icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

मुरतिजापुर में किसान अन्नत्याग आंदोलन: 17,500 रुपये पिक बीमा, ऋण माफी और तुरंत वितरण की मांग

Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे पिक विमा, कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. आंदोलनादरम्यान एका शेतकऱ्याची प्रकृती खालावल्याने आंदोलनस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. Vo : मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर प्रगती शेतकरी मंचाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. विमा भरलेल्या तसेच विमा न भरलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना १७ हजार ५०० रुपयांची पीक विमा मदत तातडीने देण्यात यावी, राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, आगामी खरीप हंगामापूर्वी सर्व शेतकऱ्यांना पीक कर्जाचे सुरळीत वाटप करावे, तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार ४०० रुपयांचा प्रोत्साहन निधी त्वरित वितरित करावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.कालपासून मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनस्थळी ठिय्या देऊन बसले आहेत. दरम्यान, कडक उन्हात आंदोलनात सहभागी झालेल्या एका शेतकऱ्याची अचानक प्रकृती बिघडली. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे आंदोलनस्थळी काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाकडून अद्याप कोणतेही ठोस आश्वासन अथवा निर्णय मिळाला नसल्याने शेतकरी अधिक आक्रमक झाले आहेत. मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा प्रगती शेतकरी मंचाने दिला आहे. Byte : राजू वानखडे, अध्यक्ष, प्रगती शेतकरी मंच. Vo 2 : दरम्यान, मूर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांनीही या आंदोलनाची दखल घेत राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून शासनाने तातडीने निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे आता राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे. Sound Byte : हरीश पिंपळे, भाजपा आमदार.
0
0
Report
Advertisement

नालेसफाई में बाल मजदूरी, पोकलेन बकेट में बच्चों को बैठाकर किया गया स्टंट—आरोप

Ambernath, Maharashtra:बालसुरक्षेला तिलांजली?; नालेसफाई करताना पोकलेनच्या बकेटमध्ये बसून अल्पवयीन मुलांना फिरवले नालेसफाई की स्टंट ? अल्पवयीन मुलांना पोकलेनच्या बकेटमध्ये बसवून जीवघेणा स्टंट व्हिडिओने उघडला नालेसफाईतील धक्कादायक कारभार; कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी  Anchor उल्हासनगर महापालिकेच्या नालेसफाई कामातील संतापजनक प्रकार समोर आला असून, मोठ्या नाल्यात अल्पवयीन मुलांना उतरवून त्यांच्याकडून कचरा आणि गाळ काढण्याचे काम करून घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. एवढ्यावरच न थांबता पोकलेन मशीनच्या बकेटवर मुलांना बसवून खेळविल्याचे व्हिडिओ समोर आल्याने बालसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकारामुळे महापालिका प्रशासन, कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून दोषींवर तात्काळ निलंबन आणि फौजदारी कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.उल्हासनगर शहरात पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई मोहिमेला वेग आला असतानाच उल्हासनगर-१ येथील राजीव गांधी नगर परिसरातील मोठ्या नाल्याच्या साफसफाईच्या कामात बालकामगारांचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करून तातडीच्या कारवाईची मागणी करण्यात आली आहे. चंद्रशेखर भुयार उल्हासनगर
0
0
Report

विधान परिषद चुनाव में कांग्रेस- महाविकास आघाडी को बड़ा नुकसान, नांदेड समेत जिलों में पलटा

