icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अकोला के इंदौर गली में खुली नाली, लोगों की सुरक्षा खतरे में

Akola, Maharashtra:अकोला शहरातील काला چबूतरा परिसरातील इंदौर गल्लीमध्ये प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा गंभीर प्रकार पुन्हा समोर आला आहे. नाला सफाईच्या नावाखाली मुख्य रस्ता खोदून अनेक दिवसांपासून उघडाच ठेवण्यात आला असून कोणतीही ठोस सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली नाही. परिणामी आज एका नागरिकाचा जीव धोक्यात येण्याची वेळ आली.इंदौर गल्दीमधून जात असताना एक नागरिक अचानक तोल जाऊन खोल आणि चिखलाने भरलेल्या उघड्या नाल्यात पडला. परिसरातील दुकानदार आणि नागरिकांनी तत्परता दाखवत मोठ्या प्रयत्नांनी त्या व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढले. मात्र या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर तीव्र टीका करत, “एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागं होणार का?” असा सवाल उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी पावसाळ्यात याच परिसरातील उघड्या नाल्यात वाहून जाऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्या घटनेतून कोणताही धडा न घेतल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या उघड्या नाल्यामुळे नागरिकांच्या जीवाला सतत धोका निर्माण झाला असून परिसरातील व्यापाऱ्यांनाही तीव्र दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ग्राहकांची वर्दळ कमी झाली असून व्यापारावरही परिणाम होत असल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली आहे. स्थानिकांनी प्रशासनाकडे तातडीने नाल्याचे काम पूर्ण करून तो मजबूत पद्धतीने झाकण्याची मागणी केली आहे.
0
0
Report
Advertisement

चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा में विधानपरिषद चुनाव 18 जून को, 977 मतदाता मतदान करेंगे

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपूर- गडचिरोली- वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद जागेची निवडणूक जाहीर, 977 मतदार बजावणार मतदानाचा हक्क, 18 जून रोजी होणार मतदान, आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन अँकर:-- चंद्रपूर – गडचिरोली -वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद जागेची निवडणूक 18 जून 2026 रोजी होणार आहे. यासाठी तिन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे 977 कार्यरत सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहे. यात सर्वाधिक चंद्रपूर जिल्ह्यातील 469 सदस्य, वर्धा जिल्ह्यातील 264 तर गडचिरोली जिल्ह्यातील 244 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्य मतदारांचा समावेश आहे. तिन्ही जिल्ह्यात 18 मे पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली असून या आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे. या निवडणुकीकरीता चंद्रपूर महानगरपालिकेचे 66 सदस्य तसेच जिल्ह्यातील 10 नगर परिषदा आणि 7 नगर पंचायतीचे एकूण 403 असे चंद्रपूर जिल्ह्यातील 469 मतदार, गडचिरोली जिल्ह्यातील 3 नगर परिषदा आणि 9 नगर पंचायतींचे एकूण 244 मतदार तर वर्धा जिल्ह्यातील 10 नगर परिषदांचे एकूण 264 मतदार आहेत. तर चंद्रपूर, गडचिरेाली आणि वर्धा येथील जिल्हा परिषदांची निर्वाचित बॉडी नसल्याने सदस्यांची संख्या शुन्य आहे. निवडणुकीकरीता प्रत्येक जिल्ह्यातील उपविभागाच्या मुख्यालयी एक याप्रमाणे 17 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे. तसेच मतमोजणी चंद्रपूर जिल्हा मुख्यालयात करण्यात येणार आहे. या निवडणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग यांच्याकडून स्वतंत्र निवडणूक निरीक्षक यांची नियुक्ती केली जाणार आहे. बाईट १) वसुमना पंत, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आशीष अम्बाडे चंद्रपूर
0
0
Report

