Back
वर्ध्यात आमरण उपोषण: रस्त्याच्या मागणीसाठी युवा संघर्ष मोर्चाचा आवाज!
Wardha, Maharashtra
वर्धा
SLUG- 2506_WARDHA_PROTEST
- वर्ध्याच्या देवळीत रस्त्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण
अँकर- देवळी ते वर्धा हा देवळी शहरातला प्रमुख मार्ग नॅशनल हायवे अथॉरिटी च्या चुकीच्या नियोजनमुळे अरुंद व धोक्याचा झाला आहे. या मार्गावरून दहेगाव-वायगाव राज्य महामार्ग क्र. ३२२ जातो. याच मार्गावर कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संस्था, एम.आय.डी.सी., जिनिंग फॅक्ट्री, तंत्रशिक्षण शाळा, कॉलेज, मागासवर्गीय वसतिगृह व ग्रामिण रुग्णालय अशा मोठ्या संस्था आहे. भविष्यातील धोके लक्षात घेता अनेक निवेदने व तक्रारी कडे दुर्लक्ष केल्यामुळे रस्त्याच्या एका बाजूची नाली हटवून रस्ता माध्यभागी व प्रशस्त करावा या मागणीसाठी आजपासून युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे यांनी बेमुदत अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली आहे.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Ambernath, Maharashtra:
बदलापुरातील भाजप पदाधिकाऱ्यांकडून महावितरणच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी
अधिकाऱ्यांचा उपहासात्मक केला शाल घालून सत्कार
वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबद्दल विचारला जाब
लोकांना टीओडी मीटरची सक्ती केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
Bdl mseb bjp
Anchor - गेल्या काही दिवसांपासून बदलापुरात विजेचा खेळखंडोबा सुरू असून त्या विरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतलाय. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढत अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. इतकच नाही तर निष्क्रिय अधिकाऱ्यांना शाल घालून गांधीगिरीच्या मार्गाने त्यांचा सत्कारही केला.
बदलापुरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. तसंच वीज ग्राहकांना महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून टीओडी मीटरची सक्तीही करण्यात येतीय. याबाबत वारंवार नागरिकांच्या तक्रारी येत असल्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी खरवई येथील महावितरण कार्यालय गाठलं आणि अधिकाऱ्यांना कडक शब्दात जाब विचारला. एवढ्यावरच न थांबता अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेबद्दल शाल देऊन गांधीगिरी पद्धतीने त्यांचा सत्कारही करण्यात. येत्या आठ दिवसात महावितरणच्या अधिकाऱ्यांनी योग्य तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय.
चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
Share
Report
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग : भाजपच्या नेत्या आणि माजी महापौर शोभा बनशेट्टी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
- *सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटांमध्ये आणखी एक मोठ्या नेत्याचा पक्षप्रवेश*
- *भाजपच्या नेत्या आणि माजी महापौर शोभा बनशेट्टी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश*
- *उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी महापौर शोभा बनशेट्टी यांचा पक्षप्रवेश संपन्न*
- शोभा बनशेट्टी या सोलापूर महापालिकेच्या माजी महापौर राहिलेल्या आहेत
- त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीत पक्षाने डावलल्यानंतर सोलापूर शहर उत्तरमधून विधानसभा निवडणूक लढवली होती
- सोलापूर शहरात मागील अनेक वर्षांपासून बनशेट्टी कुटुंबाचे राजकीय वर्चस्व राहिले आहे
- शोभा बनशेट्टी या अक्कलकोटचे भाजपचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांची ती कन्या आहेत
- माझी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या पक्षप्रवेशामुळे सोलापूर शहरात शिवसेना शिंदे गटाची ताकद आणखी वाढली
- काही दिवसांपूर्वी अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता.
0
Share
Report
Raigad, Maharashtra:
स्लग - आणीबाणी लादणाऱ्यांचे वंशज देशात अराजकता पसरवताहेत ...... भाजपच्या चित्रा वाघ यांची टीका ...... आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांचा अलिबाग इथं सत्कार ......
