icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

धामणी के किसान आमरण अनशन, नियमित विद्युत कनेक्शन की मांग

Shirur, Maharashtra:आंबेगाव तालुक्यातील धामणी येथे उपसा सिंचन योजनांच्या शेतीपंपांना नियमित वीज जोडणी मिळावी, यासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू झाले आहे. माजी सरपंच सागर जाधव यांच्या नेतृत्वाखाली २५ शेतकरी गेल्या तीन दिवसांपासून ग्रामपंचायतीसमोर उपोषणाला बसले आहेत. धामणी आणि पहाडदरा परिसरातील शेतकऱ्यांनी सुमारे ७ कोटी रुपये खर्च करून डिंभे उजव्या कालव्यावर आधारित ९ उपसा सिंचन योजना उभारल्या आहेत. मात्र, महावितरणने नियमित वीज जोडणी न देता प्रायोगिक तत्त्वावर सौरऊर्जा प्रकल्प राबवला, जो पूर्णपणे अपयश ठरल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. कर्ज आणि दागिने गहाण ठेवून उभारलेल्या या योजनांसाठी तातडीने नियमित वीज जोडणी द्यावी, या मागणीवर शेतकरी ठाम असून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
0
0
Report

सोलापूर विश्वविद्यालय में कुलगुरु समेत अधिकारियों पर भंडारा, जत्था-आक्रोश चरम पर

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापूर विद्यापीठात कुलगुरुंसह अधिकाऱ्यांच्या अंगावर उधळला भंडारा सोलापूर विद्यापीठात कुलगुरुंसह अधिकाऱ्यांच्या अंगावर उधळला भंडारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातील अहिल्यादेवींच्या स्मारकाचे काम संथ गतीने सुरू असल्याने पदाधिकारी आक्रमक स्मारक समितीमधील पदाधिकारी शरणू हांडे यांनी हा भंडारा उधळला अहिल्यादेवी स्मारक समितीतील अधिकाऱ्यांना सुबुद्धी यावे यासाठी भंडारा उधळल्याचा दावा कुलगुरु प्रकाश महानवर यांच्यासह अधिकाऱ्यांच्या अंगावर भंडारा उधळल्यानंतर काळे वस्त्र दाखवत निषेध व्यक्त केला
0
0
Report

सांगली-सातारा: धैर्यशील कदम की जीत, 100 मतों के विवाद से गूंजे आरोप-प्रत्यारोप

Satara, Maharashtra:सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम विजयी झाले... मात्र विजयाच्या जल्लोषानंतर आता महायुतीतच आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला अपेक्षेपेक्षा तब्बल 100 मते अधिक मिळाल्याने ही मते नेमकी कुणाची फुटली, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी नाव न घेता पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांना 593 मते मिळाली, तर महाविकास आघाडीचे उमेदवार अभय जगताप यांना 292 मतांची साथ मिळाली. मात्र महाविकास आघाडीकडे केवळ 192 मतांचे संख्याबळ असताना अतिरिक्त 100 मते कुठून आली, हा आता चर्चेचा विषय ठरला आहे. याच मुद्द्यावरून मंत्री जयकुमार गोरे यांनी कराड येथे माध्यमांशी बोलताना महायुतीतील काही नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका केली. आम्ही हिशोबात पक्के आहोत, नक्की हिशोब करू, असे सांगत अनेकांच्या ओठात एक, मनात एक आणि कृतीत वेगळेच असल्याचा टोला त्यांनी लगावला. गोरे यांनी आपल्या प्रतिक्रियेत भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. मात्र मित्रपक्षातील बडे नेते शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांची नावे घेणे टाळल्याने राजकीय चर्चांना आणखी उधाण आले. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून सुरू असलेली महायुतीतील धुसफूस विधान परिषद निवडणुकीनंतरही कायम असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, मतदानापूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने धैर्यशील कदम यांना पाठिंबा जाहीर केला होता. तर भाजपने आपल्या मतदार सदस्यांची मते सुरक्षित राहावीत म्हणून त्यांना सहलीवरही पाठवले होते. तरीही 100 मतांचा घोळ नेमका कुठे झाला, यावरून संशयाचे वातावरण कायम आहे. महायुतीचा उमेदवार विजयी झाला असला तरी निकालानंतरचा वाद आता अधिक गडद होताना दिसत आहे. फुटलेल्या 100 मतांचा हिशोब नेमका काय, याचा शोध घेण्याची भाषा स्वतः मंत्री जयकुमार गोरे करत आहेत. त्यामुळे येत्या काळात सातारा जिल्ह्यातील महायुतीतील अंतर्गत संघर्ष आणखी उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही
0
0
Report
Advertisement

संजय काकापाटील का भाजपा में घर वापसी: सांगली के राजनीतिक समीकरण बदले

Sangli, Maharashtra:संजय काकापाटील का भाजपा में घर वापसी: 30 जून को उनका भाजपा प्रवेश होगा। संजयकाकांच्या प्रवेशामुळे सांगली जिल्ह्यातलं राजकीय गणित बदलेलं जाणार असल्याची चर्चा आहे. गेल्या वर्षभर राजकीय वनवासात असलेल्या संजयकाकांचा पुन्हा जोरदार कमबॅक होण्याची शक्यता आहे. भाजपात पुन्हा प्रवेशासाठी त्यांनी प्रयत्न केले, परंतु internal विरोधामुळे काही अडथळे आले होते. 30 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश जाहीर होण्याची शक्यता आहे. संजयकाकांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यातलं राजकीय समीकरण ताकदवान होणार असून, तासगाव, कवठेमहांकाळ, नगरपालिकेसह पंचायत समितीवर भाजपामय वातावरण निर्माण होईल.
0
0
Report

अकोला में भारी बारिश से पानी घुसा; नाले साफ नहीं—नगर निगम पर सवाल

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात काल सायंकाळी झालेल्या धुवाधार पावसाने नगर परिषदेच्या नालेसफाई मोहिमेच्या दाव्यांची पोलखोल केली आहे. पहिल्याच जोरदार पावसात शहरातील अनेक नाल्या तुंबल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा न होता ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. त्यामुळे अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. अंजनगाव मार्गावरील धारोळी वेस, शेख कॉलनी, गजानन नगर आदी भागांमध्ये नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा साचल्यामुळे पाणी रस्त्यावरून वाहत घरांमध्ये घुसले. अचानक घरात पाणी शिरल्याने नागरिकांची धावपळ उडाली. घरातील फर्निचर, अन्नधान्य, कपडे, इलेक्ट्रॉनिक साहित्य तसेच इतर घरगुती वस्तूंचे नुकसान झाल्याचे नागरिकांनी सांगितले.दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केल्याचा दावा नगर परिषदेकडून केला जातो. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी नाल्यांची योग्य साफसफाई न झाल्याचे या पावसातून स्पष्ट झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. तुंबलेल्या नाल्यांमुळे साचलेल्या पाण्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून नाल्यांची संपूर्ण साफसफाई करावी, अशी मागणी होत आहे.
0
0
Report

पालखी आगमन से पहले वाशिम के मार्ग पर सड़क दुरुस्त, यातायात बाधित

Washim, Maharashtra:वाशिम: अँकर:श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे २८ जून रोजी वाशिम जिल्ह्यातील श्रीक्षेत्र शिरपूर येथे आगमन होणार असून हजारो वारकरी व भाविक या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. मात्र, पालखी मार्गावरील जिजाऊ चौक ते बसस्थानक हा मुख्य रस्ता खड्डेमय झाला असून पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. पालखी सोहळ्यात हजारो वारकरी याच मार्गाचा वापर करणार असल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक व भक्तांकडून होत आहे. ग्रामपंचायत आणि लोकवर्गणीच्या माध्यमातून आज या रस्त्याच्या तात्पुरत्या दुरुस्तीच्या कामास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत कडून देण्यात आली.
0
0
Report
Advertisement

महाबळेश्वर-पाचगणी में भारी बारिश से पेड़ गिरा, यातायात बाधित

Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यात कालपासून मान्सूनने दमदार हजेरी लावत जोरदार सुरुवात केली असून महाबळेश्वर–पाचगणी परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन एका दिवसात विस्कळीत झाले आहे. पाचगणी येथील शासकीय विश्रामगृहासमोर अचानक एक भलेमोठे वडाचे झाड रस्त्यावर कोसळले आहे. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नसून एका चारचाकी चे आणि दुचाकीचे नुकसान झाले आहे. झाड कोसळल्याने दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेनंतर महाबळेश्वर–पाचगणी मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली असून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीम आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून पडलेले झाड कटिंग करून बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.दरम्यान, परिसरात अजूनही मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेक ठिकाणी झाडे पडण्याचा धोका वाढला असून प्रशासनाने नागरिक आणि पर्यटकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
0
0
Report

उदगीर के निडेबन में युवक पर गरम तेल डालकर हत्या, आरोपी महिला गिरफ्तार

Latur, Maharashtra:उदगीर शहरातील निडेबन परिसरात २४ वर्षीय तरुणाच्या तोंडावर उकळते तेल टाकून त्याचा खून करण्यात आला आहे. उध्दव दहिकांबळे असं मृत तरूणांचे नाव आहे... या प्रकरणातील आरोपी महिलेला पोलिसांनी आता ताब्यात घेतले असून तिची सध्या कसून चौकशी सुरू आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. घटनेनंतर आरोपी महिला फरार झाली होती. दरम्यान, पोलिसांकडून तिचा शोध सुरू असताना संबंधित महिला उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाली. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. या प्रकरणात खुन करण्याचे नेमके कारण काय होते ? या संपूर्ण घटनेचा शोध आता पोलीस घेत आहेत....
0
0
Report
Advertisement

ठाकरे गट के विधायक बैठक के बाद महायुती में सीटों पर नया मोड़

Nagpur, Maharashtra:नागपूर नरेंद्र भोंदेकर, आमदार, शिवसेना On ऑपरेशन टायगर एक ऑपरेशन यशस्वी झाल.. मात्र हा काही ऑपरेशन नव्हता तर शिवसेना ठाकरे गटाची दुसरी फळी खासदारांना सहकार्य करत नव्हती... संजय दिना पाटील यांच्या बद्दल ज्या स्वरूपाची भाषा वापरली गेली, ती चुकीची आहे.. आणि तरी त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेतेही त्यांना ( संजय राऊत ) थांबवत नाही... एका खासदारासंदर्भात अशी भाषा वापरणे योग्य नाही... त्यामुळे आम्हाला ऑपरेशन टायगर राबवण्याची गरज नाही... आमदारही असेच नाराज होऊन आमच्याकडे येतील.. एकनाथ शिंदे यांची सहकार्या सोबत वागण्याची पद्धत ही सर्वांना माहित आहे... On ठाकरे गट आमदार बैठक ठाकरे गटाने आपल्या आमदारांना सांभाळले पाहिजे, त्यांना समजून घेतले पाहिजे, जर तसे केले तर आमदारांना इथे येण्याची गरजच नाही... खासदारांनाही आम्ही बोलवलं नव्हतं.. खासदारांना योग्य वागणूक मिळाली नाही.. म्हणून ते इकडे आले.. आमच्याकडे खासदार आले आणि पुढे आमदार आले तर आम्ही त्यांना नाही म्हणणार नाही... आमच्याकडे ठाकरे गटाचे आमदार आले तर पुढे महायुतीत जागा वाटपाची अडचण होणार नाही... On आशिष देशमुख आणखी आमदार महायुतीत नको वक्तव्य भाजप आणि शिवसेना स्वतंत्र पक्ष आहे.. भाजपला जरी आमदार आपल्या पक्षात घ्यायचे नसेल.. तरी आमचा पक्ष वेगळा आहे... On मुख्यमंत्री फडणवीस की शिंदे सध्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे और चांगले काम करत आहे.. मी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावे असे म्हणालो, तर तुम्ही ती एकच बातमी चालवणार की आमदार भोंडेकर यांनी फडणवीस एवजी शिंदेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली.. मात्र शिवसेनेचे कार्यकर्ते असल्यामुळे आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे असं वाटतं... On ठाकरे गट आमदार बैठक जे कोणी अनुपस्थित होते त्यांना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या दुसऱ्या फळीने सांभाळून घेतले पाहिजे.. मात्र जर अयोग्य पद्धतीने त्यांच्याबद्दल बोलणं झाले तर तो राग अनावर होतो... On भंडारा महायुती मत फुटली भंडारा मध्ये 36 ते 40 मतं फुटले आहे.. त्याचा आम्हाला अंदाज होता.. जर कदाचित महाविकास आघाडी समर्थित उमेदवार तगडा राहिला असता, तर आणखी मतं फुटले असते... बावनकुळे माझ्याकडेही आले होते.. त्यांच्यासोबत भेटीनंतर नाराजी दूर झाली.. मला आणि आमच्या काही नगरसेवकांना निधी मिळत नसल्याची नाराजी होती.. मात्र बावनकुळे यांच्यासोबत चे भेटीनंतर ती नाराजी दूर झाले... शिवसेना शब्दाला कार्यकर्ते आहे.. आमच्या पक्षाचे मत फुटले असतील असं वाटत नाही....
0
0
Report
Advertisement

संभाजी नगर कैफे: हैमर ऑपरेशन से 49 ध्वस्त, बालिका के साथ अत्याचार के बाद कार्रवाई

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anchor : छत्रपती संभाजी नगरात 3 दिवसापूर्वी एक कॅफे मध्ये मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली, यामुळं खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने आता ऑपरेशन हॅमर सुरू केले आहे.. यात ज्या j्या कॅफे मध्ये तरुणाईला प्रायव्हसी च्या नावावर बसायला आडोसा मिळतो तिथं थेट हातोडा पडायला सुरुवात झाली आहे. मंगलवारी एक दिवसात प्रशासनाने 49 कॅफे उध्वस्त केले आहेत.. संतोष वाहुळे, अतिरिक्त आयुक्त मनपा. पोलिसांनी गेली 2 दिवस असल्या सगळ्या कॅफेची रेकी केली त्याची एक यादी बनवली आणि महापालिकेच्या साहाय्याने ही कारवाई सुरू केली.. यापुढं एकही कॅफेत असले गैर प्रकार खपवून घेतले जाणार नाही असा इशारा पोलिसांनी दिलाय.. कॅफे म्हणजे गप्पा मारणे, कॉफी चा आस्वाद घेणारी जागा, मात्र याच जागा काही समाजकंटकांनी त्यांच्या गैर कृत्यांचे अड्डे केले होते त्यातून आता प्रशंसा सरसावले आहे, कुठं असला प्रकार चालत असेल तर नागरिकांनी तक्रारी करावी कारवाई अटळ आहे असा इशारा दिलाय, त्यामुळं संभाजी नगरात सध्या ऑपरेशन हॅमर ची जोरदार चर्चा सुरू आहे...
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top