icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

कोल्हापुर दूध संघ के अधिकारियों को अवमानना नोटिस, 9 अक्टूबर पेशी

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाचे तत्कालीन निवडणूक अधिकारी तथा विभागीय उपनिबंधक देविदास मिसाळ आणि नारायण परजणे यांना न्यायालयाच्या अवमान प्रकरणी याचिका दाखल का करू नये अशी नोटीस बजावण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये न्यायालयाने सुमोटो ही कारवाई केली. इतकेच नव्हे तर 9 ऑक्टोबरला अधिकाऱ्यांनी स्वतः कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दूध संस्था याचिकाकर्ते यांच्या वकिलाने सर्किट बेंच मध्ये युक्तिवाद करताना न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून संस्थांवर अन्याय केल्याचे कोर्टाला निदर्शनास आणून दिले. त्यानंतर कोर्टाने तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय उपनिबंधक परजाने आणि मिसाळ यांना नोटीस बजावली.
0
0
Report

रिसोड पुलिस ने कृषि सामग्री चोरी गैंग को गिरफ्तार किया; 4 लाख 45 हजार रुपये का माल बरामद

Washim, Maharashtra:रिसोड पोलिसांनी विशेष कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान शेती साहित्य चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून पाच दुचाकी, तीन मोटारपंप आणि चोरीचे साहित्य असा तब्बल ४ लाख ४५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बिबखेडा आणि मोठेगाव परिसरात मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून कटर, हातोडी, टॉमी आणि वायर कटरही जप्त करण्यात आले आहेत. या चोरट्यांनी जिल्ह्यात कुठे कुठे चोरी केली आहे याचा अधिकचा तपास रिसोड पोलीस करीत आहेत.
0
0
Report

14 अस्पतालों ने मुफ्त इलाज के नाम पर अधिक लिए पैसे; लौटे 1.9 लाख

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. मोफत उपचारात रुग्णांची लुबाडणूक; समन्वय समितीच्या दणक्यानंतर जिल्ह्यातील १४ रुग्णालयांनी परत केले पावणेदोन लाख रुपये!.. अॅंकर आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारांची सुविधा असतानाही रुग्णांकडून जादा पैसे उकळणाऱ्या जिल्ह्यातील १४ रुग्णालयांवर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.. जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय सनियंत्रण समितीने मार्च ते ऑगस्ट या कालावधीत घेतलेल्या धडक भूमिकेमुळे संबंधित रुग्णालयांना सुमारे एक लाख नव्वद हजार रुपये रुग्णांना परत करावे लागले आहेत.. उपचारात दिरंगाई,रुग्णांची अडवणूक किंवा अतिरिक्त पैशांची मागणी करणाऱ्या कोणत्याही रुग्णालयाची गय केली जाणार नाही,असा सज्जड दमही यावेळी जिल्हा प्रशासनाने दिला आहे..
0
0
Report
Advertisement

कोल्हापुर–मुंबई उड़ान सेवा सप्ताह में 5 दिन चलती है; इंडिगो शनिवार-रविवार सहित सभी दिन चलती है

Kolhapur, Maharashtra:आता बातमी कोल्हापूरातील विमान प्रवाशांसाठी .. कोल्हापूर मुंबई, मुंबई कोल्हापूर विमान सेवा आता पाच दिवस सुरू राहणार आहे. स्टार एअरवेज कंपनीने आठवड्यातील पाचच दिवस सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या सुधारित वेळापत्रकानुसार मंगळवार आणि रविवार या दोन दिवशी ही सेवा उपलब्ध नसणार आहे. पण दुसरीकडे कोल्हापूर-नवी मुंबई, नवी मुंबई - कोल्हापूर ही इंडिगो विमानसेवा आठवड्यातील सातही दिवस सुरू राहणार आहे.. त्यामुळे रविवार आणि मंगळवार या दिवशी मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी नवी मुंबई पर्यंतच सेवा उपलब्ध असणार आहे.
0
0
Report

