icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

लातूर में ठाकरे गट की बैठक में गुटबाजी, दानवे की मौजूदगी से माहौल तनावपूर्ण

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज लातूरमध्ये ठाकरे गटाच्या बैठकीत गोंधळ... व्यासपीठावरच उफाळली अंतर्गत गटबाजी... एकनाथ शिंदे यांचे नाव घेताच ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक... लातूरमध्ये अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत शिवसैनिक आमनेसामने... मध्यस्थीनंतर वाद शांत... लातूरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीतच अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याचं पाहायला मिळालं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या बैठकीत एका उपतालुकाप्रमुखाने जाहीर व्यासपीठावर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची तुलना केल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले. यावेळी काही काळ कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकल्याने बैठकीत तणाव निर्माण झाला. अखेर अंबादास दानवे यांनी हस्तक्षेप करत परिस्थिती शांत केली. मात्र, या घटनेमुळे ठाकरे गटातील अंतर्गत नाराजी आणि गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे.
0
0
Report

मैरिज साइट से २५+ महिलाओं को करोड़ों का फ्रॉड, 'लुटेरा दुल्हा' Greater Noida से गिरफ्तार; BMW X1 जब्त

Mira Bhayandar, Maharashtra:लग्नाचे आमिष दाखवून २५ हून अधिक महिलांना कोट्यवधींचा चुना लावणारा 'लुटेरा दुल्हा' अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. मिरा-भाईंदर गुन्हे शाखेने मॅट्रिमोनियल साइटद्वारे महिलांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय ठगाला उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथून अटक केली. आरोपीने खोटी नावे वापरून प्रामुख्याने दिव्यांग, घटस्फोटित आणि असहाय्य महिलांना लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले होते. प्राथमिक तपासात देशभरातील २५ हून अधिक महिलांची कोट्यवधींची फसवणूक उघड झाली असून, फसवणुकीच्या पैशातून घेतलेली महागडी 'BMW X1' कार जप्त करण्यात आली आहे. मुख्य आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून, या गुन्ह्यात मदत करणाऱ्या त्याच्या मुलालाही पोलिसांनी सहआरोपी केले आहे.
0
0
Report
Advertisement

रोहित पवार आंदोलन पर बाला नांदगावकर का बयान: स्वास्थ्य शिविर पर बहस

Navi Mumbai, Maharashtra:बाळा नांदगावकर On आरोग्य शिबीर आरोग्य शिबीर आयोजित केल्याबद्दल नवी मुंबई मनसे टीमला धन्यवाद. नवी मुंबईकर लाभ घेतील आरोग्यचि काळजी घेतील अशी अपेक्षा. On कर्जमाफी योजना कोणतंही सरकार शेतकरी कामगारांसाठी काम करत असतो मात्र योजना प्रत्येक्षात आणणार आहोत का, कि फक्त घोषणा करायच्या असे लोकांना वाटता कामा नये. विरोधीपक्ष केल तरी बोंबा मारणार नाही केल तरी बोंबा मारणार. सरकार म्हणून समाजातील एका घटकाला किती प्रामाणिकपणे मदत करतोय हे महत्वाचं. लोकांना आधीच्या घोषणा आठवतायत 15 लाख खात्यात येणार, अच्छेदिन येणार याबद्दल मी बोलणं योग्य नाही. सरकारने फसवी घोषणा न करता अत्यंत खऱ्या घोषणा कराव्या. On रोहित पवार आंदोलन तरुण पोर आहेत काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना शुभेच्छा आहेत. वेगवेगळ्या विषयावर रोहित पवार बोलत असतात अभ्यासपूर्ण बोलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. सरकार किती गांभीर्याने घेत हा महत्वाचा विषय. On कोलकत्ता एव्हईम जाळल्या लोकांच्या मनात शंका येत असेल लोकांना वाटते असेल सगळं मतांसाठी चालले आहे. जर लोकांच्या Shंका दूर करायच्या असतील तर जग ओरडून बोलतोय बॅलेट पेपर वर निवडणुका घ्या. सरकार केंद्रातील असो किंवा राज्यातील लोकांच्या मनात संभ्रम आहे हि शंका दूर करायची असेल तर बॅलेट वर निवडणुका घ्या. विरोधीपक्ष बोलत राहणार इव्हिएम मशीन मॅनेज होतात आणि म्हणून त्या जाळाव्या लागतात. On सत्ताधारी आंदोलन नवी मुंबई सत्तेत असणारी लोक समाधानी नसतील तर तुम्ही देखिल कसे समाधानी असाल. सत्ताधारी पक्षाला आंदोलन करावी लागत असतील तर परिस्थिती बिकट. कधीतरी भगवान के घर देर है अंधेर नही उपर वाले कि लाठी कभी तो पडती है त्याचा आवाज येत नाही. On आदित्य ठाकरे वाढदिवस जून महिना वाढदिवसाचा पावसाळ्याचा आणि यंदा अधिकमास सुद्धा आहे. अनेक मोठ्या नेत्यांचे वाढदिवस आहेत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या हातून महाराष्ट्राची चांगली सेवा घडो, महाराष्ट्राला चांगले दिवस येउदेत ठाकरे घराण्यातील प्रत्येक घटकाला शुभेच्छा. बाईट - बाळा नांदगावकर
0
0
Report
Advertisement

सातारा महायुती के अंदर मतभेद साफ, विधानपरिषद चुनाव में उठे सवाल

Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यातील महायुतीमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडपणे समोर आले आहेत. सातारा-सांगली विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीतील नाराजीला वाचा फुटल्याची चर्चा सुरू झाली आहे. काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर देसाई यांनी व्यक्त केलेली खंत आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. व्हीओ : 1 सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून महायुतीतील धुसफूस कायम असल्याचे बोलले जात आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक पातळीवरील मतभेद वेळोवेळी समोर येत राहिले आहेत. आता विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने हे मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.काल दरेगाव येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी पालकमंत्री शंभूराजे देसाई आले होते. जवळपास तासभर बंद दाराआड चर्चा झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी विधानपरिषद निवडणुकीच्या नियोजनात शिवसेनेला स्थान दिले जात नसल्याची आणि महायुतीचा बैठकीला बोलावले नसल्याची नाराजी व्यक्त केली."आमची अवस्था येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू अशी झाली आहे," असे वक्तव्य करत देसाई यांनी कोणाचेही नाव न घेता भाजपच्या कार्यपद्धतीवर अप्रत्यक्ष टीका केली. बाईट - मंत्री शंभूराज देसाई व्हीओ :3 विशेष म्हणजे सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी निर्माण झालेली राजकीय कटुता अद्याप पूर्णपणे संपलेली नसल्याचे संकेत या वक्तव्यातून मिळत आहेत. मात्र मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सारवासारव करत मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांच्यासोबत आमचा समन्वय आहे.आम्ही विधानपरिषदेचा निवडणुकीला एकदिलाने सामोरे जाणार असल्याचे आणि या निवडणुकी कोणतीही अडचण नसल्याचं सारवासारव मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे. बाईट - मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व्हिओ 4 आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि विधानपरिषद निवडणूक लक्षात घेता महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वय राखण्याचे आव्हान नेतृत्वापुढे उभे राहिले आहे. desai यांच्या वक्तव्यानंतर साताऱ्यातील राजकारण पुन्हा तापले असून, महायुतीतील नाराज नेत्यांच्या भावना आता उघडपणे व्यक्त होऊ लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील महायुतीतील अंतर्गत समीकरणे नेमकी कोणत्या दिशेने जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report

नागपुर में 12 मेजर पोर्ट समेत बड़े इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स का ऐलान

