445001
यवतमाळ - पुसद मध्ये जन्माष्टमीनिमित्त टाळमृदुंगाच्या गजरात शोभायात्रा.
Yavatmal, Maharashtra:जन्माष्टमीनिमित्त यवतमाळच्या पुसद शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. डीजेला फाटा देत पारंपारिक पद्धतीने सलग 11 वर्षांपासून या आदर्शवत मिरवणुकीचे आयोजन करण्यात येत आहे. या मिरवणुकीत टाळ व मृदुंगाच्या तालावर गोपाल कृष्ण भगवान की जय असा एकच जयघोष करण्यात आला. या मिरवणुकीत बाल गोपाल वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीकृष्ण जन्मोत्सव समिती पुसद तर्फे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
बुलढाणा में किसानों के राजा की धूम; रविकांत तुपकार ने बैलगाड़ी से गणेश उत्सव सजाया
Buldhana, Maharashtra:बुलढाण्यात शेतकऱ्यांच्या ‘क्रांतिकारी राजा’चे दणक्यात आगमन... डफड्याचा ताल, सजवलेली बैलगाडी आणि बैलगाडीचं सारथ्य करताना दिसले रविकांत तुपकर! श्री गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर बुलढाण्यात ‘शेतकऱ्यांच्या क्रांतिकारी राजा’ची यंदा पाचव्या वर्षी उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. विशेष म्हणजे गणरायाची मूर्ती सजवलेल्या बैलगाडीतून आणण्यात आली आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकरांनी स्वतः बैलगाडी हाकत गणरायाला मंडपात आणलं. यावेळी गणरायाच्या चरणी तुपकरांनी शेतकऱ्यांसाठी साकडं घातलं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्या, बुलढाण्याला दुष्काळाच्या यादीत घ्या आणि सरकारला शेतकऱ्यांसाठी काम करण्याची सद्बुद्धी द्या, अशी मागणी त्यांनी केली. सत्ताधारी नेत्यांनी आपापसातील भांडणं बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढावं, असं आवाहनही तुपकरांनी केलं. दरम्यान, ‘क्रांतिकारी राजा’समोरचा आकर्षक देखावाही नागरिकांचं लक्ष वेधून घेतोय.0
0
Report
बुलढाणा के किसान टॉवर पर चढ़े, दुष्काळ घोषित कराने की मांग तेज
Buldhana, Maharashtra:बुलढाणा ब्रेक कोरडा दुष्काळ जाहीर करा! शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी टॉवरवर चढून आंदोलन! बुलढाण्यात शेतकरी प्रश्न पेटला; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक अटाळी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांचे टॉवरवर चढून आंदोलन शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या, अशी मागणी पिकांची अवस्था बिकट असताना प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी टोकाचे आंदोलन कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन अमोल पाटील टॉवरवर चढल्याने प्रशासनाची धावपळ मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा0
0
Report
सरकार ने 15 मांगों को पूरा कहा, आंदोलन जारी रहेगा—अब क्या होगा?
Nagpur, Maharashtra:नागपूर - डॉ. बबनराव तायवाडे,अध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघ - जांरांगे पाटील आंदोलन - गेल्या 5-6 दिनोंांपासून आंदोलनकर्त्यांची मागणी आणि सरकारची भूमिका संदर्भात विचार केला तर असे दिसून येते की आंदोलनकर्त्यांनी ज्या काही 15 मागण्या सरकारपुढे मांडण्यात आल्या होत्या... त्या 15 मांगण्यांच्या संदर्भात 15 मुद्द्यांचा मसुदा सरकारने आंदोलनकर्त्यांना दिलेल्या दिवसापासून काल पर्यंत सरकार त्याच्यावर ठाम आहे. पहिल्या बारीक बातम्या: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री आणि सरकारमधील आमदार बोलायला लागले आहेत की सरकारने यांच्या मागण्या पूर्ण केल्या आहेत...ज्या दोन मागण्या आहेत... कोल्हापूर आणि सातारा ची गझेटीयरची मागणी आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट आहेत, विधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे सुरू आहे दुसरं प्रकरण चार लोकांची कास्ट व्हॅलिडिटी चे प्रकरण आहे,त्यावर सरकारने सांगितले आहे की एकदा जात पडताळणी समितीने नाकारलेले प्रमाणपत्र देता येत नाही,त्यासाठी कोर्टात जावे लागते उर्वरित मागण्या सरकारने मान्य-पूर्ण केल्या आहेत,वारंवार मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सांगत आहेत,त्यामुळे समाजातील विविध स्तरावर काम करणारेही चिंतन करून विचारात आहेत की सरकारने जर मागण्या पूर्ण केल्या आहेत तर हे आंदोलन कशासाठी आहे0
0
Report
Advertisement
शेगाव में श्री संत गजानन महाराज की 116वीं पुण्यतिथि पर भक्तों का महासंगम
Buldhana, Maharashtra:विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगावच्या श्री संत गजानन महाराजांचा आज 116 वा पुण्यतिथी सोहळा मोठ्या भक्तिभावात साजरा होत आहे... ऋषिपंचमी आणि महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त संतनगरी शेगाव भाविकांच्या गर्दीने अक्षरशः दुमदुमून गेली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक महाराजांच्या दर्शनासाठी शेगावात दाखल झाले आहेत. तर शेकडो दिंड्याही शेगाव नगरीत दाखल झाल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे. पुण्यतिथी उत्सवानिमित्त मागील तीन दिवसांपासून श्रींच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज मुख्य पुण्यतिथी सोहळा असल्याने सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पालखी सोहळा आणि श्रींच्या दर्शनासाठी लाखोंचा जनसागर शेगावात दाखल झाला असून, भाविकांच्या सोयीसाठी मंदिर 24 तास खुले ठेवण्यात आले आहे. दिंड्यांच्या गजरात, भजन-कीर्तनाच्या स्वरात आणि ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषाने संपूर्ण शेगाव नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. श्रींच्या पुण्यतिथी सोहळ्यामुळे शेगावात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे.0
0
Report
मुंबई-गोवा हाईवे पर टैंकर लीकेज, बचाव दल की सतर्कता से बड़ा हादसा टला
Chendhare, Maharashtra:स्लग - मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्ववत ...... अपघात ग्रस्त टँकर मधील गळती थांबवण्यात यश ........ बचाव पथकांच्या सतर्कतेमुळे मोठा धोका टळला ....... अँकर - पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातामुळे विस्कळीत झालेली मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक आता सुरळीत झाली आहे. कोकणात जाणाऱ्या मार्गिकेवर कोलाड जवळ पुगाव इथं रसायन वाहुन नेणारा टँकर उलटला आणि त्यातून ज्वालाग्राही रसायनाची गळती सुरू झाली. मात्र बचाव पथकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक जवळपास तासभर ठप्प होती. शिवाय रसायनाच्या गळतीमुळे मोठा धोका निर्माण झाला होता. मात्र बचाव पथके, फायर ब्रिगेड आणि पोलिसांनी तज्ञांच्या मदतीने प्रयत्नांची शिकस्त करून गळती थांबवून टँकर पूर्ववत केला. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली.0
0
Report
वाशीम: धोत्रा फाटा-धोत्रा सड़क पर गड्ढे, यातायात बाधित
Washim, Maharashtra:अँकर:वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील धोत्रा फाटा ते धोत्रा रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.रस्त्यावरील डांबर पूर्णपणे गायब झालं असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.या मार्गावरून दररोज नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते.मात्र,खराब रस्त्यामुळे प्रवास करताना नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.0
0
Report
Advertisement
वाशिम की अडान नदी सूखी, किसानों की चिंता बढ़ी; बारिश अब अहम उम्मीद
Washim, Maharashtra:दरवर्षी पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील आडान नदी यंदा मात्र सप्टेंबरचा अर्धा महिना उलटूनही कोरडीच आहे. अपुऱ्या पावसामुळे नदीपात्रात अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. काही ठिकाणी मोजकेच पाणी शिल्लक असून अनेक भागांत नदीपात्र कोरडे पडले आहे.याचा थेट परिणाम नदीकाठच्या शेतकरी आणि नागरिकांवर झाला असून, आगामी काळात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.नदी आणि परिसरातील जलसाठे भरण्यासाठी आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.0
0
Report
चंद्रपुर में तीन DJ पर कार्रवाई, एक दिन में 12.5 लाख का माल जप्त
Chandrapur, Maharashtra:टायटल:---- चंद्रपुरात DJवर पोलिसांचा दणका,एकाच दिवशी 3 DJवर कारवाई, 12.50 लाखांचा मुद्देमाल जप्त चंद्रपूर जिल्ह्यात कर्णकर्कश आणि विनापरवाना डीजेविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. काल एकाच दिवशी राजुरा, दुर्गापूर आणि रामनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तीन डीजेंवर कारवाई करण्यात आली. रामनगर पोलिसांनी विनापरवाना उच्च क्षमतेचे प्लाझ्मा लाईट्स आणि कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीसह डीजे साऊंड सिस्टीम आणि प्लाझ्मा साहित्य जप्त केले. या कारवाईत एकूण 12 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संबंधित ऑपरेटर आणि वाहनचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशांचे आणि ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलिसांची ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.0
