445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
पिंपरी चिंचवड के दुर्गादेवी टेकड़ी पर बिबटिया दिखा, सीसीटीवी में कैद तस्वीरें
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड - दुर्गादेवी टेकड़ी परिसरात बिबट्याचे दर्शन; दुर्गादेवी टेकड़ी वर बिबट्या फिरत असल्याचं सीसीटीव्ही समोर!0
0
Report
सोलापुर में 60 साल की लड़ाई के बाद सरकारी इंजीनियरिंग कॉलेज मंजूर
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात तब्बल 60 वर्षांच्या लढ्यानंतर शासकीय अभियांत्रिकी कॉलेज मंजूर - सोलापुरात तब्बल 60 वर्षांच्या लढ्यानंतर शासकीय अभियांत्रिकी कॉलेज मंजूर - मंगळवारी मंत्रालयातील कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला महत्त्वपूर्ण निर्णय - आ. देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केला होता पाठपुरावा - यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच प्रवेश प्रक्रियेला होणार सुरुवात - पहिल्या बॅचमध्ये तीन शाखात 180 विद्यार्थ्यांचा होणार प्रवेश - गेल्या अनेक वर्षांपासून अभियांत्रिकी कॉलेजची मागणी पूर्ण झाल्याने सोलापुरातील मोठ्या प्रमाणात असणाऱ्या कामगार वर्गांच्या पाल्यांना होणार फायदा0
0
Report
महात्मा फुले द्विशताब्दी महोत्सव के तहत वाशीम में चित्ररथ का जोरदार स्वागत
Washim, Maharashtra:महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती महोत्सवाच्या निमित्ताने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित निर्माण केलेल्या चित्ररथाचे वाशिम शहरात रात्री जोरदार स्वागत करण्यात आले.महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने हा चित्ररथ महाराष्ट्रभर फिरविण्यात येत असूनया चित्ररथामध्ये महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले यांचे अर्धाकृती पुतळे तसेच महात्मा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा,छत्रपती शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचेही पुतळे साकारण्यात आले आहेत.विशेष म्हणजे महात्मा फुले लिखित पुस्तक व पेन या प्रतीकांची प्रभावी मांडणी करण्यात आली असून भिडेवाड्याची प्रतिकृती देखील साकारण्यात आली आहे.या चित्ररथाचे वाशिम शहरात आगमन होताच नगराध्यक्ष अनिल केंदळे यांच्या सह नगर सेवक आणि विविध पक्ष,सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि विविध जाती धर्मातील नागरिकांनी जोरदार स्वागत केले.हा चित्र रथ वाशिम शहरातील विविध मार्गांनी फिरवण्यात आला.महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त राबविण्यात येणारा हा चित्ररथ उपक्रम सर्व धर्म आणि समाजात समतेची जाणीव दृढ करत नवचैतन्य निर्माण करणारा ठरत आहे.0
0
Report
Advertisement
वाशीम डंपिंग ग्राउंड में आग, धुआं से लोगों को सांस लेने में कठिनाई
Washim, Maharashtra:वाशीम: हिंगोली नाका परिसरातील डंपिंग ग्राऊंडला अचानक आग लागली.कचऱ्याचे मोठ्या प्रमाणात जळत असल्याने परिसरात दुर्गंधीयुक्त धूर पसरला असून,नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे.विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि श्वसनाचे रुग्ण यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. लोकवस्तीच्या जवळ डंपिंग ग्राऊंड असल्याने अशा घटना वारंवार घडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.त्यामुळे आग लवकरात लवकर विझवून डंपिंग ग्राऊंड शहराबाहेर हलवण्याची मागणी होत आहे.0
0
Report
कल्याण स्मार्ट सिटी प्रोजेक्ट पांच साल बाद भी अधूरा; यातायात समस्या गहरी
Kalyan, Maharashtra:कल्याणमध्ये स्मार्ट सिटीचं काम पाच वर्षापासून संथ गतीने सुरू सॅटिसच्या अर्धवट कामामुळे कल्याणकरांची सध्या तरी वाहतूक कोंडीतून सुटका नाही गेल्या पाच वर्षांपासून स्टेशन परिसरात कासव गतीने सॅटिस प्रकल्प त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. २०२१ इथे सॅटिसच्या कामाला सुरुवात झाली. मात्र पाच वर्षाचा कालावधी उलटून गेली तरीही सॅटिसचं काम अजून अर्धवट आहे. त्यामुळे स्टेशन परिसरात कल्याणकारांना रोजच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. दरम्यान या सॅटिसचं कामाचा वेग पाहता हे काम पूर्ण होण्यासाठी अजून काही कालावधी जाऊ शकतो.परिणामी यंदाच्या पावसाळ्यात देखील वाहतूक कोंडीतून कल्याणकरांची काही सुटका होईल असं वाटत नाही. याच सॅटिसच्या कामाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अतिष भोईर यांनी.0
0
Report
सावरघर गाँव ने 7000 पौधे लगाकर गाव को हरा-भरा बना दिया
Satara, Maharashtra:सावरघर - कराड तालुक्यातील सावरघर हे पुनर्वसित गाव असून, पाण्याची टंचाई असतानाही ग्रामस्थांनी एकत्र येत सुमारे ७००० झाडे लावून गावाला हिरवळ दिली आहे. ग्रामपंचायत आणि नागरिकांच्या सहभागातून गावात स्वच्छता, हरितीकरण आणि पर्यावरण संवर्धनावर भर देण्यात आला. प्रत्येक घरासमोर व सार्वजनिक ठिकाणी झाडांची लागवड करून गावाचे रूपांतर नंदनवनात झाले आहे. या उपक्रमामुळे सावरघर हे राज्यातील इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.0
0
Report
Advertisement
नाफेड के तहत ज्वारी खरीदी की नोंदणी में लंबी कतारें, अतिरिक्त कर्मचारी मांगे
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपिर येथे नाफेडमार्फत ज्वारी खरेदी नोंदणी सुरू होताच शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. मात्र नोंदणी प्रक्रिया संथ असल्यामुळे शेतकऱ्यांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे.यामुळे नोंदणी प्रक्रिया जलद करण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.0
0
Report
रत्नागिरी के गणपतीपुळे में अंगारकी संकष्ठी पर 70 हजार भक्त, 80 लाख का कारोबार
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त भाविकांची अभूतपूर्व गर्दी झाली होती. पहाटे साडेतीनपासूनच भक्तांचा महासागर लोटला होता. दिवसभरात सुमारे 70 हजार भाविकांनी बाप्पाचे दर्शन घेतल्याचा अंदाज असून या माध्यमातून परिसरात सुमारे 80 लाखांची आर्थिक उलाढाल झाल्याची शक्यता वर्तविण्यात आहे.0
0
Report
चांदवड़ तालुक़े में रिश्वत कांड: मंडल अधिकारी योगिता भोये 50 हजार लेते रंगे हाथ पकड़े गए
Chandvad, Maharashtra:चांदवड तालुक्यात महसूल विभागात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून त्याचाच आज एक प्रत्यय चांदवड तालुक्यातील खडक ओझर येथे समोर आला आहे यामध्ये मंडळ अधिकारी योगिता भोये यांना 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.0
0
Report
Advertisement
गर्मी की छुट्टियों में 812 अतिरिक्त बसें चलेंगी; 1800 से अधिक चालक तैनात
Ratnagiri, Maharashtra:राज्य मार्ग परिवहन मंडळाने या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावाला जाणाऱ्या प्रवाशांच्या सेवेसाठी नियोजित गाड्यांसोबतच अतिरिक्त गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. उन्हाळी जादा वाहतुकीसाठी राज्यभरातील विविध 812 अतिरिक्त बस चालवण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार अठराशे पेक्षा जास्त चालक आणि वाहकांची नेमणूक केली आहे.0
0
Report
नागपुर के चिखली लेआउट में देर रात आग से करोड़ों का नुकसान, कोई जनहानि नहीं
Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपूरच्या कळमना येथील चिखली लेआऊट परिसरात मध्यरात्री टिंबर ट्रेडर्सच्या (सॉ मिल) गोदामाला भीषण आगीत कोट्यावधींची नुकसान. - या घटनेत रामेश्वर टिंबर ट्रेडर्स आणि कमला टिंबर ट्रेडर्सचे मोठे नुकसान.. - या दुर्घटनेत सागवान लाकूड, दोन वूड कटिंग मशीन, टीन शेड, इलेक्ट्रिक वायरिंग आणि एसी पूर्णतः जळून खाक.. - सुमारे 1 कोटी 25 लाख रुपयांची मालमत्ता जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज.. - सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.. - मध्यरात्री लागलेल्या या आगीने पाहता पाहता रौद्र रूप धारण केले.. - घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मात्र आगीचे कारण अद्याप अस्पष्ट..0
0
