Back
क्या भरत गोगावले ने नारायण राणें की हिंसा पर सवाल उठाया?
Oros, Maharashtra
सिंधुदुर्ग --- भरत गोगावले नारायण राणेंबाबत जे बोलले ते अगदी खर बोलले राणेंनी आपली संघटना अशाच पद्धतीने वाढविली... मात्र त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी नारायण राणेंसारख मारामारी खून करून आपला पक्ष वाढवावा असा संकेत देण्यासाठीच भरत गोगावले सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते का??? माजी आमदार वैभव नाईक यांचा सवाल
byte -- वैभव नाईक, माजी आमदार
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Yavatmal, Maharashtra:
AVB
Anchor : भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांपती केलेल्या अशोभनीय वक्तव्याचा निषेध करीत यवतमाळच्या पुसद मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रदेश सरचिटणीस शरद मैंद यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत बबनराव लोणीकर यांच्या प्रतिमेला चपला जोडे मारले. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन लोणीकर यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
बाईट : अनुकूल चव्हाण
0
Share
Report
Dhule, Maharashtra:
Anchor - हिंदी भाषा सक्तीच्या निषेधार्थ धुळ्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. यावेळी ऊबाठा शिवसेनेच्या वतीने महापालिकेच्या जुन्या इमारती समोर हिंदी भाषा सक्तीच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली. सरकारच्या हिंदी भाषा शक्ती करण्याच्या धोरणाचा आम्ही जाहीर निषेध करत असल्याच सांगत यावेळी संतप्त कार्यकर्त्यानी सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. हिंदी भाषा सक्ती जर मागे घेण्यात आली नाही तर आगामी काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला
बाईट - धीरज पाटील, उबाठा महानगर प्रमुख
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Share
Report
Dhule, Maharashtra:
ANCHOR - नंदुरबार जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली. तीन राज्यांना जोडणाऱ्या नेत्रंग शेवाळे राष्ट्रीय महामार्गावर झाड कोसळल. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. रस्त्यावर झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
Share
Report
Pandharpur, Maharashtra:
29062025
Slug - PPR_MUKHADARSHAN
feed on 2c
file 01
----
Anchor - आषाढी वारी काळात मुखदर्शनरांगेत छत्रपती संभाजी चौक येथे सरकता उड्डाणपुल, प्रदक्षिणा मार्गावरील रहदारीचा अडथळ दुर होणार,
श्रीं विठ्ठलच्या मुखदर्शन रांगेत छत्रपती संभाजी चौक येथे कार्तिकी यात्रेप्रमाणे प्रदक्षिणा मार्गावरील रहदारीचा अडथळा लक्षात घेऊन सरकता उड्डाणपुल उभारण्यात आला.
सदरचा उड्डाणपुल 30 फुट लांबी व 10 फुट उंचीचा असून, यामधील 12 फुटाचा भाग सरकता असल्याने, एकादशी दिवशी प्रदक्षिणा मार्गावर येणा-या रथांना कोणताही अडथळा होणार नाही, 10 फुटांपेक्षा जास्त उंचीचा रथ आल्यानंतर अत्यंत कमीतकमी वेळेत पुलाचा वरील भाग सरकवून रथ पार करता येणार आहे.
0
Share
Report
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर जिल्ह्यात मे महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे खरिपांच्या पेरणीवर झाला परिणाम ( WKT )
- सोलापूर जिल्ह्यात मे महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे खरिपांच्या पेरणीवर झाला परिणाम
- जिल्ह्यात आतापर्यंत खरिपाच्या पेरण्या पूर्ण होणं अपेक्षित मात्र अवकाळी चा फटक्याने पेरणीला उशीर
- जून महिना संपत आला तरी देखील अद्याप जिल्ह्यातील अनेक भागात शेतकरी खरीपाची पेरणी करण्यातच व्यस्त
- यंदाच्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये कही खुशी, कही गमचे वातावरण
सोलापुरातील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी... ( WKT )
0
Share
Report
Raigad, Maharashtra:
स्लग - हिंदी भाषा सक्ती विरोधात माणगाव इथं आंदोलन
माणगांव मध्ये शिवसेना ठाकरे गटाने केली जीआरची होळी .
