Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422303

निफाड़ में बिबट्या का आतंक जारी; देवगांव में दूसरा बिबट्या जेरबंद

SKSudarshan Khillare
Nov 21, 2025 06:46:13
Niphad, Maharashtra
निफाड ब्रेकिंग निफाड मध्ये बिबट्याची दहशत कायम.... हप्त्याभरात दुसरा बिबट्या देवगावात वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद.... बिबट्या प्रवणक्षेत्र घोषित करण्याची नागरिकांची मागणी.... काही दिवसांपूर्वी नागरिकांनी बिबट्यांचा बंदोबस्तासाठी केला होता रस्ता रोको......
177
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Nov 21, 2025 07:32:12
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर. मंत्री संजय शिरसाठ यांची पत्रकार परिषद. शिंदे नाराजी, उद्धव ठाकरे आरोप. गेल्या आठवड्यात काही मंत्री न गे्ल्याने महाराष्ट्रात जो वादळ निर्माण झाला होता त्यावर आता पडदा पडला आहे. काय केलं पाहिजे, काय नाही याची आचार सहिता ठरवावी असे होते. यात वाद आहे असे काही नाही. शिंदे यांनी पत्रकार परिषद मध्ये सर्व स्पष्ट केले आहे. शिंदे यांची भेट ही पूर्वनियोजित होती. मात्र काहीजण कविता करू लागले, काही ध्न्यांनी त्यावर बोलू लागले. उद्धव ठाकरे यांच्या अवस्था सध्या धृतराष्ट्र सारखी आहे. टोमणे मारण्याचा प्रयत्न करतात. कविता करण्याचा प्रयत्न करतात. शिंदे यांना भूमिका मांडायची असेल तर ते मिडिया समोर मांडतात. युतीत मिठाचा खडा पडेल असे बिलकुल नाही. ऑन नाराजी...नेत्यांची देहबोली. प्रत्येकजण आपापल्या वेळेनुसार जात असतात. फ्लाईट मध्ये ते नेहमी वेगवेगळे जातात.. चुकून कोणी पाहिले नाही तर त्याच बाऊ करू नये. उद्धव ठाकरे यांनी आता वयोमानानुसार मोठे प्रगल्भ व्हावं... दुसऱ्याचा वास घेणे एवढ्या मोठ्या नेत्याला शोभत नाही. टोमणे मारणे बंद करा.. पक्ष संपतो ते बघण्यापेक्षा टोमणे मारणे योग्य वाटत असेल तर लखलाभ. शिंदे यांचे मोदी आणि शाह सोबत चांगले सबंध आहे. दानवे वक्तव्य. त्याचा संबंध महाराष्ट्रातील भाजप नेत्यांशी जोडणे योग्य नाही. सर्वांशी संबंध चांगले आहे. भांड्याला भांडे लागते, घर म्हंटल्यावर भांडे लागते. घटस्फोट सारखी परिस्थिती नाही. ऑन पार्थ पवार एफ आय आर. मुख्यमंत्री यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे, कुणालाही वाचवले जाणार नाही. भविष्यात जे काही कायदेशीर आहे. जे अडकतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. ऑन शीतल तेजवानी vip चौकशी. vip ट्रीटमेंट का दिली याबाबत कल्पना नाही. तेथील अधिकारी याचा उत्तर देऊ शकतील. ऑन बांगर हिंगोली. तिन्ही नेत्यांमध्ये बैठक होऊन आचार संहिता ठरली आहे. सर्वांना याची आचार साहित्याचे पालन करावे अशी सूचना सर्वांना दिली आहे. ऑन एकमेकांना चर्चा. इतका छोटा विषय ५० मिनिटांच्या भेटीत चालत नसतो... एवढ्या छोटा विषयावर चर्चा झाली की नाही. देशाच्या मीडियाचा माध्यमातून शहा पर्यंत ही बाब गेली असावी. ऑन बिनविरोध निवडणूक. छोट्या मोठ्या निवडणुकीत अनेक प्रतिनिधी बिनविरोध निवडून येत असतात. जे आरोप करताय त्यांच्याबाबत झालं नाही का, पवार साहेबांनी केले आहे, सगळ्यांनी केले आहे.... ऑन नगरसेवक पद लिलाव. मला कल्पना नाही, बोली लावून नगरसेवक असे पहिल्यांदा ऐकले. असे असेल तर राजकारणाला चांगले दिवस नाहीत ऑन आमदार अधिकारी उभे राहणे. लोकशाही मध्ये जो प्रक्रिया आहे त्यातील हा एक भाग आहे. हा प्रोटोकॉल आधीपासून आहे. काही अधिकारी स्वतःला मोठे समजता खुर्चीवरून उठत नाही. आचार सहित वगळता इतर वेळी लोकप्रतिनिधींचा सन्मान झालाच पाहिजे. ऑन लाडकी बहीण. असे प्रकार समोर आल्यानंतर सरकारने सांगितले होते, आपले नाव सरेंडर करून बाहेर पडा, अनेकजण बाहेरदेखील पडले होते. आता कारवाई करायची नाही... मात्र यावर गंभीर पाऊले उचलावी. ऑन मुंबई ट्रेन वाद तरुण मृत्यू. अत्यंत वाईट आणि दुर्दैवी घटना आहे. भाषेचा वाद इथपर्यंत जाऊ नये. डॉक्टरांच्या स्वप्न पाहणाऱ्या तरुणाचा मृत्यू होणे म्हणजे हा महाराष्ट्रावर लागलेला कलंक म्हणावं लागेल... ऑन विरोधक एकत्र निवडणूक मुंबई. शरद पवार यांनी आतापर्यंत सायलेन्स भूमिका घेतली आहे. मनसे ठाकरे एकत्र आल्यावर बोलले फक्त... कुणाचीही युती करा असे संकेत त्यांनी दिले आहे. काँग्रेसकडे त्यांचा कल आहे. असे झाले तर मनसे आणि उद्धव ठाकरेंची सेना बाहेर पडावे लागेल. ऑन ससून रुग्णालयात प्रकार. ससून होटेलच्या बाहेर बसविण्यात आले मी तातडीने दाखल घेतली जो कुणी जबाबदार असेल त्यावर कारवाई करावी अशा सूचना केल्या आहे. सहानुभूमीतने विचार करून माझ्या खात्याकडून काय करता येईल पाहू.. ऑन भाजप मुंबई सर्वे - चांगले आहे. निवडणूक जाहीर होऊ द्या, लोकांचे जन मत तयार होत नाही तो पर्यंत अशी सर्व्हे प्राथमिक असते. खरे सर्व्हे निवडणुंक जवळ असल्यावर असतात... ऑन सुनील तटकरे संपर्कात. ते कोकणातील असल्याने त्यांना राजकारण माहिती असेल मला काहीही माहिती नाही.. ऑन ओळखपत्र - टँकमध्ये ओळखपत्र कशाला टाकले, तेथून रॅकेट चालत असावे असे दिसत आहे. अत्यंत गांभीर्यपूर्वक याची चौकशी झाली पाहिजे. हे कुणी जमा केले कुणी काढले याची चौकशी झाली पाहिजे. ऑन उद्धव ठाकरे, काँग्रेस. हे दिल्लीला कुणाला भेटायला जात आहे. वेळ आल्यावर राहुलगंधीला सामानाच्या फ्रंट पेजवर छाप्याची खाज असते. राहुल गांधी सोनिया गांधी यांना विचारत नाही. आणि यांची कसली ताकत म्हणून यांना सर्व साथ घेऊन लढायचे आहे... झालेली चूक झाकण्यासाठी हे करतात. काँग्रेस आधीही कुणाची न्हवती, आजही नाही, उद्याही राहणार नाही... कसली ताकद आली, नाटकातील राजासारखा बोलतात, मेकअप केलेला चेहरा कधीतरी पुसा.... ताकद होती तर एवढे कमी आमदार कसे, नगरसेवक का नाही.. ऑन मनसे ठाकरे काँग्रेस - असेच एकमेकावर वर बोलतील याची आघाडी टिकणार नाही. पडळकर कार्यकर्ते भाजप प्रवेश... यातिनी नेते घेतील, याचा काय कार्यकर्ते ठरवतील...
