icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

रायगढ़ में मानसून ने खेती के कामों की रफ्तार बढ़ाई; किसानों में नई उम्मीद

Chendhare, Maharashtra:पावसाचा जोर आणि शेतातील पाणी कमी झाल्याने रायगडात शेतीच्या कामांची लगबग सुरू झाली आहे. जून महिन्याच्या अखेरीस आणि जुलैच्या सुरुवातीपासून रायगड जिल्ह्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने संपूर्ण जिल्ह्यातील शेतशिवार हिरवाईने नटले आहे. पावसामुळे नद्या, नाले आणि ओढे वाहू लागले असून शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. अनेक भागांत भात लावणीच्या कामांना वेग आला असून शेतकरी उत्साहाने शेतीच्या कामात व्यस्त झाले आहेत.पावसामुळे भातखाचरांमध्ये पुरेसे पाणी साचल्याने लावणीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. शेतकरी कुटुंबांसह मजुरांच्या मदतीने पारंपरिक पद्धतीने भात लावणी करताना ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. महिलांच्या ओव्या आणि आंबोणीच्या सुरांनी गावागावातील शेतशिवाराना पुन्हा एकदा जाग आली आहे.
0
0
Report

Solapur में CNG भरणे के समय Ertiga पर अचानक आग लगी, दमकल ने नियंत्रण पाया

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सीएनजी भरण्यासाठी उभारलेल्या एरटिगा कारला अचानक लागली आग सोलाउरात सीएनजी भरण्यासाठी गेलेल्या इर्टिगा कारला अचानक लागली आग, आगीत कारचं नुकसान कारमधून अचानक धूर निघत असल्यामुळे पेट्रोल पंपाच्या बाहेर कार काढण्यात आली, पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टाळलं.. सोलापूर जवळील देगाव येथील पेट्रोल पंपावरील घटना अग्निशामक यंत्रणेच्या माध्यमातून पाण्याचा फवारा केल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश इर्टिगा कारच्या पुढील भागात आग लागल्यामुळे गाडीचं मोठं नुकसान.. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट..
0
0
Report
Advertisement

सोलापूर गिरनी मजदूरों के चॉल को मालिकाना हक, 118 साल के लंबित मसले का हल!

Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग - गिरणी कामगारांच्या चाळीतील नऊ हजार कुटुंबांची घरे मालकीची होणार, 118 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न सुटल्याने कामगारांच्या मुलांनी केला जल्लोष सोलापुरातील गिरणी कामगारांच्या चाळीतील घरे मालकी हक्काने देण्याचा निर्णय गुरुवारी विधिमंडळात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केला. नऊ हजार कुटुंसांना दिलासा देणारा हा निर्णय असून गेल्या ११८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नावर आ. देवेन्द्र कोठे यांच्या प्रयत्नांमुळे अखेर तोडगा निघाला आहे. या विषयाची ऐतिहासिक घोषणा होताच भाजपच्या वतीने आ. देवेन्द्र कोठे यांच्या कार्यालयाबाहेर महापौर विनायक कोंड्याल यांच्यासह गिरणी कामगारांच्या मुलांनी गुलालाची मुक्त उधळण करत मोठा जल्लोष साजरा केला.
0
0
Report

10 ज़ोन में दिन में 13 संपत्तियाँ सील; कर वसूली 39 लाख 35 हजार रुपये

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:महापालिकेने थकबाकीदारांविरुद्ध सुरू केलेल्या करवसुली मोहिमेने पुन्हा जोर धरला आहे. शहरातील १० झोनमध्ये राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत एकाच दिवसात १३ मालमत्ता सील करण्यात आल्या असून, ३९ लाख ३५ हजार रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे. ही मोहीम सलग चौथ्या आठवड्यात यशस्वीपणे राबवण्यात आली. मागील आठवड्यात वसुली मोहिमे मिळाल्या यशानंतर आयुक्तांनी सर्व १० झोनसाठी १५ ते २० मोठ्या थकबाकीदारांची यादी कारवाईसाठी निश्चित करून दिली होती. त्यानुसार आज सर्वच झोनमध्ये पथकांनी आक्रमक पवित्रा घेत ही कारवाई केली. त्यामुळं कर थकबाकी दार यांच्या धाबे दणाणले आहे थकबाकीदाराने तातडीने कर भरावा असे आवाहन मनपाने केले आहे...
0
0
Report

कृष्णा और वारणा नदी के जलस्तर में कमी, बाढ़ का खतरा टला; पानी धीरे-धीरे घटने लगा

Sangli, Maharashtra:स्लग - कृष्णा व वारणा काठाला मोठा दिलासा,पुरचे संकट टळले,कृष्णा व वारणा नदीचे पाणी ओसरू लागले.. अँकर - कृष्णा व वारणा नदी पाणलोट क्षेत्रातल्या पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे झपाट्याने वाढणारी पाण्याची पातळी आता ओसरू लागलेली आहे.पात्रा बाहेर पडलेल्या कृष्णा व वारणा नद्या आता पात्रात परतू लागल्या आहेत.सांगलीमध्ये दोन दिवसांमध्ये बारा फुटांनी वाढून ३० फुटांवर पोहचलेल्या कृष्णा नदीच्या पाणी हळुहळू ओसरू लागली आहे.काल सायंकाळ नंतर कृष्णा नदीची पाण्याची ६ फुटांनी ओसरली असून २४ फूट इतकी पाण्याची पातळी झाली असुन पाणी हळुहळू ओसरत आहे. तर शिराळा तालुक्यातत देखील पाउसाचा जोर ओसरल्याने पात्रा बाहेर पडलेल्या वारणा नदीचीही पाणी पातळी ओसरू लागली आहे.त्यामुळे कृष्णा व वारणा काठाला मोठा दिलासा मिळाला आहे.
0
0
Report
Advertisement

छत्रपती संभाजीनगर में मतदाता सूची पुनरीक्षण में 577 शिक्षकों को नोटिस जारी

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर में मतदाता याद्या पुनरीक्षणाच्या कामात हलगर्जी करणाऱ्या शहरातील पूर्व, मध्य आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघातील ५७७ शिक्षकांना प्रशासनाने नोटीस बजावल्या. पुनरिरीक्षणासाठी १०४३ शिक्षकांची बीएलओपदी नियुक्ती करण्यात आली. नियु्क्त शिक्षक-शिक्षिकांना मतदारांची घरोघरी भेट घेऊन अर्ज वाटप करून तो भरून घेण्याची जबाबदारी आहे. हे काम सुरू होऊन ९ दिवस झाले असून, शहरातील तीनही मतदारसंघांत वेगाने काम होत नसल्याने प्रशासनाने बीएलओंवर कारवाईचा इशारा देत नोटीस बजावल्या आहेत. पूर्व विधानसभा मतदारसंघात ३२२ शिक्षकांची बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, यापैकी २८३ जण कामच करत नाहीत. मध्य मतदारसंघात ३२० नियुक्त शिक्षकांपैकी १५५ जणांना या नोटीस बजावल्या आहेत. तर पश्चिम मतदारसंघात सर्वाधिक ४०१ शिक्षक बीएलओ म्हणून नियुक्त असून, १३९ बीएलओंनी कामच केले नसल्याने त्यांना नोटीस बजावल्या आहेत
0
0
Report

छत्रपती संभाजीनगर में पानी सप्लाई संकट: आयुक्त ने पंपिंग शुरू करने के निर्देश दिए

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:नवीन पाणीपुरवठा योजना संकटात सापडली असतानाच, छत्रपती संभाजी नगर मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी आढावा बैठकीत एजन्सी आणि अधिकाऱ्यांना शुक्रवारी पंपिंग सुरू करण्याचे निर्देश दिले. कामातील कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाहीत असा दम एजन्सीला दिला. आयुक्तांनी या वेळी अॅक्शन प्लान समोर ठेवला आहे. गुरुवारी रात्रीच संबंधित एजन्सी, एमजेपीचे अधिकारी आणि मनपाच्या अभियंत्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणीचे नियोजन करावे आणि सूर्योदयासोबत काम हाती घ्यावे, असे आदेश दिले. त्यामुळं आज तरी पाण्याचे पंपीग होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे
0
0
Report

गिरणा नदी में बाढ़, 2846 क्यूसेस विसर्जन के साथ सतर्कता जारी

Nashik, Maharashtra:मालेगाव (नाशिक) कळवण, पेठ, सुरगाण्यात पावसाची संततधारेमुळे मालेगावच्या गिरणा नदीला पूर. प्रशासनाकडून सुरक्षा रक्षक लावत नदी परिसरात चोख बंदोबस्त. नाशिकच्या सुरगाणा, पेठ कळवण तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाले तुडूंब झाले आहेत. चणकापूर कळवण धरणाच्या पाणी पातळी कमालीची वाढली असून, धरणात पाण्याची आवक लक्षात घेता प्रशासनाच्यावतीने धरणातून 2846 क्यूसेस पाण्याचा गिरणा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला असून गिरणा नदी पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी काही तरुण येथे स्टंट करत पोहण्याचा प्रयत्नांत आपला जीव गमवत असतात त्यामुळे मालेगाव महापालिके तर्फे अग्निशामक दलाचे अधिकारी, कर्मचारी पोलिस प्रशासन यांचा याठिकाणी चोख बंदोबस्त असून नागरिकांना आवाहन देखील करण्यात आले. या नदी परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल मोरे यांनी.
0
0
Report
Advertisement

वसई पालिका के डंपिंग ग्राउंड से प्रदूषित पानी औद्योगिक बस्तियों में स्वास्थ्य संकट

Vasai-Virar, Maharashtra:वसई विरार पालिकेच्या भोईदापाडा येथील डंपिंग ग्राउंडच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका डंपिंग ग्राउंड शेजारी असलेल्या औद्योगिक वसाहतींना बसत आहे .. पावसाळा सुरू झाल्यापासून डंपिंग मधून येणारे केमिकल युक्त सांडपाणी कंपन्यांच्या रस्ते व परिसरातून वाहत आहे .. वाहणाऱ्या पाण्यात एक विशिष्ट फेस तयार होत असून प्रचंड दुर्गंधी येत असल्याने येथील कंपनी चालक आणि कामगारांना नाक मुठीत धरून काम करावे लागत आहे. आणि या वातावरणामुळे कामगारांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे ... पालिकेने डंपिंग मधून येणाऱ्या सांडपाणी ड्रेनेजचे योग्य नियोजन न केल्याने संताप व्यक्त केला जात आहे .. खरतर अनेक वर्ष ही समस्या कायम आहे , त्यामुळे येथील १०० हून अधिक कंपन्या आता स्थलांतर करण्याच्या मार्गावर असल्याचे मत येथील कंपनी चालकांनी व्यक्त केले आहे ...
0
0
Report

अकोला के तेल्हारा में वाणी कीड़ों से फसलों को भारी नुकसान, किसानों पर आर्थिक संकट

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात अंकुरलेल्या पिकांवर वाणी किडीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. दुबार पेरणीचे संकट एका बाजूला असतानाच अब सोयाबीन, कपाशी आणि तूर पिकांवर वाणी किडीने हल्ला चढवला आहे. कोवळे अंकुर फस्त होत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली असून, कृषी विभागाने तातडीने उपाययोजना करून मोफत कीटकनाशके उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.यंदा पावसाच्या उशिरानंतर अकोल्यासह विदर्भातील अनेक भागात शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. पिकांना अंकुर फुटताच तेल्हारा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाणी किडीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. हा कीटक सोयाबीनच्या कोवळ्या रोपांसह कपाशी आणि तूर पिकांचेही मोठे नुकसान करत आहे. महागडी बियाणे आणि खतांसाठी उधारी करून पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसमोर आता पुन्हा आर्थिक संकट उभे ठाकले आहे. वाणी किडीपासून बचावासाठी काही शेतकरी थिमेटचा वापर करत आहेत, तर काही जण किडीला हाताने वेचून नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, या किडीवर प्रभावी नियंत्रणासाठी योग्य तांत्रिक मार्गदर्शन आणि शिफारस केलेल्या उपाययोजनांची माहिती बहुतांश शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही,त्यामुळे कृषी विभागाने तातडीने शेतपातळीवर पाहणी करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, आवश्यक कीटकनाशके उपलब्ध करून द्यावेत आणि वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच वाणी किडीच्या संकटामुळे शेतकऱ्यांच्या आशांवर पुन्हा एकदा पाणी फिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
0
0
Report

कराड-विटा मार्ग पर कृष्णा पुल पर कार में अचानक आग, यातायात बाधित

Satara, Maharashtra:सातारा :- कराड-विटा मार्गावरील कृष्णा पुलावर रात्री धावत्या कारला अचानक आग लागल्याने काही काळ एकच खळबळ उडाली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आगीत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेमुळे काही काळ कृष्णा पुलावरील वाहतुकीवरही परिणाम झाला होता. Vo :-धावत असलेल्या कारमधून अचानक धूर येऊ लागतला आणि काही क्षणांतच आगीने उग्र रूप धारण केले. चालकाने प्रसंगावधान राखत वाहन तात्काळ रस्त्याच्या कडेला थांबवून बाहेर पडल्याने पुढील अनर्थ टळला.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दल आणि कराड शहर पोलिसांना कळवले. त्यानंतर अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि कारला लागलेली आग नियंत्रणात आणली.या घटनेमुळे कृष्णा पुलावरील वाहतुकीवरही काही काळ विस्कळीत झाली. पुलावर वाहनांच्या रांगा लागल्या, तर घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. कराड शहराला जोडणारा हा पूल अत्यंत वर्दळीचा असल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.
0
0
Report
Advertisement

