445001
शेतकरी न्याय यात्रेतून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाची पोलखोल करणार, आशिष खुलसंगे
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची शेतकरी न्याय यात्रा शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत आहे. शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने आणि अतिपावसामुळे नापिकीचे संकट उभे राहिले आहे. कोळसा खाणीमुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. पीक विमा मिळवण्यात अडचणी आहेत आणि पांदण रस्ते योजना रखडली आहे. सरकार 'लाडकी बहिण' योजनेचा प्रचार करत असताना, शेतकऱ्यांना दुसऱ्या हाताने लुटून उध्वस्त करत असल्याचा आरोप आशिष खुलसंगे यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
NEET पेपर लीक के विरोध में लासलगाव से जंतर मंतर तक प्रदर्शन; जवाबदेही की मांग
Yeola, Maharashtra:नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण आणि दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू झालेल्या CJP आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज लासलगावात मोर्चा काढून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला लासलगाव येथील एसटी आगारापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आंदोलनकर्त्यांनी हातात भारतीय राष्ट्रध्वज आणि निषेधाचे फलक घेऊन सहभाग नोंदवला यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली मोर्चानंतर आंदोलनकर्त्यांनी लासलगाव पोलिसांकडे निवेदन सादर केले जंतर-मंतरवरील आंदोलनावेळी लाठीचार्ज करणाऱ्या संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली0
0
Report
जंतर-मंतर पहुंचे प्रशांत मिश्रा: AI से खेती के लिए आंदोलन की धार तेज
Nagpur, Maharashtra:नागपूर नवी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनात परदेशातूनही काही जण सहभागी झाले आहेत. अमेरिकेतील सिएटल येथुन CJP आंदोलनात सहभागी होण्यासाठी ऍग्री AI archeitect आणि क्लिक to क्लाऊडचे संस्थापक CEO प्रशांत मिश्रा हे जंतर-मंतरवरील आंदोलनात सहभागी झाले होते. मायक्रोसॉफ्टचे AI ॲग्री पायलट प्रोजेकट सहसंस्थापक असलेले मिश्रा मूळचे भंडारा मोहाडी या गावचे आहे. भारतात AI माध्यमातून शेती करण्याच तंत्रज्ञान रुजवण्यात मिश्रा यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. दिल्लीत आंदोलना दरम्यान त्यांवरही लाठीलार्ज झाला. ते जखमी झालेत. सरकार विद्यार्थ्यांसोबत असंवेदनशीलपणे हाताळत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पोलिसांनी आंदोलकांनी केलेल्या मारहाणीचा त्यांनी निषेध केला. आंदोलनात सहभागी आंदोलनकर्ते स्वखर्चाने पैसे खर्च करत असल्याचे प्रशांत मिश्रा यांनी सांगितलं आहे. केंद्रिय शिक्षामंत्री प्रधान यांच्या राजीनामाशिवाय हे आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली. यासंदर्भात प्रशांत मिश्रा यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधीनी0
0
Report
नीट 2026 पेपर विवाद का नोटिस: कोर्ट ने उत्तरपत्रिकाओं की मांग की
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:बीड च्या शुभम गवते यांनी नीट 2026 परीक्षा दिली होती, त्याची ओएमआर शीट पाहता जास्त मार्क मिळायला हवे होते. याबाबत गोंधळ झाल्याचा आरोप करत त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. याबाबत आज सुनावणी झाली आणि न्यायालयाने परीक्षा घेणाऱ्या एनटीए ला नोटीस बजावली आहे, आणि त्या 2 विद्यार्थ्यांची मूळ उत्तरपत्रिका कोर्टात सादर करायला सांगितले आहे; एक आठवड्यात उत्तर पत्रिका न्यायालयात द्यायची आहे. त्यानंतर पुढील सुनावणी होईल.... महेंद्र पंडितराव गंडले, याचिका कर्त्यांचे वकील0
0
Report
Advertisement
दिल्ली के आंदोलन के समर्थन में वंचित बहुजन आघाडी ने महाराष्ट्र बंद बुलाया; येवला में डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा के सामने प्रदर्शन
