icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Nov 2024, 12:41 pm

यवतमाळ : पुसद मध्ये माणूसकीची भिंत फाउंडेशन ने वृद्ध, निराधार, बेघरांसोबत साजरी केली भाऊबीज

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळच्या पुसद येथे माणुसकीची भिंतच्यावतीने बेघर, निराधार, दिव्यांग, असहाय वृद्ध व अनाथांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. वृद्धाश्रम व रुग्णालय परिसरात हा सोहळा संपन्न झाला. माणुसकीची भिंत परिसरात स्वच्छता करून गोरगरीब निराधार वृद्धांची व पुरुषांची दाढी-कटिंग करण्यात आली. त्यानंतर महिलांनी काढलेल्या रांगोळ्यांनी अंगण सजले. पाट मांडण्यात आले. त्यानंतर माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांनी टोपी, टॉवेल, नारळ पेढा देऊन वंचितांना ओवाळले. त्यांच्या कुटुंबातील महिलांना साड्या देण्यात आल्या.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

गडचिरोली में नक्सली मुक्त घोषित: ऑपरेशन अंतिम प्रहार में 8 गिरफ्तार, 5 ने आत्मसमर्पण

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्हा सशस्त्र नक्षलमुक्त, 'ऑपरेशन अंतिम प्रहार' अंतर्गत ८ नक्षल्यांना अटक, ५ जणांचे आत्मसमर्पण, ६५ लाख रुपयांसह मोठा Shस्त्रसाठाही जप्त । अँकर: नक्षल चळवळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांनी राबविलेल्या 'ऑपरेशन अंतिम प्रहार' दरम्यान ৮ नक्षल्यांना अटक करण्यात आली असून, ५ नक्षल्यांनी आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. यामुळे गडचिरोली जिल्हा आता पूर्णत: नक्षलमुक्त झाला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक १० चा विभागीय समिती सदस्य राजू मंगू वेको आणि याच कंपनीची सदस्य असलेली त्याची पत्नी जन्नी उर्फ नगी येमला, कंपनी सदस्य जयराम गावडे, मुकेश अवलाम, विजय तामो, रजिता मडावी, ज्योती पोटावी आणि आमती पोडियाम यांचा समावेश आहे. या सर्वांवर एकूण ६४ लाख रुपयांचे बक्षीस होते. शिवाय त्यांच्याकडून ६५ लाख ३४ हजार रुपये एवढी रोख रक्कम आणि एके-४७, एसएलआर व अन्य बंदुकाही जप्त करण्यात आल्या आहेत. ७ फेब्रुवारी २०२६ ला भामरागड तालुक्याच्या सीमावर्ती भागातील फोदेवाडा गावानजीकच्या जंगलात झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला होता. त्याच्या हत्येेत अटकेतील काही नक्षल्यांचा सहभाग होता. यातील ४ जणांना तेलंगणातून, दोघांना कुमनार येथून आणि नैताळा येथून दोन जणांना अटक करण्यात आज संध्याकाळी पत्रकार परिषदेत सांगितलं. याच सोबत आज ५ जहाल नक्षल्यांनी पोलिस अधीक्षकांपुढे आत्मसमर्पण केलं. त्यात एक विभागीय समिती सदस्य, एक प्लाटून समिती सदस्य, एक क्षेत्रिय समिती सदस्य आणि दोन दलम सदस्यांचा समावेश आहे. शासनानं त्यांच्यावर एकूण ३८ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. मधु उर्फ राकेश वेळदा, जीवन उर्फ जग्गू मडकाम, रजनी उर्फ दुर्गा धुर्वा, मंगली कुरसाम, लक्ष्मी पुनेम अृशी आत्मसमर्पित नक्षल्यांची नावे आहेत. ८ नक्षल्यांना अटक आणि ५ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केल्यानं गडचिरोली जिल्हा आता नक्षलमुक्त झाल्याचं पोलिस अधिकारी यांनी सांगितलं. मात्र, यापुढं इतर राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी येऊ नये, यासाठी पोलिस सातत्यानं लक्ष ठेवून राहतील, असही त्यांनी स्पष्ट केलं.
0
0
Report

रत्नागिरी: 1 जून से यांत्रिक नौकाओं पर 61 दिन मछली पकड़ना बंद; पारंपरिकों को छूट

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी: १ जूनपासून यांत्रिक नौकांना मासेमारी बंदी; नियम मोडल्यास कठोर कारवाई.. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमानुसार यंदा १ जून ते ३१ जुलै २०२६ या ६१ दिवसांच्या कालावधींत राज्यातील सागरी जलधी क्षेत्रात यांत्रिक व यंत्रचलित नौकांना मासेमारी करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे... ही बंदी केवळ यांत्रिक नौकांसाठी असून पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर-यंत्रचलित नौकांना यातून सूट देण्यात आली आहे.. सर्व यांत्रिक नौकांनी १ जूनपूर्वी मासेमारी बंदरात परतणे बंधनकारक असून, बंदी काळात समुद्रात मासेमारी करताना आढळल्यास नौका व साहित्य जप्त करून कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.. तसेच या काळात अपघात झाल्यास कोणतीही शासकीय नुकसानभरपाई मिळणार नाही.. मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त सा.वि.कुवेसकर यांनी सर्व मच्छिमारी संस्था आणि नौकामालकांना या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे..
0
0
Report
Advertisement

वर्धा में घर के पास गांजा खेती पकड़ी, आरोपी गिरफ्तार

Wardha, Maharashtra:वर्धा घराशेजारी गांजाची शेती; आरोपी अटकेत वर्ध्यात अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेला वेग वर्धा जिल्ह्यातील हमदापुर येथे घराशेजारी गांजाची लागवड करणाऱ्या एका व्यक्तीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकून आरोपी प्रफुल तुळसीराम शंभरकर याला रंगेहात पकडले. पोलिसांच्या तपासात आरोपीने कोणतीही शासकीय परवानगी न घेता आर्थिक फायद्यासाठी गांजाची शेती केल्याचे निष्पन्न झाले. कारवाईदरम्यान गांजाची झाडे, पाने, फांद्या आणि मुळांसह जप्त करण्यात आली. जप्त गांजाचे वजन तब्बल ४ किलो ९२ ग्रॅम असून त्याची अंदाजित किंमत सुमारे ८२ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. वर्धा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी दहेगाव पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
0
0
Report
Advertisement
Advertisement

दिलचस्प खुलासा: विकास लवांडेवर हल्ल्याचा मुद्दा, पोलिस अद्याप अटक नाही — सरकारवर आरोप

Shirur, Maharashtra:राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका धार्मिक नेत्याने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेनंतर लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल होऊनही, चार दिवस उलटून गेले तरी अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. या संदर्भात स्वतः विकास लवांडे यांनी थेट सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सत्ताधारी पक्षाचे मंत्री आणि आमदार उघडपणे या गुन्हेगारांचे समर्थन करत असल्यामुळेच पोलीस कारवाई करत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणावर आणि त्यांना मिळणाऱ्या धमक्यांवर विकास लवांडे यांनी काय भूमिका मांडली आहे, पाहुयात...
0
0
Report
Advertisement

कल्याण में बाप-बेटे की टोली ने 12 घरफोड़ों का पर्दाफाश, 21 लाख सोने जब्त

Kalyan, Maharashtra:बाप लेकाची जोडिंनी घरफोडी करत घातला होता धुमाकूळ कल्याण महात्मा फुले पोलिसांनी ठोकल्या बेड्या १२ घरफोडयांची उकल करत २१लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत दोन बापलेकांच्या जोडीने घरफोडी करत कल्याण शहरात धुमाकूळ घातला होता. या बापलेकाच्या जोडींने कल्याण महात्मा फुले पोलिसांनी जेरबंद करून १२ घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आणले. या बाप लेकांच्या जोडीकडून पोलिसांनी तब्बल २१ लाखाचे सोने हस्तगत कलंय.या प्रकरणी विलास भालेराव त्याचा मुलगा कैलास भालेराव, तर दीपक जाधव आणि त्यांच्या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.घरांवर पाळत ठेवून बंद असलेल्या घरात जाऊन टोळी घरफोडी करत होते.कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी मोहने परिसरातून कैलास भालेराव आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच या दोघांनी उर्वरित साथीदारांची माहिती दिली आणि बाप-लेकांच्या या घरफोडी टोळीचा पर्दाफाश झाला.यात बाप रेकी करायचे आणि मुलं घरफोडी करायचे असा त्यांच्या घरफोडीची पद्धत ठरली होती.विलास भालेराव हा साफसफाईचे तर दीपक जाधव बिगारी कामगार करत असताना शहरात फिरत असयाचे.त्यावेळी ते बंद घरांची रेकी करायचे आणि मुलं जाऊन तर तिथे घरफोडी करायचे. चोरीतून मिळालेल्या पैशांत अल्पवयीन मुलं मौजमजा करत होते, तर चोरीतील सोन्याचे दागिने हि मुल विक्रीसाठी आपल्या वडिलांकडे देत होते.या टोळीने आणखी काही घरफोड्या केल्याचा संशय असून पोलीस पुढील तपास करत आहेत. Byte-अशोक होनमाने(Acp)
0
0
Report

केळवद में पेट्रोल पंप कर्मी पर चाकू से हमला, छह युवक गिरफ्तार

Nagpur, Maharashtra:नागपूर जिल्ह्यातील केळवद येथे गुंड प्रवृतीच्या युवकांनी पेट्रोल पंप कर्मचा-यावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडलीय. सावनेर-सौंसर महामार्गांवर असलेल्या पेट्रोल पंपावरील कर्मचा-यावर हा जीवघेणा हल्ला झाला..ही घटना CCTV त चित्रित झालीय. खुल्लक वादातून दोन मोटारसायकलवर आलेल्या 6 युवकांनी पेट्रोल पंपवरील कर्मचा-यावर चाकूने हल्ला करत गंभीर जखमी केले. रवि बांगडे असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी केळवद पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपींना अटक केली असून सहाही आरोपींना अटक झाली आहे त्यातील एक आरोपी अल्पवयीन आहे
0
0
Report

Lasalgaon के श्री शनिशंकर मंदिर में शनैश्वर जयंती के अवसर पर भक्तों की भारी भीड़

Lasalgaon, Maharashtra:अँकर:- लासलगाव येथील पुरातन श्री शनी मंदिरात शनैश्वर जयंती व शनी अमावास्यानिमित्त भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती मंदिर परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण पाहायला मिळात आहे शनैश्वर जयंतीनिमित्त श्रीराम मंदिर ट्रस्टच्या वतीने डॉ. श्री कैलास पाटील आणि शंतनू पाटील यांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आला गेल्या 117 वर्षांपासून सुरू असलेली परंपरा यंदाही मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडली यावेळी गावातून संबळ, ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने कावड मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक श्रीराम मंदिरापासून श्री शनी महाराज मंदिरापर्यंत मुख्य मार्गावरील मोठ्या उत्साहात पार पडली मिरवणुकीदरम्यान कावडधारकांचे महिला भक्तांनी विविध ठिकाणी पूजन करून स्वागत केले शनैश्वर जयंतीनिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमांमुळे लासलगावमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top