445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
तुकोबाराय पालखी दौंड के यवत में पहुंची, जन संदेश से योजनाओं की पहुँच बनी व्यापक
Rui, Maharashtra:Anchor _ जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा पालखी सोहळा आज दौंड तालुक्यातील यवत गावात मुक्कामी आहे. या वारीत राज्य शासनाच्या मदत आणि पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत संवाद वारीच्या माध्यमातून लोकगीतांमधून शासनाच्या विविध योजना आणि उपक्रम पोहोचवले जात आहेत. भारुडाच्या माध्यमातून शासनाच्या या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवत असताना वारीत चालणारे वारकरी देखील तेवढेच तल्लीन होऊन यामध्ये सहभागी होत आहेत.0
0
Report
चंद्रपुर पुलिस का कड़ा संकेत: 198 जमानत पर बाहर आए आरोपियों की परेड
Chandrapur, Maharashtra:टायटल :--गुन्हेगारांवर चंद्रपूर पोलिसांचा कडक वचक , १९८ जामिनावरील आरोपींची ओळख परेड, अटी मोडल्यास जामीन रद्द करण्याचा इशारा अँकर :-- चंद्रपूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई केली आहे. दरोडा, जबरी चोरी आणि घरफोडीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये जामिनावर बाहेर आलेल्या तब्बल १९८ आरोपींची विशेष ओळख परेड घेण्यात आली. पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. या वेळी सर्व आरोपींना न्यायालयाने घालून दिलेल्या जामिनाच्या अटींचे काटेकोर पालन करण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या. अटींचा भंग केल्यास जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात प्रस्ताव पाठविण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही पोलिसांनी दिला आहे. याशिवाय, ज्या आरोपींवर यापूर्वी प्रतिबंधक कारवाई झाली नव्हती, त्यांच्यावर तातडीने प्रतिबंधक कारवाई करण्यात आली असून भविष्यात पुन्हा गुन्हेगारीकडे वळू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालींवर २४ तास नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येकावर कठोर कारवाई केली जाईल, असा ठाम संदेश चंद्रपूर पोलिसांनी या मोहिमेतून दिला आहे.0
0
Report
मंचर दूध मिलावट के खिलाफ सभी दलों का मोर्चा; आरोपियों पर कड़ी कार्रवाई की मांग
Shirur, Maharashtra:पुणे के आंबेगांव तालुक़े के मंचर में आज सभी दलों की दूध मिलावट मुक्त निर्धार रैली संपन्न हुई। इस रैली में विभिन्न दलों के प्रमुख नेताओं और पदाधिकारियों ने मिलावटखोरों के खिलाफ जोरदार आक्रोश व्यक्त किया। आंदोलकोंने दूध में मिलावट करने वाले आरोपियों पर 302 जैसी गंभीर धाराओं के तहत प्रकरण दर्ज कर कड़ी कार्रवाई की मांग की।0
0
Report
Advertisement
चंद्रपूर पुलिस ने 66 लाख से अधिक मूल्य के नशे जलाकर नष्ट किए
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर पोलिसांकडून अंमली पदार्थांविरोधातील कारवाईत मोठे पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील ५१ गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले तब्बल ६६ लाख १४ हजार ८८६ रुपयांचे गांजा, एमडी पावडर आणि गर्द न्यायालय व संबंधित समितीच्या परवानगीनंतर नागपूर येथील अत्याधुनिक प्रकल्पात पर्यावरणपूरक पद्धतीने जाळून नष्ट करण्यात आले. या कारवाईत ३१० किलोहून अधिक गांजा, ४२० ग्रॅम एमडी आणि ७६ ग्रॅम गर्दचा समावेश असून, अमली पदार्थांविरोधातील कठोर मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे चंद्रपूर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.0
0
Report
सिंधुदुर्ग के कासारटाका मंदिर पर लाखों भक्त, धार्मिक पर्यटन का संगम
Oras Bk., Maharashtra:वर्षा पर्यटन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो सिंधुदुर्ग जिल्हा आणि निसर्गाच्या सानिध्यात वाहणारे नयनरम्य धबधबे.. मात्र धार्मिकता आणि पर्यटन यांचा दुहेरी संगम असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळ म्हणजे कासारटाका.. मालवण तालुक्यात असलेले हे स्थळ नेहमीच भाविकांना आणि पर्यटकांना आकर्षित करत असत नवसाला पावणारे देवस्थान म्हणुन प्रसिद्ध असलेल्या कासार टाका येथे लाखोच्या संख्येने पर्यटक येत असतात. विशेषतः गोवा आणि कर्नाटक येथील पर्यटकांची संख्या जास्त असते. देवदर्शन आणि मंदिराच्या बाजूला असलेलीं छोटी मात्र मनमोहक नदी यामुळे धार्मिकते सोबत पर्यटणाची जोड असलेले ठिकाण म्हणुन कासारटाका प्रसिद्ध आहे.0
0
Report
दिलचस्प headline हिंदी: मालेगांव में बिबट्या का आतंक, वीडियो में कैद हुआ हमला
Nashik, Maharashtra:मालेगाव ब्रेकिंग ( नाशिक ) दाभाडीत बिबट्याची दहशत! वासरावर हल्ला, घटना मोबाईलमध्ये कैद... मालेगाव तालुक्यातील दाभाडी गावात बिबट्याची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे. गावालगतच्या शेत परिसरात बिबट्याने एका वासरावर हल्ला केल्याची घटना घडली असून, ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, शेतकरी व नागरिकांनी रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळण्यास सुरुवात केली आहे. वन विभागाने तातडीने या भागात पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.0
0
Report
Advertisement
पूर्णा नदी में डूबकर दो नाबालिगों की मौत, परिजन शोक में
Buldhana, Maharashtra:बुलढाण्यात पूर्णा नदीत बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू. नांदुरा - बुऱ्हानपूर मार्गावर असलेल्या मानेगाव येथील पूर्णा नदी पात्रात अंघोळीसाठी उतरले होते नदीत. प्रतीक वानखेडे (12) व कृष्णा भोपळे (14) असं मृत्यू झालेल्या मुलांची नाव असून दोघेही मुलं नांदुरा येथील रहिवाशी आहेत. आज शाळेला सुट्टी असल्याने मृतक दोघे आणि त्यांचा मित्र पूर्णा नदीत पोहायला गेले होते. मात्र दोघे अंघोळीसाठी उतरतांना पाण्यातील खोलीचा अंदाज आला नाही आणि ते बुडाले. तिसरा नदीच्या काठावर बसून होता. जवळपास कुणीही नसल्याने त्यांना वाचवण्यासाठी कुणीही आले नाही. मात्र दोन तासांच्या नंतर शेतकरी जाताना दिसले असता त्यांना माहिती मिळाली, तेव्हा दोघांचे मृतदेह नदीच्या बाहेर काढण्यात आले. जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे. या घटनेमुळे दोघांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.0
0
Report
वाशीम: रिसोड पुलिस ने बाइक चोरी के दोनों मामलों में आरोपियों को गिरफ्तार किया
Washim, Maharashtra:वाशीमच्या रिसोड पोलिसांनी दुचाकी चोरीच्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकल करत दोन आरोपींना अटक केली आहे. एका प्रकरणात नुकतीच चोरीला गेलेली तर दुसऱ्या प्रकरणात तीन वर्षांपूर्वी चोरीला गेलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे. दुचाकी जप्त करण्यात आल्या असून या प्रकरणी वाशीमच्या पेनबोरी येथील कृतिक राजू डोंगरे व हिंगोली जिल्ह्यातील दाताडा येथून गोविंदा शंकर बैरागडे यांना अटक करण्यात आली. दोन आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यात अली आहे.0
0
Report
कल्याण में कांग्रेस का सत्याग्रह, अयोध्या राम मंदिर चोरी के मुद्दे पर बड़ा प्रदर्शन
Kalyan, Maharashtra:कल्याणमध्ये काँग्रेसच्या वतीने अयोध्येतील कथित राम मंदिर चोरी प्रकरणी आंदोलन, अयोध्येतील कथित राममंदिर चोरी प्रकरणी आज कल्याण जिल्हा काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हनुमान मंदिरा समोर रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन छेडण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी राम, लक्ष्मण सीतेच्या वेशात आंदोलनात सहभाग घेतला व हनुमान मंदिरात आरती करण्यात आली. तर यावेळी भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले.0
0
Report
Advertisement
संत समझदार काका के पालखी यात्रा आज सासवड़ से पंढरी के लिए प्रस्थान
Rui, Maharashtra:संत सोपान काकांच्या पालखीच पंढरीकडे प्रस्थान.....लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत पालखी सोहळ्याने ठेवलं प्रस्थान......संत सोपान काका माऊलींचे धाकटे बंधू.... संत ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू संत सोपान काका यांच्या पालखी सोहळ्याचं आज सासवड मधून पंढरीसाठी प्रस्थान झालं आहे. लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत हरिनामाच्या जयघोषात हा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने आज मार्गस्थ झालाय. या वेळी माजी आमदार संजय जगताप यांची ही उपस्थिती होती. संत सोपान काकांचे थोरले बंधू माऊली यांचा पालखी सोहळा काल सायंकाळी सासवड नगरीत विसावला आहे. आज या पालखी सोहळ्याचा सासवडमध्ये मुक्काम आहे. त्यामुळे संपूर्ण सासवड नगरी माऊलीमय झाली आहे. आज माऊलींचे धाकटे बंधू संत सोपान काकांच्या पालखी सोहळ्याच ही प्रस्थान झालय.यंदाच्या वर्षी तिथीचा एक क्षय आल्याने बारामती तालुक्यातील माळेगाव येथील मुक्काम रद्द करण्यात आला आहे. एकूण या पालखी सोहळ्याचा १४ दिवसांचा मुक्काम असणार आहे.असे सोहळा प्रमुख त्रिगुण गोसावी यांनी सांगितले आहे.0
0
Report
जुन्नर वाडज डैम ओवरफ्लो: किसानों को बड़ी राहत पानी
Barav, Maharashtra:सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जुन्नर तालुक्यातील वडज धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. १.१७ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले हे धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील शेतीचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे. यंदा पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची पिके करपून चालली होती आणि बळीराजा चिंतेत होता. मात्र, जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे हे धरण ओव्हरफ्लो झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील वर्षी हे धरण जून महिन्यातच भरले होते, पण यंदा त्यासाठी जुलै महिना उजाडला आहे. दरम्यान, कुकडी प्रकल्पातील इतर धरणे पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी या भागात अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. याचाच वडज धरणावर आढावा घेतलाय.0
0
Report
बारिश ने भूस्खलन से कोकण- पश्चिम महाराष्ट्र में यातायात रोकी, पर्यटन प्रभावित
Chendhare, Maharashtra:दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे पावसाळी पर्यटन ठप्प ...... कोकणातून पश्चिम महाराष्ट्रात जाणारी वाहतूक बंद ....... ताम्हिणी घाटातील धबधब्यावर शुकशुकाट ..... रायगडमधील पावसाळी पर्यटनाला फटका..... अतीवृष्टी दरम्यान ताम्हिणी घाट, आंबेनळी घाट आणि भोर घाटात कोसळलेल्या दरडीमुळे प्रशासनाने रस्ते वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झालाय त्याचबरोबर मोठं आर्थिक नुकसान होत असल्याने व्यावसायीजकांमध्ये निराशेचे वातावरण आहे.0
0
Report
Advertisement
मुंबई में 40 हजार बांग्लादेशी मतदार घुसाने का आरोप: किरीट सोमय्या
Kalyan, Maharashtra:मुंब्र्यात 40 हजार बांगलादेशी मतदार घुसवण्याचा प्रयत्न? किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप राज्यात विशेष मतदार नोंदणी मोहिमेला वेग आला असताना मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि कोकण विभाग अद्याप मागे असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. कल्याणमध्ये आमदार सुलभा गायकवाड आणि कार्यकर्त्याशी संवाद साधताना सोमय्या यांनी मतदारांना स्वतःचे नाव मतदार यादीत तपासून नोंदणी करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी मुंब्र्यात तब्बल 40 हजार बांगलादेशी नागरिकांची नावे मतदार यादीत घुसवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोपही केला. विशेष मतदार नोंदणी प्रक्रियेला गती देण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या कल्याण दौऱ्यावर आले होते. आमदार सुलभा गायकवाड आणि भाजप कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत त्यांनी मतदार नोंदणी मोहिमेचा आढावा घेतला. विदर्भ आणि मराठवाड्यात SIR चे काम वेगाने सुरू असले तरी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि कोकण विभाग मागे असल्याचे त्यांनी सांगितले.