Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

माझी उमेदवारी मदन येरावारांना पाडण्यासाठीच, माजी आमदार संदीप बाजोरीयांचा दावा.

Oct 03, 2024 05:25:00
Yavatmal, Maharashtra

यवतमाळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून तुतारी चिन्हावरच आपण लढु असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत तिकीट वाटपाआधीच त्यांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार देखील सुरू केला आहे. भाजप आमदार मदन येरावार यांनी मतदारसंघ बकाल करून ठेवला, रस्त्यांची दैना झाली, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून भयमुक्त वातावरण देऊ असे वचन आपण जनतेला देत असल्याचे संदीप बाजोरिया यांनी सांगितले.

2
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JMJAVED MULANI
Nov 23, 2025 17:46:36
Baramati, Maharashtra:इंदापूरचा खडकपुरा येथून कृषिमंत्री दत्तात्रय भरणेची प्रचार सभा लाईव्ह, इंदापूर नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा पॅनल मैदानात इंदापूर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे भाषण पॉइंटर खडकपुरा प्रचार सभा ही निवडणूक शहराच्या दृष्टीने महत्त्वाची आहे 2014 साली तुम्ही मला आमदार केले गेली 11 वर्ष या इंदापूर शहरात विकासाचा निधी कसा जास्त आणता येईल यासाठी मी प्रयत्न केला. येणाऱ्या माणसाची कामे हेलपाटे न मारता मार्गी लावली. 2014 पूर्वी इंदापूर शहर काय होतं आज ते बदलले की नाही जर इंदापूर शहर बदलले असले तरच तुम्ही घड्याळाला मतदान करा भविष्यात खूप काही इंदापूर मध्ये करायचं आहे. कोरोना काळात कशी मदत करता येईल यासाठी मी आणि नगराध्यक्ष अंकिता शहा आम्ही प्रामाणिकपणे केला. भविष्यात बारामती शहरात ज्या पद्धतीने इलेक्ट्रिक केबल टाकली आहे त्याप्रमाणे इंदापूर शहरात टाकली जाईल हा शब्द देतो इथे सर्व व्यापारी पेठ आहे पाठीमागे अजितदादा एका उद्घाटनासाठी इथे आले होते त्यावेळी व्यापारी वर्गाने अजित दादांना शिरसोडीचा पूल मंजूर करावा अशी मागणी केली. या गणपतीची शपथ घेऊन सांगतो रात्रीच ऑफिस उघडून तुमच्या पुलाचा प्रस्ताव तयार करून वातावरणात मुंबईला नेऊन मंजूर करणार आहात तुमचा आमदार आहे. यात जर माझं काही खोट असेल तर हा गणपती मला शिक्षा करेल इथली बाजारपेठ वाढणार आहे.पाच पटीने. व्यवसाय पाच पटीने वाढणार आहे. इंदापूरचा चेहरा मोहरा एका शिरसोडीच्या पुलामुळे बदलणार आहे शिरसोडीचा पूल होणार नाही असे म्हणणारे इथले कोण नेते आहेत ते तुमच्यासमोर आहेत, पूलाच्या कामाला कोण आडवे आले होते तो पूल होणार नाही अस कोण म्हटलं होतं हे आमच्या लाडक्या बहिणींना कळू द्या. लाडक्या बहिणींनी जर डोक्यात घेतलं चांगल्या चांगल्यांचं काम होतं इंदापूरच्या बाह्य वळणावर