Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळच्या आर्णीत भाजपाची पहिली यादी, आमदाराचा नामांचा गहजब!

Oct 22, 2024 13:19:11
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या आर्णी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत विद्यमान आमदाराचे नाव नाही. यामुळे महायुतीतील शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केला आहे. तिन्ही तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन उपजिल्हाप्रमुख विष्णू उकंडे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. पालकमंत्री संजय राठोड यांचेही या जागेसाठी आग्रह आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, जागा सुटली नाही तरी शिवसेना उमेदवार निवडणूक लढवेल.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SGSagar Gaikwad
Mar 15, 2026 03:16:13
Nashik, Maharashtra:भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी नाशकात लवकरच 'डॉग हाऊस तयार करण्यात येणार आहे...जिल्ह्यात दर महिन्याला सरासरी ६,५०० श्वानदंशाच्या घटना घडतात. त्यामुळे नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत न्यायालयाने संस्था, रुग्णालये, क्रीडा संकुले, बसस्थानके व रेल्वे स्थानकांसारख्या सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार येथील धोकादायक कुत्र्यांना कायमस्वरपी बंदिस्त ठेवण्याची परवानगी दिल्याने मनपातर्फे नाशिकच्या विल्होळी जकात नाका येथील जागेत कुत्र्यांना ठेवण्यासाठी 'डॉग हाऊस' प्रस्तावित करण्यात आले आहे....राज्यभरात वाढलेल्या श्वानदंशाच्या घटनांमुळे सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करीत काही सूट देत धोकादायक कुत्र्यांना कायमस्वरूपी बंदिस्त ठेवण्यास मान्यता दिली आहे. त्यासाठी स्वतंत्र जागेवर बांधकाम करीत त्या कुत्र्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांनी सांभाळावी असे निर्देश देण्यात आले असून त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना वेळेचे बंधनही घालण्यात आले आहे....
29
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 15, 2026 03:02:20
Amravati, Maharashtra:आखाती युद्धाचा परिणाम अमरावतीतील एकविरा देवी संस्थेच्या महाप्रसादावर; प्रसादाच्या पदार्थांमध्ये मोठी कपात, पुढील चार दिवस पुरेल इतकाच गॅस सिलेंडरचा साठा शिल्लक आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता अमरावती शहरातही जाणवू लागला आहे. शहरातील श्री एकविरा देवी संस्थेच्या महाप्रसाद अन्नछत्रावरही त्याचा परिणाम झाला असून स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे महाप्रसादातील पदार्थांमध्ये कपात करण्यात आली आहे. पूर्वी भाविकांना महाप्रसादात वरण-भात, भाजी, पोळी, कळी तसेच एक गोड पदार्थ दिला जात होता. मात्र सध्या सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने भाविकांना खिचडी, पिठलं आणि एक गोड पदार्थ असा मर्यादित महाप्रसाद दिला जात आहे. संस्थानकडे सध्या केवळ पुढील चार दिवस पुरेल इतकाच गॅस सिलेंडरचा साठा शिल्लक असल्याची माहिती व्यवस्थापकांनी दिली. दरम्यान, सिलेंडर संपल्यास चुलीवर स्वयंपाक करूनही भाविकांसाठी महाप्रसाद सुरूच ठेवण्याचा निर्णय संस्थानकडून घेण्यात आला आहे.
167
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 15, 2026 02:03:07
Yeola, Maharashtra:येवला शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढत असून पुन्हा एकदा गंभीर घटना समोर आली आहे. येवला शहरात एका वृद्ध नागरिकावर पाच ते सहा भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात वृद्ध नागरिक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.दरम्यान, ही संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच कुणाल दराडे यांनी त्वरित रुग्णालयात धाव घेत जखमी वृद्धाला मदत केली तरी येवला शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर नगरपालिका प्रशासनाने करावा अन्यथा सर्व कुत्रे धरून नगरपालिकेत सोडू अशा इशारा यावेळी शिवसेनाचे उपजिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी दिला आहे.
