icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

0
0
Report

कोल्हापुर में ईंधन वृद्धि के खिलाफ राष्ट्रवादी SP का आक्रामक प्रदर्शन

Solapur, Maharashtra:कोल्हापूर ब्रेकिंग - इंधन दरवाढीविरोधात कोल्हापुरात राष्ट्रवादी SP आक्रमक इंधन दरवाढीविरोधात कोल्हापुरात राष्ट्रवादी SP आक्रमक कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी SP पक्षाकडून मूक निदर्शने निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा राष्ट्रवादी SP कार्यकर्त्यांचा प्रयत्न पोलिस आणि कार्यकर्त्यांच्या जोरदार शाब्दिक बाचाबाची पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखल्याने आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी विचारला पोलिसांना जाब पोलीस आणि आंदोलकातील शाब्दिक चकमकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणाव पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न बाईट- गणेश जाधव - सरचिटणीस राष्ट्रवादी SP
0
0
Report
Advertisement

औसा के किल्लारी बैंक शाखा में नकद तंगी, सिर्फ 20 हजार तक सीमित नकद

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज औसा तालुक्यातील किल्लारीच्या महाराष्ट्र बँकेत रोकड टंचाई...फक्त 20 हजारांची मर्यादा, ग्राहकांना अर्धा तास ताटकळत प्रतीक्षा... बँकेत पैसे ठेवणाऱ्या ग्राहकांनाच आता स्वतःचे पैसे काढण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे. औसा तालुक्यातील किल्लारीच्या महाराष्ट्र बँकेच्या शाखेत रोकड टंचाईमुळे ग्राहकांची मोठी गैरसोय होत असून, बँकेत फक्त 20 हजार रुपयेच दिले जातील असा फलक लावण्यात आला आहे. त्यातच व्यवहारासाठी कमीत कमी अर्धा तास प्रतीक्षा करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि व्यावसायिकांना याचा सर्वाधिक फटका बसत असून, बँक प्रशासनाने तातडीने यावर उपाययोजना करावी अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.
0
0
Report

अकोला: सायखेड में रेल्वे के धक्के से चार गायों की मौत, दो घायल

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील सायखेड शिवारात अकोला-पूर्णा ब्रॉडगेज रेल्वेमार्गावर रेल्वेच्या धडकेत चार गुरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. लोहगड रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या या अपघातात दोन गाई सुद्धा गंभीर जखमी झाल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार, सायखेड शिवारातील रेल्वे रुळांवरून गुरांचा कळप जात असताना भरधाव रेल्वेची धडक बसली. या भीषण अपघातात चार गुरांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन गाई गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. सायखेड आणि चोहोगाव परिसरातील अनेक गुरे सध्या चारा आणि पाण्याच्या शोधात मोकाट फिरत असल्याचे सांगितले जात आहे. अशाच प्रकारे फिरत असताना ही गुरे रेल्वे रुळांवर आल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, मोकाट जनावरांमुळे रेल्वे मार्गांवर होणारे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
0
0
Report

खानापूर के खेतों में तूफानी हवाओं से केले की बागें उजाड़, किसानों को बड़ा नुकसान

Sangli, Maharashtra:स्लग - वादळ वाऱ्यामुळे खानापूर तालुक्यातील अनेक शेतकरयांच्या केळी बागा भुईसपाट.. अँकर - सांगलीच्या खानापूर तालुक्यातल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात केळीच्या बागा भुईसपाट होऊन शेतकरयांना मोठा फटका बसला आहे.रविवारी रात्री उशिरा वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील साळशिंग, लेंगरे,नागेवाडी येथील केळीच्या बागा भुईसपाट झाले आहेत.नुकसानग्रस्त केळी बागांची भाजपाचे नेते व माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानीचा आढावा घेत शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत मिळावी,अशी मागणी वैभव पाटील यांनी केली आहे.
0
0
Report
Advertisement
0
0
Report
Advertisement

अकोला में भारी बारिश से यातायात बाधित, पुल के निर्माण से पानी भराव पर ट्रक पलट—आरोप कंपनी पर

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात काल तेल्हारा आणि अकोट तालुक्यात जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. मुसळधार पावसामुळे परिसरातील छोटे-मोठे नाले दुथडी भरून वाहू लागले होते. दरम्यान, अकोट तालुक्यातील आडगाव येथून जाणाऱ्या अमरावती–बुलढाणा मार्गावरील सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामामुळे तयार करण्यात आलेल्या पर्याय्री वळण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. या वळण रस्त्याखालून पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्याने पावसाचे संपूर्ण पाणी रस्त्यावरच साचून राहिले. याच दरम्यान एका ट्रक चालकाने साचलेल्या पाण्यातून वाहन काढण्याचा प्रयत्न केला. मात्र रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने ट्रकचा तोल जाऊन वाहन पलटी झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आज सकाळी जेसीबीच्या सहाय्याने साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र पुलाचे बांधकाम करणाऱ्या संबंधित कंपनीने पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना न केल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तातडीने योग्य व्यवस्था करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.
0
0
Report

इंझोरी में रानडुकरा हमले से किसान घायल, वन विभाग से कार्रवाई की मांग

Washim, Maharashtra:इंझोरी तालुक्यातील शेतकरी राधेश्याम नानाजी ढोरे यांच्यावर रानडुकराने प्राणघातक हल्ला केला. शेतातील मोटार पंप दुरुस्त करण्यासाठी ते शेत परिसरात गेले असताना अचानक रानडुकराने त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात ढोरे गंभीर जखमी झाले असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने तिथल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या स्थितीबद्दल अद्याप स्पष्ट माहिती येत नसल्याचे समजते. या घटनेमुळे इंझोरी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतशिवारात जंगली प्राण्यांचा वावर वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वन विभागाने तातडीने उपाययोजना करून जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
0
0
Report

रत्नागिरी में भीषण गर्मी, तापमान 35°C तक पहुंचा; लोग पसीने से तरबतर

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्ह्यात वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण.. सध्या ऑक्टोबर हिट प्रमाणे उष्मा जाणवतोय..तापमानाचा पारा पोचला 35 वर.. अँकर रत्नागिरी जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला होता..मात्र पाऊस हुलकावणी देत आहे.. दुसरीकडे उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढत चालला आहे.मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ऑक्टोबर हिट सारखे तापमान वाढत आहे.. दमट-उष्ण हवामानामुळे रत्नागिरीकर घामाघुम होत आहेत.. सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत उखाड्याने नागरिक हैराण झाले आहेत.. वातावरणातील दमटपणा 75 ते 78 टक्क्यांवर गेला आहे..
0
0
Report
Advertisement

शिवसेना-शिंदे गट के बादल बनते सवाल: संजय राऊत का आरोप-प्रत्यारोप तेज

Shirdi, Maharashtra:खा.संजय राऊत पत्रकार परिषद मुद्दे - ऑन अहिल्यानगर शिवसेना ठाकरे गट पक्ष संघटना ढासळने अहिल्यानगरमध्ये विधानसभेला यश मिळालं नाही हे खरं आहे.. मात्र दोन्ही मतदारसंघात शिवसेना आणि महाविकास आघाडीचे खासदार आहेत... नगर शहरातील आमदार कसे जिंकतात आणि हिंदुत्ववादी कसे होतात हे सांगता जगाला माहिती.. आमदार संग्राम जगताप यांच्यावर खा.संजय राऊत यांची टीका... एक दोन निवडणुका हारलो म्हणजे कमजोरी आली असे होत नाही... पुढील कालावधी आम्ही पक्ष बांधणीसाठी झोकून देणार आहोत.. आम्ही प्रत्येकजण जिद्दीने कामाला लागलोय.. या जिल्ह्यात कोण ओरिजनल आहे , सगळे काँग्रेसचे... शेपूट घालून आता भाजपमध्ये गेले संस्था वाचविण्यासाठी... बाळासाहेब ठाकरे जेव्हा होते तेव्हा हे लोक त्यांच्या पायापाशी बसायचे... महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर हे सगळे लोक आमच्या उंबरठ्यावर रांग लाऊन उभे असतील... खा.संजय राऊत यांची भाजपच्या नेत्यावर जहरी टीका... ऑन विखे राऊत टीका श्रद्धांजली विखे पाटील आमच्या शिवसेना पक्षात होते आणि आमच्या पक्षातून गेल्यावर आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहिली.. आमच्या पक्षातून गेलेल्या लोकांना आम्ही तेव्हाच श्रद्धांजली वाहिली आहे... हे लोक फक्त सत्तेसाठी भाजपमध्ये गेलेत... भाजपची सत्ता गेल्यावर पुन्हा ते दुसरीकडे जाते , विखे पाटलांचे तसेच होईल... भाजपची सत्ता गेल्यावर ते दुसरीकडे जातील.. ऑन अमित शहा राज्यातील कोर्ट हे सगळे भाजपचे गुलाम , यांनी सगळे संघाचे नेते नेमले आहेत... भाजपचा वरचष्मा राजकारणात कधीच नव्हता... शिवसेना शिंदे गटाचे नेते अमित शहा म्हणून वारंवार त्यांना दिल्लीला जावं लागतं... ती अमित शहा यांची सेना आहे... संजय राऊत सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्याच बाजूने लागेल.. त्यामुळेच निकाल लांबवला जातोय.. ज्यांना पश्चाताप होतोय, त्यांनी परत यावं.. मात्र काही लोकांना प्रवेश मिळणार नाही.. शिवसेना पक्ष सुनावणीवर प्रतिक्रिया... संजय राऊत - शिंदे गटातील काही लोकांना पश्चाताप होत असल्यं, तर त्यांनी आमच्याकडे परत यावं.. संजय राऊत - भाजपमध्ये अनेकजण आयात केलेले.. भविष्यात भाजपाचा अध्यक्ष बाहेर देशातील झाला तर नवल वाटायला नको...
0
0
Report

