icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

चंद्रपुर के कांग्रेस उम्मीदवार शैलेश अग्रवाल ने नामांकन वापस लिया; जिल्हा अध्यक्ष की प्रतिक्रिया

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूरात विधान परिषदेचे काँग्रेस उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी परत घेतलेल्या उमेदवारी बाबत आणि अग्रवाल यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर केलेल्या गंभीर आरोपांबाबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांची प्रतिक्रिया. अग्रवाल यांनी कोणालाही विश्वासात न घेता उमेदवारी वापस घेणे ही दुर्दैवी बाब आहे, आम्ही याचा निषेधच करतो, मी या संपूर्ण घटनेचा अहवाल प्रदेश काँग्रेसकडे पाठवला आहे आणि अशा कार्यकर्त्याला पक्षातून निष्काषित केलं पाहिजे अशी मी मागणी केली आहे. शैलेश अग्रवाल यांनी काँग्रेस नेत्यांवर केलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही, त्यांनी कुणाचं नाव घेतलं पाहिजे, पुरावे दिले पाहिजे, त्यांच्यावर कोणी कार्यकर्ता विश्वास ठेवणार नाही, आमचे काही नगरसेवक फॉर्म भरण्याआधीच नॉट रिचेबल होते, हे अग्रवाल यांना देखील माहीत होतं, पण आम्ही याची भरपाई कुठून तरी करू असा आम्हाला विश्वास होता मात्र त्यांनी अशा प्रकारे फॉर्म परत घेणे दुर्भाग्यपूर्ण आहे.
0
0
Report

Nashik, Maharashtra:माजी खासदार इम्तियाज जलील यांना देखील एसआयटी कडून चौकशीसाठी बोलवले जाण्याची शक्यता.... अँकर मल्टिनॅशनल कंपनी लैंगिक छळ आणि धर्मांतर प्रकरणांमध्ये फरार असताना निदा खानला अश्रय दिल्या प्रकरणी मतीन पटेलची आत्तापर्यंत तीन वेळा कसून चौकशी करण्यात आलीये... मतीन पटेल प्राप्त मोबाईल डाटा मध्ये अनेक खुलासे समोर आले असून माजी खासदार इम्तियाज जलील यांना देखील एसआयटी कडून चौकशीसाठी बोलवले जाण्याची विश्वासनीय सूत्रांची माहिती या सर्व प्रकरणांमध्ये आत्तापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध दोषारोप पत्र देखील दाखल करण्यात आले आहेत तसेच काही दिवसात पुरवणे दोषारोप पत्र देखील दाखल करण्यात येणार आहे....
0
0
Report
Advertisement

अहिल्यानगर ग्रामस्थों का जिलाधिकारी कार्यालय के पास पुरस्कार विवाद पर प्रदर्शन

Beed, Maharashtra:बीड़ के जिलाधिकार परिषद कार्यालय परिसर में अहिल्यानगर जिले के ग्रामस्थों का आक्रामक व अनोखा आंदोलन शुरू हो गया है. वाघोली ग्राम के ग्रामस्थों ने सीधे जिलाधिकार परिषद कार्यालय परिसर में रेडा लाकर आंदोलन शुरू किया. मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायत अभियान के तहत दिए जाने वाले पुरस्कार के प्रबंध को लेकर ग्रामस्थों ने आरोप लगाते हुए कहा कि अफसर ने नियमों का उल्लंघन किया. अहिल्यानगर जिले के शेवगाव तालुकाई में वाघोली गांव पिछले तीन वर्षों से माजी वसुंधरा पुरस्कार से सम्मानित किया गया है. इस वर्ष भी उसी गांव को पुरस्कार मिलने की संभावना थी और ग्रामस्थ तैयारी कर रहे थे, पर बीड़ जिले से आए बीडीओ ने सभी नियमों के पालन को न मानते हुए पुरस्कार दूसरे गांव को दे दिया. इस कारण बीडीओ पर कार्रवाई की मांग करते हुए ग्रामस्थों ने आंदोलन शुरू किया, जिसमें महिलाओं ने भी भाग लिया.
0
0
Report

