icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Oct 2024, 05:25 am

माझी उमेदवारी मदन येरावारांना पाडण्यासाठीच, माजी आमदार संदीप बाजोरीयांचा दावा.

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून तुतारी चिन्हावरच आपण लढु असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत तिकीट वाटपाआधीच त्यांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार देखील सुरू केला आहे. भाजप आमदार मदन येरावार यांनी मतदारसंघ बकाल करून ठेवला, रस्त्यांची दैना झाली, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून भयमुक्त वातावरण देऊ असे वचन आपण जनतेला देत असल्याचे संदीप बाजोरिया यांनी सांगितले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

महाराष्ट्र में महागाई, पेपरफूट और डीजे निर्णय पर राजनैतिक आक्रोश

Pune, Maharashtra:सुप्रिया सुळे महानगरपालिकेकडून डम्पिंग यार्ड वर नवीन कचरा प्रकल्प उभारण्यात येत आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या नियमांचे पालन न करता तो प्रकल्प उभारला तर आमचा विरोध असेल महापालिका आयुक्तांना यासंदर्भात आम्ही निवेदन दिलेले आहे सभागृह नेता गणेश मिटकरी यांना देखील आम्ही यासंदर्भात माहिती दिली आहे ऑन ओबीसी आंदोलन संविधानाच्या अधिकारांतर्गत ओबीसी बंधू आंदोलन करत आहेत 200 आमदारांचे हे सरकार ओबीसींना न्याय देऊ शकत नाही ऑन सीएनजी दरवाढ आणि महागाई आज १ सप्टेंबर ची सकाळ पूजा ऐकली सर्वसामान्य जनतेला महागाईचा फटका बसला पेट्रोल डिझेल सीएनजी आणि भाडेवाढ झालेली आहे महागाई प्रचंड वाढत आहे विरोधक म्हणून ही आमची नैतिक जबाबदारी आहे या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत भाजपाचे मित्र पक्ष महागाई विरोधात आमच्या सोबत आंदोलन करत आहेत कोणालाही न घाबरतात ते रस्त्यावर उतरत आहेत प्रश्न विचारत आहेत आंदोलन करत आहेत त्यांच्या पक्षातले आणि मित्र पक्षातील लोक महागाई विरोधात बोलत आहेत भारतीय जनता पार्टीचे मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आता रस्त्यावर उतरत आहेत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे त्या चौकटीत राहून डीजेच्या संदर्भात निर्णय घेतला पाहिजे सर्वसामान्य पुणेकरांची जी मागणी आहे त्यानुसार हा निर्णय झाला पाहिजे सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांच्या कानावर या संदर्भात प्रतिक्रिया आल्यााच असतील माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसन नेमकं काय म्हणायचं आहे डीजे आहे की नाही महाराष्ट्राला आणि पुण्याला दिशा देण्याचे काम त्यांचा आहे पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीला इतकं मोठं मतदान दिलं तर आता पाण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे ऑन पीएमसी पेपर फुटी हे सरकार आल्यापासून रोजच पेपर फुटत आहेत सरकार नेमकं काय करतोय हेच कळत नाही रोज आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कॉपी