icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

आंगनवाड़ी में खराब पोषण आहार का वीडियो वायरल, सेविका पर कार्रवाई, पालक मांगें

Ambegaon, Maharashtra:अंगणवाडीतील निकृष्ट पोषण आहाराची पोलखोल करणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील चास ठाकरवाडी येथील अंगणवाडी सेविकेवर कारवाईचा बडगा उगारल्याने आता पालक आणि ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ठाकरवाडी येथील अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी यांनी खराब पोषण आहाराचा पर्दाफाश करणारा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल केल्यानंतर शासनाने त्यांच्यावर थेट बडतर्फीची कारवाई केली. मात्र, या कारवाईविरोधात आता पालक आक्रमक झाले असून, प्रामाणिक सेविकेवरील कारवाई तात्काळ मागे घेण्याची मागणी लावून धरली आहे. गेल्या १८ वर्षांपासून ठाकरवाडीतील चिमुकल्यांना घडवणाऱ्या अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी यांच्यावर शासनाने बडतर्फीची कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. दररोज ४ ते ५ किलोमीटरची पायपीट करून त्या या दुर्गम भागातील मुलांना घडवण्याचं काम करत होत्या. मात्र, अंगणवाडीत पुरवला जाणाऱ्या पोषण आहार अत्यंत निकृष्ट दर्जाचा होता. ७ ते ८ शिट्ट्या देऊनही वटाणा शिजत नव्हता, तर लापशीचा भरडा चिंगमसारखा चिकट लागत असल्याने तो खाऊन लहान मुलांची पोटं दुखत असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या होत्या. शासनाकडून येणारे निकृष्ट धान्य बाजूला ठेवून रेश्मा पारधी यांनी स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून चिमुकल्यांसाठी चांगला भरडा आणून खाऊ घातला. हा संपूर्ण प्रकार चव्हाट्यावर आणणारा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. मात्र, निकृष्ट दर्जाचा पुरवठा करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी प्रशासनाने उलट रेश्मा पारधी यांच्यावरच बडतर्फीची कुऱ्हाड चालवली. यामुळे पालकांनी प्रशासनाविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला असून मुलांनीही निकृष्ट आहाराच्या हकिगतीला दुजोरा दिला आहे. याचाच थेट शाळेतून एक्सक्लिझीव आढावा घेत पालकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
0
0
Report

आंगनवाड़ी बदतर्फी मामले पर देवदत्त निकम ने प्रशासन पर किया तीखा हमला

Ambegaon, Maharashtra:आंबेगावमधील अंगणवाडी सेविकेच्या बदतर्फी वरून आता राजकीय वातावरण तापलं असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी प्रशासनावर जोरदार निशाणा साधला आहे. अंगणवाडीतील बालकांना दिल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या आहाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यामुळे अंगणवाडी सेविका रेश्मा उर्फ देवयानी पारधी यांना सेवेतून थेट काढून टाकण्यात आलं. या कारवाईवर तीव्र संताप व्यक्त करत निकम यांनी, निकृष्ट अन्न पुरवणाऱ्या ठेकेदारांवर आणि टेंडर मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐजी सत्य समोर आणणाऱ्या सेविकेवर झालेली ही कारवाई अत्यंत अन्यायकारक असल्याचं देवदत्त निकम यांनी म्हटलं आहे. तसंच अशा प्रकारचा निकृष्ट आहार देण्यापेक्षा शासनानं 'लाडकी बहीण' योजनेप्रमाणे आहाराचे पैसे थेट पालकांच्या खात्यात जमा करावेत, जेणेकरून बालकांना सकस आहार मिळेल अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, झी २४ तासने सुरू केलेल्या 'जस्टिस फॉर देवयानी' या मोहिमेला आणि पीडित सेविकेला निकम यांनी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.
0
0
Report
Advertisement

