icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

कोकण में तपिश, दमट हवा से लोग परेशान; विदर्भ तक गर्मी की लहर

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकणात दमट हवामान..विदर्भात लाट कायम राज्यात कोकणपट्ट्यात पुढील दोन दिवस उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आलेला आहे.. उष्णतेची लाट कायम असून पुढील तीन दिवस या भागात लाट राहणार आहे.. महाराष्ट्रावर सध्या चक्रवाती वारे तसेच विदर्भातून तामिळनाडूपर्यंत हवेचा दबाव आहे..यामुळे राज्यात ऊन पावसाचा मारा सुरू असून तापमानात चढ-उतार होत आहे.. कोकण पट्ट्यात शुक्रवारी मुंबई,ठाणे,रायगड जिल्ह्यात उष्ण हवामान होते तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती.. सध्या चिपळूण मध्ये 41 डिग्री सेल्सिअस तापमान आहे.. उन्हाच्या झळा नागरिकांना बसत आहेत..
0
0
Report

शिंदे के नजदीकी राहुल गेठे को मूल सेवामें वापस भेजने का प्रस्ताव स्थगित

Navi Mumbai, Maharashtra:Anchor -: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना नवी मुंबई महानगरपालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेले उपायुक्त राहुल गेठे यांचे नगरविकास खात्याने महापालिकेत कायमसमावेशन केले होते. उपायुक्त राहुल गेठे यांची नियुक्ती समाप्त करून त्यांना सेवामुक्त करून मूळ सेवेकडे परत पाठविण्याचा ठराव सत्ताधारी भाजपने आणला होता. मात्र सदर प्रस्तावा वरून भाजपाला बॅकफूट वर जावे लागलेय. सत्ताधारी भाजपने प्रस्ताव मंजूर न करता विधी विभागाकडे सखोल अभ्यासासाठी पाठविण्याचा निर्णय घेतलाय. एकनाथ शिंदे यांच निकटवर्तीय अधिकारी म्हणून ओळख असेलेले राहुल गेठे यांना मूळ सेवेत परत पाठविण्याचा प्रस्ताव तात्पुरता स्थगित झाल्याने यासाठी पडद्यामागे काय हालचाली झाल्यात याचीच चर्चा मनपा वर्तुळात रंगत आहे.
0
0
Report

