icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सातारा में शिवसेना उद्धव गुट के भीतर नाराजगी, जिल्हाप्रमुख ने भावनात्मक पत्र लिखा

Satara, Maharashtra:सातारा : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा समोर आली असून, सातारा जिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी उद्धव ठाकरे पक्षप्रमुख यांना भावनिक पत्र लिहित थेट नाराजी व्यक्त केली आहे. “३० वर्षे पक्षासाठी निष्ठेने काम करूनही सतत उपेक्षा आणि खच्चीकरण सहन करावे लागत आहे,” असा आरोप त्यांनी पत्रातून केला आहे. पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांकडून जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा आरोप करत संजय भोसले यांनी “तारा-मारा अन्यथा बाहेर तरी काढा” अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. अनेक वर्षे पक्षासाठी संघर्ष करूनही न्याय मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.या पत्रामुळे सातारा जिल्ह्यासह शिवसेना ठाकरे गटात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement

वाशीम में 5 हजार घरकुल लाभार्थी निधि नहीं मिलने से चिंतित, सरकार से तात्कालिक मदद की मांग

Washim, Maharashtra:अक्कर:पावसाळा ख़तीज असामान्य हालत, वाशीम जिल्ह्यातील तब्बल ५ हजार घरकुल लाभार्थ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शासनाकडून निधी वितरणात होत असलेल्या विलंबामुळे अनेक घरांची कामे अर्धवट अवस्थेतच थांबली आहेत. स्वतःच्या हक्काचे पक्के घर मिळावे या आशेने अनेकांनी जुनी घरे पाडून नवीन घरकुलाचे बांधकाम सुरू केले होते, मात्र निधीअभावी आता काहींवर तात्पुरत्या निवाऱ्यात किंवा उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. काही घरांचे छप्पर बाकी आहे, तर काही घरे भिंतीपर्यंतच उभी राहिली आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर लाभार्थ्यांच्या चिंता वाढल्या असून शासनाने प्रलंबित निधी तातडीने वितरित करण्याची मागणी होत आहे
0
0
Report

काले हल्दी ने नया रिकॉर्ड बना दिया: क्विंटल 17,200 से 25,000 रुपये

Washim, Maharashtra:वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत काळ्या हळदीने भावाचा नवा उच्चांक गाठल्याने हळडि उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. काल झालेल्या लिलावात ‘कोच्या’ अर्थात काळ्या हळदीला किमान १७ हजार २०० रुपये तर कमाल २५ हजार रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी दर मिळाला. मागील लिलावाच्या तुलनेत दरात तब्बल चार हजार रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. बाजार समितीत काळ्या हळदीची ७०० क्विंटल आवक झाली असून एकूण हळदीची आवक ७ हजार क्विंटलच्या पुढे गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीत हळदीची आवक वाढत असून वाढलेल्या दरामुळे उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत.
0
0
Report

कांदा दर गिरावट से किसान आक्रोश; नाशिक चांदवड़ में महाविकास आघाडी का विरोध प्रदर्शन

Chandvad, Maharashtra:राज्यात सातत्याने घसरत असलेले कांदा दरामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचा आक्रोश आज नाशिकच्या चांदवड येथे मुंबई आग्रा महामार्गावर दिसणार आहे; महाविकास आघाडीच्या वतीने दिल्ली ला जाणारा रस्ता अडवून सरकारचा निषेध करण्यात येणार आहे या आंदोलनासाठी आमदार रोहित पवार, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, शिवसेनेचे नेते अंबादास दानवे आधी नेते उपस्थित राहणार असल्याने कांद्याचे हे आंदोलन लक्षवेधी ठरणार असल्याने या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे यासंदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
0
Report
Advertisement

