icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Nov 2024, 12:41 pm

यवतमाळ : पुसद मध्ये माणूसकीची भिंत फाउंडेशन ने वृद्ध, निराधार, बेघरांसोबत साजरी केली भाऊबीज

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळच्या पुसद येथे माणुसकीची भिंतच्यावतीने बेघर, निराधार, दिव्यांग, असहाय वृद्ध व अनाथांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. वृद्धाश्रम व रुग्णालय परिसरात हा सोहळा संपन्न झाला. माणुसकीची भिंत परिसरात स्वच्छता करून गोरगरीब निराधार वृद्धांची व पुरुषांची दाढी-कटिंग करण्यात आली. त्यानंतर महिलांनी काढलेल्या रांगोळ्यांनी अंगण सजले. पाट मांडण्यात आले. त्यानंतर माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांनी टोपी, टॉवेल, नारळ पेढा देऊन वंचितांना ओवाळले. त्यांच्या कुटुंबातील महिलांना साड्या देण्यात आल्या.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

गणेशोत्सव के लिए कोकण पहुंचते यात्री भारी ट्रैफिक जाम के खतरे में

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास यंदाही खडतर.. मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची गर्दी वेगाने वाढतेय,मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील रस्त्यांची अपूर्ण कामं चाकरमान्यांची परीक्षा पाहणार आहेत... विशेषतः चिपळूण ते लांजा या पट्ट्यात सेवा रस्ते आणि उड्डाणपुलांची कामं रखडल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागू शकतो. मुंबई, ठाणे आणि पुण्यातून हजारो वाहने एकाच वेळी कोकणात दाखल होत असल्याने या भागात वाहनांचा वेग कमालीचा मंदावणार आहे.. परंतु, वाकेड ओलांडल्यानंतर सिंधुदुर्गच्या दिशेने जाणारा रस्ता मात्र तुलनेने सुरळीत आणि वेगवान असणार आहे.. नेमकी कोणत्या ठिकाणी कोंडी होण्याची शक्यता आहे आणि रस्त्याची कामं कुठे अपूर्ण आहेत, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून... ग्राफिक्स प्लेट १: वाहतूक कोंडीची संभाव्य ठिकाणे (Bottlenecks) ▫️लव्हेल उड्डाणपूल परिसर ▫️​चिपळूण उड्डाणपूल परिसर ▫️​संगमेश्वर पुलाजवळ ​निवळी पूल ▫️​लांजा पूल ग्राफिक्स प्लेट २: महामाग्रावरील अपूर्ण कामांचा तपशील टप्पा / पट्टाअपूर्ण.....रस्त्याचे अंतर ▫️चिपळूण ते आरवली....५९५ मीटर ▫️आरवली ते काटे....५७० मीटर ▫️काटे ते वाकेड....१५० मीटर त्यामुळे या पट्ट्यातून प्रवास करताना चाकरमान्यांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागण्याची शक्यता असल्याने चालकांनी संयमाने वाहन चालवावं आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावं,असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे..
0
0
Report

सोलापुर: दो गुटों के मारपीट से 35 वर्षीय सद्दाम अमलीचुंगे की मौत; 5 गिरफ्तार

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - वळसंग गावात दोन गटात झालेल्या हाणामारीत जखमी झालेल्या एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग गावात दोन गटात झालेल्या हाणामारीत जखमी झालेल्या एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू सद्दाम अमलीचुंगे असे मृत्यू झालेल्या 35 वर्षीय तरुणाचे नाव दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग गावात बुधवारी संध्याकाळी दोन गटात मोठा वाद झाला होता यामध्ये 25-30 जणांच्या टोळक्याने दगडफेक करत काठ्या, रॉडसह सद्दाम अमलीचुंगे यांना जबर मारहाण केली होती या मारहाणीत सद्दाम अमलीचुंगे यांच्यासह 5-6 जण जखमी झाले होते, मात्र उपचारादरम्यान सद्दाम याचा मृत्यू झाला या प्रकरणी 20-25 जणांवर वळसंग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय, आतापर्यंत 5 आरोपीना पोलिसांनी अटक केली असून उर्वरित आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरूय बाईट : नातेवाईक
0
0
Report

महाराष्ट्र: MPSC सचिवों के चेहरे काले करने पर कार्रवाई की चेतावनी

Dharashiv, Maharashtra:धाराशिव MPSC सचिवांच्या तोंडाला काळे फासल्याप्रकरणी कारवाईचा इशारा! संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करणार – गृहराज्यमंत्री योगेश कदम MPSC चे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळे फासल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिला आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी MPSC सचिवांच्या तोंडाला काळे फासल्याची घटना समोर आल्यानंतर या प्रकरणावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा प्रकारे कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं कदम यांनी स्पष्ट केलंय. तसंच भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी विशेष खबरदारी घेतली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. बाईट – योगेश कदम, गृहराज्यमंत्री, महाराष्ट्र शासन
0
0
Report
Advertisement

