445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
मराठा आंदोलन की तैयारी के लिए मनोज जरांगे पाटील मुंबई रवाना
Khopoli, Maharashtra:मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. १९ सप्टेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या आंदोलनासाठी जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले असून, १८ सप्टेंबर रोजी रायगडमधील खोपोली येथे त्यांचा मुक्काम होणार आहे. खोपोलीतील तयारीचा आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाज समन्वयक डॉक्टर सुनील पाटील यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी समृद्धी कोल्हे यांनी.0
0
Report
रोहित पाटिल के पदयात्रा पर संजय काका पटेल का तंज, राजनीतिक घमासान तेज
Sangli, Maharashtra:स्लग - रोहित पाटलांच्या पदयात्रेवर,माजी खासदार संजयकाकांची टीका,रोहित पाटलांचा ही पलटवार.. अँकर - दुष्काळ निवारणासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांनी काढलेल्या पदयात्रेवरून माजी खासदार संजयकाका पाटलांनी केलेल्या टीकेवरून आता आमदार रोहित पाटील आणि संजय काका पाटील यांच्यात जुंपली आहे. सरकारच्या विरोधात मोर्चा काढायला हिम्मत आणि जिगर असावं लागतं,ते फक्त संजय काका पाटलाच्यात आहे,असा टोला लगावत कोण कुणाच्या मांडीवर बसले,कौन कुणाला मॅनेज आहे,हे काही दिवसांनी सविस्तर मांडू,असा इशारा देखील संजयकाका पाटलांनी रोहित पाटलांना दिलाय. बाईट - संजयकाका पाटील - माजी खासदार . व्ही वो - दरम्यान संजयकाका पाटलाच्या टीकेवरून रोहित पाटल्यांनी देखील काकांचा समाचार घेत..त्यांनी किमान काही तर करावं, आम्ही काही करायला गेलं की त्यावर टीका करतात,टीका करण्याच्या व्यतिरिक्त ते आजपर्यंत काही करू शकले नाहीत.. त्यामुळेच लोकांनी त्यांना घरी बसवण्याचे काम केलं आहे,असा जोरदार टोला आमदार रोहित पाटलांनी, संजयकाका पाटल्यांना लगावला आहे,थोडे रोहित पाटळांच्या पदयात्रेवरून संजय काका पाटील आणि रोहित पाटील यांच्यात पुन्हा एकदा जुंपल्याचं पाहायला मिळाले .. बाईट - रोहित पाटील -आमदार - राष्ट्रवादी काँग्रेस - ( SP )0
0
Report
अक्टूबर से यूपीआय पर MDR 0.4%; 5–300 रुपए फीस, व्यापारी-ग्राहक में विरोध
Nashik, Maharashtra:ऑक्टोबरपासून यूपीआयमध्ये मोठा बदल होणार आहे. मोठ्या व्यापाऱ्यांना २ हजार रुपयांवर यूपीआय पेमेंट घेतल्यास ०.४% मर्चेंट डिस्काउंट रेट द्यावा लागेल. हे शुल्क किमान ५ रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत असेल. या निर्णयाला नाशिकच्या व्यापारांकडून विरोध होताना पाहायला मिळतोय. जर केंद्र शासनाला जीएसटी च्या माध्यमातून सगळ्यात जास्त कर जर आम्ही देत असताना आता नव्याने असे टॅक्स का देऊ असा प्रश्न व्यापाऱ्यांनी केंद्र सरकार विचारलाय. तर ग्राहकांनी देखील या निर्णयाला विरोध दर्शवला असून व्यापारी हे पैसे ग्राहकाकडूनच वसूल करतील असे देखील मत ग्राहकांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात नाशिक मधून आढावा घेत व्यापाऱ्यांशी आणि ग्राहकाशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी.0
0
Report
Advertisement
सांगोला टेंभू योजना में पानी गड़बड़ी, छह दिन से पानी नहीं, किसान फसलें जल रहीं
Pandharpur, Maharashtra:सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील टेंभू योजनेचे पाणी गळती सहा दिवसानंतरही सुरूच, टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे योजनेच्या टेल कडील शेतकऱ्यांचे पिक जळू लागली. पाणी वाटपाचा नियमा प्रमाणे योजनेच्या टेल कडील शेतकऱ्यांना आधी पाणी देण्याचा नियम असताना, सांगोला तालुक्यातील वाटंबरे परिसरात काही शेतकऱ्यांनी स्वतःला आधी पाणी मिळण्यासाठी टेंभू योजनेचे पाईप व्हॉल्व तोडून आपल्या शेताकडे पाणी वळवले. यामुळे टेल कडील शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या पिके जळू लागली आहेत. टेंभुयोजनेच्या अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार करूनही सहा दिवस झाले तरी पाणी वाया जाण्याचा प्रकार सुरूच आहे. ---0
