Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Oct 25, 2024 07:21:47
Yavatmal, Maharashtra
यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VNVishal Nagesh More
Mar 06, 2026 01:30:51
Malegaon, Maharashtra:युद्धाचा सध्या तरी पेट्रोल,डिझेल पुरवठ्यावर कोणताही परिणाम नाही.. मनमाडच्या पानेवाडी भागात असलेल्या इंडिया ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलिंयम प्रकल्पातुन टँकर माध्यमातून राज्यभरात सुरळीतपणे होतंय इंधन पुरवठा ANC :-इराण, अमेरिका, इस्रायल यांच्यात सूरू असलेल्या युद्धामुळे आखाती इराणसह देशातून केला जाणाऱ्या इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची दाट शक्यता मात्र मनमाड शहरा लगत असलेले भारत पेट्रोलियम, इंडिया ऑइल, हिंदुस्थान पेट्रोलियम आदी इंधन प्रकल्पातुन राज्याच्या वेगवेगळ्या भागात सुमारे एक हजार टँकरच्या माध्यमातून राज्यभरात सुरळीतपणे इंधन पुरवठा केला जात असून सध्या तरी कोणतीही इंधन टंचाई नसल्याचा ट्रान्सपोर्टरांचे म्हणणे आहे
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 06, 2026 01:16:14
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 06, 2026 01:15:57
Kalyan, Maharashtra:टिटवाळ्यात गाडी हळू चालव म्हणताच तुफान राडा; पाच ते सहा जणांच्या टोळीने घरावर हल्ला करत पूर्ण कुटुंबाला लोखंडी हत्याराने केली बेदम मारहाण... टोळीचा आतंग पाहता कुटुंबाने स्वतःला तब्बल अर्धा तास ठेवले कोंडून ... घटना सीसीटीव्हीत कैद; मारहाणीत तीन जण जखमी .... टिटवाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल पोलिस तपास सुरू.... परिसरात भीतीचे वातावरण कल्याण तालुक्यातील टिटवाळा आंबेकर चौक परिसरात किरकोळ कारणावरून मोठा राडा झाल्याची घटना समोर आली आहे. गाडी हळू चालव असे झुल्फेकर अली अब्दुल्ला खान याने सांगितल्याचा राग आल्याने पाच ते सहा जणांच्या टोळीने एका कुटुंबावर हल्ला करत घराची तोडफोड केली आणि बेदम मारहाण केली. या हल्ल्यात तीन जण जखमी झाले असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी कल्याण ग्रामीण टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहे
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 06, 2026 01:15:39
Ambernath, Maharashtra:चामटोली ग्रामपंचायतीच्या कागदपत्रांचे हेराफेरी प्रकरण ग्रामसेवकांसह दोन जणांवर गुन्हा दाखल कागदपत्र हाताळताना दोन भामट्यांना ग्रामस्थांनी रंगेहात पकडलं अंबरनाथ तालुक्यातील चामटोली ग्रामपंचायत कार्यालयात रात्रीच्या वेळेस घुसून कागदपत्र हाताळणाऱ्या दोन इसमांना ग्रामस्थांनी रंगेहात पकडलं होते. या प्रकरणात दोन आरोपींसह ग्रामपंचायतचे ग्रामसेवक कैलास ऐगडे यांच्यावर कुळगांव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .अंबरनाथ पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अनिल तडवी यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झाली नसली तरी ठाणे जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण कागदपत्रे पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केल्या नंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहेत. ग्रामविकास आधिकारी कैलास ऐगडे यांनी शंकर सौदागर बामणे, सचिन हरिदास मेहत्रे याच्या नावे कोणतेही शासकिय आदेश नसताना शासकिय सुट्टीच्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालय चामटोली येथे अनाधिकृत पणे प्रवेश करण्यास सागितले. आणि त्या ठिकाणी शासकिय दस्ताएवजाची हाताळणी केली. तसेच त्यानी स्वत: त्याठिकाणी हजर राहणे आपेक्षित असताना परस्पर अनाधिकृत व्यक्तिना त्या ठिकाणी पाठवले म्हणुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चामटोली ग्रामपंचायत हद्दीतील अनेक प्रकरण सुप्रीम कोर्टात असताना अशा प्रकारे कागदपत्रांचे वर्गीकरण करून ती गहाळ करण्याच्या हेतूने ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून झालेली परस्पर आणि बेकायदेशीर पडताळणी ही गंभीर बाब असून याप्रकरणी कैलास ऐगडे यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी तक्रारदार धनाजी ईरमाळी यांनी केली आहे.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Mar 05, 2026 14:46:07
