icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

बारामती पश्चिम पट्टी में असामयिक बारिश-गारपीट से किसानों को भारी नुकसान

Rui, Maharashtra:बारामतीच्या पश्चिम पट्ट्याला अवकाळी पावसाचं गारपिटीचा फटका..... युगेंद्र पवाराकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जातं नुकसानीची पाहणी..... बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात रविवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपיטיने मोठा तडाखा दिलाय.विशेषतः होळ, सदोबाचीवाडी, वडगाव निंबाळकर, निंबूतसह परिसरातील गावांमध्ये गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. भाजीपाला पिकांसह फळबागा जमिनीवर आडव्या झाल्यात. यानंतर शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी होळ, सदोबाचीवाडी, वडगाव बुद्रुक यासह इतर परिसरात शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन या नुकसानीची पाहणी केली आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधत युगेंद्र पवार यांनी एकूणच परिस्थितीचा आढावा घेतलाय.
0
0
Report

नेताओं के नाम से बने नकली बर्थडे कार्ड वायरल: प्रचार खेल

Shirdi, Maharashtra:प्रसिद्धीची हाव आली तरुणाच्या अंगलट... भारतीय राजमुद्रेचा आणि राजकीय नेत्यांच्या नावाचा गैरवापर केल्याने गुन्हा दाखल... प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने बनवले शुभेच्छापत्र... AI च्या मदतीने बनवले स्वतःच्या वाढदिवसाचे बनावट शुभेच्छापत्र... बनावट शुभेछापत्र केले शोषल माध्यमावर व्हायरल... संगमनेर तालुक्यातील मांडवे येथील विश्वजित धुळगंड याच्यावर गुन्हा दाखल... भारतीय राजमुद्रेचा आणि राजकीय नेत्यांच्या नावाचा गैरवापर केल्या प्रकरणी गुन्हा दाखल... पोलिसांनी विश्वजित धुळे गेल्याला घेतले ताब्यात... प्रसिद्धीसाठी बनावट शुभेच्छापत्र बनवणारा खासदार निलेश लंके यांचा समर्थक आला अडचणीत..
0
0
Report
Advertisement

सोलापुर विधान परिषद चुनाव में महाविकास आघाड़ी में घमासान, कई प्रत्याशी दाखिल

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीत गोंधळ\n\nमहाविकास आघाडीत सोलापूरची जागा काँग्रेसला सुटलेली असताना देखील राष्ट्रवादी शरद पवारगटाकडून देखील उमेदवारी दाखल तर\n\nतर बार्शीतील शिवसेना ठाकरेना गटाच्या नेत्यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय\n\nमहाविकास आघाडीमध्ये काँग्रेस कडून आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज दाखल केलाय तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख यांनी AB फॉर्म सहित अर्ज दाखल केलाय\n\nतर दुसरीकडे भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांचे कट्टर विरोधी असलेले बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांचे निकटवर्तीय नागेश अक्कलकोटे यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय\n\nराष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अर्ज भरण्यासाठी सांगितलं असल्याने अर्ज भरत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत देशमुख यांनी दिली \n\nतर ‘उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कोणतीही चर्चा झालेली नाही पण उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी दोन दिवस मुदत आहे‘\n\n’पक्षातील नेते चर्चा करतील आणि महाविकास आघाडीकडून एकच अर्ज राहिलं.. दहशतीपोटी कोणी अर्ज माघार घेईल, त्यामुळे एकत्रित सर्वानी अर्ज भरलेत‘\n\nअशी प्रतिक्रिया बार्शीचे ठाकरेना गटाचे नगरसेवक आणि विधानपरिषदेचे उमेदवार नागेश अक्कलकोटे यांनी दिली.\n\nआदित्य फत्तेपुरकर ( अधिकृत काँग्रेस उमेदवार )\n\nवसंत देशमुख, उमेदवार, राष्ट्रवादी शरद पवार गट ( गळ्यात तुतारी शेला )\n\nनागेश अक्कलकोटे, अपक्ष उमेदवार तथा ठाकरेंसना गटाचे नेते\n\nधनंजय डिकोळे ( UBT नेते ) ( अपक्ष उमेदवारी दाखल ) ( चष्मा घातलेले, गळ्यात मशाल शेला )
0
0
Report

