Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune413133
बारामती पुलिस ने 34 लाख से अधिक के फर्जी उधारी घोटाले का आरोपी गिरफ्तार किया
JMJAVED MULANI
Mar 26, 2026 09:06:31
Rui, Maharashtra
34 लाखांहून अधिक रकमेचा आर्थिक अपहरण करणारा आरोपी अटक.....बारामती शहर पोलिसांची मोठी कारवाई..... गेल्या सहा महिन्यांपासून देत होता पोलिसांना चकवा.... हॉटेल मध्ये ग्राहकांची बनावट नावे नोंदवून आणि उधारी दाखवून 34 लाखांहून अधिक रकमेचा अपहरण करणाऱ्या माळेगाव येथील दत्तात्रय पोपटराव खुळे यास बारामती शहर पोलिसांनी जेरबंद केलं आहे. खुळे याच्या विरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकी संदर्भात गुन्हा दाखल होता. गेल्या सहा महिन्यांपासून खुळे हा पोलिसांना चकवा देत होता.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Mar 26, 2026 10:04:43
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:राज्यात सुमारे 14500 ग्रामपंचायतीच्या मुदत संपल्या आहेत, तिथं प्रशासक म्हणून सरपंच यांचीच निवड करण्याचा शासनाने निर्णय घेतला होता या निर्णयाला औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले होते, ज्या ठिकाणी सरपंच हाच प्रशासक आदेश लागू झाले नाहीत, तिथं आता सरपंच याना पदभार देऊ नये आणि जिथं चार्ज घेतला तिथं आर्थिक व्यवहार करण्यास मनाई आहे असे कोर्टाने सांगितले होते, त्यानंतर काही हस्तक्षेप अर्ज कोर्टात आले होते त्यानंतर कोर्टाने निकालात काही सुधारणा केल्या, सुधारित आदेशात कोर्टाने प्रशासक सरपंच याना दैनंदिन अत्यावश्यक व्यवहार करण्यास कोर्टाने मुभा दिली आहे, जिथं कारभार सरपंच यांनी हाती घेतले आहे तिथं करार करण्यात येऊ नये असे सांगितले तसेच दैनंदिन अत्यावश्यक कारभार करण्यास मुभा दिली आहे, पुढच्या सुनावणीत सगळे अर्ज एकत्र करून एक ठिकाणी मुख्य न्यायाधीश यांच्या समोर सुनावणी होईल असेही औरंगाबाद खंडपीठाने सुधारित आदेशात म्हटले आहे...
918
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 26, 2026 10:00:53
Akola, Maharashtra:राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार नरहरी झिरवाळ यांच्या एका व्हिडिओमुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र हा व्हिडिओ नेमका कोणी आणि कोणत्या उद्देशाने बाहेर काढला, असा सवाल पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. मिटकरी यांनी म्हटले की, या प्रकरणात अनेक लोकांचे फोटो त्या ट्रान्सजेंडर यादवसोबत आहेत. कॅप्टन खरात प्रकरण तापले असताना राज्यातील लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी आठ महिन्यांपूर्वीचा झिरवाळ यांचा व्हिडिओ मुद्दाम अधिवेशन संपल्यानंतर काही मिनिटांतच व्हायरल करण्यात आला. हा पूर्ण प्रकार कोणीतरी “ प्री प्लान” करूनच केला असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय झिरवाळ प्रकरण हे लक्ष विचलित करण्यासाठीच उकरून काढण्यात आले असल्याचा आरोपही मिटकरी यांनी केला. त्यांनी पुढे सांगितले की, झिरवाळ यांनी सर्वप्रथम सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री बनवण्याची मागणी केली होती. त्यानंतरच त्यांच्या मागे अँटी करप्शन लावण्यात आले आणि त्यानंतर हा व्हिडिओ बाहेर काढण्यात आला. त्यामुळे ही सोची-समजी साजिश असून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी म्हटले. दरम्यान, “कॅप्टन खरातच्या आश्रमात अघोरी पूजा करणाऱ्यांनी हा इशारा समजून घ्यावा,” असेही मिटकरी यांनी सांगितले. तसेच अजित पवार यांचा खरात यांच्यासोबत एकही फोटो नसल्याचा आम्हाला अभिमान असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार सुनेत्रा पवार यांना असून, आपण पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्ड किंवा कोर कमिटीमध्ये नसल्याने या विषयाची अधिक माहिती नसल्याचेही अमोल मिटकरी यांनी सांगितले. मात्र झिरवाळ यांच्या व्हिडिओवरून सुरू झालेल्या या वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून पुढील काही दिवसांत हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
917
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Mar 26, 2026 09:51:41
