445001
यवतमाळ - पुसद मध्ये जन्माष्टमीनिमित्त टाळमृदुंगाच्या गजरात शोभायात्रा.
Yavatmal, Maharashtra:जन्माष्टमीनिमित्त यवतमाळच्या पुसद शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. डीजेला फाटा देत पारंपारिक पद्धतीने सलग 11 वर्षांपासून या आदर्शवत मिरवणुकीचे आयोजन करण्यात येत आहे. या मिरवणुकीत टाळ व मृदुंगाच्या तालावर गोपाल कृष्ण भगवान की जय असा एकच जयघोष करण्यात आला. या मिरवणुकीत बाल गोपाल वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीकृष्ण जन्मोत्सव समिती पुसद तर्फे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
अक्कलकोट-गुलबर्गा हाईवे पर ट्रक-कार दुर्घटना, 4-5 घायल
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - अक्कलकोट गुलबर्गा महामार्गावर ट्रक आणि चारचाकी कारचा भीषण अपघात, चार ते पाच जण गंभीर जखमी अक्कलकोट महामार्गावर ट्रक आणि चारचाकी कारचा भीषण अपघात, चार ते पाच जण गंभीर जखमी.. अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील गावाजवळ ट्रकचालकाने कारला धडक दिल्याची प्राथमिक माहिती तांदळाच्या ट्रकने कारला धडक दिल्यानंतर ट्रक झाली पलटी, ट्रक मधील तांदळाचे पोते पडले रस्त्यावर अक्कलकोट गुलबर्गा महामार्गावर अपघातामुळे ट्राफिक जाम जखमींना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात करण्यात आलं दाखल अक्कलकोट ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल..0
0
Report
सावर्डे के अंडरपास में पानी भरा, महामार्ग चौपदरीकरण का अधूरा काम वजह
Ratnagiri, Maharashtra:महामार्गावरील अपूऱ्या कामाचा फटका; पहिल्याच पावसात सावर्डे येथे अंडरपासमध्ये साचले पाणी! मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील अपुर्या कामाचा फटका आता स्थानिक नागरिकांना बसू लागला आहे. चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील 'वहाळ फाटा' परिसरात असलेल्या अंडरपासमध्ये पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. हा मार्ग अत्यंत रहदारीचा असल्याने, अंडरपासमध्ये पाणी साचल्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही योग्य व्यवस्था न केल्याने या भागात जणू तळ्याचे स्वरूप आले होते. दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या या समस्येकडे प्रशासनाने आणि संबंधित कंत्राटदाराने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक करत आहेत.0
0
Report
रत्नागिरी में मॉनसून पूर्व बारिश, अगले दो दिन बारिश की संभावना
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी दुपारपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी मॉन्सूनपूर्व पाउस मान्सूनपूर्व पावसाच्या दमदार सरी.. जनजीवन विस्कळीत.. रत्नागिरी, चिपळूण,राजापूर,लांजा,संगमेश्वर या भागात मॉन्सूनपूर्व पावस हवामान विभागाने पुढचे दोन दिवस वर्तवली आहे पावसाची शक्यता मॉन्सूनपूर्व पावसाच्या अनेक ठिकाणी सरींमुळे हवेत गारवा पुढील दोन दिवस अशाच पद्धतीने पावसाच्या सरी बरसतील असा हवामान विभागाचा अंदाज या साऱ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रविंद्र कोकाटे यांनी0
0
Report
Advertisement
सायन-पनवेल मार्ग पर ट्रैवल्स बस में आग, जान बची, नुकसान बड़ा
Navi Mumbai, Maharashtra:सायन- पनवेल महामार्गावर वाशी येथे एका ट्रैवल्सच्या बसला दुपारी आग लागली, ट्रैवल्सच्या बसला आग लागली तेव्हा बस मद्ये कोणी नव्हते, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. ही आग कशी लागली याबाबत मात्र कारण समजले नाही. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल, त्यांनी तात्काळ आग विझवली परंतु यात बसचे मोठे नुकसान झाले.0
0
Report
यवतमाळ में ताप लहर से आठ लोगों की मौत, शव परीक्षण के बाद ही कारण स्पष्ट
