Back
लातूरमध्ये ड्रग्जचा वाढता बाजार: पालकांमध्ये चिंतेचं वातावरण!
VBVAIBHAV BALKUNDE
FollowJul 16, 2025 01:31:56
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज...
स्किप्ट ::- लातूर शिक्षणाचं शहर की ड्रग्जचा बाजार ? .. लातूर मध्ये तीन महिन्यांत दोन कोटींहून अधिकचा ड्रग्ज जप्त. .. ड्रग्स प्रकरणी आणखीन तिघांना अटक... पालकांमध्ये चिंतेचे वातावरण....
AC ::- लातूर हे शिक्षणासाठी देशभर ओळखलं जाणारं शहर… पण या शिक्षणाच्या गाभाऱ्यात आता अंमली पदार्थांचं विष झिरपतंय… मुंबई आणि हैदराबादहून लातुरात पोहोचणाऱ्या ड्रग्जचा पसारा एवढा वाढलाय की, मागील तीन महिन्यांत पोलिसांनी तब्बल २ कोटी १० लाख रुपयांचं ड्रग्ज जप्त केलं…लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने तीन मोठ्या कार्यवाही करत अकरा जणांना अटक करण्यात आले होते.त्यानंतर आता पोलीसांनी आणखीन तिघांना अटक केली आहे. तरीही या ड्रग्ज सिंडिकेटच्या मुळापर्यंत पोलीस अजून पोहोचले नाहीत. त्यामुळे या सर्व प्रकारामुळे पालकांची चिंता वाढली आहे.
बाईट ::- पालक
बाईट ::- पालक
14
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowJul 16, 2025 13:38:35Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1607ZT_CHP_AHIR_VISIT_1_2
( 2 file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील अरबिंदो कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन, आंदोलनस्थळी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग अध्यक्ष हंसराज अहीर यांनी घेतली जनसुनावणी, नियमभंग करणाऱ्या कंपनी प्रशासनाची काढली खरडपट्टी
अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातल्या टाकळी, जेना, बेलोरा, पानवडाळा, डोंगरगाव (खडी), किलोनी, कान्सा, शिरपूर अशा गावांमधील अनेक शेतकरी अरबिंदो रियालिटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीच्या कोळसा खाण प्रकल्पामुळे प्रभावित झाले आहेत. प्रकल्पग्रस्तांचे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु आहे, या आंदोलन ठिकाणी मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष यांनी जनसुनावणी केली. राज्याच्या भूमी अधिग्रहण व पुनर्वसन कायद्याचे पालन न करता, तसेच प्रकल्पातील गावांचे पुनर्वसन आणि भूमी अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण न करता, कोणताही मोबदला किंवा जमिनीचा दर निश्चित न करता प्रशासनाने कंपनीला उत्खननाची परवानगी दिली आहे. २४ जून २०२४ रोजी झालेल्या बैठकीत खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही परवानगी दिल्याचे सांगितले. मात्र, हा आदेश जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांच्या शपथपत्रावर आधारित असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे, या प्रक्रियेत प्रकल्पग्रस्त आणि न्यायालयाची दिशाभूल झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रकल्पग्रस्तांच्या जमीन अधिग्रहण व मोबदला त्वरीत निश्चित करावा, एकमुश्त अधिग्रहण करून रोजगार (नोकऱ्या) देण्याचे करार व्हावेत, सर्व निर्णय प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेऊन घ्यावेत आणि सरकारच्या अधिनियमाची संपूर्ण अंमलबजावणी न होईपर्यंत उत्खनन थांबवावे—या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. सरकारने कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी झाल्याशिवाय कोळसा उत्खनन परवानगी तात्काळ रद्द करावी अशी मागणी पुढे रेटण्यात आली आहे.
