445001
यवतमाळ - पुसद मध्ये जन्माष्टमीनिमित्त टाळमृदुंगाच्या गजरात शोभायात्रा.
Yavatmal, Maharashtra:जन्माष्टमीनिमित्त यवतमाळच्या पुसद शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. डीजेला फाटा देत पारंपारिक पद्धतीने सलग 11 वर्षांपासून या आदर्शवत मिरवणुकीचे आयोजन करण्यात येत आहे. या मिरवणुकीत टाळ व मृदुंगाच्या तालावर गोपाल कृष्ण भगवान की जय असा एकच जयघोष करण्यात आला. या मिरवणुकीत बाल गोपाल वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीकृष्ण जन्मोत्सव समिती पुसद तर्फे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
जालना पुलिस ने 1100 बटन गोलीयाँ और 76 सिरप की बोतलें जप्त कर तीन गिरफ्तार
Jalna, Maharashtra:जालना: 1100 बटन गोळ्या सहित 76 कप सिरपच्या बाटल्यांज जप्त; तीन जणांना अटक. जालना पोलिसांनी 1100 बटन गोळ्या सहित 76 कप सिरपच्या बाटल्या जप्त केल्या असून तीन जणांना अटक करण्यात आली. या कारवाईत 1100 बटन गोळ्या आणि 76 कप सिरपच्या बाटल्या जप्त झाल्या आहेत. 28 एप्रिल रोजी कदीम जालना पोलिसांनी बटन गोळ्या विक्री करणाऱ्या एका आरोपीला अटक केली होती. या गुन्ह्याचा सखोल तपास करताना आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली. माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.0
0
Report
सासवड में शिवसेना का बड़ा जनआक्रोश हंडा मोर्चा, पानी योजना तेज शुरू करने की मांग
Rui, Maharashtra:सासवडमध्ये पाण्यासाठी शिवसेनेचा भव्य ‘जनआक्रोश हंडा मोर्चा’ पुरंदर तालुक्यातील सासवड शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत असून सासवड वासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागताय. या पार्शभूमीवर शिवसेने शिंदे गटाच्या वतीने आज भव्य ‘जनआक्रोश हंडा मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चामध्ये महिला जेष्ठ नागरिक युवक आणि विविध भागातील रहिवाशी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. २७ वर्षे जुन्या पाणीपुरवठा योजनेमुळे शहरात पाच-पाच दिवस पाणी मिळत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला असून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या १४३ कोटींच्या नवीन पाणी योजनेचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.दरम्यान,आंदोलनामुळे सासवड शहरातील पाणीप्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.0
0
Report
अकोला में बंदूकधारी डकैती: 70 लाख की लूट, आरोपी गिरफ्तार
Akola, Maharashtra:अकोला शहरातील गौरक्षण रोड परिसरात एका सराफा व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवून तब्बल ७० लाखांचा ऐवज लुटणाऱ्या आरोपीला अटक करण्यात अकोला पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. भरदिवसा घडलेल्या या धाडसी दरोड्यामुळे शहरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.या आरोपीचा माग काढण्यासाठी अकोला पोलिसांनी तब्बल ७०० किलोमीटरचा प्रवास केला आणि ५८० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. अखेर पोलिसांनी आरोपीला भुसावळ येथून अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी गेल्या सहा दिवसांपासून अकोला शहरात वास्तव्यास होता. चादर विक्रीचा व्यवसाय करत तो परिसराची रेकी करत असल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान, पोलिसांनी आरोपीकडून २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
