icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

प्रशांत अंबी ने MLA संजय गायकवाड़ के खिलाफ धमकी का आरोप दर्ज कराया

Kolhapur, Maharashtra:शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करत प्रशांत आंबी यांनी कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. प्रशांत आंबी यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, आमदार गायकवाड यांनी फोनवर अश्लील भाषेत शिवीगाळ केली, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपमानास्पद वक्तव्य केले. यासोबतच जीभ कापण्याची व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा तक्रार अर्जात उल्लेख केला आहे. तक्रार अर्जानुसार, 26 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री 12:51 वाजता आमदार गायकवाड यांनी फोन करून धमकी दिल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 351, 352, 356, 192 तसेच मानवी हक्क संरक्षण कायद्याअंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे. तसेच, आमदार गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांकडून स्वतःला व आपल्या कुटुंम्बीयांना धोका असल्याचेही आंबी यांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांकडून तक्रारीची पडताळणी सुरू आहे.
0
0
Report
Advertisement

अंत्री में श्रीराम महाराज मेहुणकर जन्मशताब्दी के भव्य दिव्य धार्मिक उत्सव का समापन

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील अंत्री (मलकापूर) येथील श्री स्वयंभू महादेव मंदिरात सध्या भव्य दिव्य असा धार्मिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. विदर्भ भूमीचे दैदिप्यमान संत श्रीसंत श्रीराम महाराज मेहुणकर यांच्या जन्मशताब्दी उत्सवानिमित्त हा पवित्र कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.१६ ते २३ एप्रिल २०२६ या कालावधीत पार पडलेल्या या उत्सवात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह, कीर्तन, प्रवचन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला हजारो भाविकांनी उपस्थिती लावत भक्तिभावाने सहभाग नोंदवला.सप्ताहभर सुरू असलेल्या या धार्मिक उत्सवामुळे अंत्री परिसर पूर्णपणे भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता. संत श्रीराम महाराज मेहुणकर यांच्या विचारांचा आणि अध्यात्मिक वारशाचा जागर या माध्यमातून करण्यात आला.एकूणच, या भव्य सोहळ्याने भाविकांना अध्यात्मिक समाधान देत अंत्री परिसरात श्रद्धा आणि भक्तीची एक वेगळीच उंची गाठली.
0
0
Report

कल्याण में 108 एम्बुलन्स की 40 मिनट की देरी से मौत, स्थानीय लोगों ने लगाया आरोप

Kalyan, Maharashtra:ANC- कल्याण पश्चिमेतील दीपक हॉटेल परिसरात एका व्यक्तीच्या मृत्यूवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मेवालाल गुप्ता नावाच्या व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून, 108 ॲम्बुलन्स उशिरा पोहोचल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. आम्ही ॲम्बুলन्स घेऊन 12 मिनिटात पोहोचलो होतो नागरिक आम्हाला मारणार होते आमच्याकडून कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा झालेला नाही अशी प्रतिक्रिया आहे. मेवालال गुप्ता कामानिमित्त कल्याणमध्ये आले होते. अचानक छातीत वेदना सुरू झाल्याने त्यांनी 108 क्रमांकावर ॲम्बुलन्ससाठी कॉल केला. काही स्थानिक नागरिकांनीही तातडीने ॲम्बुलन्सला संपर्क साधला. मात्र, ॲम्बुलन्स तब्बल 40 मिनिटांनी घटनास्थळी पोहोचल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर गुप्ता यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतदेहाचे पोस्टमार्टमही करण्यात आले असून, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात 108 ॲम्बুলन्सवरील डॉक्टर मोहम्मद तोफिक आणि चालक प्रकाश चोरगे यांनी वेगळीच बाजू मांडली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, रात्री 10 वाजून 29 मिनिटांनी कॉल मिळाल्यानंतर ते केवळ 12 मिनिटांत घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी संबंधित व्यक्तीची तपासणी केली असता तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. तसंच, घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती आणि संतप्त नागरिकांकडून हल्ला होण्याची भीती निर्माण झाल्याने तेथून निघून जावे लागले, असेही त्यांनी स्पष्ट केले. आमच्याकडून कोणताही निष्काळजीपणा झालेला नाही,असा दावा त्यांनी केला आहे. दीपक हॉटेल परिसरात पोहोचायला अवघ्या काही मिनिटांचा वेळ लागतो, मग 40 मिनिटांचा उशीर कसा झाला? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. या प्रकरणाची संबंधित विभागाकडून चौकशी सुरू असून, प्रत्यक्षात विलंब झाला का? हे चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे. बाईट -डॉक्टर तोफिक 108 ॲम्बुलन्स बाईट - प्रकाश चोरगे ॲम्बुलन्स चालक p2c... आतिश भोईर कल्याण
0
0
Report
Advertisement

