445001
यवतमाळ : महिला बँक घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या बाबाजी दाते महिला बॅंकेत २४२ कोटींच्या अपहार प्रकरणात महिनाभराने अटकसत्र सुरू झाले आहे. पोलिसांनी शिवसेना नेते रमेश अगरवाल, व्यावसायिक प्रकाश पिसाळ आणि ठेकेदार प्रशांत पामपट्टीवार यांना अटक केली आहे. याआधी बँकेच्या CEO सुजाता महाजन, तिचा पती विलास महाजन, ॲड. वसंत मोहरेकर आणि नवलकिशोर मालाणी यांना अटक झाली होती. आता अटक केलेल्या आरोपींची संख्या सात झाली आहे. २०६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, ज्यामुळे संचालक व लेखा परीक्षक चिंतेत आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
रत्नागिरी में दापोली-हर्णेत: दराड़ के डर से 60 परिवार जीवन संकट में
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. दापोली-हर्णेत पुन्हा दरडीच्या सावटाखाली ६० कुटुंबे.. उत्खननामुळे २०१० च्या दुर्घटनेच्या आठवणींनी ग्रामस्थ धास्तावले.. अँकर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील हर्णे-राजवाडी परिसरात पुन्हा एकदा दरडी कोसळण्याचे संकट घोंघावत आहे. डोंगराच्या माथ्यावर सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर उत्खननामुळे सुमारे ६० कुटुंबांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे.. २०१० मध्ये याच भागात झालेल्या भीषण दरड दुर्घटनेत आठ निष्पाप ग्रामस्थांचा बळी गेला होता.. आता पुन्हा त्याच परिस्थितीची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त होत असल्याने,प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलून स्थानिकांच्या जीविताचे रक्षण करावे,अशी मागणी जोर धरत आहे..0
0
Report
सुनील तटकरे के बयान: शिंदे-शुळे की राजनीति में नया मोड़
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी - खासदार सुनील तटकरे पार्थ यांच्या मुख्यमंत्री भेटीबाबत मला माहिती नाही..ते भेटू शकतात... यात वावगं वाटण्याचं कारण नाही एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद भूषविलेलं आहे, ते इतर पक्षाला विशिष्ट विभाग देऊ नये असं म्हणतील असं मला वाटत नाही...राष्ट्रवादीशी त्यांचे संबंध सौहार्दाचे आहेत... अर्थ खात्याच्या प्रश्नाला उत्तर देताना तटकरे यांचं विधान अर्थखातं आम्हाला मिळावं अशी आमची मागणी आहेच...उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही मुख्यमंत्र्यांची याबाबत भेटही घेणार पाटील आणि एकनाथ शिंदे यांची भेट होत असेलयामध्ये काही राजकीय समीकरणं असतील असं मला वाटत नाही जयंतराव हे मुरब्बी राजकारणी आहेत...वेगवेगळ्या कारणासाठी ते भेटू शकतात, त्यात काही वावगं वाटत नाही त्यांच्या सत्तेत सहभागी होण्यासंदर्भात काही माहिती नाही...त्यांच्या पक्षाने कोणाबरोबर जावं हा त्यांचा निर्णय आहे... शरद पवार सत्तेत सहभागी होऊ शकतात आणि त्या संदर्भात गाठीभेटी सुरू आहेत... या प्रश्नाला तटकरे यांचे उत्तर यूपीएमध्ये चर्चा करून विचार करू असं सुप्रियाताई सुळे म्हणाल्या आहेत.. त्या एक जबाबदार नेत्या आहेत सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद ऐकली आहे... महिला आरक्षण किंवा डेलीमिटेशन याबाबत सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे... दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास संदर्भात वर्षा बंगल्यावर जाऊन चर्चा का केली जाईल? हे मला कळू शकले नाही.. अजितदादा असताना विरळीकरणाशी चर्चा झाली होती आणि ती अखेरच्या टप्प्यात गेली होती....