445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
खटाव के वडूज में नकली उर्वरक-कीटनाशक का बड़ा साठा जप्त
Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडूज येथे कृषी विभागाच्या भरारी पथकाने आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 30 लाख 60 हजार रुपयांचा संशयित बनावट खत व कीटकनाशकांचा साठा जप्त केला. कारवाईदरम्यान सुमारे 99 हजार 450 किलो संशयित बनावट दाणेदार खत, नामांकित कंपन्यांच्या बनावट गोण्या, लेबल्स, कीटकनाशके आणि पॅकिंगसाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री हस्तगत करण्यात आली. या प्रकरणी दिलीप सीताराम काळे आणि प्रतिक दिलीप काळे यांच्याविरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम, रासायनिक खते नियंत्रण आदेश, कीटकनाशक अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी यापूर्वीही अशाच प्रकारची कारवाई झाल्याची माहिती समोर आली असून, हा व्यवसाय पुन्हा कसा सुरू झाला, याचा तपास पोलीस आणि कृषी विभागाकडून सुरू आहे. तसेच बनावट खतांचा पुरवठा आणि विक्रीचे जाळे उघड करण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे.0
0
Report
चंद्रपूर जिले के सिंदेवाही के पास गिट्टी भरे ट्रक और एसटी बस की भिड़ंत; 6 यात्री गंभीर, 18 घायल
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिले के सिंदेवाही के पास गिट्टी भरे ट्रक और एसटी बस की भिड़ंत; 6 यात्री गंभीर, 18 घायल0
0
Report
चंद्रपुर में आधे घंटे की भारी बारिश से शहर जलमग्न, यातायात बुरी तरह प्रभावित
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहरात अर्ध्या तासाच्या मुसळधार पावसाने अनेक रस्ते जलमय झाले. वर्दळीच्या प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली. कस्तुरबा चौक, श्रीकृष्ण टॉकीज भागात नाले अवरुद्ध झाल्याने नागरिकांना पाण्यातून वाट काढणे कठीण झाले. तर महत्वाचा चौक असलेल्या कस्तुरबा चौकात सखल भागात पाणी साचल्याने पायी चालणारे नागरिक आणि वाहनधारकांची चांगलीच अडचण झाली. तुकुम भागात पाणी साचल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. ठिकठिकाणी जलकोंडी झाल्याने महापालिकेच्या नालेसफाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.0
0
Report
Advertisement
2 लाख टन प्याज खरीदी शुरू, मूल्य स्थिरीकरण के लिए नाफेड एनसीसीएफ
Lasalgaon, Maharashtra:केंद्र सरकारच्या वतीने किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत यंदाही नाफेड एनसीसीएफ मार्फत दोन लाख मॅट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवत खरेदी सुरू असून या खरेदी बाबत माहिती घेण्यासाठी व सूचना देण्यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी थेट लासलगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिव आणि नाफेड एनसीसीएफ चे जिल्ह्याचे मॅनेजर यांची बैठक घेतली यावेळी त्यांनी थेट बाजार समितीत शासकीय खरेदी बाबत माहिती शेतकऱ्यांना समजावी यासाठी मोठा फलक लावावा तसेच बाजार समितीचे कामकाज संपल्यानंतरही शासकीय खरेदी ही सुरू ठेवावी असे सांगत बाजार समित्यांमध्ये कमी बाजारभावाने कांद्याची खरेदी सुरू होती त्यात 50 टक्के दर वाढवण्यात आम्ही यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले0
0
Report
नागपुर में होटल हेरिटेज के हुक्का पार्लर पर भारी छापेमारी, 45 गिरफ्तार
