Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Oct 25, 2024 07:21:47
Yavatmal, Maharashtra
यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 21, 2025 15:45:36
Ambernath, Maharashtra:अंबनाच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात भरधाव कारने तीन दुचाकी स्वरांना  उडवले अपघाताचे सीसीटीव्ही आले समोर Anchor अंबरनाथच्या पूर्वे आणि पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपूलावर आज संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला ,या अपघातात पाच ते सहा जण गंभीर जखमी असल्याचं बोललं जातंय, एक भर धाव कार पूर्वेकडून पश्चिमेला जात असताना या कारने तीन दुचाकी स्वारांना उडवलं त्यातील एक दुचाकी स्वार तर दुचाकीसह पुलावरून खाली फेकला गेला, या अपघाताचे सीसीटीव्ही समोर आले असून या सीसीटीव्हीरून या अपघाताची भीषणता समोर येते ,या सर्व जखमींना उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आलं असून यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे, चंद्रशेखर भुयार अंबरनाथ चंद्रशेखर भुयार
88
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 21, 2025 14:33:39
Kalyan, Maharashtra:खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे उन्होंने विविध विषयांसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली. कल्याण स्टेशन परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानासाठी 37 गुंठे डिमार्केशन केलेली जागा द्यावी, या बाबत खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी आयुक्तांकडे मागणी केली. सुरेंद्र टेंगळे (पालिका नगर रचना अधिकारी) नागरिकांनी लेखी तक्रार करावी काळ फसणार नाही, ऑफिस मध्ये जाऊन मारणार. खासदार सुरेश उर्फ बाळुमामा म्हात्रे यांनी लोकांच्या तक्रारी आल्याने चर्चा करण्यासाठी अधिकाऱ्याला थांबवले होते, परंतु तो थांबला नसल्याने खासदार चांगलेच संतापले; नागरिकांनी लेखी तक्रार करावी, काळ नाही फसणार तर ऑफिस मध्ये मारणार. त्यांनी नागरिकांच्या कराच्या पैसे वर यांच्या पगार होतात, काम करत नाही. पालिका अधिकारी मधील टेंगळे हे कुठलाही नागरिकांचा ऐकत नाही; त्यांना मी या ठिकाणी थांबायला सांगितलं मात्र ते निघून गेले. त्यांच्या उमटपणाच्या गोष्टीमुळे आयुक्तांच्या कानावर आम्ही विषय ठेवला आहे. टेंगळे ने लोकांसोबत आदराने वागाव; यापुढे त्याची तक्रार आली तर टेंगळेला त्याचा काय काम आहे हे त्याच्या कार्यालयात शिरून त्याला समजून सांगणार. कल्याण मराठी तरुण सुसाईड ही घटना घडली ती चुकीची; एखादा व्यक्ती जीवास मुखेल, सगळ्यांनी या गोष्टीचा भान ठेवला पाहिजे. घडलेली घटना ही दुर्दैवी; राजकारण करा नये, एखाद्याला राजकारणाची सवय असल्यास कोणालाही मी काय करू शकत नाही. उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र यायला हवं; महाराष्ट्रातील लोकांची इच्छा, ते आमच्यासाठी नाही तर लोकांसाठी एकत्र येत आहेत. काँग्रेसच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना त्रास असेल तो विचारण्याची गरज वेगळी; मग सगळ्यांनी येऊन एकत्र काम करायचं, ही आजची काळाची गरज. इतर राज्यातील निकाल पाहिल्या गेला तर महाराष्ट्रात लोकसभेत काँग्रेसचा निकाल चांगला असला तरी शिवसेना व राष्ट्रवादी यांनी प्रामाणिकपणे काम केल्याने काँग्रेसचा निकाल आला. कुठल्याही निकालात होऊन जाण्यापेक्षा सगळे एकत्र चालावं ही सगळ्यांची गरज. आम्ही पवार यांच्य म्हणण्याची सहमत; एक महाराष्ट्रीयन म्हणून माझं मत व्यक्त केलं तर राज ठाकरे, उद्धव ठाकरे खत्री आणि सगळ्यांची इच्छा. जेव्हा सर्वे झाले तेव्हा निकाल अनपेक्षित लागलेला आहे; त्यांच्या सर्वे नंतर लोकांनी कोणालाही काही मतदान केलं तरी परिणाम योग्य येत नाही. महायुतीत वादविवाद होतच राहणार, त्यामुळे खरा रणसंग्राम लवकरच दिसणार; 2017 चा निकाल पाहिला तोच काहीतरी घडू नये ही अपेक्षा. ग्रामीण भागात महाविकास आघाडी आम्ही एकत्र लढत आहोत; शहरातदेखील लढावी, ही माझी मत. byte... सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) खासदार.
