Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

शेतकरी न्याय यात्रेतून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाची पोलखोल करणार, आशिष खुलसंगे

Aug 21, 2024 07:24:58
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची शेतकरी न्याय यात्रा शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत आहे. शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने आणि अतिपावसामुळे नापिकीचे संकट उभे राहिले आहे. कोळसा खाणीमुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. पीक विमा मिळवण्यात अडचणी आहेत आणि पांदण रस्ते योजना रखडली आहे. सरकार 'लाडकी बहिण' योजनेचा प्रचार करत असताना, शेतकऱ्यांना दुसऱ्या हाताने लुटून उध्वस्त करत असल्याचा आरोप आशिष खुलसंगे यांनी केला आहे.

1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Sept 17, 2025 16:50:37
Jalna, Maharashtra: FEED NAME | 1709ZT_JALNA_FARMER_FIR(5 FILES) छत्रपती संभाजीनगर :ब्रेकिंग :पैठणच्या संजय कोहकडे आत्महत्या प्रकरणी कोहकडे यांचे नातेवाईक आक्रमक नातेवाईकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या महसूल अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यासमोरून हलणार नसल्याचा नातेवाईकांनी घेतला पवित्रा अँकर : छत्रपती संभाजीनगरमधील पैठणच्या खादगाव येथील संजय कोहकडे या शेतकऱ्याने पंचनामा करण्यासाठी आलेल्या तलाठी मंडळाधिकारी यांच्या समोरच विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादाय घटना उघडकीस आली आहे. आता या प्रकरणात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास नकार दिला जात असल्याचा आरोप शेतकऱ्याच्या नातेवाईकांकडून केला जात आहे.शेतकरी आत्महत्या प्रकरणी तलाठी मंडळ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी कोहकडे यांच्या नातेवाईकांनी यांनी काल आंदोलन केलं होतं.पाचोड पोलिसांनी मध्यस्ती करून संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात येईल हे आश्वासन दिल्यानंतर संजय कोहकडे यांच्या नातेवाईकाने मृतदेहावर रात्री अंत्यसंस्कार केले.परंतु ,आज पाचोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता, पाचोड पोलिसांकडून जबाब नोंदवून घेण्यात आला, परंतु गुन्हा दाखल करण्यासाठी नकार देण्यात आल्याचा आरोप होत आहे.या प्रकरणात चौकशी सुरू आहे, त्यामुळे चौकशी पूर्ण झाल्यावर गुन्हा दाखल केला जाईल असं पाचोड पोलिसांकडून सांगण्यात आले आहे,पाचोड पोलिसांकडून तलाठी आणि महसूल अधिकाऱ्यांचे गुन्ह्यांमध्ये नाव घेण्यासाठी पोलिसांकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप नातवाईकांनी केला आहे. यामुळे संजय कोहोकडे यांचे नातेवाईक संतप्त झाल्याच्या पाहायला मिळाले, पाचोड पोलीस ठाण्यासमोर त्यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे.जोपर्यंत गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यामधून जाणार नाही अशी भूमिका संजय कोहकडे या नातेवाईकांनी घेतलीय,
5