Nanded-Waghala, Maharashtra:विधान परिषद निवडणुकीतही काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा सपशेल पराभव झाल्याचे दिसून आले. एकेकाळी गड असणा-या जिल्ह्यातही काँग्रेसची वाताहत सुरु आहे. आता डॅमेज कंट्रोल साठी प्रदेशाध्यक्ष प्रयत्न करताना दिसताहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा सर्वच जागी पराभव झाला. लोकसभा निवडणुकांनंतर विशेषता काँग्रेसची राज्यात पिछेहाट सुरूच असल्याचे चित्र दिसून येत आहे. सर्वाधिक मतदार असताना काहीठिकाणी काँग्रेसने योग्य वाटाघाटी केल्या नसल्याचीही चर्चा आहे. नांदेडमध्येही त्याचा प्रत्यय आला. काँग्रेसकडे 92 नगरपालिका असताना एववेळी काँग्रेस उमेदवाराचा अर्ज मागे घेऊन ऑपरेशन टायगर मध्ये नाव असलेले खासदार नागेश पाटील आष्टीकार यांचे सुपुत्र कृष्णा पाटील ला उमेदवारी दिली. काँग्रेसने कृष्णा पाटील यांना मतदान करण्याचा व्हीपदेखील काँग्रेसने काढला होता. पण उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या उमेदवाराला पाठींबा देण्यासाठी गळ घातल्याचा खुलासा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. यातून काँग्रेसची फसगत तर झालीच शिवाय उद्धव ठाकरे यांचा विश्वासघाती झाल्याचे सपकाळ म्हणाले. विधान परिषद निवडणूक महाविकास आघाडीचा पराभव झाला असला तरी ही मर्यादित निवडणूक होती. या निवडणूकितून जो काही निकाल आलाय तो जय आणि पराजय मानला नाही पाहिजे असे मला वाटते असेही सपकाळ म्हणाले. अशोक चव्हाण हे काँग्रेसमध्ये असताना नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. एकेकाळी सर्व नऊ आमदार आणि विधान परिषदेचे आमदार हे आघाडीचे होते. पण चव्हाण भाजपात गेले आणि काँग्रेसचा बालेकिल्ला पूर्णता ढासळला. आज जिल्हा सर्वांना आमदार माहितीचे आहेत तर विधान परिषदेवर महायुतीच्याच उमेदवाराचा विजय झालाय. पण नांदेड जिल्हा काँग्रेसचा विचारणा मानणारा जिल्हा आहे काँग्रेस यातून उभारी घेईल असा विश्वास खासदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. महायुतीच्या लाटेत काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा सुपडा साफ होताना दिसत आहे. या लाटेत टिकून राहण्यासाठी काँग्रेसला मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.
0
0
Report
Advertisement

रोहा में पानीपट्टी दर वृद्धि विरोध में शिवसेना आमरण उपोषण दूसरा दिन भी जारी

Chendhare, Maharashtra:रोहा नगरपालिका में पानीपट्टी दर वृद्धि के विरोध में शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट का आमरण उपोषण दूसरे दिन भी जारी है. रोहा शिवसेना शहर प्रमुख राजेश काफरे के नेतृत्व में आंदोलन चल रहा है और नगरपालिका ठोस निर्णय न ले तक आंदोलन जारी रहेगा. जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे ने आंदोलकांे की भेट लेकर समर्थन दिया. अन्य नगरपालिकाओं के मुकाबले रोहा में पानीपट्टी दोगुनी निर्धारित की गई है; नगरपालिका की भूमिका पर विरोध किया गया. शिवसेना संपर्क प्रमुख संजय कदम और जिल्हा प्रमुख नंदू शिर्के ने भी आंदोलकांे से मुलाकात कर समर्थन दर्शाया.
0
0
Report

वाशिम में मातंग समाज का आरक्षण उपवर्गीकरण को लेकर जोरदार आक्रोश

Washim, Maharashtra:वाशिम: अँकर:अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे अ,ब, क, ड असे उपवर्गीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी मातंग समाजाच्या वतीने आज वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. जिल्हाभरातून आलेल्या हजारो समाजबांधवांनी मोर्चात सहभाग घेत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आरक्षणाचे उपवर्गीकरण लागू करून मातंग समाजाला न्याय द्यावा, अशा मागणी आंदोलकांनी केली. शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
0
0
Report
Advertisement

NDA में संभावित सहयोगी बदलाव: महाराष्ट्र की राजनीति में वार्ता आगे बढ़ रही

Mumbai, Maharashtra:आमदार मिहिर कोठेचा On 2029 उमेदवारी पक्ष जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे आणि 2029 चा काही दावा नाही केला आहे आम्ही त्यांचे स्वागत करतो आमच्या मित्र पक्षात ते आले आहेत NDA मध्ये जे कोणी येणार मी त्यांचे स्वागत करणार On ईशान्य मुंबई उमेदवार आमचे नेतृत्व जे काही ठरवणार ते योग्य ठरवणार आमची काही मागणी नसते मित्र पक्ष मिळून वाटाघाटी करतात ते आम्हाला मान्य आहे On संजय पाटील निर्णय राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे अध्यक्ष ते योग्य वेळी करतील मी मिहिर कोठेचा म्हणून माझा याचा काडीचा संबंध नाही केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्र अध्यक्ष यांना विचारूनच हा निर्णय झाला असेल किंवा नाही मी त्यांचे स्वागत करतो ज्या प्रकारे पक्ष अध्यक्ष त्याचे आम्ही कार्य करते जर पक्ष बोले की दुसरी कडे जाऊन कार्य कर मी माझा बोजा विस्तार उचलून कार्य करेल
0
0
Report

ठाकरे गट के शिवसैनिकों पर पुलिस की सतर्कता, वाकचौरे के भागीदारी को लेकर तेज़ चर्चा

Shirdi, Maharashtra:Shirdi News Flash ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा इशारा, पोलीस प्रशासन सतर्क. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले. बंडखोर खासदार भाऊसाहेब वाकचौरेला तुडवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर खा.भाऊसाहेब वाकचौरे मतदारसंघात येणार असल्याने शिर्डी पोलिसांचा बंदोबस्त तैनात. इशारा दिलेल्या ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जातेय. वाकचौरे मतदार संघात येणार असल्याने पोलिसांकडून खबरदारी.
0
0
Report

ठाकरे गट के शिवसैनिकों का इशारा, पुलिस सतर्क, शिर्डी में सुरक्षा तैनात

Shirdi, Maharashtra:Shirdi News Flash ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा इशारा , पोलीस प्रशासन सतर्क ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ठेवलं नजर कैदेत बंडखोर खासदार भाऊसाहेब वाकचौरेला तुडवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही शshivसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर खा.भाऊसाहेब वाकचौरे मतदारसंघात येणार असल्याने शिर्डी पोलिसांचा बंदोबस्त तैनात इशारा दिलेल्या ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ठेवलय नजरकैदेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून घेतली जाते खबरदारी वाकचौरे मतदार संघात येणार असल्याने पोलिसांकडून खबरदारी
0
0
Report
Advertisement

राजुरा तहसील कार्यालय, किसान ने बैल पर प्रवेश किया, कर्ज माफी की मांग

Chandrapur, Maharashtra:टायटल: चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तहसील कार्यालयात आज एका शेतकऱ्याने बैलावर बसून केला प्रवेश, या शेतकऱ्याने कर्जमाफी झालीच पाहिजे अशा घोषणा अँकर: चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तहसील कार्यालयात आज एका शेतकऱ्याने चक्क बैलावर बसून प्रवेश केला. तहसील कार्यालयात प्रवेश केलेल्या या शेतकऱ्याने कर्जमाफी झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या. दिवाकर पाहानपटे असं त्याचे नाव असून तो राजुरा तालुक्यातील भोयेगाव येथील रहिवासी आहे. दिवाकर पाहानपटे यांनी केलेल्या या विचित्र प्रकारामुळे काही काळ तहसील कार्यालयात गोधळ उडाला. कार्यालय परिसरात या बैलावरील स्वार शेतकऱ्याच्या कृतीची चर्चा होती. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
0
Report

चंद्रपुर में 70 हजार मतदारों के नाम हटे, BLO घर-घर पहुंचेंगे

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिलेमध्ये तब्बल 70 हजार मतदारांची नावे वगळली गेली आहेत. SIR अंतर्गत जिल्ह्यात 86.56% मतदारांचे आजवर मॅपिंग झाले असून 30 जून ते 29 जुलै या कालावधीत जिल्ह्यात SIR अंतर्गत BLO च्या घरभेटीचा कार्यक्रम राबवला जाणार आहे. नागरिकांनी घरी येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाची अंमलबजावणी सध्या सुरू आहे. या कार्यक्रमाचा उद्देश मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत, त्रुटिरहित व सर्वसमावेशक ठेवणे हा आहे. महाराष्ट्र राज्याचा समावेश विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्यामध्ये करण्यात आलेला असून या कार्यक्रमासाठी 01 ऑक्टोबर 2026 ही अर्हता दिनांक निश्चित करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमांतर्गत पात्र मतदारांची नोंदणी, मतदारांच्या तपशीलांची पडताळणी, आवश्यक दुरुस्ती, स्थलांतरित मतदारांच्या नोंदी अद्ययावत करणे, दुबार नोंदींची तपासणी तसेच मतदार यादी शुद्धीकरणाची कार्यवाही करण्यात येणार आहे. सर्व प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
0
0
Report

रायगड पेण में मनसे को झटका, सामूहिक राजीनामे; शिंदे गुट में जाने की चर्चा

Chendhare, Maharashtra:रायगडच्या पेण मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसलाय. पेण तालुक्यातील मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी आपल्या समर्थकांसह पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांच्या सोबत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही सामूहिक राजीनामे दिले आहेत. जिल्हा कार्यकारिणीतील नियुक्त्यांमध्ये जुन्या कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप नाराज पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच संपर्क अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या कार्यपद्धतीबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, हा नाराज गट लवकरच आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top