icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

पुणे-बेंगलुरु हाईवे पर भिड़ंत: 5-6 घायल, यातायात बाधित

Sangli, Maharashtra:स्लग - पुणे-बेंगळुरू महामार्गावर दोन कारची समोरा-समोर जोरदार धडक.. ५ ते ६ जण जखमी.. अँकर - सांगलीच्या येडेनिपाणी फाट्याजवळ पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर दोन इनोव्हा कारची अपघात झाला आहे.या अपघातात प्राथमिक माहितीनुसार ५ ते ६ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.कोल्हापूरहून पुण्याकडे जाणारी इनोव्हा कारचे अचानक टायर फुटला.त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या रोडवर गेली.यावेळी समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली.धडकेनंतर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, त्यामध्ये ५ ते ६ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे..या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
0
0
Report

कल्याण में बंजारा समाज का पारंपरिक तीज उत्सव धूमधाम से सम्पन्न

Kalyan, Maharashtra:कल्याणमध्ये बंजारा समाजाचा पारंपरिक तीज उत्सव उत्साहात संपन्न, गौरपूजनासह सांस्कृतिक कार्यक्रम आणि कौटुंबिक स्नेहमेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद, बंजारा समाजाची परंपरता, संस्कृती आणि सामाजिक एकोपा जपणारा पारंपरिक बंजारा तीज उत्सव (गौरी) सोहळा व कौटुंबिक स्नेहमेळावा रविवारी कल्याणमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. संत सेवालाल महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कल्याण नगरीत आयोजित या सोहळ्यास बंजारा समाज बांधव भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. पारंपरिक पद्धतीने तीज उत्सव साजराण्यात आला. विशेषतः अविवाहित मुली व महिलांसाठी आनंद, उत्साह आणि आपुलकीचा हा सोहळा ठरला. यावेळी गायन, नृत्य, एकमेकांचा परिचय तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमांमधून उपस्थितांनी उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी उपस्थित बंजारा समाज बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग नोंदवत आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविले. समाजातील महिला व युवतींच्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. कौटुंबिक स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून समाजातील विविध घटक एकत्र येत सामाजिक ऐक्याचा संदेशही देण्यात आला. याप्रसंगी बंजारा समाज तीज उत्सव कृती समितीचे अध्यक्ष मदन जाधव, यांच्यासह समाजातील मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
0
0
Report

ठाणे बेलापूर रोड पर रस्ता रोको: अधिकारी के खिलाफ FIR की मांग

Navi Mumbai, Maharashtra:शनिवार को संतप्त परिवार वालों ने ठाणे बेलापूर रोड पर रास्ता रोको किया और इस मामले में दोषी अधिकारी के खिलाफ FIR दर्ज करने की मांग की है। सुसाइड नोट में सहाय्यक पुलिस उपनिरीक्षक पांडुरंग पाटील ने महापे स्थित लॉज पर आत्महत्या कर ली थी, जिसमें पुलिस अधिकारी संजयकुमार पाटील (डीसीपी), सहाय्यक पुलिस आयुक्त गिरीश ठाकूर और एक हेड कॉन्स्टेबल जयवंत आहिरे के नाम भी थे। नातेवाईकों ने इन नामों के ऊपर आत्महत्या के प्रवृत्त करने का मामला दर्ज करने की मांग की है। इस बीच शव के अंतिम कर्म के संबंध में पुलिस से चर्चा चल रही है और परिवार ने स्पष्ट किया कि अन्त्यविधि के लिए कोई तिथि नहीं तय कराई जाएगी जब तक प्राथमिकी दर्ज नहीं हो जाती।
0
0
Report
Advertisement

