Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

शेतकरी न्याय यात्रेतून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाची पोलखोल करणार, आशिष खुलसंगे

Aug 21, 2024 07:24:58
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची शेतकरी न्याय यात्रा शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत आहे. शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने आणि अतिपावसामुळे नापिकीचे संकट उभे राहिले आहे. कोळसा खाणीमुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. पीक विमा मिळवण्यात अडचणी आहेत आणि पांदण रस्ते योजना रखडली आहे. सरकार 'लाडकी बहिण' योजनेचा प्रचार करत असताना, शेतकऱ्यांना दुसऱ्या हाताने लुटून उध्वस्त करत असल्याचा आरोप आशिष खुलसंगे यांनी केला आहे.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Dec 14, 2025 14:47:06
Akola, Maharashtra:उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षण क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. “पीएचडी करके क्या दिवे लगाते?” और “पैसे मिलते हैं इसलिए एक ही परिवार के पांच-पांच लोग पीएचडी करते” जैसे वक्तव्यों पर अजित पवार पर मनुवादी, अहंकारी और लोकतांत्रिक मूल्यों के विपरीत भाषा के प्रयोग का आरोप हो रहा है. लोकप्रतिनिधि ही जनसेवक होते हैं, मालिक नहीं, यह समझ सत्ता-धारियों को रखना चाहिए, ऐसी टिप्पणी हो रही है. राज्यात आज शिक्षण व्यवस्थेची स्थिती गंभीर आहे. तब्बल ६५ हजार मराठी शाळा बंद आहेत, ११ हजार प्राध्यापक पदे रिक्त आहेत, विद्यापीठांत सुमारे ६० टक्के शिक्षकांची कमतरता आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या गेली तीन वर्षे मिळाल्या नाहीत. महा ज्योती, बार्ती आणि सारथी संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या फेलोशिप दोन वर्षांपासून रखडलेल्या आहेत. या परिस्थितीला जबाबदार विद्यार्थी आहेत की सत्ताधारी सरकार, असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. एकीकडे संशोधन, पीएचडी आणि विद्यार्थ्यांचा उपहास केला जातो, तर दुसरीकडे एकदा आमदार किंवा विधानपरिषदचे सदस्य झाले की आयुष्यभर ५० ते ५२ हजार रुपयांची मासिक पेन्शन दिली जाते. राज्यात सुमारे ९०० माजी आमदार असून त्यांच्या पेन्शनसाठी दरवर्षी सुमारे ५४ कोटी रुपयांचा खर्च सरकार करत आहे. “त्यांनी काय दिवे लावले?” असा सवालही उपस्थित होत आहे. याच पार्श्वभूमीवर पवार कुटुंबावरही टीका होत आहे. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि रोहित पवार – एकाच कुटुंबातील पाच जण खासदार, आमदार आणि मंत्री आहेत. मग एकाच कुटुंबातील लोक सत्तेत असण्यावर काही निर्बंध घालणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. टीकाकारांचे म्हणणे आहे कि विद्यार्थी हे देशाची संपत्ती आहेत, कुणाचे गुलाम नाहीत. शिक्षण, संशोधन आणि पायाभूत सुविधा देणे ही सरकारची घटनादत्त जबाबदारी आहे, ती कोणाची मेहरबानी नाही. ज्ञानाचा उपहास करणारी और विद्यार्थ्यांना दोष देणारी भाषा हा सत्तेच्या माजाचे प्रतीक असल्याचा आरोप होत आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 14, 2025 13:54:47
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 14, 2025 13:54:28
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Dec 14, 2025 13:03:59
Dharashiv, Maharashtra:धाराशिव तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून विधिमंडळात रणसंग्राम, उबाठा आमदार कैलास घाडगे पाटील विरुद्ध भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्यात जुंपली धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचे पडसाद आज थेट विधिमंडळात उमटले. तुळजापूरमध्ये ड्रग्ज माफिया मोकाट असल्याचा गंभीर आरोप करत ठाकरे शिवसेनेचे आमदार कैलास घाडडे पाटील यांनी विधानसभा सभागृहात सरकारला थेट सवाल केला. तर दुसरीकडे भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी विरोधक तुळजापूरची नाहक बदनामी करत असल्याचा आरोप करत, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. आमदार कैलास पाटील यांनी, “तुळजापूरमध्ये ड्रग्ज प्रकरण इतकं गंभीर असताना मुख्यमंत्री हे प्रकरण हलक्यात का घेत आहेत?” असा थेट सवाल उपस्थित केला. तसंच, “ड्रग्ज प्रकरणातील ‘अग्रवाल’ नावाचा मुख्य आरोपी अद्याप अटक का नाही?” असा सवाल करत पोलिसांच्या भूमिकेवरही त्यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तर भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी सभागृहात प्रत्युत्तर देताना सांगितलं की, तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाबाबत मिळालेली माहिती आपण तात्काळ पोलिसांच्या कानावर घातली होती आणि त्यानंतर मोठी कारवाई झाली. मात्र या प्रकरणाचा आधार घेत काही विरोधक एकत्र येऊन षडयंत्र रचत तुळजापूरची बदनामी करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. तुळजापूरची नाहक बदनामी कोण करतंय, याची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करावी, अशी मागणीही आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी विधिमंडळात केली.
