445001
यवतमाळच्या आर्णीत भाजपाची पहिली यादी, आमदाराचा नामांचा गहजब!
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या आर्णी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत विद्यमान आमदाराचे नाव नाही. यामुळे महायुतीतील शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केला आहे. तिन्ही तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन उपजिल्हाप्रमुख विष्णू उकंडे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. पालकमंत्री संजय राठोड यांचेही या जागेसाठी आग्रह आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, जागा सुटली नाही तरी शिवसेना उमेदवार निवडणूक लढवेल.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Washim mein van mahotsav: vrikshdindi aur vrikharopan se paryavaran jagrukta badhi
Washim, Maharashtra:वाशीम: वनमहोत्सवानिमित्त वाशिममध्ये राष्ट्रीय हरित सेना, एस.एम.सी.स्कूल आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षदिंडी व वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. निसर्ग ईको क्लबच्या विद्यार्थ्यांनी हातात रोपे आणि जनजागृतीचे फलक घेऊन शहरातून वृक्षदिंडी काढत नागरिकांना वृक्षलागवडीचे आवाहन केले. यानंतर शाळा परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करण्यात आला. पावसाळ्यात अधिकाधिक वृक्षलागवड व्हावी आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा उद्देश होता.0
0
Report
नाशिक के गंगापूर डैम में जोरदार बारिश, जलस्तर 31% तक पहुँचा — रेड अलर्ट जारी
Nashik, Maharashtra:नाशिकच्या गंगापूर डॅम परिसरात जोरदार पाऊस सुरु असून धरणात पाण्याचा साठा 31% आहे. गंगापूर डॅरामधील पाण्याची क्षमता 9 टीएमसी असून आत्ता पर्यंत साठा 31% झाला आहे. जिल्ह्याला जोरदार प्रजन्य वृष्टी आणि ढग फुटी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.0
0
Report
नागपुर-विदर्भ के विधायक मुंबई में अधिवेशन के लिए पहुँचे, बारिश ने उड़ानों को प्रभावित किया
Nagpur, Maharashtra:नागपूर तथा विदर्भातील आमदार मुंबईला गेले. काँग्रेस आमदार विकास ठाकरे नागपूर विमानतळावर दाखल झाले. इतर आमदारदेखील आज मुंबईत अधिवेशनासाठी जाणारे होते. काल मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे विमानसेवा विस्कळित झाली होती; त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या आमदारांना अधिवेशनात सहभागी होण्यात अडथळा आला.0
0
Report
Advertisement
महाड में बाढ़ की स्थिति बनी, सावित्री नदी के रानबाचीरे डैम से पानी जारी
Chendhare, Maharashtra:महाडमध्ये पूरस्थिती कायम. रान बाजीरे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. धरणाचे पाणी महाडमध्ये येत असल्याने पूर स्थिती कायम आहेत. रायगड जिल्ह्याच्या बहुतेज भागातील पूरस्थिती ओसरली आहे, मात्र महाडमध्ये अद्यापही पुराचे पाणी कायम आहे. महाबळेश्वरमध्ये पावसाचा हा परिणाम असल्याचं सांगितलं जातं. महाबळेश्वर इथं उगम पावणाऱ्या सावित्री नदीवरील रानबाजीरे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हे पाणी महाड कडे येत असल्याने महाड शहर आणि परिसरात पूरस्थिती कायम असल्याचं सांगितले जातं. महाडमध्ये सावित्री नदी अजूनही धोका पातळीवरून वाहत आहे.0
0
Report
शिरपूर जैन के प्रवेशद्वार के मुख्य मार्ग पर बड़े खड्डे, श्रद्धालुओं को मुश्किल यात्रा
Washim, Maharashtra:शिरपूर जैन के प्रवेशद्वार के मुख्य मार्ग पर बड़े खड्डे, श्रद्धालुओं को मुश्किल यात्रा0
0
Report
Meḷghāṭ meṁ lagātār bāṛiś se chikhla)**दर्यात dhundh cha gaya, pariyṭak umḍe
