445001
शेतकरी न्याय यात्रेतून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाची पोलखोल करणार, आशिष खुलसंगे
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची शेतकरी न्याय यात्रा शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत आहे. शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने आणि अतिपावसामुळे नापिकीचे संकट उभे राहिले आहे. कोळसा खाणीमुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. पीक विमा मिळवण्यात अडचणी आहेत आणि पांदण रस्ते योजना रखडली आहे. सरकार 'लाडकी बहिण' योजनेचा प्रचार करत असताना, शेतकऱ्यांना दुसऱ्या हाताने लुटून उध्वस्त करत असल्याचा आरोप आशिष खुलसंगे यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
हिंगोली में मानसून पूर्व पावस ने केळी बागों को भारी नुकसान
Hingoli, Maharashtra:अँकर -हिंगोली जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसामुळे केळी उत्पादन शेतकऱ्यांच मोठ नुकसान झाल आहे हिंगोलीच्या वसमत कळमनुरी सेनगाव तालुक्यामध्ये केळीच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागामध्ये रात्री चक्रीवादळ मान्सूनपूर्व पावसाने थेमान घातल आहे हजारो हेक्टर वरील केळीच्या बागा आडव्या झाल्या आहेत त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत सापडला आहे सेनगाव तालुक्यातील चापडगाव परिसरातून नुकसानग्रस्त शेतीतून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी...0
0
Report
रायगड़ में रात्री दो मोटरसाइकिलें भिड़ीं, दोनों मृत; खालापूर पुलिस मामले की जांच में
Karjat, Maharashtra:रायगड अपघात चौक कर्जत रस्त्यावर बोरगाव जवळ दोन मोटरसायकल स्वरांचा मध्यरात्री अपघातात मृत्यू. दोन्ही मोटरसायकल भरधाव वेगाने समोरासमोर एकमेकांना धडकल्याने दोघांचा मृत्यू झाला. दोघांना जखमींना चौक ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले मात्र दोघांचाही मृत्यू झाला होता. यापैकी एका व्यक्तीचे नाव सिद्धार्थ जाधव असून रा. नेरळ, ता. कर्जत तर दुसऱ्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. खालापूर पोलीस पुढील तपास करत आहे. रात्री भरधाव वेगाने दुचाकी चालवणे दोघांच्या जीवावर बेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते.0
0
Report
पेण तालुक़े में पिसले हुए कुत्ते ने लोगों पर हमला किया, 10–15 घायल
Chendhare, Maharashtra:पेण तालुक्यात पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत अनेकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात बोरी-शिर्की परिसरातील सुमारे 10 ते 15 जण जखमी झाले असून त्यांच्यावर पेण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोळवे, बेनेघाट, बोरी, शिर्की, मसद आणि शिर्की चाळ या गावांमध्ये या कुत्र्याने नागरिकांवर हल्ले केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून प्रयत्न सुरू आहेत.0
0
Report
Advertisement
उदययनराजे भोसले ने शहापुर में अर्जुन जाधव के परिवार से मुलाकात कर संवेदना जताई
Satara, Maharashtra:कराड सातारा -जम्मूतील उरी येथे झालेल्या स्फोटात वीरमरण आलेले जवान अर्जून जाधव यांच्या कुटुंबीयांची खा .उदयनराजे भोसले यांनी भेट घेऊन सांत्वन केले. शहापूर येथील जाधव यांच्या घरी झालेल्या या भेटीदरम्यान उदयनराजे यांनी जवानांच्या 11 महिन्यांच्या बालकाला हातात घेतले असता बाळ रडू लागले. त्या क्षणी उदयनराजे भावुक झाले, तर कुटुंबीयांची नियतीपुढील हतबलता पाहून ते काही काळ निशब्द राहिले.जवान अर्जुन जाधव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या शहापूर गावात स्मारक उभारण्याचा मानस गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. या स्मारक उभारणीसाठी भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ तसेच छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.0
0
Report
यवतमाळ के महागाव में दगड़ी कोयला ट्रक पर आग, चालक सुरक्षित बाहर निकला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या महागाव तालुक्यातील हिवरा गावाजवळ दगडी कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रकला रात्रीच्या sुमारास आग लागली. धावत्या ट्रक मधून आगीचे लोळ बघताच ट्रक चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक थांबविला, व ते सुखरुप बाहेर पडले. आगीमुळे ट्रक व त्यातील कोळसा खाक झाला. घटनास्थळे स्थानिक नागरिक व अग्निशमन दल दाखल झाले, त्यानंतर आग विझविण्यात आली.0
0
Report
चेनुस्टा खेतशिवार में बिबट्या का डर, किसानों ने सुरक्षा उपाय मांगे
