445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
जंजिरा किल्ला ब्रेकवॉटर से पर्यटन बढ़ेगा, मोदी की पहल
Chendhare, Maharashtra:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला चालना देणारा प्रकल्प जंजिरा किल्ला इथल्या ब्रेक वॉटर आणि प्रवासी जेट्टीचे लोकार्पण मंत्री नितेश राणे आणि खा. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत झाले. १९२ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या ब्रेक वॉटर व जेट्टीचे लोकार्पण सागरमाला अंतर्गत पर्यटनाच्या सुविधांसाठी करण्यात आले. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना चढउतार करताना येणाऱ्या अडचणी दूर झाल्या असल्याचं नितेश राणे यांनी सांगितलं. या प्रकल्पामुळे पर्यटकांची संख्या वाढून स्थानिकांना रोजगार मिळेल असे सुनील तटकरे यांनी व्यक्त केलं. या कार्यक्रमात महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या अधिकारी आणि पर्यटक उपस्थित होते.0
0
Report
ई-बाइक से जिलाधिकारी कार्यालय पहुंचे गोपीचंद पडळकर, मोदी के ईंधन बचाओ आह्वान पर प्रतिक्रिया
Sangli, Maharashtra:ई-बाईक घेऊन गोपीचंद पडळकरांनी गाठले जिल्हाधिकारी कार्यालय.. अँकर - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन बचतीच्या केलेल्या आवाहनाला भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांकडुन प्रतिसाद देण्यात आला आहे. गोपीचंद पडळकरांनी ई-बाईकवरून सांगली शहरात प्रवास केला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकरांनी आपला वाहनांचा ताफा सर्किट हाऊस येथे सोडून स्वतः ई-बाईक चालवत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहानाकडे विरोधकांनी राजकीय दृष्ट्या न बघता राष्ट्रहिताच्या दृष्टीने बघितलं पाहिजे आणि इंधन वाचवले पाहिजे, असं मत यावेळी व्यक्त केले आहे. बाईट - गोपीचंद पडळकर - आमदार, भाजपा.0
0
Report
रत्नागिरी के राजापुर में उबाठा गुट के कार्यकर्ताओं ने शिवसेना में प्रवेश किया
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. राजापुरात 'उबाठा'ला मोठा धक्का.. ओशिवळेतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश!.. रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील ओशिवळे मसुरकरवाडी येथील उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी आज आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा निर्णय घेतल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी आमदार सामंत यांनी नवप्रवेशितांचे स्वागत करत, गावाच्या विकासासाठी आणि सामान्यांच्या न्यायासाठी शिवसेना कटिबद्ध आहे, असे ग्वाही दिली.. या पक्षप्रवेशामुळे राजापूर मतदारसंघात शिवसेनेची ताकद अधिक वाढली आहे..0
0
Report
Advertisement
बीड़ के 73 करोड़ मावेजा घोटाले में अविनाश पाठक की निलंबन प्रक्रिया तेज—पुलिस रिपोर्ट
Beed, Maharashtra:बीड़ : 73 कोटींच्या मावेजा घोटाळ्यात तत्काली जिल्हाधिकारी अविनाश पाठकच्या अडचणीत होणार वाढ; निलंबनाच्या कारवाईसाठी हालचाली सुरू पोलिस कोठडी संदर्भातील अहवाल महसूल विभागाकडे जिल्हाधिकाऱ्यामार्फत पाठवला अब एक अत्यंत महत्त्वाची बातमी बीड़मधून है.. बीड़ سے धुळे–सोलापुर महामार्गाच्या 73 कोटींच्या अतिरिक्त मावेजा घोटाळ्यात अटकेत असलेला तत्कालीन जिल्हाधिकारी व मत्स्य व्यवसाय विभागाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश पाठक यांच्या अडचण्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण पाठक याच्या निलंबन प्रक्रियेला अब प्रशासकीय पातळीवर वेग आला आहे. पोलिसांनी त्याच्या कोठडीसंदर्भातील सविस्तर अहवाल महसूल विभागाकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठवला असून, शासनस्तरावर हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येतेय. दरम्यान, अविनाश पाठक याला पोलिस कोठडीतून बाहेर काढून थेट पोलिस अधीक्षक कार्यालयात नेण्यात आले, जिथे त्याची सखोल चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे या बहुचर्चित घोटाळ्यात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जा रही है.0
