icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Nov 2024, 12:41 pm

यवतमाळ : पुसद मध्ये माणूसकीची भिंत फाउंडेशन ने वृद्ध, निराधार, बेघरांसोबत साजरी केली भाऊबीज

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळच्या पुसद येथे माणुसकीची भिंतच्यावतीने बेघर, निराधार, दिव्यांग, असहाय वृद्ध व अनाथांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. वृद्धाश्रम व रुग्णालय परिसरात हा सोहळा संपन्न झाला. माणुसकीची भिंत परिसरात स्वच्छता करून गोरगरीब निराधार वृद्धांची व पुरुषांची दाढी-कटिंग करण्यात आली. त्यानंतर महिलांनी काढलेल्या रांगोळ्यांनी अंगण सजले. पाट मांडण्यात आले. त्यानंतर माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांनी टोपी, टॉवेल, नारळ पेढा देऊन वंचितांना ओवाळले. त्यांच्या कुटुंबातील महिलांना साड्या देण्यात आल्या.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

निफाड में पालतू कुत्तों के विरोध के बाद अधिकारी के खिलाफ केस

Niphad, Maharashtra:अँकर:-निफाड शहर परिसरामध्ये मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढल्यामुळे नगरसेविका रूपाली रंधवे व त्यांचे पती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम रंधवे यांनी निफाड नगरपंचायत मुख्याधिकारी कार्यालयात मोकाट कुत्रे सोडून निषेध व्यक्त केला होता दरम्यान या घटनेनंतर मुख्याधिकारी धीरज भामरे यांनी रंधवे दांपत्यासह पाच जणांवर सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, कर्मचाऱ्याला मारहाण करणे, प्राणी संरक्षण कायदा असे विविध कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले असून पुढील तपास निफाड पोलीस करत आहेत
0
0
Report

सोलापुर में मोदी के जन्मदिन पर बैनर से राजनीतिक हलचल तेज

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या नातवाने भाजपा कार्यालयाबाहेर लावले पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे बॅनर, बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे नातू शिखर पहारीया यांनी लावले पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर - सोलापूरातील भाजप कार्यालयात बाहेरच शुभेच्छांचे बॅनर लागल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या निमित्ताने शिखर पहारिया यांच्या राजकीय प्रवेशाचे संकेत - 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शहर मध्य मतदार संघात शिखर पहारिया निवडणूक लढण्याची रंगली होती चर्चा - मात्र ज्यांचे संपूर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये गेले असे सुशीलकुमार शिंदे यांच्या नातू शिखर पहारिया यांनीच मोदींचे बॅनर लावल्याने वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात - भाजप शहराध्यक्षांच्या वतीने शिखर पहारिया यांच्या बॅनरमुळे आश्चर्य व्यक्त करत भाजपमध्ये आल्यास स्वागतच असल्याची व्यक्त केली भावना
0
0
Report

वाशिम में बारिश नहीं: खरीफ संकट, किसानों ने उध्वस्त सोयाबीन को लेकर प्रतिकात्मक अंत्ययात्रा निकाली

Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यात ४५ ते ५० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम अक्षरशः संकटात सापडला आहे.मालेगाव तालुक्यातील राजुरा शेतशिवारात सोयाबीन पीक पूर्णपणे उध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.याच संतापातून स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी उध्वस्त सोयाबीनची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत राजुरा स्मशानभूमीत अंत्यविधी केला. व्हीओ:पावसाअभावी सोयाबीनची पिकं वाळून गेली.शेंगा भरण्याच्या निर्णायक टप्प्यातच पिकांनी माना टाकल्या. डोळ्यांसमोर उभं पीक करपताना पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणि मनात संताप आहे.राजुरा येथील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी उध्वस्त सोयाबीन चा प्रतिकात्मक अंत्यविधी करून शासनाचं लक्ष वेधलं.हेक्टरी एक लाख रुपये मदत, पीक विम्याचा लाभ,कृषी पंपांचं वीज बिल माफ करावं आणि कर्जमाफी करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. बाईट : दामू इंगळे, युवा प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना व्हीओ:सोयाबीनसोबतच तूर, कापूस,उडीद आणि हळद पिकांवरही दुष्काळाचं सावट आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करून वाशिम जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा,अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.मुख्यमंत्री आणि पालकमंत्री गावपातळीवर शेतकऱ्यांची पाहणी करण्यासाठी येत नाहीत,तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा दामू इंगोले यांनी दिला आहे. तर संतप्त शेतकऱ्यांनी आम्ही मेल्यानंतरच आमच्या खात्यात पैसे टाकणार ka असा सवाल शासनाला केला आहे. खरिपाचे पीक हातचं गेलं पावसाअभावी आता रब्बीचे सुद्धा पीक येणार नाही त्यामुळे वर्षभर संसाराचा काढा कसा हाकायचा या विवंच निश्चित शेतकरी पडले आहेत त्यामुळे शासन येत्या काळात या शेतकऱ्याकडे लक्ष देणार का व हाताश झालेला या बळीराजाला उभ करण्यासाठी मदत करणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे. बाईट:कुडलिक सानप,शेतकरी बाईट: गजानन टोंचर,शेतकरी
0
0
Report
Advertisement
Advertisement

