445001
यवतमाळच्या आर्णीत भाजपाची पहिली यादी, आमदाराचा नामांचा गहजब!
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या आर्णी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत विद्यमान आमदाराचे नाव नाही. यामुळे महायुतीतील शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केला आहे. तिन्ही तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन उपजिल्हाप्रमुख विष्णू उकंडे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. पालकमंत्री संजय राठोड यांचेही या जागेसाठी आग्रह आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, जागा सुटली नाही तरी शिवसेना उमेदवार निवडणूक लढवेल.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
जंतर मंतर हिंसक विरोध के खिलाफ बुलढाणा में रस्ता रोको, शिवसेना-ठाकरे गट का धरना
Buldhana, Maharashtra:वंचित, ठाकरे गट व काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक. जंतर-मंतरवर झालेल्या लाठीमाराच्या विरोधात जळगाव जामोद येथे एक तासापासून रास्ता रोको. दिल्ली येथे सुरू असलेल्या जंतर मंतर वरील आंदोलनात दरम्यान आंदोलन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवर पोलिसांनी केलेल्या लाठीमार व अत्याचाराच्या विरोधात बुलढाण्यातील जळगाव जामोद येथे शिवसेना ठाकरे गटाचे काँग्रेसचे वंचित चे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. कार्यकर्त्यांनी अत्याचाराच्या विरोधात रस्ता रोको केला असून गेल्या एक तासांपासून नांदुरा बुऱ्हानपूर मार्गावर कार्यकर्ते तळ ठोकून आहेत. सरकार विरोधी ही घोषणाबाजी तसेच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागणीच्या प्रचंड घोषणाबाजीने परिसर दणाणून उठला आहे.0
0
Report
वसई-विरार में रात से मौजूदा बाढ़, सड़कें पानी में डूबीं
Vasai-Virar, Maharashtra:वसई विरार में रात्रीपासून संताधार कायम विरार चा विवा कॉलेज परिसर, नालासोपारातील गाला नगर परिसर पुन्हा पाण्याखाली रस्त्यावर दीड फुटापर्यंत पाणी साचले , वाहतूक मंदावली सुरळीत झालेले जनजीवन पावसाने पुन्हा विस्कळीत कामासाठी घराबाहेर निघालेल्या नागरिकांचे हाल0
0
Report
भंडारदरा जलाशय का पानी 85% तक पहुंचा; अन्य डैमों में भी पानी बढ़ने की चेतावनी
Shirdi, Maharashtra:Anc - उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात आषाढ सरींचे जोरदार तांडव सुरू असून धरणाचा पाणीसाठा 85 टक्क्यांवर पोहोचला आहे... तर निळवंडे धरण व मुळा धरणात देखील पाण्याची आवक वेगाने सुरू असल्याने दोन्ही धरणाचा साठा देखील आज 50 टक्क्यांपर्यंत पोहोचेल.. गेल्या 24 तासात पाणलोट क्षेत्रातील घाटघर येथे 185, रतनवाडी येथे 248, तर भंडारदरा परिसरात 175 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.. आज कोणत्याही धरणातून विसर्ग सुरू नसला तरी पुढच्या दोन दिवसात पाण्याची आवक पाहता धरणातून विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे...0
0
Report
Advertisement
नासिक जिले में भारी बारिश से जलाशयों से विसर्जन, गांवों में सतर्कता जारी
Niphad, Maharashtra:अँकर:- नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी, नाशिक आणि निफाड तालुक्यात काल दुपारपासून पावसाची संततधार सुरू असल्याने गंगापूर, दारणा आणि पालखेड धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून तसेच पावसाची पाणी निवाडू निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दाखल होत असल्याने धरणाच्या बॅकवॉटरला असलेल्या चांदोरी, सायखेडा, शिंगवे आणि करंजगाव गावांना फटका बसू नये यासाठी नांदूर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदीच्या पात्रात जायकवाडीच्या दिशेने सात वक्रकार गेटच्या माध्यमातून 25 हजार 925 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून पाण्याच्या निसर्गात आणखीन वाढ होण्याची शक्यता असल्याने गोदावरी नदीच्या काठावरील गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे0
0
Report
भास्कर जाधव को महायुती में शामिल होने की खुली ऑफर, प्रमोद जठार ने संकेत दिए
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण-रत्नागिरी.. भास्कर जाधव नेते, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना बाईट: On भाजप ऑफरवर : प्रमोद जठार माझे खूप जुने मित्र आहेत. माझी काम करण्याची पद्धत त्यांना माहीत आहे. आदरापोटी त्यांनी मला भाजपमध्ये यावे, असे सांगितले असेल. विरोधी पक्षनेतेपद : विरोधी पक्षनेतेपदी माझे नाव जाहीर करण्याची जबाबदारी सरकारची आणि विधानसभेच्या अध्यक्षांची आहे. ती माझ्या पक्षप्रमुखांची नाही. जठार मित्र म्हणून पुढाकार घेत असतील आणि विरोधी पक्षनेतेपदासाठी मुख्यमंत्री व अध्यक्षांना माझे नाव जाहीर करण्याची विनंती करत असतील, तर मी त्यांचे आभार मानेन. रत्नागिरी.. भाजपची राजकीय गुगली! प्रमोद जठारांची भास्कर जाधवांना महायुतीत येण्याची खुली ऑफर; चिपळूणमध्ये एकत्रित वृक्षारोपण करत दिले थेट संकेत.. अँकर कोकणातील ज्येष्ठ नेते आणि ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या नाराजीच्या चर्चांवरून आता राजकीय वातावरण तापले आहे. भाजप नेते प्रमोद जठार यांनी भास्कर जाधव यांना थेट भाजपमध्ये महायुतीये येण्याची खुली ऑफर दिली आहे. भास्कर जाधव हे ज्येष्ठ आमदार असून कोकणाच्या विकासासाठी त्यांच्या सत्तेची गरज आहे, असे स्पष्ट वक्तव्य जठार यांनी केले आहे.0
0
Report
खेड-रत्नागिरी: नदीपात्र में कंटेनर बह गया; चालक के नियंत्रण खोने से हादसा
Ratnagiri, Maharashtra:खेड-रत्नागिरी.. जगबुडीत चालकासह कंटेनर गेला और बह गया. गोव्याहून मुंबई की दिशा में जाने वाला मालवाहू कंटेनर भराने येथील जगबुडी नदीपात्रात कोसळकर वाह गया. चालक के नियंत्रण से नियंत्रण छुट जाने पर सीधा नदीपात्र में कंटेनर कोसळ गया. दुथडीभर कर बहते नदीपात्र से वाहते कंटेनर को रोकने का बड़ा प्रयास नियंत्रण के सामने खड़ा रहा. रात्री उशिरापर्यंत कंटेनर बहने के कारण चालक का खोज कार्य शुरू था.0
0
Report
Advertisement
अण्णा हजारे अहिल्यानगर में मौन आंदोलन करेंगे, नगर के जंतर मंतर को प्रतीक बनाएंगे
Ahilyanagar, Maharashtra:दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या CJP च्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आज अहिल्यानगरमध्ये मौन आंदोलन करणार आहेत...सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्रश्न सोडवावावेत अशी अण्णा हजारे यांची भूमिका आहे...दरम्यान अण्णा हजारे ज्या ठिकाणी आंदोलन करणार आहेत त्या आंदोलनस्थळाला प्रतिकात्मक स्वरूपात "नगरचे जंतर मंतर" असे नाव देण्यात येणार आहे...0
0
Report
महाराष्ट्र में रेशन कार्ड अब स्मार्ट कार्ड, QR कोड से वितरण और पारदर्शिता बढ़ेगी
Yeola, Maharashtra:राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेनुसार रेशन कार्ड धारकांना आता स्मार्ट कार्ड मिळणार असून या स्मार्ट कार्डवर क्यूआर कोड प्रणाली देण्यात आली आहे क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर कुटुंबातील सदस्यांचा सर्व डाटा उपलब्ध होणार असून यामुळे धान्य वितरण प्रणाली अधिक सुलभ होणार आहे अन्न नागरी पुरवठा विभागाचा कारभार यामुळे पेपरलेस होणार असून या प्रणालीमुळे योग्य पद्धतीने धान्याचे वितरण देखील होणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. नंदुरबार व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये या प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले असून लवकरच राज्यभर सर्व रेशन कार्ड आता स्मार्ट कार्ड मध्ये कन्व्हर्ट केले जाणार असल्याची माहिती देखील मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यात पत्रकारांशी बोलताना दिली0
0
Report
सदाभाऊ खोत के बयान से राजनीतिक हंगामा: कराड में जोरदार विरोध
Satara, Maharashtra:कराड, सातारा दिल्लीतील जंतर मंतर वरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दहशतवाद्यांची उपमा दिल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. कराडला काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार टीका करताना कोंबडीचोर असा उल्लेख करत डिवचलं आहे. यामुळे कडकनाथ कोंबडीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राज्यात कडकनाथ कोंबडीमुळे अनेकजण अडचणीत आले होते, तसेच सदाभाऊ खोत आणि त्याच्या मुलाला या कडकनाथ कोंबडीमुळे आरोपांना सामोरे जावे लागले होते. कराड येथे काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत धर्मेंद्र प्रधानाच्या राजीनाम्यासाठी भरपावसात आंदोलन केले.यावेळी सदाभाऊ खोत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.0
0
Report
Advertisement
Satara में राहुल गांधी के मोदी आवास के सामने विरोध प्रदर्शन
Satara, Maharashtra:सातारा - लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत निवासस्थानासमोर केलेले आंदोलन हे लोकशाही परंपरा, घटनात्मक मर्यादा आणि राजकीय शिष्टाचाराला धरून नसल्याचा आरोप करत भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली सातारा येथे निषेध आंदोलन करण्यात आले. देशातील महत्त्वाच्या विषयांवर मतभेद मांडण्यासाठी संसद, लोकशाही संस्थां आणि घटनात्मक मार्ग उपलब्ध असताना पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानासमोर आंदोलन करणे हे चुकीचे असून त्यातून केवळ राजकीय प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. लोकशाही व्यवस्थेत आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला असला तरी तो कायदा, सुव्यवस्था आणि घटनात्मक मर्यादा यांचे पालन करूनच केला गेला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या आंदोलनाचा निषेध व्यक्त करत लोकशाही मूल्यांचा सन्मान राखण्याचे आवाहन केले. या आंदोल्नात भाजयुमोचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.0
0
Report
बारामती में उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ने घायल छात्रा की मदद कर उसे अस्पताल पहुँचाया
Rui, Maharashtra:उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वतः अपघातग्रस्त मुलीला केली मदत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीतील विकास कामांची पाहणी करत असताना जळोची एमआयडीसी रोडवर एक विद्यार्थिनी गाडीवरून जात असताना टेम्पोने धडक दिली. त्यावेळी सुनेत्रा पवार यांनी स्वतः गाडीची व्यवस्था करून स्वीय सहाय्यक सुनिकुमार मुसळे यांना सोबत पाठवून त्या अपघातग्रस्त मुलीला पुढील उपचारासाठी दवाखान्यात पाठवले.0
0
Report
कोल्हापुर में वर्षा से जलाशय भराव बढ़ा, राधानगरी 84% ऊपर, पंचगंगा उफान पर
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाची संततधार सुरू असल्याने जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. राधानगरी धरण 84 टक्के भरला आहे.. पश्चिम भागात पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. पंचगंगा नदीचे पाणी तिसऱ्यांदा पात्रा बाहेर पडले आहे.0
0
Report
Advertisement
ECI SIR मुहिम: शहरों में डिजिटाइज़ेशन धीमा, प्रशासन ने कड़ी कार्रवाई की चेतावनी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण म्हणजे एसआयआर मोहिमेत ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भाग पिछाडीवर पडल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात एकूण ३२ लाख १६ हजार १६७मतदारांपैकी आतापर्यंत २६ लाख ५४ हजार १३१ अर्जाचे वाटप झाले असून त्यापैकी १८ लाख २८५ अर्जाचे ऑनलाइन डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगर मध्य, पूर्व आणि पश्चिम या शहरी मतदारसंघांमध्ये कामाची गती अत्यंत संथ आहे. शहरातील तब्बल ९५ बीएलओ २० टक्क्यांच्या आतच अडकले असून जिल्हा प्रशासनाने नियमित फॉलोअप घेत या सर्वांना कडक तंबी दिली आहे. औरंगाबाद मध्य मतदारसंघात सर्वात कमी (१ लाख २३ हजार ८२१) अर्जाचे डिजिटायझेशन झाले आहे. शहरातील तब्बल ९५ बीएलओचे काम २० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्यांची दखल घेतली आहे. काही पक्षांच्या नेत्यांकडून शहरात कॅम्प लावण्यात येत असून त्या माध्यमातून एसआयआरचे काम केले जात जात आहे. विशेष म्हणजे अशा बीएलओंवर कारवाई देखील करणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे...0
0
Report
शाहगंज में 10 वर्षीय बच्ची के अपहरण का प्रयास, सतर्क नागरिकों ने बचाई जान
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:संभाजीनगरात १० वर्षीय चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला छत्रपती संभाजीनगर शहरातील शाहगंज परिसरात दहा वर्षीय चिमुकलीच्या अपहरणाचा धक्कादायक प्रयत्न समोर आला आहे. खाऊचे आमिष दाखवत एका रिक्षाचालकाने मुलीला जबरदस्तीने रिक्षात बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रकार लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ रिक्षाचा पाठलाग केला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रिक्षा नालीत अडकल्याने अपहरणकर्त्याचा डाव फसला आणि आरोपी मुलीला तसेच रिक्षाला घटनास्थळीच सोडून पसार झाला. सिटी चौक पोलिसांनी रिक्षा ताब्यात घेतली असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे एका निष्पाप चिमुकलीचा जीव वाचल्याची भावना व्यक्त केली जात आहे.0
0
Report
मान्सून फिर सक्रिय: छत्रपती संभाजीनगर में 46 मिमी बारिश से शहर भिगा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मध्ये काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. अवघ्या दीड दिवसात ४६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी सकाळपासून सुरू झालेली धार बुधवारी सायंकाळपर्यंत कायम राहिल्याने शहरासह परिसर चांगलाच भिजला. पावसामुळे उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला, तर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडेआठ ते बुधवारी सकाळी साडेआठ या २४ तासांत ३२.३ मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर बुधवारी सकाळी साढेआठ ते सायंकाळी साडेसहा या सुमारे १० तासांत आणखी १३.७ मिमी पाऊस झाला. त्यामुळे अवघ्या ३६ तासांत शहरात ४६ मिमी पाऊस कोसळला. दिवसभर आकाश ढगाळ राहिल्याने सूर्यदर्शन झाले नाही. परिणामी, कमाल तापमान २५.४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले, तर किमान तापमान २२.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. सकाळी हवेतील आर्द्रता १०० टक्के, तर सायंकाळी ९२ टक्के होती. त्यामुळे दिवसभर गारवा जाणवत होता.0
0
Report
Advertisement
