445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
पालघर बाढ़ हादसे की जांच, दोषियों के खिलाफ कड़डी कार्रवाई का भरोसा — पवार
Thane, Maharashtra:पालघर पूरघटना की चौकशी करुन दोषींवर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार.. मुरबाडमध्ये आई महोत्सव व विद्यार्थी गुणगौरव समारंभ 2026 संपन्न... उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती.. ॲकर.. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्ह्याच्या वतीने आणि प्रियजन गुणगौरव समितीच्या आयोजनातून मुरबाड तालुक्यात "आई महोत्सव व विद्यार्थी गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार यांना पत्रकारांनी पालघर येथील केळवे-धुंदलवाडी येथे पूराच्या परीस्थितीत अनुसया मनोहर लिलला ५५ वर्षीय यांचा मृत्यू झाला. रस्त्यावर पाणी साचल्याने मृत्यू देह खांद्यावर घरी आणला तर घरात ही पूराचे पाणी शिरले प्रेत वाहून जाऊ नये म्हणून चार तास घराच्या छतावर घेऊन बसले. यावर आपल्या आपात्कालीन यंत्रणा कुठे होती. त्यावर पवार म्हणाल्या की या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल. मोशी घटनेवर आमचं लक्ष असून त्यावर समिती देखील नेमली असून बचाव कार्य सुरू आहे.0
0
Report
जुन्नर से पंढरपुर तक दिंडी रवाना, ज्ञानेश्वर महाराज की परंपरा जीवंत
Barav, Maharashtra:संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याच्या मुखातून वेद वदवले त्या रेड्याच्या नावाने पंढरपूर ला जाणाऱ्या दिंड्याचे पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातून प्रस्थान झाले. संतवार्ढी येथे रेडा समाधी स्थळ असून गणबा तुकारामाच्या जय घोषात परिसर दुमदुमून निघला होता. आषाढी वारीला पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जाणा-या दिंड्यांपैकी पशूच्या नावाने ही राज्यभरातील एकमेव दिंडी आहे. रेडा समाधीस्थळापासून गेल्या १८ वर्षांपासून दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान करते यंदा १९ वे वर्ष आहे. श्रद्धा, इतिहास आणि वारकरी परंपरेचे दर्शन घडवणारी ही दिंडी वारकऱ्यांसाठी खास आकर्षण ठरत आहे..0
0
Report
चंद्रपुर के वारोरा में नाली में गिरकर बाइक सवार की मौत, पुल पर रेलिंग नहीं—जन आक्रोश
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातील टिळक वॉर्ड परिसरात नालीत पडून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव महेश गोपीचंद मेश्राम (वय ५३, रा. सरदार पटेल वॉर्ड, वरोरा) असे असून ते दुचाकीवरून जात होते. सरदार पटेल वॉर्ड व फैल वॉर्डकडे जाणाऱ्या मार्गावरील छोट्या पुलाजवळ ही घटना घडली. या पुलावर संरक्षण कठडे नाहीत व बऱ्याच वर्षापासून या नालीचे बांधकाम झालेले नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. पुलालगत असलेल्या नालीजवळून जात असताना महेश मेश्राम यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने ते नालीत पडले. नाली मध्ये वरती फक्त त्यांचे शर्ट दिसत होते त्यामुळे आत मध्ये कोणी आहे हे फार वेळाने कळले. घटनेची माहिती मिळेपर्यंत ते नालीतील पाण्यात बुडाले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. शहरातील गजबजलेल्या भागात अशा प्रकारे नालीत बुडून नागरिकाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वरोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे पाठविण्यात आला. या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत संबंधित पुलावरील संरक्षण कठडे तातडीने बसविण्याची मागणी केली आहे.0
0
Report
Advertisement
अनुसूचित जाति ट्रैक्टर योजना में घोटाला: 25 नए ट्रैक्टर भाड़े पर बिक्री के आरोप
Sangli, Maharashtra:स्लग - अनुसूचित जाती जमातीच्या ट्रॅक्टर योजनेत घोटाळ्याचा आरोप, भाडेतत्त्वाच्या नावाखाली ट्रॅक्टर विक्रीचा उद्योग ? अँकर - अनुसूचित जाती जमातीसाठी देण्यात येणाऱ्या ट्रॅक्टर योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलााय.नांदेड-जालना जिल्ह्यातील समाज कल्याणकडून देण्यात येणारे ट्रॅक्टर,थेट सांगलीच्या मिरजेमध्ये आढळून आले आहेत,हे सर्व ट्रॅक्टर भाडेतत्त्वावर देण्याचा उद्योग सुरू असल्याचं समोर आलं आहे.मात्र भाडे तत्त्वाच्या नावाखाली विक्री करण्याचा बेकायदे उद्योग असून याची व्याप्ती राज्यभर असल्याचा आरोप स्वाभिमानी स्वराज्य सेनेकडून करण्यात आला आहे. लाभार्थ्यांना देण्यात येणारी नवे कोरे ट्रॅक्टर शोरूम मधून थेट सांगलीत 90% अनुदान तत्त्वावर समाज कल्याण विभागाकडून दिले जातात ट्रक्टर महিলা व पुरुष बचत गटांना दिले जाणारे ट्रॅक्टर व मिनी ट्रॅक्टर भाड्याने देण्याचा उद्योग व्ही वो - नांदेड आणि जालना जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागाकडून अनुसूचित जाती जमातीसाठी विशेष योजनेच्या माध्यमातून अनुदान तत्वावर लाभार्थ्यांना ट्रॅक्टर देण्यात येतात,मात्र हे देण्यात आलेले,एक दोन नव्हे तर तब्बल २५ नवे कोरे ट्रॅक्टर थेट सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या एरंडोली येथे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. व्ही वो - स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे प्रशांत सदामते यांनी हा सर्व प्रकार समोर आणला आहे. तब्बल २५ नवी कोरे ट्रॅक्टर एरंडोली येथील एजंट असणाऱ्या वैभव सौंदते यांच्या घरासमोर लावण्यात आले होते,त्यापैकी 14 ट्रॅक्टर १५ वर्षांच्या भाडेकरारावर देण्यात आल्याचं समोर आले आहे.अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांसाठी अनुदान तत्वावर हे ट्रॅक्टर देण्यात येतात.मात्र हे ट्रॅक्टर नांदेड-जालना येथून आणत,भाडेतत्त्वावर देण्याच्या नावाखाली विक्री करण्यात येत असल्याचा आरोप करत एसआयटी चौकशीची,मागणी स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे अध्यक्ष प्रशांत सदामते यांनी केली आहे. बाईट - प्रशांत सदामते -अध्यक्ष - स्वाभिमानी स्वराज्य सेना. व्ही वो - अनुसूचित जमातीसाठी राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून हे ट्रॅक्टर देण्यात येतात.बाजारात चार ते पाच लाखांच्या आसपास किंमत आहे. 90% अनुदान देखील आहे.महिला व पुरुष बचत गटांच्या माध्यमातून हे ट्रॅक्टर वितरित केले जातात,पण ट्रॅक्टर शोरूम मधून लाभार्थ्याकडे न जाता ते थेट सांगलीमध्ये पोहचले आहेत,मग ते तीन ते साडे तीन लाखांना पंधरा वर्षांच्या भाडे करारा तत्त्वावर देण्यात येतात. व्ही वो - याबाबत नांदेड व सांगली समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही..तर ज्या एजंटच्या दारात हे सर्व ट्रॅक्टर आढळून आले आहेत, त्या एजंट कडून नांदेड व जालना जिल्ह्यातील हे ट्रॅक्टर असून भाडेतत्त्वावर देण्यासाठी ट्रॅक्टर आणल्याचं सांगण्यात आलं आहे. बाईट - वैभव सौंदते - ट्रॅक्टर एजंट - एरंडोली व्ही वो - योजनेतल्या अध्यादेशाच्या पडताळणीमध्ये लाभार्थी ट्रॅक्टर भाडेतत्त्वावर देऊ शकतो,पण त्याची विक्री किंवा ते गहाण ठेवू शकत नाही,असे स्पष्ट नमूद करण्यात आला आहे,मात्र प्रश्न हा आहे,की एकाच वेळी २५ ट्रॅक्टर एकाच एजंटकडे,लाभार्थी भाड्याने,तेही ६०० किलोमीटर लांब असणाऱ्या जिल्ह्यात कसे देऊ शकतात ? ज्या,महिला व पुरुष बचत गटांना ट्रॅक्टर मिळाली आहेत,त्याचे लाभार्थी खरंच अस्तित्वात आहेत ka ? ka केवळ महिला बचत गट बनवून लाभार्थी दाखवत ट्रॅक्टर भाड्याने देण्याच्या नावाखाली विक्री करण्याचा हा उद्योग तर नाही ना ? असे एक ना अनेक प्रश्न आता निर्माण झाल्याचे स्वाभिमानी स्वराज्य सेनेकडून उपस्थित केले आहेत. व्ही वो - हे सर्व प्रकरण पाहता यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता स्वाभिमानी स्वराज्य सेनेकडून व्यक्त करण्यात आली आहे.याप्रकरणी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन चौकशी करावी,अशी मागणी करण्यात आली आहे,त्यामुळे राज्य सरकारच्या चौकशीनंतरच या सर्व प्रकरणाचा उलगडा होणार आहे.0
0
Report
कर्जमाफी की नई घोषणा: लाखों किसानों के दो लाख तक कर्ज माफ!
Nagpur, Maharashtra:नागपूर बाईट - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री - कर्जमाफी - महायुती सरकार शेतकऱ्यांच्या मागे नेहमीच उभं राहील. राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार - ५० हजारांची अट कमी केली. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांचं दोन लाखांपर्यंत कर्ज माफ होणार आहे. मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळाला - शरद पवार कर्जमाफी कौतुक - शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. ते चांगलं म्हणणारे नेते. काही लोक सरकारने कितीही चांगलं काम केलं तरी खोटं बोला पण रेटून बोला अशी वृत्ती विरोधी पक्षातील काही लोकांची आहे . त्याला पवार साहेब यांनी हे उत्तर दिलंय - उद्धव ठाकरे नागपुरात रामरक्षा म्हणणार - जनता ने केली शिक्षा अब उन्हें राम रक्षा टोला - आपण टी शर्ट बदललो तसं हिंदूत्व बदलता येत नाही. मनातून असावे लागते. बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडले तेव्हाच.. त्यांचं हिंदूत्व दिसून आलं - अयोध्या मंदिरावर टीका करणाऱ्यांनी राम रक्षा म्हणनं मोठा विनोद आहे. हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना त्यांनी जेलमध्ये टाकलं होतं - सिद्धिविनायक मंदिर - मनसे पदाधिकारी किल्लेदारांनी म्हटलं होतं... सिद्धिविनायक मंदिरात गडबड झाली, त्यावेळी मुख्यमंत्री असणारे उबाठाचे यांनी का त्याची चौकशी आदेश का दिले? - किल्लेदार यांनी म्हटलले होते... सिद्धिविनायकला धोके.. वहा पोहचते थे खोके - मोदीजी यांनी राम मंदिर बनवलं आणि तारीख सुद्धा सांगितली - राम मंदिरातल जे झाले त्यांची चौकशी सुरु आहे. कोणीही सुटणार नाही. जेलमध्ये टाकणार त्यांना - नविन आलेल्यांना संधी, जुन्यांचं काय? - पक्ष पुढे जात असताना जे काही समिकरणं पक्षवाढीसाठी करावे लागतात. कार्यकर्त्यांनाही संधी मिळेल. दिलेलं कमिटमेंट पाळणारा शिवसेना पक्ष.0
0
Report
अवैध देशी कट्टा के साथ एक गिरफ्तार, दूसरा आरोपी फरार, जांच जारी
Amravati, Maharashtra:अवैध Shस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांची कारवाई; देशी कट्ट्यासह एक आरोपी अटक, एक आरोपी फरार अमरावती जिल्ह्यातील पथ्रोट पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करत एका आरोपीला अटक केली.. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आणि एक मॅगझीन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारावर करण्यात आली असून पोलिसांनी कसामपूर येथील २४ वर्षीय अनिकेत रवींद्र महाजन याला ताब्यात घेलेल्या. त्याच्या झडतीदरम्यान देशी बनावटीचे पिस्तौल, दोन जिवंत काडतुसे आणि मॅगझीन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच शस्त्र अधिनियमाच्या कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणातील दुसरा आरोपी विशाल भानुदास ठाकरे हा फरार आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.0
