icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

शिर्डी में भक्तों की भारी भीड़, सुरक्षा के बीच दर्शन व्यवस्था बेहतर

Shirdi, Maharashtra:Anc - उन्हाळी सुट्ट्यांचा शेवटचा टप्पा आणि त्यातच विकेंडचा योग जुळून आल्याने साईनगरी शिर्डीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याच पाहायला मिळतय..देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातून मोठ्या संख्येने भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल होत आहेत. साई मंदिर परिसर, दर्शन रांगा आणि प्रमुख रस्ते भाविकांच्या गर्दीने अक्षरशः फुलून गेलेले पाहायला मिळतायत... V/O - दरम्यान, वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर भाविकांना सुलभ आणि सुरक्षित दर्शन मिळावे यासाठी साईबाबा संस्थान प्रशासनाने विशेष नियोजन केलय.दर्शन रांगांचे सुयोग्य व्यवस्थापन, अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, वैद्यकीय सुविधा तसेच सावलीसाठी तात्पुरत्या शेड्स उभारण्यात आल्या आहेत.तसेच, भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी स्वयंसेवक आणि कर्मचारी सतत कार्यरत असून ऑनलाईन दर्शन पास आणि टाइम स्लॉट व्यवस्थेमुळे दर्शन प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न केला जातोय... बाईट - गोरक्ष गाडीलकर , CEO
0
0
Report

शिरूर के किसानों की केळी फसल तूफानी बारिश से भारी नुकसान, राहत की मांग तेज

Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील गायकवाड मळा परिसरात काल संध्याकाळी झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे. येथील शेतकरी प्रभाकर राऊत यांचं तब्बल अडीच एकर क्षेत्रातील केळीचं पीक वादळी वाऱ्यामुळे पूर्णपणे कोसळून जमीनदोस्त झालंय. या पिकासाठी शेतकऱ्याने ४ ते ५ लाख रुपयांचा खर्च केला होता. मात्र, ऐन काढणीच्या वेळी संपूर्ण पीक हातचं गेल्यामुळे आता मुलांच्या शिक्षणाचा आणि घरखर्चाचा मोठा प्रश्न या शेतकरी कुटुंबासमोर निर्माण झाला आहे. विशेष आणि संतापजनक बाब म्हणजे, एवढं मोठं नुकसान होऊनही अद्याप कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने किंवा प्रशासनाने पंचनामा करण्यासाठी या भागाला भेट दिलेली नाही. हताश झालेले शेतकरी जेव्हा कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत, तेव्हा त्यांचा फोन 'नॉट रिचेबल' लागत असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी आता परिसरातून केली जातेय.
0
0
Report

ताडोबा-अंधारी बफर में कृत्रिम पानी स्रोत, वन्यजीवों की भारी भीड़

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूरच्या ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर भागात पाणीाचे स्त्रोत आटल्यानंतर वनविभागाने विविध ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. ताडोबा बफर भागातील मोहर्ली वनपरीक्षेत्रात वढोली बीटात तयार झालेले अशाच कृत्रिम पाणवट्यावर मोठ्या संख्येत वन्यजीवांची गर्दी बघायला मिळत आहे. प्रकल्पात मुबलक पाणी उपलब्ध असले तरी ते वन्यजीवांपर्यंत पोहोचवण्यासाठी वनविभागाची धडपड आहे. पावसाळा लांबल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना पाणवट्यापर्यंत कॅनद्वारे पानीपुरवठा करावा लागत आहे. मात्र या सर्व वन्यजीवांना सहजपणे उपलब्ध होणारे पाणी त्यांच्यासाठी जीवन ठरले आहे.
0
0
Report
Advertisement

चंद्रपूर: सुधीर मुनगंटीवार के बयानों पर बहस, आचार संहिता के सवाल उठे

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची विविध विषयांवर प्रतिक्रिया ऑन वडेट्टीवार पाच-पाच लाख वाटप आरोप # आज 6 जून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आहे, त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवली होती. त्यांनी पैसे घेतले असेल तर तुम्ही त्यांना निष्ठा शिकवा ना, अशे विकाऊ कार्यकर्ते घेऊन पक्ष चालवला जात असेल तर त्याला कोण जबाबदार आहे? मला अभिमान आहे की आमच्या कार्यकर्त्यांना कोणी मोहात पाडू शकत नाही, आम्हाला दुसरा पक्ष काय करतो याच्याशी काही लेणं देणं नाही. 1952, 1975 मध्ये जे आरोप झाले तेच 2026 मध्ये होत आहेत, त्यामुळे लोकांची मानसिकता कशी बदलवता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. सर्वच पक्षांना त्यांचे कार्यकर्ते अशा गोष्टींपासून दूर राहावे म्हणून राष्ट्रभक्तीचं व्हॅक्सिन दिलं पाहिजे ऑन विधान परिषद आचारसंहिता 2:27 # विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे सामान्य लोकांच्या प्रश्नांवर बैठका घेता येत नसल्यामुळे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा आज संताप दिसून आला, आचार संहिता म्हणजे शोले चा नवीन गब्बर सिंग आहे का असं म्हणत या गब्बरसिंग ची भीती दाखवत सामान्य लोकांचे प्रश्न देखील सोडवता येत नाही. या निवडणुकीत नगरसेवक हे मतदार आहेत पण ते सामान्य लोकांचे प्रश्न सोडवले म्हणून प्रभावित होतात का? नगरसेवक हे त्या त्या पक्षाचे बांधील आहेत मग मी तर म्हणेल की मग निवडणुकाच का घेता? जसा आपण एखाद्या गटाची शक्ती किती त्या आधारावर को-ऑप देतो, त्याप्रमाणे एक सिस्टीम तयार करा म्हणजे घोडेबाजार पण होणार नाही आणि विधान परिषदेवर सदस्य पण निवडून जातील. तुमच्या मनातल्या इच्छाही पूर्ण होतील आणि कारण नसताना आचारसंहितेचा गब्बरसिंग सामान्य लोकांना त्रास देणार नाही, आचारसंहितेचा गब्बर सिंग त्रास द्यायला लागला तर जनतेतून कधीतरी जय-विरू तयार होणारच आहे ऑन कॉकरोच जनता पार्टी आंदोलन # सुप्रीम कोर्ट च्या माननीय न्यायमूर्तींना असं वाटलं की ते जे बोलताय ती छोटी गोष्ट आहे मात्र ती छोटी गोष्ट नव्हती, तुम्ही जेव्हा देशातील तरुणांना अशी उपमा देता, तेव्हा तरुणांच्या मनात असा भाव हा जन्माला येतो, आणि अशा भावातून तरुणांनी अशा प्रकारचा प्रयोग केला आहे, पण अशा प्रकारच्या प्रयोगाला एक योग्य दिशा आणि व्यवस्था लागते आणि अशा प्रकारची दिशा आणि व्यवस्था नसेल तर असा प्रयोग पर्याय ठरत नाही, भाजपने त्याग, तपस्या आणि बलिदानातून ही व्यवस्था तयार केली आहे, त्यामुळे सी जे पी काही पर्याय ठरू शकत नाही, मात्र हे खर आहे की सीजेपीच्या या प्रयोगातून प्रत्येकाने काहीतरी शिकलं पाहिजे की सामान्य माणसाचं मन दुखेल अशा शब्दांचा प्रयोग करायला नको, सुप्रीम कोर्टात बोलताना तुम्ही भान ठेवलं नाही त्यातून हा प्रयोग जन्माला आला, त्यामुळे असे प्रयोग कोणाला जन्माला येऊ नये याची सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे
0
0
Report

नवी मुंबई एयरपोर्ट पर छत्रपति शिवाजी महाराज का 20 फुट ऊँचा पुतला उद्घाटन

Navi Mumbai, Maharashtra:नवीORI मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले पुतळ्याचे अनावरण. मंत्री गणेश नाईक, अदिती तटकरे देखिल उपस्थित. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज स्वराज्याला छत्रपति मिळाले मला आनंद आहे या दिवशी सगल्याना जगणे हिंदवी स्वराज्य मान्य केलं तो आजचा दिवस. छत्रपती शिवरायांचा 20 फुटी पुतळ्याचे अनावरण नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर झाले. मागच्या वेळी आलो तेव्हा बोललो होतो महाराजांचा पुतळा स्वराज्याच्या राजधानीत झाला पाहिजे केवळ आठ महिन्यात हा पुतळा तयार झाला त्याचं अनावरण केलं. प्रत्येक jण यातून ऊर्जा प्राप्त करेल. बाळ माने आम्हाला परके नाहीत बाळ माने भाजपा मध्येच तयार झालेत काही कारणाने ते पक्ष सोडून गेलेले. यासंदर्भात निर्णय मुख्यमंत्री करत नाहीत प्रदेशअध्यक्ष करत असतात. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचं नवं दिलं पाहिजे हा आमचा आग्रह आहे. यासंदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे. केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे आम्ही पाठपुरावा करुन हे नामकरण करुन घेऊ. माणसं पैसा पेक्ष प्रेमाने जिंकता येतात हे जर तुम्हाला समजले तर तुम्हाला अश्याप्रकारचे बिल मांडण्याची आवश्यकता पडणार नाही. या निवडणुकीत प्रक्रियेत परिवर्तन झालं पाहिजे. यासंदर्भात कोणी बिल मांडणार असेल तर मला काहीच हरकत नाही. निवडणूक प्रक्रियेत परिवर्तन झालं पाहिजे असे माझंही मत. बाईट- देवेंद्र फडणवीस -मुख्यमंत्री
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी में जलसंकट गहराया: ग्रामीण पानी के लिए प्यासे, प्रशासन के दावों पर सवाल

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रत्नागिरी जिल्हात सध्या भीषण पाणी टंचाई गावागावांत आहे.. पाण्यासाठी लोक वणवण फिरत आहेत.. घरापासून दूरवर असलेल्या जलस्रोतांवरती जाऊन पाणी घरात आणले जाते.. चिपळूण तालुक्यातील सावर्डे कोंडमळा येथील घराजवळील विहिरी आटल्यात त्यामुळे घरापासून जवळच असलेल्या जलस्त्रोत्रांवरती जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग पार करून महामार्गाच्या बाजूला सीडी लावून दहा ते बारा फूट खाली उतरून पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.. गावातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात प्रशासनाचे नियोजन फेल ठरल आहे..
0
0
Report

ज्योती वाघमारे ने संजय राऊत पर आरोपों की बौछार, विपक्ष में तीखी बहस

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - ज्यांना लढता येत नाही ते पराभूत मानसिकतेचे लोक असतात - खा. ज्योती वाघमारे ज्योती वाघमारे, राज्यसभा सदस्य शिवसेना ऑन संजय राऊत दीडशे कोटी आरोप ज्यांना लढता येत नाही, ते पराभूत मानसिकतेचे लोक असतात.. ते फक्त दुसऱ्यांवर आरोप करतात.. संजय राऊत यांनी खरंतर आत्मपरीक्षण करायला हवं होतं अनेक ठिकाणी विधानपरिषद निवडणुकीत उमेदवार दिले नाही.. नाशिक मध्ये ठाकरे यांच्या शिवसेनेला उमेदवार देता आला नाही.. तिथे नक्की काय उलाढाल झाली. त्याचं कारण संजय राऊत यांनी सांगाव. या लोकांनी आपला पराभव मान्य केला आहे. उन्हांना लढता येत नाही.. त्यांच्याकडे माणसं नाहीत.. अशा पद्धतीचे थातूरमातूर आरोप करून स्वतःचं अपयश झाकण्याचा प्रयत्न करताय.. ऑन सुप्रिया सुळे आरोप सुप्रिया सुळे यांना आपला पक्ष सांभाळता येत नाही. या लोकांना आपली माणसं सांभाळता येत नाहीत. बिलंच मांडायचा असेल तर एक एकर शेतीमधून शंभर कोटींचं वांग्याचे उत्पन्न कस निघते. याची देखील चौकशी लावली पाहिजेत.. खरंतर सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे की, शंभर कोटीचं उत्पन्न कसे निघतं त्या संदर्भात असलं. यातून शेतकरी आत्महत्या तरी थांबतील. परंतु सगळ्यात जास्त पक्ष कोणी फोडले आणि ते कसे फोडले. याची चौकशी आणि आत्मपरीक्षण ताईंनी केलं तर बरं होईल.. ज्योती वाघमारे, राज्यसभा खासदार शिवसेना
0
0
Report

