445001
शेतकरी न्याय यात्रेतून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाची पोलखोल करणार, आशिष खुलसंगे
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची शेतकरी न्याय यात्रा शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत आहे. शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने आणि अतिपावसामुळे नापिकीचे संकट उभे राहिले आहे. कोळसा खाणीमुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. पीक विमा मिळवण्यात अडचणी आहेत आणि पांदण रस्ते योजना रखडली आहे. सरकार 'लाडकी बहिण' योजनेचा प्रचार करत असताना, शेतकऱ्यांना दुसऱ्या हाताने लुटून उध्वस्त करत असल्याचा आरोप आशिष खुलसंगे यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
भीमाशंकर मंदिर के दरवाजे बंद; निर्माण कार्य अधूरा, दर्शन अभी संभव नहीं
Shirur, Maharashtra:बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिराचे दरवाजे आणखी काही दिवस भाविकांसाठी बंदच राहण्याची शक्यता आहे. गेल्या पाच महिन्यांपासून भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी बंद आहे. प्रशासनाने ३१ मे रोजी मंदिर खुले करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात मंदिर परिसरात सुरू असलेली विकासकामे अजूनही अपूर्ण आहेत. पायरी मार्ग आणि सभामंडपाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. काम पूर्ण न झाल्यामुळे प्रशासन आता तिसऱ्यांदा मुदतवाढ देणार का? असा प्रश्न निर्माण झालाय. दुसरीकडे, देश-विदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांना दर्शन न घेताच माघारी जावे लागत असल्याने त्यांच्यात तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे ३१ मे उजाडला तरी भीमाशंकरचे दर्शन रखडणार, असेच चित्र सध्या पाहायला मिळत आहे.याचा मंदिर परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी..0
0
Report
रत्नागिरी के आंजर्ले में कोकण का पहला ग्रॉइन बांध ठप, मामलों पर खतरा बढ़ा
Ratnagiri, Maharashtra:दापोली- रत्नागिरी कोकणातील पहिल्या ग्रोइन बंधाऱ्याचे काम रखडले.. आंजर्ले किनाऱ्यावर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.. रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले समुद्रकिनाऱ्यावर उभारण्यात येणारा कोकणातील पहिलावाहिला ग्रोइन बंधारा सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.तब्बल ७० कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्णपणे ठप्प झाले असून,अर्धवट अवस्थेतील हा बंधारा ठिकठिकाणी खचू लागला आहे.समुद्रात ५०० मीटर आतपर्यंत जाणारा हा बंधारा पर्यटकांसाठी डॉल्फिन दर्शन,मनमोहक सूर्यास्त आणि सेल्फी पॉईंट म्हणून मोठे आकर्षण ठरत होता.मात्र,आता हाच अर्धवट बंधारा स्थानिक ग्रामस्थांसाठी धोक्याची घंटा बनला आहे.समुद्र उधाणाच्या काळात गावाला मोठा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ठेकेदाराच्या ढसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना, या गंभीर समस्येवर प्रशासन आता काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..0
0
Report
चिपळुण में दुर्घटना के बाद ग्रामस्थों ने महामार्ग विभाग कार्यालय पर हमला
Ratnagiri, Maharashtra:चिपळुणातील अपघातानंतर ग्रामस्थ आक्रमक; महामार्ग विभागाच्या कार्यालयावर धडक मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळुणातील वालोपे येथे दुचाकी आणि कंटेनरच्या भीषण अपघातात चार वर्षीय चिमुकलीसह तिच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ग्रामस्थांनी महामार्ग विभागाच्या कार्यालयावर धडक देत भुयारी मार्ग, सर्विस रोड, संरक्षण भिंती, गतिरोधक, लाईट व्यवस्था आणि दिशादर्शक फलकांसह विविध सुरक्षाविषयक कामांची तातडीने पूर्तता करण्याची मागणी केली.0
0
Report
Advertisement
कांदा कीमतों में उछाल, किसानों का विरोध प्रदर्शन दिल्ली तक पहुंचा
Shirur, Maharashtra:रोहित पवार बाईट पॉईंटर... शेतकऱ्यांसाठी प्रामाणिक प्रयत्न: शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन, रस्त्यावर उतरून त्यांच्या हक्कांसाठी प्रामाणिकपणे आंदोलन आणि काम करत राहण्याचा आमचा निर्धार आहे. कांदा दरवाढ आणि आंदोलन: १८ तारखेला केलेल्या आंदोलनानंतर कांद्याचे दर १२-साडेबारा रुपयांवरून १५ रुपये ८० पैशांपर्यंत वाढले. आजच्या आंदोलानंतर जनतेचा रोष पाहून सरकारला जाग आली असून उद्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह त्रिमूर्ती दिल्लीला जाणार आहे. तिथे सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. पुणे व इतर जिल्ह्यांमध्ये दरवाढीची मागणी: नाशिक जिल्ह्यासाठी जसा १५ रुपये ८० पैशांचा दर लागू झाला, तसाच तो पुणे आणि इतर जिल्ह्यांमध्येही मिळावा यासाठी आम्ही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना भेटून उद्या किंवा परवा विनंती पत्र देणार आहोत. विशिष्ट जिल्ह्यांमध्येच दरवाढ हा दुजाभाव: सरकारने वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगळा भाव ठरवणे हा दुजाभावच आहे. 'नाफेड' एका विशिष्ट पद्धतीने काम करत असले, तरी सरकारच्या दुर्लक्षामुळेच हा घोळ आणि अडचण निर्माण झाली आहे. विरोधक म्हणून आमची भूमिका: आम्ही विरोधक असलो तरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय आणि 'नाफेड'शी संपर्क साधून सर्वत्र समान भाव लागू करण्यासाठी प्रयत्न करत राहू. सोशल मीडियावरील पाठिंबा: सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेच्या आणि तरुण यांच्या हिताचे प्रश्न मांडणाऱ्या विविध आउटपुट्सना मोठा प्रतिसाद मिळत आहे. महिन्याभरातच अडीच कोटींपेक्षा जास्त लोकांनी पाठिंबा दर्शवला आहे, ज्याचा सरकारवर एक प्रकारे दबाव निर्माण होतो. तरुण आणि जनतेची एकजूट हीच ताकद: महिलांवर अत्याचार, तरुणांची बेरोजगारी किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असो; सिस्टीमच्या विरोधात लढायचे असेल तर सर्वांनी एकत्र येऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. जो लढेल तोच टिकेल, नाहीतर संपून जाईल. जागतिक परिस्थितीचा दाखला: सत्तेवर असणाऱ्या लोकांचा जेव्हा अहंकार वाढतो, तेव्हा जनता त्यांना धडा शिकवते. श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ आणि हंगेरी या country–मधील परिस्थिती आपण पाहिली आहे. भारतातही जेव्हा विद्यार्थी आणि तरुण रस्त्यावर उतरतील, तेव्हा हे आंदोलन संपूर्ण देशात वेगाने पसरेल.0
0
Report
कमला एकादशी के अवसर पर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर में फूलों से रोशन सजावट
Pandharpur, Maharashtra:अधिक तथा पुरुषोत्तम मासातील कमला एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली है. श्री विठ्ठल भक्त पुणे येथील राम जांभुळकर यांनी सेवाभावी तत्त्वावर फुलांची व पानांची भव्य सजावट केली आहे. या सजावटीसाठी झेंडू, शेवंती, अॅस्टर, गुलाब, निशिगंधा, तगर, लक्ष्मी कमळ, तुळशी, सूर्यफूल, ऑर्किड, अॅंथोरियम, कार्नेशन, जिप्सो, जरबेरा, कामिनी, अशोकाची पाने, ड्रेसिना, टेबल पाम, पिंक डेझी, ब्लू डेझी, सॅगऑफ, मनीप्लांट आदी बावीस प्रकारच्या फुलांचा व पानांचा वापर करण्यात आला है. मंदिरातील चौखांबी, चोळखांबी, श्री संत नामदेव पायरी, व्हीआयपी गेट तसेच इतर प्रमुख ठिकाणी सुमारे एक ते दीड टन विविध फुले वापरून आकर्षक सजावट करण्यात आल.0
0
Report
अकोला में बस के सामने अचानक व्यक्ति आया, चालक ने ब्रेक लगाकर हादसा टला
