icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

उल्हासनगर धर्मांतरण केस: मराठी न समझ पाने पर तीनों आरोपी को जमानत

Ambernath, Maharashtra:उल्लासनगरातील गाजलेल्या कथित ‘धर्मांतर’ प्रकरणात मोठी घडामोड समोर आली असून न्यायालयाने मराठी समजत नसल्याच्या कारणावरून तिन्ही आरोपींना जामीन मंजूर केला आहे. आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत, “आरोपींना मराठीत दाखल करण्यात आलेली FIR समजली नाही,” असा दावा करत जामिनासाठी युक्तिवाद केला. यावर सरकारी पक्षाने जोरदार आक्षेप घेत, आरोपींचा जन्म आणि शिक्षण उल्हासनगरमध्येच झाल्याने त्यांना मराठी भाषा व्यवस्थित समजते, असा दावा न्यायालयात केला. दरम्यान, पीडित महिलेच्या वकील अ‍ॅड. सरोज पगारे यांनी तपास अधिकारी न्यायालयात गैरहजर असल्यामुळे सरकारी बाजू प्रभावीपणे मांडली गेल्याचा आरोप केला आहे. आरोपींना PR बाँडवर जामीन मिळाल्यानंतर आता वरच्या न्यायालयात जाऊन कठोर कारवाईसाठी अर्ज करणार असल्याची माहितीही अ‍ॅड. पगारे यांनी दिली. या प्रकरणात आरोपींनी खोटं नाव सांगून एका हिंदू तरुणीशी विवाह केला आणि तिला बिहारला घेऊन जाऊन मानसिक तसेच शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडितेला बुरखा आणि हिजाब घालण्यास सक्ती केली गेली, गोमांस खाण्यास भाग पाडले गेले आणि आरोपीने दुसरे लग्न करून तिला घराबाहेर काढल्याची तक्रारही करण्यात आली होती. या प्रकरणी उल्हासनगरच्या सेंट्रल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी इम्रान शेख, सलमान शेख आणि एका अल्पवयीन आरोपीला अटक केली होती. तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना जामिन मंजूर करण्यात आलाय.
0
0
Report
Advertisement

26 मई से रत्नागिरी- मालवण में जलपर्यटन बंद, मॉनसून सुरक्षा के लिए जारी आदेश

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रत्नागिरीत,मालवणात 26 पासून जलपर्यटन बंद.. पावसाळी हंगामाची सुरुवात आणि समुद्रातील संभाव्य धोके लक्षात घेता जिल्ह्यातील बंदर शेत्र 26 मे पासून सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यवसायिक जलक्रीडा प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्याच्या आदेश महाराष्ट्र सागरी मंडळाने जारी केले आहेत.. हा बंदी आदेश 31 ऑगस्ट पर्यंत लागू राहणार आहे.. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या रत्नागिरी, मालवण बंदर निरीक्षकांनी काढलेल्या अधिकृत पत्रानुसार 26 मे ते 31 ऑगस्ट या पावसाळी कालावधीत सर्व प्रकारच्या जल क्रीडा,नौका विहार,स्कूबा ड्रायव्हिंग या बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.. कोकण किनारपट्टीवर पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो अशा स्थितीत पर्यटकांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून दरवर्षी प्रशासनातर्फे ही खबरदारी घेतली जाते..
0
0
Report

गंगापुर में किसानों ने तहसील के सामने हंगामा, खेत सड़क के मामले पर आंदोलन

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:गंगापूर तालुक्यातील मंजापूर शिवारातील शेतरस्त्याच्या वादावरून तहसील कार्यालयात शेतकऱ्यांनी राडा केला.. गट क्रमांक १५ ते १६ मधील शेतीकडे जाणारा रस्ता मोकळा करून देण्याच्या मागणीसाठी गेल्या सहा वर्षांपासून प्रशासनाचे उंबरठे झिजवत असल्याचा आरोप करत एका संतप्त शेतकऱ्याने थेट तहसीलदारांच्या केबिनसमोर पेट्रोल ओतून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, अंतिम टप्प्यात आलेला निकाल मुद्दाम रखडवला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी प्रशासनावर केला आहे.
0
0
Report

छत्रपति संभाजीनगर में अनधिकृत पानी कनेक्शन के खिलाफ मनपा की तेज कार्रवाई; 114 कनेक्शन काटे

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत करणाऱ्या अनधिकृत नळ जोडण्यांविरोधात महानगरपालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. उस्मानपुरा येथून  देवानगरीकडे जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर विशेष मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत तब्बल ११४ अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पाणीटंचाईची समस्या गंभीर बनत असताना, अधिकृत नळधारकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळावा यासाठी मनपा प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली आहे. यापूर्वी १३ मे रोजी झालेल्या आढावा बैठकीत पाणी पुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अनधिकृत जोडण्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
0
0
Report
Advertisement

उमर्ी-ईसापुर में तीन घंटे की जद्दोजहद के बाद बिबट पिंजरे में जेरबंद; वन विभाग ने उसे सफलतापूर्वक मुक्त किया

