Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

येवलाला में नगरपरिषद चुनाव: नामांकन तेज, नगराध्यक्ष के लिए पार्टी का नामांकन अभी शेष

SKSudarshan Khillare
Nov 16, 2025 10:19:40
Yeola, Maharashtra
येवला शहरात आगामी नगरपरिषद निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सातव्या दिवशी आणखी वेगवान झाली आहे. निवडणूक विभागाच्या कार्यालयात आज उमेदवारांची मोठी गर्दी उसळली. विविध प्रभागांसाठी नगरसेवकपदाच्या उमेदवारांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले. मात्र, या गजबजलेल्या वातावरणातही नगराध्यक्ष पदासाठी राजकीय पक्षाचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने उत्सुकता आणि सस्पेन्स कायम आहे. या बाबत आढावा घेतला आहे.
104
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Nov 16, 2025 11:47:33
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - गुंड आणि मोका लागलेल्या लोकांच्या हातात शहर देऊ नका,ईश्वरपूरकरांना साद घालत,जयंत पाटलांचा महायुतीवर निशाणा... अँकर - गुंड आणि मोका लागलेल्या लोकांच्या हातात शहर देऊ नका,असे विधान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी केले आहे. सांगलीच्या उरुण ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकी तील प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते किशोर पूर नगर परिषदेसाठी महायुतीकडून गुंड,मोका लागलेल्या लोकांना उमेदवारी दिली जात असल्याचा अप्रत्यक्ष आरोप देखील जयंत पाटलांनी,यावेळी करत ईश्वरपूर शहराला, अशा लोकांचा विळखा पडू नये,याची खबरदारी ईश्वरपुरकर घेतील,असे देखील जयंत पाटलांनी स्पष्ट केले आहे.जयंत पाटील यांच्या बालेकिल्ला असणाऱ्या ईश्वरपूर मध्ये जयंत पाटलांच्या विरोधात महायुती एकवटली आहे.तर नगर परिषदेसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार आनंदराव मलगुडे यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ पार पडला,यावेळी जयंत पाटलांनी महायुतीवर ही टीका केली आहे.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 16, 2025 11:47:17
Nashik, Maharashtra:वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये आज नाशिक शहराजवळील पेठ भागामध्ये सव्वा लाख वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ती सोहळा साजरा करण्यात आला. रामानंदचार्य नरेंद्र महाराज यांच्या उपस्थितीत शेकडो भाविकांच्या साक्षीने आपल्या आईच्या नावाने एका वृक्षाची लागवड करण्याची मोहीम पूर्ण झाली. याचा डिजिटल डेटा आणि जीपीएस लोकेशन सह अत्याधुनिक ॲप मध्ये झाडाच्या वाढीची माहिती ठेवण्यात येणार आहे. - एक पेड माँ के नाम. - झाड लावताना आणि झाड संगोपन याचे फोटो काढणार - दरवर्षी झाड लावले त्यांचा सन्मान करू, झाड संगोपन यांची नोंद ठेवली जाणार. - वेब साईट वर माहिती देऊ, ही घोषणा नाही तर आम्ही त्याचा डाटा देणार - कुंभमध्ये आम्ही येणाऱ्या साधू महंतांना वृक्ष लागवड चे आवाहन करणार
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 16, 2025 11:31:17
Nashik, Maharashtra:ऑन अहिल्यानगर बिबट्या anchor अहिल्यानगर मध्ये एक नरभक्षक बिबट्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ठार मारला आहे. केंद्र सरकारच्या कायद्यानुसार बिबट्यांना गोळी घालून ठार मारणे निषेधार्थ आहे मात्र आवश्यक तिथे मारण्याची परवानगी आहे. साध्या खूप संख्या बिबट्याची वाढ झाली आहे; जसे कुत्रे फिरतात तसे बिबट्या वाढतील. उद्या लोक बिबट्यांना पळायला कमी करणार नाही इतकी मोठी संख्या होईल. आज जे हल्ले झाले ते दुःखद आहेत; उद्या पुण्यात होणारी बैठकमध्ये नाशिक, अहिल्यानगर नाशिक येथे होणाऱ्या बिबट्याची दहशत यावर सविस्तर चर्चा करणार आहेत. AI च्या माध्यमातून यंत्रणा उभी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 16, 2025 11:19:46
