Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Oct 25, 2024 07:21:47
Yavatmal, Maharashtra
यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ADANIRUDHA DAWALE
Feb 21, 2026 05:50:00
Amravati, Maharashtra:28 तारखेच्या आत मेळघाटनातील आदिवासींच्या खात्यात पैसे जमा करा अन्यथा नागपूर येथील आदिवासी आयुक्तांचे कार्यालय फोडू; बच्चू कडू यांचा पुन्हा इशारा. बच्चू कडू यांच्या इशाऱ्यानंतर मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या आदिवासी क्षेत्रातील मजुरांना होळीपूर्वी राज्य शासनाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. प्रलंबित असलेल्या मजुरीसाठी राज्य शासनाकडून 67 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून पुढील दोन ते तीन दिवसात मजुरांच्या खात्यात मजुरीची रक्कम जमा होणार आहे तसेच मार्च अखेर पर्यंत मजुरांना नियमित रोजगार उपलब्ध होऊन मजूरीही वेळेत दिली जाणार आहे. मात्र तरीही 28 तारखेच्या आत मेळघाटातील आदिवासींच्या खात्यात पैसे जमा झाले नाही तर नागपूर येथील आदिवासी आयुक्तांचे कार्यालय फोडण्याचा इशारा बच्चू कडू यांनी पुन्हा दिला आहे. त्यामुळे आता मेळघाटातील आदिवासींची होळी साजरी होणार असल्याचं चित्र आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 21, 2026 05:48:00
Nagpur, Maharashtra:नागपूर - बारावीच्या दोन्ही विषयांचे पेपर फुटले, नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. व्हाट्सअप ग्रुप तयार करून हा सगळा पेपर फोडण्याचा प्रकार सुरू असल्याची पोलिसांना मिळाली माहिती. बारावीच्या विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हाट्सअप वर आल्याची माहिती गुरुवारी बारावी केमिस्ट्रीचा पेपर होता मात्र परीक्षा आधी पेपर विद्यार्थ्यांच्या व्हाट्सअप ग्रुपवर आला होता, सदर परिसरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर हे प्रकरण उघडकीस आले आहे. सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर एक विद्यार्थिनी वारंवार प्रसाधन गृहात जात होती त्यामुळे केंद्रावरील प्रेक्षकांना संशय झाला. तिची शिक्षकेच्या माध्यमातून झडती घेण्यात आल्यावर एक स्मार्टफोन जप्त करण्यात आला तो तपासला असता त्यामध्ये एका व्हाट्सअप ग्रुप वर परीक्षा सुरू होण्यापूर्वी पेपर आलेला होता. केंद्रप्रमुखांनी सदर पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल केला. मोबाईल मध्ये व्हाट्सअप वर 15 विद्यार्थ्यांचा एक ग्रुप तयार करण्यात आल्याचे आढळून आले आहे. दोन्ही विद्यार्थिनीची चौकशी केली असता खाजगी शिकवणी वर्गातील एका शिक्षकाने पैसे घेऊन पेपर फोडल्याची माहिती दिली. अन्य 13 विद्यार्थी शहरातील वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावर पेपर सोडवत होते, पोलीस अधिक तपास करत आहेत.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 21, 2026 05:46:34
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Feb 21, 2026 05:45:16
Mira Bhayandar, Maharashtra:मिरा भाईंदर ब्रेक मिरा-भाईंदर पालिकेत 'लाईव्ह' प्रक्षेपणावर महापौर डिंपल मेहेताची बंदी लोकशाहीचा आवाज दाबल्याचा मनसेचा आरोप "मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेचे थेट प्रक्षेपण आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यावर महापौरांनी बंदी घातल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. या निर्णयाला भाजप नगरसेविका नीला सोन्स यांनी कडाडून विरोध केला असून, जनतेचे प्रश्न जनतेसमोर येणे हा त्यांचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे. पारदर्शकतेचा दावा करणाऱ्या पालिकेने हा गोपनीयतेचा घाट का घातला, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. या निर्णयामुळे लोकशाही मूल्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शहरात नवा वाद पेटला आहे.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Feb 21, 2026 05:32:09
