icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

चंद्रपूर जिले के चौथी कक्षा के छात्र की अचानक मौत, हृदयाघात की आशंका

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील चौथी विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू, हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता. चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रम्हपुरी तालुक्यातील देलनवाडी गावात शाळेत जाण्यासाठी तयार होत असलेल्या एका 10 वर्षीय विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू झालाय. ईशान सत्यपाल आत्राम असं मृत विद्यार्थ्यांचं नाव आहे. चौथ्या वर्गात शिकणारा ईशान सकाळी शाळेत जाण्यासाठी तयार होत असतानाच अचानक खाली कोसळला. पालकांनी त्याला तातडीने शहरातीलच एका रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ईशानचा मृत्यू हृदयरोगाच्या झटक्याने झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र मृतदेहाचे शवविच्छेदन न झाल्यामुळे मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.
0
0
Report

गोकुळ दूध संघ पैनल विवाद: महायुती बनाम विपक्षी खेमे तीव्र

Kolhapur, Maharashtra:गोकुळचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांना वगळून गोकुळ दूध संघात पॅनल करावे अशी भूमिका भाजपच्या काही नेत्यांनी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे मांडली असल्याचा आरोप मुश्रीफ गटाच्या स्थानिक नेत्यांनी केलाय. त्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षाचे संयुक्त पॅनल बनवावे अशी मागणी मुश्रीफ समर्थक गोकुळचे संचालक युवराज पाटील आणि जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी पत्रकारद्वारे केली आहे. या संदर्भात भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी राष्ट्रवादीचे भाजपा, शिवसेना आणि जनसुराज्य पक्ष सोडून आणखी कोण मित्र आहे हे जाहीर करावे असं आव्हान दिले आहे. त्यामुळे गोकुळमध्ये महायुती मध्येच आव्हान प्रतिअव्हान दिले जात असल्याने दोन भूमिका समोर येत आहे.
0
0
Report
Advertisement

लातूर में सास-बहू विवाद ने बहु और बच्चों को आत्महत्या के लिए मजबूर किया

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... गैस पर स्वयंपाक का केला? किरकोळ वादातून आईसह दोन चिमुकल्यांची आत्महत्या.... lातूर जिल्ह्यातील खरोसा येथे धक्कादायक घटना.... सासू-सुनेच्या वादाने घेतलं भीषण रूप..... गॅसवर स्वयंपाक का केला ? चुलीवर का केला नाही? या कारणावरून सासू आणि सुनेमध्ये झालेल्या वादाने भीषण रूप घेतलं… आणि सुनेने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील खरोसा येथे घडली आहे. या प्रकरणात आता किल्लारी पोलिसांनी सासरच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. मयत निकिता हिच्यावर लग्नानंतर माहेरून पैसे आणि सोने आणण्याचा दबाव टाकत सासरच्या मंडळींकडून सतत मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. या छळातूनच हा वाद उफाळून आला आणि त्याचा शेवट या दुर्दैवी घटनेत झाला. या प्रकरणी पती दीपक अशोक भुरे, सासू सुनिता अशोक भुरे आणि सासरा अशोक ईश्वर भुरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report

कोल्हापुर शिवजयंती मिरवणुका में भोंदू बाबा और अशोक खरात के दुष्कृत्यों का वीडियो वायरल

Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरात शिवजयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये भोंदू बाबा व अशोक खरातची दुष्कृत्ये पाहायला मिळाली.. कोल्हापूरकर नेहमीच जयंती और उत्सवाच्या निमित्ताने समाज प्रबोधनात्मक देखावे मिरवणुकीत आणत असतात. संयुक्त मंगळवार पेठ शिवजयंती उत्सव समितीने देखील अशाच पद्धतीचा देखावा उभारून खरात सारख्या भोंदू बाबापासून सावध राहावे असं प्रबोधन केलं. सध्या या जनजागृतीवरील सजीव देखाव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.. या देखाव्याच्या माध्यमातून खरात कोल्हापुरात पण असं म्हणत हा व्हायरल होत आहे.
0
0
Report
Advertisement

नागपुर उच्च न्यायालय ने संघ प्रमुख की सुरक्षा खर्च से जुड़ी याचिका खारिज कर दी

Nagpur, Maharashtra:नागपूर उच्च न्यायालय संग्रहित व्हिडिओ वापरावा - नागपूर - * राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालय व सरसंघचालकांना ‘झेड प्लस’ सुरक्षेचा खर्च वसूल करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळलीय ..मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती - *सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुरक्षेचा खर्च सरकारी तिजोरीवर नको... याचा खर्च संघाकडूनच वसुलीची मागणी करणारी याचिक­a मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली होती .* मात्र ही याचिका विशिष्ट हेतूने दाखल केली असल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने ती फेटाळून लावली
0
0
Report

विहिप और बजरंग दल के निषेध प्रदर्शन में महिलाओं के शोषण और जबरदस्ती धर्मांतरण के खिलाफ कड़े कानून की मांग

Bhandara, Maharashtra:महिलांचे शोषण... विहिंप व बजरंग दलचे निषेध आंदोलन विश्व हिंदू परिषद व बजरंग दल भंडारा जिल्हातर्फे त्रिमूर्ती चौक येथे विविध मुद्द्यांवर निषेध आंदोलन करण्यात आले. देशात महिलांची फसवणूक, जबरदस्ती धर्मांतर व शोषणाच्या घटनांविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी सावनकुमार यांना देण्यात आले. देशात काही ठिकाणी समोर आलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कठोर कायदे करावेत, तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली. या निवेदनात संबंधित प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच जबरदस्ती धर्मातर रोखण्यासाठी स्पष्ट व कडक कायदा करावा. असा विविध मागण्या या ठिकाणी निवेदनात नमूद होत्या...
0
0
Report

