icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Oct 2024, 05:25 am

माझी उमेदवारी मदन येरावारांना पाडण्यासाठीच, माजी आमदार संदीप बाजोरीयांचा दावा.

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून तुतारी चिन्हावरच आपण लढु असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत तिकीट वाटपाआधीच त्यांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार देखील सुरू केला आहे. भाजप आमदार मदन येरावार यांनी मतदारसंघ बकाल करून ठेवला, रस्त्यांची दैना झाली, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून भयमुक्त वातावरण देऊ असे वचन आपण जनतेला देत असल्याचे संदीप बाजोरिया यांनी सांगितले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सांगली सांसद विशाल पाटील ने सरकार पर आरोप, सड़क पर जनता शासन करती है

Sangli, Maharashtra:अँकर - जनता ही रस्त्यावर राज्य करते,हे सरकारने विसरू नये,मंत्रालय व सचिवालयाच्या जीवावर तुम्ही राज्य चालवू शकत नाही,असा इशारा सांगली खासदार विशाल पाटिलांनी मनोज जरांगे-पाटलांच्या आंदोलनावरून सरकारला दिला आहे.तसेच आंदोलनक ऐवजी आंदोलकांच्या मुख्य लोकांना मॅनेज करायचे हे सरकारची सवय, दुर्दैवी असल्याची टीका सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी केली आहे. मनोज जरांगे-पाटलांच्या सुरू असलेल्या आंदोलनावरून सरकारकडून घेण्यात येणाऱ्या भूमिकेवरून विशाल पाटलांनी हे टीका केली आहे, सांगलीमध्ये मराठा समाजाच्यावतीने करण्यात आलेल्या आंदोलन प्रसंगी ते बोलत होते.
0
0
Report

पुणे के वसूलीवाले पुलिस अधिकारी ने आयुक्त को मरने की धमकी भेजी, गिरफ्तार

Pune, Maharashtra:पुण्यातील वसुलीवाल्या पोलिसाची आयुक्तांना गुगली देण्याचा प्रयत्न फसला जीवाचे वाईट करतो म्हणाला अन् काही तासांत झाला हजर!!! पुणे- शहरात गणेशोत्सवात कायदा सुव्यवस्थेचे नियोजन सुरू असताना स्पा सेंटरमधील तत्कालीन वसुली वाल्या पोलीस अमलदाराने थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनाच जीवाचे बरेवाईट करण्याचा मेसेज केला. मोबाइल बंद करुन अंडरग्राउंड होण्याचा प्रयत्न केला. यामुळे आता आपल्याला सहानभूती मिळेल, साईट पोस्टिंगवरुन चांगल्या ठिकाणी बदली होईल अशी त्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र, पोलीस प्रशासनाने तात्काोल संबंधित अमलदाराचा शोध घेऊन त्याला आयुक्तालयात येण्यास भाग पाडले. अखेर आयुक्तांनी दिलेल्या कानपिचक्यानंतर कर्मचार्‍याची चांगलीच तंतरली होती. हा कर्मचारी अडीच वर्षांपुर्वी शहरातील बहुतांश स्पा, मसाज सेंटर व्यावसायिकांकडून वसुलीचे काम करत होता. मात्र, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांत त्यांनी ६४ वसुलीबाज अमलदारांना वठणीवर आणले होते. तेव्हापासून त्याच्यासह ბევಷ್ಟು वसुलीवाले अमलदार पोलीस मुख्यालयासह साईट पोस्टिंगवर आहेत. अद्यापपर्यंत त्यांना अपेक्षित गुन्हे शाखा, तपास पथकासह महत्वाच्या ठिकाणी नियुक्ती नाही. दरम्यान, संबंधित अमलदार मुख्यालयातील नियुक्तीला कंटाळला होता. त्यामुळे पोलीस मुख्यालयातील अधिकार्‍याच्या त्रासाला कंटाळून वाईट विचार करण्याचा निर्णय घेत असल्याचा मेसेज त्याने आयुक्तांना करुन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. तसेच आपल्याविरुद्ध वारंवार nिनावी तक्रारी अर्ज केले जात असल्याचा उल्लेख त्याने अर्जात केला होता. मात्र, उलटेच घडल्यामुळे त्याचा गुगली डाव फसल्याची पोलीस दलात चर्चा रंगलीय.
0
0
Report

