icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

शिर्डी दौरे में राजनाथ सिंह ने रक्षा सामग्री उत्पादन प्रकल्प का उद्घाटन किया

Shirdi, Maharashtra:केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आज शिर्डी दौऱ्यावर.. शिर्डी येथील सावळीविहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उद्योग मंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील राहणार उपस्थित... विद्यार्थी आणि नागरीकांसाठी संरक्षण साहीत्याच्या उत्पादनाचे भव्य प्रदर्शन.. राॅकेट आणि क्षेपणास्त्र विशेष आकर्षण .. निबे गृपच्या संरक्षण उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन होणार... 200 एकर जागेत उभारला गेला प्रकल्प... प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वंदे भारत रेल्वेने शिर्डी कडे रवाना... केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शिर्डी दौऱ्यावर असल्याने बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा दाखल...
0
0
Report

अभय योजना से वाळूज एमआईडीसी में अवैध निर्माण 31 दिसम्बर 2020 तक नियमित

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील नागरिकांसाठी कमी दरात 'बेटरमेंट चार्जेस' भरून गुंठेवारी नियमित करण्याची संधी 'अभय योजने'च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. वाळूज औद्योगिक परिसरातील उद्योजकांनीही या सुविधेचा लाभ घेत आपल्या जमिनी व बांधकामे दिलेल्या मुदतीत नियमित करून घ्यावीत, असे आवाहन महानगर आयुक्त, जी. श्रीकांत यांनी केले आहे. वाळूज एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणावर विनापरवाना व अनधिकृत बांधकामे झाली असून, त्यामुळे पायाभूत सुविधांवर ताण येत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. प्राधिकरणाच्या हद्दीत नियोजनबद्ध विकास साधण्यासाठी नियमबाह्य बांधकामांवर धडक कारवाई केली जाणार आहे. शासन नियमांनुसार केवळ ३१ डिसेंबर २०२० पूर्वीचीच विनापरवाना बांधकामे नियमित केली जातील. त्यानंतरची सर्व बांधकामे अनधिकृत मानून ती हटवण्यात येतील, असा स्पष्ट इशारा आयुक्तांनी दिलाय...
0
0
Report

लातूर MIDC में गैर-औद्योगिक गतिविधियों पर कार्रवाई; क्लासेस, हॉस्टेल, खानावळी बंद

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज एमआयडीसीतील बिगर औद्योगिक व्यवसायांवर प्रशासनाचा दणका... क्लासेस, हॉस्टेल, खानावळी, अभ्यासिका तात्काळ बंद करण्याचे आदेश... क्लासेस, हॉस्टेल, खानावळी, अभ्यासिकांवर कारवाईची टांगती तलवार... नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा... एमआयडीसी परिसरात उद्योगांव्यतिरिक्त सुरू असलेल्या व्यवसायांवर आता कारवाईची टांगती तलवार आली आहे. क्लासेस, हॉस्टेल, खानावळी, अभ्यासिका आणि इतर व्यावसायिक उपक्रम तात्काळ बंद करण्याचे आदेश जिल्हा उद्योग केंद्राने दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. औद्योगिक वसाहतीत बिगर औद्योगिक व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारीनंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला असून आदेशाचे पालन न केल्यास संबंधितांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
0
0
Report
Advertisement

वाशीम जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलच्या साठ्यासाठी गर्दी; प्रशासनाने घेतले कडक पाऊले

Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही काही ठिकाणी नागरिकांकडून पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी होत असल्याने प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, पेट्रोल पंप चालकांनी वाहनधारकांची मूळ कागदपत्रांद्वारे पडताळणी करूनच इंधन विक्री करावी. रुग्णवाहिका व अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना प्राधान्याने इंधन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पेट्रोल पंपांवर इंधन साठा, आवक-विक्री व शिल्लक यांची नोंद अद्ययावत ठेवणे तसेच उपलब्ध साठ्याची माहिती दररोज फलकावर प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नागरिकांनी अफवा पसरवू नयेत, गरजेपेक्षा अधिक इंधन साठवू नये आणि अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पेट्रोलियम नियम 2002, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत कारवाई करण्यात येणार असून हा आदेश लागू करण्यात आला आहे.
0
0
Report

