icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement

अजबनगर में धार्मिक सलोखा बिगाड़ने की कोशिश, आरोपी गिरफ्तार

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरातील अजबनगर मध्ये आक्षकाऱ घोषणाबाजी करत धार्मिक सलोखा बिघडवण्याचा आणि औरंगजेबाचे उदात्तीकरणाचा प्रकार शुक्रवारी समोर आला. या प्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. शेख आसिफ शेख दादामियाँ असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली, या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.. आरोपी शेख आसिफ याने क्रांती चौक ते सिल्लेखाना रोडवरील अजबनगर येथे दुचाकीवरून नागरिकांना उद्देशून चिथावणीखोर वक्तव्ये केली. औरंगजेब आलमगीर, कान खोल के सुन लो... अशा घोषणा देत त्याने समाजात द्वेष आणि भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
0
0
Report

कोल्हापुर में एक दिन पानी की आपूर्ति रोकी जाएगी; दरों में वृद्धि का संकेत

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठल्याने आज पासून शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा होणार आहे. पाऊस सुरू होऊन धरणाची पाणी पातळी वाढेपर्यंत एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केला आहे. इतकच नाही तर पाणीपट्टी दुप्पट वाढीचा प्रस्ताव देखील प्रशासनाच्या वतीने ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आकारत असलेल्या दराप्रमाणे या प्रस्तावात नवे दर सुचवण्यात आले आहे. त्यामुळे एकीकडे दिवसाआड पाणी आणि दुसरीकडे दरवाढीचे संकट कोल्हापूरकरांना सहन करावे लागणार आहे。
0
0
Report
Advertisement

महाराष्ट्र में ओबीसी जनगणना और आरक्षण बचाने के लिए जोरदार आंदोलन

Hingoli, Maharashtra:अँकर -ओबीसीची जात निहाय जनगणना झाली पाहिजे या मागणीसह विविध मागण्यासाठी हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील जयपूर येथे ओबीसी आंदोलन प्रा, लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांच्या उपस्थितीत सभा पार पडली यावेळी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी ओबीसीची जनगणना झाली पाहिजे या मागणीसह ओबीसी बांधवानी एकत्र आलं पाहिजे आरक्षणातील घुसखोरी थांबली पाहिजे महाराष्ट्र मध्ये ज्या गोष्टी घडतायेत त्या ओबीसीचा आरक्षण संपवणाऱ्या गोष्टी घडत आहेत सरकारने ओबीसीला वाऱ्यावर सोडले आहे आम्ही राज्यभर 100 सभा घेणार असून चलो मुंबईचा नारा दिला आहे गावागावातील ओबीसी आरक्षण संपल आहे नगरपंचायत नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आरक्षण संपल असून सत्ताधारी सरकार ओबीसीवर अन्याय करत असल्याची टीका प्रा लक्ष्मण हाके यांनी केला आहे .. बाईट -प्रा, लक्ष्मण हाके (ओबीसी आंदोलन )
0
0
Report
Advertisement

सांगली हत्या मामले में IAS अधिकारी सचिन मोते पर गंभीर आरोप, नया मोड़

Sangli, Maharashtra:सांगली जिल्ह्यातील माथाडी कामगार नेतेच्या,नातूच्या हत्या प्रकरणी आयआरएस अधिकारी सचिन मोते यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. संशयित हल्लेखोर निलेश गडडे यांच्या विरोधात घटनेच्या दिवशी गुन्हा दाखल करू नये, यासाठी जत पोलिसांवर, आयआरएस अधिकारी सचिन मोते यांच्या कडून फोन करून दबाव टाकण्यात आला. त्यामुळे पाच तास गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब झाला, परिणामी जत मधून येऊन सांगलीत संशयित निलेश गडडे यांनी गोळीबार करत आपल्या नातूला मारल्याचा आरोप, मृत वेदांत बंडगर, याचे आजोबा व माथाडी कामगार नेते बाळासाहेब बंडगर यांनी केला आहे. त्याच बरोबर निलेश गडडे याच्याकडून धमकी देत, दहा लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी जत पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता, आयआरएस अधिकारी सचिन मोटे यांनी जत पोलीस निरीक्षक दादासाहेब कोळेकर यांच्यावर दबाव आणल्याचा आरोप लक्ष्मण खरात यांनी केला आहे. तर बाळासाहेब बंडगर यांनी जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक दादासाहेब कोळेकर यांना निलंबित करून संशयित हल्लेखोर निलेश गडडे याचा एन्काऊंटर करावा, अशी मागणी देखील केली आहे. हमाल ठेका आणि खड्णीच्या वादातून संशयित निलेश गडडे यांनी आपल्या साथीदारांसह माथाडी कामगार नेते बाळासाहेब बंडगर यांच्या घरात घुसून गोळीबार करत, बंडगर यांच्या १४ वर्षीय नातूचा डोक्यात गोळ्या झाडून खून केला होता, आता या सर्व प्रकरणात सुशीयत हल्लेखोर निलेश गडडे याला पाठीशी घालण्यात आले असल्याचा गंभीर आरोप झाल्याने, हत्येच्या घटनेला नवीन वळण मिळाले आहे.
0
0
Report

