icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अधिक मास में पंढरपुर: VIP घुसखोरी पर प्रशासन की कड़ी कार्रवाई

Pandharpur, Maharashtra:अधिक मासानिमित्ताने पंढरपुरात लाखो भाविक दाखल झाले आहेत विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शनाची रांग चार किलोमीटर अंतरापर्यंत गेली आहे दरम्यान दर्शन रांगेमधील घुसकोरी करणाऱ्या व व्हीआयपी दर्शन देणाऱ्या कर्मचारी किंवा खाजगी एजंटांवर कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी कार्तिकीएन एस यांनी आज पंढरपूरात दिली. मागील दोन-तीन दिवसांपासून दर्शन रांगेमध्ये भाविकांचे हाल होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यानंतर आज जिल्हाधिकारी कार्तिकीऐन एस यांनी प्रत्यक्ष दर्शन रांगेची पाहणी करून भाविकांची संवाद साधला. अधिकमासामुळे पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढली आहे. कमी वेळेमध्ये सुलभ दर्शन व्हावे यासाठी दर्शनाचा वेळ कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी व्हीआयपी दर्शन बरोबरच दर्शन रांगेतील घुसखोरी रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. व्हीआयपी दर्शन देणाऱ्या व घुसखोरी करणाऱ्या लोकांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकीयेन एस यांनी सांगितले.
0
0
Report

पटाखा हिंदी में: रत्नागिरी के लिए 30 जून तक HSRP अनिवार्य, उल्लंघन पर 1000 रुपये का जुर्माना

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जुन्या वाहनांना ३० जूनपर्यंत HSRP नंबरप्लेट बंधनकारक.. न बसवल्यास १ हजार रुपये दंड.. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जिल्ह्यातील २ लाख ११ हजार ४२३ पात्र वाहनांपैकी १ लाख ५१ हजार १९१ वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसवण्यात आली आहे, तर १० हजार ३५६ वाहनांचे काम प्रक्रियेत आहे. मात्र, अद्याप ४९ हजार ८७६ वाहनधारकांनी यासाठी बुकिंग केलेले नाही. या सर्व वाहनांना नंबरप्लेट बसवण्यासाठी ३० जूनपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत HSRP नंबरप्लेट न बसवणाऱ्या वाहनधारकांना थेट १ हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल, असा इशारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी दिला असून वाहनधारकांनी मुदतीपूर्वी हे काम पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
0
0
Report

कळंबस्ते-धामणंद मार्ग की दुर्दशा पर शिवसेना का आक्रामक प्रदर्शन

Ratnagiri, Maharashtra:कळंबस्ते-धामणंद मार्गाच्या दुरवस्थेविरोधात शिवसेना (UBT) आक्रमक.. सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारला जाब!.. कळंबस्ते-धामणंद मार्गाच्या दुरवस्थेविरोधात शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे.. पावसाळा तोंडावर आलेला असतानाही रस्त्याची झालेली दयनीय अवस्था पाहता, शिवसैनिकांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाला धारवर धरलं.. पावसाळ्यापूर्वी या मार्गाची तात्काळ डागडुजी करा, खड्डे बुजवा आणि रस्त्याची साफसफाई करा,असा थेट जाब प्रशासनाला विचारण्यात आलाय.. प्रशासनाने यावर तातडीने पावले उचलली नाहीत,तर तीव्र आंदोलनाचा इशाराही शिवसेनेने दिला आहे..
0
0
Report
Advertisement

प्रणिती शिंदे के नेतृत्व में काँग्रेस का मार्केट यार्ड चौक पर रास्ता रोको शुरू

Solapur, Maharashtra:सोलापूर - शेतकऱ्यांचे विविध प्रश्नां संदर्भात काँग्रेसच्या वतीने मार्केट यार्ड चौकात रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात शेतकरी आणि जनसामान्यांच्या विविध प्रश्नांच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने मार्केट यार्ड चौकात रास्ता रोको आंदोलन खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलनाला करण्यात आली सुरुवात कांदा, सोयाबीनला योग्य भाव मिळालाच पाहिजे याचसोबत इंधन दरवाढ कमी झाली पाहिजे यासाठी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
0
0
Report

