445001
यवतमाळच्या आर्णीत भाजपाची पहिली यादी, आमदाराचा नामांचा गहजब!
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या आर्णी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत विद्यमान आमदाराचे नाव नाही. यामुळे महायुतीतील शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केला आहे. तिन्ही तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन उपजिल्हाप्रमुख विष्णू उकंडे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. पालकमंत्री संजय राठोड यांचेही या जागेसाठी आग्रह आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, जागा सुटली नाही तरी शिवसेना उमेदवार निवडणूक लढवेल.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
चंद्रपूर के नागभीड़ में बाघ का हमला: तेंदुपत्ता कटने गई महिला की मौत
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात वाघाचा हल्ला, तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलेचा जागीच मृत्यू चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्याची घटना समोर आली आहे. किटाळी मेढा परिसरात तेंदुपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या ५५ वर्षीय महिलेवर वाघाने हल्ला करून तिला जागीच ठार केले. वनिताबाई शंकर उईके असे मृत महिलेचे नाव असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वनपथक आणि नागभीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवला असून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
चालक अवकाश पर, मुंबई कंटेनर टर्मिनल में हजारों कंटेनर फंसे, नाराज कारोबारी
Navi Mumbai, Maharashtra:Anchor- उरण मधील 'जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी' अंतर्गत येणाऱ्या 'भारत मुंबई कंटेनर टर्मिनल'मध्ये गेल्या 10 दिवसांपासून आयातीत मालाचे हजारो कंटेनर अडकून पडले आहेत. कंटेनर चालक सुट्टीवर गेले असल्याने हे कंटेनर अडकले असल्याची माहिती जे एन पी टी प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे. दरवर्षी या काळात कंटेनर चालक गावी जात असतात त्यामुळे वाहतूक खोळाबा झाल्याचे समोर आले असून, सागरी व्यापारी नियमांनुसार, जहाजावरून माल उतरविल्यानंतर कंटेनर बंदराबाहेर वाहून नेण्याचा कमाल 'टर्नअराउंड वेळ' ४८ तासांचा असतो. म्हणजेच ग्राहकांनी त्यांचे कंटेनर ४८ तासांत बाहेर काढणे बंधनकारक असते मात्र १० मे पासून भारत मुंबई कंटेनर टर्मिनल'मध्ये कंटेनर बाहेर काढण्यास विलंब सुरू झाला असल्याने व्यापारी आणि आयातदर ना याचा फटका बसत आहे।0
0
Report
NEET पेपरफुटी मामले: लातूर के डॉक्टरों के बच्चों तक क्यों पहुंची CBI की सख्ती?
Latur, Maharashtra:लातूर… शिक्षणाचं हब… डॉक्टर घडवणारी फॅक्टरी… पण आता हाच लातूर देशभरात NEET पेपरफुटी प्रकरणामुळे चर्चेत आलं आहे. NEET पेपरफुटी प्रकरणात अटक झालेल्या शिवराज मोटेगावकर यांच्यावर स्वतःच्या मुलासाठी पेपरफुटी केल्याचा गंभीर आरोप CBI कडून करण्यात आला आहे. इतकंच नाही… तर क्लासमधील काही निवडत विद्यार्थ्यांसाठी… तसेच लातूरमधील काही नामांकित डॉक्टरांच्या मुलांना आणि नातेवाईकांनाही प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे मोटेगावकर याचा मुलगा आणि लातूरमधील काही दिग्गज डॉक्टरही आता CBI च्या रडारवर आले आहेत का…? शिवराज मोटेगावकर यांच्या नंतर आता मुलगा ही CBI च्या रडारवर... लातूरतील दिग्गज डॉक्टरही CBI च्या रडारवर… NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ने शिवराज मोटेगावकर यांना अटक केल्यानंतर आता तपासाची दिशा त्यांच्या मुलाकडेही वळली आहे. मोटेगावकर यांच्या मुलाने यंदा बारावीची परीक्षा दिली असून, त्यालाही फुटलेल्या प्रश्नपत्रिकेचा फायदा झाला का…? यात तपास आता CBI करत आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे लातूरच्या शिक्षण पद्धतीवर आणि खासगी कोचिंग व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. डॉक्टर बनण्याचं स्वप्न… ते पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांची रात्रंदिवस मेहनत… पालकांनी घेतलेली कर्जं… आणि भविष्य घडवण्यासाठी सुरू असलेली धडपड… परंतु जर याच स्वप्नांचा सौदा पैशांनी… ओळखीने… आणि पेपरफुटीच्या माध्यमातून होत असेल… तर हा केवळ गुन्हा नाही… तर लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीवरचा सर्वात मोठा अन्याय आहे. शिवराज मोटेगावकर यांच्यावर स्वतःच्या मुलासाठी… क्लासमधील निवडक विद्यार्थ्यांसाठी… आणि काही दिग्गज डॉक्टरांच्या मुलांसाठीही पेपरफुटी केल्याचे आरोप होत आहेत. मोटेगावकर यांच्या स्पेशल बॅच मध्ये नेमकं कोण होतं…? आणि या रॅकेटची मुळं आणखी किती खोलवर गेली आहेत…? या प्रश्नांची उत्तरं आता संपूर्ण राज्य शोधत आहे…0
0
Report
Advertisement
रत्नागिरी: समुद्र में डूबती महिला को युवक करण महेश मिलके ने बचाया, वीडियो वायरल
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी - अल्ट्राटेक जेट्टी ते मिरकरवाडा या दरम्यान समुद्रात बुडणाऱ्या महिलेला करण महेश मिलके या तरुणानं वाचवलं सकाळी 7 वाजताच्या दरम्यानची घटना; महिलेला वाचतानाचा सर्व थरार मोबाईलच्या कॅमेरामध्ये कैद सकाळी 7 च्या दरम्यान महिला गेली होती कालवे काढायला समुद्राचा पाण्यात झालेली वाढ बेतली असती महिलेच्या जीवावर; तरुणाच्या धाडसाने वाचला महिलेचा जीव समु्द्र किनारापासून अंदाजे 150 ते 200 मीटर समुद्रात बुडत होती महिला महिलेला वाचवल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये महिलेवर उपचार सुरू0
0
Report
खारघर पुलिस ने वर्षभर की चोरी सुलझाकर 94.74 लाख का माल लौटाया
Navi Mumbai, Maharashtra:खारघर पोलिस ठाणे हद्दीत वर्षभरात घडलेल्या जबरी चोरी, घरफोडी, मोबाईल चोरी आणि हरविलेल्या मोबाईल प्रकरणांचा तांत्रिक तपास करत मिळालेला मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आलाय. खारघर पोलिसांनी 57 तोळे सोन्याचे दागिने, घरफोडीतील 27 लाख रोख रक्कम, चोरीला गेलेले अथवा हरवलेले मोबाईल हस्तगत करुन एकूण 94 लाख 74 हजार रुपयांचा मुद्देमाल मुळ मालकांना परत करण्यात आलाय.0
0
Report
मुखेड के कुएँ में बिबट्या गिरा, बचाव दल पहुँचा; पानी में डूबकर मौत
Yeola, Maharashtra:येवला तालुक्यातील मुखेड येथे एका शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये बिबट्या पडला असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती वन विभागाचे रेस्क्यू पथक घटनास्थळी पोहोचण्याच्या आधीच मृत्यूशी झुंज देत असलेला बिबट्या अखेर पाण्यात बुडून मृत पावला हा संदर्भात घटनास्थळावरून आढावा घेतला आहे0
0
Report
Advertisement
चॉकलेट के लालच में चार वर्षीय बच्ची के साथ दुष्कर्म, नागभीड़ में आरोपी गिरफ्तार
Chandrapur, Maharashtra:चॉकलेटचे आमिष दाखवून चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात संतापजनक घटना आज उघडकीस आली. अवघ्या चार वर्षीय बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून 19 वर्षीय युवकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली. या प्रकरणी आरोपी संचित याला नागभीड पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा पीडित बालिकेच्या कुटुंबातील नात्याने मेव्हणा असून त्याचे कुटुंबात नेहमी येणे-जाणे होते. घटनेच्या दिवशी आरोपीने बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखववत गावातील सुरू असलेल्या नवीन घराच्या बांधकामाच्या ठिकाणी नेत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर बालिका घरी परतल्यावर तिने आईकडे घडलेला प्रकार सांगितला. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर नागभीड पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे..0