संभाजी ब्रिगेड ने MPSC सचिव के चेहरے पर कालिमा डालने का आरोप, इस्तीफे की मांग

Pune, Maharashtra:MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला संभाजी ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांनी काळ फसल आहे. MPSC चा अभ्यास करणाऱ्या २५ लाख विद्यार्थ्यांच्या व महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्या वतीने संभाजी ब्रिगेड ने या भ्रष्ट व्यवस्थेच्या आणि नालायक सरकारच्या तोंडाला काळ फसल आहे. महेंद्र हरपाळकर च्या जी थोबाडीत मारली आहे ती या सरकारला जनतेच्या वतीने संभाजी ब्रिगेड ने मारलेली थप्पड आहे. MPSC औषधं निरीक्षक पेपर फुटी संदर्भात संभाजी ब्रिगेड ने ३ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालया सामोरं आंदोलन केले होते , त्याच वेळी सरकारला आम्ही इशारा दिला होता मात्र सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे त्यांना ज्या भाषेत समजत त्या भाषेत सांगितलं पाहिजे म्हणून ही संभाजी ब्रिगेड ची प्रतिक्रिया आहे. MPSC चे अध्यक्ष व सचिव यांनी तत्काळ राजीनामा दिला नाही तर पुढचा नंबर हा MPSC अध्यक्षांचा असेल यात तिळमात्र शंका नाही. MPSC चे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळ फासणारे संभाजी ब्रिगेड चे राज्याचे उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत , मुंबई अध्यक्ष सुहास राणे यांच्या पाठीशी संभाजी ब्रिगेड ठाम उभी आहे.
0
0
Report
Advertisement

पुणे कोथरूड में FIR मामले पर गायकवाड-रोहित पवार के बीच आरोप-प्रत्यारोप

Pune, Maharashtra:ब्रेक पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात रोहित पवार दाखल आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार प्रकाशक प्रशांत आंबी यांना संजय गायकवाड यांना केली होती शिवीगाळ साधी शिवी दिल्या प्रकरणी संतोष पंडित विरोधातला एफआयआर तात्काळ दाखल करून पंडित ला अटक ही करता मग आरती ताईंना न्याय द्या संतोष पंडित ने 'त्या' महिलेला थेट शिव्या दिलेल्या नसतानाही थेट गुन्हा दाखल करून पंडितला अटक केलीत ना मग आमदार संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांना शिव्या दिल्या होत्या मग तोही गुन्हा दाखल करा ना रोहित पवार डिसीपी सागर कवडे यांना निवदेन देणार आरती रेडेकर या महिलेची विनयभंगाची तक्रार आहे तो गुन्हा दाखल करून घ्यावा...अशी आमची मागणी आहे... रोहित पवार आमदार संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांना केलेल्या शिवीगाळी मुळे मलाही लज्जास्पद वाटतंय...म्हणून माझाही गुन्हा दाखल करून घ्या.. तक्रारदार डीसीपींना जाब विचारताहेत... तुम्ही सारिका कांबळे ना लगेच न्याय दिला ना मग त्याच न्यायाने आमचीही fir नोंदवून घ्या डिसीपी सागर कवडे यांचा माञ fir घेण्यास नकार....या केसमध्ये कोल्हापुरात ऑलरेडी nc दाखल हे कोथरूडात दुसरी fir का दाखल करायची...डीसीपी कवडे यांचा पविञा आता ad cp बनसोडे आलेत रोहित पवार त्यांना पुन्हा केस समजून सांगताहेत Fir दाखल करून घेण्यासाठी रोहित पवार ad cp बनसोडे यांच्याशी argument करताहेत झीरो fir या केसमध्ये लागू होत नाही कारण कोल्हापुरात ऑलरेडी एनसी दाखल हे तुम्ही कोर्टात जा...AD CP मग तुम्ही सारिका कांबळे ना का नाही कोर्टात पाठवलं..रोहित पवार Fir दाखल करण्यास नकार...तक्रारदारांना आमदार संजय गायकवाड नी शिव्या दिलेल्या ऑडिओ ऐकवला जातोय
0
0
Report

