445001
यवतमाळ : महिला बँक घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या बाबाजी दाते महिला बॅंकेत २४२ कोटींच्या अपहार प्रकरणात महिनाभराने अटकसत्र सुरू झाले आहे. पोलिसांनी शिवसेना नेते रमेश अगरवाल, व्यावसायिक प्रकाश पिसाळ आणि ठेकेदार प्रशांत पामपट्टीवार यांना अटक केली आहे. याआधी बँकेच्या CEO सुजाता महाजन, तिचा पती विलास महाजन, ॲड. वसंत मोहरेकर आणि नवलकिशोर मालाणी यांना अटक झाली होती. आता अटक केलेल्या आरोपींची संख्या सात झाली आहे. २०६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, ज्यामुळे संचालक व लेखा परीक्षक चिंतेत आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
कराड-सातारा: जयवंतराव भोसले पॅनेल ने सभी 21 सीटें जीतकर एकतर्फी विजय हासिल की
Satara, Maharashtra:कराड, सातारा सातरा सांगली जिल्ह्यातील 52 हजार शेतकरी सभासदांच्या यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्याच्या झालेल्या निवडणुकीत आ.अतुल भोसले ,डॉ.सुरेश भोसले यांच्या जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. या कारखाना निवडणूकीत जयवंतराव भोसले पॅनेलचे सर्व 21 जागा जिंकत एकतर्फी मोठा विजय मिळवला आहे. सर्व उमेदवार दहा ते पंधरा हजार मतांच्या आघाडीने विजयी झाल्याने कारखाण्यावर 2015 पासून असलेलं भोसले यांचं नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. या निकालानंतर भोसले समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिशबाजी करत जल्लोष केला. अपेक्षा चांगले यश आम्हाला मिळालं असल्याचं आमदार अतुल भोसले यांनी सांगितला आहे. बाईट आमदार अतुल भोसले0
0
Report
नवी मुंबई के एपीएमसी मार्केट में भारी बारिश से पानी भरा
Navi Mumbai, Maharashtra:जोरदार पावसामुळे नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत साचले पाणी. एपीएमसी भाजी मार्केट परिसरात साचले पाणी. साचलेल्या पाण्यातून मार्ग काढतांना ग्राहकांना करावी लागतेय कसरत.0
0
Report
पिंपरी-चिंचवड़ में बारिश, शहर के हिस्सों में हल्की से मध्यम वर्षा; ट्रैफिक कंट्रोल वायरल
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड अर्थात उद्योग नगरी मंगळवारी सायंकाळ पासून शहराच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली. शहराच्या विविध भागात सायंकाळपासून मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. शहरात आज सकाळपासूनही विविध भागात पाऊस पडत आहे! शहरात मुसळधार पाऊस पडत नसला तरी सायंकाळ पासून अजूनही पावसाची रिपरिप आहे. आळंदी देहू फाट्यावर या पावसातही वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियंत्रण केले जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून वाहतूक पोलिसांचं कौतुक केले जात आहे.0
0
Report
Advertisement
मुंबई उच्च न्यायालय ने गोकुळ की 644 सहकारी दूध संस्थाओं के अवसायन पर फैसला सुनाया
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या सभासद असलेल्या 644 सहकारी दूध संस्थांना सहाय्यक निबंधक- दुग्ध यांनी अवसायानात काढले होते. अवसायनांच्या या निर्णयाला स्थगिती देत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने मोठा दणका दिला आहे. अवसायनाच्या निर्णयाविरुद्ध भुदरगड तालुक्यातील फणसवाडी येथील हनुमान सहकारी दूध संस्थेने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये आव्हान दिले होते. सर्किट बेंचच्या निर्णयामुळे अवसायकांच्या एकतर्फी निर्णयाला मोठा दणका बसला आहे. तसेच; अवसायानात निघालेल्या 644 सहकारी दूध संस्थांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात महत्त्वाचे म्हणजे, अवसायानात निघालेल्या संस्थांची अवसायनाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर संस्थांच्या अपरोक्ष सहाय्यक निबंधन- दुग्ध यांनी परस्पर गोकुळ दूध संघाकडून माहिती घेऊन त्या माहितीच्या आधारावर संस्था अवसायानात काढल्याचा ठपकाही सर्किट बेंचने ठेवलेला आहे.0
0
Report
छत्रपति संभाजीनगर में हल्की वर्षा, तीन दिन के लिए येलो अलर्ट
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:महीनाभराच्या विश्रांतीनंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे, शेतकरी असो वा सर्वसामान्य माणूस पावसाची चातकासारखी वाट पाहत होते अखेर सगळ्यांना दिलासा मिळाला आहे, छत्रपती संभाजीनगर शहरासह पैठण, वैजापूर ,सिल्लोड या तालुक्यातील विविध भागात रिमझिम सरी बरसल्या. त्यामुळं पेरणीच्या कामालाही वेग येणार आहे.. दरम्यान हवामान विभागाकडून छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याला ३ दिवस यलो अलर्ट देण्यात आलाय, छत्रपती संभाजी नगर व परिसरात येत्या २६ जूनपर्यंत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल, असा अंदाज आहे।0
