icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

स्मार्ट सिटी योजना बंद: 176 करोड़ खर्च के बाद छत्रपति संभाजी नगर में संकट

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून १७६ कोटी रुपये खर्च करून छत्रपती संभाजी नगर शहरात ७०० सीसीटीव्ही आणि 'कमांड अँड कंट्रोल सेंटर' उभारण्यात आले आहे. केंद्र सरकारने ३१ मार्च रोजी 'स्मार्ट सिटी' प्रकल्प अधिकृतपणे गुंडाळल्याने या प्रकल्पांतर्गत सुरू असलेली सर्व अपूर्ण कामे आता महापालिकेच्या गळ्यात पडली आहेत. कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या देखभालचे कंत्राट लवकरच संपणार असून हा प्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता आहे. स्मार्ट चालवण्यासाठी सिटीचे प्रकल्प महापालिकेला वार्षिक ३५ कोटी रुपयांचा आर्थिक बोजा सहन करावा लागणार आहे. यावर निर्णय घेण्यासाठी येत्या २९ जून रोजी संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती मनपाने दिली
0
0
Report

भंडारा में ड्राय स्पेल से खरीफ पेराई रुकी, किसानों में बढ़ी चिंता

Bhandara, Maharashtra:एल निनो'चा प्रभाव भंडारा जिल्ह्यात 'ड्राय स्पेल'चे सावट, खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्याने शेतकरी चिंतेत... जून महिन्यात अपेक्षित ११८.५ मिमी पावसापैकी अवघा २२.८ मिमी पावसाची नोंद जिल्ह्यात केवळ १९.२ टक्के पावसाची नोंद... दुबार पेरणीच्या भीतीने शेतकरी सावध... २४ जूननंतर पूर्व विदर्भात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता, हवामानाचा अंदाज घेऊनच पेरणी करण्याचे प्रशासनाचे आवाहन... सध्या भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. पुढील आठवडाभरात दमदार पाऊस झाल्यास खरीप हंगामाला दिलासा मिळू शकतो. मात्र पावसाचा खंड आणखी वाढल्यास पेरण्या, उत्पादन आणि पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
0
0
Report

छत्रपति संभाजीनगर में मौसम ने बदला रंग: तापमान 38-40°C और आर्द्रता ऊंच

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:पावसाच्या दांडी ने छत्रपती संभाजीनगर सध्या विचित्र हवामानाला सामोरे जात आहे.. शहरात शुक्रवारी कमाल तापमान ३८.४ अंश सेल्सियस, तर किमान तापमान २४.८ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले. सकाळी हवेतील आर्द्रता ६९ टक्के होती, जी सायंकाळपर्यंत ३१ टक्क्यांवर आली. दरम्यान, हवामान विभागाच्या पुढील ५ दिवसांच्या अंदाजानुसार तापमानाचा पारा ३८ ते ४০ अंशांच्या दरम्यान राहील. शनिवारी कमाल तापमान ४० अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. २१ जूनचा अपवाद वगळता, उर्वरित सर्व दिवशी आकाश अंशतः ढगाळ राहील आणि मेघगर्जनेसह विजा चमकण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सुदैवाने, शहरात पावसाची कोणतीही नोंद अद्याप झालेली नाही. मात्र, हवेतील आर्द्रतेत मोठा चढ-उतार पाहायला मिळाला. सकाळी साडेआठ वाजता हवेतील आर्द्रता ६९ टक्के इतकी होती, ज्यामुळे सकाळच्या सत्रात प्रचंड उकाडा आणि घाम निघत होता. तर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ही आर्द्रता ३१ टक्क्यांवर गेली होती...
0
0
Report
Advertisement

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोल्हापुर दौरे में विकास योजनाओं का शुभारंभ करेंगे

Kolhapur, Maharashtra:केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांचे रात्री उशिरा कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. ते कोल्हापूर, इचलकरंजीच्या एकदिवशीय दौऱ्यावर आले आहेत. रात्री त्यांचा मुक्काम शासकीय विश्राम गृहावर आहे. कोल्हापुर विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी खासदार धनंजय महाडिक,विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा,जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महानगर पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड,जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज सकाळी ११ वाजता करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात विविध विकासकामांचा शुभारंभ होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनित्रा पवार त्यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य सदस्य यासाठी उपस्थित राहणार आहेत. मंदिरातील विकास कामाच्या शुभारंभानंतर पश्चिम महाराष्ट्र मंदिर विकास आराखड्यांतर्गत अंबाबाई मंदिर परिसरातील परिसराची ते पाहणी करणार आहेत. गेली अनेक शतके भाविकांचे धार्मिक केंद्र असणाऱ्या या मंदिराच्या मूळ वैभवाला पुन्हा उभारण्यासाठी महत्वपूर्ण पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. मंदिराच्या किरणोत्सवासाठी पूरक व्यवस्था, सुविधा निर्माण करण्याचीही तरतूद आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारने भरीव तरतूद केली आहे. मंदिर आराखड्यावर चर्चा व पाहणी केल्यानंतर दुपारी ११.३० च्या सुमारास कोल्हापूर शहरातील पोलीस परेड ग्राउंडवर आयोजित केलेल्या जाहीर सभेला गृहमंत्री संबोधित करणार आहेत. त्यानंतर दुपारच्या सत्रात ४ वाजताच्या सुमारास इचलकरंजी येथील जनता सहकारी बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन तसेच शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नामविस्तार सोहळ्यात ते सहभागी होणार आहे. त्यानंतर दुपारी ४.४५ वाजताच्या सुमारास कलाप्पांना आवाडे टेक्सस्टाईल पार्क मैदान इचलकरंजी इथे शेतकऱ्यांच्या मेळाव्याला ते संबोधित करणार आहेत. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास गृहमंत्री कोल्हापूरहून पुन्हा परतणार आहेत.
0
0
Report

अल निनो से जल-संकट के बीच दिंडीयात्रा के लिए निधि बढ़ी, सुरक्षा-व्यवस्था कड़े

Ahilyanagar, Maharashtra:या वर्षी ‘अल निनो’मुळे संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता, दिंडीतील वारकऱ्यांची संख्या कमी करण्याचे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिंडी प्रमुखांना केले आहे...आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात दिंडी चालक यांच्यासोबत पालकमंत्री विखेंनी बैठक घेतली या बैठकीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून जाणाऱ्या 200 दिंड्यांचे प्रमुख उपस्थित होते... गेल्यावर्षी दिंड्यांचे नियोजन करण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा परिषदेला २ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता... यावर्षी हा निधी वाढवून ३ कोटी ८६ लाख रुपये मंजूर करण्यात आलाय...या माध्यमातून वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी मंगल कार्यालयांसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत... तसेच पालखी मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून सोलापूर जिल्ह्यात पालख्या पोहचल्यानंतर तिथे गैरसोय होऊ नये यासाठी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशीही समन्वय साधला जाणार असल्याचे विखेंनी सांगितले...दिंडीत आजारी पडणाऱ्या वारकऱ्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य सेवा आणि उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत.
0
0
Report
Advertisement

वाशी नगरपालिका अस्पताल के बाहर पुलिस पर हमला; पोस्टमार्टम के बाद पुलिस कर्मी घायल

Navi Mumbai, Maharashtra:वाशी येथील मनपा रुग्णालयाबाहेर वाशी पोलिसांवर हल्ला. एका महिलेच्या मृत्यूनंतर मोठा गोंधळ उडाला. पोस्टमार्टमनंतर मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवत असताना महिलेच्या नातेवाईकांनी तिच्या पतीवर हल्ला केल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता यावेळी पोलिसांवरही हल्ला करण्यात आल्याचे समोर आलेय. या घटनेत वाशी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी जयदेव फुंडे तसेच रबाळे पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला दुखापत झालेय. त्यानंतर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गोंधळ घालणाऱ्या संबंधित आरोपींना ताब्यात घेण्याचे कामं पोलिस करत आहेत.
0
0
Report
Advertisement

गडचिरोली में वन अधिकारी समेत निजी व्यक्ति से 3 लाख की रंगदारी, एसीबी ने दबोचा

Gadchiroli, Maharashtra:एका खाजगी फर्निचर मार्ट व्यावसायिकाकडून वनविभागाच्या कारवाईची भीती दाखवून तब्बल ३ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकारीासह (RFO), वनरक्षक आणि एका खाजगी इसमावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना खाजगी इसमाला एसीबीच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले. या कारवाईमुळे गडचिरोली जिल्ह्यातील वनविभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीनिवास कटकू (RFO), वनरक्षक नितेश मडावी आणि खाजगी मध्यस्थ प्रदीप मंडल अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची-names- नावे आहेत. मुलचेरा तालुक्यातील पेडीगुडम वनपरिक्षेत्रात हा संपूर्ण प्रकार घडला. एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली असता, खंडणी मागितल्याची बाब स्पष्ट झाली. त्यानुसार सापळा रचून कारवाई करण्यात आली.
0
0
Report

चंद्रकांत पाटील के बयानों से उद्धव ठाकरे पर विपक्ष की नजर

Kolhapur, Maharashtra:मंत्री चंद्रकांत पाटील बाईट मुद्दे केंद्रीय मंत्री अमित शहा दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत त्याची पूर्वतयारी झाली आहे इचलकरंजी आणि कोल्हापूरमध्ये चांगली तयारी झाली आहे, लोकांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे गृह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आग्रहास्तव राज्य सरकारने तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला सुमारे पंधराशे कोटींचा निधी दिला यातील 900 कोटी रुपये जमीन अधिग्रहणासाठी जातील, उर्वरित निधीतून विकास कामे केली जाणार आहेत गेली तीन-चार महिने आमचा आग्रह होता केंद्रीय मंत्री अमित भाई पायाभरणीसाठी यावं मात्र सारखी आचारसंहिता लागली विधानसभा त्यानंतर नगरपरिषद आणि आता नुकत्याच झालेल्या विधान परिषदेची आचारसंहिता सुरू होती केंद्रीय मंत्री अमित शहा अамбाबाईचे भक्त असल्यामुळे केंद्राच्या प्रसाद योजनेतून अंबाबाई मंदिर साठी यातून निधी मिळेल इचलकरंजीतील बँकेला आणि हुपरीतील साखर कारखान्याला कल्लाप्पांना आवाडे यांचं नाव देण्यात येणार आहे, त्याच्या उद्घाटनासाठी ही केंद्रीय मंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळाला बारा वर्षे पूर्ण झाली हा एक रेकॉर्ड आहे पंडित नेहरू यांचा रेकॉर्ड त्यांनी मोडला, रेकॉर्ड मोडणं हा विषय नाही त्यांनी त्या बारा वर्षात देश कुठल्या कुठे नेला जगामध्ये भारताचे स्थान निर्माण केलं, बारा वर्षात पंतप्रधान मोदींनी केलेली काम आम्ही देशासमोर मांडत आहोत त्यामुळे मोदीजींची बारा वर्ष अशा आशयावर इचलकरंजी आणि कोल्हापुरात कार्यक्रम होणार आहेत चंद्रकांत पाटील ऑन उद्धव ठाकरे उद्धवजींना सांगणे इतका मी मोठा नाही, मला असं वाटतं की तोच मोठा होतो जो वस्तुस्थिती आणि भविष्याचा अंदाज घेतो छत्रपती शिवरायांचा आदर्श आपण घेतो, छत्रपती शिवरायांनी कुठे थांबायचं, कुठे पुढे जायचं कुठे मागायचं ठरवलं होतं त्यामुळे जगातील यशस्वी राजे अशी त्यांची छाती, त्यामुळे फार पुरातन जायला नको, प्रभू रामचंद्रांनीही आई-वडिलांच्या आदेशाने 14 वर्षांचा वनवास भवलाच, ते असे म्हणाले नाहीत की बिलकुल जाणार नाही त्यामुळे माणसाच्या आयुष्यातही कुठे थांबायचं कुठे पुढे जायचं हे समजायला हवं *(उद्धव ठाकरे यांना उद्देशून टोला)* आत्मपरीक्षण करायला कोणीही लागत नाही, मनाची तयारी लागते ती उद्धवजींची असेल त्याला मग कोणीही लागत नाही त्यामुळे तिकडे वातावर असं आहे पराचा कावळा होईल, मी म्हणतो आत्मपरीक्षण मात्र तिकडे मलाच हा काय शिकवायला असा संदेश जाईल त्यांना शिकवायला त्यांचा शेजारी असतो *(संजय राऊत यांना उद्देशून)* चंद्रकांत पाटील ऑन ऑपरेशन टायगर महाविकास आघाडीतील महा आता काढायलाच पाहिजे, आघाडी पुरेशी झाली आता काय राहिला महा विकास तर राहिलाच नाही महाविकास आघाडीला सध्या काय कार्यक्रमच नाही, रोहित पवारांना रोज एक विषय लागतो उपोषणाला बसतात काय उपोषण सोडतात काय उठले काय आणि बसले काय विरोधी पक्ष सैरभैर झाला आहे, मी सांस्कृतिक कार्यमंत्री त्यामुळे सभागृह चालवायला मला इतकं सोपं जातं त्यांना झोपेत सुद्धा बीजेपी आणि माहिती आणि आम्ही दिसतच असो, त्यातच तुम्ही अशा बातम्या सोडता, त्यामुळे ते घाबरतात चंद्रकांत पाटील ऑन संजय राऊत मराठीमध्ये एक म्हण आहे कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, आम्हाला फक्त फटका बसायचं असेल तर तो कर्माने बसेल त्यात तुम्ही कशाला भविष्यवाणी करायला हवी पण मी ग्रामीण महिने चालतो कावळ्याच्या शापाने काय होणार आहे दुसरी एक म्हण आहे गरजेल तो पडेल काय, आमचे नेते कसे शांततेत काम करतात, तुम्हीच म्हणता फुटणार नाही फुटणार नाही आणि फुटले की तुडवा-तुडवा म्हणायचं त्यामुळे जी ऑपरेशन कराल ते शांततेत करा टिकवण्याचेही आणि काढण्याचे...
0
0
Report

विखे पाटील के इशारों पर राजनीतिक तलवार, ED-SBI का नया बयान सामने

Shirdi, Maharashtra:राधाकृष्ण विखे पाटील बाईट पाॅइन्टर... ऑन जरांगे इशारा... जरांगे पाटलांच्या भावना आम्ही जाणून घेतल्या आहेत.. कायदेशीर बाबी तपासून कार्यवाही करावी लागतेय.. 59 लाख नोंदिचा डाटा जरांगे पाटलांना दिलाय.. जी काही कार्यवाही सुरू आहे त्यावर जरांगे पाटील समाधानी आहेत.. त्यांनी काही अपेक्षा व्यक्त करणं चुकीचं नाही... त्यांच्या सुचनांचा आम्ही नेहमीच आदर करत आलोय.. भविष्यातही कार्यवाही करू... जरांगे पाटील यांच्या आंदोलन करण्याच्या इशाऱ्यावर विखे पाटील यांची प्रतिक्रीया... ऑन संजय राऊत इडी सिबीआय वक्तव्य.. वायफळ बरळण्याच्या कामामुळेच त्यांच्या पक्षाचं वाटोळ झालंय.. इडी सिबीआयला काय एव्हढा वेळ आहे का?... अशा लोकांच्या मागे जाण्यासाठी... त्यांच्या फक्त तोंडात बळ आहे.. वायफळ बडबड करण्यापेक्षा त्यांनी पक्ष एकसंघ ठेवण्यासाठी दिला असता तर ठाकरेंना मदत झाली असती... ऑन उबाठा कार्यकर्ते इशारा... भाऊसाहेब वाकचौरे महायुतीत आले आहेत... शिवसेना शिंदे गटात आले आहेत... त्यांच्या बाबतीत असे काही प्रयोग केले तर परीणाम भोगण्यासाठी तयार रहा... खासदारांना मतदारसंघात फिरू देणार नाही या इशाऱ्यावर विखे पाटील यांची प्रतिक्रीया...
0
0
Report
Advertisement

