icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

कोल्हापुर: विरोधी दल नेता राजेश लाटकर ने थिएटर आग मामले में SIT जांच की मांग की

Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह जळालं नाही तर जाळलं असा गंभीर आरोप कोल्हापूर महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते राजेश लाटकर यांनी केले आहे. राजेश लाटकर आणि इतर विरोधी सदस्य एकत्र येत आज कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक निलोप्पल यांची भेट घेऊन केशवराव जळीत कांडाची चौकशी करून SIT नेमावी अशी मागणी केली आहे. विरोधी पक्षनेते लाटकर यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या कागदपत्रांमध्ये जळीत कांडानंतर फॉरेन्सिक टीमने जमा केलेल्या पुराव्यामध्ये ज्वलनशील पदार्थ सापडल्याचा दावा केला आहे.
0
0
Report

वाशिम में भारी बारिश से जलजमाव, कई रस्ते बंद; प्रशासन सतर्क

Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यात रात्री झालेल्या जोरदार पावसानंतर अनेक नदी नाल्यांना पूर आलाय. त्यामुळे काही ठिकाणी रस्ते खचले तर काही मार्ग वाहतुकीसाठी बंद झालेत. मालेगाव तालुक्यातील वाघळूद ते हिवरा रस्त्यावरील पूल वाहून गेलाय तर रिसोड तालुक्यातील पारडी ते बेलखेडा रस्ता काही काळ बंद झाला होता. याशिवाय याच तालुक्यातील केनवड ते जायखेडा आणि खडकी ढंगारे गावावरून रिठद कडं जाणारा रस्ता बंद झालाय. तर पैनगंगा नदीला असलेल्या पुरामुळं गोभणी ते करडा मार्ग बंद झालाय. हवामान विभागाने आजही मुसळधार पावसाचा इशारा दिला असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलय
0
0
Report
Advertisement

आकोला में ऑरेंज अलर्ट: मोर्ना नदी का जलस्तर पुल के पास पहुंचा

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला होता. मात्र, जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आता पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. गुरुवार आणि शुक्रवारच्या रात्री झालेल्या धुवाधार पावसामुळे अकोला शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे जुन्या शहराला नव्या शहराशी जोडणाऱ्या राजराजेश्वर राम सेतूजवळ पाणी अवघ्या सुमारे एका फूट अंतरावर पोहोचले असून, परिस्थिती आणखी गंभीर झाल्यास हा पूल वाहतुकसाठी बंद करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रशासनाने मोर्ना नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या व नाले दुथडी भरून वाहत आहेत.
0
0
Report

अकोला जिले में भारी बारिश से तेल्हारा-चोहोट्टा मार्ग पूर्णत: बंद; पुल पर पानी

Akola, Maharashtra:Anchor : कालपासून अकोला जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तेल्हारा-चोहोट्टा बाजार मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. पारळा येथील नदीला पूर आल्याने नदीचे पाणी पुलावरून वाहत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने या मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक तात्पुरती बंद केली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची गैरसोय होत आहे. नागरिकांनी पुराच्या पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथक परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून पाण्याची पातळी कमी झाल्यानंतरच वाहतूक पूर्ववत करण्यात येणार आहे.
0
0
Report

शिरपूर में भारी पानी से व्यापारिक कॉम्प्लेक्स डूबा; धुले में अतिवृष्टी चेतावनी

Dhule, Maharashtra:धुळे जिले्यातील शिरपूरातल्या व्यापारी संकुलात पाऊसाचे पाणी शिरण्यामुळे मोठे नुकसान झाले. धुळे जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून मध्यरात्रीपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरातील राजपाल कॉम्प्लेक्स च्या बेसमेंटमध्ये पाणी शिरल्याने दुकानदारांचे मोठे नुकसान झाले. शिरपूर नगरपरिषदेच्या मार्फत पाणी काढण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात 100 मिमी तर शिंदखेडा तालुक्यात 92 मिमी संभाव्य पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
0
0
Report
Advertisement

Kolhapur के पूर्व सिविल सर्जन के घर से गर्भपात का बड़ा रैकेट उजागर

Kolhapur, Maharashtra:आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात माजी सिव्हिल सर्जन यांनी तब्बल अडीचशेहून अधिक गर्भपात केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. कोल्हापूर पोलिसांनी डॉ चंद्रकांत गायकवाड यांना गर्भपात करताना रंगेहाथ पकडले आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे. गर्भलिंग करणार्या टोळीला जेरबंद केल्यानंतर पोलीस डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांच्यापर्यंत पोहोचू शकले आहेत. कोल्हापूरातील माजी सिव्हिल सर्जन यांनी अडीचशेहून अधिक गर्भपात केला - कोल्हापूर पोलिसांचा दावा. बेकायदेशीर गर्भपात करताना डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांना जेरबंद बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्यानंतर पोलिस पोलीस डॉक्टर गायकवाड यांच्या पर्यंत पोहोचले. कोल्हापुरात गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या टोळीचा भरभराट. बनावट डॉक्टर, BEHMS डॉक्टर, पोल्ट्री व्यवसायी यांच्या नंतर सेवानिवृत्त सिव्हिल सर्जन यांच्याविरुद्ध पोलिस अटक. डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांच्या अटकेनंतर गर्भलिंग निदान टोळीचा मुळासकट पर्दाफास होणार? गंभीर प्रश्न: कोल्हापूर जिल्ह्यातील वास्तविक स्थिती... जिल्ल्यात मुलगी नको या विचाराने दररोज बेकायदेशीर गर्भपात करून भ्रूणाच्या जीव घेतला जातो. त्यांच्या आदेशाने बेकादेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई होणार होती, त्यांचा माजी सिव्हिल सर्जन चंद्रकांत गायकवाड यांचा समावेश उघड झाल्यानंतर धक्का. कोल्हापूर शहरातील कदमवाडी परिसरातील प्रतिमा हॉस्पिटलमध्ये डॉ गायकवाड बेकायदेशीर गर्भपात करताना रंगेहाथ पकडला गेला. माजी सिव्हिल सर्जन असणाऱ्या चंद्रकांत गायकवाड यांनी रायगड, मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी इत्यादी ठिकाणी सेवा केल्यात. निवृत्ती वेतन मिळतो, मात्र निवृत्ती वेतनानंतरही या प्रॅक्टिस सुरू. पोलिसांनी सापडलेल्या धाडीत सोनोग्राफी मशीन, औषधं आणि शस्त्रक्रिया उपकरणं जप्त केली. गर्भलिंग निदान टोळीचा पर्दाफाश, महिलांमध्ये लक्ष केंद्रीत कारवाई. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या जिल्ह्यात बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या रॉकेटचा सुळसुळाट असल्याचे दिसत आहे. प्रामाणिक काम करणारी यंत्रणा अशा रॅकेट पर्यंत पोहोचून कारवाई करत आहे; पण असे उद्योग राजरोसपणे करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या कधी आवळणार असा प्रश्न विचारला जात आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रायोगिक तत्त्वावर स्पेशल फोर्सची स्थापन करायची सूचना दिली आहे.
0
0
Report

वाशीम में प्रेम रिश्तों के विरोध पर पति-प्रेमी ने पत्नी की गला घोंटकर हत्या

Washim, Maharashtra:वाशीम : अँकर:वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील वाकळवाडी येथे प्रेमसंबंधांना विरोध करणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणी पत्नी आशा झलके आणि तिचा प्रियकर महादेव अंभोरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. व्हिओ:पोलिसांच्या माहितीनुसार, सुरेश झलके यांचा मृतदेह काल शेतात आढळून आला होता. तपासादरम्यान, पत्नीच्या प्रेमसंबंधांना विरोध केल्यामुळे दोघांनी मिळून सुरेश यांना शेतात बोलावून गळा आवळून हत्या केल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर मृतदेह लिंबाच्या झाडाखाली टाकून पुरावे लपविण्याचा प्रयत्न करण्यात आला.या प्रकरणी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास मालेगाव पोलीस करत आहेत.
0
0
Report

पुससावळी में लगोरी गैंग का तांडव: CCTV तोड़े, सराफ दुकान समेत अन्य दुकानों में चोरी

Satara, Maharashtra:सातारा - साताऱ्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे मागील काही दिवसांपासून लगोरी गॅंग ने धुमाकूळ घातला आहे. लगोरी च्या सहाय्याने विजेच्या खांबावरील, घरांच्या आणि दुकानाच्या समोरचे बल्ब आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करून चोऱ्या करणाऱ्या चार ते पाच मंकीकॅप सह बंदिस्त इसमांनी एका सराफ दुकानासह अन्य काही दुकाने फोडल्याने तसेच काही ठिकाणी तिन ते चार बोकड आणि कोंबड्या ही लांबवल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पुसेसावळी दुरक्षेत्राचे पोलिसांनी तपास करत आहेत.
0
0
Report
Advertisement

धुळे में 24 घंटे में 150 मिमी बारिश से जलजमाव, लोग परेशान

Dhule, Maharashtra:धुळे शहरात गेल्या 24 तासात 150 मिलिमिटर पाऊसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले असून, सखल भागात पाणी साचले आहे. शहरातील संभाप्पा कॉलनी परिसरात घरांमध्ये पाणी घुसले, त्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ पाहायला मिळाली. महापालिकेच्या सभापती लताबाई पोद्दार यांच्या प्रभागात घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने पालिकेचा नियोजन शून्य कारभार चव्हाट्यावर आला. पाण्याचा निचरा होत नसल्याने घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्याने नागरिकांच्या हाल होतं आहेत. राजकीय लोक येतात मत मागतात, मात्र अडचणीत वाऱ्यावर चिडून देतात अशी नागरिकांची नाराजी व्यक्त केली.
0
0
Report

महाराष्ट्र राजनीति में तकरार: विपक्ष ने भाजपा पर निशाने, कर्जमाफी से लेकर बेरोजगारी तक

Nagpur, Maharashtra:नागपूर - विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते - - या देशात भाजपच्या हातून युवक गेला आहे, या देशातील ज्या भरोशावर यांनी सत्ता प्राप्त केली त्यांना मूर्ख बनवण्याचं काम भाजप ने केला आहे, खोटी आश्वासन देऊन फसवणूक केली, त्यामुळे त्यांना वाटतं की तरुण आमच्यापासून दूर गेला आहे त्यामुळे भाजपचे ऑफर सीजेपीच्या संस्थापकांना झाली असेल - मोदींच्या भूलथापा आणि जुमलेबाजीला आता हा तरुण भुळणार नाही यामध्ये कुठेही पुढच्या दोन-तीन वर्षात या देशातील तरुण,युवा,विद्यार्थी परिवर्तन करण्यासाठी निघालेला आहे, त्यामुळे मोदी काय म्हणतात भाजप काय म्हणते, ते कितीही आता पोटाच्या बेंबीपासून ओरडून जरी आश्वासन देतो म्हणले तरी हे खोटे बोलतात फसवणूक करतात हे आता सिद्ध झालेलं आहे On पीएम सन्मान निधी कात्री - - शेतकऱ्यांनाच्या कर्जमाफीचा दिंडोरा पेटला गेला,यादी पाठवली,फॉर्म 16 पाठवला,त्यातून शेतकऱ्यांची नावे कमी झाली, आता काल नमो शेतकरी सन्मान योजनेचा फायदा ज्या शेतकऱ्यांना मिळाला असेल तर त्याला कर्जमुक्ती व्हावे लागेल किंवा योजनेतून नाव बाद व्हावं लागेल, करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय म्हणजे याची नियत फसवणूक करणारी आहे हे सिद्ध होत आहे, या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर ही कर्जमाफी सुरुवातीपासून आम्ही म्हणत होतो की अटी-शर्ती घालून हा आकडा दहा-बारा लाखाच्या पलीकडे जाणार नाही - हात आखडता का घेत आहे शेतकरी कर्जमाफीसाठी? नको त्या कामासाठी कुंभ वर उधळपट्टी चालली, 90 टक्के कंत्राटदार गुजरातचे आहेत, 30- 32 हजार कोटींच्या कामांची गरज खरंच आहे का? आम्ही कुंभमेळ्याचे विरोधात नाही मात्र एवढ्या पैशाची खरच गरज आहे का? - जे काम केले ते पहिल्याच पुरात वाहून गेली,आता आपल्या सगळ्या गुजरातच्या कंत्राटदारांना कुंभाची कामे देण्यात आली आहेत आणि सगळी कामे निकृष्ट दर्जाचे आहेत - शेतकरी सन्मान योजनेतून कर्जमाफी देताना शेतकऱ्यांना का वगळता? या शेतकऱ्यांशी सरकारला काही देणं-घेणं नाही, केवळ मतं घेण्यासाठी शेतकऱ्यांचा वापर करायचा असा भाजप महायुतीच्या सरकारने केलेला आहे On चंद्रकांत पाटील - - चंद्रकांत पाटलांना त्यांचेच ठसे घ्यायला पाहिजे सत्य काय ते आहे पाहायला, तिथे ठुसे मारले आणि ठसे घेता लाज वाटत नाही तुम्हाला, तरुणांना मारण्यासाठी भाजपचे गुंड घातले, - तुमच्या संवेदना संपल्या आहेत, सत्तेच्या गर्दीमध्ये संवेदनाहीन झाल्या आहात, हेच या पक्षाला