Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Satara415001

सातारा में महाविकास आघाडी की सभा: विकास का वादा, भाजपा से बदला राजनीतिक संकेत

TTTUSHAR TAPASE
Nov 26, 2025 07:01:59
Satara, Maharashtra
सातारा जिल्ह्यात 9 नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची सभा पार पडली या सभेमध्ये शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे राष्ट्रीय नेते महादेव जानकर यासह काँग्रेस आणि उबाटा गटाचे नेते उपस्थित होते. यावेळी शशिकांत शिंदे यांनी सातारकरांना सर्व दडपशाही जुगारून माझ्या महाविकास आघाडीला संधी द्या मी सातारचा विकास करून दाखवतो... असं ते म्हणालेत. स्टेज बाईट: शशिकांत शिंदे. यावेळी राष्ट्रीय नेते महादेव जानकर यांनी भाजपने फसवले असल्याचा आरोप करत. शरद पवार उद्धव ठाकरे यांच्याबरोबर मलाही भाजपने फसवले असल्याचे यावेळी ते म्हणाले. स्टेज बाईट: महादेव जानकर. शरद पवार पक्षाच्या सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा पाटील यांनी मला ठेकेदार व्हायचं नाही कोणतेही टेंडर नको मला इथले भविष्य घडवायचा आहे. एक संधी मला द्या पाच वर्ष मी तुम्हाला देणार असा शब्द यावेळी त्यांनी आपल्या सभेत दिला आहे. स्टेज बाईट सुवर्णा पाटील (नगराध्यक्ष पदाच्या सातारा नगरपालिकेच्या उमेदवार). सातारा:राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे भाषण पॉइंटर. बरेच लोक या सभेला येण्यास इच्छुक आहेत मात्र साताऱ्यात मोकला श्वास घ्यायलाही परवानगी लागते. सातारकरांचे अंतर्गत पाठबळ महाविकास आघाडीला आहे. याचा उल्लेख मी मनापासून या सभेमध्ये करतोय. लोकसभेच्या निकालाबाबत निवडणुका आयोगाला उशिरा समजलं तुतारी आणि पिपाणी आता ते रद्द झालं. त्यावेळी पिपाणी नसती तर सातारकरांच्या मनातला खासदार निवडून आला असता. ही लढाई तत्वाची आहे. भाजपमध्ये जाणारे सर्व सुखी नाहीत सहनही होत नाही आणि सांगता येत नाही अशी अवस्था आहे. सर्वजण तिकडे गेले तर सामान्य जनतेचा आवाज कोण उठवणार .हा प्रश्न जसा देशात आहे तसाच सातार्यात आहे. याला वाचा फोडण्याचे काम सुवर्णा पाटील आणि महाविकास आघाडीच्या नगरपालिकेच्या उमेदवारांच्या माध्यमातून करायच आहे. ही लढाई सोपी नाही अवघड आहे ही फक्त सुरुवात आहे. कोणी ताम्रपट घेऊन आलेल्या नाही. मला माहित नाही विजय होईल की नाही. सत्याचा विजय होण्यासाठी जी चिंगारी तयार झाली. त्याची सुरुवात या सभेला बसलेल्या शिलेदारांनी केली याचा मला अभिमान आहे. ही निवडणूक नगरपालिके पुरती मर्यादित नसून देशाच्या आणि राज्याच्या हुकूमशाही विरोधातली आहे. महादेव जानकर यांना सरकारमध्ये गेल्यानुसार लक्षात आलं आणि त्यांनी पहिल्यांदा बंडाचा झेंडा असाच हाती घेतला.. आणि दुसरा झेंडा सुवर्ण पाटील यांनी घेतला. काहीजण म्हणत आहेत महाविकास आघाडीला उमेदवार मिळाला नाही. म्हणून आयात उमेदवार घेतला. तुम्हाला सोन्याची पारकच होत नाही त्यात आमचा दोष होता का?.. आमच्या कडे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी डॉक्टर सुद्धा होते ज्यांनी साताऱ्याची हाफ हिल मॅरेथॉन जगाच्या पटलावर नेली. संविधान जरी बदललं नसलं तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातला अधिकार या सरकारने काढून घेतला आहे. यासमोर बसलेल्या मतदाराला मतदानाचा अधिकार सुद्धा नाहीच तुमच्या आधी जाऊन दुसरा मतदान करतोय. पोलिस प्रशासन शासकीय यंत्रणा ठप्प... वोटर आयडी काही बघितला जात नाही मतदान जरी केलं तरी मतदान फिरवण्याची क्षमता या लोकांच्याकडे आहे. साडेतीन कोटी च कर्ज तुमच्या माथ्यावर मारलं अडीच वर्षांमध्ये फक्त कॉन्ट्रॅक्ट वाढवण्यासाठी... क्वालिटीचं तर बोलूच नका. सातारा शहराची ओळख काय? राज्यामध्ये अनेक जिल्हे ज्याप्रकारे विकसित झाले. तसं सातारमध्ये पाहायला मिळत नाही या चौकामध्ये सुद्धा