445001
यवतमाळ तालुका काँग्रेस अध्यक्षावर भरचौकात चाकुहल्ला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहराच्या मध्यवस्तीत गजबजलेल्या दत्त चौकामध्ये भरदिवसा प्राणघातक हल्ल्याची घटना घडल्याने वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रामायण हॉटेल समोर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रमेश भीसणकर यांच्यावर दोन आरोपींनी चाकूने हल्ला चढविला, यावेळी भीसनकर यांनी जखमी अवस्थेत एकाच्या हातून चाकू हिसकावल्याने दोघेही पसार झाले, त्यानंतर जखमी भीसणकर हे स्वतः ऑटोने रुग्णालयात पोहोचले. दरम्यान हा थरार शेकडो लोकांपुढे सुरू असताना कुणीही त्यांच्या बचावासाठी पुढे आले नाही.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
परळी में शिवाजी शिंदे पर धारदार हमला, अस्पताल में भर्ती; पुलिस जांच जारी
Beed, Maharashtra:परळी शहर में शिवाजी शिंदे वरिष्ठ नेता पर धारदार हथियार से हमला हुआ। हमले में वे गंभीर रूप से घायल हैं और स्व. रा.ती रुग्णालय अंबाजोगाई में उपचार हेतु स्थानांतरित किए गए हैं। इस प्रकरण की परळी संभाजीनगर पुलिस जांच कर रही है।0
0
Report
वाशीम में गर्मी से तंग उमस के बीच अचानक मूसलाधार बारिश, किसानों को राहत
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यात तापमान ४२ अंशांच्या पार गेले असताना,दुपारनंतर रिसोड शहरासह परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते.मात्र, अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.या पावसामुळे खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीच्या कामांना वेग येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.0
0
Report
ऑनलाइन प्रेमजाल में 140 युवतियों से धोखाधड़ी: आरोपी आदर्श म्हात्रे गिरफ्तार
Kalyan, Maharashtra:आधी ओळख नंतर प्रेमाच्या जाळ्यात अडकून तरुणीची फसवणूक. 140 तरुणीची फसवणूक... भामट्याला मानपाडा पोलिसांच्या ताब्यात प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणींशी संबंध प्रस्थापित करणे, त्यांचा विश्वास संपादन करणे आणि नंतर त्यांच्या नावावर लाखो रुपयांची कर्जे काढून फसवणूक करणाऱ्या भामट्याला डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीचे नाव आदर्श म्हात्रे असे असून यापूर्वी त्याला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. पनवेल रसायनी येथील परिसरात राहणारा आदर्श म्हात्रे सोशल मीडियाच्या सुरुवातीला तरुणी सोबत मैत्री करून तो त्यांचा विश्वास संपादन करायचा. त्यानंतर प्रेमसंबंध निर्माण करून संबंधित तरुणींच्या नावावर विविध बँकांमधून कर्जे काढल्याचा आरोप आहे. तपासात आतापर्यंत 140 हून अधिक तरुणींना त्याने आपल्या जाळ्यात ओढल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी 11 तरुणींनी पुढे येऊन अधिकृत तक्रारी दाखल केल्या असून आणखी काही पीडित महिला तक्रार देण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. विशेष बाब म्हणजे फसवणुकीला बळी पडलेल्या अनेक महिला उच्चशिक्षित असून विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. आर्थिक क्षेत्र, कॉर्पोरेट आणि व्यावसायिक क्षेत्रातील महिलांची संख्या यामध्ये लक्षणीय असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. नवी मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर डोंबिवलीतील एका तरुणीनेही फसवणुकीची तक्रार दिल्याने मानपाडा पोलिसांनी आदर्श म्हात्रेला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधातील गुन्ह्यांचा तपास सुरू असून आणखी पीडित महिला पुढे येण्याची शक्यता असल्याने फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणामुळे सोशल मीडियावरील ओळखी आणि ऑनलाइन नातेसंबंधांच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक फसवणुकीचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.0