Report
नसरापूर में चिमुड़िया के साथ दुष्कर्म के बाद हत्या, ब्राह्मण संगठनों ने कड़ी कार्रवाई की मांग
Yeola, Maharashtra:पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्गुण खून झाला. हा घटनेचा त्रास राज्यभरात उमटत असून नाशिकच्या येवला तालुक्यात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ व परशुराम संघटनेच्या वतीने काळ्याफिती बांधून येवला तहसीलदार आबा महाजन यांना विविध मागण्यांची निवेदन देण्यात आले. शक्ती कायद्याची अंमलबजावणी करावी, आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशा घोषणांनी तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता. याप्रसंगी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ व परशुराम संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी में गर्मी और उमस से लोग बेहाल, मानसून पूर्व बारिश की उम्मीद बढ़ी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यात आज तापमान आद्रताही वाढण्याचा इशारा.. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज रत्नागिरी जिल्ह्यातील तापमान आणि आद्रतेतही वाढ होणार असून तापमान 36 अंश सेल्सिअस राहणार आहे तर आद्रता ही 70 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.. सध्या तापमानापेक्षााही आद्रता कमालीची वाढू लागल्याने घामाच्या धारांनी नागरिकांना हैराण केले आहे.. काही दिवसांपूर्वी रत्नागिरीच्या तापमानाची नोंद 37°c झाली होती.. दमटपणा ही वाढला होता त्यामुळे नागरिकांना उन्हाच्या चटक्याबरोबरच घामाच्या धारा असाह्य करत होत्या.. आद्रतेत वाढ कायम राहिल्याने वातावरणातील दमटपणा त्रासदायक होत आहे. त्यामुळे पुन्हा आजचा दिवस अधिक उष्ण आणि दमट दिवस ठरणार आहे.. उकाडा दिवसेंदिवस असह्य होऊ लागल्याने आता मान्सूनपूर्व पावसाची प्रतीक्षा नागरिक करत आहेत..0
0
Report
वित्तीय संकट में स्थायी समिति ने 15 मिनट में 31 प्रस्ताव मंजूर किए
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर महापालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असताना आणि डोक्यावर कोट्यवधी रुपयांच्या कर्जाचा डोंगर असताना स्थायी समितीच्या बैठकीत मात्र पैशांची खैरात वाटली जात असल्याचे चित्र आहे. मंगळवारी सभापती अनिल मकरिये यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत अवघ्या १५ मिनिटांत तब्बल साडेतीन कोटी रुपयांच्या ३१ प्रस्तावांना झपाट्याने मंजुरी देण्यात आली. एवढ्या अल्पावधीत मोठ्या आर्थिक निर्णयांना विनाचर्चा हिरवा कंदील दाखवल्याने मनपाच्या कारभारातील पारदर्शकतेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मंगळवारी आयोजित या बैठकीत १३ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्ताला मंजुरी देण्यात आली. अनेक नव्या खर्चाच्या प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली.0
0
Report
नागपूर साइबर पुलिस के नौ अधिकारी निलंबित, फर्जीवाड़े और विभागीय आरोप सामने
Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपूर शहर पोलीस दलातील सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांसह नऊ जणांचे निलंबन - एकाच वेळी 9 जणांवर निलंबनाच्या कारवाईमुळे नागपूर पोलीस दलात खळबळ उडाली आहे... - नागपूर पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांनी ही कारवाई केली आहे... - पाचशे रुपयांच्या बेटिंगच्या एका फसवणुकीच्या प्रकरणात वरिष्ठांची परवानगी न घेता सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी थेट मुंबई पुण्यापर्यंत तपास केला. - त्यानंतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये मोठा अंतर्गत वाद सामोर येऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत याची तक्रार गेली होती - सायबर पोलीस ठाण्यातील गैर प्रकाराचा मुद्दा चव्हाट्यावर आल्यानंतर दीपक अग्रवाल यांच्याकडे तातडीने सायबर शाखेच्या पोलीस उपायुक्त पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.0
0
Report
Advertisement
