icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

खवड़्या पहाड़ मौत का जाल बन गया: अवैध खनन ने बना दिया सुसाइड पॉइंट

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anchor : छत्रपती संभाजी नगर मध्ये मुलासह आई-वडिलांनी डोंगरावरून उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. मात्र, या घटनेमुळे तिसगाव परिसरातील मुख्य धुळे-सोलापूर महामार्गावर असलेल्या खवड्या डोंगराचे एक अत्यंत भयानक वास्तविक चव्हाट्यावर आले आहे. हा डोंगर आता केवळ नैसर्गिक डोंगर राहिलेला नसून, वारेमाप अवैध उत्खननामुळे तो थेट मृत्यूचा सापळा म्हणजेच 'सुसाइड पॉइंट' बनला आहे. पाहुयात काय आहे प्रकार. खवड्या डोंगर बनला आहे सुसाईड स्पॉट. गेल्या 4 वर्षात 13 आत्महत्या, 1 खून अवैध उत्खननाने बनला मृत्यूचा सापळा. छत्रपती संभाजी नगरच्या धुळे सोलापूर हायवे वरून दिसणारा हा खवड्या डोंगर खवडया डोंगर अब मृत्यूचा हॉटस्पॉट ठरलाय. छत्रपती संभाजी नगरात शुक्रवारी एका तरुणांना इथून आत्महत्या केली सोबत त्याच्या आई-वडिलांचाही मृत्यू झाला मात्र त्यानंतर पुन्हा एकदा या डोंगरावर आणि परिसराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. खरंतर एरवी डोंगराला एक नैसर्गिक उतार असतो मात्र या खवड्या डोंगरावर वारेमाप उत्खनन झालाय... डोंगराची पाहणी केल्यानंतर प्रशासनाच्या दुर्लक्षाचे आणि निसर्गाच्या लुटीचे वास्तव पुढे येतेय. खवड्या डोंगरावर गेल्या काही वर्षांत महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून अफाट अवैध उत्खनन झाले आहे. यंत्रांच्या साहाय्याने डोंगराचे अक्षरशः लचके तोडल्यामुळे डोंगराचा एक भाग पूर्णपणे कापला गेला आहे. या कटिंगमुळे तेथे सुमारे 246 फूटांचा एक सरळसोट आणि सपाट कडा तयार झाला आहे. नैसर्गिक उतार नष्ट झाल्याने हा कडा थेट मृत्यूच्या दरीसारखा झाला आहे. महापालिकेची पंतप्रधान आवास योजना की नवी वसाहत पायथ्याशीच असून भविष्यातही असं काही घडू शकत त्यामुळे इथे तरी किमान सुरक्षा जाळा लावाव्या अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. गेल्या चार वर्षात या डोंगरावर तेरा आत्महत्या झाले आहेत तर एक खून झाला आहे; तरीही इथं कुठलीही सुरक्षा व्यवस्था व प्रवेश बंदी नाही. एक कुटुंभगाचा दुर्दैवी अंत झाला आहे, झालेली हानी भरून निघण्याची नाही किमान यंत्रणांनी तरी आता सावध होत काही उपाययोजना करण्याची गरज आहे. विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर.
0
0
Report

आयफोन से आत्महत्या नहीं: पुलिस ने दी शुरुआती स्पष्टता, मामले की जांच जारी

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मुलाची आत्महत्या आयफोन मुळे नाही.प्राथमिक तपासात तसं कारण दिसत नाही. मुलाने आय फोन मूळ आत्महत्या केली असे नाहीं असा खुलासा छत्रपती संभाजी नगर पोलिसांनी केलाय, त्या मुलाला वाचवण्याचे सर्व प्रयत्न ग्रामस्थ आणि पोलिसांनी  केले या घटनेला 24 तास व्हायचे आहे प्राथमिक तपासात अजून निश्चित सांगता येणार नाही की आयफोन मुळे आत्महत्या केली दुर्दैवाने तो मुलगा तणावत होता.. खात्रीशीर पणे सांगू शकत नाहीत की आय फोन मुळे आत्महत्या झाली  असे पोलीस उपयुक्तांनी सांगितले,  त्याची अडचण काय त्याला विचारलं जात होतं. त्याला समजावण्याचा प्रयत्न केला जात होता असे ही पोलीस उपयुक्तांनी सांगितले...
0
0
Report
Advertisement

