445001
यवतमाळ : महिला बँक घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या बाबाजी दाते महिला बॅंकेत २४२ कोटींच्या अपहार प्रकरणात महिनाभराने अटकसत्र सुरू झाले आहे. पोलिसांनी शिवसेना नेते रमेश अगरवाल, व्यावसायिक प्रकाश पिसाळ आणि ठेकेदार प्रशांत पामपट्टीवार यांना अटक केली आहे. याआधी बँकेच्या CEO सुजाता महाजन, तिचा पती विलास महाजन, ॲड. वसंत मोहरेकर आणि नवलकिशोर मालाणी यांना अटक झाली होती. आता अटक केलेल्या आरोपींची संख्या सात झाली आहे. २०६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, ज्यामुळे संचालक व लेखा परीक्षक चिंतेत आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
यवतमाल: दारव्हा में बाढ़ के पानी में कार डूब, पत्नी व दो बच्चियाँ लापता
Yavatmal, Maharashtra:यवतमालच्या दारव्हा तालुक्यातील दहेली गावाजवळील नदीत एक कार वाहून गेली आहे. या कार मधील पती झाडाचा आधार घेऊन बचावला असून पत्नी व दोन मुलींचा शोध लागलेला नाही. लोणी येथील अविनाश खंडारे हे कुटुंबीयांसह ईर्टिगा कार घेऊन गावी परतत असताना अडाण नदीवरील पुलावरून त्यांचे वाहन पुराच्या पाण्यात वाहून गेले. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अविनाश खंडारे हे वाहून जात असताना एका झाडाच्या साहाय्याने बचावले, त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून बचाव पथकाने त्यांची सुटका केली. मात्र त्यांची पत्नी माधवी खंदारे, मुली प्राची व साची या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. रात्रीपासून त्यांचा शोध घेतल्या जात आहे. पालकमंत्री संजय राठोड यांना घटनेची माहिती मिळतात त्यांनी प्रशासनाला ताबडतोब मदत कार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.0
0
Report
उद्धव ठाकरे ने अभिजीत दिपके को मातोश्री बुलाया, शादी पर मजाक चर्चा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन यशस्वी करून संभाजीनगरमध्ये परतलेले काँक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांना उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री'वर येण्याचे निमंत्रण दिले आहे. उबाठाचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिपके यांची रात्री भेट घेतली. या भेटीदरम्यान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खैरे यांच्या मोबाइलवरून दिपके यांच्याशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी दिपके यांच्या आई-वडिलांशीही संवाद साधला आणि गमतीने अभिजित यांना 'आता लग्न करून टाका,' असा सल्लाही दिला असल्याची चर्चा आहे...0
0
Report
रोहा-कोलाड मार्ग पर गटर स्लैब गिरा, वाहन क्षति; नगरपालिका पर सवाल
Chendhare, Maharashtra:रोहा-कोलाड मार्गावरील दमखाडी नाका परिसरात गटरावरिल काँक्रीट स्लॅब गुरुवारी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळला. या दुर्घटनेत तेथे उभ्या मोटारसायकल आणि रिक्षांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर नागरिकांनी रोहा नगरपालिकेच्या ढिसाळ आणि निष्काळजी कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. शहरातील गटरांवरील स्लॅबची नियमित तपासणी व दुरुस्ती न केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. या घटनेची चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, नुकसानग्रस्त वाहनधारकांना भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.0
0
Report
Advertisement
गडचिरोली में 24 घंटे में हुई तेज बारिश ने 25 प्रमुख मार्ग रोक दिए, प्रशासन अलर्ट
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोलीत पावसाचा विश्रांती मात्र 24 तास पडलेल्या पावसाने २५ प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा अँकर: गडचिरोली जिल्ह्यात सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे . मात्र 24 तास पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नदी-नाले दुथडी भरून वाहत असून २५ प्रमुख रस्ते आणि राष्ट्रीय महामार्ग वाहतुकासाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून प्रशासनाने नागरिकांना विनाकारण प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील मोसम नाला, आष्टी–आलापल्ली मार्गावरील दिना नदी, तसेच