445001
यवतमाळच्या आर्णीत भाजपाची पहिली यादी, आमदाराचा नामांचा गहजब!
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या आर्णी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत विद्यमान आमदाराचे नाव नाही. यामुळे महायुतीतील शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केला आहे. तिन्ही तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन उपजिल्हाप्रमुख विष्णू उकंडे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. पालकमंत्री संजय राठोड यांचेही या जागेसाठी आग्रह आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, जागा सुटली नाही तरी शिवसेना उमेदवार निवडणूक लढवेल.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
मोबाइल पर प्रतिबंध: संत गजानन महाराज मंदिर में आज से कोविड नहीं बल्कि मोबाइल निषेध
Buldhana, Maharashtra:शेगाव येथील संत गजानन महाराज समाधी मंदिर परिसरात आज पासून मोबाईल वापरण्यास प्रतिबंध. सुलभ व शांततेत दर्शन घेता यावं म्हणून मंदिर प्रशासनाचा निर्णय. विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री संत गजानन महाराज समाधी मंदिर परिसरात आजपासून भाविकांना मोबाईल वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मंदिर परिसरात मोबाईल वापरल्याने इतर भाविकांना त्रास होतो व मंदिर परिसरात दर्शन सुलभ व शांततेत घेता येत नाही म्हणून मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. आजपासून मंदिर परिसरात भाविकांनी आपला मोबाईल स्विच ऑफ करूनच ठेवावा असा आवाहन मंदिर प्रशासनातर्फे करण्यात आला आहे.0
0
Report
चंद्रपुर में तीन नाबालिग बच्चे एक साथ लापता, पुलिस ने खोज तेज
Chandrapur, Maharashtra:टायटल:---चंद्रपुर शहरात खळबळ, महाकाली वॉर्ड भागातून एकाचवेळी तीन अल्पवयीन मुले बेपत्ता, पोलीस तपासण्यात आला वेगवान अँकर:- चंद्रपूर शहरातून एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरातील महाकाली वॉर्ड परिसरातून 9, 13 आणि 15 वर्षे वयोगटातील तीन अल्पवयीन मुले अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 8 रोजी ही मुले महाकाली परिसरात खेळत होती. मात्र त्यानंतर ती घरी परतली नाहीत. मुलांचा सर्वत्र शोध घेऊनही काहीच माहिती न मिळाल्याने चिंताग्रस्त पालकांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली असून या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बाईट १) जया मोकलवार, मुलाची आई बाईट २) कृणाल रामटेके , सहायक पोलीस निरीक्षक0
0
Report
सूखाग्रस्त येवला में केले की खेती ने किसानों की आय बदल दी
Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील येवला तालुका दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो. पारंपरिक पिकांमधील अनिश्चितता यामुळे येथील शेतकऱ्यांना नेहमीच आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं. मात्र या परिस्थितीला छेद देत येवला तालुक्यातील नांदूर गावातील चार प्रगतशील शेतकऱ्यांनी केळीच्या लागवडीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे. एक वर्षात येणाऱ्या पिकाद्वारे शेतकरी आता लखपती झाला असून या केळीला स्थानिक बाजारपेठेसोबतच बाहेरील राज्यांतूनही मोठी मागणी आहे. गुजरात आणि राजस्थानमधील व्यापारी थेट शेतात येऊन केळीची खरेदी करत आहेत. एकूणच, दुष्काळी म्हणून ओळख असलेल्या येवला तालुक्यात केळीच्या लागवडीमुळे शेतीत नवसंजीवनी आली आहे. पारंपरिक पिकांना पर्याय शोधत नवनवीन प्रयोग केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते, याचं हे उत्तम उदाहरण ठरत आहे.0
0
Report
Advertisement
मोदी के आह्वान पर मंत्री भुसेन ने स्वागत किया, नागरिकों से तत्काल अमल की अपील
Nashik, Maharashtra:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचे मंत्री दादा भुसेंकडून स्वागत.... दादा भुसे ऑन नरेंद्र मोदी भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नागरिकांना जे आवाहन केले आहे त्याच मी स्वागत करतो... प्रत्येक नागरिकांना मी देखील आवाहन करतो की नरेंद मोदी यांनी केलेल्या आवाहनाची प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन अंमलबजावणी करा.. ज्यावेळेस आपण आपल्या भारताला महासत्ता बनवायचा संकल्प करतो.. तेव्हा पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला आपण प्रतिसाद दिला पाहिजे... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय चांगले मुद्दे हे उपस्थित केलेले आहे..0
0
Report
शेलु बाजार में CCTV बंद, चोरी पर अंकुश नहीं, नागरिकों ने माँगी त्वरित मरम्मत
