icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

पवना डैम से दुपहर 2 बजे पानी छोड़ना; नदी किनारे रहें सतर्क

Varsoli, Maharashtra:पवना धरणातून आज दुपारी दोन वाजता पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असून, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. मावळ तालुक्यातील पवना धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. पवना उपविभागाच्या सूचनेनुसार, सिंचन विमोचकाद्वारे 400 क्युसेक क्षमतेने पाणी नदीपात्रात सोडले जाणार आहे. तसेच रावेत येथील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दुपारी 2 वाजता जलविद्युत केंद्रामधून 1000 क्युसेक क्षमतेने अतिरिक्त विसर्ग केला जाणार आहे. या एकत्रित विसर्गामुळे नदीपात्रातील पाणीपातळी अचानक वाढू किंवा कमी होऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन पवना पाटबंधारे खात्याने केलं आहे.
0
0
Report

बागेश्वर बाबा और आनंद स्वरूप पर शिवाजी महाराज के सम्मान पर चोट का मामला दर्ज

Thane, Maharashtra:बागेश्वर बाबा आणि स्वामी आनंद स्वरूप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्याद मनोज प्रधान यांनी दिली लेखी फिर्याद सत्ताधारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान सहन करणार नाहीत, अशी अपेक्षा - मनोज प्रधान बागेश्वर बाबा आणा स्वामी आनंद स्वरूप या दोघांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत जाणीवपूर्वक अपशब्द काढून तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बीएनएस 356, 299, 192 अन्वये गुन्हा दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी लेखी फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल न केल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही मनोज प्रधान यांनी दिला आहे. धीरेंद्र शास्त्री याने, छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा युद्ध करता करता थकले, छत्रपती शिवाजी महाराजांना यांना आपण आता थकलोय असे वाटू लागले, तेव्हा एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे गेले व त्यांनी आपला मुकुट समर्थ रामदास स्वामी यांच्यासमोर ठेवला आणि म्हणाले, “मी आता थकलोय, मला यापुढे लढाई करायची नाही.”, असे विधान केले आहे. तर, स्वामी आनंद स्वरूप याने धिरेंद्र शास्त्रीचे समर्थन करताना, आनंद स्वरूप यांनी धीरेंद्र शास्त्रींच्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या वादग्रस्त विधानाचे समर्थन केले आहे. त्यांनी असा दावा केला की, युद्ध पेशवे लढले आणि नाव शिवाजीचं झालं. शिवाजींनी कधी युद्ध मैदानात लढलं नाही, तर फक्त छापामार युद्ध लढले. पेशव्यांन् उपेक्षित ठेवलं गेलं कारण ते ब्राह्मण होते. बागेश्वर बाबा (धीरेंद्र शास्त्री) यांनी माफी मागायची गरज नव्हती, असे ते म्हणाले. या दोघांनी केलेली विधाने ही महापुरूषांचा अवमान करणारी आहेत. या दोघांकडून जाणीवपूर्वक दोन धर्म- जातीसमूहांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने अशी विधाने केली आहेत, असा उल्लेख मनोज प्रधान यांनी आपल्या लेखी फिर्यादीमध्ये केला आहे. मनोज प्रधान यांनी सांगितले की, बागेश्वर आणि स्वामी आनंद स्वरूप हे दोघे जाणीवपूर्वक वाद निर्माण करणारी विधाने करीत असल्याने त्यांच्यावर बीएनएस 356, 299, 192 अन्वये गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही फिर्याद दिली आहे. सध्या कोणताही गुन्हा दाखल करताना राजकीय इच्छाशक्तीची मर्जी पोलिसांना राखावी लागत आहे. त्यामुळे या सरकारकडून आपल्या आराध्य दैवताचा अवमान सहन केला जाणार नाही, अशी अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाही, असे वाटते. दुसरे महत्वाचे महाराजांचा अवमान जरी सत्ताधाऱ्यांनी सहन केला तरी आम्ही शिवभक्त हा अवमान सहन करणार नाही. हा धिरेंद्र शास्री आणि स्वामी आनंद स्वरूप यांना धडा शिकवू, असा इशाराही प्रधान यांनी दिला.
0
0
Report

मराठा आरक्षण के मुद्दे पर बंद दरवाजे की बैठक: सामंत–जरांगे भिड़ंत नहीं, बातचीत स्पष्ट

Jalna, Maharashtra:जालना : जरांगे सामंत भेटीत दडलंय तरी काय? (पॅकेज) अँकर : मंत्री उदय सामंत यांनी मराठा आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांची अन्तरवालीत जाऊन भेट घेतलीय. सामंत हे छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योजकांसोबत बैठक घेणार होते. पण ऐनवेळी ही बैठक रद्द करून सामंत यांनी बंद दरवाजा आड जरांगे यांच्याशी चर्चा केलीय. त्यामुळे जरांगे आणि सामंत यांच्यातील बैठकीत दडलंय तरी काय असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. बघूया या भेटीवरचा हा स्पेशल रिपोर्ट. व्हिओ: ०१: मंत्री उदय सामंत यांनी अन्तरवाली सराटीमध्ये येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलीय. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारकडे मराठा समाजाच्या रखडलेल्या प्रश्नांबाबत आधीच अनेक मागण्या केल्यायत. या मागण्या जून महिन्याच्या आधी मान्य न झाल्यास जून महिन्यात अन्तर वाली सराटीत पुन्हा आंदोलन करण्याचा ईशारा जरांगे यांनी आधीच दिलाय. हे आंदोलन सुरू होण्याअधीच सामंत यांनी काल जरांगे यांची भेट घेऊन बंद दरवाजा आड चर्चा केल्यानं दोघांमध्ये झालेल्या बैठकीमुळे चर्चा रंगलीय. ही भेटीची चांगलीच चर्चा रंगलीय. दरम्यान ही कोणतीही राजकीय भेट नसून जरांगे पाटलांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र अधिकाऱ्यांकडून देण्याबाबत टाळाटाळ होत असल्याचा आरोप केला त्यामुळे कॅबिनेट बैठकीत याबाबत चर्चा करणार असल्याचे म्हटलंय. बाइट : उदय सामंत, उद्योग मंत्री व्हिओ: ०२: मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत नसल्यानं गेल्या आठवड्यात मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर चांगलच टोंडसुख घेत विखे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यामुळे सामंत यांनी भाजपवर असलेल्या नाराजीचा फायदा घेण्यासाठी तर जरांगे यांची भेट घेतली नाही ना.? असा देखील प्रश्न उपस्थित केला जाऊ लागलाय. याशिवाय जूनमध्ये जरांगे यांनी आंदोलन सुरू केल्यास त्यांच्या नाराजीचं टार्गेट हे भाजप असावे शिवसेना असू नये यासाठी तर ही भेट नाही ना अशी चर्चा या भेटीमुळे उपस्थित होऊ लागलीय. मात्र जरांगे यांनी या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं सांगत भाजपला टार्गेट करणं किंवा शिवसेनेला टार्गेट करणं असा आमचा कोणताही हेतू नसून समाजाचे प्रश्न सोडवणं हीच आमची जबाबदारी असल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे. बाइट : मनोज जरांगे पाटील व्हिओ : ०३: मंत्री उदय सामंत यांनी अनेकवेळा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केलीय. मात्र यावेळची भेट ही सामंत यांनी छत्रपती संभाजीनगर मधील उद्योजकांची बैठक रद्द करून घेतलीय. त्यामुळे सामंत छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योजकांच्या भेटीचं निमित्त पुढे करून जरांगे यांच्यासाठी वेगळीच काहीतरी चर्चा करायला तर आले नाही ना असा देखील प्रश्न आता उपस्थित केला जातोय नितेश महाजन, झी-२४ तास, जालना
0
0
Report
Advertisement

चत्रपतिप संभाजी नगर में अवैध गर्भपात केंद्र पर छापा, 4 आरोपी गिरफ्तार

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anchor : छत्रपती संभाजी नगरातील रशीदपुरा भागात एका निवृत्त न्यायाधीशांचा बंगला भाड्याने घेऊन चालवण्यात येत असलेल्या अवैध गर्भपात केंद्राचा पोलिसांनी छापा टाकून पर्दाफाश केला. केंद्र चालवणारी शाहेदा परवीन गर्भपातानंतर गर्भथेट खिडकीतून पाठीमागच्या नाल्यात फेकत होती. तेथे टपून बसलेली भडक्या कुत्र्यांची टोळी गर्भाचे लचके तोडून विल्हेवाट लावत असल्याची माहिती एक महिलेने पोलिस आयुक्तांना फोन करून दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी ४ जणांना अटक केली असून त्यांना ७दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दाम्पत्याने राहत्या घरातच औषधी, शस्त्रांच्या साठ्यासह मिनी ऑपरेशन थिएटर उभारून अवैध गर्भपाताचा क्रूर व्यवसाय सुरू केला होता. वेदनेने विव्हळणाऱ्या महिलांच्या जीवाशी खेळत गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेला हा अमानुष धंदा सोमवारी पोलिसांच्या कारवाईत उघडकीस आला. गर्भपात करणारे हे दाम्पत्य पाच वर्षांपासून याच परिसरात वारंवार घरे बदलत होते आणि त्यांचा हा व्यवसाय राजरोस सुरू होता, रशीदपुऱ्यात काही महिन्यांपासून गर्भपात सुरू असल्याची माहिती पोलिसना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपी शाहेदाच्या घरी छापा टाकला, तेव्हा आत २४ वर्षीय विवाहिता वेदनेने विव्हळत होती. पोलिस पोहोचण्याऱ्या काही मिनिटांपूर्वी तिला औषधे देऊन गर्भपाताची प्रक्रिया सुरू केली होती. पोलिसांनी तिला रुग्णवाहिकेद्वारे घाटी रुग्णालयात दाखल केले. तपासणीदरम्यान महिलेच्या घरी सापडलेले साहित्य पाहून आरोग्य पथकही चकित झाले. घाटी किंवा एखाद्या मोठ्या खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी जेवढे साहित्य लागते, ते सर्व तेथे उपलब्ध होते. यात २४ प्रकारची वेगवेगळी वैद्यकीय साधनेही या ठिकाणी उपलब्ध होती. यात मुलगी गर्भात आहे म्हणून गर्भपात केला प्रत्यक्षात गर्भात मुलगा होता असे आढळून आले आहे तर या आरोपींना गर्भपात साठी लागणारे औषध कुठून मिळतात याबाबतही आता आरोग्य पथक तपास करणार आहे...तर गर्भपात करणारे अर्भकांची विल्हेवाट नाल्यात फेकून लावली जायची हेही तपासात उघड झाले आहे त्या दृष्टीने तपास सुरू आहे... दोन महिन्यांमध्ये शहरात हे तिसरे गर्भपात रॅकेट उघडकीस आले आहे , पहिल्या 2 रॅकेट मधील आरोपी सारखे होते या प्रकरणातही पोलीस आणि महापालिका पथक हे धागे जुळतात कां याचा शोध घेताय... ग्राहक हेरण्यासाठी ग्रामीण भागात एक पूर्ण टोळी काम करत असल्याचंही पोलिसांना संशय आहे अवघ्या 30 ते 50 हजारात ही प्रक्रिया व्हायची, मात्र 2 महिन्यात हे गर्भ लिंग निदान आणि गर्भपात करणारे 3 रे रॅकेट उघड झाल्याने हा व्यवसाय संभाजी नगरात चांगलाच मुरलेला आहे हे मात्र स्पष्ट दिसतंय.. विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर...
0
0
Report

मोदा इंदोरा बायोमास बैंक में आग, धान भूसा लाखों रुपये का नुकसान

Nagpur, Maharashtra:नागपूर - शेजारच्या शेतातील आगीची ठिणगी वाऱ्यामुळे थेट धानाच्या भुसा जळून राख... - नागपुर जिल्ह्याचा मौदा येथील इंडोरा बायोमास बँक परिसरात लागली होती आग - अंदाजे ३ हजार टन धान भुसा जळाल्याची माहिती, पूर्णसाठा जळून राख - उन्हाचा तडाखा आणि जोरदार वारा त्यामुळे आग मिळा वेगाने पसरली . - कंपनीचे कोट्यवधी रुपयाचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज... - मौदा आणि रामटेकहून अग्निशामक विभागाने दाखल,पाण्याचे टँकरने पाण्याचा केला मारा.... - आटोक्यात आणण्यासाठी मोठी धडपड, अखेर आग नियंत्रणात - रिलायनस् इंडस्ट्रीजसाठी जाणारा साठा, इथेनॉल निर्मितीसाठी वापर - घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी,नआगीचे भीषण दृश्य - शेतकऱ्यांकडून पराळी खरेदी करणारी कंपनी, साठा नष्ट
0
0
Report
Advertisement

सातारा के अशोक जाधव ने अकेले पहाड़ पर बना दी 3.5 किलोमीटर सड़क

Satara, Maharashtra:सातारा-जवळील श्री सिलोबा गड येथे पूर्वी खडतर, घसरडा आणि अरुंद पायवाट होती. मात्र आता हा रस्ता स्वच्छ, सपाट आणि चालण्यासाठी योग्य झाला आहे. एका व्यक्‍ती ने निःस्वार्थ भावनेने हा बदलाव आणला होता—करंडी गावचे 67 वर्षाचे अशोक जाधव यांनी कुठलाही स्वार्थ… ना प्रसिद्धीची अपेक्षा… फक्त एकच ध्यास — आपल्या ग्रामदैवत सिलोबाप्रती श्रद्धा आणि स्वतःचा फिटनेस यातून हा 3.5 किलोमीटरचा रस्ता बनवला आहे. अशोक जाधवा यांच्या दिनक्रमात दररोज सकाळी हा डोंगरावर येऊन रस्ता करायचा, कमीत कमी 50 फुट रस्ता तयार करायचा. गेल्या एक वर्षापासून जवळपास साडेतीन किलोमीटरचा हा रस्ता अशोक यांच्या श्रमदानातून तयार झाला आहे. हा रस्ता फक्त या डोंगरावर सिलोबा भक्तांसाठी नाही, तर प्रत्येक ट्रेकर, भटक्या आणि निसर्गप्रेमीसाठी एक वरदान ठरत आहे। दशरथ मांझी यांच्या इतिहासाची हा निष्ठा-उद्भव उदाहरण आहे। गावकरी, नागरिक अशा प्रकारे या अवलिया व्यक्तिमत्वाला सलाम करतात。
0
0
Report
Advertisement

