icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

डोंबिवली–ट Tata पॉवर रोड पर चार युवकों का खतरनाक स्टंट, लोग chute रहे

Kalyan, Maharashtra:कल्याण शिळ रोड सूचक नाका ते टाटा पावर दरम्यान तरुणांचा दुचाकीवर जीवघेणा स्टंट एकाच दुचाकीवर चक्क चौबल सीट ,बसता येईना तर खांद्यावर बसून भरधाव प्रवास .. कल्याण पूर्वेतील सूचक नाका ते टाटा पॉवर मार्गे डोंबिवलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका दुचाकीवर चार तरुण प्रवास करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय धक्कादायक म्हणजे हा स्टंट सुरू असताना बाईकवर बसायला जागा नाही म्हणून एक तरुण चक्क दुसऱ्या तरुणाच्या खांद्यावर बसून भरधाव वेगाने चार तरुण दुचाकीवरून प्रवास करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे . अशाप्रकारे जीवघेणा स्टंट करत हे तरुण स्वतःचा जीव जर धोक्यात घालतच आहेत मात्र इतरांचा जीव देखील धोक्यात घालतताना दिसून येत आहेत . अशा टवाळखोर तरुणांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जातेय ..
0
0
Report

पत्नी के मानसिक उत्पीड़न से नाराज़ युवक ने आत्महत्या कर ली; सास-ससुर गिरफ्तार

Nashik, Maharashtra:मालेगाव (नाशिक) विशाल मोरे - पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून पतीची आत्महत्या... नाशिकच्या मालेगाव येथील घटनेने उडाली खळबळ... सासू, सासरे अटक पत्नी मात्र फरार... त्या पत्नीला अटक करा अन्यथा आत्मदहन करू - मयत पतीच्या कुटुंबियांचा इशारा नाशिकच्या मालेगाव येथील कॅम्प भागातील साने गुरुजी नगरात अनिकेत बाळासाहेब जगताप (वय २७) या तरुणाने केलेल्या आत्महत्येप्रकरणी कॅम्प पोलिसांनी तपास करत पत्नीसह सासू-सासरे व मामेसासू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. अनिकेत जगताप याचा वर्षभरापूर्वी पंचशील नगरातील श्रुती जगताप (वय २२) हिच्याशी विवाह झाला होता. मात्र, विवाह झाल्यापासूनच दोघांमध्ये सतत वाद होत होते. श्रुती ही नांदायला येत नव्हती तसेच तिने अनिकेतविरुद्ध पोलिसात तक्रार केल्याने तो गेल्या काही महिन्यांपासून मानसिक तणावाखाली होता. याच त्रासाला कंटाळून अखेर त्याने टोकाचे पाऊल उचलत राहत्या घरात गळफास घेतला. या प्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, अनिकेतचे वडील बाळासाहेब जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कॅम्प पोलिसांनी अनिकेतचा मानसिक छळ केल्याप्रकरणी पत्नी श्रुती जगताप, सासू वंदना सुभाष धिवरे, सासरे सुभाष सुकदेव धिवरे आणि मामेसासू उज्वला सतीश पवार (सर्व रा. पंचशील नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत सासू आणि सासरे यांना पोलिसांनी अटक केली असून पत्नी श्रुती आणि मामसासूला फरार झाले आहे. श्रुतीला आणि मामसासूला तत्काळ अटक करा अन्यथा आत्मदहन करू असा इशारा मयत अनिकेच्या कुटुंबीयांनी दिला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज निकम पुढील तपास करीत आहेत. दरम्यान या प्रकरणात पत्नी श्रुती ही त्याच्या पतीला, निरनिराळ्या केस मध्ये अडकवून तुझे हाल करून टाकू, समाजात बदनामी करून टाकू, तू मरून जा, त्या काही कामाचा नाही, मला तुझ्यासोबत रहायचे नाही... असे बोलून वागून मयत अनिकेतचा त्याच्या पत्नीने छळ केला या छळाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी सांगितले. दरम्यान त्या श्रुतीचा तपास करून तिला तत्काळ अटक करावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे. त्यात श्रुतीने कोर्टात अटक पूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केल्याचे समजते. लोहगडची घटना नुकतीच ताजी असताना आता मालेगावच्या या घटनेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला असून त्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी आता केली जात आहे.... विशाल मोरे झी मिडिया मालेगाव
0
0
Report
Advertisement

