445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
विजय वडेट्टीवारचा संजय गायकवाडांना निर्वाणीचा इशारा – अमरावती ब्रेकिंग
Amravati, Maharashtra:अमरावती ब्रेकिंग... शिवाजी कोण होता प्रकाशकाला हात लावला तर संजूला गंजू करून सोडू हे संजाने लक्षात ठेवावे; विजय वडेट्टीवार यांचा संजय गायकवाड यांना निर्वाणीचा इशारा0
0
Report
पति की पुरानी प्रेमिका ने घर में हत्या कर दी, शहर दहल गया
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगरमध्ये रक्ताचं नातं आणि अनैतिक संबंधांतून एक थरारक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या प्रियकराच्या पत्नीची भरदिवसा घरात घुसून निर्घृण हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी महिलेने आधी पिस्तूल रोखलं आणि नंतर चाकूने सपासप वार करून साधना सोनपेटकर या ४० वर्षांच्या महिलेचा जीव घेतला. छत्रपती संभाजीनगरचा बजाजनगर परिसर आज सकाळी नेहमीप्रमाणे गजबजलेला होता. साई श्रद्धा पार्क येथील एका घरात जे घडलं, त्याने संपूर्ण मराठवाडा हादरला. ४० वर्षांच्या साधना सोनपेटकर यांची त्यांच्याच घरात घुसून हत्या करण्यात आली. हत्या करणारी दुसरी कोणतीही नसून, त्यांच्या पतीची जुनी मैत्रीण शैला सोनार होती. मृत साधना यांचे पती महेंद्र सोनपेठकर आणि आरोपी शैला सोनार यांच्या संबंधाची माहिती आधीच समोर आली होती. या वादातून शैलाने महेंद्र यांच्यावर बलात्काराचा गुन्हाही दाखल केला होता. संबंधित वादाच्या रागातून हत्याकांड घडल्याचा संशय व्यक्त केला जातो. शैला सोनारने घरातच पिस्तूल आणि चाकू घेऊन साधना यांच्या घरात घुसली. गावात जवळजवळ तिघांमध्ये झटापट झाली. शैलाने साधनाच्या डोक्यावर पिस्तूल रोखलं; आजीनं पिस्तूल हिसकावून बाहेर फेकलं, पण शैलाचा राग शांत झाला नाही. तिने धारदार चाकू काढला आणि साधनावर वार सुरू ठेवल्या. साधना रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यावरही शैला वार करीत राहिली; या भीषण हल्ल्यात साधना यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर शैलाने स्वतःला घरात कोंडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी दरवाजा तोडून ताब्यात घेतलं.0
0
Report
डिजिटल इंडिया के तहत सांगली के तलाठों को लैपटॉप वितरित
Sangli, Maharashtra:सांगलीमध्ये डिजिटल इंडिया उपक्रमा अंतर्गत तलाठ्यांना चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लॅपटॉप वाटप करण्यात आले आहेत. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तालुक्यातील 53 तलाठयांना प्राथमिक स्वरूपात लॅपटॉप वाटप करण्यात आले, या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. सांगली जिल्ह्यासाठी साडेतीनशे लॅपटॉप उपलब्ध झाले आहेत. या लॅपटॉपच्या माध्यमातून अधिक पद्धतीने नोंदी ठेवणं सोपं जाणार असून शेतकरयांच्या वेदना लक्षात घेऊन शेतकरयांच्या अडचणी सोडवण्याचे काम तलाठ्यांनी करावं, असं आवाहन या निमित्ताने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.0
0
Report
Advertisement
संजय गायकवाड पर विवाद: 'शिवाजी कोण होता?' किताब पर धमकी-वार ऑडियो वायरल
