Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

शेतकरी न्याय यात्रेतून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाची पोलखोल करणार, आशिष खुलसंगे

Aug 21, 2024 07:24:58
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची शेतकरी न्याय यात्रा शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत आहे. शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने आणि अतिपावसामुळे नापिकीचे संकट उभे राहिले आहे. कोळसा खाणीमुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. पीक विमा मिळवण्यात अडचणी आहेत आणि पांदण रस्ते योजना रखडली आहे. सरकार 'लाडकी बहिण' योजनेचा प्रचार करत असताना, शेतकऱ्यांना दुसऱ्या हाताने लुटून उध्वस्त करत असल्याचा आरोप आशिष खुलसंगे यांनी केला आहे.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Jan 08, 2026 15:47:05
kolhapur, Maharashtra:नागपूर देवेंद्र फडणवीस बाईट ( उद्धव ठाकरे आरोप मुंबईला बॉम्बे करण्याचा डाव) -- मी याला गंभीरतेने घेत नाही... त्यांच्याकडे दाखवायला काही नाही... 25 वर्षात काही केले नाही... त्यामुळे अफवांचा बाजार उठवून मत मिळवू शकू असं त्यांना वाटत असेल ते 16 तारखेला स्पष्ट होईल.. -- पराभव डोळ्यासमोर दिसतो आहे त्यामुळे हे राजकारण सुरू आहे (on शहा सेना ) --- ते अनेक वेळा बोलले आहे... ते बोलल्यावर त्यांच्यावर कोणाचा विश्वास आहे का? विधानसभे असच बोलत होते तरी लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही... नगरपालिकेतही पुन्हा आम्हाला निवडून दिलं... महानगरपालिकेतही जनता आम्हालाच निवडून देईल --- जनता टोमणे आणि टीकेवर मतदान करणार नाही... जनता विकासावरच मतदान करेल -- 29 महानगरपालिकेत आमची स्थिती चांगली आहे.. 27 महापालिकेत महायुतीतील 3 पैकी एका पक्षाचा महापौर असेल... आणि भाजप नंबर वन असेल
0
comment0
Report
PNPratap Naik1
Jan 08, 2026 15:15:51
Kolhapur, Maharashtra:महिलांसाठी केएमटी बससेवा मोफत करण्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी थेट केएमटी बसमधून प्रवास करत अनोख्या पद्धतीने प्रचार केला. शहरातील केएमटी बसमध्ये बसून सतेज पाटील यांनीप्रवाशांशी संवाद साधत आपल्या जाहीरनाम्याची माहिती दिली. महिलांना सुरक्षित, मोफत आणि सुलभ सार्वजनिक वाहतूक मिळावी, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले. महिलांच्या आर्थिक बचतीसह त्यांच्या दैनंदिन प्रवासाला दिलासा मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला. केएमटी बसमधील प्रवासादरम्यान महिला प्रवाशांनी या निर्णयाचे स्वागत करत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. प्रत्यक्ष बसमधून प्रवास करून प्रचार केल्यामुळे सतेज पाटील यांच्या या प्रचाराची शहरात चर्चा होत आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Jan 08, 2026 14:27:34
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : कोणाच्याही रक्तात किती भाजप आहे दिसतंय सर्वांना - प्रकाश आंबेडकर *- अजित पवार आणि शरद पवार युतीवर प्रकाश आंबेडकरांची टीका* *- दोन्ही पवार एकच आहेत मात्र त्यांनी भाजपला उल्लू बनवले.* *- प्रकाश आंबेडकर pc पॉईंटर्स :* - मागच्या वेळी म्हटलेलं होत अभद्र युत्या तुम्हाला पाहायला मिळतील - अकोट मध्ये भाजप एमआयएम युती झालेली दिसते - सत्तेसाठी भाजपाने सुद्धा तत्व सोडलं, एमआयएम ने आम्ही RSS भाजप विरोधी आहे हे सोडलं - त्याचं बरोबर काँग्रेस आणि भाजप यांची सुद्धा युती अंबरनाथमध्ये झालेली पाहिली - पक्ष, विचर आता महत्वाचा नाही.. सत्तेततून मिळणारे टेंडर हेच महत्वाचे राहिलेत असं वाटतय - एकीकडे देशावर असलेलं संकट आहे, दुसऱ्या बाजूला देश चालवणाची धुरा असलेले अनैतिक पद्धतीने चालतायत - मतदारांना एवढं सांगणं आहे अनैतिक चालणारे, पाकीट वाटणारे बाजूला ठेवा तरच शहराचे प्रश्न सूटतील - परिवहन, चादर सारखे अनेक प्रश्न सोलापुरात आहे पण त्याची आखणी झाली *- अभद्र युतीची सरकार लोकांनी दूर ठेवावे असं म्हणणं आहे* *- काँग्रेस आणि वंचित दोघे सेक्युलर आहेत, त्यामुळे आम्ही मुंबईत युती केली* - फडणवीस यांनी अकोटबद्दल कारवाईचे सांगून 24 तासं झाले पण अजून काही झाली नाही *- ऑन बाळासाहेब सरवदे :* - सत्ता आणि टेंडर हे दोन्ही रिलटेड झालेत - त्यामुळे सत्ता मिळवण्यासाठी खून करावे लागले तरी हरकत नाही असं म्हणतायत - महाराष्ट्र बिहार सारखे होत आहे *- सुजात आंबेडकर ऑन प्रणिती :* *- सुजात आंबेडकर जे बोलले ते योग्य आहे. ते जे बोलले खर बोललेत, तुम्हाला लवकर समजेल* *- कोणाच्याही रक्तात किती भाजप आहे दिसतंय सर्वांना* *- कोणी किती एकनिष्ठ आहे लवकर समजेल* *- ऑन बिनविरोध :* - महाराष्ट्र हा बिहार होत चाललंय - सुशीलकुमार शिंदेनी बिनविरोध व्हावं म्हणून प्रचंड प्रयत्न केला - मलप्पा शिंदे नावाचा व्यक्ती शेवट प्रयत्न केला - मल्लप्पाला यांनी मारपीट करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला नाही. - मात्र आता परिवारावर दबाव आणण्याचे प्रयत्न केले जातात. *- आमचे निम्मे उमेदवार भीतीमुळे फॉर्म भरायला आले नाही* *- नागपूरमध्ये भाजपने सांगितलं आम्ही शिंदे-पवार सोबत बसणार नाही* *- वंचित शहराध्यक्षने शिंदे-पवार यांच्या पक्षाच्या अध्यक्षाशी बोलणं झालं, जगवाटप झालं होते* *- पण ऐनवेळी भाजपने शिंदे गटाच्या अध्यक्षाना बोलून केवळ 9 जागा दिल्या आणि दबाव आणून त्यांना युती जाहीर करायला लावली* - दबाव आणि धमक्याचे राजकारण सध्या सुरु आहे - हे थांबवायचं असेल तर 2-4 महिन्यात जे युद्ध पाकिस्तान बरोबर सुरु आहे - ट्रम्पला सांगितलं पाहिजे की आम्हीच मोदींचे कंबरड मोडतो कारण या दोघांच्या इगोमूळ हे सुरु आहे *- ऑन ड्रग्स :* - 18 हजार कोटीचं ड्रग्स गुजरातमध्ये पकडलं गेलं - ते कोणाचे होते माहिती नाही, केवळ एका व्यक्तीला त्यात पकडण्यात आलं - अमित शह आणि मोदी यांनी याचा खुलासा केला पाहिजे - राज ठाकरे जे बोलतायत ते फॅक्ट आहेत *- ऑन मतदान पैसे वाटप :* *- मतदानला पैसे कोणी दिलेत तर ते घ्या पण पैसे जे देत नाहीत त्यांनाच मतं द्या* *- ऑन दोन्ही राष्ट्रवादी युती :* *- मी आधीच म्हटलं होत की हे दोघे वेगळे नाहीतच, फक्त त्यांनी भाजपला उल्लू बनवलं.* *- चौकशी लागली होती म्हणून एक जण भाजपसोबत गेला स्वतःवरची चौकशी थांबवली* *- एकमेकांना डोळे दाखवायला लागल्यावर आठवण करून देतायत की 70 हजार कोटीची फाईल पेंडिंग आहे* *- आम्ही उलट भाजपला विचारतोय तुम्ही एवढे दिवस फाईल दाबली का यांचा खुलासा करा* - जर फेव्हरेबल असतील तर युती झाली पाहिजे पण पुण्यात, ठाण्यात युती नाही *- यांचा राजकीय अर्थ असं काढतोय की भाजपला दोघांना (सेना-राष्ट्रवादी) संपवायचं आहे* - म्हणून त्यांना वाऱ्यावर सोडलं आहे तुमचं तुम्ही बघा - विरोधी पक्षाची स्पेस कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच आहे - पण किती यशस्वी होतील या बाबत शंका आहे
0
comment0
Report
KRKAPIL RAUT