बाईट १) हंसराज अहीर, अध्यक्ष, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
6
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 16, 2025 13:33:38Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 1607ZT_GAD_FIRST_ST
( single file sent on 2C)
टायटल:-- गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नांनी स्वातंत्र्यानंतर प्रथमच अतिदुर्गम मरकनार ते अहेरी बस सेवेला सुरुवात, नागरिकांनी राष्ट्रध्वज फडकवत जल्लोषात केले बसचे स्वागत , मरकनार, फुलनार, कोपर्शी, पोयारकोटी सारख्या अनेक अतिदुर्गम गावांना मिळणार बस सेवेचा लाभ
अँकर:-- गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील छत्तीसगड सिमेपासून अवघ्या 6 किमी. अंतरावर असलेल्या अतिदुर्गम मरकनार ते जिल्हा उपमुख्यालय अहेरी येथे स्वातंत्र्यानंतर प्रथमच एसटी बस सेवेची सुरुवात करण्यात आली. गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहूल व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणा-या नागरिकांसाठी प्रवासाचे साधन उपलब्ध नसल्याने त्यांना पायपीट करत प्रवास करावा लागत असतो. अशा दुर्गम भागातील नागरिकांचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून विविध उपक्रम राबविले जात असतात.
मरकनार गावात बस आल्यामुळे नागरिकांनी राष्ट्रध्वज फडकवत जल्लोषात बसचे स्वागत केले. पोलीस दलामार्फत उपस्थित नागरिकांमध्ये मिठाईचे वाटप करण्यात आले. मरकनार ग्रामस्थानी 9 फेब्रुवारी 2025 रोजी नक्षल गावबंदी ठराव पारीत करुन नक्षल्याना कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही असे घोषित केले होते. या अतिदुर्गम भागातील नागरिकांचा विकास होण्यासाठी गतवर्षी पोलीस संरक्षणामध्ये कोठी ते मरकनार रस्ता तयार करण्यात आला असून मरकनार ते मुरुमभुशी रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. या भागातील नागरिकांच्या सुविधेसाठी मरकणार गावात एअरटेल टॉवरचे बांधकाम करण्यात आले आहे. बससेवा सुरु झाल्यामुळे याचा लाभ मरकनार, मुरुमभुशी, फुलनार, कोपर्शी, पोयारकोठी, गुंडूरवाही या गावातील जवळपास 1200 हुन अधिक नागरिक, रुग्ण, विद्यार्थी, प्रवासी यांना होणार आहे. एस.टी बसच्या सुविधेमुळे ग्रामस्थांना वर्षभर सहज प्रवास करता येईल, तसेच पोलीस व जनता यांचे संबंध आणखी मजबूत होण्यास मदत होईल.
याच वर्षी 01 जानेवारी 2025 रोजी गट्टा-गर्देवाडा-वांगेतुरी बस सेवा तसेच दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी कटेझरी ते गडचिरोली बस सेवा देखील सुरु करण्यात आली होती. दुर्गम भागात मागील पाच वर्षांमध्ये 420.95 कि.मी. लांबीच्या एकूण 20 रस्त्यांसोबतच एकूण 60 पुलांचे बांधकाम पोलीस संरक्षणात पूर्ण करुन घेण्यात आले आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
गडचिरोली
2
Share
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 16, 2025 13:09:14Ambernath, Maharashtra:
बदलापूरच्या ग्रामीण भागात भात लावणीच्या कामाला वेग
पाऊस लवकर आल्यानं यंदा जुलै महिन्यातच भात लावणी
पोषक वातावरणामुळे शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा
Bdl rice crop
Anchor - गेल्या दहा दिवसांपासून पडणाऱ्या दमदार पावसामुळे बदलापूरच्या ग्रामीण पट्ट्यात भात लावणीच्या कामाला वेग आलाय. यंदा पाऊस लवकर आल्यामुळे जुलै महिन्यातच सर्वत्र भात लावणी सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळतय.
बदलापूरच्या ग्रामीण पट्ट्यात बेंडशीळ चिंचवली, कोपऱ्याची वाडी, चामटोली, कासगाव, राहटोली, मुळगाव, येवे, पिंपळोली, आंबेशिव या भागात भातशेती केली जाते. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या दमदार पावसामुळे या भागातील शेतकरी राजा सुखावलाय. जुलै महिन्यातच चिखलणीसोबत भात लावणीची कामं सुरू झाली आहेत. विशेष म्हणजे पारंपरिक पद्धतीनं ही शेती केली जातीय. मजुरांची संख्या घटल्यामुळे बहुतांश शेतकरी कुटुंब एकत्रितपणे एकमेकांच्या शेतीला हातभार लावत असतात. या शेतीतून मिळणारं उत्पन्न फारसं नसलं तरी शेतकरी कुटुंबाच्या वर्षभराच्या भाताची सोय या शेतीतून होत असते. पावसाने चांगली साथ दिली तर येत्या दोन महिन्यात दमदार पीक हाती येईल असा विश्वास या शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय.