आता अंधार दिसतोय. यासाठी बदल करणे गरजेचा आहे. निसर्ग आणि नियती मध्ये बदलाची क्रांती करण्याचा निर्णय असतो तो करण्याची गरज आहे. फक्त तुमचा मतासाठी वापर केला जातो... लोकशाहीमध्ये शशिकांत शिंदे यांना एखाद्या पेटीत मत जास्त पडली तर ते स्टॉल उघडून टाकले जातात हे दुर्दैव. भाजपने जाती-जातीमध्ये भांडण लावून तुम्हा आम्हाला फसवत आहे. मी सर्वसाधारणांना एक शब्द देतो. एक संधी द्या. दडपशाही जुगारून माझ्या महाविकास आघाडीला देऊन बघा मी सर्व खरं करून दाखवतो. दहा पंधरा हजाराचा भाव निघायला लागला आता चेक नाक्यावर नोटा चेक करतात म्हणून अकाउंट पे व्हायला लागले. तर निवडणूक आयोग काय करत असेल माहित नाही.. आजची ही सभा सातारकरांचा इतिहास घडवण्याची सभा आहे. महादेव जानकर (राष्ट्रीय नेते). सुवर्णा पाटील ज्या मुशीतून तयार झाल्या... त्या पक्षाला आम्ही देखील सत्तेवर आणण्यासाठी उभ केलं आहे. ही माफी मागण्यासाठी मी आज साताऱ्यात आलो आहे. भारताचे संविधान वाचवायचे असेल तर आपल्याला भाजप मुक्त भारत करायला हवा.. त्यावेळी काँग्रेसवाले आम्हाला विचारत नव्हते म्हणून आम्ही भाजपसोबत गेलोहोत. आम्हाला माहीत नव्हतं भाजप आम्हाला फसवतील. शरद पवारांच्या पक्षाची वाताहत केली, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची पण केली आणि माझे पण चार आमदार पळवले म्हणूनच मी शरद पवार, राहुल गांधी, उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना भेटलो आणि मी भारताचा संविधान वाचवण्यासाठी एकत्र राहावं अशी विनंती केलिये. मी कॅबिनेट मंत्री होतो त्यावेळेस मला समजलं की हे सरकार आपलं नाही. भाजपची इच्छा होती की माझा पक्ष त्यांच्यामध्ये विलीनीकरण करावा. पण शेवटपर्यंत मी माझा स्वतःचाच पक्ष काढून चार आमदार स्वतः मंत्री झालो. भाजप फक्त जाती-जातीमध्ये भांडण लावून तुम्हा आम्हाला फसवत आहे. सातारा नगरपालिका महाविकास आघाडी राष्ट्रवादीच्या उमेदवार सुवर्णा पाटील स्टेज बाईट पॉईंटर. मला या साताऱ्याचा विकास करायचा आहे ज्यावेळेस मी 33 वर्षांपूर्वी लग्न होऊन साताऱ्यात आले त्यावेळचा सातारा आणि आत्ताचा सातारा त्यामध्ये काहीही बदल नाही. बाजारपेठेतील एखादा मजला वाढला असेल पण बदल झालेला नाही. शैक्षणिक व्यवस्था रोजगार नाही. एमआयडीसी ठप्प आहे. तुम्ही आत्ता थांबला तर पाच वर्ष थांबावं लागेल. आणि विकासही पाच वर्ष थांबेल. तुम्ही आत्ता नाहीतर कधीच नाही सातारा बदलायची गरज आली आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Nov 26, 2025 07:18:33
Akola, Maharashtra:आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभर सभा घेत असताना अंबाजोगाई आणि बीड येथील सभेत त्यांनी केलेल्या ‘राम कृष्ण Hari’ या विधानाची मोठी चर्चा रंगली. या विधानानंतर सभेतून ‘वाजवा तुतारी’ असा प्रतिसादही मिळाला. मात्र ही सभा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची असल्याने त्यांनी लगेचच या विधानाबाबत स्पष्टीकरण देत सारवासारव केली.दरम्यान, हे वक्तव्य चांगलेच व्हायरल झाल्यानंतर आज अकोल्यातील अकोट येथील जाहीर सभेत अजित पवारांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली. “मी अंबाजोगाईला विकासाबाबत बोललो, पण मीडियाने ते वेगळ्या संदर्भात दाखवलं, त्यांचा तो अधिकार आहे. त्या दिवशी चुकीचा शब्द माझ्याकडून वापरला गेला. माझा उद्देश फक्त शहरात स्वच्छता असावी, बकालपणा नसावा एवढाच होता. चुकीचा शब्द वापरला गेल्या बद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो ”अस अजित पवार म्हणाले.तसेच लोक मला लाखोंच्या मतांनी निवडून देतात, हे सोपं नाही. लोकांना चांगलं काम करणारा नेता हवा असतो,आम्ही ते काम करत आहोत अस ही ते म्हणाले.विकासासाठी मी मदत करतो, पण लोक माझ्या शब्दालाच पकडतात म्हणत अजित पवारांनी खंत व्यक्त केलं.
