icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

गणेश उत्सव: कानून के पालन के साथ नागरिक सहभागिता बढ़ाने पर जोर

Pune, Maharashtra:पुणे देशभर फिरत असताना मंडळाला वेळ देणं महत्वाचं आहे मी दहा दिवस इथे असतो मला वाटतं मी गणेश मंडळ कार्यकर्ता आहे. लोकप्रतिनिधी आहे. लोकांचा सहभाग कसा वाढेल याचा विचार केला पाहीजे 130 वर्षे परंपरा आहे. नियम पाळून उत्सव केला पाहीजे. प्लाझ्मा या बाबत भूमिका की ते उत्सवात नको. न्यायालयाने जे सांगितले आहे तसा उत्सव व्हावा. आवाजाचा अतिरेक नको. नागरिकांना हवा असलेला उत्सव व्हावा. ढोल ताशे बाबत पोलिसांनी कडक भूमिका घेऊ नये. हिंदू सण आहेत पारंपरिक हवे. निर्बंध नको. डिजे बाबत कोर्टाने जे सांगितले ते पालन व्हावे. आवाजाची मर्यादा राखून उत्सव करावा. लोकांना त्रास होईल असे उत्सव नको. नियमामधे राहून उत्सव करा. महाराष्ट्रातले काही लोक अडकले. मुख्यमंत्री त्यात लक्ष देऊन आहेत. स्वतः मुख्यमंत्री लक्ष घालत आहेत. काल राज्यचे मंत्री उईके विद्यार्थींना भेटले. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातलं आहे.
0
0
Report
Advertisement

एमपीएससी ड्रग्ज घोटाले में सुनील गाढवे पर आरोप, वे कहते हैं निर्दोष

Pune, Maharashtra:एमपीएससीच्या ड्रग्ज निरिक्षक परिक्षा घोटाळा प्रकरणी संशयाच्या भोवऱ्‍च सापडलेले सुनील गाढवे आत्ता आपल्यासोबत exclusive आहेत...या ड्रग्ज परिक्षेत त्यांच्या मिसेसचं सिलेक्शन झाल्याने त्यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी एनसीपीच्या महबूब शेख यांनी केल्यानंतर भाजपच्या नवनाथ बन यांनी ते भाजपचे नाहीतर रोहित पवारांचे कार्यकर्ता असल्याचा पलटवार केला होता...त्यानंतर राष्ट्रवादीचे सरचिटणील सुनील माने यांनी सुनील गाढवे अभिमन्यु पवार यांचे कार्यकर्ता असल्याचा खुलासा केलाय..त्यामुळे सध्या पुणे महापौरांसोबत सहाय्यक म्हणून वावरणारे हे सुनिल गाढवे नेमके कोण आहेत? आणि सगळेच पक्ष त्यांना हे असे डिसओन का करताहेत ? असे अनेक प्रश्न निर्माण झालेत ? म्हणूनच आज आम्ही त्यांना गाठून त्यांचं या सगळ्या वादात नेमकं काय म्हणणं हे ते जाणून घेतोय
0
0
Report