अंबेगांव में आंगनवाड़ी सेविका के निलंबन पर ठाकरे शिवसेना का प्रशासन पर हमला

Ambegaon, Maharashtra:आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी यांच्या निलंबनावरून आता राजकीय वातावरण तापू लागलं असून, ठाकरे शिवसेना या प्रकरणात आक्रमक झाली आहे. निकृष्ट पोषणाहाराविरोधात आवाज उठवल्यामुळेच प्रशासनाने ही सूडबुद्धीची कारवाई केल्याचा थेट आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोर यांनी केला आहे. १४ जून रोजी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान हा निकृष्ट दर्जाचा आहार निदर्शनास आणून देण्यात आला होता. जनावरेही खाणार नाहीत अशा दर्जाचा पोषण आहार चिमुकल्यांना दिला जात असताना, सत्य समोर आणणाऱ्या सेविकेवर कारवाई करणे हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार असल्याचं भोर यांनी म्हटलं आहे. रेश्मा पारधी यांचे निलंबन तात्काळ मागे न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ठाकरे सेनेने दिला आहे.
0
0
Report

सांगली में केसरेकर दंपति हत्या के विरोध में बड़ा हिंदू मोर्चा

Kolhapur, Maharashtra:सांगलीच्या कुपवाड मधील केसरेकर दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाचा वतीने सांगली शहरातून मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा आमदार गोपीचंद पडळकर,आमदार संग्राम जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत काढण्यात आला आहे. या मोर्चाला सकल हिंदू कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत. सांगली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते सांगली महानगरपालिका चौकापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा महानगरपालिका चौकात पोहोचल्यानंतर आक्रमक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत प्रशासनाच्या वतीने आरोपीला फाशीची शिक्षा दिल जाईल असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने दिले जात नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेतले जाणार नाही अशी भूमिका घेत आंदोलन सुरू केल आहे.
0
0
Report
Advertisement

पुणे कार्यक्रम में राहुल गांधी के समर्थन में युवाओं की भीड़, फडणवीस की मदद पर चर्चा

