icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

संजय राऊत बोले: उद्धव सरकार गिराने के लिए पांच हजार करोड़ खर्च

Nanded-Waghala, Maharashtra:Anchor उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी पाच हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. नांदेड मध्ये युबीटी कडून तुमसे ना हो पायेगा हे जनआंदोलन करण्यात आले. यावेळी संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले. सुरतच्या होटलचं बिल 120 कोटी, गुहाहाटी हॉटेलचं बिल 68 कोटी, गोव्याच्या हॉटेलचं बिल 58 कोटी आहे, हे सगळ सरकार पाडण्यासाठीचा खर्च आहे अस संजय राऊत म्हणाले. पक्ष आणि चिन्ह शिंदेना देण्यासाठी निवडणूक आयोगाला त्यांनी साडे पाचशे कोटी रुपये दिले असा आरोप संजय राऊत यांनी केला. अमित शाह यांनी आमच्या पक्ष आणि चिन्हाचा सौदा केला अस राऊत म्हणाले. सरकार नामर्द आहे, सरकार मेलं आहे, हे सरकार डेडबॉडी आहे - संजय राऊत. तुमसे ना हो पायेगा याचा अर्थ सरकार नामर्द आहे अशी जहरी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. हे नाही करायचं ते नाही करायचं, यांच्याने काही होणार नाही. खुर्सी खाली करो शिवसेना आ रही है असं राऊत म्हणाले. लोकांचे, शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यात सरकार नामर्द ठरत आहे. या सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही. सरकार मेलय, डेडबॉडी आहे, ही डेडबडी आता उचलायला पाहिजे असा घनाघात राऊत यांनी केला.
0
0
Report

44 दिन बाद बारिश आई, पर किसानों को राहत नहीं मिली

Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यात तब्बल ४४ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पावसाने हजेरी लावली आहे. कारंजा,धनज, मनभा तसेच मंगरुळपीर तालुक्यातील पोटी आणि पारवा परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली.मात्र, महिनाभराच्या पावसाच्या खंडामुळे सोयाबीन,तूर आणि कापसाची पिकं वाळून पिवळी पडली आहेत. पिकांना सावरण्यासाठी मोठ्या पावसाची गरज असताना केवळ रिमझिम पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित दिलासा मिळालेला नाही. ४४ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाऊस आला, मात्र तोपर्यंत हातातोंडाशी आलेली पिकं करपल्याने शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे.
0
0
Report

मराठा आरक्षण के समर्थन में महिलाओं ने मुख्यमंत्री के कुलदैवत के सामने साकड़

Pandharpur, Maharashtra:मराठा समाजाचे आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुबुद्धी मिळावी यासाठी मराठा समाजातील महिलांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या कुलदैवत लक्ष्मी नरसिंह चरणी साकडं घातलं आहे पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर भीमा आणि नीरा नदीच्या संगमावर लक्ष्मी नरसिंह हे मुख्यमंत्र्यांचे कुलदैवत आहे. मागील काही दिवसांपासून जरांगे उपोषणाला बसलेत. सरकार कडून गांभीर्याने दखल घेत नाही. त्यामुळे माळशिरस तालुका व पंचक्रोशीतील मराठा समाजाच्या महिला भगिनीनी नीरा नृसिंहपूर येथील भगवान लक्ष्मी नृसिंह देवस्थानात जाऊन साकडे घातले. यावेळी मनोज जरांगे यांना दीर्घायुष्य मिळावे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या कुलदैवताने सुबुद्धी द्यावी आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल निर्णय घ्यावा असे साकडे घालण्यात आले
0
0
Report
Advertisement

