icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

चंद्रपूर के अयान अजाणी ने CA फाउंडेशन में ऑल इंडिया रैंक द्वितीय पाया

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीचा अयान अजाणी सीए फाउंडेशन परीक्षेत ऑल इंडिया रँक द्वितीय स्थानी आला आहे. त्याच्या जिल्हाभरातून कौतुक होत आहे. त्याला 91.75 टक्के गुण मिळाले आहेत. दहावी आणि बारावीतही त्याने सर्वोत्तम गुण प्राप्त करून आपल्या प्रतिभेचा परिचय दिला होता. आता सीए फाउंडेशन मध्येही त्याने चमकदार कामगिरी केली आहे. कुठल्याही कोचिंग संस्थेच्या सहकार्याशिवाय स्व-अभ्यास, वेळेचे नियोजन आणि प्रत्येक विषयाची तयारी यासह अभ्यासातील सातत्य यामुळे त्याने हे यश पटकावले आहे. अयान याने आता सीए इंटरमिजिएटसाठी तयारी सुरू केली आहे. बाइट १) अयान अजाणी, यशस्वी विद्यार्थी
0
0
Report

सांगली जिला केंद्रीय बैंक भर्ती स्थगिती पर हाई कोर्ट में याचिका, नाईक ने कहा

Sangli, Maharashtra:जिल्हा बँकेच्या नोकर भरती स्थगिती विरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार - मानसिंगराव नाईक. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला सहकारी विभागाकडून देण्यात आलेल्या स्थगितीवर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून आक्षेप घेण्यात आले आहे. सहकार विभागाच्या स्थगिती विरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी स्पष्ट केलं आहे. बँकेचकडून होणारया 444 कनिष्ट लिपिक भरतीला सहकार विभागाकडून निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याचं कारण देत स्थगिती देण्यात आली आहे,मात्र कोणत्या कायदेशीर तरतुदीनुसार नोकर भरती थांबवण्यात आली याचा स्पष्ट उल्लेख नसल्याने,सहकार विभागाच्या नोकर भरती स्थगिती आदेशा विरोधात उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडे दाद मागण्यात येणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी स्पष्ट केले आहे.
0
0
Report
Advertisement

