icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

लातूर के डॉक्टर मनोज शिरुरे की सीबीआई गिरफ्तारी: तीन विद्यार्थियों को प्रश्न दिलाने में मदद

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज डॉक्टर मनोज शिरुरे यांना सीबीआय कडून अटक....तीन विद्यार्थ्यांना केमिस्ट्रीचे प्रश्न मिळवून देण्यासाठी मदत केल्याचा शिरुरेवर आरोप....शिरुरेच्या अटकेनंतर घरासह हॉस्पिटल परिसरातही शुकशुकाट... नीट २०२६ पेपरफुटी प्रकरणात लातूरच्या डॉक्टर मनोज शिरुरे यांना सीबीआयने अटक केली आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, तीन विद्यार्थ्यांना केमिस्ट्रीचे प्रश्न मिळवून देण्यासाठी मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. दरम्यान, न्यायालयाने डॉ. मनोज शिरुरे यांना सीबीआय कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू आहे. अटकेची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या घरासह हॉस्पिटल परिसरातही शुकशुकाट पाहायला मिळाला.
0
0
Report

मराठवाड़े में शिवसेना की रणनीति, शिंदे के दौरों से संगठन मजबूत

Jalna, Maharashtra:जालना खासदार श्रीकांत शिंदे बाईट मराठवाड्यात आज पासून शिवसंवाद दौऱ्याला सुरुवात झाली आहे.. 23 विधानसभेचा आढावा घेतला जाणार असून यातून पक्षाची बांधणी केली जाणार आहे.. कार्यकर्त्या बरोबर संवाद साधण्यात आला आहे.. वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठका सुरू असून, जागे संदर्भात आणखी फायनल झालेलं नाही, लवकरच आपल्याला कळेल.. शिवसेनेचा शिष्ट मंडळ महायुतीच्या इतर नेत्यासोबत चर्चा करत आहेत जागे संदर्भात.. अभिमन्यू खोतकर यांचा चांगलं काम असून पक्ष या सर्व गोष्टी बारकाईने बघत आहेत.. त्यांच्या पक्षातील नेत्यांना हे विचारलं पाहिजे छगन भुजबळ यांना आम्ही शुभेच्छा देतो.. मराठवाड्यावरती शिवसेनेचे बारकाईने लक्ष आहेत, शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस देखील मराठवाड्याला भरपूर काही देण्याचा काम केलं आहे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण बाळासाहेबांना असं सांगितलं आहे, त्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे.. पक्ष सगळ्याच कार्यकर्त्याबद्दल योग्य वेळी योग्य विचार करतो ज्योतीताई वाघमारे या सर्वसामान्य महिला कार्यकर्त्याला पक्षाने राज्यसभेवर खासदार केलं एक तारिखे आधी जागेचा तिढा सुटून जाईल.. शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मराठा समाजाच्या अनेक मागण्या पूर्ण केल्या आहेत, आता जरांगे पाटलाच्या ज्या मागण्या असतील त्यावर सरकार विचार करून नक्की त्यांच्या मागण्या सोडेल.. कांद्याच्या प्रश्नावरती आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची केंद्रीय मंत्रिमंडळ बरोबर बैठक आहे.. पार्टीची काय परिस्थिती झाली आहे त्याला वाढवलं पाहिजे त्यासाठी फिरलं पाहिजे, टीका करत बसले म्हणून अडीच वर्षात ही परिस्थिती झाली आहे, अजून रसातळाला जाऊन बसले आहेत, जेव्हा शिंदे साहेबांनी उठाव केला त्यावेळेस देखील तुम्ही टीका केली परंतु लोकांनी मतपेटीतून उत्तर दिला आहे.. त्यांना आता टाईमपास तोच उरलेला आहे.
0
0
Report
Advertisement

दिल्ली बैठक से पहले चाकण कांदा उत्पादक किसान आक्रामक, खर्च बढ़ने पर आंदोलन की चेतावनी

