Back
विदर्भात पावसाने फिरवली पाठ, शेतकऱ्यांना संकटाचा सामना!
Amravati, Maharashtra
Feed slug :- AMT_NO_RAIN_PKG दहा फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
विदर्भाकडे पावसाने फिरवली पाठ, शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेप; शेतकऱ्यांवर येणार दुपार पेरणीचा संकट
भंडारा आणि वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांनी केली दुबार पेरणी; विदर्भाला अजूनही मान्सूनच्या दमदार पावसाची गजर
अँकर :– आधी मे महिन्यात आलेल्या पावसाने संपूर्ण वातावरणात निर्माण झालेला गारवा आणि नंतर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पडलेला धो धो पाऊस आणि 15 जून नंतर विदर्भात पावसाने खंड दिल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात सापडला असून भंडारा आणि वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात असून पावसाने विदर्भाकडे पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी साठले आहे पाहूया झी 24 तास चा स्पेशेल रिपोर्ट....
Vo: विदर्भाकडे पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेप असल्याचा पाहायला मिळत आहे. संपूर्ण विदर्भाला अजूनही दमदार मान्सूनच्या पावसाची गजर असून पावसाला अजून विलंब झाल्यास शेतकऱ्यांवर दुपार पेरणीच संकट येण्याची शक्यता आहे. तर भंडारा आणि वाशिम जिल्ह्यात काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दरम्यान गेल्या आठवड्याभरापासून पावसाने दडी मारल्याने पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. विदर्भातील अनेक धरणे कोरडी पडली असून संपूर्ण विदर्भात अनेक ठिकाणी अजूनही टँकर ने पाणीपुरवठा सुरू आहे. शेतकऱ्यांनी सध्या आभाळाकडे नजर लावली असून वरून राजा शेतकऱ्यांवर प्रसन्न होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. दरम्यान पावसाने खंड दिल्याने अमरावती पिकांवर वाणी अळीचा प्रादुर्भाव झाला असून वाणी अळीकडून पिकांना पोखरायला सुरुवात झाली आहे. कृषी तज्ञांनी मार्गदर्शन करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.
बाईट :– नरसू भोयर, शेतकरी, चंद्रपूर
बाईट :– संजय बागडे, शेतकरी, भंडारा
बाईट :– चंदू बोलवार, शेतकरी, वाशिम
Vo: दमदार पाऊस होताच शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली मात्र गेल्या आठवडाभरापासून अमरावती जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने आता पिकांवर वाणी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे त्यामुळे पेरणी करताच शेतकरी संकटात सापडला आहे. पेरणी नंतर जमिनीत ओलावा नसल्यास या वाणी अळीचा प्रादुर्भाव होतो तर पाऊस येताच ही आली मरून जाते त्यामुळे शेतकरी सध्या आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. पाऊस न आल्यास ही अळी संपूर्ण बियाणे खाऊन घेणार आहे त्यामुळे कृषी विभागाच्या शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकरी करत आहे.
बाईट :– उमेश महिंगे, शेतकरी, अमरावती
ग्राफिस....
विदर्भात मान्सून दाखल झाला आहे मात्र अजून पर्यंत बरसला नाही सरासरीच्या 53% कमी पाऊस 1 ते 24 जून दरम्यान विदर्भात झाला आहे. काही जिल्ह्यात तर पावसाची जून महिन्यातील ही तूट 75% पर्यंत आहे. यंदा विदर्भातील 24 जून पर्यंत पावसाची स्थिती नेमकी कशी पाहूया ग्राफिक्स च्या माध्यमातून
अकोला जिल्हा
2025 वर्ष 25.5 मि, सामान्य पाऊस, 106. 2
1 ते 24 जून दरम्यान कमी झालेला पाऊस - (-76%) उणे 76 टक्के
अमरावती जिल्हा
2025 – 46.6 सामान्य पाऊस -106.1 आणि 1 ते 24 जून दरम्यान कमी झालेला पाऊस - 56% उणे 56 टक्के
भंडारा जिल्हा
2025 - 40.6 सरासरी -125.8 आणि 1 ते 24 जून दरम्यान कमी झालेला पाऊस -68% उणे 68 टक्के
बुलडाणा जिल्हा
2025 – 62.2 सरासरी -98.1 आणि 1 ते 24 जून दरम्यान कमी झालेला पाऊस -37% उणे 37 टक्के
चंद्रपूर जिल्हा
2025 – 81.8 सरासरी -121.4 आणि 1 ते 24 जून दरम्यान कमी झालेला पाऊस -33 % उणे 33 टक्के
गडचिरोली जिल्हा
2025 -86.6 सरासरी -154.1 आणि 1 ते 24 जून दरम्यान कमी झालेला पाऊस -44 % उणे 44 टक्के
गोंदिया जिल्हा
2025 -47.0 सरासरी -130.4 आणि 1 ते 24 जून दरम्यान कमी झालेला पाऊस -64 % उणे 64 टक्के
नागपूर जिल्हा
2025 -28.6 सरासरी -112.1 आणि 1 ते 24 जून दरम्यान कमी झालेला पाऊस -74 % उणे 74 टक्के
वर्धा जिल्हा
2025 – 71.9 सरासरी 116.2 आणि 1 ते 24 जून दरम्यान कमी झालेला पाऊस -38 % उणे 38 टक्के
वाशिम जिल्हा
2025 - 16.6 सरासरी –123 आणि 1 ते 24 जून दरम्यान कमी झालेला पाऊस -86 % उणे 86 टक्के
यवतमाळ जिल्हा
2025 – 58.5 सरासरी - 119.9 आणि 1 ते 24 जून दरम्यान कमी झालेला पाऊस -51% उणे 51 टक्के
दरम्यान विदर्भात एकूण 2025 मध्ये 56.60 मि मी पाऊस झाला असून सरासरी 120.4 मि म पाऊस होतो आणि यंदा 1 ते 24 जून दरम्यान -53 उणे 53 टक्के पाऊस झाला आहे.
बाईट :– श्रीकांथ, हवामान तज्ञ, नागपूर प्रादेशिक हवामान विभाग, हा बाईट अमर सरांनी पाठवला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement