Back
जालना रस्त्यावरील अतिक्रमण हटवून 60 मीटर मोकळा करणार!
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn encrochment av
Feed attached
जालना रस्ता अतिक्रमणमुक्त करून ६० मीटर करण्याची मोहीम मनपाने हाती घेतली आहे. मुकुंदवाडी आणि चिकलठाणा येथील अतिक्रमणे काढण्यासाठीची मुदत शुक्रवारी संपली. शनिवारपासून पुन्हा अनधिकृत बांधकामावर जेसीबी चालणार आहे. निवासी घरांची अनधिकृत व बेकायदा बांधकामे काढण्यास १५ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. कुठली बांधकामे काढली जातील आणि कुठल्या बांधकामांचा भरपाईसाठी विचार करता येईल, हे सुनावणीत न्यायालयाने स्पष्ट केले, शहरातील 3 हजार अतिक्रमण काढून शहरात 5 रस्ते महापालिका मोकळे करणार आहे... रस्त्यावर 60 मीटर पर्यंत मार्किंग केले जाणार आहे.. जालना रोड, जळगाव रोड, बीड बाय पास, पैठण रोड, पाडेगाव रोड वर या कारवाई होणार आहे...
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Kalyan, Maharashtra:
डोंबिवली एमआयडीसीतील नवीन सीमेंट काँक्रीट रस्त्याची तोडफोड
११० कोटींच्या निधीतून झालेल्या रस्त्यांची सेवा वाहिन्या, गटारे किंवा इतर कारणांनी जागोजागी तोडफोड
करदात्यांचा पैसा वाया ...पूर्वसूचना न देता काम सुरू करत असल्याने नागरिकांत संताप...अधिकाऱ्यांची चौकशी करत दोषींवर कठोर कारवाईची नागरिकांची मागणी
Anc...डोंबिवली एमआयडीसी फेज १ मधील श्री जी लाईफस्टाईल कंपनीसमोरच्या नव्याने बांधलेल्या सीमेंट काँक्रीट रस्त्याची अचानक तोडफोड करण्यात आल्याने स्थानिक रहिवासी आणि उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.या रस्त्यासाठी शासनाने गेल्या तीस वर्षांत पहिल्यांदाच ११० कोटींच्या निधीतून डोंबिवली एमआयडीसीत दर्जेदार रस्त्यांची कामे करण्यात आली होतीया निधीत एमआयडीसी व केडीएमसी यांचा समावेश होता. मात्र, रस्ते पूर्ण होण्याच्या अवघ्या काही महिन्यांतच सेवा वाहिन्या, गटारे किंवा इतर कारणांनी रस्त्यांची तोडफोड सुरू झाल्याने, कोणतीही पूर्वसूचना न देता दोन दिवसांपासून हा मजबूत रस्ता फोडण्यात आल्याने स्थानिकांनी ."नवीन रस्ता का फोडला जातोय? करदात्यांचा पैसा असा वाया घालवणं बंद व्हावं. संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी ठरवून चौकशी झाली पाहिजे,"अशी मागणी नागरिक करत आहेत. डोंबिवलीतील नागरी प्रशासन, एमआयडीसी व ठेकेदार यांच्यातील समन्वय अभावामुळे रस्त्यांचा दर्जा आणि करदात्यांचा पैसा वाया जात असल्याने दोषींवर कठोर कारवाईची मागणी देखील जोर धरू लागली आहे आहे
0
Share
Report
Wardha, Maharashtra:
वर्धा ब्रेकिंग
SLUG- 2806_WARDHA_MURDER
- वर्ध्यात शेतीच्या वादातून दोघांची हत्या तर आरोपीची आत्महत्या
- निमसडा शेतीच्या धुऱ्यावर घडली घटना
- वर्ध्याच्या निमसडा गावातील धक्कादायक घटना
- काकू आणि चुलत भावाची केली कुऱ्हाडीने हत्या
- दोघांना कुऱ्हाडीने हल्ला करीत केले ठार
- आरोपीने स्वतः विष पिऊन केली आत्महत्या
- महेंद्र मोहिजे असं आरोपीचे नाव
- साधना मोहिजे वय 55 वर्ष ,नितीन मोहिजे वय 27 वर्ष असं मृतकांचे नाव
0
Share
Report
Raigad, Maharashtra:
स्लग - ५ तारखेच्या मोर्चाकडे राजकीय दृष्ट्या पाहत नाही ..... या मोर्चातून राजकीय ध्रुवीकरणाची शक्यता नाही ..... खासदार सुनील तटकरे यांचं मत ...... राष्ट्रवादी काँग्रेस मोर्चात सहभागी होणार नाही ......
अँकर - ५ तारखेला जो मोर्चा निघणार आहे त्याकडे मी राजकीय दृष्ट्या बघत नाही. हिंदी भाषा पहिलीपासून अनिवार्य न करता पाचवी पासून पर्यायी ठेवावी अशी आमच्यासह सर्वांचीच भूमिका राहिली आहे याबाबत राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. त्यामुळे या मोर्चामुळे वेगळं काहीतरी राजकीय घडेल, राजकीय ध्रुवीकरण होईल असं मला वाटत नाही, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी व्यक्त केलं आहे. हा मोर्चा विरोधी पक्षांचा आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा कुणीही नेता यात सहभागी होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या भावना मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या कडे मांडेल असंही तटकरेंनी स्पष्ट केलंय.
