icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Nov 2024, 12:41 pm

यवतमाळ : पुसद मध्ये माणूसकीची भिंत फाउंडेशन ने वृद्ध, निराधार, बेघरांसोबत साजरी केली भाऊबीज

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळच्या पुसद येथे माणुसकीची भिंतच्यावतीने बेघर, निराधार, दिव्यांग, असहाय वृद्ध व अनाथांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. वृद्धाश्रम व रुग्णालय परिसरात हा सोहळा संपन्न झाला. माणुसकीची भिंत परिसरात स्वच्छता करून गोरगरीब निराधार वृद्धांची व पुरुषांची दाढी-कटिंग करण्यात आली. त्यानंतर महिलांनी काढलेल्या रांगोळ्यांनी अंगण सजले. पाट मांडण्यात आले. त्यानंतर माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांनी टोपी, टॉवेल, नारळ पेढा देऊन वंचितांना ओवाळले. त्यांच्या कुटुंबातील महिलांना साड्या देण्यात आल्या.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

चंद्रपुर के जॅकवेल पंप की खराबी से पानी की आपूर्ति बाधित, लोग परेशान

Chandrapur, Maharashtra:चंद्रपुरात दाताळा मार्गावरील इरई नदीच्या जॅकवेल मधील पंपात बिघाड, पाणीटंचाईने नागरिक त्रस्त चंद्रपूराचा तापता उन्हाळा ऐन भरात पोचला आहे. त्यातच चंद्रपूर शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. शहराच्यादाताळा मार्गावरील इरई नदीच्या जॅकवेल मधील पंपात बिघाड झाला आहे. यामुळे पाणीटंचाईने नागरिक त्रस्त झाले आहेत. याची सर्वाधिक झळ जुन्या चंद्रपूर शहराला बसली आहे. शहरात सुमारे 20 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. अनियमित आणि अपुरा पाणीपुरवठा मात्र नागरिकांच्या रोषाचे कारण ठरले आहे. पंप बिघाड दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मनपाने दिली आहे。
0
0
Report

चंद्रपूर मनपा ने कर वसूली में 66% तक पहुंचाई; 31 मार्च तक बकायेदारों के नाम सामने

Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर मनपा आर्थिक अडचणीत, मनपाने मालमत्ता कर थकबाकीदारांचे नावे लावली प्रमुख चौकात, 31 मार्च पर्यंत एकूण थकबाकीच्या 66 टक्के वसुली, कर थकविणा-या शिल्लक मालमत्ताधारकांवर जप्तीची टांगती तलवार अँकर:-- आर्थिक अडचणीत असलेल्या चंद्रपूर शहर मनपाने कर वसुलीसाठी विविध पर्याय स्वीकारले आहेत. शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांचे नावे मनपाने एकूण 16 ठिकाणी प्रमुख चौकात बॅनरद्वारे प्रदर्शित केली आहेत. या सर्वांचा मनपाला फायदा झाला आहे. 31 मार्च पर्यंत महानगरपालिकेच्या एकूण थकबाकीच्या 66 टक्के वसुली करण्यात मनपाला यश आले आहे. यानंतरही कर थकविणा-या शिल्लक मालमत्ताधारकांवर जप्तीची टांगती तलवार राहणार आहे.
0
0
Report
Advertisement

अकोला में गुड फ्रायडे: क्रूस यात्रा का भावुक मंचन श्रद्धालुओं को झकझोर गया

Akola, Maharashtra:अकोल्यात आज ख्रिस्ती बांधवांनी प्रभू येशू ख्रिस्तांचा शहीद दिवस म्हणून ओळखला जाणारा गुड फ्रायडे श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा केला.शहरातील माऊंट कार्मेल चर्चमध्ये यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रभू येशू ख्रिस्तांना सुळावर चढविण्याच्या घटनेचा भावपूर्ण देखावा साकारण्यात आला. तसेच येशू ख्रिस्तांनी सहन केलेल्या १४ यातनांचे टप्पेही जिवंत चित्ररूपात उभे करण्यात आले होते.पहिल्या टप्प्यात त्यांच्या सहकाऱ्याने केलेला विश्वासघात आणि सैनिकांच्या स्वाधीन केल्याचा प्रसंग दाखवण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात त्यांच्या डोक्यावर काटेरी मुकुट ठेवून क्रूस वाहण्यास भाग पाडण्यात आले. अशा प्रकारे विविध टप्प्यांमधून त्यांनी सहन केलेल्या यातनांचे दर्शन घडवण्यात आले.बाराव्या टप्प्यात येशू ख्रिस्तांना सुळावर चढविण्यात आले, तर चौदाव्या टप्प्यात त्यांच्या पार्थिवाला गुहेत ठेवण्यात आल्याचा प्रसंग साकारण्यात आला.या संपूर्ण प्रवासात प्रभू येशूंनी आपल्या छळकर्त्यांविषयी कोणतीही द्वेषभावना न ठेवता, उलट त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि क्षमा, प्रेम व शांततेचा संदेश दिला, हे विशेष अधोरेखित करण्यात आले.या कार्यक्रमाला अकोल्यातील ख्रिस्ती बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. भावनिक वातावरणात अनेकांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले होते.यावेळी जगात शांतता नांदावी अशी प्रार्थना करण्यात आली.
0
0
Report

कृष्णा नदी सफाई अभियान का शुभारंभ, सांगली में जागरूकता और सहभागिता बढ़ी

Sangli, Maharashtra:स्लग - कृष्णा नदी स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ.. अँकर - सांगलीमध्ये कृष्णा नदी स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ झाला आहे.श्री गणपती पंचायतन संस्थांकडून अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे.पंचायतन संस्थांचे युवराज आदित्यसिंह राजे पटवर्धन यांच्या उपस्थितीमध्ये कुषादीवरील सरकारी घाट या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.यामध्ये सांगलीतल्या विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व सांगलीकरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.स्वच्छ कृष्णा नदी आणि प्रदूषण थांबवण्याच्या उद्देशाने श्री गणपती पंचायत संस्थाकडून ही मोहीम सुरू केली गेली आहे.
0
0
Report

नागपूर: महिलाओं के विरुद्ध कथित अत्याचार पर कठोर सजा और चाकणकर के खिलाफ कार्रवाई

Nagpur, Maharashtra:नागपूर अरुणा सबाने, लेखिका- साहित्यिक (121 केलाय) (on खरात ) -- सुशिक्षित सुविद्य स्त्रिया या भोंदू बाबाच्या अधीन झाल्या... त्यांनी स्वतःवर अत्याचार करून घेतले... या स्त्रियांनी केलेला हा मूर्खपणा आहे... अंधश्रद्धेच टोक आहे. या स्त्रियांना कठोर शिक्षा व्हावी जेणेकरून नंतरच्या बाया अशा प्रकाराला बळी पडणार नाही.. कोणत्या भोंदू बाबाला स्वाधीन होणार नाही -- खरातला तर फाशीची शिक्षा झालीच पाहिजे...सहज फाशीची शिक्षापेक्षा जास्तीत जास्त त्रास कसा होईल अशी शिक्षा त्याला द्यायला पाहिजे. (योनी सूचीते बद्दल बोलले आहे ) ( अनेक स्त्रिया मूत्र प्यायला ) --- ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झाले त्यांच्याबद्दल मला सहानुभूती आहे... माझा आक्षेप या स्वच्छने गेल्या त्या महिलांवर आहे... रूपाली चाकणकर यांना कोणी जबरदस्ती करू शकत नाही... प्रशासकीय सेवेत असलेल्या महिला या ज्या काही महिला गेल्या... बुद्धिजीवी स्त्रीयां आहेत... त्यांच्याबद्दल माझे म्हणणे आहे.त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यामुळे बाकीच्या स्त्रियांचे डोळे उघडतील -- मी मुख्यमंत्र्यांना याबाबत मेल पाठवला आहे... एक-दोन दिवस पत्राच्या उत्तरची वाट पाहणार आहे... नागपूरला आले की त्यांची भेट पण घेणार आहे... आणि या प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहे. शिकलेल्या बया, महिला आयोगाची बाईतर तुमच्या आमच्याकडे ढुंकून पाहत नाही. एरवी आमचे फोन उचलत नाही... मेल पाठवत होतो तर उत्तर देत नाही... स्त्रियांच्या अत्याचाराबाबत बोलत नाही... तिचं काम आहे स्त्रियांना न्याय देण... इतर स्वतःसोबत इतर महिलांनाही भोंदू बाबा कडे घेऊन जात होती... म्हणून आमचा आक्षेप आहे एका मुख्य बाईला अटक झाली... तर तिच्या नंतरच्या दहा बायांना शहाण्या होतील .. म्हणून ही कारवाई व्हावी --(on चाकणकर यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी ) --हो.. कारण चाकणकर बाई तिथे गेलेले आहेत... करंगळी कापण्यासारखे प्रकार समोर येत आहे... हे सिद्ध करणं माझं काम नाही... हे कायद्याचं काम आहे... त्या इतर दहा बायांना तिथे घेऊन गेल्याचे समोर आले... आपण तर फसायचं आणि आणखीन दहा बायांनाही फसवायचं.. असं असेल तर अतिशय चुकीचे आहे.. म्हणून शिक्षा व्हावी -- काही बाबतीत असं झालं असेल की मूल होत नाही म्हणून घरच्या लोकांनी टॉर्चर केलं असेल... हे काही प्रमाणात होऊ शकत हे समजू शकत -- काही ठिकाणी व्हिडिओ, फोटोमध्ये दिसत नाही की महिलांवर अत्याचार होत नाही... बळजबरी होत आहे... चेहरा फ्रेश, व्यवस्थित आहे... त्या भोंदू बाबाला रिस्पॉन्स करत आहे... म्हणून असं वाटते हा अत्याचार नाही मात्र ज्यांच्यावर अत्याचार झाला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे -- स्वच्छ ने केलील्या महिला... विशिष्ट लॉबीतील महिला.. श्रीमंत महिला यांना तर कळायलाच हवं... हा बुद्धिजीवी वर्ग आहे... त्यांनी स्वतःचे इतकं अधपतन कसं करून घेतले हा माझा विषय आहे. -- चाकणकर यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी... कडक शिक्षा व्हायला पाहिजे
0
0
Report
Advertisement