दानिश शेख मामले में परिवार ने असिफ शेख से संपर्क कर वकील नियुक्ति का दावा

Nashik, Maharashtra:नाशिक के आय टी कंपनी निदा खान प्रकरण अपडेट... आय टी कंपनी प्रकरणातील संशयित आरोपी दानिश शेखच्या परिवाराने केला मालेगावचे माजी आमदार असिफ शेख यांना संपर्क... संपर्क केल्याने मालेगावात उडाली एकच खळबळ.. मालेगावचे इस्लाम पार्टीचे प्रमुख असिफ शेख यांच्या कडून आय टी कंपनी प्रकरणातील संशयित आरोपी दानिश शेखला देण्यात आला वकील? Anc: नाशिकचे आय टी कंपनी धर्मांतरण प्रकरणातील संशयित आरोपी दानिश शेखच्या परिवाराने मालेगावचे माजी आमदार असिफ शेख यांच्याशी संपर्क साधला व नंतर मालेगावातून दानिश शेख साठी वकील पत्र देखण्यात आले असा दावा शेख चे वकील adv फैजी यांनी केला.
0
0
Report

पुणे के किसान आंदोलन में 24-25 रुपये हमी भाव की मांग

Shirur, Maharashtra:नाशिकनंतर पुण्यात आंदोलन घेतोय. या जिल्ह्यात ही मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहे, त्यांची तशी मागणी आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली जातायेत. - मुख्यमंत्र्यांनी आधी 12.50 रुपये दर सांगितला. मग निवडणुकीपूर्वी 24 रुपये दर देणार म्हणाले होते. म्हणून आम्ही हा दर देण्याची मागणी केली. - आंदोलन सुरु केलं तेंव्हा 7 ते 8 रुपये दर होता. दुसऱ्या आंदोलनावेळी 12.50 रुपये दर सरकारने केला. मात्र आमची मागणी 24 ते 25 रुपये हमीभाव देण्याची मागणी आहे. - 10 लाख टन कांदा खरेди करावा. - व्यापारी शेतकऱ्यांकडून 4 ते 5 रुपयांनी कांदा खरेदी करतात आणि नाफेडला कांदा विक्री करतात. यातून व्यापाऱ्यांचा फायदा होतोय. त्यामुळं थेट शेतकऱ्यांकडून नाफेडने कांदा खरेदी करावा. दुर्दैवाने अद्याप तशी खरेदी सुरु झालेली नाही. - आजच्या मुंबईत होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत ठोस निर्णय व्हावा. - नाशिकमध्ये नाफेडद्वारे खरेदी करावी, असे आदेश दिलेत. मात्र प्रत्यक्षात नाफेडद्वारे खरेदी सुरु झालेली नाही. दिल्लीत झालेल्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली ही आम्हाला कल्पना नाही. मुळात तसा अद्यादेश आलेला नाही, त्यামुळं ही केवळ घोषणा केली का? - शेतकऱ्यांचे आंदोलन आहे. माझं दिलीप वळसे पाटलांना म्हणणं आहे, शेतकऱ्यांच्या मागणी केल्यानं आम्ही आंदोलन करतोय. एसी मध्ये बसून प्रश्न सुटणार नाहीत. तुम्ही केवळ माध्यमांत बोलू नका. रस्त्यावर येऊन चर्चा करा. - शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तुम्ही भांडायला हवं. पण तुम्ही विधानपरिषदेच्या तिकिटासाठी भांडताय. घोडेबाजार करताय, मग शेतकऱ्यांसाठी का भांडत नाही? - दिलीप वळसेंनी त्यांचं वजन वापरावं, त्यांचं दिल्लीत ऐकलं जात नसेल पण राज्यात ऐकतायेत का पहावं. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत कांदा प्रश्नाबाबत ठोस निर्णय घ्यावा.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top