445001
माझी उमेदवारी मदन येरावारांना पाडण्यासाठीच, माजी आमदार संदीप बाजोरीयांचा दावा.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून तुतारी चिन्हावरच आपण लढु असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत तिकीट वाटपाआधीच त्यांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार देखील सुरू केला आहे. भाजप आमदार मदन येरावार यांनी मतदारसंघ बकाल करून ठेवला, रस्त्यांची दैना झाली, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून भयमुक्त वातावरण देऊ असे वचन आपण जनतेला देत असल्याचे संदीप बाजोरिया यांनी सांगितले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
दहीहंडी उत्सव में बिना अनुमति डीजे बजाने पर चार गिरफ्तारी
Rui, Maharashtra:दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग... विनापरवाना डीजे वाजवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या ४ जणांविरुद्ध माळेगांव पोलिसात गुन्हा दाखल केला. माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीत काही इसमांनी एकत्रितपणे दहीहंडी संघ जमवून विनापरवाना डीजे वाद्य वाजवून तसेच चिथावणीखोर स्वरूपाची गाणी वाजवून एकमेकांना खुन्नस देत सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचे निदर्शनास आले. यावरून ४ जणांविरुद्ध माळेगांव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यामध्ये डीजेची दोन्ही वाहने जप्त करण्यात आली आहेत....0
0
Report
हिंदू उत्सवों के दौरान डीजे पर लगी बंदिश पर सांसद संग्राम जगतاپ ने सवाल उठाए
Ahilyanagar, Maharashtra:हिंदूंचे सण हे केवळ दोन-तीन तासांचे आनंदोत्सव असतात. मात्र, काही लोक जाणीवपूर्वक अपप्रचार करून आपल्याच लोकांना चिथावण्याचे आणि उत्सवांवर गदा आणण्याचे काम करत आहेत," असा आरोप अहिल्यानगर येथील आमदार संग्राम जगताप यांनी केला. दहीहंडी उत्सवातील भाषणा दरम्यान साऊंड सिस्टीमवरील बंदीच्या मुद्द्यावरून संग्राम जगताप यांनी प्रशासकीय यंत्रणा आणि विरोधकांवर टीका केली. वर्षभरात गणपतीचे १० दिवस, नवरात्रीचे ९ दिवस आणि दहीहंडीच्या काही तासांसाठीच हे साऊंड वाजतात. मग त्यावरच एवढा आक्षेप का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. "रात्री १० वाजताच खाकी वर्दीवाले येऊन सिस्टीम बंद करायला सांगत असतील, तर आपण कायदा पाळतोच; पण हिंदू सणांच्या वेळीच असा त्रास का दिला जातो? त्यामुळे जनतेने यापुढे हिंदू परंपरेला आणि सणांना विरोध करणाऱ्यांना उघडे पाडण्याचे आवाहन करत संग्राम जगताप यांनी केलंआहे.0
0
Report
हिंगोली के सेनगांव में खेत-झगड़े में दो गुट भिड़े, वीडियो में महिलाएं मारपीट करती दिखीं
Hingoli, Maharashtra:अँकर - हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वझर खुर्द येथे शेतीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोघांवर सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मारहाणीचा व्हिडिओ सध्या समोर आला असून फवारणीचे ट्रॅक्टर शेतीच्या धुऱ्यावरून नेण्याच्या कारणावरून हा वाद झाला आहे या मारहाणीचा व्हिडिओ आता समोर आला असून व्हिडिओमध्ये दोन महिला एकमेकींना मारहाण करताना दिसत आहेत. तसेच, एका महिलेच्या हातात शस्त्र असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसून येत या घटनेनंतर सेनगाव पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल झाले आहेत.0
0
Report
Advertisement
वाशीम में चोरियों की घटनाओं में बढ़ोतरी, हथियारबंद चोर खुलेआम घूम रहे
Washim, Maharashtra:वाशीम शहरासह जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून ,आता चोरटे हातात शस्त्र घेऊन खुलेआम फिरत असल्याचं समोर आलंय.वाशिम शहरातील गुरुप्रसाद कॉलनीत हातात चाकू घेऊन चोरीच्या उद्देशाने फिरणारा संशयित सीसीटीव्हीत कैद झाला आहे.या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून,नागरिकांनी पोलिसांना निवेदन देत रात्रीची पेट्रोलिंग आणि सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची मागणी केली आहे.0
0
Report
मनमाड में सर्पदंश से 11 वर्षीय बच्चे की दर्दनाक मौत