कुरखेडा, एटापल्ली, धानोरा, सिरोंचा, मुलचेरा, अहेरी, गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी, देसाईगंज आणि भामरागड तालुक्यांतील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अनेक गावांचा संपर्क तात्पुरता तुटला आहे. प्रशासनाने संबंधित ठिकाणी सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या असून, नागरिकांनी पूर आलेले रस्ते, पूल किंवा नदी-नाले ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच परिस्थितीवर महसूल, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. भामरागडमधील 700 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली आहे. पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्ह्यातील पावसाची स्थिती, पूरग्रस्त भागातील उपाययोजना आणि प्रशासनाकडून सुरू असलेल्या बचाव कार्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. 24 तासांत गडचिरोली जिल्ह्यात सरासरी 123 मिमी पावसाची नोंद झाली असून काही भागांत 200 मिमीपर्यंत अतिवृष्टी झाली आहे. छत्तीसगड राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यातील नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होऊन पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) तैनात असून जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि संबंधित यंत्रणा परस्पर समन्वयातून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देत बचाव व मदतकार्य प्रभावीपणे सुरू ठेवण्यास सांगितले.0
0
Report
गडचिरोली में भारी बारिश: कार पानी में बह गई, पेड़ से अड़कर बची जान
Chandrapur, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील रेंगेवाही नाल्यावर वन अधिकाऱ्यांची कार पाण्यात वाहून गेली, झाडाला अडकल्याने जीव वाचला. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य राबवून कारमधील सर्व व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात आले. पूराच्या पाण्याचा अंदाज चुकला. अश्टी–मुलचेरा मार्गावरील रेंगेवाही नाल्यावर पूराच्या पाण्यातून कार घेऊन जाण्याचा प्रयत्न वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला महागात पडला. प्रचंड प्रवाहात कार वाहून गेली; परंतु झाडाला अडकल्याने मोठी दुर्घटना टळली. कारचा ताबा सुटला आणि ती प्रवाहात वाहून गेली. दूर अंतरावर कार एका झाडाला अडकल्याने कारमधील व्यक्तींचे प्राण थोडक्यात बचावले. घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीस, महसूल विभाग आणि वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य राबवून कारमधील सर्व व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात आले. पूर आलेले रस्ते, पूल आणि नदी-नाले ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे प्रशासनाने केले आहे. सध्या पाऊस थांबला असला तरी जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा कायम आहे.0
0
Report
सांगली में तडीपार गुंडे के पास पिस्तौल-गोला बारूद, पुलिस ने गिरफ्तार किया
Sangli, Maharashtra:सांगलीमध्ये पिस्तूल घेऊन दहशत माजवणाऱ्या तडीपार गुंडाला सांगली स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. स्वप्निल प्रकाश कोलप असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 50 हजार रुपये किमतीचे पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. स्वप्निल कोलप याच्या विरुद्ध विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने त्याला सांगली जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते.परंतु तडीपार असतानाही तो सांगली रेल्वे स्थानक परिसरात फिरून दहशत माजवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानंतर सापळा रचून ताब्यात घेतले असता त्याच्याकडे पिस्तुल आणि जिवंत काडतुसे आढळून आली आहेत।0
0
Report
Advertisement
भाजपा के युवा नेता ने सैकड़ों कार्यकर्ताओं के साथ शिवसेना में प्रवेश किया, उठा बहस
