445001
यवतमाळ तालुका काँग्रेस अध्यक्षावर भरचौकात चाकुहल्ला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहराच्या मध्यवस्तीत गजबजलेल्या दत्त चौकामध्ये भरदिवसा प्राणघातक हल्ल्याची घटना घडल्याने वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रामायण हॉटेल समोर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रमेश भीसणकर यांच्यावर दोन आरोपींनी चाकूने हल्ला चढविला, यावेळी भीसनकर यांनी जखमी अवस्थेत एकाच्या हातून चाकू हिसकावल्याने दोघेही पसार झाले, त्यानंतर जखमी भीसणकर हे स्वतः ऑटोने रुग्णालयात पोहोचले. दरम्यान हा थरार शेकडो लोकांपुढे सुरू असताना कुणीही त्यांच्या बचावासाठी पुढे आले नाही.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
मोदी के भावनात्मक आह्वान पर अमरावती सांसद ने उठाए सवाल
Amravati, Maharashtra:देश आर्थिक दिवाळखोरी कडे, भावनिक आवाहन केल्यापेक्षा नागरिकांना दिलासा देणे गरजेचे; काँग्रेस खासदार बळवंत वानखडे अँकर :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना भावनिक आव्हान केल्यानंतर त्यांच्या या आव्हानावर अनेक स्तरातून टीका होताना पाहायला मिळत आहे अशाच अमरावती लोकसभेचे खासदार बळवंत वानखेडे यांनी नरेंद्र मोदी यांच्या भावनिक आव्हानावर टीका केली आहे. देश आर्थिक दिवाळखोरी कडे निघतोय की काय असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर अमरावतीचे काँग्रेस खासदार बळवंत वानखडेंकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. निवडणुकीनंतर महागाई वाढेल असं राहुल गांधींनी आधीच सांगितलं होतं भावनिक आवाहन केल्यापेक्षा नागरिकांना दिलासा देणे गरजेचे असून भावनात्मक आवाहननी नागरिकांचे भलं होणार नाही जी परिस्थिती उद्भवेल त्यावर मात करण्याची त्यांची जबाबदारी आहे असेही खासदार बळवंत वानखडे म्हणाले आहे.0
0
Report
मराठवाड़ा में जलसंकट: 11 बड़े डैम्स में पानी का स्तर घटा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्यातील तापमान ४३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. या पार्श्वभूमीवर धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वाढत असून, पाण्याचा वापरही वाढत असल्याने मराठवाड्यातील ११ मोठ्या धरणांतील जलसाठा मागील आठ दिवसांत २०० दलघमीने कमी झाला आहे. मराठवाड्यात मोठ्या आकाराची ११ धरणे आहेत. या धरणांत ५४ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा शिल्लक आहे. तर मध्यम स्वरूपाच्या ७५ प्रकल्पांत केवळ ३३ टक्के, तर लघुपाटबंधारे धरणांत सरासरी २५ टक्केच पाणीसाठा उरला आहे。0
0
Report
छत्रपति संभाजीनगर में 43.4°C तापमान, गर्मी से लोग बेहाल
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपति संभाजीनगर जिल्ह्याच्या तापमानाने ४३.४ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला असून, नागरिक उन्हाच्या झळांनी अक्षरशः होरपळून निघाले आहेत. सोमवारी तापमानाची नोंद ही केवळ आकडा नसून जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा आहे. यापूर्वी २६ एप्रिल रोजी ४३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती, जी गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक पातळी होती. मात्र सोमवारी पुन्हा एकदा पाटा त्याच ४३.४ अंशांवर जाऊन पोहोचला आहे. तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा इतकी भीषण उष्णता अनुभवायला मिळत असल्याने हवामान खात्याकडूनही सतर्कतेचा इशारा दिला जात आहे.0
