445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Jalna में विद्युत पोल से लाव्हा निकलने की घटना, नागरिकों में डर
Jalna, Maharashtra:जालना | जमीनीतून लाव्हा बाहेर पडल्याने खळबळ. विद्युत पोल रोवलेल्या जागेतून लाव्हा निघत असल्याची माहिती महावितरण आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून दिली गेली. पोल मधील विद्युत प्रवाह बंद केल्यानंतर लाव्हा सदृश खडक वितळण्याचा प्रकार थांबला. पोल जवळ पाण्याचा ओलावा नसल्यामुळे आर्थिंग मिळालं नाही, ज्यामुळे खडक वितळल्याचे स्पष्ट झाले. आजपासून पोलमधून लाव्हा बाहेर येण्याचा प्रकार बंद झाल्याची माहिती दिली गेली. या घटनेची दखल आपत्ती व्यवस्थापन विभागाने घेतली. घटनास्थळी 11 केव्ही क्षमतेचा विद्युत खांब असूनही वर्गातला लाव्हा वितळून बाहेर आल्याची चर्चा झाली. परीसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते परंतु महावितरणने भने केलं की घाबरण्याची आवश्यकता नाही.0
0
Report
बीड़ में गैस टंचाई: महिलाओं ने चूल्हे पर भाकरी पकाकर सरकार का ध्यान खींचा
Beed, Maharashtra:बीड जिल्ह्यात गॅस टंचाईचा प्रश्न आता चिघळला असून महिलांनी थेट रस्त्यावर उतरून सरकारचं लक्ष वेधलं आहे. आखाती देशांमधील युद्धाचा परिणाम देशासह बीडमध्येही जाणवत असून गॅस सिलेंडर मिळणे कठीण झाले आहे. बुकिंग करूनही वेळेवर गॅस मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत, तर काही ठिकाणी सिलेंडर ब्लॅकमध्ये विकले जात असल्याचा आरोप आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखं आंदोलन सुरु केलंय... महिलांनी चक्क चुल पेटवत भाकरी थापून सरकारचा निषेध केला. “महिनाभर गॅस मिळत नाही, मग घर कसं चालवायचं?” असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे.0
0
Report
वाशिम में मारपीट, 21 वर्षीय युवती ने विनयभंग का आरोप दर्ज कराया
Washim, Maharashtra:रिसोड येथील बीएलओ नवनाथ बोंडे यांना ३ एप्रिल रोजी मॅपिंगच्या कामादरम्यान तिघांकडून मारहाण झाली होती. या प्रकरणात आधी मारहाण व शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल झाला. एका 21वर्षीय युवतीने बोंडे यांच्यावर व्हॉट्सअॅपवर अश्लील संभाषण करून विनयभंग केल्याची तक्रार केली असून त्यांच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी करत असून तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत. दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी सांगितले. या दुहेरी गुन्ह्यामुळे संपूर्ण प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले असून, तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
Advertisement
सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती का त्रिभाजन, राजनीति गरमाई
Sangli, Maharashtra:सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे अखेर त्रिभाजन. त्रिभाजन संदर्भातले अधिसूचना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून जारी. जत आणि कवठेमहांकाळ कृषी उत्पन्न बाजार समिती आता होणार वेगळया. अधिसूचना जारी होताच सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त. सांगली कृषी उत्पन्न समितीवर आता प्रशासक राज. सांगली, मिरज, जत आणि कवठेमहांकाळ अशी एकत्रितपणे होती सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची होती सत्ता. नुकतेच जयंत पाटील समर्थक व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सदस्याची सभापती पदी झाली होती निवड. भाजप आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांच्याकडून त्रिभाजनाची करण्यात झाली होती मागणी. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्रिभाजीनानंतर महाविकास आघाडी आणि जयंत पाटलांना भाजपाचा धक्का. सांगली जिल्हा परिषदेतल्या कार्यक्रमाची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून परतफेड केल्याची राजकीय चर्चा.0
0
Report
रोजगार हमी योजना पर बैठक के बाद किसानों ने फलों की खेती से उत्साहित
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:पैठण मधील शेतकऱ्यांनी जे काय फळबागे लावलेले आहेत ते बघून मला समाधान वाटले, मी कोकणातला माणूस आहे आमच्याकडे आंबे, फणस, काजू मोठ्या प्रमाणात असतात मात्र इकडे देखील शेतकऱ्यांनी केसर आंबा जो दोन प्रकारचा असतो तो इथे लावलेला आहे. ड्रॅगन फ्रुट लावलेले आहेत, डाळिंब आहेत, पेरू आहेत असे वेगवेगळ्या फळबागांची लागवड त्यांनी केलेली आहे. म्हणजेच कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न हे बघून मला समाधान वाटले. हापूस आंबा उत्पादन कमी. हवामानाच्या बदलामुळे मोहरावर परिणाम झाला, कोकणात देखील फार मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान झालेलं आहे, सभागृहात देखील याबद्दल चर्चा झाली मुख्यमंत्र्यांकडे देखील आम्ही मागणी केली आणि त्यांनी देखील शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे मदत करू असे आश्वासन दिले आहे, त्यामुळे आम्ही देखील मदत करू. खरात बाबा प्रकरण ते अत्यंत मोठं आहे, हे प्रकरण अगदी हाताच्या बाहेर आहे, त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सर्वच त्याची सखोल चौकशी करत आहेत. त्यामुळे या चौकशीत जे काही निष्पन्न होईल त्याला त्या खरात बाबांने सामोरे जावो. आम्ही महायुतीच्या माध्यमातून सुनेत्राताई पवार यांचा एकच अर्ज दिलेला आहे, भाजप असेल किंवा शिवसेना,NCP असेल त्यांनी सुनेत्राताईंचाच अर्ज भरण्याचा ठरवलं होतं. आता विरोधक जे काही अर्ज भरत आहे त्याबद्दल आम्ही कसं सांगणार आम्ही तर आम्हचं ठरवलेलं आहे. जरी कुणी उभे राहिले तरी सुनेत्राताईंनाच निवडून आणण्याचे काम सर्वांचे राहील. बैठक निर्देश. निर्देश असे दिलेले आहेत की जे आपल्या खात्याचे काम आहे ते जलद गतीने व्हावे. नवीन केंद्र शासनाने योजना अमलात आणण्याचा निर्णय घेतलेला आहे, चार राज्यांच्या निवडणुका असल्यामुळे दोन-तीन महिने मागेपुढे होतील, तसेच आमच्या योजनेच्या अंतर्गत जे काही लोकांना लाभ मिळतात याचा आढावा आणि त्याची आज बैठक घेण्यात आली. नितेश राणे भावनेच्या आहारी जाऊन त्या महाराजांनी ते वक्तव्य केलेले आहे, परंतु नितेश राणे यांनी त्याचे समर्थन केलेले नाही. रोजगार हमी निधी पेंडिंग जसे पैसे आले तसे आम्ही याला देत जातो, मध्ये 1100 कोटी आले होते, ज्यावेळेला केंद्र शासनाचा निधी येतो त्यात राज्य शासनाचा देखील निधी असतो, जवळजवळ 1400 कोटी रुपये आम्ही आता वाटले आहेत. थोडे राहिलेत 1000-1200 च्या आसपास राहिले आहेत ते पण आम्ही लवकरच देऊ.0
0
Report
सोलापुर में चार साल में 37,000 लोग मोकाट कुत्तों के काटने से दहशत
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - गेल्या चार वर्षात तब्बल 37 हजार सोलापूरकरांना मोकाट कुत्र्यांचा चावा - सोलापूरात गेल्या 4 वर्षात तब्बल 37 हजार जणांना मोकाट कुत्र्यांचा चावा - एकीकडे नागरिक भयग्रस्त तर महापालिका सुस्त - दररोज दोनशे रुग्ण रेबीज इंजेक्शनसाठी रांगेत - लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिक या हल्ल्याचे बळी ठरत असून शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अगदी सहजपणे दुचाकीवरून जाताना अचानकपणे मोकाट कुत्रे अंगावर आल्याने अपघात घडल्याच्या घटना आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्य सोलापूरकर देखील मोकाट कुत्र्यांना चांगलेच वैतागले आहेत. - प्रशांत बाबर (सामान्य नागरिक) - मात्र एवढ्या गंभीर प्रश्नांवर महापालिका प्रशासनाची उपायोजना अपुरी ठरत असल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मोकाट कुत्र्यांची पैदास रोखण्यासाठी नसबंदी मोहीम राबवली जात असली तरी प्रत्यक्षात कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. नियमानुसार फक्त पिसाळलेले किंवा रोबोट कुत्रे पकडण्याची परवानगी असल्याने इतर कुत्र्यांना पकडून नसबंदी केल्यानंतर पुन्हा त्याच परिसरात सोडले जाते. परिणामी कुत्र्यांचे टोळके रस्त्यावर, गल्लीबोळात, आणि वस्त्यांमध्ये नागरिकांवर हल्ले करत असल्याचे चित्र दिसत आहे. महापालिका प्रशासन याबाबत नेमकं कशा पद्धतीने काम करते हे आपण ऐकूयात.... - सतीश चौगुले ( पशुवैद्यकीय अधिकारी, सोलापूर महानगरपालिका ) - प्राणी मित्रांच्या माहितीनुसार सोलापूर शहरात जवळपास 70 हजारपेक्षा अधिक मोकाट कुत्र्यांचा वावर आहे. महापालिका एकीकडे नसबंदीचा प्रयोग करत असली तरी दुसरीकडे मात्र मोकाट कुत्र्यांची संख्या वाढतच असल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली. महापालिका प्रशासनाने यावर तात्कालिक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आलीय. - इम्रान सगरी ( प्रणीमित्र ) ( पिवळा टी - शर्ट ) - End P2C - सोलापूर शहरातून मोकाट कुत्र्यांच्या बाबत आलेल्या धक्कादायक आकडेवारीमुळे शहरवासीय आणखी भयभीत झाले आहेत. - अभिषेक आदेप्पा, झी - 24 तास, सोलापूर0
0
Report
Advertisement
राष्ट्रवादी ने गोविंद मोकाटे को राहुरी विधानसभा उपचुनाव के लिए उमेदवारी दी
Ahilyanagar, Maharashtra:राष्ट्रवादी SP कडून गोविंद मोकाटे यांना उमेदवारी अहिल्यानगर च्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या काही मिनिटात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून गोविंद मोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.... प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारी बाबत शेवटपर्यंत निर्णय न घेतल्याने मोकाटे यांना शरद पवार पक्षाकडून दिली उमेदवारी.... गोविंद मोकाटे शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य... 2012 साली शिवसेना पक्षाकडून गोविंद मोकाटे झाले होते नगर तालुका पंचायत समिती सदस्य...0
0
Report
बरांज-मोकासा में अवैध कोयला खनन, लोकायुक्त ने पुनर्वसन सचिव को तलब किया
Chandrapur, Maharashtra:कर्नाटक पावर कार्पोरेशन लिमिटेड साठी कोळसा उत्खनन करणाऱ्या कंपनीचे बेकायदेशीर खाणकाम उजेडात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातल्या बरांज- मोकासा गावी ही कोळसा खाण आहे. या खाणीतून निघालेला कोळसा कर्नाटक राज्यात ऊर्जा निर्मितीसाठी वापरला जातो. मात्र कंपनीला अधिग्रहित न झालेली बरांज -मोकासा गावातील 84.41 हेक्टर वन जमीन बेकायदेशीररित्या खोदून काढण्याची रीतसर तक्रार राज्याचे लोकायुक्त आणि पुनर्वसन सचिव तुकाराम मुंडे यांना पाठविण्यात आली आहे. या जागेतून सुमारे 80 लाख मेट्रिक टन कोळसा काढून परस्पर विकण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि वन विभागाचे स्वतंत्र आणि स्वयं स्पष्ट अहवाल देखील आहेत. तक्रारीत कंपनीवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन व कोळसा उत्खनन कंपनी यांच्यात साटेलोटे असल्याने या भागातील गावांचे पुनर्वसन न करता कोळसा उत्खनन केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थानी केलाय. बाईट १) विशाल दुधे, तक्रारकर्ते, बरांज-मोकासा0
0
Report
सातारा में सफाई मजदूर यूनियन ने मांगें न पूरी होने पर आत्मदहन की चेतावनी दी
