445001
यवतमाळ तालुका काँग्रेस अध्यक्षावर भरचौकात चाकुहल्ला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहराच्या मध्यवस्तीत गजबजलेल्या दत्त चौकामध्ये भरदिवसा प्राणघातक हल्ल्याची घटना घडल्याने वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रामायण हॉटेल समोर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रमेश भीसणकर यांच्यावर दोन आरोपींनी चाकूने हल्ला चढविला, यावेळी भीसनकर यांनी जखमी अवस्थेत एकाच्या हातून चाकू हिसकावल्याने दोघेही पसार झाले, त्यानंतर जखमी भीसणकर हे स्वतः ऑटोने रुग्णालयात पोहोचले. दरम्यान हा थरार शेकडो लोकांपुढे सुरू असताना कुणीही त्यांच्या बचावासाठी पुढे आले नाही.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
घाटकोपर के असल्फा मार्केट में कचरा गाड़ी ब्रेक फेल से दुकान घुसी; दुकानदार घायल
Mumbai, Maharashtra:anchor : घाटकोपरच्या असल्फा भाजी मार्केट परिसरात आज सकाळी एक गंभीर अपघात घडला. कचरा वाहून नेणाऱ्या महानगरपालिकेच्या गाडीचा अचानक ब्रेक फेल झाल्याने नियंत्रण सुटलेली गाडी थेट एका दुकानात घुसली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. नशीब बलवत्तर म्हणून काही दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांचे प्राण वाचले आहेत. या अपघातात दुकानदार ताज मोहम्मद शेख यांना पाठीला मुक्कामार लागला असून त्यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. तसेच कचरा गाडीचा चालक आणि वाहक यांनाही किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा मुंबई मनपाच्या कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही घटना या रस्त्यावर लागलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.0
0
Report
वाशीम के वन विभाग डिपो में भीषण आग, नियंत्रण में, लाखों का नुकसान टला
Washim, Maharashtra:वाशीम: वाशीम जिल्ह्यातील मेडशी परिसरातील वन विभागाच्या डेपोमध्ये भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली.डेपोमध्ये साठवून ठेवलेल्या लाकडाने पेट घेतल्यामुळे आगीची तीव्रता वाढली होती.घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.अग्निशामक दलाचे पथक व स्थानिक नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.वेळेत आग आटोक्यात आणल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान टळले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वन विभागाकडून घटनेचा तपास सुरू आहे.0
0
Report
राहुरी उपचुनाव के लिए ईवीएम स्ट्रॉंग रूम में तीनस्तरीय सुरक्षा, 4 मई मतगणना
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर के नये पुलिस अधीक्षक मुंमका सुदर्शन ने पदभार ग्रहण करने से पहले शिर्डी में साई दर्शन किया, राहुरी विधानसभा उपचुनाव के ईवीएम स्ट्रॉन्ग रूम की निगरानी की। राहुरी विधानसभा उपचुनाव के ईवीएम मशीन राहुरी महाविद्यालय में बनाए गए स्ट्रॉन्ग रूम में रखी गई हैं। इस स्ट्रॉंग रूम परिसर में तीन स्तर की सुरक्षा व्यवस्था रखी गई है, इस बारे में पुलिस अधीक्षक सुदर्शन ने आकलन किया। पदभार ग्रहण करने से पहले ही वे काम में लग चुके हैं। 4 मई को राहुरी विधानसभा उपचुनाव की मतगणना होगी।0
0
Report
Advertisement
पंढरपुर में इंजीनियरिंग छात्रा के साथ अत्याचार: आरोपी अभी गिरफ्त में नहीं
Pandharpur, Maharashtra:Anchor - अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी वर त्याच्या नराधमाच्या त्रासाला कंटाळून तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न पंढरपूर मधील धक्कादायक घटना , गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट एका इलेक्ट्रिक इंजिनियर विद्यार्थिनीला गोड बोलून तिच्याशी जवळीक साधून महाबळेश्वर येथे एका हॉटेलमध्ये अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने सतत अत्याचार करून व्हिडिओ वायरल करण्याची धमकी देऊन त्याला त्रास दिला आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने राहत्या घरी फरशी पुसण्याचे वापरले जाणारे ऍसिड पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या तिच्यावर पंढरपुरातील खाजगीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी आरोपी अतिश पांडुरंग ताटे यांच्या विरोधात पीडीतेया आईने करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे सदर घटना होऊन एक महिना झाला तरी आरोपी या पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही अटक केलेली नाही असा आरोप नातेवाईकांनी केलेला आहे सदर घटनेतील पीडित तरुणी इंदापूर येथील एका अभियांत्रिकीच्या महाविद्यालयात इलेक्ट्रिकल इंजिनिअरच्या चौथ्या वर्षात शिकत होती.पीडित विद्यार्थीनी करकंब मधून इंदापूरला कॉलेज जाण्यासाठी गावातील बस स्थानकावर आली असता आरोपी अतिश पांडुरंग ताटे याने कॉलेजमध्ये सोडतो,असे विश्वासात घेऊन जवळीक साधत तिला स्विफ्ट कार मध्ये बसून घेऊन गेला. गाडीत बसल्यावर आरोपीने पीडित तरुणीला महाबळेश्वर येथील हॉटेलमध्ये नेले त्या ठिकाणी पीडीतेचे इच्छेविरुद्ध अत्याचार केला तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिली आणि दुसऱ्या दिवशी इंदापूर येथील कॉलेजमध्ये सोडून तो निघून गेला आरोपींनी काढलेल्या व्हिडिओ आणि फोटोच्या आधारे तो वारंवार सदर तरुणीवर अत्याचार करत होता त्याच्या अत्याचाराला कंटाळून सदर तरुणीने महत्त्वाचा प्रयत्न केला आहे0
0
Report
नागपुर में मुख्यमंत्री फडणवीस का विकास कार्यों पर बड़ा निरीक्षण—कौन से प्रोजेक्ट शुरू?
Nagpur, Maharashtra:नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात विविध विकास कामांचा आढावा घेत आहे ते आता मेयो( इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ) येथे सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्याकरता पोहोचले आहेत yashivay मेडिकल ( शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ), जिल्हाधिकारी कार्यालय आणि मानकापूर क्रीडा संकुल येथील विकास कामांची पाहणी करण्याकरता जाणार आहेत0
0
Report
नाशিক कोर्ट: निदा खान का अंतरिम जमानत आवेदन खारिज
Nashik, Maharashtra:Nashik Breaking धर्मांतर प्रकरणातील फरार संशयित निदा खानचा अंतरिम जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला - नाशिक रोड न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय - धर्मांतर आणि महिला लैंगिक शोषण प्रकरणातील फरार आरोपीला मोठा झटका - सरकारी पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने दिलासा नाकारला - सध्या अटकेत असलेल्या इतर संशयितांना मदत केल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निर्णय महत्त्वाचा - अंतरिम जामीन नाकारल्याने SITच्या अटकेच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता - निदा खानच्या पुढील कायदेशीर पर्यायांकडे आणि तपास यंत्रणेच्या कारवाईकडे लक्ष0
0
Report
Advertisement
मराठा बटालियन से सेवानिवृत्त मोहन गजानन पखान का अकोला रेलवे स्टेशन पर जोरदार स्वागत
Akola, Maharashtra:Anchor : अकोला येथील मोठी उमरी परिसरातील फत्तेपूर वाडी निवासी मोहन गजानन पखान हे मराठा बटालियनमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर अकोला रेल्वे स्थानकावर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.यावेळी कुटुंबीय, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांनी फुलांच्या हारांनी तसेच ढोल-ताशांच्या गजरात त्यांचा सत्कार करत जोरदार अभिनंदन केले. देशसेवेत दिलेल्या त्यांच्या योगदानाबद्दल उपस्थितांनी गौरव व्यक्त दिल्या.मोहन पखान यांच्या स्वागतावेळी रेल्वे स्थानक परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. “भारत माता की जय” तसेच सैनिकांच्या सन्मानार्थ घोषणांनी परिसर दणाणून गेला.0
0
Report
कल्याण के फल विक्रेता की अश्लील पोस्ट के आरोप में पुलिस ने गिरफ्तारी
