Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळच्या आर्णीत भाजपाची पहिली यादी, आमदाराचा नामांचा गहजब!

Oct 22, 2024 13:19:11
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या आर्णी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत विद्यमान आमदाराचे नाव नाही. यामुळे महायुतीतील शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केला आहे. तिन्ही तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन उपजिल्हाप्रमुख विष्णू उकंडे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. पालकमंत्री संजय राठोड यांचेही या जागेसाठी आग्रह आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, जागा सुटली नाही तरी शिवसेना उमेदवार निवडणूक लढवेल.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Feb 27, 2026 09:15:34
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Feb 27, 2026 09:04:38
Malegaon, Maharashtra:राज्यात बनावट नोटांच्या जाळ पसरवणारा मुख्य सूत्रधार मालेगावच्या छावणी पोलिसांच्या ताब्यात. संभाजी नगरच्या बनावट नोटांच्या छाप कारखाना छावणी पोलिसांकडून उध्वस्त. 23.1.2026 रोजी एचडीएफसी बँक सटाणा नाका, मालेगाव येथे महिंद्रा फायनान्सच्या गणेश खरे या एजंटने 50 हजार रुपये च्या 500 च्या भारतीय चलनातील 100 नोटा या बनावट नोटांचा भरणा केला होता. पोलिसांनी सखोल केली असता जातेगाव येथील राठोड बंधूंना ताब्यात घेतलं. चौकशी केली असता त्यांना संभाजी नगर जवळील कन्नड येथील बन्सीलाल यादव यांनी फेक करन्सी चलनात आणण्यासाठी दिली होती. पोलिसांनी बन्सीलाल यादव ला ताब्यात घेतले असता त्याला कन्नडच्याच रेहान खान याने फेक करन्सी पुरवली होती. अशी लिंक छावणी पोलिसांनी लावली. यात आणखी समीर शेख, गोल्डन कुरेशी, अजिंक्य जाधव, शुभम थोरात यांची नावे समोर आली. मग शेवटी मुख्य सूत्रधार संतोष उत्तमराव केळसकर, जय भवानी नगर छत्रपती संभाजी नगर येथील व्यवसाय ग्राफिक डिझायनर यांच्या ताब्यात घेतल्यानंतर एकूण 200 बनावट 500 रुपये दराच्या नोटा जप्त करण्यात आल्या. तसेच विनायक ग्राफिक्स नावाच्या दुकानातून बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी एकूण 01 लाख 36 हजार 700 रुपयांची साधनसामुग्री जप्त झाली. तपासात एकूण 385 बनावट 500 दाराच्या नोटा जमा झालेल्या आंढली आहेत. दरम्यान या संतोष केळसकरच्या मागावर राज्यातील विविध पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी असल्याचे समजते, मात्र नाशिक ग्रामीण छावणी पोलिसांनी अवघ्या एक महिन्यातच या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावून मुख्य सूत्रधारास अटक केल्याने आणखी काही गुन्हे निष्पन्न होण्यास मदत होणार आहे. विशाल मोरे, झी मिडिया मालेगाव
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 27, 2026 09:01:23
Akola, Maharashtra:अकोला महापालिकेतील स्थायी समिती सभागृहाला काही वर्षांपूर्वी टिपू सुलतान यांचं नाव देण्यात आलं होतं. मात्र या नामकरणावरून आता पुन्हा एकदा वाद पेटला आहे.शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्या वतीने आज महापालिका परिसरात आंदोलन करत हा फलक हटवण्याची मागणी करण्यात आली.आठ दिवसांच्या आत बोर्ड काढला नाही, तर आम्ही स्वतः तो हटवू, आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला महापालिका प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला. सभागृहाला काही वर्षांपूर्वी टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आले होते,त्या वेळीही या निर्णयावरून शहरात मतभेद निर्माण झाले होते.दरम्यान, आज शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालयात दाखल होत जोरदार घोषणाबाजी केली. संबंधित फलक तात्काळ हटवावा, अशी मागणी त्यांनी केली.Aंदोलकांनी प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. जर ठरलेल्या मुदतीत बोर्ड काढण्यात आला नाही, तर आम्ही आमच्या पद्धतीने तो हटवू, असा इशारा देण्यात आला.या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यासाठी प्रशासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 27, 2026 09:00:41
