445001
यवतमाळ - पुसद मध्ये जन्माष्टमीनिमित्त टाळमृदुंगाच्या गजरात शोभायात्रा.
Yavatmal, Maharashtra:जन्माष्टमीनिमित्त यवतमाळच्या पुसद शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. डीजेला फाटा देत पारंपारिक पद्धतीने सलग 11 वर्षांपासून या आदर्शवत मिरवणुकीचे आयोजन करण्यात येत आहे. या मिरवणुकीत टाळ व मृदुंगाच्या तालावर गोपाल कृष्ण भगवान की जय असा एकच जयघोष करण्यात आला. या मिरवणुकीत बाल गोपाल वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीकृष्ण जन्मोत्सव समिती पुसद तर्फे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
TET और NEET पेपर लीक: महाराष्ट्र सरकार पर उंगली, दानवे बोले घोटाला
Washim, Maharashtra:उद्या होणाऱ्या TET चा पेपर फुटला. या अगोदर ही NEET चा पेपर फुटला होता. त्या तील आरोपी जेल मध्ये आहेत. NEET पेपर फुटीचे केंद्र महाराष्ट्र आहे. हे सरकार गुड गव्हर्नन्स झिरो टोलरंस ची बाता मारते. या सरकारचाच हात पेपर फुटी मध्ये असल्याचा घणाघात UBT नेते अंबादास दानवे यांनी केलाय. ते वाशिम इथ UBT पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्या साठी आले असता बोलत होते.0
0
Report
दानवे का वाशिम दौरा: निधि वितरण और राम मंदिर पर कठोर टिप्पणी
Washim, Maharashtra:अँकर:शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वाशिम येथे विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यानिमित्त ते वाशिम येथे आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.दानवे म्हणाले, "मला अद्याप कोणतीही कायदेशीर नोटीस मिळालेली नाही.नोटीस मिळाल्यानंतर कायदेशीररित्या योग्य ते उत्तर देईन. मला कोणालाही नोटीस पाठवण्याचा अधिकार नाही.यावेळी त्यांनी यवतमाळ-वाशिम मतदारसंघाबाबतही भूमिका स्पष्ट केली. हा मतदारसंघ कोणाच्या बापाचा नसून तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विचारांचा मतदारसंघ आहे," असे ते म्हणाले.विकास निधीच्या मुद्यावर बोलताना दानवे म्हणाले की, "निधी मंजूर करण्याची एक ठरलेली शासकीय प्रक्रिया असते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या स्तरावर निर्णय होतात आणि त्यासाठी अनेक महिने लागतात. एखाद्या व्यक्तीमुळेच निधी मिळाला, असा दावा करणे म्हणजे जनतेची दिशाभूल करणे आहे. राज्याच्या निधी वाटपाचे धोरण ठरलेले असून त्यानुसारच आमदार-खासदारांना निधी दिला जातो.स्वतःचे अपयश लपवण्यासाठी काहीजण जनतेची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे मला कोणताही पुरावा देण्याची गरज वाटत नाही.राम मंदिराच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया देत सांगितले की, राम मंदिरासाठी शिवसेनेने संबंधित न्यासाला मदत केली होती. त्या निधीचा हिशोब संबंधित न्यासाने द्यावा. तसेच राम मंदिरातील कथित चोरी आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर नितेश राणे यांनीही आपली भूमिका स्पष्ट करावी. हिंदुत्वाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी या मुद्द्यांवरही बोलले पाहिजे. बाईट:अंबादास दानवे, UBT नेते0
0
Report
केतन हत्या केस: सिया के माता-पिता से दो घंटे की पूछताछ शुरू
Varsoli, Maharashtra:केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आतापर्यंत 10 जणांचे जबाब नोंदवण्यात आले होते. त्यात काल सिया चा भाऊ साहिल याची कसून चौकशी पोलिसांनी केली. तर आज सिया चे आईवडील यांचा जबाब नोंदविण्यात येणार आहे. मागील 2 तासांपासून सिया च्या आई वडिलांची चौकशी करण्यात येणार आहे. याच संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोनपे यांच्याशी संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी... 121 with गजानन टोनपे, DYSP (file no.01) ग्राफिक्स : *सियाच्या आई-वडिलांना चौकशीत कोणत्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार?* - सिया आणि चेतन मित्र होते, त्यांचे प्रेम संबंध होते. याची तुम्हाला कल्पना होती का? - सियाने चेतनशी लग्न करण्याचा हट्ट धरला होता का? - सियाच्या संमतीने केतनशी लग्न जुळवलं होतं का? - सियाला केतनचा स्वभाव पटत नव्हता का? - सियावर केतनशी लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली जात होती का? - लग्न ठरल्यानंतर ही सिया नेहमी चेतनशी भेटत होती, याची तुम्हाला माहिती नव्हती का? - साहिल आणि चेतन मित्र आहेत, हे पण तुम्हाला माहित नव्हतं का? - लोहगडावर ते तीन वेळा गेले होते, त्यावेळी सियाने काय कारणं सांगितली होती? - केतनच्या हत्याेचा कट रचला जात होता? याबाबत तुम्हाला कल्पना होती का?0
