icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

यवतमाल जिले के संकटग्रस्त किसानों ने कर्जमाफी की घोषणा का स्वागत किया

Yavatmal, Maharashtra:राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. शेतकाऱ्यांना कर्जमुक्त करू असे आश्वासन महायुतीने दिले होते, हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी उशीर जरी झाला असला तरी नियमित कर्ज फेड करणारे शेतकरी आणि कर्जबाजारी शेतकरी यांना पूर्णतः दिलासा दिला पाहिजे, सोबतच शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव व प्रक्रिया उद्योग झाल्यास यापुढे शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवश्यकताच भासणार नाही. त्यामुळे तशा उपाययोजना करण्यातची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
0
0
Report
Advertisement

जालना में 20 लाख विमा के लिए साथी की हत्या, खुद की मौत का बनाव

Jalna, Maharashtra:जालना : विम्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव, कारमध्ये दिला मित्राचा बळी(पॅकेज) यामध्ये पोलीस अधीक्षक बाईट देणार आहेत. बाईट दिला की पाठवून देतो. जालना : विम्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव, कारमध्ये दिला मित्राचा बळी(पॅकेज) अँकर : जालन्यातील जाफ्राबादमध्ये 20 लाखांच्या विम्याचा लाभ मिळण्यासाठी एकाने स्वतःच्या मृत्यूचा बनाव करत स्वतःच्या कारला आग लावून मित्राचा बळी दिल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करत मुख्य आरोपीसह तिघांना बेड्या ठोकल्यायत. बघूया हा स्पेशल रिपोर्ट. व्हिओ : ०१: : स्वतःचा कार अपघातात अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करून सहकाऱ्याचा केला खून करण्यात आला आहे. 20 लाख रुपयांच्या विम्यासाठी हा कट रचल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. जालन्यातील जाफ्राबाद-चिखली रोडवर ही घटना घडलीय. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह तिघांना अटक केली असून एका महिलेला देखील ताब्यात घेतलं आहे. नितीन गवळी हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असून आकाश गवळी आणि आकाश फुलारी अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत. तर आणखी एका महिलेला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रविवारी सकाळी जाफ्राबाद-चिखली रोडवर एक कार झाडावर आढळून पेट घेतलीली दिसून आली होती. यात एक मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला हा मृतदेह नाशिक येथील नितीन गवळी याचा असल्याचं सांगण्यात आलं. मात्र तपासात नितीन गवळी यानेच 20 लाखांच्या विम्याचा लाभ मिळण्यासाठी सहकारी असलेल्या आणि पेंटरचं काम करणाऱ्या संदीप चव्हाणचा खून करून कार पेटवून दिल्याचं निष्पन्न झालं आहे. बाईट : तेगबीर सिंग संधू,पोलीस अधीक्षक, जालना व्हिओ : ०२: मूळचा उत्तर प्रदेशातील असलेला संदीप चव्हाण हा नाश्क येथे पेंटरचे काम करत होता. दरम्यान त्याची ओळख नितीन गवळी आणि राजू फुलारे यांच्याशी झाली. "गावाकडे पेंटिंगचे काम आहे, आपण गावी जाऊ" असे सांगून आरोपींनी संदीप चव्हाणला सोबत नेलं. नाशिकहून छत्रपती संभाजीनगरमार्गे सिल्लोड येथे येत असताना आरोपींनी दारू प्राशन केली. त्यानंतर मुख्य फरार आरोपी नितीन गवळी याने त्याचा चुलत भाऊ आकाश गवळीला सिल्लोड येथे बोलावून घेत तिघांनी मिळून संदीप चव्हाणचा गळा दाबून खून केला. त्यानंतर जाफराबाद तालुक्यातील जंजाळवाडी परिसरात आकाश गवळी यांनी आणलेल्या गाडीला दोरी बांधून गाडी झाडावर आदळल्याचा बनाव करण्यात आला. तसेच, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने गाडीवर पेट्रोल टाकून ती पेटवून देण्यात आली. नितीन गवळी हा आर्थिक अडचणीत असून, त्याने स्वतःचा सुमारे २० लाखांचा विमा काढला होता. त्या विम्याचा लाभ मिळवण्यासाठीच हा संपूर्ण कट रचण्यात आला. तपासात बनाव असल्याचे निष्पन्न झालं आहे. बाईट : तेगबीर सिंग संधू,पोलीस अधीक्षक, जालना व्हिओ : ०३: या घटनेबाबत 31 मे रोजी डायल वर जाफराबाद-चिखली रस्त्यावर अपघात होऊन कारला आग लागल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, मृत व्यक्ती नितीन गवळी असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी जाफराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, तपासात हा बनाव असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत नितीन गवळी याने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचून विमा रक्कम मिळविण्यासाठी आणि इतर कारणांमधून सुटका मिळवण्यासाठी संदीप चव्हाणचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. बाईट: तेगबीर सिंग संधू,पोलीस अधीक्षक, जालना व्हिओ : ०४: दरम्यान या प्रकरणात कारमध्ये आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी डीएनए तपासणीची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणात आकाश गवळी आणि राजू फुलारे यांनी जबाब दिल्याची माहिती आहे. या कार जळीत प्रकरणानंतर मुख्य आरोपी नितीन गवळी हा फरार झाला होता मात्र पोलिसांनी त्याला गुजरात मधून अटक केली आहे. सध्या नितीन गवळीची पोलिसांकडून चौकशी सुरू असून त्याच्या चौकशीतून आणखी काही बाबी उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जातीय.
0
0
Report

भाजपा की शिंदे-नीति से महाराष्ट्र की राजनीति भारी उथल-पुथल

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी भास्कर जाधव 1-2-1.. अंबादास बोलले ते त्यांचा अनुभव बोलले ती वस्तुस्थिती आहे.. भाजपच्या जे-जे जवळ गेलेले पक्ष आहेत. त्या सर्वच पक्षांना अशा प्रकारचा अनुभव आलेला आहे.. ज्यांच्या बरोबर मैत्री करायची तेच पहिल्यांदा मित्राला संपवण्याचे काम ज्या दिवसापासून मैत्री करायची त्या दिवसापासूनच भाजपचे काम सुरू होतं.. एकनाथराव शिंदे यांच्या बाबतीत आता भाजपचे काम ते सुरू झालेल आहे.. खरंतर ते 2024 लाच सुरू झालेय.. 2024 च्या निवडणुकीमध्ये पुन्हा आपण एकनाथराव शिंदे यांनाच मुख्यमंत्री करू असं सांगणारा भाजपा निवडणुकीत एकनाथराव शिंदे यांचा भाजपने खर्ची करण केलं..जसे भाजपचे जास्तीत जास्त आमदार निवडून आले तसे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री तर सोडा उपमुख्यमंत्री पद द्यायला तयारही नव्हते भाजपने एक कलमी कार्यक्रम महाराष्ट्रात आता सुरू केलेला आहे.. एकनाथ शिंदेंच कच्चीकरण करणे कालच्या विधान परिषदेच्या 17 जागांपैकी भाजपच्या मूळ सातच जागा होत्या ते 12 वरती अडकून बसले..शिवसेनेच्या मुळ जागा 6 होत्या तिथं रडत खडत 4 जागा दिल्या.. स्वतः मोठे होण्यासाठी आपल्याच मित्रांना आपल्या पायाखाली घ्यायचं.आणि आपली उंची वाढवायची ही भाजपची जुनीच कार्यपद्धती आहे विश्वासघात हा त्यांच्या पाचवीला पुजलेला आहे.. एकत्र यावं कधी एकत्र यावं.. विधानसभेच्या निवडणुकीसाठी अजून तीन वर्ष बाकी आहे त्यामुळे या तीन वर्षात काय काय राज्यात घडामोडी घडतील हे बघावं लागेल.. एक घडामोडी निश्चित झालेली आहे.ती म्हणजे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांची लोकप्रियता ही झपाट्याने कमी व्हायला लागलेली आहे.. जशी लोकप्रियता कमी होते त्याच पद्धतीने विश्वास सुद्धा या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात.. प्रकल्प येतात म्हणून कोणी जाहीर केले?.. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं ना.. मंत्रिमंडळात असलेले मंत्री अशा प्रकारचे जर वक्तव्य करत असतील त्यांना वाटत असेल जनता ही पूर्णपणे अज्ञानी असेल परंतु त्याच्यामध्ये त्यांचं ज्ञान दिसून येते एवढेच मी सांगतो.. तटकरेंनी स्वतः आणि स्वतःच्या घराण्यापलीकडे कोणत्याही पक्षाचा किंवा सहकाऱ्यांचा विचार केलेला नाही.त्या विचारांमध्ये ते याही वेळेला आता यशस्वी झालेले आहेत.. सोबत 1-2-1
0
0
Report
Advertisement

पानी की किल्लत से नाराज़ महिलाएं बागलाण में ग्राम पंचायत कार्यालय पर हंडा मोर्चा

Nashik, Maharashtra:नाशिकच्या बागलाण तालुक्यातील वायगावमध्ये पाणीप्रश्नावर महिलांचा उद्रेक... ग्रामपंचायतीला ठोकले टाळे Anc- नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात पाणीटंचाईने गंभीर स्वरूप धारण केले असून प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात महिलांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला आहे. वायगाव येथे अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा तीव्र प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार मागणी करूनही ग्रामपंचायतीकडून टँकर सुरू करण्यात आले नसल्याने संतप्त महिलांनी आज थेट ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढत कार्यालयाला कुलूप ठोकले. "जोपर्यंत गावात नियमित पाणीपुरवठा सुरू होत नाही, तोपर्यंत कुलूप उघडू देणार नाही," असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या आंदोलनामुळे ग्रामपंचायत प्रशासनासह संबंधित यंत्रणेची धावपळ उडाली असून, पाणीटंचाईच्या प्रश्नावर प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report

हेलीकॉप्टर के सामने प्रेम प्रस्ताव पेश किया गया, प्रशिक्षण केंद्र में भावुक पल

Nashik, Maharashtra:दीक्षांत सोहळ्यात प्रेमाची भरारी, वैमानिकाने हेलिकॉप्टरसमोर गुडघ्यावर बसून केले प्रपोज* नाशिकच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये आज लष्करी शिस्त, पराक्रम आणि आधुनिक विमानचालन कौशल्याचे दर्शन घडले. मात्र दीक्षांत संचलन सोहळ्यानंतर घडलेल्या एका भावनिक प्रसंगाने उपस्थितांची मने जिंकली. प्रशिक्षण पूर्ण करून वैमानिक म्हणून नव्या जबाबदारीसाठी सज्ज झालेल्या भारत भारद्वाज यांनी आपल्या प्रेयसी आरुषीला सर्वांसमोर लग्नासाठी मागणी घातली. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी भारत यांनी कठोर प्रशिक्षण पूर्ण केले, त्याच ठिकाणाहून आता त्यांना सेवाही बजावायची आहे. दीक्षांत सोहळा संपल्यानंतर हेलिकॉप्टरसमोर गुडघ्यावर बसत त्यांनी आरुषीला अंगठी घालून लग्नासाठी प्रपोळ केले. या अनपेक्षित क्षणाने उपस्थित अधिकारी, कुटुंबीय आणि मित्रमंडळी भारावून गेली. आरुषीनेही सर्वांसमोर हा प्रस्ताव स्वीकारताच परिसर टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेला. भारत भारद्वाज यांनी ऑफिसमध्ये अधिकारी म्हणून रोज सॅल्युट मिळतो आणि करावा लागतो पण घरात पत्नीच खरी बॉस असते. त्यामुळे हा माझ्याकडून प्रेमाचा सॅल्युट होता अशी मिश्कील प्रतिक्रिया दिली. तर असे सरप्राईज मिळेल, याची कल्पनाही नव्हती, असे सांगत आरुषीने आपल्या आनंदाच्या भावना व्यक्त केल्या. देशसेवेच्या शपथेसोबतच प्रेमाचीही नवी सुरुवात करणारा हा क्षण उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला.
0
0
Report

नालासोपारा में विदेशी महिला पर लकड़ी के डंडे से हमला, वीडियो वायरल

Vasai-Virar, Maharashtra:नालासोपाऱ्यात एका परदेशी महिलेवर लाकडी दांड्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नालासोपारा येथील प्रगती नगर परिसरात एका नायजेरियन महिलेवर एका व्यक्तींनी लाकडी दांड्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून परिसरात खळबळ उडाली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संबंधित महिलेला मारहाण होत असल्याचे दिसत आहे. नेमके कोणत्या कारणातून हा वाद झाला आणि मारहाणीमागचे कारण काय होते, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. स्थानिक नागरिकांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनेची दखल घेत तपास सुरू केला आहे. व्हायरल व्हिडिओच्या आधारे संबंधित व्यक्तींची ओळख पटविण्याचे काम सुरू असून पुढील चौकशीनंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
0
0
Report
Advertisement

नवी मुंबई में मनसे ने गोदाम पर छापा, इथिलीन स्प्रे से उगाए आम सील

Navi Mumbai, Maharashtra:केमिकल स्प्रे से कृत्रिम रूप से आम उगाने वाले गोदाम पर मनसे की धाड; खाद्य एवं दवा प्रशासन ने लाखों रुपये के आम सील किए। नवी मुंबई में केमिकल स्प्रे से आम उगाने वाले व्यापारी के गोदाम पर मनसे ने दबिश दी। सनपाडा सेक्टर 10 क्षेत्र में एक हॉल किराये पर लेकर अमाबाद आदि कारोबार करने वाले गोदाम पर दबिश दी गई। इस दौरान इथिलीन नामक ऐसा स्प्रे जिसका मानव शरीर पर हानिकारक प्रभाव हो सकता है, के दुरुपयोग का मामला सामने आया। इस प्रकरण में मनसे ने खाद्य व औषध प्रशासन को बुलाया; FDA ने लाखों के माल को सील कर खतरनाक रसायन से उगाए गए आमों की जांच के लिए कब्जे में लिया गया।
0
0
Report

अमरावती में पेढ़ी बैरेज प्रकल्प प्रभावित किसानों ने पुनर्वसन की मांग, नहीं तो परियोजना रद्द

Amravati, Maharashtra:अमरावतीत पेढी बॅरेज प्रकल्पग्रस्त गावकरी आक्रमक; भूसंपादन विभागात मांडला ठिय्या, पुनर्वसन करा नाही तर प्रकल्प रद्द करा गावकऱ्यांची मागणी अँकर :- अमरावतीच्या रोहनखेडा, पर्वतापूर आणि दोनद या तीन गावात पेढी बॅरेज प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. यामध्ये गावातील लोकांची शेतजमीन घेण्यात आली. मात्र कित्येक वर्षापासून गावातील लोकांचे पुनर्वसनाचा मुद्दा निकाली काढला नाही यासाठी अनेकदा आंदोलन करण्यात आले मात्र तरी देखील शासनाने दखल घेतली नाही त्यामुळे आज अमरावतीच्या भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी श्री चव्हाण यांच्या कार्यालयात शेकडो गावकऱ्यांनी धडक देत आक्रमक पवित्रा घेत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आमचे पुनर्वसन करा नाहीतर थेट प्रकल्प रद्द करा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. 2007 पासून या प्रकल्पाचे काम सुरू झालं आहे मात्र ते काम 60 टक्केच पूर्ण झालं आहे. या प्रकल्पासाठी 365 हेक्टर शेत जमीन भूसंपादन करण्यात आली होती. त्यामुळे गावकऱ्यांचे तातडीने पुनर्वसन करा अशी मागणी करण्यात आली आहे. बाईट :- पारसराम सुखदिवे, गावकरी बाईट :- सतीश गोठे, गावकरी
0
0
Report
Advertisement

राजेंद्र राऊत के अर्ज पर शिवसेना बंडखोर उमेदवारों की आपत्ति, सुनवाई एक बजे

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या अर्जावर अपक्ष शिवसेना बंडखोर उमेदवारांकडून हरकत भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या अर्जावर शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांकडून हरकत शिवसेना बंडखोर उमेदवार रमेश बारस्कर यांनी चार हरकती घेतल्या. नावाच्या नोंदी बाबत हरकत, एकापेक्षा अधिक नामनिर्देशक पत्रामधील माहितीची पडताळणी, आमदार असताना शासकीय निवासस्थाना संदर्भातील माहिती बाबत हरकत, उमेदवाराच्या वयासंदर्भातली हारकत.. रमेश बारस्कर यांनी राजेंद्र राऊत यांच्या बाबतीत घेतल्या हरकती.. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कार्यालयात एक वाजता सुनावणी होणार
0
0
Report

विरार कोपरी में महावितरण केखंडित बिजली: 12 घंटे से अधिक अंधेरा, जताया गुस्सा

Vasai-Virar, Maharashtra:विरार ब्रेक विरारच्या कोपरी गावात महावितरणचा तब्बल बारा तासाहून अधिक वेळ वीजपुरवठा खंडित महावितरणच्या वीज लाईनच्या दोन वायरी जळाल्याने कोपरी गाव रात्रभर अंधारात तब्बल बारा तास उलटूनही विद्युत पुरवठा पूर्ववत झाला नसल्याने नागरिक त्रस्त. रात्रभर वीज नसल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांचे प्रचंड हाल. वारंवार तक्रारी करूनही महावितरण प्रशासनाकडून तत्काळ दखल घेतली जात नसल्याचा नागरिकांचा आरोप. "बिले वेळेवर भरतो, मग सुविधा कधी मिळणार?" असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित. वाढत्या उकाड्यात आणि अंधारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण. कोपरी गावातील वीजपुरवठा नेमका कधी सुरळीत होणार?
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top