445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
बारामती: संत तुकाराम पालखी वारी में आदेश बांदेकर की भागीदारी, बारिश के बावजूद श्रद्धा बनी
Rui, Maharashtra:संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे आदेश बांदेकर हे पाई चालत वारीमध्ये सहभागी झाले होते सर्वत्र पाऊस पडू दे सुखी समाधान नांदू दे असे साकडे त्यांनी विरहुराजाला घातले त्यांच्याशी बातचीत केली आहे.0
0
Report
बारामती में तुकोबाराय पालखी के साथ मेंढ़ों का रिंगण, इतिहासिक परंपरा
Rui, Maharashtra:यामुळे घातलं जातं तुकोबारायांच्या पालखीला मेंढ्यांचं रिंगण..... सोमनाथ माने यांनी सांगितला इतिहास..... बारामतीच्या काटेवाडीत का घातलं जातं मेंढ्यांचे रिंगण.... या रिंगण सोहळ्याला शेकडो वर्षाची परंपरा आहे. काही वर्षांपूर्वी मेंढ्यांना रोग आला होता आणि त्यामुळे त्यांच्या मृत्यू होत होता ज्यावेळी तुकोबारायांचा पालखी सोहळा या मार्गावरून निघाला होता त्यावेळी मेंढपाळ आणि आमच्या मेंढ्या वाचू द्या असं साकडं घातलं आणि मेंढ्यांचा मृत्यू थांबला गेला. आणि तेव्हापासून ही रिंगण घालण्याची परंपरा अद्याप पर्यंत सुरू आहे या संदर्भात मेढपाळ सोमनाठ माने यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी याने0
0
Report
इंदापूर में पालखी सोहळा प्रवेश, राज की मौजूदगी और कृषिमंत्री दत्तात्रय भरणे का स्वागत
Rui, Maharashtra:संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा इंदापूर तालुक्यात प्रवेश, पालखी सोहळा इंदापूर तालुक्यात प्रवेश करतात वरून राजाची हजेरी, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले इंदापूर तालुक्यात स्वागत, जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळा आज बारामतीकरांचा निरोप घेऊन पालखी सोहळ्याने इंदापूर तालुक्यात प्रवेश करताच वरून राजाने जोरदार हजेरी लावली आज दिवसभर उकाडा जाणवत होता उन्हाची तीव्रता मोठी होती मात्र पाऊस पडल्याने हवेमध्ये गारवा निर्माण झाल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे पालखी सोहळा इंदापूर तालुक्यात प्रवेश केल्यानंतर इंदापूर तालुक्याचे आमदार तथा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले0
0
Report
Advertisement
उपमुख्यमंत्री खाते पर नई चर्चा: जल्द ही खाता राष्ट्रवादी कांग्रेस को मिलने की संभावना
Pandharpur, Maharashtra:सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचे शपथ घेताना त्यांना अर्थ खाता देण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलं होतं मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि त्यानंतर पुरवणी मागण्या यामुळे हे खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे मात्र चर्चा झाल्याप्रमाणे वरिष्ठ नेते निर्णय घेऊन लवकरच हे खाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे देईल असं वक्तव्य नांदेड जिल्ह्यातील आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला आहे प्रताप पाटील चिखलीकर0
0
Report
अंधेरी में खुला मैनहोल: लड़की का पैर फँसा, जांच फिर तेज
Mumbai, Maharashtra:मुंबई मुम्बईतील मॅनहोल किती मुंबईकरांचे जीव घेणार? अंधेरीत मॅनहोल च्या झाकणात अडकला मुलीचा पाय अंधेरी स्टेशनच्या पश्चिमेकडील गटाराच्या झाकणात एका मुलीचा पाय अडकला इतर नागरिकांच्या सतर्कतेने झाली सुटका मुलीला किरकोळ दुखापत, मात्र उघडे मॅनहोल आणि तुटलेले मॅनहोलचा मुद्दा या घटनेमुळे पुन्हा चर्चेत आला0
0
Report
मालेगांव के जळकू क्षेत्र में आंधी-बारिश से जलमग्न, फसलों को नुकसान
Nashik, Maharashtra:मालेगावच्या जळकूमध्ये ढग फुटी सदृश्य पाऊस. सर्वत्र पाणीच पाणी, पिकाचे नुकसान. पाऊस बरसल्याने बळीराजा सुखावला. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील जळकू परिसरात दुपारच्या सुमारास ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने सर्व परिसर जलमय झाला. नाशिकच्या पूर्व भागात कुठेच पाऊस नसताना फक्त जळकू येथे पावसाने धुवांधार बॅटिंग करीत सर्वत्र पाणीच पाणी करून टाकले. अचानक झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी शेताची माती वाहून गेली तर पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र असे असले तरी जोरदार झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.0
0
Report
Advertisement
मीरा रोड के जेपी नॉर्थ में क्रेन गिरने से भयावह हादसा, कई घायल
