icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सुषमा अंधारे के विवादित बयान पर कृष्णा पाटील का तीखा जवाब

Nanded-Waghala, Maharashtra:Anchor - युबीटी च्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र नागेश पाटील यांच्या बोचरी टीका केल्यानंतर कृष्णा पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. सुषमा अंधारे ह्या मानसिक रोगी झाल्यात त्यांना चांगल्या मनोविकार तज्ञाची गरज आहे. त्यांनी हिंदू देवी देवतांबद्दल, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबद्दल एकेरी भाषेत वक्तव्य केली ते आम्ही उकरून काढावे का असे कृष्णा पाटील म्हणाले. जिवंत पाणी वडिलांचे श्राद्ध घालण्याची भाषा ही न शोभनारी आहे. मी चांगल्या संस्कृतीत वाढलोय वडिलांच्या विरोधात बोलणार नाही एकवेळ राजकारण थांबवेल असे कृष्णा पाटील म्हणाले. त्यांच्याशी बातचित केलीये आमचे प्रतिनीधी सतीश मोहिते यांनी.
0
0
Report

बीड़ के गेवराई में रेत घोटाला: एक बाइक पर ई-परमिट जारी, मचा हड़कंप

Beed, Maharashtra:बीड जिल्ह्यातील गेवराई येथील वाळू घोटाळ्याचे नवे धक्कादायक पैलू आता समोर येत आहेत. तहसील कार्यालयातील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांदरम्यान आता वाळू वाहतुकीसाठी दिले जाणारे इलेक्ट्रॉनिक ट्रान्सपोर्ट परमिट चक्क एका दुचाकीच्या क्रमांकावर जारी करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. या घटनेमुळे वाळू माफिया आणि महसूल प्रशासनातील संगनमताच्या आरोपांना अधिक बळ मिळाले असून जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. पाहूयात यासंदर्भातील हा विशेष रिपोर्ट... बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातील वाळू पट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे आरोप पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने लिलाव प्रक्रिया राबवली होती. मात्र या प्रक्रियेचा गैरफायदा घेत तहसीलदार संदीप खोमणे आणि महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांनी वाळू माफियांसोबत संगनमत करून तब्बल 26 हजार ब्रास वाळूचा अपहार केल्याचा गंभीर आरोप आमदार विजयसिंह पंडित यांनी केला आहे. विशेष म्हणजे वाळू वाहतुकीसाठी इलेक्ट्रॉनिक ट्रान्सपोर्ट परमिट हे नियमांनुसार चारचाकी किंवा मालवाहू वाहनांसाठी दिले जाते. मात्र येथे चक्क एका दुचाकीच्या क्रमांकावर परमिट जारी झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात किती मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला असावा, याची चर्चा सुरू झाली आहे. संबंधित तहसीलदारांवर तात्काळ बडतर्फीची कारवाई करून त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त करावा, अशी मागणी आमदार विजयसिंह पंडित यांनी केली आहे. वाळू पट्ट्यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनात मोठी खळबळ उडाली. आतापर्यंत चोरट्या मार्गाने वाहनांमधून वाळू तस्करी होत असल्याच्या घटना समोर येत होत्या. मात्र यावेळी घरकुल लाभार्थ्यांच्या नावाचा उपयोग करून दुचाकीच्या क्रमांकावर वाळू वाहतुकीची परवानगी मिळाल्याने प्रशासनही काही काळ गोंधळात पडले. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार संदीप खोमणे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. त्यामुळे आता त्यांच्या विरोधात नेमकी काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वाळू घोटाळ्याचे एकामागोमाग एक धक्कादायक तपशील समोर येत असताना जिल्हा प्रशासनाचीही मोठी गोची झाली आहे. कारण दुचाकीच्या क्रमांकावर इलेक्ट्रॉनिक ट्रान्सपोर्ट परमिट जारी होऊन त्याचा वापर होत असतानाही प्रशासनाला याची माहिती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांच्या कार्यकाळातील इतर व्यवहारांचीही सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आता सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या नार्को चाचणीची मागणीही पुढे येत आहे. त्यामुळे या प्रकरणातील चौकशीचा आवाका आणखी वाढण्याची शक्यता आहे. दुचाकीच्या क्रमांकावर वाळू वाहतुकीचे ई-परमिट जारी होणे ही केवळ तांत्रिक चूक आहे की संगनमतातून झालेला मोठा भ्रष्टाचार, याचे उत्तर आता चौकशीतूनच समजेल.
0
0
Report
Advertisement