Amravati, Maharashtra:चेनुस्टा शेतशिवार बिबट्याचा वावर; पेरणीची वेळ असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती, बंदोबस्त करण्याची मागणी चेनुस्टा शेतशिवार परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतात बिबट्या पाहिल्याचा दावा केला असून त्याचे दृश्य मोबाईल कॅमेऱ्यातही कैद झाले आहेत. सध्या पेरणीचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांची शेतातील वर्दळ वाढली आहे. अशा परिस्थितीत बिबट्याच्या उपस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. वन विभागाने तातडीने परिसरात पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.0
0
Report
Advertisement
इंद्रायणी नदी में मृत मछलियों से देहू में हलचल; भक्तों में चिंता बढ़ी
Varsoli, Maharashtra:Anchor: संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना श्रीक्षेत्र देहू येथील इंद्रायणी नदीत हजारो मासे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नदीचे पाणी दूषित झाल्याचे चित्र निर्माण झाले असून लाखो वारकरी आणि भाविकांच्या आरोग्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे..अधिक मासामुळे देहूत भाविकांची मोठी गर्दी होत असतानाच नदीत मोठ्या प्रमाणात मृत मासे तरंगताना दिसत आहेत. काही मास्यांच्या अंगावर किडे आढळल्याने पाण्याच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून वारकरी आणि स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.. vo- नदी स्वच्छतेसाठी दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च केला जात असतानाही अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने स्वच्छता मोहिमांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबतही शंका व्यक्त केल्या जात आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत मृत मासे बाहेर काढून त्यांची विल्हेवाट लावली असली, तरी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हा विषय अत्यंत संवेदनशील बनला आहे.. vo- या मृत मासे घटनेची सखोल चौकशी करून प्रदूषणास जबाबदार घटकांवर कठोर कारवाई करावी, तसेच इंद्रायणी नदी स्वच्छ आणि सुरक्षित करण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी वारकरी, नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांकडून जोर धरू लागली आहे..0
0
Report
छत्रपती संभाजीनगर बैंक चुनाव: 17 जून को सभी अपीलों की सुनवाई, अंतिम तस्वीर साफ होगी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत अर्ज छाननीनंतर बाद ठरलेल्या उमेदवारांकडून अपील दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. आमदार संजना जाधव, आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार, प्रणिकेत पाटील, इंदुमती साहेबराव पाटील, सुवर्णा जाधव, मनीज राठोड, रितेश मुनीत, मनोज देशमुख आणि प्रदीप शिंदे यांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल झाले आहेत. सुवर्णा जाधव यांनी दोन अपील दाखल केल्याने एकूण अपीलांची संख्या दहावर पोहोचली आहे. अर्ज छाननी प्रक्रियेनंतर बाद ठरवण्यात आलेल्या उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाला आव्हान दिले असून, या सर्व अपीलांवर 17 जून रोजी एकाच दिवशी सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.0
0
Report
बार्शी बेलगांव में बिजली गिरने से कड़बा जलकर राख, लाखों का नुकसान
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - बार्शीतील बेलगाव मध्ये वीज कोसळून लाखो रुपयांचा कडबा जळून राख - बार्शी तालुक्यातील बेलगाव मध्ये काल सायंकाळी कोसळली वीज - शेतात ठेवलेल्या कडब्यावरच वीज पडल्याने जवळपास अडीच लाख रुपयांचे नुकसान - अग्निशामक दलाच्या मदतीने आग विझवण्यात यश मात्र कडबा पूर्णपणे जळून राख - अचानक आलेल्या अस्मानी संकटामुळे शेतकरी हतबल - कडबा नुकसानीचा पंचनामा करून सरकारने मदत करण्याची केली मागणी0
0
Report
Advertisement
अकोला भरचौक पर पुराने विवाद के चलते चार हल्लेखोरों ने अंकुश नंदागवळी की धारदार हथियार से हत्या
Akola, Maharashtra:अकोला शहरात भरचौकात झालेल्या निर्घृण हत्येच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून एका २४ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. अंकुश नंदागवळी असे मृत तरुणाचे नाव असून ही घटना काल रात्री नवीन तारफैल परिसरातील बागडे किराणा दुकानाजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश नंदागवळी हा परिसरात असताना तीन ते चार हल्लेखोरांनी त्याला गाठले. जुन्या वादाच्या कारणावरून झालेल्या वादानंतर आरोपींनी अंकुशवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. मानेवर, डोक्यात, छातीत आणि पोटात गंभीर वार झाल्याने अंकुश रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. हल्ला इतका bhiषण होता की त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. भरवस्तीत झालेल्या या हत्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही माहिती मिळताच रामदास पेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली असून पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. रामदास पेठ पोलीस पुढील तपास करीत आहेत.0
0
Report
शिरूर में बिबटिया ने मेढ़ों पर हमला; एक भेड़ मरी, नुकसान 15 हजार
Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यातील वाघाळे येथे बिबट्या ची दहशत कायम असून बिबट्या ने पप्पू कारकुड यांच्या मेंढ्यांच्या कळपावर मध्यरात्री हल्ला केलाय. या भीषण हल्ल्यात एक मेंढी जागीच ठार झाली असून, शेतकऱ्याचे अंदाजे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाने तात्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. तसेच वाढता वावर पाहता वन विभागाने परिसरात गस्त वाढवावी, अशीही मागणी होत आहे.0
0
Report
Air India ने सुबह की दिल्ली-संभाजीनगर-दिल्ली उड़ानों को जारी रखा, यात्रियों में राहत
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:दिल्ली-छत्रपती संभाजीनगर-दिल्ली ही सकाळची विमानसेवा बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर ६ दिवसांत एअर इंडियाने यू-टर्न घेत ही सेवा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. १ जुलैपासून नव्या उड्डाण क्रमांकांसह सकाळची दिल्ली विमानसेवा सुरू राहणार असल्याने प्रवासी, पर्यटकांमधून समाधान व्यक्त होत आहे. एअर इंडियाचे सकाळच्या वेळेतील दिल्ली संभाजीनगर दिल्ली विमानसेवा १ जुलैपासून तात्पुरती बंद होणार असल्याचे ६ जूनला स्पष्ट केले होते. त्यामुळे दिल्लीसाठी एका दिवसात ये-जा करणे अशक्य होते. याबाबत नागरिकांनी रोष व्यक्त केला होता त्यानंतर एअर इंडियानं तातडीने हा निर्णय घेतलायदरम्यान इंडिगोने काही सेवा बंद केलेल्या आहे त्यांनीही अशा पद्धतीने निर्णय मागे घ्यावा अशी मागणी होते आहे...0
0
Report
Advertisement
मराठवाडा में जून के बावजूद बैंकों ने केवल 14% फसल ऋण दिया
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्यात जून महिना उजाडल्यानंतरही बँकांकडून केवळ १४ टक्केच पीककर्ज वाटप झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत कर्ज वाटप ३ टक्के अधिक आहे नेहमीप्रमाणे गती संथच असल्याचे चित्र आहे, पेरणीच्या तोंडावर आता शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज वाटप करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधे होत आहे. मराठवाड्यात यावर्षी सुमारे ४९.३३ लाख हेक्टरवर खरीप पेरणीचा अंदाज है. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीनची २६.११ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज है. त्या पाठोपाठ १२.८० लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड होण्याचा अंदाज है. याशिवाय तूर, उडीद, मूग, बाजरीची सुमारे ४.३० लाख हेक्टरवर पेरणी र पेरणी होण्याचा अंदाज है. मका ३.५५ लाख हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज है...0
0
Report
मानसून के कारण संभाजीनगर के किसान और कृषि दुकानदारों पर संकट, खरीफ तैयारी डगमगा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरात मान्सूनने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांसह कृषी दुकानदारही संकटात सापडले आहेत. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी तयारी पूर्ण केली, तर दुकानदारांनी लाखो रुपयांचे बी-बियाणे, खते आणि औषधे साठवून ठेवली. मात्र पाऊस न पडल्याने पेरण्या खोळंबल्या असून खरेदीसाठी ग्राहकही फिरकत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांसह दुकानदारांचीही आर्थिक कोंडी वाढत आहे. आगामी 3 दिवस उष्णतेची लाट असण्याची शक्यता आहे 20 तारखे नंतर पाऊस येण्याची शक्यता आहे...0
0
Report
खेत की झोपड़ी में सुगंधित तंबाकू का बड़ा धंधा उजागर; 15.48 लाख का माल जब्त
Bhandara, Maharashtra:शेतातील झोपडीत सुरू होता सुगंधित तंबाखूचा गोरखधंदा... १५.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त गोंदिया जिल्ह्याच्या रावणवाडी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई करीत सुगंधित तंबाखूचे मोठे प्रकरण उघडकीस आणले. ढिमरटोला गावालगतच्या शेतातील एका घरावर टाकलेल्या धाडीत सुगंधित तंबाखू, खुली तंबाखू, पॅकिंगसाठीची यंत्रसामग्री आणि चारचाकी वाहनासह १५ लाख ४८ हजार १०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणात मयूर मनोहर वाकडे, रा. वघाडा, ता. आरमोरी, जि. गडचिरोली याच्यावर कारवाई करण्यात आली.0
0
Report
Advertisement
