icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Oct 2024, 05:25 am

माझी उमेदवारी मदन येरावारांना पाडण्यासाठीच, माजी आमदार संदीप बाजोरीयांचा दावा.

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून तुतारी चिन्हावरच आपण लढु असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत तिकीट वाटपाआधीच त्यांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार देखील सुरू केला आहे. भाजप आमदार मदन येरावार यांनी मतदारसंघ बकाल करून ठेवला, रस्त्यांची दैना झाली, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून भयमुक्त वातावरण देऊ असे वचन आपण जनतेला देत असल्याचे संदीप बाजोरिया यांनी सांगितले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

यवतमाल वणी में डब्ल्यूसीएल के रवैये से कोयला खदानों में हड़कंप, ट्रक रोके गए

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी क्षेत्रात डब्ल्यू.सी.एल. च्या मनमानी कारभारामुळे कोळसा खान परिसरातील अनेक ग्रामस्थांचे जीव धोक्यात असल्याचा आरोप भाजपाचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केला आहे. भाजप नेते विजय पिदुरकर यांनी मुंगोली, कोलगाव आणि पैनगंगा कोळसा खाणीची कोळसा वाहतूक एक दिवसासाठी रोखून आंदोलन सुरू केले, शंभरहून अधिक कोळसा वाहतूक करणारे ट्रक थांबल्याने कोळसा खाणीतील कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प पडले. या कोळसा वाहतुकीमुळे कोलगांव चेकपोस्ट ते कोलगांव फाट्यापर्यंत प्रमुख जिल्हा मार्ग पूर्णतः उखडलेला आहे. त्यामुळे नागरिकांना येथून जीव धक्यात घालून ये जा करावी लागते, शाळेच्या बस इथून येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. कोलगांव फाटा ते भिमनगर मुंगोली रस्ता वेकोली ने नियमबाह्य परावर्तीत केला आहे. डब्लू सी एल चे अधिकारी मुजोरपणे वागत असल्याने तीन दिवसात रस्ता न बनविल्यास कोळसा वाहतूक पुन्हा रोखू असा इशारा भाजपचे विजय पिदुरकर यांनी दिला.
0
0
Report

यवला तालुक़े में पानी आपूर्ति योजना का स्टॉक घट, 38 गांव संकट में

Yeola, Maharashtra:दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवला तालुक्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून संजीवनी ठरलेल्या येवला तालुक्यातील 38 गाव पाणीपुरवठा योजनेच्या तलावातील पाण्याच्या पातळी मोठी घट झाली असून सध्या केवळ 11 एमसीएफटी पाणी शिल्लक राहिले आहे उपलब्ध साठा पाहता हा पाणीसाठा 15 ऑगस्टपर्यंतच पुरेल अशी माहिती देण्यात आली असून या पाणीपुरवठा योजनेद्वारे 54 गावे आणि 13 विविध संस्थांना पाणीपुरवठा केला जात असून सुमारे 1 लाख 25 हजार ग्रामस्थांची तहान या योजनेवर अवलंबून असल्याने उपलब्ध पाणीसाठा मर्यादित असल्याने पालखेड डाव्या कालव्यातून पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने आवर्तन सोडावे, अशी मागणी येत्या काही दिवसांत जोरदार केली जाऊ शकते
0
0
Report
Advertisement

नाशिक के यहवला में मोर ने फसलों पर हमला कर किसानों को आर्थिक नुकसान पहुंचाया

Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात शेतकरी दुहेरी संकटाचा सामना करत आहेत. राजापूर, ममदापूर, कोळम और भारम परिसरात चांगल्या पावसानंतर म्का, सोयाबीन और मूगाची पेरणी करण्यात आली. पिके चांगली उगवली असतानाच राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांनी शेतांवर धाड टाकली आहे. मोरांकडून कोवळे कोंब खाल्ले जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. दुसरीकडे, बियाण्यांवर केलेल्या रासायनिक प्रक्रियेेमुळे हे कोंब खाल्ल्यानंतर मोरांच्या जीवितालाही धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी आणि वन्यजीव संरक्षण या दोन्हींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या संदर्भात शेतकरीांच्या बांधावरून आढावा घेतला आहे
0
0
Report

