Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune413133

इंदापुर में कर माफी के साथ विकास कार्य, BJP का दावा; माने ने आभार जताया

JMJAVED MULANI
Mar 28, 2026 09:03:46
Rui, Maharashtra
इंदापुरातील शास्ती कर माफीसह मंजूर विकास कामांवर भाजपचा दावा...... भाजप नेते प्रवीण माने यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार Anchor _इंदापूर नगर परिषदेच्या शास्ती कर माफी सह भीमा नदीवरील चांडगाव ते पोमलवाडी 340 कोटी रुपयांचा नवीन पूल आणि क्रीडा संकुलाला मंजूर करण्यात आलेल्या 46 कोटी रुपयांच्या विकास कामावर भाजप नेते प्रवीण माने यांनी दावा केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ही विकास कामे मंजूर करण्यात आल्याचे म्हणत माने यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत।
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSATISH MOHITE
Mar 28, 2026 10:18:48
Nanded, Maharashtra:नांदेड जिल्ह्यात आजपासून 11 एप्रिल पर्यंत जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू करण्यात आली. 28 मार्चच्या सकाळी 6 वाजेपासून ते 11 एप्रिल 2026 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी नियमित आदेशाप्रमाणे हे आदेश लागू केले आहेत. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास गर्दी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीशेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना देण्यात आले आहेत.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 28, 2026 10:10:24
921
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 28, 2026 10:09:58
Kolhapur, Maharashtra:2017 च्या जनगणनेनंतर कोल्हापूर शहराची हद्दवाढ अटळ असल्याचा दावा कोल्हापूर शहराचे शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला आहे. जनगणनेनंतर मतदारसंघ आणि प्रभाग रचना बदलणे अनिवार्य असल्याने या तांत्रिक कारणामुळेच कोल्हापूर शहराची हद्दवाढ सध्या लांबणीवर पडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच दहा गावांचा समावेश करून हद्दवाढ करण्यास सर्वांची सहमती असल्याचा दावा देखील आमदार क्षीरसागर यांनी केला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेकडून हद्दवाढीचा प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्यात आला असून त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. कोल्हापूर शहरातील सर्किट हाऊस येथे हद्दवाढ, टेक्स्टाईल टुरिझम हब, कोल्हापूर-सांगली पूर नियंत्रण प्रकल्प, तसेच आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी क्षीरसागर यांनी कोल्हापूर शहर हद्दवाडी संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.
832
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 28, 2026 09:48:26
Akola, Maharashtra:महाराष्ट्रात सध्या गावयात्रांच्या हंगामाला सुरूवात झाली आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर गावात सिदाजी महाराजांची यात्रा आज पार पडली. या एकदिवसीय यात्रेला तब्बल 138 वर्षांची परंपरा आहे. दहीहंडीची वैभवशाली परंपरा असणारा हा उत्सव पातुरकरांसाठी जणू दिवाळीसारखाच. नेमकं कशी हैय पातूरच्या सिदाजी महाराजांची यात्रा?, काय आहेय या यात्रेच्या परंपरा?, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी चला फेरफटका मारूयात पातूरच्या या जत्रेत. सायंकाळी सिदाजी महाजारांची पालखी गावातून काढण्यात येते पालखी उचलण्याचा मान भोई समाजाला दिला गेला आहे.यानंतर संपूर्ण गावा करिता भांडाऱ्याच आयोजन करण्यात येते यासाठी मोठी तयारी केली जाते.या करिता पहाटे पासून याची जय्यत तयारी सुरू केली जाते.ही यात्रा म्हणजे पातूरकरांनसाठी जणू दिवाळी..
886
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 28, 2026 09:37:46
1056
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 28, 2026 09:37:20
Beed, Maharashtra:बीड : परळी बसस्थानकात धक्कादायक घटना; अनोळखी महिलांकडे मुलगी देऊन आई पसार परळी बसस्थानक परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या दीड वर्षाच्या चिमुकलीला बसस्थानकात अनोळखी महिलांच्या ताब्यात देऊन माता फरार झाल्याची घटना घडली आहे. “मी बाथरूमला जाऊन येते, तोपर्यंत मुलीला सांभाळा,” असे सांगून त्या महिलेने दोन प्रवासी महिलांकडे मुलीला सोपवले आणि तिथून काढता पाय घेतला. मात्र बराच वेळ उलटूनही ती महिला परतली नाही. बसस्थानक परिसरात शोध घेऊनही तिचा कोणताही पत्ता लागला नाही. अखेर या प्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्या मातेचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे... दरम्यान बसस्थानक बांधकामाचे काम सुरू असल्याने सीसीटीव्ही नाहीयेत, त्यामुळे या मातेचा शोध घेणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे आहे.
