Back
तारा भवाळकर: मातृभाषेतूनच शिक्षण हवे, इंग्रजी नाही!
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
https://we.tl/t-C0nfvAj7rE
Sng_tara_on_hindi
स्लग - हिंदीच नव्हे तर इंग्रजी देखील चौथीपर्यंत शिकवता कामा नये - तारा भवाळकर..
अँकर - हिंदीच नव्हे तर इंग्रजी भाषा देखील चौथीपर्यंत शिकवली गेली नाही पाहिजे, मातृभाषेतूनचं चौथीपर्यंत शिक्षण दिलं पाहिजे,असं मत ज्येष्ठ साहित्यिका आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तारा भवाळकर यांनी व्यक्त केले आहे,त्याचबरोबर त्रिभाषिक सूत्राचे ओझे विद्यार्थ्यांच्यावर लादणे हे अन्यायकारक आहे,आणि कोणत्याही भाषेला आपला विरोध नाही,असं परखड मत देखील तारा भवाळकरांनी व्यक्त केला आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी..
121 - तारा भवाळकर
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Pandharpur, Maharashtra:
25062025
Slug - PPR_SHIVSENA_MEETING
feed on 2c
file 01
------------
Anchor - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका साठी शिवसेनेने सोलापूर जिल्ह्यात तयारी सुरू केली आहे. शिवसेना संपर्क प्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत पंढरपूर मध्ये शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला. आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीसाठी शिवसेना ताकतीने उतरणार असून महायुतीच्या घटक पक्षांसोबत निवडणुका लढून महायुतीचा झेंडा स्थानिक स्वराज्य संस्था फडकवणार असल्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे
0
Share
Report
Mumbai, Maharashtra:
अँकर -- मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या भारतीय कामगार सेना आणि मनसेच्या हवाई कर्मचारी सेनेने एकत्रित आंदोलन केलं. इंडिगो एअरलाइन्सच्या कामगारांच्या प्रश्नसंदर्भात हे आंदोलन करण्यात आलं आहे. शिवसेना ठाकरे यांची युनियन आणि मनसे युनियनशी संबंधित कामगारांचे मॅनेजमेंट विरोधात काम बंद आंदोलन केलं.
भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस संजय कदम आणि मनसे कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संतोष धुरी यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले आहे.
मनोज कुळकर्णी
Vdo २C
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
केडीएमटीच्या परिवहन बसमधून पडून विद्यार्थाचा अपघात..
विद्यार्थी गंभीर जखमी..
Anchor: – कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन (KDMT) सेवेच्या धावत्या बसमधून पडून तुषार देशमाने या आयटीआयमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघात गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात तुषारचा डावा हात पॅक्चर असून त्याच्यावर कल्याणच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
vo.. कल्याण स्थानकातून रोनक सिटीच्या दिशेने तुषार देशमाने आपल्या घरी जात असंताना बसमध्ये चढताना बसचे हँडल अचानक तुटल्यामुळे तो चालत्या बसमधून खाली पडला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला असून त्याच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे.
अपघात घडल्यानंतरही बस चालक व वाहकाने बस थांबवली नाही, तर बस थेट रोनक सिटीपर्यंत पोहोचली. नातेवाईकांनी चालक व वाहकावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.
या घटनेमुळे विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांमध्ये संतापाची लाट असून, त्यांनी KDMT प्रशासनाकडून तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे..कल्याण महात्मा फुले पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे
बाईट:- राहुल आघाम नातेवाईक
बाईट:- तुषार देशमाने जखमी विद्यार्थी
0
Share
Report
Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Rain
Feed on - 2C
---------------------------
Anchor - मोठ्या खंडानंतर आज नांदेड शहरासह परिसरात पावसाचे आगमन झाले. गेल्यात तेरा चौदा दिवसापासून नांदेड मधे पाऊस बरसला नव्हता. आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमरास रिमझीम पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास पावसाची रिमझिम सुरु होती. पाऊस गायब झाल्याने उकाडा वाढला होता. शिवाय ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली होती. या पावसामुळे नांदेड तालुक्यातील पिकांना थोडे जीवदानी मिळणार आहे. शिवाय या रिमीझिम पावसामुळे उकाडा कमी झाला. अजूनही मोठ्या पवसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांसह सर्वांनाच आहे.
----------------
0
Share
Report
Parbhani, Maharashtra:
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीने मागील तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. वनमाला उत्तम शेटे असे या शेतकरी महिलेचे नाव असून त्या पालम तालुक्यातील पेठशिवनी येथील रहिवासी आहेत,गट क्रमांक 74/5 मध्ये त्यांची शेती आहे, पण शेती त्यांचे दिर बबन शेटे यांच्या नावावर होती, गंगाखेड उपविभागीय अधिकाऱ्यांकडे त्यांनी ज्ञाय माघितला असता त्यांना ज्ञाय मिळाला, पण मागील चार वर्षांपासून त्यांचा दिर बबन शेटे त्यांना त्यांची शेती वहिती करू देत नाहीये, त्यांनी यंदा शेतात केलेली कपाशीची लागवड त्यांच्या दिराने मोडून टाकल्याचे ते सांगतायेत, आपल्याला ज्ञाय मिळावा यासाठी वनमाला शेटे यांनी मागील तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. पण येथे ही त्यांची कुणीच दखल घेत नाहीये,
बाईट- वनमाला शेटे - उपोषणकर्ती महिला
0
Share
Report
Akola, Maharashtra:
Anchor : आणीबाणीच्या कालावधीत लढा देणा-या, कारावास भोगलेल्या अकोला जिल्ह्यातील व्यक्तींचा जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आलाय..यानिमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचाही शुभारंभही यावेळी करण्यात आलाय..देशात सन 1975 ते 1977 मध्ये आणीबाणी कालावधीत लढा देताना जिल्ह्यातील ज्या व्यक्तींनी मिसा व आयआरअंतर्गत सामाजिक व राजनैतिक कारणासाठी कारावास भोगलेला आहे, अशा व्यक्तींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आलाय...यावेळी आणीबाणीत कारावास भोगलेले ज्येष्ठ मान्यवर, त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते...यानिमित्त या काळाची माहिती देणारे प्रदर्शनही भरविण्यात आले आहे ही प्रदर्शनी नागरिकांकरिता सुद्धा खुली करण्यात आलीय..
