icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Nov 2024, 12:41 pm

यवतमाळ : पुसद मध्ये माणूसकीची भिंत फाउंडेशन ने वृद्ध, निराधार, बेघरांसोबत साजरी केली भाऊबीज

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळच्या पुसद येथे माणुसकीची भिंतच्यावतीने बेघर, निराधार, दिव्यांग, असहाय वृद्ध व अनाथांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. वृद्धाश्रम व रुग्णालय परिसरात हा सोहळा संपन्न झाला. माणुसकीची भिंत परिसरात स्वच्छता करून गोरगरीब निराधार वृद्धांची व पुरुषांची दाढी-कटिंग करण्यात आली. त्यानंतर महिलांनी काढलेल्या रांगोळ्यांनी अंगण सजले. पाट मांडण्यात आले. त्यानंतर माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांनी टोपी, टॉवेल, नारळ पेढा देऊन वंचितांना ओवाळले. त्यांच्या कुटुंबातील महिलांना साड्या देण्यात आल्या.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

प engan्गली बीजेपी ने मोदी के इंधन बचाओ संदेश पर सायकल व ई बाईक रैली निकाली

Sangli, Maharashtra:पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून करण्यात आलेल्या इंधन वाचवण्याच्या आवाहानाला सांगली भाजपाने प्रतिसाद दिलाय,भाजपा नेत्या नीतीताई केळकर यांच्या नेतृत्वाखाली सांगलीमध्ये भाजपाच्यावतीने सायकल व इलेक्ट्रिक बाईक रॅली काढण्यात आली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. शहरातला पुष्पराज चौक पासून प्रमुख मार्गांवरून ही सायकल व इलेक्ट्रिक बाईक रॅली काढत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या अहवानानुसार पर्यावरण आणि इंधन वाचवा असा संदेश देण्यात आला आहे,पंतप्रधान मोदींच्या आवाहनानुसार महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या ताफयातील वाहन कमी करण्यात आले असल्यामुळे विरोधकांनी देखील, अशा परिस्थितीमध्ये कबा आरोप करणं सोडून साथ दिली पाहिजे, व काटकसरीने इंधन वापरण्याची गरज असल्याचे असं मत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
0
0
Report

सोलापूर में गंधक बॉक्स रखते समय विस्फोट, मालिक पर मामला दर्ज; एक घायल

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - गंधकाचा बॉक्स गाडीत ठेवताना झालेल्या स्टफ रकरणात गुन्हा दाखल सोलापुरात एअर गनच्या काडतूससाठी वापल्या जाणाऱ्या गंधकाचा बॉक्स गाडीत ठेवताना झालेल्या स्टफ रकरणात गुन्हा दाखलण्यात आलाय सहारा एअर गनचे मालक बाळासाहेब प्रभाकर फुले यांच्याविरोधात सोलापुरातल्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय सोमवार 11 मे रोजी एअर गनमध्ये वापरल्या जाणाऱ्या कॉन्सनट्रेटेड स्लफर अर्थात गंधकाचा बॉक्स ठेवताना खाली पडल्याने मोठा स्टफ झाला या घटनेत सहारा एअर गन दुकानात कामगार असलेले केदारनाथ छत्रे हे अत्यंत गंभीर जखमी झाले कामागराची सुरक्षिततेची कोणतीही खबरदारी न घेता त्याला स्टफक पदार्थ हाताळण्यास दिला त्यामुळे मानवी जीवितास धोका निर्माण झाल्याचा ठपका आरोपी बाळासाहेब फुले यांच्यावर ठेवण्यात आलाय
0
0
Report

वाशीम में रमेश टॉकीज परिसर में गुप्तधन के लिए अवैध खोदाई: 6 गिरफ्तार, मेटल डिटेक्टर जब्त

Washim, Maharashtra:अँकर: वाशीम शहरातील बंद पडलेल्या रमेश टॉकीज परिसरात गुप्तधनाच्या शोधासाठी सुरू असलेल्या बेकायदेशीर खोदकामावर शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने सायंकाळी अचानक धाड टाकून 6 जणांना ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान गुप्तधन शोधण्यासाठी वापरण्यात येणारे मेटल डिटेक्टर मशीनही जप्त करण्यात आले. ताब्यातील व्यक्तींची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. मात्र, या प्रकरणात पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या प्रकरणात काही राजकीय व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त होत असून पुढील तपासाकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report
Advertisement

