icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Oct 2024, 05:25 am

माझी उमेदवारी मदन येरावारांना पाडण्यासाठीच, माजी आमदार संदीप बाजोरीयांचा दावा.

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून तुतारी चिन्हावरच आपण लढु असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत तिकीट वाटपाआधीच त्यांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार देखील सुरू केला आहे. भाजप आमदार मदन येरावार यांनी मतदारसंघ बकाल करून ठेवला, रस्त्यांची दैना झाली, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून भयमुक्त वातावरण देऊ असे वचन आपण जनतेला देत असल्याचे संदीप बाजोरिया यांनी सांगितले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

वाशिम में 50 दिन से बारिश नहीं, खरीफ नुकसान और DCH MH एप गड़बड़ी

Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यात गेल्या ५० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके करपून गेली असून शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे.त्यातच आता शासनाच्या पीक-पेरा नोंदणीसाठी वापरणाऱ्या DCH MH अ‍ॅपमध्ये गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांच्या पीक नोंदणीचे काम रखडले आहे.पीक-पेरा नोंदणी वेळेत होत नसल्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आणखी मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने अ‍ॅपमधील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून पीक-पेरा नोंदणी सुरळीत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
0
0
Report

उल्हासनगर में करंट से 26 वर्षीय युवती की मौत, CCTV पोल पर सुरक्षा सवाल

Ambernath, Maharashtra:उल्हासनगर-३ मधील धक्कादायक घटना उल्हासनगर-३ ओटी सेक्शन परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. गणेश गंगा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या करिश्मा मडवानी (वय २६) या तरुणीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. सुरक्षेसाठी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या पोलच्या संपर्कात येताच करिश्मा यांना विजेचा जोरदार धक्का बसला. पोलमध्ये नेमका करंट कशामुळे आला, याचे कारण अद्याप अस्पष्ट असून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. या दुर्घटनेमुळे परिसरातील सीसीटीव्ही पोलच्या विद्युत सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. चंद्रशेखर भुयार उल्हासनगर
0
0
Report

महासभा में अनुबंध कर्मियों के लिए 7500 रु वृद्धि: आयुक्तों पर सागर नाईक का तीखा निशाना

Navi Mumbai, Maharashtra:कंत्राटी कर्मचाऱ्यांना 7500 रूपये वाढीव पगार देण्याचा निर्णय महासभेत मंजूर झाला असताना देखिल प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे कंत्राटी कामगारांना वाढीव पगारापासून वंचित रहावे लागत आहे. याविरोधात सभागृह नेते सागर नाईक आक्रमक झाले असून महासभेत आयुक्तांसह प्रशासनाला धारेवर धरलेय. पुढील 15 दिवसात प्रशासनाने कंत्राटी कामगारांना वाढीव पगार देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि हा विलंब आम्ही खापवून घेणार नाही असा थेट इशारा मनपा आयुक्तांना दिलाय. यासोबतच तुमचा वैयक्तिक विरोध असेल तर सांगा पण स्वतःच डोक लावायला जाऊ नका असे खडेबोल सभागृह नेते सागर नाईक यांनी आयुक्तांना सुनावले आहेत।
0
0
Report
Advertisement

