icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

समृद्धि महामार्ग पर बस-ट्रक हादसे में 20-25 घायल, दो की हालत गंभीर

Washim, Maharashtra:बुलढाणा जिले मेहकर के पास पिंपरी माळी गाँव के पास समृद्धि महामार्ग पर आज सुबह निजी लक्जरी बस और ट्रक का भयंकर अपघात हुआ। पुणे से नागपुर की ओर जा रही बस चालक के नियंत्रण खोने से टक्कर हो गई, जिससे बस के अगले हिस्से का चूरा-चूरा हो गया। प्रारंभिक जानकारी के अनुसार इस दुर्घटना में बस में मौजूद 20 से 25 यात्री घायल हुए हैं, जिनमें दो की हालत चिंताजनक है। घायलों को मेहकर ग्रामीण अस्पताल समेत अन्य अस्पतालों में भर्ती कराया गया है। इस घटना से समृद्धि महामार्ग पर दुर्घटनाओं की यह श्रृंखला फिर सामने आ गई है।
0
0
Report

चंद्रपुर जंगल में रानगवा की मौत, उष्माघात का संदेह

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातल्या झरण जंगलात रानगव्याचा जंगलालागत असलेल्या रस्त्याच्या कडेला झाला मृत्यू, उष्माघाताचा संशय अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातल्या झरण जंगलात रानगव्याचा जंगलालगत असलेल्या रस्त्याच्या कडेला मृत्यू झाला. हा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील तापमान  उच्चांकी तापमानाचा फटका मानवासह वन्यजीवांना सुद्धा बसत आहे. झरण वनपरिक्षेत्र अंतर्गत , आकसापूर जंगलात भटाळी रस्त्यालगतच कक्ष क्रमांक ११७ मध्ये रानगवा मृतावस्थेत आढळला, घटनेची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली. हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीचे सदस्य वन पथकासह   घटनास्थळी पोचले. शरीरावर कुठल्याही जखमा आढळून आल्या नाही. पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राजक्ता लेनगुरे यांना पाचारण करण्यात आले. घटनास्थळी शवविच्छेदन करण्यात आले व प्रथमदर्शी उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
0
Report
Advertisement

बुलढाणा के जळगाव जामोद हत्या मामले में वरिष्ठ पुलिस अधिकारी निलंबित

Washim, Maharashtra:बुलढाणा जिले के जळगाव जामोद तालुक्यामध्ये घडलेल्या हत्या कांड प्रकरणामध्ये हलगर्जीपणा करणं पोलीस विभागातील बड्या अधिकाऱ्यांना चांगलंच भोवल है. तत्काळ एलसीबी पुलिस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि जळगाव जामोद तपास अधिकारी पुलिस निरीक्षक नितीन पाटील यांच्या अमरावती पुलिस आयुक्तांनी निलंबन केलं. या निलंबनाने पोलीस वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली है. जळगाव जामोद हत्या कांड प्रकरणातील मृत मुलीचे अद्याप ओळख पटलेली नाही. जीवंत शिवानीला मृत घोषित करके तिच्या वडील आणि भावाला न केलेल्या खुणाबद्दल अटक करण्यात आली होती. त्यामुळेच या दोन पोलीस अधिकाऱ्यांवर ही मोठी कारवाई करण्यात आली है.
0
0
Report

सोलapur की माळरान पर मानसून की प्रतीक्षा में व्याकुल काळवीट, मोबाइल पर कैद

Solapur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यात मृगाचे आगमन तरी पावसाची ओढ कायम जिल्ल्ह्यातील बोरामणी गावामध्ये माळरानावरील व्याकुळ झालेली काळवीट मान्सूनच्या प्रतीक्षेत बोरामणीच्या माळरानावर फिरणारा काळवीटांचा कळप प्रणीमित्र पप्पू जमादार यांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद मान्सूनने महाराष्ट्रात वर्दी दिली असली तरी अजूनपर्यंत सोलापूरचा पल्ला गाठलेला नाही उजाड माळरानावर पाण्याच्या शोधात भटकंती करणारी काळवीट मोबाईल कॅमेरात कैद माणसांप्रमाणे प्राणीदेखील व्याकुळतेने मान्सूनच्या प्रतीक्षेत असल्याचे स्पष्ट
0
0
Report