हिंदुत्ववादी सरकार के दौरान आंदोलन, अतिक्रमण और लव जिहाद के मुद्दों पर बवाल

Shirdi, Maharashtra:आ.गोपीचंद पडळकर बाईट मुद्दे - ऑन हिंदुत्ववादी सरकार असताना आंदोलन - समोरची लोक कायदा मानायला तयार नाहीत... सरकारी जागेवरती अतिक्रमण केली जात आहेत... ग्रामीण भागात अतिक्रमण करून प्रार्थनास्थळ उभी केलेली आहेत... नेवाशात पालिकेने अतिक्रमण कडूनही पुन्हा अतिक्रमण केली... म्हणजे तुम्ही कायदा मानत नाहीत... कायदा न मनणाऱ्या लोकांना वठणीवर आणण्यासाठी हिंदू समाज रस्त्यावर येतोय... आम्ही पाच महिन्यात 15 मुलींना लव्ह जिहादपासून परावृत्त केले... अनेक प्रकरण तर समोर पण येत नाहीत... त्यांची कार्यपद्धती संविधानाला न मानणारी... त्यामुळे आम्ही संघर्ष करतोय, सरकार आमच्या पाठीशी... ऑन ऋषीकेश शेटे हल्ला - हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर पुन्हा हल्ला करण्याची हिम्मत होऊ नये म्हणून आम्ही इथे आलोय... पोलिसांसमोर दगड घातली जात आहेत, म्हणून आम्ही रस्त्यावर आलोय... या गोष्टींना चाप बसेल असा आम्हाला विश्वास... ऑन SHRP नंबर प्लेट - मी एस एच आर पी नंबर प्लेट बनवायला दिली आहे... ऑन सोलापूर मराठा आंदोलकांनी गाडी अडवली - मी कार्यकारिणीच्या निमित्ताने सोलापूरला गेलो होतो... मराठा समाजाचे आंदोलन सुरू झाले आणि मी तिथे गेलो... त्यांनी माझी गाडी अडवली... मी तिथे माझी भूमिका स्पष्ट केली... आंदोलन करण्यात गैर नाही... मी योगायोगाने त्यांच्या आंदोलनात सापडलो... मी त्यांच्याशी चर्चा करूनच बाहेर पडलो... ऑन पुणे डीजे विरोधात मोर्चा - डीजेच्या आवाजामुळे अनेक समस्या... महाराष्ट्राला लोककला आणि परंपरा... पारंपारिक वाद्य वापरायला हवीत... गावाकडच्या लोककला बाहेर आल्या पाहिजेत... लोककलावंतांना संधी दिली पाहिजे... Byte - आ.गोपीचंद पडळकर
0
0
Report

इंदापुर में drought के दौर में किसानों को राहत, बारिश के लिए सरकार कदम उठाएगी

Rui, Maharashtra:इंदापूर*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे भाषण दगडवाडी राज्यात दुष्काळचे सावट आहे,पाऊस पडावा हे संकट दूर व्हावं असं नंदिकेश्वराच्या चरणी मी साकडं घालतो. राज्यात पाऊस पडू दे राज्यातील शेतकरी सुखी होऊ दे असं साकडं मी नंदिकेश्वर चरणी घालतो. पाऊस नाही झाला तर आपण काही करू शकणार नाही,आज राज्यातील शेतकरी अडचणीत आहे.त्याला सरकारकडून अपेक्षा आहे. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत सकारात्मक निर्णय घेतील. आज अजित दादांनी आठवण येते,दादांना आपल्या सर्व प्रश्नांची माहिती जाण होती, खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणणारा नेता आज आपल्यात नाही मी नंदिकेश्वराची शपथ घेऊन सांगतो की, निरवांगी दगडवाडी या भागात सिमेंटचे रस्ते केले आहेत.२८० कोटी रुपयांच्या रस्त्याची कामे आपण या परिसरात करत आहोत. पाइपलाइन साठी रस्ते खोदू नका,त्यामुळे रस्त्याची दुरवस्था होते. इंदापूर तालुक्यातील नीरा नदीवर निमसाखर येथे पूल व्हावा इच्छा आहे त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नीरा नदीवर पाणी अडवण्यासाठी मी अधिकाऱ्यांना बोललो आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला तरच पाऊस पडेल,असा हवामान विभागाचा अंदाज आहे.एल निनो चे खूप मोठे संकट आहे.तुम्हाला झोप लागत तशी मला ही झोप लागत नाही. पाऊस नाही पडला तर काही खरं नाही,माझा जीव खूप तळमळतो मी नंदिकेश्वराची शपथ घेऊन सांगतो.आज दादांच्या उणीव जाणवते एकच विनंती करायची आहे आम्ही काम करणारी माणसं आहोत,बारीक सारीक गोष्टी सोडून द्या वाद विवाद करू नका. पाठीमागे आपण मूठ झाकायला हवी होती ती आपण उघडी केली त्यामुळे आपल्याला त्रास झाला.मी गप्प बसणारा माणूस नाही,बावीस गावचा पाणी प्रश्न सोडवला जाईल,मुख्यमंत्र्यांच्या कानावर गोष्टी घातल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल आहे तुम्हाला जिथे काही गोष्टी करायच्या असतील तिथे मी मदत करेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सांगितले आहे. मला उद्घाटन वगैरेची हाव नाही असा आमदार मिळेल का शेतीच्या पाण्यासाठी भविष्यात योग्य तो मार्ग काढला जाईल हा शब्द देतो. कर्जमाफी मध्ये सर्वांच व्यवस्थित झाले ना ? आणखी २ लाखाच्या पुढच्या याद्या येत आहेत.जिल्ह्यात आपला तालुका दुसऱ्या नंबर ला आहे. दादांनी कन्हेरी मध्ये शेवटच भाषण केलं होत त्यात त्यांनी सांगितलं होतं राजकारण राजकारणपुरत करा.
0
0
Report

