icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Oct 2024, 05:25 am

माझी उमेदवारी मदन येरावारांना पाडण्यासाठीच, माजी आमदार संदीप बाजोरीयांचा दावा.

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून तुतारी चिन्हावरच आपण लढु असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत तिकीट वाटपाआधीच त्यांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार देखील सुरू केला आहे. भाजप आमदार मदन येरावार यांनी मतदारसंघ बकाल करून ठेवला, रस्त्यांची दैना झाली, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून भयमुक्त वातावरण देऊ असे वचन आपण जनतेला देत असल्याचे संदीप बाजोरिया यांनी सांगितले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

इंदापुर के वडापुरी में ससुराल के दमन से महिला ने आत्महत्या; तीन आरोपी गिरफ्तार

Rui, Maharashtra:सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या..... इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथील धक्कादायक घटना.... विवाहितेच्या आत्महत्ये प्रकरणी पतीसह सासू-सासरा तिघांवर इंदापूर पोलिसात गुन्हा दाखल. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथील एका 21 वर्षीय विवाहित महिलेने सासरच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. सोनाली समाधान चंदनशिवे असं मृत महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी थेट इंदापूर पोलीस स्टेशन बाहेर मोठी गर्दी केली. मयत सोनाली चंदनशिवे हिचे वडिलांच्या तक्रारीवरून आरोपी पती समाधान उर्फ कार्तिक गौतम चंदनशिवे, सासरे गौतम नामदेव चंदनशिवे आणि सासू पार्वती गौतम चंदनशिवे या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदापूर पोलिसांनी तात्काळ मयत सोनाली हिचा पती समाधान उर्फ कार्तिक चंदनशिवे आणि सासरा गौतम चंदनशिवे दोघांना अटक केली आहे. मयत सोनाली चंदनशिवे ही साडेपाच महिन्याची गर्भवती होती, सातत्याने तिला सासरी माहेरहून एक लाख रुपये हुंडा घेऊन ये यासाठी शारीरिक व मानसिक त्रास दिला जात होता या त्रासाला कंटाळून आज तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केले आहे असा आरोप मयत सोनालीचे वडील हनुमंत बनसोडे यांनी तक्रारीद्वारे केला आहे.
0
0
Report

एसीबी ने के-पश्चिम में 60 हजार रुपये रिश्वत लेते कर्मियों को रंगे हाथ पकड़ा

Mumbai, Maharashtra:मुंबई | अंधेरी पश्चिम मुंबई महापालिकेच्या के-पश्चिम विभागातील कनिष्ठ अभियंता आणि एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हणजेच एसीबीने लाच घेतल्याप्रकरणी अटक केली आहे. बेकरीचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी आणि महापालिकेची कारवाई टाळण्यासाठी 60 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप दोघांवर आहे. एसीबीच्या माहितीनुसार, 50 वर्षीय बेकरी व्यावसायिकाकडे कर्मचारी विजय रमेश पाटील यांनी सुरुवातीला 70 हजार रुपयांची लाच मागितली होती. ही रक्कम स्वतःसह कनिष्ठ अभियंता निरवकुमार चुनीलाल जैसूर यांच्यासाठी मागण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची पडताळणी केल्यानंतर कनिष्ठ अभियंत Jaasir यांनी लाचेची रक्कम 60 हजार रुपयांवर ठरवल्याचे समोर आले. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. के-पश्चिम विभागीय कार्यालयाच्या तळमजल्यावरील लिफ्टजवळ 60 हजार रुपये स्वीकारताना विजय पाटील यांना रंगेहाथ पकडण्यात आले. तर कनिष्ठ अभियंता निरवकुमार जैसूर यांना त्यांच्या सहाव्या मजल्यावरील कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले. एसीबीने जैसूर यांच्याकडून दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत. तर पाटील यांच्याकडून एक मोबाईल फोन आणि 40 हजार 820 रुपयांची रोकड मिळाली. तसेच त्यांच्या बॅगेतून तब्बल 2 लाख 37 हजार रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे.
0
0
Report
Advertisement

