445001
यवतमाळ तालुका काँग्रेस अध्यक्षावर भरचौकात चाकुहल्ला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहराच्या मध्यवस्तीत गजबजलेल्या दत्त चौकामध्ये भरदिवसा प्राणघातक हल्ल्याची घटना घडल्याने वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रामायण हॉटेल समोर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रमेश भीसणकर यांच्यावर दोन आरोपींनी चाकूने हल्ला चढविला, यावेळी भीसनकर यांनी जखमी अवस्थेत एकाच्या हातून चाकू हिसकावल्याने दोघेही पसार झाले, त्यानंतर जखमी भीसणकर हे स्वतः ऑटोने रुग्णालयात पोहोचले. दरम्यान हा थरार शेकडो लोकांपुढे सुरू असताना कुणीही त्यांच्या बचावासाठी पुढे आले नाही.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
47 दिन बारिश नहीं: लातूर के किसानों के सपने सूखे, मदद की मांग
Latur, Maharashtra:लातूर जिल्ह्यात ४७ दिवसांपासून पाऊस गायब.. सोयाबीन पिकं वाळण्याच्या मार्गावर.... आभाळ स्वच्छ आहे, पण शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र चिंता दाटलीय... ज्या पावसावर विश्वास ठेवून बळीराजाने पेरणी केली, ज्या पिकांकडून घरच्या संसाराची स्वप्नं पाहिली... त्याच पिकांना आता पावसाची प्रतीक्षा आहे. लातूरच्या शिवारात सोयाबीनची पिक आता शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत पावसाअभावी वाळताना दिसतात... हे आहेत औसा तालुक्यातील कन्हेरी गावचे शेतकरी भलभिम बोडके... १० एकर जमिनीवर त्यांनी मोठ्या आशेने सोयाबीनची पेरणी केली... पेरणी करताना बोडकेंच्या डोळ्यांसमोर होतं चांगल्या उत्पन्नाचं स्वप्न... कुटुंबाच्या गरजा भागवण्याची आशा... आणि या सगळ्याचा आधार होता तो पाऊस... सुरुवातीला पाऊस झाला... पीकही उभं राहिलं... मात्र आता तब्बल ४७ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. ज्या शेतात हिरवाई पाहून शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान यायला हवं, त्याच शेतात उभ्या पिकाकडे पाहताना आता चिंता दिसतेय... दिवसेंदिवस पिकाची अवस्था बदलतेय... खर्च झालाय, मेहनत झालीय... मात्र या मेहनतीचं चीज होईल का, याचीच धाकधूक बोडकेंच्या मनात आहे... दहा एकरांचं हे पीक म्हणजे केवळ सोयाबीन नाही... तर एका शेतकऱ्याचं वर्षभराचं स्वप्न आहे... आणि हे स्वप्न आता पावसाच्या एका सरीच्या प्रतीक्षेत आहे... ४७ दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पिकं वाळत आहेत... पेरणीपासून आजवर केलेला खर्च, घेतलेली मेहनत आणि उभं केलेलं पीक आता संकटात सापडलंय. त्यातच मागील वर्षी झालेल्या नुकसानीची मदत अद्याप शेतकऱ्यांच्या हातात पोहोचलेली नाही... त्यामुळे यंदाच्या संकटाने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे... या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार धीरज देशमुख यांनी केली आहे... तर मराठवाड्यात पावसाचा मोठा खंड पडलेला असताना सरकार दुष्काळ जाहीर करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लातूरमध्ये