445001
यवतमाळ - पुसद मध्ये जन्माष्टमीनिमित्त टाळमृदुंगाच्या गजरात शोभायात्रा.
Yavatmal, Maharashtra:जन्माष्टमीनिमित्त यवतमाळच्या पुसद शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. डीजेला फाटा देत पारंपारिक पद्धतीने सलग 11 वर्षांपासून या आदर्शवत मिरवणुकीचे आयोजन करण्यात येत आहे. या मिरवणुकीत टाळ व मृदुंगाच्या तालावर गोपाल कृष्ण भगवान की जय असा एकच जयघोष करण्यात आला. या मिरवणुकीत बाल गोपाल वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीकृष्ण जन्मोत्सव समिती पुसद तर्फे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
बीड़ नगर परिषद कार्यालय के बाहर कर्मी बनाम सामाजिक कार्यकर्ता में मारामारी
Beed, Maharashtra:बीड : चौकशीसाठी तक्रार अर्ज देणारा कार्यकर्ता व नगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये मारामारी. शहरातील सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला. बीड शहरातील एका नगरसेवकाच्या कार्यालयासमोर नगरपरिषद कर्मचारी व त्याच्या विरोधात तक्रार अर्ज देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाल्याची घटना घडली; या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला असून याप्रकरणी अद्यापपर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. बीड शहरातील एका सामाजिक कार्यकर्त्याने नगरपालिकेत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या चौकशीसाठी अर्ज दिलेला होता. हा कर्मचारी आपल्या इतर दोन सहकाऱ्यासह एका नगरसेवकाच्या कार्यालयाकडे गेला असताना त्या ठिकाणी हा सामाजिक कार्यकर्ता होता. त्याठिकाणी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला व यानंतर हाणामारी देखील झाली हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून याची जोरदार चर्चा बीड शहरात होत आहे...0
0
Report
अजित पवार के निधन के चार महीने: बारामती स्मृतिस्थल पर परिवार ने श्रद्धांजलि दी
Rui, Maharashtra:अजित पवारांच्या निधनाला चार महिने पूर्ण.... जय पवारांसह युगेंद्र पवारांनी घेतले अजित पवारांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन..... राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज चार महिने पूर्ण झाले. यानिमित्ताने बारामतीतील विद्या प्रतिष्ठान परिसरातील स्मृतिस्थळी त्यांचे धाकटे पुत्र जय पवार यांनी भेट देत अभिवादन केले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते आणि अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनीही स्मृतिस्थळाचे दर्शन घेत दादांना श्रद्धांजली अर्पण केली.0
0
Report
अमरावती में बकरी ईद धूमधाम से, पुलिस बंदोबस्त के बीच शहर उत्सव बना
Amravati, Maharashtra:अमरावतीत बकरी ईद उत्साहात साजरी; शहरात अनेक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त, एकमेकांना दिल्या शुभेच्छा अमरावती शहरात बकरी ईद अर्थात ईद-उल-अधा मोठ्या उत्साहात भक्तिमय आणि आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली. ईदच्या निमित्ताने शहरातील हैदरपुरा ईदगाह मैदानासह विविध मशिदींमध्ये हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामूहिक नमाज अदा केली. पहाटेपासूनच ईदगाह आणि मशिदींमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पारंपरिक वेशभूषेत मुस्लिम बांधवांनी अल्लाहची प्रार्थना करत देशात शांतता सुख-समृद्धी आणि बंधुभाव कायम राहावा अशी दुआ मागितली. मरकज अहले सुन्नत मस्जिद मिस्कीन शाह मियांचे इमाम मुफ्ती शरफोद्दीन यांनी ईदची नमाज अदा करून घेतली. नमाजानंतर उपस्थितांनी एकमेकांना आलिंगन देत ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शहरात शांतता, सामाजिक सलोखा आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले असून प्रशासनाकडूनही चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.0
