icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Oct 2024, 05:25 am

माझी उमेदवारी मदन येरावारांना पाडण्यासाठीच, माजी आमदार संदीप बाजोरीयांचा दावा.

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून तुतारी चिन्हावरच आपण लढु असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत तिकीट वाटपाआधीच त्यांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार देखील सुरू केला आहे. भाजप आमदार मदन येरावार यांनी मतदारसंघ बकाल करून ठेवला, रस्त्यांची दैना झाली, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून भयमुक्त वातावरण देऊ असे वचन आपण जनतेला देत असल्याचे संदीप बाजोरिया यांनी सांगितले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

रायगढ़ पुलिस की साइबर अपराध मुहिम: मौल अकाउंट धारकों पर कड़ी कार्रवाई

Chendhare, Maharashtra:स्‍लग - रायगड पोलिसांची सायबर गुन्ह्यांविरोधात मोहीम संशयित ‘म्यूल अकाउंट’ धारकांवर कारवाई जिल्‍हयात आतापर्यंत 23 गुन्‍हे दाखल सर्व म्यूल अकाउंट धारकांवर कारवाईचे संकेत सायबर फसवणुकीत वापरल्या जाणाऱ्या ‘म्यूल अकाउंट’ धारकांविरोधात जिल्हाभर विशेष कारवाई सुरू करण्यात आली असून आता पर्यंत विविध पोलीस ठाण्‍यात 23 गुन्‍हे दाखल करण्‍यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व संशयित म्यूल अकाउंट धारकांवर कायदेशीर कारवाईचे संकेत पोलीसांनी दिले आहेत. सायबर गुन्हेगार विविध आमिषे दाखवून नागरिकांकडून बँक खाती, एटीएम कार्ड, चेकबुक, सिमकार্ড आणि इतर आर्थिक साधनांचा गैरवापर करतात. अशा खात्यांमधून फसवणुकीची रक्कम वळवली जात असल्याने नागरिकांनी कोणालाही आपले बँक खाते किंवा संबंधित कागदपत्रे वापरण्यास देऊ नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी सायबर फसवणुकीबाबत सतर्क राहून संशयास्पद व्यवहारांची त्वरित माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
0
0
Report

भीमा नदी में 60 हजार क्यूसेक पानी आया, पंढरपूर के लिए सुरक्षा उपायों की शुरूआत

Pandharpur, Maharashtra:उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेले साठ हजार क्युसेक पाणी पंढरपूर मध्ये दाखल झाले आहे. यानंतर सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकएन यांनी भीमा नदीच्या वाढलेल्या पाणी पातळीची पाहणी केली. पंढरपूरमध्ये अजूनही वारकरी असल्याने भीमा नदी काठावर लाईफ गार्ड बोटी तैनात करण्यात आले आहेत. घाटांना रस्ता बंद करण्यात आलं आहे. कोणत्याही भाविकांनी अंधारामध्ये पाण्यात उतरू नये; पाण्याला वेग असल्याने पाण्यात जाण्याचा धोका पत्करू नये असे आवाहन झाले. भाविकांच्या सुरक्षेसाठी नदीकाठावर आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. सध्या साठ हजार क्युसेक पाणी आला आहे त्यामुळे पंढरपूर शहरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
0
0
Report
Advertisement

महाबळेश्वर पुलिस ने ऑनलाइन धोखाधड़ी से जुड़े 14 मोबाइल और 3.22 लाख रुपए बरामद किए

Satara, Maharashtra:महाबळेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख २२ हजार रुपये किमतीचे एकूण १४ मोबाईल आणि ऑनलाईन फसवणुकीतून २ लाख २५ हजार रुपये पोलिसांनी हस्तगत करून मूळ मालकांना परत मिळवून दिले आहेत. पोलीस निरीक्षक हर्षद गालिंंदे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने CEIR PORTAL आणि तांत्रिक माहितीच्या आधारे ही यशस्वी कामगिरी केली. ऑनलाईन फ्रॉडबाबत NCRB PORTAL वर आलेल्या ५ तक्रारींचे निवारण करत एकूण ५ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आला आहे. भविष्यातही अशी मोहीम सातत्याने राबवली जाईल अशी माहिती पोलीस निरीक्षक हर्षद गालिंंदे यांनी दिली.
0
0
Report

