445001
शेतकरी न्याय यात्रेतून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाची पोलखोल करणार, आशिष खुलसंगे
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची शेतकरी न्याय यात्रा शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत आहे. शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने आणि अतिपावसामुळे नापिकीचे संकट उभे राहिले आहे. कोळसा खाणीमुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. पीक विमा मिळवण्यात अडचणी आहेत आणि पांदण रस्ते योजना रखडली आहे. सरकार 'लाडकी बहिण' योजनेचा प्रचार करत असताना, शेतकऱ्यांना दुसऱ्या हाताने लुटून उध्वस्त करत असल्याचा आरोप आशिष खुलसंगे यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
महिला चोरी: महालुंगे एमआयडीसी से 24 घंटे में गिरफ्तार
Khed, Maharashtra:पुण्याच्या महाळुंगे एमआयडीसी परिसरातून पोलिसांनी एका सराईत महिला घरफोड्याला अवघ्या २४ तासांत बेड्या ठोकल्याात, धक्कादायक म्हणजे, ही महिला फिर्यादीची ओळखीचीच निघाली असून तिने बनावट चावीचा वापर करून चोरी केली होती. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरट्याने घरातील कपाटातून तब्बल १० तोळे सोन्याचे दागिने लंपास केले होते, ज्याची किंमत साधारण १३ लाख ८७ हजार रुपये इतकी होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे एका महिलेचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तळेगाव दाभाडे परिसरातून ३८ वर्षीय सारिका भुजबळ या महिलेला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत केलाय.0
0
Report
छत्रपती संभाजीनगर में गर्मी का कहर, अप्रैल के अंत में रिकॉर्ड तापमान 43.4°C
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा वाढला असून एप्रिलच्या शेवटच्या रविवारी तापमानाने तीन वर्षांचा विक्रम मोडला आहे. एप्रिल महिन्यातील शेवटचा रविवार ‘हॉट संडे’ ठरला. २६ एप्रिल रोजी शहरात कमाल तापमान तब्बल ४३.४ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले, जे मागील तीन वर्षांतील सर्वाधिक आहे. तर किमान तापमान २७.६ अंश सेल्सिअसवर कायम राहिले. शहर आणि परिसरात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवू लागला आहे. वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडलेले दिसून आले, तर नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले. हवामान खात्याने २९ एप्रिल ते १२ मे या कालावधीत तापमान आणखी वाढण्याचा इशारा दिला आहे. सकाळपासूनच तापमानाचा पारा झपाट्याने वाढणार असून दुपारनंतर कडक उन्हाचा तडाखा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.0
0
Report
नाशिक में वृक्षतोड़ विरोधी याचिका पर हरित लवाद में कल सुनवाई, नई गाइडलाइन पर नजर
Nashik, Maharashtra:शहरातील वृक्षतोडीच्या विरोधातील याचिकेवर उद्या हरित लवादात सुनावणी अँकर नाशिक शहरातील विविध विकासकामे आणि रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली होत असलेल्या बेसुमार वृक्षतोडीविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या राष्ट्रीय हरित लवादात सुनावणी होणार आहे. या सुनावणीत लवाद काय निकाल देणार, याकडे पर्यावरणप्रेमी व जागरूक नागरिकांसह मनपा व संबंधित प्रशासनाचे लक्ष लागलंय...काही महिन्यांपासून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध रस्त्यांचे रुंदीकरण, तसेच पायाभूत सुविधां सुरू आहे. मात्र, या विकासकामांचा फटका जुन्या वृक्षांना बसत आहे. या संदर्भात प्रशासनाकडे वारंवार दाद मागूनही ठोस कारवाई न झाल्याने, अखेर पर्यावरणवाद्यांनी राष्ट्रीय हरित लवादाचे दरवाजे ठोठावले आहेत. या याचिकेवर उद्या लवाद वृक्षतोडीवरील स्थगितीसह प्रशासनाला नवीन मार्गदर्शक तत्त्वे आखून देणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे...0