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात प्रचंड उष्णलहरी सुरू असताना गेल्या 48 तासात आठ जणांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे, हे सर्व मृत्यू उष्माघाताचे बळी असल्याचा अंदाज आहे. या सर्वांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन अहवाल यायचे असल्याने त्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. दिग्रस येथे चोवीस तासात तिघांच्या मृत्यूची माहिती पुढे आली होती, यासोबतच यवतमाळच्या चापमनवाडी आणि भोसा मार्गावर दोघांचे, पुसद मध्ये दोन तर बाभुळगाव येथे एकाचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. यातील चौघांची ओळख पटली असून चौघे अज्ञात आहेत. बाभुळगांवच्या गवंडी ते किन्ही रस्त्यावर पुलाखाली मारोतराव कावे यांचा मृतदेह आढळून आला. तर पुसदच्या हनुमान वॉर्डात अन्नपूर्णा मुळे या वृद्ध महिलेने भर उन्हात कुलर मध्ये पाणी भरले, त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं, रूग्णालयात हलविल्यानंतर उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. पुसदच्याच नगरपरिषदेच्या इंदिरानगर भागातील डम्पिंग यार्ड समोर सुभाष राठोड यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. जिल्ह्यात प्रचंड उष्ण लहरी वाहत असून, भर उन्हात बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.0
0
Report
करमाला में दौड़ती बस की डीजल टंकी टूटकर सड़क पर गिरी, एसटी पर सवाल
Pandharpur, Maharashtra:करमाळा शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवाशांनी भरलेली एसटी बस धावत असतानाच अचानक बसची डिझेल टाकी तुटून रस्त्यावर पडली. करमाळा-वाशिंबे मार्गावर धावणाऱ्या बससोबत शहरातील सिद्धार्थ नगर परिसरात हा प्रकार घडला. डिझेल टाकी रस्त्यावर पडल्याने परिसरात काही काळ प्रचंड खळबळ उडाली होती. मात्र, सुदैवाने चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना आणि जीवितहानी थोडक्यात टळली आहे. धावत्या गाडीची डिझेल टाकी निकामी होऊन पडल्याचे लक्षात येताच चालकाने तत्परता दाखवत बस जागेवरच रोखली.0
0
Report
Advertisement
सातारा नगरपालिका में हाइ-वोल्टेज बैठक: उद्धयनराजे भोसले ने नगरसेवकों को सख्त चेतावनी दी
Satara, Maharashtra:सातारा नगरपालिका में खासदार उदयनराजे भोसले और मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची आणि हायव्होल्टेज बैठक पार पडली. गेल्या काही दिवसांपासून पालिकेतील दोन्ही राजेंच्या गटातील नगरसेवकांमध्ये अंतर्गत वाद धुमसत होता. याच वादाची गंभीर दखल घेत आज दोन्ही राजेंनी नगरसेवकांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. यावेळी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना खासदार उदयनराजे भोसले यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. पालिकेच्या कामात कुठलाही सावळागोंधळ खपवून घेतला जाणार नाही, असा थेट इशारा यावेळी त्यांनी दिला. जे नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले आहेत, त्यांना प्रशासकीय कामांचा अनुभव कमी आहे, त्यामुळे पालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांना योग्य मार्गदर्शन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. यावेळी खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले नगरपालिका बैठकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आलेले पाहायला मिळाले...0
0
Report
कल्याण अम्बिवली में लिव-इन पार्टनर की निर्घृण हत्या
Kalyan, Maharashtra:कल्याण आंबिवली बनेली मधील धक्कादायक घटना चारित्र्याच्या संशयावरून 'लिव्ह-इन' पार्टनरची निर्घृण हत्या मारहाणीला कंटाळून आईकडे राहण्यास गेलेल्या 22 वर्षे तरुणीला आता मारणार नाही" म्हणून प्रेमाने बोलावले आणि बेदम मारहाण करत तिच्या डोक्यात टीव्ही आणि पाण्याचा भरलेले हंडे मारून केली हत्या रुक्सार अन्सारी असे मयत तरुणीचे नाव तर सतीश उर्फ गुड्डू वाघे असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव हत्येनंतर आरोपी रुग्णालयाबाहेरच बिनधास्त फिरत असल्याने संतप्त कुटुंबीयांनी त्याला चोप देत टिटवाळा पोलिसांच्या दिले ताब्यात टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू0
0
Report
केज-माजलगाव में आंधी-बारिश से फलों की बागें तबाह, एक किसान की मौत
