Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ - पुसद मध्ये जन्माष्टमीनिमित्त टाळमृदुंगाच्या गजरात शोभायात्रा.

Aug 26, 2024 16:56:16
Yavatmal, Maharashtra

जन्माष्टमीनिमित्त यवतमाळच्या पुसद शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. डीजेला फाटा देत पारंपारिक पद्धतीने सलग 11 वर्षांपासून या आदर्शवत मिरवणुकीचे आयोजन करण्यात येत आहे. या मिरवणुकीत टाळ व मृदुंगाच्या तालावर गोपाल कृष्ण भगवान की जय असा एकच जयघोष करण्यात आला. या मिरवणुकीत बाल गोपाल वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीकृष्ण जन्मोत्सव समिती पुसद तर्फे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRAFULLA PAWAR
Nov 20, 2025 11:04:02
Chendhare, Alibag, Maharashtra:स्‍लग – माणगावच्‍या ताम्हिणी घाटात भीषण अपघात. मृतांचा आकडा सहावर पोहोचला. लोखंडी बॅरीकेटस तोडून गाडी 1200 फुट खोल दरीत कोसळली. अँकर – पुणे माणगाव मार्गावर ताम्हिणी घाटात झालेल्‍या भीषण अपघातातील मृतांचा आकडा सहावर पोहोचला आहे. हे सर्वजण पुण्‍यातील राहिवाशी असून सोमवारी फिरण्‍यासाठी घराबाहेर पडले होते. माणगाव पोलीसांबरोबरच रोहा, माणगाव येथील बचाव पथके घटनास्‍थळी दाखल झाले आहेत. खोल दरीत कोसळलेली गाडी आणि मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. सोमवारी हे सर्वजण फिरण्‍यासाठी घराबाहेर पडले. दोन दिवस झाले तरी ते घरी परतले नाहीत म्हणून पुण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्‍यात आली. माणगाव पोलीसांनी आज सकाळच्‍या सुमारास शोध मोहीम राबवताना त्‍यांना एका अवघड वळणावर लोखंडी बॅरीकेटस तुटलेल्‍या अवस्थेत आढळून आले. पोलीसांना संशय आल्‍याने त्‍यांनी ड्रोनच्‍या मदतीने शोध घेण्‍याचा प्रयत्न केला तेव्हा 1200 फूट खोल दरीत एक गाडी आणि मृतदेह आढळून आले.
38
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 20, 2025 11:01:02
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - काका मला वाचवा असे म्हणून राजन पाटील हे शरद पवारांच्या पायावर लिन झाले - उमेश पाटील उमेश पाटील बाईट पॉईंटर्स सचिन मुळीक हे आरोपी आहेत उद्या न्यायालयात त्याची चिरफाड होईल आम्ही अर्जाची सत्यप्रत मागणी केली मग का दिली नाही? मी स्वतः जिल्हाध्यक्ष आणि अधिकृत उमेदवारसाठी तहसीलदार याना फोन केला जिल्हाधिकारी यांनी हस्तक्षेप केला म्हणून किमान शौचालय दाखला आणि मतदार यादीची प्रत मिळाली राजन पाटील म्हणाले होते की मी अर्जावर हरकत घेणार नाही नगराध्यक्ष पदासाठी डमी उमेदवार त्यांनी भरायला लावला तो अर्ज केवळ उज्वला थिटे यांच्या अर्जला आक्षेप घेण्यासाठी दाखल करण्यात आला होता सरस्वती शिंदे यांचा अर्ज वैध ठरला होता मग त्यांनी अर्ज माघार घेण्याआधीच जल्लोष का केला? सगळे बेधुंद झाले होते, गाव आनंदात बुडाले होते हे सगळं शडयंत्र भाग होता काका मला वाचवा असे म्हणून राजन पाटील हे शरद पवारांच्या पायावर लिन झालेत त्यांना माहिती अजित दादांचा कोप झालं तर काय होईल माफ करायचं की नाही आमच्याकडे नेत्यांचा प्रश्न आहे पण आम्ही मात्र माफ करणार नाही
93
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 20, 2025 10:54:05
Nagpur, Maharashtra:नागपूर जिल्ह्यातील काँग्रेस मधील अंतर्गत कलह शिगेला पोहचला आहे....वाडी मध्ये शेकडो काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे राजीनामे दिलेय.. वाडी नगर परिषदेच्या निवडणुकीत पक्षाची उमेदवारी दुसऱ्या पक्षातील नेत्यांना आणि पक्षाशी एकनिष्ठ नसलेल्यांना विकल्याचा केला गंभीर आरोप.. काँग्रेस पक्षाच्या विरोधात केली जोरदार घोषणाबाजी केली.नागपूर जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षात मोठी नाराजी दिसून येत आहे.. नागपूर जिल्ह्यातील वाडी नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील नेत्याला काँग्रेस च्या चिन्हावर उमेदवारी देण्यात आल्यामुळे वाडी मधील तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष यासह अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांचे राजीनामे पक्षाला पाठवले आहे... अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाच्या पदावरून तसेच पक्षाच्या सदस्यत्वाचा त्याग करत असल्याचे जाहीर केले आहे... काँग्रेसच्या काही नेत्यांनी (सुनील केदार यांच्या गटातील नेत्यांनी) वाडी सह बुटीबोरी डिगडोह या ठिकाणी उमेदवारी देताना घोळ केले.. एबी फॉर्म आपल्याच पसंतीच्या किंवा आपल्याच गटातील लोकांना दिले.. तर काही ठिकाणी दुसऱ्या पक्षातील लोकांना काँग्रेसची उमेदवारी बहाल केली.. त्यामुळे अनेक प्रामाणिक आणि अनेक दशकांपासून काँग्रेससाठी मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याचा आरोप वाडीतील राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.. एवढेच नाही तर वाडीसह नागपूर जिल्ह्यात काँग्रेसची उमेदवारी विकण्यात आल्याचा गंभीर आरोपही राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे...
101
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 20, 2025 10:51:11
Amravati, Maharashtra:यापूर्वी भाजप पक्ष वोट चोरी करत होता मात्र आता भाजप उमेदवारांचीही चोरी करत आहे; हर्षवर्धन सपकाळ यांची मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका या सर्व कटाचे मुख्य आका हे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – हर्षवर्धन सपकाळ चिखलदरा नगरपरिसदेच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारसह नवन्ना सदस्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कोलोती हे बिनविरोध निवडून आले आहेत. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार टीका केली असून यापूर्वी भाजप पक्ष वोट चोरी करत होता मात्र आता भाजप उमेदवारांचीही चोरी करत असल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. हा मत चोरीचा दुसरा भाग असून भाजपने आता उमेदवार चोरी सुरू केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात फ्री अँड फेअर इलेक्शन होत नाही. हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं अशोभनीय काम आहे त्याचा आम्ही धिक्कार करतो. मुख्यमंत्र्याचे एक मामी भाऊ धर्मादाय आयुक्त आहे ते जैन बोर्डिंग ची जमीन विकत आहे तर दुसरे मामेभाऊ चिखलदऱ्याची जमीन घेण्याकरिता निवडून आणत. आहे ही मुख्यमंत्र्याची गुंडशाही महाराष्ट्र खपवून घेणार नाही असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. काँग्रेस उमेदवाराला धमक्या दिल्या जात आहे किडन्याप केला जात आहे दडपशाही आणल्या जात आहे आज ही वेळ काँग्रेसवर आहे उद्या सामान्य माणसाच्याही घरात घुसायला हे मागेपुढे पाहणार नाही तसेच मुख्यमंत्री लोकशाहीची थट्टा करत असून महाराष्ट्रात हुकूमशाही आणायला पहात आहे. या सर्व कटाचे मुख्य आका हे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचंही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. भाजप हा पक्ष मुख्यमंत्र्यांनी राणा दाम्पत्याच्या खुट्याला बांधली आहे; यशोमती ठाकूर यांचे मुख्यमंत्र्यांवर टीका