Back
ठाकरे गटाच्या उपनेत्याने शेतकऱ्याला मारहाण, व्हिडीओ झाला व्हायरल!
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
csn beaten av
feed attached
ठाकरे गटाच्या उपनेत्याची शेतकऱ्याला मारहाण
ऊसाचे थकीत बिळाची मागणी केल्याने केली मारहाण
सचिन घायाळ असे मारहाण करणाऱ्या ठाकरे गटाच्या उपनेत्याचे नाव
राहुल कांबळे असे मारहाण झालेल्या शेतकऱ्याचे नाव
शेतकऱ्याला घरी बोलावून सचिन घायाळांनी केली मारहाण
घायाळांसह चौघांकडून मारहाण केल्याचा आरोप
पैठण पोलिसांत सचिन घायाळांसह चौघांवर गुन्हा दाखल
मारहाण करतानाच व्हिडीओ देखील व्हायरल
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Nashik, Maharashtra:
Nsk_congresspkg
Feed by 2C
Video 5
Byte from Mumbai
Anchor काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रात काँग्रेस संपूर्णतः संपणार आहे. कुणाल पाटील यांचा धुळे ग्रामीण मतदारसंघात मजबूत प्रभाव आहे, आणि त्यांच्या पक्षांतरामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसची पकड कमी होऊन धुळे भाजपचा किल्ला होणारे.
Vo 1 गेल्या पाच दशकाची अनिर्बंध पिढीजात सत्ता असलेले काँग्रेसचा तरुण चेहरा कुणाल पाटील .... sधुळे ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसकडून 2014 आणि 2019 या वर्षी दोन वेळा आमदार राहिले आहेत . त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 2023 मध्ये धुळे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 18 पैकी 16 जागा जिंकून भाजपचा दारुण पराभव केला होता. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत कुणाल पाटील यांना भाजपच्या राम भदाणे यांच्याकडून 66,320 मतांनी पराभव पत्करावा लागला. गेल्या पाच वर्षापासून भाजपप्रवेशाच्या चर्चांना विराम देत ते आता विकास कामांसाठी भाजपच्या ताफ्यामध्ये सामील होणार आहेत. पाटील यांच्यासोबत त्यांचे समर्थक, स्थानिक कार्यकर्ते आणि काही शैक्षणिक संस्थांचा प्रभावही भाजपकडे जाणारे., जिल्ह्यातील सहकार चळवळी वरती काँग्रेसचे जे प्रभुत्व होतं तेही आता कुणाल पाटील भाजपत गेल्यामुळे संपणार आहे.
Byte कुणाल पाटील
Vo 2 कुणाल पाटील यांच्या भाजपा प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये एक स्वच्छ प्रतिमा, उच्चशिक्षित आणि राजकीय पार्श्वभूमी असलेला मराठा नेता भाजपाला गवसला आहे. माजी केंद्रीय मंत्री माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना पर्याय म्हणून कुणाल पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पसंती दिल्याचे बोलले जात आहे. डॉक्टर सुभाष भामरे नंतर पक्षाकडे जिल्ह्यात मजबूत आणि स्वच्छ प्रतिमेचा मराठा चेहरा नव्हता तो कुणाल पाटील यांच्या माध्यमातून मिळाला आहे. त्यामुळे धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यामध्ये पाटील कुटुंबाचं असलेलं नातं गोत आणि शैक्षणिक संस्थांचं जाळ हे भाजपच्या पथ्यावर पडेल. कुणाल पाटील यांच्या पक्षांतरामुळे उरलीसुरली काँग्रेसची ग्रामीण भागातील पकड कमजोर होऊ शकते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला कार्यकर्त्यांचे मनोबल टिकवणे आणि नवीन नेतृत्व उभे करणे कठीण होणारे. यासाठी गेल्या तीन पिढ्यांच्या प्रमाणाईकतेला जागत त्यांनी भाजप जाऊ नये असे ज्येष्ठ नेत्यांना वाटतेय
Byte 3 हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष
GFX
सध्याची परिस्थिती
धुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपचे वर्चस्व
2022 जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपची बाजी
धुळे शहरात AIMIM चे आमदार फारूक शहा यांचा प्रभाव
काय होणार फायदा
उत्तर महाराष्ट्रात भाजपाला मराठा तरुण चेहरा गवसेल
सहकार चळवळीत प्रभुत्व वाढवण्यासाठी ही कुणाल पाटलांची होणार मदत.
