icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Nov 2024, 12:41 pm

यवतमाळ : पुसद मध्ये माणूसकीची भिंत फाउंडेशन ने वृद्ध, निराधार, बेघरांसोबत साजरी केली भाऊबीज

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळच्या पुसद येथे माणुसकीची भिंतच्यावतीने बेघर, निराधार, दिव्यांग, असहाय वृद्ध व अनाथांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. वृद्धाश्रम व रुग्णालय परिसरात हा सोहळा संपन्न झाला. माणुसकीची भिंत परिसरात स्वच्छता करून गोरगरीब निराधार वृद्धांची व पुरुषांची दाढी-कटिंग करण्यात आली. त्यानंतर महिलांनी काढलेल्या रांगोळ्यांनी अंगण सजले. पाट मांडण्यात आले. त्यानंतर माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांनी टोपी, टॉवेल, नारळ पेढा देऊन वंचितांना ओवाळले. त्यांच्या कुटुंबातील महिलांना साड्या देण्यात आल्या.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सातारा में गणपति आगमन: पर्यटन मंत्री Desai के साथ भक्तिमय उत्साह

Satara, Maharashtra:सातारा: राज्य पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सातारा शहरातील 'कोयना दौलत' या निवासस्थानी पारंपारिक वाद्यांच्या गजरात आणि पालखीतून मिरवणूक काढून लाडक्या बाप्पाचे अत्यंत उत्साहात आगमन झाले. यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांच्या पत्नी स्मिता देसाई आणि यशराज देसाई कन्या ईश्वरी देसाई यांनी बाप्पाचे औक्षण केले. पिढ्यांपासून चालत आलेल्या परंपरेनुसार चांदीच्या पालखीतून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून राज्यभरात सुजलाम सुफलाम वातावरण राहावे आणि सर्वसामान्यांच्या जीवनातील संकट दूर व्हावीत, अशी प्रार्थना मंत्री देसाई यांनी यावेळी केली.
0
0
Report

वाशीम में गणेश मूर्तियों के दाम 30% बढ़े, खरीदारी प्रभावित

Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात लाडक्या गणरायाच्या आगमनाची धूम सुरू झाली असून,बाप्पाला घरी नेण्यासाठी बाजारपेठेत भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय.मात्र, यंदा गणेशमूर्तींच्या दरात तब्बल ३० टक्क्यांनी वाढ झाल्याने त्याचा परिणाम खरेदीवर झाला आहे. कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे मूर्ती महागल्या असून,अनेक भाविक मोठ्या मूर्तीऐवजी लहान मूर्तींना पसंती देत आहेत.बाजारपेठेत गणेशमूर्तींसह सजावटीचे आणि पूजेचे साहित्य खरेदीसाठीही लगबग सुरू आहे.यंदा जिल्ह्यात ७६४ सार्वजनिक गणेश मंडळं आणि ‘एक गाव, एक गणपती’ अंतर्गत २२८ गणपतींची स्थापना होणार आहे.गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
0
0
Report
Advertisement

नासिक में गणेशोत्सव की धूम: घर-घर पहुँचा गणपति बाप्पा का उत्साह

Nashik, Maharashtra:लाडक्या गणरायाचं आज आगमन झालेलं आहे गणेशभक्तांमध्ये सकाळपासूनच उत्साह संचारला असून आपल्या लाडक्या गणरायाला घरी घेऊन जाण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय...हे दहा दिवस मनोभावे गणरायाची सेवा करणार आहे...वर्षभर या दिवसांची गणेशभक्त वाट बघत असतात गणपती बाप्पा मोरया चा जयघोष करत आपल्या लाडक्या गणरायाची आज प्रतिष्ठापना करून त्याला हवे तसे नैवेद्य दाखवणार आहे...चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत गणरायाला घरी घेऊन जाताना चा उत्साह पाहायला मिळतोय...नाशिक मधून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....
0
0
Report

नवी मुंबई में नितेश राणे बोले: हिंदुओं की सुरक्षा, किसी को बख्शा नहीं जाएगा

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई मंत्री नितेश राणे वराह जयंती निमित्त नवी मुंबईत. नितेश राणे यांच्या हस्ते वराह जयंतीनिमित्त महाआरती कोणीही हिंदूंकडे वाकड्या नजरेने बघितलं तर सरकार म्हणून आम्ही कोणालाही सोडणार नाही. आमची प्राथमिकता प्राधान्य ठरलेलं आहे. आमच्या सरकारमध्ये पहिलं हिंदूंच हित पाहिलं जाणार मग सगळ्यांना मोजणार त्यामुळे कोणीही कुठेही वळवळ करू नये. कुठल्याही हिंदुला त्रास दिला तर जसं आज वराह जयंती निमित्त आलोय ना तसं न सांगता येईल आणि पाहिजे तसा तांडव करेन. कुठल्याही प्रकारचा जिहाद आम्ही कोणालाही करू देणार नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने चालणारा देश हा एक हिंदू राष्ट्र आहे इथे सर्व धर्म समभाव चा टेपरेकॉर्डर लावायचं नाही. इथे हिंदूंना पहिलं मोजले जाणार मग सगळ्यांना अशी स्पष्ट भूमिका आहे. जेव्हा जेव्हा कोणीही हिरव्या रंगाचा राक्षस आपल्या हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने बघेल तेव्हा रक्षणासाठी प्रत्येक हिंदूंनी पुढे यावं.
0
0
Report
Advertisement

हिंदी दिवस पर अमित शाह करेंगे राजभाषा सम्मेलन का उद्घाटन

Navi Mumbai, Maharashtra:केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागातर्फे नवी मुंबईतील वाशी मधील सिडको एक्सिबिशन सेंटर येथे आज हिंदी दिवस आणि सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं आयोजन करण्यात आलेय. या संमेलनाचं उद्घाटन केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. हिंदीचा प्रसार करण्याबरोबरच सर्व भारतीय भाषांमध्ये परस्पर सन्मान, सहकार्य आणि सहभागाची भावना मजबूत करणं हा या संमेलनाचा प्रमुख उद्देश असून या संमेलनात राजभाषा विभागाच्या बहुभाषिक ऍप भारती चे लोकार्पण देखिल होणार आहे. यावेळी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह काय मार्गदर्शन करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
0
0
Report

आमगांव खेत में बिबट्या कुंपण में फंस कर मौत, घातपात की आशंका—वन विभाग जाँच

Bhandara, Maharashtra:आमगांव क्षेत्रातील शेतात तारांच्या कुंपणात बिबट्या फसल्याने मृत्यु झाला. घातपाताचा संशय असल्यामुळे वनविभाग चौकशी सुरू आहे. बिबट्याचे वय सुमारे १६ महिने असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, हा मृत्यु कुंपणात फसल्याने झाला की मानवी हस्तक्षेपामुळे झाला याबद्दल तपास सुरू आहे. आमगाव परिसरातील एका शेतात तारांच्या कुंपणात बिबट्या फसलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्राथमिक पाहणीत त्याने कुंपणात फसल्याने मृत्यू झाल्याचे दिसून आले. मात्र मृत्यूमागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असे वनपरिक्षेत्र अधिकारी आकरे यांनी स्पष्ट केले. मृत बिबट्याचे वय सुमारे १६ महिने असल्याची माहिती वनविभागाकडून दिली गेली आहे. या प्रकरणात मानवी हस्तक्षेप झाला आहे काय, याचा सखोल तपास सुरू आहे.
0
0
Report

वाशीम में बरसात की कमी से सूखे जैसे हालात; अधिकारी अब तात्कालिक निरीक्षण करेंगे

Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यात पावसातील खंड आणि कमी पावसामुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.पावसाअभावी करपून पिकांची वाढ खुंटल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे.या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हा प्रशासनाला तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत.महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची स्थिती,पावसातील खंड, जमिनीतील ओलावा आणि उपलब्ध पाण्याचा आढावा घेणार आहेत.तसेच गावांमधील पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि पाण्याची परिस्थिती ही तपासली जाणार आहे.शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून,या अहवालानंतर शासनाच्या निकषांनुसार मदतीसाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे.त्यामुळे प्रशासनाच्या या पाहणीकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report
Advertisement

वारणा नदी पुल से 15 फुट कार गिरकर नदी में; चालक समेत दो घायल

Sangli, Maharashtra:स्लग - वारणा नदीच्या पुलावरून कार थेट नदीपात्रात,कठडा तोडून 15 फूट कार नदीपात्रात.. वारणा नदीच्या पुलावरून कठडा तोडून चारचाकी गाडी थेट नदीपात्रात कोसळली आहे, १५ फूट उंचीवरून गाडी नदीपात्रात कोसळली,यामध्ये वाहन चालकासह दोन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे,अमृतनगर ते ऐतवडे खुर्द मार्गावरील वारणा नदीच्या पुलावर सोमवारी सकाळी सहा वाजता ही घटना घडली आहे. पुलावरील साईडचा कठडा तोडून गाडी कोरड्या नदीपात्रात पडली आहे त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.घटनेची माहिती मिळतात ग्रामस्थांसह कुरळप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
0
0
Report

नाशिक में गणेश प्रतिष्ठापना: भक्तों की उमंग से नौ दिन का उत्साह

Nashik, Maharashtra:लाडक्या गणरायाचं आज आगमन होत है... गणेशभक्तांमध्ये सकाळपासूनच उत्साह संचारला असून आपल्या लाडक्या गणरायाला घरी घेऊन जाण्यासाठी नागरिक आतुर झाले आहेत हे दहा दिवस मनोभावे गणरायाची सेवा करणार आहे वर्षभर या दिवसांची गणेशभक्त वाट बघत असतात गणपतीय बाप्पा मोरया चा जयघोष करत आपल्या लाडक्या गणरायाची आज प्रतिष्ठापना करून त्याला हवे तसे नैवेद्य दाखवणार आहे गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता असून सर्वांचे विघ्न दूर करो अशी प्रार्थना भावी करताना दिसून येत आहे नाशिक मधून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....
0
0
Report

नाशिक के येवला में गणेश प्रतिमा के लिए चांदी की वस्तुओं की भारी मांग

Yeola, Maharashtra:गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असताना नाशिकच्या येवला शहरात गणरायाच्या आरासीत चांदीच्या वस्तूंची क्रेझ पाहायला मिळत आहे... चांदीचा गणपती... चांदीचे मोदक... चांदीचे उंदीरमामा... एवढंच नाही तर चांदीची जास्वंदी आणि गुलाबाची फुलंही सध्या भाविकांचं लक्ष वेधून घेत आहेत. गणेशमूर्तीसमोर सजावटीसाठी तसंच पूजेसाठी या वस्तूंना भाविकांकडून विशेष पसंती मिळत असून मागणीतही वाढ झाली आहे. या चांदीच्या वस्तूंची नेमकी काय आहे खासियत? भाविकांचा त्याला किती प्रतिसाद मिळतोय? आणि कारागिरांकडून कोणकोणत्या वस्तू तयार केल्या जात आहेत?
0
0
Report
Advertisement

अमरावती में भारी बारिश, 6 तहसीलों में बाढ़ से किसानों को बड़ी राहत

Amravati, Maharashtra:अमरावतीत जिल्ह्यात अखेर पावसाची दमदार एन्ट्री; 6 मंडळांत अतिवृष्टी, बळीराजाला मोठा दिलासा अमरावती जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यातील पावसाची तूट भरून काढण्यासाठी सप्टेंबरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. रविवारी जिल्ह्यात सरासरी 19.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 6 महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली असून यामध्ये धारणी तालुक्यातील 4 तर वरूड तालुक्यातील 2 मंडळांचा यात समावेश आहे.. विशेष म्हणजे धारणीतील धारणी, धुळघाट, सावळीखेडा आणि सालबर्डी तर वरूडमधील बेनोडा आणि राजुरा येथे अतिवृष्टी नोंदवण्यात आली. पावसामुळे सोयाबीन कापूस आणि तूर पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र काही भागांत शेतीचे नुकसानही झाले. प्राथमिक अंदाजानुसार धारणी तालुक्यात 128 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असल्याची माहिती आहे。
0
0
Report

बारिश के मौसम में अमरावती में एक बाइक पर 5 छात्रों का खतरनाक सफर

Amravati, Maharashtra:अमरावतीत एकाच दुचाकीवर चक्क 5 तरुणांचा जीवघेणा प्रवास; वाहतूक नियमांची खुलेआम पायमल्ली, भर पावसात जीवघेणा प्रवास शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकाच दुचाकीवर तब्बल 5 तरुण बालके बसवून धोकादायक पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला आहे. भर पावसामध्ये हे पाचही दुचाकीस्वार बिनधास्तपणे गाडी चालवून मजा करत दिसून आले. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून भरधाव दुचाकी चालवण्याचा हा प्रकार विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणारा ठरत आहे. शहरातील वाढते अपघात लक्षात घेता चौकाचौकात वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले मात्र या पोलिसांचे अशा बेसिस्त दुचाकी चालवणाऱ्या तरुणांवर लक्ष गेले नाही का असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे.
0
0
Report

कोकण में नाव से गणपति बप्पा का मंगल आगमन, भक्तों में जोश और उत्साह

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- होडीत विराजमान होत गणरायाचं मंगल आगामनरत्नागिरी- होडीत विराजमान होत गणरायाचं मंगल आगामন\n\nढोल ताशांच्या गजरात गणरायाचे मंगलमय आगमन\n\nमंगलमुर्ती मोरया गणपती बप्पा मोरया\n\nकोकणात भक्तीभाव उत्साह आणि जल्लोषाच्या वातावरणात गणेशोत्सवाला दिमाखदार सुरवात\n\nपारंपारिक आणि वैशिष्ठपुर्ण गणेशोत्सवाला थाटामाटात सुरवात\n\nसंगमेश्वर तालुक्यातील भातगाव खाडीतून चक्क होडीतून आणले जातात गणराय\n\nजलमार्गावरील बाप्पाच्या आगमनाचा सोहळा सर्वांचाच आकर्षण बिंदू\n\nखाडीच्या विशालकाय पात्रामधून धुमधडाक्यात आणले जातात लाडके गणपती\n\nश्रद्धा आणि भक्तीच्या जोरावर करजुवे गावातील ग्रामस्थ गणरायांना चक्क बोटीतून घेवून येतात\n\nया आगोदर दणळवळणाची साधने नव्हती त्यामुळे गणपती कसे घरी आणले जायचे हे पुढच्या पिढीला कळण्यासाठी परंपरा कायम\n\nकोकणातल्या खाडी किनाऱ्यावरील खारवी आणि मच्छिमार समाज सुद्धा आणतो गणपती होडीतून
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top