icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Oct 2024, 05:25 am

माझी उमेदवारी मदन येरावारांना पाडण्यासाठीच, माजी आमदार संदीप बाजोरीयांचा दावा.

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून तुतारी चिन्हावरच आपण लढु असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत तिकीट वाटपाआधीच त्यांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार देखील सुरू केला आहे. भाजप आमदार मदन येरावार यांनी मतदारसंघ बकाल करून ठेवला, रस्त्यांची दैना झाली, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून भयमुक्त वातावरण देऊ असे वचन आपण जनतेला देत असल्याचे संदीप बाजोरिया यांनी सांगितले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

बेलापूर में पिसाले हुए कुत्तों के हमलों से 70 वर्षीय महिला समेत कई घायल—हाइल्प्रीक खबर

Shirdi, Maharashtra:श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस... पिसाळलेल्या कुत्र्याने केला 15 ते 20 जणांवर हल्ला... पिसाळलेल्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद.... कुत्र्याने चेहऱ्याचा लचका तोडल्यामुळे 70 वर्षीय महिला गंभीर जखमी... जखमींमध्ये लहान मुलांसह युवक आणि महिलांचाही समावेश.. हल्ल्यातील जखमींवर अहिल्यानगर, श्रीरामपूर आणि शिर्डी येथील रुग्णालयात उपचार सुरू... जखमींमध्ये 70 वर्षीय वृद्ध महिलेसह 14 वर्षीय साई मगर ,25 वर्षीय साक्ष गोरे ,15 वर्षीय मतीन काझी , 32 वर्षीय सागर जोशी , 54 वर्षीय शारदा रेनिवाल , सविता साबळे यांचा समावेश.... बेलापूर गावातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा , नागरिकांची मागणी.. एवढी गंभीर घटना होऊन देखील प्रशासनाची डोळेझाक...
0
0
Report

जरांगे ने उपोषण स्थगित किया, मराठा आरक्षण पर सरकार ने आश्वासन दिया

Jalna, Maharashtra:बिड | उपोषण सुटलं,आंदोलन सुरूच राहणार | पॅकेज अँकर | गेल्या 19 दिवसांपासून सुरु असलेलं मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सोडवण्यात अखेर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाला यश आलंय.जरांगे यांचं उपोषण सोडवण्यात यश आलं असलं तरीही आंदोलन सुरूच ठेवण्याची घोषणा जरांगे यांनी केलीय.बघूया जरांगे यांच्या उपोषणावरचा हा स्पेशल रिपोर्ट. व्हिओ :०२:मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर होणाऱ्या नियोजित आमरण उपोषणाला परवानगी नाकारून देखील मुंबईत जाऊन उपोषण करण्याच्या इराद्यावर ठाम असलेल्या मनोज जरांगेंचं आमरण उपोषण अखेर सुटलंय.जरांगे यांचं उपोषण सोडवण्यासाठी बिड जिल्ह्यातील पाटोदा येथे आज भल्या पहाटे शिष्टमंडळ येऊन धडकलं. या शिष्टमंडळात मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील,मंत्री दादा भुसे,आमदार प्रसाद लाड आणि आमदार सुरेश धस यांचा समावेश होता.सातारा,कोल्हापूर, औंध आणि पुणे गॅझेटीयरचे जीआर काढा.न्या.शिंदे समितीने शोधलेल्या 58 लाख नोंदी कमी करू नये.हैद्राबाद गॅझेटमध्ये दुरुस्ती करण्यात यावी.हैद्राबाद गॅझेटनुसार कुणबी नोंदी आढळून आलेल्यांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी SOP जाहीर करण्यात यावी.आणि मराठवाड्यातील 4 लोकप्रतिनिधीचे रद्द करण्यात आलेले जात प्रमाणपत्र वैध करण्यात यावे या मागण्या जरांगे यांनी केल्या होत्या.या मागण्यांबाबत शिष्टमंडळाने जरांगे यांना ड्राफ्ट देत सातारा आणि कोल्हापूर गॅझेटीयरचा जीआर काढण्यासाठी अहवाल बोलावण्यात आला आहे.3 ते 4 महिन्यांत अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.न्या.शिंदे समितीने शोधलेल्या 58 लाख नोंदी कमी होणार नाहीत.हैद्राबाद गॅझेटीयरच्या जीआर नुसार कुणबी जात प्रमाणपत्र वाटप केले जाईल. व्हॅलीडीटी देण्यासाठी SOP जाहीर करण्यात येईल.असं आश्वासन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं.आणि 20 व्या दिवशी जरांगे यांनी शिष्टमंडळाच्या हातून पाणी पिऊन उपोषण सोडलं बाईट : मनोज जरांगे साऊंड बाईट : राधाकृष्ण विखे पाटील साऊंड बाईट : प्रसाद लाड आमदार साऊंड बाईट: दादा भुसे मंत्री व्हिओ :०२:राज्य सरकार मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सकारात्मक असल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केल्यानंतर जरांगे यांनी उपस्थित मराठा आंदोलकांना उपोषण सोडू का अशी विचारणा करत 20 व्या दिवशी उपोषण स्थगित केलं.मात्र मराठा आरक्षणासाठी सुरू असलेला हा शेवटचा लढा असल्याचं सांगत उपोषण स्थगित केलं असलं तरी आंदोलन सुरूच राहणार असल्याचं म्हटलंय. बाईट : मनोज जरांगे व्हिओ :०३:दरम्यान 90 दिवसात सातारा,कोल्हापूर संस्थानच्या गॅझेटीयरचा जीआर काढा.अन्यथा 90 दिवसांनी उपोषण न करताच मुंबईत आंदोलन करण्याचा ईशारा जरांगे यांनी दिलाय. बाईट : मनोज जरांगे व्हिओ:०४:दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील,दादा भुसे , प्रसाद लाड यांच्या हातून पाणी पिऊन जरांगे यांनी उपोषण स्थगित केलं.त्यामुळे विखे यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचं आश्वासन दिलं. बाईट :राधाकृष्ण विखे पाटील व्हिओ:०५:जरांगे यांनी ऐन गणेशोत्सवात मुंबईत जाऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे पोलिसांनी जरांगे यांच्या उपोषणाला परवानगी नाकारल्यानं जरांगे यांनी सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.मात्र आता जरांगे यांनी उपोषण स्थगित झाल्यानं मुंबईतला गणेशोत्सव आनंदात पार पडणार हे नक्की
0
0
Report

यवतमाळ में महायुति सरकार पर SC/ST निधि हेरफेर का आरोप; वंचित बहुजन ने विरोध

Yavatmal, Maharashtra:राज्यातील महायुतीचे सरकार हे मागासवर्गीयांच्या विरोधातील असून, अनुसूचित जाती, जमातीच्या हक्काच्या निधीवर डल्ला मारत आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. यवतमाळ मध्ये विदर्भातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा निषेध नोंदविण्यात आला. हे मंत्री ज्या समाज घटकातून आले, त्या समाजाच्या विकासासाठी चा निधी पळविल्या जात असतानाही मुख्यमंत्र्यांची कठपुतली बनुन काम करीत आहेत. त्यामुळेच अनुसूचित जाती घटकातून ३५९४.०३ व अनुसूचित जमाती घटकातून १००७.१० कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळविला आहे. या मुद्द्यावर मंत्र्यांना ते जिथे फिरतील तिथे जाब विचारला जाईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते नीरज वाघमारे यांनी सरकारला दिला आहे.
0
0
Report
Advertisement

