icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

महापौर ने नाले साफ कराने का त्वरित आदेश दिया, बारिश में नागरिकों को राहत

Kalyan, Maharashtra:mahāpurārāṁcī kalyaāṇ dvārālī nāndīvālī parisarāt nālēsaphāīkī kāmācī p̄hāyaṇī tuṁḇaleyā nālēṁāṁ nālē sāfāīcī kāmāṁnā vāghāχ; garahajar adhikāryālā phōnvarāc̲hāpaḷē! Ōphisamadhyā basanyāsāṭhī āhāta ki nāgrīkāñcā samasyā jāṇūñ gēṇyāsāṭhī? — mahāpurā Anc..pāvasāḷyācā pārśbhyūm̐var kalyaāṇ pūrvēlī dvārālī āṇi nāndīvālī parisarātī nālēsaphāīkī cī kāmāñcī pāhāṇī karāṇyāsāṭhī mahāpurā haśhārśāl thavila, nānē nāgbhātī nāla sūtyācaṁ nālēṁtā tuṁ pāhāṇātyā, nāḷecphā carmuśī cāṁ kāmānē apūrī āśtāṁ; pūrā kālītāṁ nāḡarīkā yā cī vārtā. pāhāṇyādarām̐ adhikāryānāṁ sāhyayakā acitā, mahāpurāṁ sanṭāppḷyā. tumi kevalh oficina basanyāsāṭhī āhata ki nāgrikāṁcā samasyā jānūna ghēṇyāsāṭhī? āsa vāka karaṇyācāṁ adhikāryāṁnāṁ taātaḍīnē nālēśaphāīkī kāmēṁ pūrṇ karaṇyācē sāṅkhyā ḍhākaḷaṇēcāṁ āśāī. tvaṁī adhikāryāñcā kāryapaddhatiṁvara nārājī vyakta keli. mahāpurāṁ sāmbhālyā adhyāyāṁ adhikāryāñcā nālēsaphāīkī kāmēṁ tātḍīne nālēśaphāīkī kāmēṁ pūrṇ karaṇyācē sūcana dēta nāgṛīnāṁ pāvasālyāta kōṇatōhi trās hōṇāra nāhī yācī khabaradārī dēśāntara. tathāṁ kāmātmāhaljagīparanāṁ adhikāryāṁvara kārvāī karvāyācā īśārī.
0
0
Report

महिलाओं ने पानी की आपूर्ति के लिए हंडा-कळशी मोर्चा निकाला

Kalyan, Maharashtra:केडीएमसी के प्रभाग क्षेत्र कार्यालय के सामने महिलाओं ने हंडा-कळशी मोर्चा निकालकर तात्कालिक पानीपुरवठ्य की मांग की। 'पानी द्या, अन्यथा तीव्र आंदोलन' का इशारा; डोंबिवली पश्चिम के साईनगर परिसर में तीन महिनों से पानी की किल्लत के कारण निवासियों को जीवन प्रभावित हो रहा है। महिलाओं ने हाथ में हंडे-कळशा लेकर प्रदर्शन किया और पालिका प्रशासन के विरुद्ध घोषणाबाजी की। लगातार शिकायतों के बावजूद प्रशासन ने ठोस योजना नहीं दी, इसलिए तत्काल पानी पुरवठा सुनिश्चित करने की मांग। आंदोलक निवेदन देकर चेतावनी दी कि समस्या हल न होने पर आंदोलन तीव्र होगा।
0
0
Report
Advertisement

चंद्रपुर जिले के उर्वरक विक्रेताओं के 37 लाइसेंस निलंबित, 3 बड़े लाइसेंस रद्द

Chandrapur, Maharashtra:टायटल:---चंद्रपूर जिल्ह्यातील खत विक्रेत्यांचे ३७ परवाने निलंबित तीन कायमचे रद्द; कृषी विभागाची कारवाई चंद्रपूर जिल्ह्यात खत विक्रीमध्ये अक्षम्य आणि गंभीर अनियमितता आढळून आल्याने कृषी विभागाने ३७ खत विक्रेत्यांचे परवाने तात्काळ निलंबित केले असून, ३ बड्या विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करून त्यांना मोठा दणका दिला आहे. मे-जून २०२६ या कालावधीत कापूस बियाण्यांच्या अवैध विक्री प्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मोहिमेदरम्यान अनधिकृत बियाणे जप्तीची ५ प्रकरणे उघडकीस आणून सुमारे ३५.०८ लाख रुपये मूल्याचा १७.७५ क्विंटल बियाणे साठा जप्त करण्यात आला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४ बियाणे विक्री केंद्रांना विक्री बंदचे आदेश देऊन ३३.६९ लाख रुपयांचा साठा सीलबंद केला.
0
0
Report

भंडारा-गोंदिया विधानसभा परिषद चुनाव: भाजपा- कांग्रेस के आरोप-प्रत्यारोप गर्म, मतदाता कैसे पलटे?

Bhandara, Maharashtra:भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या मतदारांनी काँग्रेस समर्थित उमेदवाराला मतदान केल्याचा खासदार प्रशांत पडोळे यांचा खळबळजनक दावा. काँग्रेस पराभवाच्या भीतीनेच अशी वक्तव्ये करत असल्याचा भाजपचा पलटवार. भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांनी भाजपच्या मतदारांनीच काँग्रेस समर्थित उमेदवाराला मतदान केल्याचा दावा करत राज्यातील सत्ताधारी सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी पडोळे यांनी सरकारवर साम, दाम, दंड, भेद आणि गुंडशाहीच्या माध्यमातून सत्ता टिकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. तसेच आमदार-खासदार फोडण्याचे राजकारण सुरू असल्याचे सांगत लोकशाही धोक्यात आल्याची टीका केली. वाढती महागाई, पेट्रोल-डिझेल आणि गॅस दरवाढ यांसारख्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सत्तेसाठी राजकारण सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र भाजपने काँग्रेसचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. काँग्रेसला पराभव समोर दिसत असल्यानेच अशा प्रकारची विधाने केली जात असल्याचा दावा भाजपने केला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष आशू गोंडाने यांनी काँग्रेसने पाठिंबा दिलेल्या उमेदवाराच्या पार्श्वभूमीवर प्रश्न उपस्थित करत उलट काँग्रेसच्या मतदारांनी भाजप उमेदवाराला मतदान केल्याचा दावा केला. दोन्ही पक्षांकडून विजयाचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात कोणाचे मतदार फुटले आणि मतदारांनी कुणाच्या बाजूने कौल दिला हे २२ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीचा निकाल राजकीय वर्तुळासाठी उत्सुकतेचा विषय ठरला आहे.
0
0
Report
Advertisement

नागपुर में छह सांसदों की बैठक से शिवसेना-उद्धव ठाकरे के आसपास नई सियासी उथल-पुथल

Nagpur, Maharashtra:नागपूर अनिल देशमुख, माजी मंत्री. खासदारांचा बाबतीत सोडणार असे वक्तव्य केले, बाबा आत्राम स्वतःची पोरगी सांभाळू शकले नाही, मुलगी तुतारीवर लढली. मुलगी सांभाळू शकले नाही, काही तरी तारतम्य ठेवून आत्राम यांनी बोलावे, सुनेत्रा पवार सुनेत्रा ताई यानि राज्याच्या प्रश्नाचं अनुषंगाने अमित शाह यांची भेट घेतली असेल. काही तरी नवीन वावड्या उठवल्या होत्या, शेतकऱ्यांचा कृषी मलाला भाव नाही, संत्रा मोसंबीची झाड वाळत आहे, डिझेल पेट्रोल असे विषय आहे... संजय राऊत म्हणत होते फुटणार नाही संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना खात्री असेल जाणार नाही म्हणून तेव्हा बोलले, पण नंतर फुटले, उद्धव ठाकरे आणि पक्षावर खासदार निवडणून आले आहे... आत्राम आत्राम यांच्या वक्तव्याला गांभीर्याने घेत नाही, फक्त त्याना जाणीव करून दिली मुलगी कुठल्या पक्षात आहे... शरद पवार बैठक 10 तारखेला वर्धापन दिन पार पडला, सर्व खासदार सोबत होते, अनेक खासदारांनी भाषण केले, यात अशी चर्चा नाही. ओमराजे निंबाळकर संजय राऊत ते काय बोलले वयक्तिक प्रश्न आहे.. 6 खासदार त्यांची चर्चा सुरू असेल, शिवसेना बैठकीला गैरहजर होते, या 6 यापैकी किती जाणार, उद्धव ठाकरे यांची बैठक बोलावली होती, त्यांच्याशी चर्चा केली होती
0
0
Report

वाशिम पुलिस ने चार मोटरसाइकिल चोरी के आरोपी को गिरफ्तार किया

Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:वाशिम पोलिसांच्या धडक कारवाईमुळे वाहनचोरांवर मोठा आळा बसताना दिसत आहे.स्थानिक गुन्हे शाखेने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून तब्बل चार चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.या कारवाईमुळे जिल्ह्यातील आणखी वाहन चोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाशिम शहरातील मोटारसायकल चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने धुमका येथील उमेश किशन राठोड याला ताब्यात घेतले.चौकशी दरम्यान त्याने वाशिम शहर व मालेगाव परिसरातून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.पोलिसांनी त्याच्याकडून 1लाख 95 हजार रुपये किमतीच्या चार मोटारसायकली जप्त केल्या असून अधिक तपास सुरू आहे.
0
0
Report
Advertisement

बागलाण में गिरणा डावा कालवे के विस्तारीकरण के विरोध में किसान अर्धनग्न प्रदर्शन

Nashik, Maharashtra:– गिरणा डावा कालवा विस्तारीकरणा विरोधात बागलाणच्याय लखमापूरमध्ये विरोध... - शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन; जेसीबीचे काम बंद गिरणा डावा कालवा विस्तारीकरण व अस्तरीकरणाच्या कामाविरोधात बागलाण तालुक्यातील लखमापूर येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. गावातील शेतकऱ्यांनी आज सुरू असलेले जेसीबीचे काम बंद पाडत अर्धनग्न आंदोलन करून शासन आणि प्रशासनाविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. गिरणा डावा कालवा विस्तारीकरण करण्यापूर्वी नारपार योजना पूर्ण करून त्याचे पाणी गिरणा नदीपात्रात सोडण्यात यावे. त्यानंतरच कालवा विस्तारीकरणाचा निर्णय घ्यावा. उपलब्ध जलस्रोतांचे योग्य नियोजन करून शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. *बाईट: शेतकरी*
0
0
Report

अकोला के अकोट में आंधी-बारिश से केला किसान भारी नुकसान, मदद की मांग

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे काढणीसाठी तयार असलेल्या अनेक केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. नुकसानग्रस्त शेतकरी आता प्रशासनाकडून तातडीची मदत अपेक्षा व्यक्त करीत आहेत. अकोट तालुक्यातील पणज, बोचरा, रुईखेड, महागाव, अकोली जाहागीर आणि धामणगाव परिसरात वादळी वाऱ्याने कहर केला. अनेक ठिकाणी केळीची झाडे मुळासकट उन्मळून पडली, तर काही ठिकाणी झाडे मधोमध तुटल्याने संपूर्ण बागांचे नुकसान झाले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मोठा खर्च आणि मेहनत घेऊन शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली होती. पण कापणीच्या उंबरठ्यावर असतानाच आलेल्या अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्याने त्यांच्या आशांवर पाणी फेरले. नुकसान झाल्यानंतरही महसूल विभाग किंवा पीक विमा कंपनीचे अधिकारी अद्याप घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. नुकसानग्रस्त भागाची तातडीने पाहणी करून पंचनामे करण्यात यावेत तसेच शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत आणि नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी आणि काँग्रेस नेत्यांनी केली आहे.
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी MIDC के उद्योग जल संकट से उत्पादन ठप्प, हजारों मजदूर प्रभावित

