icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

यवतमाळ सांसद संजय देशमुख के घर के बाहर पुलिस कड़ी सुरक्षा

Washim, Maharashtra:यवतमाळ: अँकर:ठाकरेच्या शिवसेनेच्या सहा खासदारांच्या बंडखोरीच्या चर्चेमुळे राजकीय वातावरण तापले असताना,यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्या यवतमाळ जिल्ह्यातिल दिग्रस तालुक्यातील चिंचोली येथील निवासस्थाना बाहेर आजही पोलिस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.सलग दुसऱ्या दिवशीही देशमुख यांच्या घराबाहेर पोलिसांचा कडेकोट पहारा पाहायला मिळत आहे.विशेष म्हणजे, नेहमी कार्यकर्ते आणि नागरिकांच्या वर्दळीने गजबजलेले निवासस्थान सध्या शांत असून परिसरात शुकशुकाट असल्याचे चित्र दिसून येत आहे.खासदार संजय देशमुख यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत विविध स्तरांवर चर्चा आणि उत्सुकता कायम आहे.संभाव्य पक्षांतराच्या चर्चांमुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था कायम ठेवली आहे. संजय देशमुख यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील चिंचोली येथील निवासस्थानासमोर आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी..
0
0
Report
Advertisement

भंडारा गोंदिया विधान परिषद चुनाव: 457 मतदाता आज अपने हक के लिए मतदान करेंगे

Bhandara, Maharashtra:भंडारा गोंदिया विधानपरिषद निवडणुकीत 457 मतदार आज आपला हक्क बजावणार..... भंडारा गोंदिया विधान परिषदेची निवडणूक आज होऊ घातली आहे. या निवडणुकीत भंडारा गोंदिया जिल्ह्यातील एकूण 457 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतांची आकडेवारी पाहता यात महायुतीचे पारडे जड आहे. तर महायुतीने 338 मतदार आपल्याकडे असलेल्या दावा केला आहे. तर महाविकास आघाडीने आमचे 119 मतदार असून हे सर्व आमच्या सोबतच असल्याचा दावा त्यांनी केला आहे... महायुतीचे उमेदवार म्हणून अविनाशब्राह्मणकर व महाविकास आघाडी समर्थित उमेदवार म्हणून नरेंद्र ईश्वरकर हे रिंगणात आहेत. त्यामुळे नाना पटोले व परिणय फुके यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 2016 मध्ये नाना पटोले यांनी वेगळी खेळी करत परिणय फुके यांना निवडून आणलं होत. तसाच करिश्मा आता देखील होणार काय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.. याचा आढावा घेतला है आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी....
0
0
Report

अमरावती विधानपरिषद मतदान शुरू: 451 मतदारांचे भाग्य الآن तय

Amravati, Maharashtra:अमरावती विधानपरिषद निवडणुकिला सुरुवात; 451 मतदार बजावणार मतदानाचा हक्क, सात मतदान केंद्रांवर पार पडणार मतदान अमरावती विधानपरिषद निवडणुकांच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. सात केंद्रावर 451 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. सात मतदान केंद्रावर 42 अधिकारी कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पार पाडणार आहे. दरम्यान सातही मतदान केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या निवडणुकीत तिहेरी लढत होणार आहे. भाजप कडून प्रवीण पोटे, काँग्रेसकडून हर्षाजीत देशमुख, वंचितकडून निलेश विश्वकर्मा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र काँग्रेसकडून ऐन वेळेवर अमरावती महापालिका मतदारांना मतदान न करण्याचा व्हीप बजावण्यात आला असून काँग्रेसचे किती मतदार मतदानाचा हक्क बजावत नाही याकडे सर्वांचे लक्ष लागला आहे. मतदान केंद्रावरून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी
0
0
Report
Advertisement
0
0
Report
Advertisement

धाराशिव-लातूर-बीड़ में विधान परिषद के लिए आज मतदान, 29 केंद्रों पर मतदान शुरू

Dharashiv, Maharashtra:आज विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान. धाराशिव-लातूर-बीडमधील 29 केंद्रांवर सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान. स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी बजावणार मतदानाचा हक्क. महायुतीचे बसवराज पाटील व महाविकास आघाडीचे महेश देशमुख यांच्या थेट लढत. धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत तीन जिल्ह्यांतील 29 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून 988 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून मतदान केंद्रांवर अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील व महाविकास आघाडीचे महेश देशमुख यांच्या थेट लढत होत आहे.
0
0
Report
Advertisement

रामदास कदम का उद्धव ठाकरे पर जोरदार हमला; संजय राऊत पर भी निशाना

Ratnagiri, Maharashtra:रामदास कदम यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल. ही वेळ का आली, उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे, अशी मागणी. आता उद्धवजी, वहिनी आणि आदित्य ठाकरे तिघेच पक्षात राहणार, असा टोला. आमदार, मंत्री आणि आता खासदारही पक्ष सोडत असल्याचा दावा. सर्वांना चालते व्हा म्हणण्याने मराठी माणसाचे नुकसान होत आहे, अशी टीका. लहान तोंडी मोठा घास घेतोय, म्हणत उद्धव ठाकरेवर बोचरी टिप्पणी. ठाकरे गटातील सहा खासदारांच्या संभाव्य निर्णयावर भाष्य; तांत्रिक अडचण येणार नाही असा दावा. उद्धव ठाकरे यांना कायदेशीर आणि प्रशासकीय कामाचा अनुभव नाही, अशी टीका. On संजय राऊत. चाळीस आमदारांच्या जीवावर संजय राऊत खासदार झाले, असा आरोप. नैतिकता असेल तर राजीनामा का दिला नाही? असा सवाल. जगा सांगे ब्रह्मज्ञान...म्हणत संजय राऊत यांच्यावर टीका. On भास्कर जाधव. भास्कर जाधव तरी पक्षात राहतील का? त्यांनी शपथ घेऊन सांगावे, असे आव्हान. ये दिन कट जायेंगे... देखो आगे क्या होता है...म्हणत भास्कर जाधवांना इशारा. ठाकरे गटात आणखी राजकीय घडामोडी होण्याचे संकेत.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top