0
Report
Advertisement
सातारा की केमिकल फैक्ट्री में भीषण आग, दमकल ने आग पर पाया नियंत्रण
Satara, Maharashtra:सातारा की केमिकल फैक्ट्री में भीषण आग, दमकल ने आग पर पाया नियंत्रण0
0
Report
हिंगोली के कळमनुरी आदिवासी योजना में लाभार्थी चयन में अनियमितता, समिति गठित
Hingoli, Maharashtra:हिंगोलीच्या कळमनुरी आदिवासी प्रकल्प कार्यालय अंतर्गत विविध योजनांमध्ये लाभार्थी निवड करताना अनियमितता झाल्याची तक्रार करण्यात आली आहे या तक्रारीवरून आता योजनांची सखोल चौकशी करण्यासाठी समिती स्थापन झाली असून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले आहेत..0
0
Report
तिवसा तहसील में किसान आक्रोश: हरभरा-तूर खरीद और पॉलिसी विमा के मुद्दे पर हंगामा
Amravati, Maharashtra:तिवसा तहसीलवर शेतकऱ्यांचा एल्गार; हरभरा-तूर खरेदी आणि पीक विम्यासाठी शेतकरी आक्रमक शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका अन्यथा होणाऱ्या उद्रेकाला प्रशासन जबाबदार असेल अशा शब्दांत शेतकऱ्यांनी तहसील प्रशासनाला धारेवर धरले. नाफेडची खरेदी आणि पीक विम्याच्या मुद्द्यावरून तिवसा तहसील कार्यालयात आक्रमक निवेदन सादर करण्यात आले. केंद्रीय कृषी मंत्रालयाने हरभरा खरेदीसाठी २९ मे आणि तूर खरेदीसाठी ३१ मे पर्यंत मुदतवाढ दिली असताना तिवसा तालुक्यातील खरेदी केंद्र का बंद आहेत? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. खरेदी-विक्री मॅनेजर दीपक गोफने यांनी बारदाना नाही असे तकलादू कारण पुढे करून २० दिवस खरेदी बंद ठेवली. यामुळे हजारो शेतकऱ्यांचा शेतमाल उघड्यावर असून या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. खऱ्या शेतकऱ्यांचा माल घरात पडून असताना चक्क ४०० बनावट ऑनलाइन नोंदणी झाल्याचा धक्काादायक प्रकार समोर आला आहे. यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.0
0
Report
Advertisement
20 साल बाद दहावी पास: Akola की रुपाली डोंगरे की प्रेरक सफलता
Akola, Maharashtra:शिक्षणासाठी वयाचं बंधन नहीं असतं,” हे अकोल्यातील रुपाली डोंगरे यांनी आपल्या जिद्दीच्या बळावर सिद्ध करून दाखवलं आहे. लग्नानंतर तब्बल २२ वर्षांनी दहावीची परीक्षा देत रुपाली डोंगरे यांनी यश मिळवलं असून, माय-लेकाच्या या यशाची सध्या अकोल्यात जोरदार चर्चा रंगली आहे. अकोल्यातील अकोट फैल परिसरात राहणाऱ्या रुपाली गणेश डोंगरे या आयुष्मान आरोग्य मंदिरात रुग्णांची नोंदणी करण्याचे काम करतात. तर त्यांच्या पती गणेश डोंगरे हे रंगरंगोटी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घरची जबाबदारी, नोकरी आणि मुलांचा सांभाळ सांभाळत रुपालीताईंनी शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार केला. त्यांनी अकोल्यातील जागृती रात्रशाळेत प्रवेश घेतला आणि दिवसभराच्या धावपळीनंतर रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत दहावीची परीक्षा दिली. विशेष म्हणजे यंदा माय-लेकाने एकत्र अभ्यास केला. त्यांच्या मोठ्या मुलगा दक्ष डोंगरे याने बारावीच्या परीक्षेत ५५ टक्के गुण मिळवत यश संपादन केले, तर रुपालीताईंनी दहावीत ४० टक्के गुण मिळवत आपलं स्वप्न पूर्ण केलं. निकालाच्या दिवशी मनात धाकधुकी असली तरी अखेर मेहनतीचं चीज झालं आणि रुपालीताईंच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि इच्छाशक्ती असेल तर कोणतंही स्वप्न पूर्ण करता येतं, हे त्यांनी दाखवून दिलं आहे. विशेष म्हणजे दहावी उत्तीर्ण झाल्यानंतरही त्यांचा शैक्षणिक प्रवास थांबलेला नसून पुढेही शिक्षण सुरू ठेवण्याची त्यांनी इच्छा आहे. रुपाली डोंगरे यांची ही प्रेरणादायी यशोगाथा आज अनेक महिलांसाठी नवा आदर्श ठरत आहे.0
