Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

27 गावों में क्लस्टर योजना के विरोध में KDMC मुख्यालय पर प्रदर्शन

ABATISH BHOIR
Mar 17, 2026 08:22:46
Kalyan, Maharashtra
क्लस्टर योजनेविरोधात २७ गावांतील नागरिकांची केडीएमसी मुख्यालयावर धडक,परिपत्रक फाडत, जाळून केला निषेध व्यक्त,सर्व पक्षीय हक्क संरक्षण हक्क संघर्ष समिती आक्रमक, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील २७ गावांमध्ये राबविण्यात येत असलेल्या क्लस्टर योजने विरोधात स्थानिक भूमिपुत्रांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून या पार्श्वभूमीवर २७ गाव सर्व पक्षीय संरक्षण हक्क संघर्ष समिती आणि येथील नागरिकांनी आज केडीएमसी मुख्यालयावर धडक दिली. यावेळी या शासन निर्णयाची होळी करत आणि परिपत्रकाचे कागद फाडत निषेध व्यक्त केला. क्लस्टर योजना, ग्रोथ सेंटर आणि बुलेट ट्रेन बिझनेस हब यांसारख्या विविध योजनांमुळे २७ गावांतील स्थानिक नागरिक व भूमिपुत्रांवर परिणाम होत आहे. २७ गावांचा विकास नाही, सुविधा नाही तर मग मालमत्ता कराची सक्ती चालणार नाही अशी भूमिका यावेळी या नागरिकांनी घेतली. यावेळी मोर्चेकर्यांच्या शिष्टमंडळाने केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांची भेट घेत आपल्या मागण्या मांडल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्तांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकत लवकरच केडीएमसी महापौर, आयुक्त, २७ गावांतील लोकप्रतिनिधी आणि संघर्ष समिती यांची संयुक्त बैठक लावून याावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असल्याचे अध्यक्ष सुमित वझे यांनी सांगितले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Mar 17, 2026 10:06:06
Jalna, Maharashtra:जालना में बसस्थानकात चोरी करणारे चार सराईत आरोपी जेरबंद. जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. अँकर- जालना बसस्थानकात चोरी करणा-या चार सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केलंय.. शहरातील रमाईनगर येथे आरोपी निवृत्ती सुभाष शेलार याने साथिदारांच्या मदतीने बदनापूर येथून एक बॅग चोरी करून आणल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याअनुशंगाने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने बॅग चोरीची कबुली दिली व त्याने त्याचे साथिदार विकास अशोक गायकवाड, रवी गायकवाड आणि अशोक लंगोटे यांच्याकडे दिली असल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता मागच्या 12 महिन्यांपासून ते बसस्थानकात चोरी करत असल्याचं कबुली जबाबात सांगितलंय.. दरम्यान चारही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केलं असून त्यांच्याकडून 92 हजार 470 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 17, 2026 10:03:05
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे दहावीच्या प्रश्न पत्रिकाच चोरीला, उद्या होणाऱ्या भूगोल विषयाच्या पेपर वर प्रश्नचिन्ह सांगोला शहरातील सांगोला विद्यामंदिर या ठिकाणी दहावीच्या प्रश्नपत्रिका ठेवण्यासाठी स्ट्राँग रूम केली आहे. येथूनच तालुक्यातील परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका वितरित केल्या जातात. काल रात्री सदर स्ट्राँग रूमचे कुलूप तोडून 50 भूगोल विषयाच्या प्रश्नपत्रिका चोरी केल्या आहेत. धक्कादायक म्हणजे स्ट्राँग रूम असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही बंद असल्याचं समोर आले आहे. तसेच