445001
शेतकरी न्याय यात्रेतून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाची पोलखोल करणार, आशिष खुलसंगे
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची शेतकरी न्याय यात्रा शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत आहे. शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने आणि अतिपावसामुळे नापिकीचे संकट उभे राहिले आहे. कोळसा खाणीमुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. पीक विमा मिळवण्यात अडचणी आहेत आणि पांदण रस्ते योजना रखडली आहे. सरकार 'लाडकी बहिण' योजनेचा प्रचार करत असताना, शेतकऱ्यांना दुसऱ्या हाताने लुटून उध्वस्त करत असल्याचा आरोप आशिष खुलसंगे यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सोलापूर गणेशोत्सव के लिए तीन लाख मांगने पर हॉटेल व्यवसायी से खंडणी मामला दर्ज
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - गणपतीसाठी तीन लाखांची वर्गणी मागितल्याने हॉटेल व्यवसायिकाला आली चक्कर, कार्यकर्ता " नेताजी " विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल - सोलापूर शहरातील एका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवानिमित्त हॉटेल व्यवसायिकाला मागितली तब्बल तीन लाख रुपयांची वर्गणी - वर्गणीची रक्कम ऐकताच हॉटेल व्यवसायिक एकनाथ घाडगे यांना आली चक्कर - मंडळाच्या नावावर पाचशे ड्रेसचे प्रत्येकी 600 रुपये याप्रमाणे तीन लाखांची करण्यात आली होती मागणी - मात्र हॉटेल व्यवसायिकांनी यापूर्वी दोन लाख रुपये दिल्याचे सांगत प्रत्येक वर्षी 25 हजार रुपये वर्गणी देण्याची दर्शवली होती तयारी - मात्र गणेश मंडळाचा कार्यकर्ता नेताजी शिवाजी शिंदे यांनी काहीही ऐकून न घेता हॉटेल व्यवसायीकाला शिवीगाळ केल्याचा आरोप - नेताजी शिंदे यांच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल0
0
Report
5 वर्षीय गणेश भक्त ने बारिश के लिए विनती की, नंदुरबार में उम्मीद जगी
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्याचे यंदा पावसाने पाठ फिरवली आहेत. त्यामुळे भीषण काळजी परिस्थिती निर्माण होताना दिसून येत आहे. गणपती बाप्पाचा आगमन जिल्ह्यात झालेला आहे. हितेन जयेश तांबोळी या अवघ्या 5 वर्षच्या गणेश भक्ताने बाप्पाला पावसासाठी विनवणी केली आहे. जिल्ह्यात पाऊस पडू दे आणि दुष्काळाचे सावट दूर कर असा विनवणी हे हितेन ने बाप्पाला केली आहे.0
0
Report
Vidarbha me agle hafte barish ki sambhavnā nahi; Nagpur me taapman 32-34°C.
Nagpur, Maharashtra:Vidarbha me agle hafte barish ki sambhavnā nahi; Nagpur ke Pradeshik Hawa-Mausam Vibhag ne kahā. Taapman 32 se 34°C tak pahunchne ki sambhavnā vyakt ki gayi. Julai–August me barish ki bahut kam thi. Uske baad September me bhi Nagpur me achhi barish hone ki sambhavnā nahi. El Niño ke prabhav se monsoon par bada prabhav dekha ja raha hai.0
0
Report
Advertisement
ओझर के अष्टविनायक मंदिर रोशनाई से जगमगा उठा, गणेशोत्सव की धूम
Barav, Maharashtra:गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात अष्टविनायक तीर्थक्षेत्र ओझरची विघ्नहर नगरी डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या आकर्षक विद्युत रोषणाईने अक्षरशः उजळून निघाली है. बाप्पाच्या आगमनानिमित्त संपूर्ण मंदिर परिसर रोषणाईच्या लखलखाटात न्हाऊन निघाला असून, उत्सव काळात येथे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळी रंगणार आहे. मंदिर परिसराचे हे मनमोहक आणि विहंगम रूप थेट ड्रोन कॅमेऱ्यातून टीपण्यात आले असून, पाहुयात विघ्नहर नगरीची ही खास एक्स्क्लुझिव्ह दृश्ये.0
0
Report
नागपूर में 15 दिनों में स्वाइन फ्लू के 70 मरीज, डेंगू-मलेरिया के केस बढ़े