वर्धा अतिक्रमण पर जीआर को लेकर सांसद-एमएलए में आरोप-प्रत्यारोप

Wardha, Maharashtra:वर्धा Slug - 2808_wardha_mp_mla • अतिक्रमणाच्या कारवाईवरून खासदार, आमदारांचे आरोप प्रत्यारोप • शासनाचे परिपत्रक पाळण्याची खासदार अमर काळे यांची मागणी • पावसाळ्यात ३० सप्टेंबर पर्यंत अतिक्रमण काढू नये असा शासनाचा जीआर असून फक्त ३० सप्टेंबरपर्यंत अतिक्रमण काढू नये, असे सांगितल्याचे खासदार अमर काळे यांच म्हणणे • अधिकाऱ्यांनी नियमाचे, शासनाच्या परिपत्रकाचे पालन केले पाहिजे • आमदार व अधिकारी शासनाच्या परिपत्रकापेक्षा मोठे होऊ शकत नाही, असेही खासदार अमर काळे म्हणाले सर्व लोक त्या ठिकाणी बघत आहे, सहाव्या मजल्याचा आशीर्वाद असल्याचा खासदार काळेंचा आरोप -- अमर काळे, खासदार वर्धा. +++ • खासदारांच कालचे वर्तन आश्चर्यकारक आहे • प्रशासकीय अधिकाऱ्यांवर अशा पद्धतीने बोलणं योग्य नाही, अस आमदार सुमीत वानखेडे म्हणाले • विकासकामांमध्ये अडथळे आणल्याचा आमदारांचा खासदारांवर आरोप • कालची कारवाई कायदेशीर होती की बेकायदेशीर, याचा खुलासा प्रशासन करेल, असे वानखेडे म्हणाले बाईट - आमदार सुमित वानखेडे ♦️अमर काळे, खासदार वर्धा बाईट सविस्तर♦️ या अतिक्रमणाच्या संदर्भामध्ये चुकीच्या पद्धतीने कारवाई होत आहे जो व्यक्ती आहे तो मला भेटला होता त्याचं म्हणण मी ऐकून घेतलं आणि त्या अनुषंगाने संबंधित यंत्रणेला मी माझ पत्र दिलेलं होतं पंचायत समिती तहसील आणि पोलीस विभागाला पत्र दिलेलं होतं त्यामध्ये त्यांना माझ इतक सांगणं होतं की महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रक आहे त्या परिपत्रकाच्या अनुषंगाने 30 सप्टेंबर पर्यंत कुठले अतिक्रमण काढू नये त्या परिपत्रकामध्ये स्पष्ट सूचना आहे ३० सप्टेंबर पर्यंत कुठले अतिक्रमण काढू नये त्यामुळे माझे त्यांना एकच सूचना होती.. त्या गावांमध्ये काही एकच अतिक्रमण नाही आहे प्रत्येक गावामध्ये अतिक्रमण आहे नगरपरिषदेमध्ये अतिक्रमण आहे सर्वीकडे अतिक्रमण आहे त्यामुळे एकाच व्यक्तीचा अतिक्रमण काढण्यासाठी तुम्ही जे जोर जबरदस्ती करत आहे ते योग्य नाही. जेही करायचं असेल तीस सप्टेंबर च्या नंतर करा हे मी त्यांना सांगितलं माझं पत्र दिलं सकाळी मी दोनदा संबंधित अधिकाऱ्यांना फोन केले माझ्या बोलण्यानंतर ते अतिक्रमण थोडं डीले झालं आर्वीतून आमदाराकडून प्रेशराईज झालं आणि आमदाराकडून प्रेशराईज झाल्यानंतर मोठी प्रशासकीय यंत्रणा तेथे होती वीस पंचवीस पोलीस त्या ठिकाणी होते अंतिम टप्प्यामध्ये आता अतिक्रमण काढणारच आहे असे गावातून जेव्हा फोन आले तेव्हा मी तिथे गेलो तिथे गेल्यानंतर जो प्रकार झाला तो त्या ठिकाणी आपण सर्वांनी बघितला आहे परंतु माझा त्या ठिकाणी माझ स्पष्ट फक्त इतकंच म्हणणं होतं की गव्हर्मेंट च्या परिपत्रकाच आपण पालन करा. आमदार शासनापेक्षा मोठा नाही होऊ शकत आमदार शासनाच्या परिपत्रकाच्या पेक्षा मोठा होऊ शकत नाही अधिकारी परिपत्रकापेक्षा मोठे होऊ शकत नाही म्हणून मी त्यांना म्हटलं तुम्ही अधिकारी आहे परिपत्रकाच्या पालन करा. तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या आदेशावर अशा पद्धतीने जर तुम्ही नाचत असाल सर्व नियम कायदे बाजूला ठेवून अशी कृती करत असाल आता या मतदारसंघात खपवून घेतले जाणार नाही आणि हे जे दादागिरी या मतदारसंघांमध्ये आणि हे जे दडपशाही हुकुमशाही आतापर्यंत चालू आहे त्याच्या अतिरेक झाला आहे त्यामुळे आता याच्यानंतर अशा पद्धतीचे दादागिरी अशा पद्धतीचे हुकूमशाही प्रत्येकाचा एखादा सहनशीलतेचा मर्यादा असते ती सहनशीलतेची मर्यादा आता आमचे संपली आहे. लोकांचे हे संपले आहे आता पुढच्या काळामध्ये जशास तसे उत्तर या ठिकाणी आमदार जर असं करत असेल तर या ठिकाणी उत्तर मिळेल.मला वाटते वीस वर्षापासून अतिक्रमण असेल मला काही खूप जास्त त्याच्यातले आयडिया नाही आहे माझं फक्त सरळ इतकं म्हणणं होतं की 30 सप्टेंबर पर्यंत अतिक्रमण काढू नये सप्टेंबर पर्यंत थांबा ना काही अडचण आहे आणि जे लोक अतिक्रमण काढा असा फोर्स करत होते त्यांचं म्हणणं होतं की उद्या काम करायचा आहे त्यांना विचारलं मंजूर आहे काम मंजूर नाही आहे काम मंजूर नाही आहे एक आपण समजून घेतला असता की काम मंजूर आहे वर्क ऑर्डर झाला आहे त्यामध्ये ठेकेदार फक्त अतिक्रमण करता थांबला आहे तर समजू शकतो तर ठीक आहे पण ते कामच होणार नाही आहे कामावर आम्ही मंजूर नाही ठेकेदाराला वर्कक ऑर्डर नाही अशा कामांना फक्त आम्ही काहीही करू शकतो हम करे सो कायदा हा एक मेसेज लोकांपर्यंत गेला पाहिजे याच्यासाठी सर्व आहे त्यामुळे जे काही परिस्थिती काल निर्माण झाली त्याच्याकडूनच निर्माण झाली आता याच्या नंतर तरी या मतदारसंघांमध्ये बेबंदशाही आणि हुकुमशाही लोकही खपवून घेणार नाही कोणी खपवून घेणार नाही आम्ही खपवून घेणार