ओबीसी जनगणना को लेकर किसानों-नेताओं का दिल्ली तक आंदोलन शुरू

Nagpur, Maharashtra: Ngp wadetiwar Byte live u ने फीड पाठवले नागपूर - विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते - On ओबीसी बैठक - आज विदर्भातील सर्व जिल्ह्यातून ओबीसीचे सर्व नेते, पदाधिकारी ओबीसी चळवळीत काम करणारे निवडक प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होती - सरकार आमच्याशी जी चालबाजी करते आहे, आमच्या समाजाचे फसवणूक करते, हे एक राजपत्र प्रसारित झाला आहे,पंधरा दिवस प्रसिद्ध झाल्यापासून लोकांपुढे येऊ दिला नाही, याचं कारण असं आहे की जे 1 फेब्रुवारीला जनगणना होणार होते तो त्यांनी एक डिसेंबरला केलाय कारण उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा आणि उत्तराखंड या चार राज्यांच्या निवडणुका आहे म्हणून एक फेब्रुवारीपासून होणारे जनगणना ही एक डिसेंबर पासून केली - जात- निहाय जनगणना ओबीसींची झाली पाहिजे, ओबीसींचा स्वतंत्र कॉलम असला पाहिजे यासाठी आमची मागणी होती, म्हणून सरकारने लोकांचा आक्रोश होऊ नये म्हणून सरकारने ओबीसींची फसवणूक करण्यासाठी दोन महिने अगोदर अशा प्रकारचा राजपत्र काढून हे राजपत्र फसवून काय असं मी मानतो, - साधारणता एक नोव्हेंबरला दिल्लीत देशव्यापी आंदोलनाची सुरुवात होणार आहे, यापूर्वी दिल्लीत 62 संघटनाची बैठक झाली, मी त्यात गेलो नव्हतो, सरकारने दोन महिने आधी जनगणना सुरू केल्याने आमचा आंदोलन एक नोव्हेंबरला दिल्लीत होणार आहे - साधारणतः 63 संघटना 13 सप्टेंबर च्या बैठकीत दिल्लीत होत्या, आमचा स्वतंत्र ओबीसीचा कॉलम जनगणनेत असावा - ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली नाही तर आमचा आरक्षण संपुष्टात येईल, सुप्रीम कोर्ट फडणवीस सरकारने आमची फसवणूक केली, सुप्रीम कोर्टात ओबीसींच्या निकाल लागला नाही मात्र लांबवत चालले आहे - माझ्या मतदारसंघात ओबीसींच्या जागा कमी झाल्या, ऑपरेशनच्या जनगणना स्वतंत्र कॉलम शिवाय झाले नाही तर उरलं सोडलं आरक्षणही संपुष्टात आणण्याचा यांचा चालबाजी आणि उद्देश आहे हे आता लपून राहिलं नाही - 2 ऑक्टोबर गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंतीच्या निमित्ताने तालुका स्तरावर सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला आहे, 25 ऑक्टोबरला जिल्हास्तरीय आंदोलन आणि मोर्चा होईल - त्यानंतर चलो दिल्लीचा नारा घेऊन एक नोव्हेंबर ला दिल्लीला पोहचणार - On जरांगे पाटील - मला वाटतं की तीन वेळा जरांगे पाटलांचा आंदोलन झालं या तीनही आंदोलनात गुलाल फासून, कागद देऊन सरकारने त्यांची बोळवणूक केली - त्यांनी ज्या काही मागण्या दिल्या आणि त्या मंजूर केल्यानंतर त्यावर आमच्या लक्ष आहे, जर त्या 12 मागण्यांमध्ये ओबीसींच्या हक्क हिरावला जात असेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही, आमच्या वाट्याचं कुणाला देऊ नका ज्यांना कुणाला जायचं असेल ते स्वतंत्र द्या - आता न्यायालयीन लढाई सुरू झालेली आहे - On नांदेड बैठक काजू- बदाम - मंत्री गेले की अधिकाऱ्यांना सवय झाली आहे की काजू बदामाचे प्लेट पुढे आणून ठेवायचे, पहिले हे चिवडा द्यायचे आता ड्रायफ्रूट देतात, कोणाला भुक लागली तर कोणी खातो, या संवेदनशील विषयाला मराठवाड्यात दुष्काळा च्या माध्यमातून आला आहे, त्यामुळे काजू किसमिस खाल्ल्याने कोणाचं मन बदलत नाही - भरणे हे ओबीसी चळवळीतील आहेत त्यामुळे ते शेतकऱ्यांचा अहित करणार नाही मात्र तिजोरीची चाबी देवेंद्र फडणीस यांच्याकडे आहे त्यामुळे ते किती खोलतात आणि किती देतात - मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे त्यासाठी आम्ही जाणार दौरा करणार - On दिल्ली आंदोलन - आम्हाच्या ६०-७० संघटना बसतील आणि त्याचा कसा स्वरूप असेल हे जॉईंटली त्या ठिकाणी दिल्लीत घोषित होणार आहे ते लवकर होणार आणि त्याची तयारी कशी असणार हे सांगणार - On दुष्काळ केंद्र सरकार मदत - मुख्यमंत्री विरोधी पक्षात असताना एनडीआरएफ, एसडीआरएफ हे बाजूला करा आणि तात्काळ मदत करा अशी त्यांची भाषण आहेत, आमची देखील तीच मागणी आहे आता सत्तेत जे आहेत ते करून द्या ते केंद्राची वगैरे वाट पाहू नका राज्याच्या तिजोरीतून सगळी काम करा कशाला पाहिजे शक्तीपीठ? - यापेक्षा शेतकऱ्यांसाठी तिजोरी मोकळी करण्याची आवश्यकता आहे, बाकी सर्व काम बंद करा पण शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहा फडणवीसजी ऑक्टोबर महिन्यांची वाट पाहू नका अशी आमची त्यांच्याकडे मागणी आहे - On जरांगे समर्थक - आम्हाला लक्ष देण्याची गरज नाही,शिव्या आम्हालाही मोठ्या प्रमाणात देता येतात पण आमची तशी संस्कृती नाही आणि संस्कारही नाही - On दुष्काळ पालकमंत्री पाहणी - कोरड्या नजरेने पाहू नका, तुमच्या डोळ्यात ते भाव दिसले पाहिजे की शेतकऱ्यांची काय अवस्था आहे त्यामुळे हे पाहून जाऊ द्या आम्ही पाहून गेल्यानंतर जर काही केलं नाही तर आम्ही यांना पाहून घेऊ - On उड्डाणपूल हेडगेवार नाव - हे काही स्वातंत्र्य योद्धा वगैरे होते काय? हे स्वातंत्र्य चळवळीत फार मोठा योगदान होतं, दोन चार गोळ्या लागल्या आणि तलवारबाजीने यांच्यावर जखमा झाल्या, स्वतंत्र्यासाठी- देशासाठी समर्पित असणाऱ्यांची नावे दिले तर त्याला महत्त्व असेल, जर केवळ नाव देत असेल तर सत्तेचा वापर आणि विशिष्ट विचाराला बढावा देण्यासाठी आहे असं मी समजतो
0
0
Report
Advertisement

गणेशोत्सव का समापन: जिले में 19 सार्वजनिक और 4.3 लाख से अधिक घरेलू मूर्तियों का विसर्जन

Ratnagiri, Maharashtra:पाच दिवस मोठ्या उत्साहात साजरा झालेल्या गणेशोत्सवाची आज सांगता होत असून, जिल्ह्यात १९ सार्वजनिक, सव्वा लाखांहून अधिक घरगुती गणेशमूर्ती आणि ४३ हजार ३७ गौरींचे आज विसर्जन होत आहे.. डीजेवरील निर्बंधांमुळे पारंपरिक ढोल-ताशा, लेझीम आणि झांज पथकांच्या गजरात या विसर्जन मिरवणुकां निघत असून, विसर्जन घाटांवर प्रशासनाकडून स्वच्छता आणि दिव्यांची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.. चिपळूण बाजारपूल येथील वाशिष्टी च्या गणेश विसर्जन घाटाच्या इथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी..
0
0
Report

यवला तालुक़े में सूखा घोषित करने की मांग, 38 गाँव पानी संकट में

Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील येवला तालुका हा मराठवाडा सीमेलगत लागून असल्यामुळे पावसाचे प्रमाण नेहमी कमी असते सध्या येवला तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर असून उत्तर पूर्व भागात सप्टेंबर महिन्यात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर स्वरूप धारण करत आहे. तालुक्यातील पांजरवाडी, सायगाव, भुलेगाव ,देवठाण ,रेंडाळे खामगाव, गवंडगाव, पिंपळखुटे, कोळम, अंकाई,गोरखनगर, अशा गावांना अद्यापही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून आणखी दहा गावांचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या 38 गाव पाणीपुरवठा योजनेमुळे काही गावांना दिलासा असला तरी येवल्याचा उत्तर पूर्व भाग दुष्काळाने होरपळून गेला आहे महिलांनाही पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे ,तुरळक पावसाच्या भरोशावर पेरणी केलेली पिके ऐन जोमात असताना आता करपू लागल्याने बळीराजाच्या नजरा आकाशाकडे लागले आहे त्यामुळे येवला तालुका दुष्क faillग्रस्त म्हणून जाहीर करावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे या संदर्भात आढावा घेतला आहे
0
0
Report
Advertisement

कृष्णा नदी में मगर का हमला: नौजवान किसान के मोबाइल में कैद वीडियो

Sangli, Maharashtra:स्लग - कृष्णेच्या पात्रात मगरीचा थरार.. पाठलाग करत कुत्र्यावर हल्ला.. अँकर - सांगलीच्या भिलवडी येथे कृष्णा नदीच्या पात्रात एका अजस्त्र मगरीने कुत्र्याचा पाठलाग करत हल्ला केल्याचा थरारक प्रकार घडला आहे. नदीपात्रात पोहणारया कुत्राचा पाठलाग करून मगरीच्या हल्ल्याचा थरारक व्हिडिओ एका तरुणाच्या मोबाईल मध्ये कैद झाला आहे. भिलवडीच्या कुरण परिसरातील कृष्णा पात्रामध्ये हा प्रकार घडला आहे. कृष्णा नदीच्या पात्रामध्ये कुत्रा पोहत होता, तो मध्यभागी पोहोचल्यानंतर, त्या ठिकाणी त्याचा मगरीने पाठलाग सुरू केला, त्यानंतर कुत्रा भुकु लागला, मात्र काही क्षणातच मगरीने कुत्र्यावर झडप घातली और कुत्र्यासोबत मगर देखील पाण्यात गायब झाली.दरम्यान कुत्र्यावर मगरीच्या या थरारक हल्ल्याचा व्हिडिओ नदीकाठी गेलेल्या एका शेतकरी तरुणाच्या मोबाईल मध्ये कैद झाला आहे,या घटनेनंतर कृष्णा नदी काठावर भीतीच वातावरण पसरले आहे।
0
0
Report

गणेशोत्सव के बाद कोकणवासियों की वापसी के लिए 2500 ST बसें तैयार

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी: गणेशोत्सवानंतर मुंबई-पुण्याकडे परतणाऱ्या कोकणवासीयांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने तब्बल २,५०० अधिक बसेसचे नियोजन केले आहे. यापैकी तब्बल २ हजार बसेसचे आरक्षण आताच हाऊसफुल झाले असून, चाकरमान्यांनी पुन्हा एकदा ‘लालपरी’वरच सर्वाधिक विश्वास दाखवला आहे. उत्सवाच्या सुरुवातीला ३ हजार बसेसद्वारे दाखल झालेल्या लाखो भाविकांचा परतीचा प्रवास सुरक्षित आणि विनाअडथळा व्हावा यासाठी एसटी प्रशासनाने चोख नियोजन केल्याची माहिती विभाग नियंत्रण अधिकाऱ्यांनी दिली आहे.
0
0
Report

मराठवाडा के दुष्काळ पर सरकार की राहत योजना: किसानों को मदद, चारे-वीज की व्यवस्था

Nagpur, Maharashtra:मुख्यमंत्री देवendra फडणवीस यांची प्रतिक्रिया दुष्काळ राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पावसाचा खंड पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांना त्याचा फटका बसत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पिकाचा उतारा, उत्पन्न कमी होण्याची परिस्थिती आहे. या सर्व परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी पालकमंत्र्यांची बैठक आपण घेतली होती. या बैठकीत पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये या परिस्थितीचा आढावा घेऊन त्याचा अंदाज घेण्याचे आदेश दिले होते. पुढच्या आठवडाभरात या परिस्थितीचा सरकारच्या वतीने आढावा घेतला जाईल. त्यानंतर पंचनामे केले जातील. तातडीची मदतदेखील सरकारच्या वतीने केली जाईल. कर्जमाफीचे काम सरकारकडून सुरू आहे. याद्या तयार झालेल्या आहेत; त्यामुळे कोणीही पात्र लाभार्थी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी याद्या व्यवस्थित करण्याचे काम सुरू आहे. सरकारने शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे धोरण स्वीकारले आहे. चाऱ्याची व्यवस्थादेखील केली जात आहे. यावेळी अल्पकाळाचा संकट येईल, हे माहीत असल्यामुळे सरकारने आधीच उपाययोजना केली होती. वैरण विकासाचा कार्यक्रम आपण हाती घेतला होता. मोठ्या प्रमाणात चारा लावण्याचे आवाहन करण्यात आले होते आणि चारा लावून ठेवण्यात आला होता. संध्याकाळच्या सत्रात शेतकऱ्यांना अतिरिक्त वीज मिळावी यासाठीदेखील सरकार प्रयत्न करत है. सर्व भागात जास्तीची वीज आपण देत आहोत. सिंगल फेज वीजदेखील शेतकऱ्यांना दिली जाईल. ज्या ठिकाणी विहिरींमध्ये पाणी आहे, तिथे ते पाणी शेतीसाठी वापरता यावे, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. दुष्काळासंदर्भातील सर्व जीआरप्रमाणे कधी काय करायचे, याचे नियम आहेत. त्याचे पालन केले तरच एनडीआरएफचे पैसे मिळतात. त्यामुळे आम्ही या नियमांचे पालन करत असल्यामुळे राज्य सरकारच्या वतीने आपण मदत करत असतो. जे काही स्टँडिंग आदेश आहेत, त्यांचेही पालन केले जात आहे. विरोधकांना प्रत्येक गोष्टीचे राजकारण करण्याची सवय लागली आहे. शेतकरी अडचणीत आहे, त्यामुळे सर्वांनी मिळून शेतकऱ्यांना मदत करू, ही आमची भूमिका आहे. साधारणपणे आपल्याकडे अशी पद्धत आहे की, शासकीय बैठकींमध्ये प्रशासन किंवा स्थानिक अधिकारी तिथे काही खाण्यासाठी ड्रायफ्रूट्स वगैरे आणून ठेवतात. दुष्काळाच्या परिस्थितीत हे असं का करत आहेत, असा भाग नाही; पण प्रशासनाने संवेदनशीलपणे वागण्याची गरज आहे. ५ ऑक्टोबरपर्यंतचे पंचनामे झाल्यानंतर त्यासंदर्भात आपल्याला प्रस्ताव पाठवावा लागेल. त्या अनुषंगाने आमचे काम सुरू आहे आणि त्या आधारावर शेतकऱ्यांना मदत मिळू शकते. त्यामुळे नुसता दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी करून राजकारण करण्यात काही उपयोग नाही. एनडीआरएफच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारकडून जी काही मदत करता येईल, ती मदत करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे आणि ती मदत केली जात आहे. मराठवाड्यातील काही भागात प्रचंड दुष्काळी परिस्थिती आहे. तिथली छोटी धरणे आहेत, त्यामध्ये पाणी कमी आहे. मोठ्या धरणांचे पाणी राखून ठेवले आहे. जोपर्यंत पिण्यासाठी पाणी राखून ठेवणे आवश्यक आहे आणि जोपर्यंत पुढचा अंदाज येत नाही, तोपर्यंत त्या संदर्भात दुसरा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. नागपूर इंदोरा- दिघोरी परिसरातील प्रस्तावित दहा किलोमीटरचा पूल हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा केवळ ब्रिज नसून हा मोठा एलिवेटेड रोड आहे. नागपूरचा मोठा कंजेस्टेड एरिया या माध्यमातून वाहतुकीच्या दृष्टीने मोकळा होणार आहे आणि ट्रॅफिकची कोडी कमी होणार आहे.
0
0
Report
Advertisement

