icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सप्तशृंगी घाट में भारी बारिश से दराड़ गिरा, यातायात थमा

Nashik, Maharashtra:सप्तशृंगी ब्रेकिंग ( नाशिक ) - सतत पावसाच्या धारेने नाशिकच्या सप्तशृंगी घाटात दरड कोसळली... - सप्तशृंगी घाटात दरडीचा धोका कायम; संरक्षण जाळीवर प्रश्नचिन्ह Anchor : नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गड घाटात मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. रस्त्यावर भला मोठा दगड, माती आणि दगडगोटे आल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिस आणि स्थानिकांच्या मदतीने फॉकलॅण्ड मशीनच्या सहाय्याने दरड हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. मात्र, कोट्यवधी रुपये खर्चून बसविण्यात आलेल्या संरक्षणात्मक जाळीनंतरही दरड कोसळल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत आहेत
0
0
Report

एल निनो संकट से किसानों की उम्मीद, सुनेत्रा पवार का मंदिर संवर्धन निरीक्षण

Pandharpur, Maharashtra:राज्यातील अल निनो संकट टळू दे, बळीराजाला सुखी ठेवण्यासाठी लवकर पाऊस पडू दे, बळीराजा सुखी झाला तर सगळा संसार सुखी होणार आहे. असं साकड विठुरायाला आपण घातल्याचं राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. आपले आणि माऊलींचं नातं वेगळा आहे राज्यातून अनेक वारकरी पंढरपूर कडे येतात. सुविधा देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. सुरक्षित आरोग्यदायी वारी पार पडण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंदिर समितीच्या जतन संवर्धनाच्या कामाची पाहणी केली या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच भरघोस निधी दिला होता.
0
0
Report

लगातार बारिश से कोल्हापुर में जनजीवन प्रभावित, हिरण्यकेशी नदी पर पुल बह गया

Kolhapur, Maharashtra:Kop Bhadagaon Pul कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. गडहिंग्लज-चंदगड मार्गावरील हिरण्यकेशी नदीवर उभारण्यात आलेला भडगाव येथील पर्यायी कच्चा पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यांतील वाहतुक्यावर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यात अतिवृष्टीसदृश पावस सुरू आहे. सततच्या पावसामुळे सर्व नद्या दुथडी भरून वाहत असून हिरण्यकेशी नदीच्या पाणीपातळीतही मोठी वाढ झाली आहे.
0
0
Report
Advertisement

कल्याण-डोंबिवली में मुसलाधार बारिश से भारी पानी बहे, कई इमारतें पानी में डूबीं

Kalyan, Maharashtra:कल्याण पूर्व येथील अडवली ढोकली परिसरामध्ये पूर परिस्थिती. रस्त्यावरती पाणी साचल्याने नदीचा स्वरूप. अनेक दुकानांमध्ये पाणी साचले तर घरांमध्ये देखील पाणी साचले. मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवलीकरचे जनजीवन विस्कळीत. कमरेवर पाण्यातून काढावे लागते वाट. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये सकाळपासूनच मुसळधार पावसाने कल्याण डोंबिवलीकरांची जनजीवन विस्कळीत झाले आहे अनेक सकल भागामध्ये पाणी साचला आहे तर कल्याण पूर्व येथील अडवली ढोकली परिसरामध्ये पाणी साचल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे अडवली ढोबलीला जाणारा हा मुख्य रस्ता आहे गेल्याने 50 ते 100 इमारती पाण्याखाली गेल्या आहेत तर दुकान मध्ये पाणी शिरल्याने दुकानदारांचे नुकसान झाले आहेत त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी
0
0
Report
Advertisement

वसई-विरार में भारी बारिश से जनजीवन प्रभावित, बुलेट ट्रेन प्रोजेक्ट में मजदूर फंसे

Vasai-Virar, Maharashtra:वसई-विरारमध्ये मुसळधार पावसाचा कहर बुलेट ट्रेन च्या कामात अनेक कामगार अडकले सर्जा मोरी गावात पुराच्या पाण्यात अडकलेल्या अनेक नागरिकांची सुटका NDRF जवान आणि नायगाव पोलिसांकडून बचावकार्य पुरात अडकलेल्या नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर आज झालेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरार परिसरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. वसई कामण – सर्जामोरी परिसरात सुरू असलेल्या बुलेट ट्रेन च्या कामादरम्यान पाच कामगार पुराच्या पाण्यात अडकले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि NDRF पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या तत्पर बचाव मोहिमेत अडकलेल्या पाचही कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे... नागरिकांनी कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये आणि स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात येत आहे.
0
0
Report
Advertisement

