icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

यवतमाल उमरी के स्मारक पर क्रांती दिन पर ध्वजारोहण, शहीदों को सम्मान

Yavatmal, Maharashtra:क्रांती दिनानिमित्त यवतमाळच्या उमरी येथील ऐतिहासिक हुतात्मा स्मारकावर पालकमंत्री संजय राठोड यांचे उपस्थितीत स्वातंत्र्यलढ्यातील वीरांना अभिवादन करण्यात आले. 1942 च्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये देशासाठी प्राणाहुती देऊन हौतात्म्य पत्कारणाऱ्या यशवंत पाळेकर यांच्यासह स्वातंत्र्य संग्रामात शहीद झालेल्या सेनानींच्या स्मृतिप्रीत्यर्थ उमरी येथे हुतात्मा स्मारक उभारण्यात आले. क्रांती दिननिमित्त पालकमंत्र्यांनी येथे ध्वजारोहण केले. यावेळी शहीद कुटुंबियांच्या पाल्यांचा सन्मान करण्यात आला. वृक्षारोपण व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील अनेकांनी हौतात्म्य पत्करले. त्यांच्या आणि अज्ञात हुतात्म्यांच्या स्मृती कायमस्वरुपी जपल्या जाव्या अशी भावना पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केली.
0
0
Report

तूकाराम मुंढे के बयान पर नागपुर में सावजी समुदाय में बवाल

Nagpur, Maharashtra:नागपूर तुकाराम मुंढे यांच्या सावजीच्या विधानावरून चांगलाच वाद निर्माण झालाय. मात्र या वादावर तुकाराम मुंडे यांनी टू द पॉईंट या मुलाखतीत रोखठोक भाष्य केले. तुकाराम मुंडे हे त्यांच्या विधानावर ठाम आहेत. माझ्या संदर्भात हे वक्तव्य केलं.. सावजी जेवण ओईली, solti हे फॅट आहे असं वक्तव्या त्यांनी केल्या. तसेच मी कोणत्याही कल्चर आणि कम्युनिटी बाबत बोललेलं नाही फूड हॅबिट संदर्भात विधान होतं असं स्पष्टीकरण मुंडे यांनी दिले. त्यानंतर या या मुलाखतीनंतर नागपुरातील सावजी,हलबा समाजाने दिलेली प्रतिक्रिया सावजी -- (राजेंद्र नांदेकर चौपाल मधील पहिला बाईट ) -- टू द पॉईंट पहायले -- मुंढे साहेबांनी सॉल्टी म्हणाले... मीठ म्हटले तर खाऊ शकाल का? --- सावजी हा चवीचा विषय आहे --- सावजी ही चव, पारंपारिक पद्धतीने बनवण्यात येते ( निकेश वाकोडिकर चौकटीचा शर्ट ) - मुंढे साहेबांच्या वक्तव्यामुळे सावजी व्यवसायिकांवर मोठं संकट आलेय.. त्यांनी क्षमा मागावी -- आमच्याकडे एकच ग्राहक अनेकदा येतो त्यांनी सावजी जेवण खाल्लं असतं आणि तब्येत बिघडली असती तर तर आले असते का ते? (राजेंद्र नांदेकर) -- जर ठाम आहे... मात्र त्यांनी निर्माण केलेल्या वादा नंतर सावजी खवय्ये येतात.. आमच्या सावजी मसाल्यामध्ये आयुर्वेदिक पदार्थ असतात आणि पारंपारिक पद्धतीने बनवण्यात येतो -- तुम्ही एखाद्या गृहिणीकडे जाऊन त्यांची मुलाखत घ्या... मसाल्यामध्ये लवंग मिरे आणि इतर 26 गोष्टी असतात -- शरीराला अ‍ॅपायकारक असं अजिनोमोटो सारखे पदार्थ नसतात --- मूळ सावजी व्यतिरिक्तही अनेक जण सावजी नावाने व्यवसाय चालवतात... तिथे कदाचित मुंढे साहेब गेले असावे -- त्यांच्या मित्रांनी त्यांना सावजी आवडते म्हणूनच घेऊन गेले असावे... त्यांनी त्यांच्या मित्राला विचारावे की तुम्हाला असा तुमहाला अनुभव आला का? -- मुंढेनी य आमच्याकडे येऊन पारंपारिक पद्धतीने बनवलेल्या सावजीचा आस्वाद घ्यावा... --- आमच्याकडे या झी24तास च्या माध्यमातून मी त्यांना निमंत्रण देतो
0
0
Report

कोल्हापुर में Lingayat समुदाय का उग्र प्रदर्शन, अल्पसंख्यक दर्जा और स्वायत्त महामंडल की मांग

Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरमध्ये आज लिंगायत समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक आंदोलन करण्यात येत आहे… जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लिंगायत समाजाच्या वतीने आंदोलनाला सुरुवात झाली आहे… लिंगायत समाजाला अल्पसंख्यांक समाजाचा दर्जा द्यावा, तसंच महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला स्वायत्त दर्जा द्यावा, यासह विविध मागण्या आंदोलकांकडून करण्यात येत आहेत… विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर असतानाच हे आंदोलन करण्यात आले आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष द्यावं, अशी मागणी लिंगायत समाजाच्या आंदोलकांनी केली आहे…या आंदोलनाचा आढावा घेऊन आंदोलकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.
0
0
Report
Advertisement

फडणविस आज कोल्हापुर में विकास कार्यों का उद्घाटन करेंगे

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरातील विविध विकास कामांचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले जाणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, मंत्री शंभूराज देसाई उपस्थित राहणार आहेत. सांगली जिल्ह्यातील कार्यक्रम आटोपल्यानंतर मुख्यमंत्री कोल्हापूरात दाखल होणार आहेत. दुपारी 2 वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस कर्मचाऱ्यांच्या अपार्टमेंटचे उद्घाटन केले जाणार आहे, त्यानंतर दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी मुख्यमंत्री छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयाच्या नव्या सेवांचे लोकार्पण करणार आहेत. तर दुपारी 3 वाजता संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे, त्यानंतर दुपारी 3 वाजता कोल्हापुरातील प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे. कोल्हापुरातील कार्यक्रम आटोपल्यानंतर मुख्यमंत्री कागल मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करणार आहेत.
0
0
Report

कोल्हापुर के संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह का लोकार्पण आज मुख्यमंत्री फडणवीस के हाथों

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचे काम पूर्ण झाला असून आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा पार पडत आहे. दोन वर्षांपूर्वी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागून मोठं नुकसान झालं होतं. या आगीमध्ये संपूर्ण थेटर जळून खाक झाला होता. पण कोल्हापूरकर रंगकर्मी यांच्या पाठपुराव्यामुळे या नाट्यगृहाची पुनर्बांधणी दिमाखात करण्यात आली. याच नाट्यगृहाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.
0
0
Report
Advertisement

नाशिक- पुणे रेल्वे मार्ग पर चक्का-जाम; सत्यजीत तांबे का आंदोलन तेज

Shirdi, Maharashtra:नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी आज चक्काजाम आंदोलन..चाकण पासून सिन्नर पर्यंत केला जाणार चक्काजाम..नाशिक पदवीधर आमदार सत्यजीत तांबे यांच्या पुढाकाराने आयोजित आंदोलनात अनेक नेत्यांचा समावेश..नारायणगाव मधील GMRT चे कारण देत रद्द केलेला मार्ग पूर्ववत करण्याची मागणी..जुन्नर तालुक्यात खासदार अमोल कोल्हे, संगमनेर हिवरगाव पावसा टोल नाक्यावर बाळासाहेब थोरात तर सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा येथील समृद्धी महामार्गावर सत्यजीत तांबे करणार आंदोलनाचे नेतृत्व..नाशिक पुणे महामार्ग वाहतुकीवर आज मोठा परिणाम होण्याची शक्यता..विशेष म्हणजे याच मार्गासाठी महायुती सरकारने दोन दिवसापूर्वी ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या नेतृत्वात समिती स्थापन केली असून GMRT बाबत समितीचा अहवाल घेतला जाणार आहे
0
0
Report
Advertisement

नागपुर रेलवे स्टेशन पर 3.09 करोड़ रुपये मूल्य का सोना जब्त

Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपूर रेल्वे स्थानकावर ३ कोटी ९ लाख रुपयांचं सोने जप्त. DRIची (डायरेक्टर ऑफ रेवेन्यू इंटेलिजन्सची) कारवाई - भारत-बांगलादेश सीमेवरून तस्करी करून आणलेलं सोने रेल्वे मार्गाने पुढे पाठवलं जाणार असल्याची गुप्त माहिती डीआरआयला मिळाली होती - माहितीच्या आधारे १२१०२ ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला नागपूर स्थानकावर ताब्यात घेतलं - प्रवाशाकडून तब्बल २ किलो १६५ ग्रॅम वजनाचे १६ सोन्याचे बार जप्त केले ..सोन्याची अंदाजे किंमत ३ कोटी ९ लाख रुपये. - सोन्याच्या बारवरील ओळख दर्शवणाऱ्या खुणा पुसण्यात आल्याचं तपासात समोर, चौकशी सुरू - डीआरआयकडून जप्त सोन्याचा स्रोत आणि हे सोने नेमकं कुठे पोहोचवलं जाणार होतं, याचा तपास सुरू
0
0
Report
Advertisement

