445001
माझी उमेदवारी मदन येरावारांना पाडण्यासाठीच, माजी आमदार संदीप बाजोरीयांचा दावा.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून तुतारी चिन्हावरच आपण लढु असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत तिकीट वाटपाआधीच त्यांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार देखील सुरू केला आहे. भाजप आमदार मदन येरावार यांनी मतदारसंघ बकाल करून ठेवला, रस्त्यांची दैना झाली, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून भयमुक्त वातावरण देऊ असे वचन आपण जनतेला देत असल्याचे संदीप बाजोरिया यांनी सांगितले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
उद्धव ठाकरे शिर्डी में साईं दर्शन के बाद कार्यकर्ता मेळावा
Shirdi, Maharashtra:उद्धव ठाकरे साई मंदिरात पोहचले... उद्धव ठाकरे साईंच्या चरणी लीन , शिर्डी माझे पंढरपुर आरती करत ठाकरेंनी घेतलं साईंच्या समाधीचं दर्शन... ठाकरेंचा आज शिर्डीत कार्यकर्ता मेळावा... शिर्डीचे बंडखोर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मतदारसंघात आज धडाडणार ठाकरेंची तोफ... मेळाव्यापूर्वी उद्धव ठाकरे पोहचले साई दरबारी... खासदार संजय राऊत, खा, अरविंद सावंत, आदित्य ठाकरे, खा. राजाभाऊ वाजे, खा. अनिल देसाई, ठाकरेंसोबत... साई दर्शनानंतर ठाकरेंची पत्रकार परिषद आणि त्यानंतर कार्यकर्ता मेळावा... उद्धव ठाकरे हे खा. भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर काय टीका करणार..? याकडे लक्ष...0
0
Report
सांगली में घरपट्टी बढ़ोतरी पर कांग्रेस का ताली-प्रदर्शन; विपक्ष उग्र
Sangli, Maharashtra:वाढीव घरपट्टी विरोधात सांगलीमध्ये विरोधक आक्रमक झाले आहेत, सांगली महापालिकेकडून भांडवली मूल्य सर प्रणाली अंतर्गत घरपट्टीमध्ये वाढ करण्यात आली आहे. मात्र यालाच नागरिकांचा प्रचंड विरोध सुरू झाला आहे. हा विरोध दर्शवण्यासाठी सांगली महापालिकेतील विरोधक आता एकवटले आहेत. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली सांगली महापालिकेसमोर टाळ वादन करण्यात आले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार, शिवसेना सह सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता, आंदोलनाच्या ठिकाणाहून टाळ आंदोलनाचा आढावा घेतलाय, आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी ..0
0
Report
च-chipलूण के परशुराम घाट में गैबियन वॉल में दरार, भारी बारिश से गिरने का खतरा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूणच्या परशुराम घाटात 'गॅबियन वॉल'ला मोठमोठ्या भेगा; पावसाचा जोर वाढल्यास कोसळणार संकट!. चिपळूणच्या परशुराम घाटातील गॅबियन वॉलच्या भरावाला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत.. त्यामुळे गॅबियन वॉलच आता धोक्यात आली असून पावसाळ्यात महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.. लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या या गॅबियन वॉलला अवघ्या काही दिवसांतच भेगा पडल्याने महामार्गाच्या कामाच्या दर्जावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.. जर पावसाचा जोर असाच कायम राहिला,तर हा भलामोठा भराव खाली कोसळून पायथ्याशी असलेल्या पेढे वासियांवर मोठे संकट ओढवण्याची भीती वर्तवली जात आहे.. प्रशासनाच्या या ढिसाळ आणि निकृष्ट कारभारामुळे प्रवाशांसह स्थानिक नागरिकांचा जीव टांगणीला लागला असून,यावर आता तातडीने काय उपाययोजना केल्या जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.. तेथील आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रविंद्र कोकाटे यांनी..0
0
Report
Advertisement
नागपुर के नए पुलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आज पदभार संभालेंगे; रविंद्र सिंगल से प्रभार ग्रहण
Nagpur, Maharashtra:नागपूर विश्वास नांगरे पाटील आज नागपूर पोलीस आयुक्त पदभार स्वीकारेंगे। पोलीस भवन में आयुक्त पदभार ग्रहण से पहले उन्हें सलामी दी जाएगी। विश्वास नांगरे पाटील नागपूर के वर्तमान पुलिस आयुक्त रवींद्र सिंगल से आयुक्त पद का प्रभार ग्रहण करेंगे।0
0
Report
उद्धव ठाकरे शिर्डी साईं मंदिर पहुंचे, चरण स्पर्श के साथ मेळावा शुरू
Shirdi, Maharashtra:उद्धव ठाकरे साई मंदिरात पोहचले... उद्धव ठाकरे साईंंच्या चरणी लीन , शिर्डी माझे पंढरपुर आरती करत ठाकरेंनी घेतलं साईंच्या समाधीचं दर्शन... ठाकरेंचा आज शिर्डीत कार्यकर्ता मेळावा... शिर्डीचे बंडखोर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मतदारसंघात आज धडाडणार ठाकरेंची तोफ... मेळाव्यापूर्वी उद्धव ठाकरे पोहचले साई दरबारी... खासदार संजय राऊत, खा, अरविंद सावंत, आदित्य ठाकरे, खा. राजाभाऊ वाजे, खा. अनिल देसाई, ठाकरेंसोबत... साई दर्शनानंतर ठाकरेंची पत्रकार परिषद आणि त्यानंतर कार्यकर्ता मेळावा... उद्धव ठाकरे हे खा. भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर काय टीका करणार..? याकडे लक्ष...0
0
Report
पुणे के ग्रामीण इलाकों में वटपौर्णिमा पर महिलाओं का जोरदार उत्साह, परंपरा बनी नवीन ऊर्जा
Shirur, Maharashtra:पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज वटपौर्णिमेनिमित्त सकाळपासूनच महिलांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. अखंड सौभाग्यासाठी सुवासिनींनी एकत्र येत वडाच्या झाडाची मनोभावे पूजा केली. निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करत महिलांनी वडाला सुती धागा गुंडाळून सात जन्माच्या साथीची प्रार्थना केली. पूजा संपन्न झाल्यानंतर महिलांनी एकमेकींना हळद-कुंकू लावले. एकमेकींना फळांचे आणि धान्याचे 'वाण' देऊन हा सणाचा आनंद द्विगुणित करण्यात आला. आधुनिकतेच्या काळातही ग्रामीण भागात हा पारंपरिक संस्कृतीचा ठेवा आणि उत्साह मोठ्या प्रमाणावर टिकून असल्याचं आज या निमित्ताने पाहायला मिळालं.0
0
Report
Advertisement
सिंधुदुर्ग में पुरुषों ने भी वटपौर्णिमा मनाई: पति की दीर्घायु हेतु अनोखी परंपरा
Oras Bk., Maharashtra:वटपौर्णिमेला विवाहित स्त्रिया जन्मोजन्मी हाच पती मिळू दे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहरात गवळदेव मंदिर येथे गेल्या १७ वर्षांपासून पुरुष मंडळी एकत्र येत वटपौर्णिमा साजरी करीत असून यावर्षीचे १८ वे वर्ष आहे. गाऱ्हाणे घालून विधीवत पद्धतीने वडाच्या झाडाची पूजा केली जाते. वडाच्या झाडाला फेऱ्याही मारल्या जातात. पत्नी आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून पूजा करता तसेच हे पुरुष आपल्या पत्नीला दीर्घायुष्य, तसेच जन्मोजन्मी हाच पती मिळू दे यासाठी पूजा करतात. पुरूषांच्या या अनोख्या वटपोर्णिमेचे सर्वांनाच कौतूहल वाटत आहे. सर्वत्रच अशा पद्धतीने पुरुषांनी वटपोर्णिमा साजरी करण्याची प्रथा अंमलात आणण्याची मागणी होत आहे.0
0
Report
गडचिरोली- छत्तीसगढ़ सीमा पर नक्सली हथियार निर्माण कारखाना उद्ध्वस्त, 5 टन लेथ मशीन बरामद
Chandrapur, Maharashtra:टायटल:---गडचिरोली- छत्तीसगड सिमेवर नक्षल्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त , पुरुन ठेवलेले साहित्य गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ कडून नष्ट, सामुग्रीत 5 टन वजनी लेथ मशीनचा समावेश, जवानांकडून विविध नक्षली साहित्य घटनास्थळीच करण्यात आले नष्ट अँकर:-- नक्षल्यानी महाराष्ट्र - छत्तीसगड सिमेवरील गडचिरोली जिल्ह्यातील बालबेडा जंगल परिसरात शस्त्रनिर्मिती व इतर साहित्य लपवून ठेवले असल्याबाबतची माहिती गडचिरोली पोलीस दलास मिळाली होती. जंगल परिसरात विशेष अभियान पथक गडचिरोली व प्राणहिता उपमुख्यालय यांच्या संयुक्त 6 तुकड्या, बिडीडीएसचे 01 पथक व सिआरपीएफचे पथक शोध अभियान राबविण्यासाठी रवाना करण्यात आले. बिडीडीएसच्या जवानांनी परिसराची कसून तपासणी केली असता, 5 ते 6 टन वजन असलेली एक लेथ मशीन, 150 नग क्लेमोर आणि बिजीएल पाईप्स, 220 नग 12 बोअर पाईप, 20 नग रायफल रॉड मेटल पट्टी आदी नक्षल साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश आले आहे. पथकातील जवानांच्या सहाय्याने काही साहित्य जागीच नष्ट करण्यात आले. सक्रीय नक्षलवाद काळात विविध नक्षल सप्ताह, निवडणूक इ. प्रसंगी सुरक्षा दलांवर हल्ले करण्यासाठी हा साठा नक्षल्यानी लपवून ठेवला होता.0
0
Report
सोलापुर के माढा अस्पताल में प्रसूता की सफाई जबरदस्ती; 14 माह बाद 9 कर्मी निलंबित
