icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Nov 2024, 12:41 pm

यवतमाळ : पुसद मध्ये माणूसकीची भिंत फाउंडेशन ने वृद्ध, निराधार, बेघरांसोबत साजरी केली भाऊबीज

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळच्या पुसद येथे माणुसकीची भिंतच्यावतीने बेघर, निराधार, दिव्यांग, असहाय वृद्ध व अनाथांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. वृद्धाश्रम व रुग्णालय परिसरात हा सोहळा संपन्न झाला. माणुसकीची भिंत परिसरात स्वच्छता करून गोरगरीब निराधार वृद्धांची व पुरुषांची दाढी-कटिंग करण्यात आली. त्यानंतर महिलांनी काढलेल्या रांगोळ्यांनी अंगण सजले. पाट मांडण्यात आले. त्यानंतर माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांनी टोपी, टॉवेल, नारळ पेढा देऊन वंचितांना ओवाळले. त्यांच्या कुटुंबातील महिलांना साड्या देण्यात आल्या.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

जालना में भीषण गर्मी में पानी की कमी, महिलाएं 2 किमी पानी के लिए रोज चलतीं

Jalna, Maharashtra:जालना : जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई,भर उन्हात २ किलोमीटर जाऊन विहिरीतून पाणी शेंदून भागवावी लागते पाण्याची गरज(पॅकेज) अँकर :सध्या जालना जिल्ह्यात तिव्र पाणीटंचाई जाणवतीय.अनेक गावातील पाण्याचे स्त्रोत वाढत्या तापमानामुळे आटलेत.तर काही गावात मोजक्याच विहिरीत पाणी शिल्लक असल्यानं याच विहीरीतून भर उन्हात पाणी शेंदून काढत पाण्याची गरज पूर्ण करण्याची वेळ महिलांवर आलीय.बघूया जालना जिल्ह्यातील पाणीटंचाईवरचा हा स्पेशल रिपोर्ट. व्हिओ:०१: सध्या जालना जिल्ह्यात तापमानाचा पारा 42 डिग्री सेल्सिअसपर्यत गेलाय.अशा कडक उन्हात भोकरदन तालुक्यातील जानेफळ गायकवाड गावातील महिलांवर गावातील एकमेव विहिरीतून पाणी शेंदून काढण्याची वेळ आलीय.गावात नळाला पाणी येत नाही.त्यामुळे भर उन्हात गावातील महिलांवर विहिरीतून हाताने पाणी शेंदून काढण्याची वेळ आलीय.गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून गावातील महिला याच विहिरीतून पाणी काढून दररोजच्या पाण्याची भूक भागवतायत. बाईट :०१:ग्रामस्थ महिला( निळ्या रंगाची साडी असलेली महिला) बाईट : ग्रामस्थ महिला(काळी साडी असलेली महिला) व्हिओ :०२: गावच्या परिसरातील पाण्याचे स्रोत कोरडे पडल्यानं याच गावातील महिलांना दररोज 2 किलोमीटर पर्यत पाण्यासाठी पायपीट करावी लागते.त्यामुळे गावातील पाणीप्रश्न सोडवण्याची मागणी महिलांनी केलीय. बाईट :०३: ग्रामस्थ महिला(गुलाबी रंगाची साडी असलेली महिला) व्हिओ :०३: सध्या जालना जिल्ह्यातील व्हिओ:०३:सध्या जालना जिल्ह्यातील 16 गावं आणि 23 वाड्यांना 31 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरूय.मात्र अनेक गावांची मागणी असूनही अजूनही या गावांचे टँकर सुरू करण्याबाबतचे प्रस्ताव मंजूर झालेले नाही.त्यामुळे रखडलेल्या प्रस्तावाबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन पाणीटंचाई असलेल्या गावात टँकर सुरू करावे एवढीच ग्रामस्थांची माफक अपेक्षाय. नितेश महाजन,झी-२४ तास,जालना
0
0
Report

नवापूर में बर्ड फ्लू से पोल्ट्री उद्योग को करोड़ों का नुकसान, कलिंग तेज

Dhule, Maharashtra:देशाचं पोल्ट्री हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवापूरला बर्ड फ्लूने विळखा घातला आहे. बर्ड फ्लू च्या विळख्यानंतर आता प्रशासन गतिमान पावला उचलत, बाधित क्षेत्राला निर्जंतुकीकरण करण्याच कामं युद्ध पातळीवर करत आहे. सुमारे दीड लाख कोंबड्या तर दहा लाखांपर्यंत अंडी नष्ट केली जाणार असल्याचा पातळी माहिती समोर आली आहे. नवापूरमध्ये तिसऱ्यांदा बर्ड फ्लूचा लागण झाल्याने पोल्ट्री व्यवसायिकाच्या कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. बर्ड फ्लू बाधित क्षेत्राला प्रतिबंधित करण्यात आलेले आहे. तसेच पशुसंवर्धन विभागाकडून 25 पथक तयार करून बाधित क्षेत्र तील कोंबड्या कलिंग करण्याचं काम केलं जात आहे. तसेच बाधित अंडी देखील नष्ट करण्यात येणारा असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिलेली आहे. आवश्यकता भासल्यास बाहेरच्या जिल्ह्यातून पथक बोलावली जातील अशी माहिती देखील पशुसंवर्धन विभागाने दिली आहे. सुरुवातीला बाधित पोल्ट्री फार्मचा पंचनामा करण्यात येत असून, त्यानंतर प्रत्येक कोंबडीचे शास्त्रशुद्ध पद्धतीने कलिंग करून त्या पोत्यांमध्ये भरून खोल खड्ड्यात पुरल्या जात आहेत. बर्ड फ्लूची पुष्टी झाल्यानंतर प्रशासनाने कारवाईचा वेग वाढवला आहे. सुरुवातीला काही अडचणींमुळे कलिंग प्रक्रियेला उशीर झाला असला, तरी आता सात पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचे कलिंग करण्यात येत आहे. यासोबतच मोठ्या प्रमाणावर अंडी आणि पशुखाद्यही नष्ट करण्यात येणार आहे. ही संपूर्ण कलिंग प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सुमारे पाच दिवसांचा कालावधी लागणार असून, पोल्ट्री व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली असून, मोठ्या पक्षासाठी १४० रुपये, लहान पक्षासाठी १२० रुपये आणि प्रत्येक अंड्यासाठी ४ रुपये अशी भरपाई दिली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. बाइट: संजय खाचने पशुसंवर्धन सहआयुक्त. नंदी अंडी देणारा एका पक्षी वाढविण्यासाठी ५०० रुपये खर्च, मात्र शासनाकडून १४० भरपाई, मिळत असल्याने पोल्ट्री असोसिएशनचा संताप व्यक्त केला आहे. बर्ड फ्युचर हे संकट परिसरातील १२ लाख पक्षांवर आलं असूम, पहिल्या टप्प्यात १ किमी परिसरात कलिंग सुरू आहे. बर्ड फ्युच्या मगरमीठीमुळे पोल्ट्री व्यवसायिकांमध्ये मोठी चिंता पसरली आहे. तिसऱ्यांदा हा संसर्ग आढळल्याने कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे. नवापूर परिसरात सुमारे १२ लाख पक्षी असून, परिस्थिती गंभीर झाल्यास मोठ्या प्रमाणावर कलिंग करण्याची वेळ येऊ शकते. पहिल्या टप्प्यात एक किलोमीटर परिसरातील पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचे कलिंग करण्यात येणार आहे. २००६ आणि २०२१ नंतर आता २०२६ मध्ये पुन्हा बर्ड फ्लू आल्याने पोल्ट्री व्यवसाय पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. बाइट: आरिफ बलोचिय, अध्यक्ष, पोल्ट्री असोसिएशनचे. नवापूर परिसरामध्ये बर्ड फ्लूच्या लागण मुळे अंड्यांचा पुरवठा विस्कलीत झाला असून, याचा मोठा आर्थिक फटका या परिसरातील अर्थव्यवस्थेला बसणार आहे. करोडो रुपयांच् नुकसान व्यावसायिकांना सोसावा लागणार असून, या ठिकाणी बेरोजगारी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
0
0
Report

Amol Mitkari के ट्वीट से NCP में हलचल, बोले- दरवाज़ा बंद हुआ तो उंगलियाँ दबीं

Akola, Maharashtra:राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. “जब तुमने मेरे लिए दरवाज़ा बंद किया, तब मेरी उंगलियां उस चौखट में दब रही थीं.. #कडवा सच” असे ट्विट त्यांनी केले होते. दरम्यान, सोशल मीडियावर व्यक्त होताना त्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या या ट्विटचा विधानपरिषद उमेदवारीशी कोणताही संबंध नाही.“मी कधीही उमेदवारी मागितलेली नाही, फक्त पक्षाकडे माझी गरज आहे की नाही, एवढंच विचारलं,”असे त्यांनी सांगितले.पक्षात आपली उपयुक्तता संपली असेल तर वारंवार अपमान सहन करण्यापेक्षा शांत राहणे योग्य, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच, उर्दू शायरीच्या माध्यमातून त्यांनी आपली मनस्थिती मांडत साधेपणा आणि प्रामाणिकपणावर भर दिला.“फटी हुई झोळी घेऊन फिरणारे आहोत,” असे म्हणत त्यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट केली.
0
0
Report
Advertisement

मिरा-भायंदर में 4.82 करोड़ के जप्त माल नागरिकों को वापस, पुलिस ने सौंपा

Mira Bhayandar, Maharashtra:मिरा-भाईंदर : ब्रेकिंग परिमंडळ-१ कडून जप्त मुद्देमाल तक्रारदारांना परत मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-१ तर्फे तब्बल ४ कोटी ८२ लाख किमतीचा जप्त मुद्देमाल तक्रारदारांना परत करण्यात आला आहे. यामध्ये 3.03 कोटींचे सोन्याचे दागिने, 4 लाख ४६ हजारांचा चांदी आणि ₹27 लाख ४३ हजार किमतीचे मोबाईल नागरिकांना सुपूर्द करण्यात आले. या उपक्रमामुळे पोलिसांवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे दिसून येत आहे. पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर आयुक्त दत्तात्रय शिंदे आणि उपायुक्त राहुल चव्हाण यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
0
Report
Advertisement

पायधुनि में परिवार की मौत के बाद तरबूज बाजार पर डर

Navi Mumbai, Maharashtra:मुंबई के पायधुनि में एक ही परिवार के चार सदस्यों की संदिग्ध फूड पॉइजनिंग से मौत का मामला 25 अप्रैल को सामने आया है। 25 अप्रैल को इस परिवार ने अपने घर आए महमानों के साथ चिकन बिरयानी खाई थी लेकिन रात को इस परिवार ने तरबूज भी खाया था, जिसके बाद इन्हें कुछ घंटों बाद उल्टी, दस्त, सांस लेने में तकलीफ शुरू हुई। उन्हें अस्पताल ले जाया गया, लेकिन 26 अप्रैल को चारों की मौत हो गई। तरबूज खाने की वजह से मौत की आशंका जताई गई है। इस घटना का असर तरबूज की खपत पर भी पड़ता नजर आ रहा है। Navi Mumbai के APMC मार्केट में रोजाना 40 से 50 ट्रक तरबूज आते हैं। इस घटना के बाद लोगों में तरबूज खाने को लेकर भय दिखाई पड़ रहा है, जिसकी वजह से तरबूज की बिक्री प्रभावित हो रही है। बड़े पैमाने पर तरबूज मार्केट में पड़ा हुआ है। इस व्यवसाय से जुडे़ व्यापारी बताते हैं कि पायधुनि की इस घटना के बाद लोगों में तरबूज खाने पर डर का माहौल है। इसलिए गर्मी के दिनों में तरबूज की खपत नहीं हो पा रही है। इसका जायजा लिया है हमारे प्रतिनेत्री/swati नाइक ने।
0
0
Report

मिसिंग लिंक के कारण पुणे- मुंबई एक्सप्रेसवे पर यातायात बाधित

Varsoli, Maharashtra:मिसिंग लिंकका गोंधळ...! उद्घाटनानंतरही एक्सप्रेसवेवर कोंडी पुणे–मुंबई एक्सप्रेस हायवेवर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. काल मोठ्या गाजावाज्यात मिसिंग लिंकचं उद्घाटन झालं, मात्र आज सकाळी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नव्हता. त्यामुळे प्रवाशांना तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून राहावं लागलं. नेमकं काय घडलं, पाहूया हा विशेष रिपोर्ट. पुणे–मुंबई एक्सप्रेस हायवे... राज्यातील सर्वाधिक वर्दळीचा मार्ग. पण गेल्या दोन दिवसांपासून इथे प्रवास म्हणजे डोकेदुखी ठरतोय. आज सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक ठिकाणी वाहतूक अक्षरशः ठप्प झाली. काल मिसिंग लिंकचं उद्घाटन मोठ्या थाटामाटात करण्यात आलं. मात्र आज सकाळी हा मार्ग वाहतकीसाठी खुला करण्यात आला नव्हता. उद्घाटनासाठी उभारण्यात आलेल्या स्टेजमुळे वाहतुकीवर परिणाम झाला. दुपारनंतर मात्र परिस्थितीत बदल झाला. उद्घाटन सोहळ्यासाठी उभारण्यात आलेला स्टेज हटवण्यात आला... आणि त्यानंतर पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक मिसिंग लिंकवरून सुरू करण्यात आली. वाहतूक हळूहळू सुरळीत होऊ लागली असली, तरी सकाळपासून अडकलेल्या वाहनचालकांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागला. End vo : मिसिंग लिंकमुळे प्रवास वेळ कमी होणार अशी अपेक्षा होती, मात्र सुरुवातीला नियोजनाच्या अभावामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. पुढील काही दिवसांत परिस्थिती सुधारते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
0
0
Report

रत्नागिरी में चिपळूण बस चालक पर मारहाण, वीडियो वायरल

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रत्नागिरीत संताप!.. चिपळूण आगाराच्या बस चालकाला कर्जतमध्ये बेदम मारहाण..व्हिडिओ व्हायरल.. अँकर एक धक्कादायक बातमी समोर येतेय,जी पाहून एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आगाराच्या एका एसटी बस चालकाला अहिल्यांनगरमधील कर्जत जवळ काही तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही बस बीडहून चिपळूणच्या दिशेने निघाली होती.कर्जत जवळच्या एका बस थांब्यावर बस थांबली नाही,या कारणावरून संतापलेल्या काही प्रवाशांनी किंवा स्थानिक तरुणांनी एसटीचा पाठलाग केला. केवळ बस न थांबल्याच्या रागातून या तरुणांनी एसटी समोर आपली दुचाकी आडवी लावली आणि चालकाला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली.. या भीषण मारहाणीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की,चालक आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असतानाही त्याला बेदम मारले जात आहे.दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण पसरले होते... एसटी चालक-वाहकांवर अशा प्रकारे होणारे हल्ले आता चिंतेचा विषय ठरत आहेत.या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता पोलीस या मारहाणा करणाऱ्यांवर काय कारवाई करणार,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.चिपळूण आगारातूनही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे..
0
0
Report
Advertisement

परभणी के जिंतूर के सायखेडा गाँव में सडक नहीं पहुंची; ग्रामीण पाय-पाय को मजबूर

Parbhani, Maharashtra:स्वातंत्र्याचा अमृतकाळ साजरा होऊन गेला देश डिजिटल इंडियाच्या गप्पा मारतोय पण परभणीच्या जिंतूर तालुक्यात एक असं दुर्दैवी गाव आहे जिथे साधी सडकही पोहोचलेली नाहीजिंतूरमधील सायखेडा हे ते गाव जिथल्या ग्रामस्थांच्या नशिबी स्वातंत्र्यानंतरही केवळ पायपीट'च लिहिलेलं आहे आजतागायत या गावाला पक्का रस्ता मिळालेला नाही.पावसाळ्यात तर या गावाची अवस्था एखाद्या बेटासारखी होते विशेष म्हणजे हे गाव पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मतदारसंघात येतं तरीही इथला वनवास संपलेला नाही सायखेडा गावला जायला रस्ता उपलब्ध नसल्याने गावकऱ्यांना पायपीट करत गाव गाठाव लागते याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी...
0
0
Report

