icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Nov 2024, 12:41 pm

यवतमाळ : पुसद मध्ये माणूसकीची भिंत फाउंडेशन ने वृद्ध, निराधार, बेघरांसोबत साजरी केली भाऊबीज

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळच्या पुसद येथे माणुसकीची भिंतच्यावतीने बेघर, निराधार, दिव्यांग, असहाय वृद्ध व अनाथांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. वृद्धाश्रम व रुग्णालय परिसरात हा सोहळा संपन्न झाला. माणुसकीची भिंत परिसरात स्वच्छता करून गोरगरीब निराधार वृद्धांची व पुरुषांची दाढी-कटिंग करण्यात आली. त्यानंतर महिलांनी काढलेल्या रांगोळ्यांनी अंगण सजले. पाट मांडण्यात आले. त्यानंतर माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांनी टोपी, टॉवेल, नारळ पेढा देऊन वंचितांना ओवाळले. त्यांच्या कुटुंबातील महिलांना साड्या देण्यात आल्या.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

मुंबई के पंचतारांकित होटल से करोड़ों के हवाला रैकेट का पर्दाफाश

Nashik, Maharashtra:भोंदू खरातचे 'पंचतारांकित' हवाला रॅकेट अँकर मुंबईत एका भोंदू बाबाच्या नावाखाली चालणाऱ्या कोट्यवधींच्या हवाला रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अशोक खरात नावाचा हा भोंदू मुंबईतील एका अलिशान पंचतारांकित हॉटेलमधून आपले काळे साम्राज्य चालवत असल्याचं समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या रॅकेटची पाळेमुळे थेट दुबईपर्यंत पसरल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पाहुयात आमचा हा खास रिपोर्ट. वरून भोंदूगिरीचा आव आणायचा आणि आतून कोट्यवधींच्या काळ्या पैशांची विल्हेवाट लावायची. अशोक खरात याच्या काळ्या कारभाराचा असाच काहीसा थरार आता समोर आला आहे. मुंबईतील एका हायप्रोफाईल पंचतारांकित हॉटेलमधून खरात आपले हवाला रॅकेट चालवत असल्याची खळबळजनक माहिती सूत्रांनी दिली आहे. हवाल्याच्या या खेळासाठी खरातने हॉटेलमध्ये चक्क एक 'विशेष सूट' कायमस्वरूपी बुक केली होती. या रूमचे दिवसाचे भाडे तब्बल २५ हजार रुपये होते. विशेष म्हणजे, वर्षाचे ३६५ दिवस ही रूम खरातच्या नावावर बुक असायची. याच आलिशान खोलीतून दिवसाला कोट्यवधी रुपयांची देवाण-घेवाण व्हायची. भोंदूगिरीच्या नावाखाली येणारे भक्त आणि हवाल्याचे एजंट यांचा येथे राबता असायचा. पतसंस्थांचा वापर करून त्याने हे गैरव्यवहार पचविले.. आंतरराष्ट्रीय स्तरावर या रॅकेटची लिंक लागल्याने तपासाची व्याप्ती वाढली आहे. आध्यात्मिक गुरु बनून फिरणारा अशोक खरात अखेर कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची चिन्हं आहेत. मुंबईतील या आलिशान हॉटेलमध्ये खरातला कुणाचे संरक्षण होते? आणि या हवाला रॅकेटमध्ये अजून किती बडे मासे सामील आहेत? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. खरातच्या या आलिशान साम्राज्याचा पर्दाफाश झाल्याने गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे. आता तपास यंत्रणा दुबई कनेक्शनचे धागेदोरे कसे शोधतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report

दापोली बाजार में आग: पांच दुकाने जलकर खाक, लाखों का नुकसान

Ratnagiri, Maharashtra:दापोली - रत्नागिरी.. दापोली बाजारपेठ आगीच्या भक्ष्यस्थानी.. ५ दुकाने जळून खाक, लाखो रुपयांचे नुकसान.. अँकर रत्नागिरीच्या दापोली शहरातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे.दापोलीतील गजबजलेल्या बाजारपेठेत शनिवारी रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.. या आगीत पाच दुकाने जळून खाक झाली असून व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.. रात्री साडेदहाच्या सुमारास हॉटेल सन्मान समोरील बिपिन कॉर्नर परिसरात ही आग भडकली.. आगीच्या विळख्यात मोबाईल शॉपी आणि ज्वेलरी शॉपसह एकूण पाच दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत.. शिवसेना शाखेजवळील दुकानांतून धूर निघताना दिसताच स्थानिक तरुणांनी आणि नागरिकांनी तात्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले.. सुदैवाने या भीषण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.. रात्रीच्या वेळी लागलेल्या या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते..
0
0
Report

लातूर: उदगीर में दो गुटों के बीच झड़प, पत्थरबाजी से पुलिस पर हमला; 47 गिरफ्तार

Latur, Maharashtra:लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातून रात्रीच्या सुमारास धक्कादायक घटना समोर आली आहे… उदगीर शहरातील एका शाळेजवळील मुसानगर परीसरात दोन गटांमध्ये वाद झाला होता. त्यामुळे त्या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर तणावाचे रूपांतर थेट दगडफेकीत झाले त्या दगडफेकीत पोलिसांवर आणि पोलिस गाडीवर दगडफेके झाले आहे त्यामध्ये पोलीस गाडीचे मोठं नुकसान झाले आहे तर एक पोलीस कर्मचारी ही जखमी झाला आहे… या प्रकरणी तब्बल ४७ जणांविरुद्ध उदगीर शहर पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे… सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे....
0
0
Report
Advertisement

मुंबई-गोवा राजमार्ग पर अज्ञात वाहन की टक्कर से छह महीने के बिबट़े की मौत

Ratnagiri, Maharashtra:लांजा - रत्नागिरी.. मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत ६ महिन्यांच्या बिबट्याचा मृत्यू अँकर.. रत्नागिरीच्या लांजा परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.मुंबई-गोवा महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका सहा महिन्यांच्या मादी बिबट्याचा मृत्यू झाला आहे. लांजा येथील एका कुक्कुटपालन केंद्राच्या बागेत या बिबट्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.. दुर्गंधी पसरल्यानंतर ही घटना उघडकीस आली. वनविभागाच्या अंदाजानुसार, २ ते ३ दिवसांपूर्वी महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाने बिबट्याला जोरदार धडक दिली. डोक्याला आणि कमरेला गंभीर दुखापत झाल्याने जखमी बिबट्याने बागेतच प्राण सोडले. पशुवैदैयक तपासणीनंतर वनविभागाने मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार केले असून,याप्रकरणी अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. रस्त्यावरील वेगाच्या मर्यादेमुळे निष्पाप वन्यजीवांचा बळी जात असल्याने आता हळहळ व्यक्त होत आहे..
0
0
Report

शिवाजी महाराज की मूर्ति बिना मंजूरी نصب, प्रशासन को कठिनाईजनक स्थिति

Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे विना परवानगी बसवण्याच्या घटन वारंवार घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) आमदार अभिजित पाटील यांच्या मतदारसंघात असे विना परवानगी पुतळे बसवण्याचा प्रयत्न सुरू आहे. काल मध्यरात्री पंढरपूर तालुक्यातील भोसे गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला आहे सुरवातीला मोडनिंब गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला. यानंतर अंजनगाव मध्ये बसवलेल्या पुतळ्यावरून चार दिवस वातावरण तणाव पूर्ण बनले होते. आता माढा विधानसभा मतदारसंघातील भोसे गावात पुन्हा आज मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा विना परवानगी बसवला आहे. आमदार अभिजीत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्याचा मुद्दा पुढे आणला होता. विना परवानगी पुतळे बसवत असल्याने कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होत आहेत. यामुळे पोलिसांचा ताण वाढत आहे
0
0
Report
Advertisement

युद्ध से भारतीय कांदे के निर्यात में बड़ी गिरावट, लागत बढ़ी, किसानों पर असर

Lasalgaon, Maharashtra:अमेरिका, इस्राईल और इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे आखाती देशांमध्ये होणारी भारतीय कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणात घटली असून मार्च २०२६ मध्ये निर्यात सुमारे ४५ टक्क्यांनी कमी झाली आहे. मार्च २०२५ मध्ये ६०० कंटेनरद्वारे निर्यात झाली होती, तर यंदा ती केवळ ३५० कंटेनरपर्यंत मर्यादित राहिली. कंटेनर वाहतुकीचे भाडे ६००–७०० डॉलरवरून तब्बल ६५०० डॉलरपर्यंत वाढल्याने निर्यात खर्चिक बनली आहे. निर्यात घटल्याचा परिणाम लासलगाव बाजार समितीतील कांदा दरावर दिसून आला असून उन्हाळी कांद्याला जास्तीतजास्त १५०० रुपये प्रति क्विंटल तर लाल कांद्याला १४१७ रुपये दर मिळाला. गेल्या वर्षी याच काळात अनुक्रमे २६२७ व ३१०१ रुपये दर मिळाले होते. दर घसरल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून कंटेनर भाडे नियंत्रणात आणून कांदा निर्यातीला किमान १० टक्के सबसिडी द्यावी, अशी मागणी निर्यातदारांकडून करण्यात आली आहे.
0
0
Report

कृष्णा नदी पर अखिल भारतीय कनोईंग-कयाकिंग स्पर्धा का शुभारम्भ, 40 विश्वविद्यालयों के 685 खिलाड़ी

Sangli, Maharashtra:अँकर - सालीच्या कृष्णा नदीमध्ये आता बोटीच्या शर्यतींचा थरार आज पासून रंगला आहे.अखिल भारतीय अखिल भारतीय कनोईंग व कयाकिंग स्पर्धांना आज पासून सुरुवात झाली आहे.सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या राष्ट्रीय स्पर्धांचा शुभारंभ झाला आहे.या स्पर्धेसाठी देशातील 40 विद्यापीठ मधील 685 खेळाडूंना सहभाग घेतला आहे,सलग तीन दिवस कृष्णा नदीमध्ये या स्पर्धा संपन्न होणार असून भारतीय विद्यापीठे महासंघ (ए.आय.यू.) आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धांचा आयोजन करण्यात आले आहे.या उद्घाटनाच्या बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, क्रीडाक्षेत्र हा करिअरचा सक्षम पर्याय म्हणून सामोरा येत असून महाराष्ट्र शासनाच्या सकारात्मक व कृतिशील धोरणामुळे येथील राज्यातील क्रीडापटूंना स्थैर्य आणि सन्मान प्राप्त होत आहे.
0
0
Report
Advertisement

नांदेड में हत्या-घटना के बाद प्रशासन सतर्क, राजनीति में आरोप-प्रत्यारोप पुरानी रवायत

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - राजकारणात एकमेकांवर चिखलफेक करणे किंवा एकमेकांना टार्गेट करणे ही जुनी पद्धत आहे - अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण बाईट पॉइंटर्स राजकारणात एकमेकांवर चिखलफेक करणे किंवा एकमेकांना टार्गेट करणे ही जुनी पद्धत आहे, यात नवीन काहीच नाही ऑन विमान तपासणी एखाद्या घटनेचा निष्कर्ष काढण्यापूर्वी सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. चौकशीचा अहवाल समोर आल्याशिवाय घाईघाईने कोणतीही कारवाई करणे योग्य नाही ऑन चार्टर्ड विमानसेवा देशात सर्वत्र चार्टर्ड आणि कमर्शियल विमान सेवा उपलब्ध आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक असले तरी, तपासाअंतीच योग्य तो निर्णय घ्यावा ऑन नांदेड गुन्हेगारी घटना नांदेडमध्ये काल घडलेल्या घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील दोन्ही गट हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट होत आहे अशा हिंसक घटनांमुळे सामान्य जनतेत भीतीचे वातावरण निर्माण होते. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था चोख राखणे ही प्रशासनाची जबाबदारी असून पोलीस प्रशासन यावर लक्ष ठेवून आहे समाजात भीती पसरू नये आणि सुव्यवस्था टिकून रहावी यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न होणे गरजेचे आहे बाईट - अशोक चव्हाण ( माजी मुख्यमंत्री, भाजप नेते )
0
0
Report

रायगढ़ के पायथ्य हिरकणी वाडी में भीषण पानी की किल्लत, ग्रामस्थों को पानी खरीदना मजबूर

Chendhare, Maharashtra:किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाडच्या हिरकणी वाडी येथील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे. गावातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटले आहेत तर बोअर वेल देखील कोरड्या पडल्या आहेत. ग्राम पंचायतीकडून आठवड्यातून एकदाच पाणी पुरवठा होतो. त्यामुळे विकतचे पाणी घेण्यावाचून ग्रामस्थांना पर्याय नाही. त्यासाठी 2 ते 3 हजार रुपये मोजावे लागत आहेत. मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांना पाणी पुरवणे अवघड झालं आहे. सरकार दरबारी व्यथा मांडूनही दखल घेतली जात नसल्याची ग्रामस्थांची खंत आहे.
0
0
Report

बीड़ के लिंबागणेश गाँव में पंप-विहिरी वायर चोरी से पानी सप्लाई प्रभावित

Beed, Maharashtra:बीड तालुक्यातील लिंबागणेश गावामध्ये ग्रामपंचायतीमार्फत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेतील विहिरीच्या मोटारीचे विद्युत वायर गेल्या दीड महिन्यात दोन वेळा चोरीला गेल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप आहे. गावाच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या या योजनेवर चोरीच्या घटनांमुळे परिणाम होत असून पाणी टंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला. तर वारंवार होणाऱ्या चोरीमुळे ग्रामपंचायतीवर मोठा आर्थिक बोजा पडत असून आतापर्यंत सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती सरपंचांकडून देण्यात आली. यापूर्वी झालेल्या चोरीबाबत नेकनुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, पुन्हा चोरी झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप पहायला मिळतोय तर एकाच ठिकाणी दोन वेळा चोरी करणाऱ्या चोरट्यांनी नेकनुर पोलिसांसमोर आव्हान उभ केलं आहे.
0
0
Report
Advertisement

अकोला में सम्राट अशोक के 2300वें जयंती पर विशाल रंगोली, ड्रोन से रिकॉर्डिंग

Akola, Maharashtra:सम्राट अशोक महान यांच्या २,३०० व्या जयंतीनिमित्त अकोल्यात एक अनोखा आणि आकर्षक उपक्रम राबवण्यात आला आहे. तिक्ष्णगत मल्टिपरपझ वेलफेअर सोसायटी अकोला यांच्या पुढाकारातून पंचशील नगर आणि न्यू तापडिया नगर परिसरातील चक्रवर्ती सम्राट अशोक प्रवेशद्वारासमोर तब्बल ३५०० स्क्वेअर फूट क्षेत्रफळाची भव्य महाकाय रांगोळी साकारण्यात आली.या रांगोळीचे ड्रोन चित्रीकरण विशेष आकर्षण ठरत असून नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. अडीच हजार वर्षांपूर्वी सम्राट अशोक यांनी अखंड भारतभर शांती, अहिंसा आणि धम्माचा संदेश दिला होता. त्यांच्या कार्याचा प्रभाव आजही कायम असून तो युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.या पार्श्वभूमीवर त्यांच्या विचारांचा गौरव करण्यासाठी आणि तरुणांना प्रेरणा देण्यासाठी ही भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. या उपक्रमाला अकोलेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आणि सम्राट अशोकांना अभिवादन केले.या महाकाय रांगोळीच्या निर्मितीसाठी कलाकार आणि स्वयंसेवकांनी तब्बल १६ तास अखंड परिश्रम घेतले. यामध्ये सुमारे दोन क्विंटल रंगांचा वापर करण्यात आला असल्याची माहिती आयोजकांनी दिली.रांगोळीत सम्राट अशोक यांची प्रतिमा, धम्मचक्र (अशोक चक्र) तसेच बौद्ध धम्माचा अहिंसेचा संदेश प्रभावीपणे साकारण्यात आला आहे.
0
0
Report

Shirdi-Nashik: 132 खातों में करोड़ों के संदिग्ध घोटाले, ED की एंट्री की संभावनाएं

Shirdi, Maharashtra:भोंदू अशोक खरात प्रकरणात ED ची एन्ट्री होणार...? महिला अत्याचारानंतर खरात याचे कोट्यवधींचे व्यवहार आले रडारवर... नाशिक आणि शिर्डीतील मालमत्ता आणि 132 बँक खात्यांमधील कोट्यवधींचे व्यवहार यंत्रणांच्या रडारवर... अशोक खरात नॉमिनी असणारी समता पतसंस्थेत 100 तर जगदंबा पतसंस्थेत 32 खाती... या 132 खात्यांमधून कोट्यवधींचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे उघड... जगदंबा पतसंस्थेत इतर लोकांचे कागदपत्र वापरून खरात स्वतः 32 खाती ऑपरेट करत असल्याचे पतसंस्थेचे व्यवस्थापक अविनाश कांडेकर यांची कबुली... तर समता पतसंस्थेतील 100 खात्यांमध्येही मोठे गौडबंगाल असण्याची शक्यता... कोट्यवधींच्या संशयास्पद व्यवहारांमुळे अशोक खरात प्रकरणात ED ची एन्ट्री होण्याची शक्यता....
0
0
Report

नितेश राणे के बयानों पर राजासिंह बोले: मदरसे बंद करो और औरंगजेब कब्र के मुद्दे पर विवाद

Nanded-Waghala, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_Rajasinh Feed on - 2C ------------------------------- Anchor - मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्याला माझे समर्थन आहे. महाराष्ट्रातील सगळे मदरशे बंद करा. महाराष्ट्राच्या मदरशामध्ये देश विघातक शिक्षण देत आहे त्यामुळे मदरशे बंद करा. अनाधिकृत मदरशे बंद करण्या पेक्षा उध्वस्त करा असे वक्तव्य हैद्राबादचे आमदार टी राजासिंह यांनी केले. नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे काल रात्री आयोजित धर्मासभेत त्यांनी हे वक्तव्य केले. आपल्या महाराष्ट्रात बुलडोजरचा नियम लागू झाला आहे. जर मदरशे बंद केले तर पुन्हा चालू होईल, त्यामुळे अनाधिकृत मदरशावर बुलडोजर चालवण्याची गरज आहे. दाऊद इब्राहिम आणि अफजल कसाब अश्याच मदरशातून तयार झालेत. मदरशामध्ये शिकवलं जाते हिंदुची हत्या करा. नितेश राणेना माझे निवेदन आहे तुम्ही बोललेल्या वक्तव्याची अमलाबजावणी करा असे राजासिंह म्हणाले. Sound Byte - आ. टी. राजासिंह. --------------------------- औंरंगजेबची कबर उखाडून शौच्छालय बांधा Anchor - मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना औरंगजेबची कबर हटवण्यासाठी भीती का वाटतं आहे. तुम्हाला वाटते की तुम्हाला मतदान मिळणार नाही, ते तुम्हाला मतदान करणार नाही हे लिहून घ्या..मुख्यमंत्री यांना निवेदन आहे महाराष्ट्रच्या हिंदू यांना वाटत आहे औरंगजेबची कबर उखडून तिथे शौच्छालय बांधा असे वक्तव्य आमदार टी राजासिंह यांनी केले. औरंग्याची कबर महाराष्ट्रासाठी नको आहे. माझ्या संभाजी राजाला हळहळ करून मारलं. ती कबर उखडवन्यासाठी मावळे हवी असेल तर लाखो ने येऊ असे राजासिंह म्हणाले. Sound Byte - आ. टी. राजासिंह ------------------------------ घरात शस्त्र ठेवा Anchor - घरात शस्त्र ठेवा. देवाच्या गाभाऱ्यात शस्त्र ठेवणे कायदेशीर आहे. बाहेर काढून हल्ला केला तर तो वेगळा विषय आहे. जर युद्ध झाल शस्त्र नसतील तर, तुम्ही काय करणार. कस लढणार धर्मासाठी लढणाऱ्या लोकांनी बंदुकीचा परवाना घ्यावा. जिथे मदत लागेल तिचे आम्ही घेऊन देऊ. एका एका घरात पाच पाच बंदूक असली पाहिजे. देशद्रोही हल्ला करण्यासाठी आले, त्यांना गोळी मारण्यासारखे हत्यार राहिले पाहिजे असे आमदार राजासिंह म्हणाले. Sound Byte - आ. टी. राजासिंह
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top