icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

लातूर में नल का पीला पानी: नागरिकों में नाराज़गी, आपूर्ति की जांच की मांग

Latur, Maharashtra:लातूर शहरातील काही भागात नळाला पिवळसर पाणी आले... नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण... महापालिका प्रशासनाविरोधात व्यक्त केली नाराजी लातूर शहरातील काही भागात आज नळाला पिवळसर पाणी आले... हे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही, असा प्रश्न या भागातील नागरिकांना पडला असून, महापालिका प्रशासनाविरोधात त्यांनी नाराजी व्यक्त केलीय…लातूर शहरातील शिवाजी नगर, सिग्नल कॅम्प, बोधे नगर, विवेकानंदपुरम आणि समता नगर या भागांमध्ये आज दुपारच्या सुमारास नळाला पिवळसर पाणी आल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.. बदललेल्या पाण्याच्या रंगामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे… महापालिका प्रशासनाने तात्काळ पाणीपुरवठ्याची तपासणी करून स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची मागणी नागरिकांनी केलीय
0
0
Report

मेळघाट में भीषण आग: दो घर जले, एक वृद्ध महिला की मौत

Amravati, Maharashtra:अमरावतीच्या मेळघाटात भीषण अग्नितांडव; दोन घरे जळून खाक, एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील आकी गावात काल रात्री भीषण अग्नितांद पाहायला मिळाले आहे. गावात रात्री तीन घरांना अचानक लागल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. या भीषण आगीत दोन घरे पूर्णतः जळून खाक झाली असून दुर्घटनेत एका वृद्ध महिलेचा आगीत जळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. रात्रीच्या सुमारास गावातील तीन घराला अचानक आग लागल्याने आगीने काही वेळात रौद्ररूप धारण करत शेजारील दुसऱ्या घरालाही वेढा दिला. यामध्ये दोन घरे पूर्णतः जळून खाक झाली आहे तर एक घर काही प्रमाणात जळले आहे. घटनेनंतर गावकऱ्यांनी तत्परता दाखवत घराघरातून पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला गावकऱ्यांच्या athak प्रयत्नांमुळे काही वेळात आग आटोक्यात आणण्यात यश आले. दरम्यान अचलपूर येथून अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली व त्यांनी आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले या आगीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
0
0
Report

बीड में RTI कार्यकर्ता पर निर्घृण हमला: पैर टूटे, हाथ फ्रैक्चर; शिंदे गट के कार्यकर्ताओं पर मामला दर्ज

Beed, Maharashtra:बीड:माहिती अधिकार कार्यकर्त्यावर निर्घृण हल्ला; पाय तोडून हात फ्रॅक्चर.. शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल ANC - एक धक्कादायक बातमी आहे बीडमधून... माहितीचा अधिकार टाकणाऱ्या एका आरटीआय कार्यकर्त्याचे चक्क पाय तोडण्यात आलेत. एवढेच नाही तर हात देखील फॅक्चर करण्यात आल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. मारहाण करणारे शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. बीडच्या भाटसांगवी आणि औरंगपूर या गावांच्या ग्रुप ग्रामपंचायतीत गेल्या १५ वर्षांपासून विकासाचा अभाव असल्याची तक्रार स्थानिकांकडून होत असताना, माहिती अधिकाराचा वापर करून याबाबत आवाज उठवणाऱ्या बलभीम बोरवडे यांच्यावर निर्घृण हल्ला करण्यात आलाय. मोठ्या प्रमाणात निधी येऊनही गावात अपेक्षित विकास न झाल्याने बलभीम बोरवडे यांनी माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवली होती. याच कारणावरून संतप्त झालेल्या शिंदे गटाशी संबंधित काही कार्यकर्त्यांनी आठ ते दहा जणांसह बोरवडे यांच्यावर थेट हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांचा पाय तोडण्यात आला असून एक हात फ्रॅक्चर करण्यात आला आहे. ही अमानुष मारहाणी सुरू असताना वडिलांना वाचवण्यासाठी मुलगा विजय घटनास्थळी धावून आला, मात्र त्यालाही निर्दयपणे मारहाण करण्यात आली. دوघांनाही गंभीर जखमी अवस्थेत बीड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे नेते श्यामराव पडूळे यांच्यासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्यापपर्यंत एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. गावगुंडांकडून होणाऱ्या गुन्ह्यांच्या घटना सर्वसाधारण मानल्या जात असताना, आता थेट सत्ताधारी पक्षाशी संबंधित पदाधिकारींकडून कायदा हातात घेतला जात असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. बाईट: विजय बोरवडे, पीडित
0
0
Report
Advertisement

