445001
यवतमाळ तालुका काँग्रेस अध्यक्षावर भरचौकात चाकुहल्ला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहराच्या मध्यवस्तीत गजबजलेल्या दत्त चौकामध्ये भरदिवसा प्राणघातक हल्ल्याची घटना घडल्याने वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रामायण हॉटेल समोर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रमेश भीसणकर यांच्यावर दोन आरोपींनी चाकूने हल्ला चढविला, यावेळी भीसनकर यांनी जखमी अवस्थेत एकाच्या हातून चाकू हिसकावल्याने दोघेही पसार झाले, त्यानंतर जखमी भीसणकर हे स्वतः ऑटोने रुग्णालयात पोहोचले. दरम्यान हा थरार शेकडो लोकांपुढे सुरू असताना कुणीही त्यांच्या बचावासाठी पुढे आले नाही.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सोलापुर-पुणे हाइवे पर भीषण दुर्घटना, दो लोग घटनास्थल पर मृत
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात - सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात - अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती - मध्यरात्री 1 वाजता शहरातील शेळगी उड्डाण पुलावर हा अपघात झालाय - एका चार चाकी गाडीला कंटेनरने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झालाय - अपघातातील मृतांबाबत अद्याप माहिती समोर आली नाही.0
0
Report
तापमान बढ़ा, हिंगोली में कोबी की फसल बर्बाद; किसानों पर आर्थिक संकट मंडराने लगा
Hingoli, Maharashtra:मराठवाड्यासह हिंगोली जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा फटका आता फळबागांसोबत भाजीपाला पिकांनाही बसू लागला आहे.हिंगोली जिल्ह्यातील नवलगव्हाण येथील शेतकरी जगन कोरडे यांनी जानेवारी महिन्यात अर्ध्या एकर क्षेत्रावर कोबी पिकाची लागवड केली होती.उन्हाळ्यात चांगला बाजारभाव मिळेल, या अपेक्षेने त्यांनी ही लागवड केली होती.मात्र यावर्षी तापमानात झालेल्या मोठ्या वाढीमुळे कोबी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.वाढत्या उष्णतेमुळे कोबीवर काळे डाग पडले असून पिक सुकून गेले आहे.तसेच कोबीचे संरक्षण करणारी पानेही वाळून गेल्याने पिकाची गुणवत्ता पूर्णत खालावली आहे.यामुळे बाजारात या कोबीला अपेक्षित दर मिळणार नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.आधीच वाढत्या खर्चाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे आता निसर्गाच्या या बदलत्या परिस्थितीमुळे नवीन संकट उभे ठाकले आहे.0
0
Report
आगामी सप्ताह भोंदू खरात के खिलाफ पहला आरोपपत्र दाखिल की तैयारी, SIT तेज जांच
Nashik, Maharashtra:भोंदू खरातविरोधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र अँकर भोंदू अशोक खरात याच्याविरोधात एसआयटीने दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केलीये.... पुढील आठवड्यात न्यायालयात दोषारोपत्र सादर केले जाण्याची शक्यता असून, एसआयटीने खरातच्या कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले. त्याशिवाय पीडितेची भेटदेखील घेतली. त्यामुळे खरातच्या अडचणी अधिक वाढणार आहेत.एसआयटीकडून दोषारोपत्रात पीडितांचे जबाब, वैद्यकीय अहवाल, तांत्रिक पुरावे तसेच साक्षीदारांची विधाने यांचा समावेश केला जाणार आहे. तपासादरम्यान गोळा करण्यात आलेले डिजिटल पुरावे आणि घटनास्थळाशी संबंधित माहितीही महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायालय त्याची छाननी करून आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करेल. त्यानंतर खटल्याच्या सुनावणीला प्रत्यक्ष सुरुवात होईल.कायद्यानुसार, जर पहिल्या गुन्ह्यातील लैंगिक अत्याचाराचा आरोप सिद्ध झाला, तर भारतीय दंड संहिताेतील संबंधित कलमान्वये आरोपीस किमान १० वर्षापासून आजीवन कारावासापर्यंत शिक्षा होऊ शकते. काही गंभीर परिस्थितीत दंडाची तरतूदही लागू होऊ शकते...हे प्रकरण संवेदनशील आणि गंभीर स्वरूपाचे असल्याने न्यायालयीन प्रक्रिया वेगाने पार पडण्याची शक्यता आहे. गुन्हा सिद्ध झाला तर पीडितांना न्याय मिळण्यासाठी दोषारोपपत्र निर्णायक ठरणार आहे.0