0
Report
विदर्भ में भीषण लू, अकोला में तापमान 45.1°C; यलो अलर्ट जारी
Akola, Maharashtra:अवकाळी पावसामुळे काही दिवस तापमानात घट झाली होती, मात्र पुन्हा एकदा उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद पुन्हा अकोल्यात झाली असून ११ मे रोजी अकोल्याचा पारा तब्बल ४५.१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला. त्यामुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, विदर्भात उष्णतेची लाट कायम असून अकोला शहर पुन्हा एकदा राज्यातील सर्वाधिक तापमानाचे शहर ठरले आहे. वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत असून नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणे टाळले आहे.दरम्यान, उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.0
0
Report
नाशिक के मालेगाव में आदिवासी जमीन पर भू-माफियाओं का कब्जा, विरोध प्रदर्शन जारी
Nashik, Maharashtra:नाशिकच्या मालेगावात आदिवासी बांधवांच्या जमिनीवर भू माफियांचा कब्जा... आदिवासी बांधवांनी निषेध करत काढला निषेध मोर्चा... नाशिकच्या मालेगाव येथील आदिवासी बांधवांच्या जमिनीवर काही भू माफियांनी कब्जा केला त्याचा त्यांनी विरोध केल्यामुळे काही आदिवासी बांधव यांच्यावर गुन्हे दाखल केले. याचा निषेध म्हणून आदिवासी बांधवांनी आपल्या लहान बालकांसोबत शहरातील मोसमपूल गांधीपुतळा येथून अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढत निषेध व्यक्त करत निवेदन दिले.0
0
Report
Advertisement
अंबरनाथ में शिवसेना ने भाजपा के साथ युति की पेशकश
Ambernath, Maharashtra:अंबरनाथमध्ये शिवसेनेकडून भाजपला युतीची ऑफर झाल्या गेल्या गोष्टी सोडून एकत्र येण्याचा प्रस्ताव शहर विकासासाठी मतभेद विसरून एकत्र येण्याचं आवाहन विकासासाठी जुने वाद विसरण्याचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांचं आवाहन0
0
Report
बिश्नोई संदर्भ पर संग्राम जगताप के बयान से उठा नया राजनीतिक विवाद
Ahilyanagar, Maharashtra:स्लग- संग्राम जगताप लॉरेन्स बिष्णोई ट्रॅव्हल्समधील महिलांच्या छेडछाडीच्या कथित प्रकारांविरोधात काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा संदर्भ देत केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. मोर्चात बोलताना जगताप म्हणाले, “बिश्नोई समाज काळवीट हरणाला दैवत मानतो. त्याला जर कुणी ठार मारले, तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाते. त्याच धर्तीवर हिंदू समाज गाय आणि महिलांना माता मानतो. त्यांच्यावर जर कुणी वाकडी नजर टाकली, तर त्यालाही तसेच उत्तर दिले गेले पाहिजे.” नगर–पुणे महामार्गावर ट्रॅव्हल्सविरोधात आयोजित करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनात त्यांनी हे विधान केले. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली. मात्र, लॉरेन्स बिश्नोईचा संदर्भ देत केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, विरोधकांकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.0
0
Report
नवी मुंबई अस्पताल में बाहरी मरीजों के लिए शुल्क बढ़ाने की तैयारी, मंत्री का निर्देश
