icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

हिंदी: सजग अपहोल्डिंग धमाका: पिस्तुल के साथ सरायित गुंड की गिरफ्तारी; जिंदा कारतूस भी जब्त

Sangli, Maharashtra:पिस्तुल घेऊन दहशत माजविणार्‍या सराईत गुंडास अटक : पिस्तुल व जिवंत काडतूस जप्त. सांगलीच्या पलुस तालुक्यातील नागठाणे येथे पिस्तुल घेऊन दहशत माजविणार्‍या सराईत गुंडास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अनिकेत गुंडा करांडे असे याचे नाव असून तो सराईत गुंड असून त्याच्यावर यापूर्वी अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.तो कमरेला पिस्तुल लावून नागठाणे परिसरात दहशत माजवित असल्याची माहिती सांगली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्यास अटक केली आहे, त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत.
0
0
Report

90 दिनों में चुनाव: 1100 दूध संस्थाओं के मतदान का अधिकार सुरक्षित रखने की मांग

Kolhapur, Maharashtra:काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील बाईट मुद्दे ऑन गोकुळ मध्यंतरीच्या काळात गोकुळच्या दूध संस्था अवसायानात गेल्या असल्याच्या तक्रारी झाल्या होत्या सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की 90 दिवसात निवडणुका घ्या अकराशे संस्था या कायदेशीर दृष्ट्या लिक्विडेशनमध्ये आहेत या संस्था मतदानाला येणार नाहीत त्यामुळं लवकरात लवकर या संस्थांचं हेरिंग संपवा अशी आमची विनंती आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार जर 90 दिवसाच्या आत निवडणूक लागली तर या या अकराशे संस्था निवडणुकीला आल्या पाहिजेत म्हणून आम्ही दुग्ध निबंधकांना विनंती केली आहे यासंदर्भातील निकाल लवकर देऊन अकराशे दूध संस्थांच्या मतदानाचा अधिकार अबाधित राहील कायदेशीर परिस्थिती पाहिली तर 90 दिवसाच्या प्रक्रियेमध्ये या संस्था मतदानाला येऊ शकत नाहीत त्यामुळं लवकरात लवकर हेरिंग संपून या या संस्था मतदानाला याव्यात संस्था कोणाची आहे त्याच्याशी घेणेदेणे नाही मात्र लोकशाहीमध्ये संस्थेचा मतदानाचा हक्क राहिला पाहिजे अशी आमची भूमिका आहे महायुतीत काय काय सुरू आहे तुम्हाला माहिती आहे दोन गटातले वेगवेगळे वाद सुरू आहेत लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात... या अकराशी दूध संस्थांना न्याय मिळावा एवढी आमची विनंती या ठिकाणी आहे त्यांच्यात काय वाद सुरू आहे हे लोक पाहत आहेत सुनावणी घेताना अधिकाऱ्यांनाही मर्यादा आहेत रोज अनेक संस्थांच्या सुनावण्या ते घेत आहेत... हायकोर्टाने त्यांना 80 दिवसांचा कालावधी दिला आहे अजून 70 दिवस शिल्लक आहेत या 70 दिवसात त्यांचा निर्णय लागेल अशी आम्हाला खात्री आहे... अकराशे संस्था मतदानाला पात्र करायचे असतील त्यांचा हक्क अबाधित ठेवायचा असेल तर हे 90 दिवसात होईल असं मला वाटत नाही. On मोदी पेट्रोल डिझेल आवाहन हे फसलेलं परराष्ट्र धोरण आहे अमेरिकेच्या दबावाखाली ...ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशनच्या दबावाखाली हे भारत सरकारने केलेला कराराचा हा परिणाम आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर मैत्री कोणाशीच राहिलेली नाही अशी आमच्या देशाची परिस्थिती आहे टॅक्स संदर्भात विचारला असता दोन्ही मंत्री एकमेकांना बोट दाखवतात त्यावरून विस्कटलेल्या धोरणाचा परिणाम सामान्य माणसाला होतोय बंगालच्या निवडणुकीनंतर लगेच गॅस चा दर वाढला आता पेट्रोल डिझेलचा तुटवडा जाणवतोय.. पण तुमच्या चुकीच्या धोरणामुळे पेनिक सिच्युएशन निर्माण होते... पंतप्रधान बोलतात त्यावेळेस पेनिक निर्माण होतो कोविडमध्ये थाळी वाजवा म्हणलं तसं असेल तर मला माहित नाही On पंचगंगा प्रदूषण पंचगंगा प्रदूषणासाठी मागच्या वेळेस आम्ही डीपीआर तयार केले होते इचलकरंजी ते प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते त्या ठिकाणी प्रदूषण मुक्तीसाठी प्लांट तयार करावा यासाठी जागा मिळावी यासाठी प्रस्ताव सुद्धा होते नेमकं त्याचं काय झाले ते माहिती नाही सरकारने तत्काळ ॲक्शन त्या ठिकाणी घ्यावी आता पाण्याचा तुटवडा आहे सरकारने यात दक्षता घ्यावी ट्रिपल इंजिनचा सरकार आहे तिघांच्यातली भांडण मिटत नाही त्यामुळे नागरी समस्यांकडे बघायला मिळतो की नाही ती माहिती नाही तिघांची भांडण कॅबिनेटमध्ये मिटवता आता नागरिकांचे प्रश्न मिटवा अशी आमची विनंती आहे On मेटा राहुल गांधी पोस्ट मेटावरती दबाव आहे का अशी अवस्था सध्या निर्माण झाली आहे राहुल गांधींचा एखादा व्हिडिओ कोट्यावधी लोक लोकांपर्यंत पोहोचतो आणि अचानक तो दिसायचा बंद होतो ही धास्ती का घेतली गेली आहे सरकारने लोकशाहीमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मोठे Shस्त्र आहे त्यातून राहुल गांधी जगभर पोचत असतील तर त्याची धास्ती बेटावर सुद्धा सरकारचा दबाव आहे..
0
0
Report
Advertisement

