445001
यवतमाळ : महिला बँक घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या बाबाजी दाते महिला बॅंकेत २४२ कोटींच्या अपहार प्रकरणात महिनाभराने अटकसत्र सुरू झाले आहे. पोलिसांनी शिवसेना नेते रमेश अगरवाल, व्यावसायिक प्रकाश पिसाळ आणि ठेकेदार प्रशांत पामपट्टीवार यांना अटक केली आहे. याआधी बँकेच्या CEO सुजाता महाजन, तिचा पती विलास महाजन, ॲड. वसंत मोहरेकर आणि नवलकिशोर मालाणी यांना अटक झाली होती. आता अटक केलेल्या आरोपींची संख्या सात झाली आहे. २०६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, ज्यामुळे संचालक व लेखा परीक्षक चिंतेत आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
दिशा सालियन मामले में आदित्य ठाकरे पर सुदाचारण राजनीति का हमला — भास्कर जाधव
Ratnagiri, Maharashtra:हेडलाईन: दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंविरोधात सुडाचं राजकारण, भास्कर जाधव यांचा सरकारवर थेट घणाघात!. महाराष्ट्रात घडलेल्या घटनेचा तपास दिल्लीतून का? आदित्य ठाकरेंना घेरण्यासाठी भाजपचं नीच राजकारण; भास्कर जाधव यांचा हल्लाबोल मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, जरांगे पाटलांची फसवणूक अटळ; भास्कर जाधव यांचा सनसनाटी दावा मुंबई-गोवा महामार्ग म्हणजे सरकारचा कोकणाशी दुजाभाव १८ तास चाकरमान्यांचे हाल, सरकार मात्र निर्लज्ज – भास्कर जाधव आदित्य ठाकरेंना वाढत्या लोकप्रियतेमुळे अडचणीत आणण्याचा डाव; दिशा सालियन ते जरांगेंच्या उपोषণापर्यंत भास्कर जाधव यांचा सरकारवर चौफेर हल्लाबोल!. "मनोज जरांगे पाटलांना हे सरकार फसवणार, मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही" — भास्कर जाधव यांचा देवेंद्र फडणवीसांवर थेट आरोप.. Pointer *जरांगे पाटलांची दिशाभूल व विश्वासघात:* मनोज जरांगे पाटील ११ व्यांदा उपोषणाला बसले असून, सरकार त्यांची फसवणूक आणि मराठा समाजाचा विश्वासघात करणार आहे.. *इतर नेत्यांना पुढे करून स्वतः अंग काढून घेणे:* आंदोलनाची धार कमी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस इतर नेत्यांना (विखे पाटील,दरेकर, लाड, बावनकुळे, शिंदे, सामंत) पुढे करून आश्वासने द्यायला लावतात स्वतः मात्र कोणतीही हमी घेत नाहीत.. *मराठा उपोषणाला भेट नाही:* फडणवीस इतर सर्व समाजाच्या उपोषणस्थळी जातात, मात्र मराठा समाजाच्या उपोषणाला त्यांनी एकदाही भेट दिली नाही.. *आरक्षण न मिळण्याचा दावा:* सध्याच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने भूतकाळात केलेल्या विधानाचा संदर्भ देत, फडणवीस जोपर्यंत आहेत तोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, असा घणाघात जाधव यांनी केला.. ............................... हेहडलाईन: दिशа सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना गोवणे हे नीच राजकारण वाढत्या लोकप्रियतेला घाबरून सरकारकडून षडयंत्र — भास्कर जाधव.. Pointer *घाणेरड्या पातळीचे राजकारण:* दिशा सालियन मृत्यूप्रकरणी चौकशी अहवालात आदित्य ठाकरेंचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट झालेले असताना, पुन्हा त्यांच्यावर एफआयआर (FIR) दाखल करण्याचा प्रयत्न