icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

कल्याण के मोहने पाटील नगर में गोलीबारी: अभिषेक पवार ने साजिश रचने का दावा

Kalyan, Maharashtra:कल्याण जवळील मोहने पाटील नगर परिसरात काल रात्री घडलेल्या गोळीबाराच्या घटनेचा खडकपाडा पोलिसांनी अवघ्या काही तासांत उलगडा केला. पोलीस तपासानुसार या प्रकरणात धक्कादायक सत्य समोर आले आहे. सुरुवातीला स्वतःवर हल्ला झाल्याचा बनाव रचणाऱ्या अभिषेक उर्फ अभि पवारनेच संपूर्ण कट आखल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. व्हाट्सअॅप वर विरोधकाचा स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून काही दिवसांपूर्वी अभिषेक पवार आणि मोनू फुलोरे यांच्यात वाद झाला होता. या वादाचे पर्यवसान मारहाणीपर्यंत झाले होते. काल अभिषेक पवार आणि त्याचे दहा ते बारा साथीदार एका HALDI कार्यक्रमातून रात्रीच्या सुमारास मोहने पाटील नगर येथे मोनू यांच्या भावासोबत उभा होता. मोनू ला पाहताच रात्री मोहने पाटील नगर येथील मैदानात उभ्या असलेल्या मोनू फुलोरे यांच्या दिशेने गोळीबार केला. परंतु, प्रसंगावधान राखत मोनू फुलोरे यांनी घटनास्थळावरून पळ काढल्याने त्यांचा जीव थोडक्यात बचावला. गोळीबाराचा आरोप मोनू पर यावर यावा, यासाठी अभिषेकने स्वतःच्या हातावर गोळी झाडून घेतल्याचा धक्कादायक खुलासा तपासात झाला आहे. खडकपाडा पोलिसांनी तांत्रिक आणि प्रत्यक्ष पुराव्यांच्या आधारे या प्रकरणाचा वेगाने छडा लावत अभिषेक उर्फ अभि पवार आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून अभिषेक पवार हा सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे.या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून खडकपाडा पोलीस पुढील तपास करत आहेत.
0
0
Report

शिंदे गट की शिवसेना चाळीसगाव में ताकत बढ़ाने की कवायद

Jalgaon, Maharashtra:जळगाव, चाळीसगाव श्रीकांत शिंदे बाईट पॉइंटर्स श्रीकांत शिंदे ऑन शिवसंवाद दौरा शिव संवाद दौऱ्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधून प्रत्येक तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेतला जातोय. ऑन चाळीसगावात पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक घरापर्यंत शिवसेना गेली पाहिजे. प्रत्येक तालुक्यात येणाऱ्या काळात शिवसेनेची ताकद कशाप्रकारे वाढेल यासाठी सर्वांनी काम केले पाहिजे. उन्मेष पाटील यांच्या रूपाने चाळीसगाव तालुक्यामध्ये शिवसेनेची ताकद वाढली आहे. येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक ताकदीने लढून कशा जिंकता येतील यासाठी पक्ष काम करेल. ऑन शिवसेना शिंदे गटात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्याचा प्रवेश एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्रभरातून लोक मोठ्या संख्येने शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. ऑन शिवसेना बंडखोर रेश्मा काळे ! प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की आपण निवडणूक लढली पाहिजे. परंतु अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी आणि शिंदे साहेब लवकरात लवकर निर्णय घेतील. ऑन बंडखोर रेशमा काळे यांच्यासोबत संवाद साधणार्का ? शिवसेनेचा कार्यकर्ता आदेशाचे पालन करत असतो. प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते विधान परिषद, विधानसभा, जिल्हा परिषदचा उमेदवारी मिळावी अशी इच्छा असते. नाशिकमध्ये देखील भाजपाचे कार्यकर्त्यांनी देखील फॉर्म कायम ठेवलेली आहेत. त्यामुळे मला वाटते वरिष्ठ लोक एकमेकांशी बोलतील आणि जळगाव नाशिकच्या बाबतीत लवकरच तोडगा काढतील. ऑन गिरीश महाजन दिल्ली रवाना नाशिक आणि मुंबई जागेचा तिढा सोडविण्याबाबत मला माहित नाही म्हणत श्रीकांत शिंदे यांनी गिरीश महाजन यांच्या प्रश्नावर बोलण्यात टाळले. ऑन विजय वडेट्टीवार नगरसेवक पाच पाच लाख रुपये देऊन फोडले जात आहेत ! त्यांचे नगरसेवक आहेत. त्यांच्या नगरसेवकांच्या बाबतीत मला विचारून काय उपयोग? ऑन कॉकरोच जनता पार्टी आंदोलन जंतर मंतर प्रत्येकाला आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेला आहे. जंतर मंतरवर आंदोलन करण्यासाठी पोलिसांनी सर्व परवानगी दिली आहे. कुठेही आंदोलन चिरडण्याचे काम सुरू नाही. ऑन रेश्मा काळे नाशिकचा तिढा सुटत नाही त्यामुळे जळगावचाही तिढा कायम वक्तव्य ते काय बोलतात मला माहित नाही. मला माहिती नाही. पक्ष आणि वरिष्ठ नेते जो निर्णय ठरवतील, त्या गोष्टी या ठिकाणी होतील. ऑन चाळीसगावातील दादागिरी शिवसेनेची ताकद सगळीकडे वाढली पाहिजे. त्या अनुषंगाने आम्ही काम करत आहोत. ऑन आमदार किशोर पाटील वक्तव्य चाळीसगावातील बोगस मतदार एसआयआर जे होत आहे ते बोगस मतदार शोधण्यासाठी होत आहे. बोगस मतदार मतदारा जून कसे कट होतील यासाठी आम्ही विशेष लक्ष देणार.
0
0
Report

