445001
शेतकरी न्याय यात्रेतून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाची पोलखोल करणार, आशिष खुलसंगे
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची शेतकरी न्याय यात्रा शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत आहे. शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने आणि अतिपावसामुळे नापिकीचे संकट उभे राहिले आहे. कोळसा खाणीमुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. पीक विमा मिळवण्यात अडचणी आहेत आणि पांदण रस्ते योजना रखडली आहे. सरकार 'लाडकी बहिण' योजनेचा प्रचार करत असताना, शेतकऱ्यांना दुसऱ्या हाताने लुटून उध्वस्त करत असल्याचा आरोप आशिष खुलसंगे यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
तिवसा- कुऱ्हा मार्ग पर पुलिस ने 93 किलो गांजा पकड़ा, एक आरोपी गिरफ्तार
Amravati, Maharashtra:अमरावतीच्या तिवसा -कुऱ्हा मार्गांवर पोलिसांची गांजा तस्करांवर मोठी कारवाई; 93 किलो गांजा पकडला, एक आरोपी अटक अमरावती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने तिवसा कुऱ्हा मार्गांवर बोलेरो वाहनातून तब्बल 93 किलो गांजा पकडला असून यामध्ये चालक मोहन चव्हाण याला अटक करण्यात आली असून एकूण 23 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिवसा - कुऱ्हा मार्गावर शेंदुरजना बाजार नजीक सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एक विनाक्रमांकाची सिल्वर राखाडी रंगाची बोलेरो वाहन अडवून वाहनाची झडती घेण्यात आली 5 नायलॉन कट्ट्यातुन हा गांजा जप्त करण्यात आला दरम्यान याप्रकरणी कुऱ्हा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.0
0
Report
वाशिम जिले में रातोंरात पेट्रोल-डीजल की कमी, कई पंप बंद
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यात काल रात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाला असून,अनेक पेट्रोल पंप बंद आहेत.काही मोजक्याच पंपांवर पेट्रोल उपलब्ध असले तरी डिझेल मिळत नसल्याने शेतकरी व वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.अनेक ठिकाणी ‘नो पेट्रोल’ आणि ‘नो डिझेल’चे फलक लावण्यात आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.0
0
Report
सोलापुर में गर्मी से मिली राहत: आज सुबह से सूर्योदय नहीं, तापमान में बड़ी गिरावट
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूरकरांना आज सकाळपासून सूर्यदर्शनच नाही, कडक उन्हापासून मिळाला मोठा दिलासा - सोलापुरात आज सकाळपासूनच सूर्यदर्शन नाही - काल सोलापूरचा तापमानाचा पारा जवळपास 43 अंशापर्यंत पोहोचल्यानंतर आज हवेत गारवा - एप्रिल, मे महिन्यामध्ये उन्हाच्या कडक झळा सोसल्यानंतर आज तापमानात मोठी घट0
0
Report
Advertisement
कल्याण के गांधारी नदी में युवक डूबा, तलाश जारी
Kalyan, Maharashtra:कल्याण जवळील गांधारी नदीत तरुण बुडाला... अग्निशमन विभाग पोलिसांकडून शोध मोहीम सुरू.. कल्याण जवळील गांधारी नदीत एक तरुण बुडाल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली नदीवरील पुलाच्या कपड्यावर हातरून बसला होता मात्र त्याचा तोল गेल्याने तो खाली पडल्याची प्राथमिक माहिती आहे मयूर निमसे असे या तरुणाचे नाव असून हा चिकनघर येथे राहणारा तरुण आहे याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल पोलीस दाखल झाले आहेत अग्निशमन दलाकडून नदीपात्रात मयूरचा शोध सुरू आहे0
0
Report
रत्नागिरी में ईंधन-सीएनजी की कमी से रिक्षाचालकों की लंबी कतार
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यात इंधनपाठोपाठ सीएनजीचा देखील तुटवडा पहाटेपासून सीएनजी मिळावा यासाठी सीएनजी स्टेशन बाहेर लाईन रत्नागिरी शहरातील माळ नाका परिसरातल्या सीएनজি स्टेशनवर अडीचश ते तीनशे रिक्षांची लाईन रांगेत तीन ते साडेतीन तासानं रिक्षामध्ये भरला जातोय गॅस पहाटे सहा वाजल्यापून अनेक रिक्षाचालक cng च्या लाईन मध्ये ऐन हंगामात सीएनजीच्या तुटवड्यामुळे रिक्षाचालक त्रस्त धंदा करायचा की सीएनजी भरण्यासाठी रांगा लावायच्या असा सवाल0
0
Report
शिरूर जांबुत में वन विभाग ने बिबटिया मादा को जेरबंद किया, केंद्र भेजा गया
Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यातील जांबुत येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सात वर्ष वयाची बिबट मादी जेरबंद झाली असून या बिबट्याची रवानगी माणिकडोह बिबट निवारण केंद्रात करण्यात आलीय, वन विभागाने पिंपरखेड परिसरात गेली पाच महिन्यात हा 48 वा बिबट्या जेरबंद केल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळालाय मात्र अद्यापही या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने या बिबट्याना हि जेरबंद करण्याचं मोठ आव्हान वनविभागा पुढे असणार आहे.0
0
Report
Advertisement
नीट पेपरफुटी मामले में सीबीआई ने लातूर तक पहुंची गुप्त जांच
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... नीट पेपरफुटी तपासाचे धागेदोरे लातूरपर्यंत... सीबीआयचा अत्यंत गोपनीय तपास सुरू... प्रश्नपत्रिका समितीशी संबंधित निवृत्त प्राध्यापकाची मध्यरात्री चौकशी... लातूरमध्ये खळबळ... आठ सदस्यीय सीबीआय पथकाची कारवाई... कागदपत्रांसह मोबाईलचीही तपासणी... नीट पेपरफुटी प्रकरणात लातूर कनेक्शन ?... शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष सीबीआय तपासाकडे... AC ::- देशभरात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने आता अत्यंत गोपनीय तपास सुरू केला आहे... पुणे येथील गुन्ह्याचा तपास करताना या प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे... नीट परीक्षेच्या रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीशी संबंधित असलेल्या निवृत्त प्राध्यापक प्रा. पी. व्ही. कुलकर्णी यांच्या घरी सीबीआयच्या आठ सदस्यीय पथकाने मध्यरात्री तब्बल चार तास चौकशी केली... यावेळी कागदपत्रे, मोबाईल आणि डिजिटल लिंकची पडताळणी करण्यात आली... दरम्यान, सीबीआयकडून या कारवाईबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नसून, संपूर्ण तपास अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरू असल्याने लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे...0
0
Report
नागपुर में अज्ञात युवक की हत्या, फोटो वायरल से पहचान के बाद जांच तेज
Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपूरच्या एमआईडीसी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत इसासनी आधार नगरी जवळ अज्ञात युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना पुढे आली... - आकाश कृष्णा बरडे असे मयताचे नाव आहे. - सुरवातीला मृतकची ओळख पटत नसल्याने फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. या भागातील काही कंत्राटदार, मजूर यांना पाठवले. पोलिसांची ही ट्रिक कामी आली. - दुपारी पोलीस ठाण्यात मयताची पत्नी पल्लवी आली आणि फोटोतील व्यक्ती तिचे पती असल्याचे सांगितले. तिचा पती बुधवारी सायंकाळी घरून बाहेर पडला मात्र रात्री घरी आलाच नाही असे तिने सांगितले. - पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून शोधण्यासाठी टीम तयार केल्या आहेत.0
0
Report
सातारा में फडणवीस की सभा, 15,000 लाभार्थियों के साथ प्रधानमंत्री आवास योजना पर जोर
