icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

वाशीम जिले के खेत मार्गों की समस्या गंभीर, 400 से अधिक कार्य ठप

Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:वाशिम जिल्ह्यात शेतरस्त्यांचा प्रश्न गंभीर बनला असून ४०० हून अधिक कामे प्रलंबित अल्याचे समोर आले आहे.यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे आणि पीक वाहतूक करणे कठीण होत आहे.अनेक ठिकाणी रस्ते अपूर्ण किंवा नसल्याने शेतीची कामे वेळेत पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत.रोजगार हमी योजनेतील जाचक निकषांमुळे शेतरस्त्यांची कामे रखडल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे.उन्हाळा हा कामांसाठी योग्य काळ असतानाही गती नसल्याने नाराजी वाढली असून,जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देऊन ही कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
0
0
Report

तपोवन संस्थे में सिलेंडर कमी से कुष्ठ रोगियों की रसोई बाधित, अंतिम संस्कार संकट

Amravati, Maharashtra:तपोवन संस्थेला सिलेंडर तुटवडयाचा मोठा फटका; सिलेंडर मिळत नसल्याने चुलीवर स्वयंपाक करण्याची कुष्ठरोग्यांवर वेळ कुष्ठरोग्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जमा केलेले लाकूड स्वयंपाकासाठी वापरण्याची संस्थेवर वेळ; अंत्यसंस्कार करायचे कसे संस्थेसमोर गंभीर प्रश्न निर्माण अँकर :- कुष्ठरोगी रुग्णांवर उपचार आणि पुनर्वसन करणाऱ्या अमरावतीच्या तपोवन संस्थेला सिलेंडर तुटवडयाचा मोठा फटका आहे. सिलेंडरच मिळत नसल्याने चुलीवर स्वयंपाक करण्याची कुष्ठरोग्यांवर वेळ आली आहे. जवळपास 400 पेक्षा अधिक लोकांचा रोज स्वयंपाक बनवला जातो त्यामुळे कुष्ठरोगी यांच्या अंत्यसंस्कारासाठी जमा केलेले लाकूड स्वयंपाकासाठी वापरल्याने अंत्यसंस्काराचाही प्रश्न गंभीर झाला आहे. जिल्हा प्रशासनाने व पुरवठा विभागाने सिलेंडर उपलब्ध करून देण्याची संस्थेने प्रशासनाकडे मागणी केली आहे. पोळ्या बनवण्यासाठी चालणारी मशीन ही सिलेंडरवर चालते परंतु सिलेंडर नसल्याने मशीनही बंद आहे. त्यामुळे सिलेंडर अभावी आता फक्त वरण भात भाजी पोळी एवजी मसालेभाताचे जेवण बनवावे लागत आहे.
0
0
Report
Advertisement

सातारा में फिर बदली मौसम, बिजली गिरने से किसान की मौत, फसलें बुरी तरह प्रभावित

Satara, Maharashtra:सातारा -सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. माण तालुक्यात वीज पडून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, खटाव तालुक्यात फळबागा, पिके आणि जनावरांच्या चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. माण तालुक्यातील तोंडले गावात ही दुर्दैवी घटना घडली. शेतात काम करत असताना लाला दाजी जाधव, वय ६५, यांच्या अंगावर अचानक वीज कोसळली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.दरम्यान, खटाव तालुक्यात पुसेगाव, वडूज, जांब, औंध आणि आसपासच्या भागात मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे फळबागा, ज्वारी, कांदा यांसारखी पिके भिजून खराब झाली असून जनावरांच्या चाऱ्याचेही मोठे नुकसान झाले आहे.
0
0
Report

ओबीसी नेता की मांग: पुतला हटाकर शिवसृष्टी बनाने की मांग तेज

Pandharpur, Maharashtra:सोलापूरच्या माढा तालुक्यातील अंजनगाव खेळोबा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सन्मान जनकपणे काढावा आणि तो शासनाच्या किंवा ज्यांनी हा पुतळा बसवलेला आहे त्यांच्या जागेमध्ये उभा करून त्या ठिकाणी शिवसृष्टी करावी अशी मागणी ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केली आहे काल रात्री आमदार अभिजीत पाटील यांनी गुपचूक मध्यरात्री मोजणी करण्याचा प्रयत्न केला असा प्रयत्न करून धनगर समाजाच्या देवस्थानावर हक्क सांगण्याचा आमदार पाटील यांचा डाव असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलेला आहे तसेच चिखला येथे ज्या पद्धतीने महिलेला पुढे करून गोंধळ करण्याचा प्रयत्न केला होता तसाच प्रयत्न काल आमदार अभिजित पाटील यांच्या एका महिला पदाधिकाऱ्यांनी केला मात्र धनगर बांधवांनी शांततेने परिस्थिती घेतल्यामुळे हे प्रकरण पुढे गेले नाही यामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप केला प्राध्यापक लक्ष्मण हाके हे धनगर समाजाच्या देवस्थान जवळील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यावर ठाम आहेत आज कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रशासनाने हा पुतळा सन्मानाने येथून हलवावा असा इशारा प्रशासनाला दिला आहे त्यामुळे पुन्हा तणाव वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे
0
0
Report
Advertisement