होणे हे नीच व हीन पातळीचे राजकारण आहे.. *वडिलांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह:* काही वर्षांपूर्वी स्वतः दिशा सालियन यांच्या वडिलांनी समोर येऊन मुलीच्या मृत्यूवर राजकारण न करण्याची आणि तिने आत्महत्या केल्याची भूमिका मांडली होती मग आताच अचानक त्यांना काय जाणीव झाली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.. *रामदास कदमांवर टीका:* ठाकरे घराण्यासोबत अनेक वर्षे काम करून त्यांच्या मुलावर अशी वेळ आल्यावर आनंद साजरा करणाऱ्या प्रवृत्तीवर जाधव यांनी संताप व्यक्त केला.. *घोटाळे बाहेर काढल्याने सूडबुद्धी:* मुंबईतील मैदाने व पालिकेच्या शाळांच्या जमिनींचे गैरव्यवहार,Gen-G आणि इतर भ्रष्टाचाराची प्रकरणे आदित्य ठाकरे सातत्याने लावून धरत असल्याने सरकार त्यांना अडचणीत आणत आहे.. *वाढत्या जनसमर्थनाला सरकारची भीती:* तिरंगा रॅली आणि महाराष्ट्र दौऱ्यांतून आदित्य ठाकरेंना सर्वपक्षीय व जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे त्यामुळेच सरकार त्यांच्यावर दिशाभूल करण्यासाठी ही जुनी प्रकरणे उकरून काढत असल्याचा आरोप त्यांनी केला.. ............................... हेहडलाईन: "एका मानेला अनेक जिभा फुटल्यासारखी यांची प्रवृत्ती पोटात एक आणि ओठात भलतंच" — भाजप, संघ परिवारावर भास्कर जाधव यांचा हल्लाबोल.. Pointer *दुटप्पी भूमिकेवर प्रहार:* परदेशात गेल्यावर '''बुद्धाच्या देशातून आलोय'''' म्हणायचे आणि देशात आल्यावर राजकीय सोयीनुसार वेगवेगळी वक्तव्ये करायची, या भाजप आणि संघ परिवाराच्या दुटप्पीपणावर जाधव यांनी ताशेरे ओढले.. *एकाच मानेला अनेक जिभा:* आरएसएस, भाजप, विहिंप, बजरंग दल यांच्या वेगवेगळ्या संघटना असल्य तरी ती एकाच प्रवृत्तीची रूपे असून, एका मानेला अनेक जिभा फुटल्यासारखे हे लोक परिस्थितीनुसार वेगवेगळे बोलतात, असा टोला त्यांनी लगावला.. *एकमेव अजेंडा हिंदू-मुस्लिम:* परदेशात काय बोलतात किंवा स्वदेशात काय सांगतात यापेक्षा त्यांच्या पोटात काय आहे हे महत्त्वाचे असून, यांचा मूळ अजेन्डा नेहमीच फक्त हिंदू-मुस्लिम वाद पेटवणे हाच असतो.. *देशाला भोगावे लागणारे परिणाम:* यांच्या ओठात एक आणि पोटात भलतेच असते यांच्या अशा ढोंगी आणि विभाजनकारी विचारसरणीचे गंभीर परिणाम आज संपूर्ण देशाला भोगावे लागत आहेत, असा घणाघात त्यांनी केला.. .............................. हेहडलाईन: "घटना महाराष्ट्रातली, मग चौकशी अधिकारी दिल्लीतून का? आदित्य ठाकरेंविरोधात सुडाचं राजकारण" — भास्कर जाधव यांचा थेट आरोप.. Pointer *दिल्लीतून अधिकारी नेमण्यावर आक्षेप:* दिशा सालियन प्रकरणातील घटना महाराष्ट्रात घडलेली असताना आणि स्थानिक पोलीस सक्षम असताना, आदित्य ठाकरेंच्या चौकशीसाठी दिल्लीतून इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आणणे म्हणजे विशेष आदेश देऊन पाठवल्याचा संशय येतो.. *सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा दाखला:* २०२१ मध्ये बिहार निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायद्यासाठी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचे भांडवल केले गेले पण निवडणुका संपल्यावर त्या