0
Report
Advertisement
FDA ने महाराष्ट्र में मिलावटखोरों पर बड़ी छापेमारी, 43 लाख कीमत का साठा जप्त
Shirur, Maharashtra:राज्यातील जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळमाफियांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अत्यंत मोठी आणि धडक कारवाई केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि हॉटेल्सवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले आहेत. या विशेष मोहिमेत तब्बल १४ हजार ५४ किलोग्रॅम दुग्धजन्य पदार्थ आणि २४ हजार ६३२ लिटर संशयास्पद दूध जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या या साठ्याची किंमत सुमारे ४३.३१ लाख रुपये असून, हा संपूर्ण भेसळयुक्त साठा जनारोग्याच्या हितासाठी नष्ट करण्यात आला आहे. दरम्यान राज्यातील ८२ हॉटेल्स आणि ढाब्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये गंभीर त्रुटी आढळल्याने ९ मोठ्या हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, तर ३३ हॉटेल्सना सुधारणा नोटीस बजावण्यात आली आहे. मुंबईतल्या फूडविस्टा इंडिया (Fresh Menu) आणि पुण्याच्या बाणेर-पाषाण भागातील National 360 व Happy Da Dhaba या नामांकित हॉटेल्सवरही परवाना निलंबनाची कडक कारवाई करण्यात आली आहे. तसेच, प्रतिबंधित पानमसाला आणि गुटखा विक्रीप्रकरणी १३ गुन्हे दाखल करून १२ जणांना अटक करण्यात आली असून, ५ वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत. अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत नागरिकांना काही शंका किंवा तक्रार असल्यास त्यांनी प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.0
0
Report
नागपूर: 36 हजार करोड़ के कर्ज माफ़ी से 56 लाख किसानों को लाभ
Nagpur, Maharashtra:नागपूर - सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते On कर्जमाफी - - आम्ही आमच्या जाहीरनाम्यात, मी जाहीरनामा समितीचा अध्यक्ष होतो मी कर्जमुक्तीचा जाहीरनाम्यात उल्लेख केला होता जनतेला खास करून शेतकऱ्यांना वचन दिलं होतं जनतेने विश्वास व्यक्त करीत माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आम्हाला निवडणुकीत आशीर्वाद दिला - 36 हजार कोटींची कर्जमाफी घोषित केली, 56 लाख शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे याच्या अटीच्या बाबतीत काही सदस्यांच्या मागण्या होत्या आग्रह होता की याच्या अटीमध्ये काही बदल करून याची व्याप्ती वाढवण्याची आवश्यकता आहे - मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ या सर्वांचे अभिनंदन शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा एक मोठा निर्णय व्याप्ती वाढवत आज या ठिकाणी शेतकऱ्यांचा व्यापक विचार सरकारच्या वतीने केला आहे On संजय राऊत - - त्यांच्या बाबत बोलणं योग्य नाही, त्यांना या संदर्भातील जी माहिती आम्हाला नाही ती त्यांना असते याचा मात्र विचार केला पाहिजे की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना काही माहिती नाही आणि त्यांना माहिती आहे - मला वाटत नाही की केंद्र नेतृत्व अशा पद्धतीने वागत असेल - मी तेच सांगतो आहे की राज्यात कारण नसताना अस्थिरता निर्माण व्हावी यासाठी असे वक्तव्य केले जातात On सावरकर