445001
माझी उमेदवारी मदन येरावारांना पाडण्यासाठीच, माजी आमदार संदीप बाजोरीयांचा दावा.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून तुतारी चिन्हावरच आपण लढु असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत तिकीट वाटपाआधीच त्यांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार देखील सुरू केला आहे. भाजप आमदार मदन येरावार यांनी मतदारसंघ बकाल करून ठेवला, रस्त्यांची दैना झाली, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून भयमुक्त वातावरण देऊ असे वचन आपण जनतेला देत असल्याचे संदीप बाजोरिया यांनी सांगितले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
शिरूर में FDA की संभावित कार्रवाई से व्यापारी नदी में खाद्य पदार्थ फेंकते दिखे
Shirur, Maharashtra:शिरूर शहरातून एक धक्कादायक आणि चिंताजनक प्रकार समोर आला आहे. अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDA च्या संभाव्य कारवाईच्या भीतीने व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बिस्किटांचे पुढे, मॅगी आणि इतर खाद्यपदार्थ थेट नदीत आणि कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याजवळ फेकून दिले आहेत. विशेष म्हणजे पाण्यात फेकण्यात आलेला हा सर्व अन्नसाठा कालबाह्य म्हणजेच एक्स्पायरी डेट संपलेला होता. कारवाईतून वाचण्यासाठी हा घाट घालण्यात आल्याचे बोलले जात आहे. शिरूर परिसरात अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थ उघड्यावर किंवा नदीत फेकून देण्याची ही पहिलीच घटना असून, यामुळे पाण्याच्या प्रदूषणाचा आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यावर आता प्रशासन काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
शिरूर के सांसद निलेश लंके ने बलिदानभूमि पर प्रेरणा पाई, जल-संकट पर बचत आह्वान
Shirur, Maharashtra:निलेश लंके खासदार बलिदान भूमीतून प्रेरणा: खासदार निलेश लंके यांनी वढू बुद्रुक आणि तुळापूर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान भूमीला भेट दिली. ही भूमी अत्यंत ऊर्जादायक असून गड-किल्ले हे केवळ प्रेक्षणीय स्थळ नसून आपल्या सर्वांसाठी प्रेरणा आणि ऊर्जेचे स्रोत असल्याचे त्यांनी सांगितले. 'वाघासोबतच्या' व्हिडिओवर मिश्किल टिप्पणी: 'लोक कुत्र्यांना घेऊन फिरतात, पण आम्ही टायगरला घेऊन फिरतो.' शंभूराजांनी वाघाचे जबडे फाडले होते, तीच आपली प्रेरणा असल्याचे सांगत 'वाघालाही मी माझ्या चालीने चालायला लावले,' अशी दमदार प्रतिक्रिया त्यांनी दिली. राजकीय प्रश्नांना बगल: राष्ट्रवादीतील 'ऑपरेशन' आणि राजकीय घडामोडींवर बोलणे लंके यांनी स्पष्टपणे टाळले. 'मी येथे खासदार किंवा पदाधिकारी म्हणून नाही, तर केवळ शिवरायांचा मावळा म्हणून आलो आहे. या पावन भूमीत राजकीय भाष्य करणे माझ्यासारख्या शिवभक्ताला शोभणार नाही,' अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. दुष्काळावर भाष्य आणि वरुणराजाला साकडे: राज्यात असलेल्या पाणीटंचाईवर चिंता व्यक्त करत निलेश लंके यांनी 'धो-धो पाऊस पडून बळीराजा सुखी होऊ दे' अशी प्रार्थना केली. तसेच धाराशिवसारख्या भागातील पाणीटंचाईचा दाखला देत नागरिकांना पाण्याची काटेकोरपणे बचत करण्याचे आवाहन केले.0
0
Report
जुन्नर के ओतूर में भयावह दुर्घटना: दो की मौत, एक बच्ची समेत
