445001
यवतमाळच्या आर्णीत भाजपाची पहिली यादी, आमदाराचा नामांचा गहजब!
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या आर्णी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत विद्यमान आमदाराचे नाव नाही. यामुळे महायुतीतील शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केला आहे. तिन्ही तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन उपजिल्हाप्रमुख विष्णू उकंडे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. पालकमंत्री संजय राठोड यांचेही या जागेसाठी आग्रह आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, जागा सुटली नाही तरी शिवसेना उमेदवार निवडणूक लढवेल.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
आर्वी में ढोलताशा आंदोलन: घरकर वृद्धि के खिलाफ तेज़ नागरिकों ने किया प्रदर्शन
Wardha, Maharashtra:वर्धा आर्वीत ढोलताशा आंदोलन; नगरपरिषदेच्या कारभाराविरोधात संताप घरकर पाचपट वाढीविरोधात नागरिक रस्त्यावर पाणीटंचाई, कचरा व स्वच्छतेच्या प्रश्नांवर प्रशासनाला जाब बाळा जगताप यांच्या नेतृत्वात संयुक्त आंदोलनाला मोठा प्रतिसाद अँकर - आर्वी नगरपरिषदेच्या कथित हुकूमशाही कारभाराविरोधात आज आर्वी शहरात जोरदार ढोलताशा आंदोलन करण्यात आले. काँग्रेस नेते तथा प्रहार सोशल फोरमचे संस्थापक अध्यक्ष बाळा जगताप यांच्या नेतृत्वात विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. नगरपरिषदेने केलेल्या घरकरात तब्बल पाचपट वाढ केल्याचा आरोप करत, ही करवाढ अन्यायकारक आणि जनतेचे आर्थिक शोषण करणारी असल्याचे आंदोलकांनी म्हटले. करवाढीच्या तुलनेत नागरिकांना मूलभूत सुविधा अत्यल्प प्रमाणात मिळत असल्याने ही वाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी मुख्य मागणी यावेळी करण्यात आली. यासोबतच शहरातील तुंबलेले नाले, वाढती डासांची समस्या, अनियमित कचरा संकलन, काही भागांतील तीव्र पाणीटंचाई, तसेच घरकुल योजनेतील विलंब या प्रश्नांवरही आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला जाब विचारला. पावसाळ्यापूर्वी स्वच्छता मोहीम राबवावी, नियमित पाणीपुरवठा करावा आणि गरजूंना तातडीने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.0
0
Report
पुणे में इंडस इंड बैंक रिकवरी एजेंटों ने क्रेडिट कार्ड वसूली के नाम पर मारपीट
Pune, Maharashtra:पुण्यात इंडस इंड बँकेच्या रिकव्हरी एजंट्सच्या गुंडांनी क्रेडिट कार्ड वसूली साठी एका ग्राहकाला भर रस्त्यात बेदम मारहाण केलीय. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय...याप्रकरणी हडपसर पोलिसांनी त्या वसुली एजंट्सना ताब्यात घेतलं असून रितसर गुन्हा दाखल केलाय पण या निमित्ताने बँकांच्या वसुली एजंट्सच्या गुंडागर्दीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय0
0
Report
कल राज्य सरकार कृष्णा डायवर्षण प्रकल्प को मंजूरी देगा, सोलापुर को मिलेगा फायदा
Pandharpur, Maharashtra:कोल्हापूर सांगली पूर परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी उपयुक्त असणारा कृष्णा डायवर्षण प्रकल्पाला उद्या राज्य सरकार कडून मंजुरी मिळणार असल्याची माहिती भाजपचे माजी खासदार रंजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली आहे. कृष्ण नदी आणि तिच्या उप नद्यांमधील 52 TMC वाहून जाणारे पाणी बोगद्याचा वापर करून उजनी धरणात आणले जाणार आहे. यांप्रकलपासाठी पंधरा हजार कोटी रूपयांचा निधी राज्य शासन देणार आहे. त्यामुळे सोलापूर या मराठवाड्यातील दुष्काळी भागाला फायदा होणार आहे.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी में आंबे के नुकसान पर 22 हजार रु प्रति हेक्टेयर मुआवजा घोषित
