Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Oct 25, 2024 07:21:47
Yavatmal, Maharashtra
यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
YKYOGESH KHARE
Dec 08, 2025 02:49:54
Nashik, Maharashtra:शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागातर्फे रब्बी हंगाम पीक स्पर्धा २०२५-२६ जाहीर झाली आहे. ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या पाच पिकांसाठी तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर स्पर्धा घेण्यात येणार असून अर्जाची अंतिम मुदत ३१ डिसेंबर ठरवण्यात आली आहे. स्पर्धेत सर्वसाधारण गटासाठी प्रवेश शुल्क ३०० रुपये आणि आदिवासी गटासाठी १५० रुपये आहे. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे तालुका स्तरावर ५,०००, ३,००० व २,००० रुपये; जिल्हा स्तरावर १०,०००, ७,००० व ५,००० रुपये; तर राज्य स्तरावर ५०,०००, ४०,००० व ३०,००० रुपयांची बक्षिसे मिळणार आहेत. सहभागी शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणे, किमान ४० आर क्षेत्रात सलग लागवड असणे आणि ७/१२, ८-अ उतारा, नकाशा, बँक दस्तऐवज व प्रवेश शुल्क चलन जोडणे आवश्यक आहे. इच्छुकांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
18
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Dec 08, 2025 02:49:38
Chendhare, Alibag, Maharashtra:आतापर्यंत केवळ चार हजार शेतकऱ्यांची नोंदणी ......... रायगडात शेतकरयांचा अल्‍प प्रतिसाद ...... भातातील आर्द्रतेमुळे शेतकरी नाराज .........आजपासून प्रत्‍यक्ष भातखरेदी सुरू होणार ........ अँकर – बरयाच दिवसांच्‍या प्रतिक्षेनंतर अखेर रायगड जिल्ह्यात भात खरेदीसाठी ४६ केंद्रे सुरू झाली आहेत. मात्र ऑनलाइन नोंदणीला शेतकरयांकडून अल्प प्रतिसाद मिळतो आहे. भातातील जास्त आर्द्रतेमुळे शेतकरी नाराज असून, त्याचा खरेदीवर प्रत्यक्ष परिणाम होण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ चार हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असून, आजपासून प्रत्यक्ष भातखरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे.
18
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Dec 08, 2025 02:45:19
Pune, Maharashtra:अहिल्यानगर शहराजवळ केडगाव परिसरात नगर - पुणे महामार्गावर शिवाई बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास झाला आहे या अपघातात जीवित हानी झाली नसली तरी ड्रायव्हर च्या दोन्ही पायांवर मोठी इजा झाली असून पाच ते सहा प्रवासी देखील जखमी झाले आहेत. पुण्याहून छ. संभाजीनगरकडे जाणारी शिवाई बस कंटेनरवर आदळली...कंटेनर चालकाने अचानक ब्रेक लावल्यामुळे हा अपघात घडला असल्याचे प्राथमिक माहिती आहे. धडक इतकी जोरदार होती की, यात शिवाई बस चालकाच्या पायाचा अक्षरशः चुराडा झाला आहे, बसमधील इतर ५ ते ६ प्रवासी देखील जखमी झाले आहेत. २ गंभीर जखमींवर शहरात खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून पळून गेला. सुदैवाने या भीषण अपघातात अद्याप पर्यंत कुठलीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 08, 2025 02:32:31
Dhule, Maharashtra:कांद्याचे दर वाढत असताना केंद्र सरकारने आयात निर्यात धोरणाबाबत माकड चेष्टा करू नये असं आवाहन शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केले आहे. ते शहादा येथे शेतकरी मेळाव्याला आले असताना बोलत होते. केंद्र सरकारच्या धरसोड प्रवृत्तीमुळेच कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. कधी निर्यात शुल्क वाढवायचा तर कधी कांद्या निर्याताला बंदी घालायची अशा धोरणांमुळे कांदा उत्पादक शेतकरी उध्वस्त होत आहे. कांद्याला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना कांदा उत्पादनामध्ये मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे सरकारने कांद्याच्या निर्यातबाबत शेतकरी पूरक स्थिर धरून ठेवण्याची मागणी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केलेले आहे. सरकारच्या माकड चेष्टांमुळेच शेतकऱ्यांच नुकसान होत असल्याचाचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे
67
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Dec 08, 2025 02:32:15
Chendhare, Alibag, Maharashtra:रायगड पोलिसांनी हस्तगत केले तब्बल २ कोटी रूपयांच्या дигीटल फ्रॉडची माहिती. अठरा महिना दखल घेऊन रायगड जिल्ह्यात मागील 11 महिन्यात डिजीटल माध्‍यमांतून करोडो रूपयांची फसवणूक झाल्‍याची 8 प्रकरणे पोलीसांत नोंदली गेली आहेत. यातून 2 कोटी 27 लाख 82 हजार 609 रूपयांची फसवणूक झाली आहे. मात्र पोलिसांच्या सायबर पोलिस ठाण्याने तपास करून तब्बल दोन कोटीहून अधिक रक्कम परत मिळवली आहे. या प्रकरणात आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली आहे. डिgिटल फ्रॉडमधून नागरीकांची फसवणूक होवू नये यासाठी पोलीस यंत्रणेकडून प्रबोधन केले जाते. परंतु नागरिकांनी डिजीटल व्यवहार करताना सावधानता बाळगावी, अशी आवाहन पोलिसांनी केलं आहे.
