icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Oct 2024, 05:25 am

माझी उमेदवारी मदन येरावारांना पाडण्यासाठीच, माजी आमदार संदीप बाजोरीयांचा दावा.

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून तुतारी चिन्हावरच आपण लढु असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत तिकीट वाटपाआधीच त्यांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार देखील सुरू केला आहे. भाजप आमदार मदन येरावार यांनी मतदारसंघ बकाल करून ठेवला, रस्त्यांची दैना झाली, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून भयमुक्त वातावरण देऊ असे वचन आपण जनतेला देत असल्याचे संदीप बाजोरिया यांनी सांगितले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

लोणावळा में 24 घंटे में 267 मिमी बारिश, इस सीजन की सबसे भारी बारिश

Varsoli, Maharashtra:पर्यटन नगरी लोणावळ्यात पावसाने तुफान बॅटिंग केलीये. गेल्या 24 तासांत तब्बल 267 मिलिमीटर पावसाची नोंद करत, यंदाच्या मोसमातील विक्रमी पावसाची नोंद केली. हवामान विभागाने दिलेला अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरलाय. विक एंडला पावसाने कृपादृष्टी कायम ठेवल्यानं पर्यटकांच्या आनंदाला पारावर उरलेला नाही. यामुळं पर्यटनावर अवलंबून असलेला व्यापारी वर्ग सुखावलाय. लोणावळा आणि परिसरात आत्तापर्यंत 1090 मिलिमीटर पाऊस बरसलाय. या पावसाने शेतकरी वर्ग ही पेरणीच्या कामाला लागलाय. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 2392 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. ही तुलना करता पावसाने आणखी कृपादृष्टी दाखवावी अशी अपेक्षा लोणावळाकरांना आहे.
0
0
Report

सतत बारिश से मुळा-भंडारदरा डैम में पानी बढ़ा, किसान में उम्मीद जगी

Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणांमध्ये पाणीसाठा झपाट्याने वाढू लागला आहे. अकोले तालुक्यातील मुळा नदीवरील 600 एमसीएफटी क्षमतेचे पिंपळगाव खांड लघु धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे अतिरिक्त पाणी आता थेट मुळा धरणाच्या दिशेने वाहू लागले असून मुळा धरणाच्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. दुसरीकडे, भंडारदरा धरणातही पाणीसाठा 29.30 टक्क्यांवर पोहोचला असून गेल्या 24 तासांत तब्बल 218 एमसीएफटी नव्या पाण्याची आवक झाली आहे. भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने निळवंडे, आढळा आणि वाकी धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. संततधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून बळीराजामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
0
0
Report
Advertisement

देवळी-देवळी मार्ग का वळण पुल बह गया, यातायात दो दिन से बंद

Wardha, Maharashtra:देवळी तालुक्यातील चिकणी जामाणी येथील वळण पुल उखडला. दहेगाव-देवळी मार्गावर वाहतूक बंद. दोन दिवस सतत पाऊस झाल्यामुळे देवळी तालुक्यातील देवळी-दहेगाव मार्गावर असलेला चिकणी जामाणी येथील वळण पुल पावसाने वाहून गेला. या पुलावरून शाळकरी विद्यार्थी, शेतकरी आणि परिसरातील गावाकऱ्यांची नियमित वाहतूक होती. मार्ग बंद झाल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. देवळी येथून पुलगाव जाण्यासाठी दहेगाव मार्गानेच जावे लागते. महामंडळाच्या बसेस देखील याच मार्गाने पुलगाव पोहचतात. परंतु गेल्या दोन दिवसात मुसळधार पाऊस झाला. या पावसात वळण पुल उखडला आणि वाहून गेला. गेल्या दोन वर्षापासून या रस्त्याचं काम सुरु आहे. कंत्राटदार कंपनीकडून संथ गतीने काम केलं जात आहे, तरीही येथील गावाकऱ्यांनी बांधकाम व महसूल प्रशासनाला कळविले. याकडे मात्र सतत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.
0
0
Report

रामटेक के नेरला में 40 नाग पिल्ले पकड़े, वन विभाग ने सुरक्षित जंगल छोड़ने के लिए छोड़ा

Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपूर जिल्ह्यातील रामटेक जवळच्या नेरला गावात राजू ढोमणे यांच्या घरामध्ये तब्बल ४० नागांची पिल्ले आणि दोन मोठे विषारी नाग आढळून आल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच चाचेर येथील वाइल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशनचे स serpमित्र रतन कुंभरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अत्यंत सावधगिरीने आणि कौशल्याने त्यांनी सर्व ४० नागांची पिल्लांची कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे पकडली. वन्यजीव संरक्षणाच्या नियमांचे पालन करत या सर्व पिल्लांना रामटेक वन विभागाच्या कार्यालयात आणून नंतर त्यांच्या नैसर्गिक अधिवासातील जंगलात सुखरूप सोडण्यात आले घराच्या परिसरात साप आढळल्यास घाबरून न जाता त्यांना मारण्याचा प्रयत्न व पकडण्याच्या प्रयत्न करू नये, परिसरात साप आढळल्यास त्वरित जवळच्या अनुभवी सर्पमित्रांना किंवा वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
0
0
Report
Advertisement

बारिश से भाजी बाजार में सप्लाई कम, ताजा सब्जी की कीमतें आसमान छूने लगीं

Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यात सततच्या पावसामुळे भाजी बाजारात भाजीपाल्याची आवक घटल्याने बाजारात भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.गोबीचा दर ४० रुपयांवरून ६० रुपये किलोपर्यंत वाढला असून, टोमॅटो ६० रुपये तर चाकवत ७५ रुपये किलो दराने विकला जात आहे.याशिवाय भेंडी, वांगी, गवार, कारले, ढोबळी मिरची, कोथिंबीर आणि इतर पालेभाज्यांच्या दरातही लक्षणीय वाढ झाली आहे.सततच्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादन आणि बाजारातील आवक कमी झाल्याने ही दरवाढ झाला आहे.दुसरीकडे, वाढलेल्या दरांमुळे सर्वसामान्य ग्राहकांना रोजच्या भाजीपाला खरेदीसाठी अधिक खर्च करावा लागत आहे.वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर अतिरिक्त ताण पडत आहे.
0
0
Report

सवतसडा धबधबा बन गया Koan में पर्यटकों का नया पसंदीदा; चिपळूण का हॉट स्पॉट

Ratnagiri, Maharashtra:चिपळूण-रत्नागिरी..सह्याद्रीच्या कुशीत उंच कड्यावरून फेसरणारा सवतसडा धबधबा ठरतोय पर्यटकांची पहिली पसंती.. अँकर intro वरुणराजाच्या आगमनाने सध्या संपूर्ण कोकण परिसर निसर्गाच्या विविध रंगांनी नटला आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना निसर्गाच्या एका अद्भुत चमत्काराचा अनुभव घेता येत आहे.सह्याद्रीच्या नागमोडी घाटरस्त्यांवरून जाताना उंचावरून कोसळणारा चिपळूणजवळील 'सवतसडा धबधबा' सध्या पर्यटकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. पाहुयात यावरचा आमचा हा विशेष रिपोर्ट... दाट झाडीझुडपांमधून आणि काळ्या कड्यांवरून फेसाळत येणारे हे पांढरेशुभ्र पाणी पाहताच,महामार्गावरील वाहनांचे ब्रेक आपोआप सवतसड्यापाशी लागतात.निसर्गाच्या या अथांग रूपावर आधारित एका कवीने सुंदर ओळी लिहिल्या आहेत... "उंच कड्यावरून कोसळते पांढरे शुभ्र हे पाणी, हिरव्यागार रानात घुमते निसर्गाची गाणी... सवतसड्याच्या या रूपावर पर्यटक झाले दंग,पावसाच्या या सरींनी चढवला आनंदाचा रंग!" एकूणच काय तर, सह्याद्रीच्या कुशीतून उंच काड्यावरून फेसळणारा हा 'सवतसडा' धबधबा सध्या कोकणातील पर्यटनाचा मुख्य केंद्रबिंदू ठरत आहे.जर तुम्हीही या पावसाळ्यात सुरक्षित आणि निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल,तर चिपळूणचा सवतसडा तुमचा वीकेंड नक्कीच खास करेल. निसर्गाच्या या अद्भुत चमत्काराचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांची पावले आता चिपळूणकडे वळत राहतील हे नक्की..
0
0
Report
Advertisement

सोलापुर विधानपरिषद के विधायक राजेंद्र राऊत ने बार्शी के विकास कार्यों की समीक्षा की

