Back
तळेगावमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १४ आरोपी जेरबंद!
Shirdi, Maharashtra
Anc - तळेगाव दिघे ते नांदूर शिंगोटे रस्त्यावर बांधकाम चालू असलेल्या घराच्या आडोशाला हारजितीचा तिरट जुगार अड्ड्यावर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टकात १४ आरोपी जेरबंद करुन ११ लाख २४ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामुळे अवैध धंदेचालकांत एकच खळबळ उडाली आहे.त्यांच्याकडून जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य, रोख रक्कम, १३ मोबाईल, ९ मोटारसायकल असा ११ लाख २४ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या सर्वांविरुद्ध पोकॉ.अत्तार यांच्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Oros, Maharashtra:
अँकर --- सिंधुदुर्ग जिल्ह्यात संस्थानकालीन ऐतिहासिक ठेवा असलेल्या सावंतवाडी येथील कारागृहाची संरक्षक भिंत कोसळली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील तीन दिवस संततधार पाऊस कोसळतोय. आणि अशातच दगडी भिंतीवर सिमेंट चे बांधकाम केल्याने भिंत कोसळली असल्याचा अंदाज व्यक्त होतोय. कारागृहाच्या चारी बाजूच्या तटबंदीला धोका असल्याने सावंतवाडी कारागृहात असलेल्या कैद्यांना ओरोस येथील कारागृहात हलविण्यात येणार आहे. ऐतिहासिक ठेवा जमीनदोस्त होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केलीय.
0
Share
Report
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - नोकरी मिळाली नाही म्हणून एनटीपीसी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याने शेतात केली आत्महत्या
नोकरी मिळाली नाही म्हणून एनटीपीसी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याने शेतात केली आत्महत्या
नातेवाईक आणि ग्रामस्थांचे एनटिपीसीच्या समोर मृतदेह ठेवून आंदोलन सुरु
अँकर :- दक्षिण सोलापूर येथील फताटेवाडी गावात एका शेतकऱ्याने आत्महत्या केलीय. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे मृतदेह सोलापुरातील एनटीपीसी प्रकल्पाच्या प्रवेशद्वारासमोर ठेवून संतप्त नागरिकांकडून आंदोलन देखील केलं जातंय. मिथुन राठोड असे आत्महत्या केलेल्या 45 वर्षीय शेतकऱ्याचे नावं आहे. सोलापूर जिल्ह्यातील फताटेवाडी येथे एनटीपीसी प्रकल्प स्थापित झाल्यानंतर अनेकांच्या जमिनी अधिगृहीत करण्यात आल्या होत्या. या अधिग्रहणचे वाढीव पैसे मिळावेत, तसेच प्रकल्पग्रस्त म्हणून एनटीपीसीमध्ये नोकरी मिळावी या साठी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे प्रयत्न सुरु होते. मात्र त्यात त्यांना यश आले नाही यामुळेही ते त्रस्त होते. त्यातूनच त्यांनी आज आपल्या शेतात आत्महत्या केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केलाय. मिथुन राठोड याच्या आत्महत्याला एनटीपीसी जबाबदार असल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी आणि मृताच्या नातेवाईकांनी एनटीपीसी प्रकल्पासमोरचं आंदोलन सुरु केलंय. मिथुन राठोड यांचे मृतदेह एन्टीपीसीच्या प्रवेशाद्वारासमोर ठेवूनं आंदोलनाला करण्यात येतंय.
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0407ZT_JALNA_RAIN_PRBLM(3 FILES)
जालना | 15 दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची उघडीप, खरीप पिकं संकटात(वाक थ्रू)
अँकर | जालना जिल्ह्यातील खरीप पिकं पावसाअभावी संकटात आलीयत. गेल्या 15 दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस नाही.त्यामुळे सोयाबीन, कपाशी,मका ही पिकं पावसाअभावी संकटात आलीयत. आणि या पिकांचा आढावा घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नीतेश महाजन यांनी
वाक थ्रू+ चौपाल विथ शेतकरी
0
Share
Report
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- मुख्याध्यापकासाठी धरणे आंदोलन पाचवा दिवस
फीड 2C
अँकर:- अहिल्यानगर येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळाचे मुख्याध्यापक शिवाजीराव लंके यांची बदली तात्काळ रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून शाळेतील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन अहिल्यानगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय कार्यालय येथे सुरू असून या विद्यार्थ्यांचे वर्ग संस्थेच्या कार्यालयासमोरच भरविण्यात येत आहेत. पाचव्या दिवशी देखील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. तर काल संस्थेचे पदाधिकारी मंडळ आणि पालकांमध्ये बैठक संपन्न झाली परंतु या बैठकीत कुठलाही ठोस निर्णय न झाल्याने आंदोलक आपल्या निर्णयांवर ठाम राहिल्याने आंदोलन आजही सुरु राहणार असल्याचे पालकांकडून सांगण्यात आले.
