Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : पुसद मध्ये माणूसकीची भिंत फाउंडेशन ने वृद्ध, निराधार, बेघरांसोबत साजरी केली भाऊबीज

Nov 03, 2024 12:41:05
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या पुसद येथे माणुसकीची भिंतच्यावतीने बेघर, निराधार, दिव्यांग, असहाय वृद्ध व अनाथांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. वृद्धाश्रम व रुग्णालय परिसरात हा सोहळा संपन्न झाला. माणुसकीची भिंत परिसरात स्वच्छता करून गोरगरीब निराधार वृद्धांची व पुरुषांची दाढी-कटिंग करण्यात आली. त्यानंतर महिलांनी काढलेल्या रांगोळ्यांनी अंगण सजले. पाट मांडण्यात आले. त्यानंतर माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांनी टोपी, टॉवेल, नारळ पेढा देऊन वंचितांना ओवाळले. त्यांच्या कुटुंबातील महिलांना साड्या देण्यात आल्या.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Mar 08, 2026 03:01:15
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचंसह खासगी आणि अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या परीक्षा 20 एप्रिल ते 26 एप्रिलदरम्यान पार पडणार असून, त्यानंतर 30 एप्रिलपर्यंत संकलित मूल्यमापन चाचणी घेतली जाणार आहे. यंदा विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची एकूण 44 दिवसांची सुटी मिळणार आहे. वाढत्या उन्हामुळे परीक्षा लवकर घेण्याची मागणी दरवर्षी समग्र शिक्षा आणि एससीईआरटीकडून एप्रिलमध्ये गणित व भाषा विषयांची मूल्यमापन चाचणी घेतली जाते. यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा 15 दिवस आधीच सुरू झाल्याने त्या मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात संपणार आहेत. वाढता उन्हाचा तडाखा लक्षात घेता, पहिली ते नववीच्या परीक्षाही लवकर घ्याव्यात, अशी मागणी शिक्षकांकडून होत होती. मात्र, एससीईआरटीने एप्रिलमध्येच चाचण्या घेण्याचे निश्चित केल्याने शाळा 30 एप्रिलपर्यंत भरणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सीबीएसई पॅटर्नच्या शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू होत आहे. या शाळांच्या वार्षिक परीक्षा मार्चमध्येच आटोपणार असून, विद्यार्थ्यांना 1 मे ते 14 जूनदरम्यान सुट्टी असेल, तर राज्य मंडळाच्या शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू होईल.
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Mar 08, 2026 02:48:48
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी-चिंचवड शहरातील वाढते जलप्रदूषण आणि प्रदूषित पाणी पुरवठा याविषयी नागरिकांच्या वाढलेल्या तक्रारींवर उपाययोजना म्हणून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाण्याच्या पडताळणीसाठी 'त्रयस्थ संस्थे'ची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. पिण्याच्या आणि नद्यांच्या पाण्याची पडताळणी करण्यासाठी एका प्रयोगशाळेची नियुक्ती केली जाणार आहे...! तसा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे...! लवकरच या बाबत निर्णय घेतला जाणार आहे...! निगडी, चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रांत प्रक्रिया करून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून शहराच्या विविध भागांत गढूळ, प्रदूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यावर उपाय म्हणून महापालिकेने पाण्याच्या पडताळणीसाठी एका संस्थेची निवड करण्यात आलीय...