Nashik, Maharashtra:सर्पदंशाने 11 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू...\nमनमाडच्या अमरधाम परिसरातील घटना..\nअरुण सुनील पवार असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव..\nसर्पदंशाने अरुण सुनील पवार या अकरा वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या मनमाड मध्ये घडली.अमरधाम परिसरात राहणाऱ्या अरुण शाळेत घरी परतल्यानंतर पलंगावर असलेल्या सर्पाने त्याला दंश केले. त्याला उपचारासाठी मालेगाव येथे नेत असतांना रस्त्यात त्याची प्राणज्योत मावळली.मयत अरुण इयत्ता 5 वी शिकत होता .शाळेत हुशार आणि गुणी होता. त्याच्या आकस्मित निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.0
0
Report
हिंदू त्योहारों की आवाज़ पर रोक नहीं: योगेश कदम ने बापट को दिया सीधा चैलेंज
Ratnagiri, Maharashtra:दापोली - रत्नागिरी हिंदू सणांचा आवाज बंद होणार नाही; विद्याआनंद बापट यांच्या वक्तव्यावर योगेश कदम यांचं थेट आव्हान.. हिंदू सणांमधील ध्वनिप्रदूषणावरून पुण्यात विद्याआनंद बापट यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद पेटला आहे.. यावर खेडमधील दहीहंडी उत्सवातून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी बापट यांना थेट आव्हान दिले आहे.. "हिंदू सण आणि उत्सव परंपरेनुसार उत्साहातच साजरे होणार, त्यांचा आवाज कोणीही बंद करू शकत नाही," अशी ठाम भूमिका कदम यांनी मांडली असून,त्यांच्या या वक्तव्याने राजकीय व सामाजिक वर्तुळात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.. बाईट मंत्री योगेश कदम..0
0
Report
Advertisement
वाशीम में रानभाजी खाद्य महोत्सव में 23 प्रकार की रानभाज्यें प्रदर्शित
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर: पारंपरिक आहारपद्धती, स्थानिक जैवविविधता आणि रानभाज्यांचे पोषणमूल्य विद्यार्थ्यांना समजावे, यासाठी वाशिमच्या कामरगाव येथील पीएम.श्री.जिल्हा परिषद विद्यालयात रानभाजी खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात तब्बल २३ प्रकारच्या पावसाळी रानभाज्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले, तर त्यापासून तयार करण्यात आलेल्या विविध पारंपरिक पदार्थांचेही सादरीकरण करण्यात आले. मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमात कर्टुले, शेवगा, अंबाडी, चवळी, सुरणकंद, अळू, समुद्रशोक, केना आणि चमकोरा यांसह विविध रानभाज्यांचा समावेश होता. ज्वारी-बाजरीच्या भाकरी, धपाटे, अंबाडीची भाकर, शेवगा व समुद्रशोकबिर्याणी, तसेच करवंद, चिंच आणि पुदिन्याच्या सरबताचा उपस्थितांनी आस्वाद घेतला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पारंपरिक आहारपद्धतीसोबतच स्थानिक रानभाज्यांचे महत्त्व आणि त्यांचे पोषणमूल्य जाणून घेण्याची संधी मिळाली.0
0
Report
अमरावती में नई हत्या: शहर में 34वीं वारदात, तनाव बढ़ा
Amravati, Maharashtra:अमरावती शहरात रात्री आणखी एकाची हत्या; 8 महिन्यांत अमरावती शहराततब्बल 34 हत्या, शहरात खळबळ अँकर :- अमरावती शहर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरल असून काल रात्री गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कपिलवस्तू नगर येथे विशाल मनोहर वय २० वर्ष या तरुणाची चाकूने निर्घुणपने हत्या करण्यात झाली. कपिलवस्तू नगर भागात अज्ञात हल्लेखोरांनी विशालच्या पायावर आणि मांडीवर धारदार चाकूने वार केले आणि आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. त्यानंतर त्याला रुग्णालयात भरती करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान विशालचा मृत्यू झाला आहे. यानंतर घटनास्थळी आणि रुग्णालयात परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. हत्येचं कारण अद्यापही पुढे आले नसले तरी घटनेनंतर आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी शोध पथक रवाना केली आहे. अमरावती शहरात चालू वर्षातील जानेवारी ते 5 सप्टेंबर या कालावधीमध्ये ३४ हत्येच्या घटना घडल्याने एकच खळबळ उडाली असून या आठवडाभरात तिघांची हत्या करण्यात आली दोन दिवसांपूर्वी महाविद्यालयीन तरुणीची हत्या प्रकरण ताज असताना पुन्हा जीवघेणा हल्ला करण एका शुल्लक कारणावरून हत्या करण्यात आल्याने शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एरणीवर आला आहे.0
