icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सेवली में अपर तहसील कार्यालय की मांग पर गावों ने बेमुदत बंद का ऐलान

Jalna, Maharashtra:जालना : सेवलीत अप्पर तहसील कार्यालयासाठी तीव्र आंदोलन; गावकऱ्यांकडून गाव बंदची हाक जालना तालुक्यातील सेवली येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात यावं या मागणीसाठी आज सेवली गावात गावकऱ्यांनी गाव बंदची हाक दिली आहे.सेवली सर्कलमधील नागरिकांनी एकत्र येत सेवली गाव बंदची हाक दिली असून, प्रशासनाला इशारा देत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.अप्पर तहसील कार्यालय नसल्यामुळे नागरिकांना शासकीय कामांसाठी दूरवर जावे लागते. यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. विशेषतः शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे.या पार्श्वभूमीवर सेवली सर्कलमधील सर्व गावांनी एकमुखाने अप्पर तहसील कार्यालयाची मागणी करत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.जोपर्यंत सेवली येथे अप्पर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव मंजूर होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. गरज पडल्यास उपोषण, मोर्चे आणि बेमुदत बंद यांसारखी तीव्र आंदोलने केली जातील, असा इशाराही गावकऱ्यांकडून प्रशासनाला देण्यात आला आहे.
0
0
Report

तुमसर के गोवारीटोला–पिटेसुर में जलसंकट, महिलाएं पानी के लिए तरस रहीं

Bhandara, Maharashtra:गोवारीटोला–पिटेसुर ग्रामपंचायत हद्दीत भीषण पाणीटंचाई ने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. गावात पिण्याच्या पाण्याची कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याने महिलांना एक ते दीड किलोमीटर अंतरावरील विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. भर उन्हात डोक्यावर हंडे घेऊन महिलांची पाण्यासाठी रोजची वणवण सुरू आहे. प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असल्याचे सांगितले जात असले, तरी गावात केवळ पाण्याचा ढोला उभारण्यात आला असून अद्याप पाईपलाईन टाकण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत असून तातडीने कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याची जोरदार मागणी होत आहे.
0
0
Report
Advertisement

खेड में भीषण आग लगी, दमकलों की तत्परता से बड़ा नुकसान टला

Ratnagiri, Maharashtra:खेड मध्ये भीषण वणवा; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली.. खेड शहरातील कुवार साई परिसरात रविवारी संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वणवा लागल्याची घटना घडली..आग वेगाने पसरत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः ही आग जवळील घरांच्या दिशेने सरकत असल्याने रहिवाशांमध्ये मोठी घबराट पसरली होती. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी तात्काळ भाजपचे नेते ॲड. वैभव खेडेकर यांना फोनद्वारे दिली.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाने कोणताही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. आग घरांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच ती विझवण्यात यश आल्याने मोठी दुर्घटना टळली आणि अनेक घरे सुरक्षित राहिली.
0
0
Report
Advertisement

खेडमध्ये गोठ्यात भीषण आग, विधवा महिलांचे उपजीविकेचे साधन उद्ध्वस्त; आर्थिक संकट गहरले

Ratnagiri, Maharashtra:खेडमध्ये गोठ्याला भीषण आग.. दोन विधवा महिलांचे उपजीविकेचे साधन हिरावले!.. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील मांडवे येथे काल रात्री ९ वाजता एका गोठ्याला भीषण आग लागली. श्रीमती गायत्री मोरे आणि शारदा मोरे यांचा हा गोठा पूर्णपणे जळून खाक झाला असून सुमारे १.५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.. ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत गोठ्यातील गुरांना सुखरूप बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.. मात्र,दुग्ध व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या या दोन्ही विधवा महिलांसमोर आता मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.. या पीडित कुटुंबाला तातडीने शासकीय मदत मिळावी,अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत..
0
0
Report

गुहागर समुद्र चौपाटी: पांच जीवनरक्षक वेतन न मिलने पर छुट्टी पर, सुरक्षा पर सवाल

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. पगार थकल्याने जीव रक्षक रजेवर.. गुहागर समुद्र चौपाटीवरील पर्यटकांची सुरक्षा वाऱ्यावर.. नगराध्यक्ष योग्य तोडगा काढणार का.. अँकर गुहागर समुद्र चौपाटीवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या पाच जीव रक्षकांचा पगार थकल्याने गुरुवारपासून जीवरक्षक रजेवर गेले आहेत.. परिणामी ऐन हंगामात गुहागर मध्ये दाखल होणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.. गुहागरमध्ये दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत आहे..समुद्र स्नानाचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या जीव रक्षक समुद्र चौपाटीवर नसल्याने सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.. या जिरक्षकांचा मार्च महिन्याचा पगार थकला आहे.याबाबत नगरपंचायत कार्यालयामध्ये त्यांनी विचारणा केली असता,पगार 10 मे पर्यंत मिळू शकतो..दुसरे टेंडर होईल तेव्हा पगार मिळेल तोपर्यंत तुम्ही नाही आला तरी चालेल असे सांगण्यात आल्याचे जीव रक्षक सांगत आहेत.. पगाराची टांगती तलवार असल्याने गुरुवारपासून पाचही जीव रक्षक रजेवर आहेत.. यावर गुहागरच्या नगरपालिका लक्ष देऊन योग्य तोडगा काढणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे..
0
0
Report
Advertisement

