Back
दत्ता गांजाळेचा शिंदे शिवसेनेत प्रवेश, ठाकरेंना मोठा धक्का!
Manchar, Maharashtra
Feed 2C
Slug: Manchar Ganjale
File:02
Rep: Hemant Chapude(Manchar)
Anc - आंबेगाव तालुक्याचे उबाठा सेनेचे तालुकाप्रमुख दत्ता गांजाळे यांनी शंभरहून अधिक शिवसैनिक व कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केलाय.
Vo - शिवसेनेत नव्याने दाखल झालेल्या आंबेगाव तालुक्यातील या सर्व कार्यकर्त्यांचे शिंदे शिवसेनेचे प्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भगवी शाल घालत स्वागत केलं.
दत्ता गांजाळे यांच्या पक्ष प्रवेशाने शिवसेना शिंदे पक्षाची आंबेगाव तालुक्यासह मंचर शहरात मोठी ताकद वाढणार आहे... नव्याने स्थापन झालेल्या मंचर नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर मंचरचे माजी सरपंच असलेले शिवसेना उबाठाचे तालुकाप्रमुख दत्ता गांजाळे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडल्याने ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातोय.
Byte - दत्ता गांजाळे
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया मंचर पुणे...
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn sachin ghayal by te
Fees on 2 c , use in shivsena beaten pkg
संत एकनाथ कारखान्याचे चेअरमन आणि शिवसेनेचे उपनेते सचिन घायाळ यांनी शेतकऱ्याला मारहाण केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे त्याचा आणि आमचा काहीही संबंध नाही त्यांना कारखान्यात ऊसही दिला नाही असा दावा सचिन घायाळ यांनी केला आहे.. राजकीय वैमनस्य तुन मला बदनाम करण्याचा हा कट असल्याचा सचिन घायाळ यांचं म्हणणं आहे
Byte सचिन घायाळ, साखर कारखाना अध्यक्ष तथा शिवसेना उपनेते
0
Share
Report
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 3006ZT_CHP_POSTMAN_DEATH_1_2
( 2 file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील मुधोली प्रा. आ. केंद्रात डॉक्टरने रुग्णवाहिका न दिल्यामुळे 25 वर्षीय युवा पोस्टमास्टरचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा आरोप, आरोग्य विभागाने फेटाळले आरोप
अँकर:-- डॉक्टरने रुग्णवाहिका न दिल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात एका 25 वर्षीय युवा पोस्टमास्टर चा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंकित उर्फ कुणाल गायकवाड असं या पोस्टमास्टरचं नाव असून भद्रावती तालुक्यातील मुधोली येथे पोस्टमास्टर म्हणून ते कार्यरत होते. काल पहाटे अचानक त्यांची तब्येत बिघडली, त्यामुळे त्यांना गावातीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. यावेळी डॉक्टरने तपासणी करून त्यांच्या ऑक्सिजनची पातळी अतिशय कमी असल्याचे सांगितलं आणि सोबतच तातडीने त्यांना चंद्रपूरला नेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर गावकऱ्यांनी डॉक्टरांकडे रुग्णवाहिकेची मागणी केली मात्र डॉक्टरांनी रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याचं कारण सांगत रुग्णवाहिका देण्यास नकार दिला. त्यानंतर गावकऱ्यांनी एका मेटाडोर मधून पोस्टमास्टर यांना चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये रोष असून त्यांनी या घटनेला डॉक्टरांची हलगर्जी जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मते डॉक्टर हे खाजगी कामांसाठी रुग्णवाहिका वापरतात मात्र रुग्णांना रुग्णवाहिका देण्यास टाळाटाळ करतात. या घटने विरोधात दोषी डॉक्टरवर कारवाई ची मागणी करत गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे पोस्टमास्टर चा उपचाराअभावी मृत्यू झाल्याच्या आरोपांवर जिल्हा प्रशासनाने खुलासा दिलाय. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी स्वतः गावात जाऊन चौकशी केल्याचं सांगत रुग्णाच्या नातेवाईकांनी कुठल्याही प्रकारच्या रुग्णवाहिकेची मागणी केली नव्हती असं सांगितलं आहे. रुग्णवाहिका त्याच ठिकाणी उपलब्ध होती रुग्णवाहिका न देण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही, हे सर्व आरोप गैरसमजुतीतून झाल्याचा डॉक्टर कटारे यांनी खुलासा केलाय.
बाईट १) मयूर धारणे, ग्रामस्थ
बाईट २) तुळशीराम श्रीरामे, माजी सभापती, पंचायत समिती
बाईट ३) डॉ. अशोक कटारे, जिल्हा आरोग्य अधिकारी
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
Baramati, Maharashtra:
JAVED MULANI
SLUG 3006ZT_DAUNDCRIME
BYTE 1
कोयत्याचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार..... पुण्याच्या दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील घटना..... पुणे सोलापूर महामार्गावर स्वामी चिंचोली हद्दीत घडला प्रकार...... दौंड पोलिसात गुन्हा दाखल.....
Anchor_ पुण्याच्या दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे.पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील स्वामी चिंचोली हद्दीत पुण्याहून सोलापूरकडे जाणारे एक खाजगी वाहन चहा पिण्यासाठी एका टपरीवर थांबलं होतं. याच वेळेस दोन युवक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्तीने त्यांच्या अंगावरील सोन्याची दागिने काढून घेतले यासोबतच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या संदर्भात आता दौंड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय...
बाईट_ गणेश बिरादार,अप्पर पोलीस अधीक्षक
0
Share
Report
Wardha, Maharashtra:
वर्धा
SLUG - 3006_WARDHA_KHADDA
- वर्ध्यात राष्ट्रीय महामार्गाला दुसऱ्यांदा पडले मोठे भगदाड
- पुलाच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
- संबंधित बांधकाम अधिकाऱ्यावर कारवाईची राष्ट्रवादीची मागणी
अँकर- वर्ध्याच्या हिंगणघाट येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ नांदगाव चौक येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलावर चार वर्षांत दुसऱ्यांदा मोठा खड्डा पडलेला आहे. रस्त्याच्या मधोमध पडलेला हा खड्डा अपघातास निमंत्रण देतो आहे...त्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालें असून कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जात आहेय.. तर रस्ता बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी अतुल वांदिले यांनी केली आहेय..
बाईट- अतुल वांदिले, सरचिटणीस, राष्ट्रवादी शरद पवार गट,हिंगणघाट
0
Share
Report
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
4 FILES
SLUG NAME -SAT_AAROGYA_SEVAK
सातारा – राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 10 वर्षे आणि अधिक सेवा बजावलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समायोजित करण्याचा निर्णय दिनांक 14 मार्च 2024 रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला होता. मात्र, सव्वा वर्ष उलटल्यानंतरही या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. याविरोधात साताऱ्यातील संतप्त कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलनाचा इशारा दिला आहे.कर्मचाऱ्यांनी मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह संबंधित सचिव आणि आरोग्य आयुक्तांना वेळोवेळी निवेदने दिली असून, अनेकदा भेटी घेऊन समायोजन, वेतनवाढ, बदली धोरण, EPF आणि विमा योजनांबाबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला. तरीही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.या निष्क्रियतेविरोधात कर्मचारी लवकरच "लक्षवेधी असहकार आंदोलन" छेडणार असून, शासनाने त्वरित निर्णयाची अंमलबजावणी करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
Byte -
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
रखडलेल्या ठाकुर्ली उड्डाणपूलाबाबत मनसे सह ठाकरे गट आक्रमक
