445001
यवतमाळच्या आर्णीत भाजपाची पहिली यादी, आमदाराचा नामांचा गहजब!
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या आर्णी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत विद्यमान आमदाराचे नाव नाही. यामुळे महायुतीतील शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केला आहे. तिन्ही तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन उपजिल्हाप्रमुख विष्णू उकंडे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. पालकमंत्री संजय राठोड यांचेही या जागेसाठी आग्रह आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, जागा सुटली नाही तरी शिवसेना उमेदवार निवडणूक लढवेल.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नागपुर विधान परिषद उपचुनाव: पांच उम्मीदवारों के नामांकन, मतदान 18 जून
Nagpur, Maharashtra:नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघातून महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी आज दुपारी ३ वाजेपर्यंत पाच उमेदवारांचे सहा नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले. यात राजीव पोतदार (भारतीय जनता पार्टी), राजेश जंगले (अपक्ष), सुरेंद्र लोही (अपक्ष), दिनेश ढोले (इंडियन नॅशनल काँग्रेस), अतुल लोंढे (इंडियन नॅशनल काँग्रेस) या उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. यात भारतीय जनता पार्टीकडून राजीव पोतदार यांनी दोन नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत. अर्जांची छाननी मंगळवार 2 जून रोजी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख गुरूवार 4 जून आहे. या पोटनिवडणुकीसाठी मतदान गुरूवार दि. 18 जून रोजी होत असून सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतमोजणी सोमवार, 22 जून रोजी करण्यात येईल.0
0
Report
शिरूर के करडे घाट में गैंगवार: गोलीबारी, एक की मौत
Shirur, Maharashtra:करडे घाटात गुन्हेगारी संघर्ष; दोन गुन्हेगार गटांच्या वादातून गोळीबार, एकाचा मृत्यू शिरूर तालुक्यातील करडे घाट परिसरात दोन गटांमधील जुन्या वादाचे पर्यवसान थेट गोळीबारात झाले. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर य्त असून परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून हल्लेखोरांचा शोध आणि घटनेचा तपास सुरू आहे.या घटनेमुळे शिरूर तालुक्यात पुन्हा एकदा गुन्हेगारी टोळ्यांच्या वर्चस्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे...0
0
Report
विक्रोलि पेट्रोल पंप पर कांग्रेस का बैलगाड़ी प्रदर्शन, मोदी सरकार के खिलाफ रास्ता रोको
Mumbai, Maharashtra:पेट्रोल, डिझेल, सीएनजी व घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरवाढी विरोधात काँग्रेसचे विक्रोळीत पेट्रोल पंपावर बैलगाडी, घोडागाडी आंदोलन करत रास्ता रोको पेट्रोल, डिझेल, सीएनजी व घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या सततच्या दरवाढीच्या विरोधात आज काँग्रेस ने विक्रोळीत पेट्रोल पंपावर बैलगाडी, घोडागाडी वर बसून तसेच टू व्हीलर बाइक हात गाडीवर ठेवून काँग्रेसने मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको करण्यात आला.0
0
Report
Advertisement
सांगली ST कार्यालय में महिला से शारीरिक मांग के आरोप में वरिष्ठ क्लर्क की पिटाई
Sangli, Maharashtra:स्लग - एसटी आगारातील महिलेकडे शरीर सुखाची मागणी, संतप्त नातेवाईकांनी कर्मचाऱ्याला कार्यालयात जाऊन बदडले.. सांगलीच्या एसटी आगारात एका वरिष्ठ लिपिकाला एसटी कार्यालयातच बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. एसटी महामंडळातल्या एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपावरून महिलेच्या संतप्त नातेवाईकांकडून ही मारहाण करण्यात आली आहे. कदम naamक लिपिकाकडून एसटी कार्यालयात कर्मचारी असणाऱ्या एका महिलेला गेल्या दोन वर्षांपासून मानसिक आणि शारीरिक त्रास देत आहे; वरिष्ठांकडे याबाबत तक्रार करून देखील कोणतीच कारवाई होत नसल्याने संतप्त महिलेच्या नातेवाईकांनी आज थेट एसटी कार्यालयात पोहोचत, संबंधित लिपिकास बेदम चोप दिला आहे त्याचबरोबर या कर्मचाऱ्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे नातेवाईकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. एसटी कार्यालयात महिलेच्या बाबतीत घडणाऱ्या या प्रकाराबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मात्र मौन बाळगण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.0
0
Report
बारामती पश्चिम पट्टी में असामयिक बारिश-गारपीट से किसानों को भारी नुकसान
Rui, Maharashtra:बारामतीच्या पश्चिम पट्ट्याला अवकाळी पावसाचं गारपिटीचा फटका..... युगेंद्र पवाराकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जातं नुकसानीची पाहणी..... बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात रविवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपיטיने मोठा तडाखा दिलाय.विशेषतः होळ, सदोबाचीवाडी, वडगाव निंबाळकर, निंबूतसह परिसरातील गावांमध्ये गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. भाजीपाला पिकांसह फळबागा जमिनीवर आडव्या झाल्यात. यानंतर शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी होळ, सदोबाचीवाडी, वडगाव बुद्रुक यासह इतर परिसरात शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन या नुकसानीची पाहणी केली आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधत युगेंद्र पवार यांनी एकूणच परिस्थितीचा आढावा घेतलाय.0
0
Report
यवतमाळ विधानपरिषद के लिए काँग्रेस के साहेबराव कांबळे ने नामांकन दाखिल किया
Yavatmal, Maharashtra:महाविकास आघाडी कडून यवतमाळ विधानपरिषदेकरिता काँग्रेस चे साहेबराव कांबळे यांनी खासदार संजय देशमुख, आमदार बाळासाहेब मांगूळकर, आमदार संजय देरकर, माजी मंत्री माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नगरसेवक पदाधिकारी यांचा मेळावा झाल्यानंतर कांबळे यांनी नामांकन दाखल केले.0
0
Report
Advertisement
नेताओं के नाम से बने नकली बर्थडे कार्ड वायरल: प्रचार खेल
Shirdi, Maharashtra:प्रसिद्धीची हाव आली तरुणाच्या अंगलट... भारतीय राजमुद्रेचा आणि राजकीय नेत्यांच्या नावाचा गैरवापर केल्याने गुन्हा दाखल... प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने बनवले शुभेच्छापत्र... AI च्या मदतीने बनवले स्वतःच्या वाढदिवसाचे बनावट शुभेच्छापत्र... बनावट शुभेछापत्र केले शोषल माध्यमावर व्हायरल... संगमनेर तालुक्यातील मांडवे येथील विश्वजित धुळगंड याच्यावर गुन्हा दाखल... भारतीय राजमुद्रेचा आणि राजकीय नेत्यांच्या नावाचा गैरवापर केल्या प्रकरणी गुन्हा दाखल... पोलिसांनी विश्वजित धुळे गेल्याला घेतले ताब्यात... प्रसिद्धीसाठी बनावट शुभेच्छापत्र बनवणारा खासदार निलेश लंके यांचा समर्थक आला अडचणीत..0
0
Report
सोलापुर विधान परिषद चुनाव में महाविकास आघाड़ी में घमासान, कई प्रत्याशी दाखिल
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीत गोंधळ\n\nमहाविकास आघाडीत सोलापूरची जागा काँग्रेसला सुटलेली असताना देखील राष्ट्रवादी शरद पवारगटाकडून देखील उमेदवारी दाखल तर\n\nतर बार्शीतील शिवसेना ठाकरेना गटाच्या नेत्यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय\n\nमहाविकास आघाडीमध्ये काँग्रेस कडून आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज दाखल केलाय तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख यांनी AB फॉर्म सहित अर्ज दाखल केलाय\n\nतर दुसरीकडे भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांचे कट्टर विरोधी असलेले बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांचे निकटवर्तीय नागेश अक्कलकोटे यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय\n\nराष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अर्ज भरण्यासाठी सांगितलं असल्याने अर्ज भरत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत देशमुख यांनी दिली \n\nतर ‘उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कोणतीही चर्चा झालेली नाही पण उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी दोन दिवस मुदत आहे‘\n\n’पक्षातील नेते चर्चा करतील आणि महाविकास आघाडीकडून एकच अर्ज राहिलं.. दहशतीपोटी कोणी अर्ज माघार घेईल, त्यामुळे एकत्रित सर्वानी अर्ज भरलेत‘\n\nअशी प्रतिक्रिया बार्शीचे ठाकरेना गटाचे नगरसेवक आणि विधानपरिषदेचे उमेदवार नागेश अक्कलकोटे यांनी दिली.