445001
यवतमाळ तालुका काँग्रेस अध्यक्षावर भरचौकात चाकुहल्ला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहराच्या मध्यवस्तीत गजबजलेल्या दत्त चौकामध्ये भरदिवसा प्राणघातक हल्ल्याची घटना घडल्याने वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रामायण हॉटेल समोर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रमेश भीसणकर यांच्यावर दोन आरोपींनी चाकूने हल्ला चढविला, यावेळी भीसनकर यांनी जखमी अवस्थेत एकाच्या हातून चाकू हिसकावल्याने दोघेही पसार झाले, त्यानंतर जखमी भीसणकर हे स्वतः ऑटोने रुग्णालयात पोहोचले. दरम्यान हा थरार शेकडो लोकांपुढे सुरू असताना कुणीही त्यांच्या बचावासाठी पुढे आले नाही.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
APMC परिसर में ट्रक के नीचे दो मृत: मौत की वजह अभी स्पष्ट नहीं
Navi Mumbai, Maharashtra:वाशी सेक्टर 19 एपीएमसी बाजाराच्या परिसरात दोन जणांचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आलेय. याठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रक पार्किंग केले जात असून या ट्रक खालीच दोघांचा मृतदेह आढळलाय. मयत इसम ट्रक चालक आणि वाहक असून नेहमी नशेत असायचे. या दोन्हींच्या मृत्यू अति नशा केल्याने झालाय की विषारी पदार्थ प्राशन केल्याने झालाय याचा तपास पोलिस करत आहेत. दोघांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात दाखल केले असून याचा रिपोर्ट आल्यावरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. एपीएमसी पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. navi mumbai0
0
Report
गडचिरोली में आत्मसमर्पित नक्सलियों से प्रशासन का संवाद और पुनर्वसन सहायता
Gadchiroli, Maharashtra:राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह वरिष्ठ अधिकायांनी आज गडचिरोलीत आत्मसमर्पित नक्षल सदस्यांशी संवाद साधला. कार्यक्रमात आत्मसमर्पित नक्षल सदस्यांना विविध साहित्यांचे वितरण करण्यात आले तर पुनर्वसन निधी धनादेशही वितरित करण्यात आले. आत्मसमर्पितांना मुख्य प्रवाहात समावून घेत सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे राज्याच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आजपर्यंत एकुण 819 नक्षलवाद्यानी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. नक्षलवाद संपुष्टात आल्यावर राज्य शासनाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्रात विकास कामांवर लक्ष केंद्रीत केले जात आहे. या कामांचे नियोजन व आढावा घेण्यासाठी वरीष्ठ अधिकारी वेगाने कार्यरत आहेत. गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने विविध नक्षल पुनर्वसन उपक्रमांच्या माध्यमातून आत्मसमर्पित सदस्यांना रोजगार, शिक्षण, आरोग्य, कृषी व स्वयंरोजगाराशी संबंधित सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. पोलीस महासंचालक दाते यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून शांतता, विकास व प्रगतीचा मार्ग स्वीकारणाया आत्मसमर्पित नक्सल सदस्यांचे कौतुक करुन त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.0
0
Report
चंद्रपुर के बाबूपेठ में जंगल से भटकता चीतल वन विभाग ने बचाया
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहरातील वर्दळीच्या बाबूपेठ भागातील महादेव मंदिर परिसरात जंगलातून भटकत आलेल्या चितळाची वनविभाग आणि वन्यजीव कार्यकर्त्यांनी केली सुटका चितळ जंगलातून घनदाट वस्तीच्या भागात आल्यावर भटक्या कुत्र्यांनी त्याचा पाठलाग करत त्याला जखमी केले. हा प्रकार लक्षात येताच वनविभाग आणि इको प्रो वन्यजीव संस्था सदस्य सक्रिय झाले. सुमारे दोन तास चाललेल्या अभियानानंतर चितळाला ताब्यात घेतल्यावर त्याला वनविभागाच्या सुपूर्द करण्यात आले. या भागात पाण्याच्या शोधात चितळ भटकत आल्याचा अंदाज व्यक्त होत आहे。0
