Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ - पुसद मध्ये जन्माष्टमीनिमित्त टाळमृदुंगाच्या गजरात शोभायात्रा.

Aug 26, 2024 16:56:16
Yavatmal, Maharashtra

जन्माष्टमीनिमित्त यवतमाळच्या पुसद शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. डीजेला फाटा देत पारंपारिक पद्धतीने सलग 11 वर्षांपासून या आदर्शवत मिरवणुकीचे आयोजन करण्यात येत आहे. या मिरवणुकीत टाळ व मृदुंगाच्या तालावर गोपाल कृष्ण भगवान की जय असा एकच जयघोष करण्यात आला. या मिरवणुकीत बाल गोपाल वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीकृष्ण जन्मोत्सव समिती पुसद तर्फे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SNSWATI NAIK
Nov 21, 2025 18:05:51
Navi Mumbai, Maharashtra:राज्यात भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात सुरु असलेला का रे दुरावा आपल्याला नवी मुंबईतही पहायला मिळाला. नेरुळ मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे अनावरण आज वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले मात्र या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठ फिरवल्याने विविध चर्चाना उधाण आलेय. मनसे नेते अमित ठाकरे यांनी शिवस्मारकाचे अनावरण केलं होत मात्र त्यानंतर अमित ठाकरे यांच्यासह 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज नवी मुंबई मनपा तर्फे या शिवस्मारकाचे अधिकृत उदघाटन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या उदघाटन कार्यक्रमाला शिवसेना शिंदे गटाच्या सर्व प्रमुख नेत्यांनी दांडी मारली असून एकदा उदघाटन झाले असताना पुम्हा उदघाटन करायची आवश्यकता नाही असे पत्रकच खासदार नरेश म्हस्के यांनी काढत अमित ठाकरे यांच्या कृत्याचे समर्थन केले. दुसरीकडे वनमंत्री गणेश नाईक यांनी देखिल अमित ठाकरे यांना पाठीशी घालत त्यांच्यावरील गुन्हे आयुक्तांनी मागे घ्यावेत अशी मागणी केलेय. खासदार नरेश म्हस्के यांनी दिलेल्या समर्थना बद्दल मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी खासदार नरेश म्हस्के यांच्या भूमिकेचे स्वागत केले. शिवस्मारकच्या उदघाटनानंतर देखिल नवी मुंबईतील राजकारण अधिक तापताना पहायला मिळत आहे.
178
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 21, 2025 16:32:55
Baramati, Maharashtra:सरडेवाडी टोलनाक्यावर मांगुर माशांची बेकायदेशीर तस्करी उघड — 20 लाख 45 हजारांचा मुद्देमाल इंदापूर पोलिसांच्या ताब्यात.... इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी टोलनाक्यावर बेकायदेशीर पद्धतीने मांगुर माशांची मोठ्या प्रमाणात वाहतूक करणाऱ्या दोघांना इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरा संशयित वाहन अडवून तपास केला असता, प्रतिबंधित मांगुर माशांचा मोठा साठा आढळून आला.मांगुर मासे पर्यावरण आणि मानवी आरोग्यास अपायकारक असल्याने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने त्यांच्या पैदाशीस, विक्रीस आणि वाहतुकीस संपूर्ण बंदी लागू केली आहे. हीच बंदी मोडून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तातडीने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पंधरा लाख 50 हजार रुपये किमतीचे वाहन आणि चार लाख 90 हजार रुपये किमतीचे मांगुर मासे असा मिळून एकूण 20 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, इंदापूर पोलिसांनी पुढील तपास चालू आहे...
