Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422303

धरण डावे-उजवे कालवे बंद, 5 हजार हेक्टेयर ज़मीन जलमग्न

SKSudarshan Khillare
Sept 26, 2025 05:47:50
Niphad, Maharashtra
अँकर:- नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील कोळगाव, रुई व देवगाव परिसरातील सुमारे ५ हजार हेक्टर जमीन नांदूरमधमेश्वर धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या गळतीमुळे तसेच मुसळधार पावसामुळे जलमय झाली असून नापिकी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे व शेतकऱ्यांनी दिल्यानंतर या गंभीर प्रश्नाची दखल घेत नांदूर मधमेश्वर धरणाचे डावे उजवे कालवे बंद करण्याचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी तातडीने पाटबंधारे विभागाला आदेश दिले आहेत. बाईट :- निवृत्ती गारे ( जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना)
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Sept 26, 2025 06:47:53
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2609ZT_CHP_VIJAY_HELP ( single file sent on 2C)  टायटल:-- शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून निधी आणा, तुमची तिथली किंमत कळेल, काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांचा इशारा अँकर:-- केंद्रापुढे लोटांगण घाला पण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी पुढे या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत किंमत आहे हे केंद्राच्या मदतीवरून आम्हाला कळेल अशी प्रतिक्रिया काँग्रेस विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.  आतापर्यंत 50 लाख हेक्टर जमीन पूर्ण पणे खरडून गेली, पिकं वाया गेले, त्यामुळे केंद्राच्या मदतीची आवश्यकता आहे अशा वेळी जर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जाणार असतील तर आनंदच आहे पण जाऊन नुसतं येऊ नये, भरीव मदत मिळाली पाहिजे. पंजाब सरकारने दिली तशी 50 हजार रुपये हेक्टर मदत महाराष्ट्र सरकारने दिली पाहिजे, लाडक्या बहिणीचं कारण सांगून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे पाप करू नका असेही ते म्हणाले. बाईट १) आ. विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Sept 26, 2025 06:46:39
Mumbai, Maharashtra:anchor : नवरात्री निमित्त चांदीवली मधील शिवसेना पुरस्कृत बाल विकास मित्र मंडळ , जय भवानी दांडिया उत्सव इथे नेत्रदीपक देखावे उभारण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि भवानी मातेच्या संवादाचे चलचित्र इथे देखाव्यात साकारण्यात आले आहे. मंडळाचे अध्यक्ष आमदार दिलीप लांडे यांच्या संकल्पनेतून हा भव्य दिव्य ऐतिहासिक देखावा सादर करण्यात आला आहे. या मंडळांनी मराठवाड्यात आलेल्या आपत्ती च्या अनुषंगाने या उत्सवातील इतर खर्चाला आळा घालून मराठवाड्याला मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इतर मुंबई मधील नवरात्र उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना ही मंडळाचे अध्यक्ष शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी मराठवाड्याला मदत करण्याचे आवाहन केले आहे. byte : दिलीप लांडे(अध्यक्ष, शिवसेना आमदार)
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 26, 2025 06:45:51
Satara, Maharashtra:TUSHAR TAPASE 6 FILES SLUG NAME -SAT_PANDE_STORY सातारा - सध्या सगळीकडे देवीचा जागर सुरू असून या शारदीय नवरात्रौत्सवात अनेक भक्त उपवास करतात. या उपवास करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. काहीजण फळे खाऊन उपवास करतात तर काही जण पायात चप्पल घालत नाहीत .ज्याला जसं जमेल तशी देवीची भक्ती करत असतो.पण या नवरात्रौत्सवात साताऱ्यातील वाई तालुक्यातील पांडे गावात अनोखी प्रथा आहे.या प्रथेला उभ्याची नवरात्र म्हटलं जातं.जमिनीवर न बसता,जमिनीला आपली पाठ न टेकवता हा उपवास केला जातो आणि यामध्ये अनेक भक्त सहभागी होतात चला पाहूया कशी असते ही उभ्याची नवरात्र... विओ 1- पांडे गावात काळभैरवाचं जागृत स्थान आहे. येथे मागितलेली मनोकामना पूर्ण होते अशी मान्यता आहे.उपासक दिवसभर काळभैरवाची पूजा करतात.