icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

यवतमाल में जिलाधिकारी ने धाड़ डालकर अवैध रेत खनन रोककर 100-150 ब्रास रेत जप्त

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्याच्या बाभुळगाव तालुक्यातील तांबा आणि वाटखेड रेती घाटांवर थेट जिल्हाधिकारी विकास मीना यांनी धाड टाकून कारवाई केली. या ठिकाणी साठवून ठेवलेला 100 ते 150 ब्रास रेती जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे अवैध रेती व्यवसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली آهي. काही भागांमध्ये नदीपात्रातून नियमबाह्य पद्धतीने रेती उत्खनन करून ती साठवून ठेवण्यात येत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे सातत्याने येत होत्या. याची दखल घेत जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर आले, त्यांनी नायगाव जवळ रेती भरलेला एक ट्रक सुद्धा पकडला. महसूल विभाग तसेच पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी भेट देत रेतीचे साठे जप्त करून त्याची विल्हेवाट लावण्याचे आदेश देण्यात आले.
0
0
Report

लग्न के वादे पर युवती के साथ बार-बार बलात्कार: छुपे वीडियो से लाखों मांग

Nashik, Maharashtra:पीडितेवर अत्याचार करून दिले सिगारেটचे चटके... व्हिडीओचे कारण सांगून मागितले युवतीकडून पैसे..... अँकर लग्नाचे आमिष दाखवून महाविद्यालयीन युवतीवर वारंवार अत्याचार केल्यासह तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. युवतीने शारीरिक संबंधांना विरोध केल्यानंतर आरोपीने तिला मारहाण केली, सिगारेटचे चटके दिले, तसेच दारू पाजून बळजबरीने अत्याचार केल्याची तक्रार पीडितेने केली आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित युवकाने एका महिलेला हाताशी धरून पीडितेकडून लॉजमधील व्हिडीओचे कारण सांगून पैसे मागितल्याचा संशयदेखील व्यक्त करण्यात आला आहे.पीडित युवती आणि प्रथमेश प्रदीप शिंदे हे २०२४ मध्ये शिक्षण घेत असताना एकमेकांच्या संपर्कात आले. मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाल्यानंतर प्रथमेशने लग्नाचे आश्वासन देत युवतीला मुक्तिधाम परिसरातील एका लॉजवर नेले आणि तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याचा आरोप आहे. लॉजमधील छुप्या कॅमेऱ्यात दोघांचे चित्रीकरण झाल्याचा दावा करत आयेशा खान नावाच्या महिलेने लाखो रुपयांची मागणी केल्याचे आरोपीने युवतीला सांगितले. हे प्रकरण मिटविण्यासाठी मोठी रक्कम खर्च झाल्याचे सांगत आरोपीने पीडितेला इतर युवकांना जाळ्यात ओढून पैसे मिळवून देण्यास भाग पाडण्याचाही आरोप आहे. मला आयेशा खान नावाच्या महिलेचा फोन आला होता. तिने सांगितले की, तुम्ही ज्या लॉजवर गेले होते, तेथील खोलीत लावेलल्या छुप्या कॅमेऱ्यात तुमचे व्हिडीओ शूटिंग झाले आहे. ते व्हिडीओ प्रसारित न करण्यासाठी आयेशाने वीस लाखांची मागणी केल्याचे प्रथमेशने पीडितेला सांगून तिच्याकडून पैसे मागितले...
0
0
Report
Advertisement

नोट कटौती से शहर के एटीएम में नकद कमी, ग्राहकों को भारी परेशानी

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:डिजिटलचा काळ असला तरी रोख पैशांची गरज अजूनही संपलेली नाही. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून रिझर्व्ह बँकेकडून २०० आणि ५०० रुपयांच्या नोटांचा पुरवठा कमी झाल्याने छत्रपती संभाजी नगर शहरात बँकांसमोर एटीएम मध्ये पैसे ठेवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. जिल्ह्यात एसबीआयचे जवळपास २००एटीएम आहेत. रोज सुमारे १० कोटी रुपयांची गरज असताना तिथं फक्त एक ते दीड कोटी रुपये भरले जातात. परिणामी अनेक एटीएममध्ये रोख रकमेची कमतरता जाणवत आहे. बँक अधिकारी्यांच्या माहितीनुसार, नोटांचा पुरवठा घटल्यामुळे एटीएम सुरू ठेवण्यासाठी दैनंदिन जमा होणाऱ्या नोटांचा वापर केला जात आहे. त्यामुळे ग्राहकांना एटीएममधून नव्या कोऱ्या नोटांऐवजी जुन्या व खराब झालेल्या नोटा मिळत आहेत. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांनुसार एटीएम सेवा अखंड ठेवणे बंधनकारक असल्याने बँका उपलब्ध रोख रकमेचे व्यवस्थापन करण्यासाठी धडपड करत आहेत
0
0
Report

