Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळच्या आर्णीत भाजपाची पहिली यादी, आमदाराचा नामांचा गहजब!

Oct 22, 2024 13:19:11
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या आर्णी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत विद्यमान आमदाराचे नाव नाही. यामुळे महायुतीतील शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केला आहे. तिन्ही तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन उपजिल्हाप्रमुख विष्णू उकंडे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. पालकमंत्री संजय राठोड यांचेही या जागेसाठी आग्रह आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, जागा सुटली नाही तरी शिवसेना उमेदवार निवडणूक लढवेल.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Feb 22, 2026 14:30:53
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 22, 2026 13:49:00
Akola, Maharashtra:अकोला जिले के बाळापूर तालुक्यात मनारखेड गाव में आज श्री हनुमान की मूर्ति की प्राणप्रतिष्ठा उत्साह के साथ संपन्न हुई. धार्मिक वातावरण में हुए इस कार्यक्रम में पंचक्रोशी के भक्तों ने भारी संख्या में भाग लिया. विधीवत मंत्रोच्चार और पूजाअर्चना के बाद मूर्ति की प्राणप्रतिष्ठा की गयी. इस कार्यक्रम के मुख्य यजमान के रूप में राष्ट्रवादी कांग्रेस के अजित पवार पक्ष के लोकसभा समन्वयक संदीप पाटील उपस्थित थे. उनके हाथों विभिन्न धार्मिक विधियाँ संपन्न की गयीं. दौरान, मंदिर के कलश से दस और बीस रुपयों की नोटों की उछाले गई. कलश से पैसे की वर्षा होते ही उपस्थित भक्तों में वह प्रसाद समझकर प्राप्त करने के लिये भीड़ लग गयी. इस धार्मिक उत्सव से मनारखेड परिसर में उत्साह और भक्तिमय वातावरण बना।
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Feb 22, 2026 13:32:03
Buldhana, Maharashtra: बुलढाण्यातल्या चिखला गावात बसवला गेला छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा ... परिस्थिती नियंत्रणात....पोलिसांचा बंदोबस्त कायम बुलढाणा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. कालपासून चर्चेत असलेल्या चिखला काकड गावातील पुतळ्याचा वाद आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. काल मध्यरात्री शेकडो शिवभक्तांच्या उपस्थितीत आणि जयघोषात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला आहे. पुतळा बसवण्यावरून या गावात मोठा तणाव निर्माण झाला होता. दोन गटांमध्ये तुफान हाणामारीचे व्हिडिओ देखील समोर आले होते... याच पार्श्वभूमीवर काल मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी या गावाला भेट देऊन शिवभक्तांशी संवाद साधला होता. जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर मध्यरात्री प्रशासकीय हलचाली आणि शिवभक्तांच्या उत्साहात हा पुतळा सन्मानाने प्रस्थापित करण्यात आला. दरम्यान, केवळ पुतळा बसवून हा विषय थांबलेला नाही. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यीनुसार, या प्रकरणात अडथळा निर्माण करणाऱ्या किंवा वाद निर्माण करणाऱ्या दोषींवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केल्याची माहिती मिळत आहे. सद्यस्थितीत चिखला या गावातील परिस्थिती नियंत्रणात आहे.... अनेक स्थानिक नेते गावा भेटी देत आहेत.... शिवाय पोलिसांचा बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.....