मालोजीराजेंचे जे शिल्प होते त्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्याने त्याची तूट फूट झाली आपण नव्याने शिल्प करणार आहोत. व्यापारी बांधवांना मनापासून विनंती करायची आहे तुम्ही सर्व व्यापारी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहात असे समजून काम करायचं. एका पुलाच्या निर्णयामुळे इंदापूर बदलणार आहे व्यापारी संकुलासाठी आपण 10 ते 12 कोटी रूपये आपण मंजूर केले आहेत. मला कोणावर टीका करायची नाही टीका करून कोणाला मत मागायचं नाही, मी आणि अंकिता शहा यांनी इंदापूर शहराज्य विकासाचे काम केले आहे त्या जोरावर तुम्हाला मत मागत आहे पूर्वी इंदापूर शहर काय होतं आता काय बदललं याचा तुम्ही विचार करा मी निवडणुकीपुरता बोलत नाही. मी तुम्हाला तळमळीने सांगत आहे. वीरश्री मालोजीरாஜे भोसले यांच्या गढीचे काम आपण हाती घेतल आहे,ते लवकरच पूर्ण होईल. हिंदू मुस्लिम आपण भाई भाई आहोत. आज सकाळी मला खासदार रामदास आठवले यांचा फोन आला होता त्यांनी आपल्याला पाठिंबा दर्शविलेला आहे या शहराने मला 2009 पासून 2024 पर्यंत मतदान रुपी मला जे आघाडी दिली मी आयुष्यभर विसरू शकत नाही शहरात एक स्वतंत्र एसी हॉल करायचा आहे तो प्रस्ताव दिला आहे. शहरात अनेक शासकीय विभागाच्या नवीन इमारती पूर्ण केल्या आहे. महिला बचत गटाची एका स्वतंत्र इमारत माझ्या लाडक्या बहिणींसाठी केली जाईल हा शब्द लाडक्या बहिणींना देतो उत्तम खेळाडू निर्माण होण्यासाठी 56 कोटी रूपयाचे क्रीडा संकुल मंजूर केले आहेत. मला विरोधकांवर टीका करायची नाही, ही सर्व मंडळी वेगवेगळ्या कारणामुळे एकत्र आले आहेत वेगवेगळे सांगण्याची गरज नाही आज तारिक 23 आहे मागच्या वर्षीची 23 तारीख तुम्हाला आठवते का ? 23 तारखेला खडकपुरा परिसरात सर्व गुलालाने भरलेला होता. आज बरोबर एक वर्ष झाल. मुख्यमंत्र्यांनी पाच डिसेंबरला शपथ घेतली होती. 23 तारखेला आपला विजय झाला होता. तोच गुलाल तीन डिसेंबरला खडकपूडा येथे असाच पडला पाहिजे आम्ही फुकट घेणारे नाही,आम्ही वर्गणी मागणारे नाही आणि दोघे दादागिरी करणारे नाही ( दत्तात्रय भरणे यांचा विरोधकांना टोला) शहा कुटुंबीयांनी इंदापूर शहराला दिलेल्या योगदानाची उतराई करण्याची वेळ आली आहे. इंडापूरकर खूप भाग्यवान आहात भरत शेठ सारखा उमेदवार तुम्हाला उमेदवार मिळाला आहे, जो 5 वर्षे तुमची निस्वार्थपणे सेवा करेल मदत करेल स्वर्गीय शंकररावजी पाटील यांची आठवण झाल्या शिवाय राहत नाही कारण त्यांनी कधी खोटी आश्वासन या तालुक्याला दिली नाहीत निवडणुकीच्या काळात दोन समाजात धर्मात भांडणे लावायची काही लोकांची सवय असते हे इंदापूर शहर आपल्याला भयमुक्त करायचे आहे. इंदापूर शहरातील जनता मतदार खूप हुशार आहे त्याला खूप कळत,उद्या आपल्याला कोण मदत करेल,कोण आपल्याला विकासाचा निधी देईल.
