445001
माझी उमेदवारी मदन येरावारांना पाडण्यासाठीच, माजी आमदार संदीप बाजोरीयांचा दावा.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून तुतारी चिन्हावरच आपण लढु असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत तिकीट वाटपाआधीच त्यांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार देखील सुरू केला आहे. भाजप आमदार मदन येरावार यांनी मतदारसंघ बकाल करून ठेवला, रस्त्यांची दैना झाली, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून भयमुक्त वातावरण देऊ असे वचन आपण जनतेला देत असल्याचे संदीप बाजोरिया यांनी सांगितले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
चंद्रपूर इरई नदी पुल पर कार नदी में गिरी, 5 घायल
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहरातील इरई नदी पुलावरील घटना, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पाच जण जखमी. अँकर: चंद्रपूर शहरा लगत असलेल्या इरई नदी पुलावरून कठडा तोडून कार नदीत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रपूर कडून नागपूर कडे जात असताना भरधाव वेगात असलेल्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने नदी पुलावरुन कोसळून अपघात झाला. कार मध्ये ५ प्रवासी प्रवास करीत होते. पाच ही जण गंभीर जखमी झाले असून खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेने नदी पुलावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.0
0
Report
तीव्र गर्मी ने वाशीम के संतराबागों को नुकसान पहुँचाया; लाखों रुपये की फसल बर्बाद
Washim, Maharashtra:वाशीमच्या मानोरा तालुक्यातील अनेक भागांमध्ये यंदाच्या तीव्र उष्णतेचा मोठा फटका संत्रा बागांना बसला आहे.मृग बहरासाठी ताणावर ठेवलेल्या बागांना वेळेत पाऊस न झाल्याने आणि वाढत्या तापमानामुळे अनेक संत्रा बागा करपून वाळून गेल्या आहेत.उष्णतेमुळे झाडांतील ओलावा कमी झाल्याने पाने करपली,फांद्या सुकल्या आणि संपूर्ण बागांचे नुकसान झाले. लाखो रुपयांची गुंतवणूक केलेल्या शेतकऱ्यांसमोर आता आर्थिक संकट उभे ठाकले असून संत्रा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.0
0
Report
अकोला के कृषी केंद्रों में टोकन से युरिया-डीएपी की भीड़, आधार से पांच बैग वितरित
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात युरिया आणि डीएपी खत खरेदी करिता कृषी केंद्रांसमोर शेतकऱ्यांच्या रांगा पाहायला मिळत आहे. वाढती गर्दी पाहता कृषी सेवा केंद्रांनी टोकन पद्धती सुरू केली यानंतर आधार कार्ड द्वारे एका व्यक्तीला पाच युरिया बॅग देण्यात येत होत्या. नेमकी सध्याची काय परिस्थिती आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी जयेश जगड आमच्या सोबत जुडले आहेत..0
0
Report
Advertisement
पवन धरण प्रभावितों के पुनर्वसन के लिए निधि और भू-आवंटन पर मंजूरी
Varsoli, Maharashtra:पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाला अखेर सकारात्मक दिशा मिळणार असून. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत धरणग्रस्तांच्या विविध मागण्या आणि पुनर्वसन प्रक्रियेतील अडचणींबाबत सविस्टर चर्चा करण्यात आली. बैठकीत पुनर्वसनासाठी जागा वाटप करताना प्रत्येक धरणग्रस्त कुटुंबास दोन एकरप्रमाणे आवश्यक क्षेत्र उपलब्ध करून देण्यास तत्त्वतः मान्यता देण्यात आली. तसेच पुनर्वसित गावठाणांमध्ये रस्ते, पाणीपूरवठा, वीज आणि इतर मूलभूत नागरी सुविधा उभारण्यासाठी विशेष बाब म्हणून भरीव निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही शासनाकडून देण्यात आले..0
0
Report
अकोला महापालिका ने 2026 जनगणना के पहले चरण में महाराष्ट्र में दूसरा स्थान पाया
