icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Nov 2024, 12:41 pm

यवतमाळ : पुसद मध्ये माणूसकीची भिंत फाउंडेशन ने वृद्ध, निराधार, बेघरांसोबत साजरी केली भाऊबीज

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळच्या पुसद येथे माणुसकीची भिंतच्यावतीने बेघर, निराधार, दिव्यांग, असहाय वृद्ध व अनाथांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. वृद्धाश्रम व रुग्णालय परिसरात हा सोहळा संपन्न झाला. माणुसकीची भिंत परिसरात स्वच्छता करून गोरगरीब निराधार वृद्धांची व पुरुषांची दाढी-कटिंग करण्यात आली. त्यानंतर महिलांनी काढलेल्या रांगोळ्यांनी अंगण सजले. पाट मांडण्यात आले. त्यानंतर माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांनी टोपी, टॉवेल, नारळ पेढा देऊन वंचितांना ओवाळले. त्यांच्या कुटुंबातील महिलांना साड्या देण्यात आल्या.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नेवासा: ज्ञानेश्वरी पालखी सोहळे में ज्ञानेश्वरी घाट नामकरण

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या नेवासा येथील ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी सोहळा हा अवघड असा इमामपूर येथील ज्ञानेश्वरी घाट चढून नगरकडे रवाना झालाय...संत ज्ञानेश्वर महाराजांनी नेवासा येथील पैस खांब मंदिरात ज्ञानेश्वरी लिहिली...त्याच मंदिरातून हा दिंडी सोहळा पंढरपूरकडे रवाना झालाय...विशेष म्हणजे वारकऱ्यांच्या आग्रहाखातर इमामपूरच्या घाटाचे आज ज्ञानेश्वरी घाट असे नामकरण करण्यात आले...हरिनामाचा गजर करत हे नामकरण पार पडले...यासाठी माजी राज्यमंत्री शंकरराव गडाख आणि यशवंत प्रतिष्ठान यांनी पुढाकार घेतला...शंकरराव गडाख, उदयन गडाख, हभप देविदास महाराज म्हस्के, हभप उद्धव महाराज मंडलिक हे यावेळी उपस्थित होते.
0
0
Report

शिवाजी की मूर्ति पर एंटी मुस्लिम दावे गलत, इतिहासकार बोले नहीं विरोधी

Nanded-Waghala, Maharashtra:Anchor - छत्रपती शिवाजी महारাজ की मूर्ती मे एंटी मुस्लिम अँगल देखणा सरासर गलत है. शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी नही थे. किसी भी इतिहासकार ने शिवाजी महाराज को अँटी मुस्लिम नही लिखा है. शिवाजी महाराज की सेना कई मुस्लिम बडे औदो पर थे. शिवाजी महाराज के कार्यालय मे उनके पास लागभग साडेतीनसो किले थे जीनमे से कई किलो पर मंदिरो के साथ मस्जिद पी थी. शिवाजी महाराज जिस तरह से अफगान यासाठी आक्रमणकारीओ के खिलाफ लढे वैसेही गोवा मे पोर्तुगीज के खिलाफ और अन्य लोगो के खिलाफ भी लढे एसी प्रतिक्रिया जाणकार लोगोने दि.
0
0
Report

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार का पाटण दौरा, पुनर्वसन तेज़ी से होगा

Varsoli, Maharashtra:Anchor : मावळ तालुक्यातील पाटण गावावर ओढवलेल्या दरड दुर्घटनेनंतर आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. दरड कोसळून उद्ध्वस्त झालेल्या घरांची पाहणी करत त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच या दुर्घटनेत सर्वस्व गमावलेल्या आणि तिकोने कुटुंबातील बचावलेल्या सदस्याची भेट घेऊन धीर दिला. यावेळी संपूर्ण पाटण गावाचे पुनर्वसन करण्यासाठी लवकरच मुंबईत उच्चस्तरीय बैठक घेऊन हा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ग्रामस्थांना दिले आहे. मावळ तालुक्यातील पाटण गावात दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज घटनास्थळी भेट देत नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. दरड कोसळून उद्ध्वस्त झालेल्या घरांची पाहणी करत त्यांनी प्रशासनाकडून बचाव आणि मदतकार्याची माहिती घेतली. तसेच दुर्घटनेत सर्वस्व गमावलेल्या तिकोने कुटुंबातील बचावलेल्या सदस्याची भेट घेऊन त्यांच्या सांत्वन केले.
0
0
Report
Advertisement

कंडोनियम के तहत कोई हमीपत्र नहीं, महासभा के निर्णय की पुष्टि

Navi Mumbai, Maharashtra:नवी मनपा प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झालेय. नवी मुंबई शहरात कंडोनियम अंतर्गत कामे करताना कोणत्याही सोसायटीला हमीपत्र देण्याची आवश्यकता नाही असा निर्णय महासभेने मंजूर केलाय. मात्र हा निर्णय प्रशासनाने मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला असल्याची माहिती समोर आल्याने सत्ताधारी प्रशासना विरोधात आक्रमक झाले आहेत. कंडोनियम अंतर्गत कामे करताना कोणतंही हमीपत्र देण्याची आवश्यकता नाही, सभागृहाचा निर्णय अंतिम राहील अशी अशी ठाम भूमिका यावेळी स्थायी समिती सभेत सभापती अशोक पाटील यांनी घेतलाय.
0
0
Report

शास्त्रीनगर अस्पताल के लिए भाजपा का शिष्टमंडल मुख्यमंत्री से मिलने की तैयारी

Kalyan, Maharashtra:भाजपाच्या शिष्टमंडळाने घेतली शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांची भेट, मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सिव्हिल रुग्णालयाची मागणी करणार - दीपेश म्हात्रे, Anc : सतत पडणाऱ्या पावसानंतर तो रवी उगवला, पण आमचा रवी उगवलाच नाही अशी बोचरी टीका मनसे नेते, माजी आमदार राजू पाटील, यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, यांच्यावर केली. या टिकेनंतर खडबडून जागे झालेल्या भारतीय जनता पार्टीने प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, यांच्या निर्देशानुसार शास्त्रीनगर रुग्णालयात जाऊन डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची भेट घेतली. Vo केडीएमसीच्या डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयात शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे, यांनी डॉक्टर नर्स आणि कर्मचारी यांना बेदम मारहाण केली. या प्रकारानंतर केडीएमसीच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत सत्ताधारी नगरसेवकांनी केलेल्या या गुंडगिरीवर सर्वच स्तरांतून टीका होत आहे. या घटनेनंतर सर्वच विरोधी पक्षांनी यांवर संताप व्यक्त करत सत्ताधारी शिवसेनेचा निषेध व्यक्त केला. तसेच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला होता. मात्र एवढं सर्व होऊन देखील डोंबिवलीचे स्थानिक आमदार आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, यांनी या प्रकरणाची दखल न घेतल्याचा आरोप मनसे नेते राजू पाटिल, यांनी केला. या आरोपांनंतर आज भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शास्त्रीनगर रुग्णालयात भेट देत डॉक्टरांशी संवाद साधत त्यांची बाजू जाणून घेतली. यावेळी भाजपचे सर्व नगरसेवक मिळून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन लवकरात लवकर या शहराला सिविल रुग्णालय द्या अशी मागणी करणार आहोत असल्याचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी सांगितले. तर मनसे नेते राजू पाटील यांनी केलेल्या टिकेबद्दल त्यांना विचारले असता, जे सूर्याकडे बघून थुंकतात त्यांचे काय होत ते तुम्हाला माहीत आहे. जे कधीतरी उगवतात त्यांच्याबद्दल मला टीका करायची नाही असे दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.
0
0
Report
Advertisement

