Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Parbhani431401

मराठवाड़ा मुक्ती संग्राम दिवस: Hingoli में ध्वजारोहण और जश्न

GDGAJANAN DESHMUKH
Sept 17, 2025 04:31:39
Parbhani, Maharashtra
अँकर- मराठवाड्यात आज मराठवाड्याचा 77 वा मराठवाडा मुक्ती संग्रामदिन मोठ्या थाटात साजरा होत आहे. यानिमित्ताने हिंगोली येथील मुख्य शासकीय ध्वजारोहन पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते संपन्न झाले. तत्पूर्वी मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांच्या स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने हुतात्म्यांना हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. प्रशासनातील अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी हिंगोली करांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्ताने शुभेच्छा दिल्या.
4
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Sept 17, 2025 08:05:44
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1709ZT_CHP_SEVA_ABHIYAN ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपुरात मोरवा गावातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेचा प्रारंभ, पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांची उपस्थिती, या सेवा पंधरवड्यात गावाचा विकास करण्याचा संकल्प घेण्याचे केले आवाहन      अँकर:--चंद्रपुरात मोरवा गावातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेचा प्रारंभ करण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांची याप्रसंगी उपस्थिती होती. या सेवा पंधरवड्यात गावाचा विकास करण्याचा संकल्प घेण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी व उत्कृष्ट कामगिरीस प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या पुरस्कार योजनेस मान्यता दिली आहे.  यंदा हे अभियान तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश गावा-गावात विकासाची निकोप स्पर्धा निर्माण करणे, सुशासन प्रस्थापित करणे व गावांना आत्मनिर्भरतेकडे नेणे हा आहे. ग्रामपंचायतींच्या मूल्यमापनात लोकसहभाग, पारदर्शक प्रशासन, जलसमृद्धी, स्वच्छता, शिक्षण, महिला सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसविणे, डिजिटल सेवा, कर आणि पाणीपट्टीची 100 टक्के वसुली, मतदार नागरिकांचे ऍप, आयुष्यमान भारत कार्ड व विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी यांचा समावेश असेल. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना आकर्षक प्रोत्साहनपर निधी देण्यात येणार आहे. तालुकास्तरावर प्रथम तीन क्रमांकांना 15 लाख, 12 लाख व 8 लाख, जिल्हास्तरावर 50 लाख, 30 लाख व 20 लाख, विभागस्तरावर 1 कोटी, 80 लाख, 60 लाख व राज्यस्तरावर 5 कोटी, 3 कोटी व  2 कोटी रुपये अशी बक्षिसे निश्चित करण्यात आली आहेत. 17 सप्टेंबर रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायती सक्षम करणे, तळागाळापर्यंत योजनांची पोहोच वाढविणे आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांना चालना देणे या उद्दिष्ट्यांनी या अभियानाचे गुणांकन केले जाणार आहे.  बाईट १) प्रा. डॉ. अशोक उईके, पालकमंत्री, चंद्रपूर आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 17, 2025 08:03:50
Navi Mumbai, Maharashtra:story slug - मंगलप्रभात लोढा ऑन राहुल गांधी FTP slug - panvel mangalprbhat lodha shots- reporter - swati naik navi mumbai anchor - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त संपूर्ण राज्यात स्वच्छता अभियानाचा शुभारंभ पनवेलमधील गव्हाण ग्रामपंचायतीतून करण्यात आला. यावेळी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. तर आयटीआय मधील विद्यार्थ्यांद्वारे ७५० गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवले जात आहे. बाईट पॉइंटर्स ऑन नरेंद्र मोदी वाढदिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ईश्वर त्यांना दीर्घायुष्य द्यावा व त्यांचे नेतृत्व आम्हाला लाभावे अशी प्रार्थना ऑन पाकिस्तान शाहिद आफ्रिदी शाहिद आफ्रिदीला राहुल गांधी यांना कोणते पंतप्रधान बनवायचे ते विचारा, भारतामध्ये तर काही चान्स नाही त्यांचा ऑन राज भेट राज ठाकरेंसोबत अशी कोणतीही भेट झाली नाही, मंगलप्रभात लोढा यांनी राज भेटीवर बोलण टाळल बाईट - मंगलप्रभात लोढा
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 17, 2025 08:01:32
Washim, Maharashtra:वाशीम: FILE2:1709ZT_WSM_BANJAR_MORCHA_WKT WSM_BANJAR_MORCHA_SHOTS अँकर:मनोज जरांगे पाटील यांच्या मुबंईतील आंदोलनानंतर राज्य शासनाने हैदराबाद गॅझेटच्या आधारे अधिसूचना काढून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा केला.ओबीसी आरक्षणाची दारे खुली झाल्यानंतर आता याच गॅझेटला आधार मानून राज्यातील बंजारा समाजालाही अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणात समाविष्ट करावे,अशी मागणी जोर धरू लागली आहे.या मागणीसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये बंजारा समाजाने मोठ्या प्रमाणावर मोर्चे काढण्यात येतं आहेत.त्याच पार्श्वभूमीवर आज वाशिम जिल्ह्यातील मानोरा शहरातील पंचायतसमिती पासून तहसील कार्यालयापर्यंत हा बंजारा समाजाकडून मोर्चा काढला काढण्यात आला आहे यावेळी मोठ्या संख्येने बंजारा बांधव सहभागी झाले असून या मोर्चाद्वारे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे.याच बाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी..
