Back
हिंजवडीतील जलसंचय समस्येसाठी पीएमआरडीएने घेतले कठोर पाऊल!
Pune, Maharashtra
pune action
kailas puri Pune 28-6-25
feed by 2c
Anchor - पावसाळ्यात वॉटर पार्क होणाऱ्या आणि विविध समस्यांनी ग्रासलेल्या आय टी पार्क हिंजवडीला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यासाठी आयटी इंजिनियर्सनी सह्यांची मोहीम सुरू केली असतानाच हिंजवडी मध्ये पायाभूत सुविधा देणाऱ्या पुणे महानगर प्रदेश विकास महामंडळ अर्थात पीएमआरडीए ने समस्या सोडवण्यासाठी कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे.... पीएमआरडीएने केलेल्या पाहणीत हिंजवडी मध्ये रस्त्यांवर पाणी साचण्यासाठी नैसर्गिक नाल्यांवर केलेलं अतिक्रमण कारणीभूत असल्याचं समोर आलं आहे. हिंजवडी मधील जवळपास 16 नैसर्गिक नाले बुजवण्याचा किंवा त्यांचा प्रवाह बदलण्यात आल्यास पुढे आलं आहे. हे नाले काही बिल्डर्सने बुजवत त्यावर गृह प्रकल्प सुरू केल्याचेही पुढे आलं आहे. त्याचमुळे पीएमआरडीए ने महालक्ष्मी प्रमोटर्स, प्राईम प्रेस रियालिटी ग्रुप आणि इतर आस्थापनांना काम थांबवण्यासंबंधीची अर्थात स्टॉप वर्क नोटीस बजावली आहे. एवढेच नाही तर पीएमआरडीएने संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया ही सुरू करणार असल्याचं स्पष्ट केले आहे. याच संदर्भात पीएमआरडीएचे महानगर आयुक्त योगेश म्हसे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी..!
kailas 1 to 1 vis
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Oros, Maharashtra:
सिंधुदुर्ग --- 2003 मध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखवून हत्याकांड झालेल्या नांदोस गावात सापडला सांगाडा.... पुरुष जातीच्या देहाची केवळ हाडेच राहिली शिल्लक... हाडे सापडल्याने नांदोस परिसरात खळबळ... पोलीस घटनास्थळी दाखल... मृतदेहाशेजारी आढळून आली बॅग... पोलिस तपास सुरू
0
Share
Report
Ratnagiri, Maharashtra:
चिपळूण -
शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी पुन्हा चालवली बस.
चिपळूण डेपो मध्ये नव्याने दाखल झालेल्या पाच बस चे लोकार्पण सोहळ्यात भास्कर जाधव यांचा शहरातून बस चालवत फेरफटका.
आमदार भास्कर जाधव यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शेखर निकम यांची उपस्थिती.
Byte pointer :
एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्यात...या सरकारने त्या पूर्ण केल्यात - भास्कर जाधव यांची खोचक प्रतिक्रिया.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांकडून विविध मागण्या घेऊन अनेक आंदोलने करत शरद पवार यांना टार्गेट करण्यात आलं....
त्या सगळ्या मागण्या या सरकारने पूर्ण केल्या असाव्यात...असे म्हणत भास्कर जाधव यांनी केली सरकार वर टीका.
एसटी कर्मचाऱ्याच्या मागण्यांच्या प्रश्न पावसाळी अधिवेशनात ताकदीने मांडणार : भास्कर जाधव
भास्कर जाधव on राज उध्दव.
मराठी भाषेसाठी दोघे बंधू एकत्र येत आहेत याचा आनंदच....मराठी भाषा टिकली पाहिजे म्हणत दिले अनेक ऐतिहासिक दाखले.
सरकारवर टीका करताना भास्कर जाधव यांनी माध्यमांवर घेतले तोंडसुख....म्हणतात पत्रकारांना मराठी भाषा टिकावी असे वाटत नाही का ?
