icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

बाघ के हमले में गुराखी की मौत, नागभीड़ के गिरगांव जंगल में घटना

Chandrapur, Maharashtra:वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील तळोधी-बाळापूर वनक्षेत्रातील गिरगांव जंगलातली घटना, कळपात एक शेळी कमी आढळल्याने शेळी शोधण्याकरिता गेला होता जंगलात चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार झालाय. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील तळोधी -बाळापूर वनक्षेत्रातील गिरगांव जंगलात ही घटना उजेडात आली. आत्माराम दसरू बोरकर (52) असे मृत गुराख्याचे नाव आहे. शेळया चराई करीता तो गिरगांव जंगलात गेला होता. सर्व शेळया चराई करुन घराकडे परतल्या. मात्र कळपात एक शेळी कमी आढळल्याने गुराखी जंगलात गेला. तो परत न आल्यामुळे कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी जंगल परिसरात रात्रभर शोधाशोध केली. मात्र पत्ता लागला नाही. घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. वन विभाग व पोलिसांनी सकाळी शोधमोहीम राबविली. अखेर कक्ष क्र 535 मध्ये त्याचे शव आढळून आले.
0
0
Report

शिर्चूर रेलवे मार्ग परिवर्तन पर पूर्व सांसद पाटील ने मौजूदा सांसद कोल्हे पर हमला

Shirur, Maharashtra:Anc:शिरूर लोकसभा मतदारसंघातील रेल्वे आणि इतर विकासकामांवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेत विद्यमान खासदार डॉ अमोल कोल्हेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्याचा निर्णय अत्यंत धक्कादायक आणि निराशाजनक असून, हा आपल्या शिवजन्मभूमीवर अन्याय करणारा काळा दिवस आहे, अशी घणाघाती टीका आढळराव पाटील यांनी केली आहे. दरम्यान, पक्षांतर्गत घडामोडींवर बोलताना, खेड तालुक्याच्या माजी सभापतींवर जेव्हा तत्कालीन आमदारांकडून आणि उद्धव ठाकरेंकडून अन्याय झाला, तेव्हा आपण त्यांच्या पाठीशी उभे राहिलो. मात्र, पक्षाच्या वरिष्ठ নেতৃত্বाला हे रुचलं नाही आणि म्हणूनच माझी शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली, असा गौप्यस्फोटही आढळराव पाटील यांनी केला आहे. या सर्व घडामोडींनंतर आता शिरूर लोकसभा मतदारसंघात राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हं आहेत.
0
0
Report

सांगली के कैफे शॉप में नाबालिग से बलात्कार, शिवप्रतिष्ठान युवा हिन्दुस्तान ने की बड़ी धाड़

Sangli, Maharashtra:स्लग - कॅफे शॉपी मधील बलात्काराच्या घटनेनंतर शिवप्रतिष्ठान युवा आक्रमक, कॅफे शॉपवर टाकण्यात आल्या धाडी.. अँकर - सांगलीतील कॅफे शॉप मधील अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटनेनंतर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान आक्रमक झाली आहे.शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्यावतीने शहरातल्या कॅफे शॉपवर धाडी टाकून तपासणी करण्यात आली आहे. विश्रामबाग परिसरामध्ये मोठ्या संख्येने कॅफे शॉप चालू असतात,या कॅफे शॉप मध्ये अश्लील चाळे सुरू असल्याच्या तक्रारी युवा हिंदुस्तानकडून पोलीसांकडे करण्यात आली होती,मात्र तरी देखील कारवाई झाली नाही, एका कॅफे शॉप मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटनासमोर आल्यानंतर संतप्त झालेल्या शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान कडून पोलीस मुख्यालयाच्या आवारात असणाऱ्या कॅफेशॉपवर धाडी टाकल्या, यावेळी अनेक कॅफे शॉप बंद असल्याचे आढळून आले,दरम्यान शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या धाडीनंतर विश्रामबाग पोलीस देखील खडबडून जागे झाले. बाईट - नितीन चौगुले - अध्यक्ष ,शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान. बाईट - सुधीर भालेराव - पोलीस निरीक्षक - विश्रामबाग ,सांगली.
0
0
Report
Advertisement

