445001
यवतमाळच्या आर्णीत भाजपाची पहिली यादी, आमदाराचा नामांचा गहजब!
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या आर्णी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत विद्यमान आमदाराचे नाव नाही. यामुळे महायुतीतील शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केला आहे. तिन्ही तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन उपजिल्हाप्रमुख विष्णू उकंडे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. पालकमंत्री संजय राठोड यांचेही या जागेसाठी आग्रह आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, जागा सुटली नाही तरी शिवसेना उमेदवार निवडणूक लढवेल.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
कल्याण पुलिस ने 107 किलोग्राम गांजा पकड़कर तीन तस्करों को गिरफ्तार किया
Kalyan, Maharashtra:कल्याण अंमली विरोधी पथकाने १०७ किलो गांजा पकडला, तीन तस्करांना अटक. कल्याणच्या खडकपाडा भागात अमली पदार्थांची विक्री होणार असल्याची माहिती अमली विरोधी पथकाला मिळाली, त्यानुसार सापळा रचून वसीम खान, दिनेश कुमार आणि मोहित वर्मा यांना अटक केली, शिवाय त्यांच्या कडून १०७ किलो अमली पदार्थ गांजा हस्तगत केला. दरम्यान हे तिघेही अमली पदार्थाच्या खरेदी विक्रीतील सराईत गुन्हेगार असून यापूर्वी देखील मुंबई आणि उपनगरांमध्ये त्यांच्यावर अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. शिवाय ते हा गांजा कोणाला विक्री करण्यासाठी आले होते, या टोळीमध्ये कोणती मोठी टोळी सक्रिय आहे ka याचा तपास पोलीस करत आहेत0
0
Report
नागपुर महापालिका ने 12वीं में टॉप करने वालों को नकद पुरस्कार और सोने के सिक्के दिए
Nagpur, Maharashtra: नागपूर महानगरपालिका कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता 12 वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा महापौर निता ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आज सत्कार करण्यात आलेल्या 11 गुणवंत विद्यार्थ्यांपैकी 10 विद्यार्थिनी आहेत., शाळांत परीक्षेत उत्तीर्ण होत प्राविण्य मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थांना प्रोत्साहन मिळावे, याकरिता मनपाद्वारे त्यांना अनुक्रमे 25 हजार,15 हजार व 10 हजार रुपयांचे रोख पारितोषिक व प्रथम येणाऱ्या विद्यार्थांना सोन्याचे नाणे देण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरच एका कार्यक्रमाचे आयोजन करून त्या कार्यक्रमात प्रविण्याप्राप्त विद्यार्थांना महापौर यांच्याहस्ते पारितोषिक वितरण केल्या जाणार आहे.0
0
Report
अकोला अस्पताल के पास खंडहर बंगला में भीषण आग, दमकल ने काबू पाया
Akola, Maharashtra:अकोला शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालयासमोर असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अखत्यारितील मेडिकल सुपरिटेंडन यांच्या जुना व खंडर अवस्थेतील बंगला परिसरात आज भीषण आग लागल्याची घटना घडली.सदर बंगला अनेक वर्षांपासून पडझड अवस्थेत असून परिसरात मोठ्या प्रमाणात झाडाझुडपांसह कचरा साचलेला होता. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर या झाडांना अचानक आग लागली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.घटनास्थळ उपस्थित नागरिकांनी सुरुवातीला स्वतः आग विझवण्याचे प्रयत्न केले. मात्र आगीची तीव्रता वाढत असल्याने तात्काळ अग्निशामक विभागाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानि झाली नाही. मात्र काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.0
0
Report
Advertisement
सांगली में पलाश मुच्छल के खिलाफ धोखाधड़ी और जातिगत अत्याचार के आरोप