चासकमान डैम के पानी आवंटन में योजना कमी, किसानों ने प्रदर्शन

Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी वाटपामध्ये नियोजनाचा मोठा अभाव असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या ढिसाळ कारभाराविरोधात मुखई, जातेगाव, करंदी आणि शिक्रापूर परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी शिक्रापूर येथील चासकमान पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. 'पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे' अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. मागील दोन महिन्यांपासून काळव्यातून पाण्याचे आवर्तन न सोडल्यामुळे उन्हाळ्यात ऊस, भाजीपाला आणि फळबागा जळून खाक होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला. आंदोलनादरम्यान शेतकरी आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली, ज्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. प्रशासनाने तातडीने पाण्याचे आवर्तन जाहीर न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
0
0
Report

मन नदी में अवैध खनन: ग्रामस्थों ने प्रशासन से तुरंत जांच-कार्रवाई की मांग

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील बेलखेड परिसरातून वाहणाऱ्या मन नदीत अवैधरित्या उत्खनन सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी अकोला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत सदर उत्खनन तात्काळ थांबविण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मन नदीतील गाळ काढण्यास परवानगी दिली असतानाही संबंधितांकडून वाळू आणि मुरूम उपसा केला जात असल्याचा आरोप निवेदनातण्यात आला आहे. नदीपात्रातील मोठ्या प्रमाणावरील उत्खननामुळे पर्यावरणीय समतोल बिघडण्याची तसेच भूजल पातळीवर परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. ग्रामस्थांच्या मते, नदीपात्रातील वाळू आणि मुरूम काढल्यामुळे भविष्यात जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी होईल. परिणामी परिसरातील अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून अवैध उत्खननावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
0
0
Report
Advertisement

