445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
मालेगांव में सत्ता परिवर्तन की आशंका: भुषे बनाम अद्वय हिरे पैनल भिड़ंत
Nashik, Maharashtra:- मालेगावात पुन्हा एकदा मंत्री दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे - मालेगावातील ग्रामीण भागाचा सहकाराचा महत्त्वाचा कणा असलेल्या संस्थेची तब्बल १५ वर्षांनंतर निवडणूक.. - मालेगाव शेतकी संघ १५ जागांसाठी २५ उमेदवार रिंगणात.. - गेल्या १५ वर्षापासून मालेगाव शेतकी संघावर अद्वय हिरे कुटुंबीयांचे वर्चस्व मात्र यावर्षी सत्ता पालट होण्याची शक्यता.. - मंत्री भुसे यांच्या पॅनल विरुद्ध अद्वय हिरे यांच्या पॅनलची लढाई.. - मंत्री यांच्या पॅनल कडून 15 उमेदवार तर अद्वय हिरे यांच्याकडून 7 उमेदवार निवडुकीच्या रिंगणात... - बिनविरोध नाही मात्र या शेतकीसंघाच्या निवडणुकीत प्रथमच मंत्री भुसे यांची सत्ता येण्याची चिन्हे...0
0
Report
पद्मश्री रघुवीर खेडकर का दावा: डिजे लावणी से लोककला संकट में
Shirdi, Maharashtra:जेष्ठ तमाशा कलावंत पद्मश्री रघुवीर खेडकर यांनी डीजे लावणीमुळे पारंपरिक लोककला संकटात आल्याची खंत व्यक्त केली आहे.. पुणे येथे आयोजित एका कार्यक्रमात रघुवीर खेडकर यांनी ही खंत व्यक्त केली.. डीजे लावणीत नृत्यांगना करत असलेल्या नृत्याची नक्कल करत, खेडकर यांनी केलेले भाषण सोशल माध्यमांवर व्हायरल झालं आहे.. युपी बिहारमध्ये या गोष्टी चालतात, मात्र महाराष्ट्राला लाज लज्जा आणि संकृती आहे.. डिजे लावणीसारखे कार्यक्रम चालू राहिले तर आमच्या लोककलेवर फार मोठी गदा येईल असं वक्तव्य रघुवीर खेडकर यांनी केलयं..0
0
Report
KDMC कॉपी टेबल बुक में आगरी-कोळी संस्कृति न दिखने पर महासभा में भारी हंगामा
Kalyan, Maharashtra: KDMC च्या कॉफी टेबल बुकवरून महासभेत वाद; आगरी-कोळी संस्कृतीचा उल्लेख नसल्याने संताप. भूमिपुत्रांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही" .. भाजप नगर सेवक मंदार टावरे आक्रमक. अधिकारीांनी त्रुटी मान्य करत महासभेत दिलगिरी व्यक्त केली. कल्याण-डोंबिवली महापालिकाेच्या कॉफी टेबल बुकमध्ये आगरी-कोळी समाजाच्या संस्कृती आणि योगदानाचा उल्लेख नसल्याचा मुद्दा महासभेत चांगलाच गाजला. भाजप नगरसेवक मंदार टावरे यांनी प्रशासनावर जोरदार टीका करत भूमिपुत्रांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला. वाढता रोष पाहता प्रशासनाने दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली आहे. KDMC तर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकमध्ये आगरी-कोळी समाजाचा उल्लेख नसल्याने महासभेत संताप व्यक्त करण्यात आला. भाजप नगरसेवक मंदार टावरे यांनी शहराच्या मूळ संस्कृतीला डावलल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली. तसेच जाणीवपूर्वक समाजाला वगळले असल्यास माफी मागावी, अन्यथा भूमिपुत्रांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न हाणून पाडू, असा इशाराही त्यांनी दिला. सभागृहातील तीव्र प्रतिक्रिया पाहता संबंधित अधिकाऱ्यांनी माफी मागितली. दरम्यान, महापौर हर्षाली थवील चौधरी यांनी या प्रकरणी समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती देत पुस्तकाचे वितरणही तात्पुरते थांबवण्यात आल्याचे स्पष्ट केले.0