उष्णते का कहर: धाराशिव के खवा-पेड़ा उद्योग संकट में

Dharashiv, Maharashtra:उष्णतेचा फटका; धाराशिवचा खवा क्लस्टर डळमळीत – कुंतलगिरीचा पेढा झाला महाग! दूध उत्पादक शेतकरी ही संकटात धाराशिव जिल्हा खवा उत्पादनासाठी देशभर ओळखला जातो… पण आता वाढत्या उन्हामुळे हाच खवा आणि पेढा उद्योग संकटात सापडला आहे. तापमान 40 अंशांच्या पुढे गेल्याने जनावरांवर ताण वाढलाय… पाणी आणि चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय… आणि याचा थेट परिणाम दुधाच्या उत्पादनावर होतोय. परिणामी, खव्याच्या किमती वाढल्या असून कुंतलगिरीचा देशभर प्रसिद्ध पेढा देखील महागला… शेतकरी ते ग्राहक सगळेच या संकटाच्या फटक्यात सापडले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील भूम परिसरात दररोज मोठ्या प्रमाणावर दूध उत्पादन होतं… मात्र सध्या तीव्र उष्णतेमुळे उत्पादन निम्म्यावर आलं आहे. जिल्ह्यात साधारण 5 ते 6 लाख लिटर दूध उत्पादन होत असताना, आता त्यात मोठी घट झाली आहे. दुसरीकडे, धाराशिवचा खवा उद्योग हा कोट्यवधींची उलाढाल करणारा उद्योग मानला जातो… मात्र दुधाच्या कमतरतेमुळे खवा उत्पादन घटलं आहे आणि त्याचा थेट परिणाम पेढा उद्योगावरही दिसून येतोय. एकीकडे उष्णतेचा वाढता तडाखा… दुसरीकडे घटलेलं दूध उत्पादन… आणि त्यातून महागलेला खवा व पेढा… धाराशिवचा हा प्रसिद्ध उद्योग सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. जर परिस्थिती अशीच कायम राहिली, तर येत्या काळात दूध व्यवसायासोबतच धार्मिक प्रसाद व्यवस्थेवरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
0
0
Report

चंद्रकांत पाटील ने जल प्रबोधन के लिए जलव्यवस्थापन कृती पंधरवडा का उद्घाटन किया

Sangli, Maharashtra:सांगलीमें जलसंपदा विभागाच्या माध्यमातून “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा कार्यक्रम संपन्न झाला आहे। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये वारणाली येथील पाटबंधारे कार्यालयामध्ये जल व्यवस्थापन व पीक पद्धतीवर कार्यशाळा पार पडली; यावेळी मध्ये चंद्रकांत पाटलांनी बोलताना जल व्यवस्थापनाचे प्रभावी नियोजन केल्यास दुष्काळी परिस्थितीवर मात करता येऊ शकते. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करून काटकसरीने पाणी वापरण्याची गरज व्यक्त करत शेतकरी व नागरिकांच्या जलप्रबोधनासाठी जलव्यवस्थापन कृती पंधरवडा दिशादर्शक ठरेल, असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला.
0
0
Report
Advertisement

मराठी अनिवार्यता पर कोकण रिक्षा संघ ने सरकार के कदम का स्वागत किया

Kalyan, Maharashtra:मराठी सक्तीच्या निर्णयाचे कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे स्वागत ... महारष्ट्रात मराठी आलीच पाहिजे... कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघासह कल्याणातील रिक्षा चालकांची भूमिका महाराष्ट्रात मराठी आलीच पाहिजे अशी भूमिका या रिक्षा संघटनेसह कल्याण डोंबिवली चा आजूबाजूच्या परिसरातील रिक्षा चालकांनी घेतली आहे. ज्या युनियनने हा संप पुकारला ते मुंबई पुरतीच मर्यादित असल्याचा टोला देखील संघटनेचे अध्यक्ष प्रणव पेणकर यांनी लगावला .आपण कोणत्याही राज्यात गेलो तरी त्या ठिकाणची भाषा ही आलीच पाहिजे मग महाराष्ट्रात मराठी का नको, मराठी येत नसेल तर शिकून घ्या असे देखील या रिक्षा चालकांनी यावेळी सांगितले., रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरटीओसह तहसीलदार कार्यालयातील अधिकार्यावर देखील याचे खापर फोडले परवानासाठी लागणारे डोमेसाईल सर्टिफिकेट तसेच मराठीच्या परीक्षा घेताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जातो त्यातून असे परवाने देण्यात येतात त्यामुळे आधी शासकीय अधिकाऱ्यांना वठणीवर आणा अशी मागणी देखील संघटनेचे अध्यक्ष प्रणव पेणकर यांनी केली
0
0
Report

