445001
यवतमाळ - पुसद मध्ये जन्माष्टमीनिमित्त टाळमृदुंगाच्या गजरात शोभायात्रा.
Yavatmal, Maharashtra:जन्माष्टमीनिमित्त यवतमाळच्या पुसद शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. डीजेला फाटा देत पारंपारिक पद्धतीने सलग 11 वर्षांपासून या आदर्शवत मिरवणुकीचे आयोजन करण्यात येत आहे. या मिरवणुकीत टाळ व मृदुंगाच्या तालावर गोपाल कृष्ण भगवान की जय असा एकच जयघोष करण्यात आला. या मिरवणुकीत बाल गोपाल वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीकृष्ण जन्मोत्सव समिती पुसद तर्फे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
गोकुळ दूध संघ चुनाव: सुप्रीम कोर्ट के फैसले से दूध उत्पादकों को राहत
Kolhapur, Maharashtra:On गोकुळ निवडणूक निकाल स सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे दूध उत्पादक म्हणून आम्ही स्वागत करत आहोत.. गोकुळवर प्रशासकाच्या माध्यमातून ताबा मिळवायचा जे षडयंत्र रचले होते.. तो सुप्रीम कोर्टाने हाणून पडला. त्यामुळेच गोकुळच्या निवडणुकीत दूध उत्पादक आम्हाला सहकार्य करेल. आम्ही सातत्याने सांगत होतो 1200 संस्थांचा निकाल लावून ताबडतोब निवडणुका घ्या.. पण राज्य शासनाने घाईगडबडीत शेवटच्या दिवशी कायदा केला.. ताबडतोब प्रशासक नेमण्याची कारवाई झाली. अगदी चार वाजता प्रशासक साताऱ्यावरून कोल्हापुरात पोहोचतात, हा सगळा गौडबंगाल होता. पण आता दूध उत्पादकाला दिलासा मिळाला आहे... निवडणुकीसाठी सव्वाशे दिवस लागतात.. कदाचित सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात जाऊन काही दिवस वाढवून घेऊ शकतो.. पण गोकुळची निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. जिल्ह्यातील दूध उत्पादक आता मतदानाला पात्र झाला.. मतदान करून तो निर्णय घेईल.. उद्याच्या निवडणुकीत काय करायचे.. जे मुद्दे सुप्रीम कोर्टाच्या समोर आले.. त्या मुद्द्याच्या आधारे सुप्रीम कोर्टाने न्यायपूर्वक निर्णय दिला आहे.. गोकुळ दूध संघ बिनविरोध निवडणूक मधल्या काळात विनय कोरे यांनी त्या पद्धतीची प्राथमिक चर्चा अनेकांशी केली होती.. पण आता निवडणुका पुढे गेल्यामुळे ती चर्चा थांबली आहे.. आता तरी तसा प्रस्ताव माझ्याकडे आलेला नाही.. पण प्रस्ताव आला तर त्याच्यावर विचार केला जाईल.. ऑन राज्य सरकारला चपराक हा निर्णय सरकारला चपराकच आहे. आम्हाला आनंद आहे की आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत.. ऑन महायुती नेते आरोप प्रत्यारोप जो वाद आहे तो महायुती अंतर्गत आहे.. त्यामध्ये गोकुळ भरडला जाऊ नये एवढी आमची अपेक्षा आहे.. कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे. ती जनता योग्य निर्णय घेईल.. पावसाळ्यात निवडणुका येत असल्या तरी ठरावची प्रक्रिया सुरू होऊन ती पूर्ण होईल.. मतदान पावसाळाच्या नंतर एखादा महिना पुढे घ्यावे असं होईल... ऑन अपात्र संस्था बाराशे संस्थांची सुनावणी पूर्ण झाली पाहिजे अशी आमची ठाम भूमिका.. त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका.. ऑन आघाडी आम्ही समविचारी जे सोबत येतील त्यांच्यासोबत आघाडी करू.. निवडणुका गोकुळ वाचवण्यासाठी व्हायला पाहिजे अशी भूमिका.. गोकुळ दूध संघ वाढवण्यासाठी जी लोकं सोबत येईल त्यांना घेऊन निवडणुकीला सामोर जावे पक्षीय राजकारण संस्थांमध्ये असू नये ही आमची भूमिका.. कारण साडेपाच लाख शेतकरी यामध्ये आहेत . पण उलट्या बाजूने काय होईल हे मला माहित नाही.. गोकुळची आगामी निवडणूक गोकुळ दूध उत्पादक विरुद्ध बाकीचे अशी होईल.. दूध उत्पादक शेतकरी आणि दूध डेऱ्या आमच्यासोबत असतील.. आम्ही जो शब्द दिला होता दरवाढीचा तो आम्ही पूर्ण केला. जास्त दूध दरवाढ दिले. पाच वर्षात कोणत्याही कर्मचाऱ्याला त्रास दिला नाही.. सगळ्यांना सोबत घेऊन गोकुळची प्रॉडक्टिव्हिटी वाढवणे याच्यावर भर होता..त्यामुळे लोक आमच्यासोबत राहतील.0
0
Report
खेड में जलजीवन गोदाम में शॉर्टसर्किट से भीषण आग, फायर ब्रिगेड राहत कार्य में
Khed, Maharashtra:खेड/ पुणे ब्रेक खेड तालुक्यातील आळंदी-शेलपिंपळगाव रोडवरील जलजीवनच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार विद्युत खांबावरील शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस दाखल झाले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.0
0
Report
नाशिक में महिंद्रा परियोजना और MIDC विस्तार के लिए उद्योग मंत्री का बड़ा दावा
Nashik, Maharashtra:मी उद्योगमंत्री झाल्यावर पहिल्यांदा जेव्हा नाशिक ला आलो तेव्हा अनेक तक्रार होत्या मात्र आता या सर्व तक्रारी संपले आहेत याचा आनंद आहे उद्योजकांच्या अनेक अडचणी सोडवले महिंद्रा प्रकल्पसाठी आम्ही जेवढे पाठपुरावा करत होतो त्याचे 10 पट इथले उद्योजक करत होते नाशिक जिल्ह्यात अजून 10 ते 12 ठिकाणी आपण midc करत आहोत यासाठी 1300 एकर जागा आम्ही संपादित करत आहोत महिंद्रा प्रकल्प देखील नाशिक मधेच होणार आहे कुंभ मध्ये उद्योग विभागाकडून देखील आम्ही काम करणार आहे गेल्या 3 वर्षात 65 ते 67 हजार युवकांना आम्ही उद्योजक केले आहेत डाओस वर किती mou केले यावर देखील टीका होतो मात्र मी आता यावर श्वेतपत्रिका काढणार आहे mou फक्त डाओस मधेच करत नाही तर राज्यात देखील आम्ही करत आहोत0
0
Report
Advertisement
नाशिक में कुंभ के साथ उद्योग विभाग का बड़ा जुड़ाव, विकास तेज
Nashik, Maharashtra:आज विशेष आनंद आम्हाला आहे एक आगळा वेगळा कार्यक्रम आज होत आहे. कुंभ सोबत उद्योग विभागाला जोडण्यात येत आहे. कुंभ एक मोठं चॅलेंज आहे आणि आम्ही ते स्वीकारले आहे. गेल्या वेळी पेक्षा 4 ते 5 पट जास्त भाविक येणार आहेत. 10 ते 12 कोटी भाविक येथील अस अंदाज आहे. आज नाशिक शहर अध्यात्मिक आणि धार्मिक शहर म्हणून ओळखला जाते. आता विमानसेवा, रस्ते कनेक्टिव्हिटी देखील मोठया प्रमाणात झाले आहेत. कार्गो सेवा देखील सुरू होणार आहे. रेल्वे स्टेशन विस्तार देखील होणार आहे. सर्व बाजूने नाशिक शहराचा विकास आता होत आहे. नाशिक मध्ये जागचे भाव मोठया प्रमाणात वाढले आहे. मुंबई आणि पुणे नंतर नाशिक कडे जास्त ओढ आहे. पुणे पेक्षा जास्त पसंती आता नाशिकला मिळताना पाहायला मिळतो आहे. भाषणाला जास्त वेळ घेतला तर स्टेज वर असलेले मंत्रीपैकी कुणालाही मी कुंभमेळा मंत्री करून टाकेन अस मला मुख्यमंत्री म्हणाले. जास्तीजास्त झाडं आम्ही नाशिकला लावणार आहे. राज्यत सर्वाधिक झाड आम्ही नाशिक ला लावणार आहे.0
0
Report
कल्याण डोंबिवली में पानी कटौती: 24 घंटे के लिए जल आपूर्ति बंद
Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत पाणी कपात पावसाळा लांबणार असल्याने प्रशासनाची खबरदारी यंदा पावसाळा लांबणार असल्याचा अंदाज हवामान खात्याला वर्तवला आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाकडून देण्यात आल्यात. कल्याण डोंबिवली महापालिकेने देखील पाणी कपात करण्याचा निर्णय घेतलाय. 11मे रात्री बारा वाजल्यापासून पुढील २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे .शिवाय त्यानंतर कमी दाबाने पाणीपुरवठा होईल .यंदा तापमानात प्रचंड वाढ झाल्याने पाण्याचं नियोजन करण्यासाठी प्रत्येक पालिका महापालिकांसाठी तारेवरची कसरत असणार आहे. पाणी कपात करण्याचा निर्णयानंतर नागरिकांनी पाणी जपून वापरावं असा आवाहन कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने केलंय.0
0
Report
वाशीम के केला बागानों को तूफानी बरसात से भारी नुकसान, मुआवए की मांग
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर: वाशीमच्या रिसोड शहरासह कंकरवाडी, आगरवाडी सह तालुक्यातील काळ अनेक ठिकाणी वादळी वाऱ्या सह जोरदार अवकाळी पावस पडल्यामुळे केळीचे मोठं नुकसान झाले आहे. येत्या काही दिवसात या केळी चे उत्पादन सुरू होणार होते मात्र निसर्गाच्या माऱ्यामुळे उभ्या केळींची झाडे उन्मळून पडून होत्याचे नव्हते झाले. या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी निसगस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.0
0
Report
Advertisement
कल्याण के डम्पिंग ग्राउंड में आग, धुएं से लोगों को सांस लेने में परेशानी
Kalyan, Maharashtra:कल्याणमध्ये डम्पिंगला पुन्हा एकदा आग लागलीय. आगीमुळे शहरात धुराचे लोट.. कल्याणमध्ये डम्पिंगला पुन्हा आग लागलीय. कल्याण पश्चिमेच्यातील आधारवाडी डम्पिंग ग्राउंडला याआधी ४ दिवसापूर्वी आग लागली होती कल्याण मधील पुन्हा आज दुपारी आग लागल्याची माहिती केडीएमसी अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या सहा गाड्यांकडून आग विझवण्याचं प्रयत्न सुरू आहे. ही आग कशामुळे लागली हे सध्या तरी स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र आगीमुळे आजूबाजूच्या परिसरातील उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. असुन धुराचे लोट पसरल्याने आजू बाजूच्या परिसरातील नागरिकांना श्वसनाचे त्रास होऊ लागले आहेत.0
0
Report
अरनी के सहकारी बैंक से 1.5 लाख रुपये चोरी, सीसीटीवी में कैद बदमाश
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या आर्णी येथे सहकारी सोसायटीचे पीक कर्ज भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांची दीड लाखांची रोख दुचाकीवरील अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. लुटीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात चित्रित झाली आहे. सायखेडा येथील शेतकरी नामदेव शिंदे यांनी बँक ऑफ इंडिया आर्णी शाखेतून दीड लाखाची रक्कम विड्रॉल केली, त्यानंतर पीक कर्जाची परतफेड करण्यासाठी सोसायटीच्या कार्यालयात जाण्यासाठी निघाले असतांना दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या हातातील रोख रक्कम असलेली पिशवी हिसकावून पळ काढला. याप्रकरणी तक्रारीनंतर पोलीस तपास करीत आहे.0
0
Report
नवी मुंबई: आयुक्त कैलास शिंदे ने शहर के प्रोजेक्ट और नाले साफ-सफाई का निरीक्षण
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई मनपा आयुक्त कैलास शिंदे यांनी शहरातील विविध प्रकल्प, शहरातील समस्या आणि नालेसफाईच्या कामांची पाहणी केलेय. घणसोली ऐरोली लिंक ब्रिज, कोपरी येथील अँम्युजमेंट पार्क, तळवली चौकात होणारी वाहतूक कोंडी आणि शहरातील सर्व नाल्यांची पाहणी मनपा आयुक्त कैलास शिंदे यांनी केली आहे. यावेळी नालेसफाईसह मान्सूनपूर्व कामांना गती देत hi कामे लवकरात लवकर पिरन करण्याचे निर्देश मनपा आयुक्त कैलास शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिलेत.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी के हापूस में इथ्रेल का खतरा, सेहत पर असर की चेतावनी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. सावधान! इथ्रेलच्या फवाऱ्याने पिकतोय रत्नागिरीचा हापूस; चकाकीवर जाऊ नका, आरोग्याला बसतोय फटका!.. अँकर intro रत्नागिरीच्या हापूसचा सुगंध आता जगभरात दरवळू लागला आहे. पण हा सुगंध आणि नैसर्गिक चव धोक्यात आली आहे.आंबा झटपट पिकवण्यासाठी वापरलं जाणारं 'इथ्रेल' रसायन ग्राहकांसाठी विष ठरू पाहतंय. इथ्रेलमुळे आंबा किती लवकर पिकतो आणि त्याचे शरीरावर काय परिणाम होतात? पाहा हा रिपोर्ट... कोकणात सध्या हापूसचा हंगाम जोरात आहे. मात्र, नैसर्गिक अढी लावून आंबा पिकवण्यासाठी १० ते १२ दिवसांचा कालावधी लागतो. हा वेळ वाचवण्यासाठी आणि बाजारात वाढत्या दराचा फायदा घेण्यासाठी अनेक व्यापारी 'इथ्रेल' या रसायनाचा आधार घेत आहेत. इथ्रेलचा स्प्रे केल्यावर अवघ्या ४८ तासांत कच्चा आंबा पिवळाधमक दिसू लागतो.पण ही घाई ग्राहकांच्या जिवावर बेतू शकते. रसायनांच्या अतिवापरामुळे केवळ फळाची चवच बदलत नाही,तर ते थेट आपल्या शरीरातील अंतर्गत अवयवांना इजा पोहोचवत आहे. ग्राहक म्हणून आपण हा फरक ओळखणं गरजेचं आहे. नैसर्गिक आंबा हा सगळीकडून सारखा पिवळा नसतो आणि तो हातात घेतल्यावर त्याचा देठापाशी सुगंध येतो. याउलट इथ्रेलचा आंबा पिवळा असला तरी चवीला आंबट असू शकतो.0
0
Report
यवतमाळ में बस-ट्रक भयानक दुर्घटना, चालक समेत 16 यात्री घायल
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये प्रवासी घेऊन जाणाऱ्या बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून, बसमधील चालक वाहक गंभीर जखमी झाले आहे. तर 16 प्रवासी देखील जखमी आहेत. नागपूर तुळजापूर महामार्गावरील सातारा फाट्याजवळ हा अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या ट्रकने प्रवासी घेऊन जात असलेल्या दिग्रस डेपोच्या बसला समोरून जबर धडक दिली. अपघातानंतर नागरिकांनी बसच्या स्टेरिंग मध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढून, दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले. तर जखमी प्रवाशांनाही उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.0
