icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अमरावती में राणा दंपत्ति ने हनुमान चालीसा पढ़ा; ठाकरे गुट पर बड़ा हमला

Amravati, Maharashtra:हनुमान जयंती निमित्त अमरावतीत राणा दाम्पत्याचे चालिसा पठण; हनुमान चालीसा पठनाला विरोध केल्याने उद्धव ठाकरेंचा साम्राज्य उध्वस्त झालं - रवी राणा उद्धव ठाकरेंच्या सेनेचे 90 टक्के आमदार खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचा राणा यांचा गौप्यस्फोट आज हनुमान जयंती निमित्त अमरावतीच्या हनुमान गढीवर आमदार रवी राणा व माजी खासदार नवणीत राणा यांनी हनुमान चालीसाचे पठण केले आहे। अमरावतीच्या हनुमानगढी येथील 111 फुटाच्या हनुमानाच्या मूर्तीचे दर्शन घेऊन राणा दांपत्याने होम हवन करत पूजन केले आहे। यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन धांडे, अमरावतीचे उपमहापौर सचिन भेंडे यांच्यासह नगरसेवक व भावीक भक्त उपस्थित होते। यावेळी राणा दांपत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। हनुमान चालीसा पठनाला विरोध केल्यामुळेच उद्धव ठाकरेचा साम्राज्य उध्वस्त झालं; उद्धव ठाकरेना जर संकटातून मुक्त व्हायचं असेल तर त्यांनी घरामध्ये हनुमान चालीसा वाचावी आणि अमरावतीला हनुमान गढीवर यावं लागेल, तशी मी विनंती त्यांना करतो असे राणा दांपत्याने म्हटले आहे। तसेच उद्धव ठाकरेंच्या सेनेचे 90 टक्के आमदार आणि खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचा राणा यांनी गौप्यस्फोट केला आहे। तसेच येणाऱ्या काळात भाजप आणि काँग्रेस हे दोनच पक्ष राहील अशी परिस्थिती असल्याची भविष्यवाणी राणांनी केली आहे。
0
0
Report

सप्तशृंगी गढ़ पर कीर्तिध्वज फलक, लाखों भक्त जुटे

Malegaon, Maharashtra: विशाल मोरे, वणी सप्तशृंगी गड (नाशिक) - चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सप्तशृंग गडाच्या शिखरावर 'कीर्तीध्वज' फडकला -ध्वजाचे दर्शन घेण्यासाठी गडावर लाखो भाविकांनी गर्दी आदिशक्ती सप्तशृंग गडावर भगवतीच्या चैत्रोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेला आणि खान्देशवासीयांचे श्रद्धास्थान असलेला मानाचा 'कीर्तीध्वज' आज मध्यरात्री गडाच्या सर्वोच्च शिखरावर पारंपरिक पद्धतीने फडकविण्यात आला. हा सोहळा पाहण्यासाठी आणि ध्वजाचे दर्शन घेण्यासाठी गडावर लाखो भाविकांनी गर्दी केली होती. समुद्रसपाटीपासून सुमारे ४६५९ फूट उंचीवर असलेल्या या वणी गडाच्या शिखरावर जाण्यासाठी कोणताही निश्चित मार्ग नसतानाही ही परंपरा वर्षानुवर्षे अखंड सुरू आहे. सुमारे १३ मीटर लांबीचा भगवा ध्वज, त्याच मापाची काठी तसेच ३० ते ३५ किलो वजनाचे पूजा साहित्य घेऊन गवळी शिखर गाठतात. शिखरावर जुना ध्वज उतरवून नव्या ध्वजाचे विधिवत पूजन करून ध्वजारोहण करण्यात करतात. हा अद्भुत आणि धाडसी सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक गडावर उपस्थित होते。
0
0
Report