दरम्यान या संपूर्ण प्रकारामध्ये आमदार रवी राणा यांनी मध्यस्थी केली असून त्यांच्या मदतीला मोठे यश आला आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणा यांना फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत यावर यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली असून भाजप हा पक्ष मुख्यमंत्र्यांनी राणा दाम्पत्याच्या खूट्याला बांधली असल्याची टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे. मुख्यमंत्री हे दमदाटी करत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असण्याचा दुरुपयोग करत तिथल्या लोकांना दमदाटी करत आहे आल्हाद कलोति यांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांना पैसे दिले तसेच जीवे मारायच्या धमक्या दिल्या व त्यांना फॉर्म मागे घ्यायला लावले. मुख्यमंत्र्यांचे लक्ष चिखलदऱ्यातील जमिनीवर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या राज्याच्या इतिहासात सर्वात क्रूर मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातील असही यशोमती ठाकूर म्हणाले आहे. भाजपमध्ये भाजपचे कमी व भाड्याचे आणलेले उमेदवार जास्त आहे. भाजपचे लोक १०० टक्के घाबरलेल्या अवस्थेत असल्यामुळे या प्रकारे ते दमदाटी करत असून चिखलदरा नगरपरिषदेत अल्हाद करोती हे शंभर टक्के पडले असते व यामुळे मुख्यमंत्र्यांची नाचक्की झाली असती म्हणून मुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड भेद या सर्वांचा उपयोग करून आल्हाद करोती यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांना फॉर्म मागे घ्यायला लावले अशी देखील टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे दरम्यान मुख्यमंत्र्यांनी भाजप पक्ष राणा दांपत्याच्या खूट्याला बांधला असल्याचं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.
75
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 20, 2025 10:49:53
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला असा दावा करत शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून गेल्या चार दिवसांपासून वैजापूर तहसील कार्यासमोर उपोषण सुरू आहे. दरम्यान प्रशासनाने अद्याप या प्रकरणात कुठलाही तोडगा न काढल्याने शेतकरी आक्रमक झाले असून जल कुंभावर चढले आहेत; दरम्यान जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही पाण्याच्या टाकी वरून खाली उतरणार नाही, आमचा जीव गेला तरी चालेल अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांकडून घेण्यात आली आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना 6000 हेक्टरी तर पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 17000 हेक्टरी तेही एकाच पिकासाठी असा अन्याय का असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.
94
comment0
Report
SKShubham Koli
Nov 20, 2025 10:46:11
Thane, Maharashtra:मुंब्रा में खेल मैदान नहीं होने के कारण चार दिनों से मुंब्रा कौसा स्पोर्ट्स कौन्सलिंग की ओर से उपोषण किया जा रहा था जिसे आज राष्ट्रवादी अजित पवार गट के ठाणे जिलाअध्यक्ष नजीब मुल्ला की मौजूदगी में शांत किया गया। मुंब्रा के मल nisaran प्रकल्प के पास पालिका के आरक्षित भूखंड को क्रिकेट प्रेमियों के लिए आज मुक्त किया गया। नजीब मुल्ला ने पालिका प्रशासन के अधिकारियों के साथ मैदान की जांच की। हालांकि एमसीए के लिए भूखंड और पालिका से मिली जगह एमसीए क्रिकेट प्रशिक्षण के लिए दी गई, जिससे क्रिकेट प्रेमी नाराज़ थे। भविष्य में मैदान पर होने वाले कार्यों पर भी चर्चा हुई और आश्वासन दिया गया कि पांच एकड़ क्षेत्र को बच्चों द्वारा खेलने के लिए सुरक्षित रखा जाएगा।
