icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Nov 2024, 12:41 pm

यवतमाळ : पुसद मध्ये माणूसकीची भिंत फाउंडेशन ने वृद्ध, निराधार, बेघरांसोबत साजरी केली भाऊबीज

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळच्या पुसद येथे माणुसकीची भिंतच्यावतीने बेघर, निराधार, दिव्यांग, असहाय वृद्ध व अनाथांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. वृद्धाश्रम व रुग्णालय परिसरात हा सोहळा संपन्न झाला. माणुसकीची भिंत परिसरात स्वच्छता करून गोरगरीब निराधार वृद्धांची व पुरुषांची दाढी-कटिंग करण्यात आली. त्यानंतर महिलांनी काढलेल्या रांगोळ्यांनी अंगण सजले. पाट मांडण्यात आले. त्यानंतर माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांनी टोपी, टॉवेल, नारळ पेढा देऊन वंचितांना ओवाळले. त्यांच्या कुटुंबातील महिलांना साड्या देण्यात आल्या.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

भीषण गर्मी में शिक्षकों पर जनगणना का दबाव, डिजिटल तरीका से इमारत-परिवार गणना शुरू

Bhandara, Maharashtra:भर उन्हात शिक्षकांना जनगणनेचे चटके इमारत व कुटुंब जनगणनेला सुरुवात. भंडाऱ्यात कडक उन्हाचा पारा सोसत शिक्षकांना आता जनगणनेचे चटके सहन करावा लागत आहे. भर उन्हात शिक्षकांना नेमून दिल्या वार्डात प्रत्यक्ष इमारत गणना व कुटुंब गणनेला सुरुवात झाली आहे.प्रत्येक शिक्षकांकडे 200ते 250 इमारतीचे गणनेचे काम असून हि जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र प्रशासनाने कुठलेही किट किंवा संसाधने न देता शिक्षकांना कागदावर काम करतांना दिसत असून जनगणनेसाठी माहिती संकलीत करण्यास अडचणी येत असून शिक्षकांना उन्हासोबत जनगणनेचे चटके सोसावे लागत आहेत.
0
0
Report
Advertisement

पुणे के हवेली में शॉर्ट सर्किट से गोठे में आग, चार पशु मरे

Shirur, Maharashtra:हवेली पुणे...\nAnc: हवेली तालुक्यातील तुळापूर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना घडलीय,शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत पोपट शिवले या शेतकऱ्याचा संपूर्ण गोठा जळून खाक झालाय.\nया दुर्दैवी आगीत गोठ्यात बांधलेले दोन शर्यतीचे बैल आणि एका घोडीचा होरपळून मृत्यू झालाय तर एक बैल गंभीर रित्या भाजलाय. शेतकरी पोपट शिवले यांचे या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, पोटच्या लेकराप्रमाणे जपलेले पशुधन डोळ्यांदेखत गेल्याने शिवले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण तुळापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.\nप्रतिनिधी हेमंत चापुडे\nझी मिडीया हवेली पुणे...
0
0
Report

जालना के सावंगी बायपास के खेत में 5 वर्षीय ओंकार की हत्या; आरोपी पति-पत्नी गिरफ्तार

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:हरलूल सावंगी बायपास परिसरातील शेतात ५ वर्षांचा गतिमंद बालक ओंकार याची हत्या बापानेच केली मात्र पोलीस तपासात तो सावत्र बाप असल्याचे उघड झाले आहे... दुसऱ्या लग्नानंतरच्या आयुष्यात अडसर ठरत असल्याने पोटच्या मुलाला संपवण्यासाठी जन्मदात्या आईनेही या कृत्यात पतीला साथ दिली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको व गुन्हेशाखेच्या पोलिसांनी २४ तासांत आरोपी संतोष सोनाजी ढाळे आणि पत्नी पूजा यांना अटक केली आहे. आरोपी पूजाचे पहिले पती संदीप यांच्या निधनानंतर, ती गतिमंद मुलगा ओंकारला घेऊन जालन्याला आली होती. तेथे तिची ओळख संतोष ढाळे याच्याशी झाली आणि त्यांनी शिर्डीत लग्न केले. महिनाभरापासून ते  संभाजी नगरात सावित्रीनगर येथे भाड्याने राहत होते. मात्र, ओंकार हा त्यांच्या नव्या संसारात अडसर ठरत असल्याने संतोष दारू पिऊन त्याला सतत मारहाण करायचा. अखेर दोघांनी मिळून ओंकारचा काटा काढण्याचा कट रचला सोमवारी रात्री संतोषने दारूच्या नशेत झोपलेल्या ओंकारला बेदम मारहाण केली,  त्याचा गळा आवळला. यात ओंकार जागीच बेशुद्ध पडला. धक्कादायक म्हणजे, आई पूजाने त्याला वाचवण्याऐवजी स्वतःच्या ओढणीने झाकले. त्यानंतर संतोषने बालकाला घरापासून ५०० मीटर अंतरावरील सावंगी बायपासजवळील शेतात नेऊन ओढणीखाली लपवून मृतदेह फेकून दिला.
0
0
Report
Advertisement