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर बसस्थानक परिसरात भरधाव एसटी बसखाली एक इसम आल्याची थरारक घटना घडली. साकोली ते अकोला जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस स्थानकातून बाहेर पडत असताना अचानक एक इसम बससमोर आल्याने गोंधळ उडाला. चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ ब्रेक लावल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. जखमी इसमाला तातडीने मुर्तीजापूर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला अकोला येथे रेफर करण्यात आले आहे. या घटनेमुळे काही काळ बसस्थानक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.0
0
Report
Advertisement
सातारा में भीषण हादसा: स्कॉर्पियो खाई में गिरा, 8 युवक मरे
Satara, Maharashtra:सातारा : आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात स्कॉर्पिओ गाडी खोल दरीत कोसळून आठ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. या हृदयद्रावक दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तरुणांच्या कुटुंबीयांची साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांत्वनपर भेट घेत त्यांच्या दुःखात सहभाग नोंदवला.यावेळी बोलताना खा. उदयनराजे भोसले म्हणाले, “मी त्यांच्या मुलाची किंवा भावाची जागा कधीच भरून काढू शकत नाही. मात्र मुलगा आणि भाऊ या नात्याने मी सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन.”या दुःखद प्रसंगी त्यांनी दिवंगत तरुणांना श्रद्धांजली अर्पण करत, “ईश्वर दिवंगत आत्म्यांना शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो,” अशी प्रार्थना केली.दरम्यान, या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात असून सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.0
0
Report
डिजिटल अरेस्ट दिखाकर 59 लाख की ठगी: सांगली में गैंग गिरफ्तार
Sangli, Maharashtra:डिजिटल अरेस्ट दिखाकर गंडा घातून तासगाव येथील निवृत्त शिक्षकाला 59 लाख रुपयांची फसवणूक केल्याची माहिती सांगलीच्या सायबर क्राईम ब्रांचने दिली आहे. पश्चिम बंगालच्या दोघांना पुण्यातून अटक करत त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँकांचे क्रेडिट व एटीएम कार्ड सह पासबुक आणि चेकबुक जप्त करण्यात आले आहेत. या दोघांच्या कडून तासगाव येथील एका निवृत्त शिक्षकाला व्हिडिओ कॉलिंगच्याद्वारे संपर्क करून डिजिटल अरेस्टची भीती दाखवून 59 लाख रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणीस चांदीच्या सायबर क्राईम ब्रांचने तांत्रिक दृष्ट्या यशस्वी तपास करत मोर्चा पश्चिम बंगालच्या असणाऱ्या दोघांना पुण्याच्या हडपसर मधून अटक केली आहे.0
0
Report
सोळांकूर गांव में आक्रामक माकड़ से 4 दिन में 63 घायल, ऑपरेशन मंकी जारी
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील सोळांकूर गावात एका आक्रमक माकडाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गेल्या चार दिवसांत तब्बल 63 जणांना चावा घेतल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या माकडाला पकडण्यासाठी वनविभाग, रेस्क्यू टीम आणि ग्रामस्थांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे. एका अर्थाने सोळांकूर गावात ऑपरेशन मंकी शोध मोहीम राबवली जात आहे, पण हे माकड काही रेस्क्यू टीमच्या हाती लागताना दिसत नाहीये. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या राधानगरी तालुक्यातील सोळांकूर गावात सध्या एका माकडाचीच चर्चा सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून हे माकड गावात मुक्तपणे फिरत असून, मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांवर हल्ले करत आहे. इतकेच नव्हे तर दुचाकीवरून जाणाऱ्या लोकांना देखील लक्ष करत आहे. या माकडाच्या चाव्यामुळे आतापर्यंत 63 जण जखमी झाले असून, दोन जणांना गंभीर दुखापत झाल्याने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनांमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून अनेकांनी घराबाहेर पडणेही कमी केले