म्हाडा ठेकेदारों का आक्रामक प्रदर्शन: बिल बकाया पर भारी पुलिस बंदोबस्त

Mumbai, Maharashtra:फ्लॅश - म्हाडा रिपेअरिंग बोर्डाच्या कंत्राटदारांचा म्हाडा विरोधात आक्रमक पवित्रा! - म्हाडा कडून दीड ते दोन वर्षांपासून कामाची कोट्यवधी रुपयांची बिले थकीत असल्याचा कंत्राटदारांचा आरोप - थकीत बिलांसाठी म्हाडा कार्यालयाबाहेर कंत्राटदारांचे जोरदार निदर्शन - बिलांची मागणी केल्यानंतर म्हाडा अधिकाऱ्यांनी गुंड पाठवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा कंत्राटदाराचा गंभीर आरोप - धमकीप्रकरणी खेरीवाडी पोलीस ठाण्यात एनसी दाखल - म्हाडा अधिकारी आणि धमकी देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी कंत्राटदार न्यायालयात - थकीत बिले एका महिन्यात अदा करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा - मागण्या मान्य न झाल्यास सामूहिक आत्मदहन करण्याचा कंत्राटदारांचा इशारा - म्हाडा प्रशासनाविरोधात कंत्राटदार आक्रमक; थकीत बिलांमुळे संताप - प्रकरणी म्हाडाची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्काचा प्रयत्न; मात्र अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही
0
0
Report

अंधेरी वेस्ट, वर्सोव्हा में प्रतिबंधित ई-सिगरेट के अवैধ विक्रेताओं पर ATS का बड़ा छापा

Mumbai, Maharashtra:मुंबईच्या अंधेरी पश्चिम परिसरातील वर्सोवा येथे प्रतिबंधित ई-सिगारेट आणि वेपच्या अवैध विक्रीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. यारी रोडवरील सिल्वर गेट बिल्डिंगमध्ये छापा टाकून पोलिसांनी तब्बल ५ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दहशतवाद विरोधी पथक अर्थात एटीसीच्या टीमने ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच ते साडेसहा वाजण्याच्या sुमारास ही कारवाई केली. या कारवाईत आरोपीच्या ताब्यातून तब्बल ३५७ वेप अर्थात इलेक्ट्रॉनिक सिगारेट जप्त करण्यात आल्या. याशिवाय वैधानिक चित्र आणि आरोग्यविषयक इशारा नसलेल्या प्रतिबंधित विदेशी सिगारेटही पोलिसांना आढळून आल्या. या प्रकरणी ३२ वर्षीय मोहम्मद बिफफातिमा कबीर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा सिगारेट विक्रेता असून तो यारी रोड येथील सिल्वर गेट बिल्डिंगमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीविरोधात इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध अधिनियम २०१९ तसेच सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम २००३ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच बीएनएसएसच्या कलम ३५(३) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रतिबंधित ई-सिगारेट आणि विदेशी सिगारेटचा पुरवठा नेमका कुठून होत होता आणि त्या पुढे कुठे वितरित केल्या जाणार होत्या, याचा तपास वर्सोवा पोलीस करत आहेत.
0
0
Report

बुलढ़ाणा जिले में 40 दिन से बारिश नहीं, किसान संकट में; drought घोषित की मांग

Buldhana, Maharashtra:बुलढ़ाणा जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी मोठ्या संकटात! अँकर - सुमारे ४० दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने बुलढाणा जिल्ह्यातील खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. कापूस, सोयाबीन, मका, तूर आणि ज्वारीसह अनेक पिके पाण्याअभावी करपू लागली असून, पिकांची वाढही खुंटली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेण्याची मागणी करत पुन्हई ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्ह्यामध्ये सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत द्या, अशी प्रमुख मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे. तसेच नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करावेत आणि पीकविमा भरपाई त्वरित मंजूर करावी, अशी मागणीही करण्यात आली. याबाबत तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं आहे. दरम्यान, शासनाने सात दिवसांत ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पुन्हई ग्रामस्थांनी दिला आहे. आता शासन या दुष्काळी परिस्थितीची किती गांभीर्याने दखल घेतं, याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
0
0
Report
Advertisement

