445001
यवतमाळच्या आर्णीत भाजपाची पहिली यादी, आमदाराचा नामांचा गहजब!
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या आर्णी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत विद्यमान आमदाराचे नाव नाही. यामुळे महायुतीतील शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केला आहे. तिन्ही तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन उपजिल्हाप्रमुख विष्णू उकंडे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. पालकमंत्री संजय राठोड यांचेही या जागेसाठी आग्रह आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, जागा सुटली नाही तरी शिवसेना उमेदवार निवडणूक लढवेल.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
मुख्यमंत्री फडणवीस को राष्ट्रीय हथमाग दिन के समारोह के लिए आमंत्रण मिला
Yeola, Maharashtra:व्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त येवला येथे होणाऱ्या विशेष कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले आहे. भाजप विणकर प्रकोष्टचे प्रदेश संयोजक मनोज दिवटे यांनी मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मयूर मेघराज यांच्या माध्यमातून निमंत्रण पत्र सुपूर्द केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचा पारंपरिक पैठणी शाल परिधान करून सत्कार करण्यात आला. विणकर समाजासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या विविध कल्याणकारी योजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, ७ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त येवला येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचे कौतुक करत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या असून, उपस्थित राहण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती मयूर मेघराज यांनी दिली0
0
Report
श्रीरामपूर में बढ़ती अपराधों के विरोध में बड़ा मोर्चा, हत्या के आरोपी गिरफ्तार
Shirdi, Maharashtra:Anc - अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये वाढती गुन्हेगारी आणि हॉटेल व्यवसायिक अकाश दुबैय्या यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज महामोर्चाचे आयोजन करण्यात आलंय.. हत्येतील तीन आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.. मात्र मुख्य सूत्रधारांना देखील अटक करून मकोको कायद्यांतर्गत कारवाई करावी, या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून श्रीरामपूर शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे.. आज याच मागणीसाठी हजारोंच्या संख्येने नागरिक आणि शहरातील व्यावसायिक मोर्चात सहभागी होणार आहेत.. शहरात वाढलेली गुन्हेगारी आणि हॉटेल व्यावसायिक तरुणाच्या हत्येनंतर श्रीरामपूरमध्ये संतापाची लाट उसळली आहे..या मोर्चाबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...0
0
Report
रायगड़ जिला परिषद 75% अनुदान पर बीज उपलब्ध कराएगी
Chendhare, Maharashtra:अतिवृष्टीत नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा. रायगड जिल्हा परिषदेचा मदतीचा हात. ७५ टक्के अनुदानावर मिळणार बियाणे. योजनेच्या लाभासाठी ५० लाखांची तरतूद. ज्यांच्या शेतात पाणी साचून रोपवाटिकांचे नुकसान झाले त्यांना ७५ टक्के अनुदानावर भात बियाणे उपलब्ध करून दिलं जाणार आहे. यासाठी ५० लाखांची विशेष तरतूद करण्यात आल्याचे कृषी सभापती वैकुंठ पाटील यांनी सांगितलं. यातून साधारण १२ ते १५ हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. यंदा जिल्ह्यात साडेसहा हेक्टरवर भात रोप वाटिका करण्यात आल्या होत्या, त्यातील दोन हजार हेक्टर इतके क्षेत्र पाण्याखाली गेले होते.0
0
Report
Advertisement
यवतमाल में भारी सूखा: वर्षा नहीं हुई, किसानों की फसलों पर संकट
