445001
शेतकरी न्याय यात्रेतून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाची पोलखोल करणार, आशिष खुलसंगे
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची शेतकरी न्याय यात्रा शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत आहे. शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने आणि अतिपावसामुळे नापिकीचे संकट उभे राहिले आहे. कोळसा खाणीमुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. पीक विमा मिळवण्यात अडचणी आहेत आणि पांदण रस्ते योजना रखडली आहे. सरकार 'लाडकी बहिण' योजनेचा प्रचार करत असताना, शेतकऱ्यांना दुसऱ्या हाताने लुटून उध्वस्त करत असल्याचा आरोप आशिष खुलसंगे यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
स्मार्ट सिटी मिशन की अवधि पूरी, 1 मई 2026 से परियोजनाएं महापालिका के हवाले
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:केंद्र पुरस्कृत 'स्मार्ट सिटी मिशन'ची मुदत ३० एप्रिल रोजी संपल्यानंतर या अंतर्गत राबवलेले सर्व प्रकल्प १ मे २०२६ पासून अधिकृतपणे महापालिकेच्या ताब्यात आले आहेत. नगरविकास विभागाच्या आदेशानुसार, महापालिका आयुक्त यांनी या प्रकल्पांच्या संचालन आणि देखभालीसाठी ३० अधिकाऱ्यांची नियुक्ती करून जबाबदाऱ्यांचे वाटप केले आहे. आयुक्तांनी स्पष्ट केले आहे की, संबंधित अधिकाऱ्यांनी स्मार्ट सिटी कार्यालयाकडून सर्व प्रकल्पांच्या संचिका, अभिलेखे आणि साहित्याचे हस्तांतरण तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करावा. या हस्तांतरणामुळे आता शहर बससेवेपासून ते आयटी प्रकल्पांपर्यंतच्या सर्व तक्रारी आणि नियोजनासाठी महापालिका प्रशासन थेट जबाबदार असेल.0
0
Report
सोलापुर महामार्ग विकास पर भाजप- कांग्रेस पोस्टर वार, 742 करोड़ निधि मंजूर
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातील महामार्गाच्या विकास कामावरून भाजप - काँग्रेसमध्ये पोस्टर वॉरला सुरुवात - सोलापूर जिल्ह्यात मोहोळ ते वळसंग या महामार्गाच्या विकास कामावरून भाजप आणि काँग्रेसची श्रेयवादाची लढाई - काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे आणि भाजप आ.सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडून पोस्टर वार - केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोहोळ ते वळसंग या महामार्गाच्या विकास कामासाठी तब्बल 742 कोटी रुपयांचा निधी केला मंजूर. - काँग्रेस खा. प्रणिती शिंदे आणि अक्कलकोटचे भाजप आ.सचिन कल्याणशेट्टी यांच्यात हा राजकीय श्रेयवाद रंगतोय - मोहोळ ते वळसंग या महामार्गाच्या सुमारे 82 किलोमीटर साठी 742 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे पोस्टर भाजप आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून व्हायरल करून श्रेय घेण्याचा प्रयत्न - खा.प्रणिती शिंदे यांच्याकडून काम बोलते म्हणत पोस्टर तर आ.सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडून सोलापूरच्या विकासाला नवेपंख म्हणत पोस्टर केलं व्हायरल..0
0
Report
छत्रपति संभाजी नगर के मालमत्ता करदाताओं के लिए 10% छूट 31 मई तक बढ़ी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर के मालमत्ता करदाताओं के लिए दिलासादायक बातमी, सामान्य करात मिलणारी १०% सवलत आता ३१ मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. एप्रილ महिन्यात या योजनेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि नागरिकांची मागणी लक्षात घेऊन महापौर समीर राजूरकर यांनी मुदतवाढीच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आयुक्तनी यावर शिक्कामोर्तब केले है. एप्रिलमध्ये ३१ हजार मालमत्ताधारकांनी सवलतीचा लाभघेत २९ कोटी ४० लाख रुपयांचा कर भरणा केला है.0
0
Report
Advertisement
यवतमाळ के कार्यक्रम में तूफानी हवा ने सत्कार रोका, भूषण गवई का कार्यक्रम जारी
