icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

रत्नागिरी में सातबारा फेरफार के लिए 10 हजार रिश्वत लेते मंडल अधिकारी गिरफ्तार

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी ब्रेकिंग: सातबारा फेरफारासाठी १० हजारांची लाच घेणारा मंडळ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.. अँकर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण महसूल विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी धडक कारवाई केली आहे.. सातबारा फेरफार नोंदीसाठी तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी उमेश राजेशिर्के यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.. पाग पॉवर हाऊस परिसरातील एका हॉटेलमध्ये रचलेल्या या सापळ्यात ही कारवाई करण्यात आली असून,या धडक कारवाईमुळे संपूर्ण महसूल वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे..
0
0
Report

चंद्रपुर में शिक्षकों ने FBO नियम के विरोध में निर्णय के खिलाफ प्रदर्शन किया

Chandrapur, Maharashtra:टायटल:---मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत शाळेतील मुख्याध्यापकोंना Food Business Operator (FBO) म्हणून नोंदणी/परवाना घेण्याच्या निर्णय रद्द करा, चंद्रपूरात उबाठा शिक्षक सेनेची राज्य सरकार विरोधात जिल्हा परिषदेसमोर निदर्शने अँकर:-- शाळांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनाबाबत मुख्याध्यापकोंना Food Business Operator (FBO) म्हणून नोंदणी/परवाना घेण्याची जबाबदारी देण्याचा निर्णय शासनाच्या स्तरावर घेण्यात आला आहे. मुख्याध्यापकांवर अशा प्रकारची अतिरिक्त जबाबदारी टाकणे योग्य नसल्याचे स्पष्ट करत चंद्रपूर जिल्हा परिषदेसमोर उबाठा शिक्षक सेनेच्या वतीने निदर्शन आंदोलन करण्यात आले. शैक्षणिक गुणवत्ता़, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित, शिक्षकांचे मार्गदर्शन, प्रशासकीय कामकाज तसेच शाळेच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी मुख्याध्यापक पार पाडत असतात. त्यांच्यावर अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत FBO म्हणून नोंदणी, परवाना, अन्नाची गुणवत्ता, नोंदी व त्यासंबंधीच्या कायदेशीर जबाबदाऱ्या सोपविल्यास त्यांच्या मूळ शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजावर अतिरिक्त ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. मध्यान्ह भोजनाची प्रत्यक्ष स्वयंपाक, अन्न तयार करणे, साठवणूक, वितरण व संबंधित दैनंदिन प्रक्रिया ही मुख्याध्यापकांची मूलभूत शैक्षणिक जबाबदारी नाही. त्यामुळे या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर व तांत्रिक जबाबदाऱ्या मुख्याध्यापकांवर टाकणे अन्यायकारक ठरू शकते. शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना सुरक्षित, गुणवत्तापूर्ण व पौष्टिक आहार उपलब्ध करून देणे हा आहे. हा निर्णय रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय.
0
0
Report

रुग्णालय में एक्सपायर्ड सलाईन चढ़ाने का आरोप; मरीज की हालत चिंताजनक, परिजन प्रदर्शन

Navi Mumbai, Maharashtra:रुग्णाला एक्सपायरी झालेली सलाईन चढवल्याचा गंभीर आरोप. रुग्णाला एक्सपायर झालेले सलाईन चढवल्याने रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे. 50 वर्षीय गोपीराम खडसे असे रुग्णाचे नाव. रुग्णालयात नातेवाईकांचे आणि हिंदुत्ववादी संघटनांचे ठिय्या आंदोलन. संतप्त नातेवाईकांनी वैद्यकीय अधीक्षकांच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन सुरु केले. रुग्णाला फोर्टिस रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले असून प्रकृती चिंताजनक आहे. संबंधित डॉक्टर, सिस्टर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांची.
0
0
Report
Advertisement

बुलढाणा जयस्तंभ चौक पर महाले ने गाने पर डांस; धनुष संकेत चर्चा

Buldhana, Maharashtra:बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात ‘बाप तो बाप रहेगा’ गाण्यावर श्वेता महालेचा ठेका.. धनुष्यबाण दाखवत कुणाला खुणावले?.. बुलढाणा मधील माहायुती मध्ये मिठाचा खडा.. भाजपच्या आमदार श्वेता महाले यांच्या पती आणि मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त मोठं शक्तिप्रदर्शन करण्यात आलं.. यावेळी निघालेल्या रॅली दरम्यान भाजपाच्या आमदार श्वेता महाले यांनी ‘बाप तो बाप रहेगा’ या गाण्यावर ठेका धरला.. विशेष म्हणजे, याचवेळी त्यांनी धनुष्यबाणाचे चिन्ह दाखवत नेमकं कुणाला खुणावलं? , याची चर्चा आता बुलढाणा शहरात रंगली आहे.. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजपच्या आमदार श्वेता महाले यांच्यात राजकीय कुरघोडी सुरू असल्याचं चित्र आहे.. त्यातच आता रॅलीतील या कृतीमुळे बुलढाण्यात महायुतीत ‘ऑल इज वेल’ आहे का? असा प्रश्न पडला आहे ..
0
0
Report

बुलढ़ाणा महायुती में सियासी घमासान: श्वेता महाले के धनुष-बाण पर चढ़ा सवाल

Buldhana, Maharashtra:स्टोरी : बुलढाण्यात महायुतीत मिठाचा खडा? हाेडलाईन : ‘बाप तो बाप रहेगा’ गाण्यावर श्वेता महालेंचा ठेका... धनुष्यबाण दाखवत कुणाला खुणावलं? ANCHOR :bulढाण्यात भाजपच्या आमदार श्वेता महाले यांचे पती आणि मुख्यमंत्री कार्यालयातील खाजगी सचिव विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त मोठं शक्तिप्रदर्शन करण्यात आलं... मात्र, याच कार्यक्रमानंतर बुलढाण्यात महायुतीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय... रॅलीदरम्यान ‘बाप तो बाप रहेगा’ या गाण्यावर आमदार श्वета महाले यांनी ठेका धरला... विशेष म्हणजे याचवेळी त्यांनी धनुष्यबाणाचं चिन्ह दाखवत नेमकं कुणाला खुणावलं, याची चर्चा रंगली आहे... त्यातच कार्यक्रमस्थळी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर श्वेता महाले यांनी थेट शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना ओपन चॅलेंज दिलंय... “हिम्मत असेल तर समोरासमोर येऊन लढा, बुजदिलासारखं काम करू नका,” असं म्हणत त्यांनी गायकवाडांवर निशाणा साधलाय... पाहूया, बुलढाण्यात महायुतीत नेमकं काय सुरू आहे... --- VO-1 मुख्यमंत्री कार्यालयातील खाजगी सचिव विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा शहरात मोठं शक्तिप्रदर्शन करण्यात आलं... रॅלי, कार्यकर्त्यांची गर्दी आणि घोषणांनी शहर दणाणून गेलं... याच रॅलीदरम्यान भाजप आमदार श्वेता महाले यांनी ‘बाप तो बाप रहेगा’ या गाण्यावर ठेका धरला... मात्र, त्यानंतर त्यांच्या एका कृतीने राजकीय चर्चेला आणखी उधाण आलं... धनुष्यबाणाचं चिन्ह दाखवत त्यांनी नेमकं कुणाला खुणावलं? हा सवाल आता बुलढाण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलाय... VO-2 गेल्या काही दिवसांपासून बुलढाण्यात भाजपच्या आमदार श्वेता महाले आणि शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यात राजकीय कुरघोडी सुरू असल्याचं चित्र आहे... त्यातच विद्याधर महाले यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमस्थळी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर श्वेका महाले आक्रमक झाल्या... हिम्मत असेल तर समोरासमोर येऊन लढा, बुजदिलासारखे काम करू नका, असा थेट इशाराच त्यांनी दिला... बुलढाण्यात हुकूमशाही चालणार नाही... बुलढाणेकरांनी घाबरू नये, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असं म्हणत महाले यांनी आक्रमक भूमिका घेतली... साउंडबाईट - श्वेता महाले आमदार भाजपा Vo 3 - विशेष म्हणजे, पंधरा दिवसांपूर्वी आमदार संजय गायकवाड यांच्या सुपुत्र कुणाल गायकवाड यांचाही चिखलीत शक्तिप्रदर्शन करत वाढदिवस साजरा करण्यात आला होता... आता विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्तही बुलढाण्यात मोठं शक्तिप्रदर्शन झालं... यावर तुपकरांनी थेट नेत्यांच्या राजकीय संस्कृतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय... ‘अशा प्रकारे प्रदर्शन करायचं असेल, तर तरुणांनी आदर्श कुणाचा घ्यायचा?’ असा सवाल त्यांनी केलाय... राज्यातील शेतकरी संकटात असताना श्रीमंतीचं प्रदर्शन करून राजकारण्यांनी आपला हट्ट पुरवणं योग्य नाही... सामान्य जनतेला आता या सगळ्याचा वीट आलाय, अशी टीकाही तुपकरांनी केलीय... Byte - रविकांत तुपकर ,शेतकरी नेते OUTRO एकीकडे वाढदिवसानिमित्त शक्तिप्रदर्शन... दुसरीकडे ‘बाप तो बाप रहेगा’ गाण्यावर ठेका... आणि त्यानंतर धनुष्यबाणाचं चिन्ह दाखवत राजकीय संकेत... त्यातच आमदार संजय गायकवाड यांना दिलेलं थेट ओपन चॅलेंज... त्यामुळे बुलढाण्यात भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय... महायुतीत ‘ऑल इज वेल’ आहे का? की बुलढाण्यात महायुतीच्या संसारात खरंच मिठाचा खडा पडला आहे? याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय... मयुर निकम झी 24 तास बुलढाणा....
0
0
Report
Advertisement