0
Report
पिंपरी-चिंचवड़ में पानी विभाग की फर्जी नियुक्ति से पांच लोगों को ठगी, आरोपी गिरफ्तार
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आणि बोगस नियुक्तीपत्रे देऊन नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराच्या खंडणी विरोधी पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. प्रतीक राजेश धायींजे अस अटक करण्यात आलेल्या 28 वर्षीय आरोपीचे नाव आहे. आरोपी प्रतीक धायींजे हा अनेकांना नोकरीच आमिष दाखवून फसवत असल्याची गोपनीय माहिती खंडणी विरोधी पथकाला १२ सप्टेंबर २०२६ रोजी मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी पीडितांशी संपर्क साधून सविस्तर चौकशी केली असता, आरोपीने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात नोकरीचे बनावट कॉल लेटर देऊन पाच जणांची १ लाख १४ हजार ११२ रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी भोसरीतील धावडे वस्ती परिसरात असल्याची माहिती मिळताच खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता, यापूर्वी त्याने ‘म्हाडा’मध्ये स्वस्त घर मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेकांची तब्बल २२ लाख ४१ हजार ७६० रुपयांची फसवणूक केल्याच निष्पन्न झाल आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात यापूर्वीच गुन्हा दाखल आहे. आरोपीला पुढील तपासासाठी भोसरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.0
0
Report
Advertisement
पिंपरी-चिंचवड नगरपालिका की कचरा गाड़ी से पांच वर्षीय बच्ची की दर्दनाक मौत
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कचरा संकलन वाहनाच्या धडकेत एका पाच वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. निगडी पोलीस स्टेशन हद्दीतील साईनाथ नगर येथे ही दुर्धैवी घटना काल दुपारी बाराच्या सुमारास घडली. या घटनेत संस्कृती भागवत बिरादार या पाच वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. महापालिकेची कचरा संकलन करणारी गाडी BVG कंत्राटदाराची असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात निगडी पोलिसांनी कचरा संकलन गाडीवरील २८ वर्षीय वाहन चालक राहुल प्रलाद चव्हाण आणि त्याच्यासोबत असलेला ३८ वर्षीय राजू कुमार गायकवाड या दोघांना ताब्यात घेतलंय.0
0
Report
गणेशोत्सव सुरक्षा: 350 अपराधियों पर कार्रवाई, डीजे पर रोक, दामिनी पथक तैनात
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी नगर शहर पोलिस आयुक्तालय सज्ज झाले असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सण शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांनी तब्बल ३५० सराईत गुन्हेगारांवर हद्दपार कायद्यांतर्गत आणि प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये झोन-१ मधील १५० आणि झोन-२ मधील २०० जणांचा समावेश आहे. तर डीजे वर बंदी आहे मात्र तरी कुणी कुठं वाजवल्यास कारवाई साठी विशेष पथक तैनात करण्यात आली आहे.. गणेशोत्सवातील गर्दीच्या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये म्हणून साध्या वेशातील पोलिसांची करडी नजर राहील. तर, महिला आणि तरुणींच्या छेडछाडचे प्रकार रोखण्यासाठी 'दामिनी पथक' संपूर्ण शहरात गस्त घालणार आहे.0
0
Report
नागपूर दुष्काळ पर सरकार की कृषक मदद, कर्जमाफी में वृद्धि