0
Report
Advertisement
धाराशिव में ओमराजे के शिंदे प्रवेश के बाद नया राजनीतिक समीकरण
Dharashiv, Maharashtra:ओमराजेंची दुहेरी कोंडी; ठाकरे गटाचा थेट हल्ला, भाजपचीही नवी रणनीती! उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी शिवसैनिकांची मोर्चेबांधणी; भावी खासदार'च्या बॅनरने राजकीय चर्चांना उधाण! शिंदे सेनेत प्रवेशानंतर धाराशिवच्या राजकारणात नवे समीकरण; ओमराजे निंबाळकर यांच्यावर मित्र की मित्रपक्ष प्रतिस्पर्धी? धाराशिव हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाचा बालेकिल्ला असल्याचा दावा करत शिवसैनिक ओमराजेंना राजकीय उत्तर देण्याच्या तयारीत आहेत. आगामी सभेला शक्तिप्रदर्शनाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न सुरू असून, ओमराजेंच्या पक्षांतराचा मुद्दा सभेच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे. धाराशिवमध्ये ठाकरे गटाने गावोगावी बैठका सुरू करत संघटनात्मक ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.0
0
Report
शिंदे की शिवसेना में प्रवेश के बाद धाराशिव में ओमराजे निंबाळकर पर राजनीतिक परीक्षा
Dharashiv, Maharashtra:धाराशिव ओमराजेंची दुहेरी कोंडी; ठाकरे गटाचा थेट हल्ला, भाजपचीही नवी रणनीती! उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी शिवसैनिकांची मोर्चेबांधणी; भावी खासदार'च्या बॅनरने राजकीय चर्चांना उधाण! शिंदे सेनेत प्रवेशानंतर धाराशिवच्या राजकारणात नवे समीकरण; ओमराजेंसमोर मित्र की मित्रपक्ष प्रतिस्पर्धी? अँकर: ठाकरे यांची साथ सोडत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर धाराशिवच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले आहे. एका बाजूला उद्धव ठाकरे यांच्या धाराशिव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक ओमराजेंच्या विरोधात आक्रमक झाले आहेत, तर दुसऱ्या बाजूला भाजपकडून आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांचे "भावी खासदार" असे बॅनर झळकल्याने महायुतीतही राजकीय संदेश दिला जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांची विरोधकांसह मित्रपक्षाकडूनही कोंडी होत असल्याचं चित्र आहे. पाहूयात हा रिपोर्ट...0
0
Report
विश्वास नागरे पाटील के वीडियो पर कांग्रेस का विरोध, RSS समर्थक बयान से हलचल
Nagpur, Maharashtra:नागपुर के पुलिस आयुक्त के तौर पर नियुक्ति से पहले विश्वास नागरे पाटील का एक वीडियो सोशल मीडिया पर वायरल हुआ है। इस वीडियो पर कांग्रेस ने आपत्ति जताई है। कांग्रेस शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे ने भी भय व्यक्त किया है। हमारे प्रतिनिधी نے उनसे बातचीत की। ভিডিও के अंश: - विश्वास नागरे पाटील ने क्षेत्र के भीतर Hindu समाज के साथ RSS के समर्थन का संकेत दिया है, जिससे हिंदू राष्ट्र के अजेन्डे की चर्चा उठी है। - संविधान के अनुसार काम करने के बारे में आश्वासन चाहिए ताकि अन्य धर्मों के साथ व्यवहार निष्पक्ष हो। - नागपुर शहर सभी धर्मों को मानने वाला नगर है; विरोध के बावजूद प्रशासनिक neutrality बनाए रखने की जरुरत जताई गई है। - कांग्रेस और अन्य दलों ने यह भी कहा कि अधिकारी की नियुक्ति के समय पूर्वाग्रह से मुक्त भावना जरूरी है ताकि संविधान के अनुरूप कार्य हो सके। - अगला चरणसूत्र: नियुक्ति की पूर्वग्रह-शून्यवृत्ति पर आश्वासन और शर्तों के अनुसार कार्य करने की प्रतिबद्धता।0
