icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

मजलगांव में नाबालिग विवाहिता के गर्भपात की खबर, प्रशासन पर सवाल उठने लगे

Beed, Maharashtra:बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे एका अल्पवयीन विवाहित तरुणीचा गर्भपात करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा गर्भपात माजलगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातच करण्यात आला असून, या प्रक्रियेदरम्यान झालेल्या अतिरक्तस्रावामुळे पीडित तरुणीची प्रकृत्ती गंभीररीत्या खालावली. प्रकृती बिघडल्यानंतर संबंधित तरुणीला एका खासगी रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, माजलगावच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला पुढील उपचारासाठी बीड जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविल्याचा दावा केला होता. मात्र चौकशीअंती संबंधित तरुणी जिल्हा रुग्णालयात दाखलच झाली नसल्याचे उघड झाल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. गर्भपातासाठी शासनाने घालून दिलेले नियम आणि वैद्यकीय प्रक्रिया असताना त्या सर्व नियमांना बगल देत शस्त्रक्रिया करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयातील शल्य चिकित्सकही संभ्रमावस्थेत असून संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, उपचारानंतर संबंधित तरुणीचा ठावठिकाणा लागत नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. तिचा शोध घेण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या असून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून माजलगाव येथील संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक नेते बाबुराव पोटभरे यांनी केली आहे. या गंभीर प्रकरणामुळे आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान बालविवाह केल्याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिसात पती, सासू सासरे आणि पीडितेच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
0
0
Report
Advertisement

विधान परिषद चुनाव में घेराबंदी: कर्ज माफी पर सियासी हलचल तेज

Pandharpur, Maharashtra:विधान परिषद निवडणुकीत कोण कुठे आहे. भाजपने या निवडणुकी वाट लावली आहे. देशात पहिली कर्जमाफी शरद पवार यांनी केली. जनता पक्षाचे अर्थ मंत्री मधु दंडवते यांनी सुद्धा कर्ज माफी केली. सध्या अटी घालून जी कर्ज माफी सुरू आहे चूक आहे. आज स्वतः गिरीश महाजन या ठिकाणी येऊन आमदार रोहित पवार यांच्याशी चर्चा करतील. मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली आहे. ते जशा अडचणी येतील तशा सुधारण करू असे म्ह्णाले आहेत. काही अटी जरूर पडली तर शिथिल करू. लाडक्या बहीण निधी वाटपात पुरुषाने महिला दाखवून जी अनुदान घेतले त्याची चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे
0
0
Report

मालेगाव में शॉर्ट सर्किट से दस ट्रॉली चारा जला, किसानों को बड़ा नुकसान

Nashik, Maharashtra:मालेगाव तालुक्यात शॉर्टसर्किटमुळे शेतात दहा ट्रॉली चारा जळून खाक झाल्याची भीषण आग लागली. या घटनेमुळे पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कोठरे खुर्द येथील जयसिंग रामसिंग मोरकर आणि राजेंद्र जामसिंग सावकार या शेतकऱ्यांनी शेता मध्ये जनावरांसाठी मोठ्या प्रमाणात चारा साठवून ठेवला होता. उन्हाळा आणि आगामी काळातील चाऱ्याची गरज लक्षात घेऊन त्यांनी सुमारे दहा ट्रॉली चारा गंजीच्या स्वरूपात शेतात साठवून ठेवला होता. अचानक वीजवाहिनीत झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ठिणगी पडून चाऱ्याला आग लागली. आग काही क्षणांतच रौद्ररूप धारण करुन परिसरात खळबळ उडाली. धुराचे लोट आणि ज्वाला दिसताच आसपासच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला; परंतु चारा अत्यंत कोरडा असल्याने आग पसरली आणि संपूर्ण गंजी जळून खाक झाली. परिसरातील शेतकऱ्यांनी वीज वितरण व्यवस्थेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. गेल्या चार महिन्यांपासून या परिसरात वायरमनने भेट दिलेली नसल्याची भावना व्यक्त केली जाते, ज्यामुळे वीजवाहिन्यांमधील दोष वेळेवर दुरुस्त झाले नसावेत, अशी शक्यता आहे. या आगीत पशुपालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. चाऱ्यासाठी वर्षभरासाठी साठवून ठेवलेला चारा आता उरतोच नाही, त्यामुळे जनावरांना खाऊ घालण्यासाठी चारा आणायचा तरी कुठून, असा प्रश्न उभा राहिला आहे. दुष्काळी स्थिती, चाऱ्याच्या दरात वाढ आणि आर्थीक अडचणी यामुळे पशुपालक हवालदिल झाले आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. तसेच वीज वितरण कंपनीने या घटनेची चौकशी करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वीजवाहिन्यांची नियमित तपासणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून आहे.
0
0
Report