शाहू कुस्ती आघाडे की पुनर्निर्माण खबर में नया विवाद: पोलादी गर्डर हटाने से इतिहास पर सवाल

Kolhapur, Maharashtra:राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी उभारलेल्या ऐतिहासिक शाहू कुस्ती आघाडा आणि संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीवरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. पुनर्बांधणीदरम्यान शाहू महाराजांच्या काळातील मूळ पोलादी गर्डर भंगारात टाकल्याचा आरोप होत असून, शाहूद्वेषी, कुस्तीप्रेमी आणि इतिहास अभ्यासकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या ऐतिहासिक वारशाच्या जतनावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. VO1 : कोल्हापूरच्या सांस्कृतिक आणि क्रीडाि इतिहासात दोन वास्तूंना विशेष स्थान आहे… एक म्हणजे संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आणि दुसरी म्हणजे ऐतिहासिक शाहू कुस्ती आघाडा अर्थात खासबाग मैदान. या दोन्ही वास्तूंना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचे प्रतीक मानल्या जातात. सन 1912 मध्ये शाहू महाराजांनी रोममधील आखाड्यांच्या धर्तीवर खासबाग कुस्ती मैदानाची उभारणी केली. त्या काळातील अत्याधुनिक अभियांत्रिकीचा नमुना म्हणून या वास्तूकडे पाहिले जात होते. शाहू महाराजांनी कुस्तीला केवळ राजाश्रयच दिला नाही, तर जागतिक दर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली. विशाल छत उभारण्यासाठी विदेशातून पोलादी गर्डर मागवण्यात आले. या गर्डरच्या साहाय्याने मधोमध एकही खांब नसलेली भव्य रचना उभारण्यात आली. ही रचना त्या काळात अभियांत्रिकी क्षेत्रातील एक अद्भुत प्रयोग मानली जात होती, मात्र 8 ऑगस्ट 2024 रोजी लागलेल्या भीषण आगीत केशवराव भोसले नाट्यगृहासह शाहू कुस्ती आघाड्याच्याही काही भागाचे नुकसान झाले. त्यानंतर मूळ ऐतिहासिक स्वरूप कायम ठेवून पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु आता पुनर्बांधणीदरम्यान मूळ पोलादी गर्डर भंगारात टाकल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हे गर्डर आगीत गंभीररीत्या बाधित झाले नव्हते, असा दावा कुस्तीप्रेमी करत आहेत. त्यामुळे ऐतिहासिक वारसा जपण्याऐवजी तो नष्ट केल्याची भावना व्यक्त करून शाहूप्रेमी आणि कुस्ती प्रेमी संताप व्यक्त करत आहेत. Byte : अशोक पाटील – कुस्तीप्रेमी Byte:- कुस्तीपटू VO 2:- कुस्तीप्रेमींच्या मते, हे गर्डर केवळ लोखनाचे तुकडे नव्हते. ते शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचे, कोल्हापूरच्या वैभवशाली कुस्ती परंपरेचे आणि शंभर वर्षांहून अधिक इतिहासाचे जिवंत साक्षीदार होते. त्यामुळे त्यांचे जतन करणे आवश्यक होते. इतिहास संशोधकांच्याही मते, ऐतिहासिक वास्तूंच्या पुनर्बांधणीत मूळ साहित्य, रचना आणि पुराव्यांचे जतन करणे अत्यंत महत्त्वाचे असते. कारण याच गोष्टी पुढील पिढ्यांसाठी इतिहासाचे दस्तऐवज ठरतात. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे. VO 3:- आजही कोल्हापूरची ओळख देशभरात ‘कुस्तीची पंढरी’ म्हणून आहे. या परंपरेचा मजबूत पाया राजर्षी शाहू महाराजांनी घातला. त्यामुळे शाहू कुस्ती आघाड्यातील प्रत्येक दगड आणि प्रत्येक गर्डर हा इतिहासाचा अविभाज्य भाग मानला जातो. हा वाद केवळ पोलादी गर्डरचा नाही, तर राजर्षी शाहू महाराजांनी उभारलेल्या ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनाचा आहे. पुनर्बांधणीच्या नावाखाली इतिहासाचे मूळ पुरावेच नष्ट होत असतील, तर भविष्यात हा अमूल्य वारसा कोणत्या स्वरूपात पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचणार, हा प्रश्न आता प्रत्येक शाहूप्रेमी, कुस्तीप्रेमी आणि इतिहासप्रेमी विचारत आहे. प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर.
0
0
Report

एक घंटे की बारिश में कल्याण-डोंबिवली के घरों में पानी, पार्षद ने प्रशासन पर निशाना

Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आडीवली, ढोकळी आणि पिसवली परिसरात अवघ्या एक तासाच्या पावसाने अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उभरली. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नगरसेवक कुणाल पाटील यांनी आज झालेल्या महासभेत प्रशासनावर जोरदार टीका केली. नालेसफाईची कामे योग्य प्रकारे झाली नसल्याचा आरोप केला. नियमित व प्रभावी नालेसफाई न झाल्यामुळेच अल्प पावसातही नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसल्याचा दावा त्यांनी केला. महापालिकेने नालेसफाईची कामे पूर्ण झाल्याचे सांगितले असले, तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचे कुणाल पाटील यांनी सभागृहात निदर्शनास आणून दिले. नालेसफाईच्या कामाचा शहर अभियंता अनिता परदेशी यांनी पाहणी केली मात्र आजही परिस्थती तशीच आहे. अवघ्या तासभराच्या पावसात गटारे, नाले तुंबले, नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले. नागरिकांचे हाल झाले. यंदा जर नागरिकांच्या घरात पाणी शिरले तर अधिकारीांना कार्यालयात बसू देणार नाही असा इशारा दिला.
0
0
Report

ओसरगाव टोल नाका कल से शुरू, एक जुलाई से टोल वसूली, 50% छूट

Oras Bk., Maharashtra:मुंबई गोवा महामार्गांवरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथील टोल नाका उद्या पासून सुरु होणार असल्याची शक्यता आहे. मागील अनेक वर्ष शुभारम्भाच्या प्रतीक्षेत असलेल्या ओसरगाव टोल नाका सुरु करण्याच्या हालचालीना वेग आलाय. एक जुलै पासून या टोलवर टोल वसुली सुरु होणार असल्याची चर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्यात रंगलीय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाडयांना टोल माफी मिळावी ही प्रमुख मागणी जिल्हावशीयांची आहे. त्यात पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एम एच 07 गाड्यांना विशेष लेन तर व्यावसायिक गाड्यांना 50 टक्के सवलत जाहीर केलीय. उद्या पासून सुरु होण्याची शक्यता असलेल्या टोल वसुली नंतर स्थानिक काय भूमिका घेतात हे पाहणं उत्सुकतेच असेल. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी
0
0
Report
Advertisement

यवतमाळ के 3324 स्कूलों में नए शैक्षणिक वर्ष की रंगारंग शुरुआत, 34 हजार विद्यार्थी प्रवेश

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये जिल्हापरिषद, नगरपालिका, अनुदानित, विनाअनुदानित, आश्रमशाळा अशा एकूण 3324 शाळांमध्ये आजपासून विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला. शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी विकास वमीना यांनी शासकीय माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित राहून विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्षात 34 हजारांवर विद्यार्थी पहिली प्रवेश घेणार असून या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. अनेक गावांमधून विद्यार्थ्यांच्या निवडणुका काढण्यात आल्या.
0
0
Report

नागपुर में आरक्षण उपवर्गीकरण के विरोध पर बड़ा मोर्चा, मातंग समाज समेत कई समुदाय

Nagpur, Maharashtra:नागपूर में अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात मोर्चा निघाला. नागपूरात उपवर्गीकरणाच्या समर्थनात मोर्चा काढण्यात आला. मातंग समाजासह अनुसूचित जातीतील अनेक लाभवंचित समाजघटकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी करत मोर्चा काढलाय. नागपूरातील यशवंत स्टेडियम चा संविधान चौक पर्यंत हा मोर्चा करण्यात आला. या मोर्चात फलक घेऊन अनेक पदाधिकारी तसेच मातंग समाजाचे मुख्य व्यवसाय असलेला बँड पथकही या मोर्चात सहभागी झाले होते. मातंग समाजासह चर्मकार, खाटीक, वाल्मिकी उपवर्गीकरण समर्थनार्थ समाजांनी सहभाग घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेच आव्हानही मोर्चाच्या माध्यमातून मोर्चेकरांनी केला.
0
0
Report
Advertisement

