445001
यवतमाळ - पुसद मध्ये जन्माष्टमीनिमित्त टाळमृदुंगाच्या गजरात शोभायात्रा.
Yavatmal, Maharashtra:जन्माष्टमीनिमित्त यवतमाळच्या पुसद शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. डीजेला फाटा देत पारंपारिक पद्धतीने सलग 11 वर्षांपासून या आदर्शवत मिरवणुकीचे आयोजन करण्यात येत आहे. या मिरवणुकीत टाळ व मृदुंगाच्या तालावर गोपाल कृष्ण भगवान की जय असा एकच जयघोष करण्यात आला. या मिरवणुकीत बाल गोपाल वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीकृष्ण जन्मोत्सव समिती पुसद तर्फे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Ambegaon के मलिन गाँव में 12 साल बाद भी जख्म ताजा हैं
Shirur, Maharashtra:पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण... हे नाव उच्चारलं तरी आजही अंगावर शहारे येतात. ३० जुलै २०१४ च्या त्या दुर्दैवी पहाटे डोंगराची प्रचंड दरड कोसळली आणि संपूर्ण गाव काही क्षणांत मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. या भीषण दुर्घटनेत तब्बल १५१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या थरारक आणि काळीज पिळवटून टाकणाऱ्या दुर्घटनेला आज १२ वर्षे पूर्ण होत आहेत; मात्र या दुर्घटनेच्या जखमा आजही ताज्याच आहेत.0
0
Report
वंचित बहुजन आघाडी के प्रदेशाध्यक्ष और कार्यकारिणी सदस्य के लिए आज मतदान शुरू
Akola, Maharashtra:वंचित बहुजन आघाडीच्या अंतर्गत संघटनात्मक निवडणुकीला आज राज्यभर उत्साहात सुरुवात झाली आहे. प्रदेशाध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्य पदांसाठी बॅलेट पेपरद्वारे मतदान प्रक्रिया पार पडत असून, अकोल्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अधिकृत व आजीवन सदस्य मतदानाचा हक्क बजावत आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्यांच्या निवडीसाठी आज राज्यभर लोकशाही पद्धतीने बॅलेट पेपरद्वारे मतदान प्रक्रिया पार पडत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पक्षाच्या वतीने मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. ही मतदान प्रक्रिया सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. प्रदेशाध्यक्ष पदासाठी तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून कार्यकारिणी सदस्य पदासाठी एकूण २५ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत सदस्य तसेच आजीवन सदस्य मतदानाचा हक्क बजावत आहेत.राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून झालेल्या मतदानाच्या मतपेट्या मुंबई येथे एकत्रित करण्यात येणार असून तेथे मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीचा अंतिम निकाल २ ऑगस्ट रोजी मुंबई येथे जाहीर करण्यात येणार असून त्यामध्ये नव्या प्रदेशाध्यक्षांसह कार्यकारिणी सदस्यांची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात असून मतदान प्रक्रियेला सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.0
0
Report
मालेगांव के नोमानी पुल के पूरी नहीं होने से हादसा और नागरिकों की उग्र मांग
Nashik, Maharashtra:मालेगावच्या नोमानी पुलावरून पाय घसरून सात वर्षाचा बालक गेला वाहून.. पुलाचे काम अर्धवट असल्याने काम पूर्ण करण्याच्या मागणीवरून नागरिक उतरले रस्त्यावर... मालेगाव शहरातून वाहणाऱ्या मोसम नदीवर आलेल्या नोमानी पुलाचेल्या गेल्या 4 वर्षा पासून रखडलेले काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी नदीवर असलेल्या छोट्या पुलावर धरणे आंदोलन सुरु केले. नदीवर छोटा पूल असून त्याला काठडे देखील नाही पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली जातो चार दिवसा पूर्वी पुलावरून जाताना पाय घासरून सात वर्षाचा मुलगा वाहून गेला आज एक रिक्षा वाहून गेली या अगोदर देखील अशा घटना घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. जर पुलाचे काम पूर्ण झाले असते तर जीवित हानी झाली नसती त्यामुळे तातडीने अर्धवट असलेले पुलाचे काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे0
0
Report
Advertisement
शिर्डी साईं मंदिर में गुरु पूर्णिमा उत्सव का समापन, लाखों भक्त दर्शन के लिए जुटे
Shirdi, Maharashtra:साईबाबांच्या शिर्डीत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या गुरूपोर्णीमा उत्सवाची आज सांगता होत आहे.. साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याहस्ते साईमंदिर परीसरातील गुरूस्थान मंदिरात पारंपारीक पद्धतीने रूद्राभिषेक करण्यात आला.. आज उत्सवाचा तीसरा दिवस असून काल्याच्या किर्तनानंतर साईमंदिरात दहिहंडी फोडून गुरूपोर्णीमा उत्सवाचा सांगता होणार आहे.गेल्या तीन दिवसात लाखो भक्तांनी साईमंदिरात दर्शनासाठी हजेरी लावलीय..0
0
Report
बुलढाणा में गैस टैंकर चोरी: काला बाजार के बड़े रैकेट का पर्दाफाश
Buldhana, Maharashtra:LPG गैस वाहतूक करणाऱ्या टँकर मधून गॅस चोरून काळा बाजार करणार रॅकेट पकडलं. मंत्रालयातील पुरवठा विभागाच्या राज्य दक्षता पथकाची खामगाव शहरानजीक मोठी करवाई. बुलढाणा जिल्हा स्थानिक पुरवठा विभागाच्या नाकावर टिचून चालणारा एलपीजी गॅसचा काळाबाजार उघडकीस. बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 वर खामगाव शहरा नजीक सुदर्शन हॉटेल शेजारी असलेल्या एका पडक्या घरात महामार्गावरून एलपीजी गॅस वाहतूक करणाऱ्या टँकर मधून गॅसची चोरी करताना अन्न व पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने छापा टाकून टँकर मधून एलपीजी गॅसची चोरी होताना रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी राज्यदक्षता पथकाला या अशाप्रकारे गॅस चोरीच परिसरात मोठ रॅकेट सक्रिय असल्याचा संशय आहे विशेष म्हणजे बुलढाणा जिल्हा पुरवठा विभागाच्या नाकावर टिच्चून हा गॅस चोरीचा व काळ्या बाजाराचा अवैध धंदा अनेक वर्षांपासून सुरू होता. दक्षता पथकाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हा टँकर गुजरात भडुच येथून अकोला जिल्ह्यातील पणज येथे जात होता. मात्र वाटेवरच खामगाव शहरा नजीक असलेल्या सुदर्शन ढाब्यावर ठरल्याप्रमाणे चालक हा जेवणासाठी थांबला व त्याच ठिकाणी बाजूला असलेल्या एका पडक्या घरात उच्च तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बनवण्यात आलेल्या मशिनरीच्या सहाय्याने टँकरचं सील तोडून हा गॅस चोरी करून व्यावसायिक सिलेंडर मध्ये भरल्या जात होता व हे व्यावसायिक सिलेंडर काळ्या बाजारात विकल्या जात होते. बाईट - रुपेश बिजेवार, जिल्हा पुरवठा अधिकारी. एकीकडे सर्वसामान्यांना गॅस सिलेंडर हवा असल्यास अनेक प्रक्रियेतून जावं लागतं आणि महाग असलेला सिलेंडर घ्यावा लागतो मात्र अशा प्रकारे एलपीजी सिलेंडर वाहतूक करणाऱ्या टँकर मधून गॅस चोरी करून काळाबाजार करणाऱ्या या रॅकेटच्या सूत्रधारावर काय कारवाई होते हे बघणं महत्त्वाचं असेल. दक्षता पथकाने गॅस टँकर सह 88 लाखाचा मुद्देमाल जप्त करून स्थानिक पुरवठा विभागाकडे सोपविला आहे स्थानिक पुरवठा विभागाचे अधिकारी व खामगाव ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा व त्यानंतरची पुढील कायदेशीर प्रक्रिया करणार आहेत.0
0
Report
चांदोली डैम 85% भर, 7000 क्यूसेक विसर्जन जारी, वारणा नदी के जलस्तर में बढ़ोतरी
Sangli, Maharashtra:शिराळा तालुक्यातील पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे, मात्र चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे धरण ८५ टक्के भरले असून धरणातून ७ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रामध्ये करण्यात येत आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे धरणा मध्ये ८ हजार क्यूसेक पाण्याची आवक होत आहे, त्यामुळे ३४.४० टीएमसी साठवण क्षमता असणारे धरणात आता २९.३२ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. धरण जवळपास भरत आले आहे. त्यामुळे पडणार पाऊस लक्षात घेऊन धरणातून पाण्याचा विसर्ग कायम ठेवण्यात आला असून हळूहळू विसर्ग वाढवण्यात येत आहे. परिणामी वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ सुरू असल्याचे वारणा नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी असा आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.0
0
Report
Advertisement
नंदुरबार में विजय चौधरी ने महाराष्ट्र संयोजक पद से दिया इस्तीफा; ऑडियो कांड गरम
Dhule, Maharashtra:Anchor :- नंदुरबार जिल्ह्यात भाजपाचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांच्या कथित ऑडिओ क्लिप गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या ऑडिओ क्लिपमुळे भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, भाजपाच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी विजय चौधरी यांच्याविरोधात विनयभंग आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे विजय चौधरी यांच्याविरोधातील नाराजी वाढत असताना त्यांनी भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र संयोजक पदाचा राजीनामा दिला आहे. माझ्यामुळे पक्षाची बदनामी होऊ नये, तसेच पक्षातील कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, या कारणास्तव आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे. पक्षाने आतापर्यंत अनेक पदांवर काम करण्याची संधी दिली असून त्याबद्दल त्यांनी आभारही व्यक्त केले आहेत. डॉ. हिना गावित यांचाबरोबर कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप झाल्यास भाजपातील एका गटाने विजय चौधरी यांच्यावर कारवाई करून पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर विजय चौधरी यांनी उत्तर महाराष्ट्र संयोजक पदाचा राजीनामा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवला आहे.0
0
Report
कराड के एमआईडीसी में बिबट्या फिडर से टकराकर बिजली के झटके से मौत
Satara, Maharashtra:कराड, सातारा – साताऱ्यातील तासवडे एमआयडीसी येथे बिबट्याचा वावर दिवसेंन दिवस वाढत असून पहाटे एक बिबट्या तासवडे एमआयडीसीतील लाईटच्या फिडर असलेल्या जाळीत अडकला होता. जाळीतून बाहेर निघण्यासाठी बिबट्या लाईटच्या फिडरवरती चढला अन् तेथून उडी मारण्याच्या प्रयत्न करताना शाॅक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. बिबट्याला विजेचा शाॅक लागताच शाॅटसर्किट झाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे तात्काळ एमआयडीसीतील सुरक्षा रक्षकांनी फिडरकडे धाव घेतli असता त्यांना बिबट्या त्याठिकाणी अडकल्याचे दिसून आले. त्यानंतर वनविभाग तसेच तळबीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याला खाली उतरून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.0
0
Report
वारणा और कृष्णा नदियां उफान पर, हरिपूर संगम पर पानी बढ़ा; प्रशासन सतर्क
Sangli, Maharashtra:स्लग - वारणा आणि कृष्णा नदी दुथडी भरून वाहू लागल्या,नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.. सांगली जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरूच आहे.तर कृष्णा आणि वारणा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे.त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत आता वाढ झाली आहेत.वारणा नदीमध्ये चांदोली धरणातून सोडण्यात येणारे पाणी आणि पडणारा पाऊस यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ झाली आहे.तर दुसऱ्या बाजूला कृष्णा नदीच्या पाणी पातळी देखील हळूहळू वाढ होत आहे,कोयना धरणातून देखील पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.त्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ कायम आहे. त्यामुळे हरिपूर येथील संगमावर दोन्ही नद्यांचा पात्र विस्तीर्ण बनले आहे,दुथडी भरून दोन्ही नद्या वाहू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे,त्यामुळे वारणा आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.0
0
Report
Advertisement
अकोला में ऑरेंज अलर्ट के बीच तेज बारिश, शहर जलमय
Akola, Maharashtra:हवामान विभागाने २९, ३० आणि ३१ जुलै रोजी अकोला जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यानुसार आज सकाळपासूनच अकोला शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले असून सखल भागांत पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून असलेल्या उकाड्यापासून नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे, पिकांसाठी हा पाऊस लाभदायक ठरण्याची अपेक्षा असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. पावसामुळे शेतातील पिकांना नवसंजीवनी मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. मात्र, शहरात जोरदार पाऊस होत असला तरी धरण क्षेत्रात अद्याप समाधानकारक पर्जन्य झाल्याचे चित्र नाही. त्यामुळे अकोला शहरावरील पाणीटंचाईचे संकट कायम असून, प्रशासनाचे लक्ष आता धरण क्षेत्रातील पावसाकडे लागले आहे.0
0
Report
रत्नागिरी के कुटगिरी धनगर बाड़ी में विवाद, 5 परिवार पानी से महरूम
Ratnagiri, Maharashtra:संगमेश्वर-रत्नागिरी.. रत्नागिरीच्या कुटगिरी धनगरवाडीत वैयक्तिक वादातून ५ कुटुंबांची 'कोंडी'!.. नळपाणी योजनेची पाईपलाईन कापली, विहिरीचा रस्ताही बंद;..अबालवृद्धांचा पाण्यासाठी आक्रोश.. एव्हढेच नाही तर जिल्हा परिषदेच्या विहिरीकडे जाणारी पाऊलवाटही बंद करून टाकली आहे.. त्याचाद्वारे या दुष्टकृत्यामुळे वाडीतील तब्बल ५ कुटुंबे गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा थेंब अन् थेंबासाठी वंचित राहिली असून,पिण्याच्या पाण्यासाठी चिमुकल्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचा आक्रोश सुरू आहे.. विशेष म्हणजे या गंभीर समस्येबाबत संबंधित प्रशासनाकडे तक्रारी दाखल करूनही प्रशासनाने याकडे पूर्णपणे कानाडोळा केला आहे.. ऐन पावसाळ्यात/उन्हाळ्यात पाण्याच्या मूलभूत हक्कापासून ताटकळत ठेवणाऱ्या या प्रशासकीय अनास्थेविरोधात आणि दडपशाही विरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे..0
0
Report
पश्चिम विदर्भ में भारी जलसंकट, अभी भी जोरदार बारिश की उम्मीद
Amravati, Maharashtra:पश्चिम विदर्भातील मोठ्या सिंचन प्रकल्पांमध्ये सध्या सरासरी 42 टक्के जलसाठा असल्याने अद्यापही बहुतांश धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत। त्यामुळे आगामी काळात दमदार पावसाची आवश्यकता कायम आहे। विशेषतः बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्प अद्यापही कोरडाच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे। पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे धरण असलेल्या अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा प्रकल्पात sध्या केवळ 52 टक्के पाणीसाठा आहे। या धऱणातून शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो। यंदा पुरेसा पाऊस न झाल्यास रब्बी हंगामात सिंचनासाठी पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। हवामानाचा अंदाज आणि पुढील काही आठवड्यांतील पावसावरच पश्चिम विदर्भातील जलस्थिती अवलंबून राहणार असून दमदार पावस न झाल्यास भविष्यात पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीही गंभीर पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो। त्यामुळे अजूनही पश्चिम विदर्भाला दमदार पावसाची प्रतीक्षा असल्याचं दिसून येत आहे.0
0
Report
Advertisement
यवतमाळ के लोही गांव से देव गौ माता चोरी; सीसीटीवी में कैद, गिरोह सक्रिय?
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या लोही गावातून देव गायीला कार मध्ये कोंबून चोरी झाली आहे. चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात चित्रित झाला आहे. यापूर्वीही अशाच पद्धतीने लोही गावातून देव गायी चोरीला गेल्या आहेत. पहाटेच्या सुमारास चार जण कार घेऊन गावात पोहोचले, त्यांनी देव गायीला कारच्या मागच्या बाजूला कोंबून कारंजा लाडच्या दिशेने पलायन केले. लोही गावातील या देव गायींना धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. अनेक वर्षांपासून त्या गावातील एका जुन्या गढीत वास्तव्यास असून दिवसभर गावात फिरून अन्न-चारा घेतल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी परत येतात. या आधीही गायी चोरी गेल्याने, गो तस्करांची संघटित टोळी परिसरात सक्रिय असल्याचे स्पष्ट होत आहे.0
0
Report
चाँदवड-मनमाड मार्ग पर गड्ढे: कार हादसे में दो की मौत, प्रशासन से जवाब मांग
Chandvad, Maharashtra:अँकर-नाशिकच्या चांदवड- मनमाड रोडवर काही ठिकाणी रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून वारंवार तक्रारी करून प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करते, काल रात्रीच्या sमuarस स्विफ्ट गाडीचा अपघात होऊन दोन जण ठार झाले आहे,अपघात इतका भीषण होतं की खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे गाडी थेट रस्त्याच्या पलीकडे नाल्यात पडल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले,या अपघातात मनमाड येथील सागर बेदाडे व त्याचा ड्रायव्हर दोन्हीही ठार झाले आहे,त्यामुळे आता तरी प्रशासनाने चांदवड- मनमाड रोडवरील खड्डे बुजवावे यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे,दरम्यान चांदवड पोलीस याचा अधिक तपास करत आहे.0
0
Report
विटा में परप्रांतीय युवक की हत्या: आरोपी फरार
Sangli, Maharashtra:विटा येथील मायाक्कानगरमध्ये सेवानिवृत्त अधिकारी दयानंद साबळे यांच्या नवीन घराच्या बांधकामाच्या ठिकाणी दोन परप्रांतीय कामगारांमध्ये वादातून अशोक कुमारने राजमन कुमार यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने हल्ला करून त्याचा जागीच मृत्यू झाला. असा प्रकार घडल्यावर अशोक कुमार घटनास्थळापासून पसार झाला. विटा पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले, तपासास सुरूवात झाली आहे आणि संशयित आरोपीचा शोध चालू आहे. कारण काय असावे याबाबत तपास चालू आहे. खुणाच्या घटनेमुळे विटा शहरात खळबळ उडाली आहे.0
0
Report
Advertisement