संभाजीनगर में सत्तार-शिरसाठ की बैठक, विवाद समाप्त; एकनाथ शिंदे ने बुलाई मीटिंग

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:राजकारणात काहीही अशक्य नाही असं बोलल्या जातं त्याची प्रचिती आज संभाजीनगरत आली कालपर्यंत अब्दुल सत्तार हे पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्यावर सडकून टीका करत होते मात्र आज पालकमंत्री संजय शिरसाठ आणि अब्दुल सत्तार खासदार भुमरे यांच्या कार्यालयात एकत्र आले इतकच नाही तर भुमरे यांच्या कार्यालयातून जिल्हा मध्यवर्ती बँकेपर्यंत त्यांनी एकाच गाडीतून प्रवास सुद्धा केला आमच्यातला वाद संपला आहे आता कोणी वाद लावू नये अशा पद्धतीचे ही नेते मंडळी म्हणाले , महत्वाचे म्हणजे हा वाद सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात बैठक घेतली होती... शिवसेना आज जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी 20 संचालक पदासाठी अर्ज भरते आहे...
0
0
Report

शेकअप के पनवेल नगरपालिका विपक्ष नेता अरविंद म्हात्रे ने दिया इस्तीफा

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- कोकण विधानसभा निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग शेकापचे पनवेल महानगरपालिका विरोधी पक्षनेता अरविंद म्हात्रे यांचा राजीनामा अरविंद म्हात्रे यांनी महापौर यांच्याकडे सोपवला राजीनामा वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याची माहिती माझा राजीनामा स्वीकारून मला जबाबदारीतून मुक्त करा. अशी राजीनाम्यातून मागणी अरविंद म्हात्रे कोकण विधान परिषद निवडणुकीत शेकाप कडून होते उमेदवार काल पक्षाने राजीनामा द्यायला सांगितल्यासारखा अरविंद म्हात्रे यांच्याकडून राजीनामाचे पाऊल
0
0
Report
Advertisement

डोंबिवली में महावितरण के जवाब नहीं मिलने पर भाजपा का आक्रामक प्रदर्शन

Kalyan, Maharashtra:महावितरणच्या अनागोंदी कारभाराविरोधात भाजपा आक्रमक. लोकप्रतिनिधींना अधिकारी प्रतिसाद देत नसतील तर ते मार खाल्ल्याशिवाय राहणार नाहीत - भाजप नगरसेवक दीपेश मात्रे आक्रमक. महाविरतरण ने वीज पुरवठा सुरळीत केला नाही तर अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून त्यांना सळो की पळो करू - भाजपाचा महावितरण अधिकाऱ्यांना सज्जड दम. डोंबिवली परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने एकीकडे नागरिक त्रस्त आहेत तर दुसरीकडे महावितरणचे अधिकारी मात्र जागेवर जबाबदारी झटकताना दिसतात. नागरिक काय तर लोकप्रतिनिधींना देखील महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून उडवा उडवीचे उत्तरे दिली जात असल्याने आज भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. भाजपचे नगरसेवक दीपेश मात्रे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्यासह भाजपच्या शिष्टमंडळाने डोंबिवली एमआयडीसी परिसरातील महावितरणचे कार्यालय गाठले; महावितरणच्या अधिकाऱ्यांना वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठयाबाबत जाब विचारत खडे बोल सुनावले. एकीकडे नागरिक उकाड्याने त्रस्त आहेत दुसरीकडे सातत्याने वीजपुरवठा खंडित होतोय या समस्येची तक्रार करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे म्हणणं देखील एमएसईबी अधिकाऱ्यांकडून ऐकून घेतलं जात नाही. लोकप्रतिनिधींना अधिकारी प्रतिसाद देत नसतील तर ते मार खेल्ल्याशिवाय राहणार नाहीत असा दमच भाजप नगरसेवक दीपेश मात्रे यांनी एमएसईबी अधिकाऱ्यांना दिला. तसेच पुढील काही दिवसात जर महावितरण ने वीज पुरवठा सुरळीत केला नाही तर अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून त्यांना सळो की पळो करू असा इशारा देखील महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलाय.
0
0
Report

अकोला-दर्यापूर मार्ग पर ट्रक दुर्घटना: पति-पत्नी की मौत, चालक गिरफ्तार

Akola, Maharashtra:अकोल्यातील अकोला-दर्यापूर मार्गावरील खराप परिसरात आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणातील आरोपी ट्रकमालकाला पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दर्यापूरहून अकोल्याकडे येणारा बटाट्यांनी भरलेला भरधाव ट्रक चालकाला झोपेची डुलकी लागल्याने त्याने समोरून जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात खरप बुद्रुक येथील विजय पांडुरंग इंगळे आणि प्रतिभा विजय इंगळे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन करत आरोपी चालकाला तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती. यानंतर पोलिसांनी परिसरातील ३० ते ४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान राजस्थानमधील आरोपी ट्रक चालक आणि त्याच्या साथीदाराचा शोध घेण्यात यश आले असून दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सिव्हिल लाईन पोलीस करीत आहेत.
0
0
Report

अकलूज में पुलिस ने जुआ अड्डा ध्वस्त किया, 43 लोग गिरफ्तार, 30 लाख बरामद

Pandharpur, Maharashtra:माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे पोलिसांनी छापेमारी करत जुगार अड्डे उध्वस्त केले आहेत. अकलूज येथील तीन ठिकाणी छापेमारी करून तब्बल 30 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. पंढरपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या पथकाने अकलूज मध्ये जाऊन छापेमारी करून धडक कारवाई केली आहे. यामध्ये सुप्रभात हॉटेलच्या तळघरात , हॉटेल अक्षय आणि हॉटेल शिवार अशा तीन ठिकाणी पोलिसांनी छापे टाकले आहेत. या कारवाई मध्ये 43 लोक हे जुगार खेळताना आढळून आले आहेत.. तर या ठिकाणी रोख रक्कम सह मोटारसेायकल, कार , मोबाईल अशा किमती वस्तू हा आढळून आल्या. माळशिरस तालुक्यातील धडक कारवाईमुळे पोलीस चांगलेच ॲक्शन मोडवर दिसतायेत.
0
0
Report
Advertisement

शिर्डी में साईं बाबा के चरणों में 34 लाख सोने के आभूषण अर्पण

Shirdi, Maharashtra:Anc - भाविकांची अढळ श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या श्री साईबाबांच्या चरणी देश-विदेशातील भाविक नेहमीच भरभरून दान अर्पण करत असतात. आज एकाच दिवसात साईचरणी तब्बल ३४ लाखांपेक्षा अधिक किमतीचे सोन्याचे दागिने अर्पण करण्यात आले. ज्यात पंजाबमधील भटींडा येथील साईभक्त अजय कुमार यांनी सुमारे २९ लाख १९ हजार ८०० रुपये किमतीचा, आकर्षक नक्षीकाम असलेला २०० ग्रॅम वजनाचा सुवर्ण मुकुट अर्पण केले तर अनखिन एका गुप्त साईभक्ताने ५ लाख ४० हजार १६३ रुपये किमतीचा अत्यंत आकर्षक कलाकुसर केलेला सोन्याचा ब्रोच बाबांच्या चरणी अर्पण केलाय...
0
0
Report

