icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

गेवराई में शिवाजी महाराज का पुतला हटाने के साथ भारी सुरक्षा, ट्रैफिक समस्या दूर

Beed, Maharashtra:बीड: गेवराई शहरातून जाणाऱ्या धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या मधोमध उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अखेर हलविण्यात आला आहे. वाहतुकीच्या दृष्टीने अडथळा निर्माण होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात शिवप्रेमी, पोलिस प्रशासन आणि नगरपालिकेमध्ये सकारात्मक चर्चा पार पडली. सर्वांच्या सहमतीने पुतळा अन्य योग्य ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कोणताही वाद निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने संयमाने भूमिका घेतली. दरम्यान, पुतळा हलविण्याच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
0
0
Report

गर्मी में कुएँ से पिल्ला बचाने वाले विनोद धोंगडे की बहादुरी, गांव में भारी प्रशंसा

Washim, Maharashtra:अशीच एक हृदयस्पर्शी घटना वाशिम जिल्ह्यातील जाऊळका येथे घटना घडली.पाण्याच्या शोधात भटकत असताना एका मांजराचे छोटे पिल्लू विहिरीत पडले.विहिरीत अडकलेल्या त्या निष्पाप जीवाने बाहेर येण्यासाठी केलेली धडपड जीवघेणी ठरत होती हे लक्षात येताचं प्राणीमित्र विनोद धोंगडे या तरुणाने धाडस दाखवत थेट विहिरीत उतरायचा निर्णय घेतला.स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी त्या पिल्लाला स्थानिकाच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढत त्याला जीवनदान दिले.या मानवतावादी कृतीमुळे गावकऱ्यांनी विनोद धोंगडे यांचे कौतुक केले असून त्यांच्या धाडसाची सर्वत्र प्रशंसा होत आहे.या घटनेतून उन्हाळ्यात प्राणी-पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
0
0
Report
Advertisement

चंद्रपूर शहर के रामाळा तालाब में मछलियों की मौत, दुर्गंध से नागरिक परेशान

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहरात एकमेव शिल्लक राहिलेल्या रामाळा तलावात माशांचा मृत्यू होत आहे. या मृत माशांमुळे आसपासच्या परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिक त्रस्त झाले आहेत. याच परिसरात हजारो चंद्रपूरकर सकाळ -संध्याकाळ फिरण्यासाठी येतात. गेली काही वर्षे रामाळा तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या संदर्भात विविध प्रकल्प सुरू आहेत. यात संरक्षक भिंतीसह मलनिस्सारण प्रकल्प देखील महत्त्वाचा आहे. या तलावात दोन बाजूंनी येणारे रोजचे हजारो लिटर सांडपाणी तलावातील प्राणवायू संपवण्यास कारणीभूत ठरले आहेत. यावर उपाययोजना असलेली कामे मात्र आराखड्यानुसार होत नसल्याचा आरोप पर्यावरण अभ्यासकांनी केला आहे. शहरातील एकमेव शिल्लक राहिलेल्या गोंडकालीन रामाळा तलावाला वाचविण्यासाठी काटेकोर उपाय योजना गरजेच्या असल्याचे मत व्यक्त होत आहे.
0
0
Report

यवतमाळ के तीन पुलिसकर्मी गुटखा तस्करी के मामले में निलंबित

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना गुटखा तस्करा कडून गुटख्याची दोन पोती चोरी केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. लोहारा पोलीस स्टेशनचे बबलू पठाण आणि प्रशांत राठोड तर लाडखेड पोलीस ठाण्यात कार्यरत अविनाश ढोणे या पोलिस शिपायांचे निलंबन करण्यात आले असून हे तिघेही पोलीस गुटखा तस्करीत गुंतलेले होते. गुटखा तस्कर हा अमरावती येथून गुटखा घेऊन आदिलाबाद कडे जात असताना या तिघांनी त्याला थांबवून वाहन तपासणी करून ते सोडले दरम्यान अंधाराचा फायदा घेत या वाहनातील गुटख्याची दोन पोती देखील चोरली मात्र चोरीचे हे बिंग फुटले त्यामुळे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली
0
0
Report
Advertisement

गोडा ते नर्मदा जलयात्रा: अहिल्या होळकर के जन्मशताब्दी वर्ष पर जल संरक्षण का संदेश

Ahilyanagar, Maharashtra:जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'जल व्यवस्थापन कृती पंधरवड्या'च्या निमित्ताने, तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून 'गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे...आजपासून ते २९ एप्रिल २०२६ दरम्यान ही यात्रेचे आयोजन असून जलसंवर्धन आणि जल व्यवस्थापनाचा संदेश देण्यासाठी श्रीक्षेत्र चौंडी आणि श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून या जलयात्रची सुरुवात होणार आहे... अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव असलेल्या चौंडी येथून सुरू होणाऱ्या जल यात्रेच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे अहिल्यानगर प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी.
0
0
Report

