icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

तन्वी रेडीज को विश्व योगासन स्पर्धा में स्वर्ण मिला, चिपळुण में ढोल-ताश के साथ स्वागत

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी सुवर्णपदक विजेत्या तन्वी रेडीजचे चिपळुणात जल्लोषात स्वागत; ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक भारताच्या नावाने सुवर्णपदक पटकावलेल्या तन्वी रेडीज हिने गोष्टींमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. ५५ हून अधिक देश सहभागी झालेल्या या स्पर्धेत तन्वीने आपल्या कौशल्याचा ठसा उमटवत भारताची मान उंचावली. स्पर्धेनंतर रेल्वेने चिपळुणात आगमन होताच तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या डी.बी.जे. महाविद्यालयात बीएससीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या तन्वीची महाविद्यालयाच्या वतीने ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संस्थेचे चेअरमन मंगेश तांबे, प्राचार्य माधव बापट, प्रशिक्षक रणवीर सावंत, तन्वीचे कुटुंबीय, शिक्षक, प्राध्यापक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. तन्वीच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
0
0
Report
0
0
Report

शिर्डी पेढ़ो में मिलावट: FDA ने सैंपल लिए, नगर निगम ने जांच का फैसला किया

Shirdi, Maharashtra:झी 24 तास वृत्तवाहिनीचे कौतुक , शिर्डीतील पेढ्याबाबत धक्कादायक प्रकार समोर आणला... बातमी आल्यानंतर FDA ने कारवाई करत सॅम्पलही घेतले आहेत.. अनेक गोष्टी आहेत ज्या दुर्देवाने घडतायत , नगरपरिषदेच्या वतीने आणि पालकमंत्री यांच्या नेतृत्वात शिर्डीतील प्रत्येक हॉटेल , रेस्टॉरंटच्या किचनची पाहणी करण्याचा निर्णय घेतला... पाहणी करून अहवाल FDA ला आम्ही देणार आहोत... हि आजची घटना नाही , एक महिन्यापासून काम सूरू... ज्या ठिकाणी नियम फॉलो होत नाहीत , काही भेसळ होत असेल तर नगरपरिषदे मार्फत कारवाई करणार आहोत...पुर्वीच हि कारवाई सुरू केलीय.. पेढ्याचा विषय समोर आला , कर्मचारी सोसायटी मार्फत जे चांगल्या दर्जाचे पेढे विक्री होते तेच घ्यावेत अस मी भाविकांचा झी 24 तासच्या माध्यमातून आवाहन करतो... FDA विभागाकडे मनुष्यबळ हे कमी आहे , फक्त मिठाई नाही तर दूधभेसळ , औषधे अशा अनेक विषय आहेत त्याबाबत नविन अधिकारी अधिक सक्षमपणे कारवाई करतील.. अहिल्यानगरचे माजी खा.सुजय विखेंची झी 24 तास सोबत बोलतांना प्रतिक्रिया...
0
0
Report
Advertisement

नौकरी छोड़ने के क्रोध में कर्मी पर जानलेवा हमला, CCTV में कैद

Ambernath, Maharashtra:काम सोडल्याच्या रागातून कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरा झाली कैद Anchor उल्हासनगर कॅम्प क्रमांक ५ येथील नेताजी चौक परिसरातील चहा विक्रीच्या दुकानातील कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साई आर्केड इमारतीत विनय रावतानी यांचे "करक चाय" हे दुकान असून, विशाल कश्यप हा तरुण त्या दुकानात काम करतो. मध्यरात्रीच्या सुमारास विशाल दुकानासमोर साफसफाई करत असताना प्रितम विनायक चव्हाण आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी त्याच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हल्लेखोर प्रितम चव्हाण हा परिसरात "महाराजा चहा"ची शाखा चालवत असल्याची माहिती आहे. विशाल कश्यप हा यापूर्वी प्रितम चव्हाणकडे काम करत होता. मात्र काही काळापूर्वी त्याने ते काम सोडून दुसरीकडे नोकरी सुरू केली. याच कारणातून आपल्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा आरोप विशालने केला आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे. आरोपींविरोधात कोणती कारवाई होते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report

अमरावती विधान परिषद: हरशजीत देशमुख गायब, 15–20 करोड़ लेने के आरोप

Amravati, Maharashtra:काँग्रेस उमेदवार हर्षजीत देशमुख अमरावतीतून गायब; पंधरा ते वीस कोटी घेतल्याचा आरोप, काँग्रेस वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता अँकर :- अमरावती विधान परिषद निवडणुकीत रोज नवनवीन नाट्यमय घडामोडी घडत आहे. मात्र या निवडणुकीत आज एक नवा ट्विस्ट आला असून काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख हे पाच दिवसांपासून जिल्ह्यात फिरकले नसल्याचं खुद्द काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख यांनी सांगितला आहे. त्यामुळे काँग्रेस उमेदवार अमरावतीतून गायब असल्याची चर्चा आहे. तर या विषयी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना विचारलं असता हर्षिजीत देशमुखांनी 15 ते 20 कोटी घेतल्याचे आरोप केला आहे. त्यामुळे अमरावती विधान परिषद निवडणुकीत मोठ्या घडामोडी पडद्यामागे होत असल्याचे बोलला जात आहे. काय आहे हा संपूर्ण सावळा गोंधळ पाहूया झी 24 तासचा स्पेशल रिपोर्ट.... Vo:१ अमरावती विधान परिषद निवडणुकीत माजी आमदार विप्लव बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी सर्व उमेदवारांनी एकत्र येत ताकद लावली व त्यांचा उमेदवारी अर्ज बाद केला. यानंतर आता काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षजीत देशमुख हे जिल्ह्यातून गायब झाले असून ते नागपूर मधील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. मात्र त्यांनी 15 ते 20 कोटी रुपये घेतल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे. त्यामुळे हर्षजीत अजित देशमुख यांनी निवडणुकीतून अप्रत्यक्षपणे माघार घेतल्याचं बोललं जात आहे. म्हणून ही नाचक्की रोखण्यासाठी काँग्रेस आता वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे... Vo:२ अमरावती विधान परिषदेचे उमेदवार हर्षजीत देशमुख गायब असल्याची बातमी झी 24 तास ने दिल्यानंतर अखेर झी 24 तास च्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे. काँग्रेस उमेदवार हर्षजीत देशमुख गेल्या पाच दिवसापासून अमरावती जिल्ह्यातून गायब असल्याची खळबळ जनक माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून अमरावतीत ऐन निवडणुकीच्या काळात काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचा बोलल जात आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून उमेदवाराशी आमचा संपर्क झाला नाही, ते खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून हर्षदीप देशमुख यांचा जिल्ह्यातील कोणत्याच प्रमुख नेत्यांशी संपर्क नाही. त्यामुळे वरिष्ठ वंचित आणि काँग्रेसच्या नेत्यांची बोलणी सुरू आहे. वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिली आहे. 121 :- बबलू देशमुख, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस Vo:३ दरम्यान या संपूर्ण सावळ्या गोंधळाविषयी काँग्रेस नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांना विचारलं असता त्यांनी आणखी खळबळ जनक आरोप करत विधान परिषदेचे काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांनी 15 ते 20 कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे हर्षजीत देशमुख यांना हे पैसे कोणी दिले असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. 121 :- यशोमती ठाकूर, काँग्रेस नेत्या व माजी मंत्री Vo:४ विधान परिषदेच्या मतदानाला आठ दिवस शिल्लक असताना काँग्रेसचा उमेदवार अचानक गायब झाला आहे त्यामुळे अमरावती विधान परिषद निवडणुकीत रोज नवनवीन घडामोडी घडताना दिसत असून येणाऱ्या आठ दिवसात आणखी काय नाट्यमय घडामोडी पाहायला मिळतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
0
0
Report

धाराशिव में मिलावट के खिलाफ दबिश: दूध-खवा कीमतें बढ़ीं, किसानों को लाभ

Dharashiv, Maharashtra:धाराशिव जिल्ह्यात भेसळयुक्त दूध आणि खव्याविरोधात महसूल आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरात भेसळयुक्त दूध आणि खव्यावर धडक कारवाया केल्या. या कारवाईमुळे बाजारात येणाऱ्या भेसळयुक्त मालाची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. भेसळयुक्त दूध आणि खव्याविरोधात प्रशासनाने उघडलेली मोहीम आता शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरताना दिसत आहे. महसूल आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरात भेसळयुक्त दूध आणि खव्यावर धडक कारवाया केल्या. या कारवाईमुळे बाजारात येणाऱ्या भेसळयुक्त मालाची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. भेसळीच्या मालावर लगाम बसल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील दर्जेदार आणि पारंपरिक खव्याला चांगली मागणी निर्माण झाली आहे. खव्याच्या दरात प्रतिकिलो 20 ते 30 रुपयांची वाढ झाली असून दूध उत्पादक शेतकरी आणि खवा उत्पादक व्यापाऱ्यांना याचा थेट फायदा होत आहे. अनेक व्यापाऱ्यांच्या मते, दर्जेदार खव्याला यापूर्वीपेक्षा अधिक बाजारपेठ उपलब्ध होत आहे. VOICE-3: दूध आणि खव्याला योग्य भाव मिळू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. भूम तालुक्यातील पाटसांगवी गावात शेतकऱ्यांनी फटाके फोडून आणि गुलाल उधळून तुकाराम मुंडे यांच्या निर्णयाचे स्वागत केले. भेसळ रोखण्यासाठी सुरू केलेली मोहीम पुढेही कायम ठेवावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. VO-4: इतकेच नव्हे तर तुकाराम मुंडे यांची बदली करू नये, अशी मागणीही शेतकऱ्यांकडून केली जात आहे. भेसळमुक्त अन्नपदार्थांच्या दिशेने उचललेल्या या पावलामुळे ग्राहकांना शुद्ध अन्न मिळत असतानाच शेतकऱ्यांच्या उत्पादनालाही योग्य न्याय मिळत असल्याचे चित्र सध्या धाराशिव जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. भेसळयुक्त दूध आणि खव्यावर झालेल्या कारवाईमुळे धाराशिवच्या गुणवत्तापूर्ण खव्याला नवसंजीवनी मिळाली आहे. खव्याचे दर वाढल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होत असून शेतकरी प्रशासनाच्या या निर्णयाचे खुलेआम स्वागत करत आहेत.
0
0
Report
Advertisement

पुरुषोत्तमपुरी बोट हादसे में एक महिला की मौत, दो घायल

Beed, Maharashtra:पुरुषोत्तमपुरी बोट दुर्घटना प्रकरण; एका महिलेचा मृत्यू तर एक महिला गंभीर... उपविभागीय अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश बीडच्या माजलगाव तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे. तालुक्यातील पुरुषोत्तमपूरी येथे दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या बोटीला सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास नदीपात्रात भीषण अपघात झाला होता. 35 हून अधिक भाविक असलेल्या या बोटीचा समतोल बिघडल्याने ही बोट नदीपात्रात बुडाली. बोटीमधील दोन भाविक बेपत्ता होते. प्रशासनाकडून शोधकार्य सुरू असताना प्रमिला राठोड या महिला भाविकाचा मृतदेह आढळून आला.. तर वाशिम जिल्ह्यात महागाव येथील सिंधुबाई मवाळ या भाविक महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचीही प्रकृती बिकट आहे. दरम्यान उपविभागीय अधिकाऱ्यांना घटनेची चौकशी करून अहवाल मागवला आहे.. तर याप्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी माध्यमांना दिलی आहे..
0
0
Report

