icon-pinewzicon-zee
PINEWZ
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Nov 2024, 12:41 pm

यवतमाळ : पुसद मध्ये माणूसकीची भिंत फाउंडेशन ने वृद्ध, निराधार, बेघरांसोबत साजरी केली भाऊबीज

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळच्या पुसद येथे माणुसकीची भिंतच्यावतीने बेघर, निराधार, दिव्यांग, असहाय वृद्ध व अनाथांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. वृद्धाश्रम व रुग्णालय परिसरात हा सोहळा संपन्न झाला. माणुसकीची भिंत परिसरात स्वच्छता करून गोरगरीब निराधार वृद्धांची व पुरुषांची दाढी-कटिंग करण्यात आली. त्यानंतर महिलांनी काढलेल्या रांगोळ्यांनी अंगण सजले. पाट मांडण्यात आले. त्यानंतर माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांनी टोपी, टॉवेल, नारळ पेढा देऊन वंचितांना ओवाळले. त्यांच्या कुटुंबातील महिलांना साड्या देण्यात आल्या.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री बनेंगी? आमदार शेळके ने जताई आशा

Varsoli, Maharashtra:राज्याच्या मुख्यमंत्री पदी सुनेत्रा वहिनी बसाव्यात अशी माझ्यासह सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची इच्छा असून आई एकवीरेंच्या चरणी साकडं घातल्याचं सांगून मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली..राज्याच्या मुख्यमंत्री पदी अजित दादांना बघण्याचे आमच्या स्वप्न उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रूपाने पूर्ण होणार असल्याचा विश्वास आमदार शेळके यांनी व्यक्त केला.. तसेच अजित पवारांना कार्ला एकविरा गडावर आणता आलं नाही याची सल मनाला टोचत असल्याचं ही शेळके म्हणाले..
0
0
Report

जुण्नर में बेमौसम बारिश-गारपिटी से प्याज सहित अन्य फसलों को भारी नुकसान

Barav, Maharashtra:आधीच युद्धजन्य परिस्थितीमुळे शेतीमालाचे बाजार भाव गडगडल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला असताना आता निसर्गाचा प्रकोप झाल्याने उभा शेतीमाल डोळ्यादेखत जमीन दोस्त झाल्याने बळीराजाचे डोळे पाणावलेत, जुन्नर तालुक्याच्या वडज परिसराला वादळी वाय्रासह गारपीटीच्या अवकाळी पावसाने झोडपल्याने कांदा, बाजरी, दोडके यांसारख्या पिकांचं अतोनात नुकसान झालंय, उभी दोडक्याची बाग ही उपटून पडलीय तर काढणीला आलेला कांदा गारपिट्याने झोडपल्याने शेतकय्रांचं अतोनात नुकसान झालंय, नुकसान ग्रस्त शेतातून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी Hemant Chapude यांनी
0
0
Report

मुंबई-आहमदाबाद हाईवे पर भीषण ट्रैफिक जाम, मरम्मत से motorists परेशान

Palghar, Maharashtra:पालघर_ मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई वाहिनीवरील वरई उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामाचा वाहन चालकांना फटका बसला आहे. वरई ते मनोर पर्यत्न पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महामार्ग पोलिसांना वाहतूक कोंडी सोडविण्यात अपयश येत असल्याने गुजरात आणि मुंबई दोनन्ही वाहिन्यांवर भीषण वाहतूक कोंडी झाली आहे. तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून पडल्याने वाहन चालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होतेय. दरम्यान महामार्ग प्राधिकरणाच्या ढिसाळ कारभाराचा वाहन चालकांना फटका बसत आहे..
0
0
Report
Advertisement

उल्हासनगर के केंद्रीय अस्पताल में सिटीस्कैन केंद्र बंद, गरीब मरीजों को भारी परेशानी

Ambernath, Maharashtra:उल्हासनगच्या मध्यवर्ती रुग्णालयातील सिटीस्कॅन सेंटर बंद आठ ते दहा दिवसापासून सेंटर बंद असल्याने गोरगरीब रुग्णांचे हाल मनसे पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाला विचारला जाब याविषयात उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातील सिटीस्कॅन सेंटर गेले आठ ते दहा दिवसापासून बंद असल्याने गोरगरीब रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे. या बाबत मनसे पदाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक मानोहर बनसोडे यांना जाब विचारला, मध्यवर्ती रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा असताना जिल्हा रुग्णालयाच्या कोणत्याही सोई-सुविधा उपलब्ध नाहीत, आर्थिक परिस्थिती मुळे गोर-गरीब रुग्णांना बाहेरून सिटी स्कॅन करणे शक्य नाही. असतांना रुग्णालय प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे असा आरोप जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख यांनी केला. या रुग्णालयात दररोज उल्हासनगर सह कर्जत, कसारा या ग्रामीण भागातून हजारो नागरिक उपचारासाठी येत असतात.
0
0
Report
Advertisement

जालना में चाइल्डलाइन की गलत सूचना से शादी रुकवाई, आयु विवाद सामने

Jalna, Maharashtra:जालना : चाइल्डलाइनला वधू अल्पवयीन असल्याची चुकीची ऑनलाइन तक्रार, लग्न पडलं लांबणीवर, बाल संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. अँकर : बीडमधील गेवराईची मुलगी आणि छत्रपती संभाजीनगर मधील मुलगा यांचा लग्न सोहळा जालन्यात रविवारी आयोजित होता. पण लग्नातील नवरी मुलगी अल्पवयीन असल्याची ऑनलाइन तक्रार अज्ञाताने जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडे केली. बाल संरक्षण विभागाचे अधिकाऱ्यांनी थेट लग्नसोहळ्यातच धाड टाकली. पोलिसांच्या मदतीने मुलीला ताब्यात घेतलं. मुलीच्या कुटुंबीयांनी मुलगी सज्ञान असल्याचं सांगत आधारकार्ड दाखवलं. परंतु आधार कार्ड वयाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरता येत नसल्यानं पोलिसांनी मुलीच्या जन्म प्रमाणपत्राची मागणी केली. काही तासांनंतर मुलीच्या जन्म प्रमाणपत्र देखील सादर झाले. यात मुलगी सज्ञान असल्याचं स्पष्ट झालं. मात्र तोपर्यंत नवरा मुलगा आणि वऱ्हाडी मंडळी निघून गेली होती. बाल संरक्षण कक्ष म्हणजे चाईल्डलाईनने चुकीच्या माहितीद्वारे लग्नात धाड टाकल्यामुळे या दाम्पत्याचा लग्न सोहळा अखेर लांबणीवर पडला. दिवाळी नंतर हा लग्न पुन्हा पार पडणार आहे. मुलीच्या नातेवाईकांनी चाईल्ड लाईनच्या चुकीच्या माहितीमुळे कारवाईची मागणी केली आहे. या घटनेवर सर्व स्तरातून निषेध व्यक्त झाला.
0
0
Report

बारामती उपचुनाव: ओबीसी आरक्षण पर लक्ष्मण हाके का तीखा दावा

Pune, Maharashtra:काहीही झालं तरी बारामतीची पोटनिवडणूक आम्ही बिनविरोध होऊ देणार नाही, असा पुनउच्चार ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केलाय...सातारा झेडपीत झालं रणकंदन फक्त आणि फक्त ओबीसी आरक्षणाचा मुडदा पाडण्यासाठीच होतं असा आरोपही हाके यांनी केलाय. राज्यभरात नुकत्यात पार पडलेल्या झेडपी पंचायत समिती इलेक्शनमधे ओबीसीच्या सर्व आरक्षित जागा कुणबी मराठा नेत्यांनी बळकावून बारा बलुतेदारांच्या हक्काचं राजकीय आरक्षण गिळंकृत केलं असल्याचंही हाके म्हणालेत...याच दरम्यान, भाजपने ओबीसी हा तर आमचा डिएनए हे असं म्हणूनच आमचा केसानं गळा कापल्याची उद्विग्न प्रतिक्रिया प्रा. हाके यांनी व्यक्त केलीय...त्यांच्याशी आम्ही केलेली ही exclusive बातचीत...
0
0
Report

आखाती युद्ध से सोलापुर के वस्त्रोद्योग पर भारी असर; 1200-1500 करोड़ का कारोबार ठप

