icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

हिंदी में क्लिकबेट न्यूज़ हेडलाइन

Washim, Maharashtra:वाशीम शहराला पाणी पुरवठा करनाऱ्या एकबुर्जी प्रकल्पावर वरून वाशिम शहराला पाणी पुरवठा केल्या जातो.प्रकल्पातून पाणी उपसा व वाढत्या तापमानामुळे जल पातळीत झपाट्याने घट होत असल्यामुळे पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाने कडक पाऊले उचलत प्रकल्पावरून शेती सिंचन करीत असलेले 60 मोटारपंप हटवत 5 मोटारपंप जप्त केल्याने प्रकल्पात पाणी पातळी कायम असल्याचं चित्र आहे.एरव्ही मे महिन्यात 13 ते 15 टक्के जल साठा असणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात सध्या 23 टक्के जल साठा असल्याने या कारवाईमुळे जुन महिन्याच्या शेवट पर्यंत पाणी पुरणार असल्याचे नगरपरिषद इकडून सांगण्यात आलं आहे.
0
0
Report

इंदापूर थाने में हंगामा: सात पर सरकारी काम में बाधा का मामला

Rui, Maharashtra:इंदापूर पोलीस ठाण्यात थरार.....पोलीस ठाण्यातच अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतत जोरदार गोंधळ......तक्रार नोंदवण्याच्या कारणातून घडली घटना.....इंदापूर पोलिसांनी दाखल केला सात जणांविरोधात Anchor_पुण्याच्या इंदापूर पोलीस ठाण्यात एक थारारक घटना घडली आहे. शेत जमिनीच्या वादातून इंदापूर पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या काहींनी तक्रार दाखल करूनही दखल घेतली जात नाही यासोबत पोलिसांनी या प्रकरणात पैसे खाल्ले असा आरोप करत थेट अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी इंदापूर पोलीस आणि तब्बल सात जणांना विरोधात सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखलब केला आहे. 1) किरण गोफणे रा. तरंगवाडी इंदापुर 2) तानाजी सोपान सातपुते 3) राणी हनुमंत कनसे (तानाजी सातपुते यांची सासु) 4) तृप्ती तानाजी सातपुते 5) स्वप्नील सुभाष सातपुते (6) स्नेहल सुभाष सातपुते 7) कोमल सुभाष सातपुते सर्व रा. सातपुते वस्ती इंदापुर या सात जणांच्या विरोधात इंदापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तक्रार दाखल करण्यासाठी आलेले संबंधित सर्वजण ठाणे अंमलदार कक्षात घुसून जोरदार आरडाओरड करू लागले. यावेळी एका आरोपीने मोबाईलवर चित्रीकरण सुरू केले।गोंधळा दरम्यान काहींनी स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत परिस्थिती आणखी चिघळवली.तुम्हाला अत्ता इथेच पेटवून देतो अशी थेट धमकीही पोलिसांना देण्यात आली. परिस्थिती शांत करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की शिवीगाळ केली शिवाय सरकारी कामात अडथळा निर्माण केला या आरोपाखाली इंदापूर पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
0
0
Report
Advertisement

पुणे-बारामती डेमो ट्रेन के चाक में आग, फौरी रोकथाम से बड़ा हादसा टला

Rui, Maharashtra:पुणे-बारामती डेमो ट्रेनच्या चाकाला आग पुणे-बारामती डेमो पॅसेंजर ट्रेनमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. गाडी क्रमांक 71 411 च्या एका चाकाला अचानक आग लागल्याची घटना घडली. ही ट्रेन दररोज संध्याकाळी 6:54 मिनिटांनी पुण्यावरून सुटते. दरम्यान, प्रवासादरम्यान रात्री 9:30 सुमारास चाकातून धूर आणि ज्वाळा निघताना दिसल्याने प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित नागरिकांनी हा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. ही घटना लक्षात येताच तत्काळ ट्रेनला पाटस रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आले. रेल्वे प्रशासनाने वेळीच खबरदारी घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. पुढील तपास रेल्वे विभागाकडून सुरू आहे.
0
0
Report

नवी मुंबई में मुख्य जललाइन पर काम, 24 घंटे पानी आपूर्ति बंद

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 24 तास पाणीपुरवठा राहणार बंद. मुख्य जलवाहिनीवरील अत्यावश्यक कामे, व्हॉल्व बसविणे, जलवाहिनी जोडणी तसेच पावसाळापूर्व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 24 तास पाणीपुरवठा राहणार बंद. बुधवारी सकाळी 10 ते गुरुवार सकाळी 10 वाजेपर्यंत पाणी पुरवठा राहणार बंद. बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, खारघर आणि कामोठे विभागात पाणी पुरवठा राहणार बंद. गुरुवारी सायंकाळी कमी दबाने होणार पाणी पुरवठा. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन.
0
0
Report

