icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

आकोला नगरपालिका की कार्रवाई: नाश्ते की गुमठा में गंदे पानी का खुलासा, स्वास्थ्य पर सवाल

Akola, Maharashtra:अकोला महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने अखेर झोपेतून जाग येत नवीन बस स्थानक परिसरातील नाश्त्याच्या हातगाड्यांवर कारवाई केली आहे. मात्र हा प्रश्न उपस्थित होतो की, ही कारवाई खरंच जनतेच्या आरोग्याची काळजी म्हणून झाली आहेका, की फक्त सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दाखवण्यासाठी उचललेलं पाऊल आहे? नाल्यातील घाण पाणी नाश्ताच्या दुकानात वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे कर्मचारी नाल्यातून पाणी भरून नेताना दिसत आहेत. हा प्रकार केवळ घृणास्पदच नाही, तर थेट नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारा आहे. मात्र सर्वात मोठा प्रश्न महानगरपालिकेच्या कार्यप्रणालीवर उपस्थित होतो. इतक्या दिवसांपासून हा प्रकार सुरू असताना प्रशासन झोपेत होतं का? सोशल मीडियावर प्रकरण गाजल्यानंतरच कारवाई का? शहरातील इतर भागांमध्येही अशाच प्रकारे नियमांची पायमल्ली होत असताना तिकडे मात्र दुर्लक्ष का? महापालिकेने आता कारवाईचा बडगा उचलला असला तरी ही कारवाई सातत्याने होणार का, की काही दिवसांत पुन्हा परिस्थिती जैसे थे होणार? नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित अन्न मिळणं हा त्यांचा हक्क आहे, आणि तो हक्क पायदळी तुडवणाऱ्यांवर केवळ दिखाऊ नव्हे तर कठोर आणि कायमस्वरूपी कारवाई होणं गरजेचं आहे. या ठिकाणचं अतिक्रमण काढणच यावर उपाय नसून नाश्त्याची गुणवत्ता तपासणीही अधिक महत्त्वाची आहे.
0
0
Report

जिला परिषद स्थायी व विषय समितियों के सदस्य आज चुने जाएँगे; 70% महिला आरक्षण

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी - जिल्हा परिषद स्थायी आणि विषय समिती सदस्यांची आज होणार निवड सत्ताधारी आणि विरोधकांसाठी प्रतिष्ठेची लढाई ठरणार यंदा प्रशासनाने शासनाच्या कठोर निकषांचे पालन करण्याचे दिले आदेश स्थायी समितीमध्ये अध्यक्ष आणि विषय समिती सभापतींसह ८ सदस्यांची निवड केली जाणार अनुसूचित जाती-जमाती किंवा मागास प्रवर्गासाठी जागा आरक्षित महिला व बालकल्याण आणि जलव्यवस्थापन समित्यांचे स्वरुप बदलले महिला व बालकल्याण समितीमध्ये चक्क ७० टक्के आरक्षण महिलांसाठी , ८ पैकी क स्तर ६ महिला सदस्यांची निवड अनिवार्य जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीमध्ये ६ पैकी किमान ३ महिला सदस्य असणे बंधनकारक जिल्हा परिषदेच्या सभागृहात आता महिला सदस्यांची ताकद अधिक वाढणार
0
0
Report
Advertisement

सोलापुर से तिरुपति के लिए हवाई सेवा जल्द शुरू: स्लॉट मिला, ट्रैफिक बढ़त

Solapur, Maharashtra:सोलापूर ते तिरुपती विमानसेवेच्या हालचालींना आला वेग, येत्या महिनाभरात विमानसेवा सुरू होण्याची शक्यता - सोलापूर ते तिरुपर्ती विमानसेवा सुरु करण्याच्या हालचालींना आला वेग - स्टार एअर कंपनीला तिरुपत्‍यी स्लॉट मिळाल्याची माहिती - येत्या महिनाभराच्या आत मध्ये सोलापूर ते तिरुपुरी विमान सेवा सुरू होण्याची दाट शक्यता - सोलापूर ते गोवा, सोलापूर - मुंबई विमानसेवा यशस्वी तर सोलापूर ते हैदराबाद विमानसेवेच्या देखील तिकीट बुकिंगला सुरुवात - पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूरची विमानसेवेचा ताकतीने सुरू होईल हा शब्द दिल्यानंतर हालचालींना वेग - या सोबतच गोव्याचे विमानसेवेला उत्तम प्रतिसाद असून आणखी एक विमानसेवा गोव्याला सुरू करण्याचे कंपनीचे प्रयत्न सुरू असल्याचे पालकमंत्र्यांची माहिती
0
0
Report
Advertisement