Shirur, Maharashtra:चाकण बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; उत्पादन खर्च निघत नसल्याने दिल्लीतील बैठकीकडे लक्ष, तीव्र आंदोलनाचा इशारा! कांद्याचे कोसळलेले भाव आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा मेटाकूटीला आला आहे. पुण्याच्या चाकण बाजार समितीत कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. कांदा उत्पादीत करत असताना खते, डिझेल आणि मजुरी महागल्याने शेतकऱ्यांचे मूळ भांडवलही निघणे कठीण झालेय या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत होणाऱ्या कांदा दराबाबतच्या महत्त्वपूर्ण बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेय जर आज दिल्लीतून सकारात्मक निर्णय आला नाही, तर चाकण परिसरात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी आणि चाकण बाजार समितीच्या सभापतींनी दिला आहे. शिवाय मागच्या तीन महिन्यांपासून विक्री झालेल्या कांद्याला हमीभावाने समतोल राखण्यासाठी अनुदान देण्याची मागणी करण्यात आली
0
0
Report

नीट पेपरफुटी: लातूर कनेक्शन से जांच तेज, पेपर बिक्री के आरोप

Latur, Maharashtra:नीट २०२६ पेपरफुटी प्रकरणाच्या तपास वेगाने पुढे सरकत असतानाच आता काही धक्कादायक दावे समोर येत आहेत। लातूरचा शिवराज मोटेगावकर आणि नीटच्या केमिस्ट्री पेपर सेटर प्रा. पी. व्ही. कुलकर्णी याच्याविरोधात गंभीर संशय व्यक्त केला जात आहे। सूत्रांच्या माहितीनुसार, लाखो रुपयांच्या व्यवहारातून पेपर विक्री झाल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे। काही आर्थिक व्यवहार ऑनलाइन पद्धतीने झाल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे। सीबीआयच्या वाढत्या चौकशीमुळे आणि समोर येणाऱ्या नव्या धागेदोर्‍यांमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। पाहूयात याच संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट...
0
0
Report

लातूर NEET मामले में डॉक्टर मनोज शिरूर पर सीबीआई गिरफ्तारी से नया पेच

Latur, Maharashtra:लातूर में कथित नीट प्रकरणाच्या तपासात नवे धागेदोरे समोर येत आहेत. लातूर शहरातील मोठमोठी हॉस्पिटल्स... वैद्यकीय क्षेत्रातील मोठी नावे... आणि मुलांना डॉक्टर बनवण्याचं स्वप्न... तपासाच्या भोवऱ्यात आता याच गोष्टी चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. सीबीआयच्या चौकशीत समोर आलेली काही माहिती अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. डॉक्टरांचे शहरात टोलेजंग हॉस्पिटल आहेत. त्याचा वारस पुढे सुरू ठेवण्यासाठी मुलांना डॉक्टर करण्याचे स्वप्न होते. अनेक वर्षांच्या मेहनतीने उभं केलेलं नाव... समाजात निर्माण केलीली ओळख... आणि तो वारसा पुढच्या पिढीकडे सोपवण्याची इच्छा... परंतु आता याच पार्श्वभूमीवर तपासाची सुई फिरताना दिसत आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये गुणवत्ता महत्त्वाची की शॉर्टकट...? मेहनत महत्त्वाची की प्रभाव...? असे अनेक प्रश्न या संपूर्ण प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या संपूर्ण प्रकरणात डॉ. मनोज शिरूरे यांच्याCBI ने चौकशी करून त्यांच्या घराची झाडाखाली घेतली त्यानंतर त्यांना आता अटक करण्यात आली आहे. आणि त्याला न्यायालयाने पाच दिवसांची CBI कोठडी दिली आहे. अटकेची बातमी कळताच त्याच्या घर आणि हॉस्पिटलच्या परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला. अनेक डॉक्टरांचे शहरात टोलेजंग हॉस्पिटल आहेत. त्याचा वारस पुढे सुरू ठेवण्यासाठी मुलांना डॉक्टर करण्याचे स्वतः स्वप्न होते. पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नियम आणि गुणवत्तेचा मार्ग निवडला गेला की शॉर्टकटचा...? मेहनत महत्त्वाची की प्रभाव...? असे अनेक प्रश्न या संपूर्ण प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. वैद्यकीय क्षेत्रात उभा केलेला वारसा पुढे नेण्यासाठी कुठे चुकीचा मार्ग स्वीकारला गेला का...? तपास यंत्रणा आता याच धाग्यांचा शोध घेत आहे. मात्र, तपास पूर्ण होईपर्यंत कोणालाही दोषी ठरवण्यात आलेले नाही.
0
0
Report
Advertisement

