icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Nov 2024, 12:41 pm

यवतमाळ : पुसद मध्ये माणूसकीची भिंत फाउंडेशन ने वृद्ध, निराधार, बेघरांसोबत साजरी केली भाऊबीज

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळच्या पुसद येथे माणुसकीची भिंतच्यावतीने बेघर, निराधार, दिव्यांग, असहाय वृद्ध व अनाथांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. वृद्धाश्रम व रुग्णालय परिसरात हा सोहळा संपन्न झाला. माणुसकीची भिंत परिसरात स्वच्छता करून गोरगरीब निराधार वृद्धांची व पुरुषांची दाढी-कटिंग करण्यात आली. त्यानंतर महिलांनी काढलेल्या रांगोळ्यांनी अंगण सजले. पाट मांडण्यात आले. त्यानंतर माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांनी टोपी, टॉवेल, नारळ पेढा देऊन वंचितांना ओवाळले. त्यांच्या कुटुंबातील महिलांना साड्या देण्यात आल्या.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

गौशाला में मृत जानवर आदिवासी महिला के खेत में: प्रशासन चुप्पी

Bhandara, Maharashtra:गौ शाळेतील मृत जनावरे आदिवासी महिलेच्या शेतात फेकले जातात...भकटे कुत्रे मृतक जनावरांचे लचके तोडतात...परिसरात दुर्गंधी... मजूर वर्ग शेतावर जाण्यास धजावतात... गराडा येथील गौ शाळेतील संचालकांची मनमानी...आदिवासी महिलेने शासकीय कार्यालयात तक्रार देऊन उंबरठे झिजवले...कारवाई मात्र शून्य...अधिकाऱ्यांची उदासीनता की गौ संचालक मंडळासोबत साठगाठ... Anchor : गौ शाळेतील जनावरे शेतकऱ्यांच्या शेतात किव्हा बांधावर सोडून देण्याचे प्रकार महाराष्ट्रामध्ये अनेकदा समोर आले आहेत. मात्र भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील गराडा गावात गौशाळेतील मृतक जनावरे आदिवासी महिलेच्या शेतात अपूर्ण जमिनीत पुरत असल्याचे वास्तव्य पहिल्यांदाच समोर आले असून आदिवासी महिलेने अनेकदा शासकीय कार्यालयाचे दरवाजे ठोठावले पण अद्यापही कारवाई करण्यात आली नाही... अधिकाऱ्यांची उदासीनता की गो संचालक मंडळा सोबत साठगाठ असा प्रश्न उपस्थित आहे..... Vo : भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील गराडा या गावात गोशाळा अनेक वर्षापासून आहे. या गोशाळेमध्ये बहुतांश प्रमाणामध्ये जनावरांची संख्या जास्त असून उत्तम व्यवस्था असल्याने पोलिस कारवाईत मिळालेले जनावरे याच ठिकाणी आणून दिले जातात... गोशाळेला जागा असून सुद्धा मृत जनावरे ही गोशाळे समोरील वंदना करपते यांच्या शेतात अपूर्ण अवस्थेत पुरली जात असल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर आले आहे. विशेष म्हणजे पीडित वंदना करपते यांच्या शेतात गोशाळेतील खत सुद्धा फेकले जात असून याच खतामध्ये मृत जनावरे पुरले जात आहे. त्यामुळे भटके कुत्रे हे मृतक जनावरांचे लचके तोडून इतरत्र करतात त्यामुळे त्या परिसरातील शेतामध्ये जनावरांचे हाडे सुद्धा दिसून आले आहेत तर या परिसरामध्ये जनावरे पूरक असल्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून शेतकरी तसेच मजूर वर्ग शेतावर काम करण्यासाठी जाण्यास धजावत आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी शेती कशी करावी असा सुद्धा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. ज्या जागेवर मृतक जनावरे फेकली जातात याचा नोटीस देखील ग्रामपंचायतीने संबंधित गो शाळेला पत्र पाठविला आहे. तरी पण गो शाळचालक नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत मृत जनावरे उघड्यावर फेकून देत आहे..
0
0
Report