Nagpur, Maharashtra:नागपुरात १५ दिवसांत स्वाइन फ्लूचे ७० रुग्ण मिळून आले आहेत. बदलत्या हवामानामुळे व्हायरल तापाच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे; १ ते १५ सप्टेंबरदरम्यान डेंग्यूचे ९ तर मलेरियाचे ४ रुग्ण आढळले आहेत. यातच गणेशोत्सवाच्या गर्दीत संसर्ग वाढण्याचा धोका असल्यानं आरोग्य विभागाकडून खबरदारीचा आवाहन करण्यात आला आहे. स्वाइन फ्लूची प्रमुख लक्षणं ताप, खोकला, घसा खवखवणे, नाक वाहणे, अंगदुखी, डोकेदुखी, थंडी वाजणे आणि थकवा असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आरोग्य यंत्रणेचं आवाहन करण्यात आलं आहे. गणेशोत्सवातील गर्दीत मास्क आणि हातांची स्वच्छता महत्त्वाची असून खोकलताना किंवा शिंकताना रुमालाचा वापर करावा, बाहेरून आल्यावर साबणाने हात धुवा किंवा सॅनिटायझर वापरा; ताप २-३ दिवसांपेक्षा जास्त राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. श्वास घेण्यास त्रास, उलट्या किंवा तीव्र डोकेदुखी असल्यास तातडीने उपचार घ्या; स्वतःच्या मनाने प्रतिजैविक औषधं घेणं टाळा. गणेशोत्सवाच्या गर्दीत आजारी व्यक्तींनी जाणं टाळण्याचं आवाहन, लहान मुले, गर्भवती महिला आणि ज्येष्ठांनी अतिगर्दीच्या वेळा टाळाव्या.0
0
Report
कोल्हापूर में डॉल्बी उत्सर्जन से ध्वनि प्रदूषण: 6 मंडलों पर FIR
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरातील राजारामपुरी मध्ये डॉल्बीचा वापर ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा मंडळांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राजारामपुरी मध्ये आगमन मिरवणुकी दरम्यान पोलिसांनी 29 मंडळाच्या साऊंड सिस्टिमच्या आवाजाचे नमुने घेतले. त्यामध्ये 104 ते 109 डेसिबल पर्यंत आवाज गेलेल्या सहा मंडळांच्यावर कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत. शहरातील राजारामपुरी पोलिसात मंडळाचे अध्यक्ष आणि साऊंड सिस्टिम मालकाविरोधात हे गुन्हे दाखल झाले आहेत.0
0
Report
Advertisement
न्यू जर्सी में गणेशोत्सव का जश्न: नाभरे परिवार ने कला से शिवरूप गणेश बनाया
Amravati, Maharashtra:अमेरिकेतील न्यू जर्सीच्या नाभरे कुटुंबीयांच्या घरी बाप्पाचे थाटात आगमन; घरातील कला साहित्यातून साकारला शिवरूप गणरायाचा देखावा. महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत असून शशीन शंकरराव नाभरे यांच्या न्यू जर्सी येथील राहत्या घरी बाप्पाचे भक्तिमय वातावरणात आगमन झाले आहे. विशेष म्हणजे त्यांचा मुलगा यश नाभरे आणि मुलगी निधी नाभरे यांनी घरातील उपलब्ध कला साहित्याचा कल्पक वापर करत बाप्पाचा सुंदर देखावा साकारला आहे. या देखाव्यात बाप्पाचे पिता भगवान शिव यांचे त्रिशूळधारी रूपही आकर्षक पद्धतीने साकारण्यात आले आहे. परदेशात राहूनही आपल्या मातीतल्या संस्कृतीशी आणि गणेशोत्सवाच्या परंपरेशी नाते जपण्याचा हा सुंदर प्रयत्न ठरत आहे. त्यामुळे नाभरे कुटुंबीयांच्या या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.0
0
Report
अमित शाह कोल्हापुर दौरे पर, ग्रीन एनर्जी प्रकल्प का भूमिपूजन करेंगे
Kolhapur, Maharashtra:केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह 19 और 20 सितंबर को कोल्हापूर जिला दौरे पर आएंगे। 19 सितंबर शाम 5.05 बजे उनके कोल्हापूर विमानतळ पर आगमन होगा और उसके बाद वे शासकीय विश्रामगृह में ठहरेंगे। 20 सितंबर को हु्परी इथल्या कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्यात महालक्ष्मी ग्रीन एनर्जी कॉम्प्लेक्स के भूमिपूजन और किसान मेळाव्याला वे उपस्थित रहेंगे। उसके बाद दोपहर 4 बजे विमान से मुंबई लौटेंगे। इसके जरिए देश के पहले ग्रीन एनर्जी प्रकल्प के भूमिपूजन अमित शाह करेंगे, यह भाजप नेता प्रकाश आवाडे ने बताया।0
0
Report
शिरूर के किसान महिलाएं बारिश के लिए पारंपरिक गीत गाकर बरसात की मांग कर रहीं
