445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
प्रफुल पटेल के बयानों से महाराष्ट्र के मुख्यमंत्री, जम्मू-कश्मीर समेत कई मुद्दों पर राजनीतिक संकेत
Bhandara, Maharashtra:देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री, त्यांच्याबद्दल उगाच चर्चा नको... प्रफुल पटेल यांची संजय राऊत यांच्या त्या वक्तव्यावर प्रतिक्रिया... देवेंद्र फडणवीस केंद्रात गेल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे होणार नाही तर बावनकुळे होतील असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं.... यावर प्रफुल पटेल यांनी "देवेंद्र फडणवीस हे आज महाराष्ट्राचे एक यशस्वी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी राज्यात शेतकरी, गोरगरीब, गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा (रस्ते) अशा अनेक क्षेत्रांमध्ये अत्यंत उल्लेखनीय विकासकामे केली आहेत. त्यामुळे त्यांनीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहावे, ही सर्वांचीच इच्छा आहे," असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ll नेते प्रफुल पटेल यांनी व्यक्त केले आहे. जम्मू-काश्मीरमधील सरकार बदलण्याचा कोणताही प्रश्नच उद्भवत नाही... प्रफुल पटेल... जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी भाजपवर सरकार पाडण्याचे प्रयत्न होत असल्याचे आरोप केले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली असून, जम्मू-काश्मीरमध्ये सरकार बदलण्याचा किंवा पाडण्याचा कोणताही प्रश्नच येत नाही, असे म्हटले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल काँफरन्स हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने तिथे लोकशाही परंपरेनुसार सरकार स्थापन झाले आहे, "जर एखाद्या पक्षामध्ये अंतर्गत मतभेद असतील किंवा इतर काही कारणांमुळे आमदारांची ये-जा होत असेल, तर त्या प्रत्येक गोष्टीसाठी भारतीय जनता पार्टीला जबाबदार धरणे आणि त्यांना यामध्ये ओढणे अजिबात योग्य नाही..... राम मंदिरात जो प्रकार घडला तो अत्यंत चुकीचा.. प्रफुल पटेल... राम मंदिर मध्ये चोरी झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतो आहे.. यावर प्रफुल पटेल यांना विचारले असता राम मंदिर मध्ये जे झाले ते चुकीचे झाले मात्र एका मंदिरामध्ये जर असं झालं तर दुसऱ्या मंदिर मध्ये तसंच होईल हे समजणे चुकीची आहे असे प्रफुल पटेल म्हणाले... एकनाथ खडसे सध्या कुठे आहेत हे ठरवून घ्यावं... प्रफुल पटेल यांचा एकनाथ खड़सेंना खोचक टोला .... अमित शहा यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याकरिता फोन केला होता असा गौप्यस्पोट एकनाथ खडसे यांनी केला यावर प्रफुल पटेल यांनी एकनाथ खडसे यांना खोचक टोला लगावला असून एकनाथ खडसे सध्या कुठे आहेत हे त्यांनी ठरवावे असे प्रफुल पटेल म्हणाले... महाराष्ट्रात राहण्याने मराठी बोलायलाच पाहिजे मात्र केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मराठी सक्ती करू शकत नाही.... रेल्वे स्थानकावर मराठी मुद्द्यावरून झालेल्या वादावर प्रफुल पटेल यांचे प्रतिक्रिया.. महाराष्ट्रात जो राहतो त्याने मराठी बोलायलाच पाहिजे मात्र जे केंद्र सरकारचे कर्मचारी आहेत त्यांच्यावर मराठी सक्ती करणे योग्य नाही कारण त्यांचं सिलेक्शन हा ऑल इंडिया लेवल झालेला असतो असे प्रतिक्रिया त्यांनी दिली...0
0
Report
पारगांव में चार साल की बच्ची के साथ अत्याचार: पडळकर ने कठोर कार्रवाई की मांग