पत्रकार सरकारचे म्हणून सरकार म्हणतं ते दाखवलं जातं.
माशेलकर यांच्यासह अनेक अहवालांचे दाखले देत भास्कर जाधव यांचे राज्य सरकारवर टीका करत गंभीर आरोप.
भास्कर जाधव on नाराजी.
मला वाचनाची आवड...त्यामुळे जे आवडत ते मी ठेवतो.
नाराजीचा प्रश्नच नाही..... व्हॉट्स अँप स्टेटस वरून भास्कर जाधव यांची सारवा सराव.
लोकेशन : चिपळूण
0
Share
Report
Ratnagiri, Maharashtra:
रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावर सध्या खड्डेच खड्डे पाहायला मिळत आहेत. विशेषतः संगमेश्वर ते रत्नागिरी दरम्यान महामार्गाची काही ठिकाणी अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. आरवली ते बावनदी रस्त्यावर काही ठिकाणी एक फुटांपासून ते अगदी तीन किंवा चार फुटांपर्यंत खड्डे पडले आहेत, त्यामुळे या भागातून वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागतेय.. काही ठिकाणी खड्ड्यांमध्ये नुसती खडी टाकण्यात आली आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या स्थितीमुळे संगमेश्वर ते रत्नागिरी या 45 किलोमीटरच्या प्रवासासाठी तब्बल सव्वा ते दीड तास लागत आहे. त्यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत.
0
Share
Report
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 2806_BHA_ELECTION
FILE - 1 VIDEO
जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या निवडणुकीला सुरुवात शांततेमध्ये पार पडत आहे मतदान प्रक्रिया पोलिसांचा बंदोबस्त
ANCHOR :- भंडारा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाची निवडणुक आज पार पडत आहे.निवडणुकीला नुकतीच सुरुवात झाली असून १२ संचालक असलेल्या या दुध संघाच्या निवडणुकीसाठी २५ उमेदवार रिंगणात आहेत.विद्यमान अध्यक्ष रामलाल चौधरी यांच्या नेतृत्वातील काँग्रेसचे शेतकरी विकास पॅनल आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत विलास काटेखाये नेतृत्वातील सहकार पॅनल समोरासमोर उभे ठाकले आहेत. यामुळे होणाऱ्या या दुग्ध संघाच्या निवडणुकीत मोठी चुरस वाढली आहे.काँग्रेसचे आमदार नाना पटोले आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी या निवडणुकीत हात मिळवणी केल्यामुळे या निवडणुकीत वेगळे समीकरण पाहायला मिळते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
0
Share
Report
Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी- गृहराज्यमंत्री योगेश कदम
मराठी भाषा हीच प्राधान्य
हिंदी भाषेला कुठेही सक्ती केलेली नाही
मोर्चाच्या माध्यमातून मागणी काय हेच आम्हाला कळलं नाही
हिंदी भाषा असू नये यासाठी विरोध आहे का
मुंबई महानगरपालिकेला डोळ्यासमोर ठेवून हा सर्व प्रयत्न केला जातोय
मोर्चेकडून काय साध्य करणार हे सगळे राजकारण
On दादा राऊत
हिंदीची सक्ती केलेली नाही
Gr मध्ये मराठी भाषा सक्तीची आहे
संजय राऊत फक्त आकस आणत आहेत
निवडणुकीच्या तोंडावरती हे राजकारण
ऑन अजित पवार
आमच्या कुटुंबाचा विषय
आमचा कुटुंबामध्ये हा विषय
राज्याच्या कुठल्याही त्याला अडचण नाही
आर्थिक अडचण कुठेही नाही
ऑन Sukla
मुंबईची मराठी माणसांचीच राहणार
मुंबई वरती मराठी माणसाचाच भगवा झेंडा फडकणार
मुंबई मधून मराठी माणूस बाहेर जाऊ देणार नाही
ऑन वसंत मोरे
वसंत मोरे यांनी किती पक्ष बदलले
महाराष्ट्र मध्ये जनतांच्या सोबत
एकनाथ शिंदे यांच्यावरती मराठी माणसांचा विश्वास
