Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

शेतकरी न्याय यात्रेतून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाची पोलखोल करणार, आशिष खुलसंगे

Aug 21, 2024 07:24:58
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची शेतकरी न्याय यात्रा शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत आहे. शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने आणि अतिपावसामुळे नापिकीचे संकट उभे राहिले आहे. कोळसा खाणीमुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. पीक विमा मिळवण्यात अडचणी आहेत आणि पांदण रस्ते योजना रखडली आहे. सरकार 'लाडकी बहिण' योजनेचा प्रचार करत असताना, शेतकऱ्यांना दुसऱ्या हाताने लुटून उध्वस्त करत असल्याचा आरोप आशिष खुलसंगे यांनी केला आहे.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Dec 28, 2025 03:18:27
Akola, Maharashtra:मागील काही दिवसांपासून बांगलादेशात हिंदू नागरिकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. अलीकडेच दिपुचंद्र दास या हिंदू युवकाची काही कट्टरतावादी व्यक्तींनी निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे हिंदू समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना (शिंदे गट) कडून आज अकोल्यातील गांधी चौकात निषेध आंदोलन करण्यात आले, बांगलादेशचा ध्वज जाळण्यात आला. आंदोलनादरम्यान शिवसेना कार्यकर्त्यांनी बांगलादेश सरकारविरोधात घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. तसेच, बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. भारत व बांगलादेश सरकारने तेथील हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी तात्काळ प्रभावी पावले उचलावीत, अन्यथा भविष्यात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी इशाराही आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 28, 2025 03:02:43
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या पारलिंगी सामुदायातील व्यक्तीची हत्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या पारलिंगी सामुदायातील व्यक्तीची हत्या सोलापुरातल्या लष्कर परिसरातील धक्कादायक घटना, संशयित आरोपी सिसीटीव्ही कॅमेरात कैद अय्युब सय्यद असे मृत्यू झालेल्या पारलिंगी व्यक्तीचे नाव अय्युब सय्यद हे आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग 16 मधून निवडणुकीसाठी इच्छुक होते तसे विडिओ फोटो त्यांनी स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले असून त्याला लाखोंच्या संख्येने views आहेत cctv दृश्यानुसार काल रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास तीन अनोळखी इसम हे अय्युब सय्यद यांच्या घरात प्रवेश करत होते तेच तीन इसम रात्री 2 च्या सुमारास परत जातताना दिसतायत आज दुपारी ही मृत्यूची घटना उघडकीस आल्याने या अज्ञात तीन इसमानीच अय्यूब यांची हत्या केल्यााचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे या घटनेनंतर पोलिसांनी cctv मध्ये दिसणाऱ्या तिघां संशयित आरोपीचा शोध न सुरु केला आहे दरम्यान अय्युब यांची हत्या नेमकी कशामुळे झाली याचा तपास देखील सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने केला जातोय
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 28, 2025 01:01:16
Kalyan, Maharashtra:केडीएमसी निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला.. कल्याण पूर्वेत भाजपला 7 जागा मिळाल्याने भाजपा कार्यकर्ते नाराज भाजपा कार्यलयात जोरदार घोषणाबाजी करत स्वबळावर लढण्याचा कार्यकर्त्यांनी दिला इशारा.. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू झालेल्या बैठका आणि वाटाघाटीनंतर केडीएमसी निवडणुकीत अखेर शिवसेना भाजपा महायुतीचा फॉर्मुला आज ठरला. शिवसेनेला 67 आणि भाजपाला 54 जागा मिळाल्या मात्र कल्याण पूर्वेक अवघ्या सात जागा मिळालेल्या भाजप कार्यकर्ते नाराज झाले .