यवला तालुक्य में पेयजल संकट, किसानों ने कालवाय से पानी सप्लाई की मांग

Yeola, Maharashtra:अँकर : येवला तालुक्यातील विविध गावांमध्ये पावसाच्या पाण्याअभावी तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याने पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्यातून पाटचारी करून पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी खासदार समीर भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. येवला तालुक्यातील विसापूर, गोरखनगर, वसंतनगर, अंकाई, सावखेडे, चांदगाव, नायगव्हाण, कुसूर, कुसमाडी, जायखेडे, आहेरवाडी, लहीत, हडपसावरगाव आणि खिर्डीसाठे या गावांमध्ये पावसाच्या पाण्याशिवाय पाण्याचा कोणताही पर्यायी स्रोत उपलब्ध नसल्याने कायमस्वरूपी दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. उन्हाळ्यात या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यांचीही मोठी कमतरता भासत असल्याने पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्यातून पाटचारी निर्माण करून पाणी उपलब्ध करून दिल्यास या गावांच्या पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्यास मदत होईल. तसेच या परिसरातील शेतीला पाणी मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली. या मागणीसाठी संबंधित गावांतील शेतकऱ्यांनी स्वाक्षरीचे निवेदन खासदार समीर भुजबळ यांच्याकडे सादर करून पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्यातून पाटाچارि करून पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे.
0
0
Report
Advertisement

राणा दम्पत्ति ने दहीहंडी रद्द कर 51 लाख मदद का एलान

Amravati, Maharashtra:राणा दाम्पत्याच सामाजिक दायित्व, दहीहंडी रद्द करत गरजू व्यक्तींना केली ५१ लाख रुपयांची मदत; जिल्हा स्त्री रुग्णालयातील मृत बाळांना श्रद्धांजली अमरावतीत विदर्भ स्तरीय दहीहंडी स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येते. मात्र अमरावतीमध्ये जिल्हा स्त्री रुग्णालयात लागलेल्या आगीत ३ नवजात बाळांचे मृत्यू झाले होते या घटने नंतर सर्वत्र स्तरावर हळहळ व्यक्त केलं जातं आहे. त्यामुळे या संवेदनशील घटने नंतर राणा दाम्पत्याने आज होणारी दहीहंडी स्पर्धा रद्द केली आहे केली असून या दहीहंडी स्पर्धेला लागणारा ५१ लाख रुपयांचा खर्च गरजूंना वाटप केल. यावेळी जिल्हा स्त्री रुग्णालयातील ३ नवजात बाळांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच रुग्णालय दुर्घटनेतील मृतकाचे कुटुंबातील लोकांना २ लाख रुपये, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील कंत्राटी परिचारिका, कर्मचारी यांचा देखील सन्मान करून त्यांना रोख रक्कम देण्यात आली आहे. आग दुर्घटनेत वाचलेल्या ३६ बाळांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 हजार रुपये तसेच शेतकरी आत्महत्या कुटुंबातील परिवारांना रोख रक्कम. आणि जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये कर्णबधिर अंध अपंग जन्मलेल्या बालकांचा शैक्षणिक खर्च म्हणून त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात आले. अमरावती येथील राजापेठ चौकात केवळ कुठलाही गाजावाजा न करता बाल गोपालांच्या हस्ते दहीहंडीची परंपरा कायम ठेवत साध्या पद्धतीने बालगोपालांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली.
0
0
Report

