icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Nov 2024, 12:41 pm

यवतमाळ : पुसद मध्ये माणूसकीची भिंत फाउंडेशन ने वृद्ध, निराधार, बेघरांसोबत साजरी केली भाऊबीज

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळच्या पुसद येथे माणुसकीची भिंतच्यावतीने बेघर, निराधार, दिव्यांग, असहाय वृद्ध व अनाथांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. वृद्धाश्रम व रुग्णालय परिसरात हा सोहळा संपन्न झाला. माणुसकीची भिंत परिसरात स्वच्छता करून गोरगरीब निराधार वृद्धांची व पुरुषांची दाढी-कटिंग करण्यात आली. त्यानंतर महिलांनी काढलेल्या रांगोळ्यांनी अंगण सजले. पाट मांडण्यात आले. त्यानंतर माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांनी टोपी, टॉवेल, नारळ पेढा देऊन वंचितांना ओवाळले. त्यांच्या कुटुंबातील महिलांना साड्या देण्यात आल्या.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सोलापुर के भोंदू बाबा मनोहर भोसले गिरफ्तार: धोखाधड़ी और बलात्कार के आरोप

Pandharpur, Maharashtra:Solapur के_real_estate व्यवसायी को_fraud के_proceedings के_baad Bhondoo Baba Manohar Bhosale को Solapur Rural Police ने गिरफ्तारी की है। पूर्व में_Bhosale पर आर्थिक_fraud और बलात्कार के_गंभीर_मुकदमे दर्ज थे। रियल इस्टेट क्षेत्र में प्रगति करने के नाम पर पूजा करने की सलाह देकर Solapur शहर के_real_estate व्यवसायी गौतम कसबे को 50,000 रुपये की_fraud हुआ है। मनोहर भोसले और साथी विशाल वाघमारे ने victim से 2 लाख रुपये की_मांगी। शुरू में victim ने 50,000 रुपये दिए। इसके बाद_fraud का एहसास हुआ। पुलिस में_गंभीर_मुकदमा दर्ज किया गया। Bhonsale पर 2021 में भी बीमार से ठीक कराने के नाम पर एक युवक की 1.5 लाख रुपये की_fraud की गई थी। साथ ही एक महिला भक्त के असह्यpain का लाभ उठाकर बलात्कार का भी मामला दर्ज हुआ था।
0
0
Report

राघव चड्डा का भाजपा में स्वागत: चित्रा वाघ के साथ चर्चा गरम

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - राघव चड्डा यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत - चित्रा वाघ चित्रा वाघ ऑन बालमाता प्रकरण - हे दुर्दैवी आणि विचार करायला लावणारी गोष्ट आहे.. बालविवाह रोखण्याचे काम मराठवाडा आणि इतर ठिकाणी झाला आहे - सोलापुरात जर संख्या वाढली असेल तर आणखी काही उपाययोजना करता येतील त्या करू.. ऑन धर्मांतरण - राज्यामध्ये जे विकृत लांडगे फिरताना दिसतात एकेकाला वेचून - ठेचून काढण्याचे काम देवाभाऊच्या सरकारमध्ये दिसत आहे - धर्मांतरण, भोंदू विकृत बाबा, अल्पवयीन मुलींना फूस लावून अत्याचार करणारे असू देत हिसाब तो सबका होगा... - एक्झाम्पल सेट होईल अशा पद्धतीची शिक्षा या लोकांना होईल ऑन राघव चड्डा - एक खासदार लोकांशी निगडित असणारे प्रश्न विचारतो म्हणून त्यांच्या पार्टीमध्ये गदारोळ झाला... हे लोकांना वाईट वाटलं - त्यांच्या पक्षाची जी विचारधारा होती त्याचं स्वरूप समोर येत चालला आहे... - ज्यांची पॉप्युलरिटी आपल्यापेक्षा जास्त आहे ते कोणी सहकारी लागत नाहीत - राघव चड्डा यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत असेल - मोदीजींचा हा जो कारवा आहे त्यात लोक आपोआप जोडले जात आहेत - केजरीवालांनी भाजपवर जे आरोप केले होते त्यात तथ्य काही नव्हतं.. अरविंद केजरीवालांचा खरं रूप काय आहे ते लोकांसमोर घेऊन आले आहेत बाईट - चित्रा वाघ, प्रदेशाध्यक्ष, भाजप महिला आघाडी
0
0
Report
Advertisement

रोहित पवार के विरोध के बीच राजारामपुरी थाने में गायकवाड़ पर FIR की मांग

Kolhapur, Maharashtra:शिवाजी कोण होता? या कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तकाच्या प्रकाशकाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन कोल्हापूर पोलिसांनी दिलं आहे. आज कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून बसले. विरोधी सर्वपक्षीय शेकडो कार्यकर्त्यांसह रोहित पवार राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये बसून राहिले, त्यानंतर तब्बल दीड तासांनी पोलिसांनी गुन्हा दाखल करतो असं आश्वासन दिले. त्याचवेळी राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या बाहेर विरोधी आघाडीतील कार्यकर्त्यांनी कॉम्रेड गोविंदराव पानसरे लिखित शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे जाहीर वाचन सुरू केलं.. यानंतर बोलताना आमदार रोहित पवार यांनी, आमदार संजय गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी ती आम्हाला मान्य नाही, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी अशी मागणी केली. राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये तब्बल दीड तास हा सगळा राडा सुरू होता. संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही पोलीस ठाणे सोडणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. त्यामुळे अखेर पोलिसांनी नरमाईची भूमिका घेत गुन्हा दाखल करण्याचा आश्वासन दिले.
0
0
Report

डोंबिवली स्टेशन परिसर में फेरीवालों के विरुद्ध बड़ी कार्रवाई, पार्षदों ने सवाल उठाए

Kalyan, Maharashtra:फेरीवाल्यांविरोधातील कारवाईचे समर्थन मात्र दुकाने सील का केली एखाद्या फेरीवाल्याचे एकुण "कॉन्ट्रक्टर " बनू नका.. भाजप नगरसेवकाने केडीएमसी सहाय्यक आयुक्तांना स्थायी समिती सभेत खडसावले . Anchor :- कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे डोंबिवली स्टेशन परिसरात फेरीवाल्याविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू करण्यात आली .या कारवाईदरम्यान स्टेशन परिसरातील महापालिकेच्या मालकीच्या काही गाळे आहेत फेरीवाले या ठिकाणी सामान ठेवतात या गाळ्यांमध्ये अतिक्रमण झाले आहे असा आरोप करत केडीएमसीच्या सहाय्यक आयुक्तांनी सिल केले या कारवाईबाबत आज स्थायी समितीच्या सभेमध्ये भाजप नगरसेवकांनी संबंधित सहाय्यक आयुक्त भारत पवार यांना चांगलेच धारेवर धरले फेरीवाल्यांवर कारवाई सुरू आहे त्याच्यामुळे समर्थन करतो कारवाई झालीच पाहिजे.स्टेशन परिसर हा फेरीवाला मुक्त झालाच पाहिजे मात्र फेरीवाल्यांच्या एकूण दुकानदारांचे गाळे सील करणे हे कितपत योग्य ,कोणाला विचारून ते सील केले असा संतप्त सवाल नगरसेवकांनी सहाय्यक आयुक्त पवार यांना विचारला. फेरीवाल्यांचे ऐकून कारवाई करू नका..त्यांचे कॉन्ट्रॅक्टर बनू नका असं गंभीर आरोप भाजप नगरसेवक मंदार हळबे आणि दीपेश म्हात्रे यांनी केला .नगरसेवकांचा संतापले. बाईट.. दिपेश म्हात्रे स्थायी समिती सदस्य
0
0
Report
Advertisement

अहमदपूर में मतिमंद विद्यार्थी पर अमानुष मारहाण: दो शिक्षकों पर मामला दर्ज

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज: अहमदपूरमध्ये मतिमंद विद्यार्थ्याला शिक्षकांकडून अमानुष मारहाण प्रकरणी दोन मारकुट्या शिक्षकांवर गुन्हा दाखल. झी २४ तासच्या बातमीचा दनका… मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होताच संतापाची लाट. अहमदपूर येथील श्री संत ज्ञानेश्वर निवासी मतिमंद विद्यालयात काही दिवसांपूर्वी शाळेतील शिक्षकांकडून एका मतिमंद मुलाला अमानुष मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर ZEE २४ तास ने दखल घेत याची बातमी प्रसारित केली होती. अखेर या प्रकरणात आता ZEE २४ तास च्या बातमी नंतर या दोन मारकुट्या शिक्षकावर कारवाई करण्यात आली असून, संबंधित मारकुट्या दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकारी संतोषकुमार नाइकवाडे यांच्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
0
0
Report

