Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Oct 25, 2024 07:21:47
Yavatmal, Maharashtra
यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Dec 28, 2025 04:37:47
Jalna, Maharashtra:जालना : महायुतीकडून बैठकीतील निर्णयांची कमालीची गुप्तता, बंडखोरी टाळण्यासाठी नेत्यांकडून गुप्तता जालना महापालिका निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच सुरू झाली आहे. महायुती होण्यासाठी बैठकांवर बैठका सुरू आहेत. महायुती होते की नाही, झाली तर कुणाला किती जागा मिळतात, महापौर कुणाकडे असणार आहे याकडे लक्ष लागून आहे. महायुती झाल्यास अनेक कार्यकर्ते महाविकास आघाडी, त्यांच्या घटकपक्षांमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवण्याचेही नियोजन आहे. परंतु, कार्यकर्त्यांची बंडखोरी टाळण्यासाठी भाजप-शिवसेनेकडून युतीबाबतच्या निर्णयाबाबत कमालीची गुप्तता बाळगली जात आहे. युतीबाबत काहीच स्पष्टता नसल्याने कार्यकत्यांची मात्र गणिते बिघडू लगली आहेत. जालना महापालिका निवडणुकीत युती होण्यासाठी मागिल काही दिवसांपासून भाजप-शिवसेनाच्या नेत्यांच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. गुरुवारपासून बैठकांचे सत्र वाढले आहे. दरम्यान, शनिवारी अंतिम बैठक होऊन युती करण्यासह कुणाला किती जागा द्यायच्या याबाबत बैठक आयोजित करण्यात आली. परंतु, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीकडूनही चांगल्या जागा मिळाव्या या अटीवर नेते जोर धरून आहेत. यामुळे मागिल काही दिवसांपासून महायुती केवळ कागदोपत्रीच राहत आहे. दरम्यान, शनिवारी मंठा रोडवरील एका हॉटेलमध्ये भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही बैठक पाच तास सुरू होती.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 28, 2025 04:36:24
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीर नगरच्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय ठरणारी अत्यंत महत्त्वाकांक्षी जायकवाडी-नक्षत्रवाडी पाणीपुरवठा योजना अखेर निर्णायक टप्प्यावर आली आहे. तब्बल २० वर्षांपासून रखडलेल्या या योजनेतील ३९ किलोमीटर लांबीची मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले असून येत्या काही दिवसांत याची चाचणी सुरू होणार आहे. सुमारे ३ हजार कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पात केवळ मुख्य जलवाहिनीसाठी ६०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. २०२२ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर हैदराबाद येथील कंपनीने तीन ते साडेतीन वर्षांत हे काम फत्ते केले आहे. मात्र, ही चाचणी थेट महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर होत असल्याने शहरात राजकीय चचांना उधाण आले आहे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Dec 28, 2025 04:34:11
Latur, Maharashtra:लातूर महानगरपालिका हवा कुणाची PKG AC :- लातूर… एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला… विलासराव देशमुखांच्या नेतृत्वाने घडलेलं शहर… पण आज राजकारण बदललंय, राजकारणातील समीकरणं हि बदललीत आणि मुद्देही बदललेत. महानगरपालिकेत सत्ता आली, गेली, पुन्हा आली… कधी भाजपने झेंडा रोवला, तर कधी काँग्रेसने राजकीय खेळी केली. नगरसेवक फुटले, पक्षांतरं झाली… पण या सगळ्यात एक प्रश्न मात्र कायम—लातूरकरांना मूलभूत सुविधा कधी मिळणार? पाणीटंचाई, अर्धवट रस्ते, खड्डे, कचऱ्याचा हैदोस आणि विकासाचा गोंधळ… याच असंतोषाच्या पार्श्वभूमीवर यंदाची मनपा निवडणूक सर्वात चुरशीची ठरण्याचे संकेत आहेत..... यावेळी मतदान करताना उमेदवारांचा पक्ष नव्हे, तर काम आणि विकास पाहूनच निर्णय घेणार, असा निर्धार लातूरकरांनी केल्याचे बोलून दाखवलाय. लातूरला स्मार्ट सिटी म्हणून ओळख दिली गेली… येथे मात्र वास्तव वेगळंच आहे. शहरात आठ-आठ दिवसांनी पाणीपुरवठा होतो, अनेक भागात रस्ते अर्धवट आहेत, तर अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय. वेळेवर कचरा उचलला जात नाही, त्यामुळे शहरातील अनेक भागात अस्वच्छता आणि दुर्गंधी वाढतेय. याच कारणामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. त्यामुळे यावेळी मतदान करताना उमेदवारांचा पक्ष नव्हे, तर काम आणि विकास पाहूनच निर्णय घेणार, असा निर्धार लातूरकरांनी केल्याचे बोलून दाखवलाय. लातूर महानगरपालिकेत सत्ता बदलाचे प्रयोग, पक्षांतराच्या राजकीय भूकंपाच्या हालचाली आणि मूलभूत नागरी सुविधांचा वाढता असंतोष… या सगळ्या पार्श्वभूमीवर यंदाची मनपा निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. पाणी, रस्ते, स्वच्छता आणि विकास हे मुद्दे मतदारांच्या केंद्रस्थानी आहेत. शहराच्या विकासाच्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या, पण समस्या मात्र कायमच आहेत. त्यामुळे यावेळी मतदारांचा कौल नेमका कुणाला ? जातो हे मात्र पाहावं लागणार आहे. लातूर महानगरपालिकूत कुणाचा झेंडा फडकणार याकडे फक्त लातूर नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.... P2C :- वैभव बालकुंदे रिपोर्टर
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Dec 28, 2025 04:33:16
Pune, Maharashtra:आस्था, परंपरा और श्रद्धे के केंद्रस्थानी असलेल्या लोणावळ्यातील कार्ला आई एकवीरेंच्या देवस्थानाभोवती निर्माण झालेल्या आरोप प्रत्यारोपांच्या वादाने राज्याचं लक्ष वेधलं आहे. श्री एकविरा देवी देवस्थान ट्रस्ट, कार्ला मध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप देवस्थानचे पुजारी गणेश देशमुख यांनी केला होता. या आरोपांमध्ये ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांच्या वर थेट निशाणा साधत देवीचे दागिने, रोकड आणि ट्रस्टच्या मालमत्तेचा खासगी वापर केल्याचे दावे करण्यात आले होते. मात्र या गंभीर आरोपांना ट्रस्टने फेटाळून लावलं आणि तातडीची पत्रकार परिषद घेत आरोपांचे खंडन केलं. पत्रकार परिषदेत अध्यक्ष दीपक हुलावळे यांनी हे राजकीय आकसातून करण्यात आल्याचं स्पष्ट करलं आणि या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नाही असं ठामपणे सांगितलं. ट्रस्टचे विश्वस्त, पुजारी यांच्या सह घेतलेल्या पत्रकार परिषदेत ट्रस्टवर लावलेले सर्व दोष साफ फेटाळण्यात आले. दीपक हुलावळे यांनी राजकारणाच्या जागी राजकारण, देवस्थानच्या जागी देवस्थान ठेवा अशी विनंती केली. श्रद्धेच्या जागे संशय नको, देवस्थानाच्या कार्यात राजकीय हस्तक्षेप नको हा संदेश देणारी ही पत्रकार परिषद सध्या चर्चेचा विषय बनली आहे…
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 28, 2025 04:32:24
Kalyan, Maharashtra:आपला कल्याण उत्सवात आनंदराज आंबेडकरांचा सहभाग.. महाविकास आघाडीवर टीका.. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतु आनंदराज आंबेडकर यांनी कल्याण पूर्वेतील शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्या कल्याण उत्सवाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका करत आगामी निवडणुकांमध्ये महायुतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला. सध्या निवडणुकीचे वातावरण असून भीमशक्ती आणि शिवशक्तीची युती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे येत्या निवडणुकांमध्ये राज्यातील एकूण २९ महापालिकांमध्ये महायुतीचा विजय होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे युती असताना प्रत्येक पक्षाला जास्तीत जास्त जागा हव्या असतात आणि आपला पक्ष मोठा करण्याची इच्छा असणे स्वाभाविक आहे. तसेच कल्यాణ डोंबिवल आठ मुंबई मध्ये १७ अशा सर्व नासिक पुणे या ठिकाणी अनेक जागांची मागणी त्यांनी केली असल्याचा सांगत महायुतीतील जागावाटपाचा तिढा लवकरच सुटेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.महाविकास आघाडीवर टीका करताना आनंदराव आंबेडकर म्हणाले, की जाती-धर्माच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसपासून झाली आहे. मात्र सर्वच पक्ष काही प्रमाणात जाती-धर्माचा आधार घेत राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ज्या दिवशी देशातील मतदार जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन मतदान करतील, त्या दिवशी खऱ्या अर्थाने देशात सशक्त आणि निकोप लोकशाही निर्माण होईल,असे मत त्यांनी व्यक्त केले.एकनाथ शिंदे यांनी आम्हाला सन्मानपूर्वक वागणूक देण्याचे आश्वासन दिले असून त्यानुसार जागाही दिल्या जातील, असेही आनंदराव आंबेडकर यांनी सांगितले. तसेच बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे विविध जाती, धर्म आणि प्रांत असूनही देश आज एकसंघ असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.एकंदरितच कल्याण उत्सवाच्या माध्यमातून आनंदराव आंबेडकर यांनी महायुतीच्या बाजूने ठाम भूमिका मांडत आगामी निवडणुकांबाबत राजकीय संकेत दिल्याचे पाहायला मिळाले.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 28, 2025 04:23:33
Kolhapur, Maharashtra:इचलकरंजी महानगरपालिकेसाठी भाजपाच्या अंतिम उमेदवारी यादीवर आज शिक्कामोर्तब होणार आहे. आज सकाळी 11 वाजता मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या गादीवर शिक्कामोर्तब होणार आहे. इचलकरंजी महानगरपालिकेसाठी भाजपाने यापूर्वीच उमेदवारी यादी निश्चित केली होती, पण अनेक इच्छुक उमेदवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्यानंतर, निश्चित केलीली यादी रद्द करण्यात आली. त्यामुळे नव्याने तयार केलेल्या यादीवर आज निर्णय होणार आहे. जुन्या यादीमध्ये अंशतः बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इचलकरंजी महानगरपालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे. भाजपा ५४ जागेवर तर शिवसेना 11 जागांवर लढणार आहे.. इचलकरंजी शहरांमध्ये भाजप कडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे बंडखोरी रोखण्याचा मोठा आव्हान भाजपा समोर आहे.. बंडखोरांनी अपक्षांचे पॅनल उभे केले तर हे भाजपासाठी धोकादायक ठरू शकत. त्यामुळेच भाजपाकडून बंडोबांना थंड करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 28, 2025 04:18:00
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील चार नगर परिषद व एका नगर पंचायतच्या निवडणूक निकालानंतर Now उपाध्यक्ष पदांच्या निवडीकडे राजकीय लक्ष केंद्रीत झाले आहे. कारंजा नगर परिषदेत २४ डिसेंबर रोजी पदग्रहण झाले असून, रिसोड मंगरूळपीर, वाशिम नगर परिषद आणि मालेगाव नगर पंचायत येथे उपाध्यक्ष निवड नवीन वर्षात होण्याची शक्यता आहे. वाशिम नगर परिषदेत महाविकास आघाडीचे १५, भाजपचे१४,एक अपक्ष व दोन एमआयएम नगरसेवक अशी स्थिती असून बहुमतासाठी १७ नगरसेवकांची गरज आहे. त्यामुळे येथे उपाध्यक्ष पदासाठी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. इतर ठिकाणी मात्र फारसा पेच नसून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग येणार आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 28, 2025 04:17:42
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 28, 2025 04:17:29
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटात प्रवेश करणारे रशीद मामु यांनी पोलिसांत धाव घेतली आहे. काही पक्ष हिंदू-मुस्लीम असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सोशल मीडियावर माझी बदनामीही करण्यात येत आहे. यासंदर्भात आपण पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेऊन तक्रार दाखल केल्याची माहिती माजी महापौर रशीद मामू यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. मी उद्धवसेनेत प्रवेश केल्यापासून काही राजकीय पक्षांनी बदनामीचा विडा उचलला असून, अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आरोप केले जात आहेत असे रशीद मामु म्हणाले. रशीद मामु देशद्रोही आहे अशी टीका भाजपने केली आहे...
