Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळच्या आर्णीत भाजपाची पहिली यादी, आमदाराचा नामांचा गहजब!

Oct 22, 2024 13:19:11
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या आर्णी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत विद्यमान आमदाराचे नाव नाही. यामुळे महायुतीतील शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केला आहे. तिन्ही तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन उपजिल्हाप्रमुख विष्णू उकंडे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. पालकमंत्री संजय राठोड यांचेही या जागेसाठी आग्रह आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, जागा सुटली नाही तरी शिवसेना उमेदवार निवडणूक लढवेल.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
TTTUSHAR TAPASE
Mar 29, 2026 05:17:52
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 29, 2026 05:00:57
Akola, Maharashtra:वडत्या उन्हामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. उन्हाच्या तीव्रतेमुळे शरीरावर विविध त्रासही वाढताना दिसत आहेत. मात्र या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी अकोल्यातील म्हैसपूर येथे एक वेगळी आणि प्राचीन पद्धत वापरली जात आहे. आदर्श गौ सेवा केंद्रात दर रविवारी गोमय शाही स्नानाचे आयोजन करण्यात येत आहे. काय आहे ही पद्धत आणि त्याचे फायदे काय, पाहूया या रिपोर्टमधून… हे दृश्य पाहून तुम्हाला वाटत असेल की ही रंगपंचमी आहे की काय ? पण नाही, हे आहे ‘गोमय शाही स्नान’. अकोल्यातील म्हैसपूर येथील आदर्श गौसेवा केंद्रात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रत्येक रविवारी गोमय स्नानाचे आयोजन केले जाते. अनेक वर्षांपासून येथे शहरासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्वचेच्या संरक्षणासाठी गायीचे शेण आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले जाते. अंगाला शेण लावून त्या त्यात सचैल स्नान केल्याने त्वचेला चमक येते, असा दावा येथे येणारे नागरिक करत आहेत. साबण आणि शॅम्पूपेक्षा गायीचे शेण आणि गोमूत्र अधिक फायदेशीर असल्याचेही यावेळी सांगितले जात आहे. या केंद्रात सुमारे २८०० गायींचे संगोपन केले जाते. यामधील बहुतांश गायींना कत्तलीसाठी नेले जात असताना गौरक्षक आणि पोलिसांनी त्यांना वाचवले होते. येथे मोठ्या प्रमाणात गायीचे शेण आणि गोमूत्र उपलब्ध असल्यामुळे गौभक्त अंगाला शेण-गोमूत्र लावून त्यात सुमारे तासभर खेळतात आणि त्यानंतर साध्या पाण्याने आंघोळ करतात.या स्नानाचे अनेक फायदे असल्याचा दावा केला जात असून दिवसेंदिवस सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. बदलत्या काळात गायीच्या शेण-गोमूत्राचा वापर कमी झाला असला तरी शास्त्रीयदृष्ट्या त्याचे महत्त्व अजूनही कायम असल्याचे येथे सांगितले जात आहे. मोठ्या शहरांमध्ये अशा स्नानासाठी मोठे शुल्क आकारले जाते, मात्र या केंद्रात हे पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिले जात आहे.
911
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 29, 2026 04:32:12
Ambernath, Maharashtra:अंबरनाथच्या नाट्यगृहाचा पडदाच उघडेना! पडदा उघडत नसल्यानं अर्धा नाट्यप्रयोग थांबला कलाकारांनी हाताने पडदा उघडत सुरू केला प्रयोग Anchor : अंबरनाथच्या धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहात शनिवारी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या द दमयंती दामले नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. मात्र या प्रयोगावेळी मध्यंतरानंतर नाट्यगृहाचा पडदाच उघडत नसल्यानं प्रयोग तब्बल अर्धा तास रखडला. यावेळी नाट्यगृहात कुणीही टेक्निशियन हजर नसल्यानं कलाकारांनी हाताने पडदा उघडत प्रयोग सुरू केला. संतापजनक बाब म्हणजे पडद्यात बिघाड होण्यापूर्वी नाट्यगृहाच्या साउंड सिस्टीममध्येही बिघाड झाला. मात्र नाटकाच्या साउंड टीमने तो दुरुस्त करत नाटक पुढे सुरू केलं. नाटकाचा प्रयोग संपल्यावरही अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी स्वतःच्या हाताने पडदा बंद केला. त्यामुळं इतका गाजावाजा करून सुरू झालेल्या नाट्यगृहात अंबरनाथ पालिकेला नाटकांच्या प्रयोगावेळी साधे टेक्निशियन ठेवता येत नाही का? असा संतप्त सवाल नाट्यप्रेमींनी केला. नाटक संपल्यावर तिथे आलेल्या टेक्निशियनने पडद्यातला बिघाड दुरुस्त करण्याचं काम सुरू केलं. या सगळ्या प्रकारामुळे कलाकार आणि शेकडो नाट्यरसिकांसमोर अंबरनाथ पालिकेची मात्र चांगलीच नाचक्की झाली.
