445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
मालशिरस तालुक में तूफानी हवा, 40–50 किमी/घंटा की गति से चक्रवाती स्थिति
Pandharpur, Maharashtra:माळशिरस तालुक्यात तुफान वादळी वारा, जवळपास ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहिले यामुळे काही काल चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. माळशिरस तालुक्यात आज सायंकाळी पाच वाजता सुमारास तुफान वादळी वारा वाहिला. ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहत होते. यामुळे तालुक्यात सर्वत्र चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. या वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील अनेक रस्त्यांवर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. वाऱ्याचा वेग एवढा प्रचंड होता की समोरचे काहीही दिसत नव्हते.0
0
Report
सातारा- s Sangli में अभयसिंह जगताप ने अन्याय के खिलाफ चुनावी मोर्चा खोला
Satara, Maharashtra:सातारा: सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रथमच साताऱ्यात सध्याच्या राजकीय घडामोडीवर भाष्य केले सांगली सातारा हा मतदारसंघ हा क्रांतीचा जिल्हा आहे. सध्याच्या सत्ताधारी महायुतीत अंतर्गत प्रचंड धुसफूस सुरू असून, तिथल्या नगरसेवकांपासून ते मंत्र्यांपर्यंत सर्वांची निधीअभावी कोंडी केली जात आहे. केंद्रात आणि राज्यात हे पक्ष एकत्र दिसत असले, तरी स्थानिक पातळीवर त्यांच्यावर मोठा अन्याय होत आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ राजकीय नसून अन्यायग्रस्तांच्या स्वाभिमानाची लढाई आहे,असा घणाघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभयसिंह जगताप यांनी महायुतीवर केला आहे. सातारा अभयसिंह जगताप बाईट पॉईंटर सातारा सांगली विधानसभा मतदारसंघ हा क्रांतिकारी जिल्हा आहे महाविकास आघाडीतील सर्व नेते आमच्याबरोबर राहतील.. युतीमध्ये जरी तीन पक्ष असले तरी पालकमंत्री असो किंवा मंत्री मकरंद पाटील असू द्या किंवा नगरसेवक असू द्या त्यांना कुठल्याही पद्धतीचा निधी दिला जात नाही, त्यांच्याबद्दल दुजाभाव केला जातो, जरी केंद्रामध्ये हे सर्वजण एकत्र असले तरी हे सर्वजण अडचणीचा सामना करत आहेत, त्यामुळे हे सर्वजण ही स्वाभिमानाची लढाई लढतील असा मला पूर्ण विश्वास आहे घड्याळाचे चिन्ह आमच्या बॅनर असण्याचं गरज नाही, आमच्या बॅनरवर तुतारी, मशाल आणि काँग्रेसचा हात हे तीन चिन्ह असतील.. महायुतीतील पक्षातले पक्ष म्हणून नव्हे परंतु व्यक्ती म्हणून अनेक लोक, ज्यांच्यावर अन्याय झाला आहे असे सर्व लोक आपल्या सोबत आहेत.. महाविकास आघाडीतले सर्व नेते इकडे तिकडे जाणार नाहीत याची मला खात्री आहे मी सर्व ज्येष्ठ नेत्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्वांना भेटणार आहे मी शरद पवार साहेब सुप्रियाताई आणि रोहित पवार यांना जिल्ह्यात यावं अशी विनंती करणार आहे.. मला साहेबांच्या आशीर्वादाशिवाय ही निवडणूक शक्य नाही... सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य यांच्या अडचणी असतील त्या मांडण्यासाठी मी विधान परिषद लढण्याची इच्छा आहे आणि यातून त्यांचा स्वाभिमान जागृत होईल आणि आपला प्रतिनिधी परिषदेत जाव वाटत असेल तर नक्कीच हे आमच्या पाठीमागे उभे राहतील अशी मला खात्री आहे...0
0
Report
अहमदनगर: पुराने कोर्ट परिसर में अज्ञात ने कार में आग लगा दी
Ahilyanagar, Maharashtra:अहमदनगर शहर के पुराने कोर्ट परिसर में गौरव कुलकर्णी की चार पहिया वाहन को अज्ञात व्यक्ति ने आग लगा दी। आग में गाड़ी पूरी तरह जल गई है। यह हमला सीसीटीवी कैमरे में कैद हुआ है। कोतवाली थाने में तक्रार दर्ज कराई गई है और आगे की जांच जारी है। इस घटना पर शहर के विधायक संग्राम जगताप ने भी निरीक्षण किया और आरोपियों की तुरंत गिरफ्तारी की मांग की है।0
0
Report
Advertisement
खोत ने महागाई आंदोलन पर तंज कसा; पाटिल के बयान पर दिया गया कटाक्ष
