Back
हरदोली उपसरपंच धर्मेंद्र कटरे अपात्र, शासकीय जमिनीवर अतिक्रमण!
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Bhandara
Slug - 0407_BHA_INELIGIBLE
FILE - 1 VIDEO,2 IMAGE
हरदोली (सि.) येथील उपसरपंच व सदस्य अपात्र .... शासकीय जमिनीवरील अतिक्रमण भोवले
Anchor : भंडारा जिल्ह्याच्या हरदोली
(सिहोरा) येथील उपसरपंच धर्मेंद्र सेवकराम कटरे व सदस्य संगीता जितेंद्र नान्हे यांना अपर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयाने शासकीय जमिनीच्या अतिक्रमण असल्यामुळे सदर पदाकरिता अपात्र घोषित ठरविले आहे. हरदोली येथील उपसरपंच, धर्मेंद्र सेवकराम कटरे यांच्या वडिलांच्या नावे हरदोली येथील शासकीय जमिनीचा अतिक्रमण व सदस्य संगीता जितेंद्र नान्हे यांच्या पतीच्या नावे अतिक्रमण असल्याच्या कारणाने, जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरवले आहे.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0407ZT_WSM_DAM_WALL_TREE
रिपोर्टर: गणेश मोहळे, वाशिम
अँकर: वाशिमच्या रिसोड तालुक्यातील कुकसा लघु सिंचन प्रकल्पाच्या भिंतीवर वाढलेल्या झाडाझुडपांमुळे प्रकल्पाच्या भिंतीला धोका निर्माण झाला असून, भिंतीला तडा गेल्यास कुकसा, जोगेश्वरी, अंचळ, तपोवन, जायखेडा आदी गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते. प्रशा सनाला वारंवार निवेदने देऊनही भिंतीवरील झाडे काढण्यात आले नसल्यानं याकडे सिंचन विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी केला आहे.गेल्या पाच वर्षांत कुकसा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला,मात्र प्रकल्पाच्या भिंतीवर झाडे आणि झुडपांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे प्रकल्पात आधीच पाण्याचा साठा जास्त आहे.अशा परिस्थितीत भिंत फुटल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो, त्यामुळे ग्रामस्थांकडून यासंदर्भात वाशिम जिल्हाधिकारी,लघु सिंचन विभाग व पोलीस प्रशासन यांना निवेदन दिले असून अनदोलनाचा इशारा दिला आहे.
0
Share
Report
Yeola, Maharashtra:
अँकर:- एकीकडे राज्यांमध्ये अवकाळी पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असताना दुसरीकडे शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा खराब होत आहे कांद्यावर जाहीर झालेले अनुदान अद्याप मिळालेले नसताना कांदा दरात देखील दिवसेंदिवस घसरण होत आहे या संदर्भात नाफेड मार्फत कांदा खरेदी न करता भावंतर योजना राबवावी अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे तहसील कार्यालय येवला येथे निवेदन देण्यात आले याप्रसंगी येवला तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आले असून शेतकरी प्रश्नावर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. प्रसंगी येवला शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
Share
Report
Beed, Maharashtra:
FEED : Cow's life saved 01,02
बीड : तहसील आवारात गायीची तडफड... तलाठ्यांनी दाखवली सामाजिक बांधिलकी
Anc : पाटोदा तहसील कार्यालयाच्या आवारात एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला. व्यायामासाठी बाहेर पडलेल्या तलाठी मित्रांनी आवारात एका गाईला अर्धमरणावस्थेत पाहिलं… आणि चालत पुढे न जाता थांबले. तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क केला. काही वेळातच गायीची प्रकृती सुधारली. ही केवळ मदत नव्हती, तर सामाजिक जाणीव आणि माणुसकीचं जिवंत उदाहरण होतं. आज एक गाय वाचली... आणि समाजात अजूनही माणुसकी शिल्लक आहे, हे पुन्हा सिद्ध झालं.
0
Share
Report
Buldhana, Maharashtra:
उद्धवराज एकत्रित येत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष....