तुळजाभवानी के पलंग को लेकर घोड़ेदेगांव में तनाव, पुलिस ने तैनाती की

Shirur, Maharashtra:तुळजाभवानीच्या शिवकालीन पलंगावरून काल चांगलाच वाद निर्माण झाला. पलंगाच्या मार्गक्रमणावरून दोन गट आमनेसामने आले आणि वाद इतका वाढला की पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. अखेर रात्री उशिरापर्यंत या पलंगाचे रक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांवर आली असून, घोडेगावमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे तुळजाभवानीचा हा पारंपरिक पलंग तयार केला जातो. पलंग तयार करण्याचा मान असलेल्या ठाकूर कुटुंबातील एका व्यक्तीचे निधन झाल्याने यंदा पलंग तयार करण्यास काहीसा उशीर झाला. दरवर्षी गोकुळाष्टमीच्या दिवशी घोडेगाव येथील शनैश्वर मंदिरात विधिवत पूजा करून हा पलंग तयार करण्याची परंपरा आहे. त्यानंतर ऋषी पंचमीला हा पलंग पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होतो. जुन्नर, अहिल्यानगर मार्गे प्रवास करत हा पलंग दसऱ्याच्या दिवशी तुळजापूर येथील तुळजाभवनी मंदिरात पोहोचतो. मात्र यंदा पलंग तयार झाल्यानंतर त्याच्या पुढील मार्गक्रमणावरून वाद निर्माण झाला. पलंग पुढे नेण्याचा मान असलेल्या पलंगे कुटुंबीयांकडून तो जुन्नरला घेऊन जाण्याचा आग्रह करण्यात आला. तर घोडेगावच्या ग्रामस्थांनी हा पलंग किमान दोन दिवस घोडेगावमध्येच ठेवावा, अशी भूमिका घेतली. या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद वाढला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. अखेर रात्री उशिरा तुळजाभवानी मंदिर ट्रस्टकडून काय खुलासा किंवा निर्णय येतो, त्यानंतर पुढील निर्णय घेण्याचे ठरल्याची माहिती आहे. सध्या या पारंपरिक पलंगाचे रक्षण करण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या वादामुळे घोडेगावमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवकालीन परंपरेशी जोडलेला तुळजाभवानीचा हा पलंग दरवर्षी मोठ्या श्रद्धेने घोडेगावातून तुळजापूरकडे रवाना होतो. मात्र यंदा त्याच्या मार्गक्रमणावरूनच वाद निर्माण झाल्याने या परंपरेला गालबोट लागले आहे. आता तुळजाभवनी मंदिर ट्रस्टच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
0
0
Report
Advertisement

सोसायटी सभाभवन में वकील पर हमला, सरपंच समेत 5 पर मामला दर्ज

Chakan, Maharashtra:सोसायटीच्या सभेत वकिलाला मारहाण; निघोजे सरपंचासह पाच जणांवर गुन्हा निघोजे येथील 'कॅपिटल सिटी' को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हाऊसकीपिंगच्या थकीत बिलाचा जाब विचारल्यावरून एका वकिलाला बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सभेत अ‍ॅड. बभिषण पडवळ यांनी हिशोबाचा तपशील विचारला असता वाद उफाळून आला. या वादातून आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तर भांडण सोडवण्यासाठी आलेल्या त्यांच्या पत्नीशी अश्लील वर्तन करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी निघोजेच्या सरपंचांसह पाच जणांविरोधात दक्षिण महाळुंगे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
0
0
Report