0
Report
दापोली में पुराने अखबारों से बना पर्यावरण-फ्रेंडली गणेश मखर देखें
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी: पर्यावरणपूरक गणेशोत्सव: दापोलीत जुन्या वर्तमानपत्रांपासून साकारले आकर्षक मखर! पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत दापोलीतील केळसकर आणि घाग परिवाराने यंदाच्या गणेशोत्सवात टाकाऊ वर्तमानपत्रांचा पुनर्वापर करून अत्यंत देखणे व सुबक मखर साकारले आहे. या कल्पक आणि इको-फ्रेंडली सजावटीत बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, या अनोख्या मखराचे सर्वत्र कौतुक होत आहे.0
0
Report
नागपुर में महिला ड्राइवर ने चार लोगों को टक्कर मारी, चार घायल
Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपुरात महिला कार चालकाच धुमाकूळ, गोरेवाडा परिसरातील दिनशॉ फॅक्टरीजवळ भीषण अपघात - कार चालक महिलेने चार जणांना उडवल्याची घटना, तीन चिमुकल्यांसह चार जण अपघातात जखमी - पहिल्यांदा बालू कुलमेथे यांच्या एसयूव्हीला कारने धडक दिली, कारमधून मुलीसह खाली उतरत असताना बालू यांना कारची धडक - त्यानंतर नियंत्रण सुटलेल्या कारने तीन मुलांना उडवले, रस्त्यावरील हरीश रेवतकर आणि आशीष नखाते यांनाही धडक - अपघातात अनेक जण गंभीर जखमी, महिला चालकाच्या नशेत असल्याची घटनास्थळी चर्चा - महिला चालकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली, अपघातावेळी कारमध्ये आणखी कोण होते, याचाही तपास सुरू - घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासले जाणार आहे...अपघातानंतर संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्याला घातला घेराव - महिला चालकावर कठोर कारवाईची संतप्त नागरिकांची मागणी करण्यात आलीय..0
0
Report
Advertisement
दो नाबालिगों के साथ बलात्कार कर हत्या: 70 वर्षीय आरोपी को फांसी
Sangli, Maharashtra:दो अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करून एकीचा खून केल्याप्रकरणी सांगलीच्या विटा न्यायालयाने एका वृध्द नराधमास फाशीचे शिक्षा ठोठावली आहे. शिवाजी काळेल वय ७०, असे वृद्ध आरोपीचे नाव आहे. आटपाडी तालुक्यातल्या गळवेवाडी येथे ७ सप्टेंबर २०१८ रोजी गावातील एक आठ वर्षीय चिमुरडी खेळण्यासाठी गेली असता, बेपत्ता झाल्याचा प्रकार घडला होता, या प्रकरणी पोलिसांकडून शोध घेतला असता आरोपी शिवाजी काळेल यांच्या घरातील एका पत्र्याच्या डब्याला रक्ताचे डाग आढळून आले होते, त्यानंतर काळेल याला ताब्यात घेऊन त्याची पॉलीग्राफ आणि नार्कोटेस्ट करण्यात आलेणंतर त्याने दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करून, त्यापैकी एका मुलीचा खून करत मृतदेह एका पडक्या विहिरीत टाकल्याचे समोर आलं होतं. या प्रकरणी काळेला याला अटक करत त्याच्यावर विरोधात आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी विटा न्यायालयामध्ये पार पडली, यामध्ये विटा न्यायालयाने 19 साक्षीदारांची साक्ष आणि सबळ पुराव्यांच्या आधाराने आरोपी शिवाजी काळेल याला खून प्रकरणी फाशी आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी मरेपर्यंत जन्मठेपेची, शिक्षा सुनावली आहे. बाईट - आरती देशपांडे-साटविलकर - सरकारी वकील.0
0
Report
8 दिन बारिश नहीं, चंद्रपूर के धान किसान भारी संकट में
Chandrapur, Maharashtra:टायटल:--- मशागत, बिजाई, रोवणी, लावणी, मजूर खर्च, खत ,फवारणी आणि केवळ पावसाकडे डोळे, 8 दिवसात पाऊस आला नाही तर धान शेतक-याच्या हातून जाणार हंगाम, पावसाने दगा दिल्याने शेतकरी भयंकर संकटात अँकर:-- मशागत, बिजाई, रोवणी, लावणी, मजूर खर्च, खत , फवारणी आणि केवळ पावसाकडे डोळे अशी आहे चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्याची स्थिती. पुर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर हे जिल्हे भाताचे कोठार मानले जातात. मात्र यंदा अल निनो प्रभावाने पाऊसमान कमो होणार याची शक्यता असताना शेतकऱ्यांनी धाडसाने पेरणी- लावणी करत आभाळाकडे डोळे लावले. मात्र यंदा लहरी पाऊस शेतकऱ्याची जणू परीक्षा घेत आहे. अधे मध्ये दोनदा आलेला पाऊस धान पीक कसाबसा जगवून गेला मात्र आता 8 दिवसात पाऊस आला नाही तर धान शेतक-याच्या हातून हा हंगाम जाणार आहे. पावसाने दगा दिल्याने चंद्रपूरचा धान उत्पादक शेतकरी भयंकर संकटात सापडला असून विहिरी, कालवे आणि नाले- नदी यांचे सिंचन असलेले शेतकरी शिवारात ओलावा टिकवून ठेवत आहेत. धान पिकाला भरपूर पावसाची गरज असल्याने यंदाचा हंगाम शेतकऱ्यांची धडधड वाढविणारा ठरला आहे. बाईट १) चिंताग्रस्त धान शेतकरी आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
सरकारी फाइलें सात दिन से अधिक लंबित नहीं रहेंगी; तत्काल निपटारे के निर्देश
Nagpur, Maharashtra:नागपूर सरकारी फाईल सात दिवसांपेक्षा अधिक प्रलंबित ठेवल्यास कारवाई, शासकीय कामकाजातील दिरंगाईला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय घेण्यात आला.. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार सामान्य प्रशासन विभागाकडून आदेश जारी सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना काम वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश, कोणतीही फाईल एका कर्मचाऱ्याकडे सात कामकाजाच्या दिवसांपेक्षा अधिक प्रलंबित ठेवता येणार नाही. तातडीची फाईल शक्यतो एका दिवसात किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी निकाली काढण्याचे निर्देश, तातडीच्या स्वरूपाची फाईल शक्यतो चार दिवसांत निकालात काढावी लागणार आहे. एकाच विभागातील फाईलवर ४५ दिवसांत निर्णय घेणे बंधनकारक, दुसऱ्या विभागाकडे पाठवावी लागणारी फाईल तीन महिन्यांत निकाली काढण्याचे निर्देश आहे. विहित मुदतीत काम न करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.. विलंबास प्रतिबंध अधिनियमाच्या कलम १० नुसार कारवाई करण्याचे शासनाचे निर्देश नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर सामान्य प्रशासन विभागाकडून अतिरिक्त सूचना, जिल्हा परिषदांमधील निवेदने आणि तक्रारींवर सात दिवसांत कार्यवाही न झाल्याने न्यायालयाची नाराजी व्यक्त केली होती.. संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश झाल्याचा शासन परिपत्रकात उल्लेख प्रलंबित अर्ज, निवेदने आणि प्रकरणांचा विभागप्रमुखांनी दर महिन्याला आढावा घ्यावा दिरंगाई टाळण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम घेण्याचे निर्देश, ११ सप्टेंबरला सामान्य प्रशासन विभागाकडून शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे..0
0
Report
Advertisement
मराठा मोर्चा: मनोज जरांगे श्रीगोंदा में मुक्काम, 4-5 लाख समर्थकों की तैयारी
Ahilyanagar, Maharashtra:मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा आज अहिल्यानगरच्या श्रीगोंदा येथे मुक्काम असणार आहे... त्याअनुषंगाने श्रीगोंदा शहरातील बाजारतळ परिसरात मराठा बांधवांकडून जरांगे यांच्या मुक्कामाची तयारी करण्यात आलीये... जवळपास 4 ते 5 लाख मराठा बांधवांच्या मुक्कामाची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आलीये... आढावा घेत मराठा व्यवस्थापकांशी बातचीत केली आहे0
0
Report
नाशिक जेल में अबू सालेम से मुलाकात पर विश्व हिंदू परिषद चौकशी मांगती
Nagpur, Maharashtra:नागपूर महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नाशिक मध्यवर्ती कारागृहात अबू सालेमची भेट घेतल्यावरून त्यांच्या चौकशीची मागणी विश्व हिंदू परिषदेने केलीय संवेदनशील घटनात्मक पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींन गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची भेट घेणे गंभीर बाब असल्याचे नमूद करत प्यारे खान यांना पदावरून हटवावे तसेच प्रकरणाची एन आय ए आणि सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केलीय यासंदर्भात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने नागपूर जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले0