Beed, Maharashtra:बीड: वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा कहर : केज-माजलगाव तालुक्यात फळबागांचे मोठे नुकसान, अंगावर झाड पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू...! ANC - बीड जिल्ह्यातील केज आणि माजलगाव तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने मोठा कहर केला आहे. या अवकाळी संकटामुळे अनेक गावांतील फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे केळी आणि आंबा पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी केळीची झाडे जमीनदोस्त झाली असून आंब्याच्या बागांमधील फळांची मोठ्या प्रमाणात गळती झाली आहे. काही भागांत झाडे उन्मळून पडल्याने शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, केज तालुक्यातील एका गावात दुर्दैवी घटना घडली. वादळाच्या वेळी झाड अंगावर पडल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.0
0
Report
Advertisement
नंदुरबार-शहादा में डीज़ल संकट के बीच किसान पर मारपीट का वीडियो वायरल
Dhule, Maharashtra:धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये डिझेल इंधनाचा तुटवडा निर्माण झालेला दिसून येत असताना, दुसरीकडे मात्र पेट्रोल पंप चालकांच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नंदुरबारच्या शहादा शहरात डिझेल भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांकडून मारहाण करण्यात येत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवरती व्हायरल झाला आहे. कॅश पेमेंट नसून ऑनलाईन पेमेंट असल्याच्या रागात ना पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांकडून मारहाण करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शेतकरीला मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, शहादा इंधन टंचाईमुळे शेतकऱ्यांना इंधन घेण्यासाठी कसरत करावी लागत आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना डिझेल घेण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.0
0
Report
सिंधुदुर्ग में पर्यटन सीजन आख़िरी चरण, मालवण में भीड़, 26 मई से वाटर स्पोर्ट्स बंद
Oras Bk., Maharashtra:अँकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाचा हंगाम अंतिम टप्प्यात असून मोठ्या संख्येने पर्यटक मालवणमध्ये दाखल झाले आहेत. येत्या २६ मे पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन हंगामाला ब्रेक लागणार असून वॉटर स्पोर्ट्स, किल्ला फेऱ्या बंद होणार आहेत. येणारा पावसाळा आणि हवामानातील बदलामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन हंगाम दरवर्षी बंद केला जातो. त्यामुळे आज विकेंडच्या दिवशी मालवणच्या दांडी किनारी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.0
0
Report
किल्ले रायगड के गंगासागर तालाब की सफाई अभियान से इतिहास और पर्यावरण संरक्षण जागरूकता
Chendhare, Maharashtra:किल्ले रायगडावरील गंगासागर तलाव गाळमुक्तीसाठी मोहीम ... कोकण कडा मित्र मंडळ व पुरातत्त्व विभागाचा संयुक्त उपक्रम ... ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धन .... अँकर - ऐतिहासिक वारशाचे जतन आणि पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने आज किल्ले रायगडावरील गंगासागर तलाव गाळ स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. कोकण कडा मित्र मंडळ व भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. वाढत्या पर्यावरणीय बदलांच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक वास्तू व परिसर संवर्धनासाठी नागरिकांचा सहभाग वाढावा हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. आपला वारसा, आपली जबाबदारी, 'स्वच्छ तलाव, स्वस्थ पर्यावरण' तसेच 'स्वच्छ रायगड, अभिमानाचा गड' या संदेशातून दुर्गसंवर्धनाबाबत जनजागृती करण्याचाही प्रयत्न यातून करण्यात आला. या मोहिमेत दुर्गप्रेमी, इतिहास अभ्यासक, स्वयंसेवक सहभागी झाले होते.0
0
Report
Advertisement
नाशिकमधील मल्टिनॅशनल कंपनीतील धर्मांतर-शोषण प्रकरणाची तपासगाथा: काय सच BROKEN?