Jan 08, 2026 13:45:27
Thane, Maharashtra:-योगेश कदम • शिवसेनेच्या उमेदवारावर अशा पद्धतीने झालेला हल्ला ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. • या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांशी मी स्वतः संवाद साधला आहे. • संशयित व्यक्तीला लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. • प्रचारादरम्यान कुरेशी यांनी आघाडी घेतली होती आणि एकूण वातावरण त्यांच्या बाजूने झुकत होते. • ते २०१७ चे सिटिंग उमेदवार असल्याने, निवडणुकीचे वातावरण बिघडवण्याच्या उद्देशाने हा प्रकार घडवून आणला गेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. • काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही व्यक्ती संशयित म्हणून दिसत आहेत; मात्र अद्याप संपूर्ण चित्र स्पष्ट झालेले नाही. • काही संशयितांची सध्या चौकशी सुरू आहे. • लवकरच आरोपीला ताब्यात घेण्यात येईल, असा विश्वास आहे. • आरोपीला अटक केल्यानंतर त्यांनी कोणत्या हेतूने हा हल्ला केला, याची सखोल माहिती घेऊन त्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Jan 08, 2026 12:49:34
Nashik, Maharashtra:नाशिक महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच नाशिकच्या अनंत कानारे (गोल्फ क्लब) मैदान येथे उद्या शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र सभा घेणार आहेत.... या सभेची जय्यत तयारी सुरू झाली असून ठाकरेंच्या शिवसेनेकडून आणि मनसे सैनिकांकडून मोठ्या प्रमाणात नियोजन केला आहे... लाखो च्या संकेत मनसैनिक आणि शिवसैनिक या सभेत येणार आहे... उद्या दुपारच्या सुमारास ठाकरे बंधू हे नाशिक शहरात येणार असून सायंकाळच्या सुमारास ठाकरे बंधूंचे भाषण होणार आहे.... शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला सोडचिठ्ठी देत वेगवेगळ्या पक्षात दाखल झाले यानंतर पहिल्यांदाच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर जनतेशी काय संवाद साधतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.... या संदर्भात गोल्फ क्लब मैदान येथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 08, 2026 12:17:25
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:एमआयएम मध्ये बुधवारी झालेल्या राड्यानंतर गुरुवारी पदयात्रेच्या माध्यमातून एमआयएमने जोरदार शक्ती प्रदर्शन केले, जिथं राडा झाला तिथूनच सुरुवात करून एमआयएम ने बंडखोराना आणि काल गोंधळ करणाऱ्या काँग्रेसला ही ताकत दाखवल्याची चर्चा आहे प्रचंड पोलीस फौजफाट्यात ओवेसी यांनी तब्बल 2 तास प्रचारात ताकत दाखवली... बंडखोरांच्या गडात ओवेसीचे शक्तिप्रदर्शन तब्बल 2 तास पदयात्रा करीत मोर्चेबांधणी हल्ला करणाऱ्या ना मतदार जागा दाखवतील -ओवेसी एमआयएम धील राड्यानंतर एमआयएम ने आज सकाळी संभाजी नगरात रस्त्यावर उतरत शक्ती प्रदर्शन केले, महत्वाचं म्हणजे कालच्या राडा ठिकाणावरून ओवेसी यांनी आज पदयात्रेची सुरुवात केली, पोलिसांच्या प्रचंड गराड्यात या पडयात्रेची सुरुवात झाली, ओवेसी याना पोलिसांनी पूर्ण गराडा घातला होता तर रॅलीत काहो होऊ नये म्हणून 200 वर पोलिसांची सुरक्षा रॅली ला होती या पोलीस गराड्यात एमआयएम ने शक्ती प्रदर्शन करीत विरोधकांना टार्गेट केले, कालच्या हल्ल्याबाबत पोलिसांनी कारवाई करावी अन्यथा उद्या पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करू असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिलाय... इम्तियाज