445001
यवतमाळ तालुका काँग्रेस अध्यक्षावर भरचौकात चाकुहल्ला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहराच्या मध्यवस्तीत गजबजलेल्या दत्त चौकामध्ये भरदिवसा प्राणघातक हल्ल्याची घटना घडल्याने वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रामायण हॉटेल समोर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रमेश भीसणकर यांच्यावर दोन आरोपींनी चाकूने हल्ला चढविला, यावेळी भीसनकर यांनी जखमी अवस्थेत एकाच्या हातून चाकू हिसकावल्याने दोघेही पसार झाले, त्यानंतर जखमी भीसणकर हे स्वतः ऑटोने रुग्णालयात पोहोचले. दरम्यान हा थरार शेकडो लोकांपुढे सुरू असताना कुणीही त्यांच्या बचावासाठी पुढे आले नाही.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Vinayak Raut Accusations: Rane Says Won't Back Down – A War of Words in Sindhudurg
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग, आमदार निलेश राणे ऑन विनायक राऊत --- असे प्रकार विनायक राऊत सातत्याने करत असतात हे आम्ही ऐकून होतो. आता ते प्रकार त्यांच्या घरच्यानीच बाहेर काढलेत. आता ते दुसऱ्यांवर बोट दाखवू शकत नाही. माणूस असा असूच शकत नाही अशी कृत्य विनायक राऊत आणि त्यांच्या मुलाने केलीत. लाज वाटते ते आमच्या जिल्ह्यातले आहेत. आमच्या जिल्ह्याच नाव त्यांनी खराब केलंय. हे कोणी केलेलं षडयंत्र नाही तुम्ही केलेलं פाप आहे. अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे. आता त्यांनी आपलं तोंड उघडू नये. एवढ्या खालच्या थराला राजकारणात कोणी गेलेलं नाही. विनायक राऊत हे ह्यापेक्षा खाली जाऊ शकत नाहीत त्याचं तोंड काळ झालेलं आहे. ऑन विनायक राऊत राणे टीका --- खरंच आहे. त्यांना नियतीने धडा शिकवलाय. काम करण्यापेक्षा त्यांनी आमच्यावर टीका केली. आता त्यांना तोंड लपवायला जागा नाही. कायम त्यांनी राणेंना संपवण्याच टार्गेट त्यांनी केलेलं पण राणे संपले नाहीत. आम्ही असल्या धंद्यात नाही. अजून खूप काही आहे. अनेक लोक त्यांच्यावर उलटणार ज्यांनी तक्रार केली त्यांच्या कडे अजून बराच साठा आहे. आता विनायक राऊत यांनी आपली थोबड बंद करावीत. ऑन मनी लाँड्रिंग --- विनायक राऊत काळाबाजारी माणूस आहे. व्हाईट इन्कम आणि विनायक राऊत यांचा संबंध काय? राणेंवर टीका केली तर मातोश्री खुश होणार ह्या धंद्यात ते 10 वर्ष राहिलेत. मणी लाँड्रिंग चे 17 लाख मोजू नका 17 करोड पण होऊ शकतील. विनायक राऊत माझ्यासाठी झिरो आहे. माझ्या आयुष्यात किंमत नसलेला माणूस आहे जे तपासात बाहेर येईल ते ठप्प करणारे असेल0
0
Report
उदय सामंत बोले: लाड़की बहन योजना बंद नहीं होगी, 3 करोड़ महिलाएं लाभ लेंगी
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग, मंत्री उदय सामंत ऑन लाडकी बहीण योजना (अरविंद सावंत) — अरविंद सावंत यांचं तुम्ही मनावर घेऊ नका त्यांचा महाराष्ट्रात कोणीही मनावर घेत नाही. 92 लाख कमी झाले म्हणता मात्र 3 कोटी महिलाना आम्ही त्याचा फायदा देतो ते कोणच बोलत नाही. ज्यांनी दुसऱ्यासाठी कधीच काही केलं नाही त्या उबाठाच्या लोकांनी आम्हाला सल्ले देण्याची गरज नाही. पात्र महिलांची लाडकी बहीण ही योजना कधीही बंद होणार नाही .. ऑन विनायक राऊत — हा त्यांचा घरगुती विषय आहे. कोर्टाचा निर्णय आला की बोलू.. विनायक राऊत आंतरराष्ट्रीय विषय नाही ऑन आडाळी midc — नवीन उद्योजकांना जागा मिळणार सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन midc बाबत योग्य जागा मिळाली तर निर्णय घेऊ ऑन अणुऊर्जा प्रकल्प — आम्ही लोकांसोबत आहोत. कुठलाही प्रकल्प आम्हाला लादायचा नाही.0
0
Report
आशा वर्कर्स के आंदोलन से अकोला में वेतन, पेंशन और सामाजिक सुरक्षा की मांग तेज