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 17, 2025 16:46:31
kolhapur, Maharashtra:2c ला व्हिडिओ जोडले आहे --------- नागपूर अकरा वर्षीय मुलाचे अपहरण करून निर्घृण हत्या – तिघांना अटक.... अकरा वर्षीय मुलाचे अपहरण करुन निर्घृण हत्या तिघांना अटक, खंडणीसाठी मागण्यांसाठी केले होते अपहरण... प खापरखेडा परिसरातील चनकापूर येथे बुधवारी सकाळी ११ वर्षीय विद्यार्थ्याच्या हत्येची धक्कादायक घटना उघडकीस आली. जितू युवराज सोनेकर (वय ११) मुलांचं नाव आहेय...जितू हा शंकरराव चव्हाण विद्यालयाचा सहाव्या वर्गात शिकत होता... १५ सप्टेंबर रोजी शाळेसाठी घरून गेला, मात्र शाळा सुटल्यानंतर घरी परतला नाही. मित्रांनी जितूला कारमध्ये बसल्याचे सांगितलं... कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दिली...पोलिसानी शोध घेतला मात्र थांगपत्ता लागलाच नाही... अखेर आज चनकापूर येथील डब्ल्यूसीएल कॉलनीलगतच्या शिवारात गुराख्याला लहान मुलांचा शाळेच्या गणेश घातलेला लहान मुलांचा मृतदेह झुडपात दिसून आला. लागलीच घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने पाहणी केली. पोलिसांचा प्रथमिक गळा आवळून हत्या केल्याच लक्षात आलं.. यात जीतूचे वडील यांना शेत विकल्याचे पैसे मिळणार असल्याची माहिती शेजारी राहणाऱ्या आरोपीला होती... आरोपी राहुल पाल, अरुण भारती आणि यश वर्मा (तिघेही रा. चनकापूर) यांना पोलिसांनी अटक केलीय. यात अपहरण करून वडिलांना खंडणी मागण्याचा तयारीत होते, मात्र अपहरण केल्यानंतर मुलाने प्रश्न विचारू लागल्याने त्यांनी त्याची गळा आवळून हत्या केली... दोन दिवस मृतदेह लपवून ठेवत प्रकरण तापसळत असल्यानं अखेर मृतदेह झुडपात फेकला...पोलिसांनी तिघांना अटक केली. ------ बाईट - निकेतन कदम, पोलीस उपायुक्त, नागपूर
3
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 17, 2025 16:30:47
Parbhani, Maharashtra:अँकर- मराठा,ओबीसी,बंजारा,आदिवासी,धनगर समाजाकडून होत असलेल्या आरक्षणाच्या मागणीवरून समाज एक मेकासमोर उभे ठाकत आहेत, यामुळे जाती जातीमध्ये ताण तणाव निर्माण होऊन एकमेकांची मन कलुषित होत आहेत. रोज काही नेते समाजावर भाष्य करीत असल्याने संबंध ताणले गेले असल्याचे वाटत असतांना गावगाड्यात मात्र आज ही जाती पातीची घडी भक्कम बसलेली असल्याची घटना समोर आली आहे. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील शंकर सखाराम पुंडगे यांचे आज निधन झाले होते. गावात अंत्यसंस्कार करायला बौध्द समाजाची स्मशानभूमी आहे. मात्र तेथे शेड नसल्यामुळे भर पावसात अंत्यविधी कसा करणार असा प्रश्न पुंडगे कुटूंबीय आणि नातेवाईकांना पडला होता. दिवसभर पाऊस थांबायला तयार होईना. ही बाब गावातील हिंदू समाजाच्या लक्षात येताच गावात असलेल्या हिंदू स्मशानभूमीतसदर अंत्यविधी करण्यासाठी गावातील नागरीकांनी पुढाकार घेताला आणि बौध्द समाजाच्या प्रेतावर हींदू स्मशानात अंत्यविधी करण्यात आला. कुणी किती ही जाती पातीचे राजकारण केले,तरी गावगाड्यात बसलेली वीण विस्कटवली जाणार नाही हेच या घटनेतून दिसून येतंय...