Sangli, Maharashtra:सांगली में संगीतकार पलाश मुच्छल के विरुद्ध फसवणूक और अट्रोसिटी के अपराध दाखल किया गया है. शहर पुलिस थाने में पलाश मुच्छल के विरुद्ध फसवणूक और अट्रोसिटी के अपराध दाखल हुए. स्मृति मानधन के बाल मित्र विज्ञान माने ने अनुसूचित जाति-जमाती कानून के अधीन भी शिकायत दर्ज कराई थी. शिकायत के अनुसार 'नजरिया' फिल्म के लिए निवेश का वादा कर लाखों रुपये लिए गए लेकिन वापस नहीं किए गए. इसके आधार पर फसवणूक और अट्रोसिटी के अलावा अनुसूचित जाति-जमाती अत्याचार रोकथाम कानून के तहत भी शिकायत दर्ज की गई.0
0
Report
बीड़ में नकली शादी गिरोह: एक लड़की के बदले कई युवकों ने धोखा खाया
Beed, Maharashtra:बीड जिल्ह्यात बोगस लग्न लावून देणारी टोळी समोर आली आहे. या पूर्वीही ग्रामीण भागातील अनेक तरुणांची फसवणूक या बोगस लग्न लावणाऱ्या टोळीने केली आहे. मात्र असाच प्रकार बीडच्या उमापूर गावातून समोर आला असून नवरी एक अन् नवरदेव अनेक असे म्हणण्याची वेळ आली है. उमापूर येथील एका युवकाची बोगस लग्न लावणाऱ्या टोळीने लाखो रुपयांची फसवणूक केली. एकाच मुलीचे अगोदर आठ मुलांसोबत लग्न लावण्यात आले. मात्र पैशासाठी पुन्हा उमापूर येथील नवव्या नवरदेवा सोबत एजंटकडुन लग्न लावून देण्यात आले. या दरम्यान लाखो रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी बीडच्या चकलांबा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पीडित नवरदेवाने पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत न्याय मागितला आहे.0
0
Report
ल Lasalagav के सोهان नगर में गैस टैंक विस्फोट; पांच बच्चे बचे, आग पर काबू
Lasalgaon, Maharashtra:लासलगाव येथील सोहन नगर परिसरात गैस टाकीचा भीषण स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली पत्र्याचे घर असल्याने प्रचंड उकाड्यामुळे घरातील सदस्य घराबाहेर झाडाखाली बसले होते त्यामुळे पाच जण थोडक्यात बचावले असून मोठी जीवितहानी टळली आहे स्फोट इतका जोरदार होता की घरातील संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच स्फोटानंतर लागलेल्या आगीमुळे परिसरातील काही झाडेही जळून खाक झाली घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले दरम्यान, सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या टँकराच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते0
0
Report
Advertisement
गडचिरोली के अटापल्ली में इलाज देर से मिलने से महिला की मौत
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात एक अत्यंत धक्कादायक घटना पुढे आली आहे. एटापल्ली तालुक्यातील कांदोळी गावच्या एका महिलेचा वेळेत उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झालाय. या घटनेमुळे आरोग्य सुविधा, रुग्णवाहिका उपलब्धता आणि रस्त्यांच्या दुरवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कांदोळी गावातील एका महिलेने घरगुती कारणावरून विष प्राशन केले. तिला दुचाकीवरून गंभीर अवस्थेत जवळच्या बुर्गी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. या भागातील सामाजिक कार्यकर्ते प्रतीक मुधोळकर यांनी परिस्थितीची जाणीव होताच पुढाकार घेत वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली. बुर्गी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरू केले. मात्र रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात हलविणे आवश्यक होते. मात्र रुग्णवाहिकेचा चालक अनुपस्थित होता. वेळ न दवडता मुधोळकर यांनी स्वतः रुग्णवाहिका चालवत महिलेला एटापल्ली येथे पोहोचवले. मात्र खराब व खड्डेमय रस्त्यामुळे प्रवासात विलंब झाला, ज्याचा थेट परिणाम उपचारांवर झाला. एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र उपचारादरम्यान महिलेची ऑक्सिजन पातळी सतत घसरत गेल्याने अखेर तिचा मृत्यू झाला. दुर्गम भागातील रस्त्यांची स्थिती, रुग्णवाहिकेचा अभाव, जीवरक्षक प्रणालीची गरज याबाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.0
