icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

वाशिम में खाद्य सुरक्षा अभियान का असर, 1031 नए आवेदन, 864 पंजीकृत

Washim, Maharashtra:राज्यात अन्नभेसळ आणि बेकायदेशीर खाद्यव्यवसायाविरोधात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेचा प्रभाव वाशिम जिल्ह्यातही दिसून येत आहे.कारवाईच्या धसक्यामुळे हॉटेल चालक,मिठाई व्यावसायिक,दूध विक्रेते व अन्य खाद्य व्यावसायिकांनी परवाना व नोंदणीसाठी मोठी गर्दी केली आहे.गेल्या महिनाभरात जिल्ह्यात खाद्यव्यवसाय नोंदणीसाठी१,०३१ नवीन अर्ज प्राप्त झाले आहेत.सध्या जिल्ह्यात ८६४ नोंदणीकृत व परवानाधारक खाद्य व्यावसायिक आहेत.अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार परवाना किंवा नोंदणीशिवाय खाद्यव्यवसाय करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, व्यवसाय बंद करण्याचे आदेश,परवाना निलंबन तसेच न्यायालयीन कारवाई होऊ शकते. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
0
0
Report

आरोपी सिया गोयल के भाई साहिल गोयल को 10 करोड़ मानहानि नोटिस

Varsoli, Maharashtra:आरोपी सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याला अॅडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांनी थेट 10 कोटी रुपयांच्या अब्रूनुकसान भरपाई ची कायदेशीर नोटीस बजावली आहे. वडगाव मावळ न्यायालयातील सुनावणीदरम्यान सिया गोयलने "माझे वकील आशुतोष श्रीवास्तव नसून विपुल दुशिंग आहेत," असे सांगितल्याची माहिती समोर आल्यानंतर हा वाद अधिक चिघळला आहे. साहिल गोयलने खोटे, बिनबुडाचे आणि बदनामीकारक आरोप करून आपल्या व्यावसायिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचवल्याचा दावा करत आशुतोष श्रीवास्तव यांनी 10 कोटी रुपयांच्या अब्रूनुकसान भरपाईची मागणी केली आहे. तसेच आरोप मागे घेऊन सार्वजनिक माफी आणि भविष्यात असे आरोप न करण्याचे लेखी आश्वासन देण्याचीही मागणी नोटिशीत करण्यात आली आहे. आता या कायदेशीर नोटिशीला साहिल गोयल काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report
Advertisement

सिंधुदुर्ग में बारिश से भूस्खलन, वालावल गांव के घर पर पत्थर गिरा

Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्गात मागील दोन दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे कुडाळ येथील वालावल गावात डोंगर खचण्याची घटना घडलीय. वालावल मुहूर्तळी वाडीत रात्रीपासून डोंगराची माती कोसळत होती. मात्र पावसाची संततधार सुरू असल्याने डोंगरातील एक दगड थेट घरावर आला. त्यामुळे घरच्या भिंतीला तडे गेले. सुदैवाने कोणती जीवितहानी अथवा कोणी जखमी झाले नाही. मात्र ज्या घरावर दगड आदळला त्या घरातील रहिवासी भयभीत झालेत. पावसामुळे डोंगर भाग खचत चालला असून त्यामुळे येथील रहिवाश्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने लागलीच उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे.
0
0
Report

वाशिम में 61,736 वाहनधारक HSRP पंजीकरण नहीं कराए, 1 जुलाई से दंड लागू

Washim, Maharashtra:अँकर:वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी)बसविण्यासाठी आज ३० जून अंतिम मुदत आहे.मात्र, वाशिम जिल्ह्यातील तब्बल ६१ हजार ७३६ वाहनधारकांनी अद्याप नोंदणी किंवा अपॉइंटमेंट घेतलेली नाही.जिल्ह्यात १ एप्रिल २०१९पूर्वी नोंदणीकृत सुमारे १ लाख २१ हजार वाहनांपैकी केवळ ५९ हजार २६४ वाहनधारकांनी एचएसआरपी बसविली किंवा त्यासाठी अपॉइंटमेंट घेतली आहे.जिल्ह्यात एचएसआरपी बसविण्यासाठी १९अधिकृत केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.उपप्रादेशिक परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की,३० जूनपर्यंत अपॉइंटमेंट घेतल्याचा पुरावा वाहनधारकांनी जवळ ठेवावा.१जुलैपासून एचएसआरपी नसलेल्या तसेच अपॉइंटमेंट न घेतलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
0
0
Report

भीमा नदी: जलपूजन से किसानों को पानी की राहत, खेड-शिरूर में उमंग

Khed, Maharashtra:खेड /पुणे सह्याद्रीच्या पर्वतरांगा भीमाशंकरच्या परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे प्रवाहित भिमा नदीला आलेल्या प्रवाहाचे स्वागत करत भीमा नदीची ओटी भरून विधિવत जलपूजन सह्याद्रीच्या पर्वतरांगा भीमाशंकरच्या परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे ओढे, नाले आणि जलस्रोत पुन्हा प्रवाहित होऊ लागले आहेत. भिमाशंकर येथून उगम पावणाऱ्या भीमा नदीच्या पात्रालाही प्रवाह सुरू झाला आहे. भिमा नदीला आलेल्या प्रवाहाचे स्वागत करत जिल्हा परिषद सदस्य समीर सुपे व पंचायत समिती सदस्या मनीषा हिले यांच्या हस्ते भीमा नदीची ओटी भरून विधिवत जलपूजन करण्यात आली. यावेळी चांगला पाऊस पडावा, जलस्रोत समृद्ध व्हावेत आणि परिसरातील पाणीटंचाई दूर व्हावी, अशी प्रार्थना करण्यात आली. भिमा नदी प्रवाहित झाल्याने शेतकरी, नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून परिसरातील पाणीसाठ्यातही वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे खेड आणि शिरूर तालुक्यातील पाणी व शेती व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे
0
0
Report
Advertisement

चंद्रपुर भाजपा ग्रामीण कार्यकारिणी पर स्थगन, सुधीर मुनगंटीवार के समर्थकों को बड़ा झटका

Chandrapur, Maharashtra:चंद्रपुर भाजपा की ग्रामीण इकाई को प्रदेश अध्यक्ष रविन्द्र चौहान ने स्थगित किया गया है। प्रदेश महामंत्री संजय कुटे के हस्ताक्षर से कार्यकारिणी स्थगित करने का पत्र जारी किया गया है। चंद्रपुर ग्रामीण जिलाध्यक्ष हरिश शर्मा को यह पत्र भेजा गया है। 4 जून को जिला ग्रामीण कार्यकारिणी की घोषणा की गई थी, पर जैसे ही यह घोषित हुआ मुनगंटीवार विरोधी ने कई सदस्य एकत्र होकर प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान और महाराष्ट्र प्रभारी शिवप्रकाश की इस निर्णय पर आपत्ति दर्ज की। इस आक्षेप पर कार्रवाई करते हुए चंद्रपुर जिले की इतिहास रचते हुए पहली बार ग्रामीण कार्यकारिणी को स्थगित किया गया है। चंद्रपुर भाजपा के ग्रामीण जिलाध्यक्ष हरिश शर्मा मुनगंटीवार समर्थक हैं, जिससे ग्रामीण जिलाध्यक्ष की कार्यकारिणी स्थगित कर दी गई और मुनगंटीवार समर्थक ही पूरे तौर पर जगह पाए, जबकि भाजपा के अन्य विधायक और पूर्व केंद्रीय मंत्री हंसराज अहिर को दूर रखा गया। प्रदेश भाजपा ने मुनगंटीवार समर्थक जिलाध्यक्षों की संख्या कम करते हुए उन पर आधारित एक पंक्ति के हितों को चोट पहुंचाई है।
0
0
Report
Advertisement

हिंगोली के जामदया में ग्रामसवेयक के खिलाफ महिलाओं का ठिय्या प्रदर्शन, निलंबन की मांग

