icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

जयंत पाटील बोले: मुंबई पुलिस ड्रग्स मामले में कार्रवाई क्यों नहीं?

Sangli, Maharashtra:टेक - ड्रग्ज बाबत केलेल्या विधानावरून जयंत पाटील यांची मुंबई पोलिसांवर टीका. मुंबई पोलिसांच्या ड्रग्ज संबंधित कथित व्हिडिओवरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी मुंबई पोलिसांच्या कारभारावर टीका केली आहे. मुंबईतील आंदोलनादरम्यान अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना एका पोलिसाकडून ड्रग्जची धमकी देत अडकवण्याचे विधान करण्यात आले असून, यावरून आमदार जयंत पाटलांनी मुंबई पोलिसांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. या पोलिस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्स येतात कुठून ? पोलिस धमकी देतात याचा अर्थ त्यांना ड्रग्स सहज उपलब्ध होते., तसेच आज हे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना घाबरवत आहेत, उध्या सामान्य माणसाला अडकवण्यासाठीही असंच करतील, अशी भिती व्यक्त करत अशा घटनांमुळे लोकांचा पोलीस यंत्रणेवर गैरविश्वास निर्माण होतो. त्यामुळे वेळीच अशा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई केली पाहिजे, अशी मागणी देखील आमदार जयंत पाटील यांनी केली आहे, ते सांगलीच्या ईश्वरपुर मध्ये बोलत होते.
0
0
Report

चंद्रपुर के बल्लारपुर में कांग्रेस का धरना, दिल्ली लाठीचार्ज पर सरकार पर सवाल

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिले के बल्लारपुर शहर में कांग्रेस कमिटी की वती से दिल्ली लाठीमार विरोधात धरने आंदोलन, सरकार ने ठीक पेपर फूट और विद्यार्थी आंदोलन को सही प्रकार से संभाले नहीं जाने की शिकायत माजी आमदार_subhash_dhoite_ ने की। देशभर में दिल्ली के जंतर मंतर आंदोलन और विद्यार्थी लाठीमार विरोधा की श्रृंखला चल रही है। चंद्रपूर जिले के बल्लारपुर शहर में आज कांग्रेस कमिटी की वती से विद्यार्थी लाठीमार विरोधात धरने आंदोलन किया गया। इसमें शहर व तालुका कांग्रेस कमिटी के पदाधिकारी नेता व कार्यकर्ता शामिल हुए। सरकार ने पेपर फूट और विद्यार्थी आंदोलन को सही प्रकार से संभाले नहीं जाने की टिप्पणी माजी आमदार कांग्रेस जिल्हाध्यक्ष_SUBHASH_DHOITE ने इस मौके पर की। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान द्वारा इस्तीफा देकर इस समस्या को समाप्त करने की मांग भी उठाई गई।
0
0
Report

आषाढ़ी एकादशी पर पंढरपूर में रिकॉर्ड भीड़, विठोबा के चरण स्पर्श दर्शन के लिए भक्तों की कतार मंदिर से गोपालपुर कॉलेज तक

Pandharpur, Maharashtra:आषाढी एकादशीसाठी आलेल्या वारकऱ्यांनी पंढरपूर हाउसफुल्ल, विठोबाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिर पासून गोपाळपुरच्या कॉलेज पर्यंत, 2018 नंतर या वर्षी झाली रेकॉर्ड ब्रेक गर्दी, आषाढी वारीसाठी जवळपास सर्वच संतांच्या पालख्या आज पंढरपूर जवळ आल्या आहेत. त्यामुळे या पालख्या मधील वारकरी विठोबाच्या पदस्पर्श दर्शन रांगेत जाऊ लागले आहेत. त्यामुळे ही रांग गोपाळपूर मधील स्वेरी कॉलेज पर्यंत गेली आहे. अचानक झालेली गर्दी मुळे मात्र प्रशासनावर ताण आला आहे. अनेक ठिकाणी बॅरीकेटिंग तसेच इतर सुविधा नसल्याने वारकऱ्यांची गैरसोय होताना पाहायला मिळत आहे. स्वेरी कॉलेज कडून 500 विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत.
0
0
Report
Advertisement

यवतमाळ में युवा कांग्रेस ने दिल्ली के विद्यार्थियों पर लाठीचार्ज का तीव्र विरोध किया

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये युवक काँग्रेसने आक्रमक होत दिल्ली येथील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा तीव्र निषेध नोंदविला. दारव्हा मार्गावर मोठ्या संख्येने गोळा झालेल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोळा होत, केंद्र सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. यावेळी धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करीत कार्यकर्त्यांनी रस्त्यावर झोपून चक्काजाम आंदोलन सुरू केले. त्यामुळे बराच वेळ वाहतुकीचा खोळंबा झाल्याने पोलिसांनी आंदोलनस्थळी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत त्यांना स्थानबद्ध केले.
0
0
Report

नाशिक में भारी बारिश से गोदावरी नदी में बाढ़, 55775 क्यूसेक विसर्ग शुरू

Niphad, Maharashtra:नाशिक जिल्ह्यात घोटी इगतपुरी त्रंबकेश्वर दिंडोरी या परिसरामध्ये सतत संतधार तर कधी मुसळधार पाऊस सुरू असून यामुळे धरणांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे खबरदारीचा उपाय म्हणून जलसंपदा विभागाकडून धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून त्यामुळं गोदावरी नदीला पूर आल्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पात्रात वाढ झाल्याने 55775 क्यूसेक ने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून निफाड सिन्नर राज्य मार्ग वाहतुकीसाठी सकाळ पासून बंद ठेवण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर घटनास्थळावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
0
Report

अकोला जेल में आरोपी कैदी ने आत्महत्या: पत्नी हत्या के मामले की जांच जारी

Akola, Maharashtra:अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन बंदीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या अमरावती जिल्ह्यातील हिंगणी गावंडगाव येथील अनिल ओंकार निंबोकार (वय 35) यांनी कारागृहातील विहिरीत उडि घेऊन जीवन संपविल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे कारागृह प्रशासनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, मृताच्या कुटुंबीयांनी या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. अनिल निंबोकार याने चार महिन्यांपूर्वी पत्नी वृषाली निंबोकार यांच्या चारित्र्यावर संशय घेत त्यांच्या हत्या केल्याचा आरोप होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती आणि तो अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. तेरा वर्षांपूर्वी विवाह झालेल्या या दाम्पत्याला दोन मुले असून, आई-वडिलांसह दोन एकर शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. मात्र कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या आणि त्यानंतर कारागृहात झालेली आत्महत्या या दुहेरी घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून आणि कारागृह प्रशासनाकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report
Advertisement

यवतमाड़ में वंचित बहुजन आघाड़ी के बंद से भारी असर, सरकार पर तीखा हमला

Yavatmal, Maharashtra:दिल्ली येथे विद्यार्थ्यांवरील झालेल्या लाठीचार্জच्या निषेधार्थ यवथमाळ मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या बंद च्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे यांच्या नेतृत्वात या बंदचे नियोजन करण्यात आले. संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकार स्मारक परिसरात हजारो नागरिक एकत्र आले. त्यानंतर शहरातून भव्य निषेध रॅली काढण्यात आली. यावेळी व्यापाऱ्यांना प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारकडून होत असलेल्या दुर्लक्षाचा उल्लेख करत जिल्हाध्यक्ष नीरज वाघमारे यांनी सरकारच्या धोरणांवर तीव्र शब्दांत टीका केली. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे ही लोकशाही मूल्यांना काळिमा फासणारी घटना असून विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न देशाच्या लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले. बाईट : नीरज वाघमारे : जिल्हाध्यक्ष वंचित
0
0
Report

राहुरी चिंचोली फाटा में पिसालے कुत्ते ने 90 वर्षीय वृद्ध की मौत, 10-12 घायल

Shirdi, Maharashtra:Anc - अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर घडली आहे.. चिंचोली फाटा येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात एका 90 वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.. विशेष म्हणजे या कुत्र्याने आणखी 10 ते 12 जणांना चावा घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.. राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथे आज पहाटे सहाच्या सुमारास साहेबराव रामोजी वाघमारे, वय 90 वर्षे, हे त्यांच्या घरासमोर झोपलेले असताना एका पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला.. या हल्ल्यात कुत्र्याने त्यांच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडले.. या हल्ल्यात वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला.. दरम्यान, या पिसाळलेल्या कुत्र्याने परिसरातील आणखी 10 ते 12 जणांना चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे.. या घटनेमुळे चिंचोली परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.. प्रशासनाकडून दुपारी उशिरापर्यंत संबंधित कुत्र्याचा शोध घेण्याचे काम सुरू होते..
0
0
Report
Advertisement

पालकमंत्री के आदेश पर कमांड सेंटर बना, AI और ड्रोन से निगरानी

Pandharpur, Maharashtra:आषाढी वारीच्या नियंत्रणासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्या कडून कमांड सेंटर तयार करण्यात आले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) द्वारे संपूर्ण परिसराचे थेट निरीक्षण केले जात आहे. पोलीस बंदोबस्त बाबत वारी आणि पालखी मार्गावर १० हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात असून वॉकीटॉकी व इतर साधनांनी सुसज्ज नियंत्रण व्यवस्था केली आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी BDDS (BDDS) पथके आणि विशेष आरोग्य व सुरक्षा यंत्रणांचे नियंत्रण याद्वारे चालवले जाते. त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडल्यास तातडीने प्रतिसाद देण्यासाठी या कमांड सेंटर मधून सूचना देण्यात येतात.
0
0
Report

