icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

हिंगोली में भीषण गर्मी: तापमान 40°C, लोगों को घरों से न निकलने की सलाह

Hingoli, Maharashtra:अँकर - हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रचंड उष्णतेची लाट उफाळते असून आज तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेले आहे. वाढत्या तापमानाचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याची चिन्ता आहे. सूर्याची तीव्रता इतकी वाढली आहे की नागरिकांची जीवप्रतिमा कचवते. हिंगोली शहरासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये दुपारच्या वेळेत रस्त्यांवरील वर्दळ घटली आहे. अनेक ठिकाणी रस्ते शुकशुकाट झाले आहेत; नागरिक गरजेबद्दलही बाहेर पडताना टाळत आहेत. उन्हापासून बचावासाठी नागरिक रुमाल, गमछा तसेच डोक्यावर कापड बांधून बाहेर पडत आहेत. उष्माघाताच्या रुग्णांमध्येही वाढ झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग आणि प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. प्रशासनाने दुपारी 12 ते सायंकाळी 4 या वेळेत आवश्यक नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच पाणी अधिक प्रमाणात पिणे आणि उन्हापासून संरक्षण करणे गरजेचे असल्याचेही सांगितले आहे. याचाच आढावा घेतला आहे Hingoli प्रतिनिधी गजानन वाणी यांनी.
0
0
Report

नाशिक: SIT ने टीसीएस होटल आनंद रिज़ॉर्ट के मामले में जांच शुरू की

Nashik, Maharashtra:नाशिकच्या टीसीएस कंपनी मधील लैंगिक शोषण झालेल्या तरुणींच्या तक्रारीनंतर आता एसआयटीने ज्या हॉटेलमध्ये पार्ट्या केल्या जायच्या त्या हॉटेल आणि रिसॉर्स ची तपासणी सुरू केली आहे, नाशिकच्या देवळाली पोलीस ठाण्यामध्ये दाखल पुण्यामधील फिर्यादी तरुणीच्या माहितीनुसार एसआयटीने नाशिकच्या त्रंबकेश्वर रोडवरील हॉटेल आनंद रिसॉर्ट मध्ये जाऊन तपासणी केली हॉटेलचे रजिस्टर देखील ताब्यात घेतले आहे हॉटेलमध्ये हे लोक येऊन गेल्या बाबतचे पुरावे देखील एसआयटी ला प्राप्त झाले आहे, या कारवाईला हॉटेल व्यवस्थापनाने देखील दुजोरा दिला आहे. इंद्रजीत बोंडे - हॉटेल व्यवस्थापक
0
0
Report

18 हजार करोड़ बकाया: गुणवत्ता पर जोर, अमृतकाल के रोड प्रोजेक्ट का बड़ा ऐलान

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर- शिवेंद्रराजे भोसले ऑन किती देयक बाकी आहेत - बांधकाम विभागाचे आता 18 हजार कोटीची देणे बाकी आहे. - लवकरच 18 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे असं काही फार मोठा आकडा आहे असं काही नाही. - सार्वजनिक बांधकाम विभागाचा थकित देण्याचा आकडा 18 हजार कोटीचा आहे. चर्चा होताना पाणीपुरवठा वगैरे sगळ्या विभागाचे कॉन्ट्रॅक्टर हे sगळे बांधकाम खात्याच्या माथ्यावर असं नाही. ऑन कामाची गुणवत्ता - गुणवत्तेवर आमचं sगळं लक्ष आहे, गुणवत्तेबद्दल कुठलीही तडजोड करणार नाही अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत कॉलिटीच्या बाबतीत कुठलीही हे तडजोड केली जाणार नाही. - काम करतानाचे पॅरामिटर ठरवून दिले आहेत त्यातच झालं पाहिजे त्यात कुठली कारण आम्ही अधिकाऱ्यांची चालून घेणार नाही. - काम अपूर्ण असतील त्याची काय कारण आहेत काही लँड चा विषय असेल तर तो समजून घेऊ मात्र कॉन्ट्रॅक्टर कडून जर काही झालं असेल तर ते चालणार नाही. ऑन एशियन बँक - पूर्वी एशियन डेव्हलपमेंट बँक होती आता एआयईबी झाली आहे. - त्यांच्याकडून आपल्याला पंधराशे किलोमीटरच्या रस्त्याला पहिला टप्प्यात फायनान्स मिळाल आहे. - मुख्यमंत्र्याच्या सूचना आहेत की रस्ते घेताना काहीतरी थीम ठेवून रस्ते घेतले पाहिजे, एअरपोर्ट जोडणे, टुरिझम वाढण्यासाठी जे काही स्थळ राज्यातील आहेत, दोन हायवे जोडणे ज्याची कनेक्टिव्हिटी वाढेल. - संपूर्ण राज्याचा रोड नेटवर्क तयार केला आहे, अमृतकाळ 2047 पर्यंत आपण अमृतकाळ योजना तयार केली आहे. - एक ट्रिलियन इकॉनॉमी राज्याची वाढण्यासाठी आपल्या रस्त्याचा हातभार त्या इकॉनॉमी मध्ये लागला पाहिजे. - लोकांची सोय तर झालीच पाहिजे त्याचबरोबर राज्याच्या इकॉनोमी मध्ये सुद्धा वाढ झाली पाहिजे. - आमच्याकडे शेंद्रा - बिडकीन हा मेजर प्रोजेक्ट झाला आहे त्याला आपण बजेट सुद्धा तरतूद केलं आहे. - संभाजीनगर ते शिरूर या रस्त्याचे काम आपण करत आहोत.
0
0
Report
Advertisement

बीड़ नगरपालिका प्रशासन के खिलाफ प्रदर्शन: गड्ढों भरी सड़क और पानी से नागरिक नाराज़

Beed, Maharashtra:बीड: नगरपालिका प्रशासनाविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांचे आंदोलन, सत्ताधारी नगरसेवक आक्रमक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर बीड शहरातील रस्त्यावर खड्डे पडलेले ठिकाणी डागडुजी म्हणून खडीचा वापर करण्यात आला. कसलेही डांबर वापरले नसल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून पडले. शहरात अंथरलेल्या या खडीमुळे तब्बल 150 दुचाकीस्वार घसरून पडले. एवढेच नाही तर जयंतीच्या दिवशी रस्त्यावरतीच नाली वरचे घाण पाणी साचले त्यामुळे बीड शहरातील नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी व गुन्हे दाखल करा या मागणीसाठी बीड नगरपालिकेसमोर सध्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी देखील पाठिंबा देत लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.
0
0
Report

शिर्डी केस: भोंदू के संपर्क और पुलिस दबाव पर उठा बड़ा सवाल

Shirdi, Maharashtra:शिर्डीत गाजत असलेल्या गुन्ह्याच्या तपासात आता धक्कादायक वळण समोर येत आहे. भोंदू अशोक खरात हा केवळ आरोपी नसून, तो तपासावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत होता का...? फिर्यादी तरुणीसोबत थेट संपर्क आणि पोलिसांबाबत दिलेले संदेश यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.. 18 फेब्रुवारीला शिर्डी पोलीस ठाण्यात शिर्डीतील एका 24 वर्षीय तरुणीने नीरज जाधव विरोधात गुन्हा दाखल केला. सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला होता..या प्रकरणाची दखल घेत राज्य महिला आयोगानेही शिर्डी पोलिसांना नोटीस बजावली... तपास सुरू असतानाच पोलिसांनी फिर्यादी तरुणीची उलटफेर चौकशीही केली. मात्र, पोलिस आणि फिर्यादी यांच्या गोपनीय चौकशीतील संवेदनशील माहिती थेट फिर्यादीने फोन करून भोंदू अशोक खरातपर्यंत पोहोचविली आणि त्यानंतर फिर्यादी तरुणीला खरातने एक मेसेज पाठवला तो मेसेज पोलिसांनी मोबाईल रिकव्हर केल्यानंतर तपासात समोर आला... 11 मार्चला पाठवलेल्या या मेसेजनंतर घटनाक्रम अधिकच संशयास्पद झाला कारण, याच कालावधीत महिला आयोगाने शिर्डी पोलिसांना नोटीस पाठवली आणि तरुणीच्या गुन्ह्याबाबत कागदपत्र घेऊन 17 मार्चला राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात सुनावलीला येण्याचे आदेश दिले. 17 मार्चला महिला आयोगात सुनावणी पार पडली. शिर्डी पोलिस ठाण्याच्या तपास अधिकारीवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. विश्लेषण म्हणजे, नीरज जाधवला अद्याप अटक का केली नाही..? असा सवालही महिला आयोगाने उपस्थित केला. 17 मार्चच्या रात्री नाशिक पोलिसांनी भोंदू अशोक खरातला बेड्या ठोकल्या. आणि त्यानंतर तपासात अनेक धागेदोरे समोर येऊ लागले. तपासादरम्यान खरातचा मोबाईल जप्त करण्यात आला आणि त्यातून अनेक गोपनीय माहिती उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.. फिर्यादी तरुणीसोबत खरात संपर्कात, पोलिस तपासातील माहितीची देवाणघेवाण, आणि नीरज याच्या अटकेसाठी दबाव. या सगळ्या बाबींमुळे आता अनेक मोठे प्रश्न निर्माण होत असून भोंदू अशोक खरातने राजकीय किंवा इतर प्रभाव वापरून पोलिस तपासावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता का...? आणि त्याच्या मोबाईलमधून अजून कोणती गुपितं समोर येणार...? आणखी बडे कोणते नेते भोंदूच्या संपर्कात होते ज्यामुळे भोंदूची मजल पोलिसांवर दबाव टाकण्यापर्यंत पोहचली होती.. हे आता भोंदूच्या चौकशी दरम्यानच बाहेर येईल.. प्रतिनिधी कुणाल जमदाडे झी 24 तास शिर्डी अहिल्यानगर
0
0
Report

नारायणगांव मुक्ताई यात्रा: 10 दिनों में तमाशा, फायर शो और कुश्ती का उत्सव

Barav, Maharashtra:तमाशाची पंढरी... हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अभेद्य गड... आणि लाखो भाविकांचं श्रद्धास्थान! उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे नारायणगावची मुक्ताई आणि काळोबा महाराजांची यात्रा! या यात्रेचा बिगुल वाजला असून, १० दिवस नारायणगाव भक्ती आणि लोककलेच्या रंगात न्हाऊन निघणार आहे. कधी अंगावर शहारे आणणारा फायर शो, तर कधी लाल मातीतील अस्सल कुस्त्यांचा आखाडा! आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, लोकनाट्य तमाशाची पंढरी पुन्हा एकदा गजबजली आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या या यात्रेत भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळतोय. या उत्सवाचं आकर्षण म्हणजे १० दिवस चालणारी तमाशाची मेजवानी! नारायणगाव हे तमाशा पंढरी म्हणून ओळखलं जातं, त्यासोबतच चित्तथराररक फायर शो आणि पैलवानांच्या कुस्त्यांनी यात्रेची रंगत आणखी वाढवली आहे. मुक्ताई देवी नवसाला पावणारी असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक इथे हजेरी लावत आहेत.
0
0
Report
Advertisement

पूर्व मंत्री की मांग: स्व-बलात्कार कराने वाली महिलाओं के नाम और वीडियो सार्वजनिक करें

Buldhana, Maharashtra:स्वतःहून बलात्कार करवून घेणाऱ्या महिलांची नावे समोर आणा.... फोटो आणि व्हिडिओ देखील सार्वजनिक करण्याची माजी मंत्र्यांकडून धक्कादायक मागणी बुलढाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे...राज्याच्या एका माजी मंत्र्यांनी चक्क राज्यपालांना पत्र लिहून एक अत्यंत विचित्र आणि धक्कादायक मागणी केली आहे. ही मागणी ऐकून तुम्हीही थक्क व्हाल! स्वतःहून बलात्कार करून घेणाऱ्या महिलांची नावे आणि व्हिडिओ जाहीर करा! अशी धक्कादायक मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केलीये . सुबोध सावजी यांनी राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांना पाठवलेल्या पत्रात दावा केला आहे की, राज्यात 'स्वतःहून बलात्कार करून घेणाऱ्या' महिलांची संख्या वाढतेय! इतकंच नाही, तर अशा महिलांची नावे, त्यांचे फोटो आणि उपलब्ध असल्यास त्यांचे व्हिडिओ सुद्धा शासनाने सार्वजनिक करावेत, अशी धक्कादायक मागणी त्यांनी केली आहे. सावजी यांनी आपल्या पत्रात म्हटलंय की, अनेक महिला पैशांच्या लालसेपोटी किंवा स्वार्थासाठी भोंदू बाबा आणि महाठगांच्या संपर्कात येतात. अशा महिलांमुळे समाजावर कलंक लागत असून, त्यांची ओळख उघड केल्यासच अशा घटना थांबतील, असा दावा त्यांनी केला आहे. नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाचा दाखला देत त्यांनी ही मागणी लावून धरली आहे. मात्र, कायद्यानुसार पीडितेचं नाव गुप्त ठेवणं बंधनकारक असताना, माजी मंत्र्यांनी केलेली ही मागणी आता नव्या वादाला तोंड फोडणार हे निश्चित! Byte - सुबोध सावजी, माजी राज्यमंत्री राज्याच्या माजी मंत्र्यांची ही मागणी योग्य की अयोग्य? यावर आता कायदेशीर आणि सामाजिक क्षेत्रातून काय प्रतिक्रिया उमटतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
0
0
Report

फलटण-पंढरपूर रेलवे मार्ग के सर्वे पर प्रशासनिक मंजूरी अटक, केंद्र सरकार का बयान

Pandharpur, Maharashtra:ब्रिटिश काळामध्ये सर्वे झालेला पंढरपूर फलटण रेल्वे मार्ग प्रशासकीय मंजुरीच्या टप्प्यातच अडकलेला आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केंद्र政府ला विचारलेल्या प्रश्नावर त्यांना असे लेखी उत्तर मिळाले आहे. फलटण पंढरपूर रेल्वे मार्ग प्रकल्पाचे सर्वेक्षण झाले आहे. डीपीआर तयार करण्यात आला आहे. यानंतरची प्रक्रिया अद्याप झालेली नाही. फलटण पंढरपूर रेल्वे मार्ग हा पंढरपूर सारख्या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राला जोडणारा आहे. ग्रामीण भागातील दळणवळण तसेच शेतमाल वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणारा असल्याने याबाबत नागरिकांमध्ये मोठी अपेक्षा आहे मात्र सध्या हा प्रकल्प प्रशासकीय मंजुरीच्या टप्प्यात अडकल्यामुळे प्रकल्प पूर्ण होण्याच्या निश्चित कालावधी सांगता येणार नसल्याचे उत्तर केंद्र सरकारकडून खासदार मोहिते पाटील यांना मिळालेलं आहे.
0
0
Report

कोल्हापुर में ठगे बिल बकाए के खिलाफ Contractors ने भजन से सरकार विरोध प्रदर्शन

Kolhapur, Maharashtra:Kop Contractor Andolan Anc :- शासकीय कामांची थकीत बिलं तातडीने मिळावीत यासाठी राज्यभरातील कंत्राटदार आक्रमक झाले आहेत. वारंवार आंदोलन करूनही सरकारकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने कंत्राटदारांचा संताप वाढला आहे. यापूर्वीच बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आलं असून, आता कोल्हापूरात कंत्राटदारांनी अनोख्या पद्धतीने सरकारचा निषेध नोंदवला आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर भजन आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर मोठ्या संख्येने जमलेल्या कंत्राटदारांनी भजनाच्या माध्यमातून सरकारचा निषेध केला. थकीत बिलं द्या अशा मागण्यांसह घोषणाबाजी करण्यात आली. राज्यभरात कोट्यवधी रुपयांची बिलं प्रलंबित असल्याचा आरोप कंत्राटदारांनी केला आहे. अनेक कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडले असून, कामगारांचे पगार देणेसुद्धा कठीण झाल्याचं त्यांनी सांगितलं.
0
0
Report
Advertisement