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - आखाती देशातील युद्धाचा सोलापुरातील गारमेंट उद्योगाला मोठा फटका आखाती देशात सुरु असणाऱ्या युद्धाचा सोलापुरातील गारमेंट आणि टेक्सटाईल उद्योगाला बसला फटका निर्यात विस्कळीत झाली असून कच्च्या मालाच्या दरातही वाढ या अगोदरच अमेरिकेने लादलेल्या टेरिफमुळे सोलपूरातील वस्त्रोद्योग सापडला होता अडचणीत त्यात आता सुरु असणाऱ्या युद्धामुळे जवळपास 1200 ते 1500 कोटींचा व्यवहार झाला ठप्प वेळीच युद्ध थांबले नाही तर सोलापुरातील 35 ते 40 हजार कामगारांवर येऊ शकते बेरोजगारीची वेळ दरम्यान युद्धापूर्वी शिपमेंट चार्जेस हे एक हजार डॉलर होते तर ते पाच हजार डॉलरवर पोहचले आहेत. तर 33 रुपयांचे पेरॉक्साइड 70 रुपयांवर, 100 रुपयांचे प्लास्टिक पॅकिंग 200 रुपयांवर, 600 रुपयांचा रंग एक हजार रुपयांवर पोहचला आहे. यामुळे वस्त्रोद्योग व्यवसायिकांचे कंबरडे मोडल्याचे एकूणच चित्र दिसून येत आहे.
0
0
Report
Advertisement

लातूर में राम शिंदे की दीपक बोराडे से सांत्वना मुलाकात, उपोषण पर नया मोड़

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज विधान परिषद सभापती राम शिंदे बाईट पॉईंटर दीपक बोराडे हा लढावू कार्यकर्ता आहे, त्यांनी 16 तारखेला आझाद मैदानावर उपोषण सुरू केलं त्यावेळी शासनाच्या वतीने त्याची दखल घेण्यात आली, उपोषण स्थगित करण्यात आल आहे, दरम्यानच्या काळात त्यांचे सासरे आणि साडू यांच निधन झाल्यास ही त्यांनी उपोषण मागे घेतलं नाही, समाजाबद्दलची त्यांची कृतज्ञता आहे, त्यामुळे मी आज त्यांची सांत्वन पर भेट घेणार आहे. अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आज लातूर येथे दिली. साऊंड बाईट :- राम शिंदे
0
0
Report

अकोला में अचानक बेमौसमी बरसात से किसान चिंतित, गेहूं सहित फसलों को बड़ा नुकसान

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऊदेगाव गावाच्या शेतशिवारात काढणीला आलेल्या गव्हाच्या पिकाला या पावसाचा मोठा फटका बसला आहे. शेतकरी संजय फाले यांच्या दोन एकर शेतातील गहू पीक पूर्णपणे आडवे पडल्याने त्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. फक्त गहूच नव्हे तर गाव शिवारातील इतर शेतकऱ्यांच्या शेतातील वांगे, लिंबू, मका आणि बियांचा कांदा या उन्हाळी पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत सापडले असून प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
0
0
Report
Advertisement

नांदेड में जोरदार आंधी-बारिश से फसलें बर्बाद, किसानों ने मुआवजे की मांग की

Nanded-Waghala, Maharashtra:काल रात्री नांदेड जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तडाखा दिला. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारी मका सारखी पिके पूर्णपणे आडवी झाली तर हळद केळी आणि इतर फळबागांचे मोठे नुकसान झालय. हवामान खात्याचा इशारा खरा ठरला आणि पुन्हा एकदा निसर्गाची अवकृपा झाली. काल रात्री नांदेड जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला. नांदेड, अर्धापूर, भोकर, हिमायतनगर, माहूर, नायगाव, मुखेड तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले. ज्वारी, मका सारखी पिके आडवी झाली. तर केळी, शेतात कापून ठेवलेला गहू, हळदीचे नुकसान झाले. नांदुसा, कामठा, मालेगाव भागात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अगोदरच शेती उत्पादनाचा मोठा खर्च वाढलाय. त्यातच शेती मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी अगोदरच अडचणीत s? या आठ दिवसात दोनदा अवकाळणी पाऊस झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांनी हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली पीक मातीमोल झालीयेत. हवामान विभागाने 3 एप्रिल पर्यंत वादळी वाऱ्यांसह पावसाचा यलो अलर्ट नांदेड जिल्ह्याला दिलाय. त्यामुळे उरली सुरली पीक ही मातीमोल होण्याची भीती शेतकऱ्यांना भेडसावतेय. पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडुन केली जात आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top