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई मनपा क्षेत्रा बाहेरील रुग्णांना नवी मुंबईतील मनपा रुग्णालयात उपचार घेणे होणार खर्चिक, बाहेरील रुग्णांना खाजगी रुग्णालयाप्रमाणे दर आकरण्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे प्रशासनाला निर्देश. नवी मुंबई मनपा क्षेत्रा बाहेरील रुग्णांना खर्चिक होणार आहे. नवी मुंबई मनपा रुग्णालयात बाहेरील रुग्णांची संख्या 60 टक्के असून यामुळे कर भरणाऱ्या नवी मुंबईकरांना योग्य उपचार आणि सेवा देण्यास अडचणी निर्माण होतायत. अधिकारी आणि नगरसेवकांच्या आढावा बैठकीत वनमंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबई क्षेत्रा बाहेरील रुग्णांकडून खाजगी रुग्णालयांप्रमाणे दर आकारा असे निर्देश दिलेत. आगामी महासभेत तश्या प्रकारचा ठराव मंजूर करुन घ्यावा जेणेकरून नवी मुंबईतील रुग्णांना अधिक चांगली आरोग्य सेवा देणे शक्य होणार आहे.0
0
Report
Advertisement
वीरार जेटी पर मद्यधुंद हालत में डूबते व्यक्ति को बचाने वाला कर्मचारी CCTV में कैद
Vasai-Virar, Maharashtra:विरार जेटीवर आज दुपारी घडलेल्या थरारक घटनेत एका सतर्क कामगाराने प्रसंगावधान दाखवत मद्यधुंद अवस्थेत समुद्रात पडलेल्या व्यक्तीचा जीव वाचवला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. आज दुपारी एकच्या सुमारास एक व्यक्ती विरार जेटीच्या टोकावर फिरत असताना अचानक त्याचा तोल जाऊन तो खोल पाण्यात पडला. त्याचवेळी रो-रो सेवेत कार्यरत असलेले कामगार आदेश नाईक यांनी पाण्यात पडल्याचा आवाज ऐकताच क्षणाचाही विलंब न लावता समुद्रात उडी घेतली. लाटांचा सामना करत त्यांनी बुडणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्याला सुखरूप बाहेर काढले. आदेश नाईक यांच्या धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली असून स्थानिकांकडून त्यांच्या शौर्याचे कौतुक होत आहे. ही सर्व घटना जेट्टी वरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे...0
0
Report
वनमंत्री गणेश नाईक ने वाशी में मानसून पूर्व समीक्षा बैठक आयोजित
Navi Mumbai, Maharashtra:वनमंत्री गणेश नाईक यांनी आज वाशी येथे सर्व मनपा अधिकारी आणि नगरसेवकांची मान्सून पूर्व कामांसंबंधी आढावा बैठक घेतली. क्वारी असलेल्या ठिकाणी दुर्घटना होणार नाही याची दक्षता घ्यावी, नाले गटर यांची स्वच्छता करण्यात यावी, मोकळ्या वायर आणि डीपी यांची दुरुस्ती करावी, शाळांचे लिकेज दुरुस्त करावे शाळेत स्वच्छता करावी असे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी अधिकाऱ्यांना दिलेत. यावेळी उपस्थित नगरसेवकांनी देखिल प्रभागातील समस्या मांडल्या असून यासर्व समस्या सोडविण्याचे निर्देश नाईकांनी अधिकाऱ्यांना दिलेत.0
0
Report
CIDCO के अधिकारियों पर संताप जताते हुए वन मंत्री गणेश नाईक ने पाणथळ क्षेत्र के मामले की जाँच की मांग की
Navi Mumbai, Maharashtra:वनमंत्री गणेश नाईक यांनी CIDCO अधिकाऱ्यांविरोधात आपला संताप व्यक्त केलाय. पाणथळ क्षेत्र असणारी 8 ते 10 ठिकाण सिडकोच्या समितीने पाणथळ क्षेत्र नाहीत असा अहवाल दिला. आम्ही आवाज उठवला नसता तर सदर अहवाल मंजूर होऊन या पाणथळ क्षेत्रावर भूखंड बनवून ते विक्रीसाठी काढले असते. सिडको मध्ये बिल्डर लोकांचे दलाल आहेत हे मी विधान भवनात आमदार असताना बोललो होतो आता मंत्री असताना बोलतोय. गावातील लोकांनी घरे दुरुस्त करायला घेतली की हे अधिकारी येऊन करावी करतात आणि लगेचच तो भूखंड विकतात इतकी नालायक लोकं आहेत अशी जहरी टीका वनमंत्री गणेश नाईक यांनी केलेय.0
0
Report
Advertisement
