445001
यवतमाळ तालुका काँग्रेस अध्यक्षावर भरचौकात चाकुहल्ला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहराच्या मध्यवस्तीत गजबजलेल्या दत्त चौकामध्ये भरदिवसा प्राणघातक हल्ल्याची घटना घडल्याने वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रामायण हॉटेल समोर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रमेश भीसणकर यांच्यावर दोन आरोपींनी चाकूने हल्ला चढविला, यावेळी भीसनकर यांनी जखमी अवस्थेत एकाच्या हातून चाकू हिसकावल्याने दोघेही पसार झाले, त्यानंतर जखमी भीसणकर हे स्वतः ऑटोने रुग्णालयात पोहोचले. दरम्यान हा थरार शेकडो लोकांपुढे सुरू असताना कुणीही त्यांच्या बचावासाठी पुढे आले नाही.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नागपुर के ब्रह्मदेव नगर की विद्युत डीपी में आग, शॉर्ट-सर्किट से नुकसान और बिजली गुल
Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपुरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ब्रह्मदेव नगर येथील इलेक्ट्रीक डीपीला आग,आगीत इलेक्ट्रिक साहित्याचे नुकसान उष्णता आणि शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज रात्री लागलेल्या या आगीवर अग्निशमन विभागाने नियंत्रण मिळवले मात्र डीपी ला लागलेल्या आगीमुळे परिसरातील वीज गेल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागला0
0
Report
लातूर के कवठाला में मोटर जलते समय करंट से महिला की मौत; सीसीटीवी में कैद
Latur, Maharashtra:लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील कवठाळा येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. घरातील पाण्याची मोटार सुरू करत असताना विजेचा जोरदार शॉक लागून ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. उर्मिला व्यंकट निडबने असे मृत महिलेचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून गावावर शोककळा पसरली आहे.0
0
Report
कन्नड़ शहर में 70 अत्याधुनिक सीसीटीवी कैमरे, चोरी-रोधी और ट्रैफिक निगरानी के लिए उद्घाटन
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहरात कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. कन्नड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने बसविण्यात आलेल्या ७० अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ, शासकीय कार्यालय परिसर आणि संवेदनशील भागांमध्ये हे कॅमेरे बसविण्यात आले असून त्यांचे नियंत्रण पोलीस स्टेशनमधील कंट्रोल रूममधून करण्यात येणार आहे. या यंत्रणेमुळे शहरावर पोलीस प्रशासनाची अधिक प्रभावी नजर राहणार असून चोरी, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि इतर गुन्हेगारी प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.0
0
Report
Advertisement
आकोला में गैरेज के सामने दो कारें आग लगने से जलकर राख, कोई मौत नहीं
Akola, Maharashtra:अकोला शहरातील पातूर रोडवरील कमला नगर परिसरात आज पहाटेच्या सुमारास गॅरेजसमोर उभ्या असलेल्या दोन चारचाकी वाहनांना अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दोन्ही वाहने आगीत पूर्णतः जळून खाक झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात उसळत असल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी तत्काळ अग्निशामक दलाला माहिती दिल्यानंतर जवानांनी घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. प्राथमिक माहितीनुसार, ही वाहने गॅरेजसमोर उभी होती. अचानक आग लागल्याने काही क्षणांतच दोन्ही वाहनांनी पेट घेतला. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. शॉर्टसर्किट की अन्य काही कारणामुळे आग लागली याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.0