109
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 21, 2025 16:15:43
Baramati, Maharashtra:बारामती नगरपालिका निवडणूक प्रचार शुभारंभ बारामती उपमुख्यमंत्री अजित पवार भाषण पॉईंटर बारामती नगरपरिषद प्रचार शुभारंभ देव दिवाळीच्या शुभम भारतावर आज आपण प्रचाराचा शुभारंभ करत आहोत. ही निवडणूक वर्षां होत आहे. मागील काळात पौर्णिमा तावरे यांना निवडून दिलं होतं. चल आता जवळपास नऊ वर्ष होऊन गेली... बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला. सरकार आपले विचारात होतो त्यामुळे निधी मोठ्या प्रमाणावर आणायला पण यशस्वी झाले. चाळीस कोटीचं बारामती करंज उत्पन्न आणि त्यातून आपण कोरोड रुपयाची कामे केली. अनेकांच्या मुलाखती घेऊन मग 41 लोकांना संधी दिली... विरोधकांनी काही ना काही वेगळ्या प्रकारच्या बातम्या पेरण्याचा प्रयत्न केला बारामती करून तुम्ही मला 1991 ला पहिल्यांदा खासदार केले त्यानंतर पवार साहेबांचे आपण नेहमी १९६७ सालापासून त्यांना निवडून देण्याचं काम केलं. साहेबांनी देखील त्यांच्या काळात त्यांना बारामतीकरणात जेवढे काही भरभरून देता येईल तेवढे देण्याचा प्रयत्न केला नंतरच्या काळात मी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवायला लागलो. त्यामध्ये आपण काही निर्णय घेता येतात, एखाद्या नगरसेवकांनी नाही ऐकलं तर मला त्याला व्हिप बजावता येतो. तुमच्या विकासाच्या करिता आपल्या बारामतीकरांच्या विकासाकरिता हा तुमच्यासमोर बोलणारा अजित पवार कटिबद्ध आहे याची तीळ मात्र शंका मनात बाळगू नका ही निवडणूक बारामतीच्या पुढील विकासाची दिशा ठरवणारी निवडणूक आहे सर्वांची आपल्याला साथ असली तरी आपण गाफिल राहता कामा नये. काहींनी निनावी पत्र देत म्हणाले तुम्ही जो उमेदवार दिला त्याच्या बॅकग्राऊंड तपासलं नाही, मी सर्वांचे बॅकग्राऊंड तपासली जर कोणाचा राहिला असेल तर मला सांगा तेही दुरुस्त करेल मी कामाचा माणूस आहे बिनकामाचा नाही बारामतीची निवडणूक म्हटल्यावर मीडिया येणार विरोधक आपल्यावर टीका करणारा प्रत्येकाला अधिकार आहे पण मला त्या गोष्टीला उत्तर द्यायचं नाही गेल्या काही वर्षात बारामतीचा चेहरा मोहरा बदलला आहे. बारामतीच्या शारदा प्रांगणात गोरगरिबा करिता सीबीएससी स्कूल करत आहोत. पूर्वी साहेबांना व्यापारी भेटायला इच्छुक साहेब सोमेश्वर छत्रपती माळेगावचं पेमेंट काढा त्याशिवाय मार्केटमध्ये ग्राहक नाही पण आज तशी वेळ नाही शहरात आज अनेक कामे सुरू आहेत.पण काहीजण अफवा उठवतात,पण मी तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय काही करत नाही. काही मंदिर मला बाजूला करावी लागली पण त्याच्यासाठी सुंदर मंदिर बनवत आहोत. मी अंधश्रद्धा मानत नाही पण श्रद्धाला महत्व देतो कधीकधी काही मिनिटात काही इंचा पाऊस पडतो लगेच आपले मित्र तेवढीच स्क्रीन दाखवतात बघा बारामतीत किती पाणी बारामती तुंबली तुंबली अरे पण बाकीची शहरात जाऊन बघा तुमचं बस स्थानक चांगलं केल्या नंतर रेल्वे स्टेशन कोणी एकानेही सांगितले नाही ते चांगले करा पण मी केले का नाही. मी पण बारामती कर आहे माझं लहानाचं मोठेपण इथे गेले आहे. अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. प्रशासकीय भवन समोर दहा बारा एकरात गार्डन करत आहोत, त्यासाठी एक पैसा नगरपरिषदेचा घालत नाही. सर्व पैसे बाहेरून आणत आहे. 