Nagpur, Maharashtra:नागपूर - नाना पटोले -काँग्रेस बाईट On पुणे कार्यक्रम - - छात्र की गुंज या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस एका प्रकारची मदत करत आहेत असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. पुणे शिक्षणाचा हब आहे. तिथे शिकण्यासाठी बाहेरून मोठ्या प्रमाणात मुले मुली येतात. राहुल गांधी विद्यार्थ्यांसाठी येत आहेत.. त्यामुळे त्यांचं मत ऐकून घेण्यासाठी ग्राउंडच्या मैदानापेक्षा पाच पट जास्त तरुण तरुणी स्वयपुर्तीने येणार. - त्यामुळे काँग्रेसच्या कॉलेजचे विद्यार्थी येतील असा समज टाकून विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा देण्याचं काम फडणवीस यांनी केलं आहे.. त्यामुळे राहुल गांधींच्या सभेला एका प्रकारे देवेंद्र फडणवीस मदत करत आहे.. असं वाटत आहे. On नागपूर मनपा वंदे मातरम - - ही चूक आहे म्हणता येणार नाही. वंदे मातरम या गीताला महात्मा गांधी, पंडित नेहरू सारखी महान नेत्यांनी मान्यता दिली. सर्व समाजाला उद्देशून हे गाणे होते. - ज्यांचा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नाही. त्यांनी 53 वर्ष तिरंग्याचा सन्मान न करता अपशकुनी म्हणणारी ही लोक.. हे वंदे मातरम देखील म्हणणारी लोक नव्हती. - त्यामुळे वंदे मातरम चे राजकारण न करता आज देशातील शेतकऱ्यांचे ,बेरोजगार, महागाई आणि देशांची सीमा सुरक्षित नाहीत हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. आमच्यासाठी जनतेचे हे प्रश्न महत्त्वाचे त्यामुळे आम्ही ते प्रश्न घेऊन चालू. On पृथ्वीराज चव्हाण - सुप्रिया सुळे - पृथ्वीराज चव्हाण जेष्ठ नेते आहे. त्यांच्या काळात काय घडामोडी झाल्यात त्याबद्दल त्या पातळीचे नेते चर्चा करू शकतात. त्यांच्या समोर घडलं असेल ते त्यांनी मांडलं असेल आमच्यासमोर काही घडलं नसल्याने त्यावर आम्ही बोलणे योग्य नाही. - सुप्रिया ताई यांनी आम्हाला समन्वय सांगण्याची गरज नाही. - त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांच्यात काही घडामोडी झाल्या असतील. त्याबद्दल त्यांनी वक्तव्य केलं असेल त्यामुळे त्यांच्या लेव्हलच्या नेत्यांनी त्यांच्याबद्दल वक्तव्य करावे. माझ्यासारख्यांनी बोलणे योग्य नाही. On पृथ्वीराज सत्ताबदल दावा - - या देशाला पर्याय हा काँग्रेसचाच आहे. नरेंद्र मोदी यांनी दाखविलेले स्वप्न बारा वर्षात एकही स्वप्न पूर्ण केले नाही. सर्वात जास्त पंतप्रधान राहण्याची संधी मिळाली. सोबत सर्वात जास्त जग फिरण्याचा वाटा त्यांचा राहिला. - मात्र जग फिरून त्यांनी देशाच्या हितासाठी काय केले. आता चीन आपल्या देशाची सीमा ताब्यात घेण्याचं काम करतोय. त्यामुळे भाजप आणि नरेंद्र मोदी यांचे सरकार देशाचा हिताच नव्हे तर घातक आहे. - देशातील जनता काँग्रेसला आणि आमचे नेते राहुल गांधी यांना पर्याय समजतात. त्यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेस सत्तेत येईल.. On अंगणवाडी सेविका - - अंगणवाडी सेविकेने पोषण आहारातील प्रकरण समोर आणलं त्यामध्ये चौकशी व्हायला पाहिजे होती. पुरवठा करणारे सरकारचे लोक आहेत. महाराष्ट्रातील मुलाच्या तोंडातील घास खाणार हे भाजप सरकार आहे. या प्रकरणात चौकशी करून पुरवठा दारावर कारवाई व्हायला पाहिजे होती मात्र चोराला सोडून संन्यासाला फाशी असा भाजप आणि माहितीचा खेळ या निमित्ताने पुढे आला आहे.. On निधी वाटप - या तीनही पक्षांमध्ये निधी वाटपावरून मोठ्या प्रमाणात भांडण सुरू आहे. त्यामुळे यांचं बहुमताचं सरकार असतानाही महाराष्ट्र हा गड्ड्याचं महाराष्ट्र बनला आहे. 56 टक्के कमिशन द्यावं लागतं असा आरोप स्वतः कंत्राटदार करत आहे. On साखर दरवाढ - - महागाईची चर्चा करायची नाही अशी परिस्थिती भाजपने तयार करून ठेवली आहे. नकली देशप्रेम आणून वंदे मातरमर चर्चा चालली आहे. सनासुदीच्या काळात गोरगरिबांना गोडधोड खाता यावं नाही. निर्मला सीतारामन कांदे खाण्याची गरज काय म्हणत होत्या आता उद्या म्हणतील गोडधोड खाण्याची गरज काय. - भाजपला बेरोजगार महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी घेणेदेणे नाही. मात्र काँग्रेस या सगळ्या प्रश्नांना घेऊन एक मोठी लढाई उभ करण्याचे प्लॅन करत आहे. On पुणे विरोध - कोणताही संघर्ष नाही. देवेंद्र फडणवीस हे मदतच करत आहे. पुणे शहर शिक्षणाचा माहेर घर आहे. राहुल गांधी यांचं युवा पिढीत आकर्षण असल्याने मोठ्या प्रमाणात मुला मुलीची गर्दी पाहायला मिळेल.
0
0
Report

