445001
यवतमाळच्या आर्णीत भाजपाची पहिली यादी, आमदाराचा नामांचा गहजब!
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या आर्णी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत विद्यमान आमदाराचे नाव नाही. यामुळे महायुतीतील शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केला आहे. तिन्ही तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन उपजिल्हाप्रमुख विष्णू उकंडे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. पालकमंत्री संजय राठोड यांचेही या जागेसाठी आग्रह आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, जागा सुटली नाही तरी शिवसेना उमेदवार निवडणूक लढवेल.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
विठ्ठल मंदिर को 5 टन रंगीन फूलों से सजाया गया; कमल भी शामिल
Pandharpur, Maharashtra:आषाढी एकादशीसाठी विठुरायाचं मंदिर तब्बल 5 टन विविधरंगी फुलांनी सजवलं जातय. यासाठी पुण्यातील विठ्ठल भक्त भरत भुजबळ यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर वेगवेगळ्या प्रकारची फुलं मागवली असून खास कमळाच्या फुलांचा सुद्धा या सजावटीमध्ये वापर केला आहे मंदिर चौखांबी सोळखांबी संत नामदेव महाद्वार पश्चिम द्वार उत्तर द्वार विठ्ठल रुक्मिणी सभा मंडप या ठिकाणी ही सजावट करण्यात आली आहे.0
0
Report
यवतमाळ के किसान ज्ञानेश्वर मालेकर ने कर्ज के बोझ से आत्महत्या कर ली
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या पिंपळापुर येथील शेतकरी ज्ञानेश्वर मालेकरांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्याकडे पाच एकर शेती असून सततच्या नापिकेमुळे त्यांच्यावरील कर्जाचा डोंगर वाढला होता. त्यामुळे ते प्रचंड नैराश्येत होते. ज्ञानेश्वर मालेकर यांच्या दोन मुलांनी देखील दोन वर्षांपूर्वी शेतीतील अडचणेमुळे आत्महत्या केली होती. आता त्यांच्या वडिलांनी देखील आत्महत्या केल्याने मानेकर कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.0
0
Report
फलटण में तेज़ गति कार दुर्घटना: तीन युवकों की मौत, तीन गंभीर घायल
Satara, Maharashtra:TUSHAR TAPASE 3 FILES SLUG NAME -SAT_PHALTAN_ACCIDENT अँकर :सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात भरधाव वेगाने धावणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारचा भीषण अपघात होऊन या अपघातात तिघा तरुणांचा जागीच मृत्यू, तर तिघेजण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वाठार-निंबाळकर हद्दीत कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने वाहन रस्त्यालगतच्या नाल्यावरील कठड्याला जोरात धडकून पलटी झाले. अपघातावेळी कारमध्ये एकूण सहा जण प्रवास करत होते. भरधाव वेगामुळे वळणाचा अंदाज न आल्याने कारवरील ताबा सुटून हा भीषण अपघात झाला. फलटण ग्रामीण पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.0
0
Report
Advertisement
गोदावरी में उच्च विसर्ग, जायकवाडी के लिए 8.68 टीएमसी पानी—बाढ़ की चेतावनी
Niphad, Maharashtra:गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी, नाशिक आणि निफाड तालुक्यात मुसळधार तर कधी संततधार पाऊस कोसळत असल्याने दारणा गंगापूर आणि पालखेड धरणातून तसेच गोदावरीच्या उपनद्यातून पुराचे पाणी निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दाखल होत असल्याने नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडी च्या दिशेने गोदावरी नदी पात्रात आठ व प्रकार गेटच्या माध्यमातून 88 हजार क्यूसेक पाण्याचा या पावसाच्या हंगामातील उच्चांकी विसर्ग सुरू आहे मोठा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीने रुद्र रूप धारण केले आहे यामुळे प्रशासनाच्या वतीने गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे तर या पावसाच्या हंगामात आज सकाळी सहा वाजेपर्यंत नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने 8.68 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने जायकवाडी धरणाच्या लाभ क्षेत्रातील गावांना पिण्यासाठी आणि सिंचनासाठी फायदा होणार आहे Yासंदर्भात धरण क्षेत्रातून आढावा घेतला है0
0
Report
आषाढ़ी एकादशी पर 24 घंटे की भव्य दर्शन कतार, भक्तों में उमंग
Pandharpur, Maharashtra:आषाढीच्या एकादशी आदल्या दिवशीच भाविकांना पदस्पर्श दर्शनासाठी लागतात तब्बल 24 तास, विठोबाचे दर्शन झाल्यानंतर आता भाग शीण थकवा निघून जाईल अशी भावना दर्शन रांगेत आलेल्या वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे.0
