icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Nov 2024, 12:41 pm

यवतमाळ : पुसद मध्ये माणूसकीची भिंत फाउंडेशन ने वृद्ध, निराधार, बेघरांसोबत साजरी केली भाऊबीज

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळच्या पुसद येथे माणुसकीची भिंतच्यावतीने बेघर, निराधार, दिव्यांग, असहाय वृद्ध व अनाथांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. वृद्धाश्रम व रुग्णालय परिसरात हा सोहळा संपन्न झाला. माणुसकीची भिंत परिसरात स्वच्छता करून गोरगरीब निराधार वृद्धांची व पुरुषांची दाढी-कटिंग करण्यात आली. त्यानंतर महिलांनी काढलेल्या रांगोळ्यांनी अंगण सजले. पाट मांडण्यात आले. त्यानंतर माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांनी टोपी, टॉवेल, नारळ पेढा देऊन वंचितांना ओवाळले. त्यांच्या कुटुंबातील महिलांना साड्या देण्यात आल्या.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

जंतर-मंतर के छात्रों के आंदोलन की बड़ी जीत, धर्मेंद्र प्रधान ने दिया इस्तीफा

Akola, Maharashtra:दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाल्याचा दावा करण्यात येत असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विविध विद्यार्थी संघटनांनी आणि विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर-मंतरवर आंदोलन छेडले होते. या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळाला.या आंदोलनात अकोला पश्चिम मतदारसंघाचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनीही सहभाग नोंदवला होता. आंदोलनाच्या यशानंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना विद्यार्थ्यांचे आणि देशवासीयांचे आभार मानले. हा विजय कोणत्याही जाती-धर्माचा नसून संपूर्ण भारतीयांचा असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनानुसार या विद्यार्थींच्या बलिदान व्यर्थ गेले नसल्याचे सांगत, हा विजय देशातील प्रत्येक नागरिकाचा असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्यामुळे विद्यार्थ्यांचा आवाज अधिक प्रभावीपणे देशासमोर पोहोचला आणि अखेर आंदोलनाला यश मिळाल्याचेही साजिद खान पठाण यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.
0
0
Report
Advertisement

शिक्षा मंत्री के इस्तीफे के बाद छात्रों की जीत, पेपर लीक पर SIT जांच की मांग

Bhandara, Maharashtra:विद्यार्थ्यांचा विजय झाला... नाना पटोले. केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी राजीनामा देताच राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया येत आहेत. विद्यार्थी महिना भारतापासून दिल्लीच्या जंतर मंतर वर आंदोलन करत होते. देशात पेपर लीक होत होते. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी ही सरकार खेळत होती. ही मुजोर सरकार आहे. अश्रू धुळ्याच्या कांड्या, पाण्याचा मारा, करण्यात आला. एका मुलीला आपला जीव गमवावा लागला. आज राजीनामा होताच विद्यार्थ्यांचा विजय झाला आहे. पण यापुढे पेपर लीक होणार नाही याची हमी सरकारने द्यावी. तसेच पेपर लीक मध्ये आपलीच SIT नेमावी व आपलीच चौकशी करावी अशी भूमिका सरकारने घेतली होती. पेपर लीक करणारे हे भाजपाचे होते.. तर २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सत्तेत आले. देशातील जनतेने मोदींना मतदान केलं. म्हणून त्यांनी सुद्धा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील नाना पटोले यांनी केली आहे...
0
0
Report
Advertisement

धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे के बाद छात्रों की प्रमुख मांगें: मुआवजा और मुकदमे वापस

Kalyan, Maharashtra:केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा नंतर विद्यार्थ्यांनी मानले आभार. पोलिसांनी विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल केले आहेत ते मागे घेणे यावे. विद्यार्थी मरण पावले त्यांना मदत मिळावी.. विद्यार्थीची मागणी. गेल्या अनेक दिवसापासून दिल्लीच्या जंतर-मंतर येथे कॉकरोज जनता पार्टी यांनी आंदोलन केले त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर संपूर्ण देशामध्ये आंदोलन सुरू झाली धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी प्रमुख मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर कल्याण मध्ये विद्यार्थ्यांनी सांगितले आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे मात्र पोलिसांनी विद्यार्थ्यांसाठी गुन्हे दाखल केले आहेत ते मागे घ्यावे जे विद्यार्थी मरण पावलेले आहेत त्यांना मदत मिळावी अशा दोन प्रमुख मागण्यां आहेत त्या सरकारने पूर्ण कराव्या अशी मागणी विद्यार्थ्यांनी करण्यात आलेली आहे याचा आढावा घेतल्या आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी
0
0
Report

