Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : पुसद मध्ये माणूसकीची भिंत फाउंडेशन ने वृद्ध, निराधार, बेघरांसोबत साजरी केली भाऊबीज

Nov 03, 2024 12:41:05
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या पुसद येथे माणुसकीची भिंतच्यावतीने बेघर, निराधार, दिव्यांग, असहाय वृद्ध व अनाथांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. वृद्धाश्रम व रुग्णालय परिसरात हा सोहळा संपन्न झाला. माणुसकीची भिंत परिसरात स्वच्छता करून गोरगरीब निराधार वृद्धांची व पुरुषांची दाढी-कटिंग करण्यात आली. त्यानंतर महिलांनी काढलेल्या रांगोळ्यांनी अंगण सजले. पाट मांडण्यात आले. त्यानंतर माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांनी टोपी, टॉवेल, नारळ पेढा देऊन वंचितांना ओवाळले. त्यांच्या कुटुंबातील महिलांना साड्या देण्यात आल्या.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
APAMOL PEDNEKAR
Feb 24, 2026 16:18:32
Mumbai, Maharashtra:गेले अनेक वर्ष पवई च्या तलावात दररोज सोडण्यात येणारे १८ दशलक्ष लिटर सांडपाणी आता बंद होणार आहे. मुंबई मनपाच्या वतीने भांडुप आणि पवई मधील इतर ठिकाणी ते वळविण्यात येणार आहे. तसेच काही लिटर पाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करून ते तलावात सोडण्यात येणार आहे. पवई तलावात मगर, मासे आणि इतर जीव आहेत. त्याच बरोबर अनेक पानवनस्पती आहेत. त्याच बरोबर अनेक पक्षी या तलावावर आपल्याला दिसून येतात. मात्र या तलावात आजू बाजूच्या परिसरातून सांडपाणी सोडल्याने या जैव वैविध्यतेचे मोठे नुकसान होत होते. या बाबत विविध निसर्गप्रेमी संस्थांनी तक्रारी केल्यावर पालिकेच्या वतीने येथे सोडले जाणारे सांडपाणी आता योग्य ठिकाणी वळविण्याचे काम सुरू असून मे महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. आता या सांडपाण्यावर उपाय योजना होणार असल्याने या तलावातील जैववैविध्यतेचे रक्षण होणारआहे.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 24, 2026 16:02:06
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 24, 2026 15:03:32
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी खासदार संदीपान भुमरे यांच्यावर कोट्यवधी च्या जमिनी बळकावली असल्याचा आरोप केलाय... त्यांचा ड्राइवर जावेद रसूल शेख यांच्या नावावर हिबनामा करून त्या जमिनीचे संपादन मूल्य 1150 कोटी रुपये हडप करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा त्यांनी आरोप केला होता. अंबादास दानवे यांनी केलेले या सर्व आरोपांना आता संदिपान भुमरे यांचे चालक जावेद शेख यांनी उत्तर दिला आहे. आपण असला कोणताही हिबानामा केला नसून आपल्या बाबत दानवेंनी चुकीची माहिती दिली आहे. त्यामुळे आपण आता दानवेंच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असून, तशी नोटीस देखील त्यांना पाठवणार असल्याचा जावेद यांनी म्हटले आहे. तर अंबादास दानवे यांनी उल्लेख केलेले गट नंबरच त्या गावात अस्तित्वात नसल्याचा दावा जावेद शेख यांच्या वकिलांनी केला आहे.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 24, 2026 14:30:48
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 24, 2026 14:04:00