लातूर में नीट पेपरफुटी रैकेट: लाखों की वसूली, स्पेशल बैच और गैस पेपर

Latur, Maharashtra:लातूरमधे डॉक्टर बनवण्याच्या स्वप्नांचा लातूरमध्ये सौदा ?... नीट पेपरफुटी तपासात धक्कादायक खुलासे.... स्पेशल बॅच चा संशयास्पद फॉर्म्युला... लाखो रुपये भरणाऱ्यांसाठी स्वतंत्र ग्रुप, गेस पेपर आणि विशेष नोट्स... विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रेच ठेवली जात होती तारण ? सीबीआय तपासात धक्कादायक माहिती समोर... ५० हजारांपासून ते लाखो रुपयांची उकळपट्टी... नीटचे प्रश्न मिळवून देण्याच्या आमिषाचा आरोप... शिवराज मोटेगावकराच्या क्लासेसवर तपासाची धार... डॉक्टर बनण्याचं स्वप्न... आई-वडिलांची आयुष्यभराची कमाई... आणि त्या स्वप्नांवर डल्ला मारणारं एक भयानक रॅकेट आता उघड झालंय... लातूरच्या कथित नीट पेपरफुटी प्रकरणात आता असे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत, जे ऐकून कुणाच्याही अंगावर काटा येईल. प्रश्नपत्रिका मिळवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपये उकळलेलेच... पण काही विद्यार्थ्यांची मूळ शैक्षणिक कागदपत्रेच तारण ठेवून त्यांना अक्षरशः वेठीस धरलं जात होतं, अशी माहिती तपासातून समोर येत आहे. नेमकी काय होती ही पैशांची वसुली यंत्रणा ? विद्यार्थ्यांना कशाप्रकारे जाळ्यात अडकवलं जात होतं ? आणि सीबीआयच्या हाती नेमकं काय लागलं? पाहूया हा धक्कादायक रिपोर्ट... लातूर... वैद्यकीय शिक्षणासाठीचं मोठं केंद्र... दरवर्षी लाखो विद्यार्थी डॉक्टर होण्याचं स्वप्न घेऊन इथे दाखल होतात... आणि याच स्वप्नांच्या भोवती आता संशयाचं जाळं उभं राहताना दिसत है... नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात समोर आलेल्या सूत्राच्या माहितीनुसार, नियमित क्लास फी व्यतिरिक्त तब्बल 60 हजार रुपयांपासून ते थेड 5 लाखांपर्यंत अतिरिक्त भरलेल्या पैसे आणि विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र 'स्पेशल बॅच' तयार करण्यात आली होती. 'एम्स टॉपर' आणि 'अर्जुना'सारख्या खास ग्रुपमध्ये या विद्यार्थ्यांना जोडून विशेष नोट्स, प्रश्नसंच आणि कथितरित्या नीटशी संबंधित गेस पेपर पुरवले जात होते. इतकंच नव्हे, तर नीटचे प्रश्न आधीच मिळवून देण्याचं आमिष दाखवत विद्यार्थी आणि पालकांकडून लाखो रुपये आगाऊ घेतली जात असल्याची माहितीही तपासातून समोर आली आहे. डॉक्टर होण्याच्या स्वप्नाचा आधार घेत विद्यार्थी आणि पालकांच्या आर्थिक पिळवणूक केली जात होती याच वास्तव आता समोर आलय त्यामुळे मोटेगावकर याचे कारणामे आता हळूहळू बाहेर येऊ लागेले आहेत. बाईट ::- पालक डॉक्टर बनण्याचं स्वप्न दाखवून फक्त पैशांची उकळपट्टीच नव्हे, तर विद्यार्थ्यांना अक्षरशः वेठीस धरण्याही प्रकार या रॅकेटमध्ये सुरू होता, अशी धक्कादायक माहिती तपासातून समोर येत आहे...सूत्रांच्या माहितीनुसार, काही विद्यार्थ्यांची दहावी-बारावीची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला आणि इतर महत्त्वाची मूळ कागदपत्रे तारण म्हणून ठेवून घेतली जात होती. नीटचे प्रश्न मिळवून देण्याच्या बदल्यात ठरलेली रक्कम वसूल होईपर्यंत ही कागदपत्रे परत दिली जात नसल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे। सीबीआयच्या कारवाईदरम्यान अशा अनेक विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत असून, डॉक्टर होण्याच्या स्वप्नाचा फायदा घेत विद्यार्थी आणि पालकांना आर्थिक तसेच मानसिक दबावाखाली ठेवण्याचा हा प्रकार होता का, याचा तपास आता CBI कडून घेतला जात आहे.... डॉक्टर बनण्याचं स्वप्न दाखवून फक्त पैशांची उकळपट्टीच नव्हे, तर विद्यार्थ्यांना अक्षरशः वेठीस धरण्याही प्रकार या रॅकेटमध्ये सुरू होता, अशी धक्कादायक माहिती तपासातून समोर येत आहे...सूत्रांच्या माहितीनुसार, काही विद्यार्थ्यांची दहावी-बारावीची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला आणि इतर महत्त्वाची मूळ कागदपत्रे तारण म्हणून ठेवून घेतली जात होती. नीटचे प्रश्न मिळवून देण्याच्या बदल्यात ठरलेली रक्कम वसूल होईपर्यंत ही कागदपत्रे परत दिली जात नसल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. सीबीआयच्या कारवाईदरम्यान अशा अनेक विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत असून, डॉक्टर होण्याच्या स्वप्नाचा फायदा घेत विद्यार्थी आणि पालकांना आर्थिक तसेच मानसिक दबावाखाली ठेवण्याचा हा प्रकार होता का, याचा तपास आता CBI कडून घेतला जात आहे.... नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसं या कथित रॅकेटचं स्वरूप अधिक गंभीर असल्याचं चित्र समोर येत आहे... एका बाजूला लाखो रुपयांची उकळपट्टी, दुसऱ्या बाजूला 'स्पेशल बॅच', गेस पेपर, संशयास्पद प्रश्नसंच आणि विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे तारण ठेवण्याचे आरोप... या सर्व प्रकारामुळे डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या लोखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाला का, असा सवाल उपस्थित होत आहे. लातूरमध्ये शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत नेमकं कोण आणि किती मोठं जाळं कार्यरत होतं? या व्यवहारातून किती पैसा फिरला? आणि यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे ? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी सीबीआयचा तपास निर्णायक टप्प्यात पोहोचला असून या प्रकरणात आणखी काही मोठी नावं आणि धक्कादायक व्यवहार समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे...
0
0
Report