2
comment0
Report
Sept 17, 2025 16:14:24
3
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 17, 2025 15:03:00
Gadchiroli, Maharashtra:Feed slug :--- 1709ZT_GAD_NAX_IDENTIFY ( single file sent on 2C)  टायटल:-- गडचिरोली पोलीस - सिआरपीएफ आणि नक्षल यांच्यात झालेल्या चकमकीत दोन जहाल महिला नक्षल्याना कंठस्नान घालण्यात पोलीस दलाला यश, एक कमांडर आणि एक एसीएम दर्जाच्या वरीष्ठ महिला नक्षल्याची ओळख पटली, महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे जाहिर केले होते एकूण 14 लाख रुपयांचे बक्षिस, घटनास्थळावरुन 01 एके-47 रायफल व 01 पिस्तूल अशा 02 अग्निशस्त्रांसह मोठ्याप्रमाणावर दारुगोळा व नक्षक साहित्य जप्त      अँकर:-- गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील पोलीस ठाणे  गट्टा (जां.) हद्दीतील  मोडस्के जंगल परिसरात विध्वंसक कारवाया करुन घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने गडचिरोली विभागातील गट्टा दलमचे काही नक्षली एकत्र येऊन दबा धरुन बसले आहेत अशी गोपनीय माहिती मिळाली होती. घेराव घातल्यावर जवान- नक्षली यांच्यात चकमक झाली. पोलीसांचा वाढता दबाव पाहून नक्षली घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळून गेले. चकमकीनंतर  जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता, घटनास्थळावर 02 जहाल महिला नक्षल्यांचे मृतदेह आढळून आले. दोन्ही मृतक महिला नक्षल्याची ओळख पटली आहे. 1) सुमित्रा ऊर्फ सुनिता वेलादी, वय 38 वर्षे, रा. मडवेली ता. अहेरी, जि. गडचिरोली गट्टा दलम कमांडर बक्षिस - 08 लाख रु. चकमक – 14 खून – 12 जाळपोळ – 03 इतर – 02 एकुण – 31 2) ललीता ऊर्फ लड्डो ऊर्फ संध्या कोरसा,  वय 34 वर्षे,  रा. नेलटोला, ता. पाखांजूर, जि. कांकेर (छ.ग.)  गट्टा दलम एसीएम बक्षिस - 06 लाख रु. चकमक – 08 खून – 04 जाळपोळ – 01 इतर – 01 एकुण – 14 • जप्त अग्निशस्त्रे व साहित्य 1) AK- 47 रायफल – 01 2) पिस्तूल  - 01 3) जिवंत काडतूस -  37 4) वॉकी टॉकी -  02   मृत महिला नक्षली ललीता ऊर्फ लड्डो ऊर्फ संध्या कोरसा, वय 34 वर्षे, रा. नेलटोला, ता. पाखांजूर, जि. कांकेर (छ.ग.) ही गट्टा दलम डिव्हीसीएम राजु वेलादी ऊर्फ कलमसाय याची पत्नी होती.  सन 2021 पासून गेल्या आजपावेतो गडचिरोली पोलीसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे 93 कट्टर नक्षल्याना कंठस्नान घालण्यात आले असून, 130 नक्षल्याना अटक करण्यात आली आहे. 75 नक्षल्यानी गडचिरोली पोलीसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.  या भागात नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्यात आले असून पून्हा एकदा सर्व नक्षल्याना हत्यार ठेवून आत्मसमर्पण करुन मुख्य धारेमध्ये प्रवेश करण्यासाठी आवाहन केले आहे. बाईट १) निलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली आशीष अम्बाडे झी मीडिया गडचिरोली
5
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 17, 2025 14:31:58
4
comment0
Report
SGSagar Gaikwad
Sept 17, 2025 14:20:30
3
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 17, 2025 14:20:22
