Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : पुसद मध्ये माणूसकीची भिंत फाउंडेशन ने वृद्ध, निराधार, बेघरांसोबत साजरी केली भाऊबीज

Nov 03, 2024 12:41:05
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या पुसद येथे माणुसकीची भिंतच्यावतीने बेघर, निराधार, दिव्यांग, असहाय वृद्ध व अनाथांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. वृद्धाश्रम व रुग्णालय परिसरात हा सोहळा संपन्न झाला. माणुसकीची भिंत परिसरात स्वच्छता करून गोरगरीब निराधार वृद्धांची व पुरुषांची दाढी-कटिंग करण्यात आली. त्यानंतर महिलांनी काढलेल्या रांगोळ्यांनी अंगण सजले. पाट मांडण्यात आले. त्यानंतर माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांनी टोपी, टॉवेल, नारळ पेढा देऊन वंचितांना ओवाळले. त्यांच्या कुटुंबातील महिलांना साड्या देण्यात आल्या.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Nov 26, 2025 08:06:51
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मध्ये शिंदेच्या शिवसेनेतच आता दुफळी पडली आहे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्यावर धमक्या देण्याचे आणि पक्ष डुबवण्याचे आरोप केलेले आहे आणि याबाबतची तक्रार एकनाथ शिंदे कडे करणार असल्याचं सांगितला आहे तर संजय शिरसाठ यांनी पक्ष कोण वाढवते तुम्ही स्वतःला तपासा असा उलटवार केला आहे जशास तसे उत्तर मिळेल असा इशारा दिला आहे यामुळे निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतली दुफळी पुढे आली आहे... छत्रपती संभाजी नगरात निवडणुकांच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेत पक्षांतर्गत कलह वाढला आहे, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्यावर गंभीर आरोप केलेत, शिरसाठ कार्यकर्त्यांना धमक्या देतात,एकहाती पक्ष डुबवण्याचं काम शिरसाठ करत असल्याचा त्यांचा आरोप आहे, सातत्याने पहिल्या दिवसापासून सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना डावलून स्वतःच्या मर्जीचे लोक पक्षात घेताय यातून संघटनेचे नुकसान होतेय त्यामुळं शिरसाठ यांची तक्रार एकनाथ शिंदे कडे करणार असल्याचे जंजाळ यांचे म्हणणे आहे... तर जंजाळ यांना जिल्हाध्यक्ष पद ही मी दिलं, माझ्यावर आरोप करताना आणि पक्ष डुबवतो म्हणताना यांना लाज वाटली पाहिजे. मी सुद्धा जशास तसे उत्तर देईल असा उलटवार संजय शिरसाठ यांनी केला आहे आणि जिल्हा प्रमुखांची नाराजी उडवून लावली आहे.. शिरसाठ आणि जंजाळ यांच्यामध्ये गेली काही दिवस सुप्त वाद सुरू होते मात्र आता त्याचं रूपांतर आरोप प्रत्यारोपात झालं , या दरम्यान जंजाळ यांना एकनाथ शिंदे यांचे फोन करून शांत राहण्याचं सांगितलं आहे याबाबत लवकरच भेट घेऊन हा वाद सोडवू असे आश्वासन त्यांनी दिलाय मात्र या सगळ्या नंतर जंजाळ लवकरच शिवसेनेला रामराम करणार अशा चर्चांना मात्र उधाण आलं आहे... विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर...