मराठवाड़ा में सूखा गहराने से किसान बेहाल, Hingoli सहित खरीप फसलें डगमगा

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anchor : जुलै महिना अर्धा संपत आलय, तरीही आकाशातून पावसाचा थेंबही बरसलेला नाही. पहिल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरण्या तर केल्या... पण आता गेल्या आठ-दहा दिवसांपासून पाऊस पूर्णपणे गायब झाला आहे. त्यामुळे उगवलेली पिके आता डोळ्यांदेखत करपू लागली आहेत. एकीकडे पेरणी कमी तर दुसरीकडे ज्यांनी पेरणी कमी केली त्यांनी करावी कधी हा प्रश्न आहे.. त्यामुळं आगामी वर्षभराच्या उदरनिर्वाहाची चिंता आता बळीराजाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागली आहे. मराठवाड्यात निर्माण झालेल्या या गंभीर परिस्थितीवर पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट भेगाळलेली जमीन, अजूनही जमिनीला पकडून असलेली छोटी रोप हे सध्याचे मराठवाड्याचे चित्र आहे.. पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल आहे... मराठवाड्यातील हे आहेत हिंगोली जिल्ह्यातील ब्रह्मपुरी गावचे शेतकरी बलदेव शुक्ला. पाहिल्याच पावसात त्यांनी पाच एकर शेतात सोयाबीन आणि तुरीची लागवड केली, वर्षभराच्या उत्पन्नाची स्वप्नं जणू त्यांनी पेरली होती. मे महिन्यापासून मशागत, महागडं बियाणे, खतं आणि मजुरीवर त्यांनी हजारो रुपये खर्च केले. मात्र, त्यानंतर पावसाने अशी काही पाठ फिरवली की, आता उगवलेली पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या ४० वर्षांत अशी भयानक परिस्थिती फार कमी वेळा पाहायला मिळाली, असं इथले शेतकरी सांगतायत. आता पाऊस पडला नाही, पेरणी कशी करायची आणि ज्यांनी केली त्यांना दुबार पेरणीशिवाय पर्याय नाही. पण त्यासाठी पुन्हा बियाणं आणि खतांचा खर्च करायचा कुठून हाच मोठा प्रश्न आहे. Vo संपूर्ण मराठवाड्यातील शेतकऱ्यांची हीच अवस्था आहे डोळे आभाळाकडे लागले आहेत कधी येणार वरुणराजा याच प्रतीक्षेत आहेत...सगळ्यांना खरीप हंगाम वाया जाण्याची भीती वाटतेय... एकीकडे मुंबईसह राज्याच्या इतर भागांत मुसळधार पाऊस कोसळत असताना, मराठवाडा मात्र पाण्याच्या थेंबासाठी तरसतोय. पावसाची तूट तेरा टक्क्यांवर आहे तर संपूर्ण मराठवाड्यात अवघ्या 49 टक्के पेरण्या झाल्या आहेत... मराठवाडा खरिपाची आकडेवारी: एकूण खरीप क्षेत्र: ४९ लाख ७२ हजार ७६६ हेक्टर प्रत्यक्षात झालेली पेरणी: २४ लाख ५५ हजार १३३ हेक्टर (केवळ ४९%) अपेक्षित पर्जन्यमानात तूट: १३ टक्के तूट , वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ २२.३% पाऊस... विभागातील मुख्य पीक असलेल्या कापसाची पेरणी तर अत्यंत खालावली आहे. कपाशीची केवळ २३ हजार हेक्टरवर पेरणी झाली असून, पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओटी भरताना हात आखडता घेतला आहे. कडधान्याची (तूर, मूग, उडीद) केवळ ३२% तर सोयाबीनसह गळीत धान्याची ५४% पेरणी झाली आहे. मराठवाड्यात जिल्ह्यानुसार पेरणीची टक्केवारी पाहिली तर भीषणता अधिक स्पष्ट होते. सर्वाधिक ६३ टक्के पेरणी नांदेड जिल्ह्यात झाली आहे, तर सर्वात कमी म्हणजेच केवळ ३३ टक्के पेरणी लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात झाली आहे. या भागातील शेतकरी पेरणीचे धाडस करायलाही तयार नाहीत. छत्रपती संभाजीनगर: ५९% पेरणी जालना: ५८% पेरणी बीड: ४७% पेरणी परभणी: ४६% पेरणी हिंगोली: ४७% पेरणी राज्य सरकार ही यावर लक्ष ठेवून आहे, या मधल्या दिवसात थोडं प्रोटेक्टिव्ह इरिगेशन आपण देऊ शकलो तर अडचण येणार नाही असं मला मुख्यमंत्री म्हणाले तर अलनिनोमुळे पावसात तूट आणि डिस्टन्स राहणार आहे याची कबुलीही त्यांनी दिलीय.. लास्ट vo : पाऊस आज ना उद्या येईल, मात्र तोपर्यंत शेतकऱ्याच्या मनातील आशेचा अंकुर जळणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. पेरणी रखडली असली तरी त्याचा धीर सुटू नये, यासाठी तात्काळ मदतीचे हात पुढे येण्याची गरज आहे. शेवटी, शेतकरी जगला तरच देश जगणार, हे सत्य आपण विसरून चालणार नाही... हिंगोली हुन गजानन वाणी सह विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर...
0
0
Report

डोंबिवली डॉक्टर मारहाण केस: रमेश म्हात्रे के बेटे एक साल से फरार

Kalyan, Maharashtra:डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांचा मुलगा एक वर्षापासून फरार.. राजकीय दबावामुळे पोलीस पकडत नाहीत काम असा सवाल. रमेश म्हात्रे यांचा नगरसेवक पद रद्द करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली रमेश म्हात्रे यांना शासन पाठीशी घालते त्यांचा मुलगा प्रवीण रमेश म्हात्रे यांच्या विरोधात बनावट कागदपत्र बनवून अनधिकृत इमारत इमारत बांधल्याप्रकरणी विश्व नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे मात्र वर्षभर उलटूनही प्रवीण म्हात्रे हा फरार असून पोलीस तपास करत नाहीत रमेश म्हात्रे नगरसेवक असल्याने पोलीस त्यांच्या मुलाला पाठीशी घालतात रमेश म्हात्रे यांच्या विरोधात केलेले तक्रारीची दखल घ्यावी व त्यांचे नगरसेवक पद रद्द करा ...
0
0
Report
Advertisement

ATS ने महाराष्ट्र में 157 ठिकानों पर छापा; भट्टी से जुड़े लोग पूछताछ में

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:काही शॉट्स जोडले आहेत संभाजी नगरचे, इतर ठिकाणचे शॉट्स वापरा, बाईट्स नागपूर हुन आले आहेत, मिड पिटीसी पाठवला आहे... Anchor : राज्यात एटीएसना शुक्रवारी कारवाई करत तब्बल 157 ठिकाणी छापे घातले या छाप्यात पाकिस्तानचा गॅंगस्टर आणि सध्या दुबईतून ऑपरेट करत असलेला शहजाद भट्टी याच्या संपर्कात असलेल्या लोकांची चौकशी करण्यात आली या लोकांचे सगळे इलेक्ट्रॉनिक गॅजेट जप्त करण्यात आले आणि त्यातून काही महत्त्वपूर्ण माहिती मिळते का यावर पुढचा तपास अवलंबून असणार आहे मात्र याच लोकांवर कारवाई का केली पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट राज्यभर एटीएसचे छापासत्र, तब्बल 150 ठिकाणी कारवाई शहजाद भट्टी चे महाराष्ट्रातील नेटवर्क उध्वस्त करण्याचा प्रयत्न तरुणांना अमिश देऊन देशविरोधी कारवाई करण्यास प्रोत्साहित करण्याचा भट्टी चा धंदा पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात असलेल्या राज्यभरातील 112 जणांची एटीएसने टीम ने शुक्रवारी चौकशी केली. सकाळी सात वाजेपासून एटीएसच्या 14 युनिट्समधील 58 पथकांनी एकाच वेळी कारवाई करत 157 ठिकाणी छापेमारी केली. मरातवाड्यातही 14 ठिकाणी ही कारवाही करत 15 जणांची चौकशी करण्यात आली आहे... ही कारवाई पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध असलेल्या सोशल मीडिया नेटवर्कच्या तपासाचा भाग होता, शहजाद भट्टी फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि व्हॉट्सअपसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे भारतीय तरुणांशी संपर्क साधून विघातक कारवायांसाठी प्रवृत्त करण्याचा संशय आहे. या नेटवर्कमध्ये आबिद जाट ऊर्फ आबिद छल, अजमल गुजर, हम्माद मेमन, राणा हुसेन, अशरफ बशीर आलम यांच्यासह अन्य काही पाकिस्तानस्थित हँडलर्सचा