बारिश से हल्दी उत्पादन घटा, किसान आर्थिक संकट में

Washim, Maharashtra:वाशीम: शिरपूर व परिसर हळद उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, यंदा हजारो एकरात लागवड झाली होती. मात्र सततच्या पावसामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. साधारण 30–35 क्विंटल प्रति एकर मिळणारे उत्पादन यंदा 15–20 क्विंटलपर्यंत घसरले आहे. पावसामुळे कीड व बुरशीचा प्रादुर्भाव वाढून हळदीची गुणवत्ता खालावली आहे. त्यामुळे बाजारात अपेक्षित भाव मिळत नाही. काढणी अंतिम टप्प्यात असून उकडणी व घासणी प्रक्रियेतही अडचणी येत आहेत. उत्पादन घट, निकृष्ट दर्जा आणि कमी दर यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून खर्च वसूल होईल का, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
0
0
Report

चप्पल बदली के विवाद में 18 वर्षीय युवक की हत्या, चार आरोपी गिरफ्तार

Nagpur, Maharashtra:चप्पल अदलाबदलीच्या वादातून युवकाची हत्या... चार आरोपी अटकेत. रामटेक तालुक्यातील सोनेघाट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चौघान परिसरातील सोना ब्रिक्स वीट भट्ट्यावर वादातून 18वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना रविवार रात्री सुमारे घडली. या प्रकरणी रामटेक पोलिसांनी काही तासांत चार आरोपींना अटक केली आहे. मृत तरुणाचे नाव समीर राजू ध्रुव (वय 18, रा. ढाबाडी, जि. बडोदाबाजार, छत्तीसगड) असे आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रामनवमी निमित्त 26 मार्च रोजी काही तरुण रामटेक गडमंदिर येथे दर्शनासाठी गेले होते. यावेळी मंदिराबाहेर ठेवलेल्या चपलांपैकी एका तरुणाने दुसऱ्या चप्पल परिधान केल्याने गैरसमज निर्माण झाला. दुसऱ्या दिवशी हा प्रकार लक्षात आल्यानंतर संबंधित तरुणांमध्ये वाद सुरू झाला.हा वाद पुढे वाढत गेला आणि रविवारी रात्री विकोपाला गेला.. दारूच्या नशेत असलेल्या चार तरुणांनी संतापाच्या भरात समीर ध्रुव याच्यावर विटा व काठ्यांनी हल्ला चढवला. यात तो गंभीर जखमी झाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्याला तात्काळ रामटेक उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. पोलीस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी तत्पर कारवाई करत अवघ्या काही तासांत चारही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून किरकोळ वादातून झालेल्या या हत्येने खळबळ उडाली आहे.
0
0
Report

नाशिक नगर निगम के लोगो का दुरुपयोग: फर्जी संदेश से बिल भरवाने की धमकी

Nashik, Maharashtra:मनपाच्या नावाने बनावट संदेश; सायबर पोलिसांत गुन्हा दाखल... नाशिक महानगरपालिकेच्या लोगोचा गैरवापर करून प्रलंबित पाणीपट्टी व घरपट्टी भरण्याबाबत धमकीवजा व्हॉट्सअॅप संदेश पसरविण्याचा प्रकार समोर आलाय.. या प्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झालाय..अनोळखी व्यक्तींनी नाशिक महानगरपालिकेचा अधिकृत लोगो वापरून नागरिकांना प्रलंबित पाणीपट्टी आणि घरपट्टीची बिले तत्काळ भरण्याचा इशारा दिला. या संदेशात बिले न भरल्यास पाणीपुरवठा कनेक्शन खंडित करण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली होती. तसेच बिले अपडेट करण्यासाठी ६२९७०१९७९२ या क्रमांकावर 'अंकित अग्रवाल' नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले होते. इंग्रजी भाषेत पाठविण्यात आलेल्या या संदेशामुळे अनेक नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत नाशिक महानगरपालिकेच्या अधिकारीांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केलीये....संशयितांनी मनपाची ओळख चोरून अधिकृत लोगोचा वापर व्हॉट्सअॅपच्या डीपीवर केला आणि खोटे संदेश प्रसारित केले. सायबर पोलिसांनी अज्ञात व्हॉट्सअॅपधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलीस करताय... तर महानगरपालिकेने अशा प्रकारच्या संशयास्पद संदेशांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही अधिकृत माहिती केवळ महानगरपालिकेच्या अधिकृत माध्यमांद्वारेच दिली जाते, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केलंय...
0
0
Report
Advertisement

