Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

जिल्हाधिकारी स्वामींचा इशारा: कार्यालयात वाढदिवस साजरे करणे बंद करा!

VKVISHAL KAROLE
Jul 09, 2025 02:34:26
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn collector av Feed attched जिल्ह्यातील सरकारी कार्यालयांमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांच वाढदिवस साजरे होतात. कार्यालयीन वेळेत केक कापला जातो. नागरिकांना बाहेर थांबावे लागते. यावर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी याबाबत परिपत्रक जारी करत थेट शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. जिल्ह्यात महसूल, कृषी, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महावितरण, जलसंपदा, जलसंधारण, सिडको, नगरपरिषदा, पोलिस, सार्वजनिक आरोग्य, पशुसंवर्धन, शिक्षण, सहकार, समाजकल्याण अशी अनेक सरकारी कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये दररोज नागरिक विविध कामांसाठी येतात. मात्र, काही वेळा कार्यालयीन वेळेतच वाढदिवस साजरे होतात. नियमानुसार कोणत्याही शासकीय कार्यालयात वाढदिवस किंवा इतर उत्सव साजरे करता येत नाहीत. तरीही नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे जिल्हाधिकारी स्वामी यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. यापुढे कार्यालयीन वेळेत वाढदिवस साजरा केल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा थेट इशारा दिला आहे.
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top