445001
माझी उमेदवारी मदन येरावारांना पाडण्यासाठीच, माजी आमदार संदीप बाजोरीयांचा दावा.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून तुतारी चिन्हावरच आपण लढु असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत तिकीट वाटपाआधीच त्यांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार देखील सुरू केला आहे. भाजप आमदार मदन येरावार यांनी मतदारसंघ बकाल करून ठेवला, रस्त्यांची दैना झाली, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून भयमुक्त वातावरण देऊ असे वचन आपण जनतेला देत असल्याचे संदीप बाजोरिया यांनी सांगितले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
कोकण में गौरी पूजन की धूम: रातभर जागरण और तिखट नैवेद्य का उत्सव
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. गौराईच्या पाहुणचाराचा उत्साह शिगेला; आज तिखटाचा सण आणि रात्रभर जागर!.. गौराई आगमनानंतर माहेरवाशीण गौराईच्या पाहुणचाराचा उत्साह राज्यभरात पाहायला मिळत आहे.. आज गौरीपूजनानिमित्त गोडधोडासह कोकणातील परंपरेनुसार तिखटाचा खास नैवेद्य अर्पण केला जात आहे.. फुगड्या,पारंपरिक गाणी आणि लोककलांच्या साथीने आज रात्रभर आराधनेचा जागर रंगणार असून,पाच दिवसांच्या गणपती विसर्जनासोबतच लाडक्या गौऱाईला भावपूर्ण निरोप दिला जाईल..0
0
Report
नागपूर के भोसला महल में 298 वर्ष पुरानी महालक्ष्मी पूजा जारी
Nagpur, Maharashtra:नागपूरच्या ऐतिहासिक भोसला पॅलेस येथे नागपूरकर भोसले घराण्याच्या वतीने यंदाही पारंपरिक महालक्ष्मी अर्थात गौरी पूजन उत्साहात पार पडत आहे. या पूजनाला तब्बल २९८ वर्षांची ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा लाभली आहे. इ.स. 1728 मध्ये रघुजी भोसले प्रथम यांच्या काळापासून राजघराण्यात गणेशोत्सव आणि महालक्ष्मी पूजनाची परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते. अनेक पिढ्या बदलल्या, काळ बदलला; मात्र भोसले घराण्याची ही धार्मिक परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे. नागपूर भोसले घराण्याचे वंशज मुधोजी राजे भोसले यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी....0
0
Report
अहिल्यानगर में बारिश कम, 575 गांवों तक पानी टैंकर से पहुँचा रहा है
Ahilyanagar, Maharashtra:अर्ध्यापेक्षा ज्यास्त पावसाळा सरला तरी राज्यातील मोठ्या भागात म्हणावा असा पाऊस पडलेला नाही खरिपाची पीक तर सुकली आहेतच पिण्याच्या पाणीसाठी देखील वणवण फिरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. भर पावसाळ्यात शासनाला टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे. यात अहिल्यानगर जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक 113 टँकरच्या माध्यमातून 575 गावांना पाणीपुरवठा केला जात आहे...परतीचा पाऊस जोरदार झाला नाही तर आगामी काळात ट्रांकरची संख्या वाढणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिण भागात यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाला आहे. जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत होणाऱ्या सरासरी पावसाच्या केवळ 45 टक्के इतका पावस झाला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यामध्ये जिल्ह्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे सध्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 113 टँकरच्या माध्यमातून 575 गाव वाड्यावर पाणीपुरवठा केला जात आहे टँकरद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा देखील तुटपुंजा ठरत आहे महिलांना घागर भर पाण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागत आहे गावात येणारा टँकर विहिरीत सोडला जातो आणि नंतर विहिरीतून पाणी शेंदून ग्रामस्थांना घरी न्यावं लागतं यासाठी वेळ आणि कष्ट लागतात. जिल्ह्याच्या पूर्व उत्तर भागामध्ये असलेल्या तालुक्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे त्यामुळे जिल्ह्यात असलेल्या धरणांची परिस्थिती चांगली दिसते मात्र दक्षिण भागातील तालुक्यात अत्यंत कमी पाऊस झाल्याने परिस्थिती बिकट आहे. शेवगाव आणि पाथर्डी या दोन तालुक्यांमध्ये 59 टँकरच्या माध्यमातून 331 गाव वाड्यावर त्यांना पाणीपुरवठा केला जात आहे जिल्हा प्रशासनाकडून पाण्याचे स्रोत आरक्षित केले जात असून अवैध पाणी उपसा करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. यावर्षी आतापर्यंत पावसाळ्याने शेतकऱ्याची घोर निराशा केली आहे खरिपाचे पीक शेवटच्या घटका मोजत आहे तर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची भटकंती सुरू झाली आहे शेवटच्या टप्प्यात पावसाने कृपादृष्टी दाखवली नाही तर जिल्ह्यावर घोंगवणार दुष्काळाच संकट अधिक घट्ट होणार आहे.0
0
Report
Advertisement
चिमूर में कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार के नेतृत्व में किसान-महिला-विद्यार्थी मोर्चा
Chandrapur, Maharashtra:टायटल: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चिमूर येथे तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा अँकर:- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात आज शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. पंचायत समिती येथून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात विजय वडेट्टीवार यांच्यासह त्यांची कन्या शिवानी वडेट्टीवार ही सहभागी झाल्या होत्या. मोर्चाच्या माध्यमातून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांना उध्वस्त करू नका, भूलथापा देऊ नका, शेतकऱ्यांची कर्ज माफी कुठ आहे, किती लोकांना कर्जमाफी झाली. कोणता माणूस कर्जातून मुक्त झाला असा सवाल वडेट्टीवार यांनी सरकारला विचारला. हा मोर्चा आमची कर्जमाफी पूर्ण करा नाहीतर खुर्ची खाली करा हा इशारा देण्यासाठी मोर्चा असल्याचं वडेट्टीवार म्हणाले.0
0
Report
तटकोकण में गणेशोत्सव: ओवसा परंपरा आज भी महिलाओं के हाथों सजती दिखी
Oras Bk., Maharashtra:गणेशोत्सवाच्या काळात तळकोकणात विविध परंपरा आणि रूढींचे दर्शन होत असते. अशीच एक पिढ्यानपिढ्या जपली जाणारी परंपरा म्हणजे ओवसा मानवण्याची परंपरा. तळकोकणात गोरीपूजनाच्या दिवशी ओवसा मानवण्याची प्रथा आहे. आजही सवाष्ण स्त्रिया ही परंपरा जपत आहेत. जंगलातील काही वनस्पतीची फुले पाने फळे आदि घेऊन हा ओवसा सजविला जातो. मानाच्या गौरी आणि ग्रामदेवतेकडे हा ओवसा मानवला की गावातील गणपतीचे दर्शन घेऊन त्याला ओवसा मानवला जातो. सवाष्ण स्त्रिया आजही ही परंपरा जपत आहेत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी0
0
Report
यवतमाल घाटंजी में घर के सामने खेलते बच्चे की कार में फंसकर मौत
Yavatmal, Maharashtra:बातमी पालकांना 'खबरदार' करणारी पालकांनो, आपली मुलं घराबाहेर खेळत असताना किंवा कारमध्ये असताना पालकांनी विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, कारण छोट्याशा निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना घडू शकते. यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा गावात "घरासमोर खेळत असताना शेजारी उभ्या असलेल्या कारमध्ये गेलेल्या चार वर्षीय चिमुकल्याचा कार मध्ये अडकून दुर्दैवी अंत झाला. या दुर्घटनेने समाजमन हादरले आहेत. अंश शेजारी खेळत असताना तो कार मध्ये अडकून पडला. दुसरा चिमुकला कार बाहेर पडला, परंतु दरवाजा बंद झाल्याने अंश कारमध्येच अडकला. तो बाहेर पडू शकलाच नाही. कुटुंबीयांना शोध लागायला वेळ लागला. अंशला कारमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. कडक ऊनामुळे प्रकृती खालावली होती. अंशला घाटंजी ग्रामीण रुग्णालय येथे नेऊन तपासणी केली, तेथून यवतमाळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. बालरोग तज्ञांनी अंशला मृत घोषित केले. हातपाय व पापणी कोरडी पडली होती; दीड तासपूर्वी मृत्यू झाला असावा असे डॉक्टरांनी सांगितले. कुटुंबीयांनी घाटंजी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन मिळाला नव्हता असे आरोप केले आहेत. गावात शोककळा पसरली आहे. पालकांनी मुलांबाबत खबरदारी बाळगण्याची जबाबदारी अधोरेखित झाली आहे. कार नेहमी लॉक ठेवा - कार उभी ठेवत असताना ती नेहमी पूर्णपणे लॉक करून ठेवा, जेणेकरून मुले खेळता खेळता त्यात शिरणार नाहीत. कार चालवताना देखील चाइल्ड लॉक चा उपयोग करा. लहान मुलांच्या हाती कारच्या चाव्या देऊ नका, कारच्या चाव्या घरी देखील मुलां पोहोचण्यापासून दूर ठेवा. अगदी काही मिनिटांसाठीही मुलांना कारमध्ये एकटे सोडून दुकानात खरेदीसाठी किंवा बाहेर जाऊ नका. मुलांना आणीबाणीच्या प्रसंगी गाडीचा हॉर्न कसा वाजवायचा किंवा आतून लॉक कसे उघडायचे हे शिकवून ठेवा. कारचा शॉक सेन्सर सुरू ठेवा. गाडीचे हॅण्डल उघडण्याचा, काच तोडण्याचा, मोठा झटका बसल्यास हा शॉक सेंसर वाजतो. कारमधून उतरताना सर्व मुले बाहेर आली आहेत की नाही, याची नेहमी व्यवस्थित खात्री करा.0
0
Report
Advertisement
यूपीआय शुल्क पर व्यापारी उबाल: अम्बरनाथ-उल्हासनगर में दुकानों में रोका प्रदर्शन
Ambernath, Maharashtra:यूपीआय''चा भार, ''क्यूआर''ला नकार उल्हासनगर, अम्बरनाथमधील व्यापाऱ्यांचा मोर्चा पुन्हा रोखीकडे सरकारने निर्णय मागे घेतले नाही तर आंदोलनाचा इशारा केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी ''यूपीआय'' व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क (एमडीआर) आकारण्याची घोषणा केल्याने व्यापारी वर्गातून नाराजीचा सूर उमटत आहे. या संभाव्य आर्थिक भाराला विरोध दर्शवण्यासाठी अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी गुरुवारपासून आपल्या दुकानांवरील ''यूपीआय पेमेंट''चे फलक आणि ''क्यूआर कोड'' हटवण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने लवकरात लवकर हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा यासंदर्भात आंदोलन केला जाईल अशी घोषणा उल्हासनगर व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष दीपक छतलानी यांनी केली आहे. ग्राहकांना खरेदीसाठी खिशात रोख रक्कम बाळगणे अनिवार्य ठरू लागले आहे. उल्हासनगर हे ठाणे जिल्ह्यातील एक मोठे व्यापारी शहर म्हणून ओळखले जाते. घाऊक, किरकोळ खरेदी-विक्रीसह येथे अनेक लहान मोठ्या उद्योगांमधून उत्पादन सुरू असते. कापड, लाकूड अर्थात फर्निचर, जुनी वाहने, विद्युत उपकरणे, कपडे, मोबाइल अशी हजारो दुकाने, कारखाने शहरात आहेत. येथे दररोज कोट्यवधींची उलाढाल होत असते. ''आम्ही आधीच वस्तूंच्या खरेदी-विक्रीवर शासनाला वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) माध्यमातून कर अदा करत आहोत. त्यात ''यूपीआय'' सारख्या सुलभ आणि जलद प्रणालीवर अतिरिक्त शुल्क आकारल्यास त्याचा थेट आर्थिक फटका व्यापाऱ्यांना बसेल,'' अशी भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.संभाव्य आर्थिक भाराच्या पार्श्वभूमीवर ''उल्हासनगर शॉपकीपर असोसिएशन''ने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे ''यूपीआय'' व्यवहारांवरील शुल्काचा निर्णय त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे. व्यापारी आणि ग्राहक या दोघांच्याही आर्थिक हिताचा विचार करून सरकारने या निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करावा आणि सणासुदीच्या काळात बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत होण्यासाठी व्यापारी वर्गाला दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी असोसिएशनचे अध्यक्ष दीपक छतलानी यांनी केली आहे.आजच्या काळात २००० रुपये ही मोठी रक्कम नसून, या अतिरिक्त शुल्कामुळे अल्प नफ्यावर व्यवसाय करणारे व्यापारी आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर आर्थिक बोजा पडेल. या निर्णयामुळे व्यापारी पुन्हा रोख व्यवहारांकडे वळण्याची भीती आहे. ''डिजिटल इंडिया''ला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने ''झिरो-एमडीआर'' धोरण सुरू ठेवावे आणि ''यूपीआय''चा भुर्दंड व्यापाऱ्यांच्या माथी मारू नये, अशी मागणी ''चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेड'' या संघटनेने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.0
