icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Nov 2024, 12:41 pm

यवतमाळ : पुसद मध्ये माणूसकीची भिंत फाउंडेशन ने वृद्ध, निराधार, बेघरांसोबत साजरी केली भाऊबीज

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळच्या पुसद येथे माणुसकीची भिंतच्यावतीने बेघर, निराधार, दिव्यांग, असहाय वृद्ध व अनाथांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. वृद्धाश्रम व रुग्णालय परिसरात हा सोहळा संपन्न झाला. माणुसकीची भिंत परिसरात स्वच्छता करून गोरगरीब निराधार वृद्धांची व पुरुषांची दाढी-कटिंग करण्यात आली. त्यानंतर महिलांनी काढलेल्या रांगोळ्यांनी अंगण सजले. पाट मांडण्यात आले. त्यानंतर माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांनी टोपी, टॉवेल, नारळ पेढा देऊन वंचितांना ओवाळले. त्यांच्या कुटुंबातील महिलांना साड्या देण्यात आल्या.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

पाथर्डी पुलिस के सामने 3 घंटे का धरना, शिकायत न लेने पर वंचित बहुजन आघाडी

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील औरंगपूर येथील आदिवासी महिलेची तक्रार घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पाथर्डी पोलिसांविरोधात वंचित बहुजन आघाडीने पोलीस ठाण्यासमोर गेल्या तीन तासांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. तक्रार घेतली जात नसल्याने पीडित महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. या गोंधळात पीडित महिलेसोबत आलेले विठ्ठल खर्चन यांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या दबावामुळेच खर्चन यांचा मृत्यू झाल्याचा आरोप वंचितचे किसन चव्हाण यांनी केला आहे. आंदोलकांनी पोलीस निरीक्षक पुजारी यांचे निलंबन आणि दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून ठोस आश्वासन मिळेपर्यंत मागे न हटण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.
0
0
Report

हिंदी में स्लग-नितेश राणे पर राजनितिक टीका: ईद के बहाने बैनर-टिप्पणी उछली

Sangli, Maharashtra:अँकर - मंत्री नितेश राणेंना आता कोणी सिरीयस घेत नाही,एंटरटेनमेंट साधन म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं,असा टोला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी लगावला आहे.बकरी ईदच्या कुर्बानी वरून नितेश राणे यांनी केलेल्या विधानावरून इद्रिस नायकवडींनी हा टोला लगावलाय,त्याचबरोबर नितेश राणे यांनी आम्हाला धार्मिक तत्व कशी पाळावे, याचे मार्गदर्शन करण्याची गरज नाही,समाजात दुफळी निर्माण करून हिरो म्हणून पुढे येण्यासाठी त्यांचा सातत्याने बालिशपणाचे प्रयत्न सुरू आहेत,अशी टीका देखील आमदार नायकवडी यांनी केली आहे,तसेच मुस्लिम समाजाकडून गाईला राष्ट्रीय पशु म्हणून जाहीर करण्याच्या मागणीकडे सरकारने गंभीरपणे लक्ष देऊन,गाय राष्ट्रीय पशु म्हणून जाहीर करावा,अशी मागणी देखील आमदार इद्रिस नायकवडी यांनी केली आहे,ते सांगलीच्या मिरजेत बोलत होते.
0
0
Report

मावळ में जनगणना के दौरान शिक्षিকা का दर्दनाक निधन

Varsoli, Maharashtra:मावळ तालुक्यात जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात असताना एका शिक्षिकेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कान्हे फाटा येथे घडली आहे.. दीपाली तांबे असे मृत शिक्षिकेचे नाव असून जुना पुणे-मुंबई महामार्गावरील कान्हे फाटा येथे भरधाव डंपरने त्यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली.. हा अपघात इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला.. या घटनेनंतर मावळ तालुक्यातील शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली असून शासकीय सुट्टीच्या दिवशीही जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांना बोलावले जात असल्याबाबत प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.. “या मृत्यूला जबाबदार कोण?” असा सवाल शिक्षकांकडून केला जात असून महामार्गावर भरधाव डंपर वाहतुकीवर तातडीने निर्बंध आणण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे..
0
0
Report
Advertisement

