icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

शिंदे की शिवसेना में ओमराजे निंबाळकर के प्रवेश पर वैराग में पेड़े बाँटकर उत्साह

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - खा. ओमराजे निंबाळकर यांच्या समर्थनार्थ शिंदे यांच्या शिवसेनेकडून वैराग येथे वाटण्यात आले पेढे धाराशिवचे खा. ओमराजे निंबाळकर यांच्या समर्थनार्थ शिंदे यांच्या शिवसेनेकडून वैराग येथे वाटण्यात आले पेढे गेल्या दोन दिवसापासून सोशल मीडियावर ट्रोल होणाऱ्या ओमराजे निंबाळकर यांच्या समर्थनार्थ शिंदेंच्या शिवसेनेकडून जल्लोष ओमराजे निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांनी वैराग येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पेढे वाटून व्यक्त केला आनंद वैराग शहरात शिंदेंच्या शिवसैनिकांनी ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाचे जोरदार स्वागत केल ओमराजे निंबाळकर यांच्या शिवसेना शिंदे पक्षप्रवेशामुळे बार्शी शिवसेना वाढणार असल्याचा विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला
0
0
Report

सोलापुर विधान परिषद चुनाव में मोहिते पाटील और राऊत के आरोप-प्रत्यारोप तेज

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर विधान परिषद निवडणुकीवरून खा. धैर्यशील मोहिते पाटील - माजी आ. राजेंद्र राऊत यांच्यात खडाजंगी. सोलापूर विधान परिषद मतदानाच्या शेवटच्या दिवशी खा. धैर्यशील मोहिते पाटील आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या आरोप प्रत्यारोप. विधान परिषदेच्या मतदानाच्या दिवशी मोहिते पाटील यांच्या हर हर महादेवच्या स्टेटसभोवती फिरली निवडणूक. जिल्ह्यात अदृश्य शक्ती ज्या पद्धतीने काम करत होती त्यासाठी हर हर महादेवचा नारा दिल्याचं धैर्यशील मोहिते पाटील यांचे वक्तव्य. हर हर महादेवचा सर्वाधिक नारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देण्यात आला. कारण मावळ्यात धैर्य आणि धाडस यावयासाठी. त्याला भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांनी आम्हीच खरा मावळा असल्याचं सांगत दिलं प्रतिउत्तर. आमचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात सरदार होते. रावतानी पानिपतच्या युद्धातही मोठं योगदान दिले. इतिहासाची पान जर चाळली तर कोणाचा इतिहास कसा आहे हे माझ्या तोंडातून निघालं तर मोहिते पाटलांना फारच झोंबल. हर हर महादेव हे खऱ्या छत्रपतींच्या मावळ्याला शोभत असल्याचं प्रत्युत्तर राजेंद्र राऊत यांनी मोहिते पाटील यांना दिल आहे.
0
0
Report
Advertisement

सोलापुर से गोवा और हैदराबाद के उड़ानें 71 दिन बंद, मुंबई सेवा 85 दिन ठप

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूरहुन गोवा, हैदराबादची विमानसेवा 71 दिवस बंद - सोलापूर हुन गोवा, हैदराबाद विमानसेवा 71 दिवस असणार बंद - सोलापूर ते मुंबई विमान सेवेचे देखील मंगळवारपासून 85 दिवस उड्डाण नाही - पावसाळ्यात कमी होणारी दृश्य मानता आणि सोलापूर विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध नसल्याने घेण्यात आला निर्णय - सुरळीत सुरू असणारी विमानसेवा दृश्यमानतेच्या कारणांनी बंद होत असल्याने उद्योग, व्यापार, पर्यटन क्षेत्रातून उमटतेय तीव्र नाराजी - त्यामुळे सोलापुरकरांना आगामी 85 दिवस थेट सोलापुरहून विमानसेवेचा लाभ घेता येणार नाही - मात्र सोलापुरात लवकरात लवकर नाईट लँडिंगचे काम पूर्ण करून विमानसेवा सुरळीत करण्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आश्वासन
0
0
Report