केली जाते पेपर फुटला जातो जिल्हा आणि तालुक्यातील पेपर फुटतात राज्य सरकार नेमकं करत काय आहे काही लोक म्हणतात, त्यांच्याच पक्षातील काही लोक पेपर फुटतात असा आरोप दबक्या आवाजात वर्तमानपत्रांमध्ये वाचायला भेटले वृत्तवाहिन्यांवर देखील ही बातमी होती याचे उत्तर मुख्यमंत्री फडणवीसंना द्यावे लागेल मेरीटच्या भरोशावर विद्यार्थी करिअर घडू पाहताय त्याचं पाप सरकार करत आहेत ऑन अमित ठाकरे प्रकरण माझ्यामते सरकारच्या प्रोटोकॉल नुसार पंतप्रधान राष्ट्रपतींचा फोटो लावला जातो भोर मध्ये जेव्हा शेतकऱ्यांनी आंदोलन केलं त्यावेळेस थेट गुन्हे दाखल करण्यात आले अन्नधान्याचा प्रश्न सोडवणाऱ्या शेतकऱ्यांना आंदोलन केलं म्हणून जेलमध्ये टाकले जातात जो राजाला फसवतो चोऱ्या माझ्या करतो त्याच्यावर कुठलेही गुन्हे दाखल केले जात नाही ज्यांच्यावर ईडीसीबीआई कोणी दाखवले त्यांना वाशिम मध्ये टाकून मंत्री करण्याचं काम भाजप करत आहे कष्ट करणारे लढतात त्यांना तुरुंगवारी कोर्ट केसेस दाखल केले जाहते आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने महागाई बेरोजगार आणि भ्रष्टाचार देशात वाढत चालला आहे अन्नधान्याच्या किमती गगनाला भेटले आहेत रिक्षा भाडेवाढ दूध सर्वच महाग झाला है या सरकारने ज्या प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन महाराष्ट्राने देशात यात्रा काढली होती त्या प्रभू श्रीमाच्या मंदिरातील दानपेटीतले कोटी रुपये चोरीला गेली मर्यादा पुरुषोत्तमाच्या मंदिरात मर्यादाच ठेवली नाही रस्त्यांवरील खड्ड्यांची काही परिस्थिती आहे चाकणच्या रस्त्यांवर खड्ड्यांची चाळण झाली आहे याला कोण जबाबदार आहे या सरकारवर या सर्व लोकांच्या हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे पुणे महाराष्ट्रात एक नंबर आणि देशात पाच नंबरला गुन्हेगारी आल्याचं अमित शहा यांच्या डेटानुसार सिद्ध झालेला आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या डेटानुसार पुण्याची क्रमवारी जाहीर झाली आहे पुण्यामध्ये कायदा आणि व्यवस्थेच्या प्रश्न निर्माण झाला आहे पुण्यात दररोज आंदोलन होत आहेत हे सरकारने गांभीर्याने घेतलं पाहिजे पुण्यातील नागरिकांनी तुम्हाला नगरसेवक आमदार खासदार दिले मी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना कधीच पत्र लिहिल्या नव्हते परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पुण्यामध्ये लक्ष घालण्यासाठी आवाहन केले होते मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की सर्व गणेश मंडळांना विश्वासात घेऊन डीजे संदर्भात निर्णय घ्यावा ज्या ज्या मतदारांची नावे एस आय आर मधून वगळले असतील त्यांनी संकेतस्थळावर तसेच मतदार यादीत नाव चेक करून त्या संदर्भात दक्षता घेतली पाहीजेत एक मताची खूप मोठी ताकद आहे बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिला आहे त्याचा जतन करा संवर्धन करा प्रशासनाला आम्ही विनंती करतो की एस आय आर मध्ये