0
Report
लातूर में खेलते समय पानी के गड्ढे में दो बच्चों की मौत, परिवार शोकाकुल
Latur, Maharashtra:लातूर शहरातील बोधेनगर परिसरातील घटना... खेळताना पाणी साठवण्याच्या खड्ड्यात पडल्याने दोन चिमुकल्यांचा मृत्यू... दिव्या उबाळे आणि कार्तिक कांबळे या दोन बालकांचा मृत्यू... लातूर शहरात दुर्दैवी घटना...घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली गेली. ही घटना लातूर शहरातील बोधेनगर परिसरात घडली आहे. दिव्या उबाळे व कार्तिक कांबळे अशी मृत मुलांची नावे आहेत. दोघे घराबाहेर खेळत असताना पाणी साठवण्याच्या खड्ड्यात पडले. बराच वेळ मुलं दिसत नसल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता ही घटना उघडकीस आली. स्थानिक नागरिकांनी दोघांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला आहे.0
0
Report
Hindi headline
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरच्या जि.प.च्या जिल्ह्यातील २ हजार ८४ शाळांमधील भौतिक सुविधांसह मध्यान्ह भोजन योजनेच्या सुविधांचा तपासणीचा निर्णय जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला त्यानुसार सोमवारपासून त्यांची सुरुवात होत आहे. हा उपक्रम ३० मेपर्यंत चालेल. जि.प.च्या प्रशासनाने शाळांची तपासणीसाठी एकूण १९ मुद्दे काढले आहेत. त्यानुसार शाळेच्या नावापासून ते पायाभूत सुविधा, आर्थिक बाबी, वेतन, उपलब्ध साहित्य, खरेदी प्रक्रिया, शालेय व्यवस्थापन समितीच्या नोंदी, शाळेचे अभिलेखे व रजिस्टर, मध्यान्ह भोजन, ग्रंथालय व प्रयोगशाळा, शासन योजना अंमलबजावणी, शाळेचे आर्थिक मुद्दे, बैंक व्यवहार, पावत्या व खर्च नोंदी, ऑडिटदरम्यान तपासावयाचे अभिलेखे, अनुदान व निधी वापर, खरेदी प्रक्रिया, स्टॉक व मालमत्ता तपासणी, विद्यार्थी संबंधित निधी, वेतन व सेवा बाबी आणि आवश्यक रजिस्टरबाबत तपासणी करण्यात येणार आहे.0
0
Report
Advertisement
गर्मी से जयाकवाड़ी डैम का जलस्तर घटकर 40.80% पर; पानी संकट की आशंका
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणातील साठा उन्हामुळे झपाट्याने घटत आहे. वाढते तापमान, बाष्पीभवन आणि शेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेल्या उपशामुळे धरणाचा साठा ४०.८० टक्क्यांवर आला आहे. १३ एप्रिलला जायकवाडी धरणात ५६.०४ टक्के पाणीसाठा होता. एका महिन्यात १३ मे रोजी तो ४६.१४ टक्क्यांवर आला. १६ मे रोजी सकाळी धरणात केवळ ८८५.८४० दशलक्ष घनमीटर (४०.८%) जिवंत जलसाठा शिल्लक राहिला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने गेल्या २४ तासांत तब्बल १.८७५ दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. शेतीसाठी डाव्या कालव्यातून २ हजार २०० क्युसेसने दररोज पाणी सोडले जात आहे. पाणी संकट निर्माण होऊ नये म्हणून अधिकारी संपूर्ण जलनियोजनावर बारीक लक्ष ठेवून आहेत. कालव्यांमधील पाणी वाटप, बैंक वॉटर सिंचन व आगामी पावसाळ्यापर्यतच्या पाणी वापराचा काटेकोर आढावा घेतला जात आहे.0
0
Report
छत्रपती संभाजीनगर में भीषण लू, तापमान 42.4°C तक पहुंचा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरात रविवारी कमाल तापमान ४२.४ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले. ३ दिवसांनंतर तापमानाने ४२ अंश सेल्सियसचा टप्पा ओलांडला आहे. त्याचबरोबर किमान तापमान २८.९ अंश सेल्सियस नोंदवले गेले. दरम्यान, येत्या ५ दिवसांत शहरातील कमाल तापमान ४० ते ४१ अंश आणि किमान तापमान २७ ते २८ अंशांदरम्यान राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. पूढील काही दिवस उष्णतेचा प्रकोप कायम राहणार असे चित्र आहे...0