आमदार संजय गायकवाड के विरुद्ध FIR न दर्ज, कोथरूड पुलिस पर सवाल

Pune, Maharashtra:Pune fly रोहित पवार बाईट आमदार संजय गायकवाड यांच्या शिवीगाळ मुळे आरती रेडेकर या भगिनीचा विनयभंग झालाय अशी त्यांची भावना हे म्हणून त्या इकडे कोथरूड पोलीस स्टेशन ला स्वत: fir दाखल करायला आल्यात तरीही त्यांची एफआयआर नोंदवून घेतली जात नाहीये... मग संतोष पंडित प्रकरणात सारिका कांबळे या महिलेला एक न्याय आणि आम्हाला दुजाभाव असं का? असा आमचा परखड सवाल हे डीसीपी सागर कवडे सदर प्रकरणी कोल्हापुर जिल्ह्यात ऑलरेडी गुन्हा दाखल असल्यामुळे इकडे कोथरूडात स्वतंत्र गुन्हा दाखल करता येत नाही रोहित पवार ऑन mpsc काल मुंबईत सीएम सोबत बैठक घेणारे विद्यार्थी आणि mpsc चे क्लासचालक अधिक होते त्यामुळे इथून पुढची विद्यार्थ्यांची सर्व जबाबदारी हे क्लासचालक घेणार का? रोहित पवार यांचा खड़ा सवाल आज एमपीएससी सचिवांना जे काळं फासल्याचं मी समर्थन करणार नाही पण सरकारने विद्यार्थी यांच्या तीव्र भावना वेळीच समजून घेऊन एमपीएससी अध्यक्षांना राजीनामा द्यायला सांगावे
0
0
Report

मराठा आरक्षण पर तीन साल से चली राजनीति में घमासान, बेरोजगारी सवाल उठे

Pune, Maharashtra:पुणे गेल्या तीन वर्षापासून आरक्षणासंदर्भात जी आकडेवारी मांडली जाते त्यामुळे दोन समूहांमध्ये टोकदार संघर्ष निर्माण झाला आहे दोन्ही समूहाकडं ज्या मागण्या केल्या जातात त्या संविधानिक किती वास्तविक आहेत हे तपासून जे देऊ शकतात तेच सांगितलं पाहिजे त्याऐवजी सरकार आम्ही सकारात्मक आहोत इतकच बोलतो त्यामुळे संभ्रम वाढत आहे एस ई बी सी आरक्षण केस कोर्टात सुरू आहे त्यामुळे मराठा समाजामध्ये संभ्रम आहे आणि त्यातूनच आम्हाला ओबीसी आरक्षण मिळावं ही मागणी वाढत आहे आंदोलकांकडे आम्ही मागण्यांचे पत्र वारंवार दिलेला आहे त्यावर वन टेबल बसून चर्चा करणे गरजेचे आहे पण ते आत्तापर्यंत झालं नसल्यामुळे यातून मार्ग निघत नाही प्रत्येक वेळेस नवीन मागणी आली आणि त्यावर विचार करेपर्यंत दुसरी नवीन मागणी करण्यात आली त्यामुळे आंदोलन तीन वर्ष लांबलेला आहे छत्रपती शाहू महाराज यांचं प्रकरणानंतर वेदुप्त प्रकरण झालं त्यानंतर फक्त मराठा नाही तर 19 जातींनी क्षत्रियतेचा क्लेम म्हणून मराठा लावलेला आहे म्हणून ती नोंद मराठा आलेली आहे सगळेच लोक कुणबी झाले तर महाराष्ट्राच्या जाती व्यवस्थेतून मराठा हे नाव जाऊ शकते नोकरीतली बढती आणि शैक्षणिक प्रवेश या मधल्या तज्ञांनी समोर येऊन आपलं मत मांडलं पाहिजे कारण त्यांना यातील कट ऑफ माहीत आहेत जर सगळेची सगळे मराठी कुणबी झाले तर 19 टक्क्याचा मिरीट लिस्ट हाय जाईल आणि त्यामुळे वंचित मराठा त्यामध्ये मागे राहील त्यामुळे मागणी करणाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आज मराठा समाजाकडे दोन संधी आहेत एस ई बी सी आणि कुणबी त्या बेस्ट आहेत दोन्ही जर एकत्र आले आणि एका बस मध्ये बसण्याचा प्रयत्न केला तर बहुतांश लोक बस स्टॉप वर राहतील हे वास्तव आहे
0
0
Report
Advertisement

