icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

उल्हासनगर में जीन्स पार्सल कर्मियों पर लाकड़ी डंडों से हमला, CCTV में कैद

Ambernath, Maharashtra:उल्हासनगरातून मारहाणीची घटना समोर आली आहे. जीन्स पार्सल व्यवसाय करणाऱ्या दोन भावांवर काही जणांनी लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात एका भावाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. माल उचलण्याच्या पैशांच्या वादातून ही मारहाण झाल्याची माहिती समोर येत असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. उल्हासनगर-5 परिसरातील स्वामी शांती प्रकाश स्कूलजवळ जीन्स पार्सल व्यवसाय करणाऱ्या दोन भावांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. कपिल पारवाणी आणि मनीष पारवाणी हे दोघे भाऊ जीन्स फॅक्टरीमध्ये पार्सल डिलिव्हरीचे काम करतात. माहितीअनुसार, काही दिवसांपूर्वी आरोपी मुस्ताक, हरदीप आणि त्यांच्या अन्य दोन साथीदारांचा पारवाणी बंधूंसोबत माल उचलण्याच्या पैशांवरून वाद झाला होता. कंपनीमधून जास्त पैसे देऊन माल का उचलता, कमी पैशात माल आम्हालाच मिळाला पाहिजे, असा दबाव आरोपींकडून टाकला जात होता. मात्र पारवाणी बंधूंनी भावताव करण्यास नकार दिल्याने आरोपी संतप्त झाले.यानंतर आरोपींनी लाकडी दांडके घेऊन दोन्ही भावांवर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात मनीष पारवाणी यांच्या डोक्यावर गंभीर मार लागला असून ते गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही भावांना बेदम मारहाण करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.विशेष म्हणजे हा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेनंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
0
0
Report

लातूर के स्पेशल क्लास से NEET पेपरफुटी पर नया खुलासा

Latur, Maharashtra:लातूरमधील कथित ‘स्पेशल क्लास’ आता चर्चेच्या केंद्रस्थानी... NEET पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट... लातूरमधील कथित ‘स्पेशल क्लास’ चर्चेत... शिक्षणाची पंढरी लातूर पुन्हा चर्चेत.. तपासातून नवे धागेदोरे समोर येण्याची शक्यता... NEET पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात आता नवे नवे खुलासे समोर येत आहेत. लातूरमधील कथित ‘स्पेशल क्लास’ आता चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. कोचिंग क्लासच्या नावाखाली काही आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबांतील विद्यार्थ्यांसाठी वेगळे क्लास भरवले जात होते अशी माहिती आता CBI तपासात समोर आली आहे. शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या लातूरचं नाव आता NEET पेपरफुटी प्रकरणामुळे चर्चेत आलं आहे.या प्रकरणाच्या तपासात आता कथित पी. व्ही. कुलकर्णी यांच्या ‘स्पेशल क्लास’ची माहिती समोर येत आहे. डॉक्टरांच्या मुलांसह काही विद्यार्थ्यांसाठी आणि मोटेगावकर याच्या मुलांसाठी खासगी ठिकाणी ‘स्पेशल क्लास’ घेतले जात असल्याची माहिती तपासात पुढे येत असल्याने खळबळ उडाली आहे. वैभव बालकुंदे रिपोर्टर या कथित स्पेशल क्लासमध्ये विद्यार्थ्यांकडून स्पेशल क्लाससाठी प्रत्येकी तब्बल ५ लाख रुपये फी घेतली जात असल्याचीही माहिती समोर आली आहे. दररोज प्रश्न सोडवून घेणे, रिव्हिजन घेणे आणि दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी हे क्लास चालवले जात असल्याची माहिती तपासात पुढे येत असल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे लातूर शहरासह जिल्ह्यातील अनेक डॉक्टर CBI च्या यंत्रणेच्या रडारवर असल्याची माहिती आहे. दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी असे वर्ग चालत होते काय?याचाही तपास सध्या CBI कडून केला जात आहे... या प्रकरणात काल CBI ने एका नामांकित खासगी हॉस्पिटलवर छापा टाकत त्या डॉक्टर आणि मुलाची चौकशी केली आहे. त्या डॉक्टरांचा मोबाईलची आता जप्त करून फॉरेन्सिक लॅबला डिलीट केलाला डाटा पुन्हा मिळवण्यासाठी पाठवला आहे. त्यामुळे आता NEET पेपरफुटी तपासातील प्रत्येक नव्या घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे....
0
0
Report
Advertisement

