445001
शेतकरी न्याय यात्रेतून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाची पोलखोल करणार, आशिष खुलसंगे
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची शेतकरी न्याय यात्रा शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत आहे. शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने आणि अतिपावसामुळे नापिकीचे संकट उभे राहिले आहे. कोळसा खाणीमुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. पीक विमा मिळवण्यात अडचणी आहेत आणि पांदण रस्ते योजना रखडली आहे. सरकार 'लाडकी बहिण' योजनेचा प्रचार करत असताना, शेतकऱ्यांना दुसऱ्या हाताने लुटून उध्वस्त करत असल्याचा आरोप आशिष खुलसंगे यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
चंद्रपुर- वर्धा- गडचिरोली सीट पर अरुण लखानी भाजपा उम्मीदवार घोषित
Nagpur, Maharashtra:विधान परिषदेच्या चंद्रपूर- वर्धा -गडचिरोली मतदारसंघासाठी भाजपाकडून अरुण लखानी यांना उमेदवारी मिळाली आहे... ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचे होणारे व्याही आहे.... त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी0
0
Report
कोल्हापुर में अवैध शराब के ठिकानों पर छापा; 22 FIR, 15 गिरफ्तार, माल जप्त
Solapur, Maharashtra:कोल्हापुर - कोल्हापुरातील अवैध दारू धंद्यांवर छापा सुरूच, कारवाईत 22 गुन्हे दाखल तर 15 जणांना अटक. कोल्हापूरात विशेष मोहिमे अंतर्गत रविवारी सलग तिसऱ्या दिवशी हातभट्टी दारू निर्मिती, वाहतूक व विक्री विरुद्ध विशेष मोहीम राबवण्यात आली. कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईमध्ये एकूण 22 गुन्हे नोंद करण्यात आल्या असून 15 आरोपींना अटक करण्यात आलीय. या कारवाईत एकूण पाच लाख 61 हजार 290 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.0
0
Report
अमरावती विधानपरिषद चुनाव: बीजेपी ने प्रवीण पोटे को मैदान में उतारा, कांग्रेस चुनौती देगी
Amravati, Maharashtra:अमरावती विधानपरिषद निवडणुकीसाठी रंगत; भाजपकडून प्रवीण पोटे पुन्हा मैदानात, काँग्रेसचे हर्षजित देशमुख आव्हान देणार अँकर :- अमरावती विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असून भाजपने सलग तिसऱ्यांदा प्रवीण पोटे यांच्यावर विश्वास व्यक्त करत त्यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसकडून हर्षजित देशमुख यांनी यापूर्वीच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे अमरावती विधानपरिषद निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट सामना रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे आज दुपारी 12 वाजता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमुळे या अर्ज दाखल कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांनी 30 जून रोजीच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दोन्ही प्रमुख पक्षांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. अमरावती विधानपरिषद निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता असून या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून आगामी काळात प्रचाराची रणधुमाळी आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.0
0
Report
Advertisement
डोंबिवली के पिंपळेश्वर महादेव मंदिर के लिए 4.25 एकड़ जमीन मंजूर, संकल्पपूर्ती पूजन किया
Kalyan, Maharashtra:डोंबिवलीतील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिरात भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संकल्प मूर्ती पूजन केले. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात डोंबिवलीतील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिरासाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पिंपळेश्वर मंदिरभूमीची अनेक वर्षांची लढाई अखेर यशस्वी ठरली आहे. पिंपळेश्वर मंदिर हा डोंबिवलीकर ग्रामस्थांच्या वैयक्तिक आस्थेचा, श्रद्धेचा आणि सांस्कृतिक अस्मितेचा विषय आहे. मंदिराच्या जागेसाठीचा संघर्ष गेली १४ वर्षे सातत्याने सुरू होता. या संपूर्ण लढ्यात भारतीय जनता पार्टी ग्रामस्थांसोबत खंबीरपणे उभी राहिली. २०१२ च्या ऑगस्टमध्ये भाजपा ने या आंदोलनाला बळ देण्यासाठी डोंबिवली बंदची हाक दिली होती. आमच्या सर्वांसाठी हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे; महायुती सरकारने पिंपळेश्वर मंदिराला ही जागा द्यायची असे निर्णय घेतला.0