छत्रपती संभाजीनगर महापालिका में भूत-प्रेत का दावा, मंत्री शिरसाठ के बयान से तकरार

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर महापालिका में भूतांचा वावर असल्याचा दावा पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी केला आहे या ठिकाणी आधी कब्रस्तान होतं त्यामुळे इथे गाडलेले आत्मा इथल्या अधिकारी पदाधिकाऱ्यांना बेचैन करतात आणि त्यातून सगळेच बेचैन होतात असा दावा त्यांनी केला आणि पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर मध्ये चर्चांना उधाण आलय... महापालिका परिसरात आत्म्यांचा वावर. महापालिका इमारत पूर्वी कब्रस्तान ची जागा. पालकमंत्री शिरसाठ यांचा दावा, चर्चांना उधाण. छत्रपती संभाजीनगर महापालिकेला ग्रहण लागले आहे आणि ते लागण्याचे कारण म्हणजे जिथं इमारत आहे इथं सगळे मुरदे गाडले जायचे ही कब्रस्तान ची जागा आहे असं वक्तવ્ય पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी केला, त्यामुळं इथले सगळे आत्मे तुम्हाला डीवचतात आणि म्हणून सगळे बेचैन होतात असेही शिरसाठ म्हणाले, यातुन मुक्ती पाहिजे असेल तर ही इमारत चांगल्या ठिकाणी करा असा सल्लाही पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी महापौर आणि आयुक्तांना दिला, यामुळं आत्म्यांना ही सुटका मिळेल आणि तुम्हालाही सुटका मिळेल असे शिरसाठ म्हणाले, आणि या वक्तव्यानंतर छत्रपती संभाजी नगर मध्ये अक्षरशः चर्चांना उधाण आलेलं आहे. इम्तियाज जलील यांनी शिरसाठ याना डिवचले आहे, ३०-३५ वर्ष झाले तेव्हा कब्रस्थान दिसलं नाही का असा सवाल त्यांनी केलाय, आणि नवी इमारत हवीच असेल तर एन 12 भागातील कचरा डेपो हटवा आणि तिथे महानगर पालिका इमारत बांधा अशी आमची केली. अंधश्रद्धा निर्मূলन समितीने महापालिका आयुक्त यांना निवेदन दिले आहे. आयुक्तांनी खुलासा करावा आणि जादूटोणा कायदा अंतर्गत हे विधान तपासून गुन्हाही दाखल करावा अशी मागणी अनिस ने केली आहे. कुठल्या न कोणत्या कारणामुळे शिरसाट सतत वादात असतात त्यात महापालिकेत उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी केलेले हे विधान आणि त्यानंतर सुरू असलेली टोलेबाजी सगळेच चमत्कारिक आहे त्यात पालकमंत्री असलेल्या शिरसाठ यांना असली विधान करणे शोभत नाही हे तितकच सत्य आहे आणि हसत खेळत जर विधान केलं असेल तर याबद्दल खुलासा करण्याची ही तितकीच गरज आहे
0
0
Report
Advertisement