\n\nआदित्य फत्तेपुरकर ( अधिकृत काँग्रेस उमेदवार )\n\nवसंत देशमुख, उमेदवार, राष्ट्रवादी शरद पवार गट ( गळ्यात तुतारी शेला )\n\nनागेश अक्कलकोटे, अपक्ष उमेदवार तथा ठाकरेंसना गटाचे नेते\n\nधनंजय डिकोळे ( UBT नेते ) ( अपक्ष उमेदवारी दाखल ) ( चष्मा घातलेले, गळ्यात मशाल शेला )0
0
Report
चासकमान डैम के पानी आवंटन में योजना कमी, किसानों ने प्रदर्शन
Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी वाटपामध्ये नियोजनाचा मोठा अभाव असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या ढिसाळ कारभाराविरोधात मुखई, जातेगाव, करंदी आणि शिक्रापूर परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी शिक्रापूर येथील चासकमान पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. 'पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे' अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. मागील दोन महिन्यांपासून काळव्यातून पाण्याचे आवर्तन न सोडल्यामुळे उन्हाळ्यात ऊस, भाजीपाला आणि फळबागा जळून खाक होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला. आंदोलनादरम्यान शेतकरी आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली, ज्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. प्रशासनाने तातडीने पाण्याचे आवर्तन जाहीर न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.0
0
Report
Advertisement
मन नदी में अवैध खनन: ग्रामस्थों ने प्रशासन से तुरंत जांच-कार्रवाई की मांग
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील बेलखेड परिसरातून वाहणाऱ्या मन नदीत अवैधरित्या उत्खनन सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी अकोला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत सदर उत्खनन तात्काळ थांबविण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मन नदीतील गाळ काढण्यास परवानगी दिली असतानाही संबंधितांकडून वाळू आणि मुरूम उपसा केला जात असल्याचा आरोप निवेदनातण्यात आला आहे. नदीपात्रातील मोठ्या प्रमाणावरील उत्खननामुळे पर्यावरणीय समतोल बिघडण्याची तसेच भूजल पातळीवर परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. ग्रामस्थांच्या मते, नदीपात्रातील वाळू आणि मुरूम काढल्यामुळे भविष्यात जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी होईल. परिणामी परिसरातील अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून अवैध उत्खननावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.0
0
Report
लातूर में नीट पेपरफुटी रैकेट: लाखों की वसूली, स्पेशल बैच और गैस पेपर
Latur, Maharashtra:लातूरमधे डॉक्टर बनवण्याच्या स्वप्नांचा लातूरमध्ये सौदा ?... नीट पेपरफुटी तपासात धक्कादायक खुलासे.... स्पेशल बॅच चा संशयास्पद फॉर्म्युला... लाखो रुपये भरणाऱ्यांसाठी स्वतंत्र ग्रुप, गेस पेपर आणि विशेष नोट्स... विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रेच ठेवली जात होती तारण ? सीबीआय तपासात धक्कादायक माहिती समोर... ५० हजारांपासून ते लाखो रुपयांची उकळपट्टी... नीटचे प्रश्न मिळवून देण्याच्या आमिषाचा आरोप... शिवराज मोटेगावकराच्या क्लासेसवर तपासाची धार... डॉक्टर बनण्याचं स्वप्न... आई-वडिलांची आयुष्यभराची कमाई... आणि त्या स्वप्नांवर डल्ला मारणारं एक भयानक रॅकेट आता उघड झालंय... लातूरच्या कथित नीट पेपरफुटी प्रकरणात आता असे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत, जे ऐकून कुणाच्याही अंगावर काटा येईल. प्रश्नपत्रिका मिळवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपये उकळलेलेच... पण काही विद्यार्थ्यांची मूळ शैक्षणिक कागदपत्रेच तारण ठेवून त्यांना अक्षरशः वेठीस धरलं जात होतं, अशी माहिती तपासातून समोर