0
Report
मिसिंग लिंक पर सुबह भीषण दुर्घटना: दो की मौत, यातायात फिर से खुला
Varsoli, Maharashtra:पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवरील मिसिंग लिंक परिसरात पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर दोघेजण जखमी झाले होते. या अपघातामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारा मिसिंग लिंक मार्ग काही काळ बंद ठेवावा लागला होता. मात्र अपघातग्रस्त वाहने हटवल्यानंतर आता वाहतूक पूर्ववतण्यात आली आहे.0
0
Report
लग्न के नाम पर दाम्पत्य पर बलात्कार: नाशिक में मामला दर्ज
Nashik, Maharashtra:लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल. अँकर लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार तसेच जातीवाचक अपमान आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून नाशिकच्या उपनगर पोलिस ठाण्यात एका दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. संशयित आरोपी कृष्णा जगन्नाथ साळुंखे याची तरुणीसोबत ओळख झाली होती. त्याने स्वतःचे लग्न झालेले असताना ही बाब त्याने पीडितेपासून लपवून ठेवली. आरोपीने नाशिकरोड येथील मुक्तिधामजवळील एका लॉजवर नेऊन तरुणीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तरुणीने विवाहाबाबत विचारणा केली असता आरोपी टाळाटाळ करू लागला. आरोपीच्या पत्नीने तिला व तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संशयित आरोपीने पीडितेला वेगवेगळे आमिष दाखविले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिने उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली.0
0
Report
Advertisement
यवला की गोकुळधाम सोसायटी में भागवत कथा, भक्तों ने हरि कृष्णा-हरे राम भजन गाए
Yeola, Maharashtra:अँकर:- येवला शहरातील प्रसिद्ध असलेल्या गोकुळधाम सोसायटीमध्ये अधिक मास निमित्त श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी श्रीमान माधव कृष्ण प्रभुजी यांच्या मधुर वाणीतून भागवत kathेचा लाभ भाविकांनी घेतला kथेच्या समारोप्रसंगी हरे कृष्णा हरे रामा भजन गात भाविकांनी ठेका देखील धरला0
0
Report
घोड़ागांव नदी में कचरे का अंबार, पानी स्वास्थ्य के लिए खतरा बन गया
Ambegaon, Maharashtra:प्रशासकीय निष्काळजीपणाचा एक अतिशय धक्कादायक आणि भयानक प्रकार आंबेगाव तालुक्यातील घोडेगावमध्ये समोर आलाय. ज्या घोड नदीतून हजारो नागरिकांना पिण्याचं पाणी पुरवलं जातं, त्याच नदी पात्रात घोडेगाव शहरातल्या कचऱ्याचं साम्राज्य उभं राहिलंय. हॉस्पिटलच्या घातक बायो-मेडिकल वेस्टसह मृत प्राणी संपूर्ण कचरा सर्रासपणे या नदीपात्रात ओतला जातोय आणि तिथंच तो पेटवून दिला जातोय. या विषारी धुरामुळे आणि दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी उघड-उघड खेळ सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक नागरिक यावर आवाज उठवत आहेत. 'येत्या दोन तीन दिवसांत हा घातक कचरा हटवला नाही, तर तो स्वखर्चाने उचलून थेट पंचायत समितीच्या दारात आणून ओतू', असा थेट इशाराच आता संतप्त नागरिकांनी प्रशासनाला दिलाय. याचाच घोड नदी पात्रातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...0
0
Report
पिंपरी-चिंचवड ट्रैफिक विभाग ने ब्लैक फिल्म पर कारवाई; अब तक 41,500 रुपये जुर्माना
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दिघी आळंदी वाहतूक विभागाकडून चार चाकी गाड्यांच्या काचेला लावलेल्या ब्लॅक फिल्म वर कारवाई सुरु करण्यात आलीय. वाहन चालकांकडून आत्तापर्यंत 41 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे...! यापुढेही ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याच वाहतूक विभागाने स्पष्ट केलं आहे.0
0
Report
Advertisement
रेलवे स्टेशन के पास हिरण पर कुत्तों का हमला, गंभीर घायल; लोगों ने सूचना दी
Yeola, Maharashtra:येवला तालुक्यातील कोटमगाव शिवारामध्ये रेल्वे स्टेशन च्या जवळ पाण्याच्या शोधात असलेल्या एका हरणाच्या पाठीमागे काही भटकी कुत्री लागली होती यावेळी या कुत्र्यांनी या हरणाचे लचके तोडून त्याला गंभीर जखमी केले या हल्ल्यांमध्ये हरीण मृत्युमुखी पावले असून याची माहिती परिसरातील नागरिकांनी पण विभागाला दिली आहे0
