445001
यवतमाळच्या आर्णीत भाजपाची पहिली यादी, आमदाराचा नामांचा गहजब!
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या आर्णी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत विद्यमान आमदाराचे नाव नाही. यामुळे महायुतीतील शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केला आहे. तिन्ही तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन उपजिल्हाप्रमुख विष्णू उकंडे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. पालकमंत्री संजय राठोड यांचेही या जागेसाठी आग्रह आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, जागा सुटली नाही तरी शिवसेना उमेदवार निवडणूक लढवेल.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
चंद्रपुर कांग्रेस गटनेता राजेश अडूर के वन टू वन से धानोरकर गट में तनाव
Nagpur, Maharashtra:चंद्रपूर काँग्रेस गटनेते राजेश अडुर यांच्या वन टू वन पाठवला आहे धानोरकर गटाचे नगरसेवक महापालिका मधील विद्यमान काँग्रेस गटनेते राजेश अडूर यांना हटवण्याच्या करता आज नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचले.... यावेळी राजेश अडूरही तिथे पोहोचत यावर आक्षेप घेतला... त्यांनी धानोरकर गटाच्या नगरसेवकांनी वीप मोडल्याचा आरोप केला... आणि विभागीय आयुक्त दबावत असल्याचाही म्हटलं..... राजेश अडूर यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी0
0
Report
प्रतिभा धानोरकर के समर्थकों के बीच चंद्रपूर कांग्रेस में गुटबंदी तेज
Nagpur, Maharashtra:Ngp Dhanorkar 121 चंद्रपूर काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांचा 121 पाठवला आहे चंद्रपूर काँग्रेस मधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा समोर आला है. काँग्रेस गटनेटा बदलवण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या समर्थकांनी नागपूर विभागीय आयुक्त धाव घेत वडेट्टीवारांना धक्का दिलाय. विद्यमान गटनेते राजेश अडून यांना पदावरून हटवण्यासाठी 16 नगरसेवक नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात आले होते... अडूरही आपल्या समर्थकांसह पोहचले होते आणि त्यांनी प्रतिभा धानोरकर यांच्यावर आरोप केले... दरम्यान प्रतिभा धानोरकर यांनी अडूर यांच्यावर पलटवार करत अडूर यांनी काम केले असते तर गटनेता बदलवण्याची वेळ आली नसती अशी प्रतिक्रिया दिलीय...दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी ------ बाईट --खा प्रतिभा धानोरकर, काँग्रेस नेत्या ---- 121 पॉईंटर NgP Dhanorkar 121 खासदार प्रतिभा धानोरकर (121 केलाय ) --- गेल्या वेळेस सर्वानुमते राजेश आढळून काँग्रेसचे गटनेते झाले होते.... गट राष्ट्रीय काँग्रेसचा अजूनही जशाचा तसा आहे.. काही नगरसेवकांची नाराजी गटनेत्यांवर होती... त्यामुळे गटनेता बदलवण्याची प्रक्रिया काँग्रेस नगरसेवकांनी आज येथे केली --- अडूर यांनी आक्षेप नोंदवला असला... तरी या नगरसेवकांनी दहा तारखेला नोटीस काढून मीटिंग बोलवली होती.....बहुमताची बैठक पन्धरा तारखेला होती... त्यामुळे त्यांनी जरी आक्षेप घेतला असला तरी.... वीप सभागृहाच्या कामकाजा करता लागू होतं असतो... सभागृहाच्या बाहेर लागू होत नाही -(on पैशाचे आरोप ) --- येथे 16 ही नगरसेवक आहे.... त्यांना विचारले पाहिजे..... ही प्रक्रिया दबावाने नाही नगरसेवकांच्या मनाने होत आहे ---- पहिल्या अंकातच योग्य कामकाज झाला असता तर दुसऱ्या अंकाची जरुरत पडली नसते.... पहिल्या अंकात विश्वासात घेतलं नसल्यामुळे हा दुसरा अंक सुरू झाला.... नवा गटनेता 27 ही नगरसेवकांना विश्वासात घेऊन काम करेल ---- राजेश अडूर यांनी काम केलं असतं तर त्यांना बदलण्याची वेळ आली नसती --- आमची वाद घालायची इच्छा नाही.... या वादावर कायमस्वरूपी तोडगा काढू --- घटक नेत्यांच्या बाबतीत ती सगळ्यांना सांगितलेलं गोष्ट स्तरावर झालं नाही त्यामुळे --- ते कोर्टात जात असेल पण आम्ही पण कॅव्हेट दाखल केला आहे --- ही लढाई धानोरकर केव्हा वडेट्टीवारांची नाही नगरसेवकांची लढाई आहे... ही लढाई नगरसेवकांची आणि ते नक्की यशस्वी होतील0
0
Report
अधिक मास में विठ्ठल-रुक्मिणी मंदिर में दान 9.46 करोड़ के रिकॉर्ड के साथ बढ़ो
