icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नागपूर विमानतळ अब जीएमआर ग्रुप के हवाले, नया टर्मिनल और सुविधाओं के साथ चेहरा बदलेगा

Nagpur, Maharashtra:नागपूर विमानतळाचा धुरा आज जीएमआर ग्रुप कडे सोपवला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय नागरी विमानाचालन मंत्री नायडू व मिहान इंडिया लिमिटेड आणि जीएमआर समूहाचे अध्यक्ष जी एम राव यांच्या उपस्थितीत हा हस्तांतरण सोहळा नागपूर विमानतळावर होणार आहे. त्यामुळे आता नागपूर विमानतळाचा चेहरा मोहरा बदलणार आहे. जागतिक दर्जाची सुविधा नागपूर विमानतळावर तयार होणार आहे. पुढील काही वर्षात नवीन टर्मिनल सह अत्याधुनिक सुविधा नागपूर विमानतळावर उभारल्या जाणार आहे
0
0
Report
Advertisement

मावळ में मृग किडा दिखा: पावस के संकेत से खेती में नया संदेश

Varsoli, Maharashtra:निसर्ग आपल्या संकेतांमधून ऋतूंचे आगमन आधीच सांगत असतो आणि त्यातीलच एक महत्त्वाचा दूत म्हणजे मृग किडा. मान्सूनची चाहूल लागताच किंवा मृग नक्षत्र सुरू होताच हा लाल मखमली किडा जमिनीवर दिसू लागतो. त्यामुळे अनुभवी शेतकरी आता पेरणीची वेळ झाली, असा अंदाज बांधतात. महाराष्ट्रात हा किडा गोसावी, बिरबबोटी या नावांनी ओळखला जातो. मखमली लाल रंगाचा हा किडा केवळ पावसाचा संदेशवाहक नसून शेतकऱ्यांचा मित्रही मानला जातो. शेतीला हानी पोहोचवणाऱ्या इतर लहान कीटकांच्या अळ्या खाऊन तो पर्यावरणाचे नैसर्गिक संतुलन राखण्यास मदत करतो. मात्र, रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे हा दुर्मीळ होत चालला असून वर्षातून अवघे दहा ते पंधरा दिवसच त्याचे दर्शन घडते. त्यामुळे निसर्गाच्या या अनोख्या दूताचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे..
0
0
Report

लातूर के वडगाव में महावितरण के अधिकारियों के खिलाफ महिलाओं-ग्रामवासियों का प्रदर्शन

Latur, Maharashtra: लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातल्या वडगाव येथे महावितरणच्या कारभारा विरोधात नागरिकांचा संताप उफाळून आलाय. घरांमध्ये वीज मीटर बसविण्यात आलेले नसतानाही हजारो रुपयांची वीजबिले पाठविण्यात आल्याचा आरोप करत महिला आणि ग्रामस्थांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर मोर्चा काढला. मीटरच नाही तर बिल कशाचे? असा सवाल उपस्थित करत आंदोलकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे जाब विचारला. अनेक घरांना मीटर नसतानाही थकबाकी दाखवून अव्वाच्या सव्वा रकमेची बिले देण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून, ही बिले तातडीने रद्द करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे....
0
0
Report
Advertisement

सातारा में कास डहरण ऊँचाई बढ़ाने से जलवाहिनी पूरी, 24x7 पानी सप्लाई संभव

Satara, Maharashtra:सातारा शहराच्या शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या कास धरण उंचीवाढ प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या जलवाहिनीच्या कामाची पाहणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. कास धरणातील पाणी शहरापर्यंत पोहोचविण्यासाठीची जलवाहिनी पूर्णत्वास आली असल्यामुळे येत्या काही दिवसांत हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. या प्रकल्पामुळे सातारा शहराला मुबलक पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार असून भविष्यात २४x७ पाणीपुरवठा योजनेलाही चालना मिळणार आहे. यावेळी पॉवर हाऊस, सांबारवाडी आणि आनावळे येथील विविध कामांचाही आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांना कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
0
0
Report

शिरूर में सूखा: गर्मी ने जलस्रोत और चारे को किया प्रभावित; मानसून कब?

Shirur, Maharashtra:राज्यात मान्सूनचं आगमन झालं असलं तरी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. जून महिना अर्धा संपत आला तरी पाऊस न बरसल्याने पुणे जिल्ह्यातील शिरूर परिसरात जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षी उन्हाळ्यात तापमान ४५ अंशाच्या पार गेल्याने विहिरी, कूपनलिका आणि नद्यांचे जलस्रोत पूर्णपणे आटले आहेत. पाण्याअभावी हक्काचा चाराही करपून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दुसरीकडे, प्रशासनाने धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवल्याने शेती आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे. त्यामुळे आता मोठा पाऊस कधी पडतो आणि खरिपाच्या पेरण्या कधी सुरू होतात, याकडे संपूर्ण बळीराजाचे लक्ष लागले आहे.याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
0
0
Report
Advertisement

