445001
शेतकरी न्याय यात्रेतून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाची पोलखोल करणार, आशिष खुलसंगे
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची शेतकरी न्याय यात्रा शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत आहे. शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने आणि अतिपावसामुळे नापिकीचे संकट उभे राहिले आहे. कोळसा खाणीमुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. पीक विमा मिळवण्यात अडचणी आहेत आणि पांदण रस्ते योजना रखडली आहे. सरकार 'लाडकी बहिण' योजनेचा प्रचार करत असताना, शेतकऱ्यांना दुसऱ्या हाताने लुटून उध्वस्त करत असल्याचा आरोप आशिष खुलसंगे यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नगर पालिका ने प्रॉपर्टी सर्वे/री-वल्यूएशन के लिए निजी एजेंसी नियुक्ति मंजूर कर दी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण आणि फेरमूल्यांकन करण्यासाठी खासगी एजन्सी नियुक्त करण्याच्या प्रस्तावावर महापालिका सर्वसाधारण सभेत तब्बल ३ तास चर्चा झाली. या वेळी जुन्या एजन्सीने केलेल्या चुकांचा पाढाच नगरसेवकांनी सभेत वाचून दाखवला. जुन्या एजन्सीने केलेल्या चुका दुरुस्त करण्यात येतील, असे आश्वासन दिल्यानंतर सर्वपक्षीय पाठिंब्यासह या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यासाठी महापालिकेकडून लवकरच निविदा प्रसिद्ध केली जातील. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान मालमत्ता करात कोणतीही वाढ केली जाणार नाही, अशी हमी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.0
0
Report
25 गावों के लिए रिंगरोड पर विशेष शिबिर, भूसंपादन विवाद सुनवाई शुरू
Nashik, Maharashtra:रिंगरोड संदर्भात २५ गावांसाठी उद्यापासून विशेष शिबिर रिंगरोड साकारण्यात येणार आहे. यामध्ये नाशिक तालुक्यातील विविध गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनींचे अधिग्रहण केले जाताय ....काही गावांमध्ये शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला असून भूसंपादनाबाबत हरकती घेतल्या आहेत... या हरकती, सूचना, फेरविचार अर्जावर आता प्रत्यक्ष सुनावणी जिल्हा प्रशासनाकडून घेतली जाणार आहे. यासाठी उद्या २५ गावांसाठी दोन दिवसीय विशेष शिबिर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलाय...कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता वाहतुकीचा विषय मार्गी लावण्यासाठी ६५.५ किलोमीटरचा बाह्य रिंगरोड तयार केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी जिल्हा प्रशासनाला एकूण ३६६ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. हा प्रकल्प तीन तालुक्यांतून जाणार असून विविध गावांमधील शेतकऱ्यांनी भूसंपादन प्रक्रियेला व रिंगरोडला विरोध दर्शविलाय...याबाबत शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या मागण्या शासन व प्रशासनापुढे मांडून प्रशासनाकडे हरकती, सूचना आणि फेरविचार अर्ज दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांमार्फत नियोजन भवन येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आलेल्या हरकती, सूचना व फेरविचार अर्जावर थेट सुनावणी घेतली जाणार आहे....0
0
Report
अमरावती कांग्रेस में आंतरिक घमासान: नगरसेवक पैसे लेकर भाजपा के पक्ष में मतदान—देशमुख दावा
