445001
शेतकरी न्याय यात्रेतून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाची पोलखोल करणार, आशिष खुलसंगे
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची शेतकरी न्याय यात्रा शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत आहे. शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने आणि अतिपावसामुळे नापिकीचे संकट उभे राहिले आहे. कोळसा खाणीमुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. पीक विमा मिळवण्यात अडचणी आहेत आणि पांदण रस्ते योजना रखडली आहे. सरकार 'लाडकी बहिण' योजनेचा प्रचार करत असताना, शेतकऱ्यांना दुसऱ्या हाताने लुटून उध्वस्त करत असल्याचा आरोप आशिष खुलसंगे यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
रायगढ़ जिले में अनियमित बारिश की दस्तक, दक्षिण रायगढ़ में गरज के साथ बारिश
Chendhare, Maharashtra:Raigad जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी आली आहे. रायगडच्या दक्षिण भागात आज सकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. महाड, माणगाव, पोलादपूर तालुक्यांमध्ये काही भागात ढगांच्या गडगडाटासह काही काळ पाऊस बरसला. रायगड जिल्ह्यात तीन दिवसांसाठी अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र मळभ दाटून आले आहे. या पावसाचा आंबा पिकावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.0
0
Report
सांगली के मसुचीवाडी में नारियल के पेड़ पर बिजली गिरने से आग लग गई
Sangli, Maharashtra:सांगली के वाळवा तालुक्यात मसुचीवाडी में नारियल के पेड़ पर बिजली गिरने से आग लग गई. जिले में कल तेज़ हवा के साथ गरज के साथ भारी बारिश और ओले पड़े. मसुचीवाडी में एक घर के आंगन में नारियल के पेड़ पर अचानक बिजली गिरने से वह जल गया.0
0
Report
मराठवाडा में अगले चार दिन बेमौसम बारिश का अलर्ट; फसलें खतरे में
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर सह मराठवाड्यावर पुढील चार दिवस अवकाळी पावसाचे संकट आहे. विभागातील जवळपास आठही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मागील महिन्यांत गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे २० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर पुन्हा अवकाळी पाऊस व गारपिटीचे संकट विभागावर आहे. अवकाळीमुळे पुन्हा विभागातील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. १९ एप्रिल ते २३ एप्रिलपर्यंत मराठवाड्याला हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. यात छत्रपती संभाजीनगरला १९ रोजी गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. २० रोजी हलका पाऊस आणि गारपीट, २१ व २२ रोजी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची व २३ रोजी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. जालना, परभणी, बीड जिल्ह्यातही अशी परिस्थिती पुढील चार दिवसांत असणार आहे. हिंगोली जिल्ह्यात १९ ते २१ एप्रिलदरम्यान तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. २२ व २३ रोजी हलक्या पावसाच्या सरी व गारपीट होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. नांदेडमध्ये अशीच परिस्थिती असेल. लातूरमध्ये १९ ते २२ एप्रिलपर्यंत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. धाराशिव जिल्ह्याला १९ ते २३ एप्रिलपर्यंत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.0
0
Report
Advertisement
नांदेड में अचानक अवकाली बारिश से फलों और फसलों को नुकसान
Nanded-Waghala, Maharashtra:नांदेड जिल्ह्यात काल सायंकाळी काही ठिकाणी आवकाळी पाऊस झाला. नांदेड शहरात रात्री उशीरा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तडाखा दिला. नायगाव , धर्माबाद , उमरी आणि भोकर मध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. भोकर तालुक्यात तेलंगणाच्या सिमेवर काही गावात तुरळक प्रमाणात गारपीट झाली. उमरी तालुक्यातील हुंडा तांडा येथे विज पडून बैलजोडी ठार झाली. सकाळ पासून जिल्ह्यात वातावरण सामान्य होतं. सायंकाळी मात्र काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होऊन अवकाळी पावस झाला. वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे फळाबागा आणि पिकांचे नुकसान झाले आहे.0
0
Report
सोलापुर में जोरदार बारिश, कई हिस्सों में बिजली गुल; बारिश ने शहर को ढका