भारतरत्न - - मी पाच मार्चला सभागृह ठराव मांडला होता ठराव मांडताना मला शासनाच्या वतीने आश्वासन दिलं होतं, ज्यांच्या विचारावर आम्ही राजकारणात भाजपमध्ये काम करतोय आज त्यांच्या ठरावालाही दोन अधिवेशन जाणं हे योग्य नाही - मी ज्या पक्षाचा झेंडा हाती घेतला तो स्वातंत्र्यवीर सावरकरांना नमन करणारा आहे, देशाचे कणखर गृहमंत्री अमित भाई अनेकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विचारांचा उल्लेख करतात, आम्हाला फक्त ठराव करून केंद्राकडे पाठवायचा होता On उद्धव ठाकरे रामरक्षा पठण - - मला वाटतं असं कोणी नागपूरला येऊन काही रामरक्षा पठण केलं तर इशारा आहे, मी तर रोजच करतो मुंबईचे माझ्या घरी म्हणून हा काही उद्धवजींना इशारा नाही, कोणाला काय विरोध आहे रामरक्षा म्हटल्याने चुका आहेत ज्या चुका आहेत प्रभू राम क्षमा करण्याची शक्ती देतील On सोयाबीन बोगस बियाणे - - सोयाबीनच्या बाबतीत दुर्दैवाने आपलं राज्य बियाणं बनवणंमध्ये मागे आहे, आपण मध्य प्रदेश म्हणून साधारणता सोयाबीन बियाणे आणतो आणि यामध्ये मग कमी उगवणार बियाणं शेतकऱ्यांच्या नशिबी येतं, तेलंगणातून एचटीबीटी हे आपण तिथून तस्कर विकतात तिथे अडचणी आहेत - म्हणून मी बी -बियाण्याच्या बाबतीत अशासकीय विधेयक आणलं, त्याबाबत बैठक झाली आहे आपला प्रयत्न आहे की अप्रमानिक बियाणे शेतकऱ्यांना देण्यात येऊ नये - शासनाने गंभीर रीतीने या प्रकरणी कारवाई केली पाहिजे - बोगस बी बियाण्याचं अशासकीय विधेयक मांडल्या माझी भूमिका शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, मी दोन सूचना केल्या आहेत, आर्थिक फसवणुकीसाठी जसा आपण करतो तर तसेच कृषी क्षेत्रात आर्थिक फसवणूक झाल्यास त्याची चौकशी करून फास्टट्रॅक कोर्टात केस चालवायला पाहिजे, पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पाच फास्टट्रॅक कोर्ट करणे - करण न्याय द्यायला दहा वर्षे लावले तर तो शेतकरी वाट पाहू शकत नाही On Cag अहवाल - - मला याची माहिती नाही, वाचल्यावर मी सांगणार On सुप्रिया सुळे पर्यायी मतदारसंघ - - आताच यावर मतं वक्त करणे बरोबर नाही, डी लिमिटेशन व्हायला संसदेत पुन्हा बहुमत लागेल बहुमत आल्यावरच डी लिमिटेशन होईल,मला वाटत निवडणूक दहा टक्के उमेदवार आणि 90 टक्के पार्टी संघटन करत असते - निवडणूक 10% उमेदवाराची 90% संघटनेचे असते आणि म्हणून डी लिमिटेशन झाल्याने फार फरक पडतो असं वाटत नाही On धान बोनस मुद्दा - - धान पूर्व विदर्भाचा सन्मान शान आहे, कर्जमुक्ती मध्ये आपण बँकेत असणार कर्ज त्याला मुक्ती देतोय,पण हातात शेतकऱ्याच्या पैसे नाही,धान लागवड आणि विकून येणार उत्पन्न,एक एकरच मागे शेतकरी फक्त चार ते पाच हजार कमावतो,2013 मध्ये काँग्रेस सरकारने बोनस सुरू केला आणि आम्ही बंद करणे योग्य नाही, - म्हणून माझी आग्रही भूमिका आहे की धानाच्या बोनस चा विचार अतिशय गंभीर आहे0
0
Report
अमरावती से पंढरपूर तक 560 किमी साइकिल वारी पर्यावरण संदेश के साथ धाराशिव पहुंची
Dharashiv, Maharashtra:धाराशिव पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अमरावतीहून सायकल वारी पंढरपूरकडे... ५६० किलोमीटरचा प्रवास करत सायकल वारी धाराशिवच्या कळंबमध्ये दाखल... विठ्ठल दर्शनासोबत पर्यावरण रक्षणाचा संदेश; ४५ वारकऱ्यांचा अनोखा उपक्रम... अँकर विठ्ठल भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे. अमरावती ते पंढरपूर अशी सुमारे ५६० किलोमीटरची सायकल वारी सध्या सुरू असून आज ही वारी धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात दाखल