icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

केशवराव भोसले नाट्यगृह के काम की समीक्षा आज सांसद शाहू महाराज के सामने

Kolhapur, Maharashtra:शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कथित टक्केवारीच्या व्हिडिओ मुळे केशवराव भोसले नाट्यगृहाची कामे चर्चेत आली आहेत. आमदार क्षीरसागर यांनी यापूर्वीच पत्रकार बैठक घेऊन संबंधित व्हिडिओचा AI करून डब केल्याचे आरोप केला आहे, तरीदेखील आज सकाळी 11 वाजता खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या उपस्थितीत केशवराव भोसले नाट्यगृहात कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. या आढावा बैठकीत ज्या कंपनीकडे केशवराव भोसले नाट्यगृहाचे काम आहेत त्या कंपनीचे नाव या व्हिडिओमध्ये घेतले गेल्याने तो संदर्भ जोडला जात आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकं काय होतंय याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
0
0
Report

छत्रपती संभाजीनगर में जलापूर्ति बंद, दस दिन बाद भी गैप बढ़ रहा

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरच्या नक्षत्रवाडी पंपहाऊस येथील 'स्लॅब'ला गळती लागल्याने नवीन पाणीपुरवठा योजना बंद आहे. त्यामुळे शहराला मिळणारे २५ ते ३० एमएलडी वाढीव पाणी चार दिवसांपासून बंद झाले आहे. जुन्या पाणीपुरवठ्याच्या योजनांवरच पाणी शहरात येत असल्याने विविध वसाहतींचे 'गॅप' हळूहळू वाढले आहेत. आता दहा दिवसांनंतर काही वसाहतींना पाणी मिळत आहे. काही दिवसांपासूस पाणीपुरवठ्यातील गॅप कमी करण्यासाठी मनपाची कसरत सुरू होती. आता या कसरतीवरही पाणी फेरले गेले आहे त्यामुळे ऐन पावसाळ्यात पुन्हा पाणीपुरवठा दहा ते बारा दिवसाआड होण्याची शक्यता वाढलीय..
0
0
Report
Advertisement

नागपुर में मetro स्टेशन के पास कार ने पोहेवाले दुकान में घुसकर भारी नुकसान

Nagpur, Maharashtra:नागपूर - *नागपुरात वासुदेव नगर मेट्रो स्टेशन लगतच्या पोहेवाला शॉपमध्ये बेदाराकपणे घुसली कार* - मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास भरधाव कार अचानक पणे रोडच्या लगत असलेल्या दुकानाचे शेडमध्ये घुसली - कारचा वेग इतका अधिक होता की यामध्ये दुकानाच्या परिसरात असणाऱ्या लोखंडी साहित्य आणि पोलही वाकून गेले - सुदैवाने मध्यरात्री ही घटना घडल्यामुळे दुकानाचे नागरिक नव्हते मात्र दुकानाच मोठं नुकसान झालं, - मध्यरात्री शहरात रेसिंग कार रस्त्यावर उतरतात आणि त्यामधून अशा पद्धतीची घटना घडत असल्याची चर्चा आहे... - त्यामुळे ही गाडी ही भरधाव रेसिंगच्या नादात तर कार घुसली नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
0
0
Report

फलटण में सामाजिक कार्यकर्ता अतुल लाळगे की आत्महत्या: मानसिक उत्पीड़न का आरोप, कैन्डल मार्च

Satara, Maharashtra:सातारा: पुण्यातल्या फुरसुंगी येथील निवारा गृहात कार्यरत असलेल्या २६ वर्षीय सोशल वर्कर अतुल लाळगे यांच्या आत्महत्येप्रकरणी फलटण तालुक्यातील वडले गावात ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वरिष्ठांकडून होणारा कथित मानसिक छळ, धमक्या आणि अतिरिक्त कामाच्या ताणामुळे अतुलने जीवन संपवल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्राच्या आधारे दोषी संस्थाचालकांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी वडले गावामध्ये कॅन्डल मार्च काढला. घटना घडूनही प्रशासन कारवाईत दिरंगाई करत असल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला असून, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
0
0
Report
Advertisement

