icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

पुणे-मुंबई एक्सप्रेसवे पर स्कोडा कार दर्दनाक हादसा, 2 की मौत, 3 घायल

Varsoli, Maharashtra:पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर स्कोडा गाडीचा भीषण अपघात झाला आहे... मुंबई कडून पुण्याकडे येणाऱ्या लेन वर हा अपघात झाला आहे... चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला असून घटनास्थळी आयआरबी यंत्रणा, पोलीस व ऍम्ब्युलन्स दाखल झाले.. गाडीत मध्ये एकूण 5 जण होते. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी डिव्हायडर ला जाऊन धडकली. डिव्हायडरचा पत्रा हा थेट गाडीमध्ये घुसल्याने गाडीत असलेले 2 जण जागीच ठार झाले. गाडीचे दरवाजे व पत्रा कापून गंभीर जखमी व मयत झालेल्यांना बाहेर काढण्यात आले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
0
0
Report

वर्धा में गरमी ने मचा दिया कहर, पारा 46.5°C

Wardha, Maharashtra:वर्ध्यात उष्णतेचा उच्चांक, पारा 46.5 अंशांवर नागरिक हैराण - कडक उन्हाचा तडाखा, दुपारच्या वेळेत शहरात शुकशुकाट - उष्माघाताचा धोका वाढला, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा ॲंकर - वर्धा जिल्ह्यात उष्णतेचा कहर कायम असून आज तापमानाने उच्चांक गाठला आहे. आज वर्ध्यात कमाल तापमान 46.5 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. सकाळपासूनच वर्ध्यात कडक उन्हाचा तडाखा जाणवत होता. दुपारपर्यंत तापमान 46.5 अंशांवर पोहोचल्याने जनजीवनावर परिणाम झाला. काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता व्यक्त जात आहेय..वर्ध्यातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी..
0
0
Report
Advertisement

सांगली में शरद पवार गुट के कार्यालय-घर पर पथराव, गाड़ियों की तोड़फोड़

Sangli, Maharashtra:सांगली के विटा में राष्ट्रवादी शरद पवार गट के पदाधिकारियों के घर-कार्यालय और गाड़ियों की तोड़फोड़ की घटना घटी। आमदार गोपीचंद पडळकर के कार्यकर्ताओं द्वारा तोड़फोड़ कराए जाने के आरोप राष्ट्रवादी कांग्रेस के सरचिटणीस महेश कुपाडे ने लगाए। मोबाइल पर एक स्टेटस पोस्ट करने के बाद संतप्त पडळकर समर्थकों ने फोन पर धमकी देकर व्यवसायिक कार्यालय की बड़े पैमाने पर तोड़फोड़ की। इसके साथ ही घर पर भी पत्थरबाजी कर दी गई, यह भी आरोप लगाया गया है; विटा थाने में कुपाडे द्वारा रिपोर्ट दर्ज कराई गई है और कठोर कार्रवाई की मांग की गई है।
0
0
Report
Advertisement

कोल्हापूर में 85 खतरनाक इमारतें, नोटिस के बावजूद मालिकों की अनदेखी

Kolhapur, Maharashtra:राज्यात धोकायदायक इमारती कोसळल्यानं अऩेकांचे बळी गेले आहेत. असा प्रकार कोल्हापूरातही घडु शकतात. शहरातील अनेक धोकायदक इमारती काढुन घेण्यासंदर्भात कोल्हापूर महानगरपालीकेनं संबधीतांना अनेक वेळा नोटीसा काढल्या, पण धोकादायक इमारतीच्या मालकांनी या नोटीसीला कच-याची टोपली दाखविली आहे. त्यामुळे पावसाळ्यात या इमारतींना धोका निर्माण होऊन पडू शकतात.. कोल्हापूर महानगरपालिकेन केलेल्या सर्वेक्षणामध्ये शहरात तब्बल 85 हुन अधिक धोकादायक इमारती असल्याच समोर आल आहे. या सर्वेक्षणानंतर कोल्हापूर महानगरपालीकेनं संबधीत इमारत मालकांना नोटिस लागू करून इमारत काढुन घेण्याची विनंती केली होती. पण बहुतांश धोकादायक इमारत मालकांनी या नोटीसीला केराची टोपली दाखवली आहे, त्यामुळे शहरात धोकादायक इमारती कधी पडतील याचा नियम नाही.. खर तर कोल्हापूर महानगरपालिकेन पुढाकार घेवुन धोकादायक इमारती उतरवून घ्यायला हवेत.. पण ढिम्म प्रशासनान याकडे लक्ष द्यायला तयार नाही, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय..
0
0
Report

डिज़ेल की कमी से नांदेड के ग्रामीण पंपों पर किसानों की लंबी कतारें

Nanded-Waghala, Maharashtra:डिझेलच्या तुटवाड्यामुळे ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांची रांगा लागल्याचे चित्र नांदेड जिल्ह्यातील हदगाव, हिमायतनगर, भोकर तालुक्यात दिसून आले. खरीप हंगाम जवळ आल्यामुळे शेतीचं मशागतीचं काम सुरू आहे. कमी वेळात जास्त मशागत होत असल्यामुळे शेतकरी ट्रॅक्टरने जमिनीची मशागत करत आहेत; परंतु डिझेल मिळत नसल्याने ते त्रस्त आहेत. तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपांवर पहाटेपासूनच लांबलांगी रांगा दिसत आहेत. तसेच कॅनमध्ये डिझेल घेण्यासाठी रांगा लागल्यात. काही ठिकाणी डिझेल संपल्याचे फलक लावण्यात आले असल्यामुळे नागरिकांना एक पंपातून दुसऱ्या पंपाकडे भटकंती करावी लागत आहे. उन्हात तास काही प्रतीक्षा करूनही इंधन मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
0
0
Report
Advertisement

अमरावती देश का सबसे गर्म शहर; तापमान 46°C पार, हीटवेव अगले पाँच दिनों तक जारी

Amravati, Maharashtra:देशात सर्वाधिक हॉट शहर म्हणून अमरावतीची नोंद; पारा पोहचला 46 अंशाच्या पुढे, पश्चिम विदर्भात पुढील पाच दिवस कायम राहणार उष्णतेची लाट अँकर :- दक्षिण अंदमानमध्ये मान्सून दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने केली असली तरी दुसरीकडे पश्चिम विदर्भात सूर्य अक्षरशः आग ओकत असल्याचे चित्र आहे. देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद अमरावती जिल्ह्यात झाली असून काल अमरावतीचा पारा तब्बल 46 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला. त्यामुळे अमरावती देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. विदर्भासह अमरावतीत सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवत असून दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. प्रचंड उकाड्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. Vo :१ अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा आणि नागपूरसह संपूर्ण पश्चिम विदर्भ सध्या उष्णतेच्या लाटेच्या विळख्यात सापडला आहे. हवामान खात्याने पुढील पाच दिवस विदर्भात हीट वेव्ह कायम राहण्याचा इशारा दिला आहे. दुपारच्या वेळी गरम वाऱ्यांचे फटके बसत असून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. परिणामी नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. अनेक भागात रस्ते ओस पडले असून बाजारपेठांमध्येही गर्दी कमी झाल्याचे दिसत आहे. Vo:२ दरम्यान या उन्हामुळे गेल्या दोन ते अडीच महिन्यात 15 उष्माघाताचे रुग्ण अमरावती जिल्ह्यामध्ये आढळले असून जिल्हा सामान्य रुग्णालयात या रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी पाठवले आहे. तसेच आतापर्यंत तीन ते चार रुग्णांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र अजून पर्यंत अधिकृत ही आकडेवारी पुढे आली नाही. काही काम करायचे असल्यास सकाळी करून घ्यावी व बाहेर जायचे असेल तर भरपूर पाणी प्यावे तसेच पोटभर नाश्ता करून बाहेर पडावे व उन्हात गडद कपडे न घालता पांढऱ्या कपड्यांचा वापर करावा आणि बाहेरील काम करायास संध्याकाळच्या वेळेचा उपयोग करण्याचे आव्हान अमरावती जिल्हा शल्य चिकित्सक विनोद पवार यांनी केला आहे. बाईट :- डॉ. विनोद पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, अमरावती Vo:३ अमरावतीत उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढत असून शहरातील तापमान तब्बल ४६ अंशांच्या पुढे गेले आहे. अमरावती जिल्ह्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कडक ऊन आणि घामाच्या धारांमुळे नागरिक हैराण झाले आहे. त्यामुळे या कडक उन्हाळ्यात तरुण वर्ग विशेषतः बच्चे कंपनीला जलतरण तलावांचे म्हणजेच स्विमिंग पूलचे वेध लागल्याचे पाहायला मिळत आहे. शाळांना सुट्ट्या लागल्यामुळे सध्या शहरातील स्विमिंग पूलवर मुलांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत स्विमिंग पूल वर मोठी गर्दी केल्याचा चित्र आहे त्यामुळे सध्या तरुण तसेच बालकांनी आपला मोर्चा जलतरण केंद्रांकडे वळवल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान उन्हाळ्यामुळे पोहायला गेल्याने आतापर्यंत जिल्ह्यात सात बालकांचतरुणण्यात बुडून मृत्यू झाल्याची ही घटना समोर आली आहे बाईट :- अथर्व डबले, पोहायला गेलेले तरुण Vo : ४ उष्णतेमुळे सर्वाधिक फटका मजूर, शेतकरी, वाहतूक कर्मचारी आणि रस्त्यावर काम करणाऱ्या कामगारांना बसत आहे. दुपारच्या वेळेत अनेक ठिकाणी कामे बंद ठेवण्याची वेळ आली आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघात, डिहायडरेशन, चक्कर येणे, अशक्तपणा अशा तक्रारीमध्ये वाढ होत असल्याचे डॉक्टर सांगत आहेत. जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमध्ये उष्णतेशी संबंधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. दरम्यान प्रशासनाने नागरिकांना दुपारी 12 ते 4 या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. भरपूर पाणी पिणे, डोक्यावर कपडा किंवा टोपी वापरणे, हलका आहार घेणे आणि लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अमरावतीने देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद करत उष्णतेचा विक्रम केला असला, तरी आता सर्वांचे लक्ष मान्सूनपूर्व पावसाकडे लागले आहे. पुढील काही दिवस उष्णतेची तीव्रता कायम राहणार असल्याने नागरिकांनी काळजी घेणे अत्यंत आवश्यक बनले आहे.
0
0
Report

अकोला में निजी बस भीषण आग से जली, लोगों की जिंदगी बची

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील बाळापूर–शेगाव मार्गावर आज सकाळी एका खाजगी प्रवासी बसला भीषण आग लागून बस पूर्णतः जळून खाक झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील प्रवासी घेऊन जाणारी ही खाजगी बस बाळापूर–शेगाव मार्गावरून जात असताना अचानक बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला. बिघाडानंतर काही क्षणातच बसने पेट घेतला आणि आगीने संपूर्ण बसला वेढले. आगीची तीव्रता इतकी होती की घटनास्थळी उभी असलेली एक दुचाकीही आगीत सापडून जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ वाहतूकही बंद ठेवण्यात आली होती. बसमधील सर्व प्रवासी, चालक, वाहक तसेच दुचाकीवरील दोन व्यक्तींना कोणतीही दुखापत झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. अग्निशामक दल आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश झाले. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
0
0
Report
Advertisement

विरार पूर्वे इमारत के स्लैब गिरने से महिला गंभीर घायल, मरम्मत में लापरवाही पर सवाल

Vasai-Virar, Maharashtra:विरार पूर्वेत इमारतीचा स्लॅब कोसळला; महिला गंभीर जखमी, निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह सोसायटीच्या दुर्लक्षामुळे दुर्घटना; स्लॅब कोसळून महिलेची प्रकृती चिंताजनक विरार : पालघर जिल्ह्यातील विरार पूर्वेतील फुलपाडा परिसरातील प्रथमेश नगर येथे र रात्री एक गंभीर दुर्घटना घडली. साई मल्हार नावाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील स्लॅबचा काही भाग अचानक कोसळून खाली पडला. या घटनेत 27 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेची ओळख ज्योती सुनील बागरी (27) अशी असून, अपघातानंतर तत्काळ कुटुंबीय व स्थानिकांच्या मदतीने तिला जवळच्या साई समर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, तिच्या डाव्या हाताला व छातीला गंभीर दुखापत झाली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, संबंधित इमारत बराच काळ जर्जर अवस्थेत होती. तरीही वेळेवर दुरुस्तीचे काम करण्यात आले नाही. मनपाच्या सहाय्यक आयुक्त (प्रभाग समिती ‘सी’) यांनी यापूर्वीच दुरुस्तीबाबत नोटीस बजावली होती, मात्र बिल्डर व सोसायटी प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. पीडित कुटुंबीयांनी असा आरोपही केला आहे की, घटनेनंतर सोसायटीतील काही पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार दाबून टाकण्याचा सल्ला दिला आणि बाहेर माहिती दिल्यास उलट कारवाईची धमकी दिली. या आरोपांमुळे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. साई मल्हार सोसायटीत अनेक कुटुंबे वास्तव्यास असून, त्यात भाडेकरूंची संख्याही मोठी आहे. त्यामुळे इमारतीच्या सुरक्षेबाबत इतर रहिवाशांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे बिल्डर, सोसायटी अध्यक्ष आणि सचिव यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. ही घटना शहरातील जर्जर इमारतींच्या समस्येकडे पुन्हा एकदा लक्ष वेधणारी ठरली आहे. वेळेत योग्य उपाययोजना न केल्यास अशा दुर्घटना पुन्हा घडू शकतात. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
0
0
Report

विदर्भ के हर्ष दुबे को टेस्ट टीम में जगह, अफगानिस्तान के खिलाफ डेब्यू

Nagpur, Maharashtra:विदर्भाचा क्रिकेटपटू हर्ष दुबेची भारतीय क्रिकेट संघात निवड झाली आहे. भारतीय कसोटी क्रिकेट संघात निवड झालेला उमेश यादव नंतरचा तो दुसरा विदर्भाचा क्रिकेटपटू ठरला आहे. भारतीय संघ स्थान मिळवण्यासाठी हर्षने प्रचंड संघर्ष आणि मेहनत घेतलीय. रात्रि़ झोपेत सुद्धा ते क्रिकेटची स्वप्न आणि बडबड करत असल्याच त्याचे वडील सांगता. भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्यासाठी त्याने बाळगलेल ध्येय. आई-वडिलांनी मुलाच्या क्रिकेट करियर घडवण्यासाठी केलेला त्याग. हर्षने बालवयापासून क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीची देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण छाप उमटवली. आणि त्याकरता केलेल्या मोठ्या संघर्षानंतर अखेर विदर्भाच्या या क्रिकेटपटू हर्ष दुबेला भारतीय क्रिकेट कसोटी क्रिकेट संघात अफगाणिस्तान विरुद्धच्या दौऱ्यात करता स्थान मिळालं आहे. हर्षेचे वडील सुरेंद्र दुबे यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी.
0
0
Report

बीड میں PV कुलकर्णी के बिना अनुमति इमारत पर बुलडोजर, नगरपालिका ने कार्रवाई शुरू की

Beed, Maharashtra:बीड मधील पी.व्ही कुलकर्णीच्या विनापरवाना, बांधकामावर चालवणार बुलडोझर - नगरपरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या माहिती. नीट पेपर फुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार पी.व्ही कुलकर्णी याचे बीड शहरातील शाहूनगर भागात इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर नगरपरिषदेच्या नगररचना कार्यालय आणि मालमत्ता कर विभागाने पाहणी आणि चौकशी केल्यानंतर गंभीर त्रुटी आणि अनियमितता आढळून आली आहेत. या बांधकामाला कुठल्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही तसेच चोहोबाजूने नियमानुसार सोडल्या जाणार्इया जागेतही बांधकाम केलेले आहे. यामुळे सर्व होल्डर्सना नोटीसा बजावून पुढील कारवाई केली जाणार आहे. तसेच या बांधकामावर now बुलडोजर चालवण्याची कारवाई देखील केली जाणार असल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश फडसे यांनी दिली आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top