पालखी से पहले देहू नगरपंचायत की अतिक्रमण विरोधी तीव्र मुहिम

Varsoli, Maharashtra:संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला अवघे काही दिवस शिल्लक असताना देहू नगरपंचायतीने अतिक्रमणांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. गेल्या महिनाभरापासून संबंधितांना लेखी नोटिसा तसेच रिक्षाद्वारे सूचना देण्यात येत होत्या. अनेकांनी स्वखुशीने अतिक्रमणे हटवली, मात्र सूचना देऊनही अतिक्रमण न काढणाऱ्यांवर आज प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. पालखी मार्ग और परिसर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी ही मोहीम आणखी दोन ते तीन दिवस अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याची माहिती देहू नगरपंचायतीने दिली आहे..
0
0
Report

शिवसेना के 60 साल: भरत गोगावले ने यादों को उजागर किया, मानगाव में एम्बुलेंस लोकार्पण

Chendhare, Maharashtra:शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनी भरत गोगावले भावूक. शिवसेनेच्या आठवणींना दिला उजाळा. माणगाव इथं रुग्णवाहिकेचे लोकार्पण. या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या जडणघडणीच्या आठवणींना उजाळा देत पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. बाळासाहेबांनी लावलेले छोटेसे रोपटे आज भव्य वटवृक्षात रूपांतरित झाले आहे, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनाच्या प्रवासाचे वर्णन केले. मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी माणगाव येथे आयोजित कार्यक्रमात युवा सेनेच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयाला रुग्णवाहिका भेट देण्यात आली. मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेच्या संघर्षमय वाटचालीतील अनेक आठवणींना उजाळा दिला. शिवसेना ही केवळ राजकीय संघटना नसून सामान्य माणसाच्या हक्कासाठी लढणारी चळवळ असल्याचेही त्यांनी नमूद केले.
0
0
Report
Advertisement

मंत्रि नितेश राणे का बयान: उद्धव-आदित्य पर तंज, शिवसेना-कांग्रेस गठबंधन पर निशाना

