icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

लासलगांव में कांदा उत्पादकों के समर्थन के लिए आंदोलन, सरकार से हस्तक्षेप की मांग

Yeola, Maharashtra:राज्यभरात सध्या उन्हाळी कांद्याची काढणी सुरू असून बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे मात्र कांद्याला अत्यंत कमी दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्य आर्थिक संकटात सापडले आहेत अनेक ठिकाणी कांदा विक्री नंतर उत्पादन खर्चही निघत नसून काही शेतकऱ्यांना तर विक्रीनंतर एक रुपयाचेदेखील उत्पन्न हातात राहत नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे 18 मे रोजी सकाळी 9 वाजता लासलगाव मार्केट कमिटी च्या आवारात आमदार रोहित पवार यांच्यासह कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात येणार असल्याचे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे लासलगाव येथे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीसाठी आले असताना त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले
0
0
Report

येवल्या उत्तरपूर्व भाग में सूखा दूर, नया कालवा किसानों के लिए उम्मीद बन गया

Yeola, Maharashtra:येवल्या तालुक्याचा उत्तरपूर्व भाग हा पूर्ण पुणे दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात होता राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी या परिसरातील दुष्काळ दूर करण्याच्या दृष्टीने पथदर्शी मांजरपाडा हा महत्वपूर्ण प्रकल्प साकारला या प्रकल्पाचे पाणी पुणेगाव-दर्सवाडी-डोंगरगाव हा 150 किलोमीटर हुन लांबीच्या पोहच कालव्याच्या माध्यमातून डोंगरगाव साठवण तलावात सोडण्यात आले या कालव्याच्या माध्यमातून येवला व चांदवड तालुक्यातील अनेक लहान-मोठे बंधारे भरण्यात आले गेल्या तीन ते चार वर्षांपासून सातत्याने हे बंधारे भरले जात असल्याने दुष्काळी असलेल्या येवल्यातील उत्तरपूर्व भागात सिंचन क्षमतेत वाढ होऊन परिसर बागायती बनण्यास सुरुवात झाली आहे शेतीसोबत दूध व पशुपालन व्यवसायाला चालना मिळाली आहे मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून माजी खासदार समीर भुजबळ यांनी हा कालवा आठमाही करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण देखील केले आहे त्यांच्या पाठपुराव्यातून या कालव्याला आठ एस्केप गेट देखील बसविण्यात येत आहे त्यामुळे यापुढील काळात विविध गावांना या पाण्याचा लाभ होणार आहे
0
0
Report

नाशिक के निफाड में भीषण गर्मी: तापमान 43°C, बच्चों ने तैराकी तालाबों की राह ली

Niphad, Maharashtra:थंडीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या निफाड तालुक्यात यंदा उन्हाचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढला आहे १३ एप्रिलनंतर तब्बल महिनाभराने पुन्हा १३ मे रोजी कमाल तापमानाने ४३ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला विशेष म्हणजे गेल्या २५ दिवसांपासून कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे कायम राहत असल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत उन्हाच्या तीव्र झळांमुळे अंगाची लाही-लाही होत असून उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिक विविध उपाययोजना करताना दिसत आहेत. विशेषतः शालेय सुट्ट्या सुरू असल्याने लहान मुलांनी जलतरण तलावांकडे मोठ्या प्रमाणात धाव घेतली आहे निफाड तालुक्यातील नैताळे येथे असलेल्या जलतरण तलावावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत बच्चे कंपनीची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे
0
0
Report
Advertisement

वाशिम के पाटणी चौक पर मारामारी, वीडियो वायरल, पुलिस ने शुरू की जांच

Washim, Maharashtra:वाशिम शहरातील पाटणी चौकात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. किरकोळ कारणावरून काही तरुणांमध्ये वाद झाला. हा वाद पुढे वाढत जाऊन भर रस्त्यातच हाणामारीत परिवर्तित झाला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू असून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
0
0
Report

उल्हासनगर धिंड प्रकरण: दो महिला आरोपी को एक दिन की पुलिस कोठड़ी

Ambernath, Maharashtra:उल्हासनगर धिंड प्रकरण, दोन महिला आरोपींना एक दिवसांची पोलीस कोठडी Anchor उल्हासनगर धिंड प्रकरणात दोन महिला आरोपी ज्युली वाघरी आणि विणु वाघरी यांना न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींनी राजपूत कुटुंबियातील सदस्यांना मारहाण करत महिलेची केस कापत त्यांची धिंड काढली होती. या प्रकरणी उल्हासनगर सेंट्रल पोलिसांची कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर आज उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते.. यावेत पुढील तपासासाठी न्यायालयाने दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी केली दिली आहे. या प्रकरणातील आणखी ८ ते १० आरोपी अद्याप फरार असून पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेनंतर शहरात संताप व्यक्त होत असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जातेय , चंद्रशेखर भुयार ,उल्हासनगर
0
0
Report
Advertisement

नाशिक के सिन्नर में तालाब डूबने से माता सहित चार की मौत, दर्दनाक हादसा

Sinnar, Maharashtra:नाशिकच्या सिन्नर मध्ये मन सुन्न करणारी घटना दुपारच्या सुमारास घडली आहे नांदूर शिंगोटे परिसरातील नागरे बंधाऱ्यावर कपडे धुण्यासाठी महिलेसोबत तीन मुले देखील गेली होती महिला कपडे धूत असताना मुले बंधाराच्या पाण्यात बुडत असताना महिलेने पाहिले यावेळी महिलेने देखील त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतल्याने महिलेसह तिच्या मुलासह दोन भाच्यांचा बंधाऱ्याच्या खोल पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेबाबत वावी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार निरगुडे हे करत आहेत मृतांची नावे :- मनीषा विजय रामजोशी (आई कार्तिक विजय रामजोशी (मुलगा) आदित्य राहुल शिंदे (भाचा) अविनाश राहुल शिंदे (भाचा)
0
0
Report

गडचिरोली में नक्सली मुक्त घोषित: ऑपरेशन अंतिम प्रहार में 8 गिरफ्तार, 5 ने आत्मसमर्पण

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्हा सशस्त्र नक्षलमुक्त, 'ऑपरेशन अंतिम प्रहार' अंतर्गत ८ नक्षल्यांना अटक, ५ जणांचे आत्मसमर्पण, ६५ लाख रुपयांसह मोठा Shस्त्रसाठाही जप्त । अँकर: नक्षल चळवळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांनी राबविलेल्या 'ऑपरेशन अंतिम प्रहार' दरम्यान ৮ नक्षल्यांना अटक करण्यात आली असून, ५ नक्षल्यांनी आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. यामुळे गडचिरोली जिल्हा आता पूर्णत: नक्षलमुक्त झाला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक १० चा विभागीय समिती सदस्य राजू मंगू वेको आणि याच कंपनीची सदस्य असलेली त्याची पत्नी जन्नी उर्फ नगी येमला, कंपनी सदस्य जयराम गावडे, मुकेश अवलाम, विजय तामो, रजिता मडावी, ज्योती पोटावी आणि आमती पोडियाम यांचा समावेश आहे. या सर्वांवर एकूण ६४ लाख रुपयांचे बक्षीस होते. शिवाय त्यांच्याकडून ६५ लाख ३४ हजार रुपये एवढी रोख रक्कम आणि एके-४७, एसएलआर व अन्य बंदुकाही जप्त करण्यात आल्या आहेत. ७ फेब्रुवारी २०२६ ला भामरागड तालुक्याच्या सीमावर्ती भागातील फोदेवाडा गावानजीकच्या जंगलात झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला होता. त्याच्या हत्येेत अटकेतील काही नक्षल्यांचा सहभाग होता. यातील ४ जणांना तेलंगणातून, दोघांना कुमनार येथून आणि नैताळा येथून दोन जणांना अटक करण्यात आज संध्याकाळी पत्रकार परिषदेत सांगितलं. याच सोबत आज ५ जहाल नक्षल्यांनी पोलिस अधीक्षकांपुढे आत्मसमर्पण केलं. त्यात एक विभागीय समिती सदस्य, एक प्लाटून समिती सदस्य, एक क्षेत्रिय समिती सदस्य आणि दोन दलम सदस्यांचा समावेश आहे. शासनानं त्यांच्यावर एकूण ३८ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. मधु उर्फ राकेश वेळदा, जीवन उर्फ जग्गू मडकाम, रजनी उर्फ दुर्गा धुर्वा, मंगली कुरसाम, लक्ष्मी पुनेम अृशी आत्मसमर्पित नक्षल्यांची नावे आहेत. ८ नक्षल्यांना अटक आणि ५ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केल्यानं गडचिरोली जिल्हा आता नक्षलमुक्त झाल्याचं पोलिस अधिकारी यांनी सांगितलं. मात्र, यापुढं इतर राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी येऊ नये, यासाठी पोलिस सातत्यानं लक्ष ठेवून राहतील, असही त्यांनी स्पष्ट केलं.
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी: 1 जून से यांत्रिक नौकाओं पर 61 दिन मछली पकड़ना बंद; पारंपरिकों को छूट

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी: १ जूनपासून यांत्रिक नौकांना मासेमारी बंदी; नियम मोडल्यास कठोर कारवाई.. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमानुसार यंदा १ जून ते ३१ जुलै २०२६ या ६१ दिवसांच्या कालावधींत राज्यातील सागरी जलधी क्षेत्रात यांत्रिक व यंत्रचलित नौकांना मासेमारी करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे... ही बंदी केवळ यांत्रिक नौकांसाठी असून पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर-यंत्रचलित नौकांना यातून सूट देण्यात आली आहे.. सर्व यांत्रिक नौकांनी १ जूनपूर्वी मासेमारी बंदरात परतणे बंधनकारक असून, बंदी काळात समुद्रात मासेमारी करताना आढळल्यास नौका व साहित्य जप्त करून कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.. तसेच या काळात अपघात झाल्यास कोणतीही शासकीय नुकसानभरपाई मिळणार नाही.. मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त सा.वि.कुवेसकर यांनी सर्व मच्छिमारी संस्था आणि नौकामालकांना या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे..
0
0
Report
Advertisement

वर्धा में घर के पास गांजा खेती पकड़ी, आरोपी गिरफ्तार

Wardha, Maharashtra:वर्धा घराशेजारी गांजाची शेती; आरोपी अटकेत वर्ध्यात अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेला वेग वर्धा जिल्ह्यातील हमदापुर येथे घराशेजारी गांजाची लागवड करणाऱ्या एका व्यक्तीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकून आरोपी प्रफुल तुळसीराम शंभरकर याला रंगेहात पकडले. पोलिसांच्या तपासात आरोपीने कोणतीही शासकीय परवानगी न घेता आर्थिक फायद्यासाठी गांजाची शेती केल्याचे निष्पन्न झाले. कारवाईदरम्यान गांजाची झाडे, पाने, फांद्या आणि मुळांसह जप्त करण्यात आली. जप्त गांजाचे वजन तब्बल ४ किलो ९२ ग्रॅम असून त्याची अंदाजित किंमत सुमारे ८२ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. वर्धा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी दहेगाव पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top