ऑनलाइन प्रवेश सर्वर फेल, छात्रों का नामांकन बाधित; 25 मई तक बढ़ी दाखिले की आखिरी तारीख

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:राज्यभरात अकरावी ऑनलाइन प्रवेशाची शून्य फेरी संपल्यानंतर २१ मे पासून नियमित प्रवेश नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. मात्र, पहिल्या दिवसाप्रमाणेच दुसऱ्या दिवशी, म्हणजेच शुक्रवारीही शिक्षण विभागाचे सर्व्हर पूर्णपणे ठप्प झाले. संकेतस्थळ वारंवार क्रॅश झाल्यामुळे विद्यार्थी, पालक आणि महाविद्यालयांमध्ये मोठा गोंधळ उडाला. छत्रपती संभाजी नगरात दिवसभरात एका कॉलेजमध्ये जेमतेम १५ ते १८ विद्यार्थ्यांचीच नोंदणी होऊ शकली. या तांत्रिक अडचणींमुळे शिक्षण संचालक यांनी नोंदणीची मुदत आता २५ मे पर्यंत वाढवल्याची घोषणा केली आहे. मुदतवाढीमुळे प्रवेशाचे संपूर्ण वेळापत्रक पुन्हा कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदा दहावीचा निकाल लवकर लागल्याने प्रवेश प्रक्रिया महिनाभर आधीच सुरू करण्यात आली होती. त्यातही गोंधळ सुरू असल्याचे हे चित्र म्हणावे लागेल
0
0
Report

नीट पेपरफुटी केस: लातूर में सीबीआई ने तीन डॉक्टरों की पूछताछ तेज की

Latur, Maharashtra:नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयची लातुरात मोठी कारवाई....डॉ. मनोज शिरुरेंनंतर आणखी तीन डॉक्टरांची चौकशी....प्रा. पी. व्ही. कुलकर्णी कनेक्शनचा संशय... सीबीआयकडून तपास वेगवान... आज पुन्हा नव्या डॉक्टरांची सीबीआयकडून चौकशी होण्याची शक्यता .... AC :- नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा तपास वेगवान झाला है. लातूरमध्ये आणखी तीन डॉक्टरांची चौकशी करण्यात आली आहे. डॉ. मनोज शिरुरेंनंतर दोन आयुर्वेदिक आणि एका बालरोगतज्ज्ञाची सीबीआयकडून चौकशी करण्यात आली आहे. अटकेत असलेले प्रा. पी. व्ही. कुलकर्णी आणि या डॉक्टरांचा कनेक्शन असल्याचा संशय CBI ला आहे... त्या दृष्टीने CBI चा तपास सुरू आहे. त्या डॉक्टरांनी मुलांसाठी प्रश्नसंच घेतल्याचा संशय CBI ला आहे....
0
0
Report
Advertisement

