445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
खेड में भीषण आग लगी, दमकलों की तत्परता से बड़ा नुकसान टला
Ratnagiri, Maharashtra:खेड मध्ये भीषण वणवा; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली.. खेड शहरातील कुवार साई परिसरात रविवारी संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वणवा लागल्याची घटना घडली..आग वेगाने पसरत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः ही आग जवळील घरांच्या दिशेने सरकत असल्याने रहिवाशांमध्ये मोठी घबराट पसरली होती. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी तात्काळ भाजपचे नेते ॲड. वैभव खेडेकर यांना फोनद्वारे दिली.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाने कोणताही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. आग घरांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच ती विझवण्यात यश आल्याने मोठी दुर्घटना टळली आणि अनेक घरे सुरक्षित राहिली.0
0
Report
खेडमध्ये गोठ्यात भीषण आग, विधवा महिलांचे उपजीविकेचे साधन उद्ध्वस्त; आर्थिक संकट गहरले
Ratnagiri, Maharashtra:खेडमध्ये गोठ्याला भीषण आग.. दोन विधवा महिलांचे उपजीविकेचे साधन हिरावले!.. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील मांडवे येथे काल रात्री ९ वाजता एका गोठ्याला भीषण आग लागली. श्रीमती गायत्री मोरे आणि शारदा मोरे यांचा हा गोठा पूर्णपणे जळून खाक झाला असून सुमारे १.५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.. ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत गोठ्यातील गुरांना सुखरूप बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.. मात्र,दुग्ध व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या या दोन्ही विधवा महिलांसमोर आता मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.. या पीडित कुटुंबाला तातडीने शासकीय मदत मिळावी,अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत..0
0
Report
संगमनेर कोर्ट में फिर से पेशी, 9 दिन से पुलिस कस्टडी, मास्टरमाइंड फरार
Shirdi, Maharashtra:संगमनेर कोर्ट में फिर से पेशी, 9 दिन से पुलिस कस्टडी, मास्टरमाइंड फरार0
0
Report
Advertisement
गुहागर समुद्र चौपाटी: पांच जीवनरक्षक वेतन न मिलने पर छुट्टी पर, सुरक्षा पर सवाल
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. पगार थकल्याने जीव रक्षक रजेवर.. गुहागर समुद्र चौपाटीवरील पर्यटकांची सुरक्षा वाऱ्यावर.. नगराध्यक्ष योग्य तोडगा काढणार का.. अँकर गुहागर समुद्र चौपाटीवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या पाच जीव रक्षकांचा पगार थकल्याने गुरुवारपासून जीवरक्षक रजेवर गेले आहेत.. परिणामी ऐन हंगामात गुहागर मध्ये दाखल होणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.. गुहागरमध्ये दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत आहे..समुद्र स्नानाचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या जीव रक्षक समुद्र चौपाटीवर नसल्याने सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.. या जिरक्षकांचा मार्च महिन्याचा पगार थकला आहे.याबाबत नगरपंचायत कार्यालयामध्ये त्यांनी विचारणा केली असता,पगार 10 मे पर्यंत मिळू शकतो..दुसरे टेंडर होईल तेव्हा पगार मिळेल तोपर्यंत तुम्ही नाही आला तरी चालेल असे सांगण्यात आल्याचे जीव रक्षक सांगत आहेत.. पगाराची टांगती तलवार असल्याने गुरुवारपासून पाचही जीव रक्षक रजेवर आहेत.. यावर गुहागरच्या नगरपालिका लक्ष देऊन योग्य तोडगा काढणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे..0