मराठवाड़ा में जल संकट: 220 गांवों में 15 लाख लोग 257 टैंकरों से जलापूर्ति

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्यात उन्हाचा पारा जसजसा वाढतोय तसा पिण्याच्या पाण्याचे संकट वाढू लागले आहे. त्यामुळं मराठवाड्यातील २२० गावांमधील जवळपास १५ लाख लोकांना २५७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ६४७ विहिरींचे अधिग्रहण प्रशासनाने केले आहे. यात सर्वाधिक टैंकर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू आहेत. १३४ गावांमध्ये १७५ टँकरने पाणीपुरवठा सध्या होत आहे. जालना जिल्ह्यातील ५९ गावांना ५७ टँकरने, परभणीतील ५ गावांना ७, हिंगोली ३ गावांना २, नांदेडमधील १५ गावांना ११, लातूरमधील ३ गावांना २ तर धाराशिवमधील १ गावाला ३ अशा २५७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. शासकीय १८ आणि खासगी २३९ टँकरचा यात समावेश आहे.
0
0
Report
Advertisement

लोहमार्ग मरम्मत से 14 दिन यातायात प्रभावित, संभाजीनगर मार्ग बदला

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:लोहमार्ग दुरुस्तीच्या कामाचा फटका पुन्हा एकदा प्रवाशांना वसत आहे. नांदेड रेल्वे विभागांतर्गत विविध मार्गांवर तांत्रिक कामे आणि 'नॉन-इंटरलॉकिंग' ब्लॉक घेण्यात आल्यामुळे संभाजीनगरहून ये-जा करणाऱ्या ३ एक्स्प्रेस रेल्वे २२ मे ते ४ जून या कालावधीत वेगवेगळ्या मार्गांनी वळवल्या आहेत. परिणामी, ऐन उन्हाळी सुट्यांच्या हंगामात सलग १४ दिवस प्रवाशांची प्रचंड परवड होणार आहे. यापूर्वी १५ ते १८ मे या कालावधीत लोहमार्गाच्या कामासाठी मेगाब्लॉक घेतला होता रेल्वे प्रशासनाकडून वारंवार प्रवाशांची परवड होत आहे. रेल्वेचे मार्ग बदलताना प्रवाशांना सोयीस्कर असा पर्यायी मार्ग दिलेला नाही. मार्ग बदलल्यामुळे मनमाड, छत्रपती संभाजीनगर, जालना, मानवत रोड आदी स्थानकांच्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.
0
0
Report

यूएस-ईरान-इसराइल तनाव से विमान सेवाओं पर असर, संभाजीनगर से हैदराबाद-गोवा उड़ानें स्थगित

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर एव्हिएशन टर्बाइन फ्युएलचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे एअरलाइन्स कंपनीने छत्रपती संभाजीनगरची हैदराबाद आणि गोवा विमानसेवा ३० सप्टेंबरपर्यंत बंद केली आहे. एकेकाळी छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून दररोज तब्बल १९ विमानांची उड्डाणे होत होती. या विमानसेवेमुळे शहर थेट देशातील प्रमुख शहरांशी जोडले गेले होते. मात्र, कोविडच्या संकटानंतर ही संख्या सातत्याने घटत गेली. १९ वरून ही संख्या आधी १४, नंतर १२ आणि केवळ ९ विमानांवर येऊन ठेपली होती. आता हैदराबाद आणि गोवा ही दोन विमाने रद्द केल्याने संभाजीनगरमध्ये केवळ 7 विमान शिल्लक आहेत...
0
0
Report

शिरूर रोड खड्डों में डूबी, यातायात बाधित; तत्काल मरम्मत की मांग

Shirur, Maharashtra:पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती – हिवरे – पाबळ – राजगुरूनगर हा प्रमुख मार्ग सध्या अत्यंत खराब अवस्थेत असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. या मार्गावरून दररोज रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये कामासाठी जाणारे कर्मचारी, शेतकरी, व्यापारी तसेच शाळकरी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर प्रवास करत असतात. मात्र रस्त्याची झालेली दुरवस्था पाहता अपघातांचा धोका वाढला असून अनेक ठिकाणी वाहनांचे नुकसान होत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना रस्ता ओळखणे कठीण होतंय त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी केलीय
0
0
Report
Advertisement

सोलापूर में बिजली के झटके से नगर निगम ठेकेदार की मौत

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - विजेचा धक्का लागून महानगरपालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू अँकर : जुळे सोलापुरातील ए.जी. पाटील नगर येथे विजेचा धक्का लागून महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. काल २० मे २०२६ रोजी संध्याकाळच्या sुमारास ही घटना घडली. यामध्ये इस्माईल सलीम पटेल या 32 वर्षीय तरुण कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ए.जी. पाटील नगर परिसरात विजेच्या खांबावर चडून काम करत असताना इस्माईल याला अचानक विजेचा जोरदार धक्का लागल्याने तो जागीच बेशुद्ध पडला. बेशुद्धावस्थेतच त्याला तात्काळ सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. अचानक घडलेल्या या दुर्घटनेने संपूर्ण कुटुंंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top