भीमाशंकर मंदिर के विकास कार्यों का निरीक्षण, सुनेत्रा पवार ने कहा तेज़ प्रगति

Shirur, Maharashtra:सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पुण्यातील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग क्षेत्र भीमाशंकर येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी भीमाशंकर मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेत महापुजा करून आरती केली. या दर्शनानंतर त्यांनी भीमाशंकर परिसर आणि मंदिर परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. गेल्या काही दिवसांपासून मंदिरातील गर्दी आणि भाविकांच्या सोयीस्कर दर्शनासाठी विकास आराखडा राबवला जात आहे. या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी सुनेत्रा पवार आज भीमाशंकरला उपस्थित होत्या. - भीमाशंकर ला चांगल दर्शन झालं त्यामुळे आम्ही खूप समाधानी आहोत - इथे विकास आराखड्याची पाहणी करण्यासाठी मी कालच येणार होते मात्र मला काल भीमाशंकर ला यायला जमलं नाही म्हणून मी आज आले - आज मी आराखडा पाहायला आले त्यामुळे राजकीय काही प्रश्न नको - भाविकांची सोय करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत - विकास कामे सुरू आहेत ती लवकरात लवकर पूर्ण होतील असे आमचे प्रयत्न आहे - विकास कामाचा टापू खूप मोठा आहे - दादानी मजूर केलेल्या 288 कोटीची कामे सुरू आहे - तिसरा टप्पा 11 जूनला आम्ही मंजूर केला आहे त्याचे काम होणार आहेत - येथील कामे मोठ गतीने सुरू आहेत - भीमाशंकर हे हे पवित्र स्थान असून कुंभमेळा असल्यामुळे भाविकांची रीत मोठ्या प्रमाणामध्ये इकडे आहे त्या दृष्टिकोनातून आपण लवकरात लवकर पूर्ण होतील यासाठी प्रयत्न करतो - अल निनो चे जे संकट आले आहे हे टळू दे चांगला पाऊस पडू दे ही प्रार्थना भीमाशंकर चरणी केली आहे.
0
0
Report
Advertisement

इंदापुर में महाविकास आघाडी का रास्ता रोको, किसान कर्ज माफी के लिए भारी प्रदर्शन

Rui, Maharashtra:इंदापूरमध्ये महाविकास आघाडीचा रास्ता रोको आंदोलन... रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा... शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन... पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर येथे महाविकास आघाडीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आमदार रोहित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दर्शवत महाराष्ट्रातील पहिले रास्ता रोको आंदोलन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या इंदापूर तालुक्यात पार पडले. या आंदोलनात महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी काही काळ पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रोखून राज्य सरकारचे लक्ष शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीकडे वेधण्याचा प्रयत्न केला.
0
0
Report

धाराशिव FDA रेड: मराठवाड़ा डेयरी पर बड़ी कार्रवाई, नमूनों की जाँच शुरू

Dharashiv, Maharashtra:धाराशिव ब्रेकिंग आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार धाराशिव जिल्ह्यात खव्यानंतर आता दूध डेरीवर कारवाईचा बडगा. धाराशिव जिल्ह्यातील प्रसिद्ध मराठवाडा डेअरी वर अन्न व प्रशासन विभागाची कारवाई. दुग्धजन्य पदार्थाचे घेतले नमुने. अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर करण्यात आली कारवाई. मराठवाडा व मराठवऱ्हाड या नामांकित दूध उत्पादक केंद्रावर करण्यात आल्या कारवाया. मराठवाडा डेअरी दही व आईस्क्रीमचे तर मराठव्हराड दूध केंद्रावरून घेतली दुधाचे नमुने. अन्य व प्रशासन विभागाच्या या कारवाईने दूध उत्पादन करणाऱ्या दूध डेअरी केंद्राचे दाबे दणाणले.
0
0
Report
Advertisement

