icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नाशिक के इंदिरानगर भरचौक में युवक पर हमला; कार में डालने की कोशिश वायरल

Nashik, Maharashtra:Nashik Breaking - इंदिरानगरच्या भरचौकात युवकावर प्राणघातक हल्ला - कारमध्ये डांबून अपहरणाचा प्रयत्न - मागील गुन्ह्यात नाव घेतल्याच्या रागातून युवकाला मारहाण झाल्याचा प्राथमिक तपासात संशय - १९ सप्टेंबरला दुपारी कलानगर चौकाजवळ कारमधून आलेल्या टोळक्याने हल्ला केला - पाच ते सहा जणांनी शुभम कनोजिया या १९ वर्षीय युवकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली - मारहाणीनंतर युवकाला जबरदस्तीने कारमध्ये डांबण्याचा प्रयत्न - आरडाओरड होताच नागरिकांनी धाव घेत युवकाची टोळक्याच्या तावडीतून सुटका केली - घटनेचा थरारक प्रकार सीसीटीव्हीत कैद होऊन सोशल मीडियावर व्हायरल - भरचौकात टोळक्याची दहशत, युवकाच्या जीवावर बेतलेल्या हल्ल्याने खळबळ
0
0
Report
Advertisement

बारिश से खरीफ फसलों को नुकसान, बीमा क्लेम के लिए किसान प्रतीक्षा में

Washim, Maharashtra:पावसातील दीर्घ खंड आणि अनियमित पावसामुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे.सोयाबीन, कपाशी आणि तूर पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात sапडला आहे.त्यामुळे पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना आता नुकसानभरपाईची प्रतीक्षा आहे.गतवर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान होऊनही अनेक शेटकऱ्यांना पीकविम्याचा परतावा न मिळाल्याने यंदा शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.गतवर्षी २ लाख ७१ हजार ४६१ शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता, तर यंदा ही संख्या घटून ७८ हजार ९७० झाली आहे.गतवर्षी १ लाख ९९ हजार ४२१ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षणाखाली होते. यंदा केवळ ५७ हजार ५६० हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवण्यात आला आहे.दरम्यान, पावसाच्या खंडामुळे यंदाही पिकांचे नुकसान झाल्याने विमा भरलेल्या ७८ हजार ९७० शेतकऱ्यांना नुकसानभरपाई कधी मिळणार,याकडे आता लक्ष लागले आहे.
0
0
Report

नाशिक के येवला तालुक़े में बारिश नहीं होने से पेयजल संकट गहराया

Yeola, Maharashtra:नाशिकचे येवला तालुक्यात सप्टेंबर महिनाअखेरीस पावसाने ओढ दिल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर झाला आहे पुरेशा पावसाअभावी नैसर्गिक जलस्त्रोत कोरडे ठाक असून शेती पिकाबरोबर पाळीव पशु प्राण्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील गंभीर झाला आहे सायगाव धामणगाव, ममदापूर, अंदरसुल, परिसरातील मेंढपाळ पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करत असून शेळ्या मेंढ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी आता होत आहे या संदर्भात मेंढपाळांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
0
Report
Advertisement

स्कूल बस के दरवाजे अचानक खुले: बच्चों के सड़क पर गिरने से बाल-बाल बचे

Bhandara, Maharashtra:धावत्या वाहन का दरवाजा अचानक खुल गया और कुछ चिमुकले सड़क पर गिर पड़े। गोंदिया जिले के अर्जुनी तालुका के खजरिया स्थित Little Angel Public School के विद्यार्थियों की सुरक्षा पर प्रश्न उठ रहे हैं। ग्रामस्थों ने समय पर कार्रवाई कर बड़ा नुकसान टाल लिया। स्कूल छूटने के बाद विद्यार्थियों को Omni वाहन से घर भेजा जा रहा था। गोंदिया-कोहमारा मार्ग पर महामार्ग पर वाहन दौड़ते समय अचानक पिछले दरवाजा खुल गया और कुछ विद्यार्थी सड़क पर गिर पड़े। एक बच्चे के सिर में चोट आई है। घटना के देखते ही ग्रामस्थों ने बच्चों को सुरक्षित किनारे किया। डुग्गीपार पुलिस ने संबंधित वाहन को कब्जे में लिया है और जांच जारी है। इसके अलावा स्कूल की मान्यता, विद्यार्थियों के परिवहन के लिए इस्तेमाल होने वाले वाहन की फिटनेस और चालक की पात्रता पर भी प्रश्न उठ रहे हैं। इस पृष्ठभूमि पर RTO और शिक्षा विभाग ने स्कूल परिवहन वाहनों की विशेष जाँच की मांग की जा रही है।
0
0
Report
Advertisement

अमरावती में जलसंकट गहराने लगा: अपर वर्धा धरण में पानी सिर्फ 48.66% बचा

Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यात जलसाठ्यात गतवर्षीच्या तुलनेत २५.५ टक्क्यांनी घट; अपर वर्धा धरणात यंदा केवळ ४८.६६ टक्के जलसाठा अमरावती जिल्ह्यात जलसाठ्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा २५.५ टक्क्यांनी घट झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अपर वर्धा धरणात यंदा केवळ ४८.६६ टक्के जलसाठा उपलब्ध असून यंदा सप्टेंबरमध्ये आतापर्यंत फक्त २२.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे तर जून, जुलै या दोन महिन्यांत २३२.५ मिमी पाऊस पडला असून ऑगस्टमध्ये पावसाचा मोठा अभाव पाहायला मिळाला आहे. जिल्ह्यातील २४ लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असले तरी दोन मध्यम प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठी असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पावसाची स्थिती समाधानकारक नसल्याने जलस्रोतांमध्ये अपेक्षित पाणीसाठा निर्माण झालेला नाही त्यामुळे सप्टेंबर अखेरपर्यंत मोठ्या प्रकल्पांमध्ये पाणी न भरल्यास जलसंपदा विभागाला पाणीवाटपाचे फेरनियोजन करावे लागणार आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याची गरज असून परतीचा पाऊस समाधानकारक न झाल्यास आगामी काळात पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.
0
0
Report

मोहाड़ी की नहर में 75 वर्षीय विमल सोनवाने का शव मिला, जांच जारी

Bhandara, Maharashtra:कॅनल मध्ये आढळून आला महिलेचा मृत्यू देह..... मोहाडी जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील धुसाळा येथील रहवासी विमल सोनवाने ७५ वर्ष hya घरून अचानक गेल्या. आणि सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास पेंच विभागाच्या कांद्री ते नवेगाव नहरात त्यांचे शव मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली. नहरात शव दिसताच नागरिकांनी आंधळगाव पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी नहरातून शव काढून शवविच्छेदना करीता नेल्याची माहीती आहे. विमल सोनवाने ह्या शेतात गेल्या होत्या वयोरुद्ध असल्याने अचानक तोल गेला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे. आता नेमकं कशाने मृत्यू झाला याचा तपास पोलिस करत आहेत....
0
0
Report

गौराई पूजन के मौके पर बोंडे के घर कांग्रेस नेताओं की मुलाकात अमरावती में गरमाहट

Amravati, Maharashtra:राजकीय वैर बाजूला ठेवून काँग्रेस नेत्यांनी घेतले बोंडेंच्या घरी गौराईचे दर्शन; जिल्ह्यात चर्चांना उधाण अँकर :- आधी आमदार बच्चू कडू यांच्या भेटीनंतर काल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर आणि काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. गेल्या काही दिवसांत एकमेकांवर जोरदार राजकीय टीका-टिपणी करणारे हे कट्टर राजकीय विरोधक ज्येष्ठ गौरी पूजनाच्या निमित्ताने एकाच छताखाली एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखडे यांनी बोंडे यांच्या घरी महालक्ष्मी व गौराईचे दर्शन घेतले. सण-उत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारणाचे हे सुंदर दर्शन ठरले असले तरी गेल्या काही दिवसापूर्वी माजी खासदार नवनीत राणा यांनी भाजपनेते अनिल बोंडे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. त्या टीकेनंतर काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी भाजप खासदारांच्या घरी लावलेल्या या हजेरीमुळे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात नव्या राजकीय चर्चांना आणि समीकरणांना उधाण आला आहे。
0
0
Report
Advertisement