0
Report
विट्ठलवाड़ी स्टेशन पर युवक ने लोकल ट्रेन के टप पर चढ़कर ट्रेन रोक दी
Ambernath, Maharashtra:लोकल ट्रेनच्या टपावर एक तरुण चढला. विठ्ठलवाडी स्थानकात लोकल ट्रेनचा खोळंबा. विठ्ठलवाड़ी रेल्वे स्थानकात ही लोकल आल्यानंतर प्रवाशांना एक तरुण लोकलच्या टपावर चढल्याचं दिसलं. त्यांनी रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर रेल्वे पोलिसांनी या तरुणाला खाली उतरण्याचा प्रयत्न केला. यासाठी दोन ते तीन हमालही लोकलवर चढवण्यात आले. अखेर मोठ्या शर्थीच्या प्रयत्नांनी हा तरुण खाली उतरला. या सगळ्यामुळे लोकल ट्रेनचा खोळंबा झाल्यानं प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला.0
0
Report
शिर्डी जमीन घोटाले के मुख्य आरोपी अशोक खरात को कोर्ट ने 5 दिन की पुलिस कोठडी दी
Shirdi, Maharashtra:शिर्डीत गाजत असलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी भोंदू अशोक खरात याला शिर्डी पुलिस न्यायालयात हजर केलं. न्यायालयात हजर केल्यानंतर तपासी अधिकारी, सरकारी वकील आणि आरोपींच्या वकिलाचा जोरदार युक्तिवाद झाला. या एक ते दिड तासांच्या युक्तिवादानंतर अशोक खरातला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. नेमकं राहता कोर्टात काय घडलं, पाहूया हा रिपोर्ट. न्यायाधीशांसमोर भोंदू अशोक खरातला हजर करण्यात आलं. कोर्टात उभा असताना खरात खाली मान घालून स्तब्ध उभा होता. न्यायाधीशांनी विचारलं काही सांगायचं आहे का, यावर खरातने नकारार्थी मान हलवली. शिर्डी पोलिसांनी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबत युक्तिवाद मांडायला सुरुवात केली. तपासी अधिकारी PSI निवांत जाधव यांनी गुन्ह्याची गंभीरता अधोरेखित केली. जमीन खरेदीसाठी आलेली कोट्यवधींची रक्कम, व्याजाचे व्यवहार आणि इतर सहभागी आरोपी यांचा तपास करणं आवश्यक असल्याचं सांगितलं. या प्रकरणात एकूण 14 व्यवहार झाले असून तब्बल 5 कोटी 52 लाखांची उलाढाल झाल्याचा दावा पोलिसांनी युक्तिवादात केला. दरम्यान, आरोपीची पत्नी कल्पना खरात फरार असून तिचा शोध घेण्यासाठी अशोक खरातची चौकशी केल्यास आणखी माहिती मिळेल अस पोलिसांनी म्हटलं. त्याचबरोबर सरकारी वकील अॅड. गौरव बोर्डे यांनीही आरोपींच्या आर्थिक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. विविध पतसंस्थांमधील खाती, मोठ्या रकमेचे व्यवहार आणि फसवणुकीचा उद्देश स्पष्ट होत असल्याचं त्यांनी नमूद केलं. मात्र, बचाव पक्षाने म्हणजेच आरोपीच्या वकिलाने सर्व आरोप फेटाळले. जमीन व्यवहाराची संपूर्ण रक्कम फिर्यादीला देण्यात आल्याचा दावा करण्यात आला. तसेच, फिर्यादीने का उशिरा गुन्हा दाखल केला असा प्रश्नही उपस्थित केला. सावकारीचे कलम लावण्यावरही बचाव पक्षाने आक्षेप घेतला. कल्पना खरात फरार असल्याचा पोलिसांचा दावा फेटाळत, आरोपी 18 मार्चपासून नाशिक पोलीस आणि SIT च्या ताब्यात असल्याचं आरोपीच्या वकिलाने कोर्टात सांगितलं. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर एक तासाने न्यायालयाने या सुनावणीवर निर्णय देत अशोक खरातला 9 मेपर्यंत म्हणजेच चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती सरकारी वकील अॅड. गौरव बोर्डे यांनी दिली. मात्र त्यांनीही या प्रकाराबाबत माध्यमांशी जास्त बोलणं टाळलं. न्यायालयाने गुन्ह्याचं भयावह गांभीर्य ओळखत भोंदू अशोक खरातला न्यायालयाने थेट पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आता या पाच दिवसांत शिर्डी पोलीस पैशांचा काळा प्रवाह, बनावट व्यवहारांची जाळी आणि फरार कल्पना खरातचा ठावठिकाणा उघड करण्यासाठी शिर्डी पोलिस दिवसरात्र एक करून कसून चौकशी करणार आहेत. या तपासातून मोठं रॅकेट उघडण्याची दाट शक्यता असून, खरातच्या अडचणी आता आणखी वाढणार हे निश्चित.0
0
Report
Advertisement
पश्चिम बंगाल में भाजपा की सत्ता: संघ की योजना और स्वयंसेवकों का बड़ा योगदान
Yavatmal, Maharashtra:पश्चिम बंगाल मध्ये भाजपाने इतिहास घडवीत सत्ता मिळविली असली तरी त्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सूक्ष्म नियोजनाचं आणि झटलेल्या स्वयंसेवकांचं मोठं योगदान आहे. पश्चिम बंगाल मध्ये भाजपचं काम नसताना 1969 च्या कालखंडात संघाने देशभरातून प्रचारक तेथे पाठविले, त्यावेळी यवतमाळचे बबनराव सारोळकर ह्यांनी देखील आठ ते दहा वर्ष पश्चिम बंगाल मध्ये प्रचारक म्हणून काम करीत संघ विस्तार केला. राष्ट्र प्रथम हा भाव ठेऊन निरपेक्ष सेवाकार्य केले. त्यामुळे आज भाजपच्या हाती सत्ता आल्याने तेथील असुरक्षिततेचा भाव दूर व्हावा व जनतेने मोकळा श्वास घ्यावा अशी अपेक्षा वयोजेष्ठ स्वयंसेवक बबनराव सारोळकर यांनी व्यक्त केली आहे, त्यांच्याशी बातचीत केली आमची प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी.0
0
Report
पुणे के लोणी काळभोर में भीषण धमाका, एक जन घायल, बड़ा हादसा टला
Shirur, Maharashtra:पुणे लोणी काळभोरमध्ये भीषण स्फोट,एक जखमी, मोठी दुर्घटना टळली, घटने घटनेचा सीसीटीव्ही समोर पुण्याच्या लोणी काळभोर येथील माळी मळा परिसरात भीषण स्फोटाची घटना घडली असून या दुर्घटनेत एक जण जखमी झाला असून या स्फोटाचा सीसीटीव्ही समोर आला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, डिझेल-पेट्रोल वाहतूक करणाऱ्या टँकरवर वेल्डिंगचे काम सुरू असताना अचानक स्फोट झाला.या घटनेत एक कामगार जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने स्फोटाची तीव्रता मर्यादित राहिल्याने मोठी दुर्घटना टळली।0
0
Report
12 घंटों में आरोपी गिरफ्तार: वृद्ध की सोने की अंगूठी चुराने वाला पकड़ाया
Akola, Maharashtra:अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत वृद्धाच्या हातातील सोन्याची अंगठी जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक केली आहे. या कारवाईत सुमारे १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. फिर्यादी हे कामानिमित्त बाहेर गेले असताना एका अनोळखी युवकाने मोटारसायकलवर येत त्यांना धमकावून त्यांच्या हातातील सुमारे ४ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी हिसकावून नेली होती. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीला अटक केली. आरोपीकडून चोरीस गेलेली अंगठी व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
Advertisement
श्री वरदविनायक मंदिर में भक्तों की भारी भीड़, आज अष्टविनायक में विशेष पूजा
Mahad, Maharashtra:महड येथील श्री वरदविनायक मंदिर येथे आज भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. अष्टविनायकांपैकी एक असलेल्या या मंदिरात आज विशेष पूजा-अर्चा करण्यात आली. आजच्या दिवशी मंदिरात तब्बल एक लाख मोगऱ्याच्या फुलांचे अर्पण करण्यात आले. तसेच आंब्याच्या फळांचेही श्रींना नैवेद्य अर्पण करण्यात आले. फुलांच्या सुगंधाने आणि भक्तीमय वातावरणाने परिसर भारावून गेला होता. अंगारका चतुर्थी निमित्ताने मंदिरात अन्नछत्र सुरू करण्यात आले असून, मोठ्या संख्येने भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दिवसभर दर्शनासाठी भाविकांची रांग लागलेली पाहायला मिळाली.0
0
Report
मस्साजोग ग्रामपंचायत ने आवादा कंपनी का NOC रद्द किया; स्थानीय रोजगार की शर्तें लागू