राहुल गांधी दौरों पर सुप्रीम कोर्ट व विधानसभा अध्यक्ष के मुद्दों पर राजनीति गरम

Kolhapur, Maharashtra:राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष Byte मुद्दे अंबाबाईला साकडं कोल्हापूर नगरीत आल्यानंतर अंबाबाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर महाराष्ट्रात राहणाऱ्या नागरिकांना सुखी-समृद्धी ठेव अशी प्रार्थना केली. चांगला पाऊस पडू दे बळीराजाचे कल्याण होवो ही प्रार्थना केली. ऑन ठाकरे गट कोर्ट युक्तिवाद आपल्या संविधानिक प्रक्रियेत एखाद्या निर्णयाच्या विरोधात आपलं मत असेल तर न्यायव्यवस्थेकडे आपण दाद मागू शकतो, अर्ज करू शकतो. माझ्या निर्णयाशी आणि इलेक्शन कमिशनच्या निर्णयाशी लोक सहमत नसतील तर कोर्टात दाद मागणे हा त्यांचा अधिकार आहे. युक्तिवाद झाला म्हणजे कोर्टाचा निर्णय झाला असं होत नाही. त्यांनी त्यांचा युक्तिवाद केलेला आहे. दुसरी बाजू त्यांचा युक्तिवाद करतील. न्यायालय सर्व परिस्थिती आणि फॅक्टची दखल घेऊन सुप्रीम कोर्ट योग्य ते निर्णय घेईल. ऑन आमदारांच्या विरोधात निर्णय गेला तर मी दिलेला निर्णय अत्यंत शाश्वत आणि कायद्याच्या चौकटीत बसणार आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकषाच्या आधारावर दिलेला हा निर्णय आहे. जोपर्यंत सुप्रीम कोर्ट यावर अंतिम निर्णय देत नाही, तोपर्यंत भाष्य करणं योग्य नाही.. मी संविधानिक पदावर आहे माझ्याकडून तर मुळीच असं होणार नाही. अपात्रतेच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात दोन्ही बाजूने व्यक्तिवाद केल्यानंतर विधिमंडळाने जे कार्य केला आहे, त्याची सर्व माहिती सुप्रीम कोर्टाकडे आहे. त्यामुळे मला निश्चित खात्री आहे येणाऱ्या काळात यावर योग्य निर्णय होईल. ऑन राहुल गांधी दौरा विरोध प्रदर्शन करणं लोकशाहीत प्रत्येकाचा अधिकार आहे. पण जो व्यक्ती लोकशाहीवर विश्वास ठेवतो तो व्यक्ती कधीही असविधानिक प्रदर्शन कधीही करत नाही. विरोधाच्या नावाखाली आपण जर हिंसाचार किंवा एका प्रकारची आराजाकता प्रयत्न करत असाल तर निश्चितपणे असविधानिक कृत्यावरती योग्य पद्धतीने कारवाई करणे हे प्रशासनाची जबाबदारी. ऑन राहुल गांधी پروگرام राहुल गांधी यांना खरोखर या देशातील युवा पिढींबद्दल त्यांच्या समस्यांबद्दल जर का आपुलकी असती तर चिंता असती तर इतकी वर्षे ते लोकसभेचे सदस्य आहेत.. विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी कधीच आवाज उठवला नाही. संधी साधूपणा हे सातत्याने काही नेत्यांकडून दिसून येत आहे. ऑन रोहित पवार बॅनरबाजी तुम्हाला अपेक्षा आहे का ? रोहित पवार आणि ठाकरे गट त्यांच्या विरोधात बॅनर लावतील. ऑन सुप्रीम कोर्ट संजय राऊत यांना नेहमीच सगळ्या गोष्टींची घाई असते.. ही घाईच त्यांना आणि त्यांच्या पक्षाला या परिस्थितीत आणले आहे.. एका बाजूचा युक्तिवाद झाला आहे.. दुसऱ्या बाजूचा युक्तिवाद झालेला नाही असा असताना तुम्ही निकाल पण देऊन टाकलात.. संजय राऊत यांनी आता तरी.. शहाणा माणूस जो असतो जो चुकांमधून शिकतो. संजय राऊत यांनी अति घाईच्या स्वभावामुळे स्वतःचं... पक्षाचं... पक्ष नेतृत्वाचं काय नुकसान केलंय याची जाणीव ठेवावी.
0
0
Report

नागपुर खंडपीठ ने महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कानून के खिलाफ याचिका खारिज की

