445001
यवतमाळच्या आर्णीत भाजपाची पहिली यादी, आमदाराचा नामांचा गहजब!
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या आर्णी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत विद्यमान आमदाराचे नाव नाही. यामुळे महायुतीतील शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केला आहे. तिन्ही तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन उपजिल्हाप्रमुख विष्णू उकंडे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. पालकमंत्री संजय राठोड यांचेही या जागेसाठी आग्रह आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, जागा सुटली नाही तरी शिवसेना उमेदवार निवडणूक लढवेल.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
मीरा भाईंदर मामले में आतंकी लिंक की आशंका, महाराष्ट्र पुलिस की जाँच तेज
Nagpur, Maharashtra:नागपूर संजय निरूपम (शिवसेना नेते) On मीरा भाईंदर घटना - एक माथेफिरू आला होता ..तो आतंकवादी है की त्याचा कोणासोबत संबंध आहे.. याचा तपास सुरू आहे.. *पहलगाम येथील घटनेप्रमाणे मीरा भाईंदर येथील घटना.. सुरक्षारक्षकांना धर्म विचारून कलमा वाचण्यास सांगितल.. ते वाचू शकले नाहीत म्हणून त्याच्यावर हल्ला केला..* - ही दुर्दैवी घटना आहे.. ऐसी घटना कुठेही होता कामा नये.. महाराष्ट्र पोलीस आणि एटीएस अधिकारी कार्यक्षम आहेत.. याची चौकशी होऊन याचे मागे कोण हे माहिती व्हायला हवं.. - लव्ह जिहाद कार्पोरेट जिहाद सारखे प्रकरण असताना एखाद्या ग्रुपचे आपल्या डोळे तर नाही ना.. किंवा महाराष्ट्रातील लोकांना डिस्टर्ब करण्यासाठी लक्ष केले जात आहे का.. असे वाटत आहे.. मात्र अधिकारी यामागे कोण त्याला पकडून हा विषय संपवतील असा विश्वास आहे.. - आरोपीवर कोणतीही दया दाखवण्याची गरज नाही.. आरोपीच्या मागे कोण आहे.. त्याचा मास्टर माइंड कोण हे देखील तपासणं गरजेचं आहे.. हे एका व्यक्तीचे काम नाही तर यामागे एका आतंकवादी संघटन काम करत आहे.. त्याचा पाकिस्तानातील आतंकवादी संघटनांसोबत काही संबंध आहे का.. त्याचा पण तपास व्हायला hवे.. On विधान परिषद - एकनाथ शिंदे पक्षाचे सर्वेसर्वा आहेत.. कोणाला उमेदवारी द्यायची की नाही ते सर्व एकनाथ शिंदे पाहतात.. यावर जो निर्णय होईल ते एकनाथ शिंदे यांच्या लेव्हलवर होणार.. - दहावा उमेदवार देण्यासंदर्भात चर्चा आहे.. आमच्याकडे असलेल्या संख्याबळानुसार दोन विधान परिषद सदस्य आम्ही निवडून आणू.. गरज पडली तर छोटे पक्ष आणि अपक्ष आमच्या संपर्कात असतात. त्यांची सर्वांची इच्छा असली तर अजून एक उमेदवार देण्यासंदर्भात विचार होईल.. - दोन व्यतिरिक्त अजून एक उमेदवार आम्ही निवडून आणू शकू तर पुढे कोण आहे.. त्यामुळे काही फरक पडत नाही.. On उद्धव ठाकरे बिनविरोध. - *शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मोठा फरक आहे.. शरद पवार महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत.. उद्धव ठाकरे इतके मोठे नाहीत की त्यांना निवडून आणण्यासाठी नऊ जागांवरच निवडणुका झाल्या पाहिजे..* On मराठी सक्ती.. - या संदर्भात प्रताप सरनाईक यांनी काल बैठक बोलावली होती.. बैठकीत मराठी भाषेचा ज्ञान सर्वांना हवा असा सर्वांचा सुर होता.. सोबतच महाराष्ट्रातील सर्वांना मराठीत संवाद साधला पाहिजे.. मात्र मराठी बोलला नाही तर तुमची परमिट किंवा लायसन रद्द करू अशी शक्ती आपण जेव्हा करतो.. ते चुकीचं धोरण दिसतो यामुळे उपवासमारीच संकट येऊ शकतो.. असाही एक सूर होता.. - त्यावर मंत्री महोदयांनी पूर्वीच्या जीआरमध्ये सुधार करण्याचा आश्वासन दिल.. ऑटो चालक टॅक्सी चालक यांना मराठी येत नाही त्यांना प्रशिक्षण देऊन तयार करू . आणि मराठीत बोलतील अशी व्यवस्था तयार करणार...0