Akola, Maharashtra:अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक संघटना (सीटू) यांच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी जोरदार आंदोलन करण्यात आले. वाढीव प्रोत्साहनपर मानधनाची अंमलबजावणी, थकीत रकमेचा तातडीने भरणा, किमान वेतन, सामाजिक सुरक्षा और पेन्शनसह विविध मागण्यांसाठी आंदोलकांनी शासनाचे लक्ष वेधले. मार्च 2025 मध्ये संसदेत जाहीर करण्यात आलेली वाढीव प्रोत्साहन रक्कम अद्याप मिळालेली नसल्याचा आरोप आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी केला. गेल्या एका वर्षाची थकबाकी तातडीने अदा करावी, यासंदर्भातील शासन आदेश त्वरित काढावा, निश्चित प्रोत्साहन रकमेवरील अटी रद्द कराव्यात तसेच आशा सेविका आणि गटप्रवर्तकांना किमान वेतन, सामाजिक सुरक्षा आणि पेन्शन लागू करावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी शासनाने केवळ घोषणा न करता प्रत्यक्षात निर्णयाची अंमलबजावणी करावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. आंदोलनानंतर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात आले.0
0
Report
Advertisement
देवकुंड घटना: 25 लोगों के खिलाफ मामला दर्ज, एजेंट-गाइड-पर्यटक शामिल
Chendhare, Maharashtra:देवकुंड अपघातानंतर पोलिस ॲक्शन मोडवर. २५ जणां विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला. बुकिंग एजंट, गाइड आणि पर्यटकांचा समावेश. ऑनलाईन बुकिंगवर स्वतंत्र गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. रविवारी दोन जणांचा बुडून मृत्यू झाला.0
0
Report
ग्रामवासियों ने शिक्षकों की मनमानी के चलते स्कूल के द्वार पर उपवास शुरू किया
Buldhana, Maharashtra:बुलढाणा ब्रेक एल्गार: कामचुकार शिक्षकांच्या बदलीसाठी गावकरी रस्त्यावर! बुलढाण्यातील मंगरुळ नवघरे गावात शिक्षणाचा एक विसंगत चेहरा समोर आला आहे. जिथे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुणवत्तेमुळे खासगी शाळांनाही मागे टाकत आदर्श ठरली आहे, तिथे त्याच गावातील जिल्हा परिषद हायस्कूल मात्र शिक्षकांच्या मनमानी कारभारामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. हायस्कूलमधील पाच शिक्षकांवर कामात हलगर्जीपणा आणि कामचुकारपणाचा ठपका ठेवत, विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समिती आक्रमक झाली आहे. वारंवार तक्रार करूनही सुधारणा न झाल्याने, आज १३ जुलैपासून ग्रामस्थांनी शाळेच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषण सुरू केले आहे. दोषी शिक्षकांवर कठोर कारवाई किंवा बदलीची मागणी करत, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे. आता यावर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
गडचिरोली के भामरागढ़ में स्वास्थ्य सुविधाओं की कमी: मरीज खाट पर नदी पार कर इलाज के लिए आगे बढ़ा
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लाहेरी परिसरातील नागरिकांना आजही मूलभूत आरोग्य सुविधांसाठी जीवघेणा संघर्ष करावा लागत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. गंभीर आजारी रुग्णाला खाटेची कावड वरून वाहून नेत टिनाच्या डोंग्यातून नदी पार करून उपचारासाठी नेण्याची वेळ गावकऱ्यांवर आली. लाहेरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बंगाडी गावातील संतोष जेट्टी (२९) याला किडनीबाबत समस्या होती. अवयवात गंभीर संसर्ग झाल्याने प्रकृती चिंताजनक होती. तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज निर्माण झाली. रात्रीचा अंधार, नदीत पाणी आणि गावकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही वाहतूकची सुविधा नसल्याने गावकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राही. अखेर ग्रामस्थांनी