0
Report
आदित्य ठाकरे का नाशिक दौरा: संगठन मजबूती के संकेत
Nashik, Maharashtra:24 मे रोजी आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर अँकर उद्धवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे २४ मे रोजी नाशिक दौऱ्यावर येणार आहे... येणाऱ्या काळात जिल्हा परिषदशिवाय एकही निवडणूक नाही. त्यामुळे पक्ष संघटना वाढविण्यासह नाशिकमध्ये पक्षाची आणखी पडझड होऊ नये यासाठी ठाकरे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना चुचकारण्याचे काम करतील. पक्षाच्या पुनर्बाधणीच्या दृष्टीनेही हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. युवासेना चषक स्पर्धेच्या निमित्ताने ठाकरे शहरात येत असले तरी त्यांच्या दौऱ्याला राजकीय किनार असेल. ते या दौऱ्यात प्रमुख नेते, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. निष्ठावंतांना राजकीय भवितव्य घडविण्याच्या दृष्टीने आदित्य ठाकरे ठोस आश्वासन देतीল, असा अंदाज आहे. नोंदणी अभियान, पक्षाची पुनर्बाधणी, कला, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम ते यावेळी घेणार आहे.....0
0
Report
Advertisement
अकरावी प्रवेश प्रक्रिया: शून्य फेरी आज से, पात्र सूची 10:30 बजे घोषित
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:अकरावी प्रवेश प्रक्रियेला दहावीच्या निकालानंतर आता वेग आला आहे. आज पासून अकरावी प्रवेशाची 'शून्य फेरी' सुरू होणार आहे. यासाठीची गुणवत्ता यादी सकाळी १०.३० वाजता जाहीर केली जाणार आहे. या शून्य फेरीत अल्पसंख्याक संस्थांच्या ५० टक्के, इनहाऊस कोट्याच्या १० टक्के आणि मॅनेजमेंट कोट्याच्या ५ टक्के जागा भरल्या जाणार आहेत. यादी जाहीर झाल्यानंतर या यादीतील पात्र विद्यार्थ्यांनी १९ मेपर्यंत आपले प्रवेश निश्चित करायचे आहेत, अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर सध्या थांबवलेली संकेतस्थळावरील प्रक्रिया पुन्हा २० मेपासून सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात येईल.0
0
Report
भंडारा के खापा में ओबीसी कॉलम नहीं होने पर जनगणना बहिष्कार, कर्मचारी लौटे
Bhandara, Maharashtra:ओबीसी कॉलम नसल्याने भंडाऱ्याच्या खापा गावात जनगणनेवर बहिष्कार कर्मचाऱ्यांना आल्यापावली परतले. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील खापा गावात जनगणनेला तीव्र विरोध झाला आहे. २०२६-२७ च्या जनगणना प्रक्रियेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी जनगणनेवर बहिष्कार टाकत कर्मचाऱ्यांना आल्यापावली परत पाठवले. जातनिहाय जनगणना आणि ओबीसींची स्वतंत्र नोंदणी झाल्याशिवाय गावात कोणतीही गणना होऊ देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र येत आंदोलनाला पाठिंबा दिला. या घटनेमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून इतर गावांतही आंदोलनाचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.0
0
Report
नीट पेपर लीक: श्रीमंत विद्यार्थियों को डॉक्टर बनाने की धांधली उजागर
Nashik, Maharashtra:नीट पेपर लीक शुभमचे टार्गेट होते श्रीमंत पण अभ्यासात सुमार विद्यार्थी नामांकित कोचिंग क्लासच्या संचालकांची भूमिकाही संशयास्पद नीट प्रवेश परीक्षेत देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या पेपरफुटीचे धागेदोरे अब उत्तर महाराष्ट्रात येऊन पोहोचले आहेत. या रॅकेटची सर्व जबाबदारी शुभम खैरनारकडे असल्याची धक्कादायक माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. पैशांच्या जोरावर आपल्या अभ्यासात कच्च्या मुलांना डॉक्टर बनवू पाहणाऱ्या बड्या धेंडांना