पुणे के कैफे में रिल स्टार्स की टशन ने कोयता वॉर बना दी फाइट

Pune, Maharashtra:पुण्यातल्या फ्लाईंग जिप्सी咖फे दोन रिल स्टार्समधल्या टशन पुन्हा चर्चेत आलंय...पोलिसांनी या प्रकरणी दोन रिल स्टार्स मुलीसह 8 आरोपींना अटक केली असली तरी या निमित्ताने इनस्टावरची रिल-टशन प्रत्यक्ष रस्त्यांवरच्या टोळी युद्धात परिवर्तित होऊ लागल्याने पोलिसांसाठी हा सोशल मीडिया क्राईमचा मोठा सामाजिक प्रश्न म्हणून पुढे आलाय...याच विषयावर पाहुयात, आमचे पुण्याचे ब्युरो चीफ चंद्रकांत फुंदे यांचा exclusive रिपोर्ट...पुण्यातील कँफे जिप्सीत कोयता वॉरचा भडका...रिल्स स्टार्समधली टश्न सामाजिक क्राईम वाढवतेय?व्हीओ...(open by rada cctv )...हे बघा इन्स्टावरच्या रील्सवरून सुरू झालेली टश्न कशी थेट कोयता वॉरमध्ये परावर्तित झालीय ते....याद्वारे इन्स्टा रिल्सवॉर पुढे वाढत गेलं आणि उडी मारली ती दोन युवती लीड रिल्स स्टार्सनी...माधवी कुंभार आणि स्नेहल सोनके अशी त्यांची नावं...या दोघीही पहिल्या पासून मैत्रिणी आहेत. पण नंतर अथर्व आणि तीचं अफेयर जुळलेलं...पण नंतर पुन्हा त्यांच्याच ब्रेकअप झालं आणि ती पुन्हा माधवी कुंभारच्या गँगमध्ये सामिल झाली...तेव्हापासून या तीन रिल्सस्टार्समध्ये इन्स्टावर हे रील्सवॉर भडकल्याचं पोलीस सांगतात...आता आपण या भांडणांचं तात्कालिक कारण काय होतं तेही समजून घेऊयात...या सर्व रिल्स स्टार्सचे बाईक, चाकी स्टंटचे अनेक व्हिडिओ इन्स्टावर मिलीयन्समधे व्ह्यूज बटोरतात...त्यातूनच मगच सोशल मीडियावर ही रिल्स टश्शन ही वाढत चाललीय...तरुणाईने या आभासी दुनियेतली भांडणं प्रत्यक्ष रिअल लाईफमध्ये आणू नयेत, असं आवाहन पोलीस अधिकारी करतात...हे झालं रिलस्टार्समधील रिलवार्स टोळीयुद्धाचे एक प्रातिनिधीक उदाहरण...इन्स्टावर अशा अनेक रिल्स् स्टार्सच्या टोळ्या सध्या सक्रिय असून कधी कधी त्या थेट रस्त्यावर उतरून राडे करू लागल्यात....त्यामुळे पोलिसांसाठी हे सोशल क्राइमचं एक नवंच बीट बनून गेलंय...तर लक्षात आणून द्यायचा मुद्दा हाच की, सोशल मीडिया च्या काळात गुन्हेगारीचे पैटर्न ही बदलत चाललेत...म्हणूनच पालकांना आपल्या मुलं मुली रीलस्टार्स बनली म्हणून खूप काही मोठी झाली म्हणून हुरळून जाऊ नयेतर ती नेमकी कोणाच्या संपर्कात आहेत तेही तपासून घेतलं पाहिजे....नाहीतर इन्स्टावर बाईक-कार स्टंटबाजीचे हे असले व्हिडिओ टाकून लाखोंचे लाईक फॉलोअर मिरवणारी स्टाईलबाद पोरं रस्त्यावरच्या राड्यांमुळे कधी जेलात जातील ते कळणार पण नाही...म्हणून पालकांनो आपल्या मुलांना या आभासी रील्सचा दुनियेत वाहवत जाण्यापासून वेळीच रोखा...चंद्रकांत फुंदे, पुणे
0
0
Report
Advertisement