केला आहे... आता प्रश्न केवळ पावसाचा नाही... तर पावसाअभावी उद्ध्वस्त होणाऱ्या शेतकऱ्याच्या वर्षभराच्या कष्टांचा आहे... ४७ दिवसांपासून पावस गायब झालाय... शेतात उभं पीक पाण्यासाठी आसुसलंय... आणि बळीराजाची नजर अजूनही आभाळाकडेच आहे. कर्ज काढून, घाम गाळून, पै-पै जमवून शेतकऱ्याने पीक उभं केलं... आज मात्र त्या पिकाचं भवितव्य एका पावसाच्या सरीवर अवलंबून आहे. मागील वर्षीच्या नुकसानीची मदत अद्याप मिळालेली नाही... आणि यंदाही संकट दारात उभं आहे. शेतकऱ्याला आता केवळ आश्वासनांची नाही, तर मदतीच्या हाताची गरज आहे... कारण पिकं वाचलं तरच शेतकऱ्याचं स्वप्न वाचेल... आणि शेतकरी वाचला, तरच शेतीचं भविष्य वाचेल! परिस्थितीला कोणतंही नाव द्या... पण बळीराजाला सरळ हाताने मदत करा एवढीच अपेक्षा....0
0
Report
आदित्य ठाकरे की मीडिया ब्रीफिंग: ठाणे डेटा सेंटर व मेट्रो पर विरोध तेज
Mumbai, Maharashtra:शिवसेना महाराष्ट्र राज्य प्रवक्ते अरुण सावंत विषय आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद या राज्यामध्ये चार लोकांचे टोळकं महाराष्ट्राच्या विकासाला विरोध करण्याचं काम करत आहे आदित्य ठाकरे यांनी ठाण्यामध्ये डेटा सेंटर इंटरनल रिंग मेट्रो आणि क्लस्टर योजनेला विरोध केलेला आहे विकासाला विरोध करण्याचं काम हे गेले कित्येक वर्ष करत आहेत आणि म्हणून जनतेने त्यांना घरी बसवले जे आरोप त्यांनी केलेले आहेत तसे काहीही घडणार नाही जनतेला कोणताही प्रकारचा त्रास देणे हे सरकारचे उद्दिष्ट नाही0
0
Report
माँ ने बेटी से पैसे के लिए वीडियो-फोटोज बनवाने का दबाव डाला, मामला दर्ज
Nagpur, Maharashtra:नागपुर-Imamwada थाना सीमा के अंतर्गत एक चौंकाने वाला मामला सामने आया है। कर्ज के पैसे लेने के बारे में बताए जाने पर दबाव डालते हुए एक माँ ने अपनी 18 वर्षीय बेटी पर पैसे उधार लेने वाले व्यक्ति के पास जाने का दबाव डाला। बेटी को कर्ज चुकाने के लिए उसी व्यक्ति के पास जाकर वही करने को कहा गया। बेटी ने इनकार किया तो माँ ने उसे वस्त्रहीन कर वीडियो और फोटोज खिंचने को मजबूर किया। बेटी ने आरोप लगाया कि वीडियो और फोटो भेजने के लिए कहा गया। धमकी दी गई कि यदि कोई बतायेगा तो जान से मार देंगे और अपने-अपनों को नुकसान पहुँचायेंगे। बदसलूकी लगातार बढ़ने पर बेटी ने अपने पिता को इस बारे में बताया। पति-पत्नी के बीच झगड़े के बाद Imamwada पुलिस ने माँ के विरुद्ध मामला दर्ज किया। हालांकि बेटी की मांग वाली वह व्यक्ति कौन है, इसकी जांच पुलिस कर रही है।0
0
Report
Advertisement
पाणंद सड़क योजना से चंदनपुर के किसानों की खेती तक पहुंच आसान, बड़े बदलाव