अँकर - ज्यांनी आणीबाणी लादली त्या इंदिरा गांधींचे वंशज आज देशात आणीबाणी सारखीच अराजकता या देशात पसरवू पाहताहेत. राहुल गांधी देशाच्या विरोधात बोलताहेत , सैनिकांच्या विरोधात बोलताहेत. देशात अस्वस्थता निर्माण करण्यासाठी राहुल गांधी आज कार्यरत आहेत अशी टीका भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली. आणीबाणीला 50 वर्षे झाल्याबद्दल आणीबाणी काळात तुरुंगवास भोगलेल्यांचा आज दक्षिण रायगड भाजपच्या वतीने सन्मान करण्यात आला. अलिबाग इथं झालेल्या कार्यक्रमात चित्रा वाघ बोलत होत्या.
साउंड बाईट - चित्रा वाघ
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
डोंबिवलीत न्यायालयीन प्रक्रियेमुळे वर्षभर बंद असलेली टोईंग सेवा पुन्हा सुरू
चुकीच्या ठिकाणी वाहणे पार्किंग करून वाहतूक कोंडी करणारी वाहन आता टोईंग व्हॅनने थेट उचलून टोईंग सेंटरला नेण्यात येणार असून दंड भरल्यावरच वाहन मिळणार
Anc..डोंबिवलीकर वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी! मागील वर्षभर शहरातील वाहतूक अडथळे आणि चुकीच्या पार्किंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी बंद असलेली टोईंग व्हॅन सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. न्यायालयीन प्रक्रिया आणि काही तक्रारींमुळे स्थगित झालेली ही सेवा आता डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागात राबवण्यात येणार आहे. त्यामुळे आता चुकीच्या ठिकाणी उभ्या केलेल्या वाहनांवर थेट कारवाई करत वाहन टोईंग सेंटरला नेण्यात येणार आहे . या आधी रस्त्यावरती बेजबाबदारपणे वाहने उभी असली तर वाहतूक पोलिसा कडून त्या वाहनाचा ई चलान पध्दतीने मोबाईल मध्ये फोटो काढून त्याला दंडात्मक पावती ऑनलाईन पाठवत होते. दंडाची कारवाई झाली तरी वाहन रस्त्यावरच उभे राहत असल्याने दिसून येत होते. मात्र आता या टोईंग व्हॅन मुळे अवैधरित्या पार्किंग करण्यात आलेल्या वाहन उचलून थेट टोईंग सेंटरला नेण्यात येणार असुन वाहनधारकाला वाहतूक कार्यालयात जाऊन दंड भरल्यानंतरच त्याची वाहने परत मिळणार आहे .ही कारवाई डोंबिवलीतील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार असून वाहनधारकांनी अनधिकृत पार्किंग टाळून सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे.
Byte:- श्रीराम पाटील ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक डोंबिवली वाहतूक विभाग)
0
Share
Report
Pandharpur, Maharashtra:
25062025
Slug - PPR_SHIVSENA_MEETING
feed on 2c
file 01
------------
Anchor - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका साठी शिवसेनेने सोलापूर जिल्ह्यात तयारी सुरू केली आहे. शिवसेना संपर्क प्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत पंढरपूर मध्ये शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला. आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीसाठी शिवसेना ताकतीने उतरणार असून महायुतीच्या घटक पक्षांसोबत निवडणुका लढून महायुतीचा झेंडा स्थानिक स्वराज्य संस्था फडकवणार असल्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे
0
Share
Report
Mumbai, Maharashtra:
अँकर -- मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या भारतीय कामगार सेना आणि मनसेच्या हवाई कर्मचारी सेनेने एकत्रित आंदोलन केलं. इंडिगो एअरलाइन्सच्या कामगारांच्या प्रश्नसंदर्भात हे आंदोलन करण्यात आलं आहे. शिवसेना ठाकरे यांची युनियन आणि मनसे युनियनशी संबंधित कामगारांचे मॅनेजमेंट विरोधात काम बंद आंदोलन केलं.
भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस संजय कदम आणि मनसे कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संतोष धुरी यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले आहे.
