icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सातारा हाफ-मैरेथॉन में संजय कदम की हृदयाघात से मौत

Satara, Maharashtra:सातारा - साताऱ्यात हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.ही स्पर्धा सुरळीत सुरू असतानाच अचानक एक स्पर्धक संजय कदम यांना हृदयविकाराचा झटका आला. स्पर्धेदरम्यान बोगदा परिसरात धावत असतानाच त्रास जाणवला.परंतु दुर्दैवाने त्यांच्यावर सातारा शहरातील पल्स हॉस्पिटलमध्ये योग्य उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.साताऱ्या गेल्या पंधरा वर्षापासून हाफ हॅल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.या स्पर्धेत जगभरातून धावपटू सहभाग घेतात परंतु या वर्षी मात्र संजय कदम या स्पर्धकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने स्पर्धेदरम्यान शोककळा पसरली. धावपटू संजय कदम हे पुणे येथून स्पर्धेत सहभागी झाले होते.स्पर्धेत पळत असताना बोगदा परिसरात त्यांना अचानक त्रास जाणवू लागला त्याच वेळी त्यांच्या पाठीमागून धावत येणारे मॅरेथॉन स्पर्धक डॉ.मुजावर आणि मॅरेथॉन चे संयोजक डॉ.कौशिक पाटील आणि डॉक्टर प्रतापराव गोळे यांनी तातडीने बोगदा परिसरातच धावपटू संजय कदम यांची अवस्था पाहून जागेवरच प्राथमिक उपचार केले आणि तातडीने रुग्णवाहिका बोलवली. रुग्णवाहिका येईपर्यंत सी.पी.आर. उपचार सुरू केला. मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झालेले अनुभवी डॉक्टर मुजावर यांनी त्यांच्या अनुभवातून तातडीने स्पर्धक संजय कदम यांना रुग्णवाहिका आल्यानंतर रुग्णवाहिकेमध्ये घेऊन इंजेक्शन देण्यात आले.त्यानंतर पल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करून अँजिओ ग्राफी करण्यात आली. त्यामध्ये अधिक तपासणी केली असता स्पर्धक संजय कदम यांची रक्तवाहिनी ब्लॉक झाल्यानंतर हृदयाला इजा पोचली होती, त्वरित एन्जोप्लাস्टी करण्यात आली.पुणे येथून आलेल्या संजय कदम यांच्यावर तातडीने उपचार झाल्यामुळे त्यांना काही काळासाठी जीवदान मिळाले. खऱ्या अर्थाने डॉक्टरांच्या आणि संयोजकांच्या प्रयत्नांना यश आले असे वाटत असतानाच जवळपास चार तासाने त्यांची प्राणज्योत मावळली पथक वेळेत मिळाले होते परंतु संजय कदम यांच्या निधनाची वार्ता समजल्यामुळे संपूर्ण स्पर्धेमध्ये हळहळ व्यक्त केली.
0
0
Report
0
0
Report

येल्वाला के उद्यमी सम्राट वर्मा का मकान स्थलांतर, 250 जैक से उठाने का प्रयोग

Yeola, Maharashtra:येवला तालुक्यातील उद्योजक सम्राट वर्मा यांनी घर पाडण्याऐवजी चक्क घरच स्थलांतर करण्याचा निर्णय घेतलाय आणि आता तब्बल अडीचशे जॅकच्या मदतीने हे घर उचलण्याचं काम सुरू आहे. फॅक्टरीजवळ नव्याने बांधलेलं घर रस्त्याच्या कामात अडथळा होत होतं... मात्र घर पाडून नुकसान करण्याऐवजी ते दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेण्यात आला... यासाठी हरियाणातील कुरुक्षेत्र येथील कारागिरांना बोलावण्यात आलंय... सुमारे अडीचशे जॅक आणि दहा मजुरांच्या मदतीने घर जागेवरून उचलून स्थलांतरित करण्यात येत आहे... या संपूर्ण प्रक्रियेला सुमारे एक महिन्याचा कालावधी लागणार आहे... विशेष म्हणजे, नाशिक जिल्ह्यात संपूर्ण घर स्थलांतर करण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा करण्यात येत असून, या अनोख्या उपक्रमाची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे या अनोख्या प्रयोगाबाबत आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
0
Report
Advertisement