कल्याण में बोधगया जैसे स्मारक के निर्माण के लिए सकारात्मक निर्णय

Kalyan, Maharashtra:कल्याण वालधुनी येथे उभारण्यात येणार बोधगयाच्या धर्तीवर जागतिक दर्जाचे स्मारक! बुद्धभूमी फाउंडेशनच्या मागण्यांना शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश. सकल बौद्ध समाज तर्फे कल्याण पूर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ज्ञानकेंद्र आनंदउत्सव साजरा. बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेसंदर्भात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि बुद्धभूमी फाउंडेशनच्या सदस्यांनी शासनाकडे केलेल्या विविध मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या निर्णयामुळे बोधगया प्रमाणे जागतिक पातळीवरील भव्य स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, बौद्ध समाजासह कल्याण शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या ऐतिहासिक निर्णयाचा आनंद साजरा करण्यासाठी आज कल्याण पूर्वेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ज्ञानकेंद्र, ड प्रभाग क्षेत्र कार्यालयासमोर सकल बौद्ध समाज कल्याण शहर तर्फे आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बौद्धसमाज बांधवांसह नागरिकांकडून डॉ बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले त्यानंतर फटाक्यांचे आदेश बाजी करत आनंद उत्सव साजरा करण्यात आला. या वेळी सकल बौद्ध समाजाच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांचे आभार मानण्यात आले.
0
0
Report

पालघर में दिनदहाड़े युवती पर धारदार हथियार से हमला, आरोपी फरार

Palghar, Maharashtra:पालघर - पालघर शहरातील गोल्ड सिनेमा परिसरात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्लेखोराने तरुणीच्या मानेवर व कमरेवर सपासप वार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान ही घटना घडली. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. गंभीर जखमी झालेल्या तरुणीला तातडीने उपचारासाठी पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर जखमी असल्याने उपचारासाठी तिला पुढे शहरातील एका खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पालघर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत पराड आणि पथक घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीचा शोध सुरू आहे. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
0
0
Report
Advertisement

चंद्रपुर में जोरदार बारिश, तीन दिनों की तपिश के बाद मौसम ठंडा

Chandrapur, Maharashtra:चंद्रपुरात बरसला जोरदार पाऊस ,तीन दिवसांच्या उकाड्यानंतर जोरदार पावसाने वातावरणात आणला गारवा गेले तीन दिवस प्रचंड उकाडा सहन करणाऱ्या चंद्रपूरकरांना आज जलधारांनी मनसोक्त भिजवून काढले. आज दुपारपासून शहराच्या आकाशात ढगांची गर्दी होती. संध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. गेली तीन दिवस थोडा पाऊस पडत असल्याने उकाडा आणि आर्द्रता असह्य झाली होती. मात्र आज तब्बल अर्धा तासाहून अधिक काळ बरसलेल्या पावसाने वातावरणात गारवा आणला. गेले तीन महिने अतिशय उष्ण तापमानाच्या झळा सहन करणा-या चंद्रपूरकरांना मॉन्सून आगमन झाल्याने दिलासा मिळालाय.
0
0
Report

वाशीम में आंधी-बारिश ने गर्मी भगाई, शिरपूर समेत इलाके में किसानों को मिली राहत

Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मेडशी, शिरपूरसह परिसरात आज वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अनेक दिवसांपासून प्रचंड उकाडा आणि वाढत्या तापमानामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. शिरपूर येथे पहिल्या पावसाचा लहान मुलांनी मनमुराद आनंद घेतला. दरम्यान,हळद लागवड केलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस मोठा आधार ठरला असून खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीच्या कामांनाही यामुळे गती मिळणार आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top