445001
यवतमाळ तालुका काँग्रेस अध्यक्षावर भरचौकात चाकुहल्ला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहराच्या मध्यवस्तीत गजबजलेल्या दत्त चौकामध्ये भरदिवसा प्राणघातक हल्ल्याची घटना घडल्याने वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रामायण हॉटेल समोर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रमेश भीसणकर यांच्यावर दोन आरोपींनी चाकूने हल्ला चढविला, यावेळी भीसनकर यांनी जखमी अवस्थेत एकाच्या हातून चाकू हिसकावल्याने दोघेही पसार झाले, त्यानंतर जखमी भीसणकर हे स्वतः ऑटोने रुग्णालयात पोहोचले. दरम्यान हा थरार शेकडो लोकांपुढे सुरू असताना कुणीही त्यांच्या बचावासाठी पुढे आले नाही.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नवी मुंबई मुकुंद कंपनी के माथाडी मजदूर 2025 बदलाव विरोध में गेट पर प्रदर्शन
Navi Mumbai, Maharashtra:anchor -नवी मुंबईतील माथाडी कामगार बोर्डाच्या माध्यमातून विविध कंपन्यांमध्ये आणि आस्थापनांमध्ये कार्यरत आहेत. दिघा येथील मुकुंद कंपनीत अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या कंपन्यांना 2025 रोजी झालेल्या माथाडी कामगार कायद्यातील बदलावानुसार कंपनी व्यवस्थापनाने लोडिंग अनलोडींगचे यांत्रिकी पद्धतीने काम करणाऱ्या हमाल कामगारांची सेवा खंडित केले आहे. एक जुलैपासून सेवा खंडित करण्यात आल्याने कामगारांनी कंपनीच्या गेटवर कंपनी व्यवस्थापनाने सरकारच्या धोरणाचा निषेध केला. वर्षांवर्ष काम करणारे 45 वर्षाहून अधिक कर्मचारी या निर्णयामुळे बेरोजगार होणार असून सर्वाधिक मराठी तरुण बेरोजगार होणार असल्याने कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांच्या जागे बाहेरून परप्रांतीय कर्मचारी कंपनीने सेवेत घेतल्याचा आरोप आंदोलन करता कर्मचाऱ्यांनी केला आहे त्यामुळे हा निर्णय मराठी माणसाच्या विशेष करून माथाडी कामगारांच्या सेवा हक्कावर गदा आणणारा असल्याने त्याचा निषेध करून सरकारने लक्ष देण्याची मागणी केली आहे.0
0
Report
TET पेपर फूटे मामले में मंत्री दादा भुसे के घर के सामने सम्यक विद्यार्थी संघठन का धरणा
Nashik, Maharashtra:मालेगाव ( नाशिक ) विशाल मोरे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर आंदोलन TET पेपर फुटी प्रकरणी आंदोलन सम्यक विद्यार्थी संघटनेकडून आंदोलन TET पेपर फुटी प्रकरणी आज मालेगावी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर सम्यक विद्यार्थी संघटनेकडून धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली...0
0
Report
दापोली-खेड हाईवे पर नशेमन कॉलनी में बड़ा गड्ढा, देर रात दुर्घटना का खतरा बढ़ा
Ratnagiri, Maharashtra:दापोली/ रत्नागिरी दापोली-खेड महामार्गावर भलंमोठं भगदाड; नशेमन कॉलनीत अपघाताचा धोका वाढला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-खेड महामार्गावरील नशेमन कॉलनी परिसरात महामार्गाच्या मोरीचा काही भाग खचल्याने मोठे भगदाड पडले आहे. या भगदाडामुळे वाहन चालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, विशेषतः रात्रीच्या वेळी अपघाताची शक्यता वाढली आहे. स्थानिक नागरिकांनी तातडीने दुरुस्ती करून आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. प्रशासनानेही या धोकादायक ठिकाणी त्वरित लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.0
0
Report
Advertisement
नाशिक में कुंभ मेळे के दौरान खड्डों से हादसा: 7 से अधिक नागरिकों की मौत, मुद्दे उठे
