icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

80 तोला सोने के ठगी: बैंक लॉकर से नकली सोना रखने वाला मिला गिरफ्तार

Nanded-Waghala, Maharashtra:ग्राहकांनी तारण ठेवलेल्या तब्बल 80 तोळे सोन्यावर बँकेच्या कॅश इन चार्ज आणि सर्विस मॅनेजरनेच डल्ला मारला. हा डाव उघड केस येऊ नये म्हणून दोघांनीही बँकेच्या लॉकरमध्ये खरे सोने काढून घेऊन 41 तोळे बनावट सोने ठेवले होते. नांदेडमध्ये ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली. नांदेड शहरातील डॉक्टर लेन भागात स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. या शाखेत ग्राहकांनी कर्ज घेण्यासाठी सोने तारण म्हणून ठेवले होते. आठ ग्राहकांनी लॉकर मध्ये ठेवलेले 391 ग्राम सोने हे बँकेच्या कॅश इन्चार्ज असलेल्या आदित्य सेनगावकर आणि सर्विस मॅनेजर जीवन जगदाळे यांच्या ताब्यात होते. या दोघानी बँकेच्या लॉकरमधील 414 ग्रॅम सोने काढून घेतले आणि लॉकरमध्ये बनावट सोने ठेवले. दोघांनी 805 ग्राम लंपास केले होते. या सोन्याची किंमत 85 लाख 81 हजार रुपये एव्हढी आहे. सोने कमी असल्याच्या तक्रारी आल्या नंतर बॅक व्यवस्थापकाने तपासणी केली तेव्हा हा प्रकार उघड झाला. पोलिसांनी एका आरोपीला अटक केलीये.
0
0
Report
Advertisement

रायगढ़ के पालकमंत्री प्रताप सरनाईक के साथ महायुती की पारी में अहम फैसले

Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक रायगड पालकमंत्री ---- शपथविधी झाल्यापासून पालकमंत्री म्हणून आम्ही भरत गोगावले यांच्याकडेच बघत होतो. महायुती म्हणून दोन पावलं मागे पुढे यावं लागत. त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. विधान परिषदेच्या सर्व जागांवर महायुतीचा विजय होईल 7 जागा आग्रही ----- काही देवाणघेवाण असतात काही राजकीय समीकरण असतात. महायुती मध्ये मागण काही मोठी गोष्ट नाही. मागच्या वेळेस आम्ही ज्या पाच जागा लढलो त्या कायम ठेवाव्यात आणि दोन अतिरिक्त जागा आम्हाला मिळाव्यात अशी आमची मागणी होती. मात्र भविष्यात अजून काही गोष्टी आम्ही आमच्या वाट्यामध्ये पाडून घेऊ लक्षमण हाके --- स्वतःला मोठे नेते म्हणवणाऱ्यांनी लोकांनी काही गोष्टींमध्ये तोंडाला कुलुप लावण गरजेच असत. प्रसाद लाड यांच्या सारख्या व्यक्तीबद्दळ अस बोलणं योग्य नाही
0
0
Report

नाशिक के बागलाण में मध्यरात्रि अघोरी पूजा, सीसीटीवी फुटेज से पर्दाफाश

Nashik, Maharashtra:नाशिकच्या बागलाणमध्ये मध्यरात्री स्मशानात अघोरी पूजा... नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..., संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद... Anc: नाशिकच्या सटाणा शहरातील जुन्या अमरधाममध्ये मध्यरात्री कथित अघोरी पूजा झाले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात व्यक्तींनी एका अर्धनग्न मांत्रिकासह स्मशानभूमीत येऊन तांत्रिक विधी केल्याचा आरोप होत असून, या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यरात्री काही संशयित व्यक्ती आलिशान वाहनांमधून जुन्या अमरधाम परिसरात दाखल झाल्या. त्यांच्या सोबत भगवे वस्त्र धारण केलेला अर्धनग्न मांत्रिकही असल्याचे सांगितले जात आहे. या व्यक्तींनी स्मशानभूमीतील चितास्थळाजवळ जाऊन कथित अघोरी पूजा सुरू केली. या पूजेसाठी अंडी, लिंबू, उडीद, कवड्या, फुले, कापूर, नारळ तसेच इतर तांत्रिक साहित्याचा वापर करण्यात आल्याचे घटनास्थळी आढळून आले. पूजा संपल्यानंतर हे साहित्य तेथेच टाकून देण्यात आले. विशेष म्हणजे, घटनास्थळावरून काही संशयास्पद वस्तू सोबत नेण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच पोलिसांनी अमरधाम परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांचा शोध घ्यावा, तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायदा" अंतर्गत गुन्हे दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
0
0
Report

मान्सून में कोकण रेलवे: 15 जून से समय बदला, वंदे भारत-तेजस के फेरे घटे

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. वंदे भारत तेजसच्या फेऱ्यात 15 जून पासून कपात.. कोकण रेल्वे मार्गावर मॉन्सून वेळापत्रक.. गाड्यांच्या वेळा ही बदलणार.. कोकण रेल्वे मार्गावरील मान्सून काळातील आव्हानांच्या पार्श्वभूमीवर मध्ये रेल्वेने 15 जून ते 20 ऑक्टोबर या कालावधीसाठी विशेष मान्सून वेळापत्रक जाहीर केले आहे.. या कालावधीत मुंबई,पुणे,नागपूर आणि इतर महत्त्वाच्या स्थानकावरून धावणाऱ्या कोकण मार्गावरील अनेक एक्सप्रेस गाड्यांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे.. वंदे भारत,तेजस आणि एलटीटी-मडगाव एक्सप्रेसच्या फेऱ्यावरही कपात करण्यात आली आहे.. मान्सून काळात या मार्गावर सर्व गाड्यांसाठी ताशी 75 किलोमीटरची कमाल वेग मर्यादा लागू केली आहे.. कोकण रेल्वे मार्गावर मुसळधार पाऊस,दरडी कोसळण्याचा धोका,बोगदे आणि घाट विभागातील सुरक्षितता यामुळे मान्सून वेळापत्रकात गाड्यांचा वेग नियंत्रण ठेवून सुरक्षित वाहतुकीसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.. या गाड्यांच्या वेळा बदलल्या.. 1) वंदे भारत एक्सप्रेस- मुंबईहून सकाळी 5 वाजून 25 मिनिटांनी सुटून दुपारी 4 वाजता मडगावला पोहोचेल.. 2) तेजस एक्सप्रेस - सकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी सुटून सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी मडगावला पोहोचेल.. 3) जनशताब्दी,मांडवी,तुतारी,मत्स्यगंधा,नेत्रावती,दुरांतो,गरीब रथ तसेच मंगळूरु आणि केरळकडे जाणाऱ्या अनेक गाड्यांच्या वेळात बदल कारण्यात येईल.. कोणकोणत्या गाड्यांच्या फेऱ्या कमी झाल्यात पाहूया- 1) वंदे भारत - 6 दिवसांवरून 3 दिवस 2) तेजस - 5 दिवसांवरून 3 दिवस 3) एलटीटी-मडगाव - 4 दिवसांवरून 2 दिवस..
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी में अवैध शस्त्रों पर पुलिस कार्रवाई: सात हथियार, 29 कारतूस जप्त, आठ गिरफ्तार

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..crime अवैद्य शस्त्रांवर पोलिसांची कारवाई.. सात बंदुकांसह 29 काडतूसे जप्त.. आठ जणांना बेड्या..जिल्ह्यात धडक मोहीम.. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना चाप लावण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने अवैद्य शस्त्राविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे.. या मोहिमेअंतर्गत 2026 मध्ये पोलिसांनी तब्बल पाच गुन्हे उघडकीस आणले.. या कारवायांमध्ये गावठी कट्ट्यासह सात अवैद्य शस्त्रे आणि 29 जिवंत काडतूसे जप्त करण्यात पोलिसांना मोठे यश आले.. या प्रकरणी एकूण आठ संशयित आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या.. एकूण 2 लाख 28 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे..
0
0
Report

कल से सभी बस स्टॉप पर प्रसाधन गृह मुफ्त, 78 हजार पेड़ लगाए जाएंगे

Oras Bk., Maharashtra:उद्या पासून सर्व बस स्थानकांवर प्रसाधन गृह मोफत असणार आहेत. अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. एस टी महामंडळंच्या 78 व्या वर्धापन दिनाच्या पूर्व संध्येला कोकणातील बस स्थानकांची प्रताप सरनाईक यांनी पाहणी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी बस स्थानकाची सरनाईक यांनी पाहणी केली यावेळी त्यांच्या सोबत उपनेते संजय आंग्रे माजी आमदार राजन तेली उपस्थित होते. त्याप्रसंगी त्यांनी ही घोषणा केली त्यासोबत 78 हजार झाड लावण्याचा संकल्प करण्यात आलाय. सीएनजी पुरवठा बाबत आपण असमाधानी असून येत्या काळात एस टी बस इलेक्ट्रिक बस मध्ये रूपांतर केले जाईल असेही सरनाईक यांनी सांगितले
0
0
Report

सिंधुदुर्ग पुलिस के भ्रष्टाचार के आरोप पर निलेश राणे का दावा, सतेज पाटल बोले

Solapur, Maharashtra:कोल्हापूर ब्रेकिंग - सिंधुवुर्ग पोलिसांचा भ्रष्टाचार सुरूय, आ. निलेश राणेंच्या आरोपावर आ. सतेज पाटलांची प्रतिक्रिया ऑन सिंधुदुर्ग आमदार राणे ((सिंधुदुर्ग पोलिसांचा भ्रष्टाचार सुरू असा आमदार निलेश राणेंचा आरोप)) हे गंभीर आरोप सिंधुदुर्ग मधील आमदारांनी केले आहेत are , माझी त्यांना विनंती की त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते गृह खात्याकडे द्यावे गृहखात भाजपकडे आहे त्यामुळे आरोप शिंदे गटाचा आहे की वस्तुस्थितीला धरून आहे पहावं लागेल कारण राज्यातील तीन पक्षाच्या भाऊकींमध्ये वाद सुरू आहे त्यामुळे नेमका हा आरोप करण्यामध्ये हेतू काय हे पहावे लागेल सत्तेतील आमदार जर हे सांगत असतील तर गृह खात्याने त्यांच्याकडून पुरावे मागितले पाहिजे ज्यावेळेस लोकप्रतिनिधी एखादा आरोप करतो त्याच्यामध्ये अधिकृतता असली पाहिजे त्यामुळे विश्वासार्हता टिकवण्यासाठी पुरावे दिले पाहिजे खरं काय खोट काय हे लोकांच्या समोर येईल आणि त्याची चौकशी होईल
0
0
Report
Advertisement

यवतमाल विधानपरिषद चुनाव: भाजपा ने नितिन भूतडा को उम्मीदवार उतारने की तैयारी की

Yavatmal, Maharashtra:यवमताळ विधानपरिषद निवडणुकीत महायुतीकडून शिवसेना उमेदवाराची निश्चिती होत नसताना आता भाजप ने या जागेवर दावा ठोकला आहे. संख्याबळानुसार भाजप हा मोठा भाऊ असून शीर्षस्थ नेतृत्वाने सूचना दिल्यानुसार भाजप जिल्हा समन्वयक नितीन भूतडा हे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. शिवसेना दावा करीत असली तरी यवतमाळ मध्ये जागा वाटपाचा तिढा कायम आहे. शिवसेनेकडे स्थानिक सक्षम उमेदवार नसून बाहेरचा उमेदवार मान्य नाही अशीही भाजपची भूमिका आहे. एकंदरीतच यवतमाळ च्या जागेवरून भाजप सेनेत जुम्पली आहे.
0
0
Report

अमरावती: चांदूर रेलवे पुलिस ने अवैध दारू केंद्र पर छापा; नौ लाख का माल नष्ट

Amravati, Maharashtra:तीन फाईल है अवैद्य दारू निर्मिती केंद्रावर पोलिसांचा छापा; 9 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट, चांदुर रेल्वे पोलिसांची कारवाई अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे पोलिसांनी गावठी दारू निर्मितीच्या अड्ड्यावर धडक कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे गोरखेडा परिसरातील शेतातील बेड्यावर सुरू असलेल्या अवैध दारू निर्मिती केंद्रावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईदरम्यान तब्बل ८४ हजार लिटर मोहाचा सडवा जप्त करून नष्ट करण्यात आला. याशिवाय दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे नवसागर, गूळ, लोखंडी पिंपे, टोपल्या, कढई, पाईप आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले. या संपूर्ण कारवाईत सुमारे ९ लाख ८८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
0
0
Report

हिंजवडी के थिंक टेक्नोलॉजी इंडिया पर 700 कर्मचारियों को धोखा: वेतन रोका, चेक बाउंस

Pimpri-Chinchwad, Maharashtra:आयटी पार्क हिंजवडी फेस टू में Think Technology India Private Limited कंपनी ने कुछ महीनों में करीब 700 कर्मचारियों को वेतन और सुरक्षा जमा आदि के नाम पर धोखा दिया गया. सुरक्षा डिपॉज़िट के नाम पर 15000 रुपये वसूल किए गए थे. फरवरी 2026 से वेतन नहीं दिया गया, हर महीने 7 या 8 तारीख को वेतन जमा नहीं हुआ. कंपनी के CEO और संचालक हरशल भानुदास ठाकरे ने अंदरूनी ऑडिट का दावा किया और कहा वेतन 25 से 28 फरवरी के बीच दिया जाएगा, लेकिन निर्धारित समय के बाद भी वेतन नहीं मिला. कार्यालय अचानक बंद हो गया और कर्मचारियों में भय फैल गया. वेतन के चेक भी बाउंस हो चुके थे. हिंजवडी पोलीस स्टेशन में शिकायत दर्ज कराई गई. फाइट फॉर IT EMPLOYEES FORUM के पवनजीत माने ने टिप्पणी की. इसके पहले हिंजवडी IT कंपनी ने नोकरी लावण्याच्या आमिषाने युवाओं से 1.5 लाख रुपये ट्रेनींग के बहाने धोखा दिया था; अब कंपनी बनावट सामने आने से कड़ी कार्रवाई की मांग.
0
0
Report
Advertisement

भीमाशंकर मंदिर 15 जून तक बंद, भक्तों को दर्शन नहीं मिलेगा

Shirur, Maharashtra:बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध भीमाशंकर मंदिराचा विकास आराखड्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. भाविकांच्या सुरक्षेचा विचार करता, आता हे मंदिर आगामी १५ जूनपर्यंत भाविकांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. सुरुवातीला ९ जानेवारी ते ९ एप्रिल आणि त्यानंतर ३१ मे पर्यंत मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मात्र, काम अद्याप प्रलंबित असल्याने आता तिसऱ्यांदा या मुदतवाढीत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या पाच महिन्यांपासून मंदिर बंद असल्याने देशभरातून येणाऱ्या भाविकांना दर्शनाविनाच माघारी फिरावे लागत आहे. याचा थेट फटका स्थानिक आदिवासी बांधव आणि छोट्या व्यापाऱ्यांच्या रोजगाराला बसलाय. आगामी पावसाळ्यात भीमाशंकर परिसरात होणारी प्रचंड अतिवृष्टी पाहता कामाचा वेग आणि मंदिराची दारे भाविकांसाठी पूर्ण क्षमतेने कधी खुली होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.याचाच मंदिर परिसरातून एक्सक्लिजीव आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top