आज रात्रीच्या sुमारास भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्या कार्यालया बाहेर मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली. जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांवर अन्याय करू नका अन्यथा भाजपा कल्याण पूर्व स्वबळावर लढेल अशी घोषणाबाजी करण्यात आली .एकंदरीतच महायुती चा फॉर्मुला ठरला असला तरी या फॉर्मुलामुळे शिवसेना भाजपा मधील वाद वाढला असल्याचे दिसून येत आहे . वरिष्ठ नेत्यांनी जागावाटप करताना कार्यकर्त्यांना विचारात घेतले नसल्याचा आरोप देखील भाजप कार्यकर्त्यांनी केला तसेच मित्र पक्षांमुळे कार्यकर्त्यांची कोंडी होत आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना न्याय द्यावा ,वरिष्ठापर्यंत आमचे म्हणणे पोहोचवा अशी मागणी कार्यकर्त्यांनी जिल्हा अध्यक्ष नंदुर परब यांच्या कडे केली आहे यावेळी कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या भावना आम्ही वरिष्ठापर्यंत पोहोचवु, कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करू मात्र प्रत्यक्षात भाजपाला कमीच जागा मिळाल्याचे मान्य केले .तसेच याबाबत वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याचे देखील सांगितले .काही केल्या भाजप कार्यकर्त्यांचे नाराजी दूर होत नव्हती.. त्यामुळे एकंदरीतच आता महायुतीचे नेते याबाबत काय निर्णय घेतात हे पाहणे देखील महत्त्वाचं ठरणार आहे.याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Dec 28, 2025 01:00:25
Ambernath, Maharashtra:बस चालकावर बस थांबवून भर रस्त्यात हल्ला\n\nप्रवाशाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला\n\nanchor एका वाहन चालकाने भर रस्त्यात बस थांबवून बस चालकावर हल्ला केल्याची घटना बदलापुरात घडली, प्रवाशाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ ठरला, हम मारहाणीचा व्हिडिओ एका प्रवाशाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीत केला आहे ,\n\nVo बदलापूरहून मुरबाडला जाणारी बस ही बदलापूर बाजारपेठेतून जात असताना एक कार रस्त्यात मध्ये उभी होती, बस चालकाने या कारच्या  बाजूने बस काढण्याचा प्रयत्न केला असता त्या कार चालकाला त्याचा राग आला आणि त्याची आणि बस चालकाची बाचाबचा झाली त्यानंतर बस जेव्हा बदलापूर गावातील उल्हास नदीच्या पुलावरून जात असताना कार चालकाने बस चा पाठलाग करून बस भरस्त्यात थांबवली, त्यांतर त्याच्या मित्रांसह बस मध्ये घुसून चालकावर हल्ला केलाyards या वेळी त्या कार  चालकांनी कुऱ्हाड ही सोबत आणली होती .मात्र बसमधील प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला याप्रकरणी त्या कार  चालकावर बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहे\n\nचंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Dec 27, 2025 17:31:47
Jalna, Maharashtra:जालना : ब्रेकिंग | जालन्यात महायुतीच्या नेत्यांची एकत्रित बैठक संपली, महायुतीतील सर्वच पक्षांच्या अंतिम प्रस्तावावर बैठकीत चर्चा जालन्यात महायुतीय जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला-दानवे, लोणीकर उद्या अंतिम निर्णय होईल-रावसाहेब दानवे युती होण्यात आता कोणतीही अडचण नाही उदया संध्याकाळी शेवटची बैठक-दानवे जागा वाटपाचा फॉर्म्युला पक्ष श्रेष्ठीचा मान्यतेसाठी पाठवणार-दानवे युतीची औपचारिक घोषणा बाकी-खोतकर अँकर : जालना महापालिका निवडणुकीसाठी आज भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि रिपाइं आठवले गटाची एकत्रित बैठक झाली आहे. रात्री उशिरापर्यंत ही बैठक सुरू होती. दरम्यान जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर स्थानिक पातळीवर एकमत झाले असून हा जागा वाटपाचा फॉर्म्युला पक्ष श्रेष्ठींकडे मान्यतेसाठी पाठवला जाणार असून उद्या अंतिम बैठक होऊन संध्याकाळपर्यंत निर्णय होईल असं भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. तर युतीची केवळ औपचारिक घोषणा बाकी असल्याचं शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी सांगितलं आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 27, 2025 17:31:33