नीट पेपर फूट: सीबीआय ने पुणे से टीचर समेत 13 आरोपी अटक

Pune, Maharashtra:नीट पेपर घोटाळ्यात सीबीआयने पुण्यातून आणखी एका खासगी क्लासच्या शिक्षकाला अटक केलीय. तेजस शहा असं त्याचं नाव असून तो मनिषा हवालदारच्या संपर्कात होता...पाहुयात सीबीआच्या नीट तपासातील आजपर्यंतचे नेमके काय अपडेट्स आहेत ते...? नीट पेपर फुटीत तेजस शहाला पुण्यातून अटक...!!! तेजस पुण्यातील एका क्लासमधे होता टिचर मनिषा हवालदारकडून पेपर घेतल्याचा तेजसवर आरोप डॉ. मनोज शिरुरेलाही अखेर दाखवली अटक नीट पेपरफुटीत आतापर्यंत 13 जण अटकेत दरम्यान, या तपासकामी आम्ही सीबीआयला पूर्ण सहकार्य करू असंही ते म्हणाले... चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी, पुणे दरम्यान या क्लासचे संचालक सचिन हलदणकर या अटकेचा आमच्या क्लासशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केलाय...या तपासकामी आम्ही सीबीआयला पूर्ण सहकार्य करू असंही ते म्हणाले... या नीट पेपर घोटाळ्यात सीबीआय देशभरात तब्बल 49 ठिकाणी धाडी टाकून 13 आरोपींना अटक केली त्यापैकी तिन्ही मनिषा या पुण्यातल्याच निघाल्यात यापकी मनिषा वाघमारे ही एजंट असून ती केमिस्ट्रीचे पेपरसेटर पी व्ही कुलकर्णीच्या संपर्कात होती तर मॉर्डनची जीवशास्राची प्रा. मनिषा मांढरे आणि फिजिक्सची प्रा. मनिषा हवालदार ही देखील एनटीएची पेपर सेटर निघालीय...तर तिकडे लातुरातील फेमस क्लास चालक प्रा. शिवराज मोटेगावकर याच्या संपर्कात आलेले बालरोग तज्न डॉ. मनोज शिरूरेलाही सीबीआयने अखेर अटक दाखवलीय...त्यामुळे या नीट पेपर फुटी प्रकरणात आणखी किती जणांना अटक होतेय हे तपासाअंतीच समोर येईल...दरम्यान, या बायो,फिजिक्सच्या तज्न प्राध्यापिका असलेल्या या दोन्ही मनिषांना एनटीए शी जोडून देणारे एक रिटायर प्राध्यापक माञ अजूनही चौकशीच्या कक्षेबाहेर कसे काय राहिलेत? असा सवाल या क्षेणातील जाणकार खासगीत विचारताहेत...पाहुयात सीबीआय त्यांच्या पर्यंत नेमकं कधी पोहोचतंय ते?
0
0
Report

सांगली तासगांव में डिजिटल अरेस्ट से 60 लाख की धोखाधड़ी, दो गिरफ्तार

Sangli, Maharashtra:सांगली के तासगांव में डिजिटल अरेस्ट के नाम पर 60 लाख रुपये की धोखधड़ी करने वाला गिरोह गिरफ्तार किया गया। एक अंकर ने सेवानिवृत्त शिक्षक दंपति को वीडियो कॉल के जरिए कहा कि वे मानवीय तस्करी/ड्रग्स तस्करी आदि मामलों में शामिल हैं और डिजिटल अरेस्ट की धमकी देकर उनके बैंक खाते से पैसे उड़ा लिए गए। सेवानिवृत्त शिक्षक अण्णासाहेब पाटील और उनकी पत्नी को धमकी देकर लगभग 7 लाख रुपये ट्रांसफर कराए गए। तासगांव पुलिस ने शिकायत के बाद साइबर क्राइम ब्रांच को सौंप दी। साइबर क्राइम ब्रांच ने पश्चिम बंगाल के अबू हुसेन आलम और सुशील राम को हडपसर से गिरफ्तार किया। इनके खातों में 29 लाख रुपये जमा निकले। गिरफ्तारी के दौरान 18 बैंक कार्ड, चेकबुक, पासबुक और मोबाइल फोन जब्त किए गए। आगे की कार्रवाई जारी है; नागरिकों से कहा गया कि ऐसे मोबाइल कॉल से सावधान रहें।
0
0
Report