0
Report
13 वर्षीय बालिका के साथ 45 वर्षीय नराधम के अत्याचार के बाद विधायक नीलम गोरे अस्पताल पहुँचीं
Palghar, Maharashtra:पालघर जिले के कसा थाना क्षेत्र के अंतर्गत एक तेरह वर्ष की बच्ची के साथ 45 वर्ष के नराधम ने अत्याचार किया. आज विधान परिषद की उपसभापति विधायक नीलम गोरे ने कसा उप जिल्हा अस्पताल पहुँचकर पीड़िता और परिवार वालों से मुलाकात की. महाराष्ट्र में घटी चारों घटनाओं की निंदा है और इस मामले में ऐसे नराधमों को मदद करने वालों पर भी कड़ी से कड़ी कार्रवाई होनी चाहिए, साथ ही कठोर कानून बनाकर अपराधियों को कठोर सजा मिले. चारों निंदनीय घटनाओं की जानकारी लेकर आवश्यक कानून बनाने पर नीलम गोरे ने विचार व्यक्त किया.0
0
Report
Advertisement
मुख्यमंत्री मेरी प्यारी बहन योजना की मार्च-अप्रैल की किस्तें थमी, महिलाओं की मुश्किलें बढ़ीं
Yavatmal, Maharashtra:मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे मार्च एप्रिल महिन्याचे हप्ते अद्याप थकीत आहे, त्यामुळे अनेक महिलांची प्रतीक्षा वाढली आहे. मे महिना सुरू होऊनही पैसे खात्यात न आल्याने महिलांच्या अडचणी वाढल्या आहे. अनेक महिलांनी केवायसी पूर्ण केली तरीदेखील चार महिन्यांपासून त्यांना लाभ मिळालेला नाही. सरकारने दर महिन्याला नियमित पंधराशे रुपये खात्यात जमा केल्यास महिलांना आर्थिक नियोजन करता येईल व आपल्या गरजा भागवता येतील अशी अपेक्षा यवतमाळच्या लाडक्या बहिणीनी आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांचेशी बातचीत करताना व्यक्त केली.0
0
Report
पनवेल नगर निगम और CIDCO ने संयुक्त अतिक्रमण हटाकर जंक्शन सुधारा
Navi Mumbai, Maharashtra:कळंबोली जंक्शन सुधारणा प्रकल्प अंतर्गत मुंबईच्या दिशेने होणारी वाहतूक सुरळित होण्यासाठी एमजीएम हॉस्पीटल समोरील कॉरीडर उपायोगात आणण्यासाठी, पनवेल महानगरपालिका व सिडको प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने मोठी तोडक कारवाई करत परिसर अतिक्रमण मुक्त करण्यात आलाय. या तोडक कारवाईत एमजीएम रूग्णालयासमोरील वर्षानुवर्षे उभारलेली पक्की अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली आहेत.0
0
Report
वाशीम बेलखेडा में तारों से आग, 195 संतरे पेड़ जलकर नष्ट; किसान मदद मांग रहा
Washim, Maharashtra:वाशीम: बेलखेडा येथे बबन चव्हाण या शेतकऱ्याची एक हेक्टरमधील संत्रा बाग विद्युत तारांमुळे लागलेल्या आगीत काही झाड जाळले तर जी काही झाडं राहिलेली झाडं पूर्णपणे करपू गेली आहेत.या आगीत 195 झाडांचे नुकसान झाले आहे.सात वर्षांच्या मेहनतीने उभी केलेली बाग नष्ट झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.घटनेला महिना उलटूनही सर्वेक्षण होऊन मदत मिळालेली नाही.दरम्यान,खरिप हंगाम जवळ आल्याने आर्थिक अडचणी वाढल्या असून शासनाने तातडीने मदत द्यावी,अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे. बाईट:बबन चव्हाण शेतकरी,बेलखेडा0
0
Report
Advertisement