Nagpur, Maharashtra:महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याला आव्हान देणारी याचिका नागपूर खंडपीठाने फेटाळली. ठोस, स्पष्ट और सविस्तर मुद्दे रेकॉर्डवर नसल्याची बाब विचारात घेता फेटाळली याचिका. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली. मोहम्मद कैसर फारूख यांनी ही याचिका दाखल केली होती. या कायद्यातील पूर्वसूचना, सार्वजनिक प्रदर्शन, दंड आणि तिसऱ्या पक्षाच्या तक्रारीसंदर्भातील तरतुदींना याचिकेत आव्हान दिले होते. हा कायदा राज्यघटनेतील आर्टिकल १४, १९(१) (ए), २१ आणि २५ चे उल्लंघन करतो, असा दावा याचिकेत दावा करण्यात आला होता. अस्पष्ट आणि अपूर्ण मुद्द्यांच्या आधारे याचिका दाखल करून न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याबद्दल याचिकाकर्त्याला ५०० रुपयांचा दंड ठोठावला.
0
0
Report

आयफोन के लिये आत्महत्या: छत्रपती संभाजी नगर के मौत मामले की गुत्थी

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या चर्चित आत्महत्या प्रकरणात 18 वर्षीय तरुणांना आयफोन साठी आत्महत्या केल्याची एक जोरदार चर्चा सुरू आहे मात्र या बाबत बोलायला कोणीही तयार नाही, प्रत्यक्षात गेली काही महिने हा मुलगा आय फोन वापरत होता, ज्यावेळेस आत्महत्या करू नको अशी विनवणी या मुलाला त्याची आई करत होती त्यावेळेस त्यांनी गळ्यातली चांदीची चैन आणि आपला आयफोन आईकडे फेकला होता त्यामुळे आयफोन साठी हा मुलगा आत्महत्या का करेल असा प्रश्न पोलिसांसह सगळ्यांना पडतोय.. त्यात काहीजण हा मुलगा अपडेट अपडेट आयफोन घेण्यासाठी मागे लागला होता अशीही चर्चा करताय तर आयफोनच्या हप्ते भरण्यावर वडील आणि मुलांमध्ये किरकोळ वाद झाला आणि त्यातून मुलांना टोकाचे पाऊल उचललं अशाही चर्चा सुरू आहे मात्र प्रत्यक्षात हे सत्य कुटुंबातील या तिघांशिवाय कोणालाही माहिती नाही आणि या तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झालाय त्यामुळे हे सत्य या कुटुंबा सोबतच संपलय.. महत्त्वाचं म्हणजे आत्महत्या करणार या तरुणांना याच डोंगरावर एक वर्षापूर्वी सुद्धा आत्महत्येचा प्रयत्न केला होता त्यावेळेस पोलिसांनी त्याची समजूत काढली होती आणि त्याला घरी नेलं होतं मात्र या डोंगरावर तब्बल वर्षभरानंतर येत या मुलांना आत्महत्य केली आहे.. आता आत्महत्येच्या कारणाबाबत पोलीस सखोल तपास करत आहे त्यातूनच सत्य बाहेर येईलच मात्र वडील आणि मुलाचं फारसं पटत नव्हतं प्रथमदर्शनी ही माहिती पुढे आली आहे..
0
0
Report
Advertisement
Advertisement

राहुल गांधी कार्यक्रम से पहले पुणे के CEOP कैंपस में NSUI-ABVP की भिड़ंत

Pune, Maharashtra:छाञों की गुंज या कार्यक्रमाच्या आदल्या राञीच पुण्यातील सीओईपी विद्यापीठ कँम्पसमध्ये एनएसयुआय आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांत जोरदार राडा झाला...काल राञी एनएयुआयच्या काही मुली सीईओपी कँम्पसमध्ये मुलींना उद्याच्या राहुल गांधीं च्या प्रोग्राम तुम्ही देखील यावे, असं आवाहन करायला गेल्या होत्या त्यावेळी त्यांना तिकडे कोंडून ठेवल्याची काँग्रेस कार्यकर्त्यात वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे काँग्रेस चे सर्वच नेते तिकडे धावले...त्याच दरम्यान मग अभाविप चा एका गट सीओईपी कॉलेजच्या गेट येऊन धडकला त्यातूनच कडक पोलीस बंदोबस्तात दोन्ही गटाकडून तुंबळ घोषणा युद्ध रंगल्याचं बघायला मिळाले..अशातच आता दोन्ही गटांकडून परस्परांना मारहाणीचे प्रकार घडल्याचा आरोप होतोय...यातल्याच दोन किरकोळ जखमी कार्यकर्त्यांना शेजारच्याच संचेती हॉस्पिटल भर्ती केलं असता काँग्रेस नेत्यांची फौज तिकडेही पोहोचली...एकूणच कायतर राहुल गांधी च्या प्रोग्राम आधीच ही अशी राडेबाजी झाल्याने दोन्ही बाजूंनी पुन्हा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात...
0
0
Report