नाही. ची परिस्थिती कधीही या जिल्ह्याने बघितलेली नाही आणि जी परिस्थिती कधीही या आर्वी मतदारसंघाने बघितले नाही ती परिस्थिती सध्या आम्ही सर्व लोक त्या ठिकाणी बघत आहे आणि मंत्रालयातल्या सहाव्या मजल्याची मस्ती आली आहे सध्या मंत्रालयातल्या सहाव्या मजल्याचा आशीर्वाद आहे त्यामुळे हे जास्त मस्ती कोणी खपवून घेणार नाही हे सर्व मस्ती सहाव्या मजल्याचे मंत्रालयातल्या. अधिकाऱ्यांना वाटते ते सहाव्या मजल्यावरून फोन येईल आपली नोकरी धोक्यात येईल त्यामुळे अधिकारी घाबरतात अधिकाऱ्यांनी नियमाचा पालन केलं पाहिजे परिपत्रकाचे पालन केलं पाहिजे ही अपेक्षा आहे आम्ही काही चुकीचे अधिकाऱ्यांना सांगत नाही आहे नियमाच्या बाहेरच काही करा असं अधिकाऱ्यांना सांगत नाही आहे. नियमाचा पालन करा एक आमदार तुम्हाला फोन करतो तुम्हीम्ही पळत जाता एक झोपडी काढण्यासाठी एका गरीबाचे लाज वाटली पाहिजे आमदाराला लाज वाटली पाहिजे कुठल्या कामाकरिता लोकांनी निवडून दिले आहे उखंडे काढण्याकरिता पोलीस पाठवतात हे आमदाराचे काम आहे का हे आमदाराचे काम आहे का झोपड्या काढून उखंडे काढणं असं कधी बघितलं नाही ते आता बघतो आहे परंतु लोकांचे सहनशीलतेचा आता अंत झाला आहे कारण आता पुढच्या काळामध्ये जशास तसे उत्तर लोकं सुद्धा देतील आम्ही तर देऊच . विदाऊट पॉलिटिकल प्रेशर असे यंत्रणा इतके कामाला लागते का कुठून तरी प्रेशर असल्याशिवाय तुम्ही करू शकत नाही स्पष्ट आहे की आपल्या पदाचा दुरुपयोग येथे सुरू आहे आणि सहाव्या मजल्याचा आशीर्वाद आहे. लोक मला म्हणते की तुम्ही इतके शांतच कसे राहता आता गरम झालो तर तुम्ही इतके गरमच का होता जो संताप होता जो राग होता तो कालचा घटनेतून समोर आला हे बाबत तशी रागण्यासारखे होते एक झोपडी पाडण्याकरिता पूर्ण यंत्रणा कामाला लावते आमदार तेथून चार वेळा फोन करतो आमदारांनी आपले काम करावे कशाला गरीब लोकांच्या मागे लागतात.. ♦️सुमित वानखेडे आमदार सविस्तर ♦️ खर तर वर्धा लोकसभेचे सन्माननीय खासदार यांच कालच वर्तन सार्वजनिकरित्या त्यांनी केलले आहेत त्याचा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे ते अतिशय आश्चर्यकारक आहे आणि जे त्यांना जाणतात अनेक वर्षापासून त्यांचे राजकारण पाहून आहेत त्यांच्यासाठी तो खरच एक धक्का होता.. मोठा आश्चर्य याच्यासाठी आहे की एखाद्या राजपत्रित अधिकार्‍यांवर प्रशासनांवर अशा प्रकारचा अब्यूज करण्यात येते, शिवीगाळ करणे, धमकावण्यात येणे.. कारवाई प्रशासनाने केली. प्रशासन खुलासा करेल ती कालची कारवाई कायदेशीर होती की बेकायदेशीर होती. माझं फक्त एकच म्हणणं खासदार साहेबांना तुम्हाला जर शिवीगाळ करायची असेल, अरेरावी करायची असेल तर अशा लहान अधिकार्‍यांवर का करता तो बिचारा बिडिओ तर आता दोन महिन्या अगोदर जॉईन झालेला आहे त्या कारवाईचे अधिकार हे वर्धा जिल्ह्याचे एसपी ने दिलेले आहेत जिल्हा परिषदेचे पंचायत समितीचे जे सर्वोच्च अधिकारी आहेत ते जिल्हा परिषदेचे सीईओ आहेत कालच्या सारखी वर्तणूक तुम्ही त्यांच्यासमोर करणार का तो जा तुम्ही त्यांना विचारणार का हे लोक कमजोर आहेत जे लोक काही बोलू शकत नाही यशावर आवाज चढून नेतागिरी करण्यात येत नाही.. नेतागिरी करायची असेल तर सक्षम लोकांसोबत आपण कालच्या पद्धतीने वागायला पाहिजे.. माझी जी आतापर्यंतचा माझा अनुभव त्यांचा राहिलेला आहे एक नवीन कार्य संस्कृती या आर्वी विधानसभेत आणण्याचे त्यांनी काम सुरू केलेलं आहे.. जे आतापर्यंत त्यांना न कधी न त्यांच्या वडिलांच्या कार्यकाळात किंवा त्यांची आता कार्यकाळ विकास कामांच्या विरोधात तक्रार करणे चौकशा लावणी काम थांबवणे ठेकेदारांना भेटायला आल्याशिवाय काम सुरू करू नये म्हणून सूचना देणे धमक्या देणे हे काम सतत त्यांच्या कार्यालयात आणि कालचा एक छोटसं अतिक्रमण काढण्याचा जी काही कारवाई होती त्यावरचा इतका जो त्यांचा रिएक्शन होतो त्याचाच एक काही भाग आहे का अशी शंका मला आहे विकास कामांमध्ये जर जनता ना लक्षात आलं की लोकप्रतिनिधी विकास काम थांबवतात आणि कुठल्या ना कुठल्या कारणाने तक्रार करून गावाचा विकास होऊ देत नाही तर गावकरी आवाज उठवणार.. थार मधल्या गावकर्‍यांनी त्यांना जाब विचारलं तुम्ही आमच्या गावाच्या प्रकरणांमध्ये का पडतात आमच्या गावाचा विकासामध्ये अर्थात जर येत असेल तर तुम्ही त्यामध्ये हस्तक्षेप का करतात याची सुद्धा विचारणा गावकर्‍यांनी ते केली तेव्हा मला असं वाटतं की खासदार साहेब उत्तर देऊ शकले नाही खरंतर झालेली घटना दुर्दैवी आहे परंतु यापासून काही शिकून पुढे असं जर विकास कामांमध्ये अडथळा कोणी येणार असेल तर त्यांना खडे बोल सुनावल्याशिवाय जनता राहणार नाही कोणाची अरेरावी आणि अब्युजीव लँग्वेज कोणी सहन करणार नाही फाईल बाईट अमर काळे खासदार वर्धा फाईल बाईट सुमित वानखेडे आमदार आर्वी
0
0
Report

