Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Oct 25, 2024 07:21:47
Yavatmal, Maharashtra
यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Feb 18, 2026 03:33:13
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 18, 2026 03:31:18
Washim, Maharashtra:वाशीमच्या मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा फाटा ते पूर या रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत खराब झाल्याने नागरिकांसाठी हा रस्ता धोकादायक ठरत आहे.रस्त्याच्या अनेक ठिकाणी खड्डे पडले असून काही भाग खचलेला आहे.तसेच रस्ता अरुंद झाल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या कसरतीने प्रवास करावा लागत आहे.या मार्गावरून पूर येथील प्राचीन शिवमंदिरात जाणाऱ्या भाविकांची नेहमीच वर्दळ असते.मात्र खराब रस्त्यामुळे भाविकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.त्यामुळे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी,अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाकडे करण्यात येत आहे。
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 18, 2026 03:30:39
Latur, Maharashtra:लातूर शहरात वाढत्या गुन्हेगारीने गंभीर रूप धारण केले आहे. पुरणमल लाहोटी शासकीय अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन संस्थेतील चार विद्यार्थ्यांवर झालेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. दुचाकीचे मीटर फोडल्याच्या किरकोळ कारणावरून ही २० वर्षीय तरुणाचा खून करण्यात अाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या पंधरा दिवसांत शहरात चार खून आणि सात जणांवर कोयत्याने हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके ऐवजी शस्त्रे दिसू लागल्याने पालक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 18, 2026 03:30:24
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरमधून सोयगाव तालुक्यातील एका छोट्याशा गावात अवघ्या 4 महिन्यांत तब्बल 3,448 बोगस जन्मनोंदी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ग्रामपंचायतीच्या पोर्टलचा पासवर्ड बिहारमधून हैक करून हा संपूर्ण कारभार करण्यात आला. गावची लोकसंख्या साडेचार हजार असून जन्मनोंदी साडेतीन हजार झाले असल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. आरोग्य संचालकांनी या सर्व नोंदी रद्द करण्याचे आदेश दिले असून सोयगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाहेरील देशातील जन्मनोंदी असल्याचा संशय असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारीांनी सांगितलं. आमच्या ग्रामपंचायतचा पोर्टल आयडी एका तरुणाने हैक केला, त्यातून त्याने 3 हजार 447 जन्म नोंदी केल्या आहेत, त्यासंदर्भात आम्ही गुन्हा दाखल केला आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Feb 18, 2026 03:18:45
Amravati, Maharashtra:तीन महिन्यांपासून राखडली मेळघाटातील आदिवासींची मजुरी; अमरावती जिल्ह्याची तब्बल 35 कोटी 7 लाखांची मजुरी थकीत, मेळघाटातील आदिवासींची होळी अंधारात जाण्याची शक्यता मेळघाटातील आदिवासींचा होळी हा प्रमुख सण मानल्या जातो मात्र अमरावती जिल्ह्यात होळीच्या तोंडावर 50 हजार मेळघाटातील आदिवासी मजूर संकटात सापडले आहे. दोन ते तीन महिन्यांपासून मजुरी न मिळाल्याने आदिवासी मजुरांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप वाढला आहे. अमरावती जिल्ह्याची तब्बल 35 कोटी 7 लाखांची मजुरी थकीत असून मेळघाटातच 22 कोटी 28 लाख रुपये थकीत आहे. यामध्ये चिखलदरा व धारणी तालुक्यातील मजूर सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. होळी सण जवळ आला आहे मात्र मजुरांच्या हातात पैसे नाही त्यामुळे प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दरम्यान रखडलेली मजुरी तात्काळ द्या अशी मागणी आदिवासी बांधव करत आहे. होळीच्या आधी आदिवासींना मजुरी मिळाली नाही तर नागपूरच्या आयुक्तालयात घुसून आंदोलन करण्याचा इशारा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 18, 2026 03:17:43
Bhandara, Maharashtra:बाळ विक्री प्रकरणात न्यायालयाने डॉ. वाजपेयींचा अटकपूर्व जामीन फेटाळला. दुसऱ्या बाळाच्या विक्रीचा खुलासाही लवकरच होण्याची शक्यता. बाळ विक्री प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. नितेश वाजपेयी याचा अटकपूर्व जामीन अर्ज भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला. दरम्यान, आरोपी सध्या भंडाऱ्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असून, वैद्यकीय सुट्टी मिळताच त्याला अटक करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. दोन दिवसांपूर्वी १५ फेब्रुवारीला वाजपेयी यांनी कटंगी (जि. बालाघाट, म.प्र.) येथे स्वतःला सर्जिकल ब्लेडने जखमी करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्याला तुमसर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणात दुसऱ्या बाळाच्या विक्रीचा खुलासाही लवकरच होण्याची शक्यता असून, पोलिसांच्या रडारवर आणखी काही संशयित आरोपी असल्याची माहिती आहे. आतापर्यंत सहा जणांची नावे पुढे आली असून, त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी अटक झालेली लालेश्वरी सादेपाच सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. याप्रकरणी बोलताना रूपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी होणार असून दोषींवर कारवाई होईल असे सांगितले.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 18, 2026 03:17:22
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:पोलिस भरतीचे स्वप्न अधुरेच; अज्ञात वाहनाच्या धडकेत २० वर्षीय तरुणाचा मृत्यू पैठणच्या रहाटगाव शिवारात मृतदेह; सराव करताना काळाचा घाला समाजसेवेचे स्वप्न डोळ्यांत साठवून पोलिस भरतीसाठी जिद्दीने तयारी करणाऱ्या २० वर्षीय तरुणाचा मृतदेह मंगळवारी पैठण- पाचोड रोडवरील राहटगात शिवारात मृत देह आढळून आला. सुशांत संतोष भोजने (रा. वरुडी, सध्या मुक्काम दावरवाडी शिवार) असे मृत तरुणाचे नाव आहे. सुशांत भोजने हा गेल्या सहा महिन्यांपासून पोलिस भरतीसाठी कठोर सराव करीत होता. दररोज पहाटे धावण्यासाठी पैठण-पाचोड रस्त्यावर जात असे. सोमवारी पहाटे तो नेहमीप्रमाणे सराव करण्यासाठी घराबाहेर पडला. मात्र, परतलाच नाही. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेऊनही पत्ता न लागल्याने पाचोड पोलिस ठाण्यात तो हरवतली तक्रार दाखल करण्यात आली होती. परंतु मंगळवारी दुपारी राहटगाव शिवारात मोसंबी बागेजवळ रस्त्याच्या कडेला त्याचा मृत्यूदेह आढळून आला आहे. यावेळी नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. आपल्या तरुण मुलाचा मृतदेह पाहून आई-वडिलांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 18, 2026 03:15:39
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ANC : छत्रपती संभाजीनगर शहरातील गजानन महाराज मंदिर चौकाजवळ सूतगिरणी चौक रस्त्यावर असलेल्या एक हॉस्पिससमोर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पेशंट घेऊन आलेल्या एका तरुणाने रस्त्यावर उभी असलेली डॉक्टरांची कार सुरू केली आणि ती थेट अंडरग्राउंडमध्ये असलेल्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये घुसली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलचे डॉक्टर अमोल कुलकर्णी यांनी त्यांची कार हॉस्पिटलसमोर उभी केली होती. काही वेळानंतर सय्यद वसीम हे दुचाकीवर पेशंटला घेऊन हॉस्पिटलमध्ये आले. डॉक्टरांना दाखवून बाहेर आल्यानंतर त्यांची दुचाकी ही डॉक्टरांच्या कारच्या मागे अडकली होती. दुचाकी काढण्यासाठी त्यांनी कारची चावी घेत कार सुरू केली. कार बाजूला पार्क करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्‍या वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट अंडरग्राउंडमध्ये असलेल्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये घुसली. त्या वेळी लॅबमध्ये कोणीही उपस्थित नसल्याने मोठी दुर्घटना टळली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आणि माहिती मिळताच पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने कार बाहेर काढण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Feb 18, 2026 03:06:38
Nashik, Maharashtra:दोन वर्षांत मराठी शिका, नाही तर प्रमोशन विसरा अँकर राजभाषा मराठी धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नागरिकांना त्यांच्या मातृभाषेत शासकीय सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात. तसेच महापालिकेत अमराठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मराठीची परीक्षा दोन वर्षात उत्तीर्ण - करावी अन्यथा त्यांना प्रमोशन देण्यात येणार नाही, असा सज्जड इशारा मराठी भाषा संचालनालयाचे भाषा संचालक अरुण गिते यांनी मनपा प्रशासनाला दिलाय....महापालिकेत मराठी भाषा प्रचार, प्रसार व संवर्धन मार्गदर्शन कार्यशाळेत संचालक श्री. गिते बोलत होते. यावेळी सहायक भाषा संचालक चिंतामण वसावे भाषा संचालनालयाचे अधीक्षक सुनील शिरसाट, मंगेश लोखंडे, मनपाचे प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, सहायक उपायुक्त रमेश बहिरम आदी उपस्थित होते. यावेळी गिते यांनी आगामी काळात शासनामार्फत अधिकारी व कर्मचाऱ्यांना मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्याची योजना राबविण्यात येणार आहे...
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 18, 2026 03:06:15
Bhandara, Maharashtra:“25 हजार कोटींचा कुंभमेळा… पण सरकारी शाळांचा आवळला गळा”.... जिल्ह्यात 876 शिक्षकांची पदे रिक्त....32 शाळा तासिका शिक्षणाच्या खांद्यावर..... Anchor :- भंडारा जिल्ह्यातील शाळा शिक्षणाअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यात एकूण 793 शाळा असून तब्बल 876 शिक्षकांची पदे रिक्व्त आहेत. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जात असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. शिक्षणाचा हक्क कायदा असताना विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. VO :- “25 हजार कोटींचा कुंभमेळा… पण सरकारी शाळांचा आवळला गळा” अशी संतप्त प्रतिक्रिया पालकांमधून व्यक्त होत आहे. भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक व माध्यमिक अशा 761 शाळा, तसेच 32 हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालये मिळून एकूण 793 शाळा कार्यरत आहेत. या शाळांमधून जिल्ह्यातील मध्यम व गरीब कुटुुंबातील सुमारे 70 ते 75 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा 2009 आणि 2011 च्या नियमांनुसार प्रत्येक बालकाला दर्जेदार व सक्तीचे शिक्षण देणे बंधनकारक आहे. मात्र प्रत्यक्षात भंडारा जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. चार महिन्यांपूर्वी पवित्र पोर्टलद्वारे काही शिक्षक भरती करण्यात आली असली, तरी ती अत्यल्प ठरली आहे. सध्या जिल्हा परिषद शाळांमध्ये तब्बल 876 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. 32 शाळांमध्ये तर कायमस्वरूपी शिक्षकच नाहीत. तिथे तासिका शिक्षकांच्या भरवशावर शिक्षण सुरू आहे. अनेक ठिकाणी एकाच शिक्षकावर दोन ते तीन वर्गांची जबाबदारी आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत असून त्यांचा सर्वांगीण विकास खुंटत आहे. शिक्षकांच्या कमतरतेमुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि मूलभूत कौशल्य विकास यावर परिणाम होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद शाळाच शिक्षणाचा मुख्य आधार असताना या शाळा अखेरची घटका मोजत असल्याचे चित्र आहे. VO :- जिल्ह्यात शाळेत शिक्षकच नाही, तासिका शिक्षकांवर शाळा टिकून आहे. त्यामुळे एकीकडे कुंभमेळा मध्ये खर्च करायला कोट्यवधी रुपये उधळले जाणार आहेत. मात्र शिक्षणमंत्री दादा भुसे यांना जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक भरती करण्यासाठी फंड नाही... जिल्हा परिषद शाळा असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी कसाबसा शिक्षणाचे धडे घेत आहे. म्हणून शिक्षकाअभावी शाळा बंद झाल्या तर गोर गरिबांची लेकरे कशी शिक्षण घेणार हा खरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे... BYTE :- संजय मते, सामाजिक कार्यकर्ते BYTE :- रवींद्र सोनटक्के, शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद भंडारा VO :- शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत हक्क आहे. मात्र शिक्षक भरतीचा प्रश्न न सुटल्यास भंडारा जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांचे स्वप्न अधांतरी राहण्याची भीती आहे. आता प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार ka, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 18, 2026 03:02:36
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 18, 2026 02:32:26
Kalyan, Maharashtra:डोंबिवली सागांव अग्नीकांडाचा मोठा खुलासा! ‘पार्किंगला आग जाणीवपूर्वक’ — पोलिसांनी CCTVच्या आधारे लवेश पार्टे नावाच्या आरोपीला केली अटकेत; २९ दुचाकी जळाल्या, ५ जखमी डोंबिवली सागांव येथील रविकिरण सोसायटीच्या राज अर्पाटमेंटच्या पार्किंगमध्ये पहाटे सव्वा चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत पाच जण जखमी झाले होते.यात एका महिलेची प्रकृत�ी चिंताजनक आहे. महिलेची दोन मुले देखील जखमी झाली आहेत. अग्नीशमन दलाने आग विझविली. मात्र या आगीत पार्किंगमधील २९ दुचाकी जळून खाक झाल्या. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करीत लगेच तपास सुरु केला. इमारतीच्या पार्किंगमध्ये असलेल्या सीसीटीव्हीचे फूटेज पोलिसांनी तपासले. सीसीटीव्हीत एक तरुण पार्किंगच्या कचरा पेटीत काही तरी टाकतो आहे. त्यानंतर काही सेंकदातच पार्किंग आग लागली. लवेस पार्टे या तरुणाला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याला कल्याण न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. लवेशने घरातून कोणती वस्तू आणून कचरा पेटीत टाकली ? त्याुळे आग लागली. त्यात पाच जण गंभीररित्या जखमी झाले. याचा तपास पोलिस करीत आहेत.
0
comment0
Report
Advertisement
Back to top