Back
आष्टीतील पोलीस अकॅडमीत 33 विद्यार्थ्यांना विषबाधा, काय आहे कारण?
Beed, Maharashtra
बीड: आष्टीतील अकॅडमीत जेवणातून ३३ विद्यार्थ्यांना विषबाधा; अहिल्यानगर येथे उपचार सुरू
Anc:बीडच्या आष्टीतील एका पोलीस अकॅडमीत 33 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली. या विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र विद्यार्थ्यांची प्रकृती लक्षात घेता या विद्यार्थ्यांना अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. अकॅडमीत जेवणात हुलग्याची भाजी भाकरी आणि भात होता. याच जेवणानंतर विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून तहसील प्रशासनाकडून याबाबत अधिक माहिती घेतली जात आहे.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर जिल्ह्यात मे महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे खरिपांच्या पेरणीवर झाला परिणाम ( WKT )
- सोलापूर जिल्ह्यात मे महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे खरिपांच्या पेरणीवर झाला परिणाम
- जिल्ह्यात आतापर्यंत खरिपाच्या पेरण्या पूर्ण होणं अपेक्षित मात्र अवकाळी चा फटक्याने पेरणीला उशीर
- जून महिना संपत आला तरी देखील अद्याप जिल्ह्यातील अनेक भागात शेतकरी खरीपाची पेरणी करण्यातच व्यस्त
- यंदाच्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये कही खुशी, कही गमचे वातावरण
सोलापुरातील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी... ( WKT )
0
Share
Report
Raigad, Maharashtra:
स्लग - हिंदी भाषा सक्ती विरोधात माणगाव इथं आंदोलन
माणगांव मध्ये शिवसेना ठाकरे गटाने केली जीआरची होळी .
अँकर - राज्यातील हिंदी सक्तीच्या विरोधात आज माणगाव इथं शिवसेना ठाकरे गटातर्फे आंदोलन करण्यात आले. मुबंई गोवा महामार्ग बाजुला माणगाव बस स्थानक परिसरात हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली. यावेळी सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अन्य राज्यात हिंदीची सक्ती नाही मग महाराष्ट्रातच का असा सवाल यावेळी जिल्हा प्रमुख नंदू शिर्के यानी केला.
0
Share
Report
Ambernath, Maharashtra:
उल्हासनगरच्या धोबीघाट रस्त्यावरील खड्डे नागरिकांनीच बुजवले
खट्टी बुजवण्यासाठी युवकाने घेतला युवकाचा पुढाकार
Ulh potholes
Anchor उल्हासनगरच्या धोबीघाट कमला नेहरू नगर रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत ,या खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी स्वतःच्या पैशातून रस्त्यावरील खड्डे बुजवले आहेत.,सदर रस्ता हा थेट राष्ट्रीय महामार्ग कल्याण नगर हायवेला जाऊन मिळतो,त्यामुळे याठिकाणी वाहनांची वर्दळ असते,सर्वत्र खड्डे निर्माण झाल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती परंतु महापालिका दुर्लक्ष करत असल्याने अखेर लखन पाटील ह्या युवकाने श्रमदानातून खड्डे बुजवले आहेत,
चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:2906ZT_WSM_ANJAJI_AMBETKAR
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्थानिक परिस्थिती पाहून छोट्या मोठ्या पक्षासोबत युती होऊ शकते पण ज्यांच्या सोबत युती करू ते पक्ष भाजप बरोबर युतीत नसतील असं भाष्य वंचित बहुजन आघाडीच्या अंजली आंबेडकर यांनी केलं..
ऑन हिंदी...
मुंबईत आज पुरोगामी पक्ष शिक्षण क्षेत्रात वेगवेगळ्या काम करणाऱ्या संघटनाची हिंदी सक्ती बद्दल बैठक आहे,आणि यात वंचित बहुजन आघाडी सामील आहे, असंही अंजली आंबेडकर यावेळी म्हणाल्या..
बाईट: अंजली आंबेडकर,वंचित बहुजन आघाडी.
0
Share
Report
Yeola, Maharashtra:
अँकर:- नाशिक मध्ये होत असलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादकांना बसला असून निफाड चांदवड व येवल्यात द्राक्ष बागांवर विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे यासह द्राक्ष बागांमध्ये तणांची वाढ झाली असून यावर नियंत्रणासाठी महागडी औषध फवारावे लागत आहे त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली असून शासनाने औषधांवरील जीएसटी कमी करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तर दुसरीकडे कृषी तज्ञांनी जैविक बुरशीनाशक व किटकनाशकांचा वापर करावा अशी शिफारस केली आहे या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी...
0
Share
Report
Raigad, Maharashtra:
अँकर - छत्री निजामपूर नावाला गोपीनाथ पडळकरांचा आक्षेप ...... स्वराज्याच्या राजधानीत निजामाच्या खुणा कशाला ? ...... रायगडवाडी असे नामकरण करण्याची मागणी ......