Yavatmal, Maharashtra:गेल्या दहा ते बारा दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस आला मात्र जुलै च्या पहिल्या आठवड्यात पावसाने खंड दिला. वार्षिक सरासरीच्या केवळ 28 टक्के पाऊस झाला असल्याने पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे. दिवसा ऊन ताप लागल्याने वातावरणात उकाडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. शेतकऱ्यांच्या शेतात उगवलेले पीक पाण्यामुळे आणि उष्णतेमुळे कोमेजू लागले आहे. आणखी पुढील चार ते पाच दिवस पाऊस येणार नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्याने शेतकरी चिंतेत आहेत. सोयाबीन कपाशी तूर ही पिके करपल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता आहे.0
0
Report
पंढरपुर के सरकारी रेत ठेके पर रंगदारी मांगे जाने के बाद कर्मी पर हमला, हालत गंभीर
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर तालुक्यातील अजनसोंड येथील शासकीय वाळू ठेक्यावरिल कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. अजून सोंड येथे जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशाने शासकीय वाळू ठेका सुरू आहे. हा ठेका चालू ठेवायचा असेल तर पाच लाख रुपयांची खंडणी तुषार उर्फ बालाजी नागटिळक आणि त्यांच्या साथीदारांनी याने मागितली होती. याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याचा राग मनात भरून त्याने व त्याच्या साथीदाराने बबन सोपान माने यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. यामध्ये बबन माने गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून नागटिळक आणि त्याच्या साथीदाराकडून वाहनांचेही मोठे नुकसान करण्यात आले आहे.0
0
Report
मालेगाव-नाशिक में बारिश से खरीफ फसल खतरे में, किसानों की चिंता बढ़ी
Nashik, Maharashtra:मालेगाव ब्रेकिंग ( नाशिक ) - मालेगाव सह नाशिकच्या ग्रामीण भागात पुन्हा बळीराजाची चिंता वाढली.. - पावसाने दांडी मारल्याने उगवलेली पिके करपण्याच्या मार्गावर.. - पावसाने दांडी मारल्याने खरीप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता... मालेगाव तालुक्यात पावसाने अचानक विश्रांती घेतल्याने बळीराजाची चिंता पुन्हा वाढली आहे. सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात पेरणी पूर्ण केली. मात्र आता अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने नव्याने उगवलेली पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या असून, लवकरच दमदार पाऊस न झाल्यास खरीप हंगामावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यात सध्या मान्सूनचा कमकुवत टप्पा सुरू असल्याने अनेक भागांत पावसाची उघडीप दिसून येत आहे.0
0
Report
Advertisement
तीन महीनों से आतंक मचाने वाला पट्टेदार बाघ आखिर वन विभाग ने जेरबंद किया
Bhandara, Maharashtra:भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर येथील ऑर्डनन्स फॅक्टरी, सावरी आणि परिसरातील गावांमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून दहशत निर्माण करणाऱ्या पट्टेदार वाघाला अखेर वनविभागाने यशस्वीरित्या जेरबंद केले. या वाघाच्या सततच्या वावरामुळे परिसरातील शेतकरी, नागरिक आणि शेतमजूर भयभीत झाले होते. जवाहरनगर ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात तसेच सालेबर्डी–सावरी मार्गावर अनेक वेळा वाघाचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या वाघाने पेवठा परिसरातील शेतकऱ्यांच्या बैलांवर हल्ला करून त्यांचा बळी घेतला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. अनेक गावांमध्ये जनावरे चारण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. अखेर वनविभागाने रात्री रेस्कु करून वाघाला जेरबंद केले...0
0
Report
नागपुर-जबलपुर NH 44 पर पवनी के पास अज्ञात वाहन ने बाघ को मार डाला
Nagpur, Maharashtra:नागपूर–जबलपूर राष्ट्रिय महामार्गावर पवनीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झालाय. नागपूर–जबलपूर राष्ट्रिय महामार्ग क्रमांक ४४ वर पवनी वनपरिक्षेत्र हद्दीत काल पहाटे सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात वाहनाने नर बिबट्याला जोरदार धडक दिली. या अपघातात बिबट्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृत बिबट्याचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू असून वन विभाग आणि संबंधित यंत्रणा तपास करत आहेत.0
0
Report
महाराष्ट्र: नकली बीज घोटाला, किसानो को धोखा देने वाले बूस्टर प्लांट जेनेटिक्स के खिलाफ एफआईआर
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या बाभुळगाव पोलीस स्टेशन मध्ये बनावट व निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाणे विक्री प्रकरणी 'बूस्टर प्लॅंट जेनेटिक्स' कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांची विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातल्या गेवराई बाजार येथील 'बूस्टर प्लॅंट जेनेटिक्स प्रा. लिमिटेड' या कंपनीला दणका देत बियाणे निरीक्षक तथा कृषी अधिकारी दत्तात्रय तमलवाड यांनी रीतसर कायदेशीर फिर्याद नोंदवली आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार, कंपनीने बियाण्यांच्या बॅगवर "BEST QUALITY GUARANTEED 100% SATISFACTION" असा मोठा दावा केला होता. मात्र प्रत्यक्ष पाहणीत बियाणे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले. प्रयोगशाळेच्या पडताळणी अहवालात हे बियाणे 'अप्रमाणित' असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्यासाठी संबंधित कंपन्या आणि कृषी अधिकाऱ्यांचे साटेलोटे असून कृषी अधिकारी प्रत्येक कृषी केंद्राकडून पैसे उकळतात असा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांनी केला आहे.0
0
Report
Advertisement
राम मंदिर निधी पर सवाल: खेड में शिवसेना के नेताओं का तीखा विरोध
Shirur, Maharashtra:अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या देणग्यांवरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. श्रीराम मंदिर ट्रस्टने हजारो कोटींच्या निधीचा आणि भक्तांनी दिलेल्या सोन्या-चांदीच्या दानाचा कोणताही हिशोब ठेवलेला नाही, असा गंभीर आरोप करत खेड तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. सामान्य जनतेच्या पैशांवर आणि श्रद्धेवर हा एक प्रकारे दरोडाच टाकण्यात आलाय, असा घणाघात करत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्थानिक हनुमान मंदिरामध्ये रामरक्षा पठण आणि हनुमान आरती करून या सरकारचा तीव्र निषेध नोंदवला. 'आमच्या श्रद्धेचा आणि पैशांचा हिशोब द्या', अशी मागणी यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी लावून धरली.0
0
Report
खेड घाट पर पांढरी पावडर से हड़कंप, जांच शुरू
Shirur, Maharashtra:पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाटात शेकडो किलो पांढरी पावडर टाकून दिल्याने खळबळ उडाली आहे. राज्यात सध्या दूध भेसळीचा मुद्दा गाजत असतानाच हा प्रकार समोर आल्याने परिसरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही पावडर नेमकी कसली आहे आणि ती तिथे कोणी टाकली, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.0
0
Report
खंडाळा घाट पर बस में आग, 43 यात्री सुरक्षित बाहर निकले
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या पुसद तालुक्यातील खंडाळा घाटात एस टी महामंडळाच्या बसला अचानक आग लागली, आणि एकच धावा धाव झाली. पुसद-अकोलाधावणाऱ्या या बसमधील 43 प्रवासी घडलेल्या दुर्घटनेतून थोडक्यात बचावले. पुसद आगारातून ही बस निघाल्यानंतर खंडाळा घाटात बस मध्ये अचानक आग लागली. बसमध्ये 43 प्रवासी प्रवास करत होते. मात्र चालकाने प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना तातडीने बसमधून सुरक्षित बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आगीत एसटी बसचे समोरील केबिन पूर्णपणे जळून खाक झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अचानक लागलेल्या आगीमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
Advertisement
समृद्धि महामार्ग पर कार-पिकअप हादसा, चालक की मौत मौके पर
Washim, Maharashtra:वाशीम: अक्कर: वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर कार आणि पिकअप वाहनाच्या भीषण अपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू झाला. समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक 252/900, नागपूरकडे जाणाऱ्या मार्गावर झालेल्या अपघातात सुरेंद्र खोटारे वय 55, रा. अकोला यांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी मालेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघाताच्या घटनेचा तपास पोलिसांनकडून सुरू आहे.0
