Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

पावसाचे पाणी साचल्याने 200 एकर शेती नापीक होण्याचा धोका!

Sarfaraj Musa
Jul 02, 2025 09:00:15
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
पीकपाणीसाठी Sng_sheti_pani स्लग - पावसाचे पाणी साचल्याने दोनशे एकर वरील शेती नापीक होण्याची भीती.. अँकर - सांगलीच्या पलूस तालुक्यातील आमणापुर परिसरात जवळपास 200 एकर शेत नापीक होण्याच्या मार्गावर आहे.मोठ्या प्रमाणात पाऊसाचे पाणी शेतात साचून राहिल्याने शेतांचे रूपांतर तळ्यात झाले आहे.गेल्या एक महिन्यांपासून आमणापूर परिसरातील डुकरीभाग येथील 50 ते 60 हून अधिक शेतकऱ्यांच्या शेतात पाऊसाचे पाणी साचून असल्याने कोणत्याही प्रकारची पेरणी शेतकऱ्यांना घेता येत नाही,पाणी अधिक दिवस साचून राहिल्याने 200 एकर वरील शेती क्षारपड होण्याचा धोका असल्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने याची दखल घेऊन पाणी निचरा करण्याबाबतच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. बाईट - राजू गोरड - शेतकरी - आमणापूर - पलूस.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement