icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

उद्योग मंत्री उदय सामंत बोले: मराठी भाषे का सम्मान जरूरी, किसी की बात नहीं चलेगी

Nanded-Waghala, Maharashtra:- जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी काय भाषण केले ते मला माहिती नाही. पंरतू प्रत्येकाला इच्छुक राहण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला संघटना बांधण्याचा अधिकार आहे. पक्ष संघटना बांधताना स्वतःची महत्त्वकांक्षा प्रकट करण्याचा अधिकार आहे. त्याच भावनेतून गुलाबराव पाटील बोलले असतील तर त्यात वावग काय आहे. - मराठी भाषा शक्ती: याबाबत काही लोक राजकारण करत आहेत. मी स्वतः मराठी भाषेचा मंत्री आहे. तसा जिल्हाधिकारी होताना, मुख्य कार्यकारी अधिकारी होताना, पोलीस अधीक्षक होताना, मराठीचा पेपर द्यावाच लागतो. कुणावर जबरदस्ती करून हे केलं जात नाही. जे रिक्षावाले, टॅSSIवाले आहेत त्यांना प्रमाणिक मराठी बोलता आली पाहिजे ही भूमिका परिवहन मंडळाची असेल तर त्याच राजकारण करु नये. त्यांनी स्वतःदेखील शिकवायला तयार आहेत. जो महाराष्ट्रात राहतो त्याला मराठी आली पाहिजे असं जर प्रताप सरनाईक असतील तर त्याच्यात वावग काय आहे. परंतु एक महत्त्वाची भूमिका अशी आहे की जो गैरसमज मराठी लोकांमध्ये पसरवला जातोय, अशा पद्धतीची शिवसेनेची आणि परिवहन मंत्र्यांची भूमिका नाही. फक्त त्यांनी शिकावं ही जर आग्रहाची भूमिका असेल पण त्यात कोणी वावग वाटून घेऊ नये. - भागेश्वर बाबा: छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, यांच्याबद्दल कोणी जरी वावग बोलल, मोठ्यातली मोठी व्यक्ती वावग बोलली तर ते योग्य ठरत नाही. - श्रीमंत कोकाटे: कोण काय बोलल, याच्यावर मी प्रतिक्रिया देणे याला अर्थ नाही. कोकाटे काय बोलले. बाकी काय बोलले. बागेश्वर काय बोलले हे मी ऐकले नाही. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल कोणीही वावग बोलू नये ही शिवसेनेची भूमिका आहे. - मुखेड एमआयडीसी मंजुरी: नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी एमआयडीसी होते, अनेक माझे सहकारी यासाठी प्रयत्नशील आहेत. मुखेड मध्ये आम्ही नोटिफिकेशन काढलेल आहे. यानंतर पुढील प्रक्रिया होणार आहे. - नांदेड मध्ये हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प: याबाबत मला देखील संभ्रम आहे. मला आता नांदेडला आल्यानंतर कळालं की इथे हेलिकॉप्टरचे पार्ट्स बनणार आहेत. मला आता Hemant Patil म्हणाले तुम्ही काही हेलिकॉप्टर बनवणार का एमआयडीसी मार्फत. आतापर्यंत नांदेडचा विमानतळ एमआयडीसी कडे आहे हे मला माहीत होतं. आता ते वापरायला आम्ही महाराष्ट्र विमान प्राधिकरणाकडे दिलं आहे. परंतु हेलिकॉप्टरचा कारखाना कधी येणार आहे, कसा येणार आहे याची पुर्ण माहिती घेईन, पुढच्या वेळी नांदेडला आल्यावर त्याचं स्पष्टीकरण करेन. - दावोसMidдел करारात चार हजार कोटी करार आहे असं अशोक चव्हाण म्हणाले: अशोक चव्हाण साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत, मार्गदर्शक आहेत, त्याच्याशी चर्चा करेन आणि त्यानंतर स्पष्टीकरण देईन. - ऑपरेशन टायगर, खासदार संजय जाधव येणार: आता सामूहिक विवाह सोहळ्याला आलेलो आहे, राजकीय चर्चा न केलेली बरी, विवाह सोहळ्याला आलो राजकारणावर चर्चा करणे योग्य नाही, राजकारणावर बोलायचं नाही असं ठरवलं.
0
0
Report

