icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

चांदवड के श्री रेणुकामाता मंदिर में अधिक महिनों में महिला-पुरुष भक्तों की भारी भीड़

Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील श्री रेणुका माता मंदिरात अधिक महिना अर्थात पुरुषोत्तम मासानिमित्त महिला भाविकांची मोठी गर्दी होत आहे हिंदू धर्मपरंपरेनुसार तीन वर्षांनी येणारा अधिक महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या महिन्यात विविध धार्मिक विधी, पूजाअर्चा, दानधर्म तसेच लेक-जावयाला घरी बोलावून पुरणपोळीचे जेवण देण्याची परंपरा आहे यावेळी लेक आणि जावयाला कपडे भेट देत तेहतीस बत्तासे किंवा अनारशांचे वाण देण्याची प्रथा देखील पाळली जाते याचबरोबर भाविक आपल्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी जाऊन देवीची ओटी भरतात आणि तेहतीस बत्तासे किंवा अनारशांचे वाण अर्पण करतात या पार्श्वभूमीवर चांदवड येथील श्री रेणुका माता मंदिरात महिला भाविकांसह पुरुष भाविकांचीही मोठी गर्दी होत देवीच्या चरणी नतमस्तक होऊन महिला भाविकांकडून ओटी भरणे, वाण अर्पण करणे आणि विशेष पूजाविधी करण्यात येत आहेत अधिक महिन्याच्या निमित्ताने दररोज सुमारे १० ते १५ हजार भाविक चांदवड येथील श्री रेणुका माता मंदिरात दर्शनासाठी येत असल्याने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे
0
0
Report

सांगली-सातारा विधान परिषद: अभयसिंह जगताप महाविकास आघाडी के शरद पवार गुट के आधिकारिक उमेदवार

Sangli, Maharashtra:सांगली सातारा विधान परिषद निवडणूक - राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार असणार अभयसिंह जगताप.. बाळासाहेब पाटलांचा पक्षाचा अर्ज ठरला अवैध. सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार अब अभयसिंह जगताप असणार आहेत.राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून अभयसिंह जगतاپ आणि सांगलीच्या राष्ट्रवादीचे सरचिटणीस व जयंत पाटलांचे खाद्य समर्थक बाळासाहेब उर्फ प्रताप पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता,मात्र अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये बाळासाहेब पाटलांचा पक्षाचा अर्ज अवैध ठरला आहे,तर अपक्ष अर्ज वैध ठरला आहे,त्यामुळे आता सांगली सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीत अभयसिंह जगताप हे महाविकास आघाडीकडुन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार असणार आहेत,तर उद्या अर्ज माघार प्रक्रियेऊन त्यानंतरच निवडणुकीचा खरं चित्र स्पष्ट होणार आहे.
0
0
Report
Advertisement

वाशीम पूस नदी पुल काम देरी से, मानसून से पहले पूरा करने की मांग

Washim, Maharashtra:अनसिंग ते वारा जहागीर मार्गावरील पूस नदीवरील पुलाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या कामाची गती अत्यंत संथ असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. सध्या वाहतूक सुरळीत सुरू असली तरी पावसाळ्यात पूस नदीला पूर आल्यानंतर हा मार्ग पूर्णपणे बंद होतो.त्यामुळे परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना १० ते १२ किलोमीटरचा अतिरिक्त फेरा मारून प्रवास करावा लागतो.शेतकरी,विद्यार्थी, रुग्ण तसेच नोकरदार वर्गाला याचा मोठा फटका बसतो. विशेषतःआपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याने पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम पूर्ण करण्याची मागणी जोर धरत आहे.
0
0
Report

सोलापुर विधानपरिषद चुनाव: आदित्य फत्तेपुरकर का नामांकन खतरे में, दस्तखत पर जाँच होगी