गाठून कोट्यवधी रुपयांची डील केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शुभम खैरनारचा डोळा अशा विद्यार्थ्यांवर आणि पालकांवर होता, जे आर्थिकदृष्ट्या प्रचंड श्रीमंत आहेत; मात्र त्यांच्या पाल्य अभ्यासात अत्यंत सुमार आहेत. मुलाला डॉक्टर बनवण्याकरिता पाहिजे तेवढी किंमत मोजून पेपर घेतल्याचा संशय आहे. या हायटेक रॅकेटमध्ये नामंकित कोचिंग क्लासेसच्या संचालकांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. क्लासेसचे संचालक १० वी आणि १२ वीमधील गुणांच्या आधारे कमी गुण मिळालेल्या, पण 'नीट'ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना हेरून 'मुलाची प्रगती सुमार आहे, पण चिंता नाही' असे सांगून पालकांना थेट शुभमचा रेफरन्स देत होते. याआड मोठ्या कमिशनच्या टक्केवारीचा संशय व्यक्त होत आहे. त्यासाठी विविध बँक खात्यांचीही तपासणी केली जात आहे, ज्यातून शुभमकडे मोठ्या रकमा वर्ग झाल्या आहेत.0
0
Report
Advertisement
हिंगोली-परभणी सीट पर राष्ट्रवादी काँग्रेस ने दावेदारी जताई
Hingoli, Maharashtra:अँकर - येणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत हिंगोली-परभणी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचाच आमदार होणार... असा दावा राष्ट्रवादीचे वसमतचे आमदार चंद्रकांत नवघरे यांनी केला आहे. दोन्ही जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वात जास्त सदस्य असल्यामुळे राष्ट्रवादीचाच आमदार होणार असल्याचा दावा चंद्रकांत नवघरे यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर या वेळेस हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला ही संधी असावी असे देखील आमदार नवघरे म्हणाले आहेत. आज हिंगोलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये आमदार नवघरे बोलत होते. त्यामुळे महायुतीतून पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेच्या परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर दावा केला आहे.0
0
Report
नागपुर कोठीरोड महाल में गोलीबारी: तीन बाइक से आये छह ने गोली चलाई
Nagpur, Maharashtra:नागपूर कोठीरोड महाल येथे गोलीबारी के घटनेने खळबळ उडाली. रात्री साडे अकरा ते बाराच्या सुमारासची घटना; तीन बाईकवर आलेल्या सहा जणांनी केली दोनदा फायरिंग. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ नावाच्या फिर्यादीने सांगितल्याप्रमाणे रवी मोहतो, गंगा काकडे यांनी फायरिंग केली. वर्चस्व, दहशत पसरविण्यासाठी केली फायरिंग. आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे; अमली पदार्थ विक्री व बाळगण्याचे गुन्हे. त्यांच्यातील अंतर्गत वादातून ही फायरिंग झाली. कोतवाली पोलीस स्टेशन घटनेचा पुढचा तपास करीत आहे. राहुल मदने, पोलीस उपायुक्त0
0
Report
सदाभाऊ खोत ने कांग्रेस और मित्र पक्ष को घुबड़ की औलादी कहा
Sangli, Maharashtra:स्लग - काँग्रेस व मित्र पक्ष म्हणजे घुबडाची औलादी - आमदार सदाभाऊ खोत. अँकर - काँग्रेस व त्यांच्या मित्र पक्ष म्हणजे घुबडाची औलादी आहेत,या घुबड्यांनी कधी गावगाड्यातल्या आणि शेतकरयांच्या प्रश्नावर आवाज उठवला नाही,अशी घणाघाती टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन बचत आणि सोने खरेदी करू नका,असा सल्ला दिल्यानंतर आयत खाऊना चिंता लागली आहे,ज्यांना सत्ता मिळत नाही,सत्तेची डोहाळे ज्यांना लागलेत,त्यांना चिंता लागली आहे, अशी बोचारी टीका देखील आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे सांगली मध्ये पार पडलेल्या आत्मनिर्भर परिषदेमध्ये ते बोलत होते. साऊंड बाईट - सदाभाऊ खोत - आमदार0
0
Report
Advertisement