बाईट:- रागिणी देशमुख, पालक
बाईट:- आस्था सुंबे, विद्यार्थिनी
0
Share
Report
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
Sng_shetkari_suucied
स्लग - धक्कादायक ! शेतकरी पिता-पुत्राने
विषारी औषध पिऊन केली आत्महत्या..
अँकर - सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या सोनी येथे पिता-पुत्रांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कीटकनाशक पिऊन पिता-पुत्रांनी आपलं आयुष्य संपवला आहे.गणेश हिंदुराव कांबळे वय 52 आणि इंद्रजित गणेश कांबळे,वय 23,असे पिता-पुत्राचे नाव असून दोघांना आपल्या शेतात ही आत्महत्या केली आहे. सकाळच्या सुमारास हे दोघेही पिता-पुत्र शेतामध्ये गेले होते,मात्र शेतामध्येच त्यांचा मृतदेह नागरिकांना आढळून आला,यावेळी दोघांच्या मृतदेह शेजारी कीटकनाशक औषधांच्या बाटल्या देखील आढळून आल्या,
या घटनेची माहिती मिळताच,मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह मिरजेच्या शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. तर दोघा पिता-पुत्रांनी नेमकी आत्महत्या कोणत्या कारणातून केली ?हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नसून अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत,मात्र या घटनेमुळे सोनी गावात हळहळ व्यक्त होत आहे.
0
Share
Report
Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज..
स्क्रिप्ट ::- महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड ची सक्ती करण्याच्या मागणी साठी युवकाचे पालिकेतल्या झाडावर चढून शोले आंदोलन.
AC ::- लातूर शहर महानगर पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना ड्रेस कोडची सक्ती करावी तसेच प्रत्येक कर्मचाऱ्यांना ओळखपत्र सक्ती करावी या मागणीसाठी पूर्व भाग कृती समितीच्या वतीने अनेकवेळा निवेदने देऊनही कसलीच कारवाई झाली नसल्याने बाबासाहेब बनसोडे या तरुणाने महानगर पालिकेत असलेल्या झाडावर चढून शोले स्टाईल आंदोलन केलंय. मनपाच्या वतीने आश्वासन दिल्यानंतर फायर ब्रिगेड च्या कर्मचाऱ्यांनी बनसोडे यांना खाली उतरवलं.
बाईट - बाबासाहेब बनसोडे - पूर्व भाग कृती समिती अध्यक्ष
0
Share
Report
Ambernath, Maharashtra:
अंबरनाथ-बदलापूरला पूर्णवेळ नगररचनाकार नाही!
शहरातील विकास कामांवर होतोय परिणाम
कामं ठप्प झाल्याची बिल्डर असोसिएशनची तक्रार
सरकारनं दोन्हीकडे लवकरात लवकर अधिकारी नेमण्याची मागणी
Amb town planer
Anchor : अंबरनाथ आणि बदलापूर या दोन वाढत्या शहरांना गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्णवेळ नगर रचनाकारच नसल्याने कामं ठप्प झाली असल्याची तक्रार अंबरनाथ बदलापूर बिल्डर असोसिएशनने केलीये.या दोन्ही शहरांमध्ये पुनर्विकास आणि नवीन गृहप्रकल्प यांची कामं जोरात सुरू असून पूर्णवेळ नगर रचनाकार नसल्यानं ही कामं ठप्प झाली असून दोन्हीकडे लवकरात लवकर पूर्णवेळ अधिकारी नेमण्याची मागणीही करण्यात आलीये. मात्र हे दोन्ही अधिकारी आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच येत असल्यानं विकासकांची परवानग्या, दाखले अशी कामं रखडली आहेत.
vo : अंबरनाथ पालिकेचे नगर रचनाकार विवेक गौतम हे एप्रिल महिन्यात निवृत्त झाले असून बदलापूर पालिकेचे नगर रचनाकार प्रकाश मुळे हेदेखील ३ महिन्यांपूर्वी निवृत्त झाले. तेव्हापासून या दोन्ही ठिकाणी पूर्णवेळ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली नसून सध्या अंबरनाथचा चार्ज ठाणे एसआरएचे नगर रचनाकार अविनाश चव्हाण यांच्याकडे आहे, तर बदलापूरचा चार्ज पनवेल महापालिकेच्या नगर रचनाकारांकडे आहे.
चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
0
Share
Report
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
10 FILES
SLUG NAME -SAT_SCHOOL_ISSUE
सातारा - एकीकडे राज्य सरकार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर करोडो रुपये खर्च करते असे सांगत असले तरी दुसरीकडे मात्र जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या इमारतीची किती दुरावस्था आहे हे समोर आलं आहे.साताऱ्यातील जावली तालुक्यातील सायळी गावात मात्र शाळेच्या गळक्या इमारती मुळे व्हरांड्यात बसून शिक्षण घ्यावे लागत आहे.पाहुया याचा हा रिपोर्ट
वीओ १_सायळी गावात सातारा जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे याची पटसंख्या देखील फक्त ४ आहे.या शाळेची एवढी दुरावस्था आहे की अक्षरशः शाळेचा स्लॅब गळतो आहे त्यामुळे वर्गात सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे.ही इमारत एवढी जीर्ण झाली आहे भिंतीना तडे गेले आहेत.इमारतीचे कॉलम तुटले आहेत त्यातून लोखंडी बार बाहेर दिसाताय.शाळेच्या शिक्षकांकडून या बाबत पाठपुरावा करून देखील ,बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद याकडे दुर्लक्ष करत आहे
Wkt
याच wkt मध्ये शिक्षकाचा byte आहे .शिक्षकाचे नाव संदीप सुतार
वीओ 2- या शाळेत कमी विद्यार्थी असले तरी हे विद्यार्थी भीतीचा छायेत शिक्षण घेतायत.
विद्यार्थ्याचा byte
वीओ 3- या शाळेच्या इमारतीवरून ग्रामस्थ देखील आक्रमक झाले आहेत.मुलांचे जीव गेल्यावर शासनाला जाग येणार का असा सवाल ग्रामस्थानी विचारला आहे
Byte ग्रामस्थ
वीओ 4- एकूणच प्रशासनाची उदासीनता यातून दिसते आहे.या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मूलभूत सोयी सुविधाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
तुषार तपासे सातारा
0
Share
Report
Pandharpur, Maharashtra:
04072025
Slug - PPR_SHETTI_SAKADE
feed on 2c
file 10
------
Anchor - शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी राजू शेट्टी आमदार सतेज पाटील , खासदार प्रणिती शिंदे यांनी संत नामदेव पायरीला प्रतिकात्मक विठ्ठल मूर्तीच पूजन करून महामार्ग रद्द करण्यासाठी घातले साकडे, आजपर्यंत विठ्ठलाने सर्व ऐकले आहे आजही शेतकऱ्यांचे ऐकेल राजू शेट्टी यांना विश्वास
आज पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शेतकऱ्यांची दिंडी घेऊन राजू शेट्टी सतेज पाटील प्रणिती शिंदे यांनी चालत टाळ वाजवत वारकरी वेषात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कडे चालत दिंडी काढली.
आज पर्यंत पंढरपूर मध्ये येऊन अनेक आंदोलन केली या सर्व आंदोलनाला विठुरायाचा आशीर्वाद लाभला या आंदोलनात ही विठुरायाला घातलेल्या साकडं तो ऐकेल आणि फडणवीस सरकारला सुबुद्धी देईल शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे ही एकच आग्रही मागणी असणार आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे असा आग्रह ही माजी खासदार शेट्टी यांनी धरला आहे. आता विठ्ठल पावणार का हे पाहावे लागेल
----
Byte - राजू शेट्टी
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
कल्याण शीळ रोडवरील पालावा ब्रिजचे घाई घाई मध्ये केले लोकार्पण..
शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे ने काही दिवसापूर्वी केले होते आंदोलन...
मात्र आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी घाई गडबडीत केले पलावा ब्रिजचे उद्घाटन..
कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा
कल्याण शीळ रोड वरील पलावा पुलाचे लोकार्पण
कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते लोकार्पण
गेल्या अनेक वर्ष प्रतीक्षेत असलेल्या पलावा पुलाचे लोकार्पण
आम्ही ट्विटरवर इन्स्टाग्रामवर टीका करत नाही ..प्रत्यक्ष सोशल मिडियावर टीका करत नाही प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करतो - आमदार राजेश मोरे यांची नाव न घेता मनसेचे माजी आमदार राजू पाटील आणि ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांना टोला
Byte :- राजेश मोरे ( कल्याण ग्रामीण मतदारसंघ आमदार शिवसेना शिंदे गट )
0
Share
Report