445001
शेतकरी न्याय यात्रेतून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाची पोलखोल करणार, आशिष खुलसंगे
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची शेतकरी न्याय यात्रा शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत आहे. शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने आणि अतिपावसामुळे नापिकीचे संकट उभे राहिले आहे. कोळसा खाणीमुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. पीक विमा मिळवण्यात अडचणी आहेत आणि पांदण रस्ते योजना रखडली आहे. सरकार 'लाडकी बहिण' योजनेचा प्रचार करत असताना, शेतकऱ्यांना दुसऱ्या हाताने लुटून उध्वस्त करत असल्याचा आरोप आशिष खुलसंगे यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
चंद्रपूर में तंबाकू निर्माण केंद्र पर दबिश: 11.5 लाख का माल जब्त
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात पोलीस आणि अन्न सुरक्षा विभागाची संयुक्त कारवाई; तंबाखू निर्मिती केंद्रावर छापा मारून सुमारे साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. गावात विजय भांडेकर या व्यक्तीकडे सुगंधित तंबाखू व हुक्का तंबाखू साठा असून ते गडचिरोली व चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यात विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. धाडीत हुक्का तंबाखू, खुला सुगंधित तंबाखू, पॅकिंग साहित्य व यंत्रसामुग्री जप्त झाली आहे. विक्रीप्रकरणाचा मुख्य सूत्रधार म्हणून गडचिरोळाचा विनय गुप्ता याचे नाव पुढे आले असून पोलिस त्याच्या मागावर आहेत.0
0
Report
72 घंटों बाद तेंदुए का पिल्ला माँ की गोद में लौट आया; मुरबाड में खोज सफल
Ambernath, Maharashtra:अखेर 72 तासांनी बिबट्याचे पिल्लू आईच्या कुशीत विसावले मुरबाड जिल्ह्यात बिबट्याच्या शोध मोहيمेला यश मिळाले. पिल्लू घेऊन जातांना मादी बिबट्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाली. गावातील नागरिक ग्रामविभाग व मुंबई येथील संस्थेची टीमने 72 तासांच्या शोध मोहिमेची कथा सुरु केली. पिल्ला व मादी बिबट्याची भेट झाली आणि सुटकेचा निःश्वास टाकला. पहिल्या रात्री मादी बिबट्या ट्रॅप कॅमेऱ्यात आली, परंतु पिल्लाला न घेता परत गेली. तिसऱ्या रात्री पिल्लू सुरक्षित पिंजऱ्यासमोर आल्यावर मादी बिबट्या जंगलात निघून गेली.0
0
Report
हाईकोर्ट के आदेश के बावजूद अकला में स्कूल बंद कराने को लेकर मनसे का प्रदर्शन
Akola, Maharashtra:मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वाढत्या उष्णतेचा विचार करून ३० जून २०२६ पूर्वी शाळा सुरू करू नयेत, असे स्पष्ट निर्देश दिले असतानाही अकोला शहर आणि जिल्ह्यातील अनेक शाळांकडून या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने आज अकोला शिक्षण विभाग कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. तसेच संबंधित शाळांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करत शिक्षण विभागाला निवेदन देण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनाच्या परिपत्रकावर ताशेरे ओढत ३० जूनपूर्वी शाळा सुरू न करण्याचे आदेश दिले होते. यासंदर्भातील पूर्वीचे परिपत्रकही न्यायालयाने रद्द केले आहे. असे असतानाही अकोला जिल्ह्यातील अनेक शाळांनी न्यायालयीन आदेशाची अवहेलना करून विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू ठेवल्याचा आरोप मनसेने केला आहे. वाढत्या उष्णतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून त्यांच्या सुरक्षिततेशी खेळ करण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे मनसेचे म्हणणे आहे. न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शाळांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.0