अकोला: जलरथ से पेड़ों को पानी देकर शहर को हरियाला बनाने का अनोखा प्रयास

Akola, Maharashtra:एकीकडे देशभरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबवले जात असताना दुसरीकडे लावलेल्या झाडांच्या संगोपनाकडे मात्र अनेकदा दुर्लक्ष होताना दिसते. अशा परिस्थितीत अकोल्यातील अकोला गार्डन क्लब या संस्थेने वृक्ष संवर्धनासाठी अनोखा पुढाकार घेतला आहे. गेल्या 52 वर्षांपासून पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या अकोला गार्डन क्लब तर्फे झाडांना पाणी देण्यासाठी फिरता ‘जलरथ’ तयार करण्यात आला आहे. अकोला शहरातील वाढते तापमान आणि उष्णतेची तीव्रता लक्षात घेता शहर पुन्हा हिरवेगार व्हावे, या उद्देशाने गार्डन क्लबचे सदस्य रस्त्याच्या कडेला, मोकळ्या मैदानात तसेच दुर्लक्षित ठिकाणी लावलेल्या झाडांचे संगोपन करत आहेत. पर्यावरणपूरक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या या विशेष रिक्षाच्या माध्यमातूनदररोज सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत शहरातील विविध भागांमध्ये जाऊन झाडांना पाणी दिले जाते.केवळ वृक्षारोपण न करता त्यांचे संवर्धन आणि जतन करण्यावर भर देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सध्या अकोल्यातील तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असताना “सर्वाधिक उष्ण शहर” अशी ओळख पुसून अकोल्याला हिरवे शहर बनवण्याचा निर्धार गार्डन क्लबने केला आहे.
0
0
Report

भंडारा PWD कार्यालय में बिजली बचत के बैनर के बावजूद अधिकारी कुलर-फैन-लाइट चालू

Bhandara, Maharashtra:भंडारा PWD कार्यालयात “वीज जपून वापरा” फलकांचा फज्जा. अधिकारी खुर्चीवर नसतानाही कुलर, फॅन आणि लाईट सुरूच. सरकारी कार्यालयातच विजेची उधळपट्टी. प्रश्न विचारताच संबंधित अधिकाऱ्यांचे मौन. “खर्रा खाऊन थुंकू नये, खाण्यास मनाई नाही”; अधिकाऱ्यांचे अजब उत्तर. गुटखा बंदीच्या फलकांनंतरही कार्यालयात सर्रास खर्रा सेवन. एकीकडे भंडारा येथील PWD विभागात “वीज जपून वापरा” अशा सूचना देणाऱ्या पाट्या लावण्यात आल्या आहेत. मात्र दुसरीकडेमार कार्यालयातील अधिकारी आपल्याच खुर्चीवर नसतानाही कुलर, फॅन आणि लाईट सर्रास सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले. शासनाच्या वीज बचतीच्या आवाहनाला अधिकारी-कर्मचारीच हरताळ फासत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, एकीकडे सामान्य नागरिकांना वीज बचतीचे धडे दिले जात असताना सरकारी कार्यालयातच विजेची उधळपट्टी होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत संबंधित अधिकारी भैसारे यांना विचारणा केली असता त्यांनी हसत मौन बाळगणे पसंत केले. तर दुसरीकडे कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर “तंबाखू, गुटका खाऊन थुंकू नये” अशा सूचना लावण्यात आल्या आहेत. मात्र त्याच कार्यालयात अधिकारी सर्रास खर्रा खाताना दिसून येत आहेत. याबाबत विचारणा केली असता “खर्रा खाऊन थुंकू नये असे लिहिले आहे, खर्रा खाण्यास मनाई नाही” असे अजब उत्तर संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.
0
0
Report
Advertisement

भीमा नदी पर 14 बैरेज बनाकर पानी आपूर्ति सुनिश्िचित करने का नया प्रस्ताव

Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीवर पाणी अडवण्यासाठी बॅरेज बांधा , अन्यथा जन आंदोलन उभं करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांनी दिला आहे. सध्या भिमा नदीतून शेती सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत नाही केवळ शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी पाणी सोडून त्या काळात वीज पुरवठा खंडित करण्याची पद्धत सुरु झाली आहे त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना शेती साठी पाणी उपलब्ध होत नाही. भीमा नदीवर 14 ठिकाणी बॅरेज बांधून घ्यावेत यामुळे शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल. पावसाळा शिवाय फक्त सोलापूर पंढरपूर शहरांना पिण्यासाठी पाणी नदीत सोडले जाते. इतर वेळी नदीत पाणी सोडले जात नाही. याचा फटका नदीकाठच्या शेतकऱ्यांना बसत आहे
0
0
Report

