icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

शासन ने यवतमाळ मध्यवर्ती सहकारी बैंक के संचालक मंडल बरखास्त कर प्रशासक नियुक्त किया

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ शासनाने बरखास्त केले आहे. बँकेवर तातडीने प्रशासक नेमण्यात आले आहे. जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला आहे. शासनाच्या या धडक निर्णयामुळे सहकार क्षेत्रासह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची मुदत 20 डिसेंबर 2025 रोजी संपुष्टात आली आहे. त्यामुळे निवडणुक प्रक्रिया सुरु झाली होती. प्रारुप मतदार यादी आक्षेप दाखल स्वीकारण्याच्या टप्प्यावर असताना न्यायालयाने ‘जैसे थे’चे आदेश दिले. यामुळे निवडणुक प्रक्रिया लांबली. सहकार कायद्यानुसार अशा परिस्थितीत प्रशासक नेमण्याची तरतूद आहे. त्यानुसार शासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान शासन आदेशाविरोधात ‘स्टे’ मिळविण्याची धडपड संचालकांनी सुरु केलेली माहिती सुत्रांनी दिली आहे.
0
0
Report

जालना: मर्चंट बैंक घोटाले के सातों आरोपी जेल भेजे गए

Jalna, Maharashtra:जालना : मर्चंट बॅंक घोटाळ्यातील सातही आरोपींची जिल्हा कारागृहात रवानगी अँकर : जालना मर्चट बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी सोमवारी सकाळी गणेश साबळे या सातव्या आरोपीला अटकण्यात आली. या आरोपीसह पोलिस कोठडीत असलेल्या अन्य सहा आरोपींना आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना आणखी पोलिस कोठडी देण्यास नकार देत न्यायालयाने त्यांची जालना येथील जिल्हा कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट को ऑपरेटिव्ह बॅंकेच्या घोटाळ्यातील सर्व आरोपींची आता कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
0
0
Report
Advertisement

घाटकोपर में किरीट सोमय्या के जेल के बाहर प्रदर्शन, पुलिस कार्रवाई की मांग तेज

Mumbai, Maharashtra:घाटकोपर मध्ये चिराग नगर पोलीस ठाण्यात किरीट सोमय्या यांचे आंदोलन सहा तास उलटले तरी देखील सुरूच आहे घाटकोपरच्याच नित्यानंद नगर मध्ये दोन मुलींचे लैंगिक शोषण झाल्यानंतर आरोपीला मारहाण करणाऱ्या फिरतीच्या कुटुंबीयांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत पोलिसांचा असा आरोप आहे की जमावाकडून त्यांना देखील मारहाण झाली त्यानंतर अटक करण्यात आलेल्या फिर्यादीच्या नातेवाईकांवरील गुन्हे मागे घेऊन त्यांची निर्दोष मुक्तता करावी याासोबतच दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे यासाठी ते घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये जेल च्या बाहेरच ठिय्या मांडून बसले आहेत घाटकोपर पूर्वेचे आमदार पराग शहा यांनी त्यांच्या या आंदोलनात सहभाग घेतला आहे पोलीस प्रशासनाकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळत नाहीये त्यामुळे किरीट सोमय्या यांचे रात्र देखील पोलीस ठाण्यात आंदोलन करण्यात जाणार की काय असा
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी में पुलिस ने गुटखा तस्करों पर बड़ी कार्रवाई की

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. अवैध गुटखा तस्करांना दणका.. दापोली पोलिसांची खेड-दापोली मार्गावर मोठी कारवाई!.. अँकर रत्नागिरी जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी आता कंबर कसली आहे.खेड-दापोली मार्गावर पोलिसांनी सापळा रचून गुटख्याची अवैध वाहतूक करणारी एक आलिशान कार पकडली आहे.. या कारवाईत पोलिसांनी RMD, सुगंधी सुपारी आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा मोठा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.. दापोली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून,या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत... 'ॲक्शन मोड'मध्ये आलेल्या पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे..
0
0
Report

जunnar में ताप से किसान महिला मौत, प्रशासन सतर्क

Shirur, Maharashtra:जुन्नर तालुक्यात उष्माघाताचा बळी;शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू ANC:पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात उष्णतेचा वाढता तडाखा आता जीवघेणा ठरत असल्याचं समोर आलं आहे. निमगाव सावा येथिल शेतकरी महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथील गावमाळा परिसरातील रुपाली गाडगे(वय 40) यांचं सोमवारी सकाळी दुर्दैवी निधन झाल्याचं आहे.रुपाली या मागील दोन दिवस दीवसभर शेतात खुरपणीचे काम करत होत्या. तर आज सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले.त्यानंतर त्यांच्या कुटूंबियांनी त्यांना येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.प्राथमिक उपचारा नंतर त्यांना अधिकच्या तपासण्यासाठी डायग्नोस्टिक सेंटर ला जाण्याचा सल्ला देन्यात आला.दरम्यान तपासणीला जाताना त्यांना चक्कर आली.आणि बेशुद्ध पडल्या.त्यानंतर काही वेळेत त्यांचा मृत्यू झाला.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.रूपाली गाडगे यांच्या मागे पती,3 मुले असा परिवार आहे. दरम्यान, वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारच्या वेळेत कष्टाची कामे टाळावीत, पुरेसे पाणी प्यावे आणि स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात जात आहे.
0
0
Report
Advertisement

चंद्रपुर जिला अस्पताल की सांसद प्रतिभा धानोरकर ने निरीक्षण किया, मरीजों से संवाद

Chandrapur, Maharashtra:खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी, रुग्णांशीही साधला संवाद. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज आकस्मिकपणे चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय आणि कर्मवीर मा.सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन परिसराची पाहणी केली. काँग्रेसचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. रुग्णांकडून येत असलेल्या तक्रारींचा विचार करून खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे सविस्तर निरीक्षण केले. बेसिक सोयी-सुविधांबाबत औपचारिक तपासणी करताना एक्स-रे मशीन, डिलिव्हरी वॉर्ड तसेच ब्लड बँक येथे प्रत्यक्ष भेट देत निरीक्षण केले. विशेषतः स्वच्छतेच्या बाबतीतही तपासणी केली. निरीक्षणानंतर अधिष्ठात्यांना समस्या निवारणाबाबत पत्र देणार असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी आणि शौचालयाची व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी उपस्थित रुग्णांशी त्यांनी संवाद साधला.
0
0
Report
Advertisement

श्रीरामपूर तालुक्यात भोंदू गणेश शिंदे के खिलाफ बलात्कार के आरोप, गिरफ्तारी

Shirdi, Maharashtra:नाशिक, संगमनेर पाठोपाठ श्रीरामपूर तालुक्यातील भोंदूला श्रीरामपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथिल भोंदु गणेश शिंदे यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या. पीडित महिलेच्या तक्रारीवरून भोंदु गणेश शिंदे विरुद्ध श्रीरामपूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल. पोटाचा आजार बरा करून देण्याचा नावाखाली मंत्ररलेले लिंबू आणि उदी देऊन पीडित महिलेची लूट केल्याची माहिती समोर. पीडित महिलेकडून लाखों रुपये उकळत आजार बरा करून देण्याच्या नावाखाली अत्याचार केल्यााची माहिती समोर. तीन वर्षांपासून पीडित महिलेवर भोंदू शिंदे करत होता अत्याचार. गुन्हा दाखल होताच श्रीरामपूर शहर पोलिसांनी भोंदुस सापळा रचून ठोकल्या बेड्या. पोलिसांच्या चौकशीत भोंदु गणेश शिंदे याने पीडित महिलेवर पोटाचा आजार बरा करून देतो असे सांगून अत्याचार केल्याची दिली कबुली. भोंदू गणेश शिंदे याची श्रीरामपूर पोलिसांकडून कसून चौकशी सुरू. आणखी किती महिलांवर अत्याचार केलेत , किती रकमेची लूट केली याचा तपास सुरू...
0
0
Report