46
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 08, 2025 02:30:50
Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून तापमानाचा पारा आठ अंशा च्या खाली आहे. कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाल असून, घराबाहेर पडणं कठीण झालेला आहे. सायंकाळी सात वाजेपासून तर सकाळी आठ वाजेपर्यंत थंडी कडाक्याची थंडी जाणवत आहे बोचरी थंडी असल्यामुळे रस्ते निर्मनुष्य दिसून येत आहेत. तापमानाचा पारा सतत खाली येतोय. 6 अंशापर्यंत तापमान खाली आले असून, येणाऱ्या काही दिवसांमध्ये थंडी अजून वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जिल्ह्यात गेल्या आठवड्यामध्ये तापमानाचा परत 14° पर्यंत वाढला होता. मात्र आता पुन्हा तापमान सात अंशपर्यंत खाली आले आहे. रात्री गारठा अधिक जाणवत आहे. उत्तर पश्चिमी थंड वारे सक्रिय होत असल्याने धुळे जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा खाली येत असल्याच हवामान विभागाने स्पष्ट केल आहे.
54
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 08, 2025 02:17:01
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरात आता थंडीचा कडाका वाढणार असून पुढील आठवडाभर किमान तापमान १० अंशांखाली जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, रविवारी  शहरात कमाल तापमान २९.२ आणि किमान तापमान १२.२ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले. आगामी ८ ते १३ डिसेंबर या सहा दिवसांच्या अंदाजानुसार, किमान तापमानात झपाट्याने घट होईल. ८ डिसेंबर रोजी किमान तापमान १३ अंश सेल्सियस असेल, तर ९ डिसेंबर रोजी ते ११ अंशांपर्यंत खाली येईल. यानंतर १० आणि ११ डिसेंबरपर्यंत संभाजीनगरचे किमान तापमान १० अंशांपर्यंत पोहोचेल. मात्र, आठवड्याच्या उत्तरार्धात थंडीचा जोर अधिक वाढणार आहे असा इशारा हवामान खात्याने दिला आहे...
167
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 08, 2025 02:16:27
182
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 08, 2025 02:00:33
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरच्या आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपने रविवारी निवडणूक मैदानात येणाऱ्या इच्छुकांची माहिती मिळण्यासाठी उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात केली. ८ तासांत ९२२ इच्छुकांनी अर्ज घेतले. एकेका प्रभागातून डझनभर इच्छुक उमेदवारांनी अर्ज नेल्यामुळे पक्षासमोर योग्य उमेदवार निवडण्याचे मोठे आव्हान असणार आहे, शिवाय उमेदवारी न मिळाल्यास निर्माण होणारी नाराजी थोपविण्यात कोअर कमिटीला अपयश आले, तर बंडखोरी होण्याचे संकेतही पहिल्या दिवशीच्या गर्दीतून मिळाले आहेत. त्यामुळं एकहाती सत्ता मिळवण्याची स्वप्न पाहणा-या भाजपची डोकेदुखी वाढणार असेच चित्र आहे....
180
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Dec 08, 2025 01:00:27
216
comment0
Report
Advertisement
Back to top