Shirur, Maharashtra:आंबेगाव तालук्यातील पारगाव येथे एका चार वर्षांच्या निष्पाप बालिकेवर सलून चालकाकडून झालेल्या अत्याचारप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार पडळकर यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. हा प्रकार अत्यंत नीच आणि संतापजनक आहे. लव्ह जिहाद आणि अशा प्रवृत्ती ही केवळ वैयक्तिक कृत्ये नसून, त्यामागे एक पद्धतशीर सामूहिक कट (सिंडिकेट) कार्यरत आहे," असा गंभीर आरोप त्यांनी केला. नराधम आरोपीविरुद्ध पुढील १५ दिवसांत दोषारोपपत्र दाखल करून, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्याला फाशीची शिक्षा द्यावी, महाराष्ट्रात सलून व्यवसायाचे परवाने आणि ओळखपत्रे केवळ स्थानिक हिंदू नाभिक समाजातील व्यक्तींनाच दिली जावीत, इतर कोणालाही परवानगी देऊ नये, राखीव प्रवर्गाचा (SC/ST/OBC) लाभ घेऊन नोकरी मिळवल्यानंतरही छुप्या पद्धतीने धर्मांतर करणाऱ्यांची यादी तयार करून त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करावी. हिंदू कार्यकर्त्यांना चुकीच्या पद्धतीने टार्गेट करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवरही कडक कारवाई केली जाईल. अशा अनेक मागण्या आमदार पडळकरांनी केल्या. या आंदोलनात गावातील नागरिक, हिंदू संघटनांचे पदाधिकारी आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा ठाम निर्धार पडळकर यांनी व्यक्त केला.0
0
Report
संभाजीनगर में 13–18 जुलाई बारिश की संभावना, किसानों के लिए उम्मीद
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरकरांची पावसाची प्रतीक्षा लवकरच संपणार असून, जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मागील २४ तासांत कमाल तापमान ३४.६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३.० अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. सद्यस्थितीत आकाश अंशतः ढगाळ असून, पुढील काही दिवसांत वातावरणात बदल होणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १३ जुलै रोजी आकाश अंशतः ढगाळ राहील. त्यानंतर १४ जुलै रोजी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे. १५ ते १८ जुलै या कालावधीत जिल्ह्याच्या विविध भागांत पावसाच्या एक किंवा दोन मध्यम सरी किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात तापमानातही किंचित घट होऊन ते ३२ ते ३४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची चिन्हे आहेत. शेतकऱ्यांसाठी ही पावसाची स्थिती दिलासादायक ठरणार असून, पिकांना आवश्यक ओलावा मिळण्यास मदत होईल...0
0
Report
Advertisement
Vaijapur के युवक को ऑनलाइन शेयर धोखाधड़ी में 6.25 लाख का नुकसान
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ANC : शेअर मार्केटमध्ये भरघोस परताव्याचे आमिष दाखवत वैजापूरमधील एका तरुणाची तब्बल ६ लाख २५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजगोपाल राजेंद्र गवळी हे खासगी कंपनीत असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. जानेवारी २०२६ मध्ये गुगलवर गुंतवणुकीची माहिती शोधत असताना त्यांना 'बार्कलेज इन्व्हेस्टमेंट बँक'च्या नावाने बनावट वेबसाइटची लिंक मिळाली. त्यानंतर एका महिलेने व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधून मोठ्या परताव्याचे आमिष दाखवत टप्प्याटप्याने विविध बँक खात्यांमध्ये एकूण ६ लाख २५ हजार रुपय deposito करायला सांगितले. गवळी यांनी ऑनलाईन ही रक्कम भरल्यानंतरही कोणताही परतावा मिळाला नाही. सतर्कतेमुळे पुढील व्यवहार थांबविण्यात आले असून संबंधित रक्कम 'होल्ड' करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वैजापूर पोलीस करत आहेत.0
0
Report
सातारा: फलटण में दूध मिलावट के संदेह पर FDA ने दबिश; मिलावट के उपकरण और मिक्सर जप्त
Satara, Maharashtra:सातारा: फलटण तालुक्यातील होळ येथे दूध भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली. जनावरांच्या गोठ्यावर छापा टाकला. या कारवाईत बनावट दूध तयार करण्यासाठी वापरले जात असल्याचा संशय असलेले साहित्य आणि मिक्सर जप्त झाले. जप्त साहित्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून अहवालानंतर संबंधितांवर अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत कारवाई केली जाईल. कुणाल भोसले, मंगल भोसले, दिलीप भोसले आणि पावडर पुरवणारे अनोळखी दोघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया फलटण पोलिस ठाण्यात सुरू होती. छाप्यादरम्यान गोठ्यातून सुमारे ४ किलो औद्योगिक वापरासाठीची व्हे पावडर, ३ किलो नॉन-डेअरी क्रीम पावडर तसेच साहित्य एकत्रित करण्यासाठी वापरला जाणारा मिक्सर जप्त झाला.0
0