0
Report
एसटी में बुजुर्गों को मुफ्त यात्रा, 2 रुपयों के स्वच्छता शुल्क से नाराजगी
Nanded-Waghala, Maharashtra:ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास सुखकर करण्यासाठी सरकारने त्यांना मोफत सवलत दिली आहे. मात्र याच ज्येष्ठ नागरिकांकडून आता स्वच्छता अधिभाराच्या नावाखाली 2 रुपये घेतले जात आहेत. 2 रुपये किंमत जास्त नसली तरी सुट्या 2 रुपयांसाठी मात्र ज्येष्ठ नागरिकांना कटकट सहन करावी लागत आहे. परिवहन महामंडळाकडून चालवली जाणारी बस सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा आधार आहे. मोडकळीस आलेल्या बसेस, कोलमडलेले वेळापत्रक, बेजबाबदार चालक, अस्वच्छता अश्या अनेक तक्रारी असल्या तरी एस टी बस आजही सर्वासामान्यांची वाहतूकीसाठीची पसंत आहे. पण एस टी महामंडळाच्या एका नव्या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. अमृत ज्येष्ठ नागरिक योजने अंतर्गत 75 वर्षाखालील नागरिकांना एस टी प्रवास मोफत आहे. पण एस टी ने ज्येष्ठ नागरिकांसोबतच सर्वाना 2 रुपये स्वच्छता अधिभार लावलाय. मोफत प्रवास असला तरी 2 रुपये ज्येष्ठ नागरिकांनाही द्यावे लागत आहेत. तसे 2 रुपये फार काही जास्त नाहीत. पण 2 रुपये सुटे नसल्याने अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना कटकट सहन करावी लागत आहे. स्वच्छतेच्या नावाखाळ dva दोन रुपये अधिभार लावण्यात येत आहे. मात्र हे दोन रुपये नेमके कोणत्या स्वच्छतेसाठी वापरले जात आहे हा प्रश्न आहे. बसस्थानकावर सगळीकडे अस्वच्छता दिसते. शौचालय आणि इतर जागी तर नेहमीच घाण साचलेली असते. प्रवाशांची बसण्यासाठीची व्यवस्था असलेल्या ठिकाणीही अस्वच्छता दिसून येते. बसेस मध्येही अस्वच्छता असते मग हा स्वच्छता कर नेमका लावला कशासाठी जातोय असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत. सुटे दो रुपये नसल्याने अनेकदा प्रवाशी आणि प्रवाशांमध्ये वादावादीच्या घटना घडत आहेत. केवळ प्रवाशीच नव्हे तर एसटी कर्मचाऱ्यांसाठीही ज्येष्ठ नागरिकांकडून वसुल करणे अवघड होत आहे. त्यामुळे किमान ज्येष्ठ नागरिकांना या दोन रुपये स्वच्छता करातून सवलत देण्यात यावी अशी मागणी होतेय.0
0
Report
यवला- पुणे इंदोर मार्ग पर भारी ट्रैफिक जाम, मरीजों को परेशानी
Yeola, Maharashtra:नाशिकच्या येवला शहरातून जाणाऱ्या पुणे इंदोर महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली असून पाच किलोमीटर पर्यंत लांब राहायला लागल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. येवला शहरात उपजिल्हा रुग्णालयासमोरून हा महामार्ग जात असल्याने रुग्णसेवेला याचा फटका बसत असून अनेक रुग्णवाहिका या ठिकाणी अडकून पडत असतात, त्यामुळे रुग्णांचा जीवदेखील धोक्यात आला आहे. त्यामुळे येवला शहराला लवकरात लवकर उड्डाणपूल अथवा बायपास मंजूर करावा अथवा महत्त्वाच्या चौकावर रुग्णांना येवला येथे कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी.0
0
Report
Advertisement
कोकण में पोट चुनाव: सिंधुदुर्ग की 14 ग्रामपंचायतों में मतदान शुरू
Oras Bk., Maharashtra:अँकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४ ग्रामपंचायतच्या पोट निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 5 सरपंच पद व 9 ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी ही पोट निवडणूक होत आहे. आज एकूण १४ हजार २१० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सकाळ पासून अगदी शांततेत मतदान प्रक्रियेला सुरवात झाली असून. कोकणात लग्नाचा हंगाम असल्याने एक नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदान केलं.0
0
Report
धाराशिव में 29-30 मई को 32वां अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य सम्मेलन उद्घाटन सुमित्रा पवार
Dharashiv, Maharashtra:उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन. धाराशिव मध्ये 29 व 30 मे रोजी रोजी साहित्य संमेलन होणार संपन्न. धाराशिवमध्ये साहित्यप्रेमींसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ३२ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन सुमित्रा पवार यांच्या हस्ते होणार आहे. मुंबई येथे साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी सुमित्रा पवार यांना अधिकृत निमंत्रण दिले. यावेळी संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. २९ आणि ३० मे २०२६ रोजी धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात हे संमेलन पार पडणार असून, सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. नंदकुमार राऊत अध्यक्षस्थानी असणार आहेत. देशभरातील सुमारे ९०० साहित्यिक या संमेलनात सहभागी होणार असून, याआधी पु. ल. देशपांडे, जावेद अख्तर, शिवाजी सावंत, शरद पवार यांसारख्या मान्यवरांनीही या संमेलनाचे उद्घाटन केले आहे.0
0
Report
नाशिक जलस्तर घटाव: 26 परियोजनांमध्ये 41.61% जल शिल्लक
Nashik, Maharashtra:Nashik Breaking - - उन्हाच्या तडाख्यात नाशिकच्या धरणसाठ्यात घट - २६ प्रकल्पांत ४१.६१ टक्के पाणी शिल्लक - जिल्ह्यातील २६ मोठ्या-मध्यम धरणांमध्ये सध्या २९,३८५ दलघफू उपयुक्त जलसाठा उपलब्ध - गेल्या वर्षीच्या तुलनेत साठा दहा टक्क्यांनी जास्त असला तरी अवघ्या दहा दिवसांत ३.४२ टक्क्यांची घट नोंद - वाघाड आणि पुणेगाव धरणात जलसाठा दहा टक्क्यांच्या खाली, काही भागांत पाणीटंचाईची चाहूल - वाढते तापमान, बाष्पीभवन आणि ग्रामीण भागातील वाढती मागणी यामुळे प्रशासन सतर्क - जिल्ह्यातील काही गावांसाठी ६१ टँकरच्या फेऱ्या सुरू, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता - जलसंपदा विभागाकडून स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांना काटकसरीच्या वापराचा इशारा - या संदर्भात गंगापूर डॅम वरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी0
0
Report
Advertisement
सोलापूर के भोंदू बाबा मनोहर भोसले के खिलाफ आर्थिक धोखाधड़ी केस में कोर्ट आज फैसला देगा
Pandharpur, Maharashtra:Anchor - सोलापूर जिल्ह्यातील भोंदू बाबा मनोहर भोसले याच्या भोवतीचा फास पोलिसांनी आवळला, आज न्यायालयात हजर करणार पुन्हा पोलीस कोठडी की न्यायालयीन कोठडी याचा निर्णय होणार सोलापूर जिल्ह्यातील भोंदू बाबा मनोहर भोसले याला जादूटोणा अर्थिक फसवणूक गुन्ह्याखाली कुर्डूवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याची न्यायालयीन कोठडी आज संपत आहे. याच प्रकरणात मनोहर भोसले यांच्या शिवसिद्धी ट्रस्ट चा सदस्य नरेंद्र सांगळे याला कुर्डूवाडी पोलिसांनी अहिल्या नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथून ताब्यात घेतल आहे. नरेंद्र सांगळे यांच्या माध्यमातूनच मनोहर भोसले याचे बरेचसे आर्थिक व्यवहार चालायचे. मागील तीन दिवसांमध्ये पोलिसांनी मनोहर भोसले याची चौकशी केली आहे. त्यामध्ये बारामती कर्जत उंदरगाव घोटी तसेच इतर ठिकाणच्या जमिनी कशा पद्धतीने त्याने खरेदी केल्या त्याची चौकशी झाल्याची माहिती आहे. मुळे आता पोलीस मनोहर भोसले यांच्या भोवती कारवाईचा फास आवळण्याच्या तयारीत आहेत.0
0
Report
राज्यभर में कृषि सेवा केंद्र चालक हड़ताल, इंदापुर में भी बंद
Rui, Maharashtra:राज्यात कृषी सेवा केंद्र चालकांचा संप.... पुण्याच्या इंदापुरातही राज्यव्यापी संपला प्रतिसाद राज्यभरातील खत बी बियाणे आणि कृषि औषध विक्रेते संपावर गेलेत. पुण्याच्या इंदापूर तालुक्यात ही सर्व कृषी सेवा केंद्र चालकांनी या राज्यव्यापी संपात सहभाग नोंदवत आपापली कृषी सेवा केंद्र कडकडीत बंद ठेवत या संपात सहभाग घेतला.0
0
Report
दौंड में मनसे का सदस्यता अभियान शुरू; तीन दिनों में दस हजार सदस्य
Rui, Maharashtra:दौंडमध्ये मनसेचे सदस्य नोंदणी अभियान.... 3 दिवसांत 10 हजार सदस्य जोडण्याचा संकल्प... ANCHOR महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. दौंड शहर व तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या या अभियानामध्ये, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढील तीन दिवसांत तब्बल दहा हजार सदस्य जोडण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. या अभियानाबाबतची माहिती यावेळी पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली...0
0
Report
Advertisement
मुख्यमंत्री फडणवीस ने रवि राणा को जन्मदिन की शुभकामनाएं दीं; गरीबों के लिए सेवा जारी
Amravati, Maharashtra:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार रवी राणा यांना फोनवरून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; गोरगरिबांसाठी काम करतात या कामात त्यांना बळ मिळो यंदा श्रमदानातून त्यांचा वाढदिवस साजरा करणार आहे. त्यानिमित्ताने कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक उपक्रम देखील राणांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केले आहे. त्यामुळे सकाळी राणा यांच्या घरासमोर गीतांचा कार्यक्रम सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करत आमदार रवी राणा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचा पाहायला मिळत आहे. रवी राणा गोरगरिबांसाठी काम करतात या कामात त्यांना बळ मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना देखील मुख्यमंत्र्यांनी केल्याचं दिसून येत आहे.0
0
Report
येल्वा तालुक के नगरसुल में मौसम बदलने से किसानों को नुकसान, प्याज फसल भीगी
Yeola, Maharashtra:येवला तालुक्यातील नगरसुल परिसरात हवामानाच्या लहरीपणाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. एकीकडे गेल्या काही दिवसांपासून कडाक्याचे ऊन पडत असून तापमानात मोठी वाढ झाली आहे. उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असताना, दुसरीकडे काल सायंकाळी अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली. या अनपेक्षित पावसामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा अक्षरशः भिजून गेला. सायंकाळी झालेल्या पावसामुळे हा कांदा ओला झाला असून त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.0
0
Report
शिरूर में 42°C तापमान से किसान परेशान, कांदा उत्पादन पर संकट
Shirur, Maharashtra:राज्यात तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून सूर्य आग ओकतोय. पुणे शिरूरमध्ये तापमान 42 अंशापर्यंत पोहोचलं असून वाढत्या तापमानामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. सध्या शेतकऱ्यांची कांदा काढणीची लगबग सुरू आहे; मात्र वाढत्या तापमानामुळे शेतात कामासाठी मजूरच येत नाहीत, आलेले मजूर कांदा काढणी अर्धवट सोडून गावाकडे परत जात आहेत. याच आढाव्याची शिर्ष बातमी.0
0
Report
Advertisement
नाशिक के सिंहस्थ कार्यों में नियमों उल्लंघन पर महापौर ने दी कड़ी चेतावनी
