icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नितेश राणे के बयान पर मोदी-शाह के साथ संजय राऊत पर तीखी बहस

Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग, मंत्री नितेश राणे ऑन महसूल दिन -- प्रगतशील राज्याच्या दिशेने आमचं राज्य वाटचाल करतय. त्यात महसूल विभागाचं महत्वाच काम आहे. महसूल विभागात प्रामाणिक काम करणाऱ्या लोकांच्या पाठीवर थाप देण्यासाठी कौतुक करण्यासाठी आणि पुरस्कार देण्यासाठी महसूल दिन साजरा केला. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात महसूल विभागाच योगदान वाढेल असा मला विश्वास आहे. ऑन नरेंद्र मोदी व्हिडिओ --- हा आमच्या पंतप्रधान साहेबांचा मोठेपणा आहे. कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी अशा पद्धतीची भूमिका घेणं म्हणजे भारतीय म्हणून आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आपल्या देशाच नेतृत्व अशा जबाबदार आणि सुसंकृत माणसाकडे आहे. मोदी साहेब आणि त्यांच्या आईवर टीका केली तरी मनाचा मोठेपणा दाखवलाय. हे क्वचितच असेल. आदरणीय पंतप्रधानानी एक आदर्श घालून दिलाय मला त्यांचा अभिमान वाटतो. ऑन संजय राऊत --- आमच्या आदरणीय मोदी साहेबांनी एवढी तरी भावना व्यक्त केली आणि सुसंकृतपना काय असतो हे दाखवलं संजय राऊत यांचे मालक जेव्हा मुख्यमंत्री होते. तेव्हा कोरोना काळात असंख्य लोकांचा जीव केला पत्रकार बांधवांवर खोट्या केसेस टाकल्या समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यावेळी त्यांच्या मालकाने कधीच जनतेची माफी मागितली नाही. जनतेसमोर नाक रगडून माफी मागायला हवी היתה. पण उद्धव ठाकरेंसारख्या व्यक्तीकडून आम्हाला अपेक्षा नाही. हा संस्काराचा विषय असतो. संजय राऊत यांनी मातोश्रीच्या तिसऱ्या माळावर जाव आणि संस्कृत पणाचे सल्ले द्यावेत ऑन संजय राऊत ( अमित शहा तडीपार गुंड) --- संजय राजाराम राऊत 420 आहे हे आम्हाला म्हणावं लागेल. पत्रा चाळ प्रकरणी जो जेल मध्ये जाऊन आलाय तो 420च आहे. आमच्या देशाच्या गृहमंत्र्यांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही. खिचडी मध्ये पैसे खाणाऱ्या 420 ने आमच्या देशाच्या गृहमंत्र्यांवर बोलण्याची हिंमत करू नये. ऑन परीक्षा विधेयक --- नीट बाबत जो प्रकार घडला त्यानंतर Modi साहेबांनी शब्द दिलाय असा प्रकार परत देशात होणार नाही. आणि कोणी करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे हात कापतील असा आदर्श बोलण्यापलीकडे कृतीतून दाखवण्याचं काम मोदी साहेबांनी केलेय. त्यावर आदरणीय राष्ट्रपती महोदयांनी शिक्कामोर्तब केलाय ऑन काँग्रेस आणि वंचित आंदोलन ( अमित शहा ) --- कारण ते रस्त्यावरचे लोक आहेत. देशाच्या गृहमंत्र्यांचे अभिनंदन करण्यासाठी रस्त्यावर उतरल पाहिजे होत. देशाला सुरक्षित ठेवण्याचं काम अमित शहा साहेबांनी केलेय. म्हणून आपण सुरक्षित आहोत. रस्त्यावर उतरून फुलांचा हार अमित शहा यांना घातला पाहिजे तुम्ही राजकीय नेते नंतर अगोदर तुम्ही घरात सुरक्षित आहात ते देशाचा गृहमंत्री कणखर आहे. ऑन दिपके ( आंदोलन ) आंदोलन करण्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे ऑन फिश टॅक ( सोलापूर ) --- रिपोर्ट मागवला आहे. सोमवारी रिपोर्ट येईल त्यावर आम्ही अभ्यास करू आणि कारवाई करू मच्छीमारांच नुकसान होऊ नये म्हणून आमचं खात पावलं उचलेल. ऑन जुहू चौपाटी ( कचरा ) -- संबंधित यंत्रणेने यावर लक्ष घालावं
0
0
Report

सरडेवाडी टोल नाक्यावर धावत्या सिमेंट टँकर में आग, स्थानीय लोगों की सूझबूझ से बड़ा नुकसान टला

Rui, Maharashtra:सरडेवाडी टोल नाक्यावर धावत्या सिमेंट टँकरला आग; स्थानिकांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्याजवळ सोलापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या धावत्या सिमेंट वाहतूक करणाऱ्या टँकरला अचानक आग लागल्याची घटना घडली. यावेळी स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत फवारणी करणाऱ्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही; वेळेत केलेल्या प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
0
0
Report
Advertisement

पवई झील में मगर का सनबाथ, मुंबई में लोग हैंरान

Mumbai, Maharashtra:गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर लोकांना सनबाथ घेताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल, पण मुंबईच्या पवई तलावात चक्क मगरच सनबाथ घेताना दिसत आहे. पवई तलावातील तराफ्यावर निवांत पडलेल्या या मगरबाई सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. यापूर्वीही पवई तलावालगतच्या रस्त्यांवर आणि रहिवासी भागात मगरींचा वावर आढळला होता. एकाीकडे तलाव परिसरात आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असलं, तरी दुसरीकडे ही मगर मात्र कोणतीही चिंता न करता पवईच्या सुंदर वातावरणाचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहे. सध्या "मुंबईतला हा व्हीआयपी सनबाथ" पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी होत असून, पवईची मगर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
0
0
Report

विदर्भ में भारी बारिश से राहत, सरकार ने नुकसान भरपाई की घोषणा

Nagpur, Maharashtra:On Vidarbha Rain * राज्यात गेले काही दिवसात मोठा पाऊस होत आहे.. आधी मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात आणि आता विदर्भात मोठा पाऊस झाला आहे.. प्रशासन पूर्णपणे तत्पर आहे.. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना, नागरिकांना नुकसान भरपाई सरकार कडून दिली जाईल.. On Anti Narcotics Tadkforce * एन्टी नार्कोटिक्स टास्कफोर्स मध्ये काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी अतिशय मेहनतीने काम करत असतात.. हे काम प्रभावी होण्यासाठी या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मूळ वेतन पेक्षा अधिक 30 टक्के भत्ता देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे... * नशा मुक्त मुंबई आणि नशा मुक्त महाराष्ट्र अशी मुख्यमंत्र्यांची संकल्पना आहे.. शासनाने तो ध्येय समोर ठेवला आहे.. पोलीस त्यासाठी कामाला लागले आहे आणि लवकरच नशा मुक्त महाराष्ट्राचा स्वप्न पूर्ण होईल... On CJP Funding * सी जे पी असो किंवा देशातील इतर कुठल्याही संघटना असो, ज्यांना फॉरेन फंडिंग होत असेल तर त्याची तपासणी होणे अतिशय आवश्यक आहे... अक्कलकुवा येथील एका संघटना मोठ्या प्रमाणावर फॉरेन फंडिंग झाल्याचे समोर आले होते, पोलिसांनी कारवाई केली होती, तो फंड चुकीच्या कामासाठी वापरला गेला होता.. त्यामुळे अशा स्वरूपात फॉरेन फडिंग घेऊन त्याचा चुकीचा वापर होत असेल तर निश्चितच त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल... On Modi Mafi * एखाद्या घडलेल्या घटने संदर्भात तरुण आणि विद्यार्थी संताप व्यक्त करत असतात.. मात्र काही चुकीचे लोक आणि संघटना खोटं नरेटीव पसरवतात.. अशात काही तरुणांकडून पंतप्रधान किंवा मोठ्या पदावरील व्यक्तींबद्दल चुकीचे शब्द वापरले जाते.. मात्र पंतप्रधानांनी अशा तरुणांना माफ केले आहे निश्चितच त्यांचा हा पाऊल स्तुत्य आहे... On Amit Shah Visit * गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात सहकार क्षेत्र असो किंवा इतर क्षेत्र जोरात काम सुरू आहे.. आणि गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राचा संपूर्ण देशात दौरे करत असतात... महाराष्ट्रात आली आहे त्यांचे स्वागत आहे... On अक्कलकोट विकास आराखडा * अक्कलकोट येथे मोठ्या प्रमाणावर भाविक जात असतात.. त्यामुळे म्हाडा अंतर्गत अक्कलकोट येथील विकास आराखडा तयार करण्यात आला आहे लवकरच त्या ठिकाणी काम सुरू होईल आणि त्याचा फायदा भाविकांना मिळेल...
0
0
Report
Advertisement