सुधाकर घारे की गिरफ्तारी के बाद खालापूर में राजनीति गर्म, महायलगार मोर्चे पर संशय

Chendhare, Maharashtra:राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांना अटक ....... महायलगार मोर्चाआधी खालापूर पोलिसांची कारवाई ........... सर्वपक्षीय नेत्यांसह कार्यकर्ते आक्रमक रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांना पोलिसांनी अटक केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. खालापूर तालुक्यातील गोदरेज आणि टाटा स्टील कंपनीत स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळावा, या मागणीसाठी उद्या सर्वपक्षीय महायलगार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर चर्चेसाठी खालापूर पोलीस ठाण्यात आलेल्या सुधाकर घारे यांच्यासह संतोष बैलमारे, सुरेश पाटील, सागर जाधव, अंकित साखरे, कैलास गायकवाड, रवी रोकडे यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी अटक केली. नेत्यांना पोलीस वाहनातून नेल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी पोलीस वाहने अडवून काही काळ मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेकडे जाणारा जोडरस्ताही रोखला. नेत्यांच्या अटकेमुळे उद्याच्या महायलगार मोर्चाबाबत अब प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
0
0
Report

Washim के Gen Z युवकों ने 10 करोड़ रुपए जुटाने का अभियान शुरू किया

Washim, Maharashtra:वाशीम: अँकर: पुण्याच्या चिमुकल्या हृदय दरेकरच्या उपचारासाठी तब्बल १० कोटी रुपयांची गरज आहे. त्याच्या मदतीसाठी राज्यभर अभियान सुरू असताना, वाशिममधील ‘Gen Z’ युवकही मदतीसाठी पुढे आले आहेत. हातात पोस्टर घेऊन हे युवक वाशिम शहरातील चौकाचौकात उभे राहत नागरिकांना हृदयच्या उपचारासाठी मदत करण्याचं आवाहन करत आहेत. सोशल मीडियासोबतच शहरात अनेक ठिकाणी मदतीचे बॅनरही लावण्यात आले आहेत. केवळ आंदोलन आणि सोशल मीडियापुरते मर्यादित न राहता, गरजूंसाठी संवेदनशीलपणे पुढे येण्याची भावना या युवकांनी दाखवून दिली आहे. बाईट : कृष्णा कदम, वाशिम
0
0
Report

कोराड़ी विद्युत केंद्र में ओव्हरहॉलिंग हादसे में कर्मचारी गंभीर घायल, मौत की पुष्टि

Nagpur, Maharashtra:नागपूर नागपूर के कोराडी विद्युत केंद्र में ओव्हरहॉलिंग के काम के दौरान बड़ा हादसा हुआ। 660 मेगावॉट के यूनिट क्रमांक 10 में बॉयलर विभाग में कोईल निकालने का काम चल रहा था। इसी समय लोहे की रॅक अचानक नीचे गिर गई और कर्मचारी मारुती मेश्राम के ऊपर आ पड़ी, जिससे वह गंभीर रूप से घायल हो गए। घायल को अस्पताल पहुँचाने के लिए एम्बुलेंस बुलाई गई, लेकिन मार्ग के दौरान उनकी मृत्यु हो गई। घटना की जानकारी मिलते ही कोराडी पुलिस घटनास्थल और मेयो अस्पताल पहुँची और घटना की जांच शुरू कर दी। हादसे के कारण और सुरक्षा व्यवस्था के बारे में पुलिस जांच कर रही है।
0
0
Report
Advertisement

शिवसेना ने स्मार्ट मीटर के विरोध में वैभव नाईक के नेतृत्व में मोर्चा निकाला

Oras Bk., Maharashtra:वैभववाडीत स्मार्ट मीटर सक्तीविरोधात आणि वाढत्या महागाईच्या निषेधार्थ शिवसेना उबाठा तर्फे मोर्चा काढण्यात आला. माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना कार्यालयातून निघालेला हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. त्यानंतर मोर्चा महावितरणच्या वैभववाडी कार्यालयावर नेण्यात आला. हातात बॅनर व फलक घेऊन कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. स्मार्ट मीटरची सक्ती थांबवणे, महागाईवर नियंत्रण आणणे, रेशनकार्ड धारकांना सुलभ धान्य वितरण करणे तसेच गणेशोत्सव काळात गँस पुरवठा सुरळीत ठेवणे आदी मागण्या प्रशासनामार्फत शासनापर्यंत पोहोचविण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.
0
0
Report

पाणी टंचाई विरोधात भाजपाचा भव्य मोर्चा: बारवी डॅम असूनही जल संकट कायम

Kalyan, Maharashtra:पाणीटंचाईविरोधात भारतीय जनता पक्षाचा भव्य पाणीबाणी मोर्चा, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २७ मधील पाथर्ली, गोग्रासवाडी, टिळकनगर व अंबिकानगर तसेच प्रभाग क्रमांक १९ मधील सागर्ली, एमआयडीसी, इंदिरा नगर व खांबालपाडा या परिसरातील तीव्र पाणीटंचाईच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य “पाणीबाणी मोर्चा” काढण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून या सर्व परिसरातील नागरिकांना प्रचंड पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर प्रश्नाबाबत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे अनेक वेळा पत्रव्यवहार केला. महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन या समस्येची माहिती देण्यात आली. तसेच पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधून संबंधित परिसरातील जलवाहिन्या व पाणीपुरवठा व्यवस्थेची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली. गोग्रासवाडी विभागासह संबंधित परिसरामध्ये पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थेची तपासणी करण्यात आली असली तरी, अद्यापही परिस्थितीमध्ये अपेक्षित सुधारणा झालेली नाही. आजही नागरिकांना अनियमित व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, गेल्या पंधरा वर्षांमध्ये या परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईची समस्या कधीही जाणवली नव्हती. मात्र, गेल्या महिन्याभरापासून नागरिकांना पाण्यासाठी अक्षरशः हाल सहन करावे लागत आहेत. आपल्या परिसराला ज्या बारवी धरणातून पाणीपुरवठा होतो, ते बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असतानाही नागरिकांना पुरेसा व नियमित पाणीपुरवठा मिळत नाही, ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे. बाईट, महेश पाटील, नगरसेवक भाजप,
0
0
Report
Advertisement

अकोला के उमरा ग्रामपंचायत में लाखों के कथित अपव्यय का मामला; जांच की मांग

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील उमरा ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि शासकीय आदेशांची अंमलबजावणी न केल्याप्रकरणी महाराष्ट्र विधानमंडळ पंचायत राज समितीकडे तक्रार करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीतील सन २०२१-२३ या कालावधीतील तत्कालीन सरपंच व सचिव यांनी लाखो रुपयांचा अपहार केल्याचा आरोप तक्रारदार राजेंद्र मावलकर यांनी केला आहे. या प्रकरणी अमरावती विभागीय आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिले असतानाही अद्याप संबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झालेली नसल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच, प्रकरणातील अपहाराची रक्कम वसूल करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. याप्रकरणी तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
0
0
Report

चित्रा वाघ ने राहुल गांधी पर निशाना साधकर पितृसत्ता पर सवाल ठोके

Ambernath, Maharashtra:पितृसत्ताकतेवर बोलण्याआधी राहुल गांधींनी घरात डोकवावं चित्रा वाघांचा हल्लाबोल प्रियंका गांधी सक्षम असूनही त्यांना मागे का ठेवलं चित्रा वाघांचा सोनिया गांधींना सवाल पितृसत्ताकतेचा सर्वात मोठा लाभार्थी राहुल गांधीच चित्रा वाघांचा घणाघात मुलीला मागे ठेवून मुलाला पुढे का केलं?चित्रा वाघांचा सोनिया गांधींना सवाल राहुल गांधींपेक्षा प्रियंका गांधी कणभर हुशार चित्रा वाघांचा गांधी कुटुंबावर निशाणा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात येऊन राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भूमीत राहुल गांधी पितृसत्ताकतेविरोधात बोलत असतील, तर त्यांनी आधी आपल्या पक्षातील आणि कुटुंबातील परिस्थितीकडे पाहावं, असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे. राहुल गांधींपेक्षा प्रियंका गांधी अधिक हुशार आणि सक्षम असल्याचं म्हणत, त्यांना राजकारणात मागे का ठेवण्यात आलं, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. व्हिओ : महाराष्ट्रात येऊन पितृसत्ताकतेची भाषा करणाऱ्या राहुल गांधींनी आधी आपल्या कुटुंबातील राजकारणाचा विचार करावा, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. राहुल गांधींपेक्षा प्रियंका गांधी कणभर अधिक हुशार आणि सक्षम आहेत, मग त्यांना राजकारणात मागे का ठेवण्यात आलं, असा थेट सवाल त्यांनी सोनिया गांधींना केला.प्रियंका गांधी यांच्यामध्ये क्षमता असतानाही त्यांना राजकारणात पुढे का आणलं नाही, असा प्रश्न उपस्थित करत चित्रा वाघ यांनी गांधी कुटुंबावर टीका केली. प्रियंका गांधी यांचं वयाच्या पंचविशीतच लग्न करून त्यांना सासरी पाठवण्यात आलं, असा दावा त्यांनी केला.पितृसत्ताक व्यवस्थेचा सर्वात मोठा लाभार्थी कोण असेल, तर तो स्वतः राहुल गांधी आहेत, अशी बोचरी टीकाही चित्रा वाघ यांनी केली. त्यामुळे सोनिया गांधींनी देशाला याचं उत्तर द्यावं की, मुलगी सक्षम असतानाही तिला मागे ठेवून मुलाला राजकारणात पुढे का केलं, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.
0
0
Report

मनसे के साथ युति नहीं तो भाजपा सत्ता से बाहर, महाराष्ट्र में राजनीतिक हलचल तेज

Kalyan, Maharashtra:सेनेने मनसेसोबत युति तोडली नाही तर भाजपा सत्तेतून बाहेर पडणार भाजपा कार्यकारणीत सर्व पदाधिकाऱ्यांचा झाला निर्णय पुण्यातील कॉलेजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो मनसे नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत हटवण्यात आला . यानंतर संबंध देशभरात भाजपाकडून याचा निषेध केला जातोय. दर्म्यान कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील महायुतीच्या राजकारणात तर मनसेवरून भाजप आणि शिवसेनेत संघर्ष पेटलाय. दोघांमध्ये काडीमोड होण्याची शक्यता वर्तवली जातीय.आज कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात उपमहापौरांच्या दालनात भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी शिवसेनेने मनसेशी युती तोडली नाही, तर भाजपा सत्तेतून बाहेर पडेल असा पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतलाय. दरम्यान अंतिम निर्णय हा भाजपा पक्ष श्रेष्ठ घेतील अशी माहिती भाजपा उपमहापौर राहुल दामले यांनी दिली.तर ही नाटकं आहेत, सत्तेपासून हे दूर राहू शकत नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी दिली.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top