icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Nov 2024, 12:41 pm

यवतमाळ : पुसद मध्ये माणूसकीची भिंत फाउंडेशन ने वृद्ध, निराधार, बेघरांसोबत साजरी केली भाऊबीज

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळच्या पुसद येथे माणुसकीची भिंतच्यावतीने बेघर, निराधार, दिव्यांग, असहाय वृद्ध व अनाथांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. वृद्धाश्रम व रुग्णालय परिसरात हा सोहळा संपन्न झाला. माणुसकीची भिंत परिसरात स्वच्छता करून गोरगरीब निराधार वृद्धांची व पुरुषांची दाढी-कटिंग करण्यात आली. त्यानंतर महिलांनी काढलेल्या रांगोळ्यांनी अंगण सजले. पाट मांडण्यात आले. त्यानंतर माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांनी टोपी, टॉवेल, नारळ पेढा देऊन वंचितांना ओवाळले. त्यांच्या कुटुंबातील महिलांना साड्या देण्यात आल्या.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

आचारसंहिता से रुकें काम, 132 रस्ते खड्डे, मानसून में बस सेवा बंद होने की आशंका

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी. रस्ता दुरुस्तीला आचारसंहितेचा फटका. जिल्ह्यातील रस्त्यांची चाळण. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तब्बल 132 रस्ते खड्डेमुळे होऊन त्यांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यांवरील बस सेवा बंद होण्याची शक्यता आहे. मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हापरिषदच्या बांधकाम समितीच्या सभेत या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पाच कोटींची मागणी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने रस्ते दुरुस्तीची कामे रखडली आहेत. याचा फटका आता पावसाळ्यातील बस सेवेवर होणार आहे. त्यामुळे इतर वाहतुकी बंद होण्याची भीती व्यक्त होत आहे.
0
0
Report

नागपुर में गर्मी से चार मौतें: उष्माघात की आशंका

Nagpur, Maharashtra:नागपूर जिल्ह्यात तीव्र उष्णतेमुळे . उष्माघाताने जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी संशयित चौघांचा बळी ? - शवविच्छेदन अहवाल आल्या नंतर स्पष्ट होईल मृत्यूचे कारण, मात्र उन्हाचा तडाखा वाढला असल्यानं संशयितांची संख्या वाढतीवर - शनिवारी नागपूरात तापमानाचा पारा तब्बल 45 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता - उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे नागपूर शहरात दोघांचा आणि सावनेर मध्ये आणखी दोघांचा उष्माघाताने दोन जणांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे... - उष्माघाताचे चार बळी गेल्याने जिल्ह्यात भीतीचा वातावरण आहे - नागपूर शहरातील सक्करदरा आणि यशोधरा नगर परिसरात दोन अनोखी व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या दोघांनाही रुग्णाला दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले - प्राथमिक माहितीनुसार तीव्र उष्णता आणि उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे - दरम्यान जिल्ह्यातील सावनेर मध्ये उष्णतेने दोघांचा मृत्यू झाला असल्याच पुढे येत आहेम - शहरामध्ये वेगवेगळ्या भागात दोन मृतदेह तर ग्रामीणमध्ये वेगवेगळ्या भागात दोन मृतदेह आढळून आल्याने हे मृत्यू उष्माघाताने झाले का याचा तपास केला जात असून शवविच्छेदन अहवालानंतरच ते उष्माघाताने झाले का हे स्पष्ट होईल
0
0
Report
Advertisement

अमरावती में भीषण गर्मी: पारा 46.8°C तक पहुँचा, संतरे की फसल पर पड़ा असर

Amravati, Maharashtra:अमरावतीत उष्णतेची लाट कायम, उन्हामुळे जनजीवन विस्कळीत; शेतीपिकांनाही उन्हाच्या झळा, सत्राची फळगळ अमरावतीत उष्णतेचा पारा 46.8 अंशावर पोहचला आहे. अजून पाच दिवस तापमानात वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तापमान वाढीमुळे शेतातील भुईमुंग संत्रा पिकाला सध्या मोठा फटका बसतो आहे. अमरावती तापमान वाढीमुळे आतापर्यंत उष्माघाताचे 5 बळी गेले असल्यून नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडू नये असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. उन्हामुळे शरीरातील पाणी कमी पडू नये यासाठी नागरिक थंड पेयाचा आधार घेत असून दुपारच्या वेळी काम करताना झाडाची सावलीचा आधार घेऊन नागरिक कामकाज करीत आहे. दरम्यान या उन्हाचा फटका शेती पिकांना बसत असून मोठ्या प्रमाणात संत्राची फळगळ होत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी अहवाल दिन झाला आहे.
0
0
Report
Advertisement

नाशिक में आदित्य ठाकरे का दौरा: बैठकें, पार्टी मजबूत करने का प्रयास

Nashik, Maharashtra:नाशिक - - उद्धव ठाकरे सेनेचे नेते आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर - आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडणार विविध बैठका - मध्यंतरी पक्षाची झालेली पडझड आणि मनपा निवडणूक नंतर आदित्य ठाकरे यांचा नाशिक दौरा मानला जात आहे महत्त्वाचा - एकीकडे शिंदेंच्या सेनेचे श्रीकांत शिंदे यांनी नाशिक जिल्हा दौरा केल्यानंतर ठाकरेंच्या सेनेचे आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर - आदित्य ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याने पक्षाचे मोट बांधली जाणार - नगरसेवक पदाधिकारी यांच्या बैठकीनंतर आयोजित कार्यक्रमाला राहणारे उपस्थित
0
0
Report
Advertisement

साकोली में दोस्त की पार्टी के कुछ क्षणों में खूनखराबा; 12 घंटे में खुलासा, 4 आरोपी गिरफ्तार