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - काल रात्री शहरातील अनेक भागात पावसाची जोरदार हजेरी, अनेक भागातील बत्ती झाली गुल - सोलापुरात पावसाची दमदार सुरुवात, शहरातील अनेक भागात पावसाची जोरदार बॅटिंग - शहरात अनेक ठिकाणी ढगांच्या कडकडाटासह दमदार पाऊस - अकस्मात आलेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागातील बत्ती झाली गुल - सिद्धेश्वर पेठ, मुस्लिम बादशाह पेठ, बेगम पेठ, मंगळवार बाजार, कोतम चौक भागात पावसाची हजेरी0
0
Report
धाबेटेकडी में नरभक्षी बíbट जेरबंद, इलाके में दहशत खत्म
Bhandara, Maharashtra:अखेर नरभक्षी बिबट जेरबंद.... धाबेटेकडी परिसरात माजवली होती दहशत.... Anchor : गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील धाबेटेकडी परिसरात नरभक्षी बिबट जेरबंद करण्यात वन विभागाला मोठे यश आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या बिबट्याने परिसरात दहशत निर्माण केली होती. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट जेरबंद झाल्यानंतर धाबेटेकडी परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला..0
0
Report
Advertisement
सोलापुर के अक्कलकोट तालुक्यात गारपिटीस के साथ मुसळधार बारिश, फसलें नुकसान
Solapur, Maharashtra: सोलापूर ब्रेकिंग : अक्कलकोट तालुक्यामध्ये गारपिटीसह मुसळधार पावसाची हजेरी - सोलापूरच्या अक्कलकोट मध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस - अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव, हन्नूर, दर्शनाळ आदी गावाना पावसाने झोडपले - अवकाळी पावसामुळे काढून ठेवलेल्या शेतीपिकांचे नुकसान - अक्कलकोट तालुक्यातील दर्शनाळ येथील अर्जुन गाडेकर या शेतकऱ्याच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने गहू, ज्वारी, कांदा पिके भिजून गेली - याशिवाय अनेक भागत काढलेले पीक भिजले0
0
Report
सातारा दौरे की तैयारी पूरी, बैनरों से महेश शिंदे का फोटो गायब मामला चर्चा में
Satara, Maharashtra:सातारा: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज नियोजित अंगापूर आणि सातारा शहरातील गांधी मैदानावर होणाऱ्या सभेची पाहणी केली. दुपारी या दौऱ्यात अंगापूर येथे एका धार्मिक कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत यानंतर जिल्हा शासकीय विश्रामगृह येथे पश्चिम महाराष्ट्रातील शिवसैनिकांची बैठक एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडणार असून.. या बैठकीनंतर सातारा शहरात ऐतिहासिक गांधी मैदानावर होणाऱ्या शिवसेनेच्या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. आज होणाऱ्या कार्यक्रमात कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी उपस्थित पदाधिकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना सूचना केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा सातारा दौरा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे... मात्र या तयारी दरम्यान उभारण्यात आलेल्या स्वागत फलकांवर आमदार महेश शिंदे यांचे फोटो गायब झाल्याबाबत विचारणा केली असता पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बहुतांश फ्लेक्स वर आमदार महेश शिंदे यांचे फोटो असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे...0
0
Report
यवतमाल के रालेगाव में बालिकाओं की बिक्री-धर्मांतरण मामले पर विहिप-बजरंग दल ने बंद का आह्वान
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ च्या राळेगाव येथे मुलींच्या विक्री आणि त्यानंतर त्यांचे धर्मांतरण प्रकरणात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने उडी घेतली असून आज हिंदुत्ववादी संघटनानी राळेगाव बंद ची हाक दिली आहे. काल रात्री पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी करीत संताप व्यक्त केला, यावेळी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना दुर्गा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी घेरावं घालून या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपीवर कडक कारवाईची मागणी केली. राळेगाव पोलिसांच्या कार्यशैलीवर विश्वास नसून स्वतंत्र यंत्रनेद्वारा चौकशीची मागणी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत पदाधिकारी राम लोखंडे यांनी करीत आज राळेगाव बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. बाईट : राम लोखंडे : प्रांत सेवा प्रमुख, विहिप अशोक उईके : मंत्री, आदिवासी विकास0
0
Report
Advertisement
अकोला में आंधी-बारिश से रेल सेवाओं में बहाव, ओवरहेड वायर टूटने से 2–3 घंटे देरी