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 26, 2025 08:02:58
Nashik, Maharashtra:अँकर नाशकात होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरातून सुरुवात होणाऱ्या शासनाच्या प्रमुख प्रकल्प असणारा रामकाल पथाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी तेथील जुने वाड्यांमधील असलेले रहिवासी यांचे पुनर्वसन देखील करण्यात येणार आहे. पंचवटी भागातील असलेल्या हिरावाडी परिसरामध्ये महानगरपालिकेच्या जागांमध्ये त्यांना पुनर्वसन करून येथे राहण्यासाठी घर बांधून देण्यात येणार होती. मात्र शेजारीच असलेल्या अर्पण विहार ह्या सोसायटीमधील नागरिकांनी येथील पुनर्वसन होणाऱ्या बिल्डिंगला महापालिकेच्या विरोधात आंदोलन पुकारलय. ही जागा रहिवासी म्हणून न देता इतर अमेनिटी साठी द्यावी. त्या ठिकाणी शासनाची शाळा किंवा हॉस्पिटल असं काही बांधावं असं अशी मागणी स्थानिक रहिवासी आणि आंदोलकांकडून करण्यात येत आहे. पुनर्वसन करण्याआधी महापालिकेने तेथील कुठल्याही रहिवाशांची परवानगी न घेता तेथे पुनर्वसन करायचं ठरवल आहे. यामुळे नागरिकांकडून गेल्या एका आठवडाभरापासून या ठिकाणी आंदोलन करत विरोध सुरू केला आहे. जर दोन दिवसात महापालिका आयुक्तांकडून कुठलाही निर्णय घेतला नाही...तर आत्मदहनाचा इशारा आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला आहे.
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 26, 2025 07:38:46
Pune, Maharashtra:Headline - गढूळ राजकारणात लोणावळ्यात सकारात्मक चित्र पेरू विक्रेत्या महिलेला निवडणूकीचे थेट तिकीट राज्यातील राजकारणाने अनेक मर्यादा ओलांडलेल्या आहेत. अशात लोणावळ्यात मात्र एक सकारात्मक चित्र पहायला मिळतंय. फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या भाग्यश्री जगतापांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं उमेदवारी दिलीये, त्यामुळं आदिवासी समाजातील या कुटुंबाचं भाग्य उजळलंय. पण राजकारणाचा गंध ही नसलेल्या जगताप कुटुंबासमोर आता प्रचाराच्या रणधुमाळीला सामोरं जाण्याचं मोठं आव्हान असणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून जगताप कुटुंबाचं उदरनिर्वाह फळ विक्रीच्या व्यवसायावर अवलंबून आहे. अशा प्रसंगी त्यांना व्यवसाय सांभाळत प्रचाराची धुरा ही सांभाळावी लागते. त्यामुळं भाग्यश्री दिवसा फळ विक्री करता-करता ही प्रचार करतायेत अन सायंकाळी घरोघरी जाऊन मतदारांपर्यंत ही पोहचतायेत. राजकारणाच्या बाजारात तिकीट मिळवण्यापूणस्ती मतं मिळवण्यापर्यंत काय-काय करावं लागतं, हे उघड्या डोळ्याने आपण सर्वजण पाहतोय. अशात फळ विक्रेत्या भाग्यश्री स्वतःचं नशीब अजमवतायेत. तर खंडाळा बोरघाट आदिवासी माथ्यावरील बॅटरी हिल परिसरातील आदिवासींच्या पट्ट्यात भाग्यश्री जगताप यांचे जंगी स्वागत होत असून पैशांपेक्षा माणुसकी मोठी असते अन त्याचं माणुसकीच्या जोरावर मी नगरसेविका होणार, असं प्रांजळ मत त्या व्यक्त करतायेत. आणि आपलं भाग्यश्री आपलं भाग्य आजमावत आहे.
160
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 26, 2025 07:35:23
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:संजय शिरसाट PC ऑन संभाजीनगर हॉस्टेल पाल सापडली काल मला कळले, त्यावेळी मी स्वतः रुग्णालयात फोन केले, त्यातल्या 21 जणांना उपचार करण्यात आले, अत्यंत गांभीर्याने हे प्रकरण घेतले आहे, यात जो कुणी दोषी असेल त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे, पाहणी देखील करणार. मी शंकर राव चव्हाण यांच्यावर टीका केली नाही, एवढे निधी येऊन गेले कुठे असे मी म्हटले होते, त्यांना लागले असेल, एवढे पैसे खातात पण रस्ते खराब आहेत, या बाबत स्थानिक आमदार यांनी वाच्यता केली आहे, त्यानी माहिती दिली म्हणून विधान केले. ज्यांना हा कीडा आहे, दानवेंची अशी अवस्था आहे, त्यामुळे भुकत असतात. महाराष्ट्र नवे देशात अशी परिस्थिती आहे, जातीय तणाव वाढत आहे, जे काही गंभीर गुन्ह्यात पकडले जात आहे, त्याचे वत 21 मध्ये आहे, त्यामुळे नाना पाटेकर यांनी वक्तव्य केले. हे सर्व प्रकरण न्यायालयात असल्याने, प्रत्येक आरोपी असेच खोटे असल्याचे सांगत असतात, काही नसेल तर चौकशी होऊ द्या. गुलाबराव पाटील, गुलाबराव यांचे वाक्य मजाक म्हणून केले असेल, सिरीयस घेऊ नका. काँग्रेस सोबत असेच झालं त्यांनी जे काही सांगितले, त्यात गांभीर्याने घेण्यासारखे आहे, आता कुठपर्यंत त्रास सहन करावे, घर आहे त्रास होणारच. मराठी शाळा: मराठी शाळा बंद करण्याचा आमचा उद्देश नाही, एक शिक्षक पाच विद्यार्थी अशी परिस्थिती आहे, शाळा बंद करण्याचा उद्देश नाही. शाळच्या नावावर लूटमार करण्याला बंद करण्याचे प्रयत्न. राजेंद्र जंजाळ: विद्वान आहे, ते तक्रार करतात त्याचे कारण त्यांना मला माहित आहे, सगळीकडे असे बोबलत फिरणे, काही अडचण असल्यास मला सांगितले पाहिजे. जिल्हा प्रमुख करण्याचे काम मी केली, अति महत्वकांक्षा वाढल्याने असे होतात, एकहाती पक्ष, असे आरोप करताना मनाची नाही तर जणाची लाज वाटली पाहिजे, चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकतो. आदित्य ठाकरे मतदारसंघात यादी घोळ: चौकशी केली पाहिजे. माकडे पकडणे: माकडंच ना, सरकार चांगले आहे, त्यात काही गैर नाही. आयआयटी मुंबई नाव: मुंबई नामांतर झालं आहे, त्या मुंबई म्हणून उल्लेख करावे. काँग्रेस जिल्हा अध्यक्ष मारहाण: नगराध्यक्ष पळवा पळवी सुरू आहे, उमेदवार पळवणे वेगळा प्रकार पाहायला मिळत आहे, आशा निवडणूक होत नाही, उद्या खून होतील, असे चित्र झाल्यास महाराष्ट्र संस्कृतीला शोभणार नाही. भारत पाकिस्तान सामना: त्याला हरकत नाही, जिकणार आम्हीच आहे, ज्याला मार खायचा आहे त्यांनी यावं आणि मार खाऊन जावे. घाटी जन्म प्रमाणपत्र: जी काही चौकशी सुरू आहे, त्यात तफावत आढळून आली आहे, नाबालिक मुलीला प्रमाणपत्र दिले आहे, गांभीर्याने घेतले पाहिजे, त्याची कारणे पुढे येतील. देवेंद्र फडणवीस लंका: बरोबर, आम्ही त्यांना उद्देशाने बोलले नाही, भाजपने मनावर घेऊ नयेत.
