Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ - पुसद मध्ये जन्माष्टमीनिमित्त टाळमृदुंगाच्या गजरात शोभायात्रा.

Aug 26, 2024 16:56:16
Yavatmal, Maharashtra

जन्माष्टमीनिमित्त यवतमाळच्या पुसद शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. डीजेला फाटा देत पारंपारिक पद्धतीने सलग 11 वर्षांपासून या आदर्शवत मिरवणुकीचे आयोजन करण्यात येत आहे. या मिरवणुकीत टाळ व मृदुंगाच्या तालावर गोपाल कृष्ण भगवान की जय असा एकच जयघोष करण्यात आला. या मिरवणुकीत बाल गोपाल वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीकृष्ण जन्मोत्सव समिती पुसद तर्फे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Nov 13, 2025 10:55:30
Jalna, Maharashtra:जालना : ब्रेकिंग जिल्हाप्रमुख अंबेकरांची शिवसेना उबाठाला सोडचिठ्ठी, उध्दव ठाकरेंनी फोनवरुन साधला जालन्यातील शिवसैनिकांशी संवाद जिल्हाप्रमुख सोडून गेले मात्र संघटनेला कुठेही धक्का लागलेला नाही शिवसेना उबाठाचे नेते अंबादास दानवे यांचा दावा दानवेंनी घेतली पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर शिवसेनेत गेल्याने घेतली बैठक संघटनेत कुणीही उपरा नसतो स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक लढवण्यासाठी महाविकास आघाडीत निवडणूक लढवण्यास आमचं प्राधान्य-दानवे सत्तेतील तिन्हीही पक्ष सोडून आमची दारं सगळ्यांसाठी स्थानिक पातळीवर सर्वांसाठी खुली आहेत अँकर :जालन्यातील शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय.त्यानंतर आज विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज जालन्यात येऊन शिवसेना उबाठाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्याची बैठक घेतली.या वेळी दानवे यांच्या फोनवरुन पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला."तुम्ही सगळे ठाम आहात का.?ते गेले तर गेले.आपण सगळे सोबत आहोत.आपल्याला निवडणूक लढवायची असून आपणच जिंकणार आहोत काळजी करू नका" असा मंत्र यावेळी फोनवरून ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला. जिल्हाप्रमुख सोडुन गेल्यानं संघटनेला कोणताही धक्का लागला नसल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला.तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक लढवण्यासाठी महाविकास आघाडीतच निवडणूक लढवण्यास आमचं प्राधान्य आहे.मात्र सत्तेतील तिन्हीही पक्ष सोडून आमची दारं सगळ्यांसाठी स्थानिक पातळीवर सर्वांसाठी खुली आहेत असंही दानवे यावेळी म्हणाले. बाईट : अंबादास दानवे, नेते शिवसेना उबाठा पक्ष
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 13, 2025 10:48:34
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर : नगरपरिषद और नगरपंचायतींच्या रणधुमाळीला जोर आला असून,10 नोव्हेंबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.अवघे चार दिवस शिल्लक असताना इच्छुक उमेदवार नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी करत आहेत.युती किंवा आघाडीचे चित्र स्पष्ट नसल्याने अनेकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मार्ग स्वीकारला आहे.आज वाशिम नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 13 मधून राजू वानखेडे यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे, त्यांनी अनामत रक्कम म्हणून चक्क 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये आणि 10 नाण्यांच्या स्वरूपात रक्कम सादर केली.त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांची या अनोख्या पद्धतीमुळे थोडीशी दमछाक झाली.माझ्या मुलींनी जमा केलेले पैसे मी उमेदवारी अर्जासाठी अनामत रक्कम म्हणून भरले आहेत.त्यांच्या या अनोख्या कृतीमुळे अर्ज दाखल करताना उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय निर्माण झाला आहे.माझ्या मुलींनी जमा केलेले पैसे मी उमेदवारी अर्जासाठी अनामत रक्कम म्हणून भरले असल्याचे वानखेडे यांनी सांगितले. बाईट: राजू वानखेडे,उमेदवार
83
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Nov 13, 2025 10:47:53
Vasai-Virar, Maharashtra:अँकर - वसई विरार महानगरपालिकेतील आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यप्रणालीने प्रभावित होत वसई-नालासोपारा मतदारसंघातील शेकडो महिलांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.पंतप्रधान आणि मुख्यमंत्री महिला विकासासाठी सातत्याने कार्य करत आहेत, त्यामुळे महिलांचा भाजपवरील विश्वास अधिक दृढ झाला असून आगामी महापौर निश्चितच भाजपचाच असेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.. अमित ओमप्रकाश दुबे यांच्या नेतृत्वाखाली हा सामूहिक पक्षप्रवेश सोहळा वसई विरार भाजपच्या आचोळे येथील जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात संपन्न झाला...