0
Report
Advertisement
शिरूर के चांडोह में बैलगाड़ी दौड़ के दौरान थरारक हादसा, कोई घायल नहीं
Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यातील चांडोह येथे भैरवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य जपान ट्वेन्टी-ट्वेंटी बैलगाडा शर्यतीत एक थरारक घटना घडलीय, या बैलगाडा शर्यतीवेळी 'चावरेकरी' बैल अचानक उधळला, आणि या बिथरलेल्या बैलाने समोर येणाऱ्या अनेक जुंपणकऱ्यांना थेट शिंगावर घेतलंय, सुदैवाने यात कोणीला ही जखमी झालं नसून अंगावर शहारे आणणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.0
0
Report
इस्लामपूर ग्राम पंचायत निधि आवंटन में अनियमितता, हाई कोर्ट में याचिका दायर
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटताना अनियमित्ता असल्याच्या विरोधात मालशिरस तालुक्यातील इस्लामपूर ग्रामपंचायतने थेट उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. जिल्हा परिषद महापालिका नगरपालिकेचे सदस्य निवडून गेले त्यांना त्यांचा हक्काचा निधी दिला जात नाही. ग्रामपंचायत यांना देखील निधी दिला गेला नाही. शासनाचे सर्व नियम डावलून निधी वाटप होत आहे. त्यामुळे इस्लामपूर ग्रामपंचायत ने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच कडे जनहित याचिका दाखल केली आहे. जर याबाबत कारवाई नाही झाली तर जुलै महिन्यात सुरु होणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये यावर आवाज उठवण्याचा इशारा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिला आहे.0
0
Report
साईबाबा संस्थान की 2025-26 आय में गिरावट, पर मुदत जमा से आय बढ़ी
Shirdi, Maharashtra:शिर्डीतील साईबाबा संस्थान ट्रस्टच्या 2025-26 आर्थिक वर्षातील उत्पन्नाचा लेखाजोखा समोर आला असून, मागील वर्षाच्या तुलनेत संस्थानच्या एकूण उत्पन्नात घट झाल्याचे दिसून येत आहे.. मात्र मुदत ठेवींवरील व्याज उत्पन्नात तब्बल 14 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.. 2024-25 या आर्थिक वर्षात साईबाबा संस्थानचे एकूण उत्पन्न 648 कोटी रुपये होते.. तर 2025-26 मध्ये हे उत्पन्न 632 कोटी रुपयांवर आले आहे.. म्हणजेच उत्पन्नात सुमारे 16 कोटी रुपयांची घट नोंदविण्यात आली आहे.. भक्तांकडून मिळणाऱ्या रोख देणगीतही घट झाली आहे.. 2024-25 मध्ये रोख देणगी 210 कोटी रुपये होती, तर 2025-26 मध्ये ती 192 कोटी रुपयांवर आली आहे.. ऑनलाईन, यूपीआय आणि कार्डद्वारे मिळालेल्या देणगीतही काहीशी घट झाली आहे.. मागील वर्षी 123 कोटी 63 लाख रुपये मिळाले होते, तर यावर्षी 122 कोटी 36 लाख रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे.. दुसरीकडे, सोने-चांदीच्या स्वरूपातील देणगीत मात्र मोठी वाढ झाली आहे.. 