icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

चाकण MIDC दौरे में उद्योग मंत्री उदय सामंत को किसानों के तीव्र रोष का सामना

Shirur, Maharashtra:चाकण एमआईडीसी परिसर के निरीक्षण दौरे पर आए उद्योग मंत्री उदय सामंत को स्थानीय किसानों के तीव्र रोष का सामना करना पड़ा। हमारी जमीनों और घरों पर दबदबा जबरदस्ती थोपे जाने के खिलाफ नहीं, अगर अन्याय हुआ तो वे सीधे आत्महत्या कर लेंगे, ऐसा आक्रोश एक प्रभावित किसान ने उद्योग मंत्रों के समक्ष व्यक्त किया। इस समय प्रशासन से उचित समाधान नहीं निकलने का आरोप भी नागरिकों ने लगाया। स्थिति की गंभीरता को देखते हुए उद्योग मंत्री उदय सामंत ने क्रोध में आए किसान को शांत किया और सभी कागजात के साथ होटल Marriott में बैठक के लिए बुलाकर समस्या के समाधान का आश्वासन दिया।
0
0
Report

चाकण में मंत्री ने कहा 100% न्याय, सड़कों से राहत की उम्मीद

Chakan, Maharashtra:Chakan Samant Byte Rep: Hemant Chapude(Chakan) उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या संपूर्ण पत्रकार परिषदेचे सविस्तर पॉईंटर्स: १. दौऱ्याचा मूळ उद्देश चाकण परिसरातील उद्योजकांमध्ये असलेला संभ्रम दूर करणे आणि त्यांना प्रत्यक्ष न्याय मिळवून देणे हाच या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. उद्योजक असोसिएशनच्या प्रतिनिधींशी चर्चा करून प्रत्यक्ष जागेवरील अडचणी समजून घेण्यात आल्या. २. तातडीचे रस्त्यांचे उपाय व दिलासा असोसिएशनने सुचवलेले महत्त्वाचे २ ते ३ पर्यायी रस्ते तातडीने पूर्ण केल्यास वाहतूक आणि इतर समस्यांतून २५% दिलासा तात्काळ मिळेल. रस्त्यांचे खड्डे, साईड शोल्डर्स (पट्ट्या) भरणे, कचरा हटवणे आणि पार्किंगचे नियोजन यावर तात्काळ काम सुरू करण्यात आले आहे. ३. उच्चस्तरीय समिती और नोडल ऑफिसर समस्यांच्या निवारणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नोडल ऑफिसर नेमून विविध विभागांशी समन्वय साधला जाईल; याचे आदेश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ४. रस्त्यांचे काँक्रीटीकरण व निधी पूर्वी मंजूर केलेल्या २७ किमी रस्त्यांच्या काँक्रीटीकरणापैकी काही भागांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित निधीतून आवश्यकतेनुसार आणि असोसिएशन/नागरिकांच्या गरजेनुसार आणखी १७-१८ किमी रस्त्यांच्या कामांना तातडीने मंजुरी दिली जाईल. ५. पाहणीच्या वेळेवरील स्पष्टीकरण ʼफक्त अर्ध्या तासात संपूर्ण पाहणी कशी झाली?ʼ या पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट केले की, असोसिएशनच्या प्रतिनिधींनी जे बॉटलनेक (अडचणीचे मुख्य स्पॉट्स) दाखवले, तिथेच प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. उर्वरित सर्व मुद्द्यांचे सविस्तर प्रेझेंटेशन (PPT) बैठकीत पाहिले जाईल. ६. विविध प्रशासकीय विभागांशी समन्वय केवळ एमआयडीसी नव्हे, तर जलजीवन मिशन, PMRDA, महानगरपालिका/नगरपरिषद, महावितरण (वीज), पोलीस प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) या सर्व विभागांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित आहेत. सर्वांशी समन्वय साधून जमिनीचे वाद, केबल टाकणे, कचरा व पाणी यांसारख्या महत्वपूर्ण प्रश्नांवर एकत्रित तोडगा काढला जाईल. ७. हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई काम करताना किंवा पाहणीपूर्वी केवळ दिखावा म्हणून कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कामात दुर्लक्ष आढळल्यास त्यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई केली जाईल. ८. ठोस निर्णय आणि अंमलबजावणी केवळ मंत्र्यांनी येऊन पाहणी करणे हा उद्देश नसून, प्रत्यक्ष ʼडिसिजन मेकिंगʼ (ठोस निर्णय) घेऊन त्याची अंमलबजावणी करणे हा सरकारचा निर्धार आहे. चाकणकर आणि उद्योजकांना १००% न्याय मिळेपर्यंत प्रशासन कटिबद्ध राहील. Byte: उदय सामंत (उद्योगमंत्री) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया चाकण पुणे
0
0
Report
Advertisement

नाशिक के खड्डों पर सियासत गरम, 100 से अधिक घायल, मोर्चे की धमकी

Nashik, Maharashtra:खासदार संजय राऊत, बाईट पॉइंटर - नाशिकमध्ये येताना स्विमिंग पूल मध्ये पोहत आलो - मी खड्ड्यांमध्ये पोहत नाशिक पर्यंत आलो - नाशिक शहरात सात लोक खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पडले आहेत - इकडचे मंत्री , कुंभ मंत्री चंपत राय सगळ डोळ्याने पाहतात - चेष्टा करतात लहान मुलासारखे - आदित्य ठाकरे त्र्यंबकेश्वर ला जाऊन आले - 100 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत - नाशिक मध्ये मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचा साम्राज्य आहे - नाश्क म्हणे मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतले आहे - पंतप्रधान म्हणतात आम्ही देशातले रस्ते स्पेस टेक्नॉलॉजीने बनवले आहे. - आम्ही नाशिककर यांना उद्या मोर्चात सहभागी होण्यासाठी आव्हान केला आहे शिवसेना तुमच्यासाठी रस्त्यावर उतरत आहे. - उद्याचा मोर्चा देवेंद्र फडणवीस सरकारचे वस्रहरण करणारा आहे. - काही साधुमंतांनी सांगितलं मी वाचलं नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नावावर फक्त लूट सुरू आहे - ज्यांना खड्डे बुजवता येत नाही ते कुंभमेळा घ्यायला निघाले.
0
0
Report
Advertisement

रामदास आठवले चिपळूण दौरे पर, आरपीआई के जिल्हा मेळावे को संबोधित करेंगे

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज चिपळूण दौऱ्यावर.. आरपीआयच्या जिल्हा मेळाव्याला करणार संबोधित.. आरपीआय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आज चिपळूण दौऱ्यावर येत आहेत.. चिपळूण सकाळी 11 वाजता आरपीआय पक्षाचा रत्नागिरी जिल्हा मेळावा होणार असून यावेळी आठवले कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.. मुंबई-गोवा महामार्गावरील प्रांत कार्यालया जवळील शिक्षक पतपेढी सभागृहात हा मेळावा होणार आहे.. आठवले यांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे..
0
0
Report