पारदर्शकपणे काम करा ओबीसी आरक्षणासंदर्भात सत्ताधाऱ्यांना विचारा मला विचारू नका गणपती मध्ये राजकारण आणि पक्ष आणू नका चर्चेतून डीजे संदर्भात निर्णय घेतला पाहिजे बाळ गंगाधर टिळकांनी समानता आणण्यासाठी गणेशोत्सव सुरू केला होता सत्ताधाऱ्यांनाही जमत नसेल तर सोडून द्या ऑन अजितदादा विमान अपघात मी स्वतः अपडेट घेत नाही उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार सत्तेत आहे मला विश्वास आहे की ते दैनंदिन यासंदर्भात आढावा घेत असतील ऑन आत्महत्या तानाजी सावंत आत्महत्येची चौकशी झाली पाहिजे या संदर्भात मी स्वतः माहिती घेतलेली आहे ऑन मतदारसंघ पुनर्रचना माननीय मुख्यमंत्री भगवान हे असे एका खासदारांनी बोलले मतदार संघाची पुनर्रचना जेव्हा कधी करतो आरक्षण आणि मतदारसंघाचे पुनर्रचना यामध्ये अंतर आहे आमचे राजकीय मतभेद जरूर असतील पण मुख्यमंत्र्यांकडून मलाही अपेक्षा नव्हती काँग्रेसच्या काळात राजीव गांधींचे नेतृत्वाखाली शरद पवार यांनी महिला आरक्षणाचे बिल आणले होते डी लिमिटेशन म्हणजे डी एलिमिनेशन जनगणना कुठलीही झालेली नाही त्यामुळे विधेयक कसं काय पडले असते त्यांचा 50 टक्के पेक्षा जास्तीचा प्रस्तावच नाही त्यामुळे आम्ही पाठिंबा दिला नाही. असा प्रस्तावच आला नाही आहे त्या विधेयकामध्ये आणि 543 जागांमध्येच महिलांना आरक्षण दिले गेले पाहिजे आम्ही पाठिंबा देऊ अजित पवार अपघात संदर्भात मला अधिकारच नाही माझ्या भावाची बायको वहिनी सरकारमध्ये असतील तर ते आढावा घेत असतील त्यांच्याकडे माहिती आली तर माझ्याशी बातमी शेअर करते अद्यापही मला कोणतीही बातमी देत नाही राज्य सरकार चौकशी करतात की नाही एफ वाय आर करण्यासाठी किती त्रास घ्यावा लागला कर्नाटकात जाऊन राहुल गांधींना भेटल्यानंतर एफआयआर झाला आपले राज्यात गुन्हा दाखल का होत नाही विमान अपघाता संदर्भात संसदेत मी प्रश्न विचारले होते ऑन रेकॉर्ड विमान अपघाताच्या संदर्भात चौकशीची मागणी करत असते दादासाठी आम्हाला जिथे न्याय मागायचं तिथे न्याय मागू ज्यांच्या हातात गृहमंत्री पद सत्ता आहे त्या लोकांना तुम्ही प्रश्न विचारा मला प्रश्न विचारू नका दादांना न्याय मिळण्यासाठी सत्ता ही अडचण नाही या संदर्भात मी गोसिप करणार नाही सर्वोच्च व्यासपीठ संशोध आहे त्या संसदेत मी दादाच्या अपघाता संदर्भात मी प्रत्येक सत्रामध्ये ताकदीने प्रश्न मांडते परराष्ट्र धोरण संदर्भात आम्ही कधीही भाष्य करत नाही परदेशात भारताचा पंतप्रधान असतो कुठल्या पक्षाचा प्रधान नसतो ऑन जयंत पाटील अजित पवारांकडून विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली होती हे सत्य आहे या संदर्भात बोलणे त्यांनी टाळले मी या विषयावर दहा वेळा बोलले आहे ऑल मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी सर्व समाजाचे लोक विद्यार्थी महिला सर्वजण रस्त्यावर उतरले आहेत राज्य सरकारने सर्वांना फसवले आहे आदिवासींना फसवले आहे सातत्याने या सरकारने कधीच सातत्याने केलेले नाही
0
0
Report