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 21, 2025 07:18:43
Akola, Maharashtra:एकेकाळी एकत्र येत राजकारण करणारे दोन्ही पक्षांमध्ये आता कडवट भूमिका दिसत असतानाच, हिवरखेडमध्ये मात्र एकत्र येऊन निवडणुक लढवण्याचा केलेला निर्णय मतदारांमध्ये मोठा चर्चेचा विषय बनला आहे.या अनपेक्षित राजकीय समीकरणामुळे हिवरखेडची निवडणुूक अधिकच उत्सुकता वाढवणारी ठरली आहे.एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांचे विचार जुळत असल्याने बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला असल्याचं येथील उमेदवार म्हणत आहे।नगरपरिषद अस्तित्वात आल्यानंतर सर्वच पक्षांनी येथे मोर्चेबांधणीला वेग दिला असून, प्रचार मोहिमा जोरात सुरू आहेत। भाजपनेही या निवडणुकीत दमदार तयारी करत जिल्हा परिषद सदस्या आणि अनुभवी राजकारणी सुलभा दुतोंडे यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या प्रचाराचा नारळही फोडण्यात आला असून, प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्याचे आश्वासन भाजपकडून दिले जात आहे.हिवरखेड नगरपरिषद क्षेत्रात तब्बल २०,१७३ मतदार असून अध्यक्षपदासाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वच पक्ष बूथ पातळीवर शक्तीझोत लावत असताना, शिवसेना (शिंदे गट) आणि प्रहार जनशक्ती पक्षाची झाली असलेली स्थानिक युती हे संपूर्ण निवडणुकीचे समीकरणच बदलणारे ठरू शकते. त्यामुळे अंतिम क्षणी कोणाचे पारडे जड ठरणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे।दशकांपासून नगरपरिषद दर्जासाठी लढा देत अखेर हा दर्जा मिळालेल्या हिवरखेडमध्ये होत असलेली पहिलीच निवडणुūk राजकीय दृष्ट्या अत्यंत रंगतदार बनली आहे. शिवसेना–प्रहार युतीचा प्रभाव की भाजपची संघटनशक्ती ,अंतिम निकाल कोणाच्या बाजूने झुकतो, हे पाहण्यासाठी नागरिक उत्सुक आहेत。
102
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 21, 2025 07:17:50
Nagpur, Maharashtra:नागपूर चंद्रशेखर बावनकुळे (महसूल मंत्री) मैं आज यवतमाळ, पुसद, और वर्धा, देवळी इन स्थानों पर प्रचार कर रहा हूँ.. महाराष्ट्र की भाजपा के सभी विधायक, खासदार और नेताओं ने प्रचार की जिम्मेदारी संभाली है.. और महायुति 51% मत लेकर जीत जाएगी इसका मुझे विश्वास है.. Mumbai सर्वे हम भाजपा महायुती मिलकर इस बार मुंबई का महापौर बनवेंगे। मुंबई की जनता विकास के पक्ष में है.. और भाजपा के पक्ष में है.. ठाणे कानशिलात इस घटना की जिम्मेदारी लेकर उचित कार्रवाई की जाएगी.. भाजप धमकी -- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष के जिलाध्यक्ष ने आरोप लगाया कोई धमकी नहीं दी गई.. यह हमारे संस्कार और संस्कृति नहीं.. शितल तेजवानी स्पेशल ट्रीटमेंट.. क्या और कैसी ट्रीटमेंट दी गई यह पुलिस देखेगी.. परंतु इस घोटाले में जो भी आरोपी होंगे उन्हें हम सख्ती से सजा देंगे.. मालेगाव प्रकरण फासी की मांग.. जिन लोगों ने इतना बड़ा अत्याचार किया उन्हें फांसी होनी चाहिए।
52
comment0
Report
SNSWATI NAIK
Nov 21, 2025 07:10:01