मानसून देरी से खरीफ बुवाई की रफ्तार धीमी, किसान चिंतित

Yeola, Maharashtra:हवामान खात्याने अंदाज वर्तविल्यानुसार यंदा राज्यात सर्वत्र मान्सून लांबला आहे.. मान्सूनचा पाऊस न पडल्याने या पावसावर अवलंबून असलेले खरीप हंगामाच्या पेरणीचे कामे खोळंबले असल्याने शेतकरी चिंतेत आहे.. ग्रामीण भागातील बाजारपेठा ह्या बऱ्यापैकी शेतकऱ्यांवर अवलंबून असतात.. त्यामुळे बी - बियाणे मुबलक प्रमाणात खरेदी करून ठेवलेल्या कृषी सेवा केंद्राकडेही शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.. एरवी जून महिना उजाडला की बी -बियाणे व रासायनिक खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्रात लगबग सुरू होऊन मोठ्या प्रमाणात गर्दी होत असेय यंदा मात्र कृषी सेवा केंद्रासह बाजार पेठेत शुकशुकाट पाहायला मिळत आहे.. येवला येथील कृषी सेवा केंद्रातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी..
0
0
Report

आमित शाह के कोल्हापुर दौरे में 20 जून को पुलिस मैदान में जनसभा, सुरक्षा खाका तैयार

Kolhapur, Maharashtra:केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून कोल्हापुर दौऱ्यावर येत आहेत। आज रात्री नऊच्या दरम्यान अमित शाह कोल्हापुरात पोहोचणार असून 20 जून रोजी सकाळी 11 वाजता कोल्हापूरच्या पोलीस मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे। या सभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांनी सभास्थळाची पाहणी केली। या वेळी कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। अमित शाह यांनी विविध विकासकामांसाठी दिलेल्या पाठबळाबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली आहे। सभेसाठी प्रशासन आणि महायुतीकडून जय्यत तयारी सुरू आहे. सभेला मोठ्या प्रमाणात नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित राहण्याची अपेक्षा असल्याने वाहतूक, सुरक्षा, बैठक व्यवस्था आणि पार्किंगसह विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी MIDC संकट: पानी की आपूर्ति बंद, उद्योग धंधे ठप्प, हजारों रोजगार पर खतरा

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..रत्नागिरीच्या खेड लोटे MIDC वर पाणीबाणीचे संकट.. वाशिष्टी नदी आटल्याने अनेक प्लांट बंद,हजारो कामगार वाऱ्यावर!​ पाऊस लांबल्याचा मोठा फटका;पाणीपुरवठा करण्यासाठी MIDC युनियनची प्रशासनाकडे आर्त हाक.. अँकर पावसाने पाठ फिरवल्याने कोयना धरणातील पाणीसाठा धोक्याच्या पातळीवर पोहोचला असून वीज निर्मिती पूर्णपणे ठप्प झाली आहे.. परिणामी चार दिवसांपासून वाशिष्टी नदीत कोयनेचे अवजल सोडण्यात आलेले नाही.. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रासह चिपळूण शहर आणि नदीकाठच्या असंख्य गावांवर तीव्र पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे.. पुढील आठ दिवसात पाऊस न झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होणार असल्याची भीती व्यक्त होत असून दुसरीकडे एमआयडीसी ने ही अनिश्चित काळासाठी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे सर्वांना कळवले आहे.. दरम्यान पिण्यासाठीही पाणी नसल्याने काही midc तील ७५ टक्के उद्योगांनी आपलें उत्पादन बंद ठेवले आहे.. सोबत wkt & बाईट
0
0
Report

अंबेगाव में जमीन विवाद के चलते एक ही परिवार के सदस्य घायल, सात आरोपी गिरफ्तार

Shirur, Maharashtra:अंबेगाव तालुक्यातील तिवलदरा घोडेगाव येथे शेतजमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील सदस्यांवर लाठ्या-काठ्या, दगड आणि झाडाच्या फांद्यांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. पूर्ववैमनस्यातून झालेल्या या बेदम मारहाणीत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. फिर्यादी स्वप्नील काळे हे आपल्या कुटुंबासह शेतात सोयाबीनची पेरणी करत असताना, त्यांच्या चुलत भावाने बेकायदेशीर जमाव जमवून हा वाद घातला. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी स्वप्नील यांच्या डोक्यात दगड घातला, तसेच त्यांच्या वडिलांनाही बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर, पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जाणाऱ्या वडिलांना वाटेत गाठून पुन्हा मारहाण करत जिवंत मारण्याची धमकी देण्यात आली. या धक्कादायक घटनेप्रकरणी घोडेगाव पोलिसांनी डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन सात जणांविरोधात गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report
Advertisement

