Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Wardha442001

वर्ध्यात पावसात पुल वाहून गेल्याने शेतकऱ्यांचा प्रवास झाला कठीण!

MILIND ANDE
Jul 01, 2025 02:31:40
Wardha, Maharashtra
वर्धा SLUG- 0107__WARDHA_BRIDGE - वर्ध्यात पहिल्याच पावसात गेलाय पुल वाहून - देवळी तालुक्यातील वायगाव ते आलोडा रस्त्यावरील पुल - प्रत्येक पुरात पुल जातोय वाहून अँकर - वर्ध्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे आलोडा - वायगाव रस्त्यावरील पुल वाहून गेलाय. गेल्या पाच वर्षात अनेकदा हा पुल वाहून गेलाय..त्यामुळं विद्यार्थी व शेतकऱ्यांना येथून जाणे येणे त्रासदायक ठरत आहे..लोकप्रतिनिधी निवडून आले आणि गेले पण पुल वाहूनच जात आहे, वायगाव येथील आलोडा येथे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या पुलाला चांगलेच भगदाड पडले आहे. पुरामुळे हा पूल वाहून गेला असून या पुलावर पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या पायल्या उघड्या पडल्या आहेय. या भागात पडलेल्या पावसाने येथे पुलाला करण्यात आलेल्या डागडुजीची पोलखोल केली आहे. या भागात असलेल्या निमसडा, आलोडा यासह विविध गावातून विद्यार्थी वायगाव येथे शाळेत शिकायला येतात. तर परिसरातील शेतकरी देखील याच रस्त्याने ये-जा करतात त्यामुळे परिसरातील नागरिकांना आता दहा ते पंधरा किलोमीटरचा फेरा मारून वायगाव  गाठावे लागते आहे. बाईट - बालाजी वरघणे, शेतकरी
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement