445001
यवतमाळ - पुसद मध्ये जन्माष्टमीनिमित्त टाळमृदुंगाच्या गजरात शोभायात्रा.
Yavatmal, Maharashtra:जन्माष्टमीनिमित्त यवतमाळच्या पुसद शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. डीजेला फाटा देत पारंपारिक पद्धतीने सलग 11 वर्षांपासून या आदर्शवत मिरवणुकीचे आयोजन करण्यात येत आहे. या मिरवणुकीत टाळ व मृदुंगाच्या तालावर गोपाल कृष्ण भगवान की जय असा एकच जयघोष करण्यात आला. या मिरवणुकीत बाल गोपाल वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीकृष्ण जन्मोत्सव समिती पुसद तर्फे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
अमरावती के जिला स्त्री अस्पताल में वेंटिलेटर विस्फोट, 12 दिन बाद भी रिपोर्ट जारी नहीं; विपक्ष ने सरकार पर आरोप लगाए
Amravati, Maharashtra:जिल्हा स्त्री रुग्णालयातVENTILATOR explosion? Wait. Correction needed. अमरावती जिल्ह्याच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. 12 दिवस झाले तरी शासनाचा अहवाल प्रकाशित न झाल्याने विरोधकांनी टीका केली आहे. आरोग्य आयुक्त संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने आरोग्यमंत्र्यांना आपला अहवाल दिला असल्याचे स्पष्ट झाले; परंतु 12 दिवस पूर्ण होत असताना कारवाई अद्याप झाली नाही. अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे घटनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि चौकशीच्या अहवालाची मागणी केली. माजी मंत्री काँग्रेस नेते डॉ. सुनील देशमुख यांनी विरोधकांची भूमिका मांडली आणि आत्ताच्या काळात मोठे राजकारण पेटू शकते असे मत व्यक्त केले. पालकमंत्री अमरावती येथे असताना अहवाल जाणून घेण्याचा प्रयत्न करावा; विभागाकडून अधिकृत उत्तर अपेक्षित आहे.0
0
Report
वाशीम में ई-केवाईसी अधूरी, राशन लाभ प्रभावित—लाभार्थियों से शीघ्र पूरा करने की मांग
Washim, Maharashtra:अँकर: वाशीम जिल्ह्यात रेशन लाभार्थ्यांच्या ई-केवायसीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. जिल्ह्यातील १० लाख ३३ हजार ३३५ लाभार्थ्यांपैकी तब्बल १ लाख ८४ हजार ४४१ लाभार्थ्यांची ई-केवायसी बाकी आहे. आतापर्यंत ८२.१० टक्के लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. ई-केवायसी न झाल्यास आगामी काळात रेशनचा लाभ मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेशनचा लाभ सुरू ठेवण्यासाठी लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण करून घेणे आवश्यक आहे.0
0
Report
सोलापुर में सूखा गहरा रहा, चार महीने तक चारे की आपूर्ति खतरे में
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाया गडद, केवळ चार महिने पुरेल इतकाच चारा शिल्लक - सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाया गडद, केवळ चार महिने पुरेल इतकाच चारा शिल्लक - जिल्ह्यातील चारा टंचाईच्या संदर्भात जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी घेतली बैठक - उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, आणि अक्कलकोट मध्ये तीन महिने पुरेल इतका तर अन्य तालुक्यांमध्ये चार महिने पुरेल इतका चारा शिल्लक - चारा टंचाई होऊ नये यासाठी दक्षता घेण्याचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे आवाहन - तर चारा टंचाई रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना सुरू असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती0
0
Report
Advertisement
रत्नागिरी- सिंधुदुर्ग के लिए अगले दो दिन भारी बारिश और तेज हवाओं का अलर्ट
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांना दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा.. हवामान खात्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.. या कालावधीत किनारपट्टीवरील 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.. अधिवृष्टीचे संकेत पाहताना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात येत असून जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे..0
0
Report
headline
Latur, Maharashtra:एमपीएससी पेपरफुटीच्या आरोपांवरून राजकीय वाद चिघळला; किल्लारीनंतर आता औशातही गुन्हा दाखल..... एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांची बदनामी केल्याप्रकरणी किल्लारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अल्या नंतर आता औसा पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून भाजपा आमदार अभिमन्यू पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यातील वाद आता पोलिसांपर्यंत पोहोचला आहे. महेबूब शेख यांनी आमदार अभिमन्यू पवार यांचा एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील आरोपीशी थेट संबंध असल्याचा आरोप केला होता. या आरोपांवरून आमदार अभिमन्यू पवार यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत, महेबूब शेख यांच्याविरोधात औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कुठलाही ठोस पुरावा नसताना बिनबुडाचे आरोप करून आमदार अभिमन्यू पवार यांची बदनामी केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीवरून औसा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे एकीकडे एमपीएससी पेपरफुटीचे आरोप... तर दुसरीकडे या आरोपांविरोधात पोलिसांत तक्रारी... आणि आता महेबूब शेख यांच्याविरोधात थेट गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.....0