आहे. माकडाचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग, रेस्क्यू पथक आणि गावातील तरुणांनी संयुक्त मोहीम हाती घेतली आहे. हातात काठ्या घेऊन गावातील विविध भागांमध्ये शोधमोहीम राबवली जात आहे. वनविभागाने माकडाला भूल देण्यासाठी ट्रॅंक्विलायझर डार्टचा वापरही केला. मात्र, डार्ट लागल्यानंतरही माकडाने तो काढून फेकल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे माकडाला पकडण्याचे आव्हान आणखी कठीण बनले आहे. वनविभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार या माकडाला यापूर्वी काही प्रकारची दुखापत झाली असावी. त्यामुळे ते आक्रमक बनल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, ग्रामसभेत “ऑपरेशन मंकी” अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, अतिरिक्त मनुष्यबळ आणि आवश्यक साधनसामग्रीची मागणी करण्यात आली, त्यानुसार गावात हल्लेखोर माकडाला पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. पण माकड काही रेस्क्यू टीमच्या हाताला अजून तरी लागलेलं नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये या माकडाची दहशत पसरली आहे.0
0
Report
Advertisement
डोंबिवली के खंबाळपाडा में किरकोळ विवाद के चलते पड़ोसी ने पड़ोसी की हत्या
Kalyan, Maharashtra:डोंबिवलीत किरकोळ वादातून शेजाऱ्याने केली शेजाऱ्याची हत्या डोंबिवलीच्या खंबाळपाडा भागात किरकोळ वादातून एकाची हत्या करण्यात आलीय. शेजाऱ्याने शेजाऱ्याची चाकूनं भोसकून हत्या केलीय. रोहित शेलार याने प्रताप चौधरी याची हत्या केलीय. रोहित आणि प्रताप एकमेकांचे शेजारी आहेत. रोहित याच्या बांधकामामुळे प्रताप याच्या घराच्या भिंती या सामाईक होणार होत्या, मात्र प्रतापचा त्याला विरोध होता आणि याच वादातून रोहितने प्रतापची चाकूने भोसकून हत्या केली. याप्रकरणी डोंबिवली टिळक नगर पोलिस घटना स्थळी पोचली आहे आणि घटना स्थळी पंचनामा सुरु आहे या घटनेतील आरोपी चा टिळक नगर शोध सुरु केला आहे.0
0
Report
देवठाणा में पिकअप दुर्घटना: पति और दो बेटियाँ मौत, पत्नी घायल
Washim, Maharashtra:वाशीम–कनेरगाव रोडवरील देवठाणा फाट्याजवळ आज भीषण अपघात घडला. पिकअप वाहनाच्या चुकीमुळे मोटारसायकल ला जोरदार धडक बसून एका कुटुंबावर काळाचा घाला आला. इस हृदयद्रावक अपघातात पती आणि दोन्हीं मुलींचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली है. मृतांमध्ये ज्ञानेश्वर निवृत्ती खडसे, किर्ती खडसे और केतकी खडसे यांचा समावेश है. प्रामुख माहितीनुसार, मृत मुलींमध्ये एक 3 वर्षांची तर दुसरी 7 वर्षांची होती. हे कुटुंब देवठाणा येथील असल्याची माहिती समोर आली है. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. गंभीर जखमी पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे देवठाणा परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
पाथर्डी थाने के सामने विवाद से मौत, पीड़िता पर अत्याचार का नया मामला
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या पाथर्डी पोलीस ठाण्या समोर तक्रार देणाऱ्या महिलेसोबत आलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पीडित महिलेची तक्रार दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान मोठा गोंधळ उडाल्याची घटना घडली...तणावपूर्ण वातावरणात पीडित महिला आणि तिच्या मुलाने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून प्रयत्न केला...दरम्यान पोलीस ठाण्यात उपस्थित असलेले विठ्ठल खर्चन हे अचानक जमिनीवर पडून गंभीर जखमी झाले , त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्या व्यक्तीला मृत घोषीत केले...संबंधित व्यक्ती पीडित महिलेसोबत पोलीस ठाण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे...संबंधित पीडित महिलेवर एक महिन्यापूर्वी गावातीलच काही जणांनी अत्याचार केल्याचा आरोप आहे...दरम्यान पीडित महिलेची तक्रार नोंदवून घ्यावी यासाठी सोबत आलेल्या खर्चन यांचा मृत्यू झालाय या सर्व घटनेला पोलीस जबाबदार असल्याचे नातेवाईकांनी घेतले आहे0
0
Report
Advertisement
बारामती पुलिस ने नकली नियुक्ति पत्र देकर करोड़ों की ठगी करने वाले गैंग पर चोट, तीन आरोपी गिरफ्तार
Rui, Maharashtra:शासकीय नोकरीचं आमिष दाखवून कोट्यावधींना गंडा घालणारा गजाआड.... बारामती तालुका पोलिसांची मोठी कारवाई.... बनावट नियुक्त पत्र देत एक कोटी छत्तीस लाखांना गंडा घालणारी टोळी पोलिसांनी केली गजाआड. Anchor _ शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तरुण-तरुणींसह अनेकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या भामट्यांच्या टोळीवर बारामती तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. बनावट नियुक्तीपत्रे देऊन तब्बल १ कोटी ३६ लाख ९० हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या या टोळीतील आणखी एका आरोपीला बारामती तालुका पोलिसांनी गजाआड केल आहे. सुरज तिमयया असदकर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात बारामती तालुका पोलिसांनी आतापर्यंत तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. यापूर्वीच दौंड येथील अजिंक्य पाठक आणि येरवडा येथील सुधाकर सोळंकी यांना अटक केली असून या दोघांचीही रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.0
0
Report
वाशिम के रिसोड में आंधी-बारिश से पेड़ गिरने और बिजली आपूर्ति बाधित, नुकसान
Washim, Maharashtra:अँकर:वाशीमच्या रिसोड शहरासह परिसरात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. सायंकाळी दरम्यान वातावरणात अचानक बदल होऊन जोरदार पावसाला सुरुवात झाली. वाढत्या उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी वादळी वाऱ्यामुळे शहरात काही ठिकाणी नुकसान झाले. जोरदार वाऱ्यामुळे शहरातील काही भागांत झाडांच्या फांद्या तुटून पडल्या, तर काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला. शहरातील विश्वा लॉन येथे उभारण्यात आलेले लोखंडी व सजावटीचे डिजाईन कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत मोठं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटना घडली त्यावेळी परिसरात काही नागरिक उपस्थित होते. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेनंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.0
0
Report
सोलापुर में गन्ना किसान आक्रमक, दो साल से बिल बकाया के कारण उपवास-रास्ता रोको
Solapur, Maharashtra:सोलापुरात ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक - सोलापुरात ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक - बेमुदत सुरू असलेल्या उपोषणाचे रास्ता रोकोत रूपांतर - गोकुळ साखर कारखान्याने मागील दोन वर्षापासून ऊस बिले न दिल्याने शेतकऱ्यांचे उपोषण सुरु आहे - मात्र पोलिसांनी आंदोलकांना मंडप उखडून फेकू अशी भाषा केल्याने शेतकरी आक्रमक - संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने शेतकऱ्यांची माफी मागावी अन्यथा आम्ही रस्ता रोको सुरूच ठेवणार असल्याचा शेतकऱ्यांचा इशारा - मागील वर्षीचे 2 कोटी तर यंदाच्या वर्षीचे 130 कोटी थकवल्याने शेतकऱ्यांचे उपोषण सुरु आहे - जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शांततेत सुरू असलेल्या उपोषणातील शेतकरी आक्रमक - जिल्हा परिषदे बाहेरील प्रमुख रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली - दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे आंदोलकांच्या भेटीसाठी दाखल - तहसीलदार किरण जमदाडे यांच्याकडून शेतकऱ्यांची दिलगिरी व्यक्त करण्यात आली - मात्र शेतकरी आक्रमक असून माफी मागितल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका0
0
Report
Advertisement
