icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नाशिक के स्मशानभूमि में फिर बदहाली: स्लैब टूटा, बारिश में शव भीगते रहे

Yeola, Maharashtra:नाशिक येवला तालुक्यातील बाभूळगाव बुद्रुक येथे स्मशानभूमीची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. बाळू बर्डे यांची भाची नंदाबाई इंगळे यांचे निधन झाल्यानंतर अंत्यविधीसाठी मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आला. मात्र, प्रेत जाळण्याच्या ठिकाणचा वरचा स्लॅब तुटलेला असल्याने सुरू असलेल्या पावसाचे पाणी थेट मृतदेहावर पडत होते. अखेर नातेवाईकांना मृतदेहावर पत्रे ठेवून अंत्यविधी करावा लागला. मृत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठीही अशी गैरसोय सहन करावी लागत असल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला असून, स्मशानभूमीची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
0
0
Report

सोलापुर में ओबीसी नेता लक्ष्मण हाके और मराठा युवाओं के बीच भिड़ंत

Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग: सोलापुर में ओबीसी नेता लक्ष्मण हाके और मराठा युवाओं के बीच भिड़ंत। उत्तर सोलापुर तालुक के पाकणी फाटा स्थित होटल में भिड़ंत हुई। होटल निसर्ग में लक्ष्मण हाके भोजन के लिए ठहरे थे तभी घटना घटी। मूल रूप से लातूर के दो से तीन युवक हाके के ऊपर आकर हमला करने का आरोप लगाते हैं। इस बार हाके समर्थकों और मराठा युवाओं के बीच भी भिड़ंत हुई। पुलिस ने मध्यस्थता कर युवकों को हिरासत में लिया। मोहोळ थाने में 3 युवकों के खिलाफ शिकायत दर्ज करने की प्रक्रिया शुरू है। लेकिन मराठा युवाओं के अनुसार लक्ष्मण हाके और उनके साथियों ने धक्का-मुक्की की। होटल परिसर की CCTV कैमरे तुरंत जमा करने की मांग मराठा युवाओं ने की। हाके के अनुसार वे दावा करते हैं कि तीन युवक शराब पीकर आए थे।
0
0
Report

एमपीएससी पेपरफुटीमुळे आत्महत्या: रोहित पवार ने देशमुख 가족 को साथ का कदम दिया

Dharashiv, Maharashtra:धाराशिव : प्रथमेश देशमुख यांच्या कुटुंबीयांची आमदार रोहित पवार यांनी घेतली भेट. एमपीएससी पेपरफुटीमुळेच प्रथमेशने आत्महत्या केली; रोहित पवारांचा दावा. ‘मी आणि स्पर्धा परीक्षा देणारे ४५ लाख विद्यार्थी देशमुख कुटुंबीयांसोबत’ स्पर्धा परीक्षेत आलेला अपयश आणि आर्थिक विवंचनेतून पुण्यामध्ये आत्महत्या केलेल्या धाराशिव जिल्ह्यातील खासापुरी गावचे रहिवासी प्रथमेश देशमुख यांच्या कुटुंबीयांची आज आमदार रोहित पवार यांनी भेट घेऊन सांत्वन केलं. यावेळी रोहित पवार यांनी गावकऱ्यांशी संवाद साधत प्रथमेशच्या कुटुंबाची परिस्थिती जाणून घेतली. मी आणि स्पर्धा परीक्षा देणारे ४५ लाख विद्यार्थी तुमच्या कुटुंबीयांसोबत आहोत, असा विश्वास रोहित पवार यांनी देशमुख कुटुंबाला दिला. दरम्यान, एमपीएससीच्या पेपरफुटीमुळेच प्रथमेश देशमुख यांनी आत्महत्या केली, असा दावा रोहित पवार यांनी यावेळी केला.
0
0
Report
Advertisement

सोलापुर के प्राथमिक शिक्षा विभाग के विरोध में मागासवर्गीय शिक्षक संघटना आक्रामक

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात प्राथमिक शिक्षण विभागाच्या कारभाराच्या विरोधात मागासवर्गीय शिक्षक संघटना आक्रमक झालीय. अक्कलकोट तालुक्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी पदभार अनेक वेळा विभागीय आयुक्त पुणे यांचे अधिकार वापरून मनमानी कारभार केल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आलाय. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून कारवाई न झाल्यास येत्या दोन ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या निमित्ताने आत्मदहन करण्याचा इशारा अक्कलकोट तालुक्यातील मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने देण्यात आलाय.
0
0
Report

