445001
माझी उमेदवारी मदन येरावारांना पाडण्यासाठीच, माजी आमदार संदीप बाजोरीयांचा दावा.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून तुतारी चिन्हावरच आपण लढु असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत तिकीट वाटपाआधीच त्यांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार देखील सुरू केला आहे. भाजप आमदार मदन येरावार यांनी मतदारसंघ बकाल करून ठेवला, रस्त्यांची दैना झाली, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून भयमुक्त वातावरण देऊ असे वचन आपण जनतेला देत असल्याचे संदीप बाजोरिया यांनी सांगितले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
पिंपरी मालिम गावाजवळ निजी प्रवासी बस का भीषण अपघात; 25 यात्री घायल, दो की हालत गंभीर
Buldhana, Maharashtra:मेहकर जवळील पिंपरी माळी गावाजवळ खाजगी प्रवासी बसचा भीषण अपघात. 25 प्रवाशी जखमी, दोघांची प्रकृती गंभीर.. बाबा travels ची बस पुण्यावरून नागपूरला जात होती.. अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी. समोर जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून खाजगी प्रवासी बसची धडक होऊन झाला अपघात. पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल. खाजगी प्रवासी बस पुण्याहून नागपूरच्या दिशेने जाताना झाला अपघात0
0
Report
रत्नागिरी में मॉनसून सुस्त, किसानों की खेती प्रभावित
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी रत्नागिरीकर यांना दमदार पावसाची प्रतीक्षा. गतवर्षीच्या तुलनेत पावसाची मंद गती. पावसाचे आगमन न झाल्याने शेतीची कामे राखडली. गतवर्षी पहिला आठवड्याभरात 6.32 मि.मी पाऊस. गतवर्षी 20 मे पासून जिल्ह्यात हजेरी लावणाऱ्या पावसाने मात्र जून उजाडला तरी अद्याप हजेरी लावलेली नाही. त्यातच शासनाच्या महावेद प्रणालीने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार जिल्ह्यात यावर्षी पावसाची गती अत्यंत मंद आहे. गतवर्षी 1 जून ते 7 जून या कालावधीत 632.70 मिली मीटर म्हणजेच 2.09 टक्के इतका पाऊस पडला होता. मात्र यावर्षी 121.50 म्हणजेच 0.40% इतकाच पाऊस पडला आहे.0
0
Report
कोल्हापुर में मराठी फिल्म महामंडळ चुनाव: मतगणना आज शुरू
Kolhapur, Maharashtra:Kop Chitrapat Mahamandal अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळासाठी 49.90 टक्के इतके मतदान झाले आहे. राज्यातील 12 केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली असून आज कोल्हापूरात मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी 9 नंतर कोल्हापूर शहरातील राम गणेश गडकरी सभागृहात ही मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे.पूर्वीच्या काही संचालक मंडळाने एक मेकावर आरोप प्रत्यारोप केले होते, त्यामुळं ही निवडणूक ईर्षेने झाली होती. त्यामुळे या निवडणूक कडे राज्यातील चित्रकर्मीचे लक्ष लागून राहिले होते. चित्रपट महामंडळाच्या कार्यकारणीच्या एकूण 17 जागांसाठी 44 उमेदवार निवडणूक लढत झाली आहे. पण मुख्य लढत माजी अध्यक्ष मेघराज भोसले याचे समर्थ पॅनल आणि ज्येष्ठ दिग्दर्शक सतीश रणदिवे याचे चित्रक्रमी पॅनल मध्ये पाहायला मिळाली.0
0
Report
Advertisement
मानिकपूर पुलिस की तत्परता से युवक की आत्महत्या के प्रयास रोका गया
Vasai-Virar, Maharashtra:प्रेमप्रकरणातून आत्महत्येचा प्रयत्न; माणिकपूर पोलिसांच्या प्रसंगावधानाने तरुणाचे प्राण वाचले मुलीच्या आई-वडिलांनी लग्नास नकार दिल्याने नैराश्यात गेलेल्या एका तरुणाने वसई रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉकवरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मित्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे माणिकपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तरुणाला बोलण्यात गुंतवून ठेवले. त्याचवेळी एका पोलिस कर्मचाऱ्याने मागून जाऊन त्याला सुरक्षितपणे पकडत स्कायवॉकच्या कठड्यावरून खाली आणले. त्यानंतर पोलीस ठाण्यात समुपदेशन करून तरुणाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांच्या या धाडसी आणि तत्पर कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.0
0
Report
छत्रपति संभाजी नगर में पानी आपूर्ति बढ़ाने के लिए नीति लागू, मीटर और शुल्क के साथ नया वितरण नियम
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरातील नागरिकांना वाढीव पाणी देण्याच्या प्रक्रियेला गती आली आहे. गेल्या ४ दिवसांत शहरात २५.५० एमएलडी वाढीव पाणी उपलब्ध झाले आहे. त्यासाठी जलकुंभाची उभारणी करण्यात आली आहे. शहरातील ज्या भागांनी सर्वाधिक अधिकृत नळ कनेक्शन घेतले आहेत, त्या वसाहतींना प्राधान्यानाने पाणीपुरवठा करण्याचे धोरण आता मनपाने स्वीकारले आहे. याशिवाय पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी टप्याटप्याने मीटर बसवण्याची सक्ती करण्यात येणार आहे. तर नो नेटवर्क भागाला काही दिवसात पाणी मिळणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मनपाने पाणी वितरणाचे नियोजन सुरू केले आहे. आता मोफत पाणी दिले जाणार नाही. संपूर्ण शहरात तसेच नो नेटवर्क भागात नवीन नळ जोडणीसाठी नियमानुसार शुल्क भरणे अनिवार्य आहे. ज्या वसाहती किंवा गल्लीमध्ये सर्वाधिक नळ जोडण्या असतील, तेथे प्राधान्यक्रमाने पाणी सोडले जाईल. पहिल्या टप्यात सर्व व्यावसायिक मालमत्तांना पाण्याचे मीटर लावले जातील आणि त्यानंतर दुसऱ्या टण्यात घरगुती मालमत्तांना मीटर बसवले जाणार आहेत.0