हॉर्न से बढ़ता शोर: भारत में 6 करोड़ लोग सुनने क्षमता गंवा सकते हैं

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:रस्त्यावरील हॉर्नचा कर्कश आवाज नागरिकांच्या जीवावर उठले आहेत, वाढता गोंगाट आरोग्यावर गंभीर संकट बनला आहे. एक अभ्यासानुसार भारतात 6 कोटी लोकांनी आपली श्रवणशक्ती गमावली आहे, आणि गोंगाट मुलांची स्मरणशक्ति सुद्धा कमजोर करत असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. ट्राफिकमध्ये वाहनांच्या हॉर्नचा आवाज भारतातील प्रत्येक शहरात नेहमीचाच प्रश्न झाला आहे, दिल्ली मुंबई सारख्या महानगरात तर हा आवाज अधिक असतो. 2022 च्या संयुक्त राष्ट्र आकडेवारीनुसार भारतीय शहरे जगातील सर्वाधिक गोंगाटाच्या शहरांत आहेत. दिल्ली, मुंबई सारख्या महानगरांच्या रस्त्यांवर सरासरी गोंगाट 75 डेसिबल असतो; सुरक्षित मर्येयेपेक्षा चार पट जास्त. अनेकदा हा गोंगाट 100 डेसिबलच्या पुढे जातो; तो लाकूड कापण्याच्या मशीनच्या आवाजाइतका असतो. त्यामुळे गोंगाट आरोग्यास गंभीर संकट बनला आहे. भारतात 6 कोटीहून अधिक लोकांनी आपली श्रवण शक्ती गमावली आहे. संशोधनानुसार रस्त्यावरील गोंगाटामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो, शरीरात तणाव निर्माण होतो आणि रक्तदाब वाढतो; त्यामुळे मानवी शरीरावर परिणाम दिसून येत आहेत. डॉ रितेश भाग्यवंत, ENT विशेषज्ञ धक्कादायक म्हणजे बार्सिलोना येथील एका अभ्यासात असे दिसून आले की वाहतुकीच्या आवाजात 5 डेसिबलने वाढ झाली तर मुलांच्या स्मरणशक्तीचा विकास 11% पर्यंत मंदावतो. हा अभ्यास तिथं झाला असला तरी भारतातही परिस्थिती तशीच असल्याचं तज्ज्ञ म्हणतात. सोबतच मिरवणुकीतील डीजे, लग्नात डीजेचा वापर आरोग्यासाठी धोका देणारा असल्याचंही अहवालात नमूद आहे. यावर उपाय म्हणून भारतात परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी हॉर्नचा कर्कश आवाज तबला किंवा बासरीसारख्या मधुर सुरांमध्ये बदलावा असे सुचवले आहे. क्वाइट इंडिया संस्थेच्या मतानुसार शिक्षण व वर्तणुकीतील बदल हा खरा उपाय आहे. जागतिक पातळीवर चीनने गोंगाट कमी करण्यासाठी साउंड बॅरियर आणि रस्ते तयार केले आहेत; व्हिएतनाममध्ये अॅप आणि सेन्सरद्वारे चालकांवर लक्ष ठेवले जाते. कमी हॉर्न वाजवणाऱ्यांना विमा सवलत देण्यात येते. पॅरिसने MEDYOUS नावाचा नॉइज रडार तयार केला आहे जो जोरात हॉर्न वाजवणाऱ्या Vehicle कडे फोटो काढून चालान पाठवतो. नेदरलँड्सने विशिष्ट रस्त्यांची निर्मिती केली ज्यात टायर घर्षणाचा आवाज शोषला जातो. हा खूप जागतिक समस्या बनला असून उपायांची गरज आहे; अन्यथा मानव ऐकण्याची क्षमता गमावून बसेल.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top