Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना में बंजारा समाज ने जिला कलेक्टर कार्यालय के सामने रास्ता रोको, आरक्षण मांगें तेज़

NMNITESH MAHAJAN
Sept 17, 2025 06:48:45
Jalna, Maharashtra
FEED NAME | 1709ZT_JALNA_RASTA_ROKO(12 FILES) जालना :जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंजारा समाजाचा अचानक रास्ता रोको जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषणाला पंकजांनी भेट दिली नसल्याने बंजारा समाज आक्रमक एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची बंजारा समाजाची मागणी अँकर- जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंजारा समाजाने अचानक रास्ता रोको आंदोलन सुरु केलंय.. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं. यासाठी बंजारा समाजाचे दोघे आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. मात्र अद्याप कोणतिही दखल प्रशासनाने घेतली नाही. पंकजा मुंडे जालना दौर्यावर असताना उपोषणस्थळी भेट दिली नाही. त्यामुळं बंजारा समाजाच्या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन सुरु केलंय.. बाईट- नितीन राठोड, आंदोलक बाईट- अर्जुन नायक, आंदोलक
5
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SNSWATI NAIK
Sept 17, 2025 09:05:31
Navi Mumbai, Maharashtra:story slug - जेएनपीए बंदरावर डीआरआय ची मोठी कारवाई, 28 कंटेनर भरून आलेला 800 मेट्रिक टन पाकिस्तानी माल केला जप्त. FTP slug - nm jnpt port shots- photo reporter- swati naik navi mumbai Anchor -: पहलगाम हल्ल्यानंतर मे 2025 पासून पाकिस्तानी मालाच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयातीवर भारताने बंदी घातली असतानाही यूएईच्या नावाने पाठवलेल्या 800 मेट्रिक टन पाकिस्तानी मालाच्या आयातीचा पर्दाफाश करण्यात आलाय. ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेय. सदर कारवाई मुंबई महसूल गुप्तचर संचालनालय अर्थात डीआरआय च्या पथकाने जेएनपीए बंदरात केलेय. कारवाईदरम्यान 28 कंटेनरमधील 12 कोटी रुपयांचे सौंदर्य प्रसाधने, सुके खजूर जप्त करण्यात आले असून दोन जणांना अटक करण्यात आलेय. gf- photo ====================
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 17, 2025 08:48:38
4
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Sept 17, 2025 08:45:22
Buldhana, Maharashtra:बुलढाणा ब्रेकिंग पीकपाणी *बुलढाणा जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस ..... सिंदखेडराजा तालुक्यात शेतीला तलावाचे स्वरूप ....* *शेतकऱ्यांचे शेतामध्ये पाणी साचलेल्या पाण्यात आंदोलन सुरू..* *जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी...* Anchor - सिंदखेडराजा तालुक्यात गेल्या दोन महिन्यापासून सततधार पाऊस कोसळत आहे तर काही दिवसापासून ढगफुटी झालि आहे त्यामुळे तालुक्यातील सर्व शेताना तलावाचे स्वरूप आले आहे , पळसखेड चक्का या गाव परिसरा तील शेताला तलावाच स्वरूप आल्याने शेतकऱ्यांनी शेतातील पाण्यात बसून आंदोलन सुरु केलाय... शेतीच मोठ नुकसान झालंय... कापूस पिक नष्ट झाले आहे .. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आलाय..ताटडीने जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे... बाईट - बालाजी सोसे, शेतकरी..