50
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 26, 2025 06:49:43
Bhandara, Maharashtra:परिणय फुके व नाना पटोले यांची साठगाठ.... मित्र पक्षावर परिणय फुके करता आरोप.... नरेंद्र भोंडेकर यांची टीका.... भंडारा जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नाना पटोले व परिणय फुके यांची साठगाठ आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे वक्तव्य .... भंडारा जिल्ह्यात चार नगर परिषद निवडणुका लागल्या असून प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक सभेत परिणय फुके हे मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेवर टीका करतात. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस वर टीका करत नाही. भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पण कामे करत असताना टप्पा टप्प्याची पैसे येतात. भ्रष्टाचार कसा झाला. तर दुसरीकडे परिणय फुके व नाना पटोले यांची साठगाठ झाली आल्याच आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केला आहे.. एकीकडे राज्यात देवेंद्र फडणवीस, अजित दादा, शिंदे साहेब टीका करत नाही पण या ठिकाणी खालच्या पातळीवर टीका केली जाते....
122
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 26, 2025 06:30:58
102
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 26, 2025 06:30:22
Ambernath, Maharashtra:उल्हासनगर गोळीबार प्रकरणातील तीन आरोपींना अटक जामिनावर सुटलेल्या सराईत गुंडावर विरोधी टोळीने केला होता गोळीबार उल्हासनगर गोळीबार प्रकरणातील तीन आरोपींना अटक झाली आहे. जामिनावर सुटलेल्या सराईत गुंडावर विरोधी टोळीने गोळीबार केल्याची घटना उल्हासनगर मध्ये two days earlier घडली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे भिवंडी येथून ताब्यात घेतले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस कोठडीत त्याने घराशेजारी लपवलेले पिस्तूल हस्तगत केले आहे. उल्हासनगर कॅम्प तीन मधील इमली पाडा येथे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला सचिन उर्फ बाबूजी बहादूर करोतिया हा राहतो. काही महिन्यांपूर्वीच हा गुंड जेलमधून सुटून आला आहे. तो इमली पाडातील गोगाजी मंदिराजवळ शुक्रवारी रात्री मित्रां बरोबर उभा असताना तिथे मोटार सायकल वरून पाच ते सहा जणांची टोळी आली. यातील मोहित हिंदुजा याचा सचिन करोतीया याच्या भावाशी जुना वाद असल्याने या रागातून सचिनवर दोन राऊंड फायर केले आणि निघून गेले. तसेच झालेल्या गडबडीत मोहित याच्या कडून दोन राऊंड खाली पडले. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करीत तपास करण्यात आला. पोलीस पथकाने सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे भिवंडी येथून ताब्यात घेतले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस कोठडीत त्याने घराशेजारी लपवलेले पिस्तूल मध्यवर्ती पोलिसांनी हस्तगत केले आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या कडून चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
64
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 26, 2025 06:02:36
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्प (टीएटीआर) येथून नवेंगाव–नागझिरा व्याघ्र प्रकल्प (एनएनटीआर) येथे चितळ स्थानांतराची दुसरी फेरी यशस्वीरीत्या पूर्ण झाली. कोणतीही जिवितहानी न होता एकूण 63 चितळे सुरक्षितपणे जामनी गवताळ परिसरातून नागझिरा प्रकल्पातील सॉफ्ट-रिलीज एनक्लोजरमध्ये हलविण्यात आले. या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकही मृत्यू झालेला नाही. चितळ हा अतिशय संवेदनशील प्राणी असून पकडण्याच्या प्रक्रियेदरम्यान किंवा मानवी जवळीक, हाताळणी, वाहतूक यावेळी तीव्र ताणामुळे त्यांना मानसिक धक्का बसू शकतो. या ताणामुळे हृदयाचे विकार निर्माण होऊन अचानक मृत्यू होण्याची शक्यता असते, ज्याला ‘कॅप्चर मायोपथी’ असे म्हटले जाते. मात्र आजच्या स्थानांतरणात एकाही प्राणीाचा मृत्यू झालेला नाही, ही अत्यंत समाधानकारक बाब आहे. जामनी गवताळ परिसरात तयार करण्यात आलेल्या बोमा पद्धतीचा वापर करून चितळांना सुरक्षितरीत्या पकडण्यात आले. या परिसरातील योग्य अधिवास आणि चितळांची उपलब्धता या प्रक्रियेस पूरक ठरल्या. बोमामधून प्राण्यांना विशेष तयार केलेल्या ट्रान्सलोकेशन वाहनांतून हलविण्यात आले. या वाहनांची रचना प्राण्यांचा ताण कमी करण्याच्या आणि प्रवास सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने करण्यात आलेली आहे.
