Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442402

चंद्रपूरमध्ये गँगमनच्या सतर्कतेमुळे मोठा रेल्वे अपघात टळला!

ASHISH AMBADE
Jul 02, 2025 04:33:38
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 0207ZT_CHP_ACCI_AVERT ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी रेल्वे स्थानकाजवळ गँगमनच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली,  राप्तीसागर एक्सप्रेस थोडक्यात वाचली, रेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवर केली दुरुस्ती     अँकर:-- त्रिवेंद्रमहून गोरखपूरकडे जाणारी राप्तीसागर एक्सप्रेस (गाडी क्रमांक १२५१२) अपघातग्रस्त होण्याची शक्यता असताना रेल्वे गँगमनच्या सतर्कतेने चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी जंक्शनजवळ मोठी दुर्घटना टळली. ही घटना सोमवारी दुपारी  वाजताच्या उघडकीस आली. माजरी जंक्शनजवळील रेल्वे रुळाचा एक भाग तुटलेला आढळून आला. गस्तीदरम्यान गँगमनला हे लक्षात आले. प्रसंगावधान राखत त्याने तात्काळ रेड फ्लॅग लावून येणाऱ्या राप्तीसागर एक्सप्रेसला थांबवले. वेळीच दिलेल्या इशाऱ्यामुळे ट्रेन थांबवण्यात यश आले आणि शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले. दरम्यान रेल्वे प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तुटलेल्या रुळाची दुरुस्ती केली. आवश्यक सर्व तपासण्या करून राप्तीसागर एक्सप्रेसला सुरक्षितपणे पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. गँगमनच्या सावधपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. हजारो प्रवासी रेल्वेवर अवलंबून असताना, अशा प्रकारच्या सुरक्षा त्रुटी गंभीर चिंता निर्माण करणाऱ्या आहेत. रेल्वेकडून नियमित तपासणी व तांत्रिक देखभाल याकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement