icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सिंधुदुर्ग में टोल वसूली फिर शुरू, विपक्ष का तीखा हमला—गडकरी पर आरोप

Oras Bk., Maharashtra:मुंबई गोवा महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिलेल्या ओसरगाव येथील टोल नाक्याच्या शुभारंभाचे संकेत मिळाले आहेत. केंद्र शासनाने याबाबत निविदा प्रक्रिया सुरू केली असून 23 तारीख पर्यंत निविदा स्वीकारल्या जाणार असून 24 तारीख रोजी टोल वसुली साठी ठेकेदार नेमण्यात येणार आहे. 2023 साली टोल वसुली सुरू करण्यात आली होती मात्र स्थानिक पदाधिकारी आणि प्रवासी संघटनांनी विरोध केल्यामुळे टोल वसुली थांबली होती. मात्र आता पुन्हा एकदा टोल वसुली केली जाणार असल्याने विरोधक आक्रमक झाले असून नितीन गडकरी हे सिंधुदुर्गात टोल सुरू करण्यासाठीच आले होते असा आरोप करत टोल वसुलीला आपला विरोधच राहील अशी भूमिका ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी घेतलीय.. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू होणाऱ्या टोल वसुली नंतर राजकीय नेते व स्थानिक काय भूमिका घेतात या कडे आता सर्वांच लक्ष लागलेय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी
0
0
Report
Advertisement

वाशीम में सीड बैंक प्रदर्शन से पर्यावरण जागरूकता बढ़ी

Washim, Maharashtra:वाशीम: वाढते प्रदूषण,वृक्षतोड, पाण्याची टंचाई आणि ग्लोबल वॉर्मिंग यांसारख्या समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहेत.या पार्श्वभूमीवर पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २२ एप्रिल रोजी जागतिक“वसुंधरा दिन” साजरा केला जातो.याच निमित्ताने वाशिम येथील एस.एम.सी.शाळेत निसर्ग इको क्लब,राष्ट्रीय हरित सेना आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सीड बँक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या बियांची माहिती सादर केली.तसेच या बियांचा उपयोग शाळेच्या परिसरातील बॉटनिकल गार्डन विकसित करण्यासाठी आणि सामाजिक वनीकरणाच्या उपक्रमांसाठी करण्यात येणार आहे.
0
0
Report

वाशीम के NH पर सर्विस रोड के काम से ट्रैफिक जाम; एक एम्बुलेंस भी फंसी

Washim, Maharashtra:वाशीम शहरातून जाणाऱ्या अकोला–नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. आज शहरातील पुसद नाका या वर्दळीच्या चौकात चारों बाजूंनी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती, ज्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. दुपारच्या उन्हात वाहनचालक, प्रवासी व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. विशेष म्हणजे, एका Ambulanceलाही या कोंडीत अडकावे लागल्याने रुग्णसेवेवर परिणाम झाला. सर्व्हिस रस्त्याच्या कामा दरम्यान योग्य पर्यायी व्यवस्था नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांनी केला है.
0
0
Report
Advertisement

माँ ने प्रेमी के लिए बेटे का अपहरण कराने की साजिश रची, पुलिस ने पर्दाफाश किया

Nashik, Maharashtra:प्रियकरासाठी आईनेच रचला आपल्या मुलाचा अपहरणाचा कट... - नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यातील घटनेने उडाली खळबळ... - CCTV फुटेज आणि तपासाची चक्रे फिरवीत वडनेर खाकुर्डी पोलिसांनी केला या प्रकरणाचा पर्दाफाश.. ANC: विवाह झालेला असताना प्रियकराकडे आकर्षित झालेल्या मालेगाव पंचशीलनगरातील मनीषा मयूर मोंडल (वय ३५) या महिलेचा प्रियकर मोहन साईनाथ मोरे (३२, रा. अजंग) हा तिच्याबरोबर राहत नव्हता, तो सोबत राहावा यासाठी तिनेच तिच्या साडेपाचवर्षीय मुलाच्या अपहरणाचा कट रचला आणि स्वतःहून वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेली... *बाइट1 : API पुरुषोत्तम शिरसाठ, वडनेर खाकुर्डी पोलिस स्टेशन ( 00.59 सेकंद )* VO 1: यानंतर पोलिसांनी मोहनला ताब्यात घेतले, मात्र त्याने मुलगा लपविला नसल्याचे पोलिसांना पुनः पुन्हा सांगितले. पोलिसांनी मनीषाला वेळोवेळी माहिती विचारली, मात्र ती सहकार्य करीत नसल्याने पोलिसांना तिच्यावर संशय आला. वडनेर खाकुर्डीचे सहायक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने तपासाची चक्रे फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले Национल एकात्मता चौक, मोसम पुल, शिवतीर्थ, नवा बस स्टँड तसेच मनिषा ही स्वतः रिक्षा चालवते म्हणून पेट्रोल पंप येथील CCTV चेक केले. असता मनीषा ही तिचा चिखलओहोळ येथील मित्र विष्णू श्रीराम सोनवणे हिच्या ताब्यात मुलगा जितेशला देत असल्याचे दिसून आले. *CCTV मुलाला घेऊन जात असताना... रिक्षात पेट्रोल भरत असताना मनिषा* VO 2 : यानंतर Api शिरसाठ व पोलिस उपनिरीक्षक अंकुश नवले यांच्या पथकाने चिखल ओहोळ येथे जाऊन मुलाला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाला त्याची आई मनिषा हिच्या ताब्यात दिले. आणि मनीषाने प्रियकर आपल्या सोबत रहावा म्हणून खोटा बनाव रचल्याने तिच्यावर वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. *बाइट 2: API पुरुषोत्तम शिरसाठ, वडनेर खाकुर्डी पोलिस स्टेशन (1:46 सेकंद )* VO 3: दरम्यान अशा प्रकारचे खोटे गुन्हे कोणी दाखल करू नये. जेणे करून असे प्रकार हे अंगळट येऊन स्वतःवरच गुन्हे दाखल होतात. तेव्हा अस कोणी करु नये असे पोलिसांनी देखील आवाहन केले असले तरी प्रियकरासाठी मुलाचे अपहरण करणे म्हणजे आईच्या वात्सल्यावर बोट ठेवण्यासारखे झाले.... विशाल मोरे, झी मिडिया मालेगाव
0
0
Report