Washim, Maharashtra:शेलुबाजार येथे बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे मागील अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे परिसरात मागील काही दिवसांत चोरीच्या घटना घडूनही संबंधित यंत्रणेकडून कॅमेरे दुरुस्त करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सीसीटीव्ही बंद असल्यामुळे गुन्ह्यांच्या तपासातही अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे तातडीने सर्व कॅमेरे दुरुस्त करून सुरू करावेत अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे.0
0
Report
दुग्ध व्यवसायी के चारे में आग, चारा जला, बैल घायल
Yeola, Maharashtra:येवला तालुक्यातील नायगव्हाण येथे दुग्ध व्यवसाय करणारे लहानू दत्तू सदगीर व रंजना दत्तू सदगीर यांनी जनावरांसाठी विकत घेतलेला 30 ते 35 ट्रॉली चारा साठवून ठेवला होता. मात्र अचानक लागलेल्या आगीत हा चारा पूर्णपणे जळून खाक झाला. यासोबतच शेणखत देखील जळाल्याने सदगीर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या जळीतात त्यांचा बैल देखील जखमी झाला आहे. अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाला मात्र तोपर्यंत पूर्ण चारा जळून खाक झाला होता.आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून घटनेची चौकशी सुरू आहे。0
0
Report
Advertisement
मालेगाव के फार्महाउस से गोवंश तस्करी, पूर्व महापौर अब्दुल मलिक पर मामला
Nashik, Maharashtra:नाशिकच्या मालेगावात एमआयएम गटनेत्याच्या फार्म हाऊसवरून गोवंशाची तस्करी - मालेगावातील माजी महापौर एमआयएमचे गटनेते अब्दुल मलिक मोहम्मद युसुफ यांच्याविरोधात गोवंश तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगावच्या पवारवाडी व किल्ला पोलिसांनी स्वतंतपणे कारवाई करीत सवंदगाव येथील फॉर्महाऊस व इस्लामबादच्या राहत्या घराजवळील गोदामातून सुमारे अश्या तीन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात 3 लाख 20 हजार रुपये किंमतीचे 18 गोवंश जनावरे ताब्यात घेतली.दरम्यान घराजवळ कारवाई सुरू असताना मलिक याने शासकीय कामात अडथळा आणत गोवंश जनावरे पळवून लावत फरार झाला आहे.बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ही जनावरे विक्रीसाठी आणल्याचा पोलिसांना संशय आहे..0
0
Report
पंढरपुर स्टेशन रोड पर युवकों के समूह ने धारदार हथियार से युवक पर हमला
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर शहरांमधील स्टेशन रोडवर कोयता आणि चाकूने एका तरुणावर चार ते पाच तरुणांकडून काल रात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे केस माघारी घेण्यासाठी तरुणांच्या टोळक्याने आशु जाधव या तरुणावर धारदार शस्त्राने वार केले आहेत पंढरपूर शहरातील भर गर्दीच्या ठिकाणी असणाऱ्या स्टेशन रोड परिसरात कोयता आणि चाकून हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे पंढरपूरात मागच्या काही दिवसांमध्ये अशाप्रकारे हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे पोलिसांनी अशा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे0
0
Report
जनगणना और मैपिंग के कारण रत्नागिरी का पर्यटन इस बार ठप, गर्मी छुट्टियाँ प्रभावित
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जनगणना आणि एस आय आर मॅपिंगच्या कामांमुळे यंदा पर्यटनाला ब्रेक.. या दुहेरी प्रशासकीय जबाबदारीमुळे रत्नागिरीतील प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे अडकून पडली आहे.. दरवर्षी मे महिन्याच्या कडाक्याच्या उन्हात रिलॅक्स होण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी जाणारी कर्मचाऱ्यांची पर्यटन वारी यंदा या कामामुळे पूर्णपणे मंदावली असून शासकीय कार्यालयांमध्ये कामाचा प्रचंड ताण दिसून येत आहे.. उन्हाळी पर्यटनामध्ये शासकीय,निमशासकीय अधिकारी,कर्मचारी यांची संख्या अधिक असते.. या काळात शाळा महाविद्यालय यांना सुट्टी असते.त्यामुळे दरवर्षी मे महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या सहलींमुळे जिल्ह्यातील आणि जिल्हा बाहेरील पर्यटन स्थळे गजबजलेली असतात..मात्र यंदा चित्र वेगळे आहे.. एरवी एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या किंवा शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात पर्यटक यायला सुरुवात होते.. सध्या गणपतीपुळे वगळता जिल्ह्यात इतर पर्यटन स्थळे अजूनही म्हणावी तशी पर्यटकांची गर्दी दिसून येत नाही..0
0
Report
Advertisement
Chorade Phata पर तेज रफ्तार कार ने दंपति की बाइक को मारी टक्कर; CCTV कैद