0
Share
Report
Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळच्या साकुरहेटी येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीसाठी शेतकऱ्यांचा ताबा असलेल्या ईक्लास जमिनी अधिग्रहित केली जात असल्याने शेतकरी आक्रमक झाले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुखांनी देखील कारवाईला विरोध दर्शविल्याने वातावरण तापले. या जमिनीवर १९८० पासून ११ शेतकऱ्यांचे अतिक्रमण आहे. सध्या पेरणी केलेली ही ६० एकर जमिन ताब्यात घेण्यासाठी महसुल आणि पोलिसांचा फौजफाटा पोहोचला. प्रशासनाने कोणतीही पूर्व सुचना न देता ही कारवाई सुरू केल्याने
शेतकरी आक्रमक झाले.
बाईट : शेतकरी
प्रवीण शिंदे : जिल्हाप्रमुख शिवसेना ubt
0
Share
Report
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -SAT_DESAI_VADETTIVAR
सातारा - महायुतीचे हे सरकार लुटारूंचे सरकार असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती.याला मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिलं आहे. वडेट्टीवार हे फक्त भडक वक्तव्य करतायत.आम्ही लुटारू,दरोडेखोर असतो तर लोकांनी आम्हाला बहुमताने निवडून दिल नसते.आणीबाणी आणणाऱ्या काँग्रेस सरकार लोकांनी उलटून टाकलं. वडेट्टीवार फक्त भडक वक्तव्य करतायत.त्यांनी त्यांचा मुद्दा जनतेत जाऊन आणि अधिवेशनात मांडावा. महायुतीचा कामकाजावर जणमतांतून लोकांनी शिक्कामोर्तब केला आहे त्यामुळे आम्हाला वडेट्टीवार यांच्या सर्टिफिकेटची गरज नसल्याचे देसाई यांनी उत्तर दिलं आहे.
Byte -मंत्री शंभूराज देसाई
0
Share
Report
Dhule, Maharashtra:
anchor - साक्री नगरपंचायतीच्या नगर अध्यक्षांवर दाखल अविश्वास ठरवायच्या मतदान प्रक्रियेवरून गोंधळ झाला. साक्री नगरपालिकेत भाजपची सत्ता आहे, नगराध्यक्षांच्या कामकाजा विरोधात नाराजी व्यक्त करत भाजपच्या 11 पैकी सहा नगरसेवकांनी अविश्वास दाखल करण्याची मागणी केली होती. भाजपच्या सहा नगरसेवकांना विरोधकांनी पाठबळ देत जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केला होता अविश्वास ठराव. विद्यमान नगराध्यक्ष जयश्री पवार यांच्या विरोधात
अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी आज विशेष बैठकीच आयोजन करण्यात आले होते. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी बैठकीला उपस्थित न झाल्याने नगरसेवक संतप्त झाले. बराच वेळ प्रतीक्षा करूनही पिठासीन अधिकारी न आल्यामुळे नगरसेवकांनी आक्रमक होत नाराजी व्यक्त केली. अविश्वास ठरावाच्या प्रस्तावावर निर्णय न झाल्याने सत्ताधारी नगरसेवकांसह विरोधक आक्रमक झाले. प्रशासनाच्या विरोधात नगरसेवकांची घोषणाबाजी करत ही लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप केला.
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Share
Report
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 2506_BHA_ANDOLAN
FILE - 5 VIDEO
डाँ. बाबासाहेब आंबेडकर जागृत युवा संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्या करिता धरणे आंदोलन सुरू....
Anchor ;- अनुसूचित जाती व बौद्धांच्या कल्याणासाठी मंजूर झालेल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निधीतून "लाडकी बहिण योजनेसाठी" ४१०.३० कोटी रुपये वळविण्यात आले.अनु. जाती/जमाती व इतर मागास वर्गाच्या हक्काचे निधी इतरत्र वळवू नये. अनूसूचित जाती जमातीचे उपवर्गीकरण व अनुसूचित जाती जमातीना क्रिमीलेअर न लावणे बाबत संसदेत घटना दुरुस्ती करून सर्वोच्च न्यायलायाचा निर्णय रद्द करणे,तसेच महाराष्ट्रात उपवर्गीकरण साठी स्थापित झालेली समिती बरखास्त करण्यात यावी.भटक्या विमुक्तांच्या घरकुलांसाठी असणारी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेत नवीन उद्दिष्ट न घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या घरकुल योजनेत नवीन घरकुल उद्दिष्ट घेणे सुरू ठेवावे जेणेकरून राज्य पुरस्कृत घरकुल योजना सुरू राहतील.१४००० जिल्हा परिषद, नगरपरिषद शाळा बंद करण्याचे निर्णय रद्द करावे.स्वाधार योजनेच्या धर्तीवर ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुरु झालेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्या साठी असलेली ६०% गुणांची अट निरस्त करून सर्व ओबीसी विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा.विद्युत महामंडळातर्फे ग्राहकांवर स्मार्ट मीटर स्थापनेची सक्ती निरस्त करण्यात यावी.अश्या विविध मागण्या करिता डाँ.बाबासाहेब आंबेडकर जागृत युवा संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्या करिता धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
0
Share
Report