गोकुळ दूध संघ के चुनाव बिनविरोध कराने की शौमिका महाडिक की मंशा पर उत्सुकता

Kolhapur, Maharashtra:आता एक महत्त्वाची बातमी कोल्हापुरातून. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची निवडणूक जाहीर झाल्या. भाजप नेत्या आणि गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी ज्या पद्धतीने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका बिनविरोध झाल्या त्याचप्रमाणे गोकुळ दूध संघाच्या निवडणुका देखील बिनविरोध व्हावी अशी इच्छा बोलून दाखवली आहे. खरंतर गोकुळच्या राजकारणात महाडिक गट काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलं होतं. पण आता गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी गोकुळच्या निवडणुका बिनविरोध व्हाव्या असं म्हटल्याने गोकुळच्या राजकारणाला नव्याने कलाटणी मिळते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सुरू असलेल्या राजकीय संघर्षाचा सर्वसामान्य सभासदांना त्रास होतो अशी भावना दूध उत्पादकांची आहे, त्यामुळे ह्या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी ज्येष्ठ नेत्यांनी प्रयत्न करायला हवेत असं देखील महाडिक म्हणाल्यात.
0
0
Report

गोकुळ महायुती में खींचतान, SIT जांच और गन्ना संकट पर सरकार का स्पष्टीकरण

Kolhapur, Maharashtra:हसन मुश्रीफ बाईट मुद्दे On गोकुळ गोकुळची निवडणूक महायुती म्हणूनच लढणार आहोत. चौदाशे संस्थाचालकांचा मेळावा झाला याची कल्पना नाही, पण चर्चा करून योग्य ते निर्णय घेऊ. कटू चर्चा व्हायला नको होती, सगळे सदस्य महायुतीचे असताना असं का घडलं हे अनाकलनीय आहे राज्यामध्ये भाजप हा मोठा भाऊ आहे, पण गोकुळच्या सदस्यांमध्ये राष्ट्रवादी हा मोठा भाऊ. जागा वाटपाचा तिढा मुख्यमंत्री योग्य पद्धतीने सोडवतील. On MPSC विद्यार्थी आमच्या महायुती सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. मुलांच्या प्रतिक्रिया ह्या तीव्र आहेत.. आम्ही कष्ट करतो मरमर मरतो अशा पद्धतीच्या त्यांच्या भावना आहेत. पारदर्शक परीक्षा झाल्या पाहिजे असvisi त्यांच्या भूमिका. ज्यांनी चुकीचं पाऊल उचलं त्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पाऊल उचलले आहे. On SIT म्हणजे टाइमपास कोणतीतरी चौकशी समिती नेमल्याशिवाय त्याचे निष्कर्ष बाहेर येणार नाहीत. विरोधकांचं कामच आहे कोणती कृती केली तर त्याच्यावर टीका करण्याची, ते काम ते प्रामाणिक करत आहेत. On गळीत हंगाम गेल्या वर्षी 34 रुपये दिले होते शंभर रुपये राहिले होते. अनेक कारखाने ते देत आहेत. आता जे साखरेचे दर वाढले होते ते कृत्रिम वाढले होते. त्यानंतर तो कमी आला. साखरेच्या दरावर ते पैसे मागत असतील तर त्यांच्यासोबत बसावं लागेल. त्यांना समजावून सांगावं लागेल कारखान्याला त्याचा फारसा फायदा झालेला नाही. योग्य ते एफआरपी कारखाने देत आहेत. On गळीत हंगाम 15 ऑक्टोंबर पासून राज्यामध्ये साखर टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे सणावाराचे दिवस आहेत. सरकारलाही पाऊल उचलावं लागलं आहे. ऑन पार्थ पवार अमेडीया कंपनी हे न्यायालयीन प्रकरण आहे.. न्यायालयात झालेला आहे.. मी यावर उत्तर देना अपेक्षित नाही. On जरांगे पाटील त्यांना अपेक्षित असणारे सर्व निर्णय सरकारने घेतले आहेत.. समिती बरखास्त करा याबद्दलचा प्रश्न फक्त राहिला आहे. समिती बरखास्त करता येईल की नाही याबद्दल सरकारला शंका आहे.
0
0
Report

