icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

चंद्रपूर के सरकारी मेडिकल कॉलेज में विश्व तंबाकू विरोधी दिन पर लत छोड़ने की जागरूकता

Chandrapur, Maharashtra:टायटल: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे जागतिक तंबाखू विरोधी दिन कार्यक्रम अँकर: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर आणि राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या अनुषंगाने उद्घाटन व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या दिनाच्या औचित्याने डॉ. संदीप पिपरे यांनी यावर्षीची थीम "Unmasking the Appeal : Countering Nicotine & Tobacco Addiction" ची माहिती दिली व तंबाखूमुळे शारीरिक, मानसिक, सामाजिक व आर्थिक दुष्परिणामांची सखोल माहिती सांगून मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितीना भविष्यात त्यांच्या सहवासात येणाऱ्या व्यसनाधीन 10 लोकांना तंबाखू मुळे होणारे दुष्परिणामबाबत जनजागृती करण्याचे आणि तंबाखू व्यसनाधीन लोकांना तंबाखू सोडण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले. याबाबतचे मार्गदर्शन केले गेले. बाईट १) डॉ. शरद कुच्चेवार, अधिष्ठाता, शा. वै. महाविद्यालय, चंद्रपूर बाईट २) डॉ. संदीप पिपरे, जिल्हा मौखिक आरोग्य कार्यक्रम अधिकारी, चंद्रपूर आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
0
Report

नारायणगाव बायपास पर ट्रक में आग: डीज़ल टंकी बची, कोई हताहत नहीं

Shirur, Maharashtra:पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव बायपासवर बटाट्याने भरलेल्या एका ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. हा ट्रक आग्रा येथून पुण्याच्या दिशेने जात असताना रिलायन्स बायपास जवळ ट्रकला अचानक आग लागली.घटनेची माहिती मिळताच नारायणगाव पोलीस आणि जुन्नर अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. ट्रकमध्ये तब्बल १०० लिटर डिझेल होते, मात्र सुदैवाने डिझेलच्या टाकीने पेट न घेतल्याने मोठा अनर्थ टळला. स्थानिक आपदा मित्र आणि महामार्ग प्राधिकरणाच्या मदतीने रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली असून, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
0
0
Report
Advertisement

अकोला पुलिस ने अवैध हाथभट्टी शराब पर बड़ी कार्रवाई, लगभग 2 लाख रुपए का माल जब्त

Akola, Maharashtra:अकोल्यात पोलिसांनी अवैध दारू भट्टीवर कारवाई करायला सुरुवात केली आहे.जिल्ह्यात सुरू असलेल्या “ऑपरेशन प्रहार” मोहिमेअंतर्गत अकोला स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत बार्शीटाकळी तालुक्यातील सिंदखेड मोरेश्वर शिवारातील अवैध हातभट्टी दारू अड्डा उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत तब्बल २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मोठ्या प्रमाणावर मोहा सडवा आणि हातभट्टी दारू नष्ट करण्यात आली आहे.स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सिंदखेड मोरेश्वर परिसरात छापा टाकण्यात आला. यावेळी तिघेही आरोपी अवैध गावठी हातभट्टी दारू तयार करताना आढळून आले. कारवाईदरम्यान पोलिसांनी ८३ डबे मोहा सडवा, ५५ लिटर गावठी हातभट्टी दारू, चार प्लास्टिक टाक्या आणि इतर साहित्य जप्त केले.या प्रकरणी बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
0
0
Report

लोकमाता अहिल्यादेवी होळकर की 301वीं जयंती पर येवला में पुष्पहार अर्पण व अभिवादन

Yeola, Maharashtra:अँकर : लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त येवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच नगरपालिका यांच्या वतीने येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती. सजवलेल्या पुतळ्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.या प्रसंगी समाज बांधव,पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी, सामाजिक व धार्मिक कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले. जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
0
0
Report
Advertisement

कृष्णा नदी के प्रबंधन का नियंत्रण कोल्हापुर से, विरोध तेज

Sangli, Maharashtra:सांगलीतील कृष्णा नदीचे व्यवस्थापन कोल्हापूरमधून करण्यास विरोध.. कृष्णाखोर विकास महामंडळ अंतर्गत असणाऱ्या कार्यालयांची पुनर्रचना करण्यात आले आहे.त्यामुळे सांगलीतील कृष्णा नदीचे व्यवस्थापन कोल्हापूरकडे वर्ग करण्यात आला आहे.मात्र यावर सांगितलं विविध सामाजिक संघटनांबरोबर कृष्णा महापूर नियंत्रण समितीने विरोध दर्शवला आहे. सदरचा निर्णय राज्य सरकारचा नसून कृष्णा खोरे विकास महामंडळाने परस्पर घेतला आहे,असा आरोप करत कृष्ण नदीच्या व्यवस्थापनाचा कार्यालय सांगली जिल्ह्यातच असलं पाहिजे अशी मागणी कृष्णा महापूर नियंत्रण समितीकडून करण्यात आली आहे.
0
0
Report

