445001
माझी उमेदवारी मदन येरावारांना पाडण्यासाठीच, माजी आमदार संदीप बाजोरीयांचा दावा.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून तुतारी चिन्हावरच आपण लढु असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत तिकीट वाटपाआधीच त्यांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार देखील सुरू केला आहे. भाजप आमदार मदन येरावार यांनी मतदारसंघ बकाल करून ठेवला, रस्त्यांची दैना झाली, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून भयमुक्त वातावरण देऊ असे वचन आपण जनतेला देत असल्याचे संदीप बाजोरिया यांनी सांगितले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
अमित ठाकरे ने रिक्षा से नवी मुंबई में गणपति दर्शन कराया
Navi Mumbai, Maharashtra:अमित ठाकरे यांनी रिक्षातून प्रवास करून केले नवी मुंबईत गणपती दर्शन. नवी मुंबई मनसेचा महाराष्ट्र सैनिक अजय त्रिलोटकर याची मनसेचा झेंडा ,चिन्ह राजसाहेब यांचा फोटो असलेली रिक्षा पाहून मनसे नेते अमित ठाकरे यांना मोह आवरला नाही ... त्यांनी तात्काळ आपल्या गाडीतून उतरून रिक्षात बसण्याचा आग्रह केला ... आणि नवी मुंबई मध्ये मंडळांचे गणपती दर्शन चक्क रिक्षातून प्रवास करून केले ... नवी मुंबईकरांना अमित ठाकरे यांचा हा साधेपणा आवडला .. तर अनेकांनी याचे कौतुक केले ... या महाराष्ट्र सैनिकाला राजसाहेबांना भेटवणार हा शब्द देऊनच अमित ठाकरे यांनी रिक्षा चालकाचा निरोप घेतला ...0
0
Report
गणेश विसर्जन के दौरान भाग्यश्री की मौजूदगी पर सबकी निगाहें
Sangli, Maharashtra:गणपती पंचायतन संस्थानच्या श्रीचे आज पार पडणार विसर्जन..अभिनेत्री भाग्यश्री उपस्थिती राहणार का,याकडे लक्ष.. सांगलीच्या मानाचा आणि गणपती पंचायतन संस्थांच्या गणपतीची आज विसर्जन पार पडणार आहे.शाही मिरवणुकीने गणेश विसर्जन होणार आहे,या मिरवणुकीत विजयसिंहराजे पटवर्धन,राणी राजलक्ष्मी आणि युवराज अदित्यराजे पटवर्धन यांच्या प्रमुख उपस्थिती ही गणेश विसर्जन पार पडणार आहे.गणेश प्रतिष्ठापनेच्या दिवशी आरतीवरून अभिनेत्री भाग्यश्री आणि पटवर्धन कुटुंबातला वाद चव्हाट्यावर आला होता,त्यामुळे उद्याच्या होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीमध्ये अभिनेत्री भाग्यश्री उपस्थित राहणार का ? याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले.0
0
Report
वाशिम में सोयाबीन फसल बर्बाद, किसान संगठनों ने मुआवजा और कर्ज माफी की मांग
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यात ४५ ते ५० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे.मालेगाव तालुक्यासह राजुरा शिवारात सोयाबीन पीक पूर्णपणे करपल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.या संतापातून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी उध्वस्त सोयाबीनची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत राजुरा स्मशानभूमीत अंत्यविधी केला.त्यानंतर रात्री सोयाबीनची शोकसभा घेण्यात आली. यावेळी हेक्टरी एक लाख रुपये मदत,पीक विम्याचा लाभ,कृषी पंपांचे वीज बिल माफ करावे आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी,अशा मागण्या करण्यात आल्या.कृषीमंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हा दौऱ्यावर येताना शेतकऱ्यांसाठी भरीव मदत घेऊन यावे,अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावं लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष दामू इंगोले यांनी दिला.0
0
Report
Advertisement
लातूर के हासुरी गांव में राशन वितरण पर भिड़ंत, दुकानदार-ग्रामीण बहस का वीडियो वायरल
