Back
रवी राणा का ठाकरे पर तीखा हमला, पाच तारखेला मोर्चा का?
Amravati, Maharashtra
Feed slug :- AMT_RANA_VS_THAKARE दोन फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
पाच तारखेचा मोर्चा मतदारांची दिशाभूल करणारा, मुंबई महानगरपालिका निवडणूकीत मत जमा करण्यासाठी हा मोर्चा; आमदार रवी राणांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
अँकर :- हिंदी भाषा सक्तीला विरोध म्हणून मराठी भाषेची सक्ती महाराष्ट्रात असली पाहिजे यासाठी राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्रित पाच तारखेला मोर्चा काढणार आहे. या मोर्चावर बडनेराचे आमदार रवी राणा यांनी टीका केली असून उद्धव ठाकरे यांच्यावर रवी राणांनी हल्लाबोलकेला आहे. उद्धव ठाकरे यांना आता मराठी माणसाविषयी प्रेम येत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस मराठी माणसासोबत उभा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी ही नौटंकी थांबवावी मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मराठीचा मुद्दा समोर केला जात आहे उद्धव ठाकरे यांना वाटते की आमचा झेंडा मुंबई महानगरपालिकेवर फडकला पाहिजे मराठीचा कोणी महाराष्ट्रात विरोध करत नाही तर पाच तारखेचा मोर्चा मतदारांची दिशाभूल करणारा मोर्चा आहे अशी टीका रवी राणा यांनी केली. मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेसच्या दरबारात उद्धव ठाकरे गेले असही रवी राणा म्हणाले आहे.
बाईट :- रवी राणा, आमदार बडनेरा
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:2906ZT_WSM_ANJAJI_AMBETKAR
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्थानिक परिस्थिती पाहून छोट्या मोठ्या पक्षासोबत युती होऊ शकते पण ज्यांच्या सोबत युती करू ते पक्ष भाजप बरोबर युतीत नसतील असं भाष्य वंचित बहुजन आघाडीच्या अंजली आंबेडकर यांनी केलं..
ऑन हिंदी...
मुंबईत आज पुरोगामी पक्ष शिक्षण क्षेत्रात वेगवेगळ्या काम करणाऱ्या संघटनाची हिंदी सक्ती बद्दल बैठक आहे,आणि यात वंचित बहुजन आघाडी सामील आहे, असंही अंजली आंबेडकर यावेळी म्हणाल्या..
बाईट: अंजली आंबेडकर,वंचित बहुजन आघाडी.
0
Share
Report
Yeola, Maharashtra:
अँकर:- नाशिक मध्ये होत असलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादकांना बसला असून निफाड चांदवड व येवल्यात द्राक्ष बागांवर विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे यासह द्राक्ष बागांमध्ये तणांची वाढ झाली असून यावर नियंत्रणासाठी महागडी औषध फवारावे लागत आहे त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली असून शासनाने औषधांवरील जीएसटी कमी करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तर दुसरीकडे कृषी तज्ञांनी जैविक बुरशीनाशक व किटकनाशकांचा वापर करावा अशी शिफारस केली आहे या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी...
0
Share
Report
Raigad, Maharashtra:
अँकर - छत्री निजामपूर नावाला गोपीनाथ पडळकरांचा आक्षेप ...... स्वराज्याच्या राजधानीत निजामाच्या खुणा कशाला ? ...... रायगडवाडी असे नामकरण करण्याची मागणी ......
अँकर - स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड ज्या ग्राम पंचायतीत येते त्या ग्राम पंचायतीचे नाव छत्री निजामपूर असं आहे. या नावाला गोपीचंद पडळकर यांनी आक्षेप घेतलाय . स्वराज्याच्या राजधानी जिथं आहे त्या ग्रामपंचायतीचे नाव बदलून छत्री निजामपूर ऐवजी रायगडवाडी करावं अशी मागणी पडळकर यांनी केली आहे . निजामाच्या खुणा इथं कशा काय आल्या असा सवाल करीत आदिलशहा, निजामाच्या खुणा पुसल्या पाहिजेत अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. छत्री निजामपूरचे नाव बदलून ते रायगडवाडी करावं अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
बाईट - गोपीचंद पडळकर
0
Share
Report
Thane, Maharashtra:
पहिली ते पाचवी हिंदी सक्ती वरून ठाण्यात शासन निर्णयाची अनेक राजकीय पक्षांनी एकत्र येत केली प्रतीकात्मक होळी...
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनसे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष तिन्ही पक्षांनी एकत्र येत तळ्यातील महत्त्वपूर्ण अशा चिंतामणी चौक येथे शक्ती प्रदर्शन करत शासन निर्णयाची केली होळी..