सोलापुर में नौ माह की गर्भवती महिला की गला दबाकर हत्या, शहर में हड़कंप

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेचा गळादाबून खून, घटनेने संपूर्ण शहर हादरले - सोलापुरात 9 महिन्यांच्या गर्भवती महिलेचा गळा दाबून खून - लग्नास नकार दिल्याचा राग मनात धरत भिंतीवर डोक आपटत, गळा दाबत निर्घृण खून - सोनी गणेश रामपुरे वय 19 असे हत्या झालेल्या गर्भवती महिलेचे नाव - बापू सुरेश आरगोड या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून सध्या त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आलीय - गर्भवती महिला आणि तिच्या पोटातील नऊ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येतेय
0
0
Report
Advertisement

मावळ जंगल में 32 कृत्रिम पाणवठे, वन्यजीवों को राहत की नई पहल

Varsoli, Maharashtra:मावळमध्ये वाढत्या उन्हाचा कहर दिसून येत आहे. तापमान तब्बल ३९℃ पार झाले आहे. तर नैसर्गिक पाणीस्रोत आटल्याने वन्यजीवांची पाण्यासाठी वणवण होऊ नये याच पार्श्वभूमीवर मावळ वनविभागाने पुढाकार घेतला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे यांनी जंगल परिसरात तब्बल ३२ कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती केली असून या पाणवठ्यांमुळे पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या वन्यजीवांना मोठा दिलासा मिळणार असून, वन्यप्रेमींनीही या उपक्रमाचं स्वागत केलं आहे. निसर्ग आणि वन्यजीव संवर्धनासाठी मावळ वनविभागाचं हे पाऊल सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे…
0
0
Report

Satar Devlai me garmi ke chalte tanker daron me uchhal, nagrikon par bhari kharcha

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या सातारा देवलाई परिसरात बाराही महिनिने विकतच्या टँकरच्या पाण्यावरच अवलंबून असताना ऐन उन्हाळ्यात खासगी टैंकर चालकांनी दर वाढवल्याने आर्थिक भार सहन करण्याची वेळ सातारा देवळाई परिसरातील नागरिकांवर आली आहे. उन्हाचा पारा वाढत असताना विहिरीतील पाणी कमी होत असल्याने पाणी विकणाऱ्याने पाण्याचे दर वाढवले. त्यामुळे टँकर चालकांनीही आपल्या दरात वाढ केली. यामुळे नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. उन्हाळ्याआधीच सातारा-देवळाई परिसरातील अनेक नागरिकांच्या बोअरवेलचे पाणी हे डिसेंबर महिन्यातच संपले. काही नागरिकांचे बोअरवेल फेब्रुवारी महिन्यात आटल्याने पाणीाची कमतरता जाणवू लागली. यामुळे टँकरची मागणी वाढली. एप्रिल महिन्यातच टँकरचे दर वाढले. मे महिन्यात आणखी दर वाढण्याची शक्यता आहे. 2 हजार लिटर पाण्याचा टँकर आता 300 हुन 600 रुपयांवर गेला आहे..
0
0
Report
Advertisement

रायगड़ में शिंदे गट को बड़ा धक्का, शिवसैनिक राष्ट्रवादी में प्रवेश

Khopoli, Maharashtra:रायगड ब्रेकिंग: खोपोली में शिंदे गट को बड़ा धक्का। शिवसैनिकों का राष्ट्रवादी पार्टी में प्रवेश... कर्जत के विधायक महेंद्र थोरवे को राष्ट्रवादी के सुधाकर घारे ने बड़ा धक्का दिया। खोपोली में शिंदे गट के प्रमुख पदाधिकारी और शिवसैनिक कल राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे की प्रमुख उपस्थिति में राष्ट्रवादी में प्रवेश के लिए राजी हुए थे। कर्जत विधानसभा क्षेत्र के शिंदे सेना के विधायक महेंद्र थोरवे को यह बड़ा धक्का माना जा रहा है। राष्ट्रवादी के जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे पर विश्वास करते हुए इन कार्यकर्ताओं ने प्रवेश किया है। इस अवसर पर रायगड राष्ट्रवादी के जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनील पाटील, तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे, तालुकाध्यक्ष दीपक श्रीखंडे आदि प्रमुख पदाधिकारी उपस्थित थे。
0
0
Report

RTE प्रवेश की पहली फेरी: समयसीमा बढ़ी, 2 मई तक आवेदन

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) पहिल्या फेरीतील प्रवेश निश्चित करण्यासाठी आता २ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सोमवारी ही मुदत संपत होती. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील ५४१ शाळांमध्ये ४,९११ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी १७,१८७ अर्ज आले होते. पहिल्या सोडतीत ४,८६६ विद्यार्थ्यांची निवड झाली असली तरी, कागदपत्रांच्या तांत्रिक अडचणींमुळे केवळ ७४३ विद्यार्थ्यांनीच आतापर्यंत प्रवेश निश्चित केला आहे. पालकांना दिलासा देण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालक यांनी ही मुदत वाढवून दिली आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top