445001
यवतमाळ तालुका काँग्रेस अध्यक्षावर भरचौकात चाकुहल्ला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहराच्या मध्यवस्तीत गजबजलेल्या दत्त चौकामध्ये भरदिवसा प्राणघातक हल्ल्याची घटना घडल्याने वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रामायण हॉटेल समोर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रमेश भीसणकर यांच्यावर दोन आरोपींनी चाकूने हल्ला चढविला, यावेळी भीसनकर यांनी जखमी अवस्थेत एकाच्या हातून चाकू हिसकावल्याने दोघेही पसार झाले, त्यानंतर जखमी भीसणकर हे स्वतः ऑटोने रुग्णालयात पोहोचले. दरम्यान हा थरार शेकडो लोकांपुढे सुरू असताना कुणीही त्यांच्या बचावासाठी पुढे आले नाही.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
संभाजी नगर में जमीन घोटाला: बनावटी बक्षीस पत्र से करोड़ों की संपत्ति डूबे
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जमीनच्या किमती गगनाला भिडल्या आणि त्यातून फसवणुकीच्या घटनांची वाढ झाली पण छत्रपती संभाजी नगरातील एक घटना पाहून फसवणूक आता कुठच्या सीमेपर्यंत गेली याचा प्रत्यय येतोय, मूळ मालक अस्तित्वात असताना त्यांच्या जागेवर दुसरा उभा करून कोट्यवधींची जमीन दुसऱ्या नावावर झाली मात्र मूळ मालकाचे लक्ष गेले आणि सगळं प्रकार उघडकीस आला, धक्कादायक म्हणजे गेल्या 2 वर्षात असे 16 गुन्हे झाले असल्याचं स्पष्ट झाले, नागरिकांनी आता त्यांच्या मालमत्तेवर लक्ष ठेवणे गरजेचे झाले आहे... जमिनीत पैसे गुंतवताय सावधान? tuमची जमीन परस्पर विकली जातेय, संभाजी नगरात उघड झाला धक्कादायक प्रकार... जमीन गुंतवणुकीसाठी उत्तम माध्यम , अनेक लोक जमिनीत पैसे गुंतवतात मात्र जमिनीकडे लक्ष नसले तर काय होत याचे एक धक्कादायक उदाहरण आता पुढं आले आहे, संभाजी नगरातील अली असगर पेटीवाला यांची जालना महामार्गालगत हिरापूर परिसरात तब्बल 5 एकर 11 गुंठे जमीन आहे. बाजारभावानुसार या जमिनीची किंमत 20 ते 25 कोटी रुपयांच्या घरात आहे. या जमिनीची परस्पर बक्षीस पत्र बनवण्यात आले, धक्कादायक म्हणजे बक्षीस पत्राची नोंदणी करताना अगदी पेटीवाला सारखा दिसणारा इसम नोंदणी कार्यालयात नेण्यात आला, पेटीवाला यांच्या बनावट आधार कार्ड बनवण्यात आले आणि त्याच्या समक्ष ही नोंदनी झाली आणि आरोपी मोहम्मद नूर यांनी स्वतःच्या नावावर हिबनामा म्हणजे बक्षीस पत्र करून घेतले यासाठी शासनाला त्यांनी 43 लाख रुपये स्टॅम्प duty सुद्धा भरीली.. दरम्यान मूळ मालकाच्या लक्षात हा सगळा प्रकार आला, कोट्यावधीची जमीन गेल्याने त्याला धक्का बसला त्याने लागलीच पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली... या प्रकारातील तपशील... नोंदणी 27 मे संध्याकाळी 5 वाजता झाली होती, मूळ जमीन मालक पेटीवाला हॉस्पिटलमध्ये होते याचा सीसीटीव्ही पुरावा जोडला आहे, पेटीवाला लंगडत चालतात तर जमीन विकताना तोतया पेटीवाला असल्याचे उघड झाले आहे... पोलिसांनी गुन्हा दाखल केला, आणि आरोपी मोहम्मद नूर आणि नोंदणी कार्यालयातील एजंट जुनेद खान अटक केली आहे... अशा जिल्ह्यात गेल्या 2 वर्षात 8 गुन्हे दाखल झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले... या बाबत मंत्री अतुल सावे यांनी ही गंभीर आक्षेप घेतले आहेत छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात 12 घटना आणि जालन्यात 4 घटना झाल्याचे त्यांनी सांगितले... या बाबतीत त्यांनी मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांची भेट घेतल्याचे सांगितले...0
0
Report