Satara, Maharashtra:अँकर-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी मेळावा साताऱ्यातील सैनिक स्कूल ग्राउंड येथे पार पडत आहे. मोठी जय्यत तयारी या सभेच्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पहिल्यांदा 50000 लाभार्थ्यांना या कार्यक्रमासाठी बोलवण्यात आलं होत परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीचे जे आवाहन केले आहे त्याला प्रतिसाद देत आता केवळ 15000 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज या ठिकाणी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिल आहे. साताऱ्यातील सैनिक स्कुल परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी0
0
Report
Advertisement
कांग्रेस का जलसमाधि आंदोलन: भंडारा-गोंदिया में किसानों की मांगों पर सरकार की लापरवाही
Bhandara, Maharashtra:भंडारा-गोंदिया जिल्ह्यात शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे राज्य व केंद्र सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. जिल्ह्यातील विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी आज भंडारा येथील वैनगंगा नदीवर जलसमाधी आंदोलन केले जाणार आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी, कामगार, युवक आणि सर्वसामान्य नागरीक विविध गंभीर समस्यांच्या विळख्यात अडकलेले आहेत. शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे राज्य व केंद्र सरकारकडे वेळोवेळी लक्ष वेधले. मात्र त्यांच्या प्रश्नांकडे सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कष्ट, घाम आणि आशा घेऊन त्यांचा धान खरेदी केंद्राबाहेर पडलेला आहे. परंतु शासनाकडून धानाची खरेदी होत नाही. खरेदी लेल्या धानाचा चुकाराही देत नाही. बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. पिकविम्याची रक्कम दिली गेली जात नाही. ही परिस्थिती अत्यंत वेदनादायी आहे. शेतकऱ्यांचे धान खरेदी करायचे याचे नियम शासनाने निश्चित केले. मात्र आज नोंदणीकृत शेतकऱ्यांकडूनच धान खरेदी करण्यास सरकार नकार देत आहे. एकीकडे उत्पन्न वाढीसाठी प्रोत्साहन दिले जाते तर दुसरीकडे धान खरेदी लिमिट वाढवायची नाही असा दुर्दैवी प्रकार राज्य सरकारकडून सुरू आहे. जिल्ह्यात होणाऱ्याधान उत्पादनाची पूर्व कल्पना राज्य सरकारला असूनही केंद्र सरकारकडे आवश्यक शिफारस केली नाही. भाजपचे नेते शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. म्हणून आज जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घेऊन जलसमाधी आंदोलन काँग्रेसच्या वतीने करण्यात येणार आहे…0
0
Report
७ वर्ष से फरार ठग चंद्रकुमार सोनी गिरफ्तार; भंडारा पुलिस ने गिरफ्तार किया
Bhandara, Maharashtra:७ वर्षापासून फरार फसवणूकीतील आरोपीला अटक 'गुरुनानक ज्वेलर्स' या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून ग्राहकांची १७ लाख रुपयांनी फसवणूक करून फरार झालेल्या चंद्रकुमार आसनदास सोनी (वय ५५) याला भंडारा पोलिसांनी अखेर अटक केली. नागपूर ग्रामीण अंतर्गत हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत तो पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २०१९ मध्ये चंद्रकुमार सोनी आणि तोचा भाऊ मदनमोहन आसनदास सोनी (नागपूर) यांच्याविरुद्ध ग्राहकांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला होता. मदनमोहनला २०२० मध्ये अटक झाली होती, मात्र चंद्रकुमार फरार होता. या काळात तो काही दिवस जयपूर (राजस्थान) येथे आश्रयाला गेला होता. चंद्रकुमार हा हिंगणा परिसरात लपून वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. भंडारा पोलिसांच्या तांत्रिक विश्लेषणाने त्याचा शोध लावला आणि हिंगणा पोलिसांच्या सहकार्याने संयुक्त कारवाईत अटक केली.0