Advertisement
चंद्रपुर के नागभीड़ में घोड़ाझरी कालवे में भगदाड़, लाखों लीटर पानी बर्बाद—किसान चिंतित
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील नागाभेड तालुक्यातल्या घोडाझरी कालव्याला भगदाड पडलेले असून लाखो लिटर पाणी वाया जाऊन शेतीवर परिणाम झाला आहे. उन्हाळी धान व इतर पिकांच्या सिंचनासाठी यावर्षी कालव्यातून पाणी सोडण्यात आले; मात्र शेवटल्या टोकावर पाण्याची उपलब्धता कमी झाली आहे. कालवा फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी शेतात आणि परिसरात वाहून जाऊन पाण्याची नासाडी झाली आहे. शेवटच्या टोकावर असलेल्या शेतकऱ्यांना पाणी मिळण्याची समस्या जशीची तशी असून या घटनेमुळे पाणीपुरवठ्यात अडथळा निर्माण झाला आहे. संबंधित सिंचन विभागाने तात्काळ दखल घेऊन फुटलेला कालवा दुरुस्त करावा, पाण्याची नासाडी थांबवावी आणि शेवटच्या टप्प्यातील शेतकऱ्यांना नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.0
0
Report
कल्याण के आचार्य अत्रे रंगमंदिर में इंतजामों पर कलाकारों का गुस्सा वायरल वीडियो से उजागर
Kalyan, Maharashtra:कल्याणमधील आचार्य प्रल्हाद अत्रे रंगमंदिर येथील गैरसोयी आणि दुरवस्थेबाबत अनेकदा कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे. आता तर अलबत्या गलबत्या नाटकाच्या कलाकारांनी या रंगमंदिरातील गैरसोय आणि दूरवस्थेसंबधी तयार केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या दुरवस्थेबाबत वारंवार तक्रारी करूनही त्याचं पुढे काहीच होत नसल्याने आता या नाट्यगृहात प्रयोग बंद करण्याची वेळ आल्याचे कलाकारांनी म्हटले आहे. कल्याणचे हे नाट्यगृह शहरातील प्रमुख सांस्कृतिक merkez असून विविध मराठी नाटकांचे प्रयोग नियमितपणे इथे होत असतात. मात्र नाटकातील कलाकारांना येथे गैरसोयीचा सामना करावा लागतो. आता तर अलबत्या गलबत्या नाटकाच्या कलाकारांनी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये नाट्यगृहातील अनेक समस्यांकडे लक्ष वेधले आहे. अभिनेत्री श्रद्धा हांडे यांनी याबाबত नाराजी व्यक्त केलीय.0
0
Report
पत्नी ने पति की हत्या के लिए बिजली से मारने की साजिश रची, प्रेमी गिरफ्तार
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वडगाव जंगल पोलिसांनी याप्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकराला अटक केली आहे. यवतमाळच्या पंगडी गावातील एक पत्नी पतीच्याच जीवावर उठली. झोपेत असलेल्या पतीला जीवे मारण्यासाठी तिने भन्नाट कट रचला. विजेच्या वायरला अल्युमिनियम तार जोडून पतीला विजेचा शॉक देऊन जीवाणीशी संपवायचे अशी योजना पत्नी आणि तिच्या प्रियकराने आखली. कवडी मोरे असे आरोपी पत्नीचे नाव आहे. तिचे गावातीलच विष्णू आत्राम या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. या दोघांच्या विवाहबाह्य संबंधात पती गजानन मोरे हा अडथळा ठरत होता. त्यामुळे त्याचा काटा काढण्याच्या दृष्टीने पत्नीने रात्रीच्या सुमारास घरी झोपून असलेल्या पतीला विद्युत वायर मधून विजेचा शॉक देवुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. प्रियकराच्या सांगण्यावरून तिने हा कट रचला होता. सुदैवाने पत्नीचा कट फसला पती बचावला. गजाननच्या हाताच्या दोन्ही दंडांना पत्नीने विद्युत प्रवाहित तार आवळला, मात्र वेळीच जागी झालेल्या पतीने हे तार दूर केले. त्याच्या दोन्ही हातांना जखमा झाल्या आहेत. या प्रकरणी पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पत्नी व तिच्या प्रियकराला अटक केली आहे. पती पत्नीचा सुखाचा संसार सुरू असताना त्यात गावातील तिसऱ्याची एन्ट्री झाली. पती-पत्नीच्या नात्याला पत्नी विसरली आणि तिसऱ्याच्या नादाला लागून विवाहबाह्य संबंधात अडकली. त्यासाठी पत्नीचा ही जीव घ्यायला ती धजावली. पती-पत्नीच्या नात्याला कलंकित करणाऱ्या घटनेमुळे समाजमन हादरले आहे.0