0
Report
Advertisement
शिवाजी महाराज के बारे में शास्त्री के बयान पर शिवभक्तों में आक्रोश
Bhandara, Maharashtra:धीरेंद्र शास्त्रींच्या वक्तव्यावरून शिवप्रेमी संतप्त... छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर निषेध. कथावाचक धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अत्यंत संतापजनक असे वक्तव्य केले. त्या वक्तव्याच्या विरोधात गोंदिया शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर आंदोलन करून धीरेंद्र शास्त्री याच्या छायाचित्राला जोडेमारून निषेध व्यक्त करण्यात आला. दरम्यान धीरेंद्र शास्त्री याच्यावर कठोरात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज हे एकट्या महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण भारतीयांचे प्रेरणास्थान आहेत. गुलामीच्या बेड्या फेकून सर्वसामान्यांना हाताशी धरत रयतेचे राज्य निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात जाती, पातीला स्थान नव्हते. तर अगदी तळागाळातील व्यक्तींचा देखील त्यांनी आदर राखला. त्यामुळे बागेश्वर बाबा यांच्यावर कारवाईची व्हावी अशी मागणी शिव प्रेमींनी केली आहे.0
0
Report
फडणवीस का सोलापुर दौरा: दोपहर बाद बड़ी रैली की तैयारी
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सोलापूरचा दौऱ्यावर, जिल्ह्यात दोन ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सोलापूरचा दौऱ्यावर. सकाळच्या सत्रात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बार्शीचे ग्रामदैवत श्री भगवंतांच्या महापूजेचे आयोजन. फक्त दुपारनंतर सोलापूर शहरात मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेचे आयोजन. जाहीर सभेच्या ठिकाणाची पालकमंत्री जयकुमार गोरे, आ.सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे यांच्याकडून पाहणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर शहरातील जाहीर सभेसाठी पक्षाकडून जय्यत तयारीला सुरवात. मुख्यमंत्र्यांचा दौरा नेमका कसा असेल याविषयी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी0
0
Report
साताऱ्यात कास तलाव क्षेत्र में अवैध वृक्षतोड़, कौन कर रहा है यह खपत?
Satara, Maharashtra:सातारा - साताऱ्यातील कास तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत पणे वृक्षतोड केली जाते है.ही वृक्षतोड कोण आणि का करत आहे हे समजू शकलेले नाही मात्र तोडलेल्या झाडांच्या लाकडांचा ढीग लागल्याचे दिसून येत आहे.वनविभाग आणि सातारा नगरपालिका यांना या वृक्षतोडीची काहीही माहिती नसल्याचे अधिकाऱ्यांचे सांगणे आहे मात्र ज्या लोकांकडून ही वृक्षतोड केली जाते आहे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होते आहे.0
0
Report
Advertisement
