icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Nov 2024, 12:41 pm

यवतमाळ : पुसद मध्ये माणूसकीची भिंत फाउंडेशन ने वृद्ध, निराधार, बेघरांसोबत साजरी केली भाऊबीज

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळच्या पुसद येथे माणुसकीची भिंतच्यावतीने बेघर, निराधार, दिव्यांग, असहाय वृद्ध व अनाथांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. वृद्धाश्रम व रुग्णालय परिसरात हा सोहळा संपन्न झाला. माणुसकीची भिंत परिसरात स्वच्छता करून गोरगरीब निराधार वृद्धांची व पुरुषांची दाढी-कटिंग करण्यात आली. त्यानंतर महिलांनी काढलेल्या रांगोळ्यांनी अंगण सजले. पाट मांडण्यात आले. त्यानंतर माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांनी टोपी, टॉवेल, नारळ पेढा देऊन वंचितांना ओवाळले. त्यांच्या कुटुंबातील महिलांना साड्या देण्यात आल्या.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

मालेगांव के जळकू क्षेत्र में आंधी-बारिश से जलमग्न, फसलों को नुकसान

Nashik, Maharashtra:मालेगावच्या जळकूमध्ये ढग फुटी सदृश्य पाऊस. सर्वत्र पाणीच पाणी, पिकाचे नुकसान. पाऊस बरसल्याने बळीराजा सुखावला. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील जळकू परिसरात दुपारच्या सुमारास ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने सर्व परिसर जलमय झाला. नाशिकच्या पूर्व भागात कुठेच पाऊस नसताना फक्त जळकू येथे पावसाने धुवांधार बॅटिंग करीत सर्वत्र पाणीच पाणी करून टाकले. अचानक झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी शेताची माती वाहून गेली तर पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र असे असले तरी जोरदार झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
0
0
Report
Advertisement

सिंधुदुर्ग किले की दीवारों में बड़े भगदाड़, स्थानीय निवासी दुखी

Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दोन नंबरच्या बुरुजाला जवळजवळ ३ मीटर रुंदीचे मोठे भगदाड पडले. काही दगड हलल्यामुळे हे भगदाड पडल्याची माहिती किल्ल्यावरील रहिवासी असलेले मंगेश सावंत यांनी दिली आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीतील किल्ल्यांपैकी सिंधुदुर्ग किल्ला असून किल्याची तटबंदी ढासळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात बांधलेला हा एकमेव ऐतिहासिक किल्ला असूनही त्याची अशी अवस्था बघून दुःख आणि हताशपणा झाल्यासारखं वाटतं असल्याची प्रतिक्रिया किल्ल्यावरील रहिवासी मंगेश सावंत यांनी दिली. पुरातत्व विभाग या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत ढिसाळपणे वागत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
0
0
Report