Akola, Maharashtra:राज्यात हवामान विभागाने २० ते २२ एप्रिलदरम्यान वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला असतानाच, त्याआधीच १९ एप्रिलच्या मध्यरात्री अकोला जिल्ह्यात वादळी वाऱ्याने जोरदार हजेरी लावली. या अचानक बदललेल्या हवामानाचा फटका थेट मध्य रेल्वेच्या वाहतुकीलाही बसल्याचं समोर आलं आहे. अकोला शहरासह जिल्ह्यात काल मध्यरात्री जोरदार वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. काही ठिकाणी तुरळक पावसानेही हजेरी लावली. या वादळामुळे अकोल्यातील गायगाव ते पारस रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेचा ओव्हरहेड वायर तुटल्याची घटना घडली. या बिघाडामुळे अकोला, मूर्तिजापूर तसेच बडनेरा ते भुसावळ दरम्यान धावणाऱ्या अनेक प्रवासी गाड्या तब्बल २ ते ३ तास उशिराने धावल्या. परिणामी प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. विशेष म्हणजे, रेल्वे प्रशासनाकडून वेळेवर कोणतीही अधिकृत माहिती किंवा उद्घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे आधीच उशिरामुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली. दरम्यान, तांत्रिक पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम हाती घेतले आणि काही वेळातच रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.0
0
Report
नाशिक के प्रभावित किसानों को राहत नहीं मिलने से नाराज़गी बढ़ी
Nashik, Maharashtra:Breaking.. नाशिक - विशाल मोरे - अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीच्या पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्याचा समावेश नाही... - शेतकरी संतप्त... एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस और गारपीट ने धुमाकूळ घातला होता नाशिक जिल्ह्यातील 10 तालुक्याला अवकाळीचा फटका बसून तब्बल 57 हजार 46 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते.राज्य सरकार ने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली मात्र त्यात पहिल्या टप्प्यात सर्वाधिक नुकसान होऊन देखील नाशिक जिल्ह्याचा समावेश करण्यात आला नाही त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. *बाईट: 2 - शेतकरी* *ग्राफिक्स* *नुकसान ग्रस्त तालुक्याची संख्या -10 *सर्वाधिक नुकसानग्रस्त तालुके :-मालेगाव, बागलाण, देवळा, निफाड, सिन्नर, चांदवड *नुकसान क्षेत्र :-57 हजार 46 हेक्टर *बाधित गाव संख्या :-588 *बाधित शेतकरी :-79 हजार 797 *पीक नुकसान* *कांदा :-44 हजार 701 हेक्टर *गहू :-3 हजार 280 हेक्टर *डाळिंब :-4 हजार 847 हेक्टर *भाजीपाला :-1 हजार 186 हेक्टर *मका :-869 हेक्टर *द्राक्षे :-, 902 हेक्टर0
0
Report
अंबरनाथ के शिवाजीनगर मार्ग पर गतिरोधक नियम उलट, यात्राओं में बढ़ी परेशानी
Ambernath, Maharashtra:गतिरोधक मुळे अंबराठकरांची वाढणार डोकेदुखी शिवाजीनगर ते स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी गतिरोधक चुकीच्या रचनेचे गतिरोधक ठरतायत धोकादायक स्टेशनकडे जाणारा प्रवास झाला कष्टदायक नियमबाह्य रचनेचे गतिरोधक ठरतायत धोकादायक आनकर : अंबराठ शहरात नागरिकांची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शिवाजीनगर ते स्टेशनकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर जागोजागी उभारण्यात आलेले गतिरोधक आता नागरिकांसाठी मोठा त्रास ठरत आहेत. व्हिओ:अंबराठ पूर्व भागातील शिवाजीनगर ते स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर अचानकपणे अनेक ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले आहेत.त्यामुळे वाहनचालकांना वारंवार ब्रेक लावावे लागत असल्यामुळे प्रवास वेळखाऊ आणि असुविधाजनक बनला आहे. विशेष म्हणजे, अनेक ठिकाणी गतिरोधकांची रचना नियमांनुसार नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. त्यामुळे दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.याचा सर्वाधिक फटका रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना बसत आहे. सततच्या धक्क्यांमुळे मणक्याचे त्रास, पाठदुखी आणि शारीरिक वेदना वाढण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांसाठी हा प्रश्न अधिक गंभीर ठरत आहे.स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे योग्य मोजमाप आणि नियमांनुसार गतिरोधकांची पुनर्रचना करण्याची मागणी केली आहे. तसेच, आवश्यक त्या ठिकाणीच गतिरोधक ठेवावेत, अशीही मागणी होत आहे.आता प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने पाहते आणि नागरिकांना दिलासा मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. चंद्रशेखर भुयार ,अंबरनाथ0
0
Report
Advertisement
बदलापुर की नई पानी टंकी में रिसाव, गर्मी में पानी संकट गहरा
