icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

चंद्रपुर में अवैध रेत खनन दौरान कांग्रेस नेता के 3 हाईवा व एक पोकलेन जप्त

Chandrapur, Maharashtra:चंद्रपुर जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन करतांना काँग्रेसच्या बड्या नेत्याचे ३ हायवा आणि १ पोकलेन जप्त, मूल महसूल विभागाची उमा नदीच्या राजोली घाटावर कारवाई अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन करतांना काँग्रेसच्या बड्या नेत्याचे ३ हायवा आणि १ पोकलेन जप्त करण्यात आले आहेत. मूल महसूल विभागाने उमा नदीच्या राजोली घाटावर ही कारवाई केली.  महसूल विभागाच्या कारवाईत जवळपास २ कोटींच्या वरील मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. जप्त करण्यात आलेले हायवा काँग्रेसचे माजी चंद्रपूर तालुकाध्यक्ष शामकांत थेरे यांच्या मालकीचे असल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे.  मूल तालुक्यात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनाने धडक कारवाई करत तीन हायवा आणि एक पोकलेन मशीन जप्त केली. कारवाईनंतर सर्व वाहने तहसील कार्यालयात जमा करण्यात आली असून त्यांच्यावर महसूल नियमांनुसार पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बाईट १) विजय पंडिले, नायब तहसीलदार, मुल आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
0
Report

महाराष्ट्र: ऊस वाहतूकदारों पर कागदपत्रों के दुरुपयोग का आरोप; 100 कारखानों पर करोड़ों का कर्ज

Kolhapur, Maharashtra:राज्यातील ऊस वाहतूकदारांनी वाहतूक आणि तोडणीचे करार करताना दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर केल्याचा आरोप महाराष्ट्र ऊस वाहतूकदार संघटनेने केला आहे...राज्यातील खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांनी मुद्रा योजना आणि इतर योजनेतून कर्ज उचल केल्याचा दावा या संघटनेने केलाय. राज्यातील जवळपास 100 कारखान्यांनी शेकडो कोटींचे कर्ज वाहतूकदारांच्या कागदपत्रांववर उचलल्याचं समोर आलं आहे.धक्कादायक म्हणजे काही वाहतूकदारांच्या नावावर कर्नाटकामधील बँकेमधून कर्ज उचललं आहे. बँकांच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून ऊस वाहतूकदारांचे सिबिल खराब करत त्यांना देशोधडीला लावण्याचं काम कारखाना प्रशासनाकडून करण्यात आलं आहे..या विरोधात महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार शेतकरी संघटनेच्या वतीने कोल्हापूरमध्ये अन्नत्याग आंदोलन करण्यात येतंय. वाहतूकदारांचे हे प्रश्न निकाली न काढल्यास यंदाचा गळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही असा इशारा संघटनेच्या वतीने दिला आहे.
0
0
Report

धैर्यशील मोहिते पाटील ने मंत्री गोरे पर निशाना, पवार गट की चुनाव चर्चा गर्म

Pandharpur, Maharashtra:सोलापूर विधान परिषद निवडणूक निकाला नंतर माढ्याचे शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा साधलाय. चंद्रकांत पाटील हे सोलापूरचे पालकमंत्री असते तर विधान परिषदेची निवडणूक वैचारिक दृष्ट्या बिनविरोध झाली असती असा मोठा गौप्यस्फोट ही खासदार मोहिते पाटील यांनी केला आहे. विधान परिषद निवडणुकीत भाजपचे राजेंद्र राऊत विजयी झाले असले तरी शरद पवार गटाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांना मिळालेल्या मतांची जोरदार चर्चा आहे. काल पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार मोहिते पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर मोहिते पाटील यांनी पालकमंत्री गोरे यांच्यावर टिका केली.
0
0
Report
Advertisement