जनपथ: जत के सात गाँवों में पानी की समस्या खत्म होने वाली है—वसपेठ-गुड्डापूर योजना अंतिम चरण में

Sangli, Maharashtra:स्लग - जतच्या ७ गावांच्या पाण्याचा प्रश्न लवकरचं मिटणार..तम्मनगौडा रविपाटीलांकडून व्हसपेठ -गुड्डापूर योजनेच्या कामाची पाहणी.. अँकर - सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जत तालुक्यातील पाण्यापासून वंचित असणाऱ्या पूर्व भागातील सात गावांचा पाण्याचा प्रश्न लवकरचं मिटणार आहे.म्हैसाळ सिंचन योजनेतून जत तालुक्यातील माडग्याळ, व्हसपेठ,गुड्डापूर,अंकलगी अशा सात गावांसाठी ऐतिहासिक असणारया व्हसपेठ -गुड्डापूर पाणी योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.या कामाची राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते तम्मनगौडा रविपाटील यांनी पाहणी कऱत याबाबत माहिती दिली.माजी खासदार यांच्या माध्यमातून व्हसपेठ -गुड्डापूर योजनेसाठी २६ कोटींचा निधी मंजूर झाला होता,प्रत्यक्षात कामाला सुरुवात होऊन,आता हे काम आता अंतिम टप्प्यात आल्याने पाण्यापासून वंचित असणाऱ्या सात गावांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार,असल्याचे तम्मनगौडा रविपाटील यांनी दिले आहे.
0
0
Report

गौरी आगमन के उत्साह में लासलगांव में महादेव मंदिर का आकर्षक देखावा बना

Lasalgaon, Maharashtra:लासलगाव परिसरात गौरी आगमनाचा उत्साह पाहायला मिळत असून गौरीपुढे आकर्षक देखावे साकारण्याची परंपराही जपली जात आहे लासलगावजवळील पिंपळगाव नजीक येथील मंगल अनिल सिमंत यांनी गौरी आणि गणपतीपुढे हेमाडपंथीय महादेव मंदिराचा सुंदर देखावा साकारला आहे महादेवाची पिंड, सजीव डोंगररांग आणि त्यातून वाहणारे पाण्याचे झरे अशा आकर्षक स्वरूपात हा देखावा साकारण्यात आला आहे विशेष म्हणजे सिमंत कुटुंबात शेकडो वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा लग्नानंतर तब्बल ३५ वर्षांनीही मंगल सिमंत यांनी उत्साहाने कायम ठेवली आहे
0
0
Report

निफाड तहसील कार्यालय के रिकॉर्ड नए भवन में स्थानांतरित कराने की मांग पर आमरण उपवास जारी

Niphad, Maharashtra:निफाड तहसील कार्यालयाचे प्रशासकीय कामकाज गेल्या पाच वर्षांपासून नवीन प्रशासकीय इमारतीत सुरू आहे. मात्र, कार्यालयाचे महत्त्वाचे रेकॉर्ड अद्याप जुन्या तहसील कार्यालयाच्या जीर्ण इमारतीतच ठेवण्यात आले आहेत ही इमारत धोकादायक झाल्याने रेकॉर्डच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, तातडीने सर्व रेकॉर्ड नवीन प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र काजळे यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण सुरू केले आहे यावेळी निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवडे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन काजळे यांच्याशी चर्चा केली यावेळी मागणीची तातडीने पूर्तता न झाल्यास पाणीही घेणार नसल्याचा इशारा देवेंद्र काजळे यांनी दिला आहे त्यामुळे प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे आता लक्ष लागले आहे
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top