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 08, 2026 02:47:49
Chendhare, Maharashtra:स्‍लग – आखाती युदधाचे कारण पुढे करून आंब्‍याचे दर पाडण्‍याचा घाट कोकणातील हापूस आंबा उत्‍पादन बागायतदारांना भीती यंदा प्रतिकूल परिस्‍थीतीमुळे आंब्‍याचा हंगाम लांबणीवर मार्च अखेरीस आंब्‍याची आवक वाढणार तोपर्यंत युदध सुरू राहिल्‍यास आखातातील निर्यातीवर परीणाम अँकर – कोकणात यंदा हापूस आंब्‍याचे उत्‍पादन कमी आणि उशिरा असतानाच निर्यात बाजारावर आखाती युद्धाचे ढग जमा झालेत. जर या महिनाभरात युदध थांबले नाही तर आखातात होणारया आंब्‍याच्‍या निर्‍यातीवर थोडाफार परीणाम होवू शकतो. मुळात शेवटचा मोहोर देखील करपल्‍याने हापूसच्‍या उत्‍पादनावर मोठा परीणाम झाला आहे. त्‍यामुळे यंदाचा हापूस देशात विकला तरी पुरेसा है. असे असताना काही दलाल मंडळी आखाती युदधाचे कारण पुढे करून आंब्‍याचे दर पाडण्याचा प्रयत्‍न करीत असल्‍याची भीती आंबा उत्‍पादन शेतकरी व्‍यक्‍त करीत आहेत. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात हापूस आंबा बाजारात येतो मात्र प्रतिकूल परिस्थितीमुळे उशिरा म्हणजे मार्च अखेरीस आंबा मोठ्या प्रमाणात बाजारात येईल त्‍यावेळी जर युद्धजन्य परीस्थिती कायम राहिली तर आंब्‍याचे दर घसरण्याची शक्यता आहे.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 08, 2026 02:31:47
Ahilyanagar, Maharashtra:मुंबईच्या आझाद मैदानावर 12 मार्चपासून राज्यातील विविध कला-क्रिडा शिक्षक संघटनांकडून एल्गार आंदोलन केलं जाणार आहे...जवळपास 2009 पासून राज्यात कला शिक्षक भरती झालेली नाही त्याच सोबतच कला शिक्षक भरतीसाठी जाचक अटी घालण्यात आल्या आहेत ज्यात विद्यार्थी संख्येची अट घालण्यात आलीये...सोबतच विशेष शिक्षकांच्या भरती संदर्भात अद्यापही शिक्षण विभागाला सरकारकडून निर्देश दिलेले नाहीत किंवा त्यांची स्वतंत्र बिंदू नामावली करण्यात आलेली नाही...याबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रतिक्रिया दिली असून याबाबत मी संबंधित अधिकाऱ्यांशी लवकरच बोलेल...शिक्षण विभागाचे अनेक प्रश्न सध्या समोर येत आहेत...मग त्यात शिक्षकांना TET परीक्षा बंधनकारक करण्याचा विषय असो किंवा विशेष शिक्षक भरतीचा विषय असो सरकार याबाबत लक्ष घालत आहे असं राधाकृष्ण विखे म्हणाले.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 08, 2026 02:31:36
Nashik, Maharashtra:एका राष्ट्रीयकृत बँकेचे क्रेडिट कार्ड घेण्यासाठी बँकेच्या नावाने लिंक पाठवत ३ खातेदाराचे बँक खाते हॅक करून खात्यातील ३१ लाख ४२ हजाराची रक्कम ऑनलाइन काढून घेत फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. व्यावसायिकाने अॅप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर अनोळखी मोबाईलहून कॉल आला. त्या व्यक्तीने बँकेकडून क्रेडिट कार्ड करिता ऑनलाइन एप्लीकेशन करा, असे सांगितले. बँक लाईफसर्टिफिकेट नावाचे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. अॅप डाउनलोड केल्यानंतर त्याच्या मोबाईलसह खात्याचा ताबा घेत ९ लाख ५० हजारांची रक्कम ऑनलाइन काढून घेतली. अन्य दोन तक्रारदारांची अशाच प्रकारे फसवणूक झाली.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 08, 2026 02:16:54