ओशिवरा में दिनदहाड़े पत्नी की क्रूर हत्या, पति गिरफ्तार

Mumbai, Maharashtra:मुंबईच्या अंधेरी पश्चिमेतील ओशिवरा परिसरात कौटुंबिक वादाचे भीषण रूप पाहायला मिळाले. भररस्त्यात पत्नीच्या गळ्यावर धारदार चाकूने वार करून तिची हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरच घडली. हल्ल्यानंतर आरोपी पती फरार झाला होता. मात्र ओशिवरा पोलिसांनी अवघ्या काही तासांत त्याचा शोध घेत बेड्या ठोकल्या आहेत. पाहूया हा विशेष रिपोर्ट… १४ जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आदर्श नगर परिसरातील अस्ट्रר बिल्डिंगसमोर एक महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली. माहिती मिळताच ओशिवरा पोलीस ठाण्याचे बीट मार्शल पोलीस शिपाई आकाश बागल घटनास्थळी दाखल झाले. महिलेच्या गळ्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याचे दिसून आले. स्थानिक नागरिकांनी या महिलेची ओळख ३५ वर्षीय झुमरी धिरन पवार अशी पटवून दिली. तसेच तिच्यावर तिच्याच पतीने धारदार शस्त्राने हल्ला करून घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने झुमरी यांना निर्भया वाहनातून ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. प्राथमिक तपासात किरकोळ कौटुंबिक वादातून आरोपी धिरन पवार याने घरातील चाकूने पत्नीच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात बीएनएस कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर ओशिवरा पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू करण्यात आला. अखेर बेहरामबाग परिसरातून आरोपी धिरन पवार याला ताब्यात घेण्यात आले आणि १५ जुलै रोजी पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी त्याला अटक करण्यात आली. सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस निरीक्षक सचिन पाटील आणि ओशिवरा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने ही जलद कारवाई केली. हत्येमागील नेमके कारण आणि इतर कोणता हेतू होता का, याचा सखोल तपास आता ओशिवरा पोलीस करत आहेत. कौटुंबिक वादातून घडलेली ही निर्घृण हत्या पुन्हा एकदा वाढत्या कौटुंबिक हिंसाचारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. क्षणिक रागाने एका महिलेचा जीव गेला, तर तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.
0
0
Report
Advertisement

शिरूर के सणसवाडी में बिबटिया ने गोठे में घुसकर पक्षियों को मारा, इलाके में भय

Shirur, Maharashtra:Anc:पुन्हा एकदा बिबट्याची दहशत! शिरूर तालुक्यातील सणसवाडीत बिबट्याने थेट एका गोठ्यात घुसून शिकार केली आहे. मात्र, यावेळी बिबट्याचा एक वेगळाच प्रताप पाहायला मिळालाय. सणसवाडी येथील पैलवान बाबा दरेकर यांच्या गोठ्यात बिबट्याने मध्यरात्री हजेरी लावली. धक्कादायक बाब म्हणजे, गोठ्यात मोठ्या प्रमाणात पाळीव जनावरं असतानाही, बिबट्याने त्यांच्यावर हल्ला न करता तिथे असलेल्या पक्ष्यांवर ताव मारला. बिबट्याने पक्ष्यांची शिकार केल्याने आता परिसरात एकीकडे आश्चर्य, तर दुसरीकडे प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा गोठ्यातील वावर सीसीटीव्हीत कैद झाला असून, वनविभागाने तातडीने पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
0
0
Report

एमपीएससी की सभी परीक्षाएं ऑफलाइन हों; कांग्रेस का उपोषण खत्म, सीएम ने ऑनलाइन रोक हटाई

Navi Mumbai, Maharashtra:एमपीएससीच्या सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने व्हाव्यात या प्रमुख मागणीसाठी एमपीएससी कार्यालया खाली मागील 9 दिवसांपासून सुरु असलेले काँग्रेसचे बेमुदत साखळी उपोषण आज मागे घेण्यात आलेय. मुख्यमंत्र्यांनी एमपीएससीच्या ऑनलाईन परीक्षेला स्थगिती दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलेय. ऑनलाईन परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे आता जरी निर्णय मागे घेतला असला तरी यापुढे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत निर्णय घेत असताना सर्वांना विचारात घेऊन निर्णय घ्यावा अशी मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आबा दळवी केलेय..
0
0
Report

नाशिक: तीन प्रमुख आरोपी गिरफ्तार, 12 आरोपी सामने, जांच जारी

Nashik, Maharashtra:- तीन मुख्य आरोपींना ताब्यात घेतले आहे. - शहादा आणि इतर भागातून त्यांना आपण हेरून ताब्यात घेतले आहे. - राहुल भागडे, कैलास भागडे, आकाश भोईर हे तिघ आपण ताब्यात घेतलेले आरोपी आहे. - आधीचे नऊ आणि आज तीन असे बारा आरोपी आपण निष्पन्न केले आहे. - खून, चोरी यातले हे आरोपी आहे त्याचा तपास सुरू आहे - गुन्ह्यातील दुचाकी आणि चारचाकी कोणाची ही माहिती घेऊन कारवाई केली जाईल - ज्या ठिकाणी गुन्हा घडला तेथे जी पोलिस चौकी आहे तेथून पोलिस वाहन फिरते असते त्यातून पेट्रोलिंग केले जाते. मात्र पोलिसांच्या गस्तीने पर्यटकांची सुरक्षा केली जाते त्यावर आम्ही सजक राहून काम करत आहोत. - गुन्हा घडला तिथे आरोपींना नेले होते आणि पंचनामा देखील झाला आहे
0
0
Report
Advertisement

