Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

मराठा-कुणबी कार्ड विवाद: सरकार का बड़ा दावा

JJJAYESH JAGAD
Sept 11, 2025 07:48:56
Akola, Maharashtra
Anchor : राज्यातील मराठा समाजाला कुणबीचे दाखले देण्याबाबत विरोध नसून, विविध नेत्यांनी आपापल्या सूचना मांडल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांनी सांगितलं की, महाराष्ट्र सरकार सर्व समाजाला एकत्र घेऊन चालण्याचं काम करत असून, मराठा समाजासह इतर समाजालाही न्याय मिळावा यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती कार्यरत आहे.राजकारणातील आघाड्यांबाबत बोलताना आबिटकर म्हणाले कोण कोणासोबत येत आहे यापेक्षा आमचं संघटन मजबूत करून काम करणं हेच आमचं उद्दिष्ट आहे.दरम्यान, संजय राऊत यांनी उपस्थित केलेल्या “रक्त आणि क्रिकेट कसं चालतं?” या प्रश्नावर आबिटकर यांनी माहिती घेऊन उत्तर देऊ असं सांगितलं. मात्र, अतिरेकी घटनांबाबत बोलताना त्यांनी ठामपणे सांगितलं की, अतिरेक्यांन संदर्भात भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली होती, तीच भूमिका शिवसेनेची देखील असल्याच ते म्हणाले. Byte : प्रकाश आबिटकर , आरोग्य मंत्री..
5
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
YKYOGESH KHARE
Sept 11, 2025 12:01:18
Nashik, Maharashtra:nsk_malegaon . Anchor - मालेगावातील बोगस जन्म दाखला प्रकरणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी आज छावणी, किल्ला पोलिस ठाणे अधिकाऱ्यांसह अपर पोलिस अधीक्षकांची भेट घेत जन्म दाखला घोटाळा प्रकरणी चर्चा करत पुरावे सादर केले..या घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत १५०० पानांचे पुरावे सादर केले असून या पुराव्यांच्या माध्यमातून किमान ५०० जणांवर येत्या आठवड्याभरात गुन्हे दाखल होतील असा दावा सोमैया यांनी केला..पोलिसांचे काम व्यवस्थितरीत्या सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले..दरम्यान, आज नव्याने ७५० पानांचे पुरावे अपर पोलिस अधीक्षक तेगबीर सिंधू यांच्याकडे किरीट सोमैया यांनी सुपूर्द केले..जन्म दाखला घोटाळ्याप्रकरणी अजूनही व्याप्ती वाढतच चालली असून यापूर्वी मालेगावातून बोगस जन्म दाखले घेऊन फरार झालेल्यांची संख्या देखील अधिक असून त्यांचा कुठेही पत्ता लागत नाही..दरम्यान, SIT चौकशी प्रकरणावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देण्याचे सोमैया यांनी टाळले.. *बाईट - किरीट सोमैया, माजी खासदार..*
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Sept 11, 2025 12:00:25
Virar, Maharashtra:Date-21sep2025 Rep-prathamesh tawade Loc-virar Slug-VIRAR THAKRE Feed send by 2c Type-AvB Slug- विरार मध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून निषेध परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या लोक दरबाराला विरोध अँकर - वसई विरार महानगरपालिकेत आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा लोकदरबार आयोजित करण्यात आला होता, या दरम्यान ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हाताला काळया फिती बांधून निषेध व्यक्त केला ...यावेळी पन्नास खोके एकदम ओके, ओम भट स्वाहा असा घोषणा शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिल्या... वसई विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यालयात मंत्री प्रताप सरनाईक यांच्या लोक दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या अगोदरच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पालिकेच्या मुख्यालयासोबत निषेध व्यक्त करण्यात आला... Byte : किरण चेंदवणकर, शिवसेना ठाकरे गट .
