Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळच्या आर्णीत भाजपाची पहिली यादी, आमदाराचा नामांचा गहजब!

Oct 22, 2024 13:19:11
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या आर्णी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत विद्यमान आमदाराचे नाव नाही. यामुळे महायुतीतील शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केला आहे. तिन्ही तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन उपजिल्हाप्रमुख विष्णू उकंडे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. पालकमंत्री संजय राठोड यांचेही या जागेसाठी आग्रह आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, जागा सुटली नाही तरी शिवसेना उमेदवार निवडणूक लढवेल.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ADANIRUDHA DAWALE
Mar 02, 2026 15:15:51
Amravati, Maharashtra:अमरावती शहराचे ग्रामदैवत असलेल्या आंबा देवी संस्थान समोर परंपरेप्रमाणे नवसाच्या होळीचे दहन; महिनाभर नवस बोलून रचली जाते होळी अमरावती शहराचे ग्रामदैवत असलेल्या आंबा देवी संस्थान समोर दररोज प्रमाणे याहीवर्षी परंपरेप्रमाणे नवसाच्या होळीचे दहन करण्यात आले आहे. माघ पौर्णिमेपासून या होळी उत्सवाची औपचारिक सुरुवात होत असून यंदा १ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रतिष्ठापना करण्यात आली होती. नवसाची होळी म्हणून या होळीची ओळख असून महिनाभर नवस बोलून भाविक नारळ करतात. होळीच्या मध्यभागी हेटीच्या झाडाचे खोड रोवले जाते त्याचा धूर औषधी मानला जातो अशी श्रद्धा आहे. शास्त्रोक्त विधीने शेणाच्या गोवऱ्या, लाकडे व गाठींची रचना करून होळी उभारली जाते. महिला भाविकांची मोठी गर्दी इच्छा पूर्ण झालेल्या महिला होळीची ओटी भरतात अनेक महिला आगामी मनोकामनेसाठी नवस बोलून नारळ वाहतात अंबा देवी मंदिर संस्थांच्या नोंदीनुसार ही परंपरा सुमारे १२5 वर्षांहून अधिक काळा पासून अखंड होळी सुरू आहे. आज या होळीची सूर्यास्तावेळी विधीवत पूजा करून होळी दहन करण्यात आले असून यावेळी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 02, 2026 15:01:41
Nagpur, Maharashtra:नागपूर में SBL कंपनी में स्फोटातल्या जखमींना भेटण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑरेंज सिटी हॉस्पिटलला पोहोचले. डॉक्टरांकडून जखमींच्या प्रकृतीची माहिती जाणून घेतली. 19 जणांचा मृत्यू झाला आहे. इथे अजून 17 जणावर उपचार सुरू आहेत; सर्व क्रिटिकल आहेत. 21 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे; मॅनेजिंग डायरेक्टरसह 11 जणांना अटक झालीय. काही लोकं फरार आहेत; नुकसान भरपाई देण्याचं जाहीर केलं आहे. मागील घटना पाहता, या प्रकियेकडे अवलोकन करण्याची गरज आहे. केंद्राचे कायदे अनुषंगाने बदल केले पाहिजेत; अभ्यासपूर्ण रिपोर्ट्स केंद्राला पाठवले जाणार आहेत. बॉक्स पडला तरी मोठा स्फोट होऊ शकतो; ऑटोमेशन करण्याच्या अनुषंगाने बदल केल्या येतील का यावर केंद्राला अहवाल पाठवला जाईल. नियम जुने झाले आहेत; ज्वलनशील पदार्थांची तयारी आस्तित्वात असल्यामुळे सगळे गरीबांना सुरक्षित उपचार उपलब्ध करावेत, याबद्दल विचार केला पाहिजे. पेसो आणि डिशचे दुर्लक्ष असल्याचं मुद्दा मांडला गेला. पेसोने आपले प्रोटोकॉल रिवाईज करायचे आहेत; हे गरजेचे आहे. 2008 साली नियम होते, आजच्या स्तरावर तेच प्रोटोकॉल तपासायला हवेत. मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली; कडक कारवाई नक्की होईल. भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून उपाययोजना चालू असावी. मागील स्फोटानंतर ऑडिट झाले पाहिजे; मानव त्रुटी टाळण्यासाठी काय करायचं ते पाहणार आहेत.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 02, 2026 14:33:36
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदी काठावर असणाऱ्या प्रोसेस व केमिकल कंपन्या, औद्योगिक वसाहती तसेच साखर कारखान्यांकडून रसायनयुक्त सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याने गंभीर प्रदूषण होत आहे. परिणामी नदीकाठच्या गावांमध्ये साथीचे आजार पसरत आहेत. या प्रकरणी दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघठनाच्या कार्यकर्त्यांनी केलीय. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेऊन संबंधित घटकांवर तातडीने कारवाई करा अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य, शेती व जलचरांवर परिणाम होत असून त्वचारोग, अतिसार, ताप व कावीळसारखे आजार वाढले असल्याचं देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेंन आपल्या निवेदनात म्हटले आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 02, 2026 14:32:01
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Mar 02, 2026 14:17:34