या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था सुद्धा ढिसाळ असल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील अपर पोलीस अधीक्षक, पोलिस उप अधीक्षक , गट शिक्षणाधिकारी , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक यांनी तपासणी केली आहे. उद्या होणारा भूगोल विषयाचा पेपर आता होणार का नाही याबाबत दहावीच्या विद्यार्थ्या मध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. राज्य भरातील विद्यार्थ्यांचे भवितव्य यावर अवलंबून आहे. याबाबत माध्यमिक शिक्षण मंडळाचे अधिकारी पाहणी करून निर्णय घेण्याची शक्यता आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 17, 2026 10:00:21
Amravati, Maharashtra:नळ नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी काँग्रेस आक्रमक; यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात पुलावर चक्काजाम आंदोलन, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पुलाच्या टोकावर चढले. अँकर: नळ नदीवर गेल्या आठ वर्षापासून पुलाचं बांधकाम रखडल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत असून आतापर्यंत अनेकांनी जीव गमावला आहे. त्यामुळे आज काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला असून पुलावर चक्काजाम आंदोलन करण्यात आला आहे. दरम्यान शासनाकडून 17 तारखेपर्यंत पुलाचा काम सुरू करण्याचा आश्वासन दिला आहे मात्र 17 तारखेपर्यंत काम सुरू न झाल्यास 18 तारखेला परत याच ठिकाणी आंदोलन करू असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 17, 2026 09:56:10
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anchor : छत्रपती संभाजीनगर च्या औद्योगिक वसाहतीत औषधी निर्माण करणाऱ्या कंपनीला गॅस टंचाई चा मोठा फटका बसला आहे, जवळपास 60 टक्के कंपन्या बंद पडायच्या मार्गावर आहेत त्यामुळं आगामी काळात औषधांचा तुटवडा ही निर्माण होऊ शकतो असे सांगितल्या जातेय... पाहुयात एक विशेष रिपोर्ट... गॅस टँचाईचा औषध कंपन्यांना फटका लाखोंच्या ऑर्डर असूनही गॅस विना कंपनी बंद राज्यात औषधांचा तुटवडा जाणवणार ? छत्रपती संभाजी नगर मध्ये जीवनरक्षक आणि अन्य औषधी बनवणाऱ्या एकूण 78 कंपन्या आहेत मात्र या कंपन्यांपैकी आता 60 टक्के कंपन्याचे काम बंद पडायच्या मार्गावर आहे, या कंपन्यांमध्ये एलपीजी गॅस हा महत्वाचा घटक आहे, औषध प्रक्रिया करताना त्याला उकळावे लागते आणि यासाठी गॅस महत्वाचा आहे, त्यामुळं मात्र हाच गॅस मिळत नसल्याने औषध उत्पादक अडचणीत आले आहेत, संभाजी नागरचया एक कंपनीला खोकल्याची औषध बनवण्याचे 11 लाख बॉटल ची ऑर्डर प्रलंबित आहे तर 5 लाख बोटेल्स ची ऑर्डर कंपनीने नाकारली असल्याचं मालक सांगताय, त्यामुळं औषध जीवनावश्यक आहे सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केलीय... गॅस तुटवडा इतक्यात संपणार नाही असे चित्र असल्याने मालकाने आता लाकडाची भट्टी लावण्याचा प्रयोग सुरू केलाय यासाठी लाकडी बॉयलर मागवले आहे मात्र त्याचेही भाव आता वाढलेल्याच उद्योजक सांगताय... गॅस टंचाई मुळे आता चुलीवरच्या चहा प्रमाणे चुली वरचे औषधी ही निर्माण होऊ शकते असे चित्र आहे, विनोद सोडला तर प्रत्यक्षात परिस्थिती गंभीर आहे औषधी कंपन्यांचं कोट्यावधीचे नुकसान सुरू आहे आणि आगामी काळात औषधांचा तुटवडा ही निर्माण होऊ शकतो त्यामुळे सरकारनं किंमान औषधे कंपन्यापुरते लक्ष घालून गॅस उपलब्द करण्यासठी तातडीने लक्ष घालण्याची मागणी होती... विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर...
856
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Mar 17, 2026 09:55:48
Mumbai, Maharashtra:पोलीस ठाण्यात तक्रार केली म्हणून नवऱ्याने आपल्या बायकोला चक्क लोकल खाली ढकलल्याचा धक्कादायक प्रकार मुलुंड मध्ये घडला आहे नेमका काय घडला आहे हा प्रकार पाहूया हा रिपोर्ट. मुलुंड मध्ये राहणारी 38 वर्षाची पुष्पा गुप्ता आणि तिचा नवरा राजू या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद निर्माण झाले होते या वादातून पुष्पा हिने मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता ज्याचा राग राजू याच्या मनात होता. पुष्पा हिचा भाऊ तिला नेण्यासाठी तिच्या घरी आला परंतु पुष्पाच्या नवऱ्याने त्याच्या भावाचे कागदपत्र शिताफीने चोरले. मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात पुष्पा तिचा भाऊ आणि तिचा लहान मुलगा लोकल पकडण्यासाठी आले असताना आपल्या पाकिटातील आय कार्ड नसल्याचं तिच्या भावाच्या निदर्शनास आलं त्यानंतर तिच्या भावाने पुष्पाच्या नवऱ्याला फोन केला आणि आय कार्ड मागितले असता तिच्या नवऱ्याने टाळाटाळ केली त्यानंतर पुष्पाचा भाऊ हा थेट पुष्पाच्या घरी गेला परंतु यावेळी मात्र राजुने पुष्पाच्या भावाला आणि त्याच्या मुलाला घरात कोंडलं आणि तेथून फरार झाला पुष्पाच्या भावाने मुलुंड पोलिसांना फोन केला परंतु तोपर्यंत फार उशीर झाला होता पुष्पाच्या नवऱ्याने थेट मुलुंड रेल्वे स्थानक गाठलं आणि पुष्पाला थेट लोकल खाली ढकलून दिलं. बाइट संभाजी यादव वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीआरपी विवो2 दिवसाढवळ्या भर रेल्वे स्थानकात हा प्रकार घडला यात पुष्पाचा नाहक बळी गेला पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचा रागाने पुष्पाच्या नवऱ्याने हे पाहून उचलले. कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. कौटुंबिक हिंसाचाराचा भयावह चेहरा या घटनेने समोर आणलाय. Thanks and regards अमोल पेडणेकर
892
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 17, 2026 09:54:33
Nagpur, Maharashtra:नागपूर मेजर जनरल(नि )अनिल बाम ... (On स्टेट ऑफ हॉर्मूज... ट्रम्प एकटे पडले...) -- हार्मोज समुद्रधुनी सेंटर ऑफ ग्रेव्हीटी झाली है. अब ट्रम्प के अंगाशी आया है -- मगर प्रत्येक देशाने उन्हें नहीं कहा है.. अजी जापान,जर्मनी या साऊथ कोरिया... हम इसमें नहीं पड़ेंगे... अमेरिका अकेला पड़ गया है -- ट्रम्प यांचा त्रागा होतोय.. आग त्यांनी लावली होती आग त्यांनाच विझवावी लागेल -- (इराकच्या हॉटेलवर हल्ले..अमेरिकन अधिकारी... पिन पॉईंट हल्ले ) -- इराण सिलेक्टड टार्गेटवर अचूक हल्ले करत आहे --- खाडी मधील अमेरिकन असेट वर,UAE, बहरीन, इराण वर हल्ले होताय -- इराक मध्ये अमेरिकन असेट जास्त आहे... अमेरिका स्पॉन्सर टेररिस ग्रुप इराक मध्ये आहे. त्यामुळे इराणचे हल्ले आहे ( इराची अटॅक फ्रिक्वेन्सी कमी झाली का ) --- इराकची ताकद बरीच कमी झाले.