NTCA मंजूरी: विदर्भ के 5 बाघ सह्याद्री में स्थलांतर, पर्यटन को मिलेगा बढ़ावा

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. सह्याद्रीची डरकाळी वाढणार!..विदर्भातील ५ वाघ कोकणात स्थलांतरित होणार.. अँकर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आता वाघांचा संचार वाढणार आहे.विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त झाल्याने,आता वन विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे.. विदर्भातील अतिरिक्त ५ वाघांना आता 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात' आणले जाणार आहे.. राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने (NTCA) या स्थलांतरासाठी हिरवा कंदील दिला असून प्रक्रियेला वेग आला आहे.. सह्याद्री प्रकल्पात सध्या १० वाघ आहेत,या नव्या पाहुण्यांमुळे ही संख्या आता १५ वर पोहोचणार आहे.. रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवर पसरलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.. विदर्भातील 'वाघांचा हा प्रवास' सह्याद्रीचा मान नक्कीच वाढवेल..
0
0
Report

रत्नागिरी के पंकज चवंडे को महाराष्ट्र खो-खो चयन समिति में नियुक्ति

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रत्नागिरीचे पंकज चवंडे यांची राज्य खो-खो निवड समितीवर नियुक्ती.. जिल्हा असोसिएशनकडून अभिनंदनाचा वर्षाव.. महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनने २०२६-२७ च्या आगामी हंगामासाठी आपल्या निवड समितीची आणि राष्ट्रीय संघ प्रशिक्षकांची घोषणा केली आहे..यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. रत्नागिरीचे अनुभवी राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे यांची महाराष्ट्र राज्याच्या 'किशोर-किशोरी' गटाच्या निवड समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.. विशेष म्हणजे,पंकज चवंडे यांची ही या समितीवरील तिसरी टर्म असून, यापूर्वीही त्यांनी दोन वेळा निवड समितीचे सदस्य म्हणून यशस्वी कामगिरी केली आहे.. तसेच,महाराष्ट्र राज्य संघाचे प्रशिक्षक म्हणूनही त्यांचा अनुभव दांडगा आहे.. या निवडीनंतर रत्नागिरीत आनंदाचे वातावरण आहे..
0
0
Report

थकीत वेतन के बदले 52 हजार की रिश्वत: डईओ समेत तीन गिरफ्तार

Nashik, Maharashtra:थकीत वेतन बिलासाठी शिक्षक दाम्पत्याकडूनच स्वीकारली लाच.. ५२ हजार स्वीकारताना जि. प. कनिष्ठ लेखा अधिकाऱ्यासह, गट शिक्षणाधिकारी, शिक्षक जाळ्यात... दिंडोरी येथील गट शिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुकाराम चव्हाण, निगडोळ येथील प्राथमिक शिक्षक नीलेश निंबा भारती आणि जिल्हा परिषद नाशिक येथील कनिष्ठ लेखा अधिकारी देवीप्रसाद चैत्राम पाटील यांना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५२ हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी रंगेहाथ पकडले. दिंडोरी येथे काल दुपारी ही कारवाई करण्यात आलीये.. तक्रारदार व त्यांची पत्नी हे दोघेही शिक्षण असून ते 'पेसा' या विशेष कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत. सन २००२ पासून फेब्रुवारी २०२६ पर्यंतच्या एकस्तर वेतनश्रेणीतील थकीत फरकाच्या रकमेबाबत त्यांनी पंचायत समिती दिंडोरी येथे बिल सादर केले होते. या बिलाची रक्कम तक्रारदारासाठी सुमारे ६ लाख ५७ हजार ८०८ रुपये तर त्यांच्या पत्नीसाठी सुमारे ६ लाख ५५ हजार ६०० रुपये इतकी होती. ही रक्कम मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविणे आवश्यक होते तक्रारदाराने या प्रक्रियेसाठी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर आरोपी गट शिक्षणाधिकारी चव्हाण यांनी बिल पुढे पाठविण्याच्या मोबदल्यात एक टक्का लाच स्वीकारलिये....
0
0
Report
Advertisement

