icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

तुळजाभवानी मंदिर में फर्जी पुजारियों के खिलाफ विशेष छापा, दो दिन में पांच गिरफ्तार

Dharashiv, Maharashtra:श्री तुळजाभवानी मंदिरात दोन दिवसात बोगस पाच पुजारी विशेष पथकाच्या ताब्यात. दोन पुजाऱ्यांना मंदिर संस्थांनी केले पोलिसांच्या स्वाधीन तर तीन पुजाऱ्यांची चौकशी सुरू. बोगसगिरी करणाऱ्या संशयित पुजाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची मंदिर संस्थान कडून माहिती. मंदिर परिसरात भाविकांची फसवणूक और अनधिकृत पुजारी व्यवसायाला आळा घालण्यासाठी संस्थानने केली विशेष मोहीम सुरू. मोहिमे अंतर्गत सलग दोन दिवसांत पाच पुजारी पथकाच्या जाळ्यात. काही व्यक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे मंदिर संस्थानकडून पुजारी असल्याची ओळखपत्रे मिळवत असल्याचा भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर राजे कदम यांचा आरोप तर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची केली मागणी. मंदिर प्रशासनाकडून अनधिकृत पूजा, भाविकांची दिशाभूल आणि नियमबाह्य धार्मिक सेवा याविरोधात कारवाई आणखी तीव्र करण्याचे संकेत。
0
0
Report

सोलापुर में महाविकास आघाड़ी के भीतर टिकटों को लेकर गुटबाजी और हेवेदावे सामने

Pandharpur, Maharashtra:सोलापुर जिल्ह्यातील मतदारांनी महाविकास आघाडीला दोन खासदार आणि सहा आमदार निवडून दिले. सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांचे हेवेदावे समोर येऊ लागले आहे. यामुळे महाविकास आघाडीची डोके दुखी वाढली आहे. सोलापूर विधान परिषद साठी महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. वसंतराव देशमुख यांनी पंढरपूर पंचायत समितीच्या सभापती निवडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा सभापती होत असताना आपल्या समर्थकाचे मत भाजप उमेदवाराला दिल. हाता तोंडाशी आलेला सत्तेचा घास वसंतराव देशमुख यांच्यामुळे गेला मग आता त्यांना मदत कशासाठी करायची असा प्रश्न आमदार अभिजीत पाटील यांनी उपस्थित केला आहे. वसंतराव देशमुख यांची उमेदवारी देताना जिल्ह्यातील पक्षाच्या वरिष्ठांनी विश्वासात घेतलं नाही आपल्याकडे मतदार असतानाही एकही सूचक घेतला नाही विरोधी पक्षाचे उमेदवार संपर्क करतात मात्र आपल्याच पक्षाचे उमेदवार अद्याप संपर्क करत नाहीत 10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन आहे त्यावेळी शरद पवार आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या समोर ही वस्तुस्थिती मांडणार आहे मात्र तरीही वसंतराव देशमुख यांनी मागे झालेल्या कुरघोड्यांना आता उत्तर देण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच अभिजीत पाटील यांनी आता आपले जुने हिशोब चुकते करण्याचा निर्णय घेतला आहे. एकमेकांच्या हेवेदाव्या साठी महा विकास आघाडीची ताकद असलेल्या सोलापूर जिल्ह्यात आमदारांनीच पक्ष कमकुवत करण्याची भूमिका घेतली आहे
0
0
Report

महाबळेश्वर बस स्टॉप पर अधिकारी के आरेरावी बर्ताव से यात्रियों में नाराजगी

Satara, Maharashtra:महाबळेश्वर : महाबळेश्वर एसटी बस स्थानकातील एका वाहतूक निरीक्षकाच्या अरेरावी आणि उद्धट वर्तनामुळे प्रवासी तसेच पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बससेवेतील विलंबाबाबत विचारणा करणाऱ्या प्रवाशांना समाधानकारक उत्तर देण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्याने अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप करण्यात येत आहे. काल दुपारी ३.३० वाजता सुटणारी एसटी बस तब्बल एक तास उशिराने रवाना करण्यात आली. या विलंबामुळे अनेक प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. काही प्रवाशांचे पुढील प्रवासाचे आरक्षण असल्याने त्यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या. बस उशिरा का सुटत आहे, याबाबत प्रवाशांनी संबंधित वाहतूक निरीक्षकाकडे विचारणा केली असता वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. त्याच बरोबर हा कर्मचारी चित्रीकरण का करताय असा जाब विचारत होता. त्यामुळे एकूणच या घटनेबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करणे गरजेचे आहे
0
0
Report
Advertisement

