icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

रात समय खालचापाट में घर जलकर राख, 7 युवाओं ने परिवार सुरक्षित बाहर निकाला

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. गुहागर खालचापाटमध्ये मध्यरात्री घराला भीषण आग; ७ तरुणांच्या धाडसामुळे बामणे कुटुंबातील सर्वजण सुखरूप, घर जळून खाक.. अँकर गुहागरमधील खालचापाट परिसरात मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे बामणे यांच्या घराला लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण संसार जळून खाक झाला.. आगीने रौद्ररूप धारण केले असतानाच तरुणांनी प्रसंगावधान दाखवत घरातील सर्वांना तातडीने सुरक्षित बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली.. अग्निशमन दलाने शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले असून, नगराध्यक्षा निता मालप यांनी घटनास्थळाची पाहणी केली.. या दुर्घटनेत बामणे कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असले तरी तरुणांच्या या धाडसी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे..
0
0
Report

रत्नागिरी के फुरूस में बंद घर में चोर पकड़, पुलिस पूछताछ शुरू

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. खेडच्या फुरूसमध्ये बंद घरात शिरलेल्या चोराला सतर्क ग्रामस्थांनी पकडले; पोलिसांकडून संशयिताची कसून चौकशी सुरू.. अँकर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील फुरूस परिसरात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या घरफोड्यांच्या सत्राला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.. मंगलवारी रात्री एका बंद घरात शिरलेल्या संशयित चोराला गावातील तरुणांनी धाडसाने रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.. अनुज रमेश कावणकर असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव असून, गेल्या काही दिवसांपासून तो तांबड परिसरातील जंगलात लपून राहत असल्याची माहिती समोर येत आहे.. तरुणांच्या या सतर्कतेमुळे फुरूसमधील चोरीच्या दहशतीखाली वावरणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला असून,यापूर्वी घडलेल्या घरफोड्यांशी या संशयिताचा संबंध आहे का याचा सखोल तपास खेड पोलीस करत आहेत..
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी में एसीबी ने 8 महीनों में 11 रिश्वतखोरों के खिलाफ बड़े क्लीन-अप अभियान

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई ८ महिन्यांत ११ लाचखोर एसीबीच्या जाळ्यात भ्रष्टाचाराविरुद्ध नागरिकांनी पुढे येण्याचे 'एसीबी'चे आवाहन भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राचा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोरांविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. चालू वर्षात जानेवारीपासून अवघ्या अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीत एकूण ८ प्रकरणांत एका खासगी मध्यस्थासह एकूण ११ जणांवर कारवाई केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत सर्वाधिक ५ प्रकरणात ६ जण महसूल विभागाशी संबंधित आहेत. यामध्ये ३ मंडळ अधिकारी, २ तलाठी आणि १ कोतवाल यांचा समावेश आहे. तर पोलीस प्रशासनमधल्या १ प्रकरणात १ पोलीस उपनिरीक्षक आणि १ खासगी इसम, सार्वजनिक पाटबंधारे विभागाच्या एका प्रकरणातील १ कार्यकारी अभियंता आणि १ लिपिक, आरोग्य विभागाच्या एका प्रकरणात १ वैद्यकीय अधिकारी यांना लाच घेताना पकडण्यात आलं आहे.. भ्रष्टाचाराविरुद्ध नागरिकांनी पुढे येण्याचं आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधिक्षक अविनाश पाटील यांनी केलं आहे.
0
0
Report

मराठा आरक्षण पर सरकार की स्थिति से मराठवाडा में राजनीतिक तनाव बढ़ा

Nagpur, Maharashtra:नागपूर - विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते - जरांगे पाटील के आंदोलनों और उनकी भाषा पर टिप्पणी, संविधान की चौखट के पार ना जाने की बात; मराठा समाज को आरक्षण देने के प्रश्न पर सरकार की सीमाओं की चर्चा। राज्य के नेताओं द्वारा ओबीसी और मराठा आरक्षण के प्रमाण पत्रों के मुद्दे भी उठते हैं; दुष्काळ की स्थिति, कृषि संकट और परिवारिक कार्यक्रमों पर सरकार की भूमिका पर सवाल उठते हैं। एमpsc परीक्षा सुधार और अधिकारी-विरोधी टिप्पणी भी प्रमुख बिंदु बने रहते हैं; प्यारे खान अबू सलेम से जुड़ी घटनाओं और राजनीतिक बदले की चर्चा भी दिखती है। संजय राऊत, रोहित पवार आदि के विचार और महाराष्ट्र की सामाजिक-राजनीतिक दिशा पर विचार-विमर्श जारी है।
0
0
Report

