icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नाशिक साइबर पुलिस ने ऑनलाइन सट्टेबाजी से जुड़े पांच आरोपियों को गिरफ्तार किया

Nashik, Maharashtra:नाशिक - - नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई - ऑनलाइन बेटिंग चालवणाऱ्या पाच आरोपींना केली अटक - चार लॅपटॉप, 18 मोबाईल , 26 सिम कार्ड विविध बँकांचे 54 पासबुक , 4 चेक बुक आणि 25 एटीएम कार्डसह आरोपींना अटक - वेबसाईट द्वारे ग्राहकांना ऑनलाइन डिपॉझिट व विड्रॉवल करून ऑनलाईन बॅटिंग चालवत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर - काही तरुणांकडून ऑनलाईन बॅटिंग चालवलं जात असल्याची मिळाली होती माहिती - मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कळवण येथून पाच संशयित आरोपींना केली अटक बाईट - संजय पिसे , पोलीस निरीक्षक सायबर क्राईम
0
0
Report

शिर्डी सीट पर भाऊसाहेब वाकचौरे ने संजय दिना पाटील का समर्थन जाहिर किया

Shirdi, Maharashtra:खा.भाऊसाहेब वाकचौरे बाईट मुद्दे - शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जनता अत्यंत उत्साहात माझं स्वागत करत आहे... प्रत्येकाचं मत एकच की तुम्ही घेतलेला निर्णय हा योग्य... माझ्यावर कितीही आरोप करूद्या मी घरात नाही मी लोकांमध्ये आहे... मी घाबरणारा किंवा पळणारा माणूस नाही... मला मतदारसंघातील प्रत्येक गावात फिरावे लागणार , जनतेमध्ये जावे लागणार आणि मी जाणार... ऑन संजय दिना पाटील पत्रकार शिवीगाळ *संजय दिना पाटलांना रोज रोज गेली कित्येक दिवस सतावण्याचा प्रयत्न झाला...* *मात्र एक गोष्ट खरी की संयम ठेवण्याची गरज...* संजय दिना पाटलांकडून जी चूक झाली त्याबद्दल मीही दिलगिरी व्यक्त करतो... भविष्यात अशी चूक होणार नाही... *संजय दिना हा सज्जन माणूस..*. *शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्याकडून संजय दिना पाटलांची पाठराखण..* त्या त्या वेळेच्या परिस्थितीमुळे कधी कधी असे प्रकार घडतात.. शिंदे साहेबांनी दिलगिरी व्यक्त केलीय , संजय दिना पाटलांनि दिलगिरी व्यक्त केलीय , मी देखील करतो...
0
0
Report

यवला-नाशिक के पूर्व भाग में भारी बारिश, किसानों को खरीफ की तैयारी में राहत

Yeola, Maharashtra: अँकर : नाशिकच्या येवला शहरसह तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. नगरसुल, अंदरसुल, पाटोदा ,परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला असून खरीप पिकांच्या पेरणीसाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. वरुणराजाच्या या आगमनाने ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र तालुक्यातील अनेक गावांना पावसाचा पत्ताच नसल्यаче चित्र दिसून येत आहे.
0
0
Report
Advertisement

FDA ने कल्याण-डोंबिवली के होटलों को तीन दिन का अल्टिमेटम जारी किया

Kalyan, Maharashtra:FDA ने कल्याण-डोंबिवली के होटलों को तीन दिन का अल्टिमेटम जारी किया है; ग्राहक स्वास्थ्य नियमों का पालन नहीं किया तो कार्रवाई होगी। "SAFE FOOD, HEALTHY MAHARASHTRA" अभियान के तहत अन्न व औषध प्रशासन ने होटल व्यवसायियों के साथ कल्याण में महत्वपूर्ण बैठक की। बैठक में ग्राहकों को मुफ्त पीनے का पानी, स्वच्छता, खाद्य सुरक्षा नियमों का पालन और परमिट नवीनीकरण के निर्देश दिए गए। स्वास्थ्य से कोई समझौता नहीं किया जाएगा; नियमों का कड़ाई से पालन करने का आह्वान किया गया। उल्लंघन करने वालों पर कार्रवाई की चेतावनी दी गई; होटल व्यवसायियों ने आवश्यक सुधार करने की गारंटी दी। अभियान के अनुसार विभाग ने अब एक्शन मोड ले लिया है और तीन दिन के भीतर नियमों का कड़ाई से पालन होगा। होटल व्यवसायियों ने उपक्रम का स्वागत किया और 2-3 दिनों में आवश्यक सुधारों की गारंटी दी।
0
0
Report

