icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Nov 2024, 12:41 pm

यवतमाळ : पुसद मध्ये माणूसकीची भिंत फाउंडेशन ने वृद्ध, निराधार, बेघरांसोबत साजरी केली भाऊबीज

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळच्या पुसद येथे माणुसकीची भिंतच्यावतीने बेघर, निराधार, दिव्यांग, असहाय वृद्ध व अनाथांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. वृद्धाश्रम व रुग्णालय परिसरात हा सोहळा संपन्न झाला. माणुसकीची भिंत परिसरात स्वच्छता करून गोरगरीब निराधार वृद्धांची व पुरुषांची दाढी-कटिंग करण्यात आली. त्यानंतर महिलांनी काढलेल्या रांगोळ्यांनी अंगण सजले. पाट मांडण्यात आले. त्यानंतर माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांनी टोपी, टॉवेल, नारळ पेढा देऊन वंचितांना ओवाळले. त्यांच्या कुटुंबातील महिलांना साड्या देण्यात आल्या.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

रत्नागिरी में 1 जून से 2 महीने मछली पकड़ने पर पूर्ण बंदी; उल्लंघन पर कड़ी कार्रवाई

Ratnagiri, Maharashtra:महाराष्ट्राच्या सागरी जलक्षेत्रात १ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत पावसाळी मासेमारीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, समुद्र किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत यांत्रिक नौकांना मासेमारी करण्यास सक्त मनाई असेल. खवळलेला समुद्र आणि माशांचा प्रजनन काळ लक्षात घेऊन मच्छीमारांच्या सुरक्षेसाठी व मत्स्यसंपत्तीच्या संवर्धनासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला असून,या दोन महिन्यांच्या काळात खवय्यांना माशांऐवजी चिकन-मटणचा पर्याय निवडावा लागणार आहे. अखेर नारळी पौर्णिमेनंतरच पुन्हा एकदा ताजी मासळी बाजारात उपलब्ध होणार आहे.
0
0
Report

गडचिरोली-नारायणपुर पुलिस ने नक्सली हथियार कारखाना ध्वस्त कर भारी संख्या में हथियार एवं विस्फोटक पकड़े

Gadchiroli, Maharashtra:नक्सलवाद्यांचा शस्त्रास्त्र निर्मिती कारखाना गडचिरोली पोलीस आणि छत्तीसगडच्या नारायणपूर पोलीसांच्या संयुक्त कारवाईत करण्यात आला नष्ट, आंतरराज्यीय अभियानादरम्यान विविध नक्षली साहित्य घटनास्थळीच नष्ट झाले. आंतरराज्यीय सिमावर्ती भागातील दुर्गम जंगल परिसराचा फायदा घेत नक्सल्यांकडून हे साहित्य तयार करण्यात येऊन गोपनीयरित्या जंगल परिसरात जमीनीमध्ये लपवले जात असे. पथकांकडून शोध अभियान राबवून या जंगल परिसराची कसून तपासणी केली असता, 01 नग इन्सास रायफल, 02 नग सिंगल शॉट रायफल, 02 नग 12 बोअर रायफल, एसएलआर रायफलचे 02 जीवंत काडतूस, .303 रायफलचे 12 जीवंत काडतूस, 12 बोअर रायफलचे 04 जीवंत काडतूस, 25 किग्रॅ आय.ई.डी. स्फोटक, 02 नग क्लेमोर, 110 डेटोनेटर, कॉर्टेक्स वायर, 500 पेक्षा अधिक बिजीएल सेल व बिजीएल सेल बनविण्याचे साहित्य, 07 नग बिजीएल लाँचर, 03 नग टॅब लाँचर, लोखंडी सळ्या, शस्त्रनिर्मितीसाठी लागणारे 02 नग लेथ मशीन, 02 नग मोटर, ग्राइंडर मशीन, इन्व्हर्टर व बॅटरी, वायर बंडल, सोलर प्लेट इ. मोठ्याप्रमाणात शस्त्र व शस्त्रनिर्मिती साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे.
0
0
Report