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Dec 14, 2025 12:38:34
Pune, Maharashtra:Headline : मावळात पाच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या Anchor: मावळमधून आलेली अत्यंत धक्कादायक घटना.फक्त पाच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला असून, संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शनิเวारी संध्याकाळी सहा वाजता ही चिमुकली घरातून अचानक बेपत्ता झाली. रात्री आई कामावरून घरी आल्यानंतर तिच्या बेपत्ता असल्याचे लक्षात आले. माहिती मिळताच पिंपरी–चिंचवड पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. प्राथमिक तपासात उघड झाले की, घरात अनेकदा एकटी राहणाऱ्या चिमुकलीचा फायदा घेत समीर कुमार मंडळ (वय ३०–३५, विवाहित) या आरोपीने तिला घराजवळच काही अंतरावर नेले. तेथे तिच्यावर बलात्कार करून गळा दाबून हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. आज सकाळी चौकशीत संपूर्ण घटना उघडकीस आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या अमानुष कृत्यामुळे मावळ परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 14, 2025 11:53:17
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:राज ठाकरे यांना सोबत घेणं उद्धव ठाकरेची मोठी चूक - राज-उद्धव ठाकरे यांच्या ऐकीमुळे महायुतीला नॉन मराठी मते मिळणार - मंत्री रामदास आठवले राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने उद्धव ठाकरेचं नुकसान होणार असून राज ठाकरेना सोबत घेणं उध्दव ठाकरे यांनी करायला नको होतं. राज ठाकरे लोकसभेला आमच्यासोबत होते, तेव्हा आम्हाला काहीही फायदा झाला नाही. विधानसभेला आमच्यासोबत नव्हते, त्यामुळेजास्त फायदा झाला, राज ठाकरे उत्कृष्ट वक्ते आहेत, उत्कृष्ट इव्हेंट मॅनेजमेंट करतात, त्यांच्या सभांना मोठी गर्दी होते. पण त्यांना मतं मिळत नाहीत, असा टोला देखील रामदास आठवले यांनी राज ठाकरेना लगावलाय. तसेच उद्धव आणि राज यांची युती झाल्यामुळे महाविकास आघाडी मध्ये फूट पडली आहे. त्याचा फायदा आम्हाला महाराष्ट्रात होणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे, ते सांगली मध्ये बोलत होते. बाइट - रामदास आठवले - केंद्रीय राज्यमंत्री.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Dec 14, 2025 10:37:50
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 14, 2025 10:21:11
Shirdi, Maharashtra:संगमनेर तालुक्‍क के जवळे कडलग गाँव में कल शाम एक हृदयविदारक घटना घटी। अपनी दादी के सामने खेल रहे चार वर्षीय सिद्धेश कडलग पर दबा कर बैठे बाघ ने अचानक हमला किया और कुछ ही पल में उसका जीवन लील लिया। यह एकलौते बच्चे की ऐसी मौत से गाँव शोकाकुल है और अहिल्यानगर जिल्‍ला हड़कंपित हो गया। इसके बाद ग्रामवासियों ने आक्रोश में बोलना शुरू किया और कहा गया कि नरभक्षक बबट्याला ठार करना चाहिए, अन्यथा शव नहीं लिया जाएगा, परंतु वन विभाग ने बाघ को जेरबंद करने के आदेश दे दिए, जिससे नातेदारों ने मृत्यु के शव का ताबड़तोड़ स्वागत किया। अगले दिन सिद्धेश के अंतिम संस्कार में पूरा गाँव शोकाकुल रहा। गाँव