Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : पुसद मध्ये माणूसकीची भिंत फाउंडेशन ने वृद्ध, निराधार, बेघरांसोबत साजरी केली भाऊबीज

Nov 03, 2024 12:41:05
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या पुसद येथे माणुसकीची भिंतच्यावतीने बेघर, निराधार, दिव्यांग, असहाय वृद्ध व अनाथांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. वृद्धाश्रम व रुग्णालय परिसरात हा सोहळा संपन्न झाला. माणुसकीची भिंत परिसरात स्वच्छता करून गोरगरीब निराधार वृद्धांची व पुरुषांची दाढी-कटिंग करण्यात आली. त्यानंतर महिलांनी काढलेल्या रांगोळ्यांनी अंगण सजले. पाट मांडण्यात आले. त्यानंतर माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांनी टोपी, टॉवेल, नारळ पेढा देऊन वंचितांना ओवाळले. त्यांच्या कुटुंबातील महिलांना साड्या देण्यात आल्या.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGajanan MAchindar
Mar 20, 2026 02:19:34
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Mar 20, 2026 02:02:13
Dharashiv, Maharashtra:दुकानासमोर कचरा टाकणाऱ्या व्यापाऱ्याला हजार रुपये दंड कळंब नगरपालिकेने व्यापाऱ्यांना दिल्या नोटीसा दुकानदारांना कचरा वर्गीकरण सक्तीचं. नियम पाळला नाही तर थेट दंड कळंब नगरपरिषदेचा कडक इशारा कळंब शहरात स्वच्छता मोहिमेला गती देण्यासाठी नगरपरिषदAdministrationने आता कडक भूमिका घेतली आहे. दुकानदारांनी ओला आणि सुका कचरा वेगळा करून देणे बंधनकारक करण्यात आले असून नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. नगरपरिषुदेच्या वतीने शहरातील सर्व व्यावसायिकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. नियम न पाहणाऱ्या व्यापाऱ्यांना हजार रुपये दंड केला जाणार असल्याचं मोठी नमूद करण्यात आलं आहे. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करूनच तो नगरपरिषदेकडे द्यावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. स्वच्छ शहर अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर दंड आकारण्यात येणार आहे.
827
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 20, 2026 02:01:39
Akola, Maharashtra:राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून या बदलत्या हवामानाचा फटका शेती क्षेत्राला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान खात्याने 18 ते 20 मार्चदरम्यान महाराष्ट्र राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार अकोला जिल्ह्यातही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील अकोट परिसरात काल सायंकाळी गारपीट झाली, तर मध्यरात्रीनंतर जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस सुरू झाला. अचानक झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः उभ्या पिकांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.गावाकडील भागात गेल्या काही दिवसांपासून तापमान चाळीस अंशांपर्यंत पोहोचले होते. मात्र अवकाळी पावसामुळे तापमानात घट होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. दरम्यान, पावसामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.
886
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 20, 2026 02:01:19
965
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 20, 2026 01:31:14
Varasoli, Maharashtra:आज महाडमध्ये लोटणार भीमसागर. चवदार सत्याग्रह दिनाचा ९९ वा वर्धापन दिन. दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन. चवदार तळे परिसरात विद्युत रोषणाई. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडचे चवदार तळे दलितांसाठी खुले केले. हा दिवस सत्याग्रह दिन म्हणून साजरा केला जातो. आज सत्याग्रह दिनाचा ९९ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. यानिमित्त महाडच्या ऐतिहासिक चवदार तळ्यावर डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून भीमसागर लोटणार आहे. कालपासूनच हजारो आंबेडकरी अनुयायांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे. चवदार तळे आणि क्रांतीस्तंभ परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दिवसभर चवदार तळे आणि क्रांतीस्तंभ इथं विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.
975
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 20, 2026 01:17:38
Varasoli, Maharashtra:आज चवदार तळे सत्याग्रहाचा ९९ वा वर्धापन दिन महाडमध्ये साजरा होतोय. यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह इतरही अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. चवदार तळे जल शुद्धीकरण आणि सुशोभीकरण कामाच्या ५५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा शुभारंभ यावेळी होणार आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी रात्री चवदार तळे परिसराला भेट देऊन पाहणी केली. यावेळी मंत्री भरत गोगावले हे देखील उपस्थित होते.
