445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
स्मार्ट सिटी के CCTV छह महीनों में पुलिस के हवाले, सुरक्षा-ट्रैफिक नेटवर्क में बड़ा बदलाव
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॉमेरे ६ महिन्यांनंतर हस्तांतरित करण्यात येणार आहेत. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या बोर्डाच्या बैठकीत मंगळवारी हा निर्णय घेतला. महापौर समीर राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील विविध प्रशासकीय आणि विकासात्मक प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करून बोर्डाच्या सदस्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना आणि नियुक्त्यांना एकमताने मंजुरी दिली. सीसीटीव्ही यंत्रणाचे संचालन, देखभाल-दुरुस्ती आदिची जबाबदारी ६ महिन्यांनंतर पोलिसांकडे हस्तांतरित केली जाणार आहे. यामुळे आगामी काळात शहरातील अंतर्गत सुरक्षेचे आणि वाहतूक नियंत्रणाचे संपूर्ण नेटवर्क थेट पोलिसांच्या ताब्यात जाणार असल्याचे बैठकीत निश्चित केले.0
0
Report
नाबालिग छात्र ने स्कूल में शिक्षक पर चाकू से हमला किया; हालत गंभीर
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:इयत्ता नववीत नापास केल्याच्या रागातून एका अल्पवयीन विद्यार्थ्याने मंगळवारी शाळेतच वर्गशिक्षक विशाल फ्रान्सिस दुसिंग यांच्या पोटात चाकू खुपसला. छत्रपती संभाजी नगरच्या छावणी परिसरातील लिटल फ्लॉवर शाळेत ही घटना घडला. या विद्यार्थ्याला घटनेनंतर ३ तासांनी पोलिसांनी ताब्यात घेतले. दुसरीकडे अतिरक्तस्त्राव, वाढलेल्या रक्तदाबामुळे शिक्षकवरील शस्त्रक्रिया रखडली. ते व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देत आहेत. मंगळवारी मुख्याध्यापिका केबिनमध्ये असताना विद्यार्थ्याने टीसी मागितली. मुख्याध्यापिकेने त्याला अर्ज देऊन पालकांना घेऊन येण्यास सांगितले. मात्र त्याने वर्गशिक्षक दुसिंगांना बोलावण्याची मागणी केली. मुख्याध्यापिकेने निरोपावरून दुसिंग येताच 'तुम्ही मला विज्ञान व गणितात का नापास केले?' असे तो ओरडला. दुसिंग तर मराठी, हिंदी शिकवतात, असे त्याला सांगितले. तेव्हा 'तूच मला जाणूनबुजून नापास केलेस, आज तुझा मर्डर करतो' असे म्हणत त्याने कमरेचा चाकू काढून त्यांच्या पोटात खुपसला. या विद्यार्थ्याने महिनाभरापूर्वी ऑनलाईन अँपवरून ४०० रुपयांत हा चाकू मागवला होता, अशी माहिती समोर आली आहे...0
0
Report
मध्यस्थी से शाला बंद आंदोलन खत्म; आश्वासन के बाद स्कूल फिर से शुरू
Bhandara, Maharashtra:गटशिक्षणाधिकारी यांच्या मध्यस्थीने शाळा बंद आंदोलन अखेर मागे.. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर शाळा पूर्ववत सुरू.... Anchor : भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील जेवणाळा येथील ग्रामस्थ व पालक यांनी शाळेमध्ये शिक्षकांच्या मागणीसाठी शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा बंद आंदोलन केले. शालेय विद्यार्थ्यांना व शाळेत रुजू असलेल्या शिक्षकांना गेट बाहेर बसवत आंदोलन झाले. या आंदोलनाची दखल घेत लाखनी पंचायत समिती येथील गटशिक्षणाधिकारी शिल्पा निखाडे यांनी आंदोलक पालकांना भेट देत शिक्षक व स्वयंसेवक देण्याचे आश्वासन देत शाळा सुरू करण्याचे सांगितले त्यानंतर आंदोलकांनी शाळा सुरू करत मागणी लवकर पूर्ण झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचेही इशारा दिला आहे..0
0
Report
Advertisement
Washim में बारिश ने खरीफ फसलों को लाभ पहुंचाया, किसान उत्साहित
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यात रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली.वाशिम, रिसोड,कारंजा, मंगरूळपीर,मालेगाव आणि मानोरा तालुक्यांत चांगला पाऊस झाल्याने नदी-नाले, ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.या पावसामुळे खरीप हंगामातील पेरणी केलेल्या सोयाबीन, कापूस व इतर पिकांना मोठा फायदा होणार आहे.पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून पिकांच्या वाढीसाठी हा पाऊस लाभदायक ठरणार आहे.0
