445001
यवतमाळ - पुसद मध्ये जन्माष्टमीनिमित्त टाळमृदुंगाच्या गजरात शोभायात्रा.
Yavatmal, Maharashtra:जन्माष्टमीनिमित्त यवतमाळच्या पुसद शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. डीजेला फाटा देत पारंपारिक पद्धतीने सलग 11 वर्षांपासून या आदर्शवत मिरवणुकीचे आयोजन करण्यात येत आहे. या मिरवणुकीत टाळ व मृदुंगाच्या तालावर गोपाल कृष्ण भगवान की जय असा एकच जयघोष करण्यात आला. या मिरवणुकीत बाल गोपाल वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीकृष्ण जन्मोत्सव समिती पुसद तर्फे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
हिंगोली में शववाहिका धुलखात गिरने की खबर, स्वास्थ्य विभाग ने ट्रांसफर के आदेश जारी
Hingoli, Maharashtra:हिंगोली जिले में आरोग्य विभागाकडून शववाहिका धुळखात पडल्याची बातमी; आरोग्य विभागाला जाग आली असून धुळखात पडलेल्या शववाहिका हस्तांतरित करण्याचे आदेश सर्व आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत; राजाच्या सर्व जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना आदेश काढल्यात आले आहेत; राज्यभरात 132 शववाहिका जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडे वितरित करण्यात आलेले आहेत; त्यापैकी अनेक शववाहिका हस्तांतर अभावी धुळखात पडल्या आहेत; जिल्हा आरोग्य अधिकारी कडे असलेल्या सर्व शववाहिका मागणी असलेल्या नगरपंचायत पालिका यांच्याकडे हस्तांतरित करण्यात याव्यात असे आदेश आरोग्य विभागाच्या उपसंचालकाने काढले आहेत; याची बातमी आता प्रचंड चर्चेत आहे; आरोग्य विभागाला जाग आली आहे.0
0
Report
राज्य शिक्षक परिषद: शिक्षकों पर शाला के बाहर काम का बोझ खत्म करने की मांग
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर च्या राळेगणसिद्धी येथे राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षण हक्क परिषद घेण्यात आली या परिषदेसाठी राज्यभरातून हजारो शिक्षक सहभागी झाले होते शिक्षकांना केवळ शिक्षणाचा काम द्यावं ही प्रमुख मागणी या परिषदेत करण्यात आली. ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे आणि पद्मश्री पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या परिषदेत शिक्षकांच्या शाळाबाह्य कामांवर आवाज उठवणार असल्याची भूमिका सर्व मान्य करण्यात आली शिक्षकांना मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य शैक्षणिक कामे लावली जातात यातून त्यांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळत नाही याचाच परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होतो यासोबतच सेवेतील शिक्षकांना शिक्षक पात्रता चाचणी रद्द करावी यासह शिक्षकांच्या विविध मागण्यांवर या परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि पद्मश्री पोपटराव पवार यांच्या माध्यमातून आम्ही सरकारशी संवाद साधणार असल्याचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितल आहे0
0
Report
काटेपूर्णा अभयारण्य में पानी संकट, वन्यजीव पानी के लिए भटकने लगे
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील राजाकीन्ही परिसरातील काटेपूर्णा अभयारण्यात अनेक नैसर्गिक पाणवठे कोरडे पडल्याने वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मान्सूनला झालेला विलंब आणि वाढत्या उष्णतेमुळे जंगलातील जलस्रोत आटले असून हरिण,नीलगाय,रानडुक्कर यांसह विविध वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अभयारण्य परिसरातील काही बोअरवेलमध्ये पाणी उपलब्ध असतानाही ते पाणवठ्यांपर्यंत पोहोचविले जात नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने बोअरवेलचे पाणी पाणवठ्यांमध्ये सोडून वन्यजीवांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यातची मागणी प्राणी प्रेमी कडून होत आहे.0
0
Report
Advertisement
15 अगस्त से रायगढ़ के पालकमंत्री पद की पुष्टि, दळवी का दावा
Chendhare, Maharashtra:विधान परिषदेच्या बदल्यात शिवसेनेला रायगडचं पालकमंत्री पद मिळणार अशी चर्चा सुरू असताना आता अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी याबाबत महत्त्वपूर्ण विधान केलंय. मंत्री भरत गोगावले हे येत्या १५ ऑगस्टपूर्वी रायगडचे पालकमंत्री म्हणून विराजमान होतील, असा विश्वास आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केलाय. भरत गोगावले यांनी कोकणच्या विधानपरिषदेच्या जागेसाठी जो काही निर्णय घेतलाय यावरून आमचा तो अधिकार आहे. आणि याबाबत राज्याचे मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील येत्या आठ-दहा दिवसात निर्णय घेऊन आम्हाला न्याय देतील आणि भरत गोगावले यांच्या रूपात आम्हाला रायगडचे पालकमंत्री पद मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय。0
0
Report
पुणे के खेड में भीषण एक्सीडेंट, बाइक चालक की मौत, एक घायल
Shirur, Maharashtra:पुणे के खेड तालुक्यातील जैदवाडी हद्दीत पुणे - नाशिक महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. भरधाव वेगातील टाटा सफारी कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या अपघातात दुचाकीवरील अनिकेत वाघ यांचा मृत्यू झाला, तर धनेश जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रांजणी येथील अनिकेत एकनाथ वाघ वय २७ वर्षे आणि आंबेगाव तालुक्यातील धनेश बबन जाधव वय २८ वर्षे हे दोघे मोटारसायकल क्रमांक MH 14 GJ 2006 वरून राजगुरुनगरच्या दिशेने जात होते. यावेळी त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या टाटा सफारी कार क्रमांक MH 14 JEU 5455 वरील चालक अजितकुमार विनोदकुमार बाजपेयी ने भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवत दुचाकीला जोरदार धडक दिली. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात कार चालकाविरोधात मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.0
0
Report
पिंपरी-चिंचवड के स्पा सेंटर पर छापा: सेक्स ट्रैफिकिंग का पर्दाफाश, दो महिलाओं rescued, स्पा चालक गिरफ्तार, फरार अमोल जाधव की तलाश जारी
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी-चिंचवडमध्ये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षान कारवाई करत चिंचवडमधील एका स्पा सेंटरवर छापा टाकला आहे. एका मॉलमधील स्पा मध्ये सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून स्पा चालक Shahanavaz Rifaiयाला अटक करण्यात आली आहे. तर अमोल जाधव हा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल आणि इतर कागदपत्रे जप्त केली आहेत.0
0
Report
Advertisement
महा-ऑनलाइन पोर्टल की तकनीकी गड़बड़ी: प्रवेश, छात्रवृत्ति और अन्य सेवाओं में भारी देरी
Nashik, Maharashtra:सलग तिसऱ्या दिवशी 'महा-ऑनलाइन' बंद... शिष्यवृत्ती व विविध अर्ज प्रक्रियांवर परिणाम... अँकर प्रवेश हंगामाच्या ऐन तोंडावर विद्यार्थ्यांमध्ये मोठी डोकेदुखी ठरली आहे महा-ऑनलाइन पोर्टलची तांत्रिक बिघाडाची समस्या. सलग दुसऱ्या दिवशीही पोर्टल ठप्प असल्याने जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, नॉन-क्रीमीलेयर, अधिवास आणि राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रांसह विविध शासकीय सेवांचे अर्ज रखडले आहेत. अकरावी प्रवेश, शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान सर्व्हर बंद पडल्याने विद्यार्थी, पालक आणि महा-ई-सेवा केंद्रचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पोर्टल कधी सुरू होणार याकडे आता हजारो विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष लागले आहे...0
0
Report
कोल्हापुर के अंबाबाई मंदिर में 1.5 किलो सोने का कलश स्थापित, भक्तजनों में उत्साह