नवापूर एमआईडीसी में दो टेक्स्टाइल कंपनियों में आग, लाखों के नुकसान की आशंका

Dhule, Maharashtra:नवापूरच्या एमआयडीसीत दोन कंपन्यांना भीषण आग लागली ची घटना घडली आहे. सुरुवातीला ही आग नेमकी कुठे आणि कशी लागली हे लक्षात येत नव्हतं. नंतर काही क्षणातच अभिने रौद्ररूप धारण केले. नवापूरच्या एमआयडीसीत असलेल्या टेक्स्टाईल च्या दोन कंपन्यांना ही भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आग इतकी भीषण आहे की काही क्षणातच लाखो रुपयांच्या नुकसान झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळून येत आहे. नवापूर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, नवापूर अग्निशमन दलाच्या वतीने आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले जात असून, आगेचं राउद्र रूप लक्षात घेता शेजारील गुजरात यातूनही अग्निशमन दलाच्या बंबांना पायारण करण्यात आल्याची माहिती समोर आले आहे. आगीची भीषणता पाहता नवापूर नंदुरबार, साक्री, पिंपळनेर, आणि गुजरात राज्यांमधून अग्निशामक बंब मागवले जात आहेत. एमआयडीसी परिसरात आग लागलेल्या कंपन्यांमुळे इतर कंपन्यांनाही आग लागण्याची भीती निर्माण झाली आहे. एमआयडीसी कडे आग विजवण्यासाठी होण्यासाठी कुठल्याही मोठे यंत्रणा नसल्याचे दिसून आल असून, एमआयडीसी परिसरात नवापूर पोलीस दाखल झाले आहेत. आग लागलेल्या ठिकाणी न जाण्याचे पोलिसांकडून आवाहन केला जात आहे.
0
0
Report

