445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
चिपळूण में तेज हवा से पेड़ गिरा, चार-पाँच वाहन क्षतिग्रस्त, राहत कार्य शुरू
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण/रत्नागिरी चिपळूणमध्ये जोरदार वाऱ्याचा तडखा.... पंचायत समितीसमोर झाड कोसळले. चार ते पाच वाहनांचे नुकसान. मुसळधार पावसामुळे रहदारी नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. झाड हटवाण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु.... झाडाखाली चार ते पाच दुचाकी अडकल्याने गाड्यांचे नुकसान.0
0
Report
नवी मुंबई पालिका कैन्टीन में तले वड़े में जिंदा कीड़े दिखे
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महापालिका के कैन्टीन में तला हुआ वडा में जिंदा अळ्या आढळल्या, तक्रारदार महिलेने आज पालिकेच्या कॅन्टीनमधून खाण्यासाठी वडा घेतला होता, परंतु वडा मध्ये जिवंत अळ्या आढळल्याने महापालिका प्रशासन व कॅन्टीन चालकांकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.0
0
Report
विरार के कुंभारपाडा धरण में 21 वर्षीय युवक डूबा, जलस्रोतों पर सुरक्षा अपील
Vasai-Virar, Maharashtra:विरार पूर्वेतील शिरगाव परिसरातील कुंभारपाडा येथील धरणात पोहण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पावसाळ्यात जलाशयांमध्ये पोहण्याचा मोह किती जीवघेणा ठरू शकतो, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. मृत तरुणाचे नाव अभिषेक राजभर असे असून तो विरारमध्ये राहत होता. गुरुवारी संध्याकाळी मित्रांसोबत तो कुंभारपाडा धरणात पोहण्यासाठी गेला होता. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. माहिती मिळताच विरार अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य करूनही तो सापडला नव्हता. आज सकाळी पुन्हा सुरू करण्यात आलेल्या शोध मोहिमेत जवानांनी त्याचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नदी, धरणे, तलाव, धबधबे आणि बंधाऱ्यांमध्ये पोहण्यासाठी उतरू नये, असे आवाहन प्रशासनाने पुन्हा एकदा केले आहे.0
0
Report
Advertisement
नागपूर में संघ के 101वें एपिसोड का उद्घाटन डॉ. मोहन भागवत के हाथों
Nagpur, Maharashtra:नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त...संघ प्रचारकांच्या जीवनावर आधारित शंवत व्हिडिओंच्या प्रसारण झाले आहे.. आज "असू आम्ही सुखाने, पत्थर पायातील" या दृकश्राव्य मालिका के १०१ व्या भागाचे प्रसारण सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे. - "डॉ. हेडगेवार : आधुनिक युग के शालिवाहन" या विशेष यूट्यूब व्हिडिओचेही यावेळी प्रसारण होणार आहे... - लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सोसायटी सभागृहात हा कार्यक्रम होतोय0
0
Report
गडचिरोली में प्रस्तावित विमानतळ के विरोध में स्कूल के विद्यार्थियों ने बहिष्कार शुरू किया
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली मुख्यालयालगत प्रस्तावित विमानतळाच्या वशीही शाळेवर बहिष्कार, हिरापूर, गुरवळा गावातील शेकडो विद्यार्थ्यांचे शाळेसमोर आंदोलन अँकर : गडचिरोलीत प्रस्तावित विमानतळाचा वाद आता नव्या टप्प्यात पोहोचला आहे. कारण, शेतकऱ्यांनंतर आता विद्यार्थ्यांनी आंदोलनाची धुरा हाती घेतली आहे. हिरापूर आणि गुरवळा गावातील शेकडो विद्यार्थ्यांनी शाळेवर बहिष्कार टाकत सलग तिसऱ्या दिवशी शाळेसमोर ठिय्या आंदोलन सुरू ठेवले आहे. जोपर्यंत विमानतळासाठीच्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेचा जीआर रद्द होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा ठाम इशारा विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी दिला आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता विद्यार्थी आणि संपूर्ण गावाचा पाठिंबा मिळाल्याने हा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. राज्यपालांकडून आश्वासन मिळूनही जमीन अधिग्रहण प्रक्रिया न थांबल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी पुन्हा आंदोलन सुरू केले आहे.0