Satara, Maharashtra:सातारा - अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनच्या वतीने राज्यातील प्रलंबित मागण्यांसाठी आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील सफाई कामगार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी जिल्हाध्यक्ष सुरज सोलंकी यांनी शासनाने मागण्यांकडे तातडीने लक्ष दिले नाही तर येत्या १५ दिवसांत आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे संघटनेने याबाबत शासनाकडे निवेदन देऊन तात्काळ कारवाईची मागणी केली आहे।0
0
Report
Advertisement
केडीएमसी में तीन समितियों के सभापतियों की निर्विरोध निर्वाचन
Kalyan, Maharashtra:केडीएमसीत तीन समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड केडीएमसीच्या स्थायी समिती सभापती पदी मल्लेश शेट्टी शिक्षण समिती पदी अभिजत थरवळ तर महिला कल्याण समिती सभापती सारीका जाधव कल्याण डोंबिवली महाालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी शिवसेना शिंदे गटाचे मल्लेश शेट्टी यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याचबराेबर शिक्षण समिती सभापती पदी भाजपचे अभिजत थरवळ आणि महिला बालकलकल्याण समितीच्या सभापती शिवसेना शिंदे गटाच्या सारीका जाधव यांची ही बिनविरोध निवड झाली आहे. मल्लेश शेट्टी हे तिसऱ्यांदा सभापती म्हूणन निवड झाली आहे.0
0
Report
संभाजी नगर में अवैध गर्भपात रैकेट का पर्दाफाश; तीन गिरफ्तार
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:संभाजी नगर में अवैध गर्भपात के रैकेट का पर्दाफाश हुआ है। पुलिस की दबिश में दो नर्सें और एक डॉक्टर गिरफ्तार किए गए हैं, जबकि दीढ़ वर्ष से यह कारोबार चला आ रहा था। रैकेट संचालक समूह ने घर-घर जाकर सोनोग्राफी मशीन से गर्भपात के लिए लिंग निदान कर गर्भपात कराना शुरू किया। आरोपी नर्सें वर्षा जाधव और ज्योती पवार हैं और उज्वला गायकवाड वर्षा जाधव की बहन है; सभी सातारा क्षेत्र स्थित घरों में चल रहे कारोबार से जुड़े बताए जा रहे हैं। पुलिस के अनुसार इस पूरी प्रणाली में एक डॉक्टर एजेंट बना कर नागर प्रतिमा के अनुसार पढ़कर मरीजों को लेने और फीस तय करने जैसे काम होते थे; एक महिला गर्भपात के लिए तैयार मिलने पर रंगे हाथ गिरफ्तार हुई और मामले की विस्तृत जांच जारी है। आरोग्य विभाग की टीम भी घरों में बड़े पैमाने पर आवश्यक औषधियाँ और सोनोग्राफी के उपकरण मिलने की पुष्टि कर रही है; यह मामला अब कानूनी घेरे में है ताकि यह घिनोना कृत्य रोका जा सके।0
0
Report
मां की 5% जमीन कंपनी संग मिलकर गबन: भांडुप थाने में FIR दर्ज
Mumbai, Maharashtra:मामांनीच आपल्या भाच्याच्या हक्काची जमीन एका कंपनीच्या संगनमताने बळकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. यासंदर्भात भांडुप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून न्यूकेम कंपनीचे मालक निमिष सुरा, तसेच तक्रारदार नीरज माळवी यांचे मामा हितेंद्र गावंड, महेंद्र गावंड, नरेंद्र गावंड यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. यासंदर्भात नीरज माळवी यांनी भांडुप पोलिस ठाण्यात आपल्या आईच्या अर्थात मयत भावना माळवी यांच्या हिस्याची ५ टक्के जमीन ही आईच्या निधनानंतर तक्रारदाराच्या मामांनी आणि न्यूकेम कंपनीच्या संचालकांनी संगनमताने मुलुंड येथील शासकीय कार्यालयात खोटी शपथपत्र दाखल करून ही जमीन बळकावली. तक्रारदाराने सर्व पुरावे पोलिसांसमोर सादर केल्याने या संपूर्ण प्रकरणात न्यूकेम कंपनीचे डायरेक्टर निमिष सुरा यांच्यासह तक्रारदार नीरज माळवी यांचे तिन्ही मामा हितेंद्र गावंड, महेंद्र गावंड, नरेंद्र गावंड हे सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आणि अखेर या चौघांविरोधात भांडुप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.0
0