छत्रपति संभाजी नगर में नई संपत्तियों पर कर महाभियान शुरू—1 लाख से अधिक शामिल

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या हद्दीत विकसित होत असलेल्या वसाहतींमधील मालमत्ता आता प्रशासनाच्या रडारवर आहेत. मालमत्ता करातून उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने प्रशासनाने नवीन मालमत्तांना कर आकारणी, जुन्या मालमत्तांचे फेरमूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेला गती देण्यासाठी सातारा-देवळाई आणि कांचनवाडी-नक्षत्रवाडी भागात कर विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष पथके तैनात केली आहेत. या भागातील एकही मालमत्ता करातून सुटणार नाही, यासाठी पथके घरोघरी फिरत आहेत. सध्या तीन लाख २० हजार मालमत्तांना कर लागलेला आहे. या मोहिमेतून एक लाखापेक्षा अधिक मालमत्ता वाढण्याची शक्यता आहे. शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या सातारा-देवळाई आणि कांचनवाडी-नक्षत्रवाडी या भागात मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली आहेत. मात्र, अनेक मालमत्ता अद्याप कराच्या कक्षेत नाहीत. विशेष म्हणजे ग्रामपंचायत असताना जुन्या मालमत्तांनाही कर लागला नाही. त्यामुळे या मोहिमेची सुरुवात झोन-८ आणि झोन-१० मधून केली आहे.
0
0
Report

छत्रपति संभाजी नगर में ईंधन संकट तेज, पंपों पर लंबी कतारें

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरात इंधन टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी पंपांवर वाहनांच्या रांगा सातत्याने लागता आहेत. केवळ थोडेसे इंधन मिळवण्यासाठी नागरिकांना उन्हातान्हात तब्बल एक-एक तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. प्रशासनाने ऑइल कंपन्यांचे प्रतिनिधी आणि पंपधारकांची शुक्रवारी बैठक घेऊन चांगलेच फैलावर घेत पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले आहेत. कोणत्या पंपावर किती इंधन येत आहे, कधी येणार याबाबत पंपधारकांना माहिती देण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कंपनीच्या प्रतिनिधींना दिले. तर पंपचालकांनीदेखील नागरिकांना लाइनमध्ये न लावता कधी इंधन येणार आहे, याबाबत अवगत करावे, जेणेकरून पॅनिक बायंग होणार नाही. पेट्रोल-डिझेलचा स्टॉक किती आहे, याबाबतदेखील दर्शनी भागात फलक लावावे, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
0
0
Report
Advertisement

सेवेन हिल्स में खतरनाक होर्डिंग गिरा; सुरक्षा के मद्देनजर महापालिका ने पाडा

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरातील सेव्हन हिल्स परिसरात रस्त्याच्या कडेला असलेले अंदाजे ६० बाय ७० फूट आकाराचे एक मोठे आणि धोकादायक होर्डिंग महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने शुक्रवारी पाडले. या होर्डिंगसाठी संबंधित मालकाने महापालिकेची रीतसर परवानगी घेतली होती, तसेच त्याचे स्ट्रक्चरल ऑडिटही सादर केले होते. मात्र, महापालिकेने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत हे होर्डिंग सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असल्याचे आढळून आले. आगामी पावसाळा आणि वादळी वाऱ्याचा धोका लक्षात घेता, महानगरपालिकेने कोणतीही जोखीम न पत्करता कारवाई केली.
0
0
Report

नाशिक के मालेगांव में दो सरायित बदमाश गिरफ्तार, देशी पिस्टल और कारतूस सहित

Nashik, Maharashtra:नाशिक ( मालेगाव ) विशाल मोरे - नाशिकच्या मालेगावात दोन सराईत गुन्हेगारांना देशी कट्टा, आणि जिवंत काडतूसंसह अटक.. - स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आयशानगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत सापळा रचत दोन संशयीतांना ताब्यात घेतले. १) वसीम शेख इस्माईल, वय २८, रा. पाचपंजतन चौक, हलीमा गार्डनजवळ, मालेगाव २) मुशीर अली नुर अली सैय्यद, वय २९, रा. जाफरनगर, गल्ली नं. २, मालेगाव, जि. नाशिक ताब्यात घेतलेले वरील दोन संशयीतांची अंगझडती घेतली असता त्यांचे कब्जात ०१ देशी बनावटीचे पिस्टल व ०२ जीवंत काडतूसे मिळून आले. सदर इसम हे विनापरवाना बेकादेशीररित्या घातक अग्नीशस्त्र कब्जात बाळगतांना मिळून आला असून त्यांचेविरूध्द आयशानगर पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर यापुर्वी मालेगाव शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरी, प्राणघातक हल्ला, गंभीर दुखापत यासारखे गुन्हे दाखल आहेत.
0
0
Report

वरूड तालुक्यात शेतात उष्माघात से किसान की मौत, इलाके में शोक

Amravati, Maharashtra:अमरावतीच्या वरूड तालुक्यात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू; परिसरात हळहळ, खबरदारी घेण्याचे आवाहन अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील सुरळी गावातून एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शेतामध्ये काम करत असताना शेतकरी प्रल्हाद तुळशीराम ब्राह्मणे यांचा उष्णघातामुळे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रल्हादराव हे नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या शेतात कामासाठी गेले होते. दुपारी घरच्यांनी त्यांना फोन केला मात्र बराच वेळ संपर्क न झाल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. अखेर त्यांनी शेतात धाव घेतली असता प्रल्हादराव मृत अवस्थेत आढळून आले. हा प्रकार पाहून कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घटनेनंतर त्यांना वरूड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले असून आज सकाळी शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. परीक्षित रामपूरे यांनी दिली आहे. प्रल्हादराव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे राहुल आणि अमोल ब्राह्मणे तसेच एक मुलगी असा परिवार आहे.
0
0
Report
Advertisement

उल्हासनगर गोलीबारी मामले में नया मोड़, होटल व्यवसायी दीपक ठाकूर के कार्यालय पर हमला

Ambernath, Maharashtra:उल्हासनगर कैलासनगर गोळीबार प्रकरणाला नवे वळण आल्याची माहिती. गोळीबारानंतर दीपक ठाकूर यांच्या कार्यालयाची तोडफोड झाल्याचा दावा दुसऱ्या CCTV व्हिडिओत दिसला. दीपक ठाकूर यांनी ९ ते १० जणांविरोधात जीवघेणा हल्ला, गोळीबार आणि तोडफोडीचा आरोप केला आहे; त्यांनी उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. दुसऱ्या बाजूला भाजप नगरसेवक प्रधान पाटील यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी CBI चौकशी किंवा नार्को टेस्टची मागणी केली आहे. तपास पोलिस करतात. या आरोपांनंतर भाजप नगरसेवक प्रधान पाटील यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. घटनेच्या वेळी मी कार्यालयात होतो, फायरिंगची माहिती मिळाली; परंतु काय झालं ते माहीत नव्हतं. माझी CBI चौकशी किंवा नार्को टेस्ट करा, दोषी आढळल्यास शिक्षा स्वीकारेल असे त्यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी शेखर बिराजदार, बलवीर बिराजदार, अजय राव, अजीत शेख, अदालत बद्दीन खान इत्यादींचा समावेश असलेल्या तपासात ४-५ अज्ञात साथीदारांविरोधात गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. सागर पाटीलला ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे.
0
0
Report

साखर निर्यात बंदी से बाजार गिरा, राजू शेट्टी ने सरकार पर लगाया आरोप

Barav, Maharashtra:- साखर निर्यात बंदीमुळे बाजार कोसळल्याचा आरोप - सरकारने कोणतीही ठोस गरज नसताना साखर निर्यातीवर अचानक बंदी घातल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. - अवघ्या १५ दिवसांपूर्वीच ५ लाख टन अतिरिक्त निर्यातीचा कोटा मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे अचानक बंदी घालण्यामागचं कारण काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. - आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर स्थिर असताना आणि जुना निर्यात कोटा पूर्ण न झालेला असतानाही घेतलेल्या निर्णयामुळे बाजारात घबराट निर्माण झाली. - या निर्णयानंतर साखरेचे दर झपाट्याने घसरल्याने साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकरी दोघांनाही आर्थिक फटका बसल्याचा त्यांनी म्हटले. - FRP थकबाकी आणि MSP वाढ न झाल्याने शेतकरी अडचणीत - गेल्या चार वर्षांत साखरेची MSP वाढवण्यात आलेली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. - साखर उद्योग आर्थिक संकटात सापडल्याने शेतकऱ्यांची FRP थकबाकी तब्बल ३ हजार कोटी रुपयांवर गेल्याचा दावा त्यांनी केला. - ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून सरकारचे चुकीचे धोरण याला कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला. - डिझेल आणि खत तुटवड्यावर केंद्र सरकारवर टीका - देशातील डिझेल आणि रासायनिक खतांच्या तुटवड्याला केंद्र सरकारचे आंतरराष्ट्रीय धोरण जबाबदार असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. - इराणसारख्या मित्रदेशाला अमेरिकेच्या दबावाखाली दूर केल्याने भारताला स्वस्त क्रूड ऑईलचा पुरवठा कमी झाल्याचा आरोप त्यांनी केला. - आता देशात इंधन टंचाई निर्माण झाली असताना अमेरिका किंवा इतर देश भारताच्या मदतीला आलेले नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. - मान्सून काही दिवसांवर आला असताना शेतकऱ्यांना मशागतीसाठी मोठ्या प्रमाणात डिझेलची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. - सातबारासाठी शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याचा आरोप - डिझेल घेण्यासाठी पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांकडे सातबारा मागितला जात असल्याने ग्रामीण भागात शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याचे त्यांनी म्हटले. - तलाठी जनगणनेच्या कामात व्यस्त असल्याने सातबारा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. - काही ठिकाणी सातबारासाठी पैशांची मागणी होत असल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला. - ‘डिजिटल इंडिया’, ‘ई-पीक पाहणी’ आणि सॅटेलाईट सर्व्हे उपलब्ध असताना शेतकऱ्यांना सातबारासाठी का त्रास दिला जातोय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. - सरकारने तंत्रज्ञानाचा वापर करून थेट पेट्रोल पंपांना माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. - सदाभाऊ खोत यांच्यासोबतच्या भेटीबाबत स्पष्टीकरण - इंदापूर येथे सदाभाऊ खोत यांच्यासोबत झालेल्या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असे स्पष्टीकरण राजू शेट्टी यांनी दिले. - २०१२ मधील ऊस आंदोलन प्रकरणी सुरू असलेल्या न्यायालयीन तारखेनिमित्त सर्वजण एकत्र आल्याचे त्यांनी सांगितले. - कोर्टाचे कामकाज संपल्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव चहा घेताना अनौपचारिक भेट झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. - बाबुराव बोत्रे प्रकरणावरून तीव्र संताप - शिरूर मधील हार्डवेअर व्यापाऱ्याने साखर कारखाने आणि शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये बुडवल्याचा आरोप करत राजू शेट्टी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. - अवघ्या काही वर्षांपूर्वी १७ ते १८ साखर कारखाने ताब्यात घेण्यासाठी कोणाचा राजकीय पाठिंबा होता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. - पारंपरिक कारखानदार आर्थिक अडचणीत असताना एका व्यापाऱ्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात कारखाने कसे ताब्यात घेतले, याची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. - शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
0
0
Report

मानसूनपूर्व भारी बारिश ने कण्हेरी क्षेत्र में लाखों का नुकसान किया

Satara, Maharashtra:सातारा - सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्याच्या पश्चिम भागात मानसूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावत कण्हेरी परिसराला अक्षरशः झोडपून काढलं आहे. वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि ढगफुटी सदृश पावसामुळे ओढे दुथडी भरून वाहू लागले. ओढ्यांना अक्षरशा नदीचे स्वरूप आल्याचे पाहायला मिळाले. कण्हेरी परिसरातील वीटभट्ट्यांवरील कच्च्या विटा भिजल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे...असवली, कण्हेरी, लोहोम, कर्नवडी, घाडगेवाडी, अतिट, कवठे आणि जवळे परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतीचेही नुकसान झाले. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आणि वीटभट्टी चालक अडचणीत आले आहेत
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top