Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ - पुसद मध्ये जन्माष्टमीनिमित्त टाळमृदुंगाच्या गजरात शोभायात्रा.

Aug 26, 2024 16:56:16
Yavatmal, Maharashtra

जन्माष्टमीनिमित्त यवतमाळच्या पुसद शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. डीजेला फाटा देत पारंपारिक पद्धतीने सलग 11 वर्षांपासून या आदर्शवत मिरवणुकीचे आयोजन करण्यात येत आहे. या मिरवणुकीत टाळ व मृदुंगाच्या तालावर गोपाल कृष्ण भगवान की जय असा एकच जयघोष करण्यात आला. या मिरवणुकीत बाल गोपाल वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीकृष्ण जन्मोत्सव समिती पुसद तर्फे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Dec 16, 2025 08:49:13
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा तिढा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालला आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात जागांवरून दावे-प्रति-दावे होत असून, महायुतीत रस्सीखेच स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. नेमकं गणित काय आहे आणि ही युती अखेर एकत्र लढणार की फुटणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. VO 1:- कोल्हापूर महानगरपालिकेत महायुती म्हणून निवडणूक लढवण्याची भूमिका जरी जाहीरपणे नेतेमंडळी मांडत असले, तरी प्रत्यक्षात जागावाटपावरून महायुतीमध्ये मोठा संघर्ष सुरू असल्याचं चित्र आहे. शिवसेना आणि भाजपकडून अधिक जागांची मागणी होत असताना, राष्ट्रवादीला तुलनेने कमी जागा दिल्या जाण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.. त्यामुळेच महायुतीतील घटक पक्ष असणारा आणि कोल्हापूर महानगरपालिकेत सलग दोन वेळेला सत्तेत असणारी राष्ट्रवादी मित्र पक्षांच्या जाग्या दारासंदर्भात केल्या जाणाऱ्या काहीशी नाराज दिसत आहे.. यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी यापूर्वीच उघड भूमिका मांडली आहे. Byte :- मंत्री हसन मुश्रीफ, नेते राष्ट्रवादी ( जुना बाईट ) VO 2:- भाजप राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी “मागील निवडणुकीत जिंकलेल्या जागांवर आमचाच क्लेम राहील. फक्त काँग्रेसच्या जागांवरच महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा होईल असं वक्तव्य करून राष्ट्रवादीची कोंडी केल्याचे स्पष्ट दिसत आहे. एकीकडे हे विधान आणि दुसरीकडे महायुती म्हणूनच आम्ही तिन्ही पक्ष एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार असं धनंजय महाडिक यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर जागावाटपात स्थानिक आमदारांचा प्रभाव निर्णायक ठरणार असल्याचं संकेत देत धनंजय महाडिक यांनी दिले आहेत. कोल्हापूर शहरात शिवसेनेचे आमदार क्षीरसागर असल्यामुळे त्या भागात शिवसेनेला झुकत माप दिलं पाहिजे, तर कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजपचे आमदार अमल महाडिक असल्यामुळे त्या ठिकाणी भाजपला प्राधान्य मिळालं पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे. यावरून भाजप कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात ‘मोठा भाऊ’ च्या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे. Byte:- धनंजय महाडिक, खासदार राज्यसभा VO 3 :- एकीकडे भाजपा खासदार धनंजय महाडिक असोत किंवा राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ असोत. हे दोघेही कोल्हापूर आणि इचलकरंजी येथे महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय झाल्याचं सांगत आहेत.. पण भाजपा आणि शिवसेना अधिक जागेवर मागणी करत राष्ट्रवादीची कोंडी करण्याचा प्रयत्न करत असतील तर राष्ट्रवादी स्वबळावर लढेल,” असा थेट इशारा देत त्यांनी दबाव वाढवला आहे. Byte:- मंत्री हसन मुश्रीफ, नेते राष्ट्रवादी VO 4 :- हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस दोन वेळा कोल्हापूर महानगरपालिकेत सत्तेत होती. महानगरपालिकेचा दांडगा अनुभव, संघटनात्मक ताकद आणि स्थानिक नेटवर्कच्या जोरावर हसन मुश्रीफ आगामी निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत . त्यामुळे महायुती मध्ये पडद्यामागच्या हालचाली मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसतंय. महत्त्वाचं म्हणजे नागपूर अधिवेशनादरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीवरून भाजप राष्ट्रवादीला सोबत घेऊनच कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीला सामोर जाण्याची तीव्र इच्छा व्यक्त करत असल्याचं दिसतंय. पण एकीकडे एकत्र लढण्याची इच्छा, तर दुसरीकडे जागावाटपावरून मोठे दावे… जर राष्ट्रवादीला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीत, तर हसन मुश्रीफ यांच्यासारखा मुरब्बी राजकारणी “एकला चलो” ची भूमिका घेत कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवू शकतो. अशा परिस्थितीत महायुती एकसंध राहणार की जागावाटपाच्या तिढ्यातून फुटणार, याकडेच आता संपूर्ण कोल्हापूरचं लक्ष लागलं आहे. प्रताप नाईक झी २४ तास कोल्हापूर
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 16, 2025 08:17:05
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:आगामी महापालिका निवडणुकीत संभाजीनगर मध्ये एमआयएम फॅक्टर महत्त्वाचा आहे त्यातच महाविकास आघाडीतील एका पक्षाला युतीची ऑफर दिली असल्याचा गौप्य स्फोट इम्तियाज जलील यांनी केलाय त्यामुळे नक्की हा पक्ष कोण याबाबत चर्चा सुरू झाली आहे यावरून उद्धव ठाकरेच्या शिवसेनेने आणि शिंदेच्या शिवसेनेना चांगलीच टोलेबाजी केलीय... एमआयएम ला महाविकास आघाडीचा प्रस्ताव छत्रपती संभाजी नगरात एकत्र येण्याबाबत ऑफर राज्यात नाही तर शहरात कशाला एमआयएम ने ऑफर फेटाळली छत्रपती संभाजीनगर मध्ये सर्वच पक्ष आमची निवडणुका विरोधात आहे असं सांगत आहे त्यातच महाविकास आघाडीतील एका पक्षांना एमआयएम ला प्रस्ताव दिल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिली यामुळे चर्चांना उधाण आलय नक्की हा पक्ष काँग्रेस की राष्ट्रवादी काँग्रेस अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहे.. मात्र ही ऑफर फक्त शहरापूर्वी होती राज्यात नव्हती मग राज्यात नाही तर शहरात युती कशाला असं म्हणत आम्हीही ऑफर फेटाळली असल्याचं इम्तियाज यांचे   म्हणणं आहे आणि त्यामुळं संभाजी नगरात एकटे लढत किंगमेकर आम्हीच होणार असा दावा इम्तियाज जलील करत आहे... याबत महाविकास आघाडीतील घटक पक्ष उद्धव ठाकरे च्या शिवसेनेने काँग्रेसकडे बोट दाखवले आहे , काँग्रेसचे काही लोक असं करू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे मात्र काँग्रेसने असं करू नये असं खैरे म्हणाले तर महाविकास आघाडी मतांसाठी लाचार झाली आहे ते निश्चितपणे असा प्रस्ताव देऊ शकतात असं संभाजी नगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ म्हणाले... ऑफर नक्की कोणाची याबाबत इम्तियाज जलील सांगायला तयार नाही मात्र ज्या पद्धतीने चंद्रकांत खैरे अंगुली निर्देश करत आहे आणि शिरसाट सुद्धा असं होऊ शकतं असे सांगताय त्यामुळे निश्चितच काहीतरी झालंय यात वाद नाही.. मात्र तूर्तास एमआयएमची एकला चलो ची भूमिका आहे त्यामुळे महापालिका निवडणुकीत एमआयएमचा आव्हान दोन्ही पक्षाला असणार असेच दिसतंय...
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Dec 16, 2025 08:16:31
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पुणे और पिंपरी चिंचवड में राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आलाय. शरद चंद्र पवार पक्षाची 60 जागांची मागणी समोर आली आहे. महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच पवार यांनी डावपेच टाकायला सुरुवात केली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लढत होणार याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला हात देण्यासाठी पवार पक्ष पुढे सरसावला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ताकद असली तरी भाजपशी मुकाबला करणे सोपे नाही. शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या असून कार्यकर्त्यांना पावले उचलण्याचे निर्देश दिलेत. तसेच अजित पवार यांच्या कडे 60 जागांची मागणी केली गेली. निवडणूक कोअर कमिटीच्या सदस्यांनी पक्षाच्या बैठकीत समविचारी पक्षाशी युती करत भाजपला सत्तेपासून दूर राखण्याचा निर्णय घेतला. दूसरीकडे आणखी सकारात्मक प्रतिसाद दिला गेला. राष्ट्रवादीचा बोध: एकत्र लढण्याच्या तयारीने वातावरण ढवळून निघालेय.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 16, 2025 08:11:12
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 16, 2025 08:05:24
Amravati, Maharashtra:ठाकरे यांची मजबुरी असता, ठाकरे कुटुंब निवडणुकीमध्ये स्वतःच्या फायद्यासाठी एकत्र येत आहे; आमदार रवी राणा ठाकरेंवर बोचरी टीका. अँकर :– येत्या 18 तारखेला ठाकरे एकत्र येणार असून युतीची घोषणा होणार असल्याचा बोलला जात आहे. मात्र ठाकरे कुटुंबीय एकत्र येत असताना रवी राणा यांनी ठाकरे यांना चांगलच डिवचल आहे. ठाकरे कुटुंब हे निवडणुकीमध्ये स्वतःच्या फायद्यासाठी एकत्र येत असल्याच जनतेला समजते, आपल्या फायद्यासाठी व राजकीय हितासाठी ते एकत्र येतात मात्र हिंदुत्व एकनाथ शिंदे यांनी टिकून ठेवला आहे. मुंबईतील मराठी माणूस ठाकरेंच्या मजबुरीला बाजूला ठेवून, शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना साथ देतील असेही आमदार रवी राणा म्हणाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राणाविरुद्ध ठाकरे हा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. बाईट :– रवी राणा, आमदार. रवी राणा ऑन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री दावा. दावे अनेक होत असतात मात्र पाच वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतील,या राज्याला पुढे नेण्यासाठी देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे व्हिजन आहे त्यामुळे राज्यातील जनता सुद्धा म्हणते की पाच वर्ष देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री राहिले पाहिजे होते व ते राहतील. रवी राणा ऑन मराठी पंतप्रधान. मराठी माणूस पंतप्रधान झाला पाहिजे हे सर्वांची इच्छा आहे, पण नरेंद्र मोदी हे अजूनही दहा वर्ष पंतप्रधान राहतील,ते जेव्हा दहा वर्षानंतर राष्ट्रपती होतील किंवा अजून कोणत्या पदावर जातील तेव्हा मराठी माणूस पंतप्रधान झाला पाहिजे
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 16, 2025 07:45:35
Nagpur, Maharashtra:नागपूर नागपुरात भाजपच्या इच्छुकांच्या मुलाखती सुरू महापालिकेच्या 151 जागसाठी भाजपचे 1489 इच्छुक मुलाखतीला... महायुती मित्र पक्षासाठी गेल्यावेळेस जेवढी ताकत होती तेवढ्याच जागा सोडण्यास शहर भाजपा तयार... ज्याची जेवढी क्षमता तेवढ्याच जागा सोडू गेल्या वेळेस शिवसेनाच्या नागपुरात दोन जागा होत्या तर राष्ट्रवादी एक जागा जिंकली होती ( राष्ट्रवादीची एक जागा अपक्ष म्हणून होती... आणि शिवसेनेचे दोन्ही जिंकलेले उबाठामध्ये आहे ) प्रत्येक जागेसाठी भाजपकडून सरासरी 9 ते 10 उमेदवार... काही ठिकाणी एका जागेसाठी 30 इच्छुकसुद्धा आहे युवा चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे भाजपाकडून सांगण्यात आले शहर कार्यालय मंगलम इमारतीतील भाजप कार्यालयात मुलाखती सुरू आहेत.... भाजपाने तीन सर्वे केले आहे.. शहराध्यक्ष दया शंकर तिवारी यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी काणे यांनी ----- बाईट दयाशंकर तिवारी, शहराध्यक्ष, भाजप
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 16, 2025 07:33:43
Washim, Maharashtra:राज्याच्या आरोग्य सेवा अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतील विविध ३० निर्देशकांच्या आधारे ऑक्टोबर महिन्याची रँकिंग जाहीर केली असून, वाशिमचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल कावरखे यांनी पुन्हा एकदा राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मातृ व बाल आरोग्य, लसीकरण, कुटुंब नियोजन, साथरोग प्रतिबंध, तसेच हृदयरोग, मधुमेह व उच्च रक्तदाब रुग्णांसाठी दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये जिल्हा रुग्णालयाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तपासणीदरम्यान सुरक्षित प्रसूती सेवा, डायलिसिस, एनआरसी, आयसीयू, अत्याधुनिक शस्त्रक्रियागृह, मोतीबिंदू, शस्त्र surgery रक्तपेढी, सोनोग्राफी व सीटी स्कॅन या सुविधा दर्जेदार असल्याचा जिल्हा शल्यचिकित्सक संवर्गात डॉ.कावरखे अव्वल ठरले. यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या १००दिवसांच्या कृती आराखड्यातही त्यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला होता. जिल्ह्यात सरकारी आरोग्य सेवांमध्ये मोठे सुधार होतं असून, रुग्णसंख्या वाढत आहे。
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Dec 16, 2025 07:16:18
Pune, Maharashtra:Headline : मावळ तालुक्यातील उर्से गावातील चिमुकलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ शांततेत रॅली ANCHOR मावळ तालुक्यातील उर्से गावात घडलेल्या अमानुष घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात अ Applied;झ्या घटना उघडकीस आली असून, या घटनेच्या निषेधार्थ आज उर्से गावात ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थ्यांनी एकत्र येत निषेध रॅली काढली. उर्से गावात आज सकाळी वातावरण अत्यंत शोकाकुल आणि संतप्त होते. पाच वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ गावातील ग्रामस्थ, महिला, युवक तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. “आम्हाला न्याय हवा”, “दोषींना कठोर शिक्षा द्या” अशा घोषणा देत ही निषेध रॅली गावातील प्रमुख रस्त्यांवरून काढण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण समाज हादरून गेला असून, आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या रॅलीत शालेय विद्यार्थ्यांनीही सहभाग घेत समाजात सुरक्षिततेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. काळ्या फिती लावून त्यांनी आपला निषेध नोंदवला. लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, हीच अपेक्षा आता सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Dec 16, 2025 07:15:46
Pimpri-Chinchwad, Maharashtra:महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच शरद पवार यांनी डावपेच टाकायला सुरुवात केली असून पुण्या पाठोपाठ पिंपरे चिंचवड मध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचालांना वेग आलाय... पाहुयात स्पेशल रिपोर्ट.... पUNE आणि पिंपरी चिंचवड मध्ये भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लढत होणार याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला हात देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुढे सरसावला आहे. पिंपरे चिंचवड मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ताकद असली तरी बलाढ्य भाजपशी मुकाबला करणे म्हणावे तेवढे सोपे नाही. नेमकी हीच गोष्ट लक्षात घेत शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या असून कार्यकर्त्यांना त्या दृष्टीने पावले उचलण्याचे निर्देश दिलेत.... अजून या संदर्भात औपचारिक बैठक झाली नसली तरी दोन्ही पक्षाची प्रमुख नेते यासंबंधी लवकरच भेटणार असल्याचं शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी स्पष्ट केले. तर दुसरीकडे निवडणूक कोअर कमिटीचे सदस्य सुनील गव्हाणे यांनी पक्षाच्या बैठकीत समविचारी पक्षाशी युती करत भाजपला सत्तेपासून दूर रोखण्याचा निर्णय झाल्याचे स्पष्ट केले.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 16, 2025 07:05:03
Shirdi, Maharashtra:Akole News Flash अकोलेकरांचे रेल्वे मार्गासाठी आंदोलन... अकोले तालुक्यातील हजारो नागरीकांचा आज संगमनेर प्रांत कार्यालयावर मोर्चा ... अकोले शहरातुन बाईक रॅलीने आंदोलक संगमनेर प्रांतकार्यालयाकडे रवाना... शेकडोंच्या संख्येनं नागरिक मोर्चात सहभागी... अकोले ते संगमनेर 25 किलोमीटर बाईक रॅली.. नाशिक - पुणे सेमी हायस्पीड रेल्वे अकोले - संगमनेर मार्गेच न्यावी आणि अकोलेत थांबा मिळावा... नाशिक - शिर्डी शहापुर रेल्वे मार्गासाठी सर्व्हेक्षण व्हावे या दोन मुख्य मागण्या... मागण्यासाठी अकोले बंदला उस्फुर्त प्रतिसाद... राजकीय नेत्यांसह सर्व पक्षातील पदाधिकारी संगमनेरात मोर्चात होणार सहभागी... नेत्यांसह हजारो नागरिकांचा मोर्चात सहभाग... संगमनेर शहरात मोर्चा पोहोचल्यानंतर आंदोलनकर्ते प्रांत कार्यालयाकडे चालत जाणार...
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 16, 2025 06:32:19
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर.. संजय शिरसाठ यांची पत्रकार परिषद पॉइंटर ऑन् संभाजी नगर युती बैठक. आज दुपारी साडेबाराच्या वाजता शिवसेना आणि भाजपची बोलणी होईल. संयुक्त बैठक भाजप कार्यालयात होणार. आमच्या आणि त्यांच्या मागण्या मॅच झाल्या पाहिजे हा आमचा प्रयत्न. महायुतीला मिळालेल्या मताचा अनादर होऊ नये असे मी सांगत आलोय, म्हणून पहिल्या फेरीच्या बोलणी करायला मी स्वतः भाजप कार्यालयात जाणार आहे. मुंबई महापालिका एवढ एक टार्गेट ubt आणि मनसेचा आहे. याचा फायदा महायुतीला होणार आहे. सर्वांचे लक्ष युती कशी होईल याकडे लागले. सगळ्या गोष्टीचा विचार करून तिन्ही नेते ठरवतील. काही ठिकाणी अपक्ष घेतलेले आहे. त्याचा सहानुभूतीचा विचार केला जाईल. मात्र महायुती बाहेरील पक्षाच्या प्रवेशाबाबतच सहानुभूती राहील. निवडणुकीत असेच काही नवनवीन फंडे येतील, मात्र मतदार खंबीर आहे. योग्य माणसाला मतदार मतदान करतील. त्यांनी हिंदुत्ववादी विचार सोडले हे आम्ही उघड सांगतो. आम्ही लपून छपून सांगत नाही. ज्यावेळी त्यांची काँग्रेसशी युती झाली त्याचवेळी त्यांनी (ठाकरेंनी) हिंदुत्व सोडले. महानगर पालिका म्हणजे तुम्ही व्यवसाय आणि उत्पादन म्हणून तुम्ही त्यांच्याकडे पाहता का? मुंबई खड्ड्यांचे शहर हे नाव बदलले. आदित्य ठाकरे नेतृत्व चांगलं आहे आदित्य ठाकरे नेतृत्व करताय मात्र तिथले वरिष्ठ त्यांचं किती ऐकतील हा प्रश्न आहे... आणि हे ( उद्धव ) राज्यात फिरणार कोण किती फिरणार हे सर्व पाहणार.. यांनी कधीही कार्यकर्त्यांसाठी निवडणूक लढविली नाही. स्वतःसाठी लढविली संजय राऊत वक्तव्य. मराठी माणसाला हद्दपार करणाऱ्या या लोकांनी मराठी माणसासाठी बोलू नये. बिल्डरच्या नादी लागून मराठी माणसाला बेघर केले पार बदलापूर विरार ला पाठवले. मराठी माणसाला मुंबईत आणण्यासाठी महायुती काम करणार आहे. आचारसंहिता भंग आरोप एका दिवसात राजीनामा पूर्वी १५०० जीआर काढणारे हे लोक आज आमच्यावर टीका करतात. हे सगळे टीका करणारे विद्वान आहेत, कोणत्याही पक्षाचा व्यक्ती असेल तो कार्यपद्धती अवलंबता. विरोधी पक्षाने देखील उद्घाटन केले. रोहित पवार. हे सर्व विद्वान आहे. शेंबड्या पोराला जरी सांगितले तरी तो सांगेल की निवडणूक आयोगाने प्रेस घेणार म्हणजे आचार सहित लागणार. संजय राऊत. संजय राऊत जो पर्यंत निगेटिव्ह बोलत नाही, तो पर्यंत त्याला जेवण जात नाही. राहेमान डाकेत तब्येतीच काळजी घ्या, बरे व्हा आणि ubt ची वाट लावा, अमीत शहा यांचा काय करायचं, आमच्या पक्षाचा आम्ही बघू... याचा सर्वस्वी अधिकार एकनाथ शिंदे यांना आहे. जेव्हा त्यांना बदला करायचा किंवा कुठला निर्णय घ्यायचा त्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांना आहे जो आरोपी होता तो पकडला गेला, त्याची 8 तास चौकशी झाली. लगेच फासावर चढवायचं असे नाही. एकाच दिवशी सर्वांना दोषी धरून शिक्षा देणे असे आपल्या कायद्यात नाही. काँग्रेसने स्पष्ट भूमिका घेतली आहे की ubt सोबत जाणार नाही. मुंबईत युती झालीच तर मनसे आणि ubt ची होईल असे संकेत आहे. शिवसेना भाजप, ubt मनसे, काँग्रेस स्वातंत्र्य आणि राष्ट्रवादी कुठे जाईल सांगता येणार नाही. त्यामुळं संजय राऊत आज भेटणार असतील.. चला हे परिवर्तन आहे. त्यांनी हे मान्य केले. Evm घोटाळा नाही. मतासाठी लाचार झाले, मराठी माणूस गेला खड्ड्यात. असा प्रस्ताव आला असेल तर पुणे चिंचवड मध्ये युती होणार नाही हे जाहीर आहे. अजितदादा काही करत असेल तर आम्हाला कल्पना नाही. भाजप चर्चा संभाजी नगर पहिली फेरी आहे. पहिल्या फेरीत आम्ही दोघे बसू आणि त्यानंतर राष्ट्रवादीशी चर्चा करून
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 16, 2025 06:20:10
Nagpur, Maharashtra:नागपूर चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री. महसूल खाते - मुख्यमंत्री फडणवीस यांनी मला महसूल मंत्री पदाची जबाबदारी दिल्यानंतर जे सात लक्ष परिवारांचे घर नियमित होत नव्हते त्यांना घर देण्यासाठी आम्ही कायदा केला सनद साठी डॉक्युमेंट्स देण्यासाठी सनद काढून टाकले - आता केवळ प्रीमियम भरले की कोणाचे ऑफिसमध्ये जायचे गरज नाही. सनद आणि येणे घेण्याची गरज नाही. हा निर्णय राज्यातील सगळ्याच आरक्षणासाठी फायदा होणार आहे....