icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

ग्रामस्थों ने रात में कार शेड के माटी भराव का विरोध कर काम रोक दिया

Chendhare, Maharashtra:कर्जत तालुक्यात रात्रीस खेळ चाले ...... कारशेड साठी रात्रीच्या वेळी माती भराव ...... तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली ........ संतप्त ग्रामस्थानी काम बंद पाडले. भिवपुरी रोड ते कर्जत स्थानक दरम्यान कार शेड साठी रात्रीच्या वेळी सुरू असलेले मातीच्या भरावाचे काम ग्रामस्थानी बंद पाडले. बेंड से आणि वावे ही गावे उल्हास नदीच्या तीरावर असून भरावामुळे या गावात पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होण्याची भीती आहे. ग्रामस्थांच्या विनंती नंतर कर्जत तहसीलदारांनी हे काम बंद ठेवण्याचे आदेश दिले. परंतु ठेकेदाराने रात्रीच्या वेळी पुन्हा काम सुरू केले. या कामाला ग्रामस्थानी विरोध करत हे काम बंद पाडले.
0
0
Report

कम वर्षा में अमोल भुसारे ने 13 एकड़ में 6000 आम से 22 लाख आय

Washim, Maharashtra:वाशीम: रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशीम अँकर:पश्चिम विदर्भातील वाशीम जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त परिस्थितीतही मंगरूळपीर तालुक्यातील बोरव्हा येथील प्रगतशील शेतकरी अमोल भुसारे यांनी आदर्श उभा केला आहे.‘भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजने’चा लाभ घेत त्यांनी डोंगरमाथ्याच्या १३ एकरावर केशर,दशरी,तोतापुरी व बारमाही आंब्यांची६ हजार झाडे लावली आहेत.कमी उंचीच्या झाडांनाही चांगली फळधारणा होत असून प्रति झाड १०–१५ किलो उत्पादन मिळते. आंब्यासोबत पपई, फणस,जांभूळ, लिची, पेरू तसेच हळद आंतरपीक घेऊन त्यांनी उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण केले.पाइपलाईनद्वारे पाणीपुरवठा, शेततळे व ठिबक सिंचनाच्या मदतीने पाण्याचे योग्य व्यवस्थापन करत त्यांनी सुमारे २२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. कमी पावसाच्या भागातही नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि मेहनतीच्या जोरावर शेतीत यश मिळवता येते, हे त्यांनी सिद्ध केले आहे.
0
0
Report
Advertisement

112 करोड़ के महाआन्नपूर्णा प्रकल्प कोकण कृषि विश्वविद्यालय दापोली के लिए मंजूर

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकण कृषी विद्यापीठाला 112 कोटींचा महाअन्नपूर्णा प्रकल्प मंजूर.. दापोली कृषी विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा.. अँकर डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था यांच्यातील सामंजस्य करारातून प्रकल्प 1.0 मंजूर झाला आहे.. केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून राबविण्यात येणाऱ्या या ऐतिहासिक प्रकल्पासाठी 112 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यामुळे दापोली कृषी कोकण विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे..
0
0
Report

Imtiaz Jalil पर आरोप: मराठी शिक्षा को लेकर राजनेताओं में घमासान

Navi Mumbai, Maharashtra:*इम्तियाज जलील byte पॉईंटर* *On ऑटोरीक्षा मराठी सक्ती* आम्ही याच समर्थन करतो कि महाराष्ट्र मध्ये राहणाऱ्या लोकांनी मराठी शिकायला पाहिजे. पण हे करताना जे दमदाटी गुंडागर्दी सुरु आहे. तुम्ही ऑटो वाल्याला सांगणार मराठी शिक नाहीतर ठोकिन काढू हा कोणता नियम. या लोकांना कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणी दिला. गोरगरिबांना थोडा वेळ द्या. मी एमआयएम चा आमदार असताना विधानसभेत CBSE ICSE बोर्ड मध्ये मराठी अनिवार्य करण्याची मागणी केली होती. कोणी हातात कायदा घेऊ नका हीच विनंती. *On धिरेंद्रशास्त्री 4 मुलं जन्माला घाला आणि 1 आरएसएस ला द्या* तुमच्यात दम असेल तर तुम्ही 4 नाहीतर 40 मुलं जन्माला घाला तुम्ही दुसऱ्याला कशाला अक्कल शिकवताय. धिरेंद्र शास्त्री ने देवेंद्र फडणवीस समोर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय म्हंटल जर व्यासपीठावर बसलेले खरे शिवभक्त असते ना तर त्यांनी धिरेंद्र शास्त्री ला खाली खेचून जाब विचारला असता. पैसा कामावण्याचा धमदा केलंय या लोकांनी बाबा बन जावं नंतर खरात सारखे प्रकरण बाहेर येतात ते याच बाबांमुळे. *On अशोक खरात अँड TCS* लोक एवढी हुशार त्यांना कळत नव्हतं बाबा काय करत होता, तेथील पोलिस सरकारला माहित नव्हतं का. हे प्रकरण दाबण्यासाठी TCS च बोगस प्रकरण तयार करण्यात आला. अशोक खरात चबदाखवायचं नाही आम्ही नवीन केस देतो तुम्ही हेच चालवायचं TCS मध्ये काय घडलं. बोगस केस ट Totली बोगस केस. इतके शिकलेले महिला दिसत होते ते जर यजगी कोणी मुस्लिम बाबा असतं तर चारही बाजूंने बुलडोजर आणले असते घर पाडा घर फार्महाऊस पाडण्यासाठी. बाईट- इम्तियाज जलील-
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी पुलिस ने अवैध गुटखा के खिलाफ बड़ी कार्रवाई; 6.77 लाख रुपए का माल जप्त

