Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415639
रत्नागिरी- सिंधुदुर्ग में तीन नई जेटी: पर्यटन-मत्स्य उद्योग में बड़ा उछाल
PPPRANAV POLEKAR
Sept 17, 2025 07:31:30
Ratnagiri, Maharashtra
रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या जेटींना मंजुरी राजापुरातील देवाचेगोठणे-करंबेळकरवाडी, दापोलीतील उटंबर आणि मालवणातील पेंडूर येथे उभ्या राहणार नव्या जेटी मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून पर्यटन व मत्स्यव्यवसायाला मिळणार चालना कोकणच्या अर्थकारणाला मिळणार नवी दिशा; रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार रत्नागिरी : प्रतिनिधी मत्स्यव्यवसाय व बंदरे खात्याचा कार्यभार ना. नितेश राणे यांच्याकडे आल्यानंतर मासेमारी व्यवसायाबरोबरच पर्यटन वाढ या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय त्यांनी घेतले असून त्याचाच एक भाग म्हणून कोकणातील पर्यटन आणि मासेमारी व्यवसायाच्या वाढीसाठी व त्यांना अधिक चालना देण्यासाठी राज्य शासनाने कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील २ व सिंधुदुर्ग मधील १ अशा तीन ठिकाणी नव्या जेटी उभारण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. तसेच राज्याच्या महाराष्ट्र सागरी प्राधिकरणाकडून सीआरझेड विषयी देखील मंजुरी देण्यात आली आहे. राज्य शासनाने मंजूर केलेल्या तीन जेटीं मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर तालुक्यातील देवाचेगोठणे येथील करंबेळकरवाडी, दापोली तालुक्यातील उटंबर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील पेंडूर याठिकाणी नव्या जेटी उभारण्यात येणार आहे. कोकणात मासेमारी बरोबर पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकर वाडा बंदराचा विकास करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. नव्याने मंजूर करण्यात आलेल्या या तिन्ही जेटींचे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय प्राधिकरणाकडे पाठविण्यात आले आहेत. ना. नितेश राणे यांनी खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले आहेत. मत्स्य व्यवसायाला त्यांनी जल पर्यटनाची जोड दिली आहे. किनारपट्टीवर सोयी सुविधा बळकट केल्या तर त्याचा फायदा होईल हे लक्षात घेऊन त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोकणच्या किनारपट्टीवर नव्याने जेटी उभ्या राहिल्यास कोकणचा आर्थिक विकास साधला जाणार आहे. मासेमारी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी जेटी अत्यंत महत्त्वाच्या असून या जेटीमुळे मासेमारी नौका, प्रवासी बोटी आणि रो-रो जहाजे यांना सुरक्षित थांबा मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांची तसेच मालाची वाहतूक अधिक सोयीस्कर करता येणार आहे. या तीन नव्या जेटींमुळे कोकणातील किनारपट्टीवरील पर्यटन वृद्धी होणार असून पर्यटनातून आर्थिक विकास होण्यास चालना मिळणार आहे. यातूनच स्थानिकांना रोजगार आणि व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. या जेटींच्या माध्यमातून कोकण आणि मुंबई पुन्हा एकदा सागरी मार्गाने जोडले जावून यामुळे प्रवास खर्च आणि वेळ दोन्हींची बचत होणार आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
TTTUSHAR TAPASE
Sept 17, 2025 10:18:05
Satara, Maharashtra:TUSHAR TAPASE 4 FILES SLUG NAME -SAT_MAHA_UNISCO सातारा - महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर सोनेरी अक्षरांनी कोरला जाणारा क्षण म्हणजे कास पठार आणि प्रतापगडानंतर आता महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन्ही ठिकाणांना ‘युनेस्को’च्या नैसर्गिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळालं आहे. घनदाट जंगलं, थंड–स्वच्छ हवा, आणि दुर्मिळ जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेला हा परिसर आता जागतिक स्तरावर मान्यता मिळवत आहे.१९८५ मध्ये कोयना अभयारण्याचा भाग म्हणून या भागाला राष्ट्रीय दर्जा मिळाला होता, आणि आता ‘युनेस्को’कडून जागतिक वारसा दर्जा मिळाल्यामुळे पर्यावरण संवर्धनाची नवी दारे खुली झाली आहेत महाबळेश्वर–पाचगणीचा हा सन्मान, केवळ पर्यटनासाठी नव्हे तर पृथ्वीच्या इतिहासाशी जोडलेलं एक महत्त्वाचं पान आहे. byte - संतोष पाटील जिल्हाधिकारी सातारा
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 17, 2025 10:17:52