महा विद्युत वितरण विभाग के एक कर्मचारी ने ग्राहक की मारपीट की वीडियो वायरल

Ambernath, Maharashtra:महावितरणच्या कर्मचाऱ्याची ग्राहकाला मारहाण मारहाणीचा व्हिडिओ झाला व्हायरल Anchor बदलापूर पश्चिमेकडील सोनिवली महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्याने वाढीव वीज बिलाबाबत तक्रार घेऊन आलेल्या ग्राहकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय , सदर ग्राहक आपल्याला आलेले वाढीव वीज बिला बाबत विचारण्यासाठी कार्यालयात आला होता .मात्र माळी नामक बिलिंग विभागातील मुजोर कर्मचाऱ्याने संबंधित ग्राहकांच्या अंगावर जाऊन त्याला मारहाण केली हा सर्व प्रकार कार्यालयातील सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाला आहे, बदलापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांना वाढीव वीज बिल येत असल्याने प्रचंड नाराजी आहे, आपल्या वाढीव वीज बिलाबाबत विचारण्यासाठी अनेक ग्राहक विद्युत वीज वितरण कार्यालयात येत असतात मात्र त्यांच्याशी उद्धट वर्तन करत त्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय या मुजोर कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी ग्राहकांमधून केली जातेय चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
0
Report
Advertisement
0
0
Report

लोणी के पास तलाव में डूबकर IBMA कॉलेज के तीन MBA छात्र निधन

Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी जवळील चंद्रपूर गावातील साठवण तलावात बुडून तीन विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू... तिघे पायरेन्स IBMA कॉलेजच्या MBA चे विद्यार्थी... तलावातील खड्डयांचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले... सोबतच्या विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक रहिवासी मदतीसाठी धावले... मात्र तत्पूर्वी तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची प्रत्यक्षदर्शींनी दिली माहीती ... अभिषेक गंगाधर जाधव (वय 24, रा. सुरेगाव शिंगणापूर, ता. नेवासा) , प्रवीण प्रभाकर रसाळ (वय 23, रा. रामनगर, छत्रपती संभाजीनगर) , महेश अशोक शिंदे (वय 26, रा. संत ज्ञानेश्वर नगर, छत्रपती संभाजीनगर) अशी मयतांची नावे... तिघेही MBA च्या दुसऱ्या वर्षाचे विद्यार्थी असल्याची माहिती...घटनेनंतर परिसरात हळहळ... लोणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू...
0
0
Report

शिरूर कृषि उत्पन्न बाजार समिति चुनावों में तकनीकी गड़बड़ी, 729 सदस्य प्रभावित

Shirur, Maharashtra:शिरूर पुणे... तब्बल ९ वर्षांनंतर जाहीर झालेल्या शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोठा तांत्रिक घोळ समोर आला आहे. तालुक्यातील ९६ ग्रामपंचायत पैकी फक्त १८ ग्रामपंचायतींचे सदस्य मतदानासाठी पात्र ठरले असून, ७८ ग्रामपंचायतींचे सुमारे ७२९ सदस्य मतदानापासून वंचित राहिले आहेत. मतदार यादीसाठी १ फेब्रुवारी २०२६ हा अर्हता दिनांक होता, ज्या दिवशी हे सर्व सदस्य पदावर होते. मात्र, २३ आणि २४ फेब्रुवारीला त्यांची मुदत संपल्यामुळे, गटविकास अधिकारी (BDO) यांनी २ मार्च रोजी यादी पाठवताना अर्हता दिनांकाचा विचार न करता या ७२९ सदस्यांची नावे वगळली. प्रशासनाच्या या चुकिmुळे लोकप्रतिनिधींवर अन्याय होत आहे. त्यामुळे या सदस्यांची नावे तातडीने मतदार यादीत समाविष्ट करावीत आणि या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत निवडणूक प्रक्रियेला स्थगिती द्यावी, अशी मागणी शिरूर हवेलीचे माजी आमदार अँड अशोक पवार यांनी केली आहे. यासंदर्भात पवारांनी मुंबई हायकोर्टात याचीका दाखल केलीय.
0
0
Report
Advertisement

बारिश में गोंडपिपरी में भूमि-अधिग्रहण विरोधी मोर्चा, विजय वडेट्टीवार ने नेतृत्व किया