0
Report
RBI ने सर्वोदय सहकारी बैंक पंजीकरण रद्द किया; डिपॉजिटर्स को सुरक्षा वापस मिल सकती है
Mumbai, Maharashtra:मुंबईतील सहकारी बँकिंग क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. RBI ने अपुर्या भांडवलामुळे दि सर्वोदय को ऑफ बँक लिमिटेड चा परवाना रद्द केला आहे. १२ मे २०२६ रोजी व्यवसाय संपल्यानंतर ही बँक अधिकृतपणे बंद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे खातेदारांमध्ये चिंता निर्माण झाली असली, तरी RBI ने दिलासा देणारी माहितीही दिली आहे. DICGC मार्फत प्रत्येक ठेवीदाराला ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी परत मिळण्याचा अधिकार आहे. RBI च्या माहितीनुसार, सुमारे ९८.३६ टक्के ठेवीदारांना त्यांची संपूर्ण रक्कम परत मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. सहकारी बँकांच्या आर्थिक स्थितीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून, सर्वसामान्य ठेवीदारांच्या विश्वासावरही याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या ठिकाणाहून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी.0
0
Report
खारघर में पानी संकट: हर मकान में 10–12 हजार रु अतिरिक्त खर्च, न्याययुद्ध तय
Navi Mumbai, Maharashtra:पनवेल महापालिका क्षेत्र के खारघर शहर में नागरिकों को पानी की भारी कमी का सामना करना पड़ रहा है। इससे निपटने के लिए खारघर के रहने वालों को प्रत्येक फ्लैट के पीछे पानी के लिए लगभग 10 से 12 हजार रुपये अतिरिक्त खर्च करने पड़ रहे हैं। सिडको प्रशासन आवश्यक पानी आपूर्ति करने में असमर्थ है और केवल 30 प्रतिशत पानी ही सप्लाई हो रहा है; शेष पानी के लिए आवासीयों को निजी टैंकरों पर निर्भर रहना पड़ रहा है। निजी टैंकरों से आने वाला पानी नहाने के लिए भी पर्याप्त नहीं है, लिहाजा नागरिकों को साफ पीने के लिए 20 लिटर के ड्रम मँगवाने पड़ रहे हैं। इससे खारघर की ऊँची इमारतों में रहने वाले हर सदस्य को मासिक आधार पर 10 से 12 हजार रुपये अतिरिक्त खर्च उठाने पड़ रहे हैं। पनवेल महानगरपालिका या सिडको की ओर से पानी सप्लाय में देरी और असमर्थता के कारण खारघर निवासी त्रस्त हो चुके हैं और न्यायालयी लड़ाई लड़ने का निर्णय भी लिया गया है।0
0
Report
Advertisement
इम्तियाज जलील के खिलाफ ठोस कार्रवाई, मतीन पटेल के अनधिकृत घर पर छापा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ऑन नगरसेवक मातीनच्या घरावर कारवाई. आज छत्रपती संभाजीनगमधे मतीन पटेल यांचा अनधिकृत घर, दुकानवर कायदेशीर कारवाई करीत ते जमीनदोस्त केले. ते अनधिकृत होते,त्याला नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर ते हायकोर्टात गेले होते. हा इम्तियाज जलील बोंबलत आहे. तो सुप्रीम कोर्टाचे उदाहरण देत आहे. ते कोर्ट बघेल. जलील यांनी रात्री 12 वाजता मतीनच्या घराजवळ गेले होते. 35 दिवस निदा त्या घरामध्ये होती म्हणून मतीन ला अटक झाली. आणि कारवाई पूर्वी जलील त्याच्या घरी जाऊन सांगतंय की चिंता करू नका घर बांधून देऊ, नगरसेवक बनवू.. हा खऱ्या अर्थाने अर्बन टेररिस्ट आहे. इम्तियाज जलीलवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आरोपीच्या समर्थनार्थ सभा घेतली, जलील वर गुन्हा दाखल झाला पाहिजे. माझा इम्तियाज जलील याला ओपन चॅलेंज आहे. तू कुराण शरीफ ला मानतो का? तर कुराण वर हात ठेऊन सांग निदा खानाला आणले नाही का? इम्तियाजनेच तिला इथे आणले आहे. त्या बिचाऱ्या नगरसेवकचा रोल नाही. इम्तियाज जलील हा राक्षस, निजामाची औलाद विष पेरण्याचे काम करीत आहे. मतीन ने दिलेल्या स्टेटमेंटवर इम्तियाज जलीलवर गुन्हा दाखल करावे. सकाळी घर पडणार हे इम्तियाज जलील यांना सांगणारा कोण ? मी अजून पालकमंत्री पदाचा वापर केलेला नाही. माझा जरी प्रकरण असेल तर चौकशी झाली आहे. तू कुणाचा बाप होतो.. एवढी मस्ती कसली. अर्बन टेररिस्ट आहे तू.. तुझ्या टोपीवाला निजामाला सांग हे महाराष्ट्र आहे. हिंदूंच्या मुलींचे धर्मांतरण करत आहात. त्या नारेगाव भागात अनेकवेळा ड्रग्स पकडले गेले आहे. त्याचा पोलिस रेकॉर्ड आहे. लव्ह जिहाद करायला लावत आहेत, धर्मांतराचे प्रकार करायला लावत आहेत अनेक जण शहरात आहेत. आणि या सर्वांचा म्होरखा इम्तियाज जलील आहे. त्या मतीन छ्या कुटुंबाला धुळीस मिळविले आहे. त्यानिदा खानाला आणणारा इम्तियाज जलील आहे. मतीन पटेलच नाही तर इम्तियाज जलील याचे घर देखील अनधिकृत आहे. परमिशन प्रमाणे जलील चे घर आहे का? याची चौकशी करायला सांगणार आहे. अनधिकृत बांधकामाला आम्ही कधीही सपोर्ट केलेले नाही. सगळ्या नगरसेवकांच्या प्रॉपर्टी तपासणार आणि जे अनधिकृत असेल त्यांचे पडणार, मग ते माझ्या नगरसेवकाचे घर का असे ना, आम्ही घर पाडू.... इम्तियाज जलील आम्हाला घटना शिकवतोय, संपूर्ण महाराष्ट्रात निदा ला पोलिस शोधात होते आणि याने लपवून ठेवले होते. इम्तियाज जलील हा मुख्य आरोपी आहे. सरकार म्हणून पोलिसांच्या पाठीशी आम्ही खंबीर उभे आहोत. निदा नातेवाईक. तू कोर्टात जा.. तुझा तिचा संबंध कसा आहे ते मी सिद्ध करेल. तू कुराण वर हात ठेऊन सांग की, निदा खानला तू शहरात आणले नाही. ऑपरेशन सिन्दुर दरम्यान ओवेसींनी भारताची बाजू घेतली होती म्हणून त्यांना विदेश दौऱ्यात पाठवले होते. अभ्यास दौरे रद्द... मुख्यमंत्र्यांनी अभ्यास दौरे रद्द केले त्याला आमचे समर्थन आहे. ते आमचे कुटुंब प्रमुख आहेत. मोदींनी गाड्या कमी केली हा त्यांचा मोठेपणा आहे. पण पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांची सुरक्षा कमी करायला नको. आम्ही सुद्धा ताफ्यातील गाडी कमी करणार . Ev गाड्यांमध्ये गेले तर चांगलेच आहे. ऑन राणे आरोप. उद्या कॅबिनेट बैठक आहे. त्यावेळी मी मुख्यमंत्री यांना भेटणार आहे. इम्तियाज जलील हा मुख्य आरोपी आहे. मतीन हा मोहरा आहे. त्याचा घर पडले याचा मला वाईट वाटत आहे. मतीन पटेल. ऑन इम्तियाज आरोपी - पार्टीच प्रमुख आहे. मतीन आणि फिदा खान यांचा संबंध नाही. मुंब्रा येथे भाषण करून निदाला संभाजीनगर शहरात आणले आणि नारेगाव भागात मतीन यांच्या घरी ठेवले. पोलिसांच्या तपासात इम्तियाज जलील आरोपी ठरतील. त्यांनी दिलेल्या पत्रच सन्मान केला जाईल, मुख्यमंत्री महायुतीत भेदभाव करणार नाही. सुनेत्रा वहिनींनी केलेली मागणी गैर नाही. स्थानिक पातळीवर अशा काही घटना घडतात, आमच्या बाबतीत देखील अशी घटना घडली होती, आम्ही मुख्यमंत्री यांच्या कानावर टाकली त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अतिक्रमण कारवाई ही निरंतर चालणारी कारवाई आहे. मात्र नारेगाव ची कारवाई गंभीर होती, ऑन तटकरे पवार भेट. शरद पवार यांच्या तालमीत तटकरे यांची वाढ झाली आहे. राजकीय भेट न्हवती याचा राजकीय अर्थ आता तुम्ही लावा. जे संकेत मिळत आहेत. भविष्यात काय घडेल याची तयारी आहे. ऑन cm साथ विमान प्रवास. ते