विरार में सुरक्षा रक्षक की कॉलर पकड़ने वाले गुटखा विक्रेता की धिंड, जेल भेजा गया
Vasai-Virar, Maharashtra:सुरक्षारक्षक जवानाची कॉलर पकडणाऱ्या गुटखा विक्रेत्याची विरार पोलिसांनी काढली धिंड सोमवारी मध्यरात्री विरार पोलिसांनी रस्त्यावरती गुटखा विकणाऱ्यांन वर छुपी कारवाई सुरू केली होती. त्यावेळी अवैद्यरिते गुटखा सिगरेट विकणाऱ्या मनीष झा नामक तरुणांच्या टपरी वरती पोलिसांनी पाहणी केली असताना या गुटखा विक्रेत्याने पोलिसांन समोरच सुरक्षा रक्षकाची कॉलर पकडून त्याला शिवीगाळ केली असण्याची घटना घडली असून विरार पोलिसांनी मनीष झा ला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. दोन दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर काल संध्याकाळी विरार पोलिसांनी त्याची धिंड काढत तुरुंगात रवानगी केली आहे....0
0
Report
पडेगाव की करियर अकादमी में 17 वर्षीय विद्यार्थी पर अमानुष मारपीट, मामला दर्ज
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव भागातील एका करिअर अकॅडमीत पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थ्याला अमानुष मारहाण झाल्याचा धक्काdाक प्रकार समोर आला आहे. अकॅडमीतील पी.टी. प्रशिक्षक तथा व्यवस्थापक यांच्याविरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, बेल्ट आणि काठीने मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. मेस मधून जास्त जेवण का घेतले आणि सिगरेट का ओढतो या कारणाहून मारहाण केल्याचा आरोप आहे, याबाबत पोलीसानी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे...0
0
Report
Advertisement
महायुती को मजबूती: गीते-गोकुळ गीतों का खुला समर्थन
Nashik, Maharashtra:गणेश गीते आणि गोकुळ गीतेंना सुरुवातीपासून विनंती करत होतो महायुती एकसंघ राहण्यासाठी सगळे सोबत है गोकुळ गीते यांचा शंभर टक्के पाठिंबा आहे सोशल मीडियावर जे केलं जातं आहे नरेंद्र दराडेंना सीपीना पत्र द्यायला सांगितले काही लोकांकडून पोस्ट टाकल्या जात आहेत दोन्ही गीतेंना मी धन्यवाद देतो गिरीश भाऊ जे निर्णय घेतील तो मान्य असे ते म्हणाले होते गोकुळ गीतेचे योगदान वाया जाणार नाही विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे मनाप्रमाणे गोष्ट झाली नाहीतर नाराजी असते कार्यकर्ता भावनीक असतो कार्यकर्त्यांची चूक नसते जो निर्णय झाला तो महायुतीला पोषक योग्य उमेदवार असे नाही विकासाच्या अपेक्षा व्यक्त केल्या ते महामंडळ वर होते शिंदे साहेबांनी चर्चा केली आहे माझ्या आयुष्यात गीते मित्र नव्हते नवे मित्र मला मिळाले गिरीश भाऊवर चेंडू टोलावलेला नव्हता ऑन गीते बॅलेट पेपरवर - गीते यांच्यासोबत संबंध होते ते टिकून राहण्यासाठी प्रयत्न केले - ते सोबत राहतील0
0
Report
यवतमाळ के मार्की में ढाबा चालक की हत्या, खाना-दारू नहीं मिलने पर विवाद
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या झरीजामनी तालुक्यातील मार्की येथे ढाबा चालक युवकाची निर्घृণ हत्या झाली. धाब्यावर जेवण आणि दारू दिली नाही म्हणून ही हत्या झाल्याचे समोर येत आहे. गजानन उदकवार असे मृत ढाबा चालकाचे नाव आहे. या प्रकरणी सचिन टोंगे आणि साहिल काकडे या दोघांना मुकुटबन पोलिसांनी अटक केली. मृतकाने महिनाभरापूर्वीच मार्की-मुकुटबन मार्गावर टिनशेड मध्ये ढाबा सुरू केला होता. आरोपी ढाब्यावर जेवण्यासाठी आले असता जेवण बनवण्यावरून व दारू न दिल्याने त्यांचा गजानन सोबत वाद झाला, आरोपिंनी मारहाण केल्याने गजानन चे वडील आणि भावाने धाब्यावर येऊन भांडण सोडवले, त्यानंतर आरोपी पुन्हा मध्यरात्री धाब्यावर आले आणि गजानन चा खून केला.0
