445001
शेतकरी न्याय यात्रेतून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाची पोलखोल करणार, आशिष खुलसंगे
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची शेतकरी न्याय यात्रा शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत आहे. शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने आणि अतिपावसामुळे नापिकीचे संकट उभे राहिले आहे. कोळसा खाणीमुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. पीक विमा मिळवण्यात अडचणी आहेत आणि पांदण रस्ते योजना रखडली आहे. सरकार 'लाडकी बहिण' योजनेचा प्रचार करत असताना, शेतकऱ्यांना दुसऱ्या हाताने लुटून उध्वस्त करत असल्याचा आरोप आशिष खुलसंगे यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नागपुर में नौकरी के नाम पर दो ने छह लाख की धोखाधड़ी; हिंगोली पुलिस ने मामला दर्ज किया
Hingoli, Maharashtra:नागपूर येथील दोघांनी नोकरी लावण्याचे दाखवून सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार हिंगोलीत उघडकीस आला असून फसवणूक केल्याबद्दल हिंगोली शहर पोलिसात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे; आरोपींनी अनेक युवक-युवतींना नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले. मात्र पैसे घेतल्यानंतरही नोकरी न लावता टाळाटाळ केल्याने फसवणूक झाल्याचे समोर आले आहे..0
0
Report
जरांगे की प्रेस कांफ्रेंस: मराठा आंदोलन के तहत आमरण उपवास की संभावना
Jalna, Maharashtra:जालना : मनोज जरांगे पाटील यांची आज सकाळी 10.30 वाजता पत्रकार परिषद, जरांगे कठोर उपोषणाची घोषणा करण्याची शक्यता भाजप आमदार प्रसाद लाडही उद्या जरांगेंसोबत चर्चेला येणार अँकर : मनोज जरांगे पाटील यांची आज पत्रकार परिषद होणार आहे. अंतर वाली सराटी येथे आज सकाळी 10.30 वाजता जरांगे यांची पत्रकार परिषद होणार आहे. जरांगे यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारला आजच्या तारखेपर्यंतचा अल्टीमेटम दिलेला आहे. जरांगे यांनी सरकारला दिलेली ही मुदत संपत आहे. मात्र राज्य सरकार कडून अद्याप मराठा समाजाच्या मागण्याबाबत जरांगे यांना कोणताही उत्तर देण्यात आलेल नाही त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत जरांगे कठोर आंदोलनाची घोषणा करणार असल्याची माहिती जरांगे यांनी दिली आहे. दरम्यान जरांगे यांच्याशी अंतर वाली सराटी येथे भाजप आमदार प्रसाद लाड यांनी चर्चा केल्यानंतर लाड पुन्हा उद्या दुपारी 12.30 वाजता जरांगे यांची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटी येथे जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे उद्याच्या चर्चेत जरांगे यांच्या 30 मे रोजीच्या आमरण उपोषणाबाबत काही तोडगा निघतोका याकडे देखील सर्वाचं लक्ष लागलेलं आहे.0
0
Report
रत्नागिरी सहित 3 जिलों के 16 मतदान केंद्र, 1018 मतदाता मतदान करेंगे