0
Report
Advertisement
एल निनो के प्रभाव से मान्सून अभी सक्रिय नहीं, येवला में खरीफ पेराई अभी अड़ गई
Yeola, Maharashtra:एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून अद्याप अपेक्षित प्रमाणात सक्रिय झालेला नसल्याने दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या येवला तालुक्यात पेरण्या खोळंबल्या आहेत पावसाअभावी शेतकरी मका, सोयाबीनसह खरीप पिकांसाठी शेताची मशागत आणि तयारी करत आहेत मात्र अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरणी कधी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे गेल्या वर्षी याच कालावधीत बहुतेक भागात पेरण्या पूर्ण झाल्या होत्या, असे शेतकरी सांगत आहेत आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा असून मान्सून कधी सक्रिय होणार, याकडे येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे0
0
Report
अस्पताल में सुरक्षा गार्ड की सतर्कता से बड़ा हादसा टला; चाकू लेकर आया युवक पकड़ा
Akola, Maharashtra:अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयातील सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे मोठी अनर्थकारक घटना टळली आहे. उमरी परिसरातील एका युवकावर झालेल्या चाकू हल्ल्यानंतर त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, उपचार सुरू असलेल्या वॉर्डबाहेर संशयास्पद हालचाली करणारा एक तरुण सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून धारदार चाकू जप्त करण्यात आला. त्यामुळे रुग्णावर पुन्हा हल्ला करण्याच्या उद्देशाने तो आला होता का, की त्यामागे अन्य काही कारण होते, याचा तपास आता पोलीस करत आहेत. मात्र सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य मोठी घटना टळली असून त्याच्या तत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.0
0
Report
फडणवीस-उद्धव ठाकरे की एक विमान यात्रा, महाराष्ट्र के राजनीतिक समीकरण गरम
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग ठाकरे गट नेते वैभव नाईक बाइट पॉईंट्स. ऑन देवेंद्र फडणवीस और उद्धव ठाकरे एकाच विमानातून प्रवास. तो निवळ योगायोग होता. परंतु उद्धवजी सुद्धा माजी मुख्यमंत्री आहेत आणि प्रमुख नेते हे महाराष्ट्राचे आहेत. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. दोघांनी युती म्हणून काम केलेलं आहे. एकत्र बोलणं चर्चा करणं राजकारणाला अपेक्षित आहे. मीडियाने किंवा विरोधी पक्षाने चर्चा करू नये. राजकारणामध्ये संबंध वेगवेगळे होत चालले आहेत. अशा भेटीमुळे राजकीय संबंध सुधारतील याचा फायदा महाराष्ट्राला होईल. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर पक्षाच्या नावावर, उद्धवजींचे फोटो लावून हे खासदार निवडून आले होते. त्यांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन उद्धवजींना माफी मागावी लागत आहे. उद्धवजी ने सांगितलं म्हणून तिथल्या जनतेने यांना निवडून दिलं. संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघांमध्ये सुद्धा उद्धवजीने माफी मागितली. ज्यां कार्यकर्त्यांनी निवडून दिलं त्यांच्यासाठी हा दौरा आहे. अणुऊर्जा प्रकल्पाला जनतेचा नेहमीच विरोध आहे. याआधी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला कोकणातील जनतेने विरोध केला होता. मुणगेतील अणुऊर्जा प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला कोण आडवी मांजर येतील त्यांना आपण ठेचून काढू असं नारायण राणे म्हणाले होते. अणुऊर्जा प्रकल्पाला आम्ही ठामपणे विरोध करणार आहोत. पालकमंत्री नितेश राणे यांच्या या प्रकल्पाला आम्ही विरोध करू असं सांगितलं आहे. पालकमंत्र्यांची भूमिका विरोध विरोधाची असेल तर त्याचा आम्ही स्वागत करू. आंबा काजू नुकसान भरपाई गेल्या मार्च एप्रिलमध्ये शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी आंदोलन केलं. मागच्या अधिवेशनामध्ये तुटपंजी मदत 220 रुपये कलमाला जाहीर झाले होती. त्याला विरोध केला होता आणि दुसऱ्या दिवशी मोर्चा देखील काढला होता. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम निलेश राणे यांनी केल आहे. कोकण कृषी विद्यापीठ हे कोकणातील महत्त्वाचे विद्यापीठ आहे या विद्यापीठाने अनेक शेती शास्त्रज्ञ दिलेले आहेत.0