Sangli, Maharashtra:स्लग - राष्ट्रवादीचे महागाई आंदोलन म्हणजे "सौ चूहे खाके,बिल्ली चली हज को" तर जयंत पाटलांनी मुंबईत वडापावचं दुकान लावून प्राण वाचवावेत - आमदार सदाभाऊ खोत अँकर - महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आंदोलन म्हणजे "सौ चूहे खाके, बिल्ली चली हज को" अशातला हा प्रकार असल्याची बोचरी टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे,तसेच राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी मुंबईत वडापावचे दुकान लावून मुंबईच्या लोकांचे प्राण वाचवावेत,आणि नागपूरला कांदे पोहे महाग झाल्यानंतरच जाग येईल सरकारला,असा टोमणा मारण्यापेक्षा नागपूरच्या कांद्या पोहेच्या दिशेने,आपण मात्र पावलं टाकू नका, नागपूरकरांना कांदे पोहे कोणत्या दरात, घ्यायचे हे निश्चित कळतं, असा खोचक टोला आमदार खोत यांनी जयंत पाटलांना लगावला आहे,ते सांगलीच्या ईश्वरपूर मध्ये बोलत होते. बाईट - सदाभाऊ खोत - आमदार.0
0
Report
साकोली में वरिष्ठ कांग्रेस नेता नाना पटोले का जन्मदिन उत्साह के साथ मनाया गया
Bhandara, Maharashtra:भंडारा जिले के साकोली में काँग्रेस के वरिष्ठ नेता एवं पूर्व प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले का जन्मदिन आज बड़े उत्साह के साथ मनाया गया। साकोली स्थित उनके जनसंपर्क कार्यालय में आयोजित कार्यक्रम में काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ता और नागरिकों की भारी भीड़ देखने को मिली। इस अवसर पर नाना पटोले को लड्डू वितरित कर उन्हें शुभकामनाएं दी गईं तथा अोखो अनोखे तरीके से उनके दीर्घायु और उत्तम स्वास्थ्य की कामना की गई। आसपास के माहौल में उत्साह देखते ही बनता था और समर्थकों ने घोषणाबाजी के साथ जन्मदिन का आनंद उठाया।0
0
Report
पश्चिम महाराष्ट्र के शिक्षकों की खास बैठक, लंबित मुद्दों पर आक्रामक प्रतिक्रिया
Kolhapur, Maharashtra:शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नावरून पश्चिम महाराष्ट्रातील शिक्षक आक्रमक झाले आहेत. शिक्षक आमदार जयंत तासगावकर यांच्या पुढाकारातून कोल्हापुरच्या मुख्याध्यापक संघामध्ये सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांची व्यापक विशेष बैठक आज पार पडली. या बैठकीत शिक्षकांनी आपल्या विविध प्रलंबित प्रश्नांवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. बैठकीला शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर आणि तीनही जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी, वेतन पथक अधीक्षक लेखाधिकारी उपस्थित होते. शालार्थ आयडी, वैयक्तिक मान्यता प्रस्ताव, मेडिकल बिले, पदोन्नती प्रस्ताव, सेवानिवृत्ती प्रस्ताव यांसह अनेक प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. संघटनांनी मांडलेल्या शैक्षणिक समस्या शिक्षण उपसंचालक यांनी तात्काळ सोडाव्यात अशी मागणी शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केलीय.0
0
Report
Advertisement
बारामती में तेज हवाओं के साथ भारी बारिश, पेड़ की शाखा गाड़ी पर गिरने से बड़ा हादसा टला
Rui, Maharashtra:बारामतीत सुसाट वाऱ्यासह जोरदार पाऊस; झाडाची फांडी गाडीवर कोसळली... बारामती शहर आणि परिसरात आज अचानक सुसाट वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या वादळी पावसामुझं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, रस्त्या कडेला उभ्या असलेल्या एका चारचाकी गाडीवर झाडाची मोठी फांदी कोसळली. sुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि गाडीचेही मोठे नुकसान टळले. या अचानक आलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असला,तरी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बाजारपेठेतील व्यावसायिक आणि पादचाऱ्यांची मोठी पळापळ झाली. काही काळ वाहतूकही संथ गतीने सुरू होती.0
0
Report
इंदापूर में जोरदार बारिश, शहर-ग्राम में मेघगर्जना के साथ गर्मी से राहत
Rui, Maharashtra:इंदापूर तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी.. शहरासह ग्रामीण भागात मेघगर्जनेसह पाऊस... पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली... तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाच वाजण्याच्या दरम्यान मेघ गरजेने सह पावसाने हजेरी लावली.. सकाळपासूनच तीव्र ऊन आणि उन्हाळा जाणवत होता.. पाच वाचण्याच्या सुमारास जोरदार वादळ वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली... उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे..0
0
Report
अंबरनाथ में 3 वर्षीय कोब्रा के काटने से बच्चे की मौत; अस्पताल में हंगामा
