Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Dhule424001

नंदुरबारच्या आदिवासींच्या गाय वाटपात गडबड, शेतकऱ्यांना होतोय नुकसान!

PPPRASHANT PARDESHI
Jul 12, 2025 10:36:15
Dhule, Maharashtra
ANCHOR - नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींचे स्थलांतरण थांबण्यासाठी आणि स्थानिक स्तरावर त्यांना रोजगार मिळावा यासाठी दुभती जनावर वाटपाचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला. मात्र या कार्यक्रमाचेही तीन तेरा वाचवण्याच काम प्रशासन आणि ठेकेदारांनी केल्याचा दिसून येत आहे. शेतकऱ्यांना शेतीसोबत जोडधंदा करता यावे यासाठी शासनाकडून ७८ कोटी रुपये खर्च केले, गायी वाटल्या पण यां गायी आजारी आणि कमी दूध देत असल्याचा आरोप आहे. VO - गोरख गांगुर्डे.. आदिवासी शेतकरी... नंदुरबार जिल्ह्याततील गोरख यांना जोडधाण्यासाठी गाय देण्यात आली मात्र ही गाय पुरेसं दूध देत नाही.. त्यामुळे तिच्या उत्पन्न पेक्षा त्या सांभाळायचा खर्च अधिक आहे. तीच आजारपण गोरख यांना डोईजड जातं आहे, त्यामुळे ते शासनाच्या यां योजनेचा लाभ घेऊन पस्तावत आहेत. byte - गोरख गांगुर्डे, लाभार्थी vo - नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखण्यासाठी आदिवासी विकास प्रकल्प आणि शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळातर्फे जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना दुधाळ गायांचे वाटप करण्यात आले होते. यांतर्गत शासनाचे ७८ कोटी १९ लाख ५८१० रुपये खर्च करून जिल्ह्यात १० हजार ४३० गायींचे वाटप करण्यात आले. या गायांच्या वाटप करण्याच्या वेळेस प्रत्येक गाई १० लिटर दूध देणार असल्याचे महामंडळातर्फे दावा करण्यात आला होता. मात्र अनेक गाई २ ते ३ लिटरपर्यंतच दूध देत आहेत. काही गायी आजारी आहेत, नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना शेतीसोबत जोडधंदा करता यावे यासाठी आदिवासी विभागाकडून गाईंचे वाटप करण्यात आले होते मात्र आता याच गाई या आदिवासी बांधवांसाठी डोकेदुखी बनल्या आहेत. ऐका गाई मागे शेतकऱ्यांना दररोज 300 ते 400 रुपये पर्यंत खर्च करावा लागत आहे, यासह गाईंच्या औषध्यावर मोठा खर्च शेतकऱ्यांना करावा लागत आहे आणि बदल्यात एक गायीकडून त्यांना दोन ते तीन लिटर दूध मिळत आहे शेती काम सोडून शेतकऱ्यांना या गायांनाच्या देखभाल साठी धावपळ करावी लागत आहे. Byt - जयेंद्र गांगुर्डे, लाभार्थी Byt - ज्योतीराम चौरे, लाभार्थी vo - अनेक लाभार्थी योजनेबद्दल तक्रारी करत असले तरी काही शेतकरी याबाबत समाधान देखील आहेत. आपल्या आवडीप्रमाणे गाय निवडता आल्याचा आणि त्या चांगल्या असल्याचा दावा काही लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे. योजनाला बदनाम करण्यासाठी हा आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरू असल्याचाही दावा काही शेतकऱ्यांनी केला आहे. byte - लाभार्थी शेतकरी vo - एकंदरीत योजनाच्या लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना आता आपल्या शेती व घर परिवारासोबत या गायींच्या भरणपोषण करण एक मोठी अडचण निर्माण होत आहे. तरी काहींना नवा रोजगार मिळाला आहे. gfx in - आदिवासी प्रकल्प कार्यालय आणि शबरी महामंडळाची योजना - 5215 लाभार्थी - 78 कोटींचा खर्च - 10430 गायीचे वाटप - आजारी, कमी दूध देणाऱ्या गायी वाटपाचा आरोप - लाभार्थीचे दोन गट काही शासनाच्या बाजूने तर काही विरोधात gfx out vo - राज्य सरकार गोरगरीब आदिवासी शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करीत असतो. मात्र शेवटपर्यंतच्या लाभार्थी योजना खर्च लाभाची ठरली का? याचा अभयास होतं नाही. शासनाच्या अनेक योजना प्रमाणे याही योजनेचा फज्जा तर उडाला नाही ना? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. प्रशांत परदेशी, नंदुरबार.
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top