icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Nov 2024, 12:41 pm

यवतमाळ : पुसद मध्ये माणूसकीची भिंत फाउंडेशन ने वृद्ध, निराधार, बेघरांसोबत साजरी केली भाऊबीज

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळच्या पुसद येथे माणुसकीची भिंतच्यावतीने बेघर, निराधार, दिव्यांग, असहाय वृद्ध व अनाथांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. वृद्धाश्रम व रुग्णालय परिसरात हा सोहळा संपन्न झाला. माणुसकीची भिंत परिसरात स्वच्छता करून गोरगरीब निराधार वृद्धांची व पुरुषांची दाढी-कटिंग करण्यात आली. त्यानंतर महिलांनी काढलेल्या रांगोळ्यांनी अंगण सजले. पाट मांडण्यात आले. त्यानंतर माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांनी टोपी, टॉवेल, नारळ पेढा देऊन वंचितांना ओवाळले. त्यांच्या कुटुंबातील महिलांना साड्या देण्यात आल्या.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अकोला के तबला वादक शांतनु माई ने रूस में भारत का प्रतिनिधित्व किया

Akola, Maharashtra:अकोल्याचा युवा तबलावादक शांतनू मायी यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी झेप घेतली आहे. नुकत्याच रशियात पार पडलेल्या “ब्रिक्स मेलोडी महोत्सवा”त त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत रशियन रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी भारतीय शास्त्रीय संगीताची वैशिष्ट्ये, रागदारी परंपरा आणि भारतीय संस्कृतीची ओळख या माध्यमातून परदेशी विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. अकोल्याचे शांतनू मायी यांनी यापूर्वीही अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले असून विविध प्रतिष्ठित मंचांवर तबल्याची साथ दिली आहे. आयोध्या येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमात देखील दिग्गज गायकांसोबत शंतनू यांनी तबल्याचे साथ दिली होती. रशिया येथील या महोत्सवात ब्राझील, रशिया, भारत, चीन, इजिप्त आणि इंडोनेशिया अशा देशांतील कलाकार सहभागी झाले होते. अकोल्याच्या या युवा कलाकाराच्या यशामुळे शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून, तरुण कलाकारांसाठी ते प्रेरणास्थान ठरत आहेत.
0
0
Report

गादेगाव में पेड़ लगाकर तापमान 43°C से घटकर 32°C

Pandharpur, Maharashtra:ऐन वैशाख वणव्यात उन्हाचा पारा 43 अंशावर गेलेला असतानाच, पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे मात्र चक्क 32 अंश तापमान नोंदवले गेले आहे. याचे कारण म्हणजे गावात केलेली मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड. येथील वृक्षमित्र दत्ता बागल आणि त्यांच्या सहकार्यांनी गेल्या दहा वर्षापूर्वी लावलेली 100 हून अधिक वडाची झाडे आज मोठी झाली असून या झाडांमुळे गावातील तापमान नियंत्रीत राखण्यास मोठी मदत झाली आहे. सर्वत्र उखाडा जाणवत असताना येथे मात्र थंड हवेचा अनुभव येत असल्याचा दावा येथील ग्रामस्थांनी केला आहे. वाढते तापमान कमी करण्याबरोबरच पर्जन्यमान वाढावे यासाठी दत्ता बागल यांनी गेल्या दहा वर्षापूर्वी स्वखर्चातून गावात शंभरहून अधिक वडाची रोपे लावली होती. स्वतः त्याचे जतन आणि संवर्धन केले. दहा वर्षानंतर आज छोट्या रोपांचे रुपांतर वट वृक्षामध्ये झाले आहे. गावच्या ओढ्याकाठी लावलेल्या वडाच्या झाडांमुळे गावातील लोकांना ऐन उन्हाळ्यात एसी (वातानुकूलित) अनुभव येत असल्याचा दावा ही दत्ता बागल यांनी केला आहे. श्री. बागल यांनी गावातील रस्त्यांच्या दुर्फा, शाळा परिसर, ग्रामपंचात कार्यालयासह मोकळ्या जागी त्यांनी वड, पिंपळ, चिंच, करंज, गुलमोहर, कडूनिंब, भावा यासह सुमारे 700 ते 800 देशी वृक्षांची लागवड केली आहे. शिवाय शेजारच्या इतर दहा गावांमध्ये देखील त्यांनी वड, पिंपळ रोपांची लागवड केली आहे. दत्ता बागल या वृक्षप्रेमी तरुणामुळे गावातील पर्यावरण संतुलन राखण्यास मोठी मदत झाली आहे, शिवाय तर दहा गावात देखील त्यांनी पर्यावरण संतुलनाचा रोड मॅप तयार केला आहे. त्यांच्या वृक्षलागवड, जतन आणि संवर्धन कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0
0
Report
Advertisement

गरीबी से उजाला: मिस्बाह फातेमाने महाराष्ट्र में जीवविज्ञान में अव्वल स्थान पाया

Wardha, Maharashtra:वर्धा स्टोरी पडक्या घरातून महाराष्ट्रात अव्वल, मिसबाह फातेमाची सुवर्णभरारी रोजमजुरी करणाऱ्या वडिलांच्या लेकीने जीवशास्त्रात मारली बाजी जिद्द, मेहनत आणि स्वप्नांची ताकद; आष्टीच्या मिसबाहितचा राज्यात डंका खासगी शिकवणीशिवाय महाराष्ट्रात प्रथम, वर्ध्याच्या लेकीचा पराक्रम ॲंकर :वर्ध्याच्या आष्टी शहीद तालुक्यातील एका सामान्य कुटुंबातील मुलीने आपल्या जिद्दीच्या बळावर मोठं यश मिळवत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं आहे. गरीबी, हलाखीची परिस्थिती, पडकं घर आणि कोणतीही खासगी शिकवणी नसतानाही मिसबाह फातेमा हिने विज्ञान शाखेत अव्वल येत जीवशास्त्र विषयात महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या संघर्षमय यशोगाथेने अनेक विद्यार्थ्यांसमोर प्रेरणेचा आदर्श निर्माण केला आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट... व्हीओ 1 :रोजंदारीवर काम करणारे वडील... घर सांभाळणारी आई... पावसाळ्यात गळणारं पडकं घर... आणि या सगळ्या परिस्थितीवर मात करत मोठी स्वप्नं पाहणारी एक मुलगी... ही आहे वर्धा जिल्ह्यातील आष्टी शहीद तालुक्यात राहणाऱ्या मिसबाह फातेमाची प्रेरणादीय कहाणी. अत्यंत सामान्य परिस्थितीत वाढलेल्या मिसबाहने कोणतीही खासगी शिकवणी न लावता केवळ स्वतःच्या मेहनतीच्या बळावर विज्ञान शाखेत उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. जीवशास्त्र विषयात महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळवत तिने आपल्या कुटुंबासह संपूर्ण वर्धा जिल्ह्याचा मान उंचावला आहे. व्हीओ 2 :घरात अभ्यासासाठी स्वतंत्र खोली नव्हती. पावसाळ्यात घरातून पाणी झिरपत असतानाही पुस्तकं सांभाळत मिसबाह अभ्यास करत राहिली. आर्थिक अडचणींमुळे अनेक वेळा संकटं समोर उभी राहिली, मात्र परिस्थितीसमोर हार न मानता तिने शिक्षणालाच आपलं Shस्त्र बनवलं. दिवस-रात्र अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि आई-वडिलांचा आशीर्वाद, या जोरावर मिसबाहने हे यश संपादन केलं आहे. तिच्या यशानंतर गावात आनंदाचं वातावरण असून नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. बाईट : मिसबाह फातेमा, विद्यार्थिनी व्हीओ 3 :मिसबाहच्या यशामागे तिच्या शिक्षकांचंही मोठं योगदान आहे. मर्यादित साधनसामग्री असतानाही ती अभ्यासात सातत्य ठेवत होती, असं शिक्षक सांगतात. तिच्या मेहनतीची आणि अभ्यासातील चिकाटीची आज सर्वत्र चर्चा होत आहे. विशेष म्हणजे, मिसबाहच्या यशामुळे तिच्या कुटुंबियांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले आहेत. विशेषतः तिची आजीला आपल्या नातीचा अभिमान वाटत असून संपूर्ण गावासाठी ती प्रेरणास्थान ठरली आहे. बाईट : सागर सव्वालाखे, जीवशास्त्र शिक्षक व्हीओ 4 :गरीबी ही यशाच्या आड येत नाही, तर जिद्द आणि मेहनत असेल तर कोणतंही स्वप्न पूर्ण करता येतं, हे मिस्बाह फातेमाने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवलं आहे. तिची ही यशोगाथा केवळ गुणांची नाही, तर संघर्ष, मेहनत आणि आत्मविश्वासाची प्रेरणादायी कहाणी ठरत आहे. बाईट : मिसबाहची आई फायनल विवो : पडक्या घरातून सुरू झालेला हा संघर्ष आज महाराष्ट्रात अव्वल ठरण्यापर्यंत पोहोचला आहे. मिसबाह फातेमाच्या या यशामुळे केवळ तिचं कुटुंब नाही, तर संपूर्ण वर्धा जिल्हा अभिमानाने भरून गेला आहे. मिलिंद आंडे,झी २४ तास, वर्धा.
0
0
Report