Kalyan, Maharashtra:आक्षेपार्ह स्टेसट ठेवणाऱ्या कल्याणमधील फळ विक्रेत्याला पोलिसांनी केली अटक कल्याण पश्चिमेतील चिकणघर परिसरात राहणारा फळ विक्रेता विनित सिंग हा सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट करीत होता. त्याने शोशल मिडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मी भारतीय संविधान मानत नाही असे स्टेटस त्याने ठेवले हाेते. हा प्रकार येताच एका जागरुक महिनेने सिंग याच्या दुकानात जाऊन समज देण्याचा प्रयत्न केला. त्याने त्या महिनेचे काही एक न ऐकता तिच्यासोबत वाद घातला. यावेळी परिसरात गर्दी जमली. नागरिकांनी चांगलाच चोप दिला व या घटनेची माहिती महात्मा फुले पोलिसांना देण्यात आली पाेलिस घटनास्थळी दाखल झाले. सिंग याने ठेवलेले स्टेटस तात्काळ डिलीट केले. पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला. मोबाईल तपासला असता त्यात आक्षेपार्ह पाेस्ट केल्याचे पुरावे समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी सिंग याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक केली आहे. सिंग हा मूळचा प्रयागराज येथील रहिवासी आहे. तो कल्याणमध्ये फळ विक्रीचा व्यवसाय करतो.0
0
Report
ताडोबा परिघ में बारिश के बीच वन्यजीव गणना, चांदनी में जंगल का रोमाँच
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा परिघात पावसाच्या साथीने वन्यजीव गणना पार पडली. आधीच सज्ज केलेल्या उंच मचाणीवर देश-राज्यातून आणि जिल्हाभरातून रात्रीभर बसले हुश्री प्रगणकांनी दुधाळ चंद्रप्रकाशात जंगलाचा अवर्णनीय आनंद घेतला. बुद्धपौर्णिमेच्या निमित्ताने हौशी वन्यजीव गणना पार पडली. ताडोबाचा बफर क्षेत्रातील लोखंडी मचाण 57 आणि जिल्हाभरात सुमारे 100 मचाणी सज्ज करण्यात आल्या होत्या. एका मचाणीवर 2 ते 4 प्रगणक बसण्याची सोय करण्यात आली होती. या dramatic अनुभवात जंगलाचा आणि वन्यजीवांचा अनुभव घेणे ताडोबात दाखल झालेल्या वन्यजीवप्रेमींसाठी पर्वणी ठरली. यात शेकडोच्या संख्येत पक्षी-प्राणी.yz दर्शन झाले. ऐन मध्यरात्री जोरदार पाऊससरींनी आनंदात काही काळ व्यत्यय आणला. निसर्गानुभव या उपक्रमात ताडोबाच्या बफर क्षेत्रातील 57 लोखंडी मचाण तर जिल्हाभरात सुमारे 100 मचाणी सज्ज झाल्या होत्या. एका मचाणीवर क्षमतेनुसार 2 ते 4 प्रगणक बसू शकतील अशी व्यवस्था केली गेली. बुद्ध पौर्णिमेचा चंद्र तेजोमय असल्याने जंगलाचा आणि वन्यजीवांचा अनुभव घेणे ताडोबात दाखल झालेल्या वन्यजीवप्रेमींसाठी पर्वणी ठरली.0
0
Report
Advertisement
वासिम बाजार में सोयाबीन कीमतें रिकॉर्ड ऊंचाई पर, क्विंटल 6200 रुपये तक पहुंचा
Washim, Maharashtra:वाशिम: सोयाबीनच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. सध्या सोयाबीनचा दर प्रति क्विंटल 6200 रुपयांपर्यंत पोहोचला असून हा आतापर्यंतचा उच्चांक मानला जात आहे. या दरवाढीमुळे बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे चित्र दिसून येत आहे. दरवाढीचा परिणाम आता घरगुती बियाण्यांवरही होण्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे बियाण्यांचे दरही वाढू शकतात. आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाण्यांची मागणी वाढण्याची शक्यता असल्यामुळे बियाण्यांचे दरही वाढू शकतात.0
0
Report
शिंदे की अनुपस्थिति के कारण कोरेगांव दौरे पर राजनीति गरम
Satara, Maharashtra:सातारा _पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या कोरेगाव दौऱ्यातील कार्यक्रमांना आमदार महेश शिंदे अनुपस्थित राहिल्याने चर्चा रंगल्या. यावर शिंदे यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे उपस्थित राहता आले नसल्याचे स्पष्ट केले.ताकद कमी झाल्याच्या चर्चांवर “जनतेलाच विचारा” असे सांगत त्यांनी प्रत्युत्तर दिले. काही कार्यकर्ते शिवसेनेत गेल्याबाबत “पक्ष वाढवणे चांगले आहे, माझे सहकार्य राहील,” अशी भूमिका त्यांनी घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संघर्षाच्या चर्चांना त्यांनी फेटाळत “हा संघर्ष मीडियाने वाढवला आहे,” असे म्हटले. तसेच काही कार्यकर्त्यांच्या जाण्याला त्यांनी फारसे महत्त्व नसल्याचे स्पष्ट केले. “काम केले तर जनता स्वीकारेल, नाहीतर घरी पाठवेल,” असे म्हणत शिंदे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.0