996
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 20, 2026 01:16:29
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:ऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची चार पिल्लं.. शेतामध्ये पाणी पाजायला गेल्यानंतर ऊसाच्या शेतात बिबट्यांची पिल्लं आढळून आल्याची घटना समोर आली आहे. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील बहिरेवाडी येथे तानाजी खोत यांच्या शेतामध्ये ही बिबट्याची चार पिल्ले आढळून आली आहेत.शेतकरी तानाजी खोत आपल्या शेतात पाणी पाजायला गेले असता, त्या ठिकाणी मादी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला,मात्र त्यामध्ये ते बचावले,खोत यांनी आरडा-ओरड केल्यावर बिबट्याने धूम ठोकली.त्यानंतर खोत यांना आपल्या शेतामध्ये बिबट्याची चार पिल्लं आढळून आली,त्यानंतर खोत यांनी प्राणिमित्र व वनविभागालायाची कल्पना दिली,यानंतर बिबट्याच्या पिल्लांना सुरक्षितपणे शेतात ठेवण्यात आले आहे.मात्र गावामध्ये बिबट्याचा वावर आणि आढळून आलेली पिल्लं यामुळे गावात भीतीच वातावरण पसरला असून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे。
1083
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 20, 2026 01:15:58
Sangli Miraj Kupwad, Maharashtra: खानापूर तालुक्याला गारपिटीचा तडाखा,शेकडो हेक्टर द्राक्ष बागांना फटाҡ.. संगलीच्या खानापूर तालुक्यामध्ये झालेल्या गारपिटीचा फटका द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणात बसलाय.तुफानी गारपिटीमुळे द्राक्षांची घड अक्षरशः उध्वस्त झाली आहेत.भिवघाट,करंजे,बानूरगड, पळशीसह आसपासच्या गावात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावस झाला आहे.गारपीटमुळे द्राक्ष बाग शेतामध्ये घडlara फटका बसून शेतात अक्षरशा द्राक्षमण्यांचा खच पडला होता.या गारपीटचा शेकडो हेक्टरवरील द्राक्ष बागांना फटका बसण्याची भिती व्यक्त केली जात आहे. अचानकपणे झालेल्या गारपीट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे हाता तोंडाशी आलेल्या द्राक्ष बागातदार शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागतणार असून राज्य शासनाने मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
1039
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 20, 2026 01:15:39
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - जयंतराव,कधीतर टायमिंग चुकवत जा,म्हणजे आमचाही नंबर लागेल,तर सदाभाऊ खोत मोठा माणूस - आमदार सदाभाऊ खोत आणि जयंत पाटलांच्या रंगली टोलेबाजी.. अँकर - राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील आणि आमदार सदाभाऊ खोत या दोघांच्या मध्ये सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये चांगलीच टोलेबाजी रंगली.जयंतराव पाटलांचे अलीकडे अचूक टायमिंग चाधायला लागलेत,पण कधी तर 'टायमिंग चुकवत जा,म्हणजे आमचाही नंबर लागेल,अशी कोपरखळी आमदार सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटलांना लगावली,यावर जयंत पाटलांनी ही सदाभाऊ खोत मोठा माणूस आहे,नगराध्यक्षांनी आपली छोटी-मोठी काम त्यांच्याकडे करून घेवीत,माझ्यासारख्या गरिबावर प्रेशर देऊ नये,असा मिश्किल टोला जयंत पाटलांनी,सदाभाऊ खोतांना लगावला, ईश्वरपूर मधील उपजिल्हा रुग्णालयातील नवीन डायलिसिस सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी हे दोन्हीही नेते एकाच व्यासपीठावर आले होते. साऊंड बाईट - सदाभाऊ खोत - आमदार . साऊंड बाईट - जयंत पाटील - आमदार .