Byte - शेतकरी, बेंडशीळ
चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 16, 2025 12:32:09Navi Mumbai, Maharashtra:
Story slug - खारघर वासीयांचे पाण्यासाठी ठिय्या आंदोलन
पाणी के लीये ठिय्या आंदोलन
FTP slug - nm cidco water aandolan
Shots-
Reporter– swati naik
Navi mumbai
Anchor - खारघर मद्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई असल्याने नवीन बांधकामांना सी सी ओसी देऊ नये अशी मागणी करत खारघर मधील माजी नगरसेवकांनी
सिडको मद्ये ठिय्या आंदोलन केले आहे।
जोपर्यत पाण्याचा पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यत हलणार नसल्याचा इशारा यावेळी दिला ।जमिनीवर बसत ठिय्या आंदोलन केले।
Gf
0
Share
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 16, 2025 12:30:15Ambernath, Maharashtra:
अंबरनाथमधील २८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांची आरक्षणं जाहीर
प्रांत अधिकारी, तहसीलदारांकडून आरक्षणांची सोडत
Amb resevation
Anchor : अंबरनाथ तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांची आरक्षणं जाहीर झालीयेत. उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा आणि अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी विद्यालयात सोडत काढून ही आरक्षणं जाहीर करण्यात आली. यानंतर तालुक्यात कही खुशी, कही गम असं वातावरण आहे.
Vo : या आरक्षणांमध्ये साई ग्रामपंचायतीसाठी SC, बुर्दुल ग्रामपंचायतीसाठी SC महिला, मांगरूळ ग्रामपंचायत ST, डोणे ग्रामपंचायत ST महिला, सागाव ग्रामपंचायत ST, ढवळे-कुडसावरे ग्रामपंचायत OBC महिला, गोरेगाव ग्रामपंचायत OBC महिला, खरड ग्रामपंचायत OBC महिला, काकोळे ग्रामपंचायतीसाठी OBC महिला आरक्षण जाहीर झालंय.
Byte : अमित पुरी, तहसीलदार
hi
चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
0
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 16, 2025 12:08:26Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 1607ZT_GAD_STUDENT_CANCER
( single file sent on 2C)
टायटल:-- गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढल्याने व्यक्त होत आहे चिंता, 309 विद्यार्थ्यांना तपासणीत पूर्व मुख कर्करोग निदान झाल्याची आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके यांची विधान परिषदेत माहिती, आदिवासी विकास विभागाने आश्रम शाळातील विद्यार्थ्यांची एका अभियानात करविली होती तपासणी
अँकर:-- गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय आदिवासी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढल्याची चिंताजनक आकडेवारी पुढे आली आहे. विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांनी या संदर्भात विधान परिषदेत हा प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी 2022 -23 ते 2024- 25 यादरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळांमधील आरोग्य तपासणीचे आकडेच पुढे ठेवले.
गडचिरोली आदिवासी उपविभागात 769 पैकी 304
भामरागड उपविभागात 1778 पैकी 487 तर
अहेरी उपविभागात 2163 पैकी 189 विद्यार्थी व्यसनाधीन आढळले
यापैकी एकूण 309 विद्यार्थ्यांना पूर्व मुख कर्करोग निदान झाले आहे. या सर्वांवर विभागाच्या वतीने उपचार करण्यात येत असून सर्वच आदिवासी आश्रम शाळांमध्ये व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे डॉ. उईके म्हणाले.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
गडचिरोली
0
Share
Report
MAMILIND ANDE
FollowJul 16, 2025 11:38:080
Share
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJul 16, 2025 11:37:42Pune, Maharashtra:
Feed 2C
Slug: Wagholi Fired
File:01
Rep: Hemant Chapude(Wagholi)
Anc: पुणे शहरालगत असलेल्या वाघोली येथे भंगार गोडावून ला भीषण आग लागली असून आगीत गोडावून पूर्णपणे जळून खाक झालंय, आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट असून अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीची तीव्रता मोठ्या प्रमाणात असून परिसरात सर्वत्र धुराचे लोट पसरले आहेत.