डुबवणारे ठरवतील हे नवीन सांगण्याची गरज वाटत नाही On अभिजित दिपके - - तरुण लढतो आहे आणि लढणाऱ्याला प्रोत्साहन देणे हे काम आहे, त्यामुळे कोणाविरुद्ध लढत आहे हे सगळं दिसत आहे, काल अभिजीत दिपके म्हणाले पंतप्रधानांना उद्देशून की हे भारत जेवढा चमकला नाही तेवढा पंतप्रधानांचा चेहरा चमकतो आहे,हे हे म्हटल्यावर तरुणांना कळतंय त्यामुळे त्यांना भेटत असतील - या देशात परिवर्तन करायचं असेल तर सर्व विरोधी पक्षाची एकजूट करूनच पुढे जावं लागेल आणि त्याचा नेतृत्व हे सगळ्यांनी एकत्र बसून ठरवून पुढे गेला तर 29 मध्ये कोणी सत्ता परिवर्तन पासून रोखू शकणार नाही आम्हाला विश्वास आहे On भाजप सेना संघर्ष - - कसा आहे की चोर चोर मावस भाऊ असा कारभार सध्या सुरू आहे, सत्तेसाठी सत्तेतून मिळणाऱ्या पैशासाठी ही लढाई सुरू आहे कमिशनसाठी ही लढाई आहे एकमेकांविरुद्ध भांडायचं लढयचं मग आपला हिस्सा घेऊन बाजूला होऊन जायचं - सत्तेच्या सर्वोच्च पदाची महाराष्ट्रातील ते कारण आहे त्यावर अनेकांचा डोळा आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या आताच्या परिस्थितीमध्ये खाण्यासाठी आहे यापेक्षा दुसरा अर्थ काढण्याचा गरज नाही असे मला वाटते On अनुराग ठाकूर हक्कभंग - - पंतप्रधानांनी वापरलेल्या भाषेचा अभ्यास केला अनुराग ठाकूर यांनी तर त्याचे उत्तर त्याला मिळेल, पंतप्रधानांना ना शोधणाऱ्या भाषेचा वापर आमच्या नेत्यांवर केला आहे, कितीतरी भाजपचे मंडळी आहेत त्यांनी भाषा वापरली आहे - कंगना राणावत यांनी जे बोलले ते एक महिला म्हणून त्यांना लाज वाटत नव्हती, तसे अनुराग ठाकूरला तेवढेच एक काम राहिलं असेल, मंत्रिमंडळात फार काम राहिले नाही म्हणून हक्क बंग आणायचा आणला आणि राहुल गांधीवर कितीही कटले दाखल केले - राहुल गांधीं कोणालाही भीक घालत नाही On E - 20 पेट्रोल - - मान्य केलं असेल तर विचार करावा, मी ऐकलं नाही मायलेज कमी होतो, पण हे काही इथेनॉल आणि पेट्रोलचे मिश्रण होता त्यावर केंद्राची भूमिका जर अशी असेल तर त्यांनी धोरणाचा पुनर्विचार केला पाहिजे पण सत्य परिस्थिती लोकांपुढे आणले पाहिजे - आता तर E-20 पार्टी काढली आहे त्यामुळे इथेनॉल मिसळवायचे की नाही यावर सरकारची भूमिका क्लियर झाली तो संदेश स्पष्टपणे सरकारने दिला पाहिजे - सध्या रडावर नितीन गडकरी आहेत, ते अमित शहाचे रडारवर आहेत की जनतेच्या रडार वर, कोणीतरी त्यांना रडारवर आणला आहे,त्यामुळे खुर्ची खाली करण्यासाठी तर E20 चा वापर होत नाही ना - रामदेव बाबाचे प्रोडक्टस वापरलं तर खाज होते,केस जातात, जेवढ्या गाई नाही तेवढे रामदेव तूप विकतात, मधमाशी नाही तेवढेच शहद रामदेव विकतो, दोन्ही डोळे उघडे करून सांगितलं नाही त्यामुळे लोकांनी विश्वास ठेवला,मूर्ख बनवायचे काम केलं - आज जी महाराष्ट्राची स्थिती झाली होती अत्यंत खोटी आणि फसवणूक केल्याने देशाचं वाटोळं झालं, त्यामुळे कोणी यांच्यावर हे काय बोलतील काय करतील यावर कोणाचा विश्वास राहिलेला नाही, सत्तेतून खाली खेचणार आणि बाजूला करणार तर या देशाची प्रगती होईल नाहीतर पुन्हा हे नव्यान मंदिर-मशीद करत बसतील आणि देशाला लुटत असतील, जेवढे इंग्रजांनी लुटला नाही तेवढं या लोकांनी लोटला इंग्रजांपेक्षा अधिक लुटण्याचा काम केलं आहे On अमित शाह दौरा - - राहुल गांधी-खरगे यांनी तीच भूमिका मांडली की गृह खात्याच्या आदेशाशिवाय त्या तरुणांवर लाठीचार्ज,एके47,अश्रूधुर हे सगळे प्रकार केले गेले होते त्याला अमित शाह जबाबदार होते, त्याला अमित शहा आदेश यांचा आदेश होता - असे तरुणांना बडलून काढणारे, त्यांचे आयुष्य उध्वस्त करणारे गृहमंत्री जर येत असेल तर त्याला काँग्रेस विरोध करणार आणि ती भूमिका काँग्रेसने स्वीकारली आहे On भाजप नगरसेविका गुरुपौर्णिमा कार्यक्रम - पदावर बसत असताना तो कुठल्या लायकीचा आहे, आता यांची ढुंगण धुण्याची लायकी नाही त्यांना नगरसेवक केले, त्यांचे पाय धुण्याचे प्रकार ठेवले तर असे प्रकार होतीलच, अशा लोकांना पदावर बसवल्यावर विद्यार्थ्यांचे भविष्याशी हे खेळतील, विद्यार्थ्यांचा पाय धुऊन घेतील त्या नगरसेविकेला पदावर राहण्याचा अधिकार आहे का - भाजपने त्यांना पक्षातून आणि पदावरून काढून घेतले पाहिजे On ओबीसी आरक्षण - - आम्ही आमचे मुद्दे घेऊन तीन ऑगस्ट पासून पूर्व विदर्भात मंडल यात्रा काढतो आहे, यात ओबीसींची जनजागृती हा मुख्य मुद्दा आहे, फडणवीस सरकारने ओबीसींना काय दिलं सगळंच मराठ्यांना देतात तर आम्हाला आमचं द्या यात आमचा काय chükलं? - आमच्या हॉस्टेलचा अजून पत्ता नाही, आम्हाला स्वतंत्र इमारत नाही, आमच्या लोकसंख्येप्रमाणे निधी मिळत नाही, अनेक विषय आमच्या पुढे आहेत - आमची स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे, आमची खरी लोकसंख्या लोकांना कळली पाहिजे, अशा अनेक विषयांना घेऊन आम्ही ओबीसींचे 20 विषय घेऊन ही जनजागृती करतो आहे आणि ओबीसींच्या हक्कांचं मागण्यासाठी आमची ही मंडल यात्रा आहे - महायुती तर आम्हाला जबाबदार ठरवत होती स्थानिक स्वराज्य निवडणुका न होण्यासाठी यांना ओबीसी आरक्षण टिकवता आले नाही अशी माहिती सरकारची भूमिका होती - आज चार वर्षे झाले निवडणुका घेत नाही, संपूर्ण जागा रिक्त ठेवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते भाजप आणि महायुती सरकारने केला आहे, अजूनही याचा निकाल लागत नाही कोर्टात तारीख पे तारीख सुरू आहे हा जर निकाल लागला तर ओबीसींच्या चार-पाच वर्षांनी हे चांगले वकील लावून घेण्याची अपेक्षा होती - निवडणुका लावण्यासाठी सरकार गंभीर नाही हे आता दिसून आले आहे On गोसेखुर्द कॅनॉल वाहून गेला - - व्ही आय डी सी च्या अधिकारी यांनी तो रिपोर्ट देण्याप्रत्ये त्या उंदरांना आता जे आमदार म्हणून आहेत भाजपचे त्या उंदीर घुशी आणि सशेांनी तेच पोखरलं होतं - हे सगळे कॉन्ट्रॅक्टर होते ते आता भाजपचे आमदार खासदार आहेत, या सगळ्यांची उच्चस्तरीय चौकशी झाले तर भाजपचे बरेचसे खासदार आणि आमदार तुरुंगात दिसतील - जुने काम बघत झाले ते नव्याने करून देण्याचे आदेशाने त्यांनी नवीन कंपनी स्थापन केली आणि त्या कंपनीच्या नावाने काम करत आहेत आणि जुन्या पापावर पांघरून टाकलं On भिवंडी दुर्घटना - - पावसाळ्यात लोकांचा जीव गेला की सरकार सांगते आम्ही हे करणार ते करणार? महाराष्ट्र सह मुंबईत अनेक धोकादायक बिल्डिंग आहे... त्यांचे स्ट्रक्चर ऑडीट करून घेण्याची जबाबदारी सरकारची आहे.... त्यांना सूचना दिल्या पाहिजे. आज पावसाळ्यात निरअपराध लोकांचा जीव जातो.... याला जबाबदार कोण? संबंधित कार्पोरेशन इंजिनियर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे...त्या इमारतीची पाहणी झाली होती का? नऊ लोकांचा जीव जातो? जबाबदारी निश्चिती करून कारवाई झाली पाहिजे. स्ट्रक्चरल ऑडिटसाठी सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे... - सरकारने कुटुंबिया 25 लाख रुपये मदत दिली पाहिजे... हे कुटुंब उघड्यावर पडलेले आहे. राहायला घर नाही, त्यांनी कुठे राहावं आणि कुटुंब सांभाळावं या संकटात कुटुंब आहे. सरकारने त्यांना मदत करावी.
0
0
Report