मराठी विरोध: कर्नाटक दहावी परिणाम से सीमा भाग के विद्यार्थियों में मराठी के बहिष्कार पर हलचल

Kolhapur, Maharashtra:महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके बाईट मुद्दे शिक्षण क्षेत्रातही कर्नाटक सरकारने मराठी द्वेस्टी भूमिका दाखवण्याच काम केलाय कर्नाटक सरकारने सीमा भागातील विद्यार्थ्यांच्या दहावीच्या निकाल पत्रातून मराठी हा शब्द गायब केलाय मराठी हा शब्द न लिहिता तिथं ब्लँक ठेवून फक्त मार्क लिहिले आहेत यातून कर्नाटक सरकारचा मराठी द्वेष दिसून येतोय मा भागात मराठीचं अस्तित्व नाही हा दाखवण्याचा केबिलवाना प्रयत्न कर्नाटक सरकार करते त्यांनी कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी सीमा भागातील मराठी माणसं आणि भाषा अबाधित राहणार आहे या चळवळीला आम्ही पूर्णत्वाला नेल्याशिवाय शांत बसणार नाही हे कर्नाटक सरकारला आम्ही ठणकावून सांगतो मराठी बद्दल हा काही प्रकार केला आहे याचा आम्ही निषेध करतो महाराष्ट्र सरकारने याची दखल घेऊन केंद्राकडे तक्रार करावी आणि अभिजात मराठी भाषेला पुसण्याचा प्रयत्न केलाय थांबवावा अशी विनंती
0
0
Report
Advertisement

पति की पुरानी प्रेमिका ने घर में हत्या कर दी, शहर दहल गया

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगरमध्ये रक्ताचं नातं आणि अनैतिक संबंधांतून एक थरारक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या प्रियकराच्या पत्नीची भरदिवसा घरात घुसून निर्घृण हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी महिलेने आधी पिस्तूल रोखलं आणि नंतर चाकूने सपासप वार करून साधना सोनपेटकर या ४० वर्षांच्या महिलेचा जीव घेतला. छत्रपती संभाजीनगरचा बजाजनगर परिसर आज सकाळी नेहमीप्रमाणे गजबजलेला होता. साई श्रद्धा पार्क येथील एका घरात जे घडलं, त्याने संपूर्ण मराठवाडा हादरला. ४० वर्षांच्या साधना सोनपेटकर यांची त्यांच्याच घरात घुसून हत्या करण्यात आली. हत्या करणारी दुसरी कोणतीही नसून, त्यांच्या पतीची जुनी मैत्रीण शैला सोनार होती. मृत साधना यांचे पती महेंद्र सोनपेठकर आणि आरोपी शैला सोनार यांच्या संबंधाची माहिती आधीच समोर आली होती. या वादातून शैलाने महेंद्र यांच्यावर बलात्काराचा गुन्हाही दाखल केला होता. संबंधित वादाच्या रागातून हत्याकांड घडल्याचा संशय व्यक्त केला जातो. शैला सोनारने घरातच पिस्तूल आणि चाकू घेऊन साधना यांच्या घरात घुसली. गावात जवळजवळ तिघांमध्ये झटापट झाली. शैलाने साधनाच्या डोक्यावर पिस्तूल रोखलं; आजीनं पिस्तूल हिसकावून बाहेर फेकलं, पण शैलाचा राग शांत झाला नाही. तिने धारदार चाकू काढला आणि साधनावर वार सुरू ठेवल्या. साधना रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यावरही शैला वार करीत राहिली; या भीषण हल्ल्यात साधना यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर शैलाने स्वतःला घरात कोंडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी दरवाजा तोडून ताब्यात घेतलं.
0
0
Report

डिजिटल इंडिया के तहत सांगली के तलाठों को लैपटॉप वितरित

Sangli, Maharashtra:सांगलीमध्ये डिजिटल इंडिया उपक्रमा अंतर्गत तलाठ्यांना चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लॅपटॉप वाटप करण्यात आले आहेत. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तालुक्यातील 53 तलाठयांना प्राथमिक स्वरूपात लॅपटॉप वाटप करण्यात आले, या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. सांगली जिल्ह्यासाठी साडेतीनशे लॅपटॉप उपलब्ध झाले आहेत. या लॅपटॉपच्या माध्यमातून अधिक पद्धतीने नोंदी ठेवणं सोपं जाणार असून शेतकरयांच्या वेदना लक्षात घेऊन शेतकरयांच्या अडचणी सोडवण्याचे काम तलाठ्यांनी करावं, असं आवाहन या निमित्ताने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top