445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
वडाळीभोई में एसटी स्टॉप न मिलने पर ग्रामीणों ने मुंबई-आग्रा महामार्ग पर रोका
Yeola, Maharashtra:एसटी बस थांब्यासाठी वडाळीभोईचे ग्रामस्थ आक्रमक झाले असून संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून मुंबई-आग्रा महामार्गांवर रस्ता रोको आंदोलन केले. वडाळीभोई या गावाची 15 हजार लोकसंख्या असून गावातून शेकडो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी चांदवडसह इतर गावाला जातात शिवाय इतर छोट्या गावातील ग्रामस्थ देखील वडाळीभोईला ये-जा करतात मात्र एसटी थांबा नसल्याने सर्वांचे हाल होत असल्याचे सांगत नागरिकांनी रस्ता रोको केला. आंदोलनामुळे महामार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला..0
0
Report
नागपुर के नए पुलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील ने संविधान के साथ प्रतिबद्धता जताई
Nagpur, Maharashtra:माझी संविधानासोबत पूर्ण कटिबद्धता असल्याच स्पष्टीकरण नागपुरात पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर विश्वास नागरे पाटील यांनी दिलय..त्या कार्यक्रमात जाऊन कुठल्याही सेवाशर्तींचे उल्लंघन केलेले नसल्याचा दावाही विश्वास नांगरे पाटलांनी केलाय --==== ------ आयपीएस अधिकारी विश्वास नागरे पाटील यांनी आज नागपूर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला... ( पदभार स्वीकारताना चे आणि सलामी स्वीकारताना चे शॉट दाखवावेत) मात्र तत्पूर्वी नवी मुंबईत हिंदू संमेलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात केलेल्या स्तुतीपर भाषणाच्या व्हिडिओमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते...राज ठाकरे यांनी तर त्यांच्यावर निशाणा साधला होता.... नागपूरचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांनीही भाजपने मला अर्बन नक्षल ठरवले असून नागरे पाटील माझा एन्काउंटर करू शकतात अशी भिती व्यक्त केली होती आणि त्यांच्या निष्पक्षतेवर सवाल उपस्थित केले होते ... आमदार विकास ठाकरे काँग्रेस नेता ... मात्र या संपूर्ण टीक केवर नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलीय . संघाच्या कार्यक्रमात जाऊन मी कुठल्याही सेवाशर्तींचे उल्लंघन किंवा कायद्याचा भंग केलेला नाही. माझी संविधानासोबत पूर्ण कटिबद्धता आहे असे त्यांनी सांगितले. नागपूरात दीक्षाभूमी असून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार माझे मार्गदर्शक आहे. पोलीस अधिकारी असल्याने विविध संघटना, संस्था यांच्या कार्यक्रमामध्ये जाणे आणि तिथे उपस्थित लोकांना भेटणे स्वाभाविक आहे. जे नागरिक सकल हिंदू समाजातर्फे निमंत्रण घेऊन आले होते, त्यात अनेक प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश होता. मी ३० वर्षांपासून पोलिस सेवेत आहे. रमजान ईदला जातो, जैन, शीख धर्माच्या कार्यक्रमात जातो, त्याच अनुषंगाने मी तिथेदेखील गेलो होतो. तेथे जीएसटी, अध्यात्म इत्यादी विषयांवर मार्गदर्शन झाले होते. त्यात मी मानवी कल्याणासाठीच्या सामूहिक प्रार्थना बोलून दाखविल्या. त्या भाषणामध्ये मी ज्ञानेश्वरीतील प्रार्थनादेखील म्हटली होती. तसेच अंमली पदार्थांमुळे तरुणाईचे होणारे नुकसान, पोलीस दलातील संधी याबाबतदेखील बोललो होतो. तो कार्यक्रम वंदे मातरम गीताला दीडशे वर्ष व संघाला शंभर वर्ष झाल्याबत होता. ड्युटी संपल्यावर गेलो होतो.. त्यामुळे मी कुठल्याही नियमाचे उल्लंघन केले आहे असे वाटत नाही, असे विश्वास नांगरे पाटील म्हणाले.0
0
Report
अकोला: शिक्षा क्षेत्र में निजीकरण-भ्रष्टाचार के खिलाफ कांग्रेस का तीखा हमला