तुकोबांची पालखी इस वर्ष नए रथ में विराजमान होगी

Varsoli, Maharashtra:Headline : तुकोबांची पालखी यावर्षी विराजमान होणार नवीन रथात नवीन पालखी रथासाठी 250 किलो चांदा तर 150 घनफुट सागवान लाकडाचा वापर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान 7 जुलै रोजी देहूतून होणार आहे. त्यासाठी यावर्षी तुकोबांची पालखी रथ हा नवीन बनविण्यात येणार आहे. त्यासाठी आता राजस्थान मधील सिहोर या गावातून लाकडावर कोरीव नक्षीकाम करण्यात आले आहे. लाकडावर कोरीव नक्षीकाम करून हा रथ आता देहू मध्ये दाखल झाला आहे. या रथासाठी तब्बल 150 घनफूट लाकडाचा वापर करण्यात आला आहे. तर 250 किलो चांदीचा वापर या रथासाठी करण्यात येणार आहे. या रथाला बरमॅटिक सागवान जातीचा लाकूड वापरण्यात आलं आहे. दाक्षिणात्य पद्धतीचा कोरीव काम या लाकडावर करण्यात आलं आहे. या रथाला वापरण्यात आलेल्या लाकडाला ऊन वारा पाऊस याचा कोणताही परिणाम होणार नाही. नक्षीकाम करून आलेला हा लाकडी रथ आता देहूच्या मंदिर परिसरात सीसीटीव्ही च्या अंतर्गत त्यावर चांदी लावण्यात येणार आहे. तर 7 जुलै पर्यंत हे संपूर्ण चांदीचे काम पूर्ण करण्याचा मानस देहू संस्थान चा आहे.
0
0
Report
Advertisement

सोलapur-गोवा और सोलापुर-हैदराबाद उड़ानें अगस्त तक बंद, फ्लाई 91 टिकट बिक्री रोक दी

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - मान्सूनचा फटका, सोलापूर-गोवा, सोलापूर-हैदराबाद विमानसेवा ऑगस्टपर्यंत बंद मान्सूनचा फटका! सोलापूर-गोवा, सोलापूर-हैदराबाड विमानसेवा ऑगस्टपर्यंत बंद फ्लाय 91 कंपनीचा मोठा निर्णय; 19 जूनपासून तिकीट विक्री बंद पावसाळ्यात कमी दृश्यमानता आणि नाइट लँडिंग सुविधेचा अभाव असल्याने घेण्यात आला निर्णय सोलापूर-गोवा व सोलापुर-हैदराबाद विमानसेवा किमान 2 ते 3 महिने स्थगित वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या सेवेला सोलापूरसह लातूर, धाराशिव, विजयपूर, कलबुर्गी परिसरातून चांगला प्रतिसाद परिस्थिती अनुकूल झाल्यास दुपारच्या वेळेत सेवा पुन्हा सुरू करण्याची शक्यता अन्यथा ऑगस्ट किंवा सप्टेंबरपासून नियमित विमानसेवा पूर्ववत होणार फ्लाई 91 ची माहिती
0
0
Report

नाशिक के सिन्नर में आंधी-बारिश से पोल्ट्री फार्म आदि क्षेत्र में नुकसान

Sinnar, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागांत पंचाळे, پिंपळगाव,Şहा, उजनी, देवपूर, एकलहरे यास अनेक गावांमध्ये शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि पावसाच्या तडाख्यामुळे अनेक घरांची पत्रे उडून गेली असून पोल्ट्री व्यवसायालाही मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी पोल्ट्री फार्मचे शेड नुकसानग्रस्त झाल्याने शेकडो कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. घर संसार देखील भिजला गेला आहे. याच सिन्नरच्या पूर्व भागातून आढावा घेतला आहे.
0
0
Report
Advertisement