0
Report
Advertisement
यवतमाळ में ईंधन संकट से किसान परेशान, कांग्रेस का बड़ा ट्रैक्टर-डबकी मोर्चा सरकार पर हमला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळमध्ये इंधनाचा तुटवडा, डीएपी-युरिया टंचाई, पिक विमा व खंडित वीज पुरवठ्याच्या प्रश्नांवर आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या नेतृत्वात काँग्रेसने भव्य ट्रॅक्टर-डबकी मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांसमोर उभ्या ठाकलेल्या डीएपी व युरिया खतांच्या कृत्रिम टंचाई, बोगस खते-बियाणे-कीटकनाशकांचा वाढता सुळसुळाट, रखडलेला पिक विमा, वाढते पेट्रोल-डिझेल दर तसेच अपुरा व विस्कळीत वीजपुरवठा यामुळे शेतकरी हैराण झाले असून शासन प्रशासनाने त्यांना वाऱ्यावर सोडले आहे असा आरोप आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी केला. मोर्चामध्ये माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचे सह काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.0
0
Report
चंपक मैदान में बकरी ईद को लेकर बकरों की भारी बिक्री शुरू
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चंपक मैदानात बकऱ्यांच्या खरेदीची झुंबड.. बकरी ईद अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे.त्याच्या पार्श्वभूमीवर शिरगाव येथील प्रसिद्ध चंपक मैदान येथे बकऱ्यांचा भव्य बाजार भरला आहे.खरेदीसाठी व ग्राहकांची झुंबड उडत आहे. यंदाच्या बाजारात 20 हजार रुपयांपासून थेट 1 लाख 20 हजार रुपयांपर्यंतचे डौलदार आणि देखणे बकरे विक्रीसाठी दाखल झाले आहेत.. खरेदीदारांसोबतच बच्चे कंपनी आणि सर्वसामान्यांची मोठी गर्दी होत आहे.. गल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा बाजारात बकऱ्यांचे आवक उत्तम झाली आहे.. महागाईचा किंचित परिणाम जाणवत असला तरी सणाचा आनंद साजरा करण्याच्या उत्साहात कुठेही कमतरता दिसत नाही.. बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे..0
0
Report
रत्नागिरी में पानी की किल्लत: 133 गाँव में 43 हजार लोग टैंकरों पर निर्भर
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्ह्यातील 133 वाड्यांत 18 ट्रॅक्टर पाणीपुरवठा.. लांजा राजापूर तालुक्यात पाणीटंचाई असूनही अद्याप टँकर सुरूच नाही.. अँकर रत्नागिरी जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत चालल्यामुळे पाण्याची दाहकताही वाढली आहे.. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील 57 गावातील 133 वाड्यात 43 हजार 159 टंचाईग्रस्तांना 18 ट्रॅन्करने पाणीपुरवठा सुरू आहे.. सात तालुक्यात पाणी टँकरने सुरू आहे..मात्र लांजा,राजापूर या दोन तालुक्यात पाणीटंचाई असून सुद्धा अद्याप ट्रंकरने पाणीपुरवठा सुरू झाला नाही..0
0
Report
Advertisement
रत्नागिरी में भीषण गर्मी से नागरिक परेशान, जिले के कई हिस्सों में तापमान बढ़ा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्ह्यात पुन्हा उकाडा वाढला.. रत्नागिरीकरणसह पर्यटक हैराण.. अँकर रत्नागिरी जिल्ह्यात वाढत्या उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत..गेले काही दिवस मानसूनपूर्व पावसाच्या सरी पडल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता.मात्र त्यानंतर जिल्ह्यात पुन्हा उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत..घामाने अंगाची लाईव्ह होत आहे..तापमानाचा पारा चढत असल्याने रत्नागिरीसह लांजा,चिपळूण,राजापूर,गुहागर संगमेश्वर,गणपतीपुळे या सर्व विविध ठिकाणी उकाडा वाढला आहे..0