Shirur, Maharashtra:ओतूरजवळ भीषण अपघात; लहान चिमुरडीसह दोन जणांचा जागीच मृत्यू या घटनेत आयषर टेम्पो नगरकडे जात होता, तर दुचाकी कल्याणच्या दिशेने प्रवास करत होती. दोन्ही वाहनांचा वेग व अचानक धडक यामुळे अपघात अत्यंत भीषण ठरला. या अपघातात दुचाकीवरील एका लहान मुलासह दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या घटनेची संपूर्ण घटना कैद झाली असून पुढील तपास सुरू आहे. प्रतिनिधी Hemant Chapude, Zee Media Junnar Pune.0
0
Report
Advertisement
पहली बारिश में महाड के सड़क जलमय, अपूर्ण पाइपलाइन-गटार कार्य से नागरिक परेशान
Chendhare, Maharashtra:पहिल्याच पावसात महाडची दाणादाण अर्धवट कामामुळे पाणी रस्त्यावर अपूर्ण कामामुळे बोजवारा नागरिकांची गैरसोय पहिल्याच जोरदार पावसाने महाड शहरातील रस्ते जलमय झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. पाईपलाईन व गटारांची कामे अपूर्ण राहिल्यामुळे काही ठिकाणी पावसाचे पाणी थेट रस्त्यावर साचले. परिणामी वाहनचालक आणि पादचाऱ्यांना पाण्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागली. या प्रकाराची दखल घेत महाड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांनी पाणी साचलेल्या भागांची पाहणी केली. रस्त्यालगत टाकण्यात आलेला मातीचा भराव तातडीने हटवून गटारे मोकळी करण्याचे आदेश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. पहिल्याच पावसात शहरातील अपूर्ण कामांचा बोजवारा उडाल्याने नगरपालिकेच्या नियोजनावर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.0
0
Report
रत्नागिरी में भारी बारिश ने किसानों की चिंता हराई
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्ह्यात जोरदार पावसाची एन्ट्री.. चिपळूण, खेड, दापोलीत आणि संगमेश्वर मध्ये दमदार पावसाची सुरुवात.. तर उर्वरित तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी.. या पडलेल्या पावसाच्या सरिमुळे बळीराजा सुखवाला.. गेले काही दिवस पावसाने दडी मारली होती.. त्यामुळे बळीराजा संकटात आला होता.. शेतात केलीली भाताची पेरणी कडक उन्हात करपून जाण्याची भीती निर्माण झाली होती.. आज पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावलेला आहे..0
0
Report
महाड में भारी बारिश, आकाश गरजगर्ज के साथ गूंजा
Chendhare, Maharashtra:रायगड ब्रेकिंग ढगांच्या गडगडाटासह महाडमध्ये जोरदार पाऊस. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. दुपारी तीन वाजल्यापासून पावसाची संततधार. जवळपास तीन तास झालेल्या पावसाने हवेत चांगलाच गारवा. उन्हामुळे हैराण नागरिकांची कडाक्याच्या उष्म्यातून सुटका. पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या बळीराजाला दिलासा.0
0
Report
Advertisement
तुकाऱाम महाराज के 341वें पालखी सोहळे की तैयारी; देहू में नई चांदी का रथ
Varsoli, Maharashtra:संत तुकाराम महाराजांच्या ३४१ व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान ७ जुलै रोजी होणार असून, त्यासाठी देहू नगरीमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या या पालखी सोहळ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. यंदाच्या पालखी सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या पादुका देहू ते पंढरपूर नेण्यासाठी नवीन चांदीचा रथ तयार करण्यात येत आहे. या रथामुळे यंदाचा पालखी सोहळा अधिक भव्य आणि दिमाखदार ठरणार आहे. या नव्या रथाच्या निर्मितीसाठी विश्वस्तांकडून युद्धपातळीवर काम सुरू असून, राजस्थानमधून आलेले कुशल कारागीर रथाच्या सुट्या भागांवर आकर्षक कलाकुसर करत चांदी मढविण्याचे काम करत आहेत. रथावरील नक्षीकाम, कलात्मक रचना आणि पारंपरिक शैली यामुळे हा रथ वारकऱ्यांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेत अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे यंदाचा ३४१ वा पालखी सोहळा नव्या चांदीच्या रथामुळे अधिकच लक्षवेधी ठरणार असून, देहू नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली आहे.0
0
Report
जालना में 3 दिन से लापता युवक का खेत में शव, पत्नी ने हत्या का आरोप
Jalna, Maharashtra:जालना : 3 दिवसापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह शेतशिवारात आढळला. पत्नीने हत्या केल्याचा आरोप केला. वैद्यकीय अहवाल आल्यावर सत्य उघडेल, असे पोलिसांनी सांगितले. 3 दिवसांपासून बेपत्ता 34 वर्षीय कैलास गिरी यांच्या मृतदेहाची नोंद जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील गाडेगव्हाण येथे झाली. गिरी हे मागील तीन दिवसांपासून बेपत्ता होते. घरच्यांनी त्यांचा शोध घेतला, परंतु ते आढळून आले नाही. शेवटी गिरी यांच्या पत्नीने तेथील टेंभुर्णी पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली. नंतर पोलिसांनी गावातील शिवारात मृतदेह सापडल्याची माहिती घेतली. शवविच्छेदनासाठी मृतदेह जाफ्राबाद ग्रामीण रुग्णालयात पाठवला गेला. गावातील नागरिकांनी जागेच्या वादातून पतीची हत्या केली असल्याचा आरोप मयताच्या पत्नीने केला. शवविच्छेद अहवाल आणि पोलिस तपासानुसार सत्य बाहेर येईल, त्यानुसार दोषींवर कारवाई केली जाईल.0
0
Report
कल्याण पूर्वी में 15 वर्षीय लड़की के साथ दो पुरुषों का लैंगिक अत्याचार; गिरफ्तारी
Kalyan, Maharashtra:कल्याण पूर्वेतील धक्कादायक घटना 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 60 वर्षीय दो नराधमांनी केला लैंगिक अत्याचार कोळशेवाडी पोलिसांनी आरोपीला बेड्या घातल्या. कल्याणपूर्व येथील कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. घरातच मुलीला आरडाओरडा सुरू असताना आजूबाजूला रहिवाशांनी माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दखल घेऊन मुलीची सुटका केली व अख्तर मनियार व सलीम शेख या दोघांना ताब्यात घेतलं. दोघे रात्रीच्या वेळी एका 15 वर्षांच्या मुलीला घरात घेऊन आले होते व त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलगी गरीब कुटुंबातील असल्याचं सांगितलं जातं. आरोपी मणियार हा एपीएमसी मार्केटमध्ये चहाचा व्यवसाय करतो तर सलीम रिक्षा चालक आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली व पुढील तपास सुरु केला.0
0
Report
Advertisement
लोणावळा में मानसून का जोरदार आगमन, पर्यटन-व्यवसाय में नई उम्मीद
Varsoli, Maharashtra:पर्यटन नगरी लोणावळ्यात अखेर मान्सूनचे जोरदार आगमन झाले असून मुसळधार पावसाने संपूर्ण परिसराला दिलासा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे लोणावळ्यातील पर्यटन व्यवसायावर परिणाम झाला होता आणि पर्यटकांनीही लोणावळ्याकडे पाठ फिरवली होती. मात्र आता दमदार पावसामुळे वातावरण प्रसन्न झाले असून प्रसिद्ध चिक्की व्यावसायिकांसह पर्यटनाशी संबंधित व्यावसायिकांनी पावसाचे उत्साहात स्वागत केले आहे. येत्या काही दिवसांत पर्यटकांची संख्या वाढेल, अशी आशा स्थानिक व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे..0
0
Report
ओमराजे निंबाळकर: 2006 से चले संघर्ष पर अदालत के फैसले पर राजनीतिक सफाई