इंडिया आघाडी के पत्र से लोकतंत्र बचाने की मांग

Nagpur, Maharashtra:नागपूर - नाना पटोले,काँग्रेस नेते - On इंडिया आघाडीकडून सरन्यायाधीश पत्र - आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत असेल लोकांच्या मतांनी सरकार आलं पाहिजे आणि लोकनियुक्त सरकार आला पाहिजे असं आपल्या संविधानातील मूळ गाभा आहे - सन 2014 च्या नंतरच्या निवडणुका पाहिल्या तर मुख्य निवडणूक आयुक्त असेल किंवा पूर्ण यंत्रणा असेल, ईव्हीएम मशीनला हॅक करून निवडणुका जिंकतात हे सांगण्याची गरज नाही, हा काही आरोप नाही ही वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे - देशातील सरकार असो किंवा राज्यातील भाजपच्या सरकार असो या सरकारचा लोकांशी वागणूक यातून स्पष्ट होतात, सरकार यांना घाबरत नाही, लोकशाहीत जनता ही राजा असते - मात्र सरकार लोकांना घाबरवत आहे, दूध का दूध पाणी का पाणी व्हावा म्हणून इंडिया आघाडीकडून देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांना पत्र लिहिलाय की आपण हस्तक्षेप करा - या पद्धतीला आळा घालून देशाची लोकशाही वाचवा अशा पद्धतीचे पत्र इंडिया आघाडीने सरन्यायाधीश यांना लिहिलेलं आहे आणि याच्यातील वास्तविकता जनतेसमोर आली आहे - On कर्जमाफी निर्णय तारीख पुढे - - हे सरकार खोटारडे सरकार आहे, शेतकऱ्यांचे सर्रास फसवणूक करत आहे, लाडक्या बहिणी सारखा शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे,काम करणाऱ्या महिलांनाही शेतकरी म्हणून घोषित केल्याचा सरकारने सांगितलं - अर्धा एकर जमीन असलेल्या आपण शेतकरी मानतो, भूमिहीन शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे, कर्जमाफीसाठी अटी आणि शर्ती काय, राज्यातील केवळ 25 टक्के शेतकऱ्यांचा कर्ज माफ करायचा आणि इतरांच्या तोंडाला पाने पुसायचं अशा प्रकारचे सरकारचे कृती पुढे आली आहे - कंत्राटदारांचे 90 हजार कोटी थकबाकी आहे, 55 टक्के कमिशन या लोकांना द्यावा लागतो, भ्रष्ट व्यवस्था राज्याची तिजोरी लुटण्याची व्यवस्था आता आपण महाराष्ट्रात पाहतो आहे - शेतकऱ्यांचा तात्पुरता कर्ज माफ करता येतंका, एक लाखाचा कर्ज असेल तर पहिले ते कर्ज भरावे लागेल नाहीतर कर्जमाफी मिळणार नाही, शेतकऱ्यांचा फसवणूक करणारा हे सरकार आहे - On अमित साटम ---मिसिंग लिंक - - कोल्हापूरात झालेल्या अधिवेशनात कंत्राटदारांनी 95 टक्के कमिशन द्यावे लागतात असं म्हटलं होतं, सरकारचा पितळ उघड झालेला आहे सरकार जवळ पैसेच नाही राज्याला कंगाल करून टाकला आहे, 89 हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या - - लुटपातचे सरकार, 55% कमिशन खाणारे सरकार आहे - On राम मंदिर - - हिंदूंच्या श्रद्धा आणि आस्थेवर आरएसएस, भाजपने धक्का लावलेला आहे, आता साधुसंत बोलायला लागले, आरटीआयच्या बाहेर ठेवणारे मोदी, झेंडा फडकवायचा असेल तर मोदी, माणसं ठेवणारे नरेंद्र मोदी - - सीसीटीव्ही मध्ये 40 दिवसांत 70 वेळा चोरी करताना आपण पाहतो आहे, अयोध्येत जमीन घोटाळा आहे,माहितीच्या अधिकारात माहिती द्यायला तयार नाही, एसआयटी केवळ त्यांच्या सरकारची लाज वाचवण्यासाठी तयार झाले आहे - - केंद्र आणि राज्य सरकार आणि आरएसएस त्यासाठी जबाबदार आहे कारण ते त्यात होते, आता लुटीचेही श्रेय त्यांनी घ्यायला पाहिजे, जेव्हा शीळेसाठी पैसे गोळा केले होते ते पैसे कुठे गेले त्यांची माहिती नाही - - भाजपच्या लोकांना हिंदूंच्या मंदिरांपासून दूर केला पाहिजे कारण हे मंदिरांना लुटणारी टोळी आहे - On फुके - - त्यांचा राज्य पातळीवर जन्म नशिबामुळे झाला आम्ही निमित्त मात्र होतो, आमच्या धक्क्याने आणि नशिबाने ते आमदार झाले, त्यांनी चांगलं काम करावे आता त्याचे बोलत असतील त्यांच्या पक्षाचा मत आहे, ज्यांना आपण पुढे केलं असेल आणि सगळं चांगलंच व्हावं अशी आमची अपेक्षा आहे
0
0
Report

भीषण बारिश से मलंगगड चक्कीनाका क्षेत्र जलमय, कल्याण-डोंबिवली मार्ग पर यातायात बाधित

Kalyan, Maharashtra:कल्याण श्री मलंगगड चक्कीनाका मार्ग जलमय. कल्याण डोंबिवलीत दोन तासापासून मुसळधार पावसामुळे श्री मलंगगड कडून कल्याणकडे येणारा मार्गावरील चक्कीनाका परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. चेतना स्कूल परिसरात गुडघाभर पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याखालून मार्ग काढत दुचाकी, रिक्षा आणि चारचाकी वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. साचलेल्या पाण्यामुळे अनेक वाहनचालक पर्यायी मार्गांचा वापर करत असून काही ठिकाणी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास या मार्गावरील परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
0
0
Report
Advertisement

मानसून सक्रिय, कोल्हापुर धामोड़ में छात्रों ने खेत बीच शिवार क्लास का अभ्यास किया

