445001
यवतमाळ तालुका काँग्रेस अध्यक्षावर भरचौकात चाकुहल्ला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहराच्या मध्यवस्तीत गजबजलेल्या दत्त चौकामध्ये भरदिवसा प्राणघातक हल्ल्याची घटना घडल्याने वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रामायण हॉटेल समोर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रमेश भीसणकर यांच्यावर दोन आरोपींनी चाकूने हल्ला चढविला, यावेळी भीसनकर यांनी जखमी अवस्थेत एकाच्या हातून चाकू हिसकावल्याने दोघेही पसार झाले, त्यानंतर जखमी भीसणकर हे स्वतः ऑटोने रुग्णालयात पोहोचले. दरम्यान हा थरार शेकडो लोकांपुढे सुरू असताना कुणीही त्यांच्या बचावासाठी पुढे आले नाही.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
समृद्धि महामार्ग पर प्रतिबंधित अफ्रीकी मांगूर मछली तस्करी का मामला सामने
Washim, Maharashtra:वाशीम: अफ्रिकन मांगूर माशांची तस्करी समृद्धी महामार्गावर उघडकीस आली. वाशिम जिल्ह्यातील पोहा गावाजवळ समृद्धी महामार्गावर माशांची वाहतूक करणारा आयशर ट्रक पलटी झाल्याने हा प्रकार समोर आला. संभाजीनगरहून नागपूरकडे जाणारा ट्रक महामार्गावरील चॅनल क्रमांक 190 जवळ अपघातग्रस्त झाला. ट्रकमधील तीन टन माशांचा खच रस्त्यावर पडला होता. तपासणीदरम्यान हे मासे प्रतिबंधित आफ्रिकन मांगूर जातीचे असल्याचे आढळून आले. घटनेनंतर जिल्हा मत्स्यव्यवसाय विभागाने मृत माशांची विल्हेवाट लावली. या प्रकरणी कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे समृद्धी महामार्गाचा वापर प्रतिबंधित माशांच्या तस्करीसाठी होत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.0
0
Report
अकोला में एक ही दिन दो हत्या: कानून-व्यवस्था पर बड़ा सवाल
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात एका दिवसात घडलेल्या दोन हत्यांच्या घटनांमुळे खळबळ उडाली आहे. अकोला शहरातील तरुणाच्या हत्येची घटना ताजी असतानाच पातूर तालुक्यातील आलेगाव येथे आणखी एका युवकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या सलग घडलेल्या घटनांमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पातूर तालुक्यातील आलेगाव येथील यश गिऱ्हे (वय १७) या युवकाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, प्रेमप्रकरणातून झालेल्या वादातून ही घटना घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. या प्रकरणातील आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत.आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, अकोला शहरात मध्यरात्री झालेल्या तरुणाच्या हत्येनंतर अवघ्या काही तासांत आलेगाव येथे घडलेल्या दुसऱ्या हत्येमुळे जिल्हा हादरला आहे. सलग घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.0
0
Report
गडचिरोली के आष्टि में डॉक्टर पर विवाह का झांसा देकर यौन शोषण का आरोप
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथील एका डॉक्टरविरुद्ध तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप, डॉ. विजन प्रधान सरकार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल अँकर: गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथील एका डॉक्टरविरुद्ध तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी डॉ. विजन प्रधान सरकार याच्याविरुद्ध गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आरोपी डॉक्टरने संबंधित तरुणीशी विवाह करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाच्या आधारवर त्याने तिच्याशी वारंवार संबंध ठेवून तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मात्र नंतर लग्न करण्यास नकार दिल्याने पीडित तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.0
0
Report
Advertisement
वाशीम में 836 नुकसानग्रस्त किसानों को 50 लाख राहत निधि मंजूर
Washim, Maharashtra: जिल्ह्यातील ८३६ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुमारे ५० लाख रुपयांचा मदत निधी मंजूर करण्यात आला आहे.१ ते ४ एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ५७ गावांमधील २९१.६१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते.जिल्हा प्रशासनाने केलेल्या पंचनामे व अहवालाच्या आधारे राज्य शासनाने मदतीस मंजुरी दिली आहे.खरीप हंगामाच्या तोंडावर मिळालेल्या या मदतीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून आर्थिक अडचणीतून सावरण्यास मदत होणार आहे.0