1
comment0
Report
SMSATISH MOHITE
Nov 13, 2025 10:42:09
Nanded, Maharashtra:नगरपालिकेच्या निवडनुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीसही सुरुवात झाली असताना अजूनही उमेदवारी दाखल होण्यास विलंब होतोय. त्याचे कारण म्हणजे युती और आघाडीचा निर्णय होण्यास विलंब होतोय. त्या ठिकाणाची परिस्थिती आघाडी होणार असे नेतेमंडळी सांगताहेत. इकडे मात्र स्थानिक स्तरावरही निर्णय होत नसाल्याने कोणता झेंडा घेऊ हाती या संभ्रमात उमेदवार सापडले आहेत. युती, आघाडीचा पेच कायम असताना दुसरीकडे उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची किचकट ऑनलाईन प्रक्रिया आणि सोबत जोडावे लागणारे प्रमाणपत्र यामुळेही कागदपत्रे जमवण्यात उमेदवारांची दमछाक होतेय. अगदी घरात शौच्छालय असल्याचे प्रमाणपत्र, निवडणुकीसाठी बँकेचे नवीन खाते, विविध बेबाकी प्रमाणपत्र अर्जासोबत जोडायचे आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची त्रेधातिरिपीट उडालीये. नांदेड - एकूण नगर परिषद / नगर पंचायत 13 - कालपर्यंत अर्ज भरले एकूण = 02 छ. संभाजीनगर एकूण 7 नगर परिषद / नगर पंचायत - कालपर्यंत अर्ज भरले एकूण = 04 जालना - एकूण 3 नगर परिषद - कालपर्यंत अर्ज भरले एकूण - 0 निरंक धाराशिव - एकूण नगर परिषद / नगरपालिका 8 - कालपर्यंत अर्ज भरले एकूण - 03 परभणी - एकूण नगर परिषद / नगरपालिका 7 - कालपर्यंत उमेदवारी अर्ज भरले कुल = 16 बीड - एकूण नगर परिषद / नगरपालिका 5 - कालपर्यंत उमेदवारी अर्ज भरले कुल = 07 लातूर - एकूण नगर परिषद / नगरपालिका 5 - कालपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले एकूण = 2 अनेक नगर परिषदेत अजून एकही अर्ज भरण्यात आला नाही. मराठवड्यात एकूण 53 नगर पालिकांसाठी निवडणूक असताना उमेदवारी दाखल करण्याच्या पहिल्या तीन दिवसात केवळ 34 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. युती आघाडीचा निर्णय न झाल्याने उमेदवार आणि कार्यकर्ते संभ्रमात असल्याचे नेतेमंडळीही मान्य करताहेत. निवडणुकीच्या तयारीसाठी जास्त वेळ दिला नाही असा आरोप नेतेमंडळी करत असतात. पण निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊनही युती, आघाडीच्या निर्णयाचे काय करायचे. स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायचा की राज्यपातळीवर यात नेयेमंडळी गुरफलटली आहेत. इकडे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या इच्छुक उमेदवारांना मात्र काही मार्ग सुचेना अशी अवस्था झालीये. या सगळ्यामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसात उडी पडेल असे चित्र दिसत आहे.
