icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement

नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य के जलाशय में कमल फूलों का उफान, पर्यटकों के लिए बोट-गाइड सेवा

Niphad, Maharashtra:अँकर:-जैवविविधतेसाठी देशभर प्रसिद्ध असलेल्या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य परिसरातील जलाशयात यंदा निसर्गाने अनोखी उधळण केली असून सुमारे अदीच एकर क्षेत्रफळाच्या बेटावर तब्बल दोन ते तीन हजार सहस्त्र कमळपुष्पे फुलली आहेत. विशेष म्हणजे जुलै-ऑगस्ट महिन्यात बहरणारी ही कमळपुष्पे यंदा मे महिन्यातच उमलल्याने पर्यटक आणि पक्षीप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे यंदा जलाशयातील जलस्तर दीर्घकाळ टिकून राहिल्यामुळे कमळपुष्पांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण झाले परिणामी गेल्या वर्षांच्या तुलनेत यावर्षी कमळफुलांचे प्रमाण जवळपास दुपटीने वाढल्याचे वन्यजीव विभागाकडून सांगण्यात आले आता हा फुलांचा बहर ऑक्टोबर महिन्यापर्यंत हंगाम सुरु राहणार आहे सहस्र कमळपुष्पांचा हा अद्भुत नजारा पर्यटकांना जवळून अनुभवता यावा यासाठी वन्यजीव विभागाच्या वतीने बोट व गाईडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे जास्तीतजास्त पर्यटकांनी या नैसर्गिक सौंदर्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव विभागाकडून करण्यात आले आहे
0
0
Report

यवला तालुक़े में सूखे से भूजल संकट, 33 गाँवों में पानी टैंकरों से पहुँचा

Yeola, Maharashtra:दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवला तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्याने भूजल पातळीत मोठी घट झाली असून पाणीस्रोत कोरडे पडल्याने अंकाई परिसरासह ३३ गावे आणि ३७ वाड्या-वस्त्यांवर भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे अंकाई येथील कोळस टेकडी, गोरख नगर, बोराडे वस्ती आणि गोरे वस्ती येथे विहिरी व बोरवेलनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने संबंधित भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून नागरिकांची तहान भागविण्यासाठी ३३ गावे आणि ३७ वाड्या-वस्त्यांवर ३३ टँकरांच्या माध्यमातून दररोज तब्बल ५५ फेऱ्या करून पाणीपुरवठा केला जात आहे
0
0
Report
Advertisement

दिव्यांग जीआर रद्द को लेकर बच्चू कडू ने मंत्रालय में आंदोलन का संकेत दिया

Amravati, Maharashtra:बच्चू कडू यांनी दिला 19 तारखेला मंत्रालयात आंदोलनाचा इशारा; दिव्यांगांसाठी बच्चू कडू पुन्हा आक्रमक. दिव्यांगाचा जीआर रद्द करा - बच्चू कडू यांची मागणी. दिव्यांगाच्या जीआर वरून शिवसेना नेते आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहे. त्यांनी 19 तारखेला मंत्रालयात आंदोलनाचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सचिवांशी बोललो. जो जीआर काढला यूटीआय कार्ड मिळत नाही तोपर्यंत पगार देऊ नये. हा चुकीचा निर्णय आहे तो शासन निर्णय रद्द झाला पाहिजे. दोन जीआर काढल्यामुळे 50 टक्के दिव्यांग बांधव मानधनापासून वंचित राहत आहेत. ही बाब अतिशय वाईट आहे, असं बच्चू कडू म्हणाले. अन्यथा 19 तारखेला आम्हाला मंत्रालयात आंदोलन करावे लागेल, असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे. यूटीआय कार्ड काढण्याची यंत्रणा सरकारकडे नाहीये त्यामुळे दिव्यांगणा ते कार्ड भेटत नाही जोपर्यंत कार्ड भेटणार नाही तोपर्यंत महिना चालू होणार नाही हे फार चुकीचा आहे तो जीआर रद्द केला पाहिजे अशी मागणी बच्चू कडू यांनी केली.
0
0
Report