दादा हयात असते तर आज दादाच्या नियोजनप्रमाणे विलिनीकरण झालेले दिसले असते.... सध्या आमच्या पक्षात विरळीकरणाबाबत चर्चा नाही... नजीकच्या कालावधीमध्ये काय होईल ते त्यावेळी बघू... दादांनी दादांच्या पातळीवर विरळीकरणाच्या चर्चा पूर्ण केल्या होत्या... दादा राष्ट्रीय नेते होते... त्यांनी त्या पद्धतीने चर्चा केल्या.... अखेरच्या टप्प्यात चर्चा आल्या असत्या तर त्यांनी अधिकची माहिती सांगितली असती.. चर्चा सुरू आहेत आणि काय पद्धतीने सुरू आहेत याची माहिती दादांनी मला दिली होती... ठरलेला फॉर्मुला मला ज्ञात होता... खासदार म्हणून आम्ही काही प्रश्न मांडले होते.... त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली... राजकीय भेट असती तर आम्ही सुमित्रा वहिनींना सांगितले असते... काल कोर कमिटीची बैठक झाली त्यामध्ये अनेक बाबींवर चर्चा झाली... यावेळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीबद्दल कल्पना दिली... दादांबद्दल जो आदर तोच आधार मला सुनेत्रा वहिनी बद्दल... रवी राणा फार मोठे नेते त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांवर माझ्यासारख्या छोट्या नेत्यांनी बोलणं योग्य नाही... सुप्रिया सुळे यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद मिळेल या रवी राणा यांच्या प्रश्नाला उत्तर... शिंदे साहेब दिल्लीला नेहमी जात असतात... त्यांच्याकडे काही महत्त्वाचे विभाग आहेत त्यांच्या कामासाठी ते जातात... त्यांच्या प्रत्येक भेटीचा राजकीय अर्थ काढणे योग्य नाही... राज्य सरकारच्या अनेक बाबी केंद्र सरकारकडे म्हणून मुख्यमंत्री दिल्लीला जातात... भारतीय जनता पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व दिल्लीला म्हणून मुख्यमंत्री दिल्लीला जातात... आमचे सर्वांचे लक्ष संसदेच्या अधिवेशनावर... आणि येणाऱ्या बिलावरती आहे... दीड महिन्यात काय घडामोडी घडतील? काळाच्या उदरात त्या दडलेल्या असतील... पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून भाषण करतील आणि त्यानंतर काही घडामोडी असतील तर ते आम्ही तुम्हाला सांगू... राजकीय घडामोडी असू आणि नसूही शकतात... पक्षाच्या हिताच्या दृष्टीने भूमिका घेतो... राजकारण हे प्रभावित आहे.. त्यात काहीही घडू शकते... राजकारणात पुढे काय घडेल याबाबत आता काय सांगणार? सध्या राजकारणात झपाट्याने बदल घडत आहेत... विरोधी पक्ष म्हणून त्यांना त्यांची भूमिका घ्यावी लागत असेल... त्यात आम्हाला काहीही वाटत नाही... फडणवीसांनी रामरक्षा आंदोलनामध्ये सहभागी व्हावं... याबाबतचे पत्र शिवसेनेने फडणवीस यांना दिले आहे... त्यावर सुनील तटकरे यांनी जय श्रीराम म्हणत हात जोडले...0
0
Report
मुंबई-गोवा हाइवे की सर्विस रोड पर बड़ा गड्ढा, प्रशासन अजीब उपाय से दुर्घटना का खतरा
Oras Bk., Maharashtra:मुम्बई गोवा महामार्गावर सर्विस रोडला मोठे भगदाड पडलेय. महामार्गावर कासार्डे येथील सर्विस रोडला हे भगदाड पडलेय. चार ते पाच फुटाचा हा भगदाड असून त्याला बुजवण्याऐवजी प्रशासनाने बाजूला माती भरलेल्या पिशव्या लावण्याचा अजब कारभार केलाय. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. मात्र महामार्ग प्रशासनाने केलेल्या अजब उपाययोजनेमुळे अपघात होऊन वाहन किंवा वाहनचालक यांना दुखापत होण्याची शक्यता आहे.0
0
Report
Advertisement
अकोला शहर में देहव्यापार के खिलाफ पुलिस ने बड़ा छापा, रैकेट का पर्दाफाश
