icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

पहली बारिश में चिपळुण-रत्नागिरी नदी किनारे मासेमारी का उत्साह चरम पर

Ratnagiri, Maharashtra:चिपळूण-रत्नागिरी.. पहिल्याच पावसात नदीकाठी ‘मासेमारी’चा आनंद.. गळाने मासे पकडण्यासाठी शौकिनांची गर्दी!.. पहिल्याच पावसाच्या आगमनाने निसर्गाला नवा बहर आला असताना, नदीकिनाऱ्यावर मात्र एका वेगळ्याच उत्साहाची गर्दी पाहायला मिळत आहे.. पाऊस सुरू होताच नदीला नवीन पाणी आले असून, हे गोडं पाणी नदीच्या पात्रात मिसळताच मासे पकडण्यासाठी शौकिनांनी नदीकाठी एकच गर्धी केली आहे.. ग्रामीण भागात या पहिल्या पावसाच्या मासेमारीची मोठी क्रेझ असते.. शेतीच्या कामांची लगबग सुरू होण्यापूर्वी नदीकाठची ही पारंपरिक मासेमारी सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Advertisement

सोलापुर के जलापूर्ति व जलशुद्धीकरण प्रकल्प की पूर्ति के लिए मंत्री गोरे ने वरिष्ठ अधिकारियों से बैठक की

Solapur, Maharashtra:सोलापुरातील पाणीपुरवठा, बससेवा, आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या आहेत. मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी राज्याचे नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव के. एच. गोविंदराज यांची भेट घेत सोलापूरच्या विविध प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूर शहरावर विशेष प्रेम असून विकासाचा कोणताही प्रकल्प रखडू नये यासाठी मंत्री जयकुमार गोरे यांनी देखील वैयक्तिक लक्ष घातले आहे त्यामुळे विकास प्रकल्प न रखडता त्यांना गती मिळेल असा विश्वास आमदार देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केलाय.
0
0
Report

MIDC के तीन गाँवों के लिए हेक्टेयर दरें तय, गवळी शिवरा में सबसे ऊँची

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरच्या प्रस्तावित आरापूर एमआयडीसीकरिता संपादित करण्यात येणाऱ्या तीन गावांतील जमिनीसाठी मोबदल्याचा दर स्वतंत्र देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ३० जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी मुख्यालयास नवीन दर प्रस्तावित करण्यात आले आहेत. सर्वाधिक दर गवळी शिवरा गावासाठी ६२ लाख ८८ हजार ५६७ रुपये प्रति हेक्टर प्रस्तावित आहे. गवळी शिवरा येथील मागील वर्षात संकलित केलेल्या खरेदी-विक्री व्यवहाराच्या सरासरीनुसार मावेजाचे प्रति हेक्टरी ६२ लाख ८८ हजार ५६७रुपये दर प्रस्तावित केले आहे, तर सुलतानाबादसाठी प्रति हेक्टरी ६० लाख ८८ हजार ५६७ रुपये आणि आरापूरकरिता प्रति हेक्टरी ५७ लाख ८९ हजार ६०० रुपये दर प्रस्तावित करण्यात आल्याचे सांगितल्या जातंय.
0
0
Report
Advertisement

कल्याण-डोंबिवली में भारी बारिश, जलजमाव से जनजीवन बाधित; आज भी मुसलाधार बरसात

Kalyan, Maharashtra:कल्याण-डोंबिवलीत पावसाची संततधार कायम; मध्यरात्रीनंतर दिलासा, तरीही रिमझिम सुरूच! गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने कल्याण-डोंबिवलीत जनजीवन विस्कळीत केले. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भाग आणि रस्त्यांवर पाणी साचले होते. मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने साचलेल्या पाण्याचा निचरा झाला. मात्र आजही शहरात ढगाळ वातावरण असून रिमझिम पाऊस सुरूच आहे. अधूनमधून पावसाचा जोर वाढत असून पावसाचा जोर दिवसभर कायम राहिला तर आज पुन्हा सखल भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे
0
0
Report

शालार्थ आईडी घोटाले में 160 करोड़ की फर्जीवाड़े का खुलासा

Nashik, Maharashtra:शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासाने वेग पकडला असून १६ संशयित आरोपींविरुद्ध ११ हजार पानांचे प्राथमिक दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. २०१४ पासून बोगस शिक्षक भरती दाखवून शासनाची १६० कोटींची फसवणूक झाली असल्याचे आतापर्यंत सिद्ध झाले आहे एफआयरमधील ८२१ संशयितांची चौकशी सुरू आहे. यातील काहींची प्राथमिक चौकशी करण्यात आले असून, फसवणुकीचे पाळेमुळे खोदून काढले जात आहे. लवकरच या प्रकरणात एक, दोन बडे मासे गळाला लागणार असण्याची शक्यता आहे. एकाच जावक क्रमांकाचा वापर करून वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाने बोगस शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याचे उघड झाले आहे. तपासादरम्यान उपलब्ध कागदपत्रांमध्ये गंभीर विसंगती आढळून आली असून, अधिकृत नोंदींमध्ये फेरफार झाल्याचा संशय बळावला आहे. विशेष म्हणजे, एकाच अधिकृत आदेशाखाली भिन्न नावांचे संच नोंदविण्यात आल्याचे दिसून आले असून, २०१३ ते २०२६ या कालावधीत बनावट कागदपत्रांच्या आधारे शेकडो बोगस शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे नियमबाह्य शालार्थ आयडी तयार करून शासकीय तिजोरीची लूट करण्यातआल्याचे तपासात उघड झाले आहे. घोटाळा उघडकीस आल्यानंतर पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील १५० hून अधिक शिक्षकांची मान्यता रद्द करून त्यांचे पगार तातडीने थांबवण्यात आले आहेत. तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून संदीप मिटके यांच्याकडे स्वतंत्रपणे वर्ग करण्यात आल्यानंतर तपासाला गती मिळाली आहे. याप्रकरणी माजी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी, नितीन बच्छाव आणि बी. डी. चव्हाण यांच्यासह अनेक संस्थाचालक आणि शिक्षकांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top