icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

शिरूर पुलिस स्टेशन के टाकळी हाजी चौकी में हफ्ते वसूल स्टिंग वायरल: महकमे में हड़कंप

Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी पोलीस चौकीत हप्ते वसुली होत असल्याचा आरोप केला जात असल्याचाच धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय,एका युवकाने केलेल्या स्टिंग ऑपरेशन मधून ही धक्कादायक बाब समोर आलीय, शिरूर पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या टाकळी हाजी पोलीस चौकीतील हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडिओमुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात खळबळ उडालीय... धक्कादायक बाब म्हणजे टाकळी हाजी परिसरातील अवैध धंदेवाल्यांकडून पोलीस अधिकाऱ्यांकडून सर्रासपणे हप्ते वसुली केली जात असल्याची तक्रार ही ग्रामस्थांनी वारंवार वरिष्ठांकडे पत्राद्वारे केलीय.
0
0
Report
Advertisement

गणपतीपुळे में हाउसफुल भीड़, कोकण के समुद्र किनारे पर्यटकों ने जमकर आनंद

Ratnagiri, Maharashtra:गणपतीपुळे-रत्नागिरी गणपतीपुळे पर्यटकांनी हाउसफुल. अँकर आज अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त गणपतीपुळे भाविकांची गर्दी.. श्रींच्या दर्शनानंतर भाविकांनी समुद्र स्नानाचा आनंद घेतला.. समुद्रकिनारा पर्यटकांनी हाउसफुल.. शाळेला पडलेल्या सुट्ट्यांमुळे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून पर्यटक कोकणच्या समुद्र किनाऱ्याचा मनमुराद आनंद लुटताना.. यावर्षी खास विशेष म्हणजे बाहेरून आलेल्या पर्यटकांनी आय लव माय कोकण चे टी-शर्ट्स घालून जल क्रीडा चा आनंद घेतला या समुद्रकिनाऱ्यावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी..
0
0
Report

रायगढ़ के कर्जतमध्ये राजनैतिक समीकरण बदलेगा; तटकरे-थोरवे साथ आएंगे?

Chendhare, Maharashtra:रायगढ़ के कर्जतमध्ये बड़ी राजनैतिक घडामोड .........तटकरे थोरवे एकत्र येण्याचे संकेत .......... कर्जतमधील राजनैतिक समीकरणे बदलेणार ? ....... अँकर - रायगडच्या कर्जतमध्ये राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी आणि शिंदे गटातील शिवसेना यांच्यात सुरू असलेला वाद आता मिटण्याच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळत आहेत. शिंदेसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी दिलेल्या सूचनांमुळे जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात तीव्र राजकीय संघर्ष सुरू होता. या संघर्षाचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही दिसून आला होता. मात्र आता हा वाद संपुष्टात येऊन दोन्ही नेते एकत्र काम करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत थोरवे यांनी दिले आहेत. त्यामुळे रायगडच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी काळात तटकरे आणि थोरवे प्रत्यक्षात एकत्र येतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे。
0
0
Report
Advertisement

