icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

पवना बांध 95% भरा; विसर्जन शुरू, नागरिक सतर्क रहें

Varsoli, Maharashtra:Anchor: पिंपरी चिंचवड शहर आणि मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. त्यांची तहान भागवणारं अन शेतीला उपयुक्त ठरणारं पवना धरण अखेर 95 टक्के भरलंय. आज पासून पवना नदीत पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात येतोय. सुरुवातीला 800 क्यूसेक पाण्याचा अन पुढं पावसाचा जोर वाढेल तसा विसर्ग वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय. त्यामुळं नदी लगत राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. खरं तर जून महिन्यात पाठ फिरवलेल्या पावसाने अखेर जुलै महिन्यात चांगलीच कृपादृष्टी दाखवली, त्यामुळं अवघ्या वीस दिवसांतचं धरण 95 टक्के भरलंय. त्यामुळं समाधान व्यक्त केलं जातंय.
0
0
Report

चंद्रपुर में पैदल वारी: महाकाली मंदिर से विठ्ठल-रुक्मिणी तक, मुनगंटीवार ने फुगड़ी खेली

Chandrapur, Maharashtra:चंद्रपुरात महाकाली मंदीर ते घुग्गुसच्या वढा विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापर्यंत पायी वारीचे आयोजन, वारीच्या रस्त्यावर विठ्ठल भक्तीत रंगलेल्या आ. मुनगंटीवार यांनी खेळली फुगडी अँकर:-- आषाढी एकादशी पुढ्यात असताना चंद्रपुरात पुरातन देवी महाकाली मंदीर ते घुग्गुसच्या वढा येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापर्यंत पायी वारीचे आयोजन करण्यात आले. पादुका पूजन करून वारीची सुरुवात झाली. शेकडो विठू भक्तांसह आ. सुधीर मुनगंटीवार देखील यात सहभागी झाले. चंद्रपूरकांनी या पायी वारी यात्रेचे उत्साहात स्वागत केले. वारीच्या रस्त्यावर विठ्ठल भक्तीत रंगलेल्या आ. मुनगंटीवार यांनी फुगडीचा फेर धरत सहभाग दर्शविला. ------ फुगडीचे vis------- आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
0
Report
Advertisement

फलटण में तेज़ गति कार दुर्घटना: तीन युवकों की मौत, तीन गंभीर घायल

Satara, Maharashtra:TUSHAR TAPASE 3 FILES SLUG NAME -SAT_PHALTAN_ACCIDENT अँकर :सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात भरधाव वेगाने धावणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारचा भीषण अपघात होऊन या अपघातात तिघा तरुणांचा जागीच मृत्यू, तर तिघेजण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वाठार-निंबाळकर हद्दीत कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने वाहन रस्त्यालगतच्या नाल्यावरील कठड्याला जोरात धडकून पलटी झाले. अपघातावेळी कारमध्ये एकूण सहा जण प्रवास करत होते. भरधाव वेगामुळे वळणाचा अंदाज न आल्याने कारवरील ताबा सुटून हा भीषण अपघात झाला. फलटण ग्रामीण पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
0
0
Report

गोदावरी में उच्च विसर्ग, जायकवाडी के लिए 8.68 टीएमसी पानी—बाढ़ की चेतावनी

Niphad, Maharashtra:गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी, नाशिक आणि निफाड तालुक्यात मुसळधार तर कधी संततधार पाऊस कोसळत असल्याने दारणा गंगापूर आणि पालखेड धरणातून तसेच गोदावरीच्या उपनद्यातून पुराचे पाणी निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दाखल होत असल्याने नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडी च्या दिशेने गोदावरी नदी पात्रात आठ व प्रकार गेटच्या माध्यमातून 88 हजार क्यूसेक पाण्याचा या पावसाच्या हंगामातील उच्चांकी विसर्ग सुरू आहे मोठा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीने रुद्र रूप धारण केले आहे यामुळे प्रशासनाच्या वतीने गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे तर या पावसाच्या हंगामात आज सकाळी सहा वाजेपर्यंत नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने 8.68 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने जायकवाडी धरणाच्या लाभ क्षेत्रातील गावांना पिण्यासाठी आणि सिंचनासाठी फायदा होणार आहे Yासंदर्भात धरण क्षेत्रातून आढावा घेतला है
0
0
Report
Advertisement

हंगामे के बीच छह कृषि केंद्रों के लाइसेंस रद्द, 53 केंद्र निलंबित

Bhandara, Maharashtra:नियमभंग करणाऱ्या सहा कृषी केंद्रांचे परवाने कायमचे रद्द,५३ कृषिकेंद्रांचे परवाने निलंबित. भंडारा जिल्ह्यात खरीप हंगाम सुरू होताच बियाणे खते व कीटकनाशकांच्या गुणवत्तेबाबत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागाने भरारी पथकाच्या माध्यमातून धाड मारत कृषी केंद्रावर कार्यवाही केली आहे.यामध्ये सहा कृषी केंद्रांचे परवाने कायमचे रद्द व ५३ निलंबित करण्यात आले आहेत. जिह्यात सध्या ८६२ बियाणे व खत विक्री कृषी केंद्र व ७५४ कीटकनाशक विक्रेते नोंदीकृत आहे.यापैकी ८०२ कृषी केंद्रांची तपासणी पूर्ण झाली आहे.यामध्ये नियमभंग करणाऱ्या सहा कृषी केंद्रांचे परवाने कायमचे रद्द करण्यात आले असून ५३ केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.या धडक कार्यवाही मुळे ऐन हंगामात कृषी केंद्र चालक धास्तावले आहेत.
0
0
Report
Advertisement

