icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Oct 2024, 05:25 am

माझी उमेदवारी मदन येरावारांना पाडण्यासाठीच, माजी आमदार संदीप बाजोरीयांचा दावा.

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून तुतारी चिन्हावरच आपण लढु असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत तिकीट वाटपाआधीच त्यांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार देखील सुरू केला आहे. भाजप आमदार मदन येरावार यांनी मतदारसंघ बकाल करून ठेवला, रस्त्यांची दैना झाली, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून भयमुक्त वातावरण देऊ असे वचन आपण जनतेला देत असल्याचे संदीप बाजोरिया यांनी सांगितले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

संविधान बचाने के लिए कांग्रेस का आह्वान; राम मंदिर और धर्म के मुद्दे तेज

Nagpur, Maharashtra:नागपूर - नाना पटोले, काँग्रेस नेते बाईट - भाजप विशेष करून जे सरकार नरेंद्र मोदीच्या रूपाने आरएसएस चालवत आहे त्यांना संविधान मान्य नाही संविधान त्यांना मान्य नाही तर डेलीमिटेशन संविधानिक व्यवस्थेच्या ठाच्याला ते संपवायला निघाले त्यामुळे काँग्रेस पूर्ण ताकतीने संविधानाच्या बाजूने उभा राहील ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आमचे नेते राहुल गांधीांनी ती भूमिका स्पष्ट केली आहे ....आमचा प्रयत्न आहे की आमचे इंडिया अलाईनचे जेवढे लोक आहे त्यांना हे कळते कळत नसेल असं नाही त्यामुळे संविधान वाचविण्यासाठी सर्व पक्षाने एकत्रित यावं ही भूमिका आमची आहे राम मंदिर असेल त्यातली चोरी असेल देशभरातील हिंदूच्या देवळातले असे अनेक प्रकरण आपल्याला पाहायला मिळत आहे हिंदू धर्माच्या लोकांना त्यांची दिशाभूल करण्याची प्रयत्न सुरू आहे त्यांच्या परिश्रमाचे पैसे लुटले जात आहे ज्या आरएसएसला भाजपला संविधान मान्य नाही ते दुसऱ्या पक्षाचे आमदार खासदार विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे ... नाही ऐकलं तर ईडी सीबीआय याचा वापर करून त्यांना आपल्या बाजूने वळविण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे हे सगळ्यांना दिसत आहे अंतर्मनातली जी भावना असते ती प्रत्येक व्यक्तीला आपलं देणं लागतं आणि लोकप्रतिनिधी म्हणून देन लागतात ज्या संविधानामुळे तुम्ही आमदार खासदार झाला मंत्री झाला ते संविधानाच नसेल तुम्हाला आमदार खासदार काय ग्रामपंचायत मेंबर सुद्धा होता येणार नाही एवढा आम्ही म्हणू शकतो आणि तीच आमची भूमिका आहे (ऑन जयंत पाटील ,मुख्यमंत्री भेट -) मला असं वाटत नाही मी विधानसभेत त्यांना विचारलं जयंत पाटील यांनी सांगितले की असं काही नाही (ऑन शिंदे दिल्ली दौरा-) महत्त्वाचा मुद्दा असा आहे की राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे फूट झाले तेव्हा त्या केसेस सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग राहिली आहे त्यावर अजूनही निर्णय झाला नाही कायदेशीर बाबी तुम्ही त्याला म्हणता आहे पक्ष विरोधी कायद्याच्या अंतर्गत त्यावर कारवाई करता आली असती पण त्यावर का पडदा घातला ते कळत नाही... सुप्रीम कोर्टाची बाब आहे आमदार आणि खासदार पळून गेले नसते (ऑन राम रक्षा- ) देशातील सर्वसामान्य लोकांनी अयोध्येतील मंदिराच्या घटनेचा निषेध केला आहे आरएसएसचे लोक भाजपचे लोक त्या ठिकाणी बसून त्यांनी दानपेटीच लुटली हे खतरनाक लोक समोर आले आहे... त्यामुळे यांचा निषेध केला पाहिजे यासाठी राम रक्षा पठण केला जात आहे राम हे आमचं दैवत आहे या पापी लोकांना यांच्या भावना लोकांच्या भावना श्रद्धा यांना ठेच पोहोचवली ..