जunnar में दूध मिलावट के खिलाफ गणेश उत्सव के मौके पर जागरूकता प्रदर्शन

Shirur, Maharashtra:Anc:सणासुदीच्या काळात वाढणाऱ्या दूध भेसळीविरोधात जुन्नरमध्ये एका प्राध्यापकांनी थेट गणपती बाप्पाच्या पुढ्यातच जनजागृतीचा देखावा साकारला आहे. जयहिंद कॉलेजचे प्राध्यापक डॉ. अमित हेजिब यांनी आपल्या घरच्या गणेशोत्सवातून हा प्रबोधनात्मक उपक्रम राबवला आहे. गणेशोत्सवाच्या काळात गोडधोड पदार्थांसाठी दुधाला मोठी मागणी असते, आणि याच संधीचा फायदा घेत दुधात भेसळ करण्याचे प्रकार वाढतात. यावर थेट प्रहार करण्यासाठी प्राध्यापक डॉ. अमित हेजिब यांनी या देखाव्यातून दुधातील भेसळ घरच्या घरी कशी ओळखायची, भेसळीचे प्रकार कोणते आणि या दूषित दुधामुळे आरोग्यावर काय परिणाम होतात, याची सविस्तर माहिती प्रात्यक्षिकासह मांडली आहे. पर्यावरणपूरक साहित्यातून साकारलेल्या या सामाजिक प्रबोधनपर देखाव्याचे दर्शन घेण्यासाठी येणारे भाविक आणि स्थानिक नागरिक विशेष कौतुक करत आहेत. उत्सवाच्या माध्यमातून केवळ देखावे न उरलात अशा प्रकारे समाजाला दिशा देणारा संदेश दिल्याबद्दल या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
0
0
Report

भंडारा में सरकारी धान पर रोक: जांच में परदेश भेजने का मामला सामने

Bhandara, Maharashtra:भंडाऱ्यात शासकीय धानाचा काळाबाजार? आधारभूत केंद्रातून धान थेट छत्तीसगडच्या दिशेने! चौकशी समितीच्या तपासात गंभीर त्रुटी उघड धान परराज्यात पाठविल्याचे चौकशीत निष्पन्न संबंधित मिलधारकावर कारवाई होणार! भंडारा जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांकडून आधारभूत दराने खरेदी करण्यात येणाऱ्या धानाच्या साठवणूक आणि वाहतुकीवर शासनाच्या यंत्रणेकडून नियंत्रण ठेवले जाते. मात्र, साकोली तालुक्यातील आधारभूत धान खरेदी केंद्रावरून नारायणी राईस मिल बोदरा येथे जाण्यासाठी निघाल्या ट्रक छत्तीसगडच्या दिशेने जात असल्याचे आढळून आले आणि या संपूर्ण व्यवस्थेवरच प्रश्न उपस्थित झाले. ही बातमी माध्यमांवर प्रसारित होताच जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती गठित केली. या समितीने केलेल्या तपासणीत संबंधित धान परराज्यात पाठविण्यात आल्याचे समोर आले असून, धान वाहतूक आणि प्रक्रियेत काही त्रुटी आढळल्या आहेत. आता चौकशी समितीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर संबंधित मिलधारकावर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रतनलाल ठाकरे यांनी दिली आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top