पुणे में मनसे-भाजपा टकराव, मोदी फोटो हटाने पर मोर्चे की धमकी

Pune, Maharashtra:अमित ठाकरे यांच्यावर तुम्ही गुन्हा दाखल केलात इथपर्यंत ठिक हे पण तुम्ही त्यांना अटक तर करून दाखवा मगा बघा हीच झेंजी उभा महाराष्ट्र कसा पेटवते ते, असा थेट पुणे मनसे नेत्यांनी दिलाय...मोदी फोटो हटवल्याप्रकरणी राञी 2 मनसे कार्यकर्त्यांना उचलताच पुणे मनसेचे पदाधिकारी चतुश्रूंगी पोलीस ठाण्यात जमा झालेत...यासर्वांनी पोलीस अधिकाऱ्यांचीही भेट घेतली...जर तिकडे शिवतीर्थवर भाजप वाले मोर्चा काढत असतील तर आम्हीही इकडे पुण्यात भाजप कार्यालयावर मोर्चा काढू असा थेट इशाराच मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी दिलाय...या सर्वांशी आम्ही केलेली ही बातचीत...
0
0
Report

धर्मस्वतंत्रता के नाम पर लाऊडस्पीकर विवाद: अदालत के फैसलों के बाद विरोध

Pune, Maharashtra:जर नागरिकांचे अर्ज आम्हाला डीजे नको म्हणून आले असतील तर त्यांनी त्यावर कार्यवाही केली पाहिजे आता पर्यंत सरसकट परवानगी वाटत आले परंतु त्याचे भयंकर दुष्परिणाम आहेत हे निविर्वाद सिद्ध झालेला आहे नागरिकांनी या संदर्भात अनेक वेळा तक्रारी केलेले आहेत संपूर्ण परवानग्या नाकारला पाहिजेत मुख्यमंत्र्यांचे कालचे वक्तव्य हे संधीग्ध आहे फडणवीसांचं वर्ष दीड वर्षापूर्वीचा एक वक्तव्य आहे मुंबई लाउड स्पीकर मुक्त झाले आहे सांस्कृतिकचे अनेक अर्थ निघतात मग सुरुवात नेमकी कुठून करायची मशिदीच्या भोंग्या and संदर्भात वाजपेयी यांनी देखील राजधर्म पाळावा असं वक्तव्य केले होते लोकशाहीचे सर्व या संदर्भात जबाबदार आहेत सर्वच धार्मिक शाळांवरचे लाऊड स्पीकर बंद चा न्यायालयाचा निर्णय आहे सरकार असून न्यायपालिका असो किंवा ब्युरोकसी यांनी असा भेदाभेद करणं चुकीचा आहे हा माझा संविधानिक अधिकार आहे राज्यघटनेने धर्म स्वातंत्र्य आणि संचार स्वातंत्र्य दिलेला आहे परंतु या दृष्टीने अंमलबजावणी होत नाही सार्वजिक रित्या साजरी केल्याने केले जाणारे सर्व सणांच्या संदर्भात आमचा आग्रह आहे त्याबद्दल आवाज उठवणे हा आमचा हक्कही आहे आणि कर्तव्य देखील आहे धर्म स्वातंत्र्याच्या नावाखले तुम्ही काही कराल यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टीकरण दिलेले आहे यासंदर्भात आम्ही न्यायालयात जाणार आहोत प्रबोधनात्मक विचार पोहोचवण्यासाठी मी गणेश मंडळांना भेट देऊ शकतो रहदारीच्या रस्त्यांवर मिरवणूक आणि मंडपाचा अडथळा नको ढोल ताशा बंदिस्त सभागृहात वाजवा यासंदर्भात रोज कारवाई झाली नाही तर न्यायालय जाण्यासंदर्भात विचार आहे मला आत्तापर्यंत अनेक फोन कॉल्स आले समर्थन करणारेच कॉल होते मला कुठलीही धमकी आलेली नाही पेठांमध्ये राहणारे बोटचेपे नागरिक काही बोलत नाहीत अन्य सहन करतात त्यामुळे यांचं फावतं ब्युरो कृषी ही गणेश मंडळे आणि राजकीय पक्षांच्या दबावाखाली काम करतात की नाही ही पडद्या मागची बाब आहे त्याबद्दल काही स्पष्ट सांगू शकत नाही पडद्यामागच्या गोष्टीशी आम्हाला देणे घेणे नाही आमच्या हक्कांचे रक्षण व्हावं यासाठी आम्ही संघर्ष करतो
0
0
Report
Advertisement