Report
संत ज्ञानेश्वर पालखी लोणंद आगमन के लिए सुरक्षा-तैयारी पूरी की
Satara, Maharashtra:सातारा: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे १५ जुलै रोजी लोणंद नगरीत आगमन होत असून, वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुविधांसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी स्थानिक अधिकाऱ्यांसोबत नीरा नदीचा घाट आणि मुख्य पालखी स्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासकीय तयारीचा आढावा घेतला. वारी दरम्यान भाविकांना कोणतीही समस्या उद्भवू नये म्हणून १८०० शौचालये, आरोग्य पथके आणि रस्ते अतिक्रमणमुक्त ठेवण्याचा निर्देश त्यांनी दिला. तसेच आपत्ती व्यवस्थापनांतर्गत पालखी मार्गावरील १२ कोटींच्या भूमिक विमानचालना प्रकल्पाच्या कामाला गती देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.0
0
Report
Advertisement
द दूध भेसळ मामले में पूर्व मंत्री दिलीप वळसे पाटील का विपक्ष पर तीखा हमला; जांच जारी
Shirur, Maharashtra:राज्यात सध्या दूध भेसळीचा मुद्दा चांगलाच तापला असून, यावरून आता माजी मंत्री दिलीप वळसे पाटील कमालीचे आक्रमक झाले आहेत. या दूध भेसळ प्रकरणाशी माझा दूरदूरपर्यंत कोणताही संबंध नाही, असं सांगत वळसे पाटलांनी विरोधकांवर आणि बेछूट आरोप करणाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. केवळ आंबेगावच नव्हे, तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात अशा कारवाया झाल्या आहेत. जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही, एफआयआर दाखल होत नाही किंवा दोषारोपपत्र निश्चित होत नाही, तोपर्यंत त्यावर जाहीर भाष्य करणे योग्य नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच, काही लोक राजकीय हेतूने या तालुक्याला बदनाम करण्याचा कट रचत असल्याचा आरोप करत, 'पडद्यामागचा सूत्रधार मी नाही' असं म्हणत त्यांनी आरोप करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत.0
0
Report
मालेगांव संगमेश्वर में SIR शिबिर: मतदाताओं की रिकॉर्ड भीड़
Nashik, Maharashtra:मतदारांची गर्दी... मालेगाव संगमेश्वरात SIR शिबिरात मतदारांची मोठी गर्दी शिवसेनेच्या वतीने शिबिराचे आयोजन.. राज्यात, संपूर्ण देशात SIR प्रणालीचे काम सुरू आहे. त्याचाच एक भाग आज मालेगाव शहरातील माळी मंगल कार्यालयात मंत्री दादाजी भुसे व युवा सेनेचे आविष्कार भुसे यांच्या मार्गदर्शनाने व नरेंद्र सोनवणे, लताताई घोडके, मीनाताई अहिरे आणि नितीन झालते या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींच्या वतीने SIR प्रणालीचे शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराला संगमेश्वर वासियांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला यात 50 च्या वर बी एल ओ यांनी देखील मोठे सहकार्य केल्याने हजारोंच्या संख्येने मतदारांनी या शिबिराचा लाभ घेतला नागरिकांनी आभार देखील व्यक्त केले.0
0
Report
वाडेगाव स्मशानभूमी के टिनशेड की शीघ्र दुरुस्ती की मांग, बरसात में अंत्यविधि कठिन
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथील स्मशानभूमीतील टिनशेडची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. टिनपत्रे फुटल्यामुळे पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काहीवेळा पावसाच्या पाण्यामुळे चिता विझण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, यामुळे मृतदेहाचा सन्मान राखला जात नसल्याची खंतही व्यक्त केली जात आहे. या गंभीर समस्येमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. वाडेगाव येथील स्मशानभूमीमध्ये उभारण्यात आलेले टिनशेड सध्या पूर्णपणे जीर्ण झाले आहे. अनेक ठिकाणी टिनपत्रे फुटली असून पावसाचे पाणी थेट अंत्यसंस्काराच्या ठिकाणी गळत आहे. त्यामुळे पावसाळ्यात अंत्यविधी पार पाडणे अत्यंत कठीण होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मुसळधार पावसात चिता पेटविणे आणि ती कायम ठेवणे अवघड होत असून काहीवेळा चिता विझण्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारात अडथळे निर्माण होत असून नातेवाईकांनाही मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप केला आहे. स्मशानभूमीतील टिनशेडची तातडीने दुरुस्ती करून नवीन टिनपत्रे बसवावीत, तसेच नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.0
