Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Oct 25, 2024 07:21:47
Yavatmal, Maharashtra
यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
UPUmesh Parab
Nov 08, 2025 05:43:28
Oros, Maharashtra:डॉक्टरच्या हलगर्जी पणामुळे रुग्णचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवत कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांनी वैध्यकीय अधिकाऱ्यांना घेराव घातला. उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या एक रुग्णाचा ब्लडप्रेशर 50 आणि प्लेटलेट्स केवळ 36 हजार असताना निष्काळजी पणाने त्या रुग्णाला डॉक्टरांनी घरी पाठवून दिले. घरी जाताच त्या रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे आक्रमक झालेल्या नागरिकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेराव घातला. संबंधित डॉक्टर वर कारवाई करण्याची मागणी करत नागरिकांनी मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतला. अखेर ग्रामस्थांच्या मागण्या मान्य करण्याच आश्वासन दिल्यानंतर तो मृतदेह ताब्यात घेण्यात आला. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य सेवा अजूनही व्हेंटिलेटरवर असून याकडे नेते मंडळी लक्ष देणार कधी असा सवाल उपस्थित केला जातोय..
3
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Nov 08, 2025 05:18:42
Palghar, Maharashtra:पालघर नगरपरिषद निवडणुकीच्या जाहीर केलेल्या मतदार यादीतील त्रुटींबाबत नागरिकांनी केलेल्या 4674 अर्जांपैकी 3569 अर्ज स्वीकारले असून अर्जांमध्ये झालेल्या 77 टंक लेखनाच्या चुका पुरवणी मतदार यादीत सुधारण्यात आल्याची माहिती पालघर निवडणूक निर्णय अधिकारी श्याम मदनुरकर यांनी दिली आहे. प्रारूप मतदार यादी बाबत उपस्थित केलेल्या आक्षेपांचे राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना अनुसारच बदल करण्यात आले असून असे करताना प्रशासन कोणत्याही राजकीय दबावाच्या प्रभावाखाली आले नसल्याची स्पष्टोक्ती त्यांनी केली. दरम्यान मतदार यादीमधील त्रुटी संदर्भात सर्वच राजकीय पक्षाने मुद्दा उपस्थित केला होता.
4
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 08, 2025 05:18:30
Washim, Maharashtra:अँकर: वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार परिसरात तुरीच्या पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. काही दिवसांपासून झालेल्या वातावरणातील अचानक बदल, ढगाळ हवामान आणि वाढलेली आर्द्रता यामुळे या किडीचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाल्याचे शेतकऱ्याकडून बोलल जात आहे. खरीप हंगामात सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी तुरीच्या पिकाकडे शेवटच्या आशेने पाहिले होते. मात्र, आता तुरीच्या पिकावरही अळीचा हल्ला झाल्याने बळीराजा पुन्हा एकदा धास्तावला आहे. सध्या पीक वाचवण्यासाठी ट्रॅक्टरद्वारे फवारण्यांची लगबग सुरू असून, शेतकरी आपल्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन तुरीवरील रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे.
2
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 08, 2025 05:18:07
Pandharpur, Maharashtra:Anchor - माजी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र भाजपा मध्ये गेल्यानंतर धास्तावलेल्या आमदार अभिजीत पाटील यांनी पंढरपूर आणि माढा तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्यासाठी आपल्या कट्टर विरोधकांना एकत्र करून मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे. यात महायुती मधील अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे पदाधिकारी सुद्धा सहभागी झाले आहेत.भारतीय जनता पार्टीच्या आव्हाना पुढे ही मोट टिकणार का ? याची चर्चा सुरू झालेली आहे. मात्र एकेकाळच्या कट्टर विरोधकांना आता अभिजीत पाटलांचं नेतृत्व माढा आणि पंढरपूर तालुक्यातील आगामी निवडणुकीत मान्य करावं लागणार आहे.
