445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
गणेशोत्सव सजावट के दौरान विद्युत धक्का से संगमेश्वर में युवक की मौत
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. गणपती सजावटदरम्यान विजेचा तीव्र धक्का लागून संगमेश्वरमधील ३६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू.. अँकर संगमेश्वर तालुक्यातील मुरडव-सुतारवाडी येथे गणेशोत्सवाच्या सजावटीदरम्यान विजेचा जोरदार धक्का लागून सहस विष्णू केळकर या ३६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.. घरात विजेचे तोरण लावत असताना हा अपघात घडला.. उपचारासाठी तातडीने डेरवण येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.. या प्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे..0
0
Report
चंद्रकांत हंडोरे का सरकार पर हमला: मराठा छात्रों के लिए ओबीसी आरक्षण में कटौती नहीं चाहिए
Yeola, Maharashtra:खासदार व माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे ऑन मनोज जरांगे पाटील आंदोलन ओबीसींचे आरक्षण कायम ठेवून सरकारने वेगळ्या पद्धतीने मराठा समाजातील मुलांसाठी आरक्षणाची तरतूद करावी. तीन वर्षात जरांगे पाटलांची अनेक उपोषण झाली सरकारने आश्वासनांचे नुसते हरताळ फासले आहे. त्यामुळे जरांंगे पाटील आता पेटून उठले आहे आमचे म्हणणे एवढेच आहे की ओबीसी आरक्षणामध्ये कुठलीही काटछाट न करता मराठा समाजातील मुलांसाठी आरक्षण द्यावे आमचा त्याला पाठिंबा राहील. खासदार व माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे ऑन सरकारचे अपयश विद्यार्थी आंदोलन. सरकार राजकारणात मशगुल आहे विद्यार्थ्यांचा ज्याप्रमाणे विचार करायला पाहिजे त्याप्रमाणे होत नाहीये. म्हणून जंतर-मन्त्रचे आंदोलन असेल आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन असेल PhD विद्यार्थ्याचे पुण्यातील आंदोलन असेल ही आंदोलन सरकारच्या दुर्लक्षितपणामुळे सुरू झाली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमध्ये साप घусayo काय..! चावतो काय..! विद्यार्थी जखमी होतो काय मृत्युमुखी होतो काय..! माझ्या कार्यकाळात मी महाराष्ट्रामध्ये फाईव्ह स्टार हॉटेल बांधली माझे स्वप्न होते आमच्या विद्यार्थ्यांना घर मिळत नाही अभ्यास करायला जागा मिळत नाही म्हणून मी महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांसाठी 150 हॉस्टेल बांधली त्यामागे माझा हेतू विद्यार्थी शिकले पाहिजे हा होता. विद्यार्थी आंदोलन हे सरकारचे फेल्युअर आहे. खासदार व माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे ऑन सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांचा निधी इतर योजनांसाठी वळवला. मी सामाजिक न्याय मंत्री असताना स्कॉलरशिपचा मोठा भाग आम्ही विद्यार्थ्यांसाठी खर्च करत होतो मात्र सरकारने सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीण योजना व इतर योजनांसाठी पळवण्याचं कट करास्थान चालू ठेवला आहे ते बंद करा. आदिवासी विभाग व सामाजिक न्याय विभागाचा निधी 100% खर्च झाला पाहिजे. मी मंत्री असताना हा निधी लॅप्स होऊ दिला नाही मात्र तुम्ही आता 100% निधी हा वापरला पाहिजे. लाडक्या बहिणी सारख्या योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर तर भार पडलाच आहे मात्र सामाजिक न्याय विभागाच्या निधीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न होत आहे लाडक्या बहिणी बद्दल आम्हाला आकस नाही मात्र सरकारने अर्थसंकल्पात तशी तरतूद करावी. सात आठ लाख कोटी कर्ज घेतलं आणखी दोन लाख कोटी घ्या महिलांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या रोजगारासाठी पैसे उपलब्ध करून द्या. काही योजनांमुळे आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे म्हणून आमची विनंती आहे लाडक्या बहिणींना जरूर मदत करा मात्र अर्थसंकल्पात तरतूद करून0
0
Report
चंद्रपुर के पुलिस उपनिरीक्षक की CPR से जिंदगी बची, 30 मिनट बाद हालत स्थिर
Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपुरात हृदयविकाराचा जोरदार झटका आलेल्या पोलिस अधिकाऱ्याचा अर्धा तास CPR दिल्यानंतर वाचला जीव , पोलीस उपनिरीक्षक सुशील सरकार याच्या बाबतीत दैव ठरले बलवत्तर, डॉक्टर स्वप्निल पुणेकर यांच्या तत्परतेने केली कमाल अँकर:-- गणेशोत्सवाच्या कडक बंदोबस्ताची थकवणारी ड्यूटी संपवून घरी आलेल्या सुशील सरकार नामक चंद्रपूरच्या पोलिस उपनिरीक्षक अधिकाऱ्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टर अनुप वासाडे यांनी त्यांना चंद्रपुरातील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. स्वप्नील पुणेकर यांच्या रुग्णालयात रेफर केले. रुगणाकडे जाताना त्यांची प्रकृती आणखीच बिघडली. त्यामुळे ते रुग्णालयात पोहोचताच ओपीडी काउंटरवर जाऊन पडले. डॉ. स्वप्नील पुणेकर यांना कळताच त्यांनी येऊन तपासणी केली असता, सरकार यांच्या हृदयाचे ठोके पूर्णपणे थांबले होते. वैद्यकीयदृष्ट्या रुग्ण हाताबाहेर गेल्याची स्थिती असतानाही डॉ. पुणेकर आणि त्यांच्या पथकाने हार मानली नाही. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ओपीडी टेबलवरच 'सीपीआर' देण्यास सुरुवात केली. छातीवर अविरत दाब देत सलग ३० मिनिटे जीवन-mरणाची ही लढाई सुरू होती. अखेर ३० मिनिटांनंतर थांबलेल्या हृदयात संथपणे पुन्हा ठोके पडू लागले आणि थांबलेला श्वास परतला. श्वास परतताच त्यांना तातडीने व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले. रुग्णाचे हृदय पूर्ववत सुरू होताच डॉक्टरांच्या टीमने कॅथ लॅबमध्ये अँजिओप्लास्टीची प्रक्रिया सुरू केली. तपासणीदरम्यान हृदयाच्या नळीत १०० टक्के ब्लॉक असल्याचे समोर आले. डॉ. पुणेकर यांनी अत्यंत कौशल्याने त्या ब्लॉकच्या ठिकाणी 'स्टेंट' बसवून रक्तपुरवठा पूर्ववत केला. अवघ्या १२ तासांत सरकार यांना व्हेंटिलेटरवरून बाहेर काढण्यात आले असून, त्यांची प्रकृती आता पूर्णपणे धोक्याबाहेर आणि स्थिर आहे डॉक्टरांच्या तत्परतेमुळे एका कर्तव्यदक्ष पोलिसाला नवे आयुष्य मिळाले आहे.0
0
Report
Advertisement
बारामती के सोमेश्वर साखर कारखाने में पंचवार्षिक चुनाव घोषित, पवार गुट ने मुलाकात ली
Rui, Maharashtra:सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती, योगेंद्र पवारांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती, बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती युवक नेते युगेंद्र पवार यांनी घेतल्या आहेत0
0
Report
चंद्रपुर के सावली में बाघ हमले से वृद्ध किसान की मौत, वनपथक घटनास्थल पर
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात सावली तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात गुरे राखणाऱ्या इसमाचा मृत्यू, वनपथक घटनास्थळी चंद्रपूर जिल्ह्यात पावसाळ्यातही वाघाचे हल्ले सुरूच आहेत. ताज्या घटनेत सावली तालुक्यातील निलसनी -पेटगाव शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात गुरे राखणाऱ्या इसमाचा मृत्यू झाला आहे. वासुदेव लक्ष्मण वाकुडकर 68 वर्षे असे मयताचे नाव आहे. घटनेची माहिती कळताच वनपथक घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून मृतदेह सावली रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे. या परिसरात कॅमेरा ट्रॅप लावून वाघाच्या हालचाली टिपल्या जात आहेत0
0
Report
इंदापूर के ग्रामीण क्षेत्रों में आज शाम बारिश, आकाश गरज के साथ जोरदार बारिश
Rui, Maharashtra:इंदापूर तालुक्यात पावसाची हजेरी शेटफळ हवेली वडापुरी रामवाडी वकीलवस्ती परिसरात पाऊस इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात आज सायंकाळी पावसाने हजेरी लावली वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु बरसल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली वडापुरी रामवाडी वकीलवस्ती या परिसरात पावसाने हजेरी लावली आहे0
0
Report
Advertisement
बारामती शुगर फैक्ट्री चुनाव: युगेंद्र पवार के नेतृत्व में उम्मीदवारों की मुलाकातें शुरू
Rui, Maharashtra:बारामती युगेंद्र पवार के नेतृत्त्व में निवडणुकांसंदर्भात शरद पवार गटाच्या युगेंद्र पवार यांच्या उपस्थितीमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. मुलाखतीसाठी चांगला रिस्पोन्स आहे, पाच गटामध्ये 130 ते 140 अर्ज शरद पवार पक्षांकडे आले आहेत. आमचा पक्ष लोकशाही पद्धतीने चालत असतो. आम्ही मुलाखती घेत असतो जे उमेदवार कारखान्याचे हित बघतील. सध्या आम्ही स्वतंत्र पॅनल उभं करत आहोत. आम्हाला कोणाकडून प्रस्ताव आला नाही. आम्ही स्वबळावर शेतकरी पॅनल उभा करत आहोत. आम्ही माळेगांव कारखान्यासाठी प्रस्ताव दिला होता. भाजप पण स्वतंत्र पॅनल टाकत आहे. दोन्ही शिवसेना पॅनल टाकत आहेत. शरद पवार यांचं म्हणणं आहे सहकारमध्ये आपण राजकारण केलं नाही पाहिजे. शेवटी हा प्रपंचाचा प्रश्न आहे. कारखाना व्यवस्थित चालला पाहिजे. चांगली उच्शिक्षित लोक आपण निवडून दिली पाहिजेत. माळेगांव कारखाना निवडणुकीच्या वेळी सांगितलं तुमचे उमेदवार घेतो. पण तस झालं नाही. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. आताची परिस्थिती वेगळी आहे. दोन्ही पक्ष एक होणार होते त्याचे नेतृत्व अजित पवार करणार होते. हे इलेक्शन सोमेश्वर कारखान्याचं आहे. प्रचाराला सगळे येतील सगळे आम्हाला मदत करतील. सहकारमध्ये सगळे सभासद एकत्र येतात. खासदार सुप्रिया सुळे इथे लक्ष घालतील. शरद पवार यांना विनंती करणार आहे. रोहित पवार लक्ष घालतील. सगळे आम्हाला ताकद देतील. युगेंद्र पवार हा कार्यकर्ता आहे. आमच्या पक्षातले वरिष्ठ असतील निर्णय घेतील.0
0
Report
लातूर में चलते वाहन पर पेड़ गिरा, कार को नुकसान, दो घायल
Latur, Maharashtra:लातूर शहरात चालत्या कारवर अचानक वडाचं झाड कोसळलं... किरकोळ दोघे जखमी... यशवंत विद्यालयाकडून कृपा सदन रोडच्या दिशेने कार जात असताना अचानक रस्त्याच्या कडेला असलेलं वडाचं झाड कारवर कोसळलं... या घटनेत कारचं मोठं नुकसान झालं असून किरकोळ दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे... अचानक झाड कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली...0
0
Report
अनंतकुमार पाटील के नेतृत्व में महाविकास आघाडी ने सूखा राहत मोर्चा निकाला
Washim, Maharashtra:वाशीम: कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी,या मागणीसाठी महाविकास आघाडी कडून आज जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले. गेल्या ४५ दिवसांहून अधिक काळ पावसाचा खंड असल्याने पिकांची अवस्था बिकट झाली आहे. तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी,पीक विमा लागू करावा आणि शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च शासनाने उचलावा,अशी मागणी यावेळी करण्यात आली. ३०सप्टेंबरपर्यंत मदत जाहीर न केल्यास २ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा माजी आमदार अनंतकुमार पाटील यांनी दिला. अनंतकुमार पाटील,माजी आमदार0
0
Report
Advertisement
उल्हासनगर नगर-निगम महासभा में भाजप-सेना हाई-व्होल्टेज ड्रामा, महापौर ने पाटील को निलंबित किया
Ambernath, Maharashtra:उल्हासनगर महापालिकेतील महासभेत भाजपा सेनेत हाय व्होल्टेज ड्रामा भाषा नीट वापरा तुम्ही माझा बाप काढला तुमचं तीन सभेसाठी निलंबन तीन महिन्या नंतर आयोजित महासभा ठरली भाजपा सेनेच्या वादाने वादळी या वेळी प्रधान यांच्याकडून महापौर यांच्या वडिलांना उद्देशून अपशब्द निघाले. या वरूनच महापौर आणि नगरसेवक प्रधान पाटील यांच्यात शाब्दिक वाद झाला. या वेळी प्रधान यांच्याकडून महापौर यांच्या वडिलांना उद्देशून अपशब्द निघाले. यावरून महापौर अश्विनी निकम यांनी भाषा नीट वापरा तुम्ही माझा बाप काढला असं म्हणत भाजप नगरसेवक प्रधान पाटील यांना सुनावत तीन सभेसाठी निलंबन केले.0
0
Report
गणपति स्थापना के बाद ड्रैगन फ्रूट खेती से सरला चव्हाण को लाभ
Yeola, Maharashtra:गणपति आगमन और उनकी सजावट की प्रचलन है। येवला तालुक्य के चिचोंडी स्थित महिला किसान सरला चव्हाण ने सूखा खेती में भी गणराय की कृपा से ड्रैगन फ्रूट के फलों की खेती से अच्छा उत्पादन पाया और लाभ हुआ। गणराय की स्थापना के बाद ड्रैगन फ्रूट की सुंदर आरास बनाने का कार्य भी उन्होंने किया। हमारे प्रतिनिधि सुदर्शन खिल्लारे ने इस आकलन की रिपोर्ट की है।0
0
Report
श्रीवर्धन में स्थानीय रोजगार के हक़ के लिए आगरी समाज का उग्र प्रदर्शन