दस वर्षीय बच्ची के साथ दुष्कर्म: फास्ट ट्रैक कोर्ट से सजा की मांग तेज

Akola, Maharashtra:अकोल्यातील पातूर तालुक्यातल्या चान्नी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दहा वर्षीय चिमुकलीवर एका 60 वर्षीय नराधमाने पाशवी अत्याचार केल्याची घटना समोर आली होती.. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता.. या प्रकरणातील आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या असून त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.. या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी त्या मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती.. आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या मुलीच्या कुटुंबीयांशी व्हिडिओ कॉल वरून संवाद साधला आहे.. जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमार्फत हा संवाद साधण्यात आला असून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्या कुटुंबाला धीर देत या प्रकरणातील आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टातून जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी सरकार मदत करणार असल्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले.. तर कार्यकर्त्यांमार्फत कुटुंबाला तातडीने सव्वा लाखाची मदत करण्यात आली आहे...
0
0
Report

पुलिस बनकर धमकी देकर युवती के साथ बार-बार दुष्कर्म: आरोपी फरार

Shirdi, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील एका तरुणीला पोलिस असल्याचे भासवत आणि आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याच्या धमकी देत वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.. नांदगाव येथील आरोपी संदिप कौतिक बेंडके याने कॉलेजचे हरवलेले ओळखपत्र देण्याच्या बहाण्याने पिडित तरुणीशी ओळख वाढवली होती.. पीडितेला पाच महिन्यात नांदगाव, शिर्डी आणि नाशिक रोड अशा विविध ठिकाणी नेत आरोपीने तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध केल्याची फिर्याद नांदगाव पोलिस ठाण्यात दाखल झालेली आहे.. नांदगाव पोलिसांच्या पथकाने पीडितेला सोबत घेत या प्रकरणाशी संबंधित शिर्डीतील हॉटेल श्री साई समर्थची तपासणी करत पंचनामा केलाय.. आरोपी संदिप बेंडके हा फरार असून नांदगाव पोलिस त्याचा शोध घेत आहेत..
0
0
Report
Advertisement

नोटबंदी- lockdown के बाद सोने की कीमतें आसमान छूने लगीं, सराफ बाजार संकट में

Khed, Maharashtra:आधी नोटबंदी, मग लॉकडाऊन आणि आता 'हे आवाहन; सोन्याचे दर गगनाला भिडल्याने सराफ व्यावसायिक पुन्हा संकटात. आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती आणि गगनाला भिडलेले सोन्याचे दर यामुळे आधीच ग्राहक सोन्याकडे पाठ फिरवत होते. त्यातच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केल्याने पुण्याच्या राजगुरुनगर मध्ये सराफ बाजारात मोठा शुकशुकाट पाहायला मिळत आहे. सध्या सर्वत्र लग्नसराई आणि जत्रा-यात्रांचा हंगाम सुरू आहे, तरीही दागिन्यांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी नाहीये. मोदींच्या या आवाहनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असला तरी, याचा थेट फटका सराफ व्यावसायिकांना बसला आहे. आधीच नोटबंदी आणि लॉकडाऊनचा मोठा तोटा सहन केलेल्या या व्यावसायिकांसमोर आता बँकेचे कर्ज आणि कामगारांचे पगार कसे द्यायचे, हे मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे. यावर सरकारने काहीतरी विचार करावा, अशी मागणी व्यावसायिक करत आहेत.
0
0
Report

कोल्हापूर में किसानों के लिए कर्ज माफ़ी की मांग पर MNS का विरोध प्रदर्शन

Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरात शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरली आहे. बैलगाडी, ॲम्बुलन्स आणि चारचाकी गाडी घेऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली. सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना कोणतेही नियम आणि निकष लागू करू नयेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर कोणत्याही शेतकऱ्याला निकषांच्या कारणावरून वंचित ठेवल्यास मनसे स्टाईल आंदोलन छेडण्याचा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला.
0
0
Report
Advertisement