रत्नागिरी में मॉडिफाइड साइलेंसर के खिलाफ पुलिस की कड़क कार्रवाई; 10 बाइक जप्त, 29 हजार रुपए का जुर्माना

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीत मॉडिफाइड सायलेन्सरविरोधात पोलिसांची धडक मोहीम.. कर्णकर्कश आवाज करणाऱ्या १० दुचाकींचे सायलेन्सर जप्त; २९ हजारांचा दंड वसूल.. रत्नागिरी शहरात कर्णकर्कश आवाज करत नागरिकांची शांतता भंग करणाऱ्या दुचाकीस्वारांवर शहर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.. या मोहिमेत पोलिसांनी १० वाहनांचे अनधिकृत मॉडिफाइड सायलेन्सर जप्त करत वाहनचालकांकडून २९ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.. शहरात नियमभंग करणाऱ्या वाहनांवर यापुढेही अशीच कडक कारवाई सुरू राहील,असा इशारा देत वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे..
0
0
Report
Advertisement

दौंड में मामूली विवाद के बाद परिवार पर जीवघेड़ा हमला, 6 आरोपी गिरफ्तार

Rui, Maharashtra:दौंडमध्ये क्षुल्लक वादातून कुटुंबावर जीवघेणा हल्ला, 6 जणांना अटक हा थरार झालाय सीसीटीव्हित कैद..... पुण्याच्या दौंड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय.. किरकोळ अपघाताच्या कारणावरून एका कुटुंबावर कोयता, रॉड आणि हॉकी स्टिकने जीवघेणा हल्ला करण्यात आलाय.. आणि हा संपूर्ण थरार CCTV मध्ये कैद झालाय.. ही घटना आहे 24 ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता महालक्ष्मी हॉस्पिटल, दौंड येथील.. फिर्यादी यश नवनाथ गायकवाड यांच्या कारला आरोपी कृष्णा भूल याच्या मोटरसायकलचा धक्का लागला.. यावरून नुकसान भरपाई मागितल्यावरून वाद झाला.. आणि याच वादातून आरोपींनी हल्ला चढवला.. अशपाक अन्सार सय्यद, कृष्णा भूपेंद्र भूल, अमोल ज्ञानेश्वर मुळे, झहीर नजीर सय्यद, सज्जस शौकत सय्यद आणि तबरेज शौकत सय्यद.. सर्व राहणार दौंडमधील आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी झहीर सय्यद याच्या हातात कोयता होता, सज्जस सय्यद याच्या हातात रॉड, तबरेज सय्यद याच्या कमरेला पिस्तूल होतं तर अशपाक सय्यद आणि इतर 4 ते 5 जण हॉकी स्टिक घेऊन आले होते.. त्यांनी फिर्यादी यश गायकवाड, त्यांची आई, आजी आणि त्यांचे दोन मावस भाऊ मंथन आणि स्वानंद यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.. यात मंथन आणि स्वानंद हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.. पोलिसांनी सर्व 6 आरोपींना 25 ऑगस्ट रोजी पहाटे पावणे दोन वाजता अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी करत आहेत..
0
0
Report