इद्रिस नायकवडी ने राजीनामे की अफवाहों को खारिज किया, पार्टी में कोई चर्चा नहीं

Sangli, Maharashtra:स्लग - राजीनामाच्या केवळ माध्यमात चर्चा, पक्षाकडून कोणत्याही सूचना नाहीत -आमदार इद्रिस नायकवडी पक्षाचा कोणत्याही नेत्यांनी राजीनामा देण्याच्या सूचना दिल्या नाहीत, पक्षामध्ये आपल्या राजीनामाची कोणतीही चर्चा झालेली नाही,या केवळ माध्यमात चर्चा असून यासर्व पेरलेल्या बातम्या असंखा खुलासा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी केला आहे.गेल्या काही दिवसांपासून आमदार इद्रिस नायकवडी यांना राजीनामा देण्याच्या सूचना पार्थ पवार आणि पक्षाकडून देण्यात आल्याच्या चर्चा सुरू आहेत,मात्र नायकवडींनी सर्व चर्चांचे खंडन करत पक्षाच्या बैठकीत देखील अशा प्रकारची कोणतीही चर्चा झाली नाही,त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही,असे स्पष्टीकरण दिलं आहे,त्याच्याशी बातचीत केली आहेत,आमचे सांगलीचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी 21 - इद्रिस नायकवडी - आमदार - राष्ट्रवादी काँग्रेस ( AP )
0
0
Report

राजापूर में धरण परियोजना के विरोधियों का उग्र प्रदर्शन: 100% पुनर्वसन की मांग

Ratnagiri, Maharashtra:राजापूर - रत्नागिरी.. राजापुरात धरणग्रस्तांचा उद्रेक! 'आधी पुनर्वसन, मगच धरण'.. काजिर्डा-राणेवाडी मार्गावर आंदोलकांचा ठिय्या,मोजणी अधिकाऱ्यांची गाड्या अडवल्या!.. 'आधी पुनर्वसन, मगच धरण'; पोलिसांच्या दडपशाहीमुळे परिसरात तीव्र तणाव! अँकर रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील प्रस्तावित जामदा धरण प्रकल्पावरून आता रणकंदन सुरू झालंय. 'आधी पूर्ण पुनर्वसन, मगच धरण' अशी आक्रमक भूमिका घेत जामदा प्रकल्पग्रस्तांनी आज सकाळपासूनच काजिर्डा-राणेवाडी मार्गावर तीव्र आंदोलन छेडलंय.. प्रशासनाकडून आजवर केवळ आश्वासनांची खैरात केली गेल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी धरणाच्या मोजणीसाठी जाणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांच्या गाड्यांची वाट अडवून धरली आहे. विशेष म्हणजे, प्रकल्प संघर्ष समितीने यापूर्वीच प्रांताधिकारी आणि पोलिसांना निवेदने दिली होती.मात्र, शासनाच्या १००% पुनर्वसन धोरणाची अंमलबजावणी न करता आज प्रशासनाने पोलीस बळाचा वापर करून मोजणीच्या गाड्या जबरदस्तीने गावात घुसवण्याचा प्रयत्न केला.. पोलिसांच्या या दडपशाहीमुळे आंदोलनकर्ते अधिकच आक्रमक झाले असून काजिर्डा परिसरात सध्या कमालीचा तणाव निर्माण झालाय.. कायदा आणि सुव्यवस्था बाजूला सारून अधिकारी केवळ काही मोजक्या लोकांना साथ देत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय.. मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास हे आंदोलन आणखी चिघळण्याचा इशारा संघर्ष समितीने दिला असून,सध्या संपूर्ण राजापूर तालुक्याचं लक्ष या आंदोलनाकडे लागलं आहे..
0
0
Report

पिंपरी-चिंचवड़ पुल खुलते ही चार दिनांत दो हादसे, सियासी टकराव तेज

Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पिंपरी औंध मार्गावर रक्षक चौकात बनवलेल्या पुलावरून महायुतीत ठिणगी पडली आहे. हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे पत्र भाजप आमदार शंकर जगताप यांनी महापालिकेला दिल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पण वाहतूक सुरू झाल्यानंतर अवघ्या चार दिवसात या पुलावर दोन अपघात झाले. त्यावर शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पुलाची रचना चुकीची झाली असल्याचा आरोप करत या पुलाशी निगडित अभियंत्यांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा लागेल असा इशारा दिला. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि भाजप आमदार शंकर जगताप यांच्यात ज्या पुलावरून वाद सुरू झालाय त्याच पुलावरून माहिती देतायत आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी.
0
0
Report
Advertisement