30 35 एकरात शिवसृष्टी निर्माण करत आहोत. आपल्या बारामती मधील सिद्धेश्वराच्या मंदिरातील जो नंदी आहे तासा नंदी देशात नाही. बर जगात नाही,देश तरी कशाला जगात नाही च्या मायला देश तरी कशाला. अनेक गोरगरिबाण करिता घरबांधणीचा कार्यक्रम या टर्मला आम्ही हातात घेणार आहोत. अजून ही कचरा ची विल्हेवाट लावण्याकरता इंदूरच्या धर्तीवर तीन शहर निवडले आहेत त्यात बारामती आहे मी शेवटच्या प्रचार सभेला येणार आहे पण पुढील आठ दहा दिवसात अशा काही कंड्या पेटले असत्या सांगायलाच नको म्हणून त्याच्या करता आजच प्रचाराचा शुभारंभ केला चार जागा स्वीकृतच्या माझ्या हातात आहेत. मी योग्य माणसाला संधी देईल. सचिन सदाशिवराव सातव हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत बारामती मध्ये 1 लाख 2 हजार मते आहेत रेकॉर्ड करायचे. माझ्या पद्धतीने काम नाही झाले तर मग मी बघणार त्याच्यासमोर सांगतो. याच्यानंतर मी बारामती सहकारी बँकेला दुसऱ्याला संधी देणार बारामती अर्बन बँकेत फार प्रॉब्लेम होते मी आज ते काढत बसत नाही पण सचिनने चांगले बँका चालवली काही कठोर निर्णय घ्यावे लागले काही नाराज झाले, काहींच्या वसुली करावी लागली्. काही जण म्हणाले आपल्याजवळच्या आहेत तरी त्यांची वसुली अरे अजित पवार असला तरी वसुली करणार बारामती करांनाकुठेही कमीपणा येणार नाही बारामती करांनी त्याच्यावर टाकलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही हा शब्द त्याच्या साक्षीनं देतो. ही बारामती अशीच पाहिजे असेल तर 41 च्या 41 नगरसेवक आणि नगराध्यक्ष देखील निवडून द्या ज्यांना उमेदवारी मिळाले नाही त्यांनी नाराज होऊ नका. देशातील सुंदर हरित आणि स्वच्छ शहर म्हणून बारामतीचा नावलौकिक हवा आहे माझं स्वप्न आहे यासाठी मला तुमची साथ हवी आहे मी आता काही करू शकत नाही. यात माझा स्वार्थ काहीही नाही, मी सकाळी सहा वाजल्यापासून उठून फिरतो पाहतो. इतरांच्या तुलनेत हे एक अग्रेसर शहर म्हणून याची ओळख व्हावी यासाठी माझा प्रयत्न असतो. मला तुम्ही आठ वेळा वेगवेगळ्या पदावर बसून आहे आमदार केलं आहे आज देखील मी पंतप्रधानांच्या बरोबरीने बसतो हे कशामुळे शक्य झालं तर बारामतीकरण म्हणू शक्य झालं, चढउतार आले कधीकधी तुमच्यापुढे ग्रहण प्रश्न निर्माण झाला परंतु त्यातूनही तुम्ही वाट काढली सुप्रियाला निवडून देऊन साहेबांना खुश केलं मला निवडून देऊन मलाही खुश केलं तुम्ही मला मागे खासदार केलं तेव्हा मी 25 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून कामे केली . पालखी मार्ग बाहेरून गेल्याने वाहतूक कोंडीवर परिणाम झाला की नाही जेवढा ट्राफिक कमी करता येईल तेवढा प्रयत्न करत आहे. विकास झाला असला तरी मला परिपूर्ण विकास करायचा आहे आणखी काही गोष्टी राहिल्या आहेत, ते करण्यासाठी मला माझ्या घड्याळावरील उमेदवार निवडून द्या की 1991 पासून तुम्ही माझे पाठीशी उभा राहिला आहात तुमच्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊ दिला नाही. माझ्याकडे बघून माझ्या उमेदवारांना मतदान करा पूर्वी कॅनोन ने जाताना काय वाटायचं आता कसं वाटतंय गार गार वाटतंय गार गार वाटतय. आज अजित पवार आहे अजित पवार काय ताम्रपट घेऊन जन्माला आलेला नाही पण हे पुढे टिकवायचं माझ्या पुढच्यांच्या नंतर घामच निघणार आहे घड्याळाशिवाय दुसरा कुठल्याही उमेदवाराचा तुम्ही या शहरात विचार करू नका यंदा मी बेरजेचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे, कोणी कोणाचा 그ांचा शत्रू नसतो. माळेगाव मध्ये पण रंजन तावरे यांना बरोबर घेतल आहे. चांगलं काम करणार असेल तर माझी काय हरकत आहे. निवडणुकीत जागृत रहा शहराच्या विकासासाठी बनण्यासाठी वैयक्तिक नाराजी पुढे आणू नका. विरोधकांना पण कधीही कमजोर समजलं नाही काही विरोधक बाहेरून आले होते तरी देखील त्यांना आपण कमजोर समजले नाही या निवडणुकीत लाडक्या बहिणींनी साथ दिली पाहिजे, माझ्या निवडणुकीला तुम्ही कसं घरणंघर फिरता तसे या निवडणुकीलाही फिरा पत्रकारांनी खऱ्या बातम्या देत चला. काय काय जमानाले प्रत्येकाला वर्षाला दहा हजार रुपये देणार आईला म्हटलं नितीश कुमारांना भेटून आले की काय अशा काही गोष्टी होत आहेत. 1975 कोटी रुपये बारामती नगर परिषदेसाठी या कार्यकाळात आणलेले आहेत. ही निवडणूक गावकी भावकीची नाही विकासाचे आहे प्रचार करताना कोणालाही उलट बोलायचं नाही जर कोणी प्रश्न विचारला तर समजून सांगायचं ऐकलं ठीक काही जण तुम्हाला उचकवण्याचा प्रयत्न करतील, कुठल्याही जाती धर्माला ठेच पोहोचेल भावना दुखावल्या जातील अशा पद्धतीचे वक्तव्य तुमच्या सभेत बोलायचं नाही, पुढची समारोपाची सभा आपण शारदा प्रांगणात घेऊ मतदारांचा मान सन्मान ठेवा. जसं विधानसभेला माझ्या खांद्यावर मतांचा बोजा टाकल्यामुळे मी जसं पुन्हा कामाला सुरुवात करतो तसंच या नगर परिषदेच्या निवडणुकीला या सर्व घड्याळाच्या उमेदवारांना एवढं प्रचंड मतांनी विजयी करा
141
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 21, 2025 16:15:15
Baramati, Maharashtra:बारामती माळेगाव: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणाचा प्रचार-उद्घाटन बारामती माळेगाव नगरपंचायत निवडणूक प्रचार शुभारंभपासून सुरू झाला. मराठीतून बोलण्याचा कार्यक्रम सुरू झाला; बारामतीमधील प्रचाराचा शुभारंभ करणार असल्याचे सांगितले. माळेगावमध्ये काही जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु यश मिळाले नाही; बारामतीत 41 पैकी आठ जागा बिनविरोध झाल्या. निवडणूक-आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या प्रचाराचं उद्घाटन देव दिवाळीच्या मुहूर्तावर करण्यात आलं. माळेगावकरांना 35 वर्षापासून नागरिक सेवेचा अनुभव असल्याचं सांगत त्यांनी बारामतीचा विकास म्हणून विविध प्रकल्पांची गाठ बांधली. मतदारांना एकजुटीने लोकशाही विकासासाठी मतदान करण्याची दृष्टिकोन दिला; गावाच्या विकासासाठी रस्ते, शाळा, आरोग्य, जलस्रोत, शैक्षणिक संकुल, आयटीआय, कॉम्प्युटर, सीएसआर योजना, गावातील पाणी व गटार व्यवस्था यांसारखे योजनांची माहिती दिली. त्यांनी माळेगावच्या ग्रामपंचायत-नगरपंचायत क्षेत्रात निधी, योजना, आणि सार्वजनिक सुविधांचा उल्लेख केला. गावातील उज्वल भविष्यासाठी विविध निधीची उभी связता, रस्ते-नगर विकास, जलशुद्धीकरण, गटार-रस्ते, पाणी-टँकर उपाययोजना, शाळा- Hog शिक्षण, टेक्निकल शिक्षण, ई-शिक्षण अशा सुविधा उपलब्ध करून देण्याचे hedef सांगितले. गावातील विकासासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र रहावे, सामाजिक समावेशनावर भर देणे, आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सर्वांगीण विकासाचा अजेंडा राबवायचा असल्याचं उल्लेख केला. बारामती मतदारसंघातील सर्व गावांना एकत्र घेऊन विकासाची दिशा ठरवण्याचे वचन दिले. बारामती महाविकास आघाडी-राष्ट्रवादी काँग्रेस या पॅनलने ग्रामपंचायती-नगरपंचायतीच्या विकासासाठी काम करणार असल्याचं सांगितलं. बारामतीत रिंग रोड नसल्यामुळे माळेगावासाठीही तोच विकास मॉडल प्रभावी करायचा असा आशय व्यक्त केला. काही नेत्यांनी आपल्या खात्यात निधी उपलब्ध असल्याचं सांगितलं; बारामतीच्या विकासाच्या दृष्टीने मार्गदर्शक ठरवण्यासाठी एकजुटीची आवाहन केली.