लातूर में सूखा-उत्पन्न किसान आत्महत्याएं, सरकार से मदद की मांग तेज

Latur, Maharashtra:राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, लातूर जिल्ह्यातील अनेक भाग आजही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पेरणी खोळंबली आहे, कर्जाचा डोंगर वाढत आहे आणि आर्थिक विवंचनेत शेतकरी सापडला आहे. या नैराश्याच्या वातावरणात निलंगा तालुक्यात अवघ्या आठ दिवसांत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने चिंता अधिकच वाढली आहे. पावसाची प्रतीक्षा, कर्जाचा फास आणि वाढते शेतकरी संकट... पाहूया याच संदर्भातील स्पेशल रिपोर्ट. रिपोर्टर वैभव बालकुंदे जून महिना संपला... जुलैचा पहिला आठवडाही सुरू झाला... पण लातूर जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. अनेक शेतकरी अजूनही पेरणीच्या प्रतीक्षेत आहेत, तर काहींनी कर्ज काढून बी-बियाणे आणि खते खरेदी केली आहेत. मात्र, पाऊस नसल्याने शेतात ओलावा नाही आणि खरीप हंगाम धोक्यात आला आहे. पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. बँकांचे हप्ते, खासगी सावकारांचा तगादा आणि वाढता घरखर्च यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत. या वाढत्या नैराश्याच्या पार्श्वभूमीवर निलंगा तालुक्यात अवघ्या आठ दिवसांत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे लातूरमधील शेतकरी संकट पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे. शेतकरी पाऊस लांबल्याने शेतकरी आर्थिक संकटात अधिकच अडकत चालला आहे. पेरणीसाठी काढलेले कर्ज, वाढते व्याज, खासगी सावकारांचा तगादा आणि उत्पादनाची अनिश्चितता यामुळे अनेक शेतकरी नैराश्याच्या गर्तेत जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सरकारने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि सुरू असलेल्या विधिमंतळ अधिवेशनात खासगी सावकारांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केली आहे. राजू कसबे (प्रदेशाध्यक्ष, क्रांतिकारी शेतकरी संघटना) एका बाजूला राज्यातील काही भागात पुराचे संकट आहे, तर दुसऱ्या बाजूला लातूरमध्ये शेतकरी आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहत आहे. वेळेत पाऊस झाला नाही, तर खरीप हंगामासह शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडण्याची भीती आहे. पाऊस, कर्जमाफी आणि तातडीच्या मदतीची अपेक्षा घेऊन शेतकरी सरकारकडे आशेने पाहत आहे. आता येणारे काही दिवस पाऊस आणि सरकारची भूमिका, दोन्ही शेतकऱ्यांचे भविष्य ठरवणार आहेत...
0
0
Report

सोलापूर के भोंदू बाबा भोसले के खिलाफ मामला, 3 करोड़ के लेनदेन की जांच

Pandharpur, Maharashtra:सोलापूर के भोंदू बाबा भोसले के खिलाफ मामला, 3 करोड़ के लेनदेन की जांच एक महिला आरोग्याच्या तक्रारीसाठी आराम मिळावा यासाठी भोंदू म्हणून बाबाकडे आली होती आरोग्याच्या कारणाचे निराकरण करण्यासाठी ही अमावस्येला पूजा घालावी लागेल. या साठी पीडित महिलेकडून अश्लील कृत्य करण्याचे काम मनोहर मामा भोसले याने केले आहे. याबाबत त्याच्या घोटी आश्रमातून काही पुरावे सापडले आहेत. मनोहर भोसले प्रकरणाची एसआयटी कडून तपासणी आणि चौकशी सुरू आहे. यामध्ये मनोहर भोसले यांच्या 20 बँक खात्यातून तपासणी केली असता. तीन कोटी पेक्षा अधिक रूपयांचे व्यवहार समोर आले आहे.
0
0
Report
Advertisement

उरण में बेमौसम बारिश से चिरनेर समेत गांवों में पानी घूसा, घर तबाह

Navi Mumbai, Maharashtra:आज सकाळपासून उरण शहर व तालुक्यात जोरदार पाऊस सुरू झाल्याने या पावसाने चांगलीच दाणादाण उडाली आहे. अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. चिरनेर गावात पुरपरिस्थिती निर्माण झाली असून चिरनेर, नागाव तसेच तालुक्यातील इतर गावातील रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरले असल्याने जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे. उरण तालुक्यात दरवर्षी मुसळधार पाऊस पडत पडतो. यावेळी पुरग्रस्त रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचे काम हे प्रत्येक गावातील रहिवासी करत होते. तरी शासनाने पुरग्रस्तांना नुकसान भरपाई देऊन,यापुढे रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरणार नाही यासाठी खबरदारी घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. Navi Mumbai
0
0
Report

भीमाशंकर में छुट्टी के कारण भारी बारिश में भक्तों की भीड़

Shirur, Maharashtra:भीमाशंकर/पुणे भिमाशंकर येथे सुट्ट्यांमुळे भर पावसात भाविकांची मोठी गर्दी पुणे जिल्ह्यातील भिमाशंकर येथे सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भिमाशंकर परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून धुक्याची चादर आणि हिरवागार निसर्ग पर्यटकांना आकर्षित करत आहे. मुसळधार पावसाची पर्वा न करता राज्याच्या विविध भागांतून भाविक आणि पर्यटक भिमाशंकरमध्ये दाखल होत आहेत. अनेक भाविक पावसात भिजतच भगवान भिमाशंकराचे दर्शन घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया भिमाशंकर पुणे...
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top