icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

मार्डी गाँव में बिजली के तार टूटने से हादसा; बकरी मरी, नाती घायल, दादी भी मरी

Satara, Maharashtra:सातारा - माण तालुक्यातील मार्डी गावात तुटून पडलेल्या वीजवाहक तारेमुळे एक अत्यंत हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे. बेंद शिवारात शेळ्या चारत असताना एका शेळीचा पाय विजेच्या तारेत अडकल्याने ती तडफडू लागली. तिला वाचवण्यासाठी १३ वर्षांचा नातू सुजित पुढे गेला असता त्यालाही विजेचा जोरदार धक्का बसला. आपल्या डोळ्यांसमोर नातवाला मृत्यूशी झुंज देताना पाहून ६० वर्षीय आजी मालन काळे यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र विजेचा तीव्र प्रवाह असल्याने शेळीसह आजी-नातवाचा जागीच मृत्यू झाला. महावितरणच्या कथित निष्काळजीपणामुळे घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि शोककळा पसरली आहे.
0
0
Report

नीट पेपर लिक मामले में बेलापूर में कांग्रेस का भव्य मोर्चा, शिक्षण मंत्री के इस्तीफे की मांग

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई जिल्हा काँग्रेसतर्फे आज बेलापूर मध्ये नीट पेपर लिक, उशिरा होणारे विद्यालयीन प्रवेश अश्या विविध विषया संदर्भात भव्य मोर्चा काढत विद्यार्थ्यांचा आवाज अभियान राबविलाय. केंद्र सरकारच्या निष्क्रियतेमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात गेले आहे. सरकारच्या निषेयरते विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन देखिल बिघडत असून काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केले असताना अद्यापही केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा सरकारने घेतला नाही ही निषेधार्य बाब असल्याची टीका यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आबा दळवी यांनी केलेय.
0
0
Report

सोलापुर मालशिरस दुर्घटना: विधायक ने ठेकेदारों के खिलाफ कार्रवाई मांग विधानसभा में

Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तांदुळवाडी येथील विहीर दुर्घटनेप्रकरणी आमदार उत्तम जानकर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला आहे. या घटनेत 8 निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या रोडवेज सोलुशन कंपनीच्या ठेकेदारला अटक न करता सुपरवायझर सारख्या व्यक्तींना अटक करून चालढकल केली जात असल्याचा मोठा उपस्थित केला आहे. सातारा पंढरपूर या अपूर्ण कामाचं बिल काढल असून त्यामुळे अधिकाऱ्यांवर ही कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आमदार जानकर यांनी आज सभागृहामध्ये केली आहे.
0
0
Report
Advertisement

नारायण राणे ने संजय राऊत पर हमला बोला, उद्धव ठाकरे को निशाने पर रखा गया

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी भाजपा खासदार नारायण राणे पत्रकार परिषद pointers On संजय राऊत पत्र संजय राऊत यांच्या प्रत्येक वाक्याची चौकशी करावी लागेल संजय राऊत सगळं आक्षेपार्ह बोलतात कदाचित हे सगळं त्यांचं बोलणं आजारपणामुळे असेल ते मला जेव्हा भेटले, तेव्हा त्यांच्या मी तब्येतीची चौकशी केली होती माणूस जवळ आला की कसा बेफाम बोलतो याचं उदाहरण म्हणजे संजय राऊत On शहा कवच कुंडल संजय राऊत एक खासदार आहेत, संपादक सोडा, अशा परिस्थितीत त्यांनी का बोलावं राज्यातल्या राजकारणावरती देशातल्या परिस्थिती वरती संजय राऊत यांनी जरूर बोलावं अमित शहा यांचं नाव त्यांनी का घ्यावं कवच कुंडल कोणी घेतली, कवच कुंडल तू नाही का घेतलेली.. तू उद्धव ठाकरे सेनेमध्ये का राहिला आहेस संजय राऊत यांच्या जवळ कोणाची तरी कवच कुंडल आहेतच ना संजय राऊत यांच्या भोवती सहानुभूती पण कोणाची तरी आहे ना On मुख्यमंत्री ( सहावा खासदार --टायगर ऑपरेशन) ऑपरेशन झाललं, ना सहा खासदार इकडून तिकडे गेले ना आमचा हेतू साध्य झाला, कुठून काय कोणी केलं कशाला काढा On लोकशाही हे सर्व लोकशाहीसाठी धोकादायक आहे की नाही हे परिस्थितीनुसार कळेल सर्व टायगर बीजेपी मध्ये आले On उद्धव ठाकरे ठाकरेंकडे आमदार आहेत कुठे सध्या तरी त्यांच्याकडे तीनच खासदार आहेत तेही खासदार सिंधुदुर्गातले आहेत, त्यांना आम्ही भाजपमध्ये घेणार नाही, आम्ही माणूस बघून घेतो On उद्धव ठाकरे आमदार पुढचा आमदारांचा नंबर लागेल खासदारांना जो काही मोबदला मिळाला, आमदार म्हणणार आम्हाला मिळू दे राजकीय वर्चस्व On विरोधी पक्ष लोकशाही आहे, विरोधी पक्ष नेता पाहिजेच विरोधी पक्ष नेता पाहिजे, तो प्रमुख असतो कामकाजामध्ये विरोधी पक्ष नेत्याचा रोल प्रमुख असतो On उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंना सध्या बरं नाहीये, जाऊ दे ना.. त्यांना सोडा तीन खासदारांना त्यांना घेऊन बसू दे ना बाळासाहेबांची आठवण मला येते... उद्धवची नाही व्हाईट वाटतं जो पक्ष मी सुरुवातीपासून पाहिला त्याचा आज अस्त होता ना मला बरं वाटत नाही बाळासाहेबांचा आवाज ती महाराष्ट्राची गरज होती आज नाही On अणुऊर्जा प्रकल्प अणुऊर्जा प्रकल्प आता आला तर आम्ही त्याचे स्वागत करू अणू ऊर्जा प्रकल्प इथे यावा या मर्जीचा मी आहे विरोध करणारे व्यावसायिक आहेत विरोध करणारे कोण आहेत, या पूर्वी विरोध करून उद्धव ठाकरेंनी पैसे घेतले... आता गप्प बसले, एक प्रकल्प झाला तर किती प्रगती झाली असती विरोध करणाऱ्यांनी समोरून आंदोलन करा, मग मी काय करतो ते बघा सारखं आंदोलन आंदोलन चेष्टा लावली आहे वीज निर्मिती करणारा प्रकल्प कोणीही करावा मानसकृता बदलणे म्हणजे माझा फॉर्मुला आहे मार देणे... म्हणजे फटकवणे किती वेळा समजवायचं - नारायण राणे
0
0
Report

उद्धव ठाकरे का मराठवाड़ा दौरा: छह सांसदों के साथ सियासी रस्साकशी तेज

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anchor : शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून उबाठा गटाचे सहा खासदार फुटले त्यातील तीन खासदार मराठवाड्यातील होते त्यामुळे त्या सर्व खासदारांच्या मतदारसंघात आता उद्धव ठाकरे तीन दिवसांचा दौरा करणार आहे मात्र या दौऱ्यावरन आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत आता उद्धव ठाकरे दौरा करून काय उपयोग असं शिवसेना नेते म्हणताय तर उद्धव ठाकरेंचं मराठवाड्यात स्वागत आहे असं नुकतेच फुटलेले खासदार सांगताय... Vo 1... उबाठा गटा मध्ये पडलेल्या फुटी नंतर त्यांचे सहा खासदार आता एकनाथ शिंदेंच्या गळाला लागले आहे त्यात तीन खासदार हे मराठवाड्यातले आहेत त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे दौरा करणाऱ आहे, खरंतर अडीच वर्षांपूर्वी गुवाहाटी ला जाणाऱ्या आमदारांच्या संख्येत मराठवाड्यातले नऊ आमदार होते त्याही वेळेस आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात दौरा केला होता आणि तब्बल अडीच तीन वर्षानंतर आता तीन खासदार फुटलेले आहेत याच खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे नव्याने दौरा करणार आहे यवतमाळ पासून त्यांचा दौरा सुरू होणार आहे, यवतमाळ, वाशीम, हिंगोली, परभणी, धाराशिव करत थेट शिर्डी पर्यंत त्यांचा दौरा असणार आहे.. या सहाही मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरे मतदारांसोबत आणि शिवसैनिकांसोबत संवाद साधणार आहे आणि फुटलेले खासदार गद्दार असल्याचा पुन्हा एकदा आरोप ते करतील यात शंका नाही.. मात्र याच दौऱ्यावर ना आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे आता दौरा करून उपयोग तो काय असा सवाल आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून केल्या जातोय... Byte योगेश कदम, शिवसेना नेते Vo 2.. तर उद्धव ठाकरे येत असतील तर त्यांच्या पक्ष वाढीसाठी त्यांनी फिरावं त्यांनी स्वागताचा आहे अशी प्रतिक्रिया आता एकनाथ शिंदेंच्या सोबत गेलेले खासदार देत आहे.. Byte नागेश पाटील आष्टीकर, खासदार हिंगोली Byte संजय जाधव, खासदार परभणी Vo 3... मराठवाडा एकेकाळी उद्धव ठाकरेंचा शिवसेनेचा गड मात्र हा गड आमदारांच्या रूपान तीन वर्षांपूर्वी तर खासदाराच्या रूपाने आता उध्वस्त झालेला आहे, उबाठा साठी हे उध्वस्त झालेलं मतदारसंघ पुन्हा सावरण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा दौरा आहे विधान परिषद निवडणुकीत त्यांनी दौरा करत जंग जंग पछाडले मात्र मराठवडयात अवघे 3 आमदार त्यांच्या पदरी पडले, तर राज्यात 20 या व्यतिरिक्त फारस यश त्यांना आलं नाही आता खासदारांच्या मतदारसंघातील दौऱ्यान काही फरक पडेल का अशाच चर्चा आता सुरू आहे... विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर...
0
0
Report
Advertisement

CCI कपास खरीद विवाद पर प्रकाश आंबेडकर के आरोप, किसान-मोर्चे में राजनीतिक घमासान

Nagpur, Maharashtra:नागपूर प्रकाश आंबेडकर, वंचित पीसी - सीसीआय कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया विरोधात पिटीशन टाकली होती. सीसीआयने कापूस खरेदीला सुरवात केलीय... पण नवीन पद्धत सुरवात करत सिसीआयने बेल करून कापसाच्या बेल (गाठी) पडल्या भावात विकत आहे... सीसीआय अडचणीत येऊन ही व्यवस्था कोलमडली पाहिजे यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. यामुळे पुन्हा सीसीस्खरेदी बंद झाल्यास त्याचा फायद्या व्यापारी वर्गाला होईल यासाठी काम सुरू असल्याचा आरोप केलाय... शासनाला नोटीस बजावली असून त्यांनतर सुनावणी होणार आहे... सप्टेंबर महिन्याचा पहिल्या आठवड्यात धान, सोयाबीन, ज्वारी, खरेदी सेंटर आणि दर जाहीर करावे, कमी पीक झाल्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे... On राजकीय परिस्थिती ... प्रत्येक राजकीय माणूस हा गुलाम झाला आहे, विधान परिषद निवडणुका झाल्यात, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शेवटपर्यंत लढले, मात्र काँग्रेसचे उमेदवार लढले नाही, किंवा पडून गेले, त्यामुळे राजकीय पक्ष गुलाम होत आहे का?... RSS चरित्रवान असल्याचं सांगतात मात्र भागवत मोदीला गुलाम झाल्याचं दिसत आहे... देशाला आर्थिक दृष्टीने गुलाम करण्याचं काम सुरू झालं आहे... सुब्रह्मण्यन स्वामी, वानखडे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या चारित्र्यवर शंका व्यक्त केली आहे... RSS चारित्र्यवान म्हणत असताना RSS ने मोडीला कोणी विचारलं नाही.. लोकामधूम मोदींवर आरोप होत आहे... मोहन भागवत विचारणा करत नाही, म्हणजे मोहन भागवत यांनी मोहन भागवत यांना गुलाम केले अशी परिस्थिती आहे..* ... पंतप्रधान यांच वागणं किंवा त्यांची कामजोरीचे शोषण सुरू आहे....अग्रीकचारल मार्केट अमेरिका करारामुळे बाजारपेठ जगासाठी खुली केली आहे. त्यामुळे आर्थिक संकट वाढलं... सामान्य माणूस म्हणून आवाज उठवयाल सुरवात केली पाहिजे... राजकीय व्यवस्थेला लकवा मारला असल्यास... लोकांनी लकवा मरून चालणार नाही, सर्व व्यवस्था ताब्यात घेऊन त्यांना जाब विचारून ताकद सामान्य माणसाकडे असल्यानं तो अधिकार बजावला पाहिजे.. आम्ही जनजागृती करत आहे, सुब्रह्मण्यन स्वामीं, अनेक लोक आहे... ज्यांनी मीडियात मांडल आहे, लोकांनी त्यावर प्रश्न विचारले पाहिजे.. On विश्वास नागरे पाटील तो विषय इथं बोलू नये.. On MVA आमदार गैरहजर ... इच्छा़ दिसत नाही त्या त्या पक्षातील लोक भाजपात जाण्यास इच्छुक आहे. त्यात काँग्रेस पक्ष सुद्धा आहे... यात आश्चर्य काही नाही आहे... विरोधीपक्ष पाहिजे की नको हे ठरवण्याची वेळ आली आहे, जे भाजपात जाणार नाही ते खरे विरोधक अशी परिस्थिती आहे. On mva विसर्जन ... महाविकास आघाडीचे विसर्जन झाले आहे.. प्रत्येक जण भाजपात जाऊन तडजोड करत आहे... On उद्धव ठाकरे MVA नाराजी ... उद्धव ठाकरे यांनी अगोदर खुलासा करावा की मध्यरात्रि 2 वाजता जाऊन मुख्यमंत्त्री फडणवीस यांना भेटले की नाही . On काँग्रेस ... काँग्रेसचे नगरसेवक फुटले, अमادर फुटले, कुठलीच कारवाई नाही.. अमरावतीच्या उमेदवार फुटला... On संविधान चौकटीत ... कर्नाटकमदब्ये RSS बंद करावा...मोहन भागवत यांना जेलमध्ये टाकण्याची हिंमत दाखवलं का? ON काँग्रेस ग्राफ कमी होत आहे? बी टीम ... On विधान परिषद ... RSS, भाजप यांना देशप्रेम नाही नव्हते आणि राहणार नाही असे मानतो...
0
0
Report

सांगली महापालिका के चयनित नगरसेवकों पर विवादित, हाई कोर्ट में याचिका दाखिल

Sangli, Maharashtra:स्लग - स्वीकृत नगरसेवक निवडी सापडणार वादात ! निवडी बेकायदेशीर असल्याचा आरोप..उच्च न्यायालयात दाखल होणार याचिका.. अँकर - सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी आता वादात सापडण्याची शक्यता आहे.सांगलीतील सामाजिक कार्यकर्त्यांकडून स्वीकृत नगरसेवक निवडीवर आक्षेप घेत निवडी बेकायदेशीर असल्याचा आरोप केला आहे.महापालिका प्रशासनाकडून नुकत्याच आठ जणांच्या स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडी केले आहेत,मात्र त्यापैकी एकच निवड योग्य असून बाकीच्या सात निवडीत या बेकायदेशीर आणि बोगस असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर,वि.द बर्वे आणि रवींद्र वळवडे यांनी केला असून निवडीच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे,त्यामुळे सांगली महापालिकेत भाजपा,काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून करण्यात आलेल्या निवडी आता वादात सापडण्याची शक्यता आहे.
0
0
Report

मोहरम पर चंद्रपुर जेल के गैबीशाह वली दरगाह में लाखों श्रद्धालु

Chandrapur, Maharashtra:मोहरमनिमित्त जिल्हा कारागृहातातील गैबीशाह वली दर्ग्यावर श्रद्धेचा महापूर, वर्षभरातून दोन दिवस भाविकांना कारागृहाच्या या परिसरात असतो प्रवेश मोहरमच्या दिवशी चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असलेला जिल्हा तुरुंग नागरिकांसाठी खुलेला जातो. सर्वधर्मीय भाविक या तुरुंग परिसरात असलेल्या गैबीशाह वली दर्ग्यावर नतमस्तक होतात. सुमारे ४०० वर्ष जुन्या या दर्ग्यातील विहिरीचे पाणी तीर्थरुपात प्राशन करण्यासाठी तुरुंग परिसरातील गर्दी होते. चंद्रपूरचे हे कारागृह या भागातील लढवय्ये शासक ' गोंडराजे ' यांचा राजवाडा आहे. इंग्रजांनी या राजवाड्याचे कारागृहात रूपांतर केले होते. याच कारागृह परिसरात आहे गैबीशाह वली या संत पुरुषाचा ४०० वर्ष जुना दर्गा. इंग्रजांच्या काळातही इथल्या वार्षिक उरुसात खंड पडला नाही. वर्षात एकदा या कारागृहातील या दर्ग्यावर मोहरम च्या दिवशी लाखो भाविकांची गर्दी होते. दरवर्षी भाविक आणि प्रशासन यांच्या समन्वयातून हा उत्सव शांततेत पार पडतो. या दर्गा परिसरात असलेल्या विहिरीतील पाणी पवित्र समजले जाते. हे पाणी प्राशन केल्याने आजार बरे होतात व दर्ग्याचे दर्शन घेतल्यावर मनोकामना पूर्ण होतात असा भाविकांचा म्हणणं आहे. भाविकांचा उत्साह, गर्दी आणि सुरक्षा व्यवस्था यंदाही या सोहळा उत्साही वातावरणात पार पडला. चंद्रपूर जिल्हा कारागृहातील या हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या प्रतीकाने सामान्य माणसाच्या श्रद्धेला नवे परिमाण दिले आहे.
0
0
Report
Advertisement

