445001
यवतमाळच्या आर्णीत भाजपाची पहिली यादी, आमदाराचा नामांचा गहजब!
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या आर्णी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत विद्यमान आमदाराचे नाव नाही. यामुळे महायुतीतील शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केला आहे. तिन्ही तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन उपजिल्हाप्रमुख विष्णू उकंडे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. पालकमंत्री संजय राठोड यांचेही या जागेसाठी आग्रह आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, जागा सुटली नाही तरी शिवसेना उमेदवार निवडणूक लढवेल.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
मुंबई में भारी बारिश से अंधेरी सबवे पानी में, सुरक्षा कारणों से अस्थायी बंद
Mumbai, Maharashtra:मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पुन्हा एकदा पाण्याखाली गेला असून सुरक्षिततेच्या कारणास्तव तो वाहतुकीसह नागरिकांसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे. सकाळच्या गर्दीच्या वेळी सबवे बंद झाल्याने कार्यालयीन कर्मचारी, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच प्रवाशांची गैरसोय झाली. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी नागरिकांना व विद्यार्थ्यांना गोखले पूल मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.0
0
Report
मुंबई समेत बोरीवली में बारिश, यातायात धीमा; रेलवे सेवाएं सामान्य
Mumbai, Maharashtra:मुंबईसह बोरीवली परिसरात सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. अधूनमधून जोरदार सरी कोसळत असल्याने रस्त्यांवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला असून वाहनचालकांना सावधगिरीने प्रवास करावा लागत आहे. रेल्वे सेवा सध्या सुरळीत सुरू असली तरी प्रवाशांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडणे टाळावे तसेच पाणी साचलेल्या भागातून जाताना काळजी घ्यावी.0
0
Report
यवतमाल में सोयाबीन की बुवाई के बाद उग नहीं, किसान चिंतित, जांच की मांग
Yavatmal, Maharashtra:चालू खरीप हंगामात पिकांची पेरणी किंवा लागवड केल्यानंतर बियाण्यांची उगवण होत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी पुढे येत आहेत. यवतमाळ जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी लागवड केलेली सोयाबीन बियाणे उगवलेच नाही, त्यामुळे बियाण्यांची उगवण क्षमता व त्यांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. बाभुळगाव तालुक्यातील मिटणापूर येथील शेतकरी रणजीत दांडगे यांनी आपल्या शेतात सोयाबीन ची लागवड केली होती. मात्र त्यांनी लागवड केलेल्या 11 एकर शेत जमिनीवरील सोयाबीन उगवले नाही. त्यामुळे त्यांना शेतात पुन्हा नांगर फिरवून दुबार पेरणी करावी लागत आहे. याबाबत त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली आहे. दांडगे यांच्याप्रमाणेच अनेक शेतकऱ्यांच्या अशाच प्रकारच्या तक्रारी असून त्यांच्या माथी कृषी केंद्रांमधून बोगस बियाणे मारल्या गेले असावे अशी शक्यता आहे. अशा प्रकारच्या तक्रारी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे कराव्या असे आवाहन जिल्हा कृषी अधीककांनी केले आहे.0
0
Report
Advertisement
नाशिक में भारी बारिश, जलाशयों में पानी का स्तर तेज़ी से बढ़ा
Nashik, Maharashtra:ब्रेकिंग नाशिकमध्ये मुसळधार पावसाची हजेरी; धरणसाठ्यात वाढ • नाशिक जिल्ह्यात गेल्या 24 तासांत अनेक भागांत जोरदार पावसाची नोंद. • सर्वाधिक पाऊस अंबोली 224 मिमी, इगतपुरी 205 मिमी, त्र्यंबक 148 मिमी, गौतमी-गोदावरी परिसर 121 मिमी, नाशिक शहर 88 मिमी. • पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ सुरू. • दारणा धरण 36 टक्के , गंगापूर 53.34%, कश्यपी 40.93%, कडवा 49.64%, करंजवण 23.07%, चणकापूर 60.20% वर • नाशिक पाटबंधारे विभागातील एकूण उपयुक्त पाणीसाठा 37.96%, गेल्या वर्षीपेक्षा अद्याप कमी, मागील वर्षी याच दिवशी तो 71.91% होता. • गौतमी-गोदावरी धरणातून 1,280 क्युसेक, तर चणकापूर धरणातून 4,732 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. • धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे येत्या काही दिवसांत धरणसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता. प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन.0
0
Report
रत्नागिरी के दहिवली में पहाड़ टूटने से पिता-पुत्र की मौत, शव बरामद