अकोला में खरीफ के लिए यूरिया-डीएपी की खरीद में किसानों की भीड़, टोकन वितरण शुरू

Akola, Maharashtra:राज्यात मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी बियाणे आणि खत खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांकडे धाव घेत आहेत. अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात युरिया आणि डीएपी खत खरेदीसाठी शेतकरी तसेच महिला शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यंदाच्या हंगामासाठी अकोला जिल्ह्याला ७ हजार १०१ मेट्रिक टन युरिया खत उपलब्ध होणार आहे. सध्या एका आधार कार्डवर पाच पोती खताचे वाटप करण्यात येत आहे. शेतकऱ्यांची गर्दी आणि गोंधळ टाळण्यासाठी कृषी सेवा केंद्रांकडून टोकन पद्धतीने खत वितरण केले जात आहे. दरम्यान, पावसाळा सुरू झाल्यानंतर खत आणि बियाणे शेतात नेणे अवघड होते. त्यामुळे पाऊस सुरू होण्यापूर्वीच खताची खरेदी करून साठा करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
0
0
Report

अनुदीवाड़ी के खेत में मगर के पिल्ले मिले: 9 पिल्लों की मौत, 5 जीवित, प्राकृतिक आवास में छोड़ दिए गए

Sangli, Maharashtra:स्लग - अनुडीवाडीतील उसाच्या शेतात मगरीची विण; ९ पिलांचा मृत्यू, ५ पिलं नैसर्गिक अधिवासात मुक्त. अँकर - सांगलीच्या पलूस तालुक्यातील आमणापूर येथील अनुडीवाडीत एका उसाच्या शेतात १४ मगरीची पिल्ले आढळून आली आहेत. यामध्ये ९ पिल्ले मृतावस्थेत आढळून आले आहेत, तर ५ पिलं जिवंत आढळली आहेत, त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. अनुडीवाडीच्या काळ्या ओढ्यालगत असलेल्या उसाच्या शेतात एका मगरीचा वावर दिसून आला, त्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या महिलांनी आसपास पाहिलं असता काही मगरीची पिल्लं मृत अवस्थेत आढळून आली तर काही जिवंत दिसून आली. घटनेची माहिती गावकऱ्यांना आणि वन विभागाला देण्यात आल्यानंतर घटनास्थळी वन विभाग व गावकऱ्यांनी धाव घेत, शेजاریच असणाऱ्या कळ्या ओढ्यामध्ये जिवंत मगरींच्या पिल्लांना सोडण्यात आले आहे. मृत मगरांच्या पिल्लांना दफन करण्यात आला आहे, या पिल्लांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
0
0
Report

नागपूर में AC स्लीपर बस में आग से यात्रियों के जीवन खतरे, वीडियो वायरल

Nagpur, Maharashtra:नागपूर - AC स्लीपर बस मध्ये नागपुरात येणाऱ्या प्रवाशांचे जीव धोक्यात टाकल्याची घटना समोर - धावत्या बस मध्ये आग पेटवून अमली पदार्थांचे सेवन केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर - कोटावरून नागपूरला येणाऱ्या ट्रॅवेल्स मधली धक्कादायक घटना - परिवहन विभागाचे नियम धाब्यावर ठेऊन विना परवानगी अनेकांना फूट लॉबी मध्ये झोपवलं - आग पेटवली तेव्हा अनेक प्रवासी AC स्लीपर बस मध्ये झोपलेले होते, सुदैवाने कोणताही अनुचित घटना नाही.. - AC स्लीपर बस मध्ये आग पेटवली आणि अमली पदार्थांचे सेवन करून प्रवाशांचे जीव धोक्यात टाकले, ट्रॅव्हल्स एजन्सीकडे तक्रार करणाऱ्या प्रवाशाला उडवा उडवीची उत्तर मिळाल्याची माहिती..
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी के संगमेश्वर में हाईवे का काम अटका, मुंबई-गोवा मार्ग बाधित

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. महामार्गाला ग्रहण: संगमेश्वरमधील 'या' गावामुळे मुंबई-गोवा हायवेचे काम रखडले! मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामात आता रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुका मोठा अडथळा ठरत असल्याचं चित्र आहे. संगमेश्वरमधील कुरडुंदा या ठिकाणी रस्त्याचे काम अद्यापही अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना सध्या प्रचंड धूळ, माती आणि जीवघेण्या खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. जर पावसाळ्यापूर्वी कुरडुंदा येथील काम पूर्ण झाले नाही, तर प्रवाशांना थेट चिखलातून जीवघेणा प्रवास करावा लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या या संथ कारभारामुळे प्रवाशांमधून आता तीव्र संताप व्यक्त केला जात आहे..
0
0
Report
Advertisement

