icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

वाशीम में नकली बीजों से किसान परेशान, मदद की तात्कालिक मांग

Washim, Maharashtra:वाशीम: खरिप हंगामातील 80 टक्के पेरण्या पूर्ण झाल्यानंतर आता बोगस बियाण्याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनची उगवण न झाल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत असून बियाणे, खत, मशागत आणि मजुरीचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे. या प्रकरणी आतापर्यंत 35 शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्या असून विभागाकडून पडताळणी व बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. बोगस बियाणे विक्रेत्यांवर कठोर कारवाई करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
0
0
Report

यशवंतपुर-बिकानेर एक्सप्रेस पर डकैती, महिलाओं समेत कई यात्री मारहाण

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - यशवंतपुर - बिकानेर एक्सप्रेस रेल्वे गाडीवर पडला दरोडा, दरोडेखोरांकडून महिलांसह अनेक प्रवाशांना मारहाण - यशवंतपुर - बिकानेर एक्सप्रेस वर पडला सशस्त्र दरोडा - महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील अक्कलकोट तालुक्यातील तडवळ रेल्वे स्थानकावर थांबलेल्या एक्सप्रेसवर दरोडा - अज्ञात पाच ते सहा दरोडेखोरांनी रेल्वेत घुसून महिलांसह प्रवाशांना केली मारहाण - प्रवाशांकडील रोख रक्कम, मोबाईल आणि सोन्याची दागिने लुटल्याची धक्कादायक माहिती समोर - सदरच्या घटनेला विरोध करणाऱ्या प्रवाशांवर दरोडेखोरांकडून दगडफेक - यशवंतपुर बिकानेर एक्सप्रेस पहाटे तीनच्या सुमारास 74 मिनिटे तडवळ रेल्वे स्थानकावर थांबलेल्या घटना - लोहमार्ग पोलिसांसह फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल आरोपींचा शोध सुरू
0
0
Report
Advertisement

मालशेज पुलिस मदत केंद्र के डॉ. संजय घुडे को मुंबई विश्वविद्यालय से पीएचडी मिलने पर सम्मान

Shirur, Maharashtra:महामार्ग पोलीस मदत केंद्र माळशेज येथे कार्यरत असलेले पोलीस अंमलदार डॉ. संजय घुडे यांना मुंबई विद्यापीठाकडून पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मुरबाड येथे आयोजित कार्यक्रमात त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. 'मातृत्व सन्मान व विद्यार्थी गुणगौरव' या कार्यक्रमाचे आयोजन सिडकोचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्या वतीने करण्यात आले होते. पोलीस दलात कार्यरत राहून डॉ. घुडे यांनी मिळवलेल्या या शैक्षणिक यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
0
0
Report

छत्रपती संभाजीनगर में स्वच्छता के लिए नगर निगम ने 29 विशेष दस्ते तैनात

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ANC : छत्रपती संभाजीनगर शहर स्वच्छ, सुंदर और कचरामुक्त करनेासाठी महानगरपालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरात उघड्यावर कचरा टाकणे, दुकानांसमोर घाण पसरविणे आणि सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर आता कडक कारवाई केली जात आहे. मनपा आयुक्त अमोल येडगे स्वतः रस्त्यावर उतरून अचानक पाहणी करत असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत आहेत. घनकचरा व्यवस्थापन विभागाने यासाठी तब्बल २९ विशेष पथके तैनात केली असून ही पथके शहरभर अचानक तपासणी करत आहेत. गेल्या दोन दिवसांत नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून एक लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आले असून, शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.
0
0
Report

राजुरा के किसानों ने निकृष्ट सोयाबीन बीजों के कारण भारी आक्रोश जताया; अधिकारीयों को पेड़ पर लटकाने की चेतावनी

Amravati, Maharashtra:निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यामुळे राजुरा येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. महालोक कंपनीच्या सोयाबीन, इतर कंपन्यांच्या बियाण्यांची पेरणी करून 10-11 दिवस उलटूनही उगवण न झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर महालोक कंपनीचे अधिकारी शेतात दाखल झाले. या पाहणीदरम्यान भूषण काळे यांनी संताप व्यक्त करत कंपनीच्या अधिकाऱ्यांना कठोर शब्दांत इशारा दिला. मी कंपनीला सोडणार नाही; वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा अन्यथा शेतातच झाडावर लटकवण्याचा इशारा समोरासमोर दिला. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले.
0
0
Report
Advertisement

गोंडिया: सखी वन स्टॉप सेंटर की तेज कार्रवाई से दो महिलाएं सुरक्षित घर पहुंचीं

Bhandara, Maharashtra:गोंडिया से सखी वन स्टॉप सेंटर की संवेदनशील और जलद कार्यवाही के कारण बिहार और भुसावल से पिछले एक महीने से गुम दो महिलाएं सुरक्षित अपने घर पहुंचीं। जिला़ा महिला व बालविकास विभागांतर्गत के.टी.एस. अस्पताल में कार्यरत इस केंद्र ने यह जिम्मेदारी निभाई। बिहार के nalanda जिल्हे की 40 वर्षीय रिंकू देवी राजकुमार साव, दूसरी महिला भुसावल जिले की रेखा तुकडिदास राठोड थीं। वे मानसिक रूप से अस्वस्थ थीं और जानकारी न दे पाने के कारण पुलिस ने उन्हें सुरक्षा के दृष्टि से सखी वन स्टॉप सेंटर में दाखिल किया। सेंटर के समुपदेशकों ने दोनों से संवाद कर उनकी पूरी जानकारी ली। उन्होंने दी गई जानकारी के आधार पर केंद्र के कर्मचाऱियों ने उनके परिवार वालों का खोजकर संपर्क किया। परिवार ने बताया कि वे पिछले एक महीने से महिलाओं की तलाश कर रहे थे। दोनों महिलाओं के परिवार गोंडिया में दाखिल थे। उन्हें लेकर गए……
0
0
Report