श शिवाजी केस में संजय गायकवाड पर धमकी का आरोप, महाराष्ट्र में हंगामा

Kolhapur, Maharashtra:Story:- Kop MLA Gayakwad PKG Feed:- Live U Anc:- शिवाजी कोण होता? या कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तकाच्या प्रकाशकाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर सर्व स्तरातून जोरदार टीका होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आमदार संजय गायकवाड यांचे कान टोचले आहेत... दरम्यान कोल्हापूर पोलिसांनी आमदार गायकवाड यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत.. VO 1 :- शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि वाद याचे समीकरण महाराष्ट्रासाठी नवे नाही.. दोनच दिवसापूर्वी कॉम्रेड गोविंदराव पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकावरून प्रकाशक प्रशांत आंबी याला फोन करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर विरोधी पक्ष आणि पुरोगामी संघटननी जोरदार आवाज उठवत आमदार जगताप यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली. राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील राजारामपुरी पोलिसांना धारेवर धरत अदखलपात्र गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. त्यावर पोलिसांनी योग्य ते गुन्हा दाखल केला जाईल असं सांगून वेळ मारून नेली .. पण रोहित पवार निघून जाताच राजारामपुरी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याची तयारी दाखवली, त्यामुळे प्रशांत आंबी यांनी गुन्हा दाखल केला नाही. पण प्रशांत आंबी यांनी दिलेल्या अर्जावरून पोलिसांनी मध्यरात्री आमदार संजय गायकवाड यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्यामुळे पोलिसांचा निषेध करत प्रशांत आंबी आणि पुरोगामी संघटना या पुढच्या काळात रस्त्यावरची लढाई लढणार असल्याची भूमिका जाहीर केली. Byte:- प्रशांत आंबी, प्रकाशक शिवाजी कोण होता पुस्तक. VO 2:- आमदार संजय गायकवाड यांनी यासंदर्भात दिलगिरी व्यक्त केली असली तरी त्यांनी वापरलेली भाषा आक्षेपार्ह आहे. त्यामुळेच आमदार गायकवाड यांच्या विरोधात सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्तेतील अनेक नेत्यांनी आमदार गायकवाड यांचे चांगलेच कान टोचलेत. Byte:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Byte:- सुजय विखे Byte:- नवनाथ बन VO 3:- या पुढच्या काळात विरोधी पक्षातील नेते आणि पुरोगामी संघटना आमदार संजय गायकवाड यांना वेळोवेळी जाब विचारणार आहेत.. पण दुसरीकडे इतक्या वर्षानंतर गोविंदराव पानसरे यांच्या पुस्तकाचा वाद उतरून काढणे चुकीचे असल्याच इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी म्हटले आहे.. इतकच नाही तर शिवाजी हे आदरयुक्त नावच आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा शिवाजी म्हणून उल्लेख केल्याने अपमान होत नाही असं सांगत अनेक उदाहरणं दिली. Byte:- इंद्रजीत सावंत, इतिहास संशोधक VO 4:- छत्रपती शिवरायांची शिवाजी असे संबोधन करत आजवर अनेक पुस्तक प्रकाशित झाले आहेत... अस असताना आता आमदार संजय गायकवाड हे चर्चेत राहण्यासाठी असे मुद्दे उकरून स्वतः प्रसिद्धीच्या झोतात येत असल्याचा आरोप केला जातो.. त्यामुळे किमान यापुढे तरी आमदार संजय गायकवाड यांनी कोणताही विधान करताना ते चुकीचं तरी नाही ना याची शहानिशा करणे आवश्यक आहे.. अन्यथा ते सर्वांच्या टीकेचे धनी होतील हे नक्की. प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर.
0
0
Report
Advertisement

जालना में रायचंद कुरंगळ के दो बैंक घोटाले: 23.33 करोड़ और 8.12 करोड़

Jalna, Maharashtra:जालना : जालना मर्चंट बँकेला 23 कोटी 33 लाखांना गंडा घालणारा मुख्य आरोपी रायचंद कुरंगळचा आणखी एक प्रताप उघडकीस, पुर्णवादी नागरीक सहकारी बँकेलाही घातला शेतमाल गोडाऊनमध्ये तारण नसताना 8 कोटी 12 लाखांना गंडा (पॅकेज) फिडमध्ये मुख्य आरोपी कुरंगळ याचा फोटो जोडलेला आहे. अँकर : जालन्यातील मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट को ऑपरेटिव्ह बँकेला 23 कोटी 33 लाखांचा गंडा घालणारा मुख्य रायचंद कुरंगळ याचा आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे. कुरंगळ याने शेतमाल तारण असल्याचे भासवून शेतमाल तारण ठेवलेला नसताना शेतमाल तारण असल्याच्या बनावट पावत्या देऊन पुर्णवादी नागरीक सहकारी बँकेची देखील फसवणूक केली आहे. या फसवणूकीत त्याने बँकेला 8 कोटी 12 लाखांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात बँकेच्या वरिष्ठांनी गोडाऊनला भेट देऊन पाहणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बँकेच्या मॅनेजरसह रायचंद कुरंगळ याच्यावर कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाईट: सुरेश उनवणे, पोलीस निरीक्षक आर्थिक गु pran घन शाखा, जालना. व्हिओ : २: आधीच जालना मर्चंट को ऑपरेटिव्ह बँकेतील घोटाळ्यात मुख्य आरोपी असलेला रायचंद कुरंगळ याने केलेल्या 23 कोटी 33 लाखांच्या घोटाळ्यामुळे जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्र हादरलंय. त्यात बॅंकेतील गुंतवणूकदार हतबल झालेत. अशातच रायचंद कुरंगळचा पूर्णवादी नागरीक सहकारी बँकेत दुसरा घोटाळा समोर आल्यानं पोलीस अधीक्षकांनी या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवलाय. या घोटाळयाप्रकरणी आता आर्थिक गुन्हे शाखेनं फरार असलेल्या पूर्णवादी नागरीक सहकारी बँकेच्या मॅनेजरचा शोध घ्यायला सुरुवात केलीय. बाईट : मिथून घुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, जालنا (गोरा रंग असलेले) व्हिओ: ०३: पूर्णवादी नागरीक सहकारी बँकेत झालेल्या 8 कोटी 12 लाख रुपयांच्या घोटाळा हा 23 खातेधारकांच्या नावावर कर्ज काढून झालाय. मात्र या घोटाळ्यामध्ये बँकेच्या संचालक मंडळापैकी कुणाचा हात आहे का याचाही आता आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून शोध सुरू झालाय. त्यामुळे या घोटाळ्यातील आरोपी आणखी कोण याचीच चर्चा सध्या जालन्यात सुरू असल्याच पाहायला मिळतय नितेश महाजन,झी-२४ तास,जालना
0
0
Report

कल्याण-डोंबिवली में मराठी स्टिकर मुहिम: रिक्षाचालक मराठी सीखने को राजी

Kalyan, Maharashtra:कल्याण-डोंबिवलीत मनसेकडून रिक्षांवर मराठी स्टिकर मोहीम मराठी भाषा आणि स्थानिक अस्मितेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाल्याचे चित्र कल्याण-डोंबिवलीत दिसत आहे. मी मराठी बोलतो, मला मराठी समजते. माझ्या रिक्षात बसा अशा आशयाचे स्टिकर शहरातील रिक्षांवर लावण्याची मोहीम मनसे पदाधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. चार मे रोजी मराठी सक्तीच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसेने आपल्या शैलीत उत्तर देण्याचा इशारा दिला होता. त्याचाच एक भाग म्हणून ही स्टिकर मोहीम राबवली जात असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शहरातील अनेक रिक्षांवर हे स्टिकर लावण्यात आले असून सर्व रिक्षाचालकांनी स्वेच्छेने हे स्टिकर लावावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.विशेष म्हणजे, या मोहिमेला परप्रांतीय रिक्षाचालकांचाही प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. अनेक चालकांनी मराठी भाषा समजून घेण्याची आणि बोलण्याची तयारी दर्शवत स्टिकर लावले आहेत. यावेळी रिक्षाचालकांना मराठी बोलण्याचे आवाहनही करण्यात आले. मनसे पदाधिकारी योगेश पाटील यांनी यावेळी मराठी भाषेचा सन्मान राखण्याची गरज अधोरेखित केली. तर रिक्षाचालक शफिउल्लाह यांनीही मराठी शिकण्याची आणि ग्राहकांशी मराठीत संवाद साधण्याची तयारी व्यक्त केली. या मोहिमेमुळे कल्याण-डोंबिवलीत मराठी भाषा आणि स्थानिक प्रश्नांवर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
0
0
Report

बर्ली में मोर की निर्घृण हत्या; ग्रामस्थों ने वन विभाग से कठोर कार्रवाई की मांग

Sangli, Maharashtra:स्लग- बुर्लीतील बंच्याप्पा बनात राष्ट्रीय पक्षी मोराची निर्घृण शिकार ! दोषींवर वनविभागाने कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी अँकर - सांगलीच्या पलूस तालुक्यातील बुर्ली येथील बंच्याप्पा बनात राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराची निर्घृण शिकार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बनातील मंदिराजवळ नदीकडच्या बाजूला मोराची पिसे छिन्नविच्छिन्ह अवस्थेत विखुरलेली पाहायला मिळाली, तर मोराच्या शरीराचा भाग गायब असल्याने ही शिकारच असल्याचे राणी मित्रांकडून सांगण्यात येत आहे.या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पक्षीप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.बंच्याप्पा बनात शेकडो मोरांचे वास्तव्य आहे,या घटनेबाबत तातडीने वनविभागाने या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
0
0
Report
Advertisement

गोदा से नर्मदा जलयात्रा का शुभारम्भ चौंडी में Ahilyabai Holkar के जन्मगांव से

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या चौंडी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सभापती राम शिंदे यांच्या हस्ते गोदा ते नर्मदा जलयात्रेचा शुभारंभ झाला. अहिल्यादेवी होळकर यांच जन्मगाव असलेल्या चोंडी येथे जल कलश पूजन, माती कलश पूजन आणि अहिल्यादेवींच दर्शन घेऊन जल यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव आणि जलसंपदा विभागाच्या 'जल व्यवस्थापन कृती पंधरवड्या'च्या निमित्ताने 'गोदा ते नर्मदा' अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आजपासून ते २९ एप्रिल २०२६ दरम्यान ही यात्रेचे आयोजन असून जलसंवर्धन आणि जल व्यवस्थापनाचा संदेश देत चौंडी मध्यप्रदेशातील महेश्वर पर्यंत जाणार आहे.
0
0
Report

मराठी सीखने पर राजनीति गरमाई: हिंदुत्व के नाम पर बहस तेज

Oras Bk., Maharashtra:ऑन मनसे vs सदावर्ते --- प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. आमच्या परिवहन मंत्र्यांनी जी भूमिका घेतलीय त्याच समर्थन मुख्यमंत्र्यांनी केलेय. प्रत्येकजण मराठी शिकेल उगाच कोणीही या मुद्द्यावर वाद करू नये. ज्यांना इथे व्यवसाय करायचा आहे ते मराठी शिकतील, आमचे उत्तर भारतीय भाऊ देखील शिकतील त्या निमित्ताने हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे काम कोणी करू नये. आणि हिंदूंना मारण्याच्या सुक्या धमक्या देऊ नये असा विचार आमचं हिंदुत्ववादी सरकार असताना करू नये. ज्यांना मराठी शिकायचं असेल त्यांना आम्ही sगळं ट्रेनिंग देऊ. पुस्तक देऊ. मारण्याची भाषा कोणी करू नये, एवढीच खाज असेल तर एम आय एम ची नगरसेविका बोलते की मला मराठी येण्याची गरज नाही तेव्हा का गप्प बसता तेव्हा हे कागदी वाघ कुठे जातात. तेव्हा हे बिळात लपलेले वाघ कुठे असतात हिरव्या सापांना ठेचण्याची हिंमत नाही?? जो नियम हिंदू धर्माला लावता तोच नियम इतर धर्माना लावा. मुसलमान समाजाचे किती ड्रायव्हर मराठी बोलतात त्यांना कोणी का विचारत नाही. आमच्या हिंदू समाजात फूट पाडण्याचे काम कोणी करू नये आम्ही राज्यात बसलोय हे लक्षात ठेवा ज्याला मराठी येत नसेल त्यांनी मराठी शिकाव. ऑन शिंदे सेना --- निरुपम यांना शिंदे साहेब समजवतील शिंदे साहेब सक्षम आहेत. ऑन संजय राऊत ( भाजपा निर्लज्ज ) --- निर्लज्जची व्याख्या काय आहे. हे ज्याला चांगल्या पद्धतीने माहित आहे त्याला सगळे निर्लज्ज वाटतात. निर्लज्ज मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर बसलाय. निर्लज्ज काय असतो ते आपल्या मालकाकडे बघून सांगावे ऑन टोल -- मी आमदार होतो तेव्हा जिल्हा वासियांवर टोल लावायला दिला नाही. टोल सुरु झाला तरी mh 07 च्या गाडयांना टोल लागणार नाही. मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे.
0
0
Report
Advertisement

बागेश्वर बाबा के बयान पर महाराष्ट्र में सियासत ताप, मिटकरी ने कड़ा हमला

Akola, Maharashtra:बागेश्वर बाबा यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दל केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या वक्तव्याचा तीव्र शब्दांत समाचार घेतला आहे. मिटकरी यांनी बागेश्वर बाबांसह पंडित प्रदीप मिश्रा आणि आमदार संजय गायकवाड यांच्यावरही निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील जनतेला शिवरायांचा खरा इतिहास माहिती आहे, त्यामुळे बाहेरून येणाऱ्या व्यक्तींनी शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवण्याची गरज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच, काही लोक महाराष्ट्रात येऊन धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मोठी कमाई करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. बागेश्वर महाराजांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करणंच योग्य असल्याचंही मिटकरी यांनी म्हटलं आहे.
0
0
Report

Sujay Vikhe on: Sanjay Raut Trump-like attitude, we won't stop

Ahilyanagar, Maharashtra:चौंडी, अहिल्यानगर सुजय विखे ऑन संजय राऊत संजय राऊत यांना कोणीच घेत नाही त्यामुळे ते एकटे त्यांना संधी मिळाली तर ते येतील पण ते जिथे आहे तिथे सुखी असू द्या ते मुख्यमंत्र्यांपासून तर दहा-पंधरा आमदार पर्यंत आले जोपर्यंत उद्धव ठाकरेंचा एकही सरपंच शिल्लक राहत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही संजय राऊत हे ट्रम्प सारखेच वागत आहे त्यांना पाहूनच संजय राऊत यांनी भूमिका घेतली संजय राऊत यांचा परिणाम ट्रम्पवर झाला का..... शेवटचा सरपंच पडे पर्यंत मी थांबणार नाही ही संकल्पना त्यांनी पुढे चालू ठेवावी सुजय विखे ऑन महापुरुष वाद महापुरुषांबद्दल एका व्यक्तीने बोललं प्रतिमा मधील होत नाही सোशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक जण राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे संजय गायकवाड पहिल्यांदा नाहीतर नेहमीच बोलतात, त्यांनी या आधी एका व्यक्तीला मारल होत छत्रपती शिवाजी महाराजांना बोलल्यावर त्यांची प्रतिमा किंवा भावना कमी होत नाही टीव्हीवर दिसण्यासाठी अनेकांचा खटाटोप सुरू आहे
0
0
Report
Advertisement

बिजली कटने से कालंबनी अस्पताल में पोस्टमार्टम तीन घंटे देरी, प्रशासन पर सवाल उठे

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कळंबनी उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार अंधारात.. जनरेटरअभावी पोस्टमार्टम ३ तास रखडले! कळंबनी उपजिल्हा रुग्णालयाचा धक्कादायक कारभार समोर आला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर रुग्णालयातील दोन्ही जनरेटर बंद असल्याने एका मृतदेहाचे पोस्टमार्टम तब्बल तीन तास रखडले. एक जनरेटर नादुरुस्त तर दुसरा डिझेलअभावी बंद असल्याने हा गंभीर प्रकार घडला. उपजिल्हा रुग्णालयात अत्यावश्यक सुविधेअभावी मृतदेहाची विटंबना होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या निष्काळजीपणाला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
0
0
Report

