445001
यवतमाळ तालुका काँग्रेस अध्यक्षावर भरचौकात चाकुहल्ला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहराच्या मध्यवस्तीत गजबजलेल्या दत्त चौकामध्ये भरदिवसा प्राणघातक हल्ल्याची घटना घडल्याने वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रामायण हॉटेल समोर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रमेश भीसणकर यांच्यावर दोन आरोपींनी चाकूने हल्ला चढविला, यावेळी भीसनकर यांनी जखमी अवस्थेत एकाच्या हातून चाकू हिसकावल्याने दोघेही पसार झाले, त्यानंतर जखमी भीसणकर हे स्वतः ऑटोने रुग्णालयात पोहोचले. दरम्यान हा थरार शेकडो लोकांपुढे सुरू असताना कुणीही त्यांच्या बचावासाठी पुढे आले नाही.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
बुलढाणा में घाटाखाली बारिश की वापसी, आज पूरे जिले में बारिश की संभावना
Buldhana, Maharashtra:बुलढाणा वीकेंडला घाटाखाली पावसाचे कमबॅक.. जिल्ह्यात आज दिवसभर पाऊस बरसण्याची शक्यता..! बहुतांश ठिकाणी रात्रीपासून तुरळक पावसाला सुरुवात..! जिल्ह्यात दमदार पावसाने बॅटिंग केल्यानंतर दोन दिवसापासून पावसाने काही प्रमाणात अनेक ठिकाणी विश्रांती घेतली होती. यामध्ये घाटाखालील अनेक तालुक्यांचा समावेश आहे .तर काल रात्री व सकाळीच पुन्हा एकदा पावसाने संपूर्ण घाटाखालील परिसर व्यापला असून तुरळक पावसाला सुरुवात झाल्याने आज दिवसभर पावसाची बॅटिंग सुरू राहू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे एकंदरीत अनेक ठिकाणी अद्यापही पेरणी या पाहिजेत असा वेग न घेतल्याने पाऊस दमदार होणे आवश्यक असल्याचे बोलल्या जात आहे.0
0
Report
यवतमाल में भारी बारिश से नदियाँ उफान पर, खेत पानी में डूबे, फसलें भारी नुकसान
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात संततधार पाऊस पडल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहे. शेतात पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान होत असून, शेतीकामे खोळंबली आहे. मोठ्या प्रमाणात शेतजमीन खरडून निघाली आहे. जमीन चिबडल्याने सोयाबीन, कपाशी, तुरीचे रोप सडण्याचा धोका निर्माण झाला आहे. दिग्रस तालुक्यातील तूप टाकळी येथे मोठ्या प्रमाणात जमिनीतील माती खरडून निघाल्याने, दगड धोंडे बाहेर आले आहे. शेतात सांगाळलेले पाणी बाहेर काढण्याची मोठी कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे.0
0
Report
सोलापुर में पेड़ा विक्रेताओं के खिलाफ FDA छापा: अक्कलकोट मंदिर परिसर में छापेमारी
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - शिर्डीनंतर अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर परिसरातील पेढे विक्रेते तुकाराम मुंढे यांच्या रडारवर - तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर सोलापुरातील अन्न औषध प्रशासन यंत्रणा लागली कामाला - अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरातील पेढे विक्रेत्यांवर अन्न औषध प्रशासनाची धाड - मंदिर परिसरात विक्री होणारे पेढे, बर्फी, बेसनचे लाडू याचे अनेक नमुने ताब्यात घेत पाठवले प्रयोगशाळेत तपासणीला - श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरातील पेढे विक्रेत्यांसह दूध डेअरी, रेस्टोरंटची देखील अन्न औषध प्रशासनाकडून तपासणी - मंदिर परिसरातील 13 विक्रेत्यांकडून 16 हजार रुपयांचा दंड वसुल - तुकाराम मुंढे यांच्या धास्तीने आता स्वामी समर्थ नगरीतील पेढे विक्रेत्यांची उडाली झोप - तुकाराम मुंढे यांच्या आदेशाने झालेल्या धाडसी कारवाईचे स्वामी भक्तांकडून स्वागत0
