Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Oct 25, 2024 07:21:47
Yavatmal, Maharashtra
यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
Mar 15, 2026 09:36:50
Beed, Maharashtra:बीड मधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून गावाबाहेर नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. यानंतर तिला गावामध्ये आणून गावच्या चावडीवर खांबाला बांधून ठेवले गेले.. मी माझ्या पत्नीचा घरात शोध घेतला मला वाटलं तिने तिच्या जीवाचं काही बरं वाईट केलं का या भीतीने मी तिच्या आईकडे गेलो... तेवढ्यात गावातील लोकांनी तिला बांधलेल्या अवस्थेतून सोडवलं होतं... भयभीत झालेल्या माझ्या पत्नीला तिच्या आईच्या घरी नेलं.. पुन्हा पोलिसात तक्रार दिली.. पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली आहे.. मात्र या आरोपीला पाठबळ देणाऱ्यांना अटक करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी पीडित महिलेच्या पतीने केली आहे...
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 15, 2026 09:36:19
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 15, 2026 09:05:40
52
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 15, 2026 08:54:26
Shirur, Maharashtra:भीमाशंकर मंदिर सध्या चालू असलेल्या बांधकामामुळे अडीच महिन्यापासून सामान्य भाविकांच्या दर्शनासाठी बंद आहे. मात्र झारखंडातील भाजपा खासदार डॉ. निशिकांत दुबे यांच्या दुर्दैवाने प्रशासनाने नियम पायदळी त क्राल्यासारखे वागले. भाजप खासदार दुबे कुटुंबीय व नातेवाईक हेलिकॉप्टरने मंदिरात प्रवेश करून विशेष दर्शन घेतले, ज्यामुळे प्रशासनाच्या दुजाभावाबद्दल संताप व्यक्त होत आहे. मंदिराच्या सभामंडप व पायऱ्यांच्या बांधकामामुळे ९ जानेवारी ते ९ एप्रिल २०२६ या कालावधीत मंदिर बंद ठेवण्याचे आदेश होते. महाशिवरात्री उत्सवातही भक्तांना दर्शन बंदच होते. पत्रकारांनाही प्रवेश नाकारला गेला होता. स्थानिक नेतेने या कृतीची निषेध केली. थेट हेलिकॉप्टरने आलेल्या खासदारांसाठी प्रशासन नियम धाब्यावर बसेल तेव्हा मंदिराचे दरवाजे उघडले गेल्याने खळबळ उडाली. भाजप खासदारांच्या या व्हीआयपी दर्शनाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी सुरू आहे. जिल्हाधिकारी व स्थानिक तहसिलदारांशी संपर्क केलेला नाही; त्यामुळे कोणाच्या दबावाखाली हा निर्णय घेतला गेला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. खासदार डॉ. निशिकांत दुबे झारखंडमधील गोड्डा मतदारसंघाचे असतात आणि मोदीजींचे निकटवर्ती मानले जातात. या प्रकरणाची शिवसेना udhava बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या विजय शिंदे यांनी निषेध केला आणि पारदर्शकपणे चौकशीची मागणी केली. राष्ट्रवादी नेते, मनसे कार्यकर्ते व शिवभक्तांनीही या घटनेवर प्रश्न उपस्थित केला. एकूणच या घटनेमुळे भीमाशंकर मंदिरात नियमांच्या दुजाभावाबद्दल राजकीय व जन सामान्यात प्रचंड चर्चा सुरू झाली.
126
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 15, 2026 08:47:49
274
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 15, 2026 08:47:26
Nashik, Maharashtra:युद्धाचा परिणाम थेट पिण्याच्या पाण्यावर... पिण्याच्या पाण्याच्या बॉक्स च्या किमतीत 30 रुपयांनी वाढ... आखाती देशांमध्ये निर्माण झालेला युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता देशभर मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे...युद्धजन्य परिस्थितीमुळे रॉ मटेरियल मध्ये वाढ झाल्यामुळे पाणी बॉटलच्या बॉक्सच्या किमतीमध्ये जवळपास 25 ते 30 रुपयाची वाढ झाली आहे... त्यामुळे युद्धाचा फटका थेट जनसामान्यांना बसताना दिसून येत आहे.. खरंतर उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे.... उन्हात पिण्याच्या पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असते...आता थेट पाण्याच्या बॉटलच्या किमती वाढत असल्याने थेट परिणाम सामान्य नागरिकांमध्ये जाणू लागलाय....आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी...