राजापेठ में पुरी धाम जैसी प्रतिकृति, नवनीत राणा ने ढोल बजाकर जताया जलसा

Amravati, Maharashtra:जगन्नाथ पुरी धाम मंडळाचा देखाव्याच्या उद्घाटनावेळी नवनीत राणांचा ढोल पथकासोबत जल्लोष; स्वतः ढोल वाजवत केला जल्लोष अमरावतीच्या गणेशोत्सवाला लाभलेल्या ऐतिहासिक आणि भव्य परंपरेत राजापेठ येथील शहीद भगतसिंग गणेशोत्सव मंडळाने यंदा आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. तब्बल 77 वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या या मंडळाने यंदा ओडिशातील प्रसिद्ध जगन्नाथ पुरी धाम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. मंदिराची भव्य वास्तुकला, बारकाईने केलेली कलाकुसर, आकर्षक सजावट आणि आधुनिक विद्युत रोषणाईमुळे अमरावतीकरांना शहरातच पुरी धामच्या दर्शनाचा अनुभव मिळतोय. या भव्य देखाव्याचे उद्घाटन भाजपा नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते करण्यात झाले. उद्घाटनावेळी समोर सुरू असलेल्या ढोल पथकाचा उत्साह पाहून नवनीत राणांनाही ढोल वाजवण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी ढोल वाजवत जल्लोषात सहभाग घेतला. देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असून राजापेठ परिसराला जत्रेचे स्वरूप आले आहे.
0
0
Report

इंदापुर गणेशोत्सव में तुकाराम मुंडे की कार्रवाई पर विद्यार्थियों ने भेषळमुक्त भारत पाठ पढ़े

Rui, Maharashtra:इंदापुर में गणेश उत्सव के दौरान तुकाराम मुंडे की कार्रवाई की चर्चा रहती है। इंदापुर के लाखेवाड़ी स्थित जय भवानी गड संस्थान में गणेशोत्सव के अवसर पर विद्यार्थियों को शालेय शिक्षा के साथ शुद्ध भोजन और भेसळ-रहित भारत बनाने के पाठ दिए गए। विविध पर्चों के जरिये भेसळ युक्त भोजन और शुद्ध भोजन के बीच अंतर समझाया गया। दैनिक आहार में मैगी, पिज़्ज़ा, बर्गर, कोका-कोला आदि से बचकर हरी पत्तेदार सब्जियाँ और फलों का सेवन करने को कहा गया। भेसळ-रहित भारत बनाने का संदेश भी सुनाया गया।
0
0
Report

बुलढाणा दुष्काळ सूची से बाहर; किसानों का भारी प्रदर्शन

Buldhana, Maharashtra:बुलढाणा जिल्हा दुष्काळाच्या यादीतून वगळल्याने शेतकऱ्यांचा संताप आता रस्त्यावर आला आहे! मेहकर तहसील कार्यालयात संभाजी ब्रिगेडच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलं. अनेक शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आणि प्रशासनाला धारेवर धरलं. पावसाअभावी पिकांचं मोठं नुकसान होवत असताना बुलढाणा जिल्ह्याला दुष्काळाच्या यादीतून वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्ह्याचा तातडीने दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा, शेतकऱ्यांना हेक्टरी किमान पन्नास हजार रुपयांचं अनुदान द्या, तसेच दुष्काळातील सर्व सवलती लागू करा, अशी मागणी करण्यात आली. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देत तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं.
0
0
Report
Advertisement

लोनार सरोवर के जलस्तर बढ़ने से मंदिर डूबे, नवरात्रि से पहले आंदोलन की चेतावनी

Buldhana, Maharashtra:लोणार सरोवराच्या वाढत्या पाणीपातळीने चिंता वाढली! कमळजा माता मंदिरासह प्राचीन मंदिरे पाण्याखाली; नवरात्रापूर्वी पाणी काढण्याची मागणी एक वर्षात पाणी कमी करण्याचे आश्वासन हवेतच? सरोवराचा pH आणि क्षारांचे गुणधर्म बदलल्याने जैवविविधतेला धोका! पाणीपातळी अशीच वाढत राहिल्यास मानव-वन्यजीव संघर्षाची भीती जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या वाढत्या पाणीपातळीने आता गंभीर संकट निर्माण झालंय! सरोवराचं पाणी सातत्याने वाढत असून, वाढलेल्या पाण्यामुळे कमळजा माता मंदिरासह परिसरातील काही प्राचीन मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. विशेष म्हणजे, मागील वर्षी संबंधित विभागाने एका वर्षाच्या आत सरोवरातील पाणी कमी करून दाखवू, असं आश्वासन दिलं होतं. मात्र वर्ष उलटलं तरी प्रत्यक्षात पाणी काढण्याचं काम सुरू झालेलं नाही. दरम्यान, पाण्याची पातळी आणि रासायनिक गुणधर्मांमध्ये होणारे बदल लोणारच्या वैशिष्ट्यपूर्ण अल्कधर्मी जैवविविधतेसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. पाण्यामुळे जंगल क्षेत्र कमी झाल्यास वन्यप्राणी मानवी वस्तीकडे येण्याची शक्यताही व्यक्त केली जाते. आता नवरात्र उत्सव तोंडावर आला आहे. कमळजा माता मंदिर हे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असल्याने पाणी कमी न झाल्यास विविध संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिलाय.
0
0
Report
Advertisement

योगेश कदम: दापोली अणुऊर्जा परियोजना पर जनता की राय ही मेरा फैसला

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जनतेचा कौल असेल तोच माझा निर्णय; दापोलीत निसर्गाला हानी पोहोचवणारा प्रकल्प खपवून घेणार नाही — मंत्री योगेश कदम.. अँकर दापोलीत होऊ घातलेल्या अणुऊर्जा प्रकल्प बाबत बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी.. प्रकल्पाबाबत पूर्ण माहिती घेऊन ती जनतेपर्यंत पोहोचवली जाईल; त्यानंतर ग्रामस्थ आणि मतदार जो निर्णय घेतील, तोच माझा निर्णय असेल..असं म्हटलंय.. कोकणाचे नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरणाला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही प्रकल्पाला समर्थन दिले जाणार नाही.. दापोली परिसरातील विकासाची संभाव्य संधी पाहता स्थानिकांनी आपल्या जमिनी परप्रांतीय किंवा बाहेरच्या लोकांना विकू नयेत.. केवळ दिखाऊ कामे न करता रस्ते, पाणी, धरणे आणि दळणवळणाच्या माध्यमातून मतदारसंघाचा शाश्वत आर्थिक विकास साधणार.. याआधी मंत्री योगेश कदम यांनी आपल्या मतदारसंघातील दापोलीत अणुऊर्जा प्रकल्प होणार असं सांगितलं होतं.. आता आपल्याच मतदारसंघातील जनतेचा विरोध पाहून योगेश कदम यांनी यूटर्न मारलाय.. अणुऊर्जा प्रकल्पाबाबत दापोलीतील नागरिकांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या स्थानिक ग्रामदेवतेला प्रकल्प होऊ नये याबाबत साकडं घातलं होतं.. Bt योगेश कदम.. गृहराज्यमंत्री
0
0
Report