चाकण एमआईडीसी में 35 हजार उद्योग बंद, रोजगार संकट गहरा रहा है

Chakan, Maharashtra:चाकण पुणे.... युवासेना नेते आदित्य ठाकरे प्रेस पॉईंटर... उद्योगांचे स्थलांतर व रोजगाराचे संकट ​३५,३०० उद्योग बंद/बाहेर: खासदार राजाभाऊ वाजे यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना स्पष्ट झाले की, गेल्या ५ वर्षांत राज्यातून ३५,३०० उद्योग बंद पडले किंवा स्थलांतरित झाले. ​चाकणमधून २० कंपन्यांचे स्थलांतर: पायाभूत सुविधांअभावी चाकणमधून २० लघुउद्योग बाहेर पडण्याच्या तयारीत असून, यामुळे ५,००० प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्थानिक नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. ​तरुणांचे भवितव्य व जागतिक स्पर्धा: वर्ल्ड बँकेनुसार पुढील १० वर्षांत १२ कोटी तरुण-तरुणी जॉब मार्केटमध्ये येतील, मात्र राज्यात रोजगार निर्मितीऐवजी आहे ते उद्योग पळवले जात आहेत. ​चाकण व एमआयडीसीतील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्डे ​भयानक रस्ते व वाहतूक कोंडी:  उद्योगज आणि कामगारांना कामावर पोहोचण्यासाठी २ ते ३ तास ट्रॅफिकमध्ये अडकावे लागते, ज्यामुळे उत्पादकता आणि आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. ​दौऱ्याच्या आधी डागडुजीचा बनाव: नियोजित दौऱ्यानंतर रस्त्यांवरील खड्डे चपला व तात्पुरत्या मलमपट्टीने बुजवून कचरा लपवण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. ​५ कोटींचा रस्ता गायब: दीड वर्षांपूर्वी ५ कोटी खर्च दाखवलेला रस्ता उखडून गेला असून सर्वत्र केवळ खड्डेच शिल्लक आहेत. ​समिती नेमण्यावरून टोला: १४ लोकांची समिती स्थापन करून काही होणार नाही, कामात सुधारणा करण्यासाठी तुकाराम मुंढेंसारखा धडक निर्णय घेणारा एक सक्षम अधिकारी द्यावा. ​ भ्रष्टाचार आणि प्रशासकीय वसुलीचे आरोप ​एक्सप्रेस टॉवरमधून वसुली: एमआयडीसीत एक-एक प्लॉट क्लिअर करण्यासाठी प्रति चौरस मीटर १५०० रुपयांचा रेट ठरलेला असल्याचा थेट आरोप. ​उद्योजकांना नोटीसा व त्रास: प्लॉटच्या आत किरकोळ कारणांवरून उद्योजकांना दंड व नोटिसा बजावल्या जातात, मात्र प्लॉटबाहेर गटारे, वीज आणि रस्त्यांचे प्रश्न सोडवले जात नाहीत. ​खास मर्जीतील लोकांना सवलती: मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांच्या कारखान्यांना कोट्यवधींचे कर्ज व स्पेशल केस म्हणून मंजुरी मिळते, मग चाकण-अंबडच्या उद्योजकांसाठी स्पेशल केस का नाही? ​. इतर राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर भूमिका ​महिला आरक्षण विधेयक: २०२३ मध्ये मंजूर झालेले महिला आरक्षण बिल त्वरित लागू करावे; डिलिमिटेशनचा बहाणा करून राजकीय फायद्यासाठी ते टांगणीला ठेवू नये. ​जीशान सिद्दीकी धमकी प्रकरण: महाराष्ट्रात सध्या कायदा व सुव्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडाला असून सत्ताधारी केवळ फोडाफोडीच्या राजकारणात मग्न आहेत. ​सार्वजनिक वाहतूक व मेट्रो: चाकण-पिंपरी-पुणे दरम्यान मेट्रो व जलद रेल्वेची आवश्यकता असून पीएमपीएमएल/बसेसची वारंवारता वाढवून स्वस्त दरात सेवा देणे गरजेचे आहे.  नाशिकची स्थिती: नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाचेच आमदार आणि महापालिका असतानाही तिथे खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे; अंबड एमआयडीसीतून शहरात पोहोचणेही कठीण झाले आहे. ​स्थानिक आमदारांचे ऐकले जात नाही: सत्ताधारी पक्षाचे स्थानिक आमदार स्वतः तक्रार करत आहेत की प्रशासन त्यांचे ऐकत नाही; मग प्रशासन नक्की कोणाचे ऐकते असा सवाल. ​मिसिंग लिंक रस्त्याची दुरवस्था: मुंबईहून येताना नुकत्याच उद्घाटन झालेल्या मिसिंग लिंकच्या अप्रोच रोडची अवस्था लगेचच खडबडीत झाली आहे. ​. अपघातातील मदत व दुजाभावाचा मुद्दा ​मदतेवरून सरकारवर निशाणा: क्रिकेट मॅच जिंकणाऱ्या खेळाडूंना कोट्यवधी रुपये देणारे सरकार खड्ड्यांमुळे आणि अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या कुटुंबीयांना मात्र तुटपुंजे मदत देते किंवा वाऱ्यावर सोडते. ​अपघातग्रस्तांची हद्दवादावरून होणारी हेळसांड: खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या अपघातात जखमींना मदत मिळण्यासाठी पोलीस ठाण्यांमधील हद्दीचा वाद आडवा येतो, अशा प्रकरणांवर सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट निर्देश असतानाही प्रशासनाचा ढिम्म कारभार दिसून येतो. ​ विरोधकांचे आरोप आणि राष्ट्रीय राजकारण ​पंतप्रधानांच्या 'नक्षल' वक्तव्यावर पलटवार: अभ्यास करून गुण मिळवणारे, हुशार तरुण आणि प्रश्न विचारणाऱ्या Gen-Z पिढीची भाजपला ॲलर्जी असल्यामुळेच त्यांना अशी नावे दिली जात आहेत; अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या वेळची भाजप आता उरलेली नाही. ​वंदे मातरम आणि राष्ट्रगीत वाद: देशभक्ती आणि राष्ट्रगीताच्या मुद्द्यांवरून विरोधकांवर टीका करणारे सत्ताधारी स्वतः संसदेत वंदे मातरमच्या वेळी गैरहजर राहून त्याचा अपमान करतात. ​गोपीनाथ मुंडे व काँग्रेस प्रवेशाचा दावा: गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत केल्या गेलेल्या दाव्यांवर फार खोलात न जाता, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी त्यांना काय सल्ला देऊन थांबवले होते हे आपल्याला ठाऊक असल्याचे स्पष्ट केले. ​. अंधश्रद्धा आणि सामाजिक गैरप्रकारांवर भाष्य ​पुण्यातील भोंदूबाबा प्रकरणावर ताशेरे: स्वतःला अध्यात्मिक गुरू म्हणवून घेत मुलींचे शोषण करणाऱ्या आणि अंधश्रद्धा पसरवणाऱ्या प्रवृत्तींवर कारवाई करण्याऐवजी, सत्तेत बसलेले नेतेच बुवाबाजी आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचा आरोप. ​. स्थानिक आमदार आणि राजकीय हालचाली ​बाबाजी काळे यांची उपस्थिती: खेडचे आमदार बाबाजी काळे कौटुंबिक लग्नामुळे दौऱ्यातून लवकर निघाले; त्यांनी स्वतः फोन करून आंदोलनासाठी बोलावले होते, त्यामुळे त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून कोणत्याही दबावाचा प्रश्न येत नाही. ​मिलिंद नार्वेकर व महायुती नेत्यांच्या भेटीवर स्पष्टीकरण: ध्वजारोहण किंवा सार्वजनिक कार्यक्रमात समोरासमोर येऊन हस्तांदोलन केले म्हणजे राजकीय जवळीक होत नाही, असा खुलासा केला. Byte: आदित्य ठाकरे (युवासेना प्रमुख) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया चाकण पुणे....
0
0
Report

रत्नागिरी में मासेमारी बंदी 15 अगस्त तक, 2030 तक 30–70 हजार नौकरियाँ

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..नितेश राणे.. मासेमारी और सागरी सुरक्षा. मासेमारी बंदीचा कालावधी... स्थानिक मच्छीमारांच्या आर्थिक फायद्यासाठी व सागरी जीवांच्या प्रजननासाठी मासेमारीची बंदी १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती.. नवीन हंगाम.. मासेमारीचा नवीन हंगाम १६ ऑगस्टपासून अधिकृतपणे सुरू होत आहे. मच्छीमारांचे हक्क.. राज्यातील मच्छीमारांच्या अधिकारांचे आणि रोजगाराचे पूर्ण संरक्षण केले जाईल; कोणाचाही हक्क हिरावून घेऊ दिला जाणार नाही. बंदर विकास (पंतप्रधान प्रकल्प).. कोणत्याही पोर्ट/बंदर प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व राजकीय ताकद आणि इच्छाशक्ती सरकारकडे आहे.. रोजगार उद्दिष्ट (२०३०).. २०३० पर्यंत जहाज बांधणी (Shipbuilding) क्षेत्रातून सुमारे ३०,००० ते ७०,००० नवीन नोकऱ्यांची निर्मिती करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. सुरक्षा व ओळखपत्र अनिवार्य.. सागरी क्षेत्रात काम करणारा प्रत्येक खलाशी भारतीय असणे बंधनकारक आहे. त्याच्याकडे वैध आधार कार्ड आणि मतदार यादीत नाव असणे अनिवार्य आहे. किनारपट्टी सुरक्षा.. संपूर्ण महाराष्ट्र किनारपट्टी "जिहाद मुक्त" आणि सुरक्षित ठेवण्यावर सरकारचा भर असेल. पायाभूत सुविधा व राजकीय मुद्दे.. मुंबई-गोवा महामार्ग.. महामार्गाचे काम आता केवळ ५% शिल्लक असून हे काम या वर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण केले जाईल. मराठा आरक्षण.. महायुती (देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील) सरकार मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यास कटिबद्ध आहे.. हिंदू समाज संरक्षण.. हिंदू समाजाला ताकद देण्यासाठी आणि त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकार सर्व आवश्यक निर्णय घेत आहे. मुंब्रा नाव बदल.. 'मुंब्रा' या क्षेत्राचे नाव बदलून लवकरच 'मुंब्रा देवी' केले जाईल. काँग्रेसवर टीका.. पृथ्वीराज चव्हाण हे स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी काँग्रेस पक्षाची दुरवस्था केली होती, ज्यामुळे काँग्रेस आज विरोधी पक्षात आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करू नये. संजय राऊत व विरोधकांवर निशाणा.. शिवसेना आणि निवडणूक आयोग.. संजय राऊत यांनी पक्षाबाबत केलेल्या दाव्यांवर टीका करताना, "निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राऊत काय चहा पाजायला उपस्थित होते का?" असा सवाल उपस्थित केला. अर्बन नक्षलवाद.. हिंदू संस्थांना बदनाम करून तुष्टीकरणाला खतपाणी घालणाऱ्या विचारसरणीमध्ये 'अर्बन नक्षलवादी' मानसिकतेचे लोक सक्रिय आहेत आणि त्यात संजय राऊत यांचा समावेश असू शकतो..
0
0
Report
Advertisement

नाशिक: Ring Road-affected farmers stage self-immolation protest at Collectorate

Nashik, Maharashtra:- रिंग रोडबाधित शेतकऱ्यांचे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन - स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रिंग रोडबाधित शेतकऱ्यांचे आंदोलन - नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलनाला सुरुवात - काही दिवसांपूर्वी याच शेतकऱ्यांनी आमरण उपोषण केले होते - कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर आमरण उपोषण मागे घेण्यात आले होते - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चेचे आश्वासन मात्र अद्याप चर्चा नाही - कुंभमेळा मंत्र्यांनी शब्द न पाळल्याचा आंदोलकांचा आरोप - जिल्हा प्रशासनाकडूनही योग्य कारवाई होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप - आंदोलनादरम्यान गिरीश महाजन आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यावर आंदोलकांची जहरी टीका - मागणी मान्य झाली नाही तर सर्व बाधित शेतकरी थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्यावर जाऊन करणार आंदोलन आंदोलनाचा आढावा घेत आंदोलकांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी
0
0
Report

यवतमाळ में स्वतंत्रता दिवस पर ध्वजारोहण और जल-संरक्षण के साथ किसानों को राहत की घोषणाएं

Yavatmal, Maharashtra:भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मृदू व जलसंधारणमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना, प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्यासह अधिकारी कर्मचारी, स्वातंत्र्य सेनानी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या अधिकारी, कर्मचारी, युवा यांचा सन्मान करण्यात आला. तसेच जलसंवर्धन अभियानाअंतर्गत जलसंवर्धनाची शपथ घेण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यात बोगस बियाणे, खते, कीटकनाशके विक्री करणाऱ्यांवर कारवाया केल्या गेल्या. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक उभारी देण्याचं काम शासन करीत आहेत. 82 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफी ची रक्कम वाटप करण्यात आली आहे. अल निनो चे सावट असल्याने पाणी वापराबाबत नियोजन प्रशासनाने केले आहे. तसेच पिक विमा लाभ मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली.
0
0
Report

भोंदू बाबा मनोहर मामा भोसले के अघोरी प्रथाओं से ठगी, 25 आरोपी, 10 गिरफ्तार

Pandharpur, Maharashtra:भोंदू बाबा मनोहर मामा भोसले यांच्या अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा कृत्यातून मिळालेल्या अवैध पैशांची विल्हेवाट लावण्यात पुणे जिल्ह्यातील भिगवन मधील प्रसिद्ध शिक्षण संस्था चालकाचा सहभाग निष्पन्न ,रामदास झोळ आणि त्याचे साथीदार यांचा सहभाग सोलापूर गुन्हे शाखेनं निष्पन्न केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी पोलीस स्टेशन सह भोंदू बाबा मनोहर मामा भोसले यांच्या विरोधात तब्बल सहा गुन्हे दाख्ल आहेत. याचे गांभीर्य लक्षात घेऊन सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी एक विशेष एसआयटी स्थापन केली. यामध्ये भोंदू मनोहर भोसले याला मदत करणारे तब्बल 25 आरोपींचा सहभाग आढळून आला आहे.यापैकी दहा जणांना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे कुर्डूवाडी पोलिसात दाखल असलेल्या पुण्यातील प्रमुख आरोपी मनोहर मामा भोसले असून त्याने अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा, अशा अघोरी पुजेच्या माध्यमातून अनेक पिडीतांची फसवणूक करुन त्या कृत्यातून मिळालेल्या अवैध पैशाची विल्हेवाट लावण्याकरीता दत्तकला इनस्टिटयूट (शिक्षण संस्था), स्वामी चिंचोली, दौंड पुणे चे संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ यांचे मार्फतीने त्याची विल्हेवाट लावत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने, त्यांना सदर गुन्हयात आरोपी करण्यात आले आहे. तसेच त्यांचेबरोबर त्यांच्या इनस्टिटयूट (शिक्षण संस्था) मध्ये त्यांना मदत करणारे, त्यांचे इतर साथिदार यांना देखील गुन्हयात आरोपी करुन त्यापैकी राजेंद्र गोकुळ हुंबे, लक्ष्मीकांत मन्मथ लिगाडे यांना अटक करण्यात आली आहे. याचा तपास गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक राहुल गरड हे करत आहेत
0
0
Report
Advertisement

भागवत नागपुर में युवाओं से बोलते: भारत का विश्वगुरु बनने का मार्ग

Nagpur, Maharashtra:नागपुर: नागपुरात आज सरसंघचालक डॉ. मोहन भागवत ‘जेन-झी’शी संवाद साधणार आहे. कस्तुरचंद पार्कवर एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात ते नव्या पिढीतील विद्यार्थ्यांसह तरुणांशी संवाद साधणार आहेत. तत्पूर्वी ते ध्वजारोहण करतील आणि त्यानंतर मुख्य व्यासपीठावर येतील. यावेळी सरसंघचालकानी केलेले भाषण मार्गदर्शन. नागपूर - डॉ मोहन भागवत,सरसंघचालक,भाषण. भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळाला त्यावेळी लोक बोलायचे की हे स्वातंत्र्य टिकणार नाही पण स्वातंत्र्य टिकलं. प्रसंग सगळेांशी संवादाचा आहे पण मला तरुणांशी संवाद साधायला सांगितलं. प्रसंग सर्वांसोबत संवादाचा आहे मात्र तरुण हे डेमोक्रॅटिक आहे, त्याचा योग्य लाभ झाला तर आपण विश्वगुरू बनणार आणि नाही झाला तर पुढे खूप बोजा येईल. तीस वर्षांनंतर आजची पिढी जुनी पिढी बनेल, आजच्या पिढीला पुढच्या पिढी बद्दल विचार करणे आवश्यक आहे. आपली तुलना इतर लोकांशी करू नये, आपण अमेरिका चीन ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड नाही, हे तरुणांनी समजायला पाहिजे की आम्ही भारत आहोत. उन्नतीचे जे निकष पाहिजे त्यासाठी आपल्याला आपला आणि आपल्या देशाचा विचार करावा लागेल, इतर केवळ त्यांच्या भौतिक उन्नतीचा विचार करतात मात्र भारतात आपण भौतिक उन्नतीचा विचार करत नाही. संतुलन ठीक करून पुढील मार्ग दाखवणे हे भारताच्या प्रती आपलं दायित्व आहे यासाठी आपल्याला तयार व्हायचं आहे. रोजगार केवळ नोकरी होत नाही; हाताने काम करणाऱ्याला ही प्रतिष्ठा पाहिजे, उद्दमिता यालाही प्रतिष्ठा पाहिजे. अधिक साधन संपन्न देश नोकरीचा विचार करू शकतात, मात्र भारतासारखे विशाल जनसंख्या असलेला आपल्या देशाला वेगळा विचार करावा लागेल. प्राण गेले तरी चालेल असा विचार करणारे तरुण असतात, कारण वरिष्ठ किंवा ज्येष्ठ नागरिक हे हिम्मत करू शकत नाही तरुणांमध्ये ही हिंमत असते. जग ज्याला अविचार म्हणते तेच साहस पुढे कामात येणार; एकट्याचा भाग्य नाही बनत आपल्याला देशाचं भाग्य बनवायचं आहे. जगात प्रतिष्ठा पाहिजे असेल तर जेव्हा पर्यंत आपला देश, समाज प्रतिष्ठित नहीं, तोपर्यंत ते मिळणार नाही. आम्ही तेव्हा वैभव संपन्न आहोत जेव्हा भारत वैभव संपन्न आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top