445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
खेड क्षेत्र में अवकाली पावस ने फसलें उघाड़ दीं, किसानों में चिंता
Shirur, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्याच्या खेड आंबेगाव जुन्नर तालुक्यातील अनेक गावांना आज वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपलंय, अचानक पडलेल्या या अवकाळी पावसाने उन्हाळी बाजरी कांदा पिकाला या पावसाचा मोठा फटका बसणार आहे, मात्र उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळालाय.0
0
Report
कल्याण में बाप-बेटे की टोली ने 12 घरफोड़ों का पर्दाफाश, 21 लाख सोने जब्त
Kalyan, Maharashtra:बाप लेकाची जोडिंनी घरफोडी करत घातला होता धुमाकूळ कल्याण महात्मा फुले पोलिसांनी ठोकल्या बेड्या १२ घरफोडयांची उकल करत २१लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत दोन बापलेकांच्या जोडीने घरफोडी करत कल्याण शहरात धुमाकूळ घातला होता. या बापलेकाच्या जोडींने कल्याण महात्मा फुले पोलिसांनी जेरबंद करून १२ घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आणले. या बाप लेकांच्या जोडीकडून पोलिसांनी तब्बल २१ लाखाचे सोने हस्तगत कलंय.या प्रकरणी विलास भालेराव त्याचा मुलगा कैलास भालेराव, तर दीपक जाधव आणि त्यांच्या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.घरांवर पाळत ठेवून बंद असलेल्या घरात जाऊन टोळी घरफोडी करत होते.कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी मोहने परिसरातून कैलास भालेराव आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच या दोघांनी उर्वरित साथीदारांची माहिती दिली आणि बाप-लेकांच्या या घरफोडी टोळीचा पर्दाफाश झाला.यात बाप रेकी करायचे आणि मुलं घरफोडी करायचे असा त्यांच्या घरफोडीची पद्धत ठरली होती.विलास भालेराव हा साफसफाईचे तर दीपक जाधव बिगारी कामगार करत असताना शहरात फिरत असयाचे.त्यावेळी ते बंद घरांची रेकी करायचे आणि मुलं जाऊन तर तिथे घरफोडी करायचे. चोरीतून मिळालेल्या पैशांत अल्पवयीन मुलं मौजमजा करत होते, तर चोरीतील सोन्याचे दागिने हि मुल विक्रीसाठी आपल्या वडिलांकडे देत होते.या टोळीने आणखी काही घरफोड्या केल्याचा संशय असून पोलीस पुढील तपास करत आहेत. Byte-अशोक होनमाने(Acp)0
0
Report
केळवद में पेट्रोल पंप कर्मी पर चाकू से हमला, छह युवक गिरफ्तार
Nagpur, Maharashtra:नागपूर जिल्ह्यातील केळवद येथे गुंड प्रवृतीच्या युवकांनी पेट्रोल पंप कर्मचा-यावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडलीय. सावनेर-सौंसर महामार्गांवर असलेल्या पेट्रोल पंपावरील कर्मचा-यावर हा जीवघेणा हल्ला झाला..ही घटना CCTV त चित्रित झालीय. खुल्लक वादातून दोन मोटारसायकलवर आलेल्या 6 युवकांनी पेट्रोल पंपवरील कर्मचा-यावर चाकूने हल्ला करत गंभीर जखमी केले. रवि बांगडे असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी केळवद पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपींना अटक केली असून सहाही आरोपींना अटक झाली आहे त्यातील एक आरोपी अल्पवयीन आहे0
0
Report
Advertisement
Lasalgaon के श्री शनिशंकर मंदिर में शनैश्वर जयंती के अवसर पर भक्तों की भारी भीड़