0
Report
जालना में भीषण गर्मी में पानी की कमी, महिलाएं 2 किमी पानी के लिए रोज चलतीं
Jalna, Maharashtra:जालना : जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई,भर उन्हात २ किलोमीटर जाऊन विहिरीतून पाणी शेंदून भागवावी लागते पाण्याची गरज(पॅकेज) अँकर :सध्या जालना जिल्ह्यात तिव्र पाणीटंचाई जाणवतीय.अनेक गावातील पाण्याचे स्त्रोत वाढत्या तापमानामुळे आटलेत.तर काही गावात मोजक्याच विहिरीत पाणी शिल्लक असल्यानं याच विहीरीतून भर उन्हात पाणी शेंदून काढत पाण्याची गरज पूर्ण करण्याची वेळ महिलांवर आलीय.बघूया जालना जिल्ह्यातील पाणीटंचाईवरचा हा स्पेशल रिपोर्ट. व्हिओ:०१: सध्या जालना जिल्ह्यात तापमानाचा पारा 42 डिग्री सेल्सिअसपर्यत गेलाय.अशा कडक उन्हात भोकरदन तालुक्यातील जानेफळ गायकवाड गावातील महिलांवर गावातील एकमेव विहिरीतून पाणी शेंदून काढण्याची वेळ आलीय.गावात नळाला पाणी येत नाही.त्यामुळे भर उन्हात गावातील महिलांवर विहिरीतून हाताने पाणी शेंदून काढण्याची वेळ आलीय.गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून गावातील महिला याच विहिरीतून पाणी काढून दररोजच्या पाण्याची भूक भागवतायत. बाईट :०१:ग्रामस्थ महिला( निळ्या रंगाची साडी असलेली महिला) बाईट : ग्रामस्थ महिला(काळी साडी असलेली महिला) व्हिओ :०२: गावच्या परिसरातील पाण्याचे स्रोत कोरडे पडल्यानं याच गावातील महिलांना दररोज 2 किलोमीटर पर्यत पाण्यासाठी पायपीट करावी लागते.त्यामुळे गावातील पाणीप्रश्न सोडवण्याची मागणी महिलांनी केलीय. बाईट :०३: ग्रामस्थ महिला(गुलाबी रंगाची साडी असलेली महिला) व्हिओ :०३: सध्या जालना जिल्ह्यातील व्हिओ:०३:सध्या जालना जिल्ह्यातील 16 गावं आणि 23 वाड्यांना 31 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरूय.मात्र अनेक गावांची मागणी असूनही अजूनही या गावांचे टँकर सुरू करण्याबाबतचे प्रस्ताव मंजूर झालेले नाही.त्यामुळे रखडलेल्या प्रस्तावाबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन पाणीटंचाई असलेल्या गावात टँकर सुरू करावे एवढीच ग्रामस्थांची माफक अपेक्षाय. नितेश महाजन,झी-२४ तास,जालना0
0
Report
Advertisement
नवापूर में बर्ड फ्लू से पोल्ट्री उद्योग को करोड़ों का नुकसान, कलिंग तेज
Dhule, Maharashtra:देशाचं पोल्ट्री हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवापूरला बर्ड फ्लूने विळखा घातला आहे. बर्ड फ्लू च्या विळख्यानंतर आता प्रशासन गतिमान पावला उचलत, बाधित क्षेत्राला निर्जंतुकीकरण करण्याच कामं युद्ध पातळीवर करत आहे. सुमारे दीड लाख कोंबड्या तर दहा लाखांपर्यंत अंडी नष्ट केली जाणार असल्याचा पातळी माहिती समोर आली आहे. नवापूरमध्ये तिसऱ्यांदा बर्ड फ्लूचा लागण झाल्याने पोल्ट्री व्यवसायिकाच्या कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. बर्ड फ्लू बाधित क्षेत्राला प्रतिबंधित करण्यात आलेले आहे. तसेच पशुसंवर्धन विभागाकडून 25 पथक तयार करून बाधित क्षेत्र तील कोंबड्या कलिंग करण्याचं काम केलं जात आहे. तसेच बाधित अंडी देखील नष्ट करण्यात येणारा असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिलेली आहे. आवश्यकता भासल्यास बाहेरच्या जिल्ह्यातून पथक बोलावली जातील अशी माहिती देखील पशुसंवर्धन विभागाने दिली आहे. सुरुवातीला बाधित पोल्ट्री फार्मचा पंचनामा करण्यात येत असून, त्यानंतर प्रत्येक कोंबडीचे शास्त्रशुद्ध पद्धतीने कलिंग करून त्या पोत्यांमध्ये भरून खोल खड्ड्यात पुरल्या जात आहेत. बर्ड फ्लूची पुष्टी झाल्यानंतर प्रशासनाने कारवाईचा वेग वाढवला आहे. सुरुवातीला