धाराशिव कृषी विभाग में 22 करोड़ रुपए के घोटाले की आशंका, लाभार्थी सूची गायब

Dharashiv, Maharashtra:धाराशिवमध्ये कृषी विभागात २२ कोटींचा घोटाळ्याचा संशय; मोफत बी-बियाणे व खत वाटपाची नोंद गायब, लाभार्थी यादीही बेपत्ता! अँकर धाराशिव जिल्ह्यात कृषी विभागात मोठ्या घोटाळ्याचा संशय व्यक्त केला जातोय. खरीप आणि रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना देण्यात येणारे मोफत बी-बियाणे, खत आणि औषधांचे किट वाटप झालेच नाहीत किंवा झाले असतील तरी त्याची अधिकृत नोंदच उपलब्ध नाही. तब्बल २२ कोटी रुपयांच्या या योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. नेमका काय आहे हा प्रकार पाहूया या रिपोर्टमधून... कृषी विभागाकडून दरवर्षी हंगामापूर्वी शेतकऱ्यांना बी-बियाणे, कीटकनाशके आणि सुरक्षा साहित्याचे किट वाटप केले जाते. हे वाटप शेतकरी गट आणि अधिकृत यंत्रणेमार्फत केलं जातं. मात्र २०२५-२६ या कालावधीत धाराशिव जिल्ह्यात या किटचं वाटप झाल्याची कोणतीही ठोस नोंद नाही. धक्का... ज्यांना किट देण्यात आलं, त्यांची लाभार्थी यादीच उपलब्ध नाही. या प्रकरणाची पोलखोल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झाली. उभाठा गटाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला असता अधिकारी निरुत्तर झाले. २२ कोटी रुपयांच्या साहित्याचं नेमकं काय झालं, हा मोठा सवाल उपस्थित झाला आहे. झी २४ तासच्या टीमने जिल्ह्यातील विविध गावांमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला असता अनेकांनी किट मिळालंच नसल्याचं सांगितलं. काही शेतकऱ्यांना केवळ अर्धवट किंवा कमी दर्जाचं बी-बियाणं मिळालं, मात्र खत, औषधं आणि सुरक्षा साहित्य मिळालंच नसल्याची तक्रार त्यांनी केली. आम्हाला कोणतंही किट मिळालं नाही... फक्त नावाला बी दिलं, पण औषधं आणि इतर साहित्य काहीच मिळालं नाही. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे. धाराशिवमध्ये कृषी विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला झालंय. शेतकऱ्यांच्या हक्काच्या योजनांमध्ये जर असा गैरव्यवहार होत असेल, तर जबाबदार कोण? आणि २२ कोटींचं साहित्य नेमकं कुठे गेलं? या चौकशीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. ज्ञानेश्वर पतंगे, झी २४ तास, धाराशिव.
0
0
Report

सोलापुर में व्यावसायिक गैस संकट: कीमतें बढ़ीं, गैस मिलना मुश्किल

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - एकीकडे कमर्शियल गैस के दरामध्ये भरमसाठ वाढ, तर दुसरीकडे सोलापुरात मात्र पैसे देऊनही गैस मिळत नसल्याने हॉटेल व्यवसायिक त्रस्त - एकीकडे व्यावसायिक गैसच्या दरात भरमसाठ वाढ तर दुसरीकडे पैसे देऊनही गैस मिळत नसल्याने हॉटेल व्यवसायिक त्रस्त - सोलापूरात दोन महिने उलटले तरीही व्यावसायिक गैसचा तुटवडा कायम - युद्धाच्या दोन महिन्यानंतर देखील सोलापुरातील हॉटेल व्यवसायिक अडचणीतच - व्यावसायिक गैस सिलिंडरचा तुटवड्यामुळे हॉटेल व्यवसायिक तसेच ढाबाचालकांचे मोठे आर्थिक नुकसान
0
0
Report
Advertisement

जुन्नर में 46 बिबटों का जेरबंद: वन विभाग का मास्टर प्लान सामने

Barav, Maharashtra:पुणे जिल्ह्याचा शिरूर तालुक्यातल्या पिंपरखेड गावात गेल्या काही महिन्यांपासून सूर्योदयाच्या आधी-आधी काळजाचा ठोका चुकायचा. ऊसाच्या प्रत्येक पात्यात मृत्यू दबा धरून बसला होता. पण जुन्नर वनविभागाने असं काही आव्हान दिलंय, ज्याचा डंका संपूर्ण देशात वाजतोय. भारतातीलच नाही तर जगातील सर्वात मोठे रेस्क्यू ऑपरेशन हे तुम्हाला अशक्य वाटेल, पण हे सत्य आहे! अवघ्या 3 ते 5 किलोमीटरच्या परिघातून गेल्या 120 दिवसांत तब्बल 46 बिबट्यांना जेरबंद करण्यात आलंय. एकाच परिसरात बिबट्यांची इतकी मोठी संख्या असणं निसर्जप्रेमींसाठी अभ्यासाचा विषय ठरलाय. रात्रं-दिवस गस्त, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जीवावर उदार होऊन राबणाऱ्या वनविभागाने अखेर हा बिबट्यांचा गड सर केलाय.
0
0
Report

वाशीम में सेतु सेवा केंद्रों की तकनीकी खराबी, नागरिकों को भारी परेशानियाँ बनीं

Washim, Maharashtra:वाशीम: आपले सरकार सेतू सेवा केंद्रांची सेवा मागील पाच दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे. महा आयटीच्या पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सर्व कामकाज बंद पडले असून वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. उत्पन्न दाखला, अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलियर यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे मिळत नसल्याने विद्यार्थी नागरिक आणि वयोवृद्धांना वारंवार सेतू केंद्रावर फेऱ्या माराव्या लागत असूनही काम होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ही तांत्रिक अडचण दूर करून सेतू सुविधा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top