icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

हुतात्मा शक्कर कारखाने के अध्यक्ष के अधिकार छीन, आंदोलन तेज

Sangli, Maharashtra:स्लग - हुतात्मा साखर कारखान्याच्या अध्यक्ष वैभव नायकवाडी यांचे अधिकार काढले ! अँकर - सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या हुतात्मा साखर कारखान्याच्या अध्यक्षां विरोधातील आंदोलन 17 व्या दिवशीही कायम आहे. हुतात्मा साखर कारखान्यासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनाच्या ठिकाणीच संचालक मंडळ व सभासदांची बैठक पार पडली, ज्यामध्ये अध्यक्ष वैभव नायकोडे यांचे सर्व अधिकार काढून घेण्याचा ठराव करण्यात आला आहे. ठरावाची प्रत कारखान्याच्या उपाध्यक्षांकडे देण्यात आली आहे. कारखान्यामध्ये अध्यक्ष वैभव नायकवडींकडून मोठा भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप करत अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा,या मागणीसाठी सभासदांचं हुतात्मा साखर कारखान्यासमोर गेल्या 17 दिवसांपासून आंदोलन सुरू असून राजीनामासाठी आता अधिक तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
0
0
Report

सांगली महापालिका 100 करोड़ के कर्जरोख से शहर विकास को नई रफ्तार देगी

Sangli, Maharashtra:सांगली महापालिका कर्जरोख्यातून उभारणार 100 कोटींचा निधी. सांगली महापालिका कर्जरोख्यातून शंभर कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. यासाठी सांगली महापालिकेकडून मर्चंट बँकर व सीएचए नियुक्ती करण्यात येणार आहे, महापालिकेच्या आयुक्त संजीता महापात्रा यांनी हे माहिती दिली आहे. महापालिकेच्या अंतिम अर्थसंकल्पामध्ये 100 कोटी रुपयांचे कर्जरोख काढण्यात येणार असल्याचं सांगण्यात आले आहे. असून कर्जरोख्यांच्या माध्यमातून सांगली शहराच्या विकास कामांबरोबर महापालिकेच्या उत्पन्न वाढीचे उपक्रम राबवण्यात येणार असल्याचा स्पष्टण्यात आले आहे.
0
0
Report

कल्याण पश्चिम के रिवर व्यू क्लासीक इमारत में एसी ब्लास्ट से आग, कोई हताहत नहीं

Kalyan, Maharashtra:कल्याण पश्चिम ऋतू रिव्हर व्ह्यू क्लासीक इमारतीच्या पाचव्या मजल्यावर सकाळच्या sुमारास आगी लागल्याची घटना घडली. हॉल मध्ये एसीचा स्फोट होऊन ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घराला लागलेल्या आगीचे लोट इतके भीषण होते की आग सहाव्या मजल्यापर्यंत जाऊन पोहोचली. दरम्यान आगीत घराचे मोठं नुकसान झाले आहे. या आगीत दोन फ्लॅटचे नुकसान झाले आहे. आग लागली यावेळी हॉलमध्ये कोणी नसल्याने कोणतीही जीवितनाही झाली नाही. अग्निशामक विभागाला याची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले, मात्र इमारतीमध्ये अग्नी रोधक यंत्रणा सुरू असल्याने नागरिकांनी आग विझवली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
0
0
Report
Advertisement

कोल्हापूर के 13 गावों में जलयोजना पर विरोध, महिलाएं मोर्चा निकालकर वितरण की मांग

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील 13 गावांच्या पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. योजना अपूर्ण अवस्थेत असल्याचा आरोप करत संतप्त महिलांनी आज कोल्हापूर जीवन प्राधिकरण कार्यालयावर घागर मोर्चा काढला. या गावांना पाच ते सहा दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं महिलांनी सांगितलं. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी महिलांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी आणि शंखनाद करत तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. दरम्यान, या आंदोलनाचा आढावा घेत आंदोलनात सहभागी झालेल्या महिला आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.
0
0
Report

अहिल्यानगर में भीषण जलसंकट: Imampur समेत कई गांवों में पानी टैंकरों की मांग तेज

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यात उन्हाच्या तीव्रतेमुळे अनेक गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. सध्या शासनाकडून 25 गाव आणि 125 वस्त्यांवर 20 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. शहराजवळ असलेल्या इमामपूर या गावांमध्ये पाण्याची मोठी समस्या असून शासनाकडून टँकरच्या दोन फेऱ्या गावासाठी मिळतात... पाण्याचा टँकर हौदात सोडल्यानंतर पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे शासनाच्या जलजीवन मिशन योजनेच काम गावांमध्ये झालेलं असताना थेंब भरही पाणी या योजनेतून गावामध्ये आलेलं नाही इमाम पुढच्या तीव्र पाणीटंचाई बाबत सरपंच आणि महिलांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे
0
0
Report
Advertisement