एमआईएम को बढ़ा निधि, भाजपा नेता नाराज; महापौर ने बजट आंकड़े बदले

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या स्थायी समितीने हिंदुत्वाचा आक्रमक पवित्रा घेत एमआयएमच्या नगरसेवकांना अवघा ५ लाखांचा निधी दिला होता. भाजप नगरसेवकांना प्रत्येकी ५५ लाखांची खैरात वाटली होती. मात्र, अर्थसंकल्पाला अंतिम मंजुरी देताना महापौर समीर राजूरकर यांनी सभापतींनी मांडलेली आकडेवारी पूर्णपणे बदलली. एमआयएमला वाढीव २० लाखांचा निधी दिला. यामुळे भाजप नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. दोन महिन्यांपूर्वी स्थायी समितीकडून मनपाचा ३,३५४ कोटींचा सुधारित अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी एमआयएमच्या नगरसेवकांना ५ लाखांचा निधी दिला होता. हा निर्णय महापौरांनी बदलला आहे.. कुणी कोर्टात गेले तर फटका बसेल म्हणून महапौरांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जातेय..
0
0
Report

चंद्रपुर के भद्रावती में दो बच्चों की पानी के खड्ड में डूबकर मौत

Chandrapur, Maharashtra:चंद्रपुर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात दोन बालमित्रांचा पाण्याच्या खड्यात बुडून मृत्यू चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातल्या पाचगाव येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत शौचासाठी गेलेल्या दोन बालमित्रांचा पाण्याच्या खड्यात बुडून मृत्यू झाला. मृत मुलांची नावे कार्तिक संदीप सावसाकडे (वय १२ वर्षे) आणि सानिध्य विजय दूधनकर (वय १० वर्षे) अशी आहेत. तर त्यांच्यासोबत असलेला आदित्य बालू राऊत (वय १२ वर्षे) हा मुलगा सुखरूप बचावला. काल दुपारच्या सुमारास तिघेही मित्र इरई धरण परिसरातील शेताजवळील पाण्याच्या खड्डाजवळ शौचासाठी गेले होते. यानंतर तिघांनी त्या खड्ड्यात पोहण्याचा निर्णय घेतला. मात्र, पाण्यात उतरल्यानंतर कार्तिक आणि सानिध्य यांचा तोल जाऊन ते खोल पाण्यात अडकले. दोघेही बुडत असल्याचे लक्षात येताच आदित्यने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला ते शक्य न झाल्याने तो तातडीने गावाकडे धावत गेला आणि ग्रामस्थांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. काही वेळानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. भद्रावती पोलिस पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report
Advertisement

रांजगांव में ट्रक पलटा, चार गाँव की बिजली गुल, महामार्ग पर सुरक्षा सवाल

Shirur, Maharashtra:शिरूर तालुक के रांजगांव गणपति परिसर से एक बड़ी खबर सामने आ रही है। अश्टविनायक महामार्ग पर सीमेंट लेकर जा रहा एक ट्रक सड़क के किनारे 10 फुट गहरे गड्ढे में पलट गया। पाटस से भीमाशंकर की ओर सीमेंट ले जा रहे ट्रक के मोड़ पर अनुमान चुकने से यह दुर्घटना घटी। इस भीषण हादसे में ट्रक ने सड़क किनारे बिजली के खंभे उखाड़ दिए जिससे आसपास के चार गांवों की बिजली आपूर्ति बाधित हो गई है। महावितरण ने अब युद्धस्तर पर मरम्मत का काम शुरू कर दिया है। इस दुर्घटना में ट्रक चालक के पैर में गंभीर चोटें आईं, पर सौभाग्य से भारी जनहानि टली। हालांकि इस क्षेत्र में लगातार दूसरे दिन दुर्घटना होने से महामार्ग पर सुरक्षा का सवाल सामने आ गया है।
0
0
Report

अकोला में दो दिनों की बारिश से तापमान गिरा, ठंडी हवाओं ने लोगों को राहत दी

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून तापमानात लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अकोल्यात बुधवारी कमाल तापमान ३८.९ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले होते. मात्र, काल पावसाच्या प्रभावामुळे तापमानात तब्बल ५.३ अंश सेल्सिअसची घट होऊन ते ३३.६ अंशांवर आले. तापमानातील या अचानक झालेल्या घसरणीमुळे वातावरण अधिक आल्हाददायक बनले आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले होते. त्यातच दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवसही ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे तापमानात आणखी काही प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
0
0
Report

छत्रपति संभाजी नगर में नलाकनेक्शन के लिए 72 प्लंबर नियुक्त, 4000 रुपये शुल्क

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरात शहरातील सर्वच भागात नळाने पाणी देण्याचा महापालिकेचा आता प्रयत्न सुरू झालाय , शहराच्या नो नेटवर्क भागात महापालिकेने जलवाहिन्या टाकून ठेवल्या आहेत, नागरिकांना आता नवीन नळ कनेक्शन देण्यात येतील. यासाठी महापालिका प्रशासन एक धोरण निश्चित करीत आहे. शहरासाठी ७२ अधिकृत प्लंबरची नियुक्ती करण्यात येईल. नागरिकांना त्या प्लंबरकडूनच कनेक्शन घेता येईल. कनेक्शन घेण्यासाठी लागणारी मशीन महापालिका देणार आहे. एका नळ कनेक्शनसाठी १८०० रुपये व चालू आर्थिक वर्षाची पाणीपट्टी २ हजार असे मिळून ४ हजार रुपये घेण्यात येणार आहेत. कोणी अनधिकृत नळ घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर थेट फौजदारी कारवाई केली जाईल.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top