icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Oct 2024, 05:25 am

माझी उमेदवारी मदन येरावारांना पाडण्यासाठीच, माजी आमदार संदीप बाजोरीयांचा दावा.

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून तुतारी चिन्हावरच आपण लढु असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत तिकीट वाटपाआधीच त्यांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार देखील सुरू केला आहे. भाजप आमदार मदन येरावार यांनी मतदारसंघ बकाल करून ठेवला, रस्त्यांची दैना झाली, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून भयमुक्त वातावरण देऊ असे वचन आपण जनतेला देत असल्याचे संदीप बाजोरिया यांनी सांगितले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

उच्चदाब टॉवर के लिए खोदे खड्डे में डूबे एक मजदूर की मौत, वसई

Vasai-Virar, Maharashtra:उच्चदाब टॉवरसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून मजुराचा मृत्यू वसई पश्चिमेच्या मधुबन परिसरातील घटना वसई पूर्व च्या मधुबन येथील सुरक्षा स्मार्ट सिटी संकुलात एका भीषण अपघातात, पाण्याने भरलेल्या खड्ड्यात एक २० वर्षीय मजूर बुडून मरण पावला. मृताची ओळख सुमित कुमार सुरेश मंडल (२०) अशी असून, तो मूळचा बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील होता. सुरक्षा स्मार्ट सिटी संकुलात उच्चदाब टॉवर बसवण्यासाठी एमएसईबीच्या (MSEB) डीसीएल (DCL) कंपनीने खोदलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते. पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून सुमित मंडलचा मृत्यू झाला. मृताचा मोठा भाऊ, रितेश कुमार सुरेश मंडल (२४) याने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्याने सांगितले की, सुमित कंपनीच्या साइटवर काम करत होता आणि कर्तव्यावर असताना हा अपघात घडला. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. वसई तालुक्यात पावसाचा हा दुसरा बळी आहे ..
0
0
Report

चंद्रपूर शहर महापालिका की आमसभा रद्द करने के निर्णय पर भाजपा के दो गुटों के बीच टकराव, किशोर जोरगेवार की प्रतिक्रिया

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपूर शहर मनपाची आमसभा रद्द करण्याप्रकरणी मनमानी करता आली नाही म्हणून बेईमानी करण्यात आली, चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील भाजपचं दोन गटांच्या राड्या संदर्भात स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांची प्रतिक्रिया अँकर:-- चंद्रपूर शहर महानगरपालिकेची आमसभा रद्द करण्यावरून भाजपचे दोन गट चंद्रपूर महापालिकेतच भिडले. मूळ मुद्दा स्वीकृत सदस्यांमध्ये केवळ स्वीकृत सदस्यांची दोन नावे मर्जीतील नव्हती म्हणून सभा रद्द करण्याची कृती म्हणजे मनमानी करता आली नाही म्हणून बेईमानी केली असे म्हटले. बाईट १) किशोर जोरगेवार, आमदार, चंद्रपूर विधानसभा आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
0
Report
Advertisement

राम मंदिर ट्रस्ट के कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी पर आरोप, परिवार दावा मजबूत

Shirdi, Maharashtra:अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे मुख्य कोषाध्यक्ष, प्रख्यात प्रवचनकार आणि देशभरातील लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेले स्वामी गोविंद देव गिरी महाराज सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहेत. राम मंदिरातील कथित चोरीप्रकरणी त्यांच्यावर आरोप झाले असले, तरी त्यांच्या कुटुंबीयांनी हे आरोप ठामपणे फेटाळून लावत सत्य समोर येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील बेलापूर या छोट्याशा गावातून सुरू झालेला स्वामीजींचा आध्यात्मिक प्रवास नेमका कसा घडला. या स्पेशल रिपोर्ट ... बेलापूरच्या साध्या घरातून सुरू झालेला प्रवास देशातील सर्वात मोठ्या धार्मिक प्रकल्पाच्या व्यवस्थापनापर्यंत पोहोचला. आजही आपल्या मूळ गावाशी जोडलेले आहेत. सध्या त्यांच्यावर आरोपांचे सावट असले तरी सत्य काय, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातील बेलापूरच्या मातीतून घडलेले स्वामी गोविंद देव गिरी महाराज आज राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे धार्मिक नेतृत्व मानले जातात. त्यांच्या कार्याचा गौरव जितका मोठा आहे, तितकीच सध्या त्यांच्याभोवती सुरू असलेली चर्चा देखील महत्त्वाची ठरत आहे. आता तपासातून काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report
Advertisement

अंधेरी में भारी बारिश से मुख्य मार्ग बंद, जलभराव से यातायात ठप

Mumbai, Maharashtra:मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका अंधेरी परिसराला बसला आहे. अंधेरी पश्चिमकडे जाणारा मुख्य मार्ग सध्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. सततच्या पावसामुळे अंधेरी सबवे तसेच अंधेरी मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन मुंबई पोलीस आणि महानगरपालिकेचे अधिकारी घटनास्थळी तैनात झाले आहेत. नागरिकांनी या मार्गाचा वापर करू नये, तसेच पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पाणी साचल्यामुळे वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून अनेक वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. महानगरपालिकेकडून पाण्याचा निचरा करण्यासाठी आणि साचलेला कचरा हटविण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. ड्रेनेज लाईनची साफसफाई तसेच पंपांच्या सहाय्याने पाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
0
0
Report
Advertisement

मुंबई उपनगर में भारी बरसात, अंधेरी सबवे जलमग्न; मार्ग बंद, यातायात प्रभावित

Mumbai, Maharashtra:मुम्बई उपनगरात गेल्या तीन दिवसांपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून वाहतुकीवर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे. अंधेरी सबवे पुन्हा एकदा पाण्याखाली गेला असून सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रशासनाने सबवे सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे. त्यामुळे पूर्व-पश्चिम जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग बंद झाल्याने वाहनचालकांना मोठा फटका बसत आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले असून, अंधेरी सबवेऐवजी गोखले पूल मार्गे प्रवास करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच पाणी साचलेल्या रस्त्यांवरून वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हवामान विभागानेही पुढील काही तास मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली असून नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0
0
Report

रायगढ़ के नागोठणे में बाढ़ जैसी स्थिति, अंबा नदी का पानी शहर में प्रवेश

Chendhare, Maharashtra:रायगड़च्या नागोठणे शहरात पुराचे पाणी शिरले....... अंबा नदीला आलेल्या पुराचे पाणी शहरात शिरले ...... नागोठणे बाजार पेठ, एस टी स्टॅन्ड परिसर जलमय ...... नागोठणे परिसरातील जनजिवन विस्कळीत ....... अँकर - रायगड़च्या नागोठणे शहराला पुराचा वेढा पडलाय. अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पाणी शहरात शिरले आहे. त्यामुळे पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. एसटी स्टँड, कोळीवाडा तसेच बाजारपेठेचा काही भाग जलमय झाला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सामानाची आवरावर करताना व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. या भागातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.
0
0
Report
Advertisement

साकीनाका हादसे पर बीजेपी-मनसे में बयानबाजी तेज, अमित साटम पर आरोप-प्रत्यारोप

Mumbai, Maharashtra:मुंबईत साकीनाका येथे मॅन होलमध्ये पडून एका निष्पाप व्यक्तीचा बळी गेला यावरून आता सत्ताधारी भाजप आणि मनसे यांच्यामध्ये राजकारण सुरू झाले आहे मुंबईतील शाळकरी मुलगा आणि नाल्यात पडून मेलेल्या व्यक्तीच्या मृत्यूवर भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या हसण्यावरून राज ठाकरे यांनी टीका केल्यानंतर काल अमित साटम यांनी देखील राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती यानंतर आज अंधेरी विधानसभा मनसेच्या वतीने अंधेरी स्थानकाबाहेर अमित साटम यांच्या विरोधात आंदोलन करून त्यांना जाब विचारला. मनसे विभागाध्यक्ष मनीष धури, प्रशांत राणे आणि कुशल धुरी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो मनसैनिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित साटम यांच्या विरोधात घोषणाबाजी करत मुंबईकरांच्या मृत्यूबाबत जाब विचारला.
0
0
Report

