icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

विरार में बार्बेक्यू नेशन के फूड लाइसेंस पर FDA की बड़ी कार्रवाई

Vasai-Virar, Maharashtra:विरार ब्रेकिंग विरार मध्ये बार्बेक्यू नेशनच्या फूड लायसन्सवर FDAचा दणका! विरार पश्चिम येथील प्रसिद्ध बार्बेक्यू नेशन हॉटेलच्या डेझर्ट केकमध्ये झुरळ आढळल्याच्या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाची कारवाई. ग्राहकाने केलेल्या तक्रारीनंतर FDA पालघरकडून हॉटेलची तपासणी करण्यात आली. सम्बंधित ग्राहकाने हॉटेलमधील अस्वच्छता आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलेली आहे हॉटेलमध्ये अस्वच्छता आढळल्याच्या तक्रारीनंतर प्रशासनाकडून कारवाई. हॉटेलचे फूड लायसन्स सस्पेंड केल्याची माहिती. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या हॉटेल प्रशासनाला FDAचा दणका! या कारवाईमुळे हॉटेल व्यवसायिकांमध्ये खळबळ.
0
0
Report

गणेशोत्सव के दौरान मुंबई-गोवा हाईवे पर भारी वाहन बंद, प्रवास सुगम बनाने की नीति

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी; चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार.. आगामी गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरळीत व्हावा आणि महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये,यासाठी राज्य शासनाने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर १६ टन किंवा त्यापेक्षा अधिक वजन असलेल्या अवजड वाहनांना बंदी घातली आहे.. ११ ते १५ सप्टेंबर, १८ ते २० सप्टेंबर आणि २५ ते २६ सप्टेंबर या कालावधीत ही बंदी लागू राहणार असून दूध,पेट्रोल,औषधे,भाजीपाला आणि आपत्कालीन सेवा पुरवणाऱ्या अत्यावश्यक वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आले आहे..
0
0
Report

रेल्वे रुळ पर रील बनाने वाला युवक गिरफ्तार, वायरल वीडियो के बाद सुरक्षा नोटिस

Washim, Maharashtra:वाशीम: सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी रेल्वे रुळावर उभं राहून रील बनवणं वाशिमच्या पांगरी नवघरे येथील अमोल नवघरे या तरुणाला चांगलंच महागात पडलंय. वाशिम रेल्वे स्थानक परिसरात रुळावर अनधिकृत प्रवेश करून रील बनवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. रेल्वे पोलिसांनी सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून तरुणाची ओळख पटवून त्याला ताब्यात घेतलं. चौकशीनंतर रेल्वे कायद्यानुसार कारवाई करत भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३५(३) अन्वये नोटीस बजावून त्याला सोडण्यात आलं. दरम्यान, रेल्वे रुळावर रील बनवणे जीवघेणं ठरू शकतं, त्यामुळे अशा स्टंटपासून दूर राहण्याचा इशारा रेल्वे सुरक्षा दलाने दिला आहे.
0
0
Report
Advertisement

वाकोळा में मराठी लावणी वीडियो में भोजपुरी गीत जोड़ने पर बवाल

Mumbai, Maharashtra:वाकोळ्यात मराठी लावणीच्या व्हिडिओला भोजपुरी गाणं जोडल्याने वाद मुंबईतील वाकोळा परिसरात मराठी लावणीच्या व्हिडिओला भोजपुरी गाणं जोडून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे… या प्रकारामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. वाकोळ्यात मनसेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी कार्यक्रमात मराठी लावणी सादर करण्यात आली होती. याच लावणीचा व्हिडिओ एका व्यक्तीने एडिट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये मराठी लावणीच्या मूळ ऑडिओऐवजी भोजपुरी गाणं जोडण्यात आलं आणि त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला. विशेष म्हणजे, या व्हिडिओला एक मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला आहे. या प्रकारामुळे मनसे कार्यकर्त्यांांनी आक्रमक भूमिका घेतली. हा केवळ सोशल मीडिया व्हिडिओचा प्रकार नसून, मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी अस्मितेचा जाणीवपूर्वक अपमान करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच मनसेच्या कलिना विधानसभा विभागाध्यक्ष संजय लक्ष्मण अडारकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन वाकोळा पोलीस ठाण्यात नेल्याची माहिती आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे. व्हिडिओ कोणी एडिट केला, तो सोशल मीडियावर कसा व्हायरल झाला आणि त्यामागचा नेमका उद्देश काय होता, याचा तपास केला जात आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.
0
0
Report

