Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळच्या आर्णीत भाजपाची पहिली यादी, आमदाराचा नामांचा गहजब!

Oct 22, 2024 13:19:11
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या आर्णी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत विद्यमान आमदाराचे नाव नाही. यामुळे महायुतीतील शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केला आहे. तिन्ही तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन उपजिल्हाप्रमुख विष्णू उकंडे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. पालकमंत्री संजय राठोड यांचेही या जागेसाठी आग्रह आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, जागा सुटली नाही तरी शिवसेना उमेदवार निवडणूक लढवेल.

2
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Sept 18, 2025 05:32:41
Washim, Maharashtra:वाशिम: File:1809ZT_WSM_ZP_RESERVATION रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर:ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर केले असून वाशिम जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिले साठी घोषित करण्यात आले आहे.या बदलामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून अनेक दिग्गज नेत्यांचा अपेक्षाभंग झाली आहे.आता जिल्हा परिषदेच्या गट व पंचायत समिती गणांचे आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष लागले असून, जिल्हा परिषद व गट व पंचायत समिती गण आरक्षण सोडतीनंतर निवडणूक लढत रंगणार आहेत.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांनी सर्कलनिहाय बैठकी सुरू केला आहे. भाजप, काँग्रेस, शिंदे गट, उद्धव ठाकरे गट, दोन्ही राष्ट्रवादी (अजित पवार, शरद पवार गट) तसेच इतर पक्ष आता आपल्या उमेदवारांसाठी जोरदार हालचाली करणार असून ही निवडणूक पक्षीय प्रतिष्ठेची ठरणार आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 18, 2025 05:16:31
Washim, Maharashtra:वाशीम: File:1809ZT_WSM_SEVA_FORTNIGHT रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशीम अँकर:छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत १७ सप्टेंबर ते २ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवडा साजरा होत आहे.या उपक्रमाचा शुभारंभ वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दूरदृष्यप्रणाली द्वारे केला.सेवा पंधरवड्यात संजय गांधी योजना,पुरवठा विभाग,आधार कार्ड, उत्पन्न दाखला, नॉन क्रीमी लेअर, वय व आदिवासी प्रमाणपत्र, स्वामित्व सनद, घरकुल पट्टे,जात प्रमाणपत्र, सातबारा फेरफार व भूसंपादन मोबदला यांचे प्रातिनिधिक प्रमाणपत्र वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 18, 2025 05:15:58
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये दिल्ली येथील एका संस्थेमार्फत सर्वत्र शिक्षा समिती च्या नावाने कार्यालय थाटून दोन हजारावर बेरोजगार उमेदवारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संस्थेने वृत्तपत्रात शासकीय पद‌भरतीची जाहिरात देऊन बेरोजगारांकडून अर्ज शुल्क ४०० रुपये आणि सुरक्षा ठेव म्हणून १५ हजार ५०० रुपये घेणे सुरू केले. काहींना याचा संशय आल्याने त्यांनी थेट जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे तक्रार केली. मनसेने देखील याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली. परंतु अद्यापपावेतो शिक्षण विभागाकडून पोलीस तक्रार करण्यात आली नसल्याने हे प्रकरण दडपल्या जात असल्याचा आरोप फसवणूक झाली उमेदवारांनी केला आहे. सर्व शिक्षा समिती दिल्ली अशी या संस्थेची नोंदणी आहे. सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार यांची मान्यता असल्याची बतावणी करून या संस्थेने बेरोजगार युवकांकडून पैसे उकळले.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 18, 2025 05:15:42
kolhapur, Maharashtra:Ngp NCp chintan live u ने फीड पाठवले ----=---- नागपूर - *भाजपच्या बालेकिल्ल्यात अजीत दादा यांच्या राष्ट्रवादीचं उद्या(शुक्रवारी) चिंतन शिबीर* - *स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन राष्ट्रवादीचं चिंतन* - चिंतन शिबीरासाठी आजपासूनंच पदाधिकारी नागपूरात यायला सुरुवात - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाचा विस्तार करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न - चिंतन शिबीरात उपमुख्यमंत्री अजीत पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह सर्व नेते,पदाधिकारी सहभागी होणार - राष्ट्रवादीच्या चिंतन शिबीराची तयारी पूर्ण, शहरात ठिकठिकाणी लागले होर्डिंग्ज - सुनील तटकरे, छगन भुजबळ, अजीत पवारांसह अनेक नेते आज एका दिवसांआधी नागपूरात दाखल होणार
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 18, 2025 05:02:11
Kolhapur, Maharashtra:शरद पवार, पत्रकार परिषद मुद्दे *ऑन पंतप्रधान* 75 वा वाढदिवस हा त्यांच्या सहकाऱ्यांसाठी महत्वाचा असतो पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 75 वा वाढदिवस साजरा करताना मी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या कोणतंही राजकारण न आणता सुसंकृत राजकारण दाखवलं पाहिजे देशाबाहेरील नेतृत्वानी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या अवतार पुरुष का म्हटले हे मला समजलं नाही 75 व्या वर्षी मी थांबलो नाही त्यामुळे त्यांनी थांबावं असं मला म्हणता येणार नाही *ऑन पंतप्रधान मोदी जाहिरात* जाहिरातीचं प्रस्थ इतकं मी कधी पाहिलं नव्हतं शिंदेंना त्यांना आनंद द्यायचा असेल त्यावर मी काही बोलणार नाही *ऑन देवा भाऊ जाहिरात* देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेतात हे पहिले छत्रपती यांच्याकडे आशीर्वाद मागायचा अधिकार आहे जनतेनं त्यांच्याकडे राज्य दिलं राज्यात अनेक समस्या आहेत त्या समस्या त्यासाठी काय केलं छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रजेसाठी, शेतकऱ्यांसाठी केलेलं काम सगळ्यांना महिती आहे देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्याचे प्रश्न सोडवावे ही विनंती शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी *ऑन राज आणि उद्धव* राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले तर आम्हाला आनंद आहे महाविकास आघाडीवर याचा काही परिणाम होणार नाही दोघांचीही मुंबईत ताकद आहे त्याचा आम्हाला फायदा होईल *ऑन मराठा हैदराबाद गॅझेट* हैद्राबाद गॅजेट एक दिशा दाखवत आहे मला याची कॉपी मिळाली आहे सामंजस्य राहावं, एकीची वीण कायम रहावं हे सगळ्यांनाच वाटतं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, भुजबळ यांनी एकत्र बसून राज्यात सामंजस्य राहावं यासाठी प्रयत्न करावेत कारण गावागावात कटुता निर्माण झाली आहे, हे घातक आहे विखेंची समितीमध्ये सगळ्या जातीचे सदस्य आहेत मात्र बावनकुळे यांच्या समितीत सगळे ओबीसी सदस्य आहेत अशात सामाजिक कटुता कशी कमी होईल राज्याच्या हितासाठी असलेल्या मार्गाने जावं लागेल हाके किंवा आणखी लोक काही बोलतात याकडे लक्ष देण्याची गरज नाही महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात कटुता निर्माण झाली आहे कटुता इतकी निर्माण झाली आहे की एकमेकांच्या व्यवसायाकडे जात नाहीत हे चित्र महाराष्ट्रात कधीही नव्हती या देशात आरक्षणाच्या बाबतीत आदेश कोल्हापुरातून निघाला शाहू महाराज यांनी 50 टक्क्यांपर्यंत आरक्षण दिलं होतं जे गरीब आहेत ती शिक्षणापासून दूर राहू नये हा हेतू शाहू महाराज यांचा होता *ऑन निवडणूक आयोग* निवडणूक आयोगविरोधात 300 खासदार रस्त्यावर येतात हे काही साधी गोष्ट नव्हती आम्ही चर्चेसाठी बैठक बोलावण्याची विनंती केली पण नियम अटी घालून 5 खासदारांना बोलावले पण 300 खासदार रस्त्यावर आले हे नाकारता येत नाही लोक याबाबत बोलतात याची दखल निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे लोकांची शंका तयार होईल असे काम निवडणूक आयोगाने केले तर हे किती दिवस लोक सहन करतील हे माहीत नाही Vvpat बाबत प्रात्यक्षिक दाखवलं त्यावेळी मत एकाला आणि जी चिठ्ठी पडली त्यामध्ये दुसऱ्याला मत पडलं लोकसभेला 48 मधल्या 10 जागा मिळाल्या पण विधानसभेला आम्ही साधारण 110 जागा लढवल्या त्यापैकी 10 जागा आम्हाला मिळाल्या आमचा एक उमेदवार गेली 25 वर्षे निवडून येतो त्याचा पराभव होतो या सगळ्यांमुळे शंका निर्माण होते, पण याबाबत माझ्याकडे पुरावा नाही उत्तम जानकर यांच्या गावात गेलो होतो पण सरकारने त्याठिकाणी आक्षेप घेतला लोकांनी मतपेटी ठेवून मतदान करण्याचा प्रयत्न केला तर काय चुकलं होत छोटी राज्य आहेत त्याठिकाणी काय करायचं ते करा आणि मोठ्या राज्यात हे उद्योग करतात त्यामुळे लोकसभेवरून आमच्यावर टीका करणं योग्य नाही. *ऑन परराष्ट्र धोरण* पाकिस्तान हा कायम आपला शत्रू आहे नेपाळ हा आपला नेहमीचा मित्र आहे, पण आज तिथं काय परिस्थिती आहे चीनबद्दल काय नवीन सांगायची गरज नाही बांगलादेश बद्दल आपण किती त्याग केला? श्रीलंका हा आमचा मित्र होता तो आज राहिला नाही आपण सभोवताली देश दुखावून ठेवले आहेत रशिया हा भारताचा जुना मित्र होता, पण तोच रशिया कमी किमतीत तेल देत असेल तर घ्यायचे नाही का? त्याला अमेरिका विरोध करतो आपण आपल्या हिताचा विचार केलाच पाहिजे, त्यामुळे दुसऱ्या देशाचं ऐकायची काय गरज ते त्यांच्या देशाचे हित बघतील आम्ही आमचं हित बघू भारतातील वस्तू निर्यातीबाबत त्यावेळी माझ्यावर अमेरिकेबरोबर चर्चा करण्याची जबाबदारी होती पाच दिवस चर्चा झाली त्यावेळी शेती आणि दूध उत्पादक वस्तू घेतल्याचं पाहिजे अशी भूमिका मांडली त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं की आमचं पशुखाद्य घ्यावं पण आपल्याकडे पशुखाद्य धान्यापासून बनते तर अमेरिकेत गाय, म्हैस, बैल यांच्या मासांपासून पशुखाद्य बनवले जाते त्यावेळी आम्ही त्यांचा प्रस्ताव मान्य केला नाही आज देखील अमेरिका तसेच पशुखाद्य घ्यायला भाग पाडत आहेत पण मी केंद्र सरकारचे अभिनंदन करतो की त्यांनी हे मान्य केलं नाही राज्य सरकारने 600 कोटी रुपये सहकार साखर मंडळांचे थकवले आहेत *ऑन साखर कारखानदार* खाजगी साखर कारखाने चांगल्या पद्धतीने चालवले जातात कामगारांच्या हितासाठी निर्णय घेतला जातो आज पन्हाळ्यावर या कामगारांचा मेळावा आहे त्याठिकाणी काय मार्ग काढता येतो ते पाहूया चेहरे बघून साखर कारखान्यांना सरकारने मदत करणे हे धोरण चुकीचे एनसीडीच्या मदतीवरून सरकारला टोला *ऑन इथेनॉल* वीज, इथेनॉल, साखर असे वेगवेगळे उत्पादन घेतले तर साखरेचा व्यवसाय परवडणारा आहे अन्यथा नाही त्यासाठी सरकारने प्रोत्साहन द्यावा नितीन गडकरी यांचा दृष्टीकोन चांगला आहे इथेनॉल बाबत जे निर्णय घेतात ते शेतकऱ्यांसाठी हिताचे आहेत
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 18, 2025 04:47:07
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव DHARA_ALLIGATION राष्ट्रवादी काँग्रेसमधील ओबीसी नेत्यांकडून अजित पवारांना ब्लॅकमेल – मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक महेश डोंगरे यांचा गंभीर आरोप अँकर धाराशिव जिल्ह्यातील कोंबडवाडी येथे आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा तरुणाने आत्महत्या केली. त्याच्या कुटुंबाला धीर देण्यासाठी आलेल्या मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ओबीसी नेत्यांवर आरोप केले आहेत. धाराशिवच्या कोंबडवाडी येथील भेटीदरम्यान महेश डोंगरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी थेट आरोप केला की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही ओबीसी नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ब्लॅकमेल करतात. त्याचप्रमाणे, हेच नेते अजित पवार यांच्या पश्चात मराठा समाजाच्या विरोधात बैठका घेतात, असा दावाही डोंगरे यांनी केला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे मंत्री पंकजा मुंडे व आमदार धनंजय मुंडे यांची सुपारी घेऊन मराठा समाजाविरोधात काम करतात. असा आरोप देखील महेश डोंगरे यांनी केला आहे मराठा समाजाच्या आंदोलनावरून राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचा भडका उडाला आहे. Byte महेश डोंगरे _मराठा क्रांती मोर्चा समन्वयक
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 18, 2025 04:46:47
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Sept 18, 2025 04:46:34
Vasai-Virar, Maharashtra:Date-18sep2025 Rep-prathamesh tawade Loc-vasai Slug-Vasai cow Feed send by 2c Type-AV अँकर - महामार्गावर जनावरांची चोरी करणारी टोळी सक्रिय एका कार मधून चार गुरांची तस्करी गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड अँकर - मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगतच्या गावातून गुरांना चोरून नेणाऱ्या टोळीचा गावकऱ्यांनी पर्दाफाश केला आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास विरारच्या शिरसाड नाका येथे या टोळीला गावाकऱ्यांनी रंगेहात पकडून त्यात असलेल्या मुक्या जनावरांची सुटका केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या महामार्गाच्या कडेला व लगच्या गावातील मोकळ्या जागेत रात्रीच्या सुमारास मोठ्या संख्येने जनावरे निवांत बसून असतात. त्याच जनावरांना गुंगीचे औषध देऊन चोरून नेण्याचे प्रकार घडू लागले आहेत. बुधवारी सकाळी ५ च्या सुमारास एक भरधाव कार महामार्गावरील शिरसाड भागातून जात होती. यावेळी त्या कारची एका वाहनाला धडक लागली. त्या धडकेत ती कार थांबली असताना त्यात दाटीवाटीने कोंबून ४ जनावरे त्यात कोंबून भरली होती. याची माहिती येथील स्थानिकांना मिळताच नागरिक घटनास्थळी जमा झाले. या कार मधून एक गाय आणि तीन वासरांना बाहेर काढून चोरट्यांना नागरिकांनी चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.अब्दुल वाहिद आणि बिलाल शेख अशी या चोरट्यांची नावे असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Sept 18, 2025 04:32:43
Buldhana, Maharashtra:बुलढाणा .. पुरातून वाट काढत आरोग्य कर्मचारी पोहचले गावात. . नांदुरा तालुक्यातील अवधा बुद्रुक गावात पोहचून दिली सेवा .. नांदुरा तालुक्यातील पूर्णा नदीला पूर .. Anchor - गेल्या तीन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील नद्यांना पूर आला आहे. नांदुरा तालुक्यातील पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे अवधा बुद्रुक गावाचा संपर्क तुटला असतानाही आरोग्य कर्मचाऱ्यांनी हार मानली नाही. ग्रामस्थांच्या मदतीने त्यांनी पुराच्या पाण्यातून मार्ग काढत गावात प्रवेश केला आणि नागरिकांना आरोग्य सेवा पुरवली. त्यांच्या या धैर्याचे गावकऱ्यांनी आभार मानले. कर्तव्यासाठी पुराच्या पाण्यातून वाट काढणाऱ्या या कर्मचाऱ्यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Sept 18, 2025 04:18:43
Pimpri-Chinchwad, Maharashtra:pimpri hinjwadi kailas puri Pune 18-9-25 feed by 2c Anchor - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडीची वाहतूक कोंडी फुटावी यासाठी दोन महिन्यापूर्वी हिंजवडीचा अगदी पहाटेच पाहणे दौरा केला होता. अनेक बैठका ही आयोजित केल्या. त्यानंतर पीएमआरडीए ने अजित पवार यांच्या सूचनेनुसार अनेक भागातील अतिक्रमण काढली. पण ज्या गतीने रस्त्याचे काम सुरू होणं आवश्यक होतं ते सुरू झालं नसून वाहतूक कोंडी जैसे थे आहे. त्यातच सलग पडलेल्या पावसामुळे हिंजवडीतील अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्याचाही त्रास आयटीएन्सला होत आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या भेटींचा काहीही फायदा झाला नसल्याचे समोर येत आहे....याच सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी...! Kailas wkt +vis
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 18, 2025 04:02:45
kolhapur, Maharashtra:2c ला व्हिडिओ आणि फोटो जोडले आहे ------- नागपूर * *नागपूरच्या शासकीय मेडिकल रुग्णालयात लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात बाथरूमचे घाण पाणी शिरले.* * त्यामुळे गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या बाळाचे आरोग्य धोक्यात आले.. या निष्काळजीपणाला कोण जवाबदार? - या वॉर्डमध्ये 26 चिमुकले उपचार घेत होते. असे असताना अतिदक्षता विभागात घाण पाणी शिरल्याने चिमुकल्याचा आरोग्याचा प्रश्न - सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मेडिकलमधील काही वॉर्डचे नूतनीकरण करण्याचे काम सुरू * तब्बल नऊ महिन्यापेक्षा अधिक काळ उलटूनही संथ गतीने सुरू,चुकीच्या कामाचा फटका रुग्णांना बसतोय.. * लहान मुलांचे अतिदक्षता विभाग वॉर्ड क्र.25 आणि 26 चे नूतनीकरण सुरू असताना बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बांधकामाचा कचरा दुसऱ्या मजल्यावरून खाली टाकायला सुरुवात केली.. त्यामुळे गटार तुंबल * त्यामुळे वॉर्ड 25 मधील बाथरूमचे घाणेरडे पाणी तुंबून संपूर्ण वॉर्डमध्ये पसरले, पाहता पाहता दुर्गंधी सुटली आणि वॉर्डमध्ये पाणी साचले गेले.... - या घटनेनंतर सफाई कर्मचाऱ्यांनी पाणी काढले, जवळपास दोन तासाच्या प्रयत्नानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.. - *अतिदक्षता विभागासारख्या संवेदनशील ठिकाणी अशी घटना घडल्याने बांधकाम विभागाच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे..*
1
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 18, 2025 04:02:33
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - खाद्य विक्रेत्यांच्या गाड्या समोर कचरा गाड्या लावत हातगाड्या हटवण्याचा अजब प्रकार.. अँकर - सांगलीतल्या प्रतापसिंह उद्यानासमोर असणाऱ्या खाद्य विक्रेत्यांच्या गाड्या हटवण्यावरून वाद उफाळून आलाय. उद्यानासमोर असणाऱ्या फुटपात वरील खाद्य विक्रेत्यांच्या गाड्या हटवण्यासाठी महापालिककडुन हातगाड्यांच्या समोर आणि गाड्यांच्या जागेवर कचरा गाड्या लावण्यात येत आहे.त्यामुळे गाडी चालक विरुद्ध महापालिका प्रशासन,असं संघर्ष निर्माण झाला आहे. व्ही वो - सांगली शहरातल्या महापालिका कार्यालया शेजारी असणाऱ्या प्रतापसिंह उद्यान समोरील खाद्य विक्रेत्यांच्या गाड्या काढण्यावरून वाद सुरू झाला आहे. प्रतापसिंह उद्यानाच्या समोर गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळे खाद्यपदार्थांच्या गाड्या फुटपाथवर आहेत.विरंगुळा म्हणून प्रतापसिंह उद्यानामध्ये येणाऱ्या नागरिकांकडून या ठिकाणी भेळ,पाणीपुरी अशा वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यात येतो,मात्र पालिका कार्यालया शेजारीच असणाऱ्या उद्यानासमोरील खाद्य पदार्थांच्या गाड्या हटवण्याची मोहीम सुरू केली आहे,मात्र थेट गाड्या हटवण्याऐवजी सांगली महापालिका प्रशासनाकडून एक नामी शकल लढवण्यात आली आहे.ज्या ठिकाणी खाद्य विक्रेत्यांच्या गाड्या लागतात त्याच ठिकाणी किंवा त्याच्या समोर कचरा गाड्या महापालिकेकडून पार्किंग करण्यात येत आहेत.ज्यामुळे ग्राहक येऊ नयेत आणि अपोआप खाद्य विक्रेत्यांचा व्यवसाय बंद पडून हातगाडे हटतील,अशी कल्पना करण्यात आली आहे.मात्र पालिकेच्या या अजब प्रकारामुळे हातगाडी चालक व पालिका प्रशासन यांच्यात वाद निर्माण झाला आहे.तर शिवसेना ठाकरे गटाकडून पालिका प्रशासनाच्या अजब कारभाराचा निषेध नोंदवत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. बाईट - शंभूराज काटकर - जिल्हा प्रमुख, शिवसेना ठाकरे गट- सांगली. बाईट - महेश शेट्टी - भेळ विक्रेता - सांगली
4
comment0
Report
Advertisement
Back to top