सांगली की घाटी लेझीम: पारंपरिक कला में नया जोश और युवा भागीदारी

Kolhapur, Maharashtra:रात्रीचे साडेआठ वाजले की सांगलीच्या विसावा चौकात एक वेगळाच नाद घुमायला सुरुवात होतो. हा नाद आहे हलगीचा, ढोलाचा, आणि लेझीमच्या घुंगराचा. डीजे आणि डॉल्बीच्या वाढत्या दणदणाटातही सांगलीच्या अनेक चौकात आजही लेझीम या पारंपरिक वाद्यांचा ठेका जिवंत आहे. नेमकी ही परंपरा काय आहे पाहूया या विशेष रिपोर्ट मध्ये.. VO 1:- हातात लेझीम..पायात वेग ..अंगात उत्साह आणि चेहऱ्यावर कमालीचा आत्मविश्वास बाळगत लेझीम खेळणारे हे आहेत सांगली मधील विसावा मंडळाचे अध्यक्ष संजय चव्हाण.. अनेक शहरात लेझीम खेळाची क्रेझ पूर्वीसारखी राहिलेली नसली, तरी सांगली मधील याच विसावा चौकात घाटी लेझीमची परंपरा जपण्याचं काम गेल्या 40 वर्षापासून अविरत करत आहेत. लेझीमच्या प्रत्येक हालचालीमध्ये लय आहे..ताल आहे…वेग आहे. हलगी- घुमक तालावर सुरू झालेला हा खेळ काही क्षणांतच पाहणाऱ्यालाही आपल्या तालावर नाचायला भाग पाडतो. या खेळाडूंच्या हालचाली पाहिल्या की त्यांच्या अंगात अक्षरशः वीज संचारल्याचा भास होतो. VO 2 : सांगलीच्या गावभागातील विसावा चौक. याच ठिकाणी गेल्या अनेक दशकांपासून लेझीमची परंपरा जोपासली जाते. विसावा मंडळाकडून आसपासच्या मुलांना लेझीम शिकवण्याचं काम तब्बल 40 वर्षांपासून अविरत सुरू आहे. गणेशोत्सव असो, शिवजयंती उत्सव असो किंवा कोणतीही मिरवणूक असो विसावा मंडळाच्या लेझीम पथकाला मोठी मागणी असते. गणेशाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत. लेझीमच्या तालावर सांगलीकरांना मंत्रमुग्ध करण्याची परंपरा या मंडळाने जपली आहे.. VO 3 : रात्री साडेआठ वाजले की विसावा चौकात हळूहळू गर्दी जमायला सुरुवात होते. लहान मुलांपासून तरुणांपर्यंत, तरुणींंपासून विवाहित महिलां आणि अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळेच लेझीमच्या सरावासाठी इथे हजेरी लावतात. सुमारे अडीच ते तीन तास वेगवेगळ्या प्रकारच्या लेझीमच्या रचनांचा सराव इथ सध्या रोजच केला जातो. लेझीम ही केवळ तरुणांची कला राहिलेली नाही, तर ती पिढ्यान्‌पिढ्या पुढे नेणारी सामूहिक परंपरा बनली आहे.. 60 वर्षीय सविता बापट काकी असो वा अनेक किलोमीटरचे अंतर पार करून फक्त लेझीम खेळण्यासाठी विसावा चौकाकडे येणाऱ्या अश्विनी कुलकर्णी काकी असोत. लेझीमचा आवाज वाढला की या वयातही त्यांना झिंग चढते त्यामुळे न चुकता घाटी लेझीम खेळण्याचा आनंद घेण्यासाठी त्या आणि इतर महिला देखील आवर्जून दाखल होतात. त्यांना त्यासाठी कोणत्याही निमंत्रणाची गरज नसते. VO :- विनोद चव्हाण यांनी सांगितले, घाटी लेझीम प्रशिक्षक VO 4: घाटी लेझीमचा एक खेळ साधारण सात मिनिटांचा असतो.पण ही सात मिनिटं खेळाडूंसाठी अत्यंत कसोटीची असतात. कारण प्रत्येक क्षणी रचना बदलते. पायांचा वेग कायम ठेवावा लागतो. हातांची हालचाल अचूक ठेवावी लागते आणि त्याच वेळी हलगी आणि घुमक एकरूप व्हावं लागतं. याउलट कवायत लेझीममध्ये मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी होतात आणि खेळ तुलनेने अधिक काळ सुरू राहतो. घाटी लेझीममध्ये मात्र काही मिनिटांतच खेळाडूंच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागतात. घाटी लेझीम हा शिवकालीन काळापासून खेळला जात असल्याचं विसावा मंडळाचे अध्यक्ष संजय चव्हाण सांगतात. VO 5 :- या सरावात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकजण सहभागी होतात. यातील एक नाव विशेष लक्ष वेधून घेतं…विनोद चव्हाण यांचे वय 62 वर्षं. गेल्या जवळपास तीन दशकांपासून लेझीमचा सराव करणारे विनोद चव्हाण आजही तरुणांना लाजवेल अशा जोशात लेझीम खेळतात. हलगीचा ठेका सुरू झाला की वयाचा विसर