207
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 23, 2025 17:46:09
Baramati, Maharashtra:इंदापुरातून कृषिमंत्री दत्तात्रय भरणेची प्रचार सभा लाईव्ह, इंदापूर नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा पॅनल मैदानात इंदापूर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे भाषण पॉईंट अकलूज नाका प्रचार सभा सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मतदान काय करायचं पूर्वीच इंदापूर आणि आजच इंदापूर यामध्ये बदल झाला की नाही ही एकदा तपासून पहा. पूर्वी इंदापूर काय होतं आणि आता इंदापूर काय आहे, आपल्या भागात पूर्वी रस्ते कसे होते काय परिस्थिती होती आणि आज काय परिस्थिती आहे. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो माजी नगराध्यक्ष अंकिता शहा आणि मी स्वतः एक तालुक्याचा आमदार एक लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही दोघांनी पण एकमेकांच्या हातामध्ये हात घालून या इंदापूरच्या विकासासाठी जेवढा विकासाचा निधी जास्त आणता येईल तेवढा प्रयत्न केला. सर्व कार्यकर्त्यांना एकच विनंती करायची आहे कुणी गैरसमज तुमच्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतील, कधीकधी वेळ येते कावळा बसतो आणि फांदी मोडते. मी इंदापूर शहरात विकासाचा निधी आणला म्हणजे तुमच्यावरती उपकार केले नाहीत. 2009 ते मजेदार 2024 असू द्या माझ्या इंदापूर शहराने मला मतदान आरोपी आशीर्वाद दिला ते मी कधीही विसरू शकणार नाही. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही 2014 सालापासून आमदार केलं मला माहित आहे कुठे पोलिसाची गाडी किंवा बॉडीगार्ड ठेवले नाहीत या शहरासाठी जेवढा काय निधी देण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधुनो प्रामाणिकपणे केलेला आहे. काम करताना कधीही जवळचा लांबचा जातीचा गटाचा पक्षाचा कधी विचार केला नाही कशी मदत होईल हे पाहिले माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आमदार म्हणून तुम्हा सर्वांना मदत केलीली आहे. एक रात्रीत शिरसोडीचा पूल मंजूर केला तो करण्यासाठी सुट्टीच्या दिवशी सार्वजनिक बांधकाम खात्याचा कार्यालय उघडलं आणि रातोरात मुंबई गाठली तेव्हा हा पूल उपमुख्यमंत्र्या अजित पवारांच्या माध्यमातून मंजूर झाला. यामुळे इंदापूरचे बाजारपेठ पाचपटीने वाढणार आहे, याचा इंदापूर शहरातील व्यापारांना फायदा होणार आहे. शिरसोडी चा पूल मंजूर करून घेण्यासाठी मुंबईमध्ये जाऊन मी रातोरात जर ऑफिस उघडलं नसलं कागदपत्र तयार केली नसली तर माझं तोंड सडल परमेश्वर मला शिक्षा देईल यात काहीही खोटं नाही. मागील पाच वर्षात इंदापूर शहरासाठी एकूण साधारणता 867 कोटी मंजूर करणारा हा तुमचा आमदार आहे. इंदापूर शहर काय होतं इंदापूर शहर तुम्हाला बदललेलं दिसतंय का नाही दिसत नसेल त्यांनी डोळ्यावरचा चष्मा बदला. इंदापूर शहराची ओळख ही वेगळी प्रकारची होती कुठला पाहुणारावळा आज आपल्याकडे आला तरी नावे ठेवायचा. मी जास्त बोलण्यापेक्षा बोललेलं तोलणार आहे. मागील वर्षी 23 तारखेला याच दिवशी याच भागात तुम्ही कशा फटाकडे फोडल्या होत्या तशाच फटाकडे आपल्याला तीन १०० ला फोडायचे आहेत. तुम्ही माझ विधानभवनातलं माझं भाषण ऐका मी सगळ्यांच्या समोर जाऊन भाषण केलं होतं हिंदू मुस्लिम बांधवायचे भांडण लावायची आणि स्वतःच्या पोळ्या भाजून घ्यायच्या आमचा स्वभाव राहिलेला नाही. अद्यापही माझी चार वर्ष आमदारकीचे आहेत शेवटी आमदार मी आहे दोन्ही विभागाचा निधी हा आपल्या भागामध्ये आणू शकतो. हिंदू मुस्लिम आम्ही भाई भाई आहोत हे विधानभवनात ठणकावून सांगणार तुमचा हा आमदार आहे. भरत शहा यांना जर तुम्ही नगराध्यक्ष केलं तर विकासाचा किती निधी मिळेल याचा विचार करा अफवांना बळी पडू नका,फक्त घड्याळाच चिन्ह बघा. माझ्या लाडक्या बहिणींनो आज मी तुमच्यासमोर उभा आहे.मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी खूप योजना तुमच्यासाठी जाहीर केल्या आहेत मी काम करणारा आमदार आहे. मी चमकोगिरी मधला नाही,निवडणुकी पुरता येणारा मी नाही(हर्षवर्धन पाटील यांची ॲक्शन केली). माझं क्रीडा मंत्री पद जाणार आहे याची मला दोन ते तीन दिवस अगोदर चाहूल होती शेवटच्या दिवशी इंदापूर मधील क्रीडा संकुल साठी 56 कोटी रुपये मंजूर करणारा हा त्यांचा आमदार आहे. हात जोडून विनंती करतो, भरत शहा यांसह माझ्या नगरसेवक पदाचे उमेदवारांना निवडून द्या विकास कसा करायचा मी तुम्हाला सांगतो
149
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 23, 2025 17:16:59
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली बेधुंद कारचालकाने चार ते पाच जणांना उडवलं,संतप्त नागरिकांकडून वाहनाची तोडफोड.. अँकर - सांगलीत बेधुंद कारचालकाकडून चार ते पाच जणांना उडवल्याचा प्रकार हा घडला आहे.या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी चारचाकी वाहनाची तोडफोड केल्याचाही प्रकार घडला आहे.शहरातल्या बालाजी मिल रोडवर हा प्रकार घडला आहे.एका बेधुंद कारचालकाने भरधाव वेगाने रस्त्यावरील जाणाऱ्या दुचाकी वाहनधारक व रस्त्याने चालत जाणाऱ्यांना उडवले आहे.त्यामुळे चार ते पाच जण हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.यानंतर संतप्त नागरिकांनी वाहनाचा पाठलाग करत चारचाकी वाहनाची तोडफोड करत बेधुंद चालकाला बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे,या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाणे मध्ये घटनेची नोंद झाली आहे. रात्रीच्या सुमारास घडलेल्या थरारक घटनेने सांगली हादरून गेले आहे.
175
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 23, 2025 15:48:56
Gadchiroli, Maharashtra:टायटल:-- गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातल्या अतिदुर्गम टोकावरच्या फुलनार येथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना, 1000 सी–60 कमांडो, 21 बीडीडीएस टीम, नवनियुक्त पोलीस जवान, 500 विशेष पोलीस अधिकारी व खाजगी कंत्राटदार यांच्या मदतीने 24 तासात उभारले नवीन पोलीस मदत केंद्र अँकर:-- नक्षल्यांचा हिंसक कारवायांना आळा बसावा यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आज भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम फुलनार (कॅम्प गुंडूरवाही) या ठिकाणी नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली. भामरागड पासून 20 किमी. व छत्तीसगड सिमेपासुन फक्त 07 किमी अंतरावर असलेल्या अति-दुर्गम भागातील नागरिकांची सुरक्षा व सर्वांगीण विकासाला हातभार लागून ते विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरीता पोलीस मदत केंद्र फुलनार मैलाचा दगड ठरणार आहे. 