Nagpur, Maharashtra:2c ला सदर पोलीस स्टेशन चा संग्रहित व्हिडिओ जोडला आहे नागपूर पेपर फुटी प्रकरणी अजून एक आरोपीला अजून एका ट्युशन क्लासेसमधील अजून एका शिक्षकाला करण्यात आली अटक पेपर फुटी प्रकरणी पाचवी अटक नागपुरात व्हाट्सअप वरून बारावीचे भौतिक शास्त्र रसायनशास्त्र आणि गणित पेपर फुटले सदर पोलीस करताय तपास, पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे सापडले असून पुढील काही दिवसात अजून काही आरोपींना अटक होणार आरोपीचे व्हिडिओ 2cला जोडला आहे. ही बातमी अपडेट करून घ्यावी नागपूर..... पेपर फुटी प्रकरणात आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे... सहावा संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात असून त्याच्याकडून तपास सुरू आहे.. तो एका शाळेच्या शिक्षक असल्याची माहिती पुढे येत आहे ... तर सातवा आरोपी हा अल्पवयीन असल्याची माहिती... आतापर्यंत तीन आरोपींना न्यायालयकोठडीत पाठवण्यात आलेला आहे....एका विद्यार्थ्यांका जामीन मिळाला आहे....
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Feb 27, 2026 08:46:09
Jalna, Maharashtra:जालना : लाखोंच्या ई-घंटा गाड्या एकाच वर्षात बंद, शहरातील 130 भागात साचला कचरा, नागरीक त्रस्त (पॅकेज) जालना महापालिकेने वर्षभरापूर्वी लाखो रुपये खर्चून ई-घंटा गाड्या खरेदी केल्या. पण वर्षभरातच या गाड्या बंद पडल्या. त्यामुळे शहरात कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालं असून दुर्गंधी पसरलीय नागरीक या समस्येने त्रस्त झाले आहेत. व्हिओ: ई घंटा गाड्यांच्या निमित्तानं जालना महानगरपालिकेचा गलथान कारभार समोर आलाय. महापालिकेनं वर्षभरापूर्वी 20 लाख रुपये खर्चून 13 ई घंटा गाड्यांची खरेदी केली होती. पण वर्षभरातच या गाड्या बंद पडल्यायत. सध्या या गाड्या महापालिका कार्यलयाच्या परिसरात उभ्या आहेत. या गाड्या शहरातील 130 भागात जाऊन कचरा संकलनाचं काम करीत होत्या पण गाडयाच बंद झाल्यानं कचरा संकलन बंद झाला आहे. त्यामुळे कचरा साचलेल्या भागात दुर्गंधी सुटल्यानं नागरीकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. बाईट: अनुज बाहेती, नागरीक,(भगव्या रंगाचा हाफ शर्ट) व्हिओ: स्वच्छतेत शहराचा चांगला रँक आणण्यासाठी बाहेरच्या राज्यातून या गाड्यांची खरेदी करण्यात आली. महापालिकेनं खरेदी केलेल्या या गाड्या तीनचाकी आहेत. त्यामुळे शहरातील लहान मोठ्या गल्ल्यांमध्ये या गाड्या सहज प्रवेश करून कचरा संकलन करायच्या. पण वर्षभरातच या गाड्यांच्या बॅटरी निकामी झाल्या. ब्रेक फेल झाले. मोटारी बंद पडल्या तर काहींची पत्रे खराब झालीय. काही गाड्यांचे टायर खराब झाले आणि सर्व गाड्या महापालिका पार्किंगमध्ये कायमच्या उभ्या राहिल्यात. या गाड्यांचे पार्ट शहरात भेटत नसल्याची माहिती समोर आलीय. दरम्यान या गाड्यांचा वापर फक्त बिलं दाखवून पैसे उकळण्यासाठी करण्यात आला असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केलीय. बाईट: साद बिन मुबारक,सामाजिक कार्यकर्ते, जालना (पट्टे असलेला शर्ट) व्हिओ: दरम्यान बंद पडलेल्या या ई-घंटा गाड्यांवर महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी प्रतिक्रिया दिलीय. इलेक्ट्रीक गाड्यांच्या चार्जिंग स्टेशनसाठी वीज कनेक्शनची समस्या आणि दुरुस्तीची कामे रखडल्यानं या गाड्या बंद झाल्यानं कबुली त्यांनी दिली तसेच होळी पर्यत गाड्या दुरुस्ती करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बाईट: सुप्रिया चव्हाण,सहाय्यक आयुक्त, जालना महापालिका व्हिओ: या ई-घंटा गाड्या बंद पडल्यानं जालना महानगरपालिकेचा गलथान कारभार समोर आलाय. शहरातील नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागतोय. पण महापालिकेतील प्रशासनात सक्षम कारभारी नसल्यानं शहरातील स्वच्छतेचा सध्या बोजवारा उडालेला दिसून येतो हे नक्की.