पालकमंत्री शंभूराज देसाई ने पालखी तयारी की समीक्षा; प्रशासन को कडक निर्देश

Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी लोणंद येथील संत ज्ञानेश्वर माऊली पालखी तळाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासकीय तयारीचा आढावा घेतला. आगामी १५ जुलै रोजी माऊलींच्या पालखीचे जिल्ह्यात आगमन होत असून, वारकऱ्यांच्या सुविधेसाठी पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि विजेचे चोख नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी पाऊस पडण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने पर्यायी निवासाची व्यवस्था करावी, तसेच गर्दीत हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी पोलिसांना दिले. या पाहणी दौऱ्याप्रसंगी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाईट: पालकमंत्री शंभूराजे देसाई
0
0
Report
Advertisement

पवनी कृषि केंद्र में 2.5 टन नकली खाद पकड़ी; विभाग ने जप्त किया

Bhandara, Maharashtra:भंडारा जिल्ह्यात कृषी विभागाकडून अडीच मॅट्रिक टन बोगस खतसाठा जप्त कृषी विभागाची धडक कार्यवाही. जिल्ह्यात सध्या खरिपाची जोरदार तयारी सुरू असताना पवनी येथील कृषी केंद्रामध्ये अडीच मॅट्रिक टन बोगस खतसाठा मिळालेला असून कृषी विभागाने तो जप्त केला आहे. नाशिक येथील मेसर्स कृष्णा बायो ऑरगॅनिक इंडस्ट्रियल या कंपनीकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी न घेता दुसऱ्या कंपनीचे लेबल लावत खत विक्री होत असल्याचा प्रकार कृषी विभागाच्या भरारी पथकाने पुढे आणलेला आहे. भरारी पथकाने अडीच मॅट्रिक टन बोगस खत साठा जप्त करत अवैद्यपणे विक्री करणाऱ्या खत कंपनी मालकासह पवनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे.
0
0
Report
Advertisement

कोकण से पश्चिम महाराष्ट्र के प्रमुख मार्ग बंद, दराड़ों के कारण यातायात ठप

Chendhare, Maharashtra:कोकणातून पश्चिम महाराष्ट्राची वाट बिकट ....... पश्चिम महाराष्ट्रात जाणारी वाहतूक ठप्प .......सर्व प्रकारची वाहतूक बंद .......सर्व घाट रस्त्यावर दरडी कोसळण्याचा धोका ......\n\nमागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका रायगड जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेला बसला आहे. कोकणातून पश्चिम महाराष्ट्रात जाणारे प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत. वारंवार कोसळणाऱ्या दरडी याचं प्रमुख कारण आहे. कोकणातून महाबळेश्वरकडे जाणारा आंबेनळी घाट रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकासाठी बंद आहे. तर वरंध घाट और ताम्हिणी घाटातून देखील वाहतूक बंद करण्यात आली आहे त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी.
0
0
Report

शासकीय निधि जनता की नहीं, बाप का पैसा: सांसद विशाल पाटील का हमला

Sangli, Maharashtra:शासकीय निधी हा,जनतेचा नव्हे,तर आपल्या बापाचा पैसा आहे,अशी धारणा प्रशासनाची झाली,अशी टीका खासदार विशाल पाटलांनी केली आहे. सांगलीच्या मिरज पंचायत समितीच्या नूतून इमारत उद्घाटन समारंभाच्या वादावरून खासदार विशाल पाटलांनी मिरज पंचायत समितीच्या प्रशासनावर जोरदार निशाणा साधला आहे. शासनाच्या लोकांना एक सवय लागली आहे शासकीय निधी अजंतेचा नसून तो प्लिजरेने आपल्या बापाचा पैसा असल्याची धारणा त्यांच्या निर्माण झाली आहे,काही प्रशासकीय अधिकारी सत्तेचा संरक्षण मिळत असल्याच्या भावनेत आहेत.पण सत्ता कायम कोणाची नसते,मिरज तालुक्यात प्रशासकीय काळात मोठा भ्रष्टाचार झाला असून सत्ता बदलानंतर सर्व भ्रष्टाचाराची चौकशी होणार,असा इशारा देखील खासदार विशाल पाटलांनी दिला आहे.मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारत उद्घाटन सोहळ्याला सत्ताधारी महाविकास आघाडीच्या सभापती आणि उप सभापतींना विश्वासात घेतला नसल्याचा आरोप करत प्रशासनाच्या उद्घाटनापूर्वीच सत्ताधारी महाविकास आघाडीकडून नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले आहे,यावेळी आयोजित कार्यक्रमांमध्ये खासदार विशाल पाटील बोलत होते.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top