icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

करमाला में तूफान से दीवार गिरने पर वृद्ध दंपति की मौत

Pandharpur, Maharashtra:करमाळा तालुक्यात काल रात्री झालेल्या तीव्र वादळी वाऱ्यामुळे एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. वादळाच्या तडाख्यामुळे घराची भिंत अंगावर कोसळून एका वृद्ध दांपत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोमलवडी गावावर आणि परिसरात शोककळा पसरली आहे. पोमलवडी येथील रहिवासी जगन्नाथ मारुती नवले (वय ८० वर्षे) आणि त्यांच्या पत्नी शालन जगन्नाथ नवले (वय ७५ वर्षे) हे रात्री आपल्या घरात होते. दरम्यान, परिसरात अचानक वादळी वारे सुरू झाले वादळाचा वेग इतका तीव्र होता की, त्यांच्या घराची एक भिंत अचानक पत्त्यासारखी कोसळली. भिंत कोसळली तेव्हा हे वृद्ध दांपत्य घराच्या आतच होते. भिंतीचा मोठा ढिगारा अंगावर पडल्यामुळे दोघांनाही सावरण्याची संधी मिळालेली नाही आणि गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्या जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
0
0
Report

यवतमाळ विधानसभा परिषद चुनाव: महायुती के दुष्यंत चतुर्वेदी के दाखिले के बाद भी सहयोगी नाराज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत महायुतीकडून शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी महायुतीतील मित्रपक्ष भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील मंत्री, आमदार आणि पदाधिकारी यावेळी अनुपस्थित होते. भाजपचे मंत्री अशोक उईके आणि राष्ट्रवादीचे मंत्री इंद्रनील नाईक या दोघांसह पक्षाचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी या कुणालाही शिवसेनेकडून बोलावणे नसल्याने त्यांच्या मध्ये नाराजीचा सूर आहे. परिणामी दोन्ही पक्षांकडून बंडखोरीदेखील झालेली आहे. पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांनाच सन्मानाची वागणूक नसेल तर त्याचा परिणाम निवडणुकीत दिसेल असा इशारा देखील दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
0
0
Report
Advertisement

सातारा जिला परिषद के सभापति केबिन में जन्मदिन: बदनाम गुंड की मौजूदगी पर हंगामा

Satara, Maharashtra:सातारा - सातारा जिल्हा परिषदेत समाजकल्याण समितीचे सभापती ऋषिकेश धायगुडे-पाटील यांच्या केबिनमध्ये वाढदिवस साजरा करण्यात आल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या कार्यक्रमात तडीपार गुंड म्हणून ओळखला जाणारा बिया उर्फ अमित कदम उपस्थित असल्याचा दावा करण्यात आला आहे. लोकशाहीच्या मंदिरात अशा व्यक्तीची उपस्थिती दिसून आल्याने या प्रकारावर टीका होत असून जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. संबंधित छायाचित्रांमुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
0
0
Report

वाशीम में बाइक ओवरटेकिंग विवाद, 10-12 लोगों ने लोहे की रॉड से हमला, 5 घायल

Washim, Maharashtra:अँकर:वाशीम शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाजवळ दुचाकीला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून १० ते १२ जणांच्या टोळक्याने एकाच कुटुंबातील सदस्यांवर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात प्रविण राऊत गंभीर जखमी झाला असून एकूण पाच जण जखमी झाले आहेत. प्रतिक राऊत हे आई व लहान मुलासह जात असताना एका गॅरेज मालकाने त्यांच्या दुचाकीला कट मारला. यावरून झालेल्या वादात प्रतिक यांच्या आई लक्ष्मीबाई राऊत यांना मारहाण करण्यात आली, ज्यामुळे त्यांच्या हात फ्रॅक्चर झाला. त्यानंतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या प्रतिक राऊत, प्रविण राऊत, अंकुश सोनटक्के व सुरज जोगदंड यांच्यावर गॅरेजमधील व्यक्तींसह त्यांच्या नातेवाईकांनी लोखंडी रॉडने हल्ला केला. हल्ला सोडवण्यासाठी आलेले राजेश राऊत यांनाही मारहाण करण्यात आली. या घटनेत प्रविण राऊत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
0
0
Report