चंद्रपूर के बल्लारपुर में बस के ऊपर पेड़ गिरा; 40 यात्री सुरक्षित

Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1607ZT_CHP_TREE_COLLAPSE ( single file sent on 2C) टायटल:--- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात धावत्या बसवर  झाड कोसळले, तेलंगणा राज्य परिवहन बसमधील 40 प्रवासी थोडक्यात बचावले, चालकाच्या सतर्कतेमुळे एक मोठा अपघात टळला,  मुख्य रस्ता दीर्घकाळ झाला बाधित अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात तेलंगणा राज्य परिवहन प्रवासी बसवर अचानक एक मोठे झाड कोसळले. झाडाच्या मोठ्या फांद्यांनी सुमारे ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसची समोरची काच फोडली. सुदैवाने, चालक मल्लेश यादवने वेळीच ब्रेक लावल्यामुळे सर्व प्रवाशांचे प्राण वाचले. अपघातानंतर चंद्रपूर-तेलंगणा महामार्ग दीर्घकाळ बंद होता. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जेसीबी, क्रेन आणि कटरच्या मदतीने भलेमोठे झाड युद्धपातळीवर तोडण्याचे काम सुरू करण्यात आले. झाडाच्या मोठ्या फांद्या कापण्यात आल्या आणि तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. बाजूला असलेल्या सरकारी रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खोल खड्ड्यांमुळे झाडाची मुळ�े एका बाजूने कमकुवत झाली. स्थानिकांनी याबद्दल संबंधित विभागाला आणि कंत्राटदाराला वारंवार कळवले, मात्र कोणीही लक्ष दिले नाही. पावसानंतर, ते कमकुवत झालेले झाड अखेर आज  कोसळले. बाईट १) चालक, तेलंगणा परिवहन सेवा आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
0
Report

हिंगोली में भारी बारिश, हल्दी किसान परेशान, विक्रय पर असर

Hingoli, Maharashtra:आज पंधरा दिवसाच्या प्रतीक्षानंतर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे या पावसाचा फटका हिंगोलीत हळद उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून हळद मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली हळद भिजली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निष्काळजीपणामुळे लिलावा पूर्वीच हिंगोलीत शेतकऱ्यांची हळद पावसामुळे भिजली आहे.. बाजार समितीमध्ये बाजार समितीच्या नियोजन शून्य कारभारामुळे बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत यामुळे शेतकऱ्यांची हळद भिजली आहे... पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी में उद्योग मंत्री उदय सामंत का पत्र-विवाद: निधि-घटित आरोपों पर बयान

