Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : पुसद मध्ये माणूसकीची भिंत फाउंडेशन ने वृद्ध, निराधार, बेघरांसोबत साजरी केली भाऊबीज

Nov 03, 2024 12:41:05
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या पुसद येथे माणुसकीची भिंतच्यावतीने बेघर, निराधार, दिव्यांग, असहाय वृद्ध व अनाथांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. वृद्धाश्रम व रुग्णालय परिसरात हा सोहळा संपन्न झाला. माणुसकीची भिंत परिसरात स्वच्छता करून गोरगरीब निराधार वृद्धांची व पुरुषांची दाढी-कटिंग करण्यात आली. त्यानंतर महिलांनी काढलेल्या रांगोळ्यांनी अंगण सजले. पाट मांडण्यात आले. त्यानंतर माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांनी टोपी, टॉवेल, नारळ पेढा देऊन वंचितांना ओवाळले. त्यांच्या कुटुंबातील महिलांना साड्या देण्यात आल्या.

1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Oct 26, 2025 17:03:16
Kalyan, Maharashtra:राजू पाटील पॉइंटर कल्याण मध्ये मनसेच्या शाखेचे उद्घाटन ..मनसे नेते राजू पाटील यांच्या हस्त मनसेचे कल्याण शहर प्रमुख कौस्तुभ देसाई आणि त्यांच्या पत्नी माजी नगर सेवक कौस्तुरी देसाई यांच्या शाखेचे उद्घाटन यावेळी राजू पाटील यांनी भाजप सह एकनाथ शिंदे वर सडकून टीका केली आमचे मागचे शिलेदार यांच्या कार्यालयाचे उद्घाटन आम्ही सुरू करणार आहोत त्याची सुरुवात या ठिकाणहून झालेली आहे On मतदार यादी सगळीकडेच मतदार यादी मध्ये घोळ आहे.. मी स्वतः कल्याण ग्रामीण मधील दोन पॅनल ची चाचणी केली मतदार यादी मध्ये घोळ आहे कल्याण ग्रामीण मधील दिवा मधील दोन पॅनल मध्ये 16 हजार 7 98 दुबार मत मिळाली आहे.. त्यामध्ये एका माणसाची पाच मत आहेत ही लोकं खोटेपणा करून सत्तेत आलेले आहेत यापुढे त्यांनी खोटारडेपणा चालू नाही यासाठी एक तारखेला आम्ही मोर्चा देखील काढणार आहे निवडणूक आयोगाने सत्तावीस तारखेला पत्रकार परिषद घेतली तरी काही ते घोषणाही करतील *माझी सगळ्यांना आवाहन आहे की प्रत्येक मतदार यादी तपासून बघा बोगस मतदार असतील तर तुम्ही बॅलेट पेपर वरती घ्या किंवा ईव्हीएम वरती घ्या कोणी निवडी येणार नाही त्यामुळे याद्या फिल्टर करायचं काम करा* On आदित्य ठाकरे आमच्याकडे देखील मतदारांचा डाटा आम्हीही पत्रकार परिषद घेणार होतो.. हे सरसकट सगळ्या ठिकाणी झाले त्यामुळे त्याच्यात जास्त न जाता आम्ही मोर्चा काढून त्या मोर्चाचा आवाज गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचवणार ... याचा रिझल्ट चांगला येईल On एकनाथ शिंदे *माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सगळ्यांना चट्टेपट्टे सांगतात की मी परत मुख्यमंत्री होणार... याची चावल देवेंद्र फडणीस यांना लागली म्हणून ते त्यांनी स्पष्ट सांगितले की 2029 पर्यंत मीच आहे* *एकनाथ शिंदे यांनी आता चूप बसावं आणि लोकांना असे खोटेपणा दाखवून पक्षात घ्यायचं काम करू नये* On युती निवडणूक हे सत्तेचे वाटेकरी... एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास खात्याच्या माध्यमातून मुंबईची तिजोरी खाली केली ..सगळा पैसा एमएमआरडीएच्या खात्यात वळून.. त्यात मोठा भ्रष्टाचार केलाय.. तो मलिदा त्यांना दिसतो म्हणून ही भांडणं त्यांच्या सुरू आहे कल्याण अंबरनाथ उल्हासनगर सगळ्यात पालिकेत वाटोळ करून ठेवलं.. *विकासाचे डोंगर उभे करण्याच्या नादात रस्त्यात जे खड्डे पाडले त्या भ्रष्टाचाराची संधी मिळावी या साठी यांची चढाओढ आहे* On संभाजी महाराज रेल्वे स्टेशन नाव रेल्वे स्टेशनला त्रिभाषा सूत्र वापरतात ... रेल्वे पुरता आम्ही ते मान्य केलेला ... मध्ये शहरच नाव देखील आम्ही तो बदली करायला लावला *जिथे उर्दूमध्ये लिहिलं तिकडे कसला थारा द्यायला पाहिजे नव्हता.. तिकडे आमदार खासदार डुबलीकेट शिवसेनेचे आहेत ते करतात काय* *त्या ठिकाणी त्यांनी आवाज उठवला नाही तर आम्ही उठवणार आणि तो बोर्ड चेंज करणार* byte.. राजू पाटील मनसे नेते
1
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 26, 2025 15:18:29