0
Report
25 दिन बाद भी अज्ञात चालक का नहीं लगा सुराग, हिट-एंड-रन से पीड़ित परिवार उग्र
Nagpur, Maharashtra:महाल परिसरातील हिट अँड रन प्रकरणी 25 दिवसानंतर बुद्धाला धडक मारणारी कार कार आणि आरोपीचा शोध घेण्यास पोलीस अजूनही अपयशी ठरले आहे.. महाल परिसरात 7 जून रोजी सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या मुकुंद बाभरे यांना एका अज्ञात कार चालकाने जोरदार धडक दिली होती. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. घटनेनंतर त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान 12 जून रोजी त्यांचे दुःखद निधन झाले. या घटनेला आता 25दिवस उलटूनही संबंधित अज्ञात कार चालकाचा शोध लागलेला नसल्याने मृतकाच्या कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारीांनी या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष केले असून तपासात अपेक्षित गती दिसून येत नाही. सध्या या प्रकरणामुळे कुटुंबीयांमध्ये आणि परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. पोलिसांनी तत्काळ तपासाला गती देऊन अज्ञात आरोपीचा शोध घ्यावा, त्याला अटक करून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.0
0
Report
बुलढाणा के ढालसावंगी में मुसलाधार बारिश से घरों में पानी घुसा, प्रशासन पर सवाल
Buldhana, Maharashtra:बुलढाणा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, पावसाने आता आपल्या भाग बदलून मुक्काम हलवला आहे. चिखली, मेहकर, जळगाव जामोद आणि संग्रामपूरनंतर, आता बुलढाणा तालुक्यातील ढालसावंगी गावात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. बुलढाणा-संभाजीनगर महामार्गावर वसलेल्या ढालसावंगी गावात, मुसळधार पावसामुळे पाणी थेट ग्रामस्थांच्या घरात शिरले आहे. अचानक आलेल्या या पुरामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले असून, घरातील संसारोपयोगी वस्तूंचेही नुकसान झाले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी थेट प्रशासनावर आरोप केले आहेत. हायवेच्या कडेला असलेल्या पाण्याचा निचरा करणाऱ्या नाल्या पूर्णपणे ब्लॉक झाल्या आहेत. ग्रामपंचायतीकडे वेळोवेळी निवेदने देऊनही, प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप संतप्त गावकऱ्यांनी केला आहे. घरात शिरलेले पाणी बाहेर काढतानाची दृश्ये अत्यंत हृदयद्रावक आहेत. मात्र, खरा प्रश्न हा आहे की, पावसाळा अद्याप सुरूच आहे. जर पुन्हा एकदा असाच मुसळधार पाऊस झाला, तर ग्रामस्थांना आपली घरे सोडून सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. केवळ कागदी आश्वासने नको, आता प्रशासनाने वेळीच ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे, अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.0
0
Report
Advertisement
श्रीगोंदा में गुटखा तस्करी रोकथाम: तीन गिरफ्तार, लगभग 28.9 लाख का माल जब्त
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेने गुटखा तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. अलिशान कारमधून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक झाली असून, जवळपास 29 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला आहे. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक श्रीगोंदा परिसरात गस्त घालत असताना गुप्त माहितीच्या आधारे मुंढेकरवाडी येथे छापा टाकण्यात आला. यावेळी एका घरासमोर पांढऱ्या रंगाच्या कारमधून गुटख्याच्या गोण्या दुसऱ्या कारमध्ये भरल्या जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अमोल रामदास जाधव, अनिल रतन कुरुमकर आणि फरहान रेहमान बेपारी या तिघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करत आहेत.0
0
Report
गोकुळ दूध संघ के चुनाव: आज आख़िरी दिन, 15 जुलाई तक मतदाता सूची बनेगी
Kolhapur, Maharashtra:गोकुळ दूध संघासाठी ठराव दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज अखेर 5 हजार 333 इतके ठराव दाखल झाले आहेत. सभासदत्व रद्द केलेल्या संस्था वगळता 4 हजार 575 संस्था निवडणुकीसाठी पात्र आहेत. पण सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे 758 ठराव अधिक आले आहेत. आज ठराव दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठरावांची छाननी होईल आणि त्यानंतर दुबार ठराव बाजूला करून त्या ठरावांची सुनावणी होईल, त्यानंतरच गोकुळचे पात्र ठरावधारक किती हे स्पष्ट होईल. या सर्व प्रक्रियेला 15 दिवस लागणार असून 15 जुलै नंतरच गोकुळची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.0
0
Report
कल्याण-डोंबिवली में एक दिन में 18 से अधिक पेड़ गिरे, कारें और स्कूटर क्षतिग्रस्त
Kalyan, Maharashtra:अवघ्या एका दिवसात १८ हून अधिक झाडे कोसळली, काळातलाव येथे भलेमोठे झाड पडून तीन कार व दोन दुचाकींचे नुकसान कल्याण-डोंबिवलीत सुरू असलेल्या पावसामुळे अवघ्या एका दिवसात १८ हून अधिक झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये अनेक ठिकाणी वाहनांचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कुठलीही जीवित हानी किंवा कुणीही जखमी झालेलं नाही .काल मध्यरात्रीच्या sुमारास कल्याणमधील काळातलाव परिसरात शत्रुंजय टॉवर इमारतीलगत असलेले भलेमोठे झाड अचानक संरक्षक भिंतीवर कोसळले. या दुर्घटनेत तेथे उभ्या असलेल्या तीन चारचाकी आणि दोन दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने घटना मध्यरात्री घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.दरम्यान, हे झाड धोकादायक अवस्थेत असल्याबाबत स्थानिक नागरिकांनी यापूर्वी अनेक वेळा केडीएमसीकडे तक्रारी केल्याचा दावा केला आहे. मात्र, वेळेत कारवाई न झाल्याने अखेर झाड कोसळून नुकसान झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.0
0
Report
Advertisement
करवीर में बिल्ली बचाते समय मोटर से स्पर्शाकर विद्युत झटका, 13 वर्षीय शाहू की मौत
Kolhapur, Maharashtra:कुत्र्याच्या तावडीतून मांजराला वाचवण्यासाठी गेलेल्या मुलाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात असणाऱ्या कंदलगाव मध्ये घडली आहे. शाहू संदीप पाटील असं मृत्युमुखी पडलेल्या तेरा वर्षीय मुलाचे नाव आहे. शाहू हा इयत्ता सातवी शिकत होता, दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी आला, घरात जेवण करत असताना पाळीव मांजराच्या पाठीमागे कुत्रा लागल्याचे दिसताच शाहू मांजराला वाचवायला गेला, पण दरम्यान पाणी भरण्यासाठी मोटार सुरू करण्यात आली होती, त्या मोटारी जवळ मांजरी गेल्याने शाहू देखील तिथे गेला. याच दरम्यान मोटारीच्या विद्युत वायरला शाहूचा हात लागला आणि त्याला विजेचा तीव्र झटका बसला. कुटुंबीयांनी शाहूला तातडीने कोल्हापूरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात दाखल केले पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले.0
0
Report
शिरूर बाजार समिति चुनाव: महायुती के प्रचार के बीच विकास का भरोसा जताया
Shirur, Maharashtra:शिरूर बाजार समिती निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून भाजप शिवसेना महायुती शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारावेळी आमदार माऊली कटके यांनी राज्यात केंद्रीत महायुतीचं सरकार असल्याने बाजार समितीच्या विकासा साठी जनता आम्हालाच संधी देईल असा विश्वास व्यक्त करत घोडगंगा सहकारी Sाखर कारखान्याच्या मुद्द्यावरून माजी आमदार अशोक पवारांवर निशाणा साधलाय.0
0
Report
भंडारा के किसानों के लिए डायरेक्ट भात पेरणी से पानी और खर्च बचत
Bhandara, Maharashtra:एलनिनोचे सावट... पावसाअभावी कृषी विभागाची 'डायरेक्ट भात पेरणी' मोहीम... शेतकऱ्यांना पाणी आणि खर्च बचतीचा सल्ला... याच पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन 'डायरेक्ट भात पेरणी' पद्धतीचे प्रात्यक्षिक आणि जनजागृती मोहीम सुरू केली आहे. भंडारा जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक असून पारंपरिक लागवड पद्धतीस मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. मात्र यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसमोर खरीप हंगामाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. यामुळे कृषी विभागाने 'डायरेक्ट भात पेरणी' या आधुनिक पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. या पद्धतीमुळे पाण्याची बचत होते, मजुरीचा खर्च कमी होतो आणि वेळेचीही बचत होते. कृषी अधिकारी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या पद्धतीचे प्रात्यक्षिक दाखवत आहेत. शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाचे फायदे समजावून सांगत अधिकाधिक शेतकऱ्यांनी याचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात येत आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, पारंपरिक भात लागवडीपेक्षा डायरेक्ट भात पेरणीमध्ये खर्च कमी येतो. एका एकरासाठी लागणारा मजुरीचा खर्चही लक्षणीयरीत्या कमी होत असल्याने ही पद्धत सध्या परिस्थितीत अधिक फायदेशीर ठरत आहे. एलनिनोमुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता लक्षात घेता, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करून उत्पादन टिकवून ठेवण्यासाठीही ही पद्धत उपयुक्त असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.0
0
Report
Advertisement
अकोला में एक ही दिन में दो हत्याएं, बार्शीटाकळी इलाके में हड़कंप
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात एकाच दिवशी दुसऱ्या हत्येची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निंबी चेडका येथे अनिकेत इंगळे या युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणात चार ते पाच संशयितांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच बार्शीटाकळी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. एकाच दिवशी सलग दोन हत्यांच्या घटनांमुळे अकोला जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. मात्र एकाच दिवशी अकोला जिल्ह्यात दोन हत्यांच्या घटना घडल्याने कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.0
0
Report
सांगली के बेकरी और दवा दुकानों में भेसळ रोकथाम के लिए कड़ी जांच की मांग
Sangli, Maharashtra:सांगलीतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडें यांच्या कारवाईचे समर्थन करण्यात आले आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील बेकरी पदार्थ विक्री करणारे व औषध दुकानांची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या बाबतचा निवेदन सांगलीच्या अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बेकरी दुकानात भेसळयुक्त पदार्थ विकले जात आहेत. तसेच हॉस्पिटल कडून ठराविक औषध दुकानातूनच औषध खरेदीची सक्ती केली जाते, याशिवाय परवानाधारक व्यक्ती शिवाय औषध दुकान चालवली जात आहेत, असे आरोप करत अन्न व औषध प्रशासनाकडून जिल्ह्यातील सर्व बेकरी व औषध दुकानात तपासणी करावी, अन्यथा अन्न व औषध प्रशासना विरोधात आंदोलन करण्याचा इशारा आरपीआयचे माजी जिल्हाप्रमुख पोपट कांबळे यांनी दिला आहे.0
0
Report
बिन बरसात कृष्णा नदी सूखी, सांगली-मिरज में पानी संकट गहराया
Sangli, Maharashtra:सांगली जिले में कृष्णा नदी ऐन पाऊसाळ्यात कोरडी पडी आहे. सांगलीमध्ये कृष्णा नदीने पाणी टंचाई निर्माण केली आहे आणि तर मिरज, अंकली येथे कृष्णा नदीचे पात्र कोरडठाक पडले आहे. त्यामुळे कृष्णा काठावर असणाऱ्या नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पुढील काही दिवसात पाऊस समाधानकारक नसल्यास सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 10 जुलै नंतर एक एक दिवस शहराला पाणीपुरवठा करणे शक्य होईल—याची माहिती आमच्या प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी घेतली.0
0
Report
Advertisement