Lasalgaon, Maharashtra:अँकर:- लासलगाव येथील पुरातन श्री शनी मंदिरात शनैश्वर जयंती व शनी अमावास्यानिमित्त भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती मंदिर परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण पाहायला मिळात आहे शनैश्वर जयंतीनिमित्त श्रीराम मंदिर ट्रस्टच्या वतीने डॉ. श्री कैलास पाटील आणि शंतनू पाटील यांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आला गेल्या 117 वर्षांपासून सुरू असलेली परंपरा यंदाही मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडली यावेळी गावातून संबळ, ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने कावड मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक श्रीराम मंदिरापासून श्री शनी महाराज मंदिरापर्यंत मुख्य मार्गावरील मोठ्या उत्साहात पार पडली मिरवणुकीदरम्यान कावडधारकांचे महिला भक्तांनी विविध ठिकाणी पूजन करून स्वागत केले शनैश्वर जयंतीनिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमांमुळे लासलगावमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते0
0
Report
Shekap के विरोध के बीच मुंबई गोवा टोल वसुली पर नया विवाद
Chendhare, Maharashtra:मुंबई गोवा महामार्गावरील टोल वसुलीला शेकापचा विरोध सरकार कडुन कोकणवासीयाची केली जाते चेष्टा शेकापच्या चित्रलेखा पाटील यांची टीका रस्ता पूर्ण होत नाही तो पर्यंत टोल सुरु करू नका शेकापची मागणी आजही अपूर्ण और रखडलेल्या स्थितीत असलेल्या मुंबई गोवा महामार्गावर सुरू झालेल्या टोल वसुलीला शेकापने विरोध केलाय ही टोलवसुली म्हणजे कोकण वासीयांची चेष्टाच असल्याची टीका शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केली आहे रस्ता समतल नाही हा मुद्दा उपस्थित करीत रस्त्याचे इस्टिमेट किती? त्यावर एक्सट्रा क्लेम किती घेतले गेले याची चौकशी केली जावी अशी मागणी चित्रलेखा यांनी केली आहे रस्ता खऱ्या अर्थाने पुर्ण होत नाही तो पर्यंत टोल सुरु करू नका अशी मागणी शेकापच्या वतीने चित्रलेखा पाटील यांनी केली आहे0
0
Report
NEET पेपरफुटी: लातूर के प्राध्यापक कुलकर्णी पर CBI जांच शुरू
Latur, Maharashtra:लातूर PKG NEET पेपरफुटी प्रकरणात CBI तपासातून धक्कादायक माहिती समोर..... लातूरच्या निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांच्यावर गंभीर आरोप... CBI कारवाईनंतर कुलकर्णी यांच्या घराला कुलूप... कुटुंब अज्ञातस्थळी गेल्याची चर्चा... ज्या व्यक्तीवर प्रश्नपत्रिकेची गोपनीयता राखण्याची जबाबदारी होती... त्याच व्यक्तीवर पेपरफुटीचे आरोप झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे... सीबीआयच्या कारवाईनंतर निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांच्या लातूरमधील घराला सध्या कुलूप असून, कुटुंबातील कोणताही सदस्य येथे दिसून येत नाही... कुटुंब अज्ञातस्थळी गेल्याची चर्चा परिसरात सुरू असून, संपूर्ण भागात खळबळ उडाली आहे... दरम्यान, या प्रकरणाच्या विरोधात आता विद्यार्थ्यांचा संतापही रस्त्यावर उतरला आहे... काँग्रेसच्या वतीने आज लातूरमधील खासगी क्लासेस परिसरात मोठं निदर्शने आंदोलन करण्यात आलं. यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनीही आंदोलनस्थळी उपस्थित राहून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे... एकीकडे डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणारे लाखो विद्यार्थी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत... तर दुसरीकडे, ज्यांच्यावर परीक्षा प्रक्रियेची जबाबदारी आहे त्यांच्यावरच आता गंभीर आरोप होत आहेत... त्यामुळे केवळ NEET परीक्षेच्या विश्वासार्हतेवर नाही, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे... या प्रकरणात सीबीआयचा तपास अजून सुरू असून, पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे...0
0
Report
Advertisement
उष्णते के बीच अकोला जिला परिषद ने हिरवी नेट से दी राहत
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णत��ची तीव्र लाट कायम असून तापमानाचा पारा ४५ अंशांच्या पुढे गेला आहे. भारतीय हवामान विभागाने विदर्भासाठी यलो अलर्ट जारी केला असल्याने नागरिकांना कडक उन्हाचा मोठा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा परिषद प्रशासनाने नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी अभिनव पुढाकार घेत परिसरात हिरवी नेट उभारली आहे.जिल्हा परिषद परिसरात लावण्यात आलेल्या या हिरव्या नेटमुळे उन्हाची दाहकता कमी होत असल्याचा अनुभव कर्मचारी आणि नागरिक व्यक्त करत आहेत. दुपारच्या वेळेत कामानिमित्त जिल्हा परिषदेत येणाऱ्या नागरिकांना या नेटखाली काहीसा गारवा मिळत असल्याचा अनुभव घेतला जातो. तसेच, वाहनधारक देखील आपल्या दुचाकी आणि चारचाकी वाहने या नेटखाली उभी करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेत जिल्हा परिषद प्रशासनाने केलेली ही व्यवस्था नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे. प्रशासनाच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून आगामी काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असल्याने अशा उपाययोजना इतर शासकीय कार्यालयांमध्येही राबविण्याची मागणी होत आहे.0
0
Report
शंभूराज देसाई ने गोरे से व्यक्तिगत रिश्ते और राजनीति अलग रखने की बात कही
Satara, Maharashtra:जयकुमार गोरे यांनी मला निमंत्रण दिल मी देखील यापुढे स्वतः फोन करून त्यांना निमंत्रण देईन...आमची राजकीय भूमिका वेगळी असली तरी मैत्रीचे आणि वैयक्तिक नाते वेगळे...त्यामुळे व्यक्तिगत संबंधाची राजकीय सळ मिसळ करू नये... शंभूराज देसाई सातारा -साताऱ्यात काल राजकीय सरप्राईज पाहायला मिळालं होतं. प्रधानमंत्री आवास योजनेच्या कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरे यांनी मंत्री शंभूराज देसाई यांचा सत्कार केला होता.यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी स्वागत हे नेहमी हसतच स्वीकारले असतो. जयकुमार गोरे आणि माझे वैयक्तिक भांडण नाही. राजकीय भूमिका ही प्रत्येकाची वेगळी असते कारण त्याचा पक्ष वेगळा आणि माझा पक्ष वेगळा आहे.त्यांना देखील महोत्सवाचं निमंत्रण दिलं होतं मात्र मी वैयक्तिक फोन केला नव्हता.यापुढे जय भाऊंना मी स्वतः फोन करेन. मी जसा त्यांच्या शब्दाला मान दिला तसा त्यांनी देखील द्यावा. प्रोटोकॉल प्रमाणे मी कार्यक्रमाला हजर होतो. जयकुमार गोरे यांचे मी आभार मानतो कारण त्यांनी मला स्वतः फोन केला. आमची राजकीय भूमिका वेगळी असली तरी मैत्रीचे आणि वैयक्तिक नाते वेगळे असते.त्यामुळे व्यक्तिगत संबंधाची राजकीय सळ मिसळ करणे योग्य नसल्याचे देसाई यांनी सांगितले आहे. बाईट - मंत्री शंभूराज देसाई मनोज जरांगे पाटील हे सातारा गॅझेटियर बाबत आग्रही असून आणि इतर मागण्यांसाठी येणारा 30 मे पासून ते आंदोलनाला बसणार आहेत यावर पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिलीये... मनोज जरांगे पाटील यांचा सातारा गॅझेटियर बाबत सर्वात जास्त आग्रह होता.. चंद्रकांत दादा आणि मी त्या समितीवर असल्यामुळे याबाबत आम्ही पाठपुरावा केला होता. जस्टिस शिंदे यांची समितीची नेमली होती त्याला मुदतवाढ दिली होती. अजूनही त्या समितीला मुदतवाढ अस्तित्वात आहे... हे काम धीम्या गतीने होत असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणत असतील तर या समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांचा सोबत चर्चा करून ते योग्य अशा सूचना त्यांच्या विभागाला देतील असा विश्वास यावेळी मंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केला आहे बाईट: मंत्री शंभूराज देसाई0
0
Report
नवी मुंबई के एपीएमसी मसाला मार्केट में आग, दुकान 12 जलकर राख; दमकल ने नियंत्रण पाया