प्रकरणाचे काय झाले, असा सवाल जाधव यांनी विचारला.. *राजकीय फायद्यासाठी नीच पातळी:* निवडणुकीच्या किंवा राजकीय लाभासाठी अशा प्रकरणांचा वापर करणे आणि विरोधकांना गोवण्यासाठी दिल्लीवरून यंत्रणा हलवणे, ही राज्यकर्त्यांची अत्यंत हीन आणि नीच पातळी असल्याचे त्यांनी म्हटले.. .............................. हेहडलाईन: "मुंबई-गोवा महामार्ग म्हणजे कोकणाकडे पाहण्याच्या दुजाभावाचा पुरावा १८-१८ तास चाकरमानी रखडले" — भास्कर जाधव यांचा संताप.. Pointer *नितीन गडकरींच्या विधानांची आठवण:* मुंबई-गोवा महामार्गाचा इतिहास म्हणजे एक पुस्तक होईल, असे गडकरी म्हणायचे नंतर त्यांनाच लाज वाटू लागला आणि आता तर ते रस्त्याच्या उद्घाटनालाही जाणार नसल्याचे सांगतात, असा टोला जाधव यांनी लगावला.. *कोकणाबाबत दुजाभाव:* कोकणच्या विकासाच्या आणि भरघोस निधीच्या केवळ बाता मारल्या जातात प्रत्यक्षात हा रखडलेला महामार्ग म्हणजे शासनाच्या कोकणाविषयीच्या नकारात्मक दृष्टिकोणाचे आणि दुजाभावाचे उत्तम उदाहरण आहे.. *चाकरमान्यांचे हाल:* गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना तब्बल १८-१८ तास ट्रॅफिकमध्ये अडकून राहावे लागले लहान मुले, महिला व वृद्धांचे अतोनात हाल झाले.. *सरकारच्या भूमिकेवर टीका:* तासनतास रखडलेल्या प्रवाशांच्या व्यथा ऐकल्यानंतर सरकार किती निर्लज्ज आहे, हेच या रखडलेल्या कामावरून सिद्ध होते, असा घणाघात त्यांनी केला.0
0
Report
लातूर के शिक्षण संस्थापक की आत्महत्या; सुसाइड नोट में I AM GOOD FOOL से बढ़ा रहस्य
Latur, Maharashtra:लातूरच्या शिक्षण क्षेत्रातील namaांकित संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे... मात्र सुसाईड नोटमधील काही शब्दांमुळे आता या आत्महत्येभोवती नवं गूढ निर्माण झालंय... आणि त्यामुळे पोलिसांसमोरही एक नवं आव्हान उभं राहिलंय... नेमकं काय आहे प्रकार पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून... घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले... सुसाईड नोट ताब्यात घेतली... परवानाधारक शस्त्रासह घटनास्थळावरील काही वस्तूही पोलिसांनी ताब्यात घेतल्या... सुसाईड नोटमधील हस्ताक्षराचीही तपासणी सुरू करण्यात आली आहे... कारण नोटमधील मजकूर आणि त्याचा नेमका संदर्भ तपासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे... दरम्यान, सोनवणे यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी अमेरिकेत वास्तव्यास असल्यामुळे, कुटुंबीय लातूरला पोहोचेपर्यंत अंत्यविधीही थांबवण्यात आले आहेत. मात्र, शिक्षण क्षेत्रात मोठं नाव असलेल्या सोनवणे यांनी असं टोकाचं पाऊल का उचललं... याचा धक्का त्यांच्या मित्रांनाही बसलाय. शेवटी त्यांच्या मनात नेमकं काय सुरू होतं ? हा प्रश्न आता त्यांच्या मित्रांसह पोलिसांपुढेही आहे... शिक्षण क्षेत्रात मोठं नाव... प्रतिष्ठेचं आयुष्य... मग आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात अशी वेळ का आली? कुणी त्यांना फसवलं होतं का? कुणाचा दबाव होता ka? सुसाईड नोटमधील त्या शब्दांमागे नेमकं कोणतं गूढ दडलंय? शेवटच्या क्षणी त्यांच्या मनात नेमकं काय होतं... हे आता कायमचं अनुत्तरित राहणार, की पोलिसांच्या तपासातून त्याचा उलगडा होणार? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांपुढे आहे...0
0
Report
Solapur: Ganesh festival extortion alleges hotel owner asked for three lakh rupees
Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग - सोलापुरात गणेशोत्सवानिमित्त हॉटेल व्यावसायिकाला मागितली तब्बल तीन लाखांची वर्गणी, रक्कम ऐकताच हॉटेल मालकाला आली चक्कर. - सोलापुरात एका गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हॉटेल व्यवसायीकाला मागितली चक्क तीन लाख रुपयांची वर्गणी. - वर्गणीची रक्कम ऐकताच हॉटेल मालकाला आली चक्कर. - मंडळाच्या 500 ड्रेसचे प्रत्येकी 600 ₹ प्रमाणे टेलर ला देण्यासाठी मागितले तीन लाख रुपये. - गणेश मंडळासाठी वर्गणी मागणाऱ्या कार्यकर्त्याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल. गणेशोत्सवाच्या वर्गणीच्या नावाखाली हॉटेल व्यावसायिकाकडे तब्बल ३ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप समोर आला आहे. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचीही तक्रार करण्यात आली असून, या प्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निराळे वस्ती येथील क्रांती तालीम गणेशोत्सव मंडळाचा सदस्य नेताजी शिवाजी शिंदे हा हॉटेल व्यावसायिक एकनाथ सोपान घाडगे यांच्या हॉटेलवर आला होता. मंडळाच्या गणपती वर्गणीच्या नावाखाली 500 ड्रेसचे प्रत्येकी 600 ₹ प्रमाणे तीन लाख रुपये टेलरला देण्यासाठी मागितले. हॉटेल व्यवसाय एकनाथ घाडगे यांनी आपली आर्थिक परिस्थिती लक्षात घेता दरवर्षीप्रमाणे 25 हजार रुपये वर्गणी देण्याची तयारी दर्शवली. तसेच यापूर्वी मंडळाला 2 लाख रुपये दिल्याचेही सांगितले. मात्र, तक्रारीनुसार नेताजी शिंदे यांनी 3 लाख रुपयांच्या मागणीवर ठाम राहत पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. ज्ञानेश्वर सपाटे यांनी या घटनेच्या संदर्भात माहिती दिली आणि मंडळाचा सदस्य असल्याचा दावा केला. गणेशोत्सवासाठी वर्गणी मागताना कायद्याचे उल्लंघन होत नाही ना? पैसे न दिल्यास धमकी देण्याचा प्रकार कितपत योग्य? या घटनेमुळे उत्सवाच्या वर्गणीच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिस तपासात नेमके काय समोर येते, हे पाहणे महत्त्वाचे आहे. अभिषेक आदेप्पा, झी - 24 तास, सोलापूर0
0
Report
Advertisement
ओबीसी नेता लक्ष्मण हाके का विधान सभा पर जमकर हमला: गुंडा संस्कृति पर सवाल
Sangli, Maharashtra:स्लग - साल्यांनो,तुम्ही संविधानाची शपथ घेतली आहे,कायद्याचं सभागृह बनलंय गुंडाड - ओबीसी नेते लक्ष्मण हाके . अँकर - कोणीही उठतं,मनोज जरांगेला पाठिंबा देतं,साल्यांनो,तुम्ही संविधानाची शपथ घेतली आहे,अ ash्या शब्दात ओबीसी येथे लक्ष्मण हाके यांनी विधानसभेतल्या आमदारांवर टिका केला आहे,तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेत,लँड माफीया, गुटखा,मटका,आणि गुंड माणसं आणि मसल पावर वरती निवडून जात आहेत,अशी टीका करत s सेत्तरच्या दशकात महाराष्ट्राच्या विधानसभेत बॅरिस्टर आणि उच्चशिक्षित माणसं निवडून जायची,पण आता कायद्याच्या सभागृहात गुंडाड आणि सुमार दर्जाची माणसं निवडून जात आहेत,अशी घणाघातीत टीका देखील लक्ष्मण हाके यांनी आमदारांवर केली है. बाईट - लक्ष्मण हाके - ओबीसी नेते व्ही वो - धनगर आरक्षणावरून गोपीचंद पडळकर यांच्या आंदोलनावरून ओबीसी नेते लक्ष्मण हक्क यांनी टीका केली आहे,गोपीचंद पडळकर भाजपचे आमदार आहेत आणि सत्ताधारी भाजप आहे,यामुळे सत्ताधारी आमदाराला सत्ताधाऱ्यांनी विरोधात आंदोलन करायची वेळ का येते ? असा खडा सवाल लक्ष्मण हाके यांनी गोपीचंद पडळकर यांना केला आहे.. बाईट - लक्ष्मण हाके - ओबीसी नेते0
0
Report
गणपतीपुळे मंदिर में 1 जनवरी 2027 से वस्त्र संहिता लागू, भक्तों ने समर्थन दिया
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी - गणपतीपुळे मंदिरात 1 जानेवारी 2027 या दिवसापासून भाविकांसाठी वस्त्र संहिता बंधनकारक भाविकांनी वस्त्र संहितेच्या नियमाला दिल समर्थन मंदिर प्रशासनाचा निर्णय योग्यच अनेक भाविकांची प्रतिक्रिया गणपतीपुळे मंदिराच्या बाहेर वस्त्र संहिता बंधनकारक असल्याचे सांगणारे लागले बोर्ड भाविकांनी वस्त्र संहिता म्हणजे ड्रेस कोड संदर्भातले नियम पाळण्याचे मंदिर प्रशासनाचे निर्देश ऐतिहासिक मंदिर त्यामुळे मंदिर प्रशासनाचे नियम भाविकांनी पाळावेत असं ही केले आव्हान गणपतीपुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांना या ड्रेस कोड संदर्भात प्रतिक्रिया दिल्या आहेत..0
0
Report
कोंकण में जोरदार बारिश की वापसी: चिपळूण से दापोली तक संततधार जारी
Ratnagiri, Maharashtra:ब्रेकिंग हेडलाईन: कोकणात पावसाचे दमदार पुनरागमन; चिपळूण, खेडसह किनारपट्टीवर संततधार सुरू.. अँकर गेल्या काही दिवसांच्या विस्रांतीनंतर कोकणात वरुणराजाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे.. चिपळूण,संगमेश्वर,खेड,दापोली आणि गुहागर परिसरात पावसाची संततधार सुरू असून बळीराजा सुखावला आहे.. लांबलेल्या पावसामुळे सुकू लागलेल्या भातपिकाला या संततधारेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.. दापोली आणि गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे..0
0
Report
Advertisement
मराठा आंदोलन की तैयारी के लिए मनोज जरांगे पाटील मुंबई रवाना
Khopoli, Maharashtra:मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. १९ सप्टेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या आंदोलनासाठी जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले असून, १८ सप्टेंबर रोजी रायगडमधील खोपोली येथे त्यांचा मुक्काम होणार आहे. खोपोलीतील तयारीचा आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाज समन्वयक डॉक्टर सुनील पाटील यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी समृद्धी कोल्हे यांनी.0
0
Report
रोहित पाटिल के पदयात्रा पर संजय काका पटेल का तंज, राजनीतिक घमासान तेज