जालना-परभणी हाईवे पर मराठा आंदोलन: केंधळी में रास्ता रोको, मांगें पूरी न होने से आक्रोष

Jalna, Maharashtra:या मध्ये एक ड्रोन व्हिडीओ पण आहे. जालना |जालना ते परभणी महामार्ग मराठा आंदोलकांनी रोखला केंधळी येथे मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक तिरडी ठेवत केला रास्ता रोको मनोज जरांगे यांच्या मागण्या मंजूर करण्याची मागणी जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या १२ व्या दिवशी मराठा आंदोलक आक्रमक अॅंकर- जालना ते परभणी महामार्ग मराठा आंदोलकांनी रोखला असून केंधळी येथे रास्ता रोको करण्यात आलाय. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा बारावा दिवस आहे. मात्र अद्याप सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करत नाही. त्यामुळं मराठा समाज आक्रमक झाला असून जालना परभणी महामार्गावरील केंधळी येथे मुख्यमंत्र्यांनी प्रतिकात्मक तिरडी ठेवत रास्ता रोको केलाय. तर काही मराठा आंदोलक मोबाईल टाॅवर चढले असून सरकारचा निषेध केला आहे. दरम्यान या रास्ता रोको आंदोलनामुळॅ वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत。
0
0
Report
Advertisement

पंढरपुर कॉरिडोर परियोजना पर विरोध तेज, प्रभावित नागरिकों ने फिर किया मोर्चा

Pandharpur, Maharashtra:मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या कॉरिडॉर प्रकल्पाला बाधित नागरिकांनी पुन्हा एकदा विरोध सुरू केलेला आहे. आज नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये कॉरिडॉर प्रकल्पा संदर्भात ठराव करण्याचा मुद्दा समावेश केलेला आहे. याच्या विरोधात या कॉरीडॉर मध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांनी आज नगरपालिकेवर हलगी मोर्चा काढून पुन्हा एकदा कॉरिडोर करण्याला आपला विरोध असल्याचं रणशिंग फुंकलेला आहे. प्रशासन पातळीवर कॉरिडॉर करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. या प्रकल्पासाठी जवळपास 4000 कोटी रुपयांचा निधी तरतूद केली आहे. पुनर्वसन पॅकेज कसं द्यायचं याबाबत नागरिकांशी चर्चा सुरू आहे. मात्र आता पुन्हा एकदा या कॉर्डोरला विरोध होताना पाहायला मिळतोय.
0
0
Report

सातार में गणेशोत्सव: डॉल्बी-लाइट बंदी के लिए बुजुर्गों का आक्रामक आह्वान

Satara, Maharashtra:साताऱ्यात गणेशोत्सव शांततेत आणि पारंपरिक पद्धतीने पार पाडण्यासाठी डॉल्बी व लेझर लाईटवर पूर्णपणे बंदी घालण्यात यावी, अशी आक्रमक मागणी ज्येष्ठ नागरिकांनी आणि विविध सामाजिक संघटनांनी केली आहे. मागील वर्षीच्या १६ संस्थांच्या विरोधानंतर यंदा सुमारे २० संस्था या आंदोलनात उतरल्या असून, मोठ्या आवाजामुळे आणि लेझर लाईटमुळे नागरिकांच्या आरोग्यावर आणि दृष्टीवर होणाऱ्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. डॉल्बी मुळे साताऱ्यात अनेक दुर्घटना घडल्या आहेत त्याच बरोबर महाबळेश्वर आणि भुईंज या गावांमध्ये जर डॉल्बी बंदी होऊ शकते तर साताऱ्यात का नाही असा सवाल देखील या ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित केला आहे. साताऱ्यातील राजकीय लोकांनी याकडे लक्ष द्यावं अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून तात्काळ कठोर निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिक चौपाल
0
0
Report

