Back
यवतमाळच्या पावसाने रस्ते बंद, ग्रामस्थांची पूलासाठी मागणी!
Yavatmal, Maharashtra
Anchor : यवतमाळच्या महागाव तालुक्यात झालेल्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे जनूना करंजखेड रस्त्यावरील पुलाचा भराव वाहून गेल्याने करंजखेड, कासारबेहळ, हिवरा या ठिकाणाहून ये जा करणाऱ्यांसाठी रस्ता बंद झाला. हा पूलाचे काम करावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे. मात्र हे काम अद्याप मंजूर न झाल्यामुळे हा मार्ग वारंवार बंद पडण्याचा धोका निर्माण झाला असून, अपघाताचीही भीती निर्माण झाली आहे.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Navi Mumbai, Maharashtra:
story slug -उरण मद्ये सिडकोच्या कारवाई मुळे 80 कुटुंबावर भर पावसात बेघर होण्याची वेळ
सिडको की कारवाई
ftp slug - nm uran cidco action
shots-
reporter- swati naik
navi mumbai
anchor -
उरण मधील कामठा गावं येथील चिंतामणी अपार्टमेंटवर सिडकोकडून कारवाई करण्यात येत आहे ,सिडकोच्या कारवाईमुळे भर पावसात 80 पेक्षा अधिक कुटुंब झाली बेघर होणार आहेत।
भर पावसाळ्यात कारवाई करण्यात येत असल्याने रहिवासी संतप्त झाले असून,
पोलिसांचा फौंजफाटा घेऊन सिडकोची घरांवर तोडक कारवाई साठी आल्याने ,
कारवाई थांबाविण्याची रहिवासीयांची मागणी करत जेसीबी समोर अडवून रहिवास उभे राहिले आहेत।
gf -
--–--------
0
Share
Report
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2706ZT_CHP_VIJAY_1
( single file sent on 2C)
टायटल:-- मुंबईतील 5 जुलै च्या एकत्रित मराठी मोर्चा विषयी निमंत्रण आले आहे, काँग्रेस त्याबाबत सकारात्मक विचार करेल, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया
अँकर:--काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत होणाऱ्या एकत्रित मराठी मोर्चावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात हिंदीची सक्ती नको ही भूमिका आम्ही या आधीच मांडली आहे, जर दोन्ही भाऊ एकत्र येऊन या विषयावर मोर्चा काढणार असतील, जर कुठल्याही बॅनर शिवाय मराठी साठी मोर्चा काढणार असेल आणि निमंत्रण आलं तर आम्ही विचार करू आणि त्याबाबत आमची भूमिका सकारात्मक असेल असे वडेट्टीवार म्हणाले.
बाईट १) आ. विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:2706ZT_WSM_SCHOOL_ROOF_COLLAPSED
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर: वाशिम जिल्ह्यातील भटउमरा येथील जिल्हा परिषद शाळेच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळले, एक विद्यार्थी गंभीर जखमी.
वर्गात शिकवणी सुरू असताना कोसळला स्लॅब चा भाग
स्लॅब कोसळल्याने विद्यार्थी भयभीत.
वाशिम जिल्ह्यातील भटउमरा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत घडली घटना
डोक्यात स्लॅब पडल्याने जखमी झालेल्या विद्यार्थ्याला उपचारासाठी दवाखान्यात नेले
दहावर्षापूर्वी बांधण्यात आली होती ही शाळेची इमारत.
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
कल्याण शहरात अमली पदार्थविरोधात विद्यालयाची जनजागृती.. ‘पोलीस मित्र’ बनून विद्यार्थ्यांना पुढे येण्याचे आवाहन!
झोन ३ पोलिस, शिक्षण संस्था आणि नशामुक्ती संघटनांचा संयुक्त उपक्रम; पथनाट्य, अमली पदार्थांचे दुष्परिणाम प्रभावीपणे मांडले
Anc..कल्याण शहरात अमली पदार्थांच्या विरोधात ठोस पावलं उचलत झोन तीन पोलिसांनी शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला
Vo..कल्याण झोन ३ चे पोलिस आणि स्थानिक शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज शहरभर अमली पदार्थविरोधात जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली. या रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरले शाळा आणि महाविद्यालयात सादर करण्यात आलेले पथनाट्य, ज्यात अमली पदार्थांचे दुष्परिणाम प्रभावी पद्धतीने मांडले गेले.या कार्यक्रमात ॲडिशनल सीपी, झोन ३ चे DCP, कल्याणचे ACP, तसेच शाळा-कोलेजचे प्राचार्य, नशामुक्ती केंद्रातील स्वयंसेवक आणि शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.पोलिसांनी विद्यार्थ्यांना संवाद साधत मार्गर्शन केले अमली पदार्थांचे शारीरिक आणि मानसिक नुकसान स्पष्ट केलं. "कॉलेज किंवा शाळा परिसरात कोणी अमली पदार्थांची विक्री करत असेल, तर ''''पोलीस मित्र'''' म्हणून तात्काळ माहिती द्या," असे आवाहन करण्यात आले.
