Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423203

नाशिक के मोरेनगर में किसान कलाकार ने रामफळ पर प्रभु श्रीराम की तस्वीर बनाई

VNVishal Nagesh More
Mar 26, 2026 08:51:34
Malegaon, Maharashtra
नाशिकच्या बागलाण तालुक्यातील मोरेनगर गावातील शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी प्रभु श्रीराम नवमी निमित्ताने रामफळावर प्रभु श्रीराम यांचे चित्र साकारले तसेच पानावर श्रीराम लिहिले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
DPdnyaneshwar patange
Mar 26, 2026 09:51:41
Dharashiv, Maharashtra:धाराशिव: रामनवमी के अवसर पर धाराशिव में भाजप की भगवा ध्वज यात्रा जिल्हाभर में रामनवमी के मौके पर शोभायात्रा का उत्साह धाराशिव शहर में भाजप के विधायक रणाजगजीतसिंह पाटील की उपस्थिति में यात्रा। महिला और युवा यात्राओं का सहभाग, हनुमान की भूमिका निभाने वाले कलाकार ने ध्यान खींचा; राम भक्तों में बड़ा उत्साह। रामनवमी के अवसर पर धाराशिव जिले भर में शोभा यात्रे का आयोजन किया गया। धाराशिव शहर में भाजप द्वारा भगवा ध्वज यात्रा काढी गई। यात्राओं में महिलाओं समेत युवाओं का सहभाग मिला। रामनवमीनिमित्त निघाले यात्रा में हनुमान की भूमिका निभाने वाले कलाकारों ने सर्वांचे ध्यान खींचा। श्रीराम के विचार और आचार प्रत्येकाने आचरण में लाने चाहिए— इस बात को भाजप विधायक राणाजगजीतसिंह पाटील ने व्यक्त किया।
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 26, 2026 09:16:50
Khed, Maharashtra:आखाती युद्धाच्या पडसाद आता थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचताना दिसत आहेत. गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे हॉटेल व्यवसायिकांसह घरगुती ग्राहकांनाही एलपीजी मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी अनेकांनी पुन्हा पारंपरिक चुलीचा पर्याय स्वीकारला आहे. लाकडाच्या मागणीत अचानक मोठी वाढ झाली असून, या वाढत्या मागणीचा परिणाम थेट जंगलांवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जर ही परिस्थिती अशीच कायम राहिली, तर मोठ्या प्रमाणात झाडतोड होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. म्हणजेच, हजारो किलोमीटर दूर सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता स्थानिक पातळीवर पर्यावरणीय संकटाच्या रूपाने समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे गॅस पुरवठा सुरळीत करणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे ही दुहेरी जबाबदारी प्रशासनासमोर उभी ठाकली आहे.
1074
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Mar 26, 2026 09:16:34
Buldhana, Maharashtra:ज्वलनशील पदार्थ की मृत्यूचं आमंत्रण? पेट्रोल पंपावर नियमांची पायमल्ली, प्रशासन झोपेत आहे का? पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची केवळ एक 'अफवा' पसरली आणि संपूर्ण गाव जणू पेट्रोल पंपावर धावून गेला आहे. ही धक्कादायक घटना आहे बुलढाणा जिल्ह्यातील आंबे टाकळी या गावची... पण धोकादायक बाब म्हणजे, इंधन भरण्याच्या नादात नागरिक आपल्या जीवाशी खेळ करत असल्याचं विदारक चित्र पाहायला मिळतंय. बुलढाणा जिल्ह्यातील आंबे टाकळी येथे पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मात्र, कहर म्हणजे अनेक नागरिक चक्क झाकण उघडे असलेल्या बॅरलमध्ये पेट्रोल आणि डिझेल भरून ते उघड्यावर घरी घेऊन जात आहेत. ज्वलनशील पदार्थ अशा प्रकारे उघड्या बॅरलमध्ये नेणं म्हणजे चालत्या-फिरत्या बॉम्बला आमंत्रण देण्यासारखं आहे. किरकोळ ठिणगी पडली तरी भीषण स्फोट होऊन मोठी जीवितहानी होऊ शकते, याचं भानही या नागरिकांना उरलेलं नाहीये.