0
Report
अहिल्यानगर गणेशोत्सव: ध्वनि प्रदूषण पर रोक, लेज़र-प्लाज़्मा लाइट पर बैन
Shirdi, Maharashtra:आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर Ahilyanagar जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत... गणेशोत्सवात लेझर आणि प्लाझ्मा लाईटचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली असून, ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्यात येणार आहे... जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी याबाबतची माहिती दिली आहे... आगामी गणेशोत्सव ध्वनी प्रदूषणमुक्त आणि शांततेत पार पडावा, यासाठी अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे... दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी सर्व संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत... गणेशोत्सवादरम्यान लेझर आणि प्लाझ्मा लाईटचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे... तसेच सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषणाबाबत निश्चित केलेल्या डेसिबल मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर आणि संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत...0
0
Report
Advertisement
साई बाबा मंदिर में कृष्ण जन्माष्टमी पारंपरिक तरीके से स्वागत, भक्तों की भीड़
Shirdi, Maharashtra:श्रद्धा आणी सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या मंदिरातही श्रीकृष्ण जन्माचे पारंपारीक पद्धतीने स्वागत करण्यात आले.. गोकुळाष्टmatik उत्सवानिमित्त साईबाबा समाधी मंदिरात रात्री 10 ते 12 वाजेपर्यंत ह.भ.प. राजेंद्र मांडेवाल यांचे श्रीकृष्णजन्म कीर्तन झाले आणी पाळणा गात श्रीकृष्ण जन्माचे स्वागत करण्यात आलेय.. या जन्मोत्सव सोहळ्यात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, गावकरी आणी मोठ्या संख्येने साईभक्त सामील झाले..0
0
Report
पंढरपूर के विठ्ठल मंदिर में कृष्ण जन्माष्टमी का मध्यरात्रि उत्सव सम्पन्न
Pandharpur, Maharashtra:श्री विठ्ठल हा कृष्णाचा अवतार असल्याने पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये मध्यरात्री कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा साजरा करण्यात आला. कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने मंदिराच्या सभामंडपामध्ये पाळण्यात बांधण्यात आला होता. भजन कीर्तन म्हणत पारंपारिक पद्धतीने यावेळी कृष्णजन्म सोहळा साजरा करण्यात आला. यानंतर विठुरायाला सुंदर असा पोशाख करण्यात आला होता विठुरायाच्या मस्तकावर 110 हात लांब लाल रंगाचे सुंदर पागोटे बांधण्यात आले. चांदीचे काठी असा कृष्ण रुपातला पोशाख देवाला करण्यात आला होता यानंतर उपस्थिताना सुंठवड्याचा प्रसाद वाटण्यात आला0
0
Report
कल्वण के विसापुर आश्रम स्कूल में छात्रों की सेहत गंभीर, 8‑वर्षीय सृष्टी की मौत के बाद 24 से अधिक भर्ती
Nashik, Maharashtra:कळवण ( नाशिक ) : ब्रेकिंग.. - विसापूर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रकृतीचा प्रश्न गंभीर.. - ८ वर्षीय सृष्टी सूर्यवंशीच्या मृत्यूनंतर आणखी २४ विद्यार्थी रुग्णालयात दाखल... - विद्यार्थ्यांना उलटी, तापासह विविध सौम्य लक्षणे.. - केवळ खबरदारीचा उपाय म्हणून कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल.. कळवण तालुक्यातील विसापूर शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। ८ वर्षीय सृष्टी सूर्यवंशीच्या मृत्यूनंतर आश्रमशाळेतील आणखी २४ हून अधिक विद्यार्थ्यांना उलटी, तापासह विविध सौम्य लक्षणे असल्याने केवळ खबरदारीचा उपाय म्हणून कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी रुग्णालयात दाखल विद्यार्थ्यांच्या प्रकृतीचा आढावा घेतला आहे.. दरम्यान, आश्रम शाळेत इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या सृष्टी सूर्यवंशी हिचा मृत्यू झाल्यामुळे आश्रमशाळेतील आरोग्य सुविधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.0
0
Report
Advertisement
सोलापूर ब्रेकिंग: ठेकेदार 7 सितम्बर को जिलाधिकारी कार्यालय के बाहर आंदोलन करेंगे
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : राज्यातील सरकारी कंत्राटदारांचे 7 सप्टेंबरला राज्यभरात आंदोलन - राज्यातील सरकारी कंत्राटदार राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार - राज्यातील कंत्राटदारांच्या झालेल्या आत्महत्या संदर्भात राज्य कंत्राटदार महासंघाचा सरकारला इशारा. - राज्य शासनाकडे राज्यातील कंत्रादारांचे मागील अनेक वर्षांपासून 86 हजार कोटी रुपये बील थकीत आहेत. - त्यामुळे राज्यातील विविध भागात कंत्राटदारांनी आत्महत्या केलीय. - येत्या 7 सप्टेंबर रोजी सर्व शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येणार आहे. - राज्य कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांची माहिती.0
