icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

रायगड़ में रात्री दो मोटरसाइकिलें भिड़ीं, दोनों मृत; खालापूर पुलिस मामले की जांच में

Karjat, Maharashtra:रायगड अपघात चौक कर्जत रस्त्यावर बोरगाव जवळ दोन मोटरसायकल स्वरांचा मध्यरात्री अपघातात मृत्यू. दोन्ही मोटरसायकल भरधाव वेगाने समोरासमोर एकमेकांना धडकल्याने दोघांचा मृत्यू झाला. दोघांना जखमींना चौक ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले मात्र दोघांचाही मृत्यू झाला होता. यापैकी एका व्यक्तीचे नाव सिद्धार्थ जाधव असून रा. नेरळ, ता. कर्जत तर दुसऱ्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. खालापूर पोलीस पुढील तपास करत आहे. रात्री भरधाव वेगाने दुचाकी चालवणे दोघांच्या जीवावर बेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते.
0
0
Report
Advertisement

उदययनराजे भोसले ने शहापुर में अर्जुन जाधव के परिवार से मुलाकात कर संवेदना जताई

Satara, Maharashtra:कराड सातारा -जम्मूतील उरी येथे झालेल्या स्फोटात वीरमरण आलेले जवान अर्जून जाधव यांच्या कुटुंबीयांची खा .उदयनराजे भोसले यांनी भेट घेऊन सांत्वन केले. शहापूर येथील जाधव यांच्या घरी झालेल्या या भेटीदरम्यान उदयनराजे यांनी जवानांच्या 11 महिन्यांच्या बालकाला हातात घेतले असता बाळ रडू लागले. त्या क्षणी उदयनराजे भावुक झाले, तर कुटुंबीयांची नियतीपुढील हतबलता पाहून ते काही काळ निशब्द राहिले.जवान अर्जुन जाधव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या शहापूर गावात स्मारक उभारण्याचा मानस गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. या स्मारक उभारणीसाठी भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ तसेच छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
0
0
Report

चेनुस्टा खेतशिवार में बिबट्या का डर, किसानों ने सुरक्षा उपाय मांगे

Amravati, Maharashtra:चेनुस्टा शेतशिवार बिबट्याचा वावर; पेरणीची वेळ असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती, बंदोबस्त करण्याची मागणी चेनुस्टा शेतशिवार परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतात बिबट्या पाहिल्याचा दावा केला असून त्याचे दृश्य मोबाईल कॅमेऱ्यातही कैद झाले आहेत. सध्या पेरणीचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांची शेतातील वर्दळ वाढली आहे. अशा परिस्थितीत बिबट्याच्या उपस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. वन विभागाने तातडीने परिसरात पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
0
0
Report
Advertisement

इंद्रायणी नदी में मृत मछलियों से देहू में हलचल; भक्तों में चिंता बढ़ी

Varsoli, Maharashtra:Anchor: संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना श्रीक्षेत्र देहू येथील इंद्रायणी नदीत हजारो मासे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नदीचे पाणी दूषित झाल्याचे चित्र निर्माण झाले असून लाखो वारकरी आणि भाविकांच्या आरोग्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे..अधिक मासामुळे देहूत भाविकांची मोठी गर्दी होत असतानाच नदीत मोठ्या प्रमाणात मृत मासे तरंगताना दिसत आहेत. काही मास्यांच्या अंगावर किडे आढळल्याने पाण्याच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून वारकरी आणि स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.. vo- नदी स्वच्छतेसाठी दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च केला जात असतानाही अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने स्वच्छता मोहिमांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबतही शंका व्यक्त केल्या जात आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत मृत मासे बाहेर काढून त्यांची विल्हेवाट लावली असली, तरी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हा विषय अत्यंत संवेदनशील बनला आहे.. vo- या मृत मासे घटनेची सखोल चौकशी करून प्रदूषणास जबाबदार घटकांवर कठोर कारवाई करावी, तसेच इंद्रायणी नदी स्वच्छ आणि सुरक्षित करण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी वारकरी, नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांकडून जोर धरू लागली आहे..
0
0
Report