मतदारांनी स्वतःचे नाव मतदार यादीत तपासून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन सोमय्या यांनी केले. यावेळी त्यांनी काही मशिदींमधून बोगस मतदारांची नावे यादीत समाविष्ट केल्याचा आरोप करत मुंब्र्यात सुमारे 40 हजार बांगलादेशी नागरिकांची नावे मतदार यादीत घुसवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला.दरम्यान, विनायक राऊत यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर काही गोष्टी पारिवारिक असतात, त्याला राजकीय स्वरूप देऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त केले. तर संजय राऊत यांच्यावर टीका करत, ते दररोज नवे आरोप करत असतात आणि प्रसिद्धीत राहण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला सोमय्या यांनी लगावला. Byte:-किरीट सोमय्या ( भाजप नेते )0
0
Report
चंद्रपुर में लगातार बारिश नहीं होने से धान की रोपाई प्रभावित, किसान चिंतित
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात कापूस, सोयाबीन आणि तूर पिकांची पेरणी पूर्ण झाली. मात्र, जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या भात लागवडीसाठी आवश्यक असलेला सलग आणि मुबलक पाऊस न झाल्याने परिस्थिती बदलली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतांमध्ये पुरेसे पाणी साचलेले नाही. परिणामी भाताची लागवड मोठ्या प्रमाणात रखडली असून शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी ४ लाख ६३ हजार हेक्टर क्षेत्र नियोजित आहे. त्यापैकी २ लाख ५३ हजार हेक्टरवर कापूस, सोयाबीन आणि तूर पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाचा फायदा घेत शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली. मात्र, त्यानंतर पावसाने पुन्हा उघडीप दिल्याने भात लागवडीवर मोठा परिणाम झाला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते. भात लागवडीसाठी शेतात पाणी साचणे आवश्यक असते. मात्र, पावसाचा खंड पडल्याने अनेक ठिकाणी शेतांमध्ये पुरेचे पाणी नसल्यामुळे रोपवाटिकांतील रोपे तयार असूनही लागवड सुरू करता आली नाही. त्यामुळे भात लागवड रखडली असून हजारो शेतकरी चिंतेत आहेत. हवामान विभागाकडून दमदार पावसाचा अंदाज असला तरी शेतकऱ्यांचे संपूर्ण लक्ष आता पुढील पावसाकडे लागले आहे. येत्या काही दिवसांत चांगला पाऊस झाल्यास भात लागवड वेग येईल. अन्यथा लागवड होण्यास विलंब उत्पादनावर आणि शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर परिणाम करू शकतो.0
0
Report
गडचिरोली के जंगलों में रानटी हाथी, वायरल वीडियो से नागरिकों की संवेदनशीलता पर सवाल
Gadchiroli, Maharashtra:5 वर्षे मुक्काम, डझनभर हल्ले और कुछ मृत्यूनंतर देखील गडचिरोलीत रानटी हत्तींबाबत नागरिक असंवेदनशील, ताज्या वायरल व्हिडीओने मती गुंग. गडचिरोली जिल्हा मुख्यालयाजवळ मेढा गावातील जंगलात शूट झालेल्या ताज्या वायरल व्हिडीओने मती गुंग केली आहे. एका ग्रामस्थाने चक्क हत्तीला घाणेरड्या शिव्या देत आपल्या मागे धावत येण्यासाठी प्रोत्साहित केले. आणि अचानक हत्तीने देखील हल्ला करण्यासाठी धाव घेतल्याने हा रीलबाज ग्रामस्थ गांगरून पळत सुटला. हा व्हिडिओ सध्या वायरल झालाय. वनविभागाने रानटी हत्तीचा मुक्काम असलेल्या मेंढा भागात जनजागृती चालविली आहे. गस्ती पथकांच्या तैनातीनंतरही ग्रामस्थ हत्ती बघण्यासाठी गर्दी करत आहेत. सेल्फी आणि व्हिडीओचे धाडस करत संकट ओढवून घेत आहेत.0
0
Report
Advertisement