नंदूरबार में पीएम किसान: 31 जून तक ई-केवाईसी अनिवार्य, बैंक खाता लिंक जरूरी

Dhule, Maharashtra:नंदूरबार जिल्ह्यातील पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी ३१ जून च्या अगोदर ई-केवायसी पूर्ण करणे गरजेचे अनिवार्य करण्यात आला आहे. पी एम किसान योजनेमुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना याच्या फायदा होत असतो तर शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाशी बँक खाते लिंक असणे आणि अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करणेही आवश्यक आहे. ई-केवायसी न केल्यास शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा पुढील हप्ता जमा होणार नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना तातडीने ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकरी सीएससी केंद्र, बँक किंवा पीएम किसान पोर्टलच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. पीएम किसान योजनेचा लाभ अखंडित ठेवण्यासाठी मुदतीपूर्वी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
0
0
Report
Advertisement

एल निनो से बारिश देरी, किसानों को 75–100 मिमी के बाद ही पेराई की सलाह

Dhule, Maharashtra:पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत असा सल्ला धुळे जिल्हा कृषी विभागाचे कृषी अधीक्षक सुरज जगताप यांनी दिला आहे. यंदा एल निनो चा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येत असून एल निनोमुळे पाऊस लांबला आहे. धुळे जिल्ह्यासह खानदेशात सरासरी सात जून पासून पेरण्यांना सुरुवात होते. मात्र यंदा पाऊस लांबला असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीयुक्त पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नयेत असा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे. सरासरी 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्यात. दरम्यान ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन च्या माध्यमातून कापसाची लागवड करावी. असा सल्ला कृषी अधीक्षक जगताप यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
0
0
Report
Advertisement

शिंदे की शिवसेना पर भाजपा के विसर्जन का दावा, विनायक राउत के गंभीर आरोप

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे विसर्जन होणार? विनायक राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप! गरज संपली की भाजप शिंदेंच्या पक्षाची तोडमोड करणार - राऊतांचा दावा आणखी स्पष्ट: भाजपचे वैशिष्ट्यच 'गरज सरो और वैद्य मरो' असे आहे. वेळेपुरते कोणालाही सोबत घ्यायचे आणि नंतर त्याचा पूर्ण वापर करून त्याचे विसर्जन करायचे, ही भाजपची जुनी पद्धत आहे. आगामी काळात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचीही अशीच अवस्था होणार असून, भाजप त्यांच्या पक्षाची तोडमोड करून टाकेल, अशी घणाघाती टीका विनायक राऊत यांनी केली आहे.
0
0
Report

द क्लब गोल्फ मैदान में अवैध उत्खनन, वृक्षतोड़: संयुक्त पंचनामा के निर्देश

Satara, Maharashtra:सातारा - महाबळेश्वर येथील ऐतिहासिक वारसा असलेल्या ‘द क्लब’ गोल्फ मैदान परिसरात मोठ्या प्रमाणावर उत्खनन, वृक्षतोड आणि अनधिकृत बांधकामे केल्याचा आरोप होत असून या प्रकरणाची प्रांताधिकाऱ्यांनी संयुक्त पंचनाम्याद्वारे चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. हेरिटेज दर्जा प्राप्त असलेल्या या मैदानात मातीचे ढिगारे टाकणे, रस्ते तयार करणे तसेच परिसरातील अनेक झाडे तोडल्याची तक्रार पर्यावरणप्रेमींनी केली आहे. प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून महसूल, नगरपरिषद आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना संयुक्त पंचनामा करण्याच्या निर्देश दिले आहेत. दरम्यान, संबंधित कामांची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचे समोर आले असून चौकशीअंती अनधिकृत बाबी आढळल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
0
0
Report
Advertisement

