icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

मालवण में बैलगाडा स्पर्धा: 50 बैलगाडियाँ, बकासुर ने खींचा भीड़ का ध्यान

Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील चुनवरे गावात बैलगाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मालवण तालुक्यातील राकेश परब मित्र मंडळाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत राज्यातील तब्बल 50 बैलगाड्या सहभागी झाले होते. स्पर्धेच्या निमित्ताने पालकमंत्री नितेश राणे आमदार निलेश राणे यांनी आयोजनाचे कौतुक करत स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. लाखो बैलगाडा प्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेला बकासुर हा बैल या स्पर्धेत आला होता. बकासुर प्रथमच कोकणात आल्याने त्याला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
0
0
Report

कल्याण नांदिवली मलंग रोड पर ट्रैफिक जाम के कारण कार चालक ने पुलिसकर्मी से मारपीट

Kalyan, Maharashtra:कल्याण नांदीवली मलंग रोडवरील धक्कादायक घटना वाहतूक कोंडीमुळे कार बाजूला घेण्यास सांगितले म्हणून वाहतूक पोलिसाशी वाद घालत मारहाण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कल्याण पूर्वेतील नांदिवली परिसरात मलंग रोड वर वाहतूक कोंडी होत असल्याने रस्त्यावर उभी असलेली कार बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग मनात धरून कारचालक आणि त्याच्या साथीदारांनी वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालत मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। विशेष म्हणजे काही दिवसांत वाहतूक पोलिसांवर हल्ला होण्याची ही तिसरी घटना असल्याने पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। कल्याण पूर्वेतील नांदिवली परिसरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती। यावेळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस कर्मचारी देविदास वाघेरे हे कर्तव्य बजावत होते। रस्त्यावर उभ्या असलेल्या एका कारमुळे वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित कारचालकाला वाघेरे यांनी कार बाजूला घेण्यास सांगितले।मात्र, एवढ्याशा कारणावरून कारचालक संतापला। त्याने आपल्या दोन साथीदारांसह वाहतूक पोलीस देविदास वाघेरे यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात . वाद वाढताच तिघांनी मिळून वाघेरे यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करत मारहाण केली।घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या प्रकरणी पोलीस कर्मचारी देविदास वाघेरे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी संबंधित तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास कोळसेवाडी पोलीस करत आहेत。
0
0
Report
Advertisement

Solapur में प्रॉपर्टी विवाद के चलते एक ही परिवार के तीन लोगों की हत्या, हत्याकांड से जिले में दहशत

Solapur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यात बोरणामणी मध्ये प्रॉपर्टीच्या वादातून तिहेरी हत्याकांडाचा थरार समोर - अडीच कोटींच्या अडीच एकर जमिनीच्या लोभापोटी सख्खा काका बनला haiwan - बोरणामणी गावामध्ये भावाची पत्नी आणि दोन मुलांचा निर्घृण खून - घटनेतील संशयित आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात Anchor - सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरणामणी गावामध्ये संपूर्ण जिल्हा हादरवून सोडणारी घटना घडलीय. 2 मे 2026 शनिवारी पहाटेच्या सुमारास गायत्री सुधाकर मस्के वय - 45, त्यांची मुलगी प्रियंका सुधाकर मस्के वय - 18 आणि मुलगा शिवराय सुधाकर मस्के वय - 16 या तिघांवर तलवारीने वार करून निर्घृण खून करण्यात आलाय. पप्पू मस्के असे आरोपीचे नाव असून यातील मृत गायत्री ही आरोपीची भावजय तर मृत शिवराज व प्रिया हे आरोपीचे पुतणी - पुतणे आहेत. घर, शेत, आणि प्रापंचिक वादातून तिघांचा खून करण्यात आलाय. बोरणामणी गावातील या तिहेरी हत्याकांडाने सोलापूर हादरले आहे. अडीच कोटींच्या अडीच एकर जमिनीच्या लोभापोटी सख्खा काकाच हैवान बनल्याचं पाहायला मिळाल. आरोपींवार कठोरात कठोर कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केलीय. बाईट - नातेवाईक ( महिला ) बोरणामणी गावामध्ये घटना नेमकी कशा पद्धतीने घडली, मस्के कुटुंबाचा प्रॉपर्टीच्या कारणावरून वाद कशा पद्धतीचा होता याबाबतची सविस्तर माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. बाईट - गावकरी ( पुरुष ) सदरची घटना प्रॉपर्टीच्या वादातून घडलीय. तिहेरी हत्या प्रकरणातील पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. बाईट - राहुल देशपांडे ( पोलीस निरीक्षक, तालुका पोलीस ठाणे, सोलापूर ) दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरणामणी गावामध्ये मस्के कुटुंबीयांची एकसारखी सलग तीन घरे शेजारी - शेजारी आहेत. प्रॉपर्टीच्या कारणावर नातेवाईकांमध्ये झालेल्या या रक्तरंजित थरारामुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येतेय. End P2C Abhishek Adegappa, Zee - 24 तास, Solapur
0
0
Report