नीट पेपर अटक पर सीबीआई ने तेज़ कार्रवाई, सिस्टम में बड़े सुधार की मांग

Nagpur, Maharashtra:नागपूर – अशोक चव्हाण (भाजप नेता) ने नीट पेपर अटक की घटना को बेहद गंभीर बताते हुए कहा कि देशभर में होने वाली नीट परीक्षाओं से जुड़ी यह घटना विद्यार्थियों को मानसिक तनाव और उनके जीवन पर बड़ा आघात दे सकती है। सीबीआय ने मामले की गति से जांच शुरू कर दी है और जो भी जिम्मेदार होगा उसे खोजकर पनिश किया जाएगा। यह लगभग तीसरी घटना है, इसलिए शिक्षण व्यवस्था में अमूलाग्र परिवर्तन की जरूरत है ताकि लाखों छात्र जो परीक्षा देते हैं, उनकी सुरक्षा बनी रहे। ऑनलाइन परीक्षा की नई तिथि की घोषणा केंद्र सरकार ने की है ताकि छात्रों के नुकसान को रोका जा सके। एक बड़े रैकेट के होने का आरोप भी लगाया गया है जिसमें तकनीकी दुरुपयोग से परीक्षाओं के प्रश्न बनते-उलटते हैं और छात्र प्रभावित होते हैं; कॉपी बनाने में मदद करने वाले संस्थानों की भी जांच की जाएगी। कॉपी प्रकरण में कई जिल्हाधिकारियों ने अच्छा काम किया है, लेकिन कुछ जगहों पर हस्तक्षेप के कारण हालात बिगड़ते दिखते हैं इसलिए इस संपूर्ण शिक्षण प्रणाली में सुधार की मांग है। महाविकास आघाड़ी नेता आयोग से मुलाकात पर टिप्पणी नहीं। शरद पवार के बारे में कहा गया है कि वे अनुभवी नेता हैं और उन्होंने व्यवहारिक वक्तव्य दिए हैं ताकि भारत की स्थिति में सुधार हो सके। युद्ध-जन्य परिस्थितियों के कारण सामान्य आदमी का बजट प्रभावित हो रहा है और महँगाई कम नहीं हो रही है। मराठवाडा में ईंधन की कमी से शॉर्टेज बना है; रूस-आर्थिक घटनाक्रमों के कारण वैकल्पिक रास्ते देखने की जरूरत है। दोनों राष्ट्रवादी पार्टियाँ एकत्र आने के बारे में कुछ शुरूआती संकेतों के साथ चिंतित नहीं, बल्कि सकारात्मक रूप से देखते हैं। कांग्रेस के नेताओं के बारे में कहा गया कि उनका काम दिशाहीन लग रहा है और विपक्षी दलों से मिलने की संभावना बनी हुई है। मुंबई की झोपड़पट्टी में अतिक्रमण के मुद्दे को नियमित कार्रवाई के तौर पर सही माना गया है और महापालिका ने इसे आगे बढ़ाने की बात कही है।
0
0
Report

NEET पेपरफुटी केस में CBI की गिरफ्त तेज, लातूर ट्यूशन एरिया पर नया शिकंजा

Latur, Maharashtra:NEET पेपरफुटी प्रकरणात दिवसेंदिवस आवळतोय तपासाचा फास... CBI एक्शन मोडवर... लातूर ट्युशन एरिया पुन्हा चर्चेत... विद्यार्थी, पालक, डॉक्टर, स्पेशल क्लास CBI तपास अनेक दिशांनी... मोटेगावकर अटकेनंतर तपासाची व्याप्ती वाढली... नवे धागेदोरे CBI च्या हाती... NEET पेपरफुटी प्रकरण... आणि CBI तपासाचा वाढता वेग... शिवराज मोटेगावकर अटकेनंतर तपासाचं वर्तुळ वाढलं... कुटुंबीय, विद्यार्थी, स्पेशल क्लास आणि संशयित कनेक्शनपर्यंत CBI पोहोचली आहे... पी. व्ही. कुलकर्णी यांच्याशी संबंधित माहितीही तपासाच्या केंद्रस्थानी येत असल्याची चर्चा आहे... CBIने लातूरात ठाण मांडलं आहे... तपासाची व्याप्ती वाढवली आहे... आणि दिवसेंदिवस तपासाचा फास आणखी आवळला जातोय... पाहूया याच संदर्भातील स्पेशल रिपोर्ट..... NEET पेपरफुटी प्रकरणात CBIचा तपास दिवसेंदिवस अधिक खोलात जातताना दिसत आहे... लातूरमध्ये आज पुन्हा चौकशीची व्याप्ती वाढली... विद्यार्थी, पालक आणि काही संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू आहे... निवडक विद्यार्थ्यांसाठी विशेष कोचिंग दिलं जात असल्याची माहिती तपासातून समोर येत असल्याची चर्चा आहे... दुसरीकडे काही डॉक्टरांशी संबंधित माहितीचीही पडताळणी सुरू असल्याने CBI चा तपास आता अनेक दिशांनी पुढे सरकत असल्याचं चित्र आहे... NEET पेपरफुटी प्रकरणात CBI चा तपास आता प्रत्येक नव्या धाग्यापरंत पोहोचताना दिसत आहे... ट्युशन एरिया, संशयित कनेक्शन, स्पेशल क्लास, विद्यार्थी, पालक, डॉक्टर, आर्थिक व्यवहार आणि जुन्या संबंधांची पडताळणी अशा अनेक दिशांनी तपास सुरू आहे... तपास जसजसा पुढे सरकतोय... तसतसा चौकशीचा घेरा वाढतोय...
0
0
Report
Advertisement

उल्हासनगर की लेक व्य्यू इमारत चार मंजिला अचानक गिरी, धूल से स्थानीय निवासियों को परेशानी

Ambernath, Maharashtra:उल्हासनगरात ‘लेक व्ह्यू’ इमारत पत्त्यासारखी कोसळली इमारत कोसळताच मोठ्या प्रमाणात धूळ उडाल्याने परिसरातील रहिवाशांना त्रास उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील हिराघाट परिसरात पुनर्बांधणीसाठी पाडकाम सुरू असताना ‘लेक व्ह्यू’ ही चार मजली इमारत अचानक पत्त्यासारखी कोसळली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. इमारत कोसळताच मोठ्या प्रमाणात धूळ उडाल्याने परिसरातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागला.इमारतीच्या पाडकामावेळी आवश्यक सुरक्षानियमांचे पालन करण्यात आले नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घटनेनंतर प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. माहिती मिळताच संबंधित विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, पाडकाम प्रक्रियेत हलगर्जीपणा झाला का याची चौकशी केली जात आहे.
0
0
Report

बीड़ में वाल्मीक कराड की तबीयत बिगड़ी, अंबाजोगाई शिफ्टिंग पर नया विवाद

Beed, Maharashtra:बीड: वाल्मीक कराडची प्रकृती बिघडली; अंबाजोगाई हलवण्याच्या हालचालींवरून नवा वाद काय आहे 'युरोसिसटायटीस' आजार? 'युरोसिसटायटीस' म्हणजे मूत्राशयाला होणारा तीव्र जिवाणू संसर्ग किंवा सूज होय. यामध्ये रुग्णाला लघवी करताना तीव्र वेदना होणे, आग होणे, पोटात खालच्या भागात असह्य कळा येणे, वारंवार लघवीला जावे लागणे आणि काही वेळा लघवीतून रक्त पडणे अशी लक्षणे दिसतात. वेळेवर उपचार न मिळाल्यास हा संसर्ग किडनीपर्यंत पसरू शकतो. ANC - मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी असलेला वाल्मीक कराड बीड जिल्हा कारागृहात न्यायबंदी म्हणून आहे. मात्र गेल्या तीन दिवसापासून वाल्मीकची प्रकृती खालावल्याने त्याच्यावर कारागृहातच उपचार सुरू आहेत. त्याला "युरोसिसटायटीस" नावाचा गंभीर संसर्गजन्य आजार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे वाल्मीकला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयात हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.. वाल्मिक कराड आजारी असल्याचं नाटक करतोय त्याच्यावर जेलमध्येच उपचार करा अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे. आजारी असल्याचं सांगून उपचार घेण्याच्या बहाण्याने तो देशाबाहेर पळून जाऊ शकतो..वाल्मिकवर आंबेजोगाईतच का,परळीत उपचार करा असा टोला देखील जरांगे यांनी लगावला आहे. आरोपी वाल्मीकच्या उपचाराला घेऊन राष्ट्रवादी शरद पवार गटदेखील विरोध करताना दिसत आहे. कुठल्याही कैद्याला आजार झाला तर त्याला बरं करणे हे संविधानिक हक्काच्या आधीन आहे. मात्र अंबाजोगाईतच उपचाराचा हट्ट का असा सवाल देखील उपस्थित करण्यात आलाय. अंबाजोगाईपेक्षा छत्रपती संभाजी नगर मधील घाटी आणि मुंबईतील जे जे रुग्णालय अत्यंत सोयीयुक्त आहे. त्यामुळे वाल्मीक वर अंबाजोगाईत उपचार न करता या दोन्ही ठिकाणचा विचार करण्यात यावा असा सल्ला शरद पवार गटाच्या प्रवक्त्यांनी दिला आहे. बाईट: शिवराज बांगर, प्रवक्ते दरम्यान, एका हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या प्रकृतीबाबत सुरू झालेल्या हालचालींमुळे बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे. एकीकडे कारागृह प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा वैद्यकीय उपचारांची गरज अधोरेखित करत आहेत, तर दुसरीकडे उपचाराच्या ठिकाणावरून संशय आणि आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यामुळे आता प्रशासन वाल्मीक कराडला नेमकं कुठे हलवतं आणि पुढे कोणता निर्णय घेतला जातो, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी के हार्ने तट पर डंपर समुद्र में डूबा, राहतकार्य जारी – कोई हताहत नहीं

