icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

पूर्व शिक्षक आमदार अपूर्व हिरे ने शिक्षा विभाग पर गंभीर आरोप, मौत का मामला

Nashik, Maharashtra:मालेगाव ( नाशिक ) ब्रेकिंग - प्रा.बोरसे मानसिक तणावामुळे कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाल्याचा हिरे यांचा दावा.. - या संपूर्ण घटनेला शिक्षण विभाग जबाबदार असल्याचा गंभीर आरोप.. - शिक्षकांना विविध कारणांनी त्रास देण्याच्या हेतूने शाळांची चौकशी सुरू असल्याचा अपूर्व हिरे यांचा आरोप.. - पोर्टलवर सर्व कागदपत्रे अपलोड असतानाही वारंवार तपासणीचा दावा.. - चौकशी आणि दबावामुळे शिक्षक मानसिक तणावाखाली असल्याचा आरोप.. - संस्थेत भ्रष्टाचार असेल तर संस्थाचालक म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल करा – अपूर्व हिरे - शिक्षकांना त्रास देणे हा पर्याय नाही; चुकीचे असेल तर माझ्यावर कारवाई करा, हिरे यांचे आव्हान.. Anchor - मालेगावमध्ये म्युनिसिपल हायस्कूलमधील प्राध्यापक बोरसे यांच्या मृत्यूचा मुद्दा चांगलाच तापला आहे. या पार्श्वभूमीवर माजी शिक्षक आमदार अपूर्व हिरे यांनी पत्रकार परिषद घेत शिक्षण विभागावर गंभीर आरोप केले आहेत..मंत्री भुसे यांच्या तक्रारीवरून चौकशी झाल्यानंतर शाळेवर प्रशासक नेमले गेले, त्यांनी त्यांचे अधिकार वापरले.. त्यांनी वापरलेल्या अधिकाराविरुद्ध आम्ही कोर्टात गेलो कोर्ट कडून आम्हाला न्याय मिळेल..मात्र, गेल्या काही दिवसांपासून शाळेत सातत्याने चौकशी आणि तपासणीसाठी पथक येत होते. शिक्षकांवर वारंवार दबाव आणला जात होता, तर पोर्टलवर सर्व कागदपत्रे आणि माहिती उपलब्ध असतानही केवळ त्रास देण्याच्या हेतूने चौकशी सुरू असल्याचा आरोप हिरे यांनी केला आहे.याच मानसिक तणावातून प्रा.बोरसे यांना घाम फुटला, ते कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.या संपूर्ण घटनेला शिक्षण विभाग जबाबदार असल्याचा थेट आरोप अपूर्व हिरे यांनी केला आहे. तसेच, संस्थेत काही भ्रष्टाचार असेल, चुकीचे घडत असेल तर संस्थाचालक म्हणून आम्हाला जबाबदार धरा, आमच्यावर गुन्हे दाखल करा ; मात्र शिक्षकांना त्रास देऊ नका, असं आव्हानही हिरे यांनी दिलं आहे..दरम्यान, पोलिस फिर्याद घेत नसल्याचाही त्यांनी आरोप केला असून, स्वतः फोन केल्यानंतर मध्यरात्री फिर्याद नोंदवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. घटनेला २४ तास उलटूनही एकाही आरोपीला अटक झालेली नाही, असा दावा करत हिरे यांनी पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.. बाईट - अपूर्व हिरे, माजी शिक्षक आमदार
0
0
Report

कल्याण में मराठा समर्थकों का एक दिवसीय अन्नत्याग, सरकार से तुरंत समाधान की मांग

Kalyan, Maharashtra:जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कल्याणमध्येही उपोषण 12 वा दिवस आहे .अजूनही कोणत्याही प्रकारचा तोडगा मराठा आरक्षणावर निघालेला नाही. दरम्यान जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कल्याणमध्ये देखील मराठा बांधवांच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे. कल्याण तहसील कार्यालयाबाहेर मराठा बांधव एक दिवशीय अन्नत्याग लाक्षणिक उपोषणासाठी बसले आहेत. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी देखील सामील आहेत. सरकारने लवकरात लवकर यावर तोडगा काडावा अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली.
0
0
Report

अमोल कोल्हे ने DPDC फंड आवंटन पर सरकार पर तीखा हमला

Shirur, Maharashtra:जिल्हा नियोजन समितीच्या म्हणजेच डीपीसीच्या निधी वाटपावरून शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. डीपीसीमधून मिळणाऱ्या निधीपैकी तब्बल ७० टक्के निधी आमदार खर्च करतात, तर उर्वरित ३० टक्के निधी पालकमंत्र्यांच्या अखत्यारीत खर्च केला जातो. या निधीतील मोठा हिस्सा हा थेट केंद्राकडून येत असतानाही, स्थानिक खासदारांना मात्र विकासकामांसाठी यात कोणताही निधी दिला जात नाही, असा थेट आरोप अमोल कोल्हे यांनी केला आहे. खासदारांना पूर्णपणे डावलून केवळ आमदार आणि मंत्र्यांच्या हातात निधी देण्याच्या या धोरणावर त्यांनी कडक शब्दांत आक्षेप घेतला असून, या अन्यायाविरोधात आता नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे, जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडी येथील कार्यक्रमात खासदार कोल्हे बोलत होते
0
0
Report
Advertisement

वाशीम बैलपोळा बाजार बारिश से प्रभावित, किसान खर्चे कम पाने को विवश

Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:उद्याच्या बैलपोळ्याच्या पार्श्वभूमीवर वाशिमची बाजारपेठ सर्जा-राजाच्या साजशृंगाराच्या साहित्याने सजली आहे.गोंडे,घुंगरू, झुली,दोऱ्या आणि रंगांची खरेदी करण्यासाठी शेतकरी बाजारात दाखल होत आहेत.मात्र यंदा पावसाने दडी मारल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे पोळ्याच्या बाजारपेठेतील गर्दी आणि खरेदीची लगबग काहीशी कमी झाली आहे. हातात पैसा कमी असला तरी वर्षभर साथ देणाऱ्या लाडक्या बैलाप्रती शेतकरी माया कायम आहे. त्यामुळे ऐपतीनुसार खरेदी करत शेतकरी साधेपणाने बैलपोळा साजरा करण्याच्या तयारीत आहेत.
0
0
Report

नाशिक में MD ड्रग्स विक्री धंधা पकड़ा गया, दो गिरफ्तार, 56 ग्राम पावडर बरामद

Nashik, Maharashtra:नाशिकच्या पेठरोडवरील अश्वमेधनगर परिसरात एमडी ड्रग्ज विक्रीचा डाव नाशिक पोलिसांनी उधळून लावला आहे. अमली पदार्थविरोधी पथकाने सापळा रचत दोघा संशयित पेडलरना ताब्यात घेतलं. दर्शन गायकवाड आणि रोशन लोखंडे अशी या दोघांची नावं आहेत. त्यांच्या अंगझडतीत तब्बल ५६ ग्रॅम एमडी पावडर आढळून आली असून, त्याची किंमत तब्बल १ लाख ६८ हजार रुपये आहे. यासोबतच गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे. विशेष म्हणजे, संशयित दर्शन गायकवाड हा पोलिस रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, एमडीचा पुरवठा नेमका कुठून झाला आणि तो कोणाला विकला जाणार होता, याचा तपास सुरू आहे.
0
0
Report
Advertisement