Pandharpur, Maharashtra:17092025 Slug - PPR_SINA_DRONE file.02 ---- Anchor - धाराशिव जिल्ह्यातील सीना कोळेगाव धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर सीना नदी सोलापूर आणि धाराशिव च्या जिल्हा हद्दीतून दुथडी भरून वाहत आहे.माढा तालुक्यातील सीना नदी काठच्या वाकाव गावाला पुर्ण पाण्याने वेढा दिला आहे सीना नदी काठी निर्माण झालेल्या परिस्थितीची खास ड्रोन दृश्य चित्रित करण्यात आली आहेत. वाकाव मधील प्रा शिवाजी सावंत यांची शेती सीना नदीच्या पाण्यात बुडाली असून. त्यांच्या घराला पाण्याचा वेढा पडला आहे सीना नदी काठच्या केवड,उंदरगाव,सह ८ ते १० गावांना पुराचा वेढा-गावाला पाण्याने वेढल्याने गावांचा संपर्क तुटला .परांडा तालुक्यातील कोळेगाव धरण ओव्हरफ्लो झाल्याने माढा तालुक्यातील सीना नदी भागातील वाकाव,केवड,उंदरगाव,सह ८ ते १० गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातला असून गावात पाणी शिरल्याने गावाचा संपर्क तुटला आहे.कोळेगाव धरणा मधून ५२ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तुळजापूर ला जाणार्या माढा- वैराग मार्गावरील सीना नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने वाहतुक बंद झाली आहे. (# ड्रोन सौजन्य-बाळकृष्ण क्रिएशन माढा #)
7
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 17, 2025 14:20:08
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1709ZT_CHP_GAS_LEAK ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर शहरातील रहेमतनगर येथील मनपाच्या मलनिस्सारण संयंत्रात मोठी क्लोरीन गॅस गळती, 30 घरातील नागरिकांना हलविले, अधिकाऱ्यांचे पथक पोचले घटनास्थळी, परिसरातील नागरिकांत घबराट, मनपा प्रशासनाविरोधात संताप अँकर:--चंद्रपूर शहरातील रहमतनगर भागात इरई नदीच्या पात्रात असलेल्या महानगरपालिकेच्या सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट मधून क्लोरीन गॅस गळतीने खळबळ उडाली आहे. प्लांट च्या जवळपास असलेल्या लोकांना डोळे आणि घशात जळजळ जाणवत आहे. यासह डोकेदुखी आणि उलटी चा त्रास दिसून येत आहे. 25 ते 30 घरातील लोकांना ताबडतोब सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून क्लोरीन गॅस गळती सुरू असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. मात्र आज संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात क्लोरीन गॅसची गळती सुरू झाल्याचे स्थानिकांचे मत आहे. त्यामुळे परिसरात एकच घबराट पसरली असून लोकांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली आहे. घटनेची माहिती कळताच जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, महानगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून क्लोरीन गॅस ची गळती थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी मनपा विरोधात संताप व्यक्त केला आहे. बाईट १,)२) स्थानिक रहिवासी आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
3
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 17, 2025 14:19:34
Parbhani, Maharashtra:हाके बाईट पॉईन्टर - यापुढे ओबीसींनी ओबीसींनाच मतदान करायचे,एस्सी एसएसटीला मतदान करून, वेळ पडली तर मुस्लिमांना मदत करू पण ओबीसी आरक्षणा बद्दल बोलत नाहीत,त्यांना धडा शिकवू- तुम्ही आहेत किती,आम्ही आहेत किती,आम्ही बोललो गर तुंचबकाय होईल, आता आम्ही ऐकून घेणार नाही, दांडके नाहीत कोयते काढू म्हणत हाके यांनी हाबुक ढोकले... आता जाती जातींची युती होईल,ओबीसींनी फक्त ओबीसींच्याच उमेदवाराला मतदान करायची आहेत,मराठ्यांना नाही,आदिवासी एससी एसटी च्या बंधूंना घेऊन यापुढे आम्ही लढाई लढणार आहोत, ओबीसी एस्सी एसटीला मतदान करेल विरोधक टार्गेट -सत्ताधारी -मुख्यमंत्र्यांबद्दल सहानुभूती का- आम्ही जीआर फाडलाय, जीआर फाडन हे काय सोप्पी गोष्ट आहे का,कुणी म्हणतय मी मुख्यमंत्र्या विरोधातच बोलतो,कुणी म्हणतय मी वडेट्टीवारांचा माणूस आहे,,मुख्यमंत्री 14 कोटी जनतेचे आहेत,त्यांची डीगनिटी संभाळण्याची जबाबदारी आमची आहे,मुख्यमंत्र्यांच्या विरोधातच मोर्चे आहेत