बुलढाण्यातून हजारो कार्यकर्ते मुंबईकडे होणार रवाना
अँकर - अनेक वर्षानंतर उद्धव आणि राज ठाकरे एकत्रित येत असल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हा जल्लोष ठिकठिकाणी पाहायला मिळतोय. ठाकरे एकत्रित यावेत हीच जनमानसाची भावना आहे असा मानस बाळगून कार्यकर्ते आपला आनंद व्यक्त करीत आहेत... दरम्यान मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करत त्यांच्या भावना जाणून घेतले आहेत आमची प्रतिनिधी मयूर निकम यांनी.....
Wkt - मयूर निकम, प्रतिनिधी
कार्यकर्ते
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0407ZT_JALNA_MARHAN(1 FILE)
जालना | मुलीच्या छेडछाडीला विरोध करणाऱ्या वडिलांना बेदम मारहाण,चंदनझिरा पोलिसांत गुन्हा दाखल,2 संशयीतांना अटक
अँकर: जालन्यात मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्यामुळे तिच्या वडीलाला लाठ्याकाठ्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे.जालना शहराजवळील निधोना रोडवरील यमुना रेसिडेन्सी मधील ही घटना असून या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. जालना शहराजवळील निधोना रोडवरील यमुना रिसिडेन्सी मध्ये काल ही घटना घडली असून याप्रकरणी जालन्यातील चंदनझीरा पोलीस ठाण्यामध्ये मारहाणीसह ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक देखील केली आहे.
0
Share
Report
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
csn khaire byte
feed by 2 c
*ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे पॉइंटर*
- मी मातोश्रीचा सैनिक आहे. बाळासाहेबांच्या तालमीत आम्ही तयार झालोय, दोन्ही भाऊ एकत्रित यावे सर्वांचीच इच्छा आहे.
- आज महाराष्ट्रात भ्रष्टाचार सुरू आहे. महाराष्ट्रात बदल पाहिजे. दोन्ही भाऊ एकत्र येत आहे याचा आनंद आहे.
- राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंच्या नेतृत्वात मी काम केले आहे..
- ठाकरे ब्रँड राहणार आहे. तो दिसून येईल.
- राज ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना सोडली होती तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते चिमण्यांनो परत या...
- उदय सामंत दोन्ही भावासमोर कचरा आहे, तो संभ्रम निर्माण करतो.
ऑन राणेवर गंभीर आरोप...
- भाई कोळेकर हा शिवसेनेचा कार्यकर्त्या होता, त्याची हत्या झाली. तेंव्हा संपूर्ण गावात चर्चा होती राणेंनी त्यांची हत्या केली.. त्यावेळी मी कणकवलीच्या निवडणुकीत राणेंच्या विरोधात प्रचाराला गेलो होतो....
- आम्ही कणकवलीला गेलो होतो तेव्हा राणेंचा मुलगा जो बडबड करतो त्या नितेश राणेला मी धमकावले होते... त्यावेळी तो पोलिसांची गाडी घेऊन फिरत होता....
- राणे मुख्यमंत्री असताना नारायण राणे मला काढणार होते मात्र त्यावेळी राज ठाकरे आणि बाळासाहेबांनी मला काढू दिले नाही... मातोश्री आणि ठाकरे परिवाराचे माझ्यावर उपकार आहे.म्हणून मी एकनिष्ठ आहे.
- तुम्ही आणि तुमचे पोट्टे काय म्हणतात ते पाहा... मनोहर जोशींना बाजूंना करून राणेंना केले होते...
- देवा भाऊ यांना दोन भाऊ एकत्र यावं असे वाटत नव्हते... आतून त्यांना वाटत होते दोघे भाऊ एकत्र येऊ नये...