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई ब्रेकिंग नवी मुंबईतील एपीएमसी मसाला मार्केट मध्ये लागली आग. मसाला मार्केट मधील शॉप नंबर 12 ला लागली आग. आगीच कारण अद्याप अस्पष्ट. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. दुकानातील ड्रायफूट माल जळून खाक.0
0
Report
Advertisement
नीट पेपर फोड़ मामले में आमदार खोत की मांग: ऑनलाइन परीक्षा लागू होनी चाहिए
Sangli, Maharashtra:नीट पेपर फुटी मध्ये मोठी साखळी असून सरकारने, ( NTA ) राष्ट्रीय परीक्षा संस्था बरखास्त करावी,अशी मागणी आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे देशभरातील लाखो होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.या प्रकरणात केवळ छोट्या आरोपींना नव्हे,तर मूळ सूत्रधारांना कडक शिक्षा झाली पाहिजे,तसेच भविष्यात पेपर फुटी टाळण्यासाठी परीक्षेची पद्धत बदलुन"नीटची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने झाली पाहिजे,अशी मागणी देखील आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे,ते सांगलीच्या ईश्वरपूर मध्ये बोलत होते.0
0
Report
प्रतापगड किले के नवीनीकरण में खराब काम, मंत्री ने पुनः कार्य कराने के निर्देश दिए
Satara, Maharashtra:सातारा: इतिहासाच्या अनेक घटनांचा साक्षीदार असणारा प्रतापगड किल्ल्यावर पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासनातील अधिकारी आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी यांच्या समवेत किल्ल्यावर सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. या किल्ल्यावर स्थानिक नागरिकांनी निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप केला होता. याबात प्रत्यक्ष मंत्री शंभूराज देसाई यांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी करत ज्या भागात किल्ला नूतनीकरणाचे काम खराब झालं आहे ते पुन्हा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याविषयीचा आढावा आणि पर्यटन मंत्री यांच्या सोबत बातचीत केले आहे. आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी. जागतिक वारसास्थळात समावेश झालेला प्रतापगड किल्याच्या संवर्धनाचे काम पुरातत्व विभागाचा वतीने केलं जात आहे हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. काही ठिकाणी काम चांगले झालेले नाही ते काम पुन्हा करायला ठेकेदाराला करायला आहे आणि काम झाल्यानंतर ते काम पक्क होण्यासाठी कालावधी देणे गरजेचे असल्याचे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले आहे. डॉ.विलास वाहने सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग0
0
Report
तुलस गाँव में श्री देव जैतिर उत्सव आज से शुरू, लाखों भक्त तळकोण पहुँचते हैं
Oras Bk., Maharashtra:लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तसेच दक्षिण कोकणातील नराचा नारायण म्हणून प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान असलेले वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावातील श्री देव जैतिर उत्सवाला आज पासून सुरुवात झाली. ११ दिवस चालणाऱ्या ह्या उत्सवाची सांगता कवळासाने होते. मुंबई ,पुणे ,कोल्हापूर , बेळगाव तसेच जवळच्या गोवा राज्यातील भाविक मोठ्या प्रमाणात ह्या जैतिर उत्सवासाठी तळकोकणात येतात.0
0
Report
Advertisement
यवल्यात शनि जयंती और शन अमावस्या के दुर्लभ योग पर मंदिर में भक्तों की भीड़
Yeola, Maharashtra:शनेश्वर जयंतीनिमित्त येवल्यातील पुरातन आणि दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या शनि मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. यंदा शनि जयंती और शनि अमावस्या हा दुर्मिळ योग तब्बल 23 वर्षांनंतर आल्याने भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.0