0
Report
उजनी के पानी छोड़ने की मांग पर किसान उग्र, भीमा पाटबंधारे कार्यालय में ठिय्या प्रदर्शन
Pandharpur, Maharashtra:उजनी उजव्या कालव्यातून माण नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक. उभी पिकं पाण्यावाचून जळत असताना अधिकारी उडवा उडवीची उत्तर देत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज भीमा पाटबंधारे कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. वारंवार मागणी करून देखील पाणी सोडले जात नाही. उद्यापर्यंत पाणी न सोडल्यास अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयातच फोडण्याचा इशारा यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.0
0
Report
रायगड़ में शिवसेना आक्रामक, कोकण सीट पर विकास गोगावले ही उम्मीदवार होंगे
Chendhare, Maharashtra:कोकणच्या जागेवरून रायगडमध्ये शिवसैनिक आक्रमक...... कोकणची जागा शिवसेनेचीच आणि विकास गोगावले लढणार ..... मंत्री भरत गागावले समर्थक विकास गोगावले यांच्याकरिता आग्रही... महाडमध्ये शिवसैनिकांची बैठक.... अनिकेत तटकरेंच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध राज्यात विधानपरिषद निवडणुकीकरिता सर्वपक्षीय नेतेमंडळी आपापल्या उमेदवारांना संधी मिळण्याकरिता वरिष्ठांकडे कंबर कसताना पाहायला मिळत आहे. अशातच आता कोकणची एकमेव असलेली जागा आपल्याला मिळावी याकरिता शिवसेना आक्रमक झाली आहे. रायगड मध्ये मंत्री भरत गोगावले यांच्या महाड मधील निवासस्थानी शिवसैनिकांनी बैठक घेत कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर विकास गोगावलेच लढतील असा आग्रह धरलाय. राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरे यांना शिवसैनिकांनी विरोध दर्शवत सुनील तटकरे नेहमीच खोडा घालतात असा घणाघात शिवसैनिकांनी तटकरेंवर केलाय. शिवसेनेकडे सर्वाधिक ३३४ असून या जागेवर शिवसेनेचाच अधिकार असल्याचं म्हणत विकास गोगावलेच या जागेवर उमेदवार असतील. असं न झाल्यास महायुती मध्ये आम्ही मैत्रीपूर्ण लढू अशी तयारीदेखील शिवसैनिकांनी दाखवली आहे. तसं झाल्यास कोकणात महायुती तुटण्याची शक्यता आहे. याबाबत आता वरिष्ठ कोणता निर्णय घेतील आणि कोणाला उमेदवारी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.0
0
Report
Advertisement
ज्ञानेश्वर मंदिर के सेवक ने दानपेटी से लाखों की चोरी की
Pimpri-Chinchwad, Maharashtra:Anchor - ....संत ज्ञानेश्वर मंदिरात सेवेकऱ्यांन दानपेटीवर डल्ला मारल्यानंतर मंदिर विश्वस्त समितीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय..गेल्या काही महिन्यांपासून सेवेकरी दानपेटी तून चोरी करत होता अखेर तो पकडला गेल्यानंतर मंदिर समितीने अशा घटना घडू नयेत या साठी उपाय योजना सुरू केल्या आहेत... पाहुयात एक रिपोर्ट....! वि ओ - अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात सेवेकरी म्हणून काम करत असलेल्या विशाल वारुळे याने थेट माऊलींच्या दानपेटीवरच डल्ला मारल्याची धक्कादायक घटना उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडालीय..! विशाल वारुळे अस चोरी केलेल्या सेवेकराचे नाव आहे...! विशाल वारुळेच्या घरात रोकड सापडलीये. 