Chendhare, Maharashtra:रोजगाराच्या मुद्द्यावर श्रीवर्धनमध्ये आगरी समाज आक्रमक स्थानिकांना रोजगार द्या, अन्यथा खुर्च्या खाली करा परप्रांतियांना रोजगार, स्थानिकांच्या वाट्याला बेरोजगारी dास ऑफशोर, दिघी पोर्टमध्ये स्थानिकांना डावलल्याचा आरोप १८ गाव आगरी विकास संघटनेची बाईक रॅली; सरकारला इशारा0
0
Report
Advertisement
छत्रपति संभाजी नगर में उद्धव ठाकरे-फड़णवीस के बीच आमने-सामने राजनितिक युद्ध
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर मध्ये उद्या राज्याचे दोन मोठे नेते आमने सामने येण्याची शक्यता आहे , मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 17 तारखेला छत्रपती संभाजी नगर दौऱ्यावर आहेत यावेळेस मराठवाड्याच्या मुक्तिसंग्रामात बलिदान दिलेल्या शहिदांना ते मुक्ती संग्राम स्मारकावर अभिवादन करणार आहेत तर मराठवाड्यात विकासासाठी सरकारनं ज्या योजनांची घोषणा केली होती त्या योजना पूर्ण झाल्या नाहीत फक्त फसवेगिरी केली असा आरोप करत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे राज्य सरकार विरोधात निषेध आंदोलन करणार आहेत , इतकच नाही तर 17 तारखेच्या झेंडावंदनापूर्वी उद्धव ठाकरे मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारकावर जाऊन शहिदांना अभिवादन सुद्धा करणार आहेत त्यामुळे मुक्तिसंग्राम दिन निमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमें-समाने येणार असल्याचं चित्र संभाजी नगरात दिसणार आहे हे दोन्ही नेते 16 तारखेला छत्रपती संभाजी नगर मुक्कामी येत आहेत त्यामुळे 17 तारखेला दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय युद्ध रंगणार असं चित्र आहे..0
0
Report
झालिया शिवार में मधमाशा के हमले से 48 वर्षीय चालक की दुखद मौत
Bhandara, Maharashtra:मधमाशांच्या हल्ल्यात ४८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू...झालिया शिवारातील घटना.... अदानी पॉवर प्लांटमध्ये चालक म्हणून होते कार्यरत गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील झालिया येथील शिवार परिसरात मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात रवींद्र पटले ४८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतक हे अदानी पॉवर प्लांटमध्ये चालक पदावर कार्यरत आहेत. शिवार परिसरात असताना अचानक मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. मोठ्या संख्येने मधमाशांनी दंश केल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे मृताच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.0
0
Report
वाशिम जिले में खरीफ फसलें सूखे के कारण बर्बाद, किसानों ने मदद की मांग
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यात मागील ४५ ते ५० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामाला मोठा फटका बसला आहे. पावसाअभावी अनेक भागांत सोयाबीन पीक पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर असून,अनेक ठिकाणी सोयाबीनची झाडं वाळून गेली आहेत.शेंगा भरण्याच्या महत्त्वाच्या काळातच पाण्याअभावी पिकांची अवस्था बिकट झाली आहे.कारंजा, मानोरा, मालेगाव, मंगरूळपीर आणि वाशिम तालुक्यात परिस्थिती गंभीर बनली असून, एकरी मोठा खर्च करूनही हातातोंडाशी आलेलं पीक वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.सोयाबीनसोबतच तूर, कापूस, उडीद आणि मूग या पिकांवरही संकटाचं सावट आहे.त्यामुळे शासनाने तातडीने पिकांचे पंचनामे करून दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत तसेच पीक विम्याचा लाभ द्यावा,अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी लक्ष देऊन शासनाने जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. व्हिओ:वाशिम जिल्ह्यातील जलप्रकल्पांमध्ये सध्या केवळ ४० टक्क्यांच्या आसपास पाणीसाठा असल्याने आणि जलस्रोतांमध्येही अत्यल्प पाणी शिल्लक असल्याने आगामी रब्बी हंगामावरही संकट निर्माण झालं आहे. त्यामुळे वर्षभराचा संसाराचा गाडा चालवायचा कसा,असा गंभीर प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.0
0
Report
Advertisement
