icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

शिरपूर में किसानों ने रात में महामार्ग रोका; बिजली आपूर्ति इमरजेंसी लोडसेडिंग से बाधित

Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातल्या संतप्त शेतकऱ्यांनी रात्रीच्या सुमारास अंकलेश्वर बर्हाणपूर महामार्ग रोखला होता. शेतीसाठी देण्यात आलेल्या विद्युत पुरवठा इमर्जन्सी लोडसेडींग च्या नावाने खंडीत करण्यात येत असल्याने शेतकरी संतप्त झाले होते. इमर्जन्सी लोडसिडींग मुळे पिकांना पाणी देणे शक्य होत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. शिरपूर तालुक्यातील बभळाज येथील सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा रात्रीच्या वेळेस मोर्चा धडकल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच पळापळ झाली. महावितरण अधिकारींना शेतकऱ्यांचा घेराव लक्षात घेता अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. रात्री अंकलेश्वर बर्हाणपूर महामार्गावर बभळाज गावाजवळ शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला होता. महामार्ग रोखल्यानंतर शेतीतील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला.
0
0
Report

खेड के युवक ने डूबती वृद्ध महिला की जान बचाई, देवदूत बना

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. पाण्यात बुडणाऱ्या वृद्ध महिलेला वाचवले.. खेड शहरातील खारी गावाकडे जाणाऱ्या पुलाखाली एक वृद्ध महिला पाण्यात बुडत असल्याची धक्कादायक घटना घडली होती. मात्र स्थानिक युवक स्वयंम शिबे यांने प्रसंगावधान राखत धाडसी पाऊल उचलले आणि वृद्ध महिलेचा जीव वाचवण्यात यश मिळवले. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला पुलाखालील खोल पाण्यात अडकून बुडत होती. ही बाब स्वयंम शिबे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी कोणताही विचार न करता तत्काळ खाडीमध्ये उडी घेतली. पाण्याचा वेग आणि खोली अधिक असतानाही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी महिलेपर्यंत पोहोचून तिला सुरक्षित बाहेर काढले. या धाडसी बचावकार्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. स्वयंम शिबे यांच्या तत्परतेमुळे एका वृद्ध महिलेचा जीव वाचला असून त्यांच्या या मानवतावादी आणि धाडसी कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. खेड शहरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून “देवदूत बनून आला तरुण” अशा शब्दांत नागरिकांकडून त्यांच्या धाडसाचे कौतुक करण्यात येत आहे.
0
0
Report

गोंदिया में LCB ने 38.5 किग्रा गांजे के साथ दो आरोपी गिरफ्तार

Bhandara, Maharashtra:गोंदिया जिल्ह्यातील डूग्गीपार परिसरात एलसीबी पथकाने मोठी कारवाई करत 38 किलो 500 ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत गांजासह एक थार कार, चार मोबाईल असा एकूण 54 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. नाकाबंदी दरम्यान संशयित वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले तर एक आरोपी फरार झाला. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी कोकण LSG चुनाव: महायुती का पलड़ा भारी, शिवसेना को 305 मतदाताओं का लाभ

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात राजकीय रंगत वाढली महायुतीत उमेदवारीपरून रस्सीखेच असताना शिंदे शिवसेनेचे युवा नेते विकास गोगावले यांनी घेतला उमेदवारी अर्ज रत्नागिरीतल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून दोन अर्ज विकत घेतल्याची माहिती तर उद्धव ठाकरे सेनेकडून माजी आमदार बाळ माने यांनी घेतले चार अर्ज तर या निवडणुकेंत रायगडमधील शेतकरी कामगार पक्ष देखिल उमेदवार देण्याच्या तयारीत शेकापकडून चार उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती, अरविंद म्हात्रे आणि अनिल चोरडा यांनी घेतले उमेदवारी अर्ज विधानसभेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात महायुतीचे पारडे जड, शिंदे शिवसेनेकडे सर्वात जास्त म्हणजे ३०५ मतदार त्याखालोखाल भाजपकडे २७६ आणि अजित पवार राष्ट्रवादीकडे १२७, उद्धव ठाकरे सेनेकडे ५५ तर कॅग्रेसकडे ५० मतदार महायुतीक़डे एकत्र आल्यास ७०८ मतांची मॅजिक फिगर पण शह काटशह याच्या राजकारणात कुणाचे पारडे जड राहणार याची उत्सुकता
0
0
Report

सीबीआई ने नीट पेपर 10-12 लाख में बेचे जाने का मामला लातूर में उजागर किया

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज नीट चा पेपर दहा ते बारा लाखाला विकला... सीबीआय तपासातून धक्कादायक माहिती समोर... नीटचे केमिस्ट्रीचा पेपर सेटर प्रा. पी. व्ही. कुलकर्णी आणि प्रा शिवराज मोटेगावकर यांनी नीट परीक्षेचा पेपर १० ते १२ लाख रुपयांपर्यंत नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार CBI च्या तपासात उघडकीस आल्याची माहिती समोर आली आहे. पेपर विकत घेण्यासाठी अनेक पालकांनी या दोघांना ऑनलाइन रक्कम पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रा. कुलकर्णी व प्रा मोटेगावकर या दोघांनी ज्यांना पेपर विकले त्या पालकांनी पुढे आपल्या सर्कलमधील अन्य लोकांना ५ ते १० लाख रुपयांपर्यंत ते विक्री केल्याचीही माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. मोटेगावकरच्या मोबाइलमध्ये हा पेपर नीट परीक्षेच्या आधीच आल्यानंतर, प्रा. कुलकर्णी आणि मोटेगावकर यांनी मिळून हे पेपर विकले असल्याचा सीबीआयला संशय आहे. त्यामुळे पथक लातुरात ठाण माडून आहे...
0
0
Report
Advertisement

