icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Oct 2024, 05:25 am

माझी उमेदवारी मदन येरावारांना पाडण्यासाठीच, माजी आमदार संदीप बाजोरीयांचा दावा.

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून तुतारी चिन्हावरच आपण लढु असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत तिकीट वाटपाआधीच त्यांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार देखील सुरू केला आहे. भाजप आमदार मदन येरावार यांनी मतदारसंघ बकाल करून ठेवला, रस्त्यांची दैना झाली, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून भयमुक्त वातावरण देऊ असे वचन आपण जनतेला देत असल्याचे संदीप बाजोरिया यांनी सांगितले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

वर्धा ATS कार्रवाई: शहजाद भट्टी गैंग से संपर्क में आए व्यक्ति हिरासत में

Wardha, Maharashtra:वर्धा ब्रेकिंग वर्ध्यात ATS पथकाने सकाळी 7 वाजता एकाला ताब्यात घेतले. गँगस्टर शहजाद भट्टी याच्या गँगशी संपर्क असल्यावरून वर्ध्यात एकाला चौकशीकरिता घेतलं ताब्यात. पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टी याच्या गँगशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असलेल्या व्यक्तींविरोधात विविध ठिकानासह वर्ध्यात ATS पथकाची कारवाई. वर्ध्यातही एका संशयिताला ताब्यात घेतल्याने खळबळ. वर्धा, नागपूर एसटीएस पथकाची संयुक्त कारवाई. पथकाकडून संबंधित संशयिताची चौकशी सुरू असल्याची सूत्रांची माहिती. 10 तासापासून कसून ATS पथकाची चौकशी सुरु. वर्ध्याच्या वडनेर येथून एकाला घेतले आहे ताब्यात.
0
0
Report

11 घंटे बाद सुरक्षित बाहर आया विजय सपकाळ, पत्नी-बच्चों की खुशी से भावुक

Pimpri-Chinchwad, Maharashtra:मोशी दुर्घटनेमध्ये इमारतीत अडकलेल्या आणि सुखरूप बाहेर पडलेल्याचे अनुभव थक्क करणारे आहेत... विजय सपकाळ ही या दुर्घटनेत इमारती मध्ये अडकला होता...! त्याचा पाय पिलर खाली अडकला होता...खडकी फुटलेल्या काचांवर तो होता.. जगणार नाही.अशी शक्यता लक्षात घेऊन त्याने पत्नीला सेल्फी, व्हिडिओ आणि मेसेज पाठवला....सुदैवाने ११ तासानंतर त्याला बाहेर काढण्यात यश आलं. बेशुद्ध अवस्थेतून बाहेर पडल्यावर पत्नी आणि मुलीला त्याने पाहिले आणि त्याला अश्रू अनावर झाले...! त्याच्या अनुभव संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी...!
0
0
Report

गडचिरोली के जंगलों में हाथियों के आक्रामक मूवमेंट से नागरिकों में डर, वनविभाग चेतावनी

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील रानटी हत्तींच्या धुमाकुळानंतर वनविभाग सतर्क, रील आणि फोटोंच्या नादात जीव धोक्यात घालू नका, वनविभागाचे नागरिकांना आवाहन गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली वनविभागात, विशेषतः गडचिरोली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा वावर आहे. मनुष्य आणि हत्ती यांच्यात कोणताही अनुचित प्रकार किंवा संघर्ष होऊ नये, यासाठी वनविभाग सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र काही नागरिक रानटी हत्तींचे फोटो, व्हिडिओ आणि सोशल मीडियासाठी 'रील्स' बनविण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत. नुकतेच हत्तीने चिरडल्याने एका इसमाचा मृत्यू झाला आहे. गडचिरोलीच्या वनविभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे व सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. हत्तींच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यासाठी आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी, 'प्रायमरी रिस्पॉन्स टीम' आणि 'रॅपिड रिस्पॉन्स टीम' दिवस-रात्र परिसरात गस्त घालत आहेत. यासोबतच, हत्तींच्या स्थानाबाबतची आणि हालचालींची अचूक माहिती गावकऱ्यांना सातत्याने दिली जात आहे, जेणेकरून नागरिक सतर्क राहू शकतील. मात्र काही उत्साही लोक या माहितीचा गैरवापर करत असल्याचे समोर आले आहे. वनविभागाने सुरक्षेच्या कारणास्तव उभारलेले बॅरिकेड्स (कठडे) ओलांडून काही नागरिक थेट हत्तींच्या जवळ जाण्याचा धोका पत्करत आहेत. रानहत्तींचे फोटो काढणे, व्हिडिओ बनवणे आणि सोशल मीडियासाठी 'रील्स' तयार करणे या नादात अनेक जण स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत. परिसरात हत्ती दिसून आल्यास किंवा कोणतीही अडचण निर्माण झाल्यास तात्काळ वनविभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन अशा संवेदनशील परिस्थितीत जबाबदारीने वागावे, अशी अपेक्षा वनविभागाकडून व्यक्त केली जात आहे.
0
0
Report
Advertisement