Bhandara, Maharashtra:पवनीतील सावकार दांपत्याची दादागिरी, दोघांकडून केली बळजबरीने व्याजाची वसुली..... अवैध सावकारीचा प्रकार उघड .... पती पत्नीवर गुन्हे दाखल.... पवनी येथील रामपुरी वॉर्डमधील रहिवासी तक्रारदार विशाखा नागपुरे (४४) यांनी पाच वर्षांपूर्वी रेखा खोब्रागडे यांच्याकडून ३ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. १० टक्के व्याजदराने हा व्यवहार ठरला होता. नागपुरे यांनी आतापर्यंत व्याजासह एकूण १३ लाख ८० हजार रुपये परत केले. तरीही, रेखा खोब्रागडे यांनी नागपुरे यांच्या घरी जाऊन तिला शिवीगाळ केली आणि तिच्यावर घरातील वस्तू फेकून मारल्या. पवनी पोलिसांत या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम १५२ आणि ३५१ (२) आणि महाराष्ट्र सावकारी कायदा २०१४ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 08, 2026 02:15:41
Bhandara, Maharashtra:भंडारा शहरात मागील १५ दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. शहरातील नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत असल्याने दसरा मैदान येथील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी खासदार प्रशांत पडोळे यांनी पाहणी केली. या पाहणीदरम्यान पाणी साठवण टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण, माती, लोखंडाचे कण तसेच मृतावस्थेत पडलेले सरडे आढळून आल्याने नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली. याशिवाय केंद्रातील मशिनरीमधून पाणी गळती होत असून त्यामध्ये ऑईल व ग्रीस मिसळलेले असल्याचेही निदर्शनास आले. हेच दूषित पाणी शहरात पुरवठा होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार प्रशांत पडोळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जलशुद्धीकरण केंद्राची तात्काळ स्वच्छता, यंत्रणेची तांत्रिक तपासणी तसेच संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील प्रशासनाला दिला.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 08, 2026 02:00:20
Bhandara, Maharashtra:महसूल विभाग व इतर शासकीय विभाग, तहसील कार्यालय भंडारा यांच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा अंतर्गत नागरिकांना १५ पेक्षा अधिक महसूली सेवा थेट गावा-गावाात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या विशेष अभियानाचा पहिला टप्पा शहापुर गावातून उत्साहात सुरू करण्यात आला. नागरिकांना त्यांच्या गावातच विविध प्रमाणपत्रे, महसूल संबंधित सेवा तसेच शासकीय योजनांची माहिती मिळावी व त्यांच्या अडचणीचे तात्काळ निराकरण व्हावे या हेतूने हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. याच धर्तीवर तालुक्यातील इतर गावांमध्येही अशाच प्रकारे महसूल समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 08, 2026 01:16:22