राष्ट्रवादी नेता रोहित पवार भंडारा दौरे में चांदपूर स्थित हनुमान मंदिर में दर्शन

Bhandara, Maharashtra:राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार भंडारा जिल्हा दौऱ्यावर. चांदपूरच्या प्रसिद्ध हनुमान मंदिरात घेतले दर्शन.... हनुमानाच्या चरणी नतमस्तक होत रोहित पवारांनी घेतले आशीर्वाद राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी भंडारा जिल्ह्यातील चांदपूर येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात जाऊन हनुमानाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिरात पूजा-अर्चा करत आशीर्वाद घेतले. रोहित पवार यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्येही उत्साह पाहायला मिळाला. दर्शनानंतर रोहित पवार जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
0
0
Report
Advertisement

40 साल बाद संगमनेर में सत्ता-श्रेय विवाद तेज, तांबे बनाम खताळ की जंग

Shirdi, Maharashtra: संगमनेर विधानसभा मतदारसंघात 40 वर्षानंतर परिवर्तन झाल्याने राजकीय श्रेयवादाची लढाई जोर धरू लागली आहे... काँग्रेस नेते थोरात यांच्या पराभवानंतर त्यांचे भाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात नगरपालिकेत सत्ता स्थापन झाली.. सत्यजित तांबे अपक्ष आमदार तर अमोल खताळ हे सत्तेतील शिवसेनाचे आमदार... मात्र गेल्या दीड वर्षापासून शासकीय निधीतून झालेल्या कामांचे श्रेय घेण्याची चढाओढ या दोन्ही आमदारांमध्ये लागली आहे... जिल्हा नियोजन विकास निधीतून संगमनेर शहराला एक कोटींचा निधी मिळाला... व त्यातून सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर त्याच लोकार्पण बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आलं... यावेळी सत्यजित तांबे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या समोरच राधाकृष्ण विखे यांच्या निधी दिल्याबद्दल आभार मानत दुसऱ्यांनी श्रेय घेऊ नये असा टोला अमोल खताळ यांना लगावला...
0
0
Report

सोलापुर में मराठा आंदोलन: 200 फुट ऊँची टंकी पर प्रदर्शन

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात मराठा समाज आक्रमक, 200 फुट उंचीवरच्या टाकीवर चढून तरुणांचे आंदोलन मनोज जरांग्याच्या समर्थनाठ सोलापुरात मराठा समाज आक्रमक सोलापुरातील कोंडी गावाजवळ आक्रमक मराठा आंदोलक 200 फुट उंचीच्या पाण्याच्या टाकीवर चढले सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गजवळ असलेल्या कोंडी गावाजवळील पाण्याच्या टाक्यावर चढून मराठा आंदोलक आंदोलन करतायत मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी या आंदोलकाकडून केली जातं आहे जोपर्यंत प्रशासन दखल घेणार नाही तोपर्यंत खाली न उतरण्याचा मराठा तरुणांचा इशारा याविषयीचा आढ़ावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी
0
0
Report
Advertisement

हिंगोली में सकल मराठा समाज का बहिष्कार फैसला: राजकीय कार्यक्रमों से दूरी का आह्वान

Hingoli, Maharashtra:अँकर - मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत हिंगोलीत सकल मराठा समाजाच्या वतीने बैठक घेण्यात आली. या बैठकीत हिंगोली जिल्ह्यात होणाऱ्या सर्व राजकीय कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यात कुठेही राजकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यास त्याला उपस्थित राहू नये, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, 12 तारखेला मोठ्या संख्येने मराठा बांधव अंतरवाली सराटीकडे जाणार असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. बाईट – मराठा आंदोलक
0
0
Report