Amravati, Maharashtra:अमरावती काँग्रेस मधील अंतर्गत वाद आता उघडपणे समोर; विधान परिषद निवडणुकीत नगरसेवकांनी ५ ते ६ लाख रुपये घेऊन भाजप उमेदवाराच्या बाजूने मतदान केल्याचा काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांचा दावा अमरावती जिल्हा ग्रामीण काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद आता उघडपणे समोर आला आहे. अंजनगाव सुर्जी येथे आयोजित मतदार जनजागृती व SIR प्रशिक्षण शिबिरात जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी आपल्या पक्षातील काही नगरसेवकांवर गंभीर आरोप केले. विधान परिषद निवडणुकीत काही नगरसेवकांनी ५ ते ६ लाख रुपये घेऊन भाजप उमेदवाराच्या बाजूने मतदान केल्याचा दावा त्यांनी केला. काँग्रेसच्या निर्देशानुसार कोऱ्या मतपत्रिका जमा करण्याचे सांगण्यात आले होते. मात्र जिल्ह्यात केवळ पाचच कोरे फॉर्म जमा झाल्याचे त्यांनी सांगितले. जनतेने काँग्रेसच्या चिन्हावर निवडून दिलेल्या नगरसेवकांनी पैशासाठी पक्षाशी गद्दारी केल्याची टीका करत अशा पदाधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांच्या पक्षपदे काढून घेण्यात येईल असा इशाराही देशमुख यांनी दिला. या आरोपांमुळे जिल्हा काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली. आता वरिष्ठ नेतृत्वाची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. साउंड बाईट :- बबलू देशमुख, ग्रामीण जिल्हाध्यक्ष, काँग्रेस0
0
Report
Advertisement
संजय राऊत के बयानों से महाविकास आघाडी में हलचल
Nagpur, Maharashtra:संजय राऊत आज नीट पेपर फुटी प्रकरणी सोनम वांगचुक उपोषणाला बसले त्याला १७ दिवस झाले हा मोठा प्रश्न आहे.. त्यांची प्रकृती अत्यंत ढासळली हा चिंतेचा विषय.. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि आम्ही डी लिमीटेशन बिलाला पाठिंबा देणार ही माहिती चुकीची.. सुप्रिया सुळे आज १२ वाजता पत्रकार परिषद घेणार.. मे आताच त्यांना फोनवर बोललो..आपले प्रश्न त्यांना विचारले तर योग्य ठरेल.... त्या तयारीशी येणार आहे.. मी मागील काही अशा चर्चा ऐकतोय कोण कुठे जातोय अशी.. या सगळ्या अफवा आहे.. प्रफुल पटेल फुटबॉल वर्ल्डकप साठी परदेशात जातात ते नसावेत.. जयंत पाटील यांच्या मतदार संघातील एका नगरसेवकाला बेकायदेशीर अपात्र केलं.. इस्लामपूर भागातील हा नगरसेवक.. ही लोकशाहीसासाठी गंभीर गोष्ट.. त्या विषयासाठी मुख्यमंत्र्यांना बोलण्यासाठी गेले असावे.. जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत.. महाविकास आघाडीतील देखील महत्त्वाचे नेते आहेत.. हे सर्व शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाबद्दल जाणीवपूर्वक अफवा पसरविल्या जात आहे.. भाजप आणि शिंदे गटाला फार काही काम नाही.. माझी सुप्रिया सुळे सोबत आताच चर्चा झाली.. त्यांनाही आश्चर्य वाटतंय त्या आज पत्रकार परिषदेत सविस्तर बोलतील.. मागील अधिवेशनात या बिल कसा असावा यासंदर्भात सरकारसोबत चर्चा झाली होती... आमच्या पक्षातील अरविंद सावंत, सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.. पक्ष फोडणे.. आमदार खासदार फोडून बहुमत दाखवेल यामध्ये काही तथ्य नाही.. राम मंदिरा शेजारील मैदान त्यांचा वाढदिवस हा राममंदिरातील चोरीपेक्षा महत्त्वाचा असेल तर आम्हीदेखील त्यामध्ये सहभागी होऊ.. रामनगर मंदिरात उद्धव ठाकरे यांची सभा वैगेरे नाही.. आम्ही रामरक्षा पठण करणार....रामनगर मंदिर परिसरात रस्त्यावर कार्यक्रम करू.. आम्ही रस्त्यावरील लोक आहोत. थोड्या वेळात आमचे सहकारी येतील तेव्हा अंतिम निर्णय घेऊ.. त्यांच्या वाढीवसाची तयारी आतापासून होत असेल तर चांगलं आहे.. तो मोठा माणूस आहे..प्रभू रामाला या लोकानी रस्त्यावर आणलं..0
0
Report
कशेडी घाटी में दराड़, मुंबई-गोवा राजमार्ग पर यातायात ठप
Ratnagiri, Maharashtra:कशेडी घाटात आज पुन्हा दरड कोसळली; मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात आज पुन्हा एकदा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूरजवळ धामणदिवी गावच्या हद्दीत ही दरड कोसळली असून,यामुळे कोकणातून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर दरड हटवण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र प्रवाशांना मोठ्या कोंडीचा सामना करावा लागत आहे.0