Bhandara, Maharashtra:गोंदियाची दुर्दशा पाहून इथे चांगला प्रशासन देणाऱ्या व्यक्ती आणि पक्ष हवा. अरे राष्ट्रवादी तो पक्ष आहे: प्रफुल पटेल गोंदिया नगरपरिषद मी स्वतः सात वर्ष अध्यक्ष पदावर राहिलेलो आहो, माझे वडील पंचवीस वर्ष गोंदिया नगरपालिकेचे अध्यक्ष होते. म्हणून आम्हाला गोंदिया शहरांची काळजी वाटते. मला वाटते की गोंदियाचा विकास उत्तम रित्याने व्हायला पाहिजे. गोंदियाचे दुर्दशा पाहून इथे चांगलं प्रशासन देणारा व्यक्ती आणि पक्ष असे असायला पाहिजे. आणि तो असं वाटते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. मुंबईमध्ये काँग्रेसने स्वबळावर लढण्याच्या निर्णय केला असून मनसे आणि महाविकास आघाडी युती करणार आहे या प्रश्नावर प्रफुल पटेल यांची प्रतिक्रिया. ज्याप्रमाणे मुंबईत अशी चर्चा रंगली आहे की मनसे आणि महाविकास आघाडी एकत्र लढत असताना काँग्रेसने जी भूमिका घेतली यावर तुमचं काय मत आहे.. यावर प्रफुल पटेल म्हणाले की महाराष्ट्र मध्ये काँग्रेसची अवस्था आयसीयू मध्ये असल्यासारखी, प्रफुल पटेल यांच्या टोला काँग्रेस पक्ष आता काय अवस्था मध्ये आहे हे आपल्याला बिहारच्या निवडणुकीनंतर बिल्कुल स्पष्ट झालेला आहे महाराष्ट्र मध्ये पण एका काळात काँग्रेस पक्ष स्वबळावर महाराष्ट्रात राज करत होती , आम्ही जुनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आम्ही अनेक वर्ष सत्तेवर होतो पण आज काँग्रेसची अवस्था आयसीयू ची आहे. महाराष्ट्र मध्ये त्यांनी किती लोक निवडून आले ते तुम्ही बघितलं.16लोक निवडून आलेत. महाराष्ट्रात जे आले तेही जेमतेम निवडून आले आहेत. काँग्रेसचे सगळे नेते विस्कळीत होत आहेत. काँग्रेस आणि काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर लोकांच्या विश्वास राहिलेला नाही., आणि बिहारमध्ये ही अगदी स्पष्ट झाला आहे. बिहारमध्ये सुद्धा स्वतःच्या स्वबळावर काँग्रेसचे सत्ता केली होती, आता मात्र त्या सहा जागा जेमतेम मिळालेले आहेत. बिहार मध्ये काँग्रेसचे किती लढून किती निवडून आले हे सुद्धा विचार करण्याची गरज आहे. डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा, पक्षांतर्गत गटबाजी मुळे प्रफुल पटेल यांचे प्रतिक्रया स्थानिक स्तरावर थोडी राजी नाराजी असते, तुम्हीच बघा आता नगरपालिका निवडणुकीत किती लोक इच्छुक असतात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे आणि बीडमध्ये सुद्धा आहे, काही नाराजी असेल तर त्या भागातले नेते आमचे प्रांत अध्यक्ष नक्कीच काही योग्य मार्ग काढतील. प्रफुल पटेल ON पार्थ पवार पार्थ पवार संदर्भात मुख्यमंत्री आणि चौकशीचे आदेश दिलेले आहे, बाकीचे माहिती गोळा करण्यास सुद्धा दुसरी कमिटी तयार करण्यात आलेली आहे, त्या संदर्भातच काही दिवसांनी समोर येणारच गोंदिया भंडाराच्या सगळ्यात जागा आम्ही लढवणार, नगराध्यक्ष जागा सुद्धा आम्ही लढवणार आहे.: प्रफुल पटेल आमचा पक्ष चांगला रीतीने सर्व निवडणूक लढण्याकरता तयार आहे, गोंदिया भंडाराच्या सर्व जागा आम्ही लढवण्या सोबतच नगराध्यक्ष पदाच्या जागा सुद्धा आम्ही लढवल्याला तयार आहोत. गोंदिया भंडाराच्या लोकांना राष्ट्रवादीने प्राथमिक पटेल यांच्या बद्दल जास्त सांगण्याची गरज नाही. गोंदिया भंडाराच्या निवडणूक आम्ही स्वयंमबळावर लढवणार, मात्र