दापोली में घायल ऑलिव रिडले कासव इलाज के बाद समुद्र में छोड़ दिया गया

Ratnagiri, Maharashtra:दापोलीतील पाळंदे समुद्राकिनाऱ्यावर जखमी अवस्थेत आढळलेल्या एका 'ऑलिव्ह रिडले' प्रजातीच्या दुर्मिळ कासवाला वन विभाग आणि स्थानिक रक्षकांच्या मदतीने यशस्वीरित्या जीवदान देण्यात आले आहे.. दापोलीच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने या कासवावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले.. हर्णे येथील 'वाईल्ड ॲनिमल रेस्क्युअर'चे सदस्य फहाद जमादार यांच्या वॉटर टँकमध्ये या कासवावर खाऱ्या पाण्यात उपचार करण्यात आले.. ​हे कासव आता पूर्णपणे बरे झाले असून,त्याला बोटीच्या साहाय्याने समुद्रात,त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले आहे.
0
0
Report
Advertisement

ठाणे-पालघर विधानपरिषद चुनाव में रविंद्र फाटक की बिनविरोध जीत, हितेंद्र ठाकूर ने बधाई दी

Vasai-Virar, Maharashtra:ANC : ठाणे-पालघर विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड निश्चित झाल्यानंतर त्यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी रवींद्र फाटक यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विधान परिषद निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने दिलेल्या पाठिंब्याबद्दल रवींद्र फाटक यांनी ठाकूर यांचे आभार मानले. दरम्यान, बहुजन विकास आघाडी पक्ष शिवसेनेमध्ये विनिलीकरणाचा कोणताही विषयच नाही, त्यांचा पक्ष त्यांनी वाढववा, आमचा पक्ष मी वाढवेन अशी स्पष्ट भूमिका हितेंद्र ठाकूर यांनी मंडली. तर, सर्वप्रथम आपली बिनविरोध निवड झाल्यानंतर प्रथम आप्पांनी आशीर्वाद दिला होता म्हणून त्यांचे आभार माणण्यासाठी आलो असल्याचे आणि महानगरपालिकेचे, नागरिकांचे जे काही प्रश्न असतील त्यांचे ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे रवींद्र फाटक यांनी म्हटले आहे.
0
0
Report

रत्नागिरी में शीळ डैम के पानी का संकट: सिर्फ 15–20 दिन बचे

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी शहराची तहान भागवणाऱ्या शीळ धरणातील पाणीसाठा आता कमालीचा खालावला असून शहरावर पाणीटंचाईचे भीषण संकट ओढवले आहे.. धरणात सध्या अवघा ०.५८ दशलक्ष घनमीटर म्हणजेच केवळ १५ ते २० दिवस पुरेल इतकाच जिवंत साठा शिल्लक राहिला आहे.. ​वाढते तापमान आणि लांबलेल्या मान्सूनमुळे परिस्थिती बिकट बनली आहे.. प्रशासनाने सध्यातरी आठवड्यातून एक दिवस पाणीकपात लागू केली आहे; मात्र येत्या काही दिवसांत पाऊस न झाल्यास शहरात 'एक दिवस आड' पाणीपुरवठા करण्याची नामुष्की ओढवू शकते.. प्रशासनाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले असून,आता संपूर्ण रत्नागिरीकरांच्या नजरा वरुणराजाच्या आगमनाकडे लागल्या आहेत..
0
0
Report

गोकुळ दूध संघ चुनाव को लेकर कोल्हापुर में नया राजनीतिक घमासान शुरू

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच राजकीय समीकरणांच्या चर्चांना उधाण आले आहे. भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील यांनी गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे त्यावर सतेज पाटील यांनीही प्रतिक्रिया देत पुढील दोन महिन्यांत काय घडते ते पाहूया, असे म्हणत राजकीय गुगली टाकली आहे... कोल्हापूर जिल्ह्याच्या आर्थिक सत्ता केंद्र असणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक जवळ येत असताना कोल्हापुरच्या राजकारणात विविध समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे. जिल्ह्यातील सहकार आणि राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या गोकुळच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील यांनी सतेज पाटील हे थोडेच माझे राजकीय विरोधक आहेत, गोकुळमध्ये राजकारण बाजूला ठेवून काम करावे लागेल, अशा आशयाचे वक्तव्य चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी केल्याने गोकुळच्या निवडणुकीत पारंपरिक राजकीय विरोध बाजूला ठेवून काही नवे समीकरण आकाराला येणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. Shivaji Patil, Bhajap Samarthak Aamdar दरम्यान, आमदार शिवाजी पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना गोकुळचे नेते सतेज पाटील यांनीही सावध भूमिका घेतली. शिवाजी पाटील हे सातत्याने मी महायुतीचा असल्याचे सांगत आहेत. पण ते व्यक्त करत असलेली खदखद देखील योग्य आहे. त्यामुळे निवडणुकीला अजून दोन महिने बाकी आहेत. पुढच्या काळात काय घडते ते बघूया, असे म्हणत गुगली टाकली आहे. आमदार सतेज पाटील, नेते गोकुळ गोकुळच्या निवडणुकीत एकीकडे महायुती मध्ये नेत्याची मोठी फळी उभी आहे. पण त्यामध्ये आमदार शिवाजी पाटील यांना एकाकी पाडत बाजुला ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शिवाजी पाटील यांनी सतेज पाटील यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे गोकुळच्या राजकारणात नवीन काही घडत का? हे पहावे लागणार आहे. आमदार शिवाजी पाटील आणि गोकुळचे नेते सतेज पाटील यांनी व्यक्त केलेल्या वक्तव्यांमागे नेमका काय राजकीय संदेश दडलेला आहे, हे मात्र सद्या समोर आलेलं नाही, त्यामुळे गोकुळच्या राजकारणात नेमके काय घडत याची उत्सुकता कोल्हापूर जिल्ह्यात लागून राहिले आहे. प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर.
0
0
Report
Advertisement
Advertisement

रिसोड़ में घरफोड़: 2 लाख रुपये नकद और सोना चोरी, पुलिस जांच जारी

Washim, Maharashtra:रिसोड शहरातील अनंत कॉलनी परिसरात चोरट्यांनी घरफोडी करून १०तोळे सोन्यासह २लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. अमोल खडसे यांच्या घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी ही चोरी केली. आज सकाळी खडसे घरी परतल्यानंतर घरफोडीची घटना निदर्शनास आली. चोरीच्या माहिती मिळताच रिसोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. तसेच श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले असून चोरट्यांचा शोध सुरू आहे. शहरात वाढत्या चोरीच्या घटनारोखण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढीवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
0
0
Report

शिर्डी में भक्तों की भारी भीड़, सुरक्षा के बीच दर्शन व्यवस्था बेहतर

Shirdi, Maharashtra:Anc - उन्हाळी सुट्ट्यांचा शेवटचा टप्पा आणि त्यातच विकेंडचा योग जुळून आल्याने साईनगरी शिर्डीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याच पाहायला मिळतय..देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातून मोठ्या संख्येने भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल होत आहेत. साई मंदिर परिसर, दर्शन रांगा आणि प्रमुख रस्ते भाविकांच्या गर्दीने अक्षरशः फुलून गेलेले पाहायला मिळतायत... V/O - दरम्यान, वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर भाविकांना सुलभ आणि सुरक्षित दर्शन मिळावे यासाठी साईबाबा संस्थान प्रशासनाने विशेष नियोजन केलय.दर्शन रांगांचे सुयोग्य व्यवस्थापन, अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, वैद्यकीय सुविधा तसेच सावलीसाठी तात्पुरत्या शेड्स उभारण्यात आल्या आहेत.तसेच, भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी स्वयंसेवक आणि कर्मचारी सतत कार्यरत असून ऑनलाईन दर्शन पास आणि टाइम स्लॉट व्यवस्थेमुळे दर्शन प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न केला जातोय... बाईट - गोरक्ष गाडीलकर , CEO
0
0
Report

शिरूर के किसानों की केळी फसल तूफानी बारिश से भारी नुकसान, राहत की मांग तेज

Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील गायकवाड मळा परिसरात काल संध्याकाळी झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे. येथील शेतकरी प्रभाकर राऊत यांचं तब्बल अडीच एकर क्षेत्रातील केळीचं पीक वादळी वाऱ्यामुळे पूर्णपणे कोसळून जमीनदोस्त झालंय. या पिकासाठी शेतकऱ्याने ४ ते ५ लाख रुपयांचा खर्च केला होता. मात्र, ऐन काढणीच्या वेळी संपूर्ण पीक हातचं गेल्यामुळे आता मुलांच्या शिक्षणाचा आणि घरखर्चाचा मोठा प्रश्न या शेतकरी कुटुंबासमोर निर्माण झाला आहे. विशेष आणि संतापजनक बाब म्हणजे, एवढं मोठं नुकसान होऊनही अद्याप कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने किंवा प्रशासनाने पंचनामा करण्यासाठी या भागाला भेट दिलेली नाही. हताश झालेले शेतकरी जेव्हा कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत, तेव्हा त्यांचा फोन 'नॉट रिचेबल' लागत असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी आता परिसरातून केली जातेय.
0
0
Report
Advertisement

ताडोबा-अंधारी बफर में कृत्रिम पानी स्रोत, वन्यजीवों की भारी भीड़

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूरच्या ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर भागात पाणीाचे स्त्रोत आटल्यानंतर वनविभागाने विविध ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. ताडोबा बफर भागातील मोहर्ली वनपरीक्षेत्रात वढोली बीटात तयार झालेले अशाच कृत्रिम पाणवट्यावर मोठ्या संख्येत वन्यजीवांची गर्दी बघायला मिळत आहे. प्रकल्पात मुबलक पाणी उपलब्ध असले तरी ते वन्यजीवांपर्यंत पोहोचवण्यासाठी वनविभागाची धडपड आहे. पावसाळा लांबल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना पाणवट्यापर्यंत कॅनद्वारे पानीपुरवठा करावा लागत आहे. मात्र या सर्व वन्यजीवांना सहजपणे उपलब्ध होणारे पाणी त्यांच्यासाठी जीवन ठरले आहे.
0
0
Report