बाईट - सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
0
Share
Report
Oros, Maharashtra:
सिंधुदुर्ग --- 2003 मध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखवून हत्याकांड झालेल्या नांदोस गावात सापडला सांगाडा.... पुरुष जातीच्या देहाची केवळ हाडेच राहिली शिल्लक... हाडे सापडल्याने नांदोस परिसरात खळबळ... पोलीस घटनास्थळी दाखल... मृतदेहाशेजारी आढळून आली बॅग... पोलिस तपास सुरू
0
Share
Report
Ratnagiri, Maharashtra:
चिपळूण -
शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी पुन्हा चालवली बस.
चिपळूण डेपो मध्ये नव्याने दाखल झालेल्या पाच बस चे लोकार्पण सोहळ्यात भास्कर जाधव यांचा शहरातून बस चालवत फेरफटका.
आमदार भास्कर जाधव यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शेखर निकम यांची उपस्थिती.
Byte pointer :
एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्यात...या सरकारने त्या पूर्ण केल्यात - भास्कर जाधव यांची खोचक प्रतिक्रिया.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांकडून विविध मागण्या घेऊन अनेक आंदोलने करत शरद पवार यांना टार्गेट करण्यात आलं....
त्या सगळ्या मागण्या या सरकारने पूर्ण केल्या असाव्यात...असे म्हणत भास्कर जाधव यांनी केली सरकार वर टीका.
एसटी कर्मचाऱ्याच्या मागण्यांच्या प्रश्न पावसाळी अधिवेशनात ताकदीने मांडणार : भास्कर जाधव
भास्कर जाधव on राज उध्दव.
मराठी भाषेसाठी दोघे बंधू एकत्र येत आहेत याचा आनंदच....मराठी भाषा टिकली पाहिजे म्हणत दिले अनेक ऐतिहासिक दाखले.
सरकारवर टीका करताना भास्कर जाधव यांनी माध्यमांवर घेतले तोंडसुख....म्हणतात पत्रकारांना मराठी भाषा टिकावी असे वाटत नाही का ?
पत्रकार सरकारचे म्हणून सरकार म्हणतं ते दाखवलं जातं.
माशेलकर यांच्यासह अनेक अहवालांचे दाखले देत भास्कर जाधव यांचे राज्य सरकारवर टीका करत गंभीर आरोप.
भास्कर जाधव on नाराजी.
मला वाचनाची आवड...त्यामुळे जे आवडत ते मी ठेवतो.
नाराजीचा प्रश्नच नाही..... व्हॉट्स अँप स्टेटस वरून भास्कर जाधव यांची सारवा सराव.
लोकेशन : चिपळूण
0
Share
Report
Ratnagiri, Maharashtra:
रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावर सध्या खड्डेच खड्डे पाहायला मिळत आहेत. विशेषतः संगमेश्वर ते रत्नागिरी दरम्यान महामार्गाची काही ठिकाणी अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. आरवली ते बावनदी रस्त्यावर काही ठिकाणी एक फुटांपासून ते अगदी तीन किंवा चार फुटांपर्यंत खड्डे पडले आहेत, त्यामुळे या भागातून वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागतेय.. काही ठिकाणी खड्ड्यांमध्ये नुसती खडी टाकण्यात आली आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या स्थितीमुळे संगमेश्वर ते रत्नागिरी या 45 किलोमीटरच्या प्रवासासाठी तब्बल सव्वा ते दीड तास लागत आहे. त्यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत.