नांदेड दौरे पर अशोक चव्हाण पर तंज, हेमंत पाटील ने दिया जोरदार जवाब

Nanded-Waghala, Maharashtra:नांदेडला स्वागत है लेकिन आले तर काही देऊन तरी जावे अशी टीका खासदार अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिखे केली होती. चव्हाणांच्या या टिकेला सेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलंय. चव्हानांनी 72 वर्षात फक्त आलेला निधी फस्त केलाय, परत काही फस्त करायचं होतं म्हणून मागणी केली का असा पलटवार हेमंत पाटील यांनी केलाय. शेतकरी मेळाव्यानिमित्त मागच्या रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेड दौऱ्यावर आले होते. एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्यावरून माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी टोमणा मारला. नांदेडला विमानसेवा सुरु आहे, कोणीही येऊ शकतं, पण आले तर काही देऊन तरी जावे असा टोमणा अशोक चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. खा. अशोक चव्हाण यांच्या टोमण्याला शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले. 72 वर्षांपासून अशोक चव्हाण यांच्याकडे नांदेडची सत्ता असून त्यांनी फक्त घ्यायचे काम केले आहे. गोदावरी नदीसाठी आलेला 20 कोटीचा निधी फस्त करण्यात आला. अशोक चव्हानांकडे एक टोळके असून हे टोळके सर्व निधी फस्त करतं. जो काही निधी येतो तो या टोळक्याच्या माध्यमातून फस्त केला जातो. परत काही फस्त करायचं होतं म्हणून मगणी केलीका असा माझा त्यांना सवाल आहे म्हणत आमदार हेमंत पाटील निशाणा साधला. नांदेडमधील काय विकता येईल याच्यासाठी त्यांनी आतापर्यंत सत्ता मिळवली असा गंभीर आरोप पाटील यांनी केला. नांदेडला कितीही निधी आला तरी शहराची बकाल अवस्था आहे. कारभाऱ्याचं मुख्य लक्ष कामांचे टेंडर, ठेकेदार आणि टक्केवारी याच्या पलीकडे नाही असे पाटील म्हणाले. उपमुख्यमंत्र्यांच्या नांदेड दौऱ्यावरून अशोक चव्हानांनी कोपरखळी मरण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या या टिकेवर आमदार हेमंत पाटील यांनी जोरदार पलटवार केला. एकमेकांवरील या टिकेमुळे मात्र मित्रपक्षात जसा वरिष्ठ स्तरावर वाद अधूनमधून दिसून येतो तसा वाद स्थानिक स्तरावरही धूमसत आहे हे दिसून आले.
0
0
Report
Advertisement

Solapur में पिता ने तीन बच्चों को विष देकर आत्महत्या की कोशिश, जिले में हड़कम्प

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सणकी बापाने आत्महत्येपूर्वी तीन चिमूरडयांना पाजले विष, दुर्दैवी घटनेने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ ( PKG ) - सख्या बापानेच तीन चिमूरडयांना केलेल्या विषप्रयोगाने सोलापूर जिल्हा हादरला - सणकी बापाने आपल्या पोटच्या मुलांना कोल्ड्रिंक्स मधून विष पाजल्याचा धक्कादायक प्रकार समोर - एका खाजगी कंपनीमध्ये सिक्युरिटी गार्डचे काम करणाऱ्या बापाने कौटुंबिक वादातून केले कृत्य Anchor - सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीर्थ गावामध्ये हृदय पिळवटून टाकणारे घटनासमोर आलीय. बुधवारच्या दिवशी घरात झालेल्या कुरबुरीनंतर बापाने रागाच्या भरात तीन मुलांना विष पाजले. त्यानंतर स्वतःने देखील विष पीत आत्महत्या केली आहे. भीम अण्णाप्पा वाघमारे वय 30 असे आत्महत्या केलेल्या बापाचे नाव आहे. त्याची तीनही मुले अत्यावस्थेत असून त्यांच्यावर सोलापूर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तीर्थ गावातील भीम वाघमारे हा एका खाजगी कंपनीमध्ये सिक्युरिटी गार्डचे काम करतो. भीम वाघमारे याचे शेतकरी पत्नी बरोबर कुरकुर झाल्याने त्याला राग अनावर झाला त्यानंतर तो घराबाहेर पडताना प्रगती वय - 6 वर्षे, प्रतीक - वय 4 वर्षे, आणि प्रतीक्षा वय - 3 वर्षे या तीनही मुलांना दुचाकीवर बसून वळसंग येथील आठवडा बाजार मध्ये काहीतरी खाऊ घालण्याचे आम्हीच दाखवून घेऊन गेला. त्यानंतर तो घर गाठले. त्यानंतर नराधम बापाने आपल्या तीनही मुलींना कोल्ड्रिंक्सच्या माध्यमातून विष पाजले त्यानंतर स्वतःही विष घेऊन आत्महत्या केली आहे. डॉ. संपत्ती तोडकर ( वैद्यकीय अधिकारी, शासकीय रुग्णालय ) दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीर्थ गावामध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येतेय। सहा वर्षापेक्षा कमी वय असलेल्या तीनही चिमुकल्यांचे प्राण वाचले पाहिजेत यासाठी डॉक्टरांचे अहोरात्र प्रयत्न सुरू असून सर्वसामान्य नागरिकांकडून देखील प्रार्थना केली जातेय.
0
0
Report

कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2–6 अप्रैल: कला, खेल और पर्व का आयोजन

Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यातील डोंगरी भागातील नागरिकांना कला, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मनोरंजन खेळांचा आनंद घेता यावा यासाठी पाटण तालुक्यातील मरळी येथे कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र विकास पर्यटन महामंडळाच्या वतीने हा महोत्सव 2 एप्रिल ते 6 एप्रिल असा पाच दिवसांचा असणार आहे. यामध्ये कोयना नदीवर बोटिंग, मराठी-हिंदी गीतांचा ग्रांड फिनाले, पॅराग्लायडिंग, बोटिंग, हॉर्स रायडिंग आणि उंट सवारी, कृषी प्रदर्शन, पशु-पक्षी प्रदर्शन आणि महिला बचत गटांचा भव्य मेळावा, भव्य फन फेअर आणि खाद्य जत्रा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. हे सर्व कार्यक्रम 5 दिवस सुरू राहणार असून दुर्गम भागातून लोकांनी याचा आनंद घ्यावा असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.
0
0
Report

कळंब कार्यालयात शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न; पवनचक्की प्रकल्पाचा आरोप

Dharashiv, Maharashtra:कळंब उपविभागीय अधिकारी कार्यालयात अपंग शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न. पवनचक्की प्रकल्पामुळे 3 हजार कोंबड्या मृत्युमुखी पडल्याचा आरोप. वैद्यकीय अहवाल असूनही कंपनीकडून मदत नाकारली, उलट शेतकऱ्यावर खंडणीचा गुन्हा, पोलिसांकडून अटक अधिकाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्ध टळला धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे… कळंबच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात एका अपंग शेतकऱ्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे… पवनचक्कीच्या कामामुळे त्याच्या तब्बल तीन हजार कोंबड्या दगावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे… यासंदर्भात वैद्यकीय अहवाल सादर करूनही संबंधित कंपनीने मदत देण्यास नकार दिल्याचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे… इतकंच नाही तर… उलट शेतकऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करत पोलिसांकडून अटक करण्यात आल्यााचा आरोपही करण्यात आला आहे… दरम्यान… मदत मिळत नसल्यामुळे आणि पोलीस कारवाईच्या भीतीमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने थेट कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला… शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतल्यानंतर… कार्यालयातील कर्मचारी आणि उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे यांनी प्रसंगावधान राखत त्याला पकडलं… आणि मोठी दुर्घटना टळली… घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं… पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली…
0
0
Report
Advertisement

रायगढ़ किले पर अनधिकृत फलक हटे, शिव समाधि स्थल पर शांति बनी रहे

Chendhare, Maharashtra:किल्ले रायगडावरील अनधिकृत फलक हटवला ....... समाधीस्थळी लावण्यात आला होता फलक ....... समाधीस्थळी घोषणा बाजी करू नये, शांतता राखावी अशा आशयाचा मजकूर ....... किल्ले रायगडावरील शिवसमाधी स्थळी असलेला अनधिकृत फलक रायगड जिल्हा परिषद यांच्या उपस्थितीत हटवला. किल्ले रायगडावरील शिवसमाधी स्थळी शांतता राखा, घोषणाबाजी करू नये, अशा मजकुराचा अनधिकृत फलक लावण्यात आला होता. बुधवारी रात्री दीपोत्सवासाठी मंगेश वाकडीकर शिवसमाधी स्थळी गेले असता शिवप्रेमींनी याबाबत तक्रार केली. फलकावर शासन किंवा पुरातत्व विभाग या पैकी कोणाचाच उल्लेख नसल्याने वाकडीकर यांनी शिवप्रेमींना तो फलक काढण्यास सांगितलं. यावेळीshivरायांच्या नावाचा जयघोष देखील करण्यात आला.
0
0
Report
Advertisement

कृष्णा पाटिल ने अध्यक्ष पद के लिए अर्ज नहीं भरा; डोंगावकर-दानवे के आरोप गर्म

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:सभापती पदाच्या निवडणूक मध्ये यूबीटी च्या कृष्णा पाटील डोंनगावकर यांनी अर्ज भरायची तयारी केली होती पाठिंबा साठी त्यांनी शिंदे सेनेच्या खासदार भुमरे यांची भेटही घेतली मात्र गोळाबेरीज जमली नाही म्हणून अर्ज भरला नाही मात्र kaळायला मार्ग नाही असे कृष्णा म्हणाले इतकंच नाही तर याबाबत अर्थपूर्ण सौदा झाला आणि तो अंबादास दानवे यांनी केला असा नाव न घेता आरोप कृष्णा पाटील यांनी केला, इतकाच नाही तर अध्यक्ष पद निवडणुकीत ही दोन्ही शिवसेना एकत्र येणार होत्या शिंदे सेनेचे आमदार च्या महेंद्र थोरवे यांच्या कर्जत च्या रिसॉर्ट वर बैठक झाली त्याला अंबादास दानवे ही होते, शिंदे सेनेचे वरिष्ठ नेते होते त्यानंतर आम्हाला सगळ्यांना सोबत गोव्याला नेले मात्र नंतर काय झालं कळले नाही असे कृष्णा पाटील म्हणाले, इतकाच नाही तर अंबादास दानवे वर भाजप ला मदत केल्याचा अर्थपूर्ण व्यवहार झाल्याचा जो आरोप आहे त्यावर सुद्धा आग आहे म्हणून धूर येतोय असे म्हणत त्यांनी अंबादास दानवे कडे बोट केले, आता निवडणूक लढली नाही मात्र यातून उद्धव सेनेचे नुकसान झाले आणि यासाठी अंबादास यांचाच हाथ असल्याचे अप्रत्यक्ष त्यांनी सांगितले, गरज पडल्यास याबद्दल सगळे पुरावे आहेत नाव आणि पुरावे उघड केले जाईल असेही कृष्णा पाटील म्हणाले, त्यांच्या सोबत बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी...
0
0
Report

खेड के शिवदत्त आश्रम में बाबा ने महिला के साथ दुष्कर्म का आरोप, गिरफ्तारी की तैयारी

Khed, Maharashtra:पुणे ग्रामीणमधील खेड तालुका़ा सध्या एका भयानक कृत्याने हादरला आहे. चांडोली येथील शिवदत्त आश्रमात 'महाराज' म्हणून मिरवणारा नवनाथ गवळी हा प्रत्यक्षात वासनांध भोंदू असल्याचे उघड झाले आहे. एका 3 4 वर्षीय महिलेन या गवळीबाबा विरुद्ध धारिष्ठ्य दाखवून खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मे २०२५ पासून पीडित महिला कुटुंबासह आश्रमात दर्शनासाठी जात होती. १७ जुलै २०२५ रोजी पहाटे जप करत असताना आरोपीने महिलाचा विनयभंग केला. 'तुझ्या अंगातील दोष दूर करण्यासाठी शारीरिक संबंध ठेवावे लागतील' अशी अश्लील मागणी आरोपीने केली. धक्कादायक बाब म्हणजे, सुरुवातीला केवळ विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असला, तरी प्रत्यक्षात आपल्यावर अत्याचार झाल्याची कबुली आता पीडितेने दिली आहे. कुटुंबाची भीती आणि सामाजिक प्रतिष्ठेपोटी महिलेने सुरुवातीला पूर्ण सत्य लपवले होते. मात्र, आरोपीकडून होणारा फोनवरचा त्रास आणि खरात प्रकरणामुळे मिळालेल्या प्रेरणेतून या महिलेने आता सर्व सत्य समाजासमोर मांडले आहे.
0
0
Report

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प में 3.81 लाख पर्यटक, राज्य पर्यटन में अग्रणी