0
Report
Advertisement
मोदी का प्राकृतिक और जैविक खेती का आह्वान, किसानों की अनिच्छा जारी
Yavatmal, Maharashtra:पश्चिम आशियातील इराण अमेरिका इस्राईल या देशामधील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक संकट आणि खतांच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक व सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला मात्र शेतकऱ्यांमधून फारसा प्रतिसाद दिसून येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहित करणे हे सरकार पुढे आव्हान ठरणार आहे. आखाती देशांमधील युद्धामुळे जागतिक स्तरावर खतांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. खतांच्या कच्च्या मालाचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे भारतात खतटंचाई निर्माण होण्याची भीती आहे, त्यामुळे खतांचा संतुलित वापर करणे गरजेचे आहे. खतांचा अतिवापर टाळून मिश्र खते आणि सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. याआधी देखील प्रधानमंत्री नैसर्गिक शेतीवर भर देण्याचा सल्ला दिला. मात्र शेतकऱ्यांकडून त्याला फारसा प्रतिसाद नाही. कारण शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहित करणे सरकारसाठी एक मोठे आव्हान ठरणार आहे. रसायनिक शेतीच्या तुलनेत सेंद्रिय शेतीत सुरुवातीची 3-4 वर्षे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे, परंतु त्यामुळे मजुरांची गरज वाढते, बाजारपेठ सेंद्रिय मालासाठी उणे असते, आणि प्रशिक्षण मिळणेही अलीकडे अचूक झालेले नाही. सरकारच्या उपाययोजना देखील तोकड्या असल्याचा भूमिका शेतकऱ्यांनी व्यक्त केली. युद्धामुळे सेंद्रिय शेतीचा आग्रह प्रधानमंत्री यांनी केला असला तरी, शेतीत रासायनिक खतांचा अति वापर जमिनीची सुपीकता नष्ट करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नैसर्गिक शेतीमुळे खर्च कमी होतो, पिकांची गुणवत्ता वाढते आणि जमिनीचे पोत सुधारणे शक्य होते. रासायनिक शेतीमुळे जमिनीतील सूक्ष्मजीव नष्ट होतात, अन्नातील पोषक घटक कमी होतात, तसेच शेतमाल मानवी जीवनासाठी हानिकारक झाला आहे. टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे कल वाढवावा म्हणून सरकारनेदेखील प्रयत्न करणे गरजेचे आहे. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत खतांनयाच्या परदेशी पुरवठा विस्कळीत असल्याने, देशांतर्गत अन्नसुरक्षा टिकवण्यासाठी नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती हीच आत्मनिर्भर भारतासाठी गुरुकिल्ली आहे. परंतु यासाठी सरकारचे पूर्व नियोजन नसल्यामुळे सेंद्रिय शेतीचे महत्त्व समजून देखील शेतकरी त्यासाठी फारसे उत्सुक नाही.0
0
Report
PM Modi तेल कम करने का आह्वान: महंगाई से जूझते देश पर प्रभाव