0
Report
Advertisement
मावळ तालुक्यात विषमुक्त सेंद्रिय खेती के लिए दशपर्णी अर्क अभियान
Varsoli, Maharashtra:मावळ तालुक्यातील कृषि विभाग आणि पाणी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महादशपर्णी अर्क सोहळा निमित्त मावळ तालुक्यातील शिलाटणे, जांभूळ, नानोली तर्फे चाकण, यागावातील महिला शेतकरी गटांनी उत्साहात दशपर्णी अर्क तयार केला. या सर्व गटांच्या एकजुटीमुळे पाणी फाउंटेशन मेनटॉर कृषि अधिकारी स्मिता कानडे व प्रियांका पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे मावळ तालुक्यात एकूण 800 लिटर दशपर्णी अर्क बनविण्यात आला आहे. शेतकऱ्यांना दशप्रणी अर्क पिकामध्ये कीड रोगासाठी कसा फायदेशीर आहे हे कृषि अधिकारी स्मिता कानडे व प्रियांका पाटील यांनी सांगितले. या उपक्रमातून विषमुक्त शेतीच्या चळवळीत आपला सहभाग नोंदविला आणि गटशेती मध्ये वाटचाल करण्याचा दृढ संकल्प अधिक बळकट झाला..0
0
Report
भंडारा में बिना नंबर प्लेट वाहनों के इस्तेमाल पर प्रशासन पर प्रश्नचिह्न
Bhandara, Maharashtra:भंडारा जिल्ह्यात सुरूलेल्या भूमिगत गटारे व रस्ते कामांमध्ये नियमांचे उल्लंघन करत भंगार अवस्थेतील विनानंबरची वाहने वापरली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या वाहनांवर नंबर प्लेटऐवजी ‘नगरपरिषद भंडारा’ आणि ‘मांगूकिया ब्रदर्स’ अशी नावे लिहिलेली दिसत आहेत. वाहतूक विभाग व आरटीओच्या नियमांना धाब्यावर बसवत सर्रासपणे ही वाहने रस्त्यावर धावत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर वाहतूक पोलिसांनी एका वाहनावर कारवाई केली असली, तरी अशा अनेक वाहनांचा वापर सुरू असल्याची शक्यता आहे. या प्रकरणात संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत असून प्रशासन आता काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
वन विभाग ने सीतेपार में पांच वर्षीय बच्ची हत्या करने वाले बिबटिए को जेरबंद किया
Bhandara, Maharashtra:भंडाऱ्याच्या सीतेपार परिसरात पाच वर्षीय चिमुकलीचा बळी घेणाऱ्या हल्लेखोर बिबट्याला अखेर वनविभागाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. काही दिवसांआधी पहाटे मक्याच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अंशिका मिरी हिच्यावर हल्ला करून तिचा जीव घेतला होता. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाने तातडीने पिंजरे लावून शोधमोहीम राबवली आणि अखेर बिबट्याला पकडण्यात यश आले. जेरबंद केलेल्या बिबट्याला नंतर सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले असून नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.0
0
Report
Advertisement
कुही में तहसीलदार को JCB से चार किलोमीटर तक फरफटाने का मामला
Nagpur, Maharashtra:नागपूर जिल्ह्यातील कुahi तालुक्यात नायब तहसीलदार कारवाईसाठी गेले असताना जेसीबी न थांबवता मुरूम माफियांनी तहसीलदारांना जेसीबीला लटकवत चार किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याचा संतापजनक प्रकार घडलाय. कुही तालुक्यातील बोरी नाईक परिसरात मुरूम माफियांनी महसूल पथकावर हा हल्ला चढवला. सोमवारी रात्रीच्या सुमारास झाला हल्ला. नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे यांना बोरी नाईक परिसरात अवैध उत्खननाची माहिती मिळाली... त्यामुळे त्यांनी तातडीने पावले उचलत कारवाई सुरू केली. कारवाईदरम्यान जेसीबी चालकाने महसूल यंत्रणेला न जुमानता जेसीबी घेऊन तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी नायब तहसीलदार निकाळजे यांनी जेसीबिवर चढले व तो थांबवण्याचा प्रयत्न केला.. मात्र जेसीबी चालकाने निकाळजे यांना चालत्या जेसीबीला लटकवून तीन ते चार किलोमीटरपर्यंत लटकून, फरफटत नेले, त्यांच्या जीवाला धोका निर्माण केला. घटनेचा माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखল झाले. कुही पोलिसांनी जेसीबी चालक मयूर थोटे याला अटक केली केली.0