डीजे बंदी सवाल: सिर्फ हिंदू त्योहारों पर ही क्यों, नीति समानता पर उघड़े सवाल

Nagpur, Maharashtra:नागपूर बाईट - प्रवीण दटके, भाजप आमदार. - डीजे बंदीला विरोध नाही, परंतु फक्त हिंदूंच्या सणांवरच निर्बंध का? असा भाजप नेते तथा आमदाराचा प्रवीण दटके यांचा सवाल... - नागपूरात डीजे बंदीच्या पोलिस आयुक्तांच्या आदेशाच भाजपचे नेते संदीप जोशी यांनी स्वागत केलं.. तर दुसरीकडे भाजप आमदार प्रवीण दटके यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. - डीजे बंदीला आमचा विरोध नाही, मात्र हा आदेश फक्त हिंदूंच्या सणांच्या आधीच का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. - मारबत, बडग्या, पोळा, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवरच पोलिसांनी परिपत्रक काढल्याचा त्यांचा आरोप आहे. इतर -धर्मांच्या सणांच्या वेळी असा आदेश का काढला गेला नाही ? असा थेट सवाल त्यांनी पोलिस प्रशासनाला केला आहे. -- हे परिपत्रक एक जानेवारीला का काढले नाही ? 3 सप्टेंबरलाच परिपत्रक का काढले? चार,पाच सहाला दहीहंडी आहे म्हणून.. ऑक्टोबर महिन्यात गरबा नवरात्र आहे म्हणून... फक्त हिंदूंना त्रास देण्याकरता पोलीस प्रशासनाने परिपत्रक काढल्याचा आरोप -- एक जानेवारी 2027 पासून परिपत्रक काढले पाहिजे... आणि सरसकट जाती-धर्मांकरता असले पाहिजे --- कायद्याची अंमलबजावणी करायची असेल तर ती सर्व धर्मांच्या सणांना समान पद्धतीने लागू करा, अशी मागणी केली आहे. - फक्त हिंदूंच्या सणांना त्रास देण्यासाठी हे परिपत्रक काढलं असेल, तर ते आम्ही खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. - तसंच, डीजेच्या आवाजाची मर्यादा तपासण्याला विरोध नसून पोलिसांनी ती सर्व ठिकाणी आणि सर्व सणांमध्ये समानपणे तपासावी, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. - पोलिस आयुक्तांनी हे परिपत्रक मागे घ्यावं, अशी मागणी करत भाजप आमदार दटके यांनी भाजप कार्यकर्ता, गणपती मंडळाचा सदस्य आणि हिंदू म्हणून आपली भूमिका मांडत असल्याचंही प्रवीण दटके यांनी स्पष्ट केलं.
0
0
Report

पंकजा मुंडे ने बुजुर्ग के साथ सेल्फी लेकर सबका दिल जीता

Kolhapur, Maharashtra:राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. दिवसभरातील विविध कार्यक्रम आटोपल्यानंतर सायंकाळी त्या कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी दाखल झाल्या. यावेळी त्यांना भेटण्यासाठी अनेक नागरिकांनी गर्दी केली होती. याचवेळी एक ज्येष्ठ नागरिक पंकजा मुंडे यांच्यासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांना फोटो काढताना होत असलेली धडपड पाहून पंकजा मुंडे यांनी स्वतः पुढाकार घेतला. पंकजा मुंडे यांनी त्या ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल स्वतःच्या हातात घेतला आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढला. मंत्र्यांनी दाखवलेल्या या आपुलकीमुळे ज्येष्ठ नागरिकाच्या चेहऱ्यावरही आनंद दिसून आला.
0
0
Report

