Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

राजू शेट्टींचा सरकारवर हल्ला: शेतकऱ्यांवर दडपशाहीचा आरोप!

Sarfaraj Musa
Jul 04, 2025 04:34:01
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - खाकी वर्दीतील गुंडांना हाताशी धरून शक्तीपीठासाठी शेतकऱ्यांवर दडपशाही - सरकारला सुबुद्धी देण्यासाठी पांडुरंगाला साकडं घालन्यासाठी निघालो आहे - राजू शेट्टी... अँकर - खाकी वर्दीतील गुंडांना हाताशी धरून शक्तीपीठ महामार्गासाठी मुख्यमंत्र्यांकडुन शेतकऱ्यांवर दडपशाही करण्यात येत आहे,असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टींनी केला आहे,शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर मध्ये विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी शेतकरयांसह राजू शेट्टी निघाले आहेत,पंढरपूरकडे निघालेल्या राजू शेट्टींचे सांगली जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटन व शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीकडून स्वागत करण्यात आलं,यावेळी शक्तीपीठ विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शक्तिपीठ रद्द झालाच पाहिजे,अशी मागणी देखील करण्यात आली.यावेळी राजू शेट्टींनी सरकारवर निशाणा साधत मुख्यमंत्री पंढरपूरच्या विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी येत आहेत,आम्ही देखील शक्तीपीठ रद्द करण्यासाठी व सरकारला सुबुद्धी द्यावी,असे साकडं विठ्ठलाला घालण्यासाठी निघालोय, ज्या-ज्या वेळी आम्ही विठ्ठलाला साकडं घातलंय,त्या-त्या वेळी पांडुरंग आम्हाला प्रसन्न झालाय,हे सरकारनं लक्षात ठेवावं,असा इशारा एवढी राजू शेट्टींनी सरकारला दिला आहे. बाईट - राजू शेट्टी - माजी खासदार .
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement