445001
यवतमाळ - पुसद मध्ये जन्माष्टमीनिमित्त टाळमृदुंगाच्या गजरात शोभायात्रा.
Yavatmal, Maharashtra:जन्माष्टमीनिमित्त यवतमाळच्या पुसद शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. डीजेला फाटा देत पारंपारिक पद्धतीने सलग 11 वर्षांपासून या आदर्शवत मिरवणुकीचे आयोजन करण्यात येत आहे. या मिरवणुकीत टाळ व मृदुंगाच्या तालावर गोपाल कृष्ण भगवान की जय असा एकच जयघोष करण्यात आला. या मिरवणुकीत बाल गोपाल वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीकृष्ण जन्मोत्सव समिती पुसद तर्फे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सप्तशृंगी घाट में भारी बारिश से दराड़ गिरा, यातायात थमा
Nashik, Maharashtra:सप्तशृंगी ब्रेकिंग ( नाशिक ) - सतत पावसाच्या धारेने नाशिकच्या सप्तशृंगी घाटात दरड कोसळली... - सप्तशृंगी घाटात दरडीचा धोका कायम; संरक्षण जाळीवर प्रश्नचिन्ह Anchor : नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गड घाटात मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. रस्त्यावर भला मोठा दगड, माती आणि दगडगोटे आल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिस आणि स्थानिकांच्या मदतीने फॉकलॅण्ड मशीनच्या सहाय्याने दरड हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. मात्र, कोट्यवधी रुपये खर्चून बसविण्यात आलेल्या संरक्षणात्मक जाळीनंतरही दरड कोसळल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत आहेत0
0
Report
एल निनो संकट से किसानों की उम्मीद, सुनेत्रा पवार का मंदिर संवर्धन निरीक्षण
Pandharpur, Maharashtra:राज्यातील अल निनो संकट टळू दे, बळीराजाला सुखी ठेवण्यासाठी लवकर पाऊस पडू दे, बळीराजा सुखी झाला तर सगळा संसार सुखी होणार आहे. असं साकड विठुरायाला आपण घातल्याचं राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. आपले आणि माऊलींचं नातं वेगळा आहे राज्यातून अनेक वारकरी पंढरपूर कडे येतात. सुविधा देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. सुरक्षित आरोग्यदायी वारी पार पडण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंदिर समितीच्या जतन संवर्धनाच्या कामाची पाहणी केली या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच भरघोस निधी दिला होता.0
0
Report
लगातार बारिश से कोल्हापुर में जनजीवन प्रभावित, हिरण्यकेशी नदी पर पुल बह गया
Kolhapur, Maharashtra:Kop Bhadagaon Pul कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. गडहिंग्लज-चंदगड मार्गावरील हिरण्यकेशी नदीवर उभारण्यात आलेला भडगाव येथील पर्यायी कच्चा पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यांतील वाहतुक्यावर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यात अतिवृष्टीसदृश पावस सुरू आहे. सततच्या पावसामुळे सर्व नद्या दुथडी भरून वाहत असून हिरण्यकेशी नदीच्या पाणीपातळीतही मोठी वाढ झाली आहे.0
0
Report
Advertisement
वाशीम के कवठळ गांव में आठवड़ी बाजार में बच्ची कार की चपेट में आकर मौत
Washim, Maharashtra:वाशीम के कवठळ गांव में आठवड़ी बाजार में बच्ची कार की चपेट में आकर मौत हो गयी। इस हादसे में चिमुरडी का दुर्देवी निधन हो गया और घटना का CCTV फुटेज सामने आया है। मृतका का नाम आरवी योगीराज भगत है, जो अपने आजोबा के साथ आठवड़ी बाजार में गयी थी और घर लौटने के लिए रास्ता पार करते समय पीछे से आये तेज़ गति वाली कार ने उसे जोरदार धक्का दिया। उसमें उसकी मौके पर ही मौत हो गयी। हादसे के बाद वहां बड़ी भीड़ लग गयी थी।0
0
Report
कल्याण-डोंबिवली में मुसलाधार बारिश से भारी पानी बहे, कई इमारतें पानी में डूबीं
Kalyan, Maharashtra:कल्याण पूर्व येथील अडवली ढोकली परिसरामध्ये पूर परिस्थिती. रस्त्यावरती पाणी साचल्याने नदीचा स्वरूप. अनेक दुकानांमध्ये पाणी साचले तर घरांमध्ये देखील पाणी साचले. मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवलीकरचे जनजीवन विस्कळीत. कमरेवर पाण्यातून काढावे लागते वाट. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये सकाळपासूनच मुसळधार पावसाने कल्याण डोंबिवलीकरांची जनजीवन विस्कळीत झाले आहे अनेक सकल भागामध्ये पाणी साचला आहे तर कल्याण पूर्व येथील अडवली ढोकली परिसरामध्ये पाणी साचल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे अडवली ढोबलीला जाणारा हा मुख्य रस्ता आहे गेल्याने 50 ते 100 इमारती पाण्याखाली गेल्या आहेत तर दुकान मध्ये पाणी शिरल्याने दुकानदारांचे नुकसान झाले आहेत त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी0
0
Report
आयुक्त तुकाराम मुंडे ने दूध केंद्रों में मिलावट के खिलाफ छापे शुरू कर दिए
Sinnar, Maharashtra:अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कारवाईचा धडाका सुरू केला असून मुंडे यांनी आता आपला मोर्चा दूध संकलन केंद्र व खवा उत्पादनाकडे वळवला आहे सिन्नर तालुक्यात काही दूध संकलन केंद्रावर मेलामाईन नावाची पावडर मिसळल्यागत असल्याची तक्रार अन्न औषध प्रशासन विभागाला प्राप्त झाली होती. यानंतर विभागाने या ठिकाणी आता छापे टाकून कारवाईला सुरुवात केली आहे या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी0
0
Report
Advertisement
नवी मुंबई के एमआयडीसी में भारी बारिश से बड़ा जलजमाव, सड़के पानी में डूबीं
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई ब्रेकिंग नवी मुंबईत मुसळधार पाऊस. एमआयडीसी भागात मोठ्या प्रमाणात साचले पाणी. एमआयडीसी मधील रस्ते मोठ्या प्रमाणात जलमय. एमआयडीसी मध्ये कामाला आलेल्या चाकरमान्यांचे मोठे हाल. गुडघाभर पाणी साचल्याने अनेक वहाने पडतायत बंद. एमआयडीसी प्रशासनाने नालेसफाई केली की नाही, नागरिकांचा प्रश्न.0
0
Report
वसई-विरार में भारी बारिश से जनजीवन प्रभावित, बुलेट ट्रेन प्रोजेक्ट में मजदूर फंसे
Vasai-Virar, Maharashtra:वसई-विरारमध्ये मुसळधार पावसाचा कहर बुलेट ट्रेन च्या कामात अनेक कामगार अडकले सर्जा मोरी गावात पुराच्या पाण्यात अडकलेल्या अनेक नागरिकांची सुटका NDRF जवान आणि नायगाव पोलिसांकडून बचावकार्य पुरात अडकलेल्या नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर आज झालेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरार परिसरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. वसई कामण – सर्जामोरी परिसरात सुरू असलेल्या बुलेट ट्रेन च्या कामादरम्यान पाच कामगार पुराच्या पाण्यात अडकले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि NDRF पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या तत्पर बचाव मोहिमेत अडकलेल्या पाचही कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे... नागरिकांनी कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये आणि स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात येत आहे.0
0
Report
सोलापुर में बारिश नहीं, नदियाँ-तालाब सूखे, किसानों की फसलें बर्बाद
Solapur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातून पाऊस गायब, नादि, नाले, तलाव पडले कोरडे ठाक जिल्ह्यात दोन नक्षत्रे उलटूनही पावसाची ओढ कायम मागील वर्षी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यामध्ये सीना नदीला आला होता महापूर यंदाच्या वर्षी मात्र तीच सीना नदी पूर्णपणे कोरडी ठाक जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या पेरण्या गेल्या वाया गेल्या आठ दिवसांपासून रोज आभाळ येतंय मात्र पाऊस पडायला तयार नाही जिल्ह्यातील नदी, नाले, तलाव, विहिरींनी गाठला तळ आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी याविषयीचा आढावा घेतला आहे0
0
Report
Advertisement
लातूर में सूखा-उत्पन्न किसान आत्महत्याएं, सरकार से मदद की मांग तेज
Latur, Maharashtra:राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, लातूर जिल्ह्यातील अनेक भाग आजही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पेरणी खोळंबली आहे, कर्जाचा डोंगर वाढत आहे आणि आर्थिक विवंचनेत शेतकरी सापडला आहे. या नैराश्याच्या वातावरणात निलंगा तालुक्यात अवघ्या आठ दिवसांत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने चिंता अधिकच वाढली आहे. पावसाची प्रतीक्षा, कर्जाचा फास आणि वाढते शेतकरी संकट... पाहूया याच संदर्भातील स्पेशल रिपोर्ट. रिपोर्टर वैभव बालकुंदे जून महिना संपला... जुलैचा पहिला आठवडाही सुरू झाला... पण लातूर जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. अनेक शेतकरी अजूनही पेरणीच्या प्रतीक्षेत आहेत, तर काहींनी कर्ज काढून बी-बियाणे आणि खते खरेदी केली आहेत. मात्र, पाऊस नसल्याने शेतात ओलावा नाही आणि खरीप हंगाम धोक्यात आला आहे. पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. बँकांचे हप्ते, खासगी सावकारांचा तगादा आणि वाढता घरखर्च यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत. या वाढत्या नैराश्याच्या पार्श्वभूमीवर निलंगा तालुक्यात अवघ्या आठ दिवसांत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे लातूरमधील शेतकरी संकट पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे. शेतकरी पाऊस लांबल्याने शेतकरी आर्थिक संकटात अधिकच अडकत चालला आहे. पेरणीसाठी काढलेले कर्ज, वाढते व्याज, खासगी सावकारांचा