Oras Bk., Maharashtra:मंत्री नितेश राणे byte ऑन संजय राऊत ( तुडवा )--- ऑपरेशन टायगर नंतर आता तुडवा, जुडवा बुडवा, काही बोललात तरी ह्याला जबाबदार कोण ह्याचा विचार केला पाहिजे. *तृणमूल काँग्रेस मध्ये अभिषेक बॅनर्जी होता तसा उबाठाच्या अभिषेक बॅनर्जीला का प्रश्न विचारत नाही. कधीतरी आदित्य ठाकरेला ह्याबाबत विचारलं पाहिजे. तृणमूलचा अभिषेक बॅनर्जी आणि उबाठाचा आदित्य ठाकरे यांच्यात साम्य आहे. आता अभिषेक बॅनर्जी जसा हेल्मेट घालून फिरतो? एक हेल्मेट आदित्य ठाकरेला मी पाठवणार आहे. महाराष्ट्रात फिरताना चुकून अंडी आणि चपला आल्या तर हेल्मेट हवं ना.. पेंग्विन हेल्मेट मध्ये कसा दिसेल हा संशोधनाचा विषय आहे.* ऑन हीरक महोत्सव ----- उबाठाचा पक्ष काँग्रेस मध्ये विलीन होणार होता म्हणून उबाठाचे खासदार आमदार एकनाथ शिंदेकडे जात आहेत. *बाळासाहेबांच्या सगळ्या विचारांना तिलांजली देऊन उद्धव ठाकरे काँग्रेसमध्ये आपला पक्ष विलीन करणार होते. आदित्य ठाकरे यांना काँग्रेसच्या सरचिटणीस पदाचा प्रस्ताव आलेला होता. आता तुम्ही नेहरू आणि गांधींचे गोडवे गा. बाळासाहेबांचे का गाताय..* ऑन रोहित पवार ( खासदार किंमत ) --- आता हे महाविकास आघाडीवाले शेमड्या सारखे काही बोलतील. *मुळात महाराष्ट्र वर्जन ऑफ अभिषेक बॅनर्जी ला आवरलं पाहिजे होत. हे लोक काँग्रेस विचारधारा स्वीकारणारे आहेत जिहादला स्वीकारणारे आहेत हिंदुत्व विरोधी भूमिका घेणारे लोक आहेत हे जेव्हा हिंदुत्वाच्या विचारांवर तयार झालेले सगळे मूळ शिवसैनिकानी ओळखलं म्हणून ते गेले केव्हा तरी पैशाच्या पलीकडे विचार पण महत्वाचे असतात. हे रोहित पवारला कळणार नाही तो अजून लहान आहे.* ऑन संजय राऊत ( देवेंद्र फडणवीस टीका ( संरक्षण) ) --- *म्हणून उद्धव ठाकरेंनी लवकरात लवकर संरक्षण सोडावं. गद्दारांच्या संरक्षणासाठी पोलीस असतील तर उद्धव ठाकरेला कशाला संरक्षण द्यायचं.. महाराष्ट्राचा सर्वात मोठा गद्दार मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर बसतो.* ऑन शिंदेंच्या सेनेचा जन्म ( अमित शहा टीका ) ----- *संजय राऊतचा राजकीय जन्म कधी झाला हे कोणाला विचारायचं. की तो राजकीय लावारिस आहे. त्याला कचऱ्याच्या डब्यातून उचलला आहे काय. दुसऱ्यांवर आरोप करण्यापेक्षा चार बोट स्वतः कडे आहेत ते बघावं.. शिंदेंनी बाळासाहेबांच्या विचारासाठी हे उचलेले पाऊल आहे. तुझ्या राजकीय धर्मांतर त्याचं झालेले नाही.* ऑन संजय राऊत ( अमित शाह टीका ) --- राऊत काय आमच्या घरी सकाळी चहा घ्यायला येतात काय? आम्ही सकाळी कोणती जडीबुटी खातो काय करतो हे बघायला येतो का आता त्याला हाउसकीपिंगच काम राहिलंय ऑन आम्ही गिरगावकर ---- हिंदुरुदय सम्राट, हिंदुत्व आणि उद्धव ठाकरे यांचा काय संबंध आहे मला माहित नाही तो संबंध आता संपलेला आहे त्याचे रक्त आता हिरवं झालेलं आहे कोणी हिंदुरुदय सम्राट आणि उद्धव ठाकरे एकत्र जोडू नये Byte ---- मंत्री नितेश राणे
0
0
Report

नाशिक से मुंबई ओर शिवसेना के हजारों कार्यकर्ता रवाना, उद्धव ठाकरे भाषण पर नजर

Nashik, Maharashtra:शिवसेनेचा वर्धापन दिन असल्याने आज नाशिक मधून ठाकरेंच्या शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत...ऑपरेशन टायगर अंतर्गत झालेल्या घडामोडीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदा भाषण करणार आहे... यामुळे या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले असून उद्धव ठाकरे काय बोलतील याकडे कार्यकर्त्यांचाही लक्ष लागून आहे...काल घडलेल्या घटनेमुळे शिवसेना कधीही कुमकुवत होणार नाही... अशी भावना ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिलेली आहे... हे सगळे शिवसैनिक नाशिक मधून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे...या संदर्भात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांशी बातचीत केली आहे.
0
0
Report

