icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अकोला के उमरा ग्रामपंचायत में लाखों के कथित अपव्यय का मामला; जांच की मांग

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील उमरा ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि शासकीय आदेशांची अंमलबजावणी न केल्याप्रकरणी महाराष्ट्र विधानमंडळ पंचायत राज समितीकडे तक्रार करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीतील सन २०२१-२३ या कालावधीतील तत्कालीन सरपंच व सचिव यांनी लाखो रुपयांचा अपहार केल्याचा आरोप तक्रारदार राजेंद्र मावलकर यांनी केला आहे. या प्रकरणी अमरावती विभागीय आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिले असतानाही अद्याप संबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झालेली नसल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच, प्रकरणातील अपहाराची रक्कम वसूल करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. याप्रकरणी तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
0
0
Report

चित्रा वाघ ने राहुल गांधी पर निशाना साधकर पितृसत्ता पर सवाल ठोके

Ambernath, Maharashtra:पितृसत्ताकतेवर बोलण्याआधी राहुल गांधींनी घरात डोकवावं चित्रा वाघांचा हल्लाबोल प्रियंका गांधी सक्षम असूनही त्यांना मागे का ठेवलं चित्रा वाघांचा सोनिया गांधींना सवाल पितृसत्ताकतेचा सर्वात मोठा लाभार्थी राहुल गांधीच चित्रा वाघांचा घणाघात मुलीला मागे ठेवून मुलाला पुढे का केलं?चित्रा वाघांचा सोनिया गांधींना सवाल राहुल गांधींपेक्षा प्रियंका गांधी कणभर हुशार चित्रा वाघांचा गांधी कुटुंबावर निशाणा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात येऊन राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भूमीत राहुल गांधी पितृसत्ताकतेविरोधात बोलत असतील, तर त्यांनी आधी आपल्या पक्षातील आणि कुटुंबातील परिस्थितीकडे पाहावं, असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे. राहुल गांधींपेक्षा प्रियंका गांधी अधिक हुशार आणि सक्षम असल्याचं म्हणत, त्यांना राजकारणात मागे का ठेवण्यात आलं, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. व्हिओ : महाराष्ट्रात येऊन पितृसत्ताकतेची भाषा करणाऱ्या राहुल गांधींनी आधी आपल्या कुटुंबातील राजकारणाचा विचार करावा, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. राहुल गांधींपेक्षा प्रियंका गांधी कणभर अधिक हुशार आणि सक्षम आहेत, मग त्यांना राजकारणात मागे का ठेवण्यात आलं, असा थेट सवाल त्यांनी सोनिया गांधींना केला.प्रियंका गांधी यांच्यामध्ये क्षमता असतानाही त्यांना राजकारणात पुढे का आणलं नाही, असा प्रश्न उपस्थित करत चित्रा वाघ यांनी गांधी कुटुंबावर टीका केली. प्रियंका गांधी यांचं वयाच्या पंचविशीतच लग्न करून त्यांना सासरी पाठवण्यात आलं, असा दावा त्यांनी केला.पितृसत्ताक व्यवस्थेचा सर्वात मोठा लाभार्थी कोण असेल, तर तो स्वतः राहुल गांधी आहेत, अशी बोचरी टीकाही चित्रा वाघ यांनी केली. त्यामुळे सोनिया गांधींनी देशाला याचं उत्तर द्यावं की, मुलगी सक्षम असतानाही तिला मागे ठेवून मुलाला राजकारणात पुढे का केलं, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.
0
0
Report

मनसे के साथ युति नहीं तो भाजपा सत्ता से बाहर, महाराष्ट्र में राजनीतिक हलचल तेज

Kalyan, Maharashtra:सेनेने मनसेसोबत युति तोडली नाही तर भाजपा सत्तेतून बाहेर पडणार भाजपा कार्यकारणीत सर्व पदाधिकाऱ्यांचा झाला निर्णय पुण्यातील कॉलेजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो मनसे नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत हटवण्यात आला . यानंतर संबंध देशभरात भाजपाकडून याचा निषेध केला जातोय. दर्म्यान कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील महायुतीच्या राजकारणात तर मनसेवरून भाजप आणि शिवसेनेत संघर्ष पेटलाय. दोघांमध्ये काडीमोड होण्याची शक्यता वर्तवली जातीय.आज कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात उपमहापौरांच्या दालनात भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी शिवसेनेने मनसेशी युती तोडली नाही, तर भाजपा सत्तेतून बाहेर पडेल असा पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतलाय. दरम्यान अंतिम निर्णय हा भाजपा पक्ष श्रेष्ठ घेतील अशी माहिती भाजपा उपमहापौर राहुल दामले यांनी दिली.तर ही नाटकं आहेत, सत्तेपासून हे दूर राहू शकत नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी दिली.
0
0
Report
Advertisement

Kolhapur में महायुती की कुश्ती जारी, आंतरिक टकराव तेज

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात महायुतीची सत्ता मजबूत असली, तरी महायुतीतील अंतर्गत संघर्ष आता चव्हाट्यावर येताना दिसतोय. कोल्हापूर महापालिकेपासून गोकुळच्या निवडणुकीपर्यंत आणि आता पालकमंत्री विरुद्ध आमदार अशा राजकीय संघर्षाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. सत्ता महायुतीची कुस्तीही महायुतीतच अशी परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात पाहायला मिळत आहे.. VO 1 : कोल्हापूर महानगरपालिकेत सध्या महायुतीची सत्ता. भाजपच्या रूपाराणी निकम महापौरपदी विराजमान… मात्र, महापालिकेच्या कारभारात महायुतीतीलच दोन घटक पक्ष आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. शिवसेनेचे गटनेते सारंगधर देशमुख आणि राष्ट्रवादीचे गटनेते आदिल फरास… वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत आदिल फरास यांनी मांडलेल्या भूमिकेला शारंगधर देशमुख यांनी विरोध केला आणि पाहता पाहता वाद विकोपाला गेला…दोघांमध्ये हमरीतुमरी झाली , एकमेकांना आव्हान दिले. इतकंच नव्हे तर शड्डू ठोकत थेट चौकात येऊन बघून घेण्यापर्यंत हा वाद पोहोचला…त्यामुळे पोलिसांना देखील पाचारण करावे लागले.वाद इतका वाढला की अखेर पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला, तर महापौर रूपाराणी निकम यांना मध्यस्थी करून दोन्ही नेत्यांना शांत करण्याची वेळ आली. Byte :- महापौर रूपाराणी निकम VO 2 : महापौरांनी हा घरातील वाद असल्याचं सांगत तो घरातच मिटेल, अशी भूमिका घेतली… पण हा केवळ महापालिका पुरता मर्यादित संघर्ष नाही तर महायुतीतील वाढत्या अंतर्गत कुरघोडीचं हे उदाहरण आहे. कारण महानगरपालिका असो किंवा गोकुळ दूध संघ. महायुतीतील नेत्यांचा अंतर्गत संघर्ष वाढलेला पाहायला मिळतोय. कारण गोकुळच्या सत्तेसाठी महायुतीतीलच भाजप विरुद्ध राष्ट्रवादी-शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळत आहे. दूध संस्थांच्या पात्रतेवरून दुग्ध विभागाकडे दाखल झालेल्या तक्रारींच्या सुनावणीदरम्यानही महायुतीतील दुसऱ्या फळीतील नेत्यांनी भाजपाचा उल्लेख न करता अधिकाऱ्यांच्यावर आरोप केला. Vis Gondhal VO 3 :- महायुतीतील अंतर्गत धुसफूस केवळ महापालिका आणि गोकुळपुरती मर्यादित नाही…कोल्हापूर शहराचे शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनीही काही दिवसांपूर्वी पक्षांतर्गत आणि जिल्ह्याच्या राजकारणावर भाष्य केलं. मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असणाऱ्या आमदार क्षीरसागर यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे नाव न घेता जिल्ह्यात पक्षवाढीसाठी काय योगदान दिलं, असा अप्रत्यक्ष सवाल उपस्थित केला. इतकंच नाही, तर वरिष्ठांनी मंत्र्यांच्या कामकाजाचं ऑडिट करावं, अशी मागणीही त्यांनी केली. यामुळे क्षीरसागर आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यातील सुप्त संघर्षाची चर्चाही रंगली. Byte :- आमदार राजेश क्षीरसागर VO 4 : एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यावर महायुतीची मजबूत पकड… तर दुसरीकडे याच महायुतीतील घटक पक्षांमध्ये सत्तेच्या वाट्यावरून कुरघोडी… महापालिकेत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी… गोकुळमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी-शिवसेना… आणि तर सेना आमदार विरुद्ध पालकमंत्री अशी समीकरणं. त्यामुळे प्रश्न एकच. महायुती मजबूत आहे की महायुतीतील अंतर्गत संघर्ष आता उफाळून येतोय.. BYTE – विजय पाटील, राजकीय पत्रकार VO 5 : महायुती सत्तेत असताना घटक पक्षांमध्ये सुरू असलेली ही रस्सीखेच आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. कारण सत्ता एकच पण सत्तेचे दावेदार अनेक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत. गोकुळची निवडणूक असो… किंवा जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणं. प्रत्येक पक्षाला आपला प्रभाव वाढवायचा आहे. त्यामुळे नेते एकीकडे महायुतीत सगळं काही अलबेल आहे, असा दावा करत असले तरी ग्राउंडवर मात्र चित्र वेगळंच दिसतंय. सत्तेत महायुती, पण कुस्तीही महायुती मध्येच होत असल्याने या अंतर्गत संघर्षाचा फटका कोल्हापूरच्या विकासाच्या प्रश्नांना बसणार नाही ना? याकडे आता कोल्हापूरकरांचं लक्ष लागलंय. प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर.
0
0
Report

नागपुर में DJ बैन के लिए जनचळवळ, संदीप जोशी का पहल

Nagpur, Maharashtra:नागपूर नागपुरातही DJ बंदीसाठी जनचळवळ उभारणार... माजी आमदार व माजी महापौर संदीप जोशी यांचा पुढाकार DJ चा भयानक आवाज, लेझर लाईटमुळे कानावर आणि डोळ्यावर परिणाम होतात... यामध्ये सर्वसामान्य नागरिकच भरडल्या जातो . ज्येष्ठ नागरिक लहान मुलं आणि रुग्ण भरड्या जातात.. त्यामुळे आनंद साजरा करायला कुठेही विरोध नाही.. सर्वधर्मीयांनी सर्व आनंद साजरे केले पाहिजे मात्र परंतु ते साजरे करत असताना आपल्याकडे असलेले बँड, ढोल -ताशे, संदल, भजन यांचा वापर करण्याच आवाहन... डिजे बंदीकरता चळवळ उभी करण्यासाठी डिजिटल Online पिटीशन प्रशासनाने मंडळाकडून हमीपत्र घ्यावे.. आम्हाला सात ते आठ मंडळानी DJ न वापरण्याचे हमीपत्र दिले याबाबत मुख्यमंत्र्यानाही भेटू DJ आणि लेझर लाईटवर बंदी आणावी..राजकीय नेत्यांनीही DJ बाबत थांबावे गरज पडल्यास कारवाई करावी माजी आमदार आणि भाजप नेते संदीप जोशी यांच्याशी संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधिनी
0
0
Report
Advertisement
Advertisement