चना-तूर खरीद की मुदत बढ़ी, किसानों को राहत; अमरावती सहित विदर्भ में तारीखें बढ़ीं

Amravati, Maharashtra:अखिर चणा व तूर खरेदी प्रक्रियेला मुदतवाढ; २९ मे पर्यंत तूर तर ३१ मे पर्यंत चणा खरेदीला दिली मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा अँकर :- केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या चणा व तूर खरेदी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. चणा खरेदीची मुदत आता २९ मे पर्यंत वाढवण्यात आली आहे तर तूर खरेदीची मुदत ३१ मे पर्यंत वाढविण्यात आली आहे. या निर्णयामुळे अमरावती जिल्ह्यातील सुमारे १० हजार नोंदणीकृत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून तांत्रिक कारणांमुळे चणा खरेदी प्रक्रिया काही काळ थांबली होती सध्या विदर्भ मार्केटिंग फेडरेशनकडे ११,३५० शेतकऱ्यांची नोंদणी झाली होती मात्र आतापर्यंत फक्त ६,२४५ शेतकऱ्यांकडूनच खरेदी झाली. त्यामुळे सुमारे ५,१०५ शेतकरी खरेदीच्या प्रतीक्षेत राहिले आहे. जिल्हा मार्केटिंगच्या सात केंद्रांमध्ये ८,३०० शेतकऱ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी फक्त ३,१८० शेतकऱ्यांकडून चणा व तूर खरेदी करण्यात आली. दरम्यान आता या तूर आणि चना खरेदीला मुदतवाढ दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
0
0
Report

धाराशिव के आंदोरा ग्रामपंचायत में करोड़ों भ्रष्टाचार के आरोप, जांच की मांग

Dharashiv, Maharashtra:धाराशिव आंदोरा ग्रामपंचायतीत लाखोंचा भ्रष्टाचार. दलित वस्ती सुधार योजनेतील कामांमध्ये घोटाळा काम न करताच बिले उचलल्याचा गंभीर आरोप. प्रशासनाकडे पुराव्यांसह तक्रार. उच्चस्तरीय चौकशी आणि दोषींवर कारवाईची मागणी धाराशीव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील आंदोरा ग्रामपंचायतीत लाखों रुपयांचा भ्रष्टाचाराच झाल्याची बाब समोर आली आहे. दलित वस्ती सुधार योजना आणि पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून प्रत्यक्ष काम न करताच बिले उचलल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. भाजप नेते पीजी तांबारे यांनी पुराव्यांसह प्रशासनाकडे लेखी तक्रार केली आहे. आंदोरा ग्रामपंचायतीत गेल्या तीन वर्षांत करण्यात आलेल्या विकास कामांमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. रस्ते, गटार आणि इतर विकास कामे केवळ कागदावर दाखवून निधीचा अपहार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. रोहीदास नगर परिसरातील काही कामे प्रत्यक्षात न करताच बिले काढल्याचा आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. या प्रकरणात ग्रामपंचायत प्रशासन, सरपंच आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताचाही आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, आरोप समोर आल्यानंतर काही ठिकाणी घाईघाईत कामे सुरू करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
0
0
Report

शिर्डी में गजरा विक्रेते ने साई भक्तों को ठगा, पुलिस ने कारवाई शुरू

Shirdi, Maharashtra:शिर्डी साईभक्तांची फसवणूक थांबेना... साईदर्शनासाठी आलेल्या मुंबईच्या भाविकाला गजरा विक्रेत्याचा गंडा... 200 रुपयांचा गजरा थेट 2 हजारांना विकल्याचा भाविकाचा आरोप... साई मंदिराच्या द्वारकामाई परिसरातील प्रकाराने खळबळ... भाविकाची साई संस्थानकडे धाव... शिर्डी नगरपालिका आणि मंदिर सुरक्षा विभाग अॅक्शन मोडमध्ये... शहराचे उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी नगरपालिका में गजरा विक्रेत्याला धरलं धारेवर... संबंधित विक्रेत्याविरोधात कारवाई सुरू... साईनगरीची बदनामी सहन करणार नाही , लोकप्रतिनिधींचा संताप... भाविकांची फसवणूक करणाऱ्यांवर कायमस्वरूपी बंदीचा बडगा...
0
0
Report
Advertisement