तुळजापूर के तुळजाभवानी मंदिर में VIP कल्चर खत्म, सभी भक्त एक कतार में दर्शन

Dharashiv, Maharashtra:तुळजापूरच्या आई तुळजाभवानी मंदिरात दर्शन व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला आहे. व्हीआयपी आणि सर्वसामान्य भाविकांमधील भेद संपवून आता सर्व भाविकांना एकाच रांगेतून देवीचे दर्शन मिळणार आहे. मंदिर संस्थानाने घेतलेल्या या निर्णयामुळे दर्शन व्यवस्था अधिक सुलभ आणि समान होणार आहे. तुळजाभवानी मंदिरात प्रथमच व्हीआयपी, ५०० रुपये देणगी दर्शन, २०० रुपये देणगी दर्शन आणि धर्मदर्शन या सर्व रांगा भुयारी मार्गात एकत्र करण्यात आल्या आहेत. आता सर्व भाविकांना एकाच ठिकाणाहून सिंहाच्या गाभाऱ्यातून देवीचे दर्शन होणार आहे. त्यामुळे देणगीदार आणि सर्वसामान्य भाविकांमधील फरक संपुष्टात येणार आहे. सिंहासन पूजा आणि अभिषेक पूजा सुरू असतानाही देणगी दर्शन अखंड सुरू राहणार आहे. दर्शन व्यवस्था अधिक सुलभ, जलद आणि समान करण्याच्या उद्देशाने मंदिर संस्थानाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे。
0
0
Report
Advertisement

चांदवड़ तालुक़े में राजदेरवाड़ी और इंद्रायणीवाड़ी में पानी संकट; टैंकर सेवा शुरू करने की मांग

Chandvad, Maharashtra:अँकर:-चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी आणि इंद्रायणीवाडी येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे परिसरातील विहिरींनी तळ गाठल्याने पाण्याचे सर्व स्रोत आटले आहेत त्यातच प्रशासनाकडून अद्याप टँकर सुरू करण्यात आले नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे इंद्रायणीवाडी परिसरातील एका शेतकऱ्याच्या बोअरवेलच्या पाइपला झालेल्या लिकेजमधून पाणी बाहेर पडत असून त्याच पाण्यावर नागरिकांना तहान भागवण्याची वेळ आली आहे हंडाभर पाण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे मान्सूनचे आगमन अद्याप झाले नसल्याने पाणीटंचाईची समस्या अधिकच गंभीर बनल्याने तातडीने दखल घेऊन राजदेरवाडी व इंद्रायणीवाडीसाठी टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी महिलांकडून जोर धरू लागली आहे
0
0
Report

जून तक संभाजीनगर में खरीप कर्ज वितरित सिर्फ 24.57%, किसान परेशान

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जून महिन्याचा पंधरवडा उलटला तरी संभाजीनगर जिल्ह्यात खरीप पीक कर्ज वाटपाचा पार बोजवारा उडाला आहे. जिल्ह्यात अद्याप २५ टक्केही कर्जवाटप पूर्ण न झाल्याने पेरणीच्या तोंडावर बळीराजा दुहेरी अडचणीत सापडला आहे. दुष्काळाची स्थिती, कर्जमाफीचा घोळ, अपुरे कर्जवाटप यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. १५ जूनअखेर जिल्ह्यात केवळ २४.५७टक्केच कर्जवाटप झाले आहे. त्यामध्ये व्यापारी बँकांकडून केवळ ६ टक्के कर्जवाटप झाले आहे. जिल्ह्यासाठी यंदा १५९७ कोटी रुपयांचे खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात केवळ ६१ हजार ९१६ शेतकऱ्यांना ३९२ कोटी रुपयांचेच वाटप होऊ शकले आहे. पेरणीसाठी खते, बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची नितांत गरज आहे. मात्र कर्जमाफीच्या घोळात कर्जवाटप अडकला आहे. यामुळे शेतकरीही संभ्रमात आहेत.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top