Nagpur, Maharashtra:नागपूर शहरातील हॉटेल हेरिटेज येथे सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी (एनडीपीएस) पथकाने मोठी कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या धाडीत एकूण 45 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यामध्ये 36 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश आहे. या प्रकरणात सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम (COTPA Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. * कारवाईदरम्यान 13 हुक्का पॉट्ससह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.. * या मुद्देमालाची किंमत सुमारे ₹23 हजार असल्याचे पोलिसांनी सांगितले. * याप्रकरणी हॉटेलचे मालक आणि व्यवस्थापक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखل करण्यात आला आहे. * तसेच घटनास्थळी ड्रग टेस्टिंग किटच्या साहाय्याने नमुने घेण्यात आले असून त्यांचा अहवाल येणे बाकी आहे.0
0
Report
चंद्रपुर महापौर ने अचानक आमसभा रद्द की; सदस्य चयन विवाद के कारण टला
Chandrapur, Maharashtra:टायटल:---चंद्रपूर महानगरपालिकेची उद्या होणारी आमसभा महापौर संगीता खांडेकर यांच्या आदेशाने अचानक करण्यात आली रद्द, स्वीकृत सदस्यांची होणार होती निवड चंद्रपूर महानगरपालिकेची उद्या होणारी आमसभा महापौरांनी आदेशाने रद्द केली आहे. सभा रद्द करण्यासाठी महापौरांनी काँग्रेसच्या गटनेते पदाचा वाद हायकोर्टात प्रलंबित असून या संदर्भात कोर्टाने दिलेला स्थगिती आदेश प्राप्त झालेला नाही आणि या संदर्भात स्पष्टता नसल्याचं कारण दिलं आहे. मात्र आमदार किशोर जोरगेवार यांच्या समर्थकांना उद्या स्वीकृत सदस्य म्हणून मंजुरी मिळू नये म्हणून महापौरांनी आमसभा रद्द केल्याची चर्चा आहे. आमदार किशोर जोरगेवार यांचे समर्थक असलेले बलराम डोडानी आणि तुषार सोम या दोघांनी आज स्वीकृत सदस्य पदासाठी अर्ज दाखल केला. या अर्जावर भाजपचे महानगरपालिकेतील गटनेते चंद्रशेखर शेट्टी यांची देखील सही आहे. उद्या होणाऱ्या आमसभेत बलराम डोडानी आणि तुषार सोम यांनाच संधी मिळण्याची शक्यता असल्यामुळे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या तंबूत खळबळ उडाली. त्यामुळे उद्याची आम सभा तातडीने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जाते.0
0
Report
Advertisement
नवी मुंबई अस्पताल में गर्भवती महिला की मौत, डॉ भावना पगारे का निलंबन
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी इथल्या रुग्णालयात काल बुधवारी एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी ऐरोली माता बाल रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. भावना पगारे यांचं निलंबन करण्यात आलं आहे. तर बुधवारी दुपारी नेरुळ एल.पी. नाका इथं दोन विद्यार्थिनींना साचलेल्या पाण्यात विद्युत धक्का लागला. वीजजोडणीच्या मीटरमधून जाणाऱ्या आउटगोइंग केबलपैकी एका केबलचे इन्सुलेशन तुटलेले होते. या केबलचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आल्याने परिसर विद्युतभारित होऊन या विद्यार्थिनींना विद्युत धक्का लागला. हा पथदिवा वीजजोडणी व त्यावरील आउटगोइंग केबल ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीची व देखभालीखाली असून या प्रकरणाचा ठपका ठेवत विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण गाढे यांचं निलंबन करण्यात आलं आहे.0
0
Report
चंद्रपुर के भीतर भाजपा कलह: सुधीर मुंगंटीवार बनाम किशोर जोरगेवार, अजय सरकार को तड़ीपार की मांग