खानदेशात मराठा समाजाला बळ देण्यासाठी कुणाल पाटील भाजपच्या पथ्यावर पडणार
Vo 3 उत्तर महाराष्ट्रातील 47 विधानसभा मतदारसंघांपैकी काँग्रेसला 2024 च्या निवडणुकीत मर्यादित यश मिळाले. भाजपने उत्तर महाराष्ट्रात विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्या गोटात सामील करून घेण्याची रणनीती अवलंबली आहे. यापूर्वी अमरिशभाई पटेल आणि राजवर्धन कदमबांडे यांच्यासारख्या नेत्यांनीही काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता कुणाल पाटील आणि संभाव्यतः अपूर्व हिरे यांच्या प्रवेशाने भाजपचा प्रभाव आणखी वाढेल.
Byte विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते
Byte (प्रशांत परदेशी धुळ्याचे स्थानिक पाठवतो आहे )राजकीय विश्लेषक
Vo 3 आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होईल. काँग्रेसला या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणे आणि नवीन नेतृत्व उभे करणे आवश्यक आहे, तर भाजप या संधीचा फायदा घेऊन आपली पकड आणखी मजबूत करेल.
0
Share
Report
Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणीच्या लिमला गावातील महिला दारू आणि ढाबे संस्कृतीच्या विरोधात आक्रमक झाल्या असून आज महिला सरपंच प्रज्ञा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा पार पडली. यावेळी ताडकळस पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गजानन काटेवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेत लिमला गाव आणि परिसरातील दारू बंद करण्याचा एकमताने ठराव घेण्यात आला. यावर ग्रामपंचायतीच्या या बैठकीला गावातील शेकडो महिला आणि पुरुष ही उपस्थित होते, दारूमुळे अनेकांची संसार देशोधडीला लागली आहेत. नव तरुण ही व्यसनाधीन होत चालले असून यामुळे गावाचा शैक्षणिक आर्थिक सामाजिक नुकसान होत असल्याचे मत गावकर्यांनी उपस्थिती केला. तर महिलांनी मद्यपी पती मुलांकडून कुटुंबियांची कसा मानसिक शारीरिक छळ होत आहे,याची आपबीती सांगितली,येत्या 7 जुलै रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करून यामध्ये परवाना धारक दारु विक्रेते आणि ढाबा बंदीचा ठराव घेतला जाणार असल्याचे गावकर्यांनी सांगितले...
बाईट- १,२- महिला
0
Share
Report
Navi Mumbai, Maharashtra:
story Slug -: हिंदी सक्ती विरोधातील शासन निर्णय रद्द, मनसेचा नवी मुंबईत जल्लोष.
मनसे का जल्लोष
FTP slug - nm jallosh mns
shots-
reporter- swati naik
navi mumbai
Anchor -: शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर आज नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसेतर्फे जल्लोष करण्यात आलाय. फटाके फोडत, पेढे वाटत, ढोल ताशांच्या गजरात फुगड्या खेळत हा जल्लोष साजरा करण्यात आला. हा मराठी माणसांच्या एकजुटीचा विजय असून दिल्लीचेही तख्त झुकवितो महाराष्ट्र माझा अशी प्रतिक्रिया मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी व्यक्त केलेय.