पडतो, हातात लेझीम घेतली की देहभान हरपतं आणि मग सुरू होतो तो घाटी लेझीमचा भन्नाट खेळ. VO 6 : विनोद चव्हाण यांचा पूर्वी खाजगी व्यवसाय होता. सध्या ते घरीच असतात. पण श्रावण महिना सुरू झाला की त्यांच्या दिवसाचं वेळापत्रक बदलतं. गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात होते आणि त्यासोबत सुरू होतो लेझीमचा सराव. हातात लेझीम घेतलेला हा ज्येष्ठ खेळाडू सरावाच्या ठिकाणी आवर्जून पोहोचतो. एकही दिवस सराव चुकवायचा नाही हा जणू त्याचा नियमच. VO 7 : पूर्वी लेझीम म्हणजे प्रामुख्याने पुरुष आणि तरुण मुलांचा खेळ अशीच धारणा होती.पण आता ही धारणा बदलताना दिसतेय. विसावा मंडळाच्या सरावात तरुण मुली, विवाहित महिला आणि ज्येष्ठ महिलाही सहभागी होत आहेत. डीजेच्या दणदणाटापेक्षा पारंपरिक वाद्यांचा नाद अधिक भावतो म्हणूनच त्यांनी लेझीमची निवड केली. VO 8 : लेझीम हा केवळ मनोरंजनाचा खेळ नाही, तर शरीर आणि मनाच्या विकासासाठीही तो महत्त्वाचा आहे. नियमित सरावामुळे मुलांची शारीरिक क्षमता वाढते. एकाग्रता वाढते. ताल, शिस्त आणि समूहभावना विकसित होते.यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना लेझीमच्या सरावासाठी दररोज पाठवत आहेत. आपली ही मुलं डीजे आणि डॉल्बीच्या जाळ्यातून मुक्त होऊन स्वच्छंद पारंपरिक लेझीम खेळाचा आनंद घ्यावा हा त्याचा प्रयत्न.. VO 9 : सांगली संस्थानच्या काळात संगीत, कला, संस्कृती आणि विविध पारंपरिक कलांना राजाश्रय मिळाल्याचा इतिहास सांगतो. सांगलीची सांस्कृतिक ओळख ही केवळ राजकीय इतिहासापुरती मर्यादित नाही, तर संगीत, नृत्य, लोककला आणि पारंपरिक कलांच्या संवर्धनाशीही ती जोडलेली आहे.याच सांस्कृतिक वातावरणातून पुढे सांगलीच्या विविध पारंपरिक कलांना बळ मिळालं. लेझीमसारख्या लोककलांनीही या भूमीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. VO 10 : लेझीमच्या इतिहासाबाबत अनेक मतप्रवाह आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या खेळाचा वापर शारीरिक प्रशिक्षण आणि युद्धकौशल्याशी संबंधित कवायतींसाठी होत असल्याचं काही इतिहास अभ्यासक सांगतात. लेझीमच्या हालचालींमध्ये शरीराची चपळता, समूहातील शिस्त, आणि तालबद्ध हालचाली…यामुळे या खेळाचा उपयोग शारीरिक प्रशिक्षणासाठीही होत असल्याचं मानलं जातं.आज मात्र हा खेळ लोककला आणि पारंपरिक क्रीडा-संस्कृतीचा महत्त्वाचा भाग बनला आहे. लेझीममध्ये प्रत्येक खेळाडू स्वतंत्रपणे चांगला खेळला तरी पुरेसं नसतं. संपूर्ण पथक एकाच तालात हललं पाहिजे.. एकाच क्षणी रचना बदलली पाहिजे.. एका खेळाडूची चूक झाली तर संपूर्ण रचनेवर परिणाम होतो. त्यामुळे लेझीम मुलांना केवळ शारीरिक व्यायाम शिकवत नाही तर शिस्त, एकाग्रता, संघभावना आणि एकमेकांशी समन्वय साधण्याची कला देखील शिकवतं. VO 11 : लेझीम या शब्दाच्या उगमाबाबतही विविध मते आहेत. हा शब्द फारशी भाषेतील शब्दाशी संबंधित असल्याचं काही संदर्भांमध्ये सांगितलं जातं. मात्र शब्दाच्या उगमापेक्षा महत्त्वाचं आहे ते म्हणजे…शतकानुशतकं बदलत गेलेल्या काळातही लेझीमची परंपरा आजपर्यंत टिकून आहे आणि सांगलीसारख्या शहरात तर या परंपरेला आजही हजारो लोकांचा प्रतिसाद मिळतोय .सांगली शहरात सध्या जवळपास पाच लेझीम पथकं सक्रिय आहेत. त्यामध्ये विसावा मंडळाचं पथक हे जुन्या आणि मोठ्या पथकांपैकी एक आहे.आज या मंडळाकडे सुमारे 800 हून अधिक खेळाडू असल्याचं सांगितलं जातं.