icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सातार में शिंदे की पहली सभा से पहले बैनर विवाद बढ़ा, फोटो नहीं दिखे

Satara, Maharashtra:सातारा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या साताऱ्यात पहिली जाहीर सभा होत असून या सभेपूर्वीच राजकीय वातावरण तापलं आहे. सभास्थळी आणि शहरभर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली आहे. मात्र या बॅनर्सवर आमदार महेश शिंदे यांचे फोटो नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवेळी झालेल्या घडामोडीनंतर आमदार महेश शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत पत्नीला अध्यक्षपदी बसवल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनीच बॅनर्सवरून त्यांचे फोटो वगळल्याची चर्चा रंगली आहे. आता उद्याच्या सभेला आमदार महेश शिंदे उपस्थित राहणार का? ते व्यासपीठावर दिसणार का? की पक्षविरोधी भूमिकेमुळे त्यांच्यावर कारवाई होणार? याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी. बॅट रणजीत भोसले यांनी सांगितले आहे.
0
0
Report
Advertisement

चंद्रपुर में भीषण गर्मी: सभी स्कूल-कॉलेज सुबह 11 बजे तक ही संचालित

Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपुरात वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकालच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच, जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यात सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेचा तीव्र तडाखा जाणवत असून तापमान 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः उष्माघात (सन स्ट्रोक) व इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. दुपारच्या कडक उन्हात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाताना होणारा त्रास टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या (शासकीय, अनुदानित व खासगी) शाळा व महाविद्यालयांच्या वेळांमध्ये तात्पुरता बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू करून जास्तीत जास्त सकाळी 11 वाजेपर्यंत सोडण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी या निर्देशांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे निर्देश दिले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी दक्षता बाळगावी, असेही त्यांनी नमूद केले आहे.
0
0
Report

गडचिरोली में 44°C में महावितरण के ट्रांसफॉर्मर के लिए कुलर का सहारा

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोलीत चढत्या तापमानाचा असाही मुकाबला, ४४ अंश तापमानात महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरलाही आता 'कुलर'चा आधार लविदर्भात उन्हाळ्याचा तडाखा वाढला असून गडचिरोली जिल्ह्यात तापमानाने ४४ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. या कडाक्याच्या उन्हाचा फटका केवळ सर्वसामान्य नागरिकांनाच नाही, तर महावितरणच्या तांत्रिक यंत्रणेलाही बसू लागला आहे. उन्हामुळे जिल्हयातील आल्लापल्ली येथील १३२ केव्ही उपकेंद्रातील मुख्य ट्रान्सफॉर्मर (डीपी) लवकर गरम होत असल्याने, वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी चक्क ट्रान्सफॉर्मरला थंड ठेवण्यासाठी मोठ्या 'कुलर'चा आधार घ्यावा लागत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात विजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. वाढत्या लोडमुळे ट्रान्सफॉर्मरमधील तेल तापून ते गरम होते. त्यातच बाहेरचे तापमान ४४ अंशांच्या वर गेल्याने या यंत्रणेवर दुहेरी ताण पडत आहे. आल्लापल्ली येथील महावितरण आणि महापारेषणच्या परिसरात असलेल्या मोठ्या ट्रान्सफॉर्मरला थंड ठेवण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. ट्रान्सफॉर्मरच्या दोन्ही बाजूंना मोठे लोखंडी कुलर लावण्यात आले आहेत. याद्वारे ट्रान्सफॉर्मरचे तापमान नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. उन्हाळ्यात वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढल्यास नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतो. हे टाळण्यासाठी आणि यंत्रणा सुरक्षित ठेवण्यासाठी महावितरणकडून ही खबरदारी घेतली जात आहे. भर उन्हात माणसांप्रमाणेच आता यंत्रांनाही कुलरची गरज भासू लागल्याचे हे चित्र सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
0
0
Report

यवतमाळ के राळेगाव खेळापुर में अल्पवयीन लड़कियों की तस्करी-धर्मांतरण रैकेट पर आरोप

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव खेळापुर मतदार संघातील हिंदू मुलींना पळवून नेऊन त्यांच्या विक्रीचे तसेच त्यांचे धर्मांतरण करण्याचे मोठे रॅकेट सक्रिय असून या प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी त्याला कुठलीही चौकशी न करता सोडून दिल्याचा गंभीर आरोप भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल्ल चौहान यांनी केला आहे. मझहर कुरेशी हा संशयित मुलींची विक्री करण्याच्या धंद्यात सहभागी असून गो तस्करी, क्रिकेट वरील सट्टा, जुगार क्लब याशिवाय लव्ह जिहादच्या कृत्यांमध्ये देखील तो सहभागी आहे. भाजप कार्यकर्त्यांनी त्याच्या बाबत सूचना पोलिसांना दिली, मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतरही पाठीशी घालत सोडून दिले, त्यामुळे संबंधित पोलिसांना या तपासापासून दूर ठेवण्याची मागणी भाजप जिल्हाध्यक्षांनी केली आहे. दुर्गम भागातील आदिवासी व अनुसूचित जातीतील अल्पवयीन मुलींच्या विक्री रॅकेट प्रकरणातील एक धक्कादायक ऑडिओ क्लिप देखील त्यांनी पुढे आणली असून, याप्रकरणी पोलिसांनी गांभीर्याने तपास करण्याची गरज व्यक्त केली आहे.
0
0
Report
Advertisement

आ. सुधीर मुनगंटीवार ने बल्लारशाह व चंद्रपूर स्टेशन निरीक्षण कर सुरक्षा सुविधाओं के निर्देश दिए

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भातील रेल्वे प्रवाशांना अधिक दर्जेदार, सुरक्षित आणि सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारशाह व चंद्रपूर रेल्वे स्थानकाला भेट देत विविध विकासकामांचा सखोल आढावा घेतला. रेल्वे प्रशासनासोबत झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत स्थानकावरील सुरू असलेल्या कामांची प्रगती, प्रवाशी सुविधांची सद्यस्थिती तसेच नियोजित प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा बारकाईने ऊहापोह करण्यात आला. पाहणीदरम्यान काही कामांची गती अपेक्षेप्रमाणे नसल्याचे स्पष्ट झाल्याने आ. मुनगंटीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी कालबद्ध नियोजन करून कार्यवाही करावी, असे त्यांनी स्पष्ट निर्देश दिले. रेल्वे स्थानकांवर स्वच्छता, पिण्याचे पाणी, प्रतीक्षालयांची सुविधा, तिकीट व्यवस्था, प्रकाशयोजना आणि सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. या बैठकीत व्यापारी मंडळ, स्टेशन स्टॉल असोसेशन, चाईल्ड लाईन हेल्प सेंटर तसेच स्थानिक नागरिकांनी विविध समस्या आणि मागण्या मांडल्या. बल्लारशाह–कुर्ला रेल्वेगाडी तसेच काजीपेठ–पुणे मार्गावरील गाड्या दैनिक करण्याबाबतच्या मागण्या रेल्वेमंत्र्यांकडे मांडण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. स्थानिक प्रशासन आणि रेल्वे विभाग यांच्यात समन्वय राखून प्रवाशांच्या अडचणी तातडीने सोडवाव्यात, तसेच सुरू असलेल्या प्रकल्पांची गुणवत्ता आणि गती यावर कोणतीही तडजोड होऊ नये, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
0
0
Report

गडचिरोली में तेज गर्मी: दोपहर में ट्रैफिक लाइटें बंद, 42°C से नागरिकों को राहत

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा चांगलाच चढला असून उष्णतेची लाट जाणवत आहे. तापमानाने ४२ अंश सेल्सिअसची पातळी गाठल्याने नागरिक घामाघूम झाले आहेत. या उन्हात प्रवाशांना शहरातील प्रमुख चौकांमध्ये स Sig्नल लागल्यामुळे बराच वेळ थांबावे लागत होते. उन्हाच्या तीव्र झळा आणि डोक्यावर आग ओकणारा सूर्य यामुळे वाहनधारकांचे प्रचंड हाल होत होते. नागरिकांची हीच अडचण लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी दुपारी सिग्नल बंद ठेवण्याची निर्णय घेतला आहे. सायंकाळी ४ नंतर जेव्हा उन्हाची तीव्रता कमी होते आणि वाहनांची वर्दळ वाढते, तेव्हा सिग्नल यंत्रणा पूर्ववत केली जाणार आहे. वाहतूक पोलिसांच्या या संवेदनशील निर्णयामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे.
0
0
Report

