icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

दिल्ली में एसी फटने से 9 मौत: जागरुकता और सुरक्षा टिप्स

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:एसीचा sप्‍त होऊन नुकतेच 9 जणांचा दिल्लीत हकनाक बळी गेला खरं तर तापलेल्या उन्हाची काहिलीत एसी थंड हवा देणारी कामाची वस्तू आहे मात्र हाच एसी आता जीवावर उठला आहे, नक्की काय असे झाले त्यातून एसी चा s्फोट झाला काय काळजी घेण्याची गरज आहे पाहुयात एक स्पेशल रेपोर्ट एसी वापरताय सावधान ! एसीच्या s्फोटात दिल्लीत 9 जणांचा मृत्यू का होताय एसीत s्फोट, जबाबदार कोण ? उन्हाच्या काहिलीत थंड हवेची झुळूक मनाला गारवा देते आणि उन्हाळ्यात हेच काम एसी करतो, कधीकाळी फक्त चैनी चा श्रीमंतांच्या घरी असणारा एसी आता प्रत्येक दुसऱ्या घरात असतो मात्र हाच एसी तुमच्या जीवावर उठला तर, असलाच प्रकार दिल्लीत झाला, एसीच्या कॉम्प्रेसर मध्ये s्फोट झाल्याने घराला आग लागली आणि त्यात 9 जणांचा बळी गेला त्यामुळं आता एसीच्या वापरावर ही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नक्की ka लागतेय एसी मध्ये आग याचा शोध घेतला असता अगदी छोटी कारणं पुढं आली जी जीवावर उठू शकतात... प्रमुख कारणं जिथं 2 टन एसीची गरज आहे तिथं 1 टनाचा एसी लावला की कॉम्प्रेसर वर दबाव येतो त्यातून s्फोट होऊ शकतो एसीचे आयुष्य संपले तरी त्याला कूल होते म्हणून वापरतात त्यातून धोका निर्माण होऊ शकतो एसीमध्ये कूलिंगसाठी वापरला जाणारा रेफ्रिजरंट गॅस जर गळत असेल आणि त्याच वेळी इलेक्ट्रिकल वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाले, तर ठिणगी उडून भीषण s्फोट होऊ शकतो. जुन्या एसीमध्ये ज्वालाग्राही गॅसचा वापर अधिक असायचा, ज्यामुळे हा धोका वाढतो. कॉम्प्रेसर हा एसीचा मुख्य भाग असतो. जर एसी सलग अनेक तास (उदा. १८-२० तास) विश्रांतीशिवाय चालवला, तर कॉम्प्रेसर प्रचंड गरम होतो. अशा स्थितीत वायरिंग वितळून किंवा अंतर्गत दाब वाढून कॉम्प्रेसरचा s्फोट होऊ शकतो. एसीच्या बाहेरील युनिटमध्ये (Outdoor Unit) कंडेन्सर कॉइल्स असतात. जर त्यावर खूप धूळ आणि कचरा साचला असेल, तर उष्णता बाहेर फेकली जात नाही. यामुळे सिस्टीममधील प्रेशर वाढते आणि s्फोटाची शक्यता निर्माण होते. जर एसी बसवताना योग्य तंत्रज्ञानाचा वापर केला नाही किंवा गॅस रिफिल करताना निकृष्ट दर्जाचा गॅस भरला, तर सिस्टीममध्ये बिघाड होऊन अपघात होऊ शकतो. तसेच, अल्युमिनियमऐवजी स्वस्त दर्जाच्या पाईप्सचा वापर करणेही घातक ठरू शकते. विजेचा दाब अचानक वाढल्यास एसीच्या सर्किटवर ताण येतो. यामुळे आग लागून ती कॉम्प्रेसरपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे या sगळ्या गोष्टींवर बारीक लक्ष ठेवण्याची गरज आहे.
0
0
Report
Advertisement