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई सायबर पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेने संयुक्त कारवाईत तुर्भेतील मिलेनियम पार्क, बिल्डिंग क्रमांक 03, तिसरा मजला येथे सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरवर छापा टाकून एक मोठा सायबर फसवणूक रॅकेट उधळून लावले. शेअर्स मार्केट ट्रेडिंगमध्ये नफा मिळण्याचे आमिष व अमेरिकन नागरिकांच्या संगणकांमध्ये व्हायरस हल्ला करून मदतीच्या नावाखाली आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीतील अक्षय शिर्के, गगन थापर सह १७ जणांना अटक करण्यात आली. तर शिव शर्मा हा मुख्य सूत्रधार फरार आहे. छाप्यादरम्यान The Wealth Growth, The Capital Services, Sigma, Trade Knowledge Services आणि Stock Vision या नावांनी चालणाऱ्या बनावट कंपन्यांमध्ये 97 युवक व युवती संगणकावरून व्हॉट्सअॅप ग्रुप्स व कॉलच्या माध्यमातून शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आश्वासन देत असल्याचे आढळले. संगणक तपासणीअंती फसवणुकीसाठी वापरलेले चॅट मेसेजेस, विविध बँक खात्यांची माहिती, व्यवहारांचे तपशील तसेच नागरिकांनी फसवणूक झाल्याची तक्रारीचे पुरावे जप्त करण्यात आले. तपासादरम्यान उघड झालेल्या 71 बँक खात्यांपैकी 61 खात्यांतून तब्बल 12.29 कोटींचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. National Cyber Crime Reporting Portal (NCCRP) वर या प्रकरणाशी संबंधित संपूर्ण देशभरातून 31 तक्रारी नोंद झालेल्या आहेत. याशिवाय World Solution या कंपनीमार्फत अमेरिकन नागरिकांच्या संगणकांमध्ये Malware/Ransomware Attack करून स्क्रीनवर Microsoft Error Code दाखवत बनावट Microsoft Customer Support च्या नावाने फसवणूक करण्यात येत असल्याचेही उघड झाले. संपूर्ण कारवाईत 21 सीपीयू, 5 लॅपटॉप, 5 SSD, 38 मोबाईल फोन आणि GSM सर्व्हर असा मुद्देमाल जप्त केला. सायबर पोलीस ठाणे, गु.र.नं. 55/2025 कलम 318(4), 319(2), 61(2) भा.दं.वि. व माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66(C), 66(D) अन्वये गुन्हा नोंदण्यात आला असून 20 आरोपींना 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील फसवणुकीचा व्याप मोठा असून आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
111
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Nov 21, 2025 06:35:49
Buldhana, Maharashtra:बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मोहना बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण पेशाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली.. शाळेचे मुख्याध्यापक धम्मसागर कांबळे हे दारूच्या नशेत शाळेच्या आवारातच धिंगाणी घालत असल्याचे पालकांच्या लक्षात आलेय .. ज्यावेळी मुख्याध्यापक कांबळे दारूच्या नशेत शाळेत दारू पिऊन आले आणि धिंगाणा घालायला लागले तेव्हा शाळेत सर्व विद्यार्थी आणि शिक्षक हजर होते, आणि प्रार्थना सुद्धा सुरू होती.. या संदर्भातील काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे.. तर ग्रामस्थानी या प्रकाराचा निषेध केला असून शिक्षण विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी ग्रामस्थानी केलीय ..