Chandrapur, Maharashtra:भर पावसात गोंडपिपरी येथे विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात निघाला भूमी अधिग्रहणाविरोधात मोर्चा. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी येथे आज भर पावसात भूमी अधिग्रहणाविरोधात मोर्चा काढण्यात आला. गोंडपिंपरी तालुक्यातील करंजी, धानापूर, लिखितवाडा, वडोली आणि आजूबाजूच्या 12 गावांची जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. गोंडपिंपरी तालुक्यातील 12 गावांच्या शेतकऱ्यांना जमीन अधिग्रहणासाठी शासनाकडून नोटीस बजावण्यात आली असून स्थानिक ग्रामस्थांचा या भूमी अधिग्रहणाला कडाडून विरोध आहे. विशेष म्हणजे या बारा गावांपैकी एक असलेलं करंजी हे विजय वडेट्टीवार यांनी आज गोंडपिंपरी येथे भूमी अधिग्रहणाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या परिषदेला हजेरी लावली आणि त्यानंतर गोंडपिंपरी SDM कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात ते सहभागी झाले.
0
0
Report

नीट पेपर फूट के बाद 11-12वीं में बायोमेट्रिक हाजिरी अनिवार्य, निजी क्लासेस पर विवाद

Pune, Maharashtra:नीट पेपर फूट के बाद 11-12वीं में बायोमेट्रिक हाजिरी अनिवार्य, निजी क्लासेस पर विवाद असंयमहीन पक्षलेखन जारी रहा। शिक्षण विभाग ने राज्य के 11-12वी कॉलेजों में बायोमेट्रिक हजेरी लागू करने का प्रस्ताव मंजूर किया है, जिसे पालक और विद्यार्थी वर्ग ने स्वागत किया है। परंतु IMPLEMENTATION को लेकर संदेह बना हुआ है। यह इंटिग्रेटेड पैटर्न क्या सचमुच शिक्षा का बाज़ार बन गया है? पार्श्वभूमी में NEET पेपर फूट मामलों के बाद निजी क्लास चालकों की भूमिका सामने आई है। मेडिकल- इंजीनियरिंग प्रवेश प्रक्रिया NEET, JEE, CET मार्क्स पर आधारित होने के कारण 11वीं-12वीं की वर्षगाँठ पहले से ही कमजोर थी। हाल ही में कुछ निजी क्लास चालकों ने कॉलेजेस को अपने पक्ष में लाकर यह पैटर्न चलवाने शुरू कर दिये। कम से कम लाख दो लाख भरकर प्रवेश और कॉलेज जाना नहीं होगा, परीक्षा फॉर्म वह व्यक्ति-समुच्चय भर देगा। इस इंटिग्रेटेड पद्धति पर चर्चा और चिन्ता दोनों बढ़ी हैं। प्रवक्ता के अनुसार अब बाकी सब खबरों के साथ यह भी बताया गया कि बायोमेट्रिक हजेरी के साथ शासन ने निगरानी के लिए पत्थर भी उठाने चाहिए ताकि इस अवैध पद्धति पर रोक लग सके।
0
0
Report
Advertisement

