icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Nov 2024, 12:41 pm

यवतमाळ : पुसद मध्ये माणूसकीची भिंत फाउंडेशन ने वृद्ध, निराधार, बेघरांसोबत साजरी केली भाऊबीज

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळच्या पुसद येथे माणुसकीची भिंतच्यावतीने बेघर, निराधार, दिव्यांग, असहाय वृद्ध व अनाथांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. वृद्धाश्रम व रुग्णालय परिसरात हा सोहळा संपन्न झाला. माणुसकीची भिंत परिसरात स्वच्छता करून गोरगरीब निराधार वृद्धांची व पुरुषांची दाढी-कटिंग करण्यात आली. त्यानंतर महिलांनी काढलेल्या रांगोळ्यांनी अंगण सजले. पाट मांडण्यात आले. त्यानंतर माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांनी टोपी, टॉवेल, नारळ पेढा देऊन वंचितांना ओवाळले. त्यांच्या कुटुंबातील महिलांना साड्या देण्यात आल्या.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

रत्नागिरी के आरवली में मासळीवाहू कंटेनर पलटा, चालक गंभीर

Ratnagiri, Maharashtra:मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर आरवली जवळ मासळीवाहू कंटेनर पलटी. चालक गंभीर, लाखों रुपयांच्या मासळीचे नुकसान. रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील आरवली येथे मासळीची वाहतूक करणाऱ्या एका कंटेनरचा bhiषण अपघात झाला. अनियंत्रित झालेला कंटेनर महामार्गावर पलटी झाल्याने चालक गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाहेरगावी निर्यातीसाठी नेण्यात येणारी लाखो रुपयांची मासळी या अपघातात rस्त्यावर सांडल्याने मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केले. दरम्यान, अपघातग्रस्त कंटेनरमधील मासळी दुसऱ्या वाहनात भरताना कामगारांकडून सुरक्षा नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे पाहायला मिळाले. हातमोजे, सुरक्षा टोपी आणि बुटांशिवाय आरोग्याला घातक ठरेल अशा पद्धतीने मासळीची हाताळणी केली जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.. पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत..
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी के तळेकटे गाँव ने महामार्ग किनारे बड़े पैमाने पर वृक्षारोपण कर पर्यावरण संरक्षण का नया मॉडल पेश किया

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. तळेकाटे गावाची पर्यावरण पूरक पाऊल.. मुंबई गोवा महामार्गाच्या कडेला भव्य वृक्षारोपण.. अँकर मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक सुखद और कौतुकास्पद बातमी.. महामार्गाच्या चौपदरीकरणात झालेले वृक्षतोड भरून करण्यासाठी तळेकाटे गावाने एक आदर्श पाहून उचललंय.. शासकीय यंत्रणेची वाट न पाहता संपूर्ण गावाने एकत्र येत महामार्गाच्या कडेला भव्य वृक्षरोपण केलं आहे.. केवळ झाडे लावलीच नाहीत तर जगण्यासाठी गावकऱ्यांनी ट्री गाईड्स आणि पावसाच्या टँकरची खास सोयही केली आहे.. लोकसहभागातून उभ्या राहिल्या या हरित पॅटर्न चं सध्या सर्वत्र कौतुक होतंय..
0
0
Report

शिवेंद्रराजे भोसले ने सातारा के विकास दौरे में बैलगाड़ी चलाईं; समन्वय पर किया स्पष्टीकरण

Satara, Maharashtra:सातारा नगरपालिका हद्दीतील राज्य शासनाच्या वतीने चालू असलेल्या विकास कामांचा पाहणी दौरा आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केला. त्याचबरोबर भविष्यात नगरपालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी एका विकासकामाचा ठिकाणी चक्क मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बैलगाडीचा कासरा हातात घेत बैलगाडी देखील चालवली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना नगरपालिकेतील विकास कामांवरून खासदार उदयनराजे भोसले आणि नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्यामध्ये समन्वय नसल्याचे प्रश्नावर बोलताना मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी हा आरोप फेटाळून लावला. खासदार उदयनराजे असतील किंवा मी आम्ही सातारा शहराच्या विकास कामांसाठी प्रयत्न करत आहोत. दरम्यान एखाद्या पाहणी दौऱ्या दरम्यान कोणी उपस्थित नसेल तर समन्वय नाही असा त्याचा अर्थ होत नाही असा निर्वाळा मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला. तर उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावरून विचारले असता उद्धव ठाकरे यांनी असे दौरे खासदार फुटण्यापूर्वी केले असते तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती, असा टोला मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी लगावला आहे.
0
0
Report
0
0
Report
Advertisement

महामार्ग के किनारे ग्रामस्थों ने वृक्षारोपण शुरू किया: एक हजार से अधिक पौधे लगाए गए

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी-तळेकांटे मधील ग्रामस्थांनी महामार्गावर उतरत रस्त्याच्या दुतर्फा केली वृक्ष लागवड अँकर - मुंबई गोवा महामार्गावर तळेकांटे येथील ग्रामस्थांनी एकत्र येत महामार्गाच्या दुतर्फा झाडं लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ झाला. प्रशासनावर आणि ठेकेदारावर अवलंबून न राहता ग्रामस्थांनी स्वत: रस्त्यावर उतरत झाडे लावली आहेत. पहिल्या टप्प्यात जवळपास एक हजार झाडे लावण्यात येत आहेत.यामध्ये कोकणातील झाडांना प्रामुख्याने प्राधान्य देण्यात आलं आहे, यात वड , पिंपळ, आंबा , जांभूळ , फणस, बेलफळ यांसारखी झाडं आहेत.
0
0
Report

आषाढ़ी वारी में पानी की कमी नहीं होगी, गोरे ने जल-सुरक्षा के कड़े निर्देश दिए

Pandharpur, Maharashtra:यंदा जरी दुष्काळाचे सावट असले तरी आषाढी वारीसाठी चालणाऱ्या वारकऱ्यांना पाणी कमी पडणार नाही, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी निर्णय आषाढी वारी पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आज पंढरपूर मध्ये वाखरी पालखी तळ, 65 एकर, चंद्रभागा वाळवंट, दर्शन रांग या ठिकाणी देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी केली. वारीची कामे वेळेत पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या आहेत. यंदा पाऊस कमी असला तरी वारी मार्गावर 500 पिण्याचे पाणी उपलब्ध असणारे टँकर असणार आहेत. पाण्याची कमतरता पडू देणार नाही. उजनी धरणातून आषाढी वारी काळात वारकऱ्याना स्नानासाठी पाणी सोडण्यासाठी आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देणार असून वारी काळात पाणी उपलब्ध ठेवले जाईल असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले
0
0
Report
Advertisement

चंद्रकांत पाटील: RSS देशद्रोही नहीं—शाखा में भी जाना चाहिए

Sangli, Maharashtra:RSS ही देशद्रोही संघटना नहीं, विश्वास नांगरे पाटलांनी कार्यक्रमातच नव्हे तर शाखेत पण जावं - मंत्री चंद्रकांत पाटील. अँकर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,ही देशद्रोही संघटना नहीं,ते देश प्रेम शिकवणार संघटना, त्यामुळे विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात गलेते काही चुकीचं नाही,उलट त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत देखील जावं,असं विधान माझ्याशी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.नागपूर येथे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटלांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत आरएसएस बद्दल स्तुती सुमन उधळले होते,यावरून सुरू असलेल्या टीकेवरून मंत्री चंद्रकांत पाटलांनी हे विधान करत विश्वास नांगरे पाटलांची पाठराखण केले आहे,ते सांगलीमध्ये बोलत होते. चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री.
0
0
Report

रत्नागिरी के उद्योग मंत्री के पेपर फूटने पर जांच की मांग उठी, कार्रवाई की तैयारी

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- उद्योग मंत्री उदय सामंत याची चौकशी होईल याची कारवाई होईल या प्रवृत्तीच्या विरोधात शासन नक्की कारवाई करेल सरकार हा विषय नक्की गांभीर्याने हाताळले परीक्षेमध्ये पारदर्शकता असणे आवश्यक पेपर फुटू नयेत यासाठी दक्षता घेतली गेलीच पाहिजे ऑन राहुल गांधी राहुल गांधी नुसती परदेशात जाऊन टीका करत राहिले आहेत एखादी सिस्टीम किंवा संस्था सुधारण्यासाठी कधीही मार्गदर्शन केलेले नाही Nda सरकार वाईट आहे हे दाखवण्याचा फक्त ते प्रयत्न करतात परंतु हे दाखवताना काँग्रेसचा अस्तित्व काय हे कदाचित ते विसरले असावेत 80 ते 90 सलग निवडणुका हरले आहेत त्यांनी आमच्यावरती काय टीका करावी ऑन राज ठाकरे दौरा लोकशाहीमध्ये कोणी कुठेही फिरावं कोणाचाही प्रचार करावा तो पण कधी करावा हे सगळं गेल्यावरती सुचू नये 2019 ला उद्धव ठाकरे सेना काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसली ही खरी गद्दारी उद्धव ठाकरे यांनी केली सहा खासदार आणि आम्ही जो उठाव केला ते गद्दार नाहीत वंदनीय बाळासाहेबांचा विचार ज्यांनी विकला ते खरे गद्दार आहेत ऑन उद्धव ठाकरे दौरा किती दिवस फिरतात ते बघू ना ते फक्त गद्दार गद्दार गद्दारच म्हणतात ज्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसोबत गद्दारी केली त्यांनी गद्दारीची भाषा करू नये ऑन ऑपरेशन टायगर आमदार महाविकास आघाडीची मुंबईमध्ये जी बैठक झाली त्यानंतर ऑपरेशन आमदार याची चर्चा सुरू या बैठकीला 24 आमदार गैरहजर होते या आमदारांच्या मनात नक्की काय आहे हे विचारलं पाहिजे, महाविकास आघाडीच्या नेतृत्वावरती सगळे नाराज स्वतःहून जर कोणी शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारत असतील तर त्याला आम्ही कशाला नाही म्हणू 24 आमदार गैरहजर राहिले त्यांच्याशी आमची चर्चा करू त्यांची नाराजी काय ऑन राजकीय शिलेदार घोषणा ही राजकारणाची एक प्रक्रिया आहे कुणामुळे कुणाचा पक्ष थांबत नाही परंतु तो पक्ष काय ताकतीचा आहे याचं आत्मचिंतन केलं जावं शिंदेंची शिवसेना खासदारांची बाबतीतला एक नंबरचा पक्ष महायुती सहा खासदारांनी वाढली आहे कोण कुणाच्या विरोधात उभे राहणार यापेक्षा कोण जिंकणार हे महत्त्वाचं असतं ऑन श्रीकांत शिंदे केंद्रीय मंत्री पद श्रीकांत शिंदे यांनी आपला आवाका तयार केला आहे केंद्रीय मंत्री व्हायला ते नक्की पात्र गुलाबराव पाटील यांची नाही आमच्या सर्वांची इच्छा आहे श्रीकांत शिंदे केंद्रामध्ये मंत्री झाले पाहिजे स्वतःच्या कामाने ते आता स्वयंभू नेते झाले आहेत ऑन सामान स्टेटस त्याची चर्चा व्हावी म्हणूनच मी ते स्टेटस ठेवलं होतं शिंदे आणि फडणवीस यांच्यातलं बॉण्डिंग अतिशय विलक्षण आहे त्यामुळे दुसरा विमानामध्ये बसला तरी त्यांचं बॉण्डिंग कमी होणार नाही त्यांचं बॉण्डिंग राजकारणाच्या पलीकडे आहे फडणवीस एका खिडकीकडे बसले होते तर उद्धव ठाकरे दुसऱ्या खिडकीकडे त्यामुळे दोघांमध्ये चर्चा कशी होऊ शकते हे मला कळलं नाही देवेंद्र फडणवीस यांनी मधली सीट रिकामी ठेवली होती त्यामुळे पुढचं उत्तर मिळावं म्हणून मी हा स्टेटस ठेवला होता..
0
0
Report

