445001
शेतकरी न्याय यात्रेतून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाची पोलखोल करणार, आशिष खुलसंगे
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची शेतकरी न्याय यात्रा शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत आहे. शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने आणि अतिपावसामुळे नापिकीचे संकट उभे राहिले आहे. कोळसा खाणीमुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. पीक विमा मिळवण्यात अडचणी आहेत आणि पांदण रस्ते योजना रखडली आहे. सरकार 'लाडकी बहिण' योजनेचा प्रचार करत असताना, शेतकऱ्यांना दुसऱ्या हाताने लुटून उध्वस्त करत असल्याचा आरोप आशिष खुलसंगे यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
अकोला में भीषण गर्मी: तापमान 46°C, नागरिकों के लिए चेतावनी जारी
Akola, Maharashtra:Anchor : अकोला शहरात उष्णतेचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून तापमानाने तब्बल ४६ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका निर्माण झाला असून अकोला महानगरपालिकेने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रुची पहुरकर यांनी नागरिकांना आवश्यक ती काळजी घ्यावी, असे सांगितले आहे. चक्कर येणे, उलटी होणे, पोटदुखी, अंग गरम होणे, अशक्तपणा जाणवणे किंवा बेशुद्ध पडणे अशी लक्षणे दिसून आल्यास संबंधित व्यक्तीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.तसेच दुपारी १२ ते ४ या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, भरपूर पाणी प्यावे, ओआरएसचे सेवन करावे तसेच सैल आणि सुती कपड्यांचा वापर करावा, असा सल्लाही देण्यात आला आहे. शहरातील विविध भागांत महानगरपालिकेकडून पाणपोई सुरू करण्यात आल्या असून नागरिकांना ओआरएस पावडरचे वाटपही करण्यात येत आहे. आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघातग्रस्तांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.दरम्यान, सतत वाढणाऱ्या तापमानामुळे अकोलेकरांनी पुढील काही दिवस विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.0
0
Report
जालना में डीजल- पेट्रोल टंकी खाली, ग्रामीण पंपों पर किसान की लंबी कतारें
Jalna, Maharashtra:जालना : ग्रामीण भागातील अनेक पंपांवर परिस्थिती बिकट, शेतीची कामे खोळंबली ४८ पेट्रोलपंप बंद; ८० पंपांवर रांगा अनेक ठिकाणी कामे थांबवून पंपांवर कॅन घेऊन शेतकरी रांगेत उभे जालना जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पेट्रोल-डिझेल टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्याने वाहनधारकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. महिनाभरानंतर पुन्हा एकदा ८० पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसू लागल्या आहेत. विशेषतः डिझेलसाठी ग्रामीण भागात नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. काल सायंकाळपासून १७० पैकी ४८ पेट्रोल पंपांवरील इंधन संपलेले होते. जालना शहरातील अनेक पेट्रोल पंपांवरही इंधनाचा साठा संपल्याने 'नो-स्टॉक'चे बोर्ड झळकत होते. जिथे इंधन उपलब्ध आहे, अशा ठिकाणी रांगा दिसून येत होत्या. सध्या ग्रामीण भागात खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची कामे वेगाने सुरू आहेत. शेतकरी मशागतीसाठी ट्रॅक्टर आणि इतर कृषी यंत्रांचा वापर करत असल्याने डिझेलची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र पुरवठा कमी पडत असल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना कामे थांबवून पेट्रोल पंपांवर कॅन घेऊन रांगेत उभे राहावे लागत आहे. काही ठिकाणी वाहनांच्या रांगा लागत आहेत. तर अनेक ठिकाणी इंधन मिळत नसल्याची तक्रार वाहनधारकांकडून केली जात आहे.0
0
Report
अकोला में पानी संकट रोकने के लिए उपमहापार ने जलशुद्धीकरण केंद्र की समीक्षा की
