445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
कारंजा सावरकर चौक पर निजी बस-ट्रक भिड़ंत: 35 यात्री सुरक्षित, सुरक्षा मांगें तेज
Washim, Maharashtra:कारंजा शहरातील सावरकर चौकात खाजगी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. नागपूरकडे जाणाऱ्या खाजगी बसमध्ये ३५ प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात चार प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर कारंजा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अपघातात बस आणि ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. कारंजा येथील सावरकर चौकात वारंवार अपघात घडत असल्याने या ठिकाणी महामार्ग प्रशासनाने तातडीने वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.0
0
Report
सातारा में भारी बारिश से कृष्णा नदी जलस्तर बढ़ा; युवक पुल पार करते वक्त बचा
Satara, Maharashtra:सातारा तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून मर्ढे आणि आनेवाडी दरम्यान असलेल्या पुलावरून मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी वाहत आहे. अशा अत्यंत धोकादायक परिस्थितीत जीवाची पर्वा न करता पुलावरून नदीपात्र पार करण्याचा प्रयत्न करणारा एक तरुण वाहून गेला मात्र सातारा तालुका पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे त्याला वाचवण्यात यश आले आहे. या थरारक घटनेनंतर पोलिसांनी सतर्कतेचे आवाहन केले आहे.0
0
Report
पिंपरी चिंचवड में रेड अलर्ट, भारी बारिश से शहर में सतर्कता बढ़ी
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड शहरात आजही रेड अलर्ट घोषित करण्यात आला असून शहरात पावसान रात्रभर चांगलीच बॅटिंग केली. दरम्यान सकाळपासून शहरातील काही भागात पावसाने उघडीप दिली आहे. काही भागातील रस्त्यावरचे पाणी कमी झाला असून महापालिका कर्मचारी रस्त्यांची सफाई करत आहेत. मात्र पवना नदीच्या पाण्याची पातळी वाढलेली असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. आजही दमदार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी बाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. त्याच संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कैलास पुरी.0
0
Report
Advertisement
नाशिक में रेड अलर्ट, भंडारदरा पर्यटन स्थल बंदी; भारी बारिश के कारण सुरक्षा कदम
Shirdi, Maharashtra:नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट ; भंडारदरा परिसरातील पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद... सततचा मुसळधार पाऊस आणि हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाचा निर्णय... संधन व्हॅली , कोकणकडा, रतनगड, अलंग, मदन, कुलंग, कळसूबाई शिखर बंद पर्यटकांसाठी बंद... रिव्हर्स वॉटरफॉलसह सर्व साहसी पर्यटन उपक्रमांवरही तात्पुरती बंदी... पुढील आदेशापर्यंत पर्यटकांना भंडारदरा परिसरात प्रवेश नाही... आदेशाचे काटेकोर पालन करण्याच्या वनविभागाच्या सूचना.. भंडारदरा परिसरात पावसाची संततधार सुरू...0
0
Report
आषाढ़ी वारी में पैठण संत एकनाथ महाराज की दिंडी पालखी पंढरपूर के लिए रवाना
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:आषाढ़ी वारीनिमित्त पैठणच्या संत एकनाथ महाराज यांच्या दिंडी पालखी सोहळ्याचे आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. पालखी सोहळ्यात चांदीच्या रथात नाथांच्या पादुका असणार आहेत. या सोहळ्याची जय्यत तयारी झाली आहे. दिंडी सोहळ्याचे यंदाचे हे ४२७ वे वर्ष आहे. या सोहळ्यातल वारकरी, भाविक छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव व सोलापूर अशा पाच जिल्ह्यांतून २८५ किलोमीटर पायी मार्गक्रमण करणार आहेत. १९ दिवस प्रवास करीत हा सोहळा २४ जुलैला पंढरीला पोचेल. मराठवाड्यातील सुमारे ४० हजार वारकरी नাথांच्या दिंडी सोहळ्यात सहभागी होत असतात. मानाची ही तिसऱ्या क्रमांकाची पालखी आहे.0
0
Report
उल्हासनगर में धारदार हथियार से हत्या, वीडियो सामने
Ambernath, Maharashtra:उल्हासनगरात धारदार शस्त्राने भोसकून एकाची हत्या हल्ला करतानाचा व्हिडिओ आला समोर हल्ला उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 येथील कुर्ला कॅम्प चौक परिसरात धारदार शस्त्राने भोसकून एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास घडली. मृत व्यक्तीचे नाव काला उर्फ सतनाम सिंग लबाना असे असून, त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हल्ला करतानाची घटना एका नागरिकाने आपल्या कॅमेरात चित्रित केली .या प्रकरणात अनिश सिंग लबाना याने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी मोठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.0