चंद्रपूर: सुधीर मुनगंटीवार के बयानों पर बहस, आचार संहिता के सवाल उठे

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची विविध विषयांवर प्रतिक्रिया ऑन वडेट्टीवार पाच-पाच लाख वाटप आरोप # आज 6 जून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आहे, त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवली होती. त्यांनी पैसे घेतले असेल तर तुम्ही त्यांना निष्ठा शिकवा ना, अशे विकाऊ कार्यकर्ते घेऊन पक्ष चालवला जात असेल तर त्याला कोण जबाबदार आहे? मला अभिमान आहे की आमच्या कार्यकर्त्यांना कोणी मोहात पाडू शकत नाही, आम्हाला दुसरा पक्ष काय करतो याच्याशी काही लेणं देणं नाही. 1952, 1975 मध्ये जे आरोप झाले तेच 2026 मध्ये होत आहेत, त्यामुळे लोकांची मानसिकता कशी बदलवता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. सर्वच पक्षांना त्यांचे कार्यकर्ते अशा गोष्टींपासून दूर राहावे म्हणून राष्ट्रभक्तीचं व्हॅक्सिन दिलं पाहिजे ऑन विधान परिषद आचारसंहिता 2:27 # विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे सामान्य लोकांच्या प्रश्नांवर बैठका घेता येत नसल्यामुळे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा आज संताप दिसून आला, आचार संहिता म्हणजे शोले चा नवीन गब्बर सिंग आहे का असं म्हणत या गब्बरसिंग ची भीती दाखवत सामान्य लोकांचे प्रश्न देखील सोडवता येत नाही. या निवडणुकीत नगरसेवक हे मतदार आहेत पण ते सामान्य लोकांचे प्रश्न सोडवले म्हणून प्रभावित होतात का? नगरसेवक हे त्या त्या पक्षाचे बांधील आहेत मग मी तर म्हणेल की मग निवडणुकाच का घेता? जसा आपण एखाद्या गटाची शक्ती किती त्या आधारावर को-ऑप देतो, त्याप्रमाणे एक सिस्टीम तयार करा म्हणजे घोडेबाजार पण होणार नाही आणि विधान परिषदेवर सदस्य पण निवडून जातील. तुमच्या मनातल्या इच्छाही पूर्ण होतील आणि कारण नसताना आचारसंहितेचा गब्बरसिंग सामान्य लोकांना त्रास देणार नाही, आचारसंहितेचा गब्बर सिंग त्रास द्यायला लागला तर जनतेतून कधीतरी जय-विरू तयार होणारच आहे ऑन कॉकरोच जनता पार्टी आंदोलन # सुप्रीम कोर्ट च्या माननीय न्यायमूर्तींना असं वाटलं की ते जे बोलताय ती छोटी गोष्ट आहे मात्र ती छोटी गोष्ट नव्हती, तुम्ही जेव्हा देशातील तरुणांना अशी उपमा देता, तेव्हा तरुणांच्या मनात असा भाव हा जन्माला येतो, आणि अशा भावातून तरुणांनी अशा प्रकारचा प्रयोग केला आहे, पण अशा प्रकारच्या प्रयोगाला एक योग्य दिशा आणि व्यवस्था लागते आणि अशा प्रकारची दिशा आणि व्यवस्था नसेल तर असा प्रयोग पर्याय ठरत नाही, भाजपने त्याग, तपस्या आणि बलिदानातून ही व्यवस्था तयार केली आहे, त्यामुळे सी जे पी काही पर्याय ठरू शकत नाही, मात्र हे खर आहे की सीजेपीच्या या प्रयोगातून प्रत्येकाने काहीतरी शिकलं पाहिजे की सामान्य माणसाचं मन दुखेल अशा शब्दांचा प्रयोग करायला नको, सुप्रीम कोर्टात बोलताना तुम्ही भान ठेवलं नाही त्यातून हा प्रयोग जन्माला आला, त्यामुळे असे प्रयोग कोणाला जन्माला येऊ नये याची सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top