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीच्या खेड लोटे MIDC वर पाणीबाणीचे संकट.. वाशिष्टी नदी आटल्याने अनेक प्लांट बंद, हजारो कामगार वाऱ्यावर!​ पाऊस लांबल्याचा मोठा फटका; पाणीपुरवठा करण्यासाठी MIDC युनियनची प्रशासनाकडे आर्त हाक.. पावसाने ओढ दिल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योगांना आतापर्यंतचा सर्वात मोठा फटका बसला आहे. कोयना धरणातील पाणीसाठा खालावल्याने आणि वाशिष्टी नदीत अवजल न सोडल्यामुळे लोटे परशुराम, खेर्डी आणि गाणेखडपोली या तीन प्रमुख औद्योगिक वसाहतींमधील पाणीपुरवठा एमआयडीसीने अनिश्चित काळासाठी पूर्णपणे बंद केला आहे. या 'पाणी-बाणी'मुळे अनेक लघुउद्योग बंद पडले असून, मोठ्या कंपन्यांचे उत्पादन मंदावले आहे.कामगारांना पिण्याच्या पाण्यासाठीही वणवण करावी लागत आहे. या भीषण परिस्थितीचा आढावा घेणारा आमचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.. हा रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योगांचा कणा मानला जाणारा लोटे,खेर्डी आणि गाणेखडपोली औद्योगिक परिसर..पण आज या भागात कारखान्यांचे सायरन शांत पडू लागले आहेत. कोयनेत आता ९ टीएमसी चं पाणीसाठा शिल्लक राहिल्याने वीजनिर्मिती बंद केली आहे.. विजनिर्मिती ठप्प झाल्याने गेल्या चार दिवसांपासून वाशिष्टी नदीचे पात्र कोरडेठण पडले आहे. ज्यात आम्ही पोहचलो.. या नदीतून लोटे,खेर्डी आणि गाणेखडपोली एमआयडीसीसाठी दररोज तब्बल ३० दशलक्ष घनमीटर पाणी उपसले जाते. मात्र, नदीत पाणीच नसल्यामुळे एमआयडीसीने सर्व कारखान्यांचा पाणीपुरवठा अनिश्चित काळासाठी बंद केला आहे.. त्यामुळे ७५ टक्के कंपन्यांची धडधड थांबली आहे.. उद्योजक लोटे midc या जलसंकटाची सर्वात मोठी कुऱ्हाड कंत्राटी कामगारांवर कोसळली आहे.पाणी नसल्यामुळे अनेक लहान उद्योगांनी उत्पादन तात्पुरते थांबवून आपल्या कंत्राटी कामगारांना सक्तीच्या सुट्ट्या दिल्या आहेत. तर दुसरीकडे,ज्या मोठ्या कंपन्या कशाबशा सुरू आहेत,तिथे कामगारांना पिण्यासाठीही पाणी मिळेनासे झाले आहे.एमआयडीसी परिसरातील काही ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठाही याच यंत्रणेवर अवलंबून असल्याने कामगारांच्या वसाहतींमध्ये पाण्यासाठी हाहाकार माजला आहे.. रत्नागिरी एमआयडीसी युनियन अध्यक्ष.. शासनाने पाण्याचा प्राधान्यक्रम ठरवताना प्रथम पिण्याचे पाणी,नंतर शेती आणि शेवटी उद्योगांना स्थान दिले आहे. त्यामुळे कोयनेतून पाणी सुटले तरी ते आधी चिपळूण शहर आणि गावांना मिळणार आहे,म्हणजेच एमआयडीसीचा नंबर सर्वात शेवटी लागणार आहे.पुढील ८ दिवसांत जर मुसळधार पाऊस झाला नाही,तर लोटे, खेर्डी आणि गाणेखडपोलीतील अब्जावधी रुपयांचे औद्योगिक उत्पादन पूर्णपणे कोलमडेल आणि उद्योगांना टाळे ठोकण्याशिवाय पर्याय उरणार नाही,अशी भीती उद्योजक व्यक्त करत आहेत.. कोकणात दरवर्षी मुसळधार पाऊस पडतो,पण आज याच कोकणातील सर्वात मोठ्या औद्योगिक पट्ट्याला पाण्यासाठी चातकासारखी वाट पाहावी लागत आहे.
0
0
Report

धाराशिव में ओमराजे के फैसले पर मौन समर्थन, सोशल मीडिया पर उबाल

Dharashiv, Maharashtra:सोशल मीडियावर रोष... मतदारसंघात शांतता; ओमराजेंच्या निर्णयाला धाराशिवची मूक संमती? ठाकरे गटाची साथ सोडल्यानंतर ऑनलाईन टीकेचा भडिमार... पण धाराशिवमध्ये ना आंदोलन, ना उघड विरोध. अँकर ठाकरे गटाची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. फेसबुक, एक्स आणि इन्स्टाग्रामवर नाराजीचा सूर उमटत असतानाच त्यांच्या धाराशिव मतदारसंघात मात्र चित्र पूर्णपणे वेगळं आहे. ना आंदोलन... ना निदर्शने... ना उघड विरोध. उलट अनेक कार्यकर्ते आणि नागरिक बोलणंही टाळताना दिसत आहेत. त्यामुळे धाराशिवची ही शांतता नेमकी वादळापूर्वीची आहे की ओमराजेंच्या निर्णयाला मिळालेली मूक संमती? पाहूया हा रिपोर्ट... धाराशिव हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे कट्टर शिवसैनिकांची संख्या आजही मोठी आहे. काही निष्ठावंत शिवसैनिकांनी ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असली, तरी ती अद्याप संघटित आंदोलनाच्या रूपात समोर आलेली नाही. त्यामुळे मतदारसंघातील ही शांतता अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. लोक खरोखरच ओमराजेंसोबत आहेत, की योग्य वेळेची वाट पाहत आहेत? याचं उत्तर येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. सोशल मीडियावर टीकेचा भडिमार... आणि मतदारसंघात कमालीची शांतता... या दोन परस्परविरोधी चित्रांमुळे धाराशिवच्या राजकारणात नवी उत्सुकता निर्माण झाली आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयाला मतदारांचा मूक पाठिंबा आहे की ही शांतता आगामी राजकीय घडामोडींची नांदी आहे, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top