0
Report
Advertisement
पुलिस ने बारों को रात 1 बजे तक बंद कराने का आदेश जारी किया
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरातील बिअर बार रात्री दीड वाजता बंद होण्याचा नियम असला तरी अनेक बार शटर डाऊन करून पहाटेपर्यंत सुरू असायचे. रात्रभर चालणाऱ्या या धिंगाण्यामुळे गुन्हेगारीत वाढ झाली होती. अलीकडेच जालना रोडवरील एका व्यावसायिकाची हत्या आणि सिडको एन-७ मधील बार बाहेर पहाटे ४ वाजता दोन गटांत झालेला राड्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त यांनी अधिसूचना जारी करून सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. या सर्व आस्थापना दीड वाजताच्या आधी सक्तीने बंद करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.0
0
Report
छत्रपति संभाजीनगर में कांदे की कीमतें 10 रुपए बढ़ीं; मंडी में 700-2500 प्रति क्विंटल
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरमध्ये आठवडाभरात कांद्याच्या किरकोळ दरात १० रुपयांनी वाढ झाली आहे. मागील आठवड्यात २५ ते ३० रुपये किलोने मिळणारा कांदा आता ४० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे ग्राहकांचा कल हातगाड्यांऐवजी थेट भाजी मंडईत जाऊन स्वस्त दरात कांदा खरेदी करण्याकडे वाढला आहे. जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत बाजारात सोमवारी ३,९१४ क्विंटल कांद्याची आवक झाली. येथे कांद्याला ७०० ते २,५०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात २२ जून रोजी कांद्याला ४०० ते १,८०० रुपये प्रतिक्विंटल भाव होता. आवकेत झालेला बदल आणि वाढती मागणी यामुळे कांद्याच्या दरात ही वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.0
0
Report
छत्रपति संभाजी नगर मनपा में पानी सप्लाई की अनियमितता पर स्थायी समिति ने गरज से सवाल उठाए
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर मनपाच्या सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पाणीपुरवठ्यातील अनियमितता आणि शहरातील अतिक्रमणांचा विषय जोरदार तापला. पाणीपुरवठ्यासाठी प्रशासन सातत्याने 'तारीख पे तारीख' देत असल्यामुळे नागरिकांसमोर तोंड दाखवणे कठीण झाल्याचा उद्वेग भाजपच्या नगरसेवकांनी व्यक्त केला. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा देत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. मनपा अभियंत्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे संतप्त नगरसेवकांनी प्रशासनाच्या कारभारावर आगपाखड करत सभापती मकरिये यांना घरचा आहेर दिला. पाणीपुरवठ्यातील गॅप कमी करण्याबाबत प्रशासनाकडून केवळ तारखा दिल्या जात असल्यामुळे लोक आमची टिंगल उडवत असल्याचे नगरसेवकांनी सुनावले,0
0
Report
Advertisement
मराठवाड़े में SIR मोहिम धीमी, 24 दिनों में मतदारों के आवेदन और अपलोडिंग पर जोर
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रপती संभाजीनगर सह मराठवाड्यात एसआयआर मोहीम सुरू आहे. मात्र, या मोहिमेची गती मंदावली आहे. अर्ज वाटपाचे आकडे मोठे दिसत असून, त्या तुलनेत माहिती डिजिटली अपलोड होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. काम करणाऱ्या यंत्रणेवर दबाव असल्यामुळे हा प्रकार होत आहे. शिक्षकांना त्यांची कामे करून या मोहिमेत वेळ देणे शक्य होत नसल्यामुळे सध्या एसआयआरला गती मिळत नसल्याचे सांगितले जातेय... विभागात ३० जूनपासून ही मोहीम सुरू असून सुमारे दीड कोटी मतदारांचे पुनरिरीक्षणाचा हा कार्यक्रम आहे. एक महिन्यांत या मतदारांपर्यंत बीएलओंना पोहाचायचे आहे. सहा दिवस संपले असून, २४ दिवसांत उर्वरित मतदारांपर्यंत अर्ज वाटप करणे, त्यांची माहिती भरून ते अर्ज अपलोड करण्याचे काम बीएलओंना करावे लागणार आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात पुरुष मतदार ८१ लाख ४६ हजार ७६३ आणि महिला मतदार ७४ लाख ८७ हजार १८९, तर इतर मतदार ५१२ होते. यात सुमारे चार लाख मतदार वाढल्याच्या अंदाजानुसार सध्या सुमारे १ कोटी ६० लाख मतदार विभागात असतील असा अंदाज आहे...0
0
Report
यशोमती ठाकूर ने मिसिंग लिंक पर फडणवीस सरकार पर तीखा हमला
Amravati, Maharashtra:मिसिंग लिंकच्या दुरावस्थेवरून यशोमती ठाकूर आक्रमक; ४० टक्के टक्केवारीचे सरकार म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल अँकर :- मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प येथे स्लॅब कोसळून मुंबई- पुणे वाहतूक ठप्प झाली होती दोन महिन्यापूर्वी उद्घाटन झालेल्या या मिसिंग लिंकवर खड्डे देखील पडले आहेत. या प्रकल्पाच्या दर्जावरून आणि प्रवाशांच्या झालेल्या गैरसोयी वरून काँग्रेसच्या नेत्या माजी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर अत्यंत गंभीर आरोप करत कडक शब्दांत टीका केली आहे. प्रकल्पाच्या दुरवस्थेवर संताप व्यक्त करतताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की मिसिंग लिंकची काय हालत झाली आहे, हे आज संपूर्ण देश आणि महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघत आहे. देवेंद्र फडणवीस स्वतःला इन्फ्रा मॅन' म्हणून घेतात पण हा इन्फ्रा मॅन नेमकं काय करतोय हेच कोणाला समजेनासे झाले आहे. उद्घाटनानंतर लगेचच पडलेल्या खड्ड्यांवरून जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा ही केवळ एक टेस्ट होती असे बेजबाबदार वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस करतात. तर दुसरीकडे शासकीय अधिकारी हे खड्डे किरिकोळ असल्याचे सांगून आपली जबाबदारी झटकत आहेत. मिसिंग लिंकच्या उद्घाटनावेळी तिथे बळी दिला गेल्याची चर्चाही मध्यंतरी कानावर आली. इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखैली फक्त मोठ्या घोषणा करायच्या, अवाढव्य आकडे दाखवायचे आणि शेवटी मात्र कामाचा बोजवारा उडवून गोंधळ घालायचा हेच या सरकारचे काम आहे असे देखील यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.0
0
Report
इंद्रायणी के उफान ने देहू में वारकर्स पर रोक, पुलिस का कड़ा बंदोबस्त
Varsoli, Maharashtra:Anchor: जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 341 वा पालखी सोहळा आज देहू नगरीमध्ये साजरा होत आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने वारकरी येऊन या ठिकाणी पवित्र अशा इंद्रायणी नदीमध्ये स्नान करतात. मात्र यावर्षी इंद्रायणीने रौद्ररूप धारण केलेला आहे. मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदी ती दुथडी भरून वाहत आहे. तसेच इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी देखील ओलांडलेली आहे. त्यामुळेच पोलिसांचा मोठा बंदोबस्त इन्द्रायणी नदी किनारी ठेवण्यात आलेला आहे. जेणेकरून कोणताही वारकरी या ठिकाणी स्नान करण्यासाठी जाऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.0
0
Report
Advertisement
गिरणा नदी में बाढ़ के संकेत, दुधड़ी नदी भी भरकर बहने लगी; मालेगाव में सतर्कता
Nashik, Maharashtra:मालेगाव ( नाशिक ) : गिरणा नदीला पूर ; नदी दुधडी भरून वाहू लागली.. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.. मालेगाव शहर व परिसरात अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम.. गिरणा नदी प्रवाहित होऊन वाहू लागल्याने नदी पात्रातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.. या पाण्यामुळे गिरणा धरणातील पाणी पातळीत वाढ होणार आहे.. दरम्यान, मालेगाव शहर व परिसरात अद्यापही पाहिजे तितका पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत..0
0
Report
रांजणगाव एमआईडीसी में लूट के बाद महिला सड़क हादसे में मौत
Shirur, Maharashtra:ANC :शिरूर तालुक्यातील अत्यंत धक्कादायक घटनेत भंगार गोळा करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेची चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने लुटण्यात आले. लुटीनंतर महिलेला रस्त्यावर सोडून देण्यात आले. त्यानंतर परिचितासोबत दुचाकीवरून घरी जात असताना झालेल्या भीषण अपघातात तिचा मृत्यू झाला. या प्रकरणातील सराईत आरोपीला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अटक केली आहे.0
0
Report
कोल्हापुर में मुसलाधार बारिश से 18 मार्ग बाधित, 56 बांध जलमग्न
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर जैसे थे आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे सुरू आहे.. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 35 फूट 1 इंच इतकी आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट तर धोका पातळी 43 फूट इतकी आहे. जिल्ह्यातील 56 बंधारे पाण्याखाली गेले असून या बंधाऱ्यातील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे.. कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काय परिणाम झालाय त्यावर एक नजर टाकूया. जिल्ह्यातील 56 बंधाऱ्यावर पाणी आल्याने 18 मार्गावरील थेट वाहतूक बंद झाली आहे 3 राज्य मार्ग, 5 प्रमुख जिल्हा मार्ग , 2 इतर जिल्हा मार्ग असे एकूण 18 मार्ग बाधित झाले आहेत. याचा परिणाम दूध वाहतूक, व्यापार, शाळा, व्यवसाय आणि शेतीच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे. बाधित एकूण बंधाऱ्यापैकी सर्वाधिक १० बंधारे वेलगंगा नदीवरील आहे.0
0
Report
Advertisement