औरंगाबाद नामांतरणानंतर निधी विभाजन: भाजपा 80 लाख, AIMIM 30 लाख

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपची निर्विवाद सत्ता आहे. या महापालिका सत्ताधार्यांनी नगरसेवकांना देण्यात येणाऱ्या निधीत भेदभाव केल्याचे चित्र आहे. भाजपच्या नगरसेवकांना 80 लाख रुपये निधी मिळणार आहे तर एमआयएम नगरसेवकांना 35 लाख रुपये मिळणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे ‘छत्रपती संभाजीनगर’ म्हटलं जातं आणि शहराचं औरंगाबाद म्हणणं कायम असल्यामुळे एमआयएमची ही शिक्षा असेल असा दावा भाजपचा आहे. आणि काय काय आहे ते पाहूयात. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजप विरुद्ध एमआयएमचा वाद दिवसेंदिवस रंगत चालला आहे. औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर झालं असलं तरी एमआयएम अजूनही शहराला औरंगाबाद म्हणतात, त्यामुळे स्थायी समितीकडून नगरसेवकांना देण्यात आलेल्या निधीत खासकरून एमआयएम नगरसेवकांच्या निधीत कपात करण्यात आली आहे. एमआयएम नगरसेवकांना स्थायी समितीकडून अवघे 5 लाख तर प्रशासनाकडून 25 लाख असे 30 लाख देण्यात येणार आहेत; भाजपच्या नगरसेवकांना स्थायी समितीकडून 55 लाख तर प्रशासनाकडून 25 लाख असे 80 लाख रुपये प्रत्येकी मिळणार आहेत. एमआयएमचे नगरसेवक अजूनही औरंगाबाद म्हणतात, जनरल बॉडी मिटिंगमध्ये गोंधळ करतात त्यामुळे त्यांना निधी कमी देण्यात आल्याचं स्थायी समिती सभापतीचे म्हणणं आहे. "औरंगाबाद म्हणण्याची शिक्षा" असं समजलं तरी चालेल असाही सभापतींचा मत आहे. अन्यथा, आयुक्तांना या निर्णयाबद्दल विचारलं जाणार आणि येत्या सभेतही सत्ताधाऱ्यांना उत्तर द्यावं लागेल अशी इशारा एमआयएमने दिला आहे. गेली काही दिवस भाजप विरुद्ध एमआयएम अशी चर्चा सुरू आहे. मंगळवारी झालेल्या सभेत पण दोन्ही पक्षांनी निधीबद्दल संताप व्यक्त केला.
0
0
Report
Advertisement
Advertisement