छत्रपती संभाजी नगर में शिवसेना-भाजपा के बीच खींचतान बढ़ी: सत्तार के पुत्र भरते उमेदवारी

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anchor: छत्रपती संभाजी नगर की विधान परिषद की पारंपरिक जागा शिवसेना की थी, पर यह स्थान भाजपा को मिल गई, जिससे शिवसेना में नाराज़गी है. आमदार अब्दुल सत्तार के पुत्रों ने सीधे उमेदवारी अर्ज भरला, महायुती में बंडाळी शुरू हो गई; भाजपा हमें मानसन्मान नहीं दे रही—अब्दुल सत्तार ने आरोप लगाए. छत्रपती संभाजी नगर में शिवसेना-भाजप में तकरार है; महापालिका चुनाव के अंतिम क्षणों में युति टूटी, जिले की परिषद चुनाव में शिवसेना को दूर रखा गया, अब विधान परिषद की शिवसेना की पारंपरिक जागा भाजपा ने अपने पास रख ली है. क्या शिवसेना-भाजप में संभाजी नगर में राजनीतिक टकराव बढ़ेगा—अब्दुल सत्तार ने कहा ऐसी नीति से शिवसेना खत्म नहीं होगी; उनके अनुसार जनता को नुकसान नहीं होगा. भाजपा से संजय शिरसाठ ने कहा कि सत्तार इस तरह न कहें; सत्तार अपने नेताओं की बात सुने. शिवसेना के विधायक वीर विलास भुमरे ने अलग भूमिका व्यक्त की: पार्टी ने महायुती के उम्मीदवार के पीछे रहने को कहा; हम उनके मत के साथ नहीं. आगे: शिवसेना और भाजपा में संभाजी नगर में खींचतान है; महापालिका और जिला परिषद चुनाव में भी वही स्थिति दिखी; अब विधान परिषद चुनाव में भी यही स्थिति है.
0
0
Report

जयकुमार गोरे ने प्रणिती शिंदे पर तंज कसा: लोकतंत्र ने उन्हें अधिकार दिए हैं

Sangli, Maharashtra:प्रणिती शिंदे माझ्या लाडkaya भगिनी आहेत,त्यांना लोकशाहीने अधिकार दिलाय, त्यामुळे माझ्यावर त्या टीका करतात,असा खोचक टोला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांना लगावला. राजकीय अस्तित्व शोधण्यासाठी,कोणावर तरी बोलावं लागतं त्यामुळे चर्चा होते,त्यांच्या मतदार संघात, त्यांच्या मतांची संख्या चार आहे, त्यामुळे मीडियाच्या माध्यमातून अस्तित्व टिकवणं,आवश्यक असतं,त्यामुळे कोण काय बोलतो,यावर बोलणं आवश्यक वाटत नाही, असा खोचक टोला देखील मंत्री जयकुमार गोरे यांनी लगावला,ते सांगलीमध्ये बोलत होते.
0
0
Report
Advertisement