वाशीम-कोंडाळा रेलवे पुल का कार्य धीमा, किसानों को 10-12 किमी अतिरिक्त सफर

Washim, Maharashtra:वाशीम ते कोंडाळा मार्गावरील भूमिगत रेल्वे पुलाचे काम गेल्या तीन वर्षांपासून संथ गतीने सुरू असल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. विशेषतःपावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर बनण्याची शक्यता आहे. सध्या अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी तब्बल १० ते १२ किलोमीटरचा अतिरिक्त फेरा मारावा लागत आहे. यामुळे वेळ आणि इंधनाचा खर्चही वाढत आहे. दुसरीकडे पुलाखाली दोन्ही बाजूंना पाणी साचण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्यामुळे ये-जा करणे आणखी कठीण होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. शेतीचा हंगाम आणि पावसाळा तोंडावर असताना संबंधित यंत्रणांनी हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी होतं आहे.
0
0
Report

स्वच्छता दूत वामन इंगळे की साइकिल यात्रा से महाराष्ट्र में जागरूकता फैल गई

Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:वाशिम जिल्ह्यातील डव्हा येथील स्वच्छता दूत वामन इंगळे यांनी संत-महात्म्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्रभर सायकलद्वारे स्वच्छता यात्रेला सुरुवात केली आहे.विशेष म्हणजे त्यांनी आपल्या सायकलवर छोटेखानी ग्रंथालय उभारले असून गावोगावी फिरत स्वच्छतेचा संदेश देण्याचे काम सुरू केले आहे.ज्या गावात त्यांचा मुक्काम असेल त्या गावात संत गाडगेबाबांच्या विचारांनुसार स्वच्छता अभियान राबवून नागरिक,युवक आणि महिलांना वाचनाची प्रेरणा दिली जात आहे. महापुरुषांच्या विचारांची पुस्तके उपलब्ध करून समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न ते करत आहेत.या यात्रेचा कालावधी निश्चित नसला तरी स्वच्छता आणि वाचन संस्कृतीचा संदेश देत वामन इंगळे महाराष्ट्र भ्रमंती करत असल्याचे त्यांनी सांगितले. बाईट: वामन इंगळे,स्वच्छता दूत
0
0
Report
Advertisement

भंडारा में खाद की कीमतें बढ़ीं, किसान फिर आर्थिक संकट में

Bhandara, Maharashtra:*भंडाऱ्यात खतांचे दर कडाळले...खतांच्या दरवढीने जिल्ह्यातील बळीराजा पुन्हा आर्थिक संकटात....* Anchor ;- खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना रासायनिक खतांच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीने भंडारा जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा आर्थिक संकटाच्या खाईत लोटला जाणार आहे.आधीच अवकाळी पाऊस, नापिकी, वाढती मजुरी, बियाणे व कीटकनाशकांच्या महागाईने त्रस्त असलेल्या बळीराजावर आता खत दरवाढीचे नवे ओझे कोसळले असून ग्रामीण भागात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात डीएपी, तसेच पोटॅश यांसारख्या खतांच्या किमतींमध्ये प्रति बॅग ४०० ते ५०० रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.दोन वर्षांपूर्वी १ हजरा शंनबत्त ते १ हजार तिनशे रुपयांत मिळणारी खतांची गोणी आता थेट १ हजार आठशे ते २ हजार तिनशे रुपयांच्या घरात पोहोचल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.विशेष म्हणजे खरीप पेरणीपूर्वी मोठ्या प्रमाणात खत खरेदी करावी लागत असल्याने अनेक शेतकरी सावकारांकडून कर्ज घेण्याच्या तयारीत आहेत.'शेती करावी की पडीत ठेवावी?' असा संतप्त सवाल आता ग्रामीण भागातून उपस्थित केला जात आहे. Byte ;- प्रदीप कुंभलकर , कृषी केंद्र चालक Byte ;- शेतकरी
0
0
Report
Advertisement

नांदेड में मानसूनपूर्व बरसात से केला बागें भारी नुकसान, किसान आर्थिक संकट

Nanded-Waghala, Maharashtra:नांदेड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासुन वादळी वाऱ्यासह होत असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने फळबागांचे नुकसान होत आहे. काल रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मुदखेड तालुक्यातील केळी बागांचे मोठे नुकसान झाले. या वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा आडव्या पडल्या आहेत. मुदखेड तालुक्यातील इजळी या गावात सर्वाधिक नुकसान झाले आहे. काही दिवसातच ही केळी काढणीला आली होती. परंतु तोंडचा घास काल झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. पंचनामे करून मदतीची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
0
0
Report

भीमाशंकर मंदिर अभी बंद, भक्त 31 मई तक दर्शन के लिए उम्मीद लगाए बैठे

Shirur, Maharashtra:बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या, प्रसिद्ध भीमाशंकर मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आणखी किती वाट पाहावी लागणार? असा प्रश्न आता भाविक विचारत आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून मंदिरात विकास आराखड्याची कामं सुरू असल्यामुळे, हे मंदिर भाविकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आलंय. प्रशासनाने ३१ मे रोजी मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुलं करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, प्रत्यक्ष पाहणी केली असता मंदिराच्या परिसरातील बहुतांश कामं अजूनही अपूर्णच आहेत. त्यामुळे येत्या ३१ मेला मंदिर भाविकांसाठी सुरू होण्याची शक्यता सध्या तरी अत्यंत धूसर दिसतेय. दुसरीकडे, देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या शेकडो भाविकांना दर्शनाशिवाय माघारी जावं लागत असल्यानं, त्यांच्यामध्ये तीव्र नाराजीचा सूर पाहायला मिळतोय.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top