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे आयोजित 'विद्यार्थ्यांचा आवाज – शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार व नफेखोरी' या छात्र संवाद कार्यक्रमात अकोला जिल्हा काँग्रेसने शिक्षण क्षेत्रातील वाढते खाजगीकरण, नफेखोरी आणि भ्रष्टाचारावर तीव्र टीका केली आहे. शिक्षण हे नफा कमावण्याचे साधन नसून विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्याचे माध्यम असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. यावेळी काँग्रेसने केंद्र सरकारच्या परीक्षा यंत्रणेवर निशाणा साधत NEET व JEE परीक्षांमधील कथित गैरप्रकारांमुळे गुणवंत व गरीब विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असल्याचा आरोप केला गेला. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात विद्यार्थ्यांनी संघटित व जागरूक होण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले..0
0
Report
Advertisement
जालना के ढोकसाळ में भारी बारिश, अधूरे पुल पर नागरियों का दर्दनाक सफर
Jalna, Maharashtra:जालना : मंठा तालुक्यातील ढोकसाळ तांडा भागात मुसळधार पाऊस झालाय. या पावसामुळे ढोकसाळ तांडा गावातील नाल्यावर असलेल्या अर्धवट पुलावरून नागरीक जीवघेणा प्रवास करतायत. पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरामुळे पुलावरून प्रवास करता येत नाही. मात्र तरीही गावातील नागरीक या धोकादायक पुलावरून प्रवास करता दिसतायत. या भागात झालेल्या पावसामुळे नाल्याचं पाणी ढोकसाळ गावात शिरलंय.0
0
Report
वालधुनी में बुद्धभूमी फाउंडेशन के विरोध के बीच केडीएमसी मुख्यालय पर जनआक्रोश मोर्चा
Kalyan, Maharashtra:कल्याण पश्चिमेतील वाढती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रेम ऑटो ते विठ्ठलवाडी दरम्यान चार पदरी उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक जागेवरील अडथळे हटवण्याची मोहीम कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून राबवण्यात येत आहे. मात्र, या मोहिमेदरम्यान वालधुनी येथील बुद्धभूमी फाउंडेशनच्या परिसरात करण्यात आलेल्या कारवाईमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.महापालिकेने कोणतीही पूर्वसूचना न देता अन्यायकारक पद्धतीने कारवाई केल्याचा आरोप बुद्धभूमी फाउंडेशनने केला आहे. या निषेधार्थ फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेबाहेर आंदोलन सुरू केले असून त्याचाच एक भाग म्हणून आज शेकडो कार्यकर्त्यांनी केडीएमसी मुख्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला.मोर्चादरम्यान आंदोलकांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत संपादित करण्यात आलेल्या जागेचा योग्य मोबदला देण्याची मागणी केली. तसेच कारवाईस जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी आंदोलकांनी केली.दरम्यान, या प्रकरणी वालधुनी येथील बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेबाबत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत बोधगयाच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य बौद्ध स्मारक उभारण्याबाबत सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे.तथापि, केवळ तोंडी आश्वासनांवर समाधान मानणार नसल्याचे स्पष्ट करत, मागण्यांबाबत लेखी स्वरूपात हमी मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा संघटनेने दिला आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.0
0
Report
आकोला महापालिका स्थायी समिति बैठक में तीखी बहस, सुरक्षा अधिकारी निलंबित
Akola, Maharashtra:Anchor : अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेदरम्यान आज मोठा वाद निर्माण झाला. सभा सुरू असतानाच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे जिल्हाध्यक्ष तथा काँग्रेसच्या नगरसेविका स्मिता कांबळे यांचे पती गजानन कांबळे यांनी थेट सभागृहात प्रवेश केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.या घटनेमुळे सभागृहात शाब्दिक खडाजंगी झाली.नियमानुसार स्थायी समितीची सभा सुरू असताना समिती सदस्य आणि संबंधित अधिकाऱ्यांशिवाय इतर कोणालाही सभागृहात प्रवेश करण्यास परवानगी नसते. मात्र, गजानन कांबळे यांनी सभागृहात प्रवेश केल्याने सभापती विजय अग्रवाल यांनी तीव्र संताप व्यक्त करत त्यांना चांगलेच खडसावले. तसेच सुरक्षा व्यवस्थेतील हलगर्जीपणाबद्दल नाराजी व्यक्त करत संबंधित सुरक्षारक्षकांच्या निलंबनाचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान, गजानन कांबळे यांनी सत्ताधाऱ्यांकडून दलित वस्ती विकास निधीच्या वाटपात भेदभाव केला जात असल्याचा आरोप केला आहे. या आरोपांमुळे सभागृहात काही काळ जोरदार शाब्दिक वाद रंगला. अखेर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर स्थायी समितीचे कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले.0
0
Report
Advertisement
कोल्हापुर के गोकुळ मेळावे में शिवसेना का ठरावधारक मेळावा, मंडalik ने भावुक अपील
Kolhapur, Maharashtra:गोकळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरात शिवसेना के ठरावधारकांचा मेळावा उत्साहात पार पडला. इस मेळाव्यात बोलताना शिवसेना नेता माजी खासदार संजय मंडलिक यांनी आज के वटपौर्णिमा सणाचा संदर्भ देत उपस्थितांना भावनात्मक संदेश दिला. जन्मोजन्मी हाच पती मिळावा, इसके लिए महिला वटपौर्णिमेचे व्रत करती हैं. त्याचप्रमाणे गोुळके राजकारणातही आपण सर्वांनी जन्मोजन्मी शिवसेनसोबत एकदिलाने राहण्याचे व्रत घ्यावे असे आवाहन त्यांनी केले. यानंतर बोलताना खासदार धैर्यशील माने यांनी मंडलिक यांच्या वक्तव्याचा धागा पकडत मिश्कील शैलीत टोला लगावला. आम्ही जन्मोजन्मी साथ द्यायला तयार आहोत, पण नंतर आम्हाला लोहगडाच्या कड्यावरून ढकलून देऊ नका, अस वक्तव्य केले, त्यानंतर एकच हशा पिकला.0
0
Report
TES Paper Leak Protest: Shiv Sena Demands Education Minister's Resignation
Hingoli, Maharashtra:अँकर -टीईटी पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्राचा तातडीने राजीनामा घ्यावा अशी मागणी करत हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार मध्ये ठाकरे शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते शिक्षण मंत्र्याच्या विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाला आहे यावेळी सरकार पेपर फुटी प्रकरणात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचं शिवसैनिकांनी म्हटलं आहे0
0
Report
पंढरपुर में चंद्रभागा नदी की स्वच्छता बनी गंभीर चिंता, प्रदूषण बढ़ रहा
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर येथील चंद्रभागा नदीची स्वच्छता सध्या गंभीर चिंतेचा विषय बनली आहे. नदीपात्रात ठिकठिकाणी कचरा, प्लास्टिक, निर्माल्य तसेच सांडपाण्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे नदीच्या पावित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पंढरपूर मध्ये लाखो भाविक चंद्रभागेत स्नानासाठी येतात. मात्र नदीतील अस्वच्छता, दुर्गंधी आणि वाढते प्रदूषण यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. नागरिकांनी नदीची नियमित स्वच्छता, सांडपाण्यावर नियंत्रण आणि कचरा व्यवस्थापनासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे. स्थानिक प्रशासनाकडून नदी स्वच्छतेसाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असल्याचा दावा करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात नदीपात्रातील अस्वच्छतेचे चित्र कायम आहे.0
0
Report
Advertisement
कणकवली अधिकारी के आक्षेपार्ह बयान पर शिक्षक संघ ने धरना शुरू कर दिया
Oras Bk., Maharashtra:अँकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत प्राथमिक शिक्षक संघटना आक्रमक झालेत. कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर सर्व कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन छेडले असून कर्मचाऱ्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात येतेय. तर त्यांच्या या आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश संघटनाांनी पाठिंबा दर्शविलाय. आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर प्रांताधिकाऱ्यांना जाब विचारणाऱ्या कर्मचाऱ्यांना माझी तक्रार करा असे मुजोर उत्तर देतानाचा व्हिडीओ या संघटनेच्या मार्फत व्हायरल केला जातोय. या अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास प्राथमिक शिक्षक संघटना महसूल विभागाला सहकार्य करणार नसल्याचा इशारा प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने देण्यात आलाय.0