Akola, Maharashtra:अकोला शहरात देहव्यापाराविरोधात सिव्हिल लाईन पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी एका संशयित अड्ड्यावर छापा टाकत देहव्यापाराच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत देहव्यापार चालवत असल्याचा आरोप असलेल्या एका महिलेसह ग्राहक म्हणून आलेल्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच पीडित तरुणीची सुटका करून तिला सुरक्षितपणे तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणी चौघांविरोधात सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या रॅकेटचे आणखी काही धागेदोरे आहेत का, तसेच संबंधित महिलेकडून अन्य ठिकाणीही अशाच प्रकारचा व्यवसाय चालवला जात होता का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.0
0
Report
कळवण शासकीय आश्रमशाळे में 9वीं कक्षा की गर्भवती छात्रा प्रसूती मामले पर प्रमुखाध्यापक व अन्य स्टाफ निलंबित
Nashik, Maharashtra:कळवण शासकीय आश्रमशाळेतील 9 वीच्या विद्यार्थिनी प्रसूती प्रकरण के बारे में अखबार में प्रमुख तथ्य सामने आए। आश्रम शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक और अधीक्षक के निलंबन की खबर है। आदिवासी विकास विभाग ने कठोर कार्रवाई करते हुए संबंधित अधिकारीयों को निलंबित किया है। घटना की जानकारी मिलने के बाद माध्यमों ने स्थिति समेटने की कोशिश की, लोगों ने प्रशासन को जवाब देने को कहा और सामाजिक कार्यकर्ताओं ने दोषियों पर कार्रवाई की मांग तेज की। बढ़ते जनआंदोलन के चलते प्रशासन ने फैसला लिया। विद्यार्थियों की सुरक्षा के लिए जिम्मेदार संस्थाओं में किस प्रकार चूक हुई, नियमित जांच-देखरेख में त्रुटियाँ क्यों रहीं, और जिम्मेदार अधिकारी समय पर सतर्क क्यों नहीं हुए, इसकी सख्त विस्तृत जांच जरूरी है। बाइट: कश्मिरा संखे, प्रांताधिकारी कळवण0
0
Report
भंडारदरा और नीळवंडे डैम में बारिश से जल संग्रहण में उछाल, क्षेत्र में खुशहाली
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा आणी निळवंडे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे तळ गाठलेल्या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. अकरा टीएमसी क्षमता असलेल्या भंडारदरा धरणाचा पाणी साठी 80 टक्क्यापेक्षा जास्त झालाय तर निळवंडे धरणातही चाळीस टक्केहून अधिक पाणी जमा झाले आहे. उत्तर नगर जिल्ह्यातील शेती, उद्योग आणी हजारो पाणी पुरवठा योजना या धरणांवर अवलंबून असून समाधानकारक पाणीसाठा झाल्याने लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. निळवंडे धरणाजवळून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी0
0
Report
Advertisement
11 लाख बुंदी लाडू आणि 75 हजार राजगिरा प्रसाद से भक्तों की भीड़ बढ़ी
Pandharpur, Maharashtra:Anchor - सध्या आषाढी यात्रा सुरू असून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यासह देशभरातून लाखो भाविक दाखल होत आहेत. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन श्रींचा प्रसाद म्हणून मंदिर समितीमार्फत बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. दर्शनानंतर प्रत्येक भाविक श्रींचा प्रसाद म्हणून लाडू प्रसाद खरेदी करतो. ही बाब लक्षात घेऊन मंदिर समितीने 11 लाख बुंदी लाडू प्रसाद व 75 हजार राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध ठेवण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती मंदिर समितीमार्फत करण्यात येत असून, राजगिरा लाडू प्रसाद आऊटसोर्सिंग पद्धतीने खरेदी करण्यात येत आहे. भाविकांसाठी 70 ग्रॅम वजनाचे दोन बुंदी लाडू प्रति पाकीट रु. 