तेलंगाणा सरकार ने अवैध कमान से पोडसा पुल बंद किया, चंद्रपुर-हैदराबाद मार्ग ठप

Chandrapur, Maharashtra:चंद्रपुर जिले के गोंडपिपरी तालुक्यात तेलंगणा राज्य को जोडने वाले पोडसा पुल का मार्ग तेलंगणा सरकार ने अवैध लोहे की कमान बनाकर बंद कर दिया है. चंद्रपुर से हैदराबाद जाने वाले इस शॉर्टकट मार्ग पर अब केवल छोटी गाड़ियाँ जा सकेंगी, जिससे वाहनधारकों को समय और ईंधन दोनों का नुकसान उठाना पड़ रहा है. वर्धा नदी पर बने इस पुल की निर्माण सार्वजनिक निर्माण विभाग और तेलंगणा राज्य ने संयुक्त रूप से किया था. सीमा के दोनों तरफ पुल के अचानक बंद होने से रुग्णवाहिका और व्यापारिक परिवहन प्रभावित हुआ है. एक तरफ मार्ग बंद है, पर 30 किलोमीटर के राउंड से मुख्यमार्ग पर भी अव्यवस्थित यातायात के कारण यहाँ आवागमन प्रभावित है. इस निर्णय के खिलाफ पोडसा ग्रामपंचायती ने मुख्यमंत्री को तत्काल पुनर्विचार के लिए पत्र लिखा है और रास्ता सुचारु न हो तो हाईकोर्ट जाने की चेतावनी दी है. तेलंगणा सरकार से लोहे की कमान हटाने की मांग की गई है.
0
0
Report

रांजणगाव में शादी का झांसा देकर दो युवतियों के साथ दुष्कर्म

Shirur, Maharashtra:रांजणगावात लग्नाच्या आमिषाने दोन युवतींवर अत्याचार, दोन्ही आरोपींवर गुन्हे दाखल ANC.. राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र असताना़च पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव येथे दोन वेगवेगळ्या युवतीांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सागर रंधवे आणि सतीश हरीनखेडे या दोघांविरोधात रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोनन्ही आरोपींनी संबंधित युवतीशी ओळख वाढवत विश्वास संपादन केला आणि लग्नाचे आश्वासन देत वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पीडित युवतींनी दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हे दाखल करत तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे रांजणगाव परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत. प्रतिनिधी हरमन चापुडे झी मिडीया रांजणगाव पुणे...
0
0
Report
Advertisement

चंद्रपुर में छत्तीसगढ़ी महिला ट्रक से कुचली, सड़क हादसों पर उठा विरोध

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपूर शहरात सुरूच आहे अपघातांची मालिका, रोजमजुरी कामावर सायकलीने जाणाऱ्या छत्तीसगढी महिलेला मालवाहू ट्रकने चिरडले, शहरातील बंगाली कॅम्प चौकात तणाव अँकर:-- चंद्रपूर शहरात अपघातांची मालिका सुरूच आहे. चंद्रपूर -नागपूर मार्ग असो वा गडचिरोली- बल्लारपूर मार्ग या सर्वच मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक शहरवासीयांच्या मुळावर उठली आहे. कालच दोन वेगवेगळ्या घटनात दोन मृत्यू झाल्यानंतर आज सकाळी शहरातील अतिव्यस्त बंगाली कॅम्प चौकात सायकलीने रोज मजुरी करण्यासाठी जाणाऱ्या छत्तीसगढी महिलेला मालवाहू ट्रकने चिरडले. यात या महिलेचा जागीच मृत्यू झाला. रोज शहरातील अतिव्यस्त चौकांमध्ये वाढणारे अपघात नागरिकांच्या चिंतेचा विषय ठरले आहेत. शहराला वळण मार्गाची गरज असताना यापूर्वी योजनेत असलेले वळण मार्ग रद्द करून जिल्हा प्रशासनाने घोडचूक केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे मनपातील विरोधी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी जिल्हा प्रशासन व पोलिसांनी याची दखल घ्यावी अशी मागणी केली आहे. वळण मार्ग नव्याने निश्चित करून कामाला सुरुवात न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान या चौकात अपघातानंतर वाहतुकीची कोंडी झाली असून परिसरात तणाव निर्माण झाला आहे
0
0
Report

भीमाशंकर मंदिर 31 मई से दर्शन के लिए खुलेगा

Shirur, Maharashtra:भीमाशंकर मंदिर हे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असून भाविकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्य सभामंडपाच्या पुनर्बांधणीसह विविध सुरक्षा आणि सुविधा विकासकामांसाठी बंद ठेवण्यात आलेले भीमाशंकर मंदिर ३१ मे पासून पुन्हा दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार मंदिर परिसरात गर्दी व्यवस्थापन आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी व्यापक कामे हाती घेण्यात आली होती. सुरुवातीला ९ जानेवारीपासून तीन महिन्यांसाठी मंदिर बंद ठेवण्याचे नियोजन होते; मात्र कामांच्या प्रगतीनुसार ही मुदत वाढवून ३१ मे पर्यंत करण्यात आली. तब्बल साडेचार महिन्यांनंतर भीमाशंकर मंदिर पुन्हा खुले होणार असल्याने राज्यभरातील भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, येत्या काळात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top