ढोरेगाव के स्कूल में मानवी चेन से साक्षरता संदेश, शिक्षण अधिकार का आह्वान

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, ढोरेगाव येथे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने साक्षरतेचा संदेश दिला. शेकडो विद्यार्थ्यांनी हातात हात गुंफून मानवी साखळीच्या माध्यमातून ‘साक्षरतेचे बोधचিন्ह’ साकारत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केला. शालेय प्रांगणात विद्यार्थी एकत्र येत हातात हात घालून मानवी साखळीमध्ये सहभागी झाले. ‘साक्षर बना, प्रगती करा’, ‘शिक्षण हक्क – प्रत्येकाचा हक्क’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून साकारलेले साक्षरतेचे बोधचिन्ह लक्ष वेधून घेणारे आहे..
0
0
Report

अमरावती में 22 वर्षीय युवक की हत्या; 9 दिनों में चौथी हत्या, कानून-व्यवस्था चिंताजनक

Amravati, Maharashtra:अमरावतीत 22 वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने हत्या; 9 दिवसात चौथी हत्येची घटना, शहरात खाकीचा धाक संपला. अमरावती शहरातील हैदरपुर परिसरात 22 वर्षीय शेख साहिल उर्फ गणि शेख फारुख या युवकावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला. महानगरपालिकेच्या रुग्णालयासमोरच हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात साहिलच्या डोक्यासह शरीरावर गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं या घटनेनंतर अमरावती शहरातील वाढत्या हत्यांच्या घटनांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे अवघ्या 9 दिवसांत अमरावती शहरात 4 हत्येच्या घटना घडल्या आहेत. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत अमरावती शहरात एकूण 35 खून झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला असून वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून ठोस कारवाई कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
0
0
Report

खवड्या पहाड़: आत्महत्या रोकने के लिए 7.75 करोड़ का कड़ा उपाय

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरच्या तीसगाव शिवारातील खवड्या डोंगरावरून उडी घेत अनेकांनी आपली जीवनयात्रा संपवली असून, हा डोंगर सुसाइड पॉइंट ठरत आहे. त्यामुळे या डोंगराला कुंपण घालून आत्महत्यांचे प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी सर्वच स्तरातून होत होती. अखेर प्रादेशिक पर्यटन विभागाने डोंगराच्या कडेला २,७०० मीटर लांब आणि ७.८७ फूट उंच अटी-क्लॉब काटेरी कुंपण, १२ अत्याधुनिक सीसीटीव्हींसह इतर उपाययोजनांचा तब्बल ७ कोटी ७५ लाखांचा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. खोल खाणी, सुमारे दीडशे फूट कडे आणि असुरक्षितता, तीसगावातील खवड्या यामुळे डोंगर आत्महत्य वाहन-अपघातांचे केंद्र ठरत आहे. गेल्या काही वर्षांत येथून पडून किंवा उडी घेतल्याने आतापर्यंत सुमारे १३ ते १४ जणांना जीव गमवावा लागला आहे. २१ ऑगस्टला एकाच कुटुंबातील आई-वडील आणि मुलाच्या तिहेरी मृत्यूमुळे खवड्या डोंगर पुन्हा एकदा चर्चेत आला. या घटनेनंतर जिल्हाधिकारीांनी सुरक्षा क्षेत्रात कार्य करणाऱ्या आयएफसी संस्थेच्या लोकांना बोलावून आढावा घेतला आणि उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत...
0
0
Report
Advertisement

दिल्ली-सीमा वाले किसानों का उग्र मोर्चा: मराठवाड़ा-विदर्भ में पानी और कर्ज माफी की माँग, और पेपर फुटी के आरोप