0
Report
टीपू सुलतान प्रतिमा विवाद: उच्च न्यायालय में सुनवाई, दालन गणेश विसर्जन के बाद खुलेगा
Nashik, Maharashtra:मालेगाव (नाशिक) विशाल मोरे - मालेगावात टीपू सुलतान प्रतिमा वादाला न्यायालयीन वळण - उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांची उच्च न्यायालयात याचिका - प्रतिमा हटविण्याच्या महापालिका आणि पोलिसांच्या पत्रांना आव्हान - महाराष्ट्र सरकार, महापालिका आणि पोलिसांना 3 आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश.. - शान ए हिंद यांचे उपमहापौर दालन अद्याप बंदच ; गणेश विसर्जनानंतर दालन होणार खुले.. मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर शान ए हिंद यांच्या कार्यालयातील टीपू सुलतान यांच्या प्रतिमेवरून निर्माण झालेल्या वादाला आता न्यायालयीन वळण मिळाले आहे. उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी प्रतिमा हटविण्यासंदर्भातील महापालिका आणि पोलिसांच्या पत्रांना मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. बुधवारी ( दि. 16 ) झालेल्या सुनावणीत न्यायालयाने महाराष्ट्र सरकार, महापालिका आणि पोलिसांना तीन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत..या उत्तरानंतर याचिकाकर्ते शान ए हिंद यांना देखील आपले म्हणणे मांडता येणार आहे...दरम्यान, टिपू सुलतान यांच्या फोटोवरून निर्माण झालेल्या वादानंतर शान ए हिंद यांच्या उपमहापौर दालन अद्याप बंदच असून गणेश विसर्जनानंतर हे दालन खुले होणार असल्याचे शान ए हिंद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले..0
0
Report
महाराष्ट्र में आवारा कुत्तों का आतंक: पांच साल में 4.7 लाख घायल, मौत 134
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी महाराष्ट्रात भटक्या श्वानांची दहशत: पाच वर्षांत ४७ लाख नागरिकांना चावा; १३४ जणांचा मृत्यू.. अँकर राज्यात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत असून नागरिकांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे.. २०२१ ते २०२५ या पाच वर्षांत राज्यात तब्बल ४७ लाख ३७ हजार ७६३ नागरिकांना श्वानांनी चावा घेतला असून, यामध्ये १३४ जणांचा मृत्यू झाला आहे.. धक्कादायक बाब म्हणजे,राजधानी मुंबईत सर्वाधिक ५ लाख २९ हजार ६५० श्वानदंशाच्या घटनांची नोंद झाली आहे..0
0
Report
Advertisement
Kolhapur में शुद्ध धारोष्ण दूध परंपरा को दर्शाते अनोखे गणेश दृश्य
Kolhapur, Maharashtra:ANC :- भेसळयुक्त दुधाविरोधात राज्यभर कारवाई सुरू असताना, कोल्हापुरातील शुद्ध धारोष्ण दुधाची परंपरा अधोरेखित करणारा अनोखा गणेश देखावा साकारण्यात आला आहे. शनिवार पेठेतील गवळी समाज मित्र मंडळाने हा देखावा तयार केला आहे. संस्थान काळापासून कोल्हापुरातील विविध पेठांमध्ये दूध कट्ट्यावर शुद्ध धारोष्ण दूध मिळत आहे. याच परंपरेचा संदेश देण्यासाठी गणरायाला गवळ्याच्या रूपात साकारण्यात आले असून, उंदीरमामाही दूध पितताना दाखवण्यात आला आहे. बालचमूंना दुधाचा प्याला हातात घेऊन गणरायासोबत फोटो काढण्याची संधीही या देखाव्यातून देण्यात आली आहे.0
0
Report
UPI शुल्कवाढी के विरोध में नागपूर में कांग्रेस का बड़ा प्रदर्शन
Nagpur, Maharashtra:नागपूरात काँग्रेसने UPI शुल्कवाढीबाबत आंदोलन केले. सेंट्रल एवेन्यूवर गांधी पुतळ्यापाशी काँग्रेस व्यापारी आघाडीने UPI शुल्क वाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. UPI शुल्कवाडी मुळे व्यापाऱ्यांचे आणि ग्राहकांचे मोठे नुकसान असल्याचा आरोपही केला. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला.दरम्यान आंदोलन स्थळावरून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनी0
0
Report
राष्ट्रीय महामार्ग भू-संपादन मामला: पुराने जमीनधारकों के खाते में करोड़ों जमा?