کوлھاپور میں چندرکانت پٹیل کے خلاف شیواجی پٹیل کے شدید الزامات، گوکُل پر تناؤ

Kolhapur, Maharashtra:Kolhapur Big Breaking गोकुळच्या राजकारणातून चंदगडचे अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांचा भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप. आमदार शिवाजी पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय चंद्रकांत दादा पाटील यांनी कोल्हापुरात भाजप वाढवण्यासाठी काय प्रयत्न केले ? चंद्रकांत दादा पाटील यांनी भाजप म्हणून आम्हाला जवळ केलेलं नाही.. मोठे नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी भाजप समजून घ्यावे आणि कार्यकर्त्यांना बळ द्यावे.. *आमदार शिवाजी पाटील Byte मुद्दे* *ऑन गोकुळ पात्र संस्था* नेमकं काय सुरू आहे हे मीडियाच्या माध्यमातून कळत. अपात्र केलेल्या संस्था पात्र केल्या जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर ही बाब घालणार आहे.. हसन मुश्रीफ यांच्या घरात अनेक संस्था.. हा संस्था आल्या कुठून.. अपात्र संस्था पात्र झाल्या तर गोकुळ राहणार नाहीत.. एका नेत्याच्या घरात गोकुळ निघून जाईल.. गोकुळमध्ये शेतकऱ्यांच्या वाटेला नेमकं काय येत .? माझ्या मतदारसंघात आणि सर्वत्र साम-दाम दंड आणि गोकुळची दहशत या जोरावर शेतकऱ्यांच्याकडून ठराव गोळा केले जात आहेत. *ऑन शिवजी पाटील एकाकी* आमचे राष्ट्रीय नेते चंद्रकांत दादा मला गोकुळच्या बैठकीला बोलावलं नाही.. हसन मुश्रीफ यांना बोलावलं.. पश्चिम महाराष्ट्राचे नेते सुमित कदम यांना बोलावलं.. कोल्हापूर जिल्ह्याचा, गोकुळचा सुमित कदम यांचाशी संबंध नाही.. पण आम्हाला बोलावले नाही.. हे जर आम्हाला जमेत धरत नसतील तर सतेज पाटीलला आमचे विरोधक नाहीत. मुख्यमंत्री कडक शिस्तीचे आहेत. चुकीला माफी नाही.. हसन मुश्रीफ पंचवीस वर्षे मंत्री राहिले आहेत.. त्यांनी चंदगड साठी काय केले ? आम्हाला देखील भावना असतात आम्ही किती सहन करायच गोकुळ मध्ये तुम्ही.. कोल्हापूर जिल्हा बँकेत तुम्ही... मंत्री तुम्ही... आम्ही जायचे कुठे.. आम्ही फक्त झेंडे घेऊन फिरायचे का.. *ऑन चंद्रकांत पाटील* चंद्रकांत दादा पाटील हे देखील मंत्री होते.. त्यांच्याकडे खूप मोठे पद आहे.. दादांनी देखील चंदगड साठी काही नाही केलं याची खंत. चंद्रकांत दादा पाटील आता मुश्रीफ साहेब यांना घेऊन चालले आहेत.. पण चंद्रकांत दादा पाटील यांनी भाजप म्हणून आम्हाला जवळ केलेलं नाही.. आम्ही चंद्रकांत दादा पाटлांवर आरोप करत नाहीत पण या आमच्या भावना आहेत.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही खंत बोलावून दाखवायची होती... पण विधान परिषद माघारी मुळे भेटता आले नाही. मला आमदारकीचे स्वप्न किंवा लालच नाही.. लाचार होणे हा माझा स्वभाव नाही.. मला माझ्या नेत्यांनी असं शिकवलेलं नाही.. *ऑन सतेज पाटील युती* गोकुळ मध्ये राजकारण आणि भाजप काय करायचे.. मी अपक्ष आमदार होतो निवडून आलो.. निवडून आल्यानंतर मी भाजप झालो.. भाजपा आमच्या रक्तात आहे.. *ऑन भाजप ताकद* कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना स्ट्रॉंग आहे.. भाजप कुठे आहे ? भाजप म्हणजे जिल्ह्यामध्ये महाडिक परिवार खूप सक्षम आहे, अमल महाडिक आमदार आहेत.. दुसरे आमदार आवडे साहेब आहे.. मग पक्ष वाढणार कधी ? त्यामुळे मी थांबणार नाही कोणाच्या दबावाला बळी पडणार नाही.. भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी मी लढत राहणार.. कार्यकर्त्यांनी काय करायचं हे कोणीही समजून सांगत नाही.. प्रत्येक जण स्वार्थ पाहत आहे.. एका घरात अनेक पद आहेत.. प्रत्येकाला वाटतं माझ्या मागे देवेंद्र फडणवीस आहेत.. तेच मला बोलायला सांगत असतील.. माझ्या पाठीशी देवेंद्र फडणवीस आहेत.. पण गोकुळ बाबतचा लढा माझा होता.. तेराशे दहा संस्था आमच्यावर लादल्या नसत्या.. तर आम्ही आहे तसं निवडणुकीला सामोरे गेलो असतो. *ऑन प्रशासक दबाव* काही चुका होत्या म्हणून गोकुळवर प्रशासक लागला. याच प्रशासकाला मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे सकाळ – दुपार – संध्याकाळ फोन करतात आणि मेसेज करतात. गोकुळचे प्रशासक सुद्रिक यांनी तुमचे ऐकू मंत्री हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत दादा पाटील यांचे ऐकू असं बोलत आहेत.. मी प्रामाणिक काम करत असेल तर मुख्यमंत्री पाठीशी असतील.. मी जर चुकीचं काम करत असेल तर मुख्यमंत्री मला थांबवतील मला कोणी टार्गेट करण्यासारखा मी कार्यकर्ता नाही.. मी घाबरणारा आणि लाचार होणारा कार्यकर्ता नाही.. *ऑन चंद्रकांत पाटील* आमचे जिल्ह्याचे नेते.. मोठे नेते.. चंद्रकांत दादा पाटील यांनी भाजप समजून घ्यावे आणि कार्यकर्त्यांना बळ द्यावे.. गोकुळ ही सुरुवात आहे.. नंतर केडीसीसीची निवडुक आहे, मी लढत राहणार. माझ्या भावना ह्या प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. चंद्रकांत दादा पाटील यांच्या लक्षात ग्राउंड चे राजकारण लक्षात आलं पाहिजे.. ग्राउंड लेव्हलवर काय चाललंय हे दादांच्या कानावर कोणी घालत नाही.. मी असं बोलल्यामुळे परिणाम काय होतील माहित नाही.. पण मी अन्यायावर बोलत राहील. *ऑन सतेज पाटील* ते थोडे माझे विरोधक आहेत. ते राजकीय विरोधक आहेत.. पण गोकुळ मध्ये राजकारण सोडून येईन. या लोकांनी मानसन्मान द्यायला पाहिजे.. मी लाचार होऊन कोणाच्या मागे झुकून जाणार नाही..
0
0
Report