0
Report
यवतमाळ में TET पेपरफुटी पर युवक कांग्रेस ने ज्ञापन देकर इस्तीफा और कार्रवाई की मांग
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये TET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी TET पेपरफुटीतील सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांना तात्काळ न्याय द्यावा तसेच या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून त्यांच्या भविष्याशी खेळ केला जात असल्याचा आरोप करत, सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अशी मागणी युवक काँग्रेसने केली.0
0
Report
वर्धा में आरक्षण बचाव के लिए विशाल मोर्चा; उपवर्गीकरण हटाने की मांग तेज
Wardha, Maharashtra:उपवर्गीकरणाविरोधात वर्ध्यात मोर्चा, आरक्षण बचावच्या घोषणांचा एल्गार अनुसूचित जातींच्या आरक्षण बचावासाठी समाज एकवटला निर्णय मागे घ्या अन्यथा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन वर्ध्यात अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात विविध सामाजिक संघटना आणि पक्षांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. बजाज चौकातून सुरू झालेला हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. उपवर्गीकरण हटाव, आरक्षण बचाव संविधान वाचवा समानता वाचवा अशा घोषणा देण्यात आल्या. यात महिलांही सहभागी झाल्या. शासनाने हा निर्णय तातडीने मागे न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.0
0
Report
Advertisement
पंढरी की तरफ रवाना पालखी: लाखों वारकरी आषाढी एकादशी की तैयारियों में
Nashik, Maharashtra:संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरीच्या दिशेने रवाना होत आहे या निमित्ताने हजारोच्या संख्येत वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झालेले आहेत...ताल मृदुंगाचा गजर करत विठूरायाचं नाम स्मरण करत अनेक वारकरी आता विठुरायाच्या दर्शनासाठी निघाले आहे....28 दिवसाचा पायी प्रवास करत आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला हे वारकरी पोहोचणार आहेत डोक्यावर तुळस घेत अनेक महिला वारकरी देखील यात सहभागी झाले आहेत.... च्या संदर्भात वारकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....0
0
Report
पालकी यात्रा पंढरपूर की ओर प्रस्थान, मंत्री गिरीश महाजन समेत नेता मौजूद
Nashik, Maharashtra:नाशिक संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी पंढरपूर कडे प्रस्थान करत आहे. रथावर मंत्री गिरीश महाजन, मनसे नेते अमित ठाकरे, विधान परिषद आमदार गोकुळ गीते उपस्थित. आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी0
0
Report
जालना में बारिश नहीं होने से खरीप पेरणी संकट, किसानों की चिंता बढ़ी
Jalna, Maharashtra:जालना : कृषी विभागाचं आवाहन धुडकावून केलेली पेरणी पावसाअभावी संकटात जालना जिल्ह्यात खरीप पेरणी संकटात सापडली आहे. कृषी विभागाने पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका असं आवाहन केलं होतं. मात्र तरीही पेरणीला उशीर होईल या भीतीपोटी जिल्ह्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांनी पेरणी उरकून घेतली. यात धुळपेरणीसह झालेल्या पावसावर पेरणी करण्यात आली. मात्र पेरणी झाल्यानंतर समाधानकारक पाऊस झाला नाही. शिवाय गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने उघडीप दिलीय. त्यामुळे आता हीच पेरणी संकटात सापडली आहे. पाऊस झालेल्या भागात कपाशीची उगवण क्षमता चांगली असली तरी तूर, सोयाबीन या पिकांच्या उगवण क्षमतेवर प्रश्न उभा राहिला. परिणामी रिमझिम पावसावरील पेरणी संकटात सापडली आहे बाईट :3 शेतकरी बाईट आहेत0
0
Report
Advertisement
