icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अकोला में नकली जैविक खाद बनावट पर बड़ी कार्रवाई: 93 लाख का स्टॉक जब्त

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात बनावट जैविक खत उत्पादन आणि विक्रीप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली असून गुजरातमधील एग्रोनोटिक एशियन इंडस्ट्रीस या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या तपासात संबंधित कंपनीकडून Fertilizer (Inorganic, Organic or Mixed) Control Order 1985 च्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा समोर आले आहे. कृषी विकास अधिकारी आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या पथकाने MIDC-4 परिसरातील एका गोदामावर छापा टाकून तपासणी केली. यावेळी कंपनीकडून विविध जैविक उत्पादनांचे उत्पादन आणि साठवण करण्यात येत असल्याचे आढळले. तपासादरम्यान गोदामात मोठ्या प्रमाणावर जैविक खताचा साठा मिळून आला. एकूण 27 प्रकारची जैविक उत्पादने आणि हजारो लिटर द्रव स्वरूपातील खत जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे 93 लाख रुपयांमध्ये असल्याचे सांगण्यात आले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, संबंधित कंपनीकडे आवश्यक परवाने आणि कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्या. तसेच उत्पादनाच्या नोंदी आणि नमुन्यांमध्येही विसंगती असल्याचे निदर्शनास आले. यामुळे कृषी विभागाने ही कारवाई करत संबंधित कंपनीविरोधात खदानियंत्रण आदेश 1985 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई कृषी अधिकारी सुधाकर खंडारे, कृषी विकास अधिकारी तुषार जाधव आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report

मुंबई-गोवा हाईवे पर कार खाई में गिरी, एक की मौत, पांच घायल

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. मुंबई-गोवा महामार्गावर कार २५ फूट दरीत कोसळली.. एकाचा मृत्यू, ५ गंभीर जखमी!.. मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे मुंबईवरून चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या एका कार चालकाचे वालोपे येथील HP पंपाजवळ गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे ही कार थेट २५ ते ३० फूट खोल दरीत कोसळली.. या भीषण अपघाताची माहिती मिळताच चिपळूण शासकीय विश्रामगृहाजवळ तैनात असलेली 'जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी संस्थां'ची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली.. रुग्णवाहिकेच्या पथकाने तातडीने बचावकार्य सुरू करत सर्व जखमींना तात्काळ उपचारासाठी लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले.. या दुर्दैवी अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले असून,एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.. संजय जाधव असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते चिपळूणमधील मार्कंडी येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे... पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
0
0
Report
Advertisement
0
0
Report
Advertisement

चांदिवली के नालों की सफाई: सोमनाथ सांगळे के साथ रिक्षा-डस्टबीन हटे, प्रवाह बहाल

Mumbai, Maharashtra:चांदिवलीच्या टिळकनगर व सत्यनगर येथील मुख्य नाल्यांच्या साफसफाईचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र या नाल्यात चक्क रिक्षा तसेच मुंबई महानगरपालिकेचे लोखंडी डस्टबीन टाकल्याचे समोर आले आहे. ही बाब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख सोमनाथ सांगळे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत महानगरपालिका कर्मचार्‍यांच्या मदतीने रिक्षा व लोखंडी डस्टबीन बाहेर काढून घेतले. त्यामुळे नाल्याचा प्रवाह सुरळीत करण्यात यश आले. स्थानिक नागरिकांनी नाल्यांमध्ये कचरा किंवा मोठ्या वस्तू टाकू नयेत, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
0
0
Report

महाराष्ट्र में 25,400 मेगावॉट अणुऊर्जा, 1.23 लाख नौकरियाँ; बड़ा निवेश समझौता

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. बारसू, पूर्णगड, देवगड येथे अनुउर्जेसाठी सामंजस्य करार.. 25 हजार 400 मेगावॅट अनुऊर्जा आणि 1 लाख 23 हजार 500 रोजगार निर्मिती.. अँकर राज्यातील अणुऊर्जा निर्मितीसाठी एनपीटीसीएल सह चार कंपन्यांनी मंगळवारी राज्य सरकार सोबत साडेसहा लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक करार केले.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या करारातून 25 हजार 400 मेगावॅट अणुऊर्जा निर्मिती आणि 1 लाख 23 हजार 500 रोजगार निर्मिती निर्माण होणे अपेक्षित आहे.. यामध्ये रत्नागिरी बारसू येथील अदानी पावर लिमिटेड व त्यांची कोस्टल महा ऑटोमिक एनर्जी लिमिटेडचा 6 हजार मेगावॅट अणुऊर्जा प्रकल्प, पूर्णगड येथे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा अणुउर्जा रीऍक्टर प्रकल्प तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे नॅशनल थर्मल पावर कार्पोरेशन लिमिटेडच्या अणुउर्जा प्रकल्प आदींचा समावेश आहे..
0
0
Report