Byte :- आतूल झेंडे ( कल्याण dcp)
0
Share
Report
Pune, Maharashtra:
hinjeadi ultimetum
kailas puri Pune 27-6-25
feed by 2c
Anchor - हिंजवडी गावाचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समावेश करण्यासाठी गेल्या काही दिवसापासून आयटी कर्मचाऱ्यांकडून स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे. पाच दिवसात या मोहिमेत बावीस हजारहून अधिक नागरिकांनी स्वाक्षरी करत पाठिंबा दर्शवला आहे. आयटी कर्मचाऱ्यांकडून ही मोहीम सुरू असताना सरकारी पातळीवर मात्र त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आयटी कर्मचारी संतप्त झाले असून त्यांनी आणखी मोहीम तीव्र केली आहे. ट्राफिक आणि इतर समस्यांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर आयटी पार्क हिंजवडी चेष्टेचा विषय झाला असल्याची खंत व्यक्त करतानाच येत्या काही दिवसात समस्या सोडवल्या नाहीत तर आणखी तीव्र मोहीम सुरू करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. तर ग्रामस्थांनी हिंजवडीला महापालिकेत घ्यायचं असेल तर आत्ताच घ्यावं अन्यथा पुढे आम्ही स्वतंत्र महानगरपालिकेची मागणी करू असा इशारा दिला आहे. याच मुद्द्यावर आयटी कर्मचारी आणि स्थानिकांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी...!
kailas chaupal+ vis
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2706ZT_JALNA_STUDENT_PKG(25 FILES)
जालना |PKG
बेडकांचा डराव डराव आवाज ठरतोय जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा,
पारधच्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात साचलं पाऊस आणि गावातील गटाराचं पाणी,पाण्यात बेडकांनी ठोकला मुक्काम
बेडकांच्या आवाजामुळे विद्यार्थी हतबल
शाळेसमोर साचलेल्या पाण्याचा बंदोबस्त न केल्यास थेट साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन करण्याचा ग्रामस्थांचा ईशारा
अँकर : जालन्यातील पारध गावात जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण झालाय.हा अडथळा काही ईतर कोणत्याही वादाचा नाही तर हा अडथळा आणलाय चक्क बेडकांनी.नेमका हा अडथळा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कसा आला यावर बघूया हा स्पेशल रिपोर्ट
व्हिओ:१: जालन्यातील पारध गावच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर एक नवीनच संकट उभं राहिलंय.विद्यार्थ्यांना शिक्षक किंवा शिक्षिका शिकवत असताना त्यांना शिक्षक किंवा शिक्षिका काय शिकवतायत ते ऐकायला मिळत नाहीय.त्याचं कारणही तसंच आहे.काल परवा पारध गावात मुसळधार पाऊस झाला आणि शाळेबरोबरच गावातील गटाराचं सगळं पाणी शाळेसमोर तुंबलं. आता या तुंबलेल्या पाण्यात बेडकांनी ठिय्या मांडत डराव,डराव अशी घोषणाबाजी सुरू केलीय.ही बेडकं शांत बसायला तयार नाही. बेडकांचा कल्लोळ ईतका जोरात सुरुय की,शिक्षक काय शिकवतात हेच विद्यार्थ्यांना कळत नाहीय.त्यामुळे त्यांचं शिकवणीत लक्षच लागत नाही.
बाईट : विद्यार्थीनी (3 विद्यार्थीनीचे बाईट आहेत)
व्हिओ:2:पारधच्या जिल्हा परिषद शाळेसमोर पावसामुळे तयार झालेल्या डबक्यात बेडकांनी मुक्काम ठोकल्यानं विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत असल्यानं गावकरीही त्रस्त झालेत.त्यामुळे शाळेच्या आवारात साचणाऱ्या पाण्याबरोबरच गावातील नाल्यातून शाळेच्या मैदानात साचणाऱ्या पाण्याचा बंदोबस्त ग्रामपंचायतीने शालेय शिक्षण समितीने करण्याची मागणी गावकऱ्यांनी केलीय.हा प्रकार असाच सुरू राहिला तर थेट शाळे समोर साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन करण्याचा ईशारा ग्रामस्थांनी दिलाय.