0
Report
छत्रपती संभाजीनगर में नशे में डालकर नाबालिग के साथ सामूहिक बलात्कार, दोनों आरोपी गिरफ्तार
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन सख्ख्या भावांनी मिळून सातवीत शिकणाऱ्या एका निष्पाप चिमुरडीला नशेचे औषध पाजले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एवढ्यावरच न थांबता या नराधमांनी पीडितेचे नग्न फोटो आणि व्हिडिओ काढून तिच्या नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत लाखो रुपयांची खंडणी मागितली.याप्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात 'पोक्सो', सामूहिक बलात्कार आणि खंडणीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन्ही नराधम भावांना बेड्या ठोकल्या आहेत. कृष्णा सोळुंके आणि किशोर सोळुंके अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपी भावांची नावे आहेत. पीडित अल्पवयीन मुलगी आणि आरोपींची आधीपासून ओळख होती. याच ओळखीचा गैरफायदा घेत आरोपींनी तिला एका रूमवर नेले. तिथे तिला शीतपेयातून किंवा अन्नातून नशेचे औषध पाजले. मुलगी बेशुद्ध झाल्यानंतर या दोन्ही नराधमांनी तिच्यावर पाशवी अत्याचार केला.अत्याचार करताना या नराधमांनी चिमुरडीचे मोबाईलमध्ये नग्न फोटो आणि व्हिडिओ शूट केले. त्यानंतर हे व्हिडिओ मुलीच्या आत्याच्या मोबाईलवर पाठवून दिले. "जर आम्हाला पैसे दिले नाहीत, तर हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून तुमच्या कुटुंबाची बदनामी करू," अशी धमकी देत त्यांनी खंडणी मागण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे पीडितेचे कुटुंब पुरते हादरून गेले होते. पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला आणि टीव्ही सेंटर भागातील एका बारमधून या दोन्ही आरोपी भावांना मद्यधुंद अवस्थेत रंगेहात ताब्यात घेतले.0
0
Report
Advertisement
कुंभ मेळा के दौरान धर्मांतरण के आरोप, 1 लाख से अधिक परिवार हिंदू धर्म में लौटे
Nashik, Maharashtra:श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज बाईट पॉईंट्स *On घर वापसी* - आमच्या धर्मातून जे लोक धर्मांतर करून गेलेले आहेत, अशा लोकांचं शुद्धीकरण करून, त्यांच्यावर याज्ञिक विधी करून आम्ही त्यांना पुन्हा घरवापसी करून धर्मामध्ये घेत असतो. - आज धर्म संकटात आलेला आहे, - पुऱ्या जगामध्ये हिंदू राष्ट्र एक पण उरलेलं नाहीये आणि अशा वेळेला हिंदू धर्मीय लोकांना संघटित करणं हे धर्मगुरू या नात्याने मला वाटतं माझं कर्तव्य आहे आणि ते करतो." - आतापर्यंत... आतापर्यंत आम्ही १ लाख ५६ हजार परिवारांना हिंदू धर्मामध्ये घेतलंय. आणि आज ६३५ लोकं... कुटुंब... ह्या धर्मामध्ये येणार आहेत." - "काय नाही कसं आहे की, आपली जी संस्कृती आहे ती महान संस्कृती आहे. - ह्या लोकांना फसवलं होतं कारण त्यांच्या काही अडचणी असतात, खाजगी अडचणी असतात. - कुणाला मूलबाळ नसतं, कुणाच्या काहीतरी घरातले प्रॉब्लेम असतात. - त्याच्यावर बोट ठेवून हे लोक काय करतात, 'चला येशूची प्रार्थना करूया, येशूची प्रार्थना केली की येशू कृपा करेल' वगैरे. अशा प्रकारे त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन हे लोक तिकडे घेऊन जातात. - त्याचबरोबर काय करतात की आर्थिक परिस्थितीचा फायदा उठवतात आणि धर्मांतर करत आहेत. - माननीय कुंभमेळा मंत्री यांच्या हस्ते झाला. - आमच्या तिन्ही आखाड्याचे सगळे श्रीमंत होते, - त्यानंतर बाकी संत-महात्मा होते आणि वैदिक सनातन परंपरेप्रमाणे हा शिलान्यास झालेला आहे. - आता खऱ्या अर्थाने कुंभमेळ्याला सुरुवात झाली असं मानायला हरकत नाही.0