अकोला जन्म-मृत्यु पंजीकरण विभाग की अव्यवस्थाएं सामने, सभापति ने तुरंत सुधार के निर्देश दिये

Akola, Maharashtra:अकोला महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील अनागोंदी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी अचानक विभागाला भेट देत पाहणी केली. यावेळी विभागात आलेल्या नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढाच सभापतींसमोर वाचला. जन्म व मृत्यू दाखले मिळवण्यासाठी नागरिकांना दोन ते तीन महिने हेलपाटे मारावे लागत असल्याची T क्रार, तसेच विभागात नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याचे, बसण्यासाठी व उन्हापासून बचावासाठी पुरेशी सुविधा नसल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. पाहणीदरम्यान सभापती विजय अग्रवाल यांनी विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची कानउघडणी करत कामकाजात सुधारणा करण्याचे निर्देश दिले. नागरिकांना वेळेत दाखले मिळावेत, तसेच मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
0
0
Report

युति के धर्म पालन आदेश पर उठे सवाल, अनिकेत तटकरे उमेदवारी अर्ज चर्चा में

Chendhare, Maharashtra:युतीधर्म पाळण्याचे वरीष्ठांचे आदेश अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आमंत्रण आले वाढदिवसाच्या कार्यक्रमामुळे उमेदवारी अर्ज भरायला गेलो नाही पालकमंत्री पदाबाबत लवकरच निर्णय अपेक्षित अँकर - कोकण विधान परिषद निवडणुकीत युТИचा धर्म पाळण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत. अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्हाला बोलावलं होतं. परंतु आज माझा वाढदिवस आहे. घरी शुभेच्छा देण्यासाठी लोक येणार म्हणून आम्ही गेलो नाही. आमच्या शुभेच्छा राहतील असं आम्ही कळवलय असं स्पष्टीकरण मंत्री भरत गोगावले यांनी दिलं आहे. दरम्यान रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत चर्चा झाली असून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बाईट - भरत गोगावले बाईट - भरत गोगावले, मंत्री
0
0
Report
Advertisement

गोलीबारी के आरोपों का सच: पुलिस ने दोनों दावे खारिज किए

Beed, Maharashtra:गोळीबार, पिस्तूल और प्रतितक्रारींचं नाट्य; पोलिस तपासात दोन्ही दावे फोल! ANC - बीडमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोपांचा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. मस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गोळीबार केल्याचा गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली. तर दुसरीकडे धमकी आणि पिस्तूल रोखल्याच्या परस्पर तक्रारींमुळे या प्रकरणाला आणखी रंग चढला. मात्र पोलिसांच्या तपासानंतर दोन्ही बाजूंंचे दावेच खोटे ठरल्याने एकच खळबळ उडाली आहे. मग या आरोपांच्या नाट्यामागचं सत्य काय? आणि या संपूर्ण प्रकरणामागे नेमकं काय घडलं? पाहूयात हा खास रिपोर्ट... या सर्व घडामोडींनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. प्रभारी पोलिस अधिकारी वेंकट राम यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासण्यात आले. तपासादरम्यान धनंजय देशमुख यांनी केलेला गोळीबाराचा आरोप तसेच समाधान खिंडकर यांची तक्रार या दोन्ही दाव्यांमध्ये तथ्य आढळून आले नाही. त्यामुळे धनंजय देशमुख यांचा बनाव उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी देखील नाराजी व्यक्त करत खोटी तक्रार देऊन न्यायवस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाईची शक्यता वर्तवली आहे. END VO : सीसीटीव्ही फुटेज आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे धनंजय देशमुख आणि समाधान खिंडकर या दोघांनीही खोट्या तक्रारी केल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपांचे नाट्य अखेर फोल ठरले असून, पुढील कायदेशीर कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report