ऑन भास्कर जाधव
विरोधी पक्ष नेतेपद मिळवण्यासाठी त्यांचा खटाटोप
भास्कर जाधव ज्येष्ठ नेते
भास्कर जाधव यांच्याशी आमचे वैयक्तिक हेवेदावे नाहीत
भास्कर जाधव यांच्याकडून आम्ही अनेक गोष्टी शिकत आलो आहोत
ऑन रोहिणी खडसे
त्यांच्या घरात पण एक केंद्रीय मंत्री पद आहे
त्यांना सुद्धा त्यांनी एक गाजर द्यावं
कशाला स्वतःच हस करून घेता
महाराष्ट्राचा विकास होतोय एकदाची त्यांच्या पोटात दुखत असेल म्हणून ते असं करत आहेत
ऑन सिंधू रत्न योजना
योजना आपण परत सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहोत
ऑन लडकी बहिण योजना
तुझ्याच माध्यमातून मी ऐकतो आहे
मला या संदर्भात काही माहिती नाही
ऑन विनय नातू
आपण एकाच पक्षातले आहोत
समोरासमोर हा विषय बसून सोडवता येतो
त्यामुळे नातू यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी
0
Share
Report
Nashik, Maharashtra:
nsk_accidetdeath
feed by 2C
image 1 vidoe 1
anchor उपनगर टाकळी मार्गावर अवजड वाहनांना वाहतूक करण्यास बंदी असूनही सर्सासपणे वाहतूक सुरू असते. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रुशिका आनंद चांदवले राहणार रामदास स्वामी नगर ही युवती तिच्या वडिलांसोबत मोटरसायकलने टाकळी रोड, भारत गॅस ऑफिस समोरून जात असताना मद्यधुंद अवस्थेत ट्रक चालकाने भरधाव वेगात त्यांच्या मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या अपघात रुशिका हिच्या डोक्याला, हातापायांना गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ट्रक चालकाला नागरिकांनी चांगला चोप दिला. बराच वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वारंवार स्थानिक नागरिकांनी प्रतिबंधित मुख्य रस्त्यांवर अवजड वाहनांना परवानगी नसताना वाहतूक सुरू असल्याची तक्रार प्रशासनाला दिले आहे, परंतु वाहतूक पोलीस याकडे दुर्लक्ष करत असून निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे.
0
Share
Report
Ambernath, Maharashtra:
बदलापूरच्या रेशनिंग कार्यालयच स्थलांतर नाही
आशिष दामले यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट
रेशनिग कार्ड समस्यांचा निराकरण करण्यासाठी शिबिर
Bdl ration
anchor बदलापूर शहरातील रेशनिंग कार्यालय हे मुरबाडला स्थलांतरित होणार नसून ते बदलापूरलाच राहणार असल्याचं परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांनी सांगितलं, याबाबत आपण नागरी आणि अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी भेट घेऊन घेतली असून भुजबळ यांनी आश्वासन दिले असल्याचं दामले यांनी सांगितलं ,या निर्णयामुळे बदलापूरकरांची मोठी गैरसोय टळणार आहे . तसेच रेशनिंग बाबत नागरिकांच्या अनेक समस्या आहेत, यात धान्य नमिळने, घरमालकाकडून एनओसी मिळत नसल्याने रेशन कार्ड मिळत नाहीये, अश्या अनेक समस्यांचा निराकरण करण्यासाठी आशिष दामले यांनी रेशन कार्ड शिबिराचं आयोजन ही केलं होतं , या शिबिराला रेशनिंग अधिकारी उपस्थित होते या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्यांच्याच निरकरण केलं या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला
चंद्रशेखर भुयार, बदलापूर
0
Share
Report
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - चांदोली धरण 67 टक्के भरले, धरण क्षेत्रात पाऊसाची संततधार सुरूच..