Amravati, Maharashtra:AMT_FOOG_WKT दोन फाईल आहे रिपोर्टर :- अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 संततधार पावसाने फुलले चिखलदऱ्याचे निसर्ग सौंदर्य; संपूर्ण मेळघाटात पसरली धुक्याची चादर, निसर्गाचा अद्भुत आनंद घेण्यासाठी पर्यटकांची चिखलदऱ्याकडे गर्दी अँकर :- गेल्या आठवड्याभरापासून जिल्ह्यासह संपूर्ण मेळघाटात आणि चिखलदऱ्यात संततधार पाऊस पडल्यानंतर विदर्भाचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यात सध्या अल्हाददायक वातावरण तयार झाले आहे. सर्वत्र हिरवळ पसरली असून संपूर्ण मेळघाटासह चिखलदऱ्यात धुक्याची चादर पसरल्याने मोठ्या प्रमाणात अल्हाददायक वातावरण निर्माण झाला आहे. त्यामुळे निसर्गाचा संपूर्ण नजारा आपल्या डोळ्यात टिपण्यासाठी विदर्भासह संपूर्ण राज्यातून पर्यटक चिखलदराकडे दाखल होत आहेत. सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात चिखलदऱ्यात धुक्याची चादर पसरल्याने रस्ता देखील दिसेनासा झाला आहे या संपूर्ण अल्हाददायक वातावरणाचा च⇄खलदऱ्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी0
0
Report
Advertisement
कृष्णा नदी के बढ़ते जलस्तर से म्हैसाळ के बांधाधिकारी जलमग्न, सांगली में सतर्कता बढ़ी
Sangli, Maharashtra:स्लग - कृष्णा नदीच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे म्हैसाळचा बंधारा पाण्याखाली.. अँकर - सांगली जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरूचं आहे.कृष्णा आणि वारणा नदी पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे दोन्ही नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे कृष्णा नदीवरील म्हैसाळ येथील बंधारा पाण्याखाली गेला आहे.सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील शेवटचा मोठा बंधारा म्हणून ओळख आहे.मिरज तालुक्यातून कोल्हापूर जिल्ह्याकडे जाणारा जवळचा मार्ग देखील आहे.मात्र कृष्णानदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कोल्हापूर पद्धतीचा असणारा बंधारा पाण्याखाली गेला आहे,या बंधारयावरून कृष्णा नदीचा आढावा घेतला आहे,आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी0
0
Report
कराड-सातारा में रेड अलर्ट; NDRF टीम पहुँची, अफवाहों से सावधान
Satara, Maharashtra:कराड, सातारा सातारा जिल्ह्याला तीन दिवसापासून रेड अलर्ट हवामान खात्याकडून दिला आहे. कराड आणि पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने 28 जवानांची एनडीआरएफ टीम दाखल झाली आहे. आपतकालीन परिस्थितीत तालुका नियंत्रण कक्ष कार्यरत करण्यात आला असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रातांधिकारी अतुल म्हेत्रे यांनी आवाहन केले आहे. त्याचबरोबर धोकादायक असणाऱ्या पर्यटन स्थळावर जाऊ नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे.0
0
Report
कारंजा सावरकर चौक पर निजी बस-ट्रक भिड़ंत: 35 यात्री सुरक्षित, सुरक्षा मांगें तेज
Washim, Maharashtra:कारंजा शहरातील सावरकर चौकात खाजगी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. नागपूरकडे जाणाऱ्या खाजगी बसमध्ये ३५ प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात चार प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर कारंजा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अपघातात बस आणि ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. कारंजा येथील सावरकर चौकात वारंवार अपघात घडत असल्याने या ठिकाणी महामार्ग प्रशासनाने तातडीने वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.0
0
Report
Advertisement
सातारा में भारी बारिश से कृष्णा नदी जलस्तर बढ़ा; युवक पुल पार करते वक्त बचा
Satara, Maharashtra:सातारा तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून मर्ढे आणि आनेवाडी दरम्यान असलेल्या पुलावरून मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी वाहत आहे. अशा अत्यंत धोकादायक परिस्थितीत जीवाची पर्वा न करता पुलावरून नदीपात्र पार करण्याचा प्रयत्न करणारा एक तरुण वाहून गेला मात्र सातारा तालुका पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे त्याला वाचवण्यात यश आले आहे. या थरारक घटनेनंतर पोलिसांनी सतर्कतेचे आवाहन केले आहे.0
0
Report
पिंपरी चिंचवड में रेड अलर्ट, भारी बारिश से शहर में सतर्कता बढ़ी