बीड़ में मानसून नहीं—पेयजल बाधित, खेतों के लिए पानी संकट गहरा

Beed, Maharashtra:बीड: "पाऊस" गायब, पाण्यावर बंदी! बीडच्या शेतकऱ्यांवर दुहेरी संकट..! ANC : मान्सूनने पाठ फिरवल्यामुळे बीड जिल्ह्यावर भीषण पाणीटंचाईचं संकट घोंगावत आहे. जिल्ह्यातील बहुतांश पाणी प्रकल्प तळ गाठण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत शेतीसाठी धरणं आणि प्रकल्पांमधून बेकायदेशीरपणे पाणी उपसा करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. एकीकडे पावसाचा दुष्काळ आणि दुसरीकडे कारवाईची भीती, त्यामुळे बीडचा शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. पाहूयात हा विशेष रिपोर्ट... VO-1 गतवर्षी पावसाने बीड जिल्ह्यात अक्षरशः हाहाकार माजवला होता. मात्र यंदा मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यातच पावसाने दडी मारल्याने जिल्हा पुन्हा एकदा दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. जिल्ह्यातील 173 मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्पांमध्ये अवघा 17.25 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अनेक प्रकल्प मृतसाठ्यात पोहोचले असून काही पूर्णपणे कोरडे पडले आहेत. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. प्रकल्पांमधून शेतीसाठी अनधिकृतपणे पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. अशा प्रकरणांमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असून पाईप, मोटार आणि इतर साहित्य जप्त केले जाणार आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. बाईट : विवेक जॉन्सन, जिल्हाधिकारी ग्राफिक्स : - बीड जिल्ह्यातनेकून 173 मध्यम लघु प्रकल्प आहेत. - प्रकल्पात केवळ 17.25 टक्के पाणी साठा शिल्लक - 79 लघु प्रकल्प मृत साठ्यात गेले आहेत - 81 पाणीसाठा प्रकल्प कोरडे पडले आहेत - 13 प्रकल्पातील पाणी शून्यावर आहे - बीडला पाणी पुरवठा करणाऱ्या माजलगाव धरणात केबल 21.22 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. VO-2 यंदा पावसाने साथ न दिल्यामुळे सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणाऱ्या खरিপाच्या पेरण्या अद्यापही रखडलेल्या आहेत. पावसाअभावी अनेक शेतकरी सिंचन प्रकल्पांच्या पाण्यावर अवलंबून होते. मात्र आता प्रशासनाच्या कडक भूमिकेमुळे त्यांच्यासमोर नवे संकट उभे राहिले आहे. दरम्यान, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याच्या निर्णयाचे शेतकरी संघटनांनी स्वागत केले आहे. मात्र उद्योगांना सुरू असलेला पाणीपुरवठा आधी बंद करावा आणि त्यानंतर शेतीसाठी नियंत्रित स्वरूपात पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकरी नेते करत आहेत. बाईट : भाई मोहन गुंड, शेतकरी नेते END VO एकीकडे आकाशाने पाठ फिरवली आहे, तर दुसरीकडे उपलब्ध पाणीसाठाही झपाट्याने आटत चालला आहे. त्यामुळे प्रशासन पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलत असले, तरी शेतीच्या भवितव्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनत आहे. आता सर्वांच्या नजरा मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे लागल्या असून, पाऊस वेळेत बरसला नाही तर बीडसमोरील पाणी आणि शेतीचं संकट आणखी गडद होण्याची चिन्हं आहेत.
0
0
Report
Advertisement

अमरावती में रेलवे पटरी के नीचे महिला की दुखद मौत, रंगोली होटल के पास मामला

Amravati, Maharashtra:अमरावतीत रेल्वेखाली येऊन महिलेचा दुर्दैवी मृत्यू; राजापेठ हद्दीतील रंगोली हॉटेलजवळील घटना अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नवातील चौक परिसरातील रंगोली हॉटेलजवळ एका महिलेचा रेल्वेखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मीना जोहारले (रा. कुंभारवाडा, अमरावती) असे मृत महिलेचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित महिला मानसिक आजाराने त्रस्त असल्याचे सांगितले जात असून यापूर्वीही तिने तीन ते चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
0
0
Report