Kolhapur, Maharashtra:शिवसेना आमदार संजय गायकवाड مرة ایکदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कोल्हापूरमधील प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप झाला आहे. हा वाद कॉम्रेड गोविंदराव पानसरे लिखित ’शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून निर्माण झाला आहे. ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून आमदारांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. VO 1:- नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादात चर्चेत असणारे शिवसेना आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आलेत. आमदार गायकवाड यांनी कोल्हापुरातील संघर्षा बुक गॅलरीचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना मध्यरात्री फोन करून धमकी दिल्याचा आरोप समोर आला आहे. विशेष म्हणजे, ’शिवाजी कोण होता?’ या कॉम्रेड गोविंदराव पानसरे लिखित पुस्तकावरून हा वाद निर्माण झाला आहे. आमदार गायकवाड यांनी हे पुस्तक प्रशांत आंबी यांनी लिहिल्याचा समज करून त्यांना जाब विचारला. मात्र, आंबी यांनी हे पुस्तक आपले नसून कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांचे असल्याचे स्पष्ट केले. तसेच पुस्तकाचा उद्देश छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा नसल्याचेही त्यांनी सांगितले. तरीही आमदार गायकवाड यांनी संतप्त होत शिवीगाळ सुरूच ठेवल्याचा आणि “तू पण पानसरे यांच्याकडे जाशील” अशा शब्दांत धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. Byte:- प्रशांत आंबी, प्रकाशक संघर्षा बुक गॅलरी VO 2 :- या घटनेनंतर संबंधित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून, खळबळ उडाली आहे. प्रकाशक प्रशांत आंबी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार गायकवाड यांना सत्तेचा माज आल्यामुळे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. Byte:- प्रशांत आंबी, प्रकाशक संघर्षा बुक गॅलरी GFX in “शिवाजी कोण होता?” – पुस्तकात नेमकं काय आहे हे पाहूया? कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांनी 1988 साली “शिवाजी कोण होता?” हे पुस्तक लिहिले. या आधी 1939 साली कर्नाटकातील ग. कृ. कुऱ्हाडे यांनीही याच विषयावर पुस्तक लिहिले होते. पानसरे यांच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा वेगळ्या दृष्टिकोनातून आढावा घेतला आहे. पुस्तकातील मुख्य मुद्दे - शिवाजी महाराजांचा हिंदू-मुस्लिम धर्माविषयी काय दृष्टिकोण होता - शिवाजी महाराजांच्या दरबारात सर्वधर्मीयांचा सहभाग होता .. लढाया केवळ हिंदू-मुस्लिम संघर्ष नव्हत्या, याचे अनेक उदाहरणांसह स्पष्टीकरण. - शिवाजी महाराजांच्या दरबारात अनेक मुस्लमान सरदार, वतनदार आणि चाकर होते, हे सर्व मोठमोठ्या हुद्द्यावर आणि जबाबदारीच्या जागेवर होते हे विविध उदाहरणे देऊन पुस्तकात मांडले आहे. - छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठे आणि हिंदू विरुद्ध लढायांचा उल्लेखदेखील या पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. -छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व आजही सामान्य जनतेच्या मनावर अधिराज्य का