Kolhapur, Maharashtra:करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या मंदिराच्या वैभवात आज आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरावर दीड किलो सोन्याचा कळस विधीवत बसवण्यात आला आहे. अधिक महिन्यातील शुक्रवार आणि देवीच्या पूजनासाठी अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या दिवशी हा सोहळा पार पडल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या वतीने हा सोन्याचा कळस अर्पण करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री 9 वाजल्यानंतर कळस बसवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. पहाटेपासून सुरू असलेले हे काम आज सकाळी सुमारे सात वाजेपर्यंत सुरू होते. कळस बसवण्यासाठी विशेष तांत्रिक कौशल्य असलेले सुमारे २५ कर्मचारी कोल्हापूरमध्ये दाखल झाले होते. मंदिराच्या शिखरावर अत्यंत काळजीपूर्वक आणि धार्मिक विधींच्या उपस्थितीत हा कळस बसवण्यात आला. या कळसासाठी सुमारे २०० किलो तांब्याचा डेरा आणि कळस तयार करण्यात आला असून त्यावर दीड किलो सोन्याचा पत्रा चढवण्यात आला आहे. या संपूर्ण कळसाची किंमत अंदाजे अडीच ते तीन कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे. मंदिराच्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वाला साजेसा हा सोन्याचा कळस आता मंदिराच्या सौंदर्यात भर घालणार आहे. विशेष बाब म्हणजे, हा कळस प्रतापसिंह राणे यांच्या वतीने अर्पण करण्यात आला असला तरी कळसारोहणाच्या वेळी राणे कुटुंबातील एकही सदस्य उपस्थित नव्हता. तरीही धार्मिक विधी आणि मंदिर प्रशासनाच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. आजपासून अंबाबाई मंदिरावर झळकणारा हा सोन्याचा कळस भाविकांना दर्शनासाठी खुला झाला असून, अधिक मासातील या शुभ दिवशी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांचे तो विशेष आकर्षण ठरत आहे. करवीर नगरीच्या धार्मिक वैभवात भर घालणारा हा ऐतिहासिक क्षण भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला आहे.0
0
Report
नाशिक के 21 अस्पतालों को कारण बताओ नोटिस जारी, 15 टीमों से एक महीने की छापेमारी
Nashik, Maharashtra:नियम धाब्यावर बसवणाऱ्या २१ रुग्णालयांना नाशिक महानगरपालिकेची कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे. शहरातील ६७४ रुग्णालयांच्या तपासणी मोहिमेत २१ रुग्णालयांच्या कामकाजात आणि कागदपत्रांमध्ये अनियमितता आढळल्याने या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे. मुंबई नाका परिसरातील एका IVF सेंटरचा बदलापूर येथील स्त्री-बीज तस्करी प्रकरणातील संशयास्पद सहभाग आणि महात्मानगरच्या एका रुग्णालयात उघडकीस आलेले बेकायदेशीर गर्भलिंग निदान व गर्भपाताचे प्रकार, यामुळे मनपाने १५ विशेष पथके स्थापन करून महिनाभर रुग्णालयांची झाडाझडती घेतली.0
0
Report
Advertisement
पंढरपूर में रोहित पवार के अन्नत्याग आंदोलन पर पुलिस ने की कड़ी निगरानी
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर में आमदार रोहित पवार के अन्नत्याग आंदोलन के पार्श्वभूमी पर आंदोलन स्थल पर पुलिस ने बैरिकेडिंग की है। प्रशासन ने इस आंदोलन को अनुमति नकार दी है, फिर भी आमदार रोहित पवार आज पंढरपूर में अन्नत्याग आंदोलन शुरू करेंगे ताकि कानून और व्यवस्था के प्रश्न उत्पन्न न हों। राज्य सरकार की शेतकरी कर्जमाफी योजना की कठोर शर्तें रद्द करने के लिए यह आंदोलन किया जाएगा।0
0
Report
नगरसेवक मतीन पटेल का पलटवार, निधा खान से जुड़े आरोपों पर नया मोड़
Nashik, Maharashtra:नगरसेवक मतीन पटेलने मारली पलटी... निदा खानच्या आई, मावशीला भेटीची कबुली नाकारली. मल्टिनॅशनल कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी निदान खानला आश्रय देणारा छत्रपती संभाजीनगरातील एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल पलटला काही दिवसांपूर्वी निदा खानचे वृद्ध आई-वडील, मावशी माझ्या जनसंपर्क कार्यालयात आल्या होत्या. त्यांनी कुटुंबातील एका महिलेच्या प्रसूतीसाठी फक्त दोन-तीन दिवसांसाठी राहण्याकरिता मदत करा, अशी याचना केली. तेव्हा मी माझा मित्र हनीफ खानच्या रिकामी इमारतीची चावी त्या कुटुंबाकडे दिली होती. . तिघांची प्रथमच समोरासमोर चौकशी करण्यात आली होती तेव्हा मतीनने 'मी यांना ओळखत नाही, माझा यांच्याशी कधीही संबंध आला नाही,' अशी कोलांटउडी मारली. निदाच्या मावशीनेही पोलिसांना सांगितले की, 'मी यांना प्रथमच पाहतेय. आधी आमची भेट झालेली नाही.' निदाच्या आईनेही बहिणीच्या विधानाला दुजोरा दिला अशी माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली है.0