नाशिक में अगले दो दिन गर्मी चरम पर, पारा 45 डिग्री के आसपास

Nashik, Maharashtra:नाशिक जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्णतेचा तडाखा कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा इशारा. मालेगाव तालुक्यात तापमानाचा पारा सर्वाधिक ४३.८ अंशांवर पोहोचल्याने नागरिक घामाघूम. नाशिक शहरात सलग दुसऱ्या दिवशी ४१.२ अंश सेल्सिअस तापमानाची विक्र्रमी नोंद. वाढत्या उन्हामुळे निफाडच्या द्राक्षपंढरीत पिकांचे नुकसान, जिल्ह्याचे जनजीवन विस्कळीत. दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हाचा कडाका जास्त असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन. जळगावमध्ये पारा ४५.५ अंशांवर, तर विदर्भातील अकोल्यात ४५.६ अंशांची नोंद
0
0
Report

गोवा और महाराष्ट्र सीमा पर विदेशी शराब की अवैध ढुलाई पकड़ी, 1.47 करोड़ रुपये जप्त

Yeola, Maharashtra:गोवा राज्यात निर्मित व महाराष्ट्रात वाहतूक तसेच विक्रीस प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याच्या अवैध वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या येवला पथकाने धडक कारवाई केली. नंदुरबार जिल्ह्याकडे ट्रकमधून मोठ्या प्रमाणात मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर येवला विंचूर चौफुलीजवळ सापळा रचण्यात आला. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये सुमारे ५७ हजार ६०० प्लास्टिक विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. या कारवाईत वाहनासह विदेशी मद्यसाठा असा एकूण १ कोटी ४७ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतला आहे
0
0
Report
Advertisement

सातारा के महामार्ग 965D के रुंदीकरण में शिरवळ-लोणंद के पास अवैध पेड़ काटने का आरोप

Satara, Maharashtra:सातारा : शिरवळ-लोणंद-सातारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ डीच्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान शिवथर ते वाढे फाटा परिसरात नियमबाह्य वृक्षतोड झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांनी केला आहे. रस्त्याच्या हद्दीबाहेरील अनेक जुनी झाडे तोडण्यात आल्याने संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. महामार्गासाठी आवश्यक झाडतोडीची پرवानगी असतानाही अडथळा नसलेली झाडेही तोडल्याचा आरोप आहे. संबंधित ठेकेदाराने “झाडांचे पुनर्जीवन करण्यात येईल” असे स्पष्टीकरण दिले असले तरी पर्यावरणप्रेमींनी त्यावर टीका केली आहे. नव्याने लावलेल्या झाडांची देखभाल होत नसल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.
0
0
Report

पालघर किसान-आंदोलन: जल-जंगल-ज़मीन के अधिकार के लिए बड़े मोर्चे की आवाज

Palghar, Maharashtra:पालघर कडक उष्णीची पर्वा न करता हजारो शेतकरी, आदिवासी, महिला आणि युवकांनी पालघरमध्ये जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी एल्गार पुकारला. माकप आणि अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली पालघर प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. लाल झेंडे आणि जोरदार घोषणांनी पालघर शहर दणाणून गेले. यावेळी वनपट्टे, गायरान आणि सरकारी जमिनी कसणाऱ्यांच्या नावावर करण्याची मागणी करण्यात आली. तसेच विराज प्रकल्पाच्या दूषित सांडपाण्याविरोधात आणि एमआयडी मधील प्रदूषण थांबवण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.
0
0
Report

सोयाबीन पिक विमा प्रकरण: बीजेपी-शिवसेना में तीखी बहस, राठोड पर आरोप

Yavatmal, Maharashtra:सोयाबीन पिकाच्या विम्यापासून यवतमाळ जिल्ह्याला वगळल्याप्रकरणी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली आहे. भाजपने यासाठी शिवसेनेचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात टोकाची भूमिका घेत त्यांच्यावर टिकेची झोड उचलविली आहे. जिल्ह्यातील ३ लाख ६९ हजार ३६२ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २७ कोटी रुपये प्रीमियम भरला. यासोबतच केंद्र व राज्य सरकारने मिळून १०७ कोटी रुपयांचा हिस्सा अग्रिकल्चर इंशुरन्स कंपनी ऑफ इंडियााकडे जमा केला. मात्र एवढा मोठा निधी जमा होऊनही शेतकऱ्यांना फुटक्या कवडीचाही विमा लाभ मिळालेला नाही, ही अत्यंत गंभीर व संतापजनक बाब असून यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांच्या अक्षम्य दुर्लक्ष कारणीभूत आहे, ते उगाचच मुख्यमंत्री व केंद्र सरकारवर खापर फोडून शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत असा आरोप भाजप नेते देवानंद पवार यांनी केला आहे. पीक काढणी प्रयोगाच्या वेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी आवश्यक ती दक्षता घेतली नाही. त्यामुळे पालकमंत्री जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकारी हेच विमा न मिळण्यास कारणीभूत आहे. त्यांची भूमिका संशयास्पद असून या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी भाजपाने केली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने भाजपवर पलटवार केला. भाजप मध्ये आलेल्या उपऱ्या नेत्यांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रति द्वेषाचा चष्मा घातला आहे, भाजपला पिक विमा जाहीर होण्याची पद्धत समजत नाही, भाजपचे आरोप बघितले तर ते प्रधानमंत्री मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्र्यां विरोधातले आहे. त्यामुळे जाणून-बुजून पालकमंत्र्यांवर टीका कराल तर शिवसेना स्टाईल उत्तर मिळेल असा इशारा शिवसेनेचे संपर्कप्रमुख हरिहर लिंगनवार यांनी दिला आहे.
0
0
Report
Advertisement

जालना के जिला अस्पताल में MRI सेवा शुरू, मरीजों को मिली राहत

Jalna, Maharashtra:जालना : जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आता एमआरआय सेवा सुरू; रुग्णांना दिलासा. आमदार अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला शुभारंभ. अँकर : जालना जिल्हा रुग्णालयात मंगळवारपासून एमआरआय सेवा सुरू करण्यात आली आहे. शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सेवा सुरू करण्यात आली. या सेंटरचे उद्घाटन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न झाले. काही दिवसांपूर्वी मुंबई येथे आमदार अर्जुन खोतकर यांनी सार्वजनिक आरोग्य तसेच कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेतली होती. या बैठकीदरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे एमआरआय सेंटर उपलब्ध करून देणे, आधुनिक आरोग्य सुविधा वाढवणे तसेच नागरिकांना तातडीच्या वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली होती. या बैठकीनंतर तातडीने निर्णय घेत जिल्हा सामान्य रुग्णालयात आधुनिक एमआरआय मशीन मंजूर करण्यात आले. मंगळवारी या सेंटरचा शुभारंभ करण्यात आला.
0
0
Report

जालना: बदनापूर के कनारा बैंक में 7 करोड़ 31 लाख के अपहरण जैसा मामला, 17 दिन बाद मुख्य आरोपी समेत 5 गिरफ्तार

Jalna, Maharashtra:जालना : बदनापूरच्या कॅनरा बॅंकेतील 7 कोटी 31 लाखांचं अपहार प्रकरण, 17 दिवसांनी मुख्य आरोपीसह 5 जणांना अटक जालना : बदनापूरच्या कॅनरा बँक शाखेत ७ कोटी ३१ लाख रुपयांचा अपहार झाला आहे. याप्रकरणी बदनापूर पोलिसांनी मुख्य आरोपी आसाराम डोंगरे याच्यासह पाच जणांना अटक केली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल १७ दिवसांनी मुख्य आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. बँकेचा व्यवस्थापक आणि सुवर्णकार यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. पोलिसांना सुगावा लागू नये म्हणून तो हॉटेलऐवजी किरायाने एक रूम घेऊन तेथे राहत होता, कॅनरा बँकेच्या बदनापूर शाखेत झालेल्या अपहार प्रकरणात २५ एप्रिल रोजी बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याच दिवशी बँकेचा व्यवस्थापक विजेंद्र पाटणकर आणि सुवर्ण मूल्यमापक प्रवीण बुहांडे यांना अटक केली होती. या प्रकरणात थेट बँकेच्या तिजोरीतून सोन्याची पाकिटे चोरल्याचा आरोप असलेला मुख्य संशयित आरोपी संजय आसाराम डोंगरे हा फरार होता. बदनापूर पोलिसांनी संजय डोंगरे याच्यासह सचिन सानप सार्थक जाधव, रघुनाथ शिंदे, आणि शिवाजी दराडे या पाचजणांना अटक केली आहे.
0
0
Report

सिन्नर में फर्जी खातों से वित्तीय गड़बड़ी के आरोप, भोंदू अशोक खरात गिरफ्तार

Nashik, Maharashtra:न्यायालयीन कोठडीतून भोंदू अशोक खरातचा सिन्नर पोलिसांनी ताबा घेतला. जगदंबा पतसंस्थेतील फेक अकाउंट और आर्थिक व्यवहार प्रकरणी मोठी कारवाई. सिन्नरमध्ये दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी न्यायालयाकडून ताब्याला मंजुरी. उशिरा रात्री पोलिसांनी खरातला अधिकृत ताब्यात घेतले. बनावट खात्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहाराच तपास वेगात. उद्या सिन्नर न्यायालयात हजर करत पोलिस कोठडीची मागणी होणार. एका मागोमाग एक गुन्ह्यांनी खरातच्या अडचणी वाढतच चालल्या. भोंदूगिरीनंतर आता आर्थिक व्यवहारांचाही फास आवळू लागला
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top