77
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 20, 2025 10:31:55
164
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 20, 2025 10:22:01
Chandrapur, Maharashtra:नगर परिषद स्थापनेनंतर पहिल्यांदाच होत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस या औद्योगिक नगरीतील नगरपरिषद निवडणुकीत भाजप- काँग्रेस समोरासमोर , थेट लढतीमुळे या क्षेत्रात राजकीय वातावरण तापले अँकर:--2020 साली ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. मात्र सर्वपक्षीय नेत्यांनी यावर बहिष्कार घातला. अखेर राज्य सरकारला घुग्गुस या औद्योगिक नगरीत नगर परिषद स्थापनेची घोषणा करावी लागली. लगेच नगर परिषदेवर प्रशासक नेमण्यात आले आणि कारभार सुरू झाला. त्यानंतर कोविड आणि लांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका यामुळे स्थापनेनंतर पहिल्यांदाच इथे निवडणूक होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस या औद्योगिक नगरीत कोळसा खाणी, ऊर्जा- सिमेंट प्रकल्प आहेत. प्रदूषणाची राजधानी असलेल्या या शहरात नगरपरिषद निवडणुकीत भाजप- काँग्रेस समोरासमोर आहेत. 33 हजार मतदार 22 नगरसेवक निवडणार असून नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिला असे राखीव आहे. कोळसा आणि सिमेंट कामगार बहुल असलेल्या या शहरात दीर्घकाळ ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता राहिली आहे. थेट लढतीमुळे या क्षेत्रात राजकीय वातावरण तापले आहे. दोन्हीकडून विकासाचे दावे करण्यात येत आहेत. बाईट १) शारदा दुर्गम, भाजप उमेदवार बाईट २) दीप्ती सोनटक्के, काँग्रेस उमेदवार आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
135
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 20, 2025 10:05:37
169
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 20, 2025 10:02:06
Akola, Maharashtra:शासनाच्या धोरणांमुळे आणि सीसीआयच्या मर्यादित खरेदीमुळे शेतकऱ्यांना योग्य दर न मिळाल्याने प्रहार जनशक्ती पक्षातर्फे अकोट ते अकोला हे 50 किलोमीटर पायदळ कापूस दिंडी आयोजित करण्यात आली आहे. यंदा कापसातील उत्पादन घट, वाढती खर्चिक परिस्थिती आणि बाजारभावातील घसरलेली पातळी यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. शेतकऱ्यांना एकरी 15 क्विंटल मिळत असून शासन केवळ 5.6 क्विंटल खरेदी करत आहे ही मर्यादा 11 क्विंटल पर्यंत करावी या मागणीसाठी ही पायदळ वारी काढण्यात आली. सीसीआयने खरेदीसाठी दिलेल्या नियमांमुळे शेतकऱ्यांचे कापूस विक्रीप्रक्रियेवर निर्बंध आले आहेत. या अन्यायाविरोधात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष कुलदीप पाटील वसु यांच्या नेतृत्वाखाली ही दिंडी काढण्यात आली आहे.
108
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 20, 2025 09:54:32
Kalyan, Maharashtra:डोंबिवली ते ठाणे लोकल मध्ये मराठी–हिंदी वादातून मराठी विद्यार्थ्याला मारहाण, तणावातून विद्यार्थ्याची आत्महत्या मराठी बोलता येत नाही का ? मराठी बोलायची लाज वाटते का ? असे बोलत चार ते पाच तरुणांनी केली मराठी विद्यार्थ्याला होती मारहाण. मानसिक तणावातून १९ वर्षीय मराठी विद्यार्थ्याने गळफास घेत जीवन संपवलं. लोकल ट्रेन मध्ये चढताना हिंदीत बोलला त्यावरून तुला मराठी बोलता येत नाही का ? यावरून वाद झाला . काही तरुणांनी लोकल प्रवासात झालेल्या वादातून १९ वर्षीय विद्यार्थ्याला मराठी बोलता येत नाही का ? मराठी बोलण्याची लाज वाटते का ? असे बोलत यावरून मारहाण केली. डोंबिवली ते ठाणे दरम्यान ही घटना घडली. झालेल्या मारहाणीमुळे हा विद्यार्थी मानसिक तणावात होता . याच तणावातून या विद्यार्थ्याने कल्याण मध्ये आपल्या घरी येऊन गळफास घेत आत्महत्या केली . अर्णव खैरे असे या मयत विद्यार्थ्याचे नाव आहे .