गाजवते, यामागील कारणांचा शोध या पुस्तकाच्या माध्यमातून घेण्यात आला. - अनेक राजे होऊन गेले, पण शिवाजी महाराजांसाठी लोक जीव द्यायला का तयार होते याचे विश्लेषण. - वडिलोपार्जित सत्ता नसताना स्वतःच्या कर्तृत्वावर उभारलेले स्वराज्य. - “रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये” – शिवाजी महाराज यांची प्रजेबद्दलची संवेदनशीलता काय होते याचा देखील उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. परस्त्रीला मातेसमान मान आणि सर्व धर्मांप्रती आदराची भूमिका. स्त्रियांवरील अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा, करप्रणालीतील सुसूत्रता आणि दुष्काळात दिलासा देणाऱ्या योजना.. यासह अन्य मुद्द्यांना या पुस्तकाच्या माध्यमातून स्पर्श करण्यात आला आहे. GFX Out VO 3:- दरम्यान पुस्तकाचे लेखक दिवंगत कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या कुटुंबियांनी आणि गोविंदराव पानसरे यांच्या विचाराचे पाईक यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.. इतकंच नव्हे तर पानसरे यांचे विचार कधीच संपणार नाहीत अशी भूमिका मांडली आहे. Byte:- मेधा पानसरे, सून कॉम्रेड गोविंदराव पानसरे Byte:- मेघा पानसरे, मुलगी गोविंदराव पानसरे Byte:- कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे VO 4 :- अभिव्यक्ति स्वातंत्र्य, ऐतिहासिक मांडणी त्यावर राजकीय प्रतिक्रिया महाराष्ट्रासाठी नवीन नाही. पण किमान शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना हे पुस्तक नेमकं कोण लिहिलंय. हे तरी जाणून घ्यायला हवं होतं अशी प्रतिक्रिया सर्व स्तरातून व्यक्त केल्या जात आहेत..0
0
Report
नाशिक में गर्भपात रैकेट: SIT ने चार डॉक्टरों पर की जांच तेज
Nashik, Maharashtra:भोंदू अशोक खरात प्रकरणात एसआयटीकडून सुरू असलेल्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येताय... एसआयटीने खरातच्या कुकर्मांसह गर्भपात प्रकरणाची चौकशी केली करत असताना काही धक्कादायक माहिती समोर आलीये.या प्रकरणा नंतर आता अशोक खरात हा गर्भपात चे रॅकेट चालवत होता का ? आशा पद्धतीने तपास एसआयटी करत आहे.... कारण शासकीय अधिकारी असलेला डॉक्टर देखील अशोक खरातला गर्भपात करण्यासाठी मदत करत असल्याची माहिती समोर येते....पाहूया ह्या रिपोर्ट मधून...भोंदू अशोक खरात यांनी तब्बल आठ महिलांचे लैंगिक शोषण करत मी देवाचा अवतार आहे असं सांगून लैंगिक छळ केल्याबाबतीत नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यात आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहे... बंधू अशोक खरात हा ज्या महिलांबरोबर लैंगिक शोषण करत होता त्यातून एखादी महिलेला गर्भधारणा झाली तर तो गर्भपात करण्यासाठी काही गोळ्या देत असल्याची देखील माहिती समोर आली होती यानंतर जे डॉक्टर अशोक खरातला मदत करत होता या डॉक्टरांची चौकशी करण्यात आली होती.. नाशिकमधील चार बड्या डॉक्टरांचाही सहभागीता होता... या डॉक्टरांमार्फत गर्भपाताच्या गोळ्या दिल्या जातल्या... धक्कादायक बाब म्हणजे, यात नाशिकमधील एका शासकीय मोठ्या डॉक्टर अधिकाऱ्यानेही गर्भपाताच्या या रॅकेटमध्ये मदत केल्याचा संशय आहे. या डॉक्टरांनाही लवकरच चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते...स्वतःला अवतारी पुरुष सांगून खरातने पीडितांना जाळ्यात ओढले आणि घटस्फोट, नोकरी किंवा कौटुंबिक समस्या सोडवण्याचे आश्वासन देऊन शोषण केले. पीडित महिला गरोदर राहिल्यास खरात त्यांना गर्भपाताच्या गोळ्या देत असे, अशी माहिती समोर आली आहे. खरातच्या या काळ्या कारनाम्यात काही डॉक्टरांचा आणि सोनोग्राफी सेंटर्सचा सहभाग असल्याचेही समोर आलीये..... यात कोणत्या डॉक्टरांचा सहभाग होता, गर्भपात करण्यासाठी गोळ्या कुठून आणल्या, यासंदर्भात तपास केला जातोय... ह्या संपूर्ण प्रकरणाकडे एसआयटीने आपलं लक्ष केंद्रित करून शासकीय अधिकारी असलेला हा डॉक्टरची देखील एसआयटी कसून चौकशी करणार असल्याचे माहिती सूत्रांच्या मार्फत कळत आहे...नाशिकमधील चार डॉक्टरांचा सहभाग आहे. हे सर्व डॉक्टर पंचवटी परिसरातील असून, यातील एका डॉक्टर दाम्पत्याचे दिंडोरी रोडवर सोनोग्राफी सेंटर असल्याचे समजते.. या डॉक्टरांमार्फत गर्भपाताची औषधे, उत्तेजक औषधे पुरविण्यात या डॉक्टरांची महत्वाची भूमिका महत्वाची मानली जाते. त्यामुळे आता हे डॉक्टरही तपास यंत्रणेच्या रडारवर असून, त्यांनाही चौकशीसाठी लवकरच बोलावण्यात येणार असल्याची शक्यता आहे...0
0
Report
नांदेड़ गैंगवार: कबुतर गिरफ्तार, इंस्टाग्राम पर राहत-हिला देने वाली कहानी खत्म
Nanded-Waghala, Maharashtra:हीरोइन शाहरुख शेख, जिन्हें कबुतर के नाम से चर्चित किया जाता है, नागपुर नहीं बल्कि नांदेड़ के रहने वाले हैं. कबुतर उर्फ शाहरुख पर दस से अधिक गंभीर अपराध दर्ज हैं और गँगवॉर की हत्या में उसका सक्रिय हिस्सा रहा. अपराध कर भागने की उसकी आदत है, पर पुलिस ने उसे पकड़कर उसकी फड़फड़ बंद कर दी. फरार रहते हुए भी वह अपने इंस्टाग्राम अकाउंट पर सक्रिय था और पत्नी तथा मां के लिए रिल्स पोस्ट करता था. गँग वॉर में उसकी भागीदारी के बाद उसे 15 दिनों के भीतर गिरफ्तार किया गया. Byte- अबिनाश कुमार - पुलिस अधीक्षक. पोस्ट- 15 से 20 वर्ष की युवाओं में इंस्टाग्राम पर भाईगिरी के रिल्स बनते दिख रहे हैं और पुलिस इससे निपटने के लिए कड़े कदम उठाने की तैयारी कर रही है. आरोपी चाहे कितना भी शातिर क्यों न हो, नांदेड पुलिस ने साबित किया है कि वह पाताल से भी खोज निकालते हैं. ताकि युवा कबुतर जैसे अपराधियों के चक्कर में न पड़ें, वरना भविष्य खतरे में होगा. सतीश मोहिते, Zee 24 Taas, नांदेद0
0
Report
Advertisement
विदर्भ में हीट वेव, नागपुर में पारा 43-45°C के आसपास
Nagpur, Maharashtra:Ngp Heat wkt live u ने फीड पाठवले ---------- राज्याच्या काही भागात अवकाळी पाऊस असताना विदर्भात मात्र सूर्यचा तडाखा चांगलाच जाणवत आहे... बहुतांश भागात पारा 43 अंशापर्यंत पोहोचला आहे... चार-पाच दिवसांपूर्वी वर्धा आणि अकोला तर 45अंश पर्यंत तापमान होतं... आजही नागपूरात सूर्याचा कहर जाणवत आहे..... याचाच आढावा घेतल्या आमच्या प्रतिनिधींनी0
0
Report
मराठा आरक्षण पर फिर से हमले: जरंगे पाटील विखे पाटलांना निशाना
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठा आरक्षण वरून जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत, यावेळी मराठा आरक्षण उपसमितीवर हल्लाबोल करीत त्यांनी ज्यांच्यावर स्तुतीसुमन उधळली त्या विखे पाटील यांना लक्ष्य केले आहे. विखे पाटलांनी अध्यक्ष पदावरून नाव घालवले अशी जहरी टीका जरांगे पाटलांनी केली असल्यामुळे येणाऱ्या काळात जरांगे पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात तर नाही ना या चर्चा उधाणलेल्या आहेत. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांची आंदोलन संपूर्ण राज्याने पाहिली आहे. त्यात मुंबईचा अखेरचा आंदोलन, हैदराबाद गॅजेट निर्णय व उपसमितीचे काम यामुळे जरांगे पाटलांनी आंदोलन मागे घेतलं आणि सरकारवर विश्वास दर्शवला, परंतु जरांगे आता पुन्हा सरकारवर नाराज आहेत आणि त्यांनी थेट विखे पाटळांना हल्लाबोल केलंय. मराठा आरक्षण उपस्थिती बरखास्त करा अशी थेट मागणी मनोज जरंगे पाटील यांनी केली आहे. उपसमितीच्या अध्यक्ष पदासाठी विखे पाटील नाव करण्याची शक्यता होती, परंतु त्यांनी नाव घालवलं. मराठा समाजाच्या हक्कांसाठी स्वतंत्र मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असं जरांगे पाटील म्हणाले. धाराशिव येथे भीम जयंती कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विखे पाटलांनी मात्र सावध भूमिका घेतली आहे; मी अध्यक्ष राहिलेच पाहिजे असे काहीही नाही, मात्र आम्ही जे काम केले त्याचा अहवाल जरांगे यांना पाठवला असल्याचे विखे पाटील म्हणाले. जरांगे पाटील आतापर्यंत विखे पाटील आणि मराठा आरक्षण उप समिती या सगळ्या बाबत समाधानी होते, मात्र अचानकच त्यांनी आता हल्लाबोल सुरू केलाय. गेल्या काही दिवसं जरांगे पाटलांची ही धडपड सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे आता हल्लाबोल आणि लवकरच आंदोलन या भूमिकेत जरांगे नाही ना, या बाबत पुन्हा एकदा मराठवाड्यात चर्चा सुरू झाल्या आहेत.0
0
Report
जालना बैंक घोटाले का नया खुलासा: रायचंद कुरंगळ पर चौंकाने वाला आरोप
Jalna, Maharashtra:जालना : मोतीराम अग्रवाल जालना को ऑपरेटरी बँक घोटाळ्यातील आरोपी रायचंद कुरंगळ याचा आणखी एक घोटाळा उघडकीस, शेतमाल तारण ठेवलेला नसताना तारण ठेवल्याचं भासवून पुर्णवादी नागरी सहकारी बँकेलाही ८ कोटी १२ लाखांना गंडा करण्या प्रकरणी कादीम जालना पोलीस ठाण्यात बँकेच्या व्यवस्थापकासह रायचंद कुरंगळ याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जालन्यातील बँकिंग क्षेत्रांत पुन्हा खळबळ उडाली आहे. पूर्णवादी बँकेची शेतकरी, व्यापाऱ्यांसाठी वेअरहाऊस पावतीवर कर्ज देण्याची योजना होती. यासाठी 'पंचमुखी वेअरहाऊस'चे मालक रायचंद कुरंगळ याच्याशी करार केला. तारण मालाच्या जबाबदारी कुरंगळ याची होती. मात्र, ४ जून २०२५ ते १६ सप्टेंबर २०२५ या काळात कुरंगळने बनावट पावत्या तयार करून बँकेची दिशाभूल केली. २० एप्रिल २०२६ रोजी बीड येथील मुख्य कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक जालन्यातील तीनही गोडाऊनची प्रत्यक्ष पाहणी केली. तेव्हा तिथे तारण ठेवलेला माल पूर्णपणे गायब असल्याचं दिसून आलं. या प्रकरणात आरोपींनी कोणतीही समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. तारण मालाचा अपहार, विश्वासघात आणि बनावट कागदपत्रे तयार करून बँकेला कोट्यवधींचा फटका बसल्याचं स्पष्ट झालं. या प्रकरणात शाखा व्यवस्थापकाची भूमिका संशयास्पद आढळून आली असून देवळे यांनी कुरंगळने दिलेल्या पावत्यांवर ३२ कर्ज खाती मंजूर केली. त्यापैकी २४ खाती अजूनही प्रलंबित आहेत. जेव्हा बँकेने पडताळणीचे आदेश दिले, तेव्हा देवळे यांनी कुरंगळसोबत गोडाऊनला भेट देऊन तारण माल जागेवर असल्याचं भासविणारे बनावट फोटो सादर करून मुख्य कार्यालयाची फसवणूक केली.0
0
Report
Advertisement
वैकुंठ पाटील ने अधिकारियों की कड़ी जाँच की, किसानों तक योजनाएं पहुंचाने का संकेत
Chendhare, Maharashtra:वैकुंठ पाटील यांनी घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती. योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचवा अन्यथा कारवाई अटळ. फिल्डवर उतरण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. तालुका स्तरावर कृषी मेळावे घेण्याबाबत चर्चा. रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित कृषी सभापती वैकुंठ पाटील यांनी पहिल्याच आढावा बैठकीत अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, अन्यथा हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाई अटळ आहे असा इशारा त्यांनी दिला. जिल्ह्यातील कृषी योजनांची अंमलबजावणी, निधीचा वापर आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभांचा आढावा घेताना पाटील यांनी अधिकाऱ्यांना ‘फिल्डवर उतरा’ अशा सूचना केल्या. जिल्ह्यात तालुकावर कृषी मेळावे घेण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.0
0
Report
बीड़ में किसान ने बांध पर गवत जलाया, कार जलकर खाक
Beed, Maharashtra:बीड:बांधावरील गवत जाळण्यासाठी शेतकऱ्याने बांध पेटवला; सावलीत उभी असलेली चार चाकी गाडी जळून खाक\n\nAnc:एका शेतकऱ्याने शेतातील बांधावरचे गवत पेटवून दिले. याच दरम्यान झाडाच्या सावलीमध्ये पार्क करण्यात आलेली चार चाकी गाडी जळून खाक झाली. घटना बीडच्या आष्टी तालुक्यातील हरिनारायण अष्टा येथे समोर आलीय. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी शेतकऱ्याची शेतामध्ये लगबग सुरू होती. याचवेळी बांधावर वाढलेले सुके गवत आणि पालापाचोळा शेतकऱ्याने पेटवून दिला. झाडाखाली पार्क केलेली गाडी निदर्शनास न आल्यानं ही गाडी जळून खाक झाली. गाडी सीएनजी आणि पेट्रोल असल्याने भीषण पेट घेतला.0
0
Report
कोल्हापुर में अवैध निर्माण पर हाई कोर्ट ने नगरपालिका के दावे को मान्य किया
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर शहराजवळील तावडे हॉटेल ते गांधीनगर मार्गावरील तब्बल 5 लाख 25 हजार 22 चौरस फूट इतकी जमीन कोल्हापूर महानगरपालिकेच्या मालकीच्या असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे या जमिनेवर उभारलेल्या टोलेजंग इमारती आता बेकायदेशीर ठरल्या आहेत. सद्यस्थितीत या जागेवर अंदाजे 1 हजार कोटीची बांधकामे झाल्याचा अंदाज आहे. शहरातील तावडे हॉटेल ते गांधीनगर मार्गावरील निगडेवाडी पर्यंत कोल्हापूर शहराचे हद्द आहे. त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिकेने 2000 साली जकात नाका सुरू केला होता, त्याबरोबरच ट्रक टर्मिनस आणि कचरा डेपोसाठी जागा आरक्षित ठेवली होती. त्यानंतर देखील त्या ठикाणी बेकायदेशीर बांधकाम सुरू राहिली, परिणामी कोल्हापूर महानगरपालिकेने या बांधकामावर हातोडा चालवला. पण उचगाव ग्रामपंचायतने संबंधित जागा आमच्या मालकीचे असल्याचे सांगत न्यायालय धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने 27 मे 2014 रोजी जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामे पाडण्याची कारवाई थांबवली, पण आत्ता मात्र उच्च न्यायालयाने संबंधित जागा कोल्हापूर महानगरपालिकेच्या मालकीचे असल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे या परिसरात झालेली सर्व बांधकामे आता अनधिकृत ठरली आहेत. त्यामुळे कोल्हापुर महानगरपालिका या बांधकामावर कधी हातोडा चालवणार हे पहावं लागणार आहे..0
0
Report
Advertisement
गोवंडी-मानखुर्द लिंक रोड पर गैस सिलेंडर ब्लास्ट, भारी आग फैल गई
Mumbai, Maharashtra:घाटकोपर मानखुर्द लिंक रोड अनधिकृत पार्किंग साइड वर सिलेंडर ब्लास्टची घटना समोर आली आहे. मुंबई येथील गोवंडी परिसरातील अनधिकृत पार्किंग साइडवर LPG गॅस सिलिंडरचा साथ जमा करून ठेवण्यात आला होता आणि अचानक या गॅस सिलेंडर मध्ये ब्लास्ट झाल्याची माहिती समोर येत आहे. घटना स्थळी मुंबई अग्निशमन दलाच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. आग कशा मुळे लागली आहे या अद्याप पर्यंत कळू शकले नाही आहे. गोवंडी येथील एका अनधिकृत पार्किंग स्थळी सीएनजी सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे, घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर आग लागल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.0
0
Report
चांदवड-धुळे टोल के वेतन कटौती पर कर्मी नाराज़, केंद्रीय मंत्री को ज्ञापन
Yeola, Maharashtra:अँकर-नाशिकच्या चांदवड येथील सोमा टोल नाक्यावरील टोल ऑपरेशन मधील 100 व धुळे टोल वरील 75 अशा 120 किमी अंतरावरील नवीन आलेल्या कर्मचाऱ्यांना नवीन टेंडर मधून कपात करण्यात आल्याने गेल्या 18 वर्षा पासून या टोल नाक्यामार्या काम करणारे कर्मचारी संतप्त झाले असून,त्यांनी या विरोधात आवाज उठवत निषेध व्यक्त केला त्यांनी न्याय मिळावा म्हणून केंद्रीय मंत्री यांना निवेदन पाठवले असून या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळू देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे.0
0
Report
SIT ने नाशिक की मल्टिनॅशनल कंपनी के खिलाफ चौथी पीड़िता से पूछताछ की
Nashik, Maharashtra:एसआयटी'ने मल्टिनॅशनल कंपनीतील गंभीर गुन्ह्याप्रकरणी चौथ्या पीडितेचा जबाब एसआयटी ने घेतलाय... या पीडितेची राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांनी देखील भेट घेतली. कंपनीत स्थानिक पातळीवर नेटचे पासवर्ड देखील अश्लील भाषेत दिले जात होते. यातून अनेकदा धार्मिक भावना देखील दुखावल्या जात होत्या, अशी आपबिती या पीडितेने सांगितली. पिढीत तीन वर्षांपूर्वी कंपनीत ट्रेनी कंर्मचारी म्हणून लागली होती. तेव्हा रजा मेनन याने छळ केला, तो अश्लील भाषेत संभाषण करू लगला. याविषयी पिढीतेने ऑपरेशन मॅनेजर आश्विनी चैनानी हिच्याकडे तोंडी तक्रार