ठाणे पालिका: पूर्व महापौर वैती उपायुक्त गोडेपुरे के दफ्तर के बाहर ठिय्या

Thane, Maharashtra:सत्ताधारी पक्षाच्या माजी महापौरांचे उपायुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर आणि सत्ताधारी शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक अशोक वैती यांनी आज महापालिकेचे उपायुक्त गजानन गोडेपुरे यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांनी गोडेपुरे यांच्या कार्यालयाबाहेरील नामफलकाला पुष्पहार घालत प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. वारसाहक्काच्या आधारे कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या नोकरीचा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याचा आरोप वैती यांनी केला. याप्रकरणातील सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्या असून केवळ उपायुक्त गजानन गोडेपुरे यांच्या सहीअभावी प्रश्न रखडल्याचा दावा त्यांनी केला. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत तक्रारी करूनही अधिकाऱ्यांकडून प्रश्न मार्गी लावला जात नसल्याने अखेर आंदोलन करण्याची वेळ आल्याचे वैती यांनी सांगितले. विशेष म्हणजे, अशोक वैती हे ठाणे महापालिकेचे माजी महापौर असून सत्ताधारी शिवसेनेशी संबंधित आहेत. महापालिकेवरील सत्ताही सत्ताधारी पक्षाचीच आहे आणि राज्यातील उपमुख्यमंत्रीपदही त्यांच्याच पक्षाकडे आहे. असे असतानाही सत्ताधारी पक्षाच्या माजी महापौरांनाच महापालिका प्रशासनाविरोधात ठिय्या आंदोलन करावे लागत असल्याने प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
0
0
Report

मनसे-भाजप में तहकूब के बाद महापौर नियुक्ति पर घमासान

Kalyan, Maharashtra:केडीएमसीची महासभा तहकुब. मनसेचा भाजपावर पलटवार कल्याण डोंबिवली महानगर पालिकेची महासभेचे आयोजन कारण्यात आले होते मात्र काही दिवाळीपूर्वी पुण्यात मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो काढण्याच्या निषेधार्थ भाजपा कडून केडीएमसीची पूर्ण दिवसभरासाठी सर्वसाधारण सभा तहकूब केल्याने विरोधकांनी निषेध वेक्त केला महासभा जनतेचा विषय मांडण्यासाठी असते मात्र इथे सत्तेचा खेळ करण्या साठी आहे ..भाजपने ही नाटकं बंद करावीत ,विरोध असेल तर सत्तेतून बाहेर पडा ,यांच्या सत्तेच्या खेळात जनतेचे प्रश्न मात्र लांबले.
0
0
Report
Advertisement

अजित दादाओं के पाठपुरावे पर महायुती बनाम भाजप संघर्ष की तैयारी

Bhandara, Maharashtra:अजित दादांच्या पाठपुरावा करण्यापेक्षा (राष्ट्रवादी अजित पवार) त्यांनी लाचारी स्वीकारलेली आहे.... रोहित पवार.... राष्ट्रवादी पक्षाची आज बैठक असून या बैठकीमध्ये जो निर्णय घेतला जाईल ते बघू अधिवेशन जेव्हा सुरू होता आमच्याकडे जो कागद आलेला होता तो कागद आम्ही प्रसिद्ध केला होता. अजितदादा गेल्या गेल्या पहिल्या महिन्यामध्ये काय घडामोडी झाल्या हे मी बोललो होतो. आज काय करतील हे मला तरी सांगता येणार नाही, तिथे मी लक्षात ठेवलेले नाही ते भाजपा बरोबर केलेल्या कुठे ना कुठे त्यांनी काही प्रमाणात लोकांचे हिताचे निर्णय घेण्यापेक्षा अजित दादांच्या पाठपुरावा करण्यापेक्षा त्यांनी लाचारी स्वीकारलेली आहे.... आमचे तर असं म्हणणं आहे. की त्यांच्यात आणि त्यांच्या पक्षात जर हिम्मत असेल तर दादांना भाजपाने न्याय दिला नाही मग तुम्ही तिथं भाजपाची साथ सोडा आणि विरोधात या मग कदाचित तुम्ही आलात तर आपण तुमच्यापेक्षा भाजपाच्या विरोधात महायुतीच्या विरोधात एकत्र येऊ शकतो धडा देऊन संघर्षाच्या माध्यमातून करू....
0
0
Report
0
0
Report

मराठवाड्यात 11 वर्षात विकास फक्त दीड टक्का; घोषणांवर सवाल उठले

Latur, Maharashtra:मराठवाड्याच्या विकासाची गती फक्त दीड टक्का ?... घोषणा मोठ्या, प्रगती दीड टक्का... दानवेंचा सरकारला सवाल... ११ वर्षांत विकासाची प्रगती दीड टक्का... दानवेंचा आरोप... मराठवाड्याच्या विकासासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या... मोठमोठे प्रकल्प जाहीर झाले... मात्र प्रत्यक्षात विकास किती झाला? याच प्रश्नावरून अंबादास दानवेंनी सरकारला घेरलंय... मागील अकरा वर्षांत मराठवाड्यातील जाहीर केलेल्या योजनांची प्रगती केवळ दीड टक्का असल्याचा गंभीर दावा दानवेंनी केलाय... गोदावरी खोऱ्याचं पाणी असो किंवा उजनीचं पाणी... घोषणा झाल्या, मात्र निधी आणि कामांची प्रगती कुठे आहे, असा सवाल करत दानवेंनी सरकारवर जोरदार टीका केलीय... अंबादास दानवे
0
0
Report
Advertisement

सातारा की वृद्ध महिला को बेटे नहीं दे रहे साथ: मंदिर में आश्रय, प्रशासन से मदद की मांग

Satara, Maharashtra:सातारा : पतीच्या निधनानंतर दोन मुलांना सांभाळत आयुष्याची लढाई लढणाऱ्या 65 वर्षीय रुक्मिणी सदाशिव भस्मे यांच्यावर आज वृद्धापकाळातच दुर्दैवाची वेळ आली आहे. ज्या मुलांसाठी आयुष्य वेचले, त्याच मुलांकडून आधार मिळत नसल्याने त्यांना सध्या निवाऱ्यासाठी मंदिराचा आसरा घ्यावा लागत आहे. रुक्मिणी भस्मे या मूळच्या पाटण तालुक्यातील मुरूड येथील असून, पतीच्या निधनानंतर त्या मुलांसह सातारा शहरात आल्या. गेल्या सुमारे दहा वर्षांपासून त्या सत्त्वशील नगर परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होत्या. सुरुवातीला मोठ्या मुलाने घर सोडले, त्यानंतर धाकट्या मुलानेही आईची झटकली आहे. दरम्यान, घराचे भाडे थकीत झाले आणि मुलांकडून मिळणारी दरमहा दोन हजार रुपयांची मदतही बंद झाली. त्यामुळे भाडे भरणे शक्य न झाल्याने त्यांना खोली सोडावी लागली. काही दिवस नातेवाईकांकडे आश्रय घेतल्यानंतर त्या पुन्हा आपल्या घराकडे आल्या. मात्र घरासमोर पोहोचल्यावर त्यांना त्यांचा खोलीला कुलूपे दिसली.घरमालकाकडे चौकशी केली असता, धाकट्या मुलाने थकीत भाडे भरले असून, यापुढे पैसे देणार नसल्याचे सांगून आईला घरात ठेवू नका, असे सांगितल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर त्या पुन्हा एकट्या पडल्या. गेल्या चार दिवसांपासून या वृद्ध मातेला एका मंदिरात आसरा घ्यावा लागत आहे. काही नागरिकांकडून त्यांना दोन वेळचे जेवण दिले जात आहे. मात्र, राहण्यासाठी कायमस्वरूपी निवारा आणि जवळच्या व्यक्तीचा आधार नसल्याने त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. काही सामाजिक संस्थांनी या मातेला वृद्धाश्रमात ठेवण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, धाकट्या मुलाशी एकदा बोलल्याशिवाय वृद्धाश्रमात जाणार नसल्याचे रुक्मिणी भस्मे यांनी सांगितले आहे. मला माझा संसार मोडायचा नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी... 121– रुक्मिणी भस्मे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून या मातेला सुरक्षित निवारा आणि आवश्यक शासकीय मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे. बाईट – ज्येष्ठ नागरिक दरम्यान, मुलांचा संपर्क होईपर्यंत काही सामाजिक संस्था या मातेला मदत करण्यासाठी पुढे आल्या आहेत. मात्र, जिल्हा प्रशासनाने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून त्यांचे सुरक्षित पुनर्वसन करण्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.
0
0
Report