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. आंबा बागायतदारांना जाहीर झालीय हेक्टरी २२ हजार रुपये नुकसान भरपाई निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी कृषी विभाग ऍक्शन मोडवर जिल्हा कृषी विभागाकडून सर्व्हेक्षण सुरू आंबा शेतकऱ्यांच्या बागेत जाऊन माहिती संकलनाचं काम सुरू १५ मे पर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षी आंब्याचं ९० टक्के आहे नुकसान, तर काजूचं ७० टक्के नुकसान पात्र शेतकऱ्यांची माहिती जमा करण्यासाठी साह्ययक कृषी अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, महसूल अधिकारी, सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष जातात शेतकऱ्यांच्या बांधावर जिल्ह्यात आंबा आणि काजूचे सुमारे १ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्र जाहीर झालेली मदत तुटपुंजी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं मदत वाढवून देण्याची मागणी0
0
Report
रुचिता घोरपडे को नगराध्यक्ष महासंघ के अध्यक्ष पद की नियुक्ति
Ambernath, Maharashtra:नगराध्यक्ष महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडींची घोषणा: रुचिता रुचिता घोरपडे यांची निवड. रुचिता घोरपडे बदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष. राज्यातील 393 नगरपरिषद आणि नगरपंचायतींचे नेतृत्व या महासंघाने केले. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बैठकीत त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. या महासंघात अंबरठाenच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले-पाटील यांचीही निवड झालीय. राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे विषय सरकार दरबारी मांडणा, प्रशासनावर अंकुश ठेवणं, नगराध्यक्षांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी महासंघाची स्थापना झाली. गेली पाच वर्षे प्रशासकीय राजवट असल्यामुळे महासंघाची कार्यकारणी निवड नव्हती. आता सर्व नगरपालिका निवडणुक झाल्यामुळे अध्यक्षपदासह कार्यकारणी निवड मार्ग मोकला. कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला नगराध्यक्षांना महासंघचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली.0
0
Report
चंद्रपुर के धानोरा में वर्धा नदी में तीन लोग डूबे, खोज अभियान जारी
Chandrapur, Maharashtra:टायटल:--चंद्रपूर तालुक्यातील धानोरा गावाजवळ वर्धा नदीत तिघे बुडाले, शोधकार्य सुरू अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा तालुक्यातील खामोना गावचे राजू हरिचंद्र कोडापे हे बहिणीच्या गावी धानोरा येथे आले होते. आज दुपारी वर्धा नदीकाठी कपडे धुण्यासाठी गेले असताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात घसरले. स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करताना त्यांची १२ वर्षीय मुलगी अर्पिता कोडापे आणि १४ वर्षीय भाची प्रियांका मडावी यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते तिघेही खोल पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच घुग्घुस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, शोधमोहीम सुरू केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे धानोरा गावात शोककळा पसरली आहे.0
0
Report
Advertisement
