Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

शेतकरी न्याय यात्रेतून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाची पोलखोल करणार, आशिष खुलसंगे

Aug 21, 2024 07:24:58
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची शेतकरी न्याय यात्रा शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत आहे. शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने आणि अतिपावसामुळे नापिकीचे संकट उभे राहिले आहे. कोळसा खाणीमुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. पीक विमा मिळवण्यात अडचणी आहेत आणि पांदण रस्ते योजना रखडली आहे. सरकार 'लाडकी बहिण' योजनेचा प्रचार करत असताना, शेतकऱ्यांना दुसऱ्या हाताने लुटून उध्वस्त करत असल्याचा आरोप आशिष खुलसंगे यांनी केला आहे.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Dec 06, 2025 02:48:47
Akola, Maharashtra:राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांत उमेदवारांची चाचपणी, बैठका आणि रणनीती आखण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या शिवसेनेची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी “महानगरपालिकेवर भगवा फडकवणार” असा जोशपूर्ण नारा देत उपस्थित शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे संचार केले. आगामी निवडणुकीत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणती रणनीती राबवायची, कोणते कार्यक्रम आखायचे आणि कोणत्या पद्धतीने प्रचार करायचा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र या बैठकीत काही ज्येष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली. काही दिवसांपासून पक्षाच्या बॅनर्सवर एका ज्येष्ठ नेत्‍याचा फोटो गायब असल्याची चर्चा होती आणि त्यानंतर अनेकांची अनुपस्थिती लक्षात येत असल्याने शिंदे शिवसेनेत दोन गट तयार होत आहेत का? अशी कुजबुज राजकीय वर्तुळात रंगत आहे. आगामी निवडणूक तोंडावर असताना अशा घडामोडींमुळे शिंदे सेनेची स्पर्धा इतरांशी नसून आपल्याच पक्षात आहे का असा सवाल उपस्थित होत आहे..
101
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 06, 2025 02:48:29
63
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 06, 2025 02:46:32
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:चिकलठाण्यातील श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटरचे संचालक गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असल्याची माहिती आहे पोलीस त्यांचा शोध घेताय दरम्यान कॉलेज च्या 3 स्टाफ मेम्बर्स ला अटक झालीय त्यांना सोमवार पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची संलग्नता संस्थाचालक जे. के. जाधव आणि विक्रांत जाधव या संस्था चालक पितापुत्रांनी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १ लाख १० हजार रुपये शुल्क रुपये उकळत प्रवेशाचा बनाव रचला. मात्र, गुरुवारी परीक्षा येऊन ठेपल्यानंतरही विद्यार्थ्यांना हॉलतिकीटच न मिळाल्याने विद्यापीठाशी सदर संस्था संलग्नच नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. यात एमसीए च्या 133 विद्यार्थ्यांना परिक्षेपासून मुकावे लागले आहे
36
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 06, 2025 02:34:47
96
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 06, 2025 02:34:09
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:तोतया महिला आयएएस अधिकारी कल्पना भागवत हिने अनेकांना अधिकारी असल्याचे भासवून पैसे घेतले. सुरुवातीला अफगाणी प्रियकरामुळे गंभीर वळण मिळाले होते. मात्र, आता फसवणुकीच्याच अनुषंगाने तिने पैसे घेतलेल्या व्यक्तींना गुन्ह्यात साक्षीदार करण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. २३ नोव्हेंबर रोजी हॉटेलमधून कल्पनाला ताब्यात घेण्यात आले. सहा महिन्यांपासून वास्तव्य असल्याने पोलिसांनी महिला अधिकाऱ्यांच्या मदतीने चौकशी केली. तिच्या खोलीच्या तपासणीत आयएएस अधिकारी असल्याचे कागदपत्रे आढळल्यानंतर तिला अटक करण्यात आली. न्यायालयाने ६ डिसेंबरपर्यंत दहा दिवसांची वाढीव पोलिस कोठडी सुनावली. त्यामुळे आज दुपारी तिला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येईल.
