445001
माझी उमेदवारी मदन येरावारांना पाडण्यासाठीच, माजी आमदार संदीप बाजोरीयांचा दावा.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून तुतारी चिन्हावरच आपण लढु असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत तिकीट वाटपाआधीच त्यांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार देखील सुरू केला आहे. भाजप आमदार मदन येरावार यांनी मतदारसंघ बकाल करून ठेवला, रस्त्यांची दैना झाली, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून भयमुक्त वातावरण देऊ असे वचन आपण जनतेला देत असल्याचे संदीप बाजोरिया यांनी सांगितले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
65 लाख रुपए के गुवाहाटी दौरे पर उल्हासनगर महापालिका में विवाद
Ambernath, Maharashtra:उल्हासनगर महापालिकेच्या ६५ लाखांच्या गुवाहाटी दौऱ्यावरून वाद शहर विकास रखडला,नगरसेवकांचा ६५ लाखांचा गुवाहाटी दौरा चर्चेत नगरसेवकांसोबत पत्नी, आई, मुलांचाही प्रवास? गुवाहाटी दौऱ्यावरून खळबळ प्रशिक्षणाच्या नावाखाली नातेवाईकांची सहल? मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांचा सवाल उल्हासनगर महापालिकेच्या नगरसेवकांचा गुवाहाटी अभ्यास दौरा सध्या वादाच्या केंद्रस्थानी झाला आहे. शहरात रस्ते, पाणी, सांडपाणी आणि आर्थिक अडचणींचे प्रश्न कायम असतानाही तब्बल ६५ लाख रुपयांचा खर्च करून नगरसेवक प्रशिक्षणासाठी गुवाहाटीला गेल्याने नागरिकांमधून आणि विरोधकांकडून टीका होत आहे. उल्हासनगर महापालिका के नगरसेवकांसाठी गुवाहाटी येथे चार दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन झाले होते. महापालिकेच्या सचिव कार्यालयानुसार, या दौऱ्यासाठी सुमारे ६५ लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. प्रत्येक नगरसेवकासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था, भोजन, स्थानिक प्रवास, प्रकल्प भेटी, सभागृह आणि इतर सुविधांसह विमान प्रवासाचा खर्च मिळून सुमारे ७४ हजार ७२० रुपये खर्च अपेक्षित होता. दरम्यान, समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या काही व्हिडिओंमध्ये अनेक नगरसेवक कुटुंबीयांसह गुवाहाटी दौऱ्यावर गेल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे हा अभ्यास दौरा होता की पर्यटन, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने मात्र हे प्रशिक्षण मुंबईतील अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे सभाशास्त्र, प्रशासकीय कामकाज, प्रभाग विकास आणि नियोजन यांसारख्या विषयांवर प्रशिक्षण देण्यात आल्याची माहितीही पालिकेने दिली आहे.मात्र,आर्थिक अडचणीत असलेल्या महापालिकेवर सुमारे ७०० कोटी रुपयांचे ओझे असताना, शहरातील रस्ते, पाणी आणि इतर नागरी प्रश्न प्रलंबित असताना एवढा खर्च करून गुवाहाटीत प्रशिक्षण घेण्याची गरज काय होती, असा सवाल विरोधी पक्षांकडून उपस्थित केला जात आहे.तसेच काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रोहित साळवे यांनी या खर्चावर आक्षेप घेत, शहराची आणि महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता ६५ लाख रुपयांचा खर्च मंजूर करण्यापूर्वी प्रशासनाने विचार करायला हवा होता, असे म्हटले आहे. या खर्चाची सविस्तर माहिती विरोधी पक्ष म्हणून मागविणार असून, शहरातील विकासकामे रखडलेली असताना एवढा खर्च का करण्यात आला, याचा जाब विचारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे. शहरात रस्ते, खड्डे आणि इतर मूलभूत सुविधांचा अभाव असताना नगरसेवक नातेवाईकांसह गुवाहाटीला गेले.आसाममध्ये पूरस्थिती असताना नेमके कोणते प्रशिक्षण दिले जात होते,असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. महापालिका आर्थिक अडचणीत असल्याचे प्रशासन सांगते, मग ६५ ते ७० लाख रुपयांचा खर्च कशासाठी करण्यात आला आणि जनतेच्या पैशाचा हिशेब कोण देणार, असा प्रश्नही मनसेने उपस्थित करत या प्रकाराचा निषेध केला आहे. रोहित साळवे, काँग्रेस कमिटी अध्यक्ष बंडू देशमुख मनसे जिल्हाध्यक् चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर0
0
Report