0
Report
राज्य शिक्षक संघटना ने शिक्षण अधिकार परिषद में शिक्षकों के समय की मांग उठाई
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर च्या राळेगणसिद्धी येथे राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षण हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आला आहे शिक्षकांना केवळ शिक्षणाचा काम द्यावं ही प्रमुख मागणी या परिषदेत करण्यात आली. शिक्षकांना मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य शैक्षणिक कामे लावली जातात यातून त्यांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळत नाही याचाच परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होतो खाजगी शाळा आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील शिक्षकांना अशी कुठलीही कामे नसतात खाजगी शाळा प्रमाणेच जिल्हा परिषद महानगरपालिका नगर पालिका यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या शाळेतील शिक्षकांना देखील अशैक्षणिक कामे देऊ नयेत सेवेतील शिक्षकांना शिक्षक पात्रता चाचणी रद्द करावी यासह शिक्षकांच्या विविध मागण्यांवर या परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि पद्मश्री पोपटराव पवार यांच्या माध्यमातून आम्ही सरकारशी संवाद साधणार असल्याचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितल आहे0
0
Report
किरीट सोमय्या अमरावती महापालिका पहुँचे, MIM-शिंदे गुट के नगरसेवकों ने किया हंगामा
Amravati, Maharashtra:किरीट सोमय्या अमरावती महानगरपालिकेत दाखल होताच এমआयएम आणि शिंदेंच्या नगरसेवकांचा राडा; गाडीच्या खाली झोपून करण्यात आल निषेध अँकर :- भाजप नेते किरीट सोमय्या अमरावती महानगरपालिकेमध्ये दाखल होताच एमआयएम आणि शिंदे यांच्या शिवसेना गटाच्या नगरसेवकांनी मोठा राडा केल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. जन्म मृत्यूच्या बोगस नोंदी संदर्भात अमरावती महानगर पालिकेमध्ये बैठक घेण्यासाठी किरीट सोमय्या अमरावती दौऱ्यावर आले असून किरीट सोमया यांच्या विरोधात एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत назад जाओ वापस जाओ अशा घोषणा दिल्या आहेत किरीट सोमया महानगरपालिकेमध्ये दाखल होतात त्यांच्या गाडीच्या खाली झोपून निषेध करण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे.0
0
Report
Advertisement
अकोला के सरकारी अस्पताल में स्ट्रेचर नहीं मिलने पर पति को कंधे पर उठाने वाला वीडियो वायरल, तीन कर्मी निलंबित
Akola, Maharashtra:अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील पतीला पाठीवर घेऊन फिरणाऱ्या महिलेच्या व्हायरल प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. राज्यभर चर्चेत आलेल्या या घटनेनंतर संबंधित महिला माधुरी हरिजन यांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. पती संजय हरिजन यांना उपचारासाठी रुग्णालयात आणल्यानंतर स्ट्रेचर उपलब्ध करून देण्यात आले नव्हते, त्यामुळे त्यांना पाठीवर घेऊन फिरावे लागल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणानंतर राजकीय व सामाजिक स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तसेच रुग्णालय प्रशासनाने तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाईही केली आहे.सध्या संजय हरिजन यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे.0
0
Report
महाराष्ट्र में मोड़ी लिपि ट्रांसक्रिप्शन के लिए अकादमिकों की संख्या 30, लाखों दस्तावेज़ों में बढ़ती चुनौती
