445001
यवतमाळ : महिला बँक घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या बाबाजी दाते महिला बॅंकेत २४२ कोटींच्या अपहार प्रकरणात महिनाभराने अटकसत्र सुरू झाले आहे. पोलिसांनी शिवसेना नेते रमेश अगरवाल, व्यावसायिक प्रकाश पिसाळ आणि ठेकेदार प्रशांत पामपट्टीवार यांना अटक केली आहे. याआधी बँकेच्या CEO सुजाता महाजन, तिचा पती विलास महाजन, ॲड. वसंत मोहरेकर आणि नवलकिशोर मालाणी यांना अटक झाली होती. आता अटक केलेल्या आरोपींची संख्या सात झाली आहे. २०६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, ज्यामुळे संचालक व लेखा परीक्षक चिंतेत आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सीएम फडणवीस ने छत्रपति संभाजीनगर की पानी योजना में देरी पर नाराजगी जताई
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामातील दिरंगाईवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत कंत्राटदार कंपनी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची त्यांनी चांगलीच खरडपट्टी काढली. योजना पूर्ण करण्यासाठीचा तपशीलवार माहिती पुढील दहा दिवसांत लेखी स्वरूपात सादर करण्याचे आदेश देत, शहरवासीयांना नवीन योजनेचे पाणी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी सर्व अडचणी युद्धपातळीवर सोडविण्याच्या स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. ही बैठक महापौर समीर राजूरकर यांच्या तक्रारीनंतर घेण्यात आली असून, यामध्ये मंत्री, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.0
0
Report
जायकवाड़ी बांध में पानी की आवक फिर से बंद, जीवंत जलभंडार 31.42%
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जायकवाडीत पाण्याची आवक पुन्हा बंद; धरणातील जिवंत पाणीसाठा ३१.४२ टक्क्यांवर ANC : जायकवाडी धरणातील पाण्याची आवक पुन्हा एकदा थांबली आहे. १५ जुलै २०२६ रोजी मध्यरात्रीपर्यंतच्या नोंदीनुसार धरणाची पाणीपातळी १५०६.३५ फूट असून, धरणात सध्या ६८२.०४ दलघमी म्हणजेच ३१.४२ टक्के जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. यंदाच्या पावसाळ्यात १ जूनपासून आतापर्यंत धरणात एकूण २६.१७३ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच दिवशी धरणातील उपयुक्त पाणीसाठा ७६.४० टक्के होता. त्यामुळे आगामी काळात गोदावरीच्या उगम व पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होणे अत्यावश्यक असल्याचे चित्र आहे.0
0
Report
वर्धा में 12 वर्षीय बच्ची की हत्या: दगड से मारने का शक, पुलिस जांच तेज
Wardha, Maharashtra:वर्ध्यात 12 वर्षीय अल्पवयीन मुलीची दगडाने ठेचून हत्या हत्येनं परिसरात खळबळ;मुलीवर अत्याचार झाल्याचा पोलिसांचा संशय वर्धा - वर्ध्याच्या रोठा शिवारातील धक्कादायक घटना घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे. मृतक मुलगी दुपारच्या सुमारास परिसरात असलेल्या जिल्हा परिषद शाळेतून आपल्या राहत्या घरी आली असताना आधी मुलीवर अत्याचार करून तिचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मुलीचे कपडे शेतातील असलेल्या कोट्याच्या कोठारामध्ये फेकून होते आणि मुलगी दुसऱ्या बाजूच्या रूममध्ये नग्न अवस्थेत पडलेली होती ही घटना मुलीचे आई-वडील व घरी आल्यावर पुढे आल्याने पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.स्थानिक गुन्हे शाखेने चार ते पाच लोकांना ताब्यात घेतले असल्याची माहिती सांगण्यात आलेली असून गृहराज्य मंत्र्याच्या जिल्हात कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.0
