445001
यवतमाळ : महिला बँक घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या बाबाजी दाते महिला बॅंकेत २४२ कोटींच्या अपहार प्रकरणात महिनाभराने अटकसत्र सुरू झाले आहे. पोलिसांनी शिवसेना नेते रमेश अगरवाल, व्यावसायिक प्रकाश पिसाळ आणि ठेकेदार प्रशांत पामपट्टीवार यांना अटक केली आहे. याआधी बँकेच्या CEO सुजाता महाजन, तिचा पती विलास महाजन, ॲड. वसंत मोहरेकर आणि नवलकिशोर मालाणी यांना अटक झाली होती. आता अटक केलेल्या आरोपींची संख्या सात झाली आहे. २०६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, ज्यामुळे संचालक व लेखा परीक्षक चिंतेत आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
जालना के अंतरवाली सराटी में अवैध शराब बिक्री बढ़ी, जिल्हाधिकारी मित्तल ने किया खुलासा
Jalna, Maharashtra:जालना: अंतरवाली सराटी अवैध दारूच्या विळख्यात जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांची कबुली गावातील शाळेच्या बांधकामाच्या दर्जावरून सरपंचाकडे नाराजी अँकर -मराठा आरक्षणाचा केंद्र असलेले अंतरवली सराटीमध्ये अवैध दारू विक्री मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याची माहिती जालना जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी दिलीय अंतरवाली सराटी गावामध्ये ग्रामभेट दौऱ्या दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधत गावातील समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी गावातील अवैध विक्रीची जाहीर कबुली दिलीये. दरम्यान गावातील जिल्हा परिषद शाळेच्या बांधकामाच्या दर्जाबद्दल देखील त्यांनी प्रश्न उपस्थित करत गावच्या सरपंचाकडे नाराजी व्यक्त केली, संपूर्ण दिवसभर जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण, आरोग्य, पाणी समस्या याचा गावात जाऊन आढावा घेतला, यावेळी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मोठ्या प्रमाणावरती तक्रारीचा पाढा वाचला.0
0
Report
धुंध में घिरा स्काय वॉक: चिखलदरा पर पर्यटकों की भीड़
Amravati, Maharashtra:धुक्यात हरवला चिखलधाऱ्यातील निर्मानाधीन स्काय वॉक; पर्यटकांची गर्दी, परिसरात धुकेच धुके चिखलदरा येथे सध्या निसर्गाने अक्षरशः धुक्याची चादर पांघरली आहे. सकाळपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे येथील वातावरण अधिकच आल्हाददायक झाले आहे. प्रसिद्ध स्कायवॉक परिसर संपूर्णपणे दाट धुक्यात हरवून गेला. त्यामुळे काही अंतरावरील दृश्यही दिसेनासे झाले आहे. या नयनरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने चिखलदऱ्याकडे आकर्षित होत आहेत. धुक्याने वेढलेल्या स्कायवॉकवर फोटो आणि सेल्फी घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. पाऊस, धुके आणि हिरवाईचा संगम अनुभवण्यासाठी पर्यटक उत्साहाने भटकंती करताना दिसत आहेत. विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदऱ्याचे हे मनमोहक रूप पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालत आहे.0
0
Report
पिंपरी के मोशी में बचाव अभियान युद्धस्तर पर, 42 घंटे बाद भी जारी
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड च्या मोशी मध्ये अजून ही बचाव कार्य सुरू असून ४२ तासानंतर ही ही काम युद्ध पातळीवर सुरू आहे... इमारतीच्या भिंती बाहेरून पाडण्यासाठी बाजूचा कचरा काढण्याच काम सुरू आहे...त्याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी...0
0
Report
Advertisement
रायगढ़ में मानसून ने खेती के कामों की रफ्तार बढ़ाई; किसानों में नई उम्मीद
Chendhare, Maharashtra:पावसाचा जोर आणि शेतातील पाणी कमी झाल्याने रायगडात शेतीच्या कामांची लगबग सुरू झाली आहे. जून महिन्याच्या अखेरीस आणि जुलैच्या सुरुवातीपासून रायगड जिल्ह्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने संपूर्ण जिल्ह्यातील शेतशिवार हिरवाईने नटले आहे. पावसामुळे नद्या, नाले आणि ओढे वाहू लागले असून शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. अनेक भागांत भात लावणीच्या कामांना वेग आला असून शेतकरी उत्साहाने शेतीच्या कामात व्यस्त झाले आहेत.पावसामुळे भातखाचरांमध्ये पुरेसे पाणी साचल्याने लावणीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. शेतकरी कुटुंबांसह मजुरांच्या मदतीने पारंपरिक पद्धतीने भात लावणी करताना ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. महिलांच्या ओव्या आणि आंबोणीच्या सुरांनी गावागावातील शेतशिवाराना पुन्हा एकदा जाग आली आहे.0
0
Report
Solapur में CNG भरणे के समय Ertiga पर अचानक आग लगी, दमकल ने नियंत्रण पाया
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सीएनजी भरण्यासाठी उभारलेल्या एरटिगा कारला अचानक लागली आग सोलाउरात सीएनजी भरण्यासाठी गेलेल्या इर्टिगा कारला अचानक लागली आग, आगीत कारचं नुकसान कारमधून अचानक धूर निघत असल्यामुळे पेट्रोल पंपाच्या बाहेर कार काढण्यात आली, पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टाळलं.. सोलापूर जवळील देगाव येथील पेट्रोल पंपावरील घटना अग्निशामक यंत्रणेच्या माध्यमातून पाण्याचा फवारा केल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश इर्टिगा कारच्या पुढील भागात आग लागल्यामुळे गाडीचं मोठं नुकसान.. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट..0
0
Report
सोलापूर गिरनी मजदूरों के चॉल को मालिकाना हक, 118 साल के लंबित मसले का हल!
Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग - गिरणी कामगारांच्या चाळीतील नऊ हजार कुटुंबांची घरे मालकीची होणार, 118 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न सुटल्याने कामगारांच्या मुलांनी केला जल्लोष सोलापुरातील गिरणी कामगारांच्या चाळीतील घरे मालकी हक्काने देण्याचा निर्णय गुरुवारी विधिमंडळात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केला. नऊ हजार कुटुंसांना दिलासा देणारा हा निर्णय असून गेल्या ११८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नावर आ. देवेन्द्र कोठे यांच्या प्रयत्नांमुळे अखेर तोडगा निघाला आहे. या विषयाची ऐतिहासिक घोषणा होताच भाजपच्या वतीने आ. देवेन्द्र कोठे यांच्या कार्यालयाबाहेर महापौर विनायक कोंड्याल यांच्यासह गिरणी कामगारांच्या मुलांनी गुलालाची मुक्त उधळण करत मोठा जल्लोष साजरा केला.0
0
Report
Advertisement
10 ज़ोन में दिन में 13 संपत्तियाँ सील; कर वसूली 39 लाख 35 हजार रुपये
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:महापालिकेने थकबाकीदारांविरुद्ध सुरू केलेल्या करवसुली मोहिमेने पुन्हा जोर धरला आहे. शहरातील १० झोनमध्ये राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत एकाच दिवसात १३ मालमत्ता सील करण्यात आल्या असून, ३९ लाख ३५ हजार रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे. ही मोहीम सलग चौथ्या आठवड्यात यशस्वीपणे राबवण्यात आली. मागील आठवड्यात वसुली मोहिमे मिळाल्या यशानंतर आयुक्तांनी सर्व १० झोनसाठी १५ ते २० मोठ्या थकबाकीदारांची यादी कारवाईसाठी निश्चित करून दिली होती. त्यानुसार आज सर्वच झोनमध्ये पथकांनी आक्रमक पवित्रा घेत ही कारवाई केली. त्यामुळं कर थकबाकी दार यांच्या धाबे दणाणले आहे थकबाकीदाराने तातडीने कर भरावा असे आवाहन मनपाने केले आहे...0
0
Report
कृष्णा और वारणा नदी के जलस्तर में कमी, बाढ़ का खतरा टला; पानी धीरे-धीरे घटने लगा
Sangli, Maharashtra:स्लग - कृष्णा व वारणा काठाला मोठा दिलासा,पुरचे संकट टळले,कृष्णा व वारणा नदीचे पाणी ओसरू लागले.. अँकर - कृष्णा व वारणा नदी पाणलोट क्षेत्रातल्या पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे झपाट्याने वाढणारी पाण्याची पातळी आता ओसरू लागलेली आहे.पात्रा बाहेर पडलेल्या कृष्णा व वारणा नद्या आता पात्रात परतू लागल्या आहेत.सांगलीमध्ये दोन दिवसांमध्ये बारा फुटांनी वाढून ३० फुटांवर पोहचलेल्या कृष्णा नदीच्या पाणी हळुहळू ओसरू लागली आहे.काल सायंकाळ नंतर कृष्णा नदीची पाण्याची ६ फुटांनी ओसरली असून २४ फूट इतकी पाण्याची पातळी झाली असुन पाणी हळुहळू ओसरत आहे. तर शिराळा तालुक्यातत देखील पाउसाचा जोर ओसरल्याने पात्रा बाहेर पडलेल्या वारणा नदीचीही पाणी पातळी ओसरू लागली आहे.त्यामुळे कृष्णा व वारणा काठाला मोठा दिलासा मिळाला आहे.0
0
Report
छत्रपती संभाजीनगर में मतदाता सूची पुनरीक्षण में 577 शिक्षकों को नोटिस जारी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर में मतदाता याद्या पुनरीक्षणाच्या कामात हलगर्जी करणाऱ्या शहरातील पूर्व, मध्य आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघातील ५७७ शिक्षकांना प्रशासनाने नोटीस बजावल्या. पुनरिरीक्षणासाठी १०४३ शिक्षकांची बीएलओपदी नियुक्ती करण्यात आली. नियु्क्त शिक्षक-शिक्षिकांना मतदारांची घरोघरी भेट घेऊन अर्ज वाटप करून तो भरून घेण्याची जबाबदारी आहे. हे काम सुरू होऊन ९ दिवस झाले असून, शहरातील तीनही मतदारसंघांत वेगाने काम होत नसल्याने प्रशासनाने बीएलओंवर कारवाईचा इशारा देत नोटीस बजावल्या आहेत. पूर्व विधानसभा मतदारसंघात ३२२ शिक्षकांची बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, यापैकी २८३ जण कामच करत नाहीत. मध्य मतदारसंघात ३२० नियुक्त शिक्षकांपैकी १५५ जणांना या नोटीस बजावल्या आहेत. तर पश्चिम मतदारसंघात सर्वाधिक ४०१ शिक्षक बीएलओ म्हणून नियुक्त असून, १३९ बीएलओंनी कामच केले नसल्याने त्यांना नोटीस बजावल्या आहेत0