ऑपरेशन टायगर: छह सांसदों को 60-90 करोड़ के नकद इनाम, भाजपा-एनसीपी में घमासान

Dharashiv, Maharashtra:धाराशिव ऑपरेशन टायगर की ऑपरेशन बाजार? फुटलेल्या खासदारांना 60 ते90कोटी दिले. राष्ट्रवादीतून एकही आमदार-खासदार फुटणार नाही; भाजपमध्येच अंतर्गत संघर्ष असल्याचा दावाही अँकर : धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. ऑपरेशन टायगरच्या नावाखाली पक्षातून फुटलेल्या सहा खासदारांना 60 ते 90 कोटी रुपये रोख आणि अडीचशे कोटी रुपयांचा विकास निधी देण्यात आल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. राज्यातील आणि केंद्रातील भाजपमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचाही दावा त्यांनी केला. केंद्रातील भाजप एकनाथ शिंदे यांना बळ देतय तर राज्यातील देवेंद्र फडणवीस यांचा भाजप शिंदेला अडकती आणत आहे . राष्ट्रवादी काँग्रेसमधून एकही आमदार किंवा खासदार फुटणार नसल्याचा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला.
0
0
Report
Advertisement

वाशीम के संतरा बागों पर तेज गर्मी का कहर; किसान सरकार से मुआवजे की मांग

Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील मालेगाव, कारंजा, मानोरा, मंगरूळपीरसह अनेक तालुक्यांतील संत्रा बागांना यंदा तीव्र उष्णतेचा मोठा फटका बसला आहे. अप्रैल महिन्याच्या मध्यापासून मृग बहारासाठी संत्रा झाडांना ताण देण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांनी पाणी बंद केले होते. साधारणपणे दीड महिन्याचा ताण अपेक्षित असतानाही यंदा जूनच्या तिसऱ्या आठवड्या पर्यंत मान्सूनचा पाऊस न झाल्याने हा कालावधी दोन महिन्यांहून अधिक वाढला. त्यातच उन्हाळ्यात तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने अनेक संत्रा झाडे वाळून गेली आहेत. परिणामी मृग व आंबिया बहारातील संत्रा उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त संत्रा बागांचे पंचनामे करून भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे. बाईट:सुधाकर चौधरी,संत्रा उत्पादक शेतकरी बाईट:गजानन इंगोले,संत्रा उत्पादक शेतकरी बाईट:सुभाष चौधरी,शेतकरी
0
0
Report

पवन राजे हत्या केस دوबारा खोलकर न्यायिक जाँच की मांग, रोहित पवार का बयान

Dharashiv, Maharashtra:पवनराजे निंबाळकर हत्याकांडाची केस री ओपन करून न्यायालयीन चौकशी करा . राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची मागणी. पवनराजे हत्याकांडा प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक खळबळ जनक मागणी केली. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून ही संपूर्ण प्रकरण पुन्हा ओपन करावं अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. पवन राजे हत्याकांडावर पवार कुटुंबीयांनी बोलणं टाळलं होतं मात्र आज रोहित पवारांनी यावर आपलं मत व्यक्त केलं. काही खासदारांनी न्याय मिळण्यासाठी देखील पक्षांतर केलं मात्र दुसऱ्या दिवशी निकाल वेगळाच लागला .पक्षांतर करण्यासाठी न्यायव्यवस्थेचा वापर होत असेल तर ही गोष्ट लोकशाहीसाठी अत्यंत घातक असल्याचं मत व्यक्त करत रोहित पवार यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top