0
Report
Advertisement
बारामती पुलिस ने वर्षों से खड़ी 13 बेकार गाड़ियाँ मालिकों के हवाले कर दीं
Rui, Maharashtra:बारामती पोलिसांचा स्तुत्य उपक्रम ठाण्याच्या आवारात वर्षानुवर्षे धूळ खात पडलेल्या बेवारस १३ वाहन मूळ मालकांच्या ताब्यात. ५ लाख रुपये किमतीची वाहने मालकांच्या स्वाधीन. बारामती ग्रामीण पोलिसांचा स्तुत्य उपक्रम समोर आला आहे. पोलीस ठाण्याच्या आवारात वर्षानुवर्षे धूळ खात पडून असलेल्या बेवारस आणि मुद्देमालातील १३ वाहनांचा शोध घेऊन ती मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. आरटीओ नोंदी, जुने गुन्हे रेकॉर्ड आणि कागदपत्रांच्या आधारे वाहन मालकांचा शोध घेण्यात आला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सुमारे ५ लाख रुपये किमतीची वाहने मालकांच्या स्वाधीन करण्यात आली असून, आणखी ५० वाहनांच्या मालकांचा शोध सुरू आहे.0
0
Report
मालेगांव की मौसम नदी में खून मिला पानी, अवैध कत्ले से तनाव; पुलिस-प्रशासन तैनात
Nashik, Maharashtra:मालेगाव ब्रेकिंग.. - मालेगावातील मोसम नदीत रक्तमिश्रित पाण्याच्या विषयावर परिसरात तणाव.. - मोठ्या प्रमाणावर पोलिस अधिकाऱ्यांसह फौजफाटा तैनात.. - अवैध कत्तल मुळे मोसम नदीत रक्तमिश्रित पाण्याचा प्रवाह नदीत वाढल्याने सामाजिक कार्यकर्ते आक्रमक .. - मालेगाव महापालिका आयुक्त, उपायुक्त सह संबधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.. - परिसरात तणावाचे वातावरण0
0
Report
बारामती में जय पवार ने जनता दरबार लगाया
Rui, Maharashtra:बारामतीत जय पवारांनी घेतला जनता दरबार.... Anchor _राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जय पवार यांनी बारामती शहरातील कसबा परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात जनता दरबार घेतला आहे. यातून सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न जय पवारांकडून केला जातोय. सकाळी 11 ते दुपारी तीन या वेळेत जनता दरबार पार पडणार आहे.0
0
Report
Advertisement
सीबीआई की बैंक लॉकर धावा: नीट पेपरफुटी केस में लातूर में विवेचना तेज
Latur, Maharashtra:नीट पेपरफुटी के मामले में अब सीबीआई की जांच सीधे बैंक के लॉकर तक पहुँच गई है। लातूर शहर के गंजगोलाई और बार्शी रोड परिसर के एक निजी बैंक में सीबीआई के पथक ने धावा बोलकर लॉकर की जानकारी प्राप्त की है। Zee 24 Taas के पास экск्लूसिव जानकारी सामने आई है कि शिवराज मोटेगावकर और उनके परिवार के लॉकर की सीबीआई द्वारा चौकशी हो रही है। लॉकर में वास्तव में क्या दफ्न है यह स्पष्ट नहीं है, लेकिन पैसों के साठगाँठ और कागजात आदि का पता लगाने के लिए सीबीआई तफसीश कर रही है। नीट पेपरफुटी प्रकरण के धागे अब आर्थिक व्यवहारों तक पहुँच गए हैं, जिससे लातूर में हलचल मच गई है।0
0
Report
हिंगोली में गर्मी से जलस्तर घटा, 30 लघु तालाबों में से अधिकतर सूखे