2024-25 मध्ये 13 कोटी 95 लाख रुपयांची देणगी मिळाली होती. ती 2025-26 मध्ये वाढून 19 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.. दर्शन आणि आरती पासमधून मिळणाऱ्या उत्पन्नातही वाढ झाली आहे.. मागील वर्षी 37 कोटी 92 लाख रुपये मिळाले होते, तर यंदा हे उत्पन्न 39 कोटी 55 लाख रुपयांवर गेले आहे.. साई संस्थानसाठी सर्वाधिक दिलासादायक बाब म्हणजे मुदत ठेवींवरील व्याज उत्पन्नात झालेली वाढ.. 2024-25 मध्ये 242 कोटी 69 लाख रुपये व्याज मिळाले होते.. तर 2025-26 मध्ये हे उत्पन्न 256 कोटी 61 लाख रुपयांवर पोहोचले आहे.. म्हणजेच व्याज उत्पन्नात जवळपास 14 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.. साईबाबा संस्थानचा वार्षिक खर्च अंदाजे 600 कोटी रुपये असून, संस्थानकडे सध्या सुमारे 390 किलो सोने आणि 6 हजार 600 किलो चांदीचा साठा आहे.. उत्पन्नात काहीशी घट झाली असली तरी ठेवीवरील वाढलेले व्याज आणि भक्तांकडून मिळणाऱ्या विविध स्वरूपातील देणग्यांमुळे साई संस्थानची आर्थिक स्थिती आजही मजबूत असल्याचं दिसून येत आहे..0
0
Report
Advertisement
15 जून से कृष्णा नदी में जल-संकट, खेती-उद्योग के लिए पानी पर रोक
Sangli, Maharashtra:मान्सून लांबल्याने,कृष्णा नदी काठावर पाणी टंचाईचे ढग कृष्णा नदीतून पाणी उपसावर जलसंपदा विभागाकडून बंदी आदेश शेतीसाठी पाणी उपसा करण्यावर घालण्यात आली आज पासून बंदी खाजगी व औद्योगिक पाणी उपशावर देखील घालण्यात आली बंदी पाणी उपसा केल्यास फौजदारी कारवाईच जलसंपदा विभागाकडून इशारा केवळ पिण्याच्या पाण्यासाठी उपसा करण्याला परवानगी कोयना धरणातील कमी झालेले पाणीसाठा आणि नदीतील पाण्याची उपलब्धता यामुळे जलसंपदा विभागाकडून घेण्यात आला निर्णय 15 जून पासून पुढील आदेश पर्यंत कृष्णा नदीतील शेती व इतर गोष्टीसाठी पाणी उपश्यावर राहणार बंदी0
0
Report
मुरबाड में बड़ी भजन स्पर्धा: डोंबिवली मंडली ने पहला स्थान जीता
Barav, Maharashtra:ठाणे जिलेतील मुरबाड येथे वारकरी संप्रदायाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ठाणे जिल्हास्तरीय भव्य भजन स्पर्धेत भक्तिरसाची उधळण पाहायला मिळाली. दिवसभर रंगलेल्या या स्पर्धेमुळे संपूर्ण मुरबाड नगरी विठ्ठल-रुक्मिणीच्या नामघोषाने दुमदुमली होती. या चुरशीच्या स्पर्धेत डोंबिवलीच्या विष्णु स्मृती सेवा संघ भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. हवेदुटाणे येथील आई जननी कुंभलंजा भजन मंडळ आणि वसारच्या श्रीराम प्रसादिक भजन मंडळाने विभागून द्वितीय क्रमांक मिळवला. डोंबिवलीच्याच श्री गांगेश्वर आकारी ब्राह्मण देव प्रासादिक भजन मंडळाला तृतीय क्रमांकाने गौरवण्यात आले. माऊली गार्डन हॉल येथे पार पडलेल्या या सोहळ्याला आमदार किसन कथोरे यांच्यासह राजकीय आणि अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. संतोष गजानन चौधरी आणि ह.भ.प. डॉ. संजय घुडे यांनी या यशस्वी सोहळ्याचे आयोजन केले होते.0
0
Report
गंगापूर डैम क्षेत्र में नो-एंट्री, बॅकवॉटर में पुलिस सख्ती, डूबने के मामले बढ़े
Nashik, Maharashtra:नाशिक * गंगापूर धरण परिसरात पर्यटकांना नो एन्ट्री * गंगापूर धरणाच्या बॅकवॉटर परिसरात जाण्यास पोलिसांची सक्त मनाई * हुल्लडबाजी करणारे आणि पाण्यात उतरणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार * बुडून मृत्यूच्या वाढत्या घटनांमुळे तालुका पोलिसांचा निर्णय * धरणाच्या मुख्य परिसरात व बॅकवॉटर भागात साध्या वेशातील पोलिसांची गस्त * स्थानिक नागरिकांच्या मदतीने पर्यटकांवर ठेवली जाणार नजर * पावसाळा व सुट्टीच्या दिवशी परिसरात पर्यटकांची वाढती गर्दी0
0
Report
Advertisement