Latur, Maharashtra:लातूरच्या निलंगा तालुक्यातील हासुरी गावात रेशन धान्य वाटपावरून ग्रामस्थ आणि रेशन दुकानदारामध्ये वाद झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी रेशन दुकानदारांकडून ग्राहकांना, “रेशन घ्यायचं असेल तर घ्या, नाहीतर इथून जा,” असं म्हणत दमदाटी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिल्ह्यातील अनेक रेशन दुकानांमध्ये दुकानदारांच्या मनमानीच्या तक्रारी समोर येत असताना, हासुरीतील हा प्रकार चर्चेत आला आहे. आता या प्रकरणी प्रशासन काय कारवाई करणार, याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागलं आहे.0
0
Report
गणेशोत्सव में दुर्गराज रायगड की आकर्षक प्रतिकृति बन गई
Nashik, Maharashtra:गणेशोत्सवात साकारला ‘दुर्गराज रायगड’ नाशिकच्या शिंपी परिवाराने यंदा गणेशोत्सवानिमित्त आपल्या घरात ‘दुर्गराज रायगड’चा आकर्षक देखावा साकारला आहे. तीन पिढ्यांनी तब्बल दोन महिने मेहनत घेत अवघ्या ६ बाय ८ फुटांच्या जागेत रायगडाची प्रतिकृती उभारली आहे.गोमुख दरवाजा, नगारखाना, जगदीश्वर मंदिर, शिवसमाधी आणि भवानी माता मंदिरासह शिवराई नाणी, राजमुद्रा, वाघनखे, ढाल-तलवार यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पुठ्ठा, कापड, वर्तमानपत्रे आणि माती यांसारख्या पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यात आला आहे.‘गड-किल्ले वाचवा, इतिहास जतन करा’ हा संदेश देत दुर्गसंवर्धन, स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणाचे महत्त्व या देखाव्यातून अधोरेखित करण्यात आले आहे.0
0
Report
सात महिन्यात ध्वस्त सड़क: ठेकेदार पर कठोर कार्रवाई की मांग
Nashik, Maharashtra:या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांचा धोका वाढला असून शाळकरी विद्यार्थी, रुग्ण, गर्भवती महिला तसेच सर्वसामान्य प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा सवाल नागरिकांनी केला आहे. या रस्त्याची चौकशी करून दोषी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, सदर रस्ता महिन्याभरात नवीन बनवून द्यावा अन्यथा उपोषणाचा इशारा उपसरपंच जयराम भोये (मनखेड) यांनी दिला आहे.0
0
Report
Advertisement
शिरूर सांसद कोल्हे के गणेश उत्सव की मांडणी ने राजनीतिक हलचल मचा दी
Shirur, Maharashtra:शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या जनसंपर्क कार्यालयातील बाप्पाचा देखावा सध्या चांगलाच चर्चेत आलाय. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाचा उत्साह राज्यभरात पाहायला मिळतोय; पण खासदार कोल्ह्यांच्या कार्यालयात बसवलेल्या बाप्पाच्या मांडणीने राजकीय वर्तुळासह सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. बाप्पाच्या मूर्तीशेजारीच शिरूरची ओळख असणारी पारंपरिक बैलगाडी साकारण्यात आली असून, त्यावर 'मी साहेबांसोबत' अशी ठळक अक्षरात पाटी लावण्यात आली आहे. इतकंच नाही, तर बैलगाडीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा फोटोही सन्मानाने ठेवण्यात आलाय. शिरूर पट्ट्यातील बैलगाडी संस्कृती आणि साहेबांप्रती असलेली निष्ठा यांचं दर्शन घडवणारा हा देखावा पाहण्यासाठी सध्या कार्यकर्त्यांची आणि नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.0
0
Report
बारिश ने किसानों की हालत खराब की; सूखा घोषित कर मदद की मांग
Buldhana, Maharashtra:पावसाने घात केला! शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला; कोरडा दुष्काळ जाहीर करून मदतीची मागणी0
0
Report
अकोला के कानशिवणी में विवाद के बाद हवा में गोली चलाकर भीड़ हटाई गई
Akola, Maharashtra:गाडी उभी करण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर जमलेली गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केल्याची घटना अकोला जिल्ह्यातील कानशिवणी येथे घडली आहे. प्रवीण हुंडीवाले यांनी त्यांच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून हवेत एक गोळी झाडल्याची माहिती आहे. त्यांच्यासोबत असलेल्या पोलीस अंगरक्षकानेही हवेत गोळी झाडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अकोला जिल्ह्यातील कानशिवणी येथील गजानन महाराज चौकात हा प्रकार घडला. प्रवीण हुंडीवाले हे चौकात आले असताना गाडी उभी करण्याच्या कारणावरून काही नागरिकांसोबत त्यांचा वाद झाल्याची माहिती आहे. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले. जमलेली गर्दी अरेरावी करत अंगावर येत असल्याने भीतीची परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे गर्दी पांगवण्यासाठी हुंडीवाले यांनी त्यांच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून हवेत एक गोळी झाडल्याची माहिती त्यांच्या अंगरक्षकाने पोलिसांना दिली आहे. दरम्यान, हुंडीवाले यांच्या सोबत असलेल्या पोलीस अंगरक्षकानेही हवेत एक गोळी झाडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर जमलेली गर्दी तेथून निघून गेली. घटनची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर प्रवीण हुंडीवाले हे त्यांच्या अंगरक्षकासह बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात पोहोचले आणि तक्रार दाखल केली. हुंडीवाले यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार करावा लागल्याची माहिती त्यांच्या अंगरक्षकाने पोलिसांना दिली आहे. मात्र, नेमका वाद कशामुळे झाला आणि हवेत गोळीबार करण्याची परिस्थिती कशी निर्माण झाली, याचा तपास बोरगाव मंजू पोलीस करत आहेत.0
0
Report
Advertisement
नागपुर के प्रताप नगर का महागणपती स्वप्ननगरी थीम 'ड्रीम लैंड' में विराजमान
Nagpur, Maharashtra:नागपूर -- नागपुरातील प्रतापनगरचा महागणपती यंदा स्वप्ननगरीत विराजमान झालाय.. प्रथम फाउंडेशनच्या यां गणेशोत्सव मंडळाने हा स्वप्ननगरी देखावा साकारलेला आहे. यापूर्वी चांद्रयान आणि अवतार असे देखावे साकारणाऱ्या या गणेशोत्सव मंडळांनी यंदा याच थीमवर आधारित भव्य सायंटिफिक संकल्पनेतून हा देखावा साकारलाय... महत्त्वाचं म्हणजे याकरता पर्यावरण पूरक साहित्याचाच वापर केलाय... ज्या स्वप्ननगरीत बाप्पा विराजमान झाले तिथून आढावा घेतल्या आमच्या प्रतिनिधींनी बाईट --- सारंग कदम,प्रताप नगर चा महागणपती (121 केलाय... दुसऱ्या विंडोमध्ये शॉटस चालवता येईल)0
0
Report
गणित शिक्षक अभाव पर तालाठोको आंदोलन, पालक छात्र आक्रोश
Bhandara, Maharashtra:गणित शिक्षक अभाव के कारण साकरीटोला जिला परिषद हाई स्कूल व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय में गणित विषय की नियमित शिक्षिका अभाव के कारण विद्यार्थियों के शैक्षणिक नुकसान के विरोध में संतप्त पालक, विद्यार्थी, शाला सुधार समिती व व्यवस्थापन समिती ने गुरुवार शाळेला कुलूप लगाकर ‘तालाठोको’ आंदोलन किया। आगामी पंधरा दिनों में प्रथमिक सत्र परीक्षा होने के कारण विद्यार्थियों की गणित विषय की तैयारी का प्रश्न गंभीर बना था। गणित विषय के लिए नियमित शिक्षक उपलब्ध न होने के कारण विशेषतः नववी व दहावी के विद्यार्थियों के शैक्षणिक नुकसान का आरोप पालकों ने लगाया। बार-बार मांग करने के बावजूद समस्या नहीं सुलझी, इस कारण पालक व शाला व्यवस्थापन समिती ने आंदोलन का रास्ता अपनाया。0
0
Report
अकलूज में दूध भेसळी के विरोध में सामाजिक जागरूकता का अनोखा प्रदर्शन
Pandharpur, Maharashtra:गौराई समोर सोलापूर जिल्ह्यातील अकलूज मध्ये मोहनराव देशमुख कुटुंबीयांनी दूध भेसळीचा प्रबोधनात्मक देखावा तयार केला आहे. गौराई समोर अन्न औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कामाची झलक पाहायला मिळत आहे. देखाव्यात शेतात राबणाऱ्या दूध उत्पादन चांगले व्हावे यासाठी जनावराची देखभाल करणाऱ्या शेतकरी महिला. आणि जनावरांचा गोठा तसेच अन्न औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांचे अभार मानणारी गायीची प्रतिमा सोबत अन्न औषध प्रशासन विभागाचे अधिकारी आहेत. हा देखावा पाहण्यासाठी अनेक महिलांची गर्दी होत आहे.0
0
Report
Advertisement
पंढरपूर-फलटण रेलवे मार्ग पर किसानों को चौगुना मुआवजा देने की मांग
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर फलटण रेल्वे मार्गात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना चालू बाजारभावाच्या चौपट दराने नुकसान भरपाई देण्याची मागणी माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे केली. पंढरपूर फलटण या रेल्वे मार्गासाठी माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी सातारा सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांसह बैठक घेतली. या बैठकीमध्ये बाधित शेतजमीन तसेच रहिवासी भागाची माहिती घेण्यात आली. यानंतर माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना चालू बाजारभावाच्या चौपट दराने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देण्याचे माजी खासदार नाईक निंबाळकर यांनी सांगितले.0
0
Report
एफडीए ने अकोला के खाद्य प्रतिष्ठानों पर छापेमारी में 593 किलो कालबाह्य तुप जब्त
Akola, Maharashtra:अकोला शहरातील खाद्य अस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाने दोन दिवसीय विशेष तपासणी मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन नामांकित फर्ममध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलेला तब्बल ५९३ किलो कालबाह्य तुपाचा साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या तुपाची अंदाजे किंमत ४ लाख १५ हजार ९३ रुपये आहे. या प्रकरणी दोन्ही आस्थापनांचे अन्न परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत. एफडीएचे सहआयुक्त देवानंद वीर यांनी दिलेल्या माहितीीनुसार, अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने अकोला शहरातील विविध खाद्य प्रतिष्ठानांची तपासणी केली. यावेळी पूर्वा मार्केटिंग येथे केलेल्या तपासणीत तब्बल १५ वेगवेगळ्या प्रकारच्या कालबाह्य तुपाचा साठा आढळून आला. पथकाने ४५८ किलो तूप जप्त केले असून त्याची अंदाजे किंमत ३ लाख ३४ हजार ९३ रुपये आहे.त्यानंतर मेसर्स लिलाधर जगजीवन या फर्मवर कारवाई करण्यात आली. येथे ‘वटुला प्रीमियम घी’ या ब्रँडचा कालबाह्य तुपाचा साठा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे आढळले. प्रशासनाच्या पथकाने १३५ किलो तूप जप्त केले असून त्याची किंमत सुमारे ८१ हजार रुपये आहे. कालबाह्य अन्नपदार्थांची विक्री किंवा साठवणूक करून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे. दोन्ही आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित करण्यात आल्याने शहरातील खाद्य व्यावसायिकांमध्येही खळबळ उडाली आहे.0
0
Report
छत्रपति संभाजीनगर में जालना रोड पर सबसे लंबा उड्डाणपुल बनेगा, फडणवीस ने घोषणा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मध्ये जालना रोडवर राज्यातील सर्वात जास्त लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी जाहीर केले. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे महत्त्वाचं म्हणजे हा रस्ता करण्याची गेल्या कित्येक वर्षांची मागणी आहे.. या आधी दोन वेळा यासाठी भुमीपूजनही झालं मात्र प्रत्यक्षात काम सुरू होऊ शकलं नाही आणि त्यात मुख्यमंत्र्यांनी आता नव्याने घोषणा केली आहे...0
0
Report
Advertisement
