Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Oct 25, 2024 07:21:47
Yavatmal, Maharashtra
यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KLKANHAIYA LAL SHARMA
Feb 17, 2026 08:08:36
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 17, 2026 08:04:52
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी न मागितल्यास काँग्रेस भवन पेटवून देऊ, सोलापुरात हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात सोलापुरात सकल हिंदू समाज आक्रमक - हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांच्याशी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटना आक्रमक - हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागितली नाही तर काँग्रेस भवन पेटवण्याचा इशारा - हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी - जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर एकत्रित येत नोंदवला निषेध
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Feb 17, 2026 08:04:19
Thane, Maharashtra:महाराष्ट्र राज्य रस्ते व विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या शहापूर-मुरबाड - खोपोली या मुख्य मार्गावरील कोळकेवाडी व दोनघरच्या दरम्यान म्हणजेच समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असल्याची बाब समोर आली असून, ठिकठికाणी रस्ता खचल्याने लोखंडी सळ्या (बार) उघड्या अवस्थेत बाहेर पडल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्य वाहन चालकांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. मागील आठ वर्षांपासून सुरु असलेल्या व अजातगायत पूर्ण न झालेल्या शहापूर - मुरबाड - खोपोली महामार्गावरील कोळकेवाडी - दोनघर दरम्यान असलेल्या महामार्गाचा काँक्रीट रस्ता तुटून आतमधील लोखंडी जाळी बाहेर आली आहे. या उघड्या सळ्यांमुळे दुचाकीस्वारांचे टायर फुटण्याची, वाहन घसरून अपघात होण्याचे प्रकार वाढत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी हा धोका अधिक वाढत असून, एखादा गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक होते. शाळकरी मुले, कामगार तसेच ग्रामीण भागातील नागरिक याच मार्गाचा वापर करतात. मात्र एमएसआरडीसी विभागाकडून दुरुस्तीबाबत अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली दिसत नाही. रस्त्यावरील भेगा व उघडे लोखंडी बार तातडीने काढून रस्ता दुरुस्त करावा अन्यथा एखाद्या जीवितहानी नंतरच प्रशासन जागे होणार का असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित एमएसआरडीसी विभागाने तातडीने पाहणी करून धोकादायक ठिकाणी तात्काळ सुरक्षितता उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 17, 2026 07:36:32
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 17, 2026 07:35:17
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुर जिले में वनविभाग के कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी शासनाची विज बिल प्रणाली कुचकामी ठरली आहे. पाच महिन्यांपासून वेतन ना राहिल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. 16 फेब्रुवारीपासून चंद्रपुरात धरणे आंदोलन सुरू झाले आहे. मुख्य वनसंरक्षक कार्यालय चंद्रपूर येथील मजुर, विभागीय वन अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथील मजुर, वनविश्राम गृह मजुर, रामबाग वनवसाहत येथील मजुर, संगणक चालक, वाहन चालक, रोपवन मजूर व इतर मजुरांचे मासिक वेतन योजना/यোজनेत्तर अंतर्गत होत असते. ऑक्टोबर २०२५ पासून वेतन मिळालं नाही. घरखर्च, औषधी उपचार, मुलांच्या शाळेची फी, घरभाडे व जीवनावश्यक खर्च भागविणे कठीण झाले आहे. पाच महिन्याचा दीर्घ कालावधी लोटून सुध्दा वेतन मिळत नसल्याने कुटुंबाला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. अशा प्रकाराच्या गैरहजेरीमुळे चंद्रपूर वनविभागातील सर्व कंत्राटी कर्मचारी, संगणक चालक, वाहन चालक, रोपवन मजूर, बिट मदतनीस, क्षेत्र सहाय्यक मदतनीस, कार्यालयीन दिवस-रात्र पाळी चौकिदार, डेपो चौकीदार बेमुदत काम बंद आंदोलनावर गेले आहेत.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Feb 17, 2026 07:31:30
Chendhare, Maharashtra:काल प्रकल्पाच्या हलगर्जीपणाचा शेतकऱ्यांना फटका. कालव्याचा बांध फुटून पाणी शेकडो एकर शेतजमिनीत घुसले. काढणीला आलेल्या कडधान्य पिकांचे नुकसान. माणगाव तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. झालेलं नुकसान कोण भरून देणार? आक्रमक शेतकऱ्यांचा सरकारला सवाल. अँकर: माणगाव काळ प्रकल्पाच्या हलगर्जीमुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे. कालव्याचा बांध फुटून पाणी शेकडो एकर कडधान्य पिकात शिरले. त्यामुळे कशेणे परिसरातील शेतकऱ्यांचे कडधान्य पिकांचे नुकसान झाले. काढणीला आलेले वाल, हरभरा, मटकी पिके पाण्यात भिजून मातीमोल झालं आहे. यामुळे रडकुंडीला आलेले शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. आधीच अवकाळी पावसाने भातपीक वाया गेले होते; अस्मानी संकटानंतर आता काळ प्रकल्पाच्या हलगर्जीमुळे कडधान्य पीकदेखील वाया गेलं आहे. नुकसान कोण भरून देणार असा सवाल इथले शेतकरी विचारत आहेत. तातडीने भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Feb 17, 2026 07:20:08