पुणे महापालिका में अजित पवार का तैलचित्र نصب की तिथि तय, BJP-NCP एक साथ

Pune, Maharashtra:Pune exclusive पुणे मनपातील भाजप-एनसीपीमधला निधी वार अखेर मिटला दोन्ही पक्षांची आज पालिकेत संयुक्त बैठक पार पडली अजित पवार यांच्या पालिकेतील तैलचिञाची जागाही निश्चित झाली दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकञित केली पाहणी!!! भाजपचे सभागृहनेते गणेशा बीडकर पालिकेत बसवणार अजित पवारांचे तैलचिञ...!!! दोन्ही पक्षाचे झी 24 तासवर पहिल्यांदाच एकञ... वरिष्ठांच्या सुचनेनुसारच एकञ आल्याचं दोन्ही पक्ष नेत्यांनी केलं स्पष्ट.... गणेशा बीडकर, सभागृहनेते, भाजप सुनील टिंगरे, माजी आमदार निलेश निकम, विरोधी पक्षनेता, पुणे मनपा चेतन तुपे, आमदार
0
0
Report

एमआयटी पुणे कैंपस में पेपर रिचेकिंग के लिए गए कार्यकर्ताओं पर सुरक्षा कर्मियों की मारपीट

Pune, Maharashtra:पुणे कोथरूडच्या एमआयटी कैम्पस मधे आज पेपर रिचेकिंग साठीचे निवेदन प्रशासनाला द्यायला गेलेल्या काही कार्यकर्त्यांना सुरक्षा रक्षकांनी सोडले नाही म्हणून मारहाणीचा प्रकार घडलाय...याबाबत सुरूवातीला काही मुलांनी परिक्षेत नापास केल्याच्या आरोपातून प्राध्यापकांना मारहाणी झाल्याची अफवा पसरली होती पण तसंही काहीही झालं नसल्यानाच खुलासा संबंधित युवा संघटना आणि एमआयटी प्रशासनाने देखील केलाय...पण झाल्या प्रकाराला संबंधित संघटनााच जबाबदार असल्याचा आरोप एमआयटी प्रशासनाने करत लेखी प्रेसनोटद्वारे निषेध ही नोंदवलाय
0
0
Report

गणेशोत्सव के लिए ठाणे महापालिका ने सभी विभागों से समन्वय बढ़ाने के निर्देश

Thane, Maharashtra:गणेशोत्सवासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; महापौरांचे निर्देश १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी तातडीची बैठक घेत गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. गणेश मंडळांच्या प्रलंबित परवानग्या तातडीने निकाली काढण्यासह रस्ते दुरुस्ती, स्वच्छता, विसर्जन घाटांची सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्थेबाबत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पारसिक विसर्जन घाटावर ट्रॉलींची संख्या वाढविणे, फोर्कलिफ्टची व्यवस्था करणे तसेच सर्व विसर्जन घाटांची नियमित पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले. शाडू मातीच्या गणेशमूर्तींसाठी स्वतंत्र विसर्जन व्यवस्था करण्यासह कृत्रिम तलावांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. रात्रीच्या विसर्जनासाठी दोन शिफ्टमध्ये पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबरोबरच पोलीस, अग्निशमन, स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापन आणि प्रभाग कार्यालयांमध्ये सातत्याने समन्वय ठेवण्यावर महापौरांनी विशेष भर दिला.
0
0
Report
Advertisement

