445001
यवतमाळ - पुसद मध्ये जन्माष्टमीनिमित्त टाळमृदुंगाच्या गजरात शोभायात्रा.
Yavatmal, Maharashtra:जन्माष्टमीनिमित्त यवतमाळच्या पुसद शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. डीजेला फाटा देत पारंपारिक पद्धतीने सलग 11 वर्षांपासून या आदर्शवत मिरवणुकीचे आयोजन करण्यात येत आहे. या मिरवणुकीत टाळ व मृदुंगाच्या तालावर गोपाल कृष्ण भगवान की जय असा एकच जयघोष करण्यात आला. या मिरवणुकीत बाल गोपाल वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीकृष्ण जन्मोत्सव समिती पुसद तर्फे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सांगली-सातारा परिषद चुनाव: शिवसेना शिंदे गुट ने उमेदवारी वापस ली; पाटील ने अर्ज वापस
Sangli, Maharashtra:सांगली ब्रेकिंग सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीतील महायुतीतील शिवसेनेचे बंड शमले ! सांगली सातारा विधानपरिषद निवडणुकीतून अखेर शिवसेना शिंदे पक्षाची उमेदवारी मागे शिवसेना नेते व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनी घेतला उमेदवारी अर्ज मागे मंत्री शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत तानाजी पाटलांनी घेतला उमेदवारी अर्ज मागे युती धर्म पाळण्यासाठी माघार घेतल्याचे मंत्री शंभूराजे देसाईंचे स्पष्टीकरण तर पक्ष आदेशानुसार अर्ज माघार घेतल्याचं तानाजी पाटलांचं स्पष्टीकरण बाईट - शंभूराज देसाई - पर्यटन मंत्री. बाईट - तानाजी पाटील - नेते शिवसेना0
0
Report
किसानों के लिए खतरा: कृषि बीमा के चार ट्रिगर फिर शुरू, नुकसानभरपाई प्रभावित
Akola, Maharashtra:राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण व्हावे यासाठी पीक विमा योजनेतील बंद करण्यात आलेले चार ट्रिगर पुन्हा सुरू करण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना प्रहारने शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, अकोला जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश भागात शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. कोरडवाहू क्षेत्राचे प्रमाण मोठे असल्याने अतिवृष्टी, दुष्काळ, पावसातील खंड, तसेच काढणीपूर्व आणि काढणीनंतरच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी आधार ठरत असली तरी पूर्वी अस्तित्वात असलेले काही महत्त्वाचे ट्रिगर बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघत नसल्याचा दावा करण्यात आला आहे.0
0
Report
पिंपरी चिंचवड के विषाक्त शराब कांड में अवैध घर पर नगरपालिका की कार्रवाई, 12 मौतें
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पुणे और पिंपरी चिंचवड में विषाक्त शराब कांड: कर्नल सिंग विरखा के घर पर पिंपरी चिंचवड नगरपालिका ने हथोडा चलवाया। विरखा संजय नगर, फुगेवाडी के छोटे गल्लों से शराब का गुत्था चला रहा था; नगरपालिका ने नोटिस देकर 24 घंटे में घर की स्थिति स्पष्ट करने को कहा था, लेकिन घर अवैध पाया गया, इस कारण कार्रवाई की गई। विवादित घर ब्रेकर और मजदूरों की सहायता से तोड़ना शुरू किया गया, जिसके लिए नगरपालिका ने सुरक्षा तैनाती की थी ताकि किसी तरह का अनुचित घटना न हो पाए। इस दारू कांडा के मुख्य आरोपी योगेश वानखेडे ने मिथेन मिश्रित दारू दी और पिंपरी चिंचवड में 12 लोगों की मौत हो गई। विरखा का घर अंततः धराशायी हो गया; घटना पर संतोष व्यक्त किया गया।0
0
Report
Advertisement
उदय सामंत की शिष्टाई से महायुती की बगावत खत्म, जामकर ने नामांकन वापस लिया
Parbhani, Maharashtra:अँकर-परभणी हिंगोली विधान परिषदेमधील महायुतीतील बंडखोरी अखेर संपली असून, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या शिष्टाईला यश झाला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या संग्राम जामकर आणि विजय जामकर यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राष्ट्रवादीच्या आमदार राजेश विटेकर आणि मित्र पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या उपस्थितीमध्ये, दोघांनीही आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना, त्यांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत...0
0
Report
डोंबिवली एमआईडीसी मिलाप नगर तालाब में हजारों मछलियाँ मरने से स्वास्थ्य संकट
Kalyan, Maharashtra:डोंबिवली एम आय डी सी परिसरातील मिलाप नगर तलावात मृत माशांचा खच परिसरात दुर्गंधी ,नागरिकांचे आरोग्य धोक्यात डोंबिवली एम आयडी सी निवासी मधील मिलापनगर तलाव म्हणजे पूर्वीचा गणेश विसर्जन तलावात गेल्या तीन दिवसांपासून हजारो मासे मरून पाण्यावर तरंगताना दिसत आहेत.मृत माशांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे केडीएमसी ने कर्मचाऱ्यांनी येऊन तलावातील मृत मासे बाहेर काढण्याचे काम चालू केले आहे. वाढलेले तापमान ,तलावात असलेली अच्छता त्यामुळे मृत झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. या तलावात हजारोंनी अनेक जातींचे मासे आहेत त्यासाठी केडीएमसी ने तातडीने उपाययोजना करावी अशी नागरिकां कडून मागणी केली जात आहे.0
0
Report
अकोला के गीता नगर में खुले स्पेस के पेड़ आग की भेंट, बड़ा नुकसान टला
Akola, Maharashtra:अकोला शहरातील गीता नगर परिसरात ओपन स्पेसमध्ये असलेल्या झाडांना अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात उसळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच अकोला महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या घटनास्थळी पाचारण करण्यात आल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले.आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून याबाबत तपास सुरू आहे. अग्निशमन विभागाने काही वेळातच आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे कारण या प्लॉटला लागूनच लोक वस्ती सुद्धा आहे.0
0
Report
Advertisement
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर में सुवर्ण तुलसीहार अर्पण, वजन 35 ग्राम, कीमत 5 लाख
Pandharpur, Maharashtra:विठ्ठलास चरणी सोन्याचा तुळशीहार अर्पण, श्रीमती गोदाबाई गणपत गोगरे, रा. शिरापूर, ता. मोहोळ, जि. सोलापूर येथील भाविकांनी दिनांक 4 जून रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी सुवर्ण तुळशीपानांचा हार अर्पण केला. सदर हारामध्ये तुळशीपाने नग ३२ व गोल मणी नग ६४ असून त्याचे एकूण वजन ३५.००० ग्रॅम आहे. सदर सुवर्ण हाराची अंदाजित किंमत ₹५,००,८५०/- इतकी आहे. यावेळी मंदिर समितीच्या वतीने देणगीदार भाविकांचा सन्मान मंदिर समिती सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर) यांच्या हस्ते करण्यात आला..0
0
Report
देहू संस्थान ने पालखी सोहळा प्रमुखों की घोषणा की; प्रस्थान 7 जुलाई