घामाचा पैसा यांनी लुटला त्यांच्या विरोधात एक मोठी मोहीम देशपातळीवर सुरू झाली आहे (ऑन कॉंग्रेस जागरण -) काँग्रेस सुद्धा जागरण यात्रा काढत आहे ती काढलीच पाहिजे कारण हा धर्माचा आणि आस्थेचा प्रश्न आहे , ज्याप्रमाणे हिंदूंच्या मंदिरात लूट आरएसएस आणि भाजपने सुरू केली आहे त्या विरोधात सगळ्या हिंदू धर्मांनी एकत्रित आले पाहिजे असा मला वाटतं ऑन आरएसएस भूमिका - त्यामध्ये संघ इन्व्हाल्ड आहे त्यांनी काय भूमिका घेतली हे महत्त्वाचा नाही एवढ्या दिवसांनी त्यांना जाग आली त्या ठिकाणी सगळे आरएसएसचे पदाधिकारी आहे वीस पंचवीस दिवसानंतर त्यांनी निषेध केला.. ते चालणार नाही त्यांनी रजिस्टर केलं पाहिजे त्या व्यवस्थेला चारिटी म्हणून रजिस्टर झाला पाहिजे ते संघ रजिस्टर का करत नाही त्याला आता शंभर वर्ष पूर्ण झाली आहे त्यांनी रजिस्ट्रेशन का नाही केलं जनतेच्या पैशाचा हिशोब द्यायचा नाही या सगळ्या घटना पुढे आले आहे अमित शहा आणि मोदी यावर बोलणारच नाही कारण त्यांच्याजवळ बोलण्यासाठी काही नाही उलटा चोर कोतवाल को दाटे असा चित्र तयार झाला आहे (ऑन सुप्रिया - ) स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमचे प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी आरक्षणाची सुरुवात केली आणि काँग्रेसने त्याला प्राधान्य दिला आहे 31 टक्के आरक्षण महिलांना विधानसभेमध्ये द्यावं त्यासाठी कायदा पारित केला घटना दुरुस्ती केली ते आमच्या सरकारने 2024 मध्ये घटनादुरुस्ती केली तेव्हा त्याला दुरुस्ती केली नाही अनेक महिला खासदार आमदार सत्तेमध्ये पाहता आले असते लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये केला आहे हळुवारपणे त्याला 50% करता आला असता पण तो केला नाही पण तो करत नसेल तर त्याबद्दलची भूमिका त्यांना स्पष्ट करावं लागेल त्यांना महिलांना टार्गेट करायचं नाही न्याय द्यायचा नाही महाराष्ट्रात आपण पाहिलं असेल 3500 कोटी रुपये कोणाला दिले तेच दिसत नाही बहिणीच्या नावाने राज्याचे तिजोरी लुटली ते सुद्धा आता काल-परवा लक्षात आलं महिलांना पुढे करायचं मग आरएसएस मध्ये महिलांना स्थान का नाही महिलांचं त्यांना काही देणं घेणं नाही हे त्यांचा धोरण आहे (ऑन अर्थखात -) सरकारचा भाग आहे त्यांनी काय काय करावे त्यांनी कोणाला मारामारी करावी त्यांचा भाग आहे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे हे विधानसभेमध्ये भांडतात आणि नंतर सख्खे भाऊ दाखवतात पण खरी गोष्ट ही आहे की त्यांच्यामध्ये तीन तिघाडा काम बिघडा झाले आहे महिलांसाठी योजना करण्या पेक्षा त्यांची जेजुरी कशी लुटता येईल यासाठी काम सुरू आहे (ऑन फडणवीस दिल्ली जाणार का?- ) फडणवीस, बावनकुळे यांना मोठे संधी भेटते आहे विदर्भात जर मोठे पद राहत असेल तर कोणाला आनंद होणार नाही माझा काय सल्ला असणार दोन्ही आमचे मित्र आहे दोघांनाही माझ्या शुभेच्छा आहे
0
0
Report