पवार गुट के अमर काळे ने मोदी सरकार पर कड़ा हमला

Wardha, Maharashtra:वर्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केलेल्या आव्हानावर आता विविध स्तरावरून प्रतिक्रिया येत असतानाच राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे विदर्भातील एकमेव खासदार अमरकडे यांनी सुद्धा मोठे गंभीर आरोप या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालच्या आव्हानावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे विदर्भातील एकमेव खासदार अमर काळे यांची प्रतिक्रिया पहिला प्रश्न मला हा पडला की पंतप्रधानांनी ही घोषणा पाच राज्याच्या निवडणुकीच्या आधी का केली नाही पाच राज्यांच्या मतदारांची किती फसवणूक तुम्ही केली आहे हे या स्टेटमेंट वरून सिद्ध होत आहे पेट्रोल डिझेल जपून वापरायला तुम्ही सांगत आहात तर इथे सुरुवात तुम्ही तुमच्याबद्दल करायला पाहिजे तुमच्या ताबफ्यातील वाहने कमी करा तुमचे मंत्री तुमचे मुख्यमंत्री यांच्या ताब्यातील सर्व वाहने कमी करून सुरुवात तुम्हीच करायला पाहिजे नरेंद्र मोदी यांच्या स्टेटमेंट वरून देश किती आर्थिक संकटात जात आहे याची प्रचिती आता येत आहे
0
0
Report

नाशिक महापौर ने मतीन पटेल के नगरसेवक पद के लिए अग्रिम कार्रवाई शुरू की

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:निधा खानला आश्रय देने के प्रकरण में अडचण में आए एमआईएम के नगरसेवक मतीन पटेल की स्थिति और बिगड़ने लगी है। महापौर समीर राजूरकर ने उनके अपात्र होने का ठहराव पारित कराने का निर्णय लिया है। महापालिका नियमों के अनुसार अतिक्रमण कर अनधिकृत घर बनाना नगरसेवक के पद के लिए कारण बन सकता है और इसकी प्रक्रिया अब शुरू हो गई है। एमआईएम इसका जोरदार विरोध कर रहा है। नोटिस तीन दिन पहले उनके घर, कार्यालय और आश्रित मकान पर जारी किया गया; कहा गया कि वास्तविक नोटिस के अनुसार अतिक्रमण है और कदम उठाने के संकेत दिए गए। मतीन की नोटिस की जवाबी अवधि समाप्त हो रही है और आगे क्या कदम उठते हैं, यह अब देखना होगा। विपक्षी भी आक्रमक हो रहे हैं और महापालिका कानून के अनुसार कार्रवाई संभव है।
0
0
Report
Advertisement

पंतप्रधान के आह्वान पर किसान रासायनिक खाद कम कर प्राकृतिक खेती की ओर

Jalna, Maharashtra:जालना : रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीकडे शेतकऱ्यांनी वळण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनावर शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया इंधन दरवाढीमुळे जनावरांच्या मागणीत वाढीवरही शेतकऱ्यांचा रोष (चौपाल) ऐनवेळी जनावरं घेण्याची तयारी कशी करणार-शेतकरी अँकर : रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीकडे शेतकऱ्यांनी वळण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनावर शेतकऱ्यांच्या जालन्यातील शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.यांत्रिकीकरणाच्या काळात इंधन तुटवड्यामुळे तसेच दरवाढीमुळे मनुष्यबळ कमी होत असताना जनावरं विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली हे बरं नसल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलंय शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी चौपाल विथ शेतकरी
0
0
Report

हिंगोली के गोळेगाव के किसानों ने तालाव में पानी के लिए जलसमाधी आंदोलन किया

Hingoli, Maharashtra: slug-hng-JalSamadhi अँकर - हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव येथे शेतकऱ्यांनी पाण्याच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन केल आहे, सिद्धेश्वर तलावातील पाणी केळी तलावामध्ये उपसा करून टाकण्याच्या मागणीसाठी 20 ते 25 गावातील गावकऱ्यांनी आंदोलन केलं आहे केळी तलावात पाणी नसल्याने शेती पिके वाळून जात आहेत जनावरांना पाण्यासाठी भटकती करावी लागत असून 20 ते 25 गावातील नागरिकांनी पाण्यासाठी भटकती करावी लागत आल्याने केळी तलावात पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे धरण उशाला कोरड घशाला अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं आहे... बाईट - शेतकरी
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top