सातारा में मुसलधार बारिश से कृष्णा नदी में जलस्तर बढ़ा, पुराने पुल डूबे

Satara, Maharashtra:सातारा - मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. लिंब गोवे येथील कोटेश्वर मंदिराजवळील जुना पुल पुराच्या पाण्यामुळे पाण्याखाली गेला आहे. पावसाने पुन्हा जोर धरल्याने कृष्णा नदीवरील धोम-बलकवडी आणि धोम धरणातील पाणी पातळी वाढल्याने दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातो आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. लिंब येथील पुरातन घाटही पाण्याखाली गेला आहे. लिंब गोवेदरम्यानच्या जुन्या पुलाबरोबर मर्ढे - आनेवाडी दरम्यानचा पूलही पाण्याखाली गेला आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement

रत्नागिरी के चिपळुण-कराड मार्ग पर गड्ढे पानी से हादसे बढ़े

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण-कराड महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सध्या अक्षरशः 'जीवघेणा' ठरत आहे.. अँकर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण-कराड महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सध्या अक्षरशः 'जीवघेणा' ठरत आहे.. पहिल्याच पावसात पोफळी सय्यद वाडी परिसरातील रस्त्याची कमालीची दयनीय अवस्था झाली असून महामार्गावर मोठे-मोठे खड्डे पडले आहेत.पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज येत नाहीये,ज्यामुळे या भागात भीषण अपघात घडत आहेत.. निकृष्ट दर्जाचे काम आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा याचा थेट फटका आता सर्वसामान्यांना बसत असून नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत.. त्यामुळे आता प्रशासन एखाद्या मोठ्या अपघाताची आणि जीवितहानीची वाट पाहतंय का?..असा संतापजनक सवाल नागरिक विचारत आहेत.. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रविंद्र कोकाटे यांनी.. Wkt बाईट
0
0
Report

कृष्णा नदी का जलस्तर अचानक बढ़ा; तीन बाँध डूबे, सांगली के गाँव सतर्क

Sangli, Maharashtra:कृष्णा नदी पाणलोट क्षेत्र में पडणारा पाउस और कोयना धारनातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे, सांगलीतील आयुर्विन पुल येथे कृष्णा नदीची पाणी पातळी 24.6 इतकी झाली आहे. तर कृष्णा नदीवरील असणारे बहे, नागठाणे आणि सांगलीवाडी येथील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नागठाणे येथील बंधारा पाण्याखाली गेल्याने या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. दुथडी भरून कृष्णा नदी पुन्हा वाहू लागली आहे. कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार कायम असून कोयना धरणाचा विसर्ग वाढवून रात्रीपासून 23 हजार 500 क्यूसेक करण्यात आला, त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार असल्याने कृष्णा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
0
0
Report

जालना में भारी बारिश ने खरीप फसलों को बड़ी राहत दी

Jalna, Maharashtra:जालना : जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे खरीप पिकांना मोठा फायदा,पावसामुळे पिकांच्या वाढीस होणार मदत अँकर :जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे कापूस, सोयाबीन, मका, तूर, मूग व उडीद या खरीप पिकांना मोठा फायदा होणार आहे. जुलैअखेरपर्यंत झालेल्या बहुतांश पेरण्यांनंतर पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. या पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुळांची वाढ चांगली होईल. पিকांची वाढ जोमदार होईल. मूग-उडीदाची फुलधारणा चांगली होईल. विहिरी, कूपनलिका, शेततळी तसेच लघु आणि मध्यम सिंचन प्रकल्पांतील पाणीस्थित्यात वाढ झाली आहे. पुढील काळात संरक्षित सिंचनासाठीही पाणी उपलब्ध राहण्यास मदत होणार आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top