icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Nov 2024, 12:41 pm

यवतमाळ : पुसद मध्ये माणूसकीची भिंत फाउंडेशन ने वृद्ध, निराधार, बेघरांसोबत साजरी केली भाऊबीज

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळच्या पुसद येथे माणुसकीची भिंतच्यावतीने बेघर, निराधार, दिव्यांग, असहाय वृद्ध व अनाथांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. वृद्धाश्रम व रुग्णालय परिसरात हा सोहळा संपन्न झाला. माणुसकीची भिंत परिसरात स्वच्छता करून गोरगरीब निराधार वृद्धांची व पुरुषांची दाढी-कटिंग करण्यात आली. त्यानंतर महिलांनी काढलेल्या रांगोळ्यांनी अंगण सजले. पाट मांडण्यात आले. त्यानंतर माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांनी टोपी, टॉवेल, नारळ पेढा देऊन वंचितांना ओवाळले. त्यांच्या कुटुंबातील महिलांना साड्या देण्यात आल्या.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

विवेक कोल्हे की विधानपरिषद जीत के बाद शिंदे ने चप्पल पहनाकर सम्मान किया

Shirdi, Maharashtra:आपला नेता आमदार व्हावा यासाठी गेल्या सात वर्षांपासून चप्पल न घालणाऱ्या कार्यकर्त्याची इच्छा अखेर पूर्ण झाली आहे.. विवेक कोल्हे यांना भाजपने विधानपरिषदेच्या माध्यमातून आमदारकी दिल्याने कोपरगाव येथील वासुदेव शिंदे यांनी आज अखेर त्यांच्यात हस्ते पायात चप्पल घातली.. शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर कोल्हे यांनी नवीन कोल्हापुरी चप्पल देऊन आपल्या कार्यकर्त्याचा सन्मान केलाय.. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विवेक यांच्या आई माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा अवघ्या साडे चारशे मतांनी पराभव झाला होता.. हा पराभव भाजपचे कार्यकर्ते वासुदेव शिंदे यांच्या जिव्हारी लागला होता.. जोपर्यंत कोल्हे परिवारातून कुणी आमदार होत नाही, तोपर्यंत पायात चप्पल न घालता अनवाणी राहण्याचा निर्धार शिंदे यांनी केला होता.. 2024 च्या निवडणुकीत कोपरगावची जागा राष्ट्रवादीकडे गेल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार युती धर्म पाळत कोल्हे यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती.. त्यावेळी विरोधकांसह अनेकांनी आणखी पाच वर्षे वाट बघ, अशी खिल्ली उडवत वासुदेव शिंदे यांना हिणवले होते.. मात्र विवेक कोल्हे यांना विधानपरिषदेची आमदारकी मिळाल्याने सात वर्षानंतर शिंदे यांचा प्रण पूर्ण झालाय.. आज आमदार विवेक कोल्हे यांनी वासुदेव शिंदे आणि इतर कार्यकर्त्यांसोबत साई दर्शन घेतले.. ज्या सहकाऱ्याने माझ्यासाठी त्याग केला त्याचे कौतुक वाटत असल्याचे सांगत, कोल्हे यांनी वासुदेव शिंदे यांचा कोल्हापुरी चप्पल देत सन्मान केलाय..
0
0
Report
Advertisement

कर्ज फेडने के दबाव में महिला की हत्या; दागिने लूटने वाला आरोपी 24 घंटे में गिरफ्तारी

Navi Mumbai, Maharashtra:तुर्भे परिसरातील ६० वर्षीय महिलेची हत्या करून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लुटणाऱ्या मोबिन नूर कुरेशी याला तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. महिलेच्या अंत्यसंस्कारावेळी संतप्त नातेवाईकांनी काही काळ रस्त्यावर आंदोलनही केले होते. तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोबिन नूर कुरेशी हा चिकन दुकानात काम करत होता. त्याने अनेकांकडून कर्ज घेतले होते आणि ते फेडण्यात तो अपयशी ठरत होता. दरम्यान, संबंधित महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या दागिने पाहून त्याने लूट करण्याचा कट रचला. महिला लवकर विसरभोळी असल्याची माहिती आरोपीला होती. त्यामुळे त्याने तिला चहा पिण्याच्या बहाण्याने घरी बोलावले. घरात नेल्यानंतर तिच्या गळ्यातील दागिने काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने विरोध केल्याने आरोपीने तिच्याच दुपट्ट्याने गळा आवळून हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपीने महिलेचा मृतदेह बोरीत भरून घराबाहेर ठेवला. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत आरोपीला २४ तासांच्या आत अटक केली. पुढील तपास तुर्भे एमआयडीसी पोलीस करत आहेत.
0
0
Report
Advertisement

चिपळूण कळमुंडी बौद्धवाडी ने शिवसेना ठाकरे पक्ष में प्रवेश किया

Ratnagiri, Maharashtra:चिपळूण कळमुंडी बौद्धवाडीचा शिवसेना ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश.. आमदार भास्कर जाधव यांनी केले स्वागत.. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील कळमुंडी गावच्या बौद्धवाडीतील ग्रामस्थांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. आमदार भास्कर जाधव आणि जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. सत्ताधारी पक्षात राहूनही वाडीचा विकास न झाल्याने हा निर्णय घेतल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. विरोधी पक्षात असूनही मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांमुळे प्रभावित होऊन एकसंघपणे ठाकरे पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे प्रवेशकर्त्यांनी स्पष्ट केले..
0
0
Report

नाशिक में पंचवटी समृद्धि ज्वेलर्स डकैती: माजी सैनिक समेत दो आरोपी गिरफ्तार

Nashik, Maharashtra:Nashik breaking * पंचवटीतील समृद्धी ज्वेलर्स दरोडा प्रकरण * दरोडा टाकून पंजाबला पळालेल्या आंतरराज्य टोळीतील दोघांना अटक * एक आरोपी माजी सैनिक असल्याची माहिती समोर * ५०० CCTV फुटेजच्या च्या आधारे घेतला आरोपींचा शोध * पंजाब येथून घेतलं दोन्ही आरोपींना ताब्यात * गावठी कट्टा, एअरगनचा धाक दाखवत टाकला होता सशस्त्र दरोडा * महिला व्यावसायिक नैना पगारिया यांच्या धाडसी प्रतिकारामुळे टळली होती लूट * दरोडेखोरांनी चोरीच्या दुचाकी आणि कारचा केला होता वापर * ताब्यातील संशयितांना आज नाशिक न्यायालयात हजर केले जाणार
0
0
Report

अकोला के सिटी हॉस्पिटल में आग, 8 मरीज सुरक्षित बाहर, जान नहीं गई

Akola, Maharashtra:अकोला शहर के रामदास पेठ परिसर के सिटी हॉस्पिटल में आज अचानक आग लगने की घटना घडली। आग के कारण अब तक स्पष्ट नहीं हैं; घटना के बाद इलाके में खलबली मच गई। मिली जानकारी के अनुसार अस्पताल की ICU में कुछ मरीज उपचाररत थे। आग लगने की सूचना मिलते ही फायर ब्रिगेड के जवान तुरंत मौके पर पहुंचे और बचावकार्य शुरू किया गया। जवानों ने अभी तक लगभग आठ मरीजों को सुरक्षित बाहर निकाला है और अन्य मरीजों को सुरक्षित स्थान पर स्थानांतरित किया जा रहा है। अस्पताल से बाहर निकाले गए मरीजों को आगे उपचार हेतु जिला सामान्य अस्पताल में दाखिल किया गया है। सौभाग्य से इस घटना में अब तक किसी की जान नहीं गई है। इधर, फायर ब्रिगेड की तरफ से आग पर काबू पाने के लिए युद्धस्तर पर प्रयास जारी हैं।
0
0
Report
Advertisement