Nagpur, Maharashtra:नागपूर - रोहित पवार,पत्रकार परिषद - - महाराष्ट्रात जो काही मान्सून आहे, ज्या पद्धतीने पाऊस व्हायला पाहिजे होता मात्र दुर्दैवाने गेल्या काही महिन्यात पाऊस हा मनासारखा झालेला नाही, विदर्भात काही ठराविक जिल्हे सोडले तर 40 टक्के कमी पाऊस आतापर्यंत विदर्भात आहे - मराठवाड्यात 40 -45% कमी पावसाची परिस्थिती आहे, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातही अशीच परिस्थिती आहे, खरीप पिक ज्या शेतात आहे तो अडचणीत आलेला आहे, काही ठिकाणी पीक हिरवा दिसत असला तरी त्यातून चांगलं उत्पादन मिळेल असं वाटत नाही - कापूस, सोयाबीन याची उत्पादकता फार कमी होईल, शेतकरी आज मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे शेतकऱ्यांना ताबडतोब मदत दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे, ज्या जिल्ह्यात तालुक्यात पाऊस सरासरीपेक्षा 20% किंवा अधिक कमी असेल तिथे लवकरात लवकर दुष्काळ हा जाहीर झाला पाहिजे, शेतकऱ्यांना मदत दिली गेली पाहिजे जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणे या सगळ्या आमच्या मागणी आहे - यासाठी भंडारा जिल्ह्यात पहिला आंदोलन करत आहोत, विदर्भानंतर मराठवाड्यात चार-पाच दिवसात आंदोलन करणार आहोत, सरकारने जाहीर केलेले कर्जमाफी ही फसवी होती त्यासाठी आम्हाला आंदोलन करावी लागेल, शेतकरी रस्त्यावर आला त्यानंतर सरकारला नामुष्की स्वीकारावी लागले आणि त्यांनी जी फसवी योजना आणली होती त्यातल्या त्यात जाचक अटी होत्या त्या त्यांना काढाव्या लागल्या - कर्जमाफी झाली असली तरी 55 लाख शेतकऱ्यांपैकी दहा लाख शेतकऱ्यांना मिळालेलं आहे, मात्र 40 लाख शेतकऱ्यांना अजून कर्जमाफी मिळाला नाही त्यामुळे खरीप पिकांसाठी लागणारा बँकेचा कर्ज अजून मिळालं नाही, - आजचे कर्ज मिळत नाही हे बँकांना ठणकावून सांगून याचं नियोजन करणे महत्त्वाचा आहे, विद्यार्थ्यांना फी देण्याचे पैसे राहणार नाही, कॉलेज किंवा शाळांसाठी बद्दल सरकारने विचार करण्याची गरज आहे - 2025- 26 मध्ये तीन कोटी चाळीस लाख क्विंटल धानाचा उत्पादन झालं त्यातून एक कोटी चार लाख क्विंटल ही 2369 रुवयाने खरेदी सरकारने केली, परिणय फुके यांना जबाबदारी दिली होती सरकारने की कशाप्रकारे धानाची खरेदी करावी,छत्तीसगड मध्ये जाऊन त्यांनी काय केलं हे आम्हाला माहीत नाही - छत्तीसगड मध्ये 3500 रुपयाला धान खरेदी केले जातात, त्यामुळे आमचे मागणी आहे सरकारकडून धान्याची खरेदी केली जावी 2025-26 ला देणारा बोनस लवकर जाहीर करावा, यंदाची खरेदी किमान 3500 यांनी खरेदी करणे आवश्यक आहे कारण तीन कोटी 40 लाख क्विंटल खरेदी करतात - शेतकऱ्यांनी कसं जगावं असा प्रश्न निर्माण झाला आहे On MPSC - - एमपीएससीचे अध्यक्ष आहेत त्यांनी जे काळे कारणामे केल्यात आरटीओ आयुक्त असताना त्याबद्दलचा पत्र मुख्यमंत्री आणि सेक्रेटरी साहेबांना काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला होता, हजारो कोटीचा भ्रष्टाचार केल्यास ची चर्चा असेल तर मग मुख्यमंत्री, गव्हर्नर साहेबांनी याबाबत तपास करायला पाहिजे होता - एमपीएससी चा 1997 मध्ये पेपर फुटल्यावर त्यावेळचे अध्यक्ष जेलमध्ये गेले होते, नीटचा पेपर फुटल्यावर धर्मेंद्र प्रधान यांना घरी जावं लागलं, एमपीएससी ही स्वायत्त संस्था आहे त्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा घेणे आवश्यक आहे - ते म्हणतात की दोन महिन्यापूर्वी पेपर फुटला, स्वतःला वाचवायला हे म्हणत आहेत तर हा फार मोठा घोळ आहे, एमपीएससी मध्ये हे सिद्ध होतं, तुम्ही तिथे असताना विचित्र घोळ होतो, अधिकारी हे त्यांचे नैतिक जबाबदारी आहे त्यांना राजीनामा देता येत नसेल तर मुख्यमंत्र्यांना विनंती आहे त्यांनी पुढाकार घ्यावा, स्वच्छ प्रतिमेचा मुंढे साहेब किंवा झगडे साहेब यांना बसवा - विद्यार्थ्यांचा MPSC विश्वास कसा वाढेल याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे, भीमानवार यांनी ऑनलाइन परीक्षा प्रक्रिया आणण्याचा प्रयत्न केला ज्याला