icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Oct 2024, 05:25 am

माझी उमेदवारी मदन येरावारांना पाडण्यासाठीच, माजी आमदार संदीप बाजोरीयांचा दावा.

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून तुतारी चिन्हावरच आपण लढु असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत तिकीट वाटपाआधीच त्यांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार देखील सुरू केला आहे. भाजप आमदार मदन येरावार यांनी मतदारसंघ बकाल करून ठेवला, रस्त्यांची दैना झाली, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून भयमुक्त वातावरण देऊ असे वचन आपण जनतेला देत असल्याचे संदीप बाजोरिया यांनी सांगितले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

GMRT के पास मार्ग बदलने से पुणे-नाशिक रेल्वे पर आक्रोश, किसान-नेता सड़क पर

Nashik, Maharashtra:पुणे आणि नाशिक या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित सेमी हायस्पीड रेल्वेच्या मार्गावरून आता संघर्ष पेटला आहे. पुणे–नाशिक रेल्वेमार्ग बदलण्याचा निर्णय झाल्यामुळे सर्वपक्षीय नेते आक्रमक झाले आहेत.. आज जुन्नर तालुक्यांसह संगमनेर आणि सिन्नर परिसरात नाशिक पुणे महामार्ग अडवल्याने महामार्ग जवळपास दोन ते तीन तास ठप्प झाला होता.. - पुणे आणि नाशिक या दोन औद्योगिक शहरांना जोडणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प... पुणे–चाकण–राजगुरुनगर–मंचर–नारायणगाव–आळेफाटा–संगमनेर–सिन्नर–नाशिक अशी धावणार होती. या मार्गामुळे उत्तर पुणे जिल्ह्यासह संगमनेर आणि सिन्नर परिसराच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, मार्गातील नारायणगाव नजीक असणाऱ्या GMRTच्या संवेदनशील वैज्ञानिक उपकरणांवर रेल्वे मार्गाचा परिणाम होण्याची शक्यता असल्याने मार्ग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी मूळ मार्ग रद्द करून पर्यायी मार्गाचा निर्णय जाहीर केला. नव्याने जाहीर करण्यात आलेला पर्यायी मार्ग पुणे–अहिल्यानगर–शिर्डी– नाशिक असा करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या निर्णयामुळे चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर आणि सिन्नर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उचलली असून राजकारणी नेत्यांसह शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत... आमच्या संगमनेरची समृद्धी तुम्ही घेऊ शकत नाही.. आमच्या हक्काची रेल्वे कोणाला घेऊ देणार नाही.. थोरात साहेबांच्या काळात मंजूर झालेला मार्ग सगळ्या त्यावेळी मान्य होता..अनेक शेतकऱ्यांना जागेचे पैसे देखील वाटण्यात आले..त्यावेळी GMRT ची परवानगी घेतली असेल ना ? पण आता वेळखाऊपणा सुरू आहे त्या विरोधात आपला लढा... सत्यजीत ला ताब्यात घेतलं असले तरी आम्ही स्वातंत्र्य सैनिकांच्या घरातील ही विसरू नका अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांनी दिलीये... सत्यजीत तांबे यांना पोलिसांनी ताब्यात घेत सिन्नर पोलीस ठाण्यात घेऊन गेले... बाईट आंदोलक.. नाशिकच्या सिन्नर येथील गोंदे फाटा येथे देखील नाशिक पुणे रेल्वे सुरू करण्यासाठी रस्ता रोको करण्यात आला यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे देखील पाहायला मिळालं ज्यावेळी आंदोलन करतांना पोलीस ताब्यात घेत होते त्यावेळी सत्यजित तांबे यांना पोलिसांनी ताब्यात घेत सिन्नर पोलीस ठाण्यात घेऊन गेले... यावेळी अनेक आंदोलकांनी पोलीस वाहना अडवण्याचा प्रयत्न केला काही आंदोलकांनी पोलीस वाहनावर चढण्याचा देखील प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी बाळाचा वापर करत या सगळ्या आंदोलकांना पोलीस वाहनापासून बाजूला केलं.. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली... बाईट आंदोलक.. नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा विचार आपल्यासमोर मांडला गेला GMRT बाबत अभ्यासासाठी अनिल काकोडकर यांच्या नेतृत्वात समितीची स्थापना केलीये... सरकार मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील असताना आंदोलन करण्यात अर्थ नाही. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा चक्काजाम आंदोलनावरून निशाणा साधला... विनाकारण एखाद्या प्रश्नाचे राजकारण करण्याची आवश्यकता नाही.. आंदोलनाचा फार्स करण्याअपेक्षा समितीचा अहवाल आल्यावर निर्णय घेऊ... पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया दिलीये... नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पाच्या ठरलेल्या मार्गात कोणताही बदल करू नये, तसेच प्रकल्पाबाबत केवळ तांत्रिक बाबींचा विचार न करता जनभावनेचाही विचार करावा, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे. नाशिक-पुणे रेल्वेसाठी नागरिक आणि तरुण रस्त्यावर उतरले असून, या आंदोलनामागे राजकीय हेतू नसल्याचे तांबे यांनी स्पष्ट केले. नाशिक-पुणे रेल्वेसाठी २२ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रश्न मांडण्यात आला होता. त्यानंतर यासंदर्भात समिती नेमण्यात आली. या समितीला कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देऊ नये, अशी मागणी तांबे यांनी केली. नाशिक-पुणे रेल्वेसाठी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. भूसंपादनाची प्रक्रिया झाली असून, शेतकऱ्यांना ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम देण्यात आल्याचा दावा तांबे यांनी केला. त्यामुळे आता अचानक JMRD चे कारण पुढे आले असल्याबद्दल त्यांनी सवाल उपस्थित केला."लाईन ठरली, कोण करणार हे ठरले, भूसंपादन झाले, पैसे दिले. आता JMRD चे कारण पुढे आले आहे. वरातीमागून घोडे आणल्यासारखी परिस्थिती आहे," अशी टीका सत्यजित तांबे यांनी केली.दरम्यान, नाशिक-पुणे रेल्वेसाठी नागरिकांना त्रास देणे हा आंदोलनाचा हेतू नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शासनाच्या माध्यमातून आपल्याला लेखी आश्वासन देण्यात आल्याचे तांबे यांनी सांगितले. तसेच गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्याचेही त्यांनी नमूद केले.समृद्धी महामार्गाच्या प्रश्नावरही आंदोलन झाले होते, याचा दाखला देत जनभावना महत्त्वाची असल्याचे तांबे यांनी सांगितले. फक्त तांत्रिक कारणांचा विचार करू नये. जनभावनेचाही विचार झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
0
0
Report

नाशिक में विश्व आदिवासी दिवस पर भव्य शोभायात्रा, हजारों आदिवासी आकर्षक पोशाकों में

Nashik, Maharashtra:नाशिक ब्रेकिंग... - नाशिकमध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य शोभायात्रा... - आदिवासी समाजातील पारंपारिक नृत्य वाद्यांवर ताल धरत शोभायात्रा ... - जागतिक आदिवासी दिनानिमित्त सभा यात्रेमध्ये हजारो आदिवासी बांधव सहभागी ... - आदिवासी पोशाख परिधान करून हातात तीर कामानं घेत अनेक आदिवासी बांधव शोभा यात्रेत सहभागी... अँकर : नाशिकमध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त नाशिक मध्ये आज आदिवासी बांधवांकडून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते हजारो आदिवासी बांधव पारंपारिक वेशभूषेमध्ये तीर कमान घेऊन या शोभायात्रेत सहभागी झाले होते यावेळी आदिवासी समाजातील विविध रितीपरंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडले दरम्यान या शोभायात्रेत आदिवासी बांधवांची पारंपारिक वाद्य आणि नृत्यदेखील बघायला मिळाले याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी सागर गायकवाड यांनी...
0
0
Report

यवतमाल उमरी के स्मारक पर क्रांती दिन पर ध्वजारोहण, शहीदों को सम्मान

Yavatmal, Maharashtra:क्रांती दिनानिमित्त यवतमाळच्या उमरी येथील ऐतिहासिक हुतात्मा स्मारकावर पालकमंत्री संजय राठोड यांचे उपस्थितीत स्वातंत्र्यलढ्यातील वीरांना अभिवादन करण्यात आले. 1942 च्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये देशासाठी प्राणाहुती देऊन हौतात्म्य पत्कारणाऱ्या यशवंत पाळेकर यांच्यासह स्वातंत्र्य संग्रामात शहीद झालेल्या सेनानींच्या स्मृतिप्रीत्यर्थ उमरी येथे हुतात्मा स्मारक उभारण्यात आले. क्रांती दिननिमित्त पालकमंत्र्यांनी येथे ध्वजारोहण केले. यावेळी शहीद कुटुंबियांच्या पाल्यांचा सन्मान करण्यात आला. वृक्षारोपण व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील अनेकांनी हौतात्म्य पत्करले. त्यांच्या आणि अज्ञात हुतात्म्यांच्या स्मृती कायमस्वरुपी जपल्या जाव्या अशी भावना पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केली.
0
0
Report
Advertisement

तूकाराम मुंढे के बयान पर नागपुर में सावजी समुदाय में बवाल

Nagpur, Maharashtra:नागपूर तुकाराम मुंढे यांच्या सावजीच्या विधानावरून चांगलाच वाद निर्माण झालाय. मात्र या वादावर तुकाराम मुंडे यांनी टू द पॉईंट या मुलाखतीत रोखठोक भाष्य केले. तुकाराम मुंडे हे त्यांच्या विधानावर ठाम आहेत. माझ्या संदर्भात हे वक्तव्य केलं.. सावजी जेवण ओईली, solti हे फॅट आहे असं वक्तव्या त्यांनी केल्या. तसेच मी कोणत्याही कल्चर आणि कम्युनिटी बाबत बोललेलं नाही फूड हॅबिट संदर्भात विधान होतं असं स्पष्टीकरण मुंडे यांनी दिले. त्यानंतर या या मुलाखतीनंतर नागपुरातील सावजी,हलबा समाजाने दिलेली प्रतिक्रिया सावजी -- (राजेंद्र नांदेकर चौपाल मधील पहिला बाईट ) -- टू द पॉईंट पहायले -- मुंढे साहेबांनी सॉल्टी म्हणाले... मीठ म्हटले तर खाऊ शकाल का? --- सावजी हा चवीचा विषय आहे --- सावजी ही चव, पारंपारिक पद्धतीने बनवण्यात येते ( निकेश वाकोडिकर चौकटीचा शर्ट ) - मुंढे साहेबांच्या वक्तव्यामुळे सावजी व्यवसायिकांवर मोठं संकट आलेय.. त्यांनी क्षमा मागावी -- आमच्याकडे एकच ग्राहक अनेकदा येतो त्यांनी सावजी जेवण खाल्लं असतं आणि तब्येत बिघडली असती तर तर आले असते का ते? (राजेंद्र नांदेकर) -- जर ठाम आहे... मात्र त्यांनी निर्माण केलेल्या वादा नंतर सावजी खवय्ये येतात.. आमच्या सावजी मसाल्यामध्ये आयुर्वेदिक पदार्थ असतात आणि पारंपारिक पद्धतीने बनवण्यात येतो -- तुम्ही एखाद्या गृहिणीकडे जाऊन त्यांची मुलाखत घ्या... मसाल्यामध्ये लवंग मिरे आणि इतर 26 गोष्टी असतात -- शरीराला अ‍ॅपायकारक असं अजिनोमोटो सारखे पदार्थ नसतात --- मूळ सावजी व्यतिरिक्तही अनेक जण सावजी नावाने व्यवसाय चालवतात... तिथे कदाचित मुंढे साहेब गेले असावे -- त्यांच्या मित्रांनी त्यांना सावजी आवडते म्हणूनच घेऊन गेले असावे... त्यांनी त्यांच्या मित्राला विचारावे की तुम्हाला असा तुमहाला अनुभव आला का? -- मुंढेनी य आमच्याकडे येऊन पारंपारिक पद्धतीने बनवलेल्या सावजीचा आस्वाद घ्यावा... --- आमच्याकडे या झी24तास च्या माध्यमातून मी त्यांना निमंत्रण देतो
0
0
Report

कोल्हापुर में Lingayat समुदाय का उग्र प्रदर्शन, अल्पसंख्यक दर्जा और स्वायत्त महामंडल की मांग

Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरमध्ये आज लिंगायत समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक आंदोलन करण्यात येत आहे… जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लिंगायत समाजाच्या वतीने आंदोलनाला सुरुवात झाली आहे… लिंगायत समाजाला अल्पसंख्यांक समाजाचा दर्जा द्यावा, तसंच महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला स्वायत्त दर्जा द्यावा, यासह विविध मागण्या आंदोलकांकडून करण्यात येत आहेत… विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर असतानाच हे आंदोलन करण्यात आले आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष द्यावं, अशी मागणी लिंगायत समाजाच्या आंदोलकांनी केली आहे…या आंदोलनाचा आढावा घेऊन आंदोलकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.
0
0
Report

फडणविस आज कोल्हापुर में विकास कार्यों का उद्घाटन करेंगे

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरातील विविध विकास कामांचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले जाणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, मंत्री शंभूराज देसाई उपस्थित राहणार आहेत. सांगली जिल्ह्यातील कार्यक्रम आटोपल्यानंतर मुख्यमंत्री कोल्हापूरात दाखल होणार आहेत. दुपारी 2 वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस कर्मचाऱ्यांच्या अपार्टमेंटचे उद्घाटन केले जाणार आहे, त्यानंतर दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी मुख्यमंत्री छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयाच्या नव्या सेवांचे लोकार्पण करणार आहेत. तर दुपारी 3 वाजता संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे, त्यानंतर दुपारी 3 वाजता कोल्हापुरातील प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे. कोल्हापुरातील कार्यक्रम आटोपल्यानंतर मुख्यमंत्री कागल मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करणार आहेत.
0
0
Report
Advertisement

कोल्हापुर के संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह का लोकार्पण आज मुख्यमंत्री फडणवीस के हाथों

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचे काम पूर्ण झाला असून आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा पार पडत आहे. दोन वर्षांपूर्वी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागून मोठं नुकसान झालं होतं. या आगीमध्ये संपूर्ण थेटर जळून खाक झाला होता. पण कोल्हापूरकर रंगकर्मी यांच्या पाठपुराव्यामुळे या नाट्यगृहाची पुनर्बांधणी दिमाखात करण्यात आली. याच नाट्यगृहाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.
0
0
Report
Advertisement