0
Report
Advertisement
सातारा के पश्चिम हिस्से में बारिश तेज, महाबळेश्वर में एक दिन में 233 मि.मी. बारिश
Satara, Maharashtra:सातारा - सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात सध्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. पावसाचा जोर वाढतच चालला असून महाराष्ट्राचे मिनी कश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर मध्ये तब्बल एका दिवसात 233 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर कोयना पाटण पाणलोट क्षेत्रात देखील पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणांमध्ये होणारी पाण्याची आवक देखील मोठ्या प्रमाणात होते आहे. गेल्या तीन चार दिवसापासून सुरू असलेल्या या मुसळधार पावसामुळे पेरण्यांशी लगबग सुरू झाली आहे.0
0
Report
नाशिक में बारिश किसानों को प्रभावित कर गई: फसलें संकट में
Nashik, Maharashtra:नाशिकमध्ये पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका अपुऱ्या पावसामुळे उडीद, मूग आणि भुईमूग पिकांच्या पेरण्यांवर परिणाम होण्याची शक्यता पाऊस आणखी लांबल्यास भुईमूग, मूग, उडीद वगळून इतर पिकांची पेरणी करावी लागू शकते; कृषी विभागाचा अंदाज उशिरा पेरणी झाल्यास पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी पक्की पावती घ्यावी; कृषी विभागाचे आवाहन जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १० टक्के पेरण्या पूर्ण अपेक्षित २०० मिमी पावसाऐवजी आतापर्यंत फक्त ६६ मिमी पावसाची नोंद ८ जुलैनंतर पेरणी करणार असल्यास सोयाबीन, मका, बाजरी, भुईमूग आणि कापूस पिकांचा विचार करण्याचा कृषी विभागाचा सल्ला0
0
Report
नासिक की साक्षी जैन CA फाउंडेशन में ऑल इंडिया रैंक-1 के साथ देशभर में प्रथम
Nashik, Maharashtra:नाशिकमधील जैन ओसवाल बोर्डिंगची विद्यार्थिनी साक्षी जैन सीए फाउंडेशन परीक्षेत संपूर्ण देशभरातून प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झाली. तिच्या या दणदणीत यशाने नाशिकच्या शिरपेचात मानावा तुरा खोवलाय. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटण्ट्स ऑफ इंडियाच्या वतीने ही परीक्षा घेण्यात आली होती. त्यात साक्षीने ४०० पैकी ३७१ गुण मिळवत 'ऑल इंडिया रँक-१' मिळविली. साक्षी ही मूळची पाचोरा येथील असून, ती नाशिकमधील जैन ओसवाल बोर्डिंगमध्ये राहून शिकत होती. या यशात तिचे पालक व शिक्षकांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या गौरवास्पद कामगिरीमुळे विविध स्तरांतून तिचे अभिनंदन केले जात आहे.0
0
Report
Advertisement
बैल-जोड़ों और ट्रैक्टर की कमी से अकोले के परिवार ने पेरणी की, वीडियो वायरल
Shirdi, Maharashtra:ना बैलाचे औत , ना ट्रॅक्टर ; अखेर स्वतःच्या कुटुंबालाच कुळवाला जुंपून केली पेरणी. अकोले तालुक्यातील जामगाव येथील विदारक वास्तव. पेरणीचा हंगाम सुरू , पण बैलजोडी और ट्रॅक्टरचा तुटवडा. आर्थिक परिस्थिती हलाखीची ; वेळेत पेरणीचा मोठा प्रश्न. मुलगा आणि भाऊ पाभारीला, तर पत्नी व भावजय कुळव ओढत असतानाचा व्हिडिओ समोर. कुटुंबातील पाच जणांच्या श्रमातून अर्धा एकर भुईमुगाची पेरणी पूर्ण. यांत्रिकीकरणामुळे बैलजोड्या कमी , पावसानंतर ट्रॅक्टरसाठी प्रचंड गर्दी. अडीच एकर कोरडवाहू शेतीवर वर्षभराच्या उदरनिर्वाहाची धडपड. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल ; बळीराजाच्या असहाय्य वास्तवाची पुन्हा एकदा प्रचिती. अकोले तालुक्यातील आदिवासी डोंगर परिसरातील प्रकार. शेतीच्या संकटाचे हृदय हेलावून टाकणारे दृश्य ; प्रशासनानेही या लक्ष देण्याची गरज.0