मानसून देरी से, जिले में जल संकट; डैमों में 29% पानी बचा

Shirdi, Maharashtra:मान्सून लांबणीवर पडल्यामुळे पाण्याचं संकट गडद होताना दिसतंय. अहिल्यानगर जिल्हयातील प्रमुख धरणांमधील जलसाठा झपाट्याने कमी होत असून मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणांमध्ये सरासरी केवळ 29 टक्के पाणी शिल्लक आहे. त्यामुळे आता पिण्याच्या पाण्यासाठी साठा राखून ठेवण्याची वेळ जलसंपदा विभागावर आली आहे... मान्सून उशिरा येणार असल्याच्या अंदाजामुळे जिल्ह्यातील पाणीसाठ्याचं नियोजन करण्यावर भर दिला जातोय. मुळा, भंडारदरा आणि निळवंडे या महत्त्वाच्या धरणांमध्ये जलसाठा न्यूनतम पातळीवर पोहोचला आहे. सध्या केवळ 29 टक्के पाणी शिल्लक असल्याने शेती आणि उद्योग क्षेत्रावर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. जलसंपदा विभागाकडून उपलब्ध पाण्याचा वापर काटेकोरपणे करण्याचे नियोजन सुरू आहे. विशेषतः पिण्याचं पाणीासाठी साठा राखून ठेवण्यावर प्रशासनाचा भर आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धरणांमधील जलसाठा खूपच कमी असल्याने जिल्हयात पाणी टंचाईची भीती व्यक्त केली जात आहे. जर मान्सून आणखी लांबला, तर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
0
0
Report

कोकण रेलवे ने बिना टिकट यात्रियों पर कार्रवाई, अप्रैल 2026 में 2.9 करोड़ वसूल

Ratnagiri, Maharashtra:कोकण रेल्वे मार्गावरून विनातिकीट आणि अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चाप लावण्यासाठी प्रशासनाने तिकीट तपासणीची मोहीम अत्यंत तीव्र केली आहे. नुकत्याच संपलेल्या २०२५-२६ या आर्थिक वर्षात कोकण रेल्वेने सातत्य राखत एकूण ११ हजार ३९४ विशेष तिकीट तपासणी मोहिमांचं आयोजन केलं होतं. या वर्षभराच्या कालावधीत संपूर्ण मार्गावर तब्बल ४ लाख ९९ हजार ६७५ अनधिकृत प्रवासी आढळले. या सर्व प्रवाशांवर कडक कारवाई करत रेल्वेने रेल्वे भाडे आणि दंडाच्या स्वरूपात एकूण २७ कोटी ६८ लाख रुपयांची विक्रमी वसुली केली आहे. तर सरत्या एप्रिल २०२६ या एकाच महिन्यात रेल्वेने तब्बल ९३४ विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या. या मोहिमेदरम्यान ३७ हजार विनातिकीट आणि नियमबाह्य प्रवास करणारी प्रकरणे उघडकीस आली असून, अशा प्रवाशांकडून रेल्वे भाडे आणि दंडापोटी २ कोटी ९০ लाख रुपयांचा महसूल वसूल करण्यात आला आहे. रेल्वेच्या या आक्रमक भूमिकेमुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी के कुंभार्ली घाट में एसटी बस रात के भीतर बंद, यात्रियों को चार घंटे इंतजार

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी. कुंभार्ली घाटात एसटी मध्यरात्री नादुरुस्त. जंगलमय भागात प्रवाशांचे तब्बल ४ तास अतोनात हाल. डेपोच्या ढिसाळ कारभारामुळे संताप. अँकर: रत्नागिरीतून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येत आहे. कुंभार्ली घाटातील घनदाट आणि जंगलमय भागात रात्रीच्या सुमारास खेड - नांदेड ही एसटी बस अचानक बंद पडली. धोक्याच्या वळणावर आणि निर्जन ठिकाणी बस नादुरुस्त झाल्यामुळे बसमधील लहान मुले, वृद्ध आणि इतर प्रवाशांना तब्बल चार तास ताटकळत राहावे लागले. घाटात रखडलेल्या काही प्रवाशांनी तातडीने संबंधित बस डेपोशी संपर्क साधून मदतीची मागणी केली होती. मात्र, डेपो प्रशासनाकडून वेळेत कोणतीही पर्यायी व्यवस्था किंवा मदत न मिळाल्याने प्रवाशांना रात्रीचे चार तास रस्त्यावरच बसून काढावे लागले. एसटी प्रशासनाच्या या अत्यंत बेजबाबदार आणि ढिसाळ कारभारामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
0
0
Report