या प्रकरणी कोलशेवाडी पोलीस ठाण्यात अर्णव चे वडील जितेंद्र यांनी जबाब नोंदवला असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत .दरम्यान लोकल मधली झुंडशाही ,मराठी हिंदि वाद कोणत्या टोकाला पोहचला हेच या घटनेवरून दिसून येत आहे .पोलिसांनी अर्णव याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी अर्णव च्या कुटुंबीयांनी केली आहे वडील जितेंद्र खैरे यांच्या तक्रारी नुसार कल्याण पूर्व तिसगाव नाका येथील सहजिवन रेसिडेन्सीमध्ये राहणाऱ्या अर्णव खैरे हा मुलुंडच्या केळकर कॉलेजमध्ये सायन्स शाखेत शिकत होता. मंगळवार, १८ नोव्हेंबर रोजी तो नेहमीप्रमाणे कल्याणहून लोकलने कॉलेजकडे निघाला होता. ट्रेनमध्ये गर्दी असल्याने गर्दीत अर्णव याने हिंदीत थोडा आगे हो असे बोलला . इतक्यात आजूबाजूच्या चार ते पाच जणांच्या टोळयांनी तु मराठी बोलात येत नाही का ? अशी विचारणा करत तु मराठी बोलण्याची लाज वाटते का असे म्हणत त्याला ठोशांनी बुक्क्यांनी मारहाण केली . या घटनेने घाबरलेला अर्णव ठाणे स्टेशनला उतरला आणि मागील लोकलने मुलुंडला गेला. त्याने प्रॅक्टिकल पूर्ण केले पण मानसिक तणावामुळे कॉलेज अर्धवट सोडून दुपारी घरात परतला. याच दरम्यान अर्णवने वडिलांना फोन करून आपली भीती व्यक्त केली. सायंकाळी ७च्या सुमारास वडील घरी आले असता घराचा दरवाजा आतून बंद होता. शेजाऱ्यांच्या मदतीने दार उघडण्यात आले. बेडरूममध्ये अर्णवने ओढणीने गळफास घेतल्याचे आढळले. तातडीने रुख्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्याला रात्री ९:०५ वा. मृत घोषित केले यानंतर अर्णव याच्या वडिलांनी कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी जवाब नोंदवला असून पोलिसांनी नोंद करत वडिलांच्या जबाबानुसार तपास सुरू केला आहे मात्र या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. वडिलांच्या सांगण्यावरून कोळसेवाडी पोलीस स्टेशन मध्ये आकस्मित मृत्यू म्हणून गुन्हा दाखल केला असून पुढील तपास महिला पोलीस करत आहे...
145
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 20, 2025 09:32:21
Ratnagiri, Maharashtra:पक्षांतर्गत कारवाईच्या इशारानंतर खेडमध्ये वैभव खेडेकर यांची नरमाईची भूमिका... महायुती जाहीर झाल्यानंतरही पत्नी वैभवी खेडेकर यांच्यासह नगरसेवक पदासाठी अर्ज केलेल्या वैभव खेडेकर यांचा यु टर्न. भाजपला कमी जागा दिल्यामुळे खेडमधील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती नाराजी. भाजपमध्ये जाऊन वैभव खेडेकर यांचे हात रिकामेच...... रत्नागिरीतील महायुतीच्या मेळाव्याच्या नंतर वैभव खेडेकर यांची अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू. योगेश कदम विरुद्ध वैभव खेडेकर यांच्या शित युद्धात योगेश कदम पुन्हा ठरले वरचढ... अर्ज मागे घेण्याची उद्याची शेवटची तारीख असताना वैभव खेडेकर आजच घेणार माघार. वैभव खेडेकर यांनी तलवार केली म्यान, शिवसेनेच्या कार्यालयात जाऊन रामदास कदम आणि योगेश कदम यांची घेतली भेट रामदास कदम यांनी यांनी केलं vaibhav खेडेकर यांचं स्वागत
155
comment0
Report
Advertisement
Back to top