Nanded, Maharashtra:Anchor - parbhani talukyat 沙हजपूर जवळा या गाव परिसरातील शेतीची शक्तीपीठ महामार्गासाठी मोजणी करण्यासाठी आलेल्या पथकाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. लहान मुलांसह वृद्धही आंदोलनात सामील झाले होते. परभणी जिल्ह्यातील 30 गावातील जवळपास 3 हजार एकर शेतातुन प्रस्तावीत शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. या महामार्गाला येथील शेतकऱ्यांचा कायम विरोध राहिला आहे. शेतकऱ्यांनी नोटीसा स्वीकारल्या नाही, त्यामुळे गुरुवारी मध्यरात्री नंतर शासकीय कर्मचाऱ्यांनी कलम 168 प्रमाणे नोटिसा काढून शेतकऱ्यांच्या घरावर चिटकविल्या होत्या. शिवाय बीएनस 163 प्रमाणे या गावात गट धारकाशिवाय इतर कुणास येण्यास मज्जाव केला होता. शुक्रवारी मोजणी होणार असल्याने माध्यम प्रतिनिधींना ही गावात सोडलं जात नव्हतं. मोठा पोलीस बंदोबस्त या भागात तैनात करण्यात आला होता. पोलीस आणि प्रशासन दापदडपशाहीचा मार्ग अवलंबणार असले तरी शेतकरी मात्र मोजणीला विरोध दर्शविण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. यामध्ये वृद्ध महिलांसह लहान मुले शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी पथकाला तीव्र विरोध केला. पण तरीही पथकाने मोजणी सुरु ठेवल्याने संघर्ष वाढला होता. दरम्यान काही संघटना आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक दिवस आधीच पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 21, 2026 05:31:47
Nagpur, Maharashtra:नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथील घटना घडल्यावर संबंध विभागाला चौकशीचे आदेश दिले... लहान मुलगा जेवणासाठी अंगणवाडीत आला असताना रात्री अंगणवाडीतच अडकला.. शाळा बंद करताना सर्व कर्मचाऱ्यांनी आतून पाहणी केल्यावरच वर्गखोली बंद करण्याचे सूचना दिल्यात.. नाशिक घटना मागील काही वर्षात गृह विभागाचे चांगलं काम सुरू असल्याने आणि आज पोलिसांचे पाठबळ असल्याने समाजातील प्रत्येक घटक समोर येऊन आपली घटना सांगत असतो.. यात पोलिसांना सूचना दिली आहे आणि लवकर कारवाई करू.. राहुल गांधी कोर्ट मागील 10-12 वर्षांपासून जन देशातील जनतेने विकासाला समर्थन देत भाजपला साथ दिली आहे... त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत मिळणाऱ्या अपयशामुळे राहुल गांधी कुठलं तरी चुकीचं वक्तव्य करून जनतेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु आज जनतेचा विश्वास हा भाजपवर आहे.. त्यामुळे कोणतीही कृती राहुल गांधी यांनी केली तरी जनता त्याकडे लक्ष देणार नाही.. नागपूर पेपर फुटल्याची माहिती अशी कोणती घटना घडल्याची तक्रार आमच्याकडे आली नाही.. आली तर संबंधितावर कारवाई करण्यात येईल.. अंबादास दानवे महत्त्वाच्या व्यक्तींना सरकारी सुरक्षा देण्यासाठी गुप्तचर विभाग अहवाल प्राप्त करत असतो.. त्यानंतर समिती समोर अहवाल मांडल्यावर सुरक्षा देण्यासंदर्भात सुनिश्चितता मांडत असते... त्यामुळे संबंधित समितीने घेतलेला निर्णय तो असावा.. राज ठाकरे टीका देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात अनेक प्रकल्पाची कामे झाली आहेत.. त्यामुळे मागील 20 25 वर्षात मनसे या राज ठाकरेंच्या पक्षाला आलेलं अपयश पाहता असे चुकीचे वक्तव्य करून जनतेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतात... - त्यांनी कसेही कृत्य केले तरी महाराष्ट्रातील जनता आज विकासाच्या पाठीमागे उभी आहे.. विजय वडेटीवर माफी चंद्रपूर महानगरपालिकेत कोणत्याही एका पक्षाकडे बहुमताचा आकडा नव्हता... त्यामुळे सर्व पक्षांनी आपला महापौर बसवण्यासाठी प्रयत्न करत होते.. त्यामुळे विकासासाठी स्थानिक नगरसेवकांनी भाजपच्या सोबतीण्याचा निर्णय घेतला.. चंद्रपूर विनयभंग अशा घटना घडल्या तेव्हा संबंधितावर आपण कठोर कारवाई केली आहे.. अशी घटना घडल्यावर तक्रार प्राप्त झाल्यावर कठोर कारवाई केली जाणार..