आंधी-बारिश ने वसमत के केळी बागों को भारी नुकसान किया, किसान बेहाल

Hingoli, Maharashtra:अँकर -हिंगोली जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाने मोठे नुकसान झाले आहे. विशेषत वसमत तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे काढणीला आलेल्या केळीच्या बागा अक्षरश जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. वसमत तालुक्यातील बागल पार्डी, सोमठाणा, गिरगाव दाभाडी,पेडगाव आणि सालापूर या गावांच्या शिवारात मोठ्या प्रमाणात केळीच्या बागांचे नुकसान झाले आहे.अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील केळीची झाडे वादळी वाऱ्यामुळे आडवी पडली असून काही ठिकाणी संपूर्ण बागाच उद्ध्वस्त झाली आहे.केळीची लागवड केल्यानंतर जवळपास वर्षभर मोठ्या मेहनतीने आणि लाखो रुपयांचा खर्च करून शेतकरी बागांची जोपासना करतात. मात्र उत्पादन हाती येण्याच्या अंतिम टप्प्यातच अवकाळी पावसाने घात केल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
0
0
Report

इंधन वृद्धि के विरोध में कुडाळ में उद्धव ठाकरे गुट का प्रदर्शन, वैभव नाईक की पहल

Oras Bk., Maharashtra:इंधन बढ़ाने के विरोध में उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष के वतीने कुडाळ शहर में आंदोलन छेडा गया. माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले. माजी आमदार वैभव नाईक यांनी हातात सायकल घेऊन पायी चालत आंदोलनात सहभाग घेतला होता. या आंदोलनात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजप आमदार मैथिली ठाकूर यांचं महंगाई डायन खाये जात है. हे गाण वाजवून भाजपला दबाव आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी सरकारवर टीका करत जनतेला जागरुक करण्यासाठी आमचे हे आंदोलन असल्याचे सांगितले.
0
0
Report

मालेगांव में करोड़ों की जमीन 10 हजार में दस्तावेजीकरण: विवाद

Nashik, Maharashtra:मालेगाव ( नाशिक ) - हैदराबादच्या नवाबाची संभाजी नगरच्या वादग्रस्त जमीनीचे दस्त नोंदणी मालेगावात. करोडोंची जमिनीचे दस्त नोंदणी फी फक्त 10 हजार. हैदराबादच्या सालारगंज नवाबाची वारस असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीची संभाजी नगर येथील वादग्रस्त करोडोंची जमिनीचे नाशिकच्या मालेगावात अवघ्या 10 हजारात दस्त नोंदणी झाल्याचा खळबळ जनक आरोप भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनी मालेगाव दौऱ्यावर केल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी त्यांनी विविध शासकीय अधिकाऱ्यांना भेट देत तक्रार देखील केली असून लवकरच यावर कारवाई होईल असे देखील त्यांनी सांगितले.
0
0
Report
Advertisement

पदस्पर्श दर्शन के दौरान 150 भक्तों को नैवेद्य पूजन में बैठने का मौका मिला

Pandharpur, Maharashtra:विठोबाच्या पद स्पर्श दर्शन रांगेतील वारकऱ्यांना सुखद धक्का, देवाच्या नैवद्य पूजेला बसण्याची 150 भाविकांना मिळाली संधी पुरुषोत्तम महिना सध्या सुरू आहे. त्यामुळे पंढरपूर मध्ये लाखो भाविक दाखल झाले आहे. आज व्हीआयपी दर्शनावर निर्बंध आणल्यानंतर भाविकांच्या दर्शन वेग वाढला आहे. नैवद्य पूजा सुरू होताना पदस्पर्श दर्शन रांग बंद होण्या़पूर्वी शेवटचे 150 वारकरी जे रांगेत होते त्यांना समितीने अचानक नैवैद्य पूजेला बसण्याची संधी मिळाली. जे भाविक फक्त देवाच्या पायावर डोके टेकवायला आले होते त्यांना थेट देवाचा नैवेद्य कसा होते हे पाहण्याची संधी मिळाली
0
0
Report