पंढरपुर कॉरिडोर: फडणवीस का दावा, हर प्रभावित को पूरा मुआवजा
Pandharpur, Maharashtra:सोलापूरच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरच्या कॉरिडॉर चा प्लॅन उघड केला, बाधित नागरिकांना कशा पद्धतीने मोबदला देणार याचा आराखडा फडणवीसांकडे तयार . पंढरपूर शहरातील प्रस्तावित कॉरिडरच काम याच वर्षी पूर्ण होणार आहे अनेक लोक शंका कुशंका घेत आहेत. लोकांना घाबरवण्याचे भडकवण्याचे काम करतात पण आम्ही प्रत्येकाला उत्तम मोबदला देणार आहोत. ज्यांचं दुकान बाधित होते त्यांना दुकान दिले जाईल त्यांच्या व्यवसायावर कुठलाही परिणाम होणार नाही आणि जे लोक कोणत्याही योजनेत बसत नाहीत त्यांच्यासाठी स्वतंत्र पॅकेज देऊ, त्यांच्या ही पुनर्वसन करू अशी घोषणाच मुख्यमंत्र्यांनी केली आहे. एकदा कॉर्नर झाल्यानंतर पांडुरंगाच्या कृपेने त्यांचा व्यवसाय दहा फूट वाढेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. आषाढी कार्तिक आणि एकादशीच नाही तर दररोज पंढरपूर लोकांची यायची इच्छा आहे मात्र इथे सुविधा नसल्यामुळे येत नाहीत इतका भव्य दिव्य कॉरिडॉर पंढरपूरमध्ये साकार होणार आहे फक्त पंढरपूरच नाही तर सोलापूर जिल्ह्याची अर्थव्यवस्था यामुळे बदलून जाणार आहे0
0
Report
पोटदुखी के बहाने महिला के साथ दुष्कर्म, भोंदू गणेश शिंदे गिरफ्तार
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात महिलेवर अत्याचार करणारा भोंदू गणेश शिंदे गजाआड गेला है.. पोटदुखी बरं करून देण्याच्या नावाखाली त्याने महिलेला जवळपास विस लाख रूपयांना लुटलंय तर भिती दाखवत तिन वर्षापासून महिलेवर अत्याचार केलाय.. बेलापूर गावातील खटकळी येथे त्याने दावल मलिक नावाने छोटा दरबार उभारला होता जिथे हा भोंदू आलेल्या भक्तांना गंडवत होता.तीन वर्षापासून महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र माझा मुलगा निर्दोष असून जर महिलेवर तीन वर्षापासून अत्याचार केला जात होता तर अगोदरच गुन्हा दाखल का केला नाही...? असा सवाल गणेश शिंदेच्या आईने उपस्थित केलाय0
0
Report
Belapur के भोंदू गणेश शिंदे गिरफ्तार; महिला यौन शोषण और लूट के आरोप
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यात आणखी एका भोंदूला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.. पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून भोंदू गणेश शिंदे याच्यावर श्रीरामपूर पोलिस ठाण्यात महिला अत्याचारासह जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल झालाय.. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर जवळ हा भोंदू गेल्या 10 वर्षांपासून दावल मालीक न्यास नावाने दरबार भरवत होता.. दररोज शेकडो भक्त त्याच्याकडे आपल्या समस्या घेऊन येत होते.. मात्र आजार बरे करून देण्याच्या नावाखाली तो भक्तांची आर्थिक लूट करत होता.. पिडीत महिलेकडून देखील पोटाचा आजार बरा करून देण्याच्या बहाण्याने या भोंदूने 20 लाख रुपये उकळल्याचा आणि लैंगिक अत्याचार केल्याचा केल्याचा गुन्हा दाखल झालाय.. मात्र बेलापूर गावातील खटकळी येथे त्याने दावल मलिक नावाने छोटा दरबार उभारला होता जिथे हा भोंदू आलेल्या भक्तांना गंडवत होता.तीन वर्षापासून महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र माझा मुलगा निर्दोष असून जर महिलेवर तीन वर्षापासून अत्याचार केला जात होता तर अगोदरच गुन्हा दाखल का केला नाही...? असा सवाल गणेश शिंदेच्या आईने उपस्थित केलाय.. या धक्कादायक प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.. श्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या या भोंदूगिरीचा पुन्हा एकदा घृणास्पद चेहरा समोर आलाय.. महिलांवर अत्याचार करत लाखों रुपयांची लूट करणाऱ्या अशा भोंदूंना कोणतीही दया न दाखवता कडकात कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत कसून चौकशी सुरू केली असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास केला जातोय..0