Washim, Maharashtra:वाशिम: File:1709ZT_WSM_BANJARA_MORCHA_DRONE_SHOTS रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशीम अँकर : एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी सकल बंजारा समाजाच्या वतीने वाशीमच्या मानोरा तहसील कार्यालयावर आज भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले.या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने बंजारा बांधव उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.मोर्चाच्या माध्यमातून बंजारा समाजाने हैदराबाद गॅझेटनुसार समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) मधून आरक्षण द्यावे,अशी ठाम मागणी केली.यानंतर तहसीलदार मानोरा यांना निवेदन सादर करून शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.मोर्चाच्या निमित्ताने बंजारा समाजाच्या विविध संघटनांनी एकजूट दाखवत आपले हक्क सिद्ध करण्याचा निर्धार व्यक्त केला. *ड्रोनशॉट आहेत*
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 17, 2025 10:17:12
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- उद्योग मंत्री उदय सामंत byte pointers On मोदी वाढदिवस कौशल्य विकासाचा क्लस्टर विकास केंद्र करण्याचा निर्णय नमो कस्टर विकास केंद्र असल्याचे नाव असणार नाशिक, छत्रपती संभाजी नगर, अमरावती अशा पाच जिल्ह्यात हे उभारणार ऑन मनसे व्यंगचित्र व्यंगचित्राकडे डोळस पद्धतीने बघितलं पाहिजे व्यंगचित्र काढल्यामुळे त्यांचं कार्य कमी होत नाही ऑन मीनाताई ठाकरे मासाहेबांचा व्यक्तिमत्व मोठे होता आम्ही देखील आक्रमक नीच हे प्रत्येकाला योग्य नाही ही प्रवृत्ती शोधली पाहिजे ऑन सामना मोदी साहेबांची जाहिरात सामनाला का द्यावे विकतची बदनामी का करायची नितेश राणे यांच्या खात्याची अर्ध्या पेज जाहिरात सामनाला आहे सामनामध्ये लिहून स्वतःच समाधान करून घेण्यापेक्षा मोदी यांची ख्याती जगभर पसरली आहे सामना मधील टीकेचा काहीही परिणाम होणार नाही ऑन अजित पवार आमचे नेतृत्व महाराष्ट्रातलं त्यामुळे आमच्या विरोधात हा टोला नसावा एकनाथ शिंदे अमित शहा यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसतात त्यामुळे जागावाटपासाठी आम्हाला दिल्ली la जायला लागत नाही ऑन मंगल प्रसाद लोढा मंगल प्रसाद लोढा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना त्यांच्या वैयक्तिक कामासाठी भेटले असतील ऑन शेखर निकम स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये त्यांना शुभेच्छा महायुती म्हणून आम्ही नक्की लढणार शेखर निकम यांच्या मतानुसार ते स्वबळावर लढणार असतील तर आमच्या जागा वाढतील शिवसेना हा मोठा पक्ष आम्ही भाजपला रत्नागिरीत सामावून घेऊ ऑन संगीता तावडे लाडकी बहीण योजनेमधून जर ही महिला पात्र असेल तर त्या महिलेला तातडीने पंधराशे रुपये देण्यासंदर्भातील कार्यवाही केली जाईल ऑन कुणबी मराठा सर्टिफिकेट त्यांना द्यायचा आहे त्यांना ते देणं सुरू आहे ऑन मराठवाडा शेतकरी आत्महत्या दुर्दैवी घटना सरकार यात नक्की लक्ष घालेल
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Sept 17, 2025 10:17:04
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Sept 17, 2025 10:16:36
Thane, Maharashtra:भिवंडी अंजूर फाटा ते चिंचोटी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य तर भिवंडी वाडा महामार्गाची चाळण... तालुक्यातील रस्त्यासाठी २२९ कोटी ११ लाख मंजूर,पण नवरात्रीच्या तोंडावर खड्डे जैसे थे... ॲंकर... भिवंडी वाडा महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. तसेच अंजूर फाटा ते चिंचोटी या २४ किमीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. असे असतानाही याकडे संबंधित प्रशासनासह स्थानिक नेतेमंडळीचे अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. प्रथमतः अंजूर फाटा ते चिंचोटी रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनाचा खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ मामा यांच्या कडून कांगावा करण्यात आला होता. परंतु गणेशोत्सवात गणेश भक्तांना बाप्पाचे आगमनासह विसर्जनही खड्ड्यातूनच करावे लागले‌. अशातच अवघ्या दोन-चार येऊन ठेपलेल्या नवरात्री उत्सव. या नवरात्रोत्सवाच्या तोंडावरही नवदुर्गा भक्तांना देवीची वाट या खड्ड्यातूनच काढावी लागणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमधून प्रचंड रोष व्यक्त केला जातोय . सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजवण्याचा मात्र देखावा केला आहे. दोन दिवसापूर्वी तालुक्यातील खड्ड्यांमुळे संतप्त मनसे कार्यकर्त्यां कडून सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांना कुजलेला फुलांचा हार तर शाल टाकून निषेध व्यक्त करण्यात आला होता. असं असतानाही महामार्ग कोणत्या प्रकारची लांबी करण्यास सुरुवात करण्यात आलेली नाही आहे.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 17, 2025 09:50:09
