icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

बच्चू कडू के शिवसेना प्रवेश से रवी राणा गुट में हलचल, भेंडे शामिल

Amravati, Maharashtra:बच्चू कडू यांचा आमदार रवी राणा यांना धक्का; रवी राणा यांचे खंदे समर्थक निलेश भेंडे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश करताच आमदार रवी राणा यांना मोठा धक्का दिला आहे. युवा स्वाभिमान पक्षाचे खंदे समर्थक निलेश भेंडे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. आमदार बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह भेंडे यांचा अचानक प्रवेश झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. निलेश भेंडे हे आमदार रवी राणा यांचे विश्वासू समर्थक मानले जात होते त्यामुळे हा प्रवेश राणा गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. युवा स्वाभिमानमध्ये राहून निलेश भेंडे यांनी अनेक आक्रमक आंदोलने करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. आता त्याच आक्रमक शैलीत बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नव्याने राजकीय ताकद उभी करण्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आगामी स्थानिक राजकारणात या प्रवेशामुळे राणा विरुद्ध बच्चू कडू संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
0
0
Report

उसमा नाबाद-लातूर-बीड़ में पहला उमेदवारी अर्ज दाखल, महाविकास आघाडी के भीतर हलचल

Dharashiv, Maharashtra:उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. शिवसेनेचे कळंब नगरपालिकेचे गटनेते संजय मुंदडा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीकडून उमेदवाराबाबत चर्चा सुरू असतानाच मुंदडा यांनी अर्ज भरल्याने धाराशिव जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी त्यांनी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार सुरेश धस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न सोडवण्यात अपयश आल्याचा आरोपही केला.
0
0
Report
Advertisement

दिव्यांग प्रमाणपत्र सत्यापन में भारी देरी, 103 रिपोर्ट छह माह से लंबित

Washim, Maharashtra:वाशीम जिल्हा परिषदेत दिव्यांग प्रवर्गातून नोकरी व पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेत मोठा विलंब होत असल्याचे समोर आले आहे. १५२ कर्मचाऱ्यांपैकी केवळ १३ जणांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले असून ३६ कर्मचारी तपासणीसाठी गैरहजर राहिले आहेत. तर तब्बल १०३ अहवाल सहा महिन्यांपासून प्रलंबित आहेत. दिव्यांग कल्याण विभागाचे तत्कालीन सचिव तुकाराम मुंढे यांनी ९ ऑक्टोबर २०२५ रोजी सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्र व शारीरिक पडताळणीचे आदेश दिले होते. त्यानुसार अकोला येथील आरोग्यसेवा मंडळामार्फत तपासणी सुरू करण्यात आली. मात्र प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
0
0
Report

नाशिक में हिट एंड रन: चालक फरार, सीसीटीवी से खुला दर्दनाक मामला

Nashik, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील राजूर बहुला परिसरात २४ मे २०२६ रोजी हिट अँड रनची धक्कादायक घटना घडली. सत्तरीच्या घरात असलेल्या तुळसाबाईं अहिलाजी तालखे या रस्ता ओलांडत असताना भरधाव कारने जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत त्या अक्षरशः फुटबॉलप्रमाणे हवेत उडाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार मुंबईहून नाशिकच्या दिशेने येत होती. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावर न थांबता पळ काढल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. गंभीर जखमी अवस्थेत तुळसाबाई यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे, घटनेला तीन दिवस उलटूनही आणि सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असतानाही पोलिसांनी अद्याप अधिकृत तक्रार दाखल केली नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. “वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच गुन्हा दाखल करू,” असे पोलिशांकडून सांगितले जात असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, हिट अँड रन प्रकरणातील आरोपी वाहनचालकाचा शोध घेण्याची मागणी स्थानिकांकडून होत असून, सीसीटीव्हीच्या आधारे तातडीने कारचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे.
0
0
Report
Advertisement

