445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
बीड़ में विलास घुले हत्या मामले केज में बड़ा मोर्चा, हजारों जुटेंगे
Beed, Maharashtra:बीड : विलास घुले खून प्रकरणी उद्या न्यायिक मागणीसाठी केजमध्ये निघणार मोर्चा 25 ते 30 हजार लोकांचा जनसमुदाय मोर्चात होणार सहभागी सर्वपक्षीय नेतेही असणार या मोर्चात सहभागी विलास घुले हत्या प्रकरणाला तब्बल दोन आठवडे उलटलेत. मात्र अद्यापी म्हणावी तशी कारवाई पोलिसांनी केली नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. विलास घुले यांना आणि कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी उद्या केजमध्ये सर्व धर्मीय आणि सर्वसमावेशक संघटनांचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी दहा वाजता या मोर्चाचा आयोजण्यात आलेला आहे.. मोर्चाला राज्यभरातून सर्वपक्षीय नेते उपस्थित असणार आहेत. या मोर्चामध्ये पीडित घुले कुटुंबीय देखील उपस्थित राहणार आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असं घुले कुटुंबीयांचं म्हणणं आहे.. तर उद्याच्या या विराट मोर्चाला सर्वपक्षीय सर्व धर्मीय तमाम नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक नेते बाळासाहेब सानप यांनी केले आहे..0
0
Report
रत्नागिरी के रघुवीर घाट में दरड़ गिरने से यातायात बंद, भारी बारिश जारी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रघुवीर घाटात दरडी कोसळल्या.. वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद!.. अँकर रत्नागिरीतून एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे.रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला रघुवीर घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.. गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रघुवीर घाटात ठिकठिकाणी मोठ्या दरडी कोसळल्या आहेत.. एवढेच नव्हे तर घाटात काही ठिकाणी भीषण भूस्खलन झाले असून,मुख्य रस्त्याची एक बाजू थेट दरीत वाहून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.. या गंभीर परिस्थितीमुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून घाटातील वाहतूक दोन्ही बाजूंनी पूर्णपणे रोखली आहे.. सध्या पावसाचा जोर कायम असल्यामुळे पर्यटकांनी आणि प्रवाशांनी या मार्गावरून प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे..0
0
Report
नागपुर में मनसे का रोड रोको: खड्डों पर बैठकर प्रशासन से तत्काल सुधार मांग
Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपुरात पश्चिम नागपुरातील गोंधनी परिसरातील रस्त्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेकडून रस्त्यांवरील खड्ड्यात बसून आंदोलन करण्यात आलं... - परिसरातील खड्ड्यांमुळे नागरिकांचे जगणे अक्षरशः खडतर झाले आहे...या भागात तीन शाळा असल्यानं तसेच स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप मनसेने केला - गणपती नगर, शिव किराणा टॉवर लाईन परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात आज मनसेने हे 'रस्ता रोको' आंदोलन केले - प्रशासन आणि महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत नागरिकांसह मनसैनिकांनी रस्त्यावर उतरून तात्काळ दुरुस्तीची मागणी केली. - प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास यापुढे आणखी तीव्र आंदोलनाचा इशाराही मनसेकडून देण्यात आला. -0
0
Report
Advertisement
संगमनेर में भीषण कार हादसे के बाद अवैध गुटखा रैकेट का पर्दाफाश
Shirdi, Maharashtra:संगमनेर तालुक्यातील क-हे घाटात झालेल्या एका भीषण कार अपघाताने अवैध गुटखा वाहतुकीचं मोठं रॅकेट उघड झालय...राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही “गुटखा किंग” अलिशान कारमधून गुटखा कसा पोहोचवतात याचं धक्कादायक वास्तव या अपघातातून समोर आलय...अपघातानंतर कार दरीत कोसळली आणि पोलिसांनी ती वर काढताच कारच्या आत लाखोंचा गुटखा साठा आढळून आल्याने एकच खळबळ उडालीय… त्यामुळे या प्रकरणामागील मोठं जाळं उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जातेए... पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने दरीत कोसळलेली इनोव्हा कार वर काढली. मात्र कारची तपासणी करताच पोलिसांनाही धक्का बसला… कारण गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा साठा आढळून आला..पान मसाल्याच्या नावाखाली जवळपास 8 लाख 37 हजार रुपयांचा गुटखा या कार मध्ये आढळून आला..राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही अशा पद्धतीने परराज्यातून माल आणून संगमनेरमध्ये विक्री केली जात असल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.दरम्यान,जखमी आरोपींची प्रकृती चिंताजनक असून हा गुटखा नेमका कुठून आला आणि कोणाच्या सांगण्यावरून कुठे नेला जात होता,याचा तपास पोलीस करतायत...विशेष म्हणजे, याआधीही सायखिंडी फाट्याजवळ तालुका पोलिसांनी स्कॉर्पिओ गाडीतून लाखोंचा गुटखा जप्त केला होता. त्यामुळे संगमनेर परिसरात अवैध गुटखा रॅकेट सक्रिय असल्याचे स्पष्ट संकेत मिळतायत...0
0
Report
दूध पैकेटों में भेसळ: 470 लीटर भेसळयुक्त दूध पकड़ा गया, एक आरोपी गिरफ्तार
Mumbai, Maharashtra:गुन्हे शाखेने नामांकित दूध कंपन्यांच्या दुधाच्या पाकिटांमध्ये भेसळ करून विकणाऱ्या टोळीतील एका आरोपीला अटक केली आहे. अँकर: गुन्हे शाखा युनिट १२ ने मुंबईतील दहिसर पूर्व येथे एक मोठी कारवाई केली आहे. बनावट दुधाचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन (FDA) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर पूर्व येथील रोजारी कंपाऊंडमधील एका गोदामात नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पाऊचमध्ये बेकायदेशीरपणे पाणी आणि इतर घटक मिसळून बनावट दूध तयार केले जात होते. त्यानंतर हे पाऊच पुन्हा सील करून बाजारात अस्सल दूध म्हणून विकले जात होते, ज्यामुळे जनतेच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला होता. गुप्त माहितीच्या आधारे, गुन्हे शाखा युनिट १२ आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी छापा टाकला. या कारवाईदरम्यान, अंदाजे ४७० लिटर भेसळयुक्त दूध, दुधाचे पाऊच, पॅकिंग स्प्रेअर, सीलिंग मशीन आणि इतर उपकरणे जप्त करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आता पोलीस त्या भागांचा तपास करत आहेत, जिथे या भेसळयुक्त दुधाचा पुरवठा केला जात होता आणि या रॅकेटमध्ये आणखी कोण सामील आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, दूध खरेदी करताना त्याच्या पॅकेजची गुणवत्ता, सील आणि मुदतची तारीख तपासावी. जर त्यांना कोणतीही भेसळ किंवा संशयास्पद बाब आढळल्यास, त्यांनी तात्काळ पोलीस किंवा अन्न व औषध प्रशासनाला कळवावे. दहिसर पोलिसांच्या या कारवाईमुळे भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या व्यापारात गुंतलेल्यांमध्ये घबराट पसरली असून, पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
पालघर के मंत्री गणेश नाईक ने वसई-विरार में बाढ़ से स्थिति का निरीक्षण किया
Vasai-Virar, Maharashtra:पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्री गणेश नाईक यांनी आज वसई-विरारमधील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनधिकृत बांधकामे, नाले व भरावांवरील बांधकामांमुळे पूरस्थिती गंभीर झाल्याचे सांगितले. अनेक भागांतील परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचे त्यांनी नमूद केले. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवडीवर भर देत भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांचाच काळ असेल, असेही ते म्हणाले. अनधिकृत बांधकामे तोडण्यात तर येणार नाही मात्र महसूल विभागामार्फत आवश्यक कॅबिनेट मंजुरी घेऊन पात्र रहिवाशांना त्यांच्या राहत्या जागेचा मालकी हक्क देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याची माहितीही त्यांनी दिली.0
0
Report
Advertisement
मैपिंग से मालेगांव घोटाला, किरीट सोमय्या ने चुनाव आयोग से आठ दिन की मोहलत मांगी
Ahilyanagar, Maharashtra:मैपिंग से मालेगांव घोटाला, किरीट सोमय्या ने चुनाव आयोग से आठ दिन की मोहलत मांगी Oh, अहिल्यानगर महापालिकेत जुन्या नोंदीच्या नावाखाली १५ हजार बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्र दिले आहेत, या १६ महिन्यात १८ हजार ७०० जुने दाखले दुरुस्त करून दिले आहेत असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे...किरीट सोमय्या आज अहिल्यानगर दौऱ्यावर असताना त्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली... नंतर ते माध्यमांशी बोलत होते... भाजप नेते सोमय्या म्हणाले की, या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने केला... याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी पंकज आशिया आणि महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या समवेत सर्व बाबींचा आढावा घेतला आहे. डोंबिवली येथे झालेल्या डॉक्टर मारहाण प्रकरणी संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे या घटनेचा आम्ही निषेध करतो असं सोमय्या म्हणाले.0
0
Report
दहिसर में मिलावटी दूध बनाने वाले गिरोह के एक सदस्य की गिरफ्तारी, भारी मात्रा पकड़ी
Mumbai, Maharashtra:गुन्हे शाखे युनिट १२ ने मुंबईतील दहिसर पूर्व येथे एक मोठी कारवाई केली आहे. बनावट दुधाचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन (FDA) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर पूर्व येथील रोजारी कंपाऊंडमधील एका गोदामात नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पाऊचमध्ये बेकायदेशीरपणे पाणी आणि इतर घटक मिसळून बनावट दूध तयार केले जात होते. त्यानंतर हे पाऊच पुन्हा सील करून बाजारात अस्सल दूध म्हणून विकले जात होते, ज्यामुळे जनतेच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला होता. गुप्त माहितीच्या आधारे, गुन्हे शाखा युनिट १२ आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी छापा टाकला. या कारवाईदरम्यान, अंदाजे ४७० लिटर भेसळयुक्त दूध, दुधाचे पाऊच, पॅकिंग स्प्रेअर, सीलिंग मशीन आणि इतर उपकरणे जप्त करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आता पोलीस त्या भागांचा तपास करत आहेत, जिथे या भेसळयुक्त दुधाचा पुरवठा केला जात होता आणि या रॅकेटमध्ये आणखी कोण सामील आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, दूध खरेदी करताना त्याच्या पॅकेजची गुणवत्ता, सील आणि मुदतची तारीख तपासावी. जर त्यांना कोणतीही भेसळ किंवा संशयास्पद बाब आढळल्यास, त्यांनी तात्काळ पोलिस किंवा अन्न व औषध प्रशासनाला कळवावे. दहिसर पोलिसांच्या या कारवाईमुळे भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या व्यापारात गुंतलेल्यांमध्ये घबराट पसरली असून, पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
ठाकरे सेना के नगरसेवकों ने आयुक्त को घेरा, सात दिनों में समाधान नहीं तो जनआंदोलन
Nashik, Maharashtra:नाशिकमधले रस्ते आणि साचणारे पाणी यावर ठाकरे सेनेच्या नगरसेवकांनी आयुक्तांना घातला घेराव, सात दिवसात प्रश्न निकाली निघाला नाही तर जन आंदोलन छेडणार ठाकरे सेनेचा प्रशासनाला इशारा... अँकर: नाशिक मध्ये दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते फसले तर काही ठिकाणी नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला या संदर्भात आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व नगरसेवक आणि पदाधिकारीांनी महापालिका आयुक्त यांना या संदर्भात जाब विचारत प्रश्नांचा भडीमार केला तात्काळ या नाशिक शहरातील रस्ते आणि साचणारे पाणी यावर निर्णय घेऊ असे आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिला मात्र सात दिवसात जर प्रश्न निकाली निघाला नाही तर जनआंदोलन छेडणार असा इशारा ठाकरे सेनेकडून महापालिका प्रशासनाला देण्यात आला आहे.0
0
Report
Advertisement
शिर्डी से पंढरपूर पालखी यात्रा: साईं बाबा के मार्गदर्शन में 20वां वर्ष शुरू
Shirdi, Maharashtra:राज्यभरातून हजारो छोट्या मोठ्या पायी पालखी आणि दिंड्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत.. आज साईबाबांच्या शिर्डीतूनही पायी पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झालंय.. साई संस्थानच्या सहकार्याने आणि काशिकानंद महाराजांच्या मार्गदर्शनाखाली साईबाबा पालखी सोहळ्याचे 20 वे वर्ष आहे.. राहाता येथे पालखीचा पहिला मुक्काम असून साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर हे पहिल्या मुक्कामापर्यंत पायी पालखीत सहभागी झाले आहेत.. साईबाबांनी आपल्या भक्ताला विठ्ठल स्वरूप दर्शन दिल्याचा उल्लेख साईचरित्रात असून आजही शिर्डीत कोणताही व्हीआयपी आला तर पाद्य पूजा करून साई दर्शनाची सुरूवात " शिर्डी माझे पंढरपूर" या आरतीने होते.. विठुरायासह साईनामाचा जयघोष करत वारकरी शिर्डीहून पंढरपूरच्या दिशेने निघाले असून जणु काही साईबाबा विठ्ठलाच्या भेटीला निघाल्याचा अनुभव या पालखी सोहळ्यात येतोय..0
0
Report
एमपीएससी की सभी परीक्षाएं ऑफलाइन हों: कांग्रेस का अनिश्चितकालीन उपवास
Navi Mumbai, Maharashtra:एमपीएससीच्या सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने व्हाव्यात या प्रमुख मागणीसाठी एमपीएससी कार्यालया खाली काँग्रेसचे बेमुदत साखळी उपोषण.एमपीएससीच्या सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने व्हाव्यात या प्रमुख मागणीसाठी नवी मुंबई जिल्हा काँग्रेस तर्फे बेमुदत साखळी उपोषण आणि ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. नवी मुंबईतील बेलापूर येथे एमपीएससी कार्यालयाच्या खालीच काँग्रेस तर्फे हे बेमुदत साखळी उपोषण करण्यात येतं आहे. ऑनलाईन परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू शकतात त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी एमपीएससीच्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात अशी मागणी काँग्रेस तर्फे करण्यात आलेय. यावेळी जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आमचं बेमुदत साखळी उपोषण सुरूच राहील असा इशारा नवी मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष आबा दळवी यांनी दिलाय.0
0
Report
शिर्डी दर्शन: VIP पास महंगा, अब 300 रुपये; सामान्य भक्तों के लिए पास कीमत स्थिर
Shirdi, Maharashtra:साईंच्या दर्शनासाठी देश विदेशातून दररोज हजारो भाविक शिर्डीत येतात.. मात्र अनेकदा भक्तांना घाई असल्याने ते सशुल्क पास घेऊन दर्शन घेतात.. अनेक वर्षांपासून सशुल्क पास दर्शनाला दोनशे रुपये प्रति व्यक्ती अशा पद्धतीने पास दिला जातो.. मात्र आता सामान्य भक्तांसाठी सशुल्क पास दोनशे रुपये ठेवण्यात आला असून व्हीआयपी साठी हाच पास आता शंभर रुपयांनी महागला आहे.. हा पास घेतल्यानंतर भक्ताला प्रोटोकॉल देत दर्शन दिला जाणार आहे.. साईबाबा संस्थानच्या वतीने ब्रेक दर्शन व्यवस्था सुरू केली गेली गेली.. VIP शिफारस पत्र असलेल्या भक्तांना ब्रेक दर्शन व्यवस्थेत सकाळी नऊ ते दहा दुपारी अडीच ते साडेतीन आणि रात्री आठ ते साडेआठ या वेळेत प्रति व्यक्ती 200 रुपयांना सशुल्क पास घेऊन दर्शन दिलं जातं... व्हीआयपी आणि शिफारस पत्र असलेल्या साईभक्तांना ही सुविधा मिळते.. आणि आता याच पास साठी व्हीआयपी भक्तांना आता 200 ऐवजी 300 रुपये मोजावे लागणार आहे.. निर्धारित वेळेतच या साई भक्तांना दर्शन मिळणार असून एकत्रित पद्धतीने सर्वांना दर्शन दिले जाणार आहे.. मात्र घाई असलेल्या सामान्य भक्तांच्या सशुल्क पास दरामध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नसल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडीलकर यांनी दिली...0
0
Report
Advertisement
नेवी मुंबई में घरफोड़ीत सरगर्मी: आरोपी के 62 केस, 21 लाख से अधिक सोना-चांदी जब्त
Navi Mumbai, Maharashtra:Anchor -: रबाळे एमआयडीसी परिसरात झालेल्या घरफोडी गुन्ह्याचा तपास करत असताना नवी मुंबई गुन्हे शाखेने भिवंडी येथून एका सराईत चोरट्याला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्याच्यावर याआधी 49 घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले असून 13 गुन्हे नवी मुंबईतील विविध पोलिस ठाण्यात दाखल असल्याचे स्पष्ट झालेय. या सराईत चोरट्यावर एकूण 62 गुन्हे असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी लक्ष्मण शिवशरण कडून पोलीसांनी 21 लाख 25 हजारांचे सोने आणि चांदीचे दागिने जप्त केले आहेत. याप्रकरणी आरोपीला पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत.0
0
Report
महाराष्ट्र में किसान कर्ज माफी की शर्तें निरस्त करने की मांग पर विरोध प्रदर्शन
Shirdi, Maharashtra:शेतकरी कर्जमाफीच्या अटी शर्ती रद्द कराव्यात या मागणीसाठी महाराष्ट्रभर झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परदेशी समिती बरोबर बैठक आयोजित करण्यात आली होती...मात्र ही बैठक राजकीय हस्तक्षेप करत रद्द करण्यात आली. किसान सभेच्या वतीने या घटनेचा राज्यभर निषेध करत निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला असून अकोले येथे यानुसार या घटनेचा तीव्र निषेध करत निदर्शने करण्यात आली. शेतकरी कर्जमाफीच्या अटी शर्ती रद्द करा ही मागणी यावेळी करण्यात आली. उद्या आणि परवा दोन दिवस सलग अशीच निदर्शने राज्यभर किसान सभेच्या वतीने करण्यात येणार असल्याच किसान सभेचे राज्यसचिव डॉ.अजित नवले यांनी म्हणटलय0
0
Report
यातायात जाम के कारण एक और मौत: ट्रक ने बाइक सवार को मार डाला
Yeola, Maharashtra:अहिल्यानगर-मनमाड हाईवे पर यातायात जाम के कारण एक और मौत हो गई है और मालवाहक ट्रक ने टक्कर मारी जिससे एक द्विचाकी सवार की मौके पर ही मौत हो गई। पिंपळगाव जलाल के वसंत संभाजी वाघ अपने नातिनों को स्कूल छोड़ने जा रहे थे, तभी ट्रक ने उन्हें धक्का दिया; इस धक्के से उनकी कमर और पैर में गम्भीर चोटें आईं और भारी रक्तस्राव के कारण उनकी मौत हो गई। घटना की सूचना मिलते ही पुलिस ने तुरंत ट्रक चालक को चौक के पास रोक लिया और आगे की जांच शुरू कर दी है।0
0
Report
Advertisement