यवतमाळ की किमया शितल वातीले ने बारहवीं में शतप्रतिशत निकाला, क्या करेगी इंजीनियरिंग?

Yavatmal, Maharashtra:बारावीच्या परीक्षेत शंभर पैकी शंभर टक्के गुण प्राप्त करीत राज्यात अव्वल ठरलेल्या यवतमाळच्या किमया शितल वातीले या विद्यार्थिनीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. किमया ही यवतमाळच्या जगदंबा ज्युनियर सायंन्स कॉलेजची विद्यार्थिनी आहे. किमयाला विज्ञान शाखेतील सर्व विषयांमध्ये पैकीच्या पैकी गुण प्राप्त झाले आहेत. भविष्यात एक निष्णांत इंजिनियर होण्याचे तिचे ध्येय असून विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे, मोबाईल सोशल मीडियापासून दूर राहावे, अभ्यासात येणाऱ्या अडचणी शिक्षकांकडून सोडवून घ्याव्यात, व सातत्याने सराव पेपर द्यावेत असा मोलाचा सल्ला दिला आहे.
0
0
Report

नौ वर्षी बच्ची के साथ दुष्कर्म: आरोपी गिरफ्तार, क्षेत्र में हड़कंप

Khed, Maharashtra:नऊ वर्षांच्या चिमुरडीवर नराधमाचे लैंगिक अत्याचार; दक्षिण महाळुंगे पोलिसांकडून आरोपीला ठोकल्या बेड्या पुणे जिल्ह्याच्या चाकण औद्योगिक क्षेत्रातील निघोजे येथे एका नऊ वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास निघोजे येथील एका इमारतीत घडली. आरोपी तस्लिम मलिक अली(रा. निघोजे, ता. खेड) याने पीडित मुलगी जिन्यावरून जात असताना तिचा हात पकडून तिच्याशी अश्लील चाळे केले. पीडितेने आरडाओरडा करू नये म्हणून आरोपीने तिला "चिल्लाओ मत, किसीको बताना नही" अशी धमकी दिली.या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने आपल्या पालकांना घडला प्रकार सांगितला, त्यानंतर पीडितेच्याआईने तात्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्यावर 'भारतीय न्याय संहिता' (BNS) आणि 'पॉक्सो' (POCSO) कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. चिमुरड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया खेड पुणे...
0
0
Report
Advertisement

भूषण गवई के हाथों चांदूर रेलवे ई-लायब्ररी का उद्घाटन, 300 विद्यार्थियों को लाभ

Amravati, Maharashtra:माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते चांदूर रेल्वेत ई-लायब्ररीचे भव्य उद्घाटन; 300 विद्यार्थ्यांना मिळणार डिजिटल शिक्षणाचा लाभ अँकर :- अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे नगरपरिषदेच्या वतीने साकारण्यात आलेल्या अत्याधुनिक ई-लायब्ररीचे उद्घाटन भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या ई लायब्ररीला न्यायमूर्ती भूषण गवई नाव देण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची नवी दारे खुली झाली आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना घरबसल्या दर्जेदार शिक्षण घेता यावे आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या उद्देशाने ई-लायब्ररीची उभारणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी सुमारे 70 संगणकांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून तब्बल 300 विद्यार्थ्यांना याचा थेट लाभ होणार आहे. ई-लायब्ररीमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास, स्पर्धा परीक्षा तयारी तसेच विविध शैक्षणिक साधनांचा सहज वापर करता येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला मोठी चालना मिळणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला नगराध्यक्ष डॉ. प्रियंका विश्वकर्मा, न्यायाधीश अनिल किलोर, न्यायाधीश प्रविन पाटील, खासदार बळवंत वानखडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. या उपक्रमामुळे चांदूर रेल्वे शहर शिक्षणाच्या डिजिटल दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
0
0
Report