बाईट : बबलू तेलंग्रे,ग्रामपंचायत सदस्य(व्हाईट शर्ट,गोरा रंग,दाढी असलेले)
बाईट: सागर देशमूख, ग्रामस्थ(काळया रंगाचा टी शर्ट असलेले)
बाईट : प्रशांत देशमूख,ग्रामस्थ(पिवळा टी शर्ट)
व्हिओ :३:गेल्या तीन ते चार वर्षांपासून या शाळेसमोर पावसाळ्यात अशाच प्रकारचं पाणी साचतंय.त्यामुळे या पाणी साचलेल्या डबक्यात सापाचं देखील वास्तव्य आढळून येतं. त्यामुळे तातडीने या साचणाऱ्या पाण्याचा बंदोबस्त करण्यात येऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणात येणारा बेडकांचा आवाजाचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे इतकंच.
0
Share
Report
Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_jaganath_rath
नाशिक मध्ये देखील जगन्नाथ रथ उत्सव सोहळा
अँकर
जगन्नाथ पुरी मध्ये होणारा जगन्नाथ रथ उत्सव सुरू असताना नाशिक मध्ये देखील जगन्नाथ रथ उत्सव सोहळा पार पडतोय... शहरातील पंचवटी परिसरातील पंचमुखी हनुमान मंदिराच्या इथून ही जगन्नाथ रथ यात्रा उत्सव सुरू झाला आहे.... जगन्नाथ रथ हा फुलांनी सजवलेला असून त्याला आकर्षक रूप प्राप्त झाल आहे...विशेष बाब म्हणजे जगन्नाथ यांचा रथ ओढण्यासाठी एकाबाजूला महिलांचा मोठा सहभाग पाहायला मिळतो तर दुसऱ्या बाजूला पुरुष सहभागी होतात ... या रथयात्रेमध्ये रथ उडत असताना पायात चप्पल न काढता भाविक भारत ओढत असतात यामुळे या रथ उत्सवाला एक वेगळंच महत्त्व पाहायला मिळतं... या रथोत्सवाची सुरुवात पंचवटी पंचमुखी हनुमान मंदिराच्या पासून सुरुवात झाली आहे... शहरातील मेन रोड मार्गे काळाराम मंदिर असा फिरून पुन्हा एकदा पंचमुखी हनुमान मंदिर पर्यंत येणार आहे... जगन्नाथ रथ उत्सवात भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालंय.... या रथ उत्सवानिमित्त नाशिक शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय...
0
Share
Report
Virar, Maharashtra:
Date-27june2025
Rep-prathamesh tawade
Loc-virar
Slug-VIRAR COW
Feed send by 2c
Type-AV
Slug- विरार मध्ये विजेचा धक्का लागून चार गाईंचा मृत्यू
विरार पूर्व देवीपाडा परिसरातील घटना
अँकर - विरार पूर्वेकडील देवीपाडा येथील शेतात चरणाऱ्या चार गाईंचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे..देवीपाडा येथील शेतावरून जाणाऱ्या वीज वाहकतारांपैकी एक तार तुटून शेतात पडली होती.. नागरिकांनी याची तक्रार केल्यानंतर महावितरण कडून या परिसरातील वीजपुरवठा खंडित केला होता.. दरम्यान या शेतात करण्यासाठी गाई गेल्या होत्या.. त्यावेळी अचानक शेतात पडलेल्या तारेतून वीजपुरवठा सुरू झाला व शेतात चढणाऱ्या गाईंचा जागीच मृत्यू झाला... महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे या गायींचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे..
0
Share
Report
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -SAT_mock_parliament
कराड -भारतात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपा महिला मोर्चा माध्यमातून कराड मध्ये राज्यस्तरीय ‘मॉक पार्लमेंट’चे आयोजन करण्यात आले आहे.या ‘मॉक पार्लमेंट’चे
उद्घाटन भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ,भाजप सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांचा हस्ते उद्घाटन झाले.यावेळी 50 वर्षापूर्वी लावण्यात आलेल्या आणीबाणीवर चर्चा होणार आहे
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
डोंबिवली न्यूज फ्लश..
रेल्वे प्रवासात महिलांची सुरक्षितता धोक्यात
मद्यपी तरुणाचा महिलांच्या डब्यातून डोंबिवली ते मुंब्रा प्रवास
डोंबिवलीहून 10. 34 मिनिटांची सीएसटीएमला जाणाऱ्या एसी लोकल मधून मद्यपीचा प्रवास
महिलांनी विनंती करून देखील मद्यपीने दाद दिली नाही
व्हिडिओ व्हायरल,
0
Share
Report