Bhandara, Maharashtra:भंडारा जिले के अड्‍याळ वनपरिक्षेत्र के उमरी (ईसापूर) में तीन घंटे की कोशिशों के बाद वनविभाग ने बिबट को जेरबंद किया। उमरी (ईसापूर) क्षेत्र की घटनाक्रम के मुताबिक कालव्यात पायली में वन्यप्राणी बिबट होने की सूचना मिलने पर यह कारवाई की गई। उमरी चौक पर पुलिस पाटील प्रफुल्ल सावरबांधे ने बिबट की सूचना दी। शीघ्र बचाव दल और वनकर्मचार्‍यों ने मौके पर पहुंचकर स्थिति को नियंत्रण में रखा। बिबट के आसपास लोगों की भीड़ जुट गई थी। वनविभाग ने लोगों को सुरक्षित रहने की सलाह दी और शीघ्र बचाव दल ने पथराव रोककर बिबट को पिंजरे में लाने के लिए पायली में एक हिस्सा बंद कर दूसरा भाग खुला। कुछ समय बाद बिबट सुरक्षित रूप से पिंजरे में आ गया। जेरबंद किए गए बिबट को वनपरिक्षेत्र कार्यालय लाकर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मिसलवार ने जांच की। जांच में पंक्ति के अनुसार बिबट शारीरिक रूप से सक्षम पाया गया और मादा होने के साथ उसकी उम्र लगभग एक से दो वर्ष बताई गई। पशुवैद्यकीय सलाह पर बिबट को प्राकृतिक आवास में मुक्त कर दिया गया।
0
0
Report

गोंदिया गोरेगांव में तेज ट्रक ने 30 वर्षीय युवक को चीर डाला, रास्ता रोको

Bhandara, Maharashtra:गोंदिया गोरेगांव तालुक्यातील सोनी येथील रास्ता रोको आंदोलन 8 तासानंतर मागे... भरधाव ट्रकने 30 वर्षीय तरुणाला चिरडल्यानंतर स्थानिकांनी केला रास्ता रोको आंदोलन... आर्थिक मदतीचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन घेतले मागे... गोरेगाव आमगाव मार्गावरील सोनी नोनीटोला फाट्यावर घडली... अनिल हरीणखेडे (30) असे मृतक तरुणाचे नाव असून अनिल हा आपल्या दुचाकीने नोनीटोला कडून सोनीच्या दिशेने जात असताना भरधाव ट्रकने त्याला चिरडले यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता .... घटनेनंतर सोनी आणि नोनीटोला येथील नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश बघायला मिळाला व स्थानिकांनी गोरेगाव आमगाव मार्ग रोखून धरला होता.. मात्र प्रशासनाच्या मदतीने हे आंदोलन अखेर 8 तासानंतर मागे घेण्यात आले आहे...
0
0
Report
Advertisement

चिपळूण में महावितरण के खिलाफ नागरिकों ने रात भर विरोध प्रदर्शन, आपूर्ति बाधित

Ratnagiri, Maharashtra:चिपळूण - रत्नागिरी उन्हाच्या उकाड्याने त्रस्त नागरिकांचा महावितरण कार्यालयात रात्रभर ठिय्या.... रात्री बंद केलेला वीजपुरवठा पूर्ववत न केल्यामुळे संतप्त नागरिकांची महावितरण कार्यालयात रात्री उशिरा धाव.... पहाटे तीन वाजेपर्यंत चिपळूण मधील नागरिक बसले महावितरण कार्यालयात. स्थानिक नगरसेवकांसह नागरिकांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर. वीजपुरवठा सुरळीत होणार नसेल तर संपूर्ण शहराचा वीजपुरवठा खंडित करा. नागरिकांची अधिकाऱ्यांकडे मागणी. काँग्रेस नगर सेवक साजिद सरगुरो यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर.
0
0
Report

सांगली महापालिका में भाजपा का दबदबा, पवार गट को बड़ा धक्का

Sangli, Maharashtra:सांगली महापालिकेत राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का दिला आहे. जयंत पाटलांचे दोन खंदे नगरसेवकांनी मुंबईमध्ये भाजपात प्रवेश केलाय, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचा उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सांगली महापालिकेचे नगरसेवक युवराज गायकवाड आणि सुरेश बंडगर या दोघांनी भाजपात प्रवेश केला आहे. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अवघे तीन नगरसेवक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निवडून आले होते, त्यापैकी दोन नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेशा केल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटलांना हा मोठा धक्का मानला जातोय. सांगली जिल्हा परिषदेमध्ये जयंत पाटलांनी, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवत करेक्ट कार्यक्रम केला होता, त्याची परतफेड म्हणून महापालिकेत भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडत जयंत पाटलांना दणका दिल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
0
0
Report
Advertisement

कोल्हापुर पुलिस ने राजारामपुरी में गावगुंडों के खिलाफ कार्रवाई कर धड़पकड़ की

Kolhapur, Maharashtra:Anc कोल्हापूर पोलिस गावगुंडांच्या विरोधात ॲक्शन मोडवर आली आहे. शहरातील राजारामपुरी परिसरात असणाऱ्या माऊली चौकात दहशत माजवत तोडफोड करणाऱ्या गुंडाची आज पोलिसांनी शहरातून धिंड काढली आहे... दहशत माजवणाऱ्या या गावगुंडांना पोलिसी खाक्या दाखवत जिथे जिथे दहशत माजवली त्याच परिसरातून त्यांची धिंड काढून राजारामपुरी पोलिसांनी या गुंडांचा माज उतरावला. गेल्या दोन दिवसांपूर्वी राजारामपुरी परिसरात गेंड्या गँग आणि योगेश नलवडे गँग मध्ये राडा झाला होता. त्यानंतर पोलिसांनी या सर्व गुंडांना अटक करून अटक फिरवले. अजय अविनाश माने उर्फ अजय लातूर, वय 29, विशाल अविनाश माने उर्फ गोठ्या लातूर, वय 27, अमित सुरेश दिंडे, वय 29, रामू मुकुंद कलकुटगी, वय 27, ऋतेश जगन्नाथ कुराडे, वय 27, ऋणांत जगन्नाथ कुराडे, वय 21, सुरज गोपाळ दिंडे, वय 21 आणि योगेश नागोजी नलवडे, वय 38 अशी या गाव गुंडाची नावे आहेत
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top