445001
शेतकरी न्याय यात्रेतून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाची पोलखोल करणार, आशिष खुलसंगे
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची शेतकरी न्याय यात्रा शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत आहे. शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने आणि अतिपावसामुळे नापिकीचे संकट उभे राहिले आहे. कोळसा खाणीमुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. पीक विमा मिळवण्यात अडचणी आहेत आणि पांदण रस्ते योजना रखडली आहे. सरकार 'लाडकी बहिण' योजनेचा प्रचार करत असताना, शेतकऱ्यांना दुसऱ्या हाताने लुटून उध्वस्त करत असल्याचा आरोप आशिष खुलसंगे यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
उल्हासनगर में बर्निंग कार का डरावना घटनाक्रम, दमकल ने आग पर काबू पाया
Ambernath, Maharashtra:उल्हासनगरात बर्निंग कारचा थरार उल्हासनगरच्या शहाड परिसरात भर रस्त्यावर बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला , रस्त्यावरून जात असलेल्या एका कारने अचानक पेट घेतला , मात्र चालकाच्या प्रसावधानाने मोठी दुर्घटना टळली, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, माझं कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व वाहन थांबवण्यात आली त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली त्यानंतर अग्निशमन दलाला जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले , आगीचे कारण मात्र समजू शकले नाही,0
0
Report
मुंबई-गोवा महामार्ग पर निर्माण कार्य से 2 किलोमीटर लंबा ट्रैफिक जाम
Ratnagiri, Maharashtra:संगमेश्वर - रत्नागिरी..\nमुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा..\nमहामार्ग रुंदीकरणाच्या अर्धवट कामांमुळे वाहतुकीचा खोळंबा..\nमुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर शास्त्री नदीवरील पुलाच्या अर्धवट स्थितीत असलेल्या कामांमुळे महामार्गावर दोन किलोमीटरच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत..\nचार तासांपासून महामार्गवरील वाहतूक ठप्प आहे..\nत्यात आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे महामार्गावरील रहदरीचे प्रमाण सर्वात जास्त..0
0
Report
राजापूर में बॉक्साइट खदान विरोध, जनसुनावणी रद्दीकरण की मांग तेज
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी राजापूरमध्ये बॉक्साईट उत्खनन प्रकल्पावरून वातावरण तापलं बॉक्साईट उत्खननाला राजापूरवासीयांचा तीव्र विरोध विनाशकारी बॉक्साईड खाण प्रकल्प विरोधी संघर्ष समिती आक्रमक 20 मे और 26 मे रोजी होणारी जनसुनावणी रद्द करण्याची मागणी जनसुनावणी रद्द झाली नाही तर जनसुनावणी उधळण्याचा ग्रामस्थांचा इशारा राजापूर तालुक्यातील नाणार आणि सागवे गावात प्रस्तावित आहे बॉक्साइट उत्खनन प्रकल्प नाणारमध्ये 144.95 हेक्टर, आणि सागवे गावात 120.48 हेक्टरवर होणार उत्खनन बॉक्साईट उत्खननाविरोधात राजापूर पंचायत समितीनेही केला आहे विरोधाचा ठराव दोनन्ही शिवसेनेचाही आहे विरोध, स्थानिक आमदार किरण सामंत यांचाही विरोध.. जनसुनावणी रद्द करण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक0
0
Report
Advertisement
रायगढ़ में सीएनजी टैंकर चालक संघ के बंद से पंप ठप, पर्यटक प्रभावित
Chendhare, Maharashtra:टँकर चालकांच्या संपामुळे रायगडमध्ये सीएनजी पंप बंद. कोकण फिरायला आलेलेल्या पर्यटकांना मोठा फटका. रायगड जिल्ह्यातील सीएनजी टँकर चालक संघटनेने पुकारलेल्या बंदमुळे रायगडमध्ये सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. सीएनजीच्या गाड्या येत नसल्याने अनेक सीएनजी पंप बंद झाले आहेत. याचा थेट फटका कोकण फिरायला निघालेल्या पर्यटक आणि सर्वसामान्य नागरीकांना बसत आहे. भविष्य निर्वाह निधीची सुविधा, 25 हजार रुपये पगार मिळावा, इन्शुरन्स मिळावा त्याच बरोबर ड्युटीची वेळ निश्चित असावी अशा अनेक मागण्यांसाठी रायगड मधील सीएनजी टँकर चालक संघटनेने बंद पुकारला आहे. कालपासून हा बंद सुरू झाला आहे. सीएनजी घेऊन येणारी एकही गाडी आज पंपावर न आल्याने टँकर चालकांच्या बंदची झळ सर्वसामान्य नागरीक आणि पर्यटकांना बसत आहे. प्रशासनाने न्याय मागण्यांचा विचार करून मागण्या पूर्ण कराव्यात असा आग्रह संपकरी चालकांकडून केला जात आहे.0