Pandharpur, Maharashtra:Anchor - जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत दारुण पराभव ,सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षाच्या हकालपट्टीची मागणी, अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर सुडके यांनी केली हकालपट्टीची मागणी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उमेश पाटील यांनी नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत पक्ष नेस्तनाबूत केला. स्वतःला आणि भावाला सुद्धा निवडणून आणू शकले नाहीत. उमेश पाटील यांचा डीएनए भाजपचा आहे की शिवसेनेचा आहे हे आता तपासण्याची गरज आहे अशी टीका करून राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर सुडके यांनी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Feb 17, 2026 07:11:45
Vasai-Virar, Maharashtra:नालासोपाऱ्यात लाकडाच्या गोडाऊनला भीषण आग नालासोपारा पश्चिम सोपरा गावात सोनार आली परिसरामध्ये एका लाकडाच्या गोडाऊनला भीषण आग लागली ची घटना घडली आहे ही आग रात्रीच्या साडेनऊच्या سुमारास लागली आहे आग एवढी भीषण होती ka लाकड्याचा गोडाऊन जळून खाक झाला आहे मात्र आग कशामुळे लागली समजू शकले नाही मात्र स्थानिक नागरिकांनी तत्काल माहिती देत वसई विरार महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानाला तात्काळ माहिती मिळतात घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचा प्रयत्न केला आहे मात्र आग एवढ्या मोठ्या प्रमाणात होती ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना दोन तास लागेल आहे मात्र हे गोडाऊन कोणाचा आहे आणि आग कशामुळे लागली आहे ते समजू शकले नाही मात्र आग पूर्णपणे आटोक्यात आली आहे या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Feb 17, 2026 06:48:25
Yavatmal, Maharashtra:विवाहाचे स्वप्न दाखवून शेतकरी तरुणाची आर्थिक लूट करणाऱ्या टोळीचा यवतमाळच्या घाटंजी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी सिमरन पाटीलसह तिची आई, भाऊ व अन्य दोन सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. नाशिक च्या बानगाव येथील शेतकरी युवकाचे लग्न जुळवण्यासाठी घाटंजी तालुक्यातील चोरंबा येथील सिमरन पाटील हिचा प्रस्ताव पुढे आला. घरची परिस्थिती हलाखीची असल्याचे सांगत विवाहाचा खर्च मुलाकडच्यांनी उचलावा, अशी अट घालून मुलाकडून दोन लाख ५० हजार रुपये उकळण्यात आले. पैसे मिळताच सिमरन, तिची आई, भाऊ व इतर दोघे साथीदारही वेळ साधून तेथून निसटले. यानंतर घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. काही महिन्यांपूर्वी एका शेतकऱ्याला सार्वजनिक ठिकाणी मारहाण करून दुचाकी हिसकावून नेल्याच्या घटनेत ती व तिचा भाऊ आरोपी होते. या अपमानानंतर संबंधित शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्या आत्महत्या prकरणातही घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून सिमरन नुकतीच कारागृहातून बाहेर आली होती. या टोळीने महाराष्ट्रासह इतरही राज्यात कोणाची फसवणूक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Feb 17, 2026 06:19:46
Nanded, Maharashtra:एका महिलेच्या घरी घरफोडी झाली. या घरफोडीमध्ये चोरट्यांनी सोन्या-चांडीचे दागिने आणि इतर ऐवज लंपास केला. सोन्या चांदीच्या ऐवजासह साडेबारा लाख रुपयांची रोख रक्कमही चोरीला गेल्याची फिर्याद महिलेने दिली. पण घरफोडी मध्ये केवळ सोन्या-चांदीचे दागिने लंपास झाले असले तरी रोख एक्कम लंपास झाल्याचा बनाव फिर्यादी महिलेने केल्याचे पोलीसांनी उघड केले. नांदेड शहरातील ही घटना. 15 फेब्रुवारी रोजी संभाजीनगर मधील रहिवासी मंगल जंगलोड यांच्या घरी घरफोडी झाली होती. सोन्या चांदीचे दागिने घड्याळ आणि रोख 12 लाख 50 हजार रुपये गेल्याची फिर्याद देण्यात आली. चोरटे तुळजापूर येथे असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. दोन पुरुष आणि तीन महिला असे एकूण पाच चोरट्यांना पोलिसांनी तुळजापूर मधून अटक केली. सोन्या चांदीचे दागिने आणि इतर ऐवज चोरल्याचे चोरट्यांनी कबूल केले. पण रोख रकमेबाबत माहिती मिळत नसल्याने पोलिसांनी अखेर फिर्यादी महिलेचीच उलट तपासणी केली. या महिलेने काही दिवसांपूर्वी रोख रक्कम आपल्या आईकडे ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले. भाग्यनगर पोलिसांनी फिर्यादी महिलेवर गुन्हा दाखल करून ती साडेबारा लाख रुपयांची रक्कमही जप्त केली. महिलेने ही रक्कम अशा प्रकारे लपवण्याचा प्रयत्न का केला याचा तपास पोलीस करत आहेत.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Feb 17, 2026 06:01:50
0
comment0
Report
Advertisement
Back to top