Nashik, Maharashtra:सदोष रस्त्यामुळे अपघात.... शेकडो नागरिक जखमी तर 7 हून अधिक नागरिकांचा गेला जीव.... अँकर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरु असलेल्या विकासकामांनी नाशिककरांसाठी मृत्यूचे सापळे तयार केल्याचा धक्कादायक आरोप करीत काल झालेल्या महासभेत लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरले. खोदकामातील निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातांत 7 हून अधिक नागरिकांचे जीव गेले असल्याचा संतापजनक दावा लोकप्रतिनिधींनी केला. यावर महापौर हिमगौरी आडके-आहेर यांनी कडक दोषी ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (कलम १०६) दाखल करा आणि पीडित कुटुंबांना महापालिकेकडून आर्थिक भरपाई द्या, असे आदेश दिले...लोकप्रतिनिधींचा आक्रोश लक्षात घेऊन महापौर हिमगौरी आडके यांनी केसनिहाय चौकशीचे आदेश दिले.. कुंभमेळ्याच्या कामामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी माझी सैनिक असलेल्या प्रवीण गायकवाड यांचा रस्ता असलेल्या खड्ड्यामुळे मृत्यू झाला... शहरातील सातपूर परिसरात असलेल्या श्रमिक नगर मध्ये 6 जून रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास अपघात झाला आणि या अपघातात प्रवीण गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला....प्रवीण गायकवाड हे 1988 साली सैन्य दलातून रिटायर झालेत.... त्यांनी सात वर्ष देश सेवा बजावली... कश्मीरमध्ये देश सेवा बजावत असताना त्यांच्या पायाला गोळी लागली आणि यामुळे त्यांना आर्मीतून रिटायर झाले..त्यानंतर प्रवीण गायकवाड हे सिन्नर मधील एका खाजगी कंपनीमध्ये सिक्युरिटी ऑफिसर या पदावर काम करत होते....गायकवाड त्यांचा सहा जून रोजी अपघातात मृत्यू झाला त्यांची पत्नी भाग्यश्री गायकवाड या गृहिणी असून त्यांच्या मुलाने आत्ताच दहावीची परीक्षा दिली आहे... प्रवीण गायकवाड यांचा अचानक झालेल्या मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला... अचानक झालेल्या या घटनेमुळे प्रवीण गायकवाड यांच्या कुटुंबाला उदारनिर्वाह कसा करावा याबद्दल प्रश्न पडलाय....यामुळे आम्हाला नाशिक महानगरपालिकेकडून काहीतरी मदत मिळावी आणि माझ्या मुलाला नोकरी मिळावी अशी मागणी प्रवीण गायकवाड यांच्या कुटुंबीयांनी केली आहे...... बाईट- भाग्यश्री प्रवीण गायकवाड पत्नी बाईट - सार्थक गायकवाड .. मुलगा बाईट- शुभम गायकवाड...प्रवीण गायकवाड ,भाऊ सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर भरात तब्बल 28 ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे त्या रस्त्यात चाललेल्या कामांमुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो शहरातील या कामांमुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत आणि या खड्ड्यांमध्ये पडून शेकडो नागरिकांना दुखापत झाल्याचं नाशिक महानगरपालिकच्या महासभेत गदारोळ निर्माण झाला... संबंधित ठेकेदार रस्त्यावर काम सुरू असताना कुठलाही प्रकारची माहिती देत नसल्याचा आरोप नगरसेवकांकडून केला आहे तर रस्त्यात सुरू असलेल्या कामात कुठलीही सुरक्षा ठेवत नसल्याचे देखील नगरसेवकांनी सांगितलं यामुळे या अपघाताला कारणीभूत असलेल्या ठेकेदारांवर कारवाई करावी आणि ज्या ज्या नागरिकांना या कामांमुळे त्रास होऊन अपघात घडलाय या सगळ्यांची ठेकेदारांनी भरपाई द्यावी अशी मागणी नगरसेवकांनी केलीये त्याचबरोबर मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करून नोकरीला लावून द्यावं अशी देखील मागणी करण्यात आलीये.. त्याचबरोबर संबंधित ठेकेदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी देखील मागणी नगरसेवक दिनकर पाटील यांनी केली आहे... विवो/03 नाशिक महानगरपालिकेच्या कालच्या महासभेत या संदर्भात नगरसेवकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले त्यावर महापौरांनी सगळा प्रश्न