Mulund में पानी की किल्लत पर मणसे-आरपीआई-वंचित का संयुक्त मोर्चा

Mumbai, Maharashtra:मुलुंडमध्ये तीव्र पाणीटंचाईच्या निषेधार्थ आज मनसे, आरपीआय आणि वंचित आघाडीच्या वतीने मुलुंड टी विभाग कार्यालयावर संयुक्त हंडा मोर्चा काढण्यात आला. पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसेच आंदोलन अधिक तीव्र करत नागरिकांनी टी कार्यालयासमोर मडके फोडो आंदोलन छेडत निषेध व्यक्त केला. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, जय शास्त्री नगर येथून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. शंकर टेकडी, राहुल नगर आणि हनुमान पाडा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. महिलांनी डोक्यावर हंडे आणि मडकी घेऊन रॅली काढत आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी “पाणी आमचा हक्क आहे”, “घेतल्याशिवाय राहणार नाही” अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. नागरिकांनी थेट मुलुंड टी विभाग कार्यालयावर धडक देत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. टी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने नागरिक एकत्र जमले असून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिस बंदोबस्तात आंदोलन शांततेत पार पडले. स्थानिक नागरिकांना नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी प्रशासनाला दिला.
0
0
Report
Advertisement
Advertisement

Akole Taluka Child Marriage Data Sparks Questions on Administration in Maharashtra

Shirdi, Maharashtra:अकले तालुक्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील आकडेवारी केवळ धक्कादायक नाही... तर प्रशासनाच्या यंत्रणेलाच प्रश्नांच्या भोवऱ्यात उभं करणारी आहे... महिला व बालविकास विभागाच्या सर्वेक्षणात तब्बल ५५ अल्पवयीन विवाहित मुली आणि एक अविवाहित अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याची बाब समोर आली आहे... काही मुलींची प्रसूतीही झाल्याने बालविवाह रोखण्यासाठी नेमकी यंत्रणा काय करत होती..? असा सवाल आता उपस्थित केला जातोय... अकोले आणि राजूर प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविकांकडून दरमहा गरोदर आणि स्तनदा मातांचे सर्वेक्षण केले जाते. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुली गरोदर असल्याची माहिती समोर येईपर्यंत प्रशासनाला याची कल्पना नव्हती का..? की प्रशासनाला माहिती मिळूनही कानाडोळा केला..? अशा प्रश्न उपस्थित होत आहेत. केंद्र सरकारच्या मातृत्व वंदना योजनेसाठी आलेल्या अर्जांमध्येही अल्पवयीन मुलींची नावे आढळल्याने सरकारी यंत्रणांमधील समन्वयावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात अजूनही बालविवाह सुरू असल्याचं या प्रकरणातून स्पष्ट होत आहे. सामाजिक दबाव, बदनामीची भीती आणि कायदेशीर कारवाईच्या धाकामुळे अनेक बालविवाहांची नोंदच होत नसल्याचे सांगितले जात असले. गावपातळीवरील यंत्रणा, ग्रामसेवक, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन यांना याची माहिती नव्हती का..? नागरिकांकडून असा सवाल उपस्थित केला जात आहे. महाराष्ट् राज बालहक्क आयोगाने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन बाल हक्क आयोगाच्या कार्यालयात मुंबई येथे सुनावणी पार पडली. अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी, जिल्हा महिला बालविकास अधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी ही मुंबई येथे सुनावणीला हजर होते. सुनावणी केल्यानंतर जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांनी ही गंभीर गोष्ट असल्याची कबुली दिली आणि सांगितलं की अकोले तालुक्यात बालविवाहाचे प्रमाण मोठे आहे. परंतु महिला बालविकास विभाग आणि शैक्षण विभाग यांच्या दुर्लक्षामुळे बालविवाहाचे प्रमाण वाढतं चालले आहे. मुली पळून जाऊन लग्न करतील या भीतीने अनेक पालक अल्पवयातच विवाह लावत असल्याचे समोर आले आहे. बालविवाह प्रतिबंधक कायदा अस्तित्वात असताना अशा विवाहांवर कारवाई का झाली नाही..? या बाबत प्रशासन मौन का बाळगून आहे..? या गंभीर प्रकरणाची दखल घेत राज्य सरकार आणि राज्य बालहक्क आयोगाने चौकशी करून काहीतरी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी बाल संरक्षण समितीचे अशासकीय सदस्य श्रीनिवास रेणुकादास यांनी राज्य सरकारकडे केलीय. श्रीनिवास रेणुकादास, अशासकीय सदस्य, बालसंरक्षण समिती अकोले. महाराष्ट्रात बालविवाहाचं प्रमाण अजूनही गंभीर असल्याचं चित्र समोर येत आहे... शासकीय आकडेवारीनुसार राज्यात दरवर्षी २२ टक्के बालविवाह होत असून, अनेक अल्पवयीन मुली बालमाता बनत आहेत... देशातील सर्वाधिक बालविवाह होणाऱ्या ७० जिल्ह्यांपैकी १७ जिल्हे महाराष्ट्रातील असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत... बालविवाह प्रतिबंधक कायदा कडक असला तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केली आहे... बालविवाह रोखण्यासाठी सरकारने कायदेशीर कारवाईचा धाक निर्माण करण्याची गरज असल्याची मागणी त्यांनी केली आहे... शासन विविध योजना राबवत असताना अकोले तालुक्यात समोर आलेली ही आकडेवारी प्रशासनाच्या दाव्यांनाच छेद देणारी ठरत आहे..आता तरी संबंधित यंत्रणा जागी होणार का..? आणि जागरूक राहून बालविवाह थांबवणार का..? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे... प्रतिनिधी कुणाल जमदाडे झी २४ तास अहिल्यानगर
0
0
Report