विदर्भ में अप्रैल से रिकॉर्ड गर्मी, तापमान 45°C के पार पहुंचा

Akola, Maharashtra:तर विदर्भात उष्णतेचा अक्षरशः कहर पाहायला मिळतोय. एप्रिल महिन्यातच सूर्य आग ओकत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. अकोला, अमरावती आणि वर्धा या तीन जिल्ह्यांमध्ये तापमानाने 45 अंशांचा टप्पा ओलांडला असून, यंदाच्या मोसमातील आतापर्यंतचा हा उच्चांक ठरला आहे. वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे. काल अकोला आणि अमरावती येथे तब्बल 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर वर्ध्यात पारा 45.5 अंशांवर पोहोचला. याशिवाय भंडारा, चंद्रपूर आणि नागपूरमध्येही तापमान 44 अंशांच्या पुढे गेले आहे. गडचिरोली आणि गोंदिया येथे 43.6 अंश, तर वाशीम आणि यवतमाळमध्ये 43 अंश तापमानाची नोंद झाली आहे. सर्वात कमी बुलढाणा येथे 42.2 यांच्या तापमानाची नोंद झाली असली तरीही हा तापमान बुलढाणा करिता या ऋतूतला सर्वाधिक तापमान आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक काम असल्यास दुपारी 12 ते 4 घराबाहेर निघण्याची सूचना जरी दिली असली तरीही नाईलाजाने दैनंदिन कामासाठी नागरिकांना घराबाहेर पळावे लागत आहे. विदर्भात आता नागरिक घराबाहेर पडताना मोठी काळजी घेत आहे. एप्रिल महिन्यातच तापमानाने विक्रमी पातळी गाठल्याने विदर्भातील नागरिकांना उष्णतेचे तीव्र चटके बसत आहेत.दुपारच्या वेळेत अत्यावश्यक कामांशिवाय नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. रस्ते ओस पडल्याचे चित्र अनेक शहरांमध्ये पाहायला मिळत आहे.दरम्यान, उष्माघाताचा धोका वाढल्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भरपूर पाणी पिणे, उन्हात बाहेर पडताना डोक्यावर संरक्षण ठेवणे आणि दुपारच्या कडक उन्हापासून दूर राहणे, असे उपाय सांगितले जात आहेत. मात्र पोटाची खाणगी भरण्यासाठी अनेकांना घराबाहेर पडावे लागत आहे, दुपारच्या वेळेत नागरिकांची गर्दी नसल्याने व्यावसाकीयांना सुद्धा याचा फटका बसत आहे. एकीकडे वाढतं तापमान आणि दुसरीकडे उष्माघाताचा धोका, यामुळे विदर्भात सध्या नागरिकांचे हाल होत आहेत. पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विदर्भातील या उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं असून, नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. जयेश जगड, झी मिडिया, अकोला.
0
0
Report

जालना में मराठी भाषा मुद्दे पर मनसे का आक्रामक प्रदर्शन

Jalna, Maharashtra:जालना | शेळीला सदावर्तेंचा फोटो लावत, मनसेचे जोडे मारो आंदोलन गुणरत्न सदावर्ते जालन्यात आला तर त्याची गाडी फोडू मराठी भाषा मुद्द्यावरून मनसे आक्रमक जालना शहरात मनसेच्या वतीने आंदोलन अँकर- जालन्यात शेळीला सदावर्तेंचा फोटो लावत, मनसेचे जोडे मारो आंदोलन केलंय.. मुंबईसह राज्यभरात मराठा भाषेचा मुद्दा चांगलाच पेटलाय.. त्यावरून अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी मराठी भाषेला विरोध करत राज ठाकरेंवर टीका केली होती. त्यावरून ममसेनं आक्रमक भूमिका घेत सदावर्तेंचा जाहीर निषेध केलाय. जालन्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी शेळीला सदावर्तेंचा फोटो लावत जोडे मारत निषेध व्यक्त केलाय. शिवाय सदावर्ते जालन्यात आल्यास त्याची गाडी फोडून टाकू असा इशाराही दिलाय.
0
0
Report
Advertisement

निलंगा शहर में कचरे का राज, नागरिक परेशान, सार्वजनिक शौचालय बदहाल

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... निलंगा शहरात घाणीचं साम्राज्य; नागरिक त्रस्त....कचऱ्याच्या ढिगांमुळे दुर्गंधी, आरोग्याचा प्रश्न गंभीर....सार्वजनिक शौचालयांची दयनीय अवस्था उघड.... निलंगा शहरात मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाल्याचं चित्र समोर आलं आहे. शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. तर नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयांचीही दयनीय अवस्था पाहायला मिळते आहे. जागोजागी कचरा आणि घाणीचं साम्राज्य पसरल्याने नागरिक त्रस्त झाले असून, नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातो. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन नागरीकाशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी....
0
0
Report

शिंदे गट ने भाजपा नगरसेवकों के दावों की पोल खोली—वीडियो से साफ हुआ फर्क

Navi Mumbai, Maharashtra:शिवसेना शिंदे गटाने नवीMumbaiतील भाजपा नगरसेवकांच्या दाव्याची पोलखोल केलीय. झोपडपट्टीमध्ये क्लस्टर राबविण्याची मागणी शिवसेना शिंदे गट करत असताना झोपडपट्टी वासियांची 500 चौरस मीटर पर्यंतची घरे मुख्यमंत्र्यांनी अधिकृत केल्या असल्याचा दावा भाजपा नगरसेवकांनी केला होता. प्रत्यक्षात हा निर्णय मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेश वगळून लागू होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली असताना भाजपा नगरसेवक हा निर्णय नवी मुंबईतही लागू होणार असल्याची बतावणी थेट सभागृहात करत होते. मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा आणि भाजपा नगरसेवकांनी केलेला दावा यात तफावत असल्याचा व्हिडिओच पत्रकार परिषदेत दाखवत विरोधीपक्ष नेते विजय चौगुले यांनी भाजपा नगरसेवकांच्या फसव्या दाव्याची पोलखोल केलीय.
0
0
Report

सोलापुर के केला किसानों को सही दाम नहीं मिल रहे, सरकार से मदद की मांग

Solapur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी हा मोठ्या संकटात सापडलाय. सीना नदीचा महापूर, अवकाळी पाऊस, वादळ वारा अशा अनेक संकटावर मात करून केळी बाग वाचवली मात्र आता केळी काढलेला आल्यानंतर योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेगाव येथील शेतकरी बालाजी विठ्ठल पवार यांनी 3 एकर क्षेत्रामध्ये केळीचे बाग उभे केले आहे आता केळी काढणे ला आले असून योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येतेय. तीन एकर केळीसाठी तब्बल सहा लाख रुपये खर्च झाले मात्र झालेला खर्च देखील निघत नसल्याची परिस्थिती निर्माण झालीय. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांवर अशा पद्धतीची वेळ आल्याने सरकारने योग्य भाव मिळवून देण्याची मागणी हातात करण्यात येतेय.
0
0
Report
Advertisement

नवी मुंबई कांग्रेस ने धिरेंद्रशास्त्री के अपमान के खिलाफ जोडे मारो आंदोलन शुरू किया

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई काँग्रेसतर्फे वाशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या धिरेंद्रशास्त्री विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. भाजपा और आरएसएस धिरेंद्रशास्त्रीला 1 कोटी रुपये देऊन महाराष्ट्रात संतांची बदनामी करण्यासाठी बोलवत असतात असा गंभीर आरोप करत यापुढे धिरेंद्रशास्त्री महाराष्ट्रात आल्यास त्याची चपलेने धिंड काडू असा थेट इशारा काँग्रेस तर्फे देण्यात आलाय. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी धिरेंद्रशास्त्री यांच्या फोटोला जोडे मारत निषेध व्यक्त केलाय.
0
0
Report

EL-Nino के कारण मोरबे डैम में पानी संकट, नागरिकों से जल संरक्षण की अपील

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात 82.557 दश लक्ष घन मीटर इतका म्हणजेच 43.24टक्के इतका पाणी साठा उपलब्ध आहे. त्यापैकी 1 महिन्यांचा राखीव साठा वगळता प्रत्यक्ष 27.22टक्के इतका पाणी साठा उपलब्ध असून शहराची दैनंदिन पाणी पुरवठयाची गरज लक्षात घेता 7 ऑगस्ट पर्यंत पुरू शकते इतका साठा उपलब्ध आहे. सन 2026 मध्ये ‘एल-निनो’ या जागतिक हवामान बदलामुळे भारतातील मोसमी वाऱ्यावर परिणाम होऊन या वर्षी सरासरी पावसाचे प्रमाण 92% इतके राहणार असल्याचे अंदाज असून यावर्षी मोरबे धरण भरण्याची शक्यता खूपच कमी आहे. या पाश्वभूमीवर नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन मनापा आयुक्त कैलास शिंदे यांनी केलेय。
0
0
Report
Advertisement