Yeola, Maharashtra:अँकर-नाशिकच्या चांदवड मध्ये भरदुपारच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली आहे.चांदवड-निफाड रस्त्याने मुलांना शाळेतून घेण्यासाठी पायी जात असतांना भरधाव जाणा-या क्रेटा कारने स्वाती कृष्णा कुंभार्डे या २९ वर्षीय महिलेसह एका दुचाकी स्वाराला चिरडल्याने त्यात महिलेचा जागीच म-त्यू झाला तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला,पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी पोहचले व त्यांनी जखमीला पोलिस व्हॅन मध्ये टाकून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविले,दरम्याने अपघाता नंतर कार चालक मात्र गाडी गाडी घेऊन फरार झाला,गणूर,परसूल,भाटगाव मार्गे तो मुंबई-आग्रा महामार्गावर पोहचला आणि मालसाने येथे गाडी सोडून फरार झाला विशेष म्हणजे कारचे एक टार फुटलेले असतांना भरधाव वेगाने तो घटनास्थळावरुन पळून गेला.दरम्यान पोलिस या घटनेचा अधिक तपास करीत आहे.या घटनेमुळे चांदवड शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 24, 2026 14:02:12
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईच्या कोपरखैरणे परिसरात रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका व्यक्तीने आपल्या पोटच्या दोन अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ढकललं आहे. एका दलालामार्फत तो आपल्या मुलींना वेगवेगळ्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत होता. या प्रकरणी पोलिसांनी छापेमारी करत दोन्ही मुलींची सुटका केली आहे. पोलिसांनी आरोपी दलालाला अटक केली आहे. आरोपी पित्याचा शोध घेतला जात आहे. नवी मुंबईच्या बेलापूर परिसरात काही अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची गुप्त माहिती नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापेमारी केली. तेव्हा १६ आणि १४ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. पोलिसांनी खोलात जाऊन तपास केला असता यामागे याच मुलींचा नराधम बाप असल्याचं उघड झालं. મેળવलेल्या माहितीनुसार, कोपरखैरणे येथे राहणारा हा नराधम पिता आपल्याच मुलींचा सौदा करत होता. याप्रकरणी पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा (PITA) आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या दलाल पोलिसांच्या कोठडीत असून, नराधम पिता फरार आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Feb 24, 2026 13:36:01
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 24, 2026 13:35:35
Kalyan, Maharashtra:केडीएमसी कंत्राटी कर्मचाऱी गंभीर जखमी. केडीएमसी कचऱ्याचे कंत्राट असलेली सुमित एल्कोप्लास्ट कंपनी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनाबाबत हलगर्जीपणा कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतला रोड स्वीपिंग मशीन साफ करत असताना कंत्राटी कर्मचारी पाय घसरून सायलेन्सर पडला,कर्मचारी भाजल्याने गंभीर जखमी ,रुग्णालयात उपचार सुरू लोकनेते पुंडलीकशेठ म्हात्रे कर्मचारी संघटनेचा आक्रमक पवित्रा ,सुमित कंपनीने कर्मचाऱयांना सुरक्षिततेबाबत साहित्य न पुरवल्याने दुर्घटना घडली आता निवेदन नाही तर तीव्र आंदोलन - लोकनेते पुंडलीकशेठ म्हात्रे कर्मचारी संघटनेचा इशारा.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 24, 2026 12:48:06
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोमय्यांनी महाराष्ट्राच्या एफस्टीन फाईलचं केंद्रबिंदू कोण आहे हे एकदा सांगितलं पाहिजे - सुषमा अंधारे - एचडी व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या यांचं मुळात वर्क प्रोफाइल काय आहे? - सोमय्या गृहमंत्री आहेत का भाजपकडे कोणा कोणाकडे हे खात दिलेल आहे? - मालेगाव हे अतिरेक्यांचा केंद्र झाल असेल असं सोमय्या यांना वाटत असेल तर यात फडणवीस अपयशी ठरत आहेत का ? - गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता भाजपचीच सत्ता आहे. सात वर्षापेक्षा अधिक काळ राज्याचा गृहमंत्री पद फडणवीस सांभाळत आहेत - फडणवीस अपयशी ठरले आहेत त्यामुळे बांगलादेशींचा शिरकाव झालाय असं सोमय्यांना म्हणायचं आहे ka? - हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्यासाठी खळबळ जनक वक्तव्य केलेला आहे ka? - सोमय्यांनी