445001
यवतमाळ तालुका काँग्रेस अध्यक्षावर भरचौकात चाकुहल्ला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहराच्या मध्यवस्तीत गजबजलेल्या दत्त चौकामध्ये भरदिवसा प्राणघातक हल्ल्याची घटना घडल्याने वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रामायण हॉटेल समोर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रमेश भीसणकर यांच्यावर दोन आरोपींनी चाकूने हल्ला चढविला, यावेळी भीसनकर यांनी जखमी अवस्थेत एकाच्या हातून चाकू हिसकावल्याने दोघेही पसार झाले, त्यानंतर जखमी भीसणकर हे स्वतः ऑटोने रुग्णालयात पोहोचले. दरम्यान हा थरार शेकडो लोकांपुढे सुरू असताना कुणीही त्यांच्या बचावासाठी पुढे आले नाही.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सतत बारिश से मुळा-भंडारदरा डैम में पानी बढ़ा, किसान में उम्मीद जगी
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणांमध्ये पाणीसाठा झपाट्याने वाढू लागला आहे. अकोले तालुक्यातील मुळा नदीवरील 600 एमसीएफटी क्षमतेचे पिंपळगाव खांड लघु धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे अतिरिक्त पाणी आता थेट मुळा धरणाच्या दिशेने वाहू लागले असून मुळा धरणाच्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. दुसरीकडे, भंडारदरा धरणातही पाणीसाठा 29.30 टक्क्यांवर पोहोचला असून गेल्या 24 तासांत तब्बल 218 एमसीएफटी नव्या पाण्याची आवक झाली आहे. भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने निळवंडे, आढळा आणि वाकी धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. संततधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून बळीराजामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.0
0
Report
खोपोली-वे वाकण फाटा महामार्ग पर पानी से ट्रैफिक ठप
Chendhare, Maharashtra:खोपोली ते वाकण फाटा महामार्गावरील वाहतूक ठप्प पालीजवळील पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर पाणी अंबा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पाणी रस्त्यावर आले दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा, सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त तैनात0
0
Report
देवळी-देवळी मार्ग का वळण पुल बह गया, यातायात दो दिन से बंद
Wardha, Maharashtra:देवळी तालुक्यातील चिकणी जामाणी येथील वळण पुल उखडला. दहेगाव-देवळी मार्गावर वाहतूक बंद. दोन दिवस सतत पाऊस झाल्यामुळे देवळी तालुक्यातील देवळी-दहेगाव मार्गावर असलेला चिकणी जामाणी येथील वळण पुल पावसाने वाहून गेला. या पुलावरून शाळकरी विद्यार्थी, शेतकरी आणि परिसरातील गावाकऱ्यांची नियमित वाहतूक होती. मार्ग बंद झाल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. देवळी येथून पुलगाव जाण्यासाठी दहेगाव मार्गानेच जावे लागते. महामंडळाच्या बसेस देखील याच मार्गाने पुलगाव पोहचतात. परंतु गेल्या दोन दिवसात मुसळधार पाऊस झाला. या पावसात वळण पुल उखडला आणि वाहून गेला. गेल्या दोन वर्षापासून या रस्त्याचं काम सुरु आहे. कंत्राटदार कंपनीकडून संथ गतीने काम केलं जात आहे, तरीही येथील गावाकऱ्यांनी बांधकाम व महसूल प्रशासनाला कळविले. याकडे मात्र सतत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.0
0
Report
Advertisement
रामटेक के नेरला में 40 नाग पिल्ले पकड़े, वन विभाग ने सुरक्षित जंगल छोड़ने के लिए छोड़ा
Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपूर जिल्ह्यातील रामटेक जवळच्या नेरला गावात राजू ढोमणे यांच्या घरामध्ये तब्बल ४० नागांची पिल्ले आणि दोन मोठे विषारी नाग आढळून आल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच चाचेर येथील वाइल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशनचे स serpमित्र रतन कुंभरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अत्यंत सावधगिरीने आणि कौशल्याने त्यांनी सर्व ४० नागांची पिल्लांची कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे पकडली. वन्यजीव संरक्षणाच्या नियमांचे पालन करत या सर्व पिल्लांना रामटेक वन विभागाच्या कार्यालयात आणून नंतर त्यांच्या नैसर्गिक अधिवासातील जंगलात सुखरूप सोडण्यात आले घराच्या परिसरात साप आढळल्यास घाबरून न जाता त्यांना मारण्याचा प्रयत्न व पकडण्याच्या प्रयत्न करू नये, परिसरात साप आढळल्यास त्वरित जवळच्या अनुभवी सर्पमित्रांना किंवा वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.0
0
Report
बारिश से भाजी बाजार में सप्लाई कम, ताजा सब्जी की कीमतें आसमान छूने लगीं
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यात सततच्या पावसामुळे भाजी बाजारात भाजीपाल्याची आवक घटल्याने बाजारात भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.गोबीचा दर ४० रुपयांवरून ६० रुपये किलोपर्यंत वाढला असून, टोमॅटो ६० रुपये तर चाकवत ७५ रुपये किलो दराने विकला जात आहे.याशिवाय भेंडी, वांगी, गवार, कारले, ढोबळी मिरची, कोथिंबीर आणि इतर पालेभाज्यांच्या दरातही लक्षणीय वाढ झाली आहे.सततच्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादन आणि बाजारातील आवक कमी झाल्याने ही दरवाढ झाला आहे.दुसरीकडे, वाढलेल्या दरांमुळे सर्वसामान्य ग्राहकांना रोजच्या भाजीपाला खरेदीसाठी अधिक खर्च करावा लागत आहे.वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर अतिरिक्त ताण पडत आहे.0
0
Report
सवतसडा धबधबा बन गया Koan में पर्यटकों का नया पसंदीदा; चिपळूण का हॉट स्पॉट
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण-रत्नागिरी..सह्याद्रीच्या कुशीत उंच कड्यावरून फेसरणारा सवतसडा धबधबा ठरतोय पर्यटकांची पहिली पसंती.. अँकर intro वरुणराजाच्या आगमनाने सध्या संपूर्ण कोकण परिसर निसर्गाच्या विविध रंगांनी नटला आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना निसर्गाच्या एका अद्भुत चमत्काराचा अनुभव घेता येत आहे.सह्याद्रीच्या नागमोडी घाटरस्त्यांवरून जाताना उंचावरून कोसळणारा चिपळूणजवळील 'सवतसडा धबधबा' सध्या पर्यटकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. पाहुयात यावरचा आमचा हा विशेष रिपोर्ट... दाट झाडीझुडपांमधून आणि काळ्या कड्यांवरून फेसाळत येणारे हे पांढरेशुभ्र पाणी पाहताच,महामार्गावरील वाहनांचे ब्रेक आपोआप सवतसड्यापाशी लागतात.निसर्गाच्या या अथांग रूपावर आधारित एका कवीने सुंदर ओळी लिहिल्या आहेत... "उंच कड्यावरून कोसळते पांढरे शुभ्र हे पाणी, हिरव्यागार रानात घुमते निसर्गाची गाणी... सवतसड्याच्या या रूपावर पर्यटक झाले दंग,पावसाच्या या सरींनी चढवला आनंदाचा रंग!" एकूणच काय तर, सह्याद्रीच्या कुशीतून उंच काड्यावरून फेसळणारा हा 'सवतसडा' धबधबा सध्या कोकणातील पर्यटनाचा मुख्य केंद्रबिंदू ठरत आहे.जर तुम्हीही या पावसाळ्यात सुरक्षित आणि निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल,तर चिपळूणचा सवतसडा तुमचा वीकेंड नक्कीच खास करेल. निसर्गाच्या या अद्भुत चमत्काराचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांची पावले आता चिपळूणकडे वळत राहतील हे नक्की..0
0
Report
Advertisement
मानसून बरसात से कोल्हापुर के डैमों में जलस्तर तेज़ी से बढ़ा
Kolhapur, Maharashtra:मान्सून लांबल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला होता, पण मुसळधार पाऊस सुरू झाल्याने धरणांची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील धरणाची पाणी पातळी किती आहे त्यावर एक नजर टाकूया. राधानगरी धरण 33.58 टक्के इतके भरले आहे. तुळशी धरण 40.46 टक्के वारणा धरण 37.44 टक्के दूधगंगा धरण 11.29 टक्के तर कासारी, कडवी, कुंभी, पाटगाव, चिकोत्रा, जगंहटी ही लघु पाटबंधारे प्रकल्प सरासरी 32 टक्के भरले आहे, त्यातील घटप्रभा लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरले आहे.0
