icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

16 करोड़ रुपये बकाया: ऊस ट्रैक्टर मालिकाओं ने फलटण-कोल्हापूर में आंदोलन की चेतावनी दी

Satara, Maharashtra:सातारा - फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांचे सुमारे 16 कोटी रुपये थकीत असल्याचा आरोप ऊस वाहतूकदार संघटनेने केला आहे.वारंवार मागणी करूनही कारखाना प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने वाहतूकदारांमध्ये तीव्र नाराजी आहे. श्रीराम सहकारी साखर कारखाना आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील जवahar साखर कारखाना यांच्यातील भाडेतत्त्वावरील करार संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याने थकीत रकमेची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. थकीत रक्कम तातडीने अदा न केल्यास शनिवारपर्यंत फलटण आणि कोल्हापूर येथे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ऊस वाहतूकदार संघटनेने दिला आहे. सरकारने आमच्या कष्टाच्या घामाचे पैसे मिळवून द्यावेत, अशी मागणीही वाहतूकदारांनी केली आहे.
0
0
Report

जालना मर्चेंट बैंक घोटाला: 54 करोड़ से अधिक ऋण घोटाला, 8 करोड़ संपत्ति फ्रीज़

Jalna, Maharashtra:जालना : मर्चंट बँक प्रकरणात ८ कोटींची संपत्ती गोठवली; ५ संचालकांना अटक होणार बँकेत वेअर हाऊसच्या नावे १७७ बनावट खातेदार दाखवून बँक कर्ज अपहरण जालना मर्चंट बँकेतील ५३ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात कारवाईचा फास घट्ट होत आहे. १७७ बनावट खात्यांच्या माध्यमातून झालेल्या या घोटाळ्यात १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. परंतु, मुख्य आरोपी अर्थात बँकेचा अध्यक्ष गोपाल अग्रवाल अद्याप फरार आहे. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात एमपीआयडी प्रस्ताव केला. यानुसार आरोपींच्या मालमत्ता गोठवल्या जात आहेत. पोलिसांचा तपास खोलवर गेला असून आणखी पाच संचालकही आरोपी होण्याच्या मार्गावर आहे. त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. दरम्यान, मुख्य आरोपी असलेल्या रायचंद कुरंगळ, नीलेश्वर भोसले या दोघांची ८ कोटींची संपत्ती गोठवण्यात आली आहे. जालना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने एमपीआयडी प्रस्ताव केला आहे. या बँकेत वेअर हाऊसच्या नावे १७७ बनावट खातेदार दाखवून तब्बल ५४ कोटीपेक्षा जास्त रुपयांचा बँक कर्ज घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात फिर्याद देणारेच बँकेचे महाव्यवस्थापकच आरोपी निघाले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी 'एमपीआयडी' कायदा लावल्यामुळे आरोपींना पळवाट मिळणे कठीण आहे. यात त्यांना ३ ते ५ वर्षे अतिरिक्त कैद होऊ शकते. या कायद्यानुसार ठेवीदारांची फसवणूक केल्याबद्दल स्वतंत्र शिक्षेची तरतूद आहे. तसेच जशी आता ८ कोटींची संपत्ती गोठवण्यात आली, तशीच सर्व आरोपींची स्थावर-जंगम मालमत्ता जप्त केली जाईल. कोर्टाच्या आदेशाने या मालमत्तेचा लिलाव करून बँकेच्या खातेदारांचे पैसे परत केले जातील.
0
0
Report
Advertisement

तूफान में सौर ऊर्जे वाले हाईमैक्स लाइट डगमग, दुर्घटना की आशंका

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरची शहरात बसवलेले सौरऊर्जेवरील हाय मॅक्स लाईट वादळामुळे पडून अपघात होण्याची भीती आहे शहरातील तोफखाना पोलीस स्टेशन जवळ असलेला हाय मॅक्स लाईटच्या सौर ऊर्जा प्लेट रात्री वादळामुळे हेलकावे घेताना पाहायला मिळाल्या. शहरातील मुख्य चौकांमध्ये असे सौर ऊर्जेवरील हाय मॅक्स बसवण्यात आले आहेत. रधारीच्या ठिकाणी बसवलेल्या हायमॅक्स लाईट वादळाने खाली कोसळल्या तर दुर्घटना घडण्याची देखील शक्यता आहे. गेल्या तीन दिवसापासून वादळ वाऱ्यासह पाऊस पडत आहे रात्री सहा वाजेच्या सुमारास सुटलेल्या वादळ वाऱ्यात अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटल्या आणि शहरातील काही भागातील वीज पुरवठा देखील खंडित झाला अशातच महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात लावण्यात आलेले सौर ऊर्जेवरील हाय मॅक्स लाईट व्यवस्थित न बसवल्याने वाऱ्यामध्ये हेलकावे खाताना पाहायला मिळाले हे सौर ऊर्जेवरील हाय मॅच लाईट वरदळीच्या चौकातच असल्याने खाली पडल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता आहे महानगरपालिकेकडून अशा सौर उर्जेवर बसवलेल्या हाय मॅक्स ची पाहणी करून दुर्घटना घडणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे
0
0
Report