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी 16 केंद्रांवर 1 हजार 18 बजावणार मतदानाचा हक्क विधान परिषद निवडणूक 18 जूनला बॅलेट पेपरवर मतदान अँकर विधान परिषदेच्या रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीची प्रशासनाकडून जय्यत तयारी केली आहे मतदानासाठी तिन्ही जिल्ह्यात 16 मतदार केंद्र असून त्यावर 1 हजार 18 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत जिल्हा परिषद,नगर परिषद सदस्यांसह नगराध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती हे निवडणुकीसाठी मतदार असणार आहेत बॅलेट पेपरवर 18 जूनला ही निवडणूक होणार आहे तर 22 जूनला रत्नागिरी कुवारबाव येथील सिंचन भवन येथे मतमोजणी होणार आहे0
0
Report
Advertisement
नाशिक के मालेगाव में अवैध ऑक्सीटोसिन की बड़ी खेप पकड़, सात लाख का माल बरामद
Nashik, Maharashtra:नाशिकच्या मालेगावात अवैध ऑक्सिटोसिन औषधांच्या साठ्यावर छापा... - सात लाखांचा मुद्देमाल जप्त.. - गुन्हे शाखेची कारवाई; दोन संशयित ताब्यात; एक महिला मात्र फरार Anc: मालेगाव शहरातील झांजेश्वर मंदिराजवळ उभ्या असलेल्या एका पिकअप वाहनामध्ये २६ खाकी रंगाच्या बॉक्समध्ये प्रत्येकी १०० मिलीच्यां ऑक्सिटोसिन औषधाच्या १९५ बाटल्या अशा एकूण ५,०७० बाटल्या जप्त करण्यात आल्या, या बाटल्यांवर कोणत्याही कंपनीचे नाव नसल्याचे निदर्शनास आले. जप्त औषधांची किंमत १ लाख ४ हजार रुपये असून, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली सहा लाख रुपये किमतीची पिकअप गाडीही जप्त करण्यात आली. असा एकूण ७ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हस्तगत केला. याप्रकरणी संशयित आदिल शेख अश्पाक (वय २०, रा. चाळीसगाव, जि. जळगाव) व आफताब आलम ईबन हसन (वय ४८, रा. हिरापुरा, मालेगाव) यांना पोलिसांनी अटक केली असून.... संशयित नूरजहाँ आफताब ही महिला घटनास्थळावरून फरार झाली0
0
Report
रत्नागिरी में तीन महीनों में 603 सर्पदंश, गर्मी-ठंड में भी घटनाएं बढ़ीं
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्ह्यात तीन महिन्यात 603 व्यक्तींना सर्पदंश.. सर्पदंशाच्या घटनांत वाढ.. रत्नागिरी शहर आणि जिल्हा सर्पदंशाचं प्रमाण वाढले असून सर्वाधिक पावसाळ्यात सर्पदंशचं प्रमाण सर्वाधिक असते. मात्र यंदा थंडी, उन्हाळ्यातही दंशाच्या घटना घडल्या आहेत. जानेवारी ते एप्रिल या दरम्यान तब्बल 603 जणांना सर्पदंशाच्या घटना घडल्या आहेत.. त्याचबरोबर 400 हundan अधिक जणांना विंचुदोष झाला आहे, याचबरोबर माकड, मांजर, कुत्रा यासह इतर प्राण्यांनी हजारो जणांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत..0
0
Report
उदय सामंत बोले- 17 सीटें महायुती के पक्ष में
Pandharpur, Maharashtra:विधान परिषदेच्या जागांचं वाटप उद्या संध्याकाळपर्यंत होईल 17 जागा महायुती म्हणून लढू आणि निवडून येऊ असं वक्तव्य उद्योग मंत्री शिवसेना नेते उदय सामंत यांनी पंढरपूर मध्ये केला आहे रायगड विधान परिषदेच्या ठिकाणी शिवसेनेचे मतदार राष्ट्रवादी पेक्षा जास्त आहेत त्यामुळे तिथं शिवसेनेचा दावा असणार आहे. तसेच सध्या माध्यमात जे जागा वाटपाचे सूत्र फिरतंय यामध्ये काहीही तथ्य नाही. तसेच पूर्वीच्या निवडून आलेल्या पाच आणि आणखीन वाढीव जागांची मागणी केली आहे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केला आहे उपमुख्यमंत्री शिंदे हे जागा वाटपासाठी नसून तर कांद्याच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी केंद्रीय गृह सहकार मंत्र्यांच्या भेटीला गेल्याचा खुलासा सामंत यांनी