Sangli, Maharashtra:स्लग - रोहित पाटलांच्या पदयात्रेवर,माजी खासदार संजयकाकांची टीका,रोहित पाटलांचा ही पलटवार.. अँकर - दुष्काळ निवारणासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांनी काढलेल्या पदयात्रेवरून माजी खासदार संजयकाका पाटलांनी केलेल्या टीकेवरून आता आमदार रोहित पाटील आणि संजय काका पाटील यांच्यात जुंपली आहे. सरकारच्या विरोधात मोर्चा काढायला हिम्मत आणि जिगर असावं लागतं,ते फक्त संजय काका पाटलाच्यात आहे,असा टोला लगावत कोण कुणाच्या मांडीवर बसले,कौन कुणाला मॅनेज आहे,हे काही दिवसांनी सविस्तर मांडू,असा इशारा देखील संजयकाका पाटलांनी रोहित पाटलांना दिलाय. बाईट - संजयकाका पाटील - माजी खासदार . व्ही वो - दरम्यान संजयकाका पाटलाच्या टीकेवरून रोहित पाटल्यांनी देखील काकांचा समाचार घेत..त्यांनी किमान काही तर करावं, आम्ही काही करायला गेलं की त्यावर टीका करतात,टीका करण्याच्या व्यतिरिक्त ते आजपर्यंत काही करू शकले नाहीत.. त्यामुळेच लोकांनी त्यांना घरी बसवण्याचे काम केलं आहे,असा जोरदार टोला आमदार रोहित पाटलांनी, संजयकाका पाटल्यांना लगावला आहे,थोडे रोहित पाटळांच्या पदयात्रेवरून संजय काका पाटील आणि रोहित पाटील यांच्यात पुन्हा एकदा जुंपल्याचं पाहायला मिळाले .. बाईट - रोहित पाटील -आमदार - राष्ट्रवादी काँग्रेस - ( SP )0
0
Report
अक्टूबर से यूपीआय पर MDR 0.4%; 5–300 रुपए फीस, व्यापारी-ग्राहक में विरोध
Nashik, Maharashtra:ऑक्टोबरपासून यूपीआयमध्ये मोठा बदल होणार आहे. मोठ्या व्यापाऱ्यांना २ हजार रुपयांवर यूपीआय पेमेंट घेतल्यास ०.४% मर्चेंट डिस्काउंट रेट द्यावा लागेल. हे शुल्क किमान ५ रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत असेल. या निर्णयाला नाशिकच्या व्यापारांकडून विरोध होताना पाहायला मिळतोय. जर केंद्र शासनाला जीएसटी च्या माध्यमातून सगळ्यात जास्त कर जर आम्ही देत असताना आता नव्याने असे टॅक्स का देऊ असा प्रश्न व्यापाऱ्यांनी केंद्र सरकार विचारलाय. तर ग्राहकांनी देखील या निर्णयाला विरोध दर्शवला असून व्यापारी हे पैसे ग्राहकाकडूनच वसूल करतील असे देखील मत ग्राहकांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात नाशिक मधून आढावा घेत व्यापाऱ्यांशी आणि ग्राहकाशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी.0
0
Report
Advertisement
सांगोला टेंभू योजना में पानी गड़बड़ी, छह दिन से पानी नहीं, किसान फसलें जल रहीं
Pandharpur, Maharashtra:सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील टेंभू योजनेचे पाणी गळती सहा दिवसानंतरही सुरूच, टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे योजनेच्या टेल कडील शेतकऱ्यांचे पिक जळू लागली. पाणी वाटपाचा नियमा प्रमाणे योजनेच्या टेल कडील शेतकऱ्यांना आधी पाणी देण्याचा नियम असताना, सांगोला तालुक्यातील वाटंबरे परिसरात काही शेतकऱ्यांनी स्वतःला आधी पाणी मिळण्यासाठी टेंभू योजनेचे पाईप व्हॉल्व तोडून आपल्या शेताकडे पाणी वळवले. यामुळे टेल कडील शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या पिके जळू लागली आहेत. टेंभुयोजनेच्या अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार करूनही सहा दिवस झाले तरी पाणी वाया जाण्याचा प्रकार सुरूच आहे. ---0
0
Report
दापोली में पुराने अखबारों से बना पर्यावरण-फ्रेंडली गणेश मखर देखें