256
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 21, 2025 15:45:36
Ambernath, Maharashtra:अंबनाच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात भरधाव कारने तीन दुचाकी स्वरांना  उडवले अपघाताचे सीसीटीव्ही आले समोर Anchor अंबरनाथच्या पूर्वे आणि पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपूलावर आज संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला ,या अपघातात पाच ते सहा जण गंभीर जखमी असल्याचं बोललं जातंय, एक भर धाव कार पूर्वेकडून पश्चिमेला जात असताना या कारने तीन दुचाकी स्वारांना उडवलं त्यातील एक दुचाकी स्वार तर दुचाकीसह पुलावरून खाली फेकला गेला, या अपघाताचे सीसीटीव्ही समोर आले असून या सीसीटीव्हीरून या अपघाताची भीषणता समोर येते ,या सर्व जखमींना उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आलं असून यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे, चंद्रशेखर भुयार अंबरनाथ चंद्रशेखर भुयार
108
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 21, 2025 14:33:39
Kalyan, Maharashtra:खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे उन्होंने विविध विषयांसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली. कल्याण स्टेशन परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानासाठी 37 गुंठे डिमार्केशन केलेली जागा द्यावी, या बाबत खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी आयुक्तांकडे मागणी केली. सुरेंद्र टेंगळे (पालिका नगर रचना अधिकारी) नागरिकांनी लेखी तक्रार करावी काळ फसणार नाही, ऑफिस मध्ये जाऊन मारणार. खासदार सुरेश उर्फ बाळुमामा म्हात्रे यांनी लोकांच्या तक्रारी आल्याने चर्चा करण्यासाठी अधिकाऱ्याला थांबवले होते, परंतु तो थांबला नसल्याने खासदार चांगलेच संतापले; नागरिकांनी लेखी तक्रार करावी, काळ नाही फसणार तर ऑफिस मध्ये मारणार. त्यांनी नागरिकांच्या कराच्या पैसे वर यांच्या पगार होतात, काम करत नाही. पालिका अधिकारी मधील टेंगळे हे कुठलाही नागरिकांचा ऐकत नाही; त्यांना मी या ठिकाणी थांबायला सांगितलं मात्र ते निघून गेले. त्यांच्या उमटपणाच्या गोष्टीमुळे आयुक्तांच्या कानावर आम्ही विषय ठेवला आहे. टेंगळे ने लोकांसोबत आदराने वागाव; यापुढे त्याची तक्रार आली तर टेंगळेला त्याचा काय काम आहे हे त्याच्या कार्यालयात शिरून त्याला समजून सांगणार. कल्याण मराठी तरुण सुसाईड ही घटना घडली ती चुकीची; एखादा व्यक्ती जीवास मुखेल, सगळ्यांनी या गोष्टीचा भान ठेवला पाहिजे. घडलेली घटना ही दुर्दैवी; राजकारण करा नये, एखाद्याला राजकारणाची सवय असल्यास कोणालाही मी काय करू शकत नाही. उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र यायला हवं; महाराष्ट्रातील लोकांची इच्छा, ते आमच्यासाठी नाही तर लोकांसाठी एकत्र येत आहेत. काँग्रेसच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना त्रास असेल तो विचारण्याची गरज वेगळी; मग सगळ्यांनी येऊन एकत्र काम करायचं, ही आजची काळाची गरज. इतर राज्यातील निकाल पाहिल्या गेला तर महाराष्ट्रात लोकसभेत काँग्रेसचा निकाल चांगला असला तरी शिवसेना व राष्ट्रवादी यांनी प्रामाणिकपणे काम केल्याने काँग्रेसचा निकाल आला. कुठल्याही निकालात होऊन जाण्यापेक्षा सगळे एकत्र चालावं ही सगळ्यांची गरज. आम्ही पवार यांच्य म्हणण्याची सहमत; एक महाराष्ट्रीयन म्हणून माझं मत व्यक्त केलं तर राज ठाकरे, उद्धव ठाकरे खत्री आणि सगळ्यांची इच्छा. जेव्हा सर्वे झाले तेव्हा निकाल अनपेक्षित लागलेला आहे; त्यांच्या सर्वे नंतर लोकांनी कोणालाही काही मतदान केलं तरी परिणाम योग्य येत नाही. महायुतीत वादविवाद होतच राहणार, त्यामुळे खरा रणसंग्राम लवकरच दिसणार; 2017 चा निकाल पाहिला तोच काहीतरी घडू नये ही अपेक्षा. ग्रामीण भागात महाविकास आघाडी आम्ही एकत्र लढत आहोत; शहरातदेखील लढावी, ही माझी मत. byte... सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) खासदार.