0
Report
डोंबिवली महापालिका के सामने सात दिनों से आमरण उपोषण, अनधिकृत बंगला हटाने की मांग
Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयासमोर गेल्या सात दिवसांपासून ज्योती म्हात्रे, या महिला आमरण उपोषणाला बसल्या असून, आपल्या पागडी पद्धतीवरील घराचा मोबदला दिल्याचे आश्वासन दिले गेले होते, मात्र, त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला दिला गेला नाही, तसेच संबंधित जागेवर अनधिकृत बंगला उभारण्यात आला आहे, या अनधिकृत बंगल्यावर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याच्या आरोप त्यांनी केला आहे. ज्योती म्हात्रे, यांच्या म्हणण्यानुसार, डोंबिवली पश्चिमेतील गायकवाडवाडी परिसरात ज्या ठिकाणी त्यांचे पागडी पद्धतीवरील घर होते ते घर पाडण्यात आले. घरावर जेव्हा कारवाई केली गेली होती संबंधित व्यक्तीने त्यांना मोबदला दिला जाईल, असा आश्वासन दिलं होतं, मात्र आतापर्यंत ज्योती म्हात्रे, यांना कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई अथवा पर्यायी व्यवस्था देण्यात आलेली नाही. त्याच जागेवर सध्या बंगला उभारण्यात आला असून त्या अनधिकृत बंगल्यावर केडीएमसीकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या मागण्यांसाठी त्या गेल्या सात दिवसांपासून केडीएमसी मुख्यालयासमोर सात दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत. उपोषणामुळे त्यांच्या प्रकृतीबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, याबाबत महापालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता संबंधित बंगला अनधिकृत असल्याचे मान्य करण्यात आले. मात्र तो खाजगी जागेवर बांधण्यात आला असल्याने तात्काळ कारवाई करण्यात आलेली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. तसेच संबंधित बंगला मालकाने बांधकाम नियमित करण्यासाठी केडीएमसीकडे अर्ज दाखल केला असून त्या अर्जावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे सध्या कारवाई स्थगित ठेवण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. एकीकडे आपल्याला न्याय आणि मोबदला मिळत नसल्याची तक्रार ज्योती म्हात्रे करत असताना, दुसरीकडे अनधिकृत बांधकामावर कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवराही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.0
0
Report
सांगली के पांडोझरी में महावितरण कर्मी की गोलीबारी हत्या, दो संदिग्ध गिरफ्तार
Sangli, Maharashtra:सलग- जतच्या पांडोझरी येथे महावितरण कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या,दोन संशयित ताब्यात घटना: सांगली जिल्ह्यातील संख महावितरण वसुली कर्मचाऱ्याची त्याच्या राहत्या घराच्या परिसरात गोळ्या झाडून हत्या झाल्याची घटना घडली आहे. संतोष उर्फ Kumar बिराजदार असे आहेत, संख नजीक असणाऱ्या पांडोझरी गावाच्या हद्दीत मध्यरात्री अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार करून हत्या केली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे झाले. या घटनेने जत तालुक्यात खळबळ माजली आहे. या घटनेची उमदी पोलिसांत नोंद झाली आहे, या प्रकरणी उमदी पोलिसांनी دوघांना ताब्यात घेतलं आहे. मात्र या घटनेचे कारण स्पष्ट नाही, अनैतिक संबंधातून हा खून झाल्याची चर्चा सुरू असून अधिक तपास उमदी पोलीस करत आहेत.0
0
Report
Advertisement
उल्हासनगर में पानी की पाइपलाइन फटी, लाखों लीटर पानी व्यर्थ, ट्रैफिक बाधित