अँकर - सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे.गेल्या 24 तासात 57 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून चांदोली धरणाची पाण्याची पातळी देखील वाढली असून चांदोली धरण जवळपास 67% इतकं भरलं आहे.34.40 टीएमसी इतकी साठवण क्षमता असून 23 टीएमसी इतका पाणीसाठा धरणामध्ये निर्माण झाला आहे.
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2806ZT_JALNA_JARANGE_VSL(8 FILES)
जालना | ब्रेकिंग | मराठा समाजाच्या लेकरांच्या हितासाठी ही अंतरवालीतली शेवटची बैठक-जरांगे
आतापर्यंत काय मिळालं.काय मिळवायचं? मुंबई मोर्चाचा रूट कसा असणार.? याबाबत उद्या चर्चा होणार
आपापली कामे सोडून बैठकीला या-जरांगे
मराठा समाजावर होत असलेला अन्याय थांबवणं हा बैठकीचा अजेंडा
ही अंतरवालीतील शेवटची बैठक आता विजयच मिळवायचा-जरांगे
मराठा समाजासमोर सगळ्या गोष्टींचा उलगडा करणार,आत्ताच सगळं सांगणार नाही-जरांगे
पूर्ण मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही
जरांगे यांचा राज्य सरकारला ईशारा
आंदोलन शांततेत होणार पण विजय घेऊनच माघारी फिरणार-जरांगे
आमचा हा लढा शेवटचा पण आमचा संयम बघू नका,पुन्हा पुन्हा मराठ्यांचा अवमान करु नका
लेकरा बाळांच्या कल्याणासाठी कुणीही घरी राहू नका,सोशल मीडियावर या बैठकीचा आढावा पाहू नका प्रत्यक्ष बैठकीत सहभागी व्हा
आम्ही 2 वर्ष सरकारला वेळ दिला,अजून किती वेळ द्यायचा.?
अँकर | आम्ही 2 वर्ष सरकारला वेळ दिला अजून किती वेळ द्यायचा.? असा सवाल उपस्थित करत मराठा समाजाच्या लेकरांच्या हितासाठी ही अंतरवालीतली उद्याची शेवटची बैठक असल्याचं सांगत उद्याच्या मराठा समाजाच्या बैठकीत प्रत्यक्ष सहभागी व्हा असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केलं आहे.
आतापर्यंत काय मिळालं.काय मिळवायचं? मुंबई मोर्चाचा रूट कसा असणार.? याबाबत उद्याच्या बैठकीत चर्चा होणार असून आपापली कामे सोडून बैठकीला या असंही जरांगे म्हणाले आहेत.मराठा समाजावर होत असलेला अन्याय थांबवणं हा बैठकीचा अजेंडा असून ही अंतरवालीतील शेवटची बैठक आहे. आता विजयच मिळवायचा असं सांगत मराठा समाजासमोर सगळ्या गोष्टींचा उलगडा करणार,आत्ताच सगळं सांगणार नाही असंही जरांगे यांनी स्पष्ट केलंय.
पूर्ण मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय यावेळी मुंबई सोडणार नाही असाही गर्भित ईशारा जरांगे यांनी राज्य सरकारला दिलाय.29 ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन शांततेत होणार पण विजय घेऊनच माघारी फिरणार असा ठाम विश्वास जरांगे यांनी व्यक्त केला.आमचा हा लढा शेवटचा पण आमचा संयम बघू नका,पुन्हा पुन्हा मराठ्यांचा अवमान करु नका अशा शब्दात जरांगे यांनी राज्य सरकारला ठणकावलंय.लेकरा बाळांच्या कल्याणासाठी कुणीही घरी राहू नका,सोशल मीडियावर या बैठकीचा आढावा पाहू नका उद्या दुपारी 12 वाजता होणाऱ्या प्रत्यक्ष बैठकीत सहभागी व्हा असं आवाहनही जरांगे यांनी केलं.
