445001
यवतमाळ - पुसद मध्ये जन्माष्टमीनिमित्त टाळमृदुंगाच्या गजरात शोभायात्रा.
Yavatmal, Maharashtra:जन्माष्टमीनिमित्त यवतमाळच्या पुसद शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. डीजेला फाटा देत पारंपारिक पद्धतीने सलग 11 वर्षांपासून या आदर्शवत मिरवणुकीचे आयोजन करण्यात येत आहे. या मिरवणुकीत टाळ व मृदुंगाच्या तालावर गोपाल कृष्ण भगवान की जय असा एकच जयघोष करण्यात आला. या मिरवणुकीत बाल गोपाल वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीकृष्ण जन्मोत्सव समिती पुसद तर्फे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
विदर्भ की बेटी डॉ. नमीरा सिद्दीकी NEET MDS में देशभर में टॉप रैंक
Bhandara, Maharashtra:भंडाऱ्याची डॉ. नमीरा सिद्दीकी 'नीट एमडीएस' में देशात अव्वल. स्व. काळमेघ दंत महाविद्यालयातून केले बीडीएस. वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात विदर्भाने अभिमान बाळगावा अशी कामगिरी भंडाऱ्याच्या मुलीने केली आहे. नागपूरच्या दंत महाविद्यालयातून बीडीएसची पदवी मिळालेल्या डॉ. नमीरा सिद्दीकी यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेत संपूर्ण देशातून पहिला क्रमांक पटकाविला आहे. डॉ. नमीरा यांनी 'नीट एमडीएस' प्रवेश परीक्षेत देशभरातील ३१ हजार विद्यार्थ्यांमधून सर्वाधिक ८०२ गुण प्राप्त करीत प्रथम ऑल इंडिया रैंक प्राप्त केली आहे.0
0
Report
भूमिधारक किसान रातभर धरना: गडचिरोली में स्टील प्लांट और विमानतळ भूमि अधिग्रहण के विरोध की ठियोया
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भूमी अधिग्रहीत पीडितांचा रात्रभर मुक्काम, काँग्रेसच्या वतीने भूमी अधिग्रहणाबाबतचे निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी कालपासून सुरू आहे ठिय्या आंदोलन अँकर:-- गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भूमी अधिग्रहित पीडितांचा रात्रिभर मुक्काम बघायला मिळाला. काँग्रेसच्या वतीने भूमी अधिग्रहणाबाबतचे निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी कालपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. बैलगाडी आणि अन्नधान्य- शिधा घेऊन विमानतळ भूमी अधिग्रहण आणि चामोर्शी तालुक्यातील स्टील प्रकल्पाच्या भूमी अधिग्रहणातील त्रस्त शेतकरी या ठिय्या आंदोलनात आपल्या कच्च्या-बच्चांसह सहभागी झाले आहेत. या सर्वांनी रात्री जिल्हाधिकारी कार्यालया समोरच्या मिळेल त्या जागेत आपले बस्तान मांडत आपला विरोध दर्शविलाय. याबाबतचा सकारात्मक निर्णय झाल्याशिवाय इथून हलायचे नाही असा या शेतकरी कुटुंबांचा निर्धार आहे. दरम्यान शहरातील विविध सामाजिक संघटनांनी या शेतकऱ्यांसाठीची मदत पोहोचविली.0
0
Report
यवतमाळ विधान परिषद चुनाव: महाविकास आघाडी के समर्थक प्रस्ताव के बावजूद नितीन भुटडा ने बगावत से इनकार
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी पाठिंबा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता असा गोप्यस्फोट महायुतीच्या उमेदवाराविरोध बंडाचे निशाण फडकविलेले भाजप नेते नितीन भुतडा यांनी केला आहे. काँग्रेस उमेदवार साहेबराव कांबळे यांनी निवडणुकीतून अचानक माघार घेतल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी आपल्याशी संपर्क केला मात्र आपण 32 वर्षांपासून भाजपचे कार्यकर्ते आहोत, आमदारकीसाठी पक्षात आलो नाही, देश सेवेसाठी आलो त्यामुळे असल्या प्रलोभनांना मी बळी पडलो नाही, मी प्रामाणिक कार्यकर्ता आहे म्हणून महाविकास आघाडीचा प्रस्ताव विनम्रपणे नाकारला अशी माहिती नितीन भुतडा यांनी दिली.0
0
Report
Advertisement
चंद्रपुर में विश्व पर्यावरण दिवस पर विशाल वृक्षारोपण, सुधीर मुनगंटीवार की मौजूदगी
Chandrapur, Maharashtra:जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चंद्रपूरात भाजप नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भव्य महा वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन, सर्वधर्मीय प्रतिनिधींच्या सहभागातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश. नागरी समिती, चंद्रपूर यांच्या माध्यमातून राष्ट्रीय पर्यावरण संवर्धन अभियान २०२६ अंतर्गत सोनचाफा मंदिर, पठाणपुरा गेट जवळ, चंद्रपूर येथे कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. विविध धर्मांचे धर्मगुरू उपस्थित होते. वाढते प्रदूषण, हवामान बदल व पर्यावरणीय असंतुलन ह्या आव्हानांसमोर आपण उभे आहोत. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन हा उपाय असल्याची भावना व्यक्त केली गेली. प्रत्येक नागरिकाने एक वृक्ष लावून संगोपन करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले. चंद्रपूर शहर व परिसरातील नागरिक, सामाजिक संस्था, युवक, महिला, विद्यार्थी तसेच विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. उपस्थितांनी एकात्मतेचा संदेश देत परिसर हिरवागार करण्यासाठी पुढाकार घेण्याचे प्रतिज्ञा व्यक्त केली.0
0
Report
उजनी डैम में 25 किलो वजन का कटला मछला मिला, जैवविविधता का संकेत
Pandharpur, Maharashtra:Anchor सोलापूरच्या उजनी धरणात 25 किलो वजनाचा कटला मासा सापडलेला आहे. उजनी धरणाच्या जैव विविधता आणि पोषक पर्यावरणाचा हा पुरावा मानला जातो. करमाळा तालुक्यातील केतूर चांडगाव परिसरात स्थानिक मच्छीमार खानेवाले यांच्या जाळ्यात पंचवीस किलो वजनाचा कटला मासा आढळला. एवढ्या वर्षांत असा मोठा मासा पहिल्यांदाच आढळला आहे0
0
Report
चार आरोपी गिरफ्तार: 24 मोटरसाइकिल सहित 20 लाख का माल जप्त
Nashik, Maharashtra:मालेगावी तब्बल 24 मोटारसायकलींसह चार संशयितांना पोलिसांनी केली अटक... - 20 लाखांचा मुद्देमाल केला जप्त... - मालेगाव, चांदवड, संभाजी नगर, जळगाव जिल्ह्यातून संशयितांकडून दुचाकींची चोरी... मालेगाव शहरातील पवारवाडी भागात तीन गुन्ह्यांच्या संदर्भात पोलिसांनी तपास करत मालेगावातील चार संशयित आरोपींना आधी तीन मोटारसायकलींसह अटक केली. नंतर त्यांना विश्वासात घेत विचारपूस केली असता त्यांच्याांकडून अजून 21 मोटारसायकल मिळून आल्याने तब्बल 20 लाखांच्या 24 मोटारसायकल पोलिसांनी जप्त केल्या. सदर या आरोपींनी या मोटरसायकल चांदवड, मालेगाव तालुका, संभाजी नगर, जळगाव जिल्हा तसेच किल्ला, छावणी पोलीस स्टेशन हद्द मालेगाव येथून चोरी केलेल्या आहे. यांच्यासोबत आणखी कोण संशयित सहभागी होते. अजून काही मोटर सायकल त्यांच्या कडून जप्त होतात का ? याचा पोलिस तपास करत आहे.0
0
Report
Advertisement
मावळ में एमआईडीसी पुलिस ने अवैध शराब कारोबार के खिलाफ धावा की
Varsoli, Maharashtra:Headline : मावळात एमआयडीसी पोलिसांची अवैध दारू व्यवसायाविरोधात धडक कारवाई Anchor: राज्यात गाजलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील विषारी दारू प्रकरणाची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तल्यातील पोलीसांनी चांगलीच धास्ती घेतली असून मावळ तालुक्यात अवैध दारू व्यवसायाविरोधात तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. सलग दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये आंबी एमआयडीसी येथील कंजारभट वस्तीत हातभट्टी दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे ३०० लिटर कच्चे रसायन आणि ३० लिटर गावठी दारू जप्त करून नष्ट करण्यात आली. तर मिंडेवाडी येथे विक्रीसाठी साठवून ठेवलेल्या देशी दारूच्या बाटल्या जप्त करून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांचे मावळात धाबे दणाणले आहेत..0
0
Report
यवतमाळ विधान परिषद चुनाव: साहेबराव कांबळे के निष्कासन का प्रस्ताव कांग्रेस ने भेजा
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी घेऊन ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेणाऱ्या साहेबराव कांबळे यांना पक्षातून निष्कासित करावे अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष सचिन नाईक यांनी प्रदेश काँग्रेस कमिटीकडे केली आहे. साहेबराव कांबळे च्या कृतीमुळे महाविकास आघाडीला निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडण्याची नामुष्की आली. या झालेल्या संपूर्ण नाट्यमय घडामोडीमुळे जिल्हा काँग्रेस कमिटीकडून साहेबराव कांबळे यांना काँग्रेस प्रदेश सरचिटणीस पदावरून आणि पक्षातून निष्कासित करण्यात यावे, असा प्रस्ताव जिल्हाध्यक्ष सचिन नाईक यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे पाठविला आहे.0
0
Report
मावळ में कृषी सेवा केंद्र افتتاح: किसानों के लिए वरदान, खरीप में बढ़ेगी पैदावार!
Varsoli, Maharashtra:Headline : मावळ तालुका खरेदी-विक्री संघाच्या सहकार कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन Anchor: मावळ तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी. शेतीसाठी आवश्यक असणारे दर्जेदार बी-बियाणे, खते आणि कीटकनाशके ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर उपलब्ध करून देण्यासाठी मावळ तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या सहकार कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन कामशेत येथे मोठ्या उत्साहात पार पडले. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते आणि शेती औषधांच्या खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हे पहिलेच कृषी सेवा केंद्र असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. गेल्या काही वर्षांत खासगी विक्रेत्यांकडून इंद्रायणी तांदळाच्या बोगस बियाण्यांची फसवणूक झाल्याने अनेक भात उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे दर्जेदार आणि विश्वासार्ह कृषी साहित्य उपलब्ध करून देणारे हे केंद्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमामुळे मावळातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार असून शेती उत्पादन वाढीसही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.. बाईट : सुनील शेळके, आमदार, मावळ (file no.05)0
0
Report
Advertisement
नाशिक विधान परिषद चुनाव: प्रसाद हीरे की बगावत महायुती में तिरंगी लड़ाई
Nashik, Maharashtra:नाशिक (मालेगाव) - भाजप नेते प्रसाद हिरे यांची बंडखोरी... प्रसाद हिरे यांना हिरे कुटुंबाचा वारसा... महायुतीच्या उमेदवारांमध्ये रंगणार तिरंगी लढत... भाजपचे निष्ठावान मतदार माझ्यासोबत आहे... 400 पेक्षा जास्त मतांनी विजयी होऊ असे त्यांनी दावा केला... प्रसाद हिरे यांनी दिलेला दावा... बंडखोरी भाजपच्या उमेदवारांशी नाही... शिंदे सेनेच्या उमेदवार मतदारांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी... नाव न घेता नरेंद्र दराडेंवर केला आरोप... नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुتيमध्येच बंडखोरी पहायला मिळत आहे. भाजप नेते व माजी मंत्री दिवंगत डॉ.बळीराम हिरे यांचे चिरंजीव प्रसाद हिरे यांची उमेदवारीही कायम असल्याने महायुतीच्या उमेदवारांमध्ये तिरंगी लढत रंगणार आहे. उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील राजकारणात हिरे कुटुंबियांचे नाव आहे. प्रसाद हिरे यांची उमेदवारी कायम राहिल्याने या निवडणुकीत वेगळाच ट्विस्ट आला आहे. हिरे यांनी मतदारांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केलीय. आपणास हिरे कुटुंबीयांचा वारसा आहे. भाजपचे निष्ठावान मतदार माझ्यासोबत आहे. शिवसेनेच्या काही मतदारांचा मला छुपा पाठिंबा आहे. आपण 400 पेक्षा जास्त मतांनी विजयी होऊ असा दावाही त्यांनी केलाय. उमेदवार भाजपचा नाही. शिंदे सेनेचा आहे. त्यांना मिळालेल्या संधी काळात ते मतदारांचे प्रश्न सोडविण्यास अपयशी ठरले. मतदार त्यांच्या्यावर नाराज या निवडणुकीत ते दाखवतील असा विश्वासही पक्ष व पक्ष नेतृत्वावर आपला विश्वास आहे. पक्ष निष्ठा आम्हीच दाखवायची का जळगावमध्ये शिंदे सेनेही दाखवावी. असेही प्रस 추 haore हिरे म्हणाले. हीरे यांच्या उमेदवारी महायुतीचे उमेदवार नरेंड दराडे यांची डोके दुखी मात्र वाढणार हे नक्की…0
0
Report
अमरावती सीट पर कांग्रेस-भाजपा-वंचित का त्रिशूल मुकाबला
Amravati, Maharashtra:अमरावतीची एक जागा आमच्यासाठी द्यावी आणि इतर 16 ठिकाणी आमचा पाठिंबा घ्याघ्यावा; मोठा भाऊ म्हणून काँग्रेसने एक पाऊल मागे यावं वंचितची मागणी अँकर :- अमरावती विधान परिषद निवडणुकीत आता एकूण तीन उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले असून भाजपकडून प्रवीण पोटे, काँग्रेसकडून हर्षजित देशमुख तर वंचित कडून निलेश विश्वकर्मा हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे. त्यामुळे अमरावतीत आता तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान अमरावतीत काँग्रेसने स्थानिक उमेदवार न दिल्याने वंचित ने काँग्रेसला आगळी वेगळी ऑफर देत अमरावतीची जागा आमच्यासाठी सोडावी व राज्यातील इतर 16 ठिकाणी आमचा पाठिंबा घ्यावा असे म्हणत एकच खळबळ उडवून दिली आहे तसेच येणाऱ्या भविष्यात युती करायची असेल तर काँग्रेसने मोठा भाऊ म्हणून एक पाऊल मागे यावं असे वंचित चे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांनी म्हटले आहे याविषयी त्यांच्याशी अधिक बातचीत केली आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी。0
0
Report
प्रधानमंत्री के नेतृत्व में भाजपा कार्यकर्ता 25-25 पौधे लगाकर पर्यावरण दिवस मना रहे
Kalyan, Maharashtra:जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण. डोंबिवली संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा येथे रविंद्र चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांच्या असते वृक्षारोपण करण्यात आले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभर पर्यावरण दिवस म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येकी बूथ वाईस 25 झाडे लावावी आणि त्याचं संवर्धन करावे, या संदर्भातला संकल्प जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने एक झाड मा के नाम या नावाने हे संपूर्ण अभियान संपूर्ण देशभर सुरू आहे, हे करत असताना वर्षानुवर्ष पर्यावरण दिन भारतीय जनता पार्टी साजरा करते, गेल्या वर्षी लावलेले झाड किती मोठा झाला आहे, असे पंतप्रधानांनी आणि राष्ट्रीय अध्यक्षांनी असं सांगितलं आहे गेल्या वर्षी जे लावलेली झाड असेल त्या झाडाचा सेल्फी काढावा त्यामुळे ह्या मैदानातील लावण्यात आलेले सर्व गुलमोहराचे झाड भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्याची निगा राखण्याचं काम होत आहे, बाईट, रविंद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष भाजप,0