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी रत्नागिरीत पोलिसांची धडक कारवाई.. साडेसहा लाखांचा गुटखा जप्त!.. रत्नागिरी शहरात पोलिसांनी प्रतिबंधित गुटख्यावर मोठी कारवाई केली आहे... कोल्हापूरहून विक्रीसाठी आणलेला ३ लाख २७ हजारांचा गुटखा आणि ३.५ लाखांची इको कार,असा एकूण ६ लाख ७७ हजार ९०४ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे... गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी पहाटे सापळा रचून आरोपी शरद गणपती भंडारे याला अटक केली... पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून,पोलीस पुढील तपास करत आहेत..
0
0
Report

मनसे ने मानसरोवर रेलवे स्टेशन के बाहर नशा विक्रेता महिला को गिरफ्तार किया

Navi Mumbai, Maharashtra:मनसेने अमली पदार्थ विकणाऱ्या महिलेला शिकवला धडा. पनवेल मनसेच्या टीमने मानसरोवर रेल्वे स्टेशनाच्या बाहेर अंमली पदार्थ विकणा-या महिलेला सापळा लावून पकडल. महिलेला कामोठे पोलीसांच्या दिले ताब्यात. कामोठे पोलीसांनी NDPS च्या फॉरेंसिक टीमला बोलावून त्यांच्या उपस्थितीत गुन्हा केला दाखल. सदर महिला मानसरोवर रेल्वे स्थानक परिसरात अमली पदार्थाची विक्री करत होती. पोलीसांनी केलेल्या शोध मोहिमेत मुद्देमालहि हस्तगत करण्यात आल्याची प्राथमिक माहिती. मनसे महिला सेने तर्फे अमली पदार्थ विक्री करणाऱ्या महिलेला चोप देत घडवली अद्दल.
0
0
Report

धाराशिव में Archana Patil Chakurkar को विधानपरिषद भेजने की मांग बैनर से तेज

Dharashiv, Maharashtra:धाराशिव जिल्ह्यात विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. उमरगा येथे दिवंगत माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुन तथा भाजप नेत्या अर्चना पाटील चाकूरकर यांना विधानपरिषदेत संधी द्यावी, अशी मागणी बॅनरच्या माध्यमातून करण्यात आली आहे. माजी मंत्री आणि भाजप नेत बसवराज पाटील यांच्या स्पीच ग्राउंडवर लागलेल्या या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. समस्त लिंगायत समाजाच्या वतीने अर्चना पाटील यांना संधी देण्याची मागणी करण्यात आली असून, त्यांना विधानपरिषदेत पाठवणे हीच शिवराज पाटील चाकूरकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असा सूर व्यक्त केला जातोय. दरम्यान, बसवराज पाटील हे स्वतःही विधानपरिषदेचे इच्छुक असल्याने उमरगा-धाराशिव भागात राजकीय समीकरणं चांगलीच तापली आहेत. आता पक्षाचा अंतिम निर्णय काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report
Advertisement

गर्मी के बीच सब्ज़ियों के दाम गिरे, किसान चिंतित

Ahilyanagar, Maharashtra:राज्यात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढले आहे मात्र भाजीपाल्याचे दर खाली आहेत खाली आले आहेत घाऊक बाजारामध्ये सर्वात भाज्यांचे दर अर्ध्यापेक्षा खाली आले आहे वांगी, गवार शेवगा मिरची यासारख्या भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत महिन्याभरापूर्वी घाऊक बाजारात 150 रुपये किलो विकली जाणारे गवार आता शेतकऱ्यांना 20 रुपये किलो विकावी लागत आहे हीच परिस्थिती वांगे शेवगा मिरची टोमॅटो बटाटा या रोज लागणाऱ्या भाज्यांबाबत देखील आहे. गेल्या महिन्यात खाली गेलेले टरबुजाचे भाव मात्र काही प्रमाणात वर आलेले पाहायला मिळत आहेत. उन्हाळ्यामध्ये पाण्याची पातळी खाली जाते शेतकरी आपल्याकडे असलेल्या उपलब्ध पाण्याच नियोजन करून भाजीपाल्याची पिकं घेतात मात्र भाव खाली आल्याने शेतकऱ्यांना गुंतवलेले पैसे देखील वसूल होत नाहीत असं चित्र आहे
0
0
Report