0
Report
वाशिम रेलवे पुल पर रोशनी नहीं, युवकों ने मशाल जलाकर किया प्रदर्शन
Washim, Maharashtra:वाशिम शहरातून अमरावती व पुसद कडे जाणाऱ्या मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाचे लोकार्पण होऊन चार वर्षे लोटली आहेत. मात्र, पुलावर अद्याप पथदिव्यांची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत वाशिम शहरातील युवकांनी मशाल पेटवून आंदोलन केले. उड्डाण पुलावर तातडीने पथदिवे बसवावेत, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.0
0
Report
Advertisement
छत्रपति संभाजीनगर के स्कूलों में भौतिक सुविधाओं की जाँच, 391 स्कूलों में सुधार आवश्यक
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जि. प.च्या शाळांमधील भौतिक सुविधांची पाहणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १५ ते ३० मेच्या दरम्यान शाळा तपासणीची मोहीम हाती घेतली होती. त्यामध्ये शाळांच्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वर्गवारी केली आहे. त्यात २ हजार ८४ शाळांपैकी तब्बल ३९१ शाळांचा समावेश पडझड वर्गवारीत झाला असून, दुरुस्तीची मोहीम तत्काळ हाती घ्यावी लागणार आहे. या दुरुस्थीसाठी कोट्यवधींचा निधी लागणार असल्याचेही अहवालात म्हटले आहे. जिल्ह्यात जि. प.च्या २ हजार ८४ शाळा कार्यरत आहेत. या शाळांमध्ये लाखो विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र, त्यांना आवश्यक त्या सुविधा मिळत नाहीत. त्यामुळेच जि.प.च्या सीईओंनी गुणवत्ता तपासणीसह भौतिक सुविधांसाठी विशेष मोहीम राबवली.0
0
Report
तुळींज पुलिस स्टेशन में भारी बारिश के कारण पानी घुसा, प्रशासनिक कामकाज प्रभावित
Vasai-Virar, Maharashtra:नालासोपारामध्ये झालेल्या पावसामुळे तुळींज पोलीस ठाण्याच्या परिसरात पाणी साचल्याचे चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे पहिल्या जोरदार पावसात पोलीस ठाण्याच्या आवारात आणि काही भागांमध्ये पाणी शिरल्याने प्रशासनाच्या पावसाळी तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाणी साचल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या तक्रारी, कागदपत्रांची हालचाल आणि इतर प्रशासकीय कामांनाही याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.... तुळींज पोलीस ठाणे परिसरातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांनी...0
0
Report
शिंदेसेना ने छत्रपति संभाजीनगर जिला बैंक में आठ निदेशक बिनविरोध चुन लिए
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रमुख उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने शिंदेसेना धक्का बसला होता. परंतु, आता उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यातही शिंदेसेना यशस्वी झाली. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासह वैजापूरचे आ. रमेश बोरनारे, सिल्लोडचे नगराध्यक्ष अब्दुल समीर, बँकेचे माजी अध्यक्ष अर्जुन गाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पैठणचे आमदार विलास भुमरे यांच्यासिरोधात अर्जच न आल्याने ते यापूर्वीच विजयी ठरले आहेत. एकूण आठ जणांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हा बँकेच्या २१ संचालक मंडळासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून, ४ जुलै रोजी मतदान होईल. उमेदवारी अर्जाच्या छाननीनंतर १२० उमेदवारांचे विविध मतदारसंघांतून अर्ज वैध ठरले होते. यापैकी तब्बल ८३ अर्ज उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी अर्ज मागे घेण्यात आले. विशेष म्हणजे, मतदारसंघांतील उमेदवारांविरोधातील सर्व अर्ज मागे घेतल्याने आठ जणांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.0
0
Report
Advertisement
अमरावती में रात्रभर तेज बारिश से किसान और नागरिकों को मिली राहत
Amravati, Maharashtra:अमरावती में रात्रभर पावसाची दमदार बॅटिंग; शेतकऱ्यांना दिलासा, नागरिकांची उकाड्यापासून सुटका. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार काल अमरावतीत जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावत रात्रभर दमदार बॅटिंग केली आहे. त्यामुळे नागरिकांना उकाळ्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे तर बळीराजा सुखावला आहे. त्यामुळे आता खोळंबलेल्या पेरणीच्या कामाला वेग येणार आहे. मात्र अजूनही जिल्ह्यात मान्सून दाखल झाला नसून शेतकऱ्यांना अजूनही मान्सूनचा प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यात मान्सून कधी दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान आजपासून शेतकऱ्यांनी पेरणीचा लगबग सुरु केली आहे. मात्र पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. तरीही पेरणीचा हंगाम हातातून निघून जाऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केल्याचे दिसून येत आहे.0