अमरावती बस स्टेशन के निरीक्षण के बाद निलंबन; अकोला स्टेशन में सफाई अभियान तेज

Akola, Maharashtra:राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अमरावती मध्यवर्ती बस स्थानकाला अचानक भेट देत तेथील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी बसस्थानक परिसरात अस्वच्छता आढळून आल्याने त्यांनी दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई केली. या कारवाईनंतर राज्यभरातील एसटी प्रशासनात खळबळ उडाली आहे.याच पार्श्वभूमीवर अकोला मध्यवर्ती बस स्थानकातही तातडीने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. बसस्थानक परिसर, फलाट, प्रवासी प्रतीक्षालय तसेच इतर भागांची साफसफाई करण्यात येत असून कर्मचाऱ्यांकडून विशेष लक्ष दिले जात आहे. अमरावतीत झालेल्या कारवाईची धास्ती घेत अकोला बसस्थानक प्रशासनाने ही मोहीम सुरू केल्याची चर्चा रंगू लागली आहे. मात्र ही स्वच्छता नियमित उपक्रमाचा भाग असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. तरीही मंत्र्यांच्या अचानक दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर बसस्थानक प्रशासन सतर्क झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
0
0
Report

पुणे में अवैध शराब विरोधी अभियान तेज, पुलिस ने कार्रवाई का ऐलान

Pimpri-Chinchwad, Maharashtra:अवैध मद्यविक्री आणि हातभट्ट्यांचे जाळे पूर्णपणे नष्ट करण्यासाठी पुणे शहर, ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड पोलीस प्रशासनाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात नुकतीच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात एक महत्त्वाची समन्वय बैठक पार पडली असून, यामध्ये अवैध दारूच्या व्यवसायावर कठोर कारवाई करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. भेसळयुक्त दारू आणि बेकायदेशीर हातभट्ट्या शोधून त्यावर तातडीने कारवाई करण्यात येईल. तसेच या मोहिमेची व्याप्ती वाढवण्यासाठी आता पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग एकत्रितपणे काम करणार आहेत.
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी में पूर्व मानसून: नदियों से गाद साफ, बाढ़ की आशंका कम

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रत्नागिरीकरांना मोठा दिलासा! पावसाळ्यापूर्वी नद्यांमधील गाळ उपसा पूर्ण; पूरप्रवण तालुक्यांना मिळणार दिलासा.. यंदाच्या पावसाळ्यात रत्नागिरी जिल्ह्यातील पूरप्रवण तालुक्यातील नद्या मोकळा श्वास घेणार आहेत कारण प्रशासनाकडून पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमधील गाळ उपसण्याचे काम आता पूर्णत्वास आले आहे.. दरवर्षी पावसाळ्यात नदीपात्रात गाळ साचल्यामुळे पाणी परिसरातील गावांमध्ये आणि शहरांमध्ये घुसत होते ज्यामुळे मोठे नुकसान व्हायचे. मात्र यंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वीच प्रशासनाने वेगाने पावले उचलत नद्यांमधील गाळ बाहेर काढला आहे.. नदीपात्र मोकळे झाल्यामुळे पाण्याचा निचरा वेगाने होईल आणि पूरस्थितीवर नियंत्रण मिळवणे सोपे जाणार आहे.. प्रशासनाच्या या यशस्वी कामगिरीमुळे नदीकाठच्या रहिवाशांना खूप मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्यावरील पुराचे संकट काहीसे सुसह्य होण्याची शक्यता आहे.
0
0
Report

कोल्हापुर बैलगाड़ी दौड़ में अजिंक्य कोपर्डेकर ने जीता पहला स्थान

Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरात पार पडलेल्या सतेज ऋतू केसरी भव्य बैलगाडी शर्यत स्पर्धेत पहिला क्रमांक लिंगनूरच्या अजिंक्य कोपर्डेकरांनी पटकावला. त्यांना महिंद्रा ट्रॅक्टर व निशान देऊन गौरविण्यात आलं. यासह विविध गटातील विजेत्यांना बक्षीस व निशान देऊन सन्मानित करण्यात आलं. कार्यक्रमास आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. बेंदूर सणानिमित्त या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत. याही वर्षी जिल्ह्यातील नेर्ली गावाच्या मैदानावर या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी भर उन्हात अलोट गर्दी केली होती.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top