0
Share
Report
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 2806_BHA_ELECTION
FILE - 1 VIDEO
जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या निवडणुकीला सुरुवात शांततेमध्ये पार पडत आहे मतदान प्रक्रिया पोलिसांचा बंदोबस्त
ANCHOR :- भंडारा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाची निवडणुक आज पार पडत आहे.निवडणुकीला नुकतीच सुरुवात झाली असून १२ संचालक असलेल्या या दुध संघाच्या निवडणुकीसाठी २५ उमेदवार रिंगणात आहेत.विद्यमान अध्यक्ष रामलाल चौधरी यांच्या नेतृत्वातील काँग्रेसचे शेतकरी विकास पॅनल आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत विलास काटेखाये नेतृत्वातील सहकार पॅनल समोरासमोर उभे ठाकले आहेत. यामुळे होणाऱ्या या दुग्ध संघाच्या निवडणुकीत मोठी चुरस वाढली आहे.काँग्रेसचे आमदार नाना पटोले आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी या निवडणुकीत हात मिळवणी केल्यामुळे या निवडणुकीत वेगळे समीकरण पाहायला मिळते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
0
Share
Report
Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी- गृहराज्यमंत्री योगेश कदम
मराठी भाषा हीच प्राधान्य
हिंदी भाषेला कुठेही सक्ती केलेली नाही
मोर्चाच्या माध्यमातून मागणी काय हेच आम्हाला कळलं नाही
हिंदी भाषा असू नये यासाठी विरोध आहे का
मुंबई महानगरपालिकेला डोळ्यासमोर ठेवून हा सर्व प्रयत्न केला जातोय
मोर्चेकडून काय साध्य करणार हे सगळे राजकारण
On दादा राऊत
हिंदीची सक्ती केलेली नाही
Gr मध्ये मराठी भाषा सक्तीची आहे
संजय राऊत फक्त आकस आणत आहेत
निवडणुकीच्या तोंडावरती हे राजकारण
ऑन अजित पवार
आमच्या कुटुंबाचा विषय
आमचा कुटुंबामध्ये हा विषय
राज्याच्या कुठल्याही त्याला अडचण नाही
आर्थिक अडचण कुठेही नाही
ऑन Sukla
मुंबईची मराठी माणसांचीच राहणार
मुंबई वरती मराठी माणसाचाच भगवा झेंडा फडकणार
मुंबई मधून मराठी माणूस बाहेर जाऊ देणार नाही
ऑन वसंत मोरे
वसंत मोरे यांनी किती पक्ष बदलले
महाराष्ट्र मध्ये जनतांच्या सोबत
एकनाथ शिंदे यांच्यावरती मराठी माणसांचा विश्वास
ऑन भास्कर जाधव
विरोधी पक्ष नेतेपद मिळवण्यासाठी त्यांचा खटाटोप
भास्कर जाधव ज्येष्ठ नेते
भास्कर जाधव यांच्याशी आमचे वैयक्तिक हेवेदावे नाहीत
भास्कर जाधव यांच्याकडून आम्ही अनेक गोष्टी शिकत आलो आहोत
ऑन रोहिणी खडसे
त्यांच्या घरात पण एक केंद्रीय मंत्री पद आहे
त्यांना सुद्धा त्यांनी एक गाजर द्यावं
कशाला स्वतःच हस करून घेता
महाराष्ट्राचा विकास होतोय एकदाची त्यांच्या पोटात दुखत असेल म्हणून ते असं करत आहेत
ऑन सिंधू रत्न योजना
योजना आपण परत सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहोत
ऑन लडकी बहिण योजना
तुझ्याच माध्यमातून मी ऐकतो आहे
मला या संदर्भात काही माहिती नाही
ऑन विनय नातू
आपण एकाच पक्षातले आहोत
समोरासमोर हा विषय बसून सोडवता येतो
त्यामुळे नातू यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी
0
Share
Report
Nashik, Maharashtra:
nsk_accidetdeath
feed by 2C
image 1 vidoe 1
anchor उपनगर टाकळी मार्गावर अवजड वाहनांना वाहतूक करण्यास बंदी असूनही सर्सासपणे वाहतूक सुरू असते. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रुशिका आनंद चांदवले राहणार रामदास स्वामी नगर ही युवती तिच्या वडिलांसोबत मोटरसायकलने टाकळी रोड, भारत गॅस ऑफिस समोरून जात असताना मद्यधुंद अवस्थेत ट्रक चालकाने भरधाव वेगात त्यांच्या मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या अपघात रुशिका हिच्या डोक्याला, हातापायांना गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ट्रक चालकाला नागरिकांनी चांगला चोप दिला. बराच वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वारंवार स्थानिक नागरिकांनी प्रतिबंधित मुख्य रस्त्यांवर अवजड वाहनांना परवानगी नसताना वाहतूक सुरू असल्याची तक्रार प्रशासनाला दिले आहे, परंतु वाहतूक पोलीस याकडे दुर्लक्ष करत असून निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे.
0
Share
Report
Ambernath, Maharashtra:
बदलापूरच्या रेशनिंग कार्यालयच स्थलांतर नाही
आशिष दामले यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट
रेशनिग कार्ड समस्यांचा निराकरण करण्यासाठी शिबिर
Bdl ration
anchor बदलापूर शहरातील रेशनिंग कार्यालय हे मुरबाडला स्थलांतरित होणार नसून ते बदलापूरलाच राहणार असल्याचं परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांनी सांगितलं, याबाबत आपण नागरी आणि अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी भेट घेऊन घेतली असून भुजबळ यांनी आश्वासन दिले असल्याचं दामले यांनी सांगितलं ,या निर्णयामुळे बदलापूरकरांची मोठी गैरसोय टळणार आहे . तसेच रेशनिंग बाबत नागरिकांच्या अनेक समस्या आहेत, यात धान्य नमिळने, घरमालकाकडून एनओसी मिळत नसल्याने रेशन कार्ड मिळत नाहीये, अश्या अनेक समस्यांचा निराकरण करण्यासाठी आशिष दामले यांनी रेशन कार्ड शिबिराचं आयोजन ही केलं होतं , या शिबिराला रेशनिंग अधिकारी उपस्थित होते या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्यांच्याच निरकरण केलं या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला
चंद्रशेखर भुयार, बदलापूर
0
Share
Report