राहाता हादसे में 13 वर्षीय ओंकार गायकवाड की मौत: आक्रोश के बीच तीन आरोपी गिरफ्तार

Shirdi, Maharashtra:राहाता शहरातील 13 वर्षीय ओंकार दिपक गायकवाड यांच्या अपघात प्रकरणाने परिसरात संतापाची लाट उफाळली आहे. कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेले ओंकार नाशिक येथे उपचारादरम्यान मृत्यू पावले. या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी राहाता पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करून जोरदार निषेध नोंदवला. नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात घुसून आक्रोश व्यक्त केला त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तिन आरोपींना अटक केली असून अपघातातील इरटीगा कार ताब्यात घेतलीय. राहाता शहरातील श्रीकृष्ण मंदिरासमोरील रस्त्यावर 7 मे रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. कारने दिलेल्या जोरदार धडकेत ओंकार गंभीर जखमी झाले होते. धडक दिल्यानंतर कार चालकाने गाडी पुन्हा रिव्हर्स घेऊन ओंकारच्या अंगावर घालण्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. जखमी अवस्थेत ओंकारला तातडीने नाशिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि ग्रामस्थ संतप्त झाले. ओंकारचा मृतदेह रुग्णवाहिकेतून थेट राहाता पोलीस ठाण्यासमोर आणण्यात आला. यावेळी नातेवाईकांनी आक्रोश व्यक्त करत आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. या वेळी पोलीस ठाण्यासमोर दीड ते दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. मयत ओंकार गायकवाड याचे वडील मयत ओंकार गायकवाड याची आजी परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. अखेर विभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. साऊंड बाईट – अमोल भारती, DYSP नातेवाईक आणि ग्रामस्थांचा वाढता रोष पाहता पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, शोकाकुल वातावरणात ओंकार गायकवाडवर अंत्यसंस्कार झाले. या घटनेमुळे संपूर्ण राहाता परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
0
0
Report

नांदेड के माष्टी में दो गुटों के संघर्ष में 7-8 घायल, पुलिस तैनात

Nanded-Waghala, Maharashtra:नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील माष्टी येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही जमाव आमनेसामने येऊन मारहाणीत लाठ्या काठ्याचा वापर करण्यात आला. मारहाणीत सात ते आठ जखमी झाले असुन जखमी मध्ये तीन महिलांचा समावेश आहे. गावातील सार्वजनिक जागेच्या वादातून हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान दोन्ही गटाच्या तक्रारी वरून कुंडलवाडी पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. एका गटातर्फे दिलेल्या फिर्यादीवरून ऍट्रॉसिटी आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोन्ही गटातील काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या घटने नंतर गावात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून गावात तनावपूर्ण शांतता आहे. टीप - माहितीस्तव - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक काढल्याने त्या रागातून मारहाण केल्याचा एका गटाचा आरोप आहे. तर शिवाजी महाराज यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागेत झेंडा लावण्यावरून वाद झाल्याचा दुसऱ्या गटाचा आरोप है.
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी के विधायक प्रमोद जठार के अनुसार 2029 तक भाजपा के प्रतिनिधि अधिक होंगे

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी भाजपचे आमदार प्रमोद जठार पत्रकार परिषद pointers पक्ष हा युतीत चालत नाही, शत प्रतिशत पक्ष वाढवायचा, हेच माझं काम 2029 मध्ये भाजपचे जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून येतील - प्रमोद जठार निवडणुकीच्या वेळेला ठरवलं जातं युतीत लढायचं की स्वतंत्र लढायचं On राजापूर बॉक्साईड प्रकल्प कोकणात येणारे प्रकल्प पर्यावरण पूरक असावेत बॉक्साईड प्रकल्पातून रोजगार निर्माण होणार आहे का ? बॉक्साईड प्रकल्पातून कुठलाही रोजगार मिळणार नाही त्यामुळे लोक त्याला विरोध करतात आमचीही तीच भूमिका रिफायनरीचा प्रकल्प आम्ही पळवून लावला रिफायनरीचा प्रकल्प अजूनही कोणाला कळला नाही बॉक्साइड प्रकल्पाला विरोध असेल तर सरकार या संदर्भात विचार करेल पर्यटनाच्या जिल्ह्यात खणीकर्मचे प्रकल्प येऊ नयेत आमदार म्हणून हा माझा आग्रह आहे On संदेश पारकर आम्ही कोणावर पाणी सोडलं नाही, सगळे आमचे आहेत संदेश पारकर यांच्याशी मी काही बोललो नाही पण त्यांना महायुतीत यायचं असेल तर त्यांचं स्वागत माझ्या पक्षाची दार उघडी On ऑपरेशन लोटस मी एवढा सौम्य की ज्या नारायण राणे यांच्या विरोधात निवडणूक लढलो त्याच नारायण राणे यांना सौम्यपणे मी माझ्या पार्टीत आणले त्यानुसार मी माझी पार्टी शत प्रतिशत करून टाकली त्यामुळे हा प्रयोग मी रत्नागिरीत करणार नाही असं नाही त्यासाठी माझ्या प्रयोगाला सुरुवात करू दे तिसऱ्या अंकानंतर भेटा दिग्दर्शक आलेला आहे रत्नागिरी थोडी वाट बघा भाजपचे आमदार प्रमोद जठार यांचं सूचक वक्तव्य कार्यकर्त्यांचा आमदार म्हणून भाजपने माझं नाव विधान परिषदेसाठी दिलं कार्यकर्त्यांची समन्वयाची जबाबदारी माझ्याकडे
0
0
Report

कराड के पास पुणे-बेंगलुरु मार्ग पर नदी बन गया, मुसलाधार बारिश से यातायात प्रभावित

Satara, Maharashtra:पुणे बेंगलोर महामार्गाला कराड तालुक्यातील उम्ब्रज जवळ नदीचे स्वरूप आल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. साताऱ्यातील कराड व पाटण तालुक्याला आज पुन्हा अवकाळी पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे महामार्गाला अक्षरशः नदीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे पाहायला मिळाले. या महामार्गावर वाहनधारक जीव मुठीत घेऊन प्रवास करात असताना दिसत आहे. लहान वाहने अर्धी पाण्यात बुडत होत्या. दुपारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे महामार्गावर पाच किलोमीटरवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कराड उंब्रज कासेगाव या ठिकाणी सुरू असल्या रस्त्याच्या कामामुळे व ठेकेदाराच्या चुकीच्या कामाचा प्रत्यय आजच्या पावसाने आला आहे.
0
0
Report
Advertisement

यवला में किसान दंपति पर अज्ञात व्यक्ति का एसिड हमला, हालत गंभीर

Yeola, Maharashtra:येवला ब्रेक येवला तालुक्यातील देवळाणे येथे शेतकरी दाम्पत्यावर मध्यरात्री ऍसिड हल्ला.... ऍसिड हल्ल्यात शेतकरी दांपत्य गंभीर जखमी.... एकाची प्रकृती चिंताजनक..... अँकर:- नाशिकच्या येवला तालुक्यातील देवळाणे येथे बोराडे वस्तीवर रात्री साडे अकराच्या सुमारास शेतकरी भाऊसाहेब बोराडे व त्यांच्या पत्नी कांता बोराडे घराच्या टेरेसवर झोपेमध्ये असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर ऍसिड फेकले अशी तक्रार पोलिसात करण्यात आली है या घटनेत दोघे पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर येवल्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती नाशिकचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी एस स्वामी यांना कळताच त्यांनी तातडीने रुग्णालयात भेटून जखमींची विचारपूस केली प्रसंगी मनमाड पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन, तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक हे देखील उपस्थित होते दरम्यान अज्ञात व्यक्ती विरोधात येवला तालुकापोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक तयार केले असून घटनास्थळी श्वानपथक, फॉरेन्सिक लॅब तज्ञांनी भेट दिली असून सर्व बाजूने या घटनेचा कसून तपास केला जात आहे या घटनेमुळे येवला तालुक्यात खळबळ उडाली असून ऍसिड हल्ल्या मागचे कारण काय याचा पोलीस आता शोध घेत आहे बाईट :-भाऊसाहेब बोराडे, (ऍसिड हल्ल्यातील जखमी शेतकरी) बाईट:- (कांता बोराडे ,ऍसिड हल्ल्यातील जखमी महिला शेतकरी) बाईट :- डॉ, सुजित सोनवणे (संजीवन हॉस्पिटल येवला) बाईट :- बाजीराव महाजन ( उपविभागीय पोलीस अधिकारी)
0
0
Report