येत आहे. नेमकी काय होती ही पैशांची वसुली यंत्रणा ? विद्यार्थ्यांना कशाप्रकारे जाळ्यात अडकवलं जात होतं ? आणि सीबीआयच्या हाती नेमकं काय लागलं? पाहूया हा धक्कादायक रिपोर्ट... लातूर... वैद्यकीय शिक्षणासाठीचं मोठं केंद्र... दरवर्षी लाखो विद्यार्थी डॉक्टर होण्याचं स्वप्न घेऊन इथे दाखल होतात... आणि याच स्वप्नांच्या भोवती आता संशयाचं जाळं उभं राहताना दिसत है... नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात समोर आलेल्या सूत्राच्या माहितीनुसार, नियमित क्लास फी व्यतिरिक्त तब्बल 60 हजार रुपयांपासून ते थेड 5 लाखांपर्यंत अतिरिक्त भरलेल्या पैसे आणि विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र 'स्पेशल बॅच' तयार करण्यात आली होती. 'एम्स टॉपर' आणि 'अर्जुना'सारख्या खास ग्रुपमध्ये या विद्यार्थ्यांना जोडून विशेष नोट्स, प्रश्नसंच आणि कथितरित्या नीटशी संबंधित गेस पेपर पुरवले जात होते. इतकंच नव्हे, तर नीटचे प्रश्न आधीच मिळवून देण्याचं आमिष दाखवत विद्यार्थी आणि पालकांकडून लाखो रुपये आगाऊ घेतली जात असल्याची माहितीही तपासातून समोर आली आहे. डॉक्टर होण्याच्या स्वप्नाचा आधार घेत विद्यार्थी आणि पालकांच्या आर्थिक पिळवणूक केली जात होती याच वास्तव आता समोर आलय त्यामुळे मोटेगावकर याचे कारणामे आता हळूहळू बाहेर येऊ लागेले आहेत. बाईट ::- पालक डॉक्टर बनण्याचं स्वप्न दाखवून फक्त पैशांची उकळपट्टीच नव्हे, तर विद्यार्थ्यांना अक्षरशः वेठीस धरण्याही प्रकार या रॅकेटमध्ये सुरू होता, अशी धक्कादायक माहिती तपासातून समोर येत आहे...सूत्रांच्या माहितीनुसार, काही विद्यार्थ्यांची दहावी-बारावीची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला आणि इतर महत्त्वाची मूळ कागदपत्रे तारण म्हणून ठेवून घेतली जात होती. नीटचे प्रश्न मिळवून देण्याच्या बदल्यात ठरलेली रक्कम वसूल होईपर्यंत ही कागदपत्रे परत दिली जात नसल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे। सीबीआयच्या कारवाईदरम्यान अशा अनेक विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत असून, डॉक्टर होण्याच्या स्वप्नाचा फायदा घेत विद्यार्थी आणि पालकांना आर्थिक तसेच मानसिक दबावाखाली ठेवण्याचा हा प्रकार होता का, याचा तपास आता CBI कडून घेतला जात आहे.... डॉक्टर बनण्याचं स्वप्न दाखवून फक्त पैशांची उकळपट्टीच नव्हे, तर विद्यार्थ्यांना अक्षरशः वेठीस धरण्याही प्रकार या रॅकेटमध्ये सुरू होता, अशी धक्कादायक माहिती तपासातून समोर येत आहे...सूत्रांच्या माहितीनुसार, काही विद्यार्थ्यांची दहावी-बारावीची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला आणि इतर महत्त्वाची मूळ कागदपत्रे तारण म्हणून ठेवून घेतली जात होती. नीटचे प्रश्न मिळवून देण्याच्या बदल्यात ठरलेली रक्कम वसूल होईपर्यंत ही कागदपत्रे परत दिली जात नसल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. सीबीआयच्या कारवाईदरम्यान अशा अनेक विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत असून, डॉक्टर होण्याच्या स्वप्नाचा फायदा घेत विद्यार्थी आणि पालकांना आर्थिक तसेच मानसिक दबावाखाली ठेवण्याचा हा प्रकार होता का, याचा तपास आता CBI कडून घेतला जात आहे.... नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसं या कथित रॅकेटचं स्वरूप अधिक गंभीर असल्याचं चित्र समोर येत आहे... एका बाजूला लाखो रुपयांची उकळपट्टी, दुसऱ्या बाजूला 'स्पेशल बॅच', गेस पेपर, संशयास्पद प्रश्नसंच आणि विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे तारण ठेवण्याचे आरोप... या सर्व प्रकारामुळे डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या लोखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाला का, असा सवाल उपस्थित होत आहे. लातूरमध्ये शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत नेमकं कोण आणि किती मोठं जाळं कार्यरत होतं? या व्यवहारातून किती पैसा फिरला? आणि यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे ? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी सीबीआयचा तपास निर्णायक टप्प्यात पोहोचला असून या प्रकरणात आणखी काही मोठी नावं आणि धक्कादायक व्यवहार समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे...0