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Feb 22, 2026 13:00:11
Vasai-Virar, Maharashtra:वसईच्या समुद्रात सध्या एक अद्भुत दृश्य पाहायला मिळत आहे. रात्रीच्या अंधारात समुद्राचे पाणी निळसर आणि चमकताना दिसत आहे. हे दृश्य पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांसोबतच पर्यटकांचीही मोठी गर्दी होत आहे. वसईच्या किनाऱ्यावर पुन्हा एकदा जीवदीप्ती म्हणजेच बायोल्युमिनेसन्स हा नैसर्गिक प्रकार दिसून आला आहे. विशिष्ट सजीवांमुळे समुद्रात नैसर्गिक प्रकाश निर्माण होतो, त्यामुळे पाणी निळसर चमकते. काही दिवसांपूर्वी हे दृश्य दिसल्यानंतर सुरुवातीला स्थानिकांमध्ये संभ्रम आणि भीती होती. मात्र नंतर हे बायोल्युमिनेसन्स असल्याचे समजल्यावर भीती दूर झाली. राजोडी येथील रहिवासी धीरज निजाई सांगतात की, “माझा जन्म इथलाच आहे, पण पहिल्यांदाच मी असे चमकणारे समुद्राचे पाणी पाहतोय.” सध्या या निळसर चमकणाऱ्या समुद्राचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. निसर्गाने दिलेले हे दुर्मिळ आणि सुंदर दृश्य पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने समुद्रकिनारी येत आहेत.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Feb 22, 2026 12:18:19
Nashik, Maharashtra:नाशिक - - फिजिक्सवाला क्लास परप्रांतीय शिक्षक मारहाण प्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना जामीन मंजूर - मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खाजगी कोचिंग क्लासेस मध्ये केले होते आंदोलन - फिजिक्सवाला कोचिंग क्लासच्या व्यवस्थापनाला जाब विचारत एकाला केली होती मारहाण - परप्रांतीय शिक्षक मराठी विद्यार्थ्यांशी अरेरावी करतात, हिंदीत बोलण्यास भाग पाडतात, अशी तक्रार करीत मनसे विद्यार्थीसेनने केले होते आंदोलन - या प्रकरणी मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आला होता गुन्हा दाखल - गुन्हा दाखल झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांना करण्यात आली होती अटक अटकेनंतर पदाधिकाऱ्यांना जमीन
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Feb 22, 2026 11:19:21
Wardha, Maharashtra:वर्धा जिले के नागपुर- अमरावती हाईवे पर इंदर्मारी दरगाह परिसर में अस्वल का विचरण देखने को मिला; वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो गया है।Anchors: वर्धा जिले में NH 6 नागपुर- अमरावती हाईवे पर इंदरमारी दरगाह परिसर में एक धक्कादायक दृश्य देखने को मिला। दरगाह के चबूतरे पर अस्वल दिखाई देने से यात्रियों और स्थानीय नागरिकों में डर का माहौल बन गया। Highway जंगल के पास होने के कारण जंगली प्राणी अक्सर सड़क किनारे और मंदिरों के परिसर में आते रहते हैं। इस क्षेत्र में कई मंदिर और धार्मिक स्थल हैं, जिससे भक्तों की भीड़ लगी रहती है। वन्य प्राणियों के मुक्त संचरण से नागरिकों की सुरक्षा के लिए खतरा बढ़ रहा है। प्रशासन और वन विभाग ने त्वरित उपाय किए जाएं और इस भाग में गश्त बढ़ाई जाएं, स्थानीय लोगों की यह मांग है। सुखद बात यह है कि इस घटना में किसी की जान नहीं गई; अस्वल का वीडियो सोशल मीडिया पर वायरल हुआ है।
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Feb 22, 2026 10:20:05
Virar, Maharashtra:Virar Viral Video: सापासोबत स्टंटबाजी बेतली जीवावर; विरारमध्ये तरुणाचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू सोशल मीडियावर व्हिडीओ बनवण्यासाठी किंवा अति उत्साहाच्या भरात अनेकजण नको ते धाडस दाखविण्याचा प्रयत्न करीत असतात. कधी कधी अशा प्रकारचे धाडस करणं ही जीवावर बेतू शकते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात त्याने सापाला हातात पकडून त्याच्या सोबत मस्ती करणे त्या तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. सापाची छेड काढणे आणि विनाकारण त्याच्याशी खेळणे हे अनेकांना महागात पडू शकते हे तुम्ही ऐकलं असेल, पण त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात हे विरारच्या व्हायरल व्हिडिओमधून समोर आहे आहे. एका व्यक्तीने सापासोबत केलेली मस्ती त्यांच्या अंगलट आली असून या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विरार पश्चिमेच्या नवापूर येथील भागात साप आला होता. याच वेळी मद्याच्या नशेत असलेल्या एका तरुणाने त्याला पकडले. व त्यांच्या सोबत मस्ती सुरू केली होती. या सापासोबतचा हा स्टंट त्याला भलताच भारी पडला.या विचित्र चाळ्यातून याच सापाने त्याला दंश केला. त्यामुळे तेथील नागरिकांनी त्याला तातडीने जवळच्या खारोडी येथील महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. राजू चंदू बरड (४०) असे या मयत तरुणाचे नाव आहे. साप गळ्यात घेऊन फिरत असताना त्याच्या हाताला दंश झाला त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 22, 2026 10:06:18
Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवलीतल्या 65 रेरा इमारती मधील समर्थ कॉम्प्लेक्सला नोटीस. सहा मार्च पर्यंत इमारत खाली करा नाहीतर कारवाई करू महापालिकेची नोटीस.. कल्याण डोंबिवली मधील महारेरा घोटाळ्यातील 65 इमारती मधील डोंबिवली आयरे गावातील समर्थ कॉम्प्लेक्सला KDMCची पुन्हा नोटीस दिली आल्याने इमारती मधील रहिवासी चितेत. आम्ही घर घेऊन चूक केली का ? मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री ,आमदार आश्वासन देतात मात्र त्यानंतर ही कारवाईची नोटिस येते इमारतीवर कारवाई झाल्यास आमच्याकडे आत्महत्येशिवाय पर्याय नाही . समर्थ कॉम्प्लेक्स मधील महिलांचा टाहो निवडणुकांचा संपल्यानंतर कल्याण डोंबिवली मधील महारेरा घोटाळ्यातील 65 इमारातीचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे . 65 इमारतींमधील डोंबिवली आयरेगाव परिसरातील समर्थ कॉम्प्लेक्स इमारतीला केडीएमसीने पुन्हा एकदा नोटीस दिली आहे जागेच्या वादातून न्यायालयाच्या आदेशानंतर आयुक्तांच्या सूचनेनुसार या इमारतीला नोटीस दिल्याचे एडीएमसी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे मात्र पुन्हा एकदा नोटीस आल्याने या समर्थ कॉम्प्लेक्समधील रहिवाशांमध्ये एकच भीतीच वातावरण पसरले आहे. परीक्षांचा कालावधी सुरू असल्याने या इमारतीमध्ये राहणारे विद्यार्थी देखील तणावात आहेत. समर्थ कॉम्प्लेक्स मधील अनेक कुटुंंबीयांचे घराचं लोन देखील सुरू आहे इमारतीवर कारवाई झाल्यास पुढे काय करायचं कुठे जायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला मागील वर्षभरापासून सुरू असलेल्या प्रकरणात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदारांनी देखील इमारतींवर कारवाई होणार नाही असे आश्वासन दिले मात्र त्यानंतरही या नोटीस येत असल्याने रहिवाशी रहिवाशांमध्ये चिंतेचा वातावरण आहे आम्ही आमची जमापुंजी या घरांमध्ये लावली आहे तर कारवाई होणार असेल तर आमच्याकडे आत्महत्या शिवाय दुसरा पर्याय नाही तुम्ही कारवाई करा आम्ही आत्महत्या करतो असा काहो या महिलांनी माध्यमांसमोर मांडला . त्यामुळे एकंदरीतच आता या इमारतीाबाबत सरकार राजकीय नेते केडीएमसी न्यायालय काय भूमिका घेत हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. तर याबाबत सहाय्यक आयुक्त भरत पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही इमारत 65 इमारतींमधीलच आहे मात्र जागामालकाच्या वादातून न्यायालयाने इमारत निष्काशीत करण्याचे आदेश दिलेत आयुक्तांच्या सूचनेनुसार या इमारतीवर कारवाई करण्यात येणार आहे त्या संबंधित या इमारतीला सहा तारखेपूर्वी घरे रिकामे करण्याचे नोटिसा देण्यात आले असल्याचे सांगितले एक तर आम्हला व्याजासहित पैसे दया नाहीतर आम्हला जीवदेण्या पलिकेडे काही उरलं नाही.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 22, 2026 08:57:27
