icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

तळकोकण की अवकाली बारिश से जनजीवन बिखरा, कणकवली में भारी नुकसान

Oras Bk., Maharashtra:तळकोकणात मागील तीन दिवस कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेय. सिंधुदुर्गात वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या अवकाळी पावसाचा फटका कणकवली तालुक्याला बसलाय. कणकवली तालुक्यातील अनेक गावांमध्ये घराची छप्परे उडालीत तर झाड घरावर कोसळल्यामुळे घरांचेदेखील नुकसान झालेय या नुकसानीची कणकवली पंचायत समिती सभापती उपसभापती प्रांतधिकारी व तहसीलदार यांनी पाहनी केली. खारेपाटण भागात वादळी पावसाचा मोठा फटका बसला असून नुकसानग्रस्तांना जास्तीतजास्त मदत देण्याचा आपण पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे सभापती हर्षदा वाळके यांनी सांगितले.
0
0
Report

जालना में राज ठाकरे के बयान पर मनसे ने सख्त चेतावनी दी

Jalna, Maharashtra:जालना :राज ठाकरेंबद्दल वक्तव्य कराल तर जशाच तसं उत्तर देऊ जालन्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांचा गुणरत्न सदावर्तेंना पुन्हा इशारा पोलीस बंदोबस्त नसता तर सदावर्तेंची गाडीही फोडली असती आणि सदावर्तेनाही फोडलं असत मनसे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांचा इशारा काल सदावर्ते यांच्या गाडीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आॅईल फेकलं होतं.. मात्र पोलीस बंदोबस्त नसता तर सदावर्तेंची गाडी फोडली असती आणि सदावर्तेनाही फोडलं असतं असा इशारा मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी दिला असून राज ठाकरे यांच्याबद्दלचं वक्तव्य खपवून घेणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आलाय.
0
0
Report

कोलगाव में ट्रक ने दोपहिया को मारी टक्कर, 15 वर्षीय बेटी सहित 3 घायल - CCTV कैद

Oras Bk., Maharashtra:थांबलेल्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे कोलगाव येथे झालेल्या अपघातात १५ वर्षांच्या मुलीसह तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील रील स्टार कलाकार मलिक मकानदार यांच्या घरासमोर घडली. हा सर्व थरारक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. दरम्यान जखमींना अधिक उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रमजान शेख (वय ५०), हेमीना शेख (वय ४७) आणि सिमरन शेख (वय १५) सर्व रा. कोलगाव अशी जखमींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, कोलगाव येथे राहणारे शेख कुटुंब आपल्या घरी परतत होते. यावेळी ते मकानदार यांच्या घरासमोर काही वेळ थांबले असता त्यावेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक चालकाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की तिघेही गाडीवरून फेकले गेले. सुदैवाने रस्त्याच्या बाजूला ते पडल्यामुळे कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही. या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. दरम्यान अपघातात जखमी झालेल्या तिघांनाही खासगी गाडीने येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
0
0
Report
Advertisement

नगर-मनमाड मार्ग पर पुणतांबा फाटे पर जाम, परीक्षा समेत भारी असर

Shirdi, Maharashtra:नगर मनमाड महामार्गावर पुणतांबा फाट्यावर वाहतुक कोंडी... कोपरगावच्या पुणतांबा फाट्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.... प्रवासी तीन ते चार तासांपासून वाहतूक कोंडीत अडकले… नगर मनमाड महामार्गाचे काम सुरू असल्याने वाहतुकीचे नियोजन नसल्याने वाहतूक कोंडी... रविवार आणि लग्नसराईमुळे शहरातसह नगर मनमाड महामार्गावर वाहनांची गर्दी... सीईटी परीक्षार्थींनाही वाहतूक कोंडीचा फटका ; अनेक विद्यार्थी वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचू शकले नाहीत… वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांची धावपळ सुरू , मात्र नियोजनाचा अभाव असल्याने वाहतूक कोंडी... गेल्या तीन तासांपासून प्रवासी करताय वाहतूक कोंडीयचा सामना....
0
0
Report