नोव्हेंबर 2026 तक धार्मिक आयोजनों पर बैन: आयुक्त के आदेश पर राजनीतिक घमासान

Nagpur, Maharashtra:बाईट संदीप जोशी माजी आमदार व माजी महापौर (प्रवीण दटके-DJ परिपत्रक) मी अध्यादेश अत्यंत बारकाईने वाचला आहे... त्याच्यात गणेशोत्स्व असो की ताजुद्दीन बाबांचे उरूस असो आणि इतर समाजाचे जे काही कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमांवर एक नोव्हेंबर 2026 पर्यंत बंदी टाकली आहे. माझी अनौपचारिक काही जणांशी चर्चा झाली आयुक्तांना 60 दिवसांसाठीच अध्यादेश काढण्याचा अधिकार असतो... त्यानंतर पुन्हा रिनेवल होईल त्यावेळेस इतर धर्मियांचे सण असतील त्यांच्यावर लागू होईल. *त्यांनी शेण खाल्लं म्हणून मी पण शेणखाईल ही भूमिका अयोग्य आहे*. प्रवीण जी आमचे आमदार आहेत जेष्ठ नेते आहेत..त्यांनी जी भूमिका घेतली ती त्यांच्या दृष्टीने योग्य असावी
0
0
Report
Advertisement

गडचिरोली पुलिस ने 50 आत्मसमर्पित नक्सलियों का पुनर्वास हेतु जिलों में विदाई समारोह आयोजित किया

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद आता संपुष्टात आला असून पोलीस दलाच्या अभिलेखावर एकही सशस्त्र माओवादी शिल्लक नाही. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी नक्षल विरोधी अभियानांसोबतच शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून 819 नक्षलवाद्यांनी अहिंसेचा मार्ग स्वीकारला. यापैकी एकूण 50 आत्मसमर्पित नक्षल सदस्यांना त्यांच्या मूळ जिल्ह्रात परत पाठविण्यात येऊन त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. आत्मसमर्पणानंतर या सदस्यांचे समाजाच्या मुख्य प्रवाहात पुनर्वसन व्हावे यासाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरणानुसार त्यांना विविध लाभ देण्यात आले आहेत. यामध्ये आर्थिक सहाय्य, आवश्यक शासकीय व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता तसेच पुनर्वसनासाठी विविध रोजगार, स्वयं रोजगार, प्रशिक्षणाचा लाभ यांचा समावेश आहे.  गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट संजीवनीच्या माध्यमातून या पुनर्वसन कालावधीत केवळ प्रशासकीय प्रक्रिया न राबवता आत्मसमर्पित सदस्यांना नवीन ओळख, आत्मविश्वास, कौशल्य आणि सन्मानाने जीवन जगण्याची संधी उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात आला. त्यांच्या आरोग्य व शारीरिक क्षमतेकडे विशेष लक्ष देण्यात आले. ऑपरेशन रोशनी अंंतर्गत नेत्रोपचार शिबीरे व नसबंदी री-ओपनिंग सारखी आवश्यक शस्त्रक्रिया, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन आणि सामाजिक समावेशन, आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ध्यान, योग, शिबीरे आयोजीत करण्यात आले. तसेच प्रोजेक्ट संजीवनीच्या माध्यमातून आतापर्यंत सामुहिक विवाह सोहळयाचे आयोजन करुन 46 आत्मसमर्पित माओवादी जोडप्यांचे विवाह लावून देण्यात आले. 88 आत्मसमर्पित नक्षल्याना कंपनीत कौशल्य विकास प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.
0
0
Report

पुलिस ने पर्यावरण बैठक में जाने से रोका राजू शेट्टी, फिर अनुमति मिली

Kolhapur, Maharashtra:पर्यावरण संदर्भातल्या बैठकीत जातताना राजू शेट्टीना अडवलं पोलिसांनी. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहे. आज सायंकाळी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात कोल्हापुरातील पर्यावरण प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पंकजा मुंडे यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आले. मात्र पोलिसांनी राजू शेट्टी यांना बैठकीत जाण्यास सुरुवातीला अडवणूक केली. काही काळ राजू शेट्टी यांनी पोलिसांमध्ये चर्चा झाल्यानंतर राजू शेट्टी यांना बैठकीला सोडण्यात आला.
0
0
Report

चंद्रपुर-गडचिरोली में 80% स्थानीय रोजगार के लिए रोजगार हक महामोर्चा, 7 सितम्बर

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपूर- गडचिरोली स्थानिक लोकाधिकार सेनेच्या वतीने स्थानिक भूमिपुत्रांना जिल्ह्यातील विविध उद्योगात 80 टक्के रोजगारासाठी 7 सप्टेंबर रोजी रोजगार हक्क महामोर्चाचे आयोजन अँकर:-- चंद्रपूर- गडचिरोली स्थानिक लोकाधिकार सेनेच्या वतीने जिल्ह्यातील विविध उद्योगांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना 80 टक्के रोजगार मिळावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर 07 सप्टेंबर रोजी रोजगार हक्क महामोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक लोकाधिकार सेनेच्या प्रमुख गोमती पाचभाई यांच्या नेतृत्वात हा महामोर्चा शहरातील गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. चंद्रपूर जिल्हा कोळसा- वीज -खनिज संपत्ती आणि मोठ्या उद्योगांनी समृद्ध असलेला जिल्हा आहे. मात्र इथले सुशिक्षित बेरोजगार स्थानिक भूमिपुत्र रोजगारासाठी संघर्ष करत अन्य राज्यांमध्ये स्थलांतर करत आहेत. स्थानिक कारखान्यांमध्ये परप्रांतीयांना प्राधान्य दिले जात असून आपल्याच मातीतील तरुणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोਸळत आहे. या विरोधात हा महामोर्चा आयोजित केला असून मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी 88 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनासोबत स्थानिक लोकाधिकार सेनेच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक देखील आयोजित करण्यात आली आहे. बाईट १) गोमती पाचभाई, अध्यक्ष, स्थानिक लोकाधिकार सेना आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
0
Report
Advertisement

नवी मुंबई के प्रथम संदर्भ अस्पताल में मरीज की मौत, तीन स्टाफ निलंबित

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी इथल्या प्रथम संदर्भ रूग्णालयात एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत रूग्णालयातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. परिसेविका गीता केणी, सुरभी मोडसकर, फार्मसिस्ट दिपक नलावडे अशी या तिघांची नावं आहेत. महापालिका रूग्णालयात 31 ऑगस्ट रोजी 50 वर्षीय गोपीराम खडसे या रूग्णाला मलेरिया च्या उपचारा साठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर मुदत संपलेलं सलाईन रूग्णाला दिल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला. रूग्णांची प्रकृती चिंताजनक झाल्यावर त्यांना फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आज सकाळी रूग्णाचा मृत्यू झाला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं असल्याची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सुजाता पाटील यांनी दिली. तसेच हा रुग्ण मलेरियाच्या उपचारा साठी दाखल केले होते, जेव्हा महापालिका रुग्णालयात दाखल केले तेव्हा त्यांना मुदत संपलेले सलाईन चढवले त्यानंतर त्यांना त्रास झाल्याने फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मद्ये शिफ्ट झाल्यावर त्यांच्या सर्व टेस्ट केल्यावर मेंदू मधील मलेरिया दाखवण्यात आला होता,यामुळे ते गंभीर आजारी असल्याचे समोर आले असल्याचे महापौर सुजाता पाटील यांनी सगीतेल.
0
0
Report

किसानों का अहिल्यानगर जलसंपदा में वांबोरी चारी टप्पा-2 को शामिल करने का अर्धनग्न उपवास

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई गावचा वांबोरी चारी टप्पा दोन मध्ये समावेश करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी अहिल्यानगर जलसंपदा कार्यालयासमोर अर्धनग्न उपोषण सुरू केले आहे...संबंधित प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे...शिंगवे तुकाई गावाचा वांबोरी चारी टप्पा दोन मध्ये समावेश करावा या मागण्यासाठी मागच्या सहा वर्षांपासून गावातील ग्रामस्थ आणि शेतकरी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करत आहेत मात्र जलसंपदा विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकरी आणि नागरिकांनी उपोषण आंदोलन सुरू केले आहे...
0
0
Report
Advertisement