ऐकून त्यावर चौकशीचे आदेश दिले आहेत... चौकशीच्या दरम्यान जे जे ठेकेदार दोषी आढळले जातील त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचं महापौरांनी सांगितले... त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या त्या ठिकाणी ठेकेदारांनी संबंधित कामाचे फलक लावावे अशी देखील सूचना महापौर आणि उपमहापौर यांनी दिलाय... बाईट- हिमगौरी आडके महापौर नाशिक महापालिका बाईट- विलास शिंदे उपमहापौर नाशिक महानगरपालिका.. वर्तमानातील भागात, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे नागरिकांना मोठा त्रास असतोय... अत्यंत संत गतीने सुरू असलेल्या कामामुळे अनेक नागरिकांचा अपघात होत आहे सिंहस्थ कुंभमेळा नाशिक साठी महत्त्वाचा असला तरी नागरिकांची काळजी घेणं हे देखील तेवढेच महत्त्वाचा आहे... जर विकासाबरोबर नागरिकांची काळजी देखील घेतली तर कुंभमेळा देखील चांगल्या पद्धतीने होईल अशी अपेक्षा नाशिककरांनी केली आहे.... देश सेवा करणाऱ्या माजी सैनिकाचा अशा पद्धतीने जर मृत्यू होत असेल तर ही अत्यंत खेदजनक बाब असल्याचं बोललं जातंय... त्यामुळे या सगळ्यांचा धडा घेऊन नाशिक महानगरपालिकेने अशा ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली जातिये...0
0
Report
वर्धा में Maha ई-सेवा केंद्र चालक 1 जुलाई से धरना देंगे; नागरिक परेशान
Wardha, Maharashtra:वर्ध्यात ऑनलाइन सेतू केंद्र बंद; नागरिक त्रस्त. आझाद मैदान मुंबई वरील मोर्चाला वर्ध्यातून पाठिंबा. महा ई-सेवा केंद्र चालकांचा १ जुलैपासून आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा. या आंदोलनाला वर्ध्यातून पाठिंबा देत विविध 센टर, आधार कार्ड सेंटर बंद ठेवण्यात आल्याने नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. संघटनेने शासनास ३० प्रमुख मागण्या केल्या आहेत.0
0
Report
मौसम की तीव्र बारिश में मंडणगड-बाणकोट मार्ग ध्वस्त, वाहन चालकों के लिए बड़ा खतरा
Ratnagiri, Maharashtra:मंडणगड/ रत्नागिरी पहिल्याच मुसळधार पावसात मंडणगड-बाणकोट मार्ग खचला; पालवाणी फाट्याजवळ मोठ्या भेगा, अपघाताचा धोका रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात पहिल्याच मुसळधार पावसाने रस्ते बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पालवाणी फाटा परिसरातील मंडणगड-बाणकोट मार्गावर रस्त्याचा काही भाग खचून मोठ्या भेगा पडल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने दुरुस्ती आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी मोठी दुर्घटना टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.0
0
Report
Advertisement
मुंबई-गोवा हाईवे पर लांजा में दराड़, बारिश के कारण यातायात बाधित
Ratnagiri, Maharashtra:लांजा/ रत्नागिरी मुंबई-गोवा महामार्गावरीл लांजा येथील वेरळ घाटात कोसळली दरड मुसळधार पावसामुळे वेरळ घाटात रात्री पुन्हा दरड कोसळली गेल्या आठवड्यात पावसामुळे वेरळ घाटात कोसळली होती दरड सलगच्या पावसामुळे रात्री पुन्हा कोसळली दरड सुदैवाने कोणतीही हानी नाही या ठिकाणी महामार्गावर सध्या वाहतूक एकेरी सुरू दरड हटविण्याचे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू0
0
Report
भिवंडी में बिजली के झटके से 26 वर्षीय युवक की मौत, सुरक्षा पर सवाल