0
Report
Advertisement
ढोकसांवी में महिला से मंगलसूत्र लूट, दो आरोपी फरार
Shirur, Maharashtra:महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; दुचाकीस्वार चोरटे पसार Anc: शिरूर तालुक्यातील ढोकसांगवी येथील पांचोंगवस्ती परिसरात भरदिवसा महिलेचे मंगळसूत्र हिसकावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक मेडिकल स्टोअरमध्ये असताना ग्राहक बनून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी महिलेशी बोलण्याचा बहाणा केला. त्यानंतर त्यापैकी एकाने संधी साधत महिलेच्या गळ्यातील सुमारे दीड तोळे वजनाचे मंगळसूत्र हिसकावले. घटनेनंतर दोन्ही आरोपी दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाले. चोरीचा हा थरार CCTV कॅमेय्रात चित्रीत झालाय.0
0
Report
दो बच्चों की डूबने से मौत: झटके से भरी जलती हुई दुर्घटना? (Clickbait Hindi headline)
Barav, Maharashtra:जुन्नर, पुणे: बल्लाळवाडी शेततळ्यात दो बच्चों की डूबने से मौत की दुर्भाग्यपूर्ण घटना घटी। आज दोपहर शेततळे में तैरने गए बारह वर्षीय सोनकर नवले और दस वर्षीय अभी पवार की डूबकर मौत हो गई। इसके बाद पुलिस बल और रेस्क्यू टीम घटनास्थल पर पहुँचकर शवों की खोज में जुटी है।0
0
Report
सायन–पनवेल महामार्ग पर युवक को गर्मी से अचानक तबीयत बिगड़ी, अस्पताल भर्ती
Navi Mumbai, Maharashtra:सायन–पनवेल महामार्ग पर खारघर में डचाकी से यात्रा करते समय एक युवक को अचानक गर्मी लग गई. युवक अस्वस्थ हो गया और उसने तुरंत अपनी बाइक सड़क के किनारे रोकी. कुछ समय में वह फुटपाथ पर गिर गया. घटना की गंभीरता को देखते हुए स्थानीय नागरिकों ने तुरंत पास के ट्रैफिक पुलिस को बुलाया. पुलिस ने भी तत्परता दिखाते हुए युवक को MGM अस्पताल में भर्ती कराया. अभी युवक का उपचार चल रहा है और उसकी स्थिति स्थिर है.0
0
Report
Advertisement
भास्कर जाधव ने आरटीओ कैंप में खुद ड्राइविंग टेस्ट देकर नियमों का संदेश दिया
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी... आमदार भास्कर जाधव यांचा साधेपणा.. ड्रायव्हिंग टेस्टसाठी स्वतः लावली आरटीओ कॅम्पला हजेरी.. अँकर आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जाणारे आमदार भास्कर जाधव यांचा एक वेगळा आणि संयमी पैलू चिपळूणमध्ये पाहायला मिळाला. आपल्या ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपल्यानंतर, जाधव यांनी कोणतीही VIP सवलत न घेता थेट आरटीओ कैंप गाठले. यावेळी त्यांनी सर्व नियमांचे पालन करत रीतसर ड्रायव्हिंग टेस्ट दिली. एका बड्या लोकप्रतिनिधीने सामान्य नागरिकाप्रमाणे रांगेत उभे राहून आणि स्वतः वाहन चालवून चाचणी दिल्याने उपस्थित सर्वांच्या भुवया उंचावल्या. "नियम सर्वांसाठी समान आहेत," हीच कृती त्यांनी या निमित्ताने अधोरेखित केली असून, सध्या त्यांच्या या साधेपणाची मतदारसंघात मोठी चर्चा रंगली.0
0
Report
बीड के मस्साजोग में सरपंच पोटनिवडणुकी के दौरान भारी तनाव, समर्थक भिड़ंत