20 दराने, तसेच 25 ग्रॅम वजनाचे दोन राजगिरा लाडू प्रति पाकीट रु. 10 दराने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या प्रसाद विक्रीसाठी उत्तरद्वार व श्री संत तुकाराम भवन येथे दोन विक्री केंद्रे सुरू असून ती 24 तास भाविकांच्या सेवेत कार्यरत आहेत. बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती एमटीडीसी भक्तनिवास येथील लाडू उत्पादन केंद्रात हरभरा डाळ, साखर, शेंगदाणा डबल रिफाइंड तेल, काजू, बेदाणे, वेलची आदी दर्जेदार साहित्याचा वापर करून केली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत असून, लाडू प्रसादाची शासकीय प्रयोगशाळेमार्फत तपासणी करून तो खाण्यास योग्य असल्याचे प्रमाणित करण्यात आले आहे. सुमारे 110 कर्मचारी व स्वयंसेवक 24 तास भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत0
0
Report
पंढरपुर में रिक्षा भीड़: आषाढ़ी वारी के दौरान वारकियों की सुरक्षा खतरे में
Pandharpur, Maharashtra:आषाढी वारी काळात पंढरपूर मध्ये रिक्षा मधून वारकऱ्यांची धोकादायक वाहतूक, परिवहन मंत्र्यांच्या सूचनेनंतरही आरटीओ पथकाकडून कारवाई कडे कानाडोळा आषाढी वारी काळात आलेले वारकरी आपल्या मठ धर्मशाळा एस टी स्टँड , रेल्वे स्थानक वरून प्रवास करण्यासाठी रिक्षा वापर करतात. मात्र पंढरपूर मध्ये तीन आसन क्षमता असतानाही तब्बल 10 ते 12 वारकरी रिक्षा मध्ये कोंबून बसवले जातात. यामध्ये काही रिक्षा या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर वापरून सुरू आहेत. अशाच लवकर पोहोचण्यासाठी रिक्षा चालकामध्ये स्पर्धा सुरू आहे. अनेक रिक्षा या परवाना नसलेल्या सुद्धा वाहतूक करत आहेत आरटीओ विभागाने मात्र या नियमबाह्य रिक्षा वाहतुकीकडे कानाडोळा केल्याचे दिसत आहे. सुदैवाने कोणताही अप्रिय घटना घडत नाहीत. मात्र वारकऱ्यांची सुरक्षित वाहतूक करणे गरजेचं आहे.0
0
Report
बीड के टास्क फोर्स से थाईलैंड-म्यांमार सीमा पर 25 युवाओं की रिहाई के लिए कार्रवाई
Beed, Maharashtra:बीड ब्रेक - म्यानमार मधील ओलिस ठेवलेल्या तरुणांच्या सुटकेसाठी टास्क फोर्स. - बीडच्या पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याकडे असणार मोहिमेची जबाबदारी. - टास्कफोर्स मध्ये असणार एटीएस,आयबी चे अधिकारी. - थायलंड म्यानमार सीमेवर सायबर माफियांनी ओलीस ठेवलेल्या राज्यातील 25 तरुणांच्या सुटकेसाठी शासन आता ॲक्शन मोड मध्ये. - राज्यातील सर्व तक्रारदार राज्यगृह विभाग व परराष्ट्र मंत्रालय यांच्यात समन्वय साधण्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयाने बीड पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली. या टास्क फोर्समध्ये एटीएस आणि आयबी चे अधिकारी देखील असणार आहेत. - मोठ्या पगाराच्या आमिषाने राज्यातील तरुणांना एजंटांमार्फत थायलंड येथे नेऊन त्यांचे अपहरण करत म्यानमार सीमेवर ओलीस ठेवले. हा प्रकार बीडच्या तरुणामुळे समोर आला या तरुणाचा छळ करून सायबर फसवणुकीचे कामे करून घेतली जात आहेत. - भारतातील सुमारे 700 व राज्यातील सुमारे 25 तरुण ओलीस असून त्यांच्या सुटकेसाठी प्रत्येकी 7000 डॉलरची खंडणी मागितली जात असल्याचा प्रकार समोर आला होता. याबाबतची सूत्रांनी माहिती दिली आहे.0
0
Report
Advertisement
मंदिर दर्शन रांगे में सांप मिलने से भक्तों में खौफ, सुरक्षा कर्मियों ने पकड़ा