एमपीएससी के सुधार रोडमैप से भर्ती प्रणाली में पारदर्शिता और सुरक्षा बढ़ेगी

Nagpur, Maharashtra:*एमपीएससीच्या बळकटीकरणाची निश्चितच गरज आहे... त्यांच्याकडू. काही चुका निश्चितच झाल्या असतील, मात्र यापूर्वी त्यांनी परीक्षा योग्य रीत्या घेऊनही दाखवल्या आहे... आताच्या प्रकरणात कोण दोषी, याची चौकशी एसआयटी करेल....* परीक्षा पद्धतीत सुधारणासाठी राज्य सरकारने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीच्या प्रमुख वी राधा यांचे वक्तव्य.. एमपीएससीबद्दल उमेदवारांच्या मनात निश्चितच विश्वासाची कमतरता निर्माण झाली आहे... मात्र, संस्थेचे बळकटीकरण करून आणि परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करू, असे मत परीक्षा पद्धतीत सुधारणा सुचवण्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या प्रमुख आणि सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी व्यक्त केले आहे... एमपीएससीचा आकृतीबंध वाढवून अधिक कर्मचारी आणि आवश्यक संसाधने उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच, एमपीएससीच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी शासनाकडून रोडमॅप तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. * एमपीएससीचा आकृतीबंध वाढवून अधिक कर्मचारी देण्याची गरज. * एमपीएससीची स्वतःची इमारत तयार होत असून, संस्थेला सुरक्षित आणि आवश्यक संसाधने देणे गरजेचे. * यूपीएससीदेखील परीक्षा आयोजित करते; त्यामुळे परीक्षा यंत्रणेच्या कार्यपद्धतीचा विचार आवश्यक. * निवडणूक आयोग जिल्हाधिकाऱ्यांच्या यंत्रणेच्या मदतीने निवडणुका घेतो; * त्याचप्रमाणे एमपीएससीला प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात स्वतंत्र कर्मचारी असणे आवश्यक नाही.. * एमपीएससी ही घटनात्मक संस्था असून, यापूर्वीही तिने व्यवस्थित काम करून दाखवले आहे. * परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी शासन एमपीएससीला रोडमॅप देणार. * एमपीएससीमधील कथित गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र एसआयटी स्थापन. * भ्रष्ट कारभाराबाबत झिरो टॉलरन्स असायला हवे; दोषींवर कारवाई होणे आवश्यक. * परीक्षा पद्धतीतील सुधारणा आणि दोषींवरील कारवाई या दोन स्वतंत्र बाबी आहेत. Byte - व्ही राधा, परीक्षा पद्धतीत सुधारण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या प्रमुख आणि राज्य सरकारच्या अप्पर मुख्य सचिव
0
0
Report

वासिम के खरोळा गांव में एक एकड़ से इरानी अकरकरा, लाखों रुपये की आय की उम्मीद

Washim, Maharashtra:अँकर:सोयाबीन शेती अडचणीत असताना वाशीमच्या खरोळा गावातील युवा शेतकऱ्याने औषधी वनस्पतीच्या शेतीचा अनोखा प्रयोग केला आहे. विष्णू ठाकरे यांनी एक एकरात ‘इराणी अकरकरा’ची लागवड केली असून, या पिकातून दोन ते तीन लाख रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. व्हीओ:विष्णू ठाकरे यांनी जुलै महिन्यात एक एकर क्षेत्रात अकरकराची लागवड केली. अकरकराच्या फुलांना औषधनिर्मिती उद्योगात मागणी असल्याने बाजारपेठेत चांगला दर मिळत आहे.सध्या फुलांची तोडणी सुरू असून, फुले सुकवून मध्य प्रदेशातील नीमच बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवली जात आहेत. एक एकरातून ९ ते १० क्विंटल उत्पादन अपेक्षित असून, सध्या २५ ते ३० हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याचं शेतकरी सांगतात. त्यामुळे खर्च वजा जाता दोन ते तीन लाख रुपयांचं उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. एन्ड व्हीओ:विशेष म्हणजे अकरकरासाठी फवारणी आणि मशागतीचा खर्च तुलनेने कमी असल्याचं सांगितलं जात आहे.खरोळ्यातील आणखी दोन शेतकऱ्यांनीही या पिकाची लागवड केली आहे.सोयाबीनला पर्याय शोधणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नवा पर्याय ठरत आहे. बाईट: विष्णू ठाकरे, प्रयोगशील शेतकरी
0
0
Report
Advertisement

भिवंडी में पूर्व विधायक नरेंद्र पवार और पुलिसकर्मी पर सामूहिक बलात्कार का मामला सामने