Beed, Maharashtra:बीड: आवादा कंपनीकडे खंडणी प्रकरणातून मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. आता त्या कंपनीवरून मस्साजोग येथील ग्रामपंचायतीने ठराव पारित केला आहे. ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या कंपनीमध्ये स्थानिक मजुरांना रोजगार मिळावे, कंपनीचा ठेकेदार हा स्थानिक रहावा असा ठरावच पारित करण्यात आलाय.. अटी शर्ती मान्य नसल्यास याआधी दिलेली NOC थेट रद्द करण्यात येईल असा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. केज तालुक्यातील मस्साजोग येथील आवादा कंपनीकडे खंडणी मागितल्या प्रकरणी दोन गट भिडले होते. याच वादातून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. घटनेला 18 महिने पूर्ण होत आहेत. घटनेनंतर तब्बल 18 महिन्यांनी सरपंच पदासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव झाला. स्वरूपानंद देशमुख ही विजयी झाले. काल सरपंच स्वरूपानंद देशमुख यांनी सरपंच पदाचा पदभार स्वीकारला. पदभारानंतर पहिलच ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत आवादा कंपनीमुळे गावाचे आर्थिक आणि सामाजिक नुकसान झाल्याची चर्चा झाल्यानंतर कंपनीची थेट NOC रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एवढेच नाही तर या कंपनीत स्थानिक मजुरांनाच काम मिळाले पाहिजे, कंपनीचा ठेकदार हा स्थानिक असला पाहिजे. असा ठराव एकमताने पारित करण्यात आला. स्थानिकांना रोजगार मिळेल यासाठी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांनी आवादा कंपनीला NOC दिली होती. मात्र त्यांची हत्या झाल्यानंतर कंपनीत दोन कामगार वगळता स्थानिकांना काम देण्यात आले नाही. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. पहिल्याच झालेल्या ग्रामसभेला सदस्यांसह ग्रामस्थानी मोठी हजेरी लावली होती. ठरावाप्रमाणे आवादा कंपनीने न्याय नाही दिल्यास कंपनीचे काम सुरू करू देणार नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ज्या कंपनीमुळे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली त्याच नवनिर्वाचित ग्रामपंचायतीने हा ठराव घेतल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर दोन समाजात मोठे तेढ निर्माण झाले. जिल्ह्याची सामाजिक स्थिती खालावली. त्यामुळे ग्रामस्थानी घेतलेला ठराव हा योग्य असल्याचे मत सामाजिक जाणकार व्यक्त करत आहे. या ठरावाची प्रशासनाने पुढाकार घेऊन तत्काळ अंमलबजावणी करावी जेणेकरून वाढलेली सामाजिक अस्वस्थता कमी होईल असे मत समोर येत आहे. एकंदरीत, मस्साजोग ग्रामपंचायतीने घेतला हा ठराव केवळ एका कंपनीविरोधातील भूमिका नसून स्थानिक हक्क, रोजगार आणि सामाजिक न्यायासाठीचा ठोस संदेश मानला जातोय. गावाच्या विकासात स्थानिकांचा सहभाग आणि सन्मान याला प्राधान्य देण्याची भूमिका ग्रामस्थांनी स्पष्ट केली आहे. आता या ठरावावर प्रशासन आणि संबंधित कंपनी काय भूमिका घेतात, तसेच गावातील तणाव कमी करून विकासाचा मार्ग कसा मोकळा केला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महेंद्रकुमार मुधोळकर, ZEE 24 तास बीड0
0
Report
लोकशाही दिन में प्रशासन ने लंबित अर्ज तुरंत निपटाने के निर्देश दिए
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. लोकशाही दिनात सीईओंचा इशारा! प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढा रत्नागिरीत पार पडलेल्या लोकशाही दिनात प्रलंबित अर्जांच्या प्रश्नावर प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी सर्व विभागांना स्पष्ट सूचना देत, प्रलंबित तसेच नव्याने दाखल होणारे अर्ज तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचा सहभाग होता, तर क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे जोडले गेले होते. मागील अर्जांचा आढावा घेत संबंधित विभागांना अहवाल सादर करण्यासही सांगण्यात आले आहे. नागरिकांच्या तक्रारींना वेळेत न्याय मिळावा, यासाठी प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे…0
0
Report
Advertisement
