icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सांगली में तिरंगा रैली: हजारों स्टूडेंट्स ने जंतर मंतर आंदोलन का समर्थन किया

Sangli, Maharashtra:दिल्लीतील जंतरमंतर आंदोलनाला पाठिंबा म्हणून सांगलीत देखील विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आले आहे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात आला. विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तिरंगा मोर्चा काढण्यात आला,ज्या मध्ये हजारोच्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होती. हातात संविधान,तिरंगे झेंडे ,डॉ. आंबेडकर व भगतसिंह यांची प्रतिमा घेऊन जोरदार घोषणाबाजी करत काढलेल्या मोर्चाच्या माध्यमातून दिल्लीतल्या जंतरमंतर आंदोलनाला पाठिंबा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा द्यावा,अशी मागणी करण्यात आली.
0
0
Report

देवरुख के कलाकार ने ईंट से बनी रांगोळी में विठ्ठल की अनोखी कला दिखायी

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. तुळशीपत्र अन् मोरपिसानंतर आता भाजलेल्या विटेवर विठू माऊली! देवरुखच्या विलास रहाटे यांची अनोखी रांगोळी.. गळ्याखाली अषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यभरात विठ्ठल भक्तीचा उत्साह पाहायला मिळतोय.रत्नागिरीतील देवरुखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास रहाटे यांनी मात्र आपली विठ्ठलभक्ती एका अतिशय अनोख्या कलाकृतीतून व्यक्त केली आहे.. गेल्या काही वर्षांत तुळशीच्या पानावर, मोरपीसावर आणि पाण्याखाली विठ्ठलाची रांगोळी साकारणाऱ्या विलास रहाटे यांनी यंदा नदीकाठच्या मातीपासून एक छोटी वीट तयार केली.ही वीट भाजून पक्की केल्यानंतर,त्यावर अवघ्या एका तासात श्री पांडुरंगाची अतिशय मनमोहक आणि कलात्मक रांगोळी साकारली आहे.त्यांची ही आगळीवेगळी कलाकृती सध्या भाविकांचे आणि कलाप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे..
0
0
Report

रत्नागिरी के सावर्डे-डेरवण में बच्चों की डिंडी से आषाढी एकादशी की धूम

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. सावर्डे-डेरवण येथे चिमुकल्यांच्या दिंडीने विठूनामाचा गजर;एस व्ही जे सी टी महाविद्यालयात आषाढी एकादशी उत्साहात साजरी.. रत्नागिरीतील सावर्डे-डेरवण येथील एस व्ही जे सी टी महाविद्यालयात आषाढी एकादशीच्या निमित्ताने एक अनोखा भक्तिसोहळा पार पडला.लहान विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी,संत तुकाराम आणि वारकऱ्यांची सुरेख पारंपरिक वेशभूषा साकारत महाविद्यालय परिसरात टाळ-मृदुंगाच्या गजातात भव्य दिंडी काढली.या वेळी विद्यार्थ्यांनी घातलेल्या फुगड्या आणि विठूनामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भावभक्तीमय वातावरणात दुमदुमून गेला होता.
0
0
Report
Advertisement

शिर्डी में आषाढ़ी एकादशी पर 15 टन साबुदाणा खिचड़ी का महाप्रसाद, भक्तों की भारी भीड़

Shirdi, Maharashtra:सबका मालिक एक असा संदेश देणा-या साईबाबांच्या शिर्डीतही आषाढी एकादशीचा उत्साह दिसून आलाय. शिर्डी माझे पंढरपूर ही भावना घेऊन हजारो भाविक साईनगरीत दाखल झाले आहेत. आषाढी एकादशी निमित्ताने साईमंदिराला आकर्षक सजावट करत बाबांना तुळशीमाळेचा श्रृंगार करण्यात आलाय.. तर प्रसादालयात भाविकांसाठी खास 15 टनाची साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद बनवण्यात आलाय.साईदरबारी येणाऱ्या साईभक्तांसह शिर्डी पंचक्रोशीतील स्थानिक भाविक आवर्जुन या प्रसादरुपी खिचडीचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. साई संस्थांनच्या भोजनालयातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी
0
0
Report

कांग्रेस सत्याग्रह के बीच दावा: धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दें, बच्चों पर अत्याचार की जांच!