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी: पर्यावरणपूरक गणेशोत्सव: दापोलीत जुन्या वर्तमानपत्रांपासून साकारले आकर्षक मखर! पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत दापोलीतील केळसकर आणि घाग परिवाराने यंदाच्या गणेशोत्सवात टाकाऊ वर्तमानपत्रांचा पुनर्वापर करून अत्यंत देखणे व सुबक मखर साकारले आहे. या कल्पक आणि इको-फ्रेंडली सजावटीत बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, या अनोख्या मखराचे सर्वत्र कौतुक होत आहे.0
0
Report
नागपुर में महिला ड्राइवर ने चार लोगों को टक्कर मारी, चार घायल
Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपुरात महिला कार चालकाच धुमाकूळ, गोरेवाडा परिसरातील दिनशॉ फॅक्टरीजवळ भीषण अपघात - कार चालक महिलेने चार जणांना उडवल्याची घटना, तीन चिमुकल्यांसह चार जण अपघातात जखमी - पहिल्यांदा बालू कुलमेथे यांच्या एसयूव्हीला कारने धडक दिली, कारमधून मुलीसह खाली उतरत असताना बालू यांना कारची धडक - त्यानंतर नियंत्रण सुटलेल्या कारने तीन मुलांना उडवले, रस्त्यावरील हरीश रेवतकर आणि आशीष नखाते यांनाही धडक - अपघातात अनेक जण गंभीर जखमी, महिला चालकाच्या नशेत असल्याची घटनास्थळी चर्चा - महिला चालकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली, अपघातावेळी कारमध्ये आणखी कोण होते, याचाही तपास सुरू - घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासले जाणार आहे...अपघातानंतर संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्याला घातला घेराव - महिला चालकावर कठोर कारवाईची संतप्त नागरिकांची मागणी करण्यात आलीय..0
0
Report
Advertisement
दो नाबालिगों के साथ बलात्कार कर हत्या: 70 वर्षीय आरोपी को फांसी
Sangli, Maharashtra:दो अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करून एकीचा खून केल्याप्रकरणी सांगलीच्या विटा न्यायालयाने एका वृध्द नराधमास फाशीचे शिक्षा ठोठावली आहे. शिवाजी काळेल वय ७०, असे वृद्ध आरोपीचे नाव आहे. आटपाडी तालुक्यातल्या गळवेवाडी येथे ७ सप्टेंबर २०१८ रोजी गावातील एक आठ वर्षीय चिमुरडी खेळण्यासाठी गेली असता, बेपत्ता झाल्याचा प्रकार घडला होता, या प्रकरणी पोलिसांकडून शोध घेतला असता आरोपी शिवाजी काळेल यांच्या घरातील एका पत्र्याच्या डब्याला रक्ताचे डाग आढळून आले होते, त्यानंतर काळेल याला ताब्यात घेऊन त्याची पॉलीग्राफ आणि नार्कोटेस्ट करण्यात आलेणंतर त्याने दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करून, त्यापैकी एका मुलीचा खून करत मृतदेह एका पडक्या विहिरीत टाकल्याचे समोर आलं होतं. या प्रकरणी काळेला याला अटक करत त्याच्यावर विरोधात आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी विटा न्यायालयामध्ये पार पडली, यामध्ये विटा न्यायालयाने 19 साक्षीदारांची साक्ष आणि सबळ पुराव्यांच्या आधाराने आरोपी शिवाजी काळेल याला खून प्रकरणी फाशी आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी मरेपर्यंत जन्मठेपेची, शिक्षा सुनावली आहे. बाईट - आरती देशपांडे-साटविलकर - सरकारी वकील.0
0
Report
8 दिन बारिश नहीं, चंद्रपूर के धान किसान भारी संकट में