सर्व विद्यार्थ्यांनी विरोध केला - एमपीएससी चा पेपर पहिल्यांदा फुटल्यावर आम्ही तो मुद्दा मांडला, आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा पुरावे सकट बोलतो आम्ही पुरावे दिले बरेच लोकांना अटक झाले - एमपीएससी कर्मचारी परीक्षा झाल तेव्हा हेच अधिकारी असताना या परीक्षा झाल्या, आता काय तपास होतो ते आम्ही बघणार आहोत - तीन दिवसात सरकारकडून सरकारात्मक उत्तर देण्यात आलं नाही तर महाराष्ट्रात विद्यार्थी विविध जिल्ह्यात आंदोलन करतील, 12 तारखेला लातूर आंदोलन आहे, त्यानंतर पुण्यात आहे - चांगला प्रशासन यावं अशी आमची मागणी आहे On एक्सईज विभाग परीक्षा - - एक्ससाइज विभागात प्रमोशनसाठी परीक्षा घेतली जाते,ती एमपीएससी घेते, परीक्षा देताना सगळ्या विषयावर अभ्यास केला जातो, पण मार्किंग पॅटर्न काय आहे आयोगाकडे समजलं तर आपण त्याच विषयावर विचार करणार, मार्किंग पॅटर्न फुटला आणि काही अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला आणि परीक्षा देऊन प्रमोशन घेतला - पोलिसांनी तपासात म्हटला आहे की अधिकाऱ्याने तो पेपर फुटला, एम पी एस सी कडूनच हा पेपर फोडला गेला, त्यांच्याकडून सापडलेले दीडशे लोकांकडून एमपीएससीच्या अधिकाऱ्यांनी पैसे घेतला आणि त्यांनी ट्रेनिंग साठी पाठवलं - असे अधिकारी सेवेत गेल्यावर लोकांकडून पैसे वसूल करतील, म्हणून हे आंदोलन उपोषण हे विद्यार्थ्यांचा आहे आणि केवळ त्या पाठीमागे आहे On सोमेश्वर साखर कारखाना निवडणूक - - माझा व्यक्तिगत मत आहे अजितदादा जाऊन एक वर्ष देखील झाल् नाही, सोमेश्वर साखर कारखाना अजित दादांच्या मार्गदर्शनात आतापर्यंत चांगला चालला आहे, आता त्याची निवडणूक लागली असेल तर ही निवडणूक बिनविरोध होते का असा प्रयत्न सर्व पक्षांनी करावा - केवळ सोमेश्वर नाही तर इतरही काका कारखान्याने निवडणुकीत आहे असाच विचार करावा, त्यांच्याकडचे काही चांगले डायरेक्टर, आमच्याकडचे काही चांगले डायरेक्ट अशी निवडणूक बिनविरोध झाली तर चांगलंच आहे - पण आम्हाला असं कळलं की भाजप आणि शिंदे साहेबांचे काही लोक लक्ष घालायला लागले, पण आमची विनंती आहे की ही निवडणूक बिनविरोध झाली तर अजित दादांना श्रद्धांजली ठरेल On विलानीकरन - - असं काही झालं नाही, हे केवळ चर्चा आहे कुठेही विलनीकरणाची चर्चा सुरू नाही, आज त्या पक्षाची स्थिती काय आहे की त्यांचा अर्थ खातं त्यांना मिळावं यासाठी अमित शहा-मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्या - दादांकडे असलेला अर्थ खातं भाजपा अजूनही त्यांना देत नाही, मित्र पक्षांसोबतच त्यांचा चालत नाही, आम्ही सरकारच्या विरोधात बोलायला लोकांसोबत खुश आहो आम्ही आमचा चाललंय On मनोज जरांगे - - एक सामाजिक आंदोलन आहे ते स्वतः सामाजिक कार्यकर्ते आहेत, आरोग्याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे अशी माझी विनंती आहे, मुख्यमंत्री आणि सरकार यामध्ये चर्चा सुरू आहे त्या दोघात चर्चा सुरू असताना आम्ही बोलून काय होणार? - मराठा आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल, विविध समाजाचे आरक्षणाचे प्रश्न सोडवायचे असेल तर त्यात घटनादुरुस्ती करावा लागेल, सर्वपक्षीय खासदारांनी एकत्र बसून दिल्लीत बसून हा मुद्दा मांडला तर कोर्टात टिकणारा आरक्षण हे मराठा समाजाला आणि धनगर समाजाला मिळू शकतो, हा जो संवाद सुरू आहे आता जरांगे आणि सरकार यांच्यात चाललेला आहे On MPSC हाय पवार कमिटी - - हे हाय पावर कमिटी परीक्षा ऑनलाईन कशाप्रकारे घेण्यात येईल त्यासाठी करण्यात आलेली आहे, इतर अधिकारी आणि एमपीएससी अधिकाऱ्यांवर करवाई झाले पाहिजे - हे हाय पावर कमिटी म्हणजे एसआयटी सारखी आहे, अशा शेकडो एसआयटी घेतल्या जातात, - कृषी विभागाशी संबंधित कमिटीमध्ये एकही कृषी अधिकारी घेतला नाही, - ही पेपर फुटीच्या बाबतीत केलेले कमिटी हे केवळ जगाला दाखवण्यासाठी केलेली आहे, edus park कंपनी काम दिले जातात, अशाप्रकारे कंपन्या साखळी तयार करतात - ही कमिटी केवळ लोकांना दाखवण्यासाठी आहे मात्र ते कसं काम करते