152
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 26, 2025 07:33:10
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगर परिषद निवडणुकित सर्वच प्रमुख पक्षांचे नगराध्यक्ष पद उमेदवार माजी शिवसैनिक आहेत. 1998 पासून या पालिकेवर सातत्याने शिवसेनेची सत्ता आहे. राज्यात सलग इतके वर्ष एखाद्या नगर परिषदेवर शिवसेनेची सत्ता असल्याचं हे एकमेव उदाहरण आहे. ताज्या राजकीय आखाड्यात शिवसैनिकच एकमेकांविरोधात उभे आहेत. भाजप कडून नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले अनिल धानोरकर मावळत्या पालिकेत अध्यक्ष होते. ते दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे सख्खे बंधू आहेत, सध्या भाजपात आहेत. कोंग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील नामोजवार देखील या शहराचे शिवसेना पक्षाकडून नगराध्यक्ष होते, आता भाजपातून काँग्रेसमध्ये पोचले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे प्रफुल्ल चटकी एकीकृत शिवसेनेत नगर परिषद उपाध्यक्ष होते. शिवसेना उबाठा गटाचे नंदू पढाल देखील शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत. हे सर्व आजी-माजी शिवसैनिक आता निवडणूक रिंगणात दंड थोपटून आहेत. भद्रावतीची जनता यापैकी कोणता शिवसैनिक निवडते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे या नगरपरिषदक्षेत्रात स्थानिक व्यापाऱ्यांसाठी निर्माण करण्यात आलेल्या व्यापार संकुलाच्या कुचकामी सुविधा ,शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची दुरवस्था, शहरातील तलावांच्या सौंदर्यीकरणाचे रखडलेले प्रस्ताव, क्रीडांगण व बगीचे यांच्या निर्मितीसह अभ्यासिका उभारणे व आरोग्य व्यवस्थेचे सक्षमीकरण हे मुद्दे प्रचारात प्रामुख्याने रेटले जात आहेत. बाईट १) अनिल धानोरकर, भाजप ,नगराध्यक्ष उमेदवार बाईट २) सुनील नामोजवार, काँग्रेस ,नगराध्यक्ष उमेदवार बाईट ३) प्रफुल्ल चटकी, शिवसेना शिंदे ,नगराध्यक्ष उमेदवार बाईट ४) नंदू पढाल, शिवसेना उबाठा ,नगराध्यक्ष उमेदवार
59
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 26, 2025 07:18:33
Akola, Maharashtra:आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभर सभा घेत असताना अंबाजोगाई आणि बीड येथील सभेत त्यांनी केलेल्या ‘राम कृष्ण Hari’ या विधानाची मोठी चर्चा रंगली. या विधानानंतर सभेतून ‘वाजवा तुतारी’ असा प्रतिसादही मिळाला. मात्र ही सभा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची असल्याने त्यांनी लगेचच या विधानाबाबत स्पष्टीकरण देत सारवासारव केली.दरम्यान, हे वक्तव्य चांगलेच व्हायरल झाल्यानंतर आज अकोल्यातील अकोट येथील जाहीर सभेत अजित पवारांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली. “मी अंबाजोगाईला विकासाबाबत बोललो, पण मीडियाने ते वेगळ्या संदर्भात दाखवलं, त्यांचा तो अधिकार आहे. त्या दिवशी चुकीचा शब्द माझ्याकडून वापरला गेला. माझा उद्देश फक्त शहरात स्वच्छता असावी, बकालपणा नसावा एवढाच होता. चुकीचा शब्द वापरला गेल्या बद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो ”अस अजित पवार म्हणाले.तसेच लोक मला लाखोंच्या मतांनी निवडून देतात, हे सोपं नाही. लोकांना चांगलं काम करणारा नेता हवा असतो,आम्ही ते काम करत आहोत अस ही ते म्हणाले.विकासासाठी मी मदत करतो, पण लोक माझ्या शब्दालाच पकडतात म्हणत अजित पवारांनी खंत व्यक्त केलं.