123
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 15, 2026 02:02:55
Yeola, Maharashtra:येवला तालुक्यातील पाटोदा येथील श्रीरामनगर परिसरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम कथा आयोजित केली आहे विदर्भ रत्न रामायणाचार्य हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक यांच्या मधुर वाणीतून श्रीराम कथेचा लाभ भाविकांना घेता येणार आहे दिनांक 19 मार्च 2026 ते 27 मार्च 2026 पर्यंत कथा आयोजित केली असून सर्व भाविकांनी या कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे स्वामी जनेश्वरगिरी महाराज व लखनगिरी महाराज यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण व पूजन संपन्न झाला असून ध्वजारोहण व पूजन प्रसंगी परिसरातील साधू महंत वारकरी संप्रदायातील संत सह राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते
133
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 15, 2026 02:02:37
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर च्या माळीवाडा परिसरात वृद्ध व्यक्तीचे तीन लाख रुपये घेऊन पसार झालेल्या भामट्याला कोतवाली पोलिसांनी जेरबंद करून वृद्ध व्यक्तीचे लुटलेले तीन लाख रुपये वापस केले आहेत पुण्याच्या शिरूर तालुक्यातील बाजीराव पोकळे मुलीच्या उपचारासाठी तीन लाख रुपये घेऊन नगर शहरात आले होते त्यांना ओळखीच्या लाला सुद्रिक याने चहा पिण्याच्या बहाण्याने बाजूला नेऊन त्यांच्याजवळ असलेले तीन लाख रुपये हिसकावले आणि पसार झाला झालेला प्रकाराबद्दल पोकळे यांनी कोतवाली पोलीसात गुन्हा दाखल केला या गुन्ह्यांचा तपास करताना गुन्हे तपास पथकाने सुद्रिक याला कर्जत तालुक्यातून ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून पोकळे यांचे लुटलेले तीन लाख रुपये देखील हस्तगत केले आणि पोकळे यांना वापस केले आहेत पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा शहरात कौतुक होत आहे
77
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 15, 2026 01:46:14
261
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 15, 2026 01:45:27
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर :वीज तारांच्या घर्षणामुळे गहू पिकाला भीषण आग,दीड एकर गहू पीक गळून खाक अँकर :छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील कोळी बोडखा शिवारात वीज तारेच्या घर्षणामुळे भीषण आग लागून शेतकऱ्याचे उभे गहू पीक जळून खाक झाले आहे. काढणीच्या तोंडावर आलेले तब्बल दीड एकर गहू या आगीत राख झाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. केकत जळगाव येथील शेतकरी कारभारी भिमराव बढे यांची कोळी बोडखा शिवारात शेती असून त्यातील गव्हाच्या शेतात दुपारी तीन वाजेच्या सुमारास वीज तारेचा घर्षण होऊन ठिणगी पडली आणि काही क्षणातच शेतात आग भडकली. परिसरातील शेतकरी तात्काळ घटनास्थळी धावून येत आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत संपूर्ण पीक जळून खाक झाले होते. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून संबंधित विभागाने तात्काळ पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वीज तारा आणि यंत्रणेची दुरुस्ती करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. बाईट :शेतकरी
166
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 14, 2026 17:16:30
Shirur, Maharashtra:भीमाशंकर मंदिर दुरुस्तीच्या कामामुळे सर्वसामान्य भाविकांसाठी गेल्या अडीच महिन्यांपासून मंदिर बंद ठेवण्यात आले होते। तथापि भाजपचे खासदार डॉ. निशिकांत दुबे यांना मंदिर खुले करून व्हीआयपी दर्शन देण्यात आल्याचा आरोप होत आहे। डॉ. निशिकांत दुबे हे झारखंड च्या गोड्डा मतदार संघातून चार वेळा भापकडून निवडून आलेले खासदार आहेत। सभामंडप व पायरी मार्गाच्या बांधकामासह भाविकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी ९ जानेवारी २०२६ पासून तीन महिन्यांसाठी भीमाशंकर मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता। त्यामुळे हजारो किलोमीटर पायी व सायकल वारी करून येणाऱ्या भाविकांनाही दर्शन न घेता परत जावे लागत आहे। अशातच हेलिकॉप्टरने आलेल्या खासदार डॉ. निशिकांत दुबे यांना विशेष परवानगी देऊन मंदिरात दर्शन घडवण्यात आल्याने भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। राजकीय नेत्यांसाठी मंदिर खुले आणि सर्वसामान्यांसाठी बंद का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। महादेवाच्या मंदिरात दुजाभाव का? प्रशासनावर भाविकांचा संताप व्यक्त होत आहे
192
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 14, 2026 17:02:50
Chandrapur, Maharashtra:व्यावसायिक सिलेंडरच्या तुटवड्याने केली पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांची चंद्रपुरात भोजन गैरसोय, सामाजिक कार्यकर्ते जयदीप रोडे यांनी मित्र परिवाराकडून सिलेंडर एकत्र करत उमेदवारांची केली सोय अँकर: आखातातील युद्धामुळे व्यावसायिक सिलेंडरच्या तुटवडा निर्माण झालाय. यामुळे पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांची चंद्रपुरात भोजन गैरसोय झाली. सामाजिक कार्यकर्ते जयदीप रोडे यांनी मित्र परिवाराकडून सिलेंडर एकत्र करत उमेदवारांची सोय केली. 15 मार्च अर्थात रविवारी चंद्रपुरात पोलीस भरतीसाठीची लेखी परीक्षा आहे. त्यासाठी हजारो-युवक युवती चंद्रपुरात दाखल झाले आहेत. याआधी शारीरिक चाचणी दरम्यानही सलग पंधरा दिवस जयदीप रोडे यांनी निःशुल्क निवास आणि भोजन व्यवस्था राबविली होती. मात्र ताज्या गॅस सिलेंडर तुटवड्याने अचानक आलेल्या संकटाचा रोडे यांनी मित्र परिवाराच्या साथीने मुकाबला केला. राज्यभरातून आलेल्या 400 वर विद्यार्थ्यांनी मात्र यासाठी रोडे यांचे आभार मानले आहेत.
