Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Oct 25, 2024 07:21:47
Yavatmal, Maharashtra
यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Mar 25, 2026 01:45:23
Akola, Maharashtra:अकोला जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत मोठा घोटाळा उघडकीस आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तब्बल 268 शिक्षकांनी बदलीचा लाभ घेण्यासाठी बोगस दिव्यांग (UDID) प्रमाणपत्रे तसेच खोट्या आजारांची कागदपत्रे सादर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही गंभीर बाब माहिती अधिकारातून समोर आली असून या प्रकरणात मोठ्या प्रमाणात कारवाई होण्याची शक्यता आहे. अकोला जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते गणेश कुरई यांनी केला आहे. कुरई यांनी माहिती अधिकारातून काढलेल्या माहितीनुसार, तब्बल 268 शिक्षकांनी बदलीचा लाभ मिळवण्यासाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे आणि खोट्या आजारांची कागदपत्रे सादर केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात आतापर्यंत चार शिक्षकांसह एका गट शिक्षणाधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी मुर्तीजापूर मतदारसंघाचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी याआधीच केली होती. त्यासाठी त्यांनी ग्रामविकास मंत्र्यांकडे अनेकदा लेखी तक्रारही दिली होती. दरम्यान, राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. चौकशीदरम्यान गैरप्रकार सिद्ध झाल्यास सुमारे 280 शिक्षक आणि अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला जाऊ शकतो. या प्रकरणामुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली असून जिल्ह्यातील शिक्षक बदली प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
900
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 24, 2026 15:49:57
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - पेट्रोल संपणार,या अफवांनी पेट्रोल भरण्यासाठ पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची झुंबड सांगली जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी पेट्रोल टंचाई निर्माण झाल्याच्या अफवेमुळे पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठी वाहनधारकांची झुंबड उडाली आहे.आखाती देशातील युद्ध परिस्थिती मुळे पेट्रोल टंचाई निर्माण होणार ,अश्या अफवांचे पीक पसरल्याने अनेक पेट्रोल पंपांवर आता पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. ईश्वरपूर मधल्या एका पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी दुचाकी सह चार चाकी वाहनांची मोठी गर्दी झाली होती,दरम्यान जिल्हा अधिकारी यांच्याकडून मात्र कोणत्याही प्रकारची टंचाई नसल्याचं सांगण्यात येत आहे,पण केवळ अफवा पसरल्याने पेट्रोल पंपांवर पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांची गर्दी होत असल्याचं सांगण्यात आले आहे।
993
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 24, 2026 15:32:52
Ambernath, Maharashtra:अंबरनाथमध्ये पुन्हा भटक्या कुत्र्यांचा हैदोस , विद्यार्थीनीवर हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद. संबंधित परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वंशिका नागर ही नेहमीप्रमाणे आपल्या भावासोबत घरी जात असताना अचानक एका भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. कुत्र्याने तिला चावा घेतल्यामुळे ती गंभीर जखमी झाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत तिला कुत्र्याच्या तावडीतून सोडवले आणि उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या वंशिकावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अंबरनाथमध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास हा पुन्हा एकदा समोर आला असून प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार अशा घटना घडत असतानाही ठोस उपाययोजना करण्यात उपयोगी ठरत नाही असे नागरिकांकडून दावा केला जात आहे. स्थानिकांनी प्रशासनाकडे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
1083
comment0
Report
MAMILIND ANDE
Mar 24, 2026 15:17:40
Wardha, Maharashtra:वर्ध्यात पेट्रोल पंपांवर नागरिकांची झुंबड वर्ध्यात पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी अँकर - वर्धा शहरातील बजाज चौक, आरती चौक आणि शांती नगर परिसरातील पेट्रोल पंपांवर आज अचानक मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. पेट्रोल व डिझेल तुटवड्याच्या अफवेमुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर इंधन भरण्यासाठी धाव घेतली. काही ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला.दरम्यान, या परिस्थितीबाबत जिल्हा प्रशासनाने तातडीने स्पष्टता दिली आहे. वर्धा जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि कोणत्याही प्रकारचा तुटवडा नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे काही पेट्रोल पंपांवर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिस प्रशासनाने तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांवर ताण वाढल्याचेही दिसून आले. प्रशासनाच्या मते, सोशल मीडियावर पसरलेल्या चुकीच्या संदेशांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा असून घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी शांतता राखून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
1083
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 24, 2026 14:32:12
Kalyan, Maharashtra:डोंबिवलीत उच्चभ्रू सोसायटीत चेंबर साफसफाईच्या कामावरून वाद त्यानंतर थरार ! वादातून पाळीव कुत्रा सोडून हल्ला — दोन जखमी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल डोंबिवली पूर्वेकडील लोढा हेवन येथील चंद्रेश विला मधील रो हाऊस मध्ये राहणारे मनोज योगी यांच्या घराच्या मागील चेंबर चॉकप झाल्याने मनोज यांची पत्नी आणि मुलगा यांनी दोन कामगारांना बोलवले आणि त्या कामगारांकडून चेंबर साफसफाई करून घेत होते .मात्र त्यांच्या शेजारी राहणारे संतोष तिवारी ,अनुराधा तिवारी ,कृतिका तिवारी यांनी हे काम करण्यास विरोध केला .त्यामुळे या दोन कुटुंबामध्ये वाद झाला . वाद इतका विकोपाला गेला की तिवारी कुटुंबाच्या सदस्यांनी योगी कुटुंबातील सदस्यांना शिवीगाळ करत मारहाण केली इतकेच नव्हे तर तिवारी कुटुंबाने त्यांचा पाळीव कुत्रा इशारा करत योगी कुटुंबाच्या सदस्यांच्या अंगावर सोडला. समोरून कुत्रा अंगावर येत असल्याचे पाहून तिथे काम करणारे दोन्ही मजूर घाबरून पळून गेले.मात्र पाळीव कुत्र्याने मनोज योगी आणि त्यांच्या मुलावर हल्ला केला. कुत्र्याने दोघांचाही जोरात चावा घेतल्याने ते जखमी झाले. या हल्ल्यानंतर मनोज योगी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, प्रकरणी योगी कुटुंबाने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली .या तक्रारी नुसार पोलिसांनी संतोष तिवारी, अनुराधा तिवारी आणि कृतिका तिवारी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .
1079
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 24, 2026 12:49:41
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सावळेश्वर टोल नाक्याची तोडफोड सोलापूर–पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सावळेश्वर टोल नाक्यावर मोठा गोंधळ उडाला आहे एका ट्रक चालकाला मारहाण झाल्याच्या आरोपामुळे इतर संतप्त ट्रक चालकांनी एकत्र येत टोल नाक्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याची प्राथमिक माहिती या घटनेदरम्यान टोल कर्मचारी आणि चालकांमध्ये जोरदार झटापट एका अज्ञात ड्रायव्हरला मारहाण झाल्याची घटना समोर आल्यानंतर इतर ट्रक चालक संतप्त सावळेश्वर टोल नाक्यावर गोंधळ उडाल्याने सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा सोलापूर ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे
1029
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 24, 2026 12:33:15
Khed, Maharashtra:नागरिकांची पाठ फिरवली; राजगुरुनगरातील “वंदे मातरम्” कार्यक्रमात खुर्च्या रिकाम्याच नागरिकांनी पाठ फिरवल्याने “वंदे मातरम्” सादरी शताब्दी वर्षानिमित्त हुतात्मा राजगुरु यांच्या जन्मगाव राजगुरुनगर येथे आयोजित भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. देशप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात संपूर्ण कार्यक्रमस्थळी प्रेक्षकांच्या खुर्च्या रिकाम्याच राहिल्या, तर केवळ शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि कलाकार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडताना दिसला. हुतात्मा राजगुरु यांच्या/बलिदानभूमीत होत असलेल्या या कार्यक्रमाला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. देशभक्तीचा संदेश देणाऱ्या कार्यक्रमांकडेच नागरिकांनी पाठ फिरवल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.
1047
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 24, 2026 12:00:58
Shirdi, Maharashtra:Anc - संगमनेर पंचायत समितीतील कर्मचारी मारहाण प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. कार्यालयात घुसून अधिकाऱ्याला मारहाण केल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून काही आरोपींना अटक केली होती. मात्र आता या मारहाणीमागचं कारण समोर येत असून एका महिलेने संबंधित अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केल्याने प्रकरण अधिकच गुंतागुंतचं बनलं आहे. पाहूया सविस्तर रिपोर्ट... संगमनेर पंचायत समितीतील तालुका अभियान व्यवस्थापकाला काल दुपारी कार्यालयात घुसून मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर संबंधित अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून शरद थोरात यांच्यासह त्यांच्या दोन मुलांवर आणि इतर नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आणि न्यायालयात हजरही केलं. मात्र या मारहाणीमागचं नेमकं कारण स्पष्ट होत नव्हतं. आज या प्रकरणाला नवं वळण मिळालं. बचत गटाच्या माध्यमातून काम करणाऱ्या महिलांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं. संबंधित अधिकाऱ्याने गेल्या नऊ महिन्यांपासून मानधन दिलं नसल्याचा आरोप करत , त्याच अधिकाऱ्याने महिलेबरोबर विनयभंग केल्याची तक्रारही संगमनेर पोलिसांना देण्यात आली आहे. दरम्यान माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बहीण माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महिलांनी तब्बल तीन तास ठिय्या दिला. यावेळी अधिकारी आणि महिलांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. दुर्गा तांबे , माजी नगराध्यक्षा ( बाळासाहेब थोरात बहीण ) पोलिसांनी अधिकाऱ्याच्या तक्रारीवर कारवाई केली असली, तरी आता महिलेच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे. याबाबत संगमनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी दाखल गुन्ह्याबत अधिक माहिती दिलीये... डॉ. कुणाल सोनवणे , उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर विभाग दरम्यान, या मारहाणीत राजकीय नावे समोर आल्याने संगमनेरमध्ये वातावरण तापलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना राजकीय रंग चढण्याची शक्यता आहे. आता पोलिस तपासातून नेमकं सत्य काय समोर येतं, आणि दोन्ही बाजूंच्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
1086
comment0
Report
Advertisement
Back to top