11 डिसेंबर 2024 रोजी पेनगुंडा येथे नवीन पोलीस मदत केंद्र, दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी नेलगुंडा येथे नवीन पोलीस स्टेशन, दिनांक 09 मार्च 2025 रोजी याच भागात कवंडे येथे नवीन पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आली होती. गडचिरोली पोलीस दलाच्या नागरी कृती उपक्रमांद्वारे या भागातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी याद्वारे प्रयत्न केले जात आहे. या पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यात एकुण 1050 मनुष्यबळ, 04 जेसीबी, 07 ट्रेलर, 02 पोकलेन, 25 ट्रक इत्यादीच्या सहाय्याने अवघ्या एका दिवसात पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यात आली. या पोलीस मदत केंद्रामध्ये पोलीस बलाच्या सुविधेसाठी वायफाय सुविधा, 12 पोर्टा कॅबिन, जनरेटर शेड, पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ प्लांट, मोबाईल टॉवर, टॉयलेट सुविधा, पोस्ट सुरक्षेसाठी मॅक वॉल, बी.पी मोर्चा, 08 सँड मोर्चा इत्यादींची उभारणी करण्यात येत असून यासोबतच पोलीस मदत केंद्राच्या सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे 03 अधिकारी व 50 अंमलदार, एसआरपीएफ ग्रुप 14, संभाजी नगर सी कंपनीचे 02 प्लाटुन तसेच सिआरपीएफ 37 बटा. एफ कंपणीचे 01 असिस्टंट कमांडन्ट व 62 अधिकारी/अंमलदार, विशेष अभियान पथकाचे 08 पथक (200 कमांडोज) तैनात करण्यात आले आहेत. पोलीस मदत केंद्राच्या उभारणी कार्यक्रमादरम्यान जनजागरण मेळावा आयोजित करुन पोलीस मदत केंद्र फुलनार (कॅम्प गंुडूरवाही) हद्दीतील उपस्थित नागरिकांपैकी महिलांना जीवनावश्यक आणि क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. फुलनार येथील नवीन पोलीस मदत केंद्राच्या उभारणीमुळे फुलनार आणि कोपर्शी येथील अडकलेले मोबाईल टॉवरचे बांधकाम पुर्ण करण्यास मदत होणार आहे. भविष्य काळात या अतिदुर्गम भागात नवीन रस्ते बांधकाम तसेच एस. टी बस सेवा सुरु करणे शक्य होणार आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया गडचिरोली
173
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 23, 2025 15:32:32
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोलीत नगर परिषद निवडणुकीच्या कोणत्याच उमेदवाराला आमच्या घरात प्रवेश नाही, कृपया मत मागायला येऊ नका,  एका मतदाराने चक्क आपल्या घरासमोर लावले पॉम्प्लेट गडचिरोली नगरपरिषदेची 2 डिसेंबर रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. परंतु प्रभाग क्रमांक 5 अंतर्गत मतदार गुरुदास पगाडे यांनी आपल्या घरासमोर चक्क एक पोम्प्लेट लावले आहे.  या पॉम्प्लेटची सध्या जोरात चर्चा आहे.  निवडणुकीत उभे असलेल्या कोणत्याच उमेदवाराला आमच्या घरात प्रवेश नाही, कृपया मत मागायला येऊ नका  असे या पॉम्प्लेट मध्ये नमूद करण्यात आले आहे. निवडून आल्यानंतर कुठलाही नगराध्यक्ष किंवा नगरसेवक आमच्या वॉर्ड मध्ये येऊन पहात सुद्धा नाही. मागील कित्येक महिन्यांपासून नाल्यांची सफाई झालेली नाही, पथदिवे नाहीत. पाणीपुरवठयाची समस्या आहे. अशा बहुतेक समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे कुठल्याही उमेदवाराने आमच्या घरी मत मागायला येऊ नये अशी संतापाची भावना गुरुदास पगाडे यांनी व्यक्त केली आहे.  दरम्यान उभा भागातील काँग्रेस नगरसेवकाने मात्र ही आपल्याला बदनाम करण्याचा कट असल्याचे म्हटले आहे. भाजप बहुमत असलेल्या गडचिरोली नगर परिषदेत आपण विरोधी नगरसेवक होतो. सत्तेला धारेवर धरल्याने निधी देण्यात आला नसल्याचे सांगितले. बाईट १) गुरुदास पगाडे, त्रस्त नागरिक बाईट २) सतीश विधाते, माजी नगरसेवक