तगादा आणि उत्पादनाची अनिश्चितता यामुळे अनेक शेतकरी नैराश्याच्या गर्तेत जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सरकारने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि सुरू असलेल्या विधिमंतळ अधिवेशनात खासगी सावकारांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केली आहे. राजू कसबे (प्रदेशाध्यक्ष, क्रांतिकारी शेतकरी संघटना) एका बाजूला राज्यातील काही भागात पुराचे संकट आहे, तर दुसऱ्या बाजूला लातूरमध्ये शेतकरी आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहत आहे. वेळेत पाऊस झाला नाही, तर खरीप हंगामासह शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडण्याची भीती आहे. पाऊस, कर्जमाफी आणि तातडीच्या मदतीची अपेक्षा घेऊन शेतकरी सरकारकडे आशेने पाहत आहे. आता येणारे काही दिवस पाऊस आणि सरकारची भूमिका, दोन्ही शेतकऱ्यांचे भविष्य ठरवणार आहेत...0
0
Report
सोलापूर के भोंदू बाबा भोसले के खिलाफ मामला, 3 करोड़ के लेनदेन की जांच
Pandharpur, Maharashtra:सोलापूर के भोंदू बाबा भोसले के खिलाफ मामला, 3 करोड़ के लेनदेन की जांच एक महिला आरोग्याच्या तक्रारीसाठी आराम मिळावा यासाठी भोंदू म्हणून बाबाकडे आली होती आरोग्याच्या कारणाचे निराकरण करण्यासाठी ही अमावस्येला पूजा घालावी लागेल. या साठी पीडित महिलेकडून अश्लील कृत्य करण्याचे काम मनोहर मामा भोसले याने केले आहे. याबाबत त्याच्या घोटी आश्रमातून काही पुरावे सापडले आहेत. मनोहर भोसले प्रकरणाची एसआयटी कडून तपासणी आणि चौकशी सुरू आहे. यामध्ये मनोहर भोसले यांच्या 20 बँक खात्यातून तपासणी केली असता. तीन कोटी पेक्षा अधिक रूपयांचे व्यवहार समोर आले आहे.0
0
Report
पंढरपूर में उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार ने वारकरों के साथ पंगत में भोजन किया
Pandharpur, Maharashtra:राज्याच्या उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज पंढरपूर मधील एका कार्यक्रमात थेट वारकऱ्यासोबत पंगतीला बसून भोजनाचा आस्वाद घेतला. पुणे जिल्ह्यातील मंचर येथील वारकरी मंडळीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रम साठी उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार आल्या होत्या.0
0
Report
Advertisement
उरण में बेमौसम बारिश से चिरनेर समेत गांवों में पानी घूसा, घर तबाह
Navi Mumbai, Maharashtra:आज सकाळपासून उरण शहर व तालुक्यात जोरदार पाऊस सुरू झाल्याने या पावसाने चांगलीच दाणादाण उडाली आहे. अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. चिरनेर गावात पुरपरिस्थिती निर्माण झाली असून चिरनेर, नागाव तसेच तालुक्यातील इतर गावातील रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरले असल्याने जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे. उरण तालुक्यात दरवर्षी मुसळधार पाऊस पडत पडतो. यावेळी पुरग्रस्त रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचे काम हे प्रत्येक गावातील रहिवासी करत होते. तरी शासनाने पुरग्रस्तांना नुकसान भरपाई देऊन,यापुढे रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरणार नाही यासाठी खबरदारी घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. Navi Mumbai0
0
Report
भीमाशंकर में छुट्टी के कारण भारी बारिश में भक्तों की भीड़
Shirur, Maharashtra:भीमाशंकर/पुणे भिमाशंकर येथे सुट्ट्यांमुळे भर पावसात भाविकांची मोठी गर्दी पुणे जिल्ह्यातील भिमाशंकर येथे सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भिमाशंकर परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून धुक्याची चादर आणि हिरवागार निसर्ग पर्यटकांना आकर्षित करत आहे. मुसळधार पावसाची पर्वा न करता राज्याच्या विविध भागांतून भाविक आणि पर्यटक भिमाशंकरमध्ये दाखल होत आहेत. अनेक भाविक पावसात भिजतच भगवान भिमाशंकराचे दर्शन घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया भिमाशंकर पुणे...0
0
Report
भीमाशंकर-नाणेघाट में धुंध-बारिश से प्रकृति का जादुई नजारा
Shirur, Maharashtra:भीमाशंकर/पुणे - धुक्याचे ढग, पाऊसाची रिमझिम, हवेतील गारवा, हिरवाईने नटलेल्या वनराईची पर्यटकांना भुरळ पावसाच्या आगमनानंतर सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील भिमाशंकर, नाणेघाट आणि आहुपे परिसर निसर्गसौंदर्याने बहरून गेला आहे. धुक्याचे ढग, रिमझिम पावस आणि हिरवाईने नटलेली वनराई पर्यटकांना भुरळ घालत आहे. सह्याद्रीत मुसळधार पावसाची प्रतीक्षा असली, तरी सध्याचे हे निसर्गरम्य वातावरण पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत आहे.0
0
Report
Advertisement