Kolhapur, Maharashtra:Anc:- दाखले,वंशावळी, खरेदीखत, बक्षीसपत्रे यासाठी आवश्यक असलेल्या मोडी लिपीच्या कागदपत्रांच्या लिप्यंतराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने मोडी मजकुराचे मराठी लिप्यंतर आणि इंग्रजी भाषांतर करण्यासाठी राज्यातील केवळ 30 अभ्यासकांची नामिका जाहीर केली है. मात्र राज्यभरातील लाखो मोडी कागदपत्रांचा विचार करता ही संख्या अत्यंत अपुरी असल्याची टीका होत आहे. VO 1 :- महाराष्ट्रातील 1960 पूर्वीची बहुतांश महसुली, न्यायालयीन आणि शासकीय कागदपत्रे मोडी लिपीत आहेत. आजही जातीचे दाखले, कुणबी नोंदी, वंशावळी, खरेदीखত, बक्षीसपत्रे आणि इतर अनेक ऐतिहासिक नोंदी मोडी लिपीतच उपलब्ध आहेत. या कागदपत्रांचा शासकीय कामकाजासाठी वापर करायचा असेल तर त्यांचे मराठी लिप्यंतर आवश्यक असते. याच पार्श्वभूमीवर मराठी भाषा विभागाने मोडी लिप्यंतरासाठी राज्यातील 30 अभ्यासकांची नामिका तयार केली आहे. मात्र राज्याच्या तुलनेत ही संख्या खूपच कमी असल्याचा आरोप होत आहे.. सध्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी कुणबी नोंदी आवश्यक आहेत. या नोंदी मोडी लिपीत असल्याने मराठा समाजाला देखील दाखले मिळवत असताना अडचणी येत आहे. VO 2 :- मराठा-कुणबी आरक्षणाच्या संदर्भात गेल्या काही वर्षांत मोडी लिपीतील नोंदींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कुणबी दाखल्यासाठी वंशावळ, जुने महसुली अभिलेख आणि जबाबांची पडताळणी करावी लागते. या सर्व नोंदींचे मराठीत लिप्यंतर झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. त्यामुळे राज्यभरातून हजारो अर्जदारांना मोडी लिपी अभ्यासकांच्या सेवांची आवश्यकता भासत आहे. GFX IN :- मोडी लिप्यंतर का महत्त्वाचे? जातीच्या दाखल्यासाठी आवश्यक नोंदी मोडी लिपीत उपलब्ध.. कुणबी दाखल्यासाठी वंशावळ आणि जबाबांचे लिप्यंतर आवश्यक पुराभिलेख, तहसील आणि रजिस्टर कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात मोडी नोंदी न्यायालयीन प्रकरणांमधील जुने दस्तऐवज मोडी लिपीत सन 1899 पूर्वीची अनेक महसुली अभिलेखे मोडीमध्ये असल्याने त्याचे लिप्यंतर महत्वाचे आहे. GFX OUT :- VO 3 :- मोडी अभ्यासकांच्या मते, केवळ दाखल्यांसाठीच नव्ह तर न्यायालयीन कामकाजासाठीही मोडी लिप्यंतर अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक जमीन व्यवहार, खरेदीखत, बक्षीसपत्रे आणि जुने मालकी हक्काचे दस्तऐवज मोडी लिपीत असल्याने त्यांचे अचूक लिप्यंतर आवश्यक ठरते. मात्र राज्यातील लाखो कागदपत्रांच्या तुलनेत केवळ 30 अभ्यासकांवर ही जबाबदारी टाकणे व्यवहार्य नसल्याचा दावा मोडी अभ्यासक करत आहेत. Byte :- अशोक मानकर, मोडी अभ्यासक VO 4 :- विशेष म्हणजे 27 मे 2026 रोजीच्या शासन निर्णयामध्ये इतर पात्र अभ्यासकांना काम करण्यास स्पष्ट बंदी घालण्यात आलेली नाही. मात्र प्रत्यक्षात अनेक शासकीय कार्यालये नामिकेबाहेरील अभ्यासकांनी केलेले लिप्यंतर स्वीकारत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे पुराभिलेख विभागाच्या प्राथमिक आणि प्रगत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तसेच विद्यापीठांमधून मोडी लिपीचे शिक्षण घेतलेल्या सर्व पात्र अभ्यासकांना लिप्यंतराची अधिकृत मान्यता देण्याची गरज आहे, अन्यथा लिप्यंतराची कामे रखडली जातील हे नक्की.. प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर0
0
Report
अमेरिका-ईरान के दाग़े क्षेपणास्त्र: भारत पर भारी असर?