Thane, Maharashtra:भिवंडीत विजेचा झटका लागून 26 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू... भिवंडीतून हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. चौहान कॉलनीतील 26 वर्षीय तरुणाचा विजेचा झटका लागून जागीच मृत्यू झालाय. दिड वर्षाच्या मुलीच्या डोक्यावरून पित्याचं छत्र हरपलं. भिवंडीतील चौहान कॉलनी, हनुमान मंदिरासमोर राहणारा 26 वर्षीय मुश्तफा रज्जब शेख याचा बुधवारी विजेचा झटका लागून दुर्दैवी मृत्यू झालायं. मुश्तफा हा येथील गोपाल स्वीट हाऊसाठी लग्न आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये कॅटरिंगचं काम करत होता. कार्यक्रमांसाठी लागणारी भांडी आणि साहित्य मंदिर परिसरात ठेवली जात होती. काल तोही तिथे भांडी उतरवण्यासाठी गेला होता. त्याच दरम्यान उघड्या पडलेल्या विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने त्याला जोरदार झटका बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर त्याला तातडीने स्वर्गीय इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केलं. मुश्तफाच्या पश्चात पत्नी आणि फक्त दिड वर्षाची एक छोटी मुलगी आहे. या अपघाताने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुश्तफा आमचा भाऊ होता. तो कष्टाने घर चालवत होता. मंदिराच्या ठिकाणी तारा उघड्या होत्या, कोणताही सेफ्टी नव्हता. दुकानदाराच्या निष्काळजीपणामुळे आमचा भाऊ गेला. आम्हाला न्याय पाहिजे, मुआवजा पाहिजे." बाईट- ख्वाजा खान, मृतकाचा नातेवाईक "दीड वर्षाची त्याची मुलगी आहे. आता तिचं कोण करणार? जर तिथे प्रोटेक्शन असतं, तारा झाकलेल्या असत्या तर आज मुश्तफा आमच्यात असता. प्रशासनाने कठोर कारवाई करावी." बाईट-साबिर शेख, मृतकाचा नातेवाईक मृतकाच्या कुटुंबीयांनी दुकानदाराच्या निष्काळजीपणावर आरोप केला आहे. कामाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे हा अपघात झाल्याचा त्यांचा दावा आहे. कुटुंबाला उचित मुआवजा आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत आहेत. सध्या पोलिसांनी अपघाताची नोंद करून तपास सुरू केला आहे. हादसा नेमका कसा झाला आणि यात कोणाची निष्काळजी होती याचा तपास सुरू आहे. कामाच्या ठिकाणी सुरक्षा किती महत्त्वाची आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. पोलिसांच्या तपासानंतरच खरं कारण समोर येईल.0
0
Report
मुंबई-नाशिक महामार्ग पर सतत वर्षा से 7–8 किमी तक जाम, बचाव के उपाय जारी
Thane, Maharashtra:सतंतधार पावसामुळे मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी... मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर 7-8 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा.. भिवंडी तालुक्यात कालपासून सुरू असलेल्या संततधार कोसळणाऱ्या पावसाचा फटका मुंबई-नाशीक महामार्गाला बसला आहे. महामार्गावरील अर्धवट काम आणि पावसामुळे रस्त्यावर खड्डे आणि पाणी साचल्याने वाहतूक मंदावली आहे. राजनोली, पिंपळनेर, मानकोली ते खारीगाव टोलनाका या 7 ते 8 किलोमीटर पट्ट्यात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या आहेत. गेल्या 2 ते 3 तासांपासून वाहनचालक याच कोंडीत अडकून पडले आहेत. ट्रक, बस, खासगी गाड्या सगळ्यांचीच तारांबळ उडाली आहे. पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्याने अपघाताचा धोका देखील वाढला आहे. वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबई-नाशिक प्रवास करणाऱ्या नागरिकांनी पर्यायी मार्गाचा विचार करावा आणि घाई करू नये.0
0
Report
Advertisement
शिवसंग्राम महायुती में हिस्सेदारी नहीं मिलने से नाराज़, चुनावी रणनीति पर दबाव