कोल्हापुर गोकुळ चुनाव: सतेज पाटील की सर्वपक्षीय मुलाकातों से बन रहा नया समीकरण

Kolhapur, Maharashtra:इतर फीडwhatsup ला पाठवतो. ANC :- कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय… गोकुळच्या सत्तेसाठी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगण्याची शक्यता आहे… एका बाजूला महायुतीच्या नेत्यांची तगडी फळी… तर दुसरीकडे गोकुळची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा करणारे काँग्रेस नेते सतेज पाटील… मात्र, निवडणुकीच्या आधीच सतेज पाटलांनी भाजपा सह सर्वपक्षीय नेत्यांच्या गाठीभेटींवर भर दिलाय… VO 1 : गोकुळच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आणि त्याचबरोबर जिल्ह्यातील राजकीय हालचालींनाही वेग आलाय… गोकुळच्या सत्तेसाठी महायुती आणि महाविकास आघाडी आमनेसामने येण्याची शक्यता असताना, काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी मात्र आपली रणनीती आखण्यास सुरुवात केलीय…गोकुळची निवडणूक लढवणार असल्याचं सतेज पाटील यांनी आधीच जाहीर केलंय… त्यामुळे मतदारांशी संपर्क वाढवतानाच सतेज पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीगाठींवर भर दिलाय… मात्र, सतेज पाटील यांच्या या राजकीय दौऱ्यातील सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे… भाजप नेत्यांच्या घेतलेल्या भेटी. कोल्हापूर ग्रामीणचे भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी जाऊन सतेज पाटील यांनी भेट घेतली…तसंच भाजपचे सहयोगी आमदार आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असलेले आमदार शिवाजी पाटील यांचीही सतेज पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली… गोकुळच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटींमुळे राजकीय चर्चांना चांगलंच उधाण आलाय. गोकुळच्या राजकारणात महायुतीची ताकद मोठी मानली जाते… एकीकडे मंत्री हसन मुश्रीफ, भाजप आणि महायुतीतील इतर नेत्यांची तगडी फळी…तर दुसरीकडे सतेज पाटील यांची गोकुळच्या मैदानात स्वतंत्र रणनीती… अशा परिस्थितीत भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या थेट भेटी घेऊन सतेज पाटील नेमका कोणता संदेश देतायत? शत्रूंचा शत्रू तो आपला मित्र, या राजकीय समीकरणानुसार सतेज पाटील नवी मोट बांधण्याचा प्रयत्न करतायत का? अशी चर्चा आता जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झालीय. कारण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीकेची झोड उठवणाऱ्या आमदार शिवाजी पाटील आणि ग्रामीण भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांची भेट घेतल्याने जिल्ह्याच्या राजकारणात आश्चर्य व्यक्त केल जात आहे. VO 2 : मंत्री हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांच्या भेटीगाठींवर फारसं आश्चर्य व्यक्त केलेलं नाही… उलट, प्रत्येकाला निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, असं म्हणत त्यांनी सतेज पाटील यांच्या रणनीतीवर भाष्य केलंय… मात्र, भाजप नेत्यांच्या भेटीमुळे गोकुळच्या निवडणुकीत नवी राजकीय समीकरणं तयार होणार का? हा प्रश्न मात्र कायम आहे.. दुसरीकडे, भाजप नेत्यांच्या भेटीबाबत सतेज पाटील यांनीही आपली भूमिका स्पष्ट केलीय… निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने आपण अनेकांना भेटत असतो… त्याचप्रमाणे भाजप नेते आणि आमदारांनाही भेटलो… यात काहीही गैर नसल्याचं सतेज पाटील यांनी स्पष्ट केलंय… महत्त्वाचं म्हणजे, सहकार संस्थांच्या निवडणुका या पक्षविरहित असतात…असं सांगत त्यांनी भाजप नेत्यांच्या भेटींचं समर्थन केलंय… Byte : आमदार सतेज पाटील, नेते भाजपा VO 3: सतेज पाटील यांची भूमिका स्पष्ट असली… तरी गोकुळच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या नेत्यांच्या घेतलेल्या भेटींकडे राजकीय अर्थाने पाहिलं जातंय… कारण गोकुळची निवडणूक ही केवळ दूध संघाची निवडणूक नसून… कोल्हापूर जिल्ह्यातील सहकाराच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी निवडणूक मानली जाते… त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात, प्रत्येक गटात आणि प्रत्येक नेत्याच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झालंय… महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होण्याची शक्यता असली तरी, गोकुळमध्ये स्थानिक पातळीवरील समीकरणं अनेकदा पक्षीय गणितांपेक्षा वेगळी ठरतात… याचाच फायदा घेण्यासाठी सतेज पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी संपर्क वाढवलाय… भाजपच्या स्थानिक नेत्यांना थेट भेटून त्यांनी मदतीची चाचपणी केल्याची चर्चा आहे… आता या भेटींचं रूपांतर राजकीय पाठिंब्यात होतंय का? की या केवळ सदिच्छा भेटी ठरतात? याचं उत्तर गोकुळच्या निवडणुकीच्या पुढील टप्प्यात स्पष्ट होणार आहे…
0
0
Report