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील बालापूर तालुक्यातील हातरूण गावात आज झालेल्या दुर्दैवी घटनेत एका आठ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. दुपारी वादळासह पाऊस आला असता मधुकर नारायण गावंडे यांच्या घराची भिंत कोसळली त्याच वेळी शेख हसनैन शेख बिस्मिल्लाह कुरेशी (वय ८) हा तेथून जात असताना भिंत त्याच्यावर कोसळली. गावकऱ्यांनी तात्काळ मदतीला धाव घेत हसनैनला बाहेर काढले आणि प्रथम स्थानिक रुग्णालयात तर नंतर अकोला जिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हसनैन हा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक उर्दू शाळेत तिसरीत शिकत होता. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून हातरूण गावात शोककळा पसरली आहे.
2
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Oct 26, 2025 15:18:01
Yavatmal, Maharashtra:मित्र पक्षांच्या गोष्टी पटतातच असे नाही, संसार करताना अडचणी येत असतात मात्र आपल्याला विरोधकांचा पराभव करायचा आहे मित्र पक्षांचा नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेत भगवा फडकवायचा आहे, विकासासाठी महायुती ची सत्ता आणायची आहे असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यवतमाळ मध्ये आयोजित शिवसंकल्प पदाधिकारी प्रशिक्षण शिबिरात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन करताना केले. खराब हवामानामुळे शिंदे यवतमाळ मध्ये पोचू शकले नाही, त्यामुळे त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केले. शिवसैनिकांनी मतदार यादी तपासल्या पाहिजे, हक्काचे मतदारांची नावे यादीत आहे की नाही ते बघितले पाहिजे, बोगस मतदार शोधले पाहिजे असेही आवाहन शिंदे यांनी केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. घरात बसून फोक्या मारणारा मुख्यमंत्री लोकांना आवडला नाही, घरात बसून काम करणारे मुख्यमंत्री लोकांनी घरी पाठविले, डबल ढोलकी वाजवीणारा घरी पाठवला, एका बाजूला काँग्रेसची तर दुसऱ्या बाजूला हिंदुत्वाची ढोलकी जे वाजवतात त्यांचं या दिवाळीनंतर लोक दिवाळं काढतील. अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. बाईट : एकनाथ शिंदे : उपमुख्यमंत्री
6
comment0
Report
SKSACHIN KASABE
Oct 26, 2025 15:02:43
Pandharpur, Maharashtra:कार्तिकी एकादशी पासून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनी आणि एका विद्यार्थ्याला विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजा वेळी सहभागी होण्याची संधी द्यावी अशी सूचना शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मंदिर समितीकडे केली आहे. याबाबत उद्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना सुद्धा भेटून माहिती देऊ असे मंत्री भुसे म्हणाले. विठ्ठळ रुक्मिणीच्या आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजा वेळी वारकरी दांपत्याला महापूजेमध्ये सहभागी होण्याची संधी मागील काही वर्षांपासून मिळत आहे आता याच वेळी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याला आणि एका विद्यार्थिनीला अशीच संधी मिळावी अशी मागणी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली आहे यामुळे नवा पेच निर्माण होऊ शकतो. एक नवा पायंडा यामुळे पडण्याची शक्यता आहे आणि यामुळे शासकीय महापजेवेळी गोंधळाची परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते
2
comment0
Report
ABATISH BHOIR
Oct 26, 2025 14:01:58
Kalyan, Maharashtra:डोंबिवलीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचं काम सुरु झालं, पण शुभारंभाच्या वेळीच राजकीय टोला झेलावा लागला! भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी मी राजीनामा दिल्यानंतरच कामाला सुरुवात झाली, प्रदेशाध्यक्षांचं कौतुक करतो. थेट आपल्या पक्षाच्याच जिल्हाध्यक्ष नंदू परब यांना कार्यक्रमात सुनावत टोला लगावला. या वक्तव्याच्या कारणाने डोंबिवलीच्या राजकारणात चर्चा झाली. काही दिवसांपूर्वी विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आता या प्रभागातच कामाला सुरुवात झाल्यानंतर विकास म्हात्रे यांनी रस्त्याच्या ठिकाणी भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांना भेट घेतली. सात वर्ष हा रस्ता व्हावा म्हणून आम्ही प्रयत्न केले आणि आता राजीनामा दिल्यानंतर त्यांना जाग आली यामुळे, प्रदेशाध्यक्षांचं कौतुक करतो असे सांगत रस्त्यातच टीका केली. या वक्तव्यानंतर भाजपच्या गोटात आणि स्थानिक राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. शुभारंभाच्या कार्यक्रमातच झालेल्या या विधानाने डोंबिवलीत राजकीय वातावरण तापलं आहे.