Pandharpur, Maharashtra:पुरुषोत्तम मासामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या उत्पन्नात अधिक अधिक वाढ 9 कोटी 46 लाखांचं भरभरून दान भाविकांनी विठुरायाच्या चरणी अर्पण केला आहे. दर तीन वर्षातून येणाऱ्या पुरुषोत्तम तथा अधिक मासाच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी देणगी सोने-चांदी दागिने अर्पण केले आहेत. तसेच मंदिर समितीच्या इतर उपक्रम माध्यमातून नऊ कोटी 46 लाख 28 हजार 233 इतके दान प्राप्त झाले आहे. अधिक महिन्यांमध्ये पाच लाख तीस हजार 620 भाविकांनी देवाच्या चरणस्पर्श दर्शन घेतला आहे तर नऊ लाख तीस हजार 68 भाविकांनी मुखदर्शन घेतला आहे. 2023 च्या अधिक मासामध्ये मंदिर समितीला मिळालेल्या उत्पन्नापेक्षा दोन कोटी 26 लाख 85 हजार 796 रुपयांची वाढ झाली आहे.0
0
Report
Advertisement
कोळी महासंघ का आक्रोश मोर्चा: जात प्रमाणपत्र सरल बनाने की मांग
Akola, Maharashtra:अनुसूचित जमातीतील कोळी महादेव समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज अकोल्यात महाराष्ट्र राज्य कोळी महासंघाच्या वतीने भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या या मोर्चात अकोला जिल्ह्यासह विदर्भातील विविध भागांतून मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात यावी, तसेच रक्त नात्यातील व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे, या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. मोर्चेकऱ्यांनी घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले आणि आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला सादर केले. सरकार आणि प्रशासनाने समाजाच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा येत्या पावसाळी अधिवेशनादरम्यान लाखोंच्या संख्येने मोर्चा काढून राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य कोळी महासंघाचे विदर्भ प्रमुख सुरेश पाटकर यांनी दिला आहे.0
0
Report
वेदांत बंडगर हत्या मामले में मोक्का लगाने की तैयारी, मंत्री पाटिल का बयान
Sangli, Maharashtra:सांगलीत सध्या गाजत असलेल्या वेदांत बंडगर हत्या प्रकरणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आता ॲक्शन मोडवर आले आहेत. हत्या प्रकरणातील आरोपींना मोक्का लावणार असल्याचं मंत्री चंद्रकांत पाटीलाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. हत्ये प्रकरणात कोणत्याही दोषी व्यक्तीची गय केली जाणार नसून पिडीत कुटुंबाला न्याय मिळवून देण्याबाबत पोलीस प्रशासनाला कडक सूचना देखील करण्यात आल्याचा मंत्री चंद्रकांत पाटलांकडून निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारचा दबाव पोलिसांनी घेऊ नये, अशा सूचनाही चंद्रकांत पाटलांकडून देण्यात आल्या आहेत.0
0
Report
शिंदे के निर्देश पर बैठक चल रही, निर्णय आने तक प्रतीक्षा
Satara, Maharashtra:विधान परिषदेच्या अनुषंगाने बैठक झाली एक तास सर्वांचं आम्ही ऐकून घेतलं लोकांनी आपल्या भावना कोर कमिटीकडे मांडल्या आहेत आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आम्ही या सर्व लोकांचा अहवाल हा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे आम्ही सादर करणार आहोत यावर शिंदे साहेब जो निर्णय घेतील जो आदेश देतील त्यावर आम्ही निर्णय घेऊ शिंदे साहेब सांगतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल फक्त या बैठकीमध्ये सर्वांचे म्हणणे आहे की आहेत की आमच्या भावना साहेबांपर्यंत पोहोचवा काल तिढा सुटला असे म्हटले जात होते .आमच्यापर्यंत तसा कोणताही निर्णय अद्याप आलेला नाही जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेब आम्हाला आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही काही बोलणार नाही.आमचा निर्णय मतदानाच्या अगोदर होईल नवनाथ बन हे अनुभवी प्रव वक्ते आहेत त्यांच्याबद्दल बोलणं योग्य नाही भाजपचे मला अद्याप पर्यंत कोणीही भेटलेले नाही कसलीही चर्चा झालेली नाही संजय राऊत यांना कोल्ह्याला द्राक्ष आंबट या म्हणीप्रमाणे संजय राऊत आहेत मनाला वाटेल ते बोलत असतात दिवसेंदिवस ते तर तेही बोलत असतात त्यांच्या या असा बोलण्यामुळे त्यांच्याकडे सकाळी दहा वाजता भूम घेऊन जाणारे हळूहळू आता कमी झालेले दिसतील शिवसेनेतील अजून कोणीही फुटलेले नाही त्यांच्याकडे संशयाने का बघायचे तसे त्यांनी कुठे वक्तव्यही केलेले नाही ऑपरेशन पूर्ण झाल्यावर कळते ऑपरेशन काळजीपूर्वक केले जातात 2022 ला उद्धव ठाकरे म्हणाले होते ज्यांना शिवसेना सोडून जायचे आहे ते जाऊ शकतात त्या अगोदर बोलले होते त्यामुळे आत्ताही बोलले असण्याची शक्यता नाकारता येत नाही भाजप बहुमत्ताजवळ आहे महायुतीच काम केले जाणार महायुतीचा नियम पाळला जाणार भाजप गॅसवर नाही आमच्या सदस्यांना टूरवर पाठवलेले नाही आमचे सदस्य फ्री आहेत टूरवर जायची गरज नाही आत्ताच्या या बैठकीला सर्व सदस्य हजर आहेत भाजपच्या बैठकीला शिवसेनेचे आमदार महेश शिंदे हे उपस्थित होते ते महायुतीतला एक घटक होते म्हणून ते तिथे होते आता त्यांना काहीतरी काम होते म्हणून ते या बैठकीला आलेले नाहीत0