मान्सून के कारण तळकोकण के समुद्री पर्यटन 26 मई–31 अगस्त तक बंद

Oras Bk., Maharashtra:अंकर नेहमीच पर्यटकांना आकर्षित करणारे आणि पर्यटकांनी गजबलेले तळकोकणातील समुद्र किनारे आतां काही महिने शांत पाहायला मिळणार आहेत. मान्सूनच्या कालावधीत आज पासून अगदी 31 ऑगस्ट पर्यंत तळकोकणातील समुद्री पर्यटन बंद राहणार आहे. मान्सूनच्या काळात समुद्रात फार मोठे बदल पाहायला मिळतात उधान आल्यामुळे समुद्र काही प्रमाणात खवळालेला असतो आणि त्यामुळेच संभाव्य धोका लक्षात घेता समुद्रातील प्रवासी वाहतूक तसेंच समुद्री साहसी खेळ यावर 26 मे ते 31 ऑगस्ट काळात प्रशासनाकडून बंदीचे आदेश घालण्यात आले आहेत. स्थानिक व्यावसायिक देखील या काळात होणारे नुकसान सहन करुन प्रशासनाच्याDecisionाचे स्वागत करतात याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी
0
0
Report

नांदेड में डीज़ल महँगाई से एसटी बसों के किराए बढ़ने की संभावना

Nanded-Waghala, Maharashtra:इंधन दरवाढीचा मोठा फटका परिवहन महामंडळाला बसत आहे. डिझेल दरवाढीमुळे एकट्या नांदेड जिल्ह्यात महिन्याकाठी तब्बल 50 लाख रुपयांचा खर्च वाढला आहे. त्यामुळे तोट्यात चाललेल्या एस टी ला नांदेड जिल्ह्यात 50 लाखाचा आणखी तोटा सहन करावा लागणार आहे. नांदेड जिल्हयात एसटी महामंडळाचे एकुण न Nine आगार आहेत. या न nine आगारात एप्रिल महिन्यापर्यंत दर महिन्याला 8 कोटी 94 लाख 85 हजार रुपयांचा डिझेलचा खर्च होता. मात्र डिझेलचे भाव वाढल्याने या एका महिन्यात 9 कोटी 44 लाख 70 हजार रुपये इतका खर्च आलाय. आजच्या डिझेलच्या प्रति लिटर दरानुसार एस टी महामंडळाचा तब्बल 50 लाख रुपयांचा खर्च वाढलाय. यापुढे जर इंधन दरवाढ झाली तर महामंडळाला आणखी वाढीव खर्च येणार आहे. तोट्यात असेलल्या एसटी महामंडळावर इंधन दरवाढीमुळे अतिरिक्त खर्चाचा भार वाढत असल्याने , आगामी काळात एसटीच्या तिकिटाचे दर वाढवण्याची शक्यता आहे.
0
0
Report
Advertisement

सोलापूर जिल्हाधिकारी के नाम पर बनावट खाते, लोगों से पैसों की मांग; शिकायत दर्ज

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते, जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः केली सायबर सेलकडे तक्रार - सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेन यांच्या नावाने बनवले बनावट सोशल मीडिया खाते - व्हिएतनाम, थायलंड या देशातून जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बनावट खाते तयार करून होते पैशांची मागणी - याबाबत जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी स्वतः सायबर सेलकडे नोंदवली तक्रार - थायलंड,व्हिएतनाम या देशातून नाव, पदनाम, छायाचित्र वापरून बनावट खाते तयार करून नागरिकांची दिशाभूल होत असल्याचा प्रकार उघडकीस - कोणीही असा संदेशांना बळी पडू नये, कोणताही आर्थिक व्यवहार करू नये जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे आवाहन
0
0
Report