0
Report
आंबेगाव में भारी बारिश से किसानों की फसलें डूबीं, लाखों का नुकसान
Shirur, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्यातील लोणी धामणी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे संपूर्ण शेतांना तळ्याचे स्वरूप आले असून, खरीप हंगामातील पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. यात प्रामुख्याने मका, बाजरी, ज्वारी आणि गवार यांसारखी महत्त्वाची पिके पाण्यात बुडाल्याने कुजून खराब झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हा परिसर मुळात दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो, अशातच शेतकऱ्यांनी उपलब्ध असलेल्या कमी पाण्यात ही पिके जगवली होती. मात्र, काही तासांतच झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. आता या नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करून प्रशासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी येथील शेतकरी करत आहेत.0
0
Report
Advertisement
अमरावती में चार युवकों ने युवक का हाथ काटा, अस्पताल में भर्ती
Amravati, Maharashtra:तीन ते चार तरुणांनी छाटला एका तरुणाच्या हाताचा पंजा; अमरावतीत खळबळ, तरुणाची मृत्यूशी झुंज सुरू अमरावती शहरातील राजेंद्र नगर परिसरात एका युवकाचा तीन ते चार युवकांनी हाताचा पंजा पूर्णपणे छाटून टाकला जखमी युवकाला अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. दरम्यान हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाची मृत्यूशी झुंज सुरू असून पोलिसांना आरोपी निष्पन्न झाले असून लवकरच अटक केले जाणार असल्याचे माहिती पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांनी सांगितले आहे. या घटनेने शहरात मोठी खळबळ आहे.0
0
Report
रत्नागिरी में मॉनसून फिर से सक्रिय, किसानों के चेहरे खिले
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्ह्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय.. पावसाची दमदार सुरुवात.. गेले काही दिवस दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार सुरुवात केल्याने बळीराजा सुखावलेला आहे.. जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं आणि आत्ता पावसाने दमदार हजेरी लावल्याने हवेत गारवा आलेला आहे.. पावसाने दडी मारल्यामुळे गेले काही दिवस उखाणे हैराण झालेल्या नागरिकांना या आलेल्या पावसामुळे दिलाचा मिळाला आहे..0
0
Report
धाराशिव पहुँची संत गजानन महाराज की पालखी, भक्तों ने किया भव्य स्वागत
Dharashiv, Maharashtra:शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी धाराशिव शहरात दाखल झाली. शहरात पालखीचे मोठ्या उत्साहात जोरदार स्वागत! शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी आज धाराशिव शहरात दाखल झाली. धाराशिव शहरात पालखीचे मोठ्या उत्साहात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे संपूर्ण धाराशिव शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. आज धाराशिव शहरातच पालखीचा मुक्काम असणार आहे. यंदा या पालखीचे 57 वे वर्ष असून तब्बल 700 किलोमीटर पायी प्रवास करून ही पालखी पंढरपुरात दाखल होते. अत्यंत शिस्तबद्ध पालखी म्हणून या पालखी सोहळ्याची ओळख आहे. टाळ मृदंगाचा गजर आणि गण गण गणात बोते च्या जय घोषात शेकडो वारकरी या वारीमध्ये सहभागी झाले असून मजल तर मजल करीत पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहेत.0
0
Report
Advertisement
भंडारा में कांग्रेस-शिवसेना को बड़ा धक्का, 50 कार्यकर्ता भाजपा में प्रवेश
Bhandara, Maharashtra:भंडारा जिले में कांग्रेस और शिवसेना को धक्का...50 कार्यकर्ताओं ने भाजपा प्रवेश किया. इस पक्ष प्रवेश से जिल्हे की कांग्रेस और सेना को बड़ा धक्का लग रहा है. आमदार परिणय फुके की मौजूदगी में यह पक्ष प्रवेश हुआ है.0