0
Report
अमरावती में 10 कृषी निविष्ठा विक्रेत्यों के परवाने निलंबित, 6 को ताकीद
Amravati, Maharashtra:जिल्ह्यातील दहा कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे परवाने निलंबित; जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी यांची कारवाई. अमरावती जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी व कृषी निविष्ठांची गुणवत्ता राखण्यासाठी धडक मोहीम प्रारंभ केली आहे. या मोहिमेमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असून अन्य सहा केंद्रांना सक्त ताकीद दिली आहे. ऐन हंगामात शेतकऱ्यांची बियाणे व खत विक्रीत फसवणूक करण्याची माहिती उघडकीस आली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. कृषी विभागाने अशाप्रकारची शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी करण्याची मोहीम सुरू केली आहे. रासायनिक खत विक्री केंद्रातील ई-पास मशीनवर शिल्लक असलेल्या खतसाठ्याची व प्रत्यक्ष शिल्लक साठ्याची तपासणी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांमार्फत केली. तपासणीमध्ये तफावत आढळल्याने 17 कृषी निविष्ठा विक्री केंद्रांत दोष आढळल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या विरुद्ध प्रस्ताव सादर केला गेला; सुनावणी नंतर दहा रासायनिक खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले तर सहा खत विक्रेत्यांना सक्त ताकीद देण्यात आली. जिल्हा कृषी अधिकारी यांनी ही माहिती दिली. आजपासून कृषी सेवा केंद्र चालकांनी बेमुदत बंदचा इशारा दिला आहे.0
0
Report
अमरावती में ड्रग्स तस्कर के घर पर पुलिस का छापा; 53 ग्राम ड्रग्स जप्त
Amravati, Maharashtra:अमरावतीमध्ये पोलीस कोठडीत असलेल्या तस्कराच्या घरावर गुन्हे शाखेचा छापा; सुमारे ७.९५ लाख किमतीचा ५३ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त. अँकर :- अमरावतीत पोलीस कोठडीत असलेल्या ड्रग्स तस्कराच्या घरावर गुन्हे शाखेचा छापा टाकत मोठी कारवाई केली आहे यामध्ये ५३ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त काण्यात आले असून याची किंमत सुमारे ७.९५ लाख रुपये इतकी आहे. साकिब जावेद मोहम्मद आसिफ कुरेशी असे आरोपीचे नाव असून या आधी २ किलो ८० ग्रॅम एमडी जप्त प्रकरणाशी या संबंध असल्याचे तपासात पुढे आले आहे. २३ एप्रिलला दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून त्यामुळे ड्रग्ज रॅकेटचे मोठे जाळे उघड होण्याची शक्यता आहे. दरम्यान पुढील तपास पोलीस करत असून आणखी काय खुलासे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
Advertisement
ग्रामस्थों ने रात में कार शेड के माटी भराव का विरोध कर काम रोक दिया
Chendhare, Maharashtra:कर्जत तालुक्यात रात्रीस खेळ चाले ...... कारशेड साठी रात्रीच्या वेळी माती भराव ...... तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली ........ संतप्त ग्रामस्थानी काम बंद पाडले. भिवपुरी रोड ते कर्जत स्थानक दरम्यान कार शेड साठी रात्रीच्या वेळी सुरू असलेले मातीच्या भरावाचे काम ग्रामस्थानी बंद पाडले. बेंड से आणि वावे ही गावे उल्हास नदीच्या तीरावर असून भरावामुळे या गावात पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होण्याची भीती आहे. ग्रामस्थांच्या विनंती नंतर कर्जत तहसीलदारांनी हे काम बंद ठेवण्याचे आदेश दिले. परंतु ठेकेदाराने रात्रीच्या वेळी पुन्हा काम सुरू केले. या कामाला ग्रामस्थानी विरोध करत हे काम बंद पाडले.0
0
Report
पैसों के विवाद में खेड कालूस गांव में हॉकी स्टिक से मारपीट, CCTV में कैद