0
Report
Advertisement
इंदापूर प्राथमिक शिक्षक पतसंस्थे की वार्षिक सभा में हंगामा, 14 निदेशकों पर आरोप
Rui, Maharashtra:इंदापूर प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ.. संचालकांमध्ये जुंपली. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची 103 वी वार्षिक सभा वादळी ठरली. 12.05 टक्के लाभांश मंजूर झाला असला तरी अहवालातील चुकांवरून सभेत मोठा गोंधळ झाला. विविध विषयावरून संचालकांमध्ये जुंपली. दिव्यांग माजी सभापतींनी 14 संचालकांवर आरोप करताच काही संचालक त्यांच्या अंगावर धावले. सुदैवाने त्यांना इजा झाली नाही. सत्ताधारी गटातील पाच संचालक व्यासपीठावर न बसता खाली सभासदांमध्ये बसले होते. यामुळे संचालक मंडळातील दुफळी उघड झाली आहे.0
0
Report
इंदापुर में जबरी चोरी: दो आरोपी गिरफ्तार, 56 हजार का माल जप्त
Rui, Maharashtra: इंदापूरात जबरी चोरीचा गुन्हा उघड... स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई... दोन आरोपी जेरबंद... आरोपींकडून 56 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत... ANCHOR इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल जबरी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल ही जप्त करण्यात आला आहे.. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विभागाच्या पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ही कारवाई केली... अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कृष्णा राजू गिरी (वय 20) आणि वैभव देविदास साळुंखे (वय 22), दोघेही अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथील रहिवासी आहेत. आरोपींकडून विवो कंपनीचा मोबाईल, सेकंड कॉपी घड्याळ आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली होंडा स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे... जप्त मुद्देमालासह आरोपींना पुढील कारवाईसाठी इंदापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे...0
0
Report
शिर्डी में पति ने खुरपय से हमला कर पत्नी को घायल किया
Shirdi, Maharashtra:शिर्डी शहरातील कालिकानगर परिसरातील धक्कादायक घटना. पतीने केलेल्या हल्ल्यात पत्नी आरती संदीप धीवर वय 33 या गंभीर जखमी. साई संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात जखमी महिलेवर उपचार सुरू. हल्ल्यानंतर आरोपी पती स्वतःहून शिर्डी पोलीस ठाण्यात हजर. शिर्डी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू, आरोपी ताब्यात. आरोपी साई संस्थानचा कंत्राटी सुरक्षा रक्षक असल्याची प्राथमिक माहिती समोर.0
0
Report
Advertisement
दौड़ती लोकल ट्रेन में हत्या के बाद रेलवे पुलिस अलर्ट; कल्याण स्टेशन पर कड़ा सुरक्षा बंदोबस्त
Kalyan, Maharashtra:धावत्या लोकलमधील हत्येनंतर रेल्वे पोलिसांचा अलर्ट मोड. कल्याण स्थानकावर कडेकोट बंदोबस्त तैनात.. अंधेरी बोरिवली दरम्यान धावत्या लोकल ट्रेनमध्ये किरकोळ वादातून २२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याच्या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी संपूर्ण उपनगरी रेल्वे मार्गावर सतर्कता वाढवली आहे. कल्याण रेल्वे पोलीस देखील ऍक्टिव्ह मोडवर आले असून कल्याण रेल्वे स्थानकावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे .कल्याण रेल्वे पोलिसांनी तातडीने सुरक्षा उपाययोजना वाढवल्या आहेत. कल्याण रेल्वे स्थानकावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संशयित प्रवाशांची झडती घेतली जात आहे. प्लॅटफॉर्म, प्रवेशद्वार आणि लोकल गाड्यांमध्येही पोलिसांकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.0
0
Report
शिंदे गुट के नेता आला की वडेट्टीवार को लेकर उथल-पुथल: क्या वडेट्टीवार जाएंगे?