वाशीम में वादळी बारिश ने फसलों को नुकसान का खतरा

Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर, कारंजा, मालेगाव, रिसोड आणि वाशिम तालुक्यात काही ठिकाणी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागांमध्ये तुरळक गारपीटही झाली. या अवकाळी पावसामुळे शेतातील बिजवाई कांदा, हळद आणि ज्वारी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच आंबा बागांनाही या परिस्थितीचा मोठा परिणाम होऊ शकतो. वादळी वाऱ्याच्या वेगामुळे पिके आडवी पडण्याचा धोका निर्माण झाला असून, सध्या काढणीच्या टप्प्यात असलेल्या पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या बदललेल्या हवामानामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे。
0
0
Report

नांदवी ग्रामदैवत बापूजी महाराज जत्रोत्सव में पालखी नाच और बगाडे पर आतिशबाजी

Chendhare, Maharashtra:नांदवीचे ग्रामदैवत श्री बापूजी महाराज यांचा जत्रोत्सव बुधवारी पार पडला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. पंचक्रोशीतील भाविक ग्रामस्थ आणि नोकरीनिमित्त अन्य ठिकाणी स्थायिक चाकरमान्यानी जत्रेसाठी आवर्जून हजेरी लावली. आजुबाजूच्या गावातील देवतांच्या पालख्या आणि सासनकाठ्या देवाच्या भेटीसाठी दाखल झाल्या होत्या. यावेळी पालखी नाचवण्याचा अनोखा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. मंदिरा समोरील बगाडावर फिरणारी लाट सर्वांचेच आकर्षण ठरली. पारंपारिक खालुबाजा और फटाक्यांच्या आतषबाजीत लाट फिरवण्यात आली. यानिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
0
0
Report

हनुमान जयंती पर महाराष्ट्र समेत देशभर में उत्साह, लाखों श्रद्धालु दर्शन हेतु जुटे

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ANCHOR: महाराष्ट्र के साथ पूरे देशभर में हनुमान जयंती बड़े उत्साह के साथ मनाई जा रही है. छत्रपति संभाजीनगर के खुलताबाद में राज्य का एकमात्र निद्रिस्त मारुती मंदिर है. इसी भद्रा मारुती मंदिर में दर्शन के लिए भक्तों की भारी भीड़ रहती है. इस हनुमान जयंती उत्सव के पार्श्वभूमि पर अनुमान है कि लगभग 10 से 15 लाख भक्त दर्शन के लिए आ सकते हैं. इसलिए मंदिर संस्थान और प्रशासन ने व्यापक और नियोजित तैयारी की है. आज सुबह ही राज्य के मंत्री अतुल सावे, पूर्व सांसद चंद्रकांत खैरे तथा महापौर अनिल मकरीये के हाथों विधिवत पूजा की गई. साथ ही हनुमान जयंती के अवसर पर विविध धार्मिक कार्यक्रमों का आयोजन किया गया है, जय हनुमान के घोष से परिसर दुमदुमा गया. प्रशासन की ओर से सुरक्षा और आयोजन की उचित व्यवस्था की गई है ताकि भक्तों को कोई दिक्कत न हो.
0
0
Report
Advertisement