Nagpur, Maharashtra:नागपूर नितीन गडकऱी 12 मेजर पोर्ट आणि 200 मायनर पोर्ट विकसित झाले पोर्टला जोडणारे रस्ते झालेय एअरपोर्ट डबल झालेय शहरात CNG पाईप महापौर आणि सगळ्यांना सांगितले आहे की alternative फ्युएल वर आपली गाडी चालवा.. पेट्रोल, डिझेल नको आता किसान डांबर बनवणार.. डांबर रोड बायो गॅसने बनणार आता सगळ्या बँक प्रॉफिटमध्ये आल्यात.. NP नाही 16 करोड नळ कनेक्शन दिलेय 1.6 लाख स्टार्टअप , 118 युनिकॉर्न झालेय 25 तारखेला नागपूर विमानतळ हॅन्ड ओव्हर होण्याची शक्यता डबल इंजिनमुळे खूप काम झालेय आतापर्यंत जेवढे काम झाले ते ट्रेलर.. अजून पिचर बाकी.. nitiन गडकरी (प्रश्न -उत्तर ) नागपूर -हैद्राबाद दृतगती मार्ग 50 टक्के झालेय नागपूर -चंद्रपूर राज्य सरकार करेल.. 6 लेंथ 100 टक्के इथेनॉलच्या फाईलवर सही केलीय.. मारुतीच्या एक गाडी 100 टक्के इथेनॉल गाडी सुरु केली इथेनॉलबाबत अपप्रचार होतेय.. नागपुरात हायड्रोजन पंप आणि दोन बसेस सुरू होणार नागपूर- वर्धा, नागपूर- नरखेड, नागपूर- भंडारा चार लाईन रेल्वे साडेचार लाख वृक्ष आम्ही लावलेय प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने वृक्ष लावावे मुंबई स्टॉक एक्सचेंज मध्ये बॉण्ड करण्यावरून नाराज होतो...युद्ध परिस्थितीवरून विपक्षला काम हवे की नाही (on उज्वला ) आम्हाला अंदमान निकोबार मध्ये गॅस मिळाले..... नागालँड मध्येही मिळाले आहे... आपल्याकडे 87 टक्के इम्पोर्ट महाराष्ट्रातील सर्व तालुक्यात remort सेन्सरने मॅपिंग करावी... आणि जिथे फोरेस्ट वाढेल ते समजेल...याबाबत गणेश नाईक यांच्याशी बोलेन (on प्रणिती शिंदे म्हणाल्या की तुम्हाला CM केले पाहिजे ) मला फटाके लावण्याचा कार्यक्रम आहे कां?
0
0
Report
Advertisement

मावळ में देवी के मुकुट की चोरी, पुलिस ने पहन लिया फिर चोरों ने डल्ला

Varsoli, Maharashtra:मावळातील धक्कादायक प्रकार मावळातील तळेगाव दाभाडेत पोलिसांनी चोरी गेलेला चांदीचा मुकुट देवीला परिधान केला अन त्याच रात्री चोरट्यांनी पुन्हा तोचं चांदीचा मुकुट लंपास केला. तळेगावमधील तुळजाभवानी मातेचा सव्वा किलो वजनाचा चांदीचा मुकुट चोरीला गेला होता. पुजाऱ्या देखत मुकुट लंपास करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. काल 12 जूनच्या सकाळीच पोलिसांनी चोरी गेलेला चांदीचा मुकुट देवीला परिधान केला. स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी पोलिसांनी मोठा गाजावाजा केला. पण चोवीस तास उलटायच्या आत चोरट्यांनी पुन्हा त्याचं चांदीच्या मुकुटावर डल्ला मारला. त्यामुळं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उभे राहिलेत..
0
0
Report

मावल के इंदोरी के कडजाई माता मंदिर में चोरी; CCTV में तीन चोर

Varsoli, Maharashtra:मावळातील देवालयांमध्येही आता चोरट्यांचा मुक्त संचार सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. इंदोरी येथील श्री कडजाई माता मंदिरात झालेल्या धाडसी चोरीने पोलिसांच्या सुरक्षाव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विशेष म्हणजे चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी देवीसमोर हात जोडले, पादत्राणे मंदिराबाहेर काढली आणि त्यानंतर मंदिरातील मौल्यवान वस्तू चोरल्या. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून तीन चोरटे स्पष्टपणे दिसत आहेत. एकीकडे तळेगाव दाभाडे येथील तुळजाभवानी मंदिरातील मुकुट चोरीची घटना ताजी असतानाच, दुसरीकडे एकाच रात्रीत दोन वेगवेगळ्या मंदिरांमध्ये चोरी झाल्याने तळेगाव पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. चोरट्यांचे वाढते धाडस आणि मंदिरांनाच लक्ष्य करण्याच्या घटना पाहता परिसरात पोलिसांचा धाक कमी झाल्याची चर्चा सुरू झाली असून, या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर उभे ठाकले आहे..
0
0
Report
Advertisement