Pandharpur, Maharashtra:श्री विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शन रांगेमध्ये सापांचा वावर असल्याचे समोर आलेला आहे. पत्रा शेड जवळील दर्शन रांगेमध्ये हे साप आढळून आले आहेत. साप आढळून आल्यानंतर भाविकांमध्ये घबराट निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. भाविक चालत असलेल्या रांगेमध्येच हा सापांचा दर्शन भाविकांना झाल्यानंतर मंदिर समितीच्या सुरक्षा रक्षकांना याबाबत कळवण्यात आलं त्यानंतर सर्व मित्रांच्या मदतीने हे साप पकडण्यात आला.0
0
Report
महाराष्ट्र के ग्रामीण इलाकों में बारिश के लिए धोंडी-धोंडी रीति, किसान चिंतित
Akola, Maharashtra:Anchor : राज्यातील अनेक भागांत पावसाने पुन्हा एकदा दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसासाठी आता ग्रामीण भागात पारंपरिक श्रद्धा आणि लोकपरंपरांचा आधार घेतला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृतीत पाऊस पडावा म्हणून 'धोंडी धोंडी पाणी दे' ही परंपरा आजही जपली जाते. यंदा मान्सूनच्या सुरुवातीला झालेल्या जोरदार पावसानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने अचानक पाठ फिरवल्याने पिके कोमेजण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे वरुणराजाला साकडे घालण्यासाठी अनेक गावांमध्ये धोंडी काढली जात आहे. धोंडीच्या परंपरेत कडुनिंबाचा पाला, मुसळ आणि बेडूक यांना विशेष महत्त्व दिले जाते. दोन व्यक्ती धोंडीचे रूप धारण करून गावभर फिरतात, तर त्यांच्या मागे ग्रामस्थांचा ताफा असतो. गावातील महिला बेडकाची पूजा करून वरुणराजाकडे पावसाची प्रार्थना करतात. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातही असेच भावनिक आणि पारंपरिक चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, पाऊस लवकर यावा आणि शेतकरी सुखी व्हावा, या भावनेतून मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनीही बेडकावर पाणी टाकून वरुणराजाला साकडे घातले. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा आता वरुणराजाच्या कृपेवर टिकून आहेत.0
0
Report
GI टैग से लोणावळा चिक्की को वैश्विक संरक्षण मिला, परंपरा सुरक्षित
Varsoli, Maharashtra:लोणावळ्याची चिक्की ही केवळ गोड पदार्थ नाही... तर शंभर वर्षांहून अधिक इतिहास जपणारी परंपरा आहे. मुंबई-पुणे रेल्वेमार्गाच्या घाट विभागाचं बांधकाम सुरू असताना कामगारांना झटपट ऊर्जा मिळावी म्हणून गूळ आणि शेंगदाण्यांपासून तयार होणारा हा पौष्टिक गोड पदार्थ विकला जात होता. पुढे स्थानिक व्यावसायिकांनी त्याला व्यापारी स्वरूप दिलं... आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे लोणावळा चिक्की देशभर प्रसिद्ध झाली. कालांतराने "लोणावळा चिक्की" हे नावच एक विश्वासार्ह ब्रँड बनलं. आज लोणावळ्यात शेंगदाणा, काजू, बदाम, पिस्ता, तीळ, नारळ, ड्रायफ्रूट अशा अनेक प्रकारच्या चिक्की तयार केल्या जातात. दरवर्षी लाखो पर्यटक लोणावळ्यात येतात आणि परतीच्या प्रवासात चिक्कीची खरेदी आवर्जून करतात. आता GI टॅग मिळाल्यामुळे या चिक्कीच्या अस्सलपणाला कायदेशीर संरक्षण मिळणार आहे. त्यामुळे बनावट उत्पादनांवर आळा बसण्यास मदत होईल, तर स्थानिक उत्पादकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी संधी उपलब्ध होणार आहे. GI टॅगमुळे व्यापाऱ्यांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे. या निर्णयामुळे ग्राहकांचा