संतोष जेट्टी यांना खाटेवर झोपवून नदीपर्यंत आणले. त्यानंतर जीव धोक्यात घालून त्यांना टिनाच्या डोंग्यात बसवून नदी पार करण्यात आली. नदी ओलांडल्यानंतर पुन्हा खाटेवरून त्यांचा प्रवास सुरू करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाने तत्काळ रुग्णवाहिका गुंडेनूर नाल्यापर्यंत पाठविली. तेथून रुग्णाला घेऊन प्राथमिक उपचार करण्यात आले. डॉक्टर मिनल, गजेंद्र रंधये आणि संदीप गोटा यांनी रुग्णाची प्रकृति लक्षात घेऊन पुढील उपचारासाठी त्यांना ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे रवाना केले. बंगाडी हे गाव लाहेरीपासून सुमारे ७ किमीवर असून येथे ३० ते ४० घरांची वस्ती आहे. दुर्गम भागातील नागरिकांनाही आजही आरोग्य, रस्ते आणि वाहतुकीच्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले.0
0
Report
Advertisement
वर्धा के विधायक राजेश बाकाने समेत 10 आरोपी निर्दोष मुक्त
Wardha, Maharashtra:वर्धा ब्रेकिंग मारहाण व शाहीफेक प्रकरणात आमदार बकानेची निर्दोष सुटका देवळी तालुक्याच्या विजयगोपाळ येथील बँकेच्या मॅनेजर वर शाही फेक प्रकरण जुलै 2016 मध्ये शेतकऱ्यांना पीक कर्जाला दिरंगाई केल्याने विचारला होता जाब आमदार बकानेसह 10 जणांवर झाला गुन्हा दाखल देवळीचे आमदार राजेश बकाने सहित 10 जणांची निर्दोष सुटका मारहाण व शाहीफेक प्रकरणात आमदार राजेश बकाने यांच्यासह १० जणांची निर्दोष सुटका या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू होती. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद, साक्षीदारांचे जबाब व उपलब्ध पुरावे विचारात घेतल्यानंतर न्यायालयाने आरोप सिद्ध करण्यास पुरेसा ठोस पुरावा नसल्याचे नमूद करत आमदार राजेश बकाने यांच्यासह सर्व १० आरोपींची निर्दोष सुटका केली.0
0
Report
बारिश नहीं, जून में भी नहीं; किसानों के लिए 36 हजार करोड़ कर्ज माफी की घोषणा
Kolhapur, Maharashtra:पालकमंत्री प्रकाश आबिटकर Byte मुद्दे पाऊस यंदा अलनिनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबला आहे जूनमध्येदेखील पाऊस झाला नाही जितका पाऊस झाला तो पुरेसा पाऊस झाला नाही आता पुन्हा एकदा पावसाने ओढ दिली आहे दरवर्षी जून महिन्यात आपली धरण भरलेली असायची आता केवळ देवाकडे पाऊस पडण्यासाठी प्रार्थना करूया पुढच्या आठवड्यात पाऊस सुरू होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे त्यामुळे आपली धरण पूर्णपणे भरतील अशी अपेक्षा आहे कंत्राटदार कंत्राटदारांच्या थकीत बिलासाठी सरकार केंद्राकडे पाठपुरावा करत होते निर्धारित निधीची मान्यता मिळावी यासाठी सर्वजण प्रयत्न करत होतो पण कधीही शासनाचे देयक बुडालेलं नाही लाडक्या बहिणींच्यामुळे कंत्रालदारांची बिले थकली असं काही नाही सर्वसामान्य महिलांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची होती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वाची ही योजना आहे आता सुद्धा जे काही अडचणी आले असतील त्यावर आम्ही उपाय काढू अलीकडच्या काळात कामाची आणि निर्णयाची गती अधिक आहे त्यामुळे पुरवणी मागण्या वाढल्या आहेत ही सर्व लोकांची काम आहेत हे आम्ही cag पटवून देऊ कर्जमाफी राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी आमच्या सरकारने खूप महत्त्वाचा निर्णय सरसकट शेतकऱ्यांसाठी 36 हजार कोटींची कर्जमाफी केली शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम अनेकजण करत होते त्यामुळे अडचणीत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे शेतकऱ्यांमध्ये देखील सरकार प्रोत्साहन देत अशी भावना निर्माण झाली पाहिजे0
0
Report
कुडाळ कार्यक्रम में विनायक राऊत ने निलेश राणे पर बिना नाम लिए टीका
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग ज्यांनी आयुष्यभर राणेचा तिरस्कार केला.. त्यांची नियतीनेच विकेट काढली राणेना काहीच कराव लागलं नाही त्यांच्या घरच्या माणसानेच विकेट काढलीं विनायक राऊत यांना आमदार निलेश राणे यांचा नाव न घेता टोला कुडाळ येथील एका कार्यक्रमात बोलताना निलेश राणेनी केली टीका0
0
Report
Advertisement
कर्ज माफ़ी से किसानों को बड़ा तोहफा, गोकुळ दूध की मांग ने खींचा ध्यान
Kolhapur, Maharashtra:वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ प्रेस मुद्दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आभार जाहीरनाम्यात दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला कोल्हापूर जिल्हा बँकेत 2 लाखावरील 436 कोटी, दोन लाख आतील 175 कोटी अनुदान मिळणार आहे त्याप्रमाणे जिल्ह्यातील 2 लाखांच्या आतील 26874 तर 2 लाखावरील 2182 शेतकरी आहेत प्रोत्साहन अनुदानात जिल्ह्यातील 2 लाख 78 हजार 810 शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे ऑगष्टपासून अंमलबजावणी सुरु होईल On आमदार शिवाजी पाटील मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपसात हे टाळा पण ते ऐकत नाहीत त्यांनी बँकेची माहिती घ्यावी, त्यांच्या ज्ञानात भर पडेल हेरे सरंजाम हे प्रकरण नर्सिंहराव पाटलांनी मार्गी लावला होता जिल्हाधिकारी दौलत देसाई हे चंदगडचे असल्याने त्यांनी यामध्ये कामं केले आह आमदार पाटील यांनी केवळ वर्ग दोन ची एक व 55 लाख फी माफ केली On गोकुळ दूध वाढ तुकाराम मुंडे यांचे आभार एकदा प्रामाणिक अधिकारी आला तर काय बदल होतात हे लोकांनी पाहिले आहे 25 टक्के दूध भेसळ येत होते हे सिद्ध झाले याचा परिणाम गोकुळचे दूध विक्री वाढले आहे पण संकलन कमी झाले आहे. संचालक मंडळ येईल राज्यभरात गोकुळ दूध मागणी आणखी वाढणार आहे0
0
Report
जामखेड के राजेवाड़ी विवाह समारोह में नाम न बताने पर तलाठी ने माइक मारकर घायल किया
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यातील राजेवाडी येथे एका विवाह सोहळ्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. सूत्रसंचालन करणाऱ्या तरुणाने आपले नाव पुकारले नाही या रागातून तलाठी असलेल्या व्यक्तीने डोक्यात माइक मारत जोरदार मारहाण केली आहे. या प्रकरणाची तक्रार जामखेड पोलिसात दाखल करण्यात आली आहे. राजेवाडी येथील मातोश्री मंगल कार्यालयात सुरू असलेल्या विवाह सोहळ्यात अशोक पठाडे हे पाहुण्यांचे स्वागत करत होते. यावेळी तलाठी शिवाजी हजारे यांनी आपले नाव माईकवर का घेतले नाही, असा जाब विचारला आणि हजारे यांनी वाद वाढल्यानंतर शिवीगाळ करत हाणामारी सुरू केली आणि हातातील लोखंडी रॉड असलेला माईक डोक्यात मारल्याने पठाडे जखमी झाले. उपस्थितांनी मध्यस्थी करून त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.0
0
Report
कोल्हापुर में नवविवाहित महिला की मौत: दहेज के कारण हत्या का आरोप
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरात एका महिन्याच्या चिमुकलीचे बारसे होण्यापूर्वीच एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. विवाहितेच्या आईच्या तक्रारीवरून पतीसह चौघांविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. या प्रकरणी पोलिसांनी आईच्या तक्रारी वरून pती, सासू, सासरे आणि नंदे विरोधात तक्रार दाखल केली आहे. कोल्हापूर शहरातील सायबर चौक परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय अस्मिता प्रतीकसिंह काटकर यांचा रविवारी राहत्या घरी मृतदेह छताच्या पंख्याला ओढणीने लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. वर्षभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता आणि महिनाभरापूर्वी त्यांनी एका मुलीला