1
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 26, 2025 14:01:43
Chandrapur, Maharashtra:गडचिरोलीत रा. कॉ. अजित पवार गटाने दिवाळी संपताच जनकल्याण यात्रेचा दुसरा टप्पा सुरू केलाय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाची ताकद दाखविण्यासाठी माजी मंत्री आणि पक्षाचे माजी मंत्री आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी आयोजित केलेल्या वडसा येथील रोड शो आणि जाहीर सभेने महायुतीचे सहकारी आणि मविआतील पक्षांना देखील धडकी भरविली। गडचिरोली जिल्ह्यातील 2 प्रमुख आदिवासी नेते नंदू नरोटे आणि भानय्या जंगम यांचा धर्मराव आत्राम यांनी पक्षात पक्ष प्रवेश करविला. महायुतीच्या सहकारी पक्षांनी जागावाटप बोलणी करावी असे आवाहन मेळाव्यानंतर धर्मरावबाबा आत्राम यांनी केले。
1
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Oct 26, 2025 14:00:46
Jalna, Maharashtra:जालना | दिपावली स्नेहमिलन कार्यक्रमानिमित्त शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आले काँग्रेसच्या व्यासपीठावर... खोतकर काँग्रेसच्या व्यासपीठावर आल्याने चर्चांना उधाण... निवडणुकीच्या वातावरणात अर्जुन खोतकर काँग्रेसच्या व्यासपीठावर जातात याचे अनेक अर्थ काढले जातील: खोतकर ज्याला जो अर्थ काढायचा त्याने तो अर्थ काढावा, सर्व पर्याय खुले आहेत: खोतकर मी आज काँगेसच्या व्यासपीठावर आल्याने काही लोकांना भेद्रपान लागणार आहे: खोतकर यांचा रावसाहेब दानवे,कैलास गोरंटयाल यांना टोला निवडणुका येतील आणि जातील, पण जिल्ह्याचा आणि राज्याचा विकास झाला पाहिजे; खोतकर यांची भूमिका... सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत ठाम भूमिका घेतली पाहिजे: खोतकर चांगली माणसं स्थानिक स्वराज्य संस्थेवर गेली पाहिजे: खोतकर खोतकरांनी दिले निवडणुक निकालानंतर महाविकास आघाडी सोबत सत्ता स्थापनेचे संकेत *Sound byte*: अर्जुन खोतकर, शिवसेना आमदार, जालना
4
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Oct 26, 2025 13:50:11
2
comment0
Report
PNPratap Naik1
Oct 26, 2025 13:12:00
Kolhapur, Maharashtra:जयंत पाटील फलटण आणि खासदार लंके से जुड़ा मुद्दा - महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. पक्षातील नेते पुढारी वाचाळ पद्धतीने बोलून समाजात अशांतता निर्माण करत आहेत. जाती जाती धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचे पेव महाराष्ट्रात फुटलय. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या आदर्शाच्या नेमकं उलट आता महाराष्ट्र राज्य चाललं आहे. सरकारला कायदा सुव्यवस्था टिकवता आली नाही राज्यासाठी हा अडचणीचा काळ दिसतोय. राज्यातील जनता अतिवृष्टी आणि पुराला तोंड देत आहे. दुसरीकडे पोलिसांच्या अत्याचाराला देखील तोंड द्यावे लागतय. लोकांचे प्रश्न दुर्लक्षित करून नको त्या प्रश्नावर लोकांचे लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न राज्यकर्ते करत आहेत. जयंत पाटील राजकीय हस्तक्षेप विषयक - प्रत्येक गोष्टीत राजकीय हस्तक्षेप करण्याची प्रवृत्ती सातारा सांगली सोलापूर या भागात बळवली आहे. पोस्टमार्टमच्या रिपोर्ट साठी खासदार फोन करतात असा प्रकार तर व्हायचाच नाही. मात्र आता अशा गोष्टी सर्रास होत आहेत. राज्याच्या प्रमुखांसोबत फोटो काढायच आणि सगळ्या प्रशासकीय यंत्रणेवर दबाव आणायचा हे प्रकार सुरू आहेत. आता राज्याच्या प्रमुखांनी विचार करायला पाहिजे आपण कोणासोबत फोटो काढायचे. असे फोटो दाखवून प्रशासकीय यंत्रणा आणि