Dhule, Maharashtra:धुळे महापालिकेची निवडणूक राज्यातील अन्य पालिकांच्या तुलनेत वेगळी आणि चर्चेची आहे. वोट जिहादमुळे हा जिल्हा संपूर्ण देशात चर्चेत आला. विधान सभा निवडणुकीतही दोन धर्मांची उभी फाळणी मतदानात पाहायला मिळाली. त्यामुळे विकासाचा मुद्दा या निवडणुकीत गौण ठरून धर्माच्या रंगात हि महापालिका निवडणूक रंगते का हे पाहणे रंजक असणार आहे. धुळे महापालालिकेच्या ७४ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. गेल्या दोन वर्षापासन पालिकेवर प्रशासक राज आहे. त्याआधी या महापालिकेत भाजप स्वयंबळावर पहिल्यांदा सत्तेत आले होते. ७४ पैकी ५१ जागांवर भाजपचे नगरसेवक निवडून आलं होते, या दरम्यान शकडो कोटींच्या विकासाचा दावा भाजपने केला. सोबतच विरोधकांना आपल्या पक्षात घेत त्यांची ताकद कमी करण्याचा कामही भाजपने समांतर सुरु ठेवले. त्या फायदा लोकसभा निवडणुकीत होईल असं वाटत असताना विशिष्ठ समुदायाने , एकतर्फी मतदान केल्याने लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला, त्यानंतर मात्र भाजपने हिंदुत्वाची री ओढणे सुरु केले असून, विकास आणि हिंदुत्व या दोन मुद्द्यावर भाजप निवडणूक लढेल असे चित्र आहे. युती होताना दिसत नाही , त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट स्वतंत्र निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर ५१ जागा जिंकू असा दावा करीत आहेत. भाजप राष्टवादी काँग्रेस पक्षाच्या ताकदीला घाबरला असल्याचा दावा माजी आमदार फारुख शहा यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे निवडणुकीत रंगत आली असून भाजप कार्यकर्त्यांना शहा यांच्या वक्तव्यामुळे चेव आला आहे. या सर्वांमध्ये एम आय एम देखील महत्वाची ठरणार आहे. अल्पसंख्यांक भागात एम आय एम ला मत मिळाली तर , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आघाडीचे गणित बिघडणार आहे. एम आय एम गेल्या काही निवडणुकांमध्ये निर्णयक भूमिकेत आहे. शहराचा राजकीय इतिहास वैविध्यपूर्ण राहिला आहे. कधी तेलंगी घोटाळ्यात चर्चेत आलेले अनिल गोटे इथले आमदार होतात तर कधी एम आय एम चा आमदार अनपेक्षित निवडणून येतो. आता भाजपमय जिल्हा आहे त्याचा फायदा शहरात राजकीय स्थैर्यासाठी होती कि धुळेकर सत्ते विरोधात कौल देतात हे निवडणुकीत स्पष्ट होईल एकंदरीत धुळ्याची निवडणूक नाराजांच्या पक्ष विरोधी कारस्थानामुळे जास्त गाजेल असं चित्र शहरात आहेत. एक अनार सौ बिमार अशी अवस्था असल्याने निवडणाऱ्यांचा मार्ग पक्षातील तिकीट न मिळालेले उमेदवार अवघड करतील. प्रशांत परदेशी, प्रतिनिधी, धुळे
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Dec 27, 2025 17:19:14
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 27, 2025 14:31:25
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पार्टी यांनी एकत्र येत राजर्षी शाहू आघाडीची औपचारिक घोषणा केली आहे. या तिन्ही पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी)चे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी आघाडीची भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना व्ही. बी. पाटील यांनी, खासदारकी असो किंवा आमदारकी, आजवर सर्व निवडणुकांमध्ये आम्ही खांद्याला खांदा लावून लढलो. मात्र या महापालिका निवडणुकीत इंडिया आघाडीच्या वतीने एकतर्फी भूमिका घेतली गेली. त्यामुळे आता आम्ही आप आणि वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त महापालिका नव्हे तर आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही हीच आघाडी एकत्र लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर आज २१ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार असल्याची माहितीही दिली. जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी)ला २५ जागा तर वंचित बहुजन आघाडी आणि इतर मित्र पक्षांना ३१ जागा असा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. यावेळी व्हि. बी . पाटील यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे नाव न घेता टीका केली. एका व्यक्तीमुळे इंडिया आघाडी चुकीच्या दिशेने जात असल्याचे नमूद केले.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 27, 2025 14:31:08