Hingoli, Maharashtra:अँकर हिंगोली जिल्ह्यात तापमान वाढत असल्याने हिंगोली जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत मोठी घट झाली आहे जिल्ह्यातील 30 लघु सिंचन तलावांपैकी अनेक तलावांनी तळ गाठलाय सिद्धेश्वर धरणात सध्या केवळ शून्य टक्के पाणीसाठा असून हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या येलदरी धरणात देखील मागील महिनाभराच्या तुलनेत नऊ टक्क्यांनी पाणीसाठ्यात घट झाली आहे हिंगोली जिल्ह्यात एकूण 30 लघु सिंचन तलावापैकी 15 तलाव ज्योत्या खाली गेले आहेत तर पाच तलाव कोरडे ठाक पडले असून 25 टक्केच्या खाली दहा तलाव आहेत तलावाच्या पाणी पातळीत मोठी घट झाल्याने हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत याचाच आढावा घेतलाय आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी...0
0
Report
यवला शहर में ईद की नमाज़, सामाजिक सौहार्द की मिसाल
Yeola, Maharashtra:येवला शहरातील ईदगाह मैदान येथे बकरी ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात नमाज पठण केले. यावेळी शहरात शांतता व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. नमाजानंतर हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देत सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचा संदेश दिला. सर्व समाजातील नागरिकांच्या सहभागामुळे येवल्यात सलोखा आणि एकोप्याचे सुंदर चित्र पाहायला मिळाले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी देखील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.0
0
Report
Advertisement
Satara में CNG के दाम 103 रुपये/किग्रा तक, 15 दिनों में 9 बार बढ़ोतरी
Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यात CNG गॅसच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली असून आता CNG चा दर १०३.०२ रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. गेल्या १५ दिवसांत तब्बल ९ वेळा दरवाढ झाल्याने नागरिकांसह रिक्षा चालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सतत वाढणाऱ्या इंधन दरामुळे रिक्षा चालकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले असून रोजच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत असल्याची भावना चालकांकडून व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, सामान्य नागरिकांनाही प्रवास खर्चाचा अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे. CNG हा पेट्रोल-डिझेलला स्वस्त पर्याय म्हणून वापरला जात असताना वारंवार होणाऱ्या दरवाढीमुळे आता हा पर्यायही महाग होत चालल्याची चर्चा सुरू आहे. दरवाढीवर नियंत्रण आणावे आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी.0
0
Report
नाशिक में सीएनजी की कीमत में 1.35 रुपए की बढ़ोतरी, लागत बढ़ी
Nashik, Maharashtra:नाशिक मध्ये सीएनजीच्या दरात १ रुपया ३५ पैशांची वाढ. नाशिकात प्रतिकिलो सीएनजीचा दर आता ९६ रुपये ५० पैसे. गेल्या काही दिवसांतील इंधन दरवाढीमुळे वाहनचालक त्रस्त. रिक्षाचालक आणि व्यावसायिक वाहनधारकांवर आर्थिक भार वाढणार. आंतरराष्ट्रीय बाजारातील बदल आणि डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरणीचा परिणाम. सीएनजी दरवाढीमुळे प्रवासी भाडेवाढीची शक्यता. पेट्रोल-डिझेलनंतर आता सीएनजीही महागल्याने नागरिकांमध्ये नाराजी.0
0
Report
नांदेड दौरे पर शिंदे से प्रताप पाटील की बंद कमरे में चर्चा, क्या बदलेगी राह?