केला. सोलापूरचे पालकमंत्री शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना न्याय देतील अशी अपेक्षा आहे जर सोलापूरला भाजपचे पालकमंत्री आहेत तर मी रत्नागिरी मध्ये प्रताप सरनाईक ताराशिव मध्ये आणि एकनाथ शिंदे तर दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत असा अप्रत्यक्ष इशारा भाजपच्या पालकमंत्र्यांना निधी वाटपाच्या वादावर दिलेला आहे पंढरपूर मध्ये अधिक महिन्यातील मोठ्या एकादशीमुळे भाविकांशी मोठी गर्दी असल्यामुळे आपण विठ्ठलाचे दर्शन बाहेरूनच घेणार असल्याचा सुद्धा मंत्री सामंत यांनी सांगितला आहे0
0
Report
Advertisement
सोलापुर में Reelstar की रोहिणी पाराध्ये ने आत्महत्या की, पती-पत्नी की लोकप्रियता से मचा हंगामा
Pandharpur, Maharashtra:सोलापुर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. रिलस्टार विवाहित महिलेने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. अज्ञात कारणावरून हॉटेल ग्रामपंचायतच्या स्वयंपाक घरातील पत्र्याच्या लोखंडी अंगलला दोरीच्या साहाय्याने रिलस्टार रोहिणी निलेश पाराध्ये (वय 25) हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे घडली आहे. या प्रकरणाची खबर पती निलेश यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास घटना घडली आहे. एका रीलस्टाराच्या आत्महत्येने सोलापुरात खळबळ उडाली आहे. आत्महत्या का केली कोणत्या कारणाने केली याचे गूढ अद्यापही कायम आहे. मागील काही वर्षभरापासून रोहिणी पाराध्ये व निलेश पाराध्ये हे पतीपत्नी हे विविध सामाजिक घटना व खाद्यपदार्थावर आधारीत रीलच्या माध्यमातून सोशलमीडियामध्ये लोकप्रिय ठरले आहेत .त्यांच्या या लोकप्रियतेचा फायदा घेऊन त्यांनी रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर खवैय्यासाठी ब्रह्मपुरी येथे हॉटेल ग्रामपंचायत हा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात ते स्थिर होऊन आणखी नवीन शाखा प्रास्ताविक असताना अचानक पत्नी रोहिणी पाराध्ये हिने अचानक गळफास घेतला.पती निलेशने उपचारासाठी मंगळवेढ्याच्या ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डाॅक्टरानी मृत घोषीत केले.0
0
Report
देव्हाडा में 221 धान की बोरी जली, किसान को लाखों का नुकसान
Bhandara, Maharashtra:शेतकऱ्यांनी शेतात ठेवलेली २२१ धानाची पोती जळून खाक.... शेतकऱ्याचे लाखाचे नुकसान.... मोहाडी तालुक्यातील देव्हाडा येथे बिरबल गोटेफोडे या शेतकऱ्यांनी शेतावर ठेवलेली २२१ धान पोती जाळून खाक झाली आहे. देव्हादी येथील शेतकऱ्यांनी धानाची मळणी करून शेतावर धानाची पोती शेतावर ठेवली होती. माता रेल्वे लाईनला लागून कचरा पेटविण्यासाठी आग लावण्यात आली होती ती आग शेतापर्यंत पोहचत धानाची २२१ पोती ट्रॅक्टर टाली जाळून खाक झाली. अग्नी आणि विभागाची गाडी येऊन आग आटोक्यात आणली पण तो पर्यंत संपूर्ण धान जळून राख झाले होते.... यात शेतकऱ्यांचे लाखाचे नुकसान झाले आहे...0
0
Report
वाशिम में अचानक भारी बारिश और ओले से लोगों को गर्मी से राहत