10, 20, 50 आणि शंप्रत रुपयांच्या नोटांनी भरलेल्या पिशव्यांमध्ये तब्बल पावणे चार लाख रुपये पोलिसांनी जप्त केलेत. दानपेटीतील रक्कम जमा करताना विशाल हातचलाखी करायचा आणि एका पिशवीमध्ये नोटा भरायचा. गेल्या तीन महिन्यांपासून त्याचा हा उद्योग सुरु होता, असा अंदाज वर्तवला जातो. ज्या दिवशी नोटांनी भरलेली पिशवी घर घ्याण्यासाठी घेऊन जायचा, त्या दिवशी विशाल मंदिरातील काही हार घरात घेऊन जातो. असं म्हणायचा आणि पिशवीत हार दिसतील असे ठेवायचा, खाली मात्र रोकड असायची. घरी आल्यावर रोकड मोजायचा आणि नंतर ती पिशवी आहे तशी बेडमध्ये ठेऊन द्यायचा. त्याचं पिशव्यांमध्ये पावणे चार लाखांची ही रोकड आढळली. तो दानपेटीतील रक्कम जमा करणे आणि ती मोजून ठेवणे, हे काम करत होता... सी सी टी व्ही मध्ये संशयास्पद हालचाली आढळल्यानंतर त्याच भिंग फुटले...! बाईट-भीमा नरके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आळंदी वि ओ - .....या घटनेनंतर विशाल वारुळे याला अटक केले असले तरी घटनेनंतर मंदिर विश्वस्त समितीच्या कामकाजावर ही अनेक प्रश्न उपस्थित झालेत...! दानपेटी मधील पैसे हाथालण्याचे महत्वाचे काम या सेवेकराला कशाच्या आधारे दिले....? एवढे महिने तो पैसे चोरत होता तर सी सी टी व्ही मध्ये ते का तपासले गेले नाही...? तो कुणाच्या जवळचा होता का...? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असताना विश्वस्त समितीने मात्र त्याने मंदिरात सेवा देत विश्वास संपादन केला , खासकरून मंदिराचे रोखपाल महेश गोखले यांचा विश्वास संपादन केल्याचं समितीने स्पष्ट केले आहे...! बाईट - राजेंद्र उमाप, विश्वस्त वि ओ - ....या घटनेनंतर विश्वस्त समितीने मंदिरात कर्मचाऱ्यांसाठी नियम बदलले आहेत. सॉफ्टवेअर ची मदत घेऊन कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे...मंदिरातून जाताना येताना कर्मचाऱ्यांकडे कोणत्याही स्वरूपाची पिशवी असणार नाही, आणि सर्व कर्मचाऱ्यांना हनुमान मंदिरातूनच प्रवेश दिला जाणार आहे. वायओ - ....चोरीच्या घटनेनंतर मंदिर विश्वस्त समितीने विविध उपाय योजना सुरू केल्या आहेत. त्याचा किती फायदा होतो हे महत्वाचे ठरणार आहे. पण मुळात चोरी सारखी घटना होण्याची वाट का पहायची हा प्रश्न आहे...! कैलास पुरी झी मिडिया आळंदी पुणे0
0
Report
कुंभार्ली घाट के गड्ढों पर शिवसेना कार्यकर्ताओं का उबाठा विरोध, तात्कालिक सुधार की मांग
Ratnagiri, Maharashtra:कुंभार्ली घाटातील रस्त्यांची दुरवस्था आणि पडलेल्या मोठ्या खड्ड्यांवरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चिपळूणमधील कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले आहेत. पावसाळा तोंडावर आलेला असतानाही घाटातील रस्त्यांची दुरूस्ती न झाल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर उबाठा कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना थेट निवेदन सादर केले. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या धोकादायक खड्ड्यांची तातडीने बुजवणूक करावी आणि घाटाची संपूर्ण डागडुजी करण्यात यावी, अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. वेळेच दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही Yाप्रसंगी देण्यात आला आहे.0
0
Report
सावंतवाड़ी रेलवे स्टेशन का नाम लोकमान्य मधु दंडवते टर्मिनल के रूप में तय