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात आ. सुधीर मुनगंटीवार विरुद्ध आ. किशोर जोरगेवार यांच्या भाजपच्या अंतर्गत संघर्षाचं आणखी एक उदाहरण समोर आलं. आमदार किशोर जोरगेवार समर्थकांनी चंद्रपूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना भेटून भाजपचे बंगाली समाज आघाडीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अजय सरकार यांना जिल्ह्यातून तडीपार करण्याची मागणी केली. अजय सरकार आहेत सुधीर मुनगंटीवार समर्थक. चंद्रपूर जिल्ह्यातील संघर्षात गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या मुद्द्यावरून अजय सरकार यांना उमेदवारी देण्याबाबत चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत दोन तंबूत मोठा संघर्ष झाला होता. जोरगेवार समर्थकांनी पुन्हा एकदा अजय सरकार यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा हवाला देत त्यांना जिल्ह्यातून तडीपार करण्याची मागणी केली. अजय सरकार यांच्यावर 33 गुन्हे दाखल असून त्यांच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे शहरातील सामान्य नागरिक, विशेषतः महिला वर्गामध्ये भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप जोरगेवार गटाच्या नेत्यांनी आपल्या निवेदनात केला आहे.0
0
Report
मनसे ने पालिका आयुक्त के दालनात प्रदर्शन किया; भावना पगारे को निलंबित किया गया
Navi Mumbai, Maharashtra:गर्भवती महिला सोनम डोंगरे मौत प्रकरणी आज मनसे ने देखील पालिका आयुक्त कैलास शिंदे के दालनात आंदोलन केले. यावेळी शर्ट काढून आयुक्तांकडे भीरकवण्याचा प्रयत्न केला तर शर्ट काढत ठिय्या आंदोलन केले. पालिका आयुक्तांनी संबंधित स्त्रीरोगतज्ज्ञ भावना पगारे यांना निलंबित केले असल्याची माहिती दिली. तसेच इंजेक्शन देखील एफडीए ला देण्यात आले असल्याचे सांगितले. एकंदरीत हे इंजेक्शन आधी का बंद गेले नाही, मार्च महिन्यात देखील याच इंजेक्शन ने प्रतीक्षा खांडेकर या गरोदर महिला आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाला असल्याची माहिती मनसे ने दिली. चार बळी जाईपर्यंत पालिका आणि सत्ताधारी वाट बघत असल्याचे आरोप मनसे ने केले असू न याबाबत बातचीत केले आहे आमच्या प्रतीनेधी स्वाती नाईक यांनी0
0
Report
Advertisement
चार अल्पवयीन लड़कियाँ बेपत्ता, कल्याण पुलिस ने राजस्थान से सुरक्षित बरामद
Kalyan, Maharashtra:शाळेत गेलेल्या चार अल्पवयीन मुली बेपत्ता प्रकरण कल्याण बाजारपेठ पोलिसांनी मुलींचा घेतला शोध,मुली पोलिसांच्या ताब्यात Anchor- कल्याणमधील नॅशनल उर्दू हायस्कूल या शाळेतील आठवी आणि नववीत शिकणाऱ्या चार अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. २९ जूनला शाळेत गेल्यावर त्या सायंकाळी घरी परतल्याच नाहीत. Vo- त्यामुळे त्यांच्या पालकांनी बाजारपेठ पोलिसात या संदर्भात तक्रार दिली .पोलिसांनी तात्काळ या संदर्भाचा गुन्हा दाखल करून चार विविध पथक त्यांच्या शोधासाठी रवाना केली. याच दरम्यान रेल्वे स्थानक, स्टेशन परिसर,शाळेच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक माहितीच्या आधारे या मुलींचा शोध सुरू झाला. त्याच दरम्यान या मुली राजस्थानकडे जाणाऱ्या ट्रेनने प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार बाजारपेठ पोलिसांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने राजस्थानमधील मारवाड रेल्वे स्थानकातून या चारही मुलींना सुरक्षितपणे आपल्या ताब्यात घेतलं. या चारही मुली अजमेर येथे देव देवदर्शनासाठी जात असल्याची माहिती मिळते आहे. मात्र तरी देखील विविध अंगांनी या संदर्भाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. मात्र पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात या मुलींचा शोध घेऊन त्यांना सुखरूपपणे कल्याणला परत आणल्याने पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक केलं जातंय. Byte-अशोक होनमाने(Acp)0
0
Report
संसद में किसानों के सवालों के लिए केवल दो घंटे, सरकार की निष्ठा पर सवाल