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड शहरात आजही रेड अलर्ट घोषित करण्यात आला असून शहरात पावसान रात्रभर चांगलीच बॅटिंग केली. दरम्यान सकाळपासून शहरातील काही भागात पावसाने उघडीप दिली आहे. काही भागातील रस्त्यावरचे पाणी कमी झाला असून महापालिका कर्मचारी रस्त्यांची सफाई करत आहेत. मात्र पवना नदीच्या पाण्याची पातळी वाढलेली असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. आजही दमदार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी बाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. त्याच संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कैलास पुरी.0
0
Report
नाशिक में रेड अलर्ट, भंडारदरा पर्यटन स्थल बंदी; भारी बारिश के कारण सुरक्षा कदम
Shirdi, Maharashtra:नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट ; भंडारदरा परिसरातील पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद... सततचा मुसळधार पाऊस आणि हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाचा निर्णय... संधन व्हॅली , कोकणकडा, रतनगड, अलंग, मदन, कुलंग, कळसूबाई शिखर बंद पर्यटकांसाठी बंद... रिव्हर्स वॉटरफॉलसह सर्व साहसी पर्यटन उपक्रमांवरही तात्पुरती बंदी... पुढील आदेशापर्यंत पर्यटकांना भंडारदरा परिसरात प्रवेश नाही... आदेशाचे काटेकोर पालन करण्याच्या वनविभागाच्या सूचना.. भंडारदरा परिसरात पावसाची संततधार सुरू...0
0
Report
Advertisement
आषाढ़ी वारी में पैठण संत एकनाथ महाराज की दिंडी पालखी पंढरपूर के लिए रवाना
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:आषाढ़ी वारीनिमित्त पैठणच्या संत एकनाथ महाराज यांच्या दिंडी पालखी सोहळ्याचे आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. पालखी सोहळ्यात चांदीच्या रथात नाथांच्या पादुका असणार आहेत. या सोहळ्याची जय्यत तयारी झाली आहे. दिंडी सोहळ्याचे यंदाचे हे ४२७ वे वर्ष आहे. या सोहळ्यातल वारकरी, भाविक छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव व सोलापूर अशा पाच जिल्ह्यांतून २८५ किलोमीटर पायी मार्गक्रमण करणार आहेत. १९ दिवस प्रवास करीत हा सोहळा २४ जुलैला पंढरीला पोचेल. मराठवाड्यातील सुमारे ४० हजार वारकरी नাথांच्या दिंडी सोहळ्यात सहभागी होत असतात. मानाची ही तिसऱ्या क्रमांकाची पालखी आहे.0
0
Report
उल्हासनगर में धारदार हथियार से हत्या, वीडियो सामने
Ambernath, Maharashtra:उल्हासनगरात धारदार शस्त्राने भोसकून एकाची हत्या हल्ला करतानाचा व्हिडिओ आला समोर हल्ला उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 येथील कुर्ला कॅम्प चौक परिसरात धारदार शस्त्राने भोसकून एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास घडली. मृत व्यक्तीचे नाव काला उर्फ सतनाम सिंग लबाना असे असून, त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हल्ला करतानाची घटना एका नागरिकाने आपल्या कॅमेरात चित्रित केली .या प्रकरणात अनिश सिंग लबाना याने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी मोठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.0
0
Report
पुलिस ने बारों को रात 1 बजे तक बंद कराने का आदेश जारी किया
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरातील बिअर बार रात्री दीड वाजता बंद होण्याचा नियम असला तरी अनेक बार शटर डाऊन करून पहाटेपर्यंत सुरू असायचे. रात्रभर चालणाऱ्या या धिंगाण्यामुळे गुन्हेगारीत वाढ झाली होती. अलीकडेच जालना रोडवरील एका व्यावसायिकाची हत्या आणि सिडको एन-७ मधील बार बाहेर पहाटे ४ वाजता दोन गटांत झालेला राड्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त यांनी अधिसूचना जारी करून सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. या सर्व आस्थापना दीड वाजताच्या आधी सक्तीने बंद करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.0
0
Report
Advertisement