Beed: Vilas Gule murder sparks kin protest, highway blocked for two hours

Beed, Maharashtra:बीड: विलास घुले खूण प्रकरण; आरोपी अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाइकांसह ग्रामस्थांचा ठिय्या, दोन तासांपासून राष्ट्रीय महामार्ग रोखला ANC - भांडणे मिटवण्यासाठी मध्यस्थी करत असलेल्या विलास घुले या तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. घटनेला आजचा तिसरा दिवस आहे. याप्रकरणी 9 आरोपींविरोधात केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र मुख्य आरोपींसह इतर आरोपींना तत्काळ अटक करा या मागणीसाठी नातेवाईक आणि टाकळी गावचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. संतप्त ग्रामस्थानी केज मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे अहिल्यानगर - अहमदपूर राष्ट्रीय महामार्ग दोन तासांपासून ठप्प आहे. पोलिसांनी कसलीही कारवाई केली नसल्याचा आरोपी मयताच्या पत्नीने केला आहे. जोपर्यंत संपूर्ण आरोपी अटक करणार नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा ग्रामस्थानी घेतला आहे..मृतदेह सध्या अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयातच ठेवण्यात आले आहे. बाईट: सुषमा घुले, मयत विलास घुले याची पत्नी
0
0
Report

ठाकुरळी में महावितरण का बड़ा पोल गिरा, ट्रैफिक जाम और विद्युत आपूर्ति बाधित

Kalyan, Maharashtra:डोंबिवलीतील ठाकुर्ली परिसरात महावितरणचा भलामोठा विद्युत पोल कोसळला परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दोंबिवलीच्या ठाकुरळी शेलार चौक परिसरात महावितरणचा एक भला मोठा विद्युत पोल कोसळल्याची घटना घडलीय.एक बाईकस्वार इथुन जात असतांना हा पोल कोसळला, मात्र त्याने प्रसंगावधान बाळगल्याने तो वाचला. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र मुख्य रस्त्यावर हा विद्युत पोल कोसळल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी सध्या घटनास्थळी दाखल झाले असून विद्युत पोल बाजूला करण्याचे काम सुरू आहे .दरम्यान हा विद्युत पोल कोसळल्याने संपूर्ण ठाकुर्ली परिसरातला विद्युत पुरवठा खंडित झालाय.
0
0
Report
Advertisement
Advertisement

नाशिक समेत कई जिलों में अच्छी बारिश, खरीफ की खेती में तेजी

Yeola, Maharashtra:गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग येण्यास सुरुवात झाली आहे. येवला तालुक्यातही पहिल्या चांगल्या पावसानंतर शेतकरी मोठ्या प्रमाणावर कृषी सेवा केंद्रांकडे वळले असून बी-बियाणे आणि खतांच्या खरेदीसाठी गर्दी करताना दिसत आहेत. पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून पेरणीसाठी आवश्यक साहित्याची खरेदी सुरू झाली आहे. दरम्यान, कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रमाणित व दर्जेदार बियाण्यांचीच खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. येवला तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांवर सध्या शेतकऱ्यांची मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
0
Report

खारघर में पानी की किल्लत पर महिलाओं ने बिल्डर के कार्यालय का घेराव किया

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील खारघर येथील अरिहंत ग्रुपच्या गृहनिर्माण प्रकल्पात भीषण पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार पाणीपुरवठा खंडित होत असल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. समस्येच्या निषेधार्थ महिला रहिवाशांनी बिल्डर कार्यालयात जाऊन घेराव घातला. यावेळी रहिवासी आणि व्यवस्थापन यांच्यात जोरदार वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. अरिहंत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अशोक छाजेर यांच्यावर महिलांच्या अंगावर डिफेंडर वाहन घालण्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून रहिवाशांनी तातडीने पाणीप्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top