डिस्पोजेबल बंद कर स्टील के बर्तन: अकोले के दंपत्ति का पर्यावरण मिशन

Akola, Maharashtra:आज वसुंधरा दिनानिमित्त जगभरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जात असताना, अकोल्यातून एक प्रेरणादायी उपक्रम समोर आला आहे. प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणाविरुद्ध लढा देत एक डॉक्टर दाम्पत्याने ‘डिस्पोजेबल नको, स्टील वापरा’ असा प्रभावी संदेश देत जनजागृती सुरू ठेवली आहे. अकोल्यातील डॉ. योगेश आणि डॉ. मनीषा पालीवाल या दाम्पत्याने पर्यावरण रक्षणाचा अनोखा संकल्प केला आहे. मनीषा पालीवाल यांना मल्टिपल स्क्लेरोसिस आजार झाला, यानंतर त्यांनी हा आजार कशामुळे झाला याचा तपास केला असता हे आजार तापमान आणि प्रदूषणामुळे झाला असल्याच त्यांच्या लक्षात आलं.वाढते तापमान आणि प्रदूषण यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात आल्यानंतर त्यांनी या दिशेने काम करण्याचा निर्णय घेतला. गेल्या तब्बल २२ वर्षांपासून ते सातत्याने पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत आहेत. जनजागृतीसाठी त्यांनी एक विशेष सायकल तयार केली असून, या सायकलच्या माध्यमातून ते शहरभर फिरत नागरिकांना प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन करतात.‘डिस्पोजेबलऐवजी स्टीलचा वापर करा’ हा त्यांचा मुख्य संदेश आहे. लग्नसमारंभ, सामाजिक कार्यक्रम आणि दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणावर डिस्पोजेबल वस्तूंचा वापर होत असल्याने पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहे. यावर उपाय म्हणून पालीवाल दाम्पत्य लोकांना स्टीलच्या भांड्यांचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे , कोणत्याही प्रसंगासाठी ते हे ताट आणि ग्लास निशुल्क देत असतात. सुरुवातीला ३०० ताट, चमचे आणि ग्लासपासून सुरू झालेला हा उपक्रम आज हजार स्टीलच्या ताटांपर्यंत पोहोचला आहे.आतापर्यंत सुमारे दीड लाख लोकांनी या ताटांचा वापर केला आहे. योगेश पालीवाल. याचबरोबर पालीवाल दाम्पत्याने कापडी पिशव्यांच्या वापरासाठीही व्यापक मोहीम राबवली आहे. विविध ठिकाणी नागरिकांना कापडी पिशव्या वाटप करत ते प्लास्टिकमुक्त जीवनशैलीचा संदेश देत आहेत.विशेष म्हणजे, वापरण्यात न येणाऱ्या जुन्या कपड्यांपासून ते स्वतः कापडी पिशव्या तयार करून वाटप करतात. आतापर्यंत त्यांनी सुमारे ४० हजार कापडी पिशव्या वितरित केल्या आहेत.त्यांच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली असून, अनेकांनी प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळत कापडी पिशव्यांचा स्वीकार केला आहे.त्यांच्या कामामुळे समाजात एक सकारात्मक बदल दिसून येत आहे. Final Vo : वाढते प्रदूषण आणि बदलते हवामान याच्या पार्श्वभूमीवर पालीवाल दाम्पत्याचा हा उपक्रम समाजासाठी एक आदर्श ठरत आहे. वसुंधरा दिनाच्या निमित्ताने दिलेला ‘डिस्पोजेबल टाळा, स्टील वापरा’ हा संदेश केवळ एक उपक्रम नसून पर्यावरण वाचवण्याची गरज अधोरेखित करणारा आहे.
0
0
Report

कर्ज वसूली के नाम पर महिला से बलात्कार: सावकार अमित सावंत गिरफ्तार

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्जवसुलीच्या नावाखाली एका महिलेवर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गांधीनगर पोलिसांनी अमित सावंत या सावकाराला अटक केली आहे. पीडित महिलेने २०२३ साली आर्थिक अडचणीमुळे आरोपीकडून दोन लाख रुपये दहा टक्के व्याजाने घेतले होते. मात्र, कर्जफेड करण्यात अडचणी वाढताच आरोपीने तिचा गैरफायदा घेत वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपीने संबंधित महिलेला वेळोवेळी हॉटेलवर नेऊन तिचे नग्न फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यानंतर हे अश्लील चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, अशी तक्रार महिलेने पोलिसांत दिली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. तसेच या प्रकरणात इतर कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास केला जात आहे. दरम्यान, पीडित महिलेन दोन लाख 10 हजार रुपये परत करूनही उर्वरित २५ हजार रुपयांसाठी आरोपी तिचा छळ करत होता. संबंधित सावकाराने अनेक महिलांच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. पीडित महिलेने सावकाराचे पैसे ऑनलाइन आणि रोखीत भागवले होते. अस असताना देखील लिंग पिसाट सावकाराने संबंधित पीडित महिलेवर अत्याचार करत नरक यातना दिल्या. पीडित महिलेचे गंभीर आरोप पाहता या सावकाराचे दुष्कृत्ये गंभीर असल्याच दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. या सावकाराने सावकारकीच्या पैशातून आमिष दाखवून आणखी कोणा कोणााला आपल्या जाळ्यात ओढलं त्यांचा कसून तपास करावा अशी मागणी पीडित कुटुंबीय करत आहे.
0
0
Report

सांगली के बुर्ली में परडी सोहळा: ढोल-ताल और पालखी मिरवणूक की धूम

Sangli, Maharashtra:सांगलीच्या पलूस तालुक्यातील बुर्ली येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असणाऱ्या बंच्याप्पा बनात परडी सोहळा रंगला. दर तीन वर्षांनी हा परडी सोहळा आयोजित करण्यात येतो, कृष्णामाईला परडी सोडण्याचा परंपरा असून यानिमित्ताने बांधवांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले, ढोल कैताळाच्या गजर आणि फटाक्यांच्या आतशबाजीसह कृष्णानदी पर्यंत मानाच्या पालख्यांची मिरवणूक संपन्न झाली. यानिमित्ताने बुर्ली, आमणापूर, कुंडल रामानंदनगर येळावी यासह महाराष्ट्र, कर्नाटकातील धनगर बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top