445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
धाराशिव महायुती में मतभेद उजागर; ओमराजे निंबाळकर व तानाजी सावंत कार्यक्रम से बाहर
Dharashiv, Maharashtra:धाराशिव जिल्यात महायुती मधील मतभेद चव्हाट्यावर आपला जीव धाराशिव या जिल्हापरिषद च्या कार्यक्रमातुन खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार तानाजी सावंत यांना वगळले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या दौऱ्या निमित्ताने स्वागतासाठी भारतीय जनता पार्टी व जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांच्या कडून लावण्यात आले बॅनर बॅनर वरून खासदार ओमराजे निंबाळकर आमदार तानाजी सावंत यांचे फोटो वगळले केवळ पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा फोटो टाकला जिल्हा परिषदवर महायुती ची सत्ता तानाजी सावंत यांच्या 12 सदस्य व शिवसेना पक्ष्यांच्या 8 सदस्यानि पाठिंबा च्या जोरावर अर्चना पाटील आहेत अध्यक्ष तर खासदार ओमराजे निंबाळकर हे महायुती मध्ये सामील झाले असताना त्यांना ही कार्यक्रम पासून ठेवले दूर खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यकर्त्यांत नाराजी कार्यक्रमा वर बहिष्कार टाकण्याची चर्चा0
0
Report
चंद्रपूर जिले में 585 प्राथमिक शिक्षकों की भर्ती प्रक्रिया तेज़, पवित्र पोर्टल पर विज्ञप्ति
Chandrapur, Maharashtra:टायटल:---'पवित्र'वर शिक्षक भरतीची घंटा; ५८५ नव्या शिक्षकांची मिळणार सेवा शिक्षकांच्या रिक्त पदांवर तोडगा चंद्रपूर जिल्हा परिषदेने केली २५१ सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती अँकर: चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शिक्षक भरती प्रक्रियेला गती दिली असून, महाराष्ट्र शासनाच्या पवित्र पोर्टलवर primary शिक्षकांच्या ५८५ पदांची जाहिरात अपलोड केली आहे. मागील सहा महिन्यांपासून शासन निर्णयातील तरतुदींनुसार बिंदुनामावली तयार करण्याचे काम पूर्ण केल्यानंतर ही प्रक्रिया पुढे नेण्यात आली आहे.पवित्र पोर्टलवरील तांत्रिक तपासणी पूर्ण झाल्यानंतर या ५८५ पदांसाठी पवित्र पोर्टलअंतर्गत परीक्षा दिलेल्या पात्र उमेदवारांना पर्याय भरण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पुढील एक ते दीड महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.0
0
Report
NEET में कम अंकों से मानसिक तनाव, जलालपूर की छात्रा अंकिता सांगळे ने आत्महत्या
Ahilyanagar, Maharashtra:NEET परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे Ahilyanagar च्या कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील अंकिता सांगळे या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे...अंकिता ला NEET परीक्षेमध्ये 166 गुण मिळाले आहेत... अपेक्षित गुण मिळाले नाहीत म्हणून मानसिक तणावात तिने शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे घरच्यांचे म्हणणे आहे...अंकिता हिला अभ्यासासाठी स्वतंत्र खोली देण्यात आलेली होती आणि ती त्यामध्येच बसून अभ्यास करत होती...बराच वेळ झाला तिचा काही आवाज किंवा हालचाल दिसली नाही म्हणून तिच्या घरच्यांनी खोलीचा दरवाजा उघडून पाहिलं तर अंकिताने गळफास घेतल्याचे समोर आले... अंकिताच्या आत्महत्यामुळे घरातील कुटुुंब अस्वस्थ झाल आहे0
0
Report
Advertisement
कल्याण-नगर महामार्ग पर शराबी पिकअप चालक ने मचाया धूम, लोगों की सुरक्षा दांव पर
Shirur, Maharashtra:कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर महामार्गावर शिवळे गावाजवळ एका मद्यधुंद पिकअप चालकाने अक्षरशः धुमाकूळ घातल्याचा अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे.भरधाव पिकअप घेऊन चालकाने रस्त्यावरील नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ मांडला. या बेफाम गाडीने रस्त्यावरून जाणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना हुलकावणी दिली, मात्र सुदैवाने हे दुचाकीस्वार थोडक्यात बचावले आणि एक मोठी दुर्घटना टळली.चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचे आणि गाडी नागमोडी वळणे घेत असल्याचे पाहुन, पाठीमागून येणाऱ्या इतर वाहनधारकांनी आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत या पिकअप चालकाला अडवले. गाडी थांबवून पाहणी केली असता चालक नशेत धुंद असल्याचे उघड झाले. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली असून, रस्त्यावर इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या अशा बेजबाबदार चालकावर कडक कारवाई करण्याची जोरदार मागणी आता केली जात आहे.0
0
Report
यवतमाल के रालेगांव में कर्जमाफी सूची में नाम न आने पर किसान ने आत्महत्या कर ली
Yavatmal, Maharashtra:शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याने यवतमाळ च्या राळेगाव तालुक्यातील भांब इथल्या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. शासनाने कर्जमाफीची घोषणा करून अनेक दिवस उलटले आहे, कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी देखील जाहीर झाली, मात्र या यादीत नाव न आल्याच्या नैराश्यातून कर्जबाजारी शेतकरी राजू चुहुके यांनी विष प्राशन करून जीवन संपवले. राजू चुहुके यांच्या कडे चार एकर शेती आहे. त्यांच्याकडे थकित कर्ज असल्याने कर्जमाफीच्या यादीत नाव येईल या आशेने ते मध्यवर्ती बँकेत गेले होते. मात्र यादीत त्यांचे नाव नव्हते. तेव्हापासून ते चिंतेत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. मयत राजू चुहुके यांच्या मागे पत्नी आणि दोन लहान मुले आहेत.0
0
Report
नागपुर-जबलपुर राजमार्ग के मनसर पुल पर बड़ा खड्ड, यातायात कुछ समय के लिए रोक
Nagpur, Maharashtra:नागपूर–जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील मनसर येथील उड्डाणपुलावर अचानक रस्त्याचा मोठा भगदाड पडलं आहे. या घटनेत रस्ता तुटून आतील लोखंडी सळ्या आणि काँक्रीट उघडे पडले असून वाहनचालकांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून वाहतुकीवर काही काळ निर्बंध लागू केले आहेत. स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) तातडीने दुरुस्ती करून संपूर्ण उड्डाणपुलाच्या गुणवत्तेची सखोल चौकशी करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.0
0
Report
Advertisement
तडवळे के बैलगाड़ी पर दिल्ली आंदोलन की झलक, कला से सामाजिक संदेश
Satara, Maharashtra:सातारा -ज्याच्या खांद्यावर शेतकऱ्याचं आयुष्य उभं राहतं... ज्याच्या घामावर शेती फुलली... आणि ज्याला आपल्या घरातील सदस्याप्रमाणे जपलं जातं, त्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बेंदूर सण. परंपरा, संस्कृती and शेतकऱ्यांच्या भावविश्वाशी जोडलेला हा सण यंदा सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील तडवळे गावात एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. या गावातील बैलजोडीच्या अंगावर दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनाचे चित्र साकारत सामाजिक संदेश देण्याचा अनोखा प्रयत्न या गावातील चित्रकार निवास कांबळे यांनी केला आहे. परंपरेला आधुनिक सामाजिक जाणीवेची जोड देणारा हा उपक्रम पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असून, या अनोख्या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.0
0
Report
बिबट्यों के खतरे से परेशान किसानों ने दुग्ध पशुओं के लिए बंद गोठा बनवाया