यावर बारीक लक्ष ठेवावे लागेल On mpsc - आम्ही पहिल्यांदा मुद्दा मांडला तेव्हा अध्यक्षांपासून सचिवापर्यंत अप्रत्यक्ष आमच्यावर टीका करण्यात आली, आता अध्यक्ष म्हणतात की जानेवारीला पेपर फुटला, अध्यक्ष केवळ चहा आणि बिस्कीट खाण्यासाठी झालेले आहात काय? - या अध्यक्षांचं नवीन pॅटर्न झालेला आहे, पारदर्शकपणे सिस्टम आणणारा स्वच्छ प्रतिमेचा अध्यक्ष का आणत नाही? - bhiमानवार साहेब आरटीओ मध्ये कमिशनर होते तेव्हा कोणाला कंत्राट दिले याचे पुराव्यासकट आमच्याकडे आहेत, On गुणरत्ने सदावर्ते - - जो व्यक्ती नवीन-नवीन कपडे घालून, नवीन नवीन गॉगल घालून वेगवेगळ्या कलरचे गॉगल घालतात, आपण सर्वजण गाईचं किंवा म्हशीचे दूध पितो मात्र ते अशी आहेत की गाढविनीचे दूध पितात,गाढविणीचे दूध पिल्यावर डोक्यावर काय परिणाम होतात हे त्यांनी बघितलं तर कळत - गुणरत्न सदावर्ते हे कोणाचे माणूस आहेत ते मुख्यमंत्र्यांचे माणूस आहेत, हे देवेंद्र फडणवीस यांचे आजूबाजूला असे शूटर आहेत,हे सगळे बहुजन समाजातील शूटर आहेत - हे बंदूक वाले शूटर नाही राजकीय दृष्टिकोनातून बोलणारे शूटर असे देवेंद्र फडणवीस यांचे गुणरत्न सदावर्ते व्यक्ती आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस बोलतात असं म्हणता येईल हे केवळ राजकीय टिप्पणी आहे - एक माणूस उपोषणाला बसला आहे आणि सरकार त्यांच्यासोबत चर्चा करतेय On डीजे निर्बंध - - कोर्टाचा निर्णय आपल्याला मान्य करावे लागेल,विशेषतः डेसिबल पर्यंत ध्वनी ठेवावा लागेल, त्या लोकांना पारंपारिक वाद्य वाजवणारे जे लोक आहेत ते लाखो करोडो लोक आहेत, पारंपारिक पद्धती त्यांना संधी देऊ शकलो तर परंपरा आपल्याला नीट ठेवता येईल, आणि हजारो हातांना काम देता येईल त्या अनुषंगाने पारंपारिक वाद्यांना प्राथमिकता द्यायला पाहिजे - सर्वांसाठी सारखे नियम बनवायला पाहिजे, सत्ता पक्ष आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये कारवाई बाबत भेदभाव नको On सुरक्षा रक्षक - - पोलिसांची सेक्युरिटी मी घेत नाही, सामान्य लोकांचा पैसा आणि माझ्या सिक्युरिटी साठी वापरत नाही, मोठे मोठे नेते सेक्युरिटी घेऊन ठेवली आहे त्यामुळे मी माझी प्रायव्हेट सेक्युरिटी घेतली आहे, आमचे मुद्दे समजून घेण्यासाठी आम्ही On मोदी सभा book my show - तिकीट आहे जर हे मोफत असेल तर मग रजिस्ट्रेशन कशासाठी करत आहात, प्रधानमंत्री च्या शोसाठी ऑनलाईन तिकीट विक्री जर खरेदी आहे तर लोकांचा डेटा हे भाजप राजकारणासाठी करेल अशी आम्हाला शंका आहे - नवीन प्रकारच्या तिकीट किंवा बुकिंग कशाला नवीन फंडे आणत आहेत, यामुळे जी एन जी खुश होत असेल On राष्ट्रीय चित्रपट अवॉर्ड गुजरात - - राष्ट्रपती हे या देशाचे प्रमुख असतात, राष्ट्रपती प्रमुख असल्याने प्रोटोकॉल हा राष्ट्रपतींचा असतो, अयोध्यात प्रभू श्रीरामाचे मंदिर बांधला जात होते तेव्हा लोकार्पण करण्याची वेळ आली. जनार्दन कोणाची वेळ आली तिथे राष्ट्रपतींना बोलावलं गेलं नाही - नवीन संसदेच्या वेळी ही तो राष्ट्रपतींना बोलावण्यात आलं नाही, गुजरातचे नेते दिल्लीत बसणारे यांना कळलं असेल की येणाऱ्या निवडणुकीत सरकार येत नाही म्हणून सगळे कार्यक्रम आहे गुजरात मध्ये वळवलेले आहेत On vhp गरबा मुस्लिम बंदी (हिंदी) - - गरिबांनी जे पैसे देऊन अयोध्यातील राम मंदिर चे पैसे गोळा करण्यात आले, पंधराशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार तिथे झाला आहे, भ्रष्टाचाराचा जो गरबा खेळला आहे त्यावर पहिले त्यांनी बोलायला पाहिजे - सत्तेत येऊन पैसे कमवण्याचे भाजपचा चेहरा आहे तो आता समोर आला आहे On ऑपरेशन टायगर (हिंदी) - - जे खासदार गेले त्यापैकी धाराशिवच्या खासदारांना सर्वाधिक पैसे मिळाले बाकीचे काही विकास काम होतील त्यातील 20% घेण्याचा त्यांना सांगितला आहे, 150 कोटी रुपये पर्यंत त्यांना देण्यात आले, पुढच्या विधानसभा किंवा लोकसभेत जे लोक निवडून येतील ते सामान्य कुटुंबातून येथील - 2019 मध्ये भारतात आणि महाराष्ट्रात बदल सरकार मध्ये होईल
0
0
Report