बुलढाणा पुलिस की लापरवाही: मृत बेटी के हत्या से पिता-भाई जेल, शिवानी अभी जीवित

Buldhana, Maharashtra:जिवंत मुलीच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी वडील आणि भावाला पाठवलं जेलमध्ये.. बुलढाणा पोलिसांनी मृत घोषित केलेली शिवानी जिवंत जळगाव जामोद पोलिसात हजर.. बुलढाणा पोलिसांचा निष्काळजीपणाचा एक अजब नमुना समोर आला आहे. घटना अशी की वीस दिवसापूर्वी जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरात एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता मृतदेहापासून काही फुटावर महिलेचा शिरही होतं.. या प्रकरणी तात्काळ माहिती मिळाल्यावर जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली व फॉरेन्सिक विभागाची टीम बोलावून या सर्व प्रकरणाचा तपास केला, विशेष म्हणजे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी या प्रकरणात मार्गदर्शन करून या प्रकरणाचा छडा लावल्याचा दावा केला होता.. मध्य प्रदेशातील एका गावातील शिवानी बापूराव कळमेकर असे या मृत मुलीचं नाव असून तिचे तिच्या प्रियकराशी अनैतिक संबंध असून ती विवाहित असून देखील प्रियकराची ओढ असल्याने तिच्या वडिलांनी आणि भावाने तिची हत्या करून मृतदेह महाराष्ट्रातील जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राजुरा धरणात जवळ आणून टाकला होता.. अशी उकल पोलिसांनी केली होती.. याप्रकरणी आपल्या मुलीच्या हत्या चा आरोप ठेवत पोलिसांनी शिवानी कळमेकर चे वडील बापूराव कळमेकर तसेच भाऊ यांना अटक करून आत दोघेही जेलमध्ये आहे .. मात्र शिवानी कळमेकर जिवंत असून तिने आज तिच्या प्रियकरा सोबत आज बुऱ्हानपूर पोलीस स्टेशन गाठत थेट मी जिवंत असून माझ्या हत्याच्या गुन्ह्यात माझ्या वडिलांना भावाला पोलिसांनी जेलमध्ये ठेवलं असल्याचा कबुली जबाब दिला असल्याच्या माहिती आहे .. तर काही वेळापूर्वीच शिवानी कळमेकर ही जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली असून स्थानिक जळगाव जामोद पोलीस त्याचा जबाब घेत आहेत .. मात्र पोलिसांनी आढळलेल्या मृतदेहाचा डीएनए तपासणी न करता शिवानी कळमेकर च्या वडिलांना व भावावर गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकल आहे.. त्यामुळे या प्रकरणात जळगाव जामोद पोलिसांचा मोठा निष्काळजीपणा समोर येत आहे.. मात्र ज्या महिलेचा मृतदेह सापडला होता, ती नेमकी कोण , हा प्रश्न उपस्थित राहत आहे.. तर पोलीस या घटनेबद्दल बोलायला सध्या तरी तयार नाहीत..
0
0
Report
Advertisement

अलिबाग के विधायक दळवी ने तटकरे पर बरसाए, टिकट का सवाल गरम

Chendhare, Maharashtra:अलिबागचे आमदार महेंद्र दळवी सुनील तटकरेंवर बरसले. सुनील तटकरे यांना पक्षातच कुणी विचारत नाही. यावेळी वेगळा उमेदवार निवडून द्यायचा निर्धार. तटकरेंची अवस्था पाहता त्यांच्या मुलाला तिकीट मिळेल का? आमदार महेंद्र दळवी यांना शंका. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर शांत असलेले अलिबागचे आमदार महेंद्र दळवी पुन्हा एकदा सुनील तटकरे यांच्यावर बरसले आहेत. सुनील तटकरे यांना त्यांच्या पक्षातच कुणी विचारत नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याची टीका आमदार महेंद्र दळवी यांनी केली आहे. आसन डळमळीत असलेल्या नेत्याच्या मुलाला तिकीट देऊ नये, असं आमचं म्हणणं आहे. आतापर्यंत सुनील तटकरे यांनी आपल्या घरात तिकीट मिळवण्यासाठी प्रत्येक वेळी वापरलेल्या युक्त्या यशस्वी झाल्या. परंतु यावेळी वेगळा उमेदवार निवडून द्यायचा असा निर्धार स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून आलेल्या सदस्यांनी केलाय. आज सुनील तटकरेंना पक्षात कुणी विचारत नाही आणि त्यांच्या मुलाला तिकीट मिळेल ka याची त्यांनाच खात्री नसल्याचं आमदार महेंद्र दळवी म्हणाले.
0
0
Report