Ambernath, Maharashtra:अंबरनाथमध्ये 3 वर्षीय कोब्राच्या दंशाने चिमुकल्याचा मृत्यू उपचारात हलगर्जीपणाचा आरोप करत नातेवाईकांचा रुग्णालयात गोंधळ तर दुसरीकडे डॉक्टरांनी कुटुंबाने केलेले सर्व फेटाळले कुटुंबाने रुग्णालयातआणला साप अंबरनाथमधील शिव मंदिर परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरामध्ये शिरलेल्या कोब्रा जातीच्या सापाने मोबाईल पाहत बसलेल्या एका 3 वर्षीय चिमुकल्यावर दंश केल्याची घटना घडली. साप चावल्यानंतर मुलाला तातडीने उल्हासनगर मधील जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी वेळेत आणि योग्य उपचार न केल्यामुळे आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप मृत मुलाच्या आई-वडिलांनी केला आहे. मुलाच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात मोठा गोंधळ घातला. यावेळी संबंधित सापालाही पुराव्यासाठी रुग्णालयात आणण्यात आले होते. साप घेऊन रुग्णालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न होत असताना पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्यामुळे कुटुंबीय आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. तर दुसरीकडे उल्हासनगरचे जिल्हा शल्य चिकित्सक मनोहर बनसोडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले ज्यावेळी रुग्णालयात मुलाला आणलं त्यावेळी त्याची प्रकृती गंभीर होती रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तो यशस्वी ठरला असल्याचं रुग्णाचे अधीक्षण डॉक्टर बनसोडे यांनी सांगितलं याआधीही उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारा अभावी नवजात बालकांच्या मृत्यूच्या आणि रुग्णालयात तोडफोड झाल्याच्या घटना घडल्या आहेत, दरम्यान, मुलाच्या मृत्यूचे नेमके कारण आणि उपचार प्रक्रियेत कोणतीही हलगर्जी झाली होती का, याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, रुग्णालय प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
Advertisement
चंद्रपुर-गडचिरोली-वर्धा चुनाव: भाजपा के अरुण लाखानी की जीत, कांग्रेस में गुटबंदी उजागर
Wardha, Maharashtra:वर्धा स्टोरी SLUG - 0506_WARDHA_CHAN_PKG - विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये गुच्छ गोटे आणि जोडे, - चंद्रपूर -गडचिरोली- वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद जागेवर भाजपचे अरुण लाखानी यांचा बिनविरोध विजय काँग्रेसच्या जिव्हारी - वर्ध्यात काँग्रेस कडून शैलेश अग्रवाल यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन अँकर:चंद्रपुरात विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये गुच्छ- गोटे आणि जोडे यांची चलती आहे. चंद्रपूर -गडचिरोली- वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद जागेवर भाजपचे अरुण लाखानी यांचा बिनविरोध विजय काँग्रेसच्या जिव्हारी लागलाय. काँग्रेस उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी कुणालाही विश्वासात न घेता उमेदवारी मागे घेतल्याचा आरोप केला जात आहे. वर्धा येथील कार्यकर्त्यांनी जोडेमार आंदोलन करीत पुतळा जाळून निषेध केला असून शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहेय... व्ही. ओ.- चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेत भाजप उमेदवार अरुण लाखानी यांच्या विजयानंतर भाजपच्या गोटात गुलाल आहे. काँग्रेस उमेदवार शैलेश कुमार अग्रवाल आणि अपक्ष उमेदवार सुधीर कोठारी या दोन्ही उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे भाजप उमेदवार अरुण लखानी यांचा विजय अगदी सहज शक्य झाला. भाजपने या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर करून आमचे मतदार फोडल्यामुळे आणि आमच्याकडे संख्याबळ नसल्यामुळे मी उमेदवारी वापस घेत असल्याचा दावा अग्रवाल यांनी केला. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत याबाबत बोलूनच निर्णय घेतल्याचं वक्तव्य अग्रवाल यांनी केलं. तर काँग्रेस नेते भाजपच्या विजयासाठी कार्यरत होते असे सांगत अग्रवाल यांनी खळबळ उडवून दिली. यावर आता काँग्रेस पक्षात वादळ उठले आहे. कुणालाही विश्वासात न घेता अग्रवाल यांनी माघार घेत विश्वासघात केल्याचे सांगत चंद्रपूरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार सुभाष धोटे यांनी थेट अग्रवाल यांच्या पक्षातून हकालपट्टीची मागणी केली. बाईट १) सुभाष धोटे व्ही. ओ. २) दुसरीकडे वर्धा येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी उमेदवार शैलेश अग्रवाल यांच्या फोटोला जोडे मारा आंदोलन करून आपला रोष प्रकट केला. कार्यकर्ता पातळीवर भाजपशी दोन हात करण्याची तयारी असताना एनवेळी अग्रवाल यांनी आश्चर्यकारित्या माघार घेतल्याने कार्यकर्ते- नेते बुचकळ्यात पडले. मैदानात शड्डू ठोकून प्रचाराला लागण्याच्या वेळेस ही अनपेक्षित घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या स्थितीसाठी जबाबदार नेत्यांवर कठोर कारवाईची मागणी रेटली जात आहे. निवडणूक जाहीर होण्याच्या आधीच भाजपने सुमारे 100 नगरसेवक पर्यटनाला पाठवून भाजपने काँग्रेसची कोंडी केली. आणि अर्ज मागे घेण्याच्या दिवशी प्रतिस्पर्धी उमेदवारांना या ना त्या प्रकारे माघार घ्यायला लावत केलेली खेळी विरोधी काँग्रेसची भंबेरी उडवून गेली आहे. राज्यभरात भाजपने राबविलेल्या बिनविरोध पॅटर्नने काँग्रेस पुरती बेजार झाली असल्यामुळे कारवाईची तलवार नेमकी कुणकुणावर पडते याकडे तळातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. वर्ध्याहुन मिलिंद आंडे सह आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
गोकुळ गीते के साथ महायुती की चौकसी, नाशिक विधान परिषद चुनाव में ड्रामा तेज
Nashik, Maharashtra:अँकर. नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात अपक्षांनी शड्डू ठोकल्यामुळे महायुतीच्या नेत्यांची चांगलीच धावपळ उडाली होती. अखेरच्या क्षणापर्यंत मनधरणी आणि बैठकांचे सत्र सुरू होते. सहा उमेदवारांनी माघार घेतली असली, तरी एका नावाने मात्र शेवटच्या मिनिटापर्यंत महायुतीची धडधड वाढवून ठेवली होती... ते नाव म्हणजे गोकुळ गिते! नेमका काय घडला हा हाय व्होल्टेज ड्रामा? पाहूयात या सविस्तर रिपोर्टमध्ये. नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासमोरील अडचणी दूर करण्यासाठी महायुतीच्या बड्या नेत्यांनी आज दिवसभर फिल्डिंग लावलीये. माघारीच्या शेवटच्या दिवशी सहा अपक्षांनी माघार घेतली मात्र दोन अपक्ष अद्याप निवडणुकीमध्ये ठाम आहेत ज्यामध्ये सर्वात आव्हानात्मक ठरणारे गोकुळ गीते तर दुसऱ्या बाजूला भाजपचेच बंडखोर प्रसाद हिरे यांनी निवडणुकीच्या रिंगणात शूड़्डू ठोकला आहे. उदय सामंत यांनी स्वतः या दोन्ही उमेदवारांना समजावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. माघार झाली नसली तरी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करावा अशी ते मनधरणी करत आहेत. गोकुळ गीते हे गणेश गीते यांचे सखे बंधू आहेत भावाची जबाबदारी म्हणून त्यांनी भाजपचे अनेक नेते निवडून आणले आहेत नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांच्यावर महत्वपूर्ण जबाबदारी गणेश गीते यांनी दिली होती ओझर नगरपालिका आणि पिंपळगाव नगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आणण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे सध्या ते निफाड बाजार समितीचे संचालक आहेत त्यांचा उमदा स्वभाव आणि जनसामान्यांमध्ये असलेल्या दांडगा संपर्क ही त्यांची उजवी बाजू है नरेंद्र दराडे आणि गोकुळ गीते हे दोन्ही एकाच वंजारी समाजाचे आहेत.0
0
Report
यवतमाळ उपचुनाव: दुष्यंत चतुर्वेदी की निर्विरोध जीत पर शिंदे-राठोड की महफिल
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानपरिषद निवडणुकित महायुतीकडून शिवसेनेचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांची अविरोध निवड झाल्यानंतर पालकमंत्री संजय राठोड यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह चतुर्वेदी यांना घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली. पालकमंत्री संजय राठोड यांनी सुरुवातीपासूनच ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले. सर्वपक्षीय नेत्यांशी असलेले त्यांचे संबंध, महायुतीतील समन्वय आणि राज्यातील वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाच्या बळावर महायुतीचे अधिकृत उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. अशी प्रतिक्रिया शिवसेना पश्चिम विदर्भ सह संपर्कप्रमुख पराग पिंगळे यांनी दिली.0