कोल्हापूर महापौर के बीच वृक्ष प्राधिकरण बैठक में तीखी तकरार, समर्थक भिड़े

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण बैठकीत पुन्हा एकदा महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. सत्तेत एकत्र असूनही शिवसेनेचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये शाब्दिक वाद उफाळून आया. एकमेकाला बघून घेण्याची भाषा आणि खाली चौकात चल तुला दाखवतो अस म्हणत थेट बैठकीत शड्डू ठोकत दोन प्रमुख नेत्यांनी एकमेकाला आव्हान दिले. यामुळे महानगरपालिकेत तणाव निर्माण झाला होता. आज कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये वृक्ष प्राधिकरण संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या शेवटच्या सत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आदिल फरास हे वृक्षतोड संदर्भात प्रस्ताव ठेवला होता. त्या प्रस्तावाला शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी विरोध दर्शविला. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद निर्माण झाला.. हा वाद कार्यकर्त्यांना कळताच दोघांचेही कार्यकर्ते मोठ्या संख्येने कोल्हापूर महानगरपालिकेत दाखल झाले.. महानगरपालिकेतील तणाव अधिक वाढला. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला, तरी देखील काही कार्यकर्ते त्याच ठिकाणी थांबून होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर रूपाराणी निकम यांनी पोलिसांना सूचना देऊन दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पांगवण्याची विनंती केली, त्यानंतर त्यांनी गटनेते शारंगधर देशमुख आणि आदिल फरास या दोघांची भेट घेऊन वाद थांबवण्याची विनंती केली, यानंतर दोघांनाही महानगरपालिकेतून कार्यकर्त्यांना घेऊन बाहेर जाण्याची विनंती केली. त्यानंतर दोघेही आपापल्या कार्यकर्त्यांसोबत निघून गेले, यावर प्रतिक्रिया देत असताना कोल्हापूरच्या महापौर रूपाराणी निकम यांनी घरातील भांडण आहेत घरातच मिटली आहेत अशी प्रतिक्रिया दिली.
0
0
Report

तुर्भे MIDC में FDA ने बड़ी कार्रवाई, 4,942 कार्टन खाद्य पदार्थ जप्त; लाइसेंस रद्द

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी परिसरातील साधना एंटरप्राइज या कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केलेय. कंपनीवर छापा टाकून 75 लाख 21 हजार रुपये किंमतीचा तब्बल 4 हजार 942 कार्टन माल जप्तण्यात आलाय. तपासणीदरम्यान सुमारे 30 हजार रुपयांचा माल विनालेबल तसेच एक्सपायरी डेट संपलेला आढळून आलाय. या प्रकरणी साधना एंटरप्राइजचे मालक आणि भागीदारांविरोधात तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कंपनीचा परवानाही रद्द करण्यात आलाय. अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईदरम्यान कंपनीत मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थांचे रिपॅकिंग आणि लेबलिंग करून त्यामध्ये फेरफार केला जात असल्याचे समोर आलेय. खाद्यपदार्थांवरील मूळ उत्पादन तारीख आणि एक्सपायरी डेट बदलून नवीन तारखे टाकल्या जात होती, तसेच पॅकेटवरील घटकांची माहितीही बदलली जात असल्याच समोर आलेय. अशा प्रकारे पॅकेजिंगमध्ये फेरफार केल्यानंतर हे खाद्यपदार्थ पुन्हा बाजारात पुरवले जावत असल्याचे तपासात आढळून आले आहे. कारवाई दरम्यान बटाटा चिप्स, कॉर्न स्नॅक्स, कुरकुरे, इन्स्टंट नूडल्स, रेडी-टू-ईट पनीर टिक्का, दम आलू, रसोई पनीर भुर्जी, रसोई दाल मखनी, मयोनीज तसेच थम्सअप यांसारखी शीतपेये आढळून आली. या वेळी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.
0
0
Report
Advertisement

संजय राऊत पर तक्रार: स्थानीय स्तर पर बहस तेज, नेताओं का निशाना बढ़ा

Nagpur, Maharashtra:नागपूर बाईट - नरेंद्र भोंडेकर, आमदार शिवसेना On संजय राऊत तक्रार - - मी अद्याप तक्रार बघितली नाही. स्थानिक लेवलवर काही लोकांनी तक्रार दिल्याचं आमच्या लक्षात आलंय.. संजय राऊत यांना काहीं काम नाही म्हणून हे काम सुरू झाल्याचं दिसत.. - *व्यक्तिगत संस्थेविरुद्ध तक्रार करणे संजय राऊत यांना शोभत नाही. संजय राऊत यांनी तक्रार केल्यावरून ते आता दिल्लीचे राष्ट्रीय नेते राहिले नाही असे दिसते..* - संजय राऊत हे राष्ट्रीय मुद्दे घेऊन मोठ्या नेत्यांवर टीका करतात.असं म्हणत होते..मात्र आता ते गल्लीवर येऊ लागले आहे. यावरून त्यांचा स्वतःचा स्तर किती खाली उतरत चालला आहे दिसत आहे. - सत्ताधारी विरोधात विरोधक तक्रार करत असतात..आणि तक्रार करून रडत बसणे हे संजय राऊत यांन शोभतं.. - संजय राऊत यांनी तक्रारच योग्य केली नाही. आम्ही उभारलेली जागा ही खाजगी आहे..तिथे एका गुंठा सरकारी जागा नाही. त्यामुळे तपासणी केली तरी अडचण नाही.
0
0
Report