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 21, 2026 05:20:49
Solapur, Maharashtra:सोलापुर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी जाहीर - सोलापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी जाहीर - भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांमध्ये भाजपचे पदाधिकारी, निष्ठावंत तसेच आ. देवेंद्र कोठे समर्थकांना मिळाली संधी - यंदाच्या स्वीकृत नगरसेवकांच्या यादीत भाजपच्या शहराध्यक्ष रोहीणी तडवळकर तर पत्रकारिता क्षेत्रातील एक सदस्य म्हणून मनीष केत यांची करण्यात आली निवड - भाजपकडून 9 तर एमआयएम पक्षाचा 1 स्वीकृत सदस्य म्हणून नय्युम सालार यांना मिळाली संधी - महापालिका आयुक्तांकडे स्वीकृत सदस्य पदासाठी एकूण 62 अर्ज तर यापैकी 10 जणांची करण्यात आली निवड
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 21, 2026 05:20:18
Nagpur, Maharashtra:नागपूर शहरालगत खापरखेडा येथील एका शाळेत चार वर्षाच्या चिमुकला रात्रभर वर्गातच बंद राहावे लागल्याच्या धक्कादायक घटनेची गंभीर दखल शिक्षण विभागाने घेतली आहे.. याप्रकरणी सखोल चौकशी करून सखोल सविस्तर चौकशी करून तातडीने अहवाल सादर करत कारवाईचे निर्देश शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिलेय . काल खापरखेडा येथे शाळेच्या परिसरात खेळत असताना एक बालक चुकून एका वर्गाच्या खोलीत राहिला. दिवसअखेर शाळा बंद करताना कर्मचाऱ्याकडून अंतिम शाळेतील सर्व खोल्यांची पाहणी करण्यात आली नाही. परिणामी व संपूर्ण रात्र आत तो चिमुकला वर्ग खोलीत अडकून पडला होता. या घटनेमुळे पालक आणि स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत असून शाळेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिलेय
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Feb 21, 2026 05:01:20
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी उशिरा रात्री मद्यधुंद कंटेनर चालकाने सात ते आठ वाहनांना उडवल्याची घटना घडलीय. या अपघातात चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना रात्री सुमारे साडेअकराच्या दरम्यान मोशी मधल्या बोऱ्हाडेवाडी, राजमाता जिजाऊ चौक, हॉटेल सिल्वर ब्लू परिसरात घडली. एक कंटेनर चाकण-हवे रोडवरून मोशी भाजी मंडई चौक मार्गे टाटा मोटर्सच्या दिशेने जात होता. संबंधित चालक मद्याच्या नशेत वाहन चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. कंटेनर बोऱ्हाडेवाडी परिसरात पोहोचताच चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर सुसाट वेगाने धावणाऱ्या कंटेनरने समोरून जाणाऱ्या चारचाकी वाहनांना लागोपाठ धडक दिली. तसेच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांनाही कंटेनरची जोरदार धडक बसली. त्यामुळे अनेक वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढत मदतकार्य सुरू केले. या अपघाताची माहिती मिळताच भोसरी एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 21, 2026 04:17:45
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Feb 21, 2026 04:15:55
Ambernath, Maharashtra:गोरगरीब महिलांना पैशांचं आमिष दाखवून अंडाशयाची तस्करी बदलापुरमध्ये धक्कादायक प्रकार पोलिसांकडून तीन महिलांना अटक मुख्य सूत्रधार महिलेच्या घरात सापडले संशयास्पद इंजेक्शन बदलापूरमधील एका पीडित महिलेनं उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱयांशी संपर्क साधल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय. त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी बदलापूर पूर्व आणि पश्चिम या दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवल्यानंतर ज्युवेली गावात राहणाऱया सुलक्षणा गाडेकर आणि तिची उल्हासनगरातील साथीदार अश्विनी चाबूकस्वार, मंजुषा वानखेडे अशा तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांना 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. बदलापुराच्या ज्युवेली गावातील नॅनो सिटी इथं सुलक्षणा गाडेकर ही महिला राहते. तिने गर्भाशयात स्त्री बीजाची वाढ होण्यासाठी लागणारे इंजेक्शन्स घरातच साठवले होते. गरजू महिलांना पैशांचं आमिष दाखवून ती हे इंजेक्शन्स देत होती. तसंच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बेकायदेशीरपणे सोनोग्राफी देखील करवून घ्यायची. गर्भाशयात स्त्री बिजाची वाढ झाल्यानंतर अशा महिलांना गाडेकर ही आयव्हीएफ सेंटरमध्ये पाठवायची. तिथं ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन गर्भाशयातील अंडाशय काढलं जायचं. त्यानंतर त्याची सर्रासपणे विक्री करण्यात येत होती.पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावून सुलक्षणा गाडेकर हिच्यासह तिचे साथीदार अश्विनी चाबूकस्वार, मंजुषा वानखेडे यांना ताब्यात घेतलय. पोलिसांनी गाडेकर यांच्या घरी छापा मारून गर्भाशयासाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनचे फोटो, सोनोग्राफीचे फोटो, खोटी प्रतिज्ञापत्रं, महिलांचे फोटो आणि इतर संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत.
0
comment0
Report
Advertisement
Back to top