पांडे हे बारा बलुतेदारांचं गाव आहे. दरवर्षी या गावातील अनेक लोक उपवास करतात. हातात काठी घेऊन गावभर आरती करतात. आपल्या मनातून इच्छा पूर्ण करण्यासाठी देवीला नवस केला जातो. आणि नवसासाठी हा कडक उपवास केला जातो. विशेष म्हणजे गावातील मुस्लीम समाजातील लोकही देवीचा हा कडक उपवास करतात. नवस बोलणारे उपासक जमिनीवर पाय ठेवूनच सगळ्या गोष्टी करतात.उपासकाने जमिनीवर बसायचे नाही आणि झोपायचे देखील नाही.जर उपासकाला विश्रांती घ्यायचीच असेल तर मंदिरात असणाऱ्या पाळण्यावर छाती टेकवून आणि एक पाय वर घेऊन उभ्या उभ्या झोपतायच असते.ही तब्बल साडेतीनशे वर्षे जुनी परंपरा असल्याचे गावकरी सांगतात.. बाईट - उपासक विओ 2- पांडे गावातील हे उपासक नवरात्रौत्सवाचे नऊ दिवस कडक उपवास करतात. तेल, मीठ, तिखटाचा पूर्णपणे त्याग केला जातो. हे नऊ दिवस ते केवळ गोड खातात. यामध्ये साबुदाण्याची खिर खाल्ली जाते. याशिवाय ते फळं आणि दूध घेतात. बाईट - उपासक विओ 3- हा उपवास इतका कडक असतो की या नऊ दिवसांच्या काळात ते बसत नाहीत. ते अख्खे नऊ दिवस उभेच राहतात. आधार फक्त काठीचा. झोपेसाठी ते पाळण्याचा वापर करतात. या नऊ दिवसास ते झोपत नाहीत. पळत नाही. चप्पल घालत नाही. सकाळी दोन तास आणि सायंकाळी दोन तास आरती केली जाते.पाय रिकामे करण्यासाठी गावत फेरफटका मारला जातो.झोपाळ्यावर छाती टेकून एक पाय वर घेऊन झोपतात. या उपासनेत एक पाय जमिनीवर ठेवावाच लागतो.नाथांची सेवा जितकी कडक कराल, तितकं फळ चांगलं मिळतं अशी उपासकांची मान्यता आहे. गावकरी मानतात की अशी कठोर उपासना केल्यावर देवी आपल्या मनोकामना पूर्ण करते. विशेष म्हणजे या उपासनेत सर्व समाजातील लोक सहभागी होतात. तुषार तपासे सातारा
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 26, 2025 06:20:36
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 26, 2025 06:16:41
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Sept 26, 2025 06:03:59
Mumbai, Maharashtra:संजय राऊत उद्धव ठाकरे यांनी काल मराठवाडा दौरा केला शेतकऱ्यांना मदत पोहचलेली नाही, पंचनामाला अधिकारी पोहचलले नाही मुख्यमंत्री यांच्या आणि फोटो लावणाऱ्या उपमुख्यमंत्री यांच्या सांगण्यावरून जाऊ नका शेतकऱ्यांना सांगितलं कर्जमाफी हवी उद्धव ठाकरे यांनी प्रमुख दोन मागण्या केल्या हेकक्ट्री ५० हजार रुपये मदत शेतकऱ्यांना द्या पंजाब मध्ये भगवंत मान यांनी मदत दिली तशी मदत मिळावी महाराष्ट्रच्या शेतकऱ्यांना आणि दुसरी म्हणजे सरसकट कर्जमाफी द्या मुख्यमंत्री टोलवाटोलवी करताय उपमुख्यमंत्री म्हणतात पैशाचा सोंग घेता येणार नाही पीएम केअर फंड आहे, त्याच्या मधील रक्कम भारताच्या बजेट पेक्षा जास्त असेल असा लोकांना वाटतं उद्धव ठाकरे यांची मागणी आहे कीं पी एम केअर फंडाचा वापर करून महाराष्ट्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करा मुख्यमंत्री यांनी त्यांच्या दोन उप उप यांना मोदी यांच्या कडे भेटायला न्यावं ... आणि मदत मिळून द्यावी गाव पाण्यात आणि तानाजी पुण्यात अशी घोषणा काल शेतकऱ्यांनी दिली... तानाजी सावंत हे मतदारसंघ मध्ये नाहीत पुण्यात आहेत एक दिवस फक्त ते मतदारसंघ मध्ये आले
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 26, 2025 05:50:08
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2609ZT_CHP_LOSS_CHAUPAL_1_2 ( 2 file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यात सततच्या पावसाने शेती उध्वस्त, शेतकरी कोलमडला, ओला दुष्काळ जाहीर करत सरसकट मदतीची मागणी अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यात गेले चार महिने मुसळधार पावसाने शेत पिकांचे मोठे नुकसान केले आहे. मात्र गेले पंधरा दिवस संततधार पावसाने परिस्थिती आणखी बिकट केली आहे.  जिल्ह्यात धान- सोयाबीन -कापूस- तूर ही प्रमुख पिके आहेत. शेतकऱ्यांच्या मते गेल्या शंभर दिवसात शेत पिकांमध्ये जाणेही अवघड झाले आहे. सततच्या अतिवृष्टीने सोयाबीन पीक हातून गेले आहे.  सोयाबीन चंद्रपूर जिल्ह्यातील दिवाळीच्या सुमारास हाती येणारे नगदी पीक आहे. याशिवाय कपाशीला बोंडे देखील आली नसून मिरची पीक हातून गेले आहे. अशा स्थितीत पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करत सरसकट मदतीची मागणी शेतकऱ्यांनी पुढे भेटली आहे. -------शेतकरी चौपाल------ आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 26, 2025 05:48:08