सांगली के गोटखिंडी स्पर्धा परीक्षा अकॅडमी बोर्डिंग में नाबालिग लड़कियों के साथ यौन शोषण, सुरक्षा पर सवाल

Sangli, Maharashtra:स्लग - स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या निवासी शाळेतील मुलींच्या सुरक्षतेतेचा प्रश्न ऐरणीवर ! अँकर - आश्रम शाळांमधील मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न भेडसावत असताना आता खाजगी स्पर्धा परीक्षा ॲकॅडमीतल्या निवासी मुलींचा सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे, याला कारण ठरलंय सांगलीच्या गोटखिंडी येथील अकॅडमीच्या निवासी शाळेतील तीन अल्पवयीन मुलींच्या बाबतीत घडलेल्या लैंगिक अत्याचाराचा प्रकार,या धक्कादायक प्रकरणानंतर स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या निवासी शाळेतील मुलींच्या सुरक्षेचे मुद्दा समोर आला आहे. व्ही वो - सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या गोटखिंडी येथील केतनराज स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या निवासी शाळेतील तीन अल्पवयीन मुलींच्या बाबतीत लैंगिक अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याहून धक्कादायक बाब म्हणजे ॲकॅडमीच्या संस्थापकाकडूनच हा प्रकार करण्यात आला आहे,यावर कहर म्हणजे संशयित संस्थापकाच्या पत्नीने या सर्व प्रकरणात अल्पवयीन मुलींना धमकी दिल्याचा एक प्रकार घडला,त्यामुळे या प्रकरणी आता संस्थापक काशिनाथ नांगरे सह पत्नी मनीषा नांगरे या दोघांवर पोक्सो कायद्याअंतर्गत आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून काशिनाथ नांगरे याला आष्टा पोलिसांनी अटक देखील केली आहे. बाईट - तुषार दोशी - पोलीस अधीक्षक, सांगली. व्ही वो - केतनराज स्पर्धा परीक्षा ॲकॅडमीची निवासी शाळा ही गोटखिंडी येथे आहे.येथे राहणाऱ्या तीन अल्पवयीन विद्यार्थिनींच्या बाबतीत 11 जून 2026 पासून वारंवार मानसिक छळ करून त्यांच्यावर अत्याचार व विनयभंग,करण्यात आल्याचा प्रकार सुरू होता.शिक्षक दिनी गुरुदक्षिणेच्या नावाखाली देखील संस्थापक असणाऱ्या काशिनाथ नांगरे यांच्याकडून अल्पवयीन मुलींच्या बाबतीत अत्याचार करण्याच्या प्रयत्न करण्यात आला.मुलींनी या सर्व प्रकरणानंतर संस्थापक नांगरेंच्या पत्नी मनीषा नांगरे yांना सर्व हकीकत सांगितली,पण मनीषा नांगरेंनी मुलींच्यावर होणाऱ्या अत्याचाराकडे दुर्लक्ष करत,या सर्व प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी मुलींना तक्रार देऊ नये अन्यथा शैक्षणिक नुकसान करण्याची धमकी दिली,मात्र वाढत्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून मुलींनी पालकांना सर्व हाकिकत सांगितली,त्यानंतर पालकांनी थेट आष्टा पोलीस ठाणे गाठत, संस्थापक संचालक असणाऱ्या काशिनाथ नांगरे व त्याच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल केला. व्ही वो - दरम्यान या सर्व प्रकरणावरून स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या निवासी शाळेतल्या मुलींच्या सुरक्षतेतेचा प्रश्नाबाबत राज्य सरकारने कडक कायदे करावेत, सिसीसीटीव्ही बंधनकारक करावेत,अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होऊ लागली आहे. बाईट -ज्योती अदाटे - सामाजिक कार्यकर्त्या, सांगली. व्ही वो - राज्यात सध्या खाजगी निवासी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे पेव फुटलंय,मात्र या ठिकाणी राहणाऱ्या मुलींच्या सुरक्षेचे प्रश्न या घटनेनंतर समोर आला आहे,त्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या निवासी शाळेमध्ये मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना असणे गरजेचं, मागणी पुढे आली आहे.
0
0
Report
Advertisement