एयरफोर्स नेव्ही असो किंवा आयआरजीसीची सिनिअर लीडरशिप असो... मात्र त्यांच्याकडे साठा भरपूर आहे इन्फॉर्मेशन रशिया आणि चीनकडून मिळत आहे... जून 25 मध्ये मिडनाईट हॅमर ऑपरेशन झालं होतं.... ---- आता पूर्ण इराक मध्ये चायनीज नेविगेशन आहे बाय जो थ्री हे... त्याचा इराक वापर करत आहे ( मुस्तफा खोमेनी कुठे.. जखमी आहे ) --- तो जखमी असल्याचे अनेक रिपोर्ट्स आहे.... त्यामुळेच तो टीव्हीसमोर.... त्याचे ट्रीटमेंट रिपोर्ट नाही.. याबाबत स्पेक्युलेशन सुरू आहे ( जागतिक स्तरावर अनेक युद्ध सुरू आहे आणि) --= कुठलीच घडामोडी योगायोग नसते.... इराक इस्रायल युद्धापूर्वी तीन दिवस अगोदर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मध्ये युद्ध सुरू झाले --- पाकिस्तानने काबुलमध्ये मोठा हल्ला करत.... तालिबान म्हणत आहे की पक्पाक सिव्हिलियन टार्गेटवर हल्ला करत आहे.... --- युक्रेन रशिया असो गाजामध्ये हमास विरुद्ध लढत आहे. दोन वर्षांपेक्षा जास्त आले आणि इथेही 18 दिवस झाले -- प्रत्येक ठिकाणी काही ना काही तरी आहे.. प्रत्येकाने डाव रचला असतो (भारतीय डिप्लोमा सी परराष्ट्र नीती ) --- आपलं पयश आहे.... मी गव्हर्मेंटला कॉम्प्लिमेंट करीन त्यांच्या initive मुळं झाले... --- आपले 22 शिप पर्शीयनल मध्ये अडकले आहे --- आपल्या देशातच फक्त सप्लाय सुरू आहे... कंबोडिया असो किंवा अमेरिका येथे fuel प्राइस वाढले आहे
891
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 17, 2026 09:36:25
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली फ्लॅश स्लग - जिल्हा न्यायालयाच्या आवारातील दुचाकीला लागलेल्या आगीत,तीन दुचाकी जळून खाक... अँकर - सांगली न्यायालयाच्या आवारात दुचाकींना आग लागून 3 दुचाकी जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.विजयनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या पार्किंग मध्ये उभे असलेल्या एका इलेक्ट्रिक दुचाकीला अचानक आग लागली,काही क्षणात आगीने रौद्ररूप घेतल्याने शेजारी असणारे आणखी 2 दुचाकीला देखील आग लागली.तळमजल्यावरील असणाऱ्या पार्किंगच्या आवारातून आग आणि धुराचे लोट उठायला सुरुवात झाली,न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच असणाऱ्या पार्किंग मध्ये अचानक लागलेल्या आगीच्या घटनेमुळे सुरक्षा रक्षक,वकिल व नागरीकांची धावपळ उडाली. दमन काही वेळातच अग्निशमन दलाची गाडी दाखल झाली आणि ही आग भिजवण्यात आली मात्र या आगीमध्ये तीन दुचाकी जळून खाक झाले आहेत,मात्र या घटनेमुळे न्यायालयाच्या आवारात मोठा गोंधळ उडाला होता.
928
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 17, 2026 09:31:15
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी बुधवारी निवडणूक आहे या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालाय मात्र अध्यक्ष कोणाचा यावरून वाद सुरू आहे आणि त्यातच आता एक नवा ट्व twists निर्माण झाला आहे, उभाठा आणि शिंदे सेना एकत्र येणार अशी जोरदार चर्चा छत्रपती संभाजी नगर मध्ये सुरू आहे आणि दोन्ही पक्षांचे नेते ही चर्चा फेटाळत नाहीये आम्ही देखील सत्तेत सहभागी होऊ शकतो, शिंदे सेने सोबत जाण्यास हरकत काय, आम्ही संत महंत नाहीत राजकारणी आहोत राजकारण आम्हालाही साधावे लागेल असे सूचक विधान अंबादास दानवे यांनी केलाय, शिवसेना भाजप या दोघांचे भांडण झाल्यास आम्हाला संधी आहे. आमचे नगरसेवक सहलीवर गेलेत हे सत्य आहे शिंदे सेनेचे गेलेत की नाही माहिती नाही पण उद्याच्या होणाऱ्या निवडणुकी 24 तास अजून वेळ आहे. त्यामुळे राजकारणात 24 तासात काहीही होऊ शकतं असेही दानवे म्हणाले आहे, त्यामुळे शिवसेना भाजपचा अध्यक्ष पदावरून बिनसले तर शिंदे सेना त्यांच्या 24 संख्याबळासह उबाठाच्या नऊ सदस्यांची साथ घेत सत्ता स्थापन करू शकते आणि दानवेही ही शक्यता फेटाळत नाहीये त्यामुळे भाजप आता अलर्ट मोड वर आहे...