वाशीम में तेज आंधी-तूफान से सड़क बंद, लोग बेहाल

Washim, Maharashtra:वाशीम: असेगाव ते कोयाळी दरम्यानच्या रस्त्यावर मोठी झाडे उन्मळून पडल्याने हा मार्ग रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद झाला आहे. त्यामुळे कोयाळी, वरूड तोफा आणि परिसरातील गावांतील नागरिकांना बाहेरगावी जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून रस्त्यावर पडलेली झाडे हटविण्याचे काम हाती घेण्यात आले असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वादळी वाऱ्याचा फटका कोयाळी व वरूड तोफा परिसरालाही बसला आहे. अनेक घरांवरील टिनपत्रे उडाली असून काही ठिकाणी वीज खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
0
0
Report

चंद्रपुर में रक्त की भारी कमी, जनता से रक्तदान की अपील जोरदार

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. शासकीय रक्तकेंद्राच्या माहितीनुसार, सन 2025 मध्ये 15 हजार 258 रक्तपिशव्यांचे संकलन झाले होते. मात्र चालू वर्षात आतापर्यंत केवळ 5 हजार 102 रक्तपिशव्यांचे संकलन झाल्याने रुग्णालयात रक्ताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे गरजू रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने रक्तसंकलन वाढविण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. रक्तदान सप्ताहांतर्गत 12 जून रोजी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, 13 जून रोजी पदवीपूर्व विद्यार्थी आणि 15 जून रोजी महाविद्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती आणि तरुण रक्तदात्यांना स्वतःहून रक्तदान शिबिरांचे आयोजन करून शासकीय रक्तकेंद्रातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यास पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शासकीय रक्तकेंद्रात उपलब्ध होणाऱ्या रक्तपिशव्या गरजू रुग्णांना विनामूल्य दिल्या जात असल्याने रक्तदानाद्वारे समाजहितासाठी पुढे येण्याची गरज आहे.
0
0
Report

केंद्रीय सरकार ने कांदा खरीद दर 70 पैसे बढ़ाकर 16.50 रुपये प्रति किग्राम किया

Yeola, Maharashtra:अँकर इंट्रो : केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून कांदा खरेदी दरात किरकोळ वाढ केली असली तरी ती शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत अपुरी असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केला आहे. कांदा खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप करत संघटनेने सरकारला तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट... व्हॉईस ओव्हर : केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून सुरू असलेल्या कांदा खरेदीसाठी दरामध्ये प्रति किलो 70 पैशांची वाढ करत तो 15 रुपये 80 पैशांवरून 16 रुपये 50 पैसे इतका निश्चित केला आहे. मात्र हा दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याचा दावा कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केला आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार सध्या कांद्याचा उत्पादन खर्च किमान 22 रुपये प्रति किलो इतका येत असून शासनाने जाहीर केलेला खरेदी दर शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताला धक्का देणारा आहे. बाईट : कांदा उत्पादक शेतकरी व्हॉईस ओव्हर : यासोबतच नाफेड आणि एनसीसीएफमार्फत होणाऱ्या कांदा खरेदी प्रक्रियेत अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे. वजन, प्रतवारी आणि खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. संघटनेने शासनाकडे शासकीय कांदा खरेदी दर किमान 30 रुपये प्रति किलो म्हणजेच 3 हजार रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्याची मागणी केली आहे. तसेच खरेदी प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची हमी शासनाने घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. बाईट : कांदा उत्पादक शेतकरी व्हॉईस ओव्हर : दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष न दिल्यास आणि खरेदी प्रक्रियेतअनियमितता आढळल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कांदा उत्पादक शेतकऱ्य संघटनेने दिला आहे. त्यामुळे कांदा दराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून शासन याबाबत काय निर्णय घेते याकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top