चिपळूण रेलवे स्टेशन के पास प्रमुख मार्ग में गड्ढे, यात्री और वाहन चालक परेशान

Ratnagiri, Maharashtra:कोकण रेल्वे मार्गावरील अत्यंत महत्त्वाचे स्थानक असलेल्या चिपळूण रेल्वे स्थानकाकडे शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून पावसामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासी आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दररोज हजारो प्रवासी या मार्गाचा वापर करत असतानाही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. या मार्गाची तातडीने दुरुस्ती करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
0
0
Report

यवतमाळ में 'कामगार सुरक्षा निवारा' का लोकार्पण, श्रम पूजा के साथ सम्मान

Yavatmal, Maharashtra:आषाढी एकादशीच्या निमित्ताने यवतमाळ मध्ये शिवसेनेकडून कामगार बांधवांसाठी उभारण्यात आलेल्या "कामगार सुरक्षा निवारा" या लोकोपयोगी उपक्रमाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यवतमाळच्या पोस्टल मैदानाजवळ दररोज सकाळी कामगार एकवटतात, या ठिकाणी कामगारांना बसण्यासाठी व्यवस्था व्हावी याकरिता 'कामगार हाच विठ्ठल, श्रम हीच पूजा' या संकल्पनेतून कामगार सुरक्षा निवारा हा सेवाभावी उपक्रम सुरू करण्यात आला. या निमित्ताने कामगार बांधवांसाठी भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी बेघर मनोरुग्णांची सेवा करणाऱ्या समाजसेवी संदीप व नंदिनी शिंदे या दांपत्याचा विठू माऊलीच्या रूपात गौरव करण्यात आला. कामगारांचे पाय धुवून त्यांचा सन्मान करण्यात आला तर कामगारांच्या गुणवंत पाल्यांचा देखील सत्कार पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आला.
0
0
Report
Advertisement

माळशेज घाट पर खस्ताहाल सड़क से महामार्ग पर खतरा, यातायात प्रभावित

Barav, Maharashtra:कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर माळशेज घाटात तब्बल १०० फूट लांब आणि ८ फूट खोल रस्ता खचल्याने भीषण अपघाताचा धोका निर्माण झालाय. सुदैवाने रस्ता खचताना कोणतंही वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला; मात्र या प्रकारामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून जवळच असलेल्या घरांनाही धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही याच ठिकाणी रस्ता खचला होता. स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही NHAI आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने कामाच्या दर्जावर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. माळशेज घाटातील या धोकादायक परिस्थितीचा थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
0
0
Report

चंद्रपूर Congress सांसद प्रतिभा धानोरकर बयान: गटनेते पद हेतु पार्टी ने नहीं दी मदद

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूरच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांचे मोठे विधान ,चंद्रपूर महानगरपालिकेतील गटनेते पद बदलविण्यासाठी महाराष्ट्र अथवा राष्ट्रीय स्तरावर पक्ष संघटनेने कुठलीही मदत केली नसल्याचा धक्कादायक खुलासा चंद्रपूर शहर महानगरपालिकेत काँग्रेस गटनेते पद मिळवण्यासाठी खा. धानोरकर गटाने गेले सहा महिने प्रयत्न चालविले होते. यात आ. विजय वडेट्टीवार गटाच्या राजेश अडुर यांना हटवून नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी खा. धानोरकर गटाच्या सुरेंद्र अडबाले यांच्या बाजूने निर्णय दिला. आज महानगरपालिकेत गटनेते कक्षात सुरेंद्र अडवाले यांनी पदग्रहण केले. गेले सहा महिने आपण पक्षात खडतर वाटचाल केली असून माझ्या मतदारसंघातील महानगरपालिका असल्याने अन्य कुणाचा हस्तक्षेप नको अशीच आपली भूमिका होती असे सांगत पक्षात असे व्हायला नको होते असे खा धानोरकर म्हणाल्या. याही पुढे जात महाराष्ट्र अथवा राष्ट्रीय स्तरावरील पक्ष संघटनेने यात माझी कुठलीही मदत केली नाही असे मोठे विधान खा. धानोरकर यांनी केले.
0
0
Report
Advertisement

