Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

राज्य की महिला चळवळी को 50 वर्ष पूरे, यवतमाळ में महिला मुक्ति परिषद का आयोजन

SRSHRIKANT RAUT
Oct 06, 2025 06:47:22
Yavatmal, Maharashtra
राज्यातील स्त्री चळवळीला ५० वर्षे पूर्ण होत आहे. या निमित्ताने नव्याने चळवळीला दिशा देण्यासाठी यवतमाळात स्त्री मुक्ती परिषदेचे आयोजन करण्यात आले. परिषदेच्या अध्यक्षस्थानी वर्षा निकम होत्या. स्त्रियांचे संविधानिक अधिकार जपण्यासाठी आणि त्यावरील पर्यायावर यावेळी संवाद साधण्यात आला. तसेच महिलांवर शारीरिक व मानसिक अत्याचार या विषयावर गट चर्चा करण्यात आली, महिलांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक अधिकारांचे रक्षण करण्याबाबत विचार मंथन करण्यात आले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SGSagar Gaikwad
Oct 06, 2025 08:48:15
Nashik, Maharashtra:नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून महापालिकेत आयुक्तांच्या कार्यालय बाहेर आंदोलन करण्यात आलाय. नाशिकच्या खड्ड्यांच्या प्रश्नांवरती आंदोलन करण्यात आलं. शिंदे गटाचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कालच नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी देखील काल खड्ड्यांच्या बाबतीत लवकरात लवकर निर्णय घ्या नाहीतर अधिकाऱ्यांचे निलंबन करू अशा प्रकारची तंबी दिली होती. त्यानंतर आज शिंदे गटाकडून महापालिकेत आयुक्तांच्या दालनाबाहेर बसून आंदोलन शहर अभियंता यांच्या पोस्टरला थोडे मारून आंदोलन करण्यात येत आहे. या संदर्भात आंदोलकांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 06, 2025 08:32:08
Akola, Maharashtra:नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत आज मंत्रालयात काढण्यात येत आहे.भाजप आमदार माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत लॉटरी पद्धतीने ही सोडत जाहीर केली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसाठी ही सोडत अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.मात्र या निर्णयावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सरकारचा हा निर्णय म्हणजे मतचोरीसारखा प्रकार असल्याची अशी टीका त्यांनी केली. लोकांपासून चोरून आरक्षण काढलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.सपकाळ पुढे म्हणाले, “आनंदाचा शिधा देताना यामागचा राजकीय हेतू स्पष्ट दिसून आला होता. हे सत्ताधारी सण आणि धर्मावरही राजकारण करत आहेत. हे सरकार शेतकरीविरोधी असून, फक्त कुणाला किती खोके द्यायचे आणि कुणाला मंत्री करायचे याचाच विचार करते,” अशी टीका त्यांनी केली.राज्यातील राजकीय समीकरणांवर बोलताना सपकाळ म्हणाले, “ठाकरे बंधू भेटत असतील, पण आम्ही महाविकास आघाडीत एकसंघ आहोत. मोदी आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं हेच आमचं प्रमुख धोरण आहे.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Oct 06, 2025 08:15:50
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 06, 2025 08:09:32