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील तोंडगाव फाटा परिसरात आज सायंकाळी अचानक गारपीटसह जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे नागरिकांना उकाड्या पासून मोठा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. अचानक झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी नागरिकांची धावपळ उडाली, तर या पावसामुळे शेती मशागतीच्या कामाला वेग येणार असल्याने शेतकरी वर्गातही समाधानाचे वातावरण दिसून आले.0
0
Report
Advertisement
लातूर के डॉक्टर मनोज शिरुरे की सीबीआई गिरफ्तारी: तीन विद्यार्थियों को प्रश्न दिलाने में मदद
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज डॉक्टर मनोज शिरुरे यांना सीबीआय कडून अटक....तीन विद्यार्थ्यांना केमिस्ट्रीचे प्रश्न मिळवून देण्यासाठी मदत केल्याचा शिरुरेवर आरोप....शिरुरेच्या अटकेनंतर घरासह हॉस्पिटल परिसरातही शुकशुकाट... नीट २०२६ पेपरफुटी प्रकरणात लातूरच्या डॉक्टर मनोज शिरुरे यांना सीबीआयने अटक केली आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, तीन विद्यार्थ्यांना केमिस्ट्रीचे प्रश्न मिळवून देण्यासाठी मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. दरम्यान, न्यायालयाने डॉ. मनोज शिरुरे यांना सीबीआय कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू आहे. अटकेची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या घरासह हॉस्पिटल परिसरातही शुकशुकाट पाहायला मिळाला.0
0
Report
मराठवाड़े में शिवसेना की रणनीति, शिंदे के दौरों से संगठन मजबूत
Jalna, Maharashtra:जालना खासदार श्रीकांत शिंदे बाईट मराठवाड्यात आज पासून शिवसंवाद दौऱ्याला सुरुवात झाली आहे.. 23 विधानसभेचा आढावा घेतला जाणार असून यातून पक्षाची बांधणी केली जाणार आहे.. कार्यकर्त्या बरोबर संवाद साधण्यात आला आहे.. वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठका सुरू असून, जागे संदर्भात आणखी फायनल झालेलं नाही, लवकरच आपल्याला कळेल.. शिवसेनेचा शिष्ट मंडळ महायुतीच्या इतर नेत्यासोबत चर्चा करत आहेत जागे संदर्भात.. अभिमन्यू खोतकर यांचा चांगलं काम असून पक्ष या सर्व गोष्टी बारकाईने बघत आहेत.. त्यांच्या पक्षातील नेत्यांना हे विचारलं पाहिजे छगन भुजबळ यांना आम्ही शुभेच्छा देतो.. मराठवाड्यावरती शिवसेनेचे बारकाईने लक्ष आहेत, शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस देखील मराठवाड्याला भरपूर काही देण्याचा काम केलं आहे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण बाळासाहेबांना असं सांगितलं आहे, त्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे.. पक्ष सगळ्याच कार्यकर्त्याबद्दल योग्य वेळी योग्य विचार करतो ज्योतीताई वाघमारे या सर्वसामान्य महिला कार्यकर्त्याला पक्षाने राज्यसभेवर खासदार केलं एक तारिखे आधी जागेचा तिढा सुटून जाईल.. शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मराठा समाजाच्या अनेक मागण्या पूर्ण केल्या आहेत, आता जरांगे पाटलाच्या ज्या मागण्या असतील त्यावर सरकार विचार करून नक्की त्यांच्या मागण्या सोडेल.. कांद्याच्या प्रश्नावरती आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची केंद्रीय मंत्रिमंडळ बरोबर बैठक आहे.. पार्टीची काय परिस्थिती झाली आहे त्याला वाढवलं पाहिजे त्यासाठी फिरलं पाहिजे, टीका करत बसले म्हणून अडीच वर्षात ही परिस्थिती झाली आहे, अजून रसातळाला जाऊन बसले आहेत, जेव्हा शिंदे साहेबांनी उठाव केला त्यावेळेस देखील तुम्ही टीका केली परंतु लोकांनी मतपेटीतून उत्तर दिला आहे.. त्यांना आता टाईमपास तोच उरलेला आहे.0