Chandrapur me koyla khadanon ke pradushan se kisano ko nukasan ka sarve: samiti pahuchi

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- कोळसा उत्खनन आणि प्रदूषणाचे पिकांवर होणारे परिणाम अभ्यासून नुकसान भरपाई संदर्भात शास्त्रीय माहिती गोळा करण्यासाठी राज्य सरकारची समिती पोचली चंद्रपुरात, अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांनी केली कोळसा खाणीची पाहणी अँकर:-- चंद्रपूर आणि आसपास 50 हुन अधिक कोळसा खाणी आहेत. सुमारे 50 वर्षांपासून कोळसा उत्खनन सुरू आहे. कोळसा उत्खनन आणि त्याद्वारे होणाऱ्या प्रदूषणाचे, कोळसा काढताना बाहेर काढला जाणाऱ्या अजस्त्र मातीचे पिकांवर होणारे परिणाम अभ्यासणे काळाची गरज बनले आहे. नुकसानभरपाईसाठी आवश्यक शास्त्रीय निकषांचा अभ्यास करण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा चालविला होता. मुख्यमंत्री फडणसी यांच्या सूचनेनुसार यासंदर्भात गठीत राज्य सरकारची समिती आज चंद्रपुरात पोचली. राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांनी भटाडी कोळसा खाणीची पाहणी करत आसपासच्या शेतकरी वर्गाशी संवाद साधला. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी समितीला सर्व दुष्परिणाम आणि शेतकरी वर्गाचे हाल याबाबत माहिती दिली. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई गरजेची आल्याचे सांगत आगामी काळात केंद्रीय कोळसा मंत्री जी. किशन रेड्डी देखील चंद्रपुरात येणार असून महागाई वृद्धीनुसार कोळसा खाणींना शेतजमीन देताना सध्याच्या दरात मोठी वाढ केली जाणे अपेक्षित असल्याची महत्वपूर्ण माहिती आ. मुनगंटीवार यांनी याप्रसंगी दिली. बाईट १) सुधीर मुनगंटीवार, आमदार, बल्लारपूर आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
0
Report

नवी मुंबई अस्पताल के बाल विभाग में पोस्टर विवाद: गोमांस खाने का सुझाव

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई के वाशी स्थित पालिका अस्पताल के बाल विभाग में बाल आहार विशेषज्ञ द्वारा एक पोस्टर बाल रोग के कमरे में लगवाया गया था. इस पोस्टर में 9 से 11 महीने के बच्चों के आहार में क्या क्या खाना चाहिए, इसका सुझाव दिया गया था. इस पोस्टर में गोमांस खाने का सुझाव भी प्रत्यक्ष रूप से दिया गया था. पोस्टर प्रिंट आउट था और बताया गया कि इस अस्पताल की बाल आहार विशेषज्ञ महिला डॉक्टर ने इसे ऑनलाइन AI माध्यम से मराठी में ट्रांसलेट किया था. पोस्टर लगाने के बाद गलती सामने आने पर उसे कमरे से हटवा दिया गया. पोस्टर शाम चार बजे लगा और शाम के साढ़े तीन बजे हटाया गया. यह पोस्टर महापालिका आरोग्य विभाग द्वारा नहीं लगवाया गया था; महापालिका के मुख्य आरोग्य अधिकारी ने यह स्पष्ट किया है और जिसने यह पोस्टर लगवाया उसकी ट्रांसफर कर दी गई है. पालिका ने इस पर चौकशी शुरू कर दी है. बाइट्स: राजेश म्हात्रे – मुख्य वैद्यकीय अधिकारी. यह पोस्टर वायरल होने के बाद बजरंग दल ने विरोध प्रदर्शन करते हुए डॉक्टर के against कार्रवाई की मांग की है. बाइट: शंकर संकपाल, नवी मुंबई बजरंग दल संयोजक.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top