Nagpur, Maharashtra:अमेरिका और ईरान ने फिर एक बार एक दूसरे के खिलाफ क्षेपणास्त्रे दागे हैं... इसलिए फिर एक बार युद्ध शुरू हो जाने की तस्वीर है... इस सबका दुनिया पर क्या प्रभाव होगा... भारत के लिए क्या प्रभाव होंगे... पूरे दुनिया को इससे कौन सा खतरा है इन सभी बातों की जानकारी रक्षा विशेषज्ञ मेजर जनरल अनिल बाम से लेकर ली गई है.0
0
Report
Advertisement
पंढरपुर में विठ्ठल-रुक्मिणी मूर्ति के संवर्धन के लिए ASI की सलाह मानते हुए तैयारी
Pandharpur, Maharashtra:पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या जतन संवर्धना संदर्भात आषाढी वारी पूर्वी कार्यवाही केली जाईल तसेच भारतीय पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानेच श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीवर संवर्धनाचे काम केले जाईल अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिली. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती संवर्धना संदर्भात आज जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिर समिती आणि वारकरी संप्रदायातील मंडळींचे मत ऐकून घेतलं या बैठकीमध्ये वारकरी संप्रदायातील मंडळ आयुर्वेदिक पद्धतीने मूर्तीचे संवर्धन करावे अशी भूमिका मांडली मात्र याला कोणताही आधार नसल्याने भारतीय पुरातत्व विभाग जो सल्ला देईल त्या पद्धतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे संवर्धन करण्याचा निर्णय होणार आहे. आषाढी एकादशीच्या पूर्वी श्री विठ्ठल रुक्मिणी च्या मूर्तीचे संवर्धन करण्याबाबत मंदिर समिती आणि जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे0
0
Report
पनवेल में महावितरण के खिलाफ मनसे ने प्रतिकात्मक अंत्ययात्रा निकाली; सुधार नहीं तो आंदोलन
Navi Mumbai, Maharashtra:वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्या विरोधात मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. खंडित वीज पुरवठ्या विरोधात पनवेल मनसेच्या वतीने महावितरणची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून महावितरणच्या भोंगळ कारभाराचा निषेध व्यक्त केलाय. ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली असली तरी महावितरण खरच मेले असल्याची टीका करत महावितरणच्या कारभारात सुधारणा न झाल्यास पुढील आंदोलन मनसे स्टाईलने करण्याचा इशारा यावेळी मनसेतर्फे देण्यात आलाय.0
0
Report
वर्धा में मुख्य जल पाइप फटने से पानी आपूर्ति संकट बन गया
Wardha, Maharashtra:वर्ध्यात आकाशाला भिडले पाण्याचे कारंजे, वर्धा शहराचा पाणीपुरवठा धोक्यात मुख्य पाईपलाईन फुटल्याने प्रशासन धावले, दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर येळाकेळी जवळ मुख्य जलवाहिनी फुटली अँकर - वर्धा शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी येळाकेळी परिसरात अचानक फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली आहेय. जलवाहिनीतून अनेक फूट उंच पाण्याचे कारंजे उसळल्याचे चित्र समोर आले असून, या घटनेमुळे वर्धा शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहेय. सकाळी येळाकेळीजवळील मुख्य पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती फुटली. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले. घटनेची माहिती मिळताच संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहेय.0
0
Report
Advertisement