दोघे cm सोबत प्रवास करतात त्यामुळे दिसतंय की आमची महायुती किती घट्ट आहे. ऑन पार्थ पवार. 21 कोटीचा दंड भरावा असे म्हटले आहे व 60 दिवसाची मुदत दिली आहे. पुढील निर्णय महसूलमंत्री घेतील. ऑन पेपर फुटी.. अत्यंत चुकीची घटना आहे. नेटचा पेपर फुटणे म्हणजे लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची खेळ आहे. अशा मूळ विद्यार्थ्यांचे आत्मविश्वास ढासळते. अशा प्रकरणात कडक आणि मोठ्या स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी. ऑन चंद्रकांत पाटील तेल लावतात, आव्हाड यांचे विधान. ते डोक्याला तेल वापरतात आणि जितेंद्र आव्हाड मटणात जास्त तेल खातात. ऑन स्टॅलिन सनातन विधान.. स्टालिनचे वक्तव्य नेहमी विवादित असतात, ते हिंदू धर्म मानत नाही. आम्ही स्टालिन जास्त महत्व देत नाही. ऑन इम्तियाज जलील आरोप - इम्तियाज जलील तुझी लायकी काय, तुझ्या उपकारावर मी पालकमंत्री झालेलो नाही. मला जनतेने निवडून दिले आहे. तुझ्या सारखे दलाली करत फिरत नाही.... खोटे बोलण्याचे बाळ कडू इम्तियाज नगरसेवकांना देतो. काल त्यांच्या अजून एक नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे.0
0
Report
मतिन के घर गिराने पर सवाल, क्या गुंडाराज फिर से कायम?
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:नारेगावमध्ये राहणाऱ्या लोकांचे धन्यवाद देतो, त्यांनी कारवाई शांतपूर्ण होऊ दिली , मतीनच्या कुटुंबाने जे फुल अंगावर टाकले, ते अन्यायाच्या तिरडीवर वाहलेली फुल होती.. -माध्यमांनी याना प्रश्न विचारला पाहिजे, चुकीचे कसे होत आहे, राजकीय पोळी भाजण्यासाठी ही सगळी कारवाई सुरू आहे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत 15 दिवसाची वेळ द्यावी एवढ्या सकाळी कारवाई करण्याची काय आवश्यकता होती, राष्ट्रिय सुरक्षाबाबत काही यातून धोका होता का ,नोटीस दिल्यावर 24 तास होऊ दिले नाही, आधीच कारवाई झाली मतीनवर फक्त आरोप आहेत, तरीही त्याला दोषी सिद्ध केले जात आहे, मतीनने चुकी केली असेल, पण त्याच्या आई वडील यांचा काय दोष आहे, या राज्यात गुंडाराज सुरू आहे का, कोणता तरी पालकमंत्री सांगतो आणि कारवाई होते ,हे गुंडाराज नाही तर अजून काय... सरकारला मॅसेज आहे, तुम्ही गुंडगिरी करून घर तुम्ही पाडू शकता, पण आम्ही बांधून देऊ शकतो मातीन चे पाडलेले घर आम्ही बांधून देणार आहोत यात कुठलाही वाद नाही... आज हम महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे जाणार आहेत, भाजप लोकांचे अनधिकृत बांधकाम कागद पत्र दाखवणारआहे पालकमंत्री यांनी कशी चोरी केली, लुटून कसे खाल्ले, याचे सर्व पुरावे मी यंत्रणाला दिले होते, विट्स हॉटेल कसे बळकावले आपल्या समाजातील लोकांचे वर्ग दोनची जमीन कशी मुलावर केली होती, कोर्टासमोर कोट्यवधी रुपयांची जमीन आहे, त्याचे काम सुरू आहे... याचाच त्यांचा माझ्यावर राग,,, त्यामुळे त्यांना वाटत आहे की आता यांना रगडून टाका.... पण तुमची किती ताकद आहे लावा... माझी निदा खान नातेवाईक आहे असे म्हटले आहे, आता सिद्ध करा... अन्यथा कोर्टात ओढणार आहे शिरसाट साहेब तुमचे जे पप्पा दिल्लीत बसले आहे मोदी,, त्यांनी देशाचे मुद्दा मांडण्यासाठी ओवेसी यांना दुसऱ्या देशात पाठवले होते, मग त्यांनी दहशतवादी पक्षाच्या प्रमुखला पाठवले होते का ऊन जास्त आहे, शिरसाट लिंबू पाणी घेत नाही,रात्री त्यांनी देशी नव्हे तर विदेशी घ्यावी0
0
Report
ईजळी में बिजली कट से नाराज़ ग्रामीणों ने महावितरण कार्यालय के खिचड़ी खाकर किया प्रदर्शन
Nanded-Waghala, Maharashtra:सतत गायब होणाऱ्या विजेच्या त्रासाला कंटाळून ग्रामस्थांनी चक्क महावितरणच्या कार्यालयातच रात्री खिचडी खाऊन अनोखे आंदोलन केले. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील ईजळी, वाडी, चिकाळा या परिसरात सध्या महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक हैराण झाले आहेत. नियोजित लोडशेडिंगची वेळ संपल्यानंतरही वीज गायब राहत आहे. रात्री बेरात्री कधीही विजेचा लपंडाव सुरु आहे. रात्री अचानक विज गेल्याने ईजळी येथील संतप्त तरुणांनी रात्री थेट महावितरण कार्यालय गाठले आणि कार्यालयातच बसून 'खिचडी' खात अनोखे आंदोलन केले. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे ईजळीकर प्रचंड त्रस्त झाले आहेत. या समस्येकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा इजळी येथील ग्रामस्थानी दिलाय.0
0
Report
Advertisement
पनवेल पानी संकट: सत्ता-भाजपा मुख्यमंत्री से मुलाकात के बाद विरोधी आंदोलन की धमकी
Navi Mumbai, Maharashtra:पनवेल मनपा क्षेत्रातील नागरिकांना यंदा भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सत्ताधारी भाजप आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांच्या साकडे घालणार आहेत. सिडको प्रशासन मात्र पाणी प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नसल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. पाण्यासारख्या गंभीर प्रश्नाकडे सिडको गांभीर्याने लक्ष देत नसेल तर सत्ताधारी आहोत हे विसरून आम्ही रस्त्यावर उतरू अशी भूमिका पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांनी व्यक्त केलीय. विरोधीपक्ष नेते अरविंद म्हात्रे यांनी पाणी प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली असून 17 मे रोजी कळंबोली जंक्शन येथे जलवाहिनीवर मोर्चा काढून पाणी पुरवठा थांबविण्याचा इशारा दिला.0
0
Report
प्रधानमंत्री मोदी देशहित आवाहन के बाद पिंपरी-चिंचवड़ महापौर रवि लांडगे विदेश दौरे पर चर्चा
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परदेश दौरा टाळण्याचं आवाहन केलं आहे... त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांच्या परदेश दौऱ्याची चर्चा सुरू झालीय... रवी लांडगे यांचा स्वीय सहायकासह अझरबैजान दौरा निश्चित झाला आहे. अझरबैजानची राजधानी बाकू इथ होणाऱ्या संयुक्त राष्ट्र मानव वस्ती कार्यक्रमांतर्गत वर्ल्ड अर्बन फोरमच्या १७ ते २२ मे दरम्यान होणाऱ्या संमेलनात ते सहभागी होणार आहेत... पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर महापौर काय करणार याची चर्चा जोर धरू लागली आहे... आणि त्यानंतर काही तासांतच महाराष्ट्र शासनाने पिंपरी चिंचवडच्या महापौरांना परदेश दौऱ्याची मान्यता दिलीये. केंद्रात, राज्यात आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आहे, तरी सुद्धा महाराष्ट्र शासनाने पंतप्रधान मोदींचं आवाहन डावलले आहे. आता महापौर रवी लांडगे पंतप्रधानांच्या आवाहनानुसार देशहितासाठी हा परदेश दौरा रद्द करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या UN-Habitat संस्थेचे वर्ल्ड अर्बन फोरम हे तेरावे अधिवेशन आहे. यामध्ये शहरी विकास विषयक जागतिक परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. बाकु अझरबैजान येथे पार पडणाऱ्या या परिषदेला रवी लांडगे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक अभय चौगुले उपस्थित राहणार आहेत. 17 मे ते 22 मे दरम्यान हे जागतिक अधिवेशन पार पडणार असून पिंपरी पालिकेच्या स्थायी समितीने या दौऱ्यासाठी निधी ही मंजूर केलाय. या दौऱ्यावर 8 लाख 80 हजार 281 रुपयांची उधळपट्टी केली जाणार आहे. दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी 10 मे ला देशहितासाठी जनतेला आवाहन केलं. काटकसर करण्यावर भर द्या, असं आवर्जून सांगितलं. पण दुसऱ्याच दिवशी म्हणजे 11 मे ला भाजपचं सरकार असलेल्या महाराष्ट्र शासनाने महापौरांच्या परदेश दौऱ्याला मान्यता देत पंतप्रधानांच्या आवाहनाला डावलले आहे. आता पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे देशहितासाठी हा परदेश दौरा रद्द करणार ka? शहराचे प्रथम नागरिक असलेले रवी लांडगे याबाबत काय निर्णय घेतात? याकडे पिंपरी चिंचवड शहरवासीयांचं लक्ष लागून आहे.0