येवला के अंदरसुल में बंद घर से सोने-चांदी और नकदी चुराने के बाद चोर फरार
Yeola, Maharashtra:येवला तालुक्यातील अंदरसुल येथील फळांचे व्यापारी चांद भाई सय्यद यांच्या बंद घराचे कुलूप उघडून चोरट्यांनी तीन तोळे सोन्याचे दागिने व रोख दहा ते पंधरा हजार रुपये घेऊन पोबारा केला नंतर पाठीमागच्या गल्लीत बंटी भालेराव यांच्या बंद घराचे कुलूप उघडून चांदीचे दागिने व जुन्या काळातील नाणे दहा हजार रुपये रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले या घटनेची माहिती पोलिसांना समजतात येवला तालुका पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब दिघे यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी करत पंचनामा केला व पुढील तपासाचे सूत्र फिरवली असुन. मालेगाव येथील श्वान पथक मागवण्यात आले आहे.0
0
Report
1 अगस्त से 12 समुद्री मील से बाहर मछली पकड़ने की अनुमति
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. राज्यातील मच्छीमारांना १ ऑगस्टपासून १२ सागरी मैलापलिकडील विशेष आर्थिक क्षेत्रात मासेमारीची परवानगी देण्यात आली आहे. किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंतच्या महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात मात्र १५ ऑगस्टपर्यंत मासेमारीवरील बंदी कायम राहणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाने दिली आहे. त्यामुळे खोल समुद्रात मासेमारी करताना मच्छीमारांना नियमांचं काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. तसेच, बंदीच्या कालावधीत महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात बेकायदेशीररीत्या मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशाराही विभागाने दिला आहे.0
0
Report
Advertisement
येवला में पानी से जुड़ी भारी खुशखबरी: गंगासागर तालाब पूरी क्षमता से भरा
Yeola, Maharashtra:गेल्या दोन महिन्यापूर्वी येवला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगासागर तलावात पाणीसाठा कमी झाल्याने शहराचा पाणी पुरवठा 4 दिवसआड करण्यात आला होता मात्र सध्या नाशिक जिल्ह्यात धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने पालखेड धरणातून फोर फ्लो च्या पाण्याने गंगासागर तलाव भरून मिळावा अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी पाटबंधारे विभागाकडे केली होती त्यानुसार पाटबंधारे विभागाने येवल्याच्या गंगासागर तलावात आवर्तन सोडले असून या आवर्तनाने गंगासागर तलाव पूर्ण क्षमतेने भरून गेला आहे त्यामुळे आता येवलेकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असून या तलावातील पाण्याचे जलपूजन नुकतेच संपन्न झाले याप्रसंगी नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी सह इतर मान्यवर उपस्थित होते.0
0
Report
यवतमाळ के उकणी में पेड़ गिरा, घर को नुकसान, कोई घायल नहीं
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी तालुक्यातील उकणी येथे आज सकाळी सातच्या सुमारास चिंचेचे भले मोठे झाड एका घरावर कोसळले. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस धारा सुरू असून, जीवन मजगवळी यांच्या घरा शेजारी असलेले हे चिंचेचे झाड, अचानक कोसळले. झाड कोसळल्याने जीवन मजगवळी यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही. कालपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे हे झाड पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.0
0
Report
नागपूर में पानी भराव: हाई कोर्ट ने महापालिका को कड़े निर्देश दिए