172
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 26, 2025 07:01:59
Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यात 9 नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची सभा पार पडली या सभेमध्ये शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे राष्ट्रीय नेते महादेव जानकर यासह काँग्रेस आणि उबाटा गटाचे नेते उपस्थित होते. यावेळी शशिकांत शिंदे यांनी सातारकरांना सर्व दडपशाही जुगारून माझ्या महाविकास आघाडीला संधी द्या मी सातारचा विकास करून दाखवतो... असं ते म्हणालेत. स्टेज बाईट: शशिकांत शिंदे. यावेळी राष्ट्रीय नेते महादेव जानकर यांनी भाजपने फसवले असल्याचा आरोप करत. शरद पवार उद्धव ठाकरे यांच्याबरोबर मलाही भाजपने फसवले असल्याचे यावेळी ते म्हणाले. स्टेज बाईट: महादेव जानकर. शरद पवार पक्षाच्या सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा पाटील यांनी मला ठेकेदार व्हायचं नाही कोणतेही टेंडर नको मला इथले भविष्य घडवायचा आहे. एक संधी मला द्या पाच वर्ष मी तुम्हाला देणार असा शब्द यावेळी त्यांनी आपल्या सभेत दिला आहे. स्टेज बाईट सुवर्णा पाटील (नगराध्यक्ष पदाच्या सातारा नगरपालिकेच्या उमेदवार). सातारा:राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे भाषण पॉइंटर. बरेच लोक या सभेला येण्यास इच्छुक आहेत मात्र साताऱ्यात मोकला श्वास घ्यायलाही परवानगी लागते. सातारकरांचे अंतर्गत पाठबळ महाविकास आघाडीला आहे. याचा उल्लेख मी मनापासून या सभेमध्ये करतोय. लोकसभेच्या निकालाबाबत निवडणुका आयोगाला उशिरा समजलं तुतारी आणि पिपाणी आता ते रद्द झालं. त्यावेळी पिपाणी नसती तर सातारकरांच्या मनातला खासदार निवडून आला असता. ही लढाई तत्वाची आहे. भाजपमध्ये जाणारे सर्व सुखी नाहीत सहनही होत नाही आणि सांगता येत नाही अशी अवस्था आहे. सर्वजण तिकडे गेले तर सामान्य जनतेचा आवाज कोण उठवणार .हा प्रश्न जसा देशात आहे तसाच सातार्यात आहे. याला वाचा फोडण्याचे काम सुवर्णा पाटील आणि महाविकास आघाडीच्या नगरपालिकेच्या उमेदवारांच्या माध्यमातून करायच आहे. ही लढाई सोपी नाही अवघड आहे ही फक्त सुरुवात आहे. कोणी ताम्रपट घेऊन आलेल्या नाही. मला माहित नाही विजय होईल की नाही. सत्याचा विजय होण्यासाठी जी चिंगारी तयार झाली. त्याची सुरुवात या सभेला बसलेल्या शिलेदारांनी केली याचा मला अभिमान आहे. ही निवडणूक नगरपालिके पुरती मर्यादित नसून देशाच्या आणि राज्याच्या हुकूमशाही विरोधातली आहे. महादेव जानकर यांना सरकारमध्ये गेल्यानुसार लक्षात आलं आणि त्यांनी पहिल्यांदा बंडाचा झेंडा असाच हाती घेतला.. आणि दुसरा झेंडा सुवर्ण पाटील यांनी घेतला. काहीजण म्हणत आहेत महाविकास आघाडीला उमेदवार मिळाला नाही. म्हणून आयात उमेदवार घेतला. तुम्हाला सोन्याची पारकच होत नाही त्यात आमचा दोष होता का?.. आमच्या कडे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी डॉक्टर सुद्धा होते ज्यांनी साताऱ्याची हाफ हिल मॅरेथॉन जगाच्या पटलावर नेली. संविधान जरी बदललं नसलं तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातला अधिकार या सरकारने काढून घेतला आहे. यासमोर बसलेल्या मतदाराला मतदानाचा अधिकार सुद्धा नाहीच तुमच्या आधी जाऊन दुसरा मतदान करतोय. पोलिस प्रशासन शासकीय यंत्रणा ठप्प... वोटर आयडी काही बघितला जात नाही मतदान जरी केलं तरी मतदान फिरवण्याची क्षमता या लोकांच्याकडे आहे. साडेतीन कोटी च कर्ज तुमच्या माथ्यावर मारलं अडीच वर्षांमध्ये फक्त कॉन्ट्रॅक्ट वाढवण्यासाठी... क्वालिटीचं तर बोलूच नका. सातारा शहराची ओळख काय? राज्यामध्ये अनेक जिल्हे ज्याप्रकारे विकसित झाले. तसं सातारमध्ये पाहायला मिळत नाही