पंढरपुर के 150 एकड़ जमीन पर बडवे- मंदिर समिति के बीच नया विवाद

Pandharpur, Maharashtra:लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरच्या विठ्ठল रूक्मिणी मंदिर समितीच्या सुमारे 450 कोटी रूपयांच्या 150 एकर जमिनीवर बडव्यांनी दावा केला आहे. ही जमीन बडवे कुटुंबाची असल्याची त्यांनी जाहिरात फलक लावला आहे. फलक काढण्यास मंदिर समितीला सांगितले गेले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने 2014 साली बडवे- उत्पातांचे मंदिरातील सर्व अधिकार संपुष्टात आल्यानंतर आता याच बडव्यांनी विठ्ठलाच्या 150 एकर जमिनीवर दावा केल्याने खळबळ उडाली आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर समितीच्या राज्यभरात अनेक ठिकाणी शेकडो एकर जमिनी आहेत. काही जमिनीमध्ये स्थानिकांनी अतिक्रमण केले आहे तर काही जमिनीचा दिवाणी न्यायालयात वाद सुरू आहे. पंढरपूर जवळच्या अनवली गावातील सुमारे 150 एकर जमिनी बाबत बडवे आणि विठ्ठल मंदिर समिती यांच्यामध्ये अनेक वर्षांपासून पंढरपूर येथील दिवाणी न्यायालयात दावा सुरू होता. नुकताच या दाव्याचा निकाल मंदिर समितीच्या बाजूने लागला आहे. निकाल लागल्या नंतर मंदिर समितीने ही जमिन ताब्यात घेऊन दुरूस्ती सुरू केली आहे. शिवाय जमिन भाडे पट्टयाने देण्यासाठी अर्ज ही मागवले आहेत. दरम्यान दिवाणी दाव्याचा निकाल लागल्या नंतर ही वहिवाटदार मदन विश्वनाथ बडवे सह इतर 12 जणांनी ही जमिन आमच्या मालकीची असल्याचा दावा केला आहे. जमिनीच्या ठिकाणी तसा फलक लावला आहे. ही जमिन बडवे कुटुंबाची असून पंढरपूर येथील दिवाणी व उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. मुळ मालका शिवाय ही जमिन कोणीही खरेदी विक्री तसेच खंडाने देऊ नये असा मजकूर छापलेला रातोरात फलक लावण्यात आला होता. दरम्यान ही बाब मंदिर समितीच्या लक्षात येताच मंदिर समितीने बडवे कुटुंबाने लावलेला फलक काढून टाकण्यात आला आहे. अनवली येथील 150 एकर जमिन सांगली संस्थानने 1849 साली बडवे कुटुंबाला इनाम दिली होती. तेव्हा पासून या जमिनीवर बडवे कुटुंबाचा कब्जा होता. मंदिर समितीने महसूल विभागाला हाताशी धरून सातबारा उतार्यावर मंदिर समितीचे नाव लावले आहे असा आरोप करीत सरकारने आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी बडवे कुटुंबाने केली आहे. दरम्यान मंदिर समितीने बडवे यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. महसूल मंत्र्यांच्या आदेशाने ही जमिन मंदिर समितीच्या नावे करण्यात आली आहे. त्यानंतर मंदिर समितीने ही जमिन ताब्यात घेतली असून दुरूस्ती सुरू केली आहे. खंडाने देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. बडवे कुटुंबाने लावलेला फलक देखील अनाधिकृत असून तो काढून टाकण्यात आला आहे. संबंधित बडवे यांच्या या कृत्याबद्दल पोलिस तक्रार करणार असल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात आले.
0
0
Report

छत्रपती संभाजीनगर के पेट्रोल पंपों पर डीज़ल कमी, प्रशासन ने कदम उठाने का निर्णय लिया

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पेट्रोलपंपांवर डिझेलची टंचाई आठवड्यापासून तीव्र झाली आहे. त्यामुळे पंपावरून डिझेल विक्री कशी होते, याव पर बारीक लक्ष ठेवण्यासाठी तलाठ्यांना पंपनिहाय नियुक्तीचा विचार प्रशासन करीत आहे. प्राधान्याने डिझेल कुणाला द्यावे यासाठी पंपचालकांसाठी मार्गदर्शक सूचनादेखील देण्याच्या विचारात आहे. या परिपत्रकाचा मसुदा तयार असून, जिल्हाधिकारी सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेणार आहेत. इंधन टंचाईवर उपाययोजना म्हणून पेट्रोलिंग करणे, तलाठ्यांची नियुक्ती करणे, तसेच प्राधान्याने इंधन देण्याबाबत काही उपाययोजना करता येईल का, याची चाचपणी प्रशासन करीत आहे, महत्वाचं म्हणजे सध्या 12 हजार किलो लिटर डिझेल चा रोज जिल्ह्यास पुरवठा सुरुय...
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top