Nagpur, Maharashtra:शिंदे सेनेचा नेता आला कीं विचारणार वडेट्टीवार येणार कां ? कोणी म्हणेल घेतो....कारण विजय व वड्डेवार यांना घ्यायला सगळेच तयार असणार... मात्र वडेट्टीवार यांना घ्यायला कोण तयार नसणार? पण वडेट्टीवार जाणार का? त्यांची काही इच्छा? हे तर कोणी विचाराव.... वारंवार मी त्याचे खंडन करतो... -- आपणच बातमी करता आपणच विचारता... आपणच ठरवताय... तुम्ही ठरवलाय का मला बदनाम करून टाकायच? आणि बदनाम करून माझी प्रतिमा मलिन करायची?.... असं काही नागपूरच्या टीमने कोणाच्या इशा-यावर ठरवलं असेल तर तेही सांगा?... मला शोध घेता येईल? --- कशाला जाऊ?या पक्षामध्ये नताकद आहे.... ठीक आहे दिवस चांगले असतात वाईट असतात.... म्हणजे याचा अर्थ सगळ्यांनी भाजप आणि शिवसेनेबरोबर जाणे असा हा नव्हे... विरोधक शिल्लकच राहिला नाही पाहिजे अशी मीडियाचीच इच्छा दिसत आहे.. तुमच्या या बातम्यांमुळे -- मी गेल्या तीन दशकापासून राजकारण करतोय... -- पक्षाने मला इतकी ताकद दिली विरोधी पक्षनेতা आता विधिमंडळ नेता आहे... आता पक्ष संकटात आहे.. वाईट परिस्थिती आहे... मात्र बदल नक्की होतील.... माझ्या काही मुकुट घालून येत नाही.... --- सामन्य माणसाचे प्रश्न मी मांडत आहे ( टायगर ऑपेरेशननंतर केंद्रीय मंत्री वाढतोय महाराष्ट्रातील ) -- त्यांना शुभेच्छा आहे मात्र त्याचा उपयोग मोदी साहेबांनी करू दिला पाहिजे.... सध्या देशाचा गुराखी असा आहे की कोणत्या जनावराला इकडे तिकडे जाऊ देत नाही.... वाकडे तिकडे गेले की पटकन त्यांना सोटा बसतो... त्यांना खाऊ आणि पिवळी देत नाही... मोदी रुपी गुराखी त्यांना उपयोग करता येईल का हा प्रश्न (on RTO -बावनकुळे पत्र ) --- 56 जीबी च्या ऑडिओ क्लिप आहे.... विदर्भातल्या नव्या अधिकाऱ्यांना टार्गेट केले जातेय... त्यांना वसुलीच्या धंद्यात सामील होण्याकरता अनेक प्रकारचा प्रयोग केला यात आहे.... राजेंद्र भुयार,आनंद मोहड, आता खरमाटे थोडे बॅक फुटवर गेले आहे... गुरु खरमाटेच... मात्र आता यांचा गुरु राजेंद्र भुयार झाला आहे... ते नागपूरातच बसतात.... अमरावतीला नियुक्ती असून जात नाही.. आनंद मोहोड गोंदियाला असतात.. यांचा एजंट गुड्डू सेठ आहे.... आतापर्यंतच्या तीन ट्रॅप मध्ये याचेच मोबाईल क्रमांक आढळून आले.... --- आनंद मोहोड या गुड्डू शेठच्या मोबाईलवरून कॉल करतो..आपल्याच गाड्या लावतो... मध्यप्रदेश मधून आलेल्या चोरीच्या गाड्या राजरोसपणे चालवण्यासाठी --ACB -RTO अधिकारी आणि काही एजंट संगमतकरून सरांना या स्कॅम मध्ये ओढता त आणि जो येत नाही..त्यांच्यावर ट्रॅप लावतात -- माझ्या मतदारसंघातील अधिकारी साजन शेंडे --- ती गाडी नंबर वर फोन नंबर आहे म्हणजे माझ्या मतदारसंघातील जाणून बुजून तो झोपला असताना...