1020
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 19, 2026 17:45:46
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम बंगाड़ी येथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना , 1000 सी–60 कमांडो, 18 बीडीडीएस टीम, नवनियुक्त पोलीस जवान, 500 विशेष पोलीस अधिकारी व खाजगी कंत्राटदार यांच्या मदतीने 24 तासात उभारले नवीन पोलीस मदत केंद्र , सन-2023 पासूनच्या सुरक्षा पोकळी कमी करण्यासाठीच्या साखळीमधील 11 व्या नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी फुलनार कॅम्प गुंडुरवाही येथे नवीन पोलीस मदत केंद्र दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी तुमरकोठी येथे नवीन पोलीस स्टेशन 2026 या वर्षात दिनांक 24/01/2026 रोजी बिनागुंडा येथे नवीन पोलिस मदत केंद्राची स्थापना करण्यात येऊन अति-दुर्गम भागातील नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्यात आली आहे . तसेच गडचिरोली पोलीस दलाच्या नागरी कृती उपक्रमांद्वारे या भागातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जात आहे. बंगाडी पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यात एकुण 1050 मनुष्यबळ, 04 जेसीबी, 08 ट्रेलर, 02 पोकलेन, 20 ट्रक इत्यादीच्या सहाय्याने अवघ्या एका दिवसात पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यात आली. सदर पोलीस मदत केंद्रामध्ये पोलीस बलाच्या सुविधेसाठी वायफाय सुविधा, 15 पोर्टा कॅबिन, जनरेटर शेड, पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ प्लांट, मोबाईल टॉवर, टॉयलेट सुविधा, पोस्ट सुरक्षेसाठी मॅक वॉल, बी.पी मोर्चा, 08 सँड मोर्चा इत्यादींची उभारणी करण्यात येत असून यासोबतच पोलीस मदत केंद्राच्या सुरक्षाेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे 03 अधिकारी व 55 अंमलदार, एसआरपीएफ ग्रुप 03, जालना सी कंपनीचे 02 प्लाटुन तसेच सिआरपीएफ 192 बटा. सी कंपनीचे 01 असिस्टंट कमांडंट व 52 अधिकारी/अंमलदार, विशेष अभियान पथकाचे 08 पथक (200 कमांडोज) तैनात करण्यात आले आहेत. पोलीस मदत केंद्राच्या उभारणी कार्यक्रमादरम्यान जनजागरण मेळावा आयोजित करुन पोलीस मदत केंद्र, बंगाडी हद्दीतील उपस्थित नागरिकांना विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. वाढलेल्या सुरक्षाेमुळे भविष्य काळात या अतिदुर्गम भागात राष्ट्रीय महामार्ग, पूल, मोबाईल टॉवर तसेच गुंडेनूर नाल्याच्या बांधकामास सुरक्षा मिळणार असून याभागातील विकास कामांना गती मिळणार आहे. तसेच येथील दुर्गम भागात भविष्यात एस. टी. बस सेवा सुरु करणे शक्य होऊन अति-दुर्गम भागात नवीन पोलीस मदत केंद्राच्या उभारणीमुळे तेथील नागरिकांनी संतोष व्यक्त करुन पोलीस प्रशासनाप्रती आभार व्यक्त केले.
969
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Mar 19, 2026 16:15:59
Virar, Maharashtra:विरार | बहुजन विकास आघाडची गुढीपाडवा निमित्त भव्य शोभायात्रा; २१ वर्षांची परंपरा कायम गुढीपाडव्याच्या निमित्ताने बहुजन विकास आघाडीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या २१ वर्षांपासून हा सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबवला जात असून नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित या शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर, विविध सांस्कृतिक देखावे आणि सामाजिक संदेश देणाऱ्या आकर्षक झांकी यांचा समावेश असतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच नागरिक उत्साहाने या उपक्रमात सहभागी होताना दिसतात. बहुजन विकास आघाडीच्या या उपक्रमाने स्थानिक पातळीवर एक वेगळी ओळख निर्माण केली असून, सामाजिक एकात्मता आणि सांस्कृतिक जपणूक याचा संदेश दिला जातो. “गेल्या २१ वर्षांपासून आम्ही हा उपक्रम सातत्याने राबवत आहोत. समाजात एकोपा आणि संस्कृती जपण्याचा आमचा प्रयत्न आहे。”
1009
comment0
Report
Advertisement
Back to top