अंबेगांव में आंगनवाड़ी सेविका के निलंबन पर घमासान; मसाला घोटाले की मांग तेज

Ambegaon, Maharashtra:शालेय पोषण आहाराच्या निकृष्ट दर्जाची पोलखोल करणाऱ्या आंबेगावमधील अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी यांच्यावरील निलंबनाची कारवी तत्काळ मागे घेण्याची मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे. 'चोर सोडून संन्याशाला फाशी' देण्याचा हा प्रकार असून, कारवाई सेविकांवर नाही तर निकृष्ट माल पुरवणारे कंत्राटदार आणि दर्जा तपासणाऱ्या अधिकाऱ्यांवर झाली पाहिजे, असा घणाघात त्यांनी केला आहे. आंबेगावपाठोपाठ जुन्नरमध्येही शालेय पोषण आहारात भेसळयुक्त मसाले आढळल्याचे सांगत, मुलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या गैरव्यवहाराची मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी करावी; अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही डॉ. कोल्हेंनी दिला आहे.
0
0
Report
Advertisement

झी २४ तास के दवाब पर रेश्मा पारधी की कार्रवाई वापस ली गई

Ambegaon, Maharashtra:अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना दिला जाणारा आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणाऱ्या आंबेगावच्या चास येथील अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी यांच्या वरती झालेल्या कारवाईचा मुद्दा झी 24 तास ने लावून धरल्यानंतर अखेर झी 24 तास च्या दणक्यानंतर पारधी यांच्यावरील बडतर्फीची कारवाई मागे घेण्यात आली असून झी 24 तास च्या जस्टीस देवयानी मोहिमेलायश आलं असून झी 24 तास शी बोलताना रेश्मा पारधी यांना अश्रू अनावर झाले असून पारधी यांनी झी 24 तास चे आभार मानलेत त्यांच्याशी एक्सक्लिझीव बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
0
0
Report

पुणे में MH12 खत्म, MH12 1A के साथ नया नंबर-प्लेट क्रम शुरू!

Pune, Maharashtra:एमएच १२' ही पुण्याची ओळख कायम राहणार वाहनांसाठी लवकरच नवी सिरीज ​पुणे: पुण्यातील वाहनांची ओळख असलेली ‘एमएच १२’ ही इंग्रजी अक्षरांची मालिका संपत आली असली, तरी पुणेकरांची ही हक्काची ओळख कायम राहणार आहे. त्यासाठी आता 'एम एच १२ १ ए' या नव्या मालिकेचा पर्याय समोर आला आहे. देशात प्रथमच वाहनांच्या नंबरप्लेटवरील अक्षरांच्या सिरीजमध्ये ‘अंक’ आणि ‘अक्षर’ यांचा एकत्रित वापर केला जाणार आहे. ​सध्या पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) ‘एमएच १२’ अंतर्गत शेवटची ‘झेड झेड’ ही सिरीज सुरू असून लवकरच ती संपणार आहे. ही मालिका संपल्यानंतर आरटीओकडे तीन अक्षरी सिरीज सुरू करणे शक्य नव्हते. त्यामुळे पुणे आरटीओने रस्ते व महामार्ग मंत्रालयाला 'एमएच १२' च्या पुढे '१ ए' अशी मालिका सुरू करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. ​तत्पूर्वी, नवीन मालिका सुरू होईपर्यंत वाहन खरेदी करणाऱ्या पुणेकरांना 'एमएच ६१' या आरटीओ कोडने वाहनांचे रजिस्ट्रेशन करून दिले जाईल. सणासुदीच्या मुहूर्तावर वाहन खरेदी करण्यास इच्छुक ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. काही काळानंतर या वाहनांना नव्या मालिकेत ट्रान्सफर करण्याची सुविधा किमान निर्धारित शुल्क आकारून उपलब्ध करून दिली जाणार आहे. सुरुवातीला 'एमएच ६१' या नव्या क्रमांकाची चर्चा सुरू झाल्यामुळे 'एमएच १२' ही पुण्याची ओळख पुसली जाण्याची शंका व्यक्त केली जात होती. ही बाब लक्षात घेत केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पुण्याची ही ओळख जपण्यासाठी पाठपुरावा केला. त्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यासंदर्भातील मसुदा लवकरच प्रसिद्ध केला जाणार असून त्यावर नागरिकांच्या हरकती सूचना मागवण्यात येणार आहेत. त्यानंतर नव्या मालिकेला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top