सोलापुर में दिनदहाड़े सफेद बिना नंबर वाहन से महिला की भेड़-बकरियाँ चोरी

Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील अकलूज टेंभुर्णी रस्त्यावर भर दिवसा एका महिलेच्या कडील पाच शेळ्या आणि दोन बोकडांची चोरी वाहन क्रमांक नसलेल्या पांढऱ्या वाहनातून अनोळखी व्यक्तींनी चोरून नेलेले आहेत यानंतर लवंग गावातील तरुणांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे सदर महिला रस्त्याच्या कडेला शेळ्या घेऊन थांबली असताना पांढऱ्या वाहनातून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी महिलेकडे पाणी मागितले मात्र आपल्याकडे पाणी नाही असे सांगितल्यानंतर त्या व्यक्तींनी आम्हाला पाणी आणून द्या असा बहाना तयार केला महिला पाणी आणायला गेल्यानंतर त्या महिलेच्या शेळ्या आणि बोकडे अज्ञात वाहनातून चोरी करण्यात आली
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी पुलिस का डीजे-मुक्त गणेशोत्सव का आह्वान, 27 मंडलों के साथ बैठक

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी: रत्नागिरी पोलिसांचे ‘डीजेमुक्त गणेशोत्सवा’चे आवाहन नितीन बगाटे, जिल्हा पोलीस अधीक्षक रत्नागिरी पोलिसांचे ‘डीजेमुक्त गणेशोत्सवा’चे आवाहन डेसिबलची मर्यादा ओलांडल्यास कारवाईचा इशारा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची बैठक जिल्ह्यात शांततेत गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा कायम ठेवण्याचे आवाहन यंदा डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करून नवा आदर्श घालून द्या ध्वनीवर्धकांचा वापर करताना आवाजाची निर्धारित डेसिबल मर्यादा पाळण्याच्या सूचना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार बैठकीला रत्नागिरी शहरातील २७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा सहभाग
0
0
Report

हिंदी मेंheadline: हिंजवड़ी पुणे में सड़क खड्डों और मेट्रो देरी पर IT कर्मियों की नाराज़गी

Pimpri-Chinchwad, Maharashtra:हिंजवडी, पुणे मूलभूत सुविधांसाठी मोर्चा काढावा लागत असेल तर काय समजायचं... 20 उद्योगपती आणि 20 उद्योजक जात होते, तिथं त्यांना कचऱ्याची आणि रस्त्याची समस्या आहे. आता हीच समस्या हिंजवडीत आहे. आयटी सेक्टर जात असतील तर, पुन्हा नोकऱ्यांच काय? मेट्रो 2025 ला उद्घाटन होणार होत, आता उदघाटन करण्यासाठी वेळ मिळत नसल्याने रखडल आहे. मुख्यमंत्री पुण्यात आले, पण इथं येऊन आयटी अभियंत्यांशी भेटले नाहीत. रस्त्यावर खड्डे सगळीकडे अशीच परिस्थिती आहे. मुख्यमंत्र्यानी ठरवलं तर, सर्व मुद्दे एका दिवशी मार्गी लागतील. आधी मेट्रो सुरू करा. मीसिंगलिंक चा पहिला भाग पहा...100 वर्षांपूर्वी चा रस्ता वाटतोय खड्डयांबाबत ह्यांनी खिशे भरले आहेत, नागरिक रस्त्यावर... बापट यांना झालेली मारहाण चुकीची आहे. कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. हुकूमशाही सुरू आहे, ह्या सरकार च कुठलं इंजिन फेल झालं आहे. विशाखा राऊत यांचं, जात प्रमाण पत्र हे शिंदेंनीच रद्द केल आहे (घटममिद्यात) आम्ही कोर्टात जाणार आहोत. हा एकत्रित निर्णय आहे. आम्ही आयटीयन्स सोबत आहोत..उद्याही असू...
0
0
Report
Advertisement