0
Report
नेपाल में महाप्रलय के बीच मेडिकल सर्टिफिकेट से योगिनी पाटिल बचे, जानिए पूरी कहानी
Ahilyanagar, Maharashtra:स्लग- वैद्यकीय प्रमाणपत्रामुळे नेपाळ प्रलयातून बचावल्या योगिनी पाटील मेडिकल सर्टिफिकेटसाठी रुग्णालयात थांबावे लागल्याने नेपाळमधील महाप्रलयातून शेवगाव येथील महिला पर्यटक बचावल्या... योगिनी पाटील नेपाळमधील संकटाची थरारक कहाणी सांगितली... या 16 ऑगस्टला शेवगावहून कैलास मानसरोवर यात्रेसाठी रवाना झाल्या होते...17 ऑगस्टला काठमांडू येथून पुढील प्रवासासाठी त्या निघाल्या... त्यांचा सुमारे दीडशे यात्रेकरूंचा समूह होता... मात्र, सगळे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये विभागलेले होते... दरम्यान योगिनी पाटील यांच्या ग्रुपमधील तहसीलदार स्मिता पवार यांची प्रकृती खालावल्याने त्यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले... त्याच दिवशी सकाळी इमिग्रेशन सेंटरवर जाण्याचे सर्वांचे नियोजन होते...मात्र, तेथे मेडिकल सर्टिफिकेटची मागणी झाल्याने पाटील आणि त्यांच्या ग्रुपमधील सदस्यांना पुन्हा रुग्णालयात जावे लागले...तपासणी, प्रमाणपत्र मिळवण्यात वेळ गेला...त्याचवेळी इमिग्रेशन सेंटरच्या परिसरात महापुराचे पाणी घुसले...जेथे पाटील आणि त्यांचा ग्रुप जाणार होता , ते ठिकाण महापुरात नाहीसे झाले... हे सर्व समजल्यानंतर सर्वाच्या काळजाचा ठोका चुकला... मेडिकल सर्टिफिकेटसाठी रुग्णालयात थांबावे लागल्याने आमचा जीव वाचला, असे योगिनी पाटील म्हणाल्या...तीन दिवस नेपाळमध्ये आक्रोश, भीती आणि भयाण शांतता होती... अनेकांची घरे वाहून गेली...या काळात स्थानिक नागरिक, गाईड यांनी मोठी मदत केली...महादेवाच्या कृपेनेच आम्ही घरी पोहचलो असं योगिनी पाटील यांनी सांगितले.0
0
Report
Advertisement
नए मूंग की आवक से बाजारों में हलचल, किसानों को मिलेंगे बेहतर दाम
Washim, Maharashtra:वाशीम:\nFile:0609ZT_WSM_NEW_MOONG_ARRIVES रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशीम \nअँकर:वाशिम जिल्ह्यात काही भागात पावसाअभावी सोयाबीन पीक सुकण्याच्या मार्गावर असताना,दुसरीकडे अल्पावधीत तयार होणाऱ्या मुगाची बाजारात आवक सुरू झाली आहे. जिल्ह्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये यंदाच्या खरीप हंगामातील नवीन मूग दाखल होत असून, सध्या मुगाला ६ ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळत आहे.नवीन मुगाची आवक सुरू झाल्याने बाजारपेठांमध्ये शेतमालाची चहलपहल वाढली असून,शेतकऱ्यांनाही चांगल्या दराची अपेक्षा आहे.0
0
Report
पुणे के अस्पताल में आग: नगरपालिका ने दो बड़े अस्पतालों में फायर सिस्टम में खामियाँ पाईं
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर च्या हॉस्पिटलमधील आग दुर्घटनेनंतर मनपा आणि आरोग्य प्रशासन जागे झाले आहे. प्रशासनाने शहरातील बड्या रुग्णालयांची धडक झाडाझडती सुरू केली आहे. शहरातील नामांकित दोन मोठ्या रुग्णालयांच्या अग्निशमन यंत्रणेत त्रुटी आढळून आल्या आहेत. आरोग्य आयुक्त डॉ. सुनील भोकरे, मनपा उपायुक्त अंकुश पांढरे यांनी एशियन हॉस्पिटलमध्ये बैठक घेतली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन प्रमुख आणि मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांनी शहरातील दोन मोठ्या रुग्णालयाची ऑन-द-स्पॉट तपासणी केली. यात स्वयंचलित यंत्रणेेत बदल सुचवण्यात आले असून, रुग्णालयांनी ते लवकरात लवकर अमलात आणण्याची ग्वाही दिल्यानंतर महानगरपालिकेचे आरोग्य पथक माघारी आले.. धक्कादायक म्हणजे अनेक रुग्णालयांत केवळ NOसी साठी फायर यंत्रणा उभारली जाते. मात्र प्रत्यक्ष वापर होत नाही किंवा मनपाकडून तपासणी व कर्मचाऱ्यांना ट्रेनिंगही दिले जात नाही. यंत्रणा असूनही दुर्घटना घडल्यास त्याचा किती वापर होईल, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. यापूर्वी दोनदा तपासणीचे आदेश देऊनही अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नसल्याचे समोर आले आहे..0
0
Report
महापालिका आयुक्त ने फाइल मंजूरी के अधिकार बदले, वित्तीय अनुशासन की तैयारी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मनपा आयुक्त यांनी दोन दिवसांपूर्वीच प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल केले. १५ लाख रुपयांपर्यतच्या फाइली मंजूर करण्याचे अधिकार दोन्ही अतिरिक्त आयुक्तांना प्रदान करण्यात आले आहेत. उर्वरित सर्व फाइली मंजुरीसाठी थेट आयुक्तांकडे जातील. या निर्णयामुळे आर्थिक शिस्त लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. २५ लाखांवरील बिल मंजुरीच्या फाइली विभागप्रमुखांमार्फत मुख्य लेखा परीक्षकांकडे तपासणीसाठी जातील. १५ लाखांवरील संचिका मुख्य लेखाधिकाऱ्यांकडून आयुक्तांकडे जातील, महापालिकेत अनेक नगरसेवकांनीही फाईल मंजूर करण्याबाबत अडचणीच्या तक्रारी केल्या होत्या त्यानंतर आता हे आर्थिक बदल महापालिकेने केले आहे आता यानंतर तरी आर्थिक शिस्त लागते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल..0
0
Report
Advertisement
सोलापुर के शिक्षकों का पुरानी पेंशन के लिए आंदोलन, काला पट्टी बाँधकर मौन मार्च
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - जुनी पेन्शनसाठी शिक्षकांचा एल्गार; तोंडावर काळ्या फिती बांधून काढण्यात आला मूकमोर्चा जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सोलापुरातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शेकडो कर्मचाऱ्यांनी तोंडावर काळ्या फिती बांधत चार हुतात्मा पुतळ्यापासून पूनम गेटपर्यंत मूकमोर्चा काढून आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या तसेच त्यानंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना १९८२ च्या तरतुदीनुसार जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या या मागणीबाबत सरकारने २५ सप्टेंबरपर्यंत स्पष्ट आणि सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. मागणी मान्य न झाल्यास २८ सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल. त्यानंतरही सरकारने दखल न घेतल्यास २ ऑक्टोबरपासून उपोषणाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. दत्तात्रय सावंत, माजी आमदार, शिक्षक मतदारसंघ0
0
Report
छत्रपति संभाजी नगर के मुकुंदवाडी स्टेशन पर महिला ने बेटे के साथ आत्महत्या की
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरातील मुकुंदवाडी रेल्वे स्थानकावर शनिवारी एका २६ वर्षांच्या महिलेने आपल्या दोन वर्षांच्या मुलासह जालन्याकडे जाणाऱ्या तपोवन एक्स्प्रेससमोर उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेतील आई-लेकरांची ओळख पटली नाही. प्रत्यक्षदर्शीनुसार, दुपारी साडेबारा पासून ही महिला आपल्या बाळाला घेऊन स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर अत्यंत शांत बसली होती. बाळ रडू नये म्हणून तिने त्याच्या हातात एक चिप्सचे पाकीट दिले होते. निरागस बाळ चिप्स खाण्यात आणि खेळण्यात मग्न होते. मात्र, अडीच वाजेच्या सुमारास तपोवन एक्स्प्रेस भरधाव जवळ येताच महिलेने अचानक बाळाला कडेवर घेतले आणि कुणाला काही समजण्याच्या किंवा वाचवण्याच्या आतच थेट धावत्या रेल्वेसमोर झोकून दिले. घटनेनंतर लोकोपायलटने तातडीने पुंडलिकनगर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवले.0
0
Report
पानी की कमी से नुकसान: नाशिक के किसान उभे पिक बचाने की जद्दोजहद
Nashik, Maharashtra:मालेगाव (नाशिक) लखाने क्षेत्र के किसान की व्यथा... पावसाअभावी उभ्या पिकांत घातल्या मेंढ्या... गेल्या कुछ दिनोंांपासून पावसाने दडी मारल्याने मालेगाव लखाने परिसरातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पावसाच्या प्रतीक्षेत असलेली उभी खरीप पिके पाण्याअभावी सुकले आहेत. पावसाअभावी आपल्या शेतातील पीक वाचण्याची शक्यता कमी झाल्याने एका शेतकऱ्याने अखेर उभ्या पिकांत मेंढ्या चारण्यासाठी सोडल्या. पिकातून उत्पन्न मिळण्याऐवजी नुकसान सहन करावे लागत आहे. शेतकऱ्यांनी बियाणे, खते, औषधे, मशागत आणि मजुरीवर मोठा खर्च केला आहे. मात्र पावसाने मोठा खंड दिल्याने जमिनीतील ओलावा कमी होत असून पिकांच्या वाढीवर परिणाम होत आहे. सिंचनाची सुविधा नसलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील इतर भागांतही पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांना पाण्याची गरज भासत असल्याचे वृत्त आहे.0
0
Report
Advertisement