विदर्भ में जारी तेज गर्मी, चंद्रपूर में 45.2°C रिकॉर्ड, मानसून की देरी चिंता

Chandrapur, Maharashtra:आठ जून उजाडुनही विदर्भात उन्हाचा तडाखा कायम आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे रविवारी 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मॉन्सून लांबत असताना नागरिकांना उन्हाचे चटके बसत आहेत. विदर्भातील इतर शहरेही 43 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमानाची आहेत. नागरिक चातकाप्रमाणे उत्तम पावसाची वाट बघत आहेत. मात्र 15 जून पर्यंत मान्सून स्थिरावणार नसल्याची स्थिती असून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना पेरणीची घाई करू नका असे आवाहन केले आहे. यंदा अल-निनोच्या प्रभावामुळे पाऊस काळ कमी असण्याची शक्यता असल्याने चिंतेत भर पडली आहे.
0
0
Report

समृद्धि महामार्ग पर बस-ट्रक हादसे में 20-25 घायल, दो की हालत गंभीर

Washim, Maharashtra:बुलढाणा जिले मेहकर के पास पिंपरी माळी गाँव के पास समृद्धि महामार्ग पर आज सुबह निजी लक्जरी बस और ट्रक का भयंकर अपघात हुआ। पुणे से नागपुर की ओर जा रही बस चालक के नियंत्रण खोने से टक्कर हो गई, जिससे बस के अगले हिस्से का चूरा-चूरा हो गया। प्रारंभिक जानकारी के अनुसार इस दुर्घटना में बस में मौजूद 20 से 25 यात्री घायल हुए हैं, जिनमें दो की हालत चिंताजनक है। घायलों को मेहकर ग्रामीण अस्पताल समेत अन्य अस्पतालों में भर्ती कराया गया है। इस घटना से समृद्धि महामार्ग पर दुर्घटनाओं की यह श्रृंखला फिर सामने आ गई है।
0
0
Report
Advertisement

चंद्रपुर जंगल में रानगवा की मौत, उष्माघात का संदेह

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातल्या झरण जंगलात रानगव्याचा जंगलालागत असलेल्या रस्त्याच्या कडेला झाला मृत्यू, उष्माघाताचा संशय अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातल्या झरण जंगलात रानगव्याचा जंगलालगत असलेल्या रस्त्याच्या कडेला मृत्यू झाला. हा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील तापमान  उच्चांकी तापमानाचा फटका मानवासह वन्यजीवांना सुद्धा बसत आहे. झरण वनपरिक्षेत्र अंतर्गत , आकसापूर जंगलात भटाळी रस्त्यालगतच कक्ष क्रमांक ११७ मध्ये रानगवा मृतावस्थेत आढळला, घटनेची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली. हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीचे सदस्य वन पथकासह   घटनास्थळी पोचले. शरीरावर कुठल्याही जखमा आढळून आल्या नाही. पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राजक्ता लेनगुरे यांना पाचारण करण्यात आले. घटनास्थळी शवविच्छेदन करण्यात आले व प्रथमदर्शी उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
0
Report

बुलढाणा के जळगाव जामोद हत्या मामले में वरिष्ठ पुलिस अधिकारी निलंबित

Washim, Maharashtra:बुलढाणा जिले के जळगाव जामोद तालुक्यामध्ये घडलेल्या हत्या कांड प्रकरणामध्ये हलगर्जीपणा करणं पोलीस विभागातील बड्या अधिकाऱ्यांना चांगलंच भोवल है. तत्काळ एलसीबी पुलिस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि जळगाव जामोद तपास अधिकारी पुलिस निरीक्षक नितीन पाटील यांच्या अमरावती पुलिस आयुक्तांनी निलंबन केलं. या निलंबनाने पोलीस वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली है. जळगाव जामोद हत्या कांड प्रकरणातील मृत मुलीचे अद्याप ओळख पटलेली नाही. जीवंत शिवानीला मृत घोषित करके तिच्या वडील आणि भावाला न केलेल्या खुणाबद्दल अटक करण्यात आली होती. त्यामुळेच या दोन पोलीस अधिकाऱ्यांवर ही मोठी कारवाई करण्यात आली है.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top