Ambernath, Maharashtra:माणकिवली परिसरातील नव्याने बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीला गळती; ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई बदलापूरच्या जीवन प्राधिकरणाचा भोंगळ कारभार बदलापूर पूर्वेकडील शिरगांव परिसरात वाढीव बदलापूर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ही टाकी बांधण्यात आली होती. 15 दशलक्ष लिटर पाण्याची क्षमता असलेली ही टाकी भरल्यानंतर गळत असल्यामुळे या टाकीत गेल्या काही दिवसांपासून पाणी भरणे बंद करण्यात आले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या टाकीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असले तरी उद्घाटन करण्याची घाई का करण्यात आली. तसेच या भागातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात यामुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने स्थानिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संताप व्यक्त केला आहे. शिरगांव परिसर हा बदलापुरातील सर्वाधिक झपाट्याने विस्तृत होणारा परिसर असल्यामुळे या भागात टाकी उभारण्यात आली आहे. मात्र या टाकीचं काम निकृष्ट दर्जाचा झाल्यामुळे नागरिक आता उन्हाळ्याच्या झळा वाढत असताना पाण्यापासून वंचित राहणार आहेत. अनेक सोसायटी यांना या परिसरात आता टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.0
0
Report
बारामती उपचुनाव में धनगर समाज का भारी समर्थन, CM और उपमुख्यमंत्री की मौजूदगी
Rui, Maharashtra:बारामती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बाईट *ऑन_धनगर समाज पाठिंबा* बारामतीची पोटनिवडणूक लागली आहे धनगर समाजाने मोठ्या संख्येने पाठिंबा दर्शवला आहे मी सर्व समाजाचे आणि धनगर समाजाचे सुद्धा मी आभार मानते. *ऑन_सांगता सभा* सांगता सभेला सर्व माहितीचे नेते उपस्थित राहतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सभेला येणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही मंत्री येणार आहेत. महायुती मधील मान्यवर रामदास आठवले उपस्थित असतील.0
0
Report
बारामती: धनगर समाज के समर्थन से अजित पवार की उम्मीदें तेज
Rui, Maharashtra:बारामतीत अहिल्यादेवी होस्टेल धनगर समाज बांधवांची एक छोटी बैठक पार पडत आहे. बारामती पोट निवडणुकीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली अहिल्यादेवी होस्टेल धनगर समाज बैठक सुनेत्रा पवार भाषण. आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते. मला पाठिंबा देण्यासाठी तुम्ही एकत्र जमला तुम्ही दादांचे शिलेदार आहात दादांची प्रत्येक समाजासाठी काहीतरी करण्याची वृत्ती होती प्रत्येक समाजातील विद्यार्थ्याला सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत तो चांगला शिकला पाहिजे दादांनी तालुक्यातील प्रत्येक समाजासाठी सुख सुविधा निर्माण केल्या शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालत असताना दादांनी नेहमीच सर्वच समाज बांधवांना एकत्रपणे घेऊन जाण्याचे काम सातत्याने केलं. दोन अडीच महिन्यांपूर्वी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. ती घटना आम्हा सर्वांना पोरक करून गेली. मला कधी आयुष्यातही वाटलं नव्हतं की कधी इथे येऊन अशा पद्धतीने आपल्या समोर उभी राहील बोलताना सुनेत्रा पवार भावूक झाल्या.... त्यावर वहिनी तुम्ही काळजी करू नका धनगर समाज तुमच्या पाठीशी आहोत असे कार्यकर्ते म्हणाले अमर रहे अमर रहे अजितदादा अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या मग तुम्ही पाठीशी होता म्हणूनच दादा तेवढ्या उंचीवर पोहोचले आहेत. बारामतीसाठी मी काय काय करू यासाठी दादांचा 24 तास प्रयत्न असायचा. बारामतीची लोक म्हणजे त्यांचा श्वास जी घटना घडली त्या ठिकाणी सुद्धा कागद पडले होते शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी बारामतीच्या लोकांसाठी काम केलं दादांच्या नंतर एवढं सगळं पोरख झालेलं मलाही पहावलं नाही दादांची सर्वांना शिकवण आहे की कोणत्याही संकटाला घाबरायचे नाही त्याला तोंड द्यायचे दादांच्या अंत्यविधीला जो जनसमुदाय लोटला होता सर्व रस्ते बंद झाले एवढे गर्दी जमली मग सर्वांना कळालं दादा काय होते. एखाद्या माणसाची महती कळायला मरावेच लागते का ? दादा गेल्यानंतर सगळ्या जनतेला वाटलं आमचा आधार गेला आपण दादांच्या पाठीशा कायम उभे राहिलात तसाच पाठिंबा आणि विश्वास तुम्ही द्याल याची मला खात्री आहे. दादांना अत्यंत मोठ्या मतांनी तुम्ही जर वेळेस निवडून दिल. खरतर ही वेळच यायलाच नाही पाहिजे की कोणी कोणाला मत मागायला जावं पण निवडणूक लागली आहे निवडणुकीला आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. आता तुमची जबाबदारी आहे २१ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता सांगता सभा आहे तुम्हांचा पाठिंबा हिच माझी शक्ती0
0
Report
Advertisement