गडकरी ने नागपूर–मुंबई उड़ानें तुरंत बहाल कराने लिखा एयर इंडिया अध्यक्ष को पत्र

Nagpur, Maharashtra:रद्द विमानसेवा पूर्ववत करनेासाठी नितीन गडकरींचे एअर इंडिया ला पत्र पाठवले आहे. प्रमुख एअरलाइन्सने नागपूरहून चालणाऱ्या अनेक विमानसेवेमध्ये थेट कपात या फेरबदल केले आहेत. त्यामुळे व्यावसायिक, प्रवासी और गुंतवणूकदारांचे मोठे हाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येची दखल घेत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तातडीने एअर इंडियाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना पत्र लिहीत विमाने पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. नागपूर वेगाने विकसित होत असलेले आर्थिक, औद्योगिक केंद्र आहे. एअर इंडियाने नागपूर - मुंबई हे विमान अनिश्चित काळासाठी बंद केले आहे. याशिवाय इंडिगो एअरलाइन्सने काही विमानसेवा बंद केल्या आहेत तर काहींच्या फेऱ्यांमध्ये कपात घोषित केली आहे. नागपूरच्या या विमानसेवा कपातीवर असोसिएशन फॉर इंडस्‍ट्रियल डेव्‍हलमेंट (एआयडी) या संस्थेने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. एआयडीचे अध्यक्ष आशिष काळे यांनी यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना एक निवेदन सादर केले. या निवेदनाला ठाम पाठिंबा देत गडकरी यांनी एअर इंडियाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना पत्र लिहून रद्द केलेल्या सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. नागपूर देशातील वेगाने वाढत असलेले आर्थिक, औद्योगिक केंद्र आहे. अशा स्थितीत येथील हवाई कनेक्टिव्हिटीमध्ये कोणतीही तडजोड केली जाऊ नये. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून व्यवसाय, प्रशासन आणि उद्योगांसाठी अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. नागपूर-मुंबई मार्गावरील विमानसेवा कमी किंवा रद्द केल्याामुळे व्यावसायिक प्रवास, औद्योगिक उपक्रम आणि गुंतवणुकीच्या संधींवर अत्यंत विपरीत परिणाम होऊ शकतो, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एन. चंद्रशेखर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
0
0
Report
Advertisement
0
0
Report

आरापूर MIDC भूमि मापन: 90% पूर्ण, विरोध के बावजूद शेष दो-तीन दिन में पूरा

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:प्रस्तावित आरापूर एमआयडीसीसाठी जमीन मोजणीचे दहा दिवसांचे उद्दिष्ट होते. मात्र, आरापूर, गवळीशिवरा आणि सुलतानाबाद येथील मोजणी १९ दिवसांनंतर ९० टक्केच पूर्ण होऊ शकली. काही शेतकऱ्यांच्या विरोधामुळे सध्या हत्ती गेला आणि शेपूट राहिले अशी स्थिती निर्माण झाली असली, तरी उर्वरित मोजणी पुढील तीन दिवसांत पूर्ण करण्याचा विश्वास एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकल्पासाठी दहा महिन्यांपूर्वी अधिसूचना काढण्यात आली होती. अखेर ६ मे रोजी प्रत्यक्ष मोजणीला सुरुवात झाली. येथील एकूण ७६२ हेक्टर क्षेत्रापैकी मे महिन्याच्या अखेरपर्यंत ९० टक्के मोजणी पूर्ण झाली असून, केवळ दराच्या मुद्द्यावरून ज्या ठिकाणी विरोध आहे, तेवढीच मोजणी बाकी आहे. येत्या २ ते ३ दिवसांत जमीन मोजणी पूर्ण केली जाईल असे सांगण्यात आलेय..
0
0
Report

मोटरसाइकिल में आग लगने से चालक जख्मी, स्थानीय लोगों ने बुझाई आग

Yeola, Maharashtra:येवला तालुक्यातील अंदरसुल - सायगाव रोड वरून अमोल रविंद्र सैंदर हे आपल्या घरी जात असताना त्याच्या दुचाकीला अचानक आग लागल्याचे लक्षात येताच दुचाकीस्वाराने तातडीने वाहन सोडून दिल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या घटनेत दुचाकी स्वार जखमी झाला असून उपचारा करता रुग्णाला दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. अखेर आग आटोक्यात आणण्यात यश आले, परंतु तोपर्यंत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली होती. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली.
0
0
Report
Advertisement

छत्रपती संभाजी नगर में पूर्व-मौसम की आंधी-बारिश से पेड़ गिरे, विद्युत आपूर्ति बाधित

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरात अद्याप मान्सूनचे आगमन झाले नसले तरी सोमवारी संध्याकाळी अचानक आलेल्या पूर्वमोसमी पाऊस आणि ताशी ३० किमी वेगाच्या वादळी वाऱ्याने संपूर्ण शहरात दाणादाण उडवून दिली. दिवसभराच्या प्रचंड उकाड्यानंतर संध्याकाळी हवामानात अचानक बदल झाला. या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सिडकोसह अनेक भागांत झाडे आणि फांद्या कोसळल्या, चिकलठाणा विमानतळाचे छप्पर पुन्हा एकदा निखळले, तर बहुतांश शहरात वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागले. या वादळी पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी महावितरणची मात्र धावपळ उडाली.. आज पासून पूढील 3 दिवस अशाच पावसाचा इशारा देण्यात आलाय...
0
0
Report

20 लाख के बीमा के लिए साथी की हत्या, मुख्य सूत्रधार फरार

Jalna, Maharashtra:जालना: स्वतःचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करून सहकाऱ्याचा केला खून २ लाख रुपयांच्या विमासाठी रचला होता कट; दोन आरोपींना अटक, मुख्य सूत्रधार मात्र फरार अँकर: २० लाख रुपयांच्या विम्याच्या लाभासाठी नाशिक येथे पेंटरचे काम करणाऱ्या संदीप चव्हाण याचा गळा दाबून खून करून अपघाताचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार जाफराबाद-चिखली रोडवर उघडकीस आला. याप्रकरणात नितीन प्रभाकर गवळी, राजू फुलारे आणि आकाश सुधाकर गवळी यांचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले असून, पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तर मुख्य सूत्रधार नितीन गवळी हा फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. संदीप चव्हाण हा नाशिक येथे पेंटरचे काम करत होता. दरम्यान त्याची ओळख नितीन गवळी आणि राजू फुलारे यांच्याशी झाली. "गावाकडे पेंटिंगचे काम आहे, आपण गावी जाऊ" असे सांगून आरोपींनी संदीप चव्हाणला सोबत नेल्याचे समोर आले आहे. नाशिकहून छत्रपती संभाजीनगरमार्गे सिल्लोड येथे येत असताना आरोपींनी दारू प्राशन केल्याची कबुली दिली. त्यानंतर मुख्य फरार आरोपी नितीन गवळी याने आपला चुलत भाऊ आकाश सुधाकर गवळी यास सिल्लोड येथे बोलावून घेत तिघांनी मिळून संदीप चव्हाणचा गळा दाबून खून केला. त्यानंतर जाफराबाद तालुक्यातील जंजाळवाडी परिसरात आकाश गवळी यांनी आणलेल्या गाडीला दोरी बांधून झाडावर आदळल्याचा बनाव करण्यात आला. तसेच, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने गाडीवर पेट्रोल टाकून ती पेटवून देण्यात आली. नितीन गवळी हा आर्थिक अडचणीत असून, त्याने स्वतःचा सुमारे २० लाखांचा विमा काढला होता. त्या विम्याचा लाभ मिळवण्यासाठीच हा संपूर्ण कट रचण्यात आला. तपासात बनाव असल्याचे निष्पन्न या घटनेबाबत ३१ मे रोजी डायल १ ११२ वर जाफराबाद-चिखली रस्त्यावर अपघात होऊन कारला आग लागल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्या नंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, मृत व्यक्ती नितीन गवळी असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी जाफराबाद पोलिस २ ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, तपासात हा बनाव असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत नितीन गवळी याने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचून विमा रक्कम मिळविण्यासाठी व इतर कारणांमधून सुटका मिळवण्यासाठी संदीप चव्हाणचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. डीएनए तपासणीची प्रक्रिया सुरू आहे. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी डीएनए तपासणीची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणात आकाश गवळी आणि राजू फुलारे यांनी जबाब दिल्याची माहिती आहे. त्यानंतर पोकों निकम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. फरार आरोपी नितीन गवळी याच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आला.
0
0
Report