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Sept 17, 2025 08:35:29
Buldhana, Maharashtra:बुलढाण्यात मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध, शिवसैनिकांनी केले आंदोलन Anchor - मुंबईतील दादर येथे स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेनंतर राज्यभर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. याच घटनेच्या निषेधार्थ बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरातही शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन केले. या घटनेमुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या असून, त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आंदोलनकर्त्या शिवसैनिकांनी "मीनाताई ठाकरे अमर रहे" च्या घोषणा देत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध करताना सांगितले की, "ज्यांनी कोणी हे कृत्य केले आहे, त्यांच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे. मीनाताई ठाकरे या महाराष्ट्राच्या मातेसमान आहेत आणि त्यांच्या पुतळ्याचा अपमान हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे." या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. byte - शिवसैनिक
4
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 17, 2025 08:32:45
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव ब्रेकिंग DHARA_BREAKING_R2 धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील वाघेगव्हाण गावात गर्भवती महिलेला पुराच्या पाण्यातून रुग्णालयात दाखल करण्याचा थरारक प्रसंग. मध्यरात्री अंधारात गावकऱ्यांनी डबक्याची नाव बनवून गर्भवती महिलेला दिला जीवदान. ग्रामस्थांच्या धाडसी प्रयत्नामुळे महिलेचे वाचले प्राण. अतिवृष्टीमुळे गावात निर्माण झालेल्या पुरस्थितीत महिलेला आली प्रसूती वेदना, संकटात सापडले गावकरी. तत्काळ ग्रामस्थांनी एकजुटीने पुराच्या पाण्यातून मार्ग काढत महिलेला पोचवलं मुख्य रस्त्यापर्यंत. महिलेवर परंडा ग्रामीण रुग्णालयात सुरू उपचार, महिला सुरक्षित. गावकऱ्यांच्या धाडसाचे आणि एकजुटीचे सर्वत्र होत आहे कौतुक.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 17, 2025 08:31:33
Kolhapur, Maharashtra:Story:- Kop Alamatti Dam PKG Feed:- 2C Anc:- कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढ करण्यासंदर्भात कॅबिनेट बैठकीत निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार कर्नाटक सरकारने महाराष्ट्राचा विरोध असतानाही अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर पट्ट्यात संताप व्यक्त केला जात आहे. GFX in अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा कर्नाटक राज्य मंत्रिमंडळात निर्धार अलमट्टी उंची वाढवण्यासाठी 70 हजार कोटीची केली तरतूद. अलमट्टी धरणाची उंची 519. 6 मीटर वरून 524. 256 मीटर इतकी उंची वाढणार अलमट्टीची उंची वाढवण्यासाठी 1 लाख 33 हजार इतक्या जमिनीचे होणार भूसंपादन 40 हजार एकर बागायत शेती आणि 30 हजार एकर नापीक शेती भूसंपादित केली जाणार. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी बागलकोट जिल्ह्यातील वीस गावांचे आणि अकरा वॉर्डचे विस्थापित केले जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील गावांना देखील अलमट्टीच्या उंचीचा फटका बसणार.. महाराष्ट्र शासनाचा विरोध डावलून कर्नाटक सरकारने अलमट्टीची उंची वाढवण्यासाठी 70 हजार कोटीची केली तरतूद .. आत्ता राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे लक्ष. GRX Out:- VO 1:- कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घाट घातला आहे. त्याला महाराष्ट्राचा पूर्ण विरोध आहे. काही महिन्यापूर्वी मुंबईत मंत्रालयात जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत अलमट्टीच्या प्रस्तावित उंची वाढीला विरोध दर्शवण्यासाठी बैठक झाली. त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक लोकप्रतिनिधी नवी दिल्लीत केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना निवेदन दिले. अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्हयात महापूराचे संकट अतिगंभीर होवू शकते तर कित्येक भूभाग कायमचा पाण्याखाली जावू शकतो हेही पटवून सांगितले. पण कर्नाटक सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यावर शिक्का मोर्तब होवून तब्बल 70 हजार कोटीची तरतूद केली. कर्नाटक सरकारला केंद्रीय लवादाने धरणाची उंची वाढवण्यास हिरवा कंदिल दिला असला तरी अलमट्टीची उंची वाढवणं व्यवहार्य नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने कर्नाटक सरकारला खडसावून सांगण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे. . इतकच न्हवे तर अलमट्टी धरणाच्या उंची वाढीसाठी कर्नाटक सरकारच्या हालचालीवरून राजू शेट्टी चांगलेच संतापले आहेत. Byte :- राजू शेट्टी, नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना VO 2:- अलमट्टीची उंची वाढवण्याचा प्रश्‍न आता सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असून, महाराष्ट्र सरकारने यापूर्वी धरणाच्या उंची वाढीला विरोध दर्शवला आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी कोणताही निर्णय दिलेला नाही. अशा परिस्थितीत कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रयत्न करू नये, किंवा महाराष्ट्राच्या जनतेमध्ये भिती निर्माण होईल अशी कृती करू नये अशी अपेक्षा कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील नागरिकांचे म्हणणे आहे. Byte:- पूरग्रस्त भागातील शेतकरी VO 3:- एकीकडे कर्नाटक सरकारने अलमट्टी धरण उंची वाढीला मंत्रिमंडळाची मंजुरी दिली, तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्राला मात्र याचा धसका बसलाय.. अशा परिस्थितीत राज्य सरकार कशा प्रकारचे पावले उचलून कृती करतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.. प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 17, 2025 08:05:44
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1709ZT_CHP_SEVA_ABHIYAN ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपुरात मोरवा गावातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेचा प्रारंभ, पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांची उपस्थिती, या सेवा पंधरवड्यात गावाचा विकास करण्याचा संकल्प घेण्याचे केले आवाहन      अँकर:--चंद्रपुरात मोरवा गावातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेचा प्रारंभ करण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांची याप्रसंगी उपस्थिती होती. या सेवा पंधरवड्यात गावाचा विकास करण्याचा संकल्प घेण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी व उत्कृष्ट कामगिरीस प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या पुरस्कार योजनेस मान्यता दिली आहे.  यंदा हे अभियान तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश गावा-गावात विकासाची निकोप स्पर्धा निर्माण करणे, सुशासन प्रस्थापित करणे व गावांना आत्मनिर्भरतेकडे नेणे हा आहे. ग्रामपंचायतींच्या मूल्यमापनात लोकसहभाग, पारदर्शक प्रशासन, जलसमृद्धी, स्वच्छता, शिक्षण, महिला सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसविणे, डिजिटल सेवा, कर आणि पाणीपट्टीची 100 टक्के वसुली, मतदार नागरिकांचे ऍप, आयुष्यमान भारत कार्ड व विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी यांचा समावेश असेल. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना आकर्षक प्रोत्साहनपर निधी देण्यात येणार आहे. तालुकास्तरावर प्रथम तीन क्रमांकांना 15 लाख, 12 लाख व 8 लाख, जिल्हास्तरावर 50 लाख, 30 लाख व 20 लाख, विभागस्तरावर 1 कोटी, 80 लाख, 60 लाख व राज्यस्तरावर 5 कोटी, 3 कोटी व  2 कोटी रुपये अशी बक्षिसे निश्चित करण्यात आली आहेत. 17 सप्टेंबर रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायती सक्षम करणे, तळागाळापर्यंत योजनांची पोहोच वाढविणे आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांना चालना देणे या उद्दिष्ट्यांनी या अभियानाचे गुणांकन केले जाणार आहे.  बाईट १) प्रा. डॉ. अशोक उईके, पालकमंत्री, चंद्रपूर आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 17, 2025 08:03:50
