Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

नाशिकच्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणात पाण्याचा विसर्ग वाढला!

VISHAL KAROLE
Jul 03, 2025 03:02:18
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn jayakwadi av Feed attached नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे वरील धरणांतून गोदावरी नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने जायकवाडी धरणात पाण्याची आवक सध्या ६ हजार ८७४ क्युसेकने सुरू आहे. धरणाचा पाणीसाठा ४५ टक्क्यांवर आला असून मागील वर्षाच्या तुलनेत ४० टक्के पाणीसाठा अधिक आहे. मागील वर्षी याच दिवशी जायकवाडीत ४.५४ टक्के साठा होता. जायकवाडी धरण क्षेत्रात पाऊस नसला तरीही वरील भागात पाऊस झाल्याने गोदावरीवरील अनेक छोट्या-मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठाही वाढला असून, मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातसुद्धा पाण्याची आवक दहा दिवसांपासून सुरू आहे. आवक सुरू असून धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी आतापासून नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. सध्याचा पाणीसाठा बघता मराठवाड्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून पावणेदोन लाख हेक्टर शेतीलादेखील पाणी यातून मिळेल एवढे पाणी सध्या जायकवाडीत उपलब्ध आहे. आवक सुरू असल्याने जायकवाडी पुढील दोन-तीन दिवसांत पन्नास टक्क्यांवर जाईल
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement