445001
शेतकरी न्याय यात्रेतून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाची पोलखोल करणार, आशिष खुलसंगे
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची शेतकरी न्याय यात्रा शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत आहे. शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने आणि अतिपावसामुळे नापिकीचे संकट उभे राहिले आहे. कोळसा खाणीमुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. पीक विमा मिळवण्यात अडचणी आहेत आणि पांदण रस्ते योजना रखडली आहे. सरकार 'लाडकी बहिण' योजनेचा प्रचार करत असताना, शेतकऱ्यांना दुसऱ्या हाताने लुटून उध्वस्त करत असल्याचा आरोप आशिष खुलसंगे यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
महाराष्ट्र विधानसभा में महायुती की भारी जीत, बहुमत के साथ सरकार बनने की चर्चा
Nagpur, Maharashtra:नागपूर आशिष देशमुख भाजपा आमदार, 121 भाजपा उमेदवारचा महाविजय आहे... काँग्रेस उमेदवाराला चपराक आहे देशासाठी महत्त्वाच असलेलं महिला आरक्षणाचा विधेयक पारित व्हावं.. 2/3 बहुमत एनडीएच व्हावं.. त्यामुळे ऑपरेशन टायगर अंतर्गत आलेल्या खासदारांचा आम्ही स्वागत करतो आमदार येऊ ये इच्छिता महाराष्ट्रात 288 पैकी 237/238 आमदार महायुतीचे आहे... तीन चतुर्थांश महायुतीचे आमदार आहे.. सत्ताधारी पक्षाचा आहे त्यामुळे अजून काही आमदार यावे अशी गरज मला तरी वाटत नाही लोकसभेचे किंवा राज्यसभेचे खासदार येत असतील तर त्यांचे स्वागत आहे... मात्र आमदारांची खरच गरज आहे का असा प्रश्न त्या ठिकाणी आहे सत्ताधारी पक्षात असलेल्या आमदारांवर जर अन्याय नको असेल तर जर विकासाचा निधी अपेक्षित असेल.....पुढच्या निवडणुकीत उमेदवारी जर राज्यामध्ये सर्वदूर मिळायची असेल इथे अनावश्यक असलेल्या आमदारांची गर्दी कशाला हा माझा प्रश्न आहे0
0
Report
महायुती के धैर्यशील कदम विजयी: सांगली-सातारा विधान परिषद चुनाव
Kolhapur, Maharashtra:सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांचा विजय झाला आहे. वैद्य ठरलेल्या एकूण मतांपैकी 593 मत मिळवत धैर्यशील कदम यांनी विजय मिळवला आहे. विरोधी महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिह जगताप यांना 292 मत मिळाली. या निकालानंतर बोलताना विजयी उमेदवार धैर्यशील कदम यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी निश्चित करताना आपल्यावर विश्वास टाकला याबद्दल आभार मानले. या निवडणुकीत कोणतीही मतं फुटली नाहीत असा दावा त्यांनी केला. महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी 292 मते मिळाल्याची माहिती दिली. महाविकास आघाडीच्या मतांपेक्षा महायुतीच्या बाजूने मतांचा भडका असल्याचा जगताप यांनी दावा केला."0
0
Report
इसवली के सार्वजनिक कुएं से तेंदुए की सुरक्षित रिहाई, वन विभाग ने बचाव किया
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी लांजा तालुक्यातील इसवली पाथरवाडी येथे सार्वजनिक विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाने सुखरूप सुटका केली आहे. अवघ्या तासाभरात राबविण्यात आलेल्या बचाव मोहिमेमुळे बिबट्याला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर पशुवैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आलं. इसवली गावातील पाथरवाडी येथील सार्वजनिक विहिरीमध्ये बिबट्या पडला होता. याची माहिती लांजा वनविभागाला मिळताच अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याच्या सुरक्षित सुटकेसाठी विहिरीमध्ये दोरीच्या सहाय्याने लोखंडी पिंजरा सोडण्यात आला. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर बिबट्या पिंजऱ्यात सुरक्षितपणे अडकला. त्यानंतर पिंजरा वर ओढून बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यात आलं.. सुटका केलेल्या बिबट्याची सहाय्यक आयुक्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास अनुसे यांनी वैद्यकीय तपासणी केली. तपासणीत बिबट्या हा नर जातीचा असून त्याचे वय अंदाजे दीड वर्ष असल्याचे निष्पन्न झालं. तर बिबट्या पूर्णपणे सुस्थितीत असल्याने वनविभागाने त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केलं.0
0
Report
Advertisement
सुप्रीम कोर्ट के फैसले के बाद गांधी नगर सीमा तक अतिक्रमण हटाने कार्रवाई शुरू
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरा शेजारी असणाऱ्या गांधीनगरपर्यंतच्या हद्दीतील जागा कोल्हापूर महानगरपालिकेचीच असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. या निर्णयानुसार गांधीनगर हद्दीपर्यंत झालेली बांधकामे काढून टाकावी अशी मागणी जनतेमधून केली जात होती. त्यानुसार एकूण 204 प्रकरणांपैकी 177 प्रकरणांमध्ये न्यायालयाची स्थगिती असल्याने उर्वरित 27 व्यावसायिक मिळकतींवर आज सकाळपासून कारवाई केली जात आहे. यासाठी महापालिकेच्या तीन स्वतंत्र पथकांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक पथकामध्ये सहाय्यक आयुक्त, उपशहर अभियंता, कनिष्ठ अभियंता, पंचनाम्यासाठी घरफाळा लिपिक व सर्व्हेअर यांचा समावेश करण्यात आला आहे.0
0
Report
धामणी के किसान अनिश्चितकालीन उपोषण पर, विद्युत कनेक्शन के विवाद से हंगामा
Shirur, Maharashtra:धामणी ग्रामपंचायती समोर २२ जूनपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धामणी आणि पहाडदरा येथील शेतकऱ्यांनी आमरण उपोषण पुकारलं असल्याची माहिती दिली जाते. डिंभे कालव्यावरून 9 उपसा सिंचन योजना पूर्ण झाल्या असूनही महावितरणकडून विद्युत कनेक्शन मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात वाढ झालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून वीज कनेक्शन देण्याचे आदेश दिले होते, विधानसभाातही आश्वासन दिले होते; परंतु महावितरणकडून सोलर धोरणाबद्दल तत्त्वाने आक्षेप घेण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. प्रायोगिक तत्त्वावरील सोलर पंप अपयशी ठरल्याने शेतकऱ्यांनी पारंपरिक विद्युत कनेक्शनची मागणी केली आहे. कर्जबाजारी झालेले शेतकरी पाण्याअभावी संकटात सापडल्याने आज २२ जूनपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरपंच सागर जाधव यांच्यासह १० शेतकऱ्यांनी धामणी ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण पुकारलं आहे.0
0
Report
भंडारा-गोंदिया में अविनाश ब्राह्मणकर का नया नेतृत्व, किसानों के लिए आवाज़ तेज
Bhandara, Maharashtra:भंडारा गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर, सर्वसामान्य लोकांसाठी आवाज उचलणाऱ्या हा एक नेता आता विधान परिषदेला मिळालेला आहे. निश्चित हा विजय आमचा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आणि मतदारांच्या एक या माध्यमातून नवीन अध्याय भंडारा गोंद्या जिल्ह्यात सुरुवात झालेली आहे. एक नवीन नेतृत्व अविनाश ब्राह्मणकर यांच्या या दोन्ही जिल्ह्यांना मिळालेला आहे. आता अविनाश ब्राम्हणकर हे भंडारा गोंदिया जिल्हाच्या अहोरात्र मेहनत करून विकास करतील.0
0
Report
Advertisement
चंद्रपुर के मोरवा हवाई अड्डे के विस्तार को गति मिली; फडणवीस ने तात्कालिक कार्रवाई के निर्देश
Chandrapur, Maharashtra:टायटल:---चंद्रपूरच्या मोरवा विमानतळ विस्तार व आधुनिकीकरणाला गती, आ. मुनगंटीवार यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद; मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे त्वरित कार्यवाहीचे निर्देश चंद्रपूर शहरालगतच्या मोरवा विमानतळाच्या विस्तार व आधुनिकीकरणासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित प्रस्तावाची तातडीने दखल घेत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या सकारात्मक निर्णयामुळे मोरवा विमानतळाच्या विस्तार व आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेला गती मिळाणार असून यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. चंद्रपूर जिल्ह्याच्या औद्योगिक, व्यावसायिक आणि पर्यटन विकासासाठी विमानतळाचा विस्तार अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. आ. मुनगंटीवार यांनी मांडलेल्या मोरवा विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठीच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने पुढील कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. सध्या चंद्रपूर विमानतळाची धावपट्टी सुमारे ९०० मीटर लांबीची असून छोट्या प्रवासी विमानांच्या उड्डाणासाठी ती अपुरी आहे. भविष्यात नियमित विमान सेवा सुरू करण्यासाठी धावपट्टीचा विस्तार, डीजीसीए मानकांनुसार सुविधा उभारणे आणि अन्य पायाभूत विकासकामे करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे चंद्रपूर विमानतळ विकासाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.0
0
Report
शिंदे-फडणवीस गुटों की तकरार से महाराष्ट्र में खतरे के संकेत
Mumbai, Maharashtra:तुम्हाला वाटत नाही का हा खूप मोठा चमत्कार आहे या सगळ्या मतदारांना शिंदे च्या निग्रहणीत सुरक्षित ठेवले होते आणि मतदाना वेळी सोडले होते शिंदे गटात आणि भाजप मध्ये कोणत्या प्रकारचे संबंध आहे जरी शिंदेच्या बाजुला मुख्यमंत्री यांचे हसू दिसत असेल तर ते खोटे आहे शिंदेंना दिल्लीतून बळ दिले जात आहे मात्र शिंदे गटाचा एक उमेदवार भाजपने पडला धमक्यांची रिकॉर्डिंग देखील तुम्ही ऐकली असेल तरी सुद्धा शिंदे गटा विरोधात मतदान झाले या राजकारणामुळे महाराष्ट्र कमजोर केले जात आहे शिवसेना कमजोर करण्याचा प्रयत्न आहे भाजप हा भांडवल दरांचा पक्ष आहे आणि आम्ही भांडवल दरविरोधात बोलू नये हे आम्हाला मान्य नाही घाटकोपर, भांडुप मध्ये लोकांचा रोष काल दिसून आले आहे ही गद्दारी अमित शहा आणि शिंदेंनी करून घेतली आहे या मागे एकच हेतू आहे की आम्ही मुंबईसह महाराष्ट्र पैशाने विकत घेऊ शकतो आम्ही कोणाच्या बाजूने असण्याचा प्रश्नच येत नाही आम्ही कोणाच्या बाजूने का राहू आम्ही आमची भूमिका घेऊन लढत राहू जय सैतान देवेंद्र फडणवीस यांच्या मानेवरती उभे होते त्यांच्या गळा दाबण्यासाठी अशी शक्यता मला वाटते आम्हाला राज्याच्या हितासाठी निर्णय घ्यावा लागेल उद्धवजी या संदर्भात निर्णय घेतील शिवसेना कमजोर महाराष्ट्र फोडण्यामागे त्याच्यामागे एकच ध्येय आहे की शिवसेना कमजोर करणे आणि मुंबई उद्योगपतींच्या घशात घालणं की शिवसेना विरोध करते या राज्याचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्र्यांना कळायला