युतीधर्म सुद्धा पाळणार: प्रफुल पटेल यांची ग्वाही Anchor: गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या नगरपालिका नगरपंचायत च्या निवडणुका आम्ही राष्ट्रवादी म्हणून जवळपास लढाईच्या ठरवलेला आहे एखादा ठिकाणी युती ची शक्यता मात्र त्याही स्वबळावर लढणार ,महायुती चा धर्म सुद्धा आम्ही पाळतात ,नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात मध्ये काम करत असताना जे काही या निवडणुकीमध्ये निकाल जसा लागेल त्याच्यानंतरही आम्ही आमचे मित्र पक्ष आहे त्यांच्याबरोबर कसं जुळता येणार त्याच्याही आम्ही विचार करणार. अजित पवार यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतली. आणि पार्थ पवार संदर्भात चर्चा झाली का? या संदर्भात प्रफुल पटेल यांचे प्रतिक्रिया. अजित पवार दिल्लीला ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला त्याकरता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गेले होते, त्याच दिवशी बिहारचा निकाल लागला , त्यामुळे अभिनंदन कळाला त्यावेळेस अजित पवार तिथे गेले होते. किती कोणतीही दुसरी चर्चा झाली आहे असं मला काही वाटत नाही.. गवळी कुटुंब्लातील तिसरी पिढी पालिका निवडणुकीत रिंगणात.. प्रफुल पटेल यांचे प्रतिक्रिया.. भारत एक लोक तांत्रिक देश आहे, सगळ्यांना लढण्याचा अधिकार आहे आणि नियम पण बनले आहे की कोण लढू शकतो आणि कोण नाही लढू शकत, नियमात बसत असतील तर सगळ्यांना अधिकार आहे, आणि ते जनतेला ठरवायचे आहे कोणाला निवडून आणायचा आहे. उमेदवारांबद्दल आज संध्याकाळपर्यंत होणार चित्र स्पष्ट: प्रफुल पटेल राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष पदाकरता महिला उमेदवाराला संधी देण्याची चर्चा जोरात रंगली असून, आज संध्याकाळपर्यंत गोंदिया भंडारा दोन्ही जिल्ह्यातील उमेदवारांच्या नावांच्या स्पष्ट होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
47
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 16, 2025 11:07:55
Kalyan, Maharashtra:निळजे रेल्वे ओव्हरब्रिज पुनर्बांधणीसाठी पाच महिन्यांचे वाहतूक निर्बंध. ठाणे वाहतूक विभागाची नवी अधिसूचना जाहीर Anc...निळजे रेल्वे ओव्हरब्रिजची उंची कमी असल्याने वरील डबल डेकर कंटेनर वाहतुकीस अडथळा येत होता. हा अडथळा दूर करण्यासाठी ब्रिजच्या पुनर्बांधणीची महत्त्वपूर्ण कामे टाटा कंपनीने आजपासून सुरू होत असून ती ३१ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहेत. या कालावधीत परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेता ठाणे शहर वाहतूक उपविभागाने व्यापक वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे. कल्याण ग्रामीण चे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते नवीन ब्रिजच्या पुनर्बांधणीच्या कामाचे नारळ फोडून सुरवात केली आहे. पोलीस उप-आयुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांनी मोटार वाहन कायदा कलम 115 व 116 (1)(अ)(ब) अंतर्गत विविध रस्त्यांवर प्रवेशबंदी आणि पर्यायी मार्ग लागू करण्याचे आदेश दिले आहेत. 1. कल्याण → शिळफाटा निळजे कमानजवळून सर्व वाहनांना प्रवेशबंद. पर्यायी मार्ग : निळजे कमान → उजवीकडे लोढा पलावा वाहीनी → महालक्ष्मी हॉटेल → पुढे इच्छित स्थळी. 2. लोढा पलावा / कासाबेला / हेवन / एक्सपिरिया मॉल → कल्याण निळजे ब्रिज चढणीवरून कल्याणकडे जाणारा मार्ग बंद. पर्यायी मार्ग : कल्याण–शिळ रोड → शिळफाटा → देसाई खाडी ब्रिज → सरस्वती टेक्सटाईल → यू-टर्न → पलावा फ्लायओव्हर. 3. मुंब्रा / कल्याण फाटा → कल्याण (६ चाकी व जड वाहने) कल्याण फाटा येथे प्रवेशबंद. पर्यायी मार्ग : शिळफाटा → मुंब्रा बायपास → खारेगाव टोलनाका. 