परतूर, जलना में युवक का शव कचरे की गाड़ी में ले जाने पर प्रशासन पर आक्रोश

Jalna, Maharashtra:जालना :ब्रेकिंग कच-याच्या गाडीत युवकाचा मृतदेह नेण्याची पोलीस प्रशासनावर नामुष्की परतुर शहरातील संतापजनक घटना परतूर नगरपालिकेला दोन रुग्णवाहिका असताना पोलीस प्रशासनाकडून मृतदेहाची विटंबना ! पोलीस प्रशासनावर नागरिकांचा संताप, दोषींवर कारवाई करण्याची मागणी अँकर- जालना जिल्ह्यातल्या परतूर येथे एका युवकाचा मृतदेह कच-याच्या गाडीत नेल्याने पोलीस प्रशासनाविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केलाय.. परतूर शहरातील हिरालालनगर येथील बेपत्ता सुरेश ढाकरगे या युवकाचा मृतदेह पाण्याच्या टाकीखाली आढळून आला.. यावेळी पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी चक्क कच-याच्या गाडीत टाकून नेला.. विशेष म्हणजे पंधरा दिवसांपूर्वीच भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते पालिकेच्या नवीन रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं होतं.. त्यामुळं पालिकेला दोन रुग्णवाहिका असताना कच-याच्या गाडीत मृतदेह नेण्याची नामुष्की पोलीस प्रशासनावर आली. त्यामुळं नागरिकांत संताप व्यक्त होत असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे..
0
0
Report
Advertisement

अकोला के अस्पताल में मरीज को मदद नहीं मिली, महिला ने पति को गोद में उठाया

Akola, Maharashtra:अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेचा संवेदनाहीन चेहरा समोर आला आहे. ब्रेन स्ट्रोकचा झटका आलेलेल्या आपल्या पतीला उपचारासाठी घेऊन आलेल्या एका आदिवासी महिलेला रुग्णालयात कोणतीही मदत मिळाली नाही. त्यामुळे या महिलेला चक्क आपल्या पतीला पाठीवर घेऊन रुग्णालय परिसरात भटकावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित रुग्णाला तातडीने उपचारांची गरज असताना रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित असूनही महिलेला व्हीलचेअर किंवा स्ट्रेचर उपलब्ध करून देण्यात आले नाही. पोटाला सामानाची बॅग लटकवून आणि पाठीवर पतीचा भार घेऊन ही महिला विविध विभागांमध्ये मदतीच्या शोधात फिरत होती. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका गंभीर रुग्णाला उपचारासाठी आणलेल्या कुटुंबीयांना मूलभूत सुविधा आणि मदत मिळत नसेल, तर सामान्य नागरिकांनी कोणाकडे अपेक्षा ठेवायची, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या प्रकारामुळे रुग्णालयातील रुग्णसेवा, कर्मचारी वर्गाची संवेदनशीलता आणि आपत्कालीन व्यवस्थेवर टीका होत असून, "येथे उपचार मिळतात की मरण?" असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
0
0
Report

गड़चिरोली विमानतळ भूसंपादन स्थगित, किसानों को लिखित आश्वासन मिलने के बाद आंदोलन समाप्त