0
Report
Advertisement
हिंगणा में गैस कटर से ATM चोरी: 13.47 लाख नकदी लुटी गई
Nagpur, Maharashtra:गॅस कटरने एटीएम फोडून १३.४७ लाखांची रोकड लंपास. हिंगणा तालुक्यातील डोंगरगाव येथील बँक ऑफ इंडियाच्या एटीएमवर पहाटे चोरट्यांनी गॅस कटरने वाल्ट फोडून १३ लाख ४७ हजार रुपयांची रोकड लंपास केली. पहाटे ४.१९ ते ४.३१ या अवघ्या १२ मिनिटांत चार अज्ञात आरोपींनी एटीएममधील दोन्ही मशीन फोडून रोकड पळविली. एका एटीएममधून ७७ हजार ६०० रुपये, तर दुसऱ्या एटीएममधून १२ लाख ६९ हजार ४०० रुपये, अशी एकूण १३.४७ लाखांची चोरी झाली. तक्रारीवरून हिंगणा पोलीसांनी अज्ञात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.0
0
Report
छत्रपती संभाजी नगर बाबा फर्जन के बंगले से 5.26 करोड़ रुपये की नकदी SBI बैंक में जमा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या बाबा फर्जनच्या बंगल्यातून पोलिसांनी जप्त केलीली ५.२६ कोटींची रोकड बुधवारी न्यायालयाच्या आदेशाने एसबीआय बँकेत जमा केली. छावणी पोलिसांनी ४ कोठ्या भरून ही रक्कम बँकेत नेली. सुरुवातीला ५ मशीनद्वारे १६ तास मोजलेली ही रक्कम आता बँक कर्मचारी मोजत असून, बुधवारी केवळ एकच कोठी मोजून पूर्ण झाली होती. एवढी मोठी रोकड आणि शस्त्रे असल्याने छावणी पोलिस ठाण्याच्या मुख्य गेटला हातकडीचे कुलूप लावून कडक पहारा ठेवण्यात आला होता. वरिष्ठांना कोषागार विभागातील सुरक्षितता न रुचल्याने कायदेशीर परवानगी घेऊन ती छावणी पोलिसांच्या अधिकृत बँक खात्यात वळवण्यात आली. रोकड हलवली असली तरी शस्त्रे अद्याप ठाण्यातच आहेत.0
0
Report
नागपूर के रामदासपेठ होटल ड्रग्स पार्टी पर छापा, MD पावडर 1.64 ग्राम पकड़ाई
Nagpur, Maharashtra:2c ला सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या संग्रहित व्हिडिओला आहे ------- नागपूरातील रामदासपेठ येथील एका नामांकित हॉटेलमध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीवर सीताबर्डी पोलिसांनी धाड टाकून गोंदियातील तीन तरुणांना एमडी ड्रग्जचे सेवन करताना ताब्यात घेतले. आरोपींकडून १.६४० ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे.. ड्रग्जविरोधी मोहिमेदरम्यान नागपूर पोलिसांच्या सीताबर्डी पोलिस ठाण्यातील पथकाला रामदासपेठेतील हॉटेलमध्ये काही तरुण एमडी ड्रग्जचे सेवन करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत हॉटेलवर छापा टाकला. खोलीची झडती घेतली असता गोंदियातील तीन तरुण नशेच्या अवस्थेत आढळून आले. तपासादरम्यान आरोपींकडून १.६४० ग्रॅम एमडी पावडर ही जप्त करण्यात आली. चौकशीत तिघांनी मिळून सुमारे २.५ ग्रॅम एमडी खरेदी केली होती आणि त्यातील काही अंमली पदार्थाचे सेवन केल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी तिघांची वैद्यकीय तपासणी करून रक्त व मूत्राचे नमुने न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवले आहेत. या प्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली. आता एमडीचा पुरवठा कोण, पुरवठा साखळी कशी कार्यरत आहे आणि या रॅकेटमागील मुख्य सूत्रधार कोण आहेत, याचा तपास सीताबर्डी पोलीस करत आहेत.0
0
Report
Advertisement
मद्यपान कर रही हालत में रिक्षाचालक गिरफ्तार, वाहन जप्त, ड्रंक एंड ड्राइव मामला दर्ज