Navi Mumbai, Maharashtra:story slug - मंगलप्रभात लोढा ऑन राहुल गांधी FTP slug - panvel mangalprbhat lodha shots- reporter - swati naik navi mumbai anchor - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त संपूर्ण राज्यात स्वच्छता अभियानाचा शुभारंभ पनवेलमधील गव्हाण ग्रामपंचायतीतून करण्यात आला. यावेळी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. तर आयटीआय मधील विद्यार्थ्यांद्वारे ७५० गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवले जात आहे. बाईट पॉइंटर्स ऑन नरेंद्र मोदी वाढदिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ईश्वर त्यांना दीर्घायुष्य द्यावा व त्यांचे नेतृत्व आम्हाला लाभावे अशी प्रार्थना ऑन पाकिस्तान शाहिद आफ्रिदी शाहिद आफ्रिदीला राहुल गांधी यांना कोणते पंतप्रधान बनवायचे ते विचारा, भारतामध्ये तर काही चान्स नाही त्यांचा ऑन राज भेट राज ठाकरेंसोबत अशी कोणतीही भेट झाली नाही, मंगलप्रभात लोढा यांनी राज भेटीवर बोलण टाळल बाईट - मंगलप्रभात लोढा
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 17, 2025 08:01:32
Washim, Maharashtra:वाशीम: FILE2:1709ZT_WSM_BANJAR_MORCHA_WKT WSM_BANJAR_MORCHA_SHOTS अँकर:मनोज जरांगे पाटील यांच्या मुबंईतील आंदोलनानंतर राज्य शासनाने हैदराबाद गॅझेटच्या आधारे अधिसूचना काढून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा केला.ओबीसी आरक्षणाची दारे खुली झाल्यानंतर आता याच गॅझेटला आधार मानून राज्यातील बंजारा समाजालाही अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणात समाविष्ट करावे,अशी मागणी जोर धरू लागली आहे.या मागणीसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये बंजारा समाजाने मोठ्या प्रमाणावर मोर्चे काढण्यात येतं आहेत.त्याच पार्श्वभूमीवर आज वाशिम जिल्ह्यातील मानोरा शहरातील पंचायतसमिती पासून तहसील कार्यालयापर्यंत हा बंजारा समाजाकडून मोर्चा काढला काढण्यात आला आहे यावेळी मोठ्या संख्येने बंजारा बांधव सहभागी झाले असून या मोर्चाद्वारे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे.याच बाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी..
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 17, 2025 07:48:26
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1709ZT_CHP_UIKE_BITE ( single file sent on 2C)  टायटल:-- आदिवासी बांधवांना मिळालेले आरक्षण घटनात्मक, त्यात घुसखोरी होऊ न देण्याचा संकल्प, बंजारा- धनगर समाजाला एसटी घटकातून आरक्षण देण्याच्या मागणी संदर्भात आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची प्रतिक्रिया      अँकर:-- आदिवासी समाज बांधवांना मिळालेले आरक्षण घटनात्मक आहे. त्यात घुसखोरी होऊ न देण्याचा संकल्प मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी दिली आहे. राज्यात बंजारा- धनगर समाजाला एसटी घटकातून आरक्षण देण्याच्या मागणी संदर्भात गदारोळ होत असताना राज्यातील महत्त्वाचे आदिवासी नेते प्रा. डॉ. उईके यांची प्रतिक्रिया लक्षवेधी ठरली आहे. बाईट १) डॉ. अशोक उईके, आदिवासी विकास मंत्री आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
2
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 17, 2025 07:36:15
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - अभियंता आत्महत्या प्रकरणी जत मध्ये महाविकास आघाडीचे निदर्शने अँकर - सांगलीच्या जत येथे महाविकास आघाडीकडून पंचायत समितीचे बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता अवधूत वडर याच्या आत्महत्या प्रकरणी आंदोलन करण्यात आले आहे.जत पंचायत समितीच्या कार्यालयासमोर काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करत,राजकीय पदाधिकाऱ्यांच्या दबावाला व काही कर्मचाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून ही आत्महत्या झाल्याचा आरोप करण्यात आला,तसेच मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावी,अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत यांनी केली आहे.या आत्महत्या प्रकरणी मृत अभियंता अवधूत वडार याच्या कुटुंबाकडून भाजपाचे जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेकांवर मृत्यूला कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