Shirdi, Maharashtra:राहाता / अहिल्यानगर खासदार अमोल कोल्हे बाईट पॉईंटर ऑन शेतमाल हमीभाव संसदेत शेतकऱ्यांचा प्रश्नांवर चर्चेसाठी अवघे दोन तास देण्यात आले... सरकारला शेतकऱ्यांबद्दल किती आस्था आहे? हे लक्षात येते... हमीभावाच्या गाजर दाखवले जाते, मात्र वाढलेल्या उत्पादन खर्चाचा विचार होत नाही... हमीभावाची फेररचना झाली पाहिजे... ऑन कर्जमाफी कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसू नका... निवडणुकीत सरकारने दिलेल्या आश्वासनावर जनतेने विश्वास ठेवला... आश्वासनाची पूर्तता करा, हीच विरोधी पक्षांची मागणी... ऑन ऑफर वक्तव्य आणि संजय क्षीरसाठ महाभारतातला एक संजय ऐकला होता... दुसरे आमचे संजूभाऊ दिसताय, ज्यांना सगळच दिसतंय... गमतीने बोललो तरी त्याची ब्रेकिंग न्यूज होते... कालचे वक्तव्य हे केवळ पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेबाबत होते... जगात 14 ठिकाणी रेडिओ टेलिस्कोप आणि रेल्वे एकत्र... विश्वगुरु म्हणवणाऱ्या भारताला ही गोष्ट का शक्य होत नाही?... कोणतीही विचारणा झाली नसल्याची माहिती GMRT च्या अधिकाऱ्यांनी दिलीये... रेल्वे मार्ग कुणाच्या हितासाठी बदलला जातोय..? हा प्रश्न आहे... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देशात इंफ्रामॅन म्हणून ख्याती... पुणे नाशिक रेल्वे जुन्या मार्गानेच व्हावी यासाठी त्यांनी ताकद लावावी... ऑन ऑपरेशन तुतारी राष्ट्रवादीचे आठही खासदार ठामपणे एकत्र... पवार साहेब सांगतील ते धोरण, बांधतील ते तोरण, हेच आमचं सूत्र... जनता ने ज्या कारणासाठी आम्हाला निवडून दिलंय, त्यासाठी आम्ही कार्यरत... कुठल्याही चर्चा आणि वावड्यांना महत्व द्यायची गरज नाही... Byte - खा.अमोल कोल्हे , राष्ट्रवादी शरद पवार गट0
0
Report
कुंभ मेळा तैयारी: नाशिक-त्र्यंबकेश्वर के मार्ग खड्डों से परेशान
Nashik, Maharashtra:कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये विकासकामांना वेग आल्याचं बोललं जात असला तरी प्रत्यक्षात मात्र काम अत्यंत संथ गतीने सुरू आहेत . गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून सुरू झालेल्या रस्त्यांच्या कामांमुळे निवृत्तीनाथ यांच्या दिंडी निमित्त आलेल्या वारकरी आणि भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे... कुंभमेळ्याच्या तयारीसाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये रस्ते, ड्रेनेज आणि इतर पायाभूत सुविधांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. मात्र अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने आणि खड्डे पडल्याने भाविक, वारकरी तसेच स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः त्र्युम्बकेश्वरकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था खराब झाली असून खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटनाही घडत आहेत. काही भाविक खड्ड्यात पडून जखमी झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीस्थळाकडे जाणाऱ्या वारकऱ्यांमध्येही नाराजी आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी भाविक तसेच स्थानिक नागरिकांनी केलीय. दरम्यान, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. कुंभमेळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असून, ही कामे पूर्ण झाल्यानंतर नागरिकांच्या मूलभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा होईल, असे त्यांनी सांगितले. काही दिवसांचा त्रास सहन करण्याची गरज असून भविष्यात याचा लाभ भाविक आणि स्थानिक नागरिकांना होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कुंभमेळ्याच्या दृष्टीने विकासकामे आवश्यक असली, तरी ते वेळेत पूर्ण करून भाविकांना सुरक्षित आणि सुरळीत सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम हे प्रशासनाचे आहे मात्र प्रत्यक्षात जर बघितलं तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमी सुरू असलेल्या कामात प्रशासन लक्ष देत की नाही हाच प्रश्न सध्या नाशिककर विचारताय.... कुंभ शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना देखील महत्त्वाचा असला तरी नागरिकांचे देखील महत्त्वाचे आहे त्यावरही लक्ष दिले पाहिजे यानिमित्ताने हेच नागरिक बोलत आहे0