या चौकामध्ये सुद्धा आता अंधार दिसतोय. यासाठी बदल करणे गरजेचा आहे. निसर्ग आणि नियती मध्ये बदलाची क्रांती करण्याचा निर्णय असतो तो करण्याची गरज आहे. फक्त तुमचा मतासाठी वापर केला जातो... लोकशाहीमध्ये शशिकांत शिंदे यांना एखाद्या पेटीत मत जास्त पडली तर ते स्टॉल उघडून टाकले जातात हे दुर्दैव. भाजपने जाती-जातीमध्ये भांडण लावून तुम्हा आम्हाला फसवत आहे. मी सर्वसाधारणांना एक शब्द देतो. एक संधी द्या. दडपशाही जुगारून माझ्या महाविकास आघाडीला देऊन बघा मी सर्व खरं करून दाखवतो. दहा पंधरा हजाराचा भाव निघायला लागला आता चेक नाक्यावर नोटा चेक करतात म्हणून अकाउंट पे व्हायला लागले. तर निवडणूक आयोग काय करत असेल माहित नाही.. आजची ही सभा सातारकरांचा इतिहास घडवण्याची सभा आहे. महादेव जानकर (राष्ट्रीय नेते). सुवर्णा पाटील ज्या मुशीतून तयार झाल्या... त्या पक्षाला आम्ही देखील सत्तेवर आणण्यासाठी उभ केलं आहे. ही माफी मागण्यासाठी मी आज साताऱ्यात आलो आहे. भारताचे संविधान वाचवायचे असेल तर आपल्याला भाजप मुक्त भारत करायला हवा.. त्यावेळी काँग्रेसवाले आम्हाला विचारत नव्हते म्हणून आम्ही भाजपसोबत गेलोहोत. आम्हाला माहीत नव्हतं भाजप आम्हाला फसवतील. शरद पवारांच्या पक्षाची वाताहत केली, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची पण केली आणि माझे पण चार आमदार पळवले म्हणूनच मी शरद पवार, राहुल गांधी, उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना भेटलो आणि मी भारताचा संविधान वाचवण्यासाठी एकत्र राहावं अशी विनंती केलिये. मी कॅबिनेट मंत्री होतो त्यावेळेस मला समजलं की हे सरकार आपलं नाही. भाजपची इच्छा होती की माझा पक्ष त्यांच्यामध्ये विलीनीकरण करावा. पण शेवटपर्यंत मी माझा स्वतःचाच पक्ष काढून चार आमदार स्वतः मंत्री झालो. भाजप फक्त जाती-जातीमध्ये भांडण लावून तुम्हा आम्हाला फसवत आहे. सातारा नगरपालिका महाविकास आघाडी राष्ट्रवादीच्या उमेदवार सुवर्णा पाटील स्टेज बाईट पॉईंटर. मला या साताऱ्याचा विकास करायचा आहे ज्यावेळेस मी 33 वर्षांपूर्वी लग्न होऊन साताऱ्यात आले त्यावेळचा सातारा आणि आत्ताचा सातारा त्यामध्ये काहीही बदल नाही. बाजारपेठेतील एखादा मजला वाढला असेल पण बदल झालेला नाही. शैक्षणिक व्यवस्था रोजगार नाही. एमआयडीसी ठप्प आहे. तुम्ही आत्ता थांबला तर पाच वर्ष थांबावं लागेल. आणि विकासही पाच वर्ष थांबेल. तुम्ही आत्ता नाहीतर कधीच नाही सातारा बदलायची गरज आली आहे.
96
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 26, 2025 06:49:43
Bhandara, Maharashtra:परिणय फुके व नाना पटोले यांची साठगाठ.... मित्र पक्षावर परिणय फुके करता आरोप.... नरेंद्र भोंडेकर यांची टीका.... भंडारा जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नाना पटोले व परिणय फुके यांची साठगाठ आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे वक्तव्य .... भंडारा जिल्ह्यात चार नगर परिषद निवडणुका लागल्या असून प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक सभेत परिणय फुके हे मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेवर टीका करतात. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस वर टीका करत नाही. भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पण कामे करत असताना टप्पा टप्प्याची पैसे येतात. भ्रष्टाचार कसा झाला. तर दुसरीकडे परिणय फुके व नाना पटोले यांची साठगाठ झाली आल्याच आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केला आहे.. एकीकडे राज्यात देवेंद्र फडणवीस, अजित दादा, शिंदे साहेब टीका करत नाही पण या ठिकाणी खालच्या पातळीवर टीका केली जाते....