पाहिजे यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील अगदी शंकरराव चव्हाण सुद्धा असतील माननीय शरद पवार असतील विलासराव देशमुख असतील केंद्रामध्ये इंदिरा गांधी राजीव गांधी कोणी असतील त्यांना माहित आहे की शिवसेनेचे महाराष्ट्रातलं राजकीय दृष्टा मत त्यांना माहित होते की हा जो एक फोर्स आहे तो एक प्रकार राष्ट्रवादी फोर्स आहे सरकारला काही संदर्भात लढाया करता येत नसतील तर शिवसेना या लढाया लढत आहे देशासाठी हे माहीत होतं गद्दाराना भुमिका असते का ओमराजे नामचीन गद्दार आहेत आणि यांना काही भूमिका असू शकते शिवसेना तोडणे म्हणजे महाराष्ट्राचे तुकडे करणे हे अमित शहांचे भांडवलदार आहेत त्यांची आजीबाबत मनधरणी केली नाही जर शिंदे गटात गेल्यावर त्यांच्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळणार आहे का ओम च्या वतीने पहिले 15 कोटी कोणी घेतले याची माहिती उद्धव ठाकरे यांच्या कडे आहे लातूरचा काय विकास केला धाराशिव मध्ये विकास दिसत आहे तो युतीचा राज्य असताना विकास झालेला आहे साखर कारखाने उभे करणे म्हणजे विकास नाही सर्वत्र विकास हा सामुदायिक पद्धतीने होत असतो खासदारांना वाटत असेल की 100 कोटी घेतला म्हणजे विकास झाला म्हणजे व्यक्तिगत असे नाही आहे फडणवीस खोटं बोलत आहेत शिंदे यांच्या समोर काय बोलताना शिंदे यांच्या पाठीमागून काय बोलतात ते दाखवत आहेत शिंदे मध्ये आणि माझ्या मध्ये काही नाही आहे शिंदेने पूर्ण सुपारी घेतली आहे फडणवीसंना आडवा करण्याची आणि त्यांना अमित शहांचा पाठिंबा आहे देवेंद्र फडणवीस यांचा टांगा पलटी करण्यासाठी संजय राऊत आहे पहिले माझ्याशी लढा नंतर उद्धव साहेबांशी मी आजही सांगतो माझ्यासारखे हजार लोक पक्षामध्ये आहेत असे दाखवू जया पक्षासाठी ठाकरे कुटुंबासाठी जीवाची बाजी लावायला तयार असतील पैशासाठी नाही बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षासाठी आमच्यासारखे लाखो लोक आहेत या पक्षात जे तुमच्या गद्दारांशी लढायला तयार आहेत मिस्टर शिंदे माणसांचं जीवन हे क्षणभंगुर आहे बघा अजित दादांचं काय झालं एवढी मस्ती दाखवू नका आज हात उद्या नसाल0
0
Report
सोलापूर विधान परिषद के विजयी उम्मीदवार राजेंद्र राऊत को सीएम फडणवीस ने बधाई दी
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग सोलापूर विधान परिषदेचे विजयी उमेदवार राजेंद्र राऊत यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोन करून दिल्या शुभेच्छा सोलापूर विधान परिषदेचे महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांचा दणदणीत विजय झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा राजेंद्र राऊत यांना फोन करत विजयाच्या दिल्या शुभेच्छा भाजपचे राजेंद्र राऊत विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वसंत देशमुख यांच्यात होता सामना वसंत देशमुख यांचा दारुण पराभव केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा0
0
Report
Advertisement
लोणावळा में स्मार्ट मीटर विरोधी बाजार बंद, नागरिकों का भारी रोष