0
Report
लातूर के प्रोफेसर MOTEGAVAKAR पर ED जाँच की माँग, शिक्षण साम्राज्य पर राजनीति गरम
Latur, Maharashtra:AC- लातूर जिल्ह्यातील हनुमन्तवाडी या छोट्याशा खेड्यातून आलेल्या प्रा. शिवराज मोटेगावकर यांचा २५ वर्षांतील प्रवास थक्क करणारा आहे. RC क्लासेसच्या माध्यमातून राज्यभरात शिक्षणाचं मोठं नेटवर्क उभं करत हजारो विद्यार्थी आणि कोट्यवधींची उलाढाल त्यांनी केला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये उभ्या राहिल्या मालमत्तांमुळे आता त्यांच्या संपत्तीची ED चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे... VO 01- लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील हनुमंतवाडी गावातून आलेल्या ४७ वर्षीय प्रा. शिवराज मोटेगावकर यांचा प्रवास चर्चेचा विषय ठरला आहे. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील एका महाविद्यालयात तासिका तत्वावरील शिक्षक म्हणून सुरू झालेला प्रवास पुढे शिक्षण क्षेत्रातील मोठ्या नेटवर्कपर्यंत पोहोचल्याचं बोललं जात आहे. गेल्या २५ वर्षांत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये क्लासेसची सेंटर सुरू केलंय ताकद शिकवण्यासाठी त्यांनी मोठं शैक्षणिक साम्राज्य उभं केलं आहे. आता त्या साम्राज्याची ED मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखानी केली आहे... VO 02- लातूरजवळील खोपेगाव परिसरातील आलिशान इमाराती, शहरातील विविध भागांतील भूखंड, कोचिंग क्लासेस, महाविद्यालय तसेच रेणापूर परिसरातील CBSई शाळेसह विविध मालमत्तांमुळे आता त्यांचं नाव पुन्हा चर्चेत आल्यं आहे. दरम्यान, या संपूर्ण मालमत्तेची EDमार्फत चौकशी झाल्यास मोटेगावकर यांच्या पाय अजून खोलात जाऊ शकतात असं बोललं जात आहे... WKT- वैभव बालकुंदे रिपोर्टर ( ग्राउंड रिपोर्ट ) VO 03- खोपेगाव परिसरातील मालमत्तांवरून आता विविध स्तरांतून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात उभ्या उभारण्यात आलेल्या इमारतीबाबत अनाधिकृत बांधकामाचे आरोपही समोर येत आहेत... VO END- दरम्यान, प्रा. मोटेगावकर यांचं नाव गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळे सातत्याने चर्चेत आहे. शिक्षण क्षेत्रातील वाढता प्रभाव, राजकीय संबंध आणि आता समोर येणाऱ्या मालमत्तांच्या चर्चेमुळे त्यांच्या भोवतीचं वर्तुळ अधिक गडद होताना दिसत आहे. खोपेगावातील मालमत्तांपासून सुरू झालेला हा वाद पुढे आणखी कोणतं वळण घेतो, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे...0
0
Report
नीट पेपरफुटी मामले में गिरफ्तारियां और छात्रों के भविष्य पर सवाल
Akola, Maharashtra:नीट पेपरफुटी प्रकरणाचे पडसाद आता राज्यभर उमटताना दिसत आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत इतर संबंधितांवरही कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, या प्रकरणात प्राध्यापक मोटेगावकर यांना अटक करण्यात आल्यानंतर अकोल्यात काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अकोल्यातील मोटेगावकर यांच्या शिकवणी वर्गावरील बोर्डाला काळ फासलं होत तर आज संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अकोल्यातील मोटेगावकर यांच्या आरआरसी क्लासेससमोर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केले. संतप्त कार्यकर्त्यांनी क्लासेसच्या बोर्डवर शेण फेकून आपला रोष व्यक्त केला. नीट पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसेच या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.0
0
Report
Advertisement
नवी मुंबई विमानतल के नामकरण पर याचिका फेटी, आंदोलन तेज
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली असली तरी आंदोलनाच्या मद्यमातून विमानतळाला नाव देण्यावर स्थानिक भूमिपुत्र ठाम असून, 24 जून पर्यत नाव न दिल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा. विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी आमच्या एक ग्रुप कोर्टात गेला होता पण राज्य सरकार ने प्रस्ताव मंजूर करून केंद्र सरकार कडे दिला आहे, केंद्रात त्याला मंजुरी मिळणे गरजेचे असून आम्ही त्याचा पाठपुरावा करत असल्याचे नवी मुंबई विमानतळ कृती समिती कडून सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन देऊन नऊ महिने झाले आहेत 24 जून पर्यत दिले नाही तर मात्र आम्ही मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. नवी मुंबई एअरपोर्ट कृती समिती. विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव मिळेल असा विश्वास दि बा पाटील यांचे सुपुत्र अतुल भगत यांनी सगीतेल आहे. नवी मुंबई एअरपोर्टला दि बा पाटील यांचे नाव द्यावे ही आमची आज पण भूमिका आहे.. गरज पडली तर एकनाथ शिंदे पण पाठपुरावा करतील.. पण या भूमिकेवर आम्ही कायम आहोत. उदय सामंत - मंत्री0
0
Report
बदली के लिए राजनीतिक दबाव पर बीड के एसपी का कड़ा संदेश: कार्रवाई तय
Beed, Maharashtra:नेत्यांचे फोन थेट महागात पडणार बदलीसाठी दबाव टाकल्यास होणार कारवाई, बीडचे एसपी नवनीत कॉवत यांचा कडक इशारा..! ANC - पोलिसांच्या बदली प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा राजकीय किंवा बाह्य दबाव सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी संबंधितांवर थेट शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. बदलीसाठी नेते किंवा बाहेरील व्यक्तींमार्फत फोन करून दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधित पोलीस अंमलदाराविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. बाईट: नवनीत कॉवत, पोलिस अधीक्षक0
0
Report
कल्याण-डोंबिवली में 22 मई 2026 को 12 घंटे पानी आपूर्ति बंद
Kalyan, Maharashtra:कल्याण-डोंबिवलीत २२ मे २०२६ रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत १२ तास पाणीपुरवठा बंद; नागरिकांना पाणी साठवण्याचे आवाहन Anc..भारतीय हवामान खात्याने यावर्षी अलनिनो आणि आयओडीच्या प्रभावामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार राज्य शासनाने ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागासोबत झालेल्या बैठकीनंतर पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार कल्याण-डोंबिवली महानगरपालिकाेच्या बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा शुक्रवार दि. २२ मे २०२६ रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत, म्हणजेच १२ तास बंद राहणार आहे. या पाणी कपातीचा परिणाम कल्याण पूर्व-पश्चिम, डोंबिवली पूर्व-पश्चिम तसेच कल्याण ग्रामीण भागातील मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शाहाड, अटाळी आणि इतर गावांवर होणार आहे. महानगरपालिकेने नागरिकांना आवश्यक तेवढा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.0
0
Report
Advertisement
NEET पेपरफूट: CBI नागपूर-चंद्रपूर में परीक्षार्थी के घरों पर छापेमारी