जालना जिले की 1488 जिला परिषद स्कूलों के छात्रों को मुफ्त दप्तर नहीं मिले

Jalna, Maharashtra:जालना : जिल्ह्यातील 1 हजार 488 जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी मोफत दप्तरापासून वंचित जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 1 हजार 488 शाळा मात्र शाळा सुरू होऊन 15 दिवस उलटले तरीही जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना अजूनही मोफत दप्तर मिळालेले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पालकांकडूनच दप्तर विकत घेऊन शाळेत यावं लागतंय. जालना जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 1 हजार 488 शाळा असून या सर्वच शाळातील विद्यार्थी दप्तरापासून वंचित आहेत. त्यामुळे तातडीने सरकारने दप्तरापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना दप्तर द्यावे अशी मागणी विद्यार्थ्यांसह प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आलीय
0
0
Report

बदलापुर नगरपालिका ने स्टेशन क्षेत्र के अवैध फलों के विक्रेताओं पर कड़ी कार्रवाई की

Ambernath, Maharashtra:अनधिकृत फळ विक्रेत्यांवर बदलावूर नगरपालिकेची धडक कारवाई कारवाईदरम्यान फळ विक्रेत्यांची पालिका अधिकाऱ्यांसोबत अरेरावी महिला फळ विक्रेत्यांकडून कारवाई रोखण्याचा प्रयत्न Anchor - बदलापूर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं स्टेशन परिसरातल्या फळ विक्रेत्यांवर धडक कारवाई केलीय. बदलापूर पूर्वेकडील कात्रप रोडवर काही फळ विक्रेते वर्षानुवर्ष ठाण मांडून बसले होते. मुख्य रस्त्यावरच त्यांनी अवैधरित्या दुकानं थाटल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता. अखेर पालिकेच्या अतिक्रमण विभागानं धडक मोहीम राबवत फळ विक्रेत्यांचं अतिक्रमण हटवलं. या कारवाईदरम्यान काही फळ विक्रेत्यांनी पालिका अधिकाऱ्यांशी अरेरावी करत कारवाई रोखण्याचा प्रयत्नही केला. मात्र अतिक्रमण विभागाच्या पथकानं कारवाई सुरूच ठेवली. बदलापूर पूर्वेकडील या अवैध फळविक्रेत्यांविरोधात पालिकेकडे सातत्याने तक्रारी येत होत्या. याबाबत स्थानिक नगरसेवक संभाजी शिंदे आणि नगरसेविका रती पातकरांनी सर्वसाधारण सभेत  आक्रमक भूमिका घेतली होती. या फेरीवाल्यांना नेमकं कुणाचा अभय आहे असा सवाल उपस्थित करत सर्वच लोकप्रतिनिधींनी कारवाईची मागणी लावून धरली होती. त्यानुसार बदलापूर नगरपालिकाेच्या अतिक्रमण विभागाने पूर्वेकडील कात्रप रस्त्यालगत धडक कारवाई करत फळ विक्रेत्यांची दुकानं हटवली आहेत. आता ही कारवाई यापुढेही अशीच सुरू राहावी अशी अपेक्षा बदलावापुरातल्या नागरिकांनी व्यक्त केलीय।
0
0
Report