1038
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 28, 2026 09:20:18
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूरातील शाहू मिल सुरू होण्यासाठी आज खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या कार्यालयात लोकप्रतिनिधींसह आंदोलकांची बैठक पार पडली. या बैठकीला खासदार शाहू महाराज छत्रपती, कोल्हापूर शहराचे आमदार राजेश क्षीरसागर, शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे आणि हातकणंगलेचे आमदार अशोक माने उपस्थित होते. आज झालेल्या बैठकीत शाहू मिल शासनाने चालवावी यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येत सरकार दरबारी पाठपुरावा करून शाहू मिल पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. तर आमदार राजेश क्षीरसागर यांनी शाहू मिलच्या जागेवर शाहू महाराजांचे स्मारक उभारण्याबरोबरच मिल पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरendanceा करू असे स्पष्ट केले.
989
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 28, 2026 09:04:02
Malegaon, Maharashtra:वणी गडावर जाणाऱ्या भाविकांसाठी मालेगावात पोलिसांचा मोठा फौज फाटा... उद्या खानदेशातून मालेगावात येणाऱ्या देवीच्या मानाच्या रथाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त... शहरात 280 होमगार्ड, एक एस आर पी प्लाटून, 378 पोलीस अंमलदार, 42 पोलीस अधीकारी त्या सोबत RTO टीम, महामार्ग वाहतूक शाखा व स्थानिक पोलीस असा फौज फाटा तैनात शहरातील मुख्य ठिकाणी CCTV कॅमेऱ्यांची नजर... ANC: आद्य शक्ती पीठ नाशिकच्या वनी सप्तशृंगी गडावर लाखो भाविक पायी जात नतमस्तक होत असतात. खानदेशातून मोठ्या संख्येने भाविक मालेगाव मार्गे वणी गडावर पायी जात असतात. मालेगाव शहर संवेदनशील असल्याकारणाने पोलिसांना विशेष मोठी जबाबदारी पार पाडावी लागत असल्याने उद्या मानाच्या रथांचे आगमन खानदेशातून होत मालेगाव मार्गे गडावर जात आहे. त्यासाठी शहरात 280 होमगार्ड, एक एस आर पी प्लाटून, 378 पोलीस अंमलदार, 42 पोलीस अधीकारी त्या सोबत RTO टीम, महामार्ग वाहतूक शाखा व स्थानिक पोलीस असा फौज फाटा तैनात केला असून शहराच्या मुख्य चौक, रस्ते याठिकाणी 20 CCTV कॅमेऱ्यांची नजर असणार आहे.
1051
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 28, 2026 08:21:57
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शताब्दी वर्षाचा मोठ्या उत्साहात शुभारंभ... अँकर - सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा शताब्दी वर्ष पार पडत आहेत.शताब्दी वर्ष महोत्सव निमित्ताने जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून विविध कार्यक्रमांचे वर्षभर आयोजन करण्यात आले आहे.शताब्दी वर्षाच्या शुभारंभ निमित्ताने बोध चिन्हाचे उद्घाटन करत केक कापत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 100 सोसायटींच्या संचालकांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला. तसेच शताब्दी वर्षाचा प्रारंभ म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने सांगली शहरातून बाईक रॅली काढून करण्यात आला. ज्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्यासह आजी-माजी आमदार ,माजी मंत्री व बँकेचे संचालक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. साऊंड बाईट - मानसिंगराव नाईक - ,अध्यक्ष ,जिल्हा मध्यवर्ती बँक,सांगली.