मालाड में भोंदूबाबा के प्रताप पर स्थानीयों ने प्रदर्शन किया: गिरफ्तारी की मांग

Mumbai, Maharashtra:एकीकडे नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण गाजत असताना दुसरीकडे मुंबईतील मालाडमध्ये भोंदूबाबाच्या प्रतापांमुळे स्थानिक हैराण झाले आहेत. मालाडमध्ये राहणारा हा भोंदू बाबा "आपल्या अंगात रविवार आणि गुरुवार या आठवड्यातल्या दोन दिवशी देवी येते आणि मी अनेकांच्या शरीरातील भूत उतरवतो" असं म्हणत जादूटोणा करत असल्याचं दुसऱ्या स्थानिकांनी केला आहे. या सगळ्याचे पुरावे स्थानिकांनी दिंडोशी पोलिसांना दिले असून हे सगळे प्रकार त्यांनी तात्काळ थांबावेत यासाठी पोलिसांनी या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी अशी मागणी केली आहे. यासाठी 65 ते 70 स्थानिकांनी आपल्या सहीचं पत्र पोलिसांना दिला आहे. भोंदूबाबाचे प्रताप, जादूटोणा, भूत उतरवणे ही सगळी प्रकरण फक्त खेडेगावात-ग्रामीण भागात नाही तर मुंबईतल्या शहरी भागात सुद्धा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण अंधश्रद्धेला खतपाणी देणाऱ्यांची संख्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाढत चाललेली पाहायला मिळत आहे. मालाड पूर्वेला राहणारा रिदम पांचाळ हा व्यक्ती रविवार आणि गुरुवार लोकांची सेवा करतो असं म्हणत जादूटोणा करत असल्याचा आरोप त्यांच्या आजूबाजूला राहणाऱ्या स्थानिकांनी केला आहे. मागील दोन वर्षांपासून दर आठवड्याच्या रविवारी आणि गुरुवारी अघोरी पूजा करतो आणि त्याला अंगात देवी आल्याचे म्हणत इतरांच्या अंगातील भूत उतरवतो असं सांगतो. आतापर्यंत त्याच्या घरी, घराच्या समोर अशा प्रकारच्या पूजा किंवा अशा प्रकारचे प्रताप तो करत होता. मात्र 4 एप्रिलला त्याने महापालिकेच्या गार्डनमध्ये शेकडो लोकांना बोलून आपली पूजा करत उघडपणे भूत उतरण्याच्या नावाखाली जादूटोण्याचा प्रकार केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्याचे काही फोटोज व्हिडिओसुद्धा आता समाज माध्यमांमध्ये आले आहेत.
0
0
Report

अकोला में शिंदे शिवसेना और भाजपा के बीच तनाव जारी; बैनर फाड़ने पर आरोप

Akola, Maharashtra:अकोला शहरात महापालिकेतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद अधिकच चिघळताना दिसत आहे. काल शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक सागर भारूका यांच्या समर्थकांनी भाजपविरोधी बॅनरबाजी केली होती. या बॅनर हटवण्यावरूनही दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला होता. दरम्यान, काल मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी शहरातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर लावण्यात आलेला सागर भारूका यांचा बॅनर फाडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या बॅनरवर महापुरुषांचे तसेच देवतांचे फोटो लावण्यात आले होते. त्यामुळे भावना दुखावल्याचा आरोप करत, हा प्रकार भाजप कार्यकर्त्यांनी केला असावा असा अप्रत्यक्ष आरोप शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या प्रकरणी संबंधितांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहितीही पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report

सोलापुर जिला परिषद समितियों में शिंदे समूह दबाव नाकाम, सिद्धाराम म्हेत्रे को स्थान नहीं मिला

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापूर जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या निवडीत शिंदे गटाचे दबावतंत्र अपयशी ठरले - सोलापूर जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या निवडीत शिंदे गटाचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रेंचे दबावतंत्र अपयशी ठरले - शिवसेना शिंदे गटातील सदस्यांमुळेच अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे एकाकी पडले - शिवसेना शिंदे गटातील सदस्यांनीच पाठिंबा न दिल्याने सिद्धाराम म्हेत्रेंच्या मुलाला अपेक्षित विशेष समितीमध्ये स्थान मिळाले नाही - शिवसेनेच्या सिद्धाराम म्हेत्रे यांनी स्थायी, बांधकाम आणि समाजकल्याण समितीत स्थान मिळावे यासाठी निवडणूक लावण्याची घोषणा केली - मात्र झेडपीच्या 68 पैकी 60 सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिल्याने शिवसेनेतील म्हेत्रे गटाचा प्रभाव राहिला नाही - याशिवाय स्वपक्षातील 8 पैकी 6 सदस्यांनी तटस्थ भूमिका घेतल्याने सिद्धाराम म्हेत्रे यांना माघार घ्यावी लागली. - निवडणूक झाली असती तर भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले असते आणि शिवसेना शिंदे गटाची मोठी नामुष्की झाली असती.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top