यवतमाल में ट्रक ने साइकिल सवार को कुचला; सड़क सुरक्षा पर सवाल

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर एका भरधाव ट्रकने सायकल स्वारास चिरडले. रात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली. तुरीचे पोते घेऊन जाणारा ट्रक सायकल स्वार व्यक्तीच्या अंगावरून गेल्याने रस्ता रक्ता मासाने माखला होता. यवतमाळचा व्हीआयपी रोड म्हणून या परिसराची ओळख आहे. जिल्हाधिकाऱ्यांसह बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांची निवासस्थाने व शासकीय कार्यालये या ठिकाणी असताना जड वाहतुकीने सायकल स्वाराचा बळी घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे अपघातस्थळी असलेले हाय मास्ट व रस्ता दुभाजकावरील लाईट बंद होते. शिवाय या ठिकाणी सीसीटीव्ही देखील नसल्याचे निदर्शनास आले.
0
0
Report

गडचिरोली के लिए गोसे खुर्द डैम से 40 क्यूसेक पानी जारी, प्यास बुझाने तैयारी

Bhandara, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्याची तहान भागवणार भंडारा जिल्ह्यातील गोसे खुर्द धरण. गडचिरोली जिल्ह्याची तहान भागवण्यासाठी सोडण्यात आले गोसे खुर्द धरणाचे पाणी. विदर्भात उन्हाचा कडाखा वाढलेला असून अनेक जिह्यात पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातील वडसा आरमोरी व गडचिरोलीच्या भागांमध्ये नागरिकांना पिण्याचे पाण्याची अडचण होती ही बाब लक्षात घेत गडचिरोली जिल्हा प्रशासनाने गोसे खुर्द धरण प्रकल्पाला पाण्याची मागणी केली होत. या आधारे आज प्रकल्पातून 40 क्यूसेक पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. या पाण्याच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याची तहान भागणार आहे.
0
0
Report
Advertisement

महाराष्ट्र की जिल्हा परिषदों के ऑनलाइन पेमेन्ट ठप, मैन्युअल लेनदेन से काम चले

Chendhare, Maharashtra:राज्यातील जिल्हा परिषदांचे ऑनलाइन आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. मागील दोन महिन्यांपासून ही परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार करणे अडचणीचे झाले आहे. मंत्रालय स्तरावरून एक सेवा पुरवठादार कंपनी आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यात करार झाला होता. त्यानुसार ही कंपनी मागील चार वर्षांपासून सॉफ्टवेअर सेवा पुरवत होती. परंतु महाराष्ट्र बँक आणि या कंपनीतील वादामुळे कंपनीने 31 मार्चपासून आपली सेवा बंद केली. त्यामुळे जिल्हा परिषदांना मॅन्युअली व्यवहार करावे लागत आहेत. ही प्रक्रिया वेळखाऊ आणि गैरसोयीची ठरत आहे. जिल्हा परिषदेकडून पंचायत समिती, ग्राम पंचायतींना मिळणारा विकास निधी विलंबाने जात आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement

भाजपा के चार पूर्व नगरसेवक शिवसेना में प्रवेश, डोंबिवली राजनीति तेज

Kalyan, Maharashtra:डोंबिवलीत राजकीय घडामोडींना वेग आला असून भाजपच्या चार माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत डोंबिवली पिंपळेश्वर मंदिर परिसरात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक, मनीषा धात्रक, श्रीकर चौधरी आणि प्रमिला चौधरी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील शिवसेनेत दाखल झाले. केडीएमसी निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने शैलेश धात्रक आणि मनीषा धात्रक यांनी मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. तर श्रीकर चौधरी आणि प्रमिला चौधरी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरत आपले नशीब आजमावले होते. या पक्ष प्रवेशामुळे डोंबिवलीतील सेनेची राजकीय ताकद वाढणार आहे.
0
0
Report

नाशिक में महायुती उम्मीदवारों के बीच बगावत, सामंत ने अर्ज वापस लेने का दावा किया

Nashik, Maharashtra:विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये महायुतीत बंडखोरी होताना पाहायला मिळत आहे... या बंडखोरीला आळा घालण्यासाठी मंत्री उदय सामंत गेल्या 24 तासांपासून नाशकात तळ ठोकून आहे.... सकाळपासूनच उदय सामंत यांनी शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांसमोर उमेदवारी करणाऱ्या महायутиच्या उमेदवारांची भेट घेतली आहे... याबाबत बोलताना उदय सामंत यांनी तीन वाजेपर्यंत हे सगळे उमेदवार अर्ज मागे घेतील असा विश्वास व्यक्त केलाय... उद्या विधान परिषदेच्या उमेदवारी अर्ज घेण्याचा शेवटचा दिवस आहे या अनुषंगाने उदय सामंत हे नाशकात आहेत... गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असलेले गणेश गीते आणि गोकुळ गीते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय... याबाबत देखील गिरीश महाजन आणि बोलणं झालं असून याबद्दल योग्य तो निर्णय होणार असल्याचा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केलाय...महायुतीमध्ये सगळ्या ठिकाणी अलबेल सुरू असून महायुतीमध्ये मध्ये कुठल्या प्रकारची नाराजी नाही असे देखील सामंत म्हणालयेत.. उद्या तीन वाजेपर्यंत पॉझिटिव्ह असा रिझल्ट असेल असं उद्या सामंत म्हणालय
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top