झाली. डॉक्टर, अभियंते, प्रशासकीय अधिकारी, व्यापारी अशा विविध क्षेत्रांतील ४५ जण या वारीत सहभागी झाले आहेत. दररोज जवळपास १०० किलोमीटरचा प्रवास करत हे वारकरी विठ्ठल दर्शनासोबत पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत आहेत. ७ जुलै रोजी अमरावती येथून या सायकल वारीला सुरुवात झाली. पाच दिवसांत सुमारे ५६० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत ही वारी पंढरपूरकडे मार्गक्रमण करत आहे. आज कळंब शहरात वारीचे स्वागत करण्यात आले. यावेळी वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. लक्ष्मीकांत खंडागळे, सी. एन. कुलकर्णी आणि सचिन ढवळे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमात १६ महिलांसह एकूण ४५ जण सहभागी झाले असून, सायकलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवला जात आहे. बाईट लक्ष्मीकांत खंडागळे (सायकल वारी संयोजन) बंडोपंत दशरथ (स्वागत व भोजन व्यवस्था)0
0
Report
Advertisement
बांधावर की शाला में बालीराजा के खेत का नजारा और लावणी का प्रदर्शन
Oras Bk., Maharashtra:पीकपाणी राज्य शासनाच्या वतीने एक दिवस बळीराजासाठी हा उपक्रम सर्वच शाळांमध्ये राबविला जातोय. त्याचं अनुषंगाने शाळेतील मुलांना शेतात नेऊन त्याची माहिती शालेय मुलांना व्हावी या हेतूने बांधावरची शाळा हा उपक्रम राबविला जात आहे. तळकोकणात देखील जिल्हा परिषद शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जातं आहे. कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा हळवल नंबर 2 या प्रशालेच्या वतीने बांधावरची शाळा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मुलांना बळीराजाच्या शेतात नेऊन तरवा काढणे व लावणी करणे याची प्रात्यक्षिक दाखवून माहिती देण्यात आली. चिमुकल्यांनी तर धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान हे गीत गात तरवा काढला लावणी केली व बळीराजा प्रमाणेच शेताच्या बांधावर बसून न्याहरी केली.0
0
Report
रत्नागिरी में शिंदे गट से मुलाकात के चलते राजनीतिक हलचल तेज
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. बाळ माने शिंदेसेनेच्या वाटेवर? सचिन अहिर यांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण!.. बाळ माने यांनी नुकतीच विधान परिषदेचे नूतन उपसभापती सचिन अहिर यांची मुंबईत सदिच्छा भेट घेतली आहे.बाळ माने यांनी स्वतः या भेटीचा फोटो आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर शेअर केल्यामुळे ते आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना कमालीचे उधाण आले आहे.. काही महिन्यांपूर्वी ठाकरे गटातून हकालपट्टी झाल्यानंतर बाळ माने भाजपमध्ये जातील असे तर्क लढवले जात होते,मात्र भाजप नेत्यांच्या विरोधामुळे त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले नव्हते.. आता बदलत्या राजकीय परिस्थितीत बाळ माने यांनी शिंदे गटाशी जवळीक वाढवल्याचे दिसत असून,या अनपेक्षित भेटीमुळे आगामी काळात रत्नागिरीच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे..0
0
Report
नाशिक के नकली शालार्थ ID केस में बड़ा मोड़: आरोपी प्रशांत वाडीले गिरफ्तार
Dhule, Maharashtra:नाशिक येथील बहुचर्चित बनावट शालार्थ आयडी प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी प्रशांत वाडीले याला नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने धुळे येथून अटक केली आहे. आज त्याला धुळे जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असून, त्यानंतर पुढील तपासासाठी नाशिक येथे नेले जाणार असल्याची माहिती आहे. नाशिक मधील बहुचर्चित बनावट शालार्थ आयडी प्रकरणाच्या तपासात आर्थिक गुन्हे शाखेला महत्त्वाचे यश मिळाले आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी प्रशांत वाडीले याला धुळे शहरातून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, प्रशांत वाडीले यांची नुकतीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) शिक्षक आघाडीच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. अटकेनंतर नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचे पथक प्रशांत वाडीले यांच्या धुळे येथील निवासस्थानी दाखल झाले असून, तेथे सध्या झाडाझडती सुरू आहे. गेल्या सुमारे एक तासापासून ही कारवाई सुरू असून, पहाटेच नाशिकहून आलेल्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. या झाडाझडतीत महत्त्वाची कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे किंवा तपासाशी संबंधित इतर पुरावे हाती लागतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, प्रशांत वाडीले यांच्या अटकेमुळे बनावट शालार्थ आयडी प्रकरणातील आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, या प्रकरणाच्या तपासाला आता अधिक वेग येण्याची अपेक्षा आहे.0
0
Report
Advertisement
योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज की पालखी पंढरपूर के लिए भक्तिमय प्रस्थान
Shirdi, Maharashtra:Go davari tiri vaslelya Yogr gaze Sadguru Gangagiri Maharaj yanchya Sarla Bet yethun Pandharpur paid dindi che mothya bhaktimay vatavaranat Pandharpur kadhe prasthan jhale ahe. 200 varshachi parampara aslele ya palkhi sohalyat hazaror warakari sahabhagi jhale ani Shri Ramapur Shaharata palkhiche jalloshat swagat karwale gela. V/o - Sarala Betache mathadhipati Mahant Ramgiri Maharajanchya adhipattyaakhale tal mridung ani harinamacha jaIyghosh kart palkhine Pandharpukade prasthan kele ahe. Shri Ramapur nagaritat palkhiche ajalya swagat kele jhale. Shaharatil that te maidan ya thite bhaktimay vatavaranat pahila rihang sanhota savd dekhila gelay. Bite - Mahant Ramgiri Maharaj, mathadhipati Godavari dham Sarla Bet0
0
Report
महाराष्ट्र सरकार ने किसानों के लिए 2 लाख रुपए लाभ की घोषणा
Pandharpur, Maharashtra:महाराष्ट्र सरकार कडून राज्यातील शेतकऱ्यांसाठी या पूर्वीच्या कर्जमाफीत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही दोन लाख रुपयांचा लाभ मिळेल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. यानंतर पंढरपूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी संत नामदेव पायरीजवळ पेढे वाटून जल्लोष केला. आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर मधून कर्जमाफी आंदोलनाची अन्नत्याग करून सुरुवात केली होती. त्यामुळे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला0
0
Report
मुंबई-कोकण जैसी भारी बारिश अभी विदर्भ मराठवाड़ा में नहीं, किसानों को राहत की प्रतीक्षा
Yavatmal, Maharashtra:मुंबई आणि कोकणात ज्या पद्धतीने मुसळधार पाऊस झाला तसा पाऊस अद्यापही विदर्भ मराठवाड्यात झालेला नाही. विदर्भ मराठवाडा अजूनही कोरडाच असून, शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. झालेली पेरणी साधली पाहिजे अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.0
0
Report
Advertisement
