icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

निलंगा शहर में कचरे का राज, नागरिक परेशान, सार्वजनिक शौचालय बदहाल

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... निलंगा शहरात घाणीचं साम्राज्य; नागरिक त्रस्त....कचऱ्याच्या ढिगांमुळे दुर्गंधी, आरोग्याचा प्रश्न गंभीर....सार्वजनिक शौचालयांची दयनीय अवस्था उघड.... निलंगा शहरात मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाल्याचं चित्र समोर आलं आहे. शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. तर नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयांचीही दयनीय अवस्था पाहायला मिळते आहे. जागोजागी कचरा आणि घाणीचं साम्राज्य पसरल्याने नागरिक त्रस्त झाले असून, नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातो. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन नागरीकाशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी....
0
0
Report

शिंदे गट ने भाजपा नगरसेवकों के दावों की पोल खोली—वीडियो से साफ हुआ फर्क

Navi Mumbai, Maharashtra:शिवसेना शिंदे गटाने नवीMumbaiतील भाजपा नगरसेवकांच्या दाव्याची पोलखोल केलीय. झोपडपट्टीमध्ये क्लस्टर राबविण्याची मागणी शिवसेना शिंदे गट करत असताना झोपडपट्टी वासियांची 500 चौरस मीटर पर्यंतची घरे मुख्यमंत्र्यांनी अधिकृत केल्या असल्याचा दावा भाजपा नगरसेवकांनी केला होता. प्रत्यक्षात हा निर्णय मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेश वगळून लागू होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली असताना भाजपा नगरसेवक हा निर्णय नवी मुंबईतही लागू होणार असल्याची बतावणी थेट सभागृहात करत होते. मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा आणि भाजपा नगरसेवकांनी केलेला दावा यात तफावत असल्याचा व्हिडिओच पत्रकार परिषदेत दाखवत विरोधीपक्ष नेते विजय चौगुले यांनी भाजपा नगरसेवकांच्या फसव्या दाव्याची पोलखोल केलीय.
0
0
Report

सोलापुर के केला किसानों को सही दाम नहीं मिल रहे, सरकार से मदद की मांग

Solapur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी हा मोठ्या संकटात सापडलाय. सीना नदीचा महापूर, अवकाळी पाऊस, वादळ वारा अशा अनेक संकटावर मात करून केळी बाग वाचवली मात्र आता केळी काढलेला आल्यानंतर योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेगाव येथील शेतकरी बालाजी विठ्ठल पवार यांनी 3 एकर क्षेत्रामध्ये केळीचे बाग उभे केले आहे आता केळी काढणे ला आले असून योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येतेय. तीन एकर केळीसाठी तब्बल सहा लाख रुपये खर्च झाले मात्र झालेला खर्च देखील निघत नसल्याची परिस्थिती निर्माण झालीय. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांवर अशा पद्धतीची वेळ आल्याने सरकारने योग्य भाव मिळवून देण्याची मागणी हातात करण्यात येतेय.
0
0
Report
Advertisement

नवी मुंबई कांग्रेस ने धिरेंद्रशास्त्री के अपमान के खिलाफ जोडे मारो आंदोलन शुरू किया

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई काँग्रेसतर्फे वाशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या धिरेंद्रशास्त्री विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. भाजपा और आरएसएस धिरेंद्रशास्त्रीला 1 कोटी रुपये देऊन महाराष्ट्रात संतांची बदनामी करण्यासाठी बोलवत असतात असा गंभीर आरोप करत यापुढे धिरेंद्रशास्त्री महाराष्ट्रात आल्यास त्याची चपलेने धिंड काडू असा थेट इशारा काँग्रेस तर्फे देण्यात आलाय. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी धिरेंद्रशास्त्री यांच्या फोटोला जोडे मारत निषेध व्यक्त केलाय.
0
0
Report

EL-Nino के कारण मोरबे डैम में पानी संकट, नागरिकों से जल संरक्षण की अपील

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात 82.557 दश लक्ष घन मीटर इतका म्हणजेच 43.24टक्के इतका पाणी साठा उपलब्ध आहे. त्यापैकी 1 महिन्यांचा राखीव साठा वगळता प्रत्यक्ष 27.22टक्के इतका पाणी साठा उपलब्ध असून शहराची दैनंदिन पाणी पुरवठयाची गरज लक्षात घेता 7 ऑगस्ट पर्यंत पुरू शकते इतका साठा उपलब्ध आहे. सन 2026 मध्ये ‘एल-निनो’ या जागतिक हवामान बदलामुळे भारतातील मोसमी वाऱ्यावर परिणाम होऊन या वर्षी सरासरी पावसाचे प्रमाण 92% इतके राहणार असल्याचे अंदाज असून यावर्षी मोरबे धरण भरण्याची शक्यता खूपच कमी आहे. या पाश्वभूमीवर नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन मनापा आयुक्त कैलास शिंदे यांनी केलेय。
0
0
Report
Advertisement

सांगली में विधानपरिषद के लिए BJP किसे देगी मौका? संजय पाटील का नाम चर्चे में

Sangli, Maharashtra:राष्ट्रवादीच्या संजयकाकांचं हे नाव चर्चेत.. विधान परिषदेसाठी सांगली जिल्ह्यातून कोणाला संधी मिळणारी याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांना भाजपातून संधी मिळेल अशी चर्चा सुरू झालेली आहे,तर दुसरीकडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक,भाजपाच्या नेत्या नीताताई केळकर,माजी आमदार पृथ्वीराज देशमुख,भाजपाचे पुणे प्रभारी शेखर इनामदार आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम yांची देखील नाव चर्चेत आहे.त्यामुळे भाजपाकडून सांगली जिल्ह्यातल्या कोणत्या नेत्याला संधी देण्यात येणार,याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
0
0
Report

NCERT ने आठवीं कक्षा से मराठा नक्शा हटाने पर राजमाता कल्पनाराजे भोसले ने चिंता जताई

Satara, Maharashtra:सातारा - NCERT कडून मराठा साम्राज्याचा इतिहास दर्शवणारा नकाशा इयत्ता आठवीच्या पुस्तकातून वगळण्यात आला आहे. ही अतिशय गंभीर बाब असून ही धोक्याची घंटा असल्याचे खा. उदयनराजे यांच्या आई राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी सांगितले आहे. बघता बघता छत्रपती शिवाजी महाराजांवर देखील पडदा टाकण्याचं काम केलं जाऊ शकतं आणि तोच प्रयत्न सुरू असल्याचे आणि हे अजिबात चालणार नाही असं देखील त्या म्हणाल्या आहेत. जोपर्यंत सूर्य आणि चंद्र है तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव तेवत राहील असं देखील त्या म्हणाल्या आहेत.
0
0
Report
Advertisement

जयंत पाटील पर निशाना: गोरे ने कहा, विकास देवेंद्र फडणवीस के मार्ग पर

Pandharpur, Maharashtra:पंढरपुरात एका खाजगी कार्यक्रमानिमित्त आल्यानंतर जयकुमार गोरे यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. राज्यातील कुठल्याही देवाला जमीन लागत नाही. फक्त देवा भाऊला लागते. असे विधान जयंत पाटील यांनी केले होते. याचा समाचार जयकुमार गोरे यांनी घेतला. भोंदू मनोहर मामा भोसले यांच्यासोबत अनेक राजकीय पुढाऱ्यांचे फोटो पुढे येत आहेत. याच बाबत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले , कुणी कोणाला भेटणे गैर नाही. मात्र भोंदू बाबाच्या कृत्यात सामील कोण झाले असेल तर हे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले. तसेच , सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीला उजनी धरणातून पाणी सोडले आहे. 30 ऑगस्टपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा विसर्ग राखीव करून ठेवण्यात आला आहे. नियोजन चांगल्या पद्धतीने झाले आहे. सध्या तरी कुठेही टँकरची मागणी दिसत नाही. मात्र पाणी पुरत असल्यामुळे यंदा टँकर लागण्याची शक्यता कमी असल्याचेही ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले.
0
0
Report

डोंबिवली में बुक स्ट्रीट: हजारों पाठकों को मुफ्त किताबें, पढ़ने की नई संस्कृति

Kalyan, Maharashtra:नेहरू रोड–फडके रोड बनला ‘बुक स्ट्रीट सकाळ पासून वाचकांचा महापूर, १० हजारांचा सहभाग—प्रत्येकाला मोफत पुस्तक देत वाचन संस्कृतीला नवे बळ डोंबिवली ही सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाते, आणि आज या नगरीने वाचन संस्कृतीचा एक अनोखा आदर्श देशासमोर ठेवला आहे. पै फ्रेंड्स लायब्ररी आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बुक स्ट्रीट’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळ पासूनच रस्त्यावर पुस्तकांचा अक्षरशः महासागर पाहायला मिळत आहे. जुन्या-नवीन, विविध विषयांवरील हजारो पुस्तके येथे मांडण्यात आली असून, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आपल्या आवडीची पुस्तके शोधण्यात मग्न असल्याचे चित्र आहे.या उपक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे, प्रत्येक वाचनप्रेमीला कोणतेही एक पुस्तक पूर्णपणे विनामूल्य घेण्याची संधी दिली जात आहे. त्यामुळे वाचनाची गोडी वाढवण्याचा आणि पुस्तकांशी नाळ जुळवण्याचा प्रयत्न आयोजकांकडून केला जात आहे.आत्तापर्यंत हजारो नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला असून, यंदा १० हजारांहून अधिक वाचक भेट देतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे‘बुक स्ट्रीट’ हा उपक्रम वाचन संस्कृतीला नवे बळ देणारा ठरत असून, शहरात एक सकारात्मक आणि ज्ञानमय वातावरण निर्माण करत आहे.
0
0
Report
Advertisement

मंचर में नाबालिग लड़की लापता, हैदराबाद महिला पर शक

Manchar, Maharashtra:यवतमाळच्या राळेगावचे ३५ मुली बेपत्ता होण्याचे प्रकरण ताजे असतानाच, आता पुण्याच्या मंचरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. एका हसत्या-खेळत्या कुटुंबातील अल्पवयीन मुलगी अचानक गायब होते आणि मागे उरतो तो फक्त आईचा टाहो! मंचरच्या गाडेकर कुटुंबावर नियतीने नव्हे, तर एका संशयित महिलेने घाला घातल्याचा संशय व्यक्त केला जातोय. संशय आहे 'रिया सिंग' नावाच्या महिलेवर! ही महिला हैदराबादमध्ये बसून महाराष्ट्रातील मुलींना आपल्या जाळ्यात ओढतेय का? हा प्रश्न आता उपस्थित झालाय. रियाने या अल्पवयीन मुलीला काहीतरी मोठं आमिष दाखवलं, तिला फूस लावली आणि पाहता पाहता तिला राज्याच्या सीमेबाहेर नेलं. पोलिसांनी जेव्हा आरोपीचा मोबाईल ट्रेस केला, तेव्हा जे लोकेशन समोर आलं, त्याने पोलिसांचीही झोप उडवली आहे. आरोपीचे लोकेशन कधी बिहार तर कधी उत्तर प्रदेशच्या सीमा भागात दिसत आहे. या घटनेने संपूर्ण मंचर परिसरात भीतीचे सावट आहे. आपल्या मुली सुरक्षित आहेत का? असा प्रश्न प्रत्येक पालकाच्या डोळ्यात दिसतोय. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत, पथके रवाना झाली आहेत, पण प्रश्न एकच आहे... ती मुलगी आता नेमकी कुठे आहे? ती सुरक्षित आहे का? आणि या आंतरराज्य टोळीचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पसरले आहेत? मंचरची ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही, तर संपूर्ण समाजासाठी ही धोक्याची घंटा आहे. डिजिटल युगात मुलींना आमिष दाखवून पळवून नेणारी ही टोळी जर वेळीच ठेचली गेली नाही, तर ही संख्या वाढायला वेळ लागणार नाही. अब प्रतीक्षा है ती मंचर पोलिसांच्या धडक कारवाईची आणि त्या लेकीच्या घरवापसीची! प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया मंचर पुणे...
0
0
Report

अमित ठाकरे ने कहा: मराठी नियम मानिए, नहीं मानें तो अपने गाँव लौट जाएँ

Pimpri-Chinchwad, Maharashtra:रिक्षा चालकांना मराठी मान्य नसेल तर त्यांनी त्यांच्या गावात जावे: अमित ठाकरे. अमित ठाकरे हे सध्या दोन दिवसांच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज पिंपरी चिंचवडमध्ये पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी रिक्षा चालकांना मराठी सक्ती बाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केल्याबद्दल सांगितले; जर रिक्षा चालकांना या बाबत विरोध असेल तर त्यांनी त्यांच्या गावात जावे असा इशारा दिला. आता बाहेरून आलेले लोग मुंबई बंद पडणार का, असा सवाल करत मुंबई बंदसाठी आम्ही आहोत, आम्ही मराठी माणसाच्या मागे ठामपणे उभे आहोत तर मुंबई बंद कशी पडते येते हम देखते हैं कहा. अमित ठाकरे म्हणाले.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top