0
Report
छत्रपति शिवाजी महाराज की जयंती महामृत्युंजय मंदिर में रंगोली से खास अंदाज में मनाई गई
Yeola, Maharashtra:अँकर : येवला यहथील महामृत्युंजय मंदिरात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. यावेळी मंदिरातील नंदीभोवती शंभूराजांची आकर्षक व कलात्मक रांगोळी काढण्यात आली होती. या सुंदर रांगोळीने भाविकांचे व नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.0
0
Report
Advertisement
गर्मी के बाद शहर को 17 एमएलडी अतिरिक्त पानी, आपूर्ति में गैप घटेगा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरातील तीव्र पाणीटंचाई कमी करण्यासाठी मनपा उशिराने आता workआला है, उन्हाळा संपल्यावर जून महिन्यापासून पाणीपुरवठ्यात १७ एमएलडीने वाढ करण्याचा दावा मनपाने केला आहे. या वाढीव पाण्यामुळे शहराच्या पाणी वितरणातील किमान एक दिवसाचा गॅप कमी होणार असून, नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सध्या ९०० मिमी व्यासाच्या योजनेतून शहराला २६ एमएलडी पाणी मिळत आहे. फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील तांत्रिक मर्यादांमुळे पूर्ण क्षमतेने पाणी घेता येत नव्हते. मात्र, पालिकेने केलेल्या सुधारणांमुळे आता अतिरिक्त १७ एमएलडी पाणी उपलब्ध होईल.0
0
Report
उच्च अदालत ने महापालिका को साफ-सफाई मामले में जवाबदेही तय कर निधि विवरण मांगा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरातील कचरा नियमितपणे न उचलला जाणे आणि त्यावर योग्य प्रक्रिया न होणे या गंभीर बाबींची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महापालिकेला चांगलेच धारेवर धरले आहे. शेख इस्माईल यांनी ही जनहित याचिका दाखल केलेली आहे. सुनावणीदरम्यान धुळे-सोलापूर महामार्गावर गंधेली गावाजवळ कचरा टाकणाऱ्या कंत्राटदारावर काय कारवाई केली, याची विचारणा करत न्यायालयाने महापालिकेला याप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी एक आठवड्याची मुदत दिली आहे. विशेष म्हणजे, न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे शासनाकडून प्राप्त झालेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीचा वापर नेमका कसा केला, याचा सविस्तर तपशीलही आता महापालिकेला न्यायालयासमोर ठेवावा लागणार आहे. केवळ कंत्राट देऊन महापालिका आपली जबाबदारी झटकू शकत नाही आणि कचरा वर्गीकरणाबाबत नागरिकांमध्ये जागृती करणे हे प्रशासनाचेच कर्तव्य असल्याचे स्पष्ट केले.0
0
Report
चत्रपति संभाजीनगर में अवैध गर्भपात रोकथाम के लिए कड़ी कार्रवाई के निर्देश
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात मुलींच्या जन्मदराचे प्रमाण चिंताजनकरित्या घटले असून, दर हजार मुलांमागे हे प्रमाण ८९७इतके खाली आले आहे. ही आकडेवारी जिल्ह्यासाठी अत्यंत अशोभनीय असून, अवैध गर्भलिंग निदान आणि बेकायदा गर्भपाताला आळा घालण्यासाठी प्रशासनाने आता धडक कारवाई करावी. विशेषतः डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गर्भपाताच्या गोळ्या विकणाऱ्या मेडिकल चालकांवर थेट गुन्हे दाखल करून त्यांच्या परवाने रद्द करा, असे सक्त निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांची वारंवार आणि कसून तपासणी करावी. तसेच जिल्ह्यात छुपे अवैध गर्भपात केंद्र चालवले जात असल्यास ते शोधून काढावेत. चिठ्ठीशिवाय गर्भपाताच्या गोळ्या विकणाऱ्यांवर कारवाई करा. तसेच या गोळ्या मेडिकलमध्ये उपलब्ध कशा होतात? त्या येतात कुठून ? याचे मूळ शोधून काढण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला दिले आहेत0
0
Report
Advertisement