पुणे के खालुम्ब्रे में रिंग रोड से स्मशाला प्रभावित, गाँव की चिंता बढ़ी

Khed, Maharashtra:गावची स्मशानभूमीही रिंग रोडच्या विळख्यात; आता अंत्यविधी करायचा कुठे? ज्या जागेवर माणसाने आयुष्याचा शेवटचा प्रवास पूर्ण करायचा, जिथे दुखाश्रू ढाळत आपल्या माणसाला निरोप द्यायचा, तिथे आज मोठमोठाले सिमेंटचे खांब उभे राहत आहेत. रिंग रोडच्या भूसंपादनात खालुम्ब्रे गावची स्मशानभूमी बाधित झाली आहे. पुलाचे दोन मोठे खांब थेट अंत्यविधीच्या जागेवर येत असल्याने, आता गावकरी हवालदिल झाले आहेत. केवळ स्मशानभूमीच नाही, तर जिल्हा परिषदेची शाळा आणि ग्रामपंचायतीची जागाही विकासाच्या नावाखाली गावकऱ्यांनी अर्पण केली. मात्र, ज्या 'अंत्यविधी'साठी गावाला जागेची नितांत गरज आहे, तिथेच पीएमआरडीए आणि स्थानिक प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. एका बाजूला चकचकीत रस्ते होत असताना, दुसरीकडे स्मशानातील चितेला जागा मिळवण्यासाठी गावकऱ्यांना लढा द्यावा लागतोय, हे दुर्दैव!
0
0
Report
Advertisement

राष्ट्रीय राजमार्ग 53 पर नागपुर-भंडारा के पास ट्रक दुर्घटना, चालक की मौत, दूसरा घायल

Nagpur, Maharashtra:राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर काल मध्यरात्रीच्या सुमारास नागपूर - भंडारा दरम्यान मौदा जवळ एका उभ्या ट्रकला मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रक ने जोरदार धडक दिली, त्यामुळे मागून धडकलेल्या ट्रकने पेट घेतला.. यामध्ये मागच्या ट्रक मधील चालकाचा जळून मृत्यू झाला.. तर उभ्या असलेल्या ट्रक मधला चालक गंभीर जखमी झाला आहे.. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.. पोलीस आणि अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले.. या घटनेमुळे महामार्गावरची वाहतूक बराच वेळ विस्कळीत झाली होती...
0
0
Report

सोलापूर ग्रामीण पुलिस ने 938 भोंगे हटाए; 581 मंदिर और 357 मस्जिदों से कार्रवाई

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळावरील 938 भोंगे हटवले, सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी मोहीम यशस्वी - सोलापूर जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळावरील 938 भोंगे काढण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांना मोठे यश - जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचा महत्त्वपूर्ण निर्णय - सोलापूर ग्रामीण पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेमध्ये 938 पैकी 581 भोंगे मंदिर तर 357 भोंगे मशीदीवरील काढण्यात यश - समाजातील नागरिक, धर्मस्थळांचे पदाधिकारी, आणि विश्वस्तांचा कायद्याचा आदर राखत सकारात्मक प्रतिसाद
0
0
Report
Advertisement

नागपुर में सुबह के हादसे में 70 वर्षीय महिला की मौत, कार चालक फरार

Nagpur, Maharashtra:नागपूरच्या धरमपेठ भागात सुगंध मंगल कार्यालय जवळ आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.. सुमारे 70 वर्ष वयाची ही महिला मॉर्निंग वॉक वर जात असताना सुगंध मंगल कार्यालय जवळच्या चौकावर अत्यंत तीव्र गतीने आलेल्या एका कार ने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.. या धडकेमुळे महिला रस्त्यावर दूरवर फेकली गेली.. आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे... या अपघातानंतर कार तीव्र गतीने तिथून निघून गेली.. सध्या पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे आणि अपघात झालेल्या महिलेचा मृतदेह रुग्णालयात नेण्यात आलंय.. तर फरार झालेल्या कारचा शोध सुरू करण्यात आला आहे....
0
0
Report

छह महीने से अनुदान नहीं मिलने पर गोशाला चालक संकट में, प्रशासन से राहत की मांग

Nashik, Maharashtra:नाशिक ( मालेगाव ) विशाल मोरे शासनाकडून गेल्या सहा महिन्या पासून मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील गोशाळांना मिळाले नाही अनुदान.. गोशाळा चालक संकटात.. शासनाकडून गेल्या सहा महिन्या पासून नांदगाव, मनमाड, मालेगाव भागासह नाशिक जिल्ह्यातील गोशाळांना अनुदान रक्कम मिळाली नाही त्यामुळे गोशाळा चालक संकटात सापडला आहे शासनकडून महाराष्ट्र गोसेवा आयोगा मार्फत नोंदणीकृत गोशाळां मध्ये देशी गाईंच्या संगोपनासाठी प्रतिदिन प्रतीगोवंश 50 रुपये दिले जाते मात्र सहा महिन्या पासून अनुदान रखडल्यामुळे गोशाळा चालक अडचणीत सापडले असून सध्या चारा साठविण्यासाठी अनुदान रक्कमची गरज असून शासनाने लवकरात लकर अनुदान रक्कम देण्याची मागणी गोशाळा चालकांनी केली आहे बाईट :-बाळासाहेब करवर बाईट :-भैय्यासाहेब देशमुख गोशाळा चालक..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top