Ambernath, Maharashtra:उल्हासनगरमध्ये पाण्याची पाईप लाईन फुटली. फुटलेल्या पाइपलाईनमधून लाखो लिटर पाणी वाया! उल्हासनगरमध्ये शहाड पूर्वेतील उड्डाण पुलाजवळ पाण्याची पाइपलाईन फुटली असून या फुटलेल्या पाइपलाईनमधून लाखो लिटर पाणी वाया जातंय, पाण्याचे उंच फवाऱ्यांमुळे वाहतूक कोंडी झाली असून लहान मुलांचा पाण्यात आनंद घेत आहेत, तर पाण्यासाठी त्रस्त नागरिक फुटलेल्या पाइपमधून पाणी भरतायत आहे, एकीकडे शहरात अनेक भागात पाणी टंचाई भेडसावत असताना दुसरीकडे हजारो लिटर पाणी वाया जातय.0
0
Report
पंढरपुर कॉरिडर को मंजूरी मिलने के बाद मंदिर समिति काम में तेज़ी, भूमिपूजन शुरू
Pandharpur, Maharashtra:पंढरपुरात काॅरिडारला शिखर समितीची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर मंदिर समितीच्या कामांना वेग आला आहे. मंदिर समितीच्या दर्शन मंडप आणि स्कायवॉक उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. सोमवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. 129 कोटी रूपये खर्च करून तीन मजली दर्शन मंडप आणि स्काय वॉक उभारला जाणार आहे. यामध्ये भाविकांसाठी विश्रांती कक्ष,बैठक ,हाॅल,दर्शन रांग,शौचालय आदी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत0
0
Report
एल-निनो के कारण मोरबे डैम क्षेत्र में 85 दिन तक पानी सुरक्षित; नवी मुंबई के लिए सतर्कता जरूरी
Navi Mumbai, Maharashtra:यावर्षी ‘एल-निनो’ या जागतिक हवामान बदलामुळे भारतातील मॉसमी वाऱ्यावर परिणाम होऊन पावसाचे प्रमाण कमी आणि पाऊस उशिराने येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेय. मनपा आयुक्त कैलास शिंदे यांनी नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरण प्रकल्प क्षेत्राची पाहणी करत जलसाठ्याची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेतली. यासोबतच जलाशयाच्या दोन्ही बाजूने जमिनीची मोजणी आणि सीमांकन निश्चित करून कुंपण घालण्याचे निर्देश दिले आहेत. मोरबे धरण क्षेत्रात अजून 85 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा असून नवी मुंबईकर नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन आयुक्तांनी केलेय.0
0
Report
Advertisement
तळकोकण की अवकाली बारिश से जनजीवन बिखरा, कणकवली में भारी नुकसान
Oras Bk., Maharashtra:तळकोकणात मागील तीन दिवस कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेय. सिंधुदुर्गात वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या अवकाळी पावसाचा फटका कणकवली तालुक्याला बसलाय. कणकवली तालुक्यातील अनेक गावांमध्ये घराची छप्परे उडालीत तर झाड घरावर कोसळल्यामुळे घरांचेदेखील नुकसान झालेय या नुकसानीची कणकवली पंचायत समिती सभापती उपसभापती प्रांतधिकारी व तहसीलदार यांनी पाहनी केली. खारेपाटण भागात वादळी पावसाचा मोठा फटका बसला असून नुकसानग्रस्तांना जास्तीतजास्त मदत देण्याचा आपण पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे सभापती हर्षदा वाळके यांनी सांगितले.0
0
Report
जालना में राज ठाकरे के बयान पर मनसे ने सख्त चेतावनी दी
Jalna, Maharashtra:जालना :राज ठाकरेंबद्दल वक्तव्य कराल तर जशाच तसं उत्तर देऊ जालन्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांचा गुणरत्न सदावर्तेंना पुन्हा इशारा पोलीस बंदोबस्त नसता तर सदावर्तेंची गाडीही फोडली असती आणि सदावर्तेनाही फोडलं असत मनसे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांचा इशारा काल सदावर्ते यांच्या गाडीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आॅईल फेकलं होतं.. मात्र पोलीस बंदोबस्त नसता तर सदावर्तेंची गाडी फोडली असती आणि सदावर्तेनाही फोडलं असतं असा इशारा मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी दिला असून राज ठाकरे यांच्याबद्दלचं वक्तव्य खपवून घेणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आलाय.0
0
Report