Nashik, Maharashtra:नाशिक शहरात सिंहस्थाच्या कामांचा सध्या धडाका बघायला मिळतोय.. मात्र हे काम होत असताना नियमांचे पालन होत नसल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय.. याच पार्श्वभूमीवर नाशिकची महापौर आणि उपमहापौर यांनी या कामांची अधिकाऱ्यांसोबत अचानक पाहणी करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.... शहरात अनेक ठिकाणी कामांमुळे रस्ते बंद आहे त्याचबरोबर शहरात या कामांमुळे प्रचंड वाहतूक जा होताना पाहायला मिळते... या सगळ्याचा मानसिक आणि शारीरिक त्रास हा नागरिकांना होताना पाहायला मिळतोय...विकास काम होत असताना नाशिककरांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा थेट कारवाई करण्याचा इशारा महापौरांनी दिलाय...0
0
Report
महाराष्ट्र में किसान चिंतित: उर्वरक कीमतें बढ़ीं, सब्सिडी की मांग
Nagpur, Maharashtra:नागपूर बाईट - अनिल देशमुख *ऑन खत दरवाढ* महाराष्ट्रातील shेतकरी अडचणीत आहे. सोयाबीनला भाव नाही. खतांच्या किमतींमध्ये भरमसाठ वाढ झालेली आहे. २५ टक्क्यांपासून थेट 85 टक्क्यांपर्यंत वाढ करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम केले जात आहे. खतांच्या किमती सरकारने लवकरात लवकर कमी केल्या पाहिजेत किंवा सबसिडी दिली पाहिजे. लिंकिकमध्ये वेगळाच प्रकार आहे.कृषी केंद्राला दोषी ठरवले जाते... कारखानदार हा या सर्व बाबींमध्ये दोषी आहे. कृषी केंद्रावर कारवाई न करता कारखानदारावर कारवाई करण्यात यावी. *ऑन बच्चू कडू पक्ष विलीनीकरण चर्चा* बच्चू कडू यांना सल्ला देण्याची आवश्यकता नाही. ते शेतकऱ्यांसाठी काम करत असतात. योग्य तो निर्णय ते घेतील. स्वतःच्या निर्णयाबाबत त्यांच्या कार्यकर्त्यांचे काय म्हणणे आहे, त्यानुसार ते निर्णय घेतील. *ऑन सायबर पोलीस पथक भांडण* माझ्या कानावर काही गोष्टी आलेल्या आहेत. सविस्तर माहिती देतो आणि मग बोलतो. *ऑन ऑटो चालक मराठी सक्ती* मराठी सक्तीचा विषय आहे. १ मेपासून लागू होणार होता. चर्चा झाली आणि पुढे ढकलण्यात आलेला आहे. मराठी सक्तीच्या बाबतीत जुजबी मराठी तरी बोलता आली पाहिजे..आठ दहा वाक्येतरी मराठीत बोलता आल पाहिजेत त्या टॅक्सीधारकाला ती यायला पाहिजेत... तेही बोलणार नाही, तर ही भावना बरोबर नाही. महाराष्ट्रात जेव्हा तुम्ही राहता, तिथली मराठी भाषा. मराठी भाषेचे आठ-दहा वाक्ये शिकायला अडचण नसली पाहिजे... निबंध थोडीच लिहायचा आहे. मराठी भाषेचे किमान आठ दहा शब्द त्यांना बोलता यायला हवे.0
0
Report
चंद्रपुर किडनी रैकेट: डॉक्टर रविंद्रपाल सिंग की जमानत नागपुर हाईकोर्ट ने ठुकराई
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील रोशन कुडे याच्या किडनी विक्रीतून उघडकीस आलेल्या रॅकेटमधील मुख्य संशयित आरोपी डॉ. रविंद्रपाल सिंगचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी फेटाळून लावला. या निर्णयामुळे त्याच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला असून, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक डॉ. सिंगच्या अटकेसाठी रवाना झाले आहे. नागभीड येथील रोशन कुडे याची किडनी कंबोडिया येथे काढल्याचे समोर आल्याच्यापर्यंत या प्रकरणाची व्याप्ती वाढली होती. भारतातील त्रिची येथील STAR KIMS हॉस्पिटलमध्ये डॉ. रविंद्रपाल सिंग आणि डॉ. राजरत्नम गोविंदसामी हे किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पाडत असल्याचे तपासात उघड झाले होते. डॉ. सिंग याला दोनदा अंतरिम जामीन मिळाला होता. मात्र, कायदेशीर पेच निर्माण झाल्याने दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाला. तब्बल २० सुनावण्यांनंतर न्यायालयाने हा अटकपूर्व जामील अर्ज फेटाळला आहे.0
0
Report
Advertisement