Varsoli, Maharashtra:Anchor: अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या ३४१ व्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याची अधिकृत घोषणा देहू संस्थान कडून करण्यात आली आहे. जेष्ठ वद्य सप्तमी, मंगळवार दिनांक ७ जुलै रोजी श्रीक्षेत्र देहू येथील मुख्य देऊळवाड्यातून संत तुकाराम महाराजांची पालखी भक्ती, श्रद्धा आणि नामस्मरणाचा गजर करत पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. यंदाच्या पालखी सोहळ्यासाठी ह.भ.प. विक्रमसिंह मोरे, ह.भ.प. उमेश मोरे आणि ह.भ.प. लक्ष्मण मोरे यांची पालखी सोहळा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच पालखी रथ और चौघडा गाडीसाठी संस्थानतर्फे तीन बैलजोड्या खरेदी करण्यात आल्या असून त्या यंदाच्या सोहळ्यात सहभागी होणार आहेत...0
0
Report
दौंड में गुड़ में शक्कर मिलाने पर 20 टन शक्कर और 16 टन गुड़ जब्त
Rui, Maharashtra:अन्न आणि औषध प्रशासनाकडून दौंड तालुक्यातील गुऱ्हाळांवर कारवाई....20 टन साखर आणि 16 टन गुळ साठा जप्त....17 लाख 79 हजार 358 रुपये साठा जप्त या कारवाईत सुमारे 20 टन साखर आणि 16 टन गुळ जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेले या मालाची किंमत 17 लाख 79 हजार 358 रुपये इतकी आहे. प्रथमेश गुळ उद्योग सहजपूर, सात्विक ऑरॅनिक गूळ उद्योग सहजपूर, साहिल मलिक खामगाव फाटा, सहादत डी हुसेन दौंड या चार गुऱ्हाळांवर कारवाई करण्यात आली आहे...0
0
Report
Advertisement
गेवराई में खेत सड़क विवाद के कारण परिवार पर भारी हमला, वीडियो वायरल
Beed, Maharashtra:बीड: भय इथले संपणार कधी..? आता तर तहसीलदार आणि पोलिसांसमोरच रस्त्याच्या वादातून कुटुंबावर हल्ला..! बीडच्या गेवराई तालुक्यातील साठेवाडी परिसरात शेत रस्त्याच्या वादातून एका कुटुंबावर अश्लील शिवीगाळ करत 20 ते 30 लोकांकडून अचानक प्राणघातक हल्ला करण्यात आला. दगडाने हल्ला केल्याने जखमींमध्ये लहान मुलांसह महिलांचा देखील समावेश आहे. त्यांच्यावर बीडमध्ये सध्या उपचार सुरू आहेत. घटना दोन दिवसांपूर्वीची असून हल्ल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. रस्त्याबाबतीत उपविभागीय अधिकाऱ्यांचा स्थगिती आदेश असताना सुद्धा तहसीलदार आणि पोलीस यांच्या उपस्थितीत काल दुपारी रस्ता खुला केला जात होता. स्टे ऑर्डर घेऊन दाखल झालेल्या कुटुंबराने रस्ता खुला करू नये असे म्हटल्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. विशेष म्हणजे गेवराईचे नायब तहसीलदार आणि पोलिसांच्या पथकासमोरच हा हल्ला झाल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात पीडित शेतकरी कुटुंबाने पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दिली असून हल्ला करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांसमोरच झालेल्या या भ्याड हल्ल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.0
0
Report
रायगढ़ किले में शिवराज्याभिषेक के चलते खाद्य बिक्री पर बंदी, व्यवसायी नाराज
Chendhare, Maharashtra:बंदी आदेशामुळे किल्ले रायगडावरील स्थानिक व्यावसायिक संतप्त रायगड किल्ल्यावरील व्यवसायीकांनी घेतली महाड प्रांताधिकाऱ्यांची भेट व्यवसायावर घातलेली बंदी उठवण्याची केली मागणी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी यांचे मनाई आदेश अँकर किल्ले रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस खाद्य पदार्थ विक्री व्यवसायावर बंदी घालण्यात आली आहे. त्या ठिकाणी गॅस अगर चुल पेटवल्यामुळे अपघाताची भिती व्यक्त करीत महाड प्रांताधिकारी यांनी बंदीचे आदेश जारी केले आहेत. या आदेशामुळे या प्रकरणी किल्ले रायगडावरील व्यवसायीक संतप्त झाले आहेत. त्यांनी महाडचे प्रांताधिकारी पोपट ओमासे यांची भेट घेतली. त्यांना बाजु समाजाऊन सांगत बंदी आदेश मागे घेण्याची विनंती केली. ही बंदी कायम ठेवली आणि स्थानिक व्यावसायिकांना त्रास झाला तर आंदोलनाचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला.0
0
Report
बारामती में महँगाई व ईंधन दर के विरोध में पवार गट का बड़ा आंदोलन
Rui, Maharashtra:बारामतीत शरद पवार गटाचे महागाई विरोधात आंदोलन. इंधन दरवाढ कांदा दर यासह विविध प्रश्नांवर आंदोलन. युगेंद्र पवारांच्या नेतृत्वात केलं आंदोलंच. बारामती मध्ये महागाई इंधन दरवाढ कांदा दर यासह विविध प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निषेध आंदोलन केले जात आहे. युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन केलं जात आहे. बारामती मधील तीन हत्ती चौकात केलं जात असून महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. रस्त्यावर उतरण्याशिवाय कुठलाही पर्याय राहिला नाही. आम्ही आता महाराष्ट्रभर आंदोलन करत आहोत. हे आंदोलन महागाई विरोधात आहेत कांद्याला योग्यहमीभाव मिळाला पाहिजे यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढत आहेत खताचे दर वाढत आहेत गॅसचे दर वाढत आहेत कांद्याला भाव नाही. कांदा उत्पादन करण्यासाठी साधारण एकरी एक लाख रुपये लागतात, पण कांदा फक्त साडेसातशे रुपये ते 1000 रुपये प्रति टन एवढाच दर आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. महागाई विरोधात आम्ही सगळे लढत आहोत. बारामती तालुक्यात गुन्हेगारी खूप वाढत चालली आहे मला महिला येऊन भेटत आहेत, त्यांना आता बारामती सुरक्षित वाटत नाही. महिला सांगतात दादा साहेबांची बारामती म्हणून दादांची बारामती म्हणून ही बारामती ओळखली जाते दादांची बारामती असल्यामुळे आम्हाला इथे सुरक्षित वाटायचं, काही महिला तर पुण्यावरून बारामतीत राहिला आलेत कारण त्यांना इथे सुरक्षित वाटायचं, परंतु आता तसं वातावरण इथे नाही. गुन्हेगारी वाढत चालली आहे ट्रक दारू नियमबाह्य भट्ट्या ही प्रकरण वाढत चालले आहेत त्यामुळे आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही रस्त्यावर आलो आहोत. पेट्रोल डिझेल कुठे ग्रामीण भागात मिळत नाही गॅस सिलेंडर तालुक्यात आणि राज्यात मिळत नाहीत त्याचे टंचाई आहे. गॅसचा काळाबाजार थांबला पाहिजे. रात्री सहा ते दहा वाजेपर्यंत गेले अडीच महिने झालं बारामती तालुक्यात लोड शेडिंग सुरू आहे ते ताबडतोब बंद झाल पाहिजे. पूर्वी जेवढा मला पाणी मिळत होतो तेवढा आता मिळत नाही, तापमान वाढत चाललो आहे आम्हाला आमचं हक्काचं पाणी मिळालं पाहिजे. चारा टंचाई आहे, बारामती तालुक्यात साधारण चार ते साडेचार हजार कांदा उत्पादक शेतकरी आहे. जिरायत भागातील हे शेतकरी आहेत. सर्वात जास्त क्षेत्र मोडवे गावात होतं त्यानंतर बाबुर्डी आणि इतर गावात कांदा पिकतो. शासनाला आमच्याकडून विनंती आहे, लवकरात लवकर बारामती तालुक्यात एक नाफेडच सेंटर सुरू करा. त्यामुळे कांदा उत्पादकांना एक मार्केट मिळेल, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कमीत कमी दीड हजार रुपये अनुदान मिळाला पाहिजे आणि कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव शासनाने जाहीर केला पाहिजे. ज्यावेळी शरद पवार केंद्रात मंत्री होते तेव्हा कांद्याला सात हजार रुपये भाव मिळत होता, तेव्हा भाजपचे नेते कांद्याची माळ घालून संसदेत आले होते कांद्याला आता तुम्ही सोने एवढा भाव देत आहात हे काम फक्त पवार साहेबांनी केलं, शेतकरी नेते म्हणून जर आज देशात कोणी काम केलं असेल तर ते पवार साहेबांनी केल आहे. कांद्याला भाव इतिहासात कोणी दिला असेल तर तो फक्त आणि फक्त शरद पवार यांनी दिला, तेच शेतकऱ्यांचा हित बघत आले. आम्हाला विश्वास आहे