Yeola, Maharashtra:अँकर:- दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून येवल्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र घोषणाबाजी करत निदर्शने केली याप्रसंगी येवला बंदची हाक देण्यात आली होती येवलाबंदला व्यापाऱ्यांनी संमिश्र प्रतिसाद दिला असून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व्यापाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले या संदर्भात आढावा घेतला आहे0
0
Report
नांदेड में विद्यार्थियों का मोर्चा, शिक्षा मंत्री के इस्तीफे की मांग
Nanded-Waghala, Maharashtra:दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्याच्या निषेधार्थ नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला काँग्रेस, युबीटी, राष्ट्रवादी शरद पवार, मनसे सह विविध पक्षांनी पाठींबा दिलाय. दुपारी बारा वाजता आय टी आय चौकातून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात विरोधी वंचितसह काँग्रेस, युबीटी, राष्ट्रवादी शरद पवार, मनसेसह इतर पक्ष संघटनांचे पदाधिकारी आणि कारकर्ते सामील झाले होते. मोर्चात मोठ्या संख्येने विद्यार्थीही सामील झाले होते. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. काही अनुचित प्रकार घडू नये यायासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. दरम्यान नांदेडमध्ये सकाळी बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य रस्त्यावरील बाजारपेठ बंद होती.0
0
Report
लातूर बंद: व्यापारियों का समर्थन, गृहमंत्री–शिक्षा मंत्री से इस्तीफे की मांग तेज
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... लातूर जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद... बाजारपेठा बंद, व्यापाऱ्यांचा पाठिंबा..... लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा बंदच्या हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. लातूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून तिरंगा मार्च काढण्यात आला. शहरातील मुख्य बाजारपेठ और जिल्ह्यातील दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. व्यापाऱ्यांनीही या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. गृहमंत्री और शिक्षण मंत्री ने राजीनामा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी आंदोलनकर्ते आक्रमक झाले'red?.0
0
Report
Advertisement
MIDC पुलिस ने चार साल बाद अनिस खान को खोज कर परिवार से मिलवाया
Mumbai, Maharashtra:मुंबईतील एमआयडीसी पोलिसांनी चार वर्षांपासून बेपत्ता असलेल्या आठ वर्षीय अनिस खानचा शोध लावून एक महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. २२ ऑक्टोबर २०२३ रोजी अंधेरी पूर्व येथील स्नेहसदन बाल अनाथालयातून अनिस कोणालाही न सांगता बाहेर पडला होता. त्याआधी तो जुहू चौपाटी परिसरात बेवारस अवस्थेत आढळून आला होता. जुहू पोलिसांनी त्याच्या पालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणतीही माहिती न मिळाल्याने २१ ऑक्टोबर २०२३ रोजी त्याला स्नेहसदन अनाथालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी तो तेथून बेपत्ता झाला. या प्रकरणाचा तपास एमआयडीसी पोलिसांनी सातत्याने सुरू ठेवला. पोलिसांनी विविध बालसुधारगृहे, अनाथालये आणि संबंधित संस्थांकडे चौकशी केली. तपासादरम्यान एका बालसुधारगृहात वेगळ्या नावाने राहणारा मुलगा हा अनिसच असल्याचा संशय आला. त्यानंतर उपलब्ध कागदपत्रे, ओळख पडताळणी आणि इतर पुराव्यांच्या आधारे त्याची खात्री करण्यात आली. अखेर पोलिसांनी अनिसला सुखरूप ताब्यात घेत त्याची कुटुंबीयांशी भेट घडवून आणली. तब्बल चार वर्षांनंतर आपल्या मुलाला पाहताच कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. एमआयडीसी पोलिसांच्या चिकाटी, संयम आणि अथक तपासामुळे या प्रकरणाचा यशस्वी उलगडा झाला असून, या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.0
0
Report