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीत मोठी दुर्घटना! हार्ने किनाऱ्यावर भरतीच्या पाण्यात डंपर बुडाला. रत्नागिरीतून दुर्घटनेची बातमी समोर येत आहे. दापोलीतील हार्ने किनाऱ्यावर वाहतूक करणारा डंपर समुद्राच्या पाण्यात बुडाला. प्राथमिक माहितीनुसार हार्ने जेटीचे बांधकाम सध्या सुरू असून, या कामासाठी साहित्य आणि दगड-मातीची वाहतूक करणारा डंपर वापरला जात होता. मात्र, काम सुरू असतानाच समुद्राला अचानक मोठी भरती आली. पाण्याची पातळी वाढल्यामुळे डंपर भरतीच्या पाण्यात पूर्णपणे बुडला. सुदैवाने या घटनेत जीवितहानी नाही, परंतु प्रशासकीय पातळीवर आणि स्थानिक प्रशासनाकडून डंपर पाण्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
0
0
Report

श्रीकांत शिंदे ने राहुल गांधी और कांग्रेस पर निशाना, इंडिया आघाडी में फूट के संकेत

Ambernath, Maharashtra:राहुल गांधींच्या वक्तव्यावर खासदार श्रीकांत शिंदेंचा पलटवार जनतेने काँग्रेसला जागा दाखवली इंडिया आघाडीत फूट पडणार काँग्रेस एकटी पडेल – श्रीकांत शिंदे राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्र्यांना गद्दार म्हंटलं यावर प्रतिक्रिया देताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. श्रीकांत शिंदे म्हणाले जनतेने नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. पश्चिम बंगाल, Tamilnadu आणि देशातील इतर राज्यांमधील निकाल हेच दर्शवतात तसेच त्यांनी दावा केला की आज विरोधी पक्षांचे नेतेही काँग्रेस सोडून जात आहेत. तमिळनाडूमध्ये काँग्रेसने जे काही केलं, त्यावरून गद्दारी नेमकी कोणी केली हे राहुल गांधींनी आधी स्पष्ट करावं इंडिया आघाडीवरही श्रीकांत शिंदे यांनी भाष्य करत आगामी काळात इंडिया आघाडीत आणखी फूट पडेल आणि विरोधी पक्षांमध्ये काँग्रेस एकटी पडलेली दिसेल असा दावा शिंदे यांनी केला आहे. या वक्तव्यामुळे राज्यातील आणि देशातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हं दिसत आहेत. अंबरनाथ मध्ये एका कार्यक्रमात खासदार श्रीकांत शिंदे हे आले होते
0
0
Report
Advertisement