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आयोजित कार्यक्रमात वादळाने व्यत्यय आणला. कार्यक्रम सुरू असताना अचानक सोसाट्याचा वारा सुरू झाला. लोकप्रतिनिधी न्यायाधीश व विधीज्ञ उपस्थित असलेल्या मंचाच्या दिशेने वारे वाहत असल्याने कार्यक्रम मध्येच थांबवावा लागला. त्यानंतर काही वेळाने शेजारच्या सभागृहात नियोजित कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी सरन्यायाधीश भूषण गवई, पालकमंत्री संजय राठोड, माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला. तत्पूर्वी माजी मंत्री स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.0
0
Report
रायगर्ड जिले के पशुपालकों के लिए तालुकास्तरीय हेल्पलाइन जारी, तुरंत मदद संभव
Chendhare, Maharashtra:अँकर - रायगड जिल्ह्यातील पशु पालकांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे तालुका स्तरीय हेल्प लाईन नंबर जारी करण्यात आले आहेत. पशुधनाबाबत कुठलीही समस्या निर्माण झाली किंवा आजारी पडले तर या क्रमांकावर मदत मागता येईल. हे नंबर सार्वजनिक करून गावागावात पोहोचवा अशा सूचना सभापती वैकुंठन पाटील यांनी दिल्यात. पशुधन दगावल्यास दिल्या जाणाऱ्या मदतीत वाढ करण्याचं विचार सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलं.0
0
Report
सोलापुर की नई जिंदगी प्लास्टिक फैक्ट्री में आग, माल जला, कोई हताहत नहीं
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातील नई जिंदगी भागातील प्लास्टिक कारखान्याला लागली आग सोलापुरातील नई जिंदगी भागातील प्लास्टिक कारखान्याला लागली आग पहाटेच्या सुमाराला लागलेल्या आगीत कारखान्यातील सर्व माल जळून झाला खाक सोलापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी पहाटेपासूनच आग विझावण्यासाठी केले शर्थीचे प्रयत्न या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसून कारखाना मालकाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. सध्या आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आल्याचं चित्र दिसून येत आहे.0
0
Report
Advertisement
उपमहापौर धनंजय जाधव के प्रयास से एक लाख वृक्षारोपण शुरू
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या पुढाकाराने शहरात एक लाख वृक्षारोपण करण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री राधाकृष्ण विठे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. उपमहापौर धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून शहरात एक लाख वृक्ष लागवडीचा निर्धार करण्यात आला आहे...राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी या मोहिमेच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक भागांमध्ये वृक्ष लागवड करण्यात येणार आहे आणि वृक्षाचे संरक्षण आणि संगोपन देखील केल जाणार आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागरिकांना आणि वेगवेगळ्या संघटनांना सोबत घेऊन आगामी वर्षभर काम करणार असल्याचं धनंजय जाधव यांनी म्हटलं आहे0
0
Report
बिनटिकिट यात्राओं पर रेलवे का ऐतिहासिक दंड: एक महीने में 12 करोड़ 23 लाख
Nashik, Maharashtra:फुकट्या प्रवासांकडून तब्बल 12 कोटी 23 लाख रुपयांचा दंड वसूल रेल्वेने विनातिकीट आणि अनधिकृत प्रवास करणाऱ्यांविरुद्ध पुकारलेल्या मोहिमेत भुसावळ विभागाने एप्रिल २०२६ मध्ये ऐतिहासिक कामगिरी केलीये... विभागाने एकाच महिन्यात १ लाख ९ हजार प्रकरणांमध्ये कारवाई करत तब्बल १२ कोटी २३ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. तिकीट तपासणीच्या इतिहासातील हा एक नवा विक्रम मानला जातोय..विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली.पथकाने विविध गाड्यांमध्ये अचानक तपासणी केली...विनातिकीट प्रवासाबाबत मध्य रेल्वेने 'शून्य-सहिष्णुता' धोरण अवलंबले आहे. प्रवाशांनी दंड आणि कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी नेहमी वैध तिकीट खरेदी करूनच सन्मानाने प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. यापुढेही अशा धडक मोहिमा सुरूच राहतील, असा इशाराही विभागाकडून देण्यात आलाय..0
0
Report
रणजितसिंह नाईक निंबाळकर ने किसानों से मुलाकात में पानी समस्या पर स्पष्ट निर्देश दिए