लगेच त्याची बेल... झाली ... त्या ठिकाणी नाशिकची एक महिला अधिकारी होती तिच्यावर कारवाई नाही.... विदर्भातील अधिकाऱ्यांवर मात्र जाणूनबुजून कारवाई --- महाराष्ट्रात 20 कोटीची दर महिन्याला वसुली सुरू आहे.... विदर्भात सर्वाधिक वसुली होत असते... दहा ते पंधरा कोटी ची --- याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत आहे... शंभर अधिकाऱ्यांनी रीतसर तक्रार करून पहिली तक्रार घाण केली... दुसरी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करावी लागली... हा प्रश्न विधिमंडळातीलच.... संभाषण व्हायरल झाले आहे --- अमोल मोहोड नावाचा माणूस आहे... इन्स्पेक्टरला गाडी सोड म्हणून सांगतो... अनेक ठिकाणी राजेंद्र भुयार, आनंद मोहोड -- या चेक पोस्ट बंद करा म्हणजे वसुलीचा धंदा बंद होईल... मंत्रालयाच्या इशा-यावर भुयार, मोहोड आणि हा गुड्डू शेठ --- तरुण प्रामाणिक आरटीओ अधिकाऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार आहे -- शंभर आरटीओ अधिकाऱ्यांनी पत्र दिल्यानंतरही ते पत्र गहाळ झालं किती बदमाश आणि ह****** लोक आहे... ते पत्र आता मुख्यमंत्र्यांपर्यंत गेला आहे (on उदय सामंत स्टेटस ) --- लोकात चर्चा मात्र हा हात नावापुरताच आहे अशी आहे... हा हात सेकंड करण्याकरता की दाबण्याकरता धरला आहे? हे येणाऱ्या काळात दिसेल -- आम्हाला आनंद आहे? ते دوघे एकत्र असतील तर आम्हाला दुःख होण्याचं कारण नाही? (on विमानप्रवास नंतर ) -- कदाचित त्यामुळे चर्चा झाली असेल असं त्यांना वाटत असेल.. मात्र एकनाथ शिंदे हा सुद्धा जिगरी माणूस आहे ना? एवढी माणूस घेऊन जात आहे? कोणी म्हणतो पैशांनी मात्र माणूस इमान का विकतो? इमान विकण्याकरता माणसाची मानसिकता का ढळते हा प्रश्न आहे? त्यामुळे या ऑपरेशन मध्ये मुख्यमंत्री होते की नाही मला माहित नाही? मात्र काल दोघांमध्ये ji चर्चा झाली रात्री त्यानंतर हे स्टेटस आलं असेल असे स्टेटस आलेले -- सध्याच्या राजकारणात एकत्र दिसत असले तरी ते एकत्र नाही... अनेक गोष्टींवरून दिसून येते. नाशिकची जागा पडली... एकनाथ शिंदे यांच्या मनात खदखद आहे... हातात हात असले तरी हृदयाला हृदय मिळते का?0
0
Report
पातूर घाट पर गजानन महाराज पालखी का भव्य दृश्य, भक्तों का उत्साह चकित
Akola, Maharashtra:शेगावचे संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचा अकोला जिल्ह्यातील चार दिवसांचा मुक्काम आज संपला असून, पहाटे पातूर शहरातून पालखीने वाशिम जिल्ह्याकडे प्रस्थान केले. हजारो भाविकांच्या जयघोषात पालखी सध्या पातूर-वाशिम मार्गावरील निसर्गरम्य घाटातून मार्गक्रमण करत आहे. यावेळी पातूर घाटातील पालखीचे मनमोहक विहंगम दृश्य आमचे प्रेक्षक मोहन पाटील यांनी ड्रोनच्या माध्यमातून टिपले आहे. हिरव्यागार डोंगररांगा, घाटातील वळणावळणाचा रस्ता आणि त्यावरून भक्तिरसात न्हाऊन निघालेली पालखी पाहताना एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव मिळत आहे. श्री गजानन महाराजांच्या जयघोषाने पातूर घाट परिसर दुमदुमून गेला आहे. चार दिवस अकोला जिल्ह्यात मुक्काम केल्यानंतर पालखीने आज पहाटे पंढरपूरच्या दिशेने पुढील प्रवास सुरू केला. पातूर-वाशिम मार्गावरील घाटातून पालखी मार्गक्रमण करत असताना हजारो वारकरी टाळ-मृदंगाच्या गजरात आणि अभंग गात पायी चालत आहेत. हिरवाईने नटलेला घाट, शिस्तबद्ध पद्धतीने पुढे सरकणारी पालखी आणि भक्तांचा उत्साह यामुळे परिसराला भक्तिमय वातावरण लाभले आहे. ड्रोनमधून टिपलेले हे विहंगम दृश्य पालखी सोहळ्याचे भव्य स्वरूप आणि वारकरी परंपरेचे दर्शन घडवणारे ठरत आहे. हे खास दृश्य पाहूया...0
0
Report
Advertisement