लातूर में नी트 परीक्षा के लिए सुरक्षा कड़ी, मॉक ड्रिल शुरू

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... नीट पेपरफुटी प्रकरणानंतर उद्या पुन्हा नीट परीक्षा... लातूरमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त... परीक्षेपूर्वी लातूरमध्ये मॉक ड्रिल सुरू... सुरक्षा व्यवस्थेची रंगीत तालीम...नीट परीक्षा गैरप्रकारमुक्त करण्यासाठी प्रशासन सज्ज... परीक्षा केंद्रांवर सुरक्षा यंत्रणांची चाचणी... नीट पेपरफुटी प्रकरणानंतर आता पुन्हा एकदा नीटची परीक्षा घेण्यात येणार असून उद्या ही परीक्षा पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर लातूर पोलिसांकडून परीक्षा केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. लातूर शहरातील सरस्वती विद्यालयात सध्या मॉक ड्रिल सुरू आहे. यात ठिकाणावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी...
0
0
Report

गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर त्रासदायक दुर्घटना: 5 दोस्त डूबल्याचे निधन, 3 बचावले

Ratnagiri, Maharashtra:गणपतीपुळे पॅकेज.. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरून एक अत्यंत सुन्न करणारी आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. प्रशासनाने मान्सून आगमनाच्या पार्श्वभूमीवर आणि वातावरणातील बदलांमुळे २५ मे पासूनच संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पर्यटकांना समुद्रात उतरण्यास कडक बंदी जाहीर केली आहे. मात्र, असे असतानाही सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवून समुद्रात उतरणे पर्यटकांच्या एका ग्रूपला अत्यंत महाग पडले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकीन येथील १९ मित्रांचा गट गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आला होता. यातील काही तरुण आज सकाळी समुद्रात पोहण्यासाठी उतरले असता, भरतीच्या पाण्याचा आणि लाटांचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात वाहून गेले. यातील 3 जणांना स्थानिक बचाव पथकाने तातडीने सुखरूप बाहेर काढले, मात्र दुर्दैवाने ५ जणांचा बुडून मृत्यू झाला असूनचे मृतदेह हाती आले आहेत. पाहूयात सविस्तर स्पेशल रिपोर्ट... रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर आज सकाळी १० च्या सुमारास हा दुर्दैवी प्रसंग ओढवला. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील बिडकीन येथील १९ जणांचा हा गट एकत्र आनंदाने पर्यटनासाठी कोकणात दाखल झाला होता. सकाळी किनाऱ्यावर फिरत असताना यातील ८ युवक उत्साहाच्या भरात समुद्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र, सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने समुद्राचे रौद्र रूप आणि लाटांचा प्रचंड ओढ याचा अंदाज या तरुणांना आला नाही. अचानक आलेल्या मोठ्या लाटेसोबत हे सर्वजण खोल पाण्यात खेचले गेले आणि बुडू लागले. किनाऱ्यावरून आरडाओरड सुरू होताच स्थानिक जीवरक्षकांनी क्षणाचाही विलंब न करता समुद्रात उड्या घेतल्या.. स्थानिक जीवरक्षकांच्या तत्परतेमुळे तीन तरुणांचे प्राण नक्कीच वाचले, परंतु ५ मित्र खोल पाण्यात बेपत्ता झाले. या दुर्घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक देवस्थानचे पुजारी आणि ग्रामस्थही मदतीसाठी पुढे सरसावले. समुद्राला सध्या उधाण असल्यासारखी परिस्थिती असल्याने आणि पाण्याचा प्रवाह मागे खेचणारा असल्याने बचाव कार्यात प्रचंड अडथळे येत होते. पर्यटक स्थानिक प्रशासनाच्या बंदी आदेशाकडे आणि चेतावणीकडे कसे दुर्लक्ष करतात, यावर स्थानिक मंदिर पुजारी अमित गवाणकर यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.. स्थानिक जीवरक्षक, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने युद्धपातळीवर बोटींच्या मदतीने शोधमोहीम राबवली. मात्र, निसर्गाच्या रौद्र रूपापुढे या तरुणांचा निभाव लागला नाही. काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर बेपत्ता झालेल्या पाचही युवकांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत. ऐन उमेदीच्या वयातील हे पाचही मित्र आता मृत अवस्थेत आढळल्याने बिडकीन गावावर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत पावलेल्या युवकांमध्ये आदित्य संतोष राऊत (वय २२), अनिकेत बंडू हिवराळे (वय २०), आनंद राजू नरवडे (वय २०), प्रेम दीपक आत्माने (वय १९) आणि यश रमेश्वर कांबळे (वय १९) या मित्रांचा समावेश आहे. या संपूर्ण घटनेनंतर रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी घटनास्थळाची पाहणी करत पर्यटकांना कडक इशारा दिला आहे.. प्रशासनाने वारंवार बजावलेले धोक्याचे इशारे आणि सुरक्षेचे नियम क्षणिक आनंदासाठी हवेत उडवणे किती महागात पडू शकते, याचे अत्यंत भीषण आणि विदारक उदाहरण आज गणपतीपुळेच्या किनाऱ्यावर पाहायला मिळाले. ३ तरुणांचे प्राण नक्कीच वाचले, मात्र बिडकीन येथील ५ निष्पाप युवकांना आपला जीव गंवावा लागला आहे..
0
0
Report
Advertisement

उद्धव ठाकरे से बगावत के बाद संजय जाधव पर शिवसेना में तीखी प्रतिक्रियाएं

Parbhani, Maharashtra:अँकर - परभणीचे खासदार संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत केलेल्या बंडखोरी नंतर खासदार संजय जाधव यांच्या विरोधात ठाकरे यांचे शिवसैनिक आक्रमक झाले असून, ठीक ठिकाणी त्यांच्या विरोधात आंदोलने उभारली जात आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून खासदार संजय जाधव यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी जल्लोष करताना चे चित्र पहायला मिळत आहे. परभणीत संजय जाधव याच्या समर्थकाकडून जाधवांच्या प्रतिमेला दुग्धभिषेक करत जल्लोष करण्यात आला आहे. अद्याप खासदार संजय जाधव यांनी शिवसेनेत जाण्याबद्दल अधिकृत कुठलीही प्रतिक्रिया दिली नसली तरी मात्र त्यांच्या विरोधात होत असलेल्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून एकनाथ शिंदे यांची शिवसेना मैदानात उतरल्यााने परभणीत राजकीय वातावरण तापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे...
0
0
Report

रत्नागिरी में पानी की कमी से उद्योग ठप्प, मंत्री पर उठे सवाल

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी - पाण्याअभावी उद्योगधंदे बंद पडवेत असं एक वातावण निर्माण केल गेलय पाऊस पडला नाही हे उद्योग मंत्र्यामुळेच का... माणसाचं जीवनमान हे पहिलं महत्त्वाचं म्हणून राज्यभरात एमआयडीसीने जीथे रेसिडेन्सी एरियाला देखील पाणी कमी पडणार नाही ही आमची भूमिका माणसांना जेवढे पाणी लागते तेवढे पाणी एमआयडीसीत देणार इंडस्ट्रीदेखील बंद पडणार नाही याची काळजी घेतली जाईल नैसर्गिक स्त्रोत आटला असेल एमआयडीसी काही करू शकत नाही मी जलसंपदा मंत्र्यांशी बोलणार आहे कोयनेतील काही पाणी सोडून त्यातून काही मार्ग काढता आला तर हे पाहता येईल ऑपरेशन टायगर ला जर नंबर देता आले तर 365 दिवस ऑपरेशन सुरू राहील रोजच पक्षप्रवेश सुरू असतात जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे संपर्कात आहेत म्हणजे टायगर ऑपरेशन नव्हे रत्नागिरी जिल्ह्यातल प्रवेश करणारे भरपूर आहेत आणि अशीच परिस्थिती राज्यामध्ये आहे उद्धव ठाकरे पक्ष सोडून जाणार कुठे काँग्रेसने जेवढा त्रास दिला नाही तेवढा आम्ही दिला हे किती दुर्दैव असे उद्धव ठाकरे म्हणाले काँग्रेसने हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला पहिली शिवसेना फोडण्याचे काम काँग्रेसने केले दुसरी पुन्हा शिवसेना फोडण्याचं काम भुजबळ साहेबांन बाहेर काढून काँग्रेसनं केलं सावरकारांवर काँग्रेस प्रचंड टिका करते त्यांच्या.मांडीवर हे बसलेत उद्धव ठाकरेंच कालच भाषण ही उरलेली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होतेय की काय अशा पद्धतीचं भाषण युबीटीची पुर्ण काँ्रेस झालीय हे चार वर्षापुर्वी एकनाथ शिंदेनी सांगितलं हे कालच्या भाषणातून सिद्ध झाल राजिनामा जर युबीटीच्या पक्षप्रमुखांन द्यायचा असेल तो कार्यकर्त्यांना विचारुन चालणार नाही ते राहूल गांधी आणि सोनिया गांधींना विचारावं लागेल राज ठाकरेंनी मतदारांना आणि जनतेला आवाहन केले मतदार प्रतिसाद देतात की नाही हे भविष्यात कळेल 2018 ला जो सल्ला दिला ते 2019 ला पाळला गेला का त्यामुळे पुढच्या निवडणुकीची वाट बघू राज ठाकरेंनी जो सल्ला दिलेला आहे तो पुढच्या निवडणुकीत मतदार पाळतात का नाही हे पाहू कमळ ऑपरेशन म्हणजे कमळ हातात घेऊन फिरणार का उदय सामंत यांचा युबीटीला सवाल भास्कर जाधव यांना मांडलेला मुद्धा माझ्यासाठी महत्वाचा तोच आमचा मुद्धा होता बाह्ययंत्रण काय.करतात या पेक्षा आंतर्गत संवाद संपलेला आहे अंतर्गत काळाबरोबर आपण बदललं पाहीजे लोकांशी संवाद ठेवला पाहीजे भास्कर जाधव यांच्या मागणीचं जर पालन केलं तर असलेली युबूटी टिकेल -; उदय सामंत
0
0
Report

NEET परीक्षा फिर से: 21 जून को अकोला के 17 केंद्रों में सुरक्षा कड़ी

Akola, Maharashtra:पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आलेली NEET परीक्षा उद्या, 21 जून रोजी पुन्हा घेण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यातील 17 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार असून प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. परीक्षेच्या अनुषंगाने सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे.आज पोलिस विभागाच्या वतीने सर्व परीक्षा केंद्रांची पाहणी करण्यात आली. केंद्र परिसरातील सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा, प्रवेशद्वारावरील तपासणी तसेच उमेदवारांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची पडताळणी करण्यात आली. कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच परीक्षेची प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी यासाठी प्रत्येक केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार असून प्रत्येक केंद्रावर दोन CISF चे जवान तैनात करण्यात येणार आहे.यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी केंद्र प्रमुखांशी चर्चा करून आवश्यक सूचना दिल्या.परीक्षार्थींनी वेळेत केंद्रावर पोहोचून नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
0
0
Report
Advertisement

अहिल्यानगर में विखे-व कोल्हे संघर्ष फिर गर्म, भाजपा के आंतरिक गुटबाज़ी तेज

Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर के राजनीति में एक बार फिर विके कोल्हे के खिलाफ संघर्ष उभर आया है. भाजपा के दो युवा नेता अब एक-दूसरे पर खुलेआम शब्दों में हमला कर रहे हैं. विधान परिषद में निर्विरोध चुने जाने के बाद विवेक कोल्हे ने मंत्री राजाधakrishna विके पाटील को निशाना बनाया था, जिसका जवाब माजी सांसद सुजय विक्हे ने जोरदार दिया है: 'तुम्हें जिस पद का आनंद मिल रहा है, यह वही पद है जिसे हमने छोड़ा है.' इस संदर्भ में सुजय विक्हे ने विवेक कोल्हे को बिना नाम लिए तीन-चार बार चेतावनी दी. इसी क्रम में सुजय विक्हे के वक्तव्यों पर अब कोल्हे के समर्थकों और भाजप के अंदरूनी गुटबाज़ी की भी बहस तेज हो गई है. संवादों का केंद्र असल में गणेश सहकारी साखर कारखाने का मुद्दा है, जिसे लेकर संघर्ष तीन पीढ़ी से चला आ रहा है—कोल्हे परिवार और विक्हे परिवार के बीच. राज्यसभा-लोकसभा और स्थानीय संस्थाओं तक फैले इस संघर्ष के पीछे कारखाने की सत्ता-निर्माण की राजनीति प्रमुख वजह मानी जा रही है. विश्लेषकों के अनुसार यह व्यक्तिगत नहीं बल्कि जिले की राजनीतिक संरचना का हिस्सा बन गया है, जहां दोनों नेता स्वतंत्र शक्ति केंद्र बने रहने की चाह रखते हैं. ऐसे में विश्लेषक मानते हैं कि भीतर की गुटबाजी और कारखानाखंड के मुद्दे से कांग्रेस-भाजपा के बाहर के खेल भी प्रभावित होंगे. जवाब के तौर पर लगातार बयानबाजी और सार्वजनिक सत्कार-अपमान के क्रम से अहिल्यानगर के राजनैतिक माहौल में फिर से हलचल बढ़ गई है.
0
0
Report

कल्याण में 13 लाख के MD ड्रग्स के साथ अब्बास इराणी गिरफ्तार

Kalyan, Maharashtra:कल्याण अमली पदार्थ विरोधी पथक और खडकपाडा पुलिसांच्या पथकाने आंबिवली परिसरातून ड्रग्स तस्करी करणाऱ्या अब्बास हैदर सय्यद इराणी याला बेड्या ठोकल्यात अब्बास जवळून तब्बल 13 लाख 25 हजार रुपये किमतीचे MD ड्रग्स जप्त करण्यात आले आहे . दरम्यान अब्बासने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी पाठलाग करत अब्बासच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान चोरट्यांची वस्ती म्हणून कुप्रसिद्ध असलेली आंबिवली मधील इराणी वस्तीमध्ये ड्रग्स तस्करी सूरु असल्याचे दिसून आल्याने पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत . अमली पदार्थ विरोधी पथकाला गस्ती दरम्यान आंबिवली परिसरात MD ड्रग्स घेऊन एक तरुण फिरत असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे अमली पदार्थ विरोधी पथक आणि खडकपाडा पोलिसांनी आंबिवली परिसरात सापळा रचला . याच दरम्यान दुचाकीवरून जाणाऱ्या अब्बास इराणीवर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी अब्बास गाडी अडवून त्याची चौकशी सुरू केली . चौकशी दरम्यान घाबरलेल्या अब्बासने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी काही अंतरावरच पाठलाग करत त्याच्या मुसक्या आवळल्या कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 22 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे
0
0
Report

केंद्र सरकार ने कांदा खरीदी दर बढ़ाई, किसान नाराज—जानिए किस कारण

Yeola, Maharashtra:अंकर इंट्रो : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून सुरू केलेल्या कांदा खरेदी योजनेत पुन्हा एकदा दरवाढ जाहीर केली आहे. शासकीय खरेदी दरात 80 पैशांची वाढ करत तो आता 17 रुपये 30 पैसे प्रति किलो करण्यात आला आहे. मात्र कांद्याचा उत्पादन खर्चच 22 रुपये प्रति किलो असल्याचा दावा शेतकरी करत असून हा दर अमान्य असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, पाहूया हा रिपोर्ट... व्हीओ – 1 केंद्र सरकारने कांदा उत्पादकांना आधार मिळावा याासाठी नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू केली. सुरुवातीला प्रति किलो 12 रुपये 35 पैसे दर जाहीर करण्यात आला होता. मात्र हा दर अत्यंत कमी असल्याचा आरोप करत शेतकरी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि विविध ठिकाणी आंदोलन छेडले. व्हीओ – 2 शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर सरकारने खरेदी दर वाढवत तो 15 रुपये 80 पैसे प्रति किलो केला. मात्र खुल्या बाजारात व्यापाऱ्यांकडून यापेक्षा अधिक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा प्रतिसाद मर्यादित राहिला. त्यानंतर आता पुन्हा 80 पैशांची वृद्धि जाहीर करत शासकीय खरेदी दर 17 रुपये 30 पैसे प्रति किलो करण्यात आला आहे. व्हीओ – 3 मात्र या वाढीनंतरही शेतकरी समाधानी नाहीत. कांद्याचा उत्पादन खर्चच सुमारे 22 रुपये प्रति किलो असल्याचा दावा शेतकरी करत आहेत. बियाणे, खत, औषधे, मजुरी आणि वाहतूक खर्चात मोठी वाढ झाल्याने सध्याचा शासकीय दर उत्पादन खर्चापेक्षाही कमी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. व्हीओ – 4 शासकीय खरेदी दरात वाढ झाली असली तरी ती अपुरी असल्याचे मत शेतकरी संघटनांनी व्यक्त केले आहे. उत्पादन खर्च लक्षात घेऊन कांद्याला किमान 22 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक दर देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. दरवाढीबाबत सरकार पुढे काय निर्णय घेते, याकडे आता कांदा उत्पादकांचे लक्ष लागले आहे. पीटीसी : सुदर्शन खिल्लारे, प्रतिनिधी, येवला नाशिक साथीत शेतकऱ्यांच्या बाईट जोडलेल्या आहेत
0
0
Report
Advertisement

महाराष्ट्र में ओबीसी जनगणना को लेकर भाजपा-ताकतें गूंज, उद्धव ठाकरे पर सवाल

Nagpur, Maharashtra:नागपूर विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते. On ओबीसी बैठक - पंतप्रधान यांनी घोषणा केली होती राहुल गांधींनी हा प्रश्न मांडला असता सरकारने घाबरून OBCची स्वतंत्र जनगणना करू अशी भूमिका स्वीकारली ती मात्र आताच्या जनगणने स्वतंत्र कॉलम नसल्याने OBCं चे हक्कावर गदा येणार आहे... OBCला आरक्षणापासून मूलभूत संरक्षणासाठी सुद्धा सरकार विरोधी राहिली आहे. यासाठी राज्यव्यापी मोठं आंदोलन OBCच्या सर्व प्रश्नांना बैठक असणार आहे. - ओबीसीची स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे.... पहिला फेज झालेला आहे. दुसऱ्या फेजमध्ये ओबीसी कॉलम आला पाहिजे... सरकारचं लक्ष वेधणे आणि यासाठी आंदोलनाची सुरुवात महाराष्ट्र भर करावी... या मुद्द्यावर चर्चा अजेंड्यावर असणार आहे On उद्धव ठाकरे, - महाराष्ट्राने देश बघत आहे व नेशन वन इलेक्शन वन पार्टी हे वाटचाल सुरू आहे.... लोकशाही संपवण्याचा वेळा भारतीय जनता पक्षाने घेतलेला आहे. भविष्यात निवडणुका होणारच नाही ही परिस्थिती आता हळूहळू निर्माण करण्यात भाजपला यश आल आहे..विरोधी पक्ष शिल्लक ठेवायचा नाही. त्याला मुळापासून संपवून टाकायचं. संपूर्ण यंत्राचा वापर करायचा निवडणुकीला काही अर्थ राहणार नाही.... उत्तर कोरियात शहंशाहने जिंकल्या तेच उद्या भारतात येणार अशी शंका आहे... On पक्ष सोडयाला तयार भाजपनं ठाकरे सेना फोडली त्यामुळे उद्धव ठाकरे म्हंटले असेल.. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आहे तशी कायम राहत नाही.... ती बदलत असते असा आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. त्या पदावर कायम रहाणार आहे... आमची विनंती राहील यातून मार्ग काढू... लोक गेलेत येणं जाणं शारद राहते मात्र मूळ पक्ष काही हिसकावून घेऊ शकत नाही, ठाकरे पुन्हा पक्ष निर्माण करण्यासाठी काम करतील. On नीट परीक्षा गोंधळ - धर्मेंद्र प्रधानला पदावर कायम ठेवून नीट ची परीक्षा परदेशातच घेतली पाहिजे... देशात पेपर फुटतात... त्यासाठी तर कदाचित प्रयोग धर्मेंद्र प्रधान यांनी प्रयोग केला असावा केला असा खोचक टोला वडेट्टीवारांनी लगावला...आमची औकात नाही सांभाळण्याची धर्मेंद्र प्रधान सारख्या मूर्ख माणसाला वाटलं असेल...त्यामुळे हा प्रयोग करून पहावा... परदेशातच कोणाला पाठवून तिथेच परीक्षा द्यावी अशी काय भूमिका असेल... इतकी वाताहात शिक्षण क्षेत्राची कधीही झालेली नाही. तरुण मुलांच्या आत्महत्या होत आहे...तरी पण यांना लाज शरम वाटत नाही. लाज शरम विकूनच खाल्ली असेल आणि व्यवस्था उध्वस्त केली असेल अशा घटना घडतात. On पवनराजे निंबाळकर - कोण कुठल्या ठिकाणी जा ओमराजांच्या वडिलांचा खून झाला नंतर उद्धव ठाकरेंनी त्याला मुलाप्रमाणे सांभाळलं...