Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401404

पालघर के सरावल्ली ग्राम पंचायत कार्यालय में लात-घूंसे, उपसरपंच-लिपिक की भिड़ंत वायरल

HPHARSHAD PATIL
Oct 06, 2025 17:30:24
Palghar, Maharashtra
पालघर - बोईसर जवळील सरावली ग्रामपंचायत कार्यालयातच तुंबळ हाणामारी . ग्रामपंचायत मधील लिपिक आणि उपसरपंचामध्ये हाणामारी . हाणामारीचा व्हिडिओ समोर आलाय . किरकोळ वादातून हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार . उपसरपंच शुभम वडे आणि लिपिक संकेत सावंत यांच्यात कार्यालयातच हाणामारी ।
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SNSWATI NAIK
Oct 06, 2025 18:18:24
Navi Mumbai, Maharashtra:क्लीनरच्या अपहरण प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर या दोघांविरोधात सुरु असलेल्या तपासाला नवे वळण मिळाले आहे. आरोपी दिलीप खेडकरने बेलापूर न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून, न्यायालयाने या अर्जावर अद्याप निर्णय न देता पुढील सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी ठेवली आहे. दरम्यान, मुख्य आरोपींपैकी एक असलेली मनोरमा खेडकर अटकपूर्व जामीन मिळवल्यानंतर पोलिस तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तिला सकाळी 11 ते संध्याकाळी 6 या वेळेत चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, ती मुद्दाम निर्धारित वेळ संपल्यानंतर म्हणजेच संध्याकाळीच रबाळे पोलिस ठाण्यात हजर झाली. परिणामी, “संध्याकाळी 6 नंतर महिलांची चौकशी करता येत नाही” या नियमाचा लाभ घेण्याचा तिचा हेतू असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. शनिवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने दिलीप खेडकरचा जामीन अर्ज फेटाळला होता. तथापि, पुन्हा एकदा जामिनासाठी अर्ज दाखल करून त्यांनी न्यायालयात सादर केला आहे. या प्रकरणातील तपास अधिकारी यांनी न्यायालयासमोर सादर केलेल्या अहवालात, मनोरमा खेडकर तपासात सहकार्य करत नसल्याचे स्पष्ट नमूद केले आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य फिर्यादी प्रल्हाद कुमार याने भीतीमुळे गावाकडे निघून गेल्याची माहितीही पुढे आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक गुंतागुंतीचा बनला आहे. क्लीनरच्या अपहरणाशी संबंधित हा संपूर्ण प्रकार नवी मुंबई पोलिसांच्या रडारवर असून, मनोरमा आणि दिलीप खेडकर या दोघांच्या हालचालींवर पोलिसांचे बारीक लक्ष आहे. येत्या 13 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Oct 06, 2025 17:33:41
Shirdi, Maharashtra:साई संस्थानाच्या सुरक्षा पर प्रश्नचिन्ह...? साई संस्थानात मला विना मोबदला नोकरी द्या ; सुजय विखेची साई संस्थान कडे मागणी... साई संस्थानाच्या रुग्णालयात फार भ्रष्टाचार , सुजय विखे यांचे साई संस्थान प्रशासनावर गंभीर आरोप.. साई दरबारी येणाऱ्या प्रत्येक भाविकांची नोंदणी करा , सुजय विखेची संस्थानकडे मागणी.. डॉ.सुजय विखे पाटील भाषण पॉईंटर्स - जे भ्रष्टाचाराचे आरोप मंदिर प्रमुखावर झाले त्याबाबत निर्णय त्रिसदस्यीय समिती ठरवेल... सदर महिला हि सिसीटीव्हीत असुनही सापडत नाही , जर मंदिरात येवून त्या महिलेची ओळख पटत नसेल तर मंदिर सुरक्षेतबाबत मोठ प्रश्नचिन्ह निर्माण होतय... मी CEO यांना विनंती केली की सर्व साईभक्तांचे रजिस्ट्रेशन झालच पाहिजे , उद्या एखादी घटना घडली तर आम्हाला माहित नाही असे उत्तर प्रशासन देणार असेल तर ते चुकीचं... समिती अतिशय उत्कृष्ट काम करतेय , मात्र येणा-या काळात प्रत्येक साईभक्ताचे ओळखपत्र घेऊन रजिस्ट्रेशन होईल हि मला अपेक्षा... ऑन साईनाथ हॉस्पिटल भोंगळ कारभार - साईनाथ रुग्णालयात सात वर्षाचा मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्याचा पोस्टमार्टेम रिपोर्ट तो बघायचाय , नेमकी काय ट्रिटमेंट दिलीय त्यासंदर्भात काही चुकीचे असेल तर पोलिसांना फिर्याद दाखल करतील... साईनाथ रुग्णालयात जो कारभार , राजकारण सुरू आहे त्यामुळे जे नुकसान होतय त्यासाठी मला साईसेवक म्हणून मला रुग्णालयात घ्यावे ... आठवडयातून एक दिवस तरी सेवा या हेतूने रुग्णालयात काम करेल... आणि ते काम मलाच हाती घ्यावे लागेल तरच सुधारणा होईल ... रुग्णांची आणि भक्तांची हेळसांड होणार नाही असा माझा प्रयत्न राहिल... बघू आता माझ्या अर्जाचा काय निकाल लागतो.. मी 16 ऑक्टोबर पर्यंत महाशिवकथेच्या‌ आयोजनात व्यस्त आहे त्यानंतर मी माझी कथा सुरू करेल... महाकालने मला शांत रहायला सांगितलय त्यानंतर जिथे नियमावलीचे पालन होत नाही त्यावर कारवाई करू... Tiktak पण आहे आणि भाषण पण...