भारी बारिश के कारण नागपुर शहर सहित तीन तालुकों के स्कूल आज बंद

Nagpur, Maharashtra:आज शहरासह तीन तालुक्यातील शाळांना सुट्टी नागपूर शहरात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले होते... आजही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे... त्यामुळे काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन नागपूर शहरासह तीन तालुक्यातील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.. कोणती अनुचित घटना घडू नये व विद्यार्थ्यांचे सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर शहरासह नागपूर ग्रामीण,हिंगणा व कामठी तालुक्यातील शाळांना सुट्टी लागू राहणार आहे
0
0
Report

फलटण के गजानन चौक में दुकानदार पर धारदार चाकू हमला CCTV में कैद, नागरिक हडकंप

Satara, Maharashtra:फलटण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गजानन चौकातील एका कापड दुकानात सायंकाळच्या सुमारास एका माथेफिरूने तरुणावर कोयत्याने थेट जीवघेणा हल्ला करण्याचा धक्कादायक प्रकार घडला असून ही घटना दुकानातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. गजबजलेल्या परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजल्याचे पाहायला मिळत आहे. या गुंड प्रवृत्तीवर पोलीस प्रशासन कडक कारवाई करणार का, असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
0
0
Report
Advertisement

नाशिक के उमराणा NCCF खरेदी केंद्र पर मध्य प्रदेश से कांदा उतारने का आरोप

Nashik, Maharashtra:एन. सी. सी. एफ. खरेदी केंद्रावर पर राज्यातील कांदा.... नाशिकच्या उमराणा एन. सी. सी. एफ. खरेदी केंद्रावर धक्कादायक प्रकार... 20 ते 35 ट्रॅकमधून हलक्या प्रतीचा कांदा आणल्याचा आरोप...Anc:- नाशिकच्या उमराणा येथील एन. सी. सी. एफ. खरेदी केंद्रावर मध्य प्रदेशातून 20 ते 25 ट्रॅक हलक्या प्रतीची कांदा खाली होत असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सदर ट्रॅक अडवून धरल्या दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा जमाव या गोडाऊन जमा झाल्याने काही तणाव निर्माण झाला होता. VO 1: या ठिकाणी गोडाऊन दोन संस्था साठविला जातो. मात्र या ठिकाणी मध्य प्रदेशातून हलक्या प्रतीचा कांदा या ठिकाणी उतरण्यात येत होता. एन. सी. सी. एफ व नाफेडकडून शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करताना जाचक नियम व अटी लावून कांदा चांगली प्रतीचा कांदाही नाकारण्यात आला. दुसरीकडे नाफेड एन. सी. सी. एफ सहा वेळा दर वाढ करून कांदा उत्पादक शेतकरी खरेदी केंद्राकडे फिरकत नसताना एकाच वेळी 20 ते 25 ट्रॅक कांदा कसा काय या गोडाऊन खाली करण्यासाठी यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होऊन शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडले जात असल्याचा आरोप कांदा उत्पादकांनी केला. बाईट: शेतकरी VO 2: या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी कांदा उत्पादकांनी केला आहे. दरम्यान कांदा उत्पादकांनी केलेले आरोप संस्थांनी फेटाळला आहे. बाईट: कांदा खरेदी करणारी संस्था चालक VO 3: दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करून नेमका काय प्रकार सुरू आहे. याचे सत्य बाहेर काढून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी आता केली जात आहे... विशाल मोरे झी मिडिया मालेगाव
0
0
Report

मुंबई क्राइम ब्राँच ने कुख्यात बदमाश ज़ुल्फ़ीक़ार बेहलीम समेत 12 आरोपियों को गिरफ्तार किया

Mumbai, Maharashtra:मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-९ ने मोठी कारवाई करत कुख्यात गुंड झुल्फीकार बेहलीम, त्याचा भाऊ मोहसीन बेहलीम आणि त्यांच्या टोळीतील आणखी १० साथीदारांना अटक केली आहे. एकूण १२ सराईत गुन्हेगारांना खंडणीची रक्कम स्वीकारताना बांद्रा परिसरातून रंगेहात पकडण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाकडे कंत्राटी काम सुरू करण्यासाठी २५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. ही रक्कम न दिल्यास शस्त्राचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकीही आरोपींकडून देण्यात आली होती. या माहितीची खातरजमा झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या कक्ष-९ ने २७ जुलै रोजी सापळा रचून ही यशस्वी कारवाई केली. या प्रकरणी बांद्रा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसेच शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गुन्हे शाखेच्या कक्ष-९ कडे वर्ग करण्यात आला आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना ३१ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. झुल्फीकार बेहलीम याच्यावर यापूर्वीही मोक्का अंतर्गत कारवाई झाली असून तो जामिनावर बाहेर होता. प्राथमिक तपासात या टोळीने मुंबई आणि परिसरातील अनेक व्यावसायिकांकडून धमकावून खंडणी उकळल्याची माहिती समोर येत आहे. तसेच अशा प्रकारची खंडणीची मागणी झालेल्या नागरिकांनी तातडीने मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-९ किंवा मुंबई पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0
0
Report
Advertisement

नगर शहर में आवारा कुत्ते ने तीन साल के बच्चे पर अचानक हमला किया

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर शहरामध्ये भटक्या कुत्र्याने तीन वर्षाच्या मुलावर हल्ला चढवला आहे नगर शहरातील बागरोजा हाडको भागामध्ये भटक्या कुत्र्याने त्रिवेंद्र सोनवणे या तीन वर्षाच्या मुलावर अचानक हल्ला चढवला यात त्रिवेंद्र गंभीर जखमी झाला आहे त्रिवेंद्र याच्यावर भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल आहे अचानक पणे हल्ला केल्यामुळे त्रिवेंद्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत गेल्या अनेक दिवसापासून नगर शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या खूप वाढली आहे भटके कुत्रे कमी रहदारीच्या रस्त्यावर मोठ मोठ्या टोळ्या करून बसतात लहान मुलं किंवा वृद्ध यांच्यावर हल्ला चढवतात असे अनेक प्रकार सातत्याने शहरात घडत आहेत कुत्र्यांचा लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींवर हल्ला करावा करण्याचे प्रमाण वाढला असलं तरी महानगरपालिकेचे मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे
0
0
Report

वाशीम बायपास पर शराबी ट्रक चालक ने बड़े हादसे की आशंका बढ़ा दी

Akola, Maharashtra:अकोल्यातील वाशीम बायपास परिसरात एका १८ चाकी अवजड ट्रक चालकाच्या बेदरकार वाहनचालकामुळे मोठी दुर्घटना घडण्याची वेळ आली होती. कथितरित्या मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाने भरधाव ट्रक चालवत अनेक वाहनांना धडक दिली. मात्र, स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. अकोल्यातील वाशीम बायपास परिसरात हा थरारक प्रकार घडला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, १८ चाकी अवजड ट्रकचा चालक कथितरित्या मद्याच्या नशेत भरधाव वेगाने ट्रक चालवत होता. नियंत्रण सुटलेल्या ट्रकने मार्गातील अनेक वाहनांना धडक दिली. या घटनेमुळे रस्त्यावर एकच गोंधळ उडाला आणि अनेक नागरिकांनी थोडक्यात जीव वाचवला. ट्रक नियंत्रणाबाहेर जात चांद प्लांट परिसरापर्यंत पोहोचला. विशेष म्हणजे, ट्रकचे अनेक टायर पंक्चर झाल्यानंतरही चालकाने वाहन न थांबवता पुढे चालवत राहिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत एका बीएमडब्ल्यू कारसह इतर काही वाहनांचेही नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी धाडस दाखवत ट्रकचा पाठलाग केला आणि पुढे जाऊन ट्रक अडवून चालकाला पकडले. नागरिकांचा आरोप आहे की, चालक पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत होता आणि त्याच्या निष्काळजीपणामुळे मोठी जीवितहानी होऊ शकली असती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेऊन पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
0
0
Report

नागपुर में भारी बारिश से जलजमाव, विकास कार्यों के खोदाई से सड़कों का अस्त-व्यस्त होना