108
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 21, 2025 06:19:09
Nagpur, Maharashtra:नागपूर - - ग्रामपंचायतींतील संगणक परिचालकांचे कामबंद आंदोलन, चार महिन्यांपासून मानधनही नाही - नागपूर जिल्ह्यातील सावनेर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ७५ ग्रामपंचायती मध्ये कार्यरत संगणक परिचालकांनी बेमुदत कामबंद आंदोलन सूर केले आहे - संगणक परिचालकांना चार महिन्यांपासून मानधन देण्यात आले नाही, वारंवार पाठपुरावा करूनही मानधन वेळेवर मिळत नाही त्यामुळे काम बंद केल्याचे संगणक परिचालकांनी सांगितले - गेल्या चार महिन्यांपासून मानधन नसल्याने संगणक परिचालक आर्थिक संकटात सापडला आहे - त्यामुळे आता मानधन मिळाल्यावर काम करू, अशी भूमिका ग्रामपंचायती मध्ये कार्यरत संगणक परिचालकांनी घेतली आहे - शासनाने आपले सरकार सेवा प्रकल्प कार्यान्वित करण्याकरता आई टी आई लिमिटेड व रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या दोन कंपन्यांसोबत करार केला होता - या कंपन्यांची सदर प्रकल्पासाठी सेवा पुरवठादार म्हणून मुदत १८ सप्टेंबर २०२५ रोजी संपुष्टात आली आहे या मुळे ग्रामपंचायत संगणक परिचालक यांच्या मानधनाची जबाबदारी कुणाकडे राहील याचे स्पष्ट निर्देश शासनाकडून देण्यात आले नाही ज्यामुळे मानधनाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे
155
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 21, 2025 06:00:36
Nashik, Maharashtra:नाशिकमधील कॉबॅक्ट एव्हिएशन स्कुल गांधीनगर येथे आज सैन्य दलाच्या महत्वाच्या संयुक्त पासिंग आऊट परेड संपन्न झाला.. CAC-44, AHIC-43, बेसिक RPAS IP आणि OB Series 01 या चारही कोर्सेसचा संयुक्त दीक्षांत सोहळा पार पडला.. या परेडदरम्यान विविध कोर्सेस पूर्ण केलेल्या अधिकारी प्रशिक्षणार्थींना प्रतिष्ठेच्या हेलिकॉप्टर आणि RPAS विंग्ज, बॅजेस आणि ट्रॉफीज प्रदान करण्यात आले. हा सोहळा दक्षिणी कमांडचे GOC-in-C लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. दीक्षांत सोहळ्याच्यानंतर युद्ध भूमीवरील थरार अनुभवायला मिळाला. शिस्तबद्ध पडणाऱ्या पाऊल, अभिमानाने भरलेल्या ऊर, देशसेवेसाठी सज्ज झालेले तरुण अशा वातावरणात गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट एव्हिएशन स्कूलमध्ये दीक्षांत सोहळा संपन्न झाला
167
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 21, 2025 05:49:03
Akola, Maharashtra:राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अकोला जिल्ह्यातील हिवरखेड नगरपरिषद विशेष ठरत आहे. दशकांपासून नगरपरिषद दर्जासाठी सातत्याने लढा देणाऱ्या ग्रामस्थांच्या संघर्षाला यंदा यश मिळाले असून, ग्रामपंचायतीपासून नगरपरिषदेपर्यंतचा प्रवास करणारी सध्याच्या राज्यातील निवडणुकीतील ही एक मात्र नगरपरिषद आहे आणि पहिल्याच निवडणुकीत अध्यक्षपदाची धुरा महिलेकडे सोपवण्यात आली आहे. नगरपरिषद अस्तित्वात आल्यानंतर सर्वच प्रमुख पक्षांनी येथे मोर्चेबांधणी गतीने सुरू केली आहे. भाजपने अनुभवी राजकारणी आणि जिल्हा परिषद सदस्या सुलभा दुतोंडे यांच्या नावावर विश्वास ठेवत अध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली असून, त्यांच्या प्रचाराचा नारळही फोडण्यात आला आहे. शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली विकासकामे मार्गी लावू, असे आश्वासन भाजपने मतदारांना दिले आहे. हिवरखेड नगरपरिषद क्षेत्रात सुमारे २०,१७३ मतदार असून अध्यक्षपदासाठी तब्बल ७ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे अंतिम क्षणी अल्प मतांच्या फरकाने कोणाचे पारडे जड ठरणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सर्वच पक्षांनी बूथ पातळीवर शक्तीझोत लावण्यास सुरुवात केली आहे. या नगरपरिषद निवडणुकीत आणखी एक राजकीय घडामोड चर्चेत आहे. सत्ताधारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला, कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी स्थानिक पातळीवर दिलेला पाठिंबा ही अभूतपूर्व युती मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. राज्यात दोन्ही पक्षांमध्ये कडवट भूमिका दिसत असतानाच, हिवरखेडमध्ये मात्र एकत्र येऊन निवडणूक लढवण्याच्या निर्णयामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पहिल्यांदा नगरपरिषदेचा दर्जा मिळालेल्या हिवरखेडमध्ये होत असलेली ही निवडणूक त्यामुळे राजकीय दृष्ट्या अधिक रंगतदार बनली असून, अंतिम निकाल कोणाच्या बाजूने झुकतो हे पाहण्यासाठी नागरिक उत्सुक आहेत.
125
comment0
Report
Advertisement
Back to top