916
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 26, 2026 09:07:43
Kolhapur, Maharashtra:दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र यात्रा एक एप्रिल रोजी होत आहे. या यात्रेदरम्यान वादग्रस्त मारहाण करणाऱ्या पुजाऱ्यांना यात्रेपासून अलिप्त ठेवू अशी मागणी कोल्हापुरातील प्रजासत्ताक सामाजिक सेवा संघटनेचे दिलीप देसाई यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी जोतिबा डोंगरावर 15 पुजाऱ्यांनी भक्तांना बेदम मारहाणी केली होती. या मारहाणी नंतर कोडोली पोलीस स्टेशनमध्ये परस्पर विरोधी तक्रार देखील दाखल झाली आहे. असं असलं तरी प्रशासनाच्या वतीने हा वाद मिटवा यासाठी कोणतीही बैठक घेतलीली नाही, त्यामुळे जोतिबा डोंगरावर आजही पुजारी आणि भक्तां मधील वाद धुमसत आहे. याचा परिणाम चैत्र यात्रेत होवू शकतो त्यामुळे प्रशासनाने संबंधित मारहाणा करणाऱ्या पुजारांना जोतिबा डोंगरावर ठेवू नये अशी मागणी देखील दिलीप देसाई यांनी केली आहे.
954
comment0
Report
JMJAVED MULANI
Mar 26, 2026 09:06:31
943
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Mar 26, 2026 08:51:02
Buldhana, Maharashtra:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बाईट्स अशोक खरातला यासाठी मारून टाकावं की प्रकरणात गुंतलेले मंत्री आणि अधिकारी यांना संरक्षण मिळावं ऑन झी 24 तासाच्या बातमीवर शिक्कामोर्तब शिक्कामोर्तब झाला त्याबाबत हरकत नाहीये मात्र या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा झालाच पाहिजे पार्थ पवार यांचा थेट सहभाग असूनही त्यांना का वाचवले जात आहे हे अनाकलनीय आहे किंबहुना पार्थ पवारांवर टांगती तलवार ठेवणं हे भारतीय जनता पक्षाचं राजकारण असू शकतं या प्रकरणात संबंधित सगळ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे.... फक्त तेजवानी आणि दिग्विजय पाटील एवढेच आरोपी नाहीत.... यामध्ये महसूल मंत्री आणि मुख्यमंत्‍र्यांचा पण हात आहे का हे पण तपासलं पाहिजे तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे, त्यावर मी फारसं काही बोलणार नाही सत्ता मिळवण्यासाठी चंद्रकांत पाटील आणि शिंदे गटाने अघोरी प्रथांचा अवलंब केला. वैज्ञानिक दृष्टिकोन सोडून मनुस्मृतीचे विचार लादण्याचे आणि संविधानाला डावलण्याचे सरकारचे कारस्थान. On नरहरी झिरवाळ मंत्रीपदाचा राजीनामा त्यांनी दिलाच पाहिजे... मात्र या सर्वांची करते धरते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत... त्यामुळे राज्यपालांनी हे सरकार बरखास्त केले पाहिजे अशा केंद्रीय गृहमंत्री हे एके काळचे तडीपार आहेत, त्यात आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील तसेच आहेत त्यामुळे अघोरी पूजा असो किंवा निवडणूक आयोगाला वशीकरण करणं असो हे दोन नंबरचे धंदे करणे हाच नंबर दोनच्या दिल्लीतल्या माणसाचा धंदा आहे करंगळ्या कापून घेणारे 32 असोत की 36 हे सर्व बाटलेले आहेत ... त्याांचा लोकांवर लोकशाहीवर विश्वास नाहीये संविधान आणि पुरोगामित्वावर देखील त्यांचा विश्वास नाही..असा याचा अर्थ निघतो. देवेंद्र फडणवीस ऑन खरात फाईल्स फडणवीस हे सारवासारव करत आहेत, त्यांना या प्रकरणाचा राजकीय उपयोग करून घ्यायचा आहे.... विरोधकांना गप्प बसवण्यासाठी खरात फाईल्सचा वापर होतोय ... नाशिकचे पालकमंत्री या प्रकरणावर चुप्पी साधत आहे ... Ajit Pawar प्रकरण काही आकाश पाताळ एक करण्याची गरज नाही, कायद्याला कायद्याचे काम करू द्या, तपास चांगल्या पद्धतीने चालू द्या.... मी तर म्हणेल सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली हा तपास व्हावा. दोन राष्ट्रवादी एकत्रीकरण रोहित पवार जे बोलतायेत त्या प्रक्रियेमध्ये ते होते म्हणून बोलतात.... आणि रोहित पवारांच्या या बोलण्याचा अन्वयार्थ जनसामान्यात दिसून येतोय... इंधन तुटवडा पंधरा दिवसांपूर्वी राहुल गांधींनी सांगितलं होतं नियोजनाची आवश्यकता आहे.... मात्र मोदी आहे त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही असं बोलल्या गेलं.... मात्र राहुल गांधींनी म्हटल्याप्रमाणेच आज ती वेळ येत आहे......