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Oct 06, 2025 17:30:57
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी पोलीस ठाण्यात शिवसेना युबीटी च्या कार्यकर्त्यांनी मोठा जमाव केला आहे, शेतकरी प्रश्नांवर आंदोलन करीत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या वाहनाचा ताफा अडविल्या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना सोडण्याची मागणी ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी केली आहे. जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वात दुपारी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे वाहन कडून शिवसैनिकांनी सडलेली पिके व काळे झेंडे त्यांना दाखविले होते. यावेळी पोलिसांनी जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांचे सह पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. मात्र अद्याप पर्यंत त्यांची सुटका केली नसल्याने शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. पोलीस ठाणे परिसरात प्रचंड जमाव करून शिवसैनिकांनी नारेबाजी केली. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Oct 06, 2025 17:00:58
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Oct 06, 2025 14:45:25
Vasai-Virar, Maharashtra:तीन जण गंभीर जखमी , रुग्णालयात उपचार सुरू अज्ञात आरोपीने घरात शिरून केला हल्ला अँकर - विरारच्या अर्नाला गावातील एका गोवारी कुटुंबावर मध्यरात्री प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांना विरारच्या संयोग रुग्णालयात हलवण्यात आले आहे. लीला गोवारी, जगन्नाथ गोवारी, नेत्रा जगन्नाथ गोवारी अशी जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. रात्री कुटुंब झोपलेले असताना अज्ञात आरोपीने घरात प्रवेश करून आरोपीविरोधात यातील जगन्नाथ गोवारी यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. हा हल्ला नेमका कोणी व कोणत्या वादातून केला हे समजू शकलेले नाही.. अर्नाळा पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.. बाईट- विश्वास किनी, स्थानिक नागरिक.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 06, 2025 14:09:57
Akola, Maharashtra:Anchor : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर जोडा फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिवारी नावाच्या वकिलाच्या कृत्याचा राष्ट्रवादी काँग्रेस ( अ.प ) चे आमदार अमोल मिटकरी यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ही घटना अतिशय निंदनीय असून अशा विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.तिवारी यांची वकिलीची सनद तात्काळ रद्द करण्यात यावी आणि त्यांच्या विरोधात देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयात बहुजन समाजातील व्यक्ती सर्वोच्च पदावर असल्याचा राग मनात धरून तिवारी यांनी हे अमानुष कृत्य केले असावे, असा आरोपही मिटकरी यांनी केला.दरम्यान, या घटनेनंतर समाजात कोणताही तणाव निर्माण होऊ नये, यासाठी सर्वांनी संयम बाळगावा, अशी विनंतीही आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.
1
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 06, 2025 13:00:23
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 06, 2025 12:54:02
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 06, 2025 12:50:10
Akola, Maharashtra:अकोल्याात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याच्या प्रयत्नाचा निषेध केलाय. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर फेकण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेचा सर्वत्र तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. ही घटना लोकशाही व्यवस्थेसाठी धोकादायक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेच्या निषेधार्थ अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे आंदोलन करण्यात आले. शहरातील मध्यवर्ती बसस्थानक समोर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून आपला संताप व्यक्त केला. या वेळी कार्यकर्त्यांनी “लोकशाहीवर हल्ला बंद करा” अशा घोषणा देत घटनेतील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 06, 2025 12:06:53
Washim, Maharashtra:अँकर:अनंत चतुर्दशी नंतर आलेल्या भाद्रपद पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत चिमुकल्या मुलींच्या बाहुली उत्सवाला सुरुवात होते. या उत्सवाची सांगता पारंपरिकरित्या कोजागिरी पौर्णिमेला होते. मात्र यावर्षी मातीच्या बाहुल्यांचे दर गगनाला भिडले असून, त्यामुळे पालकांच्या खिशाला चांगलीच झळ बसली आहे. गणेश विसर्जनानंतर लगेचच बाहुली उत्सवाच्या तयारीला सुरुवात होते. यंदा सतत झालेल्या संततधार पावसामुळे कुंभारांना मातीची मूर्ती तयार करण्यात अडचणी आल्या. परिणामी मातीच्या बहुल्यांच्या जोड्या 300 ते 400 रुपये दराने विकल्या जात आहेत. तसेच उत्सवात लागणारे ‘बत्तीस खाऊ’ देखील महागले आहेत. तरीही चिमुकल्या ‘लाडकीचा लाड’ पुरवण्यासाठी पालकांनी बाजारात उस, ज्वारीचे धांडे आणि विविध वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी केली आहे.
1
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Oct 06, 2025 12:05:55
Jalna, Maharashtra:जालना शशिकांत शिंदे: जरांगेंच्या आरक्षणाच्या लढाईला राजकीय रंग लागू नये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची जरांगेंवर टीका जरांगेंनी सरकाकडून जीआर दुरुस्त करून घ्यावा अँकर- मनोज जरांगेंनी आरक्षणाच्या लढाईला राजकीय रंग देऊ नये असं म्हणत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी जरांगेंवर टीका केलीये.. मराठा समाजाचं वाटोळं हे शरद पवारांनी केलं असल्याचा आरोप जरांगेंनी केला होता. त्याला शशिकांत शिंदे यांनी प्रतिउत्तर देत शरद पवार जेव्हा जरांगेंना भेटायला आले तेव्हा काय ऊर्जा आहे. असं जरांगे म्हणाले आता 1994 चा जीआर विषयी ते बोलतात. तर जरांगेंनी सरकारकून जीआर दुरुस्त करून घ्यावा. मात्र त्यांनी आरक्षणाच्या लढाईला राजकीय रंग देऊ नये असं म्हणत शशिकांत शिंदे यांनी जरांगेंवर टीका केलीये..
0
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top