icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Nov 2024, 12:41 pm

यवतमाळ : पुसद मध्ये माणूसकीची भिंत फाउंडेशन ने वृद्ध, निराधार, बेघरांसोबत साजरी केली भाऊबीज

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळच्या पुसद येथे माणुसकीची भिंतच्यावतीने बेघर, निराधार, दिव्यांग, असहाय वृद्ध व अनाथांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. वृद्धाश्रम व रुग्णालय परिसरात हा सोहळा संपन्न झाला. माणुसकीची भिंत परिसरात स्वच्छता करून गोरगरीब निराधार वृद्धांची व पुरुषांची दाढी-कटिंग करण्यात आली. त्यानंतर महिलांनी काढलेल्या रांगोळ्यांनी अंगण सजले. पाट मांडण्यात आले. त्यानंतर माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांनी टोपी, टॉवेल, नारळ पेढा देऊन वंचितांना ओवाळले. त्यांच्या कुटुंबातील महिलांना साड्या देण्यात आल्या.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

शिंदे समिति के काम से सरकार ने कई योजनाएं फिर से शुरू कीं, आंदोलन की आशंका कम

Shirdi, Maharashtra:मराठा उपसमितीचे अध्यक्ष पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील पत्रकार परिषद मुद्दे - सरकारने वेळोवेळी केलेल्या कार्यवाहीमुळे जरांगे यांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही.. महाविकास आघाडीच्या काळात काही निर्णय रद्द झाल्याने समाजाचे मोठे नुकसान झाले.. मात्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा मोठे निर्णय घेतले.. शिंदे समितीने मोठ काम केलं.. 58 लाख नोंदी शोधण्याचं काम झालं असून अजूनही काम सुरूच.. विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती सुरू केलीय.. आंदोलनात मरण पावलेल्या कुटुंबियांना नोकरी दिलीय.. ज्या योजना बंद झाल्या होत्या त्या पूर्ववत सुरू केल्या आहेत.. वैधता प्रमाणपत्राची मुदत देखील वाढवून दिलीय.. सारथीसाठी देखील जागा वाढविल्या आहेत.. हैद्राबाद गॅझेट च्या अंमलबजावणीसाठी देखील सतत आढावा सुरू असून कोणाला अडचण येणार नाही अशा सूचना दिल्या आहेत.. शिंदे समितीला 2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.. निर्णयाची अंमलबजावणी करण्यात शासन कमी पडले नाही.. काही अडचणी असतील तर त्या दूर केल्या जातील.. फडणवीसांनी जी भुमिका घेतली अशी भूमिका आतापर्यंत कोणत्याच मुख्यमंत्र्याने घेतली नाही सरकार अतिशय सकारात्मक.. त्यांची भावना योग्य असली तरी आंदोलनाची वेळ येणार नाही जरांगे यांना सविस्तर अहवाल पाठवणार असून त्याचं समाधान होईल अशी खात्री कोणी धमकी दिली ते नाव सांगावे... संसदेत विद्यार्थ्यासाठी कायदा देखील झाला.. मात्र काँग्रेस केवळ आंदोलनाच्या आडून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे.. सरकारची भूमिका योग्य असताना दीपकेनी अशी वक्तव्य करणे चुकीचे... संदिग्धता निर्माण करण्यात अर्थ काय... राजकीय पक्षाकडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न.. ज्यांचा जनाधार गेलाय ते आंदोलनाच्या माध्यमातून राजकारण करताना दिसत आहे
0
0
Report

टीटंबा आश्रम शाळे विषबाधा: सेंट्रल किचन पर घातपात का आरोप

Amravati, Maharashtra:टीटंबा आश्रम शाळे विषबाधा प्रकरणाला नवे वळण; आश्रम शाळेत घातपात झाल्याचा सेंट्रल किचनचा आरोप, घातपाताचे सर्व पुरावे पोलिसांना दिले. सेंट्रल किचनच्या या आरोपाने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. टीटंबा आश्रम शाळेचा अध्यक्ष आम्हाला त्याच्याकडून साहित्य घेण्यासाठी दबाव टाकून धमकावत होता मात्र त्याच्याकडून आम्ही साहित्य न घेतल्याने त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतील असे म्हणत वारंवार धमक्या दिल्या मात्र तरीही सेंट्रल किचनने त्याच्याकडून साहित्य न केल्याने तो हा घातपात घडवून आणला आहे. या घातपाताचे सर्व पुरावे आम्ही पोलिसांना सादर केले आहे.
0
0
Report

उल्हासनगर पुलिस की बड़ी कार्रवाई: 19 वर्षीय वाहनचोर गिरफ्तार, चार मोटरसाइकिलें बरामद

Ambernath, Maharashtra:उल्हासनगर गुन्हे शाखेची मोठी कारवाई, १९ वर्षीय वाहनचोर अटकेत, चार दुचाकी जप्त उल्हासनगर गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती की, वाहनचोरी करणारा एक तरुण उल्हासनगर-१ येथील अमरडाय कंपनीजवळून उल्हास नदीकडे जाणाऱ्या मार्गावर येणार आहे. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी यांच्या पथकाने सापळा रचून फैज शेख याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीच्या सांगण्यावरून मध्यवर्ती पोलीस ठाणे हद्दीतील दोन, अंबरनाथ पोलीस ठाणे हद्दीतील एक आणि डोगरी पोलीस ठाणे हद्दीतील एक अशा एकूण चार चोरीच्या मोटारसायकल्य जप्त करण्यात आल्या. पोलिसांनी सर्व वाहने ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
0
0
Report
Advertisement

सीसीटीव्ही फुटेज के आधार पर उल्हासनगर में घरफोड़ चोर गिरफ्तार

Ambernath, Maharashtra:सीसीटीव्ही मुळे सराईत गुन्हेगार गजाआड विठ्ठलवाडी पोलिसांकडून घरफोडीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त उल्हासनगरमध्ये घरफोडीच्या गुन्ह्याचा विट्ठलवाडी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे छडा लावत सराईत चोराला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विजय शंकर रामसिंघानी असून तो अंबरनाथमधील वडोल गावचा रहिवासी आहे. फिर्यादीच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत आरोपीने घरात प्रवेश केला आणि एचपी कंपनीचा लॅपटॉप तसेच मोटोरोला G62 5G मोबाईल फोन चोरी करून फरार झाला. मात्र, आरोपीची ही संपूर्ण चोरीची घटना घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या फुटेजच्या आधारे विट्ठलवाडी पोलिसांनी आरोपीची ओळख पटवत त्याला अटक केली. पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपीने चोरीची कबुली दिली. त्यानंतर त्याच्या ताब्यातून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.
0
0
Report

गोदावरी नदी में पानी बढ़ने से नाशिक शहर में रेड-ऑरेंज अलर्ट, बारिश की चेतावनी

Nashik, Maharashtra:काल मध्यरात्रीपासून नाशिक शहर परिसरामध्ये पावसाची सतत दार सुरू आहे यामुळे गंगापूर धरणातून सकाळी नऊ वाजेच्या सुमारास 2400 क्यूसेस पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात केलाय....यामुळे पुन्हा एकदा गोदावरी नदी पाणी पातळीत वाढ होताना पाहायला मिळते... आज आणि उद्या हवामान खात्याने नाशिक शहरासह जिल्हाभरात पावसाचा अलर्ट झाली केलेला आहे.... यात गाठ माथ्याला रेड अलर्ट तर नाशिक शहर परिसरात ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे.... यामुळे शहर परिसरात मुसळधार ते आती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे... गोदावरी नदी पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे पुराचे मापदंड म्हणून ओळख असलेल्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आयााल आहे....तर रामकुंड परिसरात असलेले छोटे मोठे मंदिरा देखील पाण्याने वेढले गेल्याच चित्र पाहायला मिळतंय.... या संदर्भात रामकुंड परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी
0
0
Report
Advertisement

नवापूर तालुक्यात जलसंकट खत्म: नागझरी धरण ओवरफ्लो, पानी-खेत में राहत

Dhule, Maharashtra:जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्याने नवापूर तालुक्यावर भीषण पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले होते. नागझरी धरणातील पाणीसाठा तळाला गेल्याने आणि रंगावली नदी कोरडी पडल्याने नागरिक आणि शेतकरी चिंतेत होते. मात्र, जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात पावसाने दमदार पुनरागमन करत सलग हजेरी लावली. यामुळे नागझरी धरण पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागले आहे. धरणात मुबलक साठा झाल्याने पिण्याच्या पाण्याची आणि शेतीची चिंता मिटली आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा आधार मिळाला असून, तालुक्यातील नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. धरण ओव्हरफ्लो झाल्याने नवापूरकरांमधून समाधान आणि आनंदाचे वातावरण व्यक्त होत आहे.
0
0
Report
Advertisement