Kalyan, Maharashtra:भाजपाच्या युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षाने शेकडो कार्यकर्त्यांसह केला शिवसेनेत प्रवेश भाजपाच्या युवा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर म्हात्रे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केलाय. कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, जिल्हा संपर्कप्रमुख महेश गायकवाड यांच्या उपस्थितीत म्हात्रे यांनी प्रवेश केला. कल्याण पूर्वेतील खडे गोलवली परिसरात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी वारंवार लोकप्रतिनिधींना फोन केले, मात्र फोन उचलले जात नाहीत. त्यामुळे नाराज होऊन आपण भाजपा पक्ष सोडल्याच म्हात्रे यांनी सांगितलं.0
0
Report
रत्नागिरी के कशेडी घाट में मुंबई-गोवा राजमार्ग का रस्ता ध्वस्त, दुर्घटना का खतरा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कशेडी घाटात मुंबई-गोवा महामार्गाचा रस्ता खचला.. लोखंडी गर्डर हवेत लटकले,मोठ्या अपघाताची भीती.. मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी घाटातील जुन्या महामार्गाचा दरीकडील रस्ता खचला असून,सुरक्षेसाठी लावलेले लोखंडी गर्डर थेट हवेत तरंगू लागले आहेत.. मुसळधार पाऊस आणि संरक्षक भिंतीचा भराव वाहून गेल्याने हा रस्ता अत्यंत धोकादायक स्थितीत पोहोचला आहे.. विशेष म्हणजे कशेडी बोगद्याला हाच मुख्य पर्यायी मार्ग असून,अवघ्या एका वर्षापूर्वीच या रस्त्याचे डांबरीकरण आणि नूतनीकरण करण्यात आले होते.. मुसळधार पावसात किंवा अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे महामार्गाचा मोठा भाग दरीत कोसळण्याचा धोका निर्माण झाला असून,प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे..0
0
Report
वाशीम के तऱ्हाळा में कथित अवैध शराब बिक्री के विरोध में रास्ता रोको आंदोलन
Washim, Maharashtra:अँकर:वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील तऱ्हाळा येथे कथित अवैध दारू विक्रीविरोधात ग्रामस्थांनी गुरुवारी संभाजीनगर–नागपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला. वारंवार लेखी तक्रारी व निवेदने देऊनही अवैध दारू विक्रीवर प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. गावातील अवैध दारू विक्रीमुळे व्यसनाधीनता वाढून अनेक कुटुंबांमध्ये वाद,आर्थिक नुकसान आणि सामाजिक समस्या निर्माण होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. माहिती मिळताच पोलिस व महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून लवकरच कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, प्रशासन आता प्रत्यक्षात कोणती कारवाई करते, याकडे तऱ्हाळा ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
Advertisement
यवतमाल में भारी बरसात, रेड अलर्ट जारी; 200 मिमी तक अनुमान
Yavatmal, Maharashtra:यवतमाळमध्ये सकाळपासूनच पावसाची धुव्वाधार बॅटिंग सुरू आहे. हवामान विभागाने विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा व सतर्कतेचा इशारा देत रेड अलर्ट जारी केला आहे. या पावसात नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यवतमाळच्या अनेक भागात अतिवृष्टी सारखा पाऊस होत असून सुमारे २०० मिमीपर्यंत पावसाची नोंद होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे तसेच अनावश्यक काम असल्यास घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले0
0
Report
अमरावती में पेड़ की शाखा गिरने से केला विक्रेता घायल, हालत स्थिर
Amravati, Maharashtra:अमरावती के इर्विन चौकात झाडाची फांदी केळी विक्रेत्याच्या अंगावर पडल्याने केळी विक्रेता मोठ्या प्रमाणात जखमी; केळी विक्रेत्याच्या डोक्याला आणि छातीला गंभीर इजा झाली आहे. जखमी केळी विक्रेत्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून केळी विक्रेतेाची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. अमरावती शहरात धोकादायक झाडांची छाटणी न केल्याने वृक्ष कोसळण्याच्या घटनेत वाढ झाली असून अमरावती महानगरपालिकेकडून धोकादायक वृक्षांच्या कटिंगसाठी आणि मोजणीसाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च केल्याचाही आरोप अमरावतीकर करत आहे.0
0
Report
कोयना डैम के छह दरवाजे खुले, जल प्रवाह बढ़ा; सतर्क रहें अपील
Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यासाठी महत्त्वाची बातमी... कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने आज सायंकाळी ५ वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे कोयना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोयना धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज धरणाचे सहा वक्र दरवाजे प्रत्येकी एक फूटाने उघडण्यात आले. या दरवाजांमधून ५,०७९ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला. याशिवाय धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे एक युनिट कार्यरत असून त्याद्वारे १,०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कोयना नदीत सध्या एकूण ६,१२९ क्युसेक पाणी सोडले जात आहे. दरम्यान, पाणलोट क्षेत्रात पाऊस कायम असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकनुसार विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असून नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, तसेच नदीकाठावरील ग्रामपंचायती, स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.0
0
Report
Advertisement
फलटण अस्पताल में डॉक्टर के आत्महत्या नोट से विवाद: ओएसडी के खिलाफ मामला दर्ज
Satara, Maharashtra:सातारा जिले के फलटण उपजिल्हा अस्पताल में डॉक्टर आत्महत्या के मामले के ताजा घटनाक्रम के बीच अस्पताल में कार्यरत डॉ. राजेंद्र रूपनवर ने मंत्री तानाजी सावंत के विरोध में गंभीर आरोप करते हुए सुसाइड नोट हाथ पर लिखकर वायरल कर दिया था. पुलिस ने मामले को गम्भीरता से लिया है और इसकी जांच चल रही है. 28 जुलाई को प्रसाद कोंडेदेशमुख अपनी निजी बॉडीगार्ड के साथ उपजिल्हा अस्पताल पहुंचे. उन्होंने बुनियादी प्रमाणपत्र के लिए फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक बताते हुए डॉक्टर रूपनवर से मांगा. रूपनवर ने कहा कि नियम के अनुसार तुरंत प्रमाणपत्र देना संभव नहीं है. कोंडेदेशमुख ने दावा किया कि वे पूर्व मंत्री तानाजी सावंत के ओएसडी हैं. लेकिन डॉ. रूपनवर ने प्रमाणपत्र देने से इंकार किया. इसके बाद कोंडेदेशमुख ने इस प्रकरण की शिकायत वरिष्ठ चिकित्सा अधिकारी डॉ. एम.एस. मदने के पास की. इसके बाद डॉ. मदने ने डॉ. रूपनवर को अपनी केबिन में बुलाया. उसी समय प्रसाद कोंडेदेशमुख ने रूपनवर को धमकाने, कॉलर पकड़कर धकेলने का आरोप लगाया. उनके साथ के निजी बॉडीगार्ड ने मारने की धमकी दी और ध jig जैसी धमकी दी. इसके बाद 29 जुलाई को डॉ. मदने ने रूपनवर को नोटिस देकर कार्य पर कमी दर्शाते हुए पत्र कहा और जांच के लिए sevenारा आने को कहा. इसके बाद डॉ. रूपनवर ने एक सुसाइड नोट हाथ पर लिखा और उसकी फोटो अपने स्टेटस पर डाल दी. अस्पताल के अन्य कर्मियों ने इसे देखा और मदने को सूचना दी. मदने ने फलटण पुलिस से संपर्क किया. फलटण पुलिस ने तुरंत कार्रवाई कर रूपनवर को हिरासत में लेकर पूछताछ की. पूछताछ के बाद यह बताया गया कि मामले से जुड़ी शिकायत के आधार पर माजी मंत्री तानाजी सावंत के ओएसडी प्रसाद कोंडेदेशमुख के खिलाफ सरकारी कर्मचारी के काम में बाधा डालने के आरोप में मामला दर्ज किया गया है और आगे की जांच फलटण पुलिस कर रही है.0
0
Report
कल्याण में कंगना रणौत के विरोध में युवक कांग्रेस का प्रदर्शन
Kalyan, Maharashtra:कंगना रणौत यांच्या विरोधात कल्याणमध्ये युवक काँग्रेस आक्रमक. कंगना रणौत यांनी gen-z बद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून खासदार कंगना रणौत यांच्या विरोधात घोषणा-बाजी करण्यात आली व त्यांच्या पुतळ्याचा जाळण्याचा प्रयत्न झाला; परंतु पोलिसांनी पुतळा जाळला नाही. त्यामुळे पोलीस आणि युवक काँग्रेसमध्ये झटापट झाली, रस्त्यावर ठिय्या मांडून घोषणाबाजी झाली. कंगना रणौतांनी gen-z बद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. कंगना रणौतांना ठाणे जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही; वेळ पडल्यास शाई फेक आंदोलनदेखील करू, युवक काँग्रेसचा इशारा. जिल्हा अध्यक्ष जगजीत सिंह यांनीही भाषणात भाग घेतला.0
0
Report
नाशिक के खड्डों ने पांच लोगों की जान ली, प्रशासन पर सवाल