4. कल्याण → मुंब्रा / कल्याण फाटा (६ चाकी व जड वाहने) काटई (बदलापूर) चौक येथे प्रवेशबंद. पर्यायी मार्ग : काटई चौक → खोणी नाका → तळोजा MIDC. 5. तळोजा MIDC / नवी मुंबई → काटई चौक (६ चाकी व जड वाहने) खोणी नाका, निसर्ग हॉटेल येथे प्रवेशबंद. पर्यायी मार्ग : निसर्ग हॉटेल → उजवे वळण → बदलापूर पाईपलाइन → नेवाळी. 6. अंबरनाथ / बदलापूर → काटई चौक (६ चाकी व जड वाहने) खोणी नाका येथे प्रवेशबंद. पर्यायी मार्ग : खोणी नाका → डावे वळण → तळोजा MIDC. हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग मुंबई/नवी मुंबई → कल्याण : दिवा–संदप रोड → मानपाडा → कल्याण–शिळ रोड ठाणे/मुंबई → कल्याण : मानकोली–मोटागाव–डोंबિવली मार्ग किंवा रांजनोली–कोनगाव–कल्याण मार्ग कल्याण/डोंबिवली/उल्हासनगर → मुंबई/नवी मुंबई : चक्कीनाका → श्री मळगाई पेड → नेवाळी → बदलापूर पाईपलाईन → तळोजा MIDC कल्यान/डोंबिवली → ठाणे/मुंबई : डोंबिवली → मोटागाव → मानकोली → दुर्गाडी → कोनगाव → नाशिक–मुंबई १६ नोव्हेंबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ या निर्बंधांमधून पोलीस वाहने, रुग्णवाहिका, अग्निशामक दल आणि इतर अत्यावश्यक सेवा वाहनांना सूট असेल. निळजे ब्रिजवरील पुनर्बांधणीमुळे कल्याण–शिळ रोडवरील वाहतूक काही महिन्यांसाठी मोठ्या प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी प्रवासाची पूर्वतयारी करून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
23
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 16, 2025 11:02:38
Kalyan, Maharashtra: Nilje रेल्वे ओव्हरब्रिज पुनर्बांधणीसाठी पाच महिन्यांचे वाहतूक निर्बंध. ठाणे वाहतूक विभागाची नवी अधिसूचना जाहीर Anc...निळजे रेल्वे ओव्हरब्रिजची उंची कमी असल्याने वरील डबल डेकर कंटेनर वाहतुकीस अडथळा येत होता. हा अडथळा दूर करण्यासाठी ब्रिजच्या पुनर्बांधणीची महत्त्वपूर्ण कामे टाटा कंपनीने आज पासून सुरू होत असून ती ३१ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहेत. या कालावधीत परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेता ठाणे शहर वाहतूक उपविभागाने व्यापक वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे. कल्याण ग्रामीण चे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते नवीन ब्रिजच्या पुनर्बांधणीच्या कामाचे नारळ फोडून सुरवात केली आहे. पोलिस उप-आयुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांनी मोटार वाहन कायदा कलम 115 व 116 (1)(अ)(ब) अंतर्गत विविध रस्त्यांवर प्रवेशबंदी आणि पर्यायी मार्ग लागू करण्याचे आदेश दिले आहेत. 1. कल्याण → शिळफाटा निळजे कमानजवळून सर्व वाहनांना प्रवेशबंद. पर्यायी मार्ग : निळजे कमान → उजवीकडे लोधा पलावा वाहीनी → महालक्ष्मी हॉटेल → पुढे इच्छित स्थळी. 2. लोढा पलावा / कासाबेला / हेवन / एक्सपिरिया मॉल → कल्याण निळजे ब्रिज चढणीवरून कल्याणकडे जाणारा मार्ग बंद. पर्यायी मार्ग : कल्याण–शिळ रोड → शिळफाटा → देसाई खाडी ब्रिज → सरस्वती टेक्सटाईल → यू-टर्न → पलावा फ्लायओव्हर. 3. मुंब्रा / कल्याण फाटा → कल्याण (६ चाकी व जड वाहने) कल्याण फाटा येथे प्रवेशबंद. पर्यायी मार्ग : शिळफाटा → मुंब्रा बायपास → खारेगाव टोलनाका. 4. कल्याण → मुंब्रा / कल्याण फाटा (६ चाकी व जड वाहने) काटई (बदलापूर) चौक येथे प्रवेशबंद. पर्यायी मार्ग : काटई चौक → खोणी नाका → तळोजा MIDC. 5. तळोजा MIDC / नवी मुंबई → काटई चौक (६ चाकी व जड वाहने) खोणी नाका, निसर्ग हॉटेल येथे प्रवेशबंद. पर्यायी मार्ग : निसर्ग हॉटेल → उजवे वळण → बदलापूर पाईपलाईन → नेवाळी. 