icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

बीड़ में आजोबा नाती की भेट का दैदीप्यमान सोहळा, हजारों श्रद्धालु पहुंचे

Beed, Maharashtra:बीड शहरातील बिंदुसरेच्या तीरावर आजोबा नातीच्या भेटीचा दैदिप्यमान सोहळा.. भक्ती प्रेमाच्या आनंद सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी. Ac - बीड शहरातील बिंदुसरेच्या तीरावर आजोबा नातीच्या भेटीचा दैदीप्यमान सोहळा पार पडला.संत मुक्ताईचे आजोबा गोविंद पंत यांची बीडमध्ये समाधी आहे. आज संत मुक्ताई च्या पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर आजोबा गोविंद पंतांच्या समाधीजवळ संत मुक्ताईच्या पादुका देण्यात आल्या यावेळी मुक्ताईला साडी चोळीचा आहेर देण्यात आला. हा सोहळा पाहण्यासाठी बीड शहरातील नागरिक आणि मुक्ताई सोबत आलेले हजारो वारकरी आजोबा नातीच्या भेटीच्या सोहळ्याचे क्षण डोळ्यात साठवण्यासाठी गर्दी केली होती. संत गोविंद पंतांच्या समाधी मंदिराच्या वतीने मुक्ताईच्या पालखी सोहळ्याचा सन्मान करण्यात आला. संत ज्ञानेश्वर महाराज व भावंडांचे आजोबा गोविंद पंत याची बिंदुसरेच्या तीरावर समाधी आहे. गेल्या तीनशे वर्षांपासून आदिशक्ती मुक्ताईची पालखी बीड शहरातून पंढरीच्या दिशेने वाटचाल करत असताना हा आजोबा नातीच्या भेटीचा सोहळा मोठा प्रेमळ अंतकरणाने साजरा केला जातो. साडीचोळी भेट देऊन संस्थांच्या वतीने स्वागतही केलं जातं.त्यामुळे तीनशे वर्षाची अनोखी आजोबा नातीच्या भेटीची परंपरा अत्यंत प्रेमाने साजरी केली जाते मुक्ताई पालखी सोहळ्याचे प्रमुख रवींद्र महाराज हरणे यांनी सांगितले. बाईट- रवींद्र महाराज हरणे (पालखी सोहळा प्रमुख)
0
0
Report

श्रीगोंदा में रिश्ते के विवाद के कारण तलवार से हमला; हाथ कटे; 6 आरोपी गिरफ्तार

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगराच्या श्रीगोंदा तालुक्यात भावकीचा वाद उफाळून आला असून या वादात एकावर तलवारीने हल्ला करत त्याचे हाताचे पंजे तोडल्याचे गंभीर घटना घडली आहे...श्रीगोंदा येथील सुपेकर वस्तीवर हा धक्कादायक प्रकार घडला असून घुगल वडगाव येथील रोहिदास दांगडे हे गंभीर जखमी झालेत... रोहिदास दांगडे आणि त्यांच्या भावकीतील विक्रम दांगडे सागर दांगडे संग्राम दांगडे यांच्याशी गेल्या अनेक दिवसापासून वाद सुरू आहेत या वादातून यापूर्वी एकमेकांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत मात्र याच वादाच रूपांतर गंभीर हाणामारीत झाला असून यात रोहिदास दांगडे यांचे दोन पंजे आहेत या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलााय...रोहिदास दांगडे यांची मुलगी राधिका दांगडे हिने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार परशुराम दांगडे, अभयराज दांगडे , सागर उर्फ प्रदीप दांगडे दत्तात्रय दांगडे, विक्रम दांगडे , संग्राम उर्फ तात्याराम पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...विक्रम दांगडे या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे , तर इतर आरोपी फरार झाले आहेत...मागील भांडणाच्या कारणावरून हा प्रकार घडल्याची माहिती आहे...पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत。
0
0
Report

श्रीरामपूर में अपराध बढ़े: नेताओं ने पुलिस पर उठाए सवाल

Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील वाढत्या गुन्हेगारीवरून आता संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या बेमुदत बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले आणि राजकीय नेत्यांनी पोलिस प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गुन्हे करणारे हे केवळ मोहरे असून, या संपूर्ण गुन्हेगारी साखळीचा 'आका' कोण आहे, हे प्रशासनालाही माहिती असल्याचा दावा त्यांनी झी 24 तासाशी बोलतांना केला. मात्र, त्या सूत्रधाराचे नाव घेणे आमदारांनी टाळले. पोलिसांनी थेट त्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून कारवाई करावी, अशी मागणी केली. हिंदुत्वाच्या नावाखाली काही जण दोन नंबरचे व्यवसाय आणि गुन्हेगारीला संरक्षण देत असल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला. श्रीरामपूरात दोन-तीन टोळ्यांनी दहशत निर्माण केली असून, या विरोधातील बेमुदत बंद आणि आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आजी माजी आमदारांसह, माजी खासदारांनी दिला आहे. आंदोलन स्थळावरून आढावा घेत आजी माजी आमदार आणि माजी खासदारांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
0
0
Report
Advertisement

बारसे से पहले विवाहिता ने घर में फांसी लगा कर आत्महत्या कर दी

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर :- एक वर्षापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेने एक महिन्याच्या मुलीचे बारसे होण्यापूर्वीच राहत्या घरात छताच्या फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. अस्मिता प्रतीकसिंह काटकर (वय २३) असे तिचे नाव आहे. या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकी झाली असून राजारामपुरी पोलीस सध्या अधिक तपास करत आहेत. रविवारी सायंकाळी घडलेल्या घटनेने कुटुंबीयांचा नातेवाईकांना धक्का बसला आहे. मूळच्या आजरा तालुक्यातील लाटगाव तिथल्या अस्मिता यांचा वर्षभरापूर्वीच प्रतीकसीह काटकर त्यांच्याशी विवाह झाला होता. महिन्यापूर्वी अस्मिता यांची प्रसूती झाली होती. मुलीला एक महिना पूर्ण होत असल्याने घरात बाळाच्या बारशाची तयारी सुरू होती. रविवारी दुपारी सासू सासरे आणि पती कार्यक्रमासाठी हॉल ठरवण्यासाठी गेले होते, यावेळी अस्मिता यांनी छताला असलेल्या पंख्याला ओढणीने गळफास घेतला. काही वेळाने पती सासू-सासरे घराकडे परतले. पण आतून दरवाजा बंद असल्याने कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर दरवाजा तोडल्यानंतर अस्मिता यांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याचे दिसले. अस्मिता यांनी आपल्या लेकीला सोडून गळफास का घेतला ? याचा शोध राजारामपुरी पोलीस करत आहे。
0
0
Report

सोलापुर के मालशिरस में राजस्व विभाग की बड़ी कार्रवाई: सवा करोड़ रुपये कीमत की विदेशी शराब जब्त, दो गिरफ्तार

Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई करण्यात आली आहे. साळमुख चौकात उशिरा रात्री टाकलेल्या धाडीत तब्बल सव्वा कोटी रुपयांची अवैध विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माळशिरस पथकाने साळमुख चौकात सापळा रचला होता. यावेळी सांगोला मार्गे धुळेकडे जाणारा एक संशयित ट्रक अडवून त्याची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्याच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ ट्रकसह संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेल्या विदेशी दारूची अंदाजे किंमत सव्वा कोटी रुपये असल्याची प्राथमिक माहिती आहे. या कारवाईत ट्रकमधील दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. ही दारू नेमकी कुठून आणण्यात आली होती आणि ती कुठे पोहोचवली जाणार होती, याचा तपास राज्य उत्पादन शुल्क विभाग करत आहे.
0
0
Report
Advertisement

पश्चिम विदर्भ में बारिश की कमी से मेंढ़पालों की मुसीबत, हजारों पशु लौटने को तैयार

Washim, Maharashtra:पश्चिम विदर्भात पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांसोबतच मेंढपाळाच्या अडचणीही वाढल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने हजारो मेंढ्या-बकऱ्यांसह धनगर बांधवांचा परतीचा प्रवास ठप्प झाला आहे. सध्या त्यांचा वाशीम जिल्ह्यातील माळरानांवरच मुक्काम असून चारा, पाणी आणि इतर मूलभूत सुविधांसाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. बुलढाण्यात चांगला पाऊस पडून कुरणे हिरवीगार झाल्यानंतरच त्यांचा परतीचा प्रवास सुरू होणार असल्याने पावसाच्या प्रतीक्षेत मेंढपाळाच्या नजरा आकाशाकडे लागली आहे
0
0
Report

सुनेत्रा पवार ने जेजुरी पहुँचलकर घायल वारकरों से मुलाकात की; दुर्घटना की जानकारी ली