अमरावती के स्कूल व्हॅन-बस दरों में 25% वृद्धि, छात्रों पर आर्थिक बोझ बढ़ा

Amravati, Maharashtra:अमरावती में स्कूलबस- व्हॅन के मासिक शुल्क में तब्बल 25 प्रतिशत दरवाढ; अमरावती चालक-मालक संघटनेचा निर्णय, विद्यार्थी और पालकांना बसणार आर्थिक फटका अँकर :- पेट्रोल और डीजेल के बढ़ते दामों के कारण अमरावती जिले में स्कूल बस/व्हॅन के मासिक शुल्क में तब्बल 25 प्रतिशत दरवाढ करने का निर्णय शालेय यातायात चालक- मालिक संघटना ने लिया है, ईंधन वृद्धि खर्च, वाहन की देखरेख और चालक के वेतन में वृद्धि के कारण यह निर्णय लिया गया है. स्कूल व्हॅन बस चालक- मालिक संघटन के निर्णय से विद्यार्थियों- पालकों को बड़ा आर्थिक बोझ पड़ेगा.. अमरावती जिले में 800 से अधिक स्कूल व्हॅन बसेस हैं, प्रतिदिन लाखों विद्यार्थी स्कूल व्हॅन के जरिए शाला में आते-जाते हैं.
0
0
Report
Advertisement

गोवा सीमा पर AI ऑटो स्कैन से कागदपत्रों की सतर्कता, प्रवेश जल्द

Oras Bk., Maharashtra:अँकर गोव्यात जाण्याचा प्लॅन करताय? मग आधी तुमच्या वाहनाची कागदपत्रं व्यवस्थित आहेत का ते नक्की तपासा… कारण आता गोवा सीमेवर वाहनांची तपासणी अधिक हायटेक झाली आहे. महाराष्ट्र-गोवा तसेच कर्नाटक-गोवा सीमेवरील चेकपोस्टवर एआय आधारित ऑटो स्कॅन सिस्टीमद्वारे वाहनांचे नंबर स्कॅन करून आरसी, विमा, पीयूसीसह इतर कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. वाहनाचे कागदपत्र वैध नसल्यास अतिरिक्त दंडाचा फटका बसू शकतो, तर सर्व कागदपत्रे ओके असतील तर गोव्यात प्रवेश अधिक सुलभ होणार है. विशेष म्हणजे, एकदा सीमारेषेवर वाहनाची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर विनाकारण कागदपत्र तपासणीसाठी वारंवार अडवले जाणार नाही. प्रायोगिक तत्वावरील ही यंत्रणा भविष्यात प्रत्येक राज्यात कार्यान्वित होईल हे निश्चित आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी.
0
0
Report