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - गोपीचंद पडळकरांचा 30 सप्टेंबर रोजी दसरा मेळावा..राष्ट्रवादीचा घेणार समाचार ! अँकर - भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी मध्ये दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आला आहे,30 सप्टेंबर रोजी हा दसरा मेळावा पार पडणार आहे.28 सप्टेंबर रोजी हा दसरा मेळावा पार पडणार होता, मात्र बीड येथे होणाऱ्या ओबीसी महा मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याबाबतची विनंती मंत्री छगन भुजबळांकडून करण्यात आल्याने,दसरा मेळावा दोन दिवस पुढे ढकलत 30 सप्टेंबर रोजी होणार असल्याचे आमदार पडळकरांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.तर या दुसरा मेळाव्यातून धनगर आरक्षणा बरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून करण्यात आलेल्या टीकेबाबत गोपीचंद पडळकर काय बोलतात ? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले. बाईट - गोपीचंद पडळकर - आमदार, भाजपा.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 26, 2025 05:02:49
Yavatmal, Maharashtra:AVB यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला घरघर लागली आहे, देवानंद पवार पाठोपाठ  जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांचे निकटवर्तीय प्रवीण देशमुख यांचे सह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मंत्री वसंत पुरके व काँग्रेस नेत्यांनी स्वतःचे अपयश झाकून प्रामाणिक काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर गद्दारीचा ठपका ठेवला असा आरोप देशमुख यांनी केला. प्रस्थापित नेत्यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. जिल्हा परिषदेचे माजी सभापती अरुण राऊत, जिल्हा बँकेचे संचालक, सरपंच, माजी जि प सदस्य, नगरसेवक, खरेदी विक्री संघ व बाजार समितीचे संचालक असे 200 हून अधिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला झटका दिला आहे.     बाईट : प्रवीण देशमुख 
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Sept 26, 2025 05:02:36
Virar, Maharashtra: Date-26sep2025 Rep-prathamesh tawade Loc-virar Slug-VIRAR IRONMAN Feed send by 2c Type-AV Slug- भारतीय आयर्नमॅन हार्दिक पाटील यांचा जागतिक पराक्रम – ३९वी आयर्नमॅन स्पर्धा यशस्वी” “फ्रान्समध्ये भारताचा झेंडा फडकला – हार्दिक पाटील यांची ३९वी आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण” अँकर - फ्रान्समध्ये झालेल्या आयर्नमॅन वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२५ मध्ये भारतीय अ‍ॅथलीट हार्दिक पाटील यांनी पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. विरारचे भूमिपुत्र असलेल्या हार्दिक याने अवघ्या १६ तास ५ मिनिटांत त्यांनी ३.८ किलोमीटर पोहणे, १८० किलोमीटर सायकलिंग आणि ४२.२ किलोमीटर मॅरेथॉन पूर्ण करत आपल्या कारकिर्दीतील ३९वी आयर्नमॅन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. जगभरात सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या या ट्रायथलॉनमध्ये हार्दिक यांचा पराक्रम भारतासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. त्यांच्या चिकाटी, शिस्त आणि “कधीही हार न मानणाऱ्या” वृत्तीमुळे ते नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान बनले आहेत.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 26, 2025 04:48:22
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आक्रमक झाले आहे, जिल्ह्यात शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रूपये मदत द्यावी व कर्जमाफी चे आश्वासन पूर्ण करावे अशी मागणी करीत शेतकरी मित्रांनी नागपूर-तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग मंगरूळ कारखान्याजवळ रोखून धरला. जिल्ह्यात पूर व अतिपावसामुळे खरिपातील शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिके हातची गेली आहेत, शेतीवर केलेला सर्व खर्च वाया गेला आहे, पंचनामे होत नाहीं त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी व २९ सप्टेंबर ला मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या यवतमाळ दौऱ्यात शेतकऱ्यांशी थेट संवाद साधावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. बाईट : कुणाल जतकर
6
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top