icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Nov 2024, 12:41 pm

यवतमाळ : पुसद मध्ये माणूसकीची भिंत फाउंडेशन ने वृद्ध, निराधार, बेघरांसोबत साजरी केली भाऊबीज

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळच्या पुसद येथे माणुसकीची भिंतच्यावतीने बेघर, निराधार, दिव्यांग, असहाय वृद्ध व अनाथांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. वृद्धाश्रम व रुग्णालय परिसरात हा सोहळा संपन्न झाला. माणुसकीची भिंत परिसरात स्वच्छता करून गोरगरीब निराधार वृद्धांची व पुरुषांची दाढी-कटिंग करण्यात आली. त्यानंतर महिलांनी काढलेल्या रांगोळ्यांनी अंगण सजले. पाट मांडण्यात आले. त्यानंतर माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांनी टोपी, टॉवेल, नारळ पेढा देऊन वंचितांना ओवाळले. त्यांच्या कुटुंबातील महिलांना साड्या देण्यात आल्या.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नासिक में बिबट्या का मुक्त विचरण, किसानों-ग्रामीणों में दहशत, पिंजरा लगाने की मांग

Niphad, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात खडक माळेगाव-कोटमगाव रस्त्यालगत कोटमगाव शिवारात द्राक्षाच्या बागेत बिबट्याचा मुक्त संचार सुरु असल्याने परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे रस्त्याने जाणाऱ्या काही शेतकऱ्यांनी चारचाकी गाडीतून बिबट्याचे दर्शन होताच त्याचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला गेल्या महिनाभरापासून परिसरात मोकाट जनावरांवर हल्ल्याच्या घटना घडत होत्या मात्र बिबट्या प्रत्यक्ष नजरेस पडत नसल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते आता बिबट्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर या हल्ल्यांमागे बिबट्याचाच वावर असल्याचे स्पष्ट झाले असून, वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे
0
0
Report
Advertisement

शिंदे शिवसेना ने किरन सामंत को दक्षिण कोकण विभागीय संपर्कप्रमुख बनाकर रत्नागिरी–सिंधुदुर्ग की जिम्मेदारी सौंपी

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी. शिंदे शिवसेनेच्या दक्षिण कोकणच्या विभागीय संपर्कप्रमुख पदावर राजापूरचे आमदार किरण सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी संपर्कप्रमुख नेमतानाच विभागीय संपर्कप्रमुखही नेमले आहेत. आमदार किरण सामंत यांच्याकडे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अनेक वर्षे संघटनात्मक पातळीवर काम केल्यानंतर किरण सामंत यांनी राजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. तरीही संघटनात्मक बाबींवर त्यांची पकड कायम आहे.
0
0
Report

सातारा के कुडेघर गाँव में अचानक आया गवा, ग्रामीणों में दहशत

Satara, Maharashtra:सातारा - साताऱ्यातील कुडेघर गावात रानगवा रस्त्यावर आल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली. काही वेळ वावर करून तो जंगलात परतल्याने मोठा अनर्थ टळला. परळी भागातील कुडेघर गावात रानगवा अचानक रस्त्यावर आल्याने नागरिकांसह वाहनचालकांची भंबेरी उडाली. काही काळ गव्याने रस्त्यावर आणि शेत परिसरात वावर केल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. सकाळच्या सुमारास काही शेतकऱ्यांना शेताजवळ मोठा गवा फिरताना दिसला. गवा हा अत्यंत बलवान आणि कधीकधी आक्रमक होऊ शकणारा वन्यप्राणी असल्याने गावकऱ्यांनी सुरक्षित अंतर राखत सावधगिरी बाळगली. दरम्यान, गव्याने काही काळ परिसरात वावर करत वाहनांची आणि इतर हालचालीांचा अंदाज घेतला आणि नंतर जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. त्यामुळे संभाव्य अनर्थ टळल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला. मात्र, या घटनेमुळे कुडेघर परिसरात भीतीचे वातावरण कायम असल्यामुळे वनविभागाने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
0
0
Report

गोरेगांव ग्रामदैवत भैरवनाथ जत्रा: 45 फीट लांबी लकडीची लाट आणि पालकी उत्साह का केंद्र

Chendhare, Maharashtra:गोरेगावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ जत्रा उत्साहात... उंच बगाडावर फिरणारी देवाची लाट सर्वांचे आकर्षण... अँकर - कोकणात चैत्र महिन्यात गावागावांतून जत्रोत्सवाची धामधूम पहायला मिळते. रायगड जिल्ह्यातील गोरेगावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवस्थानच्या जत्रेची एक वेगळी ओळख आहे. सर्व धर्म समभावाचे प्रतिक असणार्‍या या उत्सवात सुमारे 45 फूट लांब लाकडाची लाट रानातून आणली जाते आणि मंदिरा समोरील उंच बगाडावरती फिरवली जाते ती फिरविण्या आधी पिरबाबा आणि गोंदीर देवाला आणण्यासाठी देवाची पालखी निघते. भिन्नाड, कुरवडे आणि चिंचवली येथून मानाची सासनकाठ्या भैरवनाथ भेटी साठी येतात. रामनवमी पासून सुरू झालेल्या यात्रा उत्सवाची हनुमान जयंती दिवशी छबिना काढून सांगता होते अठरापगड जाती आणि बारा बलुतेदार सहभागी होण्याची परंपरा आहे。
0
0
Report
Advertisement

छत्रपती संभाजीनगर में अनियमित बारिश-गारपिट से किसानों की फसलें भारी नुकसान

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. मुसळधार पावसासह गारपिटीमुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पैठण, आडुळ, पाचोड या भागांत गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी हतबल झाला आहे. गहू, हरभरा, डाळिंब आणि मोसंबी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी गव्हाची पिके आडवी झाली आहेत तर डाळिंब बागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपिटीच्या तडाख्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले असून तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
0
0
Report
Advertisement

अमरावती जिले में अनावृष्टि बारिश से गेहूं, कांदा व फलों को भारी नुकसान

Amravati, Maharashtra:अवकाळी पावसाने अमरावती जिल्ह्यात ५७८ हेक्टरमधील पिके सपाट; ६२ गावांमध्ये सर्वाधिक नुकसान अँकर :- सोमवारी रात्री उशिरा झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील रब्बी हंगामातील गहू व उन्हाळी कांद्यासह संत्रा, केळी व लिंबू या फळपिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ५७८ hेक्टर क्षेत्रास या पावसाचा फटका बसला असून मार्चमधील हा दुसरा फटका आहे. सर्वाधिक नुकसान अंजनगावसुर्जी व चांदूर बाजार तालुक्यात झाले आहे. विशेषतः गहू, कांदा व संत्रा या फळपिकांचे नुकसान अधिक प्रमाणांत झाले आहे. जिल्ह्यात अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. काही तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाची गारपीटही झाली. रब्बी हंगामातील गव्हाची काढणी बहुतांश ठिकाणी झाली असून विलंबाने पेरणी झालेला गहू काढणीच्या स्थितीत आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यात ३५ गावांमधील १०६ हेक्टर चांदूर बाजार तालुक्यातील हेक्टर क्षेत्रातील गव्हाचे नुक झाले आहे. १५१ हेक्टर उन्हाळी कांद्याला फटका बसला आहे. त्यामध्ये अंजनगावसुर्जी तालুক्यातील ९०, चांदूर बाजारमधील ४०, अचलपूरमधील १५ हेक्टरचा समावेश आहे. संत्रा, लिंबू, आंबा, पपई या फळपिकांचे नुकसान झाले आहे. विशेषतः चांदूर बाजार तालुक्यातील १३३ हेक्टरमधील संत्र्याला फटका बसला आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यात २९ हेक्टरमधील लिंबू पिकाचे नुकसान झाले आहे. ६० हेक्टरमधील केळीचे नुकसान या पावसाने झाले आहे. नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यास लवकरच प्रांरभ करण्यात येणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहूल सातपुते यांनी सांगितले.
0
0
Report