Nagpur, Maharashtra:नागपूर - नाना पटोले, काँग्रेस नेते - On काँग्रेस सत्याग्रह आंदोलन - गेल्या 12-13 वर्षात मोदी सरकारच्या विरोधात असलेला जनतेचा राग झेन झी च्या माध्यमातून पुढे आलेला आहे, आणि तो राग प्रामाणिकपणे आणि शांततेने शमवण्यापेक्षा होण्यापेक्षा सत्तेचा गैरवापर कसा केला जातो, म्हणजे जालियनवालाबाग पेक्षाही मोठी घटना करण्याचा प्रयत्न जंतरमंतरवर करणेचा प्रयत्न या लोकांनी केला - लहान मुलींचे कपडे फाडले, विनयभंग केला, एक मुलगी मरण पावली अशा पद्धतीची ही गोष्ट पुढे आली, मुलांना बेदम मारला, ही मुलं कुठल्याही राजकीय पक्षाची नव्हती, ते आपल्या अधिकाराची लढाई लढण्यासाठी आलेले होते - अशा परिस्थितीत सरकारने एक पाऊल पुढे जाऊन धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा करून घ्यायला पाहिजे होता, एका परीक्षेसाठी दहा लाखाचा खर्च कुटुंबियांना करावा लागतो आणि तो पेपर लिक झाल्याने अनेक मुला मुलींची भविष्य खराब झाले - 22 पेक्षा जणांनी आत्महत्या केली, देशातील पंतप्रधानांना यापूर्वी लहान मुलांनी आणि सार्वजनिक रित्या कधीही बोलल्या गेले नसेल ते जंतर-मंतरवर आपण पाहतो की हे मुलं मुली आपला राग व्यक्त करत आहेत - याला पॉलिटिकल धार द्यायची नव्हती नाहीतर म्हटलं असतं हे राजकीय आंदोलन आहे, म्हणून राहुलजी तिथे गेले नाही, tollersसाठी ही लढाई आम्ही लढू अशी भूमिका राहुलजींनी घेतली आणि आज देशभरात शांततेने कँडल मार्च- सत्याग्रह आंदोलन करतोय - On धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाही चर्चा - नरेंद्र मोदी यांच्या 2014 च्या पूर्वीचे भाषण आपण ऐकले, त्यात एक पेपर फुटीचा मुद्दा होता, तीन वेळचे पंतप्रधान तुम्ही झाला तर मग सुधारणा का केली नाही, आंदोलन सुरू असताना लोकसभेतून पळून जाता, 56 इंचीच्या सीना कुठे गेला - सोनम वांगचुक मध्यरात्री उपोषण सोडवता, मध्यरात्री पंतप्रधान सोशल मीडियावर बोलतात, लोकसभेत का बोलले नाही?, लोकांनी दिलेले सत्ता आहे पण भाजप बेईमानी ने मशीन मधून निवडून येते - On सोनम वांगचुक टीका - - त्यांना सोशल मीडियावर झेन झी मी काय बोलले त्याचं काय माहित नाही, काँग्रेस म्हणून आम्ही कुठलेही प्रतिक्रिया दिली नाही, त्यांच्या पत्नीने राहुल गांधी यांच्यावर टीका केली, राहुल गांधींच्या नेतृत्वात त्यांना आंदोलन करायचा होता तर आधीच सांगायला पाहिजे होता - On ठाकरे बंधू मोर्चा - - आमचा आंदोलन आज असल्यामुळे आज आम्ही त्यात व्यस्त आहोत, लोकांनी सगळ्या आंदोलनात जाऊन, जो पक्ष या मुलांच्या बाजूने उभा होतो आहेत त्यांच्याबरोबर सगळ्यांनी जावं - - हा राजकीय मुद्दा नाही हा देशाच्या भविष्याचा अजेंडा आहे त्यामुळे आज काँग्रेसचा आंदोलन देशभरात आहे त्यामुळे सगळ्यांनी त्यात सहभागी व्हावं - - अंधभक्त जे कोणी असतील भाजपचे त्यांनीही आजच्या काँग्रेसच्या आंदोलनास सहभागी व्हावा - On मोहन भागवत - - ते राम मंदिरात आज घोळात गुंतलेले त्यामुळे इतक्या उशिरा त्यांनी बोलावं हा चर्चेचा विषय आहे - - ते बोलतात तर इतका उशिरा का? सरकारचा रिमोट कंट्रोल तुम्ही आहात, पोरांचा जे नुकसान झालं पण तुम्ही इतके दिवस शांत का म्हणून राम मंदिराच्या चंदा आणि चंद्याच्या घोळा तुम्ही राहिला आहे त्यातून सिद्ध झाला आहे - On निर्मला सीतारामन - - महागाई आहे तर एक वेळा उपाशी राहा असं म्हणतात, देशाच्या अर्थमंत्री असलेल्या सितारामन या भगिनी आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की एका संविधानिक महत्त्वाच्या पदावर आहात - - नेटचा पेपर लीग झाल्यावर काय नुकसान झालं याची थोडी काळजी असते तर हे सगळं पाप त्याची वेळी संपायचा कसं याचा प्रयत्न केला असता - - निर्मला सिताराम यांच्या या वाक्यावर मुला मुलींनी sosyal मीडियावर काय प्रतिक्रिया दिल्यात ते पहा - On भाजप नेते आंदोलन वक्तव्य - - त्यांच्या या लाईनवर सोशल मीडियावर जा, तुम्हाला त्यांच्यावर काय करता ते परत कळतील, जे कोणी भाजपचे मोठे नेते असे वक्तव्य करत असतील तर आमच्याबरोबर जंतर-मंतरवर चला आणि मग असं बोलावं मग काय होतं ते बघावं - - भाजपच्या कुठल्याही नेत्यांनी अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देऊ नये असं माझं मत आहे, आज जे काही झेन झी ची मानसिकता बिघडलेली आहे ते नरेंद्र मोदी सरकारच्या पापामुळे आहे - - तीन वर्षाच्या निवडणुकीची वाट पाहण्यापेक्षा नेपाळ मध्ये जशी परिस्थिती झाली तशी परिस्थिती या देशात निर्माण होणे याची काळजी सरकारने घ्यावी - On उपद्रवी तत्व - - आताचे आंदोलन कार्य आहे सरकारने जाहीर केलं ते आतंकवादी आहेत त्यांना आतंकवादी सारखं ट्रीट केल्या जाईल, त्यामुळे मला असं वाटतं की या देशाच्या तरुणाईला आतंकवादी म्हणून हे किती मोठे पाप नरेंद्र मोदीचे सरकार आणि भाजप करताय - - सरकारचा विरोधात जो बोलतो आतंकवादी,शहरी नक्षलवादी, अण्णा हजारेंनी काँग्रेसच्या विरोधात आंदोलन केलं होतं पण काँग्रेसने कधी त्यांना आतंकवादी म्हणाले नाही - - हे आंदोलन फेसलेस आहे, स्वयंस्फूर्त मुलमुले येतात, मुलींची संख्या जास्त आहे आणि त्यामुळे आंदोलनाचे चेष्टा न करता या आंदोलनातला सकारात्मक मार्ग काढला गेला पाहिजे हे भूमिका आहे - On पीएम रील - - त्यांनी चुकीचा पाहिलं असेल, आपणही जा सोशल मीडियावर पाहिल्यावर ते पंतप्रधानांना काय काय बोलले तर मग आपल्याला कळेल, त्यामुळे मला असं वाटतं की जनमत हा जो भाग आहे याचा बीजेपीला काही देणं घेणं नाही - - हे आंदोलन टॉपवर आहे, हे जागतिक पातळीवर आहे, अमेरिका इंग्लड मध्ये झेन झी च्या सपोर्ट मध्ये आंदोलन झालं,त्यांचा राग कसा आहे हे देश बघतो आहे - - पाच वर्षांचा मालक समजू नका,जनतेसाठी काम करा,चौथ्या स्तंभाबद्दलचा राग समजला पाहिजे - On मुख्यमंत्री - - फडणवीस हे बुद्धीजीवी आहेत आणि आंदोलक हे आंदोलनजीवी आहेत, फडणवीस जेव्हा विरोधात होते तेव्हा ते काय होते मागच्या वळून बघितलं तर ते अशी प्रतिक्रिया देणार नाही, कदाचित मोदीजींना खुश करण्यासाठी ते असं बोलले असतील
0
0
Report
Advertisement