मराठा आरक्षण: जरंगे के उपोषण का आज बारहवें दिन; सरकार से अहम बैठकें जारी

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anchor : मराठा आरक्षणासाठी जरांगे यांचे उपोषणाचा आज बारावा दिवस आहे सरकारकडून प्रयत्न सुरू आहे मात्र मनोज जरांगे ऐकण्याच्या मनस्थितीत नाही जरांगे यांच्या मागणीनुसार उदय सामंत आणि प्रसाद लाड यांनी आज पुन्हा अधिकाऱ्यांची बैठक घेतली तुमच्या सगळ्या मान्य आम्ही मांडणी केली आहे, जरांगे यांनी उपोषण सोडावं असा आवाहन त्यांनी केलं मात्र मनोज जरांगे यांनी पुन्हा त्यांच्या शैलीत सरकारला फटकारले आहे त्यामुळे सरकार आणि जरांगे यांच्यामधील शीतयुद्ध कायम आहे. मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकारचे बैठक सत्र गेल्या 24 तासात 4 पेक्षा जास्त बैठका, तोडगा नाही सरकारची मागण्या मान्य असल्याची भूमिका, तर जरांगेचा विरोध कायम गेली 2 दिवस संभाजी नगरात सरकारचे असे बैठकांचे सत्र सुरू आहे, सोमवारी दिवसभर, मंगळवारी सकाळी दुपार संध्याकाळ तर बुधवारी पुन्हा सकाळी बैठक झाल्यात, या बैठकांच्या माध्यमातून जरांगे यांच्या मागण्यांवर तोडगा काढल्याचा सरकारचा दावा आहे, नोंदी नुसार प्रमाणपत्र वाटप केल्याचं उदय सामंत यांनी सांगितलंय तर validity बाबतही सरकारने मोठा दावा केलाय, अवघे 0.3 टक्के प्रमानपत्रांना व्हॅलीडीटी फेटाळ ली आहे त्यामुळं मिळण्याचे प्रमाण जास्त असल्याचा सरकारचा दावा आहे. राज्यावर भीषण दुष्काळाचे सावट आहे, बळीराजाचा पोळा सण आहे, गणेशउत्सव तोंडावर आहे त्यामुळं जरांगे यांनी समजुतीने घ्यावे आणि तब्येतीची काळजी घ्यावी असे आवाहन प्रसाद लाड यांनी केले आहे. जरांगे यांनी मात्र पुन्हा एकदा सरकारचे आवाहन धुडकावून लावत सरकारवर हल्लाबोल केलाय, सरकारला दंगली करायचा आहे, यांचे षडयंत्र सुरू आहे याचा डावात आम्ही फसणार नाही असे मनोज जरांगे म्हणाले. सरकारकडून सबुरीचा भाषेत जरांगे याना आवाहन सुरू आहे मात्र जरांगे तितकेच आक्रमक होत चालले आहे या सगळ्यात तोडगा अजूनही दृष्टीआशेपासून दूर नाही त्यामुळं येणाऱ्या काळात आंदोलन आणखीनच भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशाल करोळे सह नितेश महाजन जालना...
0
0
Report

पिंपरी चिंचवड़ में प्रेम-विवाह के बाद परिवार के दबाव से हत्या की कोशिश, आरोपी गिरफ्तार

Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड़ के पिंपळे नीलख क्षेत्र में कुटुंब के विरोध के बावजूद interracial love विवाह करने वाले अमोल वीर पर प्रेम-विवाह के राग में उसकी पत्नी के भाईयों ने पिस्तौल और कोयता से जानलेवा हमला किया. अमोल वीर के साथ अनिकेत वीर और दीपक वीर भी घायल हुए. लगभग चार महीने पहले अमोल ने परिवार की मर्जी के खिलाफ विवाह किया था. रोहन लांडगे, संदीप लांडगे, हर्षद लांडगे और अनिल लांडगे ने इस हल्ले को अंजाम दिया; मौके पर पिस्तौल गिर गई थी, जिससे अमोल बच गया. सांगवी पुलिस ने रोहन लांडगे, संदीप लांडगे, HHarshad और अनिल लांडगे को हिरासत में लिया और घातक शस्त्र जब्त किए. प्रकरण में धाराएं प्राणघातक हल्ला और गैर-कानूनी शस्त्र रखने की लगाई गई हैं; आरोपियों से हथियारों की व्यवस्था पर भी जाँच चल रही है. आरोप है कि Amol की पत्नी और परिवार पर राजनीतिक दबाव डालकर उन्हें बचाने की कोशिश की जा रही है; Amol ने आत्मदहन तक की चेतावनी दी.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top