Ajit Dada के साथ Mahayuti की चुनाव रणनीति और Gokul जीत की उम्मीद

Kolhapur, Maharashtra:मंत्री हसन मुश्रीफ प्रेस मुद्दे ऑन अजितदादा अजितदादा आमच्यातून जाणे हा आमच्यासाठी काळाकुट्ट दिवस होता, लोकसभेच्या निवडणुकीनंतर आमच्या जागा कमी झाल्या होत्या युति म्हणून अजित दादा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आणि लाडकी बहीण योजना आणली त्याच्या जाण्यानंतर पहिल्यांदा रक्षाबंधन सण येतोय. आम्हा सर्वांना दुःख वेदना होत आहे. त्यांच्या या पवित्र स्मृतीला मी वंदन करतो. ऑन गोकुळ सतेज पाटील भेटी मी दोन्ही बातम्या वाचल्यात की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सतेज पाटील भेटतायत. खरोखर एक स्तुत्य उपक्रम आहे. त्यांच्या या उपक्रमाचे मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. पण ते निवडणूक लढणार आहेत. आम्ही मात्र युतीमार्फत गोकुळ निवडणुका लढणार आहोत सतेज पाटील हे काँग्रेसचे मोठे नेते असल्यामुळे ते स्वतंत्र लढणार आहेत. गोकुळ निवडणुकीत आता महायुतीचा विजय हा काळ्या दगडावरचं पंढरी रेघ आहे. त्यामध्ये आता कसलाही संशय राहिलेला नाही. पण तो शेवटी त्यांनाही प्रयत्न करावे लागतील निवडणुकीसाठी, एकदा उमेदवार उभे राहिल्यानंतर, उमेदवारांना चेतना आणावी लागेल, त्याच्यात आत्मविश्वास आणावा लागेल. त्या पद्धतीचे ते प्रयत्न करत आहेत. ऑन सतेज पाटील आणि महाडीक संवाद वाढला मला ते काय माहिती नाही. परंतु, शेवटी निवडणुकीमध्ये कोण शत्रू किंवा मित्र असं नसतं. राजकारणामध्ये कधीच शत्रू हा शत्रू राहत नाही, मित्र हा मित्र राहत नाही. त्यांचा जर तसा प्रयत्न असेल तर त्याला ही माझ्या शुभेच्छा. ऑन केडीसीसी बँक परिणाम हे बघा आम्ही युती म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा गोकुळ एकत्र लढणार. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आज विषय नाही.. कारण अजून यादी दुरुस्त व्हायची आहे. यादी झाल्यावर आम्ही सर्वजण बसून आम्ही निर्णय घेऊ. ऑन गोकुळ सुनावणी वादाची ठणकी खरं आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जनसुराज्य आणि शिवसेना, यांचीच बहुतांशी या संस्था होत्या. कारण ज्या वेळेला सत्ता होती त्या वेळेला महाविकास आघाडी सरकार होतं. आम्ही सगळे एकत्र होतो आणि तीन वर्षाचा कट ऑफ डेट असल्यामुळे या संस्था आम्ही आधीच काढल्या होत्या. त्या वाचवणं हे आमचं काम आहे. आता ते कशासाठी प्रयत्न करतायत ते मला माहिती नाही. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही. ऑल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आतापर्यंत एकूण 29,427 शेतकरी लाभार्थी आहे. 235 कोटी 16 लाख रुपये आता बँकेकडे आलेले आहेत. ऑन राज्यातील साखरेचा भाव आता जे साखरेचे जे भाव वाढलेले होते, जे कृत्रिम वाढलेले होते, ते कमी झालेले आहेत. साखर कारखान्याच्या साठ्यावर नियंत्रण ठेवण्याची केंद्रानं आवश्यकता होती. अनेक साखर कारखान्याने आपल्या गरजेचे प्रमाणे साखर विकलेली आहे. इथेनॉल देखील फारसं काढलंलं नाही. खाजगी कारखाण्यांना बी-हेवी सुद्धा फारसं काढून दिलं नाही. सी-हेवी काय करावंच लागतं, त्याला काही इलाजच नाही. इथेनॉलला फारशी साखर गेली असं नाही, परंतु पहिल्यांदा साखर कारखान्यांनी आपली साखर विकल्यामुळं आणि केंद्र सरकारने कंट्रोल न ठेवला नसल्यामुळं त्यांची साठेबाजी झाली असेल आणि त्याचे परिणाम हे दर वाढण्यावर झाले. ऑन पिकांवर पाऊस वातावरणाचा परिणाम विशेषतः मराठवाडा, सोलापूर जिल्हा, जी ऊस पिकवणारी जिल्हे आहेत खानदेश याठिकाणी पावसाचा खंड पडलेला आहे. धरण देखील फारशी भरलेली नाहीत. एका सुदैवाने आपल्या राज्यातील सगळी मोठी धरणं भरली. परंतु अनेक छोटी-छोटी धरणं भरलेली नाहीत, तलाव भरलेले नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यातील काळम्मावाडी धरण सुद्धा काल भरलं. आता त्यातून १६००-२१०० क्युसेक