बाईट :मनोज जरांगे पाटील
दरम्यान,उद्याची अंतर वालीतील बैठक ही अंतरवाली गावातच जरांगे यांच्या उपोषणस्थळी होणार असून या बैठकीसाठी तयारी सुरु करण्यात आली आहे.जरांगे यांच्या उपोषणस्थळी मंडप टाकण्याचं काम सुरु करण्यात आलं असून आज संध्याकाळपर्यत मंडप टाकण्याचं काम पूर्ण होणार आहे.
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2806ZT_JALNA_JARANGE_BYTE(4 FILES)
जालना | ब्रेकिंग | मराठा समाजाच्या लेकरांच्या हितासाठी ही अंतरवालीतली शेवटची बैठक-जरांगे
आतापर्यंत काय मिळालं.काय मिळवायचं? मुंबई मोर्चाचा रूट कसा असणार.? याबाबत उद्या चर्चा होणार
आपापली कामे सोडून बैठकीला या-जरांगे
मराठा समाजावर होत असलेला अन्याय थांबवणं हा बैठकीचा अजेंडा
ही अंतरवालीतील शेवटची बैठक आता विजयच मिळवायचा-जरांगे
मराठा समाजासमोर सगळ्या गोष्टींचा उलगडा करणार,आत्ताच सगळं सांगणार नाही-जरांगे
पूर्ण मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही
जरांगे यांचा राज्य सरकारला ईशारा
आंदोलन शांततेत होणार पण विजय घेऊनच माघारी फिरणार-जरांगे
आमचा हा लढा शेवटचा पण आमचा संयम बघू नका,पुन्हा पुन्हा मराठ्यांचा अवमान करु नका
लेकरा बाळांच्या कल्याणासाठी कुणीही घरी राहू नका,सोशल मीडियावर या बैठकीचा आढावा पाहू नका प्रत्यक्ष बैठकीत सहभागी व्हा
आम्ही 2 वर्ष सरकारला वेळ दिला,अजून किती वेळ द्यायचा.?
अँकर | आम्ही 2 वर्ष सरकारला वेळ दिला अजून किती वेळ द्यायचा.? असा सवाल उपस्थित करत मराठा समाजाच्या लेकरांच्या हितासाठी ही अंतरवालीतली उद्याची शेवटची बैठक असल्याचं सांगत उद्याच्या मराठा समाजाच्या बैठकीत प्रत्यक्ष सहभागी व्हा असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केलं आहे.
आतापर्यंत काय मिळालं.काय मिळवायचं? मुंबई मोर्चाचा रूट कसा असणार.? याबाबत उद्याच्या बैठकीत चर्चा होणार असून आपापली कामे सोडून बैठकीला या असंही जरांगे म्हणाले आहेत.मराठा समाजावर होत असलेला अन्याय थांबवणं हा बैठकीचा अजेंडा असून ही अंतरवालीतील शेवटची बैठक आहे. आता विजयच मिळवायचा असं सांगत मराठा समाजासमोर सगळ्या गोष्टींचा उलगडा करणार,आत्ताच सगळं सांगणार नाही असंही जरांगे यांनी स्पष्ट केलंय.
पूर्ण मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय यावेळी मुंबई सोडणार नाही असाही गर्भित ईशारा जरांगे यांनी राज्य सरकारला दिलाय.29 ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन शांततेत होणार पण विजय घेऊनच माघारी फिरणार असा ठाम विश्वास जरांगे यांनी व्यक्त केला.आमचा हा लढा शेवटचा पण आमचा संयम बघू नका,पुन्हा पुन्हा मराठ्यांचा अवमान करु नका अशा शब्दात जरांगे यांनी राज्य सरकारला ठणकावलंय.लेकरा बाळांच्या कल्याणासाठी कुणीही घरी राहू नका,सोशल मीडियावर या बैठकीचा आढावा पाहू नका उद्या दुपारी 12 वाजता होणाऱ्या प्रत्यक्ष बैठकीत सहभागी व्हा असं आवाहनही जरांगे यांनी केलं.
बाईट :मनोज जरांगे पाटील
0
Share
Report