योगेश कदम: संजय पाटील माफी के बाद समान नागरी कानून पर रिपोर्ट का इंतजार

Ratnagiri, Maharashtra:खेड/ रत्नागिरी योगेश कदम गृह राज्यमंत्री पत्रकारांच्या बाबतीत अशी भाषा वापरणे अयोग्य मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी समाज दिलेय संजय पाटील यांनी माफीही मागितली आहे त्यामुळे विषय आता संपलाय: योगेश कदम खाजगी कार्यक्रमाला जाणे गैर नाही देशाच्या जडणघडणीत संघाचे मोलाचे योगदान एकनाथ शिंदे यांचे काम चांगले ऑपरेशन आम्हाला करायची गरज नाही, पेशंट आमच्याकडे येतात तुकाराम मुंढे यांची तीन वर्षे बदली होऊ नये, अशी आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुदतवाढ देता आली, तर द्या: योगेश कदम समिती गठित केली आहे, अहवाल आल्यानंतर निर्णय होईल: योगेश कदम
0
0
Report

लातूर में महायुती की ऑफर पर राजनीति तेज, डॉ. शिवाजी काळगे का रुख स्पष्ट नहीं

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... स्क्रिप्ट ::- ओमराजेंनंतर आता डॉ. शिवाजी काळगे यांनाही महायुतीची ऑफर.... पालकमंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण.... AC ::- धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर याच्या सह ६ खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता लातूरच्या राजकारणातही नवी चर्चा सुरू झाली आहे. पालकमंत्र्यांनी काँग्रेसचे आमदार डॉ. शिवाजी काळगे यांना थेट ओमराजे आले... आता हे खासदार राहिलेत... माझी पालकमंत्री म्हणून विनंती आहे, तुम्हीही महायुतीमध्ये या असे जाहीर आवाहन केले. या वक्तव्यामुळे डॉ. काळगे भाजपमध्ये जाणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, डॉ. काळगे यांनी यावर अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. ... साऊंड बाईट ::- शिवेंद्रराजे भोसले पालकमंत्री...
0
0
Report
Advertisement

शिवसेना ने संजय राठोड को राष्ट्रीय नेता बनाकर विमुक्त-भटक्या समाज सशक्त बनाने का ऐलान

Yavatmal, Maharashtra:विमुक्त व भटक्या जमाती समाजाच्या सक्षमीकरणासाठी शिवसेनेने मंत्री संजय राठोड यांची राष्ट्रीय नेतेपदी निवड केली्यानंतर मसानजोगी, पारधी, बंजारा, लोहार, गवळी, गोंधळी, जोशी, बहुरूपी आदी भटक्या समाजाकडून राठोड यांचे पारंपारिक पद्धतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. भटक्या विमুক্ত जमातीतील ही मंडळी आपापल्या पारंपारिक वेशभूषेत आले होते. यावेळी संजय राठोड यांनी किंगरी घंटा खजेरी आदी वाद्य वाजवून यापुढील काळात अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या मोठ्या सामाजिक घटकाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय मुख्य प्रवाहात आणण्याचा व्यापक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. देशभरातील विमुक्त, भटक्या व अर्धभटक्या समाजाची लोकसंख्या अंदाजे 10 ते 12 कोटी असून महाराष्ट्रात हा आकडा जवळपास 1.5 कोटी इतका आहे. एवढी मोठी लोकसंख्या असूनही हा समाज आजही शिक्षण, आरोग्य, रोजगार, निवास, जातप्रमाणपत्र, आरक्षण आणि मूलभूत सुविधांपासून मोठ्या प्रमाणावर वंचित आहे. त्यामुळे त्यांचे सक्षमीकरण हेच पुढील ध्येय असल्याचे देखील संजय राठोड म्हणाले.
0
0
Report