मिरा रोडच्या 'जेपी नॉर्थ' परिसरात 13 व्या मजल्यावरील बांधकाम क्रेन कोसळून भीषण दुर्घटना. या भीषण अपघातात एक जण गंभीर जखमी, तर खाली उभ्या असलेल्या अनेक वाहनांचे प्रचंड नुकसान. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर मदतकार्य पूर्ण. बांधकाम सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; स्थानिक नागरिकांकडून दोषींवर कठोर कारवाईची मागणी.0
0
Report
सिंधुदुर्ग किले की दीवारों में बड़े भगदाड़, स्थानीय निवासी दुखी
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दोन नंबरच्या बुरुजाला जवळजवळ ३ मीटर रुंदीचे मोठे भगदाड पडले. काही दगड हलल्यामुळे हे भगदाड पडल्याची माहिती किल्ल्यावरील रहिवासी असलेले मंगेश सावंत यांनी दिली आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीतील किल्ल्यांपैकी सिंधुदुर्ग किल्ला असून किल्याची तटबंदी ढासळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात बांधलेला हा एकमेव ऐतिहासिक किल्ला असूनही त्याची अशी अवस्था बघून दुःख आणि हताशपणा झाल्यासारखं वाटतं असल्याची प्रतिक्रिया किल्ल्यावरील रहिवासी मंगेश सावंत यांनी दिली. पुरातत्व विभाग या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत ढिसाळपणे वागत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.0
0
Report
ओशिवरा में दिनदहाड़े पत्नी की क्रूर हत्या, पति गिरफ्तार
Mumbai, Maharashtra:मुंबईच्या अंधेरी पश्चिमेतील ओशिवरा परिसरात कौटुंबिक वादाचे भीषण रूप पाहायला मिळाले. भररस्त्यात पत्नीच्या गळ्यावर धारदार चाकूने वार करून तिची हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरच घडली. हल्ल्यानंतर आरोपी पती फरार झाला होता. मात्र ओशिवरा पोलिसांनी अवघ्या काही तासांत त्याचा शोध घेत बेड्या ठोकल्या आहेत. पाहूया हा विशेष रिपोर्ट… १४ जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आदर्श नगर परिसरातील अस्ट्रר बिल्डिंगसमोर एक महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली. माहिती मिळताच ओशिवरा पोलीस ठाण्याचे बीट मार्शल पोलीस शिपाई आकाश बागल घटनास्थळी दाखल झाले. महिलेच्या गळ्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याचे दिसून आले. स्थानिक नागरिकांनी या महिलेची ओळख ३५ वर्षीय झुमरी धिरन पवार अशी पटवून दिली. तसेच तिच्यावर तिच्याच पतीने धारदार शस्त्राने हल्ला करून घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने झुमरी यांना निर्भया वाहनातून ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. प्राथमिक तपासात किरकोळ कौटुंबिक वादातून आरोपी धिरन पवार याने घरातील चाकूने पत्नीच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात बीएनएस कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर ओशिवरा पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू करण्यात आला. अखेर बेहरामबाग परिसरातून आरोपी धिरन पवार याला ताब्यात घेण्यात आले आणि १५ जुलै रोजी पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी त्याला अटक करण्यात आली. सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस निरीक्षक सचिन पाटील आणि ओशिवरा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने ही जलद कारवाई केली. हत्येमागील नेमके कारण आणि इतर कोणता हेतू होता का, याचा सखोल तपास आता ओशिवरा पोलीस करत आहेत. कौटुंबिक वादातून घडलेली ही निर्घृण हत्या पुन्हा एकदा वाढत्या कौटुंबिक हिंसाचारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. क्षणिक रागाने एका महिलेचा जीव गेला, तर तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.0
0
Report
Advertisement
शिरूर के सणसवाडी में बिबटिया ने गोठे में घुसकर पक्षियों को मारा, इलाके में भय
Shirur, Maharashtra:Anc:पुन्हा एकदा बिबट्याची दहशत! शिरूर तालुक्यातील सणसवाडीत बिबट्याने थेट एका गोठ्यात घुसून शिकार केली आहे. मात्र, यावेळी बिबट्याचा एक वेगळाच प्रताप पाहायला मिळालाय. सणसवाडी येथील पैलवान बाबा दरेकर यांच्या गोठ्यात बिबट्याने मध्यरात्री हजेरी लावली. धक्कादायक बाब म्हणजे, गोठ्यात मोठ्या प्रमाणात पाळीव जनावरं असतानाही, बिबट्याने त्यांच्यावर हल्ला न करता तिथे असलेल्या पक्ष्यांवर ताव मारला. बिबट्याने पक्ष्यांची शिकार केल्याने आता परिसरात एकीकडे आश्चर्य, तर दुसरीकडे प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा गोठ्यातील वावर सीसीटीव्हीत कैद झाला असून, वनविभागाने तातडीने पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.0