नाशिक के होटल पूल में डूबे युवक की मौत, पुलिस जांच शुरू

Nashik, Maharashtra:हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तीस वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून गणेश गायकवाड असे या तरुणाचे नाव आहे तो नाशिक येथून नातेवाईकाच्या लग्नासाठी आला होता. सायंकाळी शहराजवळील एका हॉटेलच्या स्वीमिंग पूल मध्ये मित्रा सोबत पोहण्यासाठी गेला होता पोहताना अचानक तो पाण्यात बुडू लागल्याचे पाहून त्याला बाहेर काढून सीपीआर देण्यात आले त्यानंतर त्याला तातडीने कार मध्ये घेऊन हॉस्पिटलकडे घेऊन जात असताना पुणे-इंदूर महामार्गांवर प्रचंड ट्रॅफिक जाम होते त्यामुळे काही तरुणांनी गणेशला खांद्यावर घेऊन हॉस्पिटल गाठले मात्र वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करून तपास सूरू केला आहे
0
0
Report

सोलापुर के हर तालुके में स्मार्ट हेल्थ सेंटर: जिला परिषद की महत्त्वाकांक्षित पहल

Solapur, Maharashtra:सोलापूर - सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने प्रत्येक तालुक्यात स्मार्ट आरोग्य केंद्र उभा करण्याचा निर्णय असून ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात स्मार्ट आरोग्य केंद्र उभारण्याची महत्त्वकांक्षी संकल्पना जिल्हा परिषद स्तरावर पुढे आलीय. केंद्रावर रुग्णांना आवश्यक वैद्यकीय सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रकल्पासाठी शासन अथवा जिल्हा परिषदेतून निधी उपलब्ध करण्याबाबत सकारात्मक विचार सुरू असून या संदर्भात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.
0
0
Report
Advertisement

नांदेड-हैदराबाद-बीदर मार्ग पर भारी ट्रैफिक जाम, दो घंटे यातायात ठप

Nanded-Waghala, Maharashtra:नांदेड - हैदराबाद और नांदेड - बिदर के राष्ट्रीय मार्ग पर वाहतुकी की बड़ी कोड़ी हो गई। नायगाव तालुक्यातील नरसी चौक येथे दुपारी बाराच्या सुमारास वाहतूक ठप्प झाली। याच चौकातून हैदराबाद आणि बीदर कडे वाहन जातात. या मार्गावर तब्बल पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलीसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू होते. आज रविवारचा लग्नाचा मोठा मुहूर्त असल्यामुळे या मार्गावर वाहनांची संख्या वाढली होती. वाहतुकीच्या अडचणीमुळे अनेक गाड्या अडकलेल्या होत्या आणि जवळपास दोन तास या मार्गावर वाहतूक ठप्प होती.
0
0
Report

नवी मुंबई में फ्लेमिंगो की संख्या घटी, पर्यटक फिर भी उमड़े

Navi Mumbai, Maharashtra:फ्लेमिंगो सिटी म्हणून ओळख निर्माण करू पाहणाऱ्या नवी मुंबईत यंदाच्या वर्षी फ्लेमिंगो पक्ष्यांची संख्या घटलेली पहायला मिळाली. हे फ्लेमिंगो आता परतीच्या प्रवासाला निघाले असून पावसाळ्या नंतर हिवाळ्यात फ्लेमिंगो पक्षी पुन्हा ऐरोली खाडी किनारी येतील मात्र आता त्यांच्या संख्या अधिक असावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय. ऐरोली खाडीत पाण्यावर जणू गुलाबी चादर पांघरलेय अशी अनुभूती देणारे फ्लेमिंगो आता परतीच्या प्रवासाला निघालेत. खाद्याच्या शोधात हजारो मैलाचा प्रवास करुन आलेले हे परदेशी पाहुणे पाहण्यासाठी नागरिक ऐरोली येथील बायोडायवर्सिटी केंद्रात मोठी गर्दी करत असतात. या परदेशी पाहुण्यांना पाहून प्रत्येक पक्षी प्रेमी आनंद व्यक्त करत आहेत. 4 पर्यटक/पक्षी प्रेमी. नागरिकांमध्ये फ्लेमिंगो पाहण्याचा उत्साह असला तरी फ्लेमिंगो सिटी समजल्या जाणाऱ्या नवी मुंबईत फ्लेमिंगोची संख्या घटताना पहायला मिळत आहे. नवी मुंबईतील डीपीएस तलाव आणि टीएस चाणक्य येथील पाणथळ क्षेत्रात हजारोच्या संख्येने येणारे फ्लेमिंगो यंदा आलेच नाहीत. त्यामुळे पाणथळ क्षेत्र वाचवीण्याचे आव्हान सरकार समोर आहे. ऐरोली खाडीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी.
0
0
Report

शिंदे गट की महिलाओं ने अंधारे के प्रतीम पर चॉकलेट खिलाकर विरोध जताया

Beed, Maharashtra:बीड: “चॉकलेट देऊन थांबवलं!” सुषमा अंधारे यांच्यावर शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून जोरदार हल्लाबोल करत अंधारे यांच्या प्रतिमेला चॉकलेट भरवले..! ANC - ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जोरदार टीका करत निषेध आंदोलन केले. सुषमा अंधारे भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांना समजल्यानेच त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली नाही, असा दावा शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी सुषमा अंधारे यांच्या प्रतिमेला चॉकलेट खाऊ घालत अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला. “अंधारे यांना फक्त चॉकलेट देण्यात आले,” असा टोला देखील महिला पदाधिकाऱ्यांनी लगावला. तसेच, आमदार नीलम गोऱ्हे यांच्यावर बोलण्याची सुषमा अंधारे यांची लायकी नसल्याचे म्हणत, “निलमताई पक्षाशी प्रामाणिक राहिल्या म्हणूनच बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना अनेक वेळा आमदार केले,” असेही त्यांनी सांगितले. “तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही मिळाले नाही म्हणून तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या पक्षात गेलात. तुमचे कारनामे महाराष्ट्राला माहीत आहेत,” असा आरोपही महिला पदाधिकाऱ्यांनी केला.यापुढे नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका केल्यास “सेना स्टाईलने मस्ती जिरवू,” असा इशाराही शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी दिला.
0
0
Report
Advertisement

चंद्रपूर मुल रेलवे स्टेशन पर मालधक्का प्रकल्प रद्द, रेल मंत्री ने संकेत दिया

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील मुल रेल्वे स्थानकाजवळ प्रस्तावित मालधक्का (गुड्स यार्ड) प्रकल्प रद्द करण्याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक निर्णय घेतल्याने स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नवी दिल्ली येथे रेल्वेमंत्र्यांची भेट घेत या प्रश्नावर सविस्तर चर्चा केली. स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध, संभाव्य प्रदूषण आणि पर्यावरणीय परिणाम लक्षात घेता मुल येथे मालधक्का उभारला जाणार नसल्याचे रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुल शहरातील प्रस्तावित गुड्स यार्ड प्रकल्पामुळे आयर्न ओअर आणि इतर खनिज पदार्थांच्या लोडिंग-अनलोडिंगमुळे मोठ्या प्रमाणावर वायूप्रदूषण होण्याची शक्यता होती. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होईल, पिकांचे नुकसान होईल तसेच जलस्रोत दूषित होण्याचा धोका निर्माण होईल, अशी भूमिका आ. मुनगंटीवार यांनी रेल्वेमंत्र्यांसमोर ठामपणे मांडली. मुल शहरातील वाढती वाहतूक, अपघातांचा धोका आणि ग्रामीण शांततेवर होणारा परिणाम लक्षात घेता हा प्रकल्प जनहिताच्या विरोधात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आ. मुनगंटीवार यांच्या या मागणीची गंभीर दखल घेत रेल्वेमंत्र्यांनी मुल शहरातील वाढती वाहतूक, अपघातांचा धोका आणि ग्रामीण शांततेवर होणारा परिणाम लक्षात घेता हा प्रकल्प जनहिताच्या विरोधात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आ. मुनगंटीवार यांच्या या मागणीची गंभीर दखल घेत रेल्वेमंत्र्यांनी संबंधित प्रकल्प त्या ठिकाणी होणार नसल्याचे स्पष्ट करत स्थानिक नागरिक, शेतकरी आणि व्यापारी वर्गाला मोठा दिलासा दिला आहे.
0
0
Report