Nagpur, Maharashtra:नागपूर - पावसाळ्यापूर्वी साफसफाईचे दावे केले असताना शहरात पाणी साचण्याला जबाबदार कोण? असा सवाल विचारत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून महानगर पालिकेची झाडाझडती घेतली. - अतिवृष्टी�nंतर शहरात पाणी तुंबल्याची न्यायालयाने गंभीर दखल घेतली, दरवर्षी जुलै-ऑगस्टमध्ये शहर पाण्याखाली मग उपाययोजना कुठे? - सिमेंट रस्त्यांमुळे निर्माण झालेल्या समस्यांवरील जनहित याचिकेवर सुनावणी, मनपाच्या वकिलांना पाचारण करत न्यायालयाने विचारला जाब - "साफसफाईचे दावे करता, मग ही परिस्थिती का?" न्यायालयाचा मनपाला सवाल,"अभ्यास केला म्हणता, हा कसला अभ्यास?" मनपा अधिकाऱ्यांना न्यायालयाचे खडे बोल - शुक्रवारीपर्यंत सविस्तर उत्तर सादर करण्याचे मनपाला उच्च न्यायालयाचे आदेश, "थातूरमातूर उत्तर चालणार नाही" ठोस उपाययोजना सादर करण्याचे निर्देश - हलगर्जीपणा आढळल्यास मनपा आयुक्तांनाच उत्तर मागवणार, मनपा सोबत पीडब्ल्यूडी आणि पोलिसांनाही, उच्च न्यायालयाचे फटकार - दरवर्षी नागरिकांचे जीव धोक्यात मानवी जीवनाचे काय? - शालेय विद्यार्थ्यांनाही अतिवृष्टीचा फटका, उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता - सोमलवार शाळेसमोरील रस्त्यावरील प्रकारावरून, मनपा अधिकाऱ्यांना न्यायालयाने फटकारले - लहान मुलांच्या सुरक्षेची तरी काळजी घ्या, उच्च न्यायालयाचा मनपाला सुनावणीदरम्यान सज्जड इशारा देत पुढील सुनावणी शुक्रवारी होणार0
0
Report
Advertisement
जुनार में भारी बारिश से धान रोपनी तेज; पूर्व विधायक अतुल बेनके खेत में उतरकर चिकलनी कर रहे
Barav, Maharashtra:जुन्नर तालुक्यात मुसळधार पावसामुळे भात लागवडीची कामे वेगाने सुरू असून, माजी आमदार अतुल बेनके यांनी थेट शेतातील चिखलात उतरून नांगर हाकत चिकलणी केलीय. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे जुन्नरच्या आदिवासी भागात शेतकरी भात लावणीच्या कामात व्यस्त आहेत. अशा वेळी आपला लोकप्रतिनिधी स्वतः शेतात उतरून नांगरणी आणि चिकलणी करत असल्याचे पाहून स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांमध्ये मोठा आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला.0
0
Report
शहादा के बैंक परिसर में निर्वस्त्र चोर ने एसी वायर चोरी कर दहला दिया
Dhule, Maharashtra:शहादा शहरातील दोंडाईचा रोडवरील स्टेट बँक परिसरातील 56 गाडे व्यापारी संकुलात एका भुरट्या चोराने चोरीची भन्नाट आणि अजब शक्कल लढवली आहे. ओळख लपवण्यासाठी या चोराने स्वतःचे कपडेच काढून चेहरा झाकला. त्याने संकुलातील एसीची कॉपर वायर आणि कॉम्प्रेसरची चोरी केली. चोरीला गेलेली ही महागडी वायर आणि साहित्य साठवण्यासाठी चोराने स्वतःच्याच पॅन्टचा पोत्यासारखा वापरला आणि तिथून पोबारा केला. हा संपूर्ण निर्वस्त्र चोरट्यांचा प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सध्या या अजब चोराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या भुरट्या चोरांमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी या अजब चोराचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.0
0
Report
नागोठणे पुल का भराव ढहने से मुंबई-गोवा हाईवे पर खतरा, ट्रैफिक मुश्किल
Chendhare, Maharashtra:मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास धोकादायक... नागोठणे येथील पुलाचा भराव खचला... पुलाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न... अँकर - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथील पूल पुन्हा एकदा धोकादायक अवस्थेत आला है. काही दिवसांपूर्वी या पुलावरील रस्त्याला भेगा पडून दुभंगल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता पुलाच्या दोन्ही बाजूंचा मातीचा भराव मोठ्या प्रमाणात खचत असल्याचे दिसून येत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंनी मातीचा भराव खचू लागल्याने पुलाच्या संरचनेवर ताण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुलाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.0
0
Report
Advertisement
पूर्व विदर्भ और अमरावती में आज ऑरेंज अलर्ट: नागपुर में सुबह से झमाझम बारिश
Nagpur, Maharashtra:नागपुर सहित पूरे पूर्व विदर्भ और अमरावती को आज पावस का ऑरेंज अलर्ट विदर्भ में कुछ जगहों पर अतिवृष्टि का नागपूर प्रादेशिक मौसम विभाग का इशारा नागपुर में सुबह से पावस की रिपरीप शुरू0
0
Report
गौताळा अभयारण्य में बारिश से हरियाली, सुरक्षा कारणों से पर्यटक प्रवेश बंद
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:पावसाने फुललं गौताळा अभयारण्य; हिरवाईचं नंदनवन, पण पर्यटकांना जंगलात प्रवेशबंदी मराठवाड्यासचं निसर्गवैभव म्हणून ओळखलं जाणारं गौताळा अभयारण्य सध्या पावसाच्या सरींनी अक्षरशः खुलून गेलं आहे. हिरवाईने नटलेले डोंगर, खळाळणारे धबधबे आणि धुक्याची चादर पांघरलेला परिसर पाहणाऱ्याला मोहिनी घालतो. मात्र, या निसर्गरम्य सौंदर्याचा प्रत्यक्ष आनंद घेण्यासाठी पर्यटकांना यंदा प्रतीक्षा करावी लागणार आहे. वन्यजीवांचे संरक्षण आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव वनविभागाने अभयारण्यात पर्यटकांच्या प्रवेशावर तात्पुरती बंदी घातली आहे.0
0
Report
अमरावती में बनावट हेल्मेट विक्री के खिलाफ बड़ी पुलिस कार्रवाई, हजारों हेल्मेट जप्त
Amravati, Maharashtra:अमरावती शहरात बनावट हेल्मेट विक्रीप्रकरणी वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई; बनावट हेल्मेटचा राजस्थान आणि रायपूर येथून आणलेला मोठा साठा जप्त अमरावती शहरात बनावट हेल्मेट विक्रीप्रकरणी वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई केली असून रेल्वे स्टेशन चौकातील शीतल लॉजमध्ये ठेवण्यात आलेले राजस्थान आणि रायपूर येथून आणलेले हजारो हेल्मेट जप्त केले आहे. गुप्त माहितीच्या आधारे अमरावती शहर वाहतूक पोलीस आणि आरटीओ विभागाने ही संयुक्त कारवाई केली आहे. दरम्यान वाहतूक पोलीस निरीक्षक निलेश गावंडे आणि आरटीओ अधिकारी प्रमोद गोटे यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू असून जप्त हेल्मेटचा दर्जा तपासण्यासाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) विभागाशी पत्रव्यवहार करण्यात येणार असून त्यानंतर हेल्मेटची गुणवत्ता व प्रमाणिकता निश्चित केली जाणार आहे. बनावट अथवा निकृष्ट दर्जाच्या हेल्मेटची विक्री करणाऱ्यांविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता त्यामुळे बनावट हेल्मेट विकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.0
0
Report
Advertisement
नागपुर के एमआईडीसी में किराये के हमले में महिला की मौत, दंपति घायल
Nagpur, Maharashtra:नागपूर - जुन्या भाडेकरूकडून घरात घुसून तलवार-चाकूने हल्ला घडल्याची घटना. घरात आलेल्या पाहुण्या महिलेचा मृत्यू, डहाट दाम्पत्य गंभीर जखमी. - नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमरनगर परिसरात वैमनस्यातून थरारक हल्ल्या घडल्याची घटना. - घटनेच्या सीसीटीव्हीत संपूर्ण हल्ला कैद.. रोशन तराळ आरोपीच नाव - भाडेकरू रोशन नीळकंठ तराळ याने घरात घुसून तलवार व चाकूने धर्मपाल डहाट, त्यांची पत्नी वनिता डहाट आणि घरी आलेल्या पाहुण्या संगीता राजू चौधरी यांच्यावर सपासप वार केले. - या हल्ल्यात संगीता चौधरी यांचा रक्तस्त्रावामुळे घटनास्थळीच मृत्यू झाला, तर धर्मपाल आणि वनिता डहाट गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. - आरोपी पूर्वी डहाट कुटुंबाकडे भाड्याने राहत होता. मोठ्या आवाजात रेडिओ लावण्याच्या वादातून त्याच्यात राग निर्माण झाल्याची प्राथमिक माहिती आहे. - हल्ल्यानंतर आरोपी घरातच शांत बसला होता. स्थानिक नागरिकांनी त्याला खोलीत कोंडून ठेवले. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
सोलापुर में महसूल विभाग के समाधान शिबिर से कई लोगों को लाभ
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - महसूल विभागामार्फत राबवण्यात आलेल्या समाधान शिबिराचा शेकडो सोलापूरकरांनी घेतला लाभ महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानाअंतर्गत शहरात समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. सदरच्या शिबिरामध्ये सातबारा, फेरफार नोंदी, जात व उत्पन्न रहिवासी अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरामध्ये बी -2 जागे संदर्भात कोणतेही तांत्रिक अडचणी आल्यास त्या त्वरित सोडवण्याचा विश्वास व्यक्त केला.0
0
Report
वाशीम में तेज बारिश से किसानों को मिली राहत; खरीप पिकें होंगी लाभ
Washim, Maharashtra:हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, हळद, उडीद आणि इतर पिकांना मोठा फायदा होणार असून पिकांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून यंदा चांगल्या उत्पादनाची आशा बळावली आहे.0
0
Report
Advertisement