प्रकाश आंबेडकर ने स्मार्ट मीटर को लेकर महावितरण के खिलाफ विरोध दर्ज किया

Akola, Maharashtra:Anchor : राज्यात महावितरणकडून सुरूलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कडाडून विरोध केला आहे. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून ग्राहकांकडून अधिक वीजबिल वसूल करण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. विनापरवानगी स्मार्ट मीटर बसविण्यात आल्यास संबंधितांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे. स्मार्ट मीटरचा नेमका फायदा कोणाला होणार, याचे उत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांवरही त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. चित्रपटातील 'एक दिवसाचा मुख्यमंत्री' या धर्तीवर एखाद्याला एक दिवसाचा मुख्यमंत्री करून महावितरणच्या कनिष्ठ व उपअभियंत्यांच्या संपत्तीची चौकशी केली, तर त्यांच्याकडे १५ ते २० हजार कोटी रोख रक्कम सापडेल, असा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.तसेच, 'कोक्रोच जनता पार्टी'ने सुरुवात चांगली केली होती, मात्र दीपके यांची जात समजल्यानंतर लोकांनी त्यातून माघार घेतली, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. राज्यात सुरू असलेल्या 'ऑपरेशन लोटस', ' ऑपरेशन टायगर 'वर भाष्य करताना, "वंचितकडे सत्ता नसल्याने आम्ही कोणते ऑपरेशन करणार?" असे मिश्किल वक्तव्यही प्रकाश आंबेडकर यांनी केले.
0
0
Report

लातूर के किल्लारी में युवकों ने चाकू दिखाकर दादागिरी, पुलिस ने पकड़े

Latur, Maharashtra:किल्लारीत पोलिसांनाच जिवे मारण्याची धमकी‌.. दोन तरुण अटकेत. भर चौकात हातात चाकू घेऊन दादागिरी... व्यापाऱ्यांना धमकावल्यानंतर पोलिसांशीही हुज्जत... व्हिडिओ व्हायरल. किल्लारीत दोन तरुणांचा भररस्त्यात धिंगाणा... पोलिसांशी अरेरावी आणि शिवीगाळ... सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या घटनेची जोरदार चर्चा..... कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलिसांनाच खुलेआम चॅलेंज... भर चौकात दादागिरी... आणि जिवे मारण्याच्या धमक्या. लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे दोन तरुणांनी हातात चाकू घेऊन व्यापाऱ्यांना धमकावल्याचा आरोप आहे. त्यानंतर कारवाईसाठी आलेल्या पोलिसांसमोरही या दोघांनी दमदाटी करत शिवीगाळ आणि दादागिरी केल्याचा प्रकार घडला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पोलिसांनी दोन्ही तरुणांना अटक केली आहे. भर चौकात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे....
0
0
Report
Advertisement

वसई-विरार महापालिका की इलेक्ट्रिक बस में अचानक आग, दमकल ने पाया नियंत्रण

Vasai-Virar, Maharashtra:वसई-विरार महापालिका मुख्यालय परिसरात उभी असलेल्या महापालिकेच्या इलेक्ट्रिक बसला अचानक भीषण आग लागल्याची घटना दुपारी घडली. आगीमुळे परिसरात काही काळ एकच खळबळ उडाली असून, धुराचे मोठे लोळ आकाशात पसरले होते. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली असल्याची माहिती नाही. आग नेमकी कशामुळे लागली, याचा शोध घेण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
0
0
Report

Beed murder case: OBC leader meets GhuLe family, demands hanging

Beed, Maharashtra:बीड : विलास घुले खून प्रकरण; ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी घेतली कुटुंबीयांची भेट.. प्रकाश आंबेडकरांकडून फोनवरून घुले कुटुंबाचे सांत्वन, लढ्यात सोबत असल्याची दिली ग्वाही..! सौरभ सोनवणे सह सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी नवनाथ वाघमारे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले या तरुणाचा खून करण्यात आला होता.. या घुले कुटुंबीयांच्या सांत्वन पर भेटीला ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे टाकळी येथील निवासस्थानी दाखल झाले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही घुले कुटुंबीयांना फोनवरून संवाद साधत न्यायिक लढ्यासाठी आम्ही तुमच्या सोबत असल्याची ग्वाही दिली. दरम्यान या खून प्रकरणी बीडच्या खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलावर गुन्हा दाखल करून मुख्यमंत्र्यांनी घुले कुटुंबीयांना न्याय द्यावा, सौरभ सोनवणे याच्यासह सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केली आहे.
0
0
Report
Advertisement

सुकळी उभार प्रकल्प से किसान आज भी सिंचाई से वंचित, अधिकारियों की लापरवाही पर बढ़ी नाराज़गी