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 02, 2026 14:01:10
Kolhapur, Maharashtra:आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे दीडशे नागरिक विविध ठिकाणी अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात अल्या आहेत. आखाती देशांमध्ये अडकलेल्या सुमारे 150 कोल्हापूरकरांपैकी 130 जणांची अधिकृत माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला प्राप्त झाली आहे. या सर्व नागरिकांशी प्रशासन सातत्याने संपर्कात असून ते सुरक्षित असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता संबंधित नागरिकांशी संपर्क साधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. राज्य शासनाकडून मिळणाऱ्या सर्व सूचनांची तंतोतंत अंमलबजावणी केली जात असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 02, 2026 13:51:10
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 02, 2026 12:48:16
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील विसापूर फाटा रोडवर बिबट्याने केली गायीच्या बछड्याची शिकार, वन पथकाने माहिती मिळताच नागरिकांना केले सतर्क अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातल्या विसापूर फाटा रोडवरील वननर्सरीच्या समोर बॉटनिकल गार्डन आवार भिंतीजवळ बिबट्याने भर रस्त्यावर गायीच्या बछड्याची शिकार केली. गस्तीवर असलेल्या वनरक्षक वर्षा पिंपरे व त्यांच्या टीमने घटनेची माहिती मिळताच तत्काळ दाखल होऊन प्रवाशांना सावध केले. हा परिसर गेल्या काही वर्षापासून बिबट्याच्या सतत वावराने दहशतीखाली आहे. बॉटनिकल गार्डन भिंत, राख डेपो आणि विटा भट्टी परिसरात बिबट भटकत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे स्थानिकांत भीतीचे वातावरण आहे. गावातील मांस-मटण दुकानातील जैविक कचरा इथं टाकला जातो, यामुळे कुत्रे आणि वन्यजीव शिकारीच्या शोधात इथे येतात. संबंधित विभागाने तात्काळ लक्ष देऊन कचरा व्यवस्थापनासह उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जात आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 02, 2026 12:21:02
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगररंगांमध्ये होळीचा मोठा उत्साह बघायला मिळत आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके ही होळीसाठी नंदुरबार जिल्ह्या दौऱ्यावर आले आहेत. उईके हे सातपुड्यातील आदिवासी बांधवांसोबत होळी साजरा करणार आहेत. होळी सणा निमित्ताने धडगाव शहरातून निघणाऱ्या भोंगऱ्या बाजारातील शाही मिरवणुकी त्यांनी अन्य लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांसह सहभाग नोंदवला. सातपुड्याच्या पर्वतरांगांमधील आदिवासी बांधव होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करीत आहेत. होळी सणानिमित्त सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या धडगाव शहरात भोंगऱ्या बाजाराची मोठी धूम पाहायला मिळाली. या निमित्ताने आदिवासी बांधवांनी आपली ऐतिहासिक आणि पारंपरिक शाही मिरवणूक अत्यंत उत्साहात काढली. या मिरवणुकीत गावाचे पाटील भीमसिंग पराडके आणि आमदार आमश्या पाडवी यांच्यासह परिसरातील आदिवासी सरदारांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग नोंदवला. हातातील काठ्या आणि कमरेला बांधलेले घुंगरू यांच्या आवाजासह, भले मोठे ढोल आणि वाद्यांच्या तालावर आदिवासी बांधव धुंद होऊन नाचले. आधुनिक काळातही आपली मूळ संस्कृती आणि डोंगराच्या बाजाराची परंपरा आजही धडगावमध्ये कायम असल्याचे चित्र पाहायला मिळाले. या शाही मिरवणुकीने संपूर्ण शहरात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवले असून, हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीने हा मिरवणूक पार पडला. Prashant Paredashi, Nathurbar.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Mar 02, 2026 12:05:44
Vasai-Virar, Maharashtra:पालघर जिल्ह्यात भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा संप आज तीव्र झाल्याचे चित्र आहे. वसई, पालघर, डहाणू आणि तलासरी तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आज होळीच्या दिवशी कामकाज बंद ठेवत संप पाळला. कर्मचाऱ्यांनी एकत्र येत पालघर जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांची भेट घेतली आणि विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. भूमी अभिलेख कार्यालयातील कामकाजात वाढत चाललेले खाजगीकरण, समान काम समान वेतन आणि कामाचा वाढता ताण या प्रमुख मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. या संपामुळे नागरिकांच्या भूमीविषयक कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. शासनाने मागण्या पूर्ण न केल्यास हा संप पुढे कायम ठेवणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे..
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top