icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नागपुर नगर निगम ने गर्मी से बचाव के लिए सिग्नल चौकों पर मिस्ट लागू किया

Nagpur, Maharashtra:नागपूर - - नागपूर महानगर पालिकेकडून हिट ॲक्शन प्लॅन अंतर्गत सिगनवर ग्रीन नेटच्या खाली लावण्यात आली मिस्ट सिस्टीम - नागपूरच्या टेलिफोन एक्सचेंज चौकातील सिग्नलवर लावण्यात आले स्प्रिंकलरच्या माध्यमातून पाण्याचे तुषार - नागपूरात एप्रिलच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा पारा ४५ डिग्री सेल्सिअस पार ओलांडला त्यामुळे दुपारच्या वेळी सिग्नलवर वाहनचालकांना उन्हाचे तीव्र चटके लागतात.. त्यामुळे उन्हापासून बचावासाठी पालिकेकडून काही चौकात ग्रीन नेट तर काही ठिकाणी ग्रीन नेटच्या खाली पाण्याचे तुषार सोडण्यात आलेत.. स्प्रिंकलरच्या माध्यमातून मिस्ट सिस्टीम लावण्यात आली आहे..
0
0
Report

बदलापुर की विकी वाइन शॉप में चोरी; CCTV में कैद तीन चोर

Ambernath, Maharashtra:बदलापुरात वाईन शॉपचं शटर उचकटून चोरी कात्रपच्या विकी वाईन्समधून रोकड आणि दारूच्या बाटल्या चोरल्या चोरटे सीसीटीव्हीत कैद, पोलिसांकडून तपास सुरू कात्रपच्या मुख्य चौकात विकी वाईन शॉप हे दुकान आहे. गुरुवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास तीन चोरटे या दुकानाबाहेर आले आणि त्यांनी दुकानाचं शटर उचकटलं, यानंतर त्यापैकी एकाने दुकानात प्रवेश केला. दुकानातील काउंटरमधून ७३ हजार रुपयांची रोख रक्कम आणि तीन मोबाईल, तसंच काही महागड्या दारूच्या बाटल्या या चोरट्यांनी चोरून नेल्या. ही बाब सकाळी वाईन श-shop मालकाच्या लक्षात येताच त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता रात्री ३ चोरट्यांनी चोरी केल्याचं स्पष्ट झालं. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करतायत. दरम्यान, विकी वाईन शॉप हे कात्रपच्या मुख्य चौकात आणि अतिशय गजबजलेल्या रस्त्यावर असून तिथे चोरट्यांनी चोरी केल्यानं चोरट्यांची हिंमत वाढल्याचं दिसत असून पोलिसांनी या चोरट्यांना लवकरात लवकर पकडण्याची मागणी वाईन शॉप मालकांनी केली आहे.
0
0
Report
Advertisement

47 साल के मोहम्मद जमील ने 31 साल बाद दहावी पास, परिवार में खुशियों की लहर

Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथील 47 वर्षीय मोहम्मद जमील नूर मोहम्मद यांनी 31 वर्षांनंतर पुन्हा दहावीची परीक्षा देत यश मिळवले आहे. 1995 मध्ये अपयश आल्याने त्यांचे शिक्षण अर्धवट राहिले होते. मात्र शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द कायम ठेवत त्यांनी यंदा आपल्या मुलांच्या वयाच्या विद्यार्थ्यांसोबत परीक्षा दिली आणि उत्तीर्ण होत शिक्षणाला वयाची मर्यादा नसते हे सिद्ध केले. गादी व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या मोहम्मद जमील यांच्या तीन मुलांपैकी एक डॉक्टरी, दुसरा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असून धाकटा बारावीत शिकत आहे. निकाल जाहीर होताच कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.
0
0
Report

नाशिक के TCS मामले में निडा खान गिरफ्तारी, मंत्री ने लव जिहाद रोक की मांग

Ahilyanagar, Maharashtra:राज्यभरात खळबळ उडवणाऱ्या नाशिकमधील बहुचर्चित TCS कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या संशयित आरोपी निदा खानला अटक करण्यात आली आहे. अशा प्रकारची ‘लव्ह जिहाद’सारखी प्रकरणे थांबली पाहिजेत, अशी भूमिका जलसंधारण मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. यासोबतच अटक करण्यात आलेली आरोपी एमआयएमच्या नगरसेवकांच्या संपर्कात होती, असा गंभीर दावा त्यांनी केला. संभाजीनगर हे पूर्वी सिमीचे केंद्र होते, त्यामुळे एमआयएमचे काही कार्यकर्ते सिमीच्या संपर्कात आहेत का, याचीही सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे विखे पाटील यांनी म्हटले आहे.
0
0
Report

पन्हाळगड के सदोबा दरगाह पर अतिक्रमण हटाने के लिए प्रशासन का विशेष अभियान

Kolhapur, Maharashtra:Anc :- कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडावरील सादोबा दर्गा परिसरातील उर्वरित अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासन उद्या सकाळपासून विशेष मोहीम राबविणार आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने रविवारपर्यंत पन्हाळगड परिसरात जमावबंदी आदेश लागू केला आहे. प्रशासनाने यापूर्वी हजरत पीर शहादुद्दीन खतालवल्ली पन्हाळा ट्रस्टला अतिक्रमणाबाबत नोटीस बजावली होती. नोटिसीनंतर ट्रस्टने स्वच्छतागृह आणि पत्र्याचे शेड स्वतः हटविले होते. मात्र, तलाव परिसरातील उर्वरित प्रार्थनास्थळ कायदेशीर असल्याचा दावा ट्रस्टकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे, हिंदुत्ववादी संघटनांनी या बांधकामावर आक्षेप घेत तो भाग बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासनाने दिलेली मुदत संपल्यानंतर आता उर्वरित बांधकामांवर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, वीकेंडमुळे पन्हाळगडावर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने रविवारपर्यंत जमावबंदी आदेश लागू केला आहे.
0
0
Report
Advertisement

नागपुर के जुड़वां बहन-भाई ने दहावी में सेम टू सेम 97.8% हासिल किया

Nagpur, Maharashtra:दहावीच्या निकालात नागपूरातल्या जुळ्या बहिण भावाने मिळवलेलं सेम टू सेम यश सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.... रामदासपेठ सोमलवार हायस्कूलचे विद्यार्थी खिलज व ख़ुशी चांदेवार या जुळ्या बहिण-भावांनी दहावीच्या परीक्षेत अगदी सारखे म्हणजे 97.8टक्के गुण मिळवलेय... पाचव्या वर्गापासूनच दोघेही बहिण भावांमध्ये अभ्यासाची चांगलीच चुरस आहे... यापूर्वीच्या परीक्षांमध्ये एक दोन मार्कांनी ते मागे पुढे राहणारे हे दोघेही बहिण भावानी दहावीत मात्र सेम टू सेम मार्क मिळवत वेगळाच योगायोग साधला आहे... या जुळ्या बहिण भावांशी व त्यांच्या आई व शिक्षक वर्गशिक्षिकेशी संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधींनी
0
0
Report

वाशीम के दो खंभों के विरोध ने करोड़ों का बिजली उपकेंद्र प्रोजेक्ट रोक दिया

Washim, Maharashtra:वाशीम के मंगरुळपीर तालुक्यातील तर्‍हाळा येथे उभारण्यात आलेले नवीन वीज उपकेंद्र केवळ दोन वीज खांबांच्या अडचणीमुळे रखडले आहे. ३३केव्ही वीजवाहिनी जोडणीसाठी आवश्यक खांब उभारणीला एका शेतकऱ्याचा विरोध असल्याने प्रकल्प सुरू होऊ शकलेला नाही. शेलूबाजार उपकेंद्रावरील ताण कमी करून परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी हे उपकेंद्र उभारण्यात आले आहे. मात्र प्रकल्प रखडल्याने शेतकऱ्यांना अनियमित व कमी दाबाच्या वीजपुरवठ्याचा फटका बसत असून सिंचनात अडचणी निर्माण होत आहेत. बहुतेक काम पूर्ण असूनही केवळ दोन खांबांमुळे कोट्यवर्धक रुपयांचा प्रकल्प ठप्प आहे. महावितरणच्या अधीक्षक अभियंत्याने सांगितले आहे.
0
0
Report
Advertisement

लातूर विभागीय शिक्षण मंडळ का दहावी परिणाम 88.42%, लड़कियों ने फिर मारी बाजी

Latur, Maharashtra:इयत्ता दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज जाहीर झाला असून लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा एकूण निकाल ८८ पूर्णांक ४२ टक्के इतका लागला आहे. विशेष म्हणजे, यंदाही मुलींनीच निकालात बाजी मारली आहे. लातूर मंडळांतर्गत येणाऱ्या लातूर, नांदेड आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांपैकी लातूर जिल्ह्याचा सर्वाधिक ९२ पूर्णांक ८० टक्के निकाल लागला आहे. त्याखालोखाल धाराशिव जिल्ह्याचा ९१ पूर्णांक २९ टक्के, तर नांदेड जिल्ह्याचा ८३ पूर्णांक ६२ टक्के निकाल लागला आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यंदा लातूर मंडळाच्या निकालात जवळपास २ पूर्णांक ३० टक्क्यांची घसरण झाली आहे.
0
0
Report

बीड़ भूसंपादन घोटाले: अविनाश पाठक की गिरफ्तारी से हड़कंप

Beed, Maharashtra:पोलिसांच्या तावडीत असलेल्या या व्यक्तीचा हा चेहरा नीट निरखून पहा... व्हिडिओतील हा अधिकारी कदाचित तुमच्या ओळखीचा असेल.. एकेकाळी बीड जिल्ह्याचा कारभार हाताळणारे, अधिकाराच्या खुर्चीतून संपूर्ण यंत्रणा चालवणारे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना आजच नामाच्या आधारावर गंभीर घोटाळ्याचे आरोप आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन आणि मावेजा वाटपात गैरव्यवहार झाल्याचा संशय नव्या जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी उघडकीस आणला आणि प्रशासनात खळबळ उडाली. त्यानंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात 10 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला, एसआयटी स्थापन झाली आणि तपासाची चक्र वेगाने फिरू लागली. अखेर अधिकाराच्या शिखरावर पोहोचलेला तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक याला काल लातूर येथील निवासस्थानातून पोलिसांनी अटक केली या घटनेमुळे सबंध राज्यभरात एकच खळबळ उडाली.. तत्पश्चात नव्याने जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेले विवेक जॉन्सन यांना भूसंपादनातील घोटाळ्याची फाईल हाती लागली. त्यांनी याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांच्या बनावट सयाच्या आधारे राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन प्रकरणी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्या शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या मावेजात मोठा घोटाळा झाल्याचे लक्षात आणले आणि त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणात धनंजय देशमुख यांचे देखील योगदान असल्याचा दावा करण्यात आला. आता एसआयटीच्या तपासात दिवसेंदिवस धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे... भूसंपादनाच्या प्रक्रियेत कागदपत्रांमध्ये फेरफार, बनावट स्वाक्षऱ्या, तसेच जमिनींच्या मोबदल्याच्या रकमेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय... तर भूसंपादन घोटाळ्यात जिल्हाधिकारी अविनाश पाठक हाच आरोपी झाल्याने आता त्याच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी मनसेनी केलीय. काही प्रकरणांमध्ये मूळ शेतकऱ्यांना कमी रक्कम देऊन इतरांच्या खात्यात कोट्यवधी रुपयांचा मावेजा वळवण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागत आहे... दरम्यान, तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या अटकेनंतर प्रशासन आणि राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आलंय... राज्यभरातील विविध महामार्ग भूसंपादन प्रकरणांकडे आता संशयाच्या नजरेतून पाहिलं जात असून, अनेक जिल्ह्यांतील जुन्या फाईल्सची पडताळणी सुरू होण्याची शक्यता आहे..
0
0
Report
Advertisement