कोटमगाव विठ्ठल मंदिर में आषाढ़ी वारी के दौरान भक्तों की भारी भीड़

Yeola, Maharashtra:आषाढ़ी वारीनिमित्त नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील कोटमगाव विठ्ठल मंदिरात आज भक्तीचा महासागर उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. पंढरपूरला जाणे शक्य नसलेल्या हजारो भाविकांनी कोटमगावात येऊन विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. राज्याच्या विविध भागांतून वारकरी दिंड्यांमुळे संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला. दरवर्षी आषाढी वारीच्या काळात येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. नाशिक, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतून सुमारे 450 वारकरी दिंड्या कोटमगावात दाखल होत असल्याने या परिसराला आषाढी वारीचे वेगळे धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, मंदिर परिसरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे करण्यात आली आहेत. तसेच कोटमगावला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाल्याने या धार्मिक स्थळाच्या विकासाला अधिक चालना मिळाली आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर कोटमगावात भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा अनोखा संगम अनुभवायला मिळत असून, प्रति पंढरपूर म्हणून या स्थळाचे महत्त्व दिवसेंदिवस अधिक अधोरेखित होत आहे.
0
0
Report
0
0
Report

युवाओं के रोजगार पर मोदी सरकार को कांग्रेस का बड़ा आरोप

Nagpur, Maharashtra:नागपुर विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेता सरसंघचालक संघचालक यांचा सल्ला नरेंद्र मोदी ऐकतात का? जर ऐकलं असेल तर या देशातील तरुणांची अशी वाताहात झाली नसती. या तरुणांचं रोष पाहून मोहन भागवत यांना आता काय उपरती आली का? तरुणांचं ऐकावं म्हणून.... रोजगार हिरावला जात होता. पेपर लीक होते परदेशातील नोकरी संपत होते. परदेशात भारतीय तरुणांना नोकरी मिळत नव्हती... यहच मोदी सरकार त्याला जबाबदार आहे. भागवत आज देशातील तरुण रस्त्यावर आल्यावर भडकला आहे... देशामध्ये त्याला या देशामध्ये भविष्य सुरक्षित वाटत नाही. अशावेळी मोहन भागवत यांना केंद्र सरकारला मोदींना सल्ला द्यावासा वाटतो.... आता हातात काही राहिलं नाही.... ज्या तरुणांच्या भरोशावर मोदी खुर्चीत बसले. तोच तरुण या देशाच्या पंतप्रधानाची खुर्ची हलवल्याशिवाय राहणार नाही असं वातावरण देशात निर्माण झाल्यावर याची उपरती मोहन भागवत यांना झाली असावी. मविआ आंदोलन तरुणांच्या प्रश्नासाठी जो कोणी महाविकास आघाडीतील विरोधी पक्ष घटक पक्ष आंदोलन करेल... त्या त्या सर्व आंदोलनाला आमचा पाठिंबा असेल... आम्ही केलं तर त्यांचाही पाठिंबा राहील अशी भूमिका ठरली आहे. पिंपरी चिंचवड घोटाळा महाराष्ट्रात घोटाळेबाजाचं सरकार रोज नवनवीन घोटाळे करत आहे... या सरकारची घोटाळा करणे आवड बनली आहे.... नवीन घोटाळा केल्याशिवाय यांना चैन पडत नाही.... पिंपरी चिंचवड मध्ये शालेय साहित्य भ्रष्टाचार म्हणून साडेपाचशे कोटीचा घोटाळा केला जात आहे....यात मंत्र्यांचा सहभाग आहे. सर्वोच्च न्यायालयाने डीबीटीवर पैसे टाकायचं आदेश झुगारून साडेपाचशे कोटी रुपयाचा टेंडर काढलं... मर्जीतील माणसांना काम दिलं. याची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन दोषींवर कारवाईची मागणी करू. घोटाळे करून तिजोरीची लूट करून टक्केवारी सरकार करत आहे. जनतेची चिंता राहिली नाही टक्के वसूल करण्यात यांना सर्वोच्च आनंद मिळत आहे. स्वतःचा व्हिडिओ देशाचा व्हिडिओ देशातील पंतप्रधानांनी कधीही टाकला नाही... प्रेस मोर जाऊन बाजू मांडतात.. मध्यरात्री हा व्हिडिओ टाकण्याची गरज नाही. हे सगळे रिचेस आणि व्ह्यू त्यांच्या आयटी सेलने केले...जे पैसे घेऊन हे धंदे करतात हे सगळे आर्टिफिशल आहे.... लोकांनी केलेले नाही तर....जो वेळ उघडला 95 टक्के लोक सरकार आणि नरेंद्र मोदीच्या निषेध करत आहे. यावरून तरुण अजिबात आता पाठीशी राहिलेला नाही. भाजपचे आयटी सेल हे सगळं करत आहे. या देशाच्या पंतप्रधानांची ज्या पद्धतीने अब्रू काढली जात आहे असं कधी आतापर्यंतच्या इतिहासात झालं नाही... भाजप याचा आत्मचिंतन भाजपने कराव.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top