बाईट -: गजानन काळे मनसे शहराध्यक्ष
0
Share
Report
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Gondia
Slug - 3006_GON_MLA_DAUGHTER
FILE - 7 VIDEO
आता शासकीय आदिवासी आश्रम शाळेत जाणार आमदाराची कन्या.... संपूर्ण महाराष्ट्रातील पहिलेच उदाहरण ....
आमदार कन्यांनी घेतला वर्ग आठवीत आश्रम शाळेत प्रवेश.....
आमदार संजय पुराम यांच्या मुलगा सुद्धा शिकला आश्रम शाळेत....
आदिवासी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्यासाठी पुढे याव यासाठी संजय पूराम यांचा पुढाकार....
Anchor :- एकीकडे महाराष्ट्र मध्ये सर्वत्र इंग्रजी माध्यमांची शाळांची मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना मात्र अनेक अधिकारी , कर्मचारी ,जनप्रतिनिधी हे आपापल्या मुलांना इंग्रजी शाळेकडे प्रवेश करण्यासाठी मोठमोठ्या रकमा देऊन मोठमोठ्या शाळेमध्ये प्रवेश घेत असतात.. परंतु आमगाव देवरी विधानसभेचे आमदार संजय पुराम यांनी मात्र संपूर्ण महाराष्ट्र समोर एक उत्तम उदाहरण देत आपल्या मुलीला आदिवासी विभागाच्या शासकीय आश्रम शाळेमध्ये प्रवेश दिला आणि एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रेरणादाई निर्णय त्यांनी घेतला आणि आपली मुलगी समृद्धीला पूराळा गावातच वर्ग आठवी मध्ये शासकीय आश्रम शाळेमध्ये प्रवेश दिला.....
VO:- गावातील छोटासा पदधिकारी ही चांगलं शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून खाजगी शाळेत आपल्या पाल्याचे नाव दाखल करतात आणि त्यांच्या मागे लाखो रुपये खर्च करतात असे असताना... मात्र खामगाव देवरी विधानसभेचे आमदार संजय पुराम यांनी महाराष्ट्रात एक मोठे उदाहरण निर्माण आपल्या राहत्या गावी पुराडा ढीवरीनटोला येथील आदिवासी विकास विभाग एकात्मिक प्रकल्प अंतर्गत आदिवासी आश्रम शाळा पुराडा येथे आपले मुलगी समृद्धी संजय पुराम हिला आठव्या वर्गात दाखिला दिला असून एक जनप्रतिनिधी म्हणून एक उत्तम उदाहरण संपूर्ण महाराष्ट्र समोरच नाही तर देशासमोर ठेवला आहे.....
Byte:- आमदार संजय पुराम
VO:- आमदार संजय पुराम यांनी सुद्धा आश्रम शाळेतूनच शिक्षण घेतले असून आपल्या मोठा मुलगा बिरसा संजय पुराम सुद्धा पहिल्या वर्गापासून बाराव्या वर्गापर्यंत आदिवासी आश्रम शाळा पुराडा इथेच शिक्षण दिले आता त्यांची लहान मुलगी समृद्धी ला सुद्धा आदिवासी आश्रम शाळा पुरवठा या ठिकाणी दाखला देत संपूर्ण महाराष्ट्र समोर एक उदाहरण सादर केले आहे.जर याच प्रमाणे महाराष्ट्रातील व देशातील संपूर्ण पदाधिकारी यांनी शासकीय शाळेत आपल्या मुला मुलींना दाखला दिले तर शाळेची कायापालट होणे मात्र कोणी रोखू शकत नाही व शासकीय शाळेत दर्जेदार व उत्तम शिक्षण मिळेल व कोणत्याही व्यक्तीला खाजगी शाळेत आपल्या मुला मुलींना प्रवेश देऊन लाखो रुपये खर्च करण्याची गरज पडणार नाही. अशी प्रतिक्रिया शासकीय आश्रम शाळा पुराडा येथील मुख्याध्याप कापसे यांनी दिली .आमदाराची मुलगी आपल्या शाळेत शिकतो म्हणजे आमदाराच्या लक्ष शाळेकडे जास्त राहील आणि निश्चितच याचा फायदा शाळेला मिळेल त्याचप्रमाणे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी उमेश कासिद यांचे बोलणे आहे की हे आमच्यासाठी मोठ्या गौरवाची गोष्ट आहे की आमदार यांनी आश्रम शाळेवर विश्वास दाखवत आपल्या मुलीला आदिवासी आश्रम शाळेत दाखला दिला निश्चितच यामुळे समाजासाठी मोठा उदाहरण निर्माण झाला आहे.