0
Report
नवी मुंबई क्राइम ब्रांच ने घरफोड़ो के आरोपी गिरफ्तार, 11.67 लाख का माल बरामद
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई गुन्हे शाखेने घरफोडी आणि सोनसाखळी चोरी करणाऱया दोन सराईत गुन्हेगारांना अटक करुन तब्बल ११ गुह्यांची उकल करण्यात यश मिळवले आहे. गुन्हे शाखेने या आरोपींकडून तब्बल ११ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपींनी कोपरखैरणे, पनवेल तालुका, बदलापूर, वाशिंद, नारपोली, खारघर आणि बाजारपेठ परिसरात गुन्हे केल्याची कबूलि दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी ७ जून रोजी कोपरखैरणे सेक्टर-१२ बी येथील स्वीस्तिक जमुना या इमारतीतील एका फ्लॅटमध्ये घरफोडी करून १५.९५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी करुन नेले होते. कोपरखैरणे पोलिसांनी या प्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला असताना, गुन्हे शाखा यूनिट-१ ने सुद्धा या प्रकरणाचा समांतर तपास सुरु केला होता. या तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले. अत्याधुनिक तांत्रिक साधनांच्या मदतीने दोन संशयितांची ओळख पटविली. मात्र आरोपी कायमस्वरुपी एकाच ठिकाणी न राहता मिरा-भाईंदर, चेंबूर, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील विविध डॉरमेटरी व लॉजमध्ये मुक्काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सलग १६ दिवस आरोपींचा मागोवा घेऊन युसुफ रशीद शेख ऊर्फ दीपक ऊर्फ राहुल (४२) आणि नौशाद मुस्ताक आलम ऊर्फ सागर (वय ३२) या दोघांना गत २३ जून रोजी कोपरखैरणे परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत या आरोपींनी कोपरखैरणे, पनवेल तालुका, बदलापूर, वाशिंद आणि नारपोली येथील नऊ घरफोडया केल्याची कबुली दिली. तसेच नौशादने त्याच्या साथीदारासह खारघर व बाजारपेठ परिसरातील दोन सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक करुन त्यांच्या कडून कोपरखैरणे येथील घरफोडीतील ९.४७ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, तसेच अन्य घरफोडीतील सोन्याची साखळी, एक टीव्हीएस अपाची मोटारसायकल तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली आणखी एक मोटारसायकल असा एकूण ११.६७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दोन्ही आरोपी सध्या पोलिस कोठडीत असून, त्यांच्या विरोधात दाखल असलेल्या इतर गुह्यांचा तपास गुन्हे शाखेकडून सुरु आहे. या गुह्यात अटक करण्यात आलेला आरोपी युसुफ रशीद शेख याच्यावर यापुर्वी घरफोडी व इतर ५१ गुन्हे दाखल असून तो गत २० मार्च रोजी जेलमधुन जामीन घेऊन सुटून आला होता. तर त्याचा साथीदार नौशाद मुस्ताक आलम याच्यावर यापुर्वी ३२ गुन्हे दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी दिली.0
0
Report
Advertisement
शिराळा में भारी बारिश: चांदोली डैम जलस्तर बढ़ा, पाणीसाठा बढ़ा