94
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 06, 2025 02:31:39
Amravati, Maharashtra:खडूच्या साह्याने चित्र रेखाटन करून महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अनोखं अभिवादन. अँकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील कलाशिक्षक अजय जीरापुरे यांनी खडूच्या साह्याने फलकावर चित्र रेखाटन करून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. आपल्या हक्कांसाठी लढायचे बळ देऊन गेले समाज उदाहरण्यासाठी एक युगपुरुष होऊन गेले असा स्लोगन देखील फलकावर रेखाटण्यात आल आहे. खडूच्या साह्याने चित्र रेखाटन करण्यासाठी त्यांना तीन तासाचा कालावधी लागला. दरवर्षी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चित्र रेखाटन करून अनोख अभिवादन अजय जीरापुरे करीत असतात. यावेळी देखील त्यांनी फलकावर बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र रेखाटन करून अनोखी आदरांजली वाहली आहे..
82
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Dec 06, 2025 02:30:25
Bhandara, Maharashtra:गोंदिया शहर यातायात शाखा में इंटरसेप्टर वाहन दाखिल हुआ है, वाहनों के नियम तोड़ने वाले चालकों के विरुद्ध कार्रवाई की जाएगी। इस वाहनों के कैमरे में चालक के चालान, नंबर प्लेट आदि के फोटो लिए जाएंगे और चालान उसी समय भेजे जाएंगे। इससे अब गोंदिया जिले में यातायात के नियम तोड़ने पर सावधान रहने की जरूरत है। VO: ये इंटरसपेटर वाहन बिना हेल्मेट, ट्रिपल सीट, चालक वाहन चलाते समय मोबाइल पर बात करना, गलत वे, गलत लेन आदि उल्लंघन की तस्वीर और लोकेशन लेगा और चालक को चालान तुरंत भेजा जाएगा। इस प्रकार दो वाहन गोंडिया जिले में दाखिल हुए हैं: एक इंटरसेप्टर वाहन जिला यातायात शाखा में और एक वाहन शहर यातायात शाखा को सौंपा गया है。
145
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Dec 06, 2025 02:15:31
Jalna, Maharashtra:जालना : चंदनझिरा भागातील मूख्य रस्त्यावरील अतिक्रमण महापालिकेने हटवले अँकर :गेल्या अनेक वर्षापासून जालना शहरातील  चंदनझिरा परिसरातील 60 फूट रस्त्यावर दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी केलेले पक्के बांधकाम आणि अतिक्रमणे अखेर महानगरपालिकेच्या पथकाने हटवली. या कारवाईसाठी दोन जेसीबी, ट्रॅक्टर आणि 50 हून अधिक कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. महानगरपालिकेने रहिवाशांना प्रथम स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन केले होते. यामुळे रहिवाशांनी मोठे नुकसान टाळण्यासाठी आपले सामान खाली केले होते. पालिकेचे पथकाने पक्के झालेले बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने काढण्यास सुरुवात केली. यावेळी पालिकेचे वीस कर्मचारी, चंदनझिरा पोलिस ठाण्याचे 3 अधिकारी, 30 पोलिस कर्मचारी आणि होमगार्ड असा बंदोबस्त तैनात होता. दिवसभर ही अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू होती.