Pandharpur, Maharashtra:माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे मतदार संघात सक्रिय झाले आहेत. सांगोला तालुक्यात टेंभू म्हैसाळ पाणी योजनेच्या संदर्भातील प्रश्नावर त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. जनतेच्या प्रश्नावर विलंब सहन केला जाणार नाही असा इशारा अधिकाऱ्यांना दिलेला आहे सांगोल्याच्या पाणी प्रश्नावर दिलासा देत मान नदीत चार मे पासून पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय sुद्धा या बैठकीमध्ये घेण्यात आला0
0
Report
Advertisement
पानकनेरगांव में महिलाओं ने शराबबंदी के लिए ग्रामसभा कर एकमुखी प्रस्ताव मंजूर किया
Hingoli, Maharashtra:हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव गावात दारूबंदीसाठी महिला एकवटल्या आहेत, अनेक वेळा दारूबंदी करण्याची मागणी करूनही पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने दारूबंदी महिलांनी एल्गार पुकारला आहे. पानकनेरगाव गावात अवैध दारूमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. गावात दारूबंदीसाठी महिलांनी एकत्र येत ग्रामसभा घेत दारूबंदीचा एकमुखी ठराव मंजूर केला आहे. यावेळी दारूबंदी विरोधात महिलांनी संताप व्यक्त करत गावात अवैध दारू विक्री पूर्णपणे बंद करण्याची मागणी केली आहे. पानकनेरगाव गावात दारूबंदी नाही झाली तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देखील महिलांनी दिला आहे.0
0
Report
धाराशिव के कलंब में महावितरण सबस्टेशन पर भीषण आग, बिजली सप्लाई बाधित
Dharashiv, Maharashtra:धाराशिवच्या मधील कळंब येथील महावितरणच्या सबस्टेशनला लागलेली भिषण आग पुन्हा भडकली दुपारी चार वाजलेपासून आगीचा भडका सबस्टेशन मध्ये आगीचे लोळ कळंब शहरासह ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा खंडित उन्हामुळे तापमानात वाढ झाल्याने आग लागल्याची माहिती विजेचा अतिरिक्त लोड आणि वाढतं तापमान यामुळे आग भडकली वाढत्या तापमानामुळे ट्रांसफार्मर मधील ऑइल गरम झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती मोठ्या प्रमाणात आगीचा भडका, अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू0
0
Report
नागपूर के भिवापुर में धामणगाव विद्यामंदिर में भीषण आग, कई घर जल गए
Nagpur, Maharashtra:नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील धामणगाव विद्यामंदिर येथे भीषण आग... अनेक घरे जळाली.. अग्निशमन दलाचे दलाचे दोन बंब घटनास्थळी.... गावातील लोकांचे अतोनात नुकसान.. संध्याकाळी साडे सातच्या सुमारास लागली आग0
0
Report
Advertisement
गोदरेज फॉरेस्ट इस्टेट: नागपुर में एक दिन में 500+ भूखंड हस्तांतरण, शुभ आरंभ
Nagpur, Maharashtra:देशातील नामांकित रिअल इस्टेट कंपनी म्हणून ओळखल्या जाणा-या गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने नागपूरच्या रिअल इस्टेट क्षेत्रात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. कंपनीच्या ‘फॉरेस्ट इस्टेट’ या प्रीमियम प्लॉटेड प्रकल्पातील ५००हून अधिक भूखंडांचे एकाच दिवसात यशस्वीरित्या हस्तांतरण करण्यात आले. हा ऐतिहासिक टप्पा शुभ आरंभ या गोदरेजच्या ‘शुभ आरंभ’ या विशेष कार्यक्रमांतर्गत पूर्ण करण्यात आला. नागपूर येथे पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शेकडो कुटुंणांच्या आपल्या हक्काच्या जमिनीचे स्वप्न साकार झाले आहे. शुभ आरंभ या उपक्रमाची संकल्पना ग्राहकांना त्यांच्या भूखंडाचा ताबा देण्याच्या औपचारिकतेच्याही पलीकडे आहे. या प्रकल्पात ग्राहकांना त्यांच्या हक्काच्या मालकी घरात वास्तव्य करताना आवश्यक गोष्टी मिळतील, याची काळजी घेण्यात आली आहे. ग्राहकांना नवा आणि अर्थपूर्ण अध्याय साजरा करताना सांस्कृतिक अनुभव मिळावा, याकरिता कंपनीने कसोशीने प्रयत्न केले आहे. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात झालेले भूखंड हस्तांतरण गोदरेज प्रॉपर्टीजचे विदर्भ क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. ग्राहकांचा कल मजबूत आणि पायाभूत सुविधा तसेच दीर्घकालीन राहणीमानाचा दर्जा देणा-या नियोजित आणि आलिशान वसाहतींकडे वाढत असल्याचे, यानिमित्ताने स्पष्ट होते. समृद्धी महामार्गाजवळील मोकळ्या जागेत ‘फॉरेस्ट इस्टेट’ हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकल्पाला मुंबई-नागपूर महामार्गाची जोड मिळते. जवळच रोजगार आणि आयटीचे प्रमुख केंद्र असलेले मिहान सेझही उपलब्ध आहे. या प्रकल्पावरुन मुंबई-कोलकाता महामार्ग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहजतेने पोहोचता येते. प्रकल्पाजवळच सामाजित पायाभूत सुविधाही सुलभतेने उपलब्ध होतात. आरोग्य, शिक्षण, रिटेल आणि मनोरंजनाची सर्व साधने जवळच उपलब्ध आहेत. साधारणतः २२ लाख चौरस फूट इतके विक्रीयोग्य क्षेत्रफळ असलेला हा गृहनिर्माण प्रकल्प निवासी भूखंडांनी व्यापलेला असून, हा प्रकल्प आधुनिक आणि सोयीस्कर जीवनशैलीचा उत्तम पर्याय ठरतो. सुमारे ११1 एकरच्या विस्तीर्ण परिसरात वसलेल्या ‘फॉरेस्ट इस्टेट’ या प्रकल्पाचे नियोजन निसर्गाभिमुख जीवन, आधुनिक जीवनशैली आणि मोकळ्या जागा या तीन प्रमुख सूत्रांवर आधारित आहे. या प्रकल्पात ४.७५ एकर क्षेत्रावर मियावाकी जंगल उभारण्यात आले आहे. तब्बल ७0 हजारांहून अधिक देशी रोपांची लागवड केल्याने हे जंगल ‘फॉरेस्ट इस्टेट’ प्रकल्पाचे खास वैशिष्टय ठरले आहे. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी बोर्डवॉक, कॅम्पफायर सीटिंग आणि एलिव्हेटेड डायनिंग डेक यांसारख्या खास सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. संपूर्ण वसाहतीत १३.७ एकरची हिरवळ, रानफुलांची कुरणे, औषधी वनस्परींच्या बागा आणि जैवविविधतेला प्रोत्साहन देणारी पर्यावरणीय लागवडही करण्यात आली असून, रहिवाशांना निसर्गाच्या कुशील एक आगळावेगळा अनुभव मिळणार आहे. विविध सोयीसुविधांनी सुसज्ज असलेल्या या क्षेत्रात २५ हजार आणि १० हजार चौरस फूट क्षेत्रात दोन भव्य क्लब हाऊसही आहेत. रहिवाश्यांना या क्लब हाऊसमध्ये जलतरण तलाव, क्रीडा मैदाने, पाण्याचे कारंजे तसेच मनोरंजन क्षेत्र यांसह ३५ हून अधिक अत्याधुनिक सोयीसुविधांचा लाभ घेता येईल. रहिवाशांचे आरोग्य आणि सामाजिक परस्परसंवाद वाढवण्याच्या उद्देशाने या सुविधांची उभारणी करण्यात आली आहे.0
0
Report
कल्याण बाजार में चार युवकों ने बाइक चोरी की योजना बनाई, पुलिस ने गिरफ्तार किया
Kalyan, Maharashtra:कल्याण बाजारपेठ पोलिसांनी केली चार तरुणांना अटक. त्यांच्याकडून सात गाड्या जप्त केल्या आहेत. कल्याण शहरातील बाजारपेठ, महात्मा फुले, आणि खडकपाडा या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सात गाड्या पोलिसांनी हस्तगत केल्या. समर्थ पाटील, हर्ष परदेशी, प्रणित शितप आणि सागर ढवळे हे १८ ते २१ वर्षे वयोगटातील आरोपी दुचाकी चोरत होते. सर्व आरोपी कल्याण पश्चिमेला राहणारे आहेत. बाजारपेठ पोलिसांनी गाडी चोरतांना एका तरुणाला ताब्यात घेतलं, त्यावेळी त्याच्या चौकशी दरम्यान इतर आरोपी यामध्ये सहभागी असल्याचं समोर आलं.0
0
Report
पुलिस के देवदूत बनकर जालना बस में 40 यात्रियों की जान बचाई
Buldhana, Maharashtra:मोठी बातमी समृद्धीवर पोलिसांचा देवदूत अवतार; पेटत्या बसमधून ४० प्रवाशांचे वाचवले प्राण! समृद्धि महामार्गावर आज काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली, जिथे जालना पोलिसांनी देवदूत बनून ४० प्रवाशांचे प्राण वाचवले! मेहकरजवळ धावत्या ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतला. मागून येणाऱ्या पोलीस पथकाने प्रसंगावधान राखत सायरन वाजवून बस थांबवली आणि प्रवाशांना तातडीने बाहेर काढले. पण खरा थरार तेव्हा घडला, जेव्हा समजले की एक १० वर्षांचा मुलगा आत झोपलेला आहे. आगीच्या ज्वाळा धगधगत असतानाही, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता DYSP कैलास पुसाम, पोलीस नाईक शरद सावळे आणि शिपाई प्रल्हाद टेकाळे यांनी पेटत्या बसमध्ये उडी घेतली आणि त्या मुलाला मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढले. खाकी वर्दीतल्या या अचाट धाडसामुळे आज मोठा अनर्थ टळला असून, या शूरवीरांचे संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक होत आहे.0
0
Report
Advertisement