Niphad, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील देवगाव हे गाव द्राक्ष, ऊस आणि दुग्ध व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, या परिसरात वाढलेल्या बिबट्यांच्या वावरा मुळे शेतकरी चिंतेत आहेत. बिबट्यांनी पाळीव जनावरांवर हल्ले करून अनेक जनावरे ठार केल्याच्या घटना घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर दुग्ध उत्पादक शेतकरी प्रशांत कुलकर्णी यांनी आपल्या गाईंच्या सुरक्षेसाठी बंदिस्त गोठा उभारला आहे. गोठ्यात जनावरांना त्रास होऊ नये म्हणून हवा खेळती राहण्यासाठी फॅनची ही व्यवस्था करण्यात आली आहे. बिबट्यांच्या धोक्यामुळे शेतकऱ्यांनी सुरक्षिततेचा हा नवा मार्ग स्वीकारल्याचे चित्र देवगाव मध्ये पाहायला मिळत आहे. या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी0
0
Report
दापोली-रत्नागिरी में 115 किलोग्राम टाकाऊ जाल हटाकर समुद्री जीवों को राहत
Ratnagiri, Maharashtra:दापोली-रत्नागिरीसमुद्रकिनाऱ्यावरील खडकांमध्ये अडकलेली तब्बल ११५ किलो टाकाऊ मासेमारीची जाळी हटवून सागरी जीवांना मोठा दिलासा देण्यात आला.. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे समुद्रकिनारी वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली जागतिक कांदळवन दिनानिमित्त ‘घोस्ट नेट हटाव’ मोहीम राबवण्यात आली.. समुद्रकिनाऱ्यावरील खडकांमध्ये अडकलेली तब्बल ११५ किलो टाकाऊ मासेमारीची जाळी हटवून सागरी जीवांना मोठा दिलासा देण्यात आला.. या मोहिमेत वनविभागाचे अधिकारी व कर्मचारीही सहभागी झाले.. सागरी जैवविविधतेचे संरक्षण,प्रदूषण रोखणे आणि किनारपट्टी स्वच्छ ठेवण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला..0
0
Report
Advertisement
सरकार ने ग्रामीण इलाकों में सीधे सेवाएं देकर भ्रष्टाचार रोकने का संकल्प जताया
Ratnagiri, Maharashtra:दापोली - रत्नागिरी राज्यमंत्री योगेश कदम ग्रामीण भागातील अशिक्षित नागरिकांची पिळवणूक आता खपवून घेतली जाणार नाही. गावागावात नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेणाऱ्यांना सरकारचा इशारा. हे काम मी करून देतो म्हणत फसवणाऱ्यांवर अप्रत्यक्ष निशाणा. सातबारा दुरुस्तीसारख्या साध्या कामासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागू नयेत. महसूल कार्यालयाच्या फेऱ्यांमुळे होणारा नागरिकांचा त्रास संपवण्याचा सरकारचा निर्धार. अनावश्यक कागदपत्रांच्या नावाखाली होणारी पिळवणूक थांबवण्यावर भर. Ashिक्षित आणि सर्वसामान्य नागरिकांना थेट शासकीय सेवा देण्यावर सरकारचा भर. 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान' नागरिकांसाठी दिलासादायक उपक्रम. 'समाधान शिबिरां'मधून एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा उपलब्ध. नागरिकांची कामे दलालांशिवाय आणि पारदर्शक पद्धतीने व्हावीत, ही सरकारची भूमिका. जनतेच्या साधेपणाचा गैरफायदा घेणाऱ्यांचे प्रकार थांबलेच पाहिजेत. शासनाच्या योजना आणि सेवा थेट जनतेच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प. 'नागरिकांना हेलपाटे नव्हे, तर थेट न्याय' हा सरकारचा संदेश.0
0
Report
जनते की योजनाओं को अंतिम तक पहुंचाने के लिए कठोर कार्रवाई के निर्देश योगेश कदम
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..अधिकाऱ्यांना वारंवार सांगून काम झाले नाही तर माझ्या अंगात रामदास भाई येतात अशा शब्दात योगेश कदम यांनी अधिकाऱ्यांना जनतेच्या योजनेसंदर्भात स्पष्ट शब्दात दापोलीत सुनावले ,छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर दाखले वाटप कार्यक्रमात ते बोलत होते शासन आणि प्रशासनात समन्वय असेल, तरच जनतेला न्याय मिळेल. शासन आणि प्रशासन हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. माझी काम करण्याची पद्धत स्पष्ट आणि शिस्तबद्ध आहे. पहिल्यांदा अधिकाऱ्यांना नम्रपणे समजावून सांगतो. दुसऱ्यांदा स्पष्ट शब्दांत शेवटचा इशारा देतो. तरीही काम झाले नाही, तर माझा रुद्रावतार पाहायला मिळतो. मग माझ्यात रामदासभाई कदम उतरतात,असे मिश्कील पण ठाम वक्तव्य. तिसऱ्याDा सांगण्याची वेळ आली, तर मग मागेपुढे पाहत नाही. कर्तव्यात कसूर करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही. जनतेच्या कामात अडथळा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई अपरिहार्य. शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलाच पाहिजे. अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख आणि जबाबदारीने काम करावे, असे स्पष्ट निर्देश. जनतेच्या हिताशी तडजोड अजिबात सहन केली जाणार नाही. काम करणाऱ्यांना पूर्ण पाठबळ, पण दिरंगाई करणाऱ्यांना माफी नाही.0