कोल्हापुर में बच्चों पर अत्याचार के मामलों में वृद्धि, सुरक्षा सवाल बने

Kolhapur, Maharashtra:राज्यात बालकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नरसापूर येथील धक्कादायक घटनेनंतर हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विविध जिल्ह्यांतील अशा घटनांनी डोळे उघडले असताना, सदन समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील आकडेवारीही चिंताजनक आहे. गेल्या पाच वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 623 बालकांवर अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले आहेत. बालकांवर होणारे अत्याचार थांबण्याऐवजी वाढत चालले आहेत. लैंगिक अत्याचार, छळ, अपहरण यांसारख्या घटनांमुळे बालकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. कोल्हापूरसारख्या शांत आणि सुसंस्कृत जिल्ह्यातही अशी गंभीर आकडेवारी समोर येत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. गेल्या पाच वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 623 बालकांवर अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले आहेत. तर 1130 बालकांचे अपहरण झालेाचे पोलीस रेकॉर्ड वरून दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मते, या घटनांमागे सामाजिक जागरूकतेचा अभाव, डिजिटल माध्यमांचा गैरवापर यासह बिघडलेली विकृत मानसिकता कारणीभूत असल्याचं दिसून येत आहे. बहुतांश वेळा ओळखीच्या व्यक्तीकडूनच अत्याचार होत असल्याचे उघडकीस येत असल्यामुळे अधिकच चिंता वाढली आहे. पालकांनी देखील आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे, त्यांच्याशी संवाद वाढवणे आणि संशयास्पद हालचालींवर तात्काळ कारवाई करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.. पण धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात आपल्या मुलांच्याकडे लक्ष द्यायला पालकांना वेळ नसल्याने अशा घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे असूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी आणि समाजाची सजगता तितकीच महत्त्वाची आहे. अन्यथा ही चिंताजनक आकडेवारी आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न केवळ प्रशासनाचा नाही, तर संपूर्ण समाजाचा आहे. वेळेवर पावले उचलणे आवश्यक आहे, नाहीतर ही समस्या आणखी गंभीर होऊ शकते...
0
0
Report

पाली के बल्लाळेश्वर मंदिर में अंगारकी चतुर्थी पर भक्तों की भारी भीड़

Chendhare, Maharashtra:अंगारकी चतुर्थी निमित्त पाली येथे गणेश भक्तांची मोठी गर्दी... हजारो भाविकांनी घेतले श्री बल्लाळेश्वराचे दर्शन... श्री बल्लाळेश्वर च्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा... अष्टविनायक क्षेत्रा पैकी एक महत्त्वाचे क्षेत्र असलेल्या रायगड जिल्ह्यातील पाली येथील श्री बल्लाळेश्वर मंदिरात देखील गणेश भक्तांची मोठी गर्दी पहायला मिळाली; उन्हाची दाहकता असतानाही महिला तसेच आबालवृद्धांनी गणेश दर्शनाला हजेरी लावली. यावेळी मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या. बाजारपेठ फुलली होती प्रसाद तसेच पुजेचे साहित्य घेण्यासाठीही गर्दी होती. मंदिर व्यवस्थापनाने चांगल्या सुविधा दिल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केलं आहे.
0
0
Report
Advertisement

मनमाड़-मनमाड महामार्ग पर गोपालवाड़ी में डीजल-पेट्रोल से भरा टैंकर पलटा; गाड़ियों का आवागमन बंद

Yeola, Maharashtra:अँकर : नगर मनमाड महामार्गावर येवला तालुक्यातील गोपाळवाडी शिवारात डिझेल व पेट्रोलने भरलेला टँकर नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी होऊन भीषण अपघात झाला . या अपघातामध्ये टँकर पलटी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पेट्रोल व डिझेलची गळती सुरू झाली ही बाब महामार्ग पोलिसांना लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने दोन्ही बाजूची वाहतूक बंद केली असून तालुका पोलीस देखील घटनास्थळी दाखল झाले आहेत मनमाड पानेवाडी येथून गळती थांबवणारे पथक थोड्याच वेळात घटनास्थळी दाखल होऊन गळती थांबवण्याचे प्रयत्न करणार आहेत
0
0
Report