अंजनगाव खेळोबा पुतला मामले में धनगर मराठा समाज का उग्र प्रदर्शन, प्रशासन पेच में

Pandharpur, Maharashtra:Anchor - सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा प्रकरणावर आज पुन्हा धनगर मराठा समाजाने सामने आलेले आहेत.प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी देवस्थानच्या जागेवर हक्क सांगण्यासाठी बसवलेला पुतळा सन्मानाने स्थलांतर करावा अशी मागणी केली आहे.जोपर्यंत पुतळा स्थलांतरित होत नाही. तोपर्यंत इथून आंदोलन संपणार नाही अशी भूमिका घेतली आहे तर पट्टणकोडोली येथील भाकणूक सांगणारे फरांडे बाबा यांनी थेट सदर जागा देवस्थानच्या वीर पुजारी मंडळाच्या नावे असलेले उतारे दाखवलेले आहेत. त्यामुळे आता प्रशासनापुढे पेच निर्माण होण्याची शक्यता आहे नक्की काय करावे यासाठी प्रशासनाची आज दिवसभर बैठका सुरू राहणार आहेत वन टू वन लक्ष्मण हाके, आणि फरांडे बाबा
0
0
Report
Advertisement

वनमंत्री गणेश नाईक का तंज: शिंदे को लेकर सख्त टिप्पणी

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महापालिकेत सत्ताधारी भाजपने सेवा विनियम ठराव मंजूर करुन मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय 58 वरून 60 वर्षं करण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र मनपा आयुक्तांनी सदर ठराव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवला असता नगरविकास खात्याने सदर ठराव निलंबित केलाय. 500 चौरसफूट घरांना कर माफिचा निर्णय देखिल नवी मुंबई महापालिकेने प्रथम घेतला त्यानंतर मुंबई महापालिकेने घेतला मात्र मुंबई मध्ये याची अंमलबजावणी सुरु झाली पण नवी मुंबईत नाही त्यामुळे आपल्या पायाखाली काय जळत ते पहिला बघायचं असा उपरोधीक टोला यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावलाय.
0
0
Report
Advertisement

सत्य की जीत: सतिश भोसले निर्दोष साबित, जेल से गांव लौटे भावुक

Beed, Maharashtra:बीड: अखेर सत्याचा विजय झाला, निर्दोष मुक्तता झाल्यानंतर सतीश भोसले भावुक..! मला खोट्या गुन्ह्यात गोवले गेले. एक वर्षात मी.पूर्णपणे बरबाद झालो. माझे संपूर्ण आयुष्य आणि माझे कुटुंब उध्वस्त झाले. परंतु न्याय देवतेने मला न्याय दिला. अखेर सत्याचा विजय झाल्याचे सांगत सतीश भोसले भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. निर्दोष मुक्तता झाल्यानंतर सतीश भोसले हर्सुलच्या कारागृहातून थेट त्याच्या गावी शिरूर कासार येथे आला होता. प्रशासनाने आणि काही समाजकंटकांनी उध्वस्त केलेल्या त्याच्या राहत्या घराकडे पाहून तो पुरताच गहिवरला... निर्दोष सुटल्यानंतर काय म्हणाला सतीश भोसले बघुयात...
0
0
Report
0
0
Report

चाकण मार्केट में बारिश से प्याज-आलू सड़कर किसान संकट में

Chakan, Maharashtra:निर्यात ठप्प, पावसाचा फटका; चाकण बाजार समितीत कांदा बटाटा सडला, शेतकरी संकटात चाकण बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या कांद्या आणि बटाट्यावर दुहेरी संकट कोसळले आहे. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे कांद्याची निर्यात ठप्प झाल्याने बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर कांदा आणि बटाटा साठून राहिला आहे. त्यातच अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्याने उघड्यावर ठेवलेला कांदा आणि बटाटा पूर्णपणे भिजून खराब झाला आहे. बाजार समितीत कांदा साठवणुकीसाठी पुरेशी जागा नसल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आधीच घसरलेले बाजारभाव आणि वाढलेला उत्पादन खर्च यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top