0
Report
सोलापुर विधानपरिषद के विधायक राजेंद्र राऊत ने बार्शी के विकास कार्यों की समीक्षा की
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग – सोलापूर विधानपरिषदचे आ. राजेंद्र राऊत यांच्याकडून बार्शी येथील विकास कामांची पाहणी. सोलापूर विधानपरिषद आमदार राजेंद्र राऊत यांच्याकडून बार्शी येथील विकास कामांची पाहणी. आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची केली पाहणी. आ. राऊत यांनी बार्शी तालुक्यातील विविध विकास कामासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला. तालुक्यातील कामांबाबत गुणवत्ता उच्च दर्जाचे असावी अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.0
0
Report
जिले की केंद्रीय सहकारी बैंक के चुनाव में रिकॉर्ड 99.53% मतदान, परिणाम आज स्पष्ट होंगे
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी शनिवारी अत्यंत चुरशीने आणि अभूतपूर्व वातावरणात मतदान पार पडले. जिल्ह्यातील एकूण १०५३ मतदारांपैकी तब्बल १०४८ जणांनी मतदानाचा हक्क बजावला असून, जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक ९९.५३% मतदानाची नोंद झाली आहे. राजकीय ईर्ष्या टोकाला पोहोचलेल्या या निवडणुकीत ओबीसी विकासमंत्री अतुल सावे, खासदार कल्याण काळे, अंबादास दानवे, आमदार सतीश चव्हाण, अभिजित देशमुख व जगन्नाथ काळे हे मतदान केंद्राबाहेर तब्बल आठ तास ठाण मांडून बसले होते. शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासूनच नेत्यांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. 'आम्ही आमचे मतदान करून घेतले आहे, त्यामुळे आमच्या उमेदवारांचा विजय निश्चित होईल,' अशी प्रतिक्रिया ओबीसी विकासमंत्री अतुल सावे यांनी दिली. तर दुसरीकडे, 'शेतकऱ्यांमध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तीव्र रोष असल्याने आमचेच उमेदवार जिंकतील,' असा दावा खासदार कल्याण काळे यांनी केला. आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले असून, रविवारी दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल..0
0
Report
Advertisement
जालना में नेताओं व अधिकारियों ने रिंगणोत्सव में फुगड़ी का आनंद लिया
Jalna, Maharashtra:जालना :नेते,अधिकाऱ्यांनी रिंगण सोहळ्यात घेतला फुगडीचा आनंद जालना महाविद्यालयाच्या मैदानावर हा रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आमदार अर्जुन खोतकर आणि आमदार नारायण कुचे यांनी फुगडी खेळत रिंगण सोहळ्याचा आनंद लुटला. आमदार नारायण कुचे यांनी पत्नीसह फुगडी खेळत रिंगण सोहळ्यात सहभाग नोंदवला. जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कनwariयाने पत्नी अंजली शर्मा यांच्यासह फुगडी खेळत रिंगण सोहळ्याचा आनंद घेतला.0
0
Report
गोवा में बिक्री के लिए महाराष्ट्र के विदेशी शराब का जप्त, वाशीम में बड़ा छापा
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई करत गोवा राज्यात विक्रीस असलेला आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित विदेशी मद्याचा साठा जप्त केला. मानोली–मोतसावंगा रोडवर टाटा मेगा एक्सएल वाहनातून 20 पेट्यांतील 504 बाटल्या विदेशी मद्य आणि वाहनासह एकूण 4 लाख 85 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यापरकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून राज्य उत्पादन शुल्क विभाग पुढील तपास करत आहे.0
0
Report
पीसादेवी रोड पर खुले विद्युत डीपी से मजदूर की मौत, महावितरण पर सवाल उठे