0
Report
जालना मर्चेंट बैंक घोटाला: भोकरदन शाखा प्रबंधक गिरफ्तार, मुख्य सूत्रधार पहले गिरफ्तاري
Jalna, Maharashtra:जालना मर्चंट बँक घोटाळा : भोकरदन शाखा व्यवस्थापकाला केली अटक आरोपीला सहा दिवसांची पोलिस कोठडी; मुख्य सूत्रधाराला यापूर्वीच अटक कलमाताही वाढ अँकर : जालना शहरातील जालना मर्चेंट को-ऑपरेटिव्ह बँकेची बनावट कागदपत्रांच्या आधारे २३ कोटी ३३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे गुन्ह्याची व्याप्ती पाहून पोलिस अधीक्षकांनी सखोल तपासाबाबतचे आदेश आर्थिक गुन्हे शाखेला दिले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने तपासादरम्यान गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार आणि त्याच्या इतर साथीदारांना यापूर्वीच करण्यात आली आहे. या प्रकरणात भोकरदन शाखेचा अटक केली आहे. बुधवारी भोकरदन शाखेच्या व्यवस्थापकास व्यवस्थापक नटवर सत्यनारायण (४७, वसुंधरानगर, दायमा जालना) याचा कटामध्ये सहभाग निष्पन्न झाला. तसे पुरावे पोलिसांना मिळाले. त्यामुळे त्यासही गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात आजपर्यंत मुख्य आरोपी रायचंद सखाराम कुरंगळ यास अटक करण्यात आली आहे.तसेच गुन्ह्यात आरोपींनी कर्जाची रक्कम विशिष्ट खात्यावर वर्ग केली आहे. त्या माध्यमातून बँकेची आर्थिक फसवणूक केली आहे. त्यामुळे बाधा निर्माण झाली आहे. म्हणून नमूद गुन्ह्यात महाराष्ट्र ठेवीदारांचे गुन्ह्यात ठेवीदारांच्या हितसंबंधांना हितसंबंध जोपासणारा कायदा, कलम ३, ४ व५ ही वाढ करण्यात आली आहे.0
0
Report
उष्णते के कारण नाशिक में पोल्ट्री फार्म के कोंबड़े मरने लगे, किसान चिंतित
Nashik, Maharashtra:नाशिकच्या ग्रामीण भागात उष्णतेचा कहर, पोल्ट्रीतल्या कोंबड्या पडत आहेत मृत्यूमुखी. आधी बागलाणच्या अंबासनमध्ये 600 कोंबड्यांचा मृत्यू.. और आत्ता नांदगाव मध्येही कोंबड्या पडत आहेत मृत्यूमुखी. नाशिक जिल्ह्यातील अंबासन परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाढत्या उष्णतेचा फटका कुकूटपालन व्यवसायालाही बसताना दिसत आहे. तीव्र उष्णतेमुळे तब्बल सहाशे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या परिसरात उष्णतेची लाट कायम असून तापमानात मोठी वाढ झाल्याने पशुपक्ष्यांनाही याचा मोठा फटका बसत आहे. शेतकऱ्यांनी उष्णतेपासून बचावासाठी विविध उपाययोजना केल्या असल्या तरीही या घटनेमुळे कुकूटपालन व्यवसायावर मोठे संकट ओढवले आहे. दरम्यान, या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी के जयगड़ बंदर के निर्यात प्रकल्प को गति देने का निर्देश
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जयगड बंदराच्या निर्यात प्रकल्पाला गती द्या..मंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश!.. अँकर कोकणातील हापूस आंबा,काजू आणि मत्स्य उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी रत्नागिरीतील जयगड बंदर सज्ज होत आहे... मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी या निर्यात प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.. बंदरावरील शीतसाखळी आणि पायाभूत सुविधा सक्षम करून हा प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला आहे.. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांना आणि मच्छिमारांना थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे..0