नागपुर केंद्रीय जेल में चार कैदियों का कर्मचारी पर हमला, हालत खतरे से बाहर

Nagpur, Maharashtra:नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात चार कैद्यांनी मिळून एका कर्मचाऱ्याला वबेदम महाराण केल्याची घटना घडली आहे.. या घटनेत संदीप काळे (42 वर्ष) असे कारागृहातील कर्मचारी जखमी झाले आहे... काल दुपारच्या सुमारास मध्यवर्ती कारागृहाच्या बैरक क्रमांक दहा जवळ ही घटना घडली... * बैरक क्रमांक दहा जवळ काही कैद्यांमध्ये शाब्दिक वाद सुरू असताना कारागृहाचे कर्मचारी संदीप काळे तुरुंग अधिकारी संतोष मदने यांच्या सोबत त्या ठिकाणी गेले होते... तेव्हा शाब्दिक वाद करणाऱ्या कैद्यांना ताब्यात घेऊन वरिष्ठ तुरुंग रक्षक यांच्याकडे घेऊन जात असताना अचानक चार कैद्यांनी संदीप काळे यांच्याशी वाद घालत त्यांच्यावर हल्ला केला.. एका कायद्याने धातुसदृश वस्तूने काळे यांच्यावर वार केल्यामुळे ते जखमी झाले आहे.. त्यांना रुग्णालयात दाखলण्यात आले असून त्यांच्या प्रकृती धोक्याबाहेर आहे...
0
0
Report
Advertisement

कोकण रेल्वे मार्ग पर दो दिन मेगाब्लॉक: ट्रैफिक और ट्रेन समय में बदलाव

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकण रेल्वे मार्गांवर दोन दिवस मेगाब्लॉक.. कोकण रेल्वे मार्गवर नांदगाव रोड आणि कणकवली स्थानका दरम्यान नवीन अंडरपारच्या बांधकामासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.. यामुळे उद्या 30 एप्रिल आणि 1 मे रोजी या मार्गावरील दोन महत्त्वाच्या गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला असून प्रवाशांना काही काळ मनस्ताप सहन करावा लागणार आहे.. दादर - तिरुनेलवेली एक्सप्रेस ही उद्या आणि परवा नांदगाव रोड स्थानकावर 10 मिनिटे थांबून नियंत्रित केली जाईल.. तिरुवनंतीपुरम-लोकमान्य टिळक एक्सप्रेस ही गाडी मडगांव जंक्शन ते नांदगाव रोड दरम्यान 1 तास उशिराने धावणार आहे..
0
0
Report

भाजपा ने संजय भेंडे को विधानपरिषद उम्मीदवार घोषित किया

Nagpur, Maharashtra:विदर्भातून विधानपरिषदेच्या निवडणूकीसाठी भाजपकडून प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांना उमेदवारी जाहीर झालीय. प्रस्थापितांऐवजी स्वयंसेवक, सहकारतज्ज्ञ, निवडणुकीचे मायक्रोप्लॅनर, संघटनात्मक कार्याच्या हातोटी असलेल्या संजय भेंडे यांना संधी मिळाली आहे. भाजपा शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, संदीप जोशी आणि राजू पोतदार शर्यतीत होते... मात्र भाजपा नेतृत्वाने राजकीय वर्तुळात शांत, संयमी व मितभाषी अशा संजय भेंडे यांना संधी दिली. मागील काही निवडणुकींतील त्यांच्या पडद्यामागील कामगिरी मोलाची ठरलीय. संघ मुख्यालय असलेल्या मोहीते भागाचे ते कार्यवाहदेखील होते. भेंडे हे न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापकदेखील होते. सहकार क्षेत्रात त्यांनी प्रवेश केल्यावर कामाचा आवाका वाढला व २७ वर्षांहून अधिक काळापासून ते बॅंकिंग क्षेत्राशी जुळले राहिले. यावेळी संजय भेंडे यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top