0
Report
Advertisement
हिंगोली में तेज बारिश, वसमत में नुकसान की आशंका; किसानों में खुशी की लहर
Hingoli, Maharashtra:हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरासह ग्रामीण भागामध्ये आज दुपारनंतर वादळी वाऱ्यासह जोरदार स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली है हवामान विभागाने हिंगोली जिल्ह्यासाठी आज पावसाचा येलो अलर्ट दिला होता उसके अनुसार पावसाने हजेरी लावली है या वादळी वारे और पावसामुळे वसमत तालुक्यातील नुकसान शक्यता असली है मागील काही दिवसापासून उखाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असून या पावसामुळे बळीराजांमध्ये काहीस आनंदाचे वातावरण है कारण अशाच पद्धतीने जोरदार स्वरूपाचा पाऊस लवकर बरसावं और शेतातील पेरण्या वेळेत पूर्ण हों।0
0
Report
विरार पूर्वी के सामंतपाडा स्थित डेकोरेशन गोदाम में भीषण आग; 3 दमकल मौके पर, कोई जीवनहानि नहीं
Vasai-Virar, Maharashtra:ANC : विरार पूर्वेतील टोकरे ग्रामपंचायत हद्दीतील सामंतपाडा परिसरात असलेल्या डेकोरेशन कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे . अमूल डेअरीसमोरील या गोडाऊनमध्ये ठेवलेले मोठ्या प्रमाणातील शूटिंग व डेकोरेशनचे साहित्य आगीत जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून विरार परिसरात आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.0
0
Report
जळगाव-नाशिक महायुती में घमाशान: जळगाव सीट शिवसेना को नहीं मिली
Jalgaon, Maharashtra:जळगाव विधान परिषदेत जळगावची जागा शिवसेनेला न मिळाल्याने शिवसेनेमध्ये व गुलाबराव पाटळांमध्ये नाराजी .. आमदार एकनाथ खडसे विधान परिषदे निवडणुकीतील बंडखोरीसह लाडक्या बहिणी योजनेवरून एकनाथ खडसे यांची सरकारवर टीका जळगाव आणि नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. नाशिकची जागा भाजपाला आणि जळगावची जागा शिवसेनेला मिळावी, असा आग्रह शिवसेनेकडून होता. मात्र जळगावची जागा भाजपाच्या वाट्याला गेल्याने शिवसेनेत नाराजीचा सूर उमटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे. गुलाबराव पाटील आपल्या मुलासाठी उमेदवारी इच्छुक होते, मात्र ती न मिळाल्याने नाराजी व्यक्त झाल्याचा दावा खडसे यांनी केला. तसेच नाशिक आणि जळगाव या दोन्ही ठिकाणी बंडखोर उमेदवार माघार घेण्यास तयार नसल्याने महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिल्याचे त्यांनी म्हटले. भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांनाही नाशिक आणि जळगावमधील बंडखोरी रोखण्यात अपेक्षित यश मिळाले नसल्याची टीकाही खडसे यांनी केली. शिवसेना-भाजप संघर्ष नवीन नसून आमदार किशोर पाटील यांच्या प्रत्येक निवडणुकीत भाजपकडून बंडखोरी झाल्याचा दावा देखील त्यांनी केला. इतकेच नव्हे तर विधान परिषद निवडणुकांमध्ये घोडेबाजार होत असल्याच्या चर्चेवर भाष्य करत, पूर्वी उमेदवारीसाठी पैशांचे व्यवहार, पैठण्या आणि पाकिटांचे वाटप झाल्याचे गंभीर आरोपही खडसे यांनी केले. तर दुसऱीकडे लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका करत, निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने आणि नंतर लाखो महिलांना योजनेतून वगळणे ही फसवणूक असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.0
0
Report
Advertisement
ओबीसी जनगणना की मांग तेज नहीं तो देशव्यापी आंदोलन: सावता परिषद