Akola, Maharashtra:अकोला शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर उपमहापौर अमोल गोगे यांनी महान धरण आणि महान येथील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करत शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेतला. धरणातील उपलब्ध पाणीसाठा, जलशुद्धीकरण प्रक्रिया आणि नागरिकांना होणारा पाणीपुरवठा यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.सध्या महान धरणात २५.४४८ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध असून, उपलब्ध साठ्यानुसार शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन काटेकोर आणि सुयोग्य पद्धतीने करण्यात यावे, अशा सूचना उपमहापौरांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी जलशुद्धीकरण केंद्रातील विविध प्रक्रियांची पाहणी करून पाण्याच्या गुणवत्तेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होणार नाही यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे, तसेच नागरिकांनाही पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.0
0
Report
Advertisement
सsolapur महापालिका के अतिक्रमण विभाग में स्क्रैप चोरी के आरोप, अमोल शिंदे ने घेरा
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील स्क्रॅप चोरी होत असल्याचा शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या आरोप, आरोपनंतर अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यावरच गुन्हा दाखल - सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील स्क्रॅप दिवसाढवळ्या चोरीला जात असल्याचा धक्कादायक प्रकार शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदेनीं आणला चव्हाट्यावर - कोणतीही अधिकृत परवानगी किंवा पावती नसताना अतिक्रमण विभागाचे अधिकारी जगन्नाथ बनसोडे यांच्या समोरच स्क्रॅप चोरी होत असल्याची धक्कादायक बाबसमोर - सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील पहिला टेम्पो निघून गेला त्यानंतर दुसरा टेम्पोत स्क्रॅप भरत असताना शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अमोल शिंदे यांनी टाकली धाड - महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी जग्गनाथ बनसोडे यांच्यासह इतर पाच जणांवर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - स्क्रॅप खाजगी वाहनात भरतानाच्या हालचाली या संशयास्पद असल्याची महापालिकाेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची कबुली - अतिक्रमण विभागाचे अधिकारी जग्गनाथ बनसोडेंनवर गुन्हा दाखल झाल्याने महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह ? - खाजगी वाहनात स्क्रॅप भरतानाचे कर्मचारी शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांना पाहताच पळून गेल्याने अनेक चर्चांना उधाण - संबंधितांवर कठोर कारवाई करण्यासाठी जिल्हाप्रमुख अमोल शिंदे आक्रमक0
0
Report
पुणे से अक्कलकोट जा रही परिवार की ट्रक दुर्घटना में तीन मृत, चार घायल
Solapur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील कोंडी येथे झालेल्या भीषण अपघातात दीड वर्षाच्या चिमुकल्यासह दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. धावत्या ट्रकला भरधाव कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झाला भीषण अपघात. पुण्याच्या देहूरोड येथील रवि खंडागळे यांचे कुटुंब अक्कलकोटला दर्शनासाठी जात होते. या अपघातात सिंधू रवि खंडागळे (वय ४२), त्यांची बहीण नंदा भाऊराव हाताळकर (वय ४५) आणि दीड वर्षाचा रुद्राक्ष मोरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर रुद्राक्षचे वडील उमेश प्रकाश मोरे (वय ३२) आणि आई साक्षी मोरे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सदर घटनेची नोंद सोलापूरच्या सिव्हिल पोलिसात झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.0
0
Report
नीलम गोरे ने कल्याण रेलवे यार्ड मामले की समीक्षा के साथ सुरक्षा उपायों की मांग