बारामती में दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार के पूर्णाकृती पुतले का लोकार्पण
Rui, Maharashtra:बारामती दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण. दर्शण्यासाठी बारामतीकर करतायेत गर्दी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार पडले लोकार्पण... मान्यवरांसह उपस्थितांना अश्रू अनावर. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पूर्णाकृती पुतळ्यांचे आज लोकार्पण पार पडले. उपमुख्यमंत्री सुरेंद्र पवार जय पवार यांच्यासह बारामती करांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला आहे. यावेळी विविध धर्माच्या वतीने मानवंदना देण्यात आली. बारामतीकर पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी गर्दी करत आहेत शाळकरी विद्यार्थ्यांच्या अजित पवारांच्या गीतावर सर्वांचा अश्रू अनावर झाले. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी याने0
0
Report
पवना बांध 92.55% भरला; नदी किनारे सतर्कता की अपील
Varsoli, Maharashtra:पिंपरी चिंचवड शहरासह मावळ तालुक्याच्या काही भागाची तहान भागवणारे पवन मावळातील पवना धरण आज 92.55 टक्के भरले आहे. हवामान विभागाने पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. पावसाचा जोर वाढत असल्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ही जास्त आहे. याकरिता धरणातील पाणी हे नदीपात्रात सोडावे लागणार आहे. याकरिता पावना नदीच्या काठावर असलेल्या गावांनी व तेथील नागरिकांनी सतर्क रहावे. पाटबंधारे विभागाकडून याबाबतच्या सूचना वेळोवेळी दिल्या जातील. पवना नदीची पाणी पातळी देखील वाढलेली असल्यामुळे नागरिकांनी आपली कृषी अवजारे, पशुधन नदी पात्राच्या जवळ घेऊन जाऊ नये ते सुरक्षित ठिकाणी हलवावे अशा सूचना पुणे पाटबंधारे विभागाकडून देण्यात आल्या आहेत.0
0
Report
Advertisement
बुलढाणा में महाराष्ट्र बंद के विरोध में प्रदर्शन, मलकापुर- सोलापुर मार्ग पर यातायात बाधित
Buldhana, Maharashtra:बुलढाणा ब्रेक मलकापूर सोलापूर महामार्गावर वंचितचा रास्तारोको बुलढाणात महाराष्ट्र बंदचे पडसाद Anchor - राज्यभरात पुकारण्यात आलेल्या 'महाराष्ट्र बंद'चे तीव्र पडसाद बुलढाणा जिल्ह्यात उमटले आहेत. मलकापूर-सोलापूर महामार्गावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जोरदार रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल पंधरा मिनिटे पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आंदोलकांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या या सतर्कतेमुळे काही वेळातच महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरळीत करण्यात आली असून सध्या तणावमुक्त शांतता आहे.0
0
Report
छगन भुजबल के मोदी ट्वीट पर विपक्षी मोर्चे और विरोध प्रदर्शन तेज
Yeola, Maharashtra:मंत्री छगन भुजबळ ऑन पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट फास्टट्रॅक कोर्टामध्ये जे जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना शिक्षा होईल हा चांगला निर्णय..... त्यामुळे यापुढे पेपर फुटीची प्रकरण होणार नाहीत..... कोर्टातील प्रकरण वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात त्यानंतर लोक विसरून देखील जातात.... मंत्री छगन भुजबळ ऑन ठाकरे बंधू मोर्चा एखादा विषय सरकारच्या विरोधात मिळाला तर विरोधक त्या विषयाचा फायदा घेतात.... चळवळ उभी करणे चूक आहे मी असं म्हणणार नाही विरोधी पक्षांचे ते कामच आहे. मंत्री छगन भुजबळ ऑन अण्णा हजारे पाठिंबा पाठिंबा देत आहे तर चांगली गोष्ट आहे ... मंत्री छगन भुजबळ ऑन वंचित बहुजन आघाडी बंद विरोधी पक्ष आपापल्या पद्धतीने आंदोलन करत आहेत कोन उपोषण करणार कोण महाराष्ट्र बंद करणार कोण मुंबई बंद करणार हे चालूच राहणार आहे.... मंत्री छगन भुजबळ विद्यार्थी आंदोलनात राजकीय पक्ष कोणत्याही विरोधी पक्षाला एखादा विषय मिळाला सरकारची विरोधात ते त्याच्यावर आवाज उठवतात... आम्ही देखील विरोधी पक्षात असताना एखादा विषय मिळाला की आवाज उठवण्याचं काम करतच होतो.. काँग्रेस असो बीजेपी असो शिवसेना असो कुठलाही विषय एखादा सरकारच्या विरोधात मिळाला की त्या विषयाला धरून आवाज उठवणे हे त्यांचं कामच आहे0