जरांगे का आमरण उपोषण: 30 मई को अंतरवाली सराटी में नया मोड़

Jalna, Maharashtra:जालना :मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिलेला अल्टीमेटम उद्या संपणार,सरकारकडून अद्याप मागण्याबाबत कोणताही प्रतिसाद नाही,मनोज जरांगे आणि सरकार मध्ये मध्यस्थी करणारे आमदार प्रसाद लाडही तोंडघाशी पडणार? मागण्या पूर्ण न करणाऱ्या नेत्यांवर उलटण्याचा जरांगे यांचा इतिहास (पॅकेज) अँकर : मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटीलांनी राज्य सरकारला दिलेला 28 तारखेचा अल्टीमेटम उद्या संपतोय.त्यामुळे जरांगे पाटील उद्या सकाळी साडेदहा वाजता अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेऊन 30 मे रोजीच्या आमरण उपोषणाची घोषणा करण्याची शक्यता आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे आणि राज्य सरकारमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला खरा मात्र त्यांच्या मध्यस्थीला अद्याप यश आल्याचं दिसत नाही.त्यामुळे राज्य सरकार आणि जरांगे पाटील यांच्यात मध्यस्थी करणं प्रसाद लाड यांच्या चांगलंच अंगलट येण्याची शक्यताय.कारण जरांगे यांच्या अनेक उपोषणात अनेक नेते आणि मंत्र्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश न आल्यानं जरांगे या नेत्यांवरच उलटल्याचा इतिहास आहे.बघूया यावरचा एक स्पेशल रिपोर्ट. व्हिओ :०१: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारला दिलेला 28 तारखेचा अल्टीमेटम उद्या संपतोय.भाजप आमदार प्रसाद लाड यांनी राज्य सरकार आणि जरांगे यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला खरा पण या मध्यस्थीला अजूनही यश आल्याचं दिसून येत नाहीय.कारण लाड जरांगे यांच्यासोबत चर्चा करून गेल्यानंतर लाड यांच्याकडून कोणताही निरोप अजून जरांगेंना आलेला नाही.त्यामुळे जरांगे उद्या अंतर वाली सराटी येथे सकाळी 10.30 वाजता पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या 30 मे रोजीच्या आमरण उपोषणाबाबत घोषणा करणार आहेत.30 तारखेला अंतरवाली सराटीमध्ये होणारं आमरण उपोषण हे कडक स्वरूपाचं असेल असा ईशारा जरांगेंनी सरकारला दिलाय. बाईट :मनोज जरांगे पाटील ग्राफिक्स व्हिओ :०२: ● 29 ऑगस्ट 2023 रोजी जरांगे यांनी अंतरवाली सराटीमध्ये पहिलं उपोषण केलं.या उपोषणादरम्यान गिरीष महाजन,राधाकृष्ण विखे पाटील,नितेश राणे,यांनी जरांगे आणि सरकार मध्ये मध्यसथी केली पण मागण्या पूर्ण न झाल्यानं या नेत्यांनाच जरांगे यांनी टार्गेट केलं. ●जरांगे यांचं दुसऱ्या उपोषण धनंजय मुंडे यांच्या मध्यस्थीने सुटलं.पण तरीही जरांगे यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत त्यामुळे जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर उलटत त्यांनाच टार्गेट केलं. ● जरांगे यांचं तिसरं उपोषण मुंबई तील वाशीमध्ये पार पडलं.