0
Report
घोटी टोल पर हमला: गाड़ी रोके जाने और रॉड से हमला, पुलिस कार्रवाई
Nashik, Maharashtra:पूनम भागवत - - भावली धबधब्यावर १२ तारखेला फिरायला गेलो होतो - बिर्याणी घेऊन जेवलो, पाण्यात गेलो होतो - भिजल्यानंतर कपडे बदलायला गेले होते - तिथल्या तरुणांनी शिट्टी वाजवली आणि कमेंट पास केली - नंतर माझे पती आले त्यांनी त्यांना रागावले - आम्ही दादागिरी केली नाही, त्यांनी शिवीगाळ केली - नंतर आम्ही पण शिवीगाळ केली - ग्रामस्थांनी आमचा वाद सोडविला थोडी हातपायी झाली - नंतर काही लोकांनी बघतो म्हणून इशारा केला - बलोनो गाडीवरून आले आणि पाहिला हल्ला केला - नंतर दुचाकीवर आले आणि लोखंडी रॉडने हल्ला केला किरण भागवत - घोटी टोलवर पुन्हा हल्ला केला - आम्ही टोल गेट तोडून पळालो - परत मुंबई साईडला पळायचा प्रयत्न केला - नंतर तो गाडीला लटकलेला होता - आम्ही त्याला गाडीपासून बाजूला करण्याचा प्रयत्न केला - पिंक कलरवर दिसलेल्या तरुणाने गाडी बंद केली - गाडी रिव्हर्स करतांना चैन गेली - आम्ही परत गाडी पळवली त्यावेळी पाचव्यांदा अटक केला - नंतर थेट आम्ही अंबड पोलीस स्टेशनला पोहचलो - इगतपुरी पोलिसांनी नंतर संपर्क केला आणि सहकार्य केलं - पंचनामा झाला आहे, पोलिसांनी सहकार्य केले - आपण कुत्र्याला दगड मारतांना विचार करतो - आम्ही थांबलो असतो तर कुणीतरी मेलं असतं - गाडीच्या सगळ्या काचा फोडल्या होता - गाडीत लहान मुलं होतं - पहिल्यांदा मारलं होतं ठीक होतं - तीस किलोमीटर पाठलाग करत - आमचा ज्यांच्यासोबत वाद झाला ते चार ते पाच - बाकी इतर वेगळे होते - ११२ ला कॉल केला होता - गाडी जशी पुढे जात होती तसे वेगवेगळ्या पोलिसांशी फोन करत होते - आम्ही अंबड पोलीस गाठलं आम्ही - पहिली काच फायटरने फोडली - नंतर रॉड आणि दगडांनी फोडली - पोलीस तिथं राऊंड मारतांना दिसले होते - स्थानिक लोकांमध्ये गुन्हेगारी वाढत आहे - बायकोचा वाद होतांना दिसला म्हणून मी गेलो - त्याला टपली मारली म्हंटल चल निग - नंतर मुलगा मध्ये आला म्हणून वाद वाढला - भावली डॅम धोकादायक झाला आहे - मुंबईच्या लोकांचा वाद झाला होता - फॅमिली चांगला वेळ घालावा यासाठी जातात पण त्यांचा - केस दाखल करू नका म्हणून दहा लाखांची ऑफर दिली होती0
0
Report
कोथरुड में बदमाश गैंग का कोयता हमला, युवक गंभीर रूप से घायल
Pune, Maharashtra:कोथरुडमध्ये कुख्यात गुंड घायवळ टोळीचा राडा, तरुणावर फिल्मी स्टाईल कोयत्याने वार!!! पुणे- शहरातील कायदा सुव्यवस्था मजबूत असल्याचा दावा करणाऱ्या पोलिसांच्या नाकावर टिच्चून फरार असलेल्या कुख्यात गुंड निलेश घायवळच्या कोयताधारी टोळीने राडा घातला. मध्यवर्ती कोथरुड परिसरात कोयता गॅंगने तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना मंगळवारी (दि.१४) संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोकण हॉटेलसमोर घडली आहे. ८ ते १० जणांच्या टोळक्याने तरुणाच्या डोक्यात कोयत्याने दोन वर्मी घाव घातले आहे. त्यामुळे तो गंभीरपणे जखमी झाला आहे. फिल्मी स्टाईल मुळशी पॅटर्न प्रमाणे धावपळ करत टोळक्याने तरुणावर वार केल्याने खळबळ उडाली आहे. अमित सुरेश शिंदे (वय ३५, रा. कोथरुड ) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तपासाला गती दिली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, फिल्मी स्टाईल कोयता हल्ल्यात अमित शिंदे हा तरुण गंभीरपणे जखमी झाला आहे. दरम्यान, एका कुख्यात टोळी प्रमुखाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यामुळे संबंधित टोळीशी निगडित असलेल्या साथीदारांनी तरुणाला भर रस्त्यात कोकण हॉटेलजवळ गाठले. हाताने मारहाण केल्यानंतर लपवलेले कोयते बाहेर काढून थेट हल्ला चढवला. कोयत्याचे दोन वार अमितच्या डोक्यात लागले असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.0
0
Report
Advertisement