Dharashiv, Maharashtra:धाराशिव: रामनवमी के अवसर पर धाराशिव में भाजप की भगवा ध्वज यात्रा जिल्हाभर में रामनवमी के मौके पर शोभायात्रा का उत्साह धाराशिव शहर में भाजप के विधायक रणाजगजीतसिंह पाटील की उपस्थिति में यात्रा। महिला और युवा यात्राओं का सहभाग, हनुमान की भूमिका निभाने वाले कलाकार ने ध्यान खींचा; राम भक्तों में बड़ा उत्साह। रामनवमी के अवसर पर धाराशिव जिले भर में शोभा यात्रे का आयोजन किया गया। धाराशिव शहर में भाजप द्वारा भगवा ध्वज यात्रा काढी गई। यात्राओं में महिलाओं समेत युवाओं का सहभाग मिला। रामनवमीनिमित्त निघाले यात्रा में हनुमान की भूमिका निभाने वाले कलाकारों ने सर्वांचे ध्यान खींचा। श्रीराम के विचार और आचार प्रत्येकाने आचरण में लाने चाहिए— इस बात को भाजप विधायक राणाजगजीतसिंह पाटील ने व्यक्त किया।
895
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 26, 2026 09:16:50
Khed, Maharashtra:आखाती युद्धाच्या पडसाद आता थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचताना दिसत आहेत. गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे हॉटेल व्यवसायिकांसह घरगुती ग्राहकांनाही एलपीजी मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी अनेकांनी पुन्हा पारंपरिक चुलीचा पर्याय स्वीकारला आहे. लाकडाच्या मागणीत अचानक मोठी वाढ झाली असून, या वाढत्या मागणीचा परिणाम थेट जंगलांवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जर ही परिस्थिती अशीच कायम राहिली, तर मोठ्या प्रमाणात झाडतोड होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. म्हणजेच, हजारो किलोमीटर दूर सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता स्थानिक पातळीवर पर्यावरणीय संकटाच्या रूपाने समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे गॅस पुरवठा सुरळीत करणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे ही दुहेरी जबाबदारी प्रशासनासमोर उभी ठाकली आहे.
1085
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Mar 26, 2026 09:16:34
Buldhana, Maharashtra:ज्वलनशील पदार्थ की मृत्यूचं आमंत्रण? पेट्रोल पंपावर नियमांची पायमल्ली, प्रशासन झोपेत आहे का? पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची केवळ एक 'अफवा' पसरली आणि संपूर्ण गाव जणू पेट्रोल पंपावर धावून गेला आहे. ही धक्कादायक घटना आहे बुलढाणा जिल्ह्यातील आंबे टाकळी या गावची... पण धोकादायक बाब म्हणजे, इंधन भरण्याच्या नादात नागरिक आपल्या जीवाशी खेळ करत असल्याचं विदारक चित्र पाहायला मिळतंय. बुलढाणा जिल्ह्यातील आंबे टाकळी येथे पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मात्र, कहर म्हणजे अनेक नागरिक चक्क झाकण उघडे असलेल्या बॅरलमध्ये पेट्रोल आणि डिझेल भरून ते उघड्यावर घरी घेऊन जात आहेत. ज्वलनशील पदार्थ अशा प्रकारे उघड्या बॅरलमध्ये नेणं म्हणजे चालत्या-फिरत्या बॉम्बला आमंत्रण देण्यासारखं आहे. किरकोळ ठिणगी पडली तरी भीषण स्फोट होऊन मोठी जीवितहानी होऊ शकते, याचं भानही या नागरिकांना उरलेलं नाहीये.
988
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 26, 2026 09:07:43
Kolhapur, Maharashtra:दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र यात्रा एक एप्रिल रोजी होत आहे. या यात्रेदरम्यान वादग्रस्त मारहाण करणाऱ्या पुजाऱ्यांना यात्रेपासून अलिप्त ठेवू अशी मागणी कोल्हापुरातील प्रजासत्ताक सामाजिक सेवा संघटनेचे दिलीप देसाई यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी जोतिबा डोंगरावर 15 पुजाऱ्यांनी भक्तांना बेदम मारहाणी केली होती. या मारहाणी नंतर कोडोली पोलीस स्टेशनमध्ये परस्पर विरोधी तक्रार देखील दाखल झाली आहे. असं असलं तरी प्रशासनाच्या वतीने हा वाद मिटवा यासाठी कोणतीही बैठक घेतलीली नाही, त्यामुळे जोतिबा डोंगरावर आजही पुजारी आणि भक्तां मधील वाद धुमसत आहे. याचा परिणाम चैत्र यात्रेत होवू शकतो त्यामुळे प्रशासनाने संबंधित मारहाणा करणाऱ्या पुजारांना जोतिबा डोंगरावर ठेवू नये अशी मागणी देखील दिलीप देसाई यांनी केली आहे.