सोलapur के तुलशी ग्रामवासियों ने गणपति के सामने खाली घागरी से पानी मांग

Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील पर्जन्यमान कमी असल्याने सप्टेंबर महिन्यातच दुष्काळाच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. मागील चार दिवसापासून 12 ग्रामस्थ पिण्याचे पाणी मिळावे यांसाठी आंदोलनाला बसले आहेत. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे तुळशी ग्रामस्थानी आता थेट गणरायाला पाण्यासाठी साकडे घातले आहे. गणपतीच्या मूर्ती समोर अनेक जण वेगवेगळ्या सजावटी करतात. पण पाणी मिळावे यासाठी ग्रामस्थानी थेट गणपती समोर आता रिकाम्या घागरींची आरास केली आहे. त्यामुळे या आगळ्या वेगळ्या सजावटीची चर्चा होत आहे. किमान प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना गणेशाने बुद्धी द्यावी ही अपेक्षा व्यक्त केली आहे
0
0
Report

India: Bangladeshi onion imports shrink as self-sufficiency grows; traders warn of future export markets

Yeola, Maharashtra:भारतातील कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांसाठी धक्का देणारी बातमी समोर आली आहे 2023-24 मध्ये भारतातून 40 टक्के इतका मोठ्या प्रमाणात कांदा आयात करणारा बांगलादेश आता स्वतः कांदा उत्पादनात सक्षम होत असून, अतिरिक्त उत्पादनामुळे श्रीलंकेच्या बाजारपेठेत कांदा निर्यात करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे 2020 ते 2025 या कालावधीत केंद्र सरकारने कांदा निर्यात धोरणात 11 वेळा हस्तक्षेप केल्याने त्याचा परिणाम भारताच्या पारंपरिक परदेशी बाजारपेठांवर झाल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे आता बांगलादेशासारखा भारताकडून कांदा आयात करणारा देशच निर्यातदार होण्याच्या तयारीत असल्याने भविष्यात भारतीय कांद्यासाठी परदेशी बाजारपेठा किती शिल्लक राहतील, असा सवाल व्यापाऱ्यांकडून उपस्थित केला जात असुन केंद्र सरकारने वेळीच लक्ष देण्याची मागणी कांदा निराधार व्यापारी
0
0
Report
Advertisement

परभणी में मराठवाड़ा मुक्ती संग्राम की 78वीं वर्षगांठ पर ध्वजारोहण, मंत्री मेघना बोर्डीकर समेत अधिकारी मौजूद

Hingoli, Maharashtra:परभणी में मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त परभणीत पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.. परभणीच्या रामगोपालचारी उद्यानात ध्वजारोहण पार पडले यावेळी मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांच्या स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह जिल्हाधिकारी संजय सिंग चव्हाण प्रशासनातील अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते...
0
0
Report