बदलापुर में नई पानी टंकी लीकेज, गर्मी में पानी संकट से नागरिक नाराज

Ambernath, Maharashtra:नव्याने बाँधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीला गळती; ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई बदलापूरच्या जीवन प्राधिकरणाचा भोंगळ कारभार बदलापूर पूर्वेकडील शिरगांव परिसरात वाढीव बदलापूर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ही टाकी बांधण्यात आली होती. 15 दशलক্ষ लिटर पाण्याची क्षमता असलेली ही टाकी भरल्यानंतर गळत असल्यामुळे या टाकीकामुळे गेल्या काही दिवसांपासून पाणी भरणे बंद करण्यात आले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या टाकीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असले तरी उद्घाटन करण्याची घाई का करण्यात आली. तसेच या भागातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात यामुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्यामुळे स्थानिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संताप व्यक्त केला आहे. शिरगांव परिसर हा बदलापुरातील सर्वाधिक झपाट्याने विस्तारित होणारा परिसर असल्यामुळे या भागात टाकी उभारण्यात आली आहे. मात्र या टाकीचं काम निकृष्ट दर्जाचा झाल्यामुळे नागरिक आता उन्हाळ्याच्या झळा वाढत असताना पाण्यापासून वंचित राहणार आहेत. अनेक सोसायटी यांना या परिसरात आता टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.
0
0
Report
Advertisement

अक्षय तृतीया पर देहू के मंदिर में आंबों की आकर्षक सजावट, भक्तों में उत्साह

Varsoli, Maharashtra:आज अक्षय तृतीया निमित्त भक्ती आणि उत्साहाचा अनोखा संगम पाहायला मिळतोय. देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या पवित्र भूमीत असलेल्या मुख्य मंदिरात यंदा खास आंब्यांची आकर्षक आरास करण्यात आली आहे. अक्षय तृतीया हा सण समृद्धी, शुभत्व आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर आंब्यांच्या सजावटीने नटला असून, विविध प्रकारच्या आंब्यांचा वापर करून सुंदर आणि पारंपरिक अशी मांडणी करण्यात आली आहे. या आरासीकडे भक्तांचे विशेष आकर्षण पाहायला मिळत आहे. भक्त मोठ्या संख्येने मंदिरात दाखल होत असून, दर्शनासोबतच या अनोख्या सजावटीचा आनंद घेत आहेत. मंदिर प्रशासनाच्या वतीनेही उत्कृष्ट नियोजन करण्यात आले आहे.
0
0
Report

सातारा में उपमुख्यमंत्री शिंदे का दौरा: जाहीर सभा और राजनीतिक बदलाव

Satara, Maharashtra:सातारा: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी २० एप्रिल रोजी सातारा जिल्हा दौऱ्यावर असून या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या राड्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच सातारा जिल्हा दौऱ्यावर येत असून यांचा हा दौरा शिवसेना कार्यकर्त्यांसाठी राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. उद्या होणाऱ्या दौऱ्या विषयीची माहिती पश्चिम महाराष्ट् जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे यांनी यांनी दिली आहे. या दौऱ्याची सुरुवात दुपारी होणार असून हेलिकॉप्टरने एकनाथ शिंदे हे अंगापूर येथे दाखल होणार आहेत. 4 वाजता अंगापूर येथील प्रसिद्ध श्री आत्म गजानन मंदिर येथे होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाला होजेरी लावणार आहे. यानंतर अंगापूर पंचक्रोशीतील जनतेच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. यानंतर सातारा शासकीय विश्रामगृहावर शिवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात नयेार आहे. या बैठकीत एकनाथ शिंदे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत... बैठक संपल्यानंतर संध्याकाळी सातारा येथील गांधी मैदान येथे भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे साताऱ्यात प्रथमच एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होत असून या सभेला मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित राहणार आहे. या सभेत कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती शरद कणसे यांनी दिली
0
0
Report
Advertisement