नितेश राणे का आश्वासन: गणेशोत्सव के लिए सभी काम 5 सितम्बर तक पूरे

Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग, मंत्री नितेश राणे ऑन बैठका ---- गणेशोत्सव हा आमच्या कोकणातील मोठा सण आहे. त्यानिमित्ताने आमच्या जिल्ह्यात भाविक मोठ्या प्रमाणात येतात. गणेशोत्सवाची पूर्व तयारी म्हणून महत्त्वाच्या डिपार्टमेंट ची आज बैठक घेतली. 5 सप्टेंबर पर्यंत सर्व काम पूर्ण करा असे आदेश देण्यात आलेत. येत्या काही दिवसात जिल्ह्याचा पाहणी दौरा करणार गणेशोत्सव काळात आमच्या लोकांना कही विघ्न येऊ नये यासाठी आजच्या बैठका घेतल्या ऑन हळवल फाटक --- राणे साहेबांच्या सांगण्यावरून हळवल फटकाबाबत कोणत्या समस्या आहेत त्या जाणून घेतल्या लवकरच तोडगा काढून ही समस्या सोडवली जाईल ऑन आदित्य ठाकरे ( तिरंगा रॅली) --- मुंबई महापालिका ह्यांच्याकडे असताना मोकळी मैदान ह्यांनी नाईट लाइफ साठी वापरली.. महापौर बंगल्यासारखी.. आदित्य ठाकरेने मोर्चा मातोश्रीवर काढावा.. मग अन्य भागात मोर्चा काढण्याची हिंमत करावी.. स्वतःच्या पापावर मोर्चा काढत आहेत. त्यांनी केलेल्या चुका सुधारण्याच काम आमचहायुतीच सरकार करत आहे. ऑन संजय राऊत ( अमित शहा अर्बन बँक नष्ट ) --- संजय राजाराम राऊत आणि सहकार क्षेत्राचा काय सबंध आहे. सहकार क्षेत्रात ते जे क्रांतिकारी निर्णय घेत आहेत. ते संजय राऊतच्या बौद्धिक क्षमतेपेक्षा मोठ आहे. माहित नसलेल्या विषयात त्याने पडू नये. ऑन नरेंद्र बोंडेकर --- तो त्यांच्या जिल्ह्यापुरता विषय असेल मात्र भाजपा शिवसेना सगळे पक्ष एकत्र येऊन त्यावर तोडगा काढतील. ऑन आदित्य ठाकरे ( वंदे मातरम्) -- जो देशावर प्रेम करतो त्याच्या मुखातून पूर्ण वंदे मातरम् निघत.. राजकीय धर्मांतर झालेल्या आदित्य ठाकरेंनी आम्हाला वंदे मातरम् चे महत्व शिकवू नये.... बुडामध्ये खरच हिंमत असेल तर त्याने काँग्रेसला वंदे मातरम् पूर्ण म्हणायला सांगा.. हिंमत आहे का ? लाथ मारून परत मुंबईच्या दिशेने पाठवतील.. राहुल गांधीकडे देश भक्तीची सर्टिफिकेट मागा ऑन अंगणवाडी सेविका --- त्या घटनेची चौकशी करू ऑन तुकाराम मुंढे ( भेसळ युक्त तेल 10 लाख दंड ) --- चांगली गोष्ट आहे अशाच धडक कारवाया झाल्या पाहिजेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा काही फळ विक्रेते केळी केमिकल मध्ये बुडवून दोन तासात विकत आहेत. अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. अशा लोकांवर कारवाया केल्या पाहिजेत.. ऑन नाना पटोले ( घोषणाबाज सरकार ) ---- नाना पटोले यांनी त्यांच्या पक्षाने महाविकास आघाडी सरकारच्या काळात माता भगिनीसोबत जे काही व्यवहार केलेत त्यावर बोलाव, हिशोब द्यावा. काँग्रेस पक्षात पहिला पदाधिकाऱ्यांना काय महत्व आहे याच वेगळं पुस्तक आम्हाला लिहावं लागेल ऑन हिंदी ( बंदर विकास ) ---
0
0
Report

