Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : पुसद मध्ये माणूसकीची भिंत फाउंडेशन ने वृद्ध, निराधार, बेघरांसोबत साजरी केली भाऊबीज

Nov 03, 2024 12:41:05
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या पुसद येथे माणुसकीची भिंतच्यावतीने बेघर, निराधार, दिव्यांग, असहाय वृद्ध व अनाथांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. वृद्धाश्रम व रुग्णालय परिसरात हा सोहळा संपन्न झाला. माणुसकीची भिंत परिसरात स्वच्छता करून गोरगरीब निराधार वृद्धांची व पुरुषांची दाढी-कटिंग करण्यात आली. त्यानंतर महिलांनी काढलेल्या रांगोळ्यांनी अंगण सजले. पाट मांडण्यात आले. त्यानंतर माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांनी टोपी, टॉवेल, नारळ पेढा देऊन वंचितांना ओवाळले. त्यांच्या कुटुंबातील महिलांना साड्या देण्यात आल्या.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 17, 2026 09:49:32
Latur, Maharashtra:देशभरात “लातूर पॅटर्न”मुळे शैक्षणिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केलेल्या लातूर शहरात आता गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. औसा रोडवरील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय समोर duphachhada karta mare ani kevhicya pairat dharodar shastraane vaar kele aahe. या घटनेत तिघेजण जखमी आहेत तर त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. शैक्षणिक परंपरेसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरात दिवसाढवळ्या घडत असलेल्या अशा प्रकारामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या गुन्हेगारीवर प्रशासनाचे नियंत्रण आहे का ? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.... लातूर शहरात अनेक दिवसांपासून अशा प्रकारच्या घटना वाढताना दिसत आहेत. खून, मारामाऱ्या आणि हातात कोयते घेऊन फिरणाऱ्या टोळ्या सक्रिय झाले आहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वी रात्री शहरातील वैभव नगर परीसरातील गणेश मंदिराजवळ काही तरुण हातात कोयते घेऊन शिवीगाळ करत फिरत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्या घटनेनंतर अवघ्या काही तासांतच विद्यार्थ्यांच्या वादातून हा खून झाल्याने कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अधिक कडक आणि ठोस कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. लातूरकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सुरक्षिततेबाबत प्रशासनाने तातडीने प्रभावी पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एकूनच लातूर शहरात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत का? कॉलेज परिसरात पोलिस गस्त पुरेशी आहे का? ... धारदार शस्त्र विक्रीवर नियंत्रण आहे का?‌.. या प्रश्नांची उत्तरं आता प्रशासनाला द्यावी लागणार आहेत. लातूरकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. “लातूर पॅटर्न”ने देशभरात ओळख निर्माण केली… आता लातूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी “कडक ॲक्शन पॅटर्न”ची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा गंभीर घटना वाढत असल्यामुळे लातूर… शिक्षणाची पंढरी की गुन्हेगारीचं नवं केंद्र ? बनतय... हा सवाल आता प्रत्येक लातूरकराच्या मनात आहे....
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Feb 17, 2026 09:34:04
Dharashiv, Maharashtra:माजी मंत्री तानाजी सावंत यांना धक्का. आमदार तानाजी सावंत यांचे बंडखोर पुतणे धनंजय सावंत भाजप सोबत. भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडून आलेले पुतणे धनंजय सावंत भाजपसोबत कायम राहणार. तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांची भेट. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मुंबई येथील निवासस्थानी भेट. भेटीचा फोटो समोर , धनंजय सावंत यांच्यासह चारही अपक्ष उमेदवार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती. धनंजय सावंत यांनी माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात बंडखोरी करत लढवली होती जिल्हा परिषद निवडणूक. धनंजय सावंत यांना भाजपाने केले होते पुरस्कृत
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 17, 2026 09:33:23
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे जवळपास तीन महिन्यांचे पगार झालेले नसल्याने कर्मचारी संतप्त झालेत...वारंवार प्रशासनाला निवेदन देऊन विनंती करूनही पगार न झाल्याने कर्मचाऱ्यांनी उपोषण आंदोलनाचा इशारा दिलाय...पगार झाल्यास 2 मार्च पासून कर्मचारी उपोषण आंदोलन करणार आहेत...शनिशिंगणापूर देवस्थानचे कर्मचाऱ्यांचे कुटुंब हे पगारावरच चालत असल्याने त्यांना कुटुंब चालवणे अवघड झाले आहे अशी प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी दिलीये...त्यामुळे कामगारांच्या सीटू संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात येणार आहे...तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लेखाधिकाऱ्यांकडून तपासणी करून घेत असून त्यानंतर ज्या कर्मचाऱ्यांचा पगार करणं आवश्यक आहे त्यांचे पगार केले जातील...काही कर्मचाऱ्यांची सेवानियमाची निश्चिती नाही , पगाराची निश्चित नाही त्यामुळे काही अडचणी निर्माण झाले होते...या अडचणी दूर करूनच कर्मचाऱ्यांचे पगार केले जातील असं देवस्थानचे उपमुख्यकार्यकारी तथा उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांनी म्हंटले आहे..
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Feb 17, 2026 09:32:58
Baramati, Maharashtra:बारामतीत ब्लॅकमेलिंगमुळे तरुणाची आत्महत्या; पुण्यातील तिघांविरोधात गुन्हा दाखल. बारामतीतील रुई बयाजीनगर येथे लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक, ब्लॅकमेलिंग व मानसिक त्रास केल्याच्या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात पुण्यातील तिघांविरोधात गुन्हा नोंदवला गेला आहे. २३ वर्षीय विक्रम उर्फ बबलू नवनाथ कोळपे (रा. रुई बयाजीनगर, बारामती) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मामा सत्यवान आप्पा इंगळे यांनी फिर्याद दिली आहे. सृष्टी विकास मते, श्रृती विकास मते आणि आरोपी तरुणीचे वडील, विकास मते (पुणे पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक) यांच्या विरोधात कलम १०८, ३५१(२), ३५१(३), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला गेला आहे. मृत विक्रम आणि आरोपी सृष्टी मते यांचे गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते; सुरुवातीला लग्नाचे आमिष दर्शवून नंतर घरच्यांचा विरोध असल्याचे कारण देत लग्न नाकारले गेले. २७ डिसेंबर २०२५ पासून सृष्टी आणि तिची बहीण श्रृती यांनी विक्रमला सतत फोन करून मानसिक त्रास देणे व ब्लॅकमेल करण्याची प्रक्रिया सुरू केली. पुण्यात बोलावून धमकी देण्यात आली व मोबाईलमधील फोटो व चॅटिंग डिलीट करण्यासाठी दाबा दिला., जीवे मारण्याची धमकीही दिली गेली. सृष्टीचे वडील विकास मते यांनी विक्रमच्या नातेवाईकांना फोनवरून दमदाटी करण्याचा आरोप आहे. सुसाईड नोटमध्ये छळाचा उल्लेख असल्याचे तपासात समोर आले आहे. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी विक्रमने राहत्या घरी किचनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत, “आई मला माफ कर… मला ब्लॅकमेल केले असून खूप मानसिक त्रास दिला जात आहे, त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे,” असे उल्लेख आहेत. पोलिसांनी सुसाईड नोट, कॉल रेकॉर्ड व मोबाईल डेटा तपासण्यासाठी जप्त केला आहे. घटनेनंतर आरोपी फरार असल्याची माहिती संचित झाली आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Feb 17, 2026 08:51:16
Satara, Maharashtra:सातारा : साताऱ्यातील माहुली गावातील घरात विनय कुंभारे यांच्या घरात साहित्याची आवरआवर करताना मोडी लिपीतील कागदपत्रांचा गठ्ठा सापडला आहे. ही कागदपत्रे छत्रपती थोरले शाहूमहाराज, महाराणी ताराबाई यांच्यासह पेशवे यांच्या वतीने वेदशास्त्री कुंभारे शास्त्री यांना पाठविली आहेत. यामुळे माहुली गावाबाबत आणखी ऐतिहासिक माहिती समोर आली असल्याची माहिती त्यांचे वंशज विनय कुंभारे, डॉ. संदीप श्रोत्री, इतिहास संशोधक अॅड. सौरभ देशपांडे यांनी दिली.विनय कुंभारे यांना, 'घरात मोडी लिपीतील कागदपत्रांचा गठ्ठा सापडल्यानंतर त्यातील पत्रांमध्ये छत्रपती शाहूमहाराजांचे हस्ताक्षर आणि मुद्रा असणारी पत्रे,महाराणी ताराराणी,औंध पंतप्रतिनिधी,दुसरे बाजीराव पेशवे यांचे दस्तऐवज सापडली आहेत. शाहू महाराजांच्या हस्ताक्षर पत्राच्या शेवटी असून, शेवटी 'जाणिजे लेखनालंकार' असे त्यांच्या हस्ताक्षरात नमूद केले असल्याची माहिती विनय कुंभारे यांनी दिली.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 17, 2026 08:35:44
Akola, Maharashtra:‘‘जोड्या देवाच्या घरात बनतात’’ असं म्हणतात, आणि त्याची प्रचिती देणारी एक सुंदर प्रेमकहाणी सध्या अकोल्यात चर्चेचा विषय ठरली आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र यांचं ऐतिहासिक नातं तर जुनंच, पण आता एका लग्नामुळे हे नातं अधिक घट्ट झालं आहे. मध्यप्रदेश के सिरोंज गावाच्या नयापुरा भागात राहणाऱ्या रेणुका नामदेव यांच्या कुटुंбийांचा आपल्या मुलीसाठी समविचारी आणि चांगल्या स्वभावाच्या जोडीदाराचा शोध सुरू होता. दुसरीकडे महाराष्ट्र राज्यातील अकोला येथील प्रतीक धानुका यांच्या कुटुंबीयांनाही संस्कारी आणि समजूतदार मुलीची अपेक्षा होती. विशेष म्हणजे रेणुकाची उंची केवळ 3 फूट 8 इंच तर प्रतीकची उंची 4 फूट 2 इंच असल्याने दोघांनाही योग्य जोडीदार निवडताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, म्हणतात ना ’इच्छा असेल तर मार्ग सापडतोच!’ दोघांनीही समाजमाध्यमांचा आधार घेतला आणि एकमेकांशी संवाद सुरू झाला. विचार जुळले, स्वभाव जुळले आणि नातं घट्ट होत गेलं. प्रतिक धनुका, नवरदेव प्रतिक सध्या पुण्यातील एका खासगी कंपनीत कार्यरत आहे, तर रेणुकाने एम.ए.पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने हा विवाह सोहळा पार पडला. अकोल्यात आयोजित झालेल्या त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला मोठ्या संख्येने नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होता. उपस्थितांनी नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. रेणुका नामदेव, नवरी. Final Vo : आज या अनोख्या विवाहाची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे, ही जोडी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणा असेल तर कोणतीही अडचण आड येत नाही, याचं हे जिवंत उदाहरण आहे.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 17, 2026 08:33:13
0
comment0
Report
KLKANHAIYA LAL SHARMA
Feb 17, 2026 08:08:36
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 17, 2026 08:04:52
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी न मागितल्यास काँग्रेस भवन पेटवून देऊ, सोलापुरात हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात सोलापुरात सकल हिंदू समाज आक्रमक - हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांच्याशी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटना आक्रमक - हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागितली नाही तर काँग्रेस भवन पेटवण्याचा इशारा - हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी - जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर एकत्रित येत नोंदवला निषेध
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Feb 17, 2026 08:04:19
Thane, Maharashtra:महाराष्ट्र राज्य रस्ते व विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या शहापूर-मुरबाड - खोपोली या मुख्य मार्गावरील कोळकेवाडी व दोनघरच्या दरम्यान म्हणजेच समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असल्याची बाब समोर आली असून, ठिकठికाणी रस्ता खचल्याने लोखंडी सळ्या (बार) उघड्या अवस्थेत बाहेर पडल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्य वाहन चालकांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. मागील आठ वर्षांपासून सुरु असलेल्या व अजातगायत पूर्ण न झालेल्या शहापूर - मुरबाड - खोपोली महामार्गावरील कोळकेवाडी - दोनघर दरम्यान असलेल्या महामार्गाचा काँक्रीट रस्ता तुटून आतमधील लोखंडी जाळी बाहेर आली आहे. या उघड्या सळ्यांमुळे दुचाकीस्वारांचे टायर फुटण्याची, वाहन घसरून अपघात होण्याचे प्रकार वाढत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी हा धोका अधिक वाढत असून, एखादा गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक होते. शाळकरी मुले, कामगार तसेच ग्रामीण भागातील नागरिक याच मार्गाचा वापर करतात. मात्र एमएसआरडीसी विभागाकडून दुरुस्तीबाबत अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली दिसत नाही. रस्त्यावरील भेगा व उघडे लोखंडी बार तातडीने काढून रस्ता दुरुस्त करावा अन्यथा एखाद्या जीवितहानी नंतरच प्रशासन जागे होणार का असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित एमएसआरडीसी विभागाने तातडीने पाहणी करून धोकादायक ठिकाणी तात्काळ सुरक्षितता उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 17, 2026 07:36:32
0
comment0
Report
Advertisement
Back to top