icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सोलापुर ग्रामीण पुलिस ने एक रात में तीन ऑर्केस्ट्रा बार छापा, माल जब्त

Solapur, Maharashtra:solapur ब्रेकिंग - जिल्ह्यात एकाच रात्री तीन ऑर्केस्ट्रा बारवर कारवाई, सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई - सोलापूर जिल्ह्यात एकाच रात्री तीन आर्केस्ट्रा बारवर सोलापूर ग्रामीण पोलिसांचे छापे - कारवाई मध्ये 91 जणांवर गुन्हा दाखल तर तब्बल 1 कोटी 21 लाखांचा मुद्देमाल जप्त - ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली तोकडे कपडे परिधान करून ग्राहकांसोबत अश्लील नृत्य होत असल्याचा प्रकार समोर - ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार विशेष पथकाची विशेष कारवाई - जिल्ह्यातील बार्शी, भोगाव, कोंडी या परिसरातील ऑर्केस्ट्रा बारवर करण्यात आली कारवाई - विशेष म्हणजे संबंधित पोलीस ठाण्याच्या स्थानिक पोलिसांना बाजूला ठेवत - पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या धडक कारवाईमुळे स्थानिक पोलिसांसह ऑर्केस्ट्रा बारवाल्यांचे धाबे दणाणले
0
0
Report

औरंगाबाद HC ने 11 घायल लाभार्थियों के मुआवजे में देरी पर सरकार को फटकार

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:नायलॉन मांजामुळे जखमी झालेल्या ११ जणांना भरपाई देण्याच्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारवर संताप व्यक्त केला. न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती नीरज धोटे यांनी ४ मेपर्यंतची शेवटची मुदत दिली आहे. रक्कम न मिळाल्यास छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना वैयक्तिकरीत्या जबाबदार धरले जाईल. तसेच, विलंबासाठी प्रतिदिन प्रति लाभार्थी १,००० रुपये दंड त्यांच्या स्वतःच्या खिशातून वसूल केला जाईल, असा कडक इशारा न्यायालयाने दिला आहे...राज्य सरकारने नवीन सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासाठी २ महिन्यांचा वेळ मागितला आहे. त्यावर धोरणात केवळ सरकारी तिजोरीवर भार न टाकता संबंधित दुकानांची तपासणी करणाऱ्या निरीक्षकांवरही जबाबदारी निश्चित करावी, असेही कोर्टाने म्हटले आहे..
0
0
Report
Advertisement

नाशिक के कॉर्पोरेट धर्मांतरण केस में डिजिटल प्रमाणों से रहस्यमय जाल खुला

Nashik, Maharashtra:नाशिक के कथित कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरण में जांच एजेंसियों के हाथ महत्त्वपूर्ण डिजिटल प्रमाण लगे हैं। संशयितों के मोबाइल क्लोन किए गए और धक्कादायक डिजिटल प्रमाण सामने आए हैं। मोबाइल में डिलीट हुए चैट्स और मैसेजेस फिर से मिल गए। कंपनी के व्यवस्थापकों के चौकशी की संभावना व्यक्त की जा रही है। केवल लैंगिक शोषण या धर्मांतरण नहीं, बल्कि बड़े षडयंत्र की संभावना भी जांच में है। जप्त मोबाइल डेटा के आधार पर आतंकवाद और जिहाद से संबंधों का संदेह। तकनीकी प्रमाणों के आधार पर SIT, NIA और ATS जांच कर रहे हैं। प्रकरण की गंभीरता बढ़ने की संभावना सूत्रों के अनुसार है。
0
0
Report

छत्रपति संभाजीनगर में युवक ने शराब के बाद आत्महत्या का प्रयास किया; हाथ में चाकू से 30 वार

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ३२ वर्षीय तरुणाने स्वतःच्या हातावर चाकूने तब्बल ৩০ वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. संबंधित तरुण घरी एकटाच होता. मद्यप्राशनानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. रात्रभर तो घरातच रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. दुसऱ्या दिवशी सकाळी शुद्धीवर आल्यानंतर त्याने शेजाऱ्यांकडे मदत मागितली. नागरिकांनी तात्काळ त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, मानसिक तणावामुळे हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
0
0
Report
Advertisement

वाशी के सत्रा प्लाज़ा में देहव्यापार रैकेट का पर्दाफाश; 17 वर्षीय नाबालिग समेत तीन गिरफ्तार

Navi Mumbai, Maharashtra:anchor- वाशी येथील गजबजलेल्या 'सत्रा प्लाझा' व्यापारी संकुलातील एका नामांकित हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा एपीएमसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीसह अन्य दोन महिलांची सुटका करण्यात आली असून, रॅकेट चालवणाऱ्या सुजाता चंदू राठोड (३६) या महिला दलालास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वाशीतील सत्रा प्लाझा या व्यापारी संकुलामध्ये अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेण्यात येत असल्याची माहिती परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांना मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त डहाणणे यांनी सदर ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने एका बनावट ग्राहकाद्वारे महिला दलालाशी संपर्क साधला. या व्यवहारासाठी २५ हजार रुपयांचा सौदा ठरवण्यात आला होता. त्यानंतर १६ एप्रिल रोजी दुपारी ४ च्या सुमारास पोलिसांच्या पथकाने वाशी सेक्टर १९-डी येथील सत्र प्लाझा मधील जिमीस बर्गर'च्या परिसरातील हॉटेलमध्ये धाड टाकली. यावेळी जिमीस बर्गरमध्ये एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीसह इतर महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी सदर ठिकाणावरून अल्पवयीन मुलीसह तीन महिलांची सुटका करण्यात आली. या कारवाईत सुटका करण्यात आलेल्यांमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलीसह ३६ आणि ४६ वर्षे वयाच्या दोन महिलांचा समावेश आहे. यातील एक महिला वाशीतील एका स्पा सेंटरमध्ये कामाला असल्याची माहिती समोर आली आहे. सदर ठिकाणी वेश्याव्यवसाय चालवणारी महिला दलाल सुजाता राठोड हिच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १४३ (३), १४३ (४), ९६, ९८ सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे.
0
0
Report

छत्रपति संभाजीनगर में तापमान 41.6°C, बच्चों में डिहाइड्रेशन का खतरा बढ़ा

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या आठवडाभरापासून सूर्याने रौद्ररूप धारण केले आहे, सलग सहाव्या दिवशी तापमानाचा पारा चाळिशीपार राहिला आहे. शुक्रवारी कमाल तापमान ४१.६ अंश सेल्सियस, तर किमान तापमान २३.८ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले. वाढत्या उष्म्यासह रात्रीचा उकाडाही असह्य झाला असून हवामान विभागाने शनिवारीही शहरात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. लहान तापमानाने चाळिशी ओलांडल्याने याचा सर्वाधिक फटका पाच वर्षांखालील बालकांना बसत आहे. कडक उन्हामुळे ताप, अंगदुखी, उलट्या आणि डायरियाच्या तक्रारी वाढल्या आहेत. शरीरातील पाणी कमी होऊन 'डिहायड्रेशन'चा धोका निर्माण झाल्याने शहरातील बालरुग्णालयात गर्दी आहे..
0
0
Report
Advertisement

अतिवृष्टि से नुकसान के बावजूद किसानों को पीकविमा मुआवजा नहीं मिला, सवाल उठे

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर,जालना आणि बीड जिल्ह्यातील तब्बल ९ लाख ६६ हजार ५४८ शेतकऱ्यांनी गतवर्षी खरीप हंगामातील विविध पिकांसाठी पीकविमा काढला होता. मात्र, अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान होऊनही अद्याप विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. विमा कंपन्या नुकसानभरपाई कधी देणार, असा सवाल आता शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे. गतवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी तेव्हापासून नुकसानभरपाईसाठी पाठपुरावा केला आहे, मात्र ही पीकविमा योजना उंबरठा उत्पादनावर अधारित असल्याने पीक कापणी अहवालानंतरच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल, असे कंपनीकडून आधीच जाहीर केले होते.आता पीक कापणी अहवाल कृषी विभागाने मागील महिन्यातच सादर केला असून असे असले तरी विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही.
0
0
Report

धनेगाव में मोहफूल बेचने वाली महिला पर बाघ हमला, मौत हो गई

Bhandara, Maharashtra:धनेगाव येथे मोहफूल वेचणाऱ्या महिलेवर अज्ञात प्राणीाने हल्ला चढवून ठार केल्याची घटना घडली. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील सोनेगाव बीट परिसरातील धनेगाव येथे एका 55 वर्षीय महिलेवर अज्ञात प्राणीाने हल्ला चढवून तिला जागीच ठार केले. महिलेचे नाव साधना उईके वय अंदाजे 55 वर्ष असून ही मोहफुल वेचण्यासाठी जंगल परिसरात गेली होती. हल्ल्यानंतर वन्य प्राण्यांनी तिच्यावर हल्ला चढवून तिला ठार केले. परिसरातील नागरिकांनी याची माहिती दिली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व पुढील कारवाई सुरू केली असून सध्या हा हल्ला बिबट्या किंवा वाघाचा असल्याचा संशय व्यक्त केला जातो.
0
0
Report
Advertisement

सोलापूर: मोहोळ तालुक्यात आंधी-बारिश में बिजली गिरने से 35 वर्षीय युवक की मौत

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात वीज पडून युवकाचा जागीच मृत्यू आढेगाव येथे वीज कोसळून एका तरुणाचा जागीच मृत्यू, मोहोळ तालुक्यातील घटना मोहोळ तालुक्यात सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वीज पडून एका पस्तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू.. आढेगाव येथील विजय राजाराम डोंगरे असं वीज पडून ठार झालेल्या युवकाचे नाव.. विजय डोंगरे हे आपल्या घराच्या बांधकामाजवळ थांबलेला असता अचानक वातावरण खराब झाले आणि जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाटसह पाऊस सुरू झाला. मात्र त्याच वेळी घराकडे निघत असताना अचानक वीज कोसळली आणि विजय यांचा जागीच मृत्यू झाला.. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी आहेत
0
0
Report

बीड़ में गुमनाम खत से बदनामी, कृती समिति ने कार्रवाई की मांग तेज

Beed, Maharashtra:बीड: निनावी पत्रामुळे बीडची बदनामी ; दोषींवर कारवाईची बीड कृती समितीची मागणी ANC - काही दिवसांपूर्वी बीडमधून पाठवण्यात आलेल्या एका निनावी पत्राने राज्यात मोठी खळबळ उडवून दिली होती. या पत्रात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जिवाला धोका असल्याचा गंभीर उल्लेख करण्यात आला होता. या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असली, तरी हे पत्र नेमके कोणी पाठवले याचा अद्याप उलगडा झालेला नाही. निनावी पत्रांची चौकशी करण्यासाठी कायद्यात ठोस तरतूद नसल्याचे बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी सांगितले होते. मात्र यादरम्यान बीड जिल्ह्याची राज्यात मोठी बदनामी झाली. त्यामुळे बीड कृती समिती आक्रमक झाली आहे. निनावी पत्र पाठवून बीड जिल्हा आणि प्रशासनाची बदनामी करणाऱ्याची चौकशी करून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी कृती समितीने केली आहे. जिल्ह्यातील विविध घटनेत जात पाहिली जातेय. गुन्ह्याचा देखील प्रमाण वाढला आहे. अशात काही राजकीय लोक स्वतःच्या फायद्यासाठी निनावी पत्र पाठवून शासनाची दिशाभूल करत आहेत. यामुळे जिल्ह्याची अतोनात बदनामी होतेय. असा आरोप कृती समितीने केला है. पोलिस अधीक्षकांना भेटून कारवाईचे निवेदन देण्यात आले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top