120
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Nov 21, 2025 14:21:16
140
comment0
Report
SNSWATI NAIK
Nov 21, 2025 14:20:54
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई नेरुळ स्थित छत्रपती शिवाजी महाराज स्मारक का हालिया उद्घाटन राज्य के वनमंत्री गणेश नाईक ने किया। कार्यक्रम में मुख्यमंत्री और दोनों उपमुख्यमंत्रियों के उपस्थित रहने की सूचना आई थी, लेकिन वे उपस्थित नहीं रहे। उद्घाटन के लिए पत्र पूर्व महापौर द्वारा दिया गया था; अगर समय नहीं मिला तो ऑनलाइन उद्घाटन भी हो सकता था। देरी के कारण शिवप्रेमी द्वारा उद्घाटन किया गया। मनसे नेता अमित ठाकरे द्वारा किया गया आंदोलन यह अवास्तविक प्रतीत होता है; इसलिए उन पर दर्ज होने वाले अपराध वापस लेने की मांग वनमंत्री गणेश नाईक ने की है। साथ ही अमित ठाकरे की उनकी पाठराखण नहीं होने की बात भी कही गई।
117
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 21, 2025 14:18:08
131
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 21, 2025 14:13:41
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या नगरसेवक पदाच्या तीन उमेदवारांचे अर्ज माघारी अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या नगरसेवक पदाच्या तीन उमेदवारांचे अर्ज माघारी निलेश लवटे, सैफन कोरबू, कौसर नदाफ या तीन उमेदवारांनी निवडणुकीतून घेतली माघार काँग्रेसने अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीसाठी एकूण 17 जागासाठी उमेदवार जाहीर झाले होते त्यातील तिघांनी आता माघार घेतली दरम्यान भाजपने पैसा आणि दडपशाही वापर करून उमेदवार फोडल्याचा काँग्रेसचा आरोप तर गावचा विकास भाजप करत असल्याने काँग्रेसच्या उमेदवारांनी स्वइच्छेने माघार घेतल्याचा भाजपचे प्रतिउत्तर अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी तिरंगी लढत होतेय निवडणूक लढवत असलेले तीनही पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यरोप करताना दिसतायत बाईट : अशपाक बळोरगी, काँग्रेस नगराध्यक्ष उमेदवार बाईट : मिलन कल्याणशेट्टी, भाजप नगराध्यक्ष उमेदवार
132
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 21, 2025 14:12:11
Kalyan, Maharashtra:कल्याणात दिव्यांग स्टॉलवर केडीएमसीची कारवाई. ANC-कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने 2008 पासून कार्यरत असलेल्या एका दिव्यांग बांधवाच्या स्टॉलवर कारवाई केल्याने आज वातावरण तापले. या कारवाईविरोधात अपंग विकास महासंघ आणि परिसरातील अनेक दिव्यांग बांधवांनी केडीएमसी मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलन पुकारले आहे. दिव्यांग व्यक्तीच्या उपजीविकेचा प्रश्न असताना, कोणतीही पूर्वसूचना न देता स्टॉल हटवणे ही अमानुष आणि बेकायदेशीर कारवाई आहे. संबंधित सहाय्यक आयुक्तांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, करण्याची मागणी केली आहे. या आंदोलनकर्त्यांनी केली. केडीएमसी बाहेर घोषणाबाजी करत अपंग बांधवानी निषेध व्यक्त केला. दरम्यान केडीएमसीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक स्पष्टीकरणानुसार, स्टॉल हा अनधिकृत होता तसेच पूर्वीही नोटीस देण्यात आली होती. नियमानुसारच कारवाई करण्यात आली असून, कोणतीही अन्यायकारक वागणूक करण्यात आलेली नाही, असा दावा केला आहे.