106
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 05, 2025 18:03:20
Kolhapur, Maharashtra:खासबाग कुस्ती मैदानात पुनश्च कुस्तीचा हरिओम… एक वर्षानंतर मैदानात ‘शड्डू’चा नाद! खासबाग कुस्ती मैदानालाही बसला होता. संपूर्ण व्यासपीठ जळून खाक झालं आणि तब्बल एक वर्षाहून अधिक काळ कोल्हापूराच्या परंपरेचा अधिष्ठान असलेलं हे ऐतिहासिक मैदान बंद पडलं. अखेर आता खासबागचा आखाडा पुन्हा सज्ज झाला आहे… आणि पुन्हा एकदा मैदानावर “शड्डू”चा गजर घुमू लागलाय. कोल्हापूरची ओळख म्हणजे कुस्ती… आणि कुस्ती म्हटलं की पहिलं नाव येतं ते राजर्षी शाहू महाराजांच्या खासबाग मैदानाचं. पण वर्षभरापूर्वी केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या दुर्घटनाग्रस्त आगीने खासबागचं व्यासपीठही भस्मसात केलं. व्यासपीठ जळालं आणि कुस्तीचं हे पवित्र स्थान लॉक डाऊन झाल्यासारखं शांत पडलं… एक वर्षाहून अधिक काळ मैदान बंद राहिल्यानं आखाड्याची माती निष्प्राण झाली होती… पैलवानांना सरावाची जागा नव्हती… आणि कोल्हापुराच्या पारंपरिक मल्लविद्येची धुरा जणू अडकून पडली होती .. पण अखेर हा संघर्ष संपला! आखाडा परत जिवंत करण्यासाठी ज्या पद्धतीने पैलवानाला खुराक दिला जातो… अगदी त्याच पद्धतीने मातीला खुराक देण्याचा मंत्र अवलंबण्यात आल.. या खुराकात १० पोती लिंबू, १० पोती हळद, १० डबे तेल, २ पोती काव आणि ५० लिटर दूध याशिवाय इतर पारंपरिक अर्क आणि नैसर्गिक घटक मिसळून मातीत नवी ऊर्जा फुंकण्यात आली. जमदाडे, महान भारत केसरी ( अमोल महाडिक यांनी.. मोठ्या प्रमाणात साहित्य उपलब्ध करून दिले.. दोन-चार दिवसांपूर्वी मातीत मिक्स करून खेळण्यासाठी उपलब्ध करून दिले.. ) मैदान वर्षभर बंद असल्यामुळे माती घट्ट झाली होती… आता खुराक दिल्यावर माती पुन्हा कुस्तीसाठी पोषक झालीये... या संपूर्ण कामासाठी भाजपा आमदार अमल महाडिक यांनी सर्व साहित्य दिले पण खरा कस लागला तो गंगावेश तालीमचे पैलवान, सामाजिक कार्यकर्ते आणि कुस्तीप्रेमीचा.. कारण त्यांनीच काही दिवस श्रमदान करून या आखाड्या जीव आणला.. सर्वांचा उद्देश एकच होता करवीरच्या कुस्तीची परंपरा आबादीत ठेवणे. जयदीप शितोळे, शंभर ते सव्वाशे वर्षाची वारसा... शाहू खासबाग मैदानाला ऊर्जेचा अवस्था प्राप्त झाली आहे. खासबाग मैदानात सुरू झालेला हा सराव.. लाल मातीची परंपरा जपली जाईल पैलवान सराव करताना, ‘शड्डू’ देताना.. आखेर… वर्षभरानंतर खासबाग मैदान पुन्हा जागं झालंय! मैदानावर पुन्हा मातीचा सुगंध दरवळतोय… आणि पैलवानांच्या आवाजात तोच पारंपरिक “शड्डू” घुमतोय. यानिमित्ताने कोल्हापूरच्या कुस्ती परंपरेला पुन्हा नवसंजीवनी मिळाली.