महाराष्ट्र कृषि विभाग पावस स्थिति का आकलन, किसानों के लिए पानी प्रबंधान की योजना

Nagpur, Maharashtra:नागपूर.... On कृषी विभाग आढावा पावसाच्या परिस्थितीबाबत दर दहा वर्षांनी एक वर्ष पावसाचे प्रमाण कमी असते. मागील दशकात 2017 मध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यावर्षी जिल्ह्यातील धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. सरासरी पावसाच्या तुलनेत जर पाऊस कमी पडला, तरीही आपण परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. पावसामध्ये जास्त अंतर पडल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करणे आणि शेतकऱ्यांना अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. कोणतीही परिस्थिती उद्भवली तरी प्रशासनाने सज्ज राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी करावी, त्यांचे फोटो अपलोड करून जिओ-ट्रॅकिंग करावे, जेणेकरून सर्व अधिकारी प्रत्यक्ष क्षेत्रात कार्यरत असल्याचे दिसेल. क्रॉप डायव्हर्सिटीच्या संदर्भात “महाराष्ट्र 2047” कृषी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला आहे. ज्या भागात पाणी उपलब्ध आहे, तिथे योग्य पाणी व्यवस्थापन केले जाईल. आदिवासी शेतकऱ्यांना बोरवेल उपलब्ध करून देण्यावरही विचार सुरू आहे. कृषी विभागाच्या सर्व योजनांचा आढावा घेऊन योग्य नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रासायनिक खतांची मागणी वाढलेली आहे. मागील वर्षी देखील खतांची मोठ्या प्रमाणात उचल झाली होती. खत विक्रीसाठी अनावश्यक परवाने देऊ नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोणत्याही परिस्थितींक chemical खतांचा तुटवडा होऊ नये, यासाठी प्रशासनाला स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. On दिवाळीपूर्वी मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत एकनाथ शिंदे हे आमचे सर्वोच्च नेते आहेत. ते योग्य त्या गुणवत्तेच्या आधारे निर्णय घेतील, हा त्यांचा अधिकार आहे. या संदर्भात त्यांनी अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. त्यांचा निर्णय अंतिम असेल. On कॅबिनेट संदर्भातील शब्द कॅबिनेटबाबत कोणताही शब्द देण्यात आलेला नव्हता. हा निर्णय पक्षाच्या नेतृत्वावर अवलंबून असतो. On संजय राऊत त्यांच्या विचारांमध्ये मोठा बदल झालेला दिसतो. त्यांच्यासाठी फक्त एकच सांगायचे आहे कसं होतास तू काय झालास तू काँग्रेसच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्या वैचारिक भूमिकेत बदल झाला आहे, असे मत व्यक्त करण्यात आले. त्यांच्या भूमिकेमुळे उभाठा पक्षाला मोठा परिणाम होऊ शकतो On बच्चू कडू प्रत्येक राजकीय पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते की त्यांचा नेता सर्वोच्च पदावर जावा. पूर्वी विदर्भाकडे दुर्लक्ष झाले होते, मात्र आता एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वात विदर्भाकडे विशेष लक्ष दिले जात आहे. तसेच, केंद्रात प्रतापराव जाधव यांना मंत्रीपद देण्यात आले आहे. On बंगाल निवडणूक हा विजय अत्यंत मोठा आणि अभूतपूर्व आहे. हिंदुत्ववादी विचारसरणी आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या धोरणाला जनतेचा पाठिंबा मिळाल्याचे या विजयातून दिसून येते. On पालघर अत्याचार प्रकरन अजूनही पुरोगामी महाराष्ट्रात अशा दुर्दैवी घटना अजूनही घडत आहेत, ही गंभीर बाब आहे. कायदे अधिक कठोर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा प्रकरणांमध्ये जलदगतीने कारवाई होऊन लवकरात लवकर निकाल लागणे आवश्यक आहे. एखादा गुन्हा घडल्यास दोन महिन्यांच्या आत निकाल लागावा किंवा एका महिन्यात चार्जशीट दाखल व्हावी, . करण्याची गरज आहे. अधिक प्रभावी कायदे करण्याची गरज आहे
0
0
Report
Advertisement

भारत की पहली डिजिटल जनगणना: नागरिक स्व-गणना पर मंत्री भुसे का आग्रह

Nashik, Maharashtra:नाशिक ( मालेगाव ) विशाल मोरे - मंत्री दादा भुसे यांनी परिवारासह स्व-गणना करत राष्ट्र हिताचे कामात सक्रिय योगदान द्यावे.... - शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले आवाहन. Anc: केंद्र शासनाने भारताची १६वी जनगणना, २०२७ चा कार्यक्रम जाहीर केला असून यावेळी होणारी जनगणना ही भारत शासनाची पहिली डिजीटल जनगणना असणार आहे. ज्यात दोन मुख्य टप्पे आहेत. पहिला टप्पा घरयादी व घरगणना हा असणार आहे. १) स्व गणना:- दि.०१ मे, २०२६ पासुन दि.१५ मे, २०२६ या कालावधीत म. शासनाने नागरिकांना स्वगणना करणेसाठी सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. ज्यात नागरिकांनी आपली व आपल्या कुटुंबाची माहिती म. शासनाचे संकेतस्थळ se.census.gov.in वर स्वतः प्रविष्ट करावयाची आहे. यात आपणास आपले कुटुंबातील कोणताही एक मोबाईल क्रमांक वापरुन OTP व्दारे लॉगईन करता येईल. आवश्यक माहिती प्रविष्ट करुन तुमच्या घराचे स्थान डिजिटल नकाशावर चिन्हांकित करावयाचे आहे आणि त्यानंतर कुटुंबाशी संबंधत माहिती प्रविष्ट करावयाची आहे. सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट करावे. त्यानंतर आपणास १२ आकडी SE ID मिळेल. सदर SE ID जपुन ठेवावा आणि ज्यावेळी मनपाचे नियुक्त प्रगणक माहितीची पडताळणी करणेसाठी भेट देतील त्यावेळी SE ID त्यांस द्यावा. यावेळी मंत्री दादाजी भुसे यांनी स्वतः देखील स्व गणना करून आपले राष्ट्रीय कार्य पूर्ण केले. स्वगणना केली नसेल तरीही मनपाचे नियुक्त प्रगणक आपले घरी येऊन जनगणनेची प्रक्रिया पुर्ण करतील याची नोंद घ्यावी. जनगणना हे राष्ट्रीय कर्तव्य असुन यात प्रत्येक नागरिकाने सहभाग नोंदवुन आपली जबाबदारी पार पाडावी.
0
0
Report