106
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 26, 2025 05:50:31
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील खिरडी ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक ठराव, डिजिटल मीटरविरोधात ग्रामसभेचा एकमुखी निर्णय, वाढीव विद्युत बिलांच्या तक्रारींवरून जुन्या मीटरची होत आहे मागणी चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील खिरडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत वाढीव आणि अवास्तव विद्युत बिलांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर डिजिटल मीटरविरोधात ऐतिहासिक ठराव एकमताने पारित करण्यात आला आहे. डिजिटल मीटर तात्काळ हटवण्यात यावेत आणि जुन्या पद्धतीचे मीटर पुन्हा बसवण्यात यावेत असा ठराव करण्यात आला आहे. डिजिटल मीटर बसवल्यापासून वीजबिलात अनियमित वाढ झाली असून काही घरांचे बिल दुप्पट तर काहींचे तिप्पट प्रमाणात येऊ लागले आहे. त्यामुळे आर्थिक तणाव निर्माण होत असून गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या गडचांदूर कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले आहे. मागणी मान्य न झाल्यास ग्रामस्थ स्वतः मीटर काढून ते महावितरण कार्यालयात जमा करणार आहेत.
105
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Nov 26, 2025 05:48:25
Dharashiv, Maharashtra:तुळजापूर नगराध्यक्षपदाची निवडणूक — महंत इच्छागिरी महाराजांची माघार! भाजपामधील बंडखोरी निवळली तुळजापूर – श्री तुळजाभवानी मंदिराचे महंत इच्छागिरी महाराज यांनी निवडणुकीतून नाट्यमय माघार घेतली आहे. प्रसिद्धीपत्रक जारी करून, “पवित्र परंपरेच्या रक्षणासाठी हा निर्णय घेतला” असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपाने उमेदवारी डावल्यानंतर इच्छागिरी महाराज अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले होते. मात्र आज अचानक माघार घेत, “तुळजापूरची प्रतिमा काही दिवसांपासून वाईट दिशेला वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मतदारांनी काम करणाऱ्या व्यक्तीचीच निवड करावी,” असे आवाहन त्यांनी तुळजापूरकरांना केले.
118
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 26, 2025 05:48:14
139
comment0
Report
MAMILIND ANDE
Nov 26, 2025 05:47:43
152
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Nov 26, 2025 05:47:23
Yavatmal, Maharashtra:राज्यमंत्री यांची पत्नी मोहिनी नाईक ह्या पुसद च्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक रिंगणात आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून त्या निवडणूक लढत असून विरोधकांनी त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केला आहे, मंत्री इंद्रनील यांचे यांचे दोन भाऊ देखील सून मोहिनी नाईक यांच्या विरोधात प्रचार करीत आहे. अशा परिस्थितीत मी नाईकांची सून आहे, हे माझे भाग्य आहे आणि माझे कार्यकर्तृत्वामुळे मला उमेदवारी मिळाली आहे. कोणत्या नाईकाने किती कामं केले हे जनतेला माहिती असल्याचा टोला मोहिनी नाईकांनी कुटुंबातील विरोधकांना लगावला आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, सासू अनिता नाईक यांनी पुसद चे नगराध्यक्ष पद भूषवले आहे आता मला संधी मिळाली त्यामुळे विकासाची ब्लू प्रिंट घेऊन आपण जनतेपुढे जात असल्याचे मोहिनी नाईक यांनी सांगितले आहे. त्यांनी घरोघरी भेटी देऊन प्रचाराचा धुराळा उडविला आहे.
110
comment0
Report
Advertisement
Back to top