Shirur, Maharashtra:गेल्या महिनाभरापासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने बळीराजाच्या नजरा पुन्हा एकदा आभाळाकडे लागल्या आहेत. पावसाअभावी उभी पिके करपू लागल्याने अनेक भागांत दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथे शेतात कांदा लागवड करताना महिलांनी थेट पारंपरिक गाणी गात वरुणराजाला पावसासाठी आर्त साकडं घातलं आहे. हाता-तोंडाशी आलेली पिके वाचवण्यासाठी आता दमदार पावसाची नितांत गरज असून, वरुणराजा कधी बरसणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.0
0
Report
Advertisement
झिलपा तालाब में डूबे दो 13 साल के बालकों की दर्दनाक मौत
Nagpur, Maharashtra:गौराई विसर्जनासाठी आईसोबत तलावावर गेलेल्या दोन १३ वर्षीय बालकांचा तलावाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास झिलपा शिवारातील तलावावर घडली. आयुष हरीष कुमरे आणि दर्शन धनराज लाड दोघेही रा. झिलपा अशी मृत बालकांची नावे आहेत. या घटनेने झिलपा गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. गावातील महिला गौराई विसर्जनासाठी सकाळी झिलपा शिवारातील तलावावर गेल्या होत्या. यावेळी काही मुलेही महिलांसोबत तलावाच्या पाण्यात उतरली होती. गौराई विसर्जन सुरू असताना आयुष कुमरे व दर्शन लाड हे दोघे पाण्यात बुडाल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांसह उपस्थितांनी तत्काळ तलावाकडे धाव घेतली. आयुषचे काका आणि दर्शनचे काका यांनी पाण्यात उतरून दोन्ही बालकांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तातडीने काटोल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच काटोल पोलिसांनी नोंद घेत पुढील कार्यवाही सुरू केली. आयुष हा आठवीत, तर दर्शन हा सातवीत शिक्षण घेत होता.0
0
Report
झुरकुटोला में बाघ के हमले से किसान की मौत, इलाके में दहशत
Bhandara, Maharashtra:वाघाच्या हल्ल्यात ७२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दुपारी उघडकीस आली. वातू बकाराम राऊत असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने झुरकुटोला परिसरासह लगतच्या गावांमध्ये भीतीचे सावट पसरले असून, जंगलालगतच्या शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वातू राऊत हे सकाळच्या सुमारास घरातील शेळ्यांसाठी चारा आणण्यासाठी झुरकुटोला येथील पहाडीवरील जंगल परिसरात गेले होते. हा भाग एफडीसीएमच्या कंपार्टमेंट क्रमांक ५२४ मध्ये येतो. जंगल परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक राऊत यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. राऊत यांच्यासोबत असलेल्या इतर शेतकऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने गावात धाव घेत गावकऱ्यांना याची माहिती दिली. गावकऱ्यांनी तत्काळ वन विभाग व पोलिसांना कळविले. माहिती मिळताच वन विभागाचे पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वन कर्मचाऱ्यांनी परिसराची पाहणी करून वाघाच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे. वाघाच्या हल्ल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे...0
0
Report
सानपाड़ा गैस सिलिंडर विस्फोट: दो भाइयों की हालत गंभीर, दुकानें और इमारतें क्षतिग्रस्त
Navi Mumbai, Maharashtra:anchor: removed सानपाडा सेक्टर-१ येथील प्रतीक सोसायटीतील फास्ट फूडच्या दुकानात मंगळवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन दोन सख्खे भाऊ गंभीररित्या भाजल्याची घटना घडली. मनिष लालबहादुर यादव (२७) आणि अर्जुन लालबहादुर यादव (४६) अशी जखमी भावांची नावे आहेत. दोघांवर ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. सानपाडा सेक्टर-१ मध्ये प्रतीक सोसायटीतील गाळा क्रमांक १ मध्ये यादव बंधू फास्ट फूडचे दुकान चालवत होते. तसेच ते दुकानातच ते राहत होते. सोमवारी दिवसभर काम केल्यानंतर दोघे भाऊ रात्री उशिरा झोपी गेले. प्राथमिक तपासात दुकानात ठेवलेल्या तीन व्यावसायिक गॅस सिलेंडरपैकी एका सिलेंडरमधून रात्रीच्या सुमारास गॅसची गळती झाली..