Hingoli, Maharashtra:हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील जामदया ग्रामपंचायतचे ग्रामसेवक गावातील प्रलंबित कामे न करता गावकऱ्यांना अरेराई धमकीची भाषा वापरत असल्याने ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीसाठी महिलांनी जिल्हा परिषद कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केला आहे जामदया गावांमध्ये ग्रामसेवक ग्रामसभा घेत नाहीत गावकऱ्यांची कामे करत नाहीत ग्रामसभा का घेतली नाही या कारणावरून महिलांनी कॉल केला असता महिलांना कॉल वर धमकी दिल्याचा आरोप महिलांनी केला आहे ग्रामसेवक आर जी मोरे या ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी महिलांनी ठिय्या आंदोलन केला आहे
0
0
Report

अकोला जिला अस्पताल में सुरक्षा गार्ड पर हमला, सीसीटीवी कैद, कठोर कार्रवाई की मांग

Akola, Maharashtra:अकोला शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालयात कर्तव्य बजावणाऱ्या महिला सुरक्षारक्षकावर एका व्यक्तीने कथित हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, यामुळे रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी मोठ्या संख्येने महिला रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक येत असतात. याचदरम्यान एका महिला रुग्ण आणि तिच्या पतीमध्ये काही कारणावरून वाद झाला. हा वाद शांत करण्यासाठी ड्युटीवर असलेल्या महिला सुरक्षारक्षकानी मध्यस्थी केली. मात्र, या हस्तक्षेपाचा राग मनात धरून काही वेळानंतर संबंधित व्यक्तीने एनआयसी कक्षाजवळ ड्युटीवर असलेल्या महिला सुरक्षारक्षकावर हात उगारला. हा संपूर्ण प्रकार रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. घटनेनंतर एनआयसी कक्षातील कर्मचाऱ्यांनी तातडीने 112 क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, सुरक्षा रक्षकांनी आरोपीला ताब्यात घेतले होते. मात्र, पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच आरोपी तेथून पसार झाला. या घटनेमुळे रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
0
0
Report
Advertisement
0
0
Report

मेघा नदी महापूर: शिरसगाव कसबा में पानी में डूबे बाजार, दुकानों को नुकसान

Amravati, Maharashtra:अमरावती के चांदूर बाजार तालुक्यातील शिरसगाव कसबा येथील मेघा नदीला मोठा पूर; संरक्षण भिंत फुटून गावात पाणी शिरल्याची माहिती अनेक दुकाने पाण्याखाली, माल वाहून गेला अमरावती के चांदूर बाजार तालुक्यातील शिरसगाव कसब्यात महापूर आया; नदी की सुरक्षा दीवार टूटने से पानी गांव में प्रवेश कर गया। आने वाले अचानक महापूर के कारण शिरसगाव कसब्यातील आठवडी बाजार में पानी घुसा, व्यापاری और नागरिकों की धावपळ। नदी के किनारे कई दुकाने पानी में डूब गईं और दुकानों के माल करोड़ों में बताया गया। इस प्राकृतिक आपदा से गांव में भय का माहौल बन गया है; स्थानीय प्रशासन से तुरंत सहायता की माँग की जा रही है।
0
0
Report

छत्रपती संभाजीनगर के टप्पा 1–2 में नया इंडस्ट्रीयल ग्रीनफील्ड रोड 44 गांवों से गुजरेगा

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरच्या टप्पा 1 अंतर्गत शेंद्रा डीएमआयसी ते बिडकीन ३५.८० कि.मी. आणि टप्पा २ मध्ये बिडकीन एमआयडीसी ते ढोरेगाव ३४.८० कि. मी. हा नवीन इंडस्ट्रीयल ग्रीनफील्ड रस्ता तीन तालुक्यांतील ४४ गावांतील विविध ६८० गटांतून जाईल. दोन्ही टप्प्यांसाठी जमिन मोजणी व भूसंपादन प्रक्रिया लवकरच सुरू होईल. मार्ग कोणत्या गटातून जाणार आहे, याचे राजपत्र सरकारने जारी केले. अलायन्मेंट शासनास पाठविले होते. त्याला मंजुरी देत शासनाने काढलेल्या अधिसूचनेत म्हटले की, वर्णन केलेल्या जमिनी महामार्ग म्हणून घोषित झाल्या आहेत..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top