0
Report
एमपीएससी की सभी परीक्षाएं ऑफलाइन हों; कांग्रेस का उपोषण खत्म, सीएम ने ऑनलाइन रोक हटाई
Navi Mumbai, Maharashtra:एमपीएससीच्या सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने व्हाव्यात या प्रमुख मागणीसाठी एमपीएससी कार्यालया खाली मागील 9 दिवसांपासून सुरु असलेले काँग्रेसचे बेमुदत साखळी उपोषण आज मागे घेण्यात आलेय. मुख्यमंत्र्यांनी एमपीएससीच्या ऑनलाईन परीक्षेला स्थगिती दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलेय. ऑनलाईन परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे आता जरी निर्णय मागे घेतला असला तरी यापुढे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत निर्णय घेत असताना सर्वांना विचारात घेऊन निर्णय घ्यावा अशी मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आबा दळवी केलेय..0
0
Report
नाशिक: तीन प्रमुख आरोपी गिरफ्तार, 12 आरोपी सामने, जांच जारी
Nashik, Maharashtra:- तीन मुख्य आरोपींना ताब्यात घेतले आहे. - शहादा आणि इतर भागातून त्यांना आपण हेरून ताब्यात घेतले आहे. - राहुल भागडे, कैलास भागडे, आकाश भोईर हे तिघ आपण ताब्यात घेतलेले आरोपी आहे. - आधीचे नऊ आणि आज तीन असे बारा आरोपी आपण निष्पन्न केले आहे. - खून, चोरी यातले हे आरोपी आहे त्याचा तपास सुरू आहे - गुन्ह्यातील दुचाकी आणि चारचाकी कोणाची ही माहिती घेऊन कारवाई केली जाईल - ज्या ठिकाणी गुन्हा घडला तेथे जी पोलिस चौकी आहे तेथून पोलिस वाहन फिरते असते त्यातून पेट्रोलिंग केले जाते. मात्र पोलिसांच्या गस्तीने पर्यटकांची सुरक्षा केली जाते त्यावर आम्ही सजक राहून काम करत आहोत. - गुन्हा घडला तिथे आरोपींना नेले होते आणि पंचनामा देखील झाला आहे0
0
Report
Advertisement
एक मां ने तेंदुए से संघर्ष कर बच्चों की जान बचाई
Dhule, Maharashtra:एका आईने बिबट्यासोबत संघर्ष करीत वाचावाले मुलांचे प्रान.0
0
Report
चंद्रपूर के बल्लारपुर में बस के ऊपर पेड़ गिरा; 40 यात्री सुरक्षित
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1607ZT_CHP_TREE_COLLAPSE ( single file sent on 2C) टायटल:--- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात धावत्या बसवर झाड कोसळले, तेलंगणा राज्य परिवहन बसमधील 40 प्रवासी थोडक्यात बचावले, चालकाच्या सतर्कतेमुळे एक मोठा अपघात टळला, मुख्य रस्ता दीर्घकाळ झाला बाधित अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात तेलंगणा राज्य परिवहन प्रवासी बसवर अचानक एक मोठे झाड कोसळले. झाडाच्या मोठ्या फांद्यांनी सुमारे ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसची समोरची काच फोडली. सुदैवाने, चालक मल्लेश यादवने वेळीच ब्रेक लावल्यामुळे सर्व प्रवाशांचे प्राण वाचले. अपघातानंतर चंद्रपूर-तेलंगणा महामार्ग दीर्घकाळ बंद होता. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जेसीबी, क्रेन आणि कटरच्या मदतीने भलेमोठे झाड युद्धपातळीवर तोडण्याचे काम सुरू करण्यात आले. झाडाच्या मोठ्या फांद्या कापण्यात आल्या आणि तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. बाजूला असलेल्या सरकारी रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खोल खड्ड्यांमुळे झाडाची मुळ�े एका बाजूने कमकुवत झाली. स्थानिकांनी याबद्दल संबंधित विभागाला आणि कंत्राटदाराला वारंवार कळवले, मात्र कोणीही लक्ष दिले नाही. पावसानंतर, ते कमकुवत झालेले झाड अखेर आज कोसळले. बाईट १) चालक, तेलंगणा परिवहन सेवा आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
हिंगोली में भारी बारिश, हल्दी किसान परेशान, विक्रय पर असर
Hingoli, Maharashtra:आज पंधरा दिवसाच्या प्रतीक्षानंतर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे या पावसाचा फटका हिंगोलीत हळद उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून हळद मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली हळद भिजली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निष्काळजीपणामुळे लिलावा पूर्वीच हिंगोलीत शेतकऱ्यांची हळद पावसामुळे भिजली आहे.. बाजार समितीमध्ये बाजार समितीच्या नियोजन शून्य कारभारामुळे बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत यामुळे शेतकऱ्यांची हळद भिजली आहे... पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे0
0
Report
Advertisement