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Mar 05, 2026 14:45:53
Baramati, Maharashtra:नीरा येथे जीबीएसचा धक्का : एकाचा मृत्यू शहरातून प्रशासन अलर्ट सर्वेक्षण सुरू पुणे जिल्ह्यातील नीरा येथे जीबीएस आजाराचा धक्का बसलाय . ५० वर्षीय मन्सूर सय्यद यांचा जिबीएस मुळे उपचारादरम्यान मृत्यू झालाय, तर ४६ वर्षीय कस्तुरी पटेल या महिला रुग्णाने वेळेवर उपचार घेत पूर्णपणे बरे होऊन घरी परतल्यात. जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलत घरोघरी सर्वेक्षण, पाणी तपासणी आणि सॅनिटरी सर्व्हेलन्स सुरू केले आहे. पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ चंद्रकांत वाघमारे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांनी घाबरू नये, मात्र पाणी उकळून प्यावे आणि लक्षणे दिसताच तातडीने उपचार घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 05, 2026 14:00:52
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर महानगरपालिकाेत काँग्रेसमधील दुफळी नाट्याचा दुसरा भाग आज बघायला मिळाला. स्थायी समितीचे सदस्य निवडण्यासाठी झालेल्या विशेष सभेत काँग्रेस गटनेते आणि आ. वडेट्टीवार समर्थक राजेश अडुर यांनी केवळ वडेट्टीवार समर्थकांचीच 7 नावे दिल्याने असंतोष उफाळून आला. यामुळे दुखावलेल्या खा. धानोरकर समर्थक नगरसेवकांनी सभात्याग करत अडुर यांचा निषेध केला. खा. धानोरकर समर्थक 9 नगरसेवकांनी चक्क पत्रकार परिषद घेत प्रदेशाध्यक्षांचे निर्देश डावलणाऱ्या राजेश अडुर यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली. पक्षासाठी रक्त आटवलेल्या नगरसेवकांना बाजूला सारत स्वतःच्या फायद्यासाठी मनमानी कारभार करणे सुरू असल्याचा आरोप खा. धानोरकर समर्थक नगरसेवकांनी केला. प्रदेश नेतृत्वाने राजेश अडुर यांच्या कृतीवर तातडीने हस्तक्षेप करत शिस्तभंगाची कारवाईची मागणी केली.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 05, 2026 13:19:19
Akola, Maharashtra:अकोल्यात माजी आमदार स्वर्गीय तुकाराम बिडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारे मानाचे ‘स्व. तुकाराम बिडकर त्रिस्तरीय पुरस्कार’ आज वितरीत करण्यात आले. शिक्षण, कला आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा या वेळी सन्मान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात ग्रामीण भागातील सुमारे ১০ हजार अभियंते आणि ७ हजार डॉक्टर्स घडविल्याबद्दल ललित काळपांडे यांना ज्ञानरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर ‘डेबू’, ‘महानायक’ आणि ‘सत्यशोधक’ यांसारख्या सामाजिक व वैचारिक चित्रपटांद्वारे समाजप्रबोधन केल्याबद्दल निलेश जळमकर यांना कलारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय ‘एकलव्य कला अकादमी’ च्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविल्याबद्दल सदानंद जाधव यांना क्रीडारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ग्रामीण भागातील तरुण पिढीला समाज आणि राष्ट्रनिर्मितीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्व. तुकाराम बिडकर यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांच्या कार्याची परंपरा पुढे चालू राहावी या उद्देशाने या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शत्रुघ्न बिडकर यांनी यावेळी दिली.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 05, 2026 13:00:50
Akola, Maharashtra:अकोला शहरातील रामनगर परिसरात गुरुवारी एका बंद पडलेल्या कॅफेमध्ये अचानक भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. सार्थक चिल्ड्रन हॉस्पिटलसमोर असलेल्या तीन मजली इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या ‘रोहित वडे वाला कॅफे’मध्ये ही आग लागली.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. काही वेळाच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले. दरम्यान कॅफेमध्ये ठेवलेले पाच गॅस सिलेंडर अग्निशमन दलाने सुरक्षितपणे बाहेर काढले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, याबाबत अधिक तपास सुरू आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 05, 2026 12:48:58
0
comment0
Report
Advertisement
Back to top