नंदुरबार में बारिश की कमी से किसान प्यासे फसलें हाथों से पानी दे रहे

Dhule, Maharashtra:नंदুরबार जिल्ह्यात पिकांना जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. वरुणराजा बरसत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर पिकांना हाताने पाणी देण्याची वेळ आली आहे. स्वतःच्या मुलाबाळांप्रमाणे पिकांना जगवण्यासाठी शेतकरी राजा पिकांना घोटभर पाणी देत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत अवघा ८३ मिलिमीटर पाऊस झाला असून, पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. पावसाळा सुरू होऊन जवळपास दीड महिना उलटला, तरीही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. सुरुवातीला पाण्याची उपलब्धता असल्यामुळे शेतकऱ्यांनी लागवड केली होती; मात्र भूजल पातळी खालावल्याने विहिरींनीही तळ गाठला आहे. जिल्ह्यात दमदार पाऊस होत नसल्यामुळे पिकांना जीवनदान देण्यासाठी शेतकऱ्यांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
0
0
Report

चामोर्शी में ड्रोन सर्वे के विरोध में ग्रामीणों ने ग्राम पंचायत कार्यालय में डांबा

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात वरद फेरो अलॉय कंपनीच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी डांबले, जमीन मोजणीच्या मुद्यावर भडकले नागरिक, मुधोली चक परिसरात येणार आहे प्रकल्प ( 2 file sent on 2C) टायटल:---गडचिरोली जिल्ह्यातील  चामोर्शी तालुक्यातील मुधोली चक गावाच्या परिसरातील शेतांवर संध्याकाळी ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सर्व्हेक्षण करत असलेल्या तीन लोकांना गावकऱ्यांनी पकडून ग्रामपंचायत कार्यालयात डांबून ठेवले. त्यांचे ड्रोनही जप्त केले. वरिष्ठ अधिकारी येत नाहीत तोपर्यंत आम्ही हटणार नाही आणि डांबून ठेवलेल्या लोकांनाही सोडणार नाही, अशी भूमिका घेत रात्री उशिरापर्यंत शेकडो नागरिकांनी ग्रामपंचायत परिसरात ठिय्या दिला. महिनाभरापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारोच्या संख्येने आंदोलन करणाऱ्या विमानतळ, जेएसडब्ल्यू आणि वरद फेरो अलॅयच्या प्रकल्पबाधित गावकऱ्यांना सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी तीन महिनेपर्यंत कोणत्याही हालचाली होणार नाहीत, तोपर्यंत तुम्हाला आक्षेप नोंदविण्यासाठी वेळ असेल, असे जाहीरपणे सांगितले होते. असे असताना गुरूवारी ड्रोन कॅमेऱ्यांनी शेतजमिनीचे सर्व्हेक्षण सुरू असल्याचे पाहून मुधोलीच्या गावकऱ्यांमध्ये संतप्त भावना उफाळून आल्या. हे सर्व्हेक्षण वरद फेलो अलॅय या कंपनीसाठीच असल्याचा दाट संशय आल्याने त्यांनी सर्व्हेक्षण करणाऱ्यांना पकडून ग्रामपंचायत कार्यालयात डांबले. पाहतापाहता संपूर्ण गावकरी आणि काही शेजारच्या गावांचेही लोक त्या परिसरात जमले. दरम्यान या स्थितीची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार आणि आष्टी पोलीस स्टेशनचे पथकही गावात पोहोचले. गावकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं पाहून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक हर्षवर्धन यांनी हे सर्व्हेक्षण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे सांगत गावकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
0
0
Report
Advertisement

चंद्रपुर नगरपालिका के ठेकेदार सफाई रोकने से शहर की सफाई संकट, आंदोलन तेज

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर - नालीसफाई कामगारांची सेवा स्थगित, शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर, कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांना सेवेत घ्या, काँग्रेस नगरसेवकांचे मनपासमोर आंदोलन चंद्रपूर महानगरपालिकेने नालीसफाई करणाऱ्या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर शहरात स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे शहरातील विविध प्रभागांतील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याशिवाय घराघरांतून कचरा संकलन करणारे स्वच्छता दूतही येत नसल्याने नागरिकांना घरातील कचरा उघड्यावर टाकण्याची वेळ आली आहे. परिणामी शहरात अस्वच्छता वाढत असून नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच सेवेतून कमी करण्यात आलेल्या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांना तात्काळ पुन्हा सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी नगरसेवक सचिन कत्याल यांच्या नेतृत्वात आज चंद्रपूर महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी मनपासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शहरातील स्वच्छतेचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा आणि कमी करण्यात आलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घ्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. दरम्यान, प्रशासनाने या मागणीवर तात्काळ सकारात्मक निर्णय न घेतल्यास यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी दिला.
0
0
Report
Advertisement

शिवसेना पार्षद रमेश म्हात्रे ने डॉक्टरों पर मारपीट, डॉक्टर सृष्टी बाविस्कर पर मानसिक आघात

Kalyan, Maharashtra:मारहाण झालेली डॉक्टर अजूनही झोपेत ओरडते आम्हाला मारते, मारहाण झालेल्या डॉक्टरांवर मानसिक आघात. डॉक्टर Srishti Baviskar च्या वडिलांची प्रतिक्रिया. Anchor- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे याने डॉक्टरांना मारहाण केली होती. Srishti Baviskar या महिला डॉक्टरला देखील म्हात्रेने शिवीगाळ करत मारहाण केली. घटनेला तीन दिवस उलटून गेल्यानंतरही डॉ.सृष्टी अजून कामावर रुजू झालेली नाही, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र सृष्टीने राजीनामा दिलेला नाही. तिच्यावर मानसिक आघात झालाय. अजूनही तिची झोप while वह असुरक्षित असल्याची अडचण डॉक्टरांच्या वडिलांनी व्यक्त केली. तसेच निवडून आलेले हे नगरसेवक जनतेचा काम करण्याच्या ऐवजी डॉक्टरांना मारहाण करतात ही खेदाची गोष्ट आहे. या रुग्णालयात सुरक्षा असतानाही त्यांनी बघायची भूमिका घेतली या विषयावर डॉ.सृष्टीच्या वडिलांनी प्रश्न उपस्थित केले. डॉ.सृष्टीच्या वडिलांशी आमची प्रतिनिधी आतिश भोईर यांनी चर्चा केली.
0
0
Report

शिर्डी के सावळीविहीर में FDA की कार्रवाई, दूध संकलन केंद्र का परवाना निलंबित

Shirdi, Maharashtra:शिर्डी जवळील सावळीविहीर गावात FDA की कार्रवाई। दूध संकलन केंद्र का परवाना निलंबित। साई जतिन दूध संकलन केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाची छापाेमारी। संकलन केंद्राच्या तपासणीत गंभीर अनियमितता आढळल्याने परवाना निलंबित। दूध टँकर नोंदी और गुणवत्ता नियंत्रण प्रक्रियेत त्रुटी असल्याचा FDA कडून ठपका। दूध संकलन, डिस्पॅच, लॅब और टँकर रिजेक्शनच्या नोंदी अपूर्ण असल्याचं FDA पथकाच्या तपासणीत समोर। गेल्या सहा महिन्यात दूध संकलन केंद्राचे 22 टँकर रिजेक्ट झाले। मात्र दूध संकलन केंद्राकडे कुठलीही नोंद नसल्याची गंभीर बाब समोर। FDA ने दुधाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले。
0
0
Report
Advertisement

वाशीम-हिंगोली टोल प्लाझा अदालत के आदेश पर जप्त, किसानों का मुआवजा बढ़ाने की कार्रवाई

Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यातील वाशीम-हिंगोली राष्ट्रीय महामार्गवरील धूमका-तोंडगाव येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा टोल प्लाझा जिल्हा न्यायालयाच्या आदेशाने आज जप्त करण्यात आला.जप्ती अधिकारी जितेंद्र नेमाने यांनी टोल प्लाझावर नोटीस चिपकवत आणि दवंडी देत कारवाई केली.जमीन अधिग्रहणाचा योग्य मोबदला न मिळाल्याने शेतकरी बेबी गर्जे आणि विठ्ठल गर्जे यांनी न्यायालयात धाव घेतली होती.न्यायालयाने वाढीव मोबदला देण्याचे आदेश दिले होते.मात्र आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने न्यायालयाने टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश दिले आणि त्यानुसार आज ही कारवाई करण्यात आली. बाईट :दिनकर गर्जे, शेतकरी. बाईट:जितेंद्र नेमाने,जप्ती अधिकारी.
0
0
Report

मुंबई ATS कवठेमहांकाळ में बिश्नोई गैंग से जुड़े मामले में चौकसी

Sangli, Maharashtra:बिश्नोई गँगशी संबंध असल्याच्या कारणावरून मुंबई ATS कडून कवठेमहांकाळ मध्ये चौकशी.. बिश्नोई गँगशी संबंध असल्याच्या कारणावरून मुंबई ATS कडून सांगलीच्या कवठेमहांकाळ मध्ये एकाची चौकशी करण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीकडुन बिश्नोनोईचे काही व्हिडिओ लाईक करण्यात आले होते. मूळचा नवी मुंबईच्या जवळील घनसोली येथील असलेला पण सध्या सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील एका गावात नातेवाईकाकडे संबंधित व्यक्ती राहण्यास आला होता, दरम्यान एटीएसकडुन सदर व्यक्तीची चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये तो व्यक्ती दिव्यांग असल्याचे आणि अनावधानाने काही व्हिडिओ लाईक केल्याचं तपासात समोर आल्याची माहिती काही पोलीस सूत्रांनी दिली आहे.
0
0
Report

अकोला में 197 खराब सोयाबीन बीज शिकायतें, किसान चिंतित; अमोल मिटकरी ने कार्रवाई की मांग

Akola, Maharashtra:राज्यात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी वाढत असल्याचं राजकीय पातळीवरही तापलं आहे. अकोला जिल्ह्यात कृषी विभागाकडे सोयाबीन न उगवल्याच्या तब्बल १९७ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यंदाच्या खरीप हंगामात अकोला जिल्ह्यात सर्वाधिक पेरणी सोयाबीनची झाली आहे, मात्र अनेक ठिकाणी सोयाबीन उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. या प्रकरणी अकोला जिल्ह्यात कृषी विभागाकडे १९७ तक्रारी प्राप्त झाल्या असून शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. हा मुद्दा विधिमंडळातही गाजला होता. मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी निकृष्ट बियाणे विकणाऱ्या ११ कंपन्यांवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संबंधित कंपन्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. मात्र आदेशानंतरही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करत अमोल मिटकरी यांनी कृषी अधीक्षक कार्यालयात आंदोलन छेडले. यावेळी संबंधित कंपन्यांवर तात्काळ कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच कृषिमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नसल्याची खंतही मिटकरी यांनी व्यक्त केली आहे. निकृष्ट बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर कारवाई होत नसेल, तर हे सरकार त्या कंपन्यांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top