108
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 21, 2025 14:07:48
81
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 21, 2025 14:07:21
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली जिल्ह्यातल्या नगरपरिषद नगरपंचायतीचे चित्र स्पष्ट,नगराध्यक्ष निवडणुकीत 41 तर नगरसेवका पदासाठी 594 जण रिंगणात.. सांगली जिल्ह्यातल्या सहा नगरपरिषद व दोन नगरपंचायतीसाठी निवडणूक पार पडत असून अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून 60 जणांनी माघार घेतली आहे,त्यामुळे 41 जण नगराध्यक्ष निवडणूकीच्या रिंगणात आहेत.तर नगरसेवक पदाच्या 181 जागेसाठी दाखल झालेल्या 1 हजार 678 अर्जंपैकी 1 हजार 93 जणांनी माघार घेतली आहे,त्यामुळे 594 जण रिंगणात आहेत. त्यामुळे आता नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकांचे चित्र स्पष्ट झालेला आहे. ईश्वरपूर नगर परिषदेसाठी दुरंगी अशी लढत पार पडत आहे.महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत या ठिकाणी होणार आहे.जयंत पाटलांच्या विरोधात महायुती आणि विरोधक या ठिकाणी एकवटले आहेत. आष्टा नगरपालिकेसाठी देखील महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे. पलूस नगर परिषदेसाठी तिरंगी लढत होत असून या ठिकाणी महायुतीमध्ये बिघाडी झाली आहे.भाजपा स्वबळावर लढत आहे. राष्ट्रवादी अजित पवार स्वतंत्र लढत आहे. महाविकास आघाडी या ठिकाणी एकत्रित लढत आहे. तासगाव नगरपरिषदेसाठी चौरंगी लढत होणार आहे,या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गट आघाडी,भाजपा,राष्ट्रवादी अजित पवार गट आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडी अशी लढत होणार आहे. विटा नगर परिषदेसाठी तिरंगी लढत होत आहे.महायुतीमध्ये ही लढत होत आहे.यामुळे या ठिकाणी भाजपा,शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार अशी तिरंगी लढत होणार आहे,काँग्रेस आणि राष्ट्रवादी या ठिकाणी लढत नाही. जत नगर परिषदेसाठी चौरंगी लढत होत आहे भाजपा स्वबळावर लढत आहे,शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट देखील स्वतंत्र लढत आहे तर महाविकास आघाडी एकत्रित लढत आहे. आटपाडी नगर परिषदेसाठी दुरंगी लढत होत आहे.भाजपा स्वबळावर लढत आहे, शिवसेना शिंदे गट आणि स्थानिक आघाडी एकत्रित लढत आहे. शिराळा नगरपंचायतीसाठी महायुतीमध्ये बिघाडी झाली आहे.भाजप व शिवसेना शिंदे गट एकत्रित आघाडी करून लढत आहे,तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गट दोघे एकत्र येऊन लढत आहेत,या ठिकाणी काँग्रेसची भूमिका अद्याप स्पष्ट आहे.
119
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 21, 2025 14:07:04
202
comment0
Report
Advertisement
Back to top