0
Report
केनवड़ में बोरवेल तार चोरी: 35-40 किसान पानी संकट से जूझे, गिरफ्तारी की मांग
Washim, Maharashtra:वाशीम:\n\nFile:1605ZT_WSM_MOTORWIRES_STOLEN\nरिपोर्टर:गणेश मोहळे,वाशीम \n\nअँकर:वाशिमच्या रिसोड तालुक्यातील केनवड परिसरात अज्ञात चोरट्यांनी 35 ते 40 शेतकऱ्यांच्या शेतातील विहीर व बोरवेलवरील मोटारींचे वायर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.या चोरीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून पिकांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, चोरट्यांना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.0
0
Report
त्रिपुरा वन विभाग भ्रष्टाचार के कथित घोटाले में नासिक के सरपंच गिरफ्तार
Yeola, Maharashtra:नाशिकच्या येवला तालुक्यातील एका सरपंचाला तब्बल साठ लाख रुपयांच्या रोकडसह त्रिपुरा पोलिसांनी अटक केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्रिपुरा राज्यातील वन विभागातील कथित भ्रष्टाचार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली असून, अटकेत असलेला सरपंच हा डीएफओ गौरव वाघ यांचा मामा असल्याची माहिती समोर आली आहे. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून... व्हीओ 1 : त्रिपुरा राज्यातील वन विभागामध्ये कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा संशय व्यक्त होत असताना आता या प्रकरणाचे धागेदोरे थेट नाशिक जिल्ह्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत. येवला तालुक्यातील कोटमगावचे विद्यमान सरपंच राजेंद्र चिंतामण काकळीज यांना अग्रतळा रेल्वे स्थानकावर सुमारे साठ लाख रुपयांच्या रोकडसह त्रिपुरा पोलिसांनी अटक केली. व्हीओ 2 : राजेंद्र काकळीज हे त्रिपुरा राज्यात वन विभागात डीएफओ पदावर कार्यरत असलेल्या गौरव रवींद्र वाघ यांचे मामा असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. वन विभागातील विविध प्रकल्पांमधून आर्थिक गैरव्यवहार करून कोट्यवधींची माया जमवल्याचा संशय गौरव वाघ यांच्यावर व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर त्रिपुरा पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणा काही दिवसांपासून गौरव वाघ यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होत्या. व्हीओ 3 : २५ एप्रिल २०२६ रोजी अग्रतळा रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांनी सापळा रचत राजेंद्र काकळीज यांना रोकडसह ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान एका वनरक्षकासह डीएफओंच्या सरकारी वाहन चालकाला देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. व्हीओ 4 : दरम्यान, डीएफओ गौरव वाघ यांच्या त्रिपुरातील शासकीय निवासस्थानी पोलिसांनी छापेमारी केली. या छाप्यात महत्त्वाची कागदपत्रे, सीसीटीव्ही फुटेज आणि एक ड्रोन कॅमेरा जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. व्हीओ 5 : गेल्या वीस दिवसांपासून राजेंद्र काकळीज हे त्रिपुरा पोलिसांच्या कोठडीत असून त्यांचा जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याने राज्य पोलिसांची विशेष शाखा आणि शासकीय रेल्वे पोलीस संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत आहेत. व्हीओ 6 : तपास अधिकारीांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून आणखी काही कनिष्ठ अधिकारीांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. मात्र तपासाच्या हितासाठी अधिक माहिती देण्यास पोलिसांनी सध्या नकार दिला आहे.0
0
Report
Advertisement