0
Report
चंद्रपुर के नागभिड क्षेत्र में दुर्लभ फोर्स्टेन कैट स्नेक का जोड़ा सुरक्षित रेस्क्यू
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड तालुक्यातील धामणगाव (माल) येथे सर्पमित्रांनी दुर्मिळ 'फोर्स्टेन कॅट स्नेक'च्या जोडीला सुखरूप रेस्क्यू करून जीवदान दिले आहे. या सापांच्या रेस्क्यूमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील या प्रजातीच्या नोंदींची संख्या सहावर पोहोचली आहे. धामणगाव येथील आविष्कार दुबे यांच्या घरी साप आढळून येताच त्यांनी 'स्वाब' संस्थेशी संपर्क साधला. संस्था सदस्यांनी पाच ते सहा फूट लांबीचा एक फोर्स्टेन कॅट स्नेक ताब्यात घेतला. रेस्क्यू सुरू असतानाच जवळच्या झाडावर आणखी एक सात फूट लांबीचा साप आढळून आला. सर्पमित्रांनी अथक प्रयत्नांतून या दोन्ही सापांना सुरक्षितरीत्या जेरबंद केले. हा साप 'निमविषारी' असून शांत स्वभावाचा आहे. या जोडीला वन विभागाच्या उपस्थितीत सुरक्षित अधिवासात मुक्त करण्यात आले. तळोधी वनपरिक्षेत्रात या सापाची झालेली ही चौथी नोंद असून, हे निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जात आहे.0
0
Report
रत्नागिरी में जल-संकट बढ़ा, 45 हजार लोग पानी के लिए तरस रहे, टैंकर कम
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्ह्यात टंचाईग्रस्तांमध्ये वाढ, ४५ हजार ग्रामस्थांना पाणी टंचाईची झळ.. जून महिना सुरू होऊनही अद्याप पाऊस म्हणावा तसा पडत नसल्याने जिल्ह्यातील टंचाईग्रस्त वाड्यांमध्ये आणखी भर पडली आहे.जिल्ह्यात ६४ गावांतील १५१ वाड्यांमधील ४५,८८३ ग्रामस्थांना पाणीटंचाईची झळ बसत आहे.या टंचाईग्रस्तांना केवळ १८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.मात्र, हा पाणीपुरवठा अपुरा असल्याने विकतचे पाणी पिण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. पावसाचे आगमन अजून काही दिवस लांबल्यास पाणीटंचाईची झळ अजून तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.0
0
Report
Advertisement
सोलापुर विधानपरिषद चुनाव के लिए जिला प्रशासन ने मार्गदर्शक निर्देश जारी
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर विधानपरिषद निवडणुकीत 615 मतदार, दोन उमेदवार आणि सहा ठिकाणी असणार मतदान मतदानासाठी चुकीचा पेन वापरल्यास मतदान होणार बाद, प्रशासनाकडून देण्यात जाणारा जांभळ्या रंगाचा पेन वापरणे बंधनकारक जिल्ह्यात सहा केंद्रांवर 18 जून रोजी होणार मतदान पसंतीच्या उमेदवारासमोर एक आकडा लिहिणे बंधनकारक, खुण ग्राह्य धरल्या जाणार नाहीत प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष तहसीलदार आणि पाच जणांचे पथक तैनात असणार. 22 जून रोजी नियोजन भवन येथे होणार मतमोजणी0
0
Report
अकोला में नौकरी के नाम पर धोखाधड़ी: 10 लाख से अधिक फ्रॉड सामने
Akola, Maharashtra:अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कायमस्वरूपी लिपिक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेने तब्बल १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नोकरीच्या नावाखाली बनावट कागदपत्रे देऊन आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी श्रीकांत सरदार यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे नोकरी मिळावी या आशेने त्यांनी स्वतःचे घरही गहाण ठेवल्याचे समोर आले आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न अनेक तरुण-तरुणी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे असते. मात्र याच स्वप्नाचा गैरफायदा घेत फसवणूक करणाऱ्यांचे जाळे सक्रिय असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. अकोल्यातील श्रीकांत सरदार यांच्या पत्नीची ओळख एका ब्युटी पार्लर संचालकMarार्फत स्वाती जुनगडे उर्फ इंगळे या महिलेशी झाली होती. प्रभावशाली व्यक्तींशी संबंध असल्याचा दावा करत तिने पीकेव्हीमध्ये कायमस्वरूपी लिपिक पदावर नियुक्ती मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे. नोकरीच्या प्रक्रियेसाठी मूळ कागदपत्रे आणि आगाऊ रक्कम मागण्यात आली. विश्वास संपादन केल्यानंतर आरोपी महिलेने विविध बँक खाती आणि फोनपेच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने सुमारे १० लाख रुपये स्वीकारल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर मुलाखतपत्र, नियुक्ती आदेश, ओळखपत्र आणि इतर काही कागदपत्रे देण्यात आली. मात्र नंतर ही सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे उघड झाले. श्रीकांत सरदार, फिर्यादी. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, आरोपी महिला त्यांना अनेक वेळा पीकेव्ही कार्यालयात घेऊन गेली. वैद्यकीय तपासणी, अंतिम मुलाखत, नियुक्ती आदेश आणि रुजू होण्याच्या प्रक्रियेच्या नावाखाली वारंवार अधिक पैशांची मागणी करण्यात आली. दीर्घकाळ कोणतीही नियुक्ती प्रक्रिया पूर्ण न झाल्याने संशय निर्माण झाला.यानंतर श्रीकांत सरदार आणि त्यांच्या पत्नीने पीकेव्ही प्रशासनाकडे कागदपत्रांची पडताळणी केली. त्यावेळी नियुक्तीपत्रासह सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाले. फसवणुकीची बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी आरोपी महिलेकडे पैसे परत मागितले. तक्रारीनुसार, आरोपीच्या पतीकडून ५ लाख ५० हजार रुपये परत मिळाले असले तरी उर्वरित ४ लाख ५० हजार रुपये अद्याप परत करण्यात आलेले नाहीत. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून उपलब्ध पुरावे आणि कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. तपासानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, आरोप करण्यात आलेली महिला घटनेनंतर फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणुकीच्या घटन सातत्याने समोर येत आहेत. रोजगाराच्या संधी कमी असल्यामुळे अनेकजण अशा आमिषांना बळी पडतात. त्यामुळे कोणतीही रक्कम देण्यापूर्वी संबंधित भरती प्रक्रिया अधिकृत आहे का याची खातरजमा करणे आवश्यक आहे. अन्यथा नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या कुटुंबांना आर्थिक आणि मानसिक फटका बसू शकतो. जयेश जगड झी मीडिया, अकोला0
0
Report
वाशीम कृषि बाजार में चिया पिक के दाम गिरने से किसान चिंतित
Washim, Maharashtra:वाशिम: File:1406ZT_WSM_CHIA_CROP_PRICES रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशीम अँकर:वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत चिया पिकाच्या दरात सातत्याने घसरण होत असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.गेल्या महिनाभरात चियाच्या बाजारभावात سुमारे १,५०० रुपयांची घट झाली आहे.एकेकाळी प्रतिक्विंटल २० हजार रुपयांवर गेलेला दर आता १८ हजारांच्या घरात आला आहे. काल बाजार समितीत चियाला किमान १६,४५० रुपये तर कमाल १८,८९० रुपये दर मिळाला. यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चियाची लागवड झाल्याने उत्पादन वाढले असताना दर घसरल्यामुळे उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी: चिपळूण के गोविंद गड़ पर पुलिस ने स्वच्छता अभियान चलाया
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..चिपळूण पोलिसां तर्फे गोविंद गडावर स्वच्छता मोहीम डी वाय एस पी बेले व पोलीस निरीक्षक मेंगडे यांचे मार्गदर्शन गोवळकोट येथील गोविंद गडावर राबवली मोहीम. गोविंदगड परिसरात नागरिकांनी स्वच्छता ठेवण्याचे आवाहन. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या सूचना अँकर.. सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस दलाने जिल्ह्यातील गड किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे। आज सकाळी चिपळूणच्या गोवळकोट येथील गोविंद गडावर चिपळूण पोलीस ठाणे तर्फे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली।रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या सूचनेनुसार डी.वाय.एस.पी.प्रकाश बेले,पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाने पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ही मोहीम राबवली। गोविंद गडावरील तोफांचा परिसर,रेडजाई मंदिर,बुरुज,तटबंदी आणि पार्किंग एरियामध्ये स्वच्छता करण्यात आली।एरव्ही सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या हातात काठ्या आणि बंदुकी दिसतात।आज याच पोलिस दलाने हातात झाडू आणि फावडे घेऊन किल्ला परिसर स्वच्छ केला.याचबरोबर महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या गडकिल्ल्यांवर स्वच्छता राखावी कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन आढळल्यास पोलिसांची संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.0