Sangli, Maharashtra:शिराळा तालुक्यात पावसाची दमदार हजेरी,चांदोली धरणाच्या पाणी साठ्यात वाढ.. सांगलीच्या शिराळा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे चांदोली धरणाच्या पाणीसाठयात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. गेल्या 24 तासात शिराळा तालुक्यामध्ये 24 मिलिमीटर इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तर चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 24 तासात 46 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे चांदोली धरणात पाण्याची आवक वाढल्याने धनाच्या पाणी पातळी देखील वाढ झाली असून 11.98 टीएमसी इतका पाणीसाठा धरणा मध्ये निर्माण झाला आहे.0
0
Report
कल्याण-शिंदे गट के नगरसेवक-आकाश जयस्वाल विवाद का VIDEO वायरल: महायुती में गहमागहमी
Kalyan, Maharashtra:कल्याणात राजकीय राडा! नगरसेवक मधुर म्हात्रे-आकाश जयस्वाल संघर्षाचा व्हिडिओ व्हायरल महायुतीतील वाद चव्हाट्यावर शिंदे गटाचे नगरसेवक मधुर म्हात्रे यांनी आकाश जयस्वाल याला मारहाण करण्याचा व्हिडिओ वायरल.. कल्याण पूर्वेतील श्रीराम टॉकीज परिसरात झालेल्या हाणामारी प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. शिंदे गटाचे नगरसेवक मधुर म्हात्रे आणि आकाश जयस्वाल यांच्यातील मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून राजकीय वातावरण तापले आहे. एका बाजूला मधुर म्हात्रे यांनी जयस्वालकडून धारदार शस्त्राने हल्ला झाल्याचा आरोप केला आहे, तर दुसरीकडे आकाश जयस्वाल यांनी मधुर म्हात्रे आणि त्यांच्या साथीदारांनीच आपल्याला मारहाण करून सोन्याची चैन व मोबाईल हिसकावल्याचा दावा केला आहे. या प्रकरणामुळे महायुतीतील अंतर्गत वादही पुन्हा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे काल मारहाणी झाली तेव्हा मधुर म्हात्रे यांनी हा हल्ला आकाश जयस्वाल याने केले असून जयस्वाल हा एका हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असून त्याच्यावर कल्याणमध्ये प्रवेशबंदी न्यायालयाने केली होती तसेच आकाश जयस्वाल हा भाजपचे माजी उपमहापौर आणि माजी नगरसेवक विक्रांत तरे यांचा समर्थक असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. पालिका निवडणुकीतील पराभवानंतर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा वापर करून आपल्यावर दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोपही मधुर म्हात्रे यांनी विक्रांत तरे यांच्यावर केला. निवडणुकीपासूनच आपल्या कामात अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला मात्र यावर भाजपचे माजी उपमहापौर विक्रांत तरे यांचेही नाव समोर आले आहे. तरे यांनी आपण आणि मधुर म्हात्रे हे राजकीय विरोधक असल्याचे सांगत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे स्थानिक राजकारणात आरोप-प्रत्यारोपांची जोरदार लढाई सुरू झाली असून परिसरात तणावाचे वातावरण कायम आहे. सध्या कोळसेवाडी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत असून दोघांवर गुन्हे दाखल झाले आहे.0
0
Report
नाशिक: लासलगाव स्कूल पर पेड़ गिरा, 31 विद्यार्थी सुरक्षित
Lasalgaon, Maharashtra:नाशिकच्या निफाड तालुक्यात लासलगावजवळील ब्राह्मणगाव (विंचूर) येथील जिल्हा परिषद मराठी शाळेवर आज दुपारी सुमारे 1 वाजेच्या sुमारास वादळी वाऱ्यामुळे लिंबाचे मोठे झाड दोन भागांत तुटून त्यातील एक भाग थेट शाळेच्या इमारतीवर कोसळला या घटनेत शाळेच्या छतावरील पत्र्यांचे नुकसान झाले झाड कोसळताना झालेल्या मोठ्या आवाजामुळे शाळेत उपस्थित महिला व पुरुष शिक्षक तसेच शिक्षण घेत असलेले 31 विद्यार्थी घाबरून तातडीने वर्गाबाहेर धावत आले सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला दरम्यान, झाडाचा उर्वरित अर्धा भाग अजूनही धोकादायक स्थितीत उभा असून तो तातडीने हटविण्याची गरज असून अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही0