केली, त्यांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केले, मात्र यामुळे चिडलेल्या रजा याने अटकेतील आरोपी दानिश, तसेच तौसिफच्या सोबतीने माझा अधिक छळ सुरू केला. माझा डिजिटल पाठलाग केला, तसेच माझ्याबाबत नको ती अफवा कंपनीत पसरविली, असा जबाब पीडितेने दिला आहे... मल्टिनॅशनल कंपनीत या संशयितांनी कशा पद्धतीने या महिलांना त्रास दिला पाहूया या रिपोर्ट मधून.... मल्टिनॅशनल कंपनीच्या नाशिक शाखेत संशयित आरोपींविरोधात पिडीत तरुणींनी कंपनीच्या ऑपरेशन हेडसह अनेकांकडे तक्रार देऊनही त्यावर कारवाई का केली जात नव्हती ? आरोपींचा कंपनीत एवढा दबदबा का होता ? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. विशेष म्हणजे या संशयित आरोपींची कंपनीत अन्य कोणाकडे तक्रार केल्यास ते कशा पद्धतीने सूड घ्यायचे याबाबत देखिल एका पिडीत महिलेने पोलीसांकडे केलेल्या तक्रारीत नमूद केले असून तिने तक्रारीत अनेक गंभीर आरोप केले आहेत. एकंदरीतच कंपनी प्रशासनाविरोधातच यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत..... *संबंधित तरुणी तिन वर्षांपूर्वी कंत्राटी पद्धतीने कंपनीत रुजू झाली असतांना प्रशिक्षण काळात तिला या आरोपीनी कसा त्रास दिला बघुयात -* - ट्रेनिंग रुममध्ये एकटी असताना रझा मेमन याने मला माझ्याजवळ येवून नाव व पत्ता विचारले, त्यानंतर त्याने मला एक शाब्दिक कोडे देवून त्याचे उत्तर तु मला टिम्सवर मेसेज कर असे सांगून माझ्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला. मी यापुढे देखील तुला असे कोडे देईल परंतू हि गोष्ट आपल्या दोघांमध्येच सिक्रेट ठेव असे सांगितले - रझा मेमन हा माझ्या टिमशी संबंधित नसताना सुध्दा त्याचे असे वागणे मला त्या वेळी विचित्र वाटले. परंतू मी त्या वेळी ऑफिसमध्ये नवीन असल्याने दबावामुळे कोठेही याची वाच्यता केली नाही. - मी एकटी असताना रझा हा जाणीवपूर्वक माझ्याकडे विचित्र नजरेने पाहायचा, नको असलेला स्पर्श करायचा म्हणून मी घाबरुन तिथून निघून जात असे - असे वारंवार घडू लागल्याने मी त्यानंतर जून 2023 मध्ये रझा यांच्या विचित्र वागण्याबाबत क्वालिटी / ट्रेनिंग मैनेजरकडे तोंडी तक्रार केली मात्र रझा मेमनची नीतीमत्ता पहिल्यापासून चांगली नसल्याचे सांगून मी एकटी राहणार नाही याची मला काळजी घेण्यास त्यांनी सांगितले - रझा मेमन बाबत मी आमच्या कंपनीच्या टीमलीडर महिलेलाही सांगितले असता त्यांनी मला सांगितले की, तू गृपमध्ये राहत जा, एकटी नको राहू. - दरम्यान मी रझा मेमनची तोंडी तक्रार केली आहे याचा राग मनात ठेवून रझा याने तिचे एका मुलासोबत नाव जोडून आमचे अफेअर असल्याबाबत ऑफिसमध्ये प्रचार करुन माझी बदनामी केली - रझा हा माझ्या वैयक्तीक आयुष्यात लग्नाचा संदर्भ घेत "शादी के बाद रात में सोना पडता हैं, रात में इतना क्या करती है ।" असे बोलून विचित्र पाहत हसायचा - रझा मेमनची हिंमत वाढल्याने ते आमच्या ऑफिस मधील मुलींची नेहमी छेड काढत असे. - गुढीपाडव्याला मी ऑफिसमध्ये साडी नेसून आले असतांना शाहरुख हा माझ्या जवळ मुददाम येवून बसला आणि माझ्याकडे एकटक विचित्र नजरेने रोखून पाहत बोलला की, "आज कुछ अलग ही दिख रही हो, आज कहीं चले क्या?"0
0
Report
Advertisement