Beed, Maharashtra:बीड: ज्योती मेटे शिवसंग्राम ला महायुतीत दिवंगत विनायक मेटे यांच्या हयातीत जो वाटा मिळत होता तो त्यांच्या पाश्चात्य मिळताना दिसत नाही यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि नाराजी आहे त्या आगामी निवडणुकीचा परिणाम म्हणून आगामी निवडणुकात आम्हाला पाहावे लागेल महायुतीचा घटक पक्ष म्हणून आम्ही महानगरपालिका आणि नगरपालिका मध्ये महाराष्ट्रात जिथे शक्य होईल तिथे भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत काम केले तसे असताना शिवसंग्रामच्या वाट्याला उपेक्षा येत आहे त्यामुळे वेगळा विचार न करता निवडणुकांच्या माध्यमातून आपली ताकद दाखवावी लागेल वेगवेगळ्या पक्षांची भूमिका काही दिवसात पाहत आहोत तसं न करता विस्थापितांना संधी देण्यासाठी शिवसंग्राम आपलं अस्तित्व कायम राखून राजकारण करण्यावर ठाम आहे आमच्या कार्यकर्त्यांना स्थिरस्थावर करण्यासाठी महायुतीने सन्मान जनक ठेवावे महायुतीला नम्र आवाहन करतो शिवसंग्राम ला योग्य वाटा देण्याच्या दृष्टिकोनातून आगामी काळात पावलं उचलली गेली पाहिजेत अन्यथा या कार्यकर्त्याच्या मानसिकतेला थोपवणे अवघड जाईल ही खंत मुख्यमंत्र्यांना बोलून दाखवली आहे शिवसंग्राम ने विनायक मেটे यांना गमावले मात्र ताकद गमावलेली नाही याच ताकदीचा विचार करून महायुतीने योग्य तो सन्मान द्यावा जी महामंडळ जी पक्षाची धोरण असतील अन्य सहयोगी पक्षांसाठी त्यात शिवसंग्राम चा विचार झाला पाहिजे महायुती हा शब्द पाळेल की वेगळी भूमिका शिवसंग्रामच्या बाबतीत घेईल हा आशावाद आहे मात्र तसे घडताना दिसले नाही तर आगामी येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत कार्यकर्त्यांना आवर घालण्या कठीण जाईल अद्याप स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला नाही बीड नगरपालिकेत राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत आम्ही लढलो मात्र जी आश्वासन देण्यात आली त्याची पूर्तता झाली नाही आता येऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत बीड आहे. नगरपालिकेत दिले गेलेला शब्द न पाळल्याने कार्यकर्त्यांमध्ये असणारी अस्वस्थता उद्रेकात परावर्तित होऊ नये यासाठी महायुतीला आवाहन शिवसंग्राम ला सन्मान जनक विचार करावा अन्यथा जिल्हा परिषद पंचायत निवडणुकांमध्ये आम्ही आम्ही आमची भूमिका घेऊन लोकांमध्ये जाऊ बसल्याशिवाय राहणार नाही0
0
Report
नेरुल में दो छात्राओं को बिजली का झटका, महावितरण की लापरवाही पर चहुंओं सवाल
Navi Mumbai, Maharashtra:नेरूळ एलपी जवळ दोन विद्यार्थिनींना विजेचा धक्का लागल्याची धक्कादायक घटना घडली होती. विद्युत वाहिनी अचानक कट झाल्यामुळे दोन मुलींना विजेचा धक्का लागला असून विद्यार्थिनींवर डी वाय पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. दरम्यान सदर दुर्दैवी घटना महावितरणच्या निष्काळजीपणा मुळे घडली असून विद्याथीनींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. नवी मुंबई मनपा महापौर सुजाता पाटील यांनी रुग्णालयात जाऊन विद्यार्थिनींच्या तबेबतीची विचारपूस केली असून भविष्यात अश्या घटना घडणार नाहीत याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त केलीय.0
0
Report
परशुराम घाट का गैबियन खतरे में: पेढ़े गाँव पर मंडराया संकट
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. झी २४ तास ने मुंबई - गोवा महामार्गवरील चिपळूणनजीकच्या परशुराम घाटातील गॅबियन वाला पहिल्याच पावसात गेलेले तडे ही बातमी दाखवली होती.. या बातमीची प्रशासनाने दाखल घेऊन सध्या मातीने हे तडे भरले जातायत.. या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी कोणीही नाही फक्त कामगार या ठिकाणी काम करीत आहेत.. परशुराम घाटाच्या पायथ्याशी पेढे गाव असून जवळपास हजारो लोकांची वस्ती आहे.. त्यामुळे गॅबियन वाला तडे गेल्यामुळे ही सध्या धोकादायक स्थितीत असल्यामुळे पेढे गावावरती एक प्रकारचं संकट उभे राहिलेय.. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी0
0
Report
Advertisement
