445001
यवतमाळच्या आर्णीत भाजपाची पहिली यादी, आमदाराचा नामांचा गहजब!
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या आर्णी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत विद्यमान आमदाराचे नाव नाही. यामुळे महायुतीतील शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केला आहे. तिन्ही तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन उपजिल्हाप्रमुख विष्णू उकंडे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. पालकमंत्री संजय राठोड यांचेही या जागेसाठी आग्रह आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, जागा सुटली नाही तरी शिवसेना उमेदवार निवडणूक लढवेल.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
इंग्लिश मिडियम स्कूल प्रिंसिपल पर तीसरी क्लास के छात्र के हाथ पर हमला; मामला दर्ज
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर शहराजवळ असलेल्या एका खाजगी इंग्रजी माध्यम शाळेच्या प्रिन्सिपलने इयत्ता तिसरी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलाचा हाताचा चावा घेतल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात प्रिन्सिपल गौतम बहादुर्गे या प्रिन्सिपल विरोधात नगर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठ वर्षीय विद्यार्थी शाळेत गेले असताना त्याच्या वर्गातील वर्ग मित्रांचे आपसात भांडण सुरू होते. याबाबत त्या आठ वर्षे विद्यार्थ्याने आपले क्लास टीचर ज्योती मॅडम यांना सांगितले त्यावर ज्योती मॅडम यांनी शाळेचे प्रिन्सिपल गौतम बहादुर्गे यांना बोलवून घेतले. प्रिन्सिपल आल्यानंतर त्यांनी जे विद्यार्थी आपसात भांडण करत होते त्यांचे कान पीरगाळले आणि भांडणे कसे करतात हे मी तुम्हाला दाखवतो असे म्हणून त्या आठ वर्षीय मुलाचा गळा धरून वर उचलले त्यानंतर खाली उतरवून त्या मुलाच्या हाताचा चावा घेतला. ही घटना घरी गेल्यानंतर घरच्यांच्या लक्षात आली त्यानंतर शाळेतील प्रिन्सिपल ला फोन करून या घटनेबाबत विचारले असता प्रिन्सिपल ने माझ्याकडून चुकीने ही घटना झाली मी लेखी पत्र पाठवून माफी मागतो मला तुमचा पत्ता द्या असेही त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना फोनवर सांगितले. मात्र त्या आठ वर्षीय मुलाचा असा छळ केल्याने पालकाने पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे0
0
Report
संगमेश्वर बस स्टेशन पर बारिश-कीचड़ से यात्रियों को घंटों इंतजार, मार्ग की देरी का असर
Ratnagiri, Maharashtra:संगमेश्वर-रत्नागिरी.. संगमेश्वर बस स्थानकात चिखलाचे साम्राज्य.. रखडलेल्या महामार्ग रुंदीकरणाचा प्रवाशांना फटका! मुंबई-गोवा महामार्गाच्या अपु राश्या रुंदीकरणाचा मोठा फटका आता संगमेश्वर बस स्थानकाला बसला आहे.. पावसामुळे बस स्थानक परिसरात सगळीकडे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, प्रवाशांना याच चिखलात तासन्तास उभे राहून एसटी बसची वाट पाहावी लागत आहे.. महामार्गाच्या या रखडलेल्या कामामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे..0
0
Report
पश्चिम विदर्भ में तेज बारिश, दिघी कोल्हे में बाढ़ से घरों में पानी
Amravati, Maharashtra:गेल्या 24 तासापासून पश्चिम विदर्भात पावसाची दमदार हजेरी; अमरावती और यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट, अमरावतीच्या दिघी कोल्हे गावात शिरला पावसाचे पाणी अनेकांचे संसार उघड्यावर गेल्या 24 तासांपासून संपूर्ण पश्चिम विदर्भात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली असून 24 तासापासून अशी विदर्भात दमदार पाऊस सुरू आहे. अमरावती जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडत असून अमरावती जिल्ह्यातील दिघी कोल्हे या गावात चक्क रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दिघी कोल्हे येथील नदीला पूर आल्याने गावात पुराचे पाणी शिरले असून प्रशासनाने गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे पुराचे पाणी गावात शिरल्याने अनेक घरातही पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक नागरिकांचे संसार उघड्यावर पडल्याचा पाहिला मिळाला आहे.0
0
Report
Advertisement
यवतमाल में प्रशासन ने भारी बारिश के पानी से निपटने के लिए अलर्ट जारी किया
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात आज जिल्हा प्रशासनाने पावसाचारेड अलर्ट जाहीर केला आहे. जिल्हा प्रशासन क्रिया दृष्टीने सतर्क असून अनेक भागात पावसाचे पाणी शिरल्याच्या बातम्या पुढे येत आहेत.0
0
Report
कोयना जलाशय को शिवाजी महाराज के नाम पर रखने का ऐतिहासिक निर्णय
Satara, Maharashtra:सातारा:महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळख असलेल्या कोयना धरण जलाशयाला ''छत्रपती शिवाजी महाराज'' यांचे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत करत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी महायुती सरकारचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे हा आनंदाचा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. कृषि आणि ऊर्जेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव मिळणे हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे. महायुती सरकारची शिवरायांवरील निष्ठा व आदर या निर्णयातून स्पष्टपणे दिसून येतो, असे मत शिवेंद्रराजे भोसले यांनी स्पष्ट केले.0
0
Report
चार दिनों में महाबलेश्वर-तपोला मार्ग दुरुस्त, 105 गांवों का संपर्क फिर से जुड़ा
Satara, Maharashtra:सातारा: मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर-तापोळा मार्गावरील फळणे वस्तीजवळ तापोळा खोऱ्यातील १०५ गावांना जाणारा रस्ता खचल्यामुळे या भागातील दळणवळण ठप्प झाले होते; मात्र महाबळेश्वर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सुनील शिंदे आणि मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी जिल्हा प्रशासनाच्या मदतीने अवघ्या चार दिवसांत युद्ध पातळीवर हा रस्ता दुरुस्त केला आहे. खचलेल्या रस्त्यासाठी तब्बल ५० ब्रास दगड, खडी आणि मुरुमाचा भराव घातल्यामुळे तापोळा खोऱ्यातील १०५ गावांचा तुटलेला संपर्क पुन्हा जोडला गेला आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या सूचनेनुसार आणि मुख्याधिकारी व अभियंत्यांच्या अहोरात्र मेहनतीमुळे एसटी आणि इतर वाहतूक सुरळीत झाली असून स्थानिक नागरिक व पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे.0
0
Report
Advertisement
वाशीम जिले में भारी बारिश से पैनगंगा नदी में बाढ़, बाढ़ से क्षेत्र में सतर्कता जरूरी
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. रिसोड तालुक्यातील आसेगाव पेन परिसरातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला पूर आला आहे. सततच्या पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढली असून, नदीवरील बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. पाण्याचा प्रवाह अतिशय वेगवान असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच बंधारा आणि नदीपात्राजवळ जाणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. पूरस्थितीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये खबरदारीचे वातावरण असून, प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.0
0
Report
धुळे में भारी बारिश से बाढ़ जैसे हालात, नदी-नाले प्रवाहित, सतर्क रहें
Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यात गेल्या बारा तासापासून मुसळधार पाऊस बरसत आहे. दमदार पावसामुळे नदी नाले या पावसाळ्यात पहिल्यांदाच प्रवाहित झालेले आहेत. अनेर धरण परिसरामध्ये जोरदार पाऊस पडल्यामुळे धरणातून 45 हजार क्युसिक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. अनावश्यक घराबाहेर पडू नये असा आवाहन प्रशासनाकडून जिल्ह्यातील नागरिकांना करण्यात आलेला आहे. तसेच शाळांनाही आवश्यकता भासल्यास सुट्टी जाहीर करण्यात यावी असं शिक्षण विभागाने सांगितले आहे。0
0
Report
अकोला में यलो अलर्ट के बाद तेज बारिश, नदियाँ उफान पर
Akola, Maharashtra:हवामान विभागाने अकोला जिल्ह्याला यलो अलर्ट जारी केल्यानंतर कालपासून जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बाळापूर तालुक्यातील मन, निर्गुणा आणि महेश या नद्यांना दुथडी भरून वाहत आहे. नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच अनावश्यकपणे नदीपात्रात किंवा पुलांवर जाणे टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अकोला जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे जनजीवनावर परिणाम होऊ लागला आहे. बाळापूर तालुक्यातील मन, निर्गुणा आणि महेश या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठच्या सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, पावसाचा जोर अद्याप कायम असल्याने परिस्थितीवर जिल्हा प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे. महसूल, आपत्ती व्यवस्थापन आणि पोलीस प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून नदीकाठच्या गावांमध्ये खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.0
0
Report
Advertisement
यवतमाळ में भारी बरसात से अरुणावती नदी उफान, आर्णी शहर के मोहल्लों में बाढ़
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अरुणावती नदीला पूर आला असून, पुराचे पाणी आर्णी शहरातील अनेक भागात शिरले आहे. आर्णी येथील उदयनगर, शनीमंदिर, मोबीनपुरा या भागात पुराचं पाणी शिरल्याने अनेक घरांमध्ये पाणी साचले आहे. काल रात्रीचा सुमारास अचानक पाण्याचा प्रवाह वाढून या परिसराला पुराच्या पाण्याने वेढले. त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. नागरिक कुटुंबीयांना घेऊन सुरक्षित स्थळी पोहोचले. दरम्यान घरांमध्ये पाणी शिरल्याने दैनंदिन गरजेच्या साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पूर परिस्थितीमुळे अनेक कुटुंबीय उघड्यावर आले आहेत.0
0
Report
वाशीम में किसानों के कर्ज माफी के लिए ई-केवाईसी पूरी करने का अभियान चल रहा
Washim, Maharashtra:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यात कर्जमाफीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. जिल्ह्यात 54 हजारांहून अधिक शेतकरी पात्र ठरले असून, त्यापैकी आतापर्यंत 35 हजार 429 शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. ई-केवायसी अपूर्ण राहिल्यास कर्जमाफीचा लाभ मिळण्यास विलंब होऊ शकतो. दरम्यान, सेतू केंद्रे, महा-ई-सेवा केंद्रे आणि बँकांमध्ये शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत असून, तांत्रिक अडचणींमुळे अनेकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.0
0
Report
सोलापुर में चिंचपूर बंधारा डूबा, महाराष्ट्र-कर्नाटक संपर्क टूट गया
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - पाण्याचा प्रवाह वाढल्याने चिंचपूर बंधारा बुडाला पाण्याखाली, महाराष्ट्र कर्नाटकचा संपर्क तुटला - पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरण झाले ओव्हरफ्लो - त्यामुळे भीमा नदीत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने जिल्ह्यातील अनेक बंधारे पाण्याखाली - दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर बंधारा पाण्याखाली बुडाल्याने महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांचा संपर्क तुटला - चिंचपूर बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद - कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर0
0
Report
Advertisement
नंदुरबार में भारी बरसात ने खरीफ को दी नई उम्मीद, किसानों में खुशी
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यात सलग तीन दिवसांच्या रिमझिम पावसानंतर अखेर पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. रात्रभरापासून नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस सुरू असून, शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जून महिना पूर्णपणे कोरडा गेल्यानंतर आणि जुलै महिन्याच्या अखेरच्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १९.८ टक्के पावसाची नोंद झाल्याने खरीप हंगामातील सुमारे ४० टक्के पेरण्या रखडल्या होत्या. अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीतीही व्यक्त केली जात होती. रात्रभर सुरू असलेल्या या दमदार पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना वेग मिळण्याची शक्यता आहे. पावसामुळे कापूस, मिरची आणि मका या पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. काही दिवस जिल्ह्यात समाधानकारक पाऊस कायम राहिल्यास शेतीसह पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नालाही मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.0
0
Report
वाशिम में तेज बारिश, कई जगह जलभराव की आशंका; ऑरेंज अलर्ट जारी
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यात रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून,जिल्ह्यातील अनेक भागांत पाऊस सुरू आहे.या पावसामुळे नद्या-नाले वाहू लागले असून,हा पडत असलेला पाऊस खरिपाच्या पिकांना पोषक ठरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.भारतीय हवामਾਨ विभागाने वाशिम जिल्ह्यासाठी पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून,नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.0
0
Report
सोलापुर में रात से हल्की बारिश शुरू, सूखे के बाद राहत की उम्मीद
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात काल रात्रीपासून रिमझिम पावसाला सुरुवात - दिवसभर ढगाळ वातावरणानंतर सोलापूरात सायंकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात - जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रात्रभर पावसाच्या हलक्या सरी सुरूच - संपूर्ण जून आणि जुलै महिना कोरडा गेल्यानंतर रिमझिम पावसाने सोलापूरकरांना काहीसा दिलासा - मात्र खरीप पिकांसाठी तसेच तलाव, विहिरी असे जलस्त्रोत भरण्यासाठी मोठ्या दमदार पावसाची सोलापूरकरांना प्रतीक्षा कायम0
0
Report
Advertisement