0
Report
Advertisement
खुलताबाद में शिक्षक की मौत: चार आरोपी गिरफ्तार
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:खुलताबादचे शिक्षक बोरसे यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे, काल झालेली घटना दुर्दैवी आहे याबाबत खुलताबाद पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांनी दिली يाबाबत पुढील तपास सुरू आहे आणि दोशींवर योग्य ती कारवाई होईल असेही पोलिसांनी सांगितलं, याबाबत शिवसेना ठाकरे गटातील नेते अंबादास दानवे यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले होते पोलिसांनी मारहाण केली आणि त्यानंतर या शिक्षकाला हृदयविकाराचा झटका आला असा अंबादास दानवे यांचा आरोप होता त्यानंतर पोलिसांनी हा खुलासा केला आहे0
0
Report
कोल्हापुर में पानी संकट गहराता: धरणों में जलस्तर नीचे, पानी आपूर्ति प्रभावित
Kolhapur, Maharashtra:पाणीदार जिल्हा म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूरात यंदा पाण्यासाठी चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा धोकादायक पातळीवर आला असून जलसंपदा विभागाने आता केवळ पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे. काळम्मावाडी धरणातील पाणीपातळी कमी झाल्यामुळे कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणारे तीनही उपसा पंप बंद पडले आहेत. परिणामी थेट पाणीपुरवठा योजना काही काळासाठी बंद ठेवण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील धरणावर नजर टाकल्यास राधानगरी धरणात मागील वर्षी आजच्या दिवशी 53 टक्के पाणीसाठा होता, पण आता तोच पाणीसाठा 26 टक्क्यावर घेऊन पोहोचला आहे. दूधगंगा धरणात मागील वर्षी 21 टक्के पाणीसाठा होता, आता तो 17 टक्क्याच्या दरम्यान आहे तुळशी धरणात मागील वर्षापेक्षा 12 टक्के पाणीसाठा कमी आहे धरणांतील उपलब्ध पाणीसाठ्याची आकडेवारीच परिस्थितीची गंभीरता सांगणारी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रमुख धरणांमध्ये निम्म्याहून कमी पाणी शिल्लक आहे. गेल्या वर्षी 21 मेपासून पावसाला सुरुवात झाली होती. यंदा मात्र एप्रिल महिन्यातील एक मोठा वळीव वगळता पावसाचा थेंबही पडलेला नाही. जूनचा पहिला पंधरवडा संपत आला तरी उष्णतेची तीव्रता कायम आहे. कोल्हापूर शहराला दररोज सुमारे 160 ते 180 एमएलडी पाण्याची आवश्यकता असते. मात्र उपलब्ध साठा पाहता ऑगस्टपर्यंत पाणी पुरवणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान बनले आहे. त्यामुळे शिंगणापूर योजनेवरील पंपातून पाणी उपसा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी बालिंगा आणि शिंगणापूर योजनांवर अतिरिक्त ताण पडणार आहे. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले आहे, मात्र पाण्याचा वापर अत्यंत जपून करण्याचे आवाहनही त्यांनी केले. मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील तीच री ओढत पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान राज्यातील पाणीस्थितीबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही चिंता व्यक्त केली आहे. जून आणि जुलै महिना तुलनेने कोरडा जाऊ शकतो, तर ऑगस्टमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र पुरेसा पाऊस झाला नाही तर केवळ यंदाच नव्हे तर पुढील वर्षी जानेवारीपासूनही पाणी कपातीची वेळ येऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे. धरणांबरोबरच पंचगंगा नदीची पाणीपातळीही दिवसेंदिवस खालावत आहे. उपसा पंपांना पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे पाणीपुरवठ्याचे फेरनियोजन करण्याची वेळ आली आहे. जलसंपदा विभागाने 31 ऑगस्टपर्यंतचे नियोजन केले असले तरी पावसाने लवकर हजेरी लावली नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. एकेकाळी पाण्याची चिंता नसलेल्या कोल्हापूर जिल्ह्यावर आज पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे. धरणातील घटता साठा, लांबलेला मान्सून आणि वाढती पाण्याची मागणी या तिहेरी संकटामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत उपाययोजना सुरू असल्या तरी प्रत्येक थेंब जपून वापरण्याची जबाबदारी आता नागरिकांवरही आहे.0