6. अंबरनाथ / बदलापूर → काटई चौक (६ चाकी व जड वाहने) खोणी नाका येथे प्रवेशबंद. पर्यायी मार्ग : खोणी नाका → डावे वळण → तळोजा MIDC. हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग मुंबई/नवी मुंबई → कल्याण : दिवा–संदप रोड → मानपाडा → कल्याण–शिळ रोड मानकोली–मोटागाव–डोंबिवली मार्ग किंवा रांजनोली–कोनगाव–कल्याण मार्ग कल्याण/डोंबिवली/उल्हासनगर → मुंबई/नवी मुंबई : चक्कीनाका → श्री मळगाई पेड → नेवाळी → बदLLापूर पाईपलाईन → तळोजा MIDC कल्याण/डोंबिवली → ठाणे/मुंबई : डोंबिवली → मोटागाव → मानकोली → दुर्गाडी → कोनगाव → नाशिक–मुंबई १६ नोव्हेंबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ या निर्बंधांमधून पोलीस वाहने, रुग्णवाहिका, अग्निशामक दल आणि इतर अत्यावश्यक सेवा वाहनांना सूट असेल. निळजे ब्रिजवरील पुनर्बांधणीमुळे कल्याण–शिळ रोडवरील वाहतूक काही महिन्यांसाठी मोठ्या प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी प्रवासाची पूर्वतयारी करून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
43
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Nov 16, 2025 10:36:15
Parbhani, Maharashtra:अँकर- हरिनामाचा व्यासंग लागलेल्या पांडुरंग नावाच्या एका कुत्र्याचे अकाली निधन झाल्याने सार गाव हळहळल,आज ही या गावातील नागरिकांना अश्रू अनावर होत आहेत. या श्वानाची उतराई म्हणून ग्रामस्थांनी टाळ मृदुंगाच्या गजरात वाजत गाजत या श्वानाची अंत्ययात्रा काढली आणि गावातील मंदिराच्या पाठीमागे त्यांचा दफनविधी केला. या कलियुगात वृद्ध आई वडिलांना अनाथ आश्रमात टाकण्याची स्पर्धा लागली असतांना हे गावकरी मात्र एका कुत्र्यासाठी का हळहळ व्यक्त करीत आहेत,बघुयात हा खास रिपोर्ट या गावावर शोककळा पसरलीय,त्यामुळे गावातील लोक असे सुन्न झाले आहेत. गावातील विष्णू मांडे यांनी एका कुत्र्याच्या पिल्याची आई मरण पावल्या नंतर तिच्या एका पिल्याचा सांभाळ केला,त्याच्या घरच्या लोकांनी या कुत्र्याचे पांडू असे नाव ठेवले,सदर कुत्रा अतिशय इमानदार होता, घराच्या रखवाली बरोबर मांडे यांच्या आजारी मुलाचा तो सांभाळ करायचा,पण त्याला अध्यात्माचा व्यासंग लागला. माणोली गावात दररोज सकाळी 4 वाजता अध्यात्मिक प्रभात फेरी काढण्याची प्रथा आहे त्यात तो सहभागी होत असे, सकाळी मंदिरातील घंटा वाजला की तो मंदिरात यायचा, कीर्तन,प्रवचन,हरिपाठाचा पांडूला लळा लागला होता,तो तासन्तास तेथे बसून राहत असल्याने आणि धार्मिक कार्यक्रमांना हजेरी लावत असल्याने येथील ग्रामस्थानी त्याला पांडूरंगाच्या नावाने हाक मारायला सुरुवात केली. पण अज्ञात वाहनांच्या धडकी पांडुरंगाचा अपघात झाला, त्याला वाचवण्याचा ग्रामस्थानी खूप प्रयत्न केला,पण पांडुरंगाला वाचविण्यात यश आले नाही. त्यामुळे ग्रामस्थांच्या डोळ्यातील अश्रू थांबायचं नाव घेत नाहीये, पांडुरंगाला माणसाचा ला माणसांचा लळा लागला होता,गावात कुणाचा अंतविधी असेल तर तो तिकडे हजर असायचा,धार्मिक कार्यक्रमात त्याची आवर्जून उपस्थिती असायची,गावातील प्रत्येकाचा तो लाडका झाला होता,पण त्याच्या अश्या एकाएकी जाण्याचा ग्रामस्थांना धक्का बसलाय, गावातील नागरिकांनी पांडुरंगाच्या अंत्यविधीला मोठी गर्दी केली होती, टाळ मृदुंगासह दिंडी काढीत गावकर्यांनी त्याला अखेरचा निरोप देत,गावातील मंदिराच्या पाठीमागेच त्याचा दफणविधी केला. पांडुरंग हा गावकऱ्यांचा खूप लाडका होता,रखवाली बरोबरच तो अनेक अनपेक्षित मदत ग्रामस्थांना करायचा, त्यामुळे गावकऱ्यांना त्याचा लळा लागला होता,आजच्या युगात वृध्द आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवीन्याची स्पर्धा लागलेली असतांना माणोली गावकर्यांनी दाखवलेली श्वानाप्रतीची ही माया अनेकांची मन जिंकणारी अशीच आहे.