कांदिवली में 610 ग्राम सोने की धोखाधड़ी: बैंक उपशाखा प्रबंधक गिरफ्तार

Mumbai, Maharashtra:कांदिवलीत ज्येष्ठ नागरिकाची बँक लॉकरमधील ६१० ग्रॅम सोन्याची फसवणूक; बँक मॅनेजरला अटक मुंबईच्या कांदिवली परिसरात अनिवासी भारतीय ज्येष्ठ नागरिकाच्या बँक लॉकरमधून तब्बल ६१० ग्रॅम सोन्‍याचे दागिने काढून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी इंडसइंड बँकेच्या तत्कालीन उपशाखा प्रबंधकाला अटक केली असून, त्याच्याकडून तब्बल ८१ लाख ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. फिर्यादी प्रदीप भाटीया हे गेल्या ५२ वर्षांपासून दुबईत वास्तव्यास आहेत. २२ मार्च २०२४ रोजी त्यांनी कांदिवली पश्चिमेतील एम. जी. रोडवरील इंडसइंड बँकेच्या लॉकरमध्ये ६१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने सुरक्षित ठेवले आणि ते दुबईला परत गेले. तब्बल दोन वर्षांनंतर दागिने घेण्यासाठी बँकेत आल्यानंतर लॉकरमधील सर्व दागिने गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तपास करताना तत्कालीन उपशाखा प्रबंधक कुलदीप रामचंद्र सहानी याच्या बँक खात्यांची माहिती घेतली. गेल्या दोन वर्षांत त्याच्या खात्यात सुमारे ९ कोटी रुपयांचे व्यवहार झालेले समोर आले. तसेच सोने तारण ठेवणाऱ्या संस्थांशी मोठ्या प्रमाणात व्यवहार आढळून आले. तांत्रिक तपास आणि आर्थिक व्यवहारांच्या आधारे पोलिसांनी सहानीला अटक केली. त्याने तारण ठेवलेल्या सोन्याचे फोटो मिळवून फिर्यादीकडून त्याची खात्री करण्यात आली. अवघ्या चार दिवसांत पोलिसांनी ६१० ग्रॅम सोने जप्त करून हा गुन्हा उघडकीस आणला.
0
0
Report

पवई में नजर चुराने के बहाने घर घुसकर महिला से दुष्कर्म; गिरफ्तार

Mumbai, Maharashtra:मुंबईतील पवई परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नजर काढण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करून महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पवई पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या चार तासांत आरोपीला अटक केली आहे. दिनांक १८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपári सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास तक्रारदार महिला आपल्या राहत्या घरी असताना ‘अनिल’ नावाचा तृतीयपंथी व्यक्ती नजर काढण्याच्या बहाण्याने त्यांच्या घरात आला. त्यानंतर बेडरूममध्ये जाऊन महिलेशी जवळीक साधत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८९०/२०२६, कलम ६४(१), ३५१(२) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. तांत्रिक आणि मानवी कौशल्याचा वापर करत आरोपीचा ठावठिकाणा मिळवण्यात आला. आरोपी कळवा येथील झोपडपट्टी परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपी तृतीयपंथी नसून भीक मागणारा बहुरूपी असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणातील आरोपी अनिल शेषराव शिंदे, वय २८ वर्षे, व्यवसाय – भीक मागणे, राहणार गोळाई नगर, गोळाई देवी मंदिराच्या मागे, खारेगाव, कळवा, ठाणे, याला १९ ऑगस्ट २०२६ रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. या कारवाईत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पवई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे, अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश देऊ नये आणि संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.
0
0
Report
Advertisement