0
Report
Advertisement
चंद्रपुर महानगरपालिका सफाईकर्मचारियों के वारस बेमुदत उपोषण: महिला वारस भी शामिल
Chandrapur, Maharashtra:टायटल:---चंद्रपूऱ मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांचे बेमुदत आमरण उपोषण अकराव्या दिवसात प्रवेशले, आजपासून महिला वारस बसले उपोषणाला, चंद्रपूर मनपाच्या ढिसाळ कारभाराचा केला निषेध अँकर:-- चंद्रपूर मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांचे बेमुदत आमरण उपोषण अकराव्या दिवसात प्रवेशले आहे. आजपासून महिला वारस उपोषणाला बसले आहे.त्यांनी चंद्रपूर मनपाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध केला. चंद्रपूर महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासनाच्या आदेशानुसार नियुक्ती देण्यात यावी, या मागणीसाठी वारसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पात्र असूनही अनेक वर्षांपासून नियुक्तीपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप करत २२ जून २०२६ पासून मनपा कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास त्यास सर्वस्वी मनपा प्रशासन जबाबदार राहील, असा गंभीर इशाराही आंदोलकांनी दिला आहे. बाईट १) सुजय घडसे, आंदोलक नेते आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
युवा संवाद जागर यात्रा नाशिक में येवल के बाबासाहेब आंबेडकर स्मारक पर शुरू
Yeola, Maharashtra:राज्यातील जास्तीत जास्त युवकांना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चामध्ये सामील करून घेण्यासाठी तथा भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तर्फे युवा संवाद जागर यात्रेचा आयोजन करण्यात आलं होतं यात्रेच्या तेराव्या दिवशी ही यात्रा नाशिकच्या येवल्यात दाखल झाले असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून यात्रेला सुरुवात करण्यात आली0
0
Report
राम बिराजदार को बैलजोड़ि वापस मिली; लातूर में किसान के संघर्ष की जीत
Latur, Maharashtra:पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्याची बैलजोडी अडवली... न्यायासाठी सुरू झाला संघर्ष. अखेर शेतकरी राम बिराजदार यांना बैलजोडी परत मिळाली. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील कोराळी गावातील शेतकरी राम बिराजदार अवघी तीन एकर शेती करतात. दुष्काळ, अवकाळी आणि वाढत्या खर्चाच्या चक्रात या शेतकऱ्याचं आयुष्य संघर्षात गेले. यंदा पावसाने पेरणीची आशा जागी केली. राम बिराजदार यांनी मोठ्या रकमेत बैलजोडी खरेदी केली; कारण त्यांच्या मते, बैलजोडीशिवाय शेतीला जीव नाही. बाजारातून बैलजोडी घेतल्यास काही गोरक्षकांनी संशयावर अडवले; पोलिसात गुन्हा दाखल, बैल गोशाळेत ठेवले. शेतकरी म्हणाले बैल परत मिळावेत. पेरणीच्या तोंडावर बैलजोडी नसल्याने शेतीची कामे ठप्प झाल्याची व्यथा ZEE 24 TAAS कडे मांडली. पोलीस प्रशासनाने राम बिराजदार यांना बोलावून बैलजोडी त्यांच्या ताब्यात दिली. शेतकरी आणि कुटुंबीयांना दिलासा मिळाला. या घटनेने व्यापक प्रश्न उभे राहिले: अशा प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांना त्रास होऊ नये, तसेच जनावरांच्या संरक्षणाचा उद्देश साध्य व्हावा. विधिमंडळाच्या अधिवेशनात या प्रश्नावर मार्गदर्शक तत्त्वे तयार होतील, तर भविष्यात शेतकऱ्यांचे बैल अडवले जाणार नाहीत.0
0
Report
Advertisement