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..उद्योग मंत्री उदय सामंत On रवींद्र चव्हाण पत्र फॉर सचिन अहिर बंगला रवींद्र चव्हाण हे अलायन्समधील आहेत... सचिन अहिर यांच्या बाबतीत पत्र देनं ही अड्जस्टमेन्ट आहे.. त्यांनी सात कोटी रुपयांचा निधी रत्नागिरी नगरपरिषदसाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून आणला आहे... अलायन्समधील सहकाऱ्याच्या घरासाठी त्यांनी मागणी केली तर त्यात राजकीय काहीही नाही... रत्नागिरी शहरातील विकास कामाच्या निधीसाठी रवींद्र चव्हाण यांचं पत्र चालतं? तर महायुतीतील सहकाऱ्याच्या घरासाठी त्यांचे पत्र का चालणार नाही? अशी प्रतिक्रिया उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे *On तटकरे, पटेल आणि जयंत पाटील भेट आणि सुनेत्रा पवार अंधारात* याबाबत सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी खुलासा केलेला आहे.. प्रफुल्ल पटेल साहेब आणि तटकरे साहेब हे सुनेत्रा वहिनींना न सांगता मुख्यमंत्री यांना का भेटले हे मी सांगू शकत नाही...याबाबत ते दोघं किंवा सुनेत्रा वहिनी सांगू शकतात.... शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली आहे... शिवाय जयंत पाटील यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली... असं देखील उदय सामंत यावेळी म्हणाले *On श्रीकृष्ण 5 वेळा नमाज पठण करायचा* धर्मामध्ये वाद लागावे यासाठी हे विधान केलं गेलं आहे का? हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये वाद होण्यासाठी हे विधान केलं गेलं आहे... यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांनी केलेल्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो.. - उदय सामंत Byte - उदय सामंत, उद्योगमंत्री
0
0
Report

मालाड पूर्व: नकली डॉक्टरों के खिलाफ BMC की कड़ी कार्रवाई

Mumbai, Maharashtra:मुंबईतील मालाड पूर्व येथून मोठी बातमी समोर आली आहे. बनावट डॉक्टरांविरोधात आता बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) मोठी मोहीम सुरू केली आहे. वैध वैद्यकीय नोंदणी नसताना अॅलोपॅथिक उपचार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. मालाड पूर्व येथील सह्याद्री नगर परिसरातील कृष्णा क्लिनिकला बीएमसीने नोटीस बजावली आहे. बीएमसीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुलसीदास कान्तिलाल कारपे यांनी जारी केलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे की, कृष्णा क्लिनिकमध्ये वैध नोंदणीशिवाय अॅलोपॅथिक उपचार केले जात असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार करण्यात आलेल्या तपासात संबंधित व्यक्तीकडे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल किंवा इतर कोणत्याही मान्यताप्राप्त वैद्यकीय परिषदेकडील वैध नोंदणी नसल्याचे आढळून आले. बीएमसीच्या म्हणण्यानुसार, वैध एमबीबीएस किंवा एमडी पदवी तसेच अधिकृत वैद्यकीय नोंदणीशिवाय अॅलोपॅथिक उपचार करणे हे महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ॲक्ट, १९६१ आणि नॅशनल मेडिकल कमिशन ॲक्ट, २०१९ चे उल्लंघन आहे. आरोग्य विभागाने संबंधित व्यक्तीला तात्काळ अॅलोपॅथिक उपचार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आदेशाचे पालन न केल्यास संबंधिताविरोधात एफआयआर दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आवश्यक असल्यास संबंधित क्लिनिक सील करण्याचाही इशारा देण्यात आला आहे. बीएमसीने स्पष्ट केले आहे की, नागरिकांच्या आरोग्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. वैध नोंदणीशिवाय वैद्यकीय उपचार करणाऱ्यांविरोधातील कारवाई पुढेही सुरू राहणार आहे. आता नोटीस मिळाल्यानंतर संबंधितांकडून काय उत्तर दिले जाते आणि प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मालाड पूर्व परिसरात बीएमसीच्या या कारवाईमुळे वैध नोंदणीशिवाय वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
0
0
Report

जामखेड में संत वामनभाऊ महाराज के पालखी की पहली रिंगण, भक्तों की भारी भीड़

Ahilyanagar, Maharashtra:संत वामनभाऊ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पहिले रिंगण जामखेड येथे हजारो भाविक वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले...दोन अश्वांसह वारकऱ्यांनी मोठया उत्साहाने टाळ मृदंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष करीत पहिले रिंगण सोहळ्यात सहभाग घेतला...हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते...गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज शास्त्री महाराज लाखो वारकऱ्यांना समवेत घेऊन पंढरीच्या दिशेने दिंडी घेऊन निघाले आहेत...दरम्यान मोठ्या उत्साहात हा रिंगण सोहळा पार पडला.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top