Satara, Maharashtra:साताऱ्यातील खटाव तालुक्यात पाटण–पंढरपूर मार्गावरील चोराडे फाटा येथे भरधाव चारचाकीने दुचाकीला जोरदार धडक दिली आहे. या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत.. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला... चोराडे फाटा येथे वाढत्या अपघातांच्या मालिकेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे... भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने पाठीमागून दुचाकीला जोरदार धडक दिली... या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नी दूर फेकले गेले... असून दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना कराडला उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली... दरम्यान, हा संपूर्ण अपघात जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.पाटण–पंढरपूर मार्गावर वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांकडून गतिरोधक बसविण्याची मागणी होत आहे...0
0
Report
Satara के वसंतगड किले के जंगल में वन्यजीव शिकारी पकड़े गए, मृत सायाळ बरामद
Satara, Maharashtra:सातारा - साताऱ्यातील किल्ले वसंतगड येथील परिसरात वन्यजीव शिकारीची घटना समोर आली आहे. काही संशयित शिकारी सायाळाच्या शिकारीसह आढळून आले. दुर्ग सेवकांना पाहताच शिकार्यांनी मृत सायाळ तिथेच टाकून पळ काढला. यानंतर दुर्ग सेवकांनी मृत सायाळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. वसंतगड किल्ल्याच्या परिसरात वारंवार अशा शिकारीच्या घटना घडत असल्याने वनविभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होते आहे.0
0
Report
आष्टा में ट्रेमीमაიड इंजेक्शन तस्करी: दो गिरफ्तार, 74 बोतलें जब्त
Sangli, Maharashtra:स्थानीय गुन्हे शाखेने अष्टा येथील नशेसाठी वापरणाऱ्या ट्रेमीमाईड इंजेक्शनची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ट्रेमीमाईड इंजेक्शनच्या 74 बाटल्या व दुचाकी, असा एक लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नशेसाठी वापरले जाणारे ट्रेमीमाईड इंजेक्शन घेऊन दोघे अष्टामध्ये विक्रीसाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून अभिषेक भीमराव सरवदे आणि रेहान रफिक मुजावर या दोघांना अटक केली आहे. दोघांनी ट्रेमीमाईड हे इंजेक्शन इंडिया मार्ट या एप्लीकेशन वरून ऑनलाईन मागवल्याची कबुली दिली आहे, याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी में तेज बारिश-आंधी से 1.5 करोड़ का नुकसान
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. वादळी पावसामुळे जिल्ह्यात दीड कोटीचे नुकसान वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला तडाखा बसला आहे.. सहा तालुक्यातील साडेतीनशे घरांसह गोठे,शासकीय इमारतींचे तसेच वाऱ्यामुळे विजेचे खांब,वाहिन्या तुटल्यामुळे महावीतरणालाही फटका बसला आहे.. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यात एकूण दीड कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे..0
0
Report
गोपीचंद पडळकर का सवाल: जयंत पाटल को विशाल पाटील क्यों नहीं बन पाए खासदार?
Sangli, Maharashtra:जयंत पाटलांनी आईशप्पथ घेऊन सांगावे,की विशाल पाटील खासदार व्हावेत, ही त्यांची इच्छा होती,का ? अशा शब्दांत आमदार गोपीचंद पडळकरांनी आमदार जयंत पाटलांना आव्हान दिले आहे. तसेच ज्ञान पाटलांना त्यांच्या मुलाला खासदार करायचं होतं मग विशाल पाटलांना,ते खासदार करू शकले असते, तर त्यांनी त्यांच्या मुलाला खासदार केले असते, सगळ्या पोरांचं लॉन्चिंग झालं पण जयंत पाटलांच्या पोराचं लॉन्चिंग झाला नाही, आता त्यांना सगळ्यात जास्त दुःख आहे, आर आर पाटलांचा मुलगा रोहित पाटल आमदार झाला, अजित पवारांचा मुलगा जय पवार खासदार झाला, तुम्ही सगळ्यात जास्त दुःख जयंत पाटलांना आहे, अशी बोचरी टीका देखील गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. जयंत पाटील यांना सांगलीच्या खासदारकीबाबत केलेल्या विधानावरून गोपीचंद पडळकरांनी ही टीका केली आहे,ते सांगली मध्ये बोलत होते.0
0
Report
दापोली में आंधी-बारिश से पेड़ गिरे, बिजली तार उखड़े; ग्रामीण अंधेरे में
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. दापोली तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा.. अँकर दापोली तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने अनेक गावांना जबर फटका बसला आहे.. सोवेली,मुगीच,भानघर,माटवण परिसरात मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडासह आलेल्या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे ऊनमळून पडली आहेत.. काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडाले तर काही घरांची पडझड झाली आहे.. वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब आणि तारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे..परिणामी पाणीपुरवठाही ठप्प झाला असून नागरिकांना अंधारात रात्र काढण्याची वेळ आली आहे.. अचानक आलेल्या या संकटामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे..0
0
Report
Advertisement