कोण कुठं जात मला काही यावर फार बोलयाची गरज नाही.. यावर जे चर्चा होत आहे... हा शेवट आहे महाराष्ट्रात सध्याची परिस्थिती बिहारची लोक महाराष्ट्राचे नाव ठेवतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे....नागपूर येथील गुन्हेगारी सर्वोच्च झाली आहे. अत्याचारात महाराष्ट्र पुढे गेला आहे. अधिवेशनात प्रश्न मांडू...महाराष्ट्र सगळ बघत आहे योग्य वेळी यांचा hिशोब महाराष्ट्र चुकता करेल. On वणी बीएस इसपात - बीएससी काही राजकारणी मिळून दलाली खात आहे... त्यांचा सपोर्ट आहे... ते सर्व पक्षाची लोक आहेत...त्याची सीबीआय चौकशी सीआयडी चौकशी झाली पाहिजे. अशी आमची मागणी आहे. फार मोठा घोटाळा आहे, सगळेच लोप्रतिनिधी त्यात सहभागी आहे त्याच्याशिवाय चौकशी केली. अनेक मोठे मासे यात अडकतील - संपूर्ण यंत्रणा यात आहे.. कोणी आमदार खासदाराचे नाव घेणार नाही सर्व पक्षाचे लो आहेय.. On उद्धव ठाकरे भूमिका - दोन्ही भाषण ऐकले ... उद्धव ठाकरेंच्या महाविकास इंडिया आघाडीच्या बैठकीला सोबत असतात दोन भाषणाच्या तुलनेवर बोलण्याची गरज नाही. दोघांच्याही भाषणातून जनता जे काही उद्या ठरवणार आहे. ते मला उद्या स्पष्ट दिसत आहे. जो तरुणांचा लोकांचा उद्रेक जो भावना आहे... वाकचौरे विरोधात वयोवृद्ध शिवसैनिक महिलेने वक्तव्य केलं. वेश्येला pोट भरण्यासाठी मजबुरीने ती काय करते... हे त्यापेक्षाही खालच्या दर्जाचा राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे दिसत आहे हे दुर्दैव आहे - एल निनोमुळे त्याचा प्रभाव दिसायला सुरुवात झाली आहे. हाहाकार माजला जाणार आहे. यातून महाराष्ट्र कसा सावरला जातो...आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करू मराठवाड्यातील दुष्काळामुळे पासून संपुष्टात आणू..ज्या घोषणा केल्या त्या प्रश्नाचे उत्तर द्यावे दुष्काळ पडेल...लोक विचारतील. यावेळी मात्र भयंकर परिस्थितीला समोर जावं लागेल... तुमचा सरकार कसा मार्ग काढते. सरकारकडे काय प्लॅनिंग आहे.. - सत्ताधाऱ्यांची बैठक लावावी काय भूमिका आहे काय करणार आहे हे सांगितलं तर महाराष्ट्रातील लोकांना बरं होईल. धरणे कोरडे झाले आहे पुढचे 15 दिवस तर पाणी आलं नाही तर पाण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा हाहाकार पाहायला मिळेल. - मी यावर बोलणार नाही... पक्ष काय निर्णय घ्यायचा आहे. तो बोलतील मी त्यावर गटनेचा निवडीचे काम पक्षाच्या पत्रानुसार होत असतं... त्या निर्णयाला प्रदेशाध्यक्ष जो निर्णय घेतील अशा पद्धतीची चर्चा पाहायला. ते लोक पाहत आहे. त्यावर अधिक मला वाद वाढवायचा नाही. On प्रदेशाध्यक्ष बदल पत्र - कोणाच्या बदलासाठी किंवा बदलवण्यासाठी माझा काही संबंध नसतो. जमेल तेवढं आहे त्या परिस्थितीत पक्षाचा काम करत राहतो. जाणारे कोण मागणी करणारे कोण मला माहित नाही त्यावर भाष्य करणार नाही.प्रदेशाध्यक्ष त्यावर निर्णय घेतील. मला त्या भानगडीत पडायचे नाही..
0
0
Report

