445001
यवतमाळ - पुसद मध्ये जन्माष्टमीनिमित्त टाळमृदुंगाच्या गजरात शोभायात्रा.
Yavatmal, Maharashtra:जन्माष्टमीनिमित्त यवतमाळच्या पुसद शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. डीजेला फाटा देत पारंपारिक पद्धतीने सलग 11 वर्षांपासून या आदर्शवत मिरवणुकीचे आयोजन करण्यात येत आहे. या मिरवणुकीत टाळ व मृदुंगाच्या तालावर गोपाल कृष्ण भगवान की जय असा एकच जयघोष करण्यात आला. या मिरवणुकीत बाल गोपाल वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीकृष्ण जन्मोत्सव समिती पुसद तर्फे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नांदणी में महादेवी हाथी के घर वापसी की तैयारी तेज, सुविधाओं की जाँच जारी
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूरच्या नांदणी येथील महादेवी हत्तिणीच्या घरवापसीच्या हालचालींना आता वेग आला आहे. गुजरातमधील ‘वनतारा’ची टीम नांदणीत दाखल झाली असून, हत्तिणीसाठी उभारण्यात येणाऱ्या निवासस्थानाची आणि इतर सुविधांची पाहणी सुरू करण्यात आली आहे. नांदणी मठ आणि वनतारा फाउंडेशनच्या वतीने महादेवी निवासाची व्यवस्था युद्धपातळीवर उभारली जात आहे. या सर्व कामांचा अहवाल उच्चस्तरीय समितीकडे सादर करण्यात येणार असून, त्यानंतरच महादेवीच्या घरवापसीचा अंतिम निर्णय होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून महादेवी हत्तिणीच्या पुनरागमनाची मागणी स्थानिक नागरिक आणि भक्तांकडून सातत्याने केली जात होती. आता या मागणीला यश येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गुजरातमधील वनतारा फाउंडेशनची तज्ज्ञ टीम नांदणीमध्ये दाखल झाली असून, हत्तिणीच्या वास्तव्याकरिता आवश्यक असलेल्या सुविधा आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांची पाहणी करत आहे. नांदणी मठ परिसरात माधुरीसाठी निवासस्थान उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. हत्तिणीच्या देखभालीसाठी आवश्यक असलेली जागा, खाद्यव्यवस्था, आरोग्य सुविधा आणि इतर बाबींचा आढावा घेतला जात आहे. हे सर्व काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा सविस्तर अहवाल उच्चस्तरीय समितीकडे पाठवला जाणार आहे. समितीकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतरच महादेवीच्या घरवापसीचा मार्ग अधिकृतपणे मोकळा होणार आहे.दरम्यान, महादेवी हत्तिणीच्या परतीच्या हालचालींमुळे नांदणी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.0
0
Report
रत्नागिरी के भाजपा के पक्षबांधन के लिए बड़े दौरे, शिवसेना के नेता भाजपा में शामिल
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. भाजपच्या जिल्ह्यात पक्ष बांधणीच्या दृष्टीने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आज जिल्हा दौऱ्यावर आहेत.. या दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून काहींचा प्रवेश झाला आहे.. माजी सभापती व शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी सहदेव बेटकर यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष,महामंत्री आमदार निरंजन डावखरे,आमदार योगेश सागर,आमदार प्रमोद जठार माजी आमदार डॉ.विनय नातू यांच्यासह उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे व दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव ही उपस्थित होते..0
0
Report
डोंबिवली में लिफ्ट विवाद पर मारपीट, वीडियो वायरल, पुलिस ने दर्ज किया मुकदमा
Kalyan, Maharashtra:डोंबिवलीत लिफ्टच्या वादातून राडा!सोसायटीची लिफ्ट सुरू करण्यास सांगितल्याने संतप्त शेजाऱ्यांनी केली बेदम मारहाण मारहाणीचा विडिओ सोशल मीडियावर वायरल ,टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल पोलीस तपास सुरू. डोंबिवली पूर्वेतील एका गृहनिर्माण सोसायटीत लिफ्टच्या किरकोळ कारणावरून झालेला वाद थेट मारहाणीपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोसायटीची लिफ्ट सुरू करण्यास सांगितल्याचा राग आल्याने काही शेजाऱ्यांनी एका रहिवाशाला बेदम मारहाण केली आहे. या घटनेत शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी तक्रार दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.0