नवी मुंबई: एपीएमसी बाजार में गंदगी और दुर्गंध के कारण कठोर कार्रवाई की मांग

Navi Mumbai, Maharashtra:मनपा आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली, बाजार आवारात घाण आणि दुर्गंधीचे साम्राज्य. एपीएमसी प्रशासना विरोधात कठोर कारवाईची मागणी. नवी मुंबई मनपा आयुक्तांनी एपीएमसी बाजारात केलेल्या पाहणी दौऱ्या दरम्यान अस्वछता आणि दुर्गंधी वरून एपीएमसी प्रशासनाला गुन्हा दाखल करण्याची ताकीद देऊनही एपीएमसी प्रशासन ठिम्म असल्याचे पहायला मिळत आहे. एपीएमसी बाजार आवारातील कचरा उचलण्यासाठी करोडो रुपये खर्च करूनही कचरा उचलला जात नसून यामुळे अस्वच्छता आणि प्रचंड दुर्गंधीचे साम्राज्य पहायला मिळतेय. सडलेल्या फळांचा ढीग सर्वत्र पहायला असून एपीएमसी प्रशासनावरच कठोर कारवाईची मागणी मागरिकांकडून होतं.
0
0
Report
Advertisement

गोवा में ED ने छह ठिकानों पर छापे, 67.50 लाख नकद और दस्तावेज़ जब्त

Ratnagiri, Maharashtra:गोव्यात ईडीचे सहा ठिकाणी छापे.. 67.50 लाखांची रोकड,कागदपत्रे व डिजिटल उपकरणे जप्त.. अँकर बहुबँक कर्ज फसवणूक प्रकरणात ईडी ने गोव्यातील मे.क्राऊन मिनरल ट्रेडिंग कार्पोरेशनशी (सीएमसी) संबंधित गोव्यात सहा ठिकाणी छापेमारी करून 67.50 लाखांची रोकड, मालमत्तेची कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत.. कॅनरा बँकेने दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणाची सुरुवात झाली होती.. तक्रारीनुसार संबंधित कंपनीने मडगाव शाखेतून 7 कोटी रुपयांचे कर्ज फसवणूक करून घेतले होते. नंतर हे कर्ज खाते थकीत होऊन NPए मध्ये परिवर्तित झाले असून बँकेची 6.19 कोटी रुपयांची थकबाकी झाली होती.. IDीच्या माहितीनुसार कच्च्या लोखंड धातूच्या व्यापारात कार्यरत असल्याचा दावा करणाऱ्या या कंपनीने प्रत्यक्षात कोणतेही खरे व्यवसायिक व्यवहार नव्हते.. तपास दरम्यान आरोपींनी एकाच मालमत्तांवर एकाच वेळी विविध बँकांकडून कर्ज मिळवल्याचे उघड झाले आहे.. दहा कोटी रुपयांनी अधिक कर्ज उचलण्याचा आरोप आहे तसेच एकाच मालमत्तेसाठी बनावट विक्री कागदपत्रे तयार करून ती विविध बँकांना सादर करण्यात आल्याचा आरोपी ईडीने केला आहे..
0
0
Report
0
0
Report
Advertisement

वाशीम में आरटीई सत्र 2026-27: 776 विद्यार्थियों को मुफ्त प्रवेश तय, 168 सीटें खाली

Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:वाशीम जिल्ह्यात आरटीई (राईट टू एज्युकेशन) अंंतर्गत शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी ८ मेपर्यंत ७७६ विद्यार्थ्यांचे मोफत प्रवेश निश्चित झाले आहेत.आर्थिक दुर्बल, दिव्यांग व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश दिला जातो. वाशीम जिल्ह्यात ९५ शाळांमध्ये १००७ जागा उपलब्ध असून,यासाठी २३८१ अर्ज प्राप्त झाले होते.अंतिम मुदतीपर्यंत ९४४ पैकी ७७६ प्रवेश निश्चित झाल्याने १६८ जागा रिक्त राहिल्या आहेत.पहिल्या लॉटरीत पद्धतीने ९४४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. सुरुवातीला २० एप्रिलपर्यंत केवळ ३८२ प्रवेश झाले होते.त्यानंतर राज्यभर कमी प्रतिसाद मिळाल्याने शिक्षण विभागाने मुदت ८ मेपर्यंत वाढवली.आता पुन्हा मुदतवाढ मिळणार की प्रतीक्षा Yादी जाहीर होणार, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report