0
Report
पालखी मार्ग की सुरक्षा के इंतजाम: पुलिस आयुक्त ने मंदिर में समीक्षा की
Pimpri-Chinchwad, Maharashtra:ज्ञानेश्वर महाराज की पालखी आठ तारीख को प्रस्थान करेगी। पिंपरी चिंचवड़ के पुलिस आयुक्त विनय कुमार चौबे ने माऊली समाधि मंदिर में सुरक्षा की समीक्षा की और पालखी मार्ग की चेकिंग की। चौबे ने पालखी मार्ग का निरीक्षण किया। देवस्थान समिति की ओर से चौबे का सत्कार किया गया।0
0
Report
सोलापुर के मुद्दों पर मुख्यमंत्री फडणवीस ने तुरंत कार्रवाई, IT पार्क के लिए जमीन तय
Solapur, Maharashtra:सोलापूरच्या विविध जिव्हाळ्याच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांनी लावली तब्बल दीड तासांची बैठक. अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या या बैठकीमध्ये उड्डाणपुलासह आयटी पार्क, शहराची पाणीपुरवठा वितरण व्यवस्था, आणि विमानसेवेबाबत घेण्यात आले सकारात्मक निर्णय. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आ. देवेंद्र कोठे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित. सोलापूरची विमानसेवा बंद करणाऱ्या कंपनीला दिली चपराक तर स्टार एअर कंपनीला देण्यात आली कारणे दाखवा नोटीस. एमआयडीसीला आयटी पार्कचे काम तातडीने सुरू करण्याच्या देण्यात आल्या सूचना यासोबतच आयटी पार्क साठी सात दिवसात मिळणार 50 एकर जागा. तसेच आठ वर्षात माळढوك न दिसल्याने बोरामणी विमानतळाचा पुन्हा सर्वे करण्याचे देण्यात आले आदेश. सोलापूरच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेतल्याने आ. देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार.0
0
Report
Advertisement
वाशीम के रेशन डीलर कमिशन न मिलने से आर्थिक संकट का सामना
Washim, Maharashtra:स्वस्त धान्य दुकानदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून शासनाकडून मिळणारे कमिशन त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. त्यामुळे दुकानाचे भाडे, वीज बिल,कर्मचारी वेतन तसेच घरखर्च भागवताना त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जानेवारी ते जून या कालावधीतील कमिशन अद्याप प्रलंबित असून याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही निधी मिळाला नसल्याने थकीत कमिशन तातडीने अदा करावे, अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदारांनी केली आहे.0
0
Report
नाफ़ेड और NCCF ने प्याज़ खरीद दाम बढ़ाए, नई दर 1875 प्रति क्विंटल
Nashik, Maharashtra:- नाफेड और NCCF कडून कांद्याच्या खरेदी दरात पुन्हा वाढ - क्विंटलमागे १४५ रुपयांची वाढ, नवीन दर १,८७५ रुपये प्रति क्विंटल - आजपासून सुधारित दर लागू होण्याची शक्यता - ए ग्रेडसह सर्व प्रकारच्या कांद्याची खरेदी करण्याचा निर्णय - यापूर्वी १९ जून रोजी १,७३० रुपये प्रति क्विंटल दर जाहीर करण्यात आला होता - मात्र, वाढीव दर असूनही नाफेड आणि NCCF खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांची पाठ - ३० जूनपर्यंतच्या खरेदी उद्दिष्टाच्या तुलनेत ४० टक्के खरेदीही पूर्ण न झाल्याची माहिती0
0
Report
निलंगा तालुक्य में आठ दिनों में चार किसान आत्महत्या: कर्ज और आर्थिक संकट गहरा
Latur, Maharashtra:निलंगा तालुक्यात आठ दिवसांत चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या.... शेतकरी संकट पुन्हा ऐरणीवर... कर्जबाजारीपणा, आर्थिक विवंचना आणि पेरणीसाठी पैशांचा तुटवडा... चार कुटुंबांवर दुःखाचा डोंगर.... लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात अवघ्या आठ दिवसांत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्जाचा वाढता बोजा, पेरणीसाठी पैशांची चणचण आणि आर्थिक विवंचना यामुळे या शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर येत आहे. या सलग आत्महत्यांमुळे शेतकरी संकट पुन्हा एकदा ऐरणीवर आले असून, प्रशासन आणि सरकारच्या उपाययोजनांबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.0
0
Report
Advertisement
रिसोड में खेत से चोरी: 69,500 रुपये के माल की चोरी, तीन आरोपी गिरफ्तार
Washim, Maharashtra:रिसोड जिल्ह्यातील हराळ येथील शेतकरी अजिंक्य विलास खैरे यांच्या घरातून चोरीला गेलेला 69 हजार 500 रुपयांचा शेतीमाल रिसोड पोलिसांनी हस्तगत केला आहे. सोयाबीनची 7 पोती आणि तुरीची 2 पोती असा एकूण 9 क्विंटल माल चोरीला गेला होता. तपास दरम्यान पोलिसांनी हराळ येथील गजानन कुंडलीक सरकटे, अमोल माणिक सरकटे आणि दीपक नामदेव सरकटे या तिघांना अटक केली. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर चोरीस गेलेला संपूर्ण शेतीमाल जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे परिसरातील शेतमाल चोरीच्या इतर घटनांचाही उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.0
0
Report
राहुरी में निजी स्कूल बस पलटने से 20–25 छात्राएं घायल, जान की हानि नहीं
Ahilyanagar, Maharashtra:आहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीत काल सायंकाळी खासगी शाळेची विद्यार्थिनींना घेऊन जाणारी स्कूल बस अचानक पलटी झाल्याने २० ते २५ विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या आहेत. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राहुरी शहरातील एका खासगी शाळेची स्कूल बस सायंकाळी विद्यार्थिनीांना घरी सोडण्यासाठी निघाली होती. रेल्वे स्टेशन, तांदूळवाडी, कोंढवड आणि शिलेगाव परिसरातील सुमारे ५० ते ५५ विद्यार्थिनी बसमध्ये होत्या. दरम्यान त्याचवेळी बसचा रॉड तुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन पलटी झाली. या दुर्घटनेत २० ते २५ विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आणि जखमी विद्यार्थिनींना राहुरीतील विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातानंतर स्कूल बसच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.0
0
Report
सोलापुर महापालिका के लिपिक पर SIR कार्य में लापरवाही का मुकदमा दर्ज
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - SIR च्या कामात हलगर्जीपणा केल्याने सोलापुर महापालिकेच्या लिपिकाविरोधात गुन्हा दाखल SIR च्या कामात हलगर्जीपणा केल्याने सोलapur महापालिकेच्या लिपिकाविरोधात गुन्हा दाखल मतदार यादी पुनरीक्षण अर्थात SIR च्या कामात दिरंगाई, हलगर्जीपणा आणि टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत लिपिकविरोधात गुन्हा सोलोलापुर महापालिकेत लिपिक म्हणून कार्यरत असलेले रविकिरण मधुकर ढाले यांच्या विरोधात गुन्हा नोंद सोलापुर महापालिकेत सध्या SIR प्रक्रिया सुरु आहे, रविकिरण ढाले यांच्याकडे देखील SIR ची जबाबदारी आहे 27 जून रोजी त्यांना SIR साठीचे इन्यूमरेशन फॉर्म मतदारांना वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या मात्र ढाले यांनी हे फॉर्म ताब्यात घेतले नाहीत, वारंवार फोन करून देखील ते प्रतिसाद देत नव्हते त्यामुळे रविकिरण ढाले यांनी निवडणूक राष्ट्रीय कामात अडथळा आणल्याची फिर्याद सहायक मतदान अधिकारी रामचंद्र माळी यांनी पोलिसांत दिली आहे0
0
Report
Advertisement