ना,त्यामुळे त्यांच्या बाजूने जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, ओबीसींच्या मतांवर डोळा ठेऊन जे आमदार खासदार झालेत,ज्यांनी कारखाने उभे केले,त्या पवार,मोहिते देशमुख ओबीसींच्या आरक्षणावर बोलायला तयार नाहीत,त्या पवार,मोहिते देशमुखांना घडी बसविल्याशिवाय राहणार नाहीत, On ओबीसी उपसमिती ओबीसी उपसमितीने काही तरी ठोस केलं पाहिजेत,आम्ही आता इतर काही मागत नाही,तर कुणबी नोंदी आणि जीआर रद्द करण्याची मागणी आहे,नाहीतर ओबीसींच्या रोषाला सामोरे जा अशी आमची ओबीसी उपसमितीकडे मागणी आहे, मराठा विरुद्ध इतर अशी निवडणूक लढणार आता जाती जातींची युती होईल,ओबीसींनी फक्त ओबीसींच्याच उमेदवाराला मतदान करायची आहेत,मराठ्यांना नाही,आदिवासी एससी एसटी च्या बंधूंना घेऊन यापुढे आम्ही लढाई लढणार आहोत, ओबीसी एस्सी एसटीला मतदान करेल हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाजाचे आरक्षण मिळाले पाहिजेत, पण जाती जातीच्या ढो ....ला गुळ लावला जातोय,तो गूळ कुणालाच खाता येणार नाही,
11
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 17, 2025 14:19:16
Ambernath, Maharashtra:उल्हासनगर मधील रस्त्यांना स्विमिंग पूलचं स्वरूप मनसेचं खड्ड्यात स्विमिंग करत केलं अनोखं आंदोलन  Ulh mns agitaion Anchor उल्हासनगर शहरातील रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली असून या रस्त्यावरील खड्ड्यांना अक्षरशः स्विमिंग पूलचं स्वरूप आलंय , त्यामुळे संतापलेल्या मनसे कार्यकर्ते योगीराज देशमुख यांनी धोबीघाट रस्त्यावरील खड्ड्यातील पाण्यात स्विमिंग करत अनोखा आंदोलन केलं, संताप जनक बाब म्हणजे म्हणजे या रस्त्याच्या बाजूला असलेल्या महापालिकेच्या पाईपलाईन मधूनही पाण्याची गळती होतंय त्यामुळे या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचते आहे , महापालिका प्रशासन आणि स्थानिक आमदार यांचे लक्ष वेधण्यासाठी आज हे अनोख आंदोलन करण्यात आलं , महापालिकेने नागरिकांना मोफत स्विमिंग पूल उपलब्ध करून दिल्याची बोचरी टीका यावेळी योगीराज देशमुख यांनी केली चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर 
4
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 17, 2025 14:17:48
Ambernath, Maharashtra:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा शुक्रवारी अंबरनाथ दौरा! विद्यार्थी सेनेच्या जिल्हा कार्यालयाचं करणार उद्घाटन पनवेलकर हॉलमध्ये कार्यकर्त्यांशीही संवाद साधणार Anchor : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे येत्या शुक्रवारी अंबरनाथ शहरात येणार आहेत. मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांच्या मनविसे जिल्हा कार्यालयाचं राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. vo : शिवमंदिर रोडवर खेर सेक्शनमध्ये हे जिल्हा कार्यालय आहे. यानंतर हुतात्मा चौकाजवळील पनवेलकर हॉलमध्ये राज ठाकरे हे कार्यकर्त्यांशीही संवाद साधणार आहेत. यावेळी आगामी पालिका निवडणूक, उद्धव ठाकरे यांची संभाव्य युती, यासोबतच नुकत्याच शिवसेनेत गेलेल्या मनसेच्या माजी नगरसेवकांबाबतही राज ठाकरे बोलण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे अंबरनाथमधील मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या जंगी स्वागतासाठी तयारीला लागले आहेत. याच अनुषंगाने बुधवारी सायंकाळी मनसे नेते राजू पाटील यांच्या कार्यालयात बैठक पार पडली असून गुरुवारी रात्री मनसे नेते अविनाश जाधव हे अंबरनाथ शहरात येऊन तयारीचा आढावा घेणार आहेत. चंद्रशेखर भुयार, अंबरनाथ
8
comment0
Report
Advertisement
Back to top