0
Report
लातूर की किसान हौसाबाई को मिली मदद, लेकिन बैल बीमार निकला
Latur, Maharashtra:AC. ::- वीज पडून बैल दगावल्यानंतर स्वतःच्या खांद्यावर औत घेऊन शेताची मशागत करणाऱ्या लातूर जिल्ह्यातील हौसाबाई गायकवाड यांचा संघर्ष राज्यभर चर्चेचा विषय ठरला. ZEE 24 TAAS च्या बातमीनंतर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत प्रशासनाला तातडीने बैल उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. प्रशासनाने बैल हि दिला... मात्र आता प्रशासनाने दिलेला बैलच बशा निघाला आहे. मदतीसाठी दिलेला बैल मशागतीदरम्यान खाली बसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. पाहुयात याच संदर्भातील ZEE 24 TAAS चा स्पेशल रिपोर्ट.... बाईट ::- हौसाबाई गायकवाड ( शेतकरी ) VO 01 ::- लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी गावातील ६५ वर्षीय हौसाबाई गायकवाड यांचा संघर्ष ZEE 24 TAAS ने संपूर्ण महाराष्ट्रापुढे आणला. वीज पडून बैল दगावल्यानंतर दुसरा बैल घेण्याची आर्थिक क्षमता नसल्याने हौसाबाईं स्वतः खांद्यावर जू घेऊन शेतीची मशागत करत होत्या. या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला तातडीने मदत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पशुसंवर्धन विभागामार्फत हौसाबाईंना एक बैल उपलब्ध करून देण्यात आला. मात्र, शेतकऱ्याच्या मदतीसाठी देण्यात आलेला हा बैलच काही तासांत आजारी आणि कुपोषित असल्याचे समोर आले. बाईट ::- अंबादास दानवे ( विरोधीपक्ष नेते ) VO 02 ::- मदत म्हणून दिलेला बैल शेतात काम करत असताना अचानक खाली बसला. तपासणी केल्यानुसार हा बैल अशक्त आणि कुपोषित असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मदत करण्याऐवजी प्रशासनाने शेतकऱ्याची चेष्टा केल्याची टीका आता विरोधकांकडून केली जात आहे. या प्रकरणावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही सरकार आणि प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम झाले असल्याचा आरोप त्यांनी केला. बाईट ::- अंबादास दानवे ( विरोधीपक्ष नेते ) VO 03 ::- दरम्यान, हौसाबाईंना देण्यात आलेला बैल आजारी आणि कुपोषित असल्याची बाब समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा तातडीने दखल घेतली आहे. लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधत संबंधित शेतकरी कुटुंमला त्यांच्या पसंतीचा आणि शेतीच्या कामासाठी सक्षम बैल उपलब्ध करून देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानुसार उद्याच हौसाबाईंना त्यांच्या मनाप्रमाणे बैल खरेदी करून देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मदतीबाबत निर्माण झालेला वाद मिटवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. बाईट ::- देवेंद्र फडणवीस ( मुख्यमंत्री) VO END ::- एका शेतकरी महिलेचा संघर्ष राज्याला हादरवून गेला... तिच्या मदतीसाठी सरकार धावून आलं... पण प्रशासनाने दिलेला बैलच बशा आणि कुपोषित निघाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले. शेतकऱ्याला मदतीची गरज असताना निकृष्ट मदत देण्यामागे नेमकं कोण जबाबदार, याची चौकशी होणार का, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणानंतर मुख्यमंत्री पुन्हा सक्रिय झाले असून हौसाबाईंना उद्या त्यांच्या पसंतीचा सक्षम बैल मिळणार आहे. पण या घटनेने प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर आणि जबाबदारीवर मोठे प्रश्नचिन्ह मात्र कायम ठेवले आहे....0