0
Report
Advertisement
डिंडोरी के जानूरी में मिठाई की दुकान में आग, लाखों का नुकसान
Dindori, Madhya Pradesh:डिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे ग्रामपंचायत इमारतीच्या शेजारी असलेल्या एका मिठाईच्या दुकानाला भीषण आग लागल्याने सर्व दुकानातील फर्निचर जळून भस्मसात झाले आहे या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे दरम्यान ओझर व एच ए ल येथील अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली आहे0
0
Report
वर्धा में अवैध शराब तस्करी के खिलाफ पुलिस ने 6.59 लाख का माल जप्त
Wardha, Maharashtra:वर्ध्यात दारू वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई - वर्धा जिल्ह्यात दारूबंदी पथकाने अवैध मद्यवाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 6 लाख 59 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुनापानी चौक पुलाजवळील सर्व्हिस रोडवर गुप्त माहितीच्या आधारे नाकाबंदी करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान संशयित चारचाकी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये देशी व विदेशी मद्याचा मोठा साठा आढळून आला. पोलीसांनी मयूर प्रकाश मांद्रीले (वय 25, रा. स्नेहल नगर, वर्धा) यास ताब्यात घेतले. आरोपीकडून टॅंगो पंच देशी दारूच्या 200 शिश्या, ट्यूबर्ग बिअरच्या बाटल्या व कॅन, बडवाईसर बिअरच्या बाटल्या तसेच मद्यवाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मारुती सुझुकी कार जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या वाहनासह संपूर्ण मुद्देमालाची किंमत 6 लाख 59 हजार 600 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा व मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दारूबंदी पथकाच्या या धडक कारवाईमुळे अवैध मद्यवाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून जिल्ह्यात अशा कारवाया आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.0
0
Report
ऑपरेशन टायगर की चर्चा के बीच ठाकरे गुट के सांसद शिवसेना में प्रवेश की अटकलें
Washim, Maharashtra:यवतमाळ: अँकर:शिवसेना शिंदे गटाच्या ‘ऑपरेशन टायगर’ची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असताना ठाकरे सेनेचे सहा खासदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.याच पार्श्वभूमीवर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख हे इतर खासदारांसह दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान खासदार संजय देशमुख यांच्या दिग्रस तालुक्यातील चिंचोली येथील निवासस्थानी आज शांतता दिसून आली. नेहमी नागरिकांची व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी असणाऱ्या या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळाला.ठाकरे सेनेचे सहा खासदार दिल्ली दौऱ्यावर गेल्याने नेमकी कोणती राजकीय घडामोड घडणार,याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. संजय देशमुख यांच्या घरासमोरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी..0
0
Report
Advertisement
अंबरनाथ-बदलापूर रेल्वे पर ‘जीरो डेथ’ अभियान: मानवी साखळी से जागरूकता