नाणार बॉक्साइट: जनसुनावणी टली, सत्ता-विरोधी के आरोप बरकरार

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी कोकणचा 'बॉक्साईट' ब्लास्ट!.. नाणारमध्ये जनसुनावणी स्थगित,पण ठिणगी कायम.. राऊत-सामंत आमनेसामने!.. अँकर इंट्रो.. रत्नागिरीच्या तांबड्या मातीत सध्या प्रकल्पांच्या विरोधाचा धूर निघतोय. राजापूरच्या नाणारमधील प्रस्तावित बॉक्साईट प्रकल्पावरून आता सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आलेत. स्थानिकांचा तीव्र विरोध पाहता पालकमंत्र्यांनी जनसुनावणी स्थगित केली, पण विनायक राऊतांनी याला 'सरकारची चाल' म्हटलंय. नेमकं नाणारमध्ये काय घडतंय? पाहुयात या विशेष रिपोर्टमधून... कोकणचा निसर्ग,हापीसच्या बागा आणि इथली शांतता... पण याच शांततेत आता आंदोलनाचा एल्गार घुमतोय. राजापूरच्या नाणार परिसरात प्रस्तावित बॉक्साईट प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी शड्डू ठोकलाय. 20 आणि 28 मे रोजी होणारी जनसुनावणी प्रशासनाने रद्द केली आहे. या निर्णयाची माहिती खुद्द पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली,पर ही स्थगिती वादावर पडदा टाकेल की वादाची नवी ठिणगी टाकेल, हाच मोठा प्रश्न आहे. उदय सामंत, पालकमंत्री पालकमंत्र्यांनी नरमाईची भूमिका घेतली असली, तरी ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी याला सरकारचा 'वेळकाढूपणा' म्हटलंय. सुनावणी केवळ पुढे ढकलली आहे, कॅन्सल केलेली नाही, असा दावा करत त्यांनी कोकणी माणसाला सावध राहण्याचं आवाहन केलंय. विनायक राऊत, माजी खासदार प्रमोद जठार, माजी आमदार यांनीही या प्रकल्पाला विरोध करत घरचा आहेर दिला आहे. रिफायनरीला पाठिंबा देणारे जठार बॉक्साईट प्रकल्पाच्या बाबतीत मात्र आक्रमक झाले आहेत. प्रमोद जठार, माजी आमदार या सगळ्या राजकीय कलगीतुऱ्यात सर्वात महत्त्वाचा आवाज आहे तो इथल्या भूमिपुत्रांचा. नाणार आणि परिसरातील ग्रामस्थांनी या प्रकल्पाविरोधात आरपारची लढाई लढण्याची तयारी केली आहे. स्थानिक ग्रामस्थ
0
0
Report
Advertisement

वाशीम में बिना रिफ्लेक्टर के वाहनों पर आरटीओ का विशेष अभियान; 104 वाहन दण्डित

Washim, Maharashtra:राशिम जिल्ह्यात रिफ्लेक्टरविना धावणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढल्याने आरटीओ विभागाने विशेष मोहीम सुरू केली आहे. मागील три महिन्यांत रिफ्लेक्टर नसलेल्या १०४ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ट्रक, ट्रॅक्टर-ट्रॉली, डंपर, बस आदी वाहनांना रिफ्लेक्टर बसविणे बंधनकारक असतानाही अनेक वाहनधारक नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत. रात्रीच्या वेळी रिफ्लेक्टर नसल्याने मागून येणाऱ्या वाहनचालकांना वाहन दिसत नसल्यामुळे अपघाताचा धोका वाढत असल्याचे आरटीओने स्पष्ट केले आहे. वाहनधारकांनी सुरक्षेच्या दृष्टीने रिफ्लेक्टर बसवावेत,असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
0
0
Report