Beed, Maharashtra:बीड: मस्साजोग मध्ये मतदान केंद्राबाहेर राडा; अपहरण करण्याआधी संतोष देशमुखांचा टीप देणारा मतदानाला आल्याचा धनंजय देशमुखांचा आरोप तर परळीच्या लोकांना मतदान करू नका अशी अफवा धनंजय देशमुख समर्थकाने पसरवल्याचा उमेदवार स्वरूपानंद देशमुखांचा आरोप.. मस्साजोग मध्ये तणाव. मस्साजोगे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2025 रोजी निर्घृण हत्या झाली होती. त्यानंतर या गावातील पद रिक्त झाले होते. आज सरपंच पदासाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख यांच्यात लढत आहे. दुपारी मतदान केंद्राबाहेर एकच राडा पाहायला मिळाला. दोन्ही देशमुखांचे समर्थक आमने-सामने आल्या mुळे काही काळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. अपहरण होण्याआधी संतोष देशमुख यांची टीप देणारा आरोपी सिद्धार्थ सोनवणे मतदानाला आला होता, त्यामुळे हा वाद उफाळला असल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. मस्साजोग इथल्या जिल्हा परिषद शाळेत तीन मतदान केंद्र आहेत. यातील एका मतदान केंद्रावर धनंजय देशमुख यांच्या समर्थकाने एका शिक्षकाला परळीला मतदान करू नका असे सांगत होते. त्यामुळे हा वाद झाला असल्याचा आरोप उमेदवार स्वरूपानंद देशमुख यांनी केला आहे. शिवाय ही लोकशाही आहे जामिनावर सुटलेला आरोपीला मतदानाचा हक्क नाही काय? असा प्रतिसवाल उमेदवार स्वरूपानंद देशमुख यांनी धनंजय देशमुख यांना केला आहे. रस्त्यालगत असलेल्या मतदान केंद्रावर अचानक गोंधळ उडाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे मतदारांवर थोडाफार परिणाम झाला होता. वाद विकोपाला जात असल्याचे पाहून पोलिसांनी तत्काळ मध्यस्थिची भूमिका घेतली. तब्बल 15 मिनिटं हा राडा सुरू राहिला. पोलिसांनी कायद्याचा बडगा उघरल्यानंतर मात्र दोन्ही गटातील समर्थक पांगले. राडा घालणाऱ्या समर्थकांचे व्हिडिओ फुटेज पाहून रीतसर कारवाई करणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे. शेवटी, मस्साजोग गावातील या पोटनिवडणुकीदरम्यान निर्माण झालेला तणाव आणि आरोप-प्रत्यारोप यामुळे स्थानिक राजकारण पुन्हा एकदा तापल्याचं चित्र पाहायला मिळालं. पोलिसांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला असला, तरी या घटनेमुळे मतदान प्रक्रियेवर काही प्रमाणात परिणाम झाल्याची चर्चा आहे. आता प्रशासन पुढील कारवाईकडे लक्ष ठेवून आहे, या पार्श्वभूमीवर उद्या निकाल काय लागतो आणि गावाच्या राजकारणाला कोणती दिशा मिळते, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.0
0
Report
मल्टीनेशनल केस: निदा खान की बेल पर नई तलाशी, मलेशिया कनेक्शन पर चर्चा
Nashik, Maharashtra:अँकर नाशिकच्या बहुचर्चित मल्टी नॅशनल कंपनीतील महिला लैगिंक अत्याचार व धर्मांतर प्रकरणातील संशयित फरार आरोपी निदा खान हिच्या अटकपूर्व जामीनावर काल नाशिकरोड न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. परंतु न्यायालयाने निकाल राखीव ठेवला असून २ मे रोजी जामिनावर निकाल देणार आहे. त्यामुळे निदा खानला अटक होते की बेल मिळते याचा फैसला आता २ मे रोजीच होणार आहे. मात्र या पीडित महिलेला धर्मांतर करून मलेशियाला पाठवणार असल्याची धक्कादायक माहिती समोर येते यामुळे या प्रकरणात आता मालेगाव आणि मलेशियाचा कनेक्शन समोर आला आहे.... मल्टी नॅशनल कंपनी प्रकरणात सात महिला व एका पुरषाने तक्रारी दिल्या आहेत. त्यातील एका पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून २६ मार्च २०२६ रोजी संशयित दानिश शेख, तौसिफ अत्तार व निदा खान यांच्यावर गुन्हा दाखल आहे. यातील संशयित दानिश शेख, तौसिफ अत्तार या दोघांना अटक असून, सध्या ते मुंबई नाका पोलिस ठाणे हद्दीतील गुन्ह्यांतर्गत 'SIT'च्या ताब्यात आहेत. तर, संशयित निदा खान ही फरार आहे.