Ambernath, Maharashtra:अंबरनाथ-बदलापूर रेल्वे मार्गावर अपघात रोखण्यासाठी ‘झिरो डेथ’ अभियान; पोलिसांची मानवी साखळी, नागरिकांना गुलाब देत जनजागृती; अंबरनाथ जवळ मोरीवली गावात रेल्वे क्रॉसिंग करताना आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू; अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या मोरीवली गाव परिसरात रेल्वे रुळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांची संख्या चिंताजनक आहे. गेल्या तीन वर्षांत या परिसरात तब्बल 40 जणांचा जीव गेल्याची माहिती समोर आली आहे. हे अपघात थांबवण्यासाठी मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे पोलिसांकडून मानवी साखळी तयार करून जनजागृती करण्यात आली. अशा अपघात थांबवण्यासाठी रेल्वे कडून‘झिरो डेथ’ संकल्पना राबवण्यात येत आहे. रेल्वे रुळ ओलांडणे धोकादायक असून नागरिकांनी सुरक्षित मार्गाचा वापर करावा, यासाठी रेल्वे पोलिसांकडून विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अंबरनाथ-बदलापूर दरम्यान मोरीवली गाव परिसरात पोलिसांनी मानवी साखळी तयार करून नागरिकांना रेल्वे रुळ ओलांडू नका, असे आवाहन केले. रेल्वे क्रॉसिंग करणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून गुलाबाचे फूल देण्यात आले आणि जीव धोक्यात घालून रुळ ओलांडू नये, असा संदेश देण्यात आला. रेल्वे अपघात टाळण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असून, सुरक्षित प्रवासासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहন रेल्वे प्रशासन आणि पोलिसांकडून करण्यात आले आहे.0
0
Report
ठाकरे-शिंदे के गुटों के बीच महाराष्ट्र की राजनीति में नया मोड़
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर संजय पवार उपनेते ठाकरे शिवसेना दोन दिवसापासून आम्ही लक्ष ठेऊन आहे अजून ते १०० टक्के गेले नाहीत ते जाणार नाहीत हे खात्री आहे आताच बोलणे उचित नाही ऑपरेशन टायगर मुळे देशाचे राजकारण कोणत्या थराला गेले हे कळेल याला लोकशाही म्हणतात का आम्ही रान तयार करायचे आणि तुम्ही ते दादागिरीवर पिक कापून घेऊन जायचे हे काय चालले आहे संजय राऊत ना पैशाच्या बाबत टिप मिळाली असेल त्या शिवाय बोलणार आहेत बॅड पॅच सगळ्यांना असतात याचा अर्थ आम्ही संपलो असे नाही फिनिक्स पक्षाप्रमाणे आम्ही झेप घेऊन मातोश्री आमची आहे हे दाखवून देऊ मुख्यमत्री पदावर डोळा ठेऊन एकनाथ शिंदे यांची खेळी सुरू आहे आपली ताकद दाखवून त्याना मुख्यमंत्री व्हायचे आहे पण फडणवीस हलतील का ? याचा विचार करावा आपले कुटुंब अडचणीत असताना प्रमुखना सोडून जाणे शोभते का , त्याना जनता धडा शिकवेल उद्धव ठाकरे हे हिंदूहृदय सम्राटाचे पुत्र आहेत ते खचून जाणारे नाही छातीवर पाय ठेऊन उभे राहतील.0
0
Report
ठाणे में विकास फंड्स को लेकर शिवसेना सांसद पर चर्चा का कयास
Nashik, Maharashtra:प्रकाश वाजे - राजाभाऊ वाजे यांचे वडील. - शिवसेनेचे खासदार म्हणून ते निवडून आले आहे ऑपरेशन टायगर अशी काही चर्चा सुरू आहे. - त्यांनी मला सांगितलं आहे, एक कमिटी आली होती - दीड वर्षापूर्वी ही त्यांना ठाण्याला बोलवले होते त्यांनी वडीलांशी बोलून अस सांगितलं होत. - आम्हाला शिवसेनेने आमदार आणि खासदार सांगितले - मी उद्धव ठाकरे त्याच्याशी बोलो त्यांना सांगितले कोण तुमच्यासोबत राहील माहीत नाही पण वाजे तुमच्यासोबत राहील असे मी उद्धव ठाकरे यांना सांगितले. - आम्ही आहोत तिथं सुखात आहोत. - विकास काम कोणाच्या खिशात होत नाही - ठाण्याचे मंडळी आले होते त्यांनी मला ऑफर दिली आम्ही आमचा निर्णय नाही सांगितले.0
0
Report
Advertisement
नाना पटोले बोले: ऑपरेशन गिधाड है, टायगर नहीं—लोकतंत्र के लचके टूट रहे
Nagpur, Maharashtra:हे ऑपरेशन टायगर नाही, तर हे ऑपरेशन गिधाड आहे, हे लचके तोडण्याचे काम केले जात आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली आहे.. हे ऑपरेशन गिधाड असताना त्यास ऑपरेशन टायगर म्हणून टायगर चे आरोप करू नका... यांच्याकडे खूप पैसे आहे, त्यामुळे हे लोकशाहीचे लचके तोडत आहे असा आरोप ही नाना पटोले यांनी केला आहे...0
0
Report
घर में दीया जलنے से पूजा कक्ष में आग, किचन और फर्नीचर भारी नुकसान