99
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Nov 21, 2025 14:21:16
140
comment0
Report
SNSWATI NAIK
Nov 21, 2025 14:20:54
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई नेरुळ स्थित छत्रपती शिवाजी महाराज स्मारक का हालिया उद्घाटन राज्य के वनमंत्री गणेश नाईक ने किया। कार्यक्रम में मुख्यमंत्री और दोनों उपमुख्यमंत्रियों के उपस्थित रहने की सूचना आई थी, लेकिन वे उपस्थित नहीं रहे। उद्घाटन के लिए पत्र पूर्व महापौर द्वारा दिया गया था; अगर समय नहीं मिला तो ऑनलाइन उद्घाटन भी हो सकता था। देरी के कारण शिवप्रेमी द्वारा उद्घाटन किया गया। मनसे नेता अमित ठाकरे द्वारा किया गया आंदोलन यह अवास्तविक प्रतीत होता है; इसलिए उन पर दर्ज होने वाले अपराध वापस लेने की मांग वनमंत्री गणेश नाईक ने की है। साथ ही अमित ठाकरे की उनकी पाठराखण नहीं होने की बात भी कही गई।
117
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 21, 2025 14:18:08
112
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 21, 2025 14:13:41
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या नगरसेवक पदाच्या तीन उमेदवारांचे अर्ज माघारी अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या नगरसेवक पदाच्या तीन उमेदवारांचे अर्ज माघारी निलेश लवटे, सैफन कोरबू, कौसर नदाफ या तीन उमेदवारांनी निवडणुकीतून घेतली माघार काँग्रेसने अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीसाठी एकूण 17 जागासाठी उमेदवार जाहीर झाले होते त्यातील तिघांनी आता माघार घेतली दरम्यान भाजपने पैसा आणि दडपशाही वापर करून उमेदवार फोडल्याचा काँग्रेसचा आरोप तर गावचा विकास भाजप करत असल्याने काँग्रेसच्या उमेदवारांनी स्वइच्छेने माघार घेतल्याचा भाजपचे प्रतिउत्तर अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी तिरंगी लढत होतेय निवडणूक लढवत असलेले तीनही पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यरोप करताना दिसतायत बाईट : अशपाक बळोरगी, काँग्रेस नगराध्यक्ष उमेदवार बाईट : मिलन कल्याणशेट्टी, भाजप नगराध्यक्ष उमेदवार
122
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 21, 2025 14:12:11
Kalyan, Maharashtra:कल्याणात दिव्यांग स्टॉलवर केडीएमसीची कारवाई. ANC-कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने 2008 पासून कार्यरत असलेल्या एका दिव्यांग बांधवाच्या स्टॉलवर कारवाई केल्याने आज वातावरण तापले. या कारवाईविरोधात अपंग विकास महासंघ आणि परिसरातील अनेक दिव्यांग बांधवांनी केडीएमसी मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलन पुकारले आहे. दिव्यांग व्यक्तीच्या उपजीविकेचा प्रश्न असताना, कोणतीही पूर्वसूचना न देता स्टॉल हटवणे ही अमानुष आणि बेकायदेशीर कारवाई आहे. संबंधित सहाय्यक आयुक्तांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, करण्याची मागणी केली आहे. या आंदोलनकर्त्यांनी केली. केडीएमसी बाहेर घोषणाबाजी करत अपंग बांधवानी निषेध व्यक्त केला. दरम्यान केडीएमसीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक स्पष्टीकरणानुसार, स्टॉल हा अनधिकृत होता तसेच पूर्वीही नोटीस देण्यात आली होती. नियमानुसारच कारवाई करण्यात आली असून, कोणतीही अन्यायकारक वागणूक करण्यात आलेली नाही, असा दावा केला आहे.