Raigad, Maharashtra:स्लग - मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचे महत्व पूर्ण विधान ..... आमचा शत्रू भाजप नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसच ...... राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. आगामी निवडणुकीत एकला चलो रे ...... अँकर - आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी एक महत्वपूर्ण विधान केलंय. विकास गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आमचा शत्रू भाजप नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा करताना विकास गोगावले यांनी ठाकरे सरकारच्या काळातील आपल्या वक्तव्याची आठवण करून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे आम्हालाही खंजीर खुपसावा लागेल. आगामी निवडणुकीत शिवसेनेची भूमिका एकला चलोची असेल मात्र एकनाथ शिंदे जो आदेश देतील तो मान्य असेल असंही ते म्हणाले. बाईट - विकास गोगावले, युवासेना कोअर कमिटी सदस्य
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 17, 2025 09:49:52
Akola, Maharashtra:Anchor : सामनाच्या अग्रलेखात “नरेंद्र मोदी हे आमचे वैयक्तिक शत्रू नसून महाराष्ट्राचे शत्रू आहेत” असे विधान करण्यात आले आहे, यावर राज्याचे कामगार मंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.फुंडकर म्हणाले, “सामनाच्या मेंदूवर परिणाम झाल्याने अशा प्रकारची लिखाणं केली जात आहेत. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्याबाबत अशा प्रकारची घृणास्पद भूमिका घेणे योग्य नाही.”दरम्यान, बुलढाणा येथे मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचा विडंबन करण्यात आल्याच्या घटनेवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. “पुतळे बसवण्याची मागणी सर्वजण करतात, मात्र त्याची देखरेख करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. अशा प्रकारे पुतळ्यांचा अपमान करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे,” असे मत त्यांनी स्पष्टपणे नोंदवले.त्यामुळे सामनाच्या अग्रलेखावरून आणि बुलढाणा येथील घटनेवरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. Byte : आकाश फुंडकर , कामगार मंत्री
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 17, 2025 09:23:50
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - रस्त्यातील खड्ड्यात वृक्षारोपण करत पालिकेचा निषेध. अँकर - सांगली महापालिका शहरातल्या रस्त्यातील खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे.नगरसेवकांसह नागरिकांनी मिळून रस्त्यावर झाडे लावून महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे.शहरातील माधवनगर रेल्वे उड्डाण पुलाजवळ असणाऱ्या बायपास रस्त्याजवळ असणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण महापालिकेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.शहरातील अनेक रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे.अनेक ठिकाणी रस्त्यांमध्ये खड्डे पडल्याने अपघाताचे प्रकार देखील घडत आहेत,मात्र महापालिका प्रशासनाकडुन दुर्लक्ष करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ रस्त्यामध्ये वृक्षारोपण करत आंदोलन करण्यात आले आहे.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 17, 2025 09:22:08
Nashik, Maharashtra:Nashik breaking मंत्री गिरीश महाजन byte points On मीनाताई ठाकरे - अतिशय दुर्दैवी घटना आहे ही विकृती आहे - याचा तपास केला जाईल जाणीवपूर्वक समाजात तणाव निर्माण करायचा आहे का याबाबत देखील तपास केला जाईल - यातून कुठेही ताण तणाव निर्माण होऊ याबत काळजी घ्यावी On ठाकरे ब्रँड - इंदिरा गांधी ब्रँड होते आता राहुल गांधी आणि सोनिया गांधी आहेत का8 ब्रँड - बाळासाहेब ठाकरे यांची गोष्ट वेगळी होती - *त्यामुळे ठाकरे ब्रँड आता नामशेष होत आहे* - मुंबई महापौर आता महायुती चा असेल - मागच्या वेळी देखील ते शक्य नव्हेत पण आम्ही ते केले - बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारला पुर्णपणे तिलांजली देण्यात आली आहे On कुंभ काम मोर्चा आरोप - कुंभमेळा ची काळजी करू नका ते व्यवस्थित होईल - सरकार म्हणून आमी शेतकऱ्यांना मदत करत आहोत - सत्तेत