पालखी सोहळे में बैल जोड़ी विवाद समाप्त, रानवडे परिवार की जोड़ी को मान

Pimpri-Chinchwad, Maharashtra:संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्या दरम्यान रथाला जोडण्यात येणाऱ्या बैलजोडी वरून सुरू असलेला वाद अखेर मिटला आहे. माऊलींच्या रथाला यंदा आळंदीतील रानवडे कुटुंबातील तिघांच्या बैल जोडीला मान मिळाला आहे. पुणे जिल्ह्यातून पालखी प्रवास करत असताना जाताना आणि येताना हर्षवर्धन प्रदीप रानवडे यांची बैल जोडी रथाला जुंपण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यात रथाला उमेश लक्ष्मण रानवडे यांची तर सोलापूर जिल्ह्यात पालखी जाताना येताना तुळशीराम न्यानोबा रानवडे यांची बैल जोडी रथाला जुंपण्यात येणार आहे. बैल जोडीचा मान देण्यात दावल गेल्याचा आरोप करत उमेश रानवडे यांनी नाराजी व्यक्त करत काही दिवसांपूर्वी आंदोलन केलं होतं. अखेर त्यावर तोडगा काढत हा वाद मिटवण्यात आला आहे.
0
0
Report

घोसला में विद्युत तार टूटने से बैल की मौत, किसान महावितरण से मुआवजे की मांग

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील घोसला येथे शेतरस्त्यावर तुटून पडलेल्या महावितरणच्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन एका बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शेतकरी छबिलदास तडवी हे आपल्या गाडीबैलांसह शेतात जात असताना रस्त्यावर पडलेल्या विद्युत तारेचा एका बैलाला स्पर्श झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने छबिलदास तडवी आणि त्यांचा दुसरा बैल थोडक्यात बचावले. या घटनेनंतर महावितरणच्या निष्काळजी कारभाराविरोधात शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने आर्थिक भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.
0
0
Report
Advertisement

केन्द्र के कीमत स्थिरीकरण कोष से प्याज खरीद बढ़ाने पर किसान संगठनों की नाराज़गी

Yeola, Maharashtra:शेतकरी आणि ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून यंदाही 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून मात्र, बाजारभावापेक्षा कमी दराने शासकीय खरेदी सुरू असल्याने गेल्या दीड महिन्यात केवळ 2,500 ते 2,600 मेट्रिक टन कांद्याची खरेदी झाली असतांना आता केंद्र सरकारने अतिरिक्त 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेдиसाठी नव्याने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे यावर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे संघटनेचे जिल्हाध्यक्ष केदारनाथ नवले यांनी शासकीय कांदा खरेदीचा दर किमान 3,000 रुपये प्रतिक्विंटल करावा, अन्यथा ही खरेदी तात्काळ बंद करावी, अशी मागणी केली तसेच शासकीय खरेदीतील कांद्याचा वापर देशांतर्गत Shेतकऱ्यांच्या कांद्याचे बाजारभाव पाडण्यासाठी न करता तो परदेशात निर्यात करावा, अन्यथा stateभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशार महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष केदारनाथ नवले यांनी दिला
0
0
Report
Advertisement

श्री गजानन महाराज की पालखी का शिरपूर जैन में भव्य स्वागत, लाखों भक्तों का उत्साह

Washim, Maharashtra:अषाढी वारीनिमित्त श्रीक्षेत्र शेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचा शिरपूर जैन येथील मुकाम अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. पालखीचे आगमन होताच भाविकांनी टाळ-मृदंगाच्या गजरात आणि "गण गण गणात बोते"च्या जयघोषात श्रींचे उत्स्फूर्त स्वागत केले. रात्री पालखीची नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. दर्शनासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर जामगीर महाराज संस्थानमध्ये पालखीचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. संस्थानच्या वतीने ७०० वारकरी तसेच हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तन सेवेमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top