0
Report
Advertisement
किले रायगड पर शिवराज्याभिषेक के लिए भारी भीड़, भक्त तैयार चढ़ाई को
Chendhare, Maharashtra:उद्य्या च्या किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा ..... हजारो शिवभक्तांचे किल्ले रायगडाकडे कूच ...... संभाजी राजे छत्रपती यांच्यासह गड चढण्यास प्रारंभ ...... पाचाड परिसरात शिवभक्तांची मोठी गर्दी अँकर- छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा उद्य किल्ले रायगडावर साजरा होतोय. यासाठी देशभरातून हजारो संख्येने शिवभक्त किल्ले रायगडाकडे यायला सुरुवात झाली आहे. किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड परिसरात हजारोंच्या संख्येने शिवभक्त दाखल झालेत. पाचाड ते किल्ले रायगड असा पायी प्रवास हे शिवभक्त करत किल्ले रायगडाकडे प्रस्थान करत आहेत. त्यामुळे उद्याच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी गडावर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. छत्रपती युवराज संभाजी राजे यांच्या हस्ते हा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडतो. पाचाड इथं राजमाता जिजाऊंच्या समाधीचे दर्शन घेऊन संभाजी राजे छत्रपती यांनी शिवभक्तांसह गड चढण्यास सुरुवात केली आहे.0
0
Report
सोलापुर में एनसीपी-भाजपा गुटबंदी, देशमुख की चुनावी राह मुश्किल
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांची विधान परिषदेच्या निवडणुकीत थेट भाजपला पूरक भूमिका, तीन आमदार पक्ष विरोधी भूमिकेत, विधान परिषदेच्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. आमदार उत्तम जानकर यांनी पक्षाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांना आपला पाठिंबा नसल्याची उघड भूमिका घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील खद खद बाहेर आली आहे. या पूर्वीच करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी भाजप सोबत जवळीक साधली आहे. माढा चे आमदार अभिजित पाटील यांनी सुद्धा वसंतराव देशमुख यांनी पंढरपूर पंचायत समिती सभापती निवडीत भाजपला मदत केली होती त्यामुळे देशमुख यांना आता विरोध केला आहे. तर मोहोळचे आमदार राजू खरे यांनी आधीच धनुष्यबाण घेतला है. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांना स्वकीयांची मते मिळणार नसल्याने ते आता कधी निवडणूक लढणार असा प्रश्न समोर आला है0
0
Report
दौंड के पाटस में गैंगवार: हवेत चली गोली, 2 आरोपी गिरफ्तार
Rui, Maharashtra:दौंड तालुक्यातील पाटस येथे हवेत गोळीबार... दोन्ही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अन्य दोन आरोपी ऊसात पळून गेले त्यांचा शोध सुरू आहे. तरुणांच्या दोन गटात वाद झाल्यानंतर गोळीबार झाल्याची माहिती... हवेमध्ये तीन ते चार राऊंड फायर केल्याची माहिती. अहिल्यानगर जिल्ह्यातील काष्टीमधील काही तरुण आणि पाटसच्या तरुणांमध्ये भर दुपारी उन्हात वाद झाला, या हाणामारीत गावठी पिस्तौलमधून 3 ते 4 राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. तर अन्य काही आरोपी ऊसात पळून गेली असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी घटना स्थळावरून रिकामी काडतुसे जप्त केली आहेत. मिळत असलेल्या माहितीनुसार, पाटस येथील गडदरे कॉम्प्लेक्स समोर ही घटना घडली आहे. काष्टी येथील काही गुंड प्रवृत्तीचे तरुण गडदडे कॉम्प्लेक्स समोर आले होते. त्यांची पाटस येथील काही तरुणांशी शाब्दिक बाचाबाची झाली. पुढे हा वाद वाढत गेला, दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली. त्यानंतर दोन्ही गटातील काही तरुणांनी गावठी पिस्तौल काढून हवेत गोळीबार केला. यात 3 ते 4 राऊंड फायर झाल्याची माहिती समोर येत आहे. गोळीबाराची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख आणि पाटस पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी काही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, हा गोळीबार नेमका कोणत्या कारणातुन झाला ? कोणत्या पिस्तूलमधून फायर करण्यात आला आणि यामध्ये कोण जखमी झाले आहे का ? याबत पोलिसांकडून अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. यवत पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.0
0
Report
Advertisement