137
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 26, 2025 06:30:58
157
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 26, 2025 06:30:22
Ambernath, Maharashtra:उल्हासनगर गोळीबार प्रकरणातील तीन आरोपींना अटक जामिनावर सुटलेल्या सराईत गुंडावर विरोधी टोळीने केला होता गोळीबार उल्हासनगर गोळीबार प्रकरणातील तीन आरोपींना अटक झाली आहे. जामिनावर सुटलेल्या सराईत गुंडावर विरोधी टोळीने गोळीबार केल्याची घटना उल्हासनगर मध्ये two days earlier घडली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे भिवंडी येथून ताब्यात घेतले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस कोठडीत त्याने घराशेजारी लपवलेले पिस्तूल हस्तगत केले आहे. उल्हासनगर कॅम्प तीन मधील इमली पाडा येथे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला सचिन उर्फ बाबूजी बहादूर करोतिया हा राहतो. काही महिन्यांपूर्वीच हा गुंड जेलमधून सुटून आला आहे. तो इमली पाडातील गोगाजी मंदिराजवळ शुक्रवारी रात्री मित्रां बरोबर उभा असताना तिथे मोटार सायकल वरून पाच ते सहा जणांची टोळी आली. यातील मोहित हिंदुजा याचा सचिन करोतीया याच्या भावाशी जुना वाद असल्याने या रागातून सचिनवर दोन राऊंड फायर केले आणि निघून गेले. तसेच झालेल्या गडबडीत मोहित याच्या कडून दोन राऊंड खाली पडले. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करीत तपास करण्यात आला. पोलीस पथकाने सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे भिवंडी येथून ताब्यात घेतले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस कोठडीत त्याने घराशेजारी लपवलेले पिस्तूल मध्यवर्ती पोलिसांनी हस्तगत केले आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या कडून चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
166
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 26, 2025 06:02:36
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्प (टीएटीआर) येथून नवेंगाव–नागझिरा व्याघ्र प्रकल्प (एनएनटीआर) येथे चितळ स्थानांतराची दुसरी फेरी यशस्वीरीत्या पूर्ण झाली. कोणतीही जिवितहानी न होता एकूण 63 चितळे सुरक्षितपणे जामनी गवताळ परिसरातून नागझिरा प्रकल्पातील सॉफ्ट-रिलीज एनक्लोजरमध्ये हलविण्यात आले. या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकही मृत्यू झालेला नाही. चितळ हा अतिशय संवेदनशील प्राणी असून पकडण्याच्या प्रक्रियेदरम्यान किंवा मानवी जवळीक, हाताळणी, वाहतूक यावेळी तीव्र ताणामुळे त्यांना मानसिक धक्का बसू शकतो. या ताणामुळे हृदयाचे विकार निर्माण होऊन अचानक मृत्यू होण्याची शक्यता असते, ज्याला ‘कॅप्चर मायोपथी’ असे म्हटले जाते. मात्र आजच्या स्थानांतरणात एकाही प्राणीाचा मृत्यू झालेला नाही, ही अत्यंत समाधानकारक बाब आहे. जामनी गवताळ परिसरात तयार करण्यात आलेल्या बोमा पद्धतीचा वापर करून चितळांना सुरक्षितरीत्या पकडण्यात आले. या परिसरातील योग्य अधिवास आणि चितळांची उपलब्धता या प्रक्रियेस पूरक ठरल्या. बोमामधून प्राण्यांना विशेष तयार केलेल्या ट्रान्सलोकेशन वाहनांतून हलविण्यात आले. या वाहनांची रचना प्राण्यांचा ताण कमी करण्याच्या आणि प्रवास सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने करण्यात आलेली आहे.
106
comment0
Report
Advertisement
Back to top