0
Report
सोलापुर में दूषित पानी से महिला की मौत, 40-50 लोग प्रभावित
Solapur, Maharashtra:सोलापुर शहरामध्ये दूषित पाणी पिल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे। शहरातील एस बी आयकॉन अपार्टमेंट मधील 40 ते 50 रहिवाशांना दूषित पाणी पिल्याने उलटी- जुलाबाचा त्रास होत असल्याची माहिती प्राथमिक तपासणीत समोर आली आहे। बोरच्या पाण्यात गटारीचे पाणी मिसळल्याने गंभीर प्रकार घडल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे। एकाच अपार्टमेंटमधील अनेकांना त्रास होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे। उलटी, जुलाब, पोटदुखीचा त्रास होणाऱ्या नागरिकांवर महापालिका आरोग्य विभागाकडून उपचार सुरू आहेत.0
0
Report
Advertisement
हंगामे के बीच छह कृषि केंद्रों के लाइसेंस रद्द, 53 केंद्र निलंबित
Bhandara, Maharashtra:नियमभंग करणाऱ्या सहा कृषी केंद्रांचे परवाने कायमचे रद्द,५३ कृषिकेंद्रांचे परवाने निलंबित. भंडारा जिल्ह्यात खरीप हंगाम सुरू होताच बियाणे खते व कीटकनाशकांच्या गुणवत्तेबाबत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागाने भरारी पथकाच्या माध्यमातून धाड मारत कृषी केंद्रावर कार्यवाही केली आहे.यामध्ये सहा कृषी केंद्रांचे परवाने कायमचे रद्द व ५३ निलंबित करण्यात आले आहेत. जिह्यात सध्या ८६२ बियाणे व खत विक्री कृषी केंद्र व ७५४ कीटकनाशक विक्रेते नोंदीकृत आहे.यापैकी ८०२ कृषी केंद्रांची तपासणी पूर्ण झाली आहे.यामध्ये नियमभंग करणाऱ्या सहा कृषी केंद्रांचे परवाने कायमचे रद्द करण्यात आले असून ५३ केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.या धडक कार्यवाही मुळे ऐन हंगामात कृषी केंद्र चालक धास्तावले आहेत.0
0
Report
आरापूर एमआईडीसी: किसानों के मुआवजे पर संघर्ष, जिला-प्रशासन की बैठक अगले सप्ताह
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर मध्ये नव्याने होणाऱ्या आरापूर औद्योगिक वसाहतीसाठीची काही भागाची मोजणी पूर्ण झाली असली तरी शेतकऱ्यांच्या मोबदल्याच्या मागणीनंतर दराबाबत कोंडी कायम आहे. ही कोंडी सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि एमआयडीसीचे अधिकारी शेतकऱ्यांची मनधरणी करणार आहेत. यासंदर्भात येत्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीला आमदार प्रशांत बंब, एमआयडीसी, महसूल विभागातील अधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे. शहरापासून २२ किमी असलेल्या आरापूर येथे ७६२ हेक्टर जागेवर एमआयडीसी उभारण्यात येणार आहे. या प्रस्तावित एमआयडीसीसाठी बहुतांश मोजणीही पूर्ण झाली असून, या संदर्भात काही आठवड्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांसोबत मोबदल्यासंदर्भात बैठक घेण्यात आली होती.0
0
Report
डीपीसी हर काम के जियो टैगिंग से भ्रष्टाचार पर रोक, राज्यभर में लागू
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून होणाऱ्या प्रत्येक विकासकामाचा अचूक आणि पारदर्शक लेखाजोखा ऑनलाइन ठेवण्यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. एकाच कामासाठी वेगवेगळ्या यंत्रणांकडून परस्पर निधी लाटण्याच्या प्रकार रोखण्यासाठी आता डीपीसीच्या प्रत्येक कामाचे जिओ टॅगिंग बंधनकारक केले आहे. 'कामाचे जिओ टॅगिंग आणि 'महा युनिव्हरसल आयडी' प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत बिल दिले जाणार नाही, याची अंमलबजावणी आता छत्रपती संभाजी नगरात सुरू झाली आहे... धुळे जिल्ह्यात हा उपक्रम पथदर्शी प्रकल्प म्हणून राबवला होता. तेथे भ्रष्टाचाराला लागूलेला चाप पाहून आता छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ही प्रणाली लागू केली आहे. महापालिका आणि ग्रामीण भागातील हद्दीत डीपीसीच्या निधीतून झालेल्या प्रत्येक लहान-मोठ्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून त्याचे जिओ टॅगिंग करण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे.0
0
Report
Advertisement
मालेगाव-उमरठी अवैध हथियार नेटवर्क का बड़ा पर्दाफाश पुलिस ने