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया वाघोली पुणे.,.
1
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 16, 2025 11:35:23Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1607ZT_CHP_VILLAGE_PKG_1_2
( 2 file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील तेलंगणा सीमेवरच्या जिवती तालुक्यातील 14 गावांच्या नागरिकांचा महसूल अभिलेख तयार होण्याचा मार्ग झाला प्रशस्त, महाराष्ट्र- तेलंगणा या दोन राज्यांमध्ये या चौदा गावांच्या समावेशावरून होता वाद, मात्र सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या बाजूने निकाल लागल्यानंतरही या गावातील नागरिकांना मिळत नव्हती जमीन विषयक कागदपत्रे, मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर आता प्रत्यक्ष कारवाईला होणार सुरुवात
अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील तेलंगणा सीमेवरच्या जिवती तालुक्यातील 14 गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना स्वतःचा हक्काचा महसूल अभिलेख तयार होण्याचा मार्ग प्रशस्त झालाय. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर यासंदर्भात प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात होणार आहे.
व्ही. ओ. १) चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील १४ गावामध्ये नागरिकांना महसूल अभिलेख पुरावे मिळण्यासाठी चा मार्ग प्रशस्त झाला आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांमध्ये या चौदा गावांबाबत वाद होता. मात्र यासंबंधी 28/08/ 1997 रोजी निर्णय सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या बाजूने लागला. असे असले तरी महाराष्ट्र सरकारने या गावांमध्ये वास्तव्याला असलेल्या नागरिकांना महसूल अभिलेख पुरावे दिले नाहीत.
त्यामुळे
परमडोली, मुकादम गुडा ,कोठा, महाराज गुडा, अंतापुर, येसापूर, लेंडीगुडा ,पळसगुडा, परमडोली -तांडा, लेंडीजाळा, शंकरलोधी, पद्मावती, इंदिरानगर, भोला पठार
या 14 गावातील नागरिकांची महसुली दर्जा नसल्याने मोठी अडचण होत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात याबाबत एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या सीमाभागातील गावांचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. बैठकीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे , पालकमंत्री डॉ. अशोक उईके, आमदार देवराव भोंगळे आणि जिवती तालुक्यातील १४ गावातील ग्रामस्थ, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा आदी उपस्थित होते. स्थानिक नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला वन जमिनींचे पट्टे देण्याचा निर्णयही महसूलमंत्र्यांनी जाहीर केला आहे. यामुळे अनेक वर्षांपासून वनजमिनींवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना कायदेशीर हक्क मिळणार आहेत.
बाईट १) देवराव भोंगळे, आमदार, राजुरा विधानसभा
व्ही. ओ. २) दरम्यान गेली काही वर्षे 14 गावातील नागरिकांना महाराष्ट्र आणि तेलंगणा अशा दोन्ही राज्यांचे रेशन कार्ड ,आधार कार्ड ,दुहेरी सोयीसुविधा मिळत होत्या मात्र या गावांना महाराष्ट्रातील सोयी सुविधांसह जमीन पट्टे हवे असल्याने त्यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. हा प्रश्न आता राज्य सरकार मार्गी लावत असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे
बाईट २), ३) स्थानिक नागरिक, जीवती
व्ही. ओ. ३) या 14 गावांमधील भौगोलिक स्थिती बघता तेलंगणा राज्यातील नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीने ही गावे सोयीची होती. मात्र तरीही बहुतांश मराठी भाषिक नागरिकांचे वास्तव्य असल्याने या नागरिकांनी चिकाटीचा संघर्ष चालविला होता. महाराष्ट्र सरकारने उशिरा का होईना त्यांच्या या पाठपुराव्याला प्रतिसाद दिलाय. प्रत्यक्ष कारवाई कधी सुरू होते याकडे मात्र त्यांचे लक्ष लागले आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 16, 2025 11:02:54Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1607ZT_WSM_SAMBHAJI_BRIGADE_RASTA_ROKO
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर करण्यात आलेल्या शाईफेक, धक्का बुक्की आणि प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आज वाशिम शहरातील पाटणी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.या आंदोलनात संभाजी ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडी,शिवसेना तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांसह विविध संघटनेचे मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
बाईट: गजानन भोयर,विभागीय अध्यक्ष संभाजी ब्रिगेड.