0
Report
सांगली में वंचित बहुजन आघाडी ने बंद का आह्वान, मंत्री प्रधान से इस्तीफे की मांग
Sangli, Maharashtra:वंचित बहुजन आघाडी द्वारा आघाडी के समर्थन से सांगली बंद की घोषणा की गई। इसके तहत सांगली शहर में रैली निकाली गई, मारूती रोड समेत मुख्य बाजार से वंचित बहुजन आघाडी के कार्यकर्ताओं ने बंद की जोरदार घोषणाबाजी की। शहर के डॉ. बाबासाहेब आंबेडकर statue से रैली निकली और लाठी हमले का विरोध करते हुए केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान से पद छोड़ने की मांग की गई।0
0
Report
Advertisement
पंढरपूर में आषाढ़ी एकादशी से पहले भक्तों की भीड़; 15 लाख पहुंचे, एसपी कुलकर्णी
Pandharpur, Maharashtra:आषाढी एकादशीच्या सोहळ्याला अद्याप दोन दिवस बाकी असताना पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे पोलिसांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार 15 लाख भाविक पंढरपूरमध्ये आज दाखल झाल्याचं सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितला आहे. राज्याच्या विविध भागातून आलेल्या दिंड्या आणि त्यामधून आलेले वारकरी पंढरपूर मध्ये दाखल होत आहेत प्रमुख मानाच्या पालख्यान सोबतचेही वारकरी पंढरपूर मध्ये आता दाखल होत आहे आषाढी एकादशीच्या पूर्वीच पंढरपूरमध्ये हाउसफुल गर्दी झाल्याचे चित्र प्रत्येक भागात दिसत आहे विठोबाची पदस्पर्श दर्शन रांग चंद्रभागा वाळवंट प्रदर्शना मार्ग मंदिर परिसर वारकऱ्यांनी हाउसफुल झाला आहे0
0
Report
बारामती में अजित पवार का पहला पूर्णाकृती पुतला लोकार्पित
Rui, Maharashtra:बारामतीत उभारला अजितदादांचा पहिला पूर्णाकृती पुतळा..... दादांना पाहून ऊर्जा मिळेल : बारामतीकरांच्या भावना..... दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच बारामतीत लोकार्पण करण्यात आलेय. बारामतीतून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जावे मुलाणी याने0
0
Report
जंतर-मंतर पेपरफुटी पर तहकीकात की मांग, महासभा में राजनीति गरमाती दिखी
Kalyan, Maharashtra:जंतर-मंतर लाठीचार्ज पडसाद केडीएमसीत ! शिवसेना उभाठाचे गटनेते उमेश बोरगावकर यांचे महासभा तहकूबीसाठी महापौरांना पत्र विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस कारवाईचा निषेध; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कल्याण दिल्लीतील जंतर-मंतर येथे कथित पेपर फुटी आणि विविध गैर प्रकरण विरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्या आंदोलनावर झालेल्या लाठी चर्च पडसाद आता कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेत देखील उमटण्याची शक्यता आहे . शिवसेना उभाठाचे गटनेते उमेश बोरगावकर यांनी आज होणाऱ्या सर्वसाधारण सभेसाठी तहकुबी सूचना दाखल करणार आहेत .. महासभा तहकुबीसाठी बोरगावकर यांनी महापौरांना पत्र पाठवले आहे .तहकुबी सूचनेत म्हटले आहे की, जंतर-मंतर येथे समाजसेवक सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली हजारो विद्यार्थी शिक्षण क्षेत्रातील कथित पेपरफुटी आणि गैरप्रकारांविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करत होते. मात्र, आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधूर आणि बळाचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही कारवाई लोकशाही आणि संविधानिक मूल्यांवर गंभीर आघात असल्याचेही सूचनेत नमूद करण्यात आले आहे. यासोबतच, या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. जंतरमंतर येथील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी २३ जुलै रोजीच्या केडीएमसीच्या सर्वसाधारण सभेत तहकुबी सूचना मंजूर करून या विषयावर चर्चा घडवून आणावी, अशी मागणी उमेश बोरगांवकर यांनी केली आहे.0
0
Report
Advertisement