Chandrapur, Maharashtra:टायटल:--- मशागत, बिजाई, रोवणी, लावणी, मजूर खर्च, खत ,फवारणी आणि केवळ पावसाकडे डोळे, 8 दिवसात पाऊस आला नाही तर धान शेतक-याच्या हातून जाणार हंगाम, पावसाने दगा दिल्याने शेतकरी भयंकर संकटात अँकर:-- मशागत, बिजाई, रोवणी, लावणी, मजूर खर्च, खत , फवारणी आणि केवळ पावसाकडे डोळे अशी आहे चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्याची स्थिती. पुर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर हे जिल्हे भाताचे कोठार मानले जातात. मात्र यंदा अल निनो प्रभावाने पाऊसमान कमो होणार याची शक्यता असताना शेतकऱ्यांनी धाडसाने पेरणी- लावणी करत आभाळाकडे डोळे लावले. मात्र यंदा लहरी पाऊस शेतकऱ्याची जणू परीक्षा घेत आहे. अधे मध्ये दोनदा आलेला पाऊस धान पीक कसाबसा जगवून गेला मात्र आता 8 दिवसात पाऊस आला नाही तर धान शेतक-याच्या हातून हा हंगाम जाणार आहे. पावसाने दगा दिल्याने चंद्रपूरचा धान उत्पादक शेतकरी भयंकर संकटात सापडला असून विहिरी, कालवे आणि नाले- नदी यांचे सिंचन असलेले शेतकरी शिवारात ओलावा टिकवून ठेवत आहेत. धान पिकाला भरपूर पावसाची गरज असल्याने यंदाचा हंगाम शेतकऱ्यांची धडधड वाढविणारा ठरला आहे. बाईट १) चिंताग्रस्त धान शेतकरी आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
सरकारी फाइलें सात दिन से अधिक लंबित नहीं रहेंगी; तत्काल निपटारे के निर्देश
Nagpur, Maharashtra:नागपूर सरकारी फाईल सात दिवसांपेक्षा अधिक प्रलंबित ठेवल्यास कारवाई, शासकीय कामकाजातील दिरंगाईला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय घेण्यात आला.. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार सामान्य प्रशासन विभागाकडून आदेश जारी सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना काम वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश, कोणतीही फाईल एका कर्मचाऱ्याकडे सात कामकाजाच्या दिवसांपेक्षा अधिक प्रलंबित ठेवता येणार नाही. तातडीची फाईल शक्यतो एका दिवसात किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी निकाली काढण्याचे निर्देश, तातडीच्या स्वरूपाची फाईल शक्यतो चार दिवसांत निकालात काढावी लागणार आहे. एकाच विभागातील फाईलवर ४५ दिवसांत निर्णय घेणे बंधनकारक, दुसऱ्या विभागाकडे पाठवावी लागणारी फाईल तीन महिन्यांत निकाली काढण्याचे निर्देश आहे. विहित मुदतीत काम न करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.. विलंबास प्रतिबंध अधिनियमाच्या कलम १० नुसार कारवाई करण्याचे शासनाचे निर्देश नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर सामान्य प्रशासन विभागाकडून अतिरिक्त सूचना, जिल्हा परिषदांमधील निवेदने आणि तक्रारींवर सात दिवसांत कार्यवाही न झाल्याने न्यायालयाची नाराजी व्यक्त केली होती.. संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश झाल्याचा शासन परिपत्रकात उल्लेख प्रलंबित अर्ज, निवेदने आणि प्रकरणांचा विभागप्रमुखांनी दर महिन्याला आढावा घ्यावा दिरंगाई टाळण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम घेण्याचे निर्देश, ११ सप्टेंबरला सामान्य प्रशासन विभागाकडून शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे..0
0
Report
Advertisement