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सगळ्यांशी चर्चा करून मतं जाणून घेतल्यानंतर उद्या मी माझी राजकीय भूमिका स्पष्ट करणार - खा. ओमराजे निंबाळकर *ओमराजे निंबाळकर बाईट पॉइंटर्स* - केवळ अर्थकारण आणि सत्तेच्या राजकारणावर फक्त मतं टाकली जाणार असतील आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी नेमकी काय भूमिका घ्यायची - आम्ही दिलेले स्थानिक स्वराज्य संस्थांचे उमेदवार वाईट माणसं होती का? जी माणसं काम करणारे होती तुमच्यासाठी वेळ देणारी होती *ऑन कोर्ट निकाल* - माझ्या मतदारसंघातील सर्वच कार्यकर्त्यांना मी आज बोलावलेल आहे - सगळ्यांशी चर्चा करून मतं जाणून घेतल्यानंतर उद्या मी माझी राजकीय भूमिका स्पष्ट करणार - 3 जून 2006 पासून 20 वर्ष 17 दिवसांचा संघर्ष होता... - सुरुवातीला महाराष्ट्र पोलीस या तपासात व्यवस्थित तपास करत नाहीत... यासाठी ही केस सीबीआय कडे वर्ग करण्याची मागणी केली होती - सदर प्रकरणातील आरोपी हे माजी गृहमंत्री असल्याने त्यामुळे पोलीस त्याचा तपास करत नाहीत - पोलीस तपास करत नाहीत हे सिद्ध झाल्यानंतर उच्च न्यायालयाने तपास सीबीआय कडे दिला - सीबीआयने तपास पूर्ण केला मात्र कोर्ट वैमनस्य होता का हे मान्य करत.. हत्याकांडाचा उद्देश होता का? हे देखील मान्य करत - सीबीआयने ज्या पद्धतीने तपास समोर आणला होता त्याच्या बाबतीत निकालाची निराशा झाली आहे - फार धक्कादायक निकाल आहे... यापैकी कोणीच हत्या केली नाही तर यापैकी आरोपी कोण आहे? हे घडलं कस? - मला वाटतं हे दुर्दैवी आहे याच निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहे - निकाल विरोधात जाणे म्हणजे कुटुंबासाठी खूप मोठा आघात आहे - जे दुःख 3 जून 2006 रोजी भोगलं तेच दुःख डबल भोगण्याची वेळ आली -आई भयंकर ही झाली होती.... न्याय मिळणार कसा? - मला देखील दुःख वाटते माझ्यासारख्या माणसाला अविरत सेवा करून वीस वर्षानंतर न्याय मिळू शकत नसेल तर नेमकं दाद मागायची कुठे - हा यक्ष प्रश्न आहे... - माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात केवळ आणि केवळ पवनराजे निंबाळकर यांची हत्या कुठल्या कारणासाठी झाली.. तिथूनच माझा राजकीय प्रवास सुरू झाला - सर्वसामान्य जनतेने त्या ठिकाणी मला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल आहे - आज राजकारणात राहत असताना सर्वसामान्य नागरिकांच्या मध्ये राहणं हे आद्य कर्तव्य आहे... ते कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत आहे *ऑन ट्रोलिंग* - ट्रोलिंग वाल्यांनी माणसावर काय परिस्थिती आहे याचा देखील विचार करणं गरजेचं आहे - सगळं काही 24 तास माणूस राजकीय विचाराने काम करत नसतो - दुर्दैव असा आहे की मी राजकारणात आहे.. ट्रोलिंग करायला मर्यादा असतात... - माझ्याबद्दल काही बोलायचं असेल करायचं असेल तर निश्चितपणे करा - अश्लील भाषा बोलली जात असेल तर ते दुर्दैवी आहे... मग ते कोणाच्याही बाबतीत - लोकसभेचा सदस्य म्हणून माझी दुसरी टर्म आहे.... विधानसभेचा सदस्य म्हणून मी काम केलेला आहे... - सामान्य जनतेच्या लोकप्रतिनिधी कडून काही अपेक्षा असतात - आम्ही सत्तेत नसल्यामुळे किंवा निधीच्या बाबतीत केली जाणारी कोंडी.... - साधा ट्रान्सफॉर्मर दयायचा म्हणला की शेतकऱ्याला प्रत्येक वर्षी इस्टिमेट बनवावं लागतं... मग परत पुढच्या वर्षी तेच इस्टिमेट तयार करावा लागतो... *ऑन उद्धव ठाकरे संपर्क* - मी याबाबत संपूर्ण सविस्तर बोलतो आता मला मेळाव्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे बाईट - ओमराजे निंबाळकर ( खासदार, धाराशिव लोकसभा )0