गणेश मूर्तियों के दाम 20% बढ़े; इस साल भक्तों को देना होगा अधिक खर्च

Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना यंदा गणेशमूर्तींच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.मूर्ती तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल,रंग,सजावटीचे साहित्य,इंधन आणि वाहतूक खर्च वाढल्याने ही दरवाढ झाली आहे. १४ सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होणार असल्याने वाशिम शहरासह रिसोड, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा, मालेगाव आणि ग्रामीण भागातील मूर्तिकार सध्या बाप्पाच्या मूर्तिींना अंतिम रूप देण्यात व्यस्त आहेत. मात्र, वाढलेल्या उत्पादन खर्चाचा परिणाम घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्तींच्या किमतीवर झाला असून, यंदा भक्तांना बाप्पाच्या मूर्तीसाठी अधिकची रक्कम मोजावी लागणार आहे.
0
0
Report
Advertisement

मराठवाडा के सभी धरण पानी पिए जाने के लिए आरक्षित, 450 गाँव पानी संकट से जूझेंगे

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर सह मराठवाड्यातील सर्व धरणांतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी मराठवाड्यातील आठही जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. विभागात पावसाची ३० टक्के तूट आहे. जायकवाडी, विष्णुपुरी वगळता कोणत्याही धरणात मुबलक पाणीसाठा नाही. त्यामुळे पिण्यासाठी पाणी आरक्षित करण्याचा निर्णय झाला असल्याचे आयुक्तांनी सांगितले. परभणी, लातूरमध्ये सरासरी ४० टक्क्यांहून अधिक पावसाची तूट आहे. मराठवाड्यात ८८ टँकर सुरू आहेत. ४५० गावांमध्ये पाणीटंचाई आहे. पाण्याचे स्रोत आरक्षित करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. विहिरींचे अधिग्रहणही केले आहे. कालवा समितीच्या बैठकीनंतर पाणी सोडण्यासाठी निर्णय होईल. सोबतच अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
0
0
Report