0
Report
श्रद्धा वाळकर हत्याकांड: चार साल बाद भी न्याय नहीं, अफताब पूनावाला आरोपित
Vasai-Virar, Maharashtra:देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वाळकर हत्याकांडाला चार वर्षे पूर्ण झाली असून, अद्याप न्याय मिळालेला नाही. श्रद्धाचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावाला याच्यावर तिची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याचा आरोप आहे. मात्र, खटल्याची सुनावणी संथ गतीने सुरू असल्याने कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आरोपीला एमए परीक्षेसाठी, दातांच्या उपचारांसाठी आणि मानसोपचारतज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी सुनावणीतून वारंवार सवलती देण्यात आल्याचा आरोप केला जातो. आतापर्यंत २१५ हून अधिक सुनावण्या होऊनही पुरावे सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. न्यायाच्या प्रतीक्षेत श्रद्धाचे वडील आणि आजी यांचे निधन झाले, तर तिच्या अवशेषांवर अद्याप अंत्यसंस्कारही होऊ शकलेले नाहीत. श्रद्धाची आत्या राजल नाईक यांनी खटल्याची जलदगतीने सुनावणी पूर्ण करून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.0
0
Report
मानोरा में मध्यरात्रि कार दुर्घटना, एक ही परिवार के चार घायल
Washim, Maharashtra:मंगरोळपीर–दिग्रस मार्गावरील मानोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ मध्यरात्र्री कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर आदळून अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले असून त्यांना स्थानिकांच्या मदतीने मानोरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात कारचेही मोठे नुकसान झाले आहे.0
0
Report
Advertisement
गांव की पांचवी से बारहवीं तक की स्कूल अकार्यक्षम शिक्षकों के बदली के लिए उपोषण
Buldhana, Maharashtra:अकार्यक्षम शिक्षकांच्या बदलीसाठी पूर्ण गाव एकत्र...उपसले उपोषणाचे हत्यार.... अकार्यक्षम शिक्षकांची बदली तत्काळ इथून करण्यात यावी यासाठी ग्रामस्थ आक्रमक आहेत.....या ग्रामस्थांसोबत बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी.....0
0
Report
गोवा से मुंबई आ रही कार लांजा रेस्ट हाउस के पास डंपर से भिड़ी, भीषण दुर्घटना
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी-लांजा मुंबई गोवा महामार्ग वर भीषण अपघात गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकी वाहनाचा लांजा रेस्ट हाऊस येथे भीषण अपघात अपघातात दोन महिल आणि एक मुलगा यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू उर्वरित दोन जण गंभीर गंभीर जखमी रुग्णांना लांजा ग्रामीण रुग्णालयात केले गेले दाखल मुंबई -आगरी पाडा येथे राहणारे हे कुटुंब गोव्याला गेले होते ते परत येत असताना लांजा रेस्ट हाऊस येथे एका उभ्या असलेल्या डंपरला मागून धडक दिल्याने घडला भीषण अपघात0
0
Report
छह महीनों में साइबर ठगों ने 743 नागरिकों से ऑनलाइन धोखा, करोड़ों की ठगी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..crime जिल्ह्यात 6 महिन्यात 743 जणांना ऑनलाईन गंडवले.. पावणे आठ कोटी हातोहात लांबवले..ज्येष्ठांचे फसण्याचे प्रमाण अधिक.. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जितका वाढला आहे तितका सायबर गुन्हेगारांचा सुळसुळाटही वाढला आहे.. गेल्या सहा महिन्यात सायबर भामट्यांनी जिल्ह्यातील तब्बल 743 नागरिकांना फसवले असून सात कोटी 92 लाख 73 हजार 636 रुपयांचा गंडा घातला आहे.. यात ज्येष्ठ नागरिक विशेषतः पेन्शनधारक फसण्याचे प्रमाण लक्षणीय आहे.. आयुष्यभराची कुंजी बँकेत जमा असलेल्या या जेष्ठ नागरिकांना विविध अमिषे दाखवून किंवा भीती घालून त्यांच्या बँक खात्यावर डल्ला मारला जात आहे..0
0
Report
Advertisement