मराठी-हिंदी भाषाई संघर्ष: मनसे-कन्नड वेदिका ने नया मंच बना दिया

Kolhapur, Maharashtra:हिंदी भाषेच्या वाढत्या प्रभावाला विरोध करून भारतीय प्रादेशिक भाषांच्या हक्कांसाठी लढा उभारण्याचा निर्णय नवनिर्माण सेना आणि कन्नड रक्षण वेदिके एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळतंय. कर्नाटकात मनसे नेते संदीप देशपांडे, मनसे सरचिटणीस योगेश परुळेकर आणि कन्नड रक्षण वेदिकेचे प्रदेशाध्यक्ष टी. ए. नारायण गौडा यांच्यात बैठक झाली. या बैठकीत भारतीय भाषांच्या हक्कांसाठी ‘इंडियन लँग्वेजेस फोरम’ स्थापन करण्याचा निर्णय झाला. भारतीय भाषांच्या संरक्षणासाठी 10 कलमी ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’ तयार करण्याचाही निर्णय झालाय. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दिल्लीत या फोरमचं महाअधिवेशन घेण्यात येणार असून, महाराष्ट्र, कर्नाटकासह दक्षिण भारत आणि देशातील विविध राज्यांतील भाषिक प्रतिनिधींना सहभागी करून घेण्याची तयारी आहे. म्हणजेच हिंदीच्या विरोधात प्रादेशिक भाषांना एकत्र आणण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. पण याच मनसेने सीमा भागात असणाऱ्या मराठी भाषिकांच्या जखमेवर नेहमी मीठ चोळणाऱ्या कन्नड रक्षण वेदिकेच्या नेत्यांना भेटण्याचे टाळायला हवं होत अशी भूमिका सीमा बांधवांनी व्यक्त केली आहे. इतकाच नव्हे तर कन्नड रक्षण वेदिकेाच्या गौडाला मनसे नेते भेटल्यामुळे सीमाभागात संताप व्यक्त होतोय. कारण बेळगावसह सीमाभाग मराठी भाषिकांना साहाय्याने मराठी भाषिकांनीच लढा दिला आहे. अशा परिस्थितीत मराठी भाषिकांच्या विरोधात सतत भूमिका घेणाऱ्या कन्नड रक्षण वेदिकेच्या नेत्यासोबत मनसेने बैठक घेतली असल्याचा सवाल आता महाराष्ट्र एकीकरण समितीकडून उपस्थित केला जातोय. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी मनसेवर जोरदार टीका केलीय. सीमाभागातील मराठी भाषा आणि संस्कृती संपवण्याच्या प्रयत्नांमध्ये कन्नड रक्षण वेदिकेची भूमिका राहिली असल्याचा आरोप त्यांनी केलाय. अशा संघटनेच्या प्रमुखाची भेट घेऊन मनसेने सीमावासीयांच्या जखमेवर मीठ चोळण्यं केलंय असा आरोप त्यांनी केलाय. एकीकडे हिंदी भाषेच्या कथित आक्रमणाविरोधात कन्नड रक्षण वेदिकेसोबत संयुक्त लढ्याचा रोडमॅप आखला जातोय. तर दुसरीकडे सीमाभाग महाराष्ट्रात यावा, यासाठी 70 वर्षांपासून सुरू असलेल्या मराठी भाषिकांच्या संघर्षाकडे मनसेने दुर्लक्ष केलंय. यामुळे सीमाभागात मनसेविरोधात आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आलाय. हिंदी भाषेच्या विरोधात प्रादेशिक भाषांना एकत्र आणण्याचा मनसेचा प्रयत्न, पण त्याचवेळी गेल्या सात दशकांपासून सीमा भागात महाराष्ट्रात यावा यासाठी लढणाऱ्या मराठी भाषिकांच्या भावनांचा विचार का केला गेला नाही? असा सवाल आता सीमाभागातून उपस्थित होतोय.
0
0
Report
Advertisement

मराठा समाज को न्याय दिलाने के सरकार के प्रयास पर महायुती मंत्री का बयान

Nagpur, Maharashtra:नागपूर बाईट - आशिष जयस्वाल, राज्यमंत्री *ऑन मनोज जरांगे टीका महायुती नेते* - महाराष्ट्राची संस्कृती आहे. राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आंदोलन करणं आणि सरकारने त्याला नियमित प्रतिसाद देणं, ही महाराष्ट्राची परंपरा आहे. मराठा समाजाला प्रत्येक विषयावर न्याय देण्याचा प्रयत्न महायुती सरकार करीत आहे. - सरकारने सकारात्मक भूमिका घेतली. मात्र, आरोप करणे हे जनसामान्यांमध्यील प्रतिमा खराब करणारे आहे. मराठा समाजाला न्याय देण्याचा सरकारने प्रयत्न केला. सरकारनेही सकारात्मक प्रतिसाद दिला. स्वतःची प्रतिमा मनोज जरांगे आता स्वतःच खराब करीत आहेत. *ऑन डॉक्टर आत्महत्या* - या संदर्भात कायदा आपले काम करेल. याप्रकरणी मी काहीही वक्तव्य करणार नाही. *ऑन मनोज जरांगे* - दुःख एकाच बाबीचे वाटते. महायुतीच्या शासनाने यापूर्वी कधी न मिळालेला न्याय मराठा समाजाला देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच सरकारच्या विरोधात वक्तव्य करणे आणि सातत्याने मराठा समाजावर अन्याय करणाऱ्या लोकांच्या सोबत राहून वक्तव्य करणे, हे चुकीचे आहे.
0
0
Report

मनसे ने नारायण गौड़ा से मुलाकात से सीमांत क्षेत्र में मराठी-कन्नड़ तनाव बढ़ा

Kolhapur, Maharashtra:मनसे नेत्यांनी कन्नड रक्षण वेदिकेच्या नारायण गौडा यांची भेट घेतल्याने सीमाभागातील मराठी भाषिक संतप्त झालेत. मराठी भाषिकांच्या विरोधात सातत्याने भूमिका घेणाऱ्या कन्नड रक्षण वेदिकेचे प्रमुख नारायण गौडा यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी भेट घेतल्याने सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मराठी बांधवांच्या विरोधात नेहमी गरळ ओकणाऱ्या नारायण गौड़ा यांची मनसे नेत्यांनी भेट घेतलीच कशी?, असा सवाल महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी उपस्थित केला आहे. नारायण गौडा यांची भेट घेऊन मनसे नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्रथम रक्त सांडणाऱ्या हुतात्म्यांचा अपमान केला असल्याचा आरोपही शेळके यांनी केला. मनसेने सीमाभागातील मराठी बांधवांच्या ७० वर्षांच्या संघर्षाचा अपमान केला, अशी टीका देखील शुभम शेळके यांनी केली आहे. सीमाभागातील मराठी भाषा आणि संस्कृती संपवण्याच्या प्रयत्नांमध्ये कन्नड रक्षण वेदिकेची प्रमुख भूमिका असल्याचा आरोप करत, अशा संघटनेच्या नेत्याची मनसेने घेतलीली भेट सीमावासीयांच्या जखमेवर मीठ चोळणारी असल्याचे शेळके म्हणाले. यापूर्वी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सीमाप्रश्नाबाबत सीमावासीयांच्या भावनांच्या विरोधात भूमिका मांडल्याचा दावा शेळके यांनी केला आहे, त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विरोधात सीमावासीय लढा उभारतील, असा इशारा महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी दिला आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top