असताना तुम्ही घरातून बाहेर पडले नाही - मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार तुम्ही केले आहेत - आता निवडणुका आहेत म्हणून तुम्ही मोर्चा काढत आहात On जारांगे मागणी - त्यांना जे पाहिजे होते ते त्यांना दिले आहे - कायद्याच्या चौकटीत त्यांना ते दिले आहे - काहीजण कोर्टात देखील गेले आहेत - याबत देखील आम्ही सरकार म्हणून आम्ही ताकतीने उभे राहू On राज ठाकरे - राज ठाकरे व्यंगचित्रकार आहेत त्यांनी काढले असतील On अजित पवार वक्तव्य - त्यांचा पक्ष महाराष्ट्र पुरता मर्यादित आहे - आमचा पक्ष राष्ट्रीय आहे त्यामुळे आम्हाला दिल्ली ला जावं लागत On कुंभ काम भ्रष्टाचार - कुंभमेळा कामात कुठेही भ्रष्टाचार झाले नाही सगळे काम व्यवस्थित सुरू आहे On मुख्यमंत्री समोर घोषणाबाजी - ओबीसी समाजावर कुठेही अन्याय होणार नाही On सुप्रिया सुळे मंत्री इशारा - आपण सत्तेत असताना आरक्षण आणि कर्जमाफी बाबत काय केले - देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा सरकार असताना आम्ही अनेक निर्णय घेतले - त्यांना बोलण्याचा अधिकार नाही
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 17, 2025 09:05:31
Navi Mumbai, Maharashtra:story slug - जेएनपीए बंदरावर डीआरआय ची मोठी कारवाई, 28 कंटेनर भरून आलेला 800 मेट्रिक टन पाकिस्तानी माल केला जप्त. FTP slug - nm jnpt port shots- photo reporter- swati naik navi mumbai Anchor -: पहलगाम हल्ल्यानंतर मे 2025 पासून पाकिस्तानी मालाच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयातीवर भारताने बंदी घातली असतानाही यूएईच्या नावाने पाठवलेल्या 800 मेट्रिक टन पाकिस्तानी मालाच्या आयातीचा पर्दाफाश करण्यात आलाय. ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेय. सदर कारवाई मुंबई महसूल गुप्तचर संचालनालय अर्थात डीआरआय च्या पथकाने जेएनपीए बंदरात केलेय. कारवाईदरम्यान 28 कंटेनरमधील 12 कोटी रुपयांचे सौंदर्य प्रसाधने, सुके खजूर जप्त करण्यात आले असून दोन जणांना अटक करण्यात आलेय. gf- photo ====================
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 17, 2025 08:48:38
4
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Sept 17, 2025 08:45:22
Buldhana, Maharashtra:बुलढाणा ब्रेकिंग पीकपाणी *बुलढाणा जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस ..... सिंदखेडराजा तालुक्यात शेतीला तलावाचे स्वरूप ....* *शेतकऱ्यांचे शेतामध्ये पाणी साचलेल्या पाण्यात आंदोलन सुरू..* *जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी...* Anchor - सिंदखेडराजा तालुक्यात गेल्या दोन महिन्यापासून सततधार पाऊस कोसळत आहे तर काही दिवसापासून ढगफुटी झालि आहे त्यामुळे तालुक्यातील सर्व शेताना तलावाचे स्वरूप आले आहे , पळसखेड चक्का या गाव परिसरा तील शेताला तलावाच स्वरूप आल्याने शेतकऱ्यांनी शेतातील पाण्यात बसून आंदोलन सुरु केलाय... शेतीच मोठ नुकसान झालंय... कापूस पिक नष्ट झाले आहे .. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आलाय..ताटडीने जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे... बाईट - बालाजी सोसे, शेतकरी..
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Sept 17, 2025 08:35:29
Buldhana, Maharashtra:बुलढाण्यात मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध, शिवसैनिकांनी केले आंदोलन Anchor - मुंबईतील दादर येथे स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेनंतर राज्यभर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. याच घटनेच्या निषेधार्थ बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरातही शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन केले. या घटनेमुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या असून, त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आंदोलनकर्त्या शिवसैनिकांनी "मीनाताई ठाकरे अमर रहे" च्या घोषणा देत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध करताना सांगितले की, "ज्यांनी कोणी हे कृत्य केले आहे, त्यांच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे. मीनाताई ठाकरे या महाराष्ट्राच्या मातेसमान आहेत आणि त्यांच्या पुतळ्याचा अपमान हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे." या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. byte - शिवसैनिक
4
comment0
Report
Advertisement
Back to top