962
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 17, 2026 09:30:56
Jalna, Maharashtra:जालना | सालगड्याच्या मुलाचं UPSC मध्ये यश, पत्र्याच्या शेडमध्ये राहून यश मिळवल्यानं सत्कारासाठी गावकऱ्यांची गर्दी (पॅकेज) अँकर : यश मिळवण्यासाठी परिस्थिती कधीही अडथळा ठरत नाही. त्यासाठी अथक परिश्रम, सातत्य, जिद्द अन चिकाटीची आवश्यकता असते. हेच सिद्ध करून दाखवलं आहे. जालन्यातील भिकन रोजेकर याने. नुकत्याच जाहिर झालेल्या युपीएससी परीक्षेच्या अंतिम गुणवत्ता यादीत भिकन देशात 812 रॅंक ने उत्तीर्ण झाला आहे.भिकनच्या वडिलांनी सालगडी म्हणून काम केलेलं असल्यानं भिकनचं यश कौतुकाचा विषय बनलाय.पाहूया भिकनच्या यशावरचा हा स्पेशल रिपोर्ट. व्हिओ :१: यूपीएससी परीक्षेचे निकाल लागले आणि जालन्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या सपकाळ जळगाव गावातल्या नागरिकांच्या आनंदाला उधाण आलंय.याच गावातल्या एका सालगड्याच्या मुलानं यूपीएससी परीक्षेत जोरदार मुसंडी मारत 812 वी रँक मिळवलीय. भिकन रोजेकर असं या यशस्वी विद्यार्थ्यांचं नाव आहे.याआधी भिकनने 4 वेळा यूपीएससीची परीक्षा दिली पण पदरी निराशाच पडली पण पाचव्या प्रयत्नात त्यानं यशाला गवसणी घातली.भिकनला IPS कॅडर मिळण्याची शक्यता वर्तवली जातीय.भिकन रोजेकर यांचे प्राथमिक शिक्षण चाळीसगाव तालुक्यातील वाडा येथे झाले. भिकन यांनी माध्यमिक शिक्षण जळगाव सपकाळ येथील विनय विद्यालयातून, तर पदवी छत्रपती संभाजीनगर येथील विवेकानंद महाविद्यालयातून पूर्ण केली.त्यानंतर भिकनने UPscच्या तयारी साठी दिल्ली गाठली आणि पाचव्या प्रयत्नात युपीएससी सर करत घर गाठलं. भिकन रोजेकर,यूपीएससी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी(चेक्स शर्टवरील बाईट) भिकनच्या कुटुंबाची परिस्थिती तशी बेताचीच आहे.त्याच्या वडिलांनी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या शेतात सालगडी म्हणून काम केलंय.भिकनच्या कुटुंबाकडे अवघी 2 एकर जमीन आहे.या जमिनीवरच राब राब राबून या कुटुंबाची वर्षभर गुजरान चालते.मात्र भिकनं यूपीएससीत यश मिळवल्यानं वडिलांच्या डोळ्यांचे पारणे फेडले गेलेत. जगन रोजेकर,भिकनचे वडील(फेटा घातलेले) यूपीएससीच्या निकालात भिकननं मिळवलेल्या यशामुळे त्याच्या गावातील नागरिकांसह परीसरातील नागरिकांच्या आनंदाला पारावार उरला नाहीय.दररोज लोक येऊन भिकनसह कुटुंबियांचा सत्कार करतायत.एका सालगड्याच्या मुलानं पत्र्याच्या शेडमध्ये राहून यश मिळवल्याचा आनंद गावकऱ्यांच्या आणि भिकनच्या मित्रांच्या चेहऱ्यावर दिसून येतोय. गावातील नागरिक आणि भिकनच्या हिरव्या शर्टवरील मित्राचा बाईट टाकावा. भिकनच्या कुटुंबात आई,वडील,बहीण आणि भाऊ राहतात. भिकनचा भाऊ भारतीय सैन्य दलात सैनिक म्हणून काम करतोय.तर भिकनने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्यानं रोजेकर कुटुंबाच्या आनंदाला पारावर उरला नाहीय.त्यामुळे झी-२४ तास कडूनही भिकनच्या यशाचं कौतुक आणि त्याच्या भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
1061
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 17, 2026 09:19:23