कंडारी गाँव में जल जीवन मिशन ढीला, पानी के लिए महिलाएं भड़के

Buldhana, Maharashtra:सरकारने 'हर घर जल'च्या घोषणा केल्या खरं, पण बुलढाण्यातील कंडारी गावात मात्र या योजनेचा पुरता 'खेळखंडोबा' झालाय. गेल्या तीन वर्षांपासून जलजीवन मिशनचं काम सुरू आहे, पण गावकऱ्यांच्या नशिबी मात्र अजूनही तीच जुनी पायपीट आहे. निकृष्ट दर्जाचं काम, उघड्यावर पडलेले आणि फुटलेले पाईप... रणरणत्या उन्हात गावाबाहेरच्या एका हाफशीवर पाण्यासाठी महिलांच्या रांगा लागतायत, हंड्यासाठी भांडणं होतायत, पण प्रशासनाचे डोळे मात्र अजूनही उघडायला तयार नाहीत. हाफशीवर एक एक हंडाभर पाण्यासाठी भांडण लागलेल्या महिलांची बातचीत करा त्यांचे व्यथा जाणून घेतले आहेत आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी...
0
0
Report
Advertisement

नागपुर-मुंबई समृद्धि महामार्ग पर ट्रक सहित एक करोड़ रुपये के प्रतिबंधित गुटखा पकड़ा गया

Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर महामार्ग सुरक्षा पथकाने कारंजा जवळ मोठी कारवाई करत ट्रकसह अंदाजे १ कोटी रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. गुप्त माहितीच्या आधारे कारंजा टोल नाक्यावर संशयित आयशर ट्रकची तपासणी करण्यात आली असता मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला. महामार्ग सुरक्षा पथक नागपूरचे पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपी शेख रहमान शेत्र रहीम अमरावती याला ताब्यात घेतले असून हा प्रतिबंधक असलेला गुटखा कुठून आणला होता व कुठे नेण्यात येणार होता पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report

चाकण मिडक के Mercedes-Benz परिसर में बिबटिया घुसा; वन विभाग ने रेस्क्यू शुरू किया

Khed, Maharashtra:पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीतील मर्सिडीज बेंज कंपनीमध्ये बिबट्या शिरला असून या बिबट्याला जेरबंद करण्याचं मोठ आव्हान आता वनविभागा पुढे असणार आहे. मर्सिडीज बेंज कंपनीच्या सुरक्षा भिंतीवरून बिबट्या चालत असलेला व्हिडिओ रात्री काही प्रवाशांनी आपल्या मोबाईल मध्ये चित्रित केला असून हा बिबट्या सुरक्षा भिंतीवरून पुन्हा खाली उतरून पुन्हा सुरक्षा भिंतीवरून कंपनीच्या आत मध्ये गेल्याची माहिती मिळत आहे, त्यामुळे या बिबट्याला रेस्क्यू करण्याचं काम सध्या वन विभागाकडून केलं जात असल्याची माहिती मिळत आहे.
0
0
Report

बीड़ के मातंग समाज के उपवर्गीकरण के विरोध में मुंबई कूच का आह्वान—मराठवाड़ा बैठक निर्णय

Beed, Maharashtra:बीड: मातंग समाजाचा उपवर्गीकरणाचा मोर्चा मुंबईत धडकणार; मराठवाडास्तरीय बैठकीत निर्णय ANC- अनुसूचित जातीजमातीच्या आरक्षणामधून मातंग आणि मातंग समाजाच्या पोटजातीला स्वतंत्र आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर मोर्चे काढण्यात येत आहे. आरक्षणाचे अबकड मधून उपवर्गीकरण करण्यात यावे यासाठी बीडमध्ये आज मातंग समाजाच्या समन्वयकांची मराठवाडास्तरीय बैठक पार पडली. आठ दिवसात उपवर्गीकरणा बद्दल सरकारकडून अंमलबजावणी झाली नसल्यास महाराष्ट्रातील तमाम मातंग समाज मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे. अबाल वृद्धासह जितराब घेऊन मुंबईच्या आझाद मैदानावर ठिय्या घालण्यात येईल असा इशार या बैठकीतून देण्यात आला आहे. त्यामुळे सरकारच्या डोकेदुखीत मात्र वाढ होण्याची शक्यता आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top