आरापूर एमआईडीसी: किसानों के मुआवजे पर संघर्ष, जिला-प्रशासन की बैठक अगले सप्ताह

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर मध्ये नव्याने होणाऱ्या आरापूर औद्योगिक वसाहतीसाठीची काही भागाची मोजणी पूर्ण झाली असली तरी शेतकऱ्यांच्या मोबदल्याच्या मागणीनंतर दराबाबत कोंडी कायम आहे. ही कोंडी सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि एमआयडीसीचे अधिकारी शेतकऱ्यांची मनधरणी करणार आहेत. यासंदर्भात येत्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीला आमदार प्रशांत बंब, एमआयडीसी, महसूल विभागातील अधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे. शहरापासून २२ किमी असलेल्या आरापूर येथे ७६२ हेक्टर जागेवर एमआयडीसी उभारण्यात येणार आहे. या प्रस्तावित एमआयडीसीसाठी बहुतांश मोजणीही पूर्ण झाली असून, या संदर्भात काही आठवड्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांसोबत मोबदल्यासंदर्भात बैठक घेण्यात आली होती.
0
0
Report

डीपीसी हर काम के जियो टैगिंग से भ्रष्टाचार पर रोक, राज्यभर में लागू

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून होणाऱ्या प्रत्येक विकासकामाचा अचूक आणि पारदर्शक लेखाजोखा ऑनलाइन ठेवण्यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. एकाच कामासाठी वेगवेगळ्या यंत्रणांकडून परस्पर निधी लाटण्याच्या प्रकार रोखण्यासाठी आता डीपीसीच्या प्रत्येक कामाचे जिओ टॅगिंग बंधनकारक केले आहे. 'कामाचे जिओ टॅगिंग आणि 'महा युनिव्हरसल आयडी' प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत बिल दिले जाणार नाही, याची अंमलबजावणी आता छत्रपती संभाजी नगरात सुरू झाली आहे... धुळे जिल्ह्यात हा उपक्रम पथदर्शी प्रकल्प म्हणून राबवला होता. तेथे भ्रष्टाचाराला लागूलेला चाप पाहून आता छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ही प्रणाली लागू केली आहे. महापालिका आणि ग्रामीण भागातील हद्दीत डीपीसीच्या निधीतून झालेल्या प्रत्येक लहान-मोठ्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून त्याचे जिओ टॅगिंग करण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे.
0
0
Report

मालेगाव-उमरठी अवैध हथियार नेटवर्क का बड़ा पर्दाफाश पुलिस ने

Nashik, Maharashtra:मालेगाव ( नाशिक ) विशाल मोरे - कोम्बिंग ऑपरेशनमध्ये हिफजू इद्रीसच्या कनेक्शनचा उलगडा - धुळे, जळगाव, आणि मालेगावच्या पोलिसांकडून मध्यप्रदेशात कोम्बिंग ऑपरेशन... - पोलिसांकडून देशी कट्ट्याच अवैध शस्त्र पुरवठा कनेक्शन उध्वस्त उमरठी गावाबाबत माहिती लोकसंख्या सुमारे दोन हजाराच्या आसपास आहे. उमरठी हे दोन गावे असून एक गाव महाराष्ट्रात तर दुसरे गाव मध्य प्रदेशात येते, मध्य प्रदेशात उमरठी गाव हे डोंगराळ भागात आहे. या गावात काही जण घरातच गावठी कट्टे बनवतात. तेव्हा पोलिसांनी पहाटेच्या सुमारास 400 पोलिसांसह हे कॉम्बिंग ऑपरेशन राबविले. याठिकाणी 45 संशयितांच्या घरांची झडती घेतली, 20 व्यक्तीची चौकशी केली. 12 संशयीतांकडून दोन देशी कट्टे, चार जिवंत काडतूस तसेच कट्टे तयार करण्यात येणारा कच्चा माल व साहित्य जप्त केले आहे. 27 फरार संशयितांच्या घरांची जिओ टॅगिंग करण्यात आली. बाईट: सिद्धार्थ बरवाल, DYSP मालेगाव
0
0
Report
Advertisement

सावित्री नगर में भटकते कुत्तों का आतंक, CCTV में कैद घटना, लोगों में भय

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:सावित्रीनगरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; घटना सीसीटीव्हीत कैद ANC : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रभाग क्रमांक ९ मधील सावित्री नगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास पुन्हा एकदा समोर आला आहे. गजानन महाराज मंदिर रोडवर एका भटक्या कुत्र्याने रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीच्या पायाला चावा घेतल्याची घटना घडली असून हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेकडे केली आहे.
0
0
Report

कासारसाई डैम 94% भर गया; 300 क्यूसेक विसर्जन, नदी किनारे सतर्कता जारी

Varsoli, Maharashtra:कासारसाई डैम 94% भर गया; 300 क्यूसेक विसर्जन शुरू. पवना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. मावळ आणि मुळशी तालुक्यासाठी महत्त्वाचं असलेलं कासारसाई धरण आता 94 टक्के भरलं असून धरणातून सध्या 300 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हा विसर्ग थेट पवना नदीपात्रात सोडला जात असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. कासारसाई धरणावरून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी यांच्याकडून.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top