0
Report
पेण में बारिश से गणेश मूर्ति कारखाने में पानी घुसा, मूर्तियाँ भींजीं
Chendhare, Maharashtra:गणेश मूर्ति कारखान्याला पावसाचा फटका ...... कारखान्यात पाणी शिरल्याने गणेशमूर्ती भिजल्या ..... पेण तालुक्यात झालेल्या पावसाचा फटका एका गणेशमूर्ती कारखानदाराला बसला आहे। पेणच्या कळवा गावात पावसाचे पाणी वाहून नेणारा नैसर्गिक नाल्याचा प्रवाह अडल्यामुळे पाणी गणेश मूर्ती कारखात्यात शिरले आणि मूर्ती भिजल्या आहेत। मूर्ती उंचावर ठेवून वाचवण्याचा प्रयत्न मूर्तिकारांकडून केला जात आहे। यावर स्थानिक प्रशासनाने मार्ग काढावा अशी मागणी कारखाना मालकाने केली आहे।0
0
Report
Chhatrapati Sambhajinagar mein cafe ke peeche ashlil kritiyon ke khilaf police-municipal corporation ne sanyukt karyavahi
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मध्ये कॅफेच्या आडून सुरू असलेल्या अश्लील कृत्यांविरोधात अखेर पोलिस आणि महापालिकेने संयुक्त बडगा उगारला. मंगळवारी संध्याकाळी शहरात एकाच वेळी सुरू झालेल्या या महाकारवाईत वेदांतनगर, उस्मानपुरा, कॅनॉट प्लेस, टी.व्ही. सेंटर आणि हर्सल भागातील ४९ अनधिकृत, संशयास्पद कॅफे अक्षरशः उद्ध्वस्त करण्यात आले. २०२४-२५ मध्ये पोलिस, मनपाने शहरातील २९ कॅफेंवर कारवाई केली होती. कारवाईत सातत्य न राहिल्याने कॅफे चालक पुन्हा निर्धावले होते. आठ दिवसांपूर्वी शहरातील विविध कॅफेंमध्ये नेत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर मंगळवारी कॉफी सेंटरवर मोहीम राबविली. मनपाच्या हातोड्यांने केबिन काढून टाकले. कॅनॉट प्लेसमधील १९ आस्थापनांची पाहणी करून १२ नियमबाह्य बांधकामांवर कारवाई केली.0
0
Report
Advertisement
दोंडाईचा क्षेत्र में दो दिनों की भारी बारिश से किसानों में राहत
Dhule, Maharashtra:दोंडाईचा परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस झाला. या पाऊसाने जनजीवन विस्कळीत केले असले तरी शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसून हेत आहे. काही वेळातच शहरातील प्रमुख रस्ते, चौक व सखल भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या दमदार पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातही पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळाला असून खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. कापूस, मका, बाजरी, आदी पिकांसाठी हा पाऊस पोषक ठरणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.0
0
Report
अकोला में मोटरसाइकिल चोरियाँ: दो आरोपी गिरफ्तार, चोरी की दो बाइकें बरामद
Akola, Maharashtra:अकोला स्थानिक गुन्हे शाखेने मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून चोरीच्या दोन मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आरोपींनी शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली असून, त्यांनी इतर ठिकाणीही अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत, याचा तपास पोलीस करीत आहेत. अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या दोन संशयितांची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी अकोला शहरातील दोन ठिकाणांहून मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली.पोलिसांनी आरोपींकडून चोरीच्या दोन मोटरसायकली जप्त केल्या असून त्यांची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, या आरोपींनी अकोला जिल्ह्यासह इतर भागांतही वाहन चोरीचे गुन्हे केले आहेत का, याचा शोध पोलीस घेत आहेत.0
0
Report
एलसीबी ने नंदूरबार में अंतरराज्यीय गैंग का पर्दाफाश किया: 15 केस, 2 आरोपी गिरफ्तार
Dhule, Maharashtra:नंदूरबार जिल्ह्यातील घरफोडी आणि मोटरसायकल चोरीच्या घटनांचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मोठे यश आले आहे. शहादा तालुक्यातील सात मोटरसायकल चोरी आणि आठ घरफोडी अशा एकूण १५ गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आंतरराज्य टोळीतील दोन संशयित आरोपींना एलसीबीने अटक केली आहे. या आरोपींकडून मोटरसायकली, रोख रक्कम आणि घरफोडीतील मुद्देमाल असा तब्बल आठ लाख २३ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून, आणखी एक आरोपी फरार आहे. मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील या आरोपींनी महाराष्ट्रासह गुजरात राज्यातही अनेक गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे. या संपूर्ण कारवाईमुळे आंतरराज्य गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश करण्यात एलसीबीला मोठे यश आलं असून, या आरोपींकडून आणखिन काही गुन्ह्यांच्या उलगडा लागण्याची शक्यता आहे.0
0
Report
Advertisement