पाणी पॉवर हाऊस मधून सोडल जात आहे. मी जलसंपदा विभागाला पाण्याचा विसर्ग कॅनॉल द्वारे करा आणि कॅनॉलने तलाव जिथं भरता येतील तिथं भरा असं सुचवले आहे. अनेक जिल्ह्यातील पिकं करपून गेलेली आहेत. असा जर खंड पडला असेल तर छोटी पीक वाचवणं अवघड आहे आपल्याला ती वाचवावी लागतील ऑन लाडकी बहीण केवायसी आता ६५ वर्षाच्या वरती आपण संजय गांधी निराधार योजना त्यांना देतो. केवायसी करण्यासाठी थोडा वेळ दिलेला आहे. त्यामुळं मला वाटतं ज्या अपात्र झाल्या या कारणामुळं त्या पात्र होतील ज्या महिला नोकरी करतायेत, ज्यांची परिस्थिती चांगली आहे, त्यांनी केवायसी केलेली नाही. त्यामुळे अपात्र आहे ते अपात्रच राहणार. ऑन मुंबई ऑटो रिक्षा चालकांना मुदतवाढ ६०-७० टक्के मराठी लोक आहेत त्यांना मराठी शिकवणे शक्य नव्हतं आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः काल निर्णय घेतला की एक वर्षाची मुदतवाढ द्यावी मला वाटतं एक वर्षाच्या नंतर त्यांना निदान लोकांना समजेल एवढे तरी मराठी आले पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे. ऑन महायुती धुसफूस महायुतीमध्ये कोणतीहि धुुसफुस नाही आमचा संसार आनंदाने सुरू आहे आणि मुख्यमंत्री महोदय सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेत असतात . मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेब आम्ही एकत्र होतो , मी कालच भेटलो त्यांना त्यामुळे दोघांनी बसूनच हा निर्णय घेतलाय. ऑन सूर्यघर योजना पीएम सूर्यघर योजना. देशामध्ये कुठल्याही जिल्हा मध्यवर्ती बँकेनी अशी योजना काढली नाही, ती योजना आम्ही काढली आहे. ऑन जिल्हा बँक निवडणूक रणनीती आता एकदा पक्की यादी झाली की, त्याबद्दल मी संपूर्ण तुम्हाला सांगेन, कसं होणार आहे. ऑन शक्तीपीठ राजू शेट्टी अधिकाऱ्यांना चोप देणार स्टेटमेंट शासनाने एकदा निर्णय घेतला, कायदा व्यवस्थेत हातामध्ये घेणे काही योग्य नाही. म्हणून आपण एकदा पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटले पाहिजे, त्यांना विनंती केली पाहिजे. आणि त्यांची मतं आपण आजमावली पाहिजे. ऑन पेपर फुटी प्रकरण हे वास्तव्य हे चुकीच आहे. एमपीएससी ही स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे शासनाचा काही संबंध नाही. त्याला आपण अधिकार दिलेत. ज्या पद्धतीने पेपर फुटीच्या बातम्या आलेली आहे, त्यामुळे लोकांचा विश्वास जातोय. ही गोष्ट शासनाने लक्षात घेतलेली आहे. याबद्दल मला वाटतं कडक ते कडक, या गुन्हेगाराला तर शिक्षा होईलच. जिथं ज्याचे धागेदोरे असतील, ते सुद्धा मुख्यमंत्री महोदय याचा निपटारा केल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. ऑन साखर तस्करी, अमित शहा संशय- राजू शेट्टी आरोप अमित शहा साहेब याच्याकडे सहकार खात आहे. देशामध्ये पहिल्यांदा सहकार खातं निर्माण झालंय. पूर्वी ते कृषी खात्याच्या अंतर्गत होतं आणि त्यामुळे त्यांच्या बराचसा अभ्यास याचा आहे आणि गुजरातमध्ये सुद्धा सहकार मोठ्या प्रमाणात आहे. ते जिल्हा मध्यवर्ती बँकेत सुद्धा अहमदाबादचे संचालक चेअरमन होते, त्यामुळे इथे परिपूर्ण माहिती त्यांना आहे आणि मला वाटते अशा प्रकारची पुराव्याशिवाय आरोप करणं, हे काय योग्य मला वाटत नाही. ऑन साखर दरवाढ आरोप प्रत्यारोप जरुर याची चौकशी व्हावी आणि चौकशी होऊन कठोरत कठोर उपाययोजना केल्या जातील. कृत्रिम साठा करून गरिबांना, सामान्य माणसांना या महागाईला तोंड द्यावा लागणं हे बरोबर नाही. पहिल्यांदा साखर कोट्यापेक्षा जास्त आणल्यामुळं आणि त्यानंतर त्याच्यावर नियंत्रण न ठेवल्यामुळं ही परिस्थिती उद्भवलेली आहे. ऑन मुंबई महापालिका महापौर पदाची खांडोळी ज्या वेळेला दोन-तीन पक्ष एकत्र येतात, त्यावेळेला अशा पदांच्या वाटण्या कराव्या लागतात. तो नाइलाज असतो. असलं तरी त्याचा विकासावर परिणाम होणार नाही, याची काळजी तिथं घेणं महत्त्वाचं आहे.
0
0
Report
Advertisement
0
0
Report

