icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

जात प्रमाणपत्र के लिए उच्चस्तरीय आयोग स्थापित, ऐतिहासिक दस्तावेजों की गहन समीक्षा

Nagpur, Maharashtra:जात वैधतेच्या अडचणी दूर होणार,शासनाने नेमली समिती अनुसूचित जाती जमातीतील नागरिकांना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सुलभपणे मिळण्यासाठी वारंवार अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबतचा विषय आमदार प्रवीण दटके यांनी पावसाळी अधिवेशन 2026 मध्ये उचलला होता. नागपूर आणि विदर्भातील हलबा अनुसुचित जमातीच्या नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत दटके यांनी भूमिका मांडली होती. त्यानंतर आता रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र देण्याच्या मागणीचा सर्वकष अभ्यास करण्यासाठी आता राज्य सरकारने उच्चस्तरीय अभ्यास समिती स्थापन केली आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय जारी केला. यामुळे ऐतिहासिक दस्तावेजांचा अभ्यास शक्य होणार आहे.उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती के. एल. वडणे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत राहणार असून, रवींद्र कोळी, शरण खानापुरे, सतीश धडे, महादेव व्हांकळी, दीपक चव्हाण, प्रा. डॉ. हमराज उईके यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे उपसचिव सदस्य सचिव असतील. ही समिती सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा, ब्रिटिशकालीन, निजामकालीन तसेच सी. पी. अँड बेरार प्रांतातील महसुली अभिलेख, जनगणना अहवाल, मानववंशशास्त्रीय, समाजशाश्त्रीय आणि ऐतिहासिक विविध दस्तऐवजांची पडताळणी करून त्याचा सखोल अभ्यास करणार आहे. विशेषतः अनुसूचित जमातीतील हलबा, कोष्टी समाजाची मूळ जमात, उपजमाती आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील नोंदींचा अभ्यास करून शासनाला शिफारशी सादर केल्या जाणार आहेत.
0
0
Report

सुंदरी गाँव के तालाब के पार फटने से 15-20 हेक्टेयर धान की फसल बर्बाद

Bhandara, Maharashtra:तलावाची पार फुटल्याने 15 ते 20 हेक्टर भातशेतीचे नुकसान... रात्रीच्या पावसाचा फटका.... तलावातील पाणी आणि माती शेतात शिरल्याने भातपीक जमीनदोस्त... भंडारा जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविली होती. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. दुसरीकडे आता जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा संपली असून जिल्ह्यात चांगलाच पाऊस बरसत आहे. तर याच पावसामुळे सुंदरी गावातील तलावाची पार फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतीचा मोठा नुकसान झाला आहे... भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील सुंदरी गावातील तलावाची पारफुटली. कालपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. सततच्या पावसामुळं तलावाची माती हळूहळू खचू लागली. व रात्रीच्या सुमारास पार फुटली. या तलावाची पाणी परिसरातील 15 ते 20 हेक्टर शेतीमध्ये शिरल्याने सर्वत्र जलमय परिस्थिती पाहायला मिळत आहे. या पाण्यासह तलावातील माती देखील शेतकऱ्यांच्या शेतात साचू लागल्याने शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालं आहे. आता प्रशासनाने तात्काळ पार बांधून द्यावी व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत...
0
0
Report

केळघर घाट में विशाल दरड़ से सातारा–महाबळेश्वर मार्ग बंद, बचावकार्य जारी

Satara, Maharashtra:सातारा - सातारा–महाबळेश्वर रस्त्यावरील केळघर घाटातील काळा कडा परिसरात काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसामुळे कोसळलेल्या महाकाय दरडीमुळे हा मार्ग अद्यापही पूर्णपणे बंद आहे. रस्त्यावर दगड आणि मातीचा मोठा ढिगारा साचल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली असून, वाहनचालकांना मोठा फटका बसला आहे.काल या ठिकाणी दरड हटवण्यासाठी गेलेला jcb देखील अडकून पडला आहे. आज सकाळपासून दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले, तरी सततच्या पावसामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. दरड हटवित असतानाच आणखी एक दरड कोसळल्याने काम काही काळ थांबवावे लागले. यापूर्वी दरड हटवण्याच्या प्रयत्नात एक जेसीबीही अडकल्याची घटना घडली होती.घटनास्थळी प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक सह्या्द्री ट्रेकर्सचे सदस्य मदतकार्य करत आहेत. दरड पूर्णपणे हटेपर्यंत आणि मार्ग सुरक्षित घोषित होईपर्यंत सातारा–महाबळेश्वर मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत या मार्गावरून प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
0
0
Report
Advertisement

लोणावळा में पिछले 24 घंटे में 122 मिमी बारिश, सुरक्षित रहें—यात्रियों के लिए चेतावनी

Varsoli, Maharashtra:पर्यटन नगरी लोणावळ्यावर वरुणराजाची दमदार बॅटिंग कायम असून घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा जोर सुरूच आहे. गेल्या २४ तासांत लोणावळा शहरात १२२ मिमी पावसाची नोंद झाली असून, अवघ्या एका महिन्यातच शहराने १५० इंच पावसाचा टप्पा पार केला आहे. धुक्याची दुलई, कोसळणारे धबधबे आणि हिरवाईने नटलेला घाटमाथा पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने लोणावळ्याकडे धाव घेत आहेत. मात्र, पावसाचा आनंद घेताना धोकादायक ठिकाणी जाणे टाळून सुरक्षिततेचे भान ठेवण्याचे आवाहन लोणावळा नगरपरिषद प्रशासनाने केले आहे..
0
0
Report

कोयना डैम में विसर्जन शुरू, मुसलाधार बारिश से जलस्तर बढ़ने की चेतावनी

Satara, Maharashtra:सातारा | कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने आज सकाळी 9 वाजल्यापासून धरण पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू करून कोयना नदीपात्रात १,०५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.पावसाचे प्रमाण आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकनुसार विसर्जामध्ये वाढ किंवा बदल होऊ शकतो, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. या विसर्गामुळे नदीपात्रातील पाणीपातळी वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, तसेच ग्राम प्रशासन व संबंधित यंत्रणांनी आवश्यक सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
0
0
Report

लासलगाव में चोरी की घटनाओं में तेज़ वृद्धि, ग्रामीणों में चिंता बढ़ी

Yeola, Maharashtra:लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने बाहेरगावी जाणाऱ्या ग्रामस्थांची डोकेदुखी增 वाढली आहे लासलगाव येथील साईनगर परिसरात मध्यरात्रीच्या sुमारास बंद घर फोडून सुमारे साडेतीन ते चार लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली ऋषिकेश साप्ते यांच्या पत्नीची प्रसूती झाल्याने ते सासरी गेले होते घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत कपाटातील दोन तोळ्यांचे सोन्याची पोत, सोन्याची अंगठी, कानातील दागिने तसेच सुमारे ३०० ग्रॅम वजनाचे चांदीचे ताट व ग्लास, लहान मुलाचे चांदीचे दागिने, देव्हाऱ्यातील देवाच्या मूर्ती तसेच १० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण अंदाजे साडेतीन ते चार लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला या घटनेची माहिती ऋषिकेश साप्ते यांनी लासलगाव पोलिसांना दिली असतात पोलीस घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली मात्र, चोरीस गेलेल्या सोने-चांदीच्या दागिन्यांची खरेदीची बिले असल्यासच गुन्हा दाखल करता येईल, असे पोलिसांनी सांगितल्याचा दावा फिर्यादी ऋषिकेश साप्ते यांनी केला आहे
0
0
Report
Advertisement

नीट पेपरफुटी के बाद तनाव: परळी का आदित्य अभी भी लापता

Beed, Maharashtra:नीट परीक्षेतील कमी गुणांचे टेन्शन.... परळीतील विद्यार्थी बेपत्ता; वडिलांची पोलिसांत तक्रार देशभर गाजलेल्या नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणानंतर विद्यार्थ्यांवर वाढलेल्या मानसिक ताणाचे आणखी एक चिंताजनक उदाहरण परळी वैजनाथ येथे समोर आले आहे. नीट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आदित्य राठोड हा विद्यार्थी घरातून निघून गेल्याची घटना घडली असून, त्याचा अद्याप कोणताही ठावठikाणा लागलेला नाही. याप्रकरणी आदित्यचे वडील भगवान राठोड यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रारीची नोंद करून विद्यार्थ्याचा शोध सुरू केला आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्यला नीट परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने तो प्रचंड मानसिक तणावाखाली होता. निकाल लागल्यानंतर तो घरातून निघून गेला असून, त्यानंतर त्याच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरात शोध घेतला; मात्र अद्याप तो सापडलेला नाही. आदित्य हा लातूर येथील मोटेगावकर यांच्या RCC मध्ये शिक्षण घेतला होता.
0
0
Report