विठूर दर्शन में शॉर्टकट बंद, VIP दर्शन पर नियंत्रण, दो नायब तहसीलदार नियुक्त

Pandharpur, Maharashtra:विठोबाच्या शॉर्टकट दर्शनाला आता लागला ब्रेक पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून निघाला आदेश विठू रायाची आणि रुक्मिणी मातेच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची गर्दी पंढरपूरमध्ये वाढत आहे. दर्शन रांगेतील वारकऱ्यांना जलद आणि सुलभ दर्शन होण्यासाठी आता घटनात्मक पदावरील व्यक्ती वगळता इतर कोणालाही दर्शनाला सोडले जाणार नाही. शॉर्ट कट दर्शन बंद झाल्याने वारकऱ्याना आता जास्त वेळ दर्शन रांगेत ताटकळत बसावे लागणार नाही. जिल्हाधिकारी एस कार्तिकेएन यांच्या आदेशानंतर आता प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी व्हीआयपी दर्शन वर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन नायब तहसीलदार यांची नियुक्ती केली आहे.
0
0
Report

जूहू समुद्रकिनारे कचरा: विपक्ष पालिका पर सवाल, एकजुट होकर सफाई की मांग

Mumbai, Maharashtra:मुंबईच्या जुहू समुद्रकिनाऱ्यावरील धक्कादायक चित्र समोर आलं आहे. नाले वेळेत साफ न केल्याचा फटका थेट समुद्राला बसल्याचा आरोप होत आहे. निळाशार समुद्र काळवंडला असून किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे साचल्याचा दावा विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज जुहू समुद्रकिनाऱ्याची पाहणी करत महापालिकेच्या कारभारावर जोरदार टीका केली. मुंबईची शान मानला जाणारा जुहू समुद्रकिनारा सध्या कचऱ्याच्या विळख्यात अडकलेला दिसत आहे. नाल्यांतील कचरा वेळेत साफ न केल्यामुळे तो थेट समुद्रात वाहून गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे समुद्राचे पाणी काळवंडले असून किनाऱ्यावर तीन ते तीन फूट उंचीपर्यंत कचऱ्याचे ढिगारे साचल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी जुहू समुद्रकिनाऱ्याची पाहणी केली. पाहणीनंतर त्यांनी महापालिकेच्या निष्क्रिय आणि ढिसाळ कारभारावर सडकून टीका केली. मुंबई महापालिकेने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून तातडीने श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी पेडणेकर यांनी स्वच्छतेसाठी मोठा निधी खर्च होत असल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात कर्मचारी दिसत नसल्याचा आरोप केला. कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे मुंबईकरांना प्रदूषित समुद्र आणि अस्वच्छ किनाऱ्यांचा सामना करावा लागत असल्याचाही त्यांनी आरोप केला. राजकारण बाजूला ठेवून मुंबईच्या स्वच्छतेसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र काम करण्याची गरज असल्याचं सांगत, केवळ फोटो आणि रील्स नव्हे तर प्रत्यक्ष कृतीची आवश्यकता असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, या आरोपांवर महापालिका किंवा सत्ताधारी पक्षाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, जुहू समुद्रकिनाऱ्यावरील अस्वच्छतेमुळे मुंबईच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून, आता प्रशासन यावर काय पावलं उचलतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
0
0
Report
Advertisement