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील माढ्याच्या ग्रामीण रुग्णालयात एप्रिल 2025 मध्ये नुकत्याच प्रसूती झालेल्या महिलेला तिच्या खोलीची स्वच्छता करायला लावण्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी आता 14 महिन्यानंतर माढा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षकांसह 9 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आलं आहे या घटनेने सार्वजनिक आरोग्य विभागाचा अमानवी कारभार समोर आला होता त्यामुळे या प्रकरणात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विलास मेमाणे व इतर आठ कर्मचाऱ्यांना निलंबित केला आहे.यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.0
0
Report
Advertisement
राजू शेट्टी: कोकण किसानों को राहत नहीं मिली—अणुऊर्जा प्रकल्प के विरोध की चेतावनी
Oras Bk., Maharashtra:कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान होऊनही राज्य आणि केंद्र सरकारकडून अपेक्षित मदत मिळाली नसल्याचा आरोप करत माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. याचबरोबर देवगड तालुक्यात प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवत, हा प्रकल्प कोकणच्या पर्यावरणासह आंबा, काजू आणि कोकम उत्पादनासाठी घातक ठरेल, असा इशारा त्यांनी दिला. कोकण वाचवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी ३ जुलै रोजी सकाळी १० वाजता देवगड येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. जल समाधी आंदोलनाचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. राजू शेट्टी नेमकं काय म्हणाले पहा...0
0
Report
राजगुरुनगर में मुसलाधार वळवाने व्यापारी संकुल डुबो दिया; लाखों का नुकसान
Shirur, Maharashtra:राजगुरुनगर में वळवाच्या पावसाचा कहर; व्यापारी संकुल पाण्यात बुडाले, लाखोंचे नुकसान खेड तालुक्यातील राजगुरुनगरमध्ये झालेल्या मुसळधार वळवाच्या पावसाने व्यापारी संकुले पाण्याखाली गेली. सुमारे ३० दुकानांत पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अवघ्या दीड ते दोन तासांच्या मुसळधार पावसामुळे राजगुरुनगर शहरातील व्यापारी संकुलांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. जलनिस्सारण व्यवस्था कोलमडल्याने तळमजल्यावरील सुमारे ३० दुकानांमध्ये कंबरेएवढे पाणी साचले. त्यामुळे माल, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि महत्त्वाची कागदपत्रे भिजून व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.0
0
Report
त्रंबकेश्वर से पंढरी: 230 किलो चांदी से सज्ज पालखी, 24 घंटे सुरक्षा
Nashik, Maharashtra:संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी दुपारी दोन वाजेच्या सुमारास नाशिकच्या त्रंबकेश्वर वरून पंढरीचे दिशेने प्रस्थान करणार आहे .. यानिमित्ताने निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीची आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात येत आहे... या पालखीला 230 किलो चांदीचा मुलामा लावून रथ 2016 तयार करण्यात आलाय... 24 तास सुरक्षा राहावी यासाठी रथावर सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आले आहेत.. त्याचबरोबर रथाला 24 तास सुरक्षा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आला आहे... त्या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाडांनी...0
0
Report
Advertisement
तळकोकण में आज तेज बारिश, येलो अलर्ट जारी; सिंधुदुर्ग में खेती को तेज़ प्रगति मिलेगी
Oras Bk., Maharashtra:तळकोकणात आज पावसाचा यल्लो अलर्ट जारी करण्यात आलाय. मागील तीन दिवस उसंत घेतलेल्या पावसाने काल दुपार पासून हजेरी लावलीय. काल पासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे बळीराजा सुखावलाय. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात लावणीच्या कामाला वेग येणार आहे. यल्लो अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सर्तकतेच आवाहन करण्यात आलय ..0
0
Report
सुप्रिया सुळे ने साई दरबारी दर्शन किया; महाविकास आघाडी के साथ आंदोलन की तैयारी
Shirdi, Maharashtra:Anc - राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आज साई दरबारी हजेरी लावत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. संभाजीनगर येथे आयोजित आंदोलनाला जाण्यापूर्वी सुप्रिया सुळे साईचरणी.natamastak झाल्या..यावेळी त्यांच्या हस्ते साईबाबांच्या पादुका पूजन करण्यात आले.. राज्यात आणि देशात चांगला पाऊस पडावा असे साकडे यावेळी सुप्रिया सुळे यांनी साईबाबांना घातले..दर्शनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी खासदार फूटी सोबत विविध विषयांवर भाष्य केले.. सुप्रिया सुळे बाईट पॉइंटर ऑन महाविकास आघाडी एकत्रित आंदोलन महाविकास आघाडी एकत्र आहेच.. राज्याची परिस्थिती अडचणीची आहे.. गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे..शिक्षणाचे माहेरघर ओळख असलेल्या माझ्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलीय.. हे मला जड Endःअंतःकरणाने सांगावे लागते.. आणि मी लोकप्रतिनिधी असणाऱ्या जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत असेल तर त्याची अधिक चिंता वाटते.. ऑन TET पेपर फुटी आणि खासदार फूटी प्रकरण कालच एक व्हिडिओ पाहिला.. एक महिला अंडे विकत घेते..त्यावर महिला दुकानदाराला म्हणते ही अंडी घरी जाईपर्यंत फुटणार नाही ना ? त्यावर दुकानदार म्हणतो हे खासदार आमदार नाही फुटायला.. हे दुर्दैव आहे की एवढी चेष्टा लोकप्रतिनिधींची होते.. प्रत्येकाला त्याच मत किंवा पक्ष बदलायचा अधिकार घटनेने दिलाय.. मात्र ज्या पद्धतीने सत्तेचा वापर करून ही केले जाते ते दुर्दैव.. ऑन उबाठा गट खासदार फुट आम्ही उद्धवजी यांच्या सोबत व संपर्कात.. संजय राऊत यांच्या बरोबर देखील रोजच बोलण होत.. आम्ही देखील त्यांचा दौरा पाहतोय.. ज्यांना मोठे केले ते असे वागत असतील तर ते दुःখ देणारे.. महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी घसरतेय का असे आता वाटते.. शाहू फुले आंबेडकरांच्या राज्यात ही परिस्थिती आली ती खूप अवघड.. ऑन राजकारण भाषा दर्जा.. ज्यावेळी भाषेच्या दर्जावरून प्रश्न समोर येतात तेव्हा अरुण जेटली यांचं वक्तव्य आजही आठवत.. तुम्ही दाखवणं बंद करा..हे बोलण बंद करतील असे ते म्हणायचे.. भाषा आणि मराठी भाषेचा आम्हाला सार्थ अभिमान.. मात्र जेटलींनी त्यावेळी सांगितलेल्या गोष्टी आज खऱ्या ठरल्या.. ऑन राष्ट्रवादी आमदार फुटी चर्चा.. आमदार कश्याला खासदार फुटणार ही देखील चर्चा आहे.. त्यामुळे आम्हाला काय ते नवीन वाटत नाही.. ऑन म्यानमार सीमा भारतीय ओलीस प्रकरण.. मी विरोधात असले तरी चांगल्याला चांगलं म्हणते.. परराष्ट्र मंत्रालय चांगले काम करत आहे... ज्यावेळी देशात किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा प्रश्न येतो तेव्हा देशाचे ऐक्य महत्त्वाचे.. अशा प्रसंगी देशाबद्दल एका स्वरात बोलले पाहिजे.. ऑन पिक हमीभाव फेरआढावा.. काळया मातीशी ईमान राखणाऱ्या शेतकऱ्याच कंबरडे मोडण्याचे पाप या सरकारने केले आहे.. सत्ता आहे मात्र मदतीला कोणी धावून जात नाही.. लाडकी बहीण योजनेत एक कोटी महिलांची नावे कमी झाली.. निवडणुका संपल्या की बजेटची सावरसावर केली गेली.. आज अनेक राज्यांसह देशाची आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे..0
0
Report
रायगढ़ में बारिश फिर शुरू, किसानों को मिली संजीवनी; नदी-नाले बढ़े जलस्तर
Chendhare, Maharashtra:दोन दिवसांच्या विश्रांती नंतर बरसला पाऊस. रायगडच्या काही भागात पावसाच्या सरी. पावसामुळे भातरोपांना मिली संजीवनी. नदी नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ. तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यात पावसाचे आगमन झालं आहे. अलिबागसह जिल्ह्याच्या काही भागात अधून मधून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसत आहेत. रात्री उशिरा ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. आज सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र या पावसाने नदी नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झालेय. पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी चिंतेत होते मात्र आता झालेल्या पावसाने उगवून वर आलेल्या रोपांना संजीवनी मिळाली आहे.0
0
Report
Advertisement