वाशिम के किसानों को सौर कृषि पंप योजना की देरी से झकझोर, आंदोलन चेतावनी

Washim, Maharashtra:वाशीम: अँकर: राज्य शासनाच्या मागेल त्याला सौर कृषीपंप योजनें अंतर्गत व washim च्या रिसोड तालुक्यातील वाकद, सवד, घोटा, चिखली, व्याड, कवठा, गोभणी, भर जहाँगीर यांसह अनेक गावांतील शेकडो शेतकऱ्यांनी अर्ज करून आवश्यक शुल्क भरले आहे. मात्र, अर्ज मंजूर होऊन सहा महिने उलटूनही अनेक शेतकऱ्यांना अद्याप सौर कृषीपंपाची जोडणी मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित कंपनीकडून ठोस प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. पुढील हंगाम तोंडावर असताना सौर पंप जोडणी रखडल्याने पिकांच्या नियोजनावर परिणाम होत असल्याचेही शेतकरी सांगत आहेत. प्रलंबित जोडण्या तातडीने द्याव्यात अन्यथा पुढील 15 दिवसांत आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
0
0
Report

पनवेल के ओवे कैंप गांव में पानी की भीषण टंकी, हर घर में 5–10 ड्रम

Navi Mumbai, Maharashtra:पनवेल मनपा क्षेत्रातील ओवे कॅम्प गावात पाण्याची भीषण टंचाई, प्रत्येक घरासमोर 10 10 ड्रम. पहा विशेष रिपोर्ट. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर येथे असणारे ओवे कॅम्प गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालेय. प्रत्येक घरासमोर 5 ते 10 ड्रम आणि पाण्याच्या प्रतीक्षेत असलेले ग्रामस्थ अशी गंभीर परिस्थिती पहायला मिळत आहे. नवी मुंबई आंतरष्ट्रिय विमानतळाला लागून असलेल्या पनवेल महानगरपालिकेत पाण्याची अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण झालेय. आठवड्यातून एकदा येणारा टँकर आणि नळातून अवघ्या काही मिनिटांसाठी येणारे पाणी साठविण्यासाठी नागरिकांनी चक्क 10 10 ड्रम विकत घेतले आहेत. प्रत्येक घरासमोर हे ड्रम लागलेले पहायला मिळत असून पनवेल महानगरपालिका आणि सिडको दोघांनीही दुर्लक्ष केल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. स्मार्ट सिटी म्हणून उदयास येत असताना पाणी टंचाईची भीषणता अधिक गडद होतं असून आम्हाला रोज पाणी पुरवठा करावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. ओवे कॅम्प गावातील पाण्याची भीषणता दाखवत या गावातील ग्रामस्थ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी.
0
0
Report
Advertisement
Advertisement

Kalamb Police Raid: 2 Officers Caught Bribing 36,000 in ACB Bust

Dharashiv, Maharashtra:कळंब पोलिस ठाण्यात एसीबीची धडक कारवाई; ३६ हजारांची लाच घेताना दोन पोलिस एसीबीच्या जाळ्यात दोन पोलिस अंमलदारांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (एसीबी) मोठी कारवाई या प्रकरणी अशोक दादाराव करवर याला ताब्यात घेण्यात आले असून दुसरा आरोपी सिद्धेश्वर प्रकाश शिंदे फरार तक्रारदाराचा रिलॅक्स स्पा सेंटरचा व्यवसाय सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आरोपी पोलिस अंमलदारांनी हप्त्याच्या स्वरूपात ४० हजार रुपयांची केली होती मागणी पोलिस निरीक्षकांसाठी २० हजार रुपये आणि दुय्यम अधिकाऱ्यासाठी २० हजार रुपये अशी झाली मागणी पडताळणीनंतर दोन्ही आरोपींनी पंचासमक्ष ३६ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न तक्रारदाराकडून ३६ हजार रुपये स्वीकारताना अशोक करवर याला रंगेहात पकडले. कारवाईदरम्यान आरोपीकडून ३६ हजार रुपयांची लाचेची रक्कम, ३५० रुपये रोख, एक मोबाईल, कार व मोटारसायकलच्या चाव्या जप्त दोन्ही आरोपींच्या घरझडतीची प्रक्रिया सुरू असून या प्रकरणी कळंब पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल
0
0
Report

आंबेगांव नागापूर में भक्ष के पीछे बिबट्या कुएं में गिरा; मंचर वन विभाग की रेस्क्यू टीम ने सुरक्षित बाहर निकाला

Ambegaon, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्यात मानव आणि बिबट संघर्षाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. आंबेगाव नागापूर येथे भक्षाचा पाठलाग करताना एक बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली. शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने वन विभागाला माहिती दिली. त्यानंतर मंचर वनपरिक्षेत्राच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेत बिबट्याला सुखरूप बाहेर काढले. बचाव करण्यात आलेल्या बिबट्याला पुढील उपचार आणि निरीक्षणासाठी माणिकडोह बिबट निवारण केंद्रात हलविण्यात आले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top