प्रशांत बंब ने वाळू स्टॉक्स पर छापेमारी, घरकुल योजना के लाभार्थी परेशान

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:शासनाच्या घरकुल योजनेला बांधकामासाठी शासनाकडून फुकट वाळू देण्याचे बंधन आहे मात्र ही वाळू मिळत नसल्याचं तक्रारी आहेत. भाजपा आमदार प्रशांत बंब यांनी स्वतःच्या मतदारसंघातच वाळूच्या साठ्यांवर धडक मारली. प्रशासन वाळू नसल्याचा दावा करत असताना, या साठे कुणासाठी आणि तिथे असलेले असल्याचे प्रश्न उपस्थित झाले. त्यांनी गंगापूर मतदारसंघात पाच ते सहा ठिकाणी वाळूच्या साठ्यांवर छापेमारी केली आणि प्रशासनाला ही वाळू जप्त करण्यास तसेच घरकुल योजनाच्या लाभार्थ्यांना देण्यास सांगितले. या घटनांचे राजकीय वातावरणात पोलखोल झाले आहे, सरकारची भूमिका काय असेल याबद्दल स्पष्टता घडावी अशी चर्चा सुरू आहे.
0
0
Report
Advertisement

वाशिम में नए शैक्षणिक वर्ष का शुभारम्भ, प्रवेशोत्सव में बच्चों का उत्साह

Washim, Maharashtra:वाशिम : अँकर :विदर्भात यंदा उन्हाळ्याची तीव्रता अधिक असल्यानं शाळा ३० जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्यानुसार आज नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात झालीये.शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्हाभरात प्रवेशोत्सव मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.वाशिम तालुक्यातील सोनखास इथं पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर स्वतः उपस्थित होते.यावेळी पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा फेटे बांधून,लेझीम आणि बँड पथकासह गावात मिरवणूक काढून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं.तसेच शाळा परिसर रंगीबेरंगी फुगे, रांगोळ्या,स्वागत कमानी आणि सेल्फी पॉइंटने सजविण्यात आला होता.
0
0
Report

जिम डंबेल विवाद में दो भाइयों पर हमला, घायल युवक अस्पताल में भर्ती

Kalyan, Maharashtra:कल्याणमध्ये जिममधील डंबेलचा वाद पेटला! कल्याणच्या कोळसेवाडीत 'सोनू भाई' गँगचा लहान भावानंतर मोठ्या भावावरही जीवघेणा हल्ला; .. लहान भावाची मारहाणीचा संपूर्ण थरार CCTV मध्ये कैद.. कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू Kalyaṇ préṇeśa pōlīs toṇyāṭaṭaṭī.कल्याण पूर्वेतील کوळशेवाडी परिसरातील एका जिममधील वादातून एका तरुणावर झालेल्या बेदम मारहाणीची घटना समोर आली आहे. हर्ष राहुल पाठक या तरुणाला काही जणांनी मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत महिनाभरापूर्वी हर्षचा लहान भाऊ आदर्श पाठक हा जिममध्ये व्यायाम करत होता. त्यावेळी त्याने आरोपी राज चव्हाण उर्फ सोनू याच्यासमोर असलेला डंबेज व्यायामासाठी उचलला होता. याचा राग आल्याने राज चव्हाण उर्फ सोनू भाई आणि त्याच्या साथीदारांनी आदर्शला बेदम मारहाण केली. त्या वेळी घडलेली संपूर्ण घटना जिममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला.जखमी अवस्थेत हर्षला तातडीने कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून नेमका वाद कशामुळे झाला, मारहाणीत कोण-कोण सहभागी होते आणि घटनेमागील कारणे काय आहेत याची माहिती घेतली जात आहे. तसेच संबंधितांची तक्रार नोंदवून पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
0
0
Report

रत्नागिरी की चिराणी नदी में जहरीं पानी से मछलियों की मौत, ग्रामीणों में आक्रोश

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिरणी नदीत मृत माशांचा खच,ग्रामस्थ संतप्त.. मुसळधार पावसाची संधी साधत काही लोटे midc तील कंपन्यांनी त्यांचे रसायनयुक्त विषारी पाणी थेट नदीपात्रात सोडल्यामुळे चिरणी येथील नदीत शकडो माशांचा तडफडून मृत्यू झाला असून,नदीकाठावर मृत माशांचा खच पडला आहे.कंपन्यांच्या या मुजोरीमुळे संपूर्ण परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून स्थानिक ग्रामस्थ कमालीचे संतप्त झाले आहेत.प्रदूषण नियंत्रण मंडळ या दोषी कंपन्यांवर तात्काळ कडक कारवाई करणार का,असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top