गडचिरोली बस दुर्घटना: चालत्या बस के टायर टूटे, 20 यात्री बाबत घडामोडें आल्या

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील एसटी प्रवासी भगवान भरोसे, चक्क चालत्या बसचे निघाले चाक, जिल्ह्यात आणखी एका एसटी बसचा प्रताप आला पुढे अहेरी आगाराची दामरंचा ते अहेरी जाणारी बस ऐन रस्त्यात नादुरुस्त झाली. गेली 10 वर्षे दक्षिण गडचिरोली भागातील रस्ते खड्डेमय आहेत. वारंवार बैठका आणि आश्वासने दिल्यावरही जिल्हावासीयांच्या नशिबी चिखल आणि खड्डेच आहेत. आधीच भंगार बसेस त्यात सतत खड्ड्यात चालत असल्याने त्या प्रवाशांसाठी धोका ठरत आहेत. ताज्या घटनेतील बसमध्ये सुमारे 20 प्रवासी होते. यात विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती。
0
0
Report

तंबाकू निषेध के दावों के बीच शिक्षा विभाग के कार्यालय में धूम्रपान वायरल

Akola, Maharashtra:शाळा, महाविद्यालय आणि इतर शैक्षणिक संस्थांच्या परिसरापासून १०० यार्ड अर्थात सुमारे ९१ मीटरपर्यंत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास कायद्याने बंदी आहे. विद्यार्थ्यांना तंबाख嘀च्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी विविध स्तरावर जनजागृती केली जाते, शाळा-महाविद्यालये तंबाखूमुक्त परिसर घोषित केले जातात... मात्र, अकोला जिल्हा परिषद शिक्षण विभागातून समोर आलेल्या एका व्हायरल व्हिडिओने आता गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्या शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्तीचा संदेश दिला जातो, त्याच कार्यालयात कर्मचारी चक्क तंबाखू खात असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. अकोला जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये काही कर्मचारी कार्यालयात तंबाखूचे सेवन करताना दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. कार्यालयीन वेळेतच हा प्रकार सुरू असल्याचे व्हिडिओतून दिसून येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकीकडे शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरातून १०० यार्ड अंतरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने तंबाखूचे दुष्परिणाम सांगितले जातात. शैक्षणिक परिसर तंबाखूमुक्त ठेवण्यासाठी प्रशासनाकडून नियम आणि जनजागृती मोहीम राबविली जाते. मात्र, दुसरीकडे शिक्षण विभागाच्या कार्यालयातच कर्मचारी तंबाखूचे सेवन करत असल्याचा व्हिडिओ समोर आल्याने प्रशासनाच्या नियमांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ज्यांनी विद्यार्थ्यांना तंबाखूपासून दूर राहण्याचा संदेश द्यायचा, त्यांच्याच कार्यालयात असा प्रकार होत असेल तर विद्यार्थ्यांसमोर नेमका कोणता आदर्श ठेवला जात आहे? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
0
0
Report

कल्याण में युवा कांग्रेस और पुलिस के बीच भिड़ंत, मनुस्मृति विरोध प्रदर्शन

Kalyan, Maharashtra:काँग्रेस कार्यकर्ते और पुलिसों के बीच झटापटी कल्याण में Youth Congress का आंदोलन। इस आंदोलन को anti-Manusmriti के विरोध में होना बताया गया। यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपा सरकारच्या और मनुस्मृती के विरोध में जोरदार घोषणाबाजी की. कुछ काँग्रेस कार्यकर्त्यांनी कल्याण के छत्रपती शिवाजी चौकात रस्ते पर ठिय्या मांडला. इसके बाद वातावरण तनावपूर्ण हो गया और पुलिस ने काँग्रेस कार्यकर्त्यों को नियंत्रित करना शुरू किया. जिसके बाद पुलिस द्वारा काँग्रेस कार्यकर्त्यों में झटापटी की घटनाएं सामने आईं. शहर में यही चर्चा है कि इतने دیر तक काँग्रेस के Youth कार्यकर्तों को आंदोलन करने की जगह क्यों नहीं मिली.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top