Akola, Maharashtra:अकोला-वाशिम रोडवर भीषण अपघात होऊन तीन जणांचा मृत्यू झाल्याची खोटी माहिती थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोनवरून देण्यात आली.या माहितीवरून उपमुख्यमंत्री कार्यालयातून अकोल्याचे संपर्क प्रमुख आणि माजी आमदार गोपिकीशन बाजोरिया यांना तात्काळ संपर्क करण्यात आला. बाजोरिया यांनी जिल्हाध्यक्ष अश्विन नवले यांच्यासह तत्काळ घटनास्थळी रवाना होत तब्बल ४२ किलोमीटर अंतरावरील पातुर परिसरात पाहणी केली. मात्र,त्यांना या ठिकाणी कोणताही अपघात झाल्याचे आढळून आले नाही.सुमारे दोन तासांच्या कालावधीत फोन करणारा व्यक्ती वारंवार वेगवेगळ्या ठिकाणांहून नवी माहिती देत राहिला. इतकेच नव्हे तर त्याने फोनपे द्वारे पैसे मागितल्याने संशय अधिक गडद झाला. अखेर हा कॉल फसवा असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधितांनी तो नंबर बंद करून ठेवला.सूत्रांच्या माहितीनुसार, फोन करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव प्रमोद फसाले असे सांगितले होते. उपमुख्यमंत्र्यांच्या मोबाईलवर अशा प्रकारे खोटी माहिती देणे ही गंभीर बाब ठरली आहे.अशा खोट्या कॉलमुळे प्रशासन आणि कार्यकर्त्यांचा वेळ वाया जातोच, पण खऱ्या गरजूंना रुग्णवाहिका आणि मदत पोहोचण्यात अडथळा निर्माण होतो ही बाब अशाप्रकारे फेक कॉल करणाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे.पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, खोटा कॉल करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.अकोल्याचे पोलीस अधीक्षक आता ॲक्शन मोडवर येत या प्रकरणी कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहेत. मात्र एका फेक कॉल मुळे यंत्रणेला आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना किती मनस्ताप सहन करावा लागतो हे यातून दिसून येत आहे.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Oct 06, 2025 08:07:42
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पायी चालत भावीक भक्त तुळजापुरात दाखल... तुळजाभवानी मंदिरात उद्या पौर्णिमा साजरी केली जाणार असून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी लाखो भाविक तुळजापुरात येताना दिसत आहेत आज रात्री उशिरा मंचकावरील श्रमनिद्रा संपवून तुळजाभवानीची सिंहासनावर प्रतिष्ठापना केली जाणार देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना झाल्यानंतर धार्मिक विधी स्नान आणि महाआरती करण्यात येणार उद्या सकाळी देवीजींची विधिवत पूजा देखील केली जाणार उद्या दुपारी सोलापूरच्या मानाच्याकाठ्या तुळजापुरात दाखल झाल्यानंतर रात्री काठ्यासह छबिना मिरवणूक काढण्यात येणार त्यानंतर तुळजाभवानीच्या मंदिरात महंत पुजारी यांच्याकडून आई राजाच्या उद घोषात जोगवा मागण्याचा कार्यक्रम जोगवा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर तुळजाभवानीच्या पोर्णिमा यात्रेची सांगता होते..
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 06, 2025 07:22:32
Nashik, Maharashtra:येतोय लवकरच भाऊ अशी रिल बनवून कारागृहातून सुटल्यानंतर मिरवणूक काढणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड अँकर खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींच्या नावाने सोशल मीडियावर रिल्स बनवून वायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी कडक कारवाई केली आहे.... सोशल मीडियावर येतोय भाऊ लवकरच अशी रिल बनवून कारागृहातून सुटल्यावर मिरवणुक काढलेल्या संशयतांनी शक्ती प्रदर्शन केले होते.... या भाईच्या समर्थकांना उपनगर पोलिसांनी शोधून त्यांची जिथून मिरवणूक काढली होती, त्याच ठिकाणी गुडघ्यावर चालवत धिंड काढत भाईंच्या समर्थकांची मस्ती जिरवलीं आहे... गुन्हेगारांचे सोशल मीडियावर प्रोफाइल चेक करत असताना उपनगर पोलीस ठाण्यात कुणाच्या गुन्ह्यातील आरोपी राकेश घुमरे हा कारागृहात असताना त्याची आई मुलाखत घेतेवेळी फोनवरील संभाषणाचे व्हिडिओ क्लिप बनवून त्यांनी व्हायरल केली होती....कारागृहाच्या प्रवेशद्वारातून मिरवणूक काढल्यानंतर पोलिसांनी शोध घेत या भाईंची धिंड काढली आहे....