Kolhapur, Maharashtra:राज्यभरात मान्सून सक्रिय झालेल्या असून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अशा वातावरणात राधानगरी तालुक्यातील धामोड येथील कोते माध्यमिक विद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी एक अनोखा आणि अनुभवाधारित शैक्षणिक उपक्रम राबवला. वर्गखोलीत नव्हे, तर थेट शेताच्या बांधावर विद्यार्थ्यांचा ‘शिवार वर्ग’ भरवण्यात आला. बळीराजाच्या सोबतीने विद्यार्थ्यांनी चिखलात उतरून भात शेतीतील तरवा काढणी आणि रोपलावणीची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके केली. डोक्यावर कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, पायाखाली मऊ चिखल आणि आजूबाजूला हिरवागार निसर्ग अशा उत्साही वातावरणात विद्यार्थ्यांनी शेतीची कामे प्रत्यक्ष अनुभवली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ शेतीची माहिती मिळाली नाही, तर अन्नदात्या शेतकऱ्याच्या कष्टांचीही जाणीव झाली. आधुनिक शिक्षणासोबतच पारंपरिक शेतीचे महत्त्व समजून घेण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होत आहे. सर्वच शाळांनी अशा प्रकारचे शिवार शिक्षण राबविल्यास विद्यार्थ्यांना निसर्ग, शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनाशी अधिक जवळून परिचित होण्याची संधी मिळू शकते.
0
0
Report

वाशीम में खाद्य सुरक्षा विभाग ने होटल्स पर कार्रवाई, तीन होटलों की चेकिंग में उल्लंघन पाया

Washim, Maharashtra:वाशीममध्ये अन्न सुरक्षा विभागाकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेलांवर धडक कारवाई केली आहे.शहरातील तीन हॉटेलांची तपासणी करण्यात आली.अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने साई ढाबा चा परवाना तातडीने निलंबित करण्यात आला,तर हॉटेल गणेश आणि हॉटेल चिंतामणी यांना त्रुटी दूर करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.अन्न व औषध प्रशासनाच्या विशेष तपासणी मोहिमेत ही कारवाई करण्यात आली. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड सहन केली जाणार नसून,नियमांचे पालन न करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येईल,असा इशारा अन्न सुरक्षा प्रशासनाने दिला आहे.
0
0
Report

नागपूर नगरपालिका ने संपत्ति कर बकायेदारों के खिलाफ सख्त कार्रवाई का बड़ा फैसला

Nagpur, Maharashtra:नागपूर नागपूर महापालिकेने मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाईचा निर्णय. वाणिज्यिक मालमत्ताधारकांनी थकीत कर न भरल्यास महापालिकेच्या सुविधा बंद करण्यात येणार. जीएसटी विभागाच्या मदतीने संबंधितांची बँक खात्यांची माहिती घेऊन खाते गोठवण्याची कारवाई. १० जुलै ते १५ ऑगस्टदरम्यान विशेष मालमत्ता कर वसुली मोहीम राबवली जाणार आहे. कर देयके वितरित करण्यासाठी महिला बचत गटांची नियुक्ती करण्यात येणार. सफाई कामात निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर थेट कारवाईचा इशारा. उपद्रव शोध पथकात मनुष्यबळ वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशुद्ध पाणी, खोदकामाची दुरुस्ती आणि नाले-नद्यांमध्ये कचरा टाकू नये यासाठी जनजागृतीवरही भर .
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी-कोल्हापुर अम्बा घाट में दराड़ गिर, भारी बारिश से यातायात प्रभावित

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी-कोल्हापूर आंबा घाटात पुन्हा दरड कोसळली.. मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्स्कळीत, प्रशासन अलर्ट मोडवर!.. रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील प्रसिद्ध आंबा घाटातून प्रवाशांसाठी एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे. आंबा घाटात पुन्हा एकदा गणेश मंदिराजवळ दरड कोसळल्याची घटना घडली आहे.. घाट माथ्यावर सध्या पावसाचा जोर प्रचंड वाढला असून, सतत कोसळणाऱ्या या मुसळधार पावसामुळे घाट मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठ्या दगडी आणि ढिगारे रस्त्यावर आले आहेत.. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव कमालीचा धोक्यात आला आहे.. घटनचे गांभीर्य ओळखून स्थानिक प्रशासन तातडीने अलर्ट मोडवर आले असून, दरडी हटवण्याचे आणि वाहतूक सुरळीत करण्याच्या प्रयत्न युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.. प्रवाशांनी सध्या या मार्गावरून प्रवास करताना अत्यंत काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे..
0
0
Report