यवतमाल की वणी में 50 हजार नकद चोरी: CCTV में चोरों की साज़िश

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी येथे अंगावर घाण टाकून एका व्यक्तीची 50 हजार रुपयांची रोख रक्कम चोरी केल्या गेली आहे. सावज हेरून, सापळा रचत, रोख उडवणाऱ्या या टोळीचा प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे. लालगुडा येथील शंकर धोटे यांनी बँकेतून 50 हजार रुपयांची रोख काढली, ती बॅग दुचाकीच्या हँडलला अडकविली, दरम्यान त्यांचा चोरट्यांनी पाठलाग सुरू केला. रस्त्यात त्यांच्या अंगावर घाण पडली. ती घाण साफ करण्यासाठी बाजूला जाताच एकाने रोख रकमेची पिशवी काढून घेतली, व तिथं निघून गेला, त्याच्यासोबत घाण पडल्याची माहिती देणारा देखील जात असल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे.
0
0
Report

फडणवीस ने प्रणिती शिंदे के बोलों पर कठोर प्रहार, मोदी-ट्रंप बयान का संग्राम

Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग - ट्रम्प बोले मोदी चाले या टिकेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खा. प्रणिती शिंदेंना सुनावले खडेबोल - सोलापुरातील एका आंदोलनादरम्यान खा. प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली होती सडकून टीका - ट्रम्प बोले मोदी चाले, अडाणीचे गुन्हे माफ करण्यासाठी हे सर्व चालू असल्याचं केलं होतं वक्तव्य - या वक्तव्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खा. प्रणिती शिंदे यांच्यावर संताप - प्रणिती शिंदे आमदारच्या खासदार झाल्या त्यांनी मॅच्युरिटीने बोललं पाहिजे - खा. प्रणिती शिंदे इतकं इनमॅच्युरिटी दाखवत असतील काय बोललो पाहिजे याचे भान राहत नसेल तर अशा लोकांना जनताच त्यांच स्थान दाखवेल
0
0
Report
Advertisement

भुईगांव बीच पर पहली बार राष्ट्रीय अंडर-19 लगोरी चैंपियनशिप का भव्य शुभारंभ

Vasai-Virar, Maharashtra:वसई तालुक्यातील निसर्गरम्य भुईगाव बीचवर प्रथमच राष्ट्रीय अंडर-19 बीच लगोरी स्पर्धेचा मंगळवारी संध्याकाळी दिमाखदार शुभारंभ झाला आहे. विशेष म्हणजे भारतात पहिल्यांदाच समुद्रकिनाऱ्यावर राष्ट्रीय स्तरावरील लगोरी स्पर्धा आयोजित करण्यात आल्याने या स्पर्धेला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. देशभरातील 12 हून अधिक राज्यांतील खेळाडू आणि संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. राष्ट्रीय लगोरी असोसिएशनच्या मान्यतेने आणि पालघर जिल्हा लगोरी असोसिएशनच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भुईगाव बीचवर खेळाडू, प्रशिक्षक आणि प्रेक्षकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
0
0
Report

डिज़ेल किल्लत से गर्भवती मरीज को एंबुलेंस नहीं मिली, स्वास्थ्य तंत्र पर सवाल

Hingoli, Maharashtra:अँकर -हिंगोलीत डिझेल टंचाईचा फटका आता थेट आरोग्य यंत्रणेला बसताना दिसत आहे डिझेल नसल्याचे कारण दाखवत गरोदर मातेला रुग्णवाहिका नाकारल्याचा एक प्रकार हिंगोलीच्या जवळाबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला आहे आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला 102 क्रमांकाची रुग्णवाहिका उभी असतानाही डिझेल नसल्याचे कारण देत रुग्णवाहिका नाकारल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे मालेगाव येथील मनीषा इंगळे या गरोदर महिलेला अचानक पोटात दुखत असल्याने जवळाबाजार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय महाविद्यालयात हलविण्यात सांगितले 102 रुग्णवाहीकेला कॉल करूनही आरोग्य केंद्रात उभी असलेली रुग्णवाहिका डिझेल नसल्याचे कारण देत नाकारल्याने रुग्णाला आर्थिक भार आणि मनस्ताप सहन करावा लागला है...
0
0
Report

घृष्णेश्वर मंदिर के विकास को मिली मंजूरी, 210 करोड़ के आराखड़े से काम शुरू

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्रीक्षेत्र घृष्णेश्वर मंदिराच्या विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१० कोटी रुपयांच्या सुधारित विकास आराखड्याला मंजुरी दिल्यानंतर, नवी दिल्लीत भारतीय पुरातत्त्व विभागाने संरक्षित परिसरातील विकासकामांना हिरवा कंदील दाखवला. आता आराखड्यानुसार प्रत्यक्ष कामांना सुरुवात होईल. यात प्रामुख्याने अत्याधुनिक भक्त निवास, दर्शन रांग (प्रतीक्षागृह), शॉपिंग कॉम्प्लेक्स, फंक्शन हॉल, मंदिराचा घाट आणि बायपास रोड आदी कामांचा समावेश आहे.
0
0
Report
Advertisement

पैठण के दादेगाव हजारे में माकड़ों का कहर, फसलें और घर हुए नुकसान

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:पैठण तालुक्यातील दादेगाव हजारे येथे माकडांचा धुमाकूळ; पिकांसह घरांचे मोठे नुकसान माकडांच्या उपद्रवाने शेतकरी त्रस्त; वन विभागाकडून तातडीच्या कारवाईची मागणी पैठण तालुक्यातील दादेगाव हजारे परिसरात माकडांचा मोठा उपद्रव वाढला आहे. टोळक्याने फिरणारी माकडे शेतात घुसून उभी पिके फस्त करत आहेत, तर गावात घरांमध्ये शिरून अन्नधान्य आणि वस्तूंचेही नुकसान करत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. विशेषतः शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने दखल घेऊन माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
0
0
Report

मानसून शुरू होने से पहले तेज हवाओं से होर्डिंग गिरने का खतरा, प्रशासन सतर्क

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मानसून शुरू होने से पहले वादळी वारे पाऊस सुरु झालाय. छत्रपती संभाजी नगर शहरात मोठ्या प्रमाणात खासगी इमारतींवर होर्डिंग, फ्लेक्स उभारण्यात आले आहेत. वादळी वाऱ्यामुळे कोसळून दुर्घटना होणार नाही, याची काळजी संबंधित एजन्सींनी घेण्याचे आदेश मनपाने दिले आहेत. दुर्घटना घडल्यास एजन्सी जबाबदार राहील, असेही मनपाने कळविले आहे. अनेक ठिकाणी होर्डिंगवरील फाटलेले फ्लेक्स, सैल झालेले स्ट्रक्चर, तसेच विद्युत वाहिन्या किंवा इमारतींवर लटकलेले जाहिरात साहित्य दिसत आहे. वादळी वाऱ्यामुळे हे साहित्य अचानक उडून रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवर किंवा वाहनांवर पडण्याची शक्यता असून, त्यामुळे गंभीर दुर्घटना घडू शकते. होर्डिंगमुळे नागरिकांना कोणतीही हानी होणार नाही, याची दक्षता घेणे संबंधितांना बंधनकारक आहे.
0
0
Report

अक्कलकोट में बोगस उड़ीद बीजों के 480 बैग जब्त, किसानों को राहत

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : अक्कलकोट तालुका कृषी विभागाकडून बोगस बियाणांच्या 480 बॅग जप्त - अक्कलकोट तालुका कृषी विभागाकडून बोगस बियाणांच्या 480 बॅग जप्त - जवळपास साडेआठ लाखांचे बोगस उडीद बियाणे जप्त करत खत विक्रेत्यावर मोठी कारवाई - अक्कलकोट तालुक्यातील शेकडो शेतकरी फसवणुकीपासून वाचले - परांडा येथील स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्राचे संचालक रत्नाकर कोले यांनी हे बनावट उडीद वाण तयार केले होते. - जिल्हा कृषी अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली संबंधित खत विक्रेत्यावर धाड टाकण्यात आली. - दरम्यान जप्त केलेल्या बोगस बियाणे विक्रेत्यावर रात्री उशिरा अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. - या कारवाईमुळे शेकडो शेतकरी फसवणुकीपासून वाचले.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top