Varsoli, Maharashtra:पर्यटन नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यात आज स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात नागरिकांचा संताप रस्त्यावर उतरणार आहे. लोणावळा व्यापारी संघटनेच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेते, व्यापारी आणि नागरिकांनी बंदची हाक दिल्याने शहरातील बाजारपेठा कडकडीत बंद राहिल्या. महावितरणच्या कथित गलथान कारभाराविरोधात नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भरमसाठ वीजबिले, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि स्मार्ट मीटर सक्तीच्या निर्णयामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज लोणावळा बंद ठेवत प्रशासनाला इशारा दिला आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश व्यवहार ठप्प झाले असून नागरिकांचा रोष स्पष्टपणे दिसून आला. तर स्मार्ट मीटर मुळे होणारी विजवाढ ही या निमित्ताने पुढे आली आहे.0
0
Report
नागपुर विधान परिषद चुनाव: बीजेपी के डॉक्टर राजीव पोतदार भारी जीत के साथ विजयी
Nagpur, Maharashtra:नागपूर विधान परिषद निवडणुकांत भाजपचे डॉ. राजीव पोतदार यांनी दणदणीत विजय मिळवला... त्यांना झालेल्या 823 मतांपैकी 682 मतं मिळाली... तर काँग्रेसचे अतुल लोंढे यांना केवळ 130 मत मिळालीत... या विक्रमी विजयानंतर डॉक्टर राजीव पोतदार यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी0
0
Report
नाशिक चुनाव: नरेंद्र दराडे 100+ मतों से हारे, भुजबल-गिरीश महाजन पर आरोप
Yeola, Maharashtra:नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा 100 हून अधिक मतांनी पराभव झाला. दरम्यान माझ्या पराभवाला महायुतीचे नेते जबाबदार असून त्यांनी माझा घात केला आहे. यात मंत्री गिरीश महाजन, मंत्री छगन भुजबळ यांच्यावर थेट आरोप करण्यात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून येवल्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालय बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या संदर्भात आढावा घेतला आहे. आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी0
0
Report
Advertisement
सांगली सातारा चुनाव विजय के बाद बीजेपी में जोरदार जश्न, पेड़े बांटे और आतिशबाज़ी
Sangli, Maharashtra:सांगली सातारा विधानसभा परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार देण्याची कदम यांचा दणदणीत विजय झाला आहे.या विजयानंतर सांगलीमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.मारुती चौक या ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांकडून गुलाल आणि फटाक्यांची आतिशबाजी करत पेढ्यांचा वाटप देखील करण्यात आला आहे.त्यावेळी कदम यांच्या समर्थकांकडून दर्शन कदम आमदार असा फलक झळकवत जल्लोष केला आहे.0
0
Report
परभणी: महायुती के सईद खान विजयी, समर्थकों में जल्लोष
Parbhani, Maharashtra:परभणी ब्रेकिंग परभणी सईद खान यांचा विजयानंतर कार्यकर्त्यांकडून जल्लोष परभणीत महायुतीचे सईद खान विजयी.. महाविकास आघाडीचे विवेक नावंदर यांचा पराभव.. महायुतीचे सईद खान यांना 242 मते महाविकास आघाडीचे विवेक नावंदर यांना 159 मते.. परभणी महायुतीचे उमेदवार सईद खान विजयी..0
0
Report
सोलापुर विधान परिषद चुनाव: राजेंद्र राऊत 484 में 614 मतों से भारी जीत
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे राजेंद्र राऊत यांना 614 पैकी 484 मते घेत दणदणीत विजय ( 1 to 1 ) - सोलापूर विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांचा दणदणीत विजय - 614 पैकी 484 मते घेत राजेंद्र राऊत यांनी रोवला विजयाचा झेंडा - तर विरोधी उमेदवार वसंत देशमुख यांना 118 मते - एकूण मतमोजणी प्रक्रियेमध्ये 13 मते बाद - महायुतीचे राजेंद्र राऊत यांच्या दणदणीत विजयानंतर सोलापुरात जल्लोषाला सुरुवात0
0
Report
Advertisement