वाशीम में कृषि केंद्र चालक आज से अनिश्चितकालीन बंद, खरीफ सीजन तक संकट

Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यात कृषी केंद्र चालकांचा आक्रोश तीव्र झाला असून आजपासून बेमुदत बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत हा निर्णय घेण्यात आला आहे. खत कंपन्यांकडून लादली जाणारी लिंकिंगची सक्ती,निकृष्ट दर्जाच्या उत्पादनांची जबाबदारी किरकोळ विक्रेत्यांवर टाकणे तसेच प्रशासनाकडून होणाऱ्या कारवाईच्या विरोधात कृषी केंद्र चालक आक्रमक झाले आहेत.या बंदमुळे जिल्ह्यातील अनेक कृषी केंद्रे बंद राहणार असून खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना बियाणे,खते आणि कीटकनाशकांच्या उपलब्धतेत अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
0
0
Report

महिला चोरी: महालुंगे एमआयडीसी से 24 घंटे में गिरफ्तार

Khed, Maharashtra:पुण्याच्या महाळुंगे एमआयडीसी परिसरातून पोलिसांनी एका सराईत महिला घरफोड्याला अवघ्या २४ तासांत बेड्या ठोकल्याात, धक्कादायक म्हणजे, ही महिला फिर्यादीची ओळखीचीच निघाली असून तिने बनावट चावीचा वापर करून चोरी केली होती. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरट्याने घरातील कपाटातून तब्बल १० तोळे सोन्याचे दागिने लंपास केले होते, ज्याची किंमत साधारण १३ लाख ८७ हजार रुपये इतकी होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे एका महिलेचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तळेगाव दाभाडे परिसरातून ३८ वर्षीय सारिका भुजबळ या महिलेला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत केलाय.
0
0
Report
Advertisement

छत्रपती संभाजीनगर में गर्मी का कहर, अप्रैल के अंत में रिकॉर्ड तापमान 43.4°C

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा वाढला असून एप्रिलच्या शेवटच्या रविवारी तापमानाने तीन वर्षांचा विक्रम मोडला आहे. एप्रिल महिन्यातील शेवटचा रविवार ‘हॉट संडे’ ठरला. २६ एप्रिल रोजी शहरात कमाल तापमान तब्बल ४३.४ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले, जे मागील तीन वर्षांतील सर्वाधिक आहे. तर किमान तापमान २७.६ अंश सेल्सिअसवर कायम राहिले. शहर आणि परिसरात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवू लागला आहे. वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडलेले दिसून आले, तर नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले. हवामान खात्याने २९ एप्रिल ते १२ मे या कालावधीत तापमान आणखी वाढण्याचा इशारा दिला आहे. सकाळपासूनच तापमानाचा पारा झपाट्याने वाढणार असून दुपारनंतर कडक उन्हाचा तडाखा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
0
0
Report

नाशिक में वृक्षतोड़ विरोधी याचिका पर हरित लवाद में कल सुनवाई, नई गाइडलाइन पर नजर

Nashik, Maharashtra:शहरातील वृक्षतोडीच्या विरोधातील याचिकेवर उद्या हरित लवादात सुनावणी अँकर नाशिक शहरातील विविध विकासकामे आणि रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली होत असलेल्या बेसुमार वृक्षतोडीविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या राष्ट्रीय हरित लवादात सुनावणी होणार आहे. या सुनावणीत लवाद काय निकाल देणार, याकडे पर्यावरणप्रेमी व जागरूक नागरिकांसह मनपा व संबंधित प्रशासनाचे लक्ष लागलंय...काही महिन्यांपासून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध रस्त्यांचे रुंदीकरण, तसेच पायाभूत सुविधां सुरू आहे. मात्र, या विकासकामांचा फटका जुन्या वृक्षांना बसत आहे. या संदर्भात प्रशासनाकडे वारंवार दाद मागूनही ठोस कारवाई न झाल्याने, अखेर पर्यावरणवाद्यांनी राष्ट्रीय हरित लवादाचे दरवाजे ठोठावले आहेत. या याचिकेवर उद्या लवाद वृक्षतोडीवरील स्थगितीसह प्रशासनाला नवीन मार्गदर्शक तत्त्वे आखून देणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे...
0
0
Report

शिवाजी महाराज के बारे में शास्त्री के बयान पर शिवभक्तों में आक्रोश

Bhandara, Maharashtra:धीरेंद्र शास्त्रींच्या वक्तव्यावरून शिवप्रेमी संतप्त... छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर निषेध. कथावाचक धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अत्यंत संतापजनक असे वक्तव्य केले. त्या वक्तव्याच्या विरोधात गोंदिया शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर आंदोलन करून धीरेंद्र शास्त्री याच्या छायाचित्राला जोडेमारून निषेध व्यक्त करण्यात आला. दरम्यान धीरेंद्र शास्त्री याच्यावर कठोरात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज हे एकट्या महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण भारतीयांचे प्रेरणास्थान आहेत. गुलामीच्या बेड्या फेकून सर्वसामान्यांना हाताशी धरत रयतेचे राज्य निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात जाती, पातीला स्थान नव्हते. तर अगदी तळागाळातील व्यक्तींचा देखील त्यांनी आदर राखला. त्यामुळे बागेश्वर बाबा यांच्यावर कारवाईची व्हावी अशी मागणी शिव प्रेमींनी केली आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top