हसन मुश्रीफ मुद्दों पर बीजेपी-शिवसेना-राष्ट्रवादी की संयुक्त बैठक

Kolhapur, Maharashtra:मंत्री हसन मुश्रीफ Byte मुद्दे ऑन कार्यकारणी मला यातील काही माहिती नाही पण यापूर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारणीवर होतो. कालच आमची बैठक झाली आहे या बैठकीमध्ये सर्व आमदार, खासदार आणि पक्षाचे सर्व नेते मंडळी उपस्थित होते.. या सर्वांनी सुनेत्रा वहिनींच्या पाठीमागे ठामपणे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ऑन तटकरे नाराजी. अशा प्रकारची भावना त्यांनी व्यक्त केलीली नाही, त्यांनी वहिनींच्या शपथविधीनंतर आपल्याला टार्गेट केले गेलं अशा भावना व्यक्त केल्या. पक्ष एकसंघ असल्यामुळे आमची, कार्यकर्त्यांची, सर्वांची आणि कुटुंबियांची वहिनीनी शपथ घ्यावी अशी इच्छा होती. पण शपथ घेतल्यानंतर त्या दोघांनाच टार्गेट करण्यात आलं अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.. ऑन अर्थ खाते अर्थ खात हे आमचं होतं.. सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर बजेट येणार होत, त्यामुळे ते नंतर देतो असं सांगण्यात आलं.. पण त्या अद्याप मिळालेलं नाही.. आज दिल्लीमध्ये वहिनी गेलेल्या आहेत, त्यामुळे याचा निश्चितपणे निर्णय होईल.. भारतीय जनता पक्ष याचा निश्चितपणाने सन्मान राखेल.. ऑन स्वबळ निवडणूक सगळेच पक्ष अशा प्रकारची तयारी करत असतात.. पण मला असं वाटतंय भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र लढतील.. ऑन राष्ट्रवादी वाद संपला का पेल्यामधील वादळ पेल्यामध्ये संपलेला आहे.. प्रफुल्ल भाई आपल्या कामानिमित्त बिझी होते. ऑन प्राजक्ता तनपुरे भाजप प्रवेश विधानसभेला त्यांनी निवडणूक लढवली नाही , त्याच वेळेला ते सिद्ध झालं होतं. ऑन गोकुळ निवडणूक कच्ची आणि पक्की यादीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. संस्थाकडे ठराव जाणे आणि संस्थेने संबंधित व्यक्तीच्या नावे ठराव देणे ही प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर निवडणूक लागेल. ही निवडणूक सप्टेंबर महिन्यात लागण्याचा अंदाज आहे. ऑन गोकुळ निवडणूक महायुती महायुती मधून निवडणूक लढवणार हे सातत्याने स्पष्ट केलेल आहे.. माझे मित्र सतेज पाटील यांनी बारा हजार वेळेला हसन मुश्रीफ महायुतीमधून निवडणूक लढवणार असं उच्चारले आहे.. ऑन सतेज पाटील निवडणूक आघाडी त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे.. आम्ही युतीने काय करावा हा आमचा प्रश्न आहे.. आमचं ठरलेलं आहे. गोकुळची निवडणूक लढवणे आणि जिंकणे.... महायुतीचा चेअरमन करणं हे फायनल आहे.. ऑन गोकुळ जागावाटप फॉर्म्युला जागावाटप आज होणार नाही.. मतदार यादी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत ही प्रक्रिया होणार नाही.. मतदार यादी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या समोर हा प्रश्न सुटेल.. एवढ्या जागा तेवढ्या जागा असं कुठेही ठरलेलं नाही, हा मतदार यादीनंतरचा कार्यक्रम. ऑन निवडणूक पुढे ढकलणाऱ्यांना चपराक चपराक असे म्हणता येणार नाही.. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक वेळेवर घ्या असं सांगितले आहे, त्यामुळे निवडणूक वेळेवर होत आहे.. ऑन हलाल सर्टिफिकेट मी यासंदर्भात माहिती घेतली आहे.. गोकुळला अनेक दिवसापासून अजरबैजान आणि आखाती देशामध्ये तूप लोणी पाठवतो. अशा सगळ्या इंटरनॅशनल निर्यातीसाठी अशा सर्टिफिकेटची आवश्यकता असते.. ते सर्टिफिकेट 2022 सालीच काढले आहे.. नाविद मुश्रीफ हे तर आत्ता चेअरमन झाले आहेत.. कशाला काहीही जोडलं जात आहे. मला त्याचा आश्चर्य वाटत आहे. इंटरनॅशनल व्यापार करत असताना त्यांनी अट आहे.. जे गोकुळ निवडणूक लागणार नाही असं म्हणत होते, त्यांना अशा गोष्टी काढाव्या लागत आहेत.. वास्तविक तुम्ही प्रशासकांना जाऊन विचारलं पाहिजे.. ऑन सी पी आर नूतनीकरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.. या सर्व अधिकाऱ्यांनी शांत रहावे.. तिथं सिव्हिल सर्जन बसत होते हे खरा आहे.. तिथली मालमत्ता वैद्यकीय शिक्षण विभागाकडे आहे. मी आणि आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर साहेब बसून यावर मार्ग काढू. ऑन रायगड विधान परिषद जागा तडजोड आपण जे सांगितलं ते मीही ऐकले आहे प्रसारमाध्यमात.. त्याची निश्चित माहिती घेऊन बोलेन. स्वबळ निवडणूक भुजबळ सगळ्या निवडणुक्यामध्ये प्रत्येक पक्षाने आपली तयारी करावी लागते.. कुस्तीच्या आधी पैलवान व्यायामाची तयारी करतो.. उठाबशा काढतो. तस असतं.. पण महायुती म्हणूनच लढाई होईल.. ऑन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौरा दोन प्रश्नांसाठी ते दिल्लीला गेलेले आहेत.. कांदा आणि साखर. कांदा स्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान होत आहे.. साखरेचा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे.. मला एक साखर कारखानदार म्हणाला "आता सामुदायिक आत्महत्या करण्याची वेळ आली आहे" इतक्या पद्धतीने साखर उद्योगासमोर अडचणी तयार झाल्या आहेत.. बँकांच्या अडचणी तयार झाल्या आहेत. साखरेच्या अडचणी झालेत.. त्यामुळे या बैठकीमध्ये साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन देणं, लोन रीस्ट्रक्चरिंग करणे, साखरेचे दर वाढवणे, इथेनॉलचे दर वाढवणे अशा प्रकारचे मार्ग काढून केंद्र सरकार दिलासा देईल असं वाटतं.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top