NEET में असफलता के बाद 18 वर्षीय समीक्षा पवार ने आत्महत्या की

Satara, Maharashtra:कराड, सातारा जिले के शेरे में रहने वाली समीखा दीपक पवार, आयु 18 वर्ष, ने नीट (NEET) परीक्षा में असफलता के कारणआत्महत्या करने के लिए विषाक्त दवा सेवन किया. समीखा को कराड के कृष्णा अस्पताल में भर्ती कराया गया था; सोमवार को उसकी मृत्यु हो गई. उसने पिछले वर्ष नीट परीक्षा दी थी; परिणाम में असफलता के कारण वह मानसिक तनाव और नैराश्य में थी. इसी अवस्था में उसने 23 जुलाई को चूहों मारने के लिए उपयोग की जाने वाली विषाक्त दवा खाई. उसके परिवार ने आगे की बात दो दिन बाद बताई. इसके बाद उसे 26 जुलाई को कृष्णा अस्पताल में भर्ती कराया गया, जहां उपचार के दौरान उसकी मौत हो गई. स्पर्धा परीक्षाओं में असफलता से छात्रों पर बढ़ते मानसिक तनाव का मुद्दा دوبारा सामने आ गया है. इस प्रकरण की जांच मसूर पुलिस कर रही है.
0
0
Report

शेलूबाजार के नाले में गाद-गंदगी, बरसात में दुकानें प्रभावित; तात्कालिक सफाई की मांग

Washim, Maharashtra:शेलूबाजार येथील मुख्य चौकातून अडाण नदीकडे जाणारा नाला गाळ व केरकचऱ्याने तुंबला आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसून, दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाचे पाणी रस्त्यावर तसेच दुकाने, बँका आणि इतर व्यावसायिक आस्थापनांमध्ये शिरण्याची भीती व्यापारी व नागरिकांनी व्यक्त केली आहे. शेलूबाजार मुख्य चौकातील नाल्यात मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा साचल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावर साचते. यामुळे परिसरातील दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांचे नुकसान होत असून नागरिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रशासनाने तातडीने नाल्यांची सफाई करून पाणी तुंबण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी,अशी जोरदार मागणी व्यापारी व नागरिकांनी केली आहे.
0
0
Report
Advertisement

बावधन के बारका सोन्या बैल की दिल का दौरा, मिरवणुके के दौरान निधन

Satara, Maharashtra:सातारा -बावधन ये गाव ज्या पद्धतीने बगडासाठी प्रसिद्ध आहे तसेच या गावातील बैल हे देशात प्रसिद्ध आहेत.बावधन मध्ये बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना दिवसभर बैलांना सजवून संध्याकाळी त्यांची गावातून जंगी मिरवणूक काढण्यात आली. ग्रामदैवत श्री काळभैरवनाथाच्या मंदिरापर्यंतचा सोहळाही उत्साहात पार पडला मात्र मिरवणुकीनंतर घरी परतताना सूरज उर्फ काका कदम यांच्या ‘बारका सोन्या’ या खिलार जातीच्या बैलाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अचानक मृत्यू झाला.चार वेळा बावधनचे ऐतिहासिक बगाड ओढणाऱ्या या बैलाने ऐन बेंदऱ्यादिवशीच अखेरचा श्वास घेतल्याने कदम कुटुंबासह संपूर्ण बावधनमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. बैलपोळ्या दिवशीच झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
0
0
Report

उल्हासनगर की 5 मंजिला इमारत का हिस्सा गिरा; दुकानदारों ने प्रशासन पर सवाल उठाए

Ambernath, Maharashtra:उल्हासनगरमध्ये मोठा अनर्थ टळला रिकाम्या असलेल्या ५ मजली 'साई सृष्टी' इमारतीचा मागील भाग कोसळला दुकानदारांचा पालिकेवर संतप्त सवाल छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या दिशेने अतिधोकादायक 'साई सृष्टी' ही ५ मंजिली इमारत ५ वर्षांपूर्वीच महापालिकेने रिकामी केली होती. मात्र ही इमारत वेळेत पाडण्यात न आल्यामुळे रात्रीच्या सुमारास या इमारतीचा मागील भाग अचानक कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु यामुळे परिसरातील नागरिक आणि दुकानदारांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. ​छत्रपती शिवाजी महाराज चौक हा शहरातील मुख्य आणि अत्यंत गजबजलेला भाग आहे. ५ वर्षांपूर्वी पालिकेने ही इमारत धोकादायक घोषित करून खाली करून घेतली होती. परंतु पालिकेने केवळ इमारत रिकामी करून केली अशी टीका आता होत आहे. आजूबाजूच्या दुकानदारांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र ताशेरे ओढत विचारले आहे. या इमारतीचा उर्वरित ढाचा अजूनही उभा असून तो कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पालिकेने तातडीने या इमारतीचा उरलेला भाग सुरक्षितपणे पाडून टाकावा, अशी मागणी परिसरातील व्यापाऱ्यांनी व स्थानिकांनी केली आहे.
0
0
Report