नागपुर नगर निगम ने जनगणना में धांधली पर FIR दर्ज, 10 कर्मियों पर कार्रवाई

Nagpur, Maharashtra:नागपूर - जनगणना कामात टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई करत नागपूर महानगरपालिकेकडून थेट FIR दाखल - जनगणनेच्या कामात टाळाटाळ केल्यानं 10 जणावर गुन्हा दाखल.. - १ एप्रिलपासून देशभरात जनगणना सुरू कामात सहभाग न घेतल्यामुळे कठोर पाऊल - सतरंजीपुरा झोन अधिकाऱ्यांची तक्रार, यशोधरा नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद - जनगणना 2026-27 कामाला नकार, आदेश घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप - प्राचार्य, चार शिक्षक,लेखपाल असे , एकूण १० कर्मचाऱ्यांवर कारवाई - राष्ट्रीय कर्तव्यात हलगर्जीपणा गंभीर मानला, महानगरपालिकेची कठोर भूमिका - IPC कलम 187 अंतर्गत FIR दाखल, फौजदारी कारवाईला सुरुवात - जनगणना कामात सहकार्याचे आवाहन, प्रशासनाचा इशारा
0
0
Report

कोकण के होटेलों पर गैस संकट से पर्यटन उद्योग में भारी नुकसान

Ratnagiri, Maharashtra:चिपळूण-रत्नागिरी.. युद्धाची झळ आणि गॅसचा तुटवडा.. कोकणच्या पर्यटन हंगामाला 'ब्रेक', हॉटेल व्यावसायिक संकटात! अँकर कोकणचा निसर्ग आणि तिथल्या पाहुणाचाराचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते, मात्र यंदा चित्र काहीसं वेगळं आहे. आखाती देशांमधील युद्धाचे सावट आता थेट रत्नागिरीच्या पर्यटन व्यवसायावर पडल्याचं पाहायला मिळत आहे... एरवी हाउसफुल असणारी रत्नागिरीतील हॉटेल्स यंदा पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहेत.. गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे हॉटेल मालकांना चुलीचा आधार घ्यावा लागताय.. चुलीवर अन्न शिजायला वेळ लागत असल्याने पर्यटक ताटकळत न थांबता निघून जात आहेत.. एकीकडे जागतिक युद्धाचा परिणाम आणि दुसरीकडे इंधनाची टंचाई, अशा दुहेरी कात्रीत कोकणातील हॉटेल व्यावसायिक अडकले असून त्यांना या हंगामात मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे.. पर्यटनावर अवलंबून असलेल्या या जिल्ह्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे...
0
0
Report

खस गवत से खेती में जल-संरक्षण और उपज बढ़ोतरी

Washim, Maharashtra:अँकर:अवकाळी पाऊस, वाढते तापमान आणि घटणारी भूजलपातळी यामुळे शेतीसमोर मोठी आव्हाने उभी आहेत. या पार्श्वभूमीवर वाशीम जिल्ह्यातील सोमठाना येथील शेतकरी पंकज राऊत यांनी खस गवताच्या माध्यमातून शाश्वत शेतीचा आदर्श निर्माण केला आहे. राऊत यांनी १५ एकरपैकी ५ एकरात ३० फूट अंतरावर खस गवताची लागवड करून मृद व जलसंधारण प्रभावीपणे साधले. खसच्या खोल मुळांमुळे मातीची धूप कमी होते, पावसाचे पाणी जमिनीत मुरते आणि भूजलपातळी वाढण्यास मदत होते. तसेच खस गवताचा वापर चारा व मल्चिंगसाठी केल्याने जमिनीतील ओलावा टिकतो, तणांची वाढ कमी होते आणि उत्पादनात वाढ होते. फळबाग, बांबू आणि हंगामी पिकांसोबत त्यांनी ‘तण देई धन’ ही संकल्पना यशस्वीपणे राबवली आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top