नाशिक की मल्टि नेशनल कंपनी लैंगिक शोषण और धर्मांतरण के मामले में SIT के खुलासे

Nashik, Maharashtra:नाशिकमधील बहुचर्चित मल्टिनॅशनल कंपनीत लैंगिक शोषण आणि कथित धर्मांतरण प्रकरणात आता धक्कादायक खुलासे समोर येण्यास सुरुवात झाली आहे नऊ पीडित महिलांनी पुढे येत केलेल्या तक्रारीनंतर नाशिक पोलिसांनी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाच्या अर्थात SIT च्या चौकशीत अनेक गंभीर धागेदोरे हाती लागल्याची माहिती समोर येत आहे पीडित महिलांना शिरखुरमा आणि थंड पेयांमधून गुंगीकारक पदार्थ देण्यात आल्याचा संशय लैंगिक अत्याचारानंतर मन परिवर्तन करून धर्मांतराचा दबाव टाकल्याचे आरोप आणि सर्वात धक्कादायक म्हणजे आरोपींच्या बँक व्यवहारांमधून काही संशयास्पद फंडिंगचे धागे तपासले जात असल्याची माहिती समोर आलीये... नऊ पीडित महिलांनी बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत असताना आपल्यावर लैंगिक अत्याचार, विनयभंग, मानसिक छळ आणि धर्मांतरासाठी दबाव आणण्यात आल्याची गंभीर तक्रार नाशिक पोलिसांकडे नोंदवली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत नाशिक पोलिस आयुक्तालयाने स्वतंत्र SIT ची स्थापना केली आणि गेल्या काही दिवसांपासून आरोपींची कसून चौकशी सुरू आहे... दरम्यान SIT तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार पीडित महिलांना शिरखुरमा आणि काही थंड पेयांमध्ये गुंगी आणणारे पदार्थ मिसळून आणि ते पदार्थ पाजून महिलेवर अत्याचार केल्याचा असल्याचा संशय व्यक्त केलाय.....या प्रकरणात संशयित आरोपी तौसीफ अत्तार, दानिश शेख, एजाज शेख आणि रझा मेमन यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना पुढील चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे SIT कडून आरोपींचे मोबाईल, लॅपटॉप, चॅट्स, ईमेल्स आणि डिजिटल पुरावे तपासले जात आहेत... तसेच आरोपींची बँक स्टेटमेंट्स आणि KYC दस्तावेजांचीही छाननी सुरू आहे... धर्मांतरासाठी किंवा महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी कोणत्याही संघटनेकडून किंवा बाह्य स्त्रोतांकडून आर्थिक फंडिंग झाले का ? याचा तपास SIT अत्यंत गोपनीय पद्धतीने करत असल्याची माहिती दिली आहे.... दरम्यान या प्रकरणातील महिला संशयित निदा खान हिचा अटकपूर्व जामीन अर्ज देखील न्यायालयाने फेटाळला असून या गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत गंभीर असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे यामुळे येत्या काही दिवसांत SIT च्या चौकशीत आणखी मोठे धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तर आम्ही अटकपूर्व जामीन अर्जासाठी हायकोर्टात जाणार असल्याचं आरोपीचे वकील राहुल कासलीवाल यांनी म्हटलं... या प्रकरणानंतर हिंदुत्ववादी संघटना देखील आक्रमक झालीये.. पीडित महिलांना व मांस खाऊ घालणे त्याचबरोबर काही गुंगी धारक पदार्थ पाजून लैंगिक अत्याचार करणाऱ्यांवर जर आरोपींना कडक शासन करण्यात आले नाही तर बजरंग दल रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे... धर्मांतरासाठी फंडिंग ? शितापयात गुंगीकारक पदार्थांचा वापर ? आणि महिलांना टार्गेट करून रचलेलं संघटित षडयंत्र ? नाशिकच्या मल्टिनॅशनल कंपनीच्या प्रकरणात SIT च्या तपासातून उलगडणारे धागेदोरे अत्यंत धक्कादायक आहेत.. यानंतर अजून चौकशीमध्ये काय काय उघड होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...
0
0
Report
Advertisement