रविकांत तुपकर का उपवास समाप्ति की ओर, गिरीश महाजन वार्ता के बाद स्थिति साफ

Buldhana, Maharashtra:गेल्या पाच दिवसांपासून विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषणाला बसलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचे उपोषण आज अखेर सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी काही वेळापूर्वीच उपोषणस्थळी धाव घेतली असून, त्यांनी तुपकरांशी चर्चा सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून तुपकरांच्या खालावत चाललेल्या प्रकृतीमुळे सर्व स्तरातून चिंता व्यक्त केली जात होती. अशातच गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमुळे राज्य सरकार या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी सकारात्मक असल्याचे संकेत मिळत आहेत. आता महाजन आणि तुपकर यांच्यातील या चर्चेनंतर, उपोषण मागे घेण्याची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.
0
0
Report
Advertisement

सुरेगांव में लाखों के किराने का सामान कचरे में फेंकने का मामला सामने

Shirdi, Maharashtra:राज्य में खाद्य एवं दवा प्रशासन की धावाCarवाई जारी रहते कोपरगांव तालुक के सुरेगांव में डराने वाला मामला सामने आया है। लाखों रुपये का किराना सामान सीधे कचरा डिपो में फेंक दिए जाने से हड़कंप मच गया है। रात के अंधरे में एक चारपहिया वाहन से यह माल लाकर फेंके जाने का संदेह व्यक्त किया जा रहा है। फेंके गए माल में रवा, मैगी, मसाले, दालें, बिस्किट्स, ड्रायफ्रूट्स सहित विविध खाद्य पदार्थ शामिल हैं। कुछ वस्तुएँ कालबाह्य बताई गईं तो कुछ पर एक्सपायरी डेट नहीं होने की भी पुष्टि हुई है। इसके बीच, कचरा चुनने वाली कुछ महिलाओं ने इन वस्तुओं को उठा कर ले गईं, जिससे नागरिकों के स्वास्थ्य पर प्रश्न उठ रहा है। यह माल किसका है और उसे कचरा डिपो में क्यों फेंका गया, इसकी जाँच कर दोषियों पर कार्रवाई की मांग हो रही है।
0
0
Report
Advertisement