16 वर्षीय अल्पवयस्क मुंबई फिल्म सिटी में काम पाने के इरादे से पहुँचा, हिरासत में

Mumbai, Maharashtra:*फिल्म सिटीमध्ये मालिकेत काम करण्याच्या इच्छेने आलेला १६ वर्षीय मुलगा पोलिसांच्या ताब्यात; आरे पोलिसांनी कुटुंबीयांशी साधला संपर्क* मुंबईतील फिल्म सिटीमध्ये मालिकेत काम करण्याच्या इच्छेने मध्य प्रदेशातून आलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला आरे पोलिसांनी सुरक्षित ताब्यात घेतले आहे. उत्तर नियंत्रण कक्षाकडून फिल्म सिटी परिसरात एक बेवारस मुलगा फिरत असल्याची माहिती आरे पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर आरे पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि मुलाला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. चौकशीदरम्यान मुलाने आपले नाव पारस रतिराम वर्मा, वय १६ वर्षे, असे सांगितले. तो मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील रहिवासी आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेत काम करण्याची इच्छा असल्याने तो मुंबईत आल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मुलाने दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑगस्ट रोजी तो घरातून शाळेेत जात असल्याचे सांगून निघाला. त्यानंतर छिंदवाडा येथून ट्रेनने नागपूर आणि तेथून मुंबईकडे रवाना झाला. ७ ऑगस्ट रोजी सकाळी मुंबईत पोहोचल्यानंतर लोकलने गोरेगाव स्थानक गाठले आणि तेथून पायी फिल्म सिटीमध्ये पोहोचला. पोलिसांनी मुलाकडून त्याच्या वडिलांचा मोबाईल क्रमांक घेऊन संपर्क साधला. मुलगा घरातून निघून गेल्याची माहिती वडिलांनी दिली असून, ते मुंबईत त्याला घेण्यासाठी येत आहेत. तोपर्यंत मुलाला आरे पोलीस ठाण्यात सुरक्षित ठेवण्यात आले आहे.
0
0
Report

छत्रपति संभाजीनगर में अभिजित दिपके के सुरक्षा कटे जाने को लेकर विवाद

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरमध्ये सी.जे.पी.चे अभिजित दिपके यांना देण्यात आलेलं पोलीस संरक्षण तात्काळ काढून घ्या, अशी मागणी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनने केली आहे... पोलिस अधिकाऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप करत दिपके यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे केलीय... काल दिपके यांनी एक पी एस आय या घराबाहेर हाकलले होते.. दिपके यांचं पोलीस संरक्षण काढून घ्या, अन्यथा त्यांच्या घरासमोर आंदोलन करू, असा थेट इशाराही पोलीस बॉईज असोसिएशनने दिलाय... त्यामुळे अभिजित दिपके यांच्याविरोधातील हा वाद आता अधिक चिघळण्याची शक्यता आहे...
0
0
Report