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 17, 2025 07:48:26
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1709ZT_CHP_UIKE_BITE ( single file sent on 2C)  टायटल:-- आदिवासी बांधवांना मिळालेले आरक्षण घटनात्मक, त्यात घुसखोरी होऊ न देण्याचा संकल्प, बंजारा- धनगर समाजाला एसटी घटकातून आरक्षण देण्याच्या मागणी संदर्भात आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची प्रतिक्रिया      अँकर:-- आदिवासी समाज बांधवांना मिळालेले आरक्षण घटनात्मक आहे. त्यात घुसखोरी होऊ न देण्याचा संकल्प मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी दिली आहे. राज्यात बंजारा- धनगर समाजाला एसटी घटकातून आरक्षण देण्याच्या मागणी संदर्भात गदारोळ होत असताना राज्यातील महत्त्वाचे आदिवासी नेते प्रा. डॉ. उईके यांची प्रतिक्रिया लक्षवेधी ठरली आहे. बाईट १) डॉ. अशोक उईके, आदिवासी विकास मंत्री आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 17, 2025 07:36:15
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - अभियंता आत्महत्या प्रकरणी जत मध्ये महाविकास आघाडीचे निदर्शने अँकर - सांगलीच्या जत येथे महाविकास आघाडीकडून पंचायत समितीचे बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता अवधूत वडर याच्या आत्महत्या प्रकरणी आंदोलन करण्यात आले आहे.जत पंचायत समितीच्या कार्यालयासमोर काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करत,राजकीय पदाधिकाऱ्यांच्या दबावाला व काही कर्मचाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून ही आत्महत्या झाल्याचा आरोप करण्यात आला,तसेच मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावी,अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत यांनी केली आहे.या आत्महत्या प्रकरणी मृत अभियंता अवधूत वडार याच्या कुटुंबाकडून भाजपाचे जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेकांवर मृत्यूला कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
3
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Sept 17, 2025 07:35:44
Amravati, Maharashtra:Feed slug :- AMT_SAUR_RAIN सात फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोल्यांमध्ये शिरले पाणी, शैक्षणिक साहित्य भिजले, विद्यार्थ्यांचे हाल अँकर :– अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे त्यामुळे भातकुली तालुक्यातील साहूर जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोल्यामध्ये पावसाचे पाणी शिरले असल्याने शाळेच्या वर्ग खोल्यांमध्ये दोन फूट पाणी साचले आहे त्यामुळे शाळेतील शैक्षणिक साहित्य भिजले आहे. शाळेतील शैक्षणिक साहित्याचे मोठे नुकसान झाले असून तसेच वर्ग खोल्यांमध्ये पाणी शिरल्याने विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नसल्याने विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाल्याचे पाहायला मिळत आहे. बाईट :– जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 17, 2025 07:31:30
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या जेटींना मंजुरी राजापुरातील देवाचेगोठणे-करंबेळकरवाडी, दापोलीतील उटंबर आणि मालवणातील पेंडूर येथे उभ्या राहणार नव्या जेटी मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून पर्यटन व मत्स्यव्यवसायाला मिळणार चालना कोकणच्या अर्थकारणाला मिळणार नवी दिशा; रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार रत्नागिरी : प्रतिनिधी मत्स्यव्यवसाय व बंदरे खात्याचा कार्यभार ना. नितेश राणे यांच्याकडे आल्यानंतर मासेमारी व्यवसायाबरोबरच पर्यटन वाढ या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय त्यांनी घेतले असून त्याचाच एक भाग म्हणून कोकणातील पर्यटन आणि मासेमारी व्यवसायाच्या वाढीसाठी व त्यांना अधिक चालना देण्यासाठी राज्य शासनाने कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील २ व सिंधुदुर्ग मधील १ अशा तीन ठिकाणी नव्या जेटी उभारण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. तसेच राज्याच्या महाराष्ट्र सागरी प्राधिकरणाकडून सीआरझेड विषयी देखील मंजुरी