चंद्रपुर के बैंक कर्मचारी पांच दिवसीय हफ्ते की मांग पर बेमुदत बैंकिंग बंद आंदोलन का आह्वान

Chandrapur, Maharashtra:आम्ही माणसं आहोत, यंत्र नाही, पाच दिवसांचा आठवडा मागणी पूर्ण करा, अन्यथा 25 ऑक्टोबरपासून बेमुदत बँकिंग व्यवस्था बंद आंदोलन पुकारलं. चंद्रपुरात यूनायटेड फोरम ऑफ बैंकिंग यूनियनच्या वतीने बँका बंद ठेवत SBI मुख्य शाखेसमोर निदर्शने केली. बँक कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे, मात्र त्याला अनुरूप भरती नसल्याने प्रत्येक कर्मचाऱ्यावर मोठे ओझे आहे. यात सरकारी योजनांमध्ये वाढ झाल्याने यात भर पडली आहे. अतिताणामुळे मानसिक आरोग्य देखील बिघडत चालले आहे. कुटुंबाला देण्यासाठी वेळ नसल्याने अकरा वर्षांपासून पुढे रेटलेली पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी रास्त असल्याचे आंदोलक कर्मचाऱ्यांचे मत आहे. गेली काही वर्षे बँकिंग व्यवस्थेत होणाऱ्या घोटाळ्यांमुळे आम्ही रस्त्यावर आलो असल्याचे आंदोलक म्हणाले.
0
0
Report

पनवेल में गणेशोत्सव के दौरान ट्रैफिक के लिए पुलिस का मास्टर प्लान लागू

Navi Mumbai, Maharashtra:गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई वाहतूक विभाग सज्ज झालाय. मुंबई पुणे महामार्ग आणि मुंबई गोवा महामार्गाची सुरुवातच पनवेल मधून होतं असल्याने गणेशोत्सव दरम्यान पनवेल मध्ये मोठी वाहतूक कोंडी होतं असते. यंदा वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रमुख मार्गांवर अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यासोबतच वाहतकीचे नियोजन करण्यात आलेय. रस्त्यांची कामे, खड्डे बुजवणे, रस्ता रुंदीकरण ही कामे गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेत. याशिवाय शहरातील ट्रॅफिक हॉटस्पॉट, अपघातप्रवण ब्लॅक स्पॉट आणि प्रमुख वाहतूक मार्गांचे विश्लेषण करण्यात आले असून, अपघात तसेच वाहतूक कोंडी रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल खाडे यांनी व्यक्त केले.
0
0
Report

अकोला की नेहा देशमुख ने रोजगार योजना से अपना उद्योग शुरू किया, 5 युवाओं को रोजगार मिला

Akola, Maharashtra:अकोल्यातील नेहा देशमुख यांनी योजनेचा लाभ घेत कृत्रिम दात निर्मितीचं युनिट सुरू केलं आहे. विशेष म्हणजे, स्वतःचा उद्योग उभारण्यासोबतच त्यांनी तब्बल पाच युवकांना रोजगाराची संधी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे. अकोल्यातील नेहा देशमुख... बारावीनंतर त्यांनी डेंटल मेकॅनिकचं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर बी.कॉम.ची पदवी पूर्ण केली. आपल्या शिक्षणाचा आणि कौशल्याचा उपयोग करून काहीतरी वेगळं करण्याची त्यांची इच्छा होती. 2012 मध्ये त्यांनी अगदी छोट्या स्वरूपात मॅन्युअल डेंटल लॅबोरेटरीचा सेटअप सुरू केला. मात्र उद्योगाचा विस्तार करण्यासाठी आवश्यक असलेलं भांडवल आणि आधुनिक यंत्रसामग्री हे मोठं आव्हान होतं. अशातच राज्य सरकारच्या मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमाची माहिती मिळाल्यानंतर नेहा देशमुख यांनी उद्योग उभारणीसाठी जिल्हा उद्योग केंद्राकडे जानेवारी महिन्यात आवश्यक कागदपत्रे सादर केली. शासकीय योजनेच्या माध्यमातून त्यांना एप्रिल महिन्यात २५ लाखांचं कर्ज मंजूर झालं आणि त्यानंतर मे महिन्यात त्यांच्या कृत्रिम दात निर्मिती युनिटला प्रत्यक्ष सुरुवात झाली. नेहा देशमुख , लाभार्थी पूर्वी त्यांच्या उद्योगाची वार्षिक उलाढाल साधारण १५ ते २० लाख रुपयांपर्यंत होती. मात्र शासकीय योजनेच्या माध्यमातून उद्योगाला मिळालेल्या चालनेनंतर कामाचा वेग वाढला असून यंदा उलाढाल २५ लाख रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. नेहा देशमुख यांच्या उद्योगाला मिळालेल्या या बळाचा परिणाम त्यांच्या कुटुंबांच्या मर्यादित राहिलेला नाही. त्यांच्या पतीकडून पूर्वी इन्शुरन्स प्रतिनिधी म्हणून काम केलं जातं होतं. मात्र पत्नीच्या उद्योगाला मिळालेल्या शासकीय पाठबळानंतर त्यांनी इन्शुरन्स प्रतिनिधीचं काम सोडून पत्नीच्या व्यवसायात साथ देण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, हा उद्योग आता केवळ एका कुटुंबाच्या आर्थिक स्वावलंबनाचं माध्यम राहिलेला नाही, तर रोजगारनिर्मितीचं केंद्रही बनला आहे. नेहा देशमुख यांनी आपल्या उद्योगातून पाच युवकांना रोजगारांची संधी दिली आहे. नेहा देशमुख , अभिषेक देशमुख यांचे पती सरकारच्या योजना केवळ कागदावर न राहता त्यांचा प्रत्यक्ष लाभ उद्योजकांपर्यंत पोहोचला, तर त्यातून स्वयंरोजगारासोबतच रोजगारनिर्मितीही होऊ शकते... अकोल्यातील नेहा देशमुख यांचा प्रवास याचं उदाहरण ठरत आहे. मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळालेल्या आर्थिक पाठबळामुळे एका महिलेने स्वतःचा उद्योग उभा केला... उद्योगाचा विस्तार केला आणि आज पाच युवकांना रोजगारही दिला. त्यामुळे ‘स्वयंरोजगारातून रोजगारनिर्मिती’ या संकल्पनेला अकोल्यातून प्रत्यक्ष बळ मिळताना दिसत आहे.
0
0
Report
Advertisement

बार्शीटाकळी में जमीन विवाद के कारण बोलेरो ने घर पर चढ़ाई, महिला की मौत

Akola, Maharashtra:अकोला जिलेातील बार्शीटाकळी तालुक्यातील जामवसु गावात जागेच्या वादातून बोलेरो पिकअप वाहन थेट घरावर चढवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत घरात असलेल्या अंदाजे ७५ वर्षीय सोनाबाई मखराम जाधव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर दोन ते तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमागे जागेचा वाद काय होता? घरावर वाहन चढवण्यामागे नेमकं कारण काय? हा हल्ला पूर्वनियोजित होता का? आणि या संपूर्ण प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरं बार्शीटाकळी पोलिसांच्या तपासातूनच समोर येणार आहेत.दरम्यान, ७५ वर्षीय महिलेच्या मृत्यूमुळे जामवसु गावावर शोककळा पसरली आहे.
0
0
Report
Advertisement

वेंगुर्ला में ड्रग्स के बड़े अड्डे पर कार्रवाई, शिवसेना नेता सिद्देश पराब हिरासत में

Oras Bk., Maharashtra:वेंगुर्ला yeथील शिरोडा देऊळ वाडी येथे वेंगुर्ला पोलिसांनी धडक कारवाई करत अमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी संशयीत म्हणून सिंडे शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख सिद्धेश परब यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या घराच्या बाहेरील पडवीतून अमली पदार्थाने भरलेली बॅग (गांजा कोकेन) ताब्यात घेतली आहे. यामध्ये एकुण 710 ग्राम अमली पदार्थ मिळून आला. या कारवाई मुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली असून एका सत्ताधारी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या घरी अश्या प्रकारची अमली पदार्थ सापडून आल्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे. गणेश चतुर्थीच्या तोंडावर अश्या प्रकारे मोठी कारवाई झाल्या मुळे अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी अवैध धंदे विरोधात कारवाईचे आदेश दिल्या नंतर सिंधुदुर्ग पोलीस दल कडून सर्च ऑपरेशन राबविण्यात येत असून अमली पदार्थ विरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे
0
0
Report

रत्नागिरी मार्ग पर गणेशोत्सव यात्रा में जाम की चुनौती, चिपळूण-लांजा परियोजना अधूरी