0
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 06, 2025 07:22:18
Nagpur, Maharashtra:नागपूर - जन्मजात अंध और अनाथ असलेली माला पापळकर हिने स्वीकारला महसूल सहायक पदाचा पदभार - 32 वर्षांपूर्वी माला जळगावच्या रेल्वे स्टेशनवर बेवारस स्थितीत सापडली होती - तिला अमरावतीच्या वज्झर येथील शंकरबाबा पापळकर यांच्या आश्रमात आसरा मिळाला - इथे राहताना तिने 2023-24 च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली - आज माला पापळकर नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहायक पदाचा पदभार स्वीकारला आहे - यावेळी शंकरबाबा पापळकर, आश्रमातल सव्वाशे दिव्यांग मुलं, जिल्हाधिकारी उपस्थित होते... यावेळी आश्रमातील अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले... माला आज अनेकांसाठी प्रेरणास्थान बनवली आहे - यावेळी माला आणि शंकर बाबा पापळकर यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
0
comment0
Report
PNPratap Naik1
Oct 06, 2025 07:02:01
Kolhapur, Maharashtra:मराठवाडा और उत्तराखंड मधील आपत्तीग्रस्तांसाठी कोल्हापूरातील पणदूरकर दांपत्याने दहा लाख रुपयांची देणगी दिली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधी मध्ये ही रक्कम त्यांनी जमा केली आहे. शिवाजी विद्यापीठातील सेवानिवृत्त प्राध्यापक राम पंदुरकर आणि त्यांची पत्नी हेमकिरण पणदूरकर दाम्पत्याने त्यांच्या मुलगी एड. रूपाली पणदूरकर हिच्या स्मृतिप्रित्यर्थ ही मदत केली आहे. पणदूरकर दांपत्याने या आधीही शिवाजी विद्यापीठात कमवा आणि शिका अंतर्गत अभ्यासिका उभारण्यासाठी 65 लाखांची देणगी दिली आहे तर ऑपरेशन सिंदूर वेळी देखील त्यांनी पंतप्रधान सहायता निधीमध्ये तब्बल पाच लाख रुपये दिले आहेत. ऑपरेशन सिंदूर नंतर अवघ्या पाच महिन्यातच त्यांनी महाराष्ट्रावर ओढावलेल्या संकटात मदतीसाठी पुन्हा एकदा हात पुढे केला आहे. दरम्यान मराठवाड्यातील आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत पाठवायची होती मात्र जिल्हा प्रशासनातील यंत्रणेकडून अपेक्षित सहकार्य मिळालं नसल्याची खंत राम पणदूरकर यांनी व्यक्त केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्यातील नागरिकांना किमान एक रुपया देण्याचं आवाहन करत आहेत तसं आवाहन आपले मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री का करत नाहीत असा प्रश्न हेमकिरण पणदूरकर यांनी उपस्थित केलाय. आपल्या पश्चात आपली सर्व संपत्ती देशासाठी समर्पित करणार असल्याचे देखील हेमकिरण पणदूरकर म्हणाल्यात.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 06, 2025 06:52:12
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ओबीसी नागपूर मोर्चा मोर्चा काढू द्या, त्यांनी देखीक आता दमले पाहिजे, गोरगरीब आरक्षण खाल्ले आतापर्यंत, त्यांच्या बोलण्याने कायदा चालत नाही, मराठा हैदराबाद गॅझेट आहे, त्यानुसार जीआर काढला, आता पुढच्या आठवड्यात सातारा गॅझेट निघत आहे, कितीही बोंबलू द्या, आमच्या जीआरला धक्का लागत नाही, मराठ्यांना काही द्यायाची असल्यास नियम लागतात, त्यांना लगेच काहीही न मागता दिले जाते, ही आमची खंत आहे. आता मराठे सज्ज झाले आहे. असा दबावात कुणाचा जीआर निघत नाही ,कायद्याचे नियम पूर्ण केले आहेत का हे पाहावे लागत असते. कुणाच्या दबावामुळे जीआर रद्द होत नाही हे काँग्रेसने समजवून घ्यावे.... ऑन नांदेड मोर्चा धनगर, आदिवासी, बंजारा बांधव यांनी एकत्र बसण्याची गरज आहे, आणि तोडगा काढला पाहिजे. ऑन विजय वडेट्टीवार वडेट्टीवार 374 जाती जे म्हणत आहे, तर खऱ्या ओबीसी जाती कुणी सपवल्या... त्यांच्या वक्तव्यावर ओबीसींने विचार करावे,,, येवला अलिबाबने खऱ्या ओबीसींचा घात केले आहे. 