4
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 08, 2025 05:03:27
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर: वाशिम जिल्ह्यातील चार नगरपालिका आणि एका नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या २ डिसेंबरला होणार असून, १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र, अद्यापपर्यंत ना महायुतीत सहमती झाली, ना महाविकास आघाडीत ठोस निर्णय घेण्यात आला आहे. या अनिश्चिततेमुळे कोणत्याही पक्षाने आपली अधिकृत उमेदवार यादी जाहीर केलीली नाही, त्यामुळे शेकडो इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. काही ठिकाणी संभाव्य उमेदवारांनी स्वबळावर लढणार असा नारा देत प्रचाराची सुरुवात केल्याचीही चर्चा आहे. भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या महायुतीत जागावाटपावर एकमत न झाल्याचे बोलले जात आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस, उद्धवसेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) या महाविकास आघाडीतही मतभेद कायम आहेत प्रमुख प्रभागांवर कोणत्या पक्षाचा दावा मजबूत ठेवायचा, यावरून चर्चा पुढे सरकलेली नाही. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असला तरी, उमेदवारांची यादी न जाहीर केल्याने कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षांतर्गत अंतिम चर्चेनंतर पुढील २४ ते ४८ तासांत पहिल्या उमेदवार याद्या प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
1
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 08, 2025 04:49:13
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूरकरांना विमानसेवेचे आणखी एक गिफ्ट, दर रविवारी सोलापूर ते बंगळूरू विमानसेवा सुरु - सोलापूर विमानतळ आता बिझी एअरपोर्ट होणार, विमानसेवेची व्याप्ती वाढली - दर रविवारी सोलापूर ते बंगळूरु विमानसेवा सुरु तर दररोज सोलापूर - मुंबई - बेळगांव विमानसेवेला देखील होणार सुरवात - 10 नोव्हेम्बर पासून सोलापूर -मुंबई - बेळगाव हवाई मार्गावर दररोज विमानसेवा असणार. - तर 16 नोव्हेंबर पासून बेंगळुरूसाठी दर रविवारी विमानसेवा होणार सुरू, शुक्रवारपासून तिकीट विक्री होणार सुरू - सोलापूर मुंबई चार दिवस विमानसेवा सुरू आहे या मार्गावर 75 टक्के प्रवाशांचा प्रतिसाद - सोलापूर गोवा विमानसेवा पूर्ण क्षमतेने सुरूय - आता सोलापूरकर सोलापूर ते तिरुपती विमानसेवेच्या प्रतीक्षेत आहेत
5
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 08, 2025 04:47:08
Washim, Maharashtra:अँकर : वाशिम जिल्ह्यातीलचार नगरपरिषद आणि एक नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीरकरण्यात आला असून त्यानुसार जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी कुंभेजकर म्हणाले की, आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी. तसेच, नि:पक्ष आणि मुक्त वातावरणात निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून, त्यासाठी सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे, असेही त्यांनी आवाहन केले. या बैठकीसाठी जिल्हा प्रशासनातील अधिकारी, तसेच विविध राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.
4
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 08, 2025 04:46:49
Ratnagiri, Maharashtra:गणपतीपुळे समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या मुंबईतील एका तरुणाचा बुडून मृत्यू झालाय तर दोघांना वाचवण्यात आलय.प्रफुल्ल दिनेश त्रिमुखी अस या मृत तरुणाचं नाव आहे तर भीमराज आगाळे आणि विवेक शेलार या दो तरुणांना वाचविण्यात स्थानिक वॉटर स्पोर्ट व्यवसायिक आणि जीवरक्षकांनी वाचवलेय.मुंबईतून पाच तरुण देवदर्शन व पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आले थे त्यांना समुद्रात पोहण्याचा मोह आवरता आला नाही समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं ते समुद्रात खेचले गेले ही बाब स्थानिक वॉटर स्पोर्ट व्यवसायिकांच्या लक्षात आली त्यांनी तात्काळ समुद्रात उडी मारुन या तिघांना बाहेर काढले मात्र यात एकाचा मृत्यू झाला तर दोघांना वाचवण्यात यश आलेय.या दोघांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
4
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 08, 2025 04:03:55