0
Share
Report
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_SENA_MNS_WKT दोन फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्यासाठी अमरावतीत शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्र; जुन्या आठवणी आठवल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते गहिवरले
अँकर :- मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू उद्या प्रथम मुंबईत एकत्र येत आहे. राज्य सरकारने हिंदी सक्तीचा जीआर रद्ध केल्यानंतर ठाकरे बंधू मुंबईत विजय जल्लोष सभा करणार आहे. यासाठी अनेक शिवसैनिक आणि मन सैनिक अमरावतीतून मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे. त्यापूर्वी अमरावतीत शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्र आले आहे. दरम्यान जुन्या आठवणी आठवल्याने शिवसेनेचे पदाधिकारी गहिवरल्याचे पाहायला मिळाले आहे. याविषयी शिवसैनिक आणि मनसैनिकांशी अधिक बातचीत केली आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी
चौपाल
0
Share
Report
Akola, Maharashtra:
Anchor : दोन्ही ठाकरे बंधू एका मंचावर तब्बल वीस वर्षा नंतर एकत्र येत सभा घेणार आहेत.. या सभेचा मराठी माणसावर काय परिणाम होणार आणि राज्यातील राजकारणावरही काय परिणाम होणार यासंदर्भात मनसे आणि युबीटी सेनेच्या कार्यकर्त्यां सोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी जयेश जगड यांनी..
चौपाल.....
0
Share
Report
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0407ZT_CHP_ST_TIME_1_2
( 2 file sent on 2C)
टायटल:-- नवीन शालेय सत्र सुरू झाल्यानंतर आता चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची बस फेऱ्यांच्या अनियमिततेमुळे अडचण, मुल तालुक्यात ग्रामीण भागातील विद्यार्थी तासनतास बसतात खोळंबून, एकीकडे कुटुंबीयांना भेडसावणारी चिंता तर दुसरीकडे शिक्षकांचे रागावणे झेलत शिक्षण करत आहेत पूर्ण, विद्यार्थ्यांनी शासनाला तातडीने बस फेऱ्या वाढवण्याची केली मागणी
अँकर:--
या बस मध्ये गर्दी आहे येऊ नका...
मागून बस येत आहे, यात गर्दी करू नका....
ही व अशी अनेक उत्तरे चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना एसटी वाहक देत आहेत. नवे शालेय सत्र सुरू झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लगतच्या गावांमध्ये जावे लागते. शासनाने यासाठी खास विद्यार्थी बस गाड्या देखील निश्चित केल्या आहेत. मात्र मूल असो अथवा सावली या संपूर्ण भागात बस स्थानकावर - बस थांब्यावर तिष्ठत राहिलेले विद्यार्थी नजरेस पडतात. एकीकडे कुटुंबीयांना विद्यार्थी- विद्यार्थिनी सुखरूपपणे शाळेत जाऊन परत येण्याची चिंता भेडसावते. तर दुसरीकडे योग्य वेळेत बस न मिळाल्याने वर्गात पोहोचताना झालेल्या विलंबाने शिक्षकांची बोलणी खावी लागतात. अगदी रस्त्यावर एसटी बस ची वाट बघत बसलेले विद्यार्थी आपल्याला या भागात दिसू शकतात. सध्या विद्यार्थ्यांना बस पासेस मिळालेले नाहीत. अशा स्थितीत तिकीट काढून शिक्षणासाठी पदरमोड सुरू आहे. मात्र तरीही योग्य व नियमित बस मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांसाठी विशेष आणि अधिक बस फेऱ्या सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
बाईट १),२), ३) त्रस्त विद्यार्थी
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
Pandharpur, Maharashtra:
04072025
Slug - PPR_GORE_DARSHN
feed on 2c
--------
Anchor - ग्रामविकास मंत्री पालकमंत्री जय कुमार यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श रांगेत जाऊन साधला वारकऱ्यांची संवाद
विठोबाच्या दर्शनासाठी लाखी भाविक दर्शन रांगेत आहेत. यावर्षी मे महिन्या पासून आषाढी वारीची तयारी प्रशासन कडून सुरू आहे. त्या सुविधा आज भाविकांना अनुभवता येत आहेत. दर्शन रांगेतील स्वच्छता , मिनरल वॉटर , महा प्रसाद, स्वच्छता गृह याची व्यवस्था भाविकांसाठी उपयुक्त ठरत आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज स्वतः दर्शन रांगेत चालत वारकऱ्यां सोबत संवाद साधला. वारकऱ्यांनी उपलब्ध सुविधांवर समाधान भावना व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले
-----
byte - जयकुमार गोरे, पालकमंत्री
0
Share
Report