Washim, Maharashtra:देशात सुरू असलेल्या जनगणनेत OBC समाजाची स्वतंत्र जातनिहाय नोंद करण्यात येत नसल्याचा आरोप करत वाशिम शहरात सावता परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय OBC जनगणना परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेला सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे, माजी आमदार हरिदास भदे, बळीराम सिरस्कार यांच्यासह OBC समाजातील विविध घटकांचे नेते उपस्थित होते.परिषदेत OBC जनगणना करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. सरकारने OBC जनगणनेची मागणी मान्य न केल्यास राज्यासह देशभर आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा कल्याण आखाडे यांनी यावेळी दिला。0
0
Report
बच्चू कडू: गोंडिया में प्रवेश कार्यक्रम में गरजे, सरकार पर बोला तीखा हमला
Bhandara, Maharashtra:बच्चू कडू मंत्री जरी आमचा असेल पण चुकत असेल तर ठोकल्याशिवाय राहून नका... गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथील पक्ष प्रवेश कार्यक्रमात बच्चू कडू बोलत होते0
0
Report
मनचर में करियर मार्गदर्शन मेळा और गुणवंत विद्यार्थियों का सम्मान
Shirur, Maharashtra:दहावी आणि बारावीनंतरचा काळ हा विद्यार्थ्यांच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारा आणि त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो, असे प्रतिपादन माजी सहकार मंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे. मंचर येथे आयोजित 'करिअर मार्गदर्शन मेळावा आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात' ते बोलत होते. या अभ्यासपूर्ण मेळाव्यात ज्येष्ठ करिअर मार्गदर्शन तज्ज्ञ डॉ. विवेक वेलणकर यांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील नवनवीन करिअर संधींबाबत सखोल मार्गदर्शन केले0
0
Report
Advertisement
जुना मुंबई-पुणे महामार्ग पर भक्तों की भीड़ से ट्रैफिक जाम
Varsoli, Maharashtra:छुट्ट्यांचा अखेरचा शनिवार-रविवार आणि कार्ला येथील एकवीरा देवीच्या दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांच्या गर्दीमुळे जुना मुंबई–पुणे महामार्ग रविवारी वाहतूक कोंडीत अडकला. कार्ला फाटा, एकवीरा मंदिर मार्ग तसेच परिसरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. लोणावळा, भुशी धरण आणि इतर पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या पर्यटकांची वाढलेली वर्दळही कोंडीस कारणीभूत ठरली. वाहतूक पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले, मात्र वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहनचालकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली...0
0
Report
मनमाड़ में भारी बारिश से दीवार गिरने से एक की मौत, महिला घायल
Nashik, Maharashtra:मनमाड शहरात पावसामुळे भिंत कोसळून एकाचा मृत्यू... - एक महिला जखमी... Anc: नाशिकच्या मनमाड शहर परिसरात मेघगर्जनेसह पावसाने तडाकेबंध हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जोरदार पाऊस आणि वादळ वाऱ्यामुळे शहरातील मातोश्री रमाबाई नगर परिसरात शेजारील बांधकाम सुरू असलेले भिंत पडल्याने दोन जण गंभीरित्या जखमी झाले होते. या दुर्दैवी घटनेत संजय विठ्ठल संसारे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून त्यांची पत्नी आशा संसारे यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरले आहे.0
0
Report
सांगली शहर समेत क्षेत्र में मानसूनपूर्व वर्षा ने तेज़ रफ्तार पकड़ी
Sangli, Maharashtra:सांगली शहरासह परिसरात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी अँकर - सांगली शहरामध्ये मान्सूनपूर्व पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सांगली शहरासह परिसरामध्ये मान्सूनपूर्व पाऊसाची दमदार हजेरी पाहायला मिळत आहे. सकाळी उकाडा आणि सायंकाळी पाऊस असे चित्र काहीसं गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सांगली शहरांमध्ये अनुभवायला मिळत आहे. आज सायंकाळी देखील विजाचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली.0
0
Report
Advertisement
कराड़ में विधानपरिषद प्रचार में जगताप बनाम गोर के बीच तीखी तकरार
Satara, Maharashtra:सातारा- सांगली विधान परिषदेच्या मतदारांचा कराड येथील फर्न हॉटेलमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विरोधी उमेदवार अभयसिंह जगतापांती उंची वाढली आहे, मात्र, अजून बौधिक वाढ झाली नाही. तसेच अदृश्य शक्तीची ताकद किती आहे, 22 तारखेला समजेल आणि भ्रमाचा भोपळा फुटेल असा टोला शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभयसिंह जगताप यांना लगावला आहे. तर माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडे 600 मतें असल्याचा दावा केला होता, त्याला जयकुमार गोरेंनी खोचक टोला लगावला आहे. धैर्यशील मोहिते पाटलांचा आकडा चुकला त्याच्याकडे 1200 मतें त्याच्याकडे दिसतायत असा खोचक टोला लगावला. शरद पवार यांनी गॅस महागाई बाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे खूप मोठे, जेष्ठ नेते आहेत. आखातील देशातील युद्धामुळे काही वस्तूचे भाव वाढत आहेत. मात्र तरीपण महागाईच्या बाबत सरकारकडून चांगल काम असून महागाई कंट्रोल करण्याचं काम मोदीची करत आहेत.0
0
Report
आटपाड़ी में तहसीलदार शीतल बंडगर ने अवैध रेत माफिया के खिलाफ दीर्घ पाठलाग
Sangli, Maharashtra:स्लग - अवैध वाळू वाहतुकी विरोधात महिला तहसीलदाराची धडक कारवाई, दीड तास वाळू तस्करी करणाऱ्या वाहनाचा केला थरारक पाठलाग.. मानगंगा नदीमध्ये सुरू असलेल्या अवैध वाळू तस्करीवर तहसीलदार शीतल बंडगर यांनी धाडसी कारवाई केली आहे, रविवारी आज पहाटे तब्बल दीड तास पाठलाग करून अवैध वाहतूक रोखून कारवाई केली आहे. त्यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. भल्या पहाटे स्वतः महिला तहसीलदार बंडगर यांनी माणगंगा नदीत सुरू असलेले अवैध वळू उपसावर कारवाईसाठी नदीपात्राजवळ पोहोचल्या त्यावेळी त्यांच्यासमोर एक अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर दिसून आला, त्यानंतर थरारक पद्धतीने तहसीलदार बंडगर यांनी गाडीचा पाठलाग केला. मात्र तहसीलदारांच्या गाडीला चकवा देत वाळू माफियाने सोलापूर जिल्ह्यात पोबारा केला. मात्र तहसीलदारांच्या थरारक पाठलागच्या घटनेमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत0
0
Report
ओबीसी आरक्षण बचाओ के संकेत: लक्ष्मण हाके ने दिया चेतावनी
Sangli, Maharashtra:स्लग - तुमचा डीएनए ओबीसीचा असेल,तर ओबीसींचा आरक्षण वाचवा,अन्यथा तुम्हाला घरी बसवावं लागेल - लक्ष्मण हाके. अँकर - तुमचा डीएनए ओबीसीचा असेल तर ओबीसींचा आरक्षण वाचवा,अन्यथा तुम्हाला घरी बसवावं लागेल,निवडणूकीत तुम्हाला बघून घेऊ,असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.बेरोजगार तरुणांना झुरळ म्हणल्यावर देशातला झेनजी,कॉकरोच जनता पार्टी एकवटला आहे,आम्ही तर 60% ओबीसी आहोत. ओबीसी हायकोर्टला तर सत्ताधारी कारखानदार भांडवलदार यांना,घरी बसावं लागेल,असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे,ते सांगलीत बोलत होते. बाईट - लक्ष्मण हक्के - ओबीसी नेते. अँकर - जे ओबीसींना,ते मराठा समाजाला,हे आम्हाला मान्य नाही,ज्या दिवशी ओबीसी राजकीय भूमिका घेईल,त्यादिवशी तुम्हाला पळता भुई थोडी होईल,असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हक्के यांनी दिला आहे.ज्या दिवशी ओबीसी म्हणून ओबीसी एकत्र येईल, त्यादिवशी प्रस्थापित भांडवलदार वतनदारांना घरी बसवू,असं विधान देखील हक्के यांनी दिला आहे. बाईट - लक्ष्मण हक्के - ओबीसी नेते.0
0
Report
Advertisement