0
Report
Advertisement
बीड़ में त्रिकोणी प्रेम ने पति की हत्या, पत्नी ने प्रेमी के साथ रचा षड्यंत्र
Beed, Maharashtra:पती पत्नी और "वो".... बीडमेंत्रिकोणी प्रेमाचा रक्तरंजित अंत..! ANC - सात वर्षांपूर्वी प्रेमातून जुळलेले नाते... संसारात वाढत गेलेले वाद... आणि पतीच्या जिवलग मित्रासोबत जुळलेले अनैतिक संबंध... या सगळ्याचा शेवट झाला तो एका थरारक हत्याकांडात. बीड जिल्ह्यात पत्नीने प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या पतीची हत्या घडवून आणल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, हत्येनंतर अपघाताचा बनाव रचून गुन्हा दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांच्या कसून तपासामुळे या रक्तरंजित कटाचा पर्दाफाश झाला. पाहूयात, बीडमधील या त्रिकोणी प्रेमकहाणीचा थरारक शेवट...0
0
Report
रोहित पवार के आंदोलन को लेकर मंत्री गोरे ने कड़ा निशाना
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - आ. रोहित पवार यांचे आंदोलन म्हणजे केवळ राजकीय स्टंट, मंत्री जयकुमार गोरे यांची सडकून टीका जयकुमार गोरे, पालकमंत्री --- ऑन शिवसेना बैठक -- महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना निवडून आणण्याचा विडा आम्ही सर्वानी उचलला आहे आम्ही सर्व समन्वयाने कामे करतोय, काल महायुतीची आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांच्या उपस्थितीत बैठक झाली आम्ही सगळे एक मुखाने एक दिलाने राजेंद्र राऊत यांच्या पाठीशी आहोत महायुती व्यतिरिक्त देखील अनेक घटक आमच्याकडे सोबत आहेत त्यामुळे राजेंद्र राऊत विक्रमी मतांनी विजयी होतील ऑन शिवसेना नाराजी -- लोकशाही मध्ये ह्या गोष्टी होतं राहतात, समन्वय राहावा लागतो काही कटुता होती पण आता ती संपलेली आहे, आम्ही सगळे एकत्रित कामं करण्याचा निर्णय घेतलाय ऑन रोहित पवार आंदोलन --- अस आंदोलन करण्याची गरज काय होती? निव्वळ राजकीय आणि स्टंट.. मी काय तर करतोय हे दाखवण्यासाठी केलेली स्टँटबाजी आहे सरकारने राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केलीय, त्यामुळे शेतकरी सरकारचे धन्यवाद करतायत 30 जून आधी त्याची अंमलबजावणी होणार आहे, पण ते आमच्यामुळे झाली अस भासवण्यासाठी आंदोलन केलंय पात्र आणि अपात्र शेतकरी यांच्यात वाद लावून राजकीय पोळी भाजून घेणे यापेक्षा वेगळा विषय नाही शेतकरी सोडून आमच्यासाठी कुठलाच विषय महत्वाचं नाही शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची आमची भुनिका आहे कोणी पुतणा मावशीची प्रेम दाखववायची गरज नाही ऑन राष्ट्रवादी-कांग्रेस विलीनकरण --- कोणी कुठं विलीन व्हावं हे हा त्यांचा विषय आहे. त्या विषयावर बोलणार नाही ज्याने कुठं जायचं हा त्यांचा विषय, ज्यांना आमच्याकडे यायचं तो त्यांचा विषय.. ऑन संजय राऊत -- हे जर ठेवलेले असतील तर त्यांना कोणी ठेवलं हे देखील विचारा.. या पेक्षा अधिक मी काही बोलणार नाही ऑन आमदार संपर्क -- कोणी कोणाचं काम करावे हे त्यांचा विषय, गरज वाटली तर आमच्या उमेदवाराला पाठींबा द्या न्हणून मी ही विनंती करेन ऑन दिलीप सोपल -- सोपल साहेब आणि माझे समब्द चांगले, ते त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव वेगळे दाखवतात ते योग्य निर्णय घेतील, बार्शीतला आमदार होतोय यासाठी ते योग्य निर्णय घेतील सोपल यांच्याशी देखील माझं बोलणं झालं ऑन लातूर बैल --- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संवेदनशील व्यक्तिमत्व राज्याचा विकास करताना त्यांचं कणखर आणि शेतकऱ्यांसाठी मात्र संवेदनशील आहेत आजारी रुग्ण, आजारी बैल सर्वांसाठी मदतीची भूमिका घेतात या प्रकरणात नेमकं काय झालं याची माहिती घेऊ पण त्यांनी सदृढ बैल देण्याच्या सूचना केल्या होत्या बाईट : जयकुमार गोरे, पालकमंत्री0