108
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 21, 2025 14:07:48
81
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 21, 2025 14:07:21
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली जिल्ह्यातल्या नगरपरिषद नगरपंचायतीचे चित्र स्पष्ट,नगराध्यक्ष निवडणुकीत 41 तर नगरसेवका पदासाठी 594 जण रिंगणात.. सांगली जिल्ह्यातल्या सहा नगरपरिषद व दोन नगरपंचायतीसाठी निवडणूक पार पडत असून अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून 60 जणांनी माघार घेतली आहे,त्यामुळे 41 जण नगराध्यक्ष निवडणूकीच्या रिंगणात आहेत.तर नगरसेवक पदाच्या 181 जागेसाठी दाखल झालेल्या 1 हजार 678 अर्जंपैकी 1 हजार 93 जणांनी माघार घेतली आहे,त्यामुळे 594 जण रिंगणात आहेत. त्यामुळे आता नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकांचे चित्र स्पष्ट झालेला आहे. ईश्वरपूर नगर परिषदेसाठी दुरंगी अशी लढत पार पडत आहे.महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत या ठिकाणी होणार आहे.जयंत पाटलांच्या विरोधात महायुती आणि विरोधक या ठिकाणी एकवटले आहेत. आष्टा नगरपालिकेसाठी देखील महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे. पलूस नगर परिषदेसाठी तिरंगी लढत होत असून या ठिकाणी महायुतीमध्ये बिघाडी झाली आहे.भाजपा स्वबळावर लढत आहे. राष्ट्रवादी अजित पवार स्वतंत्र लढत आहे. महाविकास आघाडी या ठिकाणी एकत्रित लढत आहे. तासगाव नगरपरिषदेसाठी चौरंगी लढत होणार आहे,या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गट आघाडी,भाजपा,राष्ट्रवादी अजित पवार गट आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडी अशी लढत होणार आहे. विटा नगर परिषदेसाठी तिरंगी लढत होत आहे.महायुतीमध्ये ही लढत होत आहे.यामुळे या ठिकाणी भाजपा,शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार अशी तिरंगी लढत होणार आहे,काँग्रेस आणि राष्ट्रवादी या ठिकाणी लढत नाही. जत नगर परिषदेसाठी चौरंगी लढत होत आहे भाजपा स्वबळावर लढत आहे,शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट देखील स्वतंत्र लढत आहे तर महाविकास आघाडी एकत्रित लढत आहे. आटपाडी नगर परिषदेसाठी दुरंगी लढत होत आहे.भाजपा स्वबळावर लढत आहे, शिवसेना शिंदे गट आणि स्थानिक आघाडी एकत्रित लढत आहे. शिराळा नगरपंचायतीसाठी महायुतीमध्ये बिघाडी झाली आहे.भाजप व शिवसेना शिंदे गट एकत्रित आघाडी करून लढत आहे,तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गट दोघे एकत्र येऊन लढत आहेत,या ठिकाणी काँग्रेसची भूमिका अद्याप स्पष्ट आहे.
119
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 21, 2025 14:07:04
202
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 21, 2025 13:50:31
Dhule, Maharashtra:राज्यात भाजपची स्पष्ट सत्ता आलेल्या दोंडाईचा नगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या सर्व बिनविरोध नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नयनकुवर रावल आणि सर्व 26 नगरसेवकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. दोंडाईच्यात रावल गडीवर विजयाचा आनंदोत्सव साजरा करत असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनी वर सर्व निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना शुभेच्छा दिल्या. दोंडाईचा शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचा आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळेस दिलेला आहेत. अशाच पद्धतीने भाजप वरती विश्वास दाखवत रहा, असं आवाहन फडणवीस यांनी नागरिकांना केले. तसेच लोकप्रतिनिधींना केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये दोंडाईचा विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचा आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल.
154
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Nov 21, 2025 13:45:41
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या पुसद येथे भाजपचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदांच्या उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. पुसद मध्ये महायुतीतील तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढत असून भाजपाचे निखिल चिद्दरवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची पत्नी मोहिनी यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. केंद्र व राज्यात भाजपचे सरकार असल्यामुळे सरकारच्या योजनां मिळवण्यासाठी भाजपाचा नगराध्यक्ष निवडून द्या असे आवाहन बावनकुळे यांनी केले. काँग्रेस पक्ष संपत चालला आहे, वडेट्टीवार नाना पटोलेचे तोंड बघत नाहीत, ते दोघे यशोमतींचे तोंड बघत नाहीत, हे सर्व हर्षवर्धन सपकाळ यांना विचारत नाही आणि काँग्रेसचे हे सारे नेते राहुल गांधींना विचारत नाही अशी विचित्र अवस्था काँग्रेसची झाली आहे असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.
98
comment0
Report
Advertisement
Back to top