Latur, Maharashtra:लातूर जिले के औसा तालुक्यात उटी ग्रामपंचायतीने समाजातील रूढी-परंपरांना छेद देणारा एक धाडसी आणि प्रेरणादायी ठराव घेतला आहे. ग्रामपंचायतीच्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की गावातील विधवा महिलांवर साज-शृंगार करण्याची कोणतीही सामाजिक बंधने राहणार नाहीत. विधवा महिलांनीही समाजात सन्मानाने आणि आत्मविश्वासाने जगावे, यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने एक बैठक पार पडली आणि बैठकीतून काही सदस्यांच्या आणि सरपंचाच्या संकल्पनेतून हा धाडसी निर्णय घेण्यात आला. रूढी परंपरेत अडकलेल्या गावातील महिलांना एकत्र करून समाजाने वर्षानुवर्षे लादलेल्या परंपरांना बाजूला सारत… विधवा महिलांनी सन्मानाने आयुष्य जगण्याचा हक्क आहे, असा ठाम संदेश या निर्णयातून देण्यात आला आहे. या निर्णयाला गावातूनही सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. गावातील विधवा महिलांनी समाजाने वर्षानुवर्षे घालून दिलेल्या जुन्या बंधनांना धैर्याने झुगारून देत सन्मानाने मंगलसूत्र, बांगड्या आणि कुंकू धारण केले. हा क्षण त्यांच्या आयुष्यातील केवळ साज-शृंगाराचा नव्हता…तर आत्मसन्मान, धैर्य आणि नव्या आयुष्याचा स्वीकार करणारा होता. समाजाने आखून दिलेल्या चौकटी मोडत या महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येत नव्या आदर्श समाजासमोर उभा केला आहे. वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरांच्या नावाखाली… विधवा महिलांच्या आयुष्यातील रंग हिरावून घेण्याची प्रथा समाजात होती. पण उटी गावाने या परंपरांना धैर्याने आव्हान देत… विधवा महिलांच्या आयुष्यात पुन्हा सन्मानाचे आणि आत्मविश्वासाचे रंग भरले आहेत. हा उपक्रम केवळ एका गावापुरता मर्यादित नाहीत… तर समाजाला विचार करायला लावणारा आणि बदलाची दिशा दाखवणारा ठरत आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 08, 2026 01:15:33
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपाला जनतेने नाकारला आहे,मात्र तरी देखील सत्तेत घुसण्यासाठी प्रयत्न केला जातोय,सत्तेत एवढे प्रेम का ? आहे,पण यापुढे भाजपाने जिल्हा परिषद,विधानसभा, लोकसभेत पराभवाची सवय लावून घ्यावी,अशी टीका खासदार विशाल पाटील यांनी केली आहे. तसेच सांगली महापालिकेत जी परिस्थिती झाली ती जिल्हा परिषदेमध्ये होणार नाही, असं सूचक विधान देखील विशाल पाटलांनी करत 18 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे, तत्पूर्वी 16 किंवा 17 तारखेला आमदार विश्वजीत कदम,जयंत पाटील व इतर नेते बसून याबाबतचा निर्णय घेतील,असे देखील खासदार विशाल पाटलांनी स्पष्ट केले आहे.
0
comment0
Report
UPUmesh Parab
Mar 07, 2026 14:48:17
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग मंत्री नितेश राणे पत्रकार परिषद महत्वाचे मुद्दे: जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत असून याबाबत आढावा शासनामार्फत घेण्यात आला. शासनाकडे याचा अहवाल आला असून हवामानातील बदलांमुळे पिकावर परिणाम झाला असून ८५ टक्के पिक नुकसान झाले आहे. शासनाकडे याचा अहवाल देण्यात आला आहे. येथील शेतकरी मुंबईत मला भेटायला आले. त्यावेळी त्यांनी सूचना केल्या. त्यानुसार नवीन टेक्नॉलॉजी येईल का ? किंवा नवीन संशोधन केंद्र कडून मार्गदर्शन होईल का? त्यानुसार, मी माहिती घेऊन बारामतीत एक “एडीटी” (एग्रीकल्चर डेवलपमेंट ट्रस्ट) म्हणून संस्था आहे. १९५७ संस्था स्थापन असून यांनी आधुनिक कृषी संशोधन केंद्र उभारले आहे. त्यावेळी मी त्या संस्थेला येथील आंबा स्थितीची माहिती दिली. यावर १० दिवसात अहवाल करून मला तो सादर केला आयओटी , ड्रोन, डिजिटल प्रणाली, चांगल्या दर्जाची औषधे या प्रमुख मुद्द्यावर स्पष्ट माहिती दिली. आपल्याकडे अवकाळी पाऊस, फूल कीड, बुरशी याचा प्रादुर्भाव फळवर होतो. अचूक हवामान माहिती देणारी प्रणाली विकसित करण्यात येईल. फुलोरा, फळधारण, किड, औषध व्यवस्थापन, मातीची आर्द्रता यांचा अभ्यास होईल. उपग्रह तंत्रज्ञानद्वारे फळ संशोधन करण्यात येईल. या प्रकल्पाचा खर्च प्रति हेक्टर ४५ हजार रुपये : साडेचार कोटीचा निधी जिल्हा नियोजन समितीकडून होईल. सरकारकडून बागायतदार वर्गाला मदत होईल. भविष्यात असे संकट शेतकरी वर्गावर येऊ नये म्हणून प्रयत्नशील; बारामती संशोधन केंद्राची मदत घेणार हा राजकीय विषय नाही. सर्वांनी सहकार्य करावे. आता शासनाकडे याची माहिती असून कोणी मोर्चा काढावा हा त्यांचा प्रश्न शेतकरी नेते राजू शेट्टी मला मुंबईत भेटले हा प्रश्न तुमचा आमचा नसून येथील सगळ्या शेतकऱ्यांचा आहे. कोकणातील शेतकऱ्याला मदत शासन करणार, तरीही मोर्चा काढायचा असेल तर योग्य, मी सुद्धा मोर्चात जाणारा आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांना हा प्रश्न माहिती आहे. आखाती देशात आपला आंबा जातो, ते ही संकट आहे. कालही अर्थसंकल्पात येथील शेतकऱ्यांना मदत झाली. हवे तर मी १२ तारीखाच्या मोर्चात येतो. माझ्या नागरिकांवर कोणताही अन्याय होऊ नये. देवभाऊंचे सरकार येथील शेतकऱ्यांना नक्कीच मदत करणार. आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर यांनी अधिवेशनात यावर लक्षवेधी मांडली आहे. मोर्चा जायला हरकत नाही. शासन म्हणून हरकत नाही. शेट्टीसाहेब भेटले त्यांच्याशी चर्चा झाली. लोकशाहीत ज्यांना मोर्चा काढायचा असेल त्यांनी नक्की काढावा. मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवा सुरळीत सुरू झाली आहे. उद्या मी मुंबईत त्याच बोटीने जाईन. मोर्चा काढण्यामागे राजकीय हेतू असेल. मी कोणाशीही बोलायला तयार फळ संशोधन केंद्र बागायतदारांना योग्य माहिती देत नाही, ही बाब किंवा तक्रार मला माहिती आहे. या केंद्राची कामे चांगली नसून याबाबत बागायतदारांनी तक्रारीकेल्या आहेत.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 07, 2026 14:32:32
Jalna, Maharashtra:FEED NAME | 0703ZT_CSN_JALIL_BYTE(1 FILE) छत्रपती संभाजीनगर | इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया... ON रोजगार मेळाव्याचे आयोजन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प जाहीर केला, त्यावेळी त्यांनी घोषणा केली की मी 50 लाख नोकऱ्या देऊ मात्र अशा पोकळ घोषणा खूप होतात, जेव्हा भारतीय जनता पार्टी सत्तेत आली होती महाराष्ट्रात अनेकदा अशा प्रकारची घोषणा करण्यात आली होती पण खऱ्या अर्थाने किती बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या याचा आकडा कधीच समोर आला नाही, आणि नोकऱ्या दिल्या की नाही दिल्या तेही माहित नाही मात्र माझ्या वतीने मी वारंवार तरुणांना नोकरी देण्यासाठी प्रयत्न करत राहिलेलो आहे, अनेक कंपन्यांना आम्ही विनंती करतो आणि त्यातून रोजगार मेळाव्याचे आयोजन करतो .... ON एमआयएम नगरसेवकांवर कारवाई होणार? जेव्हा लोक आपले प्रतिनिधी निवडतात तर ते घरी बसण्यासाठी नाही निवडत, त्यांची अपेक्षा असते माझ्या अडचणीच्या काळात ते लोकप्रतिनिधी आहे ज्यांना मी निवडून दिलेला आहे ते माझ्यासाठी धावून येईल