93
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 23, 2025 15:31:02
Pune, Maharashtra:Headline : लोणावळ्यात चित्रा वाघ यांचं मतदारांना कोणाचेही खा मटण… पण दाबा कमळाचं बटण... असे अजब आवाहन Anchor: लोणावळ्यात भाजपचा प्रचार आता पूर्ण जोरात सुरू झाला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ थेट पर्यटन नगरीत दाखल झाल्या आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गिरीश कांबळे तसेच नगरसेवक उमेदवारांच्या प्रचाराला सुरूवात केली. यावेळी भाजपच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी त्यांचे औपचारिक स्वागत केले. यानंतर शहरातील विविध ठिकाणी कोपरा सभांचे आयोजन करण्यात आले. या सभांमध्ये मतदारांनी आपापल्या स्थानिक समस्या चित्रा वाघ यांच्या समोर मांडल्या.दरम्यान, लोणावळ्यात आमदार सुनील शेळकें यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत कोंडीत पकडण्यासाठी भाजपकडून खास व्यूहरचना आखण्यात आल्याची चर्चाही रंगली आहे…तर दुसरीकडे, आमदार सुनील शेळके यांचे नाव न घेता राष्ट्रवादीवर चित्रा वाघ यांनी खरमरीत निशाणा साधला. नेत्याचं डोकं खराब झालं की हारण्याची भिती समोर येते. आणि मग एका महिलेच्या खासगी आयुष्यात डोकावण्याची हिंमत सुचते. असं वागलात तर तुम्ही घासून नाही तर ठासून येणार याशिवाय त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना अजब सल्ला दिला कोणाचेही खा मटण… पण दाबा कमळाचं बटण... बाईट : चित्रा वाघ, भाजप नेत्या
138
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 23, 2025 13:16:48
Kalyan, Maharashtra:अर्णव खैरे आत्महत्ये प्रकरणी पोलिस ऍक्शन मोडवर,सर्व दिशानी तपास सुरू कल्याण मध्ये राहणारा अर्णव खैरे आत्महत्ये प्रकरणी तपासाला वेग आला अर्णवचा मोबाईल फोन फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला असून डिजिटल पुरावे शोधण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेण्यात येत आहे. मोबाईलचा पासवर्ड उपलब्ध नसल्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने फोन डेटा उघडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अर्णव खैरेला मराठी बोलता येत नाही का? या कारणावरून रेल्वेत अज्ञात प्रवाशांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर मानसिक धक्काातून अर्णवने घरी आल्यानंतर आत्महत्या केल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. याप्रकारणी पोलिसांनी अज्ञात आरोपींवर आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा कोळसेवाडी पोलिसांनी दाखल केला आहे. GRP, RPF यांच्यासह स्थानिक पोलिसांच्या दोन विशेष पथकांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. अर्णवने प्रवास केलेल्या लोकल ट्रेनमधील प्रवाशांच्या हालचालींची चौकशी वेगाने सुरू असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे १० ते १५ प्रवाशांची ओळख पटवण्याचे प्रयत्न कोळसेवाडी पोलिसांकडून सुरु आहेत.अर्णवच्या मृत्यूपूर्वीच्या शेवटच्या हालचाली, मोबाईलमधील माहिती, प्रसंगातील प्रत्यक्षदर्शी प्रवासी यांची एकत्रित तपासणी करून त्याच्या आत्महत्येमागील खरे कारण शोधण्याकडे पोलिसांचा कल आहे. कल्याण झोन-3 चे वरिष्ठ अधिकारी स्वतः या तपासावर लक्ष ठेवून असून सर्व शक्य कोनातून सखोल चौकशी सुरु आहे.