जलील, प्रदेश अध्यक्ष असद ओवेसी ओवेसी यांनी आज लोकांसोबत चर्चा करीत मतदानाचे आवाहन केले, आणि ज्यांनी हल्ला केला, त्यांना मतदार मतदानात जागा दाखवतील असा टोला ही लगावला... तर भाजपनेही इम्तियाज वर सडकून टीका केलीय... इम्तियाज जलील यांनी रॅली मध्ये झालेल्या राडा प्रकरणात भाजप वर आरोप केले होते भाजप गुंडांना पोसत असल्याचा त्यांच्या आरोप होत त्यावर भाजपने सडकून टीका केलीय, अतुल Save यांनी इम्तियाज जलील याना नोटीस पाठवून अब्रुनुकसानीचा दावा करणार असे सांगितले आहे तर इम्तियाज बाबर चा वंशज आहे आम्ही त्याला आम्ही पळवून मारले नाही पण भाजपने असे केले तर जलील याना पळायला जागा उरणार नाही असा टोला भाजप आमदार संजय केनेकर यांनी लगावला आहे.. एमआयएम ने आज रॅली मधून शक्ती प्रदर्शन केले मात्र चर्चा होती ती पोलीस बंदोबस्ताची, त्यात आता इम्तियाज जलील यांनाही 10 पोलिसांचे संरक्षण मिळाले आहे तर काल झालेल्या हल्ल्यात पोलिसानी 50 लोकांवर दंगलीचे गुन्हे दाखल करत 6 लोकांना अटकही केलीय, मात्र कालच राडा आणि आजची ताकत दाखवण्याचे प्रयत्न , संभाजी नगरात हा वाद इतक्यात संपणार नाही याचीच नांदी दिसत होती...
0
comment0
Report
PNPratap Naik1
Jan 08, 2026 11:41:04
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपला वचननामा जाहीर केला आहे. मात्र ८१ पैकी अवघ्या 7 जागा लढवणाऱ्या ठाकरे गटाच्या वचननाम्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. महायुतीमधील सर्वच पक्षांनी हा वचननामा म्हणजे फक्त हवेतले इमले असल्याचा आरोप केला आहे. कोल्हापूर शहराच्या विकासासाठी पारदर्शक, लोकाभिमुख आणि सक्षम प्रशासन देण्याचा संकल्प करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज आपला वचननामा जाहीर केला आहे. भ्रष्टाचारमुक्त महापालिका, नागरिककेंद्री प्रशासन आणि नियोजनबद्ध शहर विकास हे या वचननामाचे मुख्य सूत्र असल्याचं ठाकरे गटाकडून सांगण्यात येत आहे. यावेळी ठाकरे गटाच्या नेत्यांसह काँग्रेसचे स्थानिक आमदार आणि पदाधिकारीही उपस्थित होते. सुनील मोदी, शहराध्यक्ष – ठाकरे शिवसेना • वचननाम्यातील प्रमुख मुद्दे • शहर विकास व पायाभूत सुविधा • नियमित व शुद्ध पाणीपुरवठा • स्वच्छता व आरोग्य सुविधा बळकट करणे • शिक्षण व युवकांसाठी विशेष धोरण • महिला, ज्येष्ठ व दुर्बल घटकांसाठी योजना • अंबाबाई अन्नछत्र अधिक सक्षम करणे • झोपडपट्टी पुनर्विकास व गृहनिर्माण • हरित कोलापूरचा संकल्प • पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्याचा आराखडा मात्र या वचननाम्यावर महायुतीमधील पक्षांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. भाजप नेत्यांनी काँग्रेसशी हातमिळवणी करून अवघ्या सात जागा लढवणाऱ्या ठाकरे सेनेचा या निवडणुकीत सुपडा साफ होईल, असा दावा केला आहे. महेश जाधव, नेते – भाजप दरम्यान शिवसेनेनं ठाकरे गटाच्या वचननाम्यावर टीकेची झोड उठवली आहे. अवघ्या सात जागा लढवणाऱ्या पक्षाचा वचननामा म्हणजे हास्यास्पद प्रकार असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. इतकंच नव्हे, तर हा वचननामा म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने असल्याची टीकाही शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी केली आहे. हर्षल सुर्वे, युवा नेते – शिवसेना एकीकडे ठाकरे गट आणि काँग्रेस पारदर्शक व लोकाभिमुख कारभाराचा दावा करत कोल्हापूरकरांसमोर आपला वचननामा सादर करत आहेत. तर दुसरीकडे जास्त जागा लढवणाऱ्या भाजप आणि शिवसेनेनं अद्याप जाहीरनामा जाहीर न केल्यावरून ठाकरे गट आणि काँग्रेसकडूनही प्रति टीका केली जात आहे. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत जाहीरनामा आणि वचननाम्यांबरोबरच आरोप-प्रत्यारोपांचं राजकारणही चांगलंच तापताना दिसत आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 08, 2026 09:42:01