यामध्ये लहान मुलांपासून तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्व वयोगटांचा समावेश आहे. ही संख्या केवळ पथकाची ताकद दाखवत नाही, तर सांगलीकरांच्या मनात आजही पारंपरिक कलांना असलेलं स्थान अधोरेखित करते. सांगली मधील बलभीम व्यायाम शाळेच्या पटांगणात सराव करणारे हे तरुण-तरुणी त्याचंच उदाहरण. मधुरा लिमये वाजवत असणाऱ्या घुमक्याचा आवाज पाहिल्यानंतर सांगलीकरांच्या अंगात कशाप्रकारे लेझीम हा खेळ भिनला आहे हे दिसून येतं. या खेळामध्ये हलगी, घुमकाचा ठेका आणि कैचाल देखील तितकाच महत्त्वाचा असतो. VO:- मधुरा लिमये, प्रशिक्षक VO:- प्रसाद कुलकर्णी, हलगी वादक. VO 12 : गणेशोत्सवाच्या सुमारे महिनाभर आधी विसावा मंडळ आणि सांगली मधील इतर व्यायाम शाळा या ठिकाणी लेझीम सरावाला सुरुवात होते. दररोज संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत सराव सुरू असतो. लेझीमच्या वेगवेगळ्या रचना, तालबद्ध हालचाली, पथकातील शिस्त आणि मिरवणुटांमध्ये एकसंध सादरीकरण. यासाठी खेळाडूंची मेहनत सुरू असते. गणेशाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत लेझीमचा हा ठेका सांगलीच्या उत्सवाला एक वेगळीच ओळख देतो. गेल्या वर्षी विसावा मंडळाच्या लेझीम पथकाला सुमारे 30 सुपाऱ्या मिळाल्या होत्या. मात्र यंदा या पथकाची मागणी आणखी वाढल्याचं मंडळाकडून सांगण्यात येतं. महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातूनही पथकाला मागणी आहे. पारंपरिक कलेतून कलाकारांना व्यासपीठ मिळतं. त्याचवेळी या कलेला आर्थिक आधारही मिळतो. पण या कलेला फक्त आर्थिक आधार म्हणून न पाहता ही परंपरा टिकली पाहिजे यासाठी सांगलीतील विसावा मंडळ आणि इतर तालमीचा उद्देश आहे. VO:- संजय चव्हाण, अध्यक्ष विसावा मंडळ VO:- ज्ञानेश लिमये, प्रशिक्षक बलभीम व्यायामशाळा VO 13 : गेल्या काही वर्षांत सण-उत्सवांची मिरवणूक म्हटलं की डीजे आणि डॉल्बीचा दणदणाट हे समीकरण बनलं आहे.आवाजाची मर्यादा, ध्वनिप्रदूषण आणि सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्नांमुळे डीजे-डॉल्बीच्या वापरावर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. याच पार्श्वभूमीवर पारंपरिक वाद्यांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधलं जात आहे. ढोल, हलगी, ताशा, लेझीम, सनई.चौघडा ही वाद्यं केवळ आवाज निर्माण करत नाहीत तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा ठेवा जपतात. त्यामुळे ही परंपरा या पुढच्या काळात देखील अशीच टिकून राहावी अशी अपेक्षा सांगलीकर व्यक्त करतात. VO 14 : गेल्या चार दशकांच्या आसपास विसावा मंडळाने लेझीमचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम केलं आहे.केवळ गणेशोत्सवापुरता हा खेळ मर्यादित न ठेवता विविध सण, उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सार्वजनिक मिरवणुकांमधून लेझीमचा प्रसार केला जाते. त्यामुळे एका मंडळाचा उपक्रम राहिलेला लेझीम, आज सांगलीच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग बनला आहे. इतकंच नव्हे तर या लेझीमची भुरळ विदेशात देखील पाहायला मिळाली. सांगलीच्या मातीतील ही लेझीम कधी साता समुद्रा पार पोहोचली हे विसावा मंडळाला देखील कळाले नाही. त्यामुळेच विसावा मंडळाची तरुण पिढी देखील त्याच जोमाने आपली परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. VO:- संजय चव्हाण, अध्यक्ष विसावा मंडळ VO:- प्रथमेश वैद्य, यूवा प्रशिक्षक विसावा मंडळ VO 15 :- पारंपरिक वाद्यांचा आवाज ऐकला की उत्सवाचं वातावरणच बदलतं..ढोलाचा ठेका, हलगीचा कडकडाट, ताशाचा गजर,आणि लेझीमच्या घुंगरांचा नाद, या सगळ्यांचं एकत्रित सादरीकरण मिरवणुकीला वेगळी ओळख देतं. डीजेच्या मोठ्या आवाजापेक्षा हा नाद कदाचित कमी भासेल, पण त्यामागे असते वर्षानुवर्षांची साधना,परंपरा आणि कलाकारांची मेहनत. म्हणूनच ही कला आणि परंपरा टिकली पाहिजे यासाठी सांगलीतील विसावा मंडळ करत असलेला प्रयत्न वाखाण्याजोगा आहे.
0
0
Report

