445001
यवतमाळच्या आर्णीत भाजपाची पहिली यादी, आमदाराचा नामांचा गहजब!
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या आर्णी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत विद्यमान आमदाराचे नाव नाही. यामुळे महायुतीतील शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केला आहे. तिन्ही तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन उपजिल्हाप्रमुख विष्णू उकंडे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. पालकमंत्री संजय राठोड यांचेही या जागेसाठी आग्रह आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, जागा सुटली नाही तरी शिवसेना उमेदवार निवडणूक लढवेल.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
शेवगाव में पति ने नहीं लौटी पत्नी के कारण बिजली तार पर चढ़कर किया जोखिमपूर्ण प्रदर्शन
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या शेवगाव शहरातील इंदिरानगर परिसरात एका व्यक्तीने विद्युत पोलवर चढून विद्युत तारेला झोका खेळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय... माहेरला आलेली पत्नी वापस येत नसल्याने तारेवर चालण्याचा अनोखा प्रताप या व्यक्तीने केला असल्याचं सांगितलं जात आहे... संबंधित व्यक्ती कर्जत येथील असल्याची माहिती आहे... तसेच त्याची मानसिक स्थिती खराब असण्याची शक्यता वर्तवली जात आहे... या व्यक्तीने विद्युत तारेला स्पर्श केला, त्यावेळी सुदैवाने त्यावेळी विद्युत पुरवठा बंद होता, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली... घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले... नागरिकांच्या मदतीने जेसीबीच्या साहाय्याने त्याला खाली उतरवण्यात आले... त्याला पुढील चौकशीसाठी शेवगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून, त्याने हे कृत्य का केले? या बद्दल चौकशी सुरू आहे... संबंधित व्यक्तीचे नाव सुनिल बर्डे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.0
0
Report
अकोला Lines चौक पर डिक्की से नौ लाख रुपए चोरी, CCTV में तीन संदिग्ध
Akola, Maharashtra:अकोला शहरातील सिव्हिल लाईन चौकात दुचाकीच्या डिक्कीतून तब्बल नऊ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे..चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, या फुटेजमध्ये तब्बल तीन आरोपी दिसून येत आहेत.विशेष म्हणजे रात्री सव्वानौ वाजताच्या सुमारास, वाहतूक सुरू असतानाच आणि सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर ही चोरी झाली आहे... त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.रस्त्यावर नेहमीप्रमाणे वाहतूक सुरू आहे आणि याच गर्दीचा फायदा घेत तीन आरोपी दुचाकीच्या दिशेने येतात. लोखंडी रॉडच्या सहाय्याने दुचाकीची सीट तिरकी करून डिक्की उघडण्यात येते... आणि डिक्कीत ठेवलेली तब्बल नऊ लाख रुपयांची रोकड लम्पास केली जाते हा संपूर्ण पार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.अवघ्या काही क्षणांत चोरी करून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. रात्री सव्वानौच्या सुमारास घडलेली ही घटना सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवरही या घटनेनंतर सवाल उपस्थित होत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. फुटेजमध्ये कैद झालेल्या तीन संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कामाला लागली आहेत.0
0
Report
चाकण में बस ने दुचाकी को टक्कर दी, पति-पत्नी और दो बच्चे घायल
Shirur, Maharashtra:पुणे-नाशिक महामार्ग पर चाकण में बस ने समोर से आ रही दुचाकी को धक्का दिया जिससे भीषण अपघात हुआ। दुचाकी पर सवार पति-पत्नी और उनकी दो बच्चों के साथ बस ने टक्कर मारी। दुर्घटना में पति-पत्नी और उनकी दो बच्चों की हालत गंभीर है और उनकी स्थिति चिंताजनक है। घायलों को कोर हॉस्पिटल में इलाज़ जारी है। इस मामले में, बस चालक पर नशे में वाहन चलाने का आरोप है और पुलिस ने चालक को हिरासत में लिया है।0
0
Report
Advertisement
चिपळूण-माणगांव में गणेश उत्सव यात्री भारी जाम के शिकार
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण - रत्नागिरी.. ब्रेकिंग न्यूज: गणेशोत्सवासाठी निघालेल्या कोकणवासीयांचा यंदाही खडतर प्रवास; मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण आणि माणगावमध्ये वाहनांच्या २ किलोमीटर लांब रांगा!.. अँकर गणेशोत्सवासाठी गावी निघालेल्या कोकणवासीयांचा प्रवास यंदाही प्रचंड तापदायक ठरत असून मुंबई-गोवा महामार्गाच्या अर्धवट कामाचा मोठा फटका गणेशभक्तांना बसतो आहे.. आधी माणगाव आणि आता चिपळूणमध्ये प्रवाशांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे.. चिपळूणमधील बहादूर शेख नाक्यावरील उड्डाणपुलाचे काम रखडल्यामुळे वाशिष्टी पुलापासून ते थेट कळंबस्ते नाक्यापर्यंत तब्बल दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.. आधीच ८ ते १० तासांचा प्रवास करून आलेल्या कोकणवासीयांना या धीम्या गतीमुळे तासनतास एकाच जागी अडकून पडावे लागत असून प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.. महामार्गावरील या भीषण वाहतूक कोंडीची बोलकी दृश्ये थेट ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून समोर आली आहेत..0
0
Report
चंद्रपुर में डीजे डेसिबल चेक, पुलिस पास दिखाए; उत्सव में सख्त पालन की अपील
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुरात उत्सवादरम्यान डीजेच्या आवाजासंदर्भात पोलिसांनी केली डेसिबल तपासणी, पहिल्या परीक्षेत डीजे चालक और साउंड ऑपरेटर झाले पास, आगामी काळातही अशाच पद्धतीने सहकार्य करावे पोलीस विभागाचे आवाहन. चंद्रपूर शहर मनपा हद्दीत गेले काही दिवस जन्माष्टमी, श्री गणेश आगमन यासह पोळा उत्साहात साजरा झाला. या उत्सवादरम्यान पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निश्चित करण्यात आलेल्या वाद्य आणि ध्वनिवर्धन यंत्रांच्या डेसिबलची तपासणी केली. चंद्रपूर शहरातील गांधी चौकात चंद्रपूर पोलिसांनी केलेली तपासणी नियमांचे पालन करणारी असल्याचे आढळून आले. आगाम गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या आवाजासंदर्भात निर्देशांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन चंद्रपूर पोलिसांनी केले आहे.0
0
Report
सातारा: जयकुमार गोरे ने मराठा आंदोलन के लिए संविधान की सीमा में समाधान पर जोर
Satara, Maharashtra:सातारा: ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलনের प्रतिक्रिया दिली आहे. राज्य सरकारने मराठा समाज बांधवांना न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी नेहमीच सातत्याने भूमिका घेतली आहे. या आंदोलनावर चर्चा आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच मार्ग निघू शकतो. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, आंदोलनात कोणतीही आचारसंहिता किंवा कायदा बाह्य प्रकार घडणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी आणि शासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.0
0
Report
Advertisement
जोगेश्वरी में इडली में कीड़ा मिलने का वीडियो वायरल, नागरिक फेरीवालों से सावधान
Mumbai, Maharashtra:जोगेश्वरीत इडलीमध्ये किडा आढळल्याचा दावा; नागरिकांना फेरीवाल्यांकडून खाद्यपदार्थ न घेण्याचं आवाहन मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील मजासवाडी भागात इडलीमध्ये किडा आढळल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. स्थानिक रहिवाशाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरोघरी जाऊन इडली विक्री करणाऱ्या एका फेरीवाल्याकडून संबंधित व्यक्तीने इडली खरेदी केली होती. मात्र, इडली खात असताना त्यामध्ये किडा आढळल्याचा दावा या व्यक्तीकडून करण्यात आला आहे. यानंतर त्याने इडली आणि त्यामध्ये आढळलेल्या किड्याचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला. या घटनेनंतर संबंधित व्यक्तीकडून परिसरातील नागरिकांना फेरीवाल्यांकडून खाद्यपदार्थ खरेदी करताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. विशेषतः घरोघरी विक्री केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची स्वच्छता आणि गुणवत्ता तपासण्याची गरज असल्याचंही सांगण्यात येत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओची अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही. इडलीमध्ये नेमकं काय आढळलं, खाद्यपदार्थ कुठे तयार करण्यात आला होता आणि या प्रकरणी संबंधित प्रशासनाकडून कोणती कारवाई करण्यात आली आहे, याबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी खाद्यपदार्थ खरेदी करताना सतर्क राहावं, असं आवाहन करण्यात येत आहे.0
0
Report
रोहित पवार ने मुंबई आंदोलन पर सरकार को चेतावनी दी, मराठा आरक्षण पर नया संघर्ष शुरू?
Latur, Maharashtra:मनोज जरांगे पाटलांच्या मुंबई आंदोलनावर आ. रोहित पवारांचा राज्य सरकारला सल्ला... मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याची भूमिका जाहीर केलीय... त्यामुळे सरकारसमोर पुन्हा एकदा मोठं आव्हान उभं राहिलंय...दरम्यान, जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनापूर्वीच सरकारने चर्चेतून मार्ग काढावा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिलाय... लातूरमध्ये एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर रोहित पवार बोलत होते... अजूनही वेळ गेलेली नाही... सरकारने आजच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट करावी आणि चर्चेतून तोडगा काढावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केलीय... जरांगे पाटील मुंबईत आंदोलनासाठी गेल्यास आंदोलकांसोबतच मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो... त्यामुळे परिस्थिती चिघळण्याआधीच सरकारने पुढाकार घेऊन चर्चा करावी, अशी भूमिका रोहित पवार यांनी मांडलीय...0
0
Report
सोलापूर के सांगोलात दुष्काळ में टेंभू योजना के अधिकारी उदासीन, लाखों लीटर पानी बर्बाद
Pandharpur, Maharashtra:सोलापूरच्या सांगोल्यात दुष्काळी परिस्थिती मात्र टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांच्या उदासीनते मुळे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याच वास्तव समोर आले आहे. सांगोला तालुक्यातील निजामपूर, अकोला वाटम्बरे लोणविरे जवळा गावातील शेतकऱ्यांना टेंभू योजनेचे पाणी आवर्तन सुरू आहे. टेल टू हेड असा पाणी वाटपाचा नियम असताना. काही शेतकऱ्यांनी योजनेचे व्हॉल्व तोडून पाणी घेतल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांच्या नियोजन शून्य कार्यपद्धती आणि उदासीनते मुळे ऐन दुष्काळ परिस्थितीत लाखो लिटर पाणी वाया जात आहे. टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांनी मात्र बघतो करतो अशी भूमिका घेतली आहे。0
0
Report
Advertisement
मोरबे डैम के पानी पर गणेश नाईक बनाम प्रशांत ठाकूर के बीच तकरार
Navi Mumbai, Maharashtra:मोरेबे धरणाच्या पाण्यावरून वनमंत्री गणेश नाईक आणि भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांच्यात जुंपली. मोरबेचे पाणी गणेश नाईकांनी आम्हाला देऊ नये पण नवी मुंबईकर गरजेपेक्षा जास्त पाणी वापरत आहेत असे सिडको म्हणत असेल तर जबाबदारी घेऊन पनवेलवासियांना पाणी उपलब्ध करुन द्यावे अन्यथा आम्ही राज्यसरकारकडे न्याय मागणार तसेच गणेश नाईक नवी मुंबईकरांच्या हिताचं बोलत असतील तर मी पनवेलकरांच्या हिताचं बोलणार अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केलेय. तर याला वनमंत्री गणेश नाईक यांनी सडेतोड उत्तर देत अडचणीच्या वेळी टँकरने काही दिवस पाणी पुरवठा करू मात्र पाईपलाईनने पाणी देणार नाही असे ठामपणे सांगितलेय. तर पाण्याची पाईपलाईन पनवेल मधूनच जाते असे म्हणणाऱ्यांना देखील गणेश नाईकांनी सडेतोड उत्तर देत कुठल्याही सुशिक्षित माणसाची ही भाषा नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केलेय.0
0
Report
यवतमाळ: डीजे से स्वास्थ्य पर असर, राठोड ने डीजे बंदी के निर्देश दिए
Yavatmal, Maharashtra:डीजेच्या आवाजात नाचल्यामुळे आपल्याला ऐकायला कमी येत असल्याचं मंत्री संजय राठोड यांनी सांगितले आहे. यवतमाळ मध्ये शांतता समितीच्या बैठकीत त्यांनी सार्वजनिक उत्सव मंडळाच् पदाधिकाऱ्यांसमोर ही आपबीती सांगितली. मतदार संघात कार्यकर्त्यांनी डीजेच्या समोर नाचण्याचा आग्रह धरला, मात्र त्यामुळे ऐकायला कमी येऊ लागले असे संजय राठोड यांनी सांगितले. कानठळ्या वाजवणाऱ्या डीजेचे हे दुष्परिणाम आहेत, त्यामुळे आगामी सन उत्सवाच्या काळात कुठल्याही मंडळाने डीजे, बँजो वाजवला तर जप्त करा... डीजे सुरू ठेवण्याबाबत पोलिसांना कुठल्याही राजकीय भाऊ, दादांचा फोन आला तर पोलिसांनी दबावात न येता कारवाई करा....असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. कुठल्याही मंडळापर्यंत डीजे पोहोचण्याच्या आधीच नाकाबंदी करून डीजे जप्त करा, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.0
0
Report
मुंबई-गोवा मार्ग पर ट्रैफिक जाम के बीच सरकार ने राहत और सुविधाओं का दावा
Navi Mumbai, Maharashtra:आज सगळ्यात जास्त गाड्या आणि वाहतूक कोकणाकडे आहे. एसटीच्या 5200 गाड्यांची बुकिंग आहे रेल्वेची वेगळी आहे प्रायव्हेट गाड्या वेगळे आहेत स्वतःच्या गाड्या वेगळ्या आहेत आणि एवढी वाहतूक ज्या वेळेला एका रस्त्याला जाते त्यावेळेला थोडीफार होईल परंतु पूर्वीसारखी अडचण या वेळेला नाही आहे. आम्ही दहा ठिकाणी सुविधा केंद्र उभारले आहेत. जर कुठे ट्राफिक थांबली तर त्या ठिकाणी चहापाणी औषध आणि शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे कोणाची अडचण होणार नाही एवढी काळजी शासनाने आणि आम्ही घेतली आहे. मनोज जरांगे मुंबईला आले तरी काही हरकत नाही आणि नाही आले तरी काही हरकत नाही. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळेच त्यांच्या ज्या काही योग्य मागण्या आहेत त्या देण्याला तयार आहोत. शासनाच्या माध्यमातून सरकार देऊ शकतं ते आम्ही द्यायला तयार आहोत. आता परवा गणेशोत्सव आहे सर्वत्र मंडप घातलेले असतात मोठ्या प्रमाणावर गर्दी असते हे पाहून मनोज जरांगे यांनी गणेशोत्सवात थोडं पाठीपुढे सरकावं. कोणावरही अन्याय न होता मराठ्यांना योग्य न्याय द्यायचा आहे तो देण्यासाठी आमचे सरकार कटीबद्ध आहे.0
0
Report
Advertisement
गणेशोत्सव के दौरान मुंबईकरों को कोई परेशानी नहीं होगी; मनोज जरांगे मुंबई नहीं आयें—उदय सामंत का आह्वान
Ratnagiri, Maharashtra:गणेशोत्सवात मुंबईकरांना अडचण नको; मनोज जरांगेंनी मुंबईत येऊ नये – उदय सामंत यांचे आवाहन.. मंत्री उदय सामंत pointer दापोली प्रकल्पाबाबत: दापोलीतील प्रकल्पाबाबतची प्राथमिक माहिती माध्यमांकडूनच समोर आली आहे.. हा प्रकल्प नेमका कधी, कुठे आणि कसा येणार आहे,याची सर्व तांत्रिक माहिती आधी तपासून घेतली जाईल आणि त्यानंतरच त्यावर अधिकृत भाष्य केले जाईल.. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर: मनोज जरांगे पाटील यांना शासनाकडून यापूर्वीही वारंवार नम्र विनंती करण्यात आलेली आहे.. सरकार ज्या मागण्या मान्य करू शकत होते, त्या सर्व मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत.. गणेशोत्सवाचे महत्त्व आणि कायदा-सुव्यवस्था: गणेशोत्सव हा केवळ राज्यातच नव्हे, तर संपूर्ण जगात आणि विशेषतः मुंबईत अत्यंत मोठ्या उत्साहात साजरा होणारा हिंदूंचा सण आहे.. अशा पवित्र सणाच्या काळात मुंबईकरांना किंवा भाविकांना कोणतीही अडचण किंवा त्रास होणार नाही,याची काळजी मनोज जरांगे यांनी घेतली पाहिजे; हीच सरकारची स्पष्ट भूमिका आहे..0
0
Report
अंधेरी के गणपति: अयोध्या जैसी झलक, भक्तों में उत्साह और सुरक्षा व्यवस्था
Mumbai, Maharashtra:अंधेरीचा राजा बाप्पाच्या मुखदर्शनासाठी भाविकांची गर्दी! अयोध्या नगरीचा भव्य देखावा ठरतोय आकर्षणाचं केंद्र मुंबईतील प्रसिद्ध अंधेरीचा राजा गणपती बाप्पाच्या मुखदर्शनाचा सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. यंदाच्या वर्षी अंधेरीच्या राजाचा मंडप चक्क अयोध्या नगरीच्या रूपात साकारण्यात आला आहे, प्रभू श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात आली आहे. अयोध्येतील राम मंदिराचं दर्शन घेता येत नसलेल्या गणेश आणि रामभक्तांसाठी अंधेरीच्या राजाच्या मंडपातच अयोध्येचा भव्य अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे या देखाव्याने भाविकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. विशेष म्हणजे अंधेरीच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक प्रसिद्ध अभिनेते आणि कलाकार स्वतःहून बाप्पाच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारचं निमंत्रण दिलं जात नसून, बाप्पावरील श्रद्धेपोटी कलाकार स्वतः दर्शनासाठी उपस्थित राहतात. दरम्यान, बाप्पाच्या दर्शनासाठी पूर्ण पोशाखात येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पुरुष हाफ पँट किंवा निकरमध्ये आल्यास त्यांना लुंगी देण्यात येते, तर महिलांनी दुपट्टा न घेतल्यास त्यांना दुपट्टा उपलब्ध करून दिला जातो. मात्र, कोणत्याही भाविकाला दर्शनापासून रोखलं जात नाही. ‘आपली संस्कृती जपा’, असं आवाहनही मंडळाकडून करण्यात आलं आहे. दुसरीकडे, सध्या एफडीएकडून खाद्यपदार्थांवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर अंधेरीच्या राजाच्या मंडपातही विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. भाविकांना प्रसाद म्हणून केवळ शेंगदाणे आणि फुटाणे देण्यात येणार असून, भेसळयुक्त किंवा संशयास्पद कोणताही खाद्यपदार्थ देण्यात येणार नसल्याचं मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे भव्य अयोध्या नगरीचा देखावा, संस्कृती जपण्याचा संदेश आणि सुरक्षित प्रसादाची व्यवस्था, यामुळे यंदाचा अंधेरीचा राजा भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.0
0
Report
तिवरे डैम हादसे धरणग्रस्तों के लिए 33 घरों का लोकार्पण; अब तक 57 कुटुंब पुनर्वसन
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण/ रत्नागिरी तिवरे धरणग्रस्तांना ३३ घरांची भेट; पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण धरणग्रस्तांना घरांच्या चाव्या प्रदान; आतापर्यंत ५७ कुटुंबांचे पुनर्वसन रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटून झालेल्या दुर्घटनेत २१ जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेकांची घरे पाण्यात वाहून गेली होती. या दुर्घटनेतील धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. त्यानुसार आज शनिवारी उद्योगमंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ३३ घरांचे लोकार्पण करण्यात आले आणि धरणग्रस्तांना घरांच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या. आतापर्यंत एकूण ५७ घरे धरणग्रस्त कुटुंबांना देण्यात आली आहेत. यावेळी आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार संजय कदम, रमेश कदम, सभापती सूर्यकांत घाडगे, शशिकांत चव्हाण, नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.0
0
Report
Advertisement