एसटी बसस्टैंड के 200 मीटर दायरे में निजी वाहनों का प्रवेश बंद

Bhandara, Maharashtra:भंडारा बसस्थानक परिसरात खासगी प्रवासी वाहनांवर 200 मीटरपर्यंत निर्बंध. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामण्डळाच्या (एसटी) बसस्थानक परिसरात खासगी प्रवासी वाहनांच्या वर्दळीमुळे महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यापूर्वी बसस्थानकाच्या 100 मीटर परिसरात अशा वाहनांना बंदी होती; मात्र अनेक ठिकाणी या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळले. याची दखल घेत एसटी महामंडळाने आता बसस्थानकाच्या 200 मीटर परिसरात कोणत्याही खासगी प्रवासी वाहनांना प्रवेशबंदी लागू केली आहे. या नियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विभागीय अधिकारी सज्ज झाले असून, नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.
0
0
Report

भंडारा: 20-25 ठेवीदारों ने डिपॉजिट वापस माँगा, ऑफिस पर धावा

Bhandara, Maharashtra:भंडारा जिले के साकोली स्थित लक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, लाखनी शाखा के 20 से 25 ठेवीदारों ने भंडारा जिले के उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय पर धावा बोलकर अपने जमाकर्ताओं के धन वापसी की मांग की। तीन दिनों में राशि वापस नहीं मिलने पर आमरण अनशन की चेतावनी दी। ठेवीदारों ने कहा कि जमा राशियाँ लौटाने में टालमटोल हो रहा है। इसके बाद जिल्हा उपनिबंधक शुद्धोधन कांबळे ने संबंधित संस्था को तुरंत ठेवीदारों को राशि लौटाने और एक रिपोर्ट प्रस्तुत करने के आदेश दिए। साथ ही ठेवीदारों से कानून की धारा के भीतर रहकर अपनी मांग आगे बढ़ाने को कहा गया।
0
0
Report

17 वर्षीय बालिका का विवाह रोकना; दामिनी टीम ने सफलतापूर्वक कार्रवाई की

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी परिसरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह लावला जात असल्याची धक्कादायक माहिती मिळताच, दामिनी पथक और अंगणवाडी सेविकांनी ऐनवेळी धाव घेऊन हा बालविवाह यशस्वीपणे रोखला. लग्न मंडपात पोलीस आल्याची कुणकुण लागताच नवरीनं वेशभूषेत असलेली अल्पवयीन मुलगी और २३ वर्षीय नवरदेव लग्न मंडपातून पळून जात लपले होते. अखेर पोलिसांनी नातेवाईकांना विश्वासात घेतल्यानंतर तब्बल दीड तासाने हा हाईव्होल्टेज ड्रामा शांत झाला. दामिनी पथकाने दोन्ही कुटुंंबांतील आई-वडील और तरुण-तरुणीला कायद्याची समज दिली. त्यानंतर, मुलीचे वय कायदेशीररित्या १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय विवाह करणार नाही, असे आश्वासन नातेवाईकांनी प्रशासनाला दिले. धक्कादायक म्हणजे चार महिन्यांनी ही मुलगी अठरा वर्षाची होणार होते मात्र मुलगी और मुलांमध्ये प्रेम होतं लग्न करण्यासाठी ते थांबायला तयार नव्हते पालकांना पळून जाण्याची धमकी त्यांनी दिली होती, त्यामुळे हा लग्न सोहळा आयोजित केला होता मात्र पोलिसांनी तो रोखला..
0
0
Report
Advertisement

राज्य सरकार ने दापोली कोकण कृषि विश्वविद्यालय के विकास के लिए 86 करोड़ रुपये मंजूर किए

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. दापोली कृषी विद्यापीठाला 86 कोटी.. विकास कामांना शासनाची प्रशासकीय मान्यता.. विद्यापीठाला मोठा दिलासा.. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या विकासाला मोठी चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.. विद्यापीठाच्या विविध प्रलंबित पायाभूत सुविधा प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देत सुमारे 86 कोटी रुपयांच्या विकास कामांचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे.. या निर्णयामुळे विद्यापीठातील हजारो विद्यार्थ्यांना आधुनिक वस्तीगृह सुविधा उपलब्ध होणार असून शैक्षणिक व प्रशासकीय व्यवस्थाही अधिक सक्षम होणार आहे..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top