चंद्रपूर के विठ्ठल-रुक्मिणी मंदिर में आषाढ़ी एकादशी पर भक्तों की भीड़

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहराच्या पठाणपुरा भागातील विठ्ठल मंदिर शहराच्या स्थापित इतिहासातील महत्वाचे धार्मिक केंद्र आहे. आषाढ़ी एकाद्शीनिमित्ताने चंद्रपूरचे ऐतिहासिक विठ्ठल-रुक्मिणी मंदीर भाविकांच्या गर्दीने फुलले. मंदिर परिसरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, भजन व उत्सव आयोजित केले जातात. दरवर्षी आषाढी व कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने मंदिरातून भव्य रथयात्रा काढण्यात येते. हा रथ संपूर्ण शहरातून मार्गक्रमण करतो. हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने यात सहभागी होतात. ही परंपरा शेकडो वर्षांपासून अखंडितपणे सुरू असून, शहराच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. दरवर्षी भाविकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत आहे. उत्सव काळात कायदा-सुव्यवस्था, स्वच्छता, पाणीपुरवठा व इतर मूलभूत सुविधांची आवश्यकता भासते. म्हणूनच मंदिराला ‘ब’ वर्ग दर्जा मिळावा यासाठी शासन स्तरावर मागणी केली जात आहे. हे झाल्यास आर्थिक व प्रशासकीय सहाय्य उपलब्ध होऊन ही कामे अधिक सक्षमपणे करता येणार आहे.
0
0
Report

सोलापुर में आवारा कुत्ते के हमले से 9 साल के बच्चे की मौत

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - दोन महिन्यांपूर्वी भटक्या कुत्र्याचा बालकाला चावा, दुर्दैवी घटनेत रेबीजने 9 वर्षीय बालकाचा मृत्यू\n\n- सोलापूर शहरात भटक्या कुत्र्याच्या चाव्याने बालकाचा दुर्दैवी मृत्यू\n\n- दोन महिन्यांपूर्वी शहरातील भटक्या कुत्र्याने बालकाला घेतला होता चावा\n\n- समर्थ योगीराज स्वामी वय वर्षे 9 असे सदरच्या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या बालकाचे नाव\n\n- सदरच्या घटनेने शहरातील भवानी पेठ मोठी खळबळ\n\n- बालकाने कुत्रा चावल्याचा प्रकार घरात कोणालाच सांगितला नसल्याची धक्कादायक बाब समोर\n\n- मात्र अचानकपणे विचित्र वागणे, पाण्याला घाबरणे, श्वानाप्रमाणे गुरगुरणे असे अनेक विचित्र प्रकार त्याच्यात आढळल्याने त्याच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये सुरू होते उपचार\n\n- शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्याने सोलापुरकरांच्या वतीने महापालिकेवर व्यक्तण्यात येतोय तीव्र संताप\n\n- दुर्दैवी घटनेने संपूर्ण सोलापुर शहरात व्यक्त करण्यात येतेय हळहळ
0
0
Report

विलास घुले हत्या मामला: सांसद पुत्र का आरोपी से संपर्क सीडीआर में उजागर; भूख हड़ताल

Beed, Maharashtra:बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले खून प्रकरणात एक नवीन अपडेट आली आहे. विलास घुले याची हत्या होण्यापूर्वी एक मीटिंग झाली होती. यादरम्यान बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या पुत्र सौरभ सोनवणे याचा आरोपीसोबत फोनवरून संपर्क झाल्याचा आरोप रमेश घुले यांनी केला आहे. सीडीआर मध्ये स्पष्ट उल्लेख आल्याने घुले कुटुंंब आता आक्रमक झाले आहे. SIT च्याच अधिकाऱ्यांनी ही माहिती दिल्याचा दावा घुले कुटुंबाने केला आहे. सात दिवसात सौरभ सोनवणे यांच्या सीडीआर मधील संपर्कात आलेल्या आरोपींना अटक करा अन्यथा कुटुंबासह जिल्हाधिकारी कचेरीसमोर आमरण उपोषण करू असा इशारा घुले कुटुंंबाने निवेदनातून दिला आहे.
0
0
Report
Advertisement

लातूर में पेपरफुटी विरोधी मोर्चा: धर्मेंद्र प्रधान से इस्तीफे की मांग

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... पेपरफुटीविरोधात काँग्रेसचा लातुरात एल्गार मोर्चा... केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा... काँग्रेस नेते आ अमित देशमुख नीटसह विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या निषेधार्थ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या वतीने लातुरात एल्गार मोर्चा काढण्यात आला... काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात विद्यार्थी, तरुण आणि तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते... लातुर शहरातील ट्युशन एरिया ते जिल्हा क्रीडा संकुल असा हा मोर्चा काढण्यात आला...यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली...
0
0
Report

आषाढ़ी एकादशी पर साईं बाबा के दर्शन को शिर्डी-पंढरपूर में भक्तों का जनसैलाब

Shirdi, Maharashtra: आषाढ़ी एकादशीच्या दिवशी पंढरपूरात वारकऱ्यांचा जनसागर लोटलेला असताना "शिर्डी माझे पंढरपूर" म्हणत हजारो साईभक्त आज शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला दाखल झाले आहेत.. सकाळपासून साईबाबांच्या मंदिरात भाविकांनी अलोट गर्दी केली आहे.. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने साईबाबांचे मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आले असून साईबाबांच्या मुर्तीला कोट्यावधी रूपयांच्या आभुषणांसह तुळशीपत्राची माळ घालण्यात आली आहे.. साईबाबांच्या समाधीवर विठूरायाच्या प्रतीमेचे दर्शनही आज भाविकांना होत असून साईबाबांची शिर्डी पंढरपूरमय झाल्याचं बघायला मिळत आहे.
0
0
Report

अकोले तालुक्यात भारी वर्षा से भूस्खलन, घर मिट्टी में दफन; लोग सुरक्षित स्थानों पर

Shirdi, Maharashtra:Anc - अहिल्यानगर जिल्ह्यातील आदिवासी बहुल अकोले तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे.. अतिवृष्टीमुळे पांजरे येथील हरी शांताराम उघडे यांच्या घरावर मोठे भूस्खलन झाले.. या दुर्घटनेत त्यांचे संपूर्ण घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे.. माहिती मिळताच पोलिस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य राबवले.. या दुर्घटनेत मनुष्यहानी झाली नसली तरी, आठ शेळ्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या आहेत.. खबरदारीचा उपाय म्हणून हरी शांताराम उघडे यांच्यासह परिसरातील आणखी तीन कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Advertisement
Back to top