फुलंब्री पर नेशनल हाईवे पर आठ घंटे का ट्रैफिक जाम, एम्बुलेंस भी फंसी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सकाळ ते सायंकाळपर्यंत वाहतुकीचा खेळखंडोबा झाला. सुट्टीचा दिवस व लग्नसराईच्या गर्दीमुळे सकाळी ११ वाजेपासून सुरू झालेली वाहतूक कोंडी रात्री ७ वाजेपर्यंत अधूनमधून सुरूच होती. तब्बल ८ तास चाललेल्या या गोंधळामुळे प्रवाशांचे भर उन्हात प्रचंड हाल झाले. फुलंब्री शहरातील खुलताबाद टी-पॉईटवर तिन्ही दिशांनी वाहने एकाच वेळी आल्याने कोंडीची समस्या निर्माण झाली. अवजड वाहने वळताना रस्ता पूर्णतः अडकला गेल्याने ट्रक, ट्रॅव्हल्स व दुचाकींच्या दीड ते दोन किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यात अंबुलन्स सुद्धा अडकली...0
0
Report
नाशिक के हिसवाळ स्कूल में पोषण आहार में कीड़े-एलर्जी, शिक्षकों के खिलाफ कार्रवाई की मांग
Nashik, Maharashtra:नाशिक के मालेगाव तालुक्यातील हिसवाळ जिला परिषद स्कूल के पोषण आहार में कीड़े और अळ्या पाए गए, शिकायत करने वाले विद्यार्थियों के साथ शिक्षकों द्वारा मारहाण की गई। अब तक संबंधित शिक्षकों के खिलाफ कोई कार्रवाई नहीं हुई है, जिससे ग्रामस्थ व पालक आक्रामक हो गए हैं। 10 साल से अधिक समय से स्कूल की इमारत खतरनाक घोषित है, फिसलन भरा वर्षा ऋतु आदि में स्थिति और भयावह हो जाती है; पाठशाला में teaching की सामान्य व्यवस्था नहीं है, एक ही शिक्षक कई कक्षाओं को पढ़ाते हैं। गंदगी के प्रशासनिक व्यवस्थाओं का हवाला देते हुए ग्रामस्थों ने शिक्षकों के निलंबन और मामले की उच्चाधिकारिक जांच की मांग की है तथा पंचायत समिति कार्यालय के परिसर में आने वाले दिनों में आंदोलन/उपोषण के संकेत दिए हैं।0
0
Report
नाशिक कोर्ट में आज निदा खान की जमानत पर सुनवाई; आरोपों की गूंज
Nashik, Maharashtra:Nashik Breaking - *टीसीएस प्रकरणातील फरार निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी* - नाशिकरोड न्यायालयात सुनावणी पार पडणार - गुन्हा दाखल झाल्यापासून निदा खान फरार, एसआयटीच्या धाडीपूर्वीच निसटली - गर्भवती असल्याचे कारण देत जामिनासाठी न्यायालयात अर्ज - पहिल्या सुनावणीत आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद, आज सरकारी पक्ष मांडणार बाजू - धार्मिक भावना दुखावणे व धर्मांतर प्रयत्नाचे निदा खानवर गंभीर आरोप0
0
Report
Advertisement
सोलापूर में भारत की भीमज्योत महायात्रा का शानदार स्वागत और उत्साह
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात ‘भारताची भीमज्योत’ महायात्रेचे उत्साहात स्वागत Anc : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपा अनुसूचित जाती मोर्चाकडून ‘भारताची भीमज्योत’ महायात्रेचा सोलापूरातील कार्यक्रम उत्साहात आणि जल्लोषात पार पडला.भाजपा प्रदेशाध्यक्ष विश्वजीत अनिलकुमार गायकवाड यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही महायात्रा दीक्षाभूमी ते चैत्यभूमी असा प्रेरणादायी प्रवास करत सोलापूरात दाखल झाली.कार्यक्रमात सामाजिक एकात्मता, समता आणि संविधानिक मूल्यांचा संदेश देण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत Yशस्वी ठरला.हॉटेल हेरिटेज येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.0
0
Report
उत्तर महाराष्ट्र में गर्मी, नाशिक में पारा 41 पार, तीन जिलों में 44 डिग्री
Nashik, Maharashtra:उत्तर महाराष्ट्रात एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सूर्य अक्षरशः आग ओकत असून थंडगार हवेचे शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पारा 41 अंशांच्या पार गेल आहे तर जळगाव, धुळे, नंदुरबार हे जिल्हे उष्णतेचे हॉटस्पॉट ठरत असून आज या तीनही जिल्ह्यात कमाल तापमान 44 अंशांच्या वर गेलं आहे. आजचे तापमान - जळगाव - 44.3 नंदुरबार - 44.00 धुळे - 44.00 नाशिक - 41.4 अहिल्यानगर - 41.000