214
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Mar 14, 2026 17:02:18
Buldhana, Maharashtra:बुलढणा. डॉ बाळासाहेब आंबेडकर पत्रकार परिषद. 23 तारखेला नागपूर में RSS कार्यालयावर आंदोलन करणार आहे. एपस्टीन फाईल में नरेंद्र मोदी सह केंद्रीय मंत्र्यांची नाव आहेत. त्यामुळे भारताचे नाक कापले असून प्रतिमा मलिन झाली आहे. एपस्टीन फाईल मध्ये जे वर्णन केलेलं आहे, ते मोदी संदर्भात घडलेले आहे का. फाईल मध्ये अधिकचे वर्णन आहे. त्यांना ब्लॅकमेल केले जास्त असून असा पंतप्रधान नको आहे, तो देशाला घातक आहे. 23 तारखेला आम्ही विचारणार आहे. पंतप्रधानाचे चारित्र्य बसते का. कारवाई का केली नाही. याचा जाब विचारणार आहे. मध्यम वर्गीयांना आवाहन आहे. आतापर्यंत भारतात अशी परिस्थिती बघितली नाही. खोटे स्वप्न मध्यम वर्गीयांना दाखवण्यात आलेले आहे. कुटुंब सुरक्षित नाही, याची जाण ठेवी पाहिजे. पंतप्रधान सुरक्षित नाही. पंतप्रधान चे चारित्र्य सुद्धा योग्य नसेल तर मध्यम वर्गीयांनी यावा. मोहन भागवत यांना विचारणार आहे की तुम्ही संस्कृत शिकवता राष्ट्रप्रेम शिकवता मग मोदी वर कारवाई कधी करणार. इलेक्शन मध्ये RSS चे कार्यकर्ता जास्त दिसतो पण BJP चे कमी दिसते. मोहन भागवत यांनी आमच्या आंदोलनात उतरावे , आम्ही त्यांचे स्वागत करु. आमच्यात आणि RSS मध्ये वैचारिक मतभेट मात्र दुष्मानी नाही. आंदोलनात काँग्रेस , आप, डावे पक्ष, 22 संघटना उपस्थित राहता. मोहन भागवत यांना आम्ही आग्रह धरणार आहे की पंतप्रधान बदला. बाई ट डॉ बाळासाहेब आंबेडकर, वंचित नेते.
161
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 14, 2026 16:32:38
Satara, Maharashtra:सातारा - पाटणमध्ये शहीद जवानाला अभिवादन करून पालकमंत्री शंभूराज देसाई साताऱ्याच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या भरतगाव रस्त्यावर दुचाकीचा अपघात झालेला त्यांच्या नजरेस पडला. अपघात पाहताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपला ताफा थांबवला आणि थेट जखमी दुचाकीस्वाराकडे धाव घेतली. जखमी व्यक्तीची त्यांनी आपुलकीने विचारपूस करत “तब्येत ठीक आहे का?” अशी चौकशी केली आणि त्याला धीर दिला. यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या त्या दुचाकीस्वाराला तात्काळ आपल्या ताफ्यातील गाडीत बसवून उपचारासाठी जवळच्या दवाखान्यात पाठवण्याच्या सूचना दिल्या. राजकारणाच्या धावपळीतही दाखवलेली ही माणुसकी आणि तत्परता पाहून परिसरातील नागरिकही भावूक झाले. अपघातग्रस्ताला दिलेल्या या तात्काळ मदतीमुळे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक केले जाते
179
comment0
Report
Advertisement
Back to top