लातूर में ‘पिस्तुल्या महाराज’ प्रकरण पर विवाद, वीडियो वायरल के बाद कार्रवाई की मांग

Latur, Maharashtra:लातूरमध्ये सध्या ‘पिस्तुल्या महाराज’ प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे... हातात पिस्तूल घेऊन व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाराजांवर टीकेची झोड उठली आहे... अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही या व्हिडिओवर आक्षेप घेत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे... मात्र एवढा गाजावाजा होऊनही संबंधित महाराज अद्याप सापडत नसल्याची चर्चा आहे... तर दुसरीकडे पोलीस प्रशासनाकडूनही कोणतीही स्पष्ट कारवाई किंवा अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही... त्यामुळे नेमकं कारवाई होणार का...? आणि पिस्तुल्या महाराजांवर काय भूमिका घेतली जाणार...? याकडे आता लातूरकरांचे लक्ष लागले आहे...
0
0
Report

73 बोरे कांदे बेचने पर किसान को सिर्फ 400 रुपये, प्रति किलो 50 पैसे

Pandharpur, Maharashtra:कांद्याच्या दरात मोठी घसरण: 73 पोती विकून शेतकऱ्याच्या हातात पडले फक्त 400 रुपये कांद्याला मिळाला प्रतिकिलो 50 पैसे भाव ,बळीराजाच्या नशिबी आलेली दैना पुन्हा एकदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळाली करमाळा तालुक्यातील पांगरे येथील शेतकरी अंकुश अण्णा गुंजाळ यांना बाजारभावात झालेल्या प्रचंड घसरणीचा मोठा फटका बसला आहे. 73 गोणी कांदा विकल्यानंतर सर्व खर्च वजा जाता या शेतकऱ्याच्या हातात केवळ 400 रुपये मिळाले आहेत अंकुश गुंजाळ यांनी आपल्या शेतात कष्टाने पिकवलेला कांदा 21 एप्रिल 2026 रोजी सोलापूरच्या शरीफ ट्रेडर्स' या आडत दुकानावर विक्रीसाठी आणला होता. एकूण ७३ पिशव्या (पोती) कांदा त्यांनी विक्रीसाठी लावला होता. मात्र, बाजारपेठेत कांद्याची आवक वाढल्याने किंवा मागणी घटल्याने त्यांच्या कांद्याला प्रति किलो केवळ ५० पैसे इतका नीचांकी भाव मिळाला. मिळालेल्या पट्टीनुसार, कांद्याच्या विक्रीतून मिळालेली एकूण रक्कम आणि त्यावर झालेला खर्च यांचा ताळमेळ बसवणे कठीण झाले आहे. 73 पिशव्या कांदा विकल्यानंतर अंकुश गुंजाळ शेतकऱ्याला एकूण 5068 रुपये मिळाले होते. वाहतुकीचे गाडी भाडे, हमाली, तोलाई आणि इतर आडत खर्च वजा जाता, प्रत्यक्षात शेतकऱ्याला केवळ 400 रुपये मिळाले आहेत. शेतकऱ्याकडे सरकारने लक्ष देऊन प्रत्येक पिकाला हमीभाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी दिली आहे.
0
0
Report
Advertisement

पुणे ग्रामीण बैलगाड़ी दौड़ में अचानक बैल रिंग में घुसा, भीड़ में दहशत

Barav, Maharashtra:पुणे जिल्ह्यात सध्या यात्रा-जत्रांचा उत्साह शिगेला पोहोचला असून, गावगावात बैलगाडा शर्यतींचा थरार पाहायला मिळतोय. मात्र, उत्तर पुणे जिल्ह्यात एका बैलगाडा शर्यतीदरम्यान अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे.\n\nगाड्याला जुंपत असताना एका 'धुरेकर' बैलाने अचानक धिंगाणा घातला. हा बैल इतका बिथरला की, त्याला आवरण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना तो चक्क पायाखाली घेतलं, एवढ्यावरच नव्हे तर, हा सुसाट सुटलेला बैल थेट घाट पार करून रिंगणात घुसला.\n\nया अचानक घडलेल्या प्रकारामुळे घाटात एकच पळापळ झाली आणि काही काळ भीतीचं वातावरण पसरलं होतं. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top