Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

मंगलवेढ़ा के केंद्र पर दहावी पेपर के पहले दिन दस छात्र तोतिया पकड़े गए

SKSACHIN KASABE
Feb 20, 2026 11:20:44
Pandharpur, Maharashtra
सोलापूर जिलेतील मंगळवेढा तालुक्यातील परीक्षा केंद्रावर पहिल्याच दिवशी दहावीचा पेपर देताना दहा विद्यार्थ्यांना पकडले. मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील बाळकृष्ण विद्यालयामध्ये आज दहावीचा पेपर सुरू असताना केंद्र संचालक यांनी शाळेमध्ये तपासणी करत असताना सुतार इंटरनॅशनल स्कूल लक्ष्मी दहिवडी येथील दहा बहिष्ठ विद्यार्थी तोतया म्हणून मराठीचा पेपर देत असल्याचं आढळून आलं या केंद्रातील वेगवेगळ्या परीक्षा खोलीमध्ये हे विद्यार्थी पेपर देत असताना आढळून आले यानंतर केंद्र संचालकांनी बोर्डाच्या नियमानुसार कारवाई केली असून मंगळवेढा पोलिसांना मध्ये सुद्धा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Feb 20, 2026 11:55:06
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- केंद्रीय प्लास्टिक प्रशिक्षण संस्था सिपेटतर्फे चंद्रपूरात आयोजित झाली ‘प्लास्टिक कचरा व्यवस्थापन’ विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा अँकर:-- केंद्रीय प्लास्टिक प्रशिक्षण संस्था सिपेट चंद्रपूर यांच्या वतीने आज ‘प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि चक्रीय अर्थव्यवस्था’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. चंद्रपूर येथे सिपेट स्थापना झाल्यापासून प्लास्टिक उद्योगपूरक विविध नाविन्यपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जात आहेत. याच अनुषंगाने रसायने आणि खते मंत्रालय, रसायने आणि पेट्रोकेमिकल्स विभाग, भारत सरकार यांच्या सौजन्याने हे राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहाराज्यमंत्री हंसराज अहिर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या चर्चासत्रात प्लास्टिक कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन, आधुनिक पुनर्वापर तंत्रज्ञान, शाश्वत विकासाची दिशा तसेच चक्रीय अर्थव्यवस्थेची संकल्पना यावर तज्ज्ञ मार्गदर्शन केले गेले. CSIR-NEERI, VNIT नागपूर, CIPET तसेच प्लास्टिक उद्योग क्षेत्रातील दिग्गज तज्ज्ञांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती होऊन उद्योग आणि समाजामध्ये शाश्वत पद्धतींचा अवलंब करण्यास चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. उद्योग क्षेत्रातील इच्छुक उमेदवार, विद्यार्थी, संशोधक, पर्यावरण तज्ञ व संबंधित क्षेत्रातील व्यक्तींनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 20, 2026 11:49:22
Kalyan, Maharashtra:कल्याण लोकसभा मतदारसंघातील विकास प्रकल्पांसाठी तब्बल पाच हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. या पार्श्वभूमीवर त्यांनी संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणी दौर्‍यात कल्याण डोंबिवली महानगरपालिका तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे अधिकारी उपस्थित होते. दुसरा पलावा पूल, मेट्रो-१२ प्रकल्प, तिसरा पत्री पूल, कल्याण पूर्व पश्चिम जोडणारा वालधुनी पूल आणि कल्याण रिंगरोड विकास प्रकल्पांची सविस्तर पाहणी करण्यात आली. विशेषतः रिंगरोड प्रकल्पातील भूसंपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी येत्या चार पाच दिवसांत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तोडगा काढण्यात येणार असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले. प्रकल्पांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करून कामांना गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. कल्याण डोंबिवली परिसरातील वाढती लोकसंख्या आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता हे पूल व रस्ते प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. मेट्रो-१२ प्रकल्पामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार असून, पूर्व पश्चिम जोडणी सुलभ होणार आहे. लवकरात लवकर ही सर्व कामे पूर्ण करून कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीमधून दिलासा देण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले. विकासकामांमुळे परिसराच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्याच बरोबर कल्याण डोंबिवली करांच्या सेवेत १०० नवीन ई बस लवकरच दाखल होतील अशीही माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिली
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 20, 2026 11:47:17
Chandrapur, Maharashtra:कारल्याची भाजी बनवल्याच्या कारणावरून झालेल्या क्षुल्लक वादात मुलाने आईचा खून केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील डोंगरगाव येथे उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे नाव जगदीश पेटकुले (वय 36) असून मृत महिलेचे नाव सुमित्राबाई पेटकुले (वय 65) आहे. आरोपीची पत्नी दोन महिन्यांपूर्वी मुलांना घेऊन माहेरी गेल्याने तो आईसोबतच राहत होता. काल रात्री वाद झाल्यानंतर आरोपीने आईला अमानुष मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सुमित्राबाई यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपीला दारूचे व्यसन असून दारूच्या नशेतच त्याने हे कृत्य केल्याची परिसरात चर्चा आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Feb 20, 2026 11:32:04
Pandharpur, Maharashtra:मोहिते पाटील यांना कुठलेही छत सहजासहजी उपलब्ध होणार नाही. गरज पडली तेव्हा सावली शोधली आणि पुन्हा सोडून दिली, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा इशारा खासदार मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने शिंदे सेनेची त्यांची जवळीक वाढल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटील यांना जोरदार टोला लगावला आहे सुपडा साफ करून म्हणणाऱ्यांचाच आता सुपडा साफ झालेला आहे. त्यांना आता कुठेही सहजासहजी शत उपलब्ध होणार नाही. सातारा जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष करण याला प्राधान्य आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांना काय वाटते हा माझा विषय नाही. देसाई यांच्याशी संवाद साधणार का याला बगल देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही उप मुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधतील आणि मार्ग निघेल असा विश्वास ग्रामविकास मंत्री गोरे यांनी व्यक्त केला आहे
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 20, 2026 11:23:32
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरात ठाकरे गटाच्या शिवसेनेत अंतर्गत वाद चिघळल्याचे चित्र समोर आले आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेचे शहरप्रमुख सुनील मोदी यांची कोल्हापूर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्यानंतर काही शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. परिवहन समितीमध्ये विशाल देवकुळे यांचे नाव डावलण्यात आल्याचा आरोप करत संतप्त शिवसैनिकांनी सुनील मोदी यांच्या घरी जाऊन जाब विचारला. या वेळी परिसरात मोठा गोंधळ उडाला. “सुनील मोदी यांनी शिवसेनेचा घात केला, ते शिवसेनेत राहून काँग्रेसचे हस्तक झाले आहेत,” असा आरोप विशाल देवकुळे आणि त्यांच्या समर्थकांनी केला. “कोल्हापुरातून उद्धव ठाकरे की शिवसेना मोदींनी संपवली,” असा गंभीर आरोपही करण्यात आला. या घटनेमुळे ठाकरे गटातील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले असून, आगामी राजकीय घडामोडींवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणावर सुनील मोदी यांची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 20, 2026 10:34:23
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 20, 2026 10:20:03
Bhandara, Maharashtra:भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालय व महाविद्यालयाची केली खासदारांची पाहणी.... रुग्णांना देण्यात येणाऱ्या आहार कच्चा.... रुग्णांना देण्यात येतात कच्च्या पोळ्या.... रुग्णालयात सर्वीकडे घाण.... भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालय व महाविद्यालय येथे आज अचानक खासदार प्रशांत पडोळे यांनी भेट देत रुग्णालयातील स्वयंपाक गृह, रुग्णालय पाहणी केली. या पाहणी दरम्यात रुग्णांना देण्यात येणाऱ्या पोळ्या कच्च्या, भात शिजलेला नाही, डाळीत पाणीच आढळून आलं. तसेच संपूर्ण रुग्णालयात घाणीचे साम्राज्य पसरले असल्याचे दिसून आहे. या सर्व विषयाला घेऊन डॉक्टर यांना धारेवर धरले तसेच ज्या कंत्रादाराला हा कंत्राट आहे. त्याचा कंत्राट रद्द करून सुधारणा कराव्या अशी सूचना देण्यात आली. दुसरीकडे असा कच्च्या पोळ्या देण्यात येत असून रूग्णांच्या जीवासी खेळ सुरू आहे. असा दोषींवर कारवाईची करण्याची गरज आहे...
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Feb 20, 2026 10:08:43
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 20, 2026 10:06:24
Ahilyanagar, Maharashtra:पुणे जिल्ह्यातील भिगवण येथे तरुणीचा अपहरण केल्याची पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी मोर्चा काढून मुस्लिम तरुणाने अपहरण केला असून आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी केली मात्र अपहरण झालेल्या तरुणी पोलीस स्टेशनमध्ये हजर होत आपण स्वतःहून गेलो होतो असं सांगितलं आहे मुलीच्या या वक्तव्यानंतर आमदार जगताप यांनी शहाजी प्रवृत्ती अशाच असल्याचं म्हटलं आहे आधार नसलेल्या अल्पवयीन मुलीला टार्गेट केलं जात असून सज्ञान झाल्यानंतर त्यांच्या कडून आपण स्वतःहून स्वीकृत केला असल्याचं बघून घेतलं जात आहे असं म्हटलं आहे आमदार जगताप यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 20, 2026 10:06:07
Solapur, Maharashtra:ज्यांनी स्वतःच्या रक्ताच्या भावाशी प्रतारणा केली, ते मुंबईच्या जनतेचे आणि मित्रांचे काय होणार? उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा आपलं 'लहान मन' दाखवून दिलं आहे. • उद्धव ठाकरेंच्या राजकारणाचं नवं समीकरण म्हणजे 'Use and Throw'. गरज लागली की मनसेला वापरायचं आणि पदं वाटायची वेळ आली की त्यांच्या पाठीत खंजीर खुपसायचा, हीच उबाठा गटाची खरी प्रवृत्ती आहे. • मुंबई महापालिकेत स्वार्थासाठी इतरांना जवळ करायचं आणि काम झालं की वाऱ्यावर सोडायचं, हा 'गरज सरो आणि वैद्य मरो' असा त्यांचा खाक्या आहे. • एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट झाली की मातोश्रीवर जळफळात का सुरू होतो? ही भीती आगामी पराभवाची आहे. • एकनाथ शिंदे हे विरोधकांचीही कामं मार्गी लावतात, म्हणूनच आज संपूर्ण महाराष्ट्राने त्यांना 'लोकनेता ते लोकनाथ' म्हणून स्वीकारलं आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top