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मद्याच्या नशेत धुंद होऊन शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या एका रिक्षाचालकाला छत्रपती संभाजी नगर वाहतूक पोलिसांनी शोधून काढत बेड्या ठोकल्या. या मद्यपी चालकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याची गंभीर दखल घेत पोलिसांनी आरोपीचे वाहन जप्त केले असून, त्याच्याविरुद्ध 'ड्रंक अँड ड्राइव्ह' अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. प्रदीप अशोक दाभाडे असे चालकाचे नाव आहे, ब्रेथ अनालायझरद्वारे त्याची वैद्यकीय चाचणी केली असता त्याने दारू प्यायल्याचे सिद्ध झाले. पोलिसांनी त्याची रिक्षा जप्त केलीय...0
0
Report
अकोल्य में बोगस बीज मामले पर मिटकरी की कृषि मंत्री भरणे पर तीखी नाराज़गी
Akola, Maharashtra:अकोळ्याच्या बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्यावर जाहीर नाराज़गी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही कृषिमंत्रीने फोन उचलला नाही, असा आरोप मिटकरी यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा आणि अडचणी ऐकण्यासाठी मंत्री उपलब्ध राहिले पाहिजेत, मात्र तसे होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. बोगस बियाण्यांमुळे हजारो शेतकरी संकटात सापडले असून या प्रश्नावर आपण अकोळ्यात आंदोलनही केले, त्यानंतरही कृषिमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. पक्षाचा कार्यकर्ता आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या लोकप्रतिनिधींचे फोन दुर्लक्षित होणे योग्य नसल्याचे मिटकरी म्हणाले. शेतकऱ्यांच्या अडचणी तातडीने ऐकून त्यांना न्याय देण्याची जबाबदारी कृषिमंत्रीांची आहे. मात्र फोनही न उचलल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना निर्माण होत असल्याचे सांगत मिटकरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे अकोल्यातील बोगस बियाणेग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला असून ' मामा हे वागणं बरं नव्हे ' म्हणत त्यांनी मिश्किल टीका ही केली आहे.0
0
Report
Satara: ज्ञानेश्वर माऊली पालखी ने नीरा नदी में स्नान कराया, ड्रोन शूट
Satara, Maharashtra:सातारा -वाल्हे येथुन मुक्कामानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीने काल सातारा जिल्हयात प्रवेश केला .नीरा नदीत माऊलीच्या पादुकांना स्नान घालण्यात आले . या पालखी सोहळ्यात माउलीच्या पादुका पालखीतून बाहेर काढल्या जातात आणि नीरा नदीच्या दत्त घाटावर या माउलीच्या पादुकांना स्नान घातल जात हा स्नान घालतानाचा सोहळा डोळ्यात साठवून ठेवण्या सारखा असतो .माउली माउलीच्या गजरात नीरा नदीच्या तीरावर पादुकांना स्नान घालतानाचा नयनरम्य असा सोहळा पाहण्यासाठी सातारा जिल्ह्यातील भाविकांची मोठ्या प्रमाणात नीरा नदीच्या तीरावर गर्दी केली होती . सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने माऊलींच्या पालखीचे मोठ्या दिमाखात स्वागत करण्यात आले.या सर्व सोहळ्याचे ड्रोन शूट खास झी 24 तास च्या प्रेक्षकांसाठी...0
0
Report
Advertisement
सिंधुदुर्ग के चिपी हवाई अड्डे से 15 अगस्त से Navi Mumbai उड़ान शुरू
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून 15 ऑगस्ट पूर्वी सुरु होणार विमान सेवा... सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केली घोषणा... चिपी ते नवी मुंबई विमानसेवा होणार सुरु.. 15 ऑगस्ट पूर्वी फ्लाय 90 आणि नंतर इंडिगोची सेवा होणार सुरु.. कोकणवासियांना मिळणार दिलासा0
0
Report