1089
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Mar 28, 2026 08:20:47
Buldhana, Maharashtra:बुलढाणा.. माहितीच्या अधिकाराचे मी हिजडे धंदे करत नाही, तुम्ही तुमच्या घरात चौकशी करा, हे कोण करत आहे म्हणून.. आमदार संजय गायकवाड यांची पुन्हा एकदा आमदार श्वेता महालेवर टीका.. आमचे सरळ काम आहे, छातीला छाती भिडवायचे आणि विषय खातम करायचा , मागून पाठीत खंजीर खुपसायचे आम्हाला जमत नाही .. तर आम्ही पण पाहणार , कोणाला धमकी देणार, कोणाला जेलमध्ये घालणार, आमच्या पण कानावर आहे आमदार काय करतात, मी काही घरातला आमदार नाही.. एकप्रकारे आमदार महाले यांना आव्हान दिले. Anchor - मी पण एक आमदार आहे, महाराष्ट्रात देशांत माझे नाव आहे, पण एक माणूस सांगणार नाही की आमदार गायकवाड यांचा त्रास आहे म्हणून . चिखलीच्या आमदार म्हणतात की आमदार गायकआड यांनी माहितीच्या अधिकार टाकून सरपंचावर दबाव आणून प्रवेश घेतला . मात्र माहितीच्या अधिकारासारखे मी हिजडे धंदे कधीच करत नाही. हे मी नाही करत, तुम्ही तुमच्या घरात चौकशी करा ,कोण करता आहे ते, आमचे सरळ सरळ काम आहे , छातीला छाती भिडवायची आणि विषय खातम करायचा, मागून पाठीत खंजीर खुपसायचा आम्हाला जमत नाही.. अशाप्रकारची टीका पुन्हा एकदा आमदार संजय गायकवाड यांनी श्वेता महालेवर केली .. दोन दिवसांपूर्वााही आमदार गायकवाड यांनी आमदार महालेवर वादग्रस्त वक्तव्य केले होते.. त्याला उत्तर देत आमदार महाले यांनी सुद्धा आमदार गायकवाड हे दबाव टाकून प्रवेश करून घेत असल्याचे म्हटले होते. (1. ते 1.10 पर्यंत.. ) आम्ही चिखली मध्ये आलो ते आमचा पक्ष वाढवण्यासाठी, खासदार यांना कमी पडलेली मात्र वाढवण्यासाठी, जिल्हा परिषद चे जागा जिंकण्यासाठी. चिखली तालुक्यात माझे असंख्य नातेवाईक , पण माझ्याविषयी त्यांनी काही चागले पोस्ट केले त्याला धमकी देतात. आमच्या शिवसैनिकाला धमकी देतात. आतापर्यंत पाच सहा वेळा आमच्या शिवसैनिकांनी भाजपा आमदार निवडून आणला, आताही आणला, आणि त्याने काही काम सांगितले की त्याला म्हणताय आमच्या पक्षात प्रवेश घ्या, कोणत्याही कार्यकर्त्याने काम सांगितले की त्याला पक्ष सोडा म्हणतात. आमची बाळासाहेबांची शिवसेना आहे . शिवसेना चिरडायला निघत असेल तर आम्ही तो त्रास दूर करायला आलो आहे, विधानसभा लढायला नाही. आता आम्ही पण पाहणार , कोणाला धमकी देणार, कोणाला जेलमध्ये घालणार, आमच्या पण कानावर आहे आमदार काय करतात, मी काही घरातला आमदार नाही.. (१.१० ते ८.१० पर्यंत.) साउंड बाई ट संजय गायकवाड, आमदार .
1062
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 28, 2026 08:04:54
Navi Mumbai, Maharashtra:तालुक्यातील वर्चस्व्याला धक्का बसल्याने डीडीएसआर ग्रुप वर गोपीचंद पडळकरांचे बिनबुडाचे आरोप. आमदार गोपीचंद पडळकर यांनी नवी मुंबईतील डीडीएसआर ग्रुप बाबत केलेल्या गैरकारभाराच्या आरोपांचे डीडीएसआर ग्रुप तर्फे खंडन करण्यात आलेय. आम्ही आता पर्यंत सर्व काम नियमात केले असून अनेक इमारती उभ्या करुन नागरिकांना घरे दिली आहेत. गोपीचंद पडळकर यांचे आटपाडी तालुक्यातील वर्चस्व धोक्यात आल्याने त्यांनी हे बिनबुडाचे आरोप केले असून याआरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. आमच्या विरोधात कोणते पुरावे असल्यास त्यांनी समोर आणावे अन्यथा चौकशी अंती क्लीनचिट मिळाल्यावर मानहानीचा दावा दाखल करू असा इशारा यावेळी डीडीएसआर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक राहूल हजारे यांनी दिलाय.
1068
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 28, 2026 07:46:45
Pandharpur, Maharashtra:चैत्र वारीसाठी आलेल्या वारकऱ्यांना गॅस सिलेंडर टंचाई, वारकऱ्यांनी तीन दगड गोळा करून स्वयंपाकासाठी पेटवल्या चुली मध्य पूर्व मधील युद्ध परिस्थिती कायम असल्याने गॅस सिलेंडर टंचाई सुरू आहे. याचा फटका आता चैत्र वारीसाठी आलेल्या वारकऱ्यांना बसला आहे. चैत्र वारी साठी अनेक दिंड्या आज पंढरपूर मधील भक्ती सागर परिसरात दाखल झाल्या आहेत. या ठिकाणी एक दृश्य दिसत आहे. दिंड्या मधील महिलांनी स्वयंपाकासाठी चुली मांडल्या आहेत. याच चुलीवर त्यांनाच स्वयंपाक सुरू आहे. गॅस टंचाई मुळे सिलेंडर उपलब्ध झाले नाही. त्यामुळे स्वयंपाक करण्यासाठी सरपण विकत घेऊन, गोळा करून चुली पेटवण्याची आणि स्वयंपाक करण्याची वेळ वारकऱ्यावर आली आहे.
1048
comment0
Report
Advertisement
Back to top