1
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 13, 2025 10:39:56
Kalyan, Maharashtra:आरपीएफ अधिकाऱ्याचा गणवेश घालून फिरणारा तोतया आरपीएफ अधिकारी गजाआड कल्याण रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, अविनाश जाधव असे तरुणाचे नाव “मैं आरपीएफ अधिकारी हूँ!” म्हणणारा तोतया तरुण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात —पोलिसांसोबत सेल्फी घेण्याच्या हव्यासात अडकला पोलिसांच्या जाळ्यात कल्याण रेल्वे पोलिसांनी आरपीएफ चा गणवेश घालून आरपीएफ अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या तरुणाला बेड्या ठोकल्यात. अविनाश जाधव असे या तरुणाचे नाव असून त्याला पोलीस बनण्याची क्रेज होती , तो शिर्डी येथील एका हॉटेलमध्ये काम करत असल्याने त्याचे लग्न देखील जमत नव्हते . त्यामुळेच आपल्या मित्रमंडळी कुटुंबामध्ये आपली इमेज जमवण्यासाठी मी आरपीएफ मध्ये भरती झाल्याचे सांगत आरपीएफ युनिफॉर्म घालूनच रेल्वेने वावरत असल्याचे समोर आले आहे अविनाश हा कल्याण रेल्वे स्थानकात आला होतो त्यावेळेस रेल्वे स्थानकात असेल्याने आर पी एफ पोलीस सोबत सेल्फी जाधव काढले यावरून आर पी एफ पोलिसाच्या लक्षात आले त्याने आय डी मागितले ते दाखवू नशकल्याने सर्व प्रकार समोर आला आहे. याने आणखी कुणाची फसवणूक केली आहे का याचा तपास आता रेल्वे पोलीस करत आहेत
1
comment0
Report
SKShubham Koli
Nov 13, 2025 10:30:00
Thane, Maharashtra:ठाण्यातील वर्तक नगर येथे प्रति शिर्डी के रूप में ओळख असणाऱ्या साईबाबा मंदिराचा वर्धापन दिनानिमित्ताने राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. सर्व ठाणेकरांच्या हाल अपेक्षा दूर व्हाव्यात अशी साई चरणी प्रार्थना केली. ऑन ठामपा आरक्षण - भारतीय जनता पक्षाच्या राज्यस्तरीय नेतृत्वानं महायुतीतच निवडणुका लढवायच्या अशी इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यामध्ये मी स्पष्ट सांगितले आहे की महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढवताना कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यावी लागेल. तशा पद्धतीचे प्रयत्न सध्या चालू आहे देशभरात मोदी साहेबांच्या नेतृत्वात जशी प्रगती चालू आहे तसेच महाराष्ट्रातही होईल. देवेंद्र फडणवीस यांचा नेतृत्व आहे परिपक्व नेतृत्व आहे महाराष्ट्रात. कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही त्यांच्या सहकार्य म्हणून मी राज्यस्तरावर मांडेल. ऑन महापौर दावा - प्रत्येकाला दावा करायचा अधिकार आहे. संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यामध्ये चमत्कार घडेल असा माझा विश्वास आहे साईबाबांच्या कृपेने. ऑन बिबटे - पुणे जिल्ह्यामध्ये चार धरण आहेत. पूर्वी एवढी उसाची शेती नव्हती उसाच्या शेतीमुळे त्यांना तिथे आदिवास मिळाला. एकेकाळी त्या ठिकाणी बिबट्याचा वावर नव्हता उसाचा शेतामुळे त्यांना असं वाटतं की हा आमचा अधिवास आहे. ऑथेंटिक अशी माहिती आहे की साधारण 700 बिबटे आहेत. ऑफ द रेकॉर्ड साधारण दोन १००० हजारच्या संख्या त्यांनी पार केलेले आहे. ज्यावेळेस मी त्या ठिकाणी गेलो होतो त्या घरात वेगवेगळ्या वयाच्या नागरिकांवर हल्ला झाला मुळात मलाच अशा गोष्टीची लाज वाटली. हल्ला करणाऱ्या बिबट्याला ऑन द स्पॉट शूट करा. त्या ठिकाणी लाखो लोक दुखी आहेत. पुणे जिल्हा व नगर जिल्हा करिता दोन्ही जिल्हा करिता 11 11 कोटींची तात्पुरती यंत्रणा उभी केली आहे. चंद्रपूरच्या भागात जशी यंत्रणा उभे केले तशी यंत्रणा उभी केली जाईल.जेणेकरून मानवाच्या व हिंसक प्राण्यांच्या मध्ये संघर्ष कमी होईल.