बारिश की कमी से खरीफ फसल संकट, कृषी विभाग ने किसानों को जरूरी उपाय बताए
Washim, Maharashtra:गेल्या १४ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. पावसाअभावी अनेक ठिकाणी पिके सुकू लागली असून उगवलेल्या पिकांवर विविध रोग व अळींचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणी सुरू केली आहे. पावसातील खंडामुळे पिकांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन पिके कशी वाचवावीत, कोणत्या उपाययोजना कराव्यात तसेच रोग व अळींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, याबाबत कृषी अधिकारी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करत आहेत. पावसातील खंडाच्या परिस्थितीत वेळेवर योग्य उपाययोजना केल्यास पिकांचे नुकसान काही प्रमाणात टाळता येऊ शकते, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या संभाव्य आर्थिक नुकसानीपासून संरक्षण मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.0
0
Report
मालेगाव पवारवाडी पुलिस ने 7 गावठी कट्टे समेत 8 जिंदा कारतूस के साथ 7 आरोपियों को गिरफ्तार किया
Nashik, Maharashtra:नाशिकच्या मालेगाव पवारवाडी पोलीस स्टेशनचे हद्दीत दोन इसम हे मुंबई आग्रा नॅशनल हायवे लगत ओवाडी नाला पुलाखाली काहितरी संशयीत शत्र बाळगुन आहे. त्यानुसार पवारवाडी पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने मुंबई आग्रा नॅशनल हायवे ओवाडी नाला पुलाखाली येथे सापळा रचुन गुन्हेगार नामे- 1) नवाज अशरफ सिराज अहमद वय-36 रा.स.नं. 113/2, फिरोजाबाद, पवारवाडी, मालेगाव. 2) मोहम्मद रेहान निहालुद्दीन वय-32 वर्षे रा. करीम नगर, ग.नं.02, घर नं. 29, मालेगांव यांना ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ ०२ गावठी कट्टे व ०३ जिवंत काडतूस मिळून आले. सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपी क्र. 3 नामे-हिफजु रहेमान मोहम्मद इद्रीस रा-नयापुरा, मालेगाव यांचे कडून सदर गावठी कटटे यांचे कडून विकत घेतलेले तपासात निष्पन झाल्याने त्यास ताब्यात घेवून गुन्हयात अटक करण्यात आली त्यानंतर सदर गावठी कटटे बाबत विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने ०१ गावठी कटटा ०१ जिवंत काडतूस असे त्याने काढून दिले तसेच त्याने मालेगाव शहरातील साथीदार आ.क्र. ४) अन्सारी मोहंमद हुसैन मोहंमद याकुब ऊर्फ समोसा वय 27 वर्ष रा. सर्वे नं. 105/अ/1 प्लॉट नं. 87 गुलशने मासुम मोहनबाबा नगर मालेगांव यास ताब्यात घेवून त्याचे कडील ०१ गावठी कटटा ०१ जिवंत काडतूस असे जप्त करण्यात आले व आ.क्र. ०५) रिजवान मोहंमद उस्मान वय 31 वर्ष रा. नयापुरा ग.न. 5 घ.न.610 मालेगांव याचे कडून ०१ गावठी कटटा ०१ जिवंत काडतूस असे जप्त करण्यात आले व आ.क्र. ०६ समीर अंजूम शकिल अहमद ऊर्फ पानवाला वय 31 वर्ष रा. सर्वे नं.98 प्लॉट नं.40 बाग ए महेमुद संगमेश्वर मालेगांव याचे कडून ०१ गावठी कटटा ०१ जिवंत काडतूस असे जप्त करण्यात आले, व आ.क्र.०७ कासीम खान शकिल खान ऊर्फ कासीम घोडा वय 22 वर्ष रा. गुलशने इब्राहिम ग.न.04 साबेरा हाज्जीन मशीद जवळ मालेगांव याचे कडून ०१ गावठी कटटा ०१ जिवंत काडतूस असे जप्त करण्यात आले असे पवारवाडी पोलीस स्टेशन गुन्हयात एकूण ०७ गावठी कटटे व ०८ जिवंत काडतूस असे मालेगाव शहरात विक्री करणारा आरोपी क्र. 3 नामे-हिफजु रहेमान मोहम्मद इद्रीस रा-नयापुरा, मालेगाव हा या प्रकरणाचा मेन मोरखा आहे.0
0
Report
Advertisement
विदर्भ में बारिश नहीं, धान संकट; किसान टैंकर से पानी देकर फसल बचाने
