445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
करजत-खोपोली मार्ग पर अज्ञात महिला का शव: इलाके में हड़कंप, मौत की वजह जांच
Karjat, Maharashtra:कर्जत-खोपोली मार्गावर एका अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पळसदरी परिसरात रस्त्यालगतच्या खड्ड्यात हा मृतदेह सापडला असून मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पळसदरी परिसरात स्थानिकांना तीव्र दुर्गंधी येत असल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला. मृत महिला अंदाजे ३५ ते ४० वर्षांची असून तिचा मृतदेह सुमारे आठ दिवसांपूर्वीचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महिलेने कुर्ती व निळ्या रंगाची पँट परिधान केली होती. तिच्या उजव्या हातात एक बांगडीही आढळून आली आहे. मृत्यू नेमका कशामुळे झाला, हत्या आहे की अन्य काही कारण, याचा तपास कर्जत पोलीस करीत आहेत. तसेच महिलेची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतर अधिक माहिती समोर येणार आहे.0
0
Report
रायगढ़ किले के स्वच्छता मुद्दे पर मनसे का अनोखा प्रदर्शन, शौचालय का भांडा भेंट
Chendhare, Maharashtra:महाराष्ट्र नवनिर्माण सेना के किल्ले रायगडावर अनोखे आंदोलन. रायगड विकास प्राधिकरण और पुरातत्व विभागाला शौचालयाचे भांडा भेट देण्यात आला. मनसेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष राजू पार्टे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. दोन दिवसांपूर्वी एका पर्यटक महिलेने रायगड किल्ल्यावरील शौचालयाचा प्रश्न सोशल मिडीयावरून महाराष्ट्राला समोर मांडला होता. महिलेच्या व्हायरल व्हिडिओची दखल घेत शौचालयाचे भांडे भेट देण्यात आले.0
0
Report
वाशीम में उपोषण के बीच आरक्षण पर आज शाम तक बड़ी खबर की उम्मीद
Washim, Maharashtra:वाशिम: मनोज जरांगे रखरखत्या उन्हात उपोषण करत असून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्यांची समजूत घालत आहेत आज सायंकाळपर्यंत चांगली गोड बातमी येईल असा मोठा दावा मंत्री संजय राठोड यांनी वाशिमच्या पोहरादेवी माध्यमांशी बोलताना केलाय. तर बंजारा आरक्षणासंदर्भातही माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमण्यात आली असून तीन महिने हा आयोग राज्यभर फिरून सर्वांचे मतं जाणून घेणार आहे आणि त्यानंतर राज्य सरकारकडे शिफारस करणार आहे. अशीही माहिती दिलीये. बाईट:संजय राठोड, मंत्री मृदा व जलसंधारण0
0
Report
Advertisement
करमाला पुलिस ने अवैध इंजेक्शन बिक्री के आरोप में दो को गिरफ्तार, 150 इंजेक्शन जब्त
Pandharpur, Maharashtra:करमाळा पोलिसांनी टर्मीन इंजेक्शनच्या एकुण १५० बाटल्या जप्त केल्या आहेत. करमाळा मधील कर्जत रोडवरील पाण्याची टाकी जवळ पोलिसांनी साध्या वेशात जावून सदर इंजेक्शन विक्रीस आणलेल्या इसमांवर पाळत ठेवून सदर पथकांनी प्रतिबंधित इजेंक्शन विक्री करीत असलेल्या दोन व्यक्तींना जागीच मुददेमालासह पकडुन प्रतिबंधित इंजेक्शन ताब्यात घेतले. सदर इंजेक्शन परिशिष्ठ एच प्रवर्गात मोडत असल्याने ते फक्त डॉक्टरच्या प्रिस्क्रीप्शन व्दारेच विक्री करणे बंधनकारक आहे. सदरची औषधे डॉक्टरांचे चिठ्ठी शिवाय, औषधाचा मुळ गुणधर्म माहित नसतांना, व त्याचे खरेदी बिल नसताना अवैद्य मार्गाने प्राप्त करुन अशा औषधाचे वापरामुळे स्वास्थास जिवीतास हानी होण्याची शक्यता आहे. तसेच त्यातील विषारी द्राव्याचे दुष्परीणाम होवून इंजेक्शन घेणारे व्यक्तींचे जिवीतास धोका किंवा आरोग्यास गंभीर दुखापत होवू शकते हे माहीत असताना नमुद इंजेक्शन अवैधरीत्या प्राप्त करुन गैरवापर करण्याच्या उददेशाने अनाधिकृतपणे बेकायदेशीररित्या विक्री करण्याचा प्रयत्न झाला आहे. सदर व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला आहे0
0
Report
अकोला अदालत ने 15 साल बाद साजिद खान पठाण समेत 10 आरोपी को निर्दोष मुक्त किया