0
Report
इचलकरंजी के पानी संकट का तात्कालिक समाधान मांगने पर शिव शाहू आघाडी का आंदोलन
Kolhapur, Maharashtra:Kop Mataka Fod Andolan Feed:- 2C Anc :- इचलकरंजी शहरातील पाणी प्रश्न तातडीने सोडवू अस आश्वासन राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले होते, पण राज्य सरकार इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी कोणताच प्रयत्न करत नसल्याचा आरोप करत इचलकरंजी शहरातील शिव शाहू आघाडीच्यावतीने महानगरपालिकाेसमोर अभिनव आंदोलन केलं. शिव शाहू आघाडीचे नेते आणि नगरसेवकांनी सरकारच्या या उदासीन भूमिके विरोधात मटका फोड आंदोलन केलं. यावेळी पाणी प्रश्नावरून आमदार आणि खासदारांचा निषेध करण्यात आला. इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत सरकारच्या वतीने तातडीने इचलकरंजीचा पाणी प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन दिले होते, पण इचलकरंजी महानगरपालिकेत सत्तेवर येताच सरकारला याचा विसर पडला असल्याचा आरोप शिव शाहू आघाडीने केला आहे.0
0
Report
Advertisement
माडवी हिडमाची के गुणगान पर रोक, समिति ने बैन और आरोपी की गिरफ्तारी मांग
Nagpur, Maharashtra:माओवाद्यांचा सर्वात क्रूर आणि त्यांच्या मिलिटरी कमांडचा कमांडर असलेल्या माडवी हिडमाची एका गाण्याच्या माध्यमातून जोरदार उदात्तीकरण सुरू आहे.. पुणे आणि गडचिरोली मध्ये त्यासंदर्भात गुन्हे दाखल झालेयं. आता नक्षल पिडीतांसाठी काम करणाऱ्या "जनसंघर्ष समिती"ने हिडमाचा उदात्तीकरण करणाऱ्या त्या गाण्यावर बंदी लावण्याची तसेच गाण तयार करणाऱ्यांना शोधून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे...एका क्रूरकर्माचे उदात्तीकरण योग्य नाही.. हिडमाच्या उदात्तीकरणाच्या माध्यमातून शहरी भागातील तरुणांमध्ये नक्सलवादी विचारसरणी नव्याने पेरण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे...0
0
Report
सिंधुदुर्ग में ईंधन संकट: पेट्रोल डीजल की कमी से यात्राएं प्रभावित
Oras Bk., Maharashtra:अँकर ----- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात इंधन तुटवडा जाणवू लागलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल मिळण बंद झालंय तर काही पेट्रोल पंपावर कमी प्रमाणात पेट्रोल उपलब्ध आहे. दुचाकींना केवळ 200 रुपये तीन चाकी 500 आणि four चाकींना केवळ 1 हजार रुपयांच पेट्रोल दिलं जात आहे. तशा पाट्या देखील लावण्यात आल्या आहेत. लांबचा प्रवास करणाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. येत्या दिवसात इंधन पुरवठा सुरळीत न झाल्यास सिंधुदुर्गात पेट्रोल व डिझेलचा तुडवडा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही0
0
Report
विदर्भ में अगले तीन दिन गर्मी का अलर्ट, नागपुर सहित चार जिलों में येलो चेतावनी
Nagpur, Maharashtra:नागपूर विदर्भात पुढील तीन दिवस उष्णतेचा अलर्ट अकोला,अमरावती आणि वर्धा येथे उष्णतेचा यलो अलर्ट अकोला आणि अमरावती पुन्हा एकदा पारा 45 अंशावर सकाळपासूनच उष्णतेच्या झळा... विदर्भातील उष्णतेचा प्रकोपाबाबत आढावा घेतलाय नागपुरातून आमचे प्रतिनिधीनी0
0
Report
Advertisement