साखर दरवाढ के पीछे कृत्रिम फायदा? केंद्र जांच कर रहा है

Pune, Maharashtra:पुणे बाईट हर्षवर्धन पाटील पुण्यात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ अध्यक्ष हर्षवर्धन पाटील पुरस्कारांची घोषणा करताहेत साखर महासंघाचा मानाचा पहिला जीवनगौरव पुरस्कार माजी मंञी कलाप्पा आवाडे यांना जाहिर झालाय... मध्यंतरी साखरेच्या बाजारपेठेत जी कुञित भाववाढ झाली त्याचा फायदा आम्हा साखर कारखानदारांना झालेली नाही याउलट ग्राहकांना माञ, चढ्या दराने साखर खरेदी करावी लागली, त्यामुळे कृञिम साखर दरवाढीची चौकशी व्हावी, अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केलीय यंदाच्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे साखर कारखानदारी फारशी समाधानकारक परिस्थिती नसणार हे बाजारपेठेत साखरेचा दर 60 प्रतिकिलो असला तरी कारखान्याचे साखर खरेदी टेंडर हे 42 ते 45 रुपयांनी निघताहेत...ही वस्तुस्थिती हे नुकतीच झालेली साखर दरवाढ टंचाई ही कृत्रिम याचा फायदा साखर कारखाना किंवा शेतकरी यांना झाला नाही.याबाबत केंद्र सरकार चौकशी करत आहे.
0
0
Report
Advertisement

गणेशोत्सव के लिए कोकण पहुंचते यात्री भारी ट्रैफिक जाम के खतरे में

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास यंदाही खडतर.. मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची गर्दी वेगाने वाढतेय,मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील रस्त्यांची अपूर्ण कामं चाकरमान्यांची परीक्षा पाहणार आहेत... विशेषतः चिपळूण ते लांजा या पट्ट्यात सेवा रस्ते आणि उड्डाणपुलांची कामं रखडल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागू शकतो. मुंबई, ठाणे आणि पुण्यातून हजारो वाहने एकाच वेळी कोकणात दाखल होत असल्याने या भागात वाहनांचा वेग कमालीचा मंदावणार आहे.. परंतु, वाकेड ओलांडल्यानंतर सिंधुदुर्गच्या दिशेने जाणारा रस्ता मात्र तुलनेने सुरळीत आणि वेगवान असणार आहे.. नेमकी कोणत्या ठिकाणी कोंडी होण्याची शक्यता आहे आणि रस्त्याची कामं कुठे अपूर्ण आहेत, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून... ग्राफिक्स प्लेट १: वाहतूक कोंडीची संभाव्य ठिकाणे (Bottlenecks) ▫️लव्हेल उड्डाणपूल परिसर ▫️​चिपळूण उड्डाणपूल परिसर ▫️​संगमेश्वर पुलाजवळ ​निवळी पूल ▫️​लांजा पूल ग्राफिक्स प्लेट २: महामाग्रावरील अपूर्ण कामांचा तपशील टप्पा / पट्टाअपूर्ण.....रस्त्याचे अंतर ▫️चिपळूण ते आरवली....५९५ मीटर ▫️आरवली ते काटे....५७० मीटर ▫️काटे ते वाकेड....१५० मीटर त्यामुळे या पट्ट्यातून प्रवास करताना चाकरमान्यांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागण्याची शक्यता असल्याने चालकांनी संयमाने वाहन चालवावं आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावं,असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे..
0
0
Report