कोयना डैम के वक्र दरवाजे आज पूरी तरह बंद; नदी किनारे गांवों के लिए सतर्कता जारी

Ratnagiri, Maharashtra:ब्रेकिंग न्यूज : कोयना धरणाचे वक्र दरवाजे पूर्णपणे बंद; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा कायम.. कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे दोन वक्र दरवाजे आज दुपारी १२ वाजता पूर्णपणे खाली आणून सांडव्यावरील विसर्ग बंद करण्यात आला आहे.. सध्या पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू असून त्याद्वारे कोयना नदीपात्रात १,०५० क्यूसेक्स वेगाने पाण्याचा प्रवाह सुरू आहे. मात्र,पाणलोट क्षेत्रातील पावसाचा अंदाज घेऊन विसर्ग पुन्हा वाढवला जाऊ शकतो,त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी पात्रात उतरू नये असे आवाहन करत स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश कार्यकारी अभियंता कोयना सिंचन विभागाने दिले आहेत..
0
0
Report

वाशिम के मालेगाव में चोरी की कोशिश, सीसीटीवी फुटेज में पकड़ा गया आरोपी

Washim, Maharashtra:वाशिम : अँकर:वाशिमच्या मालेगाव शहरात पहाटे पाचच्या सुमारास चोरीच्या प्रयत्नाने खळबळ उडाली. मुस्लिम वस्तीत चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या चोरट्याला नमाजसाठी उठलेल्या कुटुंबीयांनी पाहिलं. त्यानंतर कुटुंबीयांनी आरडाओरड केल्याने नागरिकांनी चोरट्याचा पाठलाग केला. चोरट्याच्या हालचाली सीसीटीव्हीत कैद झाल्या. घटनेची माहिती मिळताच मालेगाव शहर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवली. यावेळी शेतातील पिकांच्या आड लपलेल्या सोनू हुसैन इकबाल हुसैन आरोपी ला पोलिसांनी पकडलं. आरोपी मध्य प्रदेशातील बुरहानपूरच्या आझाद नगर येथील रहिवासी असल्याचं समोर आलंय. मालेगावसह परिसरात आणखी चोरीच्या घटना केल्या आहेत का,याचा तपास मालेगाव पोलीस करत आहेत.
0
0
Report

गडचिरोली में गणेशोत्सव शांतिपूर्ण, पुलिस ने संवाद बैठक के बाद सुरक्षा व्यवस्थाएं तय कीं

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यात गणेशोत्सव शांततेत, उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडावा, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने गणेशोत्सव मंडळ संवाद बैठकीचे आयोजन संस्कृती सभागृह, गडचिरोली येथे करण्यात आले. संवाद बैठकीला जिल्ह्यातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शांतता समितीचे सदस्य, प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या सुरक्षा उपाययोजना, वाहतूक व्यवस्था, मिरवणुकीचे नियोजन, ध्वनिक्षेपकाचा वापर, विद्युत सुरक्षा, महिला व बालकांची सुरक्षितता तसेच सामाजिक सलोखा याबाबत sविस्तर चर्चा करण्यात आली. गणेशोत्सवाच्या कालावधीत ऑनलाईन नोंदणी करावी. तसेच गणेशोत्सव काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या अफवा, आक्षेपार्ह संदेश किंवा समाजामध्ये तेढ निर्माण करणा-या पोस्टबाबत नागरिकांनी सतर्क राहावे. अशा प्रकारची माहिती आढळून आल्यास ती पुढे प्रसारित न करता तत्काळ गडचिरोली पोलीस दलाच्या निदर्शनास आणून द्या, याबाबत सूचना देण्यात आल्या. गणेशोत्सवाच्या कालावहीत नागरिकांच्या सहकार्याने प्रभावी सुरक्षा व्यवस्था राबविण्यात येणार असून, गडचिरोली पोलीस दलाकडून संवेदनशील ठिकाणी आवश्यक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी होऊ नये तसेच गणेश विसर्जन मिरवणुका सुरक्षित व सुरळीतपणे पार पडाव्यात यासाठी गणेश मंडळांनी गडचिरोली पोलीस दलाशी आवश्यक समन्वय ठेवावा, असे निर्देश यावेळी देण्यात आले.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top