445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
शिरपूर में किसानों ने रात में महामार्ग रोका; बिजली आपूर्ति इमरजेंसी लोडसेडिंग से बाधित
Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातल्या संतप्त शेतकऱ्यांनी रात्रीच्या सुमारास अंकलेश्वर बर्हाणपूर महामार्ग रोखला होता. शेतीसाठी देण्यात आलेल्या विद्युत पुरवठा इमर्जन्सी लोडसेडींग च्या नावाने खंडीत करण्यात येत असल्याने शेतकरी संतप्त झाले होते. इमर्जन्सी लोडसिडींग मुळे पिकांना पाणी देणे शक्य होत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. शिरपूर तालुक्यातील बभळाज येथील सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा रात्रीच्या वेळेस मोर्चा धडकल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच पळापळ झाली. महावितरण अधिकारींना शेतकऱ्यांचा घेराव लक्षात घेता अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. रात्री अंकलेश्वर बर्हाणपूर महामार्गावर बभळाज गावाजवळ शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला होता. महामार्ग रोखल्यानंतर शेतीतील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला.0
0
Report
खेड के युवक ने डूबती वृद्ध महिला की जान बचाई, देवदूत बना
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. पाण्यात बुडणाऱ्या वृद्ध महिलेला वाचवले.. खेड शहरातील खारी गावाकडे जाणाऱ्या पुलाखाली एक वृद्ध महिला पाण्यात बुडत असल्याची धक्कादायक घटना घडली होती. मात्र स्थानिक युवक स्वयंम शिबे यांने प्रसंगावधान राखत धाडसी पाऊल उचलले आणि वृद्ध महिलेचा जीव वाचवण्यात यश मिळवले. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला पुलाखालील खोल पाण्यात अडकून बुडत होती. ही बाब स्वयंम शिबे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी कोणताही विचार न करता तत्काळ खाडीमध्ये उडी घेतली. पाण्याचा वेग आणि खोली अधिक असतानाही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी महिलेपर्यंत पोहोचून तिला सुरक्षित बाहेर काढले. या धाडसी बचावकार्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. स्वयंम शिबे यांच्या तत्परतेमुळे एका वृद्ध महिलेचा जीव वाचला असून त्यांच्या या मानवतावादी आणि धाडसी कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. खेड शहरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून “देवदूत बनून आला तरुण” अशा शब्दांत नागरिकांकडून त्यांच्या धाडसाचे कौतुक करण्यात येत आहे.0
0
Report
गोंदिया में LCB ने 38.5 किग्रा गांजे के साथ दो आरोपी गिरफ्तार
Bhandara, Maharashtra:गोंदिया जिल्ह्यातील डूग्गीपार परिसरात एलसीबी पथकाने मोठी कारवाई करत 38 किलो 500 ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत गांजासह एक थार कार, चार मोबाईल असा एकूण 54 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. नाकाबंदी दरम्यान संशयित वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले तर एक आरोपी फरार झाला. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी कोकण LSG चुनाव: महायुती का पलड़ा भारी, शिवसेना को 305 मतदाताओं का लाभ
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात राजकीय रंगत वाढली महायुतीत उमेदवारीपरून रस्सीखेच असताना शिंदे शिवसेनेचे युवा नेते विकास गोगावले यांनी घेतला उमेदवारी अर्ज रत्नागिरीतल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून दोन अर्ज विकत घेतल्याची माहिती तर उद्धव ठाकरे सेनेकडून माजी आमदार बाळ माने यांनी घेतले चार अर्ज तर या निवडणुकेंत रायगडमधील शेतकरी कामगार पक्ष देखिल उमेदवार देण्याच्या तयारीत शेकापकडून चार उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती, अरविंद म्हात्रे आणि अनिल चोरडा यांनी घेतले उमेदवारी अर्ज विधानसभेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात महायुतीचे पारडे जड, शिंदे शिवसेनेकडे सर्वात जास्त म्हणजे ३०५ मतदार त्याखालोखाल भाजपकडे २७६ आणि अजित पवार राष्ट्रवादीकडे १२७, उद्धव ठाकरे सेनेकडे ५५ तर कॅग्रेसकडे ५० मतदार महायुतीक़डे एकत्र आल्यास ७०८ मतांची मॅजिक फिगर पण शह काटशह याच्या राजकारणात कुणाचे पारडे जड राहणार याची उत्सुकता0
0
Report
तुमसर अस्पताल में पानी की भारी किल्लत, 45°C तापमान में मरीज और गर्भवती महिलाएं परेशान
Bhandara, Maharashtra:तुमसर उपजिल्हा रुग्णालयात पाण्याचा ठणठणाट; ४५°C तापमानात रुग्ण आणि गरोदर मातांचे हाल! लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष.... प्रशासनाच्या मनमानी कारभार चव्हाट्यावर,0
0
Report
सीबीआई ने नीट पेपर 10-12 लाख में बेचे जाने का मामला लातूर में उजागर किया
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज नीट चा पेपर दहा ते बारा लाखाला विकला... सीबीआय तपासातून धक्कादायक माहिती समोर... नीटचे केमिस्ट्रीचा पेपर सेटर प्रा. पी. व्ही. कुलकर्णी आणि प्रा शिवराज मोटेगावकर यांनी नीट परीक्षेचा पेपर १० ते १२ लाख रुपयांपर्यंत नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार CBI च्या तपासात उघडकीस आल्याची माहिती समोर आली आहे. पेपर विकत घेण्यासाठी अनेक पालकांनी या दोघांना ऑनलाइन रक्कम पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रा. कुलकर्णी व प्रा मोटेगावकर या दोघांनी ज्यांना पेपर विकले त्या पालकांनी पुढे आपल्या सर्कलमधील अन्य लोकांना ५ ते १० लाख रुपयांपर्यंत ते विक्री केल्याचीही माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. मोटेगावकरच्या मोबाइलमध्ये हा पेपर नीट परीक्षेच्या आधीच आल्यानंतर, प्रा. कुलकर्णी आणि मोटेगावकर यांनी मिळून हे पेपर विकले असल्याचा सीबीआयला संशय आहे. त्यामुळे पथक लातुरात ठाण माडून आहे...0
0
Report
Advertisement
वाशीम-कोंडाळा रेलवे पुल का कार्य धीमा, किसानों को 10-12 किमी अतिरिक्त सफर
Washim, Maharashtra:वाशीम ते कोंडाळा मार्गावरील भूमिगत रेल्वे पुलाचे काम गेल्या तीन वर्षांपासून संथ गतीने सुरू असल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. विशेषतःपावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर बनण्याची शक्यता आहे. सध्या अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी तब्बल १० ते १२ किलोमीटरचा अतिरिक्त फेरा मारावा लागत आहे. यामुळे वेळ आणि इंधनाचा खर्चही वाढत आहे. दुसरीकडे पुलाखाली दोन्ही बाजूंना पाणी साचण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्यामुळे ये-जा करणे आणखी कठीण होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. शेतीचा हंगाम आणि पावसाळा तोंडावर असताना संबंधित यंत्रणांनी हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी होतं आहे.0
0
Report
स्वच्छता दूत वामन इंगळे की साइकिल यात्रा से महाराष्ट्र में जागरूकता फैल गई
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:वाशिम जिल्ह्यातील डव्हा येथील स्वच्छता दूत वामन इंगळे यांनी संत-महात्म्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्रभर सायकलद्वारे स्वच्छता यात्रेला सुरुवात केली आहे.विशेष म्हणजे त्यांनी आपल्या सायकलवर छोटेखानी ग्रंथालय उभारले असून गावोगावी फिरत स्वच्छतेचा संदेश देण्याचे काम सुरू केले आहे.ज्या गावात त्यांचा मुक्काम असेल त्या गावात संत गाडगेबाबांच्या विचारांनुसार स्वच्छता अभियान राबवून नागरिक,युवक आणि महिलांना वाचनाची प्रेरणा दिली जात आहे. महापुरुषांच्या विचारांची पुस्तके उपलब्ध करून समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न ते करत आहेत.या यात्रेचा कालावधी निश्चित नसला तरी स्वच्छता आणि वाचन संस्कृतीचा संदेश देत वामन इंगळे महाराष्ट्र भ्रमंती करत असल्याचे त्यांनी सांगितले. बाईट: वामन इंगळे,स्वच्छता दूत0
0
Report
रात के अंधेरे में गैस सिलेंडर वितरण, ब्लैक मार्केटिंग का शक—भंडारा लाखनी
Bhandara, Maharashtra:भंडाऱ्याच्या लाखनीत रात्रीच्या अंधारात गॅस सिलेंडर वाटप..... ब्लॅक मार्केटिंगचा संशय.... हे सिलेंडर अधिकृत नोंदीवर वितरित झाले की अवैधरीत्या, याबाबत मात्र स्पष्टता नाही. रात्रीच्या अंधारात सुरू असलेल्या या कारभारामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. तालुका पुरवठा अधिकाऱ्यांना हा व्हिडिओ पाठवून याबाबत विचारणा केली असताहा प्रकार गंभीर व चुकीचे असल्याचे सांगत वरिष्ठांकडे अहवाल पाठवून कारवाईचे संकेत दिले आहेत.0
0
Report
Advertisement
टाकळी में पेयजल की मांग पर महिलाओं ने ग्राम पंचायत के सामने घागर मोर्चा निकाला
Sangli, Maharashtra:सांगलीच्या मिरज तालुक्यातील टाकळी येथे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला. टाकळी गावात पाणी पुरवठा सुरळीत होत, नसल्याचा आरोप करत संतप्त महिलांनी हातात घागरी घेऊन ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली, यावेळी संतप्त महिलांनी ग्रामविकास अधिकारीांना घेराव घालत धारेवर धरले. दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.0
0
Report
भंडारा में खाद की कीमतें बढ़ीं, किसान फिर आर्थिक संकट में