Rui, Maharashtra:उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जेजुरीत जाऊन जखमींची घेतली भेट... प्रशासनाशी सुनेत्रा पवार यांनी साधला संवाद..... सासवड जेजुरी मार्गावरील अपघाताची घेतली माहिती..... ग्रामीण रुग्णालयात जाऊन सुनेत्रा पवार यांनी घेतली माहिती.... आज माऊलींच्या वारीत सासवड ते जेजुरी मार्गावर बेलसर फाट्या नजीक एका टेम्पोची धडक बसून तीन महिला वारकरी यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती विकास पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जेजुरी ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली आहे. सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाशी संवाद साधत या अपघाताची माहिती घेत जखमींना आवश्यात ते उपचार करण्यात यावेत अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
0
0
Report
Advertisement

कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार किसानों के मुद्दे उठा रहे, दुष्काळ और कर्ज माफी पर आरोप

Nagpur, Maharashtra:नागपूर विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते. समाजाची एकजूट करणे आणि हक्क मिळवणे हा प्रश्न आहे.. शेतकऱ्याचे प्रश्न निर्माण झाले, कर्जमाफीचा पत्ता नाही, शेतकरी यांचे बियाणं न उगवल्यानं हाल होत आहे. शेतकरी चिंतेत आहे... 3 ऑगस्ट 9 ऑगस्ट मंडल यात्रा होईल...यात शेतकरी प्रश्न मांडून जनजागृती करू... On लाडकी बहीण लाभार्थी कमी झाले निवडणुका होत्या तेव्हा सरसकट बहणीना दिले, आता अटी शर्ती लावण्याचे पाप सरकारने केलं. कर्जमाफीत इन्कम टॅक्स अट लावली... यात लाखो शेतकरी वगळण्याचा डार्हा आहे... अंगणवाडी सेविका, कंत्राटी काम करणारे शेतकरी आहे, पोराने फॉर्म 16 भरला म्हणून यात त्याचे नाव वगळेंले जाईल, शेतकरी यांना काही फायदा होणार नाही... पुन्हा मतदानासाठी जेव्हा सत्ताधारी जाईल तेव्हा महिला मतदान करताना जाब विचारेल, लाडकीचे नाव कमी केले रेवडी वाटायला पैसे आहे.... कोटीच्या जमिनी देतात, निवडणुका संपल्या म्हणून मस्तीत असल्या प्रमाणे सत्ताधारी वागत आहे... On गिरीश महाजन दाराडेचा पराभव का झाला हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांची मैत्री युती आहे. त्यामुळे एकमेकांना पाडण्याचे काम करत आहे... On मुंबई SRA SRA मध्ये गोंधळ आहे... चौकशी झाली तर मुंबईत चार पाच लाख कोटींचा घोटाळा बाहे येईल, पुण्यात TDR घोटाळा झाला, 5 हजार कोटींचा घोटाळा आहे... सरकारी जागेचा TDR घेतला, मुंबइ जुहूत सत्ताधारी पक्षाचा आशीर्वादाने SRA सुरू आहे, पैसे कमावण्याचा सत्ताधारी यांचा धंदा आहे... ON पाऊस नाही दुष्काळ अल निनोचा पाऊस कोकणात झाला, विदर्भ मराठवाडा बेल्टमध्ये चिंतेचे वातावरण आहे..लावलंल जे उगवलं ते जाणार आहे.. दुबारसाठी सरकारने तातडीने व्यवस्था करावी, तरच शेतकरी वाचेल, प्रचंड कोरडा दुष्काळ असेल.. सरकारचे यावर चिंतन बैठक नाही, हे दुर्दैव आहे... विधानसभेत बियाण्यासाठी विचारले, मंत्र्यांनी सांगितलं कारवाई करू, काय कारवाई करते याकडे लक्ष आहे... बियाण्यासाठी बैठक लावून, शेतकरी आणि लोकप्रतिनीधी यांना बोलावून बैठक घ्यावी, निवेदन दिले, यात आम्ही शेतकरी यांची भेट घेऊ दौरा करू, बियाणे घेतले, त्याच्यावर कारवाई करा, शेतकरी यांच्या पाठीशी उभे राहू... ON पाऊस तूट पाऊस नाही, यावर्षी अल निनोचा प्रभाव दर्शवला आहे...कमी पावसात कोणतं बियाणे घ्यावे, यावर सरकारने काम केले पाहिजे होते... जे पर्याय द्यायला पाहिजे होते, या संकटातून कसे सावरायचे हे सरकारने सांगावे.. ON चंद्रपूर वाद मनपा मला माहित नाही, निवडला गेलेला नेता, स्थानिक नेते पाहत बसतील. ON एकनाथ खडसे सध्या महाराष्ट्रात भाजपात धुसफू सुरु आहे. मुख्यमंत्री दिल्लीत जाणाऱ्या चर्चेमुळे त्यामुळे मोकळ्या मैदान कसे खेळायचे यासाठी दुसरा गट सक्रिय झाला आहे.... त्यासाठी दुसरा गट सक्रिय झाला असावा असं वाटते त्याबद्दल मला माहित नाही... On खडसे - महाजन पूर्वी महाजन म्हणत होते खडसेंना कसे घेतात मी पाहीन? आता म्हणतात मी रोखलेल नाही. काही ना काही गडबड नक्की आहे... वरून आकाचा आदेश आल्यावर हे काय कोणाचा बाल बाका करतील. On वारकरी अपघात वारकऱ्यांना पैसे देतो पाणी देतो म्हणून निवडणुकीच्या तोंडावर सांगून घोषणा करण्यात आल्या... आज वारकऱ्यांना अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे₹ सुरक्षेच्या प्रश्न आहे वारकऱ्यांचे हाल होत आहे. मी स्वता वारीत जाणार आहे.. काय परिस्थिती असेल ते पाहणार आहे. दरवर्षी निघणाऱ्या वारी आणि वारकरी संप्रदाय या संदर्भात सरकारच्या तोकड्या व्यवस्था आहे. हे आता लपून राहिलेलं नाही...त्यामुळे अशा पद्धतीचे घटना घडत आहे...
0
0
Report

नाशिक के ग्रामीण क्षेत्र में बारिश से किसानों की चिंता बढ़ी; तुषार सिंचन निर्भरता बढ़ी

Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह येवला तालुक्यात पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. जून महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी मका, सोयाबीन, बाजरी, मूग यासह विविध खरीप पिकांची पेरणी केली. पिके उगवू लागली आणि चांगली वाढही सुरू झाली. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे पिकांसमोर पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकरी विहिरीतील साठवलेल्या पाण्याच्या आधारावर तुषार सिंचन करून पिके जगवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र हा पर्यायही मर्यादित असून, लवकरच दमदार पाऊस झाला नाही तर खरीप हंगाम धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे या संदर्भात थेट शेतकऱ्याच्या बांधावरून आढावा घेतला आहे
0
0
Report
0
0
Report
Advertisement

28 साल से डॉक्टर बनकर दिखाने वाला नकली डॉक्टर गिरफ्तार, 10 करोड़ का घोटाला

Mumbai, Maharashtra:मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-१ ने तब्बल २८ वर्षांपासून स्वतःला डॉक्टर म्हणून सादर करणाऱ्या एका तोतया डॉक्टराला अटक करत मोठा गैरप्रकार उघडकीस आणला आहे. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईत आरोपी बनावट ओळखपत्रे, पॅन कार्ड, व्हिजिटिंग कार्ड आणि विविध संस्थांची बनावट प्रमाणपत्रे वापरून डॉक्टर असल्याचा बनाव करत असल्याचे समोर आले. प्राथमिक तपासात आरोपीने विविध बँकांमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे खाती उघडून साथीदारांच्या मदतीने मागील तीन वर्षांत सीएसआर फंडाच्या माध्यमातून सुमारे १० कोटी रुपयांचा अपहार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. आरोपीच्या घरातून महाराष्ट्रासह इतर राज्यांतील व्यक्ती आणि कंपन्यांच्या नावांची कागदपत्रे, प्रोजेक्ट रिपोर्ट तसेच वैद्यकीय उपचारासाठी वापरले जाणारे साहित्यही जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे या गैरव्यवहाराचे जाळे अनेक राज्यांमध्ये पसरल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमे, वैद्यकीय व्यवसाय अधिनियम आणि राष्ट्रीय चिकित्सा आयोग अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून गुन्हे शाखेकडून त्याच्या इतर साथीदारांचा आणि आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास सुरू आहे.
0
0
Report

धनज बुद्रुक में तहसील कार्यालय शुरू करने की मांग पर वाशीम में बड़ा प्रदर्शन

Washim, Maharashtra:वाशीम : वाशीमच्या कारंजा लाड तालुक्यात प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालय कामरगावऐवजी धनज बुद्रुक येथेच सुरू करावे,या मागणीसाठी धनज बुद्रुक येथे ग्रामस्थांनी आंदोलन केले.बसस्थानक चौकात घोषणाबाजी करत शासनाचा निषेध करण्यात आला. धनज बुद्रुक हे प्रशासकीय व भौगोलिक दृष्ट्या सक्षम केंद्र असल्याने कार्यालय येथेच सुरू करण्याची मागणी करण्यात आली. मागणी मान्य न झाल्यास चक्काजामसह तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. तसेच हस्ताक्षर अभियान सुरू असून,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top