Buldhana, Maharashtra:दगड-धोंड्यांच्या वाटेवरून आता शेतात ट्रॅक्टरची वाटचाल! पाणंद रस्ता योजनेसचा चंदनपूरच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा चंदनपूर गावातील शेतकऱ्यांसाठी शेतीपर्यंत पोहोचण्याचा रस्ता म्हणजे अक्षरशः संघर्षाची वाट होती. दगड-धोंडे, मोठमोठे नाले आणि चिखलामुळे शेतात बैलगाडी तर सोडाच, ट्रॅक्टर नेणंही मुश्किल होतं. मात्र राज्य सरकारच्या पाणंद रस्ता योजनेतून या रस्त्याचं काम झाल्यानंतर परिस्थिती बदलली आहे. आता शेतकऱ्यांना शेतीमालाची वाहतूक करणं आणि शेतीची कामं करणं तुलनेने सोपं झालंय. पाहूया, चंदनपूरच्या शेतकऱ्यांची ही बदललेली वाट... हा रस्ता... चंदनपूरच्या शेतकऱ्यांसाठी कधी काळी रस्ता नव्हताच... तर ती होती अडचणींची वाट! दगड-धोंड्यांनी भरलेला रस्ता... ठिकठिकाणी पडलेले नाले... पावसाळ्यात चिखल आणि पाणी... या सगळ्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. बैलगाडी नेणं कठीण... ट्रॅक्टर नेणं आणखी कठीण... आणि शेतीमाल शेतातून बाहेर काढताना तर शेतकऱ्यांची अक्षरशः दमछाक होत होती. मात्र आता याच रस्त्याचं चित्र बदललंय. राज्य शासनाच्या पाणंद रस्ता योजनेतून रस्त्याचं काम झालं... आणि शेतकऱ्यांच्या वर्षानुवर्षांच्या अडचणी काही प्रमाणात दूर झाल्या. ज्या वाटेवरून पूर्वी चालणंही अवघड होतं, त्याच रस्त्यावरून आता ट्रॅक्टर आणि शेतीची वाहनं सहजपणे शेतापर्यंत पोहोचू लागली आहेत. शेती म्हणजे फक्त पिकं घेणं नाही... तर त्या पिकासाठी वेळेवर ट्रॅक्टर, खतं, बियाणं, औषधं आणि मजूर शेतात पोहोचणंही तितकंच महत्त्वाचं. रस्ता खराब असेल तर याचा थेट परिणाम शेतीच्या कामांवर होतो. पण पाणंद रस्ता झाल्यानंतर शेतात जाणं-येणं, शेतीची मशागत करणं आणि शेतीमाल बाहेर काढणं शेतकऱ्यांसाठी सोपं झाल्याचं ते सांगत आहेत.0
0
Report
दापोली-रत्नागिरी में 54वीं संयुक्त कृषि संशोधन बैठक सफल, आधुनिक तकनीक पर जोर
Ratnagiri, Maharashtra:दापोली - रत्नागिरी.. दापोलीत ५४ वी संयुक्त कृषी संशोधन व विकास समिती बैठक संपन्न; आधुनिक तंत्रज्ञान व संशोधनावर भर.. दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात ५४ वी संयुक्त कृषी संशोधन व विकास समिती बैठक २०२६ उत्साहात पार पडली... महाराष्ट्रीय कृषी शिक्षण व संशोधन परिषद,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात रोजगार व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले आणि कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी कृषी प्रदर्शनाची पाहणी करत विविध तंत्रज्ञान व उत्पादनांची माहिती जाणून घेतली.. यावेळी दोन्ही मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रयोगशीलतेचे कौतुक करत आधुनिक शेतीला प्रोत्साहन देण्यावर भर दिला, तसेच कृषी क्षेत्रातील नावीन्यपूर्ण संशोधनासाठी शासनाचे पूर्ण पाठबळ राहील अशी ग्वाही दिली.. रत्नागिरी.. कृषी विद्यापीठाच्या आकृतीबंधावर शासन सकारात्मक; रोहित पवारांच्या टीकेला आशिष जयस्वाल यांचे प्रत्युत्तर.. कृषी विभागाच्या आकृतीबंधाबाबत शासन नव्याने विचार करून योग्य निर्णय घेईल,अशी ग्वahi दिली आहे.. कृषी विभागाच्या आकृतीबंधावरून आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांवर बोलताना, रोहित पवार काय म्हणतात ते जाऊ द्या, प्रशासान याबाबत पूर्णपणे सकारात्मक असून लवकरच यातून योग्य मार्ग काढला जाईल, असा टोला त्यांनी लगावला..0