0
Report
कोसारी दुहेरी हत्याकांड के साक्षीदार का अपहरण कर खून, शव पेड़ से लटका मिला
Sangli, Maharashtra:स्लग - दुहेरी हत्याकांड खटल्यातील मुख्य साक्षीदाराचा अपहरण करून निर्घृण खून.. अँकर - सांगलीच्या जत तालुक्यातल्या कोसारी येथील दुहेरी हत्याकांडातील साक्षीदाराचे अपहरण करून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.कर्नाटकच्या मदभावी येथे अपहरण झालेल्या दादासो यमगर यांचा झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे.मंगळवारी सांगलीच्या न्यायालयात जबाब देण्यासाठी निघाले असता कवठेमहांकाळ तालुक्यातल्या नागज फाटा येथून यमगर यांचा अपहरण करण्यात आले होते.याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील झाला होता.दरम्यान बुधवारी दुपारच्या सुमारास कर्नाटकच्या अथणी तालुक्यातल्या मदभावी येथे यमागर यांचा खून करून मृतदेह झाडाला गळफास लावलले अवस्थेत आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या घटनास्थळी धाव घेतली होती.मृत यमगर हे जत तालुक्यातल्या कोसारी मध्ये 2023 मध्ये घडलेल्या दुहेरी हत्याकांडातील मुख्य साक्षीदार होते, मंगळवारी त्यांची न्यायालयामध्ये महत्त्वपूर्ण साक्ष नोंदवली जाणार होती,तत्पूर्वी त्यांचा अपहरण करून खून करण्यात आला आहे. जबाब नोंदवू नये,या उद्देशाने त्यांचे अपहरण करून खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे.0
0
Report
बस ब्रेक फेल से पलटी: 7 जख्मी, 27 यात्री सुरक्षित
Nashik, Maharashtra:बसचे ब्रेक फेल..चालकाचे नियंत्रण सुटले ; बस विजेच्या डिपीवर जाऊन आदळत पलटी झाली... अपघातात ७ जण जखमी दोघे गंभीर... खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल... विजेचा पुरवठा खंडित झाल्याने सुदैवाने बसमधील २७ प्रवासी वाचले.. मालेगाव - धुळे रस्त्यावरील रॉयल हॉटेलजवळ घडली घटना..0
0
Report
Advertisement
शिर्डी जमीन घोटाला: भोंदू खरात की चौकसी तेज, साक्षियों के बयान सामने
Shirdi, Maharashtra:शिर्डी पोलिसांकडून जमीन गैरव्यवहार प्रकरणात भोंदू खरात याची चौकशी सुरू... भोंदू खरात याची दुपारपासून शिर्डी पोलिस करताय कसून चौकशी.. मला गोत्यात आणण्यासाठी साक्षीदारांनी भूमिका बदली... शिर्डीतील जमिनीचा व्यवहार पूर्ण कायदेशीर... सावकारी करण्यासाठी हा व्यवहार केला नाही... मी जमीन मागायला जमीन मालकाकडे गेलो नव्हतो , ते आणि त्यांचे समवेत असणारे माझ्याकडे आले... चौकशी दरम्यान अशोक खरात याने दिली पोलिसांना माहिती.. पोलिस चौकशीत अशोक खरात याने दिलेली माहिती - 22 / 8 / 2023 ला साठे खत आणि मुक्तीआर पत्र झालं आणि 23 / 8 / 2023 ला खरेदी खत झालं.. 22 तारखेला मूळ जमीन मालक आले नाही , त्याची खूप वेळ वाट बघितली त्यामुळे 23 आम्हाला जमिनीची खरेदी करावी लागली.. 22 आणि 23 तारखेला आम्ही रक्कम RTGS करून गोंदकर यांच्या खात्यावर पाठवली होती... जमीन परत घ्यायचे आणि व्याज मिळावे असे काहीही ठरलेलं नव्हत.. सर्व साक्षीदार एक झाले आहेत आणि आता नाही होऊन पडत आहेत... मी जेव्हा जमीन बघायला गेलो तेव्हा जमिनीचा मूळ मालक नव्हता.. अरविंद बावके आणि किरण सोनवणे हे दोघे जण जमीन दाखवण्यासाठी आले होते... जेव्हा जमीन खरेदी करायला गेलो तेव्हा शिर्डीतील व्यावसायिक मयत जितेंद्र शेळके आणि महेंद्र शेळके हे होते... आरोपी भोंदू अशोक खरात चौकशीत सविस्तर माहिती न देता पोलिसांना देतोय अर्धवट माहिती... भोंदू खरात हा शिर्डी पोलिसांच्या कोठडीत असताना सकाळी 10 वाजता करतो जेवण , एक चपाती आणि डाळ भात अस कोठडीत दिलं जात जेवण... आणि सकाळच्या जेवणातील उरलेले जेवण सायंकाळी 5 वाजता करतो..मात्र संध्याकाळी भोंदू खरात हा जेवण करत नाही.... विश्वसनीय सूत्रांची माहिती....0