कोयना डैम: पाणीसाठा खतरे सीमा तक, जून में बारिश नहीं हुई तो पर्यटन प्रभावित

Satara, Maharashtra:महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणातील पाणीसाठा धोक्याच्या पातळीवर पोहोचला आहे. 105 टीएमसी क्षमता असलेल्या धरणात सध्या केवळ 15.20 टीएमसी पाणी शिल्लक आहे. त्यात देखील फक्त 10.08 टीएमसी एवढाच पाणीसाठा वापरण्याजोगा आहे. कोयना धरणाच्या सध्याच्या भीषण स्थितीचं एक्सक્લुझिव्ह ड्रोन शूट.. पावसाने जूनच्या पहिल्या आठवड्यात हजेरी न लावल्याने धरण परिसरातील डोंगर उघडे पडले असून, बॅकवॉटर मोठ्या प्रमाणात मागे सरकलं आहे. याचा फटका पर्यटन, बोट व्यवसाय आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बसत आहे.
0
0
Report
Advertisement

वाशिम में यातायात सुरक्षा और पर्यावरण के लिए भव्य साइकल रैली का आयोजन

Washim, Maharashtra:वाशिम जिल्हा पोलीस दल और सायकल असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज वाशिम येथे भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. पोलीस कवायत मैदान येथून या रॅलीला प्रारंभ झाला. रॅलीला जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. यावेळी जिल्हाभरातील मोठ्या संख्येने सायकलस्वार सहभागी झाले होते. सायकलिंग बाबत जनजागृती करणे, आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणे तसेच पर्यावरण संवर्धनाला चालना देणे हा या रॅलीचा मुख्य उद्देश होता. रॅলিाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
0
0
Report

नाशिक के भोंदू ज्‍योतिषी सचिन देशमुख पर 36 करोड़ का घोटाला, फरार

Nashik, Maharashtra:अँकर भविष्य सांगणारा स्वतःच्याच भविष्याची अशी काही कुंडली मांडेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. हनुमान भक्त असल्याचा आव आणून, लोकांच्या भविष्याचा ताळेबंद मांडणारा एक भोंदू ज्योतिषी आता कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून फरार झालाय. नाशिकमधील ज्योतिषी सचिन देशमुख नावाच्या या महाठगानं तब्बल ३२१ गुंतवणूकदारांना ३६ कोटी रुपयांना कसा गंडा घातला? पाहूया आमचा हा विशेष रिपोर्ट. नाशिकच्या पंडित कॉलनी रोडवर या महाशयानं अंजनिय ज्योतिष नावाचं एक आलिशान कार्यालय थाटलं होतं. स्वतःला हनुमान भक्त म्हणवून घेणारा हा देशमुख लोकांचं भविष्य सांगायचा. पण या ज्योतिषगिरीच्या आड त्याचा खरा गेम प्लॅन वेगळाच होता. भविष्य पाहायला आलेल्या भोळ्याभाबड्या भक्तांना तो गोड बोलून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला भाग पाडायचा. सचिन देशमुख लोकांना ऑनलाईन झूम बैठका आयोजित करत असे. ज्योतिषाच्या नावाखाली शेकडो लोकांना शेअर मार्केटच्या जाळ्यात ओढणाऱ्या सचिन देशमुखची कुंडली आता सायबर पोलिसांनी हातात घेतली आहे. या गुन्ह्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली असून, पोलिसांनी आवाहन केलंय की ज्यांची ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी पुढे यावं. आता पोलीस या आंतरराष्ट्रीय स्तरावर फरार झालेल्या भोंदू ज्योतिषाला दुबईतून कधी खेचून आणतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
0
0
Report

नाशिक: मतीन पटेल का जवाब सामने, SIT पूछताछ की संभावना

Nashik, Maharashtra:एमआयएम नगरसेवक मतीन पटेलचा जवाब आता समोर इम्तियाज जलील साहब को पूछना पडेगा' असे उत्तर मतीन पटेलने पोलिसांना दिल्याचे आता समोर.... अँकर नाशिक टीसीएस प्रकरणांमध्ये निदा खान फरार असताना तिला अश्रय दिल्याप्रकरणी एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याची आत्तापर्यंत तीन वेळा एसटी कडून चौकशी करण्यात आली असून जेव्हा मतीन पटेलला विचारणा करण्यात आली की निदा खान कुठे आहे तेव्हा त्याने इम्तियाज जलील साहब को पूछना पडेगा' असे उत्तर दिले चार शीट मधला हा जवाब आता समोर आला असून याप्रकरणी सर्व आरोपीं विरुद्ध नाशिक सत्र न्यायालयामध्ये चारशीट दाखल करण्यात आले असून एमआयएम चे माजी खासदार इम्तियाज जलील यांना देखील एसआयटी कडून चौकशीसाठी बोलवल्या जाण्याची शक्यता आहे
0
0
Report
Advertisement

पैठण में आंधी-बारिश से किसानों के फसलों को भारी नुकसान

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात दादेगाव बुद्रुक येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकरी दीपक हजारे यांची ११०० केळीच्या झाडांची बाग काही मिनिटांत जमीनदोस्त झाली. रोपे, ठिबक, खत, औषधे व मजुरीसाठी त्यांनी ७५ ते ८० हजार रुपये खर्च केले होते. शेतीतून उत्पन्न मिळून कुटुंबाला आधार मिळेल, अशी अपेक्षा असताना अवकाळी पावसाने सर्व मेहनतीवर पाणी फेरले. बाग उद्ध्वस्त झाल्याने घेतलेले कर्ज फेडायचे कसे, हा मोठा प्रश्न त्यांनी समोर उभा राहिला आहे. परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या केळी, मका, भाजीपाला व फळबागांचेही नुकसान झाले असून तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
0
0
Report
Advertisement

देवलाई तांडा तालाब में पांच नाबालिग डूबे, तीन की मौत, दो बचे

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरालगतच्या देवळाई तांडा परिसरातील साई टेकडी तलावात शनिवारी सायंकाळी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. पोहण्यासाठी गेलेल्या पाच अल्पवयीन मुलांपैकी तीन मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला, तर दोन मुलांनी कसाबसा जीव वाचवला. मृत मुलांमध्ये विशाल घुले, आदर्श इंगोले आणि यश यांचा समावेश आहे. हे तिन्ही मित्र सातारा परिसरातील लक्ष्मी कॉलनी येथील रहिवासी होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागा दाखल झाले, जवानांनी तलावात शोधमोहीम राबवत तिन्ही मुलांना बाहेर काढले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे देवळाई तांडा परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
0
0
Report

चिपळूण में सरकारी वाळू चेकिंग केबिन में भीषण आग, सारा सामान राख

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये रात्रीच्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडली आहे. मिरजोळी बायपासवरील सरकारी वाळू तपासणी केबिनला अचानक भीषण आग लागली. या आगीमुळे केबिनमधील संगणक, टेबल आणि महत्त्वाचे साहित्य जळून पूर्णपणे खाक झाले आहे. आगीमुळे निरगुडी बायपास परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले होते, ज्यामुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एका स्थानिक दुकानदाराने प्रसंगावधान राखत आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत केबिनचे मोठे नुकसान झाले होते. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपास सुरू आहे.
0
0
Report

रत्नागिरी: लांजा की काजू फैैक्ट्री चोरी के मामले में 2 आरोपी गिरफ्तार, 9 लाख से ज्यादा माल जब्त

Ratnagiri, Maharashtra:लांजा के काजू फैक्टरी में चोरी का छडा लगा: स्थानीय गुन्हे अन्वेषण शाखे ने २ आरोपीं को अटक किया, ९ लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल हस्तगत. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील 'झिमण्स कश्यु पॉइंट कोत्रेवाडी' काजू फॅक्टरीमध्ये झालेली चोरी उघडकीस आली. कोणतीही ठोस सुगावा नसताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गोपनीय माहितीत आधारित चोरीचा छडा लावला. भाटये येथील शाहरुख मुराद साखरकर आणि शहरातील वजीद मोहम्मद अझीझ खान या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून चोरीला गेलेला काजू गर आणि गुन्ह्यात वापरलेली एक चारचाकी गाडी, असं एकूण ९,४१,८७९ रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली, पुढील तपास लांजा पोलीस करत आहेत.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top