आता बिघडलेल्या या गाड्या दुरुस्त होऊन या गाड्या शहरातील नागरिकांच्या सेवेत पुन्हा कधी दाखल होतात याचेच वेध शहरातील नागरीकांना लागलेत.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 27, 2026 08:19:28
Kalyan, Maharashtra:डोंबिवली पीएंडटी कॉलनी परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असल्याचे संतप्त नागरिकांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयावर मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी केली. निवडणुकीच्या काळात मुबलक पाणीपुरवठा करण्यात आला, मात्र निवडणुका संपताच पुन्हा टंचाई सुरू झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पाइपलाइन टाकण्यात आल्या असल्या तरी त्या लाईनमधून पाणीच येत नसल्याची तक्रार रहिवाशांनी केली. फक्त पाइप टाकून फोटो काढले, प्रत्यक्षात नळ कोरडेच आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली. सध्या परिसरात टँकरवर अवलंबून राहावे लागत असून, टँकरच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत नागरिकांनी गंभीर शंका व्यक्त केल्या आहेत. टँकरचे पाणी पिण्यास अयोग्य आहे. त्यामुळे लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे, असा आरोप करण्यात आला.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 27, 2026 08:17:50
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:2025 मध्ये राज्यात गरपीट आणि अतिवृष्टी झाली त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले सरकारने मोठी मदत केली मात्र अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर काही ठिकाणी प्रशासनाच्या चुकीने 2 वेळ मदतीचे पैसे आले त्याना सरकारने वसुलीसाठी नोटीस पाठवल्या आहेत यामुळं मदतीचा हा घोळ संपता संपत नाही असे चित्र आहे.. पाहुयात काय आहे प्रकार सरकारकडून शेतकऱयांच्या मदतीचा गोंधळ अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना मदत अजुनही मिळाली नाही... तर काही ठिकाणी दुबार मदत मिळाल्याने शेतकऱ्यांना नोटीस... गारपीट आणि अतिवृष्टी ची शेतकऱ्यांना मिळणारी मदतीचा गोंधळ संपता संपता नाही असे चित्र आहे.. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना अजूनही जाहीर केलेली मदत मिळाली नाहीय, काही ठिकाणी के वाय सी ची अडचणी तर काही ठिकाणी अजून काही गोंधळ, एकट्या मराठवाड्यात अजूनही 2025 ला जी अतिवृष्टी झाली अशा 2 लाख 38 हजार 217 शेतकऱ्यांना इ के वाय सी अडचणीमुळे मदत मिळू शकली नाहीय, या शेतकऱ्यांचे तब्बल 129 कोटी अजुन वाटप होऊ शकले नाहीय.. म्हणजे अजूनही 23 टक्के शेतकरी मदती पासून वंचित आहे, महत्त्वाचं म्हणजे ही थांबलेली मदत आहे जून जुलै अतिवृष्टी ची, धक्कादायक प्रकार म्हणजे मे 2025 मध्ये मराठवाड्यात गरपीट झालेली मोठे नुकसान झाले त्याबाबत ही मदत जाहीर झाली , ही मदत तर अजूनही शेतकऱ्यांना मिळाली नाही, यासाठी स्वयं तहसीलदार दर्जाचे अधिकारी राज्य सरकारला पत्र पाठवून शेतकरी चक्रा मारताय अनुदान द्या अशी मागणी करताय, जालना जिल्ह्यातील बदनापूर तहसीलदार चे असे एक पत्र झी 24 तासच्या हात्री आले आहे हे पत्र सरकार कडून मिळणाऱ्या मदतीची भीषणता दाखवण्यास पुरेसे आहे.. 2025 अतिवृष्टी न मिळलेले शेतकरी संख्या आणि पैसे संभाजी नगर 38666 शेतकरी वंचित 23.39 कोटी प्रलंबित जालना 29875 शेतकरी वंचित थकीत रक्म 15 कोटी परभणी 37817 शेतकरी 19 कोटी थकीत हिंगोली 6593 शेतकरी 4 कोटी प्रलंबित नांदेड 47314 शेतकरी 24.85 कोटी प्रलंबित बीड 23499 शेतकरी 12.53 कोटी प्रलंबित लातूर 34681 शेतकरी 17.39 कोटी प्रलंबित धाराशिव 19772 शेतकरी 14.17 कोटी प्रलंबित.. या सगळ्या बाबत मराठवाडा विभागीय आयुक्त मात्र सावध भूमिका घेत तांत्रिक अडचणी असतील मात्र लवकरच पैसे मिळतील असे सांगत आहेत... छत्रपती संभाजी नगरच्या गंगापूरमध्ये शासकीय अनुदानाचा वेगळाच घोळ पुढं आला आहे, या शेतकऱ्यांना 2022-23 चे अनुदान 2024 ला आले मात्र त्यात प्रशासनिक चुकीमुळे त्यांना दुबार अनुदान आले .. प्रशासकीय स्तरावर झालेल्या तांत्रिक चुकीमुळे शेतकऱ्यांना मिळालेल्या 'अतिरिक्त अनुदानाच्या वसुलीसाठी तहसील कार्यालयाकडून नोटिशी बजावण्यात आल्या आहेत. धक्कादायक म्हणजे पैसे न भरल्यास मालमत्तेवर बोजा टाकण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. या निर्णयामुळे आधीच अस्मानी आणि सुल्तानी संकटात सापडलेला शेतकरी आता अधिकच हवालदिल झाला आहे. बाईट्स शेतकरी 3 बाईट्स आहे ही शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीची अवस्था दयनीय अशीच म्हणावी लागेल, कुठं येतंच नाही कुठं आलं तर वसुली साठी नोटिसा, सरकार शेतकऱ्यांच्या नावाने घोषणा मोठमोठ्या करते, मात्र मदत मिळण्याची ही कासावगती शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे त्यामुळं घोषणा करताना आणि मदत देताना यात गंभीर्य येणे ही तितकेच गरजेचे आहे... विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर...
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 27, 2026 07:47:44
Yeola, Maharashtra:नाशिक जिले के लासलगांव कृषि उपज बाजार समिति में प्याज किसान 'शोले शैली' में विरोध प्रदर्शन कर रहे हैं। उन्होंने प्याज की नीलामी रोक दी है और सीधे पानी की टंकी पर बैठ गए हैं। उन्होंने गले में प्याज की माला पहनकर विरोध शुरू किया है。 किसानों की मांग है कि प्याज के लिए मूल्य विनिमय योजना तुरंत लागू की जाए, गारंटीकृत मूल्य घोषित किया जाए और पहले से बिके प्याज पर सब्सिडी दी जाए। इसके अलावा, किसानों ने आक्रामक रुख अपनाते हुए मांग की है कि नाशिक जिले के सभी 15 विधायक सत्र में प्याज का मुद्दा मजबूती से उठाएं, अन्यथा वे सत्र से बाहर चले जाएंगे。 इस बीच, इस विरोध प्रदर्शन से इलाके में तनावपूर्ण माहौल बन गया है और पुलिस प्रदर्शनकारियों को समझाने की कोशिश कर रही है。
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Feb 27, 2026 07:47:24
Satara, Maharashtra:सातारा: फलटण तालुक्यातील विडणी येथील कोकरेवाडी परिसरात जंगली रानगव्याने वस्तीमध्ये घुसून धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात राजेंद्र सदाशिव जाधव हे गंभीर जखमी झाले असून त्यांना बारामती येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे. विडणी येथे कोकरेवाडी परिसरात अचानक घुसल्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली यादरम्यान राजेंद्र जाधव यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले.या घटनेनंतर संपूर्ण कोकरेवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. वन विभागाकडून रानगव्याला पकडण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून या भागात रानगाव याला पकडण्यासाठी विशेष म्हणून राबवली जात आहे
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Feb 27, 2026 07:31:01