0
Report
यवतमाल महापौर और कांग्रेस नेताओं बीच बहस, भाजपा ने नागरिकों समाधान पर ज़ोर दिया
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष प्रियदर्शनी उईके यांना अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत भेटायला गेलेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची चांगलीच शाब्दिक चकमक झाली. नगराध्यक्षांनी त्यांच्या कक्षात दोघांना येण्याची परवानगी दिली असताना, सर्व काँग्रेस पदाधिकारी आत गेल्याने हा वाद झाला. नगराध्यक्षांचा कक्ष हा जनतेचा आहे, त्यामुळे कोणीही आत येऊ शकतं अशी भूमिका काँग्रेसने मांडली तर काँग्रेस पदाधिकाऱ्यांची वर्तणूक व बोलण्याची भाषा अयोग्य होती, त्यांनी अर्धवट व्हिडिओ व्हायरल करून प्रसिद्धी मिळविण्यापेक्षा नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी विधायक भूमिका घेणे अधिक महत्त्वाचे आहे, असे मत भाजपाचे गटनेते नितीन गिरी यांनी व्यक्त केले.0
0
Report
Advertisement
अमरावती में पोटे- Rana की मुलाकात: राजनीतिक वैर खत्म करने की उम्मीद
Amravati, Maharashtra:विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रवीण पोटे आणि रवी राणा यांची सदिच्छा भेट; प्रवीण पोटे यांनी रवी राणा यांचं कार्यालयात येऊन केलं स्वागत, रात्री उशिरापर्यंत दोघांन मध्ये बैठक अँकर :- अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे उमेदवार आणि माजी मंत्री प्रवीण पोटे यांनी युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांच्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन सदिच्छा भेट घेतली. प्रवीण पोटे यांनी रवी राणा यांचं शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. यावेळी भाजपाचे खासदार अनिल बोंडे देखील उपस्थित होते. रवी राणा आणि प्रवीण पोटे यांच्या या भेटीमुळे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. अमरावतीच्या राजकारणात राणा विरुद्ध पोटे असा संघर्ष अनेक वर्षे पाहायला मिळाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही नेत्यांमधील मतभेद अधिक ठळकपणे समोर आले होते. दरम्यान रात्री उशिरापर्यंत झालेल्या या सदिच्छा भेटीमुळे प्रवीण पोटे आणि रवी राणा यांच्यातील जुने राजकीय वैर संपुष्टात आले आहे का असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.0
0
Report
Tapovan वृक्षतोड़ मामला: मुंबई HC में आज सुनवाई, 1800 पेड़ों का भवितव्य तय
Nashik, Maharashtra:तपोवन वृक्षतोड प्रकरण: उच्च न्यायालयात आज सुनावणी आघामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील साधुग्राम मधील १८०० झाडांवर कुऱ्हाड चालवण्याच्या महापालिकेच्या निर्णया विरोधात आज मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे वृक्षतोडीच्या प्रशासनाच्या या निर्णयाला आव्हान देत मनसेचे शहरापाध्यक्ष अँड नितीन पंडित यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांच्या अंतरिम अर्जावर पालिकेने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणे अपेक्षित होते मात्र अद्याप ते दिलेले नाही. उच्च न्यायालयातून पळवाट काढण्यासाठी हे प्रकरण राष्ट्रीय हरीत लवादाकडे वर्ग करण्याची मागणी पालिकेने केली होती मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावली. पालिका न्यायालयात वेळकाढू धोरण अवलंबत असल्याचा आरोप होत असून आज उच्च न्यायालय यावर काय निर्णय देणार यावर १८०० झाडांचे भवितव्य ठरणार आहे....0
0
Report
हिंगोली में विकलांग नागरिक स्मशानभूमि पर अतिक्रमण हटाने की मांग लेकर उपवास शुरू किया
Hingoli, Maharashtra:हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील टाकळगाव गावात स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटवून जागेची मोजणी करण्याच्या मागणीसाठी अपंग नागरिकांनी स्मशानभूमीतच अमरण उपोषण सुरू केला आहे उपोषणाचा दुसरा दिवस असून स्मशानभूमीची जमीन अतिक्रमण मुक्त करून ग्रामपंचायतीच्या ताब्यात द्यावी या प्रमुख मागणीसाठी हे उपोषण सुरू करण्यात आल आहे..0
0
Report
Advertisement