सेवानिवृत्त नेवी अधिकारी को OTP पर धोखा, 5.98 लाख की ठगी

Kalyan, Maharashtra:सेवानिवृत्त ओळखपत्र’च्या आमिषाने डोंबिवलीतील निवृत्त नौदल अधिकाऱ्याची फसवणूक; ओटीपी घेत ५.९८ लाखांवर डल्ला डोंबिवली पूर्वेतील आयरे रोड परिसरात राहणाऱ्या स्मृती विलास घाग या नौदलातून मुख्य दूरसंचार पर्यवेक्षक पदावरून सेवानिवृत्त झाल्या आहेत. गेल्या महिन्यात त्यांच्या नावाला एखाद्या अज्ञात व्यक्तीचा फोन आला. आपण बँक ऑफ इंडियाच्या बांद्रे शाखेतून बोलत असल्याचे सांगत, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना विशेष ओळखपत्र देण्यासाठी नोंदणी करायची असल्याचे भामट्याने सांगितले. त्यासाठी मोबाईलवर आलेला ओटीपी मागितला. घाग यांनी ओटीपी दिल्यानंतर त्यांच्या खात्यातून तीन व्यवहारांद्वारे 4 लाख, 1 लाख 50 हजार आणि 48 हजार रुपये असे एकूण 5 लाख 98 हजार रुपये वळते करण्यात आले. मोबाईलवर व्यवहारांचे संदेश आल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर रामनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर गुन्हे अन्वेषण शाखा आणि रामनगर पोलिस या प्रकरणाचा समांतर तपास करत आहेत.
0
0
Report
Advertisement

अंबरनाथ में बिल्ली को 12वें मंज़िले से फेंकने का मामला: आरोपी के विरुद्ध केस दर्ज

Ambernath, Maharashtra:अंबरनाथ में इमारत के 12वें मंजिले से एक बिल्ली को नीचे फेंककर उसकी हत्या किए जाने के मामले में आरोपी के विरुद्ध आखिरकार केस दर्ज किया गया. शिवाजीनगर पुलिस स्टेशन में संबंधित व्यक्ति के खिलाफ मामला दर्ज किया गया. अंबरनाथ के एक हाउसिंग कॉम्प्लेक्स के 12वें मंजिले से एक व्यक्ति ने बिल्ली को नीचे गिरा दिया जिससे उसकी गंभीर चोटें आईं और उसकी मौके पर ही मौत हो गई. इस अमानवीय कृत्य से स्थानीय नागरिक और पशुप्रेमियों में भारी आक्रोश है. पशुप्रेमी की शिकायत के बाद शिवाजीनगर पुलिस ने इस घटना की गम्भीर दखल ली. पुलिस ने आरोपी के विरुद्ध पशुओं के प्रति क्रूरता रोकथाम कानून के अनुसार मामला दर्ज किया है.
0
0
Report

Shalarth ID scam: BJP leader Sanjay Garud arrested, over 160 crore fraud

Nashik, Maharashtra:शालार्थ आयडी घोटाळ्यात भाजप नेता संजय गरुड याला अटक गुन्हा दाखल झाल्यापासून होता फरार, सोलापूर जिल्ह्यातून अटक जळगावातील शेंदुर्णी गावाचा रहिवासी , जळगावातील भाजपाचा बडा नेता * शिक्षण विभागातील 'शालार्थ आयडी' घोटाळ्यात नाशिक विभागातील ८४१ शिक्षक व कर्मचाऱ्यांचे आयडी बनावट असल्याचे उघड. * या बनावट आयडींपैकी तब्बल ६३८ (७५.८६ टक्के) शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी एकट्या जळगाव जिल्ह्यातील निष्पन्न. * घोटाळ्याप्रकरणी जळगावचे तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना 'एसआयटी' पथकाकडून अटक. * हिंगोणीकर यांनी २०११ ते २०१५ दरम्यान जळगाव जिल्ह्यातील २५९ शिक्षकांना स्वतःच्या सहीने बनावट वैयक्तिक मान्यता दिली. * शशिकांत हिंगोणीकर हे कवी असून त्यांचे तब्बल ६४ कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. * आरोपी प्रशांत वाडिले याने १० ते १२ लाख स्वतःकडे ठेवून उर्वरित रक्कम शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना दिल्याचा संशय. * बनावट पुरावे वापरून शासनाची १६० कोटींपेक्षा अधिक आर्थिक फसवणूक केल्याने संघटित गुन्हेगारीचे कलम लागू.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top