महाराष्ट्र में 50 लाख बोगस मतदाताओं का संदेह, बीजेपी ने जांच तेज़ की

Dhule, Maharashtra:राज्यच्या मतदार यादीत किमान 50 लाख बोगस मतदार असल्याचा संशय आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातही एसआयआरची अंमलबजावणी होईल तेव्हा हा प्रकार स्पष्ट होईलच, पण महाराष्ट्र भाजपने यावर स्वतंत्र शोधमोहीम राबवून बोगस मतदारांचा पर्दाफाश केला आहे अशी माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली. धुळे येथे 24 एप्रिलला आमदार अनुप अग्रवाल यांच्यासोबत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की महाराष्ट्रात 50 मतदार संघ असे आहेत, की गेल्या 20 वर्षात तेथील मुस्लिम समाजाच्या मतदारांमध्ये दुप्पट किंवा तिप्पट वाढ झाली आहे. याचाच अर्थ तेथे बाहेरुन आलेल्या मतदारांचा शिरकाव करुन घेण्यात आला आहे. ही चिंताजनक बाब आहे. भाजपने केेलेल्या पाहणीत तेथील मुस्लिम लोकसंख्या 30 हजारांपासून तीन लाखापर्यंत वाढल्याचं दिसून आले. दुसरीकडे हिंदूंची मतदारसंख्या नैसर्गिक 20 टक्के वाढली आहे. ही तफावत मतदार यादीत शिरकाव करण्याचे षडयन्त्र दाखवून देणारी आहे. अशा मतदार संघांमध्ये विशेष निरीक्षक नेमावा अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केल्याचेही सोमय्या यांनी सांगितले. तीन लाख बोगस जन्म प्रमाणपत्रे आम्ही हुडकून काढली व ती रद्द ठरवली. त्यातही विशिष्ट समुदायाचाच भरणा होता. काही ठिकाणी मुस्लिम मतदार नोंदणी अधिकार्‍यांनी कट रचून मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये 80 टक्के नोंदी जुळत असल्याचा अहवाल सादर केला असून हिंदूबहुल वस्तींमध्ये मात्र तेच प्रमाण अत्यंत कमी असल्याचा रिपोर्ट दिल्याचा धक्कादायक प्रकारही घडला आहे. धुळे व मालेगाव या दोन्ही मतदार संघात नावे समाविष्ट असून दोन्हीकडे मतदान करणारे 22 हजार मतदार आम्ही शोधून काढले आहेत. त्यांना आता कुठेही मतदान करता येणार नाही यासाठी प्रशासनाकडे यशस्वी पाठपुरावा केल्याचेही किरीट सोमय्या यांनी सांगितले.
0
0
Report
Advertisement

2016 में 24 गांव जोड़ने के बाद अकोला महानगरपालिका के विस्तार के बावजूद नागरिक नाराज़

Akola, Maharashtra:सन २०१६ में २४ गावांचा समावेश करून अकोला महानगरपालिकेची हद्दवाढ करण्यात आली; मात्र “हद्दवाढ म्हणजे विकास” हे स्वप्न आजही अपूर्णच राहिल्याची तीव्र नाराजी नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे. मूलभूत सुविधांचा अभाव आणि वाढते कर यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.हद्दवाढीतील प्रभाग क्रमांक ३, ४, ५, १२, १३ आणि १४ मध्ये आजही पाणीटंचाई, खराब रस्ते, अपुरी स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न कायम आहे. नागरिकांना अपेक्षित असलेल्या सोयीसुविधा मिळालेल्या नाहीत. उलटपक्षी, मालमत्ता करासह विविध करांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांचा रोष अधिकच तीव्र झाला आहे.या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी, अकोला पूर्व शहराच्या वतीने गांधी-जवाहर बाग ते महानगरपालिका असा भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेत आपल्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.दरम्यान, नागरिकांच्या या वाढत्या संतापामुळे प्रशासनावर दबाव वाढत असून, आता महानगरपालिका यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report
Advertisement

सप्तशृंगी गढ़ मंदिर की चांदी में 22 किलो की कमी, जांच जारी

Nashik, Maharashtra:सप्तशृंगी गडावरील आदिशक्तीची चांदी गायब झाल्याचा दावा... अंमळ अपडेट... देवीच्या साडेतीन शक्ती पीठांपैकी पूर्णपीठ असलेल्या श्री सप्तशृंग गडावरील आदिमायेच्या मंदिर गर्भगृहातील चांदीमध्ये २२ किलोची तफावत चौकशीत आढळून आली आहे. मंदिरातील ही २२ किलो चांदी नेमकी कुठे गायब झाली? सध्या कळवण प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्याकडे चौकशी सुरू आहे. १३-१४ किलोचा फरक असल्याचे निष्कर्ष या चौकशेत आढळले आहेत. गेल्या २२ वर्षात चांदीत घट झाली असल्याचा दावा सप्तशृंग गड व्यवस्थापनाने केला आहे. वास्तव्य वजनानुसार ४०६ किलो असलेली चांदी ३८६ किलो झाली असल्याने २२ किलोची तफावत आढळली. विश्वस्तांनी वजन तपासताना ही बाब समोर आली. या प्रकरणी ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष, विश्वस्तांसह संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी झाली आहे. भाविकांनी दान केलेली चांदी मंदिर गाभऱ्यात ठेवली जाते. सन १९९८ ते २०१४ या काळात ४०६ किलो चांदी नसून ३९७ किलो चांदी विश्वस्त मंडळाने गाभाऱ्यात लावली होती; पुढे काहीकाळात ३८३ किलो भरली होती. १३-१४ किलोचा फरक तीन महिन्यांपासून चौकशीत उघड होत आहे. चांदीमध्ये कुठेही अपहार झाला नाही असे ट्रस्टच्या प्रभारी व्यवस्थापक म्हणाले. श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी गडावर भाविकांची गर्दी... दान केलेली चांदी गाभाऱ्यात ठेवली जाते. १४ किलोची तफावत असल्याची तक्रार शंकास्पद. चौकशीमध्ये सत्य समोर येईल. अंतिम निष्कन्न होईपर्यंत चौकशी चालणार आहे.
0
0
Report

जगताप धमकी मामले पर नेताओं की संयमित प्रतिक्रिया; आबिटकर बाईट मुद्दे पर जाँच के निर्देश

Kolhapur, Maharashtra:मंत्री प्रकाश आबिटकर बाईट मुद्दे ऑन बीड जिल्ह्यात महिला रुग्ण जमिनीवर बेड मी तिथल्या अधिकारांशी बोललो, संबंधित पेशंटची देखील बोललो, दर महिन्याला जो कॅम्प आयोजित करतात, त्या कॅम्पमध्ये पेशंट संख्या अचानक वाढली, त्यामुळे पेशंटला थोडासा त्रास झाला. डेप्युटी डायरेक्टरांना वस्तुस्थिती काय ? याची चौकशी करायला सांगितले आहे. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी जी कारवाई करावी लागेल ते करायच्या सूचना दिल्या आहेत. On जगताप प्रशांत आंबी धमकी प्रकरण लोकप्रतिनिधी म्हणून अशा घटना होणे बरोबर नाही. हा विषय ज्या पद्धतीने झाला तो अपेक्षित नाही. अशा घटनेबाबत आम्हा मंडळींनी संयमाने जायला हवे. अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे. प्रत्येकाला मनाप्रमाणे मागणी करण्याची मुभा आहे. सार्वजनिक जीवनात लोकप्रतिनिधी यांनी अतिशय संयमाने गेले पाहिजे. कारण त्यांना साठी सामुदायिक आचारसंहिता असते, त्यामुळे समज द्यायला पाहिजे असं काही नाही. या घटने संदर्भात आमचे मुख्य नेते त्यांच्याशी बोलतील आणि त्यांना सूचना देतील.
0
0
Report

शिवाजी महाराज के सम्मान को अडिग रखने की मांग, नेताओं ने माफीनामा जारी किया

Buldhana, Maharashtra:छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान अबाधित ठेवावा. प्रकाशाला केलेल्या अयोग्य शब्दांबद्दल गायकवाडांची दिलगिरी. तर पुस्तकांमधील एकेरी नाव न घेता आदराने घ्या, आणि महाराजांचे एकेरी नाव घेऊन करोडो हिंदूंचा अपमान करू नका. शिवाजी कोण होता या पुस्तिकेचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांनी फोनवर अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती. यांबद्दल त्यांनी आता दिलगिरी व्यक्त केलीय. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख नेहमी सन्मानपूर्वकच व्हावा, ही आपली ठाम भूमिका असल्याचे आमदार संजय गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. Related पुस्तकातील एकेरी उल्लेखांवर आक्षेप घेत त्यांनी हा विषय वादाचा नसून संस्कार आणि आदराचा असल्याचे मत व्यक्त केले. दरम्यान, अलीकडील वादात आपल्या तोंडून काही अयोग्य शब्द गेले असल्याची जाणीव व्यक्त करत त्यांनी मनापासून दिलगिरीही व्यक्त केली. तसेच, छत्रपती शिवरायांविषयी निष्ठा आणि सन्मान कायम ठेवत संबंधितांनी योग्य ती दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय. महाराजांचा अपमान करून करोडो हिंदूंचा अपमाना करू नये अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी केलीय.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top