संगमेश्वर में सोन पुल के अंतिम चरण के बाद 15 जून से एक-तरफा यातायात शुरू

Ratnagiri, Maharashtra:संगमेश्वर-रत्नागिरी, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग पर संगमेश्वर के पास यातायात जाम जल्द खत्म होगा. सोनापुल पुल पर काम अंतिम चरण में है और 15 जून तक एक-तरफा पुल पर यातायात शुरू हो पाएगा. इसे राष्ट्रीय महामार्ग विभाग ने मंजूरी दी है. इससे संगमेश्वर बस स्टेशन के सामने होने वाले यातायात जाम से बारिश के मौसम में राहत मिलेगी. कई वर्ष से सोन पुल का काम धीमी गति से चल रहा था, जिसके कारण रोज यातायात जाम का सामना करना पड़ता था. एक किलोमीटर का सफर तय करने में दो घंटे लग रहे थे, जिससे स्थानीय चालक नाराज़ थे.
0
0
Report
Advertisement

शिरखेड पुलिस ने गोवंश तस्करी करने वाले वाहन को पकड़कर 2.74 लाख मूल्य का माल बरामद किया

Amravati, Maharashtra:शिरखेड पोलिसांची कारवाई: MH 05 BJ 0955 क्रमांकाच्या झायलो कार गोवंशीय जनावरांना कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती मिळाली. लेहगाव चौक येथे नाकाबंदी केली गेली. संबंधित वाहनचालकाने रॉंग साईडने पळवण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी पाठलाग केला असता वाहन रस्त्याखाली उतरून झाडाला धडकले. चालक पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला पकडले. वाहनाची तपासणी केली असता मागील सीट काढून त्यात ८ गोवंशीय जनावरे पाय व तोंड बांधून निर्दयतेने कोंबून भरल्याचे आढळले. सर्व जनावरांची सुटका करून गोरक्षण केंद्र चिंचखेड येथे चारा-PANI व सुरक्षाासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी वाहन चालक फाजील अहमद अन्सार अहमद वय २६ रा. नालसाबपुरा, अमरावती याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल.
0
0
Report
Advertisement

सातारा में शिवसेना उद्धव गुट के भीतर नाराजगी, जिल्हाप्रमुख ने भावनात्मक पत्र लिखा

Satara, Maharashtra:सातारा : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा समोर आली असून, सातारा जिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी उद्धव ठाकरे पक्षप्रमुख यांना भावनिक पत्र लिहित थेट नाराजी व्यक्त केली आहे. “३० वर्षे पक्षासाठी निष्ठेने काम करूनही सतत उपेक्षा आणि खच्चीकरण सहन करावे लागत आहे,” असा आरोप त्यांनी पत्रातून केला आहे. पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांकडून जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा आरोप करत संजय भोसले यांनी “तारा-मारा अन्यथा बाहेर तरी काढा” अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. अनेक वर्षे पक्षासाठी संघर्ष करूनही न्याय मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.या पत्रामुळे सातारा जिल्ह्यासह शिवसेना ठाकरे गटात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
0
0
Report
Advertisement

वाशीम में 5 हजार घरकुल लाभार्थी निधि नहीं मिलने से चिंतित, सरकार से तात्कालिक मदद की मांग

Washim, Maharashtra:अक्कर:पावसाळा ख़तीज असामान्य हालत, वाशीम जिल्ह्यातील तब्बल ५ हजार घरकुल लाभार्थ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शासनाकडून निधी वितरणात होत असलेल्या विलंबामुळे अनेक घरांची कामे अर्धवट अवस्थेतच थांबली आहेत. स्वतःच्या हक्काचे पक्के घर मिळावे या आशेने अनेकांनी जुनी घरे पाडून नवीन घरकुलाचे बांधकाम सुरू केले होते, मात्र निधीअभावी आता काहींवर तात्पुरत्या निवाऱ्यात किंवा उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. काही घरांचे छप्पर बाकी आहे, तर काही घरे भिंतीपर्यंतच उभी राहिली आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर लाभार्थ्यांच्या चिंता वाढल्या असून शासनाने प्रलंबित निधी तातडीने वितरित करण्याची मागणी होत आहे
0
0
Report

काले हल्दी ने नया रिकॉर्ड बना दिया: क्विंटल 17,200 से 25,000 रुपये

Washim, Maharashtra:वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत काळ्या हळदीने भावाचा नवा उच्चांक गाठल्याने हळडि उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. काल झालेल्या लिलावात ‘कोच्या’ अर्थात काळ्या हळदीला किमान १७ हजार २०० रुपये तर कमाल २५ हजार रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी दर मिळाला. मागील लिलावाच्या तुलनेत दरात तब्बल चार हजार रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. बाजार समितीत काळ्या हळदीची ७०० क्विंटल आवक झाली असून एकूण हळदीची आवक ७ हजार क्विंटलच्या पुढे गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीत हळदीची आवक वाढत असून वाढलेल्या दरामुळे उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top