Kolhapur, Maharashtra:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकतेच खाद्य तेलाच्या बाबतीत विधान केले आहे. खाद्य तेलाचा वापर कमी करावा ज्याच्यामुळे आपल्या शरीराला देखील फायदा होईल आणि त्याची मागणी देखील कमी होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं... आपला देश पाम ऑइलसाठी इंडोनेशिया, मलेशिया या देशांवर अवलंबून आहे. तर सूर्यफुलासाठी रुस आणि युक्रेन या देशांवर आपण अवलंबून आहोत.. युद्धाच्या पार्श्वभूमीवर खाद्यतेल महाग केलं आहे. त्यामुळे आपल्या देशासाठी आपण सर्वांनी खाद्य तेलाचा वापर खूप कमी करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आले. मात्र मार्केटमधील नेमकी परिस्थिती काहीशी वेगळी आहे. तेलाचे दर वाढणार असल्याच्या भीतीने अनेकांनी आधीच भरमसाठ तेल घेऊन ठेवलं आहे. त्याशिवाय लग्न समारंभाला खाद्यतेलाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो,0
0
Report
नारायण राणे का दलीय हमला: राहुल गांधी-खडसे पर तीखा प्रहार
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग खासदार नारायण राणे on Rahul Gandhi/ Ek Nath Khadse ( Narendra Modi taika ) राहुल गांधींला यश आणि अपयश यातील फरक समजत नाही. एवढा बुध्दु राजकारणी मी पाहिला नाही, लोकसभेत कसा वावरतो कसा बोलतो यावर्षीची भाषणे बघा, काय भयानक बोलतो पंतप्रधानांना काय उद्देशायच ते पण त्याला कळत नाही. काँग्रेसची सत्ता होती तेव्हा यश मिळवलं असत तर तुमच्या पक्षाची ही अवस्था झाली नसती. on Khadse -- Khadseला BJPने बाहेर काढलं म्हणून त्यांना शहाणपणा सुचतोय. आता रिटायरमेंट कडे चाललेत. मोदींना अडचणीत आणण्यासाठी हे टीका आणि प्रयत्न करत आहेत पण मोदी कधीच अडचणीत येणार नाहीत.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी में महाआरोग्य शिबिर, जामगे ग्राम में स्वास्थ्य सुविधाओं का संचालन
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या जामगे गाव महाआरोग्य शिबिराचे आयोजन केल होतं.. जामगे या गावी श्री कोटेश्वरी मानाई देवी वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त ग्रामविकास मंडळ जामगे यांच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन केल होतं.. या शिबिरास शिवसेना नेते रामदास कदम यांनी उपस्थिती लावली..रामदास कदम यांनी शिबिराची पाहणी करत आपलें आरोग्य विषयक विविध तपासन्याही केल्या.. महाआरोग्य शिबिरात बीपी,शुगर,ईसीजी,एसपीओ2,दंत तपासणी तसेच जनरल हेल्थ चेकअप सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत..हे आरोग्य शिबीर अजून पुढील दोन दिवस सुरु राहणार आहे..0
0
Report
चंद्रपूर महापालिका के पानीक़ी तंगी पर विपक्ष ने 550 करोड़ का हिसाब माँगा
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर मनपाच्या पाणीटंचाई विषयक विशेष आमसभेत विरोधी पक्ष आक्रमक, 550 कोटी खर्चले, गेले कुठे, विचारला सवाल, आता टँकर, बोरिंग और प्लास्टिक टाक्या पुरविण्याचा सत्ताधारी भाजपचा नामुष्कीचा निर्णय अँकर:-- चंद्रपूर मनपाच्या पाणीटंचाई विषयक विशेष आमसभेत आज विरोधी पक्षाचे नगरसेवक आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. अमृत टप्पा 1आणि 2 शहरात कार्यरत असताना पाणीटंचाई का उद्भवली? नागरिकांना दारोदार पाण्यासाठी का भटकावे लागत आहे ,असे प्रश्न विचारून विरोधकांनी सभा दणाणून सोडली. या दोन्ही योजना एकत्रित करून सुमारे 550 कोटी खर्चले गेले आहेत, ते पैसे गेले कुठे असा सवाल त्यांनी विचारला. महापौर आणि आयुक्तांनी यावर थेट उत्तर न देता मलमपट्टीची घोषणा केली. यात आठवडाभरात प्रत्येकी 2 नगरसेवका मागे प्रभागात टँकर वाढ, बोरिंग निर्मिती आणि प्लास्टिक पाणी टाक्या पुरविण्याचा नामुष्कीचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला. बाईट १) एड. राहुल घोटेकर, नगरसेवक, काँग्रेस बाईट २) संगीता खांडेकर, महापौर, मनपा0