57
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 16, 2025 10:32:49
Washim, Maharashtra:वाशीम: ॲंकर:नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर मतदार जागृतीसाठी वाशीम शहरात उपक्रमांना सुरुवात झाली आहे.श्री बाकलीवाल विद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेतर्फे ‘एका मताचे सामर्थ्य’ या विषयावर पोस्टर निर्मिती व पत्रलेखन स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी मतदानाचे महत्व दर्शवणारी आकर्षक पोस्टर्स व पत्रे तयार करून मतदार जागृतीचा संदेश दिला.‘एक मत बदलू शकते भविष्य’,‘मतदान हा हक्क नव्हे तर कर्तव्य’ अशी प्रभावी घोषवाक्ये विद्यार्थ्यांच्या पोस्टर्समध्ये झळकली.प्रशासनाने २ डिसेंबर रोजी मतदान करून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन केले असून वाशीमकरांच्या सहभागातून व्यापक जनजागृती होण्याची अपेक्षा व्यक्त केली.या कार्यक्रमास सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार निलेश पळसकर,मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गायकवाड यांसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
80
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 16, 2025 10:31:25
Chendhare, Alibag, Maharashtra:स्लग - सुनील तटकरे यांना भरत गोगावले यांचा मोठा धक्का ...... होम पीच रोह्यात राष्ट्रवादीत पडझड ..... माजी उपनगराध्यक्षा शिल्पा धोत्रे यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी ........ समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश ....... अँकर - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे होम पीच असलेल्या रोह्यात मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिलाय. रोहा शहराच्या माजी उपनगराध्यक्षा शिल्पा धोत्रे यांच्यासह माजी नगराध्यक्ष लालताप्रसाद कुशवाह यांनी आज आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केलाय. मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शिल्पा धोत्रे यांना रोहा नगर परिषदेसाठी शिवसेनेतर्फे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली. शिल्पा धोत्रे या सुनील तटकरे यांच्या अत्यंत निकटवर्ती म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला रोह्यात मोठा धक्का बसल्याचे मानलं जात आहे. बाईट १ - भरत गोगावले, मंत्री बाईट २- शिल्पा धोत्रे
111
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 16, 2025 10:31:08
Latur, Maharashtra:अतःिवृष्टीच्या अनुदानाबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी सुरु असतानाच दुसरीकडे दोन दिवसांपूर्वी जाहीर रब्बीसाठीच्या हेक्टरी दहा हजाराच्या अनुदानाचा घोळ झाला आहे.अनुदानाबाबतचा निर्णय प्रशासनातील अधिकाऱ्यांना नीट समजून न आल्यामुळे काही भागात शेतकऱ्यांना बाधित क्षेत्राच्या शंभर टक्के तर काही भागात साठच टक्के अनुदान खात्यावर जमा झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला असून उर्वरित चाळीस टक्के अनुदान आता मिळणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून लवकरच सर्व अनुदान जमा होईल, असे शेतकऱ्यांना आश्वस्त करण्यात येत आहे.