घर छोड़ने पर निंदा आत्मा को क्लेश देता है: वनमंत्री गणेश नाइक

Navi Mumbai, Maharashtra:जुनं घर सोडल्यावर त्याची निंदा करणं म्हणजे आत्म्याला क्लेश ज्या घरात आपण होतो, ते सोडल्यानंतर त्या घराबद्दल वाईट बोलणं म्हणजे आत्म्याला क्लेश देण्यासारखं असल्याचं वक्तव्य राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केलं. तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचा आदर आजही कायम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही आपण पक्ष सोडल्याची खंत आजही वाटत असल्याचं गणेश नाईक म्हणाले . “मी ज्या ट्रॅकवरून आलो आहे, तो ट्रॅक सांगतो की एकदा चंदनाच्या पाटावर आणि चांदीच्या ताटावरून उठल्यानंतर पुन्हा त्यावर बसायचं नसतं,” 2004 ते 2014 या काळात मंत्री आणि पालकमंत्री म्हणून काम करत असताना बाळासाहरे ठाकरे विविध कामं सांगायचे आणि ती कामं आदरपूर्वक पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केला, असंही त्यांनी नमूद केलं. “माझी कोणाविषयी कटुता नाही. ना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल, ना राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल किंवा त्यांच्या नेत्यांबद्दल मी कधीही अनुद्गार काढले नाहीत,” साऊंड बाईट -: गणेश नाईक वन मंत्री.
0
0
Report

नवी मुंबई में अति धोकादायक इमारतों के পানি और बिजली कनेक्शन तोड़ने की शुरुआत

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईत अतिधोकादायक इमारतींचे पाणी कनेक्शन आणि वीज कनेक्शन तोडण्यास सुरुवात. नवी मुंबई मनपा तर्फे अतिधोकादायक इमारती मध्ये राहणाऱ्या नागरिकांना महापालिकेचा धक्का. अति धोकादायक इमारतींचे पाणी आणि वीज कनेक्शन महापालिकेने तोडले. वाशी मधील जय महाराष्ट्र सोसायटी पासून कारवाईला सुरुवात. एवढी कठोर कारवाई नरिकांच्या सुरक्षेसाठी की बिल्डरच्या फायद्यासाठी....? वीज पाणी कनेक्शन कापून नागरिकांद्वारे महापालिकेवर बांधकाम परवानगी मिळवण्याचा डाव आहे का....? महापालिकेच्या कठोर कारवाईमुळे अनेकन प्रश्न उपस्थित.
0
0
Report
Advertisement

सांगली जिला बैंक कथित घोटाले की चौकशी के विरोध में आजी-पूर्व निदेशक हाई कोर्ट पहुंचे

Sangli, Maharashtra:सांगली जिला मध्यवर्ती बँकेच्या कथित घोटाळया प्रकरणी सुरू करण्यात आलेल्या निवृत्त न्यायाधीश चौकशी विरोधात आजी-माजी संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करत निवृत्ती न्यायाधीशामार्फत सुरू असलेल्या चौकशीला स्थगिती द्यावी,अशी मागणी करण्यात आली आहे.बँकेतील 81 कोटी 89 लाखांच्या कथित घोटाळयाबाबत माजी आमदार गोपीचंद पडळकर आमदार सदाभाऊ खोत यांच्याकडून राज्य शासनाकडे निवृत्त न्यायाधीशानमार्फत चौकशीची मागणी करण्यात आली होती,त्यानुसार जिल्हा बँकेच्या कथित घोटाळ्यांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी सुरू झाली आहे.मात्र या चौकशीला सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आजी-माजी संचालकांकडून आक्षेप घेण्यात आला आहे.
0
0
Report

रत्नागिरी में वेल्डिंग के दौरान युवक गिरा, हाई वोल्टेज से जला, सुरक्षा तारों में फंसा

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे एमआयडीसी परिसरात वेल्डिंगचं काम करत असताना अचानक तोल जाऊन पडल्याने एक तरुण कामगार गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रोशन रामचंद्र घवाळी असं या तरुणाचं नाव आहे. उंचावरून पडत असताना बाजूने जाणाऱ्या हायव्होल्टेज वीज वाहिनीचा स्पर्श झाल्याने त्याची पाठ जळाली आणि त्यानंतर तो कुंपणाच्या सुरक्षा तारांमध्ये अडकला. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला वाचवलं. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जवानांनी कटरच्या सहाय्याने कंपाऊंडच्या सुरक्षा तारा कापल्या आणि अडकलेल्या रोशनची सुरक्षित सुटका केली. सध्या सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर युद्धपातळीवर उपचार सुरू आहेत.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top