0
Report
कवठळ की महिलाएं पानी की बारिश के लिए जलाभिषेक, किसानों के लिए राहत की मांग
Buldhana, Maharashtra:धोंडी धोंडी पाणी दे...! पावसासाठी कवठळच्या महिलांचा आर्त टाहो...! Anchor : गेल्या तब्बल ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बुलढाणा जिल्ह्यातील कवठळ परिसरात शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढावलंय... पावसाअभावी पिकं वाळण्याच्या मार्गावर आहेत, तर दुसरीकडे विजेचा लपंडाव आणि अनियमित लोडशेडिंगमुळे शेतकरी पुरते हैराण झालेत. या संकटातून मार्ग काढण्यासाठी कवढळमधील महिलांनी चक्क डोक्यावर पाण्याने भरलेले हांडे घेत गावातून मिरवणूक काढली... आणि त्यानंतर महादेवाला जलाभिषेक करत जोरदार पावसासाठी साकडं घातलं. पिकं पूर्णपणे हातातून जाण्याची वाट न पाहता प्रशासनाने तातडीने शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे करावेत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरघोस आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी महिलांनी केली आहे. त्यासोबतच शेतीसाठी सुरळीत वीजपुरवठा करा आणि अनियमित लोडशेडिंग थांबवा, अशीही मागणी आहे. महागडी बियाणं, खतं आणि मशागतीचा खर्च करून उभं केलेलं पीक आता डोळ्यादेखत वाळतंय... महादेवाच्या चरणी महिलांनी साकडं घातलंय... आता सरकार आणि प्रशासन शेतकऱ्यांचा हा आक्रोश ऐकणार का हा महिलांचा प्रश्न आहे... Byte - शेतकरी महिला0
0
Report
Advertisement
सांगली में MD ड्रग्स जब्त, एक आरोपी गिरफ्तार
Sangli, Maharashtra:सांगलीच्या विटा येथे ४२ लाखांच्या किमतीचा एमडी ड्रग्ज जप्त; एकाला अटक. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली आहे. विटा-तासगाव रस्त्यावर एमडी ड्रग्जची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सापळा रचून एका संशयास्पद वाहनाची तपासणी केली असता ९६५ ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि रिकामे कॅप्सूल आढळून आले. यावर दत्तात्रय अंकुश पाखरे याला अटक करत ४२ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्राथमिक तपासानुसार सदर_MD ड्रग्ज हे केरळमधील कासारगोड येथून विक्रीसाठी आणल्याची माहिती समोर आली असून अधिक तपास चालू असलेल्या स्थितीमध्ये आहेत.0
0
Report
NCMC कार्ड अनिवार्यता 30 सितम्बर तक टाली गई; वरिष्ठ नागरिक और महिला यात्री अब भी छूट पाएंगे
Washim, Maharashtra:वाशीम: वरिष्ठ नागरिक और महिला प्रवाशांसाठी सवलतीची बातमी आहे. एसटी महामंडळाने सवलतीच्या प्रवासासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या NCMC कार्डची सक्ती आता ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे कार्ड नसले तरी ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना जुन्या पद्धतिने सवलतीचे तिकीट मिळणार आहे. NCMC कार्ड काढताना सर्व्हर डाऊन आणि तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांसह वाहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या तक्रारींची दखल घेत एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.0
0
Report
अनुराधा नक्षत्र पर गौरी आह्वान आज शाम आठ बजे
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - गुरुवारी अनुराधा नक्षत्रावर सायंकाळी आठपर्यंत करता येणार गौरींचे आवाहन - लाडक्या गणरायाचे मोठ्या उत्साहात स्वागत केल्यानंतर गुरुवारी होणार गौरींचे आगमन - गुरुवारी अनुराधा नक्षत्रावर सायंकाळी आठपर्यंत करता येणार गौरींचे आवाहन - गौरींचे आवाहन पूजन आणि गौरी विसर्जनबाबत पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली सविस्तर माहिती - शनिवारी मूळ नक्षत्रावर दिवसभरात केव्हाही करता येणार गौरींचे विसर्जन0
0
Report
Advertisement