सोलापुर में तहसीलदार ने रास्ता रोको प्रदर्शनकारियों के साथ बैठकर उनकी मांगें सुनीं

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - मराठा आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी चक्क तहसीलदार बसले रस्त्यावर - सोलापुरात सकल मराठा समाजाकडून रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांसोबत तहसीलदारही बसले रस्त्यावर - मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सोलापुर - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरच्या रास्ता रोकोमध्ये आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी तहसीलदार किरण जमदाडे आणि पोलीस अधिकारी कुंदन गावडे बसले रस्त्यावर - दिवसेंदिवס मराठा आंदोलकांची भावना तीव्र होत असताना प्रशासनाची सामंजस्याची भूमिका - तहसीलदार किरण जमदाडे हे एका पायाने दिव्यांग असताना, आंदोलकांसोबत रस्त्यावर बसून म्हणणे ऐकून घेतल्याने सकल मराठा समाजाच्यावतीने त्यांचे आभार मानण्यात आले - मराठा आंदोलकांची प्रशासकीय अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर महामार्गावरील रस्ता मोकळा करून वाहतूक सुरळीत करण्यात आली - मराठा आंदोलकांच्या भावना ऐकून घेण्यासाठी रस्त्यावर बसलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे होतेय सर्वत्र कौतुक
0
0
Report

वाशीम में बारिश से खरीफ पर संकट, जलस्रोतों के सूखने का खतरा

Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिकांवर दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यां कडून विहिरी, बोअरवेल, नदी, तलावातून आणि शेततळ्यांमधून सिंचन सुरू आहे. मात्र, जलसाठे पुरेसे भरले नसल्याने पाण्याचा उपसा असाच सुरू राहिला तर नोव्हेंबरअखेर अनेक प्रकल्प, तलाव, विहिरी आणि बोअरवेल कोरडे पडण्याची भीती आहे. त्यामुळे आज खरीप वाचवण्या साठी वापरले जाणारे पाणी उद्या पिण्याच्या पाण्यासह रब्बी हंगामासाठी संकट ठरू शकते. ही परिस्थिती पाहता प्रशासनाने आतापासूनच गावनिहाय जलसाठ्यांचा आढावा घेत पाण्याचे काटेकोर नियोजन करणे गरजेचे आहे.
0
0
Report
Advertisement

जलजीवन मिशन में भ्रष्टाचार के आरोप, जिल्हा परिषद विभागवार श्वेतपत्र जारी करेगी

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जि.प.तील २०२२ ते २०२६ या ४ वर्षाच्या प्रशासकीय काळात जलजीवन मिशन शाळा खोल्या दुरुस्ती, सीसीटीव्ही बसवणे बांधकाम विभागा अशी कोट्यवधींच्या कामांमध्ये भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे या ४ वर्षात प्रत्येक विभागातील निधी योग्य कामावर व योग्य पद्धतीने खर्च करण्यात आला का, कामे कोणती व कशी केली, याची श्वेतपत्रिका जिल्हा परिषद काढणार आहे. शिंदेसेनेचे गटनेते राधाकिसन पठाडे यांनी केलेल्या मागणीनुसार विभागप्रमुख व गटविकास अधिकाऱ्यांनी गावनिहाय कामांची श्वेतपत्रिका सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी दिले. अध्यक्षांनी सर्व खातेप्रमुखांना विभागनिहाय श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश दिले. तसेच बीडीओंनीही कोणत्या गावात, कोणत्या योजनेतून किती रकमेची कामे केली, ती कशी झाली, याची श्वेतपत्रिका १५ दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले. जि.प.तील कामांबाबत श्वेतपत्रिका काढण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
0
0
Report

मोहगव्हाण में अवैध गावठी दारू का 1600 लीटर सड़ा कर नष्ट, आरोपी फरार

Washim, Maharashtra:मोहत मोहळे? (Note: Original Marathi content cleaned for news relevance) मोहत मोहळे, वाशीम अँकर:वाशिम तालुक्यातील मोहगव्हाणच्या शेतशिवारात अनसिंग पोलिसांनी अवैध गावठी दारूविरोधात कारवाई करत तब्बल १ हजार ६०० लिटर मोहाचा सडवा नष्ट केला आहे.या सडव्याची अंदाजे किंमत १ लाख २८ हजार रुपये असून,पोलिसांचे पथक कारवाईसाठी पोहोचले असता घटनास्थळी असलेले संशयित इसम पोलिसांना चकवा देत पसार झाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सडवा नष्ट करूनही या कारवाईत एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही.मोहगव्हाण परिसरात अवैध दारू निर्मितीविरोधात पोलिसांकडून कारवाई केली जाते, मात्र आरोपी कारवाईपूर्वीच पसार होत असल्याने पोलिसांसमोर त्यांना पकडण्याचे आव्हान कायम आहे.
0
0
Report

झीलों धारणों की सुरक्षा के लिए जलसंपदा के सभी धरणों का स्ट्रक्चरल ऑडिट मंजूर

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:राज्यातील जलसंपदा विभागाच्या ५ हजार ४१० सिंचन धरणांची सद्यस्थिती आणि सुरक्षितता तपासण्यासाठी स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ऑडिटमध्ये अनेक बाबी समोर येतात. त्यात धरणांच्या भिंती, सांडवा आणि अन्य ठिकाणी झाडे उगवतात. तर काही धरणांची पिचिंग खराब होते. भराव निघून जातो. अशावेळी धरणांची दुरुस्ती सुचविण्याचे काम स्थानिक अधिकारी करतात. मात्र निधीअभावी सर्वच धरणांची देखभाल दुरुस्ती करणे शक्य होत नाही. यातून धरणे फुटण्यासारख्या घटना घडतात. धरण बांधण्यासाठी होणाऱ्या खर्चासारखाच खर्च यावर करावा लागतो. शिवाय शेतीची आणि बऱ्याचदा जीवित हानीही होते. असे प्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारने विभागाच्या जलसंपदा अधिपत्याखालील सर्व धरणांचे एका योजनेंतर्गत स्ट्रक्चरल थर्ड पार्टी ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. धरणांच्या सुरक्षिततेतील त्रुटी आढळल्यास आवश्यक दुरुस्ती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी या अहवालाचा उपयोग होणार आहे. हे ऑडिट करण्यासाठी एका मंडळातील पाच अभियंत्यांचे पथक दुसऱ्या जिल्ह्यात पाठविण्यात आले आहे. छत्रपती संभाजी नगरच्या जायकवाडी सह मराठवाड्यातील अकरा मोठ्या धरणांचाही यात ऑडिट होणार आहे..
0
0
Report
Advertisement

मराठवाड़ा drought: 158 crore fund allocated to tackle drought planning

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्यावर सध्या पावसाऐवजी दुष्काळाचे ढग गडद होऊ लागले आहेत. पावसाळा सुरू असतानाच टंचाई आराखडा तयार करण्याचे संकट प्रशासकीय यंत्रणेवर ओढवले आहे. मागील दीड दशकामध्ये सहाव्यांदा असा प्रसंग प्रशासनासमोर आला आहे. विभागातील आठपैकी पाच जिल्हे डेंजर झोनमध्ये आले असून त्या जिल्ह्यातील ४ हजार ७३९ गावांतील ९ हजार १२२ योजनांसाठी आराखडा तयार केला आहे. जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी या पाच जिल्ह्यांसाठी डिसेंबर २०२६ पर्यंत १५८ कोटी रुपयांची तरतूद पाण्यासाठी करावी लागेल. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोली या तीन जिल्ह्यांतील वस्तुनिष्ठ माहितीचे संकलन झाल्यानंतर नियोजन करण्यात येईल,
0
0
Report

बंजारा समाज का तीज उत्सव: परंपरा और एकजुटता का चित्ताकर्षक उत्साह

Washim, Maharashtra:वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील कासोळा तांड्यावर बंजारा समाजाचा पारंपरिक तीज उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. पारंपरिक वेशभूषेतील महिला आणि युवतींनी तीजच्या टोपल्या डोक्यावर घेत मिरवणुकीत सहभाग घेतला. पारंपरिक गीतांनी संपूर्ण तांडा दुमदुमून गेला. सती आई मंदिरापासून निघालेली मिरवणूक भवानी माता संस्थान आणि सेवालाल महाराज संस्थान येथे पोहोचली. त्यानंतर तलावात तीजचे विधिवत विसर्जन करण्यात आले. विसर्जनावेळी भावुक वातावरण निर्माण झाले. तीज हा धार्मिक उत्सवासोबतच बंजारा समाजाची एकजूट आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरा जपणारा उत्सव असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
0
0
Report