Nagpur, Maharashtra:नागपूर - On दुष्काळ - - मागील वर्षी अतिवृष्टी झाल्यानंतर सरकारने हजार कोटी रुपयांची रक्म थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली होती.. आणि आता कर्जमाफीत देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला मदत केली आहे. - आता उद्भवलेल्या संकटामुळे आपण प्रत्येक जिल्ह्यात लक्ष ठेवून आहोत. आम्ही शेतकऱ्यांना कधीच वाऱ्यावर सोडलं नाही. आत्तापर्यंत इतिहासात शेतकऱ्यांना मदत करण्याचा आमच्या सरकारचा विक्रम आहे. *सरकार समोर आर्थिक अडचण येत असते..मात्र आम्ही शेतकऱ्यांना ती अडचण सांगत नाही. मी शेतकऱ्यांना मदत करत असतो.* On दिशा सालीयान प्रकरण -(हिंदी) - ती एक प्रक्रिया आहे. त्याबद्दल तपास करणारे अधिकारीच बोललेले योग्य असेल. मात्र प्रत्येक घटनेची निष्पक्ष चौकशी व्हावी. On रोहित पवार - - रोहित पवार सध्या स्वतःला चर्चेत आणण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा. On कॅबिनेट दुष्काळ चर्चा - - दर आठवड्यात असलेल्या स्थितीवर कॅबिनेटमध्ये चर्चा होत असते. जिल्हा निहाय आढावा घेण्याच्या सर्व पालकमंत्र्यांना सूचना देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांचे त्यावर लक्ष आहे. एकंदरीत नुकसानीची आकडेवारी तपासून त्यावर उचित निर्णय करण्यात येईल.. On मनोज जरांगे - - जरांंगे पाटील यांचा आंदोलन नॉन इशूला इशू करून होत आहे.. हे आता महाराष्ट्रातील जनतेला कळाल आहे. आपला देश कायद्यावर चालणार आहे. व्हॅलिडीटी कमिटीचं काम प्रत्येक गोष्टीची तपासणी करणे त्यांचं काम आहे. माधुरी पाटील यांचा जो निकाल आला त्यामध्ये जे आवश्यक कागदपत्रे आहेत. त्यामध्ये काही चुकीचं केलं असेल तर न्यायालयात दाद मागण्याचा तुम्हाला अधिकार आहे.. *मात्र अशा पद्धतीने अ राजकतेचे वातावरण महाराष्ट्रात निर्माण करून ज्यांनी सर्वात जास्त मराठा समाजाला न्याय दिला त्यांच्याबद्दल समाजात भ्रम निर्माण करणे योग्य नाही. कोणाच्यातरी इशारावरून आणि द्वेषावरून , पूर्वग्रही भावनेतून होत आहे..अस माझं स्पष्ट मत आहे.* - ज्यांनी आतापर्यंत मराठा समाजाला अनेक योजनांपासून वंचित ठेवलं.. आणि ज्यांनी मराठा समाजाला न्याय देण्याचं काम केलं त्यांच्याबद्दل आज जनतेत भ्रम पसरवून खोटं नेरेटिव्ह पसरविल्या जात आहे हे आज मराठा समाजातील लोकांना कळून चुकला आहे.. On गणेश नाईक - - गणेश नाईक हे वरिष्ठ नेते आहेत. एकनाथ शिंदे त्यांच्यावर कधीच वक्तव्य करत नाही त्यांचा मोठेपणा आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी ते विरोधी पक्षात असताना त्यांना सत्तेत आणण्यासाठी ते टाकला. *त्यामुळे त्यांना योग्य समज दिली गेली पाहिजे..*0
0
Report
Advertisement
अकोले के वरखड़वाड़ी क्रशर ब्लास्ट से आदिवासी परिवारों के घर क्षतिग्रस्त, स्थानीय भय बना
Shirdi, Maharashtra:Anc - अकोले तालुक्यातील देवसंथ परिसरातील वरखडवाडी येथे खडी क्रशरच्या ब्लास्टिंगमुळे आदिवासी कुटुंंबांच्या घरांना तडे गेल्याचा आरोप करण्यात आलाय... क्रशरमधील स्फोटांनंतर दूरपर्यंत धक्के जाणवत असून, ब्लास्टिंगदरम्यान उडणारे दगड थेट घरांवर पडत असल्याचंही समोर आलंय... त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय... या प्रकरणानंतर योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात आलीय.. या ब्लास्टिंगमुळे काही आदिवासी कुटुंंबांच्या घरांच्या भिंतींना तडे गेल्याचे व्हिडिओ सोशल माध्यमातून समोर आले असून त्यामुळे घरात राहणाऱ्या कुटुंंबांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय... भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जातोय...0
0
Report
मानगांव में बल्कड्रग फार्मा प्रकल्प के विरोध ने रूप लिया; 16 सितम्बर को एल्गार सभा
Chendhare, Maharashtra:स्लग - बल्कड्रग फार्मा प्रकल्पाविरोधात स्थानिकांचा एल्गार ........ माणगावात रासायनिक प्रकल्पाला कडाडून विरोध ....... १६ सप्टेंबरला प्रकल्पविरोधात एल्गार सभा ........ पर्यावरण, शेती, पाण्यासाठी स्थानिकांचा लढा ....... सर्वपक्षीय पदाधिकारी एकवटले; प्रकल्पाविरोधात रणशिंग .........0
0
Report
सातारा में गणेश उत्सव: मंत्री और पुलिस की योजना से यातायात रहा सहज
Satara, Maharashtra:सातारा शहरात गणेशोत्सवाच्या निमित्त पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलीस प्रशासनासोबत शहरातील विविध भागाची पाहणी केली. यावेळी पोलीस प्रशासन आणि गणेश मंडळांनी केलेल्या उत्तम आणि शिस्तबद्ध नियोजनामुळे वाहतुकीची अडचण न आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंडळांच्या सहकार्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला नाही आणि आनंदात गणेशोत्सव साजरा करता येत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. तसेच आगामी विसर्जन मिरवणुकीचे नियोजनही यशस्वीपणे पार पडेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.0
0
Report
Advertisement