Akola, Maharashtra:अकोला महानगरपालिकेने 2026 च्या जनगणना मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करत राज्यातील महापालिकांमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय जनगणना संचालनालयाच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यात अकोला मनपाने नियोजित वेळेआधी काम पूर्ण करत हा मान मिळवला आहे. या यशाबद्दल मनपा अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रात सुरू असलेल्या जनगणना मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात अकोला महानगरपालिकेने उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे.1 मे ते 15 मे या कालावचीत ‘स्वगणना’ मोहीम राबविण्यात आली होती. त्यानंतर 16 मे ते 14 जून दरम्यान प्रगणकांनी घरोघरी जाऊन माहिती संकलनाचे काम केले. अंतिम मुदतीला अवघे तीन दिवस शिल्लक असतानाच अकोला मनपाने संपूर्ण काम पूर्ण करून राज्यातील महापालिकांमध्ये दुसरा क्रमांक मिळवला.0
0
Report
कॉलेज रोड पर निजी सावकारी विवाद में युवक पर गोली, हालत गंभीर
Nashik, Maharashtra:कॉलेज रोड परिसर में निजी सावकारी के पैसे के विवाद के कारण एक युवक पर बंदूक तानकर प्राणघातक हमला हुआ। नाशिक शहर के कॉलेज रोड इलाके में निजी सावकारी के पैसे के विवाद के चलते युवक पर बंदूक तानी गई और उसकी बेदम मारपीट भी की गई। इस हमले में युवक गंभीर घायल है, पीड़ित ने गंगापुर पुलिस द्वारा पर्याप्त कार्रवाई नहीं करने का आरोप लगाया है। अमृतधाम निवासी तुषार भोसले अपने मित्रों से कॉलेज रोड पर मिलने गया था, रात लगभग 11:30 बजे संदिग्ध सूरज तिवारी, प्रशांत भोकेफोडे, निकिल साळवे और अमित यादव ने फ़ॉर्च्युनर कार से वहाँ आकर हमला किया। तुषार ने 8 महीने पहले 15% ब्याज पर 8 लाख रुपये लिए थे। हर महीने 75,000 रुपये ब्याज दे रहे थे और इसी पैसे के विवाद से आरोपियों ने तुषार पर बंदूक तानकर उसके मित्र को बेरहमी से पिटाई की। घायल के सिर और गाल में गंभीर चोट आई हैं और एमएलसी दर्ज की गई है। शिकायत देकर भी पुलिस कार्रवाई नहीं होने का आरोप तुषार भोसले ने किया है। इस घटना से नाशिक में निजी सावकारों के डर का मुद्दा फिर से सामने आया है, और कानून के दायरे में पुलिस ऐसे साहूकारों के विरुद्ध कैसे कार्रवाई करेगी, यह देखने के लिए महत्वपूर्ण है।0
0
Report
Advertisement
खापा में ट्रक की भिड़ंत, दुचाकी सवार युवक की मौके पर मौत
Bhandara, Maharashtra:ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू...खापा येथील घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील खापा येथे ट्रकने दुचाकीस्वारास जोरदार धडक दिल्याची घटना रामटेकच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला. मृत युवक हा हिंगणा येथील रहिवासी असून त्याचे नाव हिमांशु पटले असे आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.0
0
Report
तापोला केबल ब्रिज दिवाळी में खुलेगा; महाबळेश्वर-खेड का नया संपर्क बन जाएगा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. महाबळेश्वर-खेड 'तापोळा केबल ब्रिज' अंतिम टप्प्यात; दिवाळीत होणार खुला!.. अँकर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणचे अंतर कमी करणाऱ्या महाबळेश्वर आणि खेड तालुक्याला जोडणारा तापोळा येथील भव्य 'केबल स्टेड ब्रिज' आता अंतिम टप्प्यात आला आहे.. १४८.५ कोटींच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून,आगामी दिवाळीत हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे.. या पुलामुळे सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांमधील दळणवळण अधिक सोपं आणि जलद होईल.तसेच आजवर विकासापासून दूर राहिलेल्या कांदाटी खोऱ्यातील गावांचा आर्थिक आणि सामाजिक कायापालट होणार आहे.. सध्याच्या आंबेनळी आणि वरंधा घाटापेक्षा तापोळा मार्ग अधिक सोयीस्कर असल्याने पर्यटकांची याला पहिली पसंती असेल.. कोयना बॅकवॉटर आणि रघुवीर घाटाच्या निसर्गरम्य परिसरामुळे पर्यटनाला मोठी संजीवनी मिळणार असून,कोकण,गोवा आणि व्याघ्र प्रकल्पांकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठी हा मार्ग गेमचेंजर ठरणार आहे..0
0
Report
इंदिरानगर के मल्हार अपार्टमेंट में चोरी, वॉचमन के घर से तीन मोबाइल गायब
Nashik, Maharashtra:इंदिरानगरमधील मल्हार अपार्टमेंटमध्ये धाडसी चोरीची घटना ▪️ सकाळी ७.४५ वाजेच्या सुमारास चोरीचा प्रकार उघड ▪️ एका महिलेने आणि लहान मुलीने वॉचमनच्या घरात प्रवेश केला ▪️ वॉचमनच्या घरातील तब्बल तीन मोबाईल फोन लंपास ▪️ चोरीदरम्यान आणखी एक महिला कंपाऊंडबाहेर संशयास्पदरीत्या थांबलेली ▪️ तिघींनी संगनमताने चोरी केल्याचा प्राथमिक संशय ▪️ चोरीनंतर टेम्पोमधून घटनास्थळावरून पलायन ▪️ परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन; संशयित दिसल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन。0
0
Report
Advertisement
स्थल न मिलने से छत्रपति संभाजीनगर जिला परिषद की पहली सभा स्थगित
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेच्या नियोजनाला सामान्य प्रशासन विभाग लागला आहे. पदाधिकारी आणि प्रशासनाने समन्वयातून ३० जून ही तारीखही निश्चित केली आहे. मात्र, त्यासाठी सभागृह निश्चित होऊ शकलेले नाही. त्यामुळे तारीख ठरली, पण स्थळ ठरेना, अशी स्थिती झाली आहे. जिल्हा परिषदेची ५७ कोटी रुपये खर्चुन नवीन इमारत उभी करण्यात आली आहे. या इमारतीचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र, फर्निचर आणि विद्युत जोडणीचे काम प्रलंबित आहेत. त्यामुळे टोलेजंग इमारत असूनही अपूर्ण सुविधांमुळे ती वापरात घेणे शक्य नाही त्यामुळे बैठक कुठे घ्यावी हक्काची जागा नाही या गोंधळात ही पहिली सर्वसाधारण सभा लांबली आहे..0
0
Report
हिंगोली पुलिस ने पंप चोर गैंग का पर्दाफाश, 2 लाख 3 हजार का माल बरामद
Hingoli, Maharashtra:हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोकळा पंप चोरून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीचा हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे या टोळी कडून तीन गुन्हे उघडकीस आणले असून 2 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे..0
0
Report
नागपुर में मतदाता सत्यापन के लिए बड़ा फैसला: 70 BLO निलंबित, विशेष पुनरीक्षण से पहले प्रशासन सख्त
Nagpur, Maharashtra:नागपूर मतदार पडताळणीच्या कामात टाळाटाळ केल्याचा कारणावरून 70 बीएलओंवर निलंबनाची टांगती तलवार निवडणूक विभागाचे महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषद सीईओंना पत्र विशिष्ट सखोल पुनरीक्षण प्रक्रियेपूर्वी मतदार तपासणीचे काम रखडल्याचा ठपका नागपुरात आतापर्यंत केवळ 69 टक्के मतदार पडताळणी पूर्ण 46 लाखांहून अधिक मतदारांपैकी 31 लाख 86 हजार मतदारांचीच तपासणी मतदार पडताळणीत नागपूर राज्यात 29व्या क्रमांकावर घसरला बीएलओंकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने प्रशासनाची कारवाईचा इशारा संबंधित बीएलओंना यापूर्वी नोटीस आणि सुनावणीची संधी दिली... कामात कुचराई करणाऱ्यां विरोधात पोलिसांत तक्रारीही दाखल निलंबनासाठी प्रस्तावित 70 बीएलओंपैकी 35 जिल्हा परिषद तर 35 शहरी भागातील 20 जूनपासून सुरू होणाऱ्या विशेष सखोल पुनरीक्षणापूर्वी प्रशासनाचा दणका कारवाईचा अहवाल महापालिका आणि जिल्हा परिषदेकडून मागविणार0
0
Report
Advertisement
आळंदी के कचरा डिपो पर फिर उठा सवाल: कचरा जलाने से प्रदूषण
Pimpri-Chinchwad, Maharashtra:आळंदीतील कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. केळगाव परिसरातील नागरिकांनी नगरपरिषदवर गंभीर आरोप करत कचऱ्याची वैज्ञानिक पद्धतीन विल्हेवाट लावण्याऐवजी तो जाळला जात असल्याचा दावा केला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात धूर, दुर्गंधी आणि वायू प्रदूषण निर्माण होत असल्याची तक्रार आहे. श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ आणि दम लागण्याच्या समस्या वाढत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कचरा जाळण्याची पद्धत बंद करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय.0
0
Report
शिरूर में 36 घंटे में हत्या का पर्दाफाश, नाबालिग आरोपी गिरफ्तार
Shirur, Maharashtra:पुण्याच्या शिरूर तालुक्यातील वरूडे गावात घराबाहेर ओट्यावर झोपलेल्या ४३ वर्षीय बाळासो बबन तांबे यांची धारदार कोयत्याने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण शिरूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, शिक्रापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत तत्परता दाखवत, अवघ्या ३६ तासांत या खुनाचा पर्दाफाश केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जुन्या वादाचा आणि काही दिवसांपूर्वी झालेल्या शिवीगाळीचा राग मनात धरून, गावातीलच एका अल्पवयीन मुलाने हा रक्ताचा खेळ खेळल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला कोयता जप्त केला आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.0
0
Report
आधार कार्ड से यूरिया वितरण: अकोला में किसानों में डर, कालाबाजारी की आशंका
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात युरिया खतासाठी शेतकऱ्यांच्या रांगा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. खताचा तुटवडा दूर करण्यासाठी प्रशासनाने पुरेसा साठा उपलब्ध करून दिला असला, तरी आधार कार्डवर प्रति व्यक्ती पाच बॅग युरिया देण्याच्या निर्णयामुळे आता नव्या प्रश्नांना तोंड फुटले आहे. शेतकरी असल्याची खात्री न करता केवळ आधार कार्डच्या आधारे खत वाटप होत असल्याने साठेबाजी आणि काळाबाजार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खरीप हंगामाची लगबग सुरू असताना अकोट तालुक्यात युरियासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून युरियाचा पुरवठा अपुरा असल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. आता खताचा साठा उपलब्ध होत असला, तरी वितरण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शासनाच्या नियमानुसार केवळ आधार कार्ड दाखवून प्रति व्यक्ती पाच बॅग युरिया दिले जात असल्याने प्रत्यक्षात शेती नसलेल्या व्यक्तीलाही खत मिळण्याची शक्यता आहे. यामुळे साठेबाज मोठ्या प्रमाणात युरिया खरेदी करून नंतर जादा दराने विक्री करू शकतात, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांच्या मते, युरिया वितरणासाठी आधार कार्डसोबत सातबारा उतारा, किसान कार्ड किंवा फार्मर आयडी अनिवार्य केल्यास खरी गरज असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत खत पोहोचू शकेल. तसेच संबंधित शेतकऱ्याकडे किती जमीन आहे आणि त्याला किती खताची आवश्यकता आहे, याचीही खातरजमा होऊ शकते. त्यामुळे साठेबाजी आणि काळाबाजाराला आळा बसण्यास मदत होईल. दरम्यान, युरियाच्या उपलब्धतेबाबत चिंता करण्याचे कारण नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यासाठी युरिया आणि डीएपी खताचा मुबलक साठा उपलब्ध असून त्याचे नियोजनबद्ध वितरण सुरू असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे. युरिया खरेदीची गरज असल्याची भूमिका || एकीकडे युरियाचा पुरेसा साठा उपलब्ध करून शेतकऱ्यांची अडचण दूर करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात असला, तरी वितरण प्रक्रियेत शेतकरी पडताळणीचा अभाव असल्याने साठेबाजीची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आधार कार्डसोबत सातबारा किंवा फार्मर आयडीची अट लागू करून खत वितरण अधिक पारदर्शक करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. आता या मागणीकडे शासन आणि कृषी विभाग कितपत गांभीर्याने पाहतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.0
0
Report
Advertisement