0
Report
गंगा-गोदावरी पूजन के साथ कावनाई में वैदिक मंत्रोच्चार और भूमिपूजन सम्पन्न
Nashik, Maharashtra:ब्रेकिंग इगतपुरी तालुक्यातील कावनाईच्या क्षेत्र कपिलधारा येथे पार पडले गंगापूजन सिंहास्थ सोहळ्याच्या निमित्ताने कुंभमेळ्याचे मानले जाते मूळ स्थान गंगा गोदावरी पूजनाप्रसंगी वैदिक तिथीनुसार भूमिपूजनयावेळी उपस्थित होते साधू महंत पुढील महिन्यात पार पडणार आहे नाशिक त्रंबकेश्वर चे ध्वजारोहण या पार्श्वभूमीवर गोदावरी कपिला नद्यांच्या पवित्र संगम स्थळी सांख्य योगाचे उगमस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सगळ्यात वैदिक मंत्र उच्चार धार्मिक विधी करण्यात आले जिल्ह्यातील अधिकारी लोकप्रतिनिधी होते उपस्थित0
0
Report
Advertisement
लातूर-उमरगा हाईवे पर अंधेरा, यात्रियों को खतरा; नागरिकों ने तात्कालिक पथदिवे शुरू करने की मांग
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... लातूर-उमरगा महामार्गावर अपघातांचा धोका वाढला.... किल्लारीच्या ग्रामीण रुग्णालयासमोर अंधाराचं साम्राज्य... पथदिवे तात्काळ सुरू करण्याची मागणी.... लातूर-उमरगा महामार्गावरील किल्लारी परिसरात बंद पथदिव्यांमुळे वाहनधारकांचा प्रवास धोकादायक बनला आहे. विशेषतः ग्रामीण रुग्णालयासमोरील पथदिवे सातत्याने बंद असल्याने रात्री या परिसरात अंधाराचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. महामार्गालगतच ग्रामीण रुग्णालय असल्याने रुग्ण, नातेवाईक आणि नागरिकांची सतत ये-जा असते. मात्र अंधारामुळे या परिसरात वारंवार अपघात होत असून काही अपघातांमध्ये जीवही गेले आहेत. त्यामुळे आणखी एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता प्रशासनने तात्काळ पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे...0
0
Report
गणेशोत्सव के लिए कोकण रेलवे ने विशेष गाड़ियाँ और नए स्टॉप घोषित किए
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. गणेशोत्सवात गावी जाण्याची चिंता मिटली.. कोकण रेल्वेची मोठी भेट..विशेष गाड्या,नवीन थांब्यांची घोषणा.. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या लाखो चाकरमान्यांसाठी आणि गणेश भक्तांसाठी कोकण रेल्वे व मध्य रेल्वेने मोठा दिलासा दिया है.. यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त विशेष रेल्वे गाड्या,मेमू सेवा और काही महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना नवीन थांबे जाहीर करण्यात आले आहे.. त्यामुळे मुंबई,ठाणे,दिवा,पुणे और इतर शहरातून कोकणात येणाऱ्या प्रवाश्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार है..0
0
Report
सातारा में नेर फाटा के पास ट्रक-कार भिड़ंत: विजय भोसले और पत्नी की मौत, बेटा बच गया
Satara, Maharashtra:सातारा: कोरेगाव–पुसेगाव मार्गावरील नेर फाटा परिसरात एका पेट्रोल पंपाजवळ रात्री अडीच वाजता आयशर ट्रक आणि कारची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात पुसेगाव येथील विजय भोसले आणि त्यांची पत्नी समृद्धी भोसले यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर त्यांचा मुलगा बचावला आहे. ओव्हरटेक करताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असून, पुसेगाव पोलिस पुढील तपास करत आहेत.0
0
Report
Advertisement