अमरावती में भारी बारिश, उपमुख्यमंत्री ने राहतकार्य शुरू कराने के निर्देश दिए

Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यात पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा; तातडीने मदत कार्य सुरू करण्याचे दिले आदेश अंबरावती जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील नद्या-नाल्यांना पूर आला असून काही गावांचा मुख्य रस्त्यांशी संपर्क तुटला आहे. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी परिस्थितीची दखल घेतली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून जिल्ह्यातील पूरस्थितीची सविस्तर माहिती घेतली. नागरिकांना तातडीने मदत पोहोचवण्यासाठी व कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी प्रशासनाला अत्यंत सतर्क राहून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
0
0
Report

मालेगांव- पंढरपुर बस में बारिश में कांच टूटा, चालक गाड़ी चलाता रहा

Nashik, Maharashtra:मालेगाव पंढरपूर बसमध्ये प्रवाशांच्या जीव धोक्यात... भर पावसात गाडीची काच तुटलेली व्हायपर बंद, तरीही वाहनचालक गाडी चालवतोय... गाडीतील सतर्क प्रवाशांकडून व्हिडिओ व्हायरल... नाशिकच्या मालेगाव बस डेपो मधून मालेगाव पंढरपूर येथे जाणाऱ्या बसची काच तुटलेली, तिचे व्हायपर देखील बंद आहे. आणि त्यात बाहेर जोरात पडणारा पाऊस यामुळे समोर रस्त्यावर काही दिसत नसताना.vehicle चालवत असल्याने गाडीत बसलेल्या प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने तत्काळ गाडी थांबवून आम्हला गाडी बदलून देण्याची मागणी प्रवासी करत आहे. मात्र बसचे अधिकारी कर्मचारी काही जीवित हानी बघायची वाट बघत आहे. का? असा सवाल आता विचारला जात आहे..
0
0
Report
Advertisement

नागपूर के सावनेर में कर्ज से परेशान दो भाइयों ने रेलगाड़ी के सामने आत्महत्या कर दी

Nagpur, Maharashtra:नागपूर / सावनेर रेल्वे अपघात अपडेट.. - नागपूर जिल्ह्यातील सावਨੇरजवळ दोन सख्ख्या भावांची रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याचा घटनेनं एकच खळबळ उडाली आहेय ... - माळेगाव टाऊन रेल्वे रुळावर दोघांचे मृतदेह आढळल्यानंतर पोलिसानी घटनास्थळी पोहचून तपास सुरू केलाय... - मृतांची ओळख निरंजन फिरके (४०) आणि योगेश फिरके (३७) पटली आहे... - बेकरी व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जामुळे कुटुंब आर्थिक संकटात सापडले... कर्जाची परतफेड न झाल्याने घर जप्तीची नोटीस बजावल्याची माहिती समोर आलो... - घर जप्तीच्या भीतीमुळे दोघेही मानसिक तणावात असल्याची माहिती यातूनच दोघांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे... - गुरुवारी सकाळी शेतीत जात असल्याचे सांगून दोघे घराबाहेर पडले होते त्यानंतर धावत्या मालगाडीसमोर उडी घेतल्याचा प्राथमिक अंदाज - सावनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला आहे.. - आकस्मिक मृत्यूची नोंद पोलिसांकडून करण्यात आली - कर्जबाजारीपणा आणि घर जप्तीच्या नोटिशीचा आत्महत्येशी संबंध आहे का? तपास सुरू आहे... - दोन्ही भावांनी पत्नी आणि मुलाला घटनेच्या एक दिवसा आधी माहेरी सोडून दिले होते... त्यानंतर काल त्यांनी टोकाचे पाऊल उचलेलेो..
0
0
Report

बारिश से नांदगांव खंडेश्वर में पुल टूटे, 15 गाँव संपर्क से कटे

Amravati, Maharashtra:पावसामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाघोडा गावाजवळील नागरिकांचं मोठं नुकसान; मुसळधार पावसाने पूल गेला वाहून,शेतातील पीक खरडली पावसामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाऊस एवढा भयंकर होता की शेतीमधील माती वाहून गेली असून शेती पिके खरडून गेली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असल्याचा पाहायला मिळत आहे. तसेच तालुक्यातील वाघोडातील हा पुल वाहून गेल्याने जवळपास पंधरा गावांचा संपर्क तुटला आहे. रात्री अनेक नागरिकांना मंगल कार्यालयामध्ये ठेवण्यात आले असून प्रशासनाकडून अद्यापही आम्हाला कोणतीही मदत मिळाली नाही त्यामुळे प्रशासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी अशी आमची मागणी गावकरी करत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top