Nashik, Maharashtra:मालेगाव ( नाशिक ) विशाल मोरे - कोम्बिंग ऑपरेशनमध्ये हिफजू इद्रीसच्या कनेक्शनचा उलगडा - धुळे, जळगाव, आणि मालेगावच्या पोलिसांकडून मध्यप्रदेशात कोम्बिंग ऑपरेशन... - पोलिसांकडून देशी कट्ट्याच अवैध शस्त्र पुरवठा कनेक्शन उध्वस्त उमरठी गावाबाबत माहिती लोकसंख्या सुमारे दोन हजाराच्या आसपास आहे. उमरठी हे दोन गावे असून एक गाव महाराष्ट्रात तर दुसरे गाव मध्य प्रदेशात येते, मध्य प्रदेशात उमरठी गाव हे डोंगराळ भागात आहे. या गावात काही जण घरातच गावठी कट्टे बनवतात. तेव्हा पोलिसांनी पहाटेच्या सुमारास 400 पोलिसांसह हे कॉम्बिंग ऑपरेशन राबविले. याठिकाणी 45 संशयितांच्या घरांची झडती घेतली, 20 व्यक्तीची चौकशी केली. 12 संशयीतांकडून दोन देशी कट्टे, चार जिवंत काडतूस तसेच कट्टे तयार करण्यात येणारा कच्चा माल व साहित्य जप्त केले आहे. 27 फरार संशयितांच्या घरांची जिओ टॅगिंग करण्यात आली. बाईट: सिद्धार्थ बरवाल, DYSP मालेगाव0
0
Report
सावित्री नगर में भटकते कुत्तों का आतंक, CCTV में कैद घटना, लोगों में भय
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:सावित्रीनगरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; घटना सीसीटीव्हीत कैद ANC : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रभाग क्रमांक ९ मधील सावित्री नगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास पुन्हा एकदा समोर आला आहे. गजानन महाराज मंदिर रोडवर एका भटक्या कुत्र्याने रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीच्या पायाला चावा घेतल्याची घटना घडली असून हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेकडे केली आहे.0
0
Report
कासारसाई डैम 94% भर गया; 300 क्यूसेक विसर्जन, नदी किनारे सतर्कता जारी
Varsoli, Maharashtra:कासारसाई डैम 94% भर गया; 300 क्यूसेक विसर्जन शुरू. पवना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. मावळ आणि मुळशी तालुक्यासाठी महत्त्वाचं असलेलं कासारसाई धरण आता 94 टक्के भरलं असून धरणातून सध्या 300 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हा विसर्ग थेट पवना नदीपात्रात सोडला जात असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. कासारसाई धरणावरून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी यांच्याकडून.0
0
Report
Advertisement
कोल्हापुर में बारिश घट, पंचगंगा नदी जलस्तर 6 इंच घटकर 31 फुट 9 इंच
Kolhapur, Maharashtra:Kolhapur जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे, पंचगंगा नदीची पाणी पातळी 6 इंचांनी कमी झाली आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 31 फूट 9 इंच इतकी झाली आहे. रात्री हीच पाणी पातळी 32 फूट 3 इंच इतकी होती. असे असले तरी जिल्ह्यातील 29 बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू झाल्याने चिंतेत असणारा बळीराजा काहीसा सुखावला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील याच पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी。0
0
Report
मावल तालुक़े में खरीफ पिक बीमा के लिए किसानों में जबरदस्त उत्साह
Varsoli, Maharashtra:मावळ तालुक्यात खरीप हंगाम 2026 साठी पंतप्रधान पिक विमा योजना सुधारित लागू करण्यात आली असून त्या अंतर्गत भात, सोयाबीन, भुईमूग पिकासाठी पिक विमा भरण्याच्या कामाला वेग आला आहे. मौजे शिरगांव येथे कृषि अधिकारी विकास गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पिक विमा भरण्याचे प्रगती पथावर आहे. शिरगांव आणि परिसरातील गावामध्ये विविध कार्यकारी सोसायटी, ग्रामपंचायत, कृषि सेवा केंद्र, दूध संकलन केंद्रावर पिक विमा भरण्याबाबत प्रचार प्रसिद्धी करण्यात येत आहे. पिकांचे नैसर्गिक आपत्ती, वातावरणातील बदल यामुळे पिकांचे नुकसान होते त्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या पिकासाठी सुरक्षा कवच हे पिक विमा भरल्यामुळे मिळते त्यामुळे शेतकऱ्यांनी हे पीक विमा भरण्यासाठी गर्दी केली आहे.0
0
Report
औंढे में विद्युत तार टूटने से तीन जानवरों की मौत
Varsoli, Maharashtra:मावळ तालुक्यात मागील काही दिवसाहून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वीजवाहक तारा तुटून पडण्याच्या घटना घडत आहेत. त्यातच औढे गावात मुसळधार पाऊस व वाऱ्यामुळे महावितरणची ओव्हरहेड वीजवाहक तार तुटून शेतात पडली. या तारेच्या संपर्कात आल्याने एक दुभती गाय, एक वासरू आणि एक रेडा अशा तीन जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही जनावरे औढे गावातील नारायण मांडकेर यांच्या मालकीची असून, या दुर्घटनेमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. महावितरण कंपनीने या घटनेची दखल घेऊन संबंधित शेतकऱ्याला तातडीने योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पीडित शेतकऱ्यांनी केले आहे.0
0
Report
Advertisement