Pandharpur, Maharashtra:विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपुरकर यांचा उमेदवारी अर्ज सूचकाच्या हरकतीमुळे बाद झाल्यानंतर आता काँग्रेस याबाबत न्यायालयात मागणार. काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जावर आपण सही केली नाही असे प्रतिज्ञापत्र सूचक नागेश भोसले यांनी दिले. त्यामुळे हा अर्ज बाद झाला.मात्र उमेदवारी अर्ज नागेश भोसले यांनी केलेली सही आणि नंतर प्रतिज्ञा पत्रावर केलेली सही या सारख्याच आहेत. यामध्ये कसलीही तफावत नाही त्यामुळे आता या दोन्ही सह्या एकच आहेत. हे सत्य समोर आणण्यासाठी न्यायालयात जाणार आहे. तसेच फॉरेन्सिक तपासणी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. नागेश भोसले यांनी दबावामुळे हा निर्णय घेतला हेही स्पष्ट होणार आहे. नागेश भोसले यांच्यासोबत काल भाजपचे आमदार नेते मंडळी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे संरक्षण होतं जर ते म्हणत असतील मी काँग्रेसचा नगरसेवक नसताना त्यांच्या अर्जावर सही का करू ? मग ते आता भाजपचे नगरसेवक आहेत का ? असा प्रश्न सुद्धा आदित्य फत्तेपूरकर यांनी उपस्थित केला आहे. भाजपच्या बद्दल सोलापुरातल्या लोकांमध्ये मोठा असंतोष आहे. तो असंतोष या विधान परिषदेच्या मतदानातून बाहेर येईल. अशी भिती भाजप नेत्यांना आहे त्यामुळेच त्यांनी काँग्रेस उमेदवारचा अर्ज कशातरी पद्धतीने बाद करण्यास षडयंत्र रचले आहे. वन टू वन - आदित्य फत्तेपूरकर
0
0
Report
Advertisement

येवला-नांदगाव रोड पर इर्टिगा कार में आग, यात्री सुरक्षित बाहर निकलने में सफल

Yeola, Maharashtra:येवला तालुक्यातील येवला-नांदगाव रोडवरील सोमठाणा गावाजवळ रात्रीच्या सुमारास एका इर्टिगा कारला अचानक आग लागून वाहन पूर्णपणे जळून खाक झाले. कारमध्ये असलेल्या पाच ते सहा प्रवाशांनी प्रसंगावधान राखत तात्काळ बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच येवला अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. गाडीही येवल्याच्या दिशेने नांदगाव मार्गे मालेगाव कडे जात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
0
0
Report

रत्नागिरी में जलस्रोतों की गिरावट: पानी का स्तर 28.55% पर, एक माह में लगभग 15% कमी

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यात जलसाठा घटला असून अठ्ठावीस टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. महिनाभरात पंधरा टक्के घट झाली आहे. अँकर, गेल्या काही दिवसांपासून हवामानात सततचे बदल, वाढता उष्मा आणि अनलिनोच्या प्रभावामुळे मानसून लांबवण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील जलस्त्रोत्रांमधील पाणीसाठा चिंतेचा विषय बनला आहे. जिल्ह्यातील नदी-नाले कोरडे पडले आहेत, धरणांमधील पाणीसाठाही झपाट्याने कमी झाला आहे. एप्रिल अखेर धरणांमध्ये 43.397% पाणी होते, मे महिन्यात ते थेट 28.55% वर आल्यामुळे महिनाभरात सुमारे 15% घट झाली आहे.
0
0
Report
Advertisement

वेरुळ के श्री घृष्णेश्वर मंदिर में अधिकमास अभिषेक, 5–9 जून; गाभार दर्शन बंद

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिरात ५ ते ९ जून दरम्यान अधिकमासानिमित्त भव्य 'अतिरुद्र अभिषेक' सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा सलग २४ तास सुरू राहणार असल्याने, या पाच दिवसांच्या कालावधीत भाविकांना गाभाऱ्यातून दर्शन बंद राहील. देश-विदेशातून येणाऱ्या भक्तांना केवळ मुखदर्शनावरच समाधान मानावे लागणार आहे, श्री घृष्णेश्वर मंदिरात १९८५ पासून दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्यात विश्वशांतीसाठी अतिरुद्र अभिषेक करण्याची परंपरा आहे. यंदा देशभरातील ४०० ब्रह्मवृंदांचा सहभाग असेल. विशेष म्हणजे, हरिद्वार येथून आणलेल्या पवित्र गंगाजलाने हा महाअभिषेक पार पडणान असून, या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे..
0
0
Report

विप्लव बाजोरिया की उमेदवारी रद्द, पिता-पुत्र ने हाईकोर्ट जाने की धमकी दी

Amravati, Maharashtra:विप्लव बाजोरिया यांची उमेदवारी बाद झाल्यानंतर बाजोरिया पिता-पुत्र आक्रमक; आम्ही हायकोर्टात जाऊ नये म्हणून आम्हाला निर्णयाची ऑर्डर दिली नाही बाजोरिया यांचा आरोप अँकर :- अमरावती विधान परिषद निवडणूक अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळत असून काल अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी बाद झाल्यानंतर बाजोरिया पिता-पुत्र चांगलेच आक्रमक झाले आहे. आम्ही हायकोर्टात जाऊ नये म्हणून आम्हाला निर्णयाची ऑर्डर दिली नाही असा गंभीर आरोप माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी केला आहे. आम्हाला ऑर्डर न देता कलेक्टर पार्टीला गेले. कलेक्टरने पक्षपात करून आमचा फार्म रद्द केला आमची हीअरिंग पंधरा मिनिटं घेतली आणि विरोधकांची सात ते आठ तास घेतली असाही आरोप माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी केला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर बाजोरीया पिता-पुत्राने अनेक आरोप केले असून अमरावतीत विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. निवडणूक अधिकाऱ्याने ऑर्डरची कॉपी देताच मी हायकोर्टात जाऊन उमेदवारी अर्ज वैध ठरवणार असे वक्तव्य बाजोरिया यांनी केले आहे.
0
0
Report
Advertisement