Chandrapur, Maharashtra:टायटल:-- वर्षभरात ३.८१ लाख पर्यटकांची ताडोबा व्याघ्रसफारी, पर्यटनात पुन्हा एकदा राज्यात ठरले अव्वल, ३५ कोटींचा मिळविला महसूल अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात मागील वर्षभरात ३ लाख ८१ हजार पर्यटकांनी हजेरी लावली. या वाढत्या पर्यटकांच्या संख्येमुळे प्रकल्पाला सुमारे ३५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला असून राज्यात प्रकल्प व्याघ्रपर्यटनात अव्वल ठरले आहे. हमखास व्याघ्रदर्शनासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प हा देशातील सर्वोत्तम प्रकल्पांपैकी एक आहे. जैविक विविधता, नैसर्गिक वारसा आणि घनदाट जंगलांनी व्याप्त असलेल्या या प्रकल्पाला राष्ट्रीयच नव्हतर,आंतरराष्ट्रीयस्तरावर महत्वाचे स्थान आहे. मागील वर्षभरात बफर व कोअर क्षेत्र मिळून ३ लाख ८१ हजार ८१० पर्यटकांनी हजेरी लावली. यात कोअर झोनमधील १ लाख १७हजार ९५३, तर बफर झोनमधील २ लाख ६३ हजार ८५७ पर्यटकांचा समावेश आहे. २०२४-२५मध्ये याच प्रकल्पात ३ लाख ६७ हजार ४ पर्यटकांनी हजेरी लावली होती. यातून प्रकल्पाला एकूण ३६ कोटी ७२ लाख ८ हजार ८७० रुपयांचा महसूल मिळाला. यंदा ३ लाख ८१ हजार ८१० पर्यटकांनी ताडोबा प्रकल्पात सफारी केली आहे.  आता पर्यटकांनी ताडोबासह पेंच, नवेगाव-नागझिरा, मेळघाट व बोर व्याघ्र प्रकल्पांनाही पसंती दर्शविली आहे.
0
0
Report
Advertisement

गैस संकट के बीच अकोला में संभाजी ब्रिगेड का नाली गैस प्रदर्शन

Akola, Maharashtra:Anchor : सर्वसामान्य नागरिकांना गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी सध्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर अकोल्यात संभाजी ब्रिगेडच्या वतीने एक अनोखे आंदोलन करण्यात आले. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कार्यकर्त्यांनी नालीतून गॅस काढण्याचा प्रतीकात्मक उपक्रम राबवला.अमेरिका, इजरायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम भारतातही जाणवत असून, गॅस टंचाईची समस्या अधिक तीव्र झाली आहे.शहरी भागात नागरिकांना तब्बल २५ दिवसांनी, तर ग्रामीण भागात ४५ दिवसांनी गॅस सिलेंडर मिळत असल्याचे सांगितले जात आहे.गॅस मिळवण्यासाठी विविध एजन्सीसमोर नागरिकांची मोठी गर्दी होत असून, रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांना काम सोडून तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तात्काळ गॅस पुरवठा सुरळीत करावा, तसेच एजन्सीसमोर उभ्या असलेल्या नागरिकांसाठी उन्हापासून संरक्षणाची व्यवस्था करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.यावेळी सरकारच्या निषेधार्थ नालीतून गॅस सिलेंडरमध्ये गॅस भरल्याचा प्रतीकात्मक प्रयत्न करत अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
0
0
Report

अंजनगाव खेळोबा में शिवाजी महाराज के पुतले को लेकर मराठा-धनगर तनाव बढ़ा

Pandharpur, Maharashtra:মাডھا तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यावरून मराठा आणि धनगर समाजात सुरू झालेला वाद दगड फेक लाठी चार्ज पर्यंत गेला. आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचे बाळराजे पाटील यांनी पुतळा बसवला ती जागा खेलोबा देवस्थानची नाही. जरी असली तरी त्यांनी विरोध करू नये. त्यांच्या मुळे आज मंदिरावरील कळस सुरक्षित आहे. आम्ही आज पर्यंत 600 पुतळे परवानगी शिवाय बसवले. या पुढे ही असेच पुतळे बसवणार. जर हाकेने पुन्हा विरोध केला तर रस्त्यावर कपडे फाटे पर्यंत मारू असा इशारा दिला आहे
0
0
Report
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top