भाजे ग्रामपंचायती को बड़ा झटका! सरपंच, उपसरपंच समेत छह सदस्य अपात्र

Varsoli, Maharashtra:मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीत मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. ग्रामपंचायतीच्या vid्यमान सरपंच, उपसरपंचासह तब्बल सहा सदस्यांना अपात्र ठरविण्याचा आदेश अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी दिला आहे. ग्रामपंचायत कराची थकबाकी मुदतीत न भरल्याच्या आरोपावरून हा विवाद दाखल करण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी अर्ज फेटाळल्यानंतर याविरोधात अतिरिक्त विभागीय आयुक्तांकडे अपील करण्यात आलं होतं. या अपीलावर सुनावणी झाल्यानंतर २ सप्टेंबर २०२६ रोजी अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी आदेश देत सहा जणांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरवलं आहे. या निर्णयामुळे भाजे ग्रामपंचायतीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. याचाच आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी...
0
0
Report

शिंदे गुट के MLA ने मनोज जरांगे से मुलाकात कर हालत जानकारी ली

Jalna, Maharashtra:जालना : शिवसेना शिंदे गटाचे नांदेड दक्षिण आणि उत्तर मतदार संघाचे आमदार अंतरवाली सराटी मध्ये शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर आणि आमदार आनंदराव बोंडारकर यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट दोन्ही आमदारांनी जरांगे यांची भेट घेतली असून त्यांच्या प्रकृतीची देखील विचारपूस केली आज मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा 10 वा दिवस असून नेतेमंडळी त्यांच्या भेटी घेत आहे अँकर : शिवसेना शिंदे गटाचे नांदेड दक्षिण आणि उत्तर मतदार संघाच्या आमदारांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे.शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर आणि आमदार आनंदराव बोंडारकर यांनी  मनोज जरांगे यांची भेट रात्री भेट घेतली.यावेळी दोन्ही आमदारांनी जरांगे यांच्या प्रकृतीची देखील विचारपूस केली.
0
0
Report
Advertisement

सोलापुर में ऊस बिल के लिए किसानों का आक्रमक प्रदर्शन, तहसीलदार ने आंसू पोंछे

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे अर्ध नग्न आंदोलन, आंदोलनावेळी अश्रू अनावर झालेल्या महिला शेतकऱ्यांचे प्रशासनाने पुसले अश्रू. सोलापुरात थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक. अडीच कोटी रुपयांचे ऊस बिल मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी काल झाडावर चढत केले होते आंदोलन. आंदोलनावेळी एका महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर, मध्यस्थ्यासाठी आलेल्या तहसीलदार किरण जमदाडे महिला शेतकऱ्याला धीर देत पुसले शेतकऱ्याचे अश्रू. महिला शेतकऱ्याला आईप्रमाणे जवळ घेणाऱ्या आणि डोळे पुसतानाचा तहसीलदारांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. एक तासांच्या आंदोलनानंतर प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर झाडावरचे आंदोलन अखेर मागे. प्रशासकीय अधिकाऱ्याने महिला शेतकऱ्याला जवळ घेत अश्रू पुसताच इतर शेतकरीही झाले भावुक.
0
0
Report

रातभर चली किसान आंदोलन: चिखली महावितरण सबस्टेशन पर अनियमित बिजली आपूर्ति से किसानों का संघर्ष

Washim, Maharashtra:वाशीम: वाशिमच्या रिसोड तालुक्यातील चिखली महावितरण सबस्टेशनवर संतप्त शेतकऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत मुक्काम आंदोलन केलं.पावसाने दडी मारल्याने सोयाबीनसह खरीप पिके वाळण्याच्या मार्गावर असताना, महावितरणच्या अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.वारंवार वीजखंडित होणे, अनियमित लोडशेडिंग आणि जळालेले ट्रान्सफॉर्मर वेळेत न बदलल्याचा आरोप करत घोटा, चिखली, व्याड आणि कवठा परिसरातील शेतकऱ्यांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं.दरम्यान, रात्री दोन वाजता महावितरणचे अधिकारी अंजनकर यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांशी चर्चा केली.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top