0
Report
पवनी के कुराडा तालاب में गाळ उपसा रुका, मत्स्य उत्पादन प्रभावित
Bhandara, Maharashtra:भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील कुराडा येथे गाळ उपसा रखडल्याने तलाव उथळ....मत्स्य व्यवसायाला फटका.... भंडाऱ्याच्या पवनी येथील कुराडा (मामातलाव) तलावातील गाळ उपसा अनेक वर्षांपासून न झाल्याने तलाव उथळ झाला असून पाणीसाठवण क्षमतेत मोठी घट झाली आहे. अमृत योजनेंतर्गत सुरू असलेल्या सौंदर्यीकरण कामांमुळेही मागील दोन वर्षांपासून तलावात पुरेसे पाणी साठले नाही. परिणामी, पवनी मच्छी उत्पादक सहकारी संस्थेचे मत्स्य उत्पादन ठप्प झाले असून संस्थेला सुमारे ५० ते ६० लाखांचे नुकसान सहन करावे लागले आहे. संस्थेने जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन देत ‘गाळमुक्त तलाव, गाळयुक्त शिवार’ अभियानांतर्गत गाळ उपसा करून तलावाचे खोलीकरण करावे, तसेच नुकसानभरपाई व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.0
0
Report
सोलापुर महायुती ने राजेंद्र राऊत को उमेदवारी दी, कांटे का मुकाबला तय
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात महायुतीकडून माजी आ राजेंद्र राऊत यांना उमेदवारी, थोड्याच वेळात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत दाखल करणार उमेदवारी अर्ज - सोलापूर विधान परिषदेच्या जागेसाठी महायुतीतून भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर - प्रशांत परिचारक यांना नाकारत राजेंद्र राऊत यांना देण्यात आली उमेदवारी - थोड्याच वेळात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दाखल करणार उमेदवारी अर्ज - महाविकास आघाडी कडून सोलपूरची जागा काँग्रेसला उमेदवार मात्र अद्याप गुलदस्त्यात0
0
Report
Advertisement
बकरी ईद के मौके पर 131 गोवंश की अवैध तस्करी: मकोका के तहत बड़ी कार्रवाई
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी नगर शहरात कत्तल्यासाठी आणलेल्या १३१ गोवंशांना अमानुष पद्धतीने घराच्या तिसऱ्या मजल्यावर डांबून ठेवले होते. पोलिसांनी धडक Carवाई करत त्या १३१ गोवंशाची सुटका केली होती. दरम्यान, कारवाईच्या तीन दिवसांनंतर जिन्सी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चालणाऱ्या या अवैध गोवंश तस्करी आणि साठवणुकीच्या संपूर्ण रॅकेटविरुद्ध थेट मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गोवंश तस्करी किंवा अवैध कत्तल करणाऱ्या टोळीविरुद्ध मकोका लावण्याची शहरासह मराठवाड्यातील ही पहिलीच ऐतिहासिक कारवाई ठरली आहे.0
0
Report
अंबरनाथ-उल्हासनगर मार्ग पर तेज रफ्तार स्विफ्ट डिजायर कार ने मचाई हलचल, कई घायल, चालक फरार
Ambernath, Maharashtra:भरधाव स्विफ्ट डिझायर कारचा अम्बरनाथ-उल्हासनगर मार्गावर धुमाकूळ; अनेक जखमी, चालक फरार Anchor अंबरनाथ आणि उल्हासनगरदरम्यान एका भरधाव आणि बेकाबू स्विफ्ट डिझायर कारने काल रात्री उशिरा मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर अक्षरशः धुमाकूळ घातला. भरधाव कारने मार्गातील अनेकांना धडक दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी फॉलोवर लाईन चौक परिसरात कारला घेराव घालत कारची तोडफोड केली.मात्र यागोंधळाचा फायदा घेत चालक घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेत वाहनाच्या मागील बाजूची काच पूर्णपणे फुटली असून कारचे नुकसान झाले आहे. फरार चालकाच्या हालचाली परिसरातील सीसीटीिव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून फरार चालकाचा शोध सुरू केला आहे.0
0
Report
वाशीम में एकबुर्जी बांध के जलभंडार घटने से पानी संकट की आशंका
Washim, Maharashtra:वाशीम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पातील पाणीसाठा चिंताजनकरीत्या घटला असून सध्या केवळ एक ते सव्वा दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणी शिल्लक आहे.११.९७ दशलक्ष घनमीटर क्षमता असलेल्या प्रकल्पातील साठा झपाट्याने कमी झाल्याने आगामी काळात वाशिम शहरासह परिसरावर पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.वाढते तापमान आणि पाण्याचा वाढता वापर यामुळे प्रशासनासमोर पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचे मोठे आव्हан उभे राहिले आहे.0
0
Report
Advertisement