नासिक में एंटी करप्शन अधिकारी बनकर फसवणूक करने वाले दो ठग गिरफ्तार
Nashik, Maharashtra:नाशिकमध्ये स्वतःला अँटी करप्शन अधिकारी सांगून फसवणूक करणाऱ्या दोन तोतया अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल सातपूर येथील एमआयडीसी कार्यालय परिसरातून संशयितांना पोलिसांनी घेतलं ताब्यात संशयित सचिन ठोके याला अटक केलेल्या संशयितांचे नाव बनावट ओळखपत्रे आणि 'अँटी करप्शन' अधिकारी असल्याचे भासवून सरकारी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न संशयितांकडे बनावट ओळखपत्रे सापडली; अनेकांची फसवणूक केल्याचा पोलिसांना संशय सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल0
0
Report
कक्षा में मोबाइल के इस्तेमाल पर सत्तार का कड़ा निर्देश, शिक्षकों से पूर्ण समय शिक्षण पर जोर
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:शिक्षकांनी वर्गात मोबाइल वापरल्यास कारवाई, आमदार अब्दुल सत्तारांचा इशारा ANC: विद्यार्थ्यांना शिकवताना शिक्षकांनी मोबाइलचा वापर करू नये, अन्यथा संबंधित शिक्षकावर कारवाई केली जाईल, असा इशारा आमदार अब्दुल सत्तार यांनी दिला. सिल्लोड येथील नगर परिषद प्रशालेच्या प्रवेशोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. गोरगरीबांची मुले नगर परिषद शाळांमध्ये शिक्षण घेत असल्याने शिक्षकांनी दर्जेदार शिक्षण देण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. वर्गात अध्यापन सुरू असताना शिक्षकाजवळ मोबाइल आढळल्यास त्याला थेट घरि पाठवू, असा सज्जड दमही त्यांनी भरला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी शिक्षकांनी पूर्ण वेळ अध्यापनावर लक्ष केंद्रित करावे, असेही सत्तार यांनी यावेळी स्पष्ट केले.0
0
Report
बालू माफिया-पुलिस पर हत्या के आरोप, सुरेश बोरसे के परिजनों ने न्याय की मांग
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. बोरसे यांच्या मृत्यूस वाळू माफिया आणि पोलिस जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री अतुल सावे आणि आमदार प्रशांत बंब यांनी बोरसे कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी कुटुंबीयांनी "आम्हाला न्याय द्या" अशी भावनिक मागणी केली. दरम्यान, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मंत्री अतुल सावे यांनी कुटुंबीयांना दिले आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
Advertisement
तुपकर के अन्नत्याग आंदोलन का दूसरा दिन: प्रशासन मौन, सरकार से जवाब की मांग
Buldhana, Maharashtra:रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तुपकरांची संतप्त प्रतिक्रिया रविकांत तुपकरांनी पुकारलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. मात्र, या आंदोलनाकडे राज्य सरकारने आणि स्थानिक प्रशासनाने पूर्णपणे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. प्रशासनाचा या प्रकरणातील उदासीन पवित्रा आता संतापजनक ठरत आहे. आंदोलनाचा आज दुसरा दिवस उजाडूनही सरकारी पातळीवरून तुपकरांशी चर्चा करण्यासाठी किंवा मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी कोणताही अधिकारी अद्याप फिरकलेला नाही. सरकारने या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप तुपकरांनी केला आहे. विशेष म्हणजे, एखाद्या नेत्याने बेमुदत अन्नत्याग आंदोलन पुकारल्यानंतर प्रशासनाने तातडीने वैद्यकीय पथक तैनात करणे अपेक्षित असते. मात्र, रविकांत तुपकरांच्या बाबतीत हे नियमही पायदळी तुडवले गेले आहेत.0