153
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 23, 2025 13:03:52
Pune, Maharashtra:लोणावळा नगरपरिषद निवडणूक चांगलीच रंगात आली असून भाजप प्रचारसभेत भाजपच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय खळबळ उडाली. आमदार सुनील शेळकें यांचे नाव न घेता बेताल व्यक्तव्य केलं असून मावळात आमच्या विचारांचा आमदार नसला तरी आमदारांचा बाप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्याकडे आहे असे वक्तव्य त्यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत केले. या विधानावर नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू असून, त्यांनी आमदार सुनील शेळके यांच्यावर केलेल्या एकेरी भाषेतील टीकेलाही विरोध होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष आणखीच वाढले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीचे संकेत दिल्याची चर्चा असताना, लोणावळा भाजपने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे भाजपच्या कमळ चिन्हावरील काही उमेदवारांनीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना उघडपणे पाठिंबा दिल्याचे समोर आलंय...
145
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 23, 2025 13:00:55
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : दहशत आणि गुंडागर्दी संपवण्यासाठी ब-balराजे पाटील याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे - उमेश पाटील - मोहोळ मध्ये पंडित देशमुख यांची संतोष देशमुख यांच्यापेक्षाही निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. - त्यात बाळराजे पाटील हा मुख्य तर इतर एकूण 13 आरोपीना निर्दोष सोडण्यात आले होते. - पोलिसात ज्या साक्षीदारांनी साक्ष दिली ते कोर्टात फुटले. त्यातील साक्षीदारांना कारखान्यात नोकरी, टेंडर, सोलापुरात गाळे देण्यात आले त्याचा तपास झाला पाहिजे. - सरकारी पक्षाने हायकोर्टात दाखल केलेले अपील 20 वर्षात कोर्टाच्या बोर्डावार आली नाही. - त्यामुळे यामध्ये नेमकं सरकारी यंत्रणेतील कोण मॅनेज झालेय का हे तपासावे - चुकीला माफी नाही, याचा बदला घेतला जाईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले - एकनाथ शिंदे यांच्या विधानाचे मी स्वागत करतो. तसेच आमची एकट्याची नव्हे तर संपूर्ण मोहोळ तालुक्याची मागणी आहे की - दहशत आणि गुंडागर्दी संपवण्यासाठी बाळराजे पाटील याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे - सरकारी पक्षातर्फे हरिष साळवी ही केस लढवतील ही जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे - पंडित देशमुख यांच्या हत्येचा न्यायालयीन मार्गाने बदला घेतल्यानंतर मोहोळ तालुक्याला न्याय मिळेल.
200
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 23, 2025 12:49:19
Baramati, Maharashtra:बारामती के राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष के युवा नेते युगेंद्र पवार के प्रचार का विश्लेषण जारी है। आज prabhag 20 में एक पदयात्रा हुई, जिसमें कांग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी और अपक्ष उम्मीदवार सभी एक साथ प्रचार कर रहे हैं। अजित पवार गट के आठ नगरसेवक बिनविरोध हैं और चार सीटों पर मौजूदा उम्मीदवारों के साथ चर्चा है कि कुछ उम्मीदवारों को रुपये देकर उम्मीदवार बनवाया गया है। ऐसे दावों के बीच हमारे उम्मीदवार सामान्य घरों से हैं और वे मेहनत करके काम करना चाहते हैं; उन्होंने कहा कि पैसा देकर उम्मेदवारी मिलना सामान्य है, पर बारामती के लोग समझदार हैं और अत्याधिक पैसा वाला प्रचार टिक नहीं पाएगा। कुछ उम्मीदवार नए हैं जो किसी पार्टी में नहीं थे; उन्होंने कहा कि यदि उन्हें अवसर मिला तो वे अच्छा काम करेंगे। प्रचार के दौरान दबाव, अफवाह और धनबल का प्रयोग हुआ है, जिसे स्थानीय लोग महसूस कर रहे हैं। बारामतीकरणों से कहा गया है कि सामान्य घरों के लोगों को अवसर दिया जाए और लोकतंत्र को जीवंत रखने के लिए मजबूत विपक्ष को आगे आना चाहिए। कुछ लोग यह भी कह रहे हैं कि अजित पवार गट के आठ नगरसेवक इस वर्ष बिनविरोध क्यों elected हुए, जबकि पहले से प्रयास चल रहा था। 25 लाख रुपये जैसी बड़ी राशियाँ एक उम्मीदवार को दी जा रही थीं, हमारे पास सभी उम्मीदवारों के लिए इतने पैसे नहीं हैं। नगरपालिका के निर्माण के बाद यह पहली बार है कि ऐसी स्थिति उत्पन्न हुई है, जबकि सत्ताधारी पक्ष स्थानीय लोगों के प्रेम और पहचान के साथ चुनाव जीतना चाह रहा है। लोकतंत्र की साख बनाए रखने के लिए आम जनता से सहयोग चाहा गया ताकि बारामती के लोग समझदारी दिखाते हुए सही निर्णय लें।