Nagpur, Maharashtra:देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफूट प्रकरणाच्या तपासात आता विदर्भ कनेक्शन समोर येऊ लागले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) दिल्ली येथील विशेष पथकाने नागपूर आणि चंद्रपूर येथे तीन परीक्षार्थी उमेदवारांच्या घरांवर झडती घेतली . या कारवाईत नागपूर सीबीआय पथकानेही सहकार्य केले. तपास यंत्रणांच्या या हालचालींमुळे विदर्भातील शैक्षणिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, झडती घेण्यात आलेल्या तिघांपैकी दोन विद्यार्थीनी नागपूरमधील असून एक परीक्षार्थी उमेदवार चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. सीबीआयच्या पथकांनी या विद्यार्थ्यांच्या घरांची व मोबाईलची तपासणी केली. या विद्यार्थ्यांचे नीट परीक्षेदरम्यान काही संशयास्पद संपर्क, आर्थिक व्यवहार आणि परीक्षा प्रक्रियेशी संबंधित डिजिटल पुरावे तपासण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी संबंधित विद्यार्थ्यांच्या निवासस्थानी लॅपटॉप, मोबाईल फोन, काही दस्तऐवज तसेच ऑनलाईन व्यवहारांची माहिती तपासली. पेपरफूट रॅकेटशी संबंधित दलाल, कोचिंग नेटवर्क किंवा आर्थिक देवाणघेवाणीचा काही संबंध आहे का, याचाही तपास सुरू असल्याची माहिती आहे. अद्यापपर्यंत कुणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही.0
0
Report
हिरकणी STR T6 वाघीणा का GPS कॉलर गायब, ट्रैप कैमरे में फिर कैद
Satara, Maharashtra:कोयना जलाशय से तारफ्य के जरिए सह्याद्री व्याघ्र प्रकल्प में छोड़ी गई 'हिरकणी' अर्थात STR T6 वाघीण को फिर से ट्रैप कैमरे में कैद किया गया है। पर गले में GPS कॉलर गायब दिखाई दे रहा है। पिछले पंद्रह दिनों से हिरकणी ट्रैक न होने के कारण वन विभाग चिंता में है। VO: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प की हिरकणी STR T6 को 7 फ़रवरी 2026 को कोयना जलाशय से जंगल क्षेत्र में भेजा गया था और उसके बाद GPS कॉलर के साथ निगरानी रखी जा रही थी। लेकिन पिछले पंद्रह दिनों से सिग्नल एक ही स्थान से आ रहा था, संभवतः कॉलर में तकनीकी खराबी या कॉलर गिर जाने जैसी स्थिति। वन विभाग ने खोज बढ़ाई, पर हिरकणी का ठिकाना नहीं मिला। इसके बाद ट्रैप कैमरों की संख्या बढ़ाकर विश्लेषण शुरू किया गया। इसी क्रम में कोयना जंगल के कोअर भाग में घूमती एक वाघीण ट्रैप कैमरे में कैद हुई, जिसके पट्टों के विश्लेषण से वही हिरकणी STR T6 स्पष्ट हुई, पर इस बार गले में GPS कॉलर नहीं दिखा। संभव है कि उसने पंजे से कॉलर निकाल लिया हो या तकनीकी कारण से वह गले से गिर गया हो, क्षेत्र संचालक तुषार चव्हाण ने बताया। बाइट - तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प। वीडियो 2-0 विश्लेषण के अनुसार कॉलर बीच-बीच में सिग्नल दे रहे हैं, अतः जंगल परिसर में वह कहीं गिरा हो सकता है। ट्रैप कैमरे में हिरकणी की फोटो/वीडियो स्पष्ट रूप से स्वस्थ दिख रही है और वजन बढ़ने की दिशा में संकेत भी मिले हैं। बाइट - मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे। हिरकणी वाघिणी के फोटोज़-वीडियो से तबीयत सुदृढ़ दिखी और अब वह सह्याद्री के वातावरण के अनुकूल प्रतीत हो रही है। वन्यजीव प्रेमी और प्रकल्प प्रशासन ने राहत की सांस ली है।0
0
Report
कोल्हापुर में मगरी के अंडों से नौ पिल्लों का सफल जन्म, प्राकृतिक आवास में संरक्षण प्रयास
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरच्या हातकणंगले वनपरिक्षेत्रातील कृष्णा नदीकाठावरील शेतात मगरीची अंडी आढळल्याचे ठरले. वन्यजीव संरक्षण संस्था इचलकरंजी यांनी ही माहिती वनविभागाला दिल्यानंतर अंडी नैसर्गिक अधिवासातच सुरक्षित ठेवून त्यांचे संवर्धन करण्यात आले. सुमारे दस दिवसांच्या देखरेखीनंतर तब्बल ९ मगरीची पिल्ले सुखरूप बाहेर आली. वनविभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर यांनी तपासणी करून पिल्लांना सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडले. कोलहापुरात प्रथमच नैसर्गिक अधिवासात मगरीची अंडी जतन करून यशस्वीरीत्या पिल्ले उबविण्याचा प्रयोग वनविभागाने केला आहे. नागरिकांनी मगरीची अंडी आढळल्यास वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.0
0
Report
Advertisement