0
Report
Advertisement
मिरज पंचायत समिति की नयी इमारत उद्घाटन को लेकर सांसद विशाल पाटल के बयान पर मंत्री जयकुमार गोरे और भाजपा विधायक सुरेश खाडे की तीखी टिप्पणी
Sangli, Maharashtra:सांगली के खासदार विशाल पाटील के विधानानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे और मिरजे के भाजपा आमदार सुरेश खाडेंकडुन खासदार विशाल पाटलांवर जोरदार टीका किया गया है। मिरज पंचायत समिती के नूतनीमारती के दोनों बार उद्घाटन हुए हैं। सत्ताधारी महाविकास आघाडीकडून प्रशासकीय उद्घाटनाला डावलण्यात आल्याचा आरोप करत शासकीय उद्घाटनाच्या आदल्या दिवशी नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पाडला, यावेळी खासदार विशाल पाटलांनी शासकीय निधीवरून प्रशासनावर गंभीर टीका करत थेट प्रशासनाचा बाप काढला..यावरून प्रशासनाकडुन आयोजित उद्घाटन समारंभाच्या सभेतून भाजप नेत्यांनी खासदार विशाल पाटलांनी जोरदार टीका केली. इमारतीसाठी तुमच्या बापाने चेक, डीडी, का ऑनलाइन पैसे पाठवले होते, असा सवाल करत उद्घाटन करायची, एवढीचं खूमखुमी असेल तर खासदार फंडाच्या बाहेरून एक रुपयाचा निधी आणून विकास करून मग रूबाब करा, असा टोला लगावला आहे. तर आपल्या बापाच्या वैशिनाथ बिल्डिंग बांधली नाही शासकीय निधीतूनच बिल्डिंग बांधली गेलीये, पण यापुढे तुम्ही तुम्हाला तुमच्या बापाच्याच पैश्यांनी विकास करावा लागेल..असा विधान माजी मंत्री सुरेश खाडेंनी विशाल पाटलांवर केला आहे.0
0
Report
FDA के नए दूध नियम: 3.2 फैट और 8.3 SNF से किसान संकट में
Shirur, Maharashtra:FDA च्या दुध खरेदीच्या फॅट आणि SNF च्या नव्या नियमांमुळे राज्यातील लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची भीती माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली आहे. नव्या नियमावलीनुसार stateात कोणत्याही डेअरीने ३.२ फॅट आणि ८.३ SNF पेक्षा कमी दर्जाचे दूध खरेदी करू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. जर दूध या निकषांवर उतरले नाही तर ते कंपन्यांना परत करावे लागेल, ज्यामुळे दूध संकलन कमालीचे घटण्याची शक्यता आहे. या जाचक अटींमुळे ग्रामीण आणि विशेषतः आदिवासी भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असून, या निर्णयाचा दुग्ध व्यवसायावर दूरगामी परिणाम होईल, अशी चिंता वळसे पाटील यांनी व्यक्त केलीय.0
0
Report
यवत में संत तुकोबाराय की पालखी का आगमन, काळभैरवनाथ मंदिर में मुक्काम
Rui, Maharashtra:संत तुकोबारायांचा पालखी सोहळा यवत मध्ये दाखल.... यवत मधील श्री काळभैरवनाथ मंदिरामध्ये तुकोबारायांची पालखी मुक्कामासाठी असणार आहे. या ठिकाणी समाज आरती पार पडेल आणि त्यानंतर भाविक या ठिकाणी संत तुकोबारायांच्या पादुकांचे दर्शन घेतील. विठ्ठल नामाच्या जयघोषात यवतनगरी दुमदुमून निघाली असून यवतकरांकडून वारकऱ्यांना पिठलं भाकरीचा बेत देखील आखण्यात आला आहे.0
0
Report
Advertisement
विद्यार्थी शिकायतों के बाद अमिगो एविएशन अकैडमी पर MSBVT से जांच की मांग
Mumbai, Maharashtra:विद्यार्थ्यांच्या तक्रारींनंतर अमिगो एव्हिएशन अकॅडमी अडचणीत; मनविसेकडून चौकशीची मागणी मुंबई : विद्यार्थ्यांकडून प्रवेशावेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करणे, दिशाभूल करणे तसेच इतर गंभीर तक्रारी समोर आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने अमिगो एव्हिएशन अकॅडमीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्य सरचिटणीस अॅड. स्नेहल आडारकर यांनी विद्यार्थ्यांसह अकॅडमीच्या मुख्य कार्यालयाला भेट देत व्यवस्थापनाची जाब विचारणा केली. यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रलंबित तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याची मागणी करण्यात आली. तसेच अकॅडमीच्या माजी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, विद्यार्थ्यांना दिलेली कथित दिशाभूल करणारी आश्वासने आणि संस्थेच्या कार्यपद्धतीबाबतही व्यवस्थापनाकडे कठोर शब्दांत खुलासा मागण्यात आला. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आता महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण मंडळ (MSBVT) यांच्याकडे अधिकृत चौकशीची मागणी करणार आहे. यासोबतच महाराष्ट्रभर कार्यरत असलेल्या सर्व एव्हिएशन प्रशिक्षण संस्थांचे स्वतंत्र लेखापरीक्षण (ऑडिट) करून त्या शासनाच्या नियम व मानकांचे पालन करतात का, याची सखोल तपासणी करण्याची मागणीही करण्यात येणार आहे. “विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक किंवा त्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही संस्थेला पाठीशी घातले जाणार नाही. आवश्यक असल्यास कायदेशीर लढा आणि तीव्र आंदोलनही उभारले जाईल,” असा इशारा अॅड. स्नेहल आडारकर यांनी दिला. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना हा पाठपुरावा शेवटपर्यंत करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.0
0
Report
यवत में सुप्रिया सुळे ने वारकर्स के लिए भाकरी बनाकर दिखाया सहयोग
Rui, Maharashtra:यवत मध्ये सुप्रिया सुळे यांनी थापल्या वारकऱ्यांसाठी भाकऱ्या. पालखी सोहळा आज पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावात मुक्कामी आहे. यवत मध्ये ग्रामस्थांच्या वतीने वारकऱ्यांना पिठलं भाकरी ची खास मेजवानी दिली जाते. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील यवतमध्ये श्री काळभैरवनाथ मंदिरात उपस्थिती लावत या ठिकाणी महिलांबरोबर वारकऱ्यांसाठी भाकऱ्या थापल्या आहेत. याशिवाय सुप्रिया सुळे यांनी पिठलं भाकर खाण्याचा आस्वाद देखील घेतला आहे.0
0
Report
यवत में वारकरी अन्नदान: दीढ़ टन पिठलं और दीढ़ लाख भाकरी की भव्य मेजबानी
Rui, Maharashtra:अन्नदानाचा लावा मेळा । भुकेल्यांचा भरा घास पेला ॥॥ अन्न पूर्णब्रह्म जाणावे । प्रेमे सर्वांना वाढवावे ॥१॥ दारी आला जो भुकेला । विठ्ठल भेटे त्या रूपाला ॥२॥ सेवाभाव अंतरी ठेवा । दीनजनांचा धावा घ्या ॥३॥ दानामध्ये नाही अभिमान । तेथे वसे श्रीनारायण ॥४॥ तृप्त झाले जेवणारे । आशीर्वाद देते सारे ॥५॥ तुका म्हणे सेवा खरी । विठ्ठल भेटे अंतरी ॥॥ यवतमध्ये वारकऱ्यांसाठी दीड टन पिठलं, दीड लाख भाकऱ्यांची मेजवानी; ८२ वर्षांची अखंड परंपरा यंदाही कायम... लोणी काळभोर ते यवत हा पायी प्रवास करून आलेल्या लाखो वारकरी भाविकांसाठी तब्बल दीड टन पिठलं आणि दीड लाख भाकऱ्यांची मेजवानी आयोजित करण्यात आलीय. गावातील घराघरांत भाकऱ्या तयार करण्याचे काम सुरू असतानाच, यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिर परिसरात सकाळपासूनच पिठलं तयार करण्याची लगबग सुरू झाली होती. मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या विशाल कढईंमध्ये पारंपरिक पद्धतीने पिठलं तयार करण्यात आले. एका कढईत सुमारे ६० किलो पिठलं बनविण्यात येत होते. त्याासाठी २० किलो बेसण तसेच सुमारे ४० किलो कांदा, मिरची, लसूण, तेल, मसाले व इतर साहित्य वापरण्यात आले. अशा एकूण १४ ते १५ कढईंमध्ये पिठलं तयार करून भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. या अन्नदानासाठी गावातील युवकांनी दिवसभर परिश्रम घेतले. पिठलं तयार करणे, भाकऱ्या जमा करणे, भोजन वाढणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता आणि शिस्तबद्ध नियोजन अशा विविध जबाबदाऱ्या ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने स्वीकारल्या. ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली तरुणांनी सेवाभावाची ही परंपरा पुढे चालवत समाजासमोर आदर्श निर्माण केलाय. मागील वर्षी एक टन पिठलं आणि एक लाख भाकऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र यंदा पिठलं-भाकरीच्या भोजनासाठी वाढलेली मागणी लक्षात घेऊन त्यामध्ये वाढ करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. जावेद मुलानी, झी 24 तास, दौंड0
0
Report
Advertisement
