Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421505

बदलापूरमध्ये दमदार पावसाने भात लावणीला दिला वेग!

CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Jul 16, 2025 13:09:14
Ambernath, Maharashtra
बदलापूरच्या ग्रामीण भागात भात लावणीच्या कामाला वेग पाऊस लवकर आल्यानं यंदा जुलै महिन्यातच भात लावणी पोषक वातावरणामुळे शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा Bdl rice crop Anchor - गेल्या दहा दिवसांपासून पडणाऱ्या दमदार पावसामुळे बदलापूरच्या ग्रामीण पट्ट्यात भात लावणीच्या कामाला वेग आलाय. यंदा पाऊस लवकर आल्यामुळे जुलै महिन्यातच सर्वत्र भात लावणी सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळतय.        बदलापूरच्या ग्रामीण पट्ट्यात बेंडशीळ चिंचवली, कोपऱ्याची वाडी, चामटोली, कासगाव, राहटोली, मुळगाव, येवे, पिंपळोली, आंबेशिव या भागात भातशेती केली जाते. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या दमदार पावसामुळे या भागातील शेतकरी राजा सुखावलाय. जुलै महिन्यातच चिखलणीसोबत भात लावणीची कामं सुरू झाली आहेत. विशेष म्हणजे पारंपरिक पद्धतीनं ही शेती केली जातीय. मजुरांची संख्या घटल्यामुळे बहुतांश शेतकरी कुटुंब एकत्रितपणे एकमेकांच्या शेतीला हातभार लावत असतात. या शेतीतून मिळणारं उत्पन्न फारसं नसलं तरी शेतकरी कुटुंबाच्या वर्षभराच्या भाताची सोय या शेतीतून होत असते. पावसाने चांगली साथ दिली तर येत्या दोन महिन्यात दमदार पीक हाती येईल असा विश्वास या शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय. Byte - शेतकरी, बेंडशीळ चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top