Washim, Maharashtra:वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या उन्नती या सुधारित वाणाला तब्बल ८,५३० प्रति क्विंटल असा उच्चांकी दर मिळाल्याची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या एका दिवसातच या वाणाच्या दरात १,२०० ची झपाट्याने वाढ झाल्याचे बाजार समितीच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. ६ नोव्हेंबर रोजी ११-३५ सोयाबीन वाणाला ४,४५० ते ७,३३० दरम्यान दर मिळाला होता. तर ७ नोव्हेंबर रोजी त्याच वाणाच्या भावात वाढ होऊन दर ४,५५० ते ८,५३० प्रति क्विंटल इतका झाला. तज्ञांच्या मते, आगामी हंगामात बियाण्यासाठी उन्नती वाणाची मागणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन बियाणे कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केली आहे. त्यामुळेच सोयाबीनच्या दरात ही अभूतपूर्व वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दर वाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधाणी भावना निर्माण झाली असून, आगामी काळातही दर स्थिर राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
12
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 08, 2025 04:02:01
Akola, Maharashtra:राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे सर्वेसर्वा शरद पवार आज अकोला दौऱ्यावर असून, त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात शेतकऱ्यांशी संवाद साधून होणार आहे. सकाळी दहा वाजता अकोल्यातील कान्हेरी सरप येथे शरद पवार शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाला आमदार रोहित पवार यांच्यासह स्थानिक नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.यानंतर शरद पवार हे पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधणार असून, राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर आपली भूमिका मांडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर दुपारी शरद पवार अकोल्यातील खडकी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान संस्थेच्या वास्तूचे अनावरण करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे अकोला जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच रंगले आहे.
10
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 08, 2025 03:49:55
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:कर्जबाजारी झालेल्या नोकरांनीच मालकाचे चार लाख रुपये चोरले, 12 तासात गुन्हा उघडकीस कर्जबाजारीपणातून मालकाचे चार लाख रुपये चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिन्सी परिसरात हा सर्व प्रकार घडला असून पोलिसांनी अवघ्या 12 तासांतच आरोपींना पकडत या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मालकाच्या सांगण्यावरून चार लाख रुपये आणण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यानीच त्याच्या दोन साथीदारांसह पैसे चोरीचा डाव रचत ही चोरी केली. जिन्सी पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी फरदीन शेख याला अटक केली आहे. कर्जामुळे अडचणीत सापडलेल्या आरोपीने पैशांच्या लालसेपोटी हा गुन्हा केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. जिन्सी पोलिसांनी तात्काळ कारवाई करून संपूर्ण रक्कम जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.
13
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 08, 2025 03:49:22
Jalna, Maharashtra:जालना : बागेश्वरी साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा, ऊसाला प्रतिटन 3 हजार 200 रुपये भाव देण्याची मागणी अँकर : 2024-25 च्या गळीप हंगामातील 233 रुपये तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाचे वजन कारखान्याव्यतिरिक्त ईतरत्र करण्यास परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जालन्यातील बागेश्वरी या खाजगी साखर कारखान्यावर मोर्चा काढलाय. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबरच शेतकरी देखील सहभागी झाले होते. या आंदोलना दरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून बागेश्वरी साखर कारखान्याचा परिसर दणाणून सोडला. यंदा ऊसाला प्रति टन 3 हजार 200 रुपये भाव देण्याची मागणीही स्वाभिमानीच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान या आंदोलनावळी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता.
9
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 08, 2025 03:49:06
Akola, Maharashtra:आगामी निवडणुकीपूर्वी राज्यात मोठ्या प्रमाणावर पक्षांतराचे सत्र सुरू झाले आहे. अकोट येथे भाजप युवती आघाडीच्या माजी जिल्हा उपाध्यक्षा चंचल पितांबरवाले यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला आहे. अकोटमध्ये पार पडलेल्या या प्रवेश सोहळ्याला स्थानिक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. चंचल पितांबरवाले यांनी आधीच भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. अकोट नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी या वेळी महिला राखीव जागा निश्चित असल्याने चंचल पितांबरवाले या संभाव्य दावेदार म्हणून पाहिल्या जात आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे अकोटमधील राजकीय समीकरणांमध्ये नव्या चर्चांना उधाण आलं आहे.
11
comment0
Report
Advertisement
Back to top