16 टक्के मराठा आरक्षण असल्याचे माहीत असताना आरक्षण दिले त्यामुळे त्यांनी ओबीसींने वाटोळे केले, शरद पवारांनी आमचा वाटोळं केले आहे, त्यांना देखील यांना सोडलं नाही ऑन वडेट्टीवार तलवार बाजी येवला वल्याचे शब्द आहे, त्यांना ते भाषा आहे, तलवारी, कोयते याची त्यांची भाषा आहे, त्यान्ची भाषा आहेत, त्यांना दंगली घडवून आणायचे आहे. राजकीय स्वार्थ साठी ओबीसीं नेत्यांनी लावला आहे... ऑन धाराशिव व्हिडीओ काहीही एकाचे दोन जोडले असेल, वातावरण दूषित करण्यासाठी त्यांनी असे जोडले असेल, दसर्या मेळाव्यात देखील असे केले पाहिजे, मराठा असे नाहीत. मराठे निजामीच्या औलादी असल्याचं ते वक्तव्य करतात, दुसरा गुलाम म्हणतात, तुम्हाला मराठ्याने सांभाळले त्यांना असे बोलतात, आम्ही एक शब्द बोललो नाही, पण आमच्यावर बोलले तर मी गप्प बसणार नाही. खून करणारे आहेत, अध्यात्मिक ठिकाणी काय शब्द वापरतात हे लोक, दुसऱ्याचे खाण्याची सवय लागली आहे. सिल्लोडला सरपंच उपोषणाला बसला त्याकडे लक्ष देण्यासाठी यांना वेळ नाही. तिकडे लक्ष देण्यासाठी रोग आला का यांना... सर्वांनी वेगवेगळ्या पद्धतीने उपोषण करण्यापेक्षा एकत्र करावे ऑन शेतकरी अतिवृष्टी केंद्रकडे मदतीसाठी देणार देखील नाही हे, पण आम्ही घेणार आहेत, दिवाळीपर्यंत वाट पाहतो, अन्यथा शेतकऱ्याचा टोकाचे शेवटचा आंदोलन करायचे आहे. एकदाच तुकडा पाडणार. दिवाळीनंतर एक बैठक घेऊन आंदोलन तारीख ठरवणार आहे. ऑन प्रकाश आंबेडकर धनगर समाजाकडे नेतृत्व दिले पाहिजे, धनगर समाजाला हे काही लोक मूर्ख समजतात, अलिबाबा लोकांना मूर्ख समजतात, त्याला झोप लागेल का? ओबीसी नेतृत्व करण्यापेक्षा आपल्या आरक्षणासाठी धनगर समाजाने लढाई लढावी, मराठा समाजाच्या बाबत बोलून आपली ताकद वाया घालवू नयेत ऑन भुजबळ गंभीर आरोप.. मला चर्चा ऐकली, वडेट्टीवार आणि भुजबळ नाशिक मध्ये फार्म हाऊस वर बैठक झाली, अलिबाबा म्हणाला की, अजित पवारने मला त्यावेळी गुंतवले होते, आता आपल्याला संधी आहे, ओबीसी आंदोलन नेतृत्व काँग्रेसकडे देऊन अजित पवार यांना बदनाम करावे, फडणवीस यांची देखील तोंड बंद होईल...वडेट्टीवार आणि भुजबळ आता  एक झालं आहे, शरद पवारांनी मोठं केले, त्याच्या सांगण्यावरून ओबीसी आरक्षण दिले त्यांचा विश्वास ठेवला नाही, नासाक आणि नालायक माणूस भुजबळ आहे. अजित पवार यांच्या विरोधात षडयंत्र तयार केले जात आहे.मुंडे घराणे देखील भुजबळसोबत एकत्र आले आहे. बदला असा घ्यायचे की, परळीच देखील म्हणणे आहे की फडणवीस याने आमची खूप दशा केली असल्यामे ओबीसींनि एकत्र प्लॅन तयार करण्याचा षडयंत्र सुरू आहे. फडणवीस यांच्या डोक्यात भुजबळ दगड घालणार आहे, पण फडणवीस खुंटा घालेल  असा की निघणार नाही....अजित पवार, एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी सावध राहावे... भुजबळ जत्रेतील विस्तू आहे, परळी घराणे बाबत किती वाईट मत होते, धनगर आरक्षण बाबत एक शब्द काढत नाही... ऑन ओबीसी मोर्चे आम्ही आता मोर्चाला काहीही उत्तर देणार नाही, एक दिवस ओरडतील आणि जातील. ऑन राहुल गांधी लाल्या वक्तव्य कसली कारवाई करता रे, तुमचा धुराडाच आता... मराठ्यांनि आता पाडाच.. ऑन आंनद शिधा हे आंनद शिधा कुठे गेले माहीत नाही, आम्ही दिवाळीपर्यंत वाट पाहणार, त्यानंतर अशी वेळ येईल की नेत्यांना राहता येणार नाही
0
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top