Nanded-Waghala, Maharashtra:नांदेड दौऱ्यावर असलेले खासदार श्रीकांत शिंदे यांची राष्टवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मध्य रात्री भेट घेत बंद दाराआड चर्चा केली. दोघामध्ये अर्धा तास बंद दाराआड बैठक झाल्याने विवीध चर्चांना उधाण आल. दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्याने त्यांना निमंत्रण दिलं होत पण त्यांच्या कार्यक्रमामुळे त्यांना उशीर झाला. ते सकाळीं माझ्या घरी येणार होते , मात्र घरगुती कार्यक्रमामुळे सकाळी बाहेरगावी जायचं असल्याने मीच येऊन त्यांना भेटलो. श्रीकांत शिंदे माझ्या सोबत लोकसभेत होते , ते मित्र पक्षाचे नेते आहेत , ते नांदेडला आले त्याचं स्वागत करावं हा त्या मागचा उद्देश असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले. भेट झाल्यावर काही तरी चर्चा होणारच , त्याच्या सोबत राजकिय चर्चा झाली. संभाव्य जिल्हा परिषद, विधान परिषदेबाबत चर्चा झाल्याचे आमदार चिखलीकर म्हणाले. नांदेड विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला सोडण्याची आपली मागणी कायम आहे, पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल ते मान्य असल्याचे चिखलीकर म्हणाले. विधान परिषदेसाठी अनेकांनी उमेदवारी अर्ज घेतले , प्रवीण पाटील चिखलीकर यांनी देखील अर्ज घेतला, मला ते कळलं मात्र माझी काही चर्चा प्रवीण पाटील चिखलीकर यांच्याशी झाली नसल्याचे चिखलीकर म्हणाले. अनेकांनी उमेदवारी अर्ज घेतले , ज्यांना उमेदवाररी मिळाली नाही तर ते अपक्ष राहतील. नांदेड विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार नाही असं मला वाटतं असंही. चीखलीकर म्हणाले नांदेड मध्ये महायुतीकडे सर्वाधिक मतदार संख्या आहे. भाजपाने या जागेवर दावा केलाय. मात्र ही निवडणुक बिनविरोध होणार नाही असं वक्तव्य चीखलीकरांनी केल्याने नांदेड मध्ये महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे दिसते.0
0
Report
Advertisement
चंद्रपुर में बकरीद की सामूहिक नमाज, मुस्लिम समुदाय ने शांति की दुआ मांगी
Chandrapur, Maharashtra:टायटल:---चंद्रपूरात साजरा झाला बकरीद सण, मुस्लिम समाज बांधवांनी अदा केली सामूहिक नमाज चंद्रपूरात आज बकरीद सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. ईद-उल-अजहा म्हणजेच बकरीद निमित्त शहरातील रयतवारी कॉलरी येथील मज्जिद जमाले मुस्तफा ईदगाह मैदानावर मुस्लिम समाज बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली व शहरात अमन शांती राहावी यासाठी प्रार्थना केली. यावेळी मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.0
0
Report
वाशीम में एक्सपायर्ड दवाओं के खुले में फेंकने से पर्यावरण और स्वास्थ्य खतरा
Washim, Maharashtra:वाशीम: वाशीम शहरातील विविध मेडिकल चालकांकडून एक्सपायरी झालेल्या औषधांच्या गोळ्या,इंजेक्शन तसेच अन्य वैद्यकीय साहित्य उघड्यावर फेकण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याचे समोर येत आहे. मात्र, संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. बायो मेडिकल वेस्ट संकलनासाठी वाहन शहरात नियमितपणे फिरत असतानाही काही मेडिकल चालकांकडून एक्सपायरी औषधांचा साठा उघड्यावर टाकला जात असल्याने पर्यावरण प्रदूषणात वाढ होत आहे. तसेच या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खासकरून वैद्यकीय कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे बंधनकारक असताना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासन व आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.0
0
Report
अकोला के गौरक्षण रोड पर तेल फैलाने से सड़क हादसों की भारी संभावना
Akola, Maharashtra:अकोला शहरातील गौरक्षण रोड परिसरातील साई शील पेट्रोल पंप ते जुन्या आयकर कार्यालयादरम्यानच्या रस्त्यावर सध्या धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. काँक्रीटच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात तेल सांडल्यामुळे अनेक दुचाकी वाहने घसरत असून काही वाहनचालक किरकोळ जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.रस्त्यावर तेल सांडल्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना याचा मोठा फटका बसत असून अनेक जण घसरून पडत आहेत. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन काही जागृत नागरिकांनी घटनास्थळी थांबत वाहनचालकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि वाहने हळू चालवण्याचे आवाहन केले आहे.मात्र अद्याप प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने तात्काळ रस्त्यावरील तेल साफ करून अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.0
0
Report
Advertisement