राज ठाकरे के जन्मदिन पर भांडुप में पेट्रोल 5 रुपये में वितरित, काटकर मनाया

Mumbai, Maharashtra:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस भांडुप मध्ये अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला भांडुप मधील पेट्रोल पंपावर पाच रुपये सवलतीच्या दरात पेट्रोलचे वितरण वाहनचालकांना करत मनसैनिकांनी हा वाढदिवस साजरा केला यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून सरकारचा निषेध देखील व्यक्त करण्यात आला राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिक हे त्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून भांडुपच्या या पेट्रोल पंपावर अशा पद्धतीने पाच रुपये सवलतीच्या दरात पेट्रोल देऊन मनसैनिकांनी केक कापत आपला निषेध व्यक्त केला आणि राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला.
0
0
Report

पिंपरी चिंचवड़ के रामकृष्ण मोरे नाट्यगृह की दुर्दशा पर कलाकार नाराज़

Pimpri-Chinchwad, Maharashtra:रामकृष्ण मोरे नाट्यगृहाची दुर्दशा, कलाकारांनी व्यक्त केली नाराजी Pimpri natyagruh kailas puri Pune 14-6-26 feed by 2c Anchor - महाराष्ट्रात नाट्यगृहांची दुरावस्था या समस्येच्या सामना दीर्घ काळापासून रसिक प्रेक्षक आणि कलाकारांना करावा लागतोय... अनेकदा कलाकारांनी याविषयी उघड भाष्य केले... पण सांस्कृतिक विभागाला आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला अद्यापही जाग आलेली नाही... अलबत्या गलबत्या या लोकप्रिय नाटकाच्या कलाकारांनी पिंपरी चिंचवड मधील लोकप्रिय अशा रामकृष्ण मोरे नाट्यगृहाच्या दुर्दशेला वाचा फोडलीये... गेले कित्येक दिवसांपासून या नाट्यगृहात असुविधा मिळत असल्याने त्यांनी थेट प्रेक्षकांसमोर नाराजी व्यक्त करत असूविधांना वाचा फोडण्याची विनंती केली...
0
0
Report

बीड़ में MPPSC परीक्षा: 5 हजार से अधिक उम्मीदवार, जिलाधिकारी ने केंद्रों की निगरानी शुरू की

Beed, Maharashtra:बीड : एमपीएससी ची परीक्षेसाठी 5 हजारांहून अधिक उमेदवार; जिल्हाधिकाऱ्यांकडून केंद्रांची तपासणी आज राज्यभरासह बीड जिल्ह्यातही कडक बंदोबस्तात पार पडत आहे. बीडमधील 21 उपकेंद्रांवर दोन सत्रांमध्ये ही परीक्षा होते असून तब्बल 5 हजार 881 उमेदवार नशीब आजमावत आहेत. परीक्षेचे गांभीर्य आणि पारदर्शकता कायम राखण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी स्वतः परीक्षा केंद्रांना भेट देत पाहणी सुरू केली आहे. उमेदवारांची कोणतीही गैरसोय होऊ नये, तसेच गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी प्रशासन सतर्क झाले असून सर्व केंद्रांवर कडेकोट व्यवस्था करण्यात आली आहे.
0
0
Report
Advertisement

जालना में धारदार हथियार से युवक की हत्या, चार थाने की पुलिस तलाश में

Jalna, Maharashtra:जालना :धारदार शस्त्राने वार करून तरुणाची हत्या सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील घटनेने परिसरात खळबळ. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके रवाना आज सकाळच्या sुमारास शहरातील पंचमुखी महादेव मंदिर परिसरात एक तरुण गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला होता. त्याला तातडीने जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार करत शेख रफिक याला गंभीर जखमी केले होते. त्यामुळे त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, घटना घडल्यानंतर पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. या हत्येच्या घटनेने जालना शहर हादरले असून आरोपीच्या शोधार्थ चार पोलीस पथके रवाना करण्यात आल्याची माहिती जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे.
0
0
Report

इस साल स्कूल सामग्री की कीमतें 20-25% बढ़ीं, अभिभावकों पर बढ़ा भारी बोझ

Yeola, Maharashtra:नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वीचं विद्यार्थ्यांच्या आवश्यक असलेल्या शालेय साहित्याच्या किमतीत यंदा 20 ते 25 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. वह्या, पुस्तके, पेन , पेन्सिल, रंगसाहित्य तसेच इतर स्टेशनरी वस्तूंच्या वाढलेल्या दरांमुळे पालकांच्या खर्चात मोठी वाढ झाली असून त्यांना आर्थिक ताणाचा सामना करावा लागत आहे.दरवर्षी शाळा सुरू होण्यापूर्वी पालकांकडून मोठ्या प्रमाणात शालेय साहित्याची खरेदी केली जाते. मात्र यंदा बाजारात वह्या आणि पुस्तकांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top