Kalyan, Maharashtra:कल्याण रेलवे यार्ड अत्याचार प्रकरण के संबंध में नीलम गोरे ने आढ़ावा लिया। पुलिस प्रशासन के साथ बैठक के अलावा पीड़ित परिवारों से मुलाकात की गई। पीड़ित लड़की की शिक्षा की पूरी जिम्मेदारी शिवसेना संभालेगी। इस प्रकरण में पुलिस चार्टशीट जल्द दाखिल होगी। रेलवे परिसर के आसपास खाली इमारतों को ढहाने या वहां सुरक्षा रक्षक तैनात करने की मांग, रेलवे पुलिस और स्थानीय पुलिस के बीच समन्वय बढ़ाने के निर्देश, रेलवे यार्ड में सर्च लाइट और CCTV लगाने की सलाह नीलम गोरे ने दी। केंद्र/राज्य सरकार से 140 पॉक्सो कोर्ट का प्रस्ताव मंजूर हुआ है, पर उपलब्ध कोर्ट केवल 38 हैं। बाकी कोर्ट आने तक केस लटकता है।0
0
Report
Advertisement
नासिक के येवल्या गांव में ट्रैक्टर ट्रॉली के भूस में आग, किसान को नुकसान
Yeola, Maharashtra:नासिक जिल्ह्यातील येवल्याच्या नगरसुल येथील भडके वस्तीवर मक्याच्या भुसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉलीतील मक्याच्या भुसाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेत ट्रॉलीमधील संपूर्ण मक्याचं भूस जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. स्थानिकांनी आग लागल्याचे दिसतात ट्रॅक्टर चालकाला याची माहिती दिली असता त्वरित ट्रॅक्टर थांबून ट्रॅक्टर व ट्रॉली बाजूला केली. ट्रॅक्टर चालक मक्याचं भूस घेऊन जात असताना विजेच्या तारांचीं ठिणग्या उडाल्या आणि काही क्षणांतच ट्रॉलीतील कोरड्या भुसाने पेट घेतला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.0
0
Report
तुर्भे डम्पिंग ग्राउंड के विरोध में आमरण उपवास, रास्ता रोको कर प्रदर्शन
Navi Mumbai, Maharashtra:तुर्भे येथील डम्पिंग ग्राउंड मध्ये उभारण्यात येणाऱ्या वेस्ट टू एनर्जी या प्रकल्पा विरोधात स्थानिक नगरसेवक आणि झोपडपट्टी वासीयांनी विरोध दर्शवत आमरण उपोषणाला सुरुवात केलय. आज सायंकाळी आक्रमक झालेल्या नागरिकांनी आपला संताप व्यक्त करण्यासाठी रास्ता रोको देखिल केला. आक्रमक झालेल्या नागरिकांनी ठाणे बेलापूर रोड वर उतरत चक्काजाम आंदोलन करत प्रशासना पर्यंत आपला आवाज पोहचविण्याचा प्रयत्न केला. यावेळी आमरण उपोषणाला बसलेल्या नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढत शांततेच्या माध्यमातून आंदोलन करण्याचे आवाहन केल्यावर हा रास्ता रोको मागे घेण्यात आलाय.0
0
Report
तुर्भे डम्पिंग ग्राउंड की वेस्ट टू एनर्जी परियोजना रोकें, उपोषण जारी रहेगा
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील तुर्भे डम्पिंग ग्राउंड मध्ये वेस्ट टु एनर्जी हा प्रकल्प महापालिकेतर्फे राबविण्याचा घाट घातला जात असून याविरोधात स्थानिक नगरसेवक आणि झोपडपट्टी धारकांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. वेस्ट टु एनर्जी प्रकल्प राबविल्यास झोपडपट्टी भागात पुनर्विकास प्रकल्प राबविता येणार नाही. यासोबतच नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण निर्माण होणार आहे. वेस्ट टु एनर्जी प्रकल्प रद्द करावा अन्यथा आमरण उपोषणावरून उठणार नाही असा थेट इशारा नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी मनपा प्रशासनाला दिलाय.0
0
Report
Advertisement
गडचिरोली में काँग्रेस का धरणा, भूमि-धिग्रहण में प्रशासनिक मनमानी
Gadchiroli, Maharashtra:टायटल:--- गडचिरोली जिल्ह्यातील एमआयडीसी आणि विमानतळाच्या जागेसाठी भूमीअधिग्रहण संदर्भात प्रशासनाची मनमानी सुरू असल्याच्या आरोप करत काँग्रेसने केले धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालया पुढे एकत्र आले संबंधित गावातील हजारो नागरिक, सकारात्मक निर्णय न झाल्यास चार जून रोजी ठिय्या आंदोलन करण्याचा केला निर्धार अँकर:-- गडचिरोली जिल्ह्यातील एमआयडीसी आणि विमानतळाच्या जागेसाठी भूमीअधिग्रहण संदर्भात प्रशासनाची मनमानी सुरू असल्याच्या आरोप करत काँग्रेसने आज धरणे आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालया पुढे संबंधित गावातील हजारो नागरिक एकत्र आले. यासंदर्भात सकारात्मक निर्णय न झाल्यास चार जून रोजी ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केलाय. गडचिरोली जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा दावा करणाऱ्या सरकारकडून प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. एमआयडीसीच्या या दडपशाही धोरणाविरोधात १४ गावांतील नागरिकांनी एकत्र येत 'मुंडण आंदोलन' केले होते. सरकार आणि प्रशासनाला जागे करण्यासाठी वेळोवेळी निवेदने देण्यात आली, परंतु प्रशासनाकडून यावर कोणतीही सकारात्मक पावले उचलली गेली नाहीत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, "सरकार गडचिरोलीला विकासाकडे नाही, तर विनाशाकडे घेऊन जात आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.0
0
Report
जुन्नर के पश्चिम आदिवासी क्षेत्र में जल संकट पर प्रशासन ने ठोस आदेश दिए
Barav, Maharashtra:*ब्रेकिंग* *पुणे* *जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील भीषण पाणीटंचाईचा प्रश्न आता थेट पुणे जिल्हा परिषदेत पोहोचला* जिल्हा परिषद सदस्या माई लांडे यांनी डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन पुणे जिल्हा परिषद सीईओ यांच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरले* जुन्नरच्या आदिवासी भागात शासनाचे पाण्याचे टँकर वेळेत पोहोचत नसल्याचा आरोप करत, जलजीवन मिशनची कामेही अत्यंत बोगस पद्धतीने झाल्याचा गंभीर आरोप माई लांडे यांनी केला. अनेक गावांमध्ये आजही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने संतप्त झालेल्या माई लांडे थेट हंडा घेऊन जिल्हा परिषदेत दाखल झाल्या. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी परिस्थितीची दखल घेत प्रशासनाला तातडीचे आदेश दिले. जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागात टँकर वेळेत पोहोचवावेत, गरज पडल्यास टँकर संख्या वाढवावी तसेच रोजचा अहवाल सादर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, जलजीवन मिशन अंतर्गत ज्या ठिकाणी निकृष्ट किंवा बोगस कामे झाली आहेत, त्या प्रकरणांची चौकशी करून संबंधित ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. पुढील आठवड्यात पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पश्चिम आदिवासी भागाचा दौरा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यावेळी बोलताना माई लांडे म्हणाल्या, “माझ्या माणसांना पिण्याचे पाणी मिळालेच पाहिजे। समस्या सुटल्या नाहीत तर जिल्हा परिषद जनरल बॉडीमध्ये अधिक आक्रमक भूमिका घेऊ, आणि गरज पडल्यास आदिवासी महिलांसह उपोषण आंदोलन करू.” पाणीटंचाईच्या प्रश्नावर आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आमनेसामने आल्याने जुन्नर तालुक्यातील परिस्थितीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.0
0
Report
मीरा रोड के सीएनजी पंप पर भारी मारपीट: दो पक्ष भिड़े, मामला दर्ज
Mira Bhayandar, Maharashtra:मीरा रोडच्या सीएनजी पंपावर तुफान हाणामारी; गुन्हा दाखल मीरा- रोडवरील महानगर सीएनजी पेट्रोल पंपावर सीएनजी भरण्यासाठी वाहनांची मोठी रांग लागलेली असताना एका वाहनचालकाने अचानक मध्येच गाडी घुसवल्याने दोन जना मध्ये वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर काही वेळातच हा वाद विकोपाला जाऊन वाद तुफान हाणामारीत बदलल्याची माहिती समोर आली आहे. या मारामारीत काही जण जखमी झाल्याची माहिती असून, घटनेनंतर दोन्ही पक्ष मिरा रोड पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी दोन्ही बाजूंची माहिती घेत पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. तसेच, समोर आलेल्या एफआयआरनुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 74, 79, 115(2), 352, 189(1), 189(2), 190, 191(2) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1), 37(3) आणि 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.0