सोलापुर: दो गुटों के मारपीट से 35 वर्षीय सद्दाम अमलीचुंगे की मौत; 5 गिरफ्तार

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - वळसंग गावात दोन गटात झालेल्या हाणामारीत जखमी झालेल्या एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग गावात दोन गटात झालेल्या हाणामारीत जखमी झालेल्या एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू सद्दाम अमलीचुंगे असे मृत्यू झालेल्या 35 वर्षीय तरुणाचे नाव दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग गावात बुधवारी संध्याकाळी दोन गटात मोठा वाद झाला होता यामध्ये 25-30 जणांच्या टोळक्याने दगडफेक करत काठ्या, रॉडसह सद्दाम अमलीचुंगे यांना जबर मारहाण केली होती या मारहाणीत सद्दाम अमलीचुंगे यांच्यासह 5-6 जण जखमी झाले होते, मात्र उपचारादरम्यान सद्दाम याचा मृत्यू झाला या प्रकरणी 20-25 जणांवर वळसंग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय, आतापर्यंत 5 आरोपीना पोलिसांनी अटक केली असून उर्वरित आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरूय बाईट : नातेवाईक
0
0
Report

महाराष्ट्र: MPSC सचिवों के चेहरे काले करने पर कार्रवाई की चेतावनी

Dharashiv, Maharashtra:धाराशिव MPSC सचिवांच्या तोंडाला काळे फासल्याप्रकरणी कारवाईचा इशारा! संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करणार – गृहराज्यमंत्री योगेश कदम MPSC चे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळे फासल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिला आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी MPSC सचिवांच्या तोंडाला काळे फासल्याची घटना समोर आल्यानंतर या प्रकरणावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा प्रकारे कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं कदम यांनी स्पष्ट केलंय. तसंच भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी विशेष खबरदारी घेतली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. बाईट – योगेश कदम, गृहराज्यमंत्री, महाराष्ट्र शासन
0
0
Report
Advertisement

चंद्रपुर के बैंक कर्मचारी पांच दिवसीय हफ्ते की मांग पर बेमुदत बैंकिंग बंद आंदोलन का आह्वान

Chandrapur, Maharashtra:आम्ही माणसं आहोत, यंत्र नाही, पाच दिवसांचा आठवडा मागणी पूर्ण करा, अन्यथा 25 ऑक्टोबरपासून बेमुदत बँकिंग व्यवस्था बंद आंदोलन पुकारलं. चंद्रपुरात यूनायटेड फोरम ऑफ बैंकिंग यूनियनच्या वतीने बँका बंद ठेवत SBI मुख्य शाखेसमोर निदर्शने केली. बँक कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे, मात्र त्याला अनुरूप भरती नसल्याने प्रत्येक कर्मचाऱ्यावर मोठे ओझे आहे. यात सरकारी योजनांमध्ये वाढ झाल्याने यात भर पडली आहे. अतिताणामुळे मानसिक आरोग्य देखील बिघडत चालले आहे. कुटुंबाला देण्यासाठी वेळ नसल्याने अकरा वर्षांपासून पुढे रेटलेली पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी रास्त असल्याचे आंदोलक कर्मचाऱ्यांचे मत आहे. गेली काही वर्षे बँकिंग व्यवस्थेत होणाऱ्या घोटाळ्यांमुळे आम्ही रस्त्यावर आलो असल्याचे आंदोलक म्हणाले.
0
0
Report

पनवेल में गणेशोत्सव के दौरान ट्रैफिक के लिए पुलिस का मास्टर प्लान लागू

Navi Mumbai, Maharashtra:गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई वाहतूक विभाग सज्ज झालाय. मुंबई पुणे महामार्ग आणि मुंबई गोवा महामार्गाची सुरुवातच पनवेल मधून होतं असल्याने गणेशोत्सव दरम्यान पनवेल मध्ये मोठी वाहतूक कोंडी होतं असते. यंदा वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रमुख मार्गांवर अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यासोबतच वाहतकीचे नियोजन करण्यात आलेय. रस्त्यांची कामे, खड्डे बुजवणे, रस्ता रुंदीकरण ही कामे गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेत. याशिवाय शहरातील ट्रॅफिक हॉटस्पॉट, अपघातप्रवण ब्लॅक स्पॉट आणि प्रमुख वाहतूक मार्गांचे विश्लेषण करण्यात आले असून, अपघात तसेच वाहतूक कोंडी रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल खाडे यांनी व्यक्त केले.
0
0
Report