0
Report
लातूर की 65 वर्षीय महिला कांधे पर बैल उठाकर खेती कर रही, बैल कुपोषित निकला
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज औत खांद्यावर घेऊन नांगरणी करणाऱ्या लातूरच्या महिलेस राज्य सरकारने मदत म्हणून दिलेला बैल निघाला ''कुपोषित''.... विज पडून बैल दगावल्यानंतर दुसऱ्या बैलासोबत स्वतः खांद्यावर जू घेऊन शेतीची मशागत करणाऱ्या देवणी तालुक्यातील बोंबळी येथील ६५ वर्षीय हौसाबाई गायकवाड यांच्या संघर्षाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले होते. त्यांच्या व्यथा थेट मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचल्यानंतर तातडीने पशुसंवर्धन विभागाला बैल उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. अवघ्या २४ तासांत हौसाबाईंच्या शेतात बैलही पोहोचला. मात्र, पशू विभागाकडून मिळालेला बैलच कुपोषित निघाला आहे. त्यामुळे मशागतीत त्याची मदत होण्यापेक्षा त्यांनाच बैलावर उपचार करण्याची वेळ आली आहे.0
0
Report
Advertisement
jaisa: हिंदी में शीर्षक: जालना ज्वारी कीमतreach 5400 रुपये/क्विंटल, आपूर्ति-डिमांड में उछाल
Jalna, Maharashtra:जालना : जालन्यात ज्वारीला 5 हजार 400 रुपयांचा बाजारभाव, मागणी वाढल्यानं भावात तेजी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत ज्वारीच्या दराने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. उच्च प्रतीच्या ज्वारीला प्रतिक्विंटल तब्बल ५ हजार ४०० रुपयांपर्यंत दर मिळत असून बाजार समितीच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वाधिक दर मानला जात आहे. विशेष म्हणजे मागील काही आठवड्यांपासून ज्वारीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने आवक कमी आणि मागणी अधिक असल्याने ही तेजी कायम आहे. sध्या खरीप हंगामातील पेरणीची लगबग सुरू झाली आहे. बियाणे-खते आणि मशागतीच्या खर्चासाठी रोख पैशांची गरज असल्याने अनेक शेतकरी साठवून ठेवलेली ज्वारी विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. मात्र, बाजारात येणाऱ्या ज्वारी पैकी उच्च प्रतीच्या मालाचे प्रमाण मर्यादित असल्याने व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा निर्माण होत आहे. जालना बाजार समितीत सध्या सर्व प्रकारच्या भुसार मालाची एकूण आवक आवक सुमारे ५ हजार ८७४ क्विंटल इतकी आहे. त्यामध्ये ज्वारीची आवक सुमारे ३ हजार क्विंटल असून गहू, हरभरा आणि सोयाबीनची त्याखालोखाल आहे. बाजारातील जाणकारांच्या मते, ज्वारीची आवक गेल्या काही दिवसांत कमी झाली आहे. त्याचवेळी खाद्य उद्योग, किरकोळ व्यापारी आणि ग्राहकांकडून मागणी वाढल्याने दराला आधार मिळत आहे. यंदा उच्च प्रतीच्या ज्वारीला मिळणारा दर गतवर्षीच्या तुलनेत अधिक आहे. मागील वर्षी ज्वारीचा कमाल दर सुमारे ५ हजार रुपये प्रतिक्विंटल होता. यंदा तो ५४०० रुपयांपर्यंत पोहोचल्याने शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल सुमारे ४०० रुपयांचा अतिरिक्त लाभमिळत आहे. सध्या बाजारात येणाऱ्या ज्वारीपैकी केवळ २० टक्के माल उच्च प्रतीचा असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. एकीकडे उच्च प्रतिच्या ज्वारीला स्थानिक पातळीवरून मागणी वाढली आहे. गुजरात आणि राजस्थान येथून मध्यम प्रकारच्या ज्वारीची मागणी नोंदवली जात आहे. तिकडे ही ज्वारी पेरणीसाठी वापरली जाते. जनावरांच्या चाऱ्यासाठी मध्यम प्रकारची ज्वारी बियाणे म्हणून वापरली जाते. त्यामुळे त्या ज्वारीलाही मागणी वाढली आहे. खरीप हंगाम यावर्षी लांबला आहे त्यामुळे पुढील काही दिवस पेरणीसाठीही ज्वारीची मागणी कायम असणार आहे..0