Wardha, Maharashtra:सुकळी उभार प्रकल्प मतलब धरण उराशी, कोरड घशाशी अँकर - सुमारे १७५० हेक्टार क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळावा या उद्देशाने उभारण्यात आलेला सुकळी उभार प्रकल्प २०१४ मध्ये पूर्ण झाला. मात्र कालव्यांतील तांत्रिक त्रुटी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे आजही अनेक शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. २०१६ मध्ये प्रथमच पाणी सोडण्यात आले असले तरी लाभधारकांपर्यंत ते प्रभावीपणे पोहोचले नाही.या समस्येवर माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री गफाट यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी आमदार राजेश बकाने यांच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. बैठकीनंतर अधिकाऱ्यांनी आंजी, पुलई, कामठी, पवणुर, नरसुला, बेलगाव, पेठ व बोरगाव सावली परिसरातील डावा व उजवा कालवा यांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी अपुऱ्या पाणीपुरवठ्यासह कालव्यांच्या दुरवस्थेबाबत तक्रारी मांडल्या. पाहणीनंतर आवश्यक दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार असून त्यासाठी आमदार राजेश बकाने पाठपुरावा करणार आहेत. सुकळी उभार प्रकल्पातील सर्व त्रुटी दूर करून प्रत्येक शेतकऱ्याला शंभर टक्के सिंचनाचे पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती सुनील गफाट यांनी दिली.
0
0
Report

देवली पुलिस ने प्रतिबंधित सुगंधित तंबाकू, गुटखा और पान मसाला की अवैध बिक्री पर बड़ी कार्रवाई

Wardha, Maharashtra:अँकर : सार्वजनिक आरोग्याला घातक ठरणाऱ्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, गुटखा व पान मसाल्याच्या बेकायदेशीर साठवणूक आणि विक्रीविरोधात देवळी पोलिसांनी मोठी कारवाई केली. २५ जून २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वायगाव (नि.) येथील देशमुख लेआउटमध्ये आरोपी सतीश गंगाधर नांडे यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत जनम तंबाखूची ५० पॅकेट, भाग्य गुटख्याची ३६३ पॅकेट, रत्ना तंबाखूचे १० टिन, ५०० ग्रॅम खर्रा असा एकूण ३२,८२६ किमतीचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्राथमिक तपासात हा माल बेकायदेशीर विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून आरोपीविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
0
Report

जालना में हनीट्रैप बनाकर पैसे मांगे, महिला समेत छह गिरफ्तार

Jalna, Maharashtra:जालना: ब्रेकिंग :जालन्यात हनीट्रॅप करणा-या महिलेसह सहा जणांना पोलिसांकडून बेड्या सोशल मीडियावर अश्लिल व्हिडिओ बनवून करायची पैशांची मागणी विविध पोलिस स्टेशनमध्ये आरोपी महिलेविरोधात सात गुन्हे दाखल सपना निकाळजे (वय 23 वर्ष) असं आरोपी महिलेचं नाव अँकर- जालन्यात हनीट्रॅप करून पुरुषांकडून पैशांची मागणी करणार्या एका महिलेसह सहा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्याात. सपना निकाळजे (वय 23 वर्ष) असं आरोपी महिलेचं नाव असून ती बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा तालुक्यातील पांगरी येथील रहिवासी आहे.. मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ओळख करून पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून आणि त्यांच्याकडून पैसे उकळल्याच्या घटना घडत होत्या.. तशीच एक घटना दोन दिवसांपूर्वी नवीन मोंढा भागात घडली.. एका बोलेरो चालकाला अडवून त्याला डांबून पैसे मागणी करण्यात आली. तसेच फिर्यादीच्या नातेवाईक आणि मित्रांकडून फोन पे वर पैसे मागवून घेतले.. या प्रकरणी चंदनझिरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी तपास करत असताना अवघ्या चार तासात पोलिसांनी हनीट्रॅप करणारी टोळीच गजाआड केलीये.. सपना निकाळजे असं मुख्य आरोपी महिलेचे नाव असून अविनाश गणेश झोटे, अर्जुन राजपूत, शंकर माणिक जाधव आणि आतिष सतीष गायकवाड या साथिदारांना अटक केलीये.. दरम्यान आरोपींकडून 2 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कारवाई पोलीस करत आहेत.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top