रत्नागिरी के खेड में नदी में डूबे ही परिवार के तीन सदस्य, दर्दनाक मौत

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधून एक अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी बातमी समोर येत आहे...खेड तालुक्यातील धामणंद काजूफाटा परिसरातील नागझरी नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे...दुपारच्या sुमारास ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली.. नदीतील पाण्याच्या खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने हा घात झाल्याचे बोलले जात आहे.. या दुर्घटनेत १५ वर्षांची लावण्या पार्टे, ३८ वर्षांचे नितीन जाधव आणि अवघ्या १२ वर्षांच्या विराज जाधव या तिघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.. हे सर्वजण एकमेकांचे नातेवाईक होते.. घटना माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ शोधमोहीम राबवून तिघांचेही मृतदेह बाहेर काढले.. या घटनेमुळे संपूर्ण खेड आणि धामणंद परिसरात शोककळा पसरली असून, खेड पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे आणि पोलीस पुढील तपास करत आहेत...
0
0
Report
Advertisement

नीट पेपर लीक के विरोध में कांग्रेस का देशव्यापी चक्का-जाम

Kalyan, Maharashtra:नीट पेपर फुटीच्या विरोधात कॉग्रेसचे चक्का जाम आंदोलन कॉग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात.. नीट पेपर फुटी प्रकरणाच्या विरोधात संपूर्ण देशभरात आंदोलन सुरु आहेत.आज याच्याच निषेधार्थ कल्याण काँग्रेसच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आला. कल्याणच्या रेल्वे स्टेशन बाहेर रस्त्यात बसून केंद्र सरकार विरोधात जोरदार यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. सात वर्षात ७० पेपर लीक झाले तरी मोदी सरकार का गप्प आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपली जबाबदारी स्वीकारून त्वरित आपल्या पदाचा राजीनामा देण्याची मागणी केली गेली. आंदोलनाची तीव्रता बघता आंदोलन कर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
0
0
Report

کوکن सीट پر महायुती की रस्साकशी: शिवसेना का नया दांव

Chendhare, Maharashtra:स्‍लग - कोकण विधान परिषदेसाठी महायुतीत रस्सीखेच ? विकास गोगावले यांचे नाव पुढे करून शिवसेनेनं टाकला डाव ? कोकणच्‍या जागेसाठी पालमंत्रीपदाचा सौदा ? सुनील तटकरे यांच्‍या खेळीकडे सर्वांचे लक्ष अँकर - विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर महायुतीतच जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या असून, संभाव्य उमेदवारांच्या चर्चेला वेग आला आहे. माजी आमदार अनिकेत तटकरे यांचे नाव आघाडीवर असतानाच, आता राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचे नाव चर्चेत आणून शिवसेनेकडून सुनील तटकरेंची कोंडी करण्‍याचा प्रयत्‍न होण्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे. व्हिओ १ – गेली काही वर्षे रखडलेली विधान परीषदेच्‍या कोकण स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था मतदार संघाची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. आता या जागेवरून महायुतीतच रस्‍सीखेच सुरू झाली आहे. राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचा बाईट घ्‍यावा व्हिओ २ – रायगड, रत्‍नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील तीन जिल्‍हयातील स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमधील लोकप्रतिनिधी या निवडणूकीसाठी मतदान करणार आहेत. या तीनही जिल्‍हयांतील मतदारांचा विचार केल्‍यास महायुतीमध्‍यये शिवसेनेकडे सर्वाधिक मतदार आहेत. त्‍याखालोखाल भाजप आणि सर्वात कमी मतदार राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत. त्‍यामुळे या मतदार संघावर शिवसेना या मतदार संघावर दावा सांगण्‍याची दाट शक्‍यता आहे. विकास गोगावले यांचे नाव पुढे करून शिवसेनेने राजकीय डाव टाकला आहे. गोगावले यांचया नावाची चर्चा सुरू झाली असली तरी मंत्री भरत गोगावले यांनी याबाबत सावध पवित्रा घेतला आहे. बाईट 2 – भरत गोगावले, मंत्री व्हिओ ३ – रायगडात शिवसेना आणि राष्‍ट्रवादी कॉंग्रसमधील वाद काही नवीन नाही. पालकमंत्री पदावरून राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या आदिती तटकरे आणि शिवसेनेचे भरत गोगावले यांच्‍यात जोरदार रस्‍सीखेच सुरू आहे. त्‍यामुळे अजूनही रायगडचे पालकमंत्रीपद रिक्‍तच राहिलं आहे. मात्र या निवडणूकीच्‍या निमित्‍ताने राष्‍ट्रवादी कॉंग्रेसची पर्यायाने सुनील तटकरे यांची कोंडी करण्‍याचा प्रयत्‍न शिवसेनेकडून सुरू असल्‍याचं बोललं जात आहे. विधान परीषदेच्‍या जागा राष्‍ट्रवादीला सोडली तर त्‍याबदल्‍यात पालकमंत्री पदाची मागणी शिवसेनेकडून होवू शकते. बाईट – भरत गोगावले, मंत्री फायनल व्हिओ – सद्याची राजकीय परीस्थिती पाहता चेंडू सुनील तटकरे यांच्‍या कोर्टात आहे. काय निवडायचे या निर्णय त्‍यांना घ्‍यावा लागणार आहे. आता तटकरे लेकीसाठी पालकमंत्री पद घेतात की लेकासाठी विधान परीषदेची आमदारकी घेतात कर आणखी काही प्रतिडाव टाकतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. प्रफुल्‍ल पवार, झी 24 तास रायगड
0
0
Report
Advertisement

