Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

डोंबिवली एमआयडीसी: गढूळ पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर संकट!

ABATISH BHOIR
Jul 12, 2025 10:03:49
Kalyan, Maharashtra
डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात नळाला "गढूळ" पाणी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर Anchor :- डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात रहिवाशांच्या घरात गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे .शुक्रवार दुपार पासून मिलापनगर मधील श्री वसंत छेडा आणि इतर काही बंगलो मध्ये गढूळ, अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याचे दिसल्यावर काहींनी याबाबत एम आय डी सी कडे तक्रारी केल्या .कल्याण डोंबिवलीत डेंगू, मलेरिया, टायफॉईड, कावीळ इत्यादी साथीच्या आजारानी डोके वर काढल्याने या गढूळ पाण्यामुळे नागरिक भयभीत झालेत . एमआयडीसी निवासी भागात नाले ,गटारांची भूमिगट सांडपाणी वाहिन्यांची रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. याकामा दरम्यान अनेकदा खोदकाम करताना निष्काळजीपणामुळे पाण्याच्या पाईपलाईन फुटतात मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने गढूळ पाणी या पाईपलाईन मध्ये मिसळत असल्याच्या तक्रारी रहिवाशांनी केल्यात याबाबत अनेकदा एमआयडीसी कडे तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप देखील नागरिकांनी केलाय .
7
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top