छत्रपती संभाजीनगर बैंक चुनाव: 17 जून को सभी अपीलों की सुनवाई, अंतिम तस्वीर साफ होगी

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत अर्ज छाननीनंतर बाद ठरलेल्या उमेदवारांकडून अपील दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. आमदार संजना जाधव, आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार, प्रणिकेत पाटील, इंदुमती साहेबराव पाटील, सुवर्णा जाधव, मनीज राठोड, रितेश मुनीत, मनोज देशमुख आणि प्रदीप शिंदे यांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल झाले आहेत. सुवर्णा जाधव यांनी दोन अपील दाखल केल्याने एकूण अपीलांची संख्या दहावर पोहोचली आहे. अर्ज छाननी प्रक्रियेनंतर बाद ठरवण्यात आलेल्या उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाला आव्हान दिले असून, या सर्व अपीलांवर 17 जून रोजी एकाच दिवशी सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
0
0
Report
Advertisement

अकोला भरचौक पर पुराने विवाद के चलते चार हल्लेखोरों ने अंकुश नंदागवळी की धारदार हथियार से हत्या

Akola, Maharashtra:अकोला शहरात भरचौकात झालेल्या निर्घृण हत्येच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून एका २४ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. अंकुश नंदागवळी असे मृत तरुणाचे नाव असून ही घटना काल रात्री नवीन तारफैल परिसरातील बागडे किराणा दुकानाजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश नंदागवळी हा परिसरात असताना तीन ते चार हल्लेखोरांनी त्याला गाठले. जुन्या वादाच्या कारणावरून झालेल्या वादानंतर आरोपींनी अंकुशवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. मानेवर, डोक्यात, छातीत आणि पोटात गंभीर वार झाल्याने अंकुश रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. हल्ला इतका bhiषण होता की त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. भरवस्तीत झालेल्या या हत्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही माहिती मिळताच रामदास पेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली असून पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. रामदास पेठ पोलीस पुढील तपास करीत आहेत.
0
0
Report

Air India ने सुबह की दिल्ली-संभाजीनगर-दिल्ली उड़ानों को जारी रखा, यात्रियों में राहत

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:दिल्ली-छत्रपती संभाजीनगर-दिल्ली ही सकाळची विमानसेवा बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर ६ दिवसांत एअर इंडियाने यू-टर्न घेत ही सेवा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. १ जुलैपासून नव्या उड्डाण क्रमांकांसह सकाळची दिल्ली विमानसेवा सुरू राहणार असल्याने प्रवासी, पर्यटकांमधून समाधान व्यक्त होत आहे. एअर इंडियाचे सकाळच्या वेळेतील दिल्ली संभाजीनगर दिल्ली विमानसेवा १ जुलैपासून तात्पुरती बंद होणार असल्याचे ६ जूनला स्पष्ट केले होते. त्यामुळे दिल्लीसाठी एका दिवसात ये-जा करणे अशक्य होते. याबाबत नागरिकांनी रोष व्यक्त केला होता त्यानंतर एअर इंडियानं तातडीने हा निर्णय घेतलायदरम्यान इंडिगोने काही सेवा बंद केलेल्या आहे त्यांनीही अशा पद्धतीने निर्णय मागे घ्यावा अशी मागणी होते आहे...
0
0
Report
Advertisement

मराठवाडा में जून के बावजूद बैंकों ने केवल 14% फसल ऋण दिया

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्यात जून महिना उजाडल्यानंतरही बँकांकडून केवळ १४ टक्केच पीककर्ज वाटप झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत कर्ज वाटप ३ टक्के अधिक आहे नेहमीप्रमाणे गती संथच असल्याचे चित्र आहे, पेरणीच्या तोंडावर आता शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज वाटप करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधे होत आहे. मराठवाड्यात यावर्षी सुमारे ४९.३३ लाख हेक्टरवर खरीप पेरणीचा अंदाज है. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीनची २६.११ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज है. त्या पाठोपाठ १२.८० लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड होण्याचा अंदाज है. याशिवाय तूर, उडीद, मूग, बाजरीची सुमारे ४.३० लाख हेक्टरवर पेरणी र पेरणी होण्याचा अंदाज है. मका ३.५५ लाख हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज है...
0
0
Report
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top