0
Report
Advertisement
तापमान के कारण माकुओं की टोली सड़क पर प्यास बुझाती बारिश ने राहत दी
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून प्रचंड उष्णतेचा सामना नागरिकांसह वन्यजीवांनाही करावा लागला. ४० ते ४४ अंशांपर्यंत पोहोचलेल्या तापमानामुळे जंगलातील अनेक पाणवठे कोरडे पडले आणि पाण्याच्या शोधात वन्य प्राणी गावांच्या दिशेने येऊ लागले. अशातच गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यांवर आणि खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. या पाण्याचा आधार घेत माकडांची एक टोळी रस्त्यावरच तहान भागवत असल्याचे हृदयस्पर्शी दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. उन्हाच्या झळांनी व्याकूळ झालेल्या या मुक्या जीवांना पावसाच्या पाण्याने दिलासा मिळाल्याचे हे चित्र आहे.0
0
Report
खरप गांव के पास ट्रक दुर्घटना: पति-पत्नी की मौत, ग्रामीणों ने गिरफ्तारी तक रोका रास्ता
Akola, Maharashtra:अकोला शहरालगतच्या खरप गावाजवळ रस्ता अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या पती-पत्नीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला होता. संतप्त ग्रामस्थांनी आरोपी वाहन चालकाला अटक होईपर्यंत मृतदेह उचलू देणार नसण्याची भूमिका घेतली होती. खरप गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या एकाअज्ञात ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली होती. धडक इतकी भीषण थी की दुचाकीवरील विजय इंगळे आणि त्यांच्या पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर संबंधित वाहन चालकाने वाहनासह घटनास्थळावरून पळ काढला आहे. मात्र आरोपी वाहन चालकाला तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत रस्ता रोको केला होता. अखेर पोलिसांनी गावकऱ्यांची समजूत काढून हा मार्ग आता मोकळा केला आहे. या रस्त्यावर पाहणी करून गतिरोधक लावणार असून सीसीटीव्ही च्या माध्यमातून फरार आरोपीचा शोध लवकरच घेऊ असा आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर गावकऱ्यांनी हा मार्ग मोकळा केला आहे.0
0
Report
रत्नागिरी-कोकण चुनाव से Bal Mane की अचानक माघारी, उद्धव ठाकरे से हकालपट्टी के बाद सियासी घमासान
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- कोकण विधान परिषद निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेणाऱ्या बाळ माने यांचे दोन स्टेस्टस चर्चेत मनाच्या ज्या दरवाज्यातून संशय आत प्रवेश करतो, त्याचवेळी त्या दरवाज्यातून प्रेम आणि विश्वास दोन्ही बाहेर पडतात रिव्हेंज इज जस्ट वेस्ट आँफ टाईम( बदला हा वेळेचा अपव्यय आहे) बाळ माने यांच्या स्टेस्टसचा रोख कुणाकडे याची चर्चा तर दुसऱ्या स्टेस्टसमधून बाळ माने यांनी स्टेट्स ठेवून संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना पुण्यतिथीनिमित्त केलं अभिवादन कोकण विधान परिषद निवडणुकीत माघारीनंतर उद्धव ठाकरे सेनेतून बाळ माने यांची झाली होती हकालपट्टी0
0
Report
Advertisement