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड मध्ये अवघ्या 20 रुपयांसाठी मित्राच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय....! पिंपरी मध्ये रवींद्र आणि सत्यजित कांबळे यांच्या मध्ये बुधवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. ‘माझे तुझ्याकडे 20 रुपये उधार आहेत’ असे म्हणत सत्यजितने रवींद्रच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला. या हल्ल्यात रवींद्र गंभीर जखमी झाला असून त्यांना तातडीने महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे फिरवली. दरम्यान, हल्ल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक लातूर रवाना झाले आणि त्याला बेड्या ठोकण्यात यश आले.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 27, 2026 07:22:10
Bhandara, Maharashtra:एआय सर्चमुळे तरुणावर संशय.....पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप.... भंडाराच्या गोबरवाही परिसरातील घटना.... पोलिसांनी सर्व आरोप फेटाळले.... Anchor :- एआय वर सर्च करणे एका तरुणाला महागात पडले आहे.. एआय वर सर्च केल्याने पोलिसांनी ताब्यात घेत मारहाण केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे.... Vo :- भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस ठाणे हद्दीत 15 फेब्रुवारी रोजी खंदाळ येथील रहिवासी विजय भोरगडे यांच्या घरी चोरी झाली. त्यांनी याची तक्रार गोबरवाही पोलिसात दिली. या चोरीचा संशय घेत त्यांनी गावातील तिघांचा नाव घेतलं. त्यात प्रमोद बोरघरे , व कुणाल बोरघरे यांची नावे तक्रारीत नमूद झाली. स्वतःचे नाव संशयित म्हणून आल्यानंतर घाबरलेल्या कुणालने “संशयित आरोपी असल्यास बचाव कसा करावा?” असा प्रश्न गुगलवर शोधला. हा सर्च हिस्टरी पोलिसांच्या हाती लागल्याने संशय अधिकच बळावल्याचा आरोप आहे. चौकशीसाठी ताब्यात घेताना मोबाईल जप्त करण्यात आला. भंडारा स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने कुणाल याला ताब्यात घेतले व भंडारा येथे आणून मारहाण केल्याने हात फ्रॅक्चर झाल्याचा दावा कुणालने पत्रकार परिषदेत केला. हाताला गंभीर दुखापत झाली असून शरीरावरही मारहाणीच्या खुणा असल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर पोलिसांनी त्यांच्या नाकात काहीतरी टाकून त्रास दिला व जबरदस्तीने कबुली कबुली देण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. यावेळी कोणताही गुन्हा नोंद नसतानाही मारहाण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांना सामान्य रुग्णालयात नेले. मात्र तेथेही मारहाणीबद्दल कुणाला सांगितले तर तुमच्या वडिलांनाही गुन्ह्यात अडकवू अशी धमकी दिल्याचा आरोप कुणाल बोरघरे यांनी केला आहे. नंतर पोलिसांनी त्यांना सोडून दिल्यानंतर कुणाल बोरघरे यांनी आपल्या गावातील रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून घेतली. तपासणीत त्यांच्या हाताला फॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत माजी आ. चरण वाघमारे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तातडीने चौकशी करून दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 27, 2026 06:47:50
Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडून शोले स्टाईल’ आंदोलन करत शेतकरी थेट पाण्याच्या टाकीवर चढून बसले आहेत. कांद्याच्या माळा गळ्यात घालून लक्ष आंदोलन सुरू केले आहे. कांद्याला तात्काळ भावांतर योजना लागू करावी, हमीभाव जाहीर करावा आणि आधीच विकलेल्या कांद्याला अनुदान द्यावे. तसेच नाशिक जिल्ह्यातील सर्व १५ आमदारांनी अधिवेशनात कांद्याचा प्रश्न ठामपणे मांडावा, अन्यथा सभात्याग करावा, अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.दरम्यान, या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत.
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top