MIDC के विरोध में मराठा गाँव CM से मिलने का मंच तैयार

Kolhapur, Maharashtra:संभाजी भिडे बाईट मुद्दे ऑन सैनिक टाकळी MIDC अख्खं गाव म्हणतंय आम्हाला MIDC नको. आमची पोटासाठी जगणारी जात नाही.. मराठा विना राष्ट्र घडणार नाही.. आम्ही मुख्यमंत्री यांना भेटणार आहे..आम्ही जमीन देणार नाही एवढे लक्षात ठेवा.. अखंड हिंदुस्तान निर्माण करणारी आग असणारी लोक है. मारहाण केलेल्या विरोधात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहे ऑन डॉल्बी सबंध देशाने डॉल्बी फेकून दिला पाहिजे. डॉल्बी जाळी पाहिजे. डॉल्बी कायमस्वरूपी जाळली पाहिजे.त्याचा उपयोग काय. काळया शक्ती नाकारण्यासाठी काही गोष्टी नाकारल्या पाहिजे.. त्यामध्ये डॉल्बी एक आहे ऑन दहीहंडीमध्ये महिलांचे नाच गाणं असले प्रकार करणारे देशद्रोही.. ते आपले असले तरी ते मूर्ख आहेत..
0
0
Report

महाराष्ट्र में पेपरफुटी पर टास्क फोर्स से सवाल: क्या भर्ती प्रक्रियाएं निष्पक्ष रहेंगी?

Nagpur, Maharashtra:नागपूर बाईट - संजय राऊत, नेता शिवसेना उद्धव ठाकरे सेना - इतकं मोठं सरकार आहे, महानगृहमंत्री आहेत, तरी पेपर फुटत आहेत, वारंवार फुटत आहेत. काल हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. टास्क फोर्स नेमण्याची का वेळ आली आहे? दहा वर्षांपासून राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे राज्य आहे. तरीही मुलांच्या आयुष्यात पेपरफुटीसारखी प्रकरणे समोर येत आहेत. दुर्दैवाने सांगावं लागत आहे, NEET असो किंवा MPSC असो, इतर स्पर्धा परीक्षा असो, या सगळ्या पेपरफूटीच्या रॅकेटमध्ये भाजपचे कार्यकर्ते आहेत. UPSC प्रकरणात पुण्यात लोकांना पकडले आहे. हे सर्व लोक भाजपचे कार्यकर्ते आहेत. टास्क फोर्स काय करणार आहे? जिल्ह्या-जिल्ह्यात पोलीस यंत्रणा काय करत आहे? दुसरी यंत्रणा असेल तर काम वाढत आहे. कोणत्याही टास्क फोर्सशिवाय लोकसेवा आयोगाची सेटिंग भरती प्रक्रिया चालायची, तेव्हा मला असं वाटायचं. ऑन अयोध्या मंदिर अयोध्येत अशी वेळ आली आहे ki, प्रभू श्रीरामजींच्या मंदिरात दानपेटीच्या रांगा दिसत आहेत. भाजपच्या राज्यात दानपेटीची चोरी होत आहे, शाळा लुटल्या जात आहेत. एअर मार्शलला येऊन सीओ बनवला आहे. पहिले आमचा पुजारी सर्व काही बघत होता. एअर मार्शलला त्या ठिकाणी बसवलेलं आहे. मोठमोठे अधिकारी त्या ठिकाणी बसवले आहेत. राम मंदिरालासुद्धा सोडलं नाही, मग विद्यार्थ्यांना का सोडणार आहेत? DJ पश्चिम बंगाल दोन्ही सरकार राज्यात भाजपचे सरकार आहे. ममता बॅनर्जींचे सरकार तर नाही आहे ना? पश्चिम बंगालमध्ये आता म्हणता, बॅनर्जी हिंदूविरोधी आहेत. म्हटलं असतं. यामध्ये नागपुरात गाईडलाईन आली आहे. इथेही देवेंद्र फडणवीस यांचे भाजपचे सरकार आहे. नागपुरात संघाचे मुख्यालय आहे. त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे. कारण DJच्या आवाजाचा त्रास होतो. त्यापासून भूकंप येत आहे, त्याचा ब्रेनवर होतो, हार्टवर होतो, आजारी लोकांना त्रास होतो. त्या गोष्टीत सर्वसमावेशक गाईडलाईन सर्व देशांमध्ये हवी आणि त्याच्या पालन व्हायला हवे. गोवा भाजप बैठक एकनाथ शिंदे भाजपमध्ये मर्ज झाले पाहिजेत. ..त्यांच्या पार्टीचे कमांडर चीफ अमित शाह आहेत. एकनाथ शिंदे यांची पार्टी नाही गट आहे. गोव्यामध्ये कधी, दिल्लीत कधी अमित शहा यांच्या पाठीमागे धावा लागतं आहे. भाजप शिंदे गट यांचे विचारधारा एक होऊ शकते मात्र बाळासाहेब ठाकरे विचारधारेत साम्य आहे मात्र आम्ही पूर्णपणे वेगळे आहोत. MPSC लोकसेवा आयोग बरखास्त केला पाहिजे. सर्वसमावेशक पद्धतीने प्रक्रिया आणि परीक्षा झाली पाहिजे. विश्व हिंदू परिषद गरबा समर्थन नितेश राणे तो नितेश राणे पागल माणूस आहे. पागल झालेला आहे. हे नवीन-नवीन मुल्ला बनते, जोरात मानतात हिंदुत्वाचे नवीन मूल्य आहेत या व्यक्तीचे. या व्यक्तीचे नाव घेतलं. त्याच व्यक्तीने RSSला हाफ चड्डीवाला म्हटलं होतं. वीर सावरकरांना माफीवीर म्हणणारा हाच व्यक्ती आहे. हिंदुत्व अशा पाठ लोकांना शिकवतील? देशाचे संस्कार माहिती नाहीत, संस्कृती माहिती नाही, हिंदुत्वाचे पाठ शिकवतील का? धंदे भडकावण्याचा प्रकारच्या बाते करतील. मंत्र्यांच्या माध्यमातून बोलायला पाहिजे. आपण आहेत कोण, त्यांनी सांगितलं पाहिजे. सगळ्यात अगोदर आपण ज्या गोष्टी ठेवल्या आहेत, शंकर यासारखे यांचे मान्यता आहे का? आपल्या हिंदुत्व धर्माचे सर्व मोठे त्यांच्यासोबत गोष्ट करा. नागपुरातून मोहन भागवत यांच्यासोबत येऊन गोष्ट करा. न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत यांनी वेगळी गोष्ट म्हटली. आपण वेगळी गोष्ट करता. हा देश काय आहे, हिंदुत्व काय आहे? ऑन विशाखा राऊत एका नगरसेवक पदासाठी विशाखा राऊत पक्ष सोडतील असं नाही..नगरसेविका विशाखा राऊत या फक्त जुन्या जनतेच्या कळवळ्याच्या नेत्या आहेत. त्यांच्या विरोधात कटकारस्थान रचले जात आहे. सूडबुद्धीने आमच्या नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द केले जात आहे. भाजपाच्या १७ नगरसेवकांच्या जात पडताळणी होत नाही. प्रमाणपत्रावर शिवसेना शिंद गटाचे सात-आठ जण जात पडताळणी होत नाही... जे विरोधात आहे त्यांची जात पडताळणी होते.. हमारे भी दिन आ जायेंगे तब देख लेंगे.. मनोज जरांगे यांची एकनाथ शिंदेंवर टीका एकनाथ शिंदे विश्वासपात्र नाहीत. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे झाले नाहीत ते मनोज जरांगे कसे होणार भीषण संकट सोयाबीन, विदर्भ ‘विरोधक’ हा शब्द चुकीचा आहे. आपण महाराष्ट्राचे नागरिक आहोत. विदर्भात दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. राज्याचे मुख्यमंत्री विदर्भातील, नागपूरचे आहेत. अनेक मंत्री विदर्भाचे कॅबिनेटमध्ये आहेत. अजूनपर्यंत दुष्काळाविषयी संवेदना व्यक्त केली असेल, असे ऐकले नाही. जो शेतकरी दुष्काळाशी संघर्ष करतोय, त्याला दिलासा देणारे काही वक्तव्य, मदत किंवा काही जाहीर झालं का? सोयाबीनबाबत विशेषतः मुख्यमंत्री बोलत नाहीत. मंत्री गर्भावर बोलतात, मुसलमानांवर बोलतात, पाकिस्तानवर बोलतात, याच्यावर बोलतात. विदर्भातला शेतकरी आत्महत्येच्या कड्यावर उभा आहे. दुष्काळामुळे त्याच्यावर एकही मंत्री गांभीर्याने बोलताना दिसत नाही. नितेश राणे यांची राहुल गांधींवर टीका राहुल गांधींची तुलना कोणासोबत करता? याआधी राहुल गांधींचे बूट उचलणारे हेच लोक आहेत.
0
0
Report

भंडारा में महायुति-शिंदे गट बनाम कांग्रेस के बीच तकरार तेज

Bhandara, Maharashtra:महायुति मध्ये भोंडेकराणवर अन्याय होत आहे, त्यामुळे त्यांनी आमच्या काँग्रेस पक्षात याव.. मुकुंद साखरकर काँग्रेस जिल्हाध्यक्ष भंडारा भंडारा जिल्ह्यात महायुती शिवसेना शिंदे गट भाजपा यांचा वाद विकोपाला गेला आहे... यावर आता काँग्रेस कडून थेट शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना जाहीरपणे पक्षात येण्याचे आवाहन केलेले आहे. यावेळी साखरकर यांनी महायुतीचे आमदार धोंडेकर यांच्या विकास कामांची स्तुती करत त्यांच्यावर महायुती अन्याय होत असल्याचे सांगितले आहे. यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असल्याचे सांगितले जाते आणि शिंदे गट आणि काँग्रेस यांच्यात काही छुपी युती तर नाही ना असाही आता प्रश्न निर्माण होत आहे.
0
0
Report
Advertisement

कोल्हापुर के सैनिक टाकळी में जमीन हस्तांतरण रद्द कराने की मांग पर मोर्चा

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील सैनिक टाकळी इथल्या ग्रामस्थांनी एमआयडीसी जमीन हस्तांतरणाचा शासन निर्णय रद्द करावा या मागणीसाठी पाठपुरावा करत आहेत. या मागणीला घेऊनच आज सैनिक टाकळी जल-जमीन-जीवन बचाव कृती समितीच्या वतीने शिरोळ तहसीलदार कार्यालयावर आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून प्रस्तावित सैनिक टाकळी एमआयडीसीसंदर्भातील जमीन हस्तांतरणाचा शासन निर्णय रद्द करावा तसेच माजी सैनिक व शेतकऱ्यांना मारहाण व राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी आमदार राजेंद्र पाटील यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील केली जाणार आहे. शिरोळ मधील शिवाजी पुतळा येथून तहसीलदार कार्यालयापर्यंत काही वेळेत हा मोर्चा काढला जाणार आहे.
0
0
Report

कर्जत में कांदे के विवाद पर भाई ने तीन बहनों पर लकड़ी डंडों से हमला

Ahilyanagar, Maharashtra:शेतातील कांदा घेतल्याच्या शुल्लक कारणावरून जोरदार मारहाण केल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यात घडली आहे... अहिल्या नगरच्या कर्जत तालुक्यातील राक्षस वाडी येथे हा धक्कादायक प्रकार घडला असून भावाच्या शेतातील कांदे न विचारता घेतल्यामुळे भावांनीच तीन बहिणींना लाकडी दांड्याने जोरदार मारहाण केली आहे या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून कर्जत तालुक्यासह जिल्ह्यात या मारहाणीची चर्चा सध्या सुरू आहे दरम्यान मारहाण करणाऱ्या भावांची तक्रार पोलिसात केल्यानंतर पोलिसांकडे दोन्ही बाजूच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत
0
0
Report

पिंपरी-चिंचवड़ के माळुंगे MIDC में ड्रोन से रील बनाते चार युवक गिरफ्तार: पुलिस ने बड़ी कार्रवाई

Chakan, Maharashtra:पिंपरी-चिंचवडच्या म्हाळुंगे एमआयडीसी भागात भररस्त्यात वाहने आडवी लावून ड्रोनच्या सहाय्याने रिल्स बनवणाऱ्या हुल्लडबाजांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. संत तुकाराम चौक ते भिंडेवाडी रस्त्यावर फॉर्च्युनर, स्कॉर्पिओसह चार गाड्या भरधाव व समांतर चालवून वाहतूक ठप्प करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हाळुंगे पोलिसांनी यातील चारही आलिशान गाड्या जप्त केल्या असून तिघांना तात्काळ ताब्यात घेतले आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी सार्वजनिक सुरक्षितता धोक्यात घालणाऱ्यांवर आता पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
0
0
Report
Advertisement

सोलापुर में मराठा समुदाय ने पुणे-राष्ट्रीय महामार्ग पर रास्ता रोको शुरू किया

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात मराठा समाज आक्रमक, सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सोलापुरात मराठा समाज उतरला रस्त्यावर सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील बाळे पुलाजवळ रास्ता रोको आंदोलन शेकडोंच्या संख्येने मराठा समाज बांधव रास्ता रोको आंदोलनात सहभागी सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत असल्याने मराठा समाज बांधवांच्या भावना तीव्र
0
0
Report

संगमनेर में मंत्री-नेता के बीच तकरार, तांबे के बयान से राजनीतिक हलचल

Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे.. मात्र आमदार सत्यजीत तांबे यांनी, मामा बाळासाहेब थोरात यांच्या समोरच विखे पाटलांचं तोंडभरून केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.. संगमनेर नगरपालिकाेच्या वतीने विविध विकास कामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत पार पडला.. शहरात सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी, संगमनेर पालिकेला भरघोस निधी दिल्याबद्दल आमदार सत्यजीत तांबे यांनी त्यांचे जाहीर आभार मानले.. मात्र दुसऱ्यांनी याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला भाषणादरम्यान त्यांनी नाव न घेता आमदार अमोल खताळ यांना लगावलाय.. मामा बाळासाहेब थोरात यांच्या समोरच सत्यजीत तांबे यांनी विखे पाटलांचे आभार मानत कौतुक केल्याने, त्यांच्या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली आहे..
0
0
Report

गैंग ऑफ फोर के कथित अभियान से महाराष्ट्र में सतर्कता बढ़ी

Mumbai, Maharashtra:महाराष्ट्राच्या जनतेने सावध राहावे... महाराष्ट्रामध्ये "गॅंग ऑफ 4" कार्यरत झाली आहे.... अरुण सावंत. २०२९ मध्ये जर सत्तेमध्ये यायचं असेल तर मुंबई आणि महाराष्ट्राला जास्तीत जास्त बदनाम करा. हे या गॅंग ब्रीदवाक्य आहे उद्दिष्ट आहे या "गॅंग ऑफ फोर" मध्ये शामिल आहेत राहुल गांधी, संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि रोहित पवार. दररोज यांचा एक कलमी कार्यक्रम ठरलेला आहे तो म्हणजे खोट्या बातम्या पसरवा, जास्तीत जास्त बदनाम करा, जनतेमध्ये भ्रम निर्माण करा. "गॅंग ऑफ फोर" कडे महाराष्ट्राच्या विकासाचा कोणताही पॉझिटिव्ह अजेंडा नाही महाराष्ट्राच्या जनतेने सजग आणि सावध राहिलेलं बरं महायुती मधील तीनही पक्षांनी आपापसातील हेवे दावे बाजूला ठेवून 2047 पर्यंतचे विकासात्मक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवावं एकोप्याने काम करावे. श्रीमान देवेंद्र फडणवीस आणि श्रीमान एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करावेत. अन्यथा.... अरुण सावंत शिवसेना महाराष्ट्र राज्य प्रवक्ते "बस... अब लडना है"...
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top