445001
यवतमाळ - पुसद मध्ये जन्माष्टमीनिमित्त टाळमृदुंगाच्या गजरात शोभायात्रा.
Yavatmal, Maharashtra:जन्माष्टमीनिमित्त यवतमाळच्या पुसद शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. डीजेला फाटा देत पारंपारिक पद्धतीने सलग 11 वर्षांपासून या आदर्शवत मिरवणुकीचे आयोजन करण्यात येत आहे. या मिरवणुकीत टाळ व मृदुंगाच्या तालावर गोपाल कृष्ण भगवान की जय असा एकच जयघोष करण्यात आला. या मिरवणुकीत बाल गोपाल वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीकृष्ण जन्मोत्सव समिती पुसद तर्फे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
गोंदिया के नवेगाव-नागझिरा टाईगर रिजर्व में मुरदोली में नया प्रवेशद्वार खुला, रोजगार के अवसर बढ़े
Bhandara, Maharashtra:गोंदियाच्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात मुरदोली येथे जंगल सफारीसाठी नवीन पर्यटन प्रवेशद्वाराचे उद्घाटन.... पर्यटनासोबतच स्थानिक नागरिकांना मिळणार रोजगार...0
0
Report
अकोला पुलिस ने ऑपरेशन प्रहार के तहत तीन आरोपी गिरफ्तार; देसी पिस्तुले और गोला बरामद
Akola, Maharashtra:अकोला स्थानिक गुन्हे शाखेने ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत आरोपींकडून दोन देशी पिस्तुले व जिवंत काडतुसे असा सुमारे 2 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. अटक केलेल्या आरोपींकडून शस्त्रास्त्रांची खरेदी-विक्री व बाळगण्याबाबत अधिक चौकशी सुरू आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.या कारवाईत पोलिस अधिकाऱ्यांसह पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.0
0
Report
सातारा में अवैध पिस्टल विक्री के मामले में 22 वर्षीय गिरफ्तार; दो पिस्तुले बरामद
Satara, Maharashtra:सातारा - कराड तालुक्यात अवैध पिस्तुल विक्रीप्रकरणी सातारा स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत 22 वर्षीय युवकाला अटक केली. त्याच्याकडून दोन देशी बनावटीची पिस्तुले व दोन जिवंत काडतुसे असा सुमारे 1.69 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला पकडले असून त्याचा एक साथीदार फरार आहे.0
0
Report
Advertisement
छत्रपति संभाजीनगर विभाजन बारहवीं का परिणाम 88.68%, छह साल में सबसे कम विद्यार्थी उत्तीर्ण
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल शनिवारी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. यंदा छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल ८८.६८ लागला. गेल्या ६ वर्षांत हा सर्वात कमी निकाल आहे. गेल्यावर्षी ९२.२४ टक्के असलेला निकाल यावर्षी ८८.६८ टक्क्यांवर आला. ३.५६ टक्क्यांची घट झाली. कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबाजवणी झाल्याने निकालाचा टक्का खालावला. या निकालात यंदा छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रथम क्रमांकावर असून जिल्ह्याचा निकाल ९०.८२ टक्के लागला आहे. विभागातील निकालात यंदा मुलांच्या तुलनेत मुलींच्या निकालाचे प्रमाण अधिक असून ६.२२ टक्के अधिक विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. विभागात कॉपीच्या ५८, सामूहिक कॉपीच्या ५०१ प्रकरणे समोर आली होती.0
0
Report
पुलिस थाने में शिकायत के बाद दोस्त ने दोस्त की पत्थर से हत्या
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - पोलीस ठाण्यात तक्रार देण्याच्या कारणावरून मित्राने केली मित्राची दगडाने ठेचून हत्या Anchor - ‘पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास ka पाठवला?’ असा जाब विचारात झालेल्या वादात मित्रानेच आपल्या मित्राची दगडाने ठेचून हत्या केलीय. बार्शी तालुक्यातील वैराग येथे ही धक्कादायक घटना घडलीय. या घटनेत दिनेश उर्फ अप्पासाहेब कापसे या 31 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. तर मृताच्या भावाच्या फिर्यादीवरून बबलू मुळे याच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आलाय.0
0
Report
Wardha के Kelzar में रात भर मुरूम उत्खनन, प्रशासन पर उठे सवाल
Wardha, Maharashtra:वर्ध्याच्या केळझर मध्ये मुरूम उत्खननात 'रात्रीत खेळ चाले' - मध्यरात्री उत्खननाने केळझर खदान चर्चेत अँकर : सेलू तालुक्यातील केळझर येथे मुरूम उत्खनन प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत असून, आता या प्रकरणाला ‘रात्रीच्या उत्खनना’चा नवा ट्विस्ट मिळाला आहे. जिल्हा प्रशासनाने पियुष्य इन्फ्राटेच प्राइवेट लिमिटेड या खासगी कंपनीला तब्बल 52 हजार ब्रास मुरूम उत्खननाची परवानगी दिल्यानंतर आधीच वाद निर्माण झाला होता. मात्र आता रात्रीच्या अंधारात सुरू असलेल्या उत्खननामुळे प्रशासनावर थेट संशय व्यक्त केला जात आहे. केळझर गावातील गट क्रमांक 537 व 123 मधील क्षेत्रात रात्रीच्या वेळीही मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. नियमांनुसार ठरावीक वेळेतच उत्खनन करण्याची अट असतानाही ही कंपनी बिनधास्तपणे रात्रीचं उत्खनन करत असल्याचे चित्र आहे. महसूल अधिकारी, सेलू तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांच्या जाणीवपूर्वक या उत्खननाकडे दुर्लक्ष होत असल्याची गावकऱ्यांची ओरड आहे. कंपनीवर कारवाईची मागणी केली जात आहे.0
0
Report
Advertisement
स्मार्ट सिटी मिशन की अवधि पूरी, 1 मई 2026 से परियोजनाएं महापालिका के हवाले
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:केंद्र पुरस्कृत 'स्मार्ट सिटी मिशन'ची मुदत ३० एप्रिल रोजी संपल्यानंतर या अंतर्गत राबवलेले सर्व प्रकल्प १ मे २०२६ पासून अधिकृतपणे महापालिकेच्या ताब्यात आले आहेत. नगरविकास विभागाच्या आदेशानुसार, महापालिका आयुक्त यांनी या प्रकल्पांच्या संचालन आणि देखभालीसाठी ३० अधिकाऱ्यांची नियुक्ती करून जबाबदाऱ्यांचे वाटप केले आहे. आयुक्तांनी स्पष्ट केले आहे की, संबंधित अधिकाऱ्यांनी स्मार्ट सिटी कार्यालयाकडून सर्व प्रकल्पांच्या संचिका, अभिलेखे आणि साहित्याचे हस्तांतरण तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करावा. या हस्तांतरणामुळे आता शहर बससेवेपासून ते आयटी प्रकल्पांपर्यंतच्या सर्व तक्रारी आणि नियोजनासाठी महापालिका प्रशासन थेट जबाबदार असेल.0
0
Report
सोलापुर महामार्ग विकास पर भाजप- कांग्रेस पोस्टर वार, 742 करोड़ निधि मंजूर
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातील महामार्गाच्या विकास कामावरून भाजप - काँग्रेसमध्ये पोस्टर वॉरला सुरुवात - सोलापूर जिल्ह्यात मोहोळ ते वळसंग या महामार्गाच्या विकास कामावरून भाजप आणि काँग्रेसची श्रेयवादाची लढाई - काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे आणि भाजप आ.सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडून पोस्टर वार - केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोहोळ ते वळसंग या महामार्गाच्या विकास कामासाठी तब्बल 742 कोटी रुपयांचा निधी केला मंजूर. - काँग्रेस खा. प्रणिती शिंदे आणि अक्कलकोटचे भाजप आ.सचिन कल्याणशेट्टी यांच्यात हा राजकीय श्रेयवाद रंगतोय - मोहोळ ते वळसंग या महामार्गाच्या सुमारे 82 किलोमीटर साठी 742 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे पोस्टर भाजप आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून व्हायरल करून श्रेय घेण्याचा प्रयत्न - खा.प्रणिती शिंदे यांच्याकडून काम बोलते म्हणत पोस्टर तर आ.सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडून सोलापूरच्या विकासाला नवेपंख म्हणत पोस्टर केलं व्हायरल..0
0
Report
छत्रपति संभाजी नगर के मालमत्ता करदाताओं के लिए 10% छूट 31 मई तक बढ़ी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर के मालमत्ता करदाताओं के लिए दिलासादायक बातमी, सामान्य करात मिलणारी १०% सवलत आता ३१ मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. एप्रილ महिन्यात या योजनेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि नागरिकांची मागणी लक्षात घेऊन महापौर समीर राजूरकर यांनी मुदतवाढीच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आयुक्तनी यावर शिक्कामोर्तब केले है. एप्रिलमध्ये ३१ हजार मालमत्ताधारकांनी सवलतीचा लाभघेत २९ कोटी ४० लाख रुपयांचा कर भरणा केला है.0
0
Report
Advertisement
यवतमाळ के कार्यक्रम में तूफानी हवा ने सत्कार रोका, भूषण गवई का कार्यक्रम जारी
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आयोजित कार्यक्रमात वादळाने व्यत्यय आणला. कार्यक्रम सुरू असताना अचानक सोसाट्याचा वारा सुरू झाला. लोकप्रतिनिधी न्यायाधीश व विधीज्ञ उपस्थित असलेल्या मंचाच्या दिशेने वारे वाहत असल्याने कार्यक्रम मध्येच थांबवावा लागला. त्यानंतर काही वेळाने शेजारच्या सभागृहात नियोजित कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी सरन्यायाधीश भूषण गवई, पालकमंत्री संजय राठोड, माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला. तत्पूर्वी माजी मंत्री स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.0