महाराष्ट्राच्या एफस्टीन फाईलचं केंद्रबिंदू कोण आहे हे एकदा सांगितलं पाहिजे - जगभरात एफस्टीन फाईल वेगळी गाजतेय पण महाराष्ट्रातल्या एफस्टीन फाईलच केंद्रबिंदू कोण आहे हे सोमय्या यांच्याकडे आहे असं महाराष्ट्रातल्या लोकांना वाटतं यावर सोमय्यांचं काय उत्तर आहे? - तुमचा कशावरच वॉच नसेल तर गृहमंत्री म्हणून तुम्ही सपशेल अपयशी आहात - सोमय्या यांनी सुनावलेले खडेबोल अर्थातच त्यांच्या गृहमंत्र्यांसाठी आहेत - सोमय्या यांची एफस्टीन फाईल फडणवीस यांनी काढली त्यामुळे फडणवीस हे अपयशी गृहमंत्री आहेत हे सांगण्यासाठी कदाचित सोमय्या करत असतील बाईट - सुषमा अंधारे ( शिवसेना उपनेत्या )
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Feb 24, 2026 12:39:12
Nashik, Maharashtra:नाशिक शहरातील जलालपूर येथील श्रीराम मंदिर के مالک کی 4.44 ہेक्टیر जमीन کی بےقانونہ فروخت کا جھوٹا واقعہ سامنے آیا ہے۔ वाल्मीकीनगर के रहिवाशों ने इस मामले में जिला प्रशासन से संपर्क किया है और 2 फरवरी 2026 को हुई जमीन की फेरफार पंजीकरण 5292 को रद्द कर देने की मांग की है। 1961 में स्थापित इस मंदिर की जमीन के लिए पहले पांच पंचों की नियुक्ति की गई थी, लेकिन पंचों के निधन के बाद कुछ व्यक्तियों ने संगनमत से अपने नाम वारश के तौर पर डालकर जमीन परस्पर विक्रय किया है। यह व्यवहार गैरकानूनी है और धार्मिक भावना को ठेस पहुंचाने वाला है, इसी कारण पंचवटी पुलिस थाना में मुकदमा दर्ज किया गया है। अभी प्रशासन और पुलिस इस प्रकरण की गहन जाँच कर रही है।
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 24, 2026 12:35:16
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका, शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास मातीमोल - सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागील ग्रहण कायम - महापुरानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका - गहू,ज्वारी, हरभरा,द्राक्ष, आंबे अशा अनेक पिकांचे वादळी वारा, अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान - एकीकडे शेतकऱ्यांच्या मालाला अपेक्षित भाव नाही तर दुसरीकडे निसर्गाची देखील अवकृपा - महापुरानंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. आज उद्या मध्ये काढलेला ज्वारीची, हरभऱ्याची, गहुची पीक आडवी झाली आहेत तर दुसरीकडे द्राक्षाच्या भागांना आणि आंब्याच्या झाडांना सुद्धा मोठा फटका बसलाय.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 24, 2026 12:24:51
Akola, Maharashtra:माजी मंत्री तथा बच्चू कडू यांनी आज अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे भेट देत शेती क्षेत्रातील नव्या घडामोडींचा आढावा घेतला. Vo : सध्या शेतीमध्ये होत असलेले बदल, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि विद्यापीठात सुरू असलेल्या विविध संशोधन प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी बच्चू कडू यांनी विद्यापीठातील शास्त्रज्ञांशी चर्चा केली. कृषी क्षेत्र अधिक लवचिक, शाश्वत आणि शेतकरीहिताचे कसे होईल याबाबत त्यांनी सविस्तर संवाद साधला. विद्यापीठात विकसित होत असलेल्या नवीन वाणांच्या पिकांबाबत तसेच अत्याधुनिक शेती पद्धतींबाबत माहिती घेत त्यांनी समाधान व्यक्त केले आणि विद्यापीठाच्या कार्याची स्तुती केली. यावेळी त्यांच्या सोबत काही शेतकरीही उपस्थित होते. नवीन रोपे घेण्यासाठी तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी उत्सुकता दाखवली. दरम्यान, “इतरांसाठी वेळ देतो, पण स्वतःसाठी वेळ कुठे मिळतो?” असे हसत म्हणत बच्चू कडू यांनी स्मितहास्य केले आणि उपस्थितांमध्ये हलकं-फुलकं वातावरण निर्माण झालं.
0
comment0
Report
Advertisement
Back to top