सांगली नगरपालिका के 37 कर्मचारियों को एक साथ निलंबित किया गया

Sangli, Maharashtra:सांगली फ्लॅश Sng_mnp_nilambit स्लग - सांगली महापालिकेच्या 37 कर्मचाऱ्यांना एकाच वेळी करण्यात आला निलंबित.. अँकर - सांगली महापालिकेच्या विविध विभागातील तब्बल 37 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आला आहे.कामावर हजर राहत नसल्याचा ठपका ठेवत महापालिका आयुक्त संगीता महापत्रा यांनी ही धडक कारवाई केली आहे.सफाई विभागासह पाणीपुरवठा,अग्निशमन,बांधकाम व सुरक्षा विभाग मधील कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. ९० दिवसांपेक्षा जास्त काळ विनापरवाना गायब राहिल्याबाबत ठपका ठेऊन निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, त्याचबरोबर अत्यावश्यक सेवा विस्कळीत केल्याबद्दल विभागीय चौकशी सुरू केली आहे. एकाच वेळी 37 कर्मचाऱ्यांच्यावर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे महापालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
0
0
Report

जयकुमार गोरे ने तीर्थक्षेत्र आघाडी के नेताओं से मुलाकात से चुनाव समीकरण बदले

Pandharpur, Maharashtra:सोलापूर विधान परिषद निवडणुक्याच्या निमित्ताने पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भालकेना धोबीपछाड दिला आहे. शिवसेना नेते अनिल सावंत यांच्या नेतृत्वाखाली 13 पैकी 9 नगरसेवकांनी घेतली पालकमंत्री यांची भेट , विधान परिषद निवडणुकांमध्ये भाजपला मदत पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे 13 नगरसेवक आहेत. नगरपालिका निवडणुकीत भगीरथ भालकेंनी पालकमंत्र्यांना आव्हान दिले होते. आता विधान परिषदेच्या निवडणुक निमित्ताने पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भालके यांच्या नेतृत्वाखालील तीर्थक्षेत्र आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. माजी आरोग्य मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांच्या नेतृत्वाखाली 9 नगरसेवकांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांना आपला पाठिंबा असल्याचे सांगितले आहे. तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख हे सोबत सुद्धा पंढरपूर पंचायत समिती सभापती निवडीत भाजप सोबत होते त्यामुळे काय काय होत ते कळेल असे पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले आहेत त्यामुळे मतदान होई पर्यंत पालकमंत्री जय कुमार गोरे अजून किती धक्के देतात हे पाहावे लागेल
0
0
Report
Advertisement

अरुण लाखानी ने चंद्रपुर में विजयी प्रमाणपत्र ग्रहण किया; बोले मैं गरीब हूँ

Chandrapur, Maharashtra:चंद्रपुर-गडचिरोली-वर्धा स्थानीय निर्वाचन क्षेत्र से विजयी भाजपा उम्मीदवार अरुण लाखानी ने चंद्रपुर के जिलाधिकारी कार्यालय से विजयी प्रमाणपत्र ग्रहण किया। इस चुनाव में पैसे के महापूर के आरोप सामने आ रहे थे, उन्होंने कहा— मैं गरीब हूँ, इतने पैसे कैसे बाँट सकता हूँ? चंद्रपुर, गडचिरोली और वर्धा के भाजपा प्रतिनिधि और कार्यकर्ता कार्यक्रम में उपस्थित थे। उन्होंने तीनों जिलों के भाजपा प्रतिनिधियों और कार्यकर्ताओं का आभार व्यक्त किया। जीत मिलने के बाद अब जलप्रदूषण, ठोस कचरा प्रबंधन आदि विषयों पर ध्यान केंद्रित करेंगे। कांग्रेस के आरोप थे कि पैसे का महापूर था, पर चुनाव के बारे में उन्होंने कहा— यह सवाल तभी उठेगा जब चुनाव हुआ हो; मैंने कहा, मैं इतने पैसे नहीं बाँट सकता।
0
0
Report

मुंबई-गोवा हाइवे पर मानवनिर्मित झरने यातायात बाधित, कणकवली वासियों की मांग

Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्गात धबधबे प्रवाहित झालेत. हे धबधबे नैसर्गिक नाहीत तर कृत्रिम धबधबे आहेत. महामार्ग प्राधिकरणाच्या भोंगळ कारभारामुळे कणकवलीत हे धबधबे प्रवाहित झालेत. मुंबई गोवा महामार्गावर कणकवली शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाखाली पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात खाली कोसळतेय. मागील वर्षीदेखील असेच धबधबे कोसळत होते मात्र त्यावर काही प्रमाणात मरम्मत झाली होती; परंतु आता पहिल्या पावसात पुन्हा एकदा मानवनिर्मित धबधबे प्रवाहित झालेत. यामुळे वाहनचालकांना प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागतोय. एकीकडे मुंबई गोवा महामार्गाचे काम 90 टक्के पूर्ण झाल्याचे सांगितले जाते मात्र ठेकेदाराच्या काही चुकांमुळे प्रवाहित झालेले धबधबे बंद करावेत अशी मागणी कणकवली वासीय करत आहेत.
0
0
Report
Advertisement