शून्य सावली दिवस: दुपारी विद्यार्थ्यांमध्ये सावली अदृश्य अनुभव

Washim, Maharashtra:वाशिम: अँकर हटवण्यात आलेल्या गावातील जिल्हा परिषद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आज शून्य सावली दिवस अनुभवला. सूर्य डोक्यावर आल्याने दुपारी बारा ते एक वाजल्याच्या दरम्यान प्रत्येकाची सावली अदृश्य झाली. उत्तरायण-दक्षिणायनामुळे वर्षातून दोनदा सूर्य कर्कवृत्त व मकरवृत्तादरम्यानच्या भागांवर थेट डोक्यावर येतो. त्यावेळी सावली क्षणभर गायब होते. विद्यार्थ्यांनी विज्ञान शिक्षक गोपाल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली छोटे प्रयोग करून ही घटना समजून घेतली. काचेवर वस्तू ठेवून सावली कशी अदृश्य होते हे त्यांनी पाहिले. ही अनोखी भौगोलिक घटना अनुभवताना विद्यार्थ्यांमध्ये खूप उत्साह दिसून आला.
0
0
Report

नवी मुंबई: अदालत ने होल्डिंग पॉन्ड के आदेश दिए — महापौर दावा तीन पॉन्ड पर्याप्त

Navi Mumbai, Maharashtra:सानपाडा जुईनगर भागात होल्डिंग पॉन्ड बुजवून मैदान निर्माणण्यात आलेय. आता अतिक्रमित मैदानावरील भराव काढून पुन्हा होल्डिंग पॉन्ड पुनरस्थापित करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. दुसरीकडे महापौर सुजाता पाटील यांनी सानपाडा जुईनगर भागात 3 होल्डिंग पॉन्ड असून चौथ्याची गरज लागणार नाही असा अजब दावा केलाय. सानपाडा जुईनगर विभागात असलेल्या होल्डिंग पॉन्ड वरून आता संघर्ष पहायला मिळण्याची शक्यता आहे. होल्डिंग पॉन्ड बुजवून त्याठिकाणी सध्या मैदान उभं राहिलेलं दिसत असलं तरी न्यायालयाने होल्डिंग पॉन्ड मधील भराव 3 महिन्यात काढण्याचे आदेश नवी मुंबई महापालिकाेला दिले आहेत. असे असले तरी नवी मुंबई मनपा महापौर यांनी शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मैदान अधिक महत्वाचे असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
0
0
Report

सोलापुर विधानपरिषद सीट पर भाजपा उम्मीदवार का फैसला कौन करेगा?

Solapur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यात विधानपरिषदेच्या एका जागेसाठी अनेक दिग्गज नेत्यांनी देव ठेवले पाण्यात - राज्यात तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होणार विधान परिषदेच्या निवडणुका - सोलापूर जिल्ह्यात विधान परिषदेच्या एका जागेसाठी निवडणूक - जिल्ह्यात स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवल्यानंतर विधानपरिषदेची उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत अनेक चर्चांना उधाण - मंत्री जयकुमार गोरे जो ठरवतील तोच असणार उमेदवार ? - सोलापूर जिल्ह्यातील विधानपरिषदेची एक जागा बिनविरोध होण्याची दाट शक्यता आजपासून आचारसंहिता लागू झाली असून प्रत्येकाने त्याचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी एस. कार्तिकेन यांनी दिले आहेत. बाईट - एस. कार्तिकेयन ( जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सोलापूर ) सोलापूर जिल्ह्यातील एका विधानपरिषदेच्या जागेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचे एकूण 616 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे. --------------------------------- *खालील प्रमाणे मतदार असतील* 1) सोलापूर महानगरपालिका - 102 + 9 ( स्वीकृत ) = एकूण 111 2) जिल्हापरिषद - 68 3) पंचायत समिती सभापती - 11 4) नगरपरिषद / नगरपंचायत - 374 ( नगरसेवक ) + 12 ( नगराध्यक्ष ) + 40 स्वीकृत नगरसेवक = 426 *एकूण - 616 मतदार* --------------------------- सोलापूर जिल्ह्यातील विधानपरिषदेच्या एका जागेसाठी प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, राम सातपुते, शशिकांत चव्हाण, रणजितसिंह नाईकनिंबाळकर, शहाजी पवार, दिलीप माने, राजन पाटील इत्यादींची नावे चर्चेत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपला चांगले यश मिळाल्याने जिल्ह्यात आता चांगले वर्चस्व निर्माण झाले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top