सोलापूर में वर्चस्व की लड़ाई: सड़क पर युवक की हत्या CCTV में कैद

Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग - सोलापुरात एका तरुणाचा कोयत्याने भोसकून, दगडाने ठेचून खून, संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद. सोलापुरात वर्चस्ववादातून भर रस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या. भर रस्त्यात गाडी आडवून कोयता और दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. सुरेश श्रीराम असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. 5 जणांच्या टोळक्याने शहरातील 70 फूट रोडवर ही धक्कादायक प्रकार घडलाय. वराह पालनावरून आरोपी आणि मयतात पूर्वीपासून वाद होता. याशिवाय मृत सुरेश श्रीरामवर एकूण 10 गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. यामध्ये 6 पैकी 5 आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
0
0
Report
Advertisement

नाशिक में बर्ड फ्लू के प्रकोप के बाद कुक्कुटपालक सावधान रहें

Nashik, Maharashtra:नंदुरबारच्या नवापूर भागात बर्ड फ्लू या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर येताच नाशिक जिल्ह्यातील प्रशासन अलर्ट मोडवर. जिल्ह्यातील सर्व कुक्कुटपालक आणि पोल्ट्री फार्म चालकांना सावधनता बाळगण्याचा जिल्हाधिकारीने दिला इशारा. नंदुरबारच्या नवापूर भागात बर्ड फ्ल्यू या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर येताच मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील पोल्ट्री फार्म धारका मध्ये खळबळ उडून भीती निर्माण झाली आहे बर्ड फ्ल्यूचा आपल्याकडे शिरकाव होऊ नये म्हणून पोल्ट्री फार्म धारक सर्व उपाययोजना करताना दिसत असून प्रशासनदेखील अलर्ट मोडवर आले आहे. जिल्ह्यातील सर्व कुक्कुटपालक आणि पोल्ट्री फार्म चालकांना सावधगता बाळगावी अशी सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली असून बर्ड फ्ल्यू रोग कुक्कुट पक्ष्यांमध्ये वेगाने पसरणारा असून त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे कुक्कुटपालन केंद्रांवर कोणतीही लक्षणे दिसल्यास ती तत्काळ गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. पक्ष्यांमध्ये अचानक मृत्यूचे प्रमाण वाढणे, खाद्य आणि पाण्याचे सेवन कमी होणे, सुस्ती किंवा अशक्तपणा येणे अंडी उत्पादनात अचानक घट होणे ही लक्षणे आढळल्यास त्वरित संबंधित यंत्रणेला कळविण्यात यावे असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
0
0
Report

नाशिक में कुंभ रिंग रोड भू-संवर्धन पर किसानों का उग्र प्रदर्शन; प्रशासन पर आरोप

Nashik, Maharashtra:नाशिक मध्ये आगामी कुंभमेळा अनुषंगाने होणाऱ्या रिंगरोड भूसंपादनावरून वाद चिघळला - मातोरी, मुंगसरा येथे मोजणीदरम्यान झालेल्या तणाव वरून शेतकरी आक्रमक - पोलिसांकडून शेतकऱ्यांना घरात घुसून मारहाणीचा स्थानिकांचा आरोप - प्रशासनाच्या विरोधात उद्या शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालय समोर केले जाणार शेतकरी जन आक्रोस आंदोलन - सिंहस्थ कुंभमेळ्या रिंग रोड भूसंपादनाच्या जमीन मोजणीवरून शेतकरी आणि प्रशासनामधील झाला होता वाद - शेतकऱ्यांचा महिला शेतकऱ्यांवरही पोलीस प्रशासनाकडून लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप त्यानंतर शेतकरी आक्रमक - कुंभमेळा मंत्रांवर गंभीर आरोप करत उद्या शेतकऱ्यांकडून केले जाणार आंदोलन - प्रश्नांना मिटल्यास मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top