0
Report
Advertisement
छत्रपती संभाजीनगर में पानी सप्लाई संकट: आयुक्त ने पंपिंग शुरू करने के निर्देश दिए
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:नवीन पाणीपुरवठा योजना संकटात सापडली असतानाच, छत्रपती संभाजी नगर मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी आढावा बैठकीत एजन्सी आणि अधिकाऱ्यांना शुक्रवारी पंपिंग सुरू करण्याचे निर्देश दिले. कामातील कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाहीत असा दम एजन्सीला दिला. आयुक्तांनी या वेळी अॅक्शन प्लान समोर ठेवला आहे. गुरुवारी रात्रीच संबंधित एजन्सी, एमजेपीचे अधिकारी आणि मनपाच्या अभियंत्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणीचे नियोजन करावे आणि सूर्योदयासोबत काम हाती घ्यावे, असे आदेश दिले. त्यामुळं आज तरी पाण्याचे पंपीग होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे0
0
Report
गिरणा नदी में बाढ़, 2846 क्यूसेस विसर्जन के साथ सतर्कता जारी
Nashik, Maharashtra:मालेगाव (नाशिक) कळवण, पेठ, सुरगाण्यात पावसाची संततधारेमुळे मालेगावच्या गिरणा नदीला पूर. प्रशासनाकडून सुरक्षा रक्षक लावत नदी परिसरात चोख बंदोबस्त. नाशिकच्या सुरगाणा, पेठ कळवण तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाले तुडूंब झाले आहेत. चणकापूर कळवण धरणाच्या पाणी पातळी कमालीची वाढली असून, धरणात पाण्याची आवक लक्षात घेता प्रशासनाच्यावतीने धरणातून 2846 क्यूसेस पाण्याचा गिरणा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला असून गिरणा नदी पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी काही तरुण येथे स्टंट करत पोहण्याचा प्रयत्नांत आपला जीव गमवत असतात त्यामुळे मालेगाव महापालिके तर्फे अग्निशामक दलाचे अधिकारी, कर्मचारी पोलिस प्रशासन यांचा याठिकाणी चोख बंदोबस्त असून नागरिकांना आवाहन देखील करण्यात आले. या नदी परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल मोरे यांनी.0
0
Report
वसई पालिका के डंपिंग ग्राउंड से प्रदूषित पानी औद्योगिक बस्तियों में स्वास्थ्य संकट
Vasai-Virar, Maharashtra:वसई विरार पालिकेच्या भोईदापाडा येथील डंपिंग ग्राउंडच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका डंपिंग ग्राउंड शेजारी असलेल्या औद्योगिक वसाहतींना बसत आहे .. पावसाळा सुरू झाल्यापासून डंपिंग मधून येणारे केमिकल युक्त सांडपाणी कंपन्यांच्या रस्ते व परिसरातून वाहत आहे .. वाहणाऱ्या पाण्यात एक विशिष्ट फेस तयार होत असून प्रचंड दुर्गंधी येत असल्याने येथील कंपनी चालक आणि कामगारांना नाक मुठीत धरून काम करावे लागत आहे. आणि या वातावरणामुळे कामगारांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे ... पालिकेने डंपिंग मधून येणाऱ्या सांडपाणी ड्रेनेजचे योग्य नियोजन न केल्याने संताप व्यक्त केला जात आहे .. खरतर अनेक वर्ष ही समस्या कायम आहे , त्यामुळे येथील १०० हून अधिक कंपन्या आता स्थलांतर करण्याच्या मार्गावर असल्याचे मत येथील कंपनी चालकांनी व्यक्त केले आहे ...0
0
Report
Advertisement
अकोला के तेल्हारा में वाणी कीड़ों से फसलों को भारी नुकसान, किसानों पर आर्थिक संकट
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात अंकुरलेल्या पिकांवर वाणी किडीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. दुबार पेरणीचे संकट एका बाजूला असतानाच अब सोयाबीन, कपाशी आणि तूर पिकांवर वाणी किडीने हल्ला चढवला आहे. कोवळे अंकुर फस्त होत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली असून, कृषी विभागाने तातडीने उपाययोजना करून मोफत कीटकनाशके उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.