शिवसेना स्थापना दिवस: शिंदे के नेतृत्व में हिंदुत्व की तेज़ रफ्तार जारी

Satara, Maharashtra:शिवसेनेचा वर्धापन दिन नेहमीप्रमाणे उत्साहाच्या वातावरणात साजरा करतोय शिवसेनेचे राजकीय जडणघडणीत अनेक स्थित्यंतरं आली आहेत शिवसेनेची स्थापना हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी केली आणि त्यांना भक्कम साथ धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेबांनी दिली ज्वलंत हिंदुत्वाचा विचार मनामध्ये रुजवण्याचे काम स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलं प्रत्येक उंबऱ्याच्या आत शिवसैनिक असला पाहिजे हे बाळासाहेबांचे विचार जपण्याचं काम पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब यांनी केलं असून हे काम अत्यंत जोमाने पुढे नेलं आहे. गेल्या चार वर्षात शिवसेनेचा झंजावात महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे. स्वर्गीय हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचाराची कास धरूनच पक्ष वाढला पाहिजे दोन्हीही नेत्यांच्या ज्वलंत हिंदुत्वाला बळकटी मजबुती महाराष्ट्रात आणि देशात मिळाले पाहिजे हे सूत्र घेऊन आम्ही पुढे वाटचाल करत आहोत. कालपासून आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदान प्रक्रियेत होतो. आज मुंबईत गेल्यानंतर कळेल पक्षाच्या व्यासपीठावर नव्याने कोण कोण येत आहे ते . ऑपरेशन टायगर ची चर्चा सुरू झाली होती तेव्हा काही माध्यमांनी विचारलं होतं असं काय आहे का यावर मी सांगितलं होतं उबाटाच्या खासदारांच्या मध्ये खदखद आहे आणि केवळ खासदारांमध्येच नाही तर आमदारांमध्ये आणि नगरसेवकांमध्ये सुद्धा खदखद आहे असे मी बोललो होतो. आम्हाला जे पाठबळ पाहिजे आहे ते मिळत नाहीये अशी खदखद उबाटाचे अनेक आमदार व्यक्त करतायेत पक्षाचे प्रमुखांनी जर अश्या आमदारांना एकत्र घेऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची वेळ मागून आमच्या आमदारांचे प्रश्न प्रलंबित आहे ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले तर आमदारांना सुद्धा आधार वाटतो. अशा पद्धतीने काहीच उबाटा गटामध्ये दोन वर्षात झालं नाही. त्यामुळे ते अस्वस्थ आहेत खासदारांच्या मध्ये जशी खदखद होती त्यापेक्षा जास्त खदखद ही उभाटाच्या आमदारांमध्ये आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील आमदार येण्यासाठी इच्छुक असतील तर याबाबतीतला निर्णय घेण्याचा अधिकार आमचे पक्षप्रमुख शिंदे साहेबांना आहे. कोणाला प्रवेश द्यायचा कोणाला नव्याने समाविष्ट करून घ्यायचं हे सगळे अधिकार आमचे साहेब एकनाथ शिंदे यांना आहे. On संजय राऊत संजय राऊत यांनी माध्यम पाहावीत आमच्याकडे आलेल्या खासदारांचा निषेध करत आहे तसं दुसऱ्या बाजूला खासदारांचं फ्लेक्स आणि बोर्ड लावून स्वागत सुद्धा करत आहेत त्यामुळे एकच बाजू माध्यमांना सांगू नका. राज्यात कायदा घ्यायचा अधिकार कोणाला नाही जर कोणी खासदारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर राज्य सरकारची जबाबदारी आहे सगळ्या लोकप्रतिनिधींच आणि जनतेचे रक्षण करण्याची राऊत हे कसलं टायगर ऑपरेशन म्हणत होते आम्ही उल्फ ऑपरेशन करणार असं सुद्धा म्हटले त्यांनी काय ऑपरेशन केलं. तुमच्या बैठकीला सहा खासदार अनुपस्थित होते त्यानंतर तुम्ही शिवीगाळ सुरू केली. याच सुद्धा तारतम्य आणि भान रावतांना राहिलं नाही ते आता सैरभैर झाले आहेत राऊत जर तोडू म्हणत असतील तर त्यांनी समोर यावं. राऊत कधीच रस्त्यावर उतरले नाहीत. राऊत यांनी रस्त्यावरून आंदोलन केले संघर्षाची भूमिका घेतलीये असे कधीच झालं नाही राऊत बोलल्याशिवाय काहीच करू शकत नाही. राऊत हा कृती शून्य माणूस आहे
0
0
Report

शिंदे-उद्धव गुटों के बैनरों में भ्रम, संजय पाटील कौन?

Mumbai, Maharashtra:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार फुटले असले तरी त्यांचा अजून कोणत्याच पक्षात प्रवेश झाला नाही. ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार हे निश्चित आहे. अश्यात आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. त्यामुळे दोन्ही शिवसेनेचे बॅनर वॉर रंगलेले आहे. यात कांजूरमार्ग मध्ये मात्र समोरासमोर लावण्यात आलेल्या बॅनर मूळ कार्यकर्ते मात्र संभ्रमात असल्याचे दिसते आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसनेकडून संजय दिना पाटील यांच्या स्वागताचे बॅनर लागले आहेत, तर या बॅनर समोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापन दिनाच्या शुभेच्छांचा बॅनर लागला असून यावर ही संजय दिना पाटील यांचे फोटो लागलेले आहेत. त्यामुळे शिवसैनिक मात्र संजय पाटील नक्की कुठे? या बाबत संभ्रमात असल्याचे दिसते आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top