0
Report
Advertisement
शिंदे सेना में शुभांगी पाटील शिंदे का प्रवेश, उद्धव ठाकरे के समर्थकों की मौजूदगी
Dhule, Maharashtra:खासदार फुटी नंतर ऑपरेशन टायगर पुन्हा एकदा सक्रिय ठाकरे सेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील शिंदे सेनेच्या गळाला लागल्या आहेत. ठाकरे सेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील शिंदे सेनेत प्रवेश करण्यासाठी धुळ्यावरून कार्यकर्त्यांसह मार्गस्थ झाल्या आहेत. मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुभांगी पाटील यांचा पक्षप्रवेश होणार आहे. उद्धव ठाकरे साहेबांवर कुठल्याही प्रकारची नाराजी नाही, परंतु कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आग्रहास्तव आपण शिंदे सेनेत प्रवेश करत असल्याच शुभांगी पाटील यांनी स्पष्ट केले आहे.0
0
Report
सिया और चेतन को अदालत ने 14 दिन की न्यायालयीन कोठडी दी; नार्को टेस्ट नहीं आवश्यक
Varsoli, Maharashtra:विपुल दूशिंग सियाचे वकील आज आरोपींनी पोलिसांनी तीन दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती.... कोर्टाने ती मान्य केली नाही.... त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे..... ज्या कारणासाठी त्यांनी पोलिस कोठडी ची मागणी केली होती ती योग्य नसल्याचं आम्ही म्हटलं कोर्टाने ते मान्य ही केलं नाही.... नार्को टेस्ट आवश्यकता नाही असे कोर्ट म्हणाले..... सध्या तरी जामिनाची आवश्यकता नाही...... Byte : विपुल दुशिंग, सियाचे वकील (file no.01) ---------------------------------------------------------- Byte : राम शहाणे, चेतनचे वकील, (file no.02,03) BYTE POINTERS अधिक तपासासाठी योग्य कारण नसल्यामुळे न्यायालयाने या दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली..... आरोपींची नार्को टेस्ट ची मागणी केली होती पोलिसांनी, पण त्याला एक प्रकिया आहे....जर स्वतः हा आरोपी त्यासाठी तयार असेल तर.... पण या केस मध्ये आरोपी त्यासाठी तयार नव्हते.... नार्को टेस्ट चा अर्ज नाकारला कोर्टाने.... मागचीच कारणे पुढ आली....डेटा रिकव्हर करायची.....अन्य तिसऱ्या माणसाबाबत काहीच माहिती कोर्टात सादर करण्यात आली नाही..... त्याबद्दल काही सांगता येत नाही..... ----------------------------------------------------------------- Byte : गजानन टोणपे, DYSP, लोणावळा ग्रामीण (file no.04) Dysp byte pointer : ३ दिवस पोलिसांनी दोघांची पोलिस कोठडी वाढवून मागीतली होती मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळली सिया आणि चेतनची न्यायालयीन कोठडीत रवानगी, पोलीस कोठडीची मागणी फेटाळली १४ दिवसांची दोघांना न्यायालयीन कोठडी...0
0
Report
रत्नागिरी में दुर्लभ सफेद मंगू사가 कैमरे में कैद, चिपळुण के पास वायरल वीडियो
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यातून निसर्गाच्या एका आगळ्यावेगळ्या चमत्काराची बातमी समोर येत आहे. चिपळूण शहरालगत एका भागात अत्यंत दुर्मिळ मानले जाणारे पांढरे रंगाचे मुंगूस आढळून आले आहे. एरवी तपकिरी रंगात दिसणारा हा प्राणी चक्क पांढऱ्या रंगात पाहिल्यानंतर स्थानिक परिसरात कमालीचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चिपळुणातील एका सजग युवकाने या दुर्मिळ वन्यजीवाचा वावर आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला असून, सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. वन्यजीवप्रेमींसाठी ही एक अत्यंत उत्सुकतेची आणि आनंदाची बाब मानली जात आहे..0
0
Report
Advertisement