डोंबिवली लोढ़ा हीवन: फेरीवाल्यांचे अतिक्रमण से नागरिक परेशान

Kalyan, Maharashtra:केडीएमसी अधिकारी सत्ताधाऱ्यांना जुमानत नाहीत? डोंबिवलीत सत्ताधाऱ्यांनाच करावे लागले फेरीवाल्यांविरोधात आंदोलन लोढा हेवन परिसर फेरीवालामुक्त करण्याची मागणी डोंबिवली पूर्वेतील लोढा हेवन परिसरात वाढत्या फेरीवाल्यांच्या समस्येमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून, या प्रश्नाकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आठवडा बाजार बंद करण्याचे सूचना केल्यानंतर देखील केडीएमसी प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जाते त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रासाला सामोरे जावे लागते या निषेधार्थ शिवसेनेकांनी लोढा हेवन परिसरात आंदोलन केलं महापालिकेने कारवाई केली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा देखील शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी यावेळी दिला लोढा हेवन परिसरातील रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागांवर मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढल्याने वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांना होणारा त्रास तसेच स्वच्छतेच्या समस्या निर्माण झाल्याच्या तक्राऱी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या कडे स्थानिक नागरिकांकडून वारंवार करण्यात येत होत्या अखेर केडीएमसी प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने शिवसेनेच्या आंदोलन करत प्रशासनाचा निषेध नोंदविला.यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, "लोढा हेवन परिसर तात्काळ फेरीवालामुक्त करण्यात यावा. अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल," असा इशारा दिला आमदार राजेश मोरे व सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाच प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याची वेळ आल्याने केडीएमसीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या आंदोलनानंतर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे。
0
0
Report

नागपुर में पेड़ों की स्वास्थ्य जाँच: आर्टिफिशियल इंटेलिजेंस से होगा समग्र मूल्यांकन

Nagpur, Maharashtra:राज्याची उपराजधानी नागपूर शहरात महापालिकेने झाडांची आरोग्य तपासणीचा एक अभिनव प्रकल्प न हाती घेतलाय.. प्रायोगिक तत्त्वावर नागपुरात आजपासून सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात पाच हजार झाडांची सखोल तपासणी केली जातेय .एका चारचाकी वाहनावर सेंसर आणि लेझर युक्त यंत्राच्या माध्यमातून अवतीभवतीच्या झाडांची सखोल स्कॅनिंग केली जाईल... त्यामध्ये झाडांची उंची, लांबी रुंदी, बुंध्याचा घेर, बुंधा आतून ठोस आहे की पोकळ, झाड सुरक्षित आहे की ते पडू शकतो याची माहिती स्कॅनिंग च्या माध्यमातून नोंदवली जाईलच... शिवाय झाडाची अवस्था पाहून हे यंत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित सॉफ्टवेअरच्या मदतीने झाडाला कोणत्या पोषक द्रव्यांची आवश्यकता आहे, झाडांनी किती प्रमाणात पाणी जमिनीखाली धरून ठेवले आहे, त्याला पाणी किती प्रमाणात दिले गेले पाहिजे, झाड किती प्रमाणात कार्बन शोषतो आहे, किती ऑक्सिजनचा उत्सर्जन करत आहे या सर्वांची नोंदही या आरोग्य तपासणीत होणार आहे...भारतात मुंबई महानगरपालिके नंतर नागपूर येथे प्रयोग राबवले जात असून मुंबईत 25 हजार झाडांची तर नागपुरात 5 हजार झाडांची आरोग्य तपासणी या माध्यमातून होणार आहे...
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top