भूम दूध भेसळ मामला: छह महीनों में 23 करोड़ 470 हजार लीटर मिलावटी दूध

Dharashiv, Maharashtra:भूम दूध भेसळ प्रकरणात महाधक्कादायक खुलासा! सहा महिन्यांत 23 कोटी 4 लाख 70 हजार लिटर भेसळयुक्त दूध विक्रीचा संशय. या प्रकरणामुळे खव्याचे क्लस्टर उद्ध्वस्त होण्याची भीती...... अँकर भूममधील दूध भेसळ प्रकरणात तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सहा महिन्यांत 23 कोटी 4 लाख 70 हजार लिटर भेसळयुक्त दूध विक्री झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करणारा हा स्पेशल रिपोर्ट... श्रीगणेश कानगुडे, पोलिस निरीक्षक, भूम भेसळ केलेल्या दुधात फॅटचे प्रमाण टिकवण्यासाठी निकृष्ट दर्जाची दूध पावडर, पाम तेल आणि निरमा वापरल्याचा संशय आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अशा दुधामुळे मूत्रपिंड, यकृत आणि पचनसंस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतात. या प्रकरणात सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले असून सर्व आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके कार्यरत आहेत. तपासात हा गोरखधंदा गेल्या तीन वर्षांपासून सुरू असल्याचेही समोर आले आहे. भूममधील दूध भेसळ प्रकरणाने राज्यभरातील दूध सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, धाराशिव.
0
0
Report

बाबा फर्जन की संपत्ति पर रहस्य: असली मालिक कौन?

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर मध्ये सध्या चर्चा आहे ती बाबा फर्झन ची, 90 च्या दशकातील डॉन आणि कामगार नेते असलेला बाबा फर्झन यांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला त्याच्या घरात साडेपाच कोटी रक्कम, बंदुका आणि 6 हजार काडतुसे सापडली होती शहरात बाबा फर्जन ची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता ही आहे, त्यावर 30 वर्ष आधी सोडून गेलेल्या मुलांनी दावा केलाय त्यामुळं एकेकाळी शाही आयुष्य जगलेला आणि मरताना जवळ कुणीही नसलेला बाबा च्या संपत्ती बाबत ही चर्चा आता सुरू झाली आहे... बाबा फर्जन च्या कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक कोण ? अखेरच्या क्षणी सोबत कुणीही नसलेला बाबांच्या संपत्तीचे वाटेकरी समोर आलिशान आयुष्य जगलेला बाबा फर्झन मरताना मात्र एकटाच ! डॉन बाबा फर्झन एक काळ गाजवला आणि जेव्हा गेला तेव्हा जवळ आपलं म्हणून कुणीही नसलेला आणि आता इतिहासाच्या पानात हरवलेला कुख्यात डॉन.. 90 च्या दशकात तत्कालीन औरंगाबाद शहरात दहशत असलेला हा डॉन बाबा फर्झन म्हणजेच फरदून अर्देशिर दोरडी, 90 च्या दशकात शहरावर याचा दबदबा होता, राजकीय नेत्यांपासून सामान्य माणूस सगळेच याला घाबरायचे असे सांगण्यात येतंय, साडेसहा फूट उंची , कंबरेला पिस्तुल, ओपन जीप, डोळ्यावर गॉगल , कपाळावर टीका, खांद्यांवर गमछा, पारशी असूनही सरदार सारखा पेहराव असा सगळा लवाजमा.. प्रचंड हिंदुत्व जोपासणारा अशी त्याची ओळख. सुरुवातीला गुंडाची ओळख, मग कामगार नेता आणि 90 च्या दशकात त्याने अपक्ष विधानसभा ही लढवली मात्र चंद्रकांत खैरे यांनी त्याचा पराभव केला, मात्र तो त्यानंतरही सतत कुठल्या न कुठल्या कारणाने चर्चत होताच.. त्याच्या वर हत्येचा प्रयत्न, मारामारी, दंगल, अपहरण , जमिनी बळकवने असे अनेक गुन्हे दाखल होते, त्याच्या तापट स्वभावामुळे त्याला बायका आणि 2 मुले ही 30 वर्ष आधी त्याला सोडून गेली, नुकतीच त्याच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली त्यात साडेपाच कोटी रुपये कॅश आणि प्रचंड सोनं नाणं सोबतच सहा बंदुका आणि साडेसहा हजार काडतुसे आढळून आले आणि तो पुन्हा चर्चेत आला, अंदाजानुसार त्याची संपत्ती 100 कोटीच्या घरात आहे.. सध्या तरी त्याचा रोहिला गल्ली तील 50 कोटींचा वाडा, पाडेगाव रोड वरील 6 एकर जागा त्यातील बंगला जो 10 कोटींचा सांगण्यात येतोय, आणि घरी सापडलेली साडेपाच कोटी कॅश आणि लाखोंचे सोनेनाने याची चर्चा आहे आता याचा वारस कोण अशी चर्चा असताना त्यांचा मुलाने ते आमचे वडील असल्याने संपत्तीवर दावा केलाय... Byte फिरदोस दोरडी, बाबा फर्झन यांचा मुलगा.. बाबा फर्जन अगदी निर्जन स्थळी बंगला बांधून साडेसहा एकर परिसरात राहत होता , त्याच्या घरात एक खोली होती त्या खोलीत तो कोणालाही जाऊ देत नव्हता त्या खोलीत साडेपाच कोटी रुपये आणि सोनं नाणी सापडली मात्र एका अंदाजानुसार त्या खोलीत यापेक्षाही बरंच काही होतं असं सांगितल्या जाते , तो आजारी होता मात्र त्या खोलीच्या दूर जायला तयार नव्हता त्यामुळे घरातच उपचार करावे लागले आणि त्यातच त्याचा मृत्यूही झाला मात्र या खोलीच रहस्य अजूनही कायम आहे.. त्यामुळे त्याची संपत्ती यापेक्षाही जास्त असू शकते पोलिसांनी याबाबत तपास करावा असं त्यावेळेसचे तत्कालीन बाबा फर्जनचे ओळखीचे लोक सांगतात.. सुभाष पाटील, उबाठा नेते ( फर्झन चे जुने प्रतिस्पर्धी ) कोट्यावधीची संपत्ती आणि एक काळ गाजवणारा बाबा फर्जंन ज्यावेळेस मेला त्यावेळेस त्याच्यासोबत कोणीही नव्हतं, फक्त घरी केअरटेकर एक महिला होती जी महिला बाबा फर्जंनची दुसरी पत्नी असल्याचा दावा करते, पोलिसांनी तिला अटक केली आहे मात्र अजूनही अनेक गोष्टी बाबा फर्जंन बाबत उकल झाल्या नाही त्यामुळे हे रहस्य कधी उकल होणार आणि बाबा फर्जंनची अजून किती माया आहे याबाबतच पोलिसांचा तपास सुरू आहे.. विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर...
0
0
Report