Bhandara, Maharashtra:पूजा घरात जळत असलेल्या दिव्यामुळे घराला आग लागली व त्यात घरातील सामान व फर्नीचर जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गोंदिया शहरातील मामा चौकातील विजय मिश्रा यांच्या घरातील पूजा खोलीत दिवा जळत होता व त्यामुळे आगीने भडका घेतला. यामध्ये घरातील किचन व पूजा रूममध्येच आग भडकली. विनय मिश्रा यांनी फोनवरून अग्निशमन विभागाला माहिती दिली असता अग्नी शमन गाडी घटनास्थळी येत आग आटोक्यात आणली. मात्र आगीमुळे किचनमध्ये फ्रीज व अन्य साहित्य तसचे फर्नीचर जळून मोठे नुकसान झाले.0
0
Report
आष्टीकर के बेटे कृष्णा पाटील बनेंगे विधान परिषद उम्मीदवार; महाविकास आघाडी में चुनावी घमासान शुरू
Nanded-Waghala, Maharashtra:खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र कृष्णा पाटील आष्टीकर नांदेड विधान परिषदेचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यामुळे महाविकास आघाडी उद्या होणाऱ्या मतदानाबाबत काय निर्णय घेणार हा प्रश्न निर्माण झालाय. अद्याप कृष्णा पाटील आष्टीकर हेच आमचे उमेदवार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिलीये. आष्टीकर जर शिवसेनेत गेलेच तर महाविकास आघाडीतील घटक पक्षातील सर्वांसोबत चर्चा करून मतदानाबाबत निर्णय घेऊ असेही चव्हाण म्हणाले. त्यांच्याशी बातचित केलीये आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांनी.0
0
Report
Advertisement
भाऊसाहेब वाकचौरे की पत्नी सरस्वती का बयान: दिल्ली और Haridwar कार्यक्रम पर प्रतिक्रिया
Shirdi, Maharashtra:Shirdi News Flash खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पत्नी सरस्वती वाकचौरे यांची प्रतिक्रिया आली समोर काल सायंकाळी ते दिल्लीला गेलेत... हरिद्वार येथील धार्मिक कार्यक्रमाला आज जाणार आहेत... काल रात्री त्यांच्याशी बोलणं झालं होतं.. आज संपर्क केला नाही... राजकीय चर्चांबद्दल मला माहित नाही... मी देखील हे सगळ टिव्ही वर पाहत आहे...0
0
Report
दिल्ली में ऑपरेशन टायगर के बीच सांसद संजय जाधव रवाना
Parbhani, Maharashtra:अँकर -ऑपरेशन टायगर वरून दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना आता चांगलाच वेग आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव हे काल नांदेड येथून चार्टड विमानाने तातडीने दिलीत रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे त्यानंतर आता परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या घरासमोर शुकशुकाट पाहायला मिळत आहे खासदार संजय जाधव यांचे सुरक्षारक्षक आणि ड्रायव्हर हे देखील परभणीतच असल्याची माहिती समोर येत आहे खासदार संजय जाधव ज्या गाडीने प्रवास करतात ती गाडी सुद्धा संजय जाधव यांच्या घरासमोर असल्याचं चित्र आहे0
0
Report
पुणे के आंबेगाव में पोल्ट्री फार्म में 3600 मुर्गियों की मौत, किसान ने सहायता मांगी
Ambegaon, Maharashtra:अँकर: पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव येथे एका पोल्ट्री फार्ममध्ये तब्बल ३,६०० बॉयলर कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून परिसरात खळबळ उडाली आहे. संतोष पोंडे असे या बाधित शेतकऱ्याचे नाव असून, ते गेल्या १५ वर्षांपासून पोल्ट्री व्यवसाय करत आहेत. त्यांच्या पोल्ट्री शेडमध्ये एकूण ३,७०० कोंबड्या होत्या. नेहमीप्रमाणे सायंकाळी खाद्य टाकण्यासाठी गेले असता, त्यांना कोंबड्या मृत अवस्थेत आढळल्या. या दुर्दैवी घटनेत ३,७०० पैकी केवळ १०० कोंबड्या जिवंत राहिल्या असून, तब्बल ३,६०० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने कोंबड्यांचा अचानक मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, कृषी अधिकारी... घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, तपास सुरू आहे. मात्र, या घटनेमुळे पोंदे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांनी शासनाकडे मदतीची मागणी केली आहे。0
0
Report
Advertisement