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 27, 2025 14:30:26
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 27, 2025 13:54:19
Kolhapur, Maharashtra:महायुती के तौर पर कोल्हापूर महापालिका निवडणूक लढवत असताना जागावाटपात तडजोड करावी लागत असल्याचं भाजपचे सचिव महेश जाधव यांनी स्पष्ट केलं आहे. महायुतीकडून तब्बल ७०० ते ८०० इच्छुक निवडणूक लढवण्यासाठी पुढे आल्यामुळे, प्रत्येकाला तिकीट देणं शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं. महेश जाधव यांच्या म्हणण्यानुसार, या परिस्थितीत भाजपला काहीच जागा मिळण्याची शक्यता असून, त्यामुळे अनेक तरुण, निष्ठावंत आणि मेहनती कार्यकर्त्यांना तिकीट मिळणार नाही. तरीही महापालिकेवर महायुतीची सत्ता आणण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांनी त्यागाची तयारी ठेवावी, असं आवाहन त्यांनी केलं. काही ठिकाणी मित्रपक्षाला जागा गेल्या तरी राग मानू नये, प्रत्येक कार्यकर्त्याचा योग्य सन्मान पक्षाकडून केला जाईल, असा विश्वासही त्यांनी दिला. पक्षविरोधी भूमिका घेऊ नये तसेच बंडखोरी करू नये, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी इशारा दिला आहे. महेश जाधव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हे आवाहन केलं आहे. पाहूया महेश जाधव नेमकं काय म्हणाले.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 27, 2025 13:47:00
Akola, Maharashtra:अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत बिघाड झाल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. आज जागावाटपाच्या मुद्द्यावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मात्र जागावाटपावर एकमत न झाल्याने ही बैठक निष्फळ ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप 55 शिवसेना एकनाथ शिंदे 15 आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( अ.प ) 10 जागांवर निवडणूक लढणार असल्याचा फार्मूला जवळपास नक्की झाला होता. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र चर्चा केली. त्यानंतर त्यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे नेते गोपीकिशन बाजोरिया यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, अकोला महापालिका निवडणूक फिफ्टी-फिफ्टीच्या ( शिवसेना + राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) फार्मुल्यावर लढण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे मात्र अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचा iki पक्षाच्या नेत्यांनी म्हंटलं आहे. मात्र महायुती संदर्भातील अंतिम निर्णय अद्याप झालेला नसून चर्चा सुरूच असल्याचे इंद्रनील नाईक , आमदार अमोल मिटकरी आणि एकनाथ शिंदे शिवसेना चे नेते गोपीकिशन बाजोरिया यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान, या घडामोडींमुळे अकोला महायुतीतील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा चर्चेत आली असून पुढील काही तासांत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता וर्तवली जात आहे.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Dec 27, 2025 13:46:37
Vasai-Virar, Maharashtra:वसई विरार में शिवसेना ठाकरे गट स्वबळावर निवडणूक लढवणार वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये बवीआ, मनसे, काँग्रेस एकत्रित निवडणूक लढवणार बहुजन विकास आघाडीच्या चिन्हावर हे दोन्ही पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची माहिती समोर येत आहे. पालिकेच्या 29 प्रभागात 115 उमेदवार तिन्ही पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरवले जाणार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या महाविकास आघाडीतून बाजूला होत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा दिला आहे यामुळे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे
0
comment0
Report
Advertisement
Back to top