मराठवाडा दुष्काळ और जरांगे उपोषण: सरकार पर विपक्ष का हमला

Nagpur, Maharashtra:नागपूर - विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते कहते हैं कि मनोज जरांगे का उपोषण राजनीति के अनुसार स्थगित होने की पहली बार नहीं है। पहले भी मुंबई जाते समय सरकार जरांगे के आगे झुकी है और अब भीshivyaa (अपशब्द) खाकर भी मंत्री-शासन उनकी मांग मानते रहे हैं। हैदराबाद गेजेट के अनुसार प्रमाणपत्र देने के बाद वैलिडिटी के लिए स्वतंत्र कानून बनना चाहिए ताकि यह नियम न्याय व्यवस्था के भीतर आ सके। यह भी कहा गया है कि जरांगे पाटीळ ने सरकार के मंत्रियों से मिलकर कुछ हुआ है, जिससे ओबीसी समुदाय की भागीदारी कम हो सकती है और मराठा समुदाय के लिए 348 जातियों में से लगभग 200 जातियों के प्रति आय में असमानता है। मराठा समाज के लिए पैकेज 2023 में घोषित हुआ था, परंतु तीन साल में केवल 13 हजार करोड़ मिले; 完ा सरकार से पूर्ण पैकेज की मांग है ताकि मराठवाडा के लोगों का भरण-पोषण सुनिश्चित हो सके। (On मोदी वाढदिवस आणि नितीन नवीन) भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नए मोदी के जन्मदिन पर दीप जलाने को कह रहे हैं, जबकि मोदी कहते हैं तेल कम खाओ; यह बहस देशभक्ति के नए तौर-तरीकों पर है, यूपीआई शुल्क का संदर्भ भी यहाँ आता है। (On मराठवाडा दुष्काळ) आज मराठवाडा मुक्ती दिन है; दुष्काळ पांचवी बार पुनः प्रकट हुआ है, पिछले 45 दिन बरसात नहीं, फसलें खतरे में; 2023 में 66 हजार करोड़ का पैकेज घोषित था, पर 2026 तक केवल 13 हजार करोड़ दिए गए। जनता से कहा गया है कि जब तक पूरा पैकेज नहीं मिलत तब तक मंत्रियों को सड़कों पर उतरना चाहिए। (On जरांगे उपोषण) महाराष्ट्र में जरांगे पाटील का आंदोलन स्थगित क्यों हुआ, यह समझने की कोशिश की जा रही है; इरिगेशन के ठेकेदारी के मामले में 1400 करोड़ की परियोजनाओं के बारे में चर्चा है और इनके विरोधी इसे सरकार-जरांगे समझौता बताने में लगे हैं। (On मराठवाडा دुष્કाळ - CM) मुख्यमंत्री ने कहा कि अगली पीढ़ी दुष्काळ नहीं देखेगी, पर 66 हजार करोड़ के पैकेज के बचे हुए पैसे क्यों नहीं दिए गए; राज्य के पूर्ण पैकेज के लिए दबाव बनाया जाएगा। On राहुल गांधी मुख्यमंत्री वक्तव्य - राहुल गांधी के नेतृत्व के पक्ष में समर्थन और उनके कार्यक्रमों में लोगों की भीड़ की बातें बताई गईं। On नागपूर गुन्हेगारी - नागपुर में अपराध दर 43% बढ़ी है; नए पुलिस आयुक्त से ड्रग्स और स्कूलों में फैली समस्या को रोकने की मांग, शहर में सुरक्षा पर चिंता और शासन के प्रति जवाबदेही की बात उठी है। On चोर-चोर मावस भाऊ आदि टिप्पणी - राजनीतिक द्वेष और तडीपार के बारे में चर्चा कि कैसे कुछ व्यक्तियों को राजनीतिक कारणों से निशाना बनाया जा रहा है; पुलिस व्यवस्था और सुरक्षा पर सवाल उठे। On भिमनवार राजीनामा - घोटालों के मामलों में सरकार के रवैये पर सवाल उठे और भिमनवार के साथ सरकार से उत्तरदायित्व की मांग की गई। (On जरांगे हिंदी) एजेंडा: जरांगे के इशारे पर 1400 करोड़ के टेंडर के नज़दीकी लोगों को लाभ मिला, उनके समर्थन में कुछ लोग कह रहे हैं कि जाँच होनी चाहिए।
0
0
Report

बिजली बाघिन का निधन: संजय गांधी पार्क में उम्र से जुड़ी बीमारी से मौत

Mumbai, Maharashtra:Borivali मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिजली वाघिणीचे निधन मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून दुःखद बातमी समोर आली आहे. उद्यानातील बिजली अर्थात T2 या वाघिणीचे वृद्धापकाळाशी संबंधित आरोग्याच्या समस्यांमुळे निधन झाले आहे. 16 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजून 45 मिनिटांनी बिजलीने अखेरचा श्वास घेतला. ती अंदाजे 18 वर्षे 4 महिन्यांची होती. बिजलीला 11 जुलै 2016 रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पातून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले होते. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ ती उद्यानाच्या देखरेखीखाली होती. या काळात लाखो पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या बिजलीने उद्यानातील वन्यजीव संवर्धन आणि प्राणी देखभाल व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग बनली होती. गेल्या महिन्यापासून बिजलीच्या आहारात हळूहळू घट होत असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर पशुवैद्यकीय पथकाकडून तिच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत होते. मात्र, उपचार आणि वैद्यकीय प्रयत्नांनंतरही तिचे निधन झाले. वृद्धापकाळामुळे मृत्यू झाल्याचे प्राथमिक स्वरूप असले तरी मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी बिजलीचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने वन्यजीवप्रेमींना बिजलीच्या आठवणी आणि तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top