मुंबई-गोवा महामार्ग पर क्लिष्ट ट्रैफिक, संगमेश्वर पुल के अधूरे काम से दो किमी लम्बी कतारें

Ratnagiri, Maharashtra:संगमेश्वर - रत्नागिरी.. मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा.. महामार्ग रुंदीकरणाच्या अर्धवट कामांमुळे वाहतुकीचा खोळंबा.. मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर शास्त्री नदीवरील पुलाच्या अर्धवट स्थितीत असलेल्या कामांमुळे महामार्गावर दोन किलोमीटरच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत.. त्यात पडलेल्या पावसामुळे रस्ता चिखलमय झाल्यामुळे या चिखलातूनच वाहनांना प्रवास करावा लागतोय.. अगदी संथ गतीने या ठिकाणी वाहतूक सध्या सुरू आहे.. गेल्या अर्धा तासापासून ही वाहतुक ठप्प झाली आहे..
0
0
Report

राज ठाकरे-मनोज जरांगे पर सदावर्ते का हमला: ज्वलनशील पदार्थ पर खुली बहस

Jalna, Maharashtra:जालना :ऑईल फेकीनंतर सदावर्ते यांची प्रतिक्रिया.. अँड गुणरत्न सदावर्ते यांची राज ठाकरेंसह मनोज जरांगेंवर टिका राज ठाकरे तुला सांगतो आजचा प्रकार तुझ्या माणसांनी माझ्या गाडीवर ज्वलनशील पदार्थ टाकला, त्यांचा जाळण्याचा उद्देश होता का? जालन्यामध्ये झालेल्या शाईफेक प्रकरणावरून सदावर्ते यांचा राज ठाकरे आणि मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप राज ठाकरे मी तुला आव्हान करतो की तू सांग मी म्हणशील तिथे येतो वैचारिक चर्चा करू मी डंकी की चोट पर हेच म्हणेल की राज ठाकरे वैचारिक लढण्याची कुवत संपली का रे बाबा ... मनोज जरांगे वैचारिक लढण्याची कुवत संपली का रे बाबा. ... यांचे जे काही संवेदनशील आणि अप-परवृत्तिचे विचार आहे... लोकशाहीच्या विचारणं जी माणसं प्रेरित असतात ती अशा लोकांसमोर वाकत नसतात. कारण आम्ही वाळू वाले नाही आणि टन टन टोलवाले सुद्धा नाही ...असं म्हणत शाही फेक केल्यावरून गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली .. आज जो काही प्रकार घडला आहे तो ज्वलनशील पदार्थ आहे, तो ऑइल आहे, त्यांचा जाळायचा उद्देश होता का यामध्ये मनोज दरांगे आणि राज ठाकरे यांच्या अप परावर्त विचाराचे आणि अर्ध्या हळकुंडाने धुतलेले, पावशेरी पिलेले होते का राज ठाकरे यांचे दूध खुळे विचार आणि मनोज जरांगे यांचे कुचे विचार या दोन्ही विचारांसमोर आम्ही थांबणारे आणि थकणारे नाहीत. बाईट - ॲड. गुणरत्न सदावर्ते
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top