यंदा पावसाच्या उशिरानंतर अकोल्यासह विदर्भातील अनेक भागात शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. पिकांना अंकुर फुटताच तेल्हारा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाणी किडीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. हा कीटक सोयाबीनच्या कोवळ्या रोपांसह कपाशी आणि तूर पिकांचेही मोठे नुकसान करत आहे. महागडी बियाणे आणि खतांसाठी उधारी करून पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसमोर आता पुन्हा आर्थिक संकट उभे ठाकले आहे. वाणी किडीपासून बचावासाठी काही शेतकरी थिमेटचा वापर करत आहेत, तर काही जण किडीला हाताने वेचून नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, या किडीवर प्रभावी नियंत्रणासाठी योग्य तांत्रिक मार्गदर्शन आणि शिफारस केलेल्या उपाययोजनांची माहिती बहुतांश शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही,त्यामुळे कृषी विभागाने तातडीने शेतपातळीवर पाहणी करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, आवश्यक कीटकनाशके उपलब्ध करून द्यावेत आणि वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच वाणी किडीच्या संकटामुळे शेतकऱ्यांच्या आशांवर पुन्हा एकदा पाणी फिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.0
0
Report
कराड-विटा मार्ग पर कृष्णा पुल पर कार में अचानक आग, यातायात बाधित
Satara, Maharashtra:सातारा :- कराड-विटा मार्गावरील कृष्णा पुलावर रात्री धावत्या कारला अचानक आग लागल्याने काही काळ एकच खळबळ उडाली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आगीत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेमुळे काही काळ कृष्णा पुलावरील वाहतुकीवरही परिणाम झाला होता. Vo :-धावत असलेल्या कारमधून अचानक धूर येऊ लागतला आणि काही क्षणांतच आगीने उग्र रूप धारण केले. चालकाने प्रसंगावधान राखत वाहन तात्काळ रस्त्याच्या कडेला थांबवून बाहेर पडल्याने पुढील अनर्थ टळला.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दल आणि कराड शहर पोलिसांना कळवले. त्यानंतर अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि कारला लागलेली आग नियंत्रणात आणली.या घटनेमुळे कृष्णा पुलावरील वाहतुकीवरही काही काळ विस्कळीत झाली. पुलावर वाहनांच्या रांगा लागल्या, तर घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. कराड शहराला जोडणारा हा पूल अत्यंत वर्दळीचा असल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.0
0
Report
आकोला जिले के नागोली-नागठाणा में पानी भरते वक्त युवक बिजली के झटके से मौत
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर तालुक्यातील नागोली-नागठाणा गावात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक बोअरिंगवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय आयटीआय विद्यार्थ्याचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून, सोळंके कुटुंवावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आदर्श सुनील सोळंके हा नागोली-नागठाणा येथील रहिवासी असून तो शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये मेकॅनिकल ट्रेडच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता,तो गावातील ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक बोअरिंगवर पाणी भरण्यासाठी गेला असता, बोअरिंग सुरू करताना अचानक विद्युत प्रवाह आल्याने त्याला जोरदार विजेचा शॉक बसला. हा शॉक इतका तीव्र होता की त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत आदर्शचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून, एका होतकरू आणि तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची माहिती संबंधित प्रशासन आणि पोलिसांना देण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या विद्युत उपकरणांची नियमित तपासणी आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.0
0
Report
Advertisement