यवला में दराड़े हार से शिवसेना की ताकत घटी, सात नगरसेवक महायुती में शामिल

Yeola, Maharashtra:- येवल्यात दराडेंना धक्का ; शिवसेनेचे सात नगरसेवक राष्ट्रवादीच्या गटात सामील होणार ? - माजी खा.समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत महायुतीच्या नगरसेवकांची भुजबळ संपर्क कार्यालयात बैठक... - आ.किशोर दराडें व कुणाल दराडे यांच्या कार्यशैलीवर नाराज असल्याची नगरसेवकांनी व्यक्त केली खंत.. - नाशिक विधान परिषदेतील ' दराडे ' यांच्या पराभवानंतर येवल्यातील शिवसेनेची ताकदही कमी होऊ लागल्याचे चित्र.. - दराडेंच्या पराभवानंतर येवल्यात राजकीय घडामोडींना वेग.. - महायुती म्हणून नगरसेवक आमच्याकडे आले ; महायुती म्हणून आम्ही सोबत काम करू...माजी खा.समीर भुजबळ यांची प्रतिक्रिया... Anchor - आ.किशोर दराडे व कुणाल दराडे यांच्या कार्यशैलीवर नाराज असलेल्या सात शिवसेना नगरसेवकांनी आज मंत्री छगन भुजबळ यांचे येवल्यातील संपर्क कार्यालय गाठत माजी खा.समीर भुजबळ यांची भेट घेतली..भविष्यात मंत्री भुजबळ यांच्या नेतृत्त्वात काम करण्याचे सुतोवाच या नगरसेवकांनी केल्याने येवल्यात विधान परिषदेच्या निवडणुकीत पराभव झालेल्या दराडेंची पुन्हा एकदा ताकद कमी होणार असल्याचे चित्र आहे..विधान परिषद निवडणुकीत दाखवलेला अविश्वास, तसेच दराडे बंधू यांच्या विषयी नाराजी असल्यानेच हे शिवसेनेचे सात नगरसेवक भुजबळांच्या गोटात सहभागी होणार असल्याचे सुतोवाच शिवसेना उपजिल्हाप्रमुख असलेले अमोल शिंदे यांनी केले..दरम्यान, महायुती म्हणून आम्ही येवल्यातील नगरसेवकांची बैठक घेतली होती, या बैठकीत शिवसेना, राष्ट्रवादी व भाजपचे नगरसेवक उपस्थित होते महायुती म्हणून लोकसभा, विधानपरिषद आम्ही महायुती म्हणून एकत्र लढलो, त्यानंतर भाजप व राष्ट्रवादी म्हणून नगर परिषद निवडणुकीत एकत्र लढलो, त्यावेळी शिवसेना आमच्यासोबत नव्हती..मात्र आता महायुती म्हणून आम्ही एकत्रच आहोत, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना महायुती म्हणून सोबत घेत पुढे चालणार आहोत..अशी प्रतिक्रिया माजी खा.समीर भुजबळ यांनी दिली.. √ बाईट - समीर भुजबळ, माजी खासदार √ बाईट - अमोल शिंदे , उपजिल्हाप्रमुख, शिवसेना
0
0
Report

कल्याण डोंबिवली में तेज बारिश से जलजमाव, ठेकेदारों और अधिकारी की मिलीभगत पर सवाल

Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवली सकाळपासून पावसाची रिपरिप. अधून मधून पावसाच्या जोरदार सरी. नालेसफाई ठेकेदारांसाठी की अधिकाऱ्याच्या टक्केवारीसाठी? कल्याण डोंबिवली शहराला कालच्या मुळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते, तर आज सकाळ पावसाची रिमझिम तर अधूनअधून जोरदार सरी बरसत आहे. दहा मिनिटाच्या पावसात रस्त्यावर पाणी साचल्याने नदीचे स्वरूप पाहायला मिळाले. महापालिका नाले साफ करण्यासाठी करोडो रुपये खर्च केले जाते, करोडो च्या टेंडर काढले जातात ते ठेकेदारांसाठी की अधिकाऱ्याच्या टक्केवारीसाठी असा कल्याण डोंबिवली करणारं म्हणणं आहे. याचा आढावा घेतला गया है.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top