0
Report
वाशीम में पुलिस की भेष में लुटेरों ने लाखों का सोना चुरा लिया
Washim, Maharashtra:वाशीममें पुलिस होने की बतावणी करते नागरिकाला लुटणाऱ्या टोळीचा कारनामा समोर आला है। सोनखास रोड पर एका व्यक्तीला अडवून त्याच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेण्यात आले. हातचलाखीने दागिने बदलून आरोपींनी तब्बल साडेसहा लाख रुपयांचे सोने लंपास केले। तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने परळी वैजनाथ येथील हसन अली शेखु बेग याच्यापर्यंत धागा पोहोचवला। घरझडतीत चोरीची सोन्याची चैन आणि दोन अंगठ्या हस्तगत करण्यात आल्या। मात्र कारवाईची चाहूल लागताच हसन अली फरार झाला असून, पोलिसांकडून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.0
0
Report
गोकुळ दूध संघ के चुनाव: 5332 संस्थाओं की अंतिम मतदाता सूची प्रकाशित
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी निश्चित करण्यात आली आहे. या यादीमध्ये 5332 संस्थाांचा समावेश झाला आहे. निवडणूक कार्यक्रमापूर्वीच प्रत्येक टप्प्यावर चौकशी, सुनावणी आणि न्यायालयीन लढाई झाल्यामुळे नेमक्या किती संस्था पात्र होणार यासंदर्भात संभ्रम होता. पण अखेर मोठ्या न्यायालयीन लढ्यानंतर 5332 संस्था या मतदानासाठी पात्र झाल्या आहेत.0
0
Report
Advertisement
पुणे: दुचाकी से मंगलसूत्र चोरी करने वाले चोर गिरफ्तार; चार लाख रुपये का माल बरामद
Pune, Maharashtra:पुणे दुचाकी वर येऊन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवणाऱ्या चोरट्याला दरोडा आणि वाहन चोरी पथक युनिट दोन ने पाठलाग करून पकडले.. स्वप्निल सतीश आहेर राहणार पापडे वस्ती असं महिलांच्या गळ्यातील चोरी करणाऱ्या चोरट्यांचे नाव .आरोपी आहेर याने वडगाव शेरी मांजरी आणि इतर भागातून रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकी वरून येऊन ओरबाडून न्यायचा याबाबत आरोपी स्वप्निल आहेर यांच्या विरोधात चंदन नगर आणि मांजरी पोलिसात गुन्हे दाखल होते. या चोरीच्या घटनांचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता.. आरोपीची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात. आरोपी स्वप्नील आहेर यांच्याकडून पोलिसांनी तब्बल चार लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.0
0
Report
हिंगोली के जिल्हाधिकारी ने निरीक्षण किया: शिक्षा और स्वास्थ्य सेवाओं का सीधे आकलन
Hingoli, Maharashtra:अँकर - हिंगोली जिल्ह्यातील विकास कामे आणि नागरिकांना उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक व आरोग्य सुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्ह्यातील गोरेगाव सवना येथील आपले सरकार सेवा केंद्र, आयुष्मान केंद्र आणि जिल्हा परिषद शाळांच्या सुरू असलेल्या कामांची स्वतः जाऊन पाहणी केली आहे, जिल्हाधिकाऱ्यांच्या अचानक भेटीमुळे प्रशासकीय यंत्रणेत चांगलीच धावपळ उडाल्याच पाहायला मिळाल आहे.. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळेस नागरिकांशी संवाद देखील साधला आहे नागरिकांना काही अडचणी असतील तर थेट तक्रार नोंदवा तात्काळ कारवाई केली जाईल असा आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना दिले आहे..0
0
Report
अकोला में खरीफ फसलें संकटग्रस्त, सोयाबीन और कपास सूखने लगे
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामावर मोठे संकट ओढावले आहे. मुर्तीजापूर, बाळापूरसह जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये सोयाबीन आणि कपाशी या प्रमुख पिकांनी पावसाअभावी माना खाली टाकल्या आहेत. अनेक भागांमध्ये सोयाबीनचे पीक अक्षरशः सुकून चालले असून, तोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या महिनाभरापासून समाधानकारक पाऊस न झाल्याने जमिनीत ओलावा शिल्लक राहिलेला नाही. परिणामी, सोयाबीन आणि कपाशीच्या पिकांवर त्याचा मोठा विपरीत परिणाम दिसून येत आहे. विशेषतः सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यातच पावसाने दडी मारल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या खर्चातून बियाणे, खते आणि औषधांची फवारणी करत पिके जगविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता पावसाअभावी उभी पिके डोळ्यादेखत करपताना दिसत आहेत. काही भागांमध्ये सोयाबीनचे पीक पूर्णपणे सुकल्याची स्थिती असून कपाशीची वाढही खुंटली आहे. एकीकडे आधीच नैसर्गिक संकटे आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना, आता पावसाच्या प्रदीर्घ खंडाने त्याच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. आगामी काही दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर जिल्ह्यातील खरीप उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.दरम्यान, नुकसानग्रस्त भागांची शासनाने तातडीने पाहणी करून पिकांचे पंचनामे करावेत आणि परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत अकोला जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सध्या अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून, आता दमदार पाऊसच त्यांच्या उभ्या पिकांना जीवदान देऊ शकतो.0
0
Report
Advertisement