पुलावर मनसे आणि ठाकरे गटाचे एकत्रित आंदोलन
प्रतीकात्मक विमान निवडून नोंदवला सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाचा निषेध
प्रतिकात्मक इन्फ्रामॅन आणून खासदार श्रीकांत शिंदे नाटोला
Anchor :- डोंबिवली जवळील ठाकुरली येथील 90 फीट ला जोडणारा उड्डाणपूल हा गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे .बाधितांच्या मोबदल्याअभावी हा पूल रखडल्याचे बोलले जात आहे . गेल्या पंधरा वर्षाहून अधिक काळ हा पूल पूर्ण करण्यासाठी अनेकदा पाठपुरावा करूनही पुलाचे काम पूर्ण न झाल्याने याबाबत मनसे आणि ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतलाय .डोंबिवलीत पुन्हा एकदा मनसे आणि ठाकरे गटाने एकत्र येत या अर्धवट पुलावर आज आंदोलन केलं. या पुलावर प्रतिकात्मक विमाने रॉकेट उडवून प्रशासनासह सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदवला. या आंदोलनात प्रतीकात्मक इन्फ्रा मॅन देखील आणण्यात आला होता खासदार श्रीकांत शिंदे समर्थक यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचे इन्फ्रा मॅन म्हणून बॅनर लावले होते.. या पार्श्वभूमीवर मनसेने प्रतीकात्मक इन्फ्रा मॅन आणून अप्रत्यक्षरीत्या खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली.यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी सांगितले की ,"मनसेचे माजी आमदार व नेते राजू पाटील यांनी 30।जूनपर्यंत जर या पुलाचे काम सुरू झालं नाही तर आंदोलनाचा इशारा दिला होता .हा ब्रिज बनवण्यासाठी 2002 साली सुरुवात केली मात्र अजूनही हा ब्रिज पूर्ण होत नाही या पुलासाठी 42 करोडचे टेंडर काढलं होतं ..24 करोड ठेकेदाराला देऊन देखील हे काम रखडलेल्या अवस्थेत आहे . या ब्रिज साठी कोणते रॉकेट सायन्स लागलं त्यासाठी प्रतीकात्मक सायंटिस्ट आणि इन्फॉर्म बोलावलं आहे त्यांच्या या ठिकाणी सत्कार केला या ठिकाणी भविष्यात उडून जावं लागेल आम्हाला हवेत उडणारे कार आणि बाईक विकत घ्यावे लागतील असा टोला प्रशासनासह सत्ताधाऱ्यांना लगावला .
Byte :- प्रकाश भोईर ( मनसे जिल्हाध्यक्ष )
0
Share
Report
Beed, Maharashtra:
बीड: तहसीलदार साहेब, शेत जमिनीला रस्ता द्या; हतबल झालेल्या शेतकऱ्याने घेतले अंगावर डिझेल ओतून..!
Anc- परळी तालुक्यातील सिरसाळा शिवारातील शेतकरी ज्ञानेश्वर दहिफळे हे गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या गट क्रमांक 390 मधील शेतजमिनीला रस्ता मिळावा यासाठी प्रशासन दरबारी मागणी करत होते. मात्र वारंवारच्या दुर्लक्षामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचलत अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. नशीब बलवत्तर म्हणून पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत अनर्थ टाळला आणि संबंधित शेतकऱ्याला ताब्यात घेतलं. शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आता जीवावर बेतू लागल्याचे विदारक वास्तव ग्रामीण भागातून समोर येत आहे.
0
Share
Report
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_MURDER
दारूच्या नशेत पित्यानेच पोटच्या गोळ्याचा घेतला जीव, डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून नऊ वर्षाच्या चिमुकलीचा केला खून.
परंडा तालुक्यातील शेळगाव येथील हृदय पिळवटून टाकणारी घटना.
Anchor
धाराशिवच्या परंडा तालुक्यातील शेळगावमध्ये घडली काळीज हादरवणारी घटना...
गौरी ज्ञानेश्वर जाधव – अवघ्या 10 वर्षांची निरागस मुलगी...
डोक्यात धारदार शस्त्राने वार... आणि पित्यानेच संपवला आपल्या लेकराचा जीव.दारूच्या आहारी गेलेल्या बापाचं राक्षसी रूप आज उघडं पडलं.