0
Report
Advertisement
हिंगोली के किसानों ने कर्ज माफी के लिए पुतले जलाकर सरकार का विरोध किया
Hingoli, Maharashtra:हिंगोलीत कर्जमाफीच्या मुद्द्यावरून क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे, सरकारने कर्जमाफी मध्ये शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत गोरेगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत केले आहे. कर्जमाफीच्या जीआर मधील जाचक अटी रद्द करा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या या प्रमुख मागण्यासाठी गोरेगाव येथे मुख्यमंत्री यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत सरकारचा निषेध केला आहे यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली0
0
Report
जालना में भीषण पानी संकट: बोरगांव बुद्रुक और पारध में हर घर तक पानी नहीं पहुँच रहा
Jalna, Maharashtra:जालना :जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या कायम बोरगाव बुद्रुकसह पारध गावात भीषण पाणीटंचाई सार्वजनिक नळांना पाणी येत नसल्यानं ग्रामस्थ हतबल जालना जिल्ह्यातील बोरगाव बुद्रुक आणि पारध गावात सध्या भीषण पाणीटंचाई पाहायला मिळत आहे.जाफ्राबाद तालुक्यातील बोरगाव बुद्रुक येथे सार्वजनिक नळांना दर दोन दिवसांनी प्रत्येक घराला दोनच हंडे पाणी येतं.गरजेप्रमाणे पाणी मिळत नसल्यानं गावातील महिलांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे.तर भोकरदन तालुक्यातील पारध गावाच्या परीसरात लघु पाणी प्रकल्प असूनही ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कारभारामुळे ग्रामस्थांना पाणी विकत घेण्याची वेळ आलीय.त्यामुळे दैनंदिन पाण्याची गरज भागवावी तरी कशी असा प्रश्न ग्रामस्थांना पडलाय.0
0
Report
जाति वैधता प्रमाणपत्र के लिए कोळी महासंघ का रायगढ़ में एक दिवसीय धरणा प्रदर्शन
Chendhare, Maharashtra:जाति वैधता प्रमाणपत्रासाठी कोळी महासंघाचे आंदोलन रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे अँकर आदिवासी कोळी समाजबांधवांना जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावेत, तसेच २० ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी तातडीने करावी, या मागणीसाठी कोळी महासंघातर्फे मंगळवारी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाकडून बैठकीतील निर्णयांच्या अंमलबजावणीत होत असलेल्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. आदिवासी कोळी समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत तातडीने परिपत्रक काढून कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली. पावसाळी अधिवेशनात समाजाचा प्रश्न मार्गी न लागल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. आंदोलनात कोळी महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आदिवासी कोळी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते。0
0
Report
Advertisement
कोल्हापूर प्रवेश कर विवाद से महापालिका में सियासी हलचल
Kolhapur, Maharashtra:प्रवेश कराच्या मुद्द्यावर कोल्हापूरात राजकारण तापले. उद्याच्या महापालिका महासभेत या प्रस्तावावर काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष. कोल्हापूर महापालिकेच्या प्रवेश कराच्या प्रस्तावावरून नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. एमएच-09 आणि एमएच-51 या स्थानिक वाहनांना वगळून अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या बाहेरील भाविक आणि पर्यटकांकडून प्रवेश कर आकारावा, असा प्रस्ताव ठाकरे गटाचे स्वीकृत नगरसेवक सुनील मोदी उद्याच्या महासभेत मांडणार आहेत. मात्र या प्रस्तावाला काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला असून महाविकास आघाडीतील दोन घटक पक्षांमध्येच मतभेद उघड झाले आहेत. कोल्हापूर शहरात गेल्या आठवडाभरापासून प्रवेश कराचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. शहरातील आर्थिक अडचणी आणि महापालिकेच्या मर्यादित उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवर बाहेरील वाहनांकडून प्रवेश कर आकारण्याची कल्पना पुढे आली आहे. ठाकरे गटाचे स्वीकृत नगरसेवक सुनील मोदी यांनी उद्याच्या महासभेत यासंदर्भातील प्रस्ताव मांडण्याची तयारी केली आहे. एमएच-09 आणि एमएच-51 या कोल्हापूर जिल्ह्यातील वाहनांना वगळून अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून हा कर आकारण्याची मागणी करण्यात आली आहे. सुनील मोदी यांनी या प्रस्तावाचे समर्थन करताना महापालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत अत्यंत कमी असल्याचे सांगितले आहे. प्रवेश कराच्या माध्यमातून मिळणारा निधी शहरात येणाऱ्या पर्यटकांसाठी पार्किंग, स्वच्छता, वाहतूक आणि मूलभूत सुविधांवर खर्च करता येईल, अशी त्यांची भूमिका आहे. मात्र या प्रस्तावाला काँग्रेसने जोरदार विरोध केला आहे. गटनेत्यांच्या बैठकीतच सुनील मोदी यांनी कोणत्याही परिस्थितीत हा प्रस्ताव आणू नये, अशी भूमिका काँग्रेसने घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटातील मतभेद आता उघडपणे समोर आले आहेत. या संपूर्ण प्रकरणात महापालिका प्रशासनाची भूमिकाही चर्चेचा विषय ठरली आहे. प्रशासनाने स्वतःचा अधिकृत प्रस्ताव न आणता सदस्यांच्या माध्यमातून हा मुद्दा पुढे आणल्याची चर्चा सुरू आहे. यावर बोलताना महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी हा सदस्य ठराव असून तो मंजूर झाल्यास शहराच्या विकास कामांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध होऊ शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. प्रवेश करामुळे महापालिकेच्या तिजोरीत भर पडणार की भाविक आणि पर्यटकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार, यावर राजकीय चर्चा रंगली आहे. गेल्या आठ दिवसांपासून चर्चेत असलेल्या या प्रस्तावावर उद्याच्या महासभेत काय निर्णय होतो, याकडे कोल्हापूरकरांसह अंबाबाई भक्तांचे लक्ष लागले आहे..0
0
Report
परतूर नगर परिषद ने सफाई कर्मचारियों के वेतन नहीं दिए, कर्मियों ने किया आंदोलन
Jalna, Maharashtra:जालना :ब्रेकिंग परतूर नगर परिषदेनं स्वच्छता कर्मचाऱ्यांचे वर्षभरापासून पगार थकवले स्वच्छता कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन संतप्त स्वच्छता कर्मचाऱ्यांनी ठोकले नगरपरिषदेला कुलूप पगार होईपर्यंत कुलूप उघडू देणार नाही,स्वच्छता कर्मचाऱ्यांचा ईशारा अँकर :जालन्यातील परतूर नगर परिषदेने तब्बल एक वर्षांपासून स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पगार थकवले आहेत.त्यामुळे संतप्त झालेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी परतूर नगर परिषदेला कुलुप ठोकत नगर परिषदेच्या कार्यालयासमोर कामबंद आंदोलन केलंय.एप्रिल महिन्यात पगाराचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिलं होतं मात्र नगर परिषदेने पगाराचा प्रश्न सोडवला नाही.त्यामुळे संतप्त झालेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी अखेर नगर परिषदेला कुलूप ठोकत कामबंद आंदोलन केलं. जोपर्यंत स्वच्छता कर्मचाऱ्यांच्याच्या पगाराचा प्रश्न सोडवला जात नाही तोपर्यंत कुलूप काढू देणार नसल्याचा ईशारा स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दिलाय. बाईट : स्वच्छता कर्मचारी0
0
Report
महाराष्ट्र महामार्ग के खतरनाक क्षेत्रों में तात्कालिक उपाय और जांच शुरू
Pandharpur, Maharashtra:महाराष्ट्र राज्य सडक विकास महामंडळाने महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस. यांनी दिल्या. सातारा- पंढरपूर महामार्गावरील तांदुळवाडी हद्दीत रस्त्यालगत धोकादायक तीन विहिरी असून, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने तात्काळ रस्त्यालगत असणाऱ्या विहिरींच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू करावे. तसेच अपघात प्रवण क्षेत्रावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यासाठी सूचना करून रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे सा, भूसंपादन प्रमाणे रस्ता झाला आहे का, मार्गावरील पुल व रस्त्याचे काम अंदाजपत्रकानुसार