0
Report
किसानों की बदहाली के बीच कर्ज माफी पर राजनीति का खेल उजागर
Ratnagiri, Maharashtra:Chiplun - Ratnagiri विनायक राऊत राष्ट्रवादी विलीन.. (काँग्रेस) इंडिया पक्षाकडून खरा चेहरा देण्याची गरज..यासाठी काँग्रेसने पुढाकार घ्यायला हवा.. पण दुर्भागाने अद्यापही ते होत नाही.. त्यानुसार देशाच्या नेतृत्वात प्रगती होणार नाही.. आजीलाला दिलेला बैल (लातूर) अत्यंत भयानक दयनीय अशी अवस्था महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची झालेली आहे.. पिण्याच्या पाण्याचा दुर्भिक्ष शेती पूर्णतः सुकून गेलेली आहे अशा वेळेला गोरगरिबांना शेती करणे शेती नांगरणे हे कठीण झालेलं आहे.. अशा वेळेला शासनाने केलेली कर्जमाफी ही केवळ आणि केवळ शेतकऱ्यांना फसवणूक करणारी आहे शेतकऱ्याची दयनीय अवस्था खर्या अर्थाने लातूरमध्ये दिसून आलेले आहे.. निर्लज्ज शासनकर्त्यांना याची कळवळ येईल असं मला वाटत नाही.. भ्रष्टाचाराने दिलेला बैल हा बिचार्या आजीला न्याय देऊ शकणार नाही.. दुबाऱ पेरणी.. शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गांभीर्याने विचार करावा.. पाण्याचा दुष्काळ हे संकट याचा नियोजन करणे फार महत्त्वाचा आहे.. रवी राणांच्या या बकवास गिरीला आम्ही फार किंमत देत नाही.. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा विसर्जित करण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाने नक्कीच केला आहे.. गरज सरो आणि वैद्य मरो हे भाजपचे वैशिष्ट्य.. विसर्जित केल्यानंतर तोडमोड करून टाकायचं अशीच परिस्थिती एकनाथ शिंदेंच्या पक्षाची भविष्यात होणार आहे एकनाथ शिंदे आणि ठाकरे एकत्रित येणं.. ज्या ठाकरे घराण्याला संपवण्याचे पाप ज्या व्यक्तीने केलेला आहे..त्याच्याशी हात मिळवणे करण्याचं काम माननीय पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब करतील असं मला वाटत नाही.. मोदी वर्षपूर्ती पंडित जवाहरलाल नेहरूंनी प्रतिकूल परिस्थितीत देश उभा केला.. नरेंद्र मोदींना तयार केलेलं वैभव आयत मिळाल.. पक्षांतर मी आणि भास्कर जाधव आम्ही कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही प्रतिकूल परिस्थितीत जगण्याचे धैर्य माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आमच्यात निर्माण केलेल आहे.. आम्ही दोघे बाजारात विकले जाणार नाही.. किती आल्याने किती गेले तरी सुद्धा शिवसेना आमचा पक्ष वाढवण्याची ताकद आमच्या दोघांमध्ये आहे.. बालमा बालमा यांचे वैशिष्ट्य काय आहे हे सन्माननीय खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केलेला आहे.. राजन साळवी आम्हाला सातत्याने सांगायचे बाळमानींना घेऊ नका तरीसुद्धा आम्ही त्यांना घेतलं.. उदय सामंत..भाजप प्रवेश सरशी तिकडे पारशी.. सत्ता तिकडे माननीय उदय सामंत हे ठरलेला आहे.. शरद पवारांच्या आमदार संजय रावतांवर नाराज. संजय राऊत शरद पवारांचे निस्सीम भक्त आहेत.. शरद पवारांना खासदारकी मिळवण्यासाठी संजय राऊत यांची मोलाची भूमिका.. रोहित पवार आंदोलन.. देवेंद्र फडणवीस सरकारने केलेले शेतकऱ्यांचे कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसणारी आहेत.. आम्ही सुद्धा बुद्ध बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेनेचे शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा बुरखा पूर्णपणे फाडलेला आहे.. अजित पवार अपघात.. अजित पवारांच्या अपघाताचे कारण सरकारनं सर्वांसमोर आणणे गरजेचे आहे.. काही कपटी लोकांचा त्या अपघातामध्ये सहभाग आहे का याबद्दलची शंका वाढतच चाललेली आहे त्यांचं शंका निरसन करण्याची जबाबदारी सरकारचीच आहे तीही करत नाहीत याचा अर्थ रोहित पवार जे काही म्हणताय त्यामध्ये सत्य आहे असं लोकांचं समज आहे..0