1053
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Mar 26, 2026 08:51:02
Buldhana, Maharashtra:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बाईट्स अशोक खरातला यासाठी मारून टाकावं की प्रकरणात गुंतलेले मंत्री आणि अधिकारी यांना संरक्षण मिळावं ऑन झी 24 तासाच्या बातमीवर शिक्कामोर्तब शिक्कामोर्तब झाला त्याबाबत हरकत नाहीये मात्र या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा झालाच पाहिजे पार्थ पवार यांचा थेट सहभाग असूनही त्यांना का वाचवले जात आहे हे अनाकलनीय आहे किंबहुना पार्थ पवारांवर टांगती तलवार ठेवणं हे भारतीय जनता पक्षाचं राजकारण असू शकतं या प्रकरणात संबंधित सगळ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे.... फक्त तेजवानी आणि दिग्विजय पाटील एवढेच आरोपी नाहीत.... यामध्ये महसूल मंत्री आणि मुख्यमंत्‍र्यांचा पण हात आहे का हे पण तपासलं पाहिजे तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे, त्यावर मी फारसं काही बोलणार नाही सत्ता मिळवण्यासाठी चंद्रकांत पाटील आणि शिंदे गटाने अघोरी प्रथांचा अवलंब केला. वैज्ञानिक दृष्टिकोन सोडून मनुस्मृतीचे विचार लादण्याचे आणि संविधानाला डावलण्याचे सरकारचे कारस्थान. On नरहरी झिरवाळ मंत्रीपदाचा राजीनामा त्यांनी दिलाच पाहिजे... मात्र या सर्वांची करते धरते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत... त्यामुळे राज्यपालांनी हे सरकार बरखास्त केले पाहिजे अशा केंद्रीय गृहमंत्री हे एके काळचे तडीपार आहेत, त्यात आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील तसेच आहेत त्यामुळे अघोरी पूजा असो किंवा निवडणूक आयोगाला वशीकरण करणं असो हे दोन नंबरचे धंदे करणे हाच नंबर दोनच्या दिल्लीतल्या माणसाचा धंदा आहे करंगळ्या कापून घेणारे 32 असोत की 36 हे सर्व बाटलेले आहेत ... त्याांचा लोकांवर लोकशाहीवर विश्वास नाहीये संविधान आणि पुरोगामित्वावर देखील त्यांचा विश्वास नाही..असा याचा अर्थ निघतो. देवेंद्र फडणवीस ऑन खरात फाईल्स फडणवीस हे सारवासारव करत आहेत, त्यांना या प्रकरणाचा राजकीय उपयोग करून घ्यायचा आहे.... विरोधकांना गप्प बसवण्यासाठी खरात फाईल्सचा वापर होतोय ... नाशिकचे पालकमंत्री या प्रकरणावर चुप्पी साधत आहे ... Ajit Pawar प्रकरण काही आकाश पाताळ एक करण्याची गरज नाही, कायद्याला कायद्याचे काम करू द्या, तपास चांगल्या पद्धतीने चालू द्या.... मी तर म्हणेल सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली हा तपास व्हावा. दोन राष्ट्रवादी एकत्रीकरण रोहित पवार जे बोलतायेत त्या प्रक्रियेमध्ये ते होते म्हणून बोलतात.... आणि रोहित पवारांच्या या बोलण्याचा अन्वयार्थ जनसामान्यात दिसून येतोय... इंधन तुटवडा पंधरा दिवसांपूर्वी राहुल गांधींनी सांगितलं होतं नियोजनाची आवश्यकता आहे.... मात्र मोदी आहे त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही असं बोलल्या गेलं.... मात्र राहुल गांधींनी म्हटल्याप्रमाणेच आज ती वेळ येत आहे......
1071
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 26, 2026 08:21:51
Washim, Maharashtra:देशभरात रामनवमी उत्साहात साजरी होत असताना,बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथेही यात्रा मोठ्या उत्साहात सुरू आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने भाविक येथे दाखल झाले असून,विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.भाविक जगदंबा माता,संत सेवालाल महाराज, संत बाबनलाल महाराज व संत रामराव महाराज यांचे दर्शन घेऊन नवस फेडण्याची परंपरा आहे.मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी असून,सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.जागृत देवस्थान असून आपले मागने पूर्ण येथे होत असल्याने येथे दर्शनासाठी येत असल्याचे भाविक सांगातात
1098
comment0
Report
Advertisement
Back to top