जन्म दिला होता. घरात मुलीच्या बारशाची तयारी सुरू असतानाच ही घटना घडल्याने कुटुंबीयांसह परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे. घटनेच्या वेळी पती, सासू आणि सासरे बारशासाठी हॉल पाहण्यासाठी बाहेर गेले होते. घरात परतल्यानंतर दरवाजा आतून बंद असल्याने तो तोडण्यात आला. त्यावेळी अस्मिता यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. पण अस्मिता प्रतीकसिंह काटकर हिने आत्महत्या केली नसून हुंडा आणि मुलगा पाहिजे या हव्यासापोटी तिची हत्या केल्याची तक्रार पोलिसात दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्मिता यांचा पती प्रतीकसिंह काटकर, सासरे वीरेंद्र काटकर, सासू मनीषा काटकर आणि नणंद ऋतुजा काटकर यांच्याविरुद्ध हुंडाबळीसह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती, सासू आणि सासरे या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. तक्रारीनुसार, विवाहानंतर काटकर कुटुंबीयांकडून वारंवार पैशांची मागणी केली जात होती. तसेच मुलगा झाल्याच्या कारणावरून अस्मिता यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात येत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या सर्व आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. एका महिन्याच्या चिमुकलीला आईचा आधार गमवावा लागलेल्या या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे..0
0
Report
Advertisement
भावकी के विवाद में तलवार से हमला, रोहिदास दांडगे के हाथ टूटे; आरोपी गिरफ्तार
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यात भावकीका वाद उफाळून आला असून या वादात एकावर तलवारीने हल्ला करत त्याचे हाताचे पंजे तोडल्याचे गंभीर घटना घडली आहे...श्रीगोंदा येथील सुपेकर वस्तीवर हा धक्कादायक प्रकार घडला असून घुगल वडगाव येथील रोहिदास दांगडे हे गंभीर जखमी झालेत... रोहिदास दांडगे आणि त्यांच्या भावकीतील विक्रम दांडगे सागर दांडगे संग्राम दांडगे यांच्याशी गेल्या अनेक दिवसापासून वाद सुरू आहेत या वादातून यापूर्वी एकमेकांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत मात्र याच वादाच रूपांतर गंभीर हाणामारीत झाला असून यात रोहिदास दांडगे यांचे दोन्ही पंजे आहेत रोहिदास यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर रोहिदास यांची मुलगी राधिका दांगडे हिने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद आहे या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय...त्यानुसार परशुराम दांगडे, अभयराज दांगडे , सागर उर्फ प्रदीप दांगडे दत्तात्रय दांगडे, विक्रम दांगडे , संग्राम उर्फ तात्याराम पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...विक्रम दांगडे या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे , तर इतर आरोपी फरार झाले आहेत...मागील भांडणाच्या कारणावरून हा प्रकार घडल्याची माहिती आहे...पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या भागातील भावकीचे वाद सर्रास पाहायला मिळतात, अगदी शुल्लक कारणावरून सुरू झालेले वाद पिढ्याlivingपिढ्या सुरू असतात यात वादाच मोठं कारण नसलं तरी परिणाम मात्र गंभीर स्वरूपाचे असतात त्यामुळे गावातील भांडण आणि भावकीच्या भांडणाबाबत वाद घालणारांचं समुपदेशन होणे गरजेचा आहे0
0
Report
वसतिगृहों की सचाई: रियलिटी चेक में खामियाँ उजागर