नाशिक में 100 इलेक्ट्रिक बसें, पहले चरण में 50 से शुरू, CCTV लिफ्ट सहित

Nashik, Maharashtra:नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि आधुनिक करण्याच्या दिशेने मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे... मुंबई आणि पुणे नंतर आता नाशिक शहर बस सेवेत तब्बल 100 इलेक्ट्रिक अर्थात EV बसेस दाखल होणार आहेत... यातील पहिल्या टप्प्यातील 50 EV बसेसचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शहर बस सेवेत समावेश करण्यात येणार आहे... तर दुसऱ्या टप्प्यात आणखी 50 इलेक्ट्रिक बसेस शहर बस सेवेत दाखल होणार आहेत... अत्याधुनिक पद्धतीने या बसेसची निर्मिती करण्यात आली असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बसमध्ये CCTV कॅमेऱ्यांची सुविधा देण्यात आली आहे... तसंच प्रवाशांच्या सोयीसाठी एसीची सुविधा आणि दिव्यांग प्रवाशांसाठी स्वतंत्र हायड्रोलिक लिफ्ट ची व्यवस्था करण्यात आली आहे... त्यामुळे नाशिककरांचा प्रवास आता अधिक सुरक्षित, आरामदायी आणि पर्यावरणपूरक होणार आहे... या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी
0
0
Report
Advertisement

फार्मेसी छात्रा के फोटो मॉर्फ कर इंस्टाग्राम पर पोस्ट करने वाला आरोपी गुजरात गिरफ्तार

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मधील फार्मसी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीचे फोटो मॉर्फ करून ते बनावट इंस्टाग्राम अकाउंट वरून अपलोड करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी गुजरात मधून अटक केली आहे. फरहान अली सुभान अली असे आरोपीचे नाव असून तो उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे. याप्रकरणी विद्यार्थिनींनी तक्रार केल्यानंतर आरोपी गुजरात मध्ये लपून बसला होता. त्याने दोन फेक इंस्टाग्राम आयडीवर विद्यार्थिनीच्या मित्र व मैत्रिणींचे फोटो मॉर्फ करून अश्लील फोटो तयार केले. त्या फोटोंना अश्लील मजकूर देऊन ते इंस्टाग्राम सारख्या सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर अपलोड केले. आरोपीला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
0
0
Report

पंढरपूर कॉरिडोर के मुआवजे मुंबई दरों के अनुरूप, पुनर्वसन सहित दीर्घकालीन योजना

Pandharpur, Maharashtra:पंढरपूर प्रस्तावित कॉरिडॉर मधील जमीन व मालमत्ता अधिग्रहणासाठी देण्यात येणारा मोबदला हा थेट मुंबईतील दरांच्या धर्तीवर देण्यात आला आहे. संपूर्ण भारतात एवढा मोठा मोबदला अन्यत्र दिला गेला नसावा, बाधितांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती प्रस्तावित कॉरिडॉर बाधितांची मुख्यमंत्र्या सोबत बैठक झाली. पंढरपूरचा विकास हा पुढील ५० वर्षांचा विचार करून भाविकांच्या सोयी-सुविधांसह स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने केला जात आहे, दरवर्षी पंढरपुरला येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत असल्याने संपूर्ण शहराचा एकात्मिक आणि दीर्घकालीन विचार करून नियोजन होत आहे. बाधितांचे योग्य पुनर्वसन करून ‘जागेस जागा’ देण्याचे शासनाचे धोरण आहे.विकास आराखड्यामुळे बाधित होणारे दुकानदार, रहिवासी आणि इतर व्यावसायिक यांच्या पुनर्वसनाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहील. पूर्वीच्या अनुभवांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेला अविश्वास दूर करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. बाधित दुकानदारांना पर्यायी दुकाने, तर बाधित होणाऱ्या ५०० हून अधिक घरांतील नागरिकांना योग्य पर्याय उपलब्ध करून देत नियोजन केले आहे
0
0
Report

नागपुर जलशुद्धीकरण केंद्र में क्लोरीन गैस लीकेज, सुरक्षित निकासी

Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपूर जिल्ह्याच्या शंकरपूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण प्रकल्पात क्लोरीन वायू गळतीची घटना. गोधनी येथील क्लोरीन वायू गळतीची घटना ताजी असताना गुरुवारी संध्याकाळी शंकरपूर मध्येही वायू गळती झाली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ घबराट पसरली होती मात्र तातडीने केलेल्या उपाययोजनांमुळे मोठी दुर्घटना टळली. जलशुद्धीकरण प्रकल्पात 900 किलो चे सिलेंडर लावण्यात आले होते, त्याचे वॉशर निघाल्याने गॅस गळती झाल्याची माहिती. जलशुद्धीकरण प्रकल्पात उपस्थित कर्मचाऱ्यांना गॅसची दुर्गंधी आल्यावर तात्काळ पोलीस आणि आग्निशमन विभागाला माहिती दिली. पोलिसांनी आजूबाजूचा परिसर रिकामा करून घेतला, तसेच अग्निशमन विभागाने गॅस गळती बंद करून सिलिंडरला तेथून हटवण्यात आले. हा जलशुद्धीकरण प्रकल्प गावापासून दूर असल्याने कुणीही प्रभावित झाले नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या या जलशुद्धीकरण केंद्रातून आजूबाजूच्या 14 गावातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येतो.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top