पाटण में पानी का संकट: टैंकर पानी पर जनता की उथल-पुथल

Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यातील पाटण शहरात सध्या पाण्याची गंभीर टंचाई निर्माण झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन रस्त्याच्या कामादरम्यान फुटल्याने गेल्या आठ दिवसांपासून अनेक भागातील नळपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. त्यामुळे नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. पाणी मिळवण्यासाठी महिलांची मोठी धावपळ सुरू असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते. कोयना धरण आणि कोयना नदी काठी असलेल्या पाटण शहरातील नागरिकांना पाण्यासाठी टँकर मागे धावावे लागत आहे. कोणा धरण उराशी तरी कोरड घासायची अशी परिस्थिती पाटणच्या जनतेची निर्माण झाली आहे. कोयना धरण आणि कोयना नदीच्या परिसरात असलेल्या पाटण शहरावरच पाण्यासाठी अशी वेळ येणे, ही प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब मानली जात आहे. मुख्य अधिकारी, नगरपालिका प्रशासन आणि संबंधित ठेकेदार यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप होत आहे. फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करण्यास उशीर होत असल्याने नागरिकांचे हाल वाढले आहेत. विरोधकांनी प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे, तर सत्ताधारी गटाकडून लवकरच पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात येत आहे. मात्र, तोपर्यंत पाटणकरांना पाण्यासाठी आणखी किती दिवस संघर्ष करावा लागणार, हा सवाल आता उपस्थित होत आहे.
0
0
Report

Sangli clash over approved councillor selection in Ajit Pawar's NCP; 35 officials resign

Sangli, Maharashtra:सांगलीस्वीकृत नगरसेवक निवडीवरून राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये मोठा वाद उफाळून आला आहे. पक्षाच्या 35 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत; शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्याकडे राजीनामे सुपूर्द करण्यात आले आहेत. महापालिकेचे गटनेते मैनुद्दिन बागवान यांच्याकडून पक्षाचा आदेश डावलत पक्षाशी संबंधित नसणाऱ्या व्यक्तीची स्वीकृत नगरसेवक पदी निवड करण्यात आल्याचा आरोप करत मैनुद्दिन बागवान यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी देखील शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्याकडून करण्यात आली आहे. दरम्यान स्वीकृत नगरसेवक पदी डावलण्यात आलेले दिगंबर जाधव यांनी गटनेते बागवान यांच्याकडून बोली लावून आर्थिक तडजोड करत स्वीकृत नगरसेवक पदाची निवड करण्यात आल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी उपमुख्यमंत्री सुनिता पवार प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे शहर राष्ट्रवादी कडून स्पष्ट करण्यात आले आहे. स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून राष्ट्रवादी अजित पवार पक्षात असलेला संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.
0
0
Report

अक्षय तृतीया पर दत्त मंदिर में 151 किलो आम की आकर्षक आरास, महाप्रसाद वितरण

Lasalgaon, Maharashtra:लासलगाव येथे अक्षय तृतीयाम निमित्त दत्त मंदिरात भक्तिभावाने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी भक्तांकडून तब्बल १५१ किलो आंब्याची मनमोहक आरास साकारण्यात आली आकर्षक सजावटीमुळे मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी उसळली होती या विशेष प्रस ngi मध्ये पूजाविधी, अभिषेक आणि धार्मिक कार्यक्रम पार पडले आंब्याच्या आरासचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या उत्साहात हजेरी लावली दरम्यान, उद्या संध्याकाळी या आंब्यापासून तयार करण्यात येणारा आमरस आणि पुरणपोळीचा महाप्रसाद भाविकांना वाटप करण्यात आली आहे
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top