अकोला की नेहा देशमुख ने रोजगार योजना से अपना उद्योग शुरू किया, 5 युवाओं को रोजगार मिला

Akola, Maharashtra:अकोल्यातील नेहा देशमुख यांनी योजनेचा लाभ घेत कृत्रिम दात निर्मितीचं युनिट सुरू केलं आहे. विशेष म्हणजे, स्वतःचा उद्योग उभारण्यासोबतच त्यांनी तब्बल पाच युवकांना रोजगाराची संधी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे. अकोल्यातील नेहा देशमुख... बारावीनंतर त्यांनी डेंटल मेकॅनिकचं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर बी.कॉम.ची पदवी पूर्ण केली. आपल्या शिक्षणाचा आणि कौशल्याचा उपयोग करून काहीतरी वेगळं करण्याची त्यांची इच्छा होती. 2012 मध्ये त्यांनी अगदी छोट्या स्वरूपात मॅन्युअल डेंटल लॅबोरेटरीचा सेटअप सुरू केला. मात्र उद्योगाचा विस्तार करण्यासाठी आवश्यक असलेलं भांडवल आणि आधुनिक यंत्रसामग्री हे मोठं आव्हान होतं. अशातच राज्य सरकारच्या मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमाची माहिती मिळाल्यानंतर नेहा देशमुख यांनी उद्योग उभारणीसाठी जिल्हा उद्योग केंद्राकडे जानेवारी महिन्यात आवश्यक कागदपत्रे सादर केली. शासकीय योजनेच्या माध्यमातून त्यांना एप्रिल महिन्यात २५ लाखांचं कर्ज मंजूर झालं आणि त्यानंतर मे महिन्यात त्यांच्या कृत्रिम दात निर्मिती युनिटला प्रत्यक्ष सुरुवात झाली. नेहा देशमुख , लाभार्थी पूर्वी त्यांच्या उद्योगाची वार्षिक उलाढाल साधारण १५ ते २० लाख रुपयांपर्यंत होती. मात्र शासकीय योजनेच्या माध्यमातून उद्योगाला मिळालेल्या चालनेनंतर कामाचा वेग वाढला असून यंदा उलाढाल २५ लाख रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. नेहा देशमुख यांच्या उद्योगाला मिळालेल्या या बळाचा परिणाम त्यांच्या कुटुंबांच्या मर्यादित राहिलेला नाही. त्यांच्या पतीकडून पूर्वी इन्शुरन्स प्रतिनिधी म्हणून काम केलं जातं होतं. मात्र पत्नीच्या उद्योगाला मिळालेल्या शासकीय पाठबळानंतर त्यांनी इन्शुरन्स प्रतिनिधीचं काम सोडून पत्नीच्या व्यवसायात साथ देण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, हा उद्योग आता केवळ एका कुटुंबाच्या आर्थिक स्वावलंबनाचं माध्यम राहिलेला नाही, तर रोजगारनिर्मितीचं केंद्रही बनला आहे. नेहा देशमुख यांनी आपल्या उद्योगातून पाच युवकांना रोजगारांची संधी दिली आहे. नेहा देशमुख , अभिषेक देशमुख यांचे पती सरकारच्या योजना केवळ कागदावर न राहता त्यांचा प्रत्यक्ष लाभ उद्योजकांपर्यंत पोहोचला, तर त्यातून स्वयंरोजगारासोबतच रोजगारनिर्मितीही होऊ शकते... अकोल्यातील नेहा देशमुख यांचा प्रवास याचं उदाहरण ठरत आहे. मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळालेल्या आर्थिक पाठबळामुळे एका महिलेने स्वतःचा उद्योग उभा केला... उद्योगाचा विस्तार केला आणि आज पाच युवकांना रोजगारही दिला. त्यामुळे ‘स्वयंरोजगारातून रोजगारनिर्मिती’ या संकल्पनेला अकोल्यातून प्रत्यक्ष बळ मिळताना दिसत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top