icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

शेतकरी के साथ ऑनलाइन धोखाधड़ी: 1.94 लाख रुपये की ठगी, विटा पुलिस थाने में शिकायत

Sangli, Maharashtra:अँकर - म्हैस देण्याच्या नावाखाली एका शेतकरयाची तब्बल दोन लाखाचा ऑनलाईन फसवणूक झाली आहे. सांगलीच्या खानापूर तालुक्यातील वाळूज मध्ये हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. वाळूज येथे प्रमोद बाबर यांनी यूट्यूब चैनलवरती वेगवेगळ्या म्हशी घरपोच देतो, अश्या जाहिरातीची व्हिडीओ पाहिला, त्यानंतर म्हैस खरेदीसाठी त्यांनी संपर्क केला,यानंतर वेगवेगळे व्हिडीओ टाकून जनावरे किती चांगली आहेत, आम्ही चांगल्या पद्धतीने तुम्हाला सोय देऊ शकतो,असे बाबर यांना विश्वास देण्यात आला,यामुळे बाबर यांनी वेगवेगळ्या पद्धतीने १ लाख ९४ हजार रुपये ऑनलाइन पाठवले, मात्र पैशाच्या बदल्यात बाबर यांना देण्यात आली नाही उघड सातत्याने त्यांच्याकडून पैसे मागण्याचा सपाटा सुरूच ठेवण्यात आला आणि अखेर आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात येतात बाबर यांनी विटा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. बाईट - प्रमोद बाबर - शेतकरी ,वाळूज, विटा. बाईट - विपुल पाटील - पोलीस उपअधीक्षक - विटा.
0
0
Report