गाय के शुद्ध गोबर से बनी पर्यावरण-फ्रेंडली गणेश मूर्ति, किसान बेटी की अनोखी पहल

Shirdi, Maharashtra:गणपती बाप्पा म्हणजे श्रद्धा..बाप्पा म्हणजे भक्ती..आणि बाप्पा म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या मनातला जिव्हाळा...पण याच बाप्पाच्या विसर्जनानंतर निसर्गाची हानी होऊ नये, जलप्रदूषण होऊ नये आणि बाप्पाच्या आशीर्वादातून नव्या जीवनाची सुरुवात व्हावी... अशी अनोखी संकल्पना संगमनेर तालुक्यातील दाढ खुрдच्या राधिका राजेश गव्हाणे या उच्च शिक्षेित youths ने साकारली आहे... गाईच्या शुद्ध शेणापासून तयार केलेली ही सात्त्विक आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्ती जिच्या विसर्जनानंतर बाप्पा निसर्गात विलीन होतात आणि त्यातून पुन्हा जीवन फुलतं... या बाप्पाची खासियत केवळ मूर्तीच्या निर्मितीत नाही...तर बाप्पाच्या विसर्जनानंतरही आहे... पाण्यात विसर्जित झाल्यानंतर मूर्तीपासून शेतीसाठी उपयुक्त खत तयार होतं.. आणि त्याहूनही सुंदर म्हणजे या मूर्तीमध्ये देशी गाईच्या शेनासह , मुलतानी माती आणि हिरडा, बेहडा, अर्जुन यांसारख्या औषधी वनस्पतींच्या बियांचा समावेश केला गेलाय. राधिका गव्हाणे dhaad khaurdchya Bsc मायक्रो बायोलॉजीचे उच्च शिक्षण घेणाऱ्या राधिका गव्हाणे यांचा हा उपक्रम गणेशभक्तीला पर्यावरणसंवर्धनाची सुंदर जोड देणारा ठरत आहे हे मात्र नक्की..
0
0
Report

चंद्रपूर में गणेशोत्सव पर लेजर लाइट और भारी ध्वनि उपकरण पर पूर्ण रोक

Chandrapur, Maharashtra:आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात लेझर लाईट आणि तीव्र ध्वनिक्षेपकांवर पूर्णपणे प्रतिबंध लावलाय तर डीजे बाबत देखील कडक नियम व अटी-शर्ती लागू केल्या आहेत. हा नियम आज मध्यरात्रीपासून लागू होणार असून 27 सप्टेंबर च्या मध्यरात्रीपर्यंत हा नियम लागू असेल. आगामी काळात पोळा, तान्हा पोळा, गणेशात्सव आणि गणेश विसर्जन असे विविध धार्मिक, सांस्कृतिक व सार्वजनिक उत्सव आयोजित केले जाणार आहेत. यात नियमांचे उल्लंघन होऊ नये तसेच सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था व कायदा आणि नागरिकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी आज जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हे विशेष निर्बंध व मनाई आदेश जारी केले आहेत. चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी काढलेल्या आदेशातील ठळक वैशिष्ट्ये... # लेझर लाईटवर पूर्ण बंदी, मिरवणुकीदरम्यान तीव्र आणि अति तीव्रतेचे फ्लॅश लाईट व मानवी डोळयांवर तसेच आरोग्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या प्रकाश यंत्रणांच्या वापरावर पुर्णतः बंदी # प्लाझ्मा सिस्टीम, मॉडीफाइड साउंड इक्विपमेंट, वुफर, सबवुफर यासारख्या अत्यंत तीव्र व हानीकारक ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर पूर्णतः बंदी राहील. # पोलिस अधिकारी मिरवणुकीतील लाईट उपकरणांची तपासणी करू शकतील व धोकादायक आढळल्यास ते तात्काळ बंद करण्याचे निर्देश देतील # कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपक, लाउडस्पिकर, एम्प्लीफायर वापर करता येणार नाही. # रुग्णालय, शैक्षणिक संस्था, न्यायालये यासारख्या घोषित शांतता क्षेत्र परिसरात ध्वनी मर्यादांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. # नियमांचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलिस अधिनियमन, 1951 चे कलम 70 अन्वये ध्वनी व प्रकाश यंत्रणा उपकरणे जप्त केली जातील. सोबतच न्यायालयात खटला दाखल केला जाईल. बाईट १) आयुष नोपानी, जिल्हा पोलीस अधीक्षक, चंद्रपूर
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top