Byte ;- कमल कापसे, मुख्याध्यापक आश्रम शाळा पूराळा
Byte:- उमेश काशीद ,प्रकल्प अधिकारी देवरी
0
Share
Report
Ambernath, Maharashtra:
दहागावच्या नदीत बदलापूरचा तरुण बुडाला!
४ दिवस उलटूनही तरुणाचा शोध लागेना
एनडीआरएफ, फायर ब्रिगेड कडून शोधकार्य सुरूच
Bdl boy drowned
Anchor : बदलापूरजवळच्या दहागाव नदीवर मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी आलेला तरुण पाण्यात बुडाल्याची घटना घडलीये. मात्र ४ दिवस उलटूनही या तरुणाचा शोध लागलेला नाही. त्यामुळं एनडीआरएफ आणि फायर ब्रिगेडकडून अजूनही शोधकार्य सुरू आहे.
Vo : आशिष करोतीया या तरुणाचं नाव असून तो बदलापूर पश्चिमेला राहणारा आहे. आशिष हा २६ जून रोजी मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी दहागावच्या नदीवर गेला होता. यावेळी तो पोहण्यासाठी नदीत उतरला, पण पाण्याचा अंदाज न आल्यानं तो नदीत बुडाला. तेव्हापासून सलग चार दिवस त्याचा शोध घेण्यासाठी एनडीआर एफ आणि फायर ब्रिगेडकडून शोधकार्य सुरू आहे. मात्र अजूनही त्याचा शोध लागलेला नाही. त्यामुळं त्याचे कुटुंबीय चिंतेत आहेत.
चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 3006ZT_JALNA_MORCHA_NEW(10 FILES)
जालना | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करा
जिल्हाधिकारी कार्यालयावर ख्रिश्चन समाजाचा भव्य मोर्चा
ख्रिश्चन धर्मगुरूंबद्दल पडळकर यांनी सांगलीत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला भव्य मोर्चा
अँकर |ख्रिश्चन धर्मगुरूंबद्दल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज जालन्यात ख्रिश्चन समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आलाय.या मोर्चात हजारो ख्रिश्चन समाजाचे लोक सहभागी झालेत.शहरातील महात्मा गांधी चमन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा भव्य मोर्चा काढण्यात आला.यावेळी मोर्चेकऱ्यांनी पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदवला.काही दिवसांपूर्वी पडळकर यांनी सांगलीतील ऋतुजा राजगे यांच्या आत्महत्येशी ख्रिश्चन धर्मगुरूंचा कोणताही संबंध नसताना ख्रिश्चन धर्मगुरूंना मारण्याची आणि हातपाय तोडण्याची धमकी देत बक्षीस देण्याची भाषा केल्यानं पडळकर यांची आमदारकी मुख्यमंत्र्यांनी रद्द करावी अशी मागणी या मोर्चात सहभागी झालेल्या ख्रिश्चन धर्मगुरूंनी केली.