कोलगाव में ट्रक ने दोपहिया को मारी टक्कर, 15 वर्षीय बेटी सहित 3 घायल - CCTV कैद
Oras Bk., Maharashtra:थांबलेल्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे कोलगाव येथे झालेल्या अपघातात १५ वर्षांच्या मुलीसह तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील रील स्टार कलाकार मलिक मकानदार यांच्या घरासमोर घडली. हा सर्व थरारक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. दरम्यान जखमींना अधिक उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रमजान शेख (वय ५०), हेमीना शेख (वय ४७) आणि सिमरन शेख (वय १५) सर्व रा. कोलगाव अशी जखमींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, कोलगाव येथे राहणारे शेख कुटुंब आपल्या घरी परतत होते. यावेळी ते मकानदार यांच्या घरासमोर काही वेळ थांबले असता त्यावेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक चालकाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की तिघेही गाडीवरून फेकले गेले. सुदैवाने रस्त्याच्या बाजूला ते पडल्यामुळे कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही. या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. दरम्यान अपघातात जखमी झालेल्या तिघांनाही खासगी गाडीने येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले.0
0
Report
Advertisement
नगर-मनमाड मार्ग पर पुणतांबा फाटे पर जाम, परीक्षा समेत भारी असर
Shirdi, Maharashtra:नगर मनमाड महामार्गावर पुणतांबा फाट्यावर वाहतुक कोंडी... कोपरगावच्या पुणतांबा फाट्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.... प्रवासी तीन ते चार तासांपासून वाहतूक कोंडीत अडकले… नगर मनमाड महामार्गाचे काम सुरू असल्याने वाहतुकीचे नियोजन नसल्याने वाहतूक कोंडी... रविवार आणि लग्नसराईमुळे शहरातसह नगर मनमाड महामार्गावर वाहनांची गर्दी... सीईटी परीक्षार्थींनाही वाहतूक कोंडीचा फटका ; अनेक विद्यार्थी वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचू शकले नाहीत… वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांची धावपळ सुरू , मात्र नियोजनाचा अभाव असल्याने वाहतूक कोंडी... गेल्या तीन तासांपासून प्रवासी करताय वाहतूक कोंडीयचा सामना....0
0
Report
नाशिक के होटल पूल में डूबे युवक की मौत, पुलिस जांच शुरू
Nashik, Maharashtra:हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तीस वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून गणेश गायकवाड असे या तरुणाचे नाव आहे तो नाशिक येथून नातेवाईकाच्या लग्नासाठी आला होता. सायंकाळी शहराजवळील एका हॉटेलच्या स्वीमिंग पूल मध्ये मित्रा सोबत पोहण्यासाठी गेला होता पोहताना अचानक तो पाण्यात बुडू लागल्याचे पाहून त्याला बाहेर काढून सीपीआर देण्यात आले त्यानंतर त्याला तातडीने कार मध्ये घेऊन हॉस्पिटलकडे घेऊन जात असताना पुणे-इंदूर महामार्गांवर प्रचंड ट्रॅफिक जाम होते त्यामुळे काही तरुणांनी गणेशला खांद्यावर घेऊन हॉस्पिटल गाठले मात्र वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करून तपास सूरू केला आहे0
0
Report
सोलापुर के हर तालुके में स्मार्ट हेल्थ सेंटर: जिला परिषद की महत्त्वाकांक्षित पहल
Solapur, Maharashtra:सोलापूर - सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने प्रत्येक तालुक्यात स्मार्ट आरोग्य केंद्र उभा करण्याचा निर्णय असून ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात स्मार्ट आरोग्य केंद्र उभारण्याची महत्त्वकांक्षी संकल्पना जिल्हा परिषद स्तरावर पुढे आलीय. केंद्रावर रुग्णांना आवश्यक वैद्यकीय सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रकल्पासाठी शासन अथवा जिल्हा परिषदेतून निधी उपलब्ध करण्याबाबत सकारात्मक विचार सुरू असून या संदर्भात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.0
0
Report
Advertisement