सोलापुर के मालशिरस में पुल से गाड़ी गिरने से तीन की मौत

Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील नातेपुते जवळ निरा उजवा कालव्याच्या पुलावरून एक ईरटीका गाडी कालव्यात पडले असून त्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. ही मुंबईवरून फोंडशिरस कडे जाणारी जात असताना थेट कालव्यात पडली. यात तीन जण गाडीत अडकले असून ते मयत झाल्याची घटना घडली आहे. पाटबंधारे खात्याचे शाखाअधिकारी घटनास्थळी पहाटेपासून हजर असून फाॅकलेनद्वारे गाडी कुठे अडकली हे शोधले जात आहे. गाडीत प्रवाशी मूळचे सातारा जिल्ह्यातील दूधबावी येथील असून ते मुंबई येथे नोकरी निमित्त स्थायिक झाले आहेत. फोंडशिरस येथे येत असताना आज पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली आहे. गाडी चालक सुनील टिळेकर हा बचावला असून या गाडीत त्याची पत्नी व सासू, सासरे मयत झाले आहेत.
0
0
Report

वाशीम के उमरदरी गांव में जियो मोबाइल टॉवर के विद्युत कक्ष में आग, तकनीकी खराबी से लगी

Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या उमरदरी गावात जिओ कंपनीच्या मोबाईल टॉवरशी संबंधित विद्युत खोलीला आग लागल्याची घटना घडली.ही आग तांत्रिक बिघाडामुळे लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.घटनेमुळे काही काळ गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.स्थानिक नागरिकांनी तत्काळ याची माहिती संबंधित यंत्रणेला दिल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.या घटनेमुळे टॉवरचा वीज पुरवठा खंडित झाला असून परिसरातील मोबाईल सेवांवर त्याचा परिणाम झाला आहे
0
0
Report
Advertisement

सोलापुर में मागासवर्गीय शिक्षकों के मुंडन आंदोलन को लेकर प्रशासन पर दबाव बढ़ा

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - गेल्या अनेक दिवसांपासून सुरू झालेल्या आंदोलनाची दखल घेत नसल्याने मागासवर्गीय शिक्षक संघटना करणार मुंडन आंदोलन - गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची दखल प्रशासन घेत नसल्याने मागासवर्गीय शिक्षक संघटना आक्रमक - अक्कलकोट तालुक्यातील गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या विरोधात जिल्हा परिषदेच्या बाहेर सुरु आहे आंदोलन - विभागीय आयुक्तांचे अधिकार वापरून शिक्षकांच्या बदल्या केल्याचा गटशिक्षण अधिकाऱ्यांवर आरोप - प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यास लवकरच मुंडन आंदोलन करण्याचा इशारा
0
0
Report

लातूर में स्ट्रीट लाइट बंद, दुर्घटनाओं में वृद्धि पर नागरिकों ने रात में विरोध प्रदर्शन किया

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... किल्लारीत स्ट्रीट लाईट बंद... अपघातांच्या घटनांमध्ये वाढ.. नागरिकांचा संताप... रात्री रस्त्यावर उतरून आंदोलन... ‘बोंब मारो’ आंदोलन करत प्रशासनाचा निषेध... AC ::- लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे नागरिकांचा संताप उफाळून आला आहे... लातूर–उमरगा राज्य महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे वारंवार अपघात घडत असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे... वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे... याच पार्श्वभूमीवर रात्री किल्लारीतील नागरिक आक्रमक होत थेट रस्त्यावर उतरले... प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत ‘बोंब मारो’ आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला... तसेच, प्रशासनाने या आंदोलनाची तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा यापुढे याहून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे...
0
0
Report
Advertisement

नागपुर में रिश्वत मांगने का मामला: एसीबी ने उपव्यवस्थापक और लिपिक को गिरफ्तार किया

Nagpur, Maharashtra:नागपूर हात गमावलेल्या कर्मचाऱ्याकडून अडीच लाखांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस, मनुष्यबळ विकास विभागाचे उपव्यवस्थापक आणि लिपिक एसीबीच्या जाळ्यात, MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. वैद्यकीय बिल मंजुरी आणि एरिअर्स देण्यासाठी लाचेची केलीं होती मागणी कर्तव्यावर असतांना अपघातात कर्मचाऱ्याने गमावला होता उजवा हात संबंधितांना मदत करण्याऐवजी लाच मागितल्याने संताप, तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेत केली तक्रार, तक्रारीची पडताळणी करून एसीबीने सापळा रचला तक्रारदाराच्या घरीच कारवाई करत आरोपी रंगेहाथ पकडले अडीच लाखांची रक्कम स्वीकारताना उपव्यवस्थापक अटक, कनिष्ठ लिपिकाचाही सहभाग उघड
0
0
Report

सतारा के महिला डॉक्टर आत्महत्या मामले में पुलिस उप निरीक्षक गोपाळ बदने जमानत पर बाहर

Satara, Maharashtra:सातारा -फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेल्या पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला कोल्हापूर सर्किट बेंच न्यायालयाने ५० हजारांच्या वैयक्तिक बॉण्डवर जामीन मंजूर केला आहे. बदने गेल्या पाच महिन्यांपासून अटकेत होता. २३ ऑक्टोबर २०२५ रोजी फलटण येथे एका महिला डॉक्टरने हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मृत्यूपूर्वी तिने आपल्या हातावर बदने आणि प्रशांत बनकर यांची नावे लिहून मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप केला होता. त्यानंतर दोघांना पोलिसांनी अटक केली होती. जामीन मंजूर करताना न्यायालयाने काही अटी घातल्या असून साक्षीदारांवर दबाव न आणणे, पुराव्यांमध्ये फेरफार न करणे आणि सुनावणीस हजर राहणे बंधनकारक केले आहे. अटींचे उल्लघन झाल्यास जामीन रद्द करण्याचा इशाराही न्यायालयाने दिला आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top