icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

जिला परिषद शालाओं के लिए नया उपक्रम: अधिकारी हर साल एक स्कूल दत्तक लेंगे

Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण विभागाने नवा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत शिक्षण विभागातील अधिकारी आणि पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांना पुढील एक वर्षासाठी प्रत्येकी एक शाळा दत्तक घ्यावी लागणार आहे.दत्तक घेतलेल्या शाळांना नियमित भेटी देऊन विद्यार्थी गुणवत्ता,भौतिक सुविधा, शैक्षणिक वातावरण आणि पालकांच्या सहभागाचा आढावा घेऊन आवश्यक मार्गदर्शन केले जाणार आहे.या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांवरील पालकांचा विश्वास वाढण्यास मदत होणार असून,शाळांचा शैक्षणिक दर्जाही उंचावण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
0
0
Report

टीईटी पेपर फूटने के खिलाफ प्रदर्शन, शिक्षा मंत्री दादा भुसे से इस्तीफे की मांग

Ahilyanagar, Maharashtra:राज्य परीक्षा परिषद आणि शालेय शिक्षण मंत्रालयाच्या ढिसाळ कारभारामुळे टीईटी परीक्षेचा पेपर फुटला...याची जबाबदारी स्वीकारून राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी सम्मीक विद्यार्थी संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली...हातात निषेधाचे बॅनर घेऊन यावेळी विद्यार्थ्यांना जोरदार घोषणाबाजी केली...टीईटी परीक्षेत मोठा घोटाळा होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला...दरम्यान काही daysांपूर्वी NEET चा देखील पेपर फुटला होता, या विरोधात दिल्लीत मोठी आंदोलने झाली तरी देखील केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही याचा आंदोलकांनी निषेध नोंदवला... दरम्यान यावेळी विद्यार्थ्यांनी बनवलेला बॅनर लक्ष वेधून घेत होते.
0
0
Report
Advertisement

पवार गट के आह्वान पर जिलाधिकारी कार्यालय के सामने टीईटी पेपरफुटी विरोध

Satara, Maharashtra:साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि विविध संघटनांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र व राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. NEET पेपर फुटी नंतर राज्यात अवघ्या १५ दिवसांत झालेल्या टीईटी पेपरफुटीची जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच, बड्या कंत्राटदारांच्या फायद्यासाठी सर्वसामान्यांवर लादलेल्या 'स्मार्ट मीटर' योजनेमागे सरकारचे मोठे आर्थिक षड्यंत्र असल्याचा घणाघाती आरोप केला गेला.
0
0
Report

छत्रपति संभाजी नगर के दो नामी होटेल सील, कुज़ी भाजियाँ और रंगमिश्रण पाए गए

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:राज्यात अन्न व औषध प्रशासनाची धडाकेबाज कारवाई सुरू आहे. छत्रपती संभाजी नगरच्या هॉटेलमध्ये अन्न व औषध प्रशासनाने आज छापा टाकला असून या शहरातील दोन नामांकित हॉटेलचे परवाने रद्द करण्यात आले. हॉलमध्ये कुजलेल्या भाज्या असल्याची माहिती मिळाली आणि आहारात वापरल्या जाणाऱ्या रंगांबाबतही तक्रारी आल्या. त्यामुळे या हॉटेलांवर सील ठोळण्यात आले आणि परवाने निलंबित केले गेले. दुसऱ्या गावात नामी वेज हॉटेलमध्ये कुजलेल्या भाज्या/खाऊसामग्रीत अडचणी आल्याचं निदान झालं; त्यामुळे त्या हॉटेलचाही प्रवेश बीमित करण्यात आला. अशा हॉटेलमध्ये अन्नात वापरला जाणारा रंग आणि इतर विष्क्रिय घटक आढळल्यास तपासणी चालू राहील, आणि ग्राहकांनी तक्रारी केल्यास कारवाई केली जाईल. या मोहिमेचे नेतृत्व विभागांनी स्पष्ट केलं आहे की अन्नात विष टाकणाऱ्या या हॉटेल्सवर कारवाई सुरूच राहील. विभागांनी जनता आणि ग्राहकांना आपले आहार जपण्यासाठी काळजी घेण्याची विनंती केली.
0
0
Report

बीड में पानी के लिए महिलाएं ग्राम पंचायत पर हंडा मोर्चा निकलीं

Beed, Maharashtra:बीड जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असली, तरी अनेक भागांतील पिण्याच्या पाण्याची समस्या अद्यापही कायम आहे. आष्टी तालुक्यातील साबलखेड गावात गेल्या अनेक दिवसांपासून नळाला पाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त महिलांनी थेट ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तात्काळ पाणीपुरवठा सुरू करा, अन्यथा अहिल्यानगर–आष्टी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडू, असा इशाराही आंदोलक महिलांनी दिला आहे. sabलखेड गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत आहे. गावातील नळयोजनेतून अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थ, विशेषतः महिलांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत कोणताही बदल होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर गावातील महिलांनी डोक्यावर हंडे घेऊन ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला.
0
0
Report
Advertisement
Advertisement

भागवत बोले राजनीति का चरित्र: हार मानना नहीं, प्रयास ही सफलता का रास्ता

Nagpur, Maharashtra:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत नागपुर में सिंधु एजुकेशन सोसाइटी के कार्यक्रम में संबोधन करते हुए कहा कि राजनीति का चरित्र ऐसा है कि किसी का अच्छा होता है तो जलने वाले अफराद पैदा होते हैं। उन्होंने कहा: जिनका सब कुछ उजड़ गया, उनके पास कुछ नहीं है, इसलिए रोना नहीं चाहिए; प्रयास करना चाहिए, प्रयास से सब ठीक होता है, प्रतीक्षा करनी पड़ती है; रोने वाला आदमी पहले ही हार जाता है, जो लड़ाई करता है कुछ न कुछ हासिल करता है। भगवान ने गीता में अर्जुन को बताया है: भागने से तुम्हारी प्रस्तुति होगी, लड़ोगे जीतोगे तो वैभव मिलेगा; डटे रहना, अड़े रहना, संघर्ष करना इसमें नुकसान नहीं है। यह जीवन का भाग है—हारना नहीं। एक दरवाजा बंद होता है तो दूसरा दरवाजा खुलता है। संघ प्रमुख मोहन भागवत सिंधु एजुकेशन सोसाइटी के कार्यक्रम में उपस्थित लोगों को संबोधित करते हुए कहा कि लोगों ने सब कुछ छोड़कर यहां आना स्वीकार किया; वे जमीन पर रहना चाहते हैं जो भारत है, जहां धर्म का आचरण निर्भरता से किया जा सके; पीढ़ियों से कमाई, संपत्ति, व्यवसाय, खेती सब छोड़कर लोग यहां आए। वे शरणार्थी नहीं थे, विस्थापित थे; उनके लिए गलत शब्द का उपयोग हुआ उस समय, वे अपने मातृभूमि के प्रेम के कारण संघर्षरत योद्धा थे। एक लड़ाई हार गए थे, हम सब लोग लड़ाई हार गए थे; भारत को एक रखने की कोशिश, लेकिन कैरियर या संपत्ति नहीं चुना गया—देश चुना, धर्म चुना। दशा बदलती है, परिस्थिति बदलती है; पेट भरने वाली शिक्षा आवश्यक है, लेकिन अनिवार्य नहीं है; बिना शिक्षा के भी लोग बड़े होते हैं और शिक्षित लोगों को नौकरी पर रखते हैं। शिक्षा से विवेक प्राप्त होता है। घर से शुरू होती है, पहले टीचर माता हैं। भगवान ने कहा है, मनुष्यों को जीवन देना है, जीवित रहना अपने लिए नहीं बल्कि अपनों के लिए। स्वयं नेकी से जीना है और सबको नेकी से शिक्षानी है, कृर्ति से सीखानी है।
0
0
Report

वाघराल पाडा में जलभराव पर महापालिका पर आरोप, आयुक्त ने किया निरीक्षण

Vasai-Virar, Maharashtra:वसई : वसई पूर्वेकडील वाघराल पाडा येथे पाण्याच्या प्रवाहात वाहने वाहून गेल्याच्या घटनेला महापालिका जबाबदार असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्ष नेता मनोज पाटील यांनी केला असतानाच आज पालिका आयुक्त बी पी यांनी वाघराल पाडा परिसरात पाहणी केली आहे ... वाघराल पाडा परिसरात डोंगर पोखरून अनधिकृत चाळी बनवण्यात आल्या आहेत ... चाळ माफियांनी नैसर्गिक नाले बुझवल्याने रस्त्यांना नदीचा प्रवाह येतो आणि रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेली वाहने वाहून जायचे प्रसंग घडले आहेत ... डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह कसा बदलता येईल यासाठी पालिका प्रयत्न करत असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे... बाईट - बी पी पृथ्वीराज, पालिका आयुक्त.
0
0
Report
Advertisement

मुंबई-गोवा महामार्ग की हालत खराब, नागोठणे पुल अधूरा, सर्विस रोड गड्ढों से भरा

Chendhare, Maharashtra:मुंबई गोवा महामार्गाबाबत दिलेल्या प्रत्येक डेडलाईन हवेत विरली आहे. अजूनही महामार्गाचे काम अपूर्ण असून त्याचा त्रास आणि मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागतो आहे. नागोठणे जवळ को येथील उड्डाण पुलाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे सध्या प्रवाशांना सर्विस रोडवरून प्रवास करावा लागतोय. इथल्या सर्व्हिस रोडची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले असून खडी बाहेर आली आहे. इथून वाहने चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. प्रवासी अक्षरशः वैतागले आहेत. त्यातच पावसाचे पाणी खड्ड्यात साचल्याने अंदाज न आल्याने वाहने आपटण्याचे प्रकार घडून वाहने नादुरुस्त होत आहेत. प्रवाशांना वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागतो आहे.
0
0
Report

पुणे–नाशिक रेल्वे पर अमोल कोल्हे का बयान: शरद पवार के साथ एकजुटता

Nashik, Maharashtra:अमोल कोल्हे - माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला.. पुणे नाशिक रेल्वेच्या प्रश्नावर मी उत्तर दिले होते.. मी शरद पवारांसोबतच कायम राहणार - पुणे -नाशिक रेल्वे होण्यासाठी राजाभाऊ वाजे आणि अमोल कोल्हे भाजप सोबत गेले तर होऊ शकतो त्यावर माझं उत्तर होत. - सुप्रिया सुळे ह्या आमच्या गटनेत्या आहे आमचे सर्व खासदार एकत्र आहे, ह्या चर्चा काय सुरू आहे त्याची मला कल्पना नाही. - संजय राऊत यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्याचे मी आभार मानतो, मी कुठ ही जाणार नाही यावर मी मत व्यक्त केले आहे शरद पवार साहेब सांगतील ते धोरण बांधतील ते तोरण... अमोल कोल्हे यांची पत्रकार परिषद होत असताना दिंडोरीचे शरद पवार खासदार भास्कर भगरे हे देखील आले आहेत आम्ही सर्व आठ खासदार एकसंघ आणि सोबत असल्याचे खासदार कोल्हे यांनी ऑपरेशन तुतारी वर उत्तर दिलं आहे. भास्कर भगरे खासदार दिंडोरी शरद पवार - ऑपरेशन तुतारी अशी कोणतीही माहिती नाही, मला त्याची कल्पना नाही आम्ही सर्व खासदार एकत्र राहून शरद पवार साहेबांनासोबत राहणार हे आमचे एकमत आहे. - निधी मिळत नाही हा विषय आहे पण सरकारकडेच पैसे नाही. अमोल कोल्हे पुन्हा बोले त्याचे पॉईंट - इन्फ्रा मॅन म्हणून देवेंद्र फडणवीस हे ओळखले जातात. १४देशांमध्ये ज्या पद्धतीने हा प्रकल्प सुरू आहे तो आपल्याकडे का होऊ शकत नाही हा माझा सवाल आहे. डबल इंजिन सरकार आहे राज्यात केंद्रात सरकार आहे त्यामुळे हा प्रकल्प व्हायला पाहिजे. नाशिक पुणे प्रकल्पाचा मार्गाने सर्वे झाला आहे त्याच मार्गाने व्हावा ही आमची भूमिका आहे ही आमची मागणी - लोकशाहीमध्ये ज्यांनी आम्हाला ज्या बाजूने कौल दिला आहे त्यांच्यासोबत त्यांच्या मतांचा असा अपमान करणे योग्य नाही त्यामुळे विकास व्हायला पाहिजे लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे यासाठीच मायबाप जनता असते त्यामुळे सरकारची जबाबदारी म्हणून तो निर्णय व्हायला आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत. - सरकारची जबाबदारी आहे आणि त्यात इन्फ्रा मॅन म्हणून देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे त्यासाठी हा निर्णय होईल अशी आमची मनोमन भावना आहे. - अजित दादांचे ते स्वप्न होतं आणि त्या साठी आम्ही देखील कटिबंध आहोत.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top