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:एमआईएम में बुधवार के दंगों के बाद गुरुवार को पदयात्रा के जरिये एमआईएम ने जोरदार शक्ति प्रदर्शन किया। जहाँ शुरू से ही बदमाशों से भिड़ंत हुई और कल के कलह मचाने वाले कांग्रेस को भी ताकत दिखायी गयी। प्रचार के दौरान ओवैसी ने लगभग 2 घंटे की पदयात्रा में ताकत दिखाई। बंडखोरों के गढ़ में ओवैसी का शक्ति प्रदर्शन। लगभग 2 घंटे पदयात्रा कर के मोर्चा तैयार किया गया। हल्ला करने वालों को मतदाताओं से दूर रखने की चेतावनी दी गई। संभाजी नगर में आज रैली के माध्यम से शक्ति प्रदर्शन किया गया; कल के दंगे के घटनाक्रम से आज पदयात्रा शुरू की गई, पुलिस की भारी तैनाती के बीच रैली को सुरक्षित रखने के लिए 200 से अधिक सुरक्षा बलों की व्यवस्था थी। इम्तियाज जलील ने कहा कि पुलिस कार्रवायी हो अन्यथा कल प्रदर्शन किया जाएगा। गैरिक समग्र: इम्तियाज जलील—प्रदेश अध्यक्ष। ओवैसी ने आज लोगों से मतदान की अपील की; जिन्होंने हरकत की, उन्हें अब मतदान में पराजय दिखेगी—यह उनका स्पष्ट इशारा था। एमआईएम की रैली में पुलिस बंदोबस्त की चर्चा रही; इम्तियाज जलील को 10 पुलिस दस्ते की सुरक्षा मिली है; कल हुए दंगों के मामले में 50 लोगों के खिलाफ दंगा-निरोधक धाराओं के तहत केस दर्ज और 6 लोगों को गिरफ्तार किया गया। विशाल करोल, छत्रपती संभाजी नगर।
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 08, 2026 09:38:17
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर.. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेचे पॉइंटर - मनपा निवडणुकी निमित्ताने प्रचारार्थ प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आम्ही घेतला. राज्यात आम्ही युतीमध्ये आहोत. मात्र वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती आहे. - आमच्या विकासाचा जाहीरनामा जनतेसमोर ठेवत पाणी प्रश्नच अभिवाचन आम्ही दिले आहे. विकासाबाबत राष्ट्रवादी पक्ष वचनबद्ध आहे. - या शहराला पर्यटनाचा वेगळा इतिहास आहे. पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा निर्माण झाल्यास मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील असा जाहीरनाम्यात आम्ही उल्लेख केला आहे. शौचालयाची अवस्था दैनानीय आहे. - 2014 ते 2019 पर्यंत च्या काळात अनेकवेळा पाण्याच्या प्रश्नासाठी आम्ही सभागृहात बोललो. ऑन पुणे प्रकरण. - मुरलीधर मोहोळ यांनी त्यांची भूमिका मांडली, आम्ही देखील आमची भूमिका मांडली. निवडणुकीत आरोप होत असतात. आम्ही वेगवेगळे लढतोय मात्र कटुता वाढणार नाही याची दक्षता घ्यावी असे मी म्हणालो आहे. - राजकारणात असे आरोप प्रत्यारोप होत असतात नंतर सोबत बसून बोलू. - 99 साला पासून राज्यात अपरिहार्यता निर्माण झाली.. त्याकाळी शरद पवार यांच्यावर गलिच्छ भाषेचा वापर झाला मात्र त्या नंतर सोबत गेले... भाजप सेना मध्ये यापूर्वी तसे झाले होते. - अजित पवार हे भाजपला बोलले नाही. पुण्यामध्ये प्रवृत्ती विरोधात बोललो असे अजित पवार म्हणाले. - प्रचाराचा वेग वाढला की, टीका टिप्पणी