157
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Dec 05, 2025 17:45:38
Buldhana, Maharashtra:ऑन तपोवन मधील वृक्षतोड. कुंभमेळ्यासाठी एवढी मोठी झाडं तोडणे , त्या वृक्षांशी अनेकांची आस्था जोडलेली आहे . भावना जोडलेली आहे . आस्थेचा आणि भावनेचा विचार केला गेला पाहिजे. विकास करत असताना जंगलाचा ऱ्हास करतो , पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे . ग्लोबल वॉर्मिंग प्रॉब्लेम उभा राहिला आहे . त्यामुळे शिवसेना जनतेच्या सोबत उभी आहे .. ऑन मंगलप्रभात लोढा . मंगलप्रभात लोढा यांनी जे सांगितले, त्यात काही नाकारता येत नाही . पण सगळेच पक्ष देवाभाऊ चालवतात हे 100 टक्के खोटं आहे . शिवसेना हा पक्ष ध्येय धोरणावर चालतो . लोढाजी यांच्या बोलण्यात काही तथ्य नाही . ऑन भाजपचा महापौर . शिवसेना भाजपा महायुती असेल आणि त्यांच्या जागा जास्त आल्या तर त्यांचाच महापौर होईल . आमचा जागा जास्त आल्यात तर आमचा महापौर होईल . मुंबई मध्ये जिंकायचे असेल तर महायुती झाली पाहिजे . जे नगर पालिकेत झाले आणि त्यांचा फटका आम्हाला बसला .याचा फायदा महा विकास आघाडीला होणार आहे . याची काळजी दोन्ही पक्षाचे नेते घेतील . जास्त जागा भाजपा लढणार असल्याने ते ठामपणे सांगू शकतात की महापौर आमचा होईल .. जर महायुती झाली नाही तर आम्ही आमचा महापौर करू .
210
comment0
Report
MKManoj Kulkarni
Dec 05, 2025 16:15:16
Navi Mumbai, Maharashtra:Anchor :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाने 'प्रोजेक्ट महागदेवा' या महत्त्वाकांक्षी फुटबॉल विकास उपक्रमाची सुरुवात केली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील 13 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना शोधणे, त्यांना घडविणे आणि संपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्धेश्य आहे. प्रोजेक्ट महागदेवा द्वारे राज्यात एक शिस्तबद्ध प्रतिभा प्रवाह तयार करून महाराष्ट्राला ग्रामीण व युवा फुटबॉल उत्कृष्टतेचे अग्रस्थान मिळवून देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या साठी मुंबईतील कुपरेजा फुटबॉल मैदानात निवड प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्र फुटबॉल amabesidor अभिनेता त्रायगर श्रॉफ यांनी खेळाडूंसोबत खेळून प्रोत्साहन देखील दिल आहे.. या संदर्भात या प्रोजेक्टचे अधिकारी क्षितिज देसाई आणि महिला फुटबॉल खेळाडू यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मनोज कुळकर्णी यांनी..
159
comment0
Report
SKSACHIN KASABE
Dec 05, 2025 15:20:05
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर शहरातील लिंक रोड येथील एका खाजगी दवाखान्यात 2 डिसेंबर रोजी पंढरपूर तालुक्यातील आढीव येथील आरती सुरज चव्हाण (वय 22) या महिलेला दुसऱ्या बाळंतपणासाठी दाखल करण्यात आले होते. सदरची महिलेची प्रसुती झाल्यानंतर तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. त्यामुळे डॉक्टरांनी महिलेच्या नातेवाईकांना रक्त कमी असल्याने तिला रक्त चढवण्याची गरज असल्याचं सांगितलं.महिलेची प्रसुती होण्यापूर्वीच डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तिच्यासाठी रक्त आणण्यास सांगण्यात आलं होतं. त्याप्रमाणे कुटुंबाने पंढरपूर मधील एका ब्लड बँक स्टोरेज येथून ओ पॉझिटिव रक्त आणून ठेवलं होतं. डॉक्टरांनी रक्त चढवल्यानंतर बाळंतीण महिलेला जास्त त्रास सुरू झाला. त्यामुळे डॉक्टरांनी तिला सोलापूर येथील खाजगी दवाखान्यामध्ये उपचारास घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे त्या महिलेच्या नातेवाईकांनी सोलापूर येथील खाजगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी दाखल केले. तेथे उपचारानंतर सदर महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी अद्याप कोणावर गुन्हा दाखल झाला नाही.
155
comment0
Report
Advertisement
Back to top