Nashik, Maharashtra:अँकर एक... दोन... तीन... चार आणि आता पाचवा बळी. नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्डे आता अपघाताचे नव्हे, तर मृत्यूचे कारण ठरत आहेत. यावर्षी आतापर्यंत पाच नागरिकांनी खड्ड्यांमुळे आपला जीव गमावला आहे. प्रत्येक घटनेनंतर संताप व्यक्त झाला, आश्वासने मिळाली, पण खड्डे मात्र कायम राहिले. शहरात सुरू असलेल्या संस्था कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर चालले विकास कामे हे नागरिकांसाठी आता डोकेदुखी बनत चालले असून मृत्यूचे सापळेही बनत चालले आहेत...पाहुयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट... शहरातील खड्ड्यांनी आणि उदासीनयंत्रणेने अखेर पाचव्या निष्पाप नाशिककराचा बळी घेतलाच. अंबड एमआयडीसीतील एक्स्लो पॉईंट भागात चिखल आणि खड्यामुळे नीलेश प्रल्हाद कोतकर या तरुण व्या व सा यि का चा अपघाती मृत्यू झालाय.. यंदाच्या पावसाळ्यात खड्यांमुळे झालेला हा पाचवा मृत्यू असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात रोष वाढला आहे. नाशिकच्या कामटवाडे येथील विमल रेसिडेन्सीमध्ये राहणारे कोतकर मंगळवारी दुपारी एमएच ३९ जे ४९२१ क्रमांकाच्या दुचाकीवरून घरी जात असताना हा अपघात झाला. या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या ५ वर्षांच्या चिमुकलीचे पितृछत्र हरपले. खड्ड्यांमुळे माझ्या निष्पाप मुलाचा बळी गेलाय याकडे शासन लक्ष देईल का असा प्रश्न देखील निलेश च्या वडालांनी विचारलाय निलेश ला पाच वर्षाची मुलगी आहे पत्नी आहे या लहान मुलीचा उदरनिर्वाह कसा होणार हीच शिक्षण कसं पूर्ण होणार असा प्रश्न देखील निलेशच्या वडिलांनी विचारलाय... निशा मुलीच्या शिक्षणाची काहीतरी जबाबदारी शासनाने स्वीकारली आणि तिच्या पत्नीला नोकरी लावून द्यावी अशी मागणी निलेशच्या वडिलांनी केली तर शहरात शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडलेत यामुळे अनेक अपघात होत आहेत असं निलेश च्या भावाने म्हटलले आहेत ज्या ज्या रस्त्यावर जाल त्या त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याची तक्रार देखील निलेश च्या भावाने केली आहे हे रस्ते लवकर कसे तयार होतील याकडे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे असं निलेश च्या वडिलांनी म्हटलं बाईट- प्रल्हाद कोतकर....निलेश चे वडील बाईट- राकेश कोतकर......निलेश चा भाऊ शहरात पडलेल्या खड्ड्यांमुळे या पाच जणांचा झाला मृत्यू... प्रभाकर निकम ,मृत्यू - 24 मार्च प्रभाकर निकम यांचा मृत्यू सातपूर अंबड रोडवर रस्त्याचे काम सुरू असताना पडलेल्या खड्ड्यात मृत्यू झाला.. उज्वला गायकवाड - मृत्यू 5 एप्रिल उज्वला गायकवाड यांचा मेरी म्हसरूळ रोड वरती खड्या मुळे अपघात झाला..आणि त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला... प्रवीण गायकवाड, मृत्यू - 6 जून माजी सैनिक असलेले प्रवीण गायकवाड यांचा श्रमिक नगर परिसरात ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला... दीपाली बेळे, मृत्यू - 25 जुलै. दिपाली बेळे यांचा मेरी परिसरात असलेल्या तारा वाला सिग्नल परिसरात खड्ड्यात गाडी उधळल्यामुळे त्याखाली पडल्या आणि त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यानंतर 40 दिवस मृत्यूची झुंज देत असताना त्यांचा मृत्यू झाला... निलेश कोतकर - 29 जुलै नाशिकच्या सातपूर-अंबड लिंक रोडवरील एक्सलो पॉइंट येथे 28 जुलै रोजी दुपारी सुमारे 1.30 वाजण्याच्या sुमारास झालेल्या अपघाताचा व्हिडिओ आता समोर आला आहे...या अपघातात निलेश कोतकर हे गंभीर जखमी झाले होते. अपघात होताच घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत निलेश कोतकर यांना रस्त्याच्या बाजूला सुरक्षित ठिकाणी हलवले आणि मदतीचे प्रयत्न सुरू केले.अपघातानंतर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. बाईट- गणेश वाघ , पोलिस... या संपूर्ण प्रकाराबाबत महापौर हिमगौरी आडके यांनी घडलेली घटना दुर्दायवी असून यात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आतापर्यंत कंत्राटदारांना दंड लावण्यात आलेला आहे यापुढे त्यांना ब्लॅक लिस्ट केलं जाईल आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अधिकारी यांना देखील यात खेचणार असताना; बाईट- हिमगौरी अडके महापौर नाशिक मनपा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विकासकामांचा वेग वाढला आहे. मात्र या विकासाच्या गडबडीत नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याच समोर येत आहे... पाच मृत्यूंनंतरही अनेक रस्त्यांवरील खड्डे तसेच असल्याने आता प्रश्न एकच... आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागं होणार?0
0
Report
Advertisement