सांगली में दुर्गा माता के रूप में विरोध: स्मार्ट मीटर के बिल बढ़ाने का आंदोलन

Sangli, Maharashtra:सांगली जिल्ह्यात महावितरण मंडळाकडून स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत..हे स्मार्ट मीटर बसवल्यामुळे बिल दुपटीने तिपटीने वाढवून येत आहेत..याच्या निषेधार्थ महाराष्ट्र संघर्ष समितीतर्फे अनोखे आंदोलन करण्यात आले..यावेळी एका महिलेने दुर्गा मातेची वेशभूषा करून सांगलीच्या महावितरण कार्यालयासमोर या स्मार्ट मीटरला विरोध करत आंदोलन करण्यात आले,यावेळी सरकारचा निषेधही करण्यात आला,जर हे स्मार्ट मीटर बसवण्याचे थांबवले नाही तर घरोघरी जाऊन स्मार्ट मीटर फोडून टाकू असा इशारा देखील यावेळी आंदोलने दिला..
0
0
Report
Advertisement

चांदवड़ घाट पर मार्ग निर्माण से ट्रक खराब, जाम, ट्रैफिक पुलिस की तैनाती की मांग

Yeola, Maharashtra:मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील चांदवड येथील रेणुका देवी मंदिरासमोरील चांदवड घाटात सध्या रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे या कामामुळे या ठिकाणी एकतर्फी वाहतूक सुरू असतानाच एक ट्रक अचानक नादुरुस्त झाल्याने क्रेनच्या साह्याने ना दुरुस्त ट्रक बाजूला करण्याचे काम सुरू असल्याने दोन बाजूला गेल्या एक तेदीड तासापासून मोठी वाहतूक कोंडी झाली आहे वाहतुकीची कोंडी वाढल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांना आणि वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे घटनास्थळी स्वयंसेवक वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत असले तरी वाढती वाहतूक लक्षात घेता ते अपुरे पडत असल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी या ठिकाणी तातडीने वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे
0
0
Report

चंद्रपुर में बारिश ने किसानों की उम्मीद बंधाई, खरीफ फसलें सूखे का खतरा

Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1507ZT_CHP_RAIN_SHORTAGE ( single file sent on 2C) टायटल:--- चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने दिली ओढ, पेरणी केलेली पिके वाचविताना शेतकऱ्यांचे हाल, आभाळाकडे दृष्टी लावून बसलेत शेतकरी अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यात मान्सून महिनाभर उशिरा दाखल झाला मात्र त्यातही जुलै च्या पहिल्या चार दिवसात पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. चंद्रपूर जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक असलेल्या धानासाठी भरपूर पावसाची आवश्यकता असते. मात्र सोयाबीन -कापूस आणि तूर या पिकांसाठी पेरणीयोग्य पाऊस झाला‌याने शेतकऱ्यांनी उत्साहाने पेरणी करत हंगाम सुरू केला. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली आहे त्यामुळे खरीप हंगामाचे काय होईल अशी चिंता शेतकरी वर्गाला आहे. ज्या भागांमध्ये सिंचनाची सोय आहे तिथे शेतकरी मोटारद्वारे पाणी देत पिके कशीबशी वाचविताना दिसत आहेत. मात्र आता पिके पिवळी पडू लागल्याने शेतकऱ्यांना अधिक चिंता सतावू लागली आहे. उत्तम पावसासाठी शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. बाईट १) धनराज शेंडे, शेतकरी आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
0
Report

रांजणगाव में होटल कर्मचारी पर अमानवीय मारपीट, वीडियो वायरल

Shirur, Maharashtra:पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात कारेगाव येथील 'शिवशक्ती स्वीट होम'मध्ये एका हॉटेल कामगाराला अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे, हॉटेलमध्ये मागवलेली वडापावची ऑर्डर वेळेत न मिळाल्याचा राग अनावर झाल्याने, एका व्यक्तीने हॉटेलमधील कामगाराला अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप होत आहे. एका शुल्लक कारणावरून झालेल्या या मारहाणीमुळे हॉटेल परिसरात काही काळ दहशतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला असून, हॉटेल मालकांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. या मुजोर ग्राहकावर तातडीने आणि कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
0
0
Report
Advertisement

कल्याण के वालधुनी फ्लाईओवर पर तेज टेम्पो बेरिकेट तोड़कर भिड़ा: यातायात बाधित

Kalyan, Maharashtra:वालधुनी उड्डाण पुलावर भरधाव टेम्पोची हाईट्स बॅरिकेट्सला धडक बॅरिकेट्स कोसळले; परिसरात वाहतुक कोंडी,आठवड्यातील दुसरी घटना .. कल्याणमधील वालधनü उड्डाणपुलावर पोलीसप्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू आहेगेल्या आठवड्यात १० तारखेला घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती आज पुन्हा पहाटे ५:३० वाजता घडली. एका भरधाव टेम्पोने जोरदार धडक दिल्याने पुलावरील 'हाइट बॅरिकेट्स' थेट खाली तुटून पडले. सुदैवाने पहाटेची वेळ असल्याने मोठी जीवितहानी टळली असली, तरी एकाच आठवड्यातील या दुसऱ्या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.अवजड वाहनांना बंदी असतानाही ही वाहने पुलावर येतातच कशी? वाहतूक पोलिसांचा वचक का नाही? असा संतप्त सवाल नागरिकांनी  केला आहे.
0
0
Report
0
0
Report

यवतमाळ के मोहदा में दुकानों पर चोरी: सोना-चांदी समेत नकद पार, CCTV में कैद

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या मोहदा गावात पहाटेच्या सुमारास सराफा व्यावसायिकांची दोन दुकाने फोडून मोठ्या प्रमाणात सोन्या व चांदीचा ऐवज तसेच रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये चित्रित झाला आहे. संतोष वर्मा यांचे राजेंद्र ज्वेलर्स आणि धर्मेश वर्मा यांचे वर्मा ज्वेलर्स मोहदाच्या मुख्य बाजारपेठेत आहे. पहाटे चार वाजता च्या सुमारास सहा ते आठ चोरटे दुचाकीने पोहोचले, दोन्ही दुकाने फोडून आतील सोन्या चांदीचा ऐवज आणि रोख रक्कम त्यांनी लुटली व पसार झाले. सकाळी चोरीची माहिती समजताच पांढरकवडा पोलिसांसह जिल्हा पोलीस अधीक्षक, ठसे तज्ञ, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दहा पथके रवाना करण्यात आली आहे. ठिकठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्या जात आहे. जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाणे क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून दररोज चोरीच्या घटना उघडकीस येत असल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
0
0
Report
Advertisement

पुणे ग्रामीण पुलिस ने ओतूर में अंतरराज्यीय डकैती गिरोह के छह सदस्यों को गिरफ्तार किया

Shirur, Maharashtra:Rep: Hemant Chapude(Junnar) Anchor:: पुणे ग्रामीण पोलिसांनी ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत दरोड्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीतील सहा जणांना अटक केली आहे. आरोपींकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे, धारदार शस्त्रे तसेच चोरीची बोलेरो जीपसह एकूण १४ लाख ८७ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र व तेलंगणातील २० गंभीर गुन्ह्यांची उकल झाली आहे. सोनूकसिंग कपूरसिंग टाक (30, हडपसर, पुणे), पिलूकसिंग शेरसिंग दुधानी (40, खोपोली, रायगड), करणसिंग गगनसिंग टाक (27, परभणी), पंकजसिंग काळूसिंग शिकलगार उर्फ दुधानी (40, अंबरनाथ), पापीसिंग उर्फ कृष्णसिंग साहेबसिंग टाक (18, परभणी) आणि मंगलसिंग मायासिंग दुधानी (58, परभणी) या सहाही आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून चौकशीदरम्यान दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी आणि वाहनचोरीचे एकूण २० गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये दोन दरोडे, एक दरोड्याचा प्रयत्न, दोन जबरी चोरी, १३ घरफोडी आणि दोन वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. तसेच या आरोपींवर यापूर्वी महाराष्ट्र, तेलंगणा व इतर राज्यांत ५० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. या कारवाईमुळे महाराष्ट्र आणि तेलंगणात सक्रिय असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा मोठा पर्दाफाश झाला असून पुढील तपासातून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, ओतूर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिसरातील ग्रामस्थांच्या मोलाच्या सहकार्याने करण्यात आली आहे.
0
0
Report

सोलापूर में धनंजय मुंडे को मंत्री बनाने के लिए सिद्धरामेश्वर को दंडवत दिया

Solapur, Maharashtra:सोलापुर में आ. धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळण्यासाठी कार्यकर्त्यांनी घातले ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांना दंडवत. आ. धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळावे यासाठी सोलापुरात भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने सिद्धरामेश्वरांना दंडवत घालत झाली महाआरती. आ. धनंजय मुंडे यांच्या भावीमंत्री म्हणून उल्लेख ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांना घालण्यात आले साकडे. आ. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 51 किलोचा लाडू महाप्रसाद म्हणून वाटत झाली मागणी. मुंडे कार्यकर्त्यांकडून आमदार धनंजय मुंडे यांना मंत्री पद मिळत नाही तोपर्यंत फेटा न घालण्याचा निर्धार.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top