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Sept 11, 2025 11:46:14
Shirdi, Maharashtra:Anc - ओळख लपवून साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत जाणाऱ्या गुन्हेगारांची आता खैर नाही.. कारण साईबाबासंस्थाने AI तंत्रज्ञानाचा आधार घेत नवीन " पीपल काउंटिंग आणि फेस डिटेक्शन " प्रणाली कार्यान्वित केली आहे.. या प्रणालीमुळे साई मंदिरात विविध प्रवेशद्वारांनी प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या भाविकांची तंतोतंत आकडेवारी संस्थानला कळणार आहे.. यासोबतच महाराष्ट्रासह देशातील गुन्हेगारांचा डेटा या प्रणालीत संग्रहित केला जाणार असल्याने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींनी मंदिराच्या आवारात प्रवेश करताच सीसीटीव्हीच्या आधारे साई संस्थानला तातडीने अलर्ट मिळणार आहे.. एका भाविकाच्या देणगीतून ही नवीन AI प्रणाली संस्थानने कार्यान्वित केली आहे.. साईभक्तांच्या सुकर दर्शनासह मंदिर आणि भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही प्रणाली अंत्यंत महत्वाची ठरणार आहे.. याचाच आढावा घेतलाय आणि साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी.. tiktak kunal jamdade with ceo gorksh gadilkar
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 11, 2025 11:36:20
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 11, 2025 11:32:45
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव: DHARA_MP_LETTER तुळजापुरातील वादग्रस्त डिवायएसपी निलेश देशमुख यांची मुदत वाढ रद्द करा खासदार ओमराजे निंबाळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी तुळजापूर ड्रग्ज प्रकरण आणि बोगस मतदार नोंदणी प्रकरणात योग्य तपास न केल्याचा आरोप निलेश देशमुख यांच्या काळातच तुळजापूर ड्रग्ज आलं आणि फोफावलं, मग त्यांना मुदतवाढ का असा सवाल ? Anc: तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाची देशभर चर्चा झाली. या प्रकरणातील काही आरोपी अजूनही फरार आहेत. त्यावरून खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पोलिस अधिकाऱ्यावर रोष व्यक्त केला. तुळजापूरचे डीवायएसपी निलेश देशमुख यांना एक वर्षाची मुदतवाढ सरकारकडून देण्यात आली. त्यावर शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आक्षेप घेत ही मुदतवाढ रद्द करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. ज्यांच्या काळात तुळजापुरात ड्रग्ज आलं फोफावल त्यांच्यावर सरकार कारवाई करणार की बक्षीस देणार असा सवाल ओमराजे यांनी केला. तसेच ड्रग्ज प्रकरणाचा तपास उच्चस्तरीय यंत्रणाकडे सोपवावा अशी मागणी ही त्यांनी केली. Byt: ओमराजे निंबाळकर, खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 11, 2025 11:32:19
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1109ZT_GAD_NOVEL_CLASS_1_2_3 ( 3 file sent on 2C)  टायटल:-- गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सुरू करण्यात आला अनोखा शिक्षा वर्ग ,106 आत्मसमर्पित नक्षल महिला आणि पुरुष घेत आहेत साक्षरतेचे धडे, आत्मसमर्पित नक्षल्याना शासकीय कौशल्य योजनांचा फायदा मिळवून देण्यासाठी पाचवी पास करणे होते आवश्यक, या गरजेतून निर्माण झाला आहे दहा दिवसीय साक्षरता वर्ग, मात्र या साक्षरता वर्गात आत्मसमर्पित नक्षल्याना शिक्षणाप्रती असलेले प्रचंड औत्सुक्य आले दिसून, कित्येकांना दहावी व उच्च शिक्षणही घ्यायचे असल्याने या संपूर्ण योजनेबाबत पोलीस दल व्यक्त करत आहे समाधान अँकर:-- गडचिरोली पोलीस प्रशासनाने महाराष्ट्र शासनाचे धोरण असलेल्या आत्मसमर्पण योजनेअंतर्गत गेली काही वर्षे शेकडो नक्षलवाद्यांचे आत्मसर्पण शक्य केले आहे. या आत्मसमर्पित नक्षल्याना कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार असून त्यासाठी आवश्यक असलेली साक्षरता मिळवून देण्यासाठी पोलिसांनी चक्क आत्मसमर्पित नक्षल्यांचे साक्षरता वर्ग सुरू केले आहेत. या वर्गातून आयुष्य जंगलात काढलेल्या या सर्वांना शिक्षणाप्रती असलेले प्रचंड औत्सुक्य दिसून आले आहे. व्ही. ओ. १) गडचिरोली म्हणजे नक्षल प्रभावित जिल्हा. या जिल्ह्यात उत्तर- दक्षिण पसरलेल्या निबीड अरण्यात 80 च्या दशकापासून नक्षल चळवळीचे हिंसक रूप या ना त्या प्रकारे दिसून येते. गेली काही वर्षे उत्तम नियोजनामुळे गडचिरोली पोलिसांनी यावर अंकुश आणला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आत्मसमर्पण योजनेमुळे गेल्या काही वर्षात गडचिरोलीत मोठ्या संख्येत नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण झाले आहे. या आत्म समर्पित नक्षलवाद्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी आणि उदरनिर्वाहासाठी काही कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक होते. मात्र हे नक्षल महिला- पुरुष साक्षर नसल्याने अडचणी भासल्या. शासकीय कौशल्य योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी किमान पाचवी पास असणे आवश्यक आहे. अशा स्थितीत या आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना साक्षर करण्यासाठी जिल्हा पोलीस दल आणि गडचिरोली जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग यांनी एकत्र योजना आखली. प्रोजेक्ट संजीवनी अंतर्गत गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या एकलव्य स्वभागृहात दहा दिवस चालणारा साक्षरता वर्ग सुरू झालाय. या सर्व नक्षलवाद्यांना पुढच्या एप्रिल महिन्यामध्ये पाचवीच्या परीक्षेला बसविले जाणार आहे.  त्यांना शिवणकाम, वेल्डर , बाईक मेकॅनिक व अन्य कौशल्य योजना अनुदान दिले जाणार आहे. बाईट १) निलोत्पल, पोलीस अधिक्षक, गडचिरोली व्ही. ओ. 2) आत्मसमर्पण योजना स्वीकारल्यानंतर गडचिरोली जिल्हा व शहरात हाताला कुठलेही काम नसलेल्या या सदस्यांना हक्काचे घर मिळण्यासाठी घरकुलांची योजना आखण्यात आली आहे. मात्र बारमाही रोजगार मिळवून देण्यासाठी आवश्यक साक्षरता वर्गाची कल्पना सर्वांनीच उचलून धरली. या सर्वांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी हे आवश्यक होते. वर्गात येणाऱ्या बहुतांश आत्मसर्पित सदस्यांनी 20 ते  25 वर्षाचा काळ हिंसक चळवळीत घालविला आहे. त्यांना अक्षरांची -आकड्यांची लिखित ओळख नाही. या वर्गात सामील झालेला व जून 2024 मध्ये आत्मसमर्पण केलेला गिरिधर तुमरेटी हा कमांडर त्यातलाच एक. त्याला हे संपूर्ण जग समजून घेण्यासाठी शिक्षण आवश्यक वाटत आहे. याशिवाय नक्षल्यांच्या प्रेस टीम मध्ये दीर्घकाळ काम केलेल्या अंजू जाडले हिला केवळ पाचवी दहावीच नव्हे तर आगामी काळात उत्तम संगणक शिक्षण घ्यायचे आहे. या प्रयत्नामुळे आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना शिक्षणाप्रती असलेले प्रचंड आकर्षण दिसून आले आहे. बाईट २) गिरीधर तुमरेटी, आत्मसमर्पित नक्षली बाईट ३) अंजु जाडले, आत्मसमर्पित नक्षली व्ही. ओ. ३)  गडचिरोली जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे. या जिल्ह्यात तेलुगु- गोंडी -मराठी -हिंदी अशा भाषा बोलल्या जातात. मात्र अक्षर ओळख नसलेल्या आत्मसमर्पित नक्षल्यांसाठी थेट पाठ्यपुस्तके व त्यातील अभ्यास कठीण विषय होता. मात्र शिक्षकांनी 106 विद्यार्थ्यांपैकी पहिली -दुसरीची अक्षर ओळख असलेल्या विद्यार्थ्यांना एप्रिल महिन्यात पाचवी च्या परीक्षेला बसवून त्यांना साक्षर करण्याचा चंग बांधला आहे. यासाठी गडचिरोलीच्या शिक्षण विभागाने उत्तम शिक्षक देखील नियुक्त केले असून पुढील दहा दिवसात खेळीमेळीच्या वातावरणात या 50, 60 प्रसंगी 65 वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांना अक्षर ओळख व नंतर गृहपाठ देत  परीक्षेला बसवायचे आहे. बाईट ४) किशोर सुरपाम, शिक्षक व्ही. ओ. ४) खरंतर ही शून्यातून सुरुवात आहे. सामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण फार सोपे व सहज वाटते. मात्र अर्धे आयुष्य काट्याकुट्यात ,जंगलात व बंदुकीच्या, भीतीच्या छायेत काढलेल्या आणि आता मुख्य प्रवाहात येण्यासाठी जीवाची धडपड करणाऱ्या या आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या आयुष्यात आता ज्ञानज्योत पेटली आहे. ही कायम राखत इतरांसाठी ते आदर्श व्हावेत हीच या साक्षरता वर्गाची फलनिष्पत्ती राहणार आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया गडचिरोली
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Sept 11, 2025 11:15:19
Mumbai, Maharashtra:अँकर -- मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे.त्यानुसार मुंबईतील वॉर्डची प्रारूप पूणर्रचना झाली आहे.निवडणूक आयोगाच्या वतीने ही प्रारूप पूणर्रचना करण्यात आली आहे.या रचनेवर हरकती सूचना मागवण्यात आल्या आहे.मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये तीन दिवस निवडणूक आयोगाचे अधिकारी हरकती आणि सूचना ऐकण्यासाठी बसले आहेत. कुर्ल्यातील माजी नगरसेवक कप्तान मलिक जे माजी मंत्री नवाब मलिक यांचे धाकटे बंधू आहेत यांनी आणि कुर्ल्यातील माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांनी आपल्या वॉर्डातील हरकती नोंदवल्या आहेत. वोट चोरीसाठी काही इमारती दुसऱ्या वॉर्ड मध्ये टाकण्यात आल्याचा आरोप युबिटी च्या माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांनी केला आहे.तर  कप्तान मलिक माजी नगरसेवक यांनी  कुर्ला विभागातील  २०१७ मध्ये  वॉर्ड १७० मधील मधे जी baundri होती ती बदलण्यात आली तसे दीड हजार मतदार बदलल्या गेलेत गोल्डन प्लाझा सारखे ५ इमारती वॉर्ड १६९ मधे टाकण्यात आल्या.यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे. आज निवडणूक आयोगाकडे हरकत घेतली.आयोगाने त्यावर विचार करू, आमची हरकत बरोबर आहे असे सांगितले. मी काम करणारा माणूस आहे.लोकांमध्ये रोष आहे त्याची बाजू मांडण्यासाठी आलो. Byte -- कप्तान मलिक माजी नगरसेवक Byte -- प्रविणा मोरजकर  मनोज कुळकर्णी  Feed send TVU ४८ Slug -- BMC hearing 
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 11, 2025 11:00:37
Akola, Maharashtra:Anchor : राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर अकोला शहरात असताना आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.कर्करोगाने त्रस्त असलेल्या एका रुग्णाला सिटी स्कॅनसाठी अकोल्यातील शासकीय मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहे.रुग्णासाठी लागणारे औषध उपलब्ध असतानाही गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णाला परत पाठवले जात असल्याचा गंभीर आरोप रुग्णाच्या पतीने केला आहे. या रुग्णालयात जबाबदार अधिकारी अनुपस्थित असल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. औषध साठा संपल्यानंतर मागणी करण्याची जबाबदारी येथील अधिकाऱ्यांची आहे मात्र मागणी केली नसल्याने औषध पुरवठा करण्यात आला नसल्याचं दिसून येत आहे.अनेक दिवसांपासून औषध पुरवठा नसल्याने रुग्णाला परत पाठवले जात असतानाही संबंधित अधिकाऱ्यांकडे औषधांची मागणी का केली गेली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.आजही रुग्णाला बोलावण्यात आलं मात्र पुन्हा एकदा त्यांना केवळ तारीख देऊन परत पाठवण्यात आलं. आरोग्यमंत्री स्वतः शहरात असतानाही रुग्णांना होत असलेला त्रास आणि आरोग्य विभागाची निष्क्रियता यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. Byte : शैलेश ताठे , रुग्णाचे पती..