आकोला जिले के नागोली-नागठाणा में पानी भरते वक्त युवक बिजली के झटके से मौत

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर तालुक्यातील नागोली-नागठाणा गावात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक बोअरिंगवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय आयटीआय विद्यार्थ्याचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून, सोळंके कुटुंवावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आदर्श सुनील सोळंके हा नागोली-नागठाणा येथील रहिवासी असून तो शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये मेकॅनिकल ट्रेडच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता,तो गावातील ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक बोअरिंगवर पाणी भरण्यासाठी गेला असता, बोअरिंग सुरू करताना अचानक विद्युत प्रवाह आल्याने त्याला जोरदार विजेचा शॉक बसला. हा शॉक इतका तीव्र होता की त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत आदर्शचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून, एका होतकरू आणि तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची माहिती संबंधित प्रशासन आणि पोलिसांना देण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या विद्युत उपकरणांची नियमित तपासणी आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
0
0
Report

जीएमआर एयरपोर्ट नागपूर एयरपोर्ट को आधुनिक एवीएशन हब बनाने की योजना का ऐलान

Nagpur, Maharashtra:नागपूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे रूपांतर एका आधुनिक एव्हिएशन तसेच कार्गो हब आणि एअरपोर्ट सिटीमध्ये होणार आहे. नागपूर विमानतळाच्या खाजगीकरणानंतर आता जीएमआर एअरपोर्ट लिमिटेडने विमानतळाच्या सर्वांगीण विकासाचा महत्त्वकांक्षी आराखडा जाहीर केला. टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणाऱ्या विस्तारानुसार नागपूर विमानतळाची वार्षिक प्रवासी हाताळणी क्षमता तीस लाख प्रवाशांवरून तीन कोटी पर्यंत वाढवण्यात येणार आहे. करारांतर्गत विमानतळ मध्य भारताचे एक मोठे व्यावसायिक आणि आर्थिक केंद्र म्हणून नावारूपास येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात कंपनी विद्यमान टर्मिनल इमारतीच्या नूतनीकरणासाठी तीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. पुढील बारा ते अठरा महिन्यांत प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त चेक-इन काउंटर्स, सेल्फ चेक-इन किओस्क, विस्तृत सुरक्षा क्षेत्र, अपग्रेड केलेले वॉशरुम्स आणि विशेष लाउंज तयार केले जातील. त्यानंतर, पुढील काही वर्षांत मिहान-एसईझेड आणि विमान दुरुस्ती केंद्राजवळ (एमआरओ) एक भव्य नवीन एकात्मिक टर्मिनल इमारत बांधली जाईल. भविष्यातील विमानांची वाढती वाहतूक आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे लक्षात घेऊन दुसरी समांतर धावपट्टी आणि नवीन एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर उभारला जाणार आहे. तसेच विद्यमान टर्मिनल इमारतीचे नूतनकरण होणार आहे. नागपूर विमानतळाचा होणाऱ्या कायापालट बाबत आमच्या प्रतिनिधींनी माहिती जाणून घेतली आहे. जीएमआरचे कार्यकारी संचालक एस जी के किशोर यांच्याकडून
0
0
Report

नाशिक आश्रम स्कूल में नाबालिग छात्रा ने बच्चे को जन्म दे दिया; महाराष्ट्र में हड़कंप

Nashik, Maharashtra:महाराष्ट्राला हादरवणारी घटना ;आश्रम शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन ९ वीच्या मुलीने दिला बाळाला जन्म सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका आश्रमशाळेत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला नाशिकच्या कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका आश्रमशाळेत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. इयत्ता नववीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक व काळजाचा थरका उडविणारी घटना समोर आली असून, या प्रकारामुळे आदिवासी विकास विभागाच्या देखरेख व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित विद्यार्थिनीशी संबंध ठेवणारा आरोपी देखील अल्पवयीन व तिचाच नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला बाल न्याय व्यवस्थेनुसार बालसुधारगृहात पाठवण्यात आल्याची माहिती आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी दिली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थिनींच्या आरोग्य तपासणीसाठी विविध सुविधा उपलब्ध असल्याचा दावा केला जातो. मात्र, या आश्रमशाळेतील घटनेमुळे या यंत्रणेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे, विद्यार्थिनी गर्भवती राहिल्याची बाब इतक्या उशिरा लक्षात आली कशी? विद्यार्थिनींच्या आरोग्य तपासणीची प्रक्रिया नेमकी कशी राबवली जात होती? तसेच संबंधित जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी होणार का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. बाईट: अपर आयुक्त दिनकर पावरा आदिवासी विकास भवन नाशिक
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top