आदिवासी विद्यार्थियों के ख़िलाफ़ आंदोलन के बीच मंत्री से इस्तीफ़े की मांग तेज

Nashik, Maharashtra:नाशिक *हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाईट पॉईंट* *ऑन आंदोलन* - युवक आदिवासी वर्ग और विद्यार्थी मूलनिवासी आदिवासी हक्क अधिकाराच्या अनुषंगाने आंदोलन सुरू आहे - जी बिंदू नामावली आहे त्यामध्ये खड़साळ पण फडणवीसरने केला आहे फसवणूक करत असताना आठव्या नंबर वर आदिवासींचा टाकण्यात आला आहे - जे अन्न आहे ते अन्नाचा दर्जा आहे - बिंदू नामावलीतला गळ दुरुस्त करावा - आतापर्यंत दोन वर्षात फडणवीस साहेब 892 आदिवासी विद्यार्थ्यांचा बळी आणि मृत्यू झाला आहे याला आपण कारणीभूत आहात - तात्काळ या विभागाचे मंत्री आदिवासी विभागाचे मंत्री अशोक उईके यांनी राजीनामा द्यावा - स्वतंत्र्य कॅबिनेटची बैठक येथे बोलवण्यात यावी सर्व मागण्या मंजुर द्यावी *ऑन राहुल गांधी दौरा आंदोलक भेट* - त्यांनी छात्रकी गुंज कार्यक्रमात पुण्यात विद्यार्थ्यांशी चर्चा केली - नागपूर संभाजीनगर वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे - या ठिकाणच्या प्रतिनिधींची भेट घालण्याचा आमचा मानस आहे - आमचा या आंदोलनाला मोर्चाला पाठिंबा आहे *ऑन छात्रो की गुंज फडणवीस आरोप* - खोटं बोला रे टून बोला ही त्यांची शैली आहे - त्यांच्यावर खोटं बोलण्याचा आजार झाला आहे त्यामुळे मी त्यांना गेट वेल सून म्हणेल *ऑन महागाई* - देशाचे पंतप्रधान सांगतात भाजीत तेल कमी टाका सांगत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाचे वाटोळ झाले नरेंद्र दरिंदर आहे *ऑन जरांगे आंदोलन* - जातनिहाय जनगणना आमची मागणी आहे - जनगणनेच्या निमित्ताने तो मोकळा झाला पाहिजे आमची मागणी आहे - आपापसात एकमेकांना लढवणे ओबीसी विरुद्ध मराठा एनटी लढाई लावत आहे थोडा थोडा आणि राज्य करा *ऑन Sir* - अनेक ठिकाणी घोळ आहे - बरच काही लपलेला आहे sir अनुषंगाने नागरिकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचे काम करत आहे - महिला आरक्षण काँग्रेसने आणलं होतं पंचायतराजच्या अनुषंगाने आलेलं पुढे देखील ते विधायक आलं त्याला आमचा पाठिंबा होता आता इथे पण महिलांना आरक्षण देण्याचे विधेयक आणायचं असेल तर काँग्रेसचा पाठिंबा राहील - खोटं बोलायचं आणि विसरभोळ्याचा आरोप त्यांना झाला आहे त्यातून गेटवेल सून या त्यांना शुभेच्छा *ऑन सोशल मीडिया* - शासनात राहून प्रशासनात भ्रष्टाचार करायचा सोशल मीडियातून कसा जायचं हे सांगता - त्यांच्या सूचना लोकशाहीच्या वा भाड्या काढणाऱ्या *ऑन मोदी फोटो* - मोदींचा फोटो देशातील जनतेने त्यांच्या मनातून काढून टाकला - गोंधळ भ्रष्टाचार मोदी सरकारचा ब्रीदवाक्य आहे
0
0
Report

ओबीसी नेता लक्ष्मण हाके का आक्रोश मोर्चा पुणे से मुंबई के लिए रवाना

Rui, Maharashtra:दौंड पुणे ओबीसी नेते लक्ष्मण हाके ऑन मुंबई ओबीसी आरक्षण आक्रोश मोर्चा थोड्याच वेळात लक्ष्मण हाकेंच्या ओबीसी जन आक्रोश मोर्चाला होणार सुरुवात.... दौंड तालुक्यातील पाटस टोल नाका परिसरातून मुंबईसाठी निघणार...... सरकारनं अंतरवालीत विमानतळ बांधव पण आमच्या अन्नात माती कालवू नये : लक्ष्मण हाके..... सरकारमधील कोणाशी ही बोलणं नाही : लक्ष्मण हाके.... ओबीसींचे आरक्षण संपलं नाही हे सामंतांनी सिद्ध करावं..... अनपड माणसाच्या सांगण्यावरून सरकार जीआर वर जीआर काढतंय : लक्ष्मण हाके ओबीसी नेते लक्ष्मण हाके थोड्याच वेळात दौंड तालुक्यातील पाटस येथून ओबीसी आरक्षण आक्रोश मोर्चाला सुरुवात करत आहेत. थोड्याच वेळात पुण जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस येथून हा मोर्चा मुंबईसाठी मार्गस्थ होणार आहे. दरम्यान या मोर्चापूर्वी लक्ष्मण हाके यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी यांनी....
0
0
Report
Advertisement
Advertisement
Advertisement
Back to top