0
Report
हिंदी: सजग अपहोल्डिंग धमाका: पिस्तुल के साथ सरायित गुंड की गिरफ्तारी; जिंदा कारतूस भी जब्त
Sangli, Maharashtra:पिस्तुल घेऊन दहशत माजविणार्या सराईत गुंडास अटक : पिस्तुल व जिवंत काडतूस जप्त. सांगलीच्या पलुस तालुक्यातील नागठाणे येथे पिस्तुल घेऊन दहशत माजविणार्या सराईत गुंडास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अनिकेत गुंडा करांडे असे याचे नाव असून तो सराईत गुंड असून त्याच्यावर यापूर्वी अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.तो कमरेला पिस्तुल लावून नागठाणे परिसरात दहशत माजवित असल्याची माहिती सांगली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्यास अटक केली आहे, त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत.0
0
Report
Advertisement
TCS धर्मांतरण मामले में निडा खान की नाशिक कोर्ट में पेशी, सुरक्षा बढ़ी
Nashik, Maharashtra:Breaking - TCS कंपनीतील धर्मांतर प्रकरण निदा खानला नाशिक रोड न्यायालयात केले हजर न्यायालय परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात चार दिवसांची पहिली पोलीस कोठडी संपल्याने आज निदाला न्यायालयात हजर केले जाते आहे आज देखील इन कॅमेरा सुनावणी पार पडण्याची शक्यता0
0
Report
90 दिनों में चुनाव: 1100 दूध संस्थाओं के मतदान का अधिकार सुरक्षित रखने की मांग
Kolhapur, Maharashtra:काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील बाईट मुद्दे ऑन गोकुळ मध्यंतरीच्या काळात गोकुळच्या दूध संस्था अवसायानात गेल्या असल्याच्या तक्रारी झाल्या होत्या सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की 90 दिवसात निवडणुका घ्या अकराशे संस्था या कायदेशीर दृष्ट्या लिक्विडेशनमध्ये आहेत या संस्था मतदानाला येणार नाहीत त्यामुळं लवकरात लवकर या संस्थांचं हेरिंग संपवा अशी आमची विनंती आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार जर 90 दिवसाच्या आत निवडणूक लागली तर या या अकराशे संस्था निवडणुकीला आल्या पाहिजेत म्हणून आम्ही दुग्ध निबंधकांना विनंती केली आहे यासंदर्भातील निकाल लवकर देऊन अकराशे दूध संस्थांच्या मतदानाचा अधिकार अबाधित राहील कायदेशीर परिस्थिती पाहिली तर 90 दिवसाच्या प्रक्रियेमध्ये या संस्था मतदानाला येऊ शकत नाहीत त्यामुळं लवकरात लवकर हेरिंग संपून या या संस्था मतदानाला याव्यात संस्था कोणाची आहे त्याच्याशी घेणेदेणे नाही मात्र लोकशाहीमध्ये संस्थेचा मतदानाचा हक्क राहिला पाहिजे अशी आमची भूमिका आहे महायुतीत काय काय सुरू आहे तुम्हाला माहिती आहे दोन गटातले वेगवेगळे वाद सुरू आहेत लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात... या अकराशी दूध संस्थांना न्याय मिळावा एवढी आमची विनंती या ठिकाणी आहे त्यांच्यात काय वाद सुरू आहे हे लोक पाहत आहेत सुनावणी घेताना अधिकाऱ्यांनाही मर्यादा आहेत रोज अनेक संस्थांच्या सुनावण्या ते घेत आहेत... हायकोर्टाने त्यांना 80 दिवसांचा कालावधी दिला आहे अजून 70 दिवस शिल्लक आहेत या 70 दिवसात त्यांचा निर्णय लागेल अशी आम्हाला खात्री आहे... अकराशे संस्था मतदानाला पात्र करायचे असतील त्यांचा हक्क अबाधित ठेवायचा असेल तर हे 90 दिवसात होईल असं मला वाटत नाही. On मोदी पेट्रोल डिझेल आवाहन हे फसलेलं परराष्ट्र धोरण आहे अमेरिकेच्या दबावाखाली ...ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशनच्या दबावाखाली हे भारत सरकारने केलेला कराराचा हा परिणाम आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर मैत्री कोणाशीच राहिलेली नाही अशी आमच्या देशाची परिस्थिती आहे टॅक्स संदर्भात विचारला असता दोन्ही मंत्री एकमेकांना बोट दाखवतात त्यावरून विस्कटलेल्या धोरणाचा परिणाम सामान्य माणसाला होतोय बंगालच्या निवडणुकीनंतर लगेच गॅस चा दर वाढला आता पेट्रोल डिझेलचा तुटवडा जाणवतोय.. पण तुमच्या चुकीच्या धोरणामुळे पेनिक सिच्युएशन निर्माण होते... पंतप्रधान बोलतात त्यावेळेस पेनिक निर्माण होतो कोविडमध्ये थाळी वाजवा म्हणलं तसं असेल तर मला माहित नाही On पंचगंगा प्रदूषण पंचगंगा प्रदूषणासाठी मागच्या वेळेस आम्ही डीपीआर तयार केले होते इचलकरंजी ते प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते त्या ठिकाणी प्रदूषण मुक्तीसाठी प्लांट तयार करावा यासाठी जागा मिळावी यासाठी प्रस्ताव सुद्धा होते नेमकं त्याचं काय झाले ते माहिती नाही सरकारने तत्काळ ॲक्शन त्या ठिकाणी घ्यावी आता पाण्याचा तुटवडा आहे सरकारने यात दक्षता घ्यावी ट्रिपल इंजिनचा सरकार आहे तिघांच्यातली भांडण मिटत नाही त्यामुळे नागरी समस्यांकडे बघायला मिळतो की नाही ती माहिती नाही तिघांची भांडण कॅबिनेटमध्ये मिटवता आता नागरिकांचे प्रश्न मिटवा अशी आमची विनंती आहे On मेटा राहुल गांधी पोस्ट मेटावरती दबाव आहे का अशी अवस्था सध्या निर्माण झाली आहे राहुल गांधींचा एखादा व्हिडिओ कोट्यावधी लोक लोकांपर्यंत पोहोचतो आणि अचानक तो दिसायचा बंद होतो ही धास्ती का घेतली गेली आहे सरकारने लोकशाहीमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मोठे Shस्त्र आहे त्यातून राहुल गांधी जगभर पोचत असतील तर त्याची धास्ती बेटावर सुद्धा सरकारचा दबाव आहे..0
0
Report
नवापूर एमआईडीसी में दो टेक्स्टाइल कंपनियों में आग, लाखों के नुकसान की आशंका
Dhule, Maharashtra:नवापूरच्या एमआयडीसीत दोन कंपन्यांना भीषण आग लागली ची घटना घडली आहे. सुरुवातीला ही आग नेमकी कुठे आणि कशी लागली हे लक्षात येत नव्हतं. नंतर काही क्षणातच अभिने रौद्ररूप धारण केले. नवापूरच्या एमआयडीसीत असलेल्या टेक्स्टाईल च्या दोन कंपन्यांना ही भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आग इतकी भीषण आहे की काही क्षणातच लाखो रुपयांच्या नुकसान झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळून येत आहे. नवापूर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, नवापूर अग्निशमन दलाच्या वतीने आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले जात असून, आगेचं राउद्र रूप लक्षात घेता शेजारील गुजरात यातूनही अग्निशमन दलाच्या बंबांना पायारण करण्यात आल्याची माहिती समोर आले आहे. आगीची भीषणता पाहता नवापूर नंदुरबार, साक्री, पिंपळनेर, आणि गुजरात राज्यांमधून अग्निशामक बंब मागवले जात आहेत. एमआयडीसी परिसरात आग लागलेल्या कंपन्यांमुळे इतर कंपन्यांनाही आग लागण्याची भीती निर्माण झाली आहे. एमआयडीसी कडे आग विजवण्यासाठी होण्यासाठी कुठल्याही मोठे यंत्रणा नसल्याचे दिसून आल असून, एमआयडीसी परिसरात नवापूर पोलीस दाखल झाले आहेत. आग लागलेल्या ठिकाणी न जाण्याचे पोलिसांकडून आवाहन केला जात आहे.0
0
Report
Advertisement