1
comment0
Report
MKManoj Kulkarni
Nov 13, 2025 10:27:05
1
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 13, 2025 10:26:40
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड मध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी हात मिळवनी केल्यानंतर ही आघाडी संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनली होती. पण आता मात्र चंदगड नगरपरिषद निवडणूकीत नवा ट्विस्ट निर्माण झालाय. चंदगड नगर परिषद निवडणूक निमित्ताने केवळ दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत, तर महाविकास आघाडी सोबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची आघाडी असणार आहे अस कोल्हापूर जिल्हा शरद पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हि.बी. पाटील यांनी स्पष्ट केले आहे. भाजप वगळता इतरांशी आघाडी करा असं राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी जिल्हास्तरावर निरोप दिला असल्याचे देखील व्ही. बी. पाटील यांनी सांगितलं आहे. महाविकास आघाडीला घेऊनच अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आहे असा दावा ही. बी. पाटील यांनी केला आहे..
1
comment0
Report
SKShubham Koli
Nov 13, 2025 10:26:26
Thane, Maharashtra:ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 2.38 करोडचा मेफेड्रोन जप्त; दोन आरोपी अटक. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठी कारवाई करत मेफेड्रोन (Mephedrone) हा प्रतिबंधित अंमली पदार्थ जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 9 किलो 71 ग्रॅम मेफेड्रोन जप्त करत दोन संशयितांना अटक केली असून, जप्त केलेल्या अंमली पदार्थाची किंमत सुमारे 2,38,57,900/- इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी सापळा रचून अब्दुल्ला शेख आणि कमलेश अनंत सोनवणे यांच्यासह आणखीन दोघांना ताब्यात घेतले आहे तपासादरम्यान त्यांच्या ताब्यातून 9 किलो 71 ग्रॅम मेफेड्रोन असा मोठा साठा जप्त करण्यात आला. येणाऱ्या काळात देखील मोठी करडी नजर ठाणे, अमली विरोधी पथकाची शहरात असल्याचं ठाणे क्राईम ब्रांच पथकाचे उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी सांगितलं.
1
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 13, 2025 09:33:22
Amravati, Maharashtra:इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरचे अमरावतीत फलक लागल्याने भाजप आक्रमक; अर्ध्या तासापेक्षा अधिकचा काळ आयुक्तांच्या दालनात भाजप पदाधिकाऱ्यांचा ठिया. खासदार अनिल बोंडें यांच्या नेतृत्वात पदाधिकारी पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेले असता, अनिल बोंडे यांच्या सहभागाने अर्ध्या तासापेक्षा अधिकचा काळ आयुक्तांच्या दालनात भाजप पदाधिकाऱ्यांचा ठिया दिला आहे. अमरगती शहरातील मुख्य चौकांमध्ये इस्लामच्या प्रचाराचे फलक लागतेच कसे असा सवाल खासदार अनिल बोंडे यांनी पोलीस आयुक्तांना विचारला आहे. लव्ह जिहाद निर्माण करण्याचे काम या माध्यमातून होत असल्याचा आरोप अनिल बोंड यांनी केला असून हे जिहादी रॅकेट उध्वस्त केले पाहिजे, याचे धागेदोरे राष्ट्र विघातक शक्तींशी जोडल्या गेले आहे यावर कारवाई करण्याची खासदार अनिल बोंडे यांनी मागणी केली आहे.
45
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 13, 2025 09:22:48
Akola, Maharashtra: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या प्रवक्त्यांच्या पहिल्या यादीत आमदार अमोल मिटकरी यांचं नाव नसल्याने गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. पक्षातील त्यांच्या भूमिकेबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात होते.मात्र आज पक्षाने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकाच्या यादीत अमोल मिटकरी यांचं नाव 22व्या क्रमांकावर जाहीर करण्यात आलं आहे त्यामुळे मिटकरी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. या पार्श्वभूमीवर मिटकरी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “मी वैयक्तिकरित्या समाधानी आहे. प्रवक्तेपद किंवा पद नसणं महत्त्वाचं नाही, अजितदादांचा कार्यकर्ता असणं माझ्यासाठीचं मोठं आहे." या[m]ुळे आता मिटकरींच्या या प्रतिक्रियेनं अनेक तर्कांना पूर्णविराम मिळाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.
11
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 13, 2025 09:18:58
2
comment0
Report
Advertisement
Back to top