नेनाडे जिला केंद्रीय बँक बचाने का श्रेय किसे मिला—देशमुख बनाम चव्हाण की बहस

Nanded-Waghala, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_Bank_Pckg Feed on - 2C --------------------------------- Anchor - अवसायानात निघालेल्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सव्वाशे कोटी रुपयांचे कर्ज देऊन तारले होते. पुढे अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी सव्वाशे कोटीचे कर्ज माफ केले. याच जिल्हा बँकेच्या शाखेच्या एका सोहळ्यात बँक बुडन्यापासून कोणी वाचवली यावरून श्रेयवादाची लढाई रंगली. पाहुयात नेमके काय घडले. Vo - शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची परिस्थिती फारशी चांगली नाही. राजकारण्यात ताब्यातील या बँकाची ही परिस्थिती का झाली हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पण बँक बुडन्यापासून कोणी वाचवली यावरून मात्र नांदेडमध्ये श्रेयवादाची लढाई पाहायला मिळाली. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बुडन्यापासून माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी वाचवली की माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी वाचवली यावरून श्रेयवादाची ही लढाई रंगली. कर्जाची परतफेड होत नसल्याने नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक 2007 साली अवसायानात निघाली होती. पण राज्य सरकारच्या सव्वाशे कोटीच्या कर्जामुळे बँक बुडन्यापासून वाचली. याच नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भोकर येथील शाखेचं इमारतीचा लोकार्पण सोहळा काल सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी खासदार भास्करराव पाटील खातागावकर यांनी बँक वाचवण्याचे श्रेय कुणाचे याबद्दल वक्तव्य केले. अवसायानात निघालेल्या या बँकेला माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी सव्वाशे कोटीचे कर्ज दिले त्यामुळे बँक असेपर्यंत त्यांचे उपकार मानले पाहिजेत असे वक्तव्य आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले. तर बँक वाचवण्याचे श्रेय विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण या दोघांनाही जाते असे माजी खासदार भास्करराव पाटील म्हणाले. तर अशोक चव्हाण यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत झालेला किस्सा सांगितला. बँक बंद करण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळात आला होता त्यावेळी मी महसूल मंत्री होतो. सर्व मंत्री एकीकडे होते आणि मी एकीकडे. पण विलासरावानी बँक बंद करण्याचा निर्णय घेतला नाही. मी मुख्यमंत्री झाल्यावर बँकेला दिलेल्या सव्वाशे कोटीच्या कर्जाचे रूपांतर अनुदानात केले असे अशोक चव्हाण म्हणाले. पण अशोक चव्हाण यांनी भाषनात विलासरावांना श्रेय दिले नाही. Sound Byte - आ.प्रताप पाटील चिखलीकर Sound Byte - भास्करराव पाटील - माजी खासदार Sound byte - खा. अशोक चव्हाण Vo - बँक बंद न करण्याचा निर्णय विलासरावानी घेतला त्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करणार की नाही हा प्रश्न झी २४ तासच्या प्रतिनिधिने विचारल्यावर मात्र अशोक चव्हाण हो नक्कीच आभार मानणार असे उत्तर दिले. Boom Byte - खा. अशोक चव्हाण Vo - साखर कारखाण्यांना आणि संस्थांना दिलेले भरमसाठ कर्ज, अवास्तव खरेदी, फुगीर नोकरभरती या आणि इतर कारणामुळे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अवसायानात निघाली होती. सहकार खात्याने केलेल्या चौकशीमध्ये तत्कालीन संचालक मंडळाला दोषी धरण्यात आले होते. मात्र पुढे कोणतीही कारवाई झाली नाही. आज सुदैवाने बँक पुन्हा सुस्थीतीत आणण्यात आताच्या संचालक मंडळाला यश आले आहे. पण ही बँक वाचवण्याचे श्रेय घेण्यावरून वाद रंगला असताना बँक का बुडाली याच आत्मचिंतन करनेही गरजेचे आहे.
0
0
Report