देण्यात आली आहे. राज्य शासनाने मंजूर केलेल्या तीन जेटीं मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर तालुक्यातील देवाचेगोठणे येथील करंबेळकरवाडी, दापोली तालुक्यातील उटंबर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील पेंडूर याठिकाणी नव्या जेटी उभारण्यात येणार आहे. कोकणात मासेमारी बरोबर पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकर वाडा बंदराचा विकास करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. नव्याने मंजूर करण्यात आलेल्या या तिन्ही जेटींचे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय प्राधिकरणाकडे पाठविण्यात आले आहेत. ना. नितेश राणे यांनी खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले आहेत. मत्स्य व्यवसायाला त्यांनी जल पर्यटनाची जोड दिली आहे. किनारपट्टीवर सोयी सुविधा बळकट केल्या तर त्याचा फायदा होईल हे लक्षात घेऊन त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोकणच्या किनारपट्टीवर नव्याने जेटी उभ्या राहिल्यास कोकणचा आर्थिक विकास साधला जाणार आहे. मासेमारी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी जेटी अत्यंत महत्त्वाच्या असून या जेटीमुळे मासेमारी नौका, प्रवासी बोटी आणि रो-रो जहाजे यांना सुरक्षित थांबा मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांची तसेच मालाची वाहतूक अधिक सोयीस्कर करता येणार आहे. या तीन नव्या जेटींमुळे कोकणातील किनारपट्टीवरील पर्यटन वृद्धी होणार असून पर्यटनातून आर्थिक विकास होण्यास चालना मिळणार आहे. यातूनच स्थानिकांना रोजगार आणि व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. या जेटींच्या माध्यमातून कोकण आणि मुंबई पुन्हा एकदा सागरी मार्गाने जोडले जावून यामुळे प्रवास खर्च आणि वेळ दोन्हींची बचत होणार आहे.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 17, 2025 07:16:38
Parbhani, Maharashtra:अँकर- हिंगोलीच्या कळमनुरी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आज हैदराबाद गॅजीटीअर रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी बांधवांच्या वतीने एल्गार मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चाला ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी औंढा नागनाथाचे दर्शन घेतले असून माध्यमांशी बातचीत केलीय. फडणवीस ऑन लक्ष्मण हाके सरकारने काढलेला हैदराबाद गॅझेटीअर चा शासन निर्णय हा ओबीसी आरक्षण संपवणारा जीआर आहे. मुख्यमंत्री यांच्यावर आमचा विस्वास आहे. त्यांनी हा जिआर रद्द करावा.. कुणबी ऑन लक्ष्मण हाके. आज हिंगोलीत कुणबी प्रमाणपत्र दिले त्याच जिल्ह्यात आम्ही ते रद्द करावा म्हणून आंदोलन करत आहोत. ज्या सत्ताधारी आणि विरोधकांना मराठा समाजाच्या मतांची काळजी लागली त्यांना आम्ही धडा शिकवणार.. बंजारा ऑन हाके.. हैद्राबाद गॅझेट नुसार जर मराठ्यांना आरक्षण मिळू शकत तर तांडा वस्तीवर राहणाऱ्या बाजारा समाजाला ही वाटू शकत.. बंजारा समाजाला विनंती आहे आपल्या ताटातल आरक्षण वाचवन हे गरजेचे आहे.आपलं झोपडं आधी वाचवू आपल्यात फूट पडेल असं कुठल्याच समाजाने वागू नये.. हाके यांचं बाजारा समाजाला आवाहन जरागे ऑन हाके.. विरोधी पक्षानें एका चौथी नापास व्यक्तीला या आंदोलनाचं नेतृत्व दिल त्यांना रसद पुरवली त्यांनी बेकायदा मागणी केली आणि त्यांच्या म्हणण्यावर सरकार हा बेकायदा जीआर काढला. On शरद पवार- शरद पवारांनी जरांगेना उपोषणाला बसवलं जरांगे पाटलांच आंदोलन विरोधी पक्षांनी उभं केलं,जर त्यांनी आंदोलन उभं केलं नसत,तर आमचं आरक्षण गेलं नसत,शरद पवारांनी जर आंदोलन उभं केलं नसत,ही बेकायदा मागणी आहे असं सांगितलं असत,माझी राजकीय कारकीर्द एवढ्या वर्षाची आहे,हे मागासांच आरक्षण आहे. हे जर शरद पवारांनी मनोज जरांगे पाटलांच्या कानात सांगितलं असत. ही वेळ आमच्यावर आली नसती अस लक्ष्मण हाके म्हणाले... तुम्ही नेहमी शरद पवारांवर टीका करता,जीआर तर फडणवीसांनी काढलाय ना जीआर फाडून टाकलाय ना आम्ही,त्यांचं काय कौतुक करतोय का आम्ही, शासनाच्या विरोधात आम्ही रस्त्यावर आहे. फडणवीस म्हणतायत ओबीसीचा डी इन ए - म्हणून चालणार नाही,तर ते कतृत्वाकने दाखवाव लागेल....