कोल्हापुर के संत बालूमामा देवस्थान ट्रस्ट में 60 करोड़ रुपये घोटाला, SIT जांच शुरू

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर इथं असणाऱ्या संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी SIT स्थापन करण्यात आली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली चार अधिकारी और आठ पोलीस कर्मचारी अशा एकूण बाराच जणांचा या पथकात समावेश आहे. संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये तब्बल 60 कोटी 75 लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे चौकशी अहवालातून निष्पन्न झाले होत. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने या प्रकरणाच्या तपासाला गती देण्यासाठी SIT स्थापन करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. मार्च 2020 ते मार्च 2026 या कालावधीत मेंढ्यांची विक्री तसेच जमीन खरेदीमध्ये अनियमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी तात्कालीन धर्मादाय निरीक्षक तथा प्रशासक रागिनी खडके, देवस्थानचे सचिव रावसाहेब कोणकेरे यांच्यासह कंत्राटदार आणि संबंधित पदाधिकाऱ्यांविरोधात यापूर्वीच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेकडून देवस्थानच्या विविध आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू असून, विश्वस्त आणि कर्मचाऱ्यांचे जबाबही नोंदवले जात आहेत. आता SIT स्थापन झाल्याने या प्रकरणातील तपासाला अधिक वेग येण्याची शक्यता आहे.
0
0
Report

अमित ठाकरे का नाशिक दौरा: विश्वविद्यालयों में छात्रों के साथ संवाद की योजना

Nashik, Maharashtra:- मनविसेचे नेते अमित ठाकरे साधणार झेन जी सोबत संवाद - महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे नेते अमित ठाकरे उद्या नाशिक दौऱ्यावर - शहरातील विविध महाविद्यालयांना भेट देत विद्यार्थ्यांशी साधणार संवाद - मनविसेच्या युनिटचे उद्घाटन आणि सभासद नोंदणीचा घेणार आढावा - सकाळी ९ वाजता अमित ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याला सुरुवात - सकाळी ९.३० वाजता उत्तमनगर येथील कर्मवीर वाबळे महाविद्यालयाला भेट - त्यानंतर आर.बी.के. महाविद्यालय, के.बी.टी. इंजिनिअरिंग, के.टी.एच.एम. आणि के.के. वाग महाविद्यालयाला भेटी - विविध महाविद्यालयांमध्ये मनविसेच्या युनिटचे उद्घाटन अमित ठाकरे यांच्या हस्ते होणार - विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, मनविसेकडून आवाहन
0
0
Report

आदिवासी आश्रमशालाओं में 2421 शिक्षक भर्ती, चार जिलों में प्रक्रिया शुरू

Nashik, Maharashtra:आदिवासी विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये २ हजार ४२१ शिक्षक पदांसाठी भरती आदिवासी विकास विभागाकडून शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू पवित्र पोर्टलद्वारे होणार शिक्षकांची भरती नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर विभागातील आश्रमशाळांमध्ये भरती प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांची पदे भरणार पेसा क्षेत्रातील ८८५ तर नॉन-पेसा क्षेत्रातील १ हजार ५३६ पदांचा समावेश नाशिक विभागात सर्वाधिक ८२६ पदे उपलब्ध ठाणे विभागात ६१३, अमरावतीत ४६८, तर नागपूर विभागात ५१४ पदे मराठी आणि इंग्रजी माध्यमातील शिक्षकांची पदे भरणार उच्च माध्यमिक स्तरावर विविध विषयांच्या शिक्षकांचीही भरती पारदर्शक आणि गुणवत्ताधारित पद्धतीने भरती प्रक्रिया राबविणार उमेदवारांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष देण्याचे आवाहन आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांचे आवाहन
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top