फरार निदा खानने नाशिकरोड न्यायालयात जामीनसाठी अर्ज केलेला आहे. या अर्जावर काल सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी प्रभावी युक्तिवाद करीत तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी केली...निदा खान हीने पीडित तरुणीवर कशापद्दतीने दबाव टाकला व पीडितेला तिच्या धर्मावरून हिणवले. तसेच पीडितेच्या मनात भीती घालून तिला धर्मांतरासाठी बुरखा, धार्मिक पुस्तके दिली. तसेच तिचे नाव बदलून हानिया ठेवण्यात आलं. पीडितेच्या धर्मांतराच्या प्रयत्न झाला. मालेगाव येथे धर्मांतरासंदर्भातील कागदपत्रे बनविण्यात आली. निदाने पीडितेच्या मोबाईलमध्ये इस्लाम धर्मासंदर्भातील रील्स, यू ट्यूब लिंक पाठविल्या गेल्या. रोजा पठण, हिजाब परिधान याबाबतची माहिती पीडितेला दिली. तिला मलेशियात पाठविण्याचेही कारस्थान निदा खानसह संशयितांचे होते, असा त्यावर महाराष्ट्रात धर्मांतराचा कायदा नाही, पण धार्मिक भावना हेतुपुरस्तर दुखावणे गुन्हा आहे. याप्रकरणात निदा खानची चौकशी होणे आवश्यक आहे. निदाच्या मोबाईलमधून अनेक माहिती मिळण्याची शक्यता आहे. निदा गरोदर असली, तरी तिला वैद्यकीय सेवा पुरविण्याची हमी शासनाची असल्याचा युक्तिवाद अॅड. मिसर यांनी केला व निदाच्या अटकपूर्व जामिनाला हरकत घेण्यात आली.दावा करीत यात 'मनीट्रेल' झाल्याचाही संशय व्यक्त केला. न्यायालयात मांडलेले मुद्दे: पीडितेची शैक्षणिक कागदपत्रे संशयितांनी ताब्यात घेतली होती. मालेगावमध्ये कार्यरत असलेल्या एका गटाच्या मदतीने तिचे नाव बदलण्याचा प्लॅन आखण्यात आला होता. पीडितेला मलेशियाला पाठवून ‘इम्रान’ नावाच्या व्यक्तीकडे कामाला लावण्याची योजना तयार करण्यात झाली होती. पीडितेच्या मोबाईलमध्ये इस्लामिक अॅप्स डाउनलोड करून दिली होती. तिला धार्मिक शिकवणींशी संबंधित YouTube आणि Instagram लिंक सतत पाठवल्या जात होत्या. संशयित निदाने पीडितेला बुर्का आणि इस्लामविषयक माहिती असलेली पुस्तके दिली होती. धार्मिक परिवर्तनाच्या उद्देशाने ही सामग्री पुरवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही सामग्री पोलिसांनी जप्त केली आहे. पीडितेला ‘हानिया’ हे नाव देण्यात आले होते. तसेच तिला मलेशियाला पाठवण्यासाठी एक विशिष्ट व्यक्तीशी जोडण्याची कटकारस्थान होती. पीडितेला कळाले की संशयित दानिश विवाहित आहे, तेव्हा तिला मलेशियाला पाठवण्याचे आमिष दाखवून पुन्हा जाळ्यात ओढण्यात आले. निदा या संशयिताकडून मलेशिया कनेक्शनविषयी अधिक माहिती मिळवणे अत्यंत आवश्यक आहे. बुर्का आणि धार्मिक पुस्तके नेमकी कुठून आली, कोणाने आर्थिक मदत किंवा आसरा दिला, तसेच निदाचा मोबाईल जप्त करणे या सर्व बाबींची चौकशी अद्याप सुरू आहे.दरम्यान, बचाव पक्षाचे वकील यांनी सरकार पक्षाचा युक्तिवाद खोडून काढताना महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायदाच नाही. उत्तर प्रदेश सरकारचा कायदा आहे, अन्य राज्यांत कायदा नाही. धर्मांतराचा कोणताही प्रयत्न करण्यात आलेला नाही असे सांगत सांगत निदा खान ही गरोदर असल्याने तिच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्याची मागणी केलीये... मालेगावमध्ये आणि मलेशिया कनेक्शन उघड झाल्याने आता ही इंटरनॅशनल कनेक्शन समोर आलंय ..आता यात NIA आणि ATS देखील तपास करण्याची शक्यता आहे...यामुळे निदा खान च्या अटकेनंतर अनेक बाबी समोर येणार आहे....0
0
Report
Advertisement