Akola, Maharashtra:अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने तब्बल 15 वर्षांपूर्वी घडलेल्या आंदोलन प्रकरणात काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांच्यासह अन्य आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. 2010 मध्ये काँग्रेसच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याच्या प्रकरणाचा निकाल न्यायालयाने दिला आहे. 2010 मध्ये काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान प्रतीकात्मक पुतळा जळण्यात आला होता. त्यानंतर आरएसएस कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली होती. या आंदोलनात सध्याचे काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण तसेच माजी महापौर मदन भरगड ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते ) यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा सहभाग होता. आंदोलनादरम्यान पोलिसांनी आणि आरएसएस कार्यकर्त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आंदोलकां मध्ये आणि अर्जच कार्यकर्ता आणि पोलिसांमध्ये जळालेला पुतळा हिसकावण्याचा प्रयत्न झाला होता.या घटनेत काही आरएसएस कार्यकर्ते आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी दीर्घकाळ सुरू होती. अखेर सुमारे 15 वर्षांनंतर अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने निकाल देत आमदार साजिद खान पठाण, माजी महापौर मदन भरगड यांच्यासह दहा आरोपींची निर्दोष सुटका केली आहे. 15 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाचा अखेर निकाल लागला असून न्यायालयाच्या निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.0
0
Report
यवतमाळ के वाणी में गोठे की आग, आठ बकरियाँ जलकर मर गईं; कारण साफ नहीं
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वाणी तालुक्यातील बेसा येथे आज दुपारी लागलेल्या भीषण आगीत गोठ्यात बांधून ठेवलेल्या आठ बकऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. बकरीपालक शेतकरी दत्तू गोहोकार ह्यांच्या ह्या बकऱ्या होत्या. सकाळी बकऱ्यांना चारून आणल्यानंतर त्यांना गावातील गोठ्यात बांधून ते घरी परतले. त्यानंतर काही वेळातच गोठ्याला अचानक आग लागली. गोठ्यात मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेला चारा असल्याने आगीने क्षणार्धात उग्र रूप धारण केले. त्यानंतर वणी येथील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत गोठ्यात बांधलेल्या आठ बकऱ्या जिवंत जळाल्या होत्या. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.0
0
Report
Advertisement
यवतमाळ: साहेबराव कांबळे ने अपक्ष नामांकन दाखल किया, महा-आघाडी को कड़ा मुकाबला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधान परिषद निवडणूकिसाठी काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, सोमवारी ते महाविकास आघाडीकडून काँग्रेसचा अधिकृत अर्ज दाखल करतील. 446 पैकी महाविकास आघाडीकडे 195 चे संख्याबळ आहे, परंतु आपण स्थानिक चे उमेदवार असल्याने आणि निवडणूक ही गोपनीय असल्याने विजय आपल्याच पारड्यात येईल असा दावा साहेबराव कांबळे यांनी केला. साहेबराव कांबळे हे कॉग्रेस चे प्रदेश सरचिटणीस असून त्यांनी २०२४ मध्ये उमरखेड विधानसभा मतदारसंघात काँग्रेस कडून निवडणूक लढवली होती मात्र त्यांचा भाजप उमेदवाराने पराभव केला होता. कांबळे यांच्या विरोधात महायुती कडून कोणाला उमेदवारी मिळते याकडे लक्ष लागले आहे. बाईट : साहेबराव कांबळे : उमेदवार0
0
Report
कल्याण मेट्रो मॉल परिसर में मद्यपान से आतंक, होटल चालक पर हमला CCTV में
Kalyan, Maharashtra:कल्याण पूर्वेतील मेट्रो मॉल परिसरात रात्रीच्या वेळी मद्यपी आणि नशेखोरांचा उपद्रव वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मेट्रो मॉल परिसरात थंड पाण्याची बाटली न दिल्याने दारूच्या नशेत धुंद असलेल्या तरुणांनी एका हॉटेल चालकाला बेदम मारहाण केली आहे. ही महाराणीची घटना CCTV कॅमेरात कैद झाली आहे. मेट्रो मॉल परिसरात रात्री उशिरापर्यंत काही व्यक्ती रस्त्यावर बसून मद्यपान ,नशा करतात. मद्यधुंद अवस्थेत आरडाओरडा, शिवीगाळ तसेच जाणाऱ्या येणाऱ्यांना त्रास देण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे त्यामुळे नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण आहे.0
0
Report
मोदी के इंधन बचत के आह्वान के बीच राठोड के हेलीकॉप्टर दौरे पर विरोधाभास
Washim, Maharashtra:अँकर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचा आवाहन केलेलं असतांना मंत्री संजय राठोड यांचा हेलिकॉप्टर दौरा आणि शासकीय वाहनांचा मोठा ताफा वाशिमच्या पोहरादेवी बघायला मिळाला होता यावर संजय राठोड यांनी सर्व सर्व केली असून माध्यमांनी प्रश्न विचारला असता आम्ही वाहनांचा ताफा निम्मा केलाय,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला आम्ही सर्वच मंत्री आणि मुख्यमंत्री सुद्धा प्रतिसाद देत असल्याचे सांगितलं प्रत्यक्षात मात्र संजय राठोड यांच्या ताफ्यात 20 ते 22 शासकीय वाहन असल्याचं समोर आलंय.0
0
Report
Advertisement
केडीएमसी ने 12 घंटे पानी आपूर्ति बंद की चेतावनी: कब और कहाँ?
Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवली महानगरपालिका 2 जूनला मंगळवारी 12 तास पाणी पुरवठा बंद राहणार. कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत येत्या मंगळवार दि. ०२ जूनला १२ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत ही पाणी कपात लागू राहणार असल्याची माहिती केडीएमसीच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. भारतीय हवामान खात्याने यंदा अलनिनो आणि आयओडीच्या प्रभावामुळे पावसाळा उशिरा सुरू होण्याची शक्यता वर्तवली आहे. संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी राज्य सरकार आणि जलसंपदा विभागाच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.येत्या मंगळवारी बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रांमधून होणारा पाणी पुरवठा सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे कल्याण पूर्व-पश्चिम, डोंबिवली पूर्व-पश्चिम तसेच ग्रामीण भागातील अनेक परिसरावर याचा परिणाम होणार आहे.दरम्यान महापालिकेने नागरिकांना आवश्यक तेवढाच पाणीसाठा करून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे.0
0
Report
ठाणे के डॉ. ओंकार पावसकर के क्लिनिक में दूसरी बार चोरी, CCTV में चोर की हलचल कैद
Thane, Maharashtra:ठाण्यातील कावेसर येथील डॉ. ओंकार पावसकर यांच्या प्राण्यांच्या दवाखान्यात वर्षभरात दुसऱ्यांदा चोरीची घटना घडली आहे. गुरुवारी पहाटे अज्ञात चोरट्याने दवाखान्याचे शटर उचकटून रोकड व मांजरींचे खाद्य असा सुमारे 96 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. यावेळी चोरट्याने सीसीटीवी कॅमेरेही फोडले. मात्र एका कॅमेरात त्याच्या हालचाली कैद झाल्या आहेत.यापूर्वी एप्रिल 2025 मध्येही याच दवाखान्यात चोरी झाली होती. दोन्ही घटनांतील चोर एकच असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन दिवस उलटूनही आरोपी फरार आहे.0
0
Report
नांदेड के कृषि विभाग ने खत बिक्री करने वाले केंद्रों के लाइसेंस छह महीने के लिए निलंबित किए
Nanded-Waghala, Maharashtra:Anchor - चढ्या दराने खत विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर नांदेडच्या कृषी विभागाने कारवाई केली. नांदेड जिल्ह्यातील नायगाव मधील सात कृषी सेवा केंद्रांचे खत विक्री परवाने सहा महिन्या साठी निलंबित करण्यात आले. कृषी विभागाने संबंधित दुकानदारांना नोटीस देऊन कार्यवाही केल्याने कृषी व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कारवाई झालेल्या दुकानदारांमध्ये मातोश्री ऍग्रो एजन्सी, शिवकृपा कृषी सेवा केंद्र, गजानन कृषी सेवा केंद्र, केदार कृषी सेवा केंद्र, वसंत ऍग्रो सर्विस सेंटर, हनुमान कृषी सेवा केंद्र, आणि दशरथ कृषी सेवा केंद्र यांचा समावेश आहे. या करावाईमुळे चढ्या दराने खत विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.0
0
Report
Advertisement
मराठा- कुणबी आरक्षण पर कोल्हापुर गॅझेट से नया मोड़: सरकार का निर्णय अब आएगा
Kolhapur, Maharashtra:मराठा आरक्षणाच्या लढ्याला आता नवं वळण मिळालं आहे. हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटनंतर आता कोल्हापूर गॅझेटची चर्चा जोर धरू लागली आहे. ब्रिटिशकालीन 1886 च्या कोल्हापूर गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी समाजाबाबत करण्यात आलेल्या उल्लेखांच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी पुढे आली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला कुणबी नोंदींच्या आधारे ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला. यासाठी हैदराबाद संस्थानातील गॅझेटचा आधार घेतला गेला. आता त्याच धर्तीवर कोल्हापूर संस्थानातील 1886 च्या गॅझेटची चर्चा सुरू झाली आहे. सकल मराठा समाजासह विविध संघटनांनी सरकारकडे कोल्हापूर गॅझेट स्वीकारण्याची मागणी केली आहे. या गॅझेटमध्ये तत्कालीन कोल्हापूर संस्थानात सुमारे 2 लाख 99 हजार कुणबी आणि सुमारे 62 हजार मराठा असल्याची नोंद असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच मराठा आणि कुणबी यांच्यात बेटी व्यवहार, शेती व्यवसाय आणि सामाजिक संबंध समान असल्याचे उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे. मराठा संघटनांचा दावा आहे की, ज्या पद्धतीने हैदराबाद गॅझेटच्या आधारे कुणबी नोंदी शोधण्यात आल्या, त्याच पद्धतीने कोल्हापूर गॅझेटचा विचार झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील लाखो मराठा कुटुंबांना लाभ मिळू शकतो. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा आणि परिसरातील समाजाचे लक्ष या गॅझेटकडे लागले आहे. दिलिप देसाई, समन्वयक सकल मराठा समाज. मराठा आरक्षणाच्या लढ्यात हैदराबाडे आणि सातारा गॅझेटनंतर आता कोल्हापूर गॅझेटची एन्ट्री झाली आहे. या दस्तावेजातील ऐतिहासिक नोंदींमुळे आरक्षणाच्या चर्चेला नवे परिमाण मिळाले असले तरी अंतिम निर्णय हा शासन, मागासवर्ग आयोग आणि न्यायालयीन प्रक्रियेवर अवलंबून असणार आहे. त्यामुळे कोल्हापूर गॅझेट हा मराठा आरक्षणाच्या प्रश्नातील महत्त्वाचा संदर्भ ठरतो की निर्णायक पुरावा, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे. प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर..0
0
Report
आकोला में अगले दो दिनों में आकाशीय बिजली और बारिश की चेतावनी, नागरिक सतर्क रहें
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात पुढील दोन दिवस वातावरणात बदल होण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार 30 मे ते 1 जून दरम्यान जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यात आज आणि उद्या ढगाळ वातावरणासह काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच या कालावधीत ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. संभाव्य वादळी वाऱ्यांमुळे नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.जनावरांना झाडाखाली किंवा विद्युत तारेखाली बांधू नये, तसेच वीज, वारा आणि पावसापासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. वीजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली उभे राहणे टाळावे. याशिवाय पाऊस व विजांच्या परिस्थितीत मोबाईल फोनचा वापर शक्यतो टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.दरम्यान, शेतकऱ्यांनी काढणी केलेला शेतमाल, कृषी अवजारे आणि अन्य साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. हवामानातील या बदलामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही प्रशासनाने म्हटले आहे.0
0
Report
महायुती 17 में से सभी सीटें जीतने का दावा, महाविकास को क्लीन स्वीट
Pandharpur, Maharashtra:राज्यातील विधान परिषदेच्या सर्वच्या सर्व 17 जागा महायुती जिंकणार असून महाविकास आघाडीला क्लीन स्वीट मिळणार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना विश्वास सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपला 616 पैकी 520 मते भाजप उमेदवाराला मिळतील. महाविकास आघाडी मधील अनेक हितचिंतक आपल्या सोबत आहेत असा दावा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केला काँग्रेस कडे स्वतःच्या चिन्हावर उभा रहायला उमेदवार नाही. जरी मिळाला तरी त्यासाठी लागणारे सूचक अनुमोदक मिळणार नाहीत. सातारा भाजपवर निधी बाबत आणण्यात आलेला आहे मात्र सोलापुरात साताऱ्यापेक्षाही जास्त निधी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिलेला आहे. साताऱ्यात निधी वाटपात अन्याय होत असल्याचे मंत्री गोरे म्हणाले. शिवसेना आणि माझ्या कोणताही वादन आहे उदय सामंत असतील शंभूराज देसाई असतील हे माझे चांगले मित्र आहेत ते त्यांचा पक्ष वाढवण्याचे काम करत आहेत मी माझा पक्ष वाढवायचं काम करत आहे. महायुती मधील जागावाटप आज सायंकाळपर्यंत पूर्ण होईल आणि उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाईल सातारा सांगली विधान परिषदेच्या जागेवर आपले बंधू शेखर गोरे इच्छुक आहेत तसेच भाजपमधील इतर उमेदवारी इच्छुक आहेत मात्र पक्ष देईल त्याच्या पाठीशी आपण उभे राहू त्याला निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करू असं मंत्री गोरे म्हणाले0
0
Report
Advertisement