अमरावती में 10 कृषी निविष्ठा विक्रेत्यों के परवाने निलंबित, 6 को ताकीद

Amravati, Maharashtra:जिल्ह्यातील दहा कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे परवाने निलंबित; जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी यांची कारवाई. अमरावती जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी व कृषी निविष्ठांची गुणवत्ता राखण्यासाठी धडक मोहीम प्रारंभ केली आहे. या मोहिमेमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असून अन्य सहा केंद्रांना सक्त ताकीद दिली आहे. ऐन हंगामात शेतकऱ्यांची बियाणे व खत विक्रीत फसवणूक करण्याची माहिती उघडकीस आली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. कृषी विभागाने अशाप्रकारची शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी करण्याची मोहीम सुरू केली आहे. रासायनिक खत विक्री केंद्रातील ई-पास मशीनवर शिल्लक असलेल्या खतसाठ्याची व प्रत्यक्ष शिल्लक साठ्याची तपासणी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांमार्फत केली. तपासणीमध्ये तफावत आढळल्याने 17 कृषी निविष्ठा विक्री केंद्रांत दोष आढळल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या विरुद्ध प्रस्ताव सादर केला गेला; सुनावणी नंतर दहा रासायनिक खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले तर सहा खत विक्रेत्यांना सक्त ताकीद देण्यात आली. जिल्हा कृषी अधिकारी यांनी ही माहिती दिली. आजपासून कृषी सेवा केंद्र चालकांनी बेमुदत बंदचा इशारा दिला आहे.
0
0
Report

अमरावती में ड्रग्स तस्कर के घर पर पुलिस का छापा; 53 ग्राम ड्रग्स जप्त

Amravati, Maharashtra:अमरावतीमध्ये पोलीस कोठडीत असलेल्या तस्कराच्या घरावर गुन्हे शाखेचा छापा; सुमारे ७.९५ लाख किमतीचा ५३ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त. अँकर :- अमरावतीत पोलीस कोठडीत असलेल्या ड्रग्स तस्कराच्या घरावर गुन्हे शाखेचा छापा टाकत मोठी कारवाई केली आहे यामध्ये ५३ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त काण्यात आले असून याची किंमत सुमारे ७.९५ लाख रुपये इतकी आहे. साकिब जावेद मोहम्मद आसिफ कुरेशी असे आरोपीचे नाव असून या आधी २ किलो ८० ग्रॅम एमडी जप्त प्रकरणाशी या संबंध असल्याचे तपासात पुढे आले आहे. २३ एप्रिलला दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून त्यामुळे ड्रग्ज रॅकेटचे मोठे जाळे उघड होण्याची शक्यता आहे. दरम्यान पुढील तपास पोलीस करत असून आणखी काय खुलासे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report

ग्रामस्थों ने रात में कार शेड के माटी भराव का विरोध कर काम रोक दिया

Chendhare, Maharashtra:कर्जत तालुक्यात रात्रीस खेळ चाले ...... कारशेड साठी रात्रीच्या वेळी माती भराव ...... तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली ........ संतप्त ग्रामस्थानी काम बंद पाडले. भिवपुरी रोड ते कर्जत स्थानक दरम्यान कार शेड साठी रात्रीच्या वेळी सुरू असलेले मातीच्या भरावाचे काम ग्रामस्थानी बंद पाडले. बेंड से आणि वावे ही गावे उल्हास नदीच्या तीरावर असून भरावामुळे या गावात पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होण्याची भीती आहे. ग्रामस्थांच्या विनंती नंतर कर्जत तहसीलदारांनी हे काम बंद ठेवण्याचे आदेश दिले. परंतु ठेकेदाराने रात्रीच्या वेळी पुन्हा काम सुरू केले. या कामाला ग्रामस्थानी विरोध करत हे काम बंद पाडले.
0
0
Report
Advertisement

कम वर्षा में अमोल भुसारे ने 13 एकड़ में 6000 आम से 22 लाख आय

Washim, Maharashtra:वाशीम: रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशीम अँकर:पश्चिम विदर्भातील वाशीम जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त परिस्थितीतही मंगरूळपीर तालुक्यातील बोरव्हा येथील प्रगतशील शेतकरी अमोल भुसारे यांनी आदर्श उभा केला आहे.‘भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजने’चा लाभ घेत त्यांनी डोंगरमाथ्याच्या १३ एकरावर केशर,दशरी,तोतापुरी व बारमाही आंब्यांची६ हजार झाडे लावली आहेत.कमी उंचीच्या झाडांनाही चांगली फळधारणा होत असून प्रति झाड १०–१५ किलो उत्पादन मिळते. आंब्यासोबत पपई, फणस,जांभूळ, लिची, पेरू तसेच हळद आंतरपीक घेऊन त्यांनी उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण केले.पाइपलाईनद्वारे पाणीपुरवठा, शेततळे व ठिबक सिंचनाच्या मदतीने पाण्याचे योग्य व्यवस्थापन करत त्यांनी सुमारे २२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. कमी पावसाच्या भागातही नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि मेहनतीच्या जोरावर शेतीत यश मिळवता येते, हे त्यांनी सिद्ध केले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top