दापोली में रानभाजी पाककृती प्रदर्शन, 40 से अधिक रानभाज्याओं के स्वाद प्रस्तुत

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..दापोलीत 'रानमाया' रानभाजी प्रदर्शन; पारंपरिक भाज्यांच्या पाककृतींनी वेधले लक्ष.. रत्नागिरीतील दापोली येथे कृषी विभाग आणि रामराजे महाविद्यालयाच्या वतीने 'रानमाया' रानभाजी पाककृती प्रदर्शन भरवण्यात आले.नव्या पिढीला पारंपरिक रानभाज्यांची ओळख व पौष्टिक महत्त्व कळावे यासाठी आयोजित या प्रदर्शनात ४० हून अधिक रानभाज्या आणि त्यांपासून बनवलेली चवदार सूप्स व नवनवीन पदार्थ सादर करण्यात आले.फास्टफूडच्या काळात स्थानिक खाद्यसंस्कृती जपणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला..
0
0
Report

गणेशोत्सव के मौके पर चाकरमान्यों के लिए पुल निरीक्षण, किरण सामंत ने किया दौरा

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. गणेशोत्सवापूर्वी चाकरमान्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी आमदार किरण सामंत ॲक्शन मोडमध्ये; चिपळूणच्या बहादूरशेख नाका उड्डाणपुलाची केली पाहणी.. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्न व्हावा यासाठी लांजा-राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी स्थानिक आमदार शेखर निकम यांच्या समावेत चिपळूण येथील बहादूरशेख नाका उड्डाणपुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.. सणासुदीच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावर होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उड्डाणपुलाचे काम, सर्व्हिस रोडची दुरुस्ती आणि खड्डे बुजवण्याची कामे तातडीने पूर्ण करण्याचे कडक निर्देश त्यांनी यावेळी प्रशासकीय यंत्रणा व संबंधित कंत्राटदारांना दिले.. चाकरमान्यांना कोणताही त्रास सहन करावा लागू नये यासाठी कामाला गती देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत..
0
0
Report
Advertisement

उदयराजे भोसले ने भरतगाववाडी के नए रथ की कलाकारी पर प्रशंसा की

Satara, Maharashtra:सातारा : भरतगाववाडी येथील श्री गजानन भंडारा उत्सवासाठी तयार करण्यात येत असलेल्या नूतन मिरवणूक رथास खासदार उदयनराजे भोसले यांनी सदिच्छा भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत रथाच्या कलाकुसरीचे आणि कारागिरांच्या कौशल्याचे कौतुक केले.भरतगाववाडीच्या ‘एक गाव, एक गणपती’ या २३५ वर्षांच्या परंपरेचे कौतुक करून उदयनराजेंनी ग्रामस्थांच्या एकजुटीचे अभिनंदन केले. यावेळी रथाचे कारागीर सचिन भांडवलकर, नितीन भांडवलकर आणि आकाश सुतार यांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
0
0
Report