डोंबिवली स्टेशन पर 70 वर्षीय पंडित वाघ की जान बचाने वाले पुलिसकर्मी की प्रशंसा

Kalyan, Maharashtra:धावती लोकल पकडण्याच्या नादात अनेक प्रवाशांनी आपला जीव गमावला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. रेल्वे प्रशासनाकडून वारंवार जनजागृती केली जात असतानाही काही प्रवासी घाईघाईत जीव धोक्यात घालतात. असाच प्रकार डोंबिवली रेल्वे स्थानकात समोर आला. धावती लोकल पकडण्याच्या प्रयत्नात ७० वर्षीय पंडित वाघ हे प्लॅटफॉर्म आणि लोकलच्या मधील धोकादायक जागेत पडण्याच्या स्थितीत आले होते. मात्र डोंबिवली जीआरपीचे पोलीस कर्मचारी अनिल शेळके यांनी प्रसंगावधान राखत त्यांना वेळीच बाहेर खेचून त्यांचा जीव वाचवला. ही घटना डोंबिवली स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर घडली. या घटनेनंतर पंडित वाघ यांनी पोलीस कर्मचारी अनिल शेळके यांचे आभार मानले. दरम्यान, धावती लोकल पकडणे, चालत्या ट्रेनमधून चढणे-उतरणे हे अत्यंत धोकादायक असून प्रवाशांनी घाई न करता सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
0
0
Report

चंद्रपूर में कल 10 केंद्रों पर नीट परीक्षा, 3301 परीक्षार्थी, सुरक्षा व्यवस्था में भारी बढ़ोतरी

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात 10 केंद्रांवर उद्या नीट परीक्षा होणार आहे. एकूण 3301 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. मागच्या पेपरफुटीनंतर सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. चंद्रपूरात प्रश्नपत्रिका वायुदलाच्या विमानाने आधीच पोचल्या असून त्या जिल्हा प्रशासनाने कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात गोपनीय ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. उद्या प्रश्नपत्रिकांची वाहतूक आणि प्रत्यक्ष केंद्रावर असणारी सुरक्षा आणि व्यवस्था याबाबत पोलीस प्रशासनाने आज चाचपणी केली. चंद्रपूरात सुमारे 300 पोलिस कर्मचारी- अधिकारी यादरम्यान तैनात असतील. प्रत्येक केंद्रावर CISF जवानांचा बंदोबस्त असणार आहे. प्रत्येक केंद्रावर जिल्हा प्रशासनाने वेगळी यंत्रणा उभारली आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top