पुढच्या काळात अनेक गोष्टी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. - क्लिष्ट महसुली कायदे सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो आहे शेतकऱ्यांच्या शेतात बांधून रस्ते बांधण्यासाठी पांदण रस्ते योजना आम्ही आणली आहे. - विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट साठी स्टॅम्प पेपर लागणार सर्टिफिकेट कुठल्या डॉक्युमेंट साठी स्टॅम्प पेपर लागणार नाही - आपसात वाटणी करायची असेल वडिलोपार्जित प्रॉपर्टीचे तर पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर ते होईल मुद्रांक शुल्क लागणार नाही, असे अनेक निर्णय आमच्या खात्याने घेतले आहे. - महसूल विभागात जनतेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी निर्णय घेण्यात आले. - सरकारी जागेवरचे बसले आहे.... 2011 च्या आधीच्या लोकांना पट्ट्या वाटप केलं जात आहे. विदर्भातील छोटी जंगल जागेत दोन लाख परिवार होते. त्या घरातील लोकांना वाटप करण्याकरिता पासून खात्याचा प्रवास बघितला तर तीन ते चार कोटी लोकांच्या मालमत्तेचा अनेक वर्षापासून असलेले प्रश्न सोडविण्यात आले आहे. त्यांना लाभ पोहोचविण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. - आमच सरकार विकसित महाराष्ट्र करता काम करता आहे. मला विश्वास आहे, पुढच्या काळात महसूल खातं राज्यात तर अग्रगण्य करूच पण देशात आधुनिकरण स्वीकारून आम्ही पुढे जाऊ जे मोजणी खात सुद्धा अपडेट केला जाणार आहे. (नागपूर महानगर पालिका*) नागपूर असो की मुंबई असो भाजप मजबूत राहिल, शिवसेना हा त्याठिकाणी पहिले पासून आमचा नैसर्गिक मित्र म्हणून काम करत आहे. त्यामुळे जिथे भाजप मजबूत आहे, तिथे भाजपला आणि जिथे शिवसेना मजबूत आहेत तिथे शिवसेनेला युती करण्याचा निर्णय वरिष्ठ स्तरावर झाला आहे. त्यामुळे त्यात आता किंतु परंतु करण्याची गरज नाही On पिंपरी चिंचवड - भाजप आणि शिवसेना महायुती आहे, राज्यामध्ये कुछ ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने महायुती अपडेट होते आहे...मात्र अनेक ठिकाणी आमची बोलणी सुरू झाली आहे. भाजप शिवसेनेचे बोलणे सुरू झाल्यानंतर इतर 13 पक्षांसोबत सुद्धा आम्ही बोलणी करणार आहोत. On युवा स्वाभिमान अमरवती - आमच्याकडे युवा स्वाभिमान हा पंधरा वर्षापासून महायुतीचा भाग आहे. रवी राणा यांनी अनेक वेळा भाजपाला पाठिंबा दिला पंधरा वर्षापासून ते मित्र पक्षात आहे. महायुतीचा प्रस्ताव आमच्या सोबत युवा स्वाभिमान शिवसेना याचा आहे, निश्चितपणे आम्ही महायुतीत जाणार आहोत. अमरावती मध्ये महायुतीमध्ये राहणार आहोत. On आदित्य ठाकरे प्रमोट - उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते. तेव्हाच त्यांनी आपल्या मुलाला प्रमोट केलं होतं. त्यात नवीन काय? वडील जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हाच त्याला प्रमोट केलं त्यात नवीन काय. On पिंपरी - अजित दादांना त्यांचा महापौर व्हावा असं वाटते. आम्हाला भाजपचा व्हावा असं वाटते त्यांचा ते करतात आमचं आम्ही करतो. On संजय राऊत पोस्टर - राज्य निवडणूक आयोगाने आचारसंहिता लावल्यानंतर सगळ्यांनीच आपले पोस्टर काढले. आम्ही आमच्या पोस्टर काढले त्यांनी, काढले नसेल म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली नाही काढले म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली. त्यात काही नवीन नाही त्यांनी काढायला पाहिजे....