Nashik, Maharashtra:नाशिकच्या गाजलेल्या मल्टिनॅशनल कंपनीतील धर्मांतर आणि महिला शोषण प्रकरणात आता मोठी घडामोड समोर आली आहे. फरार आरोपी निदा खानला आश्रय दिल्याच्या आरोपाखाली छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याला एसआयटीने समन्स बजावले आहे. दुसरीकडे, या प्रकरणातील आरोपी दानिश शेख याने पीडितेकडून लाखो रुपये उकळल्याचाही धक्कादायक खुलासा तपासात झाला आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट... मल्टिनॅशनल कंपनीतील या प्रकरणातील धक्कादायक बाब तपासातून समोर आली आहे. अटकेत असलेल्या दानिश शेख याने पीडितेवर दोन लाख रुपयांहून अधिक रक्कम उकळल्याचे एसआयटीच्या तपासात उघड झाले आहे. पीडितेवर मानसिक दबाव टाकत आर्थिक शोषण करण्यात आल्याचा आरोप असून, दानिशचे बँक खातेही एसआयटीने सील केले आहे. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या दोषारोपपत्रात या आर्थिक व्यवहारांचे पुरावे जोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तानी शेख याने या महिलेचा धर्मांतराचा केला असल्याचा आरोप असताना त्याने लैंगिक अत्याचार देखील केल्याची तक्रार बीड तिने दिली आहे मात्र यात आता या पिढीची आर्थिक फसवणूक देखील केल्याची माहिती समोर आली आहे... या संपूर्ण प्रकरणाची देखील चौकशी केली पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे... हे नेमके घेतलेले पैसे कशासाठी वापरले याचा कुठे ताळमेळ होता याची देखील चौकशी केली अस पाहिजे... त्याचबरोबर मल्टिनॅशनल कंपनीत केलेल्या धर्मांतराच्या प्रकरणात असलेल्या सगळ्या आरोपींचे अकाउंट चेक केले पाहिजे त्यांच्या कुटुंबाचे देखील अकाउंट चेक केले पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे... मल्टिनॅशनल कंपनीतील कथित धर्मांतर आणि महिला शोषण प्रकरणाचा तपास आता अधिक वेगाने पुढे जात आहे. या प्रकरणातील संशयित निदा खान तब्बल ४० दिवस फरार होती. या काळात तिला छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय दिल्याचा आरोप एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याच्यावर करण्यात आला आहे.याच प्रकरणी एसआयटीने मतीन पटेलला चौकशीसाठी समन्स बजावले असून तो लवकरच नाशिकमध्ये चौकशीसाठी हजर राहण्याची शक्यता आहे...एसआयटीने न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रातही मतीन पटेलचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत.तपास यंत्रणा आता मतीन पटेल आणि निदा खान यांच्यातील संबंध, संपर्क आणि फरारी काळातील हालचालींची सखोल चौकशी करणार आहे. तसेच निदाला आश्रय देण्यासाठी कोणाचा दबाव होता का? याचाही तपास केला जाणार आहे.... मल्टिनॅशनल कंपनीतील धर्मांतर आणि शोषण प्रकरणात आता राजकीय आणि आर्थिक कनेक्शनही समोर येऊ लागल्याने या तपासाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मतीन पटेलच्या चौकशीनंतर आणखी कोणती मोठी माहिती समोर येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.0
0
Report
शिरोडा केरवाड़ी में तेज हवाओं से मछुआरी नाव डूब, राजन सारंग लापता
Oras Bk., Maharashtra:अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने शिरोडा - केरवाडी येथून समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेली बोट बुडाली. यात केरवाडी येथीलच राजन सारंग (४६) हे बेपत्ता झाले आहेत. तोड होडीचे मालक प्रकाश सारंग व त्यांचा मुलगा दाजी सारंग यांना वाचवण्यात दुसर्या होडीला यश आले आहे. शिरोडा केरवाडी येथून नेहमीप्रमाणे एकाच कुटुंबातील प्रकाश सारंग, त्यांचा मुलगा दाजी व त्यांचा भाऊ राजन सारंग हे मच्छिमारीसाठी समुद्रात गेले होते. यावेळी अचानक झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही मच्छिमारी बोट बुडाली. यात प्रकाश सारंग व त्यांचा मुलगा बोटीवर असणाऱ्या ऑइल टँकर मध्ये राहिले. यानंतर त्यांना वाचवण्यात दुसऱ्या बोटीला यश आले. मात्र राजन सारंग हे समुद्रात बुडाले. दरम्यान राजन सारंग यांचा समुद्रात शोध घेणे सूरु असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. केरवाडी येथील मच्छिमार सीसायटीचे चेअरमन काशिनाथ नार्वेकर यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.0
0
Report
देवेन्द्र फडणवीस ने गोदाम लॉजिस्टिक पार्क पर खुशी जताई; राहुल गांधी के बयान पर प्रतिक्रिया
Nagpur, Maharashtra:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाईट गोदाम लॉजिस्टिक पार्कमध्ये शंभर एकरांवर ही सुविधा उभारण्यात आल्याचा आनंद आहे. ग्लोबल सप्लाय चेनमध्ये अशा प्रकारच्या सुविधा उभारणे आवश्यक आहे. राहुल गांधी यांचे वक्तव्य (केंद्र सरकार वर्षभरात कोसळेल) यावर प्रतिक्रिया देताना— मुंगेरी लाल के हसीन सपने ही मालिका यायची, त्याचाच प्रत्यय राहुल गांधी यांच्या वक्तव्यातून येतो. नाना पटोले यांच्या इंधन टंचाईवरील टीकेबाबत नाना पटोले यांना त्यांच्या पक्षात कोणी गंभीरतेने घेत नाही. त्यांना एक साधा शहराध्यक्षही त्यांचा करता आलेला नाही. आता विनाकारण राग आमच्यावर का काढत आहेत?0
0
Report
Advertisement