946
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 29, 2026 04:17:35
Amravati, Maharashtra:शेतकऱ्यांच्या घराला लागली अचानक आग; घरातील 30 क्विंटल कापूस जळून खाक, शेतकरीचे लाखोच नुकसान. अमरावती जिल्ह्यातील शेंदूरजना घाट येथील शेतकऱ्यांच्या घराला काल रात्री अचानक लागली आग लागल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या आगीत शेतकऱ्याच्या घरात असलेला 30 क्विंटल कापूस जळून खाक झाला आहे. त्यामुळे शेतकरी सुभाष सोलव यांचे लाखोचे नुकसान झाले आहे. आग विझवण्यासाठी गावातील नागरिकांनी आटोकाट प्रयत्न केल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले मात्र घरी कोणीही नसल्याने आग कशी लागली असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान कारण अस्पष्ट असून घरात असलेले गॅस सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळल्याचे पाहायला मिळाले आहे.
1042
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 29, 2026 04:01:10
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:कोट्यवधी च्या जमिनीच्या हिबनामा प्रकरणात प्रसिद्धी च्या झोतात आलेल्या खासदार संदीपण भुमरे यांचा चालक जावेद शेख वर अखेर गुन्हा दाखल झालाय... दाऊद पुरा भागातील 9 एक्कर जमिनीच्या हिबानामा प्रकरणात हा गुन्हा दाखल झालाय... जमिनीचे मूळ मालक मीर मेहमूद अली आणि जावेद रसूल शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय, आर्थिक फसवणूक, विश्वासघात , धमकी देणं या कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झालाय... या बाबत मुजाहिद्द इकबाल खानांनी तक्रार केली होती, मूळ मालक मीर मेहमूद अली यांनी मुजाहिद इकबाल खान यांना यातील काही जमिनीचा हिबानामा करून दिला होता. असं असताना पुन्हा जावेद रसूल शेख यांना दुसरा हिवानामा करून आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार करण्यात आली, त्यानंतर छत्रपती संभाजी नगर आर्थिक गुन्हे शाखेने हा गुन्हा दाखल केलाय...
1049
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 29, 2026 04:00:52
1076
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 29, 2026 03:49:34
1009
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 29, 2026 03:49:01
Khed, Maharashtra:पुणे जिले के खेड तालुका में जमिनी के विवाद के कारण टीका लेने आए महिलाओं के समूह और स्थानीय युवाओं के बीच फ्री-स्टाइल मारपीट की घटना सामने आई है। खेड तालुक्यातील वाफगाव में जमिनीका ताबा लेने के लिए बाहर से महिलाओं की बड़ी टोली लाई गई थी, लेकिन स्थानीय लोगों के विरोध पर विवाद ने जोर पकड़ा और कुछ ही क्षणों में मारपीट में तब्दील हो गया। महिलाओं सहित युवाओं के बीच जोरदार धक्का मुक्की, मारामारी और गंदगी/गोंधळ से परिसर में तनावपूर्ण स्थिति बन गई। कुल घटना के वीडियो सामने आए हैं, जिसमें खुलकर चल रही मारपीट स्पष्ट दिखाई दे रही है। स्थानीय लोगों ने आरोप लगाया है कि पुलिस मौके पर पहुंचकर स्थिति नियंत्रित करने के लिए कड़ी कार्रवाई तुरंत नहीं कर पाई। जमिनी के ताबे के लिए ऐसी परिस्थितियों में महिलाओं का उपयोग करके हास्यास्पद तरह से तनाव बढ़ रहा है, जिससे कानून-व्यवस्था का प्रश्न गंभीर बन गया है और सामान्य नागरिकों में डर का माहौल फैल गया है।
1079
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 29, 2026 03:48:10
1064
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 29, 2026 03:47:53
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरच्या एन-६ सिडको परिसरातील साईनगर येथे शनिवारी रात्री उशिरा गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. ३१ वर्षीय समीर नाईक या तरुणाच्या राहत्या घरातच ही घटना घडली असून, त्याच्या कानाजवळून डोक्याच्या आरपार गोळी गेल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. प्राथमिक तपासानुसार, समीरने स्वतःवरच गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त केला जातो. घटनेनंतर त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. समीर हा आपल्या आई आणि लहान भावासोबत साईनगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होता. त्याची आई बजरंग चौकात बांगड्यांचे दुकान चालवते, तर समीर पौरोहित्याचे काम करून कुटुंबाला हातभार लावत होता. घटनेच्या दिवशी सायंकाळी आई दुकानात गेल्यानंतर समीर घरी एकटाच होता. काही वेळाने लहान भाऊ घरी परतला असता, समीर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याच्या शेजारी पिस्तूलही आढळून आले. हा प्रकार पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
1063
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 29, 2026 03:35:24
1077
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 29, 2026 03:34:32
1094
comment0
Report
SMSATISH MOHITE
Mar 29, 2026 03:34:16
Nanded, Maharashtra:नांदेड शहरात खाजगी शिकवणीसाठी आलेल्या जवळपास दिडशे मुलींना लव्ह जिहाद मध्ये अडकवून अपहरण करून त्यांचे धर्मांतरण करण्यात आल्याचा स्फ़ोटक दावा शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी केलाय. धर्मांतरण कायद्याबाबत बोलताना अधिवेशनात आमदार हेमंत पाटील यांनी हे वक्तव्य केले होते. झी 24 तासशी बोलताना आमदार हेमंत पाटील यांनी पुन्हा हा दावा केला. नांदेड शहरात खाजगी शिकवणीसाठी राज्यभरातून विद्यार्थी येतात. मुस्लिम समाजाचे काही टोळके या अल्पवयीन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात ओढतात. मागच्या दोन वर्षात जवळपास दिडशे मुलींचे अपहरण करून आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात त्यांचे अपहरण करण्यात आल्याचा दावा पाटील यांनी केला. काही मौलवी यासाठी मदत करत असल्याचे पाटील म्हणाले. उद्योगपती असलेल्या आपल्या मित्राच्या अवघ्या 14 वर्षांच्या मुलीला पश्चिम बंगाल मध्ये युवकाने पळवून नेले होते. त्या मुलीला सोडवताना पोलीस स्टेशनमध्ये जमावाने हल्ला केल्याचा किस्सा पाटील यांनी सांगितला. लोकसंख्या वाढीसाठी मुस्लिम समाजाला कारणीभूत ठरवत एक कुटुंब एक मुल अनिवार्य करणे गरजेचे असल्याचे पाटील म्हणाले. मुस्लिम समाजातील कुटुंबात आठ आठ मुले असतात, ते कुटुंब नियोजन ऑपरेशन करत नाहीत. यातून राजकीय सत्ता हातात घेण्याचा डाव असल्याचे पाटील म्हणाले. भारतात बहुतांश मुस्लिम हे धर्मांतरण झालेले मुस्लिम असल्याचा दावा पाटील यांनी केला. दिवंगत माजी मुख्यमंत्री ए आर अंतूले हे पूर्वी कदम असल्याचा दावाही हेमंत पाटील यांनी केला. हे सर्व दावे हेमंत पाटील यांनी अधिवेशनातही केले.
1050
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 29, 2026 03:18:54
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर मध्ये जुना बाजार परिसरात राजकीय वर्चस्ववादातून माजी नगरसेवकावर लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्याने हल्ला झाला होता, त्याप्रकरणी एमआयएमचे नगरसेवक मेहराज खान यांच्यासह त्यांच्या भाऊ आणि इतर एकूण ११ जणांविरुद्ध शहर चौक पोलिस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ला झालेले रफत यार खान हे यापूर्वी एमआयएमकडून नगरसेवक होते. मात्र, पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यात पराभव झाल्यानंतर त्यांनी मालेगाव येथील इस्लाम पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत कलीम कुरेशी यांनीही याच पक्षात प्रवेश केल्याने शहरातील एमआयएम विरुद्ध इस्लाम पार्टी असा हा राजकीय संघर्ष होत आहे. त्यातून मारहाणीचा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगीतले आहे.
1007
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 29, 2026 03:17:06
1066
comment0
Report
Advertisement
Back to top