0
Report
रायगढ़ में मुस्लिम समुदाय ने रोहा-आष्टमी मैदान पर पावस के लिए सामुदायिक नमाज़ से दुआ मांगी
Chendhare, Maharashtra:पावसासाठी मुस्लिम बांधवांची ईश्वराकडे आर्जव. सामुदायिक नमाज पठण करून प्रार्थना रोह्यातील मैदानात अदा केली नमाज. रायगड जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने रोहा-अष्टमी येथील मुस्लिम समाज बांधवांनी पावसासाठी विशेष सामुदायिक नमाज अदा करून अल्लाहकडे दुवा केली. तीन दिवस उपवास पाळल्यानंतर रविवारी गौळवाडी रोडवरील क्रिकेट मैदानावर हा धार्मिक कार्यक्रम पार पडला. जामे मस्जिद रोहाचे मौलाना सादिक मुकादम यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. नमाजनंतर पावसासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. लांबलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत या प्रार्थनेची परिसरात चर्चा होत आहे.0
0
Report
Advertisement
पनवेल-नेरुळ में विशेष नमाज-ए इस्तिस्का, भारी मुस्लिम सहभागिता
Navi Mumbai, Maharashtra:बारिश की रहमत के बहाने देश में शांति और व्यवस्था, साथ ही किसानों की समृद्धि के लिए आज पनवेल और नेरुळ में विशेष नमाज-ए-इस्तिस्का आयोजित की गई थी। इस सामूहिक प्रार्थना में पनवेल और Navi Mumbai के विविध हिस्सों से मुस्लिम समुदाय के लोग बड़ी संख्या में शामिल हुए। इस अवसर पर श्रद्धा और एकजुटता के साथ मौजूद लोगों ने अल्लाह तआला से लाभदायक बारिश के लिए दुवा की। नमाज के बाद देश में शांति, आम जनता के कल्याण, किसान की मेहनत को सफलता मिले, सूखे की स्थिति दूर हो और समस्त मानवजाति पर कृपा हो—इसके लिए विशेष प्रार्थना की गई।0
0
Report
मोरे डैम की मुख्य जलवाहिनी से लाखों लीटर पानी चोरी, 39.89 लाख रुपए के नुकसान
Navi Mumbai, Maharashtra:मोरेबे धरणातून पानी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला अनधिकृतपणे बेकायदेशीर जोडणी करून लाखों लिटर पाणी चोरी केल्याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खांदेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पाणी पुरवठा विभागाच्या तपासणीत अज्ञात व्यक्तींनी पनवेल मधील विचु़ंबे व देवदगाव हद्दीत एक्सप्रेसवेच्या बाजूला असलेल्या मुख्य जलवाहिनीच्या वॉशआउट व्हॉल्व्ह तोडून अनधिकृत नळजोडणी करून पाणी चोरी केल्याचे निदर्शनास आले. अधिक तपासात सदर जलवाहिनीवरून ३९,८९,५८०/- रुपये किमतीच्या ३,३२,४६५ घनमीटर पाण्याची चोरी करण्यात आल्याचे आढळून आले आहे. या पाणी चोरीमुळे संपूर्ण नवी मुंबईच्या पाणी पुरवठ्यावर मोठा परिणाम झाल्याचे आढळून आले.0
0
Report
चंद्रपुर में नीट परीक्षा के लिए सुरक्षा चाकचौबंद, 10 केंद्रों पर 3301 छात्र
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुर जिले में नीट परीक्षा के लिए प्रशासन और पुलिस व्यवस्था सज्ज है; सभी चेकिंग पूरी कर दी गई हैं। 10 केंद्रों पर आज नीट परीक्षा हो रही है; कुल 3301 छात्र परीक्षा दे रहे हैं। पिछले पेपरफुटीन के बाद सुरक्षा व्यवस्था में बढ़ोतरी की गई है। जिले में प्रश्नपत्रिका वायु सेना के विमान से पहुंची थी जिसे कठोर सुरक्षा बंदोबस्त के साथ केंद्र तक पहुंचाया गया। सुरक्षा और व्यवस्था के लिए लगभग 300 पुलिस कर्मचारी- अधिकारी तैनात हैं। प्रत्येक केंद्र पर CISF जवानों की सुरक्षा व्यवस्था है।0
0
Report
Advertisement
