामस्थांचे आंदोलन आज १२९ व्या दिवशीही सुरूच आहे. प्रशासनाने दखल न घेतल्याने संतापलेल्या आंदोलकांनी,आज लोटे परिसरात खाजगी दौऱ्यावर आलेल्या राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची अचानक भेट घेऊन आपली कैफियत मांडली. आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मंत्री पंकजा मुंडे यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून गाऱ्हाणे ऐकण्याचे आदेश दिले, तसेच लवकरच मंत्रालयात शिष्टमंडळाची बैठक बोलावण्याचे आश्वासन दिले.. पर्यावरण मंत्र्यांच्या या आश्वासनानंतरही, जोपर्यंत कंपनीचे घातक उत्पादन पूर्णपणे बंद होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही यावर आंदोलक ठाम आहेत..
0
0
Report
Advertisement

Wardha नदी में डूबकर तीन की मौत, दो बेटियाँ समेत पिता शामिल

Wardha, Maharashtra:वर्ध्यात तिघांचा नदीत बुडून मृत्यू वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव परिसरातील घटना अधिक मासातील दुर्दैवी शोकांतिका : वना नदीत बुडून तिघांचा मृत्यू दोन मुली आणि वडिलांचा समावेश असल्याची माहिती वर्ध्यात अधिक मासातील दोन दिवसात चौघाचा झाला मृत्यू या दुर्घटनेत अतुल लक्ष्मण किनेकर (45), त्यांची मुलगी रिधिमा अतुल किनेकर (15) आणि तिची मैत्रीण गुंजन रमेशराव मसराम (रा. मांडगाव) यांचा मृत्यू झाला. सकाळी साडेनऊच्या सुमारास तिघेही अधिक मासानिमित्त वना नदीवर स्नानासाठी गेले होते. मात्र बराच वेळ होऊनही ते घरी परतले नाहीत. नदीकाठी त्यांचे कपडे आढळून आल्याने नातेवाईकांना संशय आला. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि तातडीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. अथक प्रयत्नांनंतर दुपारी तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. दोन दिवसाअगोदर हिंगणाघाट तालुक्यातील शेकापूर बाई येथे एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता..संपूर्ण मांडगाव गावात शोककळा पसरली आहे.
0
0
Report

गोपाळगड किले में दो आमों के लिए पर्यटक रोके गए; निजी मालिक ने मुख्य द्वार बंद किया

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी - गोपाळगड पॅकेज गुहागरच्या ऐतिहासिक गोपाळगड किल्ल्यावर पर्यटकांना डांबले! दोन आंबे उचलले म्हणून बागधारकाने किल्ल्याचे मुख्य गेट केले बंद! "किल्ला आमचा खाजगी आहे" असा दावा करत बागधारकाचा पर्यटकांवर धमकावण्याचा प्रयत्न.. गेल्या वर्षी सरकारने किल्ला ताब्यात घेऊनही खाजगी मालकीचा दावा कसा? प्रशासनावर प्रश्नचिन्ह.. गुहागरमधून पर्यटनाला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऐतिहासिक गोपाळगड किल्ल्यावर फिरायला गेलेल्या पर्यटकांना थेट मुख्य दरवाजा लावून डांबून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. गुन्हा काय? तर झाडावरून फक्त 'दोन आंबे' उचलले! 'हा किल्ला आमचा आहे' असा दावा करत या पर्यटकांना धमकावण्यात आले. गेल्या वर्षीच सरकारने हा किल्ला ताब्यात घेतला असतानाही ही दादागिरी झाली कशी? हा मोठा प्रश्न आहे. पाहूयात आमचा हा विशेष रिपोर्ट...
0
0
Report