0
Report
नागपुर में मनुस्मृति के विरोध पर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस ने संविधान सम्मान यात्रा निकाली
Nagpur, Maharashtra:नागपूर -- नागपुरात आज मनुस्मृतीच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने रेशीमबाग संघ कार्यालयावर संविधान सन्मान यात्रा काडण्यात आली होती. NIT कर्मचारी सांस्कृतिक भवन, ग्रेट नाग रोड येथून या आंदोलनाला सुरुवात झाली. प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष शिवराज मोरे आणि सहप्रभारी नवज्योत सिंग संधू यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला यावेळी रामटेकचे श्याम कुमार बर्वे हेही या मोर्चामध्ये सहभागी झाले होते... यावेळी आंदोलकांना पोलिसांनी भट सभागृह येथे बॅरिकेट टाकून रोखले.. त्यानंतर सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले0
0
Report
Advertisement
जालना के ओबीसी नेताओं के आंदोलन से सरकार पर दबाव, कर्जमाफी की मांग
Jalna, Maharashtra:जालना, नवनाथ वाघमारे ओबीसी नेते बाईट पॉईंटर..... ऑन जालना जिल्ह्यात पाऊस नाही राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत तात्काळ पावलं उचलले पाहिजे, तात्काळ दुष्काळ जाहीर करणं गरजेचं आहे... शेतकऱ्यांच्या बाबतीत राज्य सरकारने वेळ काढूपणा केला नाही पाहिजे.. जरांगे यांच आंदोलन म्हणजे रोजच मड त्याला कोण रड अशी परिस्थिती निर्माण झाली. राज्य सरकारने जरांगे यांचे किती मुके घेतले तरी तो म्हणणार नाही की मला हे दिलं म्हणून... राज्य सरकारने संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी... ऑन मनोज जरांगे पाटील आंदोलन जुन्या काळात पायातलं वाहन डोक्यावर घेतलं नाही पाहिजे असं म्हणायचे राज्य सरकारने पायातली चप्पल पायात ठेवली असती तर एवढा जरांगेचा त्रास झाला नसता... एकनाथ शिंदे साहेबांनी पायातली चप्पल डोक्यावर घेतली. ओबीसींचा रोष तुम्हाला परवडणारा नाही, मराठवाड्यातले येणाऱ्या काळात चार हजार कुणबी प्रमाणपत्र रद्द झालेले पाहायला मिळतील... मनोज जरांगेकडे राज्य सरकारने दुर्लक्ष कराव, मनोज जरांगे म्हणजे सगळा मराठा नाही... मनोज जरांगे कोण आहे त्याला अक्कल आहे का.. जरांगे यांचे उपोषण आता राहिलेलं नाही, दररोज पाच ते सात सलाईन घेतल्यानंतर माणसाला काही होत नाही... सलाईन घेतल्यानंतर उपोषण संपलेल असतं... ऑन मुंबई आंदोलन ओबसींच्या आंदोलनाला परवानगी दिली नाही याला परवानगी दिली तर त्याचा विचार ओबीसी करतील... मुंबईत गेलेल्या मराठा समाजाच्या तरुणावर गुन्हे दाखल झाले तर जबाबदार कोण.... पायातली चप्पल डोक्यावर घेतल्यावर काय होतं त्याचे उत्तम उदाहरण जरांगे आहे.. गेल्या तीन वर्षापासून राज्यातील ओबीसी हा त्रास सहन करतोय, त्याचा कोणी विचार केला आहे का... छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पासून मुख्यमंत्र्यापासून तर भुजबळांची आई माय काढायची,0
0
Report
बुलढाणा के कार्यक्रम में हंगामा: विधायक के आरोपों पर प्रशासन-समर्थकों की तनातनी
Buldhana, Maharashtra:बुलढाणा.. आमदार संजय गायकवाड , भाषण पॉइंट्स . मी कर्नाटक ला असताना बुलढाण्यात कार्यक्रम झाला . कार्यक्रम कशासाठी तर माझ्या मुलाचा चां वाढदिवसा चिखलीत झाला म्हणून . एका लेकराला चॅलेंज देण्यासाठी बुलढाण्यात कार्यक्रम झाला . त्या कार्यक्रमात माझा सहभाग शुन्य होता . वाढदिवसाला माणसाला 500 रुपये रोज माणसे आणली . चपराशी पासून अधिकाऱ्यांपर्यंत पाच पाच फोन . आम्हाला भाड्याच्या माणसांची गरज नाही . कार्यक्रमात माझ्यावर टीका केली,. लाईट गेली म्हटले, अर्धा अर्धा तास लाईट टिकती का . शेतकऱ्यांना विचारा. तिथे लाईट गेली त्यात माझा काय दोष . मला जर विरोध करायचा असता तर मी धाड नाक्यावर फौज उभी केली असती तर सगळे मागच्या मागे गायब झाले असते . काही काँग्रेसवाले हीजडे बाईंच्या बाजूला जाऊन दंड थोपटून राहिले. यांचे बाप दादा माझ्या हाताखालीन कधीचे मोकळे झालेय. दंड थोपटता तर कुणासाठी दंड थोपटता . त्यादिवशी पोलिसा बांधवांना दिवसभर चौकाचौकता ताटकळत ठेवले . काय तर vip मुव्हमेंट आहे . एक बिडीओ लेव्हलचा अधिकारी, खाजगी सचिव, आणि vip मुव्हमेंट.. अख्ख बुलढाणा जाम करून टाकले . एम्बुलन्स लाही जगा दिली नाही चौका चौकात जेसीबी उभ्या करून लोकांना त्रास दिला.. म्हणतात बुलढाण्याचा कचरा चिखलीत आला. तुम्ही कार्यक्रमाला आले तर कचरा आहे ka , हे शिवसेनेचे भगवे वादळ आहे . तुम्ही आम्हाला कचरा म्हणता मी cm dcm यांच्या मंत्रिमंडळातील दमदार आमदार आहे . आम्ही जे केले ते करून दाखवा दंड थोपटता तर कुणासाठी दंड थोपटता* . त्यादिवशी पोलिसा बांधवांना दिवसभर चौकाचौकता ताटकळत ठेवले . काय तर vip मुव्हमेंट आहे . एक बिडीओ लेव्हलचा अधिकारी, खाजगी सचिव, आणि vip मुव्हमेंट.. गोरगरीब लेकरांना तडीपार करायचे काम करू नका, खोट्या केसेस करू नका. चागल्या मार्गाने देखील तुम्ही लोकांची कामे करू शकता . Rss ला सुद्धा कधी किंमत दिली नाही, बुलढाण्यात कार्यक्रमता ओरिजनल भाजपा नव्हती . चिखली मध्ये सुद्धा ओरिजनल भाजपा सोबत नाही . लोकांना जेवण ठेवले तर जेवायला पण कुणी गेले नाही . वाढदिवसाला दोन चार कोटी खर्च करता, दुसरीकडे आमचे शेतकरी मरतोय, आत्महत्या करतो, दुष्काळ आहे, शेतकरी विवंचनेत असताना कोट्यवधी वाढदिवसाला खर्च करता . बाप तो बाप होता है म्हटले, बाई म्हणून बाप कसा होईल . ईश्वरनी दोनच जाती घडवल्या पुरुष आणि स्त्री . आम्ही स्त्रीला देवी, आई सामना पाहतो, चामुंडा समजतो. बाप तो बाप ची भाषा करणारे, म्हणजे नारिजातीचा अपमान करणारी जात आहे . महिलांचा सन्मान नाही तर अपमान करणारी गोष्ट आहे . ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी बापच नाही तर त्यापुढच्या पण दाखवीन . तुम्ही काहीच काळजी करू नका, मी पण आमदार आहे . मी काही नुसता केबिन मधे घुसून धमक्या देणारा नाही . गरज पडली तर पाचव्या मजल्यावरून कार्यक्रम करून टाकीन, इतके डोके खराब होऊन माझे . तुमची ताकद दाखवायची तर लेकराला काय दाखवता तुमची ताकद जनतेला दाखवा. छत्रपतींनी स्वराज्यासाठी लढाई लढली, महिलांचा सन्मान केला . आता धाड सर्कल पासून बापाची एन्ट्री होणार . पण बाप देखील त्या बाईला बहिणीसारखा , मुली सारखा समजतो हे देखील त्यांनी विसरू नये त्यांनी धनुष्यबाण चिन्ह दाखविले , म्हणजे त्यांचे म्हणणे आहे इकडे धनुष्यबाण कायम राहिले पाहिजे . तुम्ही तुमच्या पक्ष वाढवा, आम्ही आमचे पक्ष वाढवतो . मात्र विनाकारण आमच्याशी संघर्ष करण्याचा प्रयत्न करू नका. आमचं संघर्ष तुम्हीशी नाही . आपल्या मागे कुणी नव्हते ते आपण घाबरलो नाही, आता तर मी आमदार आहे .0
0
Report
नागपुर के Barrel Café में आग लगाने वाले दो गिरफ्तार; CCTV से हुआ पर्दाफाश
Nagpur, Maharashtra:नागपूर कॅफे पबच्या एन्ट्रीवरून झाला वाद, इगो दुखावल्याने पेटवून दिले कॅफ पब 9 लाखांच्या नुकसानीप्रकरणी दोघांना अटक...मुख्य आरोपी मास्टर शेफ, CCTV मुळे उलगडली घटना नागपुरातील शिवाजीनगर येथील द बॅरल كॅफेला आग लावून सुमारे 9 लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केलीय. मुख्य आरोपीची ओळख मनमोहन तिवारी असे नाव आहे.त्याच्यासह साथीदार शुभम विश्वकर्मा यालाही पोलिसांनी अटक केलीय. कॅफेतील एन्ट्रीवरून झालेला वाद आणि सर्व्हिसबद्दलची नाराजी हे मुख्य कारण असल्याचे बोलल्या जाते . 5 सप्टेंबरच्या रात्री मनमोहन कॅफेमध्ये गेला होता. एन्ट्रीच्या वेळी त्याच्याजवळ असलेले काही सामान आत नेण्यास परवानगी देण्यात आली नाही. त्यानंतर एन्ट्रीसाठी त्याच्याकडून काही पैसे जमा करून घेण्यात आले. आरोपीच्या म्हणण्यानुसार, त्याने दारू खरेदी केली होती, पण त्याला दारू बनावट वाटली आणि पैसे देऊनही कॅफेमध्ये अपेक्षित सेवा मिळाली नाही. याच गोष्टीवरून तो नाराज झाला होता.दरम्यान कॅफेमधून बाहेर पडल्यानंतर मनमोहनने त्याचा साथीदार शुभमला फोन केला. शुभमला तो जिथे काम करतो त्या हॉटेलमधून घेऊन दोघे कथितरित्या कॅफेत पोहोचले. त्यानंतर मनमोहनने त्याच्या गाडीतून पेट्रोल काढले आणि कथितरित्या कॅफेला आग लावली. घटनेनंतर दोघेही तिथून फरार झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कॅफेमधील CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. नंतर आग लावून बाहेर पडताना आरोपी दिसले . CCTV आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेतले. अंबाझरी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. पोलीस आगीची संपूर्ण योजना, घटनेतील दोघांची भूमिका आणि घटनेमागील इतर दुव्यांचा तपास करत आहेत. मुख्य आरोपीने अनेक देशांमध्ये मास्टरशेफ म्हणून काम केले होते ----- बाईट पोलिस अधिकारी, अंबाझरी पोलीस स्टेशन0
0
Report
Advertisement
पूर्व शिक्षक आमदार अपूर्व हिरे ने शिक्षा विभाग पर गंभीर आरोप, मौत का मामला