0
Report
दिल्ली बैठक से पहले चाकण कांदा उत्पादक किसान आक्रामक, खर्च बढ़ने पर आंदोलन की चेतावनी
Shirur, Maharashtra:चाकण बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; उत्पादन खर्च निघत नसल्याने दिल्लीतील बैठकीकडे लक्ष, तीव्र आंदोलनाचा इशारा! कांद्याचे कोसळलेले भाव आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा मेटाकूटीला आला आहे. पुण्याच्या चाकण बाजार समितीत कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. कांदा उत्पादीत करत असताना खते, डिझेल आणि मजुरी महागल्याने शेतकऱ्यांचे मूळ भांडवलही निघणे कठीण झालेय या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत होणाऱ्या कांदा दराबाबतच्या महत्त्वपूर्ण बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेय जर आज दिल्लीतून सकारात्मक निर्णय आला नाही, तर चाकण परिसरात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी आणि चाकण बाजार समितीच्या सभापतींनी दिला आहे. शिवाय मागच्या तीन महिन्यांपासून विक्री झालेल्या कांद्याला हमीभावाने समतोल राखण्यासाठी अनुदान देण्याची मागणी करण्यात आली0
0
Report
Advertisement
नीट पेपरफुटी: लातूर कनेक्शन से जांच तेज, पेपर बिक्री के आरोप
Latur, Maharashtra:नीट २०२६ पेपरफुटी प्रकरणाच्या तपास वेगाने पुढे सरकत असतानाच आता काही धक्कादायक दावे समोर येत आहेत। लातूरचा शिवराज मोटेगावकर आणि नीटच्या केमिस्ट्री पेपर सेटर प्रा. पी. व्ही. कुलकर्णी याच्याविरोधात गंभीर संशय व्यक्त केला जात आहे। सूत्रांच्या माहितीनुसार, लाखो रुपयांच्या व्यवहारातून पेपर विक्री झाल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे। काही आर्थिक व्यवहार ऑनलाइन पद्धतीने झाल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे। सीबीआयच्या वाढत्या चौकशीमुळे आणि समोर येणाऱ्या नव्या धागेदोर्यांमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। पाहूयात याच संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट...0
0
Report
लातूर NEET मामले में डॉक्टर मनोज शिरूर पर सीबीआई गिरफ्तारी से नया पेच
Latur, Maharashtra:लातूर में कथित नीट प्रकरणाच्या तपासात नवे धागेदोरे समोर येत आहेत. लातूर शहरातील मोठमोठी हॉस्पिटल्स... वैद्यकीय क्षेत्रातील मोठी नावे... आणि मुलांना डॉक्टर बनवण्याचं स्वप्न... तपासाच्या भोवऱ्यात आता याच गोष्टी चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. सीबीआयच्या चौकशीत समोर आलेली काही माहिती अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. डॉक्टरांचे शहरात टोलेजंग हॉस्पिटल आहेत. त्याचा वारस पुढे सुरू ठेवण्यासाठी मुलांना डॉक्टर करण्याचे स्वप्न होते. अनेक वर्षांच्या मेहनतीने उभं केलेलं नाव... समाजात निर्माण केलीली ओळख... आणि तो वारसा पुढच्या पिढीकडे सोपवण्याची इच्छा... परंतु आता याच पार्श्वभूमीवर तपासाची सुई फिरताना दिसत आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये गुणवत्ता महत्त्वाची की शॉर्टकट...? मेहनत महत्त्वाची की प्रभाव...? असे अनेक प्रश्न या संपूर्ण प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या संपूर्ण प्रकरणात डॉ. मनोज शिरूरे यांच्याCBI ने चौकशी करून त्यांच्या घराची झाडाखाली घेतली त्यानंतर त्यांना आता अटक करण्यात आली आहे. आणि त्याला न्यायालयाने पाच दिवसांची CBI कोठडी दिली आहे. अटकेची बातमी कळताच त्याच्या घर आणि हॉस्पिटलच्या परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला. अनेक डॉक्टरांचे शहरात टोलेजंग हॉस्पिटल आहेत. त्याचा वारस पुढे सुरू ठेवण्यासाठी मुलांना डॉक्टर करण्याचे स्वतः स्वप्न होते. पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नियम आणि गुणवत्तेचा मार्ग निवडला गेला की शॉर्टकटचा...? मेहनत महत्त्वाची की प्रभाव...? असे अनेक प्रश्न या संपूर्ण प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. वैद्यकीय क्षेत्रात उभा केलेला वारसा पुढे नेण्यासाठी कुठे चुकीचा मार्ग स्वीकारला गेला का...? तपास यंत्रणा आता याच धाग्यांचा शोध घेत आहे. मात्र, तपास पूर्ण होईपर्यंत कोणालाही दोषी ठरवण्यात आलेले नाही.0
0
Report
नीट पेपर फूट: सीबीआय ने पुणे से टीचर समेत 13 आरोपी अटक
Pune, Maharashtra:नीट पेपर घोटाळ्यात सीबीआयने पुण्यातून आणखी एका खासगी क्लासच्या शिक्षकाला अटक केलीय. तेजस शहा असं त्याचं नाव असून तो मनिषा हवालदारच्या संपर्कात होता...पाहुयात सीबीआच्या नीट तपासातील आजपर्यंतचे नेमके काय अपडेट्स आहेत ते...? नीट पेपर फुटीत तेजस शहाला पुण्यातून अटक...!!! तेजस पुण्यातील एका क्लासमधे होता टिचर मनिषा हवालदारकडून पेपर घेतल्याचा तेजसवर आरोप डॉ. मनोज शिरुरेलाही अखेर दाखवली अटक नीट पेपरफुटीत आतापर्यंत 13 जण अटकेत दरम्यान, या तपासकामी आम्ही सीबीआयला पूर्ण सहकार्य करू असंही ते म्हणाले... चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी, पुणे दरम्यान या क्लासचे संचालक सचिन हलदणकर या अटकेचा आमच्या क्लासशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केलाय...या तपासकामी आम्ही सीबीआयला पूर्ण सहकार्य करू असंही ते म्हणाले... या नीट पेपर घोटाळ्यात सीबीआय देशभरात तब्बल 49 ठिकाणी धाडी टाकून 13 आरोपींना अटक केली त्यापैकी तिन्ही मनिषा या पुण्यातल्याच निघाल्यात यापकी मनिषा वाघमारे ही एजंट असून ती केमिस्ट्रीचे पेपरसेटर पी व्ही कुलकर्णीच्या संपर्कात होती तर मॉर्डनची जीवशास्राची प्रा. मनिषा मांढरे आणि फिजिक्सची प्रा. मनिषा हवालदार ही देखील एनटीएची पेपर सेटर निघालीय...तर तिकडे लातुरातील फेमस क्लास चालक प्रा. शिवराज मोटेगावकर याच्या संपर्कात आलेले बालरोग तज्न डॉ. मनोज शिरूरेलाही सीबीआयने अखेर अटक दाखवलीय...त्यामुळे या नीट पेपर फुटी प्रकरणात आणखी किती जणांना अटक होतेय हे तपासाअंतीच समोर येईल...दरम्यान, या बायो,फिजिक्सच्या तज्न प्राध्यापिका असलेल्या या दोन्ही मनिषांना एनटीए शी जोडून देणारे एक रिटायर प्राध्यापक माञ अजूनही चौकशीच्या कक्षेबाहेर कसे काय राहिलेत? असा सवाल या क्षेणातील जाणकार खासगीत विचारताहेत...पाहुयात सीबीआय त्यांच्या पर्यंत नेमकं कधी पोहोचतंय ते?0
0
Report
Advertisement