गौरी आपल्या आजीकडे राहत होती… कारण तिच्या वडिलांना दारूचं गंभीर व्यसन होतं.
पण एक दिवस, आजी नसताना पित्यानेच धारदार शस्त्र घेऊन लहानग्या गौरीवर केला हल्ला.
तिला वारंवार आजारी पडत असल्याचं कारण सांगत बापाने थेट खून केला.
गौरी जाधव ही गावातील शाळेत चौथीत शिक्षण घेत होती.
हत्या केल्यानंतर आरोपी बापाने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला,
पण आजीच्या सतर्कतेमुळे सत्य बाहेर आलं.
आंबी पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर जाधव याला ताब्यात घेतलं आहे...
Byte गोरक्षनाथ खरड
पोलीस अधिकारी आंबी पोलीस स्टेशन
0
Share
Report
Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Solar
Feed on - 2C
---------------------------------
Anchor - शासकीय कार्यालय विजबिलमुक्त करण्यासाठी शासन पुढाकार घेत असताना दुसरीकडे काही शासकीय कार्यालय मात्र उदासीनता बाळगाताना दिसताहेत. नांदेड जिल्हा परिषदेच्या इमारतीवर दोन वर्षांपूर्वी एक कोटी रुपये खर्चून सोलार यंत्रणा बसवन्यात आली मात्र ही यंत्रणा वापराविना धुळखात पडून आहे.
Vo - शासकीय यंत्रणा कशी बेजबाबदारपणे वागते याचे आणखी एक उदाहरण नांदेडमध्ये समोर आले आहे. जिल्हा परिषदेच्या इमारत विजबील मुक्त करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी इमारतीवर सोलार यंत्रणा लावण्यात आली. जवळपास एक कोटी रुपये खर्च यासाठी करण्यात आला. पण दोन वर्ष झालेहे सोलार वपारविना पडून आहे. पण त्यामुळे जिल्हा परिषदेला विद्युत बिल भरावे लागत आहे. जिल्हा परिषदेला महिन्याला साधारणता पाच ते सहा लाख रुपये लाईट बिल येते. मग यंत्रणा लावली पण ती वापरली नाही त्यामुळे जिल्हा परिषदेला विजबील भरावे लागले. दोन वर्षाचा विचार केला तर एक कोटी पेक्षा जास्त विजबिल जिल्हा परिषदेला भरावे लागले. सोलार यंत्रणा कार्यान्वित केली असती तर हे बिल भरावे लागले नसते. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस, शिवसेनेसह इतर संघटनानी केलीये.
Byte - बालाजी गाडे - काँग्रेस प्रवक्ता
Byte - सुनील पाटील - शिवसेना यु. बी. टी.
Byte - दशरथ पाटील - जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय छावा.
Vo - याबाबत झी 24 तासने मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्याशी संपर्क साधला. सोलार सुरु करण्यास का उशीर झाला याबाबत विचारणा केली. मात्र कोणतेही उत्तर न देता त्या थेट कॅबिन बाहेर पडून आपल्या वाहनातून निघून गेल्या. अधिकाऱ्यांनी आगोदरच बेजबाबदाररपणा दाखवलेला असताना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जबाबदारी झाटकून पळ काढला.
Vo - विजाबिलपासून मुक्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूर्यघर योजना सुरु केलीये. प्रोत्साहनपर अनुदान दिले जात आहे. दुसरीकडे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषद कार्यालयाचा असा बेजबादारपणा समोर आलाय. त्यामुळे हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे.
-------------------
0
Share
Report
Beed, Maharashtra:
*"बीड हादरतंय! अल्पवयीन मुलीवर अत्याचार — आरोपींना आमदार संदीप क्षीरसागरांचं अभय? धनंजय मुंडेंचा थेट स्फोट!"*
Anc- बीडमधल्या 'उमाकिरण क्लासेस'मध्ये एका निष्पाप अल्पवयीन मुलीवर दोन शिक्षकांनी विकृत अत्याचार केला. याप्रकरणी तीन दिवसानंतर आरोपी शिक्षकांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केलीय.. आता याच प्रकरणावरून आमदार धनंजय मुंडे हे आक्रमक झाले आहे. संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात अनेक आरोपांनी घेतलेले धनंजय मुंडे यांनी तब्बल 200 दिवसानंतर मौन सोडला आहे. लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी शिक्षक यांना आमदार संदीप क्षीरसागर यांनीच अभय दिल्याचा गंभीर आरोप मुंडेंनी केलाय.