कोल्हापूर के राजाराम बांध पर 12 वर्षीय बच्चे की डूबकर मौत

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरातील राजाराम बंधारा इथ पोहण्यासाठी गेलेल्या बारा वर्षीय शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय. उज्वल गंगाराम बडगे असे मृत मुलाचे नाव आहे. मूळचे कर्नाटक मधील गोकाक येथील रहिवासी असलेले गंगाराम बडगे हे गेल्या काही वर्षांपासून कसबा बावडा इथं त्यांची 2 मुले आणि पत्नीसह राहतात. गंगाग्राम बडगे हे त्यांच्या दोन मुलांना सोबत पोहण्यासाठी राजाराम बंधारा इथ गेले होते. यावेळी गंगावाला काही कामासाठी बाजूला गेले, त्यावेळी काठावर उभा असलेला उज्वल हा त्याचा 12 वर्षीय मुलगा पाय घसरून नदीत पडला. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन पथकाकातील स्वयंसेवकांनी शर्थीचे प्रयत्न करून उज्वलला पाण्याबाहेर काढल. पण उपचारापूर्वीच उज्वल याचा मृत्यू झाला होता.. या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत करण्यात आलीय.
0
0
Report
Advertisement

बदलापुर म्हाडा कॉलनी में पानी की पाइपलाइन फूटी, पानी बर्बाद

Ambernath, Maharashtra:बदलापूर शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात पाणी गळती दररोज शेकडो लिटर पाणी जातय वाया बदलापूर शहरातील म्हाडा कॉलनी येथील काँक्रीट रस्त्याखालील पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही पाण्याची गळती सुरू असून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासनाचे मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. एकीकडे बदलापूर शहरातील अनेक भागात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना, दुसरीकडे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे होणाऱ्या या पाण्याच्या अपव्ययाबद्दल स्थानिक नागरिकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.
0
0
Report

नाशिक येवला तालुक्यात विहिरीत पडलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा जीव पोलीस जवानाने उडी मारून वाचवला – कौतुक

Lasalgaon, Maharashtra:नाशिकच्या येवला तालुक्यातील लासलगाव जवळ असलेल्या कोटमगाव येथे ग्रामपंचायत कर्मचारी संतोष शिंदे हे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळ गेले असता विहिरीत पाय घसरून पडल्याने विहिरीत पडले होते . दरम्यान परिसरातच कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई रुपेश कांबळे यांना विहिरीतून वाचवा वाचवा असा आवाज आल्याने त्यांनी क्षणाचाही विलंब न करता विहिरीच्या पाण्यात उडी घेऊन या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्राण वाचवल्याने पोलिसांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे
0
0
Report
Advertisement

अमरावती में गर्मी की लहर, पारा 46.8°C; 15 उष्माघात रोगी, 3-4 मौतें

Amravati, Maharashtra:अमरावतीत उष्णतेची लाट कायम, पारा पोचला 46.8 अंशावर; आतापर्यंत जिल्ह्यात आढळले उष्माघाताचे 15 रुग्ण अमरावती जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून काल जिल्ह्यात उन्हाचा पारा 46.8 अंशावर पोहोचण्याचा पाहायला मिळाल आहे. त्यामुळे सध्या अमरावतीकर उन्हाने त्रस्त झाले असून अंगाची लाही लाही करणारा ऊन अमरावतीकर अनुभवात आहे. दरम्यान या उन्हामुळे गेल्या दोन ते अडीच महिन्यात पंधरा 15 उष्माघाताचे रुग्ण आढळले असून जिल्हा सामान्य रुग्णालयात या रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी पाठवले आहे. तसेच आतापर्यंत तीन ते चार रुग्णांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र अजून पर्यंत अधिकृत ही आकडेवारी पुढे आली नाही. काही काम करायचे असल्यास सकाळी करून घ्यावी व बाहेर जायचे असेल तर भरपूर पाणी प्यावे तसेच पोटभर नाश्ता करून बाहेर पडावे व उन्हात गडद कपडे न घालता पांढऱ्या कपड्यांचा वापर करावा आणि बाहेरील काम करायचे असल्यास संध्याकाळच्या वेळेचा उपयोग करण्याचे आव्हान अमरावती जिल्हा शल्य चिकित्सक विनोद पवार यांनी केला आहे.
0
0
Report

आरबीआई ने सातारा यशवंत सहकारी बैंक का लाइसेंस रद्द कर दिया; डिपॉज़िट धारक घबराए

Satara, Maharashtra:सातारा - आर्थिक दृष्ट्या डबघाईला आलेल्या द यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड फलटण या सहकारी बँकेवर भारतीय रिझर्व बँकने कठोर कारवाई करत बँकेचा परवाना रद्द केला आहे. 18 मे ला जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार 19 मे पासून व्यवसाय समाप्तीनंतर बँकेला कोणताही बँक व्यवहार करता येणार नसल्याने ठेवीदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आरबीआय ने बँकेकडे पुरेसे भांडवल नसणे, उत्पन्नाची क्षमता कमी असणे तसेच बँकिंग रेगुलेशन ॲक्ट मधील विविध अटींचे पालन न केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई केली आहे. आरबीआय ने महाराष्ट्राच्या सहकार आयुक्त आणि सहकारी संस्था निबंधकांना बँक बंद करून लिक्विडेटर नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top