Solapur me सूखा घोषित करने की मांग तेज, दिशा बैठक में ठोस कदम का आह्वान

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा - खा. प्रणिती शिंदे उजनी धरण भरले असले तरी त्याचे नियोजन व्यवस्थित व्हावे आणि सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा अशी आमची मागणी आहे लोकप्रतिनिधिंच्या दिशा बैठकीत एकमुखाने ठराव करण्यात आला. पिकं करपली, लोड शेडींग अनियमितपणे करत आहेत त्यामुळे शेतकऱ्याचे मरण आहे. डीपीडीसी मिटिंग मध्ये आता काही तथ्य राहिले नाही. त्याला काही मतलब नाही राहिले. तिथे मनमानी असते, मंत्र्यांना पाहिजे तेवढेच अधिकारी बोलवले जातात, त्यात सत्ताधारी असतात कोणी विरोध करत नाहीत. अन्यायाविरोधात कोणी बोलत नाही त्यामुळे डीपीडीसीला काही अर्थ राहिला नाही. याउलट दिशा मिटिंग मध्ये आम्ही आरोग्य, शिक्षण, हायवे, महावितरण अश्या एकूण 30 हेडच्या चर्चा झाल्या. प्रत्येक हेडचे अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे अधिकाऱ्यांवर धाक राहतो. आमच्यावर लोकांचा धाक आहे तर आम्हाला पण त्याची उत्तर अधिकाऱ्यांकडून अपेक्षित आहेत. प्रशासनाने कोणाच्या दबावाखाली न येता काम केले पाहिजे, म्हणून वॉच डॉग म्हणून आम्ही काम करतोय. लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही दिशा मीटिंग चालवतो. सगळी सरकारी कामे ही व्यवस्थित झाली पाहिजे मात्र ती कामे व्यावसायिक झाली आहेत. दुष्काळ तेरावा महिना अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करा, कर्जमाफी ही केवळ कागदावर राहिली आहे.. पाच टक्के लोकांना देखील कर्जमाफी झाली नाही ही शोकांतिका आहे. 2010 पासून सोलापूर जिल्ह्यात एकही अंगणवाडी मंजूर झालेली नाही. त्या बैठकीत अनेक धक्कादायक माहिती समोर आली मात्र ती तशी न राहता त्यावर काम झाले पाहिजे. ऑन अंगणवाडी आहार: मग पॅकेज फूड हे कोणीच खाऊ नये कारण त्यात केमिकल आणि प्रिझर्वेटिव्ह असतात. महिनांनी बनवलेले अन्न बंद करुन कोणा उद्योजकाला फायदा होण्यासाठी हे पॅकेज फूड दिले जात आहे. लहान मुले आणि गरोदर मातांना हे पॅकेज फूड दिले जाते त्याचा किती गंभीर परिणाम होणार आहे. पॅकेज फूड देण्यापेक्षा सरळ मॅगी द्या म्हणजे उद्योजकाला फायदा होईल. FDA च्या माध्यमातून त्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. सोयाबीन पिकं विमा 3 वर्षांपासून प्रलंबित आहे तो मिळावा. ऑन आवास योजना बंद : अहिल്യादेवी यांच्या नावाने ओबीसी आणि रमाई मातेच्या नावाने एससी साठी सुरू असलेली रमाई आवास योजना हळूहळू बंद करण्याचे कारस्थान हे सरकार करत आहे. ही दोन्ही नावे पुसून ती पीएम आवास योजनेत इंटीग्रेट करायचे आणि ही नावे पुसून टाकण्याचा वाईट डाव आहे. 2025 पासून यां दोन्ही योजनेचे प्रस्ताव घेऊ नका असे आदेश राज्य सरकारने दिले असल्याचे अधिकाऱ्यांनी रेकॉर्डवर आणले आहे. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आहोत. दिशाच्या माध्यमातून सोलापूर दिशा मिटिंगने या दोन्ही योजना बंद करू नये असा प्रस्ताव पाठवावा. ऑन एन कॅप : एन कॅपचा विषय आम्हाला माहिती आहे. स्मार्ट सिटी, फॉरेस्ट काही अधिकारी उपस्थित नव्हते त्यांना देखील नोटीस बजवायला सांगितली आहे. एन कॅप ही प्रदूषणमुक्त करण्यासाठी असते त्याचाही आढावा घेतला, मात्र त्यातही भरपूर अनियमित्ता आहे.
0
0
Report

अस्पताल में एक्सपायर्ड विडाल किट से टायफाइड टेस्ट के गलत परिणाम का खतरा

Amravati, Maharashtra:चार फाईल आहे धक्कादायक जिल्हा सामान्य रुग्णालयात टायफाईडच्या तपासणीसाठी वापरली जाते एक्सपायर्ड विडाल किट; रुग्णालय प्रशासनाचा रुग्णांच्या जीवाशी खेळ अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात पॅथॉलॉजी लॅब क्रमांक 37 मध्ये टायफाईडच्या तपासणीसाठी जानेवारी 2026 मध्ये कालबाह्य झालेले विडाल तपासणी कार्ड वापरले जात असल्याचे धक्कादायक वास्तविक समोर आले आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. विडाल तपासणी ही प्रामुख्याने टायफाईड व आतड्यांचा ताप असलेल्या रुग्णांच्या रक्तातील साल्मोनेला जिवाणूविरुद्ध तयार झालेल्या विशिष्ट प्रतिपिंडाची पातळी तपासण्यासाठी केली जाते. दीर्घकाळ ताप, अशक्तपणा डोकेदुखी किंवा पोटाशी संबंधित लक्षणे असलेल्या रुग्णांच्या निदान प्रक्रियेत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या तपासणीचा वापर केला जाते मात्र मुदत संपलेल्या किट मधील अभिक्रमकांची कार्य kapasitat निर्धारित गुणवत्तेप्रमाणे राहीलच असे नाही परिणामी चाचणीचा निकाल चुकीचा किंवा विश्वसनीय येण्याची शक्यता निर्माण होते त्याचा परिणाम रुग्णांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संपूर्ण गंभीर प्रकाराची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
0
0
Report
Advertisement

नाशिक के पेठरोड में MD ड्रग्स सप्लाई का धंधा पकड़ा गया; दो गिरफ्तार

Nashik, Maharashtra:नाशिकच्या पेठरोडवरील अश्वमेधनगर परिसरात एमडी ड्रग्ज विक्रीचा डाव नाशिक पोलिसांनी उधळून लावला आहे. अमली पदार्थविरोधी पथकाने सापळा रचत दोघा संशयित पेडलरना ताब्यात घेतलं. दर्शन गायकवाड आणि रोशन लोखंडे अशी या दोघांची नावं आहेत. त्यांच्या अंगझडतीत तब्बल ५६ ग्रॅम एमडी पावडर आढळून आली असून, त्याची किंमत तब्बल १ लाख ६८ हजार रुपये आहे. यासोबतच गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे. विशेष म्हणजे, संशयित दर्शन गायकवाड हा पोलिस रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, एमडीचा पुरवठा नेमका कुठून झाला आणि तो कोणाला विकला जाणार होता, याचा तपास सुरू आहे...
0
0
Report

नागपुर के मारबत महोत्सव में चार देशों के राजदूत पहुंचेंगे, धमाकेदार कार्यक्रम

Nagpur, Maharashtra:नागपूरची ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेची ओळख असणाऱ्या मारबत महोत्सवाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवण्यासाठी नागपूर महानगरपालिका प्रयत्नरत आहे. त्यादृष्टीने महापालिकेने तयारी केली असून येत्या 11 सप्टेंबर रोजी आयोजित मारबत महोत्सव पाहण्यासाठी चार देशाचे राजदूत येणार आहे. याशिवाय काही सेलिब्रिटी कलाकारांनाही निमंत्रित करण्यात आलेय. महोत्सवाअंतर्गत विविध उपक्रम राबविल्या जात आहेत. नागपूर शहरातील पर्यटनाला चालना मिळावी, शहराच नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्यासाठी तसेच नागपूरचा सांस्कृतिक वारसा समृद्धीकरणकरण्याठी मनपामार्फत उत्सवाचे हे आयोजन करण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे नेहरु पुतळा चौकाजवळ काळी -पिवळी मारबत भेटीचा प्रसंग पाहण्यासाठी यंदा खास व्यवस्था ही करण्यात आलीय. या सगळ्या बाबत माहिती जाणून घेतली आहे स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी यांच्याकडून
0
0
Report

चाकण में भीषण ट्रैफिक जाम: पुणे-नाशिक हाईवे पर 5–7 किमी वाहन कतारें

Shirur, Maharashtra:चाकणमध्ये भीषण वाहतूककोंडी; पुणे-नाशिक महामार्गावर ५ ते ७ किलोमीटर वाहनांच्या रांगा चाकण औद्योगिक वसाहतीतील पुणे-नाशिक महामार्गावर सकाळपासून वाहतुकीचा बोजवारा उडालाय… पाच ते सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने कामगार, प्रवासी आणि रुग्णवाहिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागतोय. सकाळच्या शिफ्टच्या वेळी वाहनांची संख्या वाढल्याने महामार्गावरील वाहतूक संथ झाली… अनेक वाहनचालकांना तासन्‌तास कोंडीत अडकून पडावं लागतंय.रुग्णवाहिकांनाही या कोंडीतून मार्ग काढताना अडचणी येत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनलीय चाकण औद्योगिक वसाहतीत दररोज लाखो कामगारांची ये-जा होते… त्यात वाढती वाहनसंख्या आणि अपुऱ्या वाहतूक व्यवस्थेमुळे वारंवार कोंडीची समस्या निर्माण होतेय.त्यामुळे तात्पुरत्या उपायांपेक्षा कायमस्वरूपी वाहतूक नियोजन करण्याची मागणी होत असून, चाकणची ही वाहतूककोंडी अखेर कधी सुटणार? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय.
0
0
Report
Advertisement

नाशिक में आरके ग्रुप शंभूराजे मित्रमंडळ 22 फुट गणेश मूर्ति के साथ गणेश उत्सव

Nashik, Maharashtra:नाशिकमध्ये आरके ग्रुप शंभूराजे मित्रमंडळाचा गणेशोत्सवाचा जल्लोष; २२ फूट उंच गणरायाची भव्य प्रतिष्ठापना नाशिक च्या आरके ग्रुप शंभूराजे मित्रमंडळाच्या वतीने गेल्या २० वर्षांपासून रेडक्रॉस परिसरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यंदाही गणेशोत्सवासाठी मंडळाने जय्यत तयारी केली असून, तब्बल २२ फूट उंच श्री गणरायाची भव्य मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी काल सायंकाळी वाजत-गाजत मिरवणुकीने आणण्यात आली. गणरायाच्या आगमनाच्या मिरवणुकीत २२ दशमूर्ती आणि ५० वादकांचे ढोल पथक सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजराने आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहपूर्ण वातावरणात काढण्यात आलेल्या या मिरवणुकीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले..गेल्या दोन दशकांपासून सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसह गणेशोत्सवाची परंपरा जपणाऱ्या मंडळाने यंदाही विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. भव्य मूर्ती, आकर्षक सजावट आणि उत्साहपूर्ण मिरवणुकीमुळे यंदाचा गणेशोत्सव विशेष ठरणार आहे....
0
0
Report

सोलापुर में मातंग समाज का महा-येल्गार मोर्चा: उपवर्गीकरण के लिए तत्काल निर्णय की मांग

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी सोलापुरात आज मातंग समाजाचा महाएल्गार मोर्चा आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी सोलापुरात आज मातंग समाजाचा महाऑेल्गार मोर्चा सकल मातंग समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार महामोर्चा सर्वोच्च न्यायालयाच्या १ ऑगस्ट २०२४ च्या निकालाची महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्याची मागणी आरक्षण उपवर्गीकरणाचा तातडीने निर्णय घेण्याची राज्य सरकारकडे मागणी न्यायमूर्ती अनंत बदर आयोगाचा अहवाल सादर होऊनही कार्यवाही नसल्याने समाजात नाराजी आरक्षणाचा अपेक्षित लाभ न मिळालेल्या ५७ जातींना न्याय देण्याची मागणी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात नवी वेस, महात्मा फुले पुतळा, अण्णाभाऊ साठे चौक, रामलाल चौक मार्गे मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सिद्धेश्वर मंदिर मार्गे जिल्हा परिषद पुनम गेटवर सभेत रूपांतर मातंग समाजातील आमदार, खासदार, माजी मंत्री आणि प्रमुख नेतेमंडळी मोर्चात सहभागी होणार महाराष्ट्रभरातून समाजबांधव सोलापुरात दाखल होण्याची शक्यता मोर्चानंतर शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार
0
0
Report

मालेगांव में 5 दिन के बच्चे की माँ से बिक्री: 6 आरोपी गिरफ्तार

Nashik, Maharashtra:मालेगाव (नाशिक) विशाल मोरे - नाशिकच्या मालेगावात ५ दिवसांच्या मुलाची आईकडून विक्री प्रकरण - पोलिसांनी केली आणखी दोन संशयित महिलांना अटक - ७० हजारात केली मुलाची विक्री पोटच्या ५ दिवसांचा मुलाची ७० हजार रुपयात विक्री करणाऱ्या निर्दयी मातेला आयशानगर पोलिसांनी अटक केली होती. मुंबईपासून तामिळनाडू, मालेगाव असे कनेक्शन निघालेल्या या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली होती. यात एकूण ६ जणांवर गुन्हा दाखल असून आधी आई फर्जना चांद शेख हिला व नंतर यतील मध्यस्ती सूफिया शेख उर्फ मन्ना वय वर्ष ५१, दुसरी नसीम बानो - वय वर्ष ५५ यांना पोलिसांना अटक करण्यात यश आलं. यातील मुख्य आरोपी अण्णा अजून धारावी पोलिसांच्या गुन्ह्यात अटक असून आणखी एक महिलेचा या गुन्ह्यात समावेश आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top