ओझर विघ्नहर्ता गणपति द्वारयात्रा आज उत्साह के साथ शुरू

Barav, Maharashtra:अष्टविनायक क्षेत्रांपैकी एक असलेल्या ओझरच्या विघ्नहर्त्याचा भाद्रपद द्वारयात्रा उत्सव आजपासून मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात सुरू झाला आहे. पहाटेची विधीवत महापूजा संपन्न झाल्यानंतर विघ्नहराला आकर्षक पोषाख आणि सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले असून, मंदिराचे दरवाजे भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहेत. ​गणरायाला त्याच्या बहिणींना निमंत्रण देण्यासाठी पालखीतून घेऊन जाण्याची येथील शेकडो वर्षांची परंपरा असून, हजारो भाविक अनवाणी पायांनी या द्वारयात्रेत सहभागी होत आहेत. चार दिवस चालणाऱ्या या उत्सवात कुस्त्यांचा आखाडा, कीर्तन महोत्सव आणि महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाचा थेट ओझरमधून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
0
0
Report
Advertisement

यवतमाळ दौरे में किसानों ने दुष्काळ बताई; सूखा घोषित और फसल बीमा मांग

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ दौऱ्यावर असलेल्या विधिमंडळ अंदाज समितीच्या सदस्यांसमोर शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. पुसद येथे समिती सदस्य आमदार सदाभाऊ खोत यांना शेतकऱ्यांनी वाळलेले सोयाबीन दाखवून दुष्काळी स्थिती बाबत अवगत केले. खरीप हंगामातील पिकांचे पावसाअभवी प्रचंड नुकसान झाले आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी या 27 आमदारांच्या समितीने प्रवृत्त करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यासोबतच शेतकऱ्यांना रखडलेला पिक विमा द्यावा, माळपठारावरील पाणी प्रश्न दूर करावा अशाही मागण्या करण्यात आल्या.
0
0
Report

वाशिम रेलवे स्टेशन के पास तीन आरोपी गिरफ्तार, हथियार और मोबाइल जब्त

Washim, Maharashtra:वाशिम रेल्वे स्टेशन परिसरात दरोड्याचा डाव आखत टपून बसलेल्या तीन आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून दोन चाकू, मिरची पुडी, लांब खिडा, छोटी टॉमी, हँडग्लोज आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. विशाल कालाबाल्या चव्हाण, यशवंत चव्हाण आणि शंकेश भोसले अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरोड्याचा संभाव्य प्रकार घडण्यापूर्वीच उधळून लावण्यात आला. या प्रकरणी वाशिम शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास वाशिम शहर पोलीस करीत आहेत.
0
0
Report

अकोला में मिट्टी की गणेश मूर्तियाँ, अनाज से सजीं; 65 हजार बीज वितरित होंगे

Akola, Maharashtra:गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना अकोल्यात पर्यावरणपूरक मातीच्या गणेशमूर्तींना मोठी मागणी आहे. महिला मूर्तिकार रेवती भांगे गेल्या १० ते ११ वर्षांपासून लाल मातीपासून गणेशमूर्ती साकारत आहेत.यंदा त्यांनी गहू, तांदूळ, चणे, विविध डाळी, राजमा, ज्वारी, वाटाणा अशा विविध धान्यांपासून अनोखी गणेशमूर्ती तयार केली आहेत. ही मूर्ती तयार करण्यासाठी तब्बल तीन दिवस लागले. विशेष म्हणजे विसर्जनानंतर या मूर्तीतील धान्याचा वापर करता येणार आहे.यासोबतच गणेशमूर्तीच्या माध्यमातून लिली, कर्दळी आणि तुळशीच्या बियांचे वाटप करण्यात येणार असून, यंदा तब्बल ६५ हजार बियांचे वाटप करण्याचा संकल्प आहे.त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश अकोल्यातून दिला जात आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top