वाढताना. ऑन पुणे समाधान अजित पवार विधान. - पुणेमधे एकत्र लढतोय,त्या बाबत हा विधान आहे. उद्याच्या भवितव्यात काय घडेल असे चर्चा माझ्या पातळीपर्यंत नाही. - निवडणुकीत यश मिळण्यासाठी कार्यकर्त्यांना उभारी देणारी वक्तव्य करावी लागतात. ऑन NDA समाविष्ट. - 2014 पासून आमचा nda मध्ये जाण्याचा सुरू होते, तेंव्हा आम्ही बाहेरून पाठिंबा दिला होता. त्यानंतर अनेक वेळा घटना घडल्या आणि 2023 ला गेलो, NDA मधे आमचा सहभाग कायम आहे. - मला माझ्या मर्यादेची जाणीव आहे. शरद पवार यांनी nda मध्ये यावे, हा निर्णय मी सांगू शकत नाही. - आम्ही वेगळी भूमिका घेतली. - मंत्री संजय शिरसाठ यांची अनेक विधान चांगले असतात मात्र कधी कधी ते घसरतात. शरद पवार यांच्या बाबतीत बोलणे योग्य नाही, असे मला वाटते. - कार्यकर्त्यांची एक फळी थांबली, न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणुका थांबली आहे. उमेदवारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे स्वातंत्र्य लढण्याचा निर्णय झाला.. आम्ही स्पेस निर्माण करतोय असे नाही. अगोदरच अस्तित्व निर्माण केली आहे. ऑन ठाकरे बंधू मुलाखत. - मराठी अस्मिता म्हणून बाळासाहेबांनी शिवसेना संघटना निर्माण केली. आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले. त्यांची भूमिका त्यांना रुजवायची असेल म्हणून त्यांनी सांगितले असेल. - 1985 साली दादांची सत्ता आली त्यावेळी एक वाक्य ते बोलले होते. ही जी भूमिका मांडली जाते ते विरोधक स्वतःच्या अस्तित्व साठी मांडत असतील. - विरोधकांकडे मुद्दे नसतील अशी स्थिती असते तेंव्हा आरोप करतात. - जनतेचा पाठबळ उरत नाही तेंव्हा आरोप, आणि दोघे एकत्र आले आता अस्तित्वाची लढाई आहे. ऑन प्रतोद. - घटनेत तरतूर आहे. विरोधकांकडे किती संख्याबळ असले पाहिजे.विरोधकातील कुठल्याही पक्षाकडे 30 हे संख्याबळ नाही. ऑन संजय राऊत - शिरसाठ भेट. - संजय राऊत यांच्या भूमिकेबाबाद आमच्या मनात वेगळी भूमिका जरूर आहे. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. एका लग्नात आमची भेट झाली आम्ही चांगले बोललो.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Jan 08, 2026 07:00:13
kolhapur, Maharashtra:नागपूर विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेता। महाराष्ट्र की राजनीति में यासंदर्भात प्रदेशाध्यक्षसोबत कोणतीही चर्चा झालेली आहे। आम्ही सगळ्याबाबी प्रदेशात चर्चा करू। पक्षाबरोबर चिन्हावर निवडून येऊन अशा प्रकारचा अधिकाराचा स्वातंत्र्य कोणालाही नाही। निर्णयाबाबत आम्ही गंभीरतेने बघत आहोत। हे दुर्दैवीच आहे। हे पक्षासाठी नुकसानीचच आहे। प्रदेशाध्यक्ष स्वतः लक्ष ठेवून आहेत। अशी चर्चा आहे, प्रदेशाध्यक्ष त्यांच्या संपर्कात आहे, योग्य मार्ग निघेल। राज ठाकरे - अजित पवार। एकमेकांवर कुरघोड्या सुरू आहे। अजित पवारांवर भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणतात की चूक झाली यांना सोबत घेतलं. हे केवळ निवडणुकीपुरत आहे की त्यानंतरही. मात्र जनतेला कळत आहे की भ्रष्टाचारी लोकांना भाजपा सामावून घेते. सोबत घेतल जात सत्तेत वाटा देण्यात येते। निवडणुकीपुरता केवळ सोंग दाखवल जाते। महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख समजून स्वतः शहाणा असल्याच दाखवण्यात येत आहे। पैसा भ्रष्टाचारातूनच कमावलेला होता। इतके पैसे आले कुठून...अदानी,अंंबानी दिले होते का असा प्रश्न निर्माण होतो। महाराष्ट्रातून लुटलेलाच पैसा वापरला गेला.