Gadchiroli, Maharashtra:नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता 62 वर्षीय देवजी उर्फ थिप्पीरी तिरुपती याने तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती आहे. त्याने तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यात आपल्या सहकाऱ्यांसह शस्त्र खाली ठेवल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. याबाबत दोन दिवसात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. सध्या पोलीस प्रशासनाने या घडामोडीला दुजोर दिलेला नसला तरी या वृत्ताचे खंडन देखील केलेले नाही. या मोठ्या घडामोडीने देशातील नक्षल चळवळीचे कंबरडे मोडल्याची स्पष्टता झाली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी 31 मार्च 2026 पूर्वी देशातून नक्सलवादाचे उच्चाटन करण्याची ठाम भूमिका घेतली आहे. त्यानुसार देशभर अभियान राबविले जात आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये नक्सलवाद्यांचा थिंक टॅंक समजला जाणारा भूपती उर्फ सोनूदादा यांनी गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे आत्मा समर्पण केले होते. त्यानंतरच्या काळात कुख्यात नक्सल कमांडर हीडमा याचाही चकमकीत मृत्यू झाला होता. नक्षल चळवळ खिळखिळी झाल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च नेता देवजी याला आत्मसमर्पण करण्याचा दबाव होता. त्याला यश आल्याचे समजत आहे. त्याच्यावर विविध राज्य सरकारांचे एकूण दहा कोटी बक्षीस होते.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 22, 2026 08:53:23
Bhandara, Maharashtra:चेन्नई समुद्र दुर्घटना – महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर काळाचा घाला. महाराष्ट्रातील 15 विद्यार्थी Cognizant या IT कंपनीमध्ये इंटर्नशिपसाठी चेन्नई येथे गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार काल सुट्टी असल्याने 26 विद्यार्थी चेन्नई–पुडुचेरी रोडवरील कंथाट्टूर पोलीस स्टेशन हद्दीतील समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले होते. तेथील मंदिरात दर्शन देखील घेतले व नंतर समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेले. समुद्र सामान्य दिसत असला तरी या किनाऱ्यावर अचानक 10 ते 15 फूट उंच लाटा नेहमीच उसळतात. पण हा मनमोहक दृश्य आपल्या मोबाईल मध्ये कैद करण्यासाठी मुले सेल्फी घेत असताना अचानक समुद्र खळखळला व मोठ्या लाटा उसळत लाटेने तिघांना समुद्रात ओढले. घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकाने तात्काळ शोधमोहीम सुरू केली. या दुर्घटनेत एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला तिचं नाव मयुरी चौधरी असून भंडारा जिल्ह्याच्या वरठी येथील रहिवासी आहे. जळगाव जिल्ह्यातील एक विद्यार्थी अद्याप बेपत्ता आहे. तर एका विद्यार्थ्याला बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले आहे. आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 25 दिवसांपूर्वी मयुरी चेन्नई येथे गेली होती. स्वप्नाची भरारी घेण्यापूर्वीच मयुरीने जगाचा निरोप घेतला. या घटनेची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तमिळनाडू सरकार आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला आहे. शोधमोहीम वेगाने सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रशासनाकडून बेपत्ता विद्यार्थ्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. समुद्रकिनारी जाताना सतर्कता बाळगणे किती आवश्यक आहे, याची ही वेदनादायी आठवण आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top