शिराळा तालुक्य में विद्यार्थियों ने 22 हजार पौधे रोपण किया—पर्यावरण की मिसाल

Sangli, Maharashtra:सांगलीच्या शिराळा तालुक्यात पर्यावरण रक्षण वृक्ष संवर्धन संदेश घेऊन विद्यार्थ्यांकडून तब्बल 22 हजार वृक्ष बियांचे रोपण करण्यात आले आहे.आरळा, कोकरूड,भाष्टेवाडी डोंगर व विद्यालय परीसरात विद्यार्थी व शिक्षकांकडून बियांचे रोपण करण्यात आला आहे.उन्हाळ्याच्या सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांकडून बियांचे संकलन करण्यात आले होते,ज्यामध्ये आंबा,फणस, जांभुळ,करंज व इतर बियांचा समावेश होता.आरळा येथील गांधी सेवाधाम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडुन हा उपक्रम राबवण्यात आला आहे.
0
0
Report

गडचिरोली में स्मार्ट मीटर मुद्दे पर कांग्रेस का आक्रामक प्रदर्शन, महावितरण कार्यालय घेराव

Chandrapur, Maharashtra:टायटल:---स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर गडचिरोली काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढत स्मार्ट मीटर धोरणाविरोधात घोषणाबाजी गडचिरोलीत स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. चामोर्शीतील महावितरण कार्यालयावर काँग्रेसने धडक मोर्चा काढत सरकारच्या स्मार्ट मीटर धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ रद्द करावी, वाढती वीजबिले कमी करावीत आणि वीज ग्राहकांवरील अन्याय थांबवावा, या प्रमुख मागण्यांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयाला घेराव घातला. सरकारने स्मार्ट मीटर लादण्याचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला. दरम्यान, काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
0
0
Report
Advertisement

नागपूर विभाग में बारिश से खरीफ पेरणी तेज, 29% क्षेत्र पर पेरणी पूरी

Nagpur, Maharashtra:- नागपूर - जून महिनाभर दडी मारल्यानंतर नागपूर विभागात गेल्या तीन दिवसांपासून समाधानकारक पाऊस. - पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा; खरीप पेरणीच्या कामांना वेग. - नागपूर विभागात आतापर्यंत सरासरी १६५.७ मि.मी. पावसाची नोंद. - वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक १९४.५ मि.मी., तर नागपूरमध्ये १७१.४ मि.मी. पावस. - विभागात आतापर्यंत २७ टक्के क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण. - यंदा खरीपासाठी १८.९५ लाख हेक्टर क्षेत्राचे नियोजन; ५.१६ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी. - वर्ध्यात ४५%, चंद्रपुरात ४०% आणि नागपुरात २९% पेरणी पूर्ण. - पुढील काही दिवसांत पाऊस कायम राहिल्यास पेरणीचा वेग आणखी वाढण्याची शक्यता.
0
0
Report

अमरावती के मोर्शी में बुस्टर सोयाबीन बियाणे नहीं उगे, किसान मुआवजे और मुफ्त बीज मांग

Amravati, Maharashtra:अमरावतीच्या मोर्शीत बुस्टर कंपनीच्या हुतूतू सोयाबीन बियाण्याची उगवण न झाल्याने शेतकरी संकटात; दुबार पेरणीचे संकट, शेतकरी आर्थिक संकटात अँकर :- अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात बुस्टर कंपनीच्या हुतूतू सोयाबीन बियाण्याची उगवण न झाल्याचा शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचा आरोप केला आहे. पेरणीनंतर 10 दिवसांहून अधिक कालावधी लोटूनही अनेक शेतांमध्ये सोयाबीनची उगवण झाली नसल्याने शेतकरी संकटात सापडला असून निकृष्ट बियाण्यांमुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. कृषी अधिकाऱ्यांनी लाडकी, कशीमपूर आणि खोपडा परिसरातील शेतांची प्रत्यक्ष पाहणी केली असून बुस्टर कंपनी, वितरक आणि विक्रेत्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत, नुकसानभरपाई आणि दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे。
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top