अकोला में नीलगाय की बढ़ते आक्रमण से किसान परेशान, मुआवजे की मांग तेज

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात आधीच बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांमुळे अनेक ठिकाणी पिकांची उगवण न झाल्याने शेतकरी दुबार पेरणीच्या संकटाचा सामना करत आहेत. त्यातच आता नीलगाईंच्या वाढत्या वावरामुळे उगवलेल्या पिकांवरही मोठा धोका निर्माण झाला आहे. तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव परिसरासह अकोट तालुक्यात नीलगाईंचे कळप शेतात घुसून सोयाबीनसह इतर पिकांची नासधूस करत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पिकांचे संरक्षण करण्यासाठी रात्रभर शेतात पहारा द्यावा लागत असून शेतकऱ्यांची मोठी कसरत सुरू आहे. वनविभागाने तातडीने पाहणी करून नीलगाईंचा बंदोबस्त करावा, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. अन्यथा उरलेली पिकेही नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अकोला जिल्ह्यात सोयाबीन उगवणीच्या संकटानंतर नीलगाईंच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांपुढे दुहेरी संकट उभे राहिल्याचे चित्र आहे.
0
0
Report

जालना: दो बायोटेक कंपनियों पर किसानों को धोखा देकर बोगस बीज बेचने का मामला

Akola, Maharashtra:शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे दावे करून बोगस व निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांची विक्री केल्याप्रकरणी जालना जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या कंपन्यांवर अकोल्यातील एमआयडीसी आणि सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये जालन्यातील बूस्टर प्लॅंट जेनेटिक्स प्रा. लि. आणि मध्यप्रदेशातील रवी सिड्स या कंपन्यांचा समावेश आहे.संबंधित कंपन्यांच्या बियाण्यांची उगवण क्षमता अत्यंत कमी असल्याच्या तक्रारी शेतकऱ्‍यांनी कृषी विभागाकडे केल्या होत्या , अकोला कृषी विभागाकडे 1 हजारावर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी सर्वप्रथम शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या 11 बियाणे कंपन्यांवर कारवाईची सभागृहात मागणी केली होती.जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सतीशकुमार प्रभाकर दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी अधिकाऱ्यांनी बियाण्यांचे नमुने अधिकृत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. या तपासणीत बियाण्यांची गुणवत्ता निर्धारित निकषांनुसार नसल्याचे स्पष्ट झाले. बियाण्यांच्या पाकिटांवर केलेले दावे खोटे आणि बियाणे नियमांचे उल्लंघन करून शेतकऱ्यांची दिशाभূল करणारे असल्याचे अहवालात सिद्ध झाले आहे. याप्रकरणी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन्ही कंपन्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. ऐन पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
0
0
Report
Advertisement

वाशीम में नकली बीजों से किसान परेशान, मदद की तात्कालिक मांग

Washim, Maharashtra:वाशीम: खरिप हंगामातील 80 टक्के पेरण्या पूर्ण झाल्यानंतर आता बोगस बियाण्याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनची उगवण न झाल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत असून बियाणे, खत, मशागत आणि मजुरीचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे. या प्रकरणी आतापर्यंत 35 शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्या असून विभागाकडून पडताळणी व बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. बोगस बियाणे विक्रेत्यांवर कठोर कारवाई करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
0
0
Report

यशवंतपुर-बिकानेर एक्सप्रेस पर डकैती, महिलाओं समेत कई यात्री मारहाण

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - यशवंतपुर - बिकानेर एक्सप्रेस रेल्वे गाडीवर पडला दरोडा, दरोडेखोरांकडून महिलांसह अनेक प्रवाशांना मारहाण - यशवंतपुर - बिकानेर एक्सप्रेस वर पडला सशस्त्र दरोडा - महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील अक्कलकोट तालुक्यातील तडवळ रेल्वे स्थानकावर थांबलेल्या एक्सप्रेसवर दरोडा - अज्ञात पाच ते सहा दरोडेखोरांनी रेल्वेत घुसून महिलांसह प्रवाशांना केली मारहाण - प्रवाशांकडील रोख रक्कम, मोबाईल आणि सोन्याची दागिने लुटल्याची धक्कादायक माहिती समोर - सदरच्या घटनेला विरोध करणाऱ्या प्रवाशांवर दरोडेखोरांकडून दगडफेक - यशवंतपुर बिकानेर एक्सप्रेस पहाटे तीनच्या सुमारास 74 मिनिटे तडवळ रेल्वे स्थानकावर थांबलेल्या घटना - लोहमार्ग पोलिसांसह फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल आरोपींचा शोध सुरू
0
0
Report
Advertisement

मालशेज पुलिस मदत केंद्र के डॉ. संजय घुडे को मुंबई विश्वविद्यालय से पीएचडी मिलने पर सम्मान

Shirur, Maharashtra:महामार्ग पोलीस मदत केंद्र माळशेज येथे कार्यरत असलेले पोलीस अंमलदार डॉ. संजय घुडे यांना मुंबई विद्यापीठाकडून पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मुरबाड येथे आयोजित कार्यक्रमात त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. 'मातृत्व सन्मान व विद्यार्थी गुणगौरव' या कार्यक्रमाचे आयोजन सिडकोचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्या वतीने करण्यात आले होते. पोलीस दलात कार्यरत राहून डॉ. घुडे यांनी मिळवलेल्या या शैक्षणिक यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
0
0
Report

छत्रपती संभाजीनगर में स्वच्छता के लिए नगर निगम ने 29 विशेष दस्ते तैनात

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ANC : छत्रपती संभाजीनगर शहर स्वच्छ, सुंदर और कचरामुक्त करनेासाठी महानगरपालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरात उघड्यावर कचरा टाकणे, दुकानांसमोर घाण पसरविणे आणि सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर आता कडक कारवाई केली जात आहे. मनपा आयुक्त अमोल येडगे स्वतः रस्त्यावर उतरून अचानक पाहणी करत असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत आहेत. घनकचरा व्यवस्थापन विभागाने यासाठी तब्बल २९ विशेष पथके तैनात केली असून ही पथके शहरभर अचानक तपासणी करत आहेत. गेल्या दोन दिवसांत नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून एक लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आले असून, शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.
0
0
Report

राजुरा के किसानों ने निकृष्ट सोयाबीन बीजों के कारण भारी आक्रोश जताया; अधिकारीयों को पेड़ पर लटकाने की चेतावनी

Amravati, Maharashtra:निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यामुळे राजुरा येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. महालोक कंपनीच्या सोयाबीन, इतर कंपन्यांच्या बियाण्यांची पेरणी करून 10-11 दिवस उलटूनही उगवण न झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर महालोक कंपनीचे अधिकारी शेतात दाखल झाले. या पाहणीदरम्यान भूषण काळे यांनी संताप व्यक्त करत कंपनीच्या अधिकाऱ्यांना कठोर शब्दांत इशारा दिला. मी कंपनीला सोडणार नाही; वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा अन्यथा शेतातच झाडावर लटकवण्याचा इशारा समोरासमोर दिला. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले.
0
0
Report
Advertisement

गोंडिया: सखी वन स्टॉप सेंटर की तेज कार्रवाई से दो महिलाएं सुरक्षित घर पहुंचीं

Bhandara, Maharashtra:गोंडिया से सखी वन स्टॉप सेंटर की संवेदनशील और जलद कार्यवाही के कारण बिहार और भुसावल से पिछले एक महीने से गुम दो महिलाएं सुरक्षित अपने घर पहुंचीं। जिला़ा महिला व बालविकास विभागांतर्गत के.टी.एस. अस्पताल में कार्यरत इस केंद्र ने यह जिम्मेदारी निभाई। बिहार के nalanda जिल्हे की 40 वर्षीय रिंकू देवी राजकुमार साव, दूसरी महिला भुसावल जिले की रेखा तुकडिदास राठोड थीं। वे मानसिक रूप से अस्वस्थ थीं और जानकारी न दे पाने के कारण पुलिस ने उन्हें सुरक्षा के दृष्टि से सखी वन स्टॉप सेंटर में दाखिल किया। सेंटर के समुपदेशकों ने दोनों से संवाद कर उनकी पूरी जानकारी ली। उन्होंने दी गई जानकारी के आधार पर केंद्र के कर्मचाऱियों ने उनके परिवार वालों का खोजकर संपर्क किया। परिवार ने बताया कि वे पिछले एक महीने से महिलाओं की तलाश कर रहे थे। दोनों महिलाओं के परिवार गोंडिया में दाखिल थे। उन्हें लेकर गए……
0
0
Report

पालकमंत्री शंभूराज देसाई ने पालखी तयारी की समीक्षा; प्रशासन को कडक निर्देश

Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी लोणंद येथील संत ज्ञानेश्वर माऊली पालखी तळाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासकीय तयारीचा आढावा घेतला. आगामी १५ जुलै रोजी माऊलींच्या पालखीचे जिल्ह्यात आगमन होत असून, वारकऱ्यांच्या सुविधेसाठी पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि विजेचे चोख नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी पाऊस पडण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने पर्यायी निवासाची व्यवस्था करावी, तसेच गर्दीत हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी पोलिसांना दिले. या पाहणी दौऱ्याप्रसंगी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाईट: पालकमंत्री शंभूराजे देसाई
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top