Report
Advertisement
पुणे में आप को बड़ा झटका, युवा प्रदेशाध्यक्ष दौंडकर भाजपा में शामिल
Khed, Maharashtra:पुणे जिल्ह्यात आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला असून युवक प्रदेशाध्यक्ष मयुर दौंडकर यांनी आप ला राम राम करत भाजपा मध्ये पक्षप्रवेश केलाय भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबई येथे दौंडकर यांनी पक्षप्रवेश केलाय.0
0
Report
अमरावती में गैस सिलेंडर टंचाई पर वंचितों का उग्र प्रदर्शन—चूल जला कर विरोध
Amravati, Maharashtra:तीन फाईल आहे सिलेंडर टंचाई विरोधात वंचित आक्रमक; अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचितचे चुल पेटवून आंदोलन आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चूल पेटवून प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी सामान्य नागरिकांना तातडीने गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच सिलेंडरच्या टंचाईमुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असल्याची तीव्र नाराजीही व्यक्त करण्यात आली. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्यात अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.0
0
Report
चामटोली में जलजीवन मिशन के 1 करोड़ के बावजूद पानी की समस्या गहरा गई
Ambernath, Maharashtra:स्वातंत्र्यानंतर 78 वर्ष उलटूनही बदलापूरजवळच्या चामटोली ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी पाड्यांमधल्या महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागतीय. इथल्या देवळाची वाडी या आदिवासी पाड्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 1 कोटी रूपयांचा खर्च करण्यात आलाय. मात्र चार वर्ष होऊनही पाणी योजनेचं कामच पूर्ण झालं नसल्यामुळे इथल्या महिलांना पाणीासाठी 4 ते 5 किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागतीय. चामटोली ग्रामपंचायतीअंतर्गत सह्याद्रीच्या डोंगररांगेत पाच ते सहा आदिवासी पाडे आहेत. यात बेंडशीळ, चिकणीची वाडी, ताडवाडी, चाफ्याची वाडी, देवळाची वाडी या वाड्यांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 2021-22 मध्ये देवळाची वाडी या पाड्यासाठी 1 कोटी 26 लाखांची पाणी योजना मंजूर करण्यात आली. त्या अंतर्गत पाण्याची टाकी, विहीर, पाईपलाई, नळ जोडणी अशी कामे होती. मात्र 4 वर्ष उलटूनही ही कामे पूर्ण झालेली नाही. दुसरीकडे अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला 1 कोटी 2 लाख रूपयांचे बिल अदा केलेले आहे. ही योजना अर्धवट अवस्थेत राहिल्यामुळे इथल्या आदिवासी बांधवांचे विशेषत: महिल वर्गाचे प्रचंड हाल होतायेत. इथल्या महिलांना धुण्या-भांड्यासाठी 4 ते 5 किलोमीटर पायपीट करत भोज धरण गाठावे लागते आणि तिथूनच पिण्यासाठी पाणी आणावं लागतं. पाण्याच्या समस्येमुळे इथल्या मुली शिक्षणापासून वंचित राहिल्या आहेत. पाणी भरण्याच्या रोजच्या कसरतीमुळे देवळाच्या वाडीतील 95 टक्के मुली शाळेचं गेल्या नसल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. ग्रामपंचायत प्रशासन आणि पंचायत समिती अधिकाऱ्यांच्या या भोंगळ कारभाराविरोधात स्थानिक ग्रामपंचायत सदस्य सुकऱ्या हंबिर यांनी आवाज उठवलाय. माहिती अधिकाराअंतर्गत त्यांनी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ठेकेदाराला अदा करण्यात आलेल्या बिलांची माहिती मागवलीय. तसच या योजनेच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केलीय. आदिवासींच्या हक्काचं पाणी पळवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर कारवाई न केल्यास इथले आदिवासी बांधव जनआंदोलन उभं करतील असा इशाराही त्यांनी दिलाय.0
0
Report
Advertisement