Nagpur, Maharashtra:नागपुरात आज दुपारी झालेल्या पावसाने शहराला अक्षरश: झोडपून काढले. विविध भागांमध्ये पाणी साचले व विशेषत: रेंगाळलेल्या विकासकामांचा नागपुरकरांना मोठा फटका बसला. जेथे जेथे सिमेंट रस्त्यांचे बांधकाम, खोदकाम सुरू आहे, अशा ठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते. मोठमोठे दावे करणाऱ्या प्रशासनाची यातून पोलखोल झालीय. अदुपारी एक वाजताच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. शहरातील अनेक प्रमुख चौकांना तलावांचे स्वरुप आले होते. तर वस्त्यांमध्ये पाणी साचले होते. काही ठिकाणी रस्त्यांवर वेगाने नदीप्रवाहित झाल्याचे दिसून आले हुडकेश्वर, नरेंद्र नगर श्रीनगर, कन्नमावर नगर, प्रतापनगर, गोपालनगर, सोनेगाव, सहकारनगर, पडोळे चौक बेसा येथील अनेक वस्त्यांमधील सखल भागात तसेच घरांमध्ये पाणी शिरल्याची तक्रार आहेत. पावसामुळे चाकरमान्यांची तारांबळ उडाली. वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला शहरातील सखल भागात पाणी साचले तर नाले दुथडी भरुन वाहत होते. वर्धा मार्गावर विमानतळाजवळील चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे विमानतळाकडे जाणारा मुख्य मार्ग पावसाचे पाणी साचल्यामुळे बंद होता . वर्धा मार्गावर अनेक शाळा-महाविद्यालये आहेत. तेथील विद्यार्थी, शिक्षक हे बराच वेळ वाहतुकीच्या कोंडीत अडकले होते. अनेक रस्त्यांची दुर्दशा झाल्याचे दिसून आले. रस्त्यांवरील गिट्टी उखडल्याने दुचाकीचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. गटारे तुंबली, घरांमध्ये स्वच्छतागृहातून पाणी गोपालनगर परिसरातील अनेक ठिकाणी तर गटारे तुंबली होती व गटारांचे पाणी रस्त्यांवरुन वाहत होते. मागील अनेक वर्षांपासून विकासकामांंसाठी खोदल्या जात असलेल्या पडोळे चौकात तर तीन फुटांहून अधिक पाणी साचले होते. आजूबाजूच्या सर्व वस्त्यांत पाणी शिरले होते. सोमलवार निकालस शाळेसमोर मागील काही महिन्यांपासून सिमेंट रस्त्याचे काम रेंगाळले आहे. पावसामुळे माती व पाणी शाळेतच शिरले. त्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेर निघायला मार्गच नव्हता. शाळेचे संपूर्ण मैदान जलमय झाले होते. शेवटी रेस्क्यू टीम च्या मदतीने दोरखंड लावून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले...
0
0
Report
Advertisement

जयंत पाटील बोले: जेन-ज़ी आक्रामक है, कंगना राणावत को होगी अपनी चूक का एहसास

Sangli, Maharashtra:जेन-झीच्या प्रतिक्रियेनंतर कंगना राणावत यांना त्यांची चूक लक्षात येईल - जयंत पाटील जेन-झी ही नव्या पध्दतीने विचार करणारी आक्रमक युवा पिढी आहे, त्यामुळे जेन-झी त्याच्यावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया देतील, त्यावेळी कंगना राणावत यांना त्यांची चूक लक्षात येईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी दिली आहे, खासदार कंगणा राणावत यांनी जेन-झीवर जनरेशन गटार अशी टीका केली आहे, यावरुन जयंत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे, तसेच जेन-झीच्या आकांक्षा खूप मोठ्या आहेत, त्यावर सरकारने विचार केला पाहिजे, असे ही मत जयंत पाटील यांनी व्यक्त केल, ते सांगली मध्ये बोलत होते.
0
0
Report

चंद्रपुर में दीर्घ कालावधि के बाद भारी बारिश, किसानों की उम्मीदें जगीं

Chandrapur, Maharashtra:चंद्रपुरात दीर्घ कालावधीनंतर दमदार पावसाची हजेरी बघायला मिळत आहे. शहर जिल्ह्यात today सकाळपासून पावसाळी वातावरण होते. मात्र संध्याकाळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मॉन्सूनचे दोन महिने उलटूनही भरपूर पावसाच्या चंद्रपूर जिल्ह्यात सध्या अत्यल्प पाऊस झालाय. धान व अन्य पिकांची रोवणी- पेरणी देखील पावसाने लांबली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 7 जून पासून केवळ 27 टक्के पाऊस पडलाय. पिके आणि पाणीपुरवठा यासाठी देखील पावसाची अत्यंत आवश्यकता आहे. शेतकऱ्यांसह सामान्य नागरिक दमदार पावसाची प्रतिक्षा करत आहेत.
0
0
Report

जुलाई की भारी बारिश से जून की कमी पूरी, रायगढ़ में जलसंकट टला

Chendhare, Maharashtra:अन्‍कर-जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील जून महिन्यातील पावसाची तूट पूर्णपणे भरून निघाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरी पर्जन्यमानाच्या 66 टक्के पावसाची नोंद झाली असून, धरणे आणि लघुपाटबंधारे प्रकल्पांमध्ये तब्बल 95 टक्के पाणीसाठा झाला आहे. हेटवणेसह 28 पैकी 23 प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून, यंदाच्या वर्षी पाणीटंचाईचे संकट टळल्याचे चित्र आहे. मागील दोन महिन्यात जिल्हयात पावसाने 2000 च्या टप्‍प्‍यावर ओलांडला आहे. अजून दोन महिने पावसाळा शिल्लक असल्याने यंदा वार्षिक सरासरीपेक्षाही अधिक पावसाची नोंद होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top