icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

चिपळूण-रत्नागिरी में कांग्रेस का आंदोलन; शिक्षा मंत्री व गृह मंत्री के इस्तीफे की मांग

Ratnagiri, Maharashtra:चिपळूण-रत्नागिरी NEET पेपरफुटी अन् दडपशाहीविरोधात चिपळूणात काँग्रेसचे तीव्र आंदोलन; शिक्षणमंत्री व गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी! शिक्षण व्यवस्थेतील गोंधळ, NEET पेपरफुटी आणि आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये काँग्रेसच्या वतीने सायंकाळी जोरदार आंदोलन करण्यात आलं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अटकेचा तीव्र निषेध करत गृहमंत्री अमित शाह यांनीही राजीनामा द्यावा, या मागणीसाठी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरत निषेधाच्या जोरदार घोषणाही देण्यात आल्या।
0
0
Report

गर्भवती की दीड किलोमीटर स्ट्रेचर यात्रा: गडचिरोली में स्वास्थ्यकर्मियों ने बचाई जान

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील दुर्गम کوئیंदूळ गावात प्रसूतीवेदना सुरू झालेल्या गर्भवती महिलेला रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना तब्बल दीड किलोमीटर स्ट्रेचरवरून नेण्याची वेळ आली. पक्का रस्ता आणि वाहतुकीची सुविधा नसल्यामुळे घडलेल्या या घटनेने दुर्गम भागातील आरोग्य सुविधांची मर्यादा पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. मात्र, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे संबंधित महिलेची सुरक्षित प्रसूती झाली असून माता आणि नवजात बालिका दोघींची प्रकृती स्थिर आहे. कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील कोईंदूळ गावातील पुष्पा सुनील परसा (३०) यांना सोमवारी सकाळी प्रसूतीवेदना सुरू झाल्यानंतर आरोग्य पथक तातडीने गावात दाखल झाले. मात्र, गावापर्यंत पक्का रस्ता नसल्याने तसेच वाटेत नाला असल्यामुळे रुग्णवाहिका थेट पोहोचू शकली नाही. परिणामी आरोग्य कर्मचाऱ्यांनी पुष्पा परसा यांना स्ट्रेचरवरून दीड किलोमीटर अंतर पार करून रुग्णवाहिकेपर्यंत आणले. त्यानंतर त्यांना कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे त्यांची सुखरूप प्रसूती झाली आणि त्यांनी एका मुलीला जन्म दिला. पुढील उपचारासाठी त्यांना गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयात हलवण्यात आले आहे. कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील कोईंदूळ, रेकनार, गडदापल्ली आणि गुंमडी ही चार आदिवासीबहुल गावे पावसाळ्यात अक्षरशः संपर्कविहीन होतात. कसनसूर किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी ग्रामस्थांना दोन मोठे आणि तीन लहान असे एकूण पाच नाले पार करावे लागतात. मुसळधार पावसात हे नाले दुथडी भरून वाहू लागल्याने या गावांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटतो आणि आरोग्य सेवांसह दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होतो.
0
0
Report
Advertisement

सरकार के दखल से छात्रों के आंदोलन पर लोकतंत्र खतरे में: जाधव का आरोप

Ratnagiri, Maharashtra:चिपळूण - रत्नागिरी.. भास्कर जाधव यांचा सरकारवर थेट हल्ला: लोकशाही आणि संविधान धोक्यात; विद्यार्थ्यांना दहशतवादी ठरवणारे सरकार अहंकारी.. विद्यार्थ्यांचे शांततापूर्ण आंदोलन.. जंतर-मंतरवर आंदोलन करणारी मुले या देशाची भावी पिढी होती. त्यांनी कोणताही कायदा हातात घेतला नव्हता किंवा दहशतवादी कृत्य केले नव्हते.. सरकारकडून चिथावणी आणि उचकवाउचकवी.. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना उकसवण्याचे आणि चिथावणी देण्याचे काम थेट सरकारनेच केले.. चर्चेचा मार्ग नाकारला.. लोकशाहीचा मुख्य आत्मा 'चर्चा' हा आहे, मात्र सरकारने विद्यार्थ्यांशी कोणतीही चर्चा न करता हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला.. पोलिसांचा गैरवापर आणि दगड भरलेले डंपर.. गंभीर आरोप करताना जाधव म्हणाले की, आंदोलनाच्या ठिकाणी नेमप्लेट आणि युनिफॉर्म नसलेले पोलीस तैनात करण्यात आले होते. पोलिसांना दगड भरलेले डंपर पुरवण्याचे काम राज्यकर्त्यांनीच केले.. राज्यकर्त्यांचा अहंकार.. 'आम्ही ठरवू ते धोरण आणि आम्ही बांधू ते तोरण' असा अहंकार सध्याच्या राज्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे. न्यायव्यवस्था व प्रशासनावर टीका.. कोर्टाच्या निर्णयामुळे राज्यकर्त्यांना प्रेरणा मिळत आहे.सध्या न्यायव्यवस्था कोणाची तरी बटीक झाल्यासारखी आणि प्रशासन जुलमी कारभार करणाऱ्या गुंडांसारखे वागत आहे.. संविधान आणि लोकशाही धोक्यात.. देशातील लोकशाही आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सध्या पूर्णपणे धोक्यात आले आहे.. अपयश लपवण्यासाठी विद्यार्थ्यांना 'आतंकवादी' लेबल.. हे आंदोलक आतंकवादी, नक्षलवादी की विदेशी गुंड होते हे शोधायला सरकारला २०-२१ दिवस लागले का? स्वतःचे अपयश लपवण्यासाठी सरकार विद्यार्थ्यांवर दहशतवादी असल्याचा ठपका ठेवत आहे.. सरकार तात्काळ बदलण्याची मागणी.. मारहाण करण्यापूर्वी सरकारने चर्चा का केली नाही? हे सरकार अत्यंत अहंकारी झाले असून ते तात्काळ बदलले पाहिजे. मोदींना असं वाटतंय मी म्हणजे विश्वगुरु..
0
0
Report

रामदास कदम की मजाकिया टिप्पणी से उद्धव ठाकरे के दिल्ली दौर में हलचल

Ratnagiri, Maharashtra:खेड - रत्नागिरी.. उद्धव ठाकरेंच्या जंतरमंतर आंदोलनातील उपस्थितीवर रामदास कदमांची मिश्किल टीका;बाळासाहेबांच्या विचारांवर भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान.. *दिल्ली दौऱ्यावर मिश्किल टोला..* शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या जंतरमंतरवरील आंदोलनातील सहभागावर मिश्किल शब्दांत टीका केली.. *राजकीय आयुष्यातील पहिलेच आंदोलन..* उद्धव ठाकरे यांच्या राजकीय प्रवासात ते प्रथमच एखाद्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले,असे म्हणत कदमांनी चिमटा काढला.. *'दिल्ली तुम्ही सांभाळा...'* राहুল गांधींना उद्धव ठाकाकरेंनी दिलेल्या पाठिंब्यावर प्रश्न उपस्थित करत, "दिल्ली तुम्ही सांभाळा, महाराष्ट्र आम्ही सांभाळतो," असा टोला रामदास कदम यांनी लगावला.. *विचारसरणीवर स्पष्टतेची मागणी..* राहुल गांधींना पाठिंबा देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी ते सहमत आहेत की नाही,यावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करण्यात आली.. *राम मंदिर मुद्द्यावरून आव्हान..* प्रभू श्रीराम मंदिरातील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलण्याआधी उद्धव ठाकरेंनी स्वतःचा नैतिक अधिकार सिद्ध करावा, असे कदम म्हणाले.. *राजकीय संघर्ष तीव्र होणार..* उद्धव ठाकरे यांच्या या दिल्ली दौऱ्यामुळे महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध रंगण्याची शक्यता आहे..
0
0
Report
Advertisement

अण्णा हजारे कल अहिल्यानगर वाडिया पार्क गांधी स्मारक पर मौन प्रदर्शन करेंगे

Ahilyanagar, Maharashtra:ANC- दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उद्या सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत अहिल्यानगरच्या वाडिया पार्क येथील गांधी स्मारक येथे मौन आंदोलन करणार आहेत. सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधऊन प्रश्न सोडवावेत अशी अण्णा हजारे यांची भूमिका आहे. लोकशाहीत संवादाऐवजी दडपशाहीचा मार्ग स्विकारल्याने अण्णा हजारेांनी चिंता व्यक्त केली आहे. या आंदोलनस्थळाला प्रतिकात्मक स्वरूपात "नगरचे जंतर मंतर" असे नाव देण्यात येणार आहे. या आंदोलनाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
0
0
Report

कोपरखैरणे सेक्टर-19 में तलवार-चॉपर के डर से जानलेवा हमला; एक गिरफ्तार, दूसरा फरार