वांगणी के अनधिकृत चॉलों पर धड़ाकेदार कार्रवाई; 100 से अधिक घर ढहे

Ambernath, Maharashtra:महसूल विभागाची धडक कारवाई 100हून अधिक अनधिकृत घरे जमीनदोस्त अनधिकृत चाळींमध्ये बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांचं वास्तव्य? वांगणी पश्चिमेकडील एकविरा नगर भागात धडक कारवाई करत महसूल विभागानं 100हून अधिक घरं जमीनदोस्त केली आहेत. या कारवाईमुळे चाळमाफियांचे धाबे दणाणले आहेत. महत्वाचं म्हणजे या चाळींमध्ये बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांचं वास्तव्य वाढत असल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे या कारवाईनं गुन्हेगारांनाही चाप बसणार आहे. वांगणी ग्रामपंचायत हद्दीत चाळ माफियांनी अक्षरश: उच्छाद मांडला होता. वांगणी पश्चिमेकडे मोठ्या प्रमाणात अनधिकृत चाळींचं बांधकाम करण्यात आलं होतं. सोशल मीडियात स्वस्त घरांच्या फसव्या जाहिराती करत त्याची गोरगरीबांना विक्री केली जात होती. या चाळ माफियांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या जागेतही अवैध बांधकामं केली होती. याबाबत अनेकदा तक्रारी झाल्यानंतर वांगणीच्या सरपंच वनिता आढ़ाव यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांनी मोठ्या फौज फाट्यासह वांगणीत धडक कारवाई केली. या कारवाईत जवळपास 100 हून अधिक घरं जमीनदोस्त करण्यात आली आहेत. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागानेही राज्य महामार्गावरील अतिक्रमाणांवर कारवाई केलीय.
0
0
Report
Advertisement

Chondi Jyanti Mahotsav Me Rohit Pawar aur Gopi Chand Padalkar ke beech hungama: Chunaav ki badha

Ahilyanagar, Maharashtra:आमदार रोहित पवार जाणीवपूर्वक जयंती उत्सवात गोंधळ घालून गाल बोट लावण्यासाठी चोंडी येथे येतात रात्री दर्शन करून गेल्यानंतर जाणीवपूर्वक पुन्हा येऊन घोषणाबाजी करत गोंधळ निर्माण केल्याचा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव असलेल्या चोंडी येथे 301वी जयंती साजरी केली जाते रात्री बारा वाजेच्या sुमारास जयंतीनिमित्त गोपीचंद पडळकर कार्यकर्त्यांसोबत अहिल्यादेवी यांच्या स्मारकावर अभिवादन करण्यासाठी पोहोचले यासोबतच आमदार रोहित पवार देखील अभिवादन करण्यासाठी आले अभिवादन झाल्यानंतर दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते एकत्र झाले आणि कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ सुरू झाला ढकलाढकली आणि घोषणाबाजी झाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला रोहित पवार देखील अभिवादन झाल्यानंतर स्मारकाच्या बाहेर पडले दरम्यान हा प्रकार रोहित पवारांकडून जाणीवपूर्वक केला गेला असल्याचं पडळकर यांनी म्हटल आहे गोपीचंद पडळकर यांच्याशी बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी
0
0
Report

यवतमाळ विधान परिषद: महायुती उम्मीदवार अभी तय नहीं, काँग्रेस के साहेबराव कांबळे आगे

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधान परिषदेसाठी महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही, महाविकास आघाडी करून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांचे नाव निश्चित मानले जात आहे, त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून, सोमवारी ते काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करतील असे त्यांनी सांगितले आहे. तर महायुतीत शिवसेना ही जागा लढवेल मात्र अद्याप उमेदवारीची निश्चिती झाली नाही. यात स्थानिक उमेदवार द्यावा असा आग्रह असल्याने, खेतानी फाउंडेशनचे सलीम खेतानी यांचे नाव आघाडीवर आहे. याशिवाय नागपूर येथील किरण पांडव आणि माजी आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या नावाची देखील चर्चा आहे. या नावांपैकी पालकमंत्री संजय राठोड कुणाला पसंती देतात आणि शिवसेना नेतृत्व काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top