Bhandara, Maharashtra:*भंडाऱ्यात खतांचे दर कडाळले...खतांच्या दरवढीने जिल्ह्यातील बळीराजा पुन्हा आर्थिक संकटात....* Anchor ;- खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना रासायनिक खतांच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीने भंडारा जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा आर्थिक संकटाच्या खाईत लोटला जाणार आहे.आधीच अवकाळी पाऊस, नापिकी, वाढती मजुरी, बियाणे व कीटकनाशकांच्या महागाईने त्रस्त असलेल्या बळीराजावर आता खत दरवाढीचे नवे ओझे कोसळले असून ग्रामीण भागात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात डीएपी, तसेच पोटॅश यांसारख्या खतांच्या किमतींमध्ये प्रति बॅग ४०० ते ५०० रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.दोन वर्षांपूर्वी १ हजरा शंनबत्त ते १ हजार तिनशे रुपयांत मिळणारी खतांची गोणी आता थेट १ हजार आठशे ते २ हजार तिनशे रुपयांच्या घरात पोहोचल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.विशेष म्हणजे खरीप पेरणीपूर्वी मोठ्या प्रमाणात खत खरेदी करावी लागत असल्याने अनेक शेतकरी सावकारांकडून कर्ज घेण्याच्या तयारीत आहेत.'शेती करावी की पडीत ठेवावी?' असा संतप्त सवाल आता ग्रामीण भागातून उपस्थित केला जात आहे. Byte ;- प्रदीप कुंभलकर , कृषी केंद्र चालक Byte ;- शेतकरी0
0
Report
पंढरपूर एकादशी पर चार लाख भक्त जुटे: दर्शन के लिए छह घंटे की लाइन
Pandharpur, Maharashtra:सध्या पुरुषोत्तम मास सुरू आहे या महिन्यातील आज कमला एकादशी आहे. या एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर मध्ये आज चार लाख भाविक दाखल झालेले आहेत पंढरपूरमध्ये प्रदक्षिणा मार्ग चंद्रभागा वाळवंट मंदिर परिसर 65 एकर दर्शन रांग या ठिकाणी भाविकांची गर्दी झालेली आहे भाविकांच्या दर्शनाला सहा तासांचा कालावधी लागत असून मंदिर समितीने दर्शन रांगेमध्ये भाविकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत0
0
Report
Advertisement
पंढरपुर में एकादशी के बीच बकरी ईद पर ऐतिहासिक निर्णय: कुर्बानी नहीं
Pandharpur, Maharashtra:पुष्ठरपुरात एकादशीचा सोहळा साजरा होत आहे. तसेच आज बकरी देखील असल्याने पंढरपुर मधील मुस्लिम धर्मीय नागरिकांनी बकरी ईद की कुर्बानी न देण्याचा एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पंढरपुरात वारकरी सांप्रदायाला मांस वर्ज्य आहे. त्यामुळेच विठ्ठल भक्त असणाऱ्या मुस्लिम धर्मीय बांधवांनी आजची बकरीत उद्या साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नमाज पठाणासह सर्व धार्मिक कार्यक्रम उद्याच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.0
0
Report
नांदेड में मानसूनपूर्व बरसात से केला बागें भारी नुकसान, किसान आर्थिक संकट
Nanded-Waghala, Maharashtra:नांदेड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासुन वादळी वाऱ्यासह होत असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने फळबागांचे नुकसान होत आहे. काल रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मुदखेड तालुक्यातील केळी बागांचे मोठे नुकसान झाले. या वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा आडव्या पडल्या आहेत. मुदखेड तालुक्यातील इजळी या गावात सर्वाधिक नुकसान झाले आहे. काही दिवसातच ही केळी काढणीला आली होती. परंतु तोंडचा घास काल झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. पंचनामे करून मदतीची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.0
0
Report
भीमाशंकर मंदिर अभी बंद, भक्त 31 मई तक दर्शन के लिए उम्मीद लगाए बैठे
Shirur, Maharashtra:बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या, प्रसिद्ध भीमाशंकर मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आणखी किती वाट पाहावी लागणार? असा प्रश्न आता भाविक विचारत आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून मंदिरात विकास आराखड्याची कामं सुरू असल्यामुळे, हे मंदिर भाविकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आलंय. प्रशासनाने ३१ मे रोजी मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुलं करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, प्रत्यक्ष पाहणी केली असता मंदिराच्या परिसरातील बहुतांश कामं अजूनही अपूर्णच आहेत. त्यामुळे येत्या ३१ मेला मंदिर भाविकांसाठी सुरू होण्याची शक्यता सध्या तरी अत्यंत धूसर दिसतेय. दुसरीकडे, देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या शेकडो भाविकांना दर्शनाशिवाय माघारी जावं लागत असल्यानं, त्यांच्यामध्ये तीव्र नाराजीचा सूर पाहायला मिळतोय.0
0
Report
Advertisement