35 करोड़ कमीशन का दावा: संजय गायकवाड ने कहा, न्याय तुरंत चाहिए

Buldhana, Maharashtra:बुलढाणा ब्रेकिंग के रूप में सामने आए हालिया बयान: आमदार संजय गायकवाड के भाषण में कहा गया कि न्यायालय में 20–25 वर्ष के खटले चलते हैं, जबकि उनके कार्यालय में सिर्फ एक तारीख होती है, उसी दिन आर्ग्यूमेंट और जजमेंट हो जाता है और मामला समाप्त हो जाता है। गायकवाड ने 35 करोड़ के कमीशन के बारे में स्पष्ट कहा कि उन्होंने ऐसी बात कही है या नहीं, यह स्पष्ट नहीं है, लेकिन उन्होंने उक्त मामले पर अपनी प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि अन्य नेता बुवाबाजीत पैसे गंवाते हैं, पर वे जनसेवा और जनता की मदद पर जोर देते हैं। चिखली विधानसभा क्षेत्र की विभिन्न टोली व पदाधिकारी शिंदे की शिवसेना में शामिल होने के दौरान गायकवाड ने 35 करोड़ कमीशन के बारे में स्पष्ट टिप्पणी दी, तथा प्रेम-जिहाद कानून जैसी मांग उनके कारण उठी थी ऐसा कहा। यह पूरा संदर्भ बुलढाणा में संवाद के तौर पर पेश किया गया है।
0
0
Report

मुंगसापूर आश्रम में पप्पई विक्रेता पर मारहाण: सात गिरफ्तार?

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या कन्नड तालुक्यातील मुंगसापूर येथील ब्रह्मश्री जनार्दन स्वामी आश्रमात नेऊन पपई विक्री करणाऱ्या शेतकऱ्यास बेदम मारहाण केल्याप्रकरणी मुक्तानंदगिरी महाराज ऊर्फ बापू महाराज यांच्यासह सात जणांविरोधात कन्नड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी सकाळी जेहूर येथील शेतकरी बबन जयवंतराव पवार हे नेहमीप्रमाणे आश्रमात पपई विकण्यासाठी गेले होते. आश्रमातील सेवक रवींद्र गोडसे यांनी त्यांना मनाई केली त्यानंतर पवार बाहेर रस्त्याच्या कडेला थांबले असता, काही सेवकांनी पवार यांना जबरदस्तीने महाराजांच्या केबिनमध्ये नेले. महाराजांसह सात जणांनी त्यांना मारहाण केली. लाकडी पादुकांनी ठिकठिकाणी व आधीच फॅक्चर असलेल्या हातावर मारले. संजय फोलाने याने दांडक्याने मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या पवार यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. यानंतर पवार यांनी तक्रार दिली होती त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान महाराजांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत...
0
0
Report

केसापुरी ग्राम में महिलाओं की एकजुटता से दारू बंदी एकमत मंजूर

Beed, Maharashtra:बीड : आमदार प्रकाश सोळंकेच्या सुनबाई सरसावल्या; केसापुरीत महिलांच्या ताकदीने दारूबंदी ठराव मंजूर..! बीडच्या माजलगाव मतदारसंघातून एक मोठी आणि सकारात्मक बातमी समोर येत आहे. केसापुरी गावात महिलांच्या एकजुटीने दारूबंदीचा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला आहे. आमदार प्रकाश सोळुंके यांच्या सुनबाई पल्लवी सोळुंके यांच्या पुढाकारातून ही महत्त्वाची ग्रामसभा पार पडली. गावातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दारूमुळे होणारे घरगुती वाद, आर्थिक नुकसान आणि सामाजिक समस्या याविरोधात ठाम आवाज उठवला. महिलांच्या या निर्धाराला ग्रामस्थांचाही पाठिंबा मिळाला आणि अखेर दारूबंदीचा ठराव एकमताने मंजूर झाला. महिलांच्या एकजुटीचा हा विजय मानला जात असून, या निर्णयामुळे केसापुरी गावात शांतता, सुव्यवस्था आणि निरोगी वातावरण निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
0
0
Report
Advertisement

ईंधन संकट ने गैस सिलेंडर की किल्लत बढ़ाई, शहरों में लकड़ी भट्टों से भोजन बना

Dhule, Maharashtra:आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याने कमर्शियल व घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आज हनुमान जयंतीनिमित्त धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम व भंडाऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. धुळ्यातील शिरपूर येथे आयोजित भंडाऱ्यासाठी गॅस सिलेंडर उपलब्ध न झाल्याने आयोजकांनी लाकडी भट्ट्यांचा वापर करून जेवण तयार करण्यास सुरुवात केली आहे. सुमारे तीन हजार भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. दरवर्षी होणाऱ्या या कार्यक्रमात यंदा गॅस टंचाईमुळे अडथळे निर्माण झाले आहेत. जिल्ह्यातील इतर अनेक ठिकाणीही अशीच परिस्थिती दिसून येत असून लाकडी भट्ट्यांचा वापर वाढला आहे. गॅस टंचाईमुळे विवाह सोहळ्यात देखील लाकडी भट्ट्या पेटल्याच्या आता दिसून येत आहे
0
0
Report

छत्रपति संभाजी नगर जिले में तेज आंधी-बारिश से फसलें बर्बाद, मुआवजे की मांग तेज

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात 2 दिवसापासून जोरदार वादळी वारे पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट झाली, या वादळी वारे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे सोन्यासारखे डोलणारे पीक एका रात्रीत जमीनदोस्त झाले; कन्नड, वैजापूर, सिल्लोड, पैठण, सोयगाव आणि फुलंब्री या तालुक्यांमध्ये काही ठिकाणी गारपीट झाली त्यामुळे गहू, मका, ज्वारी, बाजरी, हरभरा काढणीला आलेले हे पीक मातीमोल झाले; त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळल्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
0
0
Report
Advertisement

सोलापुर से हैदराबाद के लिए नई विमान सेवा शुरू, टिकट बुकिंग आज से

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूरकरांसाठी मोठी गुड न्यूज, 17 एप्रिलपासून सोलापूर ते हैदराबाद विमान सेवेचा शुभारंभ - सोलापूरकरांसाठी मोठी गुड न्यूज, 17 एप्रिल पासून सोलापूर ते हैदराबाद विमानसेवेला शुभारंभ - आज पासून तिकीट बुकिंग ला सुरुवात तर आठवड्यातून पाच दिवस असणार सेवा - सोलापूर ते गोवा, सोलापूर ते मुंबई चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता सोलापूर ते हैदराबाद विमानसेवा सुरू होणार - सोलापूर ते गोवा विमानसेवा देणाऱ्या फ्लाय 91 कंपनीच्या वतीनेच सोलापूर ते हैदराबाद विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय - सोलापुरातील हजारो तरुण हैदराबादच्या आयटी क्षेत्रात कार्यरत असून त्यांना या विमानसेवेचा मोठा फायदा होणार आहे
0
0
Report

छावणी में कचरा डंपर की टक्कर से छात्र ओंकार खनसे की मौत

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरमध्ये परीक्षेहून घरी परतणाऱ्या एका तरुण विद्यार्थ्याचा महापालिकेच्या कचरा वाहणाऱ्या डंपरखाली चिरडून मृत्यू झाला आहे. ओंकार रायभान खनसे असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो परीक्षेनंतर मोपेडवरून घरी परतत होता. प्रॅक्टिकल परीक्षा दिल्यानंतर काही वेळ मित्रांसोबत वेळ घालवून ओंकार मिल कॉर्नरमार्गे छावणीच्या दिशेने निघाला होता. दरम्यान, बारापुल्ला गेट परिसरात कचरा संकलन करणाऱ्या कंपनीच्या डंपरने त्याला समोरून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की ओंकारचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच छावणी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, नागरिकांकडून रस्ते सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top