काही अडचणींमुळे कलिंग प्रक्रियेला उशीर झाला असला, तरी आता सात पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचे कलिंग करण्यात येत आहे. यासोबतच मोठ्या प्रमाणावर अंडी आणि पशुखाद्यही नष्ट करण्यात येणार आहे. ही संपूर्ण कलिंग प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सुमारे पाच दिवसांचा कालावधी लागणार असून, पोल्ट्री व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली असून, मोठ्या पक्षासाठी १४० रुपये, लहान पक्षासाठी १२० रुपये आणि प्रत्येक अंड्यासाठी ४ रुपये अशी भरपाई दिली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. बाइट: संजय खाचने पशुसंवर्धन सहआयुक्त. नंदी अंडी देणारा एका पक्षी वाढविण्यासाठी ५०० रुपये खर्च, मात्र शासनाकडून १४० भरपाई, मिळत असल्याने पोल्ट्री असोसिएशनचा संताप व्यक्त केला आहे. बर्ड फ्युचर हे संकट परिसरातील १२ लाख पक्षांवर आलं असूम, पहिल्या टप्प्यात १ किमी परिसरात कलिंग सुरू आहे. बर्ड फ्युच्या मगरमीठीमुळे पोल्ट्री व्यवसायिकांमध्ये मोठी चिंता पसरली आहे. तिसऱ्यांदा हा संसर्ग आढळल्याने कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे. नवापूर परिसरात सुमारे १२ लाख पक्षी असून, परिस्थिती गंभीर झाल्यास मोठ्या प्रमाणावर कलिंग करण्याची वेळ येऊ शकते. पहिल्या टप्प्यात एक किलोमीटर परिसरातील पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचे कलिंग करण्यात येणार आहे. २००६ आणि २०२१ नंतर आता २०२६ मध्ये पुन्हा बर्ड फ्लू आल्याने पोल्ट्री व्यवसाय पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. बाइट: आरिफ बलोचिय, अध्यक्ष, पोल्ट्री असोसिएशनचे. नवापूर परिसरामध्ये बर्ड फ्लूच्या लागण मुळे अंड्यांचा पुरवठा विस्कलीत झाला असून, याचा मोठा आर्थिक फटका या परिसरातील अर्थव्यवस्थेला बसणार आहे. करोडो रुपयांच् नुकसान व्यावसायिकांना सोसावा लागणार असून, या ठिकाणी बेरोजगारी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.0
0
Report
Amol Mitkari के ट्वीट से NCP में हलचल, बोले- दरवाज़ा बंद हुआ तो उंगलियाँ दबीं
Akola, Maharashtra:राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. “जब तुमने मेरे लिए दरवाज़ा बंद किया, तब मेरी उंगलियां उस चौखट में दब रही थीं.. #कडवा सच” असे ट्विट त्यांनी केले होते. दरम्यान, सोशल मीडियावर व्यक्त होताना त्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या या ट्विटचा विधानपरिषद उमेदवारीशी कोणताही संबंध नाही.“मी कधीही उमेदवारी मागितलेली नाही, फक्त पक्षाकडे माझी गरज आहे की नाही, एवढंच विचारलं,”असे त्यांनी सांगितले.पक्षात आपली उपयुक्तता संपली असेल तर वारंवार अपमान सहन करण्यापेक्षा शांत राहणे योग्य, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच, उर्दू शायरीच्या माध्यमातून त्यांनी आपली मनस्थिती मांडत साधेपणा आणि प्रामाणिकपणावर भर दिला.“फटी हुई झोळी घेऊन फिरणारे आहोत,” असे म्हणत त्यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट केली.0
0
Report
मिरा-भायंदर में 4.82 करोड़ के जप्त माल नागरिकों को वापस, पुलिस ने सौंपा
Mira Bhayandar, Maharashtra:मिरा-भाईंदर : ब्रेकिंग परिमंडळ-१ कडून जप्त मुद्देमाल तक्रारदारांना परत मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-१ तर्फे तब्बल ४ कोटी ८२ लाख किमतीचा जप्त मुद्देमाल तक्रारदारांना परत करण्यात आला आहे. यामध्ये 3.03 कोटींचे सोन्याचे दागिने, 4 लाख ४६ हजारांचा चांदी आणि ₹27 लाख ४३ हजार किमतीचे मोबाईल नागरिकांना सुपूर्द करण्यात आले. या उपक्रमामुळे पोलिसांवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे दिसून येत आहे. पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर आयुक्त दत्तात्रय शिंदे आणि उपायुक्त राहुल चव्हाण यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.0
0
Report
Advertisement