झाले आहे का, रस्त्याची रुंदी, रस्त्यावर गतिरोधक, लोखंडी बॅरिकेट, रिफ्लेक्टर संरक्षण कठडे, प्रकाश व्यवस्था, यासारख्या उपाययोजना आहेत का याची चौकशी करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या चौकशीमध्ये दोषी असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी येथील ग्रामस्थांनी तांदुळवाडी हद्दीत वारंवार अपघात घडत असून रस्त्याची काम भूसंपादनाप्रमाणे झाले नाही. रस्त्याचे काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे झाले आहे. तसेच तांदुळवाडी हद्दीतील उघडे पुलावर सतत खड्डे पडत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. संबंधित ठेकेदाराकडून तात्पुरती डागडुजी करण्यात येते. सदर पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट करावे अशी मागणी केली. जिल्हाधिकारीांनी तांदुळवाडी हद्दीतील महामार्गालगत असणाऱ्या तीन विहिरींची तसेच उघडे पूल येथील पाऊणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.0
0
Report
Advertisement
कोल्हापुर में शिंगणापूर बांध लीकेज से जल संकट, आपूर्ति युद्ध स्तर पर मरम्मत
Kolhapur, Maharashtra:नदी उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती सध्या कोल्हापूरकरांवर ओढवली आहे. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर बंधाऱ्याच्या बरग्यांना गळती लागल्याने ते बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. पाटबंधारे विभाग आणि कोल्हापूर महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग जेसीबीच्या सहाय्याने ही दुरुस्ती करत आहे. दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यात पाटबंधारे विभागाने उपसा बंदी देखील लागू केली आहे. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.0
0
Report
शिवसेना का ट्रैक्टर मार्च: बीड में किसानों की कर्जमाफी की मांग
Beed, Maharashtra:बीड : शेतकरी कर्जमाफीसाठी उद्धव सेना आक्रमक; जिल्हाधिकारी कचेरीवर धडकला बीड मधील ट्रॅक्टर मोर्चा..! शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आज मराठवाडाभर शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ‘बळीराजा गर्जना ट्रॅक्टर रॅली’ चे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर "नको अटी - नको शर्ती, आम्हाला द्या संपूर्ण कर्जमुक्ती" या घोषवाक्याखाली आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयांवर ही ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीत मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर घेऊन शिवसेना पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले आहेत. राज्यातील शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडला असून कर्जबाजारीपणा, पिकांना मिळणारा कमी दर, खतांचा तुटवडा, अपुरा वीजपुरवठा आणि विमा कंपन्यांकडून होणारी फसवणूक यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरीांच्या सरसकट कर्जमुक्तीसाठी शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ही धडक ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली आहे. दरम्यान जर सरकारने शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी केली नाही तर महाराष्ट्राचा नेपाळ होईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष गणेश वरेकर यांनी दिला आहे...0
0
Report
लातूर में रविकांत तुपकर के उपोषण के समर्थन में किसान, कर्जमाफी बिना शर्त की मांग
Latur, Maharashtra:লातুর 브েকিং न्यूज शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या उपोषण आंदोलनाला लातूर मधून पाठिंबा... शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढा तीव्र.... शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या उपोषण आंदोलनाला पाठिंबा देत शेतकरी संघटनेने लातूरमध्ये आंदोलन केलं आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या अध्यादेशावर शेतकरी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कर्जमाफीसाठी घालण्यात आलेल्या जाचक अटी तत्काळ रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात येत आहे. याच निषेधार्थ शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या अध्यादेशाची प्रतीकात्मक होळी करत जोरदार घोषणाबाजी केली.0
0
Report
Advertisement