Beed Family Sword Attack over Four-Acre Farm Sparks Bloodshed in Beed
Beed, Maharashtra:बीड: चार एकर शेतीसाठी रक्तरंजित संघर्ष! पुतण्याने तलवारीच्या वारात काकाचे बोटं छाटले, चुलत भाऊ गंभीर..! पुतण्याने चुलत्यावर तलवारीने हल्ला करत हाताची बोटं छाटली तर चुलत भावालाही गंभीर जखमी केलं. बीड तालुक्यातील रुई शहाजानपूर येथील या घटनेचा थरारक व्हिडिओही समोर आला आहे. विशेष म्हणजे, गुन्हा दाखल होऊनही आरोपी अद्याप मोकाट असल्याने बीड पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. २४ जून रोजी रुई शहाजानपूर येथे ही रक्तरंजित घटना घडली. रामू सोपान घुमरे यांच्या मालकीच्या चार एकर शेतीच्या विक्रीवरून कुटुंबात अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. हा वाद अखेर हिंसक झाला. आरोपानुसार, पुतण्या अतुल घुमरे याने तलवारीने चुलते रामू घुमरे यांच्यावर हल्ला करत त्यांच्या हाताचं बोट छाटलं. त्यानंतर चुलत भाऊ बाळासाहेब घुमरे यांच्यावरही तलवारीने वार करून त्यांना गंभीर जखमी केलं. हल्ल्यानंतर दोन्ही जखमींना प्रथम बीड जिल्हा रुग्णालयात आणि नंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र जखमा गंभीर असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलविण्यात आलं. तब्बल आठवडाभर उपचार घेतल्यानंतर दोघेही घरी परतले आहेत. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटना गंभीर असतानादेखील पोलिसांनी योग अशी कारवाई केलीच नसल्याचा आरोप पीडित शेतकरी कुटुंुबाने केला आहे. त्यामुळेच पीडित कुटुंब पोलिस अधीक्षक कार्यालयात ठाण मांडून बसले आहे. पीडित जखमी शेतकऱ्यांनी त्यांच्यावरील उपचार पूर्णपणे झाल्यानंतर त्यांनी बीड ग्रामीण पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी अतुल घुमरे याच्यासह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य पाहता पोलिसांनी काल रात्रीपासून आरोपींची शोध मोहीम सुरू केली आहे. लवकर आरोपीना अटक करू अशी ग्वाही बीड पोलिसांनी दिली आहे. चार एकर शेतीच्या वादाने रक्ताच्या नात्यांवर तलवारीची धार फिरली... रक्ताच्या नात्यांमध्ये वैर इतकं टोकाला पोहोचलं ki एकाच कुटुंबातील चार सदस्य रक्तबंबाळ झाले. आता या प्रकरणात पोलिसांची पुढची कारवाई आणि आरोपींना कधी अटक होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महेंद्रकुमार मुधोळकर ZEE 24 तास बीड..0
0
Report
सांगली जिला परिषद ने कृषि दिवस बड़े उत्साह से मनाया; किसानों को सम्मान और मार्गदर्शन
Sangli, Maharashtra:सांगली जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून एक जुलै कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांचा जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्ते sन्मान करण्यात आला आहे.यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामात अलनिनोचा पिकांवर होणारे परिणाम आणि घ्यावयाची काळजी याबाबत कृषी संशोधन विभागाच्या शास्त्रज्ञांकडून मार्गदर्शन देखील देण्यात आले. जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती देखील यावेळी साजरी करण्यात आली.0
0
Report
अलिबाग में कृषि दिन समारोह: किसानों का सम्मान, सरकार व जिल्हा परिषद का संयुक्त कार्यक्रम
Chendhare, Maharashtra:अँकर - राज्य सरकार आणि रायगड जिल्हा परिषदेचा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज अलिबाग इथं कृषी दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच त्यांना सहकार्य करणाऱ्या कृषी सेवकांचा सन्मान करण्यात आला. शेतकऱ्यांसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी अवजारांची माहिती देण्यात आली.0
0
Report
Advertisement