आता जो काही प्रकार घडला होता (पैठणगेट येथील अतिक्रमण कारवाई) जेव्हा मारामारी झाली होती, मी स्वतः पोलीस आयुक्तांना सांगितलं होतं त्याच्या बाबतीत तुम्हाला जी कारवाई करायची आहे ती तुम्ही करा. त्याच कोणीही समर्थन करणार नाही पण दुसऱ्या दिवशी ज्या प्रकारे एक तर चूक कोणाची आहे हे स्पष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे 2014 ला केंद्र सरकारने फेरीवाल्यांसाठी एक कायदा काढला, आणि तो कायदा सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकाांना बंधनकारक आहे, की त्यांनी त्या फेरीवाल्यासाठी जागा निर्माण करावी, नियमाप्रमाणे आहे त्यामुळे आपली महानगरपालिका काही वेगळी आहे का? की विदेशातील आहे ज्यांना तेथील नियम लागू होतात पहिले आपल्याकडे आयुक्त एकटेच होते, तेव्हा त्यांनी निर्णय घेतला असता तर, फेरीवाल्यांसाठी जागा निर्माण केली असती तर, त्यामुळे तुम्ही तसं का नाही केलं मलाही माहित आहे की शहागंज परिसरात आणि इतर ठिकाणी देखील नेहमी जिथे फेरीवाल्यांना अडचण होत आहे फेरीवाले कशासाठी उभे राहतात तर ते त्यांच्या उदरनिर्वाहासाठी उभे राहतात *फेरीवाल्यांसाठी जागा निर्माण होत नाही याचा अर्थ हा होतो की महानगरपालिका किंवा पोलीस आयुक्ताचा एखादा कर्मचारी असू द्या त्या कर्मचाऱ्यांसाठी हे फेरीवाले म्हणजे एटीएम मशीन असते* *तुम्ही कधीही जायचं त्याला इथून उठ म्हणायचं मग तो तुम्हाला विनंती करतो शंभर पाचशे रुपये देतो* शहागंज परिसरात एक पोलीस चौकी आहे, ज्यावेळी तिथे महाराज झाले तेव्हा तिथे पोलीस वाले का नव्हते चूक जर महानगरपालिकेची आहे, आणि तुम्ही फक्त त्या फेरीवाल्यांवर जबरदस्ती करत होते त्यामुळे आमचे लोक तिथे गेले, कुणाची भाषा कशी होती ते मला माहित नाही मात्र तुम्ही तेरा लोकांवर गुन्हे दाखल केलेत त्यामुळे मी तुम्हाला ओपन चॅलेंज करतो, हे पोलीस आयुक्तांनी आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांनी ही समजून घ्यावे "आमचे जे नगरसेवक त्या ठिकाणी नव्हते त्यांची देखील नावं त्या एफ आय आर मध्ये टाकण्यात आले त्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून ते टाकण्यात आले?" सत्ताधारी पक्षांनी तुम्हाला जबरदस्ती केली आहे का?, पराभव झालेल्या उमेदवारांनी तुम्हाला ही सक्ती केली का? याचा अर्थ हा आहे की कुठे काही झालं तर आमच्या नगरसेवकांनी घरी पळून जावं आणि गोधडीत लपून बसावं त्यामुळे एका प्रकारे तुम्ही दबाव टाकण्याचे काम करत आहेत, त्यामुळे तुम्ही नियमप्रमाणे जी कारवाई करायची ती करा आम्ही पण न्यायालयात जाऊ आणि न्यायालयामार्फत तुम्हाला प्रश्न विचारू की फेरीवाल्यांसाठी जागा तुम्ही का तयार केली नाही ON अपात्र कारवाई ठीक आहे नियमाप्रमाणे त्यांनी एफ आयआर केलेली आहे , मात्र आता पोलीस आयुक्तांनी त्याची चौकशी करायला हवी त्याचबरोबर आयुक्तांनी याची देखील चौकशी करावी की कुणाच्या सांगण्यावरून हे नाव एफआयआर मध्ये ऍड केले पोलिसांनीच नाव टाकले त्यामुळे तुम्ही काही चौकशी केली ka ki या एफ आय आर मधील नावे असणारे नगरसेवक त्या ठिकाणी होते ka? त्यामुळे जर खोटी एफ आय आर दाखल झाली असेल तर त्यांच्यावर देखील आता कारवाई करा असं एका बाजूने नका होऊ देऊ कायदा काणून आम्हाला देखील कळतो
0
comment0
Report
Advertisement
Back to top