भ्रष्टाचार के आरोप, राजनीति का बाज़ार: ओबीसी के लिए 100% छात्रवृत्ति की मांग तेज

Nagpur, Maharashtra:विजय वडेट्टीवार देश पूर्ण उध्वस्त झालाय... 7.7 GDP दाखवताय.. बेशरम की अमर्याद झाली आहे - डिझेल पेट्रोल रांगा लागल्या.. बेरोजगार रस्त्यावर उतरला आहे.. एक्स्पोर्ट इम्पोर्ट मध्ये मोठी घट आहे... - -- अशा परिस्थितीत आपली पाठ थोपटून घेणे आणि देशाला उध्वस्त करताय --- कॉकरोच जनता m पार्टीने आंदोलन उभे केले... आता युवा शांत बसणार नाही... -- या आंदोलनातून देशातील परिवर्तनाची सुरुवात होणार आहे.. आणि ते परिवर्तन होईल... त्याची सुरुवात झाली आहे सरकारला जावे लागेल -- देशाच्या खुर्चीवर बसलेली जी प्रवृत्ती आहे... ती हिटलरच्या विचाराची आहे... त्यामुळे जो सत्यासाठी लढतो आहे.. सच्चाई sाठी रस्त्यावर येतो आहे.. त्याला दाबण्याचं काम करताय -- यामध्ये सीबीएससी मध्ये त्या पोरांची भूमिका त्यांनी मांडली... 17 वर्षाच्या पोराला सोडत नाही.. त्यामुळे स्वाभाविक आहे (on मराठा OBC ) --- या सरकारची भूमिका कधीच OBC बाजूनं राहिली नाही. मत घेण्यापुरत..म्हणजे गाईचे दूध काढण्यापुरत ..वासराला गाईचा स्तनाला लावण आणि मग ओढून घेणं... अशी ओबीसी बाबत या सरकारची प्रवृत्ती आहे ---- सर्वांनाच या सवलती दिल्या गेल्या... ओबीसी या स्पर्धेत कसा टिकू शकेल... --- जेवढे तुम्ही सारथीला देतात तेवढे आम्हाला देतात... या सवलती देताना देशातील ओबीसी 50% पेक्षा जास्त आहे --- सारथी प्रमाणे पैसे मिळत असेल तर एवढ्या मोठ्या समाजाचा कसा विकास होईल --- त्यांना देण्याचा विरोध नाही.. एससी, एसटी प्रमाणे आम्हाला 100% स्कॉलरशिप स्वलती द्या -- आणि गरीब समाजा यांची कुचंबणा होउ नये ( उमेदवार माघार ) -- राजकारणाचा बाजार झाला आहे. रस्त्यावर बसून वाटेल ते घेता येतं वाटेल ते खरेदी करता येतं... अशी खात्री भारतीय जनता पक्षाला झाली आहे. प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे हा देश विकला गेला आहे -- घेणाऱ्या देण्यावर दोघांवरही कारवाई दकेली पाहिजे.. चौकशी झाली पाहिजे --- सुधीर मुनगंटीवार कालच म्हणाले की या निवडणुकीत जे चालतं ते पाहून या निवडणुकाच होऊ नये -- नगरसेवक निवडून येतो तो कोणत्याच पक्षाचा नसतो -- 70 टक्के लोक विकले जातात -- 30 टक्के इमानदार --- पैसे किती मिळवावे पाच लाख, दहा लाख, पंधरा लाख -- हे पैसे आले कुठून -- जे उमेदवार दिले ते विकल्या गेले --- आपल्याच पक्षाचे लोक आपल्याच आपल्या लोकांना पैसे मागत आहे... भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी पैसे मागितले --- विधान परिषदेचे राजकारण वेश्येला लाजवेल इतक्या खालच्या स्तराचे झाले आहे -( काँग्रेस नेत्यांनीच पैसे दिले... दगाबाजी केली... मी जिथे सांगेल तिथेच मतदान करा..शैलेश अग्रवाल यांचा आरोप ) --= हे मी ऐकले आहे... काही नगरसेवकांना पाच-पाच लाख रुपये काँग्रेसच्या एका नेत्याने दिले... -- माझ्या एका नगरसेवकाने हे सांगितले... हे पैसे ठेवा मी सांगतले त्यालाच मतदान करा तोवर हे पैसे ठेवा.. हे पैसे कुठून आले कोणाचे होते हे काही त्यानी सांगितले नाही.. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 40- 45 काँग्रेसच्या नगरसेवकांना एका नेत्याने पाच -पाच लाख रुपये वाटल्याची जोरदार चर्चा आहे.. -- त्याबाबत माझे पुरावे नाही ही चर्चा आली कुठून... आणि झाली कुठून हे मला सांगणं मला उचित वाटत नाही -- शैलेश अग्रवाल यांच्याकडे ही माहिती असेल त्यांनी आमच्या वरिष्ठांकडे द्यावी -- मी पुरावा नसताना देण उचित नाही
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी: वैभव नाइक पर एसीबी जांच, अपसंपदा मामले में कणकवली नगरपंचायत को पत्र

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे नेते माजी आमदार वैभव नाईक रत्नागिरी एसीबीकडून चौकशीच्या फेऱ्यात अपसंपदा प्रकरणी रत्नागिरी एसीबी कार्यालयाकडून कणकवली नगरपंचायतीला पत्र कणकवली शहरातील वैभव नाईक यांनी खरेदी केलेल्या दोन गाळ्यांसंदर्भातील एसीबीने मागवली माहिती विकत घेण्यात आलेले गाळे एक आहेत कि दोन गाळे स्वतंत्र आहेत, अशी माहिती एसीबीने मागवली रत्नागिरी एसीबीच्या पोलिस उपअधिक्षकांचं कणकवलीच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र २००२ आणि २००६ मध्ये वैभव नाईक यांनी या गाळ्याची केली होती खरेदी २०२२ सालापासून वैभव नाईक यांची अपसंपदा प्रकरणी रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयामार्फेत सुरु आहे चौकशी
0
0
Report

तीन वर्षाचा चिमुकला पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू: गावात शोक