चंद्रपुर में पोलियो टीकाकरण अभियान शुरू, 0–5 साल के बच्चों को डोज वितरित

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्हा प्रशासन व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आज राबविली जात आहे पोलिओ लसीकरण मोहीम अँकर:-- चंद्रपूर जिल्हा प्रशासन व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आज 'दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी' या घोषवाक्याखाली राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जात आहे. आरोग्य विभागाने या मोहीमसाठी व्यापक नियोजन पूर्ण केले आहे. या मोहीमेअंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना स्थानिक लसीकरण केंद्रावर पोलिओची लस देण्यात येत आहे. नागरिकांनी आपल्या पाच वर्षाखालील मुला-मुलींना वेळेत पोलिओची लस देण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. चंद्रपूर मनपा क्षेत्रातील रयतवारी कॉलरी येथील कार्यक्रमात भाजप गटनेते शेखर शेट्टी व नगरसेविका राजलक्ष्मी कारंगल यांच्या उपस्थितीत लहान बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला।
0
0
Report
Advertisement

रात की भारी बारिश ने वाशीम के किसानों की फसलें डुबो दीं

Washim, Maharashtra:अचानक रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिंपरी, नेतंसा, अंचळ, जोगेश्वरी, कुकसा, मागूळ झणक, कोयाळी आणि जायखेडा परिसराला या पावसाचा सर्वाधिक फटका बसला. या भागातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गालगतच्या नाल्याचे पाणी कांचन नदीत सोडले जात असल्याने थोड्याशा पावसातही नदीला पूर येत असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. नदीने रौद्ररूप धारण केल्याने हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून नुकतीच केलेली खरीपाची पेरणीही वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतकर्यावर दुबार पेरणीचे संकट कोसळला आहे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी तसेच या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
0
0
Report

शिर्डी दौरे पर उद्धव ठाकरे के समर्थकों की चुप्पी: वाकचौरे ने कुछ नहीं कहा—मौन बना सवाल

Shirdi, Maharashtra:मनोज जरांगे यांच्या प्रश्नांवर शिंदे गटात गेलेल्या खा.भाऊसाहीेब वाकचौरे यांनी बोलणं टाळलं... उद्धव ठाकरेंना अर्धवट सोडून खासदारांनी जायला नको होतं मनोज जरांगे यांच्या या वक्तव्यावर वाकचौरे यांनी बोलणं टाळलं.. याबाबत मी काहीही भाष्य करणार नाही... खा.भाऊसाहेब वाकचौरे यांची प्रतिक्रिया... उद्धव ठाकरे शिर्डी दौरा... उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याबाबत देखील मी काहीही सांगू आणि बोलू इच्छित नाही... राजकीय प्रश्नांवर खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचं मौन.. टीकाटिप्पणी ही चालूच राहणार आहे... एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची प्रक्रिया सुरूच राहते त्यामुळे मी कुठलेही भाष्य करू इच्छित नाही... मागील कालावधीत आमच्यावर आरोप सुरू होते आता ही सुरू आहेत.. त्यामुळे मी भाष्य करणार नाही..- खा.भाऊसाहेब वाकचौरे
0
0
Report

अकोला के बार्शीटाकळी में स्कूल के सामने गटर जाम, दुर्गंध से बच्चे परेशान

Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या झोडगा येथील जिल्हा परिषद शाळेसमोरील तुंबलेल्या गटाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते कुलदीप चव्हाण यांनी थेट गटारीत बसून अनोखे आंदोलन केले आहे, या आंदोलनामुळे ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. झोडगा येथील जिल्हा परिषद शाळेसमोरील गटार अनेक दिवसांपासून तुंबले असून सांडपाणी रस्त्यावर साचत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच डासांची वाढ होऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. या समस्येकडे संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेकदा निवेदने आणि तक्रारी करण्यात आल्यााचा दावा ग्रामस्थांनी केला. मात्र, कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने संतप्त सामाजिक कार्यकर्ते कुलदीप चव्हाण यांनी थेट तुंबलेल्या गटारीत बसून आंदोलन केले. या अनोख्या आंदोलनाची परिसरात मोठी चर्चा रंगली असून, प्रशासनाने तातडीने गटाराची स्वच्छता करून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top