Nashik, Maharashtra:मालेगाव ( नाशिक ) ब्रेकिंग - प्रा.बोरसे मानसिक तणावामुळे कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाल्याचा हिरे यांचा दावा.. - या संपूर्ण घटनेला शिक्षण विभाग जबाबदार असल्याचा गंभीर आरोप.. - शिक्षकांना विविध कारणांनी त्रास देण्याच्या हेतूने शाळांची चौकशी सुरू असल्याचा अपूर्व हिरे यांचा आरोप.. - पोर्टलवर सर्व कागदपत्रे अपलोड असतानाही वारंवार तपासणीचा दावा.. - चौकशी आणि दबावामुळे शिक्षक मानसिक तणावाखाली असल्याचा आरोप.. - संस्थेत भ्रष्टाचार असेल तर संस्थाचालक म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल करा – अपूर्व हिरे - शिक्षकांना त्रास देणे हा पर्याय नाही; चुकीचे असेल तर माझ्यावर कारवाई करा, हिरे यांचे आव्हान.. Anchor - मालेगावमध्ये म्युनिसिपल हायस्कूलमधील प्राध्यापक बोरसे यांच्या मृत्यूचा मुद्दा चांगलाच तापला आहे. या पार्श्वभूमीवर माजी शिक्षक आमदार अपूर्व हिरे यांनी पत्रकार परिषद घेत शिक्षण विभागावर गंभीर आरोप केले आहेत..मंत्री भुसे यांच्या तक्रारीवरून चौकशी झाल्यानंतर शाळेवर प्रशासक नेमले गेले, त्यांनी त्यांचे अधिकार वापरले.. त्यांनी वापरलेल्या अधिकाराविरुद्ध आम्ही कोर्टात गेलो कोर्ट कडून आम्हाला न्याय मिळेल..मात्र, गेल्या काही दिवसांपासून शाळेत सातत्याने चौकशी आणि तपासणीसाठी पथक येत होते. शिक्षकांवर वारंवार दबाव आणला जात होता, तर पोर्टलवर सर्व कागदपत्रे आणि माहिती उपलब्ध असतानही केवळ त्रास देण्याच्या हेतूने चौकशी सुरू असल्याचा आरोप हिरे यांनी केला आहे.याच मानसिक तणावातून प्रा.बोरसे यांना घाम फुटला, ते कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.या संपूर्ण घटनेला शिक्षण विभाग जबाबदार असल्याचा थेट आरोप अपूर्व हिरे यांनी केला आहे. तसेच, संस्थेत काही भ्रष्टाचार असेल, चुकीचे घडत असेल तर संस्थाचालक म्हणून आम्हाला जबाबदार धरा, आमच्यावर गुन्हे दाखल करा ; मात्र शिक्षकांना त्रास देऊ नका, असं आव्हानही हिरे यांनी दिलं आहे..दरम्यान, पोलिस फिर्याद घेत नसल्याचाही त्यांनी आरोप केला असून, स्वतः फोन केल्यानंतर मध्यरात्री फिर्याद नोंदवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. घटनेला २४ तास उलटूनही एकाही आरोपीला अटक झालेली नाही, असा दावा करत हिरे यांनी पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.. बाईट - अपूर्व हिरे, माजी शिक्षक आमदार0
0
Report
कल्याण में मराठा समर्थकों का एक दिवसीय अन्नत्याग, सरकार से तुरंत समाधान की मांग
Kalyan, Maharashtra:जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कल्याणमध्येही उपोषण 12 वा दिवस आहे .अजूनही कोणत्याही प्रकारचा तोडगा मराठा आरक्षणावर निघालेला नाही. दरम्यान जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कल्याणमध्ये देखील मराठा बांधवांच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे. कल्याण तहसील कार्यालयाबाहेर मराठा बांधव एक दिवशीय अन्नत्याग लाक्षणिक उपोषणासाठी बसले आहेत. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी देखील सामील आहेत. सरकारने लवकरात लवकर यावर तोडगा काडावा अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली.0
0
Report
अमोल कोल्हे ने DPDC फंड आवंटन पर सरकार पर तीखा हमला