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास यंदाही खडतर ठरण्याची शक्यता आहे. मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची गर्दी वेगाने वाढतेय, मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील रस्त्यांची अपूर्ण कामं चाकरमान्यांची परीक्षा पाहणार आहेत... विशेषतः चिपळूण ते लांजा या पट्ट्यात सेवा रस्ते आणि उड्डाणपुलांची कामं रखडल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागू शकतो. मुंबई, ठाणे आणि पुण्यातून हजारो वाहने एकाच वेळी कोकणात दाखल होत असल्याने या भागात वाहनांचा वेग कमालीचा मंदावणार आहे.. परंतु, वाकेड ओलांडल्यानंतर सिंधुदुर्गच्या दिशेने जाणारा रस्ता मात्र तुलनेने सुरळीत आणि वेगवान असणार आहे.. नेमकी कोणत्या ठिकाणी कोंडी होण्याची शक्यता आहे आणि रस्त्याची कामं कुठे अपूर्ण आहेत, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून... ग्राफिक्स प्लेट १: वाहतूक कोंडीची संभाव्य ठिकाणे (Bottlenecks) लव्हेल उड्डाणपूल परिसर चिपळूण उड्डाणपूल परिसर संगमेश्वर पुलाजवळ निवळी पूल लांजा पूल ग्राफिक्स प्लेट २: महामार्गावरील अपूर्ण कामांचा तपशील टप्पा / पट्टाअपूर्ण.....रस्त्याचे अंतर चिपळूण ते आरवली....५९५ मीटर आरवली ते काटे....५७० मीटर काँटे ते वाकेड....१५० मीटर त्यामुळे या पट्ट्यातून प्रवास करताना चाकरमान्यांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागण्याची शक्यता असल्याने चालकांनी संयमाने वाहन चालवावं आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे..
0
0
Report

वाशिम में बैंक कर्मचारी रैली, चार दिन बंद रहने की संभावना

Washim, Maharashtra:अँकर: देशव्यापी बँक संपाच्या पार्श्वभूमीवर युनायटीड फोरम ऑफ बँक यूनियन्सच्या आवाहनानुसार वाशिममध्ये विविध सरकारी बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी रॅली काढत निदर्शने केली. बँक ऑफ महाराष्ट्रपासून सुरू झालेल्या या रॅॅलीत जिल्ह्यातील विविध सरकारी बँकांचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. पाच दिवसीय बँकिंग लागू करावी आणि PIL मधील भेदभाव दूर करावा, यासह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष वेधले. मात्र पुढील तीन दिवस सुट्टी असल्याने सरकारी बँका आजपासून सलग चार दिवस बंद राहणार असून,याचा फटका सणासुदीच्या काळात ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे. रॅलीची सांगता बँक ऑफ इंडिया शाखेसमोर करण्यात आली. आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर यासमोरील तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बँक कर्मचारी आंदोलन सरकारला दिला.
0
0
Report
Advertisement

धाराशिव में पशुवैद्यकीय दवाखाने पर मंत्री भुजबळ के विरोध में बवाल

Yeola, Maharashtra:मंत्री छगन भुजबळ ऑन धाराशिव येथे पशुवैद्यकीय दवाखान्यात माणसांवर उपचार - मी सुद्धा ते ऐकलं... - अतिशय चुकीची आहे... - धाराशिव चे कलेक्टर यांनी या गोष्टीकडे लक्ष घातले पाहिजे... - शासनाकडे काही अडचणी असतील तर त्या सोडवल्या पाहिजे... - ही अतिशय मान खाली घालायला लावणारी गोष्ट आहे... - राज्य सरकार एवढे खर्च करत असताना तसेच भारत सरकार वेगवेगळ्या योजना आणत असताना अश्या रीतीने परिस्थिती यावी ही चुकीची गोष्ट आहे... minister छगन भुजबळ ऑन मुंबईमधील कचऱ्याची हायकोर्टाकडून दखल - नगरपालिका महानगर पालिकेचे कामच आहे... - पिण्यासाठी पाणी, गटाराची सोय करणे, विजेची सोय करणे, कचऱ्याची विल्हेवाट लावणे... - प्रत्येक नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत असतील त्यांनी सुद्धा त्यांच्या पातळीवर काम केले पाहिजे... - कचरा गटार स्वच्छ न केल्यास रोगराई वाढणार... - काळजी अशा पद्धतीने घेतली पाहिजे की महानगरपालिका किंवा शासकीय रुग्णालयातील रुग्ण hospitalाची संख्या कमी होईल... - आजारी वडिलांची संख्या कमी होईल... - त्या दृष्टीकोनातून आणि सर्व सांगत असतो... - आता हाय कोर्टाने कान टोचले आहे... minister छगन भुजबळ ऑन मनोज जरांगे यांची ईडीकडे तक्रार - त्यांच्याबरोबर उजवे डावे हात म्हणून काम करत होते... - त्यांच्याजवळ जे काही पुरावे असतील सादर करतील... - ते कायद्याप्रमाणे होईल... minister छगन भुजबळ ऑन मनोज सारंगे.. अमृता फडणवीस साडी चोळी भेट देणार - गुडवील निर्माण करण्यासाठी... - मितल या तिकडे कलेक्टर आहे... - सरकारचा निरोप त्यांना सांगायला गेल्या होत्या त्यांच्यासाशी गलिच्छ भाषेमध्ये सगळ्यांच्या समोर त्यांच्याशी चर्चा केली... - मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदे, शिरसाठ तसेच बावनकुळे त्यांना देताच...
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top