Bhandara, Maharashtra:धानाचे परे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची केविलवाणा प्रयत्न.... धान परे वाचविण्यासाठी टँकरचा आधार.... गुरुदेव सेवा मंडळाचा शेतकऱ्यांना दिलासा.... विदर्भात पावसाने पाठ फिरवली असून भंडारा जिल्हात धान शेतीचे विदारक दृश्य पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी धान पऱ्हाची लागवड केली असून धानाला अंकुर सुद्धा आले आहे. मात्र जिल्ह्यात मागील पंधरा दिवसापासून पावसाचा थांगपत्ता नसल्याने पऱ्यांनी मान खाली केली. धान पिकाची रोवणी केलेल्या शेतात तडे गेले असून भयावह स्थिती बघायला मिळत आहे. जिल्ह्यात अद्याप अपेक्षित पाऊस झालेला नसून धान शेतीला पावसाची प्रतीक्षेत आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील येनोळा,मांगली,वलनी, शिवनाळा, जुनोना या परिसरात शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष किशोर पंचभाई यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा लक्षात घेत शेतकऱ्यांना धान वाचविण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा करत आहेत. धानाचे परे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.0
0
Report
अकोला में किसानों की फसल बचाने के लिए तेज बारिश की मांग, महंगे खर्च से संकट
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यात यंदा कृषी विभागाने सुमारे साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी क्षेत्र जाहीर केले आहे. मात्र अनेक ठिकाणी बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार, तर काही भागात तिबार पेरणीची वेळ आली आहे. यातच गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने उगवलेल्या पिकांची वाढ खुंटली असून जमिनीतील ओलावाही झपाट्याने कमी होत आहे. बियाणे, खते, मजुरी आणि मशागतीचा वाढता खर्च यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पिके वाचवण्यासाठी आता शेतकऱ्यांची नजर आभाळाकडे लागली असून तातडीने पावसाची आवश्यकता असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या पाल्यांची शैक्षणिक फी आणि वीजबिल माफ करून शासनाने तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही होत आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील बोडखा गावातील शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत.0
0
Report
तुमसर नगरपरिषद: अदालत ने स्वीकृत सदस्य वैध, भाजपा के अमरीश सानेकर व शैलेश मेश्राम निर्वाचित
Bhandara, Maharashtra:तुमसर नगरपरिषद यहाँ स्वीकृत सदस्यांची निवड प्रक्रिया अखेर पार पडली तुमसर जिल्ह्यातील तुमसर नगरपरिषदेत स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली होती परंतु स्वीकृत सदस्यांची निवड नियमबाह्य झाल्याचे आक्षेप घेतल्याने हे प्रकरण न्यायालयात सुरू होते. स्वीकृत सदस्याच्या निवड प्रक्रियेच्या प्रकरणात न्यायालयाने प्रमोद तितीरमारे राष्ट्रीय काँग्रेस यांची निवड वैध असून दोन स्वीकृत सदस्याचे निवड करण्याचे आदेश दिले. अखेर नगरपरिषद तुमसर येथे दोन स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली या निवड प्रक्रियेत स्वीकृत सदस्य म्हणून अमरीश सानेकर भाजपा, शैलेश मेश्राम भाजपा यांची निवडण्यात आली. स्वीकृत सदस्यांची निवड शांततेत पार पाडण्यासाठी नगरपरिषद येथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता.0
0
Report
Advertisement