Shirur, Maharashtra:जिल्हा नियोजन समितीच्या म्हणजेच डीपीसीच्या निधी वाटपावरून शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. डीपीसीमधून मिळणाऱ्या निधीपैकी तब्बल ७० टक्के निधी आमदार खर्च करतात, तर उर्वरित ३० टक्के निधी पालकमंत्र्यांच्या अखत्यारीत खर्च केला जातो. या निधीतील मोठा हिस्सा हा थेट केंद्राकडून येत असतानाही, स्थानिक खासदारांना मात्र विकासकामांसाठी यात कोणताही निधी दिला जात नाही, असा थेट आरोप अमोल कोल्हे यांनी केला आहे. खासदारांना पूर्णपणे डावलून केवळ आमदार आणि मंत्र्यांच्या हातात निधी देण्याच्या या धोरणावर त्यांनी कडक शब्दांत आक्षेप घेतला असून, या अन्यायाविरोधात आता नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे, जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडी येथील कार्यक्रमात खासदार कोल्हे बोलत होते0
0
Report
Advertisement
वाशीम बैलपोळा बाजार बारिश से प्रभावित, किसान खर्चे कम पाने को विवश
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:उद्याच्या बैलपोळ्याच्या पार्श्वभूमीवर वाशिमची बाजारपेठ सर्जा-राजाच्या साजशृंगाराच्या साहित्याने सजली आहे.गोंडे,घुंगरू, झुली,दोऱ्या आणि रंगांची खरेदी करण्यासाठी शेतकरी बाजारात दाखल होत आहेत.मात्र यंदा पावसाने दडी मारल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे पोळ्याच्या बाजारपेठेतील गर्दी आणि खरेदीची लगबग काहीशी कमी झाली आहे. हातात पैसा कमी असला तरी वर्षभर साथ देणाऱ्या लाडक्या बैलाप्रती शेतकरी माया कायम आहे. त्यामुळे ऐपतीनुसार खरेदी करत शेतकरी साधेपणाने बैलपोळा साजरा करण्याच्या तयारीत आहेत.0
0
Report
बारामती में मोदी के प्रेरणास्थल का निरीक्षण, शरद पवार ने भी किया दौरा
Rui, Maharashtra:माजी केंद्रीय कृषिमंत्री बारामतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या प्रेरणास्थळाची केली पाहणी बारामतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या प्रेरणास्थळाचे काम अंतिम टप्प्यात आले असून माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज या प्रेरणास्थळाची पाहणी केली0
0
Report
नाशिक में MD ड्रग्स विक्री धंधা पकड़ा गया, दो गिरफ्तार, 56 ग्राम पावडर बरामद
Nashik, Maharashtra:नाशिकच्या पेठरोडवरील अश्वमेधनगर परिसरात एमडी ड्रग्ज विक्रीचा डाव नाशिक पोलिसांनी उधळून लावला आहे. अमली पदार्थविरोधी पथकाने सापळा रचत दोघा संशयित पेडलरना ताब्यात घेतलं. दर्शन गायकवाड आणि रोशन लोखंडे अशी या दोघांची नावं आहेत. त्यांच्या अंगझडतीत तब्बल ५६ ग्रॅम एमडी पावडर आढळून आली असून, त्याची किंमत तब्बल १ लाख ६८ हजार रुपये आहे. यासोबतच गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे. विशेष म्हणजे, संशयित दर्शन गायकवाड हा पोलिस रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, एमडीचा पुरवठा नेमका कुठून झाला आणि तो कोणाला विकला जाणार होता, याचा तपास सुरू आहे.0
0
Report
Advertisement