0
Report
पंढरपुर में रोहित पवार के आंदोलन के समर्थन में किसानों ने सरसकट कर्जमाफी की मांग की
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर येथे सुरू असलेल्या आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कर्जबाजारी शेतकरी दाखल झाले आहेत.. कर्जमाफीमध्ये आम्हाला कोणताही लाभ होत नाहीये. त्यामुळे सरकारने अटी आणि निकष काढून सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी केली आहे. याच शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.0
0
Report
मालवण के ऑटो गैरेज में भीषण आग, 15 दोपहिया और एक कार जलकर राख
Oras Bk., Maharashtra:मालवण धुरीवाडा येथे ऑटो गॅरेजच्या ठिकाणी दुरुस्तीसाठी ठेवलेल्या १५ दुचाकी व एक कार जळून खाक झाली. रात्री अचानक लागलेल्या आगीत रामेश्वर ऑटो गॅरेजमध्ये दुरूस्ती साठी ठेवलेल्या गाड्या जळून खाक झाल्या आहेत. काळुजी सदाशिव कांदळगावकर यांच्या मालकीचे हे गॅरेज असून शाॅर्टसर्कीट मुळे आग लागतल्याचे बोलले जात आहे. आग लागताच स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न करत पाण्याचा मारा करत तसेच नगरपालिकााच्या बुलेट फायरफायटर द्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र सर्व गाड्या जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.0
0
Report
Advertisement
रायगढ़ के गर्मी में वाटरपार्क में छुट्टी के दिन भीड़, पर्यटकों को राहत मिली
Chendhare, Maharashtra:रायगड़ जिले में तपती गर्मी से लोगों को राहत मिल रही है। वाटरपार्क में पर्यटकों की भीड़ लगी है। गर्मी से शरीर को ठंडक मिलती है। एंकर - गर्मी अधिक बढ़ने से नागरिक हैरान हैं। तपती गर्मी से राहत पाने के लिए नागरिकों और पर्यटकों ने अपना रुख वॉटरपार्क की ओर मोड़ दिया है। रायगड़ जिले के विभिन्न वाटरपार्क में छुट्टी के दिन तथा सप्ताहांत पर बड़ी भीड़ होती है। छोटे बच्चों के साथ युवक और परिवार जलक्रीड़ा का आनंद ले रहे हैं और कड़क गर्मी में शरीर को ठंडक पाने का प्रयास कर रहे हैं। जलक्रीड़ा, स्विमिंग पूल, रेन डांस और अन्य मनोरंजक कार्यक्रमों के कारण बच्चों भी खुश हैं। छुट्टी के दिन जिले के वाटरपार्क फूल-फूल कर रहे हैं। इसलिए वाटरपार्क चालक भी माहौल से संतुष्ट हैं।0
0
Report
हिंगोली में मानसून पूर्व पावस ने केळी बागों को भारी नुकसान
Hingoli, Maharashtra:अँकर -हिंगोली जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसामुळे केळी उत्पादन शेतकऱ्यांच मोठ नुकसान झाल आहे हिंगोलीच्या वसमत कळमनुरी सेनगाव तालुक्यामध्ये केळीच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागामध्ये रात्री चक्रीवादळ मान्सूनपूर्व पावसाने थेमान घातल आहे हजारो हेक्टर वरील केळीच्या बागा आडव्या झाल्या आहेत त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत सापडला आहे सेनगाव तालुक्यातील चापडगाव परिसरातून नुकसानग्रस्त शेतीतून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी...0
0
Report
रायगड़ में रात्री दो मोटरसाइकिलें भिड़ीं, दोनों मृत; खालापूर पुलिस मामले की जांच में
Karjat, Maharashtra:रायगड अपघात चौक कर्जत रस्त्यावर बोरगाव जवळ दोन मोटरसायकल स्वरांचा मध्यरात्री अपघातात मृत्यू. दोन्ही मोटरसायकल भरधाव वेगाने समोरासमोर एकमेकांना धडकल्याने दोघांचा मृत्यू झाला. दोघांना जखमींना चौक ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले मात्र दोघांचाही मृत्यू झाला होता. यापैकी एका व्यक्तीचे नाव सिद्धार्थ जाधव असून रा. नेरळ, ता. कर्जत तर दुसऱ्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. खालापूर पोलीस पुढील तपास करत आहे. रात्री भरधाव वेगाने दुचाकी चालवणे दोघांच्या जीवावर बेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते.0
0
Report
Advertisement