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Jan 08, 2026 05:45:48
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पर्यावरण संरक्षणासाठी निर्भीडपणे भूमिका मांडणारे, अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेले विचारवंत आपण गमावले आहेत,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पर्यावरणविषयक जाणिवा आणि विशेषतः पश्चिम घाटातील जैवविविधतेबाबत समाजात संवेदनशीलता निर्माण करणारे नेतृत्व आज हरपले असल्याची भावना अजित पवार यांनी व्यक्त केली. जैवविविधतेच्या संरक्षणासाठी डॉ. माधव गाडगीळ यांनी भारताच्या सामाजिक आणि पर्यावरणीय जाणीवांना अमूल्य असे योगदान दिले. पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास आणि निसर्गसंपत्तीच्या संवर्धनासाठी त्यांनी आयुष्यभर अथक प्रयत्न केले. डॉ. गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पर्यावरण अभ्यासक आणि संशोधक घडले. पश्चिम घाटात होणाऱ्या विकासकामांमुळे तेथील जीवसृष्टी आणि पर्यावरणीय समतोल धोक्यात येऊ शकतो, हा इशारा सर्वप्रथम त्यांनीच प्रशासनाला दिला होता. त्यांच्या या दूरदृष्टीपूर्ण भूमिकेमुळे पर्यावरण संरक्षणाबाबत राष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू झाली. अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली। बाईट - उपमुख्यमंत्री अजित पवार
0
comment0
Report
AKAMAR KANE
Jan 08, 2026 04:49:57
kolhapur, Maharashtra:नागपूर महानगरपालिका निवडणुकीत भाजप और शिवसेनेच्या युतीमध्ये शिवसेनेला आठ जागा मिळाल्याचे जाहीर झाले असले तरी प्रत्यक्षात मात्र सहाच जागेवर शिवसेनेचा धनुष्यबाण निवडणूक मैदानात आहे युतीमध्ये शिवसेनेची उमेदवारी मिळालेल्या दोन उमेदवारांनी भाजपचा एबी फॉर्म जोडल्याने त्यांना कमळ निवडणूक चिन्ह मिळाले आहे... भाजप शिवसेनेत युतीवरून अनेक बैठका झाल्या, रस्सीखेच झाली.. अखेर आठ जागांवर शिवसेनेला समाधान मानावं लागलं. त्यातही दोन उमेदवारांनी त्यांच्या अर्जासह भाजपचा एबी फॉर्म दिलाने प्रत्यक्षात सहाच जागी शिवसेनेचे उमेदवार धनुष्यावर लढत आहे.. प्रभाग 24 च्या दुर्गेश्वरी कोसरे आणि प्रभाग 7 च्या मीनल तरारे या शिवसेनाच्या कोट्यातून उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांनी शिवसेनेचा एबी फॉर्म न जोडता भाजपचा एबी फॉर्म जोडल्याने त्यांना भाजपचे कमळ चिन्ह मिळाले आहे त्यामुळे आता नागपूर महानगरपालिकेच्या 151 जागांपैकी 145 ठिकाणी कमळ चिन्हावर उमेदवार आहेत तर 6 ठिकाणी धनुष्यबाण चिन्ह सह उमेदवार आहे
0
comment0
Report
Advertisement
Back to top