बीड़ में सदाभाऊ खोत के बयान पर उबाल: आंदोलनकारियों ने कहा—छात्रों को दहशतवादी कहना ठीक नहीं

Beed, Maharashtra:बीड : बीडमध्ये सामाजिक संघटना आक्रमक; विद्यार्थ्यांना 'दहशतवादी' म्हणणाऱ्या सदाभाऊ खोत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन दिल्लीच्या जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यावरून राज्यात वाद पेटला आहे. विद्यार्थ्यांना 'दहशतवादी' अशी उपमा देणाऱ्या सदाभाऊ खोत विरोधात बीडमध्ये सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांच्या फोटोच्या फलकला जोडे मारून तीव्र निषेध नोंदवला. घोषणाबाजी करत संबंधित वक्तव्य तात्काळ मागे घ्यावे आणि विद्यार्थ्यांची माफी मागावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली. या आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांबातल्या वक्तव्यावरून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत...
0
0
Report
0
0
Report
Advertisement

जंतर‑मंतर लाठीचार्ज: महासभा में हंगामा और नारे

Kalyan, Maharashtra:जंतर-मंतर वरील विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचारा विरोधात केडीएमसी महासभेत गोंधळ महासभा सुरू असताना हातात तिरंगा घेऊन उद्धव ठाकरे आणि मनसेच्या नगरसेवकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला, उद्धव ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी या घटनेच्या निषेधार्थ महासभा तहकूब करण्यात यावी अशा प्रकारचं पत्र दिलं होतं. मात्र महासभा सुरू करण्यात आली. त्यामुळे नगरसेवक आक्रमक झाले.नगरसेवकांनी भारत माता की जय ,इन्कलाब जिंदाबाद अशा प्रकारच्या घोषणांनी महासभा दणाणून सोडली. यानंतर महासभेचं कामकाज सुरू होऊ द्या अशा प्रकारच्या सूचना महापौरांकडून करण्यात आल्या. मात्र आक्रमक झालेल्या नगरसेवकांनी महासभेत घोषणाबाजी सुरूच ठेवली. त्यामुळे महासभा काही काळ तहकूब करण्याची वेळ आली.
0
0
Report

Constitution Chowk में बिना अनुमति प्रदर्शन पर रोक, नागपुर पुलिस सतर्क

Nagpur, Maharashtra:2c ला व्हिडिओ जोडला आहे -=--------- नागपूरच्या संविधान चौकात परवानगीशिवाय कोणालाही आज आंदोलन करण्यास परवानगी नाही. काल CJP आंदोलनमुळे निर्माण झालेल्या परिस्थيمुळे सावधागिरी म्हणून आज पोलिसांनी तिथे कोणालाच आंदोलनास परवानगीदिली नाही.परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वारंवार अनाउन्स करत आहेत की संविधानचौकात परवानगीशिवाय कोणीही आंदोलनास येऊ नये, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल. संविधान चौकात वेगवेगळ्या ठिकाणांहून, वेगवेगळ्या मार्गांनी 10 ते 15 लोकांचा गट थोड्या-थोड्या वेळाने पोहोचत आहे. पोलिस 5-10 मिनिटांत त्यांना तेथून हटवत आहेत..
0
0
Report

चंद्रपुर के भद्रावती में बिबटिया पिंजरे में, गौतम नगर के नागरिकों को राहत

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरातल्या गौतम नगर परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद, नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरातील गौतम नगर परिसरात गेल्या आठ दिवसांपासून दहशत माजविणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या अथक प्रयत्नांनंतर पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आला. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भद्रावती वनविभागाने परिसरात पिंजरा आणि कॅमेरे बसवून सातत्याने गस्त सुरू ठेवली होती. नियोजनबद्ध मोहिमेद्वारे अखेर बिबट्याला सुरक्षितरीत्या पकडण्यात वनविभागाला यश आले. जेरबंद झालेला बिबट्या पाहण्यासाठी गौतम नगर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गर्दीमुळे काही काळ बिबट्या अधिक आक्रमक झाल्याचे दिसून आले. मात्र, वनविभागाने तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले. वनविभागाने बिबट्याला पुढील वैद्यकीय तपासणी आणि आवश्यक उपचारांसाठी सुरक्षित ताब्यात ठेवले असून, त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top