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:उघड्या विद्युत डीपीचा करंट लागून मजुराचा मृत्यू; पिसादेवी रोडवरील दुर्घटनेनंतर संताप ANC : छत्रपती संभाजीनगर शहरातील पिसादेवी रोडवरील ढाब्याजवळ उघड्या विद्युत डीपीचा करंट लागून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुरेश कचरू साळवे, वय ४०, असे मृत मजुराचे नाव असून ते मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. महावितरणच्या उघड्या डीपीमुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. घटनास्थळी अरुंद रस्ता, अतिक्रमण आणि संबंधित यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाद व्यक्तीचा जीव गेल्याने परिसरात संताप व्यक्त होत असून, दोषींवर कठोर कारवाई आणि अशा उघड्या विद्युतडीपी तातडीने सुरक्षित करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.0
0
Report
Advertisement
9 महीने बाद आसिफ रायडर गिरफ्तार: समीर इनायत खान हत्या मामले का खुलासा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:शहरातील गजबजलेल्या चेलीपुरा भागात जुन्या वादातून भाजीपाला विक्रेता समीर इनायत खान याची तलवारीने गळा चिरून हत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. 31 ऑक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर संभाजी नगर गुन्हे शाखेच्या पथकाने शोएब काला, इसरार खान, नसीर इन्ता आणि असलम चाऊस यांना तात्काळ अटक केली होती. मात्र, त्यावेळी मुख्य आरोपी आसिफ रायडर पसार झाला होता. गुन्हे शाखेचे पथक सातत्याने त्याच्या मागावर होते. अखेर तब्बल 9 महिन्यांनी त्याला अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. फरार आसिफ हा मुंबईतील कामाठीपुऱ्याजवळील छोटा सोनापूर (नागपाडा) येथे लपला होता. कुटुंबासह त्याने त्या ठिकाणी स्थलांतर केले होते. उदरनिर्वाहासाठी तो तिथे एका वेल्डिंगच्या दुकानात काम करत होता. त्याने आपली संपूर्ण जुनी ओळख नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. स्वतःचे 'आसिफ रायडर' हे नाव बदलून त्याने 'अनिस बाबा' असे नवीन नाव धारण केले होते.0
0
Report
बारिश के बीच शेड न मिलने से डोंगरकडा में अंतिम संस्कार भारी संकट
Hingoli, Maharashtra:अँकर हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या डोंगरकडा गावात मूलभूत सुविधांचे विदारक चित्र समोर आले आहे दुर्दैवी आणि घटना समोर आलेली आहे गावातील जिजाबाई पंडित यांच्या निधनानंतर अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत गेलेल्या नातेवाईक आणि ग्रामस्थांना तेथे साधे पावसापासून संरक्षण करणारे पत्रांचे शेडही उपलब्ध नसल्याने मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला आहे.. भर पावसात चिता पेटत नसल्याने अंत्यविधी रखडला आणि मृतदेहाची झालेली परवड या ठिकाणी पाहायला मिळाली या दुर्देवी घटनेमुळे गावातील लोकप्रतिनिधी सरपंच ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या निष्क्रतेबद्दल ग्रामस्थातून संताप व्यक्त केला जात आहे.. डोंगरकडा गावात अंत्यसंस्कारासाठी गावकऱ्यांना संघर्ष करावा लागत आहे0
0
Report
गोंदिया के आमगाव नगर में पहली बारिश में पानी घुसा, सुविधाओं का अभाव संकट
Bhandara, Maharashtra:पहिल्याच पावसात आमगाव येथील रेणुका नगर शिरला पावसाचा पाणी.... नागरिकांना पाण्यातून काढावी लागते वाट..... गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव नगरपरिषद हद्दीतील रेणुका नगरात मूलभूत सुविधांच्या अभावामुळे पुन्हा एकदा उघड झाला आहे. पहिल्याच पावसामुळे रेणुका नगर मध्ये पाणी शिरला आहे... पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक गटारे, नाले उभारण्यात आलेली नाही. परिणामी, पावसाचे पाणी रस्त्यांवर तसेच निवासी भागात साचून राहिला आहे... प्रमुख रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्यामुळे पादचारी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वाराना पाणीमध्ये वाट काढावी लागत असल्याचं चित्र सद्या पाहायला मिळत आहे...0
0
Report
Advertisement