चंद्रपूर नगरपालिका सभा रद्दी पर भाजप के दो गुटों में भारी खींचतान, प्रवेश द्वार पर भिड़ंत
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूरात मनपा आमसभा रद्द करण्यावरून भाजपच्या 2 गटात अभूतपूर्व राडा बघायला मिळाला. मनपाच्या प्रवेशद्वारावर भाजपचे दोन गट आपसात भिडले. आ. जोरगेवार गटाने आपल्याच महापौर आणि आयुक्त यांचा निषेध केला तर उत्तर देताना महापौरांनी आमच्याच पक्षाचे नगरसेवक विषय वेगळ्या वाटेवर नेत असल्याची टीका केली. या प्रकरणाचे आणखी एक टोक म्हणजे काँग्रेस च्या अंतर्गत सुरू असलेला गटनेपदाचा संघर्ष. तो न्यायालयात पोचल्याने काँग्रेसने स्वीकृत सदस्य निवडीबाबत असमर्थता दर्शवून आमसभा पुढे ढकलावी अशी मागणी केली. कधी नव्हे ते महापौरांनी काँग्रेसची मागणी मान्य केली. आमसभा रद्द झाली नसून पुढे ढकलली आहे. मात्र आमच्याच पक्षाचे नगरसेवक स्वार्थापोटी विषय वेगळ्या वाटेवर नेत असल्याची टीका महापौरांनी केली. फेब्रुवारी महिन्यात नवी सत्ता आरूढ झाली. स्वीकृत सदस्य निवड त्यानंतर काही दिवसात लगेच होणे अपेक्षित होते. मात्र आधी काँग्रेस गटनेतेपदाचा चिघळलेला वाद आणि आता भाजपच्या 2 गटातील टोकाचा संघर्ष यामुळे मनपाचा कुस्तीचा आखाडा बनत असून विकासाचे मूलभूत मुद्दे मागे पडले आहेत. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
मालेगाव में लगातार बारिश से स्लॅप गिरने से बुजुर्ग और पोते की मौत
Nashik, Maharashtra:मालेगाव (नाशिक) विशाल मोरे - मालेगाव शहरात सततच्या पावसामुळे घराचा स्लॅप कोसळला... स्लॅप कोसळून आजीचा आणि नातवाचा मृत्यू... मालेगाव शहरातील कलेक्टर पट्टा भागातील महारुद्र हनुमान मंदिरा शेजारी सततच्या पावसामुळे घरातील स्लॅप कोसळल्याने आजी विमलबाई पंढरीनाथ येवले (वय वर्ष 80) व चेतन रामचंद्र येवले (वय वर्ष 20) यांचा दुर्दैवी अंत झाला. आज दुपारी 3 वाजेच्या दरम्यान सतत धारेच्या पावसामुळे आजी विमलबाई येवले यांच्या निधनाची माहिती मिळाली. घरात एकूण 5 जण राहत होते. घटनास्थळी अग्निशामक दलाचे अधिकारी, कर्मचारी व परिसरातील नागरिकांनी रेस्क्यू करुन घरातील बाकी कुटुंबांना बाहेर काढलं; तथापि आजी व नातवाचा दुर्दैवी अंत झाला.0
0
Report
यवतमाळ में ऑनलाइन परीक्षा विरोधी आंदोलन: ऑफलाइन परीक्षा की मांग
Yavatmal, Maharashtra:एमपीएससीच्या ऑनलाइन परीक्षेसह नॉर्मलायझेशन पद्धतीविरोधात तसेच वारंवार घडणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांच्या निषेधार्थ स्पर्धा परीक्षार्थी युवक-युवतींनी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढत कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत शासनाचे लक्ष वेधले. एमपीएससीची परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाइन पद्धतीने व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. ऑनलाइन परीक्षा पद्धतीत अनेक प्रकारचे घोटाळे होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. तसेच नॉर्मलायझेशन पद्धतीमुळे गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून, वेगवेगळ्या दिवशी व वेगवेगळ्या स्वरूपाची प्रश्नपत्रिका दिल्याने समान संधीच्या तत्त्वाला धक्का बसत असल्याचे विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून म्हटले आहे. याशिवाय नेट व टीईटी परीक्षांसारख्या पेपरफुटीच्या घटनांमधील दोषींवर कठोर कारवाई करावी, स्पर्धा परीक्षांचे परीक्षा शुल्क कमी करावे, तसेच शासनाने दरवर्षी परीक्षांचे निश्चित वेळापत्रक आणि रिक्त पदांचा तपशील आगाऊ जाहीर करावा, अशा विविध मागण्यांही विद्यार्थ्यांनी केल्या.0
0
Report
Advertisement