कल्याण बाजार की मुख्य सड़क का हिस्सा ढह गया; मरम्मत की तात्कालिक मांग

Kalyan, Maharashtra:कल्याण मध्ये बाजारपेठेत मुख्य रस्त्याच्या मधोमध काही भाग खचला, कल्याण शहरातील बाजारपेठ परिसरात मुख्य रस्त्याचा काही भाग अचानक खचला याच ठिकाणी यापूर्वीही मोठा खड्डा पडला होता. स्थानिक व्यापाऱ्यांनी या धोकादायक परिस्थितीबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्यानंतरही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. सध्या महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून खचलेल्या भागाभोवती बैरीकेटिंग केली आहे. मात्र, सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हा रस्ता आणखी खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या मार्गावर सतत वाहतूक सुरू असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक व्यापारी आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.
0
0
Report
Advertisement

महाराष्ट्र में भारी बारिश: कोयना डैम क्षेत्र में बाढ़ के संकेत

Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून काल 24 तासात महाबळेश्वर मध्ये 202 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील पावसाचा जोर वाढला असून कोयनेमध्ये 121 मिलिमीटर तर नवजामध्ये 174 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या कोयना धरणात 86 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्याचबरोबर अनेक भागात घाटमाथ्यांवर मुसळधार पाऊस कोसळत असल्याने दरडी कोसळण्याचे प्रकार देखील वाढले आहेत. त्याचबरोबर उरमोडी, कण्हेर, धोम धरणातून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
0
0
Report

भिवंडी घटना पर विजय वडेट्टीवार: संरचनात्मक ऑडिट और 25 लाख राहत की मांग

Nagpur, Maharashtra:नागपूर विजय वडेट्टीवार, काँग्रेस. भिवंडी घटना पर चर्चा: पावसाळ्यात लोकांचा जीव गेला की सरकार सांगते आम्ही हे करणार ते करणार? महाराष्ट्र सह मुंबईत अनेक धोकादायक बिल्डिंग आहे... त्यांचे स्ट्रक्चर ऑडीट करून घेण्याची जबाबदारी सरकारची आहे.... त्यांना सूचना दिल्या पाहिजे. आज पावसाळ्यात निरअपराध लोकांचा जीव जातो.... याला जबाबदार कोण? संबंधित कार्पोरेशन इंजिनियर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे...त्या इमारतीची पाहणी झाली होती का? नऊ लोकांचा जीव जातो? जबाबदारी निश्चिती करून कारवाई झाली पाहिजे. स्ट्रक्चरल ऑडिटसाठी सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे... - सरकारने कुटुंबिया 25 लाख रुपये मदत दिली पाहिजे... हे कुटुंब उघड्यावर पडलेले आहे. राहायला घर नाही, त्यांनी कुठे राहावं आणि कुटुंब सांभाळावं या संकटात कुटुंब आहे. सरकारने त्यांना मदत करावी.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top