वणी गढ़ यात्रा में दो श्रद्धालुओं की मौत, गर्मी से बेहाल हालत

Malegaon, Maharashtra:विशाल मोरे, कळवण ( नाशिक ) - वणी गडावर जाणाऱ्या दो भाविकांचा मृत्यू... उष्णतेने चक्कर येऊन पडल्याने मृत्यू. वणी येथील सप्तशृंगी गडाकडे पायी वारी करत असताना दोन भाविकांचा वेगवेगळ्या ठिकाणी भोवळ येऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. परे sh धर्मा पवार (वय १७, रा. चौगाव, ता. चोपडा) आणि राजेंद्र रामराव पाटील (४५, रा. जुवार्डी, ता. भडगाव) अशी या मृत भाविकांची नावे आहेत. या घटनेमुळे वारीत सहभागी झालेल्या भाविकांमध्ये हळहळ व्यक्त केली जाते. कळवण तालुक्यातील भेंडी येथे पदयात्रा पोहोचली असता भंडारा कार्यक्रमादरम्यान जेवणाच्या रांगेत उभा असलेल्या परेश पवार या युवकाला अचानक भोवळ आली. तो खाली कोसळल्यानंतर त्याला तातडीने मदत करण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी कळवण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, भडगाव तालुक्यातील जुवार्डी येथील राजेंद्र पाटील पालखीसोबत वणी गडाच्या दिशेने जात असताना मालेगाव तालुक्यातील शेरूळ परिसरात त्यांना अचानक भोवळ आली. त्यांना तातडीने उपचारासाठी धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांच्या मृत्यू झाले.
0
0
Report
Advertisement

अक्कलकोट के आधुनिक बस स्टेशन का 90% कार्य पूर्ण, भक्तों की लंबी प्रतीक्षा खत्म

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - अक्कलकोट शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या बस स्थानकाचे 90% काम पूर्ण, गेल्या अनेक वर्षांपासूनची स्वामीभक्तांची प्रतीक्षा पूर्ण - अक्कलकोट शहरामधील नवीन अत्याधुनिक बसस्थानक बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात - अक्कलकोट शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या नवीन बस स्थानकाचे 90 टक्के काम पूर्ण - स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोट मध्ये येणाऱ्या भाविकांना बस स्थानकाच्या माध्यमातून मिळणार अत्याधुनिक सुविधा - गेल्या अनेक वर्षांपासूनची स्वामीभक्त आणि अक्कलकोट वासियांची प्रतीक्षा अखेर पूर्ण - आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नातून 29 कोटी रुपये मंजूर करून हायटेक बस स्थानकाची उभारणी - भव्य बस स्थानकामध्ये 22 प्लॅटफॉर्म, प्रवासी प्रतीक्षालय, वातानुकूलित प्रतिक्षालय, कॅन्टीन, प्रसाधनगृह, अधिकारी विश्रांतीगृह, डॉरमेट्री रूम, हिरकणी कक्ष अशा अनेक कक्षांची उभारणी - नवीन बसस्थानकाचे लवकरच लोकार्पण होऊन नागरिकांच्या सेवेत रुजू होणार
0
0
Report

नागपुर के निजी बैंकों में सोने के जमानत घोटाले में 23 करोड़ का नुकसान

Nagpur, Maharashtra:नागपुरात सोने तारण कर्ज घोटाळा उघड, बनावट दागिन्यांवर कर्ज उचलून बँकेची फसवणूक खाजगी बँकेच्या ९ शाखांमध्ये फसवणुकीचा प्रकार, वार्षिक अंकेक्षणात घोटाळा समोर एकूण २३ कोटी १९ लाखांची फसवणूक झाल्यानं बँकेला मोठा आर्थिक फटका १५९ खातेदारांकडून बनावट सोने तारण ठेवत जानेवारी २०२३ ते ऑक्टोबर २०२५ कालावधीतील प्रकार खातेदार, मूल्यनिर्धारक, अंकेक्षक, अधिकारी संगनमत, बनावट दागिने खरे दाखवून कर्ज मंजूर बँकेच्या विभागीय व्यवस्थापकांच्य चौकशीत घोटाळा उघडकीस आल्यानंतर धंतोली पोलिसात तक्रार धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून यात सखोल तपास सुरू बेलतरोडी परिसरातील प्रकरणानंतर उघडकीस आला घोटाळा, संपूर्ण शहरातील शाखांची तपासणी होणार गहाण सोनं त्रयस्थ अधिकाऱ्यांकडून दागिन्यांची पडताळणी, त्यात मोठ्या प्रमाणात बनावट सोने आढळले बँकिंग प्रणालीतील मोठी पोकळी उघड झाली, आतील संगनमतामुळे घोटाळा वाढल्याचा अंदाज
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top