पोलिसांवर दबाव आणण्याचा काही जणांचा उद्योग राज्यात सुरू आहे. मृत डॉक्टर महिलेने पोलिसाचं नाव हातावर लिहिलं होतं त्यामुळे पाच दहा मिनिटात त्या पोलिसाला ताब्यात घ्यायला हवं होतं. त्या पोलिसाला पळून जाण्याची व्यवस्था झाली. अतिशय गांभीर्याने हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न महाराष्ट्रात हाताळला जात नाही. जो शिरजोर आहे त्यालाच संधी जास्त असं सध्याचं राज्यातील चित्र आहे. निलेश लंके बाईट पॉईंट राज्याच्या राजकारणात गलिच्छपणा आला आहे. सध्या जातीभेद निर्माण करणारे राजकारणी पाहायला मिळत आहेत. नेते वाचाळ वीर झाले आहेत पोलिसांचा दबाव राहला नाही. या प्रवृत्तीला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारच थांबवू शकतो. लोकांचे संरक्षक म्हणूनच ज्यांच्याकडे पाहतो त्यांच्याकडूनच अशी कृत्य होत असतील तर त्याचा निषेध आहे. गृहमंत्र्यांनी अशा लोकांवर तात्काळ आणि कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Oct 26, 2025 13:03:44
Kolhapur, Maharashtra:आपला मावळा संघटनेच्या वतीने आज कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम केली. खासदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून राज्यातल्या गडकोट किल्ल्यांची स्वच्छता मोहीम केली जाते. आतापर्यंत 8 किल्ल्यांवर ही स्वच्छता मोहीम केली आहे.. यावेळी खासदार शाहू महाराज, आमदार जयंत पाटील यांनी उपस्थिती लावली. यावेळी फलटण घटनेवरून खासदार निलेश लंके आणि जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. जाती- जातीत लोकांना विभागण्याचे काम केलं जातं. अठरा पगड जातींना एकत्र घेऊन जाणारा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना जगभर ओळखलं जातं...सध्या राज्यात गलिच्छ राजकारण सुरू असल्याची टीका खासदार लंके यांनी केलीय.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 26, 2025 13:03:18
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यात महायुती होणार का नाही याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. एकीकडे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडून महायुती करण्यास तयारी दर्शवली आहे. परंतु भाजपकडून अजूनही याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही आहे. नंदुरबार जिल्ह्यात दोन भाजपाचे आमदार आहेत. त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाणार भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांची माहिती, गेल्या काही काळापासून नंबर एकच्या पक्ष म्हणून भाजप राहिला आहे दोन वेळेस भाजपाच्या खासदार निवडून आले आहेत तर जिल्हा परिषदेवर देखील भाजपाची सत्ता राहिली आहे त्यामुळे नंबर एकच्या पक्ष म्हणून भाजप मोठा भाऊ असून, अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे की भाजप स्वातंत्र लढली पाहिजे, मात्र याबाबत आम्ही जिल्ह्याची कोर कमिटी निर्णय घेऊन राज्यपातळीकडे पाठवणार आहेत आणि शेवटी वरिष्ठांच्या आदेशाच्या पालन करून निर्णय घेतला जाणार, मात्र आमच्या मित्र पक्षांकडून युती संदर्भात सकारात्मक भूमिका जाहीर केली आहे. राज्यात आमची महायुतीची सत्ता आहे तर देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आमची सत्ता आहोत त्यामुळे राज्य पातळीचे सर्व नेत्याची चर्चा करून आम्ही आमच्या निर्णय जाहीर करणार प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी युतीबाबत संभ्रम अशी भूमिका जाहीर केली आहे.
0
comment0
Report
Diwali 2025
Advertisement
Back to top