सहभाग असल्याचाही यंत्रणांना संशय आहे त्यातून ही कारवाई करण्यात आली... नक्की कसा हेरायचा तरुण 18 ते 35 वर्ष वयोगटाचे तरुण हे खास टार्गेट वर असायचे, त्यांना एक टीम हेरून त्यातील कोण जाळ्यात येऊ शकते याचा अभ्यास केला जायचा अनेक तरुण दिवसातील बराच वेळ मोबाईल वर घालवतात, त्यात भट्टी आणि इतर संबंधित लोकांच्या पोस्ट कोण जास्त पाहतो, like करतो share करतो अशा लोकांना तो हेरायचा कुणी समाज माध्यमावर काही वेगळी पोस्ट केली, याबत दुःख व्यक्त केले ही लोक टार्गेट व्हायची, याना समाज माध्यमातून हेरून संपर्क केला जायचा आणि त्यांना सुरुवातीला गोड बोलून नंतर काम दिले जायचे, धार्मिकदृष्ट्या संवेदनशील विषयांचा आधार घेऊन तरुणांचे कट्टरपंथीकरण करण्याचा प्रयत्न करणे खास करून बेरोजगार तरुणांना पैशांचे आमिष दाखवून त्यांचा देशविघातक कारवायांसाठी वापर, गुप्त माहिती गोळा करणे, अमली पदार्थांची तस्करी, अवैध शस्त्रांची वाहतूक आणि स्थानिक पातळीवर स्लीपर सेल उभारण्याचे प्रयत्न या_netवर्कमार्फत करण्याचा प्रयत्न होता...याबाबत एटीएस आणि राज्य सरकार लक्ष ठेवून आहे कारवाईत अनेक गंभीर गोष्टी आढळून आलेले आहेत आणि या सगळ्यावर कडक कारवाई होईल असं सरकारने स्पष्ट केलं आहे... Byte देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री Byte पंकज भोयर, गृहराज्य मंत्री Vo 2... जो शहजाद भट्टी हे सगळं घडवून आणतोय तो आहे तरी कोण हेही पाहूयात कोण आहे शहजाद भट्टी शहजाद भट्टी हा पाकिस्तानी गँगस्टर आहे, सोशल मीडिया इन्फ्लुएनसर असण्यासोबतच पाकिस्तानच्या आय एस आय चा तो डिजिटल हँडलर आहे.. तो इन्स्टाग्राम, फेसबुक आणि यु ट्यूब वर 333 , 30 आणि 33 या बॅनर खाली काम करत असल्याचे आढळून आले आहे, तो स्वतःला राष्ट्राचा आवाज आणि समाज सेवक असल्याचे भासवतो... मूळ हा पाकिस्तान च्या पंजाब प्रांत चा रहिवासी आहे, पाकिस्तानात त्यावर चोरी , दरोडा आणि बलात्कार सारखे गुन्हे दाखल आहेत, पाकिस्तान मधून पळून तो दुबईत गेला आणि तिथं फारukh खोखर गॅंग च्या संपर्कात आला आणि आता तो दुबईतून आणि इतर काही देशातून आपलं नेटवर्क चालवतोय सध्या तो आयएसआयच्या थेट संपर्कात असल्याचा बोलवलं जातंय आणि दहशतवादी अजमल गुज्जर आणि अबिद भट यांच्या सहकार्याने भारतात शस्त्रास्त्र आणि ड्रग पुरवठा करण्यात सहभागी आहे मिड पिटीसी विशाल करोळे *हा भट्टी बिष्णोई गॅंग चा ही मित्र होता मात्र पहलगाम हल्ल्या नंतर यांचे फाटले, भट्टी वर पुर्तुगाल मध्ये बिष्णोई गॅंग ने हल्ला ही केला होता , भारतातील अनेक दहशतवादी कारवायत भट्टी याचा संपर्क आढळुन आला आहे, गोरगरीब मुलं हेरणे आणि त्यांना देश विरोधी कारवाया करायला लावणे हा याचा मुख्य धंदा आहे* Vo.. तासनतास अनेक मुलं मोबाईलवर असतात मात्र हे मुलं मोबाईलवर करतात काय कुणाच्या संपर्कात येतात याकडेही लक्ष देण्याचाचा अब असं?
0
0
Report

जालना में सोयाबीन पिक में हिरण भगाने के लिए किसान गावठी जुगाड़ अपनाने लगे

Jalna, Maharashtra:जालना : सोयाबीन पिकामध्ये हिरणांचा उच्छाद,हरणांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांकडून गावठी जुगाडाचा उपाय अँकर : जालना जिल्ह्यात हजारो हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी करण्यात आलीय. पिकाने जमिनीतून वर मान काढताच कोवळ्या सोयाबीन पिकावर हिरणांनी ताव मारायला सुरुवात केलीय. या प्रकाराला शेतकरी मेटाकुटीला आलाय. मात्र दिवसा आणि रात्रीच्या वेळेला हिरणा उभ्या पिकात नुकसान करत असल्यानं मेटाकुटीला या आलेल्या जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गावठी उपाय शोधले. घनसावंगी तालुक्यातील बोडखा बुद्रुक गावातील शेतकऱ्यांनी पिकातून हिरणांना पळवून लावण्यासाठी अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्यांना बिअर बाटली बांधल्या आहेत. वारा आल्यानंतर या बाटल्यांचं एकमेकांना घर्षण होऊन आवाज येतो. त्यामुळे हिरणा पिकातून पळ काढतात. तर काही शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी हिरण पिकावर ताव मारू नये म्हणून एका काठीला नायलॉनच्या दोरीने बॅटरी बांधली आहे. वाऱ्यांमुळे रात्रीच्या वेळी ही बॅटरी सर्व बाजूंनी फिरते. त्यामुळे शेतात शेतकरी असल्याचा भास हिरण प्राण्यांना होतो त्यामुळे हिरण पिकातून पळ काढतात आणि हिरणांमुळे नुकसान होत नसल्याचा दावा शेतकऱ्यांनी केलाय. तर काही शेतकऱ्यांनी कीटकनाशकांची बाटली कापून ही बाटली काठीला कापून जोडली आहे. वाऱ्यामुळे ही बाटली फिरून आवाज होतो. या आवाजामुळे देखील प्राणी पिकात येत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितलंय. तर काही शेतकऱ्यांनी वन विभागाने हिरणांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. बाईट : बाळासाहेब ढेरे,शेतकरी(काळा टी शर्ट) बाईट : रामभाऊ दहीभाते,शेतकरी, गुलाबी टी शर्ट बाईट : नारायण वाढेकर,शेतकरी, पांढरा शर्ट
0
0
Report
Advertisement

कोकण से पश्चिम महाराष्ट्र तक यातायात बंद; दराड़ गिरنے का खतरा, अंबेनळी-वरंध-तम्हिणी घाट बंद

Chendhare, Maharashtra:पश्चिम महाराष्ट्रात जाणारी वाहतूक ठप्प .......सर्व प्रकारची वाहतूक बंद .......सर्व घाट रस्त्यावर दरडी कोसळण्याचा धोका .......अँकर - मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका रायगड जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेला बसला आहे. वारंवार कोसळणाऱ्या दरडी याचं प्रमुख कारण आहे. कोकणातून महाबळेश्वरकडे जाणारा आंबेनळी घाट रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकिच्याासाठी बंद आहे. तर वराढ घाट आणि ताम्हिणी घाटातून देखील वाहतूक बंद करण्यात आली आहे त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी.
0
0
Report

आषाढ़ीवारी के मौके पर पंढरपूर डिपो में नई एसटी बसें पूजन के साथ शामिल

Pandharpur, Maharashtra:आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर आगाराला नव्या कोऱ्या एसटी बस मिळाल्या आहेत. आमदार समाधान आवताडे आणि राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत या नवीन एसटी बसचे पूजन करण्यात आले. यावेळी आमदारांसह अधिकाऱ्यांनी नव्या बस मधून फेरफटका सुद्धा मारला. ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांना अधिक चांगली वाहतूक सेवा मिळावी यासाठी राज्य शासन आणि परिवहन महामंडळ सातत्याने प्रयत्नशील आहे. नवीन बसमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि वेळेची बचत करणारा ठरेल असे मनोगत आमदार अवताडे यांनी व्यक्त केले
0
0
Report

सांगली में राम मंदिर चंदे चोरी के विरोध में कांग्रेस का टाळ-भजन प्रदर्शन

Sangli, Maharashtra:स्लग -राम मंदिर चोरी प्रकरणी काँग्रेसचे सांगलीत टाळ-भजन आंदोलन.. अँकर - अयोध्यातील राम मंदिर देणगी चोरी प्रकरण सांगलीमध्ये काँग्रेसकडून सत्याग्रह आंदोलन करण्यात आले आहे. सांगली मिरज रस्त्यावरील हनुमान मंदिरासमोर काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत व शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली टाळ-भजन आंदोलन करण्यात आले. राम मंदिर चोरी प्रकरणाचा निषेध नोंदवत भाजप सरकारचा निषेध नोंदवण्यात आला आहे,तातडीने याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी,अन्यथा काँग्रेसकडून पुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा देण्यात आला आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top