कटेपूर्णा अभयारण्य में टैंकर से जलसंकट दूर, कृत्रिम पानवठे बनाए गए

Washim, Maharashtra:कटेपूर्णा अभयारण्य मध्ये वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने वन्यजीवांसाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. कडक उन्हाळ्यामुळे नैसर्गिक पाणवठे आटण्याची शक्यता निर्माण झाल्याने अभयारण्यात टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा वाढवण्यात आला आहे. वन विभागाकडून विविध भागात शेकडो कृत्रिम पानवठे तयार करण्यात आले असून त्यामध्ये नियमितपणे पाणी भरले जात आहे. दर तीन ते चार दिवसांनी टँकरने पाणीपुरवठा करून कोणताही पाणवठा कोरडा पडू नये याची दक्षता घेतली जात आहे. दुर्गम भागातही प्रखर उन्हात पाणी मिळत असल्याने हरण, नीलगाय, रानडुक्कर यांसारख्या वन्यजीवांना याचा फायदा होत आहे.
0
0
Report

वसई के राजवाड़ी समुद्र तट पर दुर्लभ डॉल्फिन मृत पाई गई

Vasai-Virar, Maharashtra:वसईतील राजवाडी समुद्र किनाऱ्यावर आज दुर्मिळ जातीचा डॉल्फिन मासा मृत अवस्थेत आढळून आला आहे मिळालेल्या माहितीनुसार, भरतीच्या पाण्यामुळे हा डॉल्फिन किनाऱ्यावर वाहण्यात आला. आज दुपारच्या सुमारास किनाऱ्यावर फिरणाऱ्या गावकऱ्यांना हा मोठ्या आकाराचा मासा दिसून आला आणि त्यांनी तात्काळ याची माहिती स्थानिक प्रशासनाला दिली. या मृत डॉल्फिनची लांबी अंदाजे ८ ते १० फूट असून रुंदी सुमारे ३ फूट आहे. दरम्यान, बोटीचा धक्का लागल्यामुळे या डॉल्फिनचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, गावकऱ्यांच्या मदतीने या मृत डॉल्फिनला किनाऱ्यावरच पुरण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे सागरी जीवांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. संबंधित यंत्रणांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
0
0
Report
Advertisement

तुळजापुर में माता तुळजाभवानी के मंदिर में नगारा अर्पण उत्साह के साथ हुआ

Dharashiv, Maharashtra:तुळजापुरात नगारा अर्पण सोहळा उत्साहात; आई तुळजाभवानीच्या जयघोषाने परिसर दुमदुमला धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरमध्ये महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात नगारा अर्पण सोहळा उत्साहात पार पडला. तुळजाभवानी पक्षाळ मंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत “आई राजा उदो उदो” च्या जयघोषात नगारा मंदिरात आणण्यात आला. रात्री धूप आरतीच्या वेळी मुख्य महंत तुकोजी बुवा आणि पुजाऱ्यांच्या उपस्थितीत नगारा देवीला अर्पण करण्यात आला. परंपरेनुसार धूप आरतीदरम्यान नगारा वाजवण्याची परंपरा आजही कायम राखली जात आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top