Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

येवला में श्रीराम जन्मोत्सव: 400 साल की परंपरा के साथ भक्तों की भारी भीड़

SKSudarshan Khillare
Mar 26, 2026 09:30:59
Yeola, Maharashtra
येवला येथे श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. चारशे वर्षांची परंपरा लाभलेल्या श्रीमंत बंडयाराम मंदिरात , लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तींना आकर्षक सजावट करण्यात आली होती. “श्रीराम जय राम”च्या गजरात मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. नाशिकच्या काळाराम मंदिर व अयोध्येतील रामलल्लाप्रमाणेच येवल्यातील या पुरातन मंदिराची परंपरा आजही जपली जात असून मोठ्या भक्तिभावाने राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRAFULLA PAWAR
Mar 26, 2026 10:36:49
Varasoli, Maharashtra:अलिबागचे हॉटेल व्यवसाय दुहेरी कात्रीत गैस सिलेंडरचा तुटवडा, चुलीसाठी लाकडं नाहीत. उपलब्ध लाकडांचा दर वधारला. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे पर्यटन नगरी अलिबाग मधील हॉटेलमध्ये चुली पेटल्या आहेत. हॉटेल चालकांनी चुलीचा पर्याय शोधला मात्र त्यासाठी लाकडे मिळेनाशी झाली आहेत. पूर्वी सॉमिल वर ५ रुपये किलो दराने मिळणाऱ्या लाकडांचा दर वधारला असून एका किलोसाठी १२ रुपये मोजावे लागत आहेत. ग्रामीण भागातील जंगलात मिळणारी लाकडे आणताना वनविभागाचा जाच सहन करावा लागतोय. अशा दुहेरी कात्रीत हॉटेल व्यावसायिक सापडले आहेत. याचा पर्यटन व्यवसायावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होतेय.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 26, 2026 10:32:56
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 26, 2026 10:04:43
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:राज्यात सुमारे 14500 ग्रामपंचायतीच्या मुदत संपल्या आहेत, तिथं प्रशासक म्हणून सरपंच यांचीच निवड करण्याचा शासनाने निर्णय घेतला होता या निर्णयाला औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले होते, ज्या ठिकाणी सरपंच हाच प्रशासक आदेश लागू झाले नाहीत, तिथं आता सरपंच याना पदभार देऊ नये आणि जिथं चार्ज घेतला तिथं आर्थिक व्यवहार करण्यास मनाई आहे असे कोर्टाने सांगितले होते, त्यानंतर काही हस्तक्षेप अर्ज कोर्टात आले होते त्यानंतर कोर्टाने निकालात काही सुधारणा केल्या, सुधारित आदेशात कोर्टाने प्रशासक सरपंच याना दैनंदिन अत्यावश्यक व्यवहार करण्यास कोर्टाने मुभा दिली आहे, जिथं कारभार सरपंच यांनी हाती घेतले आहे तिथं करार करण्यात येऊ नये असे सांगितले तसेच दैनंदिन अत्यावश्यक कारभार करण्यास मुभा दिली आहे, पुढच्या सुनावणीत सगळे अर्ज एकत्र करून एक ठिकाणी मुख्य न्यायाधीश यांच्या समोर सुनावणी होईल असेही औरंगाबाद खंडपीठाने सुधारित आदेशात म्हटले आहे...
1052
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 26, 2026 10:00:53
Akola, Maharashtra:राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार नरहरी झिरवाळ यांच्या एका व्हिडिओमुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र हा व्हिडिओ नेमका कोणी आणि कोणत्या उद्देशाने बाहेर काढला, असा सवाल पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. मिटकरी यांनी म्हटले की, या प्रकरणात अनेक लोकांचे फोटो त्या ट्रान्सजेंडर यादवसोबत आहेत. कॅप्टन खरात प्रकरण तापले असताना राज्यातील लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी आठ महिन्यांपूर्वीचा झिरवाळ यांचा व्हिडिओ मुद्दाम अधिवेशन संपल्यानंतर काही मिनिटांतच व्हायरल करण्यात आला. हा पूर्ण प्रकार कोणीतरी “ प्री प्लान” करूनच केला असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय झिरवाळ प्रकरण हे लक्ष विचलित करण्यासाठीच उकरून काढण्यात आले असल्याचा आरोपही मिटकरी यांनी केला. त्यांनी पुढे सांगितले की, झिरवाळ यांनी सर्वप्रथम सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री बनवण्याची मागणी केली होती. त्यानंतरच त्यांच्या मागे अँटी करप्शन लावण्यात आले आणि त्यानंतर हा व्हिडिओ बाहेर काढण्यात आला. त्यामुळे ही सोची-समजी साजिश असून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी म्हटले. दरम्यान, “कॅप्टन खरातच्या आश्रमात अघोरी पूजा करणाऱ्यांनी हा इशारा समजून घ्यावा,” असेही मिटकरी यांनी सांगितले. तसेच अजित पवार यांचा खरात यांच्यासोबत एकही फोटो नसल्याचा आम्हाला अभिमान असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार सुनेत्रा पवार यांना असून, आपण पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्ड किंवा कोर कमिटीमध्ये नसल्याने या विषयाची अधिक माहिती नसल्याचेही अमोल मिटकरी यांनी सांगितले. मात्र झिरवाळ यांच्या व्हिडिओवरून सुरू झालेल्या या वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून पुढील काही दिवसांत हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