हर्णे में दो गुटों के बीच भीषण बवाल, पुलिस तैनात

Ratnagiri, Maharashtra:Ratnagiri रत्नागिरी से बड़ी खबर: दापोली तालुका के हरने में दो गुटों के बीच जबरदस्त बवाल, इलाके में तनाव!.. किले में शराब पीने को लेकर विवाद; हरने क्षेत्र में हिंदू-मुस्लिम समुदायों के बीच संघर्ष! स्थिति को नियंत्रित करने के लिए पुलिस मौके पर तैनात.. रत्नागिरी जिले के दापोली तालुका के हरने में दो युवकों पर 40 से 50 लोगों की भीड़ द्वारा बेरहमी से हमला किए जाने की सनसनीखेज घटना सामने आई है.. हरने किला परिसर में शराब पी रहे लोगों को रोकने पर हुए विवाद के बाद चिन्मय गुरव और रघुवीर नाम के दो युवकों पर जानलेवा हमला किया गया, जिसमें दोनों गंभीर रूप से घायल हो गए हैं.. इस घटना के विरोध में दापोली के शिवप्रेमी और आक्रोशित नागरिक रात में डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर एकत्र हुए और जोरदार रास्ता रोको आंदोलन करते हुए यातायात बाधित कर दिया.. नागरिकों ने आरोपियों की तत्काल गिरफ्तारी की मांग की है, जबकि पुलिस ने समय रहते मौके पर पहुंचकर स्थिति को नियंत्रण में कर लिया है.. दापोली पुलिस थाने में मामला दर्ज करने की प्रक्रिया जारी है और क्षेत्र में कानून-व्यवस्था बनाए रखने के लिए अतिरिक्त पुलिस बल तैनात किया गया है..
0
0
Report

माणगांव में नाबालिग लड़की हत्या: 24 घंटे में आरोपी शुभम उतेकर गिरफ्तार

Chendhare, Maharashtra:माणगाव पोलिसांनी २४ तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या; हत्या करून मृतदेह जंगलात फेकला ..... माणगावमध्ये अल्पवयीन मुलीच्या हत्येचं प्रकरण ....... गुन्ह्याचे कारण अद्याप गुलदस्त्यात ...... अल्पवयीन मुलीच्या हत्येने गावात संताप ....... माणगाव तालुक्यातील पळसगाव ग्रामपंचायत हद्दीतील घरोशीवाडी येथे ही धक्कादायक घटना उघडकीस आली. निधी राकेश उतेकर (वय १५) असे मृत मुलीचे नाव आहे. निधी ही आपल्या कुटुंबासह मुंबईतील विलेपार्ले येथे राहत होती. ती सेंट जेव्हियर्स शाळेत शिक्षण घेत असून नुकतच इयत्ता नववी उत्तीर्ण झाली होती. उन्हाळी सुट्टीसाठी सुमारे आठ दिवसांपूर्वी ती आई-वडील आणि भावासह मूळ गावी घरोशीवाडी येथे आली होती. सोमवार, २५ मे रोजी रात्री सुमारे नऊच्या sुमारास निधी ही वडिलांच्या मोबाईलवर बोलत घराबाहेर पडली होती. मात्र, बराच वेळ उलटूनही ती परत न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. परिसरात सर्वत्र शोधमोहीम राबविण्यात आली, मात्र तिचा काहीच मागमूस लागत नव्हता. दरम्यान, बुधवार, २७ मे रोजी घरोशीवाडी लगतच्या डोंगराळ आणि जंगल परिसरात एका मुलीचा मृतदेह आढळल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. त्यानंतर निधीच्या कुटुंबीयांना घटनास्थळी बोलावण्यात आले असता मृतदेह निधीचाच असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर संपूर्ण माणगाव तालुक्यात संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. मृतदेह निर्जन जंगल परिसरात आढळून आला होता. तिच्या अंगावर गंभीर जखमा असल्याने धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. माहिती मिळताच माणगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथक, श्वानपथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी चार स्वतंत्र पथके तयार केली होती. मोबाईल कॉल डिटेल्स, परिसरातील हालचाली, स्थानिकांकडून चौकशी आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपी शुभम उतेकर याला ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली. आरोपी आणि मृत मुलगी एकमेकांच्या परिचयातील असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली, त्यामागे वैयक्तिक वाद होता की अन्य कोणते कारण, याबत पोलिस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे रायगड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांकडून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे. बाईट १ - राकेश उतेकार, मुलीचे वडील बाईट २ - संजय बांगर पोलिस निरीक्षक , माणगाव
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top