0
Report
छत्रपति संभाजीनगर में भीषण गर्मी, चिड़ियाघर के बाघ-शेर पसीने से तर-बतर
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा पारा चाळीशी पार गेला असून… या कडक उन्हाचा फटका फक्त नागरिकांनाच नाही, तर प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांनाही बसतोय… त्यामुळं सिद्धार्थ उद्यानातल्या वाघ आणि सिंहांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून, त्यांना दिवसातून चार वेळा आंघोळ घालण्यात येतेय… तर प्रत्येक पिंजऱ्यात कुलर लावून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातोय. उन्हाच्या झळांमुळे या प्राण्यांना धाप लागण्याची समस्या जाणवत असल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी प्रशासन सतर्क आहे. पाण्याचा पुरेसा साठा, सावलीची व्यवस्था आणि थंडावा मिळावा यासाठी विविध उपाय राबवले जात आहेत.0
0
Report
Advertisement
महाराष्ट्र बोर्ड परिणाम में देरी: हड़ताल से बारहवीं-दहवी का रिजल्ट कई दिनों तक रुकेगा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:दहावी-बारावीच्या परीक्षा लवकर झाल्याने निकालही लवकर लागण्याची शक्यता होती. मात्र, महाराष्ट्र बोर्डाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे आता निकालास विलंबाची चिन्हे आहेत संभाजीनगर मंडळातील ५९ कर्मचारी संपात सामील आहेत. उत्तरपत्रिका तपासणी पूर्ण झाली असली तरी निकालासाठी आवश्यक डेटा एन्ट्री आणि रिपोर्ट पडताळणीचे काम ठप्प आहे. यामुळे एप्रिलअखेरीस अपेक्षित असलेला बारावीचा आणि मेमधील दहावीचा निकाल लांबणीवर पडू शकतो.0
0
Report
छत्रपति संभाजी नगर महापालिका चुनाव के बाद २२ नवनिर्वाचित नगरसेवकों की सदस्यता खतरे में
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर मनपा निवडणुकीत विजयानंतर आता नवनिर्वाचित २२ नगरसेवकांचे सदस्यत्व धोक्यात आले आहे. दोनपेक्षा जास्त अपत्ये, अनधिकृत बांधकाम, मनपाच्या जागांवरील अतिक्रमण अशा तक्रारींनंतर प्रशासनाने चौकशी सुरू केली होती, त्याचा अहवाल आता पूर्ण केला असून आता अंतिम निर्णयाचा चेंडू महापालिका आयुक्तांच्या दरबारात आहे. निवडणुकांनंतर सत्ताधारी भाजप, शिवसेनेच्या नगरसेवकांविरोधात एमआयएम तक्रारींचा पाऊस पडला. प्रसासनाने या तक्रारींची सखोल चौकशी करून आपला अहवाल आयुक्तांकडे सोपवला आहे.0
0
Report
विदर्भ में गर्मी का खतरा: ऑरेंज अलर्ट अकोला- अमरावती- वर्धा, नागपूर- चंद्रपूर- बुलढाणा
Nagpur, Maharashtra:विदर्भात अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात आजही उष्णतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर नागपूर, चंद्रपूर आणि बुलढाण्याला ही येलो अलर्ट आहे. उष्णतेच्या लाटेत विदर्भ अक्षरशः होरपळून निघाला आहे. रविवार तर अकोला, अमरावती वर्धा या जिल्ह्यात उष्णतेचा कहर दिसून आला. अकोल्यात तब्बल 46.9 अंश सेल्सिअस तर अमरावतीतही 46.8 अंश सेल्सिअस, आणि वर्धा जिल्ह्यात 46.4 अंश सेल्सिअस पर्यंत पारा चढला होता. या मोसमातील उच्चांकी तापमान ठरले... सकाळ आठपासूनच उन्हाची दाहकता जाणवत आहे... दुपारी तर रस्त्यावर फिरताना उन्हचे चटके बसत आहे... आणि संध्याकाळी ही उष्णतेच्या झळा जाणवत आहे0
0
Report
Advertisement