तिथे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगे यांचं उपोषण सोडवलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तिथेच जरांगेना सगे सोयरेचा मसुदा देण्यात आला पण त्याची अंमलबजावणी झाली नाही.त्यामुळे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीष महाजन यांच्यावर जरांगे यांनी रोष व्यक्त केला... ●जरांगे यांचं चौथं उपोषण ● अगरांगे यांचं चौथं उपोषण 10 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी असे 17 दिवस चौथं उपोषण झालं.या उपोषणादरम्यान जरांगे यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर रोष व्यक्त करत फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्याकडे कूच केली.मात्र जरांगे मराठा आंदोलकांसह भांबेरी गावातून पुन्हा अंतरवालीत परत आले आणि त्यांनी उपोषण सुरूच ठेवलं. राज्य सरकार आणि मराठा समाज यांच्यात मधयस्थी करणाऱ्या नेत्यांना टार्गेट करण्याचा इतिहास राहिलाय.त्यामुळे आता मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेणारे प्रसाद लाड यांच्यावरही जरांगे उलटतील का असा प्रश्न निर्माण झालाय...दरम्यान जरांगे यांच्या मागण्या कधीही पूर्ण होणाऱ्या नाहीत.त्यांच्या मागण्या घटनाबाह्य आहेत.मात्र शिष्टमंडळाकडून जरांगे यांना खोके मिळत नसल्यानं जरांगे या नेत्यांना टार्गेट करत असल्याचा आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी केलाय... बाईटव: नवनाथ वाघमारे, ओबीसी नेते व्हिओ:०३: येत्या 30 मे पासून जरांगे यांनी अंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषणाचा ईशारा दिलाय.जरांगे यांचं अंतरवाली सराटीत होणारं हे 9 वं आमरण उपोषण असणार आहे.आतापर्यंत जरी सरकारकडून जरांगे यांच्या मागण्यांबाबत कोणताही प्रतिसाद मिळाला नसला तरी जरांगे उपोषण सुरू करण्याआधीच राज्य सरकार कडून काही हालचाली होतात का याकडे सर्वांच लक्ष लागलंय.शिवाय येत्या काळात मध्यस्थीची भूमिका घेणारे प्रसाद लाड पुन्हा जरांगेंचे टार्गेट ठरतात का हे देखील पाहायला पाहिजे.
0
0
Report

वाशीम में डीजेल तंगी समाप्त: सप्लाई बढ़ी, पेट्रोल पंपों पर भीड़ घटी

Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:वाशीम जिल्ह्यात मागील दहा ते बारा दिवसांपासून निर्माण झालेली डिझेल टंचाई आता नियंत्रणात आली असून पेट्रोल पंपांवरील गर्दी ओसरली आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मशागत आणि कृषी कामांना वेग आल्याने डिझेलच्या मागणीत मोठी वाढ झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही ठिकाणी अतिरिक्त साठेबाजीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे म्हटले होते. त्यालाच दुजोरा देत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात ३१ टक्के अधिक डिझेल विक्री झाल्याची माहिती दिली. साठेबाजी करणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई केली असून सध्या जिल्ह्यात डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top