में वन विभाग की ओर से चार टीमों ने रात भर खोजबीन की और नदी किनारे, गवताळ इलाकों में तलाश जारी रही; ग्रामवासियों ने बताया कि इस क्षेत्र में कई बबट्‍े मुक्त घूम रहे थे और उन्होंने वन विभाग के अधिकारियों से मांग की कि बाघों को पिंजरे में बंद कर गाँव-गाँव में सुरक्षा व्यवस्था कड़ी की जाए। चिखली रोड के पास सूरज दिलीप कडलग के घर के पास घटना घटी; सिद्धेश की दादी मिराबाई ने इसे सुनकर बिलखते हुए बताया कि बेटे की मौत के साथ पोते की यादें उनकी जिंदगी भर के लिए दर्द बनकर रह जाएंगी। वन विभाग ने सफलता पूर्वक इलाके में बाघों को पकड़ने के लिए प्रयास तेज किए और अंततः क्षेत्र के पास बहते जल स्रोत के नज़दीक एक बबट्या जेरबंद किया गया।
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Dec 14, 2025 10:15:48
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Dec 14, 2025 09:49:42
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Dec 14, 2025 09:23:11
Lasalgaon, Maharashtra:उच्च न्यायालयाने नायलॉन मांजावर बंदी घातलेली असताना देखील नाशिक जिल्ह्यात नायलॉन मांजाचा सर्रास वापर सुरू असल्याच दिसून येत आहे येवला पाठोपाठ आता लासलगाव मध्ये देखील नायलॉन मांजामुळे अक्षय नहाटा हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या गळ्याला खोलवर जखम झाली होती सुदैवाने वेळीच उपचार मिळाल्याने डॉक्टरांनी 21 टाके टाकून त्याचा रक्तस्राव बंद केला. दरम्यान या बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा वापर सर्रास सुरू असून पोलीस यंत्रणा याकडे डोळझाक करत आहे का ? हा सवाल निर्माण झाला आहे पोलिसांनी अशा नायलॉन माता/Vिक्रेत्यांवर व वापरणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 14, 2025 09:18:12
Kalyan, Maharashtra:नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या.. डोंबिवलीतून जनजागृती रॅलीला सुरुवात.. २२ तारखेला पायी दिंडी काढत नवी मुंबई विमान तलावर काढणार मोर्चा.. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला राष्ट्रीय नेते स्वर्गीय दि. बा. पाटील. यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे. आक्रमक .पवित्रा घेण्यात आला आहे.गेल्या अकरा वर्षा पासून संघर्ष सुरु आहे नवी मुंबई विमानतळ हुन 25 तारखेला विमानसेवा सुरु होणार आहे मात्र नावाची घोषणा केलीअद्याप केली गेली नसल्याने पाच ही जिल्ह्यातील भूमिपुत्र एकत्र येतं येत्या २२ तारखेला भिवंडी येथून पायी दिंडी यात्रा काढून थेट नवी मुंबई विमानतळावर धडक देण्याचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज डोंबिवलीतून २७ गाव संघर्ष समितीच्या वतीने जनजागृती रॅली सुरुवात केली आली. त्याचं प्रमाणे २१ तारखेपर्यंत मुंबई लगतच्या पाचही जिल्ह्यांमध्ये बाईक रॅली, विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणून जनजागृती केली जाणार असल्याचे सांगत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला. बाईट, सुरेश बाळ्या मामा म्हात्रे, खासदार भिवंडी लोकसभा, राष्ट्रवादी, अध्यक्ष संघर्ष समिती,
0
comment0
Report
Advertisement
Back to top