0
Report
चंद्रपुर के टाडोबा-आंधारी बफर.zone में मामा मेल बाघ ने गाई का शिकार किया
Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मातब्बर वाघ मामा मेल ची नवा व्हिडिओ समोर, मुल तालुक्यातील फुलझरी गावाजवळ गाईची केली शिकार अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मातब्बर वाघ मामा मेल ची नवा व्हिडिओ समोर आलाय. मुल तालुक्यातील फुलझरी गावाजवळ वाघाने गाईची शिकार केली. पाळीव जनावरावर हल्ला करून शेत शिवारात ओढून नेले. सध्या जानाळा- केसलाघाट या भागात मामा मेलचा मुक्काम आहे. हा भला थोरला वाघ या भागात अनेक ठिकाणी दर्शन देत आहे. ताज्या व्हिडिओत फुलझरी गावाच्या अगदी बाजूला त्याने सहजपणे गाईची शिकार केली. वाघाच्या या वावराने ग्रामस्थ मात्र चिंतेत आहेत. वनविभागाचे मामा मेल वाघाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष आहे.0
0
Report
आमदार शिवाजी पाटील पर 100 करोड़ के मानहानि दावे की चेतावनी, मुश्रीफ का इशारा
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर, आमदार शिवाजी पाटील यांनी गेल्या पाच वर्षात गोकुळमधील साधा ग सुद्धा कधी ऊच्चारलेला नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतरच त्यांना हा सगळा साक्षात्कार झालेला दिसतोय. त्यामुळेच अलीकडच्या काळात ते सातत्याने माझ्यावर आरोप करीत सुटले आहेत. मी मात्र श्री. पाटील यांच्यावर काहीही बोलणार नाही, असे यापूर्वीच सांगितलेले होते आणि बोलणारही नव्हतो. परंतु; काल त्यांनी माझ्यावर हसन मुश्रीफ यांनी नोटाबंदीच्या काळात स्वतःकडील कोट्यावधी रुपये बँकेत आणून बदलून घेतले आणि बँकेला अडचणीत आणले, असा व्यक्तिशः बदनामीकारक आरोप केला. त्यामुळे, मी त्यांच्यावर शंभर कोटी रुपयांचा फौजदारी बदनामीचा दावा न्यायालयात दाखल करणार असल्याचा इशारा, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. मंत्री श्री. मुश्रीफ यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, मी गेल्या ३५-४० वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाच्या वाटचालीमध्ये माझ्या वैयक्तिक प्रतिमेला फार जपत आलो आहे. मी कुठलीही गोष्ट मान्य करीन. परंतु माझी प्रतिमा, माझा स्वाभिमान, माझ्याबद्दलचा समाजाचा दृष्टिकोन कधीही बदलता कामा नये, यासाठी मी पडेल ती किंमत देऊन मी कायदेशीर लढाई लढत असतो. आजपर्यंत ज्या- ज्या वेळी माझी व्यक्तिशः बदनामी केली, त्यांच्याविरोधात मी १०० कोटी रुपयांचे फौजदारी बदनामीकारक दावे न्यायालयात दाखल केलेले आहेत. माझ्यावतीने दाखल होत असलेला हा दहावा दावा आहे. आमदार शिवाजी पाटील यांनी माझ्यावर केलेल्या या वक्तव्यातून त्यांनी माझी व्यक्तीशः बदनामी केली आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत त्यांनी यासंबंधीचे पुरावे जाहीर करावेत. अन्यथा त्यानंतर त्यांच्यावर शंभर कोटी रुपयांचा फौजदारी बदनामीकारक दावा दाखल करणार आहे. श्री यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की, आमदार शिवाजी पाटील यांनी असेही वक्तव्य केले आहे की केडीसीसी बँकेकडून साखर कारखान्यांसह इतर संस्थांना अर्थपुरवठा केला जातो. त्यामुळे मुश्रीफ यांच्या विरोधात जाण्यास आमदार घाबरतात. त्यांचे हे वक्तव्य म्हणजे हासुद्धा आमदारांचा, माझ्या संचालकांचा, कारखानदारांचा आणि समस्त शेतकऱ्यांचाही अपमानच आहे. श्री मुश्रीफ यांनी पुढे म्हंटले आहे, आमदार श्री. पाटील हे गोकुळ दूध संघ आणि के. डी. सी. सी. बँकेत चौकशी लावतो, हे करतो आणि ते करतो, अशा नुसत्या बाष्कळ गप्पा मारत आहेत. त्यांनी ते एकदा करूनच दाखवावच. कारण आम्ही संस्था कशा स्वच्छ, पारदर्शी आणि सभासदाभिमुख चालविलेल्या आहेत, हे सगळ्या सभासदांना आणि जनतेलाही माहीत आहे.0
0
Report
Advertisement
