icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

टँकर वेल्डिंग के दौरान धमाका, एक मजदूर गंभीर रूप से घायल; CCTV में पूरी घटना कैद

Bhor, Maharashtra:ब्रेक टँकर वेल्डिंग करताना स्फोट, एक कामगार गंभीर जखमी. सीसीटीव्ही मध्ये झाला सर्व प्रकार कैद पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या माळी मळा परिसरात आज सकाळी पेट्रोलजन्य टँकरच्या वेल्डिंगचे काम सुरू असतानाही टाकीत असलेल्या गॅसमुळे अचानक झालेल्या स्फोटात भाजल्यामुळे एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळी मळा परिसरातील ‘भारत वेल्डिंग वर्क्स’ या वर्कशॉपमध्ये टँकरच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. काम सुरू असतानाच अचानक मोठा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की वरील पत्र्याचे शेड तुटून पत्रे बाजूला उडून पडले. या घटनेत चांद बाबू हा कामगार गंभीर भाजला. स्फोटानंतर तो शेडखाली अडकला होता. जखमीला बाहेर काढले आणि तातडीने रुग्णवाहिका बोलावून पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. स्फोटात टँकरचे मोठे नुकसान झाले असून काही अंतरावरपर्यंत आवाज ऐकू गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने इतर कोणतीही जीवितहानी झाली नाही. संबंधित टँکرचा वापर पेट्रोल व डिझेल वाहतुकीसाठी केला जात होता. टाकीत उरलेल्या ज्वलनशील वायूंच्या साठ्यामुळे वेल्डिंगदरम्यान ठिणगी पडून स्फोट झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. परंतु यांचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
0
0
Report

सोलापुर में 60 साल की लड़ाई के बाद सरकारी इंजीनियरिंग कॉलेज मंजूर

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात तब्बल 60 वर्षांच्या लढ्यानंतर शासकीय अभियांत्रिकी कॉलेज मंजूर - सोलापुरात तब्बल 60 वर्षांच्या लढ्यानंतर शासकीय अभियांत्रिकी कॉलेज मंजूर - मंगळवारी मंत्रालयातील कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला महत्त्वपूर्ण निर्णय - आ. देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केला होता पाठपुरावा - यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच प्रवेश प्रक्रियेला होणार सुरुवात - पहिल्या बॅचमध्ये तीन शाखात 180 विद्यार्थ्यांचा होणार प्रवेश - गेल्या अनेक वर्षांपासून अभियांत्रिकी कॉलेजची मागणी पूर्ण झाल्याने सोलापुरातील मोठ्या प्रमाणात असणाऱ्या कामगार वर्गांच्या पाल्यांना होणार फायदा
0
0
Report
Advertisement

महात्मा फुले द्विशताब्दी महोत्सव के तहत वाशीम में चित्ररथ का जोरदार स्वागत

Washim, Maharashtra:महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती महोत्सवाच्या निमित्ताने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित निर्माण केलेल्या चित्ररथाचे वाशिम शहरात रात्री जोरदार स्वागत करण्यात आले.महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने हा चित्ररथ महाराष्ट्रभर फिरविण्यात येत असूनया चित्ररथामध्ये महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले यांचे अर्धाकृती पुतळे तसेच महात्मा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा,छत्रपती शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचेही पुतळे साकारण्यात आले आहेत.विशेष म्हणजे महात्मा फुले लिखित पुस्तक व पेन या प्रतीकांची प्रभावी मांडणी करण्यात आली असून भिडेवाड्याची प्रतिकृती देखील साकारण्यात आली आहे.या चित्ररथाचे वाशिम शहरात आगमन होताच नगराध्यक्ष अनिल केंदळे यांच्या सह नगर सेवक आणि विविध पक्ष,सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि विविध जाती धर्मातील नागरिकांनी जोरदार स्वागत केले.हा चित्र रथ वाशिम शहरातील विविध मार्गांनी फिरवण्यात आला.महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त राबविण्यात येणारा हा चित्ररथ उपक्रम सर्व धर्म आणि समाजात समतेची जाणीव दृढ करत नवचैतन्य निर्माण करणारा ठरत आहे.
0
0
Report

कल्याण स्मार्ट सिटी प्रोजेक्ट पांच साल बाद भी अधूरा; यातायात समस्या गहरी

Kalyan, Maharashtra:कल्याणमध्ये स्मार्ट सिटीचं काम पाच वर्षापासून संथ गतीने सुरू सॅटिसच्या अर्धवट कामामुळे कल्याणकरांची सध्या तरी वाहतूक कोंडीतून सुटका नाही गेल्या पाच वर्षांपासून स्टेशन परिसरात कासव गतीने सॅटिस प्रकल्प त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. २०२१ इथे सॅटिसच्या कामाला सुरुवात झाली. मात्र पाच वर्षाचा कालावधी उलटून गेली तरीही सॅटिसचं काम अजून अर्धवट आहे. त्यामुळे स्टेशन परिसरात कल्याणकारांना रोजच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. दरम्यान या सॅटिसचं कामाचा वेग पाहता हे काम पूर्ण होण्यासाठी अजून काही कालावधी जाऊ शकतो.परिणामी यंदाच्या पावसाळ्यात देखील वाहतूक कोंडीतून कल्याणकरांची काही सुटका होईल असं वाटत नाही. याच सॅटिसच्या कामाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अतिष भोईर यांनी.
0
0
Report
Advertisement
Advertisement

नागपुर के चिखली लेआउट में देर रात आग से करोड़ों का नुकसान, कोई जनहानि नहीं

Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपूरच्या कळमना येथील चिखली लेआऊट परिसरात मध्यरात्री टिंबर ट्रेडर्सच्या (सॉ मिल) गोदामाला भीषण आगीत कोट्यावधींची नुकसान. - या घटनेत रामेश्वर टिंबर ट्रेडर्स आणि कमला टिंबर ट्रेडर्सचे मोठे नुकसान.. - या दुर्घटनेत सागवान लाकूड, दोन वूड कटिंग मशीन, टीन शेड, इलेक्ट्रिक वायरिंग आणि एसी पूर्णतः जळून खाक.. - सुमारे 1 कोटी 25 लाख रुपयांची मालमत्ता जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज.. - सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.. - मध्यरात्री लागलेल्या या आगीने पाहता पाहता रौद्र रूप धारण केले.. - घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मात्र आगीचे कारण अद्याप अस्पष्ट..
0
0
Report
Advertisement

नसरापूर में चिमुड़िया के साथ दुष्कर्म के बाद हत्या, ब्राह्मण संगठनों ने कड़ी कार्रवाई की मांग

Yeola, Maharashtra:पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्गुण खून झाला. हा घटनेचा त्रास राज्यभरात उमटत असून नाशिकच्या येवला तालुक्यात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ व परशुराम संघटनेच्या वतीने काळ्याफिती बांधून येवला तहसीलदार आबा महाजन यांना विविध मागण्यांची निवेदन देण्यात आले. शक्ती कायद्याची अंमलबजावणी करावी, आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशा घोषणांनी तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता. याप्रसंगी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ व परशुराम संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
0
Report

रत्नागिरी में गर्मी और उमस से लोग बेहाल, मानसून पूर्व बारिश की उम्मीद बढ़ी

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यात आज तापमान आद्रताही वाढण्याचा इशारा.. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज रत्नागिरी जिल्ह्यातील तापमान आणि आद्रतेतही वाढ होणार असून तापमान 36 अंश सेल्सिअस राहणार आहे तर आद्रता ही 70 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.. सध्या तापमानापेक्षााही आद्रता कमालीची वाढू लागल्याने घामाच्या धारांनी नागरिकांना हैराण केले आहे.. काही दिवसांपूर्वी रत्नागिरीच्या तापमानाची नोंद 37°c झाली होती.. दमटपणा ही वाढला होता त्यामुळे नागरिकांना उन्हाच्या चटक्याबरोबरच घामाच्या धारा असाह्य करत होत्या.. आद्रतेत वाढ कायम राहिल्याने वातावरणातील दमटपणा त्रासदायक होत आहे. त्यामुळे पुन्हा आजचा दिवस अधिक उष्ण आणि दमट दिवस ठरणार आहे.. उकाडा दिवसेंदिवस असह्य होऊ लागल्याने आता मान्सूनपूर्व पावसाची प्रतीक्षा नागरिक करत आहेत..
0
0
Report

वित्तीय संकट में स्थायी समिति ने 15 मिनट में 31 प्रस्ताव मंजूर किए

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर महापालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असताना आणि डोक्यावर कोट्यवधी रुपयांच्या कर्जाचा डोंगर असताना स्थायी समितीच्या बैठकीत मात्र पैशांची खैरात वाटली जात असल्याचे चित्र आहे. मंगळवारी सभापती अनिल मकरिये यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत अवघ्या १५ मिनिटांत तब्बल साडेतीन कोटी रुपयांच्या ३१ प्रस्तावांना झपाट्याने मंजुरी देण्यात आली. एवढ्या अल्पावधीत मोठ्या आर्थिक निर्णयांना विनाचर्चा हिरवा कंदील दाखवल्याने मनपाच्या कारभारातील पारदर्शकतेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मंगळवारी आयोजित या बैठकीत १३ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्ताला मंजुरी देण्यात आली. अनेक नव्या खर्चाच्या प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top