महाराष्ट्र में भू-अधिग्रहण और भ्रष्टाचार पर सवाल, नाना पटोले का आरोप

Nagpur, Maharashtra:नागपूर नाना पटोले, काँग्रेस,नेते On अमित शाह दौरा महाराष्ट्रातील शासकीय जमिनी मोदी मित्रांना द्यायसाठी आता किती संपत्ती शिल्लक राहिली आहे. किती द्यायची बाकी आहे... याची माहिती घेण्यासाठी ते महाराष्ट्रात येत असतात...भ्रष्टाचाराची जी व्यवस्था राज्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे...अमित शहाने मोदीच्या दौऱ्यातून पाहत आहे....महाराष्ट्रात येऊन लुटता कस येईल यावर त्यांचं काम राहिल्याचा आरोप केला आहे.. On सपकाळ खेद - त्यांनी खेद व्यक्त केला...त्यामुळे आता त्यात काही कमेंट करण्यासारख नाही.. खेद व्यक्त केल्यामुळे विषय संपला आहे... - शेतीचा हंगाम महाराष्ट्रात सुरू आहे खताचा बियाण्याचं मोठ्या प्रमाणात तुटवडा बोगस बियाणे आणि खतमुळे शेतकऱ्यांना लुटताना पाहत आहे. सरकारचे महामंडळ बोगस बियाणे घेतले आहे... त्यामुळे महाराष्ट्र सर्वात जास्त आत्महत्याय भ्रष्टाचारी व्यवस्थेमुळे होत आहे....सरकारी कंपन्या बोगस बियाणे विकून शेतकऱ्यांना बरबाद करून आयुष्यातून उध्वस्त करत आहे... On मोदी विद्यार्थी संवाद साधणार - परवा भागवत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तरुणांनी सांगितलं शिक्षण हा अधिकार आहे...आज भाजप आणि संघाने ते शिक्षण विकत देण्याचं काम करत आहे...सामान्य गरीब कुटुुंबातील मुलं शिक्षण घेऊ शकत नाही... रोजगार संधी उपलब्ध होत नाही...अशी भूमिका विद्यार्थ्यांनी बाहेर येऊन मांडली. 12 वर्षात देशभरातील विद्यार्थ्यांचे आयुष्य बरबाद करण्याचं काम मोदी सरकारने केलं. त्याचा परिणाम जेन जी रस्त्यावर आले. त्यामुळे पंतप्रधान यांना इंस्टाग्रामवर यावं लागल. हे देशात बदलाचे संकेत दिसत आहे.. On राष्ट्रवादी तटकरे प्रफुल पटेल,आणि वाद - राष्ट्रवादी मधील अंतर्गत वाद आहे.. प्रशांत किशोर कुठल्याही पक्षाला प्रमोशन कसे करतात त्यावर टेंडर घेतात.. त्यासाठी ते आले असेल. प्रफुल Patel सुनील तटकरे तो त्यांच्या पक्षाचा वाद काँग्रेस त्या वादात पडण्यांसाठी काही कारण नाही.प्रफुल पटेल मोठे भाऊ आहे त्यांचा चांगला अशी अपेक्षा आहे. On मोदी शिंदे भेट - एकनाथ शिंदे यांना फडणीसांचा त्रास आहे आणि तेच तक्रार करायला ते दिल्लीत गेले - प्रधानमंत्री यांना खासदार भेटायला जातात या राजकीय अर्थ काय घ्यायचा आम्ही यावर हस्तक्षेप करणार नाही... On मोदी पाठीशी - संजय राऊत आरोप - कुठल्या गोष्टीसाठी पाठीशी आहे... संजय राऊत यांनी काय ऐकलं. त्यावर मी काही सांगू शकणार नाही संजय राऊत यावर अधिक सांगू शकतील. On आरक्षण वाद, प्रमाणपत्र रद्द - देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारने मराठा बंजारा धनगर या समाजाची फसवणूक केली आहे... 2014 मध्ये गडकरी फडणवीस यांनी महाराष्ट्रात फिरून राज्यात आणि केंद्रात सरकार आल्यावर त्याच्या जातीच्या मागण्या पूर्ण करू.... - सरकार येऊन 12-13 वर्ष पूर्ण झाले. बहुमताच सरकार आहे.... तरीसुद्धा समाजाला न्याय देऊ शकले नाही...मराठा वर्सेस ओबीसी धनगर विरुद्ध आदिवासी गोवारी विरुद्ध आदिवासी अशा पद्धतीचे भांडण लावून इंग्रजांच्या नीतीप्रमाणे जातीय सलोखा धार्मिक सलोखा तो संपवण्याचा काम यांनी केल आहे. घटनात्मक दुरुस्ती करून न्याय देण्याचे काम करत आलं... असतं पण लोकांना हे भांडवल ठेवत आहे. On इ 20 पेट्रोल डिझेल भेसळ - पेट्रोल डिझेलमध्ये भेसळ करणारी लोक होते... तेव्हा काँग्रेस सरकार कारवाई करायची. आता सरकारच पेट्रोल आणि डिझेलमध्ये भेसळ करत आहे. आणि लोकांच्या गाड्या खराब करत आहे...पैसे लुटत आहे स्वतः मात्र गर्भ श्रीमंत होत आहे.. लोकांचा आर्थिक नुकसान करण्याचे काम सरकार करत आहे... या सरकारचा खरा चेहरा सर्वसामान्यांच्या समोर आला आहे. सरकार भेसळीचे काम करते... त्यामुळे सरकारवरच कारवाई कराचा निर्णय घेतला आहे On cng bio गॅस - मोदी है तो मुनकी नाही म्हणायची मात्र आता मोदी है तो भेसळ असं त्याचं समीकरण झालं.. . On उपवर्गीकरण आरक्षण विषय हायकोर्ट - या सर्व समाजाला आश्वासन देऊन सगळ्यांना फसवलं आहे..विधानसभेत 2019 मध्ये फडणवीस सरकारने गायकवाड समितीचा रिपोर्ट आणून विधानसभेची फजगत केली.त्यानंतर सुप्रीम कोर्टाने फटकारले आहे. या समाजाला फसवण्याचं काम आणि आपसात लढायचं काम सुरू आहे... त्यामुळेच जरांगे हाके संघर्षामध्ये येतात आणि समाजाला दिसला जात आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top