173
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 23, 2025 12:34:47
Ambernath, Maharashtra:माजी नगरसेविका शुभांगी बहनवाल यांच्या पतीवर शिवसेना कार्यकर्त्यांचा हल्ला झाला. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. भाजप मध्ये गेल्याने हल्ला केल्याचा आरोप यात आहे. शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी नगरसेविका शुभांगी बेहनवाल यांच्या पतीवर शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या कार्यकर्त्यांनी याप्रकरणी हल्ला केला. उल्हासनगरमध्ये घडलेल्या घटनेची नोंद मध्यवर्ती पोलीस ठाण्यात झाली. बेहनवाल यांच्या कार्यकर्त्यांचा रात्रौ 11 वाजता योगेश पवार यांच्या येण्याबरोबरच चौधरी यांच्या कार्यकर्त्यांनी पवार याला मारहाण केली, आणि शिलरत्न जाधव व आणखी एकाने सचिन आहेर यांना मदत केली. परिसरात दशहत पसरवण्यासाठी आरडा ओरडा व मारहाण करण्यात आली. या घटनेचा गुन्हा मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दाखल झाला. याप्रकरणी शीलरत्न जाधव, रतन उर्फ बाळा गायकवाड, सचिन आहेर व इतरांच्या विरोधात गुन्हे नोंदवण्यात आले.
87
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 23, 2025 12:22:01
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यातील ३१५ शेतकऱ्यांच्या ई-केवायसी नसल्यामुळे नुकसानाच्या अनुदानापासून वंचित आहे. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या नुकसान झालं होतं, प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते, पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठवण्यात आलेला होता, या नुकसानीत ९१८ शेतकऱ्यांच्या नुकसान झालं होतं, त्यापैकी ६०३ शेतकऱ्यांना नुकसानाची भरपाई मिळालेली आहे. मात्र अजूनही ३१५ शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेली नसल्यामुळे सप्टेंबरपासून नुकसान झालेल्या शेतकरी अजूनही नुकसान भरपाई पासून वंचित असल्याने तातडीने ई-केवायसी करून घ्यावा जेणेकरून शासनाची मदत मिळण्यास मदत होणार आहे. प्रशांत परदेशी, नंदूरबार.
95
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 23, 2025 12:21:18
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यात उसाच्या पाठोपाठ पपईच्याही दरांचा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. व्यापारी पपईला योग्य दर देत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलीली आहे. नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पपईची लागवड करण्यात आलेली असून आता पपई काढणीवर आली आहे. मात्र पपईला चांगला दर मिळत नसल्याने पपई उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, व्यापाऱ्याकडून पपईला आठ रुपये 11 पैसे देण्याच्या निर्णय घेतला होता मात्र ऐन वेळेस व्यापाऱ्यांनी ठरवून दिलेला दर शेतकऱ्यांना देत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून पपई तोडणी बंद करण्यासाठी विचार केला जात आहे. नंदुरबार जिल्ह्यातील पपई घेण्यासाठी उत्तर भारतातून व्यापारी येत असतात, मात्र व्यापाऱ्यांच्या मनमानीमूळ शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असल्याने पपई नाशवंत फळ असल्यामुळे व्यापाऱ्यांकडून मनमानी केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव द्यावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून केली जात आहेत.
100
comment0
Report
Advertisement
Back to top