0
Share
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 16, 2025 11:01:47Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -SAT_rada
सातारा- साताऱ्यातील पोवई नाका परिसरात दोन टोळक्यांत हाणामारी झाली आहे. ही मारामारी महाविद्यालयीन युवकांच्या दोन गटांत झाली असून, परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
1
Share
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJul 16, 2025 10:32:49Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File.name : 1607ZT_MAVAL_TOLL_ISSUE
Total files : 05
Headline : मावळ मधील सोमाटने टोल नाक्याचा प्रश्न पुन्हा तापणार
टोल नाका बंद न केल्यास तळेगावकर नागरिक पुन्हा उतरणार रस्त्यावर
Anchor :
तळेगाव दाभाडे येथील सोमाटने टोल नाका अनेक वर्षांपासून बेकायदेशीर रित्या चालवला जात आहे. हा अनधिकृत टोल नाका बंद करावा या मागणीसाठी पुन्हा एकदा मावळ मधील स्थानिक नागरिक एकत्रित होत आंदोलनाचा इशारा दिला आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी अधिवेशनामध्ये हा टोल नाका बेकायदेशीर असल्याने याच्यावरती कारवाई करण्यात यावी असा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता. तसेच स्वर्गीय किशोर आवारे यांनी हा टोल नाका बंद व्हावा म्हणून बेमुदत उपोषणाच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रत्यक्ष आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन हा टोल नाका बंद करण्यासंदर्भात सूचना केलेल्या होत्या. परंतु अद्याप पर्यंत हा टोलनाका बंद करण्यात आलेला नसल्याने टोल प्रशासन मंत्र्यांच्या आदेशाला देखील केराची टोपली दाखवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा टोल नाका बंद करून नागरिकांना टोल मधून व वाहतूक कोंडीतून सुटका करावी अन्यथा 22 जुलै पासून मावळ मधील स्थानिक नागरिकांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.
बाईट : अरुण माने, स्थानिक नागरिक (file no.04)
बाईट : सचिन भांडवलकर, स्थानिक नागरिक (file no.05)
0
Share
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowJul 16, 2025 10:31:17Virar, Maharashtra:
Date-16july2025
Rep-prathamesh tawade
Loc-virar
Slug-VIRAR PROTEST
Feed send by 2c
Type-AV
Slug- विरार मध्ये ओला उबेर चालकांचे अचानक आंदोलन
भाडे वाढीसाठी गाड्या अडवून आंदोलन
अँकर - वसई विरार शहरात ओला उबेर च्या चालकांकडून भाडे वाढीसाठी आंदोलन केले ... आज दुपारी विरार पूर्वेच्या साईनाथ सर्कल जवळ गाड्या अडवून आंदोलनाला सुरुवात केली..रस्त्यावरून जाणाऱ्या ओला उबेर च्या गाड्या अडवून भाडे रद्द करण्याची मागणी केली..चालकांनी भर रस्त्यात गाड्या अडवल्यामुळे काही काळ या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती...