Khopoli, Maharashtra:महामार्गाच्या भू-संपादनात मोबदल्याचा घोळ? खालापूर : हाळ-पळसदरी राष्ट्रीय महामार्गासाठी अंजरुण येथे झालेल्या भूसंपादनात 1 कोटी 29 लाख 80 हजार 117 रुपयांचा मोबदला जुन्या जमीनधारकांच्या खात्यावर जमा झाल्याचा आरोप शेतकरी अशोक गोपाळ पिंगळे यांनी केला आहे. आपण जमीन खरेदी करून ताब्यात घेतली होती, मात्र भूसंपादनाच्या नोंदीत जुन्या जमीनधारकांची नावे असल्याचा त्यांचा दावा आहे. खरेदीखत डावलून निर्णय घेतल्याचाही आरोप पिंगळे यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणी प्रांत अधिकाऱ्यांशी बातचीत केली असता त्यांनी शेतकऱ्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले असून, भूसंपादनाची प्रक्रिया नियमानुसारच झाल्याचे स्पष्ट केले आहे.0
0
Report
Advertisement
केंद्रीय गृह मंत्री अमित शाह का कोल्हापुर दौरा: भूमिपूजन और किसान मेळावे की योजना
Kolhapur, Maharashtra:केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा 19 आणि 20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्यात महालक्ष्मी ग्रीन एनर्जी कॉम्प्लेक्सचे भूमिपूजन केले जाणार आहे. याच दरम्यान ते शेतकऱ्यांचे देखील संवाद साधणार आहेत. ज्या ठिकाणी भूमिपूजन होणार आहे आणि त्यानंतर शेतकरी मेळावा होणार आहे त्या ठिकाणीचा आढावा घेऊन कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक भाजप आमदार राहुल आवाडे याच्याशी बातचीत केलीय.0
0
Report
नाशिक में आईआईटी बॉम्बे के विशेषज्ञ मनपा लैब की जाँच, सड़क निर्माण परीक्षणों पर मार्गदर्शन
Nashik, Maharashtra:* आयआयटी बॉम्बेच्या तज्ज्ञांकडून मनपाच्या गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळेची पाहणी * डांबरी रस्त्यांच्या कामांपूर्वीच्या विविध तांत्रिक चाचण्यांचा घेतला आढावा * रस्ते विकासकामांमध्ये गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा मनपाचा प्रयत्न * मिश्रणाची घनता तपासणाऱ्या चाचण्यांबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन * वॉल्यूमेट्रिक एनालिसिस अंतर्गत मिश्रणातील घटक व पोकळ्यांचे प्रमाण तपासणी * मार्शल स्टॅबिलिटी चाचणीद्वारे रस्त्याच्या मिश्रणाची भार सहन क्षमता तपासणी * चाचण्यांची पद्धत, उपकरणांचा वापर आणि निष्कर्षांच्या मूल्यमापनावर सविस्तर मार्गदर्शन0
0
Report
वाशीम में 50-55 दिन बारिश से खरीफ फसल बर्बाद, सोयाबीन प्रभावित; सूखा घोषित कर मदद की मांग
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यासह मालेगाव तालुक्यात पावसाने तब्बल ५० ते ५५ दिवसांचा दीर्घ खंड दिल्याने खरीप हंगाम अक्षरशःकरपून गेला आहे. जिल्ह्याचं मुख्य पीक असलेलं सोयाबीन आता काढणीच्या उंबरठ्यावर असताना अनेक शेतांमध्ये वाळून गेलंय. यंदा या पिकातून उत्पादनाची कोणतीही अपेक्षा उरलेली नाही. डोळ्यांसमोर उभं पीक उद्ध्वस्त होताना पाहून शेतकरी हतबल झाले आहेत. वर्षभराची मेहनत आणि खर्च पाण्याअभावी वाया गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आता अश्रू आहेत. त्यामुळे सरकारने वाशिम जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा आणि नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी.0
0
Report
Advertisement