दुकान पूर्णपणे बंद असल्याने गळती झालेला गॅस दुकानातच साचून राहिला. मंगळवारी सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास एका भावाने कामासाठी उठून दिवा लावण्यासाठी विद्युत स्विच दाबला. स्विच दाबताना झालेल्या स्पार्कच्या संपर्कात दुकानात साचलेला गॅस येताच आग भडकल्यानंतर क्षणार्धात सिलेंडरचा bhiषण s्फोट झाला. या स्फोटात दोन्ही भाऊ गंभीररित्या भाजले. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, दुकानाचे शटर उचकटून मोठे नुकसान झाले. आसपासच्या सुमारे पाच दुकानांनाही स्फोटाचा फटका बसला. रस्त्याच्या पलीकडे असलेल्या सुरज हॉस्पिटललाही स्फोटाचे हादरे जाणवले. तसेच समोरील आणि आजूबाजूच्या इमारतींमधील घरांच्या व दुकानांच्या काचा फुटल्या. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि सानपाडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. दोन्ही जखमी भावांना प्रथम वाशीतील महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटरमध्ये हलविण्यात आले.0
0
Report
Advertisement
दीघी में देश का सबसे बड़ा ग्रीनफील्ड जहाज निर्माण प्रकल्प; 27 हजार करोड़ निवेश
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रायगडच्या दिघीत देशातील सर्वात मोठे शिपयार्ड; कोकणात २७ हजार कोटींची गुंतवणूक.. कोकणातील दिघी येथे देशातील सर्वात मोठा ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्प उभारण्यासाठी राज्य सरकार आणि ‘माझगाव डॉक’ यांच्यात २७ हजार कोटींचा ऐतिहासिक करार झाला..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या या करारामुळे देशाच्या जहाजबांधणी क्षमतेत महाराष्ट्राचा वाटा ४० टक्क्यांवर पोहोचणार आहे. युद्धनौका आणि व्यापारी जहाजांची निर्मिती करणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे राज्यात सुमारे ९० हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत..0
0
Report
मराठा आरक्षण उपसमिती के सदस्य के बयान पर रोहित पवार का जवाब मांगा गया
Satara, Maharashtra:कराड, सातारा : मराठा आरक्षणाच्या उपसमितीचा सदस्य म्हणून सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चेदरम्यान दिलेला प्रत्येक शब्द पाळला आहे, असा दावा मंत्री शंभूराज देसाई यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देसाईंनी मराठा आरक्षणाबाबत सत्य सांगावे, असे आव्हान दिले होते. त्याला उत्तर देताना देसाई यांनी हे वक्तव्य केले. हैदाबाद गॅझेटमधील कुणबी नोंदी शोधून त्या शिंदे समितीकडे सोपविण्याचे काम सरकारने प्रामाणिकपणे केले आहे. याबाबत आपण काय केले, हे रोहित पवारांनी मनोज जरांगे पाटील यांनाच विचारावे, असेही देसाई म्हणाले. सातारा व औंध गॅझेटबाबत कायदेशीर बाबींचा विचार करून अॅडव्होकेट जनरल आणि वरिष्ठ कायदेतज्ज्ञांच्या सल्ल्याने निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात मुंबईकर आणि भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषण करू नये, अशी विनंती देसाई यांनी केली. आंदोलकांशी चर्चेसाठी सरकारची दारे नेहमीच खुली आहेत, असेही त्यांनी सांगितले.0
0
Report
लंदन में अनिल खेड़ेंकर ने गणपति प्रतिष्ठापना से भारतीय संस्कृति को जीवंत दिखाया
Pandharpur, Maharashtra:इंग्लंड लंडन शहरांमध्ये अनिल खेडेकर यांनी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. परदेशात राहून सुद्धा अनिल खेडेकर यांनी भारतीय संस्कृतीची आपली नाळ तुटू दिली नाही. त्यांनी त्यांच्या घरी बसवलेल्या गणपतीसमोर पंढरपूरच्या आषाढी वारीचा देखावा सुद्धा अत्यंत सुंदरपणे तयार केला आहे. त्यांनी पहिल्यांदच लंडन ते पंढरपूर वारी सुद्धा काढली होती इंग्लंडमध्ये राहून तेथे राहत असलेल्या भारतीयांना एकत्र करून सर्व भारतीय सण साजरा करण्यामध्ये अनिल खेडेकर यांचा पुढाकार असतो.0
0
Report
Advertisement