137
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 16, 2025 10:19:20
Nashik, Maharashtra:- तीस दिवसांमध्ये १लाख ११ हजार ४२४ झाडं लावली - पुढच्या काळात उष्माघाताने लोक मरतील, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते - आज वृक्ष लागवड करण्याची गरज - आज नरेंद्र महाराज यांच्या दक्षिणपीठ येथे होणार हा उपक्रम चांगला - हे साधू महंत जनजीवन वाचावे यासाठी काम करत आहे. - माझे आणि नरेंद्र महाराज यांची जुनी ओळख - भारताचा अनुकरण इतर देश करता - कोळसा जाळण्याची गरज भविष्यात राहणार नाही, तसा कायदा येईल - इलेक्ट्रिक वाहन हाच पर्याय - हा कायदा होईल, - देशाचे नेतृत्व नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते, एक पेड माँ के नाम तसा हा उपक्रम - विश्व वाचावे हा उपक्रम राबवला त्याचे आभार - वृक्ष तोड हे योग्य नाही. त्यावर कायदा होईल ऑन अहिल्यानगर बिबट्या - तेथे एक बिबट्या मारला - साध्या खूप संख्या बिबट्याची वाढली - जसे कुत्रे फिरतात तसे बिबट्या वाढतील - आज जे हल्ले होता ते दुःख दायक. - उद्या पुण्यात होणारी बैठक त्यावर नाशिक, अहिल्यानगर नाशिक येथे होणारी बिबट्याची दहशत यावर सविस्तर चर्चा करणार - AI च्या माध्यमातून यंत्रणा उभी करण्यासाठी प्रयत्न - नसबंदी हा अंतिम टप्पा, गरज असेल तर होईल. - बिबट्या वनतारा, आफ्रिका येथे पाठू, मात्र हा निर्णय केंद्र सरकारचा
79
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 16, 2025 10:16:30
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात उभारण्यात आलेल्या स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. दरम्यान याच पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमावरून ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी ट्विट करत तब्बल 13 महिन्यांनी उद्घाटन कार्यक्रमासाठी वेळ मिळाला असल्याचे म्हणत टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषण म्हणाले: स्वामी रामानंद तीर्थ यांनी मोलाचे काम केले. स्वामी रामानंद तीर्थ यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामची ज्योत पेटवली. वाल्लभभाई पटेल यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांनी साथ दिली. त्यांना जेल मध्ये जावे लागले. आज मराठवाडा स्वतंत्र दिसत आहे. मनपाने 300 वर्ष जुन्या तलावाचे पुनरजीवन केले. 300 वर्षा पूर्वी माहीत होते कमळचे सरकार येणार आहे. कितीही चिखल असला तरी कमळ फुलते, पण कमळ स्वतःला डाग लागू देत नाही. मी घेतलेले तिकीट आज घेतले तरी ते त्यांनी पुढे ग्राह्य धरावे. मी 20 रुपये अतुल सावे यांच्याकडून उसने घेतले आहेत.
43
comment0
Report
Advertisement
Back to top