बीएमसी प्रमुख अस्पतालों के हाउसकीपिंग टेंडर में 45 करोड़ रुपये के घोटाले का आरोप

Mumbai, Maharashtra:बीएमसीच्या प्रमुख रुग्णालयांतील हाऊसकीपिंग टेंडरमध्ये ४५ कोटी रुपयांचा घोटाळा; भाजप आमदार मिहीर कोटेचा यांचे बीएमसी आयुक्तांना पत्र मुलुंडचे भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी प्रमुख महापालिका रुग्णालयांतील हाऊसकीपिंग कंत्राटांसाठी काढलेल्या टेंडरमध्ये ४५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करत ते रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांनी बीएमसीच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याचीही मागणी केली असून, निविदा प्रक्रियेत संगनमत करून फेरफार झाल्याचा आरोप केला आहे. स्थायी समितीसमोर हा प्रस्ताव मंजуриसाठी ठेवला जाणार आहे. अंदाजित खर्चापेक्षा २०% पेक्षा कमी दराने कोट करण्यात आले आहे. आमदार कोटेचा यांनी असाही दावा केला की, कंपनीने कामगारांच्या सुरक्षेसाठी लागणाऱ्या साहित्याचा खर्च शून्य दाखवून कामगारांच्या आरोग्याशी तडजोड केली असून कामगार कायद्यांचे उल्लंघन केले आहे. तसेच, कंत्राटदाराने स्थायी समितीची मंजুরি मिळण्यापूर्वीच KEM रुग्णालयात शेकडो कामगार तैनात केल्याचा आरोपही त्यांनी केला. मुंबईचा महापौर भाजपचा असताना भाजप आमदारानेच स्वतः च्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
0
0
Report

कान बहरेपन के बावजूद शांभवी पंचबुद्धे ने दहावी में 94.2% हासिल किया

Nagpur, Maharashtra:नागपूराच्या शांभवी पंचब्ध्दे या 100% ऐकू न येणाऱ्या विद्यार्थिनीने दहावीत 94.2% गुण मिळवत घवघवीत यश मिळवले आहे... महत्त्वाचं म्हणजे सामान्य विद्यार्थ्यांच्या शाळेत सामान्य विद्यार्थ्यांसोबत शिकून दहावीच्या परीक्षेत तिने 94.2% गुण मिळवलेय... शिवाय परीक्षे दरम्यान लेखणीकही घेतली नव्हती.. शांभवी पाचव्या वर्गात असताना तिला मोठ्या प्रमाणावर कफ झाले.. आणि हळूहळू तिची ऐकण्याची शक्ती कमी होत गेली... ती सातव्या वर्गात पोहोचेपर्यंत ऐकण्याची शक्ती पूर्णपणे नाहीशी झाली... मात्र तिच्या कुटुंबीयांनी तिला सामान्य विद्यार्थ्यांच्या शाळेतच ठेवण्याचा निर्णय घेतला... सोमलवार शाळेने सुद्धा साथ दिली... शांभवीला ऐकू येत नाही म्हणून फक्त तिला पहिल्या बाकावर बसण्याची सूट देण्यात आली.. शिक्षकांनी शिकवताना केलेला लीप मुव्हमेंट ती आत्मसात करायची आणि शिक्षक इतर विद्यार्थ्यांना काय सांगत आहे हे लीप रीडिंग च्या माध्यमातून समजून घ्यायची... ऐकण्यासंदर्भातल्या व्याधीमुळे बोर्डाच्या नियमाप्रमाणे शांभवीला राईटर मिळू शकत होता, मात्र शांभवी ने स्वतःच पेपर लिहिण्याचा निर्णय घेतला... आणि दहावीच्या परीक्षेत 94.2% अंक मिळवत घवघवीत यश मिळवले* आहे... शांभवी चे वडील आणि शिक्षिकेशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी...
0
0
Report

पनवेल पुलिस ने करंजाडे रेलवे प्रोजेक्ट से 1.5 करोड़ रुपये के स्टील चोरी के तीनों को गिरफ्तार किया

Navi Mumbai, Maharashtra:पनवेल पोलिसांनी करंजाडे येथील रेल्वे प्रकल्पातून 1.5 कोटी रुपयांचे स्टील चोरी केल्याप्रकरणी तिघांना अटक केली असून संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. करंजाडे येथील सुरू असलेल्या रेल्वे पुलाच्या कामाच्या ठिकाणाहून सुमारे दीड कोटी रुपयांचे 67 टन स्टील चोरीला गेले होते. तपासादरम्यान हायड्रा क्रेनच्या सहाय्याने स्टील उचलून वाहतूक केल्याचे उघड झाल्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हे शाखेने क्रेनच्या हालचालींचा माग काढत चालकाची चौकशी केली असता चोरीचा माल धानसर परिसरात ठेवल्याचे समोर आले. पोलिसांनी तात्काळ छापा टाकून सर्व स्टील जप्त केले. चोरी केल्याप्रकरणी पनवेल पोलिसांनी साइट मॅनेजर विजयकुमार वर्मा, स्क्रॅप व्यावसायिक अजीजुल रहमान आणि मजूर परवेज आलाव यांना अटक केलेय.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top