जालना में कृषी सहाय्यक पर रिश्वतखोरी के आरोप, भाजपा नेता की धमकी वीडियो वायरल

Jalna, Maharashtra:जालना : कृषी सहाय्यकाने शेतकऱ्यांना कृषी योजनांचा लाभ देण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप,भाजपा किसान मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षांनी केली कृषी सहाय्यकाला शिवीगाळ (पॅकेज) अँकर :भाजपा किसान मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षांनी एका कृषी सहाय्यकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत बुटाने मारण्याची धमकी दिलीय.ही शिवीगाळ करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.ज्या कृषी सहाय्यकाला शिवीगाळ करण्यात आली त्याने शेतकऱ्यांकडून वैयक्तिक लाभाच्या योजना देण्यासाठी पैसे घेऊनही योजनांचा लाभ न दिल्यास तक्रारी आहेत. व्हिओ :०१:हा व्हिडीओ जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातला.या व्हिडीओत पाठीला बॅग लटकवलेली व्यक्ती आहे मंठा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी सहाय्यक सुधाकर सुनेवाड.तर सुधाकर सुनेवाड यांना शिवीगाळ करणारी व्यक्ती भाजपा किसान मोरे.मोरे यांनी कृषी सहाय्यक असलेल्या सुधाकर सुनेवाड यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत बुटाने मारण्याची धमकी दिली.मोरे हे धमकी देतांनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं खळबळ उडालीय.मात्र हा प्रकार सुनेवाड यांच्या लाचखोरीमुळे घडला असून हा व्हिडीओ महिना भरापूर्वीचा असल्याचं सांगण्यात येतंय. कृषी सहाय्यक सुनेवाड यांनी शिवनगिरी गावातील शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ देण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून पैसे उकळले मात्र पैसे देऊनही शेतकऱ्यांना योजनेचं अनुदान मिळालं नसल्याच्या तक्रारी आहेत. बाईट :सुधाकर जाधव,पीडित शेतकरी, शिवणगिरी ता मंठा(लाल शर्ट) बाईट : दिलीप जाधव,पीडित शेतकरी, शिवणगिरी ता मंठा व्हिओ :०२: याच शेतकऱ्यांनी लाचखोरीचा आरोप असलेल्या कृषी सहाय्यकांची तक्रार भाजपाकि मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश मोरे यांच्याकडे केली.त्यामुळे मोरे यांनी सुधाकर सुनेवाड याला गाठत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत बुटाने मारण्याची धमकी दिली.दरम्यान शेतकऱ्यांचे पैसे मरत करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठीच या कृषी सहाय्यकाला आपण धमकावल्याच मोरे यांनी म्हटलंय. बाईट : राजेश मोरे,प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा किसान मोर्चा,महाराष्ट्र प्रदेश व्हिओ:०३:  कृषी सहाय्यक असलेल्या सुधाकर सुनेवाड यांनी अनेक शेतकऱ्यांना कृषी योजनांचा लाभ देण्याच्या नावाखाळ्या गंडा घातल्याचा आरोप आहे.मात्र आतापर्यंत त्याच्यावर कोणतीही कारवाई न झाल्यानं सुनेवाड यांना निलंबित करण्याची मागणी फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी केलीय. नितेश महाजन,झी-२४ तास,जालना
0
0
Report

सांगली-सातारा में महाविकास आघाडी टूटने की आहट, कांग्रेस ने भी उमेदवारी भरी

Sangli, Maharashtra:सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर काँग्रेसकडून देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे, सांगली महापालिकेचे नगरसेवक संजय मेंढे आणि मयूर पाटील या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष, महापालिकेचे विरोधी पक्ष नेते व नगरसेवकांचे उपस्थितीमध्ये संजय मेंढे आणि मयूर पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला असून पक्षाच्या नेत्यांच्या आदेशानुसार उमेदवारी अर्ज दाखल झालाय आणि पुढील आदेशानुसार भूमिका स्पष्ट केली जाईल, असं काँग्रेसचे सर जिल्हाध्यक्ष राजशे नाईक यांनी स्पष्ट केले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top