नीट पेपरफुटी: सीबीआई बैंक लॉकर तक पहुँची, लाखों के गबाड़े का खुलासा

Latur, Maharashtra:नीट पेपरफुटी प्रकरणातील तपास दिवसेंद्वस अधिक खोलवर जातताना दिसत आहे... सीबीआयने आता आरोपींच्या आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेण्यास सुरुवात केली आहे... सूत्रांच्या माहितीनुसार, नीटच्या केमिस्ट्री पेपर सेटर पी. व्ही. कुलकर्णी, त्यांच्या पत्नी आणि काही नातेवाईकांच्या बँक खात्यांची तसेच लॉकरची तपासणी करण्यात आली आहे... या तपासादरम्यान लाखो रुपयांचे दागिने, काही रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे... इतकेच नव्हे तर या कारवाईत सीबीआयच्या हाती लाखो रुपयांचे घबाड लागल्याचेही सांगितले जात आहे... संबंधित लॉकर सील करण्यात आल्याची चर्चा असून, या सापडलेल्या साहित्याचा आणि नीट पेपरफुटी प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचा काही संबंध आहे का, याचा तपास आता सीबीआयकडून केला जात आहे... त्यामुळे तपासाची दिशा आता थेट आर्थिक व्यवहारांकडे वळल्याचं स्पष्ट होत आहे... दरम्यान अटकेत असलेल्या शिवराज मोटेगावकर याला अटक केल्यानंतर सीबीआयने त्याच्या आणि त्याच्या कुटुंबीयांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे... बँक खाती, व्यवहारांचा इतिहास आणि लॉकरची तपासणी केली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे... पेपरफुटी प्रकरणातून मिळालेल्या पैशांचा प्रवाह नेमका कुठे गेला?... कोणकोणत्या खात्यांमधून व्यवहार झाले?... आणि या व्यवहारांचा संबंध आणखी कोणाशी जोडला जातो का?... याचा शोध तपास यंत्रणा घेत आहे... याच तपासादरम्यान डॉ. मनोज शिरुरे यांच्या अटकेनंतर लातूरमधील आणखी चार डॉक्टर सीबीआयच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली असून त्यांच्याशी संबंधित काही बाबींचीही पडताळणी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे... नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता निर्णायक टप्प्यावर पोहोचताना दिसत आहे... एकीकडे पेपरफुटीच्या रॅकेटचा पर्दाफास होत असताना, दुसरीकडे पैसा मागोवा घेत सीबीआय थेट बॅंकेतील खाती आणि लॉकरपर्यंत पोहोचली आहे... लाखो रुपयांचे दागिने, रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे समोर आल्याच्या चर्चेमुळे या घोटाळ्याची व्याप्ती नेमकी किती मोठी आहे, याबाबत नवे प्रश्न निर्माण झाले आहेत... हा पैसा नेमका कुणाचा?... तो कोणत्या व्यवहारातून आला ?... आणि नीट पेपरफुटीच्या काळ्या कमाईचा हा भाग तर नाही ना?... याची उत्तरं आता सीबीआय शोधत आहे... शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या या रॅकेटमागे आणखी किती मोठी नावं दडली आहेत ?... लॉकरमधून बाहेर आलेले धागेदोरे आणखी कुणाच्या दारापर्यंत पोहोचणार आहेत?... आणि या घोटाळ्याचं संपूर्ण नेटवर्क अखेर उघड होणार का?... याकडे आता केवळ लातूरच नव्हे, तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे...
0
0
Report
Advertisement

नागपूर में रंजीत देशमुख के 80वें जन्मदिन पर ग्रामविकास पुरस्कार वितरण

Nagpur, Maharashtra:नागपूर --- माजी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रणजीतबाबू देशमुख यांच्या ८० व्या वाढिदसानिमित्त ग्रामविकास पुरस्काराचे आयोजन --- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्काराचे होणार वितरण.. - नागपूरच्या वनामती सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन.. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री जयमकुमार गोरे हे सुद्धा उपस्थित आहे.... यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख मंचावर आहे, तसेच आशिष देशमुख हे व्यासपीठावर उपस्थित आहे. यासह आयोजन समितीत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुद्धा उपस्थित आहे... - live फ्रेम
0
0
Report

वाशी में ग्राहक ने पेरू विक्रेता पर बेरहमी से मारपीट; CCTV में कैद

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुबंईतील वाशीमध्ये एका पेरू विक्रेत्याला ग्राहकाने जबर मारहाण केल्याची घटना समोर आलेय. ग्राहकाने पेरू घेत गूगल पे वर स्कॅन करण्याचे नाटक करत तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पेरू विक्रेत्याने पैसे मागितले असता ग्राहक आणि पेरू विक्रेत्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी राग अनावर झालेल्या ग्राहकाने पेरू विक्रेत्याला शिविगाळ करत लाकडी काठीने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत पेरू विक्रेता जखमी झालाय. या प्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून वाशी पोलिसांनी केवळ अदखल पात्र गुन्हा नोंद करुन प्रकरण मिटवल्याचे समोर आलेय. या घटनेमुळे वाशी परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून मारहाण करणाऱ्या ग्राहकावर गुन्हा दाखल करत कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येतेय. या घटनेचा सिसीटीव्ही देखिल समोर आला असून पोलिस काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top