Kalyan, Maharashtra:सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदार नरेंद्र पवार व बडतर्फ पोलिस यांनी पीडित मुलीवर केला सामूहिक बलात्कार पिस्तूल दाखवत दोघांनी केला बलात्कार भिवंडी पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कल्याण शहरात मदत करण्याच्या बहाण्याने pिडीत तरुणीस आपल्या कार्यालयात बोलावून तिला भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्या प्रकरणी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार व बडतर्फ पोलिस कर्मचारी शैलेश पाटील यांच्या विरोधात पडघा पोलिस ठाण्यात गुरुवारी पहाटे शस्त्राचा धाक दाखवून दारू पाजून सामूहिक शारीरिक अत्याचार केल्या प्रकरणी पिडीत तरुणीने दिलेल्या तक्रारी वरून पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत तरुणी पिडीत तरुणीने माझ्या इंस्टाग्राम अकाऊंड वरील मोबाईल वर संपर्क साधून मदत मागितली.मी तिला भेटले असता तिने जी घृणास्पद हकीकत सांगितली ती ऐकून माझ्या पायाखालची जमीन हादरली.तिच्या जवळील व्हिडिओ व मोबाईल चॅट बघितल्यानंतर मी तत्काळ पिडीत तरुणीला घेऊन रात्री पडघा पोलिस ठाण्यात दाखल झाले.पोलिस महासंचालक सदानंद दाते यांना रात्री संपर्क केल्यानंतर त्यांनी पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या.पडघा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज गिर यांनी रात्री उशिरा सर्व खातरजमा करून शस्त्राचा धाक दाखवून सामूहिक अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.परंतु ही घटना अत्यंत निंदनीय काळिमा फासणारी असून देशात आणि राज्यात लाडकी बहीण म्हणून डांगोरा पिटणाऱ्या भाजपचा माजी आमदार अशा पद्धतीने कृत्य करीत असेल तर त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे.तर शैलेश पाटील हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर परदेशी महिलेवर अत्याचार केल्या प्रकरणी तर स्वतःच्या आईला शस्त्राचा धाक दाखवून तिच्या नावे असलेली जमीन आपल्या नावे करून बळकावली प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.त्यामुळे या दोन्ही आरोपींना कठोर शिक्षा व्हावी.यांना ४८ तासात अटक न झाल्यास हजारो महिलांना सोबत घेऊन पडघा पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन करू असा इशारा काँग्रेस नगरसेविका गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी दिला आहे. पिडीत तरुणी
0
0
Report

दौंड के रेकॉर्ड आरोपी दत्ता शिंदे पर दो साल का तडीपार

Rui, Maharashtra:दौंड तालुक्यातील राहू येथील रेकॉर्डवरील सराईत आरोपी दत्ता अशोक शिंदे याच्यावर यवत पोलिसांकडून तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. दत्ता शिंदे याच्यावर विविध गंभीर स्वरूपाचे 19 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कायदा और सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी त्याला दोन वर्षांसाठी पुणे जिल्हा, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडसह अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत आणि श्रीगोंदा तालुक्याच्या हद्दीतून तडीपार करण्यात आलं आहे. उपविभागीय अधिकारी दौंड उपविभाग यांच्या आदेशानुसार यवत पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
0
0
Report

कळंबा जेल में अधिकारी पर हमला, छह बंदीयों की धमकी से तनाव

Kolhapur, Maharashtra:कळंबा काराग्रहातील अधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला आहे. कारागृहातील मोका प्रकरणातील सहा न्यायाधीन बंदी यांनी एकत्र येत तू लय नियमाने वागतोस शांत रहा नाहीतर आम्ही बाहेर गेल्यावर बघून घेऊ अशी धमकी देत कळंबा कारागृहातील तुरुंगाधिकारी प्रकाश चव्हाण यांच्यावर दगडाने हल्ला चढविला. प्रकाश चव्हाण हे अधिकारी या हल्ल्यात जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी न्यायाधीन बंदी यांच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी आशुतोष वर्तले, विनायक चौगुले, आदम सय्यद, भारत शेट्टी आणि शाहिद सगळ्यात विरोधात वेगवेगळ्या शहरात गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top