विश्वास वाढेल, निर्यातीला चालना मिळेल आणि लोणावळ्याच्या पारंपरिक उद्योगाला मोठा आधार मिळेल, अशी अपेक्षा व्यापारी व्यक्त करत आहेत. पर्यटकांसाठीही ही आनंदाची बातमी आहे. लोणावळ्याला भेट म्हणजे चिक्कीची खरेदी, हे समीकरण अनेक वर्षांपासून कायम आहे. आता GI टॅगमुळे जगभरातील ग्राहकांना अस्सल लोणावळा चिक्कीची खात्री मिळणार आहे, अशी भावना चिक्कीप्रेमी आणि पर्यटक व्यक्त करत आहेत. लोणावळ्याची ओळख फक्त निसर्गसौंदर्यापुरती मर्यादित नाही... तर चिक्कीमुळेही ती जगभर पोहोचली आहे. आता GI टॅग मिळाल्यामुळे या शंभर वर्षांच्या परंपरेला अधिकृत संरक्षण मिळालं आहे. त्यामुळे स्थानिक उद्योग, व्यापारी आणि ग्राहक या तिघांनाही याचा मोठा फायदा होणार आहे..0
0
Report
Advertisement
यवला के नागडे में बिबट्या पकड़, इलाके में हड़कंप के बीच वन विभाग ने पिंजरा लगाकर जेरबंद किया
Yeola, Maharashtra:येवला तालुक्यातील नागडे येथे गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने दहशत माजवली होती स्थानिक नागरिकांनी बिबट्याच्या दहशतीमुळे येवला वनविभागाला नागडे परिसरात पिंजरा लावण्याची विनंती केली होती दरम्यान वनविभागाने आप्पासाहेब साताळकर यांच्या शेतात लावलेल्या पिंजरामध्ये काल मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला असून सर्वांनी सुटकेचा निष्वास टाकला Yावेळी पिंजऱ्यात असलेला बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली आहे0
0
Report
यवतमाल में नकली बीज-ख़ाद से किसान परेशान, आत्महत्याएँ बढ़ीं; राजू उंबरकर लगाए सरकार पर आरोप
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे आणि खते मारल्या गेल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. यासाठी सरकार सोबतच कृषी विभागातील अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप मनसे नेता राजू उंबरकर यांनी केला आहे. वाणी, मारेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये त्यांनी दौरा करून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली. ज्या शेतकऱ्यांची फसगत झाली त्यांनी मनसेकडे तक्रारी कराव्यात, जेणेकरून मनसैनिक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल. कृषी विभागाचा गुणनियंत्रण विभाग बोगस बियाणे व खतांच्या कंपन्यांशी हात मिळवणी करून असल्याने शेतकऱ्यांचा विश्वासघात झाला आहे, त्यामुळे या शेतकऱ्यांना तत्काळ दर्जेदार बियाणे मोफत उपलब्ध करून द्यावे अन्यथा मनसैनिकांच्या रोशाला समोर जावे असा इशाराही राजू उंबरकर यांनी दिला आहे.0
0
Report
गोंदिया में 5 वर्ष की बच्ची पर भटकते कुत्तों का वीडियो CCTV में कैद
Bhandara, Maharashtra:6 कुत्र्यांनी केला 5 वर्षाच्या मुलीवर हल्ला.... घटना सीसीटीव्ही मध्ये कैद..... गोंदिया शहरात एका 5 वर्षाच्या मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढविला आहे.. ही मुलगी रोडवर उभी असताना अचानक 6 कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. तिला चावा देखील घेतला मुलगी मोठ्याने ओरडू लागल्याने परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केल्याने कुत्रे पाळले. सुदैवाने मुलीला गंभीर इजा झाली नसली तरीही तिला रुग्णालयात नेण्यात आले आहे. कुत्र्यांच्या हल्ल्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. त्यामुळे गोंदिया शहरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे....0
0
Report
Advertisement