मेळघाट में 358 नवजातों की मौत, स्वास्थ्य सेवा बदहाल, सरकार सवालों के घेरे में

Amravati, Maharashtra:धक्कादायक अमरावतीच्या मेळघाटात ३५८ नवजात बालकांचा मृत्यू; बालकांच्या किंकाळ्यानी मेळघाट सुन्न मेळघाट परिसरात नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले असून वर्षभरात तब्बल ३५८ बालकांचा जन्मत: मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मेळघाटातील दुर्गम भागात आजही वैद्यकीय सुविधांचा मोठा अभाव असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. गर्भवती महिलांना वेळेवर उपचार मिळत नाहीत तसेच तज्ज्ञ डॉक्टर, आवश्यक उपकरणे आणि आरोग्य सेवा उपलब्ध नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहे स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही मेळघाटात अजूनही आरोग्यसेवा पोहोचली नसल्याचा धक्कादायक वास्तव समोर आला आहे. दरम्यान जिल्हा स्त्री रुग्णालयात सर्वाधिक म्हणजे २६१ नवजात मृत्यूंची नोंद झाली आहे. अनेक गर्भवती महिलांना अत्यंत उशिरा रुग्णालयात दाखल केले जाते त्यामुळे उपचार मिळण्याआधीच परिस्थिती गंभीर होत असल्याचाही समोर आला आहे.
0
0
Report

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सभागृह में जन्म प्रमाणपत्र घोटाला: QR से दूसरा नाम उजागर

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... मनपा सभेत बनावट जन्म प्रमाणपत्राचा धक्कादायक प्रकार उघड ANC : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सभेत आज एक गंभीर प्रकार समोर आला आहे. जन्म दाखला एका व्यक्तीच्या नावाने असताना, त्यावरील QR कोड स्कॅन केल्यावर दुसऱ्याच व्यक्तीचे नाव दिसत असल्याचे उघड झाले. हा प्रकार भाजपचे नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी सभागृहात उघड करत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बनावट जन्म प्रमाणपत्र तयार करणाऱ्या रॅकेटचा संशय व्यक्त करत, संबंधितांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. एका जन्म प्रमाणपत्रावर दोन वेगवेगळी नावे आढळल्यामुळे नागरिकांच्या अधिकृत कागदपत्रांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न उपस्थित होत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
0
0
Report
Advertisement

सतारा में 9-10 मई को विद्रोही साहित्य सम्मेलन, परिवर्तनकारी विचारों की बहार

Satara, Maharashtra:साताऱ्यात 9 आणि 10 मे ला विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉ. आ. ह. साळुंखे तर स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. भारत पाटणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ.सोनाझारिया मिंझ यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हे १५ वे विद्रोही साहित्य संमेलन पार पडणार आहे. या संमेलनात परिवर्तनवादी विचारांची मांडणी, परिसंवाद, गटचर्चा, काव्यवाचन आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, राज्यभरातील लेखक, विचारवंत आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विषयांवर चर्चेचा ऊहापोह या संमेलनात होणार आहे.
0
0
Report

पुराने पुणे- मुंबई मार्ग पर तेजगति कार में आग, चालक की मौत

Varsoli, Maharashtra:Headline : जुन्या पुणे मुंबई महामार्गावर चारचाकी वाहनाला आग या आगीत वाहनचालकाचा आगीत होरपळून मृत्यू Anchor: जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कामशेत येथील उड्डाणपुलावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव चारचाकी वाहनाला अचानक आग लागून वाहनातील चालकाचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना रात्री साधारण दीडच्या सुमारास घडली. आग इतकी भीषण होती की काही क्षणांतच संपूर्ण वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी गेले. घटनेची माहिती मिळताच कामशेत पोलीस आणि वडगाव अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. चालकाला वेळेत बाहेर पडता न आल्याने त्याचा जागीच होरपळून मृत्यू झाला. सध्या मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. हा अपघात मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर घडला असून, घटनेचा पुढील तपासकामशेत पोलीस करत आहेत.
0
0
Report
Advertisement

देहूरोड में बीजेपी कार्यकर्ता रमेश रेड्डी की हत्या: चार आरोपी गिरफ्तार

Varsoli, Maharashtra:देहूरोड परिसरात २९ एप्रिल रोजी गोळीबाराचा थरार झाला होता या गोळीबारात भाजप कार्यकर्ता रमेश रेड्डी यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या केली होती, या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. या आरोपींनी ज्या भागात गोळीबार करत रमेश रेड्डी ची हत्या केली त्याच भागात पोलिसांनी धिंड काढली ,रमेश रेड्डी यांच्यावर चार हल्लेखोरांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली होती. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत देहूरोड पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि अखेर चार आरोपींना अटक करण्यात यश मिळवले.पोलिसांनी कडक बंदोबस्तात आरोपींना घटनास्थळ परिसरात आणून त्यांची धिंड काढली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित झाले. पोलिसांनी या कारवाईद्वारे गुन्हेगारांवर वचक बसवण्याचा प्रयत्न केला.दरम्यान, या हत्येमागील नेमका हेतू काय होता, याचा शोध पोलिस घेत असून पुढील तपास सुरू आहे. आरोपींकडून अधिक माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे...
0
0
Report

Sangli-Kolhapur road potholes rift: residents endure danger as project stalls

Sangli, Maharashtra:सांगली-कोल्हापूर रस्त्याचे काम रखडल्याने दुरावस्था,रस्ता ठरतोय नागरिकांच्यासाठी जीवघेणा.. अँकर - सांगली शहरातला कोल्हापूर रस्ता हा गेल्या सहा महिन्यांपासून रखडला आहे चौपदरीकरण करण्यासाठी रस्त्याचे काम सुरू करण्यात आलं मात्र सध्या त्या रस्त्याचे काम बंद पडले परिणामी रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले ज्यामुळे रोज त्रास अपघात होत आहेत. व्ही वो - सांगलीतून कोल्हापूरकडे जाणारा शहरातला प्रमुख रस्त्याचं सहा महिन्यांपूर्वी चौपदरीकरण सुरू झालं.महापालिका प्रशासनाकडून चौपदरीकरणासाठी रस्त्याच्या बाजूला असणारी अतिक्रमण काढण्यात आली.मग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनेरस्त्याच्या कामाला सुरुवात देखील झाली,मात्र गेल्या चार ते पाच महिन्यांपासून रस्त्याचे काम बंद पडले आहे.व्ही वो - सांगली शहराच्या एसटी स्टँड जवळ असणाऱ्या शास्त्री चौकापासून ते आदीसागर मंगल कार्यालयापर्यंत रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे.ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय,अक्षरशः जीव मुठीत घेऊन वाहन चालवावी लागतात.इतकच नव्हे तर रोजरासपणे किरकोळ अपघात घडत असल्याने काही महिन्यांपूर्वी याच खड्ड्यांमुळे एका महिलेचा मृत्यू देखील झाला होता. बाईट - सुभाष भोसले - रिक्षा चालक - सांगली. व्ही वो - सांगली-कोल्हापूर रस्त्याच्या खड्ड्यांविरोधात आणि रस्त्याचे काम तातडीने सुरू करावं,या मागणीसाठी लोकहित मंचकडून आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात आंदोलनाची भूमिका घेण्यात आली आहे। बाईट - मनोज भिसे - अध्यक्ष - लोकहित मंच व्ही वो - रस्त्याच्या कामाची बिल न मिळाल्याने ठेकेदाराकडून काम बंद करण्यात आलाय.तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निधीच्या बाबतीत तरतूद आणि वरिष्ठ पातळीवर निधीची मागणी करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने रस्त्याचा चौपदरीकरण काम सुरू झालं खरं, मात्र हाच रस्ता आता नागरिकांसाठी जीवघेणा बनला असून रस्त्याचे काम रखडल्याने नागरिकांना वेगवेगळ्या त्रासाला सामोरे जावं लागत असल्याने याला जबाबदार कोण ? असा प्रश्न आता निर्माण झालाय.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top