शिंदे के साथ सत्ता की बहुमत चुनौती, ऑपरेशन टाइगर पर राजनीतिक संग्राम

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर *संजय शिरसाट पत्रकार परिषद ऑन आपचे 7 खासदार भाजपाकडे ऑपरेशन टायगर चर्चा - आमचे जे सहा-सात खासदार भाजपात गेले ते राज्यसभेचे, राज्यसभेत बहुमत असायला अजून 18 खासदारांची गरज आहे. - म्हणून आम्ही ऑपरेशन टायगर करतोय असं नाही. आमच्या संपर्कात सगळेजण आहेत हे आम्ही नाकारत नाही ऑपरेशन टायगर सांगून केलं जात नाही. - मात्र योग्य निर्णय कधी घ्यायचा हा अधिकार शिंदे यांच्याकडे आहे. असे सांगून ऑपरेशन होत नाही मात्र योग्य वेळी राजकीय भूकंप पाहायला मिळेल. ऑन विधान परिषदसाठी शिंदे शिवसेनेकडून बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांचे नाव चर्चेत. - विधान परिषदेमध्ये दोन जागा आहेत यासाठी दहा-बारा इच्छुक उमेदवारांची यादी एकनाथ शिंदे साहेबाकडे आहे. - आता त्यात एक नंबर कोण दोन नंबर कोण असे कयास मीडियाच्या माध्यमातून लावले जात आहेत. - अशी आतापर्यंत कोणतीही चर्चा झाली नाही, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने लॉबिंग करत असतो. ऑन मराठी सक्तीला विरोध - निरुपम - महाराष्ट्र मध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला मराठी आली पाहिजे. मात्र निर्णय घेऊन उद्याच मराठी बोल असा आग्रह धरणे योग्य नाही. यावर काय निर्णय घ्यायचा ते प्रताप सरनाईक हे शिंदे साहेबांना बोलून घेईल. ऑन संदीप देशपांडे - संजय निरूपम - भैया मुंबई बंद करू शकत नाही. महाराष्ट्रात राहायचं तर मराठी यायला पाहिजे. मराठी पाट्या सर्व मुंबई मध्ये लावण्यात आला आहे. - काही लोकांना वाटतं आता मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होईल - मुंबईत हिंदी भाषिकांचा कब्जा होईल असे वाटत मात्र तसे होणार नाही. - महानगरपालिकेत हिंदी महापूर होईल असे वाटत होतं पण काही होणार नाही. - मुंबई हे मराठी माणसाचीच आहे त्यासाठी कोणतेही तडजोड आम्ही करणार नाही. ऑन बकासुर सारखी भाजप झाली आहे - संजय राऊत - संजय राऊतला डिप्रेशन आले आहे. कुणाच्या बाजूने बोलावा हा त्याच्यासाठी मोठा विषय झाला आहे. - अजित दादाची राष्ट्रवादी शरद पवार गटातून फुटली बाजूला झाली. शरद पवारांची आजची भूमिका काय आहे हे संजय राऊतला माहित नाही. - उबटामध्ये जे अंतर्गत आता भांडण आहेत त्यामुळे उबाटाची सध्याची स्थिती काय आहे ते त्यांना सांगता येत नाहीत. - तुमच्यामध्ये असलेली फाटा फूट आणि काँग्रेसचे काँग्रेसच आहे ते कधी कुठे जाईल त्याचा काही नियम नाही. - तुमच्यामध्ये असलेली फाटा फूट याचा इतराने जर फायदा घेतला तर त्याला बकासुरमन कितपत योग्य आहे. - आता संजय राऊत ने कितीही बडबड केली तरी हे समीकरण काय ते आता रोखू शकणार नाहीत ऑन संजय राऊत - उद्धव ठाकरे दुखी आहेत - उद्धव ठाकरे का दुःखी आहेत. त्याचा कारण संजय राऊत यांना माहिती आहे. आणि उद्धव ठाकरे दुखी असल्याने संजय राऊत का दुःखी हेही माहिती आहे. यांची काराने वेगळी आणि दाखवता वेगळी.. ऑन बागेश्वर धाम शिवाजी महाराजांच्या बद्दल वक्तव्य - या महाराजांनी महाराज गिरी सोडून राजकारणात करावं, प्रत्येक जण उठतो राजकारणात धडे देत आहे शिवाजी महाराज थकले होते तुम्हाला माहित आहे का शिवाजी महाराज थकले होते? - काही कथोगल्पित कहाण्या करणं या महाराजांनी थांबवल्या पाहिजे. ऑन सुनेत्रा पवार यांचे मुख्यमंत्री म्हणून बॅनर.... - सुनेत्रा पवार यांचे बोर्ड लावले हे कार्यकर्त्यांचे भावना असते. प्रत्येकाला वाटत आपला नेता मोठा व्हावा. - आम्हालाही एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून पहायचे देवेंद्र फडणवीस साहेबांचे बॅनर लागले नव्हते का? एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना. ऑन बागेश्वर धाम वक्तव्य चार मुले जन्माला घाला एक आरएसएसला द्या - चार मूल पैदा करावे की सहा आता ही यांनी ठरवावे का ? - अशा प्रकारचे वक्तव्य करून समाधानी काय दिशा द्यायची हे त्यांनी ठरवलं पाहिजे. ऑन संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा - संजय गायकवाड यांनी त्यासंदर्भात कायद्याचे स्पष्टीकरण दिल आहे. परंतु नियमानुसार जी काय असेल ती कारवाई पोलीस करत आहेत. ऑन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर चाकू हल्ला - शहरामध्ये गुन्हेगاريةचे प्रमाण वाढतय, कुणाचं प्रमाण वाढते मी पोलीस आयुक्तां सुद्धा सांगितल आहे की शहरामध्ये गुंडगिरी ड्रगचे प्रमाण खुनाचे प्रमाण वाढतात. - पोलिसांचा धाक या शहरांमध्ये राहिला नाही की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑन उद्धव ठाकरे विधान परिषद उमेदवारी. - उद्धव ठाकरे यांना पुन्हा विधान परिषद मध्ये जायचं आहे त्यांची ती मानसिकता आहे. - काँग्रेसवाले म्हणतात उद्धव ठाकरे असतील तर आम्ही विचार करू राष्ट्रवादीवाले म्हणतात आम्ही पाठिंबा देऊ ह्या सगळ्या बातम्या फक्त चाललेल्या आहेत. - अखेर उद्धव ठाकरे हेच विधान परिषद चे उमेदवार असणार आहेत ते स्वतः इच्छुक आहेत. - किती काही झालं तरी ही निवडणूक उद्धव ठाकरे लढवणार आहेत. ऑन भाजप आय एम ए निवडणूक - पक्ष वाढविण्यासाठी सर्वच मदत करत आहे. ही सर्व पुढील निवडणुकriची तयारी आहे. हे भाजपने केले त्यात काही गैर नाही. ऑन मनसे पदाधिकारी गुन्हे दाखल - मनसेने आंदोलन केलं म्हणून संजय निरूपण यांनी यांनी विरोध केला की काय म्हणून संजय निरुपम च्या विरोधात आंदोलन. - हा आता राजकीय डावपेच त्या ठिकाणी चालला आहे. - महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मराठी आलं पाहिजे हा आमचा सुद्धा आग्रह आहे. ऑन सोलापूरच्या मनोहर बाबाला अटक नेत्यांचे सोबत फोटो - बाबा असतील भविष्यकाळातील प्रत्येक माणूस राजकीय नेत्याशी संबंधित असतो. - त्यांचा असलेला एखादा कार्यक्रम असेल त्यांची असलेली एखादी भेट असेल हे स्वाभाविक आहे. - जसं खराब प्रकरण झालं आहे त्याच्यामध्ये त्यांनी केलेले दुष्कृत्य यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता आढळला तर त्यावर कारवाई झाली पाहिजे असे आमचे स्पष्ट मत आहे. - युपी बिहारचे बाबा इकडे फिरत असतात आणि ते फोटो काढतात आणि त्या फोटोच्या आधारे मग ते इतरांना ब्लॅकमेल करतात असं झालं आहे. - आता राजकीय पुढारी सुद्धा बाबा सोबत फोटो काडताना घाबरतील आणि फोटो देणार नाहीत.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top