बाईट : रेवयांग भालेराव,ख्रिश्चन धर्मगुरू
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:3006ZT_WSM_RAIN_30JUN
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर: वाशिम जिल्ह्यात एक दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे.काल दिवसभर अधूनमधून रिमझिम सरी बरसत होत्या.मात्र आज दुपारीनंतर जोरदार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवनावर परिणाम झाला आहे.गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सातत्याने पाऊस सुरू असल्यामुळे खरीप हंगामातील उरलेली पेरणी खोळंबली आहे.शेतकऱ्यांना योग्य हवामानाची प्रतीक्षा असून, पावसामुळे शेतीकामात अडथळे निर्माण होत आहेत. जमिनीची ओल वाढल्याने यंत्रसाधनांद्वारे पेरणी करणे कठीण झाले आहे.त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अजूनही पेरणीचे काम प्रलंबित आहे.
0
Share
Report
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - वहिवाटाच्या वादातून कुटुंबाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्क टेम्पोत बसून,पाच दिवसापासून सुरू आहे बेमुदत उपोषण..
अँकर - सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका कुटुंबाकडून चक्क टेम्पोमध्ये बसून गेल्या पाच दिवसांपासून बेमुदत उपोषण करण्यात येत आहे.तासगाव तालुक्यातल्या जुळेवाडी येथील जाधव कुटुंबाकडुन हे आंदोलन सुरू असून आंदोलनाचा पाचवा दिवस आहे.गावातल्या काही पक्षपाती लोकांच्याकडून घरासमोर तारेचे कंपाउंड घालण्यात आला आहे, त्यामुळे कुटुंबाला ये-जा करण्याची रस्ता बंद झाल्याचा आरोप करत प्रशासनाने तारेचे कंपाउंड काढून वहिवाट करून देण्याच्या मागणीसाठी जाधव कुटुंबाकडुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या टेम्पोमध्ये बसून आमरण उपोषण सुरू केले आहे.
बाईट - संदेश जाधव - आंदोलक,जुळेवाडी.
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME |3006ZT_JALNA_BUS_START(2 FILES)
जालना | मनसेनं आंदोलनाचा ईशारा देताच 8 वर्षांपासून बंद झालेली बससेवा झाली सुरु,रस्ता खराब असल्यानं बंद होती बस
अँकर | जालन्यातील नांदखेडा,किन्ही 8 वर्षांपासून बंद झालेली बससेवा पुन्हा मनसेच्या आंदोलनाच्या ईशाऱ्यामुळे सुरू करण्यात आलीय.8 वर्षांपुर्वी किन्ही,नांदेखेडा गावामध्ये जाणारी बससेवा खराब रस्त्याअभावी बंद करण्यात आली होती.आता खराब झालेला रस्ता दुरुस्ती होऊनही बस सेवा बंद असल्यानं मनसेच्या वतीनं जाफ्राबाद परिवहन आगार प्रमुखांना आंदोलनाचा ईशारा दिला होता.त्यामुळे अखेर ही बससेवा सुरु करण्यात आल्यानं ग्रामस्थांमधून आनंद व्यक्त केला जातोय.
0
Share
Report
Palghar, Maharashtra:
पालघर _
डहाणू तालुक्यातील गांगोडी कुंडपाडा या आदिवासी वस्तीतील विद्यार्थ्यां तसेच ग्रामस्थ पावसाळ्यात या जीवघेण्या मार्गावरून प्रवास करीत असल्याचं भयाण वास्तव समोर आलय. कुंडपाडा येथे सुमारे १०० ते १५० घरांची लोकसंख्या असून बहुतांश नागरिक हे शेतमजुरी आहेत. येथील विद्यार्थ्यांना जवळील सायवन गावातील शाळांमध्ये जाण्यासाठी गावातून रस्ता आहे. मात्र तो रस्ता एक ते दीड किलोमीटर वळसा घालून जावा लागत असल्याने सर्वजण याच मार्गाचा वापर करतात. उन्हाळ्यात नदी च पात्र खाली असल्याने काही अडचण येत नाही. मात्र पावसाळ्यात चार महिने या पाड्यातील सर्व जण याच जीव घेण्या रस्त्याचा वापर करत असतात.
0
Share
Report