1000
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Mar 26, 2026 09:51:41
Dharashiv, Maharashtra:धाराशिव: रामनवमी के अवसर पर धाराशिव में भाजप की भगवा ध्वज यात्रा जिल्हाभर में रामनवमी के मौके पर शोभायात्रा का उत्साह धाराशिव शहर में भाजप के विधायक रणाजगजीतसिंह पाटील की उपस्थिति में यात्रा। महिला और युवा यात्राओं का सहभाग, हनुमान की भूमिका निभाने वाले कलाकार ने ध्यान खींचा; राम भक्तों में बड़ा उत्साह। रामनवमी के अवसर पर धाराशिव जिले भर में शोभा यात्रे का आयोजन किया गया। धाराशिव शहर में भाजप द्वारा भगवा ध्वज यात्रा काढी गई। यात्राओं में महिलाओं समेत युवाओं का सहभाग मिला। रामनवमीनिमित्त निघाले यात्रा में हनुमान की भूमिका निभाने वाले कलाकारों ने सर्वांचे ध्यान खींचा। श्रीराम के विचार और आचार प्रत्येकाने आचरण में लाने चाहिए— इस बात को भाजप विधायक राणाजगजीतसिंह पाटील ने व्यक्त किया।
906
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 26, 2026 09:16:50
Khed, Maharashtra:आखाती युद्धाच्या पडसाद आता थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचताना दिसत आहेत. गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे हॉटेल व्यवसायिकांसह घरगुती ग्राहकांनाही एलपीजी मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी अनेकांनी पुन्हा पारंपरिक चुलीचा पर्याय स्वीकारला आहे. लाकडाच्या मागणीत अचानक मोठी वाढ झाली असून, या वाढत्या मागणीचा परिणाम थेट जंगलांवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जर ही परिस्थिती अशीच कायम राहिली, तर मोठ्या प्रमाणात झाडतोड होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. म्हणजेच, हजारो किलोमीटर दूर सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता स्थानिक पातळीवर पर्यावरणीय संकटाच्या रूपाने समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे गॅस पुरवठा सुरळीत करणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे ही दुहेरी जबाबदारी प्रशासनासमोर उभी ठाकली आहे.
1085
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Mar 26, 2026 09:16:34
Buldhana, Maharashtra:ज्वलनशील पदार्थ की मृत्यूचं आमंत्रण? पेट्रोल पंपावर नियमांची पायमल्ली, प्रशासन झोपेत आहे का? पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची केवळ एक 'अफवा' पसरली आणि संपूर्ण गाव जणू पेट्रोल पंपावर धावून गेला आहे. ही धक्कादायक घटना आहे बुलढाणा जिल्ह्यातील आंबे टाकळी या गावची... पण धोकादायक बाब म्हणजे, इंधन भरण्याच्या नादात नागरिक आपल्या जीवाशी खेळ करत असल्याचं विदारक चित्र पाहायला मिळतंय. बुलढाणा जिल्ह्यातील आंबे टाकळी येथे पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मात्र, कहर म्हणजे अनेक नागरिक चक्क झाकण उघडे असलेल्या बॅरलमध्ये पेट्रोल आणि डिझेल भरून ते उघड्यावर घरी घेऊन जात आहेत. ज्वलनशील पदार्थ अशा प्रकारे उघड्या बॅरलमध्ये नेणं म्हणजे चालत्या-फिरत्या बॉम्बला आमंत्रण देण्यासारखं आहे. किरकोळ ठिणगी पडली तरी भीषण स्फोट होऊन मोठी जीवितहानी होऊ शकते, याचं भानही या नागरिकांना उरलेलं नाहीये.
1000
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 26, 2026 09:07:43
Kolhapur, Maharashtra:दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र यात्रा एक एप्रिल रोजी होत आहे. या यात्रेदरम्यान वादग्रस्त मारहाण करणाऱ्या पुजाऱ्यांना यात्रेपासून अलिप्त ठेवू अशी मागणी कोल्हापुरातील प्रजासत्ताक सामाजिक सेवा संघटनेचे दिलीप देसाई यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी जोतिबा डोंगरावर 15 पुजाऱ्यांनी भक्तांना बेदम मारहाणी केली होती. या मारहाणी नंतर कोडोली पोलीस स्टेशनमध्ये परस्पर विरोधी तक्रार देखील दाखल झाली आहे. असं असलं तरी प्रशासनाच्या वतीने हा वाद मिटवा यासाठी कोणतीही बैठक घेतलीली नाही, त्यामुळे जोतिबा डोंगरावर आजही पुजारी आणि भक्तां मधील वाद धुमसत आहे. याचा परिणाम चैत्र यात्रेत होवू शकतो त्यामुळे प्रशासनाने संबंधित मारहाणा करणाऱ्या पुजारांना जोतिबा डोंगरावर ठेवू नये अशी मागणी देखील दिलीप देसाई यांनी केली आहे.
1068
comment0
Report
JMJAVED MULANI
Mar 26, 2026 09:06:31
1061
comment0
Report
Advertisement
Back to top