Navi Mumbai, Maharashtra:कोपरखैरणे सेक्टर-19 में दो युवकों ने तलवार और चॉपर का डंडा दिखाकर एक युवक पर जानलेवा हमला किया। इस हमले में विवाद मिटाने आई पीड़ित परिवार की माँ पर भी डाँककर हाथापाई हुई। मामले में कोपरखैरणे पुलिस थाने में मामला दर्ज किया गया है और एक आरोपी को गिरफ्तार किया गया है जबकि दूसरा आरोपी अभी फरार है। घर के पास बैठने को नहीं कहने पर गुस्से में यह हमला किया गया और मध्यस्थ के तौर पर आई पीड़ित की माँ के सिर में पत्थर लगने से गंभीर चोट आई। इसके अलावा आरोपी तलवार लेकर घूमते हुए इलाके में दहशत फैला रहे थे।
0
0
Report

चंद्रपूर में बारिश में कांग्रेस ने जंतर मंतर प्रकरण पर प्रदर्शन, राजीनामा की मांग

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर में बारिश में कांग्रेस ने जंतर मंतर प्रकरण पर प्रदर्शन, राजीनामा की मागन चंद्रपूरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी भर पावसात मुख्य गांधी चौकात केले जंतर मंतर प्रकरणाविरोधात आंदोलन, पंतप्रधान, गृहमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांचा मागितला राजीनामा अँकर: चंद्रपूरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी भर पावसात मुख्य गांधी चौकात केले जंतर मंतर प्रकरण आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराविरोधात आंदोलन केले. जोरदार घोषणाबाजीने काँग्रेस कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. पंतप्रधान, गृहमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांचा काँग्रेसने राजीनामा मागितला. देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने होत असल्याची टीका काँग्रेसने केली.
0
0
Report
Advertisement

नागभीड़ तालुक़े में घोड़ाझरी उपकालवा फूट गया, किसानों को भारी नुकसान

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड तालुक्यात घोडाझरी उपकालवा फुटला, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान अनेक वर्षांच्या प्रतीक्षा केल्यानंतर नागभीड तालुक्यात ब्रह्मपुरी, नागभीड आणि सिंदेवाही तालुक्यात जाणाऱ्या घोडाझरी उपकालव्यात प्रथमच जलसिंचनासाठी पाणी सोडण्यात आले होते. परंतु, पाणी सोडण्यात आल्यानंतरच तळोधी परिसरातील ओवाळा गावाजवळ कालव्याला मोठे भगदड पडून ते फुटले. या दुर्घटनेमुळे पाणी जलदगतीने बाहेर पडून जवळील शेतात प्रवेश करावे लागले. सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत तब्बल तीन तास पाण्याचा प्रवाह चालू रहाण्याने धानपिकांसह इतर पिकांनाही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळाली. या घटनेमुळे पाण्यााची प्रचंड नासाडी झाली असून यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे शेतकरी आधीच संकटात होते. कालव्याच्या निकृष्ट बांधकामामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले असल्याचे बोलले जात आहे. शासनाने तातडीने या प्रकरणाची चौकशी करून मदत देण्याची मागणी झाली आहे. (स्टेशन: चंद्रपूर)
0
0
Report

नवी मुंबई महापालिका: सोमनाथ केकाण की कार्यमुक्ति महासभेत मंजूर

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महानगरपालिकेचे नगररचनाकार सोमनाथ केकाण यांना कार्यमुक्त करण्याचा ठराव आज महासभेत मंजूर करण्यात आला. तर अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांच्यावर कार्यमुक्त करण्याची मागणी करत विरोधकांनी सभागृहात ठिय्या मांडला होता. वाशीतील नैवेद्य इमारतीला नियमबाह्य पद्धतीने पूर्णत्व प्रमाणपत्र (CC) आणि भोगवटा प्रमाणपत्र (OC) दिल्याचा ठपका सोमनाथ केकाण यांच्यावर ठेवण्यात आला. या प्रकरणातील चौकशीनंतर त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आला. त्यामुळे सोमनाथ केकाण यांना कार्यमुक्त करून त्यांच्या मूळ पदावर पाठवण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आल्याची माहिती महापौर सुजाता पाटील यांनी दिली. तसेच, नगररचना विभागात त्यांच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आलेल्या इतर प्रकरणांचीही चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती महापौर सुजाता पाटील यांनी दिली. तर चुकीच्या पद्धतीने पदावर आलेले अग्निशमन अधिकारी पुरषोत्तम जाधव याच्यावर कारवाई न करता केकाणी यांच्यावर कारवाई केली असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे.
0
0
Report
Advertisement
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top