Oras Bk., Maharashtra:कोकण वासियांसाठी आनंदाची बातमी आहे. कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधू दंडवते यांचं नाव आता सावंतवाडी रेल्वे स्थानकाला देण्यात येणार आहे. आज झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून मागील अनेक वर्ष ही मागणी कोकण वासियांनी लावून धरली होती. मात्र आज पालकमंत्री नितेश राणे यांनी सदरचा विषय कॅबिनेट समोर ठेवला होता. सावंतवाडी रोड स्थानकाला आता लोकमान्य मधू दंडवते टर्मीनर्स असं नाव देण्यात येणार आहे; आज त्यामुळे कोकणवासियांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी सिंधुदुर्ग0
0
Report
Advertisement
बीड़ के गेवराई में गैस सिलेंडर विस्फोट; घर जलकर राख, परिवार सुरक्षित
Beed, Maharashtra:बीड़ की गेवराई शहर के वाणी मंगल कार्यालय परिसर में मध्यरात्रि एक घर में भीषण आग लग गयी। इस आग में घर के सभी संसार सामान जले खाक हो गये हैं। घरगुंटी गैस सिलेंडर के विस्फोट के कारण आग लगी होने की प्रारम्भिक जानकारी है। घर मालक बालासाहेब महामुनी के दो महीने पहले ही घर का निर्माण पूरा हुआ था। महिना भर पहले वास्तु शांति भी हुई थी। महामुनी परिवार देवदर्शन के लिये गये थे, इसलिए घर में कोई नहींथा। इससे सौभाग्य से कोई जनहानि नहीं हुई। पड़ोसियों ने आग की घटना मोबाईल कैमरे में कैद की है। उक्त आग को नियंत्रण में लाने में दमकल दल को सफलता मिली है, पर अभी पंचनामा नहीं हुआ है। इसलिए पंचनामा और आर्थिक सहायता की आशा व्यक्त की जाती है।0
0
Report
इंदापुर में पानी संकट पर भाजपा नेता की प्रेस कॉन्फ्रेंस, जल वितरण के मुद्दे गरम
Rui, Maharashtra:इंदापूरचा पाणी प्रश्न पेटला ! अपयश कोणाचं ? भाजप नेते प्रवीण माने प्रदीप गारटकारांची पत्रकार परिषद इंदापूरप्रवीण माने पत्रकार परिषद आज आम्ही भाजपच्या वतीने खुलासा करू इच्छितो आज तालुक्यात शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. याच्या नियोजनासाठी त्रिमासिक बैठक घेतल्या जातात त्यात जे ठरले ते प्रत्यक्षात उतरले तर पाणी योग्य पद्धतीने मिळत असते १९६४ साली खडकवासला उजव्या कालव्याची योजना सुरू झाली ४० हजार हेक्टर क्षेत्र यावर अवलंबून आहे. गेले अनेक वर्षे पाणी मिळत होत त्यानंतर यावर अनेक योजना झाल्या मूळ पाणी वाटप कसं होत यात खोलात मला जायचे नाही इंदापूर तालुक्यातील टेल टू हेड पाणी मिळालं पाहिजे यासाठी भाजप गेले अनेक वर्ष प्रयत्न करत आहे मागाणी केली आहे काल देखील आम्ही मंत्री विखे पाटील यांकडे आम्ही मागणी केली आहे त्यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत पोलिस बंदोबस्तात इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी द्यावे २ जून च्या आसपास आपल्या खडकवासल्याचे पाणी मिळेल अशी अपेक्षा आहे ३७ नंबर चारी शेतफळ येथे सुरू होते आणि ६४ नंबर चारी शेतफळगडे येथे सुरू होते ३७ नंबर पासून भिजवत गेले पाहिजे ते ६४ नंबर पर्यंत पाणी द्यावे अशी आमची मागणी आहे. आज भयानक परिस्थिती आहे,शेतकऱ्यांनी कर्ज काढून पीक जोपासली आहेत अशात जर ही पिके गेली तर वर्षभराची घडी विस्कटल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्या बाजूला भारनियमन सुरू आहे ज्याचा कोणताच वेळ फिक्स नाही उकाडा आहे अंगाची लाहीलाही होत आहे. अधिकारीांनी योग्य नियोजन केले पाहिजे अन्यथा आम्ही मुख्यमंत्र्याकडे दाद मागू خاتिमान काम झाले पाहिजे राधाकृष्ण विखे पाटील यांकडे देखील आम्ही ही मागणी करणार आहोत. कालवा सल्लागार समिती मध्ये याचे नियोजन ठरत असते, प्रत्येक हंगामाचे नियोजन अगोदर होत असते. कागदावर दाखवले की एवढे पाणी देणार आहे पण प्रत्यक्षात ते दिले नाही. पाणी वाटप समितीमध्ये इंदापूरचा हिस्सा किती ठरला असेल ना ? मग ते पाणी गेले कुठे ? आम्ही कालवा सल्लागार समितीला ही याची विचारणा करू आज हातातोंडाशी आलेले पिक जळाले तर यापेक्षा मोठी शोकांतिका नाही. म्हणून भाजपा कायम पाठपुरावा करत राहू ज्या शेतकऱ्यांनी रस्ता रोको केला पाण्यासाठी त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत आम्ही मुख्यमंत्र्याकडे याबाबत पाठपुरावा करू गुन्हे मागे घेण्याची मागणी करू. नेरा नदीची ही बिकट परिस्थिती असून पक्षाला पिण्यासाठी देखील पाणी तिथे नाही. त्या नदीवर धापे बसवण्यासाठी निधीची मागणी करणार आहोत. आज उजनी धरण मायनसमध्ये आहे. उजनी साठी ज्यांनी आपल्या जमिनी दिल्या होत्या त्यांचा पुढील भविष्याचा प्रश्न आहे. संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामाचा प्रश्न आहे मंत्री नितीन गडकरी यांनी लवकरात लवकर अपूर्ण असणारा रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. भाजप कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. आम्ही मंत्री विखे पाटील यांनी खडकवासल्याच्या पाण्यासाठी निवेदन आम्ही स्वतः स्वाक्षरी करून दिले आहे. प्रदीप गारटकर पत्रकार परिषद मागील दोन दिवसापूर्वी आंदोलन झाले मी पाहिले त्यात आजी माजी मंत्री रस्त्यावर उभे राहून अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन बोलत होते. कालवा सल्लागार समिती मध्ये तुम्ही दोघेही आहात, तुम्ही सरकार मध्ये आहात मग विषय सोडवण्यासाठी ही नौटंकी कशासाठी. जेव्हा काम करायचे तेव्हा पाठ फिरवायची आता नौटंकी करायची. १९९५-९६ साली आम्ही स्वप्न पाहिलं होतं, त्या काळी ८४ कोटी ची योजना होती. उजनी मधून पाणी उचलायचे आणि शेतफळगडे येथे टाकायचे तेव्हा भाजप चे सरकार होते. तेव्हा या योजनेला मंजुरी मिळाली होती. दोन्ही कॅनॉल वरील ६५ गावाचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटत होता, तेव्हा पाणी आरक्षित होते सरकारकडे पैसे होते त्यावेळी भाजप सरकारने ती मान्य केले पण ती योजना इंदापूरसाठी करायची याचे रणकंदन झाले. मी अगोदर केले आहे म्हणून बोलत आहेत. लाकडी निंबोडी तालुक्याला माहिती नव्हती पण त्या आंदोलनामुळे माहिती झाली. ती जर योजना झाली असती तर आज पाण्यासाठी इंदापूर तालुक्याला आंदोलन करण्याची वेळ आली असती. पावसाळ्यात उजनी मध्ये जेवढा पाणी वरून वाहून येते ते आम्हाला उचलून देण्याची फक्त परवानगी हवी होती. दोन कॅनॉल चे पाणी तोडायचे आणि उजनीतून घ्यायचे अशी योजना होती. या तालुक्यातील जनतेचे दुर्दैव आहे गारटकरचे नाही माझं भिजणार नव्हते. तेव्हा अनेक लोक आडवे आले. जेव्हा मी रक्त ओतून काम केले तेव्हा समाजाने आमची चेष्टा केली ना ? सीमा माढा होऊ देऊ नका यासाठी आम्ही उजनीवर आंदोलन केले. ही योजना मांडल्यानंतर हा बोगदा झाला आहे. तेव्हा याच उजनी चा शेतकरी म्हणायचा यांना काही काम नाही. आता तीन योजना सुरू आहेत. ते पाणी दोन जिल्ह्याला जाणार आहे. डाळज मधून कर्जат साठी पाणी जाणार आहे. सांगितले जात आहे की ते पाणी आम्ही मराठवाड्यासाठी नेणार आहोत. नीरा नदी मधून बोगद्या मधून उजनीत पावसाचे पाणी आणणार आहेत. पण आज नीरा नदीची अवस्था काय आहे. १२२ वर्षे पाऊस पडला नाही एवढा पाऊस मागील वर्षी झाला त्यानंतर एक वर्षाची स्थिती ही आहे. त्यातून ७ टीएमसी पाणी तुम्ही इकडे आणल्यानंतर काय होणार. मग जल संपदाचे अधिकारी तंतोतंत पाणी सोडतील आणि इंदापूरचे शेतकरी टाळ्या वाजवत बसतील. आज बावीस गावाचा पाणी प्रश्न सुटला का ? ज्याांच्या मनगटात जोर होता त्यांनी पाणी नेले यांना सांगितले तुम्ही फक्त गप्प बसायचे पाण्याच्या