नाशिक- पुणे रेल्वे मार्ग पर चक्का-जाम; सत्यजीत तांबे का आंदोलन तेज

Shirdi, Maharashtra:नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी आज चक्काजाम आंदोलन..चाकण पासून सिन्नर पर्यंत केला जाणार चक्काजाम..नाशिक पदवीधर आमदार सत्यजीत तांबे यांच्या पुढाकाराने आयोजित आंदोलनात अनेक नेत्यांचा समावेश..नारायणगाव मधील GMRT चे कारण देत रद्द केलेला मार्ग पूर्ववत करण्याची मागणी..जुन्नर तालुक्यात खासदार अमोल कोल्हे, संगमनेर हिवरगाव पावसा टोल नाक्यावर बाळासाहेब थोरात तर सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा येथील समृद्धी महामार्गावर सत्यजीत तांबे करणार आंदोलनाचे नेतृत्व..नाशिक पुणे महामार्ग वाहतुकीवर आज मोठा परिणाम होण्याची शक्यता..विशेष म्हणजे याच मार्गासाठी महायुती सरकारने दोन दिवसापूर्वी ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या नेतृत्वात समिती स्थापन केली असून GMRT बाबत समितीचा अहवाल घेतला जाणार आहे
0
0
Report
Advertisement

नागपुर रेलवे स्टेशन पर 3.09 करोड़ रुपये मूल्य का सोना जब्त

Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपूर रेल्वे स्थानकावर ३ कोटी ९ लाख रुपयांचं सोने जप्त. DRIची (डायरेक्टर ऑफ रेवेन्यू इंटेलिजन्सची) कारवाई - भारत-बांगलादेश सीमेवरून तस्करी करून आणलेलं सोने रेल्वे मार्गाने पुढे पाठवलं जाणार असल्याची गुप्त माहिती डीआरआयला मिळाली होती - माहितीच्या आधारे १२१०२ ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला नागपूर स्थानकावर ताब्यात घेतलं - प्रवाशाकडून तब्बल २ किलो १६५ ग्रॅम वजनाचे १६ सोन्याचे बार जप्त केले ..सोन्याची अंदाजे किंमत ३ कोटी ९ लाख रुपये. - सोन्याच्या बारवरील ओळख दर्शवणाऱ्या खुणा पुसण्यात आल्याचं तपासात समोर, चौकशी सुरू - डीआरआयकडून जप्त सोन्याचा स्रोत आणि हे सोने नेमकं कुठे पोहोचवलं जाणार होतं, याचा तपास सुरू
0
0
Report

16 वर्षीय अल्पवयस्क मुंबई फिल्म सिटी में काम पाने के इरादे से पहुँचा, हिरासत में

Mumbai, Maharashtra:*फिल्म सिटीमध्ये मालिकेत काम करण्याच्या इच्छेने आलेला १६ वर्षीय मुलगा पोलिसांच्या ताब्यात; आरे पोलिसांनी कुटुंबीयांशी साधला संपर्क* मुंबईतील फिल्म सिटीमध्ये मालिकेत काम करण्याच्या इच्छेने मध्य प्रदेशातून आलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला आरे पोलिसांनी सुरक्षित ताब्यात घेतले आहे. उत्तर नियंत्रण कक्षाकडून फिल्म सिटी परिसरात एक बेवारस मुलगा फिरत असल्याची माहिती आरे पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर आरे पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि मुलाला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. चौकशीदरम्यान मुलाने आपले नाव पारस रतिराम वर्मा, वय १६ वर्षे, असे सांगितले. तो मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील रहिवासी आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेत काम करण्याची इच्छा असल्याने तो मुंबईत आल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मुलाने दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑगस्ट रोजी तो घरातून शाळेेत जात असल्याचे सांगून निघाला. त्यानंतर छिंदवाडा येथून ट्रेनने नागपूर आणि तेथून मुंबईकडे रवाना झाला. ७ ऑगस्ट रोजी सकाळी मुंबईत पोहोचल्यानंतर लोकलने गोरेगाव स्थानक गाठले आणि तेथून पायी फिल्म सिटीमध्ये पोहोचला. पोलिसांनी मुलाकडून त्याच्या वडिलांचा मोबाईल क्रमांक घेऊन संपर्क साधला. मुलगा घरातून निघून गेल्याची माहिती वडिलांनी दिली असून, ते मुंबईत त्याला घेण्यासाठी येत आहेत. तोपर्यंत मुलाला आरे पोलीस ठाण्यात सुरक्षित ठेवण्यात आले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top