3
Share
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 16, 2025 10:16:10Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणी जिल्ह्यातील पाथरी सेलू रोडवरच्या देवनांद्रा परिसरातील धावत्या ट्रॅव्हल बसमधून नैसर्गिक प्रसुती झाल्यानंतर चालत्या ट्रॅव्हलमधूनच त्या नवजात बाळाला फेकून दिल्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आलीय, हा अमानूष प्रकार पती-पत्नीच्या स्वरुपात कथित असलेल्या जोडप्याने केल्याचे उघड झालंय, पोलीस या प्रकरणात कसून तपस करीत आहेत,
व्हीओ- परभणीच्या पाथरी सेलू रस्त्यावर मंगळवारी सकाळी संतप्रयाग ही ट्रॅव्हल पुणे येथून सेलूमार्गे परभणीकडे जात होती. पाथरीपासून दोन किमीवर देवनांद्रा शिवारात कॅनाललगत या बसमधून बाळ रस्त्यावर फेकून दिल्याचे रस्त्यावरून जाणाऱ्या काही नागरिकांच्या लक्षात आली, या नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पाथरी पोलिसांनी या विषयाला गंभीर्याने घेत पोलिस यंत्रणा अलर्ट केली आणि दोन तासांच्या आत ट्रॅव्हल्सचा पाठलाग करत पोलिसांनी आरोपींना परभणीतून ताब्यात घेतले.
बाईट- रवींद्रसिंह परदेशी- पोलीस अधीक्षक, परभणी
व्हीओ- पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात हे जोडपे पती पत्नी असल्याचे पोलीस अधिक्षकांनी सांगितलं. हे दाम्पत्यांने आंतरजातीय विवाह केला असून ते दीड वर्षांपासून पुणे येथील चाकण परिसरात राहात होते अशी माहिती आहे. पुरुष जातीचे हे अर्भक असल्याचे सांगण्यात आलंय, शिवाय हे बाळ मयत जन्माला आले म्हणून घाबरून आपण हे बाळ फेकून दिल्याचे पोलिसांना या दाम्पत्याने सांगितले,
महिला 3 तासापूर्वी बाळंत झाल्याने तिला उपचारासाठी परभणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर दुसरा आरोपी पोलिसांनी ताब्यात घेऊन पाथरी पोलिस ठाण्यात हजर केलाय. याप्रकरणी हवालदार अमोल जयस्वाल यांच्या फिर्यादीवरून ऋतिका मिलिंद ढेरे (रा. राहुलनगर, परभणी) आणि अल्ताफ मेहनुदिन शेख (रा. परभणी) या दोन आरोपींविरूद्ध अर्भकाचे पालन पोषण न करण्याच्या उद्देशाने चालत्या ट्रॅव्हलमधून फेकून देऊन गुप्त विल्हेवाट लावली म्हणून संबंधित दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 94 आणि 3(5) नुसार गुन्हा आला.
बाईट- रवींद्रसिंह परदेशी- पोलीस अधीक्षक, परभणी
व्हीओ- या प्रकारामुळे नात्याला काळिमा फासण्यात आलाय,याबाबत पोलीस सविस्तर टॉअस करीत असून निकम बाळ बस मध्ये झालं होतं की अगोदर झालं होतं,हे दोघे खरोखरच पती पत्नी आहेत का याबाबत माहिती पुढे येणार आहे.
गजानन देशमुख, झी मीडिया परभणी
5
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 16, 2025 10:12:10Raigad, Maharashtra:
स्लग - नवीन मद्य विक्री परवान्यावरून तृप्ती देसाई यांचा सरकारवर हल्लाबोल ...... लाडक्या बहिणींचे संसार उद्धवस्त करू नका ..... देसाई यांची सरकारला विनंती ..... 1972 पासून बंद परवाने आताच कशाला ? ......
अँकर - राज्यात नवीन मद्य विक्री परवाने वितरणावरून विरोधक सरकारवर तुटून पडत असतानाच आता सामाजिक कार्यकर्तेही पुढे सरसावले आहेत. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी सरकारवर हल्ला चढवलाय. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देताय त्याचं स्वागत आहे पण त्यासाठी नवीन दारू विक्री परवाने देण्याची गरज नाही. एखाद्या महिन्यात पैसे नाही दिलेत तरी बहिणी रागावणार नाहीत पण त्यांचे संसार उद्धवस्त करू नका अशी विनंती त्यांनी केलीय. 1972 नंतर मद्य विक्री परवाने दिलेले नाहीत मग आताच का देताय असा सवाल तृप्ती देसाई यांनी सरकारला केलाय.
बाईट - तृप्ती देसाई , भूमाता ब्रिगेड
0
Share
Report