3
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Sept 17, 2025 07:35:44
Amravati, Maharashtra:Feed slug :- AMT_SAUR_RAIN सात फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोल्यांमध्ये शिरले पाणी, शैक्षणिक साहित्य भिजले, विद्यार्थ्यांचे हाल अँकर :– अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे त्यामुळे भातकुली तालुक्यातील साहूर जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोल्यामध्ये पावसाचे पाणी शिरले असल्याने शाळेच्या वर्ग खोल्यांमध्ये दोन फूट पाणी साचले आहे त्यामुळे शाळेतील शैक्षणिक साहित्य भिजले आहे. शाळेतील शैक्षणिक साहित्याचे मोठे नुकसान झाले असून तसेच वर्ग खोल्यांमध्ये पाणी शिरल्याने विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नसल्याने विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाल्याचे पाहायला मिळत आहे. बाईट :– जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक
1
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 17, 2025 07:31:30
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या जेटींना मंजुरी राजापुरातील देवाचेगोठणे-करंबेळकरवाडी, दापोलीतील उटंबर आणि मालवणातील पेंडूर येथे उभ्या राहणार नव्या जेटी मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून पर्यटन व मत्स्यव्यवसायाला मिळणार चालना कोकणच्या अर्थकारणाला मिळणार नवी दिशा; रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार रत्नागिरी : प्रतिनिधी मत्स्यव्यवसाय व बंदरे खात्याचा कार्यभार ना. नितेश राणे यांच्याकडे आल्यानंतर मासेमारी व्यवसायाबरोबरच पर्यटन वाढ या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय त्यांनी घेतले असून त्याचाच एक भाग म्हणून कोकणातील पर्यटन आणि मासेमारी व्यवसायाच्या वाढीसाठी व त्यांना अधिक चालना देण्यासाठी राज्य शासनाने कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील २ व सिंधुदुर्ग मधील १ अशा तीन ठिकाणी नव्या जेटी उभारण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. तसेच राज्याच्या महाराष्ट्र सागरी प्राधिकरणाकडून सीआरझेड विषयी देखील मंजुरी देण्यात आली आहे. राज्य शासनाने मंजूर केलेल्या तीन जेटीं मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर तालुक्यातील देवाचेगोठणे येथील करंबेळकरवाडी, दापोली तालुक्यातील उटंबर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील पेंडूर याठिकाणी नव्या जेटी उभारण्यात येणार आहे. कोकणात मासेमारी बरोबर पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकर वाडा बंदराचा विकास करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. नव्याने मंजूर करण्यात आलेल्या या तिन्ही जेटींचे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय प्राधिकरणाकडे पाठविण्यात आले आहेत. ना. नितेश राणे यांनी खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले आहेत. मत्स्य व्यवसायाला त्यांनी जल पर्यटनाची जोड दिली आहे. किनारपट्टीवर सोयी सुविधा बळकट केल्या तर त्याचा फायदा होईल हे लक्षात घेऊन त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोकणच्या किनारपट्टीवर नव्याने जेटी उभ्या राहिल्यास कोकणचा आर्थिक विकास साधला जाणार आहे. मासेमारी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी जेटी अत्यंत महत्त्वाच्या असून या जेटीमुळे मासेमारी नौका, प्रवासी बोटी आणि रो-रो जहाजे यांना सुरक्षित थांबा मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांची तसेच मालाची वाहतूक अधिक सोयीस्कर करता येणार आहे. या तीन नव्या जेटींमुळे कोकणातील किनारपट्टीवरील पर्यटन वृद्धी होणार असून पर्यटनातून आर्थिक विकास होण्यास चालना मिळणार आहे. यातूनच स्थानिकांना रोजगार आणि व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. या जेटींच्या माध्यमातून कोकण आणि मुंबई पुन्हा एकदा सागरी मार्गाने जोडले जावून यामुळे प्रवास खर्च आणि वेळ दोन्हींची बचत होणार आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top