Khed, Maharashtra:पैशों के विवाद से खेड तालुक्यात काळूस गावात भीषण रूप घेतलं. चारचाकी गाड्यांमधून आलेल्या टोळक्याने गावात दहशतीचा थरार माजवत हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली आणि एकाला चक्क गाडीच्या बोनटवरून फरपटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार CCTV कॅमेरात कैद झाला आहे.0
0
Report
कम वर्षा में अमोल भुसारे ने 13 एकड़ में 6000 आम से 22 लाख आय
Washim, Maharashtra:वाशीम: रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशीम अँकर:पश्चिम विदर्भातील वाशीम जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त परिस्थितीतही मंगरूळपीर तालुक्यातील बोरव्हा येथील प्रगतशील शेतकरी अमोल भुसारे यांनी आदर्श उभा केला आहे.‘भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजने’चा लाभ घेत त्यांनी डोंगरमाथ्याच्या १३ एकरावर केशर,दशरी,तोतापुरी व बारमाही आंब्यांची६ हजार झाडे लावली आहेत.कमी उंचीच्या झाडांनाही चांगली फळधारणा होत असून प्रति झाड १०–१५ किलो उत्पादन मिळते. आंब्यासोबत पपई, फणस,जांभूळ, लिची, पेरू तसेच हळद आंतरपीक घेऊन त्यांनी उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण केले.पाइपलाईनद्वारे पाणीपुरवठा, शेततळे व ठिबक सिंचनाच्या मदतीने पाण्याचे योग्य व्यवस्थापन करत त्यांनी सुमारे २२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. कमी पावसाच्या भागातही नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि मेहनतीच्या जोरावर शेतीत यश मिळवता येते, हे त्यांनी सिद्ध केले आहे.0
0
Report
Advertisement
43 डिग्री तापमानात टीनपत्र्याच्या खोलीत शिष्यवृत्ती परीक्षा—मलकापुर में अभिभावक नाराज़
Buldhana, Maharashtra:तालुका - मलकापूर , जिल्हा - बुलढाणा 43 डिग्री तापमानात टीनपत्र्याच्या खोलीत शिष्यवृत्ती परीक्षा.. मलकापूरात पालक संतप्त... उष्णतेच्या लाटेत विद्यार्थ्यांशी निष्काळजीपणा.. शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह...0
0
Report
112 करोड़ के महाआन्नपूर्णा प्रकल्प कोकण कृषि विश्वविद्यालय दापोली के लिए मंजूर
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकण कृषी विद्यापीठाला 112 कोटींचा महाअन्नपूर्णा प्रकल्प मंजूर.. दापोली कृषी विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा.. अँकर डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था यांच्यातील सामंजस्य करारातून प्रकल्प 1.0 मंजूर झाला आहे.. केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून राबविण्यात येणाऱ्या या ऐतिहासिक प्रकल्पासाठी 112 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यामुळे दापोली कृषी कोकण विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे..0
0
Report
Imtiaz Jalil पर आरोप: मराठी शिक्षा को लेकर राजनेताओं में घमासान
Navi Mumbai, Maharashtra:*इम्तियाज जलील byte पॉईंटर* *On ऑटोरीक्षा मराठी सक्ती* आम्ही याच समर्थन करतो कि महाराष्ट्र मध्ये राहणाऱ्या लोकांनी मराठी शिकायला पाहिजे. पण हे करताना जे दमदाटी गुंडागर्दी सुरु आहे. तुम्ही ऑटो वाल्याला सांगणार मराठी शिक नाहीतर ठोकिन काढू हा कोणता नियम. या लोकांना कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणी दिला. गोरगरिबांना थोडा वेळ द्या. मी एमआयएम चा आमदार असताना विधानसभेत CBSE ICSE बोर्ड मध्ये मराठी अनिवार्य करण्याची मागणी केली होती. कोणी हातात कायदा घेऊ नका हीच विनंती. *On धिरेंद्रशास्त्री 4 मुलं जन्माला घाला आणि 1 आरएसएस ला द्या* तुमच्यात दम असेल तर तुम्ही 4 