0
Report
डोंबिवली में स्मार्ट मीटर विरोध: मीटर बॉक्स पर ताला, आंदोलन की चेतावनी
Kalyan, Maharashtra:महावितरण स्मार्ट मीटर बसवण्याची शक्ती तर डोंबिवलीकरांचा स्मार्ट मीटरला विरोध, स्मार्ट मीटरला विरोध करत सोसायट्यांनी मीटर केबिनला लावले कुलूप, महावितरण कंपनीने सक्ती केली तर वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू असा महावितरणला डोंबिवली घरांचा इशारा, Anc : महावितरणकडून स्मार्ट मीटर बसविण्याबाबत ग्राहकांच्या मोबाईलवर मेसेज येऊ लागल्यानंतर डोंबिवलीत नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. स्मार्ट मीटरमुळे वीजबिल वाढेल, असा आरोप करत डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरातील काही हाउसिंग सोसायट्यांनी थेट सोसायटीच्या मीटर बॉक्सलाच कुलूप ठोकले आहे. इतकेच नव्हे तर स्मार्ट मीटर बसवू नयेत, अशी मागणी करत महावितरणला लेखी निवेदनही देण्यात आले आहे. Vo स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून डोंबिवलीत नागरिकांचा विरोध अधिक तीव्र होताना दिसत आहे. महावितरणकडून स्मार्ट मीटर बसविण्याबाबतचे मेसेज ग्राहकांच्या मोबाईलवर येऊ लागल्यानंतर अनेक नागरिकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरातील नवसंकुलसह काही हाउसिंग सोसायट्यांनी थेट इमारतीच्या मीटर बॉक्सलाच मोठे कुलूप ठोकत अनोख्या पद्धतीने विरोध दर्शवला आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता मीटर बदलले जाऊ नयेत, यासाठी हा निर्णय घेतल्याचे रहिवाशांनी सांगितले. स्मार्ट मीटरमुळे वीजबिल भरमसाठ वाढण्याची भीती तसेच अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता व्यक्त करत नागरिकांनी महावितरण प्रशासनाला लेखी पत्रही दिले आहे. आमच्या इमारतीत स्मार्ट मीटर बसवू नयेत, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, कुलूप लावलेल्या मीटर बॉक्सचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून डोंबिवलीत स्मार्ट मीटरविरोधातील नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागतल्याचे चित्र दिसत आहे. जर महावितरण कडून स्मार्ट मीटर बसवले गेले किंवा सक्ती केली गेली तर मोठे आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला,0
0
Report
वीटभट्टी धूल से महामार्ग पर यातायात समस्या, उपायों की मांग
Washim, Maharashtra:कारंजा ते शेलूबाजार दरम्यान एका वीटभट्टीमधून उडणारी धूळ वाहनधारकां साठी मोठी समस्या ठरत आहे. वीटभट्टीतील धूळ थेट महामार्गावर येत असल्याने वाहन चालविताना चालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. भरधाव वाहनांमुळे धुळीचे प्रमाण वाढत असून काही वेळा समोरील वाहनही स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन धूळ नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनधारक व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.0
0
Report
Advertisement