0
Report
रायगर्ड जिले के पशुपालकों के लिए तालुकास्तरीय हेल्पलाइन जारी, तुरंत मदद संभव
Chendhare, Maharashtra:अँकर - रायगड जिल्ह्यातील पशु पालकांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे तालुका स्तरीय हेल्प लाईन नंबर जारी करण्यात आले आहेत. पशुधनाबाबत कुठलीही समस्या निर्माण झाली किंवा आजारी पडले तर या क्रमांकावर मदत मागता येईल. हे नंबर सार्वजनिक करून गावागावात पोहोचवा अशा सूचना सभापती वैकुंठन पाटील यांनी दिल्यात. पशुधन दगावल्यास दिल्या जाणाऱ्या मदतीत वाढ करण्याचं विचार सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलं.0
0
Report
सोलापुर की नई जिंदगी प्लास्टिक फैक्ट्री में आग, माल जला, कोई हताहत नहीं
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातील नई जिंदगी भागातील प्लास्टिक कारखान्याला लागली आग सोलापुरातील नई जिंदगी भागातील प्लास्टिक कारखान्याला लागली आग पहाटेच्या सुमाराला लागलेल्या आगीत कारखान्यातील सर्व माल जळून झाला खाक सोलापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी पहाटेपासूनच आग विझावण्यासाठी केले शर्थीचे प्रयत्न या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसून कारखाना मालकाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. सध्या आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आल्याचं चित्र दिसून येत आहे.0
0
Report
Advertisement
उपमहापौर धनंजय जाधव के प्रयास से एक लाख वृक्षारोपण शुरू
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या पुढाकाराने शहरात एक लाख वृक्षारोपण करण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री राधाकृष्ण विठे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. उपमहापौर धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून शहरात एक लाख वृक्ष लागवडीचा निर्धार करण्यात आला आहे...राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी या मोहिमेच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक भागांमध्ये वृक्ष लागवड करण्यात येणार आहे आणि वृक्षाचे संरक्षण आणि संगोपन देखील केल जाणार आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागरिकांना आणि वेगवेगळ्या संघटनांना सोबत घेऊन आगामी वर्षभर काम करणार असल्याचं धनंजय जाधव यांनी म्हटलं आहे0
0
Report
बिनटिकिट यात्राओं पर रेलवे का ऐतिहासिक दंड: एक महीने में 12 करोड़ 23 लाख
Nashik, Maharashtra:फुकट्या प्रवासांकडून तब्बल 12 कोटी 23 लाख रुपयांचा दंड वसूल रेल्वेने विनातिकीट आणि अनधिकृत प्रवास करणाऱ्यांविरुद्ध पुकारलेल्या मोहिमेत भुसावळ विभागाने एप्रिल २०२६ मध्ये ऐतिहासिक कामगिरी केलीये... विभागाने एकाच महिन्यात १ लाख ९ हजार प्रकरणांमध्ये कारवाई करत तब्बल १२ कोटी २३ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. तिकीट तपासणीच्या इतिहासातील हा एक नवा विक्रम मानला जातोय..विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली.पथकाने विविध गाड्यांमध्ये अचानक तपासणी केली...विनातिकीट प्रवासाबाबत मध्य रेल्वेने 'शून्य-सहिष्णुता' धोरण अवलंबले आहे. प्रवाशांनी दंड आणि कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी नेहमी वैध तिकीट खरेदी करूनच सन्मानाने प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. यापुढेही अशा धडक मोहिमा सुरूच राहतील, असा इशाराही विभागाकडून देण्यात आलाय..0
0
Report
रणजितसिंह नाईक निंबाळकर ने किसानों से मुलाकात में पानी समस्या पर स्पष्ट निर्देश दिए
Pandharpur, Maharashtra:माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे मतदार संघात सक्रिय झाले आहेत. सांगोला तालुक्यात टेंभू म्हैसाळ पाणी योजनेच्या संदर्भातील प्रश्नावर त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. जनतेच्या प्रश्नावर विलंब सहन केला जाणार नाही असा इशारा अधिकाऱ्यांना दिलेला आहे सांगोल्याच्या पाणी प्रश्नावर दिलासा देत मान नदीत चार मे पासून पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय sुद्धा या बैठकीमध्ये घेण्यात आला0
0
Report
Advertisement