आपापल्या पक्षातील नेत्यांनी आपले पोस्टर काढले पाहिजे. त्यांनी काढले नाही म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली. On गुलाबराव पाटील - गुलाबराव पाटील त्यांच्या स्वभावाप्रमाणे बोलत असतात मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि आम्ही बसलो होतो त्यात जो निर्णय व्हायचा तो झालेला आहे. On पिंपरी चिंचवड अजित दादा वक्तव्य - त्यांच्या पक्ष त्यांनी कसा चालवायचा त्यांनी निवडणूक कशी जिंकायची यश पराजय जे व्हायचे ते होईल. निवडणूक निवडणुकीच्या तत्त्वावर लढावी लागते. त्यांना त्यांच्या पक्षाचा अधिकार आहे. त्यांना त्यांचा निर्णय घ्यायचा आहे, त्यांनी काय केलं, यावर मी बोलण्यापेक्षा आमची तयारी काय आहे. 51% मत घेऊन आम्हाला जिंकायचा आहे. महायुतीत आम्ही चांगल्या प्रकारे निवडून येऊ महायुतीला लोकांची पसंती आहे.* On अमित शहावर मुंबई घशात - त्यांना बोलायला काही मुद्दे नाहीये...त्यांना मुंबईच्या विकसित मुंबईचा प्लॅन माहिती नाही... त्यांच्याकडे विकासाचा अजेंडा नाही.... सकाळी झोपेतून उठल्यापासून त्यांचा टोमणे मारायचा कार्यक्रम सुरू होतो....जोपर्यंत चंद्र सूर्य आहे... महाराष्ट्र पासून मुंबईला कोणीही वेगळे करणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला आहे. - काहीतरी दिवसभर टीव्हीवर दिसल पाहिजे चाललं पाहिजे तर काय फेसबुकवर कॉमेंट केले पाहिजे, त्यासाठी ते बोलत असतात.* On पैश्याचा महापूर वाहणार - राऊत - आजपर्यंत त्यांनी तेच धंदे केल्यामुळे त्यांना तेच दिसतं.* On मुंबई दोन्ही भाऊ एकत्र - दोन्ही भाऊ एकत्र येतील हे चांगलं समीकरण आहे. ते का? एकत्र येतात या लोकांना चांगल्या तऱ्हेने माहीत आहे... जनादार संपतो तेव्हा असे समीकरण तयार होतात. ठाकरेकडे व्हिजन काय आहे...इतके वर्ष त्यांच्याकडे मुंबईचा महापौर होता, त्यांनी काय केलं अखेर देवेंद्र फडणीस आणि एकनाथ शिंदे यांना यावं लागलं..* On महाविकास आघाडी वेगवेगळी. - 2014 पूर्वीची मुंबई काढा आणि 2024 मुंबई काढा. आमचा दावा नाही की सर्व बदललं, 2029, 2035 आणि 2047 चा विकसित महाराष्ट्रचा प्लॅन देवेंद्र फडणीस यांनी तयार केला आहे... मुंबई ही जगातील सर्वात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय शहर झाल्याशिवाय राहणार नाही...* On ठाकरे - कॉंग्रेस. - त्यांना सर्वांना शुभेच्छा आहे, इंडिया आघाडीचे नाव न घेता वीस-बावीस जण हातवर करून एकत्र आले होते. त्या त्यांना सोबत घेऊन या, या सर्वांनी आलं पाहिजे आम्ही 51% मत घेण्याची तयारी केली आहे. On महायुती जागा वाटप - जागावाटप योग्य ठिकाणी चालू आहे. जेव्हा जागा वाटपाचा फार्मूला तयार होईल. तेव्हा तुम्हाला आनंद होईल.* On दिग्विजय सिंग चिन्ह गोठवले - कायदे काय आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांना चिन्ह दिल त्यामध्ये काल-परवा नवीन कायदा तयार केला नाही.... संविधानाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जे कायदे दिले आहेत, त्याच कायद्याने पक्ष चिन्ह त्यांना मिळाला आहे....तुमच्या पक्षातील लोकप्रतिनिधी तुमच्या सोबत किती आहे. याचा कायदा आहे, सुप्रीम कोर्टाचे निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाची कायदे याचे चिन्ह आहे.. - आम्ही 29 ही महानगरपालिका भाजप महायुती जिंकणार आहे, किती ठिकाणी मौत्रिपूर्ण होईल त्यावेळी भाजप महायुतीचे महापौर राहतील.
0
comment0
Report
Advertisement
Back to top