0
Report
छत्रपती संभाजी नगर में शिवसेना-भाजपा के बीच खींचतान बढ़ी: सत्तार के पुत्र भरते उमेदवारी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anchor: छत्रपती संभाजी नगर की विधान परिषद की पारंपरिक जागा शिवसेना की थी, पर यह स्थान भाजपा को मिल गई, जिससे शिवसेना में नाराज़गी है. आमदार अब्दुल सत्तार के पुत्रों ने सीधे उमेदवारी अर्ज भरला, महायुती में बंडाळी शुरू हो गई; भाजपा हमें मानसन्मान नहीं दे रही—अब्दुल सत्तार ने आरोप लगाए. छत्रपती संभाजी नगर में शिवसेना-भाजप में तकरार है; महापालिका चुनाव के अंतिम क्षणों में युति टूटी, जिले की परिषद चुनाव में शिवसेना को दूर रखा गया, अब विधान परिषद की शिवसेना की पारंपरिक जागा भाजपा ने अपने पास रख ली है. क्या शिवसेना-भाजप में संभाजी नगर में राजनीतिक टकराव बढ़ेगा—अब्दुल सत्तार ने कहा ऐसी नीति से शिवसेना खत्म नहीं होगी; उनके अनुसार जनता को नुकसान नहीं होगा. भाजपा से संजय शिरसाठ ने कहा कि सत्तार इस तरह न कहें; सत्तार अपने नेताओं की बात सुने. शिवसेना के विधायक वीर विलास भुमरे ने अलग भूमिका व्यक्त की: पार्टी ने महायुती के उम्मीदवार के पीछे रहने को कहा; हम उनके मत के साथ नहीं. आगे: शिवसेना और भाजपा में संभाजी नगर में खींचतान है; महापालिका और जिला परिषद चुनाव में भी वही स्थिति दिखी; अब विधान परिषद चुनाव में भी यही स्थिति है.0
0
Report
Advertisement
जयकुमार गोरे ने प्रणिती शिंदे पर तंज कसा: लोकतंत्र ने उन्हें अधिकार दिए हैं
Sangli, Maharashtra:प्रणिती शिंदे माझ्या लाडkaya भगिनी आहेत,त्यांना लोकशाहीने अधिकार दिलाय, त्यामुळे माझ्यावर त्या टीका करतात,असा खोचक टोला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांना लगावला. राजकीय अस्तित्व शोधण्यासाठी,कोणावर तरी बोलावं लागतं त्यामुळे चर्चा होते,त्यांच्या मतदार संघात, त्यांच्या मतांची संख्या चार आहे, त्यामुळे मीडियाच्या माध्यमातून अस्तित्व टिकवणं,आवश्यक असतं,त्यामुळे कोण काय बोलतो,यावर बोलणं आवश्यक वाटत नाही, असा खोचक टोला देखील मंत्री जयकुमार गोरे यांनी लगावला,ते सांगलीमध्ये बोलत होते.0
0
Report
अकोला जन्म-मृत्यु पंजीकरण विभाग की अव्यवस्थाएं सामने, सभापति ने तुरंत सुधार के निर्देश दिये
Akola, Maharashtra:अकोला महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील अनागोंदी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी अचानक विभागाला भेट देत पाहणी केली. यावेळी विभागात आलेल्या नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढाच सभापतींसमोर वाचला. जन्म व मृत्यू दाखले मिळवण्यासाठी नागरिकांना दोन ते तीन महिने हेलपाटे मारावे लागत असल्याची T क्रार, तसेच विभागात नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याचे, बसण्यासाठी व उन्हापासून बचावासाठी पुरेशी सुविधा नसल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. पाहणीदरम्यान सभापती विजय अग्रवाल यांनी विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची कानउघडणी करत कामकाजात सुधारणा करण्याचे निर्देश दिले. नागरिकांना वेळेत दाखले मिळावेत, तसेच मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.0
0
Report
कारंजा तालुके के कामरगांव में मानसूनपूर्व बारिश ने गर्मी से राहत दी
Washim, Maharashtra:वाशीम: वाशीम जिल्ह्यात एकीकडे तापमानाने 43 अंशांचा टप्पा ओलांडला असताना उष्णतेने नागरिक अक्षरशः हैराण झाले होते. मात्र, आज कारंजा तालुक्यातील कामरगाव परिसरात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावत नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झाला असून वातावरण आल्हाददायक झाले आहे. या पावसामळे खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला गती मिळणार असून शेतकऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.0
0
Report
Advertisement