Bhandara, Maharashtra:साकोली शहरातील गडकुंबली रोड परिसरातील तलाव काठावर पहाटे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला युवकाचा मृतदेह आढळल्यानंतर संपूर्ण साकोली हादरली होती.छाती, मान आणि डोक्यावर धारदार शस्त्राचे खोल वार,शेजारी उभी मोटरसायकल,बाजूला पडलेली बॅग आणि शहराच्या मध्यभागी घडलेली ही थरारक हत्या ! मात्र पोलिसांनी अवघ्या १२ तासांत तपासाची चक्रे वेगाने फिरवत उलगडा केला. ज्यांच्यासोबत मृताने शेवटची रात्र घालवली तेच 'जिवलग मित्र' मारेकरी असल्याचे समोर आले.नशेच्या अवस्थेत झालेली अश्लील शिवीगाळ,जुनी खुन्नस आणि क्षणिक संतापातून मित्रांनीच निखिल राजकुमार कांबळे (३०, मुरपार-लेंडेझरी, ता.सड़क अर्जुनी याचा निघृण खून केल्याची धक्कादायक कबुली आरोपींनी पोलिसांसमोर दिली आहे.अटक झालेल्यांमध्ये गणेश मनोहर वलथरे (२०) सागर पारधी (१९) ओंकार मेश्राम (२१, सर्व पंचशील वॉर्ड, साकोली) तसेच मानेगाव रोड (ता. लाखनी) येथील कमलेश चुन्नीलाल कुकवास (२३) याच्यासह एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.या प्रकरणी साकोली पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.न्यायालयाने आरोपींना २७ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून विधीसंघर्षग्रस्त बालकाला बालसुधारगृहात पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली.
0
0
Report
Advertisement

चंद्रपुर के सिंधेही जंगल में टी-2 बाघिनी ने चार महिलाओं पर हमला कर जेरबंद

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातल्या जंगलात तेंदूपाने तोडणाऱ्या चार महिलांवर हल्ला करून त्यांना ठार मारणारी टी-2 वाघीण वनविभागाने केली जेरबंद. पवनपार जंगल कक्ष क्रमांक 282 मध्ये ही टी-2 नावाची वाघीण वनविभागाने जेरबंद केली. चार महिलांना एकाच वेळी ठार मारण्याच्या घटनेनंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वनविभागाने आपली संपूर्ण शक्ती या भागात ट्रॅप कॅमेरे - पायी गस्त, सीसीटीव्ही कॅमेरे लावत पणाला लावली होती. वनविभागाचे बेशुद्ध करणारे पथक देखील या भागात सतत गस्त घालत होते. याच दरम्यान त्यांना टी-2 वाघिणीचा सुगावा लागला. डार्ट मारून वाघिणीला जेरबंद करण्यात आले. मात्र या वाघिणी सोबत असलेल्या बछड्याबाबत वनविभागाने कुठलीही स्पष्टता केलेली नाही. हल्लेखोर वाघीण जेरबंद झाल्यानंतर या भागातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
0
0
Report

सांगली में पुलिसकर्मी के घर चोरी, 21 तोला सोना समेत लाखों की चोरी

Sangli, Maharashtra:सांगलीमध्ये पोलिसाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला,पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरवरील तीन फ्लॅट फोडले, 21 तोळे सोन्यासह लाखोंची रोकड लंपास.. अँकर - सांगली मध्ये पोलीसाच्या घरीच चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.विशेष म्हणजे पोलीस ठाण्याच्या शेजारी असणाऱ्या अपार्टमेंट मध्ये चोरट्यांनी डल्ला मारला आहे.पोलीसाच्या घरासह तीन ठिकाणी चोरी करत २१ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह लाखों रुपयांची रोकड लंपास केली आहे.संजयनगर पोलीस ठाण्याच्या शेजारी असणाऱ्या अपार्टमेंट मध्ये भरदिवसा हा चोरट्यांनी ही चोरी केली आहे,यामध्ये संजयनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस शिपाई कपिल साळुंखे यांच्या बंद घरात चोरी झाली,साळुंखे हे कुटुंबासह गावी गेले असता चोरट्यांनी हा डाव साधला आहे.त्यानंतर दोघा चोरट्यांनी शेजारी असणारे एक फ्लॅट आणि व आणखी एका अपार्टमेंट मध्ये चोरी करत सोन्याच्या दागिन्यांसह रोकड चोरी करत पोबारा केला आहे,दोघा चोरट्यांचे सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागले असून पोलोस चोरट्यांचा शोध घेत आहेत,मात्र पोलीस ठाण्याच्या शेजारीच आणि पोलिसांच्या घरात चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे.
0
0
Report

जुन्नर के नेनेघाट में धुंध की चादर, मॉनसून के पहले सैलानी जुटे

Barav, Maharashtra: пावसाळा सुरू होण्यास अजून काही दिवसांचा अवधी असला, तरी सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आतापासूनच पावसाची चाहूल लागली आहे. जुन्नरमधील ऐतिहासिक नानेघाटात धुक्याची पांढरी चादर पसरली असून, निसर्गाचं एक विहंगम रूप पाहायला मिळत आहे. याच धुक्याचा आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी आतापासूनच नानेघाटात गर्दी करायला सुरुवात केलीय सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ऐतिहासिक नानेघाटात पावसाळ्याची चाहूल लागली आहे. जून महिना उजाडण्यापूर्वीच या भागात धुक्याचं साम्राज्य पाहायला मिळत असून, संपूर्ण घाट परिसर पांढऱ्याशुभ्र धुक्याच्या चादरीत वेढला गेला है. कडक उन्हाच्या चटक्यानंतर आता निसर्गाने कात टाकली असून, हवेत गारवा निर्माण झालाय
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top