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 11, 2025 10:51:35
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात झालेल्या अतिवृष्टीची आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली माहिती सोलापुरात झालेल्या अतिवृष्टीची आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली माहिती सोलापूर शहरासह अक्कलकोट तालुक्याला पावसाने झोडपलं अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांच्या घरात आणि शेतकऱ्यांच्या शेतीत पाणी शिरल्याने मोठे नुकसान हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 118 मिलिमिटर इतक्या पावसाची नोंद झालीय या अतिवृष्टीची आणि नुकसानीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली असून मुख्यमंत्री यांनी दिले मदतीचे आश्वासन भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची माहिती दरम्यान अक्कलकोटमध्ये अनेक गावात पूरसदृश्य परिस्थिती असून नागरिकांनी नदीकाठी जाने टाळावे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे नागरिकांना आवाहन बाईट : सचिन कल्याणशेट्टी, आमदार, अक्कलकोट
1
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 11, 2025 10:37:33
Nashik, Maharashtra:*Nashik Breaking * अँकर - नाशिकमधील बहुचर्चित राहुल धोत्रेच्या हत्याकांड प्रकरणातील आरोपी असलेले भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे पोलीसांच्या हाती लागत नसल्याने धोत्रे कुटुंबीय आता संतप्त झाले आहेत. पुढील तिन दिवसात निमसेला अटक न केल्यास संपूर्ण वडार समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढू असा ईशारा धोत्रे कुटुंबियांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे. 22 ऑगस्टला किरकोळ कारणावरून राहुल धोत्रेवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता, उपचारादरम्यान 29 ऑगस्टला राहुलचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी उद्धव निमसेसह त्याच्या साथीदार आणि कार्यकर्त्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान गेल्या 20 दिवसापासून उद्धव निमसेच्या मागावर पोलीसांची 4 पथके असूनही तो हाती लागत नाहीये. कालच उच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीनही फेटाळत पोलीसांच्या तपासावर ताशेरे ओढले होते.. बाईट - आकाश धोत्रे, मयत राहुलचा भाऊ
2
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 11, 2025 10:30:22
Satara, Maharashtra:TUSHAR TAPASE 1 FILE SLUG NAME -SAT_DESAI_RAUT सातारा - उबाठा गटाच्या माझं कुंकू माझा देश या आंदोलनाही खिल्ली मंत्री शंभूराज देसाई यांनी उडवली आहे. साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी संजय राऊत यांचा सकाळी नऊचा भोंगा म्हणत समाचार घेतला आहे. संजय राऊत यांनी ऑपरेशन सिंदूर विषयी वक्तव्य करत भारतीय सैन्य दलाचा अवमान केल्याचे सर्वांना माहित आहे. त्यामुळे उसण अवसान आणून अशाप्रकारे सैन्य दलाच्या पराक्रमाचे राजकीय भांडवल कोणीही करू नये, अशी टीका शंभूराज देसाई यांनी केली आहे. त्याचबरोबर ठाकरे बंधूंच्या युतीबाबत बोलताना मंत्री शंभूराज देसाई यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उबाठा गटाची मते फुटली असल्याचा संशय असून त्याचे विश्लेषण करण्याची ठाकरे बंधूंची बैठक झाली असावी, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. बाईट - मंत्री शंभूराज देसाई
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 11, 2025 10:20:02
1
comment0
Report
Advertisement
Back to top