445001
यवतमाळ तालुका काँग्रेस अध्यक्षावर भरचौकात चाकुहल्ला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहराच्या मध्यवस्तीत गजबजलेल्या दत्त चौकामध्ये भरदिवसा प्राणघातक हल्ल्याची घटना घडल्याने वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रामायण हॉटेल समोर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रमेश भीसणकर यांच्यावर दोन आरोपींनी चाकूने हल्ला चढविला, यावेळी भीसनकर यांनी जखमी अवस्थेत एकाच्या हातून चाकू हिसकावल्याने दोघेही पसार झाले, त्यानंतर जखमी भीसणकर हे स्वतः ऑटोने रुग्णालयात पोहोचले. दरम्यान हा थरार शेकडो लोकांपुढे सुरू असताना कुणीही त्यांच्या बचावासाठी पुढे आले नाही.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
शिर्डी दौरे पर उद्धव ठाकरे के समर्थकों की चुप्पी: वाकचौरे ने कुछ नहीं कहा—मौन बना सवाल
Shirdi, Maharashtra:मनोज जरांगे यांच्या प्रश्नांवर शिंदे गटात गेलेल्या खा.भाऊसाहीेब वाकचौरे यांनी बोलणं टाळलं... उद्धव ठाकरेंना अर्धवट सोडून खासदारांनी जायला नको होतं मनोज जरांगे यांच्या या वक्तव्यावर वाकचौरे यांनी बोलणं टाळलं.. याबाबत मी काहीही भाष्य करणार नाही... खा.भाऊसाहेब वाकचौरे यांची प्रतिक्रिया... उद्धव ठाकरे शिर्डी दौरा... उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याबाबत देखील मी काहीही सांगू आणि बोलू इच्छित नाही... राजकीय प्रश्नांवर खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचं मौन.. टीकाटिप्पणी ही चालूच राहणार आहे... एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची प्रक्रिया सुरूच राहते त्यामुळे मी कुठलेही भाष्य करू इच्छित नाही... मागील कालावधीत आमच्यावर आरोप सुरू होते आता ही सुरू आहेत.. त्यामुळे मी भाष्य करणार नाही..- खा.भाऊसाहेब वाकचौरे0
0
Report
अकोला के बार्शीटाकळी में स्कूल के सामने गटर जाम, दुर्गंध से बच्चे परेशान
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या झोडगा येथील जिल्हा परिषद शाळेसमोरील तुंबलेल्या गटाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते कुलदीप चव्हाण यांनी थेट गटारीत बसून अनोखे आंदोलन केले आहे, या आंदोलनामुळे ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. झोडगा येथील जिल्हा परिषद शाळेसमोरील गटार अनेक दिवसांपासून तुंबले असून सांडपाणी रस्त्यावर साचत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच डासांची वाढ होऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. या समस्येकडे संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेकदा निवेदने आणि तक्रारी करण्यात आल्यााचा दावा ग्रामस्थांनी केला. मात्र, कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने संतप्त सामाजिक कार्यकर्ते कुलदीप चव्हाण यांनी थेट तुंबलेल्या गटारीत बसून आंदोलन केले. या अनोख्या आंदोलनाची परिसरात मोठी चर्चा रंगली असून, प्रशासनाने तातडीने गटाराची स्वच्छता करून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.0
0
Report
खिद्रापुर में मंदिर अतिक्रमण मामले पर ग्रामीणों ने गांव बंद कर प्रदर्शन किया
Kolhapur, Maharashtra:भारतीय पुरातत्त्व विभाग और न्यायालय के निर्णय के विरोध में कोल्हापुर जिले के खिद्रापुर स्थित ग्रामस्थोंने गावबंद की हाक देत तीव्र आंदोलन शुरू किया। इस अवधि में ग्रामस्थोंने गाव से मोर्चा निकाल कर धरणे आंदोलन किया और प्रसिद्ध कोपेश्वर मंदिर भी बंद रखा गया। खिद्रापुर के ऐतिहासिक कोपेश्वर मंदिर परिसर के कुछ घर और बांधकाम अतिक्रमण के संदर्भ में न्यायालय में याचिका दाखिल की गई थी। इस याचिका पर सुनवाई करते हुए न्यायालय ने संबंधित बांधकाम हटवाने के आदेश दिए हैं। भारतीय पुरातत्त्व विभाग ने भी मंदिर परिसर में कुछ बांधकाम अतिक्रमण के क्षेत्र में आने की बात कही है। परंतु इस निर्णय का ग्रामस्थों ने तीव्र विरोध दिखाया है। मंदिर परिसर में कई पीढ़ियों से रहने वाले नागरिकों की संपत्ति शासन की विभिन्न नोंदों में दर्ज है, फिर भी इन्हें अतिक्रमणधारक कैसे कहा जा सकता है, यह सवाल ग्रामस्थों ने उठाया है। निर्णय के निषेधार्थ ग्रामस्थों ने गांव के सभी व्यवहार बंद रखे। साथ ही कोपेश्वर मंदिर भी बंद रख प्रशासन और शासन का ध्यान आकर्षित करने का प्रयास किया। आंदोलन के दौरान ग्रामस्थों को न्याय मिलना चाहिए, घरों पर अन्यायकारी कार्रवाई रुकवाएं– ऐसी घोषणाएं दी गईं। ग्रामस्थों ने न्यायालयीन निर्णय के पुनर्विचार की मांग, पुरातत्त्व विभाग से स्थानीय नागरिकों की पक्ष समझने की अपील और किसी भी कार्रवाई से पहले वैकल्पिक रास्ता निकालने की मांग की。0
0
Report
Advertisement
कंचन नदी के बाढ़ से वाशिम के खेत संकट में, पेराई मौसम प्रभावित
Washim, Maharashtra:वाशिम के तालुक्यातील कांचन नदी में बाढ़ आ जाने से नेतंसा ते कोयाळी मार्ग कुछ समय के लिए बंद था और इस क्षेत्र की शेतियों को भी पेरणी के मौसम में बड़ा नुकसान हुआ है। खास बात यह है कि इस भाग में बारिश न होने के बावजूद बुलढाणा जिले में बारिश के कारण यह बाढ़ आई है, जिससे कई किसानों की खेत की मिट्टी बह गई है, जिसके कारण इस क्षेत्र की पेरणियाँ कुछ दिनों के लिए टलने की संभावना है। पिछले दो वर्षों से इस नदी में बार-बार बाढ़ आ रही है, इसलिए इस नदी को गहराई करके बाढ़ की स्थिति को रोकने की किसानों की मांग है।0
0
Report
खटाव के पास मालवी शिवार में अवैध दारू हाथभट्टी पर छापा; माल जब्त
Satara, Maharashtra:सातारा: खटाव जवळ मळवी शिवारात सिरस वस्ती लगत पुसेगाव पोलिसांनी अवैध दारू हातभट्टीवर धडक छापा टाकून या कारवाई १ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या मध्ये पोलिसांनी गुळमिश्रित रसायनाचे ९ प्लास्टिक बॅरल जागीच नष्ट केले असून, २ कॅन हातभट्टी दारू जप्त केली आहे. याप्रकरणी खटाव येथील आरोपी शरद संजय जाधव याच्यावर पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे आणि त्यांच्या पथकाने ही धडक कामगिरी केली आहे.0
0
Report
नाशिक में हरित कुंभ के अंतर्गत पंचवटी में महापालिका प्रमुख परिवार सहित सफाई मोहीम
Nashik, Maharashtra:उन्नत नाशिक अभियानाच्या अंतर्गत पंचवटीत महापालिका आयुक्त, महापौर - उपमहापौरांची कुटुंबासह स्वच्छता मोहीम... हरित आणि स्वच्छ कुंभ अभियान अंतर्गत नाशिक शहरात प्रशासन लोकप्रतिनिधी आणि नाशिककरांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम... अँकर: नाशिक शहरामध्ये उन्नत नाशिक आणि हरित कुंभ अभियानाच्या अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. आज पंचवटीमध्ये महापालिका आयुक्त, महापौर आणि उपमहापौर हे कुटुंबासोबत स्वच्छता करत स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. हरित कुंभाच्या अनुषंगाने नाशिक करांनी देखील स्वच्छ आणि सुंदर शहर राखण्यासाठी ह्या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन आयुक्त आणि महापौर यांनी केले. ज्या ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आलेली आहे त्या कपिला नदीचा उगम स्थानच झाल्याचे चित्र पाहायला मिळतंय... अनेक बिल्डर्स आणि महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे प्रवाहित असलेली नदी ही नाही झाल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे... ज्या ठिकाणाहून कपिला नदीचा उगम झाला आहे स्वच्छता करून ती नदी पुन्हा प्रवाहित करण्याची मागणी महापौर आणि उपमहापौर यांनी आयुक्तांकडे केली आहे...आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....0
0
Report
Advertisement
चंद्रपुर के किडनी तस्करी केस में डॉक्टर रविंद्र पाल सिंह को अदालत ने 10 दिन की पुलिस कोठडी दी
Chandrapur, Maharashtra: ( single file sent on 2C) टायटल:---चंद्रपुरातील किडनी तस्करी प्रकरणातील आरोपी डॉ. रवींद्र पाल सिंग ला न्यायालयाने सुनावली १० दिवसांची पोलीस कोठडी अँकर:-- बहुचर्चित आणि आंतरराष्ट्रीय कनेक्शन असलेल्या किडनी तस्करी प्रकरणात चंद्रपूर पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. कोर्टाने आज या प्रकरणातील आरोपी डॉक्टर रवींद्र पाल सिंग ला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ब्रम्हपुरी न्यायालयात आज आरोपी रविंद्र पाल सिंग आणि पोलिसांच्या वकिलांमध्ये तीन तास जोरदार युक्तिवाद झाला. आरोपीला जास्तीत जास्त दिवसांची कोठडी मिळावी आणि या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा सखोल तपास करता यावा यासाठी पोलिसांनी आपल्याकडील सबळ पुरावे न्यायालयासमोर सादर केले. गुन्ह्याचे गांभीर्य आणि आरोपीचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील लागेबंधे लक्षात घेता सरकारी वकिलांनी न्यायालयात जवळपास तीन तास युक्तिवाद केला. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य विषद करणारे तब्बल ३५ मुद्दे न्यायालयासमोर मांडले. आरोपीच्या वकिलांनी पोलिसांचे दावे खोडून काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी सादर केलेले ठोस पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आरोपीची पोलीस कस्टडी मिळाल्यामुळे या आरोपींनी आतापर्यंत किती जणांची किडनी काढली, या रॅकेटमध्ये आणखी कोणत्या बड्या डॉक्टरांचा किंवा दलालांचा समावेश आहे, आर्थिक व्यवहारांची देवाणघेवाण कशी आणि कुठे झाली यांसारख्या अनेक मोठ्या आणि धक्कादायक बाबींचा खुलासा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.0
0
Report
बाघ के मुखौटे पहन कर घरफोड़े: कल्याण पूर्व में सीसीटीवी में कैद
Kalyan, Maharashtra:वाघाचे मुखवटे घालून घरफोड्या कल्याण पूर्वेतील घरफोडी सीसीटीव्ही कैद. कल्याण पूर्वेतील काटे मानिवली नाका परिसरातील रॉयल गोल्ड पॅलेस इमारतीत फिरत दरोडेखोर दिसत आहेत. तोंडावर वाघाचे मुखवटे आणि हातात शस्त्र असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरा स्पष्ट दिसत आहे. मे महिन्यात रॉयल गोल्ड पॅलेस इमारतीत घरफोडी झाली होती. दीड महिन्यानंतर सीसीटीव्ही समोर आलेत. या घरफोडीला दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला, पण दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागले नाहीत. या व्हायरल झालेल्या सीसीटीव्हीमुळे कल्याण शहरात भीतीचे वातावरण पसरलं आहे.0
0
Report
भिवंडी में भीषण आग: 7-8 गोदामों को राख, गैस एजेंसी के पास हड़कंप
Thane, Maharashtra:भिवंडी ब्रेकिंग... निंबवलीत भीषण आग, 7-8 गोदामे खाक, गॅस एजन्सीमुळे खळबळ... अँकर... ब्रेकिंग! भिवंडी तालुक्यातील निंबवली गावच्या हद्दीत पहाटे भीषण आग लागली. टायर, लाकूड आणि प्लास्टिक गोदाम आगीच्या भक्षस्थानी. बाजूला गॅस एजन्सी असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे._ आज पहाटे 3 च्या सुमारास निंबवली गावाजवळील टायर गोदाम आणि लाकडाच्या वखारीला आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने 7 ते 8 गोदामे जळून खाक झाली. यामध्ये टायर गोदाम, लाकडाचे गोदाम आणि प्लास्टिक गोदाम पूर्णपणे भस्मसात झाले आहेत. बाजूलाच गॅस एजन्सी असल्याने स्फोटाची भीतीने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आग आटोक्यात, पण नुकसान मोठे.0
0
Report
Advertisement
जगजग गजानन महाराज पालखी वाशिम पहुंची: आषाढी उत्साह ने भरे भक्तिमय माहौल
Washim, Maharashtra:शेगाव येथून निघालेली श्री संत गजानन महाराजांची पालखी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे भक्तिमय वातावरणात दाखल झाली.यापूर्वी पालखीचा पहिला मुक्काम डव्हा येथील नाथ नंगे महाराज संस्थानात झाला होता.यंदा पालखी सोहळ्याचे ५७ वे वर्ष असून, सुमारे ७०० वारzki सहभागी झाले आहेत.त्यामध्ये २५० पताकाधारी, २५० टाळकरी आणि २०० सेवाधाऱ्यांचा समावेश आहे. "गण गण गणात बोथे आणि विठोबा रखुमाईच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे.७५० किलोमीटरचा पायी प्रवास ३३ दिवसांत पूर्ण करून ही पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूरला पोहोचणार आहे.वाशिम जिल्ह्यात पालखीचा पुढील तीन दिवस मुक्काम राहणार असून,विविध गावांतून पुढील प्रवास सुरू राहणार आहे.या पालखी सोहळ्याचा आढावा घेतला आमचे वाशिमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी.0
0
Report
शिरूर में कांदा सड़ने से किसानों के सामने बड़ा आर्थिक संकट
Shirur, Maharashtra:आधीच बाजारभाव कोसळल्याने अडचणीत आलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संकटात आता आणखी भर पडली आहे. बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने पिकवलेला कांदा वखारीत साठवून ठेवला होता. मात्र, आता हा साठवलेला कांदा सडून मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. यापूर्वी अवकाळी पाऊस आणि गारपिटीतमुळे शेतातील कांद्याचे प्रचंड नुकसान झाले होते, आणि आता वखारीतील कांदाही सडल्याने शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक फटका बसल्याने शेतकऱ्यांचे लाखा रूपयांचे नुकसान झालंय याचाच नुकसान ग्रस्त कांदा चाळीजवळून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...0
0
Report
कोलाड पुल पर सुरक्षा रेलिंग अधूरी, यातायात जोखिम में
Chendhare, Maharashtra:अ ardh vat kathdyantoonch Kolad uddhaan pulavar vahatun; pravaashancha jeevaashi khel ? ......... 50 phoot unch pulavar suraksha apoorna ......... prashasanachya nirnayavar pravaashankodun santap Mumbai-Goa mahaamargaavar Kolad uddhaan pulavar surakshan kathdyanchi kaame apoorna astaanaach magil aath-daha divasantyaat non Mumbaiakaade janaaaree vahatu nirthi aasthaa. Pulachya donhi baajuna anek thikanit keval lohndii sallya ubbyaa aani surakshak kathade adoopoorna hoteil. Samhaare 50 te 60 phoot unch aslelya ya pulavar apghaat jhaalaa tar vaahan tehet kaal koosalnyachi bhiti vyakt jati ahe. Surkheshe kaame poornhoun sangathe vahatu poorn karunyasathi prashasan pravaashankadun jeevashi khelat aalahak ahe. Pulavare surakshak kathade tatadi poorn karun surakshita vahatu vyavastha sunishchit karavi, aashi maagni pravaashankodun hot ahe.0
0
Report
Advertisement
सोलापुर में 511 किलो मिलावटयुक्त मिठाई नष्ट, एफएसए की बड़ी कार्रवाई
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात 511 किलो निकृष्ट दर्जाची मिठाई नष्ट, अन्न औषध प्रशासनाची मोठी कारवाई भेसळयुक्त ३४८ किलो स्वीट अन् १६३ किलो अजमेरी बर्फी नष्ट अन्न व औषध प्रशासन अलर्ट : वनस्पती तुपाचा साठा जप्त अँकर - अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या अन्न पदार्थांविरोधातील कारवाईला वेग आला आहे.याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातही अन्न व औषध प्रशासन सतर्क झाले असून गेल्या आठवडाभरात संशयित आणि अस्वच्छ परिस्थितीत साठवून ठेवलेल्या अन्न पदार्थावर धडक कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ३४८ किलो स्वीट बर्फी आणि १६३ किलो अजमेरी बर्फी असा एकूण ५११ किलो साठा जागीच नष्ट करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावडेवाडी येथील मेसर्स रामदेव डेअरीवर छापा टाकून भेसळीची शंका असलेले आणि अस्वच्छ परिस्थितीत साठवून ठेवलेले १ हजार ८०७.४० किलो अन्नपदार्थ जप्त केले.या जप्त साठ्याची किंमत ६ लाख ९१ हजार ४४५ रुपये आहे. या कारवाईत स्किम्ड मिल्क पावडर आणि वनस्पती तुपा असा साठा जप्त करण्यात आला. परवान्याशिवाय तयार करण्यात आलेली आणि भेसळीची शंका असलेला ५११ किलो साठा जागीच नष्ट करण्यात आला. अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील कलम २६ आणि २७ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.0
0
Report
अकोला में भारी बारिश से बाढ़, देऊळगाव में कार में बह गई वीडियो वायरल
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले होते. पातूर तालुक्यातील देऊळगाव येथे पावसाच्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहात एक चारचाकी वाहन वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, काल झालेल्या जोरदार पावसामुळे देऊळगाव परिसरातील नदी-नाल्यांना मोठा पूर आला. पावसाचे पाणी अचानक गावात शिरल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले. याच दरम्यान रस्त्यालगत उभी असलेली एक चारचाकी गाडी पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहिली गेली. या घटनेचा थरारक व्हिडिओ स्थानिकांनी मोबाईलमध्ये कैद केला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून केवळ वाहनाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना पूरस्थितीत नदी-नाल्यांच्या परिसरात न जाण्याचे आणि पाण्याचा अंदाज न घेता रस्ता ओलांडू नये, असे आवाहन केले आहे.0
0
Report
पैसों के खेल ने शिरूर बाजार समिति चुनाव की लोकतांत्रिकता पर सवाल खड़े किए
Shirur, Maharashtra:निवडणुकीचं गणित जेव्हा पैशांच्या गणितावर मांडलं जातं, तेव्हा ती लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असते, असं स्पष्ट मत राष्ट्रवादी कॉग्रेस चे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केलंय शिरूर बाजार समिती निवडणुक प्राचार नारळ शुभारंभावेळी वळसे पाटील यांनी उमेदवारी वाटप, मतदारांच्या सवयी आणि शेतकऱ्यांचे हित यावर परखड भाष्य केलंय. शिरूर बाजार समितीच्या निवडणूक प्रचार शुभारंभ वेळी ते बोलतात यावेळी शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटकें सह अनेक जिल्हा परिषद सदस्य आणि उमेदवार कार्यकर्ते उपस्थित होते0
0
Report
Advertisement