अँकर - स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड ज्या ग्राम पंचायतीत येते त्या ग्राम पंचायतीचे नाव छत्री निजामपूर असं आहे. या नावाला गोपीचंद पडळकर यांनी आक्षेप घेतलाय . स्वराज्याच्या राजधानी जिथं आहे त्या ग्रामपंचायतीचे नाव बदलून छत्री निजामपूर ऐवजी रायगडवाडी करावं अशी मागणी पडळकर यांनी केली आहे . निजामाच्या खुणा इथं कशा काय आल्या असा सवाल करीत आदिलशहा, निजामाच्या खुणा पुसल्या पाहिजेत अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. छत्री निजामपूरचे नाव बदलून ते रायगडवाडी करावं अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
बाईट - गोपीचंद पडळकर
0
Share
Report
Thane, Maharashtra:
पहिली ते पाचवी हिंदी सक्ती वरून ठाण्यात शासन निर्णयाची अनेक राजकीय पक्षांनी एकत्र येत केली प्रतीकात्मक होळी...
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनसे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष तिन्ही पक्षांनी एकत्र येत तळ्यातील महत्त्वपूर्ण अशा चिंतामणी चौक येथे शक्ती प्रदर्शन करत शासन निर्णयाची केली होळी..
यावेळी तिन्ही पक्षांचे अनेक प्रमुख नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते...
0
Share
Report
Shirdi, Maharashtra:
Anc - शिर्डीच्या साई संस्थानमध्ये बोगस कर्मचारी भरतीचा आरोप केला जातोय.. माजी सैनिकांच्या नावाने बोगस सुरक्षारक्षक भरती झाल्याचा संशय असून जिल्हा माजी सैनिक कल्याण समितीने कागदपत्रांची पडताळणी सुरू केली आहे..
V/O - शिर्डीच्या साईबाबा संस्थानमध्ये सुरक्षा विभागात कुशल कर्मचारी म्हणून अनेक माजी सैनिक नोकरी करत आहेत.. सध्या संस्थानमध्ये कंत्राटी पद्धतीने 84 माजी सैनिक सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहेत.. मात्र हीच नोकरी भरती वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.. माजी सैनिकांच्या नावाने बोगस सुरक्षारक्षक भरती झाल्याचा आरोप केला जातोय.. जिल्हा माजी सैनिक कल्याण समितीने कागदपत्रांची पडताळणी सुरू केली असून काही जणांकडे माजी सैनिक असल्याचे सबळ पुरावे नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.. त्यामुळे आता जिल्हा माजी सैनिक कल्याण समितीच्या अहवालाकडे लक्ष लागले आहे.. साई संस्थानमध्ये माजी सैनिकांच्या नावाने नोकरभरतीत घोटाळा झालाय का..? असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित झालाय..
Byte - अशोक दुशिंग, सामाजिक कार्यकर्ते
V/O - शिर्डी संस्थानमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेल्या माजी सैनिकांवर होत असलेल्या आरोप जर खरे ठरले तर संस्थांचे मोठे आर्थिक नुकसान झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.. त्यामुळे जिल्हा माजी सैनिक कल्याण समीरचा अहवालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या अहवालामध्ये नेमकं किती कर्मचाऱ्यांनी बोगस कागदपत्र दिले आहे हे स्पष्ट होणार आहे मात्र या प्रकरणामुळे संस्थानच्या नोकर भरतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताय....
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
राज्य सरकारने काढलेल्या जीआर ची केली होळी..
सरकार विरोधात घोषणा बाजी करत जी आर ची होळी..
कल्याणमध्ये ठाकरे गट व मनसे एकत्र — हिंदी सक्तीविरोधात आंदोलन!
कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना मध्यवर्ती शाखेबाहेर आज शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आले.
सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाच्या परिपत्रक फाडत त्याची होळी करत, "मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवूया!" अशा आशयाचे बॅनर झळकवले केले आंदोलन
आंदोलनात कार्यकर्त्यांनी अभिमान आहे आम्हाला, आम्ही मराठी!","हिंदी सक्ती करणाऱ्या महायुती सरकारचा निषेध!"अशा आशियाचे फलक हातात घेत सरकार विरोधात घोषणाबाजी करत केले आंदोलन
शिवसेना (ठाकरे गट) व मनसेचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि युवक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी
byte... प्रकाश भोईर
माजी आमदार मनसे
byte.. विजय साळवी
उपनेते ubt
0
Share
Report
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2906ZT_CHP_UBT_PROTEST
( single file sent on 2C)
टायटल:---चंद्रपुरात हिंदी सक्तीविरोधात शिवसेना उबाठा पक्षाचे आंदोलन, जीआर प्रती जळून हिंदी सक्तीचा निषेध,हिंदी नव्हे, हिंदी सक्तीला विरोध, भर पावसात शिवसेनेने केले आंदोलन
अँकर -हिंदी सक्तीच्या विरोधात राज्यभरात उठलेल्या आवाजाच्या पार्श्वभूमीवर आज चंद्रपुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने स्थानिक गांधी चौक येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान शासन निर्णयाच्या प्रती जाळून निषेध नोंदविण्यात आला. विरोध हिंदी भाषेला नसून जबरदस्तीने हिंदी लादण्याला आहे अशी आंदोलकांची भूमिका होती. भर पावसात देखील मोठ्या संख्येने शिवसैनिक यात सहभागी झाले.
बाईट १) संदीप गिऱ्हे, जिल्हाध्यक्ष शिवसेना उभाठा
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report