Back
पळ काढलेल्या मुलींनी न्यायालयात घातला धिंगाणा, नागरिकांची धावपळ!
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn girls abscond av
Feed attached
समाजातील अन्याय-अत्याचाराला बळी पडलेल्या मुलींना सुधारण्यासाठी असलेल्या बालगृहातच असुविधासह मारहाण करण्यात येत असल्याचा आरोप करत शहरातील विद्यादीप बालगृहातील ९ मुलींनी पळ काढला, न्याय द्या... न्याय द्या... म्हणत अल्वयीन मुली शहरभर सैरभैर धावत होत्या. जिवावर उदार झालेल्या या मुलींच्या हातांवर जखमा होत्या. हे चित्र पाहून काही नागरिक त्यांच्या मागे धावत होते खरे; पण त्या मुलींच्या हातात दगड, पाने होते. पाठीमागे आलेल्या नागरिकांना शिवीगाळ करत त्यांनी ३ किमी धावत जिल्हा न्यायालय गाठले. न्यायालयात त्यांनी धिंगाणा घातल्याने परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. न्यायालयातील वकील, कर्मचारी अन् पोलिससुद्धा मुलींचा आक्रोश आणि आक्रमकता पाहून स्तब्ध झाले होते. हा सगळा प्रकार सोमवारी दुपारी घडला. दरम्यान, नऊ जणींना बालकल्याण समितीने रात्री उशिरा न्यायासमोर हजर करत जवाब नोंदविला. या सातपैकी ४ जणींना पालकांच्या ताब्यात दिले तर तिघीना इतर बालगृहात पाठविले. नऊपैंकी दोघी अद्यापही फरार आहेत.. साधी साबण आणि टूथ पेस्ट ही मिळत नसल्याचा या मुलींचा आरोप आहे , यामुळं बालसुधार गृहातील दुरवस्था पुन्हा एकदा पुढं आली आहे...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement