445001
यवतमाळ तालुका काँग्रेस अध्यक्षावर भरचौकात चाकुहल्ला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहराच्या मध्यवस्तीत गजबजलेल्या दत्त चौकामध्ये भरदिवसा प्राणघातक हल्ल्याची घटना घडल्याने वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रामायण हॉटेल समोर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रमेश भीसणकर यांच्यावर दोन आरोपींनी चाकूने हल्ला चढविला, यावेळी भीसनकर यांनी जखमी अवस्थेत एकाच्या हातून चाकू हिसकावल्याने दोघेही पसार झाले, त्यानंतर जखमी भीसणकर हे स्वतः ऑटोने रुग्णालयात पोहोचले. दरम्यान हा थरार शेकडो लोकांपुढे सुरू असताना कुणीही त्यांच्या बचावासाठी पुढे आले नाही.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
डीपीसी हर काम के जियो टैगिंग से भ्रष्टाचार पर रोक, राज्यभर में लागू
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून होणाऱ्या प्रत्येक विकासकामाचा अचूक आणि पारदर्शक लेखाजोखा ऑनलाइन ठेवण्यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. एकाच कामासाठी वेगवेगळ्या यंत्रणांकडून परस्पर निधी लाटण्याच्या प्रकार रोखण्यासाठी आता डीपीसीच्या प्रत्येक कामाचे जिओ टॅगिंग बंधनकारक केले आहे. 'कामाचे जिओ टॅगिंग आणि 'महा युनिव्हरसल आयडी' प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत बिल दिले जाणार नाही, याची अंमलबजावणी आता छत्रपती संभाजी नगरात सुरू झाली आहे... धुळे जिल्ह्यात हा उपक्रम पथदर्शी प्रकल्प म्हणून राबवला होता. तेथे भ्रष्टाचाराला लागूलेला चाप पाहून आता छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ही प्रणाली लागू केली आहे. महापालिका आणि ग्रामीण भागातील हद्दीत डीपीसीच्या निधीतून झालेल्या प्रत्येक लहान-मोठ्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून त्याचे जिओ टॅगिंग करण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे.0
0
Report
मालेगाव-उमरठी अवैध हथियार नेटवर्क का बड़ा पर्दाफाश पुलिस ने
Nashik, Maharashtra:मालेगाव ( नाशिक ) विशाल मोरे - कोम्बिंग ऑपरेशनमध्ये हिफजू इद्रीसच्या कनेक्शनचा उलगडा - धुळे, जळगाव, आणि मालेगावच्या पोलिसांकडून मध्यप्रदेशात कोम्बिंग ऑपरेशन... - पोलिसांकडून देशी कट्ट्याच अवैध शस्त्र पुरवठा कनेक्शन उध्वस्त उमरठी गावाबाबत माहिती लोकसंख्या सुमारे दोन हजाराच्या आसपास आहे. उमरठी हे दोन गावे असून एक गाव महाराष्ट्रात तर दुसरे गाव मध्य प्रदेशात येते, मध्य प्रदेशात उमरठी गाव हे डोंगराळ भागात आहे. या गावात काही जण घरातच गावठी कट्टे बनवतात. तेव्हा पोलिसांनी पहाटेच्या सुमारास 400 पोलिसांसह हे कॉम्बिंग ऑपरेशन राबविले. याठिकाणी 45 संशयितांच्या घरांची झडती घेतली, 20 व्यक्तीची चौकशी केली. 12 संशयीतांकडून दोन देशी कट्टे, चार जिवंत काडतूस तसेच कट्टे तयार करण्यात येणारा कच्चा माल व साहित्य जप्त केले आहे. 27 फरार संशयितांच्या घरांची जिओ टॅगिंग करण्यात आली. बाईट: सिद्धार्थ बरवाल, DYSP मालेगाव0
0
Report
सावित्री नगर में भटकते कुत्तों का आतंक, CCTV में कैद घटना, लोगों में भय
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:सावित्रीनगरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; घटना सीसीटीव्हीत कैद ANC : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रभाग क्रमांक ९ मधील सावित्री नगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास पुन्हा एकदा समोर आला आहे. गजानन महाराज मंदिर रोडवर एका भटक्या कुत्र्याने रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीच्या पायाला चावा घेतल्याची घटना घडली असून हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेकडे केली आहे.0
0
Report
Advertisement
कासारसाई डैम 94% भर गया; 300 क्यूसेक विसर्जन, नदी किनारे सतर्कता जारी
Varsoli, Maharashtra:कासारसाई डैम 94% भर गया; 300 क्यूसेक विसर्जन शुरू. पवना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. मावळ आणि मुळशी तालुक्यासाठी महत्त्वाचं असलेलं कासारसाई धरण आता 94 टक्के भरलं असून धरणातून सध्या 300 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हा विसर्ग थेट पवना नदीपात्रात सोडला जात असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. कासारसाई धरणावरून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी यांच्याकडून.0
0
Report
कोल्हापुर में बारिश घट, पंचगंगा नदी जलस्तर 6 इंच घटकर 31 फुट 9 इंच
Kolhapur, Maharashtra:Kolhapur जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे, पंचगंगा नदीची पाणी पातळी 6 इंचांनी कमी झाली आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 31 फूट 9 इंच इतकी झाली आहे. रात्री हीच पाणी पातळी 32 फूट 3 इंच इतकी होती. असे असले तरी जिल्ह्यातील 29 बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू झाल्याने चिंतेत असणारा बळीराजा काहीसा सुखावला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील याच पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी。0
0
Report
मावल तालुक़े में खरीफ पिक बीमा के लिए किसानों में जबरदस्त उत्साह
Varsoli, Maharashtra:मावळ तालुक्यात खरीप हंगाम 2026 साठी पंतप्रधान पिक विमा योजना सुधारित लागू करण्यात आली असून त्या अंतर्गत भात, सोयाबीन, भुईमूग पिकासाठी पिक विमा भरण्याच्या कामाला वेग आला आहे. मौजे शिरगांव येथे कृषि अधिकारी विकास गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पिक विमा भरण्याचे प्रगती पथावर आहे. शिरगांव आणि परिसरातील गावामध्ये विविध कार्यकारी सोसायटी, ग्रामपंचायत, कृषि सेवा केंद्र, दूध संकलन केंद्रावर पिक विमा भरण्याबाबत प्रचार प्रसिद्धी करण्यात येत आहे. पिकांचे नैसर्गिक आपत्ती, वातावरणातील बदल यामुळे पिकांचे नुकसान होते त्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या पिकासाठी सुरक्षा कवच हे पिक विमा भरल्यामुळे मिळते त्यामुळे शेतकऱ्यांनी हे पीक विमा भरण्यासाठी गर्दी केली आहे.0
0
Report
Advertisement
औंढे में विद्युत तार टूटने से तीन जानवरों की मौत
Varsoli, Maharashtra:मावळ तालुक्यात मागील काही दिवसाहून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वीजवाहक तारा तुटून पडण्याच्या घटना घडत आहेत. त्यातच औढे गावात मुसळधार पाऊस व वाऱ्यामुळे महावितरणची ओव्हरहेड वीजवाहक तार तुटून शेतात पडली. या तारेच्या संपर्कात आल्याने एक दुभती गाय, एक वासरू आणि एक रेडा अशा तीन जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही जनावरे औढे गावातील नारायण मांडकेर यांच्या मालकीची असून, या दुर्घटनेमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. महावितरण कंपनीने या घटनेची दखल घेऊन संबंधित शेतकऱ्याला तातडीने योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पीडित शेतकऱ्यांनी केले आहे.0
0
Report
मुंबई: दहिसर पूर्व में तेज कार ने लोगों को कुचला, एक महिला गंभीर घायल
Mumbai, Maharashtra:मुंबईतील दहिसर पूर्व येथील आर.टी. परिसरात भरधाव कारने अचानक अनेकांना धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात एका महिलेला गंभीर दुखापत झाली असून, इतर काही जणांनाही किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिस आणि रुग्णवाहिकेला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी महिलेला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले असून, अपघाताचे नेमके कारण काय होते याचा तपास सुरू आहे. तसेच या घटनेप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाईही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.0
0
Report
मुंबई के कांदिवली पूर्व ठाकूर कॉम्प्लेक्स में मध्यरात्री चोरी: चार दुकानों के शटर तोड़े
Mumbai, Maharashtra:मुंबईतील कांदिवली पूर्व येथील ठाकूर कॉम्प्लेक्समधील गोकुळ नगरी-१ या उच्चभ्रू परिसरात मध्यरात्री धक्कादायक चोरीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी सलग चार दुकानांचे शटर आणि कुलूप तोडून दुकानांमध्ये प्रवेश केला आणि रोख रक्कम तसेच मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला.\n\nया घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून व्यापाऱ्यांमध्येही मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण चोरीची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या फुटेजमध्ये चोरटे अत्यंत शांतपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने चोरी करताना दिसत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.\n\nघटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करत सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. तसेच फॉरेन्सिक पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.\n\nया घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांनी रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करण्याची आणि सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला असून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
Advertisement
Versova में पानी की पाइप फटने से जल जमाव, यातायात प्रभावित
Mumbai, Maharashtra:मुंबईच्या वर्सोवा परिसरातील जे.पी. रोडवरील संजीव एन्क्लेव्ह, ७ बंगलो येथे आज पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती झाली. काही क्षणांतच हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहू लागल्याने परिसर जलमय झाला आणि वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागला. या घटनेमुळे काही काळ वाहतूकही मंदावली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ महापालिकेला याची माहिती दिल्यानंतर संबंधित अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पाईपलाईन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून पाणीपुरवठा काही काळासाठी प्रभावित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, अशा घटना टाळण्यासाठी पाईपलाईनची नियमित तपासणी व देखभाल करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले आहे.0
0
Report
नवी मुंबई के खारपाडा टोल पर मनसे का प्रदर्शन; भर्ती फैसले से हंगामा
Navi Mumbai, Maharashtra:खारपाडा टोलवर मनसेचे आंदोलन; परप्रांतीयांच्या भरतीवरून गोंधळ. खारपाडा टोल नाक्यावर मनसेने आंदोलन केलेय. स्थानिकांना डावलून 50 परप्रांतीयांना खारपाडा टोल नाका प्रशासनाने नोकरी दिल्याच्या विरोधात मनसेने आंदोलन केलेय. मनसे कार्यकर्त्यांनी काही वेळ वाहतूक रोखत आपला आक्रमक पवित्रा दाखवलाय. टोलवर कार्यरत कर्मचाऱ्यांना हटवण्याचाही प्रयत्न यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी केला असून पोलीसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. Navi Mumbai0
0
Report
कल्याण लॉज में भाई-बहन ने हाथ काटकर आत्महत्या की कोशिश; हालत स्थिर
Kalyan, Maharashtra:कल्याण रेलवे स्टेशन के सामने महाराष्ट्रीय लॉज में भाई-बहन ने हाथ की नस काटकर आत्महत्या प्रयास किया, यह धक्कादायक घटना सामने आई है. इस घटना से क्षेत्र में हलचल मच गई. सुनील बेलशेकर उम्र 56 और पद्मजा बेलशेकर उम्र 53 की ज़ख्मी भाई-बहन की नाम हैं. पुलिस ने जानकारी दी अनुसार दोनों बेरोजगार हैं तथा कामधंधा नहीं होने के कारण निराशा से उन्होंने यह कदम उठाया. ये दोनों असनगांव से कल्याण आए थे. महाराष्ट्रीय लॉज में उन्होंने हाथ की नस काटकर आत्महत्या का प्रयास किया. सूचना मिलते ही पुलिस ने तुरंत घटनास्थल पर पहुँचाकर दोनों को इलाज के लिए कलवा के छत्रपति शिवाजी महाराज अस्पताल में भर्ती कराया. अभी दोनों की हालत स्थिर है0
0
Report
Advertisement
नाशिक गोदावरी खतरे से चांदोरी में बाढ़ आशंका, प्रशासन ने स्थान जाने को कहा
Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्याच्या धरण क्षेत्रामध्ये सतत संतधार सुरू असल्यामुळे गंगापूर दारणा या धरणांमधून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असून गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे निफाड तालुक्यातील चांदोरी, सायखेडा, परिसरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीने पात्र सोडले असून चांदोरी गावाला पुराचा विळखा पडायला सुरुवात झाली आहे रात्रभर पाऊस सुरू राहिल्यास विसर्ग आणखी वाढवण्यात येणार असल्यामुळे चांदोरी गावात पुराचे पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला असून सतर्कतेचा इशारा म्हणून प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले आहे दरम्यान निफाड तालुक्यातील चांदोरी गावातून पूर परिस्थितीचा आढावा घेतला आहे0
0
Report
मुंबई में बंद के बीच भांडुप में दुकानदार-रिक्शा चालक भी बंद रहे
Mumbai, Maharashtra:वंचित बहुजन आघाडी च्या बंद ला मुंबईत समिश्र प्रतिसाद दिसतो आहे. भांडुप मध्ये मात्र या बंद ला मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. इथे दुकानदार, रिक्षा चालक यांनी स्वतः बंद पाळला आहे. तर जी दुकाने सुरू होती, ती वंचित च्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून बंद केली आहे. भांडुप च्या महाराष्ट्र नगर परिसरात वंचित चे पदाधिकारी फिरत आहेत आणि सुरू असलेली दुकाने बंद करण्यात येत आहेत. याचा आढावा घेतला आहे.0
0
Report
सादाभाऊ खोत के पोस्टर पर हमला; राष्ट्रवादी कांग्रेस के विरोध प्रदर्शन तेज
Sangli, Maharashtra:स्लग - आमदार सदाभाऊ खोत यांच्या पोस्टरला जोडे मारून,राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा निषेध.. अँकर - आमदार सदाभाऊ खोत यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून सांगलीत आंदोलन करण्यात आले आहे. आमदार खोत यांच्याकडुन दिल्लीतील आंदोलन विद्यार्थ्यांना आतंकवादी अशी उपमा देण्यात आली होती. यावरून तीव्र पडसाद उमटत आहेत, सांगलीत देखील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्यावतीने खोत यांच्या विरोधात निदर्शने करत आमदार खोत यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला आहे,शहरातील कॉलेज कॉर्नर येथे आंदोलन करण्यात आले, यावेळी खोत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आमदार खोत यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली.0
0
Report
Advertisement