सांगली में विधानपरिषद के लिए BJP किसे देगी मौका? संजय पाटील का नाम चर्चे में

Sangli, Maharashtra:राष्ट्रवादीच्या संजयकाकांचं हे नाव चर्चेत.. विधान परिषदेसाठी सांगली जिल्ह्यातून कोणाला संधी मिळणारी याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांना भाजपातून संधी मिळेल अशी चर्चा सुरू झालेली आहे,तर दुसरीकडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक,भाजपाच्या नेत्या नीताताई केळकर,माजी आमदार पृथ्वीराज देशमुख,भाजपाचे पुणे प्रभारी शेखर इनामदार आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम yांची देखील नाव चर्चेत आहे.त्यामुळे भाजपाकडून सांगली जिल्ह्यातल्या कोणत्या नेत्याला संधी देण्यात येणार,याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
0
0
Report

NCERT ने आठवीं कक्षा से मराठा नक्शा हटाने पर राजमाता कल्पनाराजे भोसले ने चिंता जताई

Satara, Maharashtra:सातारा - NCERT कडून मराठा साम्राज्याचा इतिहास दर्शवणारा नकाशा इयत्ता आठवीच्या पुस्तकातून वगळण्यात आला आहे. ही अतिशय गंभीर बाब असून ही धोक्याची घंटा असल्याचे खा. उदयनराजे यांच्या आई राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी सांगितले आहे. बघता बघता छत्रपती शिवाजी महाराजांवर देखील पडदा टाकण्याचं काम केलं जाऊ शकतं आणि तोच प्रयत्न सुरू असल्याचे आणि हे अजिबात चालणार नाही असं देखील त्या म्हणाल्या आहेत. जोपर्यंत सूर्य आणि चंद्र है तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव तेवत राहील असं देखील त्या म्हणाल्या आहेत.
0
0
Report
Advertisement

जयंत पाटील पर निशाना: गोरे ने कहा, विकास देवेंद्र फडणवीस के मार्ग पर

Pandharpur, Maharashtra:पंढरपुरात एका खाजगी कार्यक्रमानिमित्त आल्यानंतर जयकुमार गोरे यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. राज्यातील कुठल्याही देवाला जमीन लागत नाही. फक्त देवा भाऊला लागते. असे विधान जयंत पाटील यांनी केले होते. याचा समाचार जयकुमार गोरे यांनी घेतला. भोंदू मनोहर मामा भोसले यांच्यासोबत अनेक राजकीय पुढाऱ्यांचे फोटो पुढे येत आहेत. याच बाबत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले , कुणी कोणाला भेटणे गैर नाही. मात्र भोंदू बाबाच्या कृत्यात सामील कोण झाले असेल तर हे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले. तसेच , सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीला उजनी धरणातून पाणी सोडले आहे. 30 ऑगस्टपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा विसर्ग राखीव करून ठेवण्यात आला आहे. नियोजन चांगल्या पद्धतीने झाले आहे. सध्या तरी कुठेही टँकरची मागणी दिसत नाही. मात्र पाणी पुरत असल्यामुळे यंदा टँकर लागण्याची शक्यता कमी असल्याचेही ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले.
0
0
Report

डोंबिवली में बुक स्ट्रीट: हजारों पाठकों को मुफ्त किताबें, पढ़ने की नई संस्कृति

Kalyan, Maharashtra:नेहरू रोड–फडके रोड बनला ‘बुक स्ट्रीट सकाळ पासून वाचकांचा महापूर, १० हजारांचा सहभाग—प्रत्येकाला मोफत पुस्तक देत वाचन संस्कृतीला नवे बळ डोंबिवली ही सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाते, आणि आज या नगरीने वाचन संस्कृतीचा एक अनोखा आदर्श देशासमोर ठेवला आहे. पै फ्रेंड्स लायब्ररी आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बुक स्ट्रीट’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळ पासूनच रस्त्यावर पुस्तकांचा अक्षरशः महासागर पाहायला मिळत आहे. जुन्या-नवीन, विविध विषयांवरील हजारो पुस्तके येथे मांडण्यात आली असून, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आपल्या आवडीची पुस्तके शोधण्यात मग्न असल्याचे चित्र आहे.या उपक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे, प्रत्येक वाचनप्रेमीला कोणतेही एक पुस्तक पूर्णपणे विनामूल्य घेण्याची संधी दिली जात आहे. त्यामुळे वाचनाची गोडी वाढवण्याचा आणि पुस्तकांशी नाळ जुळवण्याचा प्रयत्न आयोजकांकडून केला जात आहे.आत्तापर्यंत हजारो नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला असून, यंदा १० हजारांहून अधिक वाचक भेट देतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे‘बुक स्ट्रीट’ हा उपक्रम वाचन संस्कृतीला नवे बळ देणारा ठरत असून, शहरात एक सकारात्मक आणि ज्ञानमय वातावरण निर्माण करत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top