वाशीम में अवैध दारू पर कार्रवाई: 6.33 लाख रुपयों का माल जप्त

Washim, Maharashtra:वाशीम पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून जिल्ह्यात अवैध दारू व्यवसायाविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. स्थानिक गुन्हे शाखेने अनसिंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहगव्हाण येथील धरण परिसरात छापा टाकून 5 लाख 74 हजार 500 रुपयांचा मोहामाच सडवा व गावठी हातभट्टीची दारू जप्त करून नष्ट केली. आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. तसेच मानोरा तालुक्यातील कार्ली येथेण्यात आलेल्या कारवाईत 58 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण 6 लाख 33 हजार रुपयांचा अवैध दारूसाठा नष्ट करण्यात आला असून संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
0
0
Report
Advertisement

शहागंज में अतिक्रमण हटाव अभियान के दौरान जोरदार भिड़ंत

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर च्या शहागंज भागात महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान जोरदार राडा झाला. मनपाचे पथक कारवाई करत असताना अचानक काही हातगाडी चालक आणि दुकानदार आक्रमक झाले. त्यांनी पथकावर धावून जात थेट संघर्षाची भूमिका घेतली. या गोंधळात संतप्त व्यापाऱ्यांनी मनपा कर्मचाऱ्यांना अद्वातद्वा शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल यांनाही या व्यापाऱ्यांनी शिवीगाळ केली. या प्रकरणी रात्री उशिरा सिकंदर नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. या राड्याचे पडसाद रात्री उशिरापर्यंत उमटत राहिले. आपल्या नेत्याला झालेल्या शिवीगाळीची बातमी पसरताच ऋषिकेश जैस्वाल यांचे कार्यकर्ते जुन्या शहरात गोळा झाले. त्यामुळे मध्यरात्री शहागंज परिसरात दोन्ही गट आमनेसामने येण्याची चिन्हे निर्माण झाली आणि वातावरण तापले. शिवीगाळ करणाऱ्याला कार्यकर्त्यांनी चोप दिला. याचे देखील व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
0
0
Report

नासिक के दरीआई माता डोंगर पर भयानक आग, पर्यावरण प्रेमियों ने घातपात का आरोप

Nashik, Maharashtra:नाशिकमधील दरीआई माता डोंगरावर आज भीषण वणवा लागला. घातपाताचा संशय व्यक्त करत स्थानिकांनी तातडीने कारवाईची मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांतील हा सातवा वणवा आहे. वनविभाग, दरीआई माता वृक्षमित्र परिवार आणि स्थानिकांनी अनेक वर्षे जपलेली शेकडो झाडे जळून खाक झाली. मोर, ससे, पक्षी, सरडे यांसारखे अनेक वन्यजीव आगीत होरपळले. जैवविविधतेचे मोठे नुकसान झाले आहे. सलग सात वेळा एकाच भागात वणवे लागणे हा योगायोग नसून घातपात असल्याचा संशय पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला आहे. तातडीने पंचनामा करून अज्ञात व्यक्तींविरुद्ध FIR दाखल करावा. तसेच पिंपळ टेकडी, लोखंडे वस्ती, दरीआई माता डोंगर परिसरात कायम गस्त व CCTrap कॅमेरे लावावेत. तर दोषींवर भारतीय वन कायदा १९२७ व भादंवि कलम ४३५ अंतर्गत कठोर कारवाई करावी. अशी मागणी पर्यावरणप्रेमी करत आहेत
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top