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. दहिवलीत डोंगरकडा कोसळून बाप लेकाचा मृत्यू.. तब्बल २१ तासानंतर मृतदेह हाती..७५ वर्षीय वृद्देला ढिगाऱ्याखालून सुखरूप काढले बाहेर.. पाच घरे जमीन दोस्त.. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील दहिवली येथे मुसळधार पावसामुळे सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या sुमारास डोंगरकड्याचा मोठा भाग कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाले घरासह गाडले गेलेले शांताराम बाळा शेलार आणि सतीश शांताराम शेलार या बाप लेकांचे मृतदेह २१ तासानंतर हाती लागले तर दुर्घटनेनंतर चार तासांनी कल्पना शांताराम शेलार या वृद्धेला ढिकाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात बचाव यंत्रणेला यश आले.. दरम्यान येथील १५ कुटुंबियांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले असून दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना शासनातर्फे तातडीने चार लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले..0
0
Report
रायगढ़ के धरणों में पानी 84% तक जमा, जलसंकट खत्म
Chendhare, Maharashtra:स्लग - रायगडकरांची जलचिंता मिटली. जिल्ह्यातील १८ धरणे तुडूंब भरली. धरणामध्ये ८४ टक्के पाणीसाठा अँकर - रायगड जिल्ह्यात धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे रायगडकरांची जलचिंता मिटली आहे. लघुपाटबंधारे विभागाच्या प्रकल्पातील पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. २८ प्रकल्पात ८४ टक्के पाणी साठा जमा झाला आहे. १८ धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. तर पाच धरणं ५० टक्के भरली आहेत. हेटवणे मध्यम प्रकल्पात ६४ टक्के पाणीसाठा झाला आहे.५८.९४० दशलक्ष घन मीटर पाणीसाठा या धरणांमध्ये जमा झाला आहे.0
0
Report
Advertisement
नागपुर के फुकेश्वर में कार लूट: चाकू दिखाकर डराने-धमकाने आरोपी फरार
Nagpur, Maharashtra:कार ने यात्रियों को रास्ते में चाकू दिखाकर लूट ली... नागपूर जिल्ह्यातील फुकेश्वर शिवारातील 5 जुलै रोजीची घटना... कृषी विभागाचे कर्मचारी सुहास चंद्रकांत हजारे हे पाच जुलै रोजी आपल्या कार ने नातेवाईकांसोबत जात असताना फुकेश्वर भागात निर्जन ठिकाणी दोघांनी चाकूचा धाक दाखवत त्यांची कार थांबवली आणि त्यांना लूटल्याची घटना घडली आहे... कार मध्ये पाठीमागे बसलेल्या सहकार्याने व्हिडिओ शूट केला.. - या घटनेत सोनं आणि काही रोकड लुटल्याची माहिती - सुहास हजारे परिवारासह आपल्या अल्टो कारने बुटीबोरीकडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी केली लुटमार - चार तोळे सोनं आणि काही रोकड लुटली - पाच जुलै सायंकाळी पाच वाजताची घटना, आरोपी अजून हि फरार आहेत..0
0
Report
रत्नागिरी में 181 गांवों के लिए भूस्खलन खतरा, खेड में अलर्ट जारी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यातील 181 गावांना दरडीचा धोका. दहिवलीतील भूस्खलनानंतर प्रशासन सतर्क; खेड तालुक्यात सर्वाधिक गावे. खेड तालुक्यातील दहिवली शेलारवाडीमध्ये भूस्खलन होऊन तीघे ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यातील एका महिलेला वाचविण्यात आले आहे. मात्र या घटनेने खेड तालुक्यात काही वर्षांपूर्वी घडलेल्या पोसरे दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. या प्रकारानंतर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. पावसाळ्यापूर्वी केलेल्या सर्व शहरात जिल्ह्यात 181 गावांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका आहे. त्यात अतिसंवेदनशील 13 गावांचा समावेश आहे. सर्वाधिक धोका असलेली 50 गावे खेड तालुक्यात आहेत.0
0
Report
धुळे में रिमझिम बारिश ने मौसम बदला, ऑरेंज अलर्ट जारी
Dhule, Maharashtra:अनेक दिवसानंतर धुळे जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली है. अनेक भागांमध्ये मध्यरात्रीपासून रिमझिम पाऊस बरसत आहे. धुळे जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला है. धुळे, शिंदखेडा, शिरपूर, साक्री तालुक्यामध्ये मध्यरात्रीपासून पावस पडत असून, शेतकरी समाधानी झाले आहेत. या पावसाने मात्र सकाळी विद्यार्थ्यांसह पालकांची तारांबळ उडवली. रात्रीपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे धुळेकर नागरिकांची उकाड्यातून सुटका मिळाली आहे.0
0
Report
Advertisement
MIDC भूखंडों पर उद्योग शुरू करने की अंतिम तिथि तय की गई
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून भूखंड घेतल्यानंतरही पाच वर्षात तेथे सुमारे ४० टक्के बांधकाम करून तेथे उद्योग सुरू करणे उद्योजकांना बंधनकारक आहे. मात्र असे असूनही छत्रपती संभाजी नगर विभागातील अनेकानी बांधकाम सुरू केले नाही, एमआयडीसीकडून घेतलेल्या २५४ भूखंड मालकांना डिसेंबरअखेरपर्यंत उद्योग सुरू करण्याची आता अखेरची मुदत देण्यात आली आहे. सुमारे 250 भूखंड विनावापराचे पडून असल्याचे एमआयडीसीच्या सर्वेक्षणात आढळून आले होते. या भूखंडमालकांना नोटीस बजावण्यात आली होती. आता वरिष्ठ कार्यालयाकडून विना वापराच्या भूखंडासंदर्भात लवकरच धोरण निश्चित करण्यात येईल. यानंतर पुढील कार्यवाही होईल0
0
Report
रत्नागिरी में भारी बारिश से भारी नुकसान, 21 जानवर मरे, बिजली खंभे गिरे
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. पाऊस,वादळी वाऱ्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात कोटीहून अधिक नुकसान.. घरें,गोठे,शाळा,रस्ते,पुल,मोऱ्या बाधित.. २१ जनावरे दगावली,महावितरणाचे १० खांब कोसळले.. अँकर जिल्ह्यातील घरे,गोठे,शाळा,अंगणवाड्या,रस्ते,पूल,मोऱ्या आदींना मोठ्या फटका बसला आहे.. या पावसाने जिल्ह्यात आठवड्याभरात एक कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.. जुलैपासून पावसाने वादळी वाऱ्यासह मुसळधार बरसण्यास सुरुवात केल्याने जिल्ह्यातील घरे,गोठे,शाळा,अंगणवाड्या,रस्ते,पूल,मोऱ्या आदींना मोठ्या फटका बसला आहे.. यात २१ जनावरे दगावली असून महावितरणाचे १० विद्युत खांब कोसळले आहेत.. या पावसाने जिल्ह्यात आठवड्याभरात एक कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे..0
0
Report
राज्य के अधिकतर स्कूल कल बंद, टीईटी और पदोन्नति पर शिक्षक संघों का विरोध
Chendhare, Maharashtra:राज्यातील बहुतांश शाळा उद्या बंद राहणार सरकारच्या धोरणाविरोधात शिक्षक संघटना एकवटल्या ऑन लाईन टीईटी परीक्षेला शिक्षकांचा विरोध आझाद मैदान आणि सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन राज्यातील सर्व माध्यमांच्या ८० टक्के शाळा उद्या (गुरुवारी) बंद राहणार आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्या आहेत. टी इ टी परीक्षेतील घोळ आणि सेवा ज्येष्ठ शिक्षकांना डावलून केली जाणारी पदोन्नती या विरोधात शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहे. ऑन लाईन टी इ टी परीक्षा घेण्यास शिक्षकांचा विरोध आहे. उद्या शाळा बंद ठेवून मुंबईत आझाद मैदान आणि प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं जाणार आहे.0
0
Report
Advertisement
वाशीम में SIR मोहिम के चलते स्कूल समय 7:30 से 1 बजे तक बदला गया
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:वाशिम जिल्ह्यात विशेष मतदार यादी पुनरीक्षण (SIR) मोहिमेला गती देण्यासाठी प्रशासनाने ७ ते २९ जुलैदरम्यान शाळांच्या वेळेत तात्पुरता बदल केला आहे. संबंधित खासगी अनुदानित, अंशतःअनुदानित तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळा सकाळी ७.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत भरतील. बीएलओ म्हणून नियुक्त शिक्षकांना दुपारी २ नंतर घरभेटी देऊन मतदार पडताळणी, गणनापत्रके भरणे आणि त्यांचे डिजिटलायझेशन करता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यां च्या निर्देशानुसार शिक्षण विभागाने संबंधित सर्व यंत्रणांना आवश्यक आदेश जारी केले असून, २९ जुलैपर्यंत ही मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येणार आहे。0
0
Report
देहू में संत तुकाराम महाराज के पादुकाओं की पूजा सम्पन्न; पालकी अकुर्डी के लिए रवाना
Varsoli, Maharashtra:संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे देहु येथील इनामदार वाडा येथे आज जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. इनामदार वाडा येथून मुक्काम करून आता पालखी आकुर्डीकडे मार्गस्थ होणार आहे..देहूनगरी ला निरोप दिल्यानंतर पालखी संत तुकाराम महाराजांचे शिष्य अनगड शहावली बाबा यांच्या दर्ग्यात मुस्लिम समाजाची पहिली आरती संपन्न होईल.0
0
Report
नागपुर: हिरा स्वीट्स के उत्पादन यूनिट में मृत उंदीर मिलने पर लाइसेंस रद्द
Nagpur, Maharashtra:- नागपुरातील पाचपावली परिसरातील हिरा स्वीट्सच्या उत्पादन युनिटमध्ये तपासणीदरम्यान मृत उंदीर आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने कठोर कारवाई - अन्न सुरक्षा अधिकार्यानी कारखान्याची तपासणी केली असता स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन उघड. - कारखान्यात तयार होणाऱ्या मिठाई, विशेषतः सोनपापडीच्या उत्पादन प्रक्रियेत मृत उंदीर आढळल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. - तपासणीचा अहवाल अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे सादर करण्यात आला. - हिरा स्वीट्सचा अन्न व्यवसाय परवाना रद्द करण्यात आला. - नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.0
0
Report
Advertisement