0
Report
Advertisement
Dhananjay ने पड़ोसियों के बीच पानी डालने को लेकर भिड़ंत, CCTV में कैद
Ambernath, Maharashtra:घरासमोरील नाल्यात पाणी टाकलं यावरून शेजाऱ्यांमध्ये हाणामारी\nहाणामारीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद\nघरासमोरील नाल्यात पाणी टाकलं या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका कुटुंबातील सदस्यांना मारहाण केल्याची घटना उल्हासनगर कॅम्प नंबर दोन मध्ये घडली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून ,या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे\nVo कॅप नंबर दोन भैय्यासाहेब आंबेडकर परिसरात मुंड आणि वाल्मिकी हे दोन कुटुंब शेजारी शेजारी राहतं ,या दोन कुटुंबांमध्ये कायम किरकोळ कारणावरून वाद होत असतात , काल संध्याकाळच्या सुमारास संतोषदेवी मुंड यांनी लादी पुसायचं पाणी घरासमोरील नाल्यामध्ये टाकलं , हे पाहून शेजारी राहणारे रमेश वाल्मिकी यांनी हे पाणी नाल्यात का टाकलं यावरून संतोष देवी यांना जाब विचारला , त्यानंतर रमेश यांनी संतोष देवी यांना शिवीगाळ करत त्यांना धक्काबुक्की केली हे पाहून संतोष देवी यांचे पती सुनील कुमार तिथे आले , मात्र रमेश वाल्मिकी आणि त्यांच्या मुलांनी लाथा बुक्क्यांनी मुंड पती-पत्नीला जबर मारहाण केली ,ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे ,याप्रकरणी पोलिसांनी वाल्मीकी परिवारातील चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत\nचंद्रशेखर भुयार उल्हासनगर0
0
Report
विदर्भ में तेज गर्मी: अमरावती 46.4°C, वर्धा 46.5°C, नागपुर 44.4°C
Nagpur, Maharashtra:नागपूर विदर्भ होरपळला.. वर्धा 46.5 अंश सेल्सिअस तापमान अमरावती 46.4 और अकोला जिल्ह्यात पारा 46.3 अंशावर जिल्हा तापमान अमरावती 46.4 वर्धा 46.5 अकोला 46.3 यवतमाळ 45.4 नागपूर 44.4 बुलडाणा 43.8 चंद्रपूर 43.8 गडचिरोली 43.6 वाशिम 44.0 गोंदिया 43.80
0
Report
अब Akola तक पहुँचा नीट पेपर फूट, कांग्रेस ने मंत्री इस्तीफे की माँग की
Akola, Maharashtra:देशभर गाजत असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणाचे पडसाद आता अकोल्यातही उमटताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने अकोल्यात आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे आमदार साजीदखान पठाण यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. देशभरात झालेल्या नीट पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरल्याची भावना व्यक्त करत काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वर्षभर परिश्रम घेऊन परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये या प्रकारामुळे तीव्र नाराजी आणि निराशेचे वातावरण निर्माण झाले असल्याचे आंदोलकांनी म्हटले. पेपर फुटीमुळे शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळलीत झाला असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांसह संबंधित सर्व दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली. तसेच या गंभीर प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. यावेळी काँग्रेस तर्फे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा फोटो जाळण्यात आला. पेپر खोटी प्रकरणात पोलिसांनी मोटेगावकर यांना अटक केली आहे तर मोटेगावकर यांचा काँग्रेसच्या व्यासपीठावरून एका भाषणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये आपण देशमुख परिवाराचा कुंकू लावला असल्याचं त्यांनी म्हटले आहे. तर गुन्हेगार कोणाचाही नातेवाईक असो कुणाचाही निकड वरती असो त्याला शिक्षा झालीच पाहिजे अशी भूमिका सुद्धा काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी मांडली आहे. या आंदोलनात काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.0
0
Report
Advertisement