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग – सोलापूर विधानपरिषदचे आ. राजेंद्र राऊत यांच्याकडून बार्शी येथील विकास कामांची पाहणी. सोलापूर विधानपरिषद आमदार राजेंद्र राऊत यांच्याकडून बार्शी येथील विकास कामांची पाहणी. आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची केली पाहणी. आ. राऊत यांनी बार्शी तालुक्यातील विविध विकास कामासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला. तालुक्यातील कामांबाबत गुणवत्ता उच्च दर्जाचे असावी अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
0
0
Report

जिले की केंद्रीय सहकारी बैंक के चुनाव में रिकॉर्ड 99.53% मतदान, परिणाम आज स्पष्ट होंगे

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी शनिवारी अत्यंत चुरशीने आणि अभूतपूर्व वातावरणात मतदान पार पडले. जिल्ह्यातील एकूण १०५३ मतदारांपैकी तब्बल १०४८ जणांनी मतदानाचा हक्क बजावला असून, जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक ९९.५३% मतदानाची नोंद झाली आहे. राजकीय ईर्ष्या टोकाला पोहोचलेल्या या निवडणुकीत ओबीसी विकासमंत्री अतुल सावे, खासदार कल्याण काळे, अंबादास दानवे, आमदार सतीश चव्हाण, अभिजित देशमुख व जगन्नाथ काळे हे मतदान केंद्राबाहेर तब्बल आठ तास ठाण मांडून बसले होते. शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासूनच नेत्यांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. 'आम्ही आमचे मतदान करून घेतले आहे, त्यामुळे आमच्या उमेदवारांचा विजय निश्चित होईल,' अशी प्रतिक्रिया ओबीसी विकासमंत्री अतुल सावे यांनी दिली. तर दुसरीकडे, 'शेतकऱ्यांमध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तीव्र रोष असल्याने आमचेच उमेदवार जिंकतील,' असा दावा खासदार कल्याण काळे यांनी केला. आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले असून, रविवारी दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल..
0
0
Report
Advertisement

पीसादेवी रोड पर खुले विद्युत डीपी से मजदूर की मौत, महावितरण पर सवाल उठे

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:उघड्या विद्युत डीपीचा करंट लागून मजुराचा मृत्यू; पिसादेवी रोडवरील दुर्घटनेनंतर संताप ANC : छत्रपती संभाजीनगर शहरातील पिसादेवी रोडवरील ढाब्याजवळ उघड्या विद्युत डीपीचा करंट लागून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुरेश कचरू साळवे, वय ४०, असे मृत मजुराचे नाव असून ते मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. महावितरणच्या उघड्या डीपीमुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. घटनास्थळी अरुंद रस्ता, अतिक्रमण आणि संबंधित यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाद व्यक्तीचा जीव गेल्याने परिसरात संताप व्यक्त होत असून, दोषींवर कठोर कारवाई आणि अशा उघड्या विद्युतडीपी तातडीने सुरक्षित करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
0
0
Report

9 महीने बाद आसिफ रायडर गिरफ्तार: समीर इनायत खान हत्या मामले का खुलासा

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:शहरातील गजबजलेल्या चेलीपुरा भागात जुन्या वादातून भाजीपाला विक्रेता समीर इनायत खान याची तलवारीने गळा चिरून हत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. 31 ऑक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर संभाजी नगर गुन्हे शाखेच्या पथकाने शोएब काला, इसरार खान, नसीर इन्ता आणि असलम चाऊस यांना तात्काळ अटक केली होती. मात्र, त्यावेळी मुख्य आरोपी आसिफ रायडर पसार झाला होता. गुन्हे शाखेचे पथक सातत्याने त्याच्या मागावर होते. अखेर तब्बल 9 महिन्यांनी त्याला अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. फरार आसिफ हा मुंबईतील कामाठीपुऱ्याजवळील छोटा सोनापूर (नागपाडा) येथे लपला होता. कुटुंबासह त्याने त्या ठिकाणी स्थलांतर केले होते. उदरनिर्वाहासाठी तो तिथे एका वेल्डिंगच्या दुकानात काम करत होता. त्याने आपली संपूर्ण जुनी ओळख नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. स्वतःचे 'आसिफ रायडर' हे नाव बदलून त्याने 'अनिस बाबा' असे नवीन नाव धारण केले होते.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top