अँकर - राज्यातील हिंदी सक्तीच्या विरोधात आज माणगाव इथं शिवसेना ठाकरे गटातर्फे आंदोलन करण्यात आले. मुबंई गोवा महामार्ग बाजुला माणगाव बस स्थानक परिसरात हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली. यावेळी सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अन्य राज्यात हिंदीची सक्ती नाही मग महाराष्ट्रातच का असा सवाल यावेळी जिल्हा प्रमुख नंदू शिर्के यानी केला.
0
Share
Report
Ambernath, Maharashtra:
उल्हासनगरच्या धोबीघाट रस्त्यावरील खड्डे नागरिकांनीच बुजवले
खट्टी बुजवण्यासाठी युवकाने घेतला युवकाचा पुढाकार
Ulh potholes
Anchor उल्हासनगरच्या धोबीघाट कमला नेहरू नगर रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत ,या खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी स्वतःच्या पैशातून रस्त्यावरील खड्डे बुजवले आहेत.,सदर रस्ता हा थेट राष्ट्रीय महामार्ग कल्याण नगर हायवेला जाऊन मिळतो,त्यामुळे याठिकाणी वाहनांची वर्दळ असते,सर्वत्र खड्डे निर्माण झाल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती परंतु महापालिका दुर्लक्ष करत असल्याने अखेर लखन पाटील ह्या युवकाने श्रमदानातून खड्डे बुजवले आहेत,
चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:2906ZT_WSM_ANJAJI_AMBETKAR
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्थानिक परिस्थिती पाहून छोट्या मोठ्या पक्षासोबत युती होऊ शकते पण ज्यांच्या सोबत युती करू ते पक्ष भाजप बरोबर युतीत नसतील असं भाष्य वंचित बहुजन आघाडीच्या अंजली आंबेडकर यांनी केलं..
ऑन हिंदी...
मुंबईत आज पुरोगामी पक्ष शिक्षण क्षेत्रात वेगवेगळ्या काम करणाऱ्या संघटनाची हिंदी सक्ती बद्दल बैठक आहे,आणि यात वंचित बहुजन आघाडी सामील आहे, असंही अंजली आंबेडकर यावेळी म्हणाल्या..
बाईट: अंजली आंबेडकर,वंचित बहुजन आघाडी.
0
Share
Report
Yeola, Maharashtra:
अँकर:- नाशिक मध्ये होत असलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादकांना बसला असून निफाड चांदवड व येवल्यात द्राक्ष बागांवर विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे यासह द्राक्ष बागांमध्ये तणांची वाढ झाली असून यावर नियंत्रणासाठी महागडी औषध फवारावे लागत आहे त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली असून शासनाने औषधांवरील जीएसटी कमी करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तर दुसरीकडे कृषी तज्ञांनी जैविक बुरशीनाशक व किटकनाशकांचा वापर करावा अशी शिफारस केली आहे या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी...
0
Share
Report
Raigad, Maharashtra:
अँकर - छत्री निजामपूर नावाला गोपीनाथ पडळकरांचा आक्षेप ...... स्वराज्याच्या राजधानीत निजामाच्या खुणा कशाला ? ...... रायगडवाडी असे नामकरण करण्याची मागणी ......
अँकर - स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड ज्या ग्राम पंचायतीत येते त्या ग्राम पंचायतीचे नाव छत्री निजामपूर असं आहे. या नावाला गोपीचंद पडळकर यांनी आक्षेप घेतलाय . स्वराज्याच्या राजधानी जिथं आहे त्या ग्रामपंचायतीचे नाव बदलून छत्री निजामपूर ऐवजी रायगडवाडी करावं अशी मागणी पडळकर यांनी केली आहे . निजामाच्या खुणा इथं कशा काय आल्या असा सवाल करीत आदिलशहा, निजामाच्या खुणा पुसल्या पाहिजेत अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. छत्री निजामपूरचे नाव बदलून ते रायगडवाडी करावं अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
बाईट - गोपीचंद पडळकर
0
Share
Report