icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Oct 2024, 05:25 am

माझी उमेदवारी मदन येरावारांना पाडण्यासाठीच, माजी आमदार संदीप बाजोरीयांचा दावा.

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून तुतारी चिन्हावरच आपण लढु असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत तिकीट वाटपाआधीच त्यांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार देखील सुरू केला आहे. भाजप आमदार मदन येरावार यांनी मतदारसंघ बकाल करून ठेवला, रस्त्यांची दैना झाली, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून भयमुक्त वातावरण देऊ असे वचन आपण जनतेला देत असल्याचे संदीप बाजोरिया यांनी सांगितले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Satara में CNG के दाम 103 रुपये/किग्रा तक, 15 दिनों में 9 बार बढ़ोतरी

Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यात CNG गॅसच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली असून आता CNG चा दर १०३.०२ रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. गेल्या १५ दिवसांत तब्बल ९ वेळा दरवाढ झाल्याने नागरिकांसह रिक्षा चालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सतत वाढणाऱ्या इंधन दरामुळे रिक्षा चालकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले असून रोजच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत असल्याची भावना चालकांकडून व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, सामान्य नागरिकांनाही प्रवास खर्चाचा अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे. CNG हा पेट्रोल-डिझेलला स्वस्त पर्याय म्हणून वापरला जात असताना वारंवार होणाऱ्या दरवाढीमुळे आता हा पर्यायही महाग होत चालल्याची चर्चा सुरू आहे. दरवाढीवर नियंत्रण आणावे आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी.
0
0
Report
Advertisement

नांदेड दौरे पर शिंदे से प्रताप पाटील की बंद कमरे में चर्चा, क्या बदलेगी राह?

Nanded-Waghala, Maharashtra:नांदेड दौऱ्यावर असलेले खासदार श्रीकांत शिंदे यांची राष्टवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मध्य रात्री भेट घेत बंद दाराआड चर्चा केली. दोघामध्ये अर्धा तास बंद दाराआड बैठक झाल्याने विवीध चर्चांना उधाण आल. दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्याने त्यांना निमंत्रण दिलं होत पण त्यांच्या कार्यक्रमामुळे त्यांना उशीर झाला. ते सकाळीं माझ्या घरी येणार होते , मात्र घरगुती कार्यक्रमामुळे सकाळी बाहेरगावी जायचं असल्याने मीच येऊन त्यांना भेटलो. श्रीकांत शिंदे माझ्या सोबत लोकसभेत होते , ते मित्र पक्षाचे नेते आहेत , ते नांदेडला आले त्याचं स्वागत करावं हा त्या मागचा उद्देश असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले. भेट झाल्यावर काही तरी चर्चा होणारच , त्याच्या सोबत राजकिय चर्चा झाली. संभाव्य जिल्हा परिषद, विधान परिषदेबाबत चर्चा झाल्याचे आमदार चिखलीकर म्हणाले. नांदेड विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला सोडण्याची आपली मागणी कायम आहे, पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल ते मान्य असल्याचे चिखलीकर म्हणाले. विधान परिषदेसाठी अनेकांनी उमेदवारी अर्ज घेतले , प्रवीण पाटील चिखलीकर यांनी देखील अर्ज घेतला, मला ते कळलं मात्र माझी काही चर्चा प्रवीण पाटील चिखलीकर यांच्याशी झाली नसल्याचे चिखलीकर म्हणाले. अनेकांनी उमेदवारी अर्ज घेतले , ज्यांना उमेदवाररी मिळाली नाही तर ते अपक्ष राहतील. नांदेड विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार नाही असं मला वाटतं असंही. चीखलीकर म्हणाले नांदेड मध्ये महायुतीकडे सर्वाधिक मतदार संख्या आहे. भाजपाने या जागेवर दावा केलाय. मात्र ही निवडणुक बिनविरोध होणार नाही असं वक्तव्य चीखलीकरांनी केल्याने नांदेड मध्ये महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे दिसते.
0
0
Report

वाशीम में एक्सपायर्ड दवाओं के खुले में फेंकने से पर्यावरण और स्वास्थ्य खतरा

Washim, Maharashtra:वाशीम: वाशीम शहरातील विविध मेडिकल चालकांकडून एक्सपायरी झालेल्या औषधांच्या गोळ्या,इंजेक्शन तसेच अन्य वैद्यकीय साहित्य उघड्यावर फेकण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याचे समोर येत आहे. मात्र, संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. बायो मेडिकल वेस्ट संकलनासाठी वाहन शहरात नियमितपणे फिरत असतानाही काही मेडिकल चालकांकडून एक्सपायरी औषधांचा साठा उघड्यावर टाकला जात असल्याने पर्यावरण प्रदूषणात वाढ होत आहे. तसेच या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खासकरून वैद्यकीय कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे बंधनकारक असताना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासन व आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
0
0
Report
Advertisement

अकोला के गौरक्षण रोड पर तेल फैलाने से सड़क हादसों की भारी संभावना

Akola, Maharashtra:अकोला शहरातील गौरक्षण रोड परिसरातील साई शील पेट्रोल पंप ते जुन्या आयकर कार्यालयादरम्यानच्या रस्त्यावर सध्या धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. काँक्रीटच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात तेल सांडल्यामुळे अनेक दुचाकी वाहने घसरत असून काही वाहनचालक किरकोळ जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.रस्त्यावर तेल सांडल्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना याचा मोठा फटका बसत असून अनेक जण घसरून पडत आहेत. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन काही जागृत नागरिकांनी घटनास्थळी थांबत वाहनचालकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि वाहने हळू चालवण्याचे आवाहन केले आहे.मात्र अद्याप प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने तात्काळ रस्त्यावरील तेल साफ करून अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
0
0
Report

शिर्डी में साईं भक्त ने 3025 किलो आम दान किया, आमरस तीन दिन

Shirdi, Maharashtra:साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत येणारे साईभक्त साईंच्या झोळीत रोख रकमेसह मौल्यवान वस्तू दान करतात..मात्र पुणे जिल्ह्यातील नारायणबाग येथील रवी नारायण करगळ या शेतकरी साई भक्ताने साईंच्या चरणी साडेतीन हजार किलो केसर आंब्यांचे दान केलंय.. साई संस्थानने प्रसादालयात या आंब्याचा थंडगार आमरस तयार केलाय.. साईभक्तांना पुढील तीन दिवस आमरसाची मेजवानी देण्यात आल्येली.साईभक्तांनाही आमरस पुरीचे जेवन द्यावे, या हेतुने साई संस्थानच्या प्रसादालयात भाविकांना आमरसाची मेजवानी देण्यात येत आहे.पुणे जिल्ह्यातील साईभक्त करगळ यांनी देणगीच्या माध्यमातून साईंच्या चरणी दान म्हणून जवळपास ३०२५ किलो आंबे दान केले भाविक आमरसाचा स्वाद घेत आहे.३०२५ किलो आंब्यातून सरसरी ८० ते ८५०० हजार भाविक आमरसाच्या मेजवानीचा लाभ घेतील.पुढील तीन दिवस हजारो साईभक्त या गोड मेजवानीचा लाभ घेणार आहेत.साई संस्थानच्या भोजनालयातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी
0
0
Report
Advertisement

मंचर बारव-दर्गा विवाद शांत, शहर में कड़ी सुरक्षा व्यवस्था

Shirur, Maharashtra:मंचर बारव-दर्गा वाद: वाद निवळला, पण शहरात तणावपूर्ण शांतता; कडेकोट पोलीस बंदोबस्त पुणे जिल्ह्यातील मंचरमध्ये पांडवकालीन बारव आणि दर्ग्यावरून निर्माण झालेला वाद काल प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर काहीसा निवळला आहे. बकरी ईदनिमित्त दर्ग्यामध्ये नमाज पठण न करण्याचं आवाहन प्रशासनाने केल्यानंतर संभाव्य तणाव टळला आहे. तसेच हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेला जनआक्रोश मोर्चाही सध्या स्थगित करण्यात आला आहे. परंतु, खबरदारीचा उपाय म्हणून मंचर शहरात सध्या कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, संवेदनशील भागांत पोलिसांची गस्त सुरू आहे. परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे。
0
0
Report

राजे गट ने शिवसेना के साथ जुड़कर फलटण में पार्टी ताकत बढ़ाई

Satara, Maharashtra:सातारा:फलटण येथे 'राजे गटा'च्या वतीने शिवसेनेचा मेळावा पार पडला या मेळाव्याला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती लावून फलटण विधानसभा मतदारसंघात यापूर्वी शिवसेनेची संघटनात्मक ताकद कमी असली, तरी आता संपूर्ण ‘राजे गट’ अधिकृतपणे पक्षासोबत आला आहे. या बळामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत फलटणचा आमदार शिवसेना (शिंदे गट) पक्षाचाच होईल असा ठाम विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. या मेळाव्यात आमदार महेश शिंदे यांचे नाव न घेता त्यांनी स्थानिक राजकारणावर भाष्य करत पक्षांतर्गत गटबाजी आणि विरोधी पक्षांशी छुपे संधान बांधणी करत असल्याबाबत त्यांचे कान टोचले. काही मतदारसंघांमध्ये ‘माझ्याशिवाय पदाधिकारी होऊच शकत नाही’ अशी भाषा काही लोक करत आहेत. मात्र शिवसेनेत कोणाचीही मनमानी आणि मक्तेदारी चालणार नाही. शिवसेनेचे पदाधिकारी तयार करण्यात जर कोणी अडथळा आणत असेल, तर मी स्वतः आणि खासदार राहुल शेवाळे तिथे जाऊन ठाण मांडून बसू, पण संघटना वाढवण्यापासून कोणालाही रोखू देणार नाही.यावेळी त्यांनी विरोधी पक्षांमधील नेत्यांशी असलेली छुप्या जवळीकतेवर बोट ठेवत स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा पदासाठी पक्ष दुसऱ्या दावणीला बांधायचा धंदा यापुढील काळात शिवसेनेत चालणार नाही. पक्षाच्या वाढीला आणि अस्मितेला बाधक ठरणारे कोणतेही छुपे संबंध अजिबात खपवून घेतले जाणार नसल्याचे ते यावेळी म्हणाले स्टेज बाईट: मंत्री उदय सामंत
0
0
Report

अमरावती में रोहयो क्षेत्र की मजदूरी बकाया: 3.17 करोड़ रुपये, 17,765 मजदूर प्रभावित

Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यात रोहयो अंतर्गत काम करणाऱ्या ३ कोटी १७ लाख रुपयांची मजुरी थकीत; १७ हजार ७६५ मजुरांना फटका अमरावती जिल्ह्यात रोहयो अंतर्गत काम करणाऱ्या सुमारे ३ कोटी १७ लाख रुपयांची मजुरी थकीत आहे. जिल्ह्यात सध्या ६२३५ विकास प्रकल्प सुरू असून १७ हजार ७६५ मजूर कार्यरत आहे त्यामुळे या मजुरांना फटका बसल्याच पाहायला मिळत आहे. मजुरांना दररोज सरासरी ३९७ रुपये मजुरी मिळते मात्र देयकांमध्ये मोठा विलंब होत आहे. ग्रामपंचायत स्तरावर ५३७० कामे सुरू असून विविध यंत्रणांमार्फत ८६५ प्रकल्प राबवले जात असून वरूड तालुक्यात सर्वाधिक ७४१६ मजूर, चिखलदऱ्यात २४०७ तर धाणीत १६४८ मजूर कार्यरत आहे. मजुरी वेळेवर न मिळाल्याने अनेक कामगारांना कर्ज काढून घरखर्च भागवावा लागत असून उपासमारीची वेळ आली आहे. कामगारांनी थकीत मजुरी तात्काळ खात्यात जमा करण्यासह वेतन वितरण प्रक्रिया जलद करण्याची मागणी केली आहे.
0
0
Report
Advertisement

दुर्गाडी किले आंदोलन पर शिवसेना-भाजपा में तू-तू मैं-मैं, लाज के बहाने आंदोलन

Kalyan, Maharashtra:भाजपाला लाजिरवाणे वाटत असल्यामुळे आंदोलनात सहभागी होत आहेत दुर्गाडी किल्ले आंदोलनात शिवसेनेचा भाजपाला टोला.. सरकार हा हिंदुत्ववादी संघटनेचा आहे त्यांना देखील आंदोलन करावे लागतात ही लाजिरवाणी गोष्ट आहे.. उपनेते विजय साळवी दुर्गाडी किल्ले परिसरात बकरी ईदच्या दिवशी हिंदूंना प्रवेश बंदी केली जाते. याच्या निषेधार्थ दोन्ही शिवसेनेकडून गेल्या ४० वर्षांपासून घंटानाद आंदोलन केलं जातं. यावर्षी भाजपाने देखील या आंदोलनात पहिल्यांदा सहभागी होण्याचा इशारा दिला होता. मात्र दुर्गाडीच्या आंदोलनाबाबत शिवसेनेने भाजपवर जोरदार प्रहार केलाय. या आंदोलनात सहभागी होण्याची भाजपला उशिरा का होईना जाग आली. निवडणुकीच्या वेळेला हिंदूंच्या मताची भीक मागतो, म्हणून लाजिरवाला वाटत असल्याने ते आंदोलनात सहभागी होत आहेत, मात्र यात कोणीही राजकारण करू नये असा टोला शिवसेनेने भाजपला टोला लागवलाय. आतिश भोईर
0
0
Report

वाशीम समेत जिलों में ईद-उल-अजहा शांति और उत्साह के साथ मनाई गई

Washim, Maharashtra:वाशीम शहरासह रिसोड,मालेगांव, मंगरूळपीर, कारंजा,मानोरा तालुक्यात देखील हा सण मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरा करण्यात आला. वाशीम येथील ईदगाहवर ईद उल अजहाची सामूहिक नमाज सकाळी पठण करण्यात आली. नमाज पठण केल्यावर जगात शांतता राहावी यासाठी प्रार्थना करण्यात आली. प्रार्थना झाल्यावर मुस्लिम बांधवानी एकमेकांच्या गळाभेटी देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या संख्यने ईदगाहवर मुस्लिम बाँडव उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून ईदगाहसह शहरात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
0
0
Report

उदयनराजे भोसले फिर सक्रिय मोड में, सातारा राजनीति में नई हलचल

Satara, Maharashtra:साताऱ्याच्या राजकारणात पुन्हा एकदा “राजे” ऍक्टिव्ह मोडवर आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे…जवळपास वर्षभर शांत असलेले छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आता पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. साताऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या रक्षक प्रतिष्ठानच्या बैठकीत उदयनराजे भोसले यांनी प्रमुख पदाधिकारी, अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांसोबत सविस्तर चर्चा करत संघटनेला नव्या जोमाने कामाला लागण्याच्या सूचना दिल्या..जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरा… सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तत्पर राहा आणि सातारा जिल्ह्यातील एकाही नागरिकाला अडचण येऊ देऊ नका, अशा स्पष्ट सूचना देत..जनतेची सेवा हेच प्रथम उद्देश असेल पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली.बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पाहायला मिळालं, तर दुसऱ्या कडे या बैठकीनंतर साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून…“उदयनराजे पुन्हा ऍक्टिव्ह मोडवर आले आहेत का?” अशी चर्चा आता रंगू लागली आहे.राजकीय शांततेनंतर पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या गराड्यात दिसलेले उदयनराजे… आणि जनतेच्या प्रश्नांवर थेट फोकस…यामुळे आगामी काळात साताऱ्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top