0
Report
रोहित पवार के अन्नत्याग आंदोलन पर सदाभाऊ खोत की तीखी टिप्पणी
Sangli, Maharashtra:रोहित पवार के अन्नत्याग आंदोलन पर सदाभाऊ खोत की तीखी टिप्पणी. संपूर्ण शेतकरी कर्जमाफी करावी, या मागणीसाठी पंढरपूरमध्ये आमदार रोहित पवाराकडून आंदोलन सुरू करण्यात आले आहे, यावरून आमदार सदाभाऊ खोत यांनी रोहित पवारांवर टीका करत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आता नवीन भिडू आलाय याचा स्वागत आहे. पण त्याआधी राज्याचे खाजगी साखर कारखाने सहकारी करण्याची मागणी रोहित पवारांनी करावी, शेतकऱ्यांच्या FRP देण्याची मागणी करावी, आणि महाराष्ट्रातील जिल्हा बँक, सूतगिरण्या, दूध संघ कुणी खाऊन टाकल्या, हे पण रोहित पवारांनी सांगावं, असा टोला देखील आमदार सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे, ते सांगलीमध्ये बोलत होते.0
0
Report
Advertisement
सोलापुर के बार्शी तालुक्यात स्कूल के प्राचार्य समेत परिवार ने सामूहिक आत्महत्या
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापूरच्या बार्शी तालुक्यात मुख्याध्यापकासह कुटुंबाची सामूहिक आत्महत्या - सोलापूरच्या बार्शी तालुक्यात मुख्याध्यापकासह कुटुंबाची सामूहिक आत्महत्या - मुख्याध्यापकाने दोन मुले, पत्नीला संपवून स्वतः केली आत्महत्या - शेअर मार्केटमध्ये कोट्यवधीचे नुकसान झाल्याने उचलले टोकाचे पाऊल - मुख्याध्यापक योगेश पाटील, पत्नी माधुरी, मुले अथर्व आणि शिवांश अशी मृतांची नावे आहेत - बार्शी तालुक्यातील हत्तीज गावातील धक्कादायक घटना - योगेश पाटील हे नंदुरबार येथे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते - मात्र शेअर मार्केट मध्ये सातत्याने नुकसान होत गेल्याने त्यांना 1 कोटी 80 लाख रुपये कर्ज झाले. - या कर्जाच्या विवंचनेतूनच त्यांनी संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केली - घटनास्थळी पोलिसांना 22 पानांची सुसाईड नोट मिळाली आहे - या घटनेनंतर संपूर्ण बार्शी तालुक्यावर शोककळा पसरली आहे0
0
Report
Solapur Legislative Council Election: BJP Pulls Three Opposition MLAs into Its Fold
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात महायुतीचे पारडे झाले जड, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तीन आमदारांचा भाजप उमेदवाराला पाठिंबा ( PKG ) - सोलापूरचा गड महायुतीचा पारड जड - सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तब्बल तीन आमदार भाजपच्या गळीला - सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरेंनी विरोधकांचा केला करेक्ट कार्यक्रम - सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत भाजपने मोहिते पाटलांना पाडले एकाकी अभिषेक आदेप्पा, सोलापूर प्रतिनिधी0
0
Report
महाड़ में पानी संकट: मंत्री गोगावले की मदद से हर दिन 90 टैंकर पानी पहुंच रहा
Chendhare, Maharashtra:महाड़ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कोथुर्डे आणि कुर्ला धरणाच्या पाण्याने तळ गाठला असून महाडकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तहानलेल्या महाडकरांच्या मदतीला मंत्री भरत गोगावले धावले आहेत. गोगावले यांच्या माध्यमातून नडगाव गावाजवळील डोंगरात असलेल्या तलावातून हा पाणीपुरवठा केला जातोय. मागील 6 दिवसांपासून तब्बल 12 टँकरांच्या सहाय्याने या पाणी पुरवठ्याची व्यवस्था सुरु आहे; दररोज 90 टँकर पाणी महाड शहराला पुरवले जात आहे. भविष्यात नडगाव डोह आरक्षित करून महाड़चा पाणी प्रश्न मार्गी लावणार असल्याचं गोगावले यांनी सांगितलं.0
0
Report
Advertisement