headline

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर विधान परिषद स्थानीय स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला चार वर्षे उशीर झाला आहे एकत्रित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अरुण जगताप हे याआधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर आमदार होते 2022 साली त्यांचा कार्यकाल संपला त्यानंतर निवडणूक झाली नाही 2022 मध्ये कार्यकाल संपलेले जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची देखील अजूनही निवडणूक झाली नाही त्यामुळे सध्या एक महानगरपालिका और 14 नगरपालिका नगरपंचायत चे 461 सदस्य मतदार असणार आहेत यातही भाजप सर्वाधिक 199 सदस्य संख्या असलेला पक्ष आहे त्या खालोखाल राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 50 नगरसेवक आहेत निवडणुकीत निवडून येण्यासाठी 231 मतदान या दोन्ही पक्षाकडे आहे गेल्या वेळी जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असली तरी यावेळी भाजप जागेसाठी दावा करेल तर राष्ट्रवादीकडून देखील ही जागा आपल्यालाच मिळावी यासाठी दावा केला जात आहे
0
0
Report

चंद्रपूर के नागभीड़ में बाघ का हमला: तेंदुपत्ता कटने गई महिला की मौत

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात वाघाचा हल्ला, तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलेचा जागीच मृत्यू चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्याची घटना समोर आली आहे. किटाळी मेढा परिसरात तेंदुपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या ५५ वर्षीय महिलेवर वाघाने हल्ला करून तिला जागीच ठार केले. वनिताबाई शंकर उईके असे मृत महिलेचे नाव असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वनपथक आणि नागभीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवला असून पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report

चालक अवकाश पर, मुंबई कंटेनर टर्मिनल में हजारों कंटेनर फंसे, नाराज कारोबारी

Navi Mumbai, Maharashtra:Anchor- उरण मधील 'जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी' अंतर्गत येणाऱ्या 'भारत मुंबई कंटेनर टर्मिनल'मध्ये गेल्या 10 दिवसांपासून आयातीत मालाचे हजारो कंटेनर अडकून पडले आहेत. कंटेनर चालक सुट्टीवर गेले असल्याने हे कंटेनर अडकले असल्याची माहिती जे एन पी टी प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे. दरवर्षी या काळात कंटेनर चालक गावी जात असतात त्यामुळे वाहतूक खोळाबा झाल्याचे समोर आले असून, सागरी व्यापारी नियमांनुसार, जहाजावरून माल उतरविल्यानंतर कंटेनर बंदराबाहेर वाहून नेण्याचा कमाल 'टर्नअराउंड वेळ' ४८ तासांचा असतो. म्हणजेच ग्राहकांनी त्यांचे कंटेनर ४८ तासांत बाहेर काढणे बंधनकारक असते मात्र १० मे पासून भारत मुंबई कंटेनर टर्मिनल'मध्ये कंटेनर बाहेर काढण्यास विलंब सुरू झाला असल्याने व्यापारी आणि आयातदर ना याचा फटका बसत आहे।
0
0
Report
Advertisement

NEET पेपरफुटी मामले: लातूर के डॉक्टरों के बच्चों तक क्यों पहुंची CBI की सख्ती?

Latur, Maharashtra:लातूर… शिक्षणाचं हब… डॉक्टर घडवणारी फॅक्टरी… पण आता हाच लातूर देशभरात NEET पेपरफुटी प्रकरणामुळे चर्चेत आलं आहे. NEET पेपरफुटी प्रकरणात अटक झालेल्या शिवराज मोटेगावकर यांच्यावर स्वतःच्या मुलासाठी पेपरफुटी केल्याचा गंभीर आरोप CBI कडून करण्यात आला आहे. इतकंच नाही… तर क्लासमधील काही निवडत विद्यार्थ्यांसाठी… तसेच लातूरमधील काही नामांकित डॉक्टरांच्या मुलांना आणि नातेवाईकांनाही प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे मोटेगावकर याचा मुलगा आणि लातूरमधील काही दिग्गज डॉक्टरही आता CBI च्या रडारवर आले आहेत का…? शिवराज मोटेगावकर यांच्या नंतर आता मुलगा ही CBI च्या रडारवर... लातूरतील दिग्गज डॉक्टरही CBI च्या रडारवर… NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ने शिवराज मोटेगावकर यांना अटक केल्यानंतर आता तपासाची दिशा त्यांच्या मुलाकडेही वळली आहे. मोटेगावकर यांच्या मुलाने यंदा बारावीची परीक्षा दिली असून, त्यालाही फुटलेल्या प्रश्नपत्रिकेचा फायदा झाला का…? यात तपास आता CBI करत आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे लातूरच्या शिक्षण पद्धतीवर आणि खासगी कोचिंग व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. डॉक्टर बनण्याचं स्वप्न… ते पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांची रात्रंदिवस मेहनत… पालकांनी घेतलेली कर्जं… आणि भविष्य घडवण्यासाठी सुरू असलेली धडपड… परंतु जर याच स्वप्नांचा सौदा पैशांनी… ओळखीने… आणि पेपरफुटीच्या माध्यमातून होत असेल… तर हा केवळ गुन्हा नाही… तर लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीवरचा सर्वात मोठा अन्याय आहे. शिवराज मोटेगावकर यांच्यावर स्वतःच्या मुलासाठी… क्लासमधील निवडक विद्यार्थ्यांसाठी… आणि काही दिग्गज डॉक्टरांच्या मुलांसाठीही पेपरफुटी केल्याचे आरोप होत आहेत. मोटेगावकर यांच्या स्पेशल बॅच मध्ये नेमकं कोण होतं…? आणि या रॅकेटची मुळं आणखी किती खोलवर गेली आहेत…? या प्रश्नांची उत्तरं आता संपूर्ण राज्य शोधत आहे…
0
0
Report

रत्नागिरी: समुद्र में डूबती महिला को युवक करण महेश मिलके ने बचाया, वीडियो वायरल

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी - अल्ट्राटेक जेट्टी ते मिरकरवाडा या दरम्यान समुद्रात बुडणाऱ्या महिलेला करण महेश मिलके या तरुणानं वाचवलं सकाळी 7 वाजताच्या दरम्यानची घटना; महिलेला वाचतानाचा सर्व थरार मोबाईलच्या कॅमेरामध्ये कैद सकाळी 7 च्या दरम्यान महिला गेली होती कालवे काढायला समुद्राचा पाण्यात झालेली वाढ बेतली असती महिलेच्या जीवावर; तरुणाच्या धाडसाने वाचला महिलेचा जीव समु्द्र किनारापासून अंदाजे 150 ते 200 मीटर समुद्रात बुडत होती महिला महिलेला वाचवल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये महिलेवर उपचार सुरू
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top