रत्नागिरी में डिजे-मुक्त गणेश उत्सव: कम आवाज में उत्सव की मांग बढ़ी

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- डिजे-मुक्त गणेशोत्सवाच्या मुद्द्यावर सध्या कमी आवाजाच्या इन्स्ट्रुमेंट्सला मागणी वाढली गणेश मंडळं ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी आणि उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यासाठी कमी आवाजातील वाद्यांना देत आहेत पसंती परिणामी कमी आवाजात पण भक्तिमय वातावरण टिकवणारा उत्सव साजरा करण्याकडे कल वाढतोय ध्वनीप्रदर्शन टाळत उत्सवाचा उत्साह कायम ठेवण्यासाठी कमी आवाजातील डीजे सेटला पसंती मर्यादित आवाजात चांगली साऊंड क्वालिटी देणाऱ्या सिस्टीमची खरेदी वाढली डीजेच्या ऐवजी ट्रॉली करावकेला इलेक्ट्रॉनिक दुकानातून वाढती मागणी
0
0
Report
Advertisement

चिपळूण–सावर्डे में बैल झुंज, ट्रैफिक जाम; पुलिस ने रास्ता साफ किया

Ratnagiri, Maharashtra:चिपळूण - रत्नागिरी.. मुंबई–गोवा महामार्गावर दोन बैलांमध्ये थरारक झुंज; सावर्डे येथे वाहतूक ठप्प, पोलिसांनी सोडवली झुंज.. मुंबई–गोवा महामार्गावर चिपळूणजवळील सावर्डे बाजारपेठ येथे भररस्त्यात दोन बैलांमध्ये जोरदार झुंज झाल्याची घटना घडली. अचानक सुरू झालेल्या या झुंजीमुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती.. भरधाव वाहनांच्या वर्दळीच्या ठिकाणी दोन्ही बैल एकमेकांना भिडल्याने वाहनचालक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बैलांच्या या झटापटीमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती.. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सतर्कता दाखवत शर्थीचे प्रयत्न करून दोन्ही बैलांना महामार्गावरून बाजूला हुसकावून लावले. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. पोलिसांच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठा धोका टळला..
0
0
Report

गृहराज्यमंत्री योगेश कदम ने परंडा के मृतक परिवार से मुलाकात कर सहायता की घोषणा

Dharashiv, Maharashtra:प्रथमेश देशमुख यांच्या कुटुंबीयांची गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतली भेट. प्रथमेशच्या कुटुंसाला शासकीय योजनांचा लाभ देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. घरकुल योजनेचा लाभ तातडीने देण्याचे मंत्री योगेश कदम यांचे निर्देश. प्रथमेशच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत योगेश कदम यांनी जाणून घेतल्या अडचणी. धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील खासापूर येथील मयत प्रथमेश देशमुख यांच्या कुटुंबीयांची राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज भेट घेतली. स्पर्धा परीक्षेतील अपयश आणि आर्थिक विवंचनेतून प्रथमेश देशमुख यांनी आत्महत्या केली होती. या घटनेनंतर प्रथमेशच्या कुटुंबीयांची भेट घेऊन योगेश कदम यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत संवेदना व्यक्त केल्या. दरम्यान, प्रथमेशच्या कुटुंबाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री योगेश कदम यांनी दिल्या आहेत. तसेच घरकुल योजनेचा लाभ तातडीने देण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करत कुटुंबाला शासनाच्या योजनांचा आणि मदतीचा लाभ मिळवून द्यावा, अशा सूचनाही कदम यांनी दिल्या. विशेष म्हणजे, इतकी गंभीर घटना घडूनही एकही मंत्री प्रथमेशच्या कुटुंबीयांच्या भेटीला आला नाही, अशी टीका सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी केली होती. त्यानंतर आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रथमेशच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.
0
0
Report

गणेशोत्सव के चलते मुंबई-गोवा राजमार्ग पर भारी वाहन 16 दिन के लिए बंद

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना आजपासून बंदी आरटीओ विभागाकडून अवजड वाहनांची कसून चौकशी 3 टप्प्यात अवजड वाहतुकीवर निर्बंध, 16 दिवसांमध्ये 10 दिवस गणेशोत्सवामध्ये अवजड वाहतुकीसाठी बंदी खारघर ते सावंतवाडी पर्यंत मुंबई गोवा महामार्गावर बंदी रत्नागिरी जिल्ह्यात कशेडी ते चिपळूण, चिपळूण ते रत्नागिरी आणि रत्नागिरी ते राजापूर अशी आरटीओ विभागाची सहा पथक 24 तास कार्यरत 16 टन किंवा त्यापेक्षा अधिक वजन क्षमतेच्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना बंदी भाविकांचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि वाहतूक कोंडी मुक्त व्हावा यासाठी राज्य शासनाचा निर्णय महामार्गावरील अवजड वाहतूक रोखण्यासाठी रत्नागिरी आरटीओची पथक तैनात अशी असेल अवजड वाहनांना बंदी... 11 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर पाच दिवसांचे गणपतीचे विसर्जन 18 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर गौरी गणपती विसर्जन 25 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर अनंत चतुर्दशी जयगड बंदर आणि जेएनपीटी बंदर येथून आयात निर्यात मालाची वाहने, दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, औषध, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, अन्नधान्, भाजीपाला, नाशवंत माल, या जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना नियम लागू नाही
0
0
Report
Advertisement

इंदापुर में पेपर फुटी के विरोध में विद्यार्थियों ने तहसील कार्यालय के सामने मोर्चा निकाला

Rui, Maharashtra:इंदापूर मध्ये पेपर फुटी वरून विद्यार्थ्यांचं आंदोलन..... इंदापूर तहसील कार्यालयावर काढला मोर्चा.... Anchor _स्पर्धा परीक्षेतील पेपर फुटीच्या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यांमध्ये तीव्र पडसाद उमटत असताना आज पुण्याच्या इंदापूर मध्ये सुद्धा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी इंदापूर तहसील कार्यालयावरती मोर्चा काढत पेपर फुटीचा निषेध नोंदवला. इंदापूर नगरपरिषद पासून इंदापूर तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. यात बहुसंख्येने विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी झाले होते.
0
0
Report

भेसळयुक्त बटर पर खाद्य सुरक्षा विभाग ने बड़ी कार्रवाई, 75,356 किलो जप्त

Ahilyanagar, Maharashtra:आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांच्या तपासणीसाठी अन्न आणि औषध प्रशासनाने विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत अहिल्यानगरच्या निंबळक परिसरातील एमआयडीसी भागातील अरिहंत कोल्ड स्टोरेजवर अन्न-औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ७५ हजार ३५६ किलो पाश्चराइज्ड कुकिंग बटरचा साठा ताब्यात घेण्यात आला असून, या साठ्याची किंमत तब्बल ३ कोटी ९५ लाख ६२ हजार रुपये आहे. ‘मधुरामा क्रीमी डिलाईट’ या ब्रँडच्या बटरच्या दर्जा आणि लेबलिंगबाबत संशय निर्माण झाल्यानंतर प्रशासनाकडून रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान विविध बॅचमधील चार बटरचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. हे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर बटरचा दर्जा तसेच अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले आहे की नाही, हे स्पष्ट होणार आहे.दरम्यान, संपूर्ण बटरचा साठा सुरक्षितपणे जप्त करून प्रशासनाच्या ताब्यात ठेवण्यात आला आहे. प्रयोगशाळेच्या अहवालात भेसळ, निकृष्ट दर्जा किंवा अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांविरोधात अन्न सुरक्षा कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे. सण-उत्सवांच्या काळात मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न-औषध प्रशासनाकडून तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top