यावेळी तिन्ही पक्षांचे अनेक प्रमुख नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते...
0
Share
Report
Shirdi, Maharashtra:
Anc - शिर्डीच्या साई संस्थानमध्ये बोगस कर्मचारी भरतीचा आरोप केला जातोय.. माजी सैनिकांच्या नावाने बोगस सुरक्षारक्षक भरती झाल्याचा संशय असून जिल्हा माजी सैनिक कल्याण समितीने कागदपत्रांची पडताळणी सुरू केली आहे..
V/O - शिर्डीच्या साईबाबा संस्थानमध्ये सुरक्षा विभागात कुशल कर्मचारी म्हणून अनेक माजी सैनिक नोकरी करत आहेत.. सध्या संस्थानमध्ये कंत्राटी पद्धतीने 84 माजी सैनिक सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहेत.. मात्र हीच नोकरी भरती वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.. माजी सैनिकांच्या नावाने बोगस सुरक्षारक्षक भरती झाल्याचा आरोप केला जातोय.. जिल्हा माजी सैनिक कल्याण समितीने कागदपत्रांची पडताळणी सुरू केली असून काही जणांकडे माजी सैनिक असल्याचे सबळ पुरावे नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.. त्यामुळे आता जिल्हा माजी सैनिक कल्याण समितीच्या अहवालाकडे लक्ष लागले आहे.. साई संस्थानमध्ये माजी सैनिकांच्या नावाने नोकरभरतीत घोटाळा झालाय का..? असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित झालाय..
Byte - अशोक दुशिंग, सामाजिक कार्यकर्ते
V/O - शिर्डी संस्थानमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेल्या माजी सैनिकांवर होत असलेल्या आरोप जर खरे ठरले तर संस्थांचे मोठे आर्थिक नुकसान झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.. त्यामुळे जिल्हा माजी सैनिक कल्याण समीरचा अहवालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या अहवालामध्ये नेमकं किती कर्मचाऱ्यांनी बोगस कागदपत्र दिले आहे हे स्पष्ट होणार आहे मात्र या प्रकरणामुळे संस्थानच्या नोकर भरतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताय....
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
राज्य सरकारने काढलेल्या जीआर ची केली होळी..
सरकार विरोधात घोषणा बाजी करत जी आर ची होळी..
कल्याणमध्ये ठाकरे गट व मनसे एकत्र — हिंदी सक्तीविरोधात आंदोलन!
कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना मध्यवर्ती शाखेबाहेर आज शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आले.
सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाच्या परिपत्रक फाडत त्याची होळी करत, "मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवूया!" अशा आशयाचे बॅनर झळकवले केले आंदोलन
आंदोलनात कार्यकर्त्यांनी अभिमान आहे आम्हाला, आम्ही मराठी!","हिंदी सक्ती करणाऱ्या महायुती सरकारचा निषेध!"अशा आशियाचे फलक हातात घेत सरकार विरोधात घोषणाबाजी करत केले आंदोलन
शिवसेना (ठाकरे गट) व मनसेचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि युवक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी
byte... प्रकाश भोईर
माजी आमदार मनसे
byte.. विजय साळवी
उपनेते ubt
0
Share
Report
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2906ZT_CHP_UBT_PROTEST
( single file sent on 2C)
टायटल:---चंद्रपुरात हिंदी सक्तीविरोधात शिवसेना उबाठा पक्षाचे आंदोलन, जीआर प्रती जळून हिंदी सक्तीचा निषेध,हिंदी नव्हे, हिंदी सक्तीला विरोध, भर पावसात शिवसेनेने केले आंदोलन
अँकर -हिंदी सक्तीच्या विरोधात राज्यभरात उठलेल्या आवाजाच्या पार्श्वभूमीवर आज चंद्रपुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने स्थानिक गांधी चौक येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान शासन निर्णयाच्या प्रती जाळून निषेध नोंदविण्यात आला. विरोध हिंदी भाषेला नसून जबरदस्तीने हिंदी लादण्याला आहे अशी आंदोलकांची भूमिका होती. भर पावसात देखील मोठ्या संख्येने शिवसैनिक यात सहभागी झाले.
बाईट १) संदीप गिऱ्हे, जिल्हाध्यक्ष शिवसेना उभाठा
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात शिवसेना ठाकरे आणि मनसेचे एकत्रित येत हिंदी सक्तीच्या विरोधात आंदोलन
- सोलापुरात शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्रित येत हिंदी सक्ती विरोधात केल आंदोलन..
- सोलापुरातील जिल्हा परिषद गेट समोर हिंदी सक्तीच्या जीआरची होळी करत नोंदवला निषेध.
- शिवसेना ठाकरे गटाकडून कार्यकर्त्यांनी मशाल हातात घेऊन हिंदी सक्तीच्या जीआरची करण्यात आली होळी..
- सोलापुरातील शिवसेना ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्त्यांचा उत्साह पाहिला मिळाला..
- हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला गेला नाही तर शिक्षण कार्यालय फोडणार असल्याचा इशारा कार्यकर्त्यांकडून देण्यात आला..
- शिवसैनिक आणि मनसे सैनिकांचा मंत्रालयात घुसून तोडफोड करण्याचा इशारा...
- उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत होणाऱ्या मोर्चा शिवसेना युबीटी आणि मनसे कार्यकर्ते होणार सहभागी..
Byte : शरद कोळी, शिवसेना ठाकरे गट उपनेते
Byte : प्रशांत इंगळे, मनसे सोलापूर लोकसभा अध्यक्ष..
0
Share
Report
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- संग्राम जगताप हिंदुत्ववादी संघटना पाठिंबा
फीड 2C
अँकर:- अहिल्यानगर शहरामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांना समर्थन देण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत जगताप यांना पाठिंबा दिला आहे गेल्या काही दिवसांपासून आमदार संग्राम जगताप प्रकार हिंदुत्ववादी भूमिका घेत आहेत त्यामुळे त्यांच्या विरोधात ठिकाणी मुस्लिम समाजाचे मोर्चे निघत आहेत याला उत्तर देण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने नगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एकवटले होते यात वेगवेगळ्या राजकीय पक्षासह संघटना आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता माजी खासदार सुजय विखे पाटील ह भ प संग्राम बापू भंडारे हिंदुत्व संघटनेचे नेते सागर बेग यांनी या पाठिंबा कार्यक्रमात सहभाग घेतला हिंदुत्वासाठी लढणाऱ्या आमदार जगताप यांच्यासोबत आम्ही कायम राहणार असल्याचं संग्राम भंडारे यांनी म्हटला आहे तर संग्राम जगताप हे माझे मित्र आहेत आणि हिंदुत्वासाठी भूमिका घेत असतील तर आम्ही कायम त्यांच्या सोबत राहू संग्राम यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना काही जणांकडून साईडलाईन करण्याचा प्रयत्न होत आहे मात्र त्यांची भूमिका रास्त असून हिंदू धर्मासाठी आहे हिंदू धर्मासाठी जर कोणी आवाज उठवत असेल आणि त्याला कोणी विरोध करत असेल तर देखील हिंदू म्हणून त्यांना पाठिंबा देऊ अस देखील सुजय विखे यांनी म्हटलं आहे
बाईट:- सुजय विखे पाटील, माजी खासदार
बाईट:- संग्राम बापू भंडारे
0
Share
Report
Akola, Maharashtra:
2 फाईल्स आहेत..AVB
Anchor : मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना बजेटला मंजूर केली असून शासनाच्या योजनांमधून सर्वोत्तम गांव, शाळा, रस्ते, स्मशानभूमी यासोबतच इतर सगळ्या सुविधांमध्ये जे गाव प्रथम येईल, त्याला बक्षिस देण्यात येईल अशी घोषणा राज्य सरकारने केलीय.. राज्यभरासाठी २५० कोटी रूपयांची ही संकल्पना असून विकासाच्या प्रत्येक टप्पेनुसार विजेत्यांना बक्षिस देण्यात येणार असल्याच ग्रामविकास राज्य मंत्री जयकुमार यांनी म्हंटलय ते अकोला दौऱ्यावर असताना बोलत होते...तर सध्या राज्यात सुरू असलेल्या हिंदी सक्तीच्या विषयावर बोलताना त्यांनी हिंदी भाषेची सक्ती नसून मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आलाच ते म्हणाले..मात्र यासोबत इतर ही भाषा आपल्या मुलांना आल्या पाहिजे असे ही ते म्हणले.. सध्या मुंबई महापालिकेची निवडणूक आहे आणि विरोधकांकडे कुठलाही मुद्दा नाही त्यामुळे निवडणुकीसाठी हा मुद्दा घेऊन काही लोक राजकारण करीत असल्याचंही ते म्हणाले..पावसाळी अधिवेशनावर विरोधक चहापानावर बहिष्कार टाकणार असल्याची शक्यता आहे, यावर त्यांनी विरोधक आहेच कुठं असे म्हटले आहेय..
Byte : जयकुमार गोरे , ग्रामविकास राज्य मंत्री ..
0
Share
Report