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 28, 2025 04:02:15
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला आज अंतिम ठरण्याची शक्यता आहे. सध्या भाजपा 35, शिवसेना 32 आणि राष्ट्रवादी 14 जागा संदर्भात अंतिम फार्मूला समोर आल्याचं दिसून येत आहे. असं असलं तरी अनेक जागांवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. आज उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महायुतीच्या प्रमुख नेत्यांमध्ये अंतिम जागा वाटपाची चर्चा होणार आहे. या चर्चेनंतरच ठरलेल्या फॉर्मुलावर शिक्कामोर्तब होणार आहे.. महायुतीकडे इच्छुकांची भली मोठी यादी आहे, त्यामुळे महायुतीच्या सर्व जागांवर शिक्कामोर्तब होण्यासाठी वेळ लागत आहे. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा फॉर्मुला पाहिल्यानंतर अनेक इच्छुकांना, कट्टर कार्यकर्त्यांना तिकीट मिळेल असं दिसत नाही, त्यामुळे महायुतीमध्येच नाराजांची संख्या अधिक असेल असंच सध्या दिसतंय.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Dec 28, 2025 04:01:27
Beed, Maharashtra:बीड: खंडोबा यात्रेनिमित्त आंबील वडगाव येथे भव्य कुस्त्यांची दंगल. मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या कुस्ती स्पर्धेत मराठवाड्यातील नामांकित आणि होतकरू मल्लांनी आपली ताकद आणि कौशल्य दाखवले. कुस्त्यांचे सामने पाहण्यासाठी आंबील वडगावसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. पारंपरिक पद्धतीने मांडण्यात आलेल्या कुस्ती मैदानात एकापेक्षा एक रंगतदार आणि चुरशीचे सामने झाले. मल्लांच्या डावपेचांना आणि ताकदीला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. या कुस्ती दंगलीमुळे खंडोबा यात्रेचा उत्साह अधिकच वाढला असून, ग्रामीण भागातील पारंपरिक क्रीडेला चालना मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. आयोजकांनी उत्तम नियोजन केल्यामुळे कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Dec 28, 2025 03:52:58
Baramati, Maharashtra:कडाक्याच्या थंडीत बारामतीतील हॉटेल व्यावसायिकांच्या आग्रहास्तव उपमुख्यमंत्री अजित दादा पवारांनी घेतला चहाचा आस्वाद. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर असून त्यांनी नेहमीप्रमाणे भल्या पहाटे पाच वाजताच विकासकामांची पाहणी सुरू केली. विविध विकासकामांचा आढावा घेत असताना एका ठिकाणी स्ट्रीट फूडसाठी उभारण्यात आलेल्या शॉप्सची त्यांनी पाहणी केली. यावेळी तेथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या चहाच्या दुकानाची माहिती घेत असताना संबंधित व्यावसायिकाने कडाक्याच्या थंडीत चहा घेण्याचा आग्रह केला. व्यावसायिकांच्या आग्रहाला मान देत उपमुख्यमंत्री पवार यांनी चहाचा आस्वाद घेतला. चहा घेत असताना दादांनी उपस्थितांशी संवाद साधत दुधाच्या व्यवसायासंदर्भात चर्चा केली. दूध उत्पादक, व्यावसायिक आणि स्थानिक उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणी जाणून घेत त्यावर उपाययोजनांबाबतही त्यांनी विचारमंथन केले. या प्रसंगी दादांचा साधेपणा आणि सर्वसामान्य व्यावसायिकांशी असलेला थेट संवाद पुन्हा एकदा पाहायला मिळाला.
0
comment0
Report
Advertisement
Back to top