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर:वाशीमच्या कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. गॅस एजन्सीसमोर आज सकाळ पासूनच ग्राहकांच्या लांब रांगा लागल्या असून, महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकजण कडक उन्हात तासन्‌तास उभे राहून सिलेंडरची प्रतीक्षा करत आहेत. घरगुती वापरासाठी अत्यावश्यक असलेला गॅस वेळेवर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. उशिरा होणारा पुरवठा आणि अपुरा साठा यामुळे ही समस्या अधिक तीव्र झाली आहे. प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन सुरळीत पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात या येत आहे。
918
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 17, 2026 09:05:55
Nashik, Maharashtra:एसटी चालक-वाहकांची अल्कोटेस्ट होणार नंतरच हाती स्टेअरिंग देणार ! अँकर प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या मद्यपी एसटी कर्मचाऱ्यांवर लगाम लावण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने आता कडक पाऊल उचलले आहे. आता चालक आणि वाहक या दोघांचीही ड्यूटी सुरू होण्यापूर्वी अल्कोटेस्ट केली जाणार आहे. या चाचणीत पात्र ठरल्यानंतरच चालकाच्या हाती स्टेअरिंग दिले जाईल. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होणार असून, मद्यधुंद अवस्थेत गाडी चालविणाऱ्यांच्या मनमानीला चाप बसणार आहे. एसटी आगारात हजर होताच चालक आणि वाहकांना आता एका मशीनद्वारे स्वतःची तपासणी करून घ्यावी लागेल. त्यांच्या श्वासातील मद्याचे प्रमाण मोजले जाईल. ही प्रक्रिया आता दैनंदिन कामकाजाचा भाग असेल. केवळ हजेरी लावली म्हणजे काम मिळाले असे आता होणार नाही. जोपर्यंत संबंधित कर्मचारी अल्कोटेस्टमध्ये 'पास' होत नाही तोपर्यंत त्याला गाडीवर किंवा ड्युटीवर पाठविले जाणार नाही.
1098
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 17, 2026 09:05:10
Akola, Maharashtra:अकोला शहरात पाणीटंचाईची समस्या तीव्र होत चालली आहे. 65 एमएलडी प्लांटवरून होणारा पाणीपुरवठा आता दोन दिवसाआड न राहता थेट चौथ्या दिवशी करण्यात येणार आहे. अकोला महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी मुख्य जलस्त्रोत असलेल्या काटेपूर्णा प्रकल्पामध्ये सध्या सुमारे 39 दलघमी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे.सद्यस्थितीत वाढत्या तापमानामुळे शहरात तीव्र उन्हाळा जाणवत असून पाण्याची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.यासोबतच वाढत्या बाष्पीभवनामुळे धरणातील पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत आहे.ही परिस्थिती लक्षात घेता महानगरपालिका प्रशासनाने पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.यामुळे आता अकोला शहरात पाणीपुरवठा तीन दिवसाआड, म्हणजेच चौथ्या दिवशी केला जाणार आहे. नागरिकांनी या बदलाची नोंद घेऊन पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
1032
comment0
Report
Advertisement
Back to top