विषयावर बोलायचे नाही अस सांगितले रस्ते झाले वीज आली म्हणजे विकास होणार आहे का शेतकऱ्यांचा उन्हाळ्यात पिके जळाली तर त्याचं काय होणार राजकारण असच चालू राहणार समाज निवडणुका आल्या की जातीपाती आणि पैशावर मतदान करत राहणार तालुक्याचे पाणी टिकवण्याची जबाबदारी कोणाची होती,या लोकप्रतिनिधी ची होती,आम्ही सांगत होतो आडवे लावा पण आडवे लावल्यावर आपले मंत्री पद जाईल अशी चिंता होती जनता जात पाहिजे तुम्हाला पैसे पाहिजेत तर ते उत्तम पद्धतीने मिळत आहेत ते घ्या. आम्हाला नुसता संघर्ष करायला लावा. आम्हाला जर सत्तेत बसवले असते तर कोणाशीही वाकडे घेतले असते पण तुमच्या पाण्याचे रक्षण केले असते आता धरणाला भोके पडायची ती पडली पडायला तुम्ही आणि निस्तारायला आम्ही आता काय ती बजावता येतात काय आता फक्त संघर्ष उरला आहे. कॅनॉल वरील शेतकऱ्याला सांगायचे आहे हा जो संघर्ष आहे त्याला जबाबदार आहेस मी सत्य बोलतो म्हणून माझं कोणाशी कधी पटत नाही. माझा कुटुंब राजकारणात नव्हत त्या काळी काँग्रेस ला कोणीही विरोधी नव्हते त्या काळी मला ४० हजार मते मिळाली. मी पराकोटीचे प्रयत्न केले पण जनतेनी साथ दिली नाही म्हणून आज वाईट वाटते. जनता ने साथ दिली असती तर आज ही वेळ आली नसती. आज निवेदन देणे आणि नेत्यांच्या पाया पडणे या पलीकडे जनतेने आमच्या हातात काही ठेवले नाही जिवात जीव असे पर्यंत त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्याही पाया पडू द्वा दोन ही आजी माजी मंत्री यात दोषी आहेत, सर्वात मोठी प्रॉपर्टी पाणी आहे याचे रक्षण करण्याची जबाबदारी तुमची होती तुम्ही ते केले नाही पण रस्त्यावर येऊन नाटक करत आहात. उसाची बिले अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाहीत. आमचा जन्मच जनतेसाठी आहे आयुष्य तालुक्यासाठी वाहून टाकले आहे ४५ वर्षे नुसता संघर्ष केला आहे. आजही आम्ही संघर्ष करू. इंदापूर नगरपरिषदेच्या प्रश्नासाठी मी त्यावेळी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांसाठी दोन पोर भांडतात तसे मी भांडत होतो. मी झटलो तालुक्यासाठी आणि तालुक्याने केली माझी माती. आज सर्व मी या उघड्या डोळ्याने पाहत आहे.कोण कसा नाचत आहे. पाण्याच्या विषयावर टोकाची भूमिका घ्यायची असेल तर आम्ही आंदोलनात येऊ नाही तर जे नाटक चालू आहे ते चालू द्या.0
0
Report
गडचिरोली के सिरोंचा में पुल निर्माण के लिए 30 गाँवों का गर्मी में उपवास
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील अटीवागू पुलाच्या मागणीसाठी नागरिकांचे भर उन्हात आंदोलन, टेकडा परिसरातील 30 गावातील नागरिकांचा आंदोलनात सहभाग anker: गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील 30 गावांना जोडणाऱ्या पुलाच्या बांधकामासाठी भर उन्हात नागरिकांनी साखळी उपोषण सुरू केलं आहे. सिरोंचा तालुक्यात टेकडा परिसरात असलेल्या गावांकडे जाण्यासाठी रस्ता आणि अटीवागू नाल्यावर पूल नसल्याने पावसाळ्यात या भागातल्या गावांचा संपर्क तुटतो. नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र मागील दीड वर्षांपासून पुलाचे बांधकाम थांबले असल्याने पावसाळ्यात नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे पूल बांधकामाच्या मागणीसाठी परिसरातल्या 30 गावातल्या नागरिकांनी सिरोंचा तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले असून उन्हाची परवा न करता हे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन बेमुदत सुरू ठेवण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.0
0
Report
Advertisement