Nashik, Maharashtra:मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतिगृहाचा रियालिटी चेक अँकर मागासवर्गीय आणि दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाचा मार्ग सुकर व्हावा याकरिता निवास, अन्न आणि निर्वाह सुविधा देणाऱ्या सरकारी आणि अनुदानित वसतिगृहाची दैना उडाल्याचे चित्र कॅगने गेल्या दोन वर्षात राज्यभर केलेल्या वसतिगृहांच्या प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले आहे. काही अनुदानित वसतिगृहांमध्ये विद्यार्थीच आढळले नसल्याने ती बनावट असल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे.... नाशिकच्या वसतिगृहाचा देखील झी 24 तास कडून रियालिटी चेक करण्यात आला... या रियालिटी चेक करून विद्यार्थ्यांनी अनेक तक्रारी वसतिगृहाबद्दल केल्यात...शहरातील आडगाव परिसरात असलेल्या वस्तीगृहात बांधकाम अत्यंत निष्कृष्ट असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली, तर संपूर्ण वस्तीगृहाच्या इमारतीचे खिडकीच्या काचा देखील फुटल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितले.... यामुळे अनेक किडे मच्छर हे रूममध्ये घुसून विद्यार्थ्यांच्या आरोग्यास हानीकारक ठरत आहेत... पावसाळ्यात थेट पोर्चमध्ये पाणी शीरत असल्याचे देखील विद्यार्थ्यांनी सांगितला , तर वस्तीगृहात संगणक कक्ष, जिम त्याचबरोबर ती लायब्ररी देखील असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितल.. वस्तीगृहाच्या इमारतीमध्ये फक्त ग्राउंड फ्लोअरवरच सीसीटीव्ही लावलेले आहेत मात्र संपूर्ण इमारतीत सीसीटीव्ही नसल्याचीदेखील तक्रार विद्यार्थ्यांनी केली.... या संदर्भात झी 24 तास ने केलेलं रियालिटी चेक पाहुयात....0
0
Report
दुध में SNF बढ़ाने के लिए पशukhoadyों में घातक रसायन, मिल्क सेफ्टी खतरे में
Kolhapur, Maharashtra:राज्यात भेसळयुक्त दुधाविरोधात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई सुरू असताना, दुधाच्या गुणवत्तेशी संबंधित आणखी एक गंभीर प्रश्न समोर येत आहे. दुधातील SNF वाढविण्यासाठी बाजारात विविध प्रकारची पशुखाद्ये विकली जात आहेत. यातील अनेक पशुखाद्यामध्ये घातक रसायन असल्याचा संशय आहे. त्यामुळे केवळ भेसळयुक्त दुधावर कारवाई करून चालणार नाही, तर पशुखाद्याच्या गुणवत्तेवरही प्रभावी नियंत्रण असणे आवश्यक असल्याच समोर येत आहे. राज्यात भेसळयुक्त दुधावर अन्न व औषध प्रशासनाकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. दूध पावडर, रसायने आणि इतर पदार्थांचा वापर करून दुधातील SNF कृत्रिमरीत्या वाढविण्याचे प्रकार यापूर्वी उघडकीस आले आहेत. मात्र आता आणखी एक धोक्याची बाब चर्चेत आली आहे. काही तपासण्यांमध्ये जनावरांच्या पशुखाद्यामध्ये घातक औद्योगिक रसायन आढळल्याची प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे मेलामाइन सारखे रसायनाचे अंश दुधात येण्याचा धोका निर्माण झाला आहे. डॉ. पी एम काळे, पशु वैद्यक व पशुखाद्य अभ्यासक राजू शेट्टी, नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना तज्ज्ञांच्या मते, राज्यातील प्रत्येक पशुखाद्य उत्पादकाची नियमित नमुना तपासणी, प्रयोगशाळा चाचण्या, दोषी उत्पादकांवर कठोर कारवाई आणि शेतकऱ्यांमध्ये जनजागृती या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. सुरक्षित पशुखाद्य मिळाल्यासच सुरक्षित दूध ग्राहकांपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे शेतकरी देखील जनावरांसाठी सुरक्षित खाद्यच बाजारपेठेत उपलब्ध करून द्यावे अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. भेसळयुक्त दुधाविरोधातील कारवाई जितकी महत्त्वाची आहे, तितकेच महत्त्वाचे म्हणजे दुधाच्या स्रोताची तपासणी. जर पशुखाद्यामधूनच घातक रसायनांचा प्रवेश होत असल्यास, त्यावरही तितक्याच कठोरपणे नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता, पशुखाद्याची नियमित तपासणी आणि दोषींवर कठोर कारवाई ही काळाची गरज बनली आहे. प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर.0
0
Report
Advertisement