Gadchiroli, Maharashtra:टायटल:--- गडचिरोलीत काँग्रेसचे आंदोलन संपले, विमानतळ भूसंपादन प्रक्रियेेला तात्पुरती स्थगिती, शेतकऱ्यांना लेखी आश्वासन, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर अंतिम निर्णय, सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांची आंदोलनस्थळी भेट, जनभावनांचा आदर राखत शासनाची सकारात्मक भूमिका गडचिरोलीत विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रियेविरोधात जिल्हा मुख्यालयात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या काँग्रेसच्या शेतकरी आंदोलनाची दखल घेत जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिनिधी म्हणून आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलक शेतकऱ्यांशी रात्री उशिरापर्यंत sविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी विमानतळ भूसंपादनासंदर्भातील पुढील प्रक्रिया सध्या तात्पुरती स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर करत अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून घेतला जाईल, असे आश्वासन दिले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे लेखी पत्रही आंदोलक शेतकऱ्यांना देण्यात आले. गडचिरोली येथे विमानतळ उभारणीसाठी शिरापूर चक, गुरुवळा, हिरापूर आणि राखी या गावांमधील सरकारी, खाजगी तसेच वन विभागाच्या अखत्यारितील एकूण ३११.८१ हेक्टर आर जमीन संपादित करण्यासाठी राज्य शासनाने १२ मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये १०४ कोटी ४८ लाख ६४ हजार २३९ रुपयांच्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता प्रदान केली आहे. या निर्णयाविरोधात ठिय्या आंदोलन सुरू झाले होते. नागरिकांनी लोकशाही मार्गाने आंदोलन केले असून शासन जनभावनांचा पूर्ण आदर करते. कोणतेही काम बळजबरीने करण्याची शासनाची भूमिका नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले असून विकास आणि लोकहित यांचा समतोल राखण्यावर भर दिला आहे. यासोबतच प्रस्तावित चामोर्शी औद्योगिक वसाहतीच्या टप्पा पाच अंतर्गत लॉईड्ससाठी तसेच JSW कंपनी बाबत सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. भूसंपादन अधिसूचनेनुसार सुरू असलेल्या या प्रक्रियेत संबंधित नागरिक व शेतकऱ्यांना हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी ९० दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
0
0
Report
Advertisement

उमेश दलवी हत्या मामला: सचिन साठे पीड़ित परिवार से मिले, मुख्यमंत्री से मुलाकात योजना

Beed, Maharashtra:ANC - कामगार उमेश दळवी खूनप्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी केवळ एका आरोपीला अटक केली असून, पीडित कुटुंबाने सुरुवातीपासून या गुन्ह्यात तीन आरोपींचा सहभाग असल्याचा आरोप केला असून मात्र उर्वरित संशयितांबाबत अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने कुटुंबीयांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे चुलत नातू सचिन साठे यांनी आज पीडित कुटुंबाची भेट घेत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशीही चर्चा करून तपासाची माहिती घेतली. सचिन साठे यांनी या प्रकरणात पीडित कुटुब्लाला न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. तसेच दोषींवर कठोर कारवाई होऊन संपूर्ण सत्य समोर आणण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
0
0
Report

शिवाजी महाराज के शिवराज्याभिषेक दिवस पर देशभर में रायगड़ में बड़ा उत्साह

Yeola, Maharashtra:हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला 352 वर्ष पूर्ण झाले असून देशभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे स्वराज्याची राजधानी रायगडावर सकाळपासूनच लाखोंच्या संख्येने मावळे दाखल झाले आहे मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून येवला शहरात शिवसृष्टी उभारण्यात आली असून या ठिकाणी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधीश पुतळ्याला शेकडो शिवप्रेमींनी सकाळपासून अभिवादन केले असून बनकर पाटील स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भेट देऊन अभिवादन केले या ठिकाणी शिवव्याख्याते दीपक देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची पाने उलगडत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
0
0
Report

कांदा खरीदी शर्तों में ढील, किसान बोले- मिनिमम 2000 रुपये क्विंटल चाहिए

Shirdi, Maharashtra:राज्य सरकारने शासकीय कांदा खरेदीच्या अटी शिथिल करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला खरा , पण हा शासन निर्णय अद्याप कागदावरच असल्याने कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. कांदा उत्पादनासाठी प्रति क्विंटल २ हजार रुपयांपर्यंत खर्च येत असतांना मात्र , शेतकऱ्याच्या पदरात १२०० रुपये पडत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने, शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कांद्याला प्रति क्विंटल किमान २ हजार रुपये भाव जाहीर करावा , अशी आर्त हाक श्रीरामपूर येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारला दिली आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top