नाहीतर 40 मुलं जन्माला घाला तुम्ही दुसऱ्याला कशाला अक्कल शिकवताय. धिरेंद्र शास्त्री ने देवेंद्र फडणवीस समोर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय म्हंटल जर व्यासपीठावर बसलेले खरे शिवभक्त असते ना तर त्यांनी धिरेंद्र शास्त्री ला खाली खेचून जाब विचारला असता. पैसा कामावण्याचा धमदा केलंय या लोकांनी बाबा बन जावं नंतर खरात सारखे प्रकरण बाहेर येतात ते याच बाबांमुळे. *On अशोक खरात अँड TCS* लोक एवढी हुशार त्यांना कळत नव्हतं बाबा काय करत होता, तेथील पोलिस सरकारला माहित नव्हतं का. हे प्रकरण दाबण्यासाठी TCS च बोगस प्रकरण तयार करण्यात आला. अशोक खरात चबदाखवायचं नाही आम्ही नवीन केस देतो तुम्ही हेच चालवायचं TCS मध्ये काय घडलं. बोगस केस ट Totली बोगस केस. इतके शिकलेले महिला दिसत होते ते जर यजगी कोणी मुस्लिम बाबा असतं तर चारही बाजूंने बुलडोजर आणले असते घर पाडा घर फार्महाऊस पाडण्यासाठी. बाईट- इम्तियाज जलील-0
0
Report
Advertisement
रत्नागिरी पुलिस ने अवैध गुटखा के खिलाफ बड़ी कार्रवाई; 6.77 लाख रुपए का माल जप्त
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी रत्नागिरीत पोलिसांची धडक कारवाई.. साडेसहा लाखांचा गुटखा जप्त!.. रत्नागिरी शहरात पोलिसांनी प्रतिबंधित गुटख्यावर मोठी कारवाई केली आहे... कोल्हापूरहून विक्रीसाठी आणलेला ३ लाख २७ हजारांचा गुटखा आणि ३.५ लाखांची इको कार,असा एकूण ६ लाख ७७ हजार ९०४ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे... गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी पहाटे सापळा रचून आरोपी शरद गणपती भंडारे याला अटक केली... पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून,पोलीस पुढील तपास करत आहेत..0
0
Report
मनसे ने मानसरोवर रेलवे स्टेशन के बाहर नशा विक्रेता महिला को गिरफ्तार किया
Navi Mumbai, Maharashtra:मनसेने अमली पदार्थ विकणाऱ्या महिलेला शिकवला धडा. पनवेल मनसेच्या टीमने मानसरोवर रेल्वे स्टेशनाच्या बाहेर अंमली पदार्थ विकणा-या महिलेला सापळा लावून पकडल. महिलेला कामोठे पोलीसांच्या दिले ताब्यात. कामोठे पोलीसांनी NDPS च्या फॉरेंसिक टीमला बोलावून त्यांच्या उपस्थितीत गुन्हा केला दाखल. सदर महिला मानसरोवर रेल्वे स्थानक परिसरात अमली पदार्थाची विक्री करत होती. पोलीसांनी केलेल्या शोध मोहिमेत मुद्देमालहि हस्तगत करण्यात आल्याची प्राथमिक माहिती. मनसे महिला सेने तर्फे अमली पदार्थ विक्री करणाऱ्या महिलेला चोप देत घडवली अद्दल.0
0
Report
धाराशिव में Archana Patil Chakurkar को विधानपरिषद भेजने की मांग बैनर से तेज
Dharashiv, Maharashtra:धाराशिव जिल्ह्यात विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. उमरगा येथे दिवंगत माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुन तथा भाजप नेत्या अर्चना पाटील चाकूरकर यांना विधानपरिषदेत संधी द्यावी, अशी मागणी बॅनरच्या माध्यमातून करण्यात आली आहे. माजी मंत्री आणि भाजप नेत बसवराज पाटील यांच्या स्पीच ग्राउंडवर लागलेल्या या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. समस्त लिंगायत समाजाच्या वतीने अर्चना पाटील यांना संधी देण्याची मागणी करण्यात आली असून, त्यांना विधानपरिषदेत पाठवणे हीच शिवराज पाटील चाकूरकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असा सूर व्यक्त केला जातोय. दरम्यान, बसवराज पाटील हे स्वतःही विधानपरिषदेचे इच्छुक असल्याने उमरगा-धाराशिव भागात राजकीय समीकरणं चांगलीच तापली आहेत. आता पक्षाचा अंतिम निर्णय काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
Advertisement