महाराष्ट्र: महायुती के बागी उमेदवारों के कारण महाविकास आघाड़ी में उथलपुथल

Kolhapur, Maharashtra:शंभूराज देसाई मुद्दे On विधानपरिषद निवडणूक एखादा दुसरा अपवाद सोडला तर महायुती म्हणून आम्ही एकत्र लढतोय महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी शेवटच्या दिवशी माघार घेऊन ही निवडणूक सोडली आहे महायुतीसमोर टिकणार नाही हे लक्षात आल्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतली देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी महायुतीत मिठाचा खडा पडू नये याची काळजी घेण्याचे सांगितले. On संजय राऊत संजय राऊत यांना काही काम नाही संख्याबळ महायुतीचे असल्याने त्यांच्या उमेदवारांनी माघार घेतली संजय राऊत हे नेहमी मोठे आकडे बोलून लक्ष वेधून घेतात त्यांनी पुरावे द्यावेत, उगाच सकाळी सकाळी काहीतरी बोलून लक्ष वेधून घेतात On बाळा माने बाळ माने यांनी उबाठा गटाकडून अर्ज भरला होता पण माने यांना टिकाव लागणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी अर्ज मागे घेतला संजय राऊत हे बाळा माने यांनी स्तुती करत होते, माघार घेतली की लगेच वाईट झाले का? बाळा माने यांच्या वक्तव्याने ठाकरे गटात काय चाललंय हे महाराष्ट्रातील जनतेला कळालं बाळा माने यांच्या माहिती नाही उदय सामंत यांना उपमुख्यमंत्री बनायचं आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे आम्ही सगळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत उदय सामंत यांच्याकडे शंकेकडे बघावं असा हेतू बाळा माने यांचा असावा On खाजगी सावकारी खासगी सावकारी बाबत मी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर प्रश्न घालेन मुख्यमंत्री या प्रश्नाकडे पूर्णपणे लक्ष घालतील अण्णासाहेब पाटील महामंडळाकडे योग्य निधी देतील मराठा समाजातील तरुणांना यामध्ये अडचणी येणार नाही गेल्या मंत्रीमंडळ बैठकीत याबाबत चर्चा झाली आहे On नाशिक बंडखोरी नाशिक मध्ये उदय सामंत ठाण मांडून आहेत त्यामुळे नाशिकमध्ये कुठलीही अडचण येणार नाही माघारी साठी आमचा उमेदवार वेळात पोचू शकला नाही त्यामुळे त्या ठिकाणी अर्ज राहिला आहे मात्र त्या ठिकाणी उदय सामंत योग्य तो निर्णय घेतील
0
0
Report
Advertisement

पराजय से बेहतर माघार: सुधीर मुनगंटीवार का बयान

Chandrapur, Maharashtra:पराभवत होण्यापेक्षा यशस्वी माघार उत्तम, विधानपरिषद निकालावर आ. सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया ऑन काँग्रेसचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांची माघार पराभवापेक्षा यशस्वी माघार घेणे हा उत्तम गुण आहे, आचारसंहितेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांच्या संदर्भातल्या बैठका थांबल्या होत्या, त्यांच्या माघारी मुळे आता गोरगरिबांच्या प्रश्ना संबंधातल्या बैठका घेणे सोपी झालंय ऑन संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांनी माघार घेण्यासाठी दीडशे कोटी वाटप केले, विधानपरिषदेत घोडेबाजार झाल्याच्या केलेल्या आरोपावर त्यांच्याकडे काही माहिती असेल तर त्यांनी ती इन्कम टॅक्स विभागाला द्यावी, त्यांचं नाव संजय आहे, महाभारतातल्या संजयला जसं सगळं समजत होतं तसं त्यांनाही समजं असा त्यांना भास झाला आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top