-----------
पोलिसांच्या कोठडीत असलेले विजय पवार आणि प्रशांत खाटोकर – हे दोन नावं आता बीडच्या काळजावर ओरखडे घालणारी नावं बनली आहेत... शहरातील नामांकित असलेल्या उमाकिरण खासगी क्लासेस मध्ये याच दोन राक्षसानी एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याने पुन्हा एकदा बीड जिल्हा हादरला आहे. याच प्रकरणावरून आमदार धनंजय मुंडे हे आक्रमक झाले आहेत..बीडमधील संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. त्यात त्यांना मंत्रिपद देखील मुकावे लागले... आता बीडच्या लैंगिक प्रकरणात धनंजय मुंडे यांनी लोकप्रतिनिधी आणि पोलिस प्रशासनावरच बोट ठेवले आहे. या आरोपींना संदीप क्षीरसागर यांनीच पाठीशी घातले आहे. त्यांचे आरोपींसोबत घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे संदीप क्षीरसागर यांची देखील चौकशी करावी अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.
बाईट: धनंजय मुंडे,
----------
संदीप क्षीरसागर आरोपींशी संपर्कात होते! हे लाजीरवाणं आहे. हे भीतीदायक आहे. असा सुरू धनंजय मुंडे यांनी काढल्यानंतर संदीप क्षीरसागर यांचे चुलत बंधू डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी देखील आरोपाचे समर्थक करत भावावर टीकेची तोफ डागली आहे. आरोपी विजय पवार म्हणजे संदीप यांचा उजवा हात आहे! गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी थेट आमदाराच्या घरात बसलेला होता. या सर्व बाबीची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी योगेश क्षीरसागर यांनी केली आहे.
बाईट: डॉ. योगेश क्षीरसागर, चुलत बंधू
--------------
लैंगिक अत्याचार प्रकरणात धनंजय मुंडे यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर थेट आरोप केले. त्यानंतर मात्र बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील या आरोप प्रत्यारोपात सहभाग घेतला आहे..लैंगिक अत्याचाराची घटना काळीमा फासणारी आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. मात्र मुंडे यांनी क्षीरसागर यांच्यावर केलेले आरोप सिद्ध होणे गरजेचे आहे. आरोप करणे खूप सोपे असते..! या प्रकरणात आमदार संदीप क्षीरसागर यांचा कसलाही संबंध नसल्याचे सांगत मुंडे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले आहे..
बाईट: बजरंग सोनवणे, खासदार
----------
बीड मधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची गय कोणीही करू नये. मी पीडित कुटुंबाची स्वतः भेट घेणार आहे. आणि आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी मी बीडच्या पोलिस अधीक्षकांना तशा सूचना देखील दिल्याची माहिती मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
बाईट: पंकजा मुंडे, मंत्री ( हा बाईट मुंबईत झाला आहे)
---------
घटना समोर आल्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर मात्र गायब असल्याचे समजते..त्यांच्यावर गंभीर आरोप होऊन देखील ते अद्याप माध्यमांसमोर आलेले नाहीत. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले आहे. आरोपींना खरंच संदीप क्षीरसागर यांचे अभय होते का? गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी त्यांच्या घरी होते का? ह्या सर्व बाबी तपासाअंती पुढे येतीलच..! आता आमदार संदीप क्षीरसागर धनंजय मुंडे यांच्या आरोपावर काय बोलतील याकडे देखील राज्याचे लक्ष लागले आहे.
महेंद्रकुमार मुधोळकर, बीड
0
Share
Report