आमच्या आंदोलनाची दखल सरकार घेईल. पेट्रोल एका आठवड्यात चार ते पाच रुपये प्रति लिटर प्रमाणे वाढले जेव्हा इंधन क्रूड ऑइल वाढतो तेव्हा सर्वच खर्च वाढतो. पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले पाहिजेत, शरद पवार यांचा सरकार असताना याचे दर पन्नास रुपये होते आता शंभरच्या पुढे गेलेत. ऑन मागण्या पूर्ण होतील का. आमच्या मागण्या पूर्ण होतील असं वाटत नाही, कारण नेहमी शेतकऱ्याच्या विरोधातील हे सरकार राहिला आहे. शेतकऱ्यांसाठी काँग्रेस सरकार आणि पवार साहेबांचा सरकार नेहमी काम करणार सरकार होतं. मागचा दहा-बारा वर्षाचा अनुभव बघून असं वाटतंय हे सरकार आमच्या सर्व मागण्या पूर्ण करणार नाहीत पण आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय कोणता पर्याय राहिला नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या हे सरकार पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही हा लढाल चालू ठेव. ऑन बारामती गुन्हेगारी कमी झाली असं पोलिस म्हणतात. पोलिसांचं काम आहे गुन्हेगारी कमी करणे ते म्हणणार नाहीत गुन्हेगारी कमी झाली. बारामतीच्या जनतेला जाऊन विचारा ते सांगतील गुन्हेगारी वाढली की कमी झाली.0
0
Report
Advertisement
इंदापुर में प्रतिबंधित गुटखा तंबाकू पर दबिश: होटल से महंगी जप्ती
Rui, Maharashtra:अन्न व औषध प्रशासनाचा इंदापूरात गुटखा माफियांना दणका.... राज hotellवर छापा.. प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तंबाखूचा साठा जप्त.... वाहनासह 2 लाख 57 हजार 254 रुपयांचा मुद्देमाल जप्त... या प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत...0
0
Report
लोणावळा टाटा डैम में पानी शून्य प्रतिशत, भीषण गर्मी से जलस्तर गिरा
Varsoli, Maharashtra:लोणावळ्यातील लोणावळ्यातील टाटा धरणातील पाणी साठा शून्य टक्के झाले आहे. दुपारच्या तापमानात वाढ झाली असून, वाढत्या उन्हामुळे पाणी पातळ पडल्याचं वर्णन केलं जातं. पर्जन्यमानासाठी प्रसिद्ध असलेल्या मावळ तालुक्यातील अनेक धरणे शंभर टक्के भरली होती; परंतु उष्णतेच्या झळा आणि वाष्पीभवनामुळे टाटा धरणातील पाणी साठा शून्य टक्क्यांवर आला असल्याचं सांगितलं जातं. मागील वर्षी जुलै अखेर टाटा धरण 100 टक्के भरले होते, ज्यामुळे या धरणाच्या सांडव्यावरून पाणी इंद्रायणी नदीच्या पात्रात सोडलं जात होतं; तर दुसऱ्या बाजूला टाटाचे वालवण धरणातील पाणी साठा कमी होऊ लागला आहे, ज्यामुळे टाटा धरण ओस पडलेले दिसते.0
0
Report
मान्सून के आगमन से मावल के किसानों में उम्मीद की लहर
Varsoli, Maharashtra:मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागताच मावळ तालुक्यात शेतकरी कामाला लागले असून भात लागवडीपूर्व तयारीच्या कामांना वेग आला आहे. शेतात नांगरणी, मशागत, आणि रोपवाटिकांसाठी जमीन तयार करण्याची लगबग सर्वत्र पाहायला मिळत आहे. यंदा समाधानकारक पावसाची अपेक्षा असल्याने शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून शेतीची प्रत्येक तयारी वेळेत पूर्ण करण्याची लगबग सुरू आहे. तसेच शेतांमध्ये कृषी अवजारांचा वाढलेला वापर, मशागतीची सुरू असलेली कामे आणि आगामी हंगामाबाबत शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आशावाद हे चित्र सध्या मावळात पाहायला मिळत आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा आता नव्या हंगामाच्या स्वागतासाठी सज्ज झाला असून शेतीच्या कामांमुळे गावागावांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे..0
0
Report
Advertisement