मनोज कुळकर्णी
Vdo २C
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
केडीएमटीच्या परिवहन बसमधून पडून विद्यार्थाचा अपघात..
विद्यार्थी गंभीर जखमी..
Anchor: – कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन (KDMT) सेवेच्या धावत्या बसमधून पडून तुषार देशमाने या आयटीआयमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघात गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात तुषारचा डावा हात पॅक्चर असून त्याच्यावर कल्याणच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
vo.. कल्याण स्थानकातून रोनक सिटीच्या दिशेने तुषार देशमाने आपल्या घरी जात असंताना बसमध्ये चढताना बसचे हँडल अचानक तुटल्यामुळे तो चालत्या बसमधून खाली पडला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला असून त्याच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे.
अपघात घडल्यानंतरही बस चालक व वाहकाने बस थांबवली नाही, तर बस थेट रोनक सिटीपर्यंत पोहोचली. नातेवाईकांनी चालक व वाहकावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.
या घटनेमुळे विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांमध्ये संतापाची लाट असून, त्यांनी KDMT प्रशासनाकडून तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे..कल्याण महात्मा फुले पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे
बाईट:- राहुल आघाम नातेवाईक
बाईट:- तुषार देशमाने जखमी विद्यार्थी
0
Share
Report
Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Rain
Feed on - 2C
---------------------------
Anchor - मोठ्या खंडानंतर आज नांदेड शहरासह परिसरात पावसाचे आगमन झाले. गेल्यात तेरा चौदा दिवसापासून नांदेड मधे पाऊस बरसला नव्हता. आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमरास रिमझीम पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास पावसाची रिमझिम सुरु होती. पाऊस गायब झाल्याने उकाडा वाढला होता. शिवाय ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली होती. या पावसामुळे नांदेड तालुक्यातील पिकांना थोडे जीवदानी मिळणार आहे. शिवाय या रिमीझिम पावसामुळे उकाडा कमी झाला. अजूनही मोठ्या पवसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांसह सर्वांनाच आहे.
----------------
0
Share
Report
Parbhani, Maharashtra:
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीने मागील तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. वनमाला उत्तम शेटे असे या शेतकरी महिलेचे नाव असून त्या पालम तालुक्यातील पेठशिवनी येथील रहिवासी आहेत,गट क्रमांक 74/5 मध्ये त्यांची शेती आहे, पण शेती त्यांचे दिर बबन शेटे यांच्या नावावर होती, गंगाखेड उपविभागीय अधिकाऱ्यांकडे त्यांनी ज्ञाय माघितला असता त्यांना ज्ञाय मिळाला, पण मागील चार वर्षांपासून त्यांचा दिर बबन शेटे त्यांना त्यांची शेती वहिती करू देत नाहीये, त्यांनी यंदा शेतात केलेली कपाशीची लागवड त्यांच्या दिराने मोडून टाकल्याचे ते सांगतायेत, आपल्याला ज्ञाय मिळावा यासाठी वनमाला शेटे यांनी मागील तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. पण येथे ही त्यांची कुणीच दखल घेत नाहीये,
बाईट- वनमाला शेटे - उपोषणकर्ती महिला
0
Share
Report
Akola, Maharashtra:
Anchor : आणीबाणीच्या कालावधीत लढा देणा-या, कारावास भोगलेल्या अकोला जिल्ह्यातील व्यक्तींचा जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आलाय..यानिमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचाही शुभारंभही यावेळी करण्यात आलाय..देशात सन 1975 ते 1977 मध्ये आणीबाणी कालावधीत लढा देताना जिल्ह्यातील ज्या व्यक्तींनी मिसा व आयआरअंतर्गत सामाजिक व राजनैतिक कारणासाठी कारावास भोगलेला आहे, अशा व्यक्तींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आलाय...यावेळी आणीबाणीत कारावास भोगलेले ज्येष्ठ मान्यवर, त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते...यानिमित्त या काळाची माहिती देणारे प्रदर्शनही भरविण्यात आले आहे ही प्रदर्शनी नागरिकांकरिता सुद्धा खुली करण्यात आलीय..
0
Share
Report