240
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 15, 2026 08:47:16
Jalna, Maharashtra:जालना :धनगर आंदोलक दिपक बो-हाडे मुंबईकडे रवाना मुंबईतल्या आझाद मैदानात सकाळी 10 वाजल्यापासून करणार आमरण उपोषण धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी वनवा पेटला आहे आता विझवणं अवघड- दिपक बो-हाडे आंदोलनाला परवानगी मिळाली- बो-हाडे जालन्यातील धनगर आंदोलक दीपक बो-हाडे आंदोलकांना घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. सोमवार रोजी सकाळी 10 वाजल्यापासून दिपक बो-हाडे मुंबईतल्या आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार आहेत.. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं या प्रमुख मागणीसाठी बो-हाडे आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिल्याचंही बो-हाडे यांनी सांगितलं.. मात्र जोपर्यंत एसटी आरक्षणाची अमंलबजावणी होणार नाही. तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असं बो-हाडे यांनी म्हंटलं असून वनवा पेटला आहे आता विझवणं अवघड आहे असा इशाराही दिलाय. बाईट- दिपक बो-हाडे, धनगर समाजाचे आंदोलक
157
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 15, 2026 08:19:04
Varasoli, Maharashtra:स्‍लग – पुन्‍हा एकदा घरोघरी मातीच्‍या चुली गॅस सिलेंडर टंचाईच्‍या भीतीने चुलींची चलती ग्राहकांची मोठी मागणी, पण पुरवठा कमी कुंभारवाडयांमध्‍ये लगबग , चुली बनवण्‍याचे काम सुरू मातीच्‍या टंचाईमुळे कुंभार समाज अडचणीत अँकर - गॅस सिलेंडरच्या संभाव्य टंचाईच्या भीतीमुळे रायगड जिल्ह्यात लोक पुन्हा एकदा पारंपरिक चुलीकडे वळताना दिसत आहेत. त्यामुळे कुंभारवाड्यांमध्ये मातीच्या चुली बनवण्याची लगबग सुरू आहे. व्हिओ 2 - पूर्वीसारखी मागणी नसल्याने अनेक कुंभारांनी हा व्यवसाय सोडला होता. त्यामुळे सध्या अचानक वाढलेल्या मागणीला पुरवठा करणे कठीण झाले आहे. त्यातच चुली बनवण्यासाठी लागणारी योग्य माती सहज उपलब्ध होत नसल्याचीही मोठी अडचण कुंभार समाजासमोर आहे. गावोगावी ग्राहकांकडून चुलीसाठी मागणी वाढत असली तरी त्या प्रमाणात उत्पादन करणे कारागिरांसाठी अवघड ठरत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ग्राहकांना चुलीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. बाईट – रूपाली म्हशीलकर, कारागीर महिला फायनल व्हिओ – घरोघरी मातीच्‍या चुली ही म्‍हण आता कालबाह्य झाली आहे. परंतु वाढत्या मागणीमुळे काही कारागीर पुन्हा या पारंपरिक व्यवसायाकडे वळताना दिसत आहेत. त्यामुळे मातीच्या चुलींचा व्यवसाय पुन्हा एकदा जिवंत होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. प्रफुल्‍ल पवार, झी 24 तास रायगड
183
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 15, 2026 08:18:17
Yeola, Maharashtra:राज्यात सध्या व्यावसायिक गॅसची टंचाई निर्माण झाल्यामुळे हॉटेल व्यवसायिकांवर मोठं संकट आलं आहे. मात्र येवला शहरातील एका कारागिराने भन्नाट देशी जुगाड शोधून काढला आहे. ऑईलवर चालणारी शेगडी तयार करत त्याने हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा दिला आहे. पाहूया खास रिपोर्ट. सध्या सर्वत्र व्यावसायिक गॅसची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस उपलब्ध नसल्याने अनेक हॉटेल बंद करण्याची वेळ येत आहे. अशा परिस्थितीत नाशिक जिल्ह्यातील येवला शहरातील कारागीर तुषार लाड यांनी एक अनोखा देशी जुगाड केला आहे. त्यांनी ऑईलवर चालणारी शेगड़ी तयार केली असून सध्या ही शेगडी चर्चेचा विषय ठरत आहे. या शेगडीची खासियत म्हणजे ती टाकावू ऑईलवर चालते आणि त्यावर हॉटेलमधील जवळपास सर्व पदार्थ सहज बनवता येतात. त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांसाठी ही शेगड़ी वरदान ठरत आहे. गॅस टंचाईमुळे अडचणीत सापडलेल्या हॉटेल व्यवसायिकांनी या शेगडीचे स्वागत केले असून कमी खर्चात पर्याय उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त केले आहे. गॅस टंचाईच्या काळात येवला शहरातील या कारागिराचा देशी जुगाड अनेक हॉटेल व्यवसायिकांसाठी खऱ्या अर्थाने दिलासा ठरताना दिसत आहे. सुदर्शन खिल्लारे, येवला नाशिक