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 17, 2025 06:48:45
Jalna, Maharashtra: FEED NAME | 1709ZT_JALNA_RASTA_ROKO(12 FILES) जालना :जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंजारा समाजाचा अचानक रास्ता रोको जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषणाला पंकजांनी भेट दिली नसल्याने बंजारा समाज आक्रमक एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची बंजारा समाजाची मागणी अँकर- जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंजारा समाजाने अचानक रास्ता रोको आंदोलन सुरु केलंय.. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं. यासाठी बंजारा समाजाचे दोघे आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. मात्र अद्याप कोणतिही दखल प्रशासनाने घेतली नाही. पंकजा मुंडे जालना दौर्यावर असताना उपोषणस्थळी भेट दिली नाही. त्यामुळं बंजारा समाजाच्या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन सुरु केलंय.. बाईट- नितीन राठोड, आंदोलक बाईट- अर्जुन नायक, आंदोलक
5
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 17, 2025 06:45:50
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn cm program Feed by link छत्रपती संभाजी नगरच्या किनगाव मध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंचायतराज समृद्ध अभियान या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आलं.. ग्रामीण भागांतील विकासासाठी असलेल्या सर्व योजना एकाच छताखाली उपलब्ध होतील अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे,  यातून गावागावांमध्ये स्पर्धा लावून विकासात कुठलं गाव पहिल्या नंबर वर येईल याकडे राज्य सरकारचे लक्ष असेल असं मुख्यमंत्री म्हणाले.. Cm भाषण इतर पॉइंटर्स प्रधानमंत्री जन्म दिवस निमित्ताने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज कार्यक्रमाला आज आपण सुरुवात करतोय देशातील 25 कोटी लोक भारतात आता गेल्या 10 वर्षात गरिबीतून बाहेर आले...  मोदी साहेबांच्या नेतृत्वात विकास सुरुय... समृद्ध भारतासाठी समृद्ध पंचायत राज गरजेचे आहे कुठलेही गाव मागे राहू नये म्हणून समृद्ध पंचायत राज कार्यक्रम आपण सुरू केलाय,  जलयुक्त शिवार योजनेने 20 हजार गावांना समृद्ध केले, हे काम कायम सुरुय लाडक्या बहिणीला आपण 1500 रुपये देतो काही सावत्र भाऊ म्हणतात योजना बंद होईल पण योजना बंद होणार नाही, नाही नाही उलट लवकरच आम्ही जास्त पैसे देणार आहोत.... महिला सक्षमीकरण आपले ध्येय आहे ...जिल्हा बँकेच्या वतीने आम्ही लाडक्या बहिणींना कर्ज देतोय, प्रवीण दरेकर यांनी ही योजना सुरू केली आहे... आम्हाला महिलांना लखपती दीदी करायचं आहे, 25 लाख लखपती दीदी तयार केल्या अजून 25 लाख करतोय, 1 कोटी महिलांना लखपती दीदी करायचा आमचा मानस आहे....ती 1500 रुपयांवर जिवंत राहणार नाही तर लखपती बनून परिवर्तन घडवेल आपल्यात फूट पाडणारे अनेक आहेत पण आपण एक राहू समृद्ध होऊ स्पर्धा आजपासून सुरू झाली कुठलं गाव बाजी मारेल याकडे आमचं लक्ष आहे
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Sept 17, 2025 06:30:57
Mumbai, Maharashtra:anchor : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७५ वा वाढदिवस …या निम्मित आज घाटकोपर पूर्व येथे आमदार पराग शहा आणि पारसधाम संस्थेच्या वतीने ७५ नव नवीन मोफत योजनांची सुरुवात करण्यात आली. जैन मुनी श्री नम्रमुनी यांच्या संकल्पनेतून या योजना सुरू करण्यात आल्या आहेत.यात मोफत गायींना खाद्य, नमो टी स्टॉल, गरजूंना मोफत कार, रिक्षा, शिलाई, लैपटॉप, सायकल इत्यादी वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे, तर मोफत विविध आरोग्य योजना, शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.आज पासून या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. पंतप्रधानाचे विचार भारतातील साधू संतांना ही प्रेरणा देत आहेत आणि म्हणून नम्रमुनी यांच्या संकल्पनेतून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त या ७५ मोफत योजना सुरू करीत असल्याचे आमदार पराग शहा म्हणाले. byte : पराग शहा(भाजप आमदार)
0
comment0
Report
Advertisement
Back to top