पुणे के खेड में धानोरे के गोदाम में भीषण आग, भारी नुकसान

Shirur, Maharashtra:पुणे के खेड में धानोरे के गोदाम में भीषण आग, भारी नुकसान आळंदी ग्रामीण भागातील धानोरे गावाकडे जाणाऱ्या मार्गावर ही दुर्घटना घडली. आग एवढी भीषण होती की, गोदामात असलेल्या तीन गॅस सिलिंडरचे एकापाठोपाठ एक मोठे स्फोट झाले. या स्फोटांमुळे परिसरात प्रचंड घबराट पसरली होती. तसेच गोदामाबाहेर उभी असलेली एक आयशर मालवाहू गाडी आणि एक मोटारकार देखील या आगीत पूर्णपणे जळून खाक झाली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत तब्बल साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
0
0
Report

नागपुर-मुंबई महामार्ग पर बस-ट्रक भिड़ंत, चालक सहित 2 घायल

Washim, Maharashtra:वाशिम: बस-ट्रक भिड़ंत नागपुर–मुंबई समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक 223 जवळ संजय ट्रॅवल्सच्या बसची एका ट्रकला जोरदार धडक बसल्याची घटना घडली. या अपघातात बस चालक, क्लिनरसह दोन प्रवासी गंभीर जखमी झाले असून अन्य चार प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. महामार्ग पोलीस आणि मदत पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. सर्व जखमींना उपचारासाठी वाशिम येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
0
0
Report

भंडारा में आवारा कुत्तों का बढ़ता प्रभाव; चार महीनों में 2682 लोगों को काटा

Bhandara, Maharashtra:भंडारा जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ... चार महिन्यांत २ हजार ६८२ जणांना चावा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण... भंडारा शहरातच ५६४ नागरिक कुत्र्यांच्या हल्ल्याचे बळी.... उपाययोजना असूनही भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली... नगर परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह... रस्ते, चौक आणि वसाहतींमध्ये भटक्या कुत्र्यांचे टोळके भंडारा शहरातील रस्ते, चौक, बाजारपेठा आणि निवासी भागात भटक्या कुत्र्यांचे टोळके सहजपणे दिसून येत आहेत. अनेक ठिकाणी हे कुत्रे दुचाकीस्वार, पादचारी तसेच शाळकरी मुलांवर धावून जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. परिणामी नागरिकांना रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणेही धोकादायक वाटू लागले आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीत भंडारा जिल्ह्यात २ हजार ६८२ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यापैकी ५६४ रुग्ण हे भंडारा शहरातील आहेत. विशेष म्हणजे २०२५ या वर्षात एकट्या भंडारा शहरात १ हजार ४७५ नागरिकांना कुत्र्यांचा चावा लागल्याची नोंद आहे. वाढत्या घटनांमुळे रेबीजचा धोका देखील वाढला असून आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण निर्माण होत आहे. भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव हा केवळ भंडारा शहरापुरता मर्यादित नसून संपूर्ण जिल्ह्याची गंभीर समस्या बनत चालली आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने प्रभावी कृती आराखडा राबविण्याची गरज व्यक्त केली जात आहे. नारायण सूर्यवंशी, अधिष्ठाता मेडिकल कॉलेज भंडारा नगर परिषदेकडून भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण, लसीकरण आणि स्थलांतर यासारख्या उपाययोजना राबविल्या जात असल्याचा दावा केला जातो. मात्र प्रत्यक्षात शहरातील अनेक भागांमध्ये कुत्र्यांची संख्या वाढलेली दिसत आहे. त्यामुळे उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मधुरा मदनकर, अध्यक्ष नगर परिषद भंडारा गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यात २ हजार ६८२ आणि शहरात ५६४ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची आकडेवारी प्रशासनासाठी धोक्याची घंटा ठरत आहे. आता भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येवर प्रशासन कितपत प्रभावी उपाययोजना करते, याकडे भंडारा जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top