1071
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 26, 2026 08:21:51
Washim, Maharashtra:देशभरात रामनवमी उत्साहात साजरी होत असताना,बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथेही यात्रा मोठ्या उत्साहात सुरू आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने भाविक येथे दाखल झाले असून,विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.भाविक जगदंबा माता,संत सेवालाल महाराज, संत बाबनलाल महाराज व संत रामराव महाराज यांचे दर्शन घेऊन नवस फेडण्याची परंपरा आहे.मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी असून,सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.जागृत देवस्थान असून आपले मागने पूर्ण येथे होत असल्याने येथे दर्शनासाठी येत असल्याचे भाविक सांगातात
1098
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 26, 2026 08:06:36
Satara, Maharashtra:सातारा: पोलीस अधीक्षक तुषार दोशी हे आज त्यांचा पोलीस मुख्यालयात हजर झाल्याचे आणि दैनंदिन कामकाजाला केली सुरुवात केल्याचे पहायला मिळाले. जिल्हा परिषद निवडणूक अध्यक्षपदाच्या निवडीवेळी राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना जिल्हा परिषदेच्या सभागृहात घेऊन जाताना मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाली होती. या दरम्यान झालेल्या गोंधळानंतर मंत्री शंभूराज देसाईंनी विधानपरिषदेत सातारा पोलिस प्रमुख तुषार दोशी आणि त्याच्या काही अधिकाऱ्यांना निलंबित कराव अशी मागणी केली होती या मागणी नंतर सभागृहात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तुषार दोशी यांना निलंबित करावे असे निर्देश दिले होते मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराची चौकशी केली जाईल असं सांगितले होते. या घटनाक्रमानंतर पोलिस अधीक्षक दोशी हे आज दोन दिवसांनंतर पोलिस मुख्यालयात हजर झाले आहेत त्याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी...
1024
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 26, 2026 08:06:21
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - लाल मिरचीचे दर भडकले,दुप्पट वाढ झाल्याने सर्वसामान्यांना आर्थिक फटका.. अँकर - सांगलीमध्ये लाल मिरचीचे दर चांगलेच भडकले आहेत. 100 ते 300 रुपये किलो असणारया मिरची दरात दुपटीने वाढ झाली आहे.त्यामुळे आधीच महागाई आणि गॅस दरवाढीच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांना मिरची दरवाढीचा झटका बसत आहेत.सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात लाल मिरचीची आवक दरवर्षी होत असते,मात्र यंदा मिरची उत्पादन घटला आहे त्यामुळे आवक देखील कमी प्रमाणात येत आहे.परिणामी लाल मिरच्यांचे दर हे दुप्पट झाले आहेत प्रामुख्याने सांगली बाजारात संकेश्वरी,ब्याडगी,गुंटूर, तेजा आणि सीजेंड या मिरच्यांना चटणी बनवण्यासाठी मोठी मागणी असते , प्रामुख्याने आंध्र प्रदेश,तेलंगणा, कर्नाटक राज्यांमधून मोठ्या प्रमाणात मिरचीचं उत्पादन घेतले जाते,मात्र गतवर्षी अवकाळी पाऊस आणि घसरलेले दर,यामुळे यंदा मिरची उत्पादन घटल्याने लाल मिरच्यांचा दर गगनाला भिडले आहेत. परिणामी मिरचीची विक्री देखील घटली असून सर्वसामान्यांच्या अवाक्या बाहेर लाल मिरची गेली आहे.
1063
comment0
Report
Advertisement
Back to top