224
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 15, 2026 08:04:16
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सलग सणांच्या पार्श्वभूमीवर श्री स्वामी समर्थ मंदिर रात्री 12 ते 2 बंद ठेवण्याच्या निर्णय - सलग सणांच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय - श्री स्वामी समर्थ मंदिर दर्शनासाठी रात्री 12 ते 2 यावेळेत राहणार बंद - राज्यभरातून आणि देशभरातून येणाऱ्या स्वामी भक्तांसाठी 22 तास स्वामींचे दर्शन खुले ठेवण्याचा मंदिर समितीचा निर्णय - गुढीपाडवा, स्वामी समर्थ प्रकट दिन, रमजान ईद तसेच साप्तहिक सुट्टीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला बदल - भक्तांची संभाव्य गर्दी लक्ष्यात घेता महिला आणि पुरुष भक्तांसाठी स्वतंत्र रांगेची सोय
123
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 15, 2026 08:00:18
Shirdi, Maharashtra:Rahuri News Flash इथे उपस्थित सर्वांना नमस्कार... राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची मराठीतून भाषणाला सुरुवात... राज्यपाल पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर वर्मा यांचा राज्यात पहिल्याच सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थिती... राज्यपालांनी केली पहिल्याच भाषणाची सुरूवात मराठीत.. मी देखील त्रिपुराचा मुख्यमंत्री होतो... देशातील अनेक मुख्यमंत्र्यांचे लक्ष असते, फडणवीस काय करताय... देवेंद्र फडणवीस एक डायनॅमिक नेतृत्व... राज्यपालांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक... आज राज्यपालांच्या हस्ते देवेंद्र फडणवीस यांचा डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देऊन सन्मान... राहुरी येथील कृषी विद्यापीठाच्या वतीने डॉक्टरेट देऊन सन्मान...
194
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 15, 2026 07:49:00
Shirdi, Maharashtra:ऑन बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणूक - दोन्ही निवडणुका बिनविरोध व्हाव्यात... सर्वांनी एकमताने निर्णय करावा असा आमचा प्रयत्न... मात्र निवडणूक लादली गेली, तर आम्ही लढायला तयार... ऑन मुंबई महापौर लाल दिवा - लाल दिवा गाडीवर नव्हता, तर बोनेटच्या ठिकाणी होता... महापौरांचा यात काहीही दोष नाही... कुणीही लाल दिवे वापरू नये हा जुनाच निर्णय आहे... महापौरांही त्याची कल्पना आहे... महापौरांना विनाकारण टार्गेट करणे योग्य नाही... ऑन इंधन तुटवडा - नागरिकांनी केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे वागले पाहिजे... काही राजकीय पक्ष नागरिकांमध्ये जाणीवपूर्वक भिती निर्माण करताय... पॅनिक सिच्युएशन झाली तर असलेली चांगली परिस्थिती खराब होण्याची संभावना... अशी भिती निर्माण झाली तर लोक साठवणूक करतील... केंद्र सरकार आणि मोदीजी आपल्यासाठी सर्व गोष्टी नीट करताय, त्यावर विश्वास ठेवा... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील नागरिकांना आवाहन....
147
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Mar 15, 2026 07:35:20
Buldhana, Maharashtra:खामगावात ‘पार्ले-जी’ उत्पादन ठप्प; गॅस टंचाईमुळे ५०० कामगारांवर संकट... खामगाव येथील शिवांगी बेकर्स कंपनीतील बिस्किट उत्पादन गेल्या गुरुवारपासून पूर्णपणे बंद पडले आहे. येथे ‘क्रीम’ व ‘ग्लुकोज’ प्रकारातील प्रसिद्ध पार्ले-जी बिस्किटांचे उत्पादन घेतले जाते. ओव्हन गॅसवर चालत असल्याने गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळे उत्पादन प्रक्रिया ठप्प झाली आहे. कंपनीत सुमारे ५०० कामगार कार्यरत असून उत्पादन बंद राहिल्यास त्यांच्या रोजगारावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, उत्पादन थांबल्यामुळे कंपनीला दररोज लाखो रुपयांचा फटका बसत असून बाजारात बिस्किटांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे....
93
comment0
Report
Advertisement
Back to top