Malegaon, Maharashtra:मामाच्या गावी सुट्टीनिमित्त आलेल्या अवघ्या तीन वर्षीय चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना देवळा तालुक्यातील दहिवड धोबीघाट येथे घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. कृष्णा महेश अहिरे (वय ३ वर्षे, रा. वायगाव, ता. बागलाण) हा उन्हाळी सुट्टीनिमित्त आपल्या मामाच्या गावी दहिवड धोबीघाट येथे आला होता. घराजवळील आंब्याच्या झाडाखाली बसून तो आंबे खात होता. आंबे खाल्ल्यानंतर हात खराब झाल्याने तो जवळच असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ हात धुण्यासाठी गेला. यावेळी त्याचा तोल जाऊन तो पाण्याच्या टाकीत पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, कृष्णाचे मामा जीवन देवरे व आजोबा बापू देवरे हे पाण्याच्या टाकीजवळ आले असता त्यांनी कृष्णा पाण्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने त्याला बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती कृष्णाला मृत घोषित केले. अवघ्या तीन वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याचा अशा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याने अहिरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक, ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले असून चिमुकल्या कृष्णाच्या अकाली निधनाबद्दल सर्व स्तरांतून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, घरांच्या परिसरात असलेल्या पाण्याच्या टाक्या, विहिरी व इतर धोकादायक ठिकाणे सुरक्षित ठेवण्याची गरज या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. लहान मुलांवर सतत लक्ष ठेवणे तसेच अशा ठिकाणी आवश्यक सुरक्षेच्या उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.
0
0
Report

सोलापुर के बोरामणी शिवार में 36 किलो गांजा जप्त; अंतरराज्य ड्रग गैंग का भंडाफोड़

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातील बोरामणी शिवारात तब्बल 36 किलो गांजा जप्त, सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेची मोठी कारवाई - दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी शिवारात तब्बल 36 किलो गांजा जप्त - छत्तीसगड राज्यातील जगदलपूर येथून गांजा बोरामणी मध्ये येताच पोलिसांनी टाकली धाड - सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाची मोठी कारवाई - 36 गड मधून गांजा आणणाऱ्या तीन जणांना ठोकल्या बेड्या - सदर आरोपींना न्यायालयाने सुनावली 9 जून पर्यंत पोलीस कोठडी - गांजा पुरवठा करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरू
0
0
Report
Advertisement

चंद्रपूर के टाडोबा के पास रानटी हाथी कळप प्रवेश, ग्रामीण और पर्यटन चिंता में

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिले में प्रविष्ट हुए रानटी हाथी कळप ने टाडोबा के करीब प्रवेश किया है. सावली तालुक्यातील मुरमाडी-गोलाभूज भाग के विस्तीर्ण तालाब क्षेत्र को निवास स्थली चुना गया है. यह कळप गडचिरोली जिले के रहने के बाद पिछले 5 दिन से वैनगंगा नदी पार कर चंद्रपूर के मुरमाडी-गोलाभूज क्षेत्र में मुक्काम पर है. ग्रामवासियों के नुकसान के भय से वनविभाग ने गांव में 25 प्रशिक्षित जवान तैनात किए हैं. निगरानी के लिए ड्रोन से नजर रखी जा रही है और कळप को गांव के नजदीक आने से रोकने के लिए पेटते टेंभे, तीखे धुएँ और लाउडस्पीकर का उपयोग किया जा रहा है. यदि कळप Tadoba में प्रवेश करता है, तो वहाँ के पर्यटन और स्थानीय जिंदगी पर असर पड़ने की संभावना है.
0
0
Report

भारतीय जनता पार्टी पर आरक्षण विभाजन का आरोप, दीपक केदार ने यात्रा शुरू की

Yeola, Maharashtra:महाराष्ट्र राज्यात एस सी घटकांमध्ये आरक्षणाचा वर्गीकरणाचा प्रयास भारतीय जनता पक्ष कडून केला जात असल्याचा गंभीर आरोप करून ऑल इंडिया पॅंथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदारे यांनी आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात केली असून येवल्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवसृष्टी स्मारक येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून यात्रेला सुरुवात करण्यात आली याप्रसंगी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून आरक्षण बचाव नारा देण्यात आला प्रसंगी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
0
0
Report

हिंगोली के सेनगाव शासकीय वस्तीगृह की मरम्मत: सिमेंट के बजाय मिट्टी-खड़कट से कार्य

Hingoli, Maharashtra:अँकर -हिंगोलीच्या सेनगाव येथील शासकीय मागासवर्गीय वस्तीग्रहाची इमारत धोकादायक बनल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलं आहे पायाभूत कामांच्या ठिकाणी माती मिश्रित खडक टाकण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ग्रामीण भागातील विद्यार्थी या शासकीय वस्तीगृहात शिक्षण घेत असतात मात्र इमारत धोकादायक बनली आहे आणि त्यामध्ये आता पुन्हा दुरुस्तीचं काम सुरू असताना खाली सिमेंट काँक्रीटचे काम न करता केवळ माती मिश्रित खडक टाकून दुरुस्तीचे काम होत असल्याचा प्रकार समोर आला आहे कोट्यावधी रुपये खर्च करून होत असलेल काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा प्रकार समोर आला आहे संबंधित विभागाने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे
0
0
Report
Advertisement

ACB ने भू-करमापक सहित दो आरोपियों को लाच के साथ गिरफ्तार किया

Chandrapur, Maharashtra:शासकीय कार्यालयांत सर्वसामान्यांची अडवणूक करून मलिदा लाटणाऱ्या लाचखोरांना चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दणका दिला आहे. नागभीड येथील भूमी अभिलेख कार्यालयातील परीरक्षण भू-करमापक रंजीत रामचंद्र कनोजकर आणि त्याचा खासगी पंटर जयंत दीपक कामडी या दोघांना १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे भूमी अभिलेख विभागात खळबळ उडाली आहे. तक्रारदार राहत असलेली जागा आणि त्यांच्या आजोबांच्या नावे असलेल्या घराच्या जागेचा फेरफार वडिलांच्या नावावर करावयाचा होता. या अधिकृत कामासाठी तक्रारदाराने नागभीड भूमी अभिलेख कार्यालयात रीतसर अर्ज दाखल केला होता. मात्र, हक्काच्या कामासाठीदेखील भू-करमापक रंजीत कनोजकर याने चक्क १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणीकेली. लाच देण्याची अजिबात नसल्याने इच्छा तक्रारदाराने थेट चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक लाचखोर भूकरमापक विभागाकडे रंजीत कनोजकर लेखी तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने तक्रारीची शहानिशा करण्यासाठी पंचांसमक्ष पडताळणी केली. तडजोडीअंती १० हजार रुपये लाच देण्याचे ठरले. भूकरमापक कनोजकर याने स्वतः पैसे न घेता, तळोधी येथील त्याचा खासगी माणूस जयंत कामडी याच्याकडे ही रक्कम सुपूर्द करण्यास तक्रारदाराला सांगितले. नियोजनानुसार, तक्रारदाराने लाचेची १० हजार रुपयांची रक्कम आरोपी जयंत कामडी याच्या हातात देताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने झडप घालून त्याला रंगेहात पकडले. मुख्य सूत्रधार भू-करमापक रंजीत कनोजकर यालाही तत्काळ ताब्यात घेण्यात आले.
0
0
Report

सातारा नगरपालिका की नई भव्य इमारत का उद्घाटन जल्द; उदयनराजे भोसले ने निरीक्षण किया

Satara, Maharashtra:सातारा - सातारा नगरपालिकेची भव्य-दिव्य नवी इमारत साकार झाली आहे. या नव्या इमारतीची पाहणी खा. उदयनराजे भोसले आणि त्याचा सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांनी केली. शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेता जुन्या इमारतीची मर्यादा स्पष्टपणे जाणवत होती. नवीन जागेच्या शोधापासून ते निधी उभारणीपर्यंत अनेक अडचणी समोर होत्या. मात्र सर्व घटकांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास आला. साताऱ्याच्या वैभवात भर घालणारी ही आधुनिक प्रशासकीय इमारत लवकरच नागरिकांच्या सेवेसाठी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार असून, तिच्या भव्य उद्घाटनाचा कार्यक्रमही लवकरच आयोजित केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली. शहराच्या विकासाचा नवा अध्याय ठरणाऱ्या या इमारतीचे श्रेय आजी-माजी सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि सातारा शहरातील नागरिकांना जात असल्याचे यावावेळी सांगण्यात आले. बाईट खासदार उदयनराजे भोसले
0
0
Report

गर्मी और रोग से अनार बाग उखाड़कर किसानों ने ट्रैक्टर चलाकर बाग नष्ट किया

Yeola, Maharashtra:जून महिन्याच्या पहिल्या सप्ताहामध्ये उन्हाची तीव्रता अधिक वाढल्याने फळबाग जगणे मुश्किल होत आहे त्यातच डाळिंब बागेवर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जळगाव नेऊर येथील डाळिंब उत्पादक शेतकरी पवन शिंदे, गोकुळ शिंदे व योगेश शिंदे यांनी आपल्या सहा एकर डाळिंब बागेवर ट्रॅक्टर फिरवून बाग नष्ट केली आहे चार वर्षे बाग उभी करण्यासाठी आलेला खर्च, उत्पादनात असलेली तफावत यामुळे शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला असून शासनाने शेतकरी हिताचे निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे
0
0
Report
Advertisement

भीम नगर में पानी टंकी नहीं, डबकों से प्यास बुझाने पर मजबूर नागरिक

Akola, Maharashtra:एकीकडे शासनाकडून प्रत्येक नागरिकाला स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे दावे केले जात असताना, अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातील भीमनगर परिसरात मात्र नागरिकांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. हे चित्र आहे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातील भीम नगरातील धक्कादायक बाब म्हणजे, येथील नागरिकांना चक्क डबक्यात साचलेले पाणी भरून आपली तहान भागवावी लागत आहे. मूर्तिजापूर शहराच्या बायपास रोडलगत असलेल्या भीमनगर परिसरात अनेक दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. परिणामी महिलांसह लहान मुलांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. परिसरात साचलेल्या डबक्यातून नागरिक पाणी भरताना दिसत असून, यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हे पाणी पिण्यासाठी आणि घरगुती वापरासाठी वापरले जात असल्याने आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, वारंवार तक्रारी करूनही संबंधित प्रशासन आणि लोकप्रतিনিধींनी या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. उन्हाळ्याच्या तीव्र झळा आणि वाढत्या तापमानामुळे पाण्याची गरज अधिक असताना भीमनगरवासीयांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. स्वच्छ पिण्याचे पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असताना प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भीमनगर परिसरातील पाणीटंचाईची समस्या तातडीने सोडवून नियमित आणि स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आता प्रशासन या गंभीर समस्येकडे कितपत गांभीर्याने पाहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. डबक्यातील पाणी भरून तहान भागविण्याची वेळ नागरिकांवर येणे ही प्रशासनासाठी निश्चितच चिंतेची बाब आहे. भीमनगरवासीयांच्या पाणी समस्येवर तातडीने तोडगा निघणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report

अभय सिंह जगताप का स्थानीय मुद्दों पर महाविकास आघाडी का हमला

Satara, Maharashtra:सातारा: सांगली-सातारा स्थानीय स्वराज्य संस्थेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रथमच साताऱ्यात सध्याच्या राजकीय घडामोडीवर भाष्य केले आहे. सांगली-साताराआवघड विधानसभा क्षेत्र हा क्रांतिकारी विचारांचा जिल्हा आहे. सध्या सत्ताधारी महायुतीत अंतर्गत प्रचंड धुसफुस सुरू असून, तिथल्या नगरसेवकांपासून ते मंत्र्यांपर्यंत सर्वांची निधीअभावी कोंडी केली जात आहे. केंद्रात आणि राज्यात हे पक्ष एकत्र दिसत असले, तरी स्थानिक पातळीवर त्यांच्यावर मोठा अन्याय होत आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ राजकीय नसून अन्यायग्रस्तांच्या स्वाभिमानाची लढाई आहे, असा घणाघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभयसिंह जगताप यांनी महायुतीवर केला आहे.
0
0
Report

मानसूनपूर्व भीषण बरसात से सातारा जिले में जनजीवन प्रभावित, बिजली आपूर्ति बाधित

Satara, Maharashtra:माण सातारा - माण तालुक्याला मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले आहे. म्हसवड, देवापूर, कुकुडवाड, वरकुटे-मलवडी आणि गोंदवले परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी मुसळधार तर कुकुडवाड परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या जोरदार पावसामुळे वरकुटे-मलवडी येथील आठवडी बाजार परिसर पाण्याखाली गेला. तर कुकुडवाड-मायणी मार्गावर झाड कोसळल्याने वीज खांब आणि विद्युत तारा तुटल्या. परिणामी मायणी फिडरची वीजपुरवठा यंत्रणा बंद पडली आणि म्हसवडसह परिसरातील अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला.महावितरणचे कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अचानक झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top