0
Report
दिल्ली-नोएडा के डिजिटल अरेस्ट धोखे से 1.23 करोड़ की ठगी: रत्नागिरी साइबर पुलिस ने पर्दाफाश
Ratnagiri, Maharashtra:सव्वा कोटींची फसवणूक.. दिल्लीतून आरोपीस अटक.. रत्नागिरी पोलिसांची कामगिरी.. डिजिटल अरेस्टची भीती दाखवून गंडा.. अँकर बंगळुरू पोलीस आणि नवी दिल्लीतील सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून एका व्यक्तीला डिजिटल अरेस्टची भीती घालत तब्बल 1 कोटी 23 लाख रुपयांना गंडवणाऱ्या आंतरराज्य टोळीचा रत्नागिरी सायबर पोलिसांनी पर्दाफास केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिल्लीतून गगनदीप भारद्वाज राहणार नोएडा दिल्ली या मुख्य आरोपीला अटक केली आहे.. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे..0
0
Report
Advertisement
शिवाजीनगर भुयारी मार्ग में पानी भरने की आशंका, रेलवे तीन दिन में मरम्मत का दावा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर महापालने रेल्वेला भुयारी मार्गात मडपंप बसवण्यासाठी दिलेली १० दिवसांची मुदत संपली आहे. अद्याप मडपंप बसवण्यात आलेला नाही. त्यामुळे पावसाळ्यात शिवाजीनगर भुयारी मार्गात पुन्हा पाणी तुंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाणी उपسण्याची कोणतीही पर्यायी यंत्रणा उपलब्ध नसल्याने वाहनचालकांना पुन्हा गैरसोयीचे होणार आहे, दरम्यान Railway ठेकेदाराने पंपासाठी लागणारे साहित्य वेगवेगळ्या ठिकाणाहून मागवले असल्याने ते पोहोचण्यास विलंब झाला. पुढील ३ दिवसांत काम पूर्ण करण्यात येईल असा दावा रेल्वे विभागाने केला आहे...0
0
Report
सहकारी बैंक चुनाव में घराणेशाही, नेताओं ने परिवार के सदस्यों को मैदान में उतारा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक पारंपरिकदृष्ट्या कार्यकत्यांची निवडणूक मानली जाते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना डावलून दिग्गज नेते, त्यांची निवडणुकात मुले-मुली, भाऊ आणि इतर कुटुंबीयांनाच अधिक संधी दिली जात असल्याचे चित्र आहे. विधानसभा, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांप्रमाणेच आता सहकार क्षेत्रातही घराणेशाहीचा शिरकाव झाल्याने निष्ठावान कार्यकत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पालकमंत्री संजय शिरसाट, ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, खासदार डॉ. कल्यान काळे, आमदार अनुराधा चव्हाण आणि आमदार रमेश बोरनारे या विद्यमान लोकप्रतिनिधींनी स्वतःचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यासोबतच अनेक नेत्यांनी आपल्या कुटुंबीयांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. कार्यकत्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा असताना, अनेक नेत्यांनी स्वतःसह आपल्या कुटुंबीयांना उमेदवारी दिल्याने जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीचा प्रभाव ठळकपणे दिसून येत आहे.0
0
Report
रत्नागिरी के पाज पंढरी गाँव में भीषण जलटंचाई, 15 दिनों में सिर्फ चार बाल्टी पानी
Ratnagiri, Maharashtra:दापोली - रत्नागिरी.. अथांग समुद्र शेजारी, पण पाण्यासाठी टाहो! पाज पंढरी गावात भीषण पाणीटंचाई.. अँकर एकीकडे अथांग समुद्र... आणि दुसरीकडे घोटभर पाण्यासाठी ग्रामस्थांची जीवघेणी धावपळ! रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठं कोळी बांधवांचं गाव असलेल्या दापोली तालुक्यातील 'पाज पंढरी'वर आज भीषण पाणीटंचाईचं संकट कोसळलं आहे.. गावातील विहिरींनी तळ गाठला असून, बांधतीवरे नळपाणी पुरवठा योजनेतून तब्बल १५ दिवसांनी केवळ ४ हंडे पाणी मिळत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.. पाणी विकत घ्यायला पैसे कुठून आणायचे? या विवंचनेत येथील महिला असून, वयोवृद्ध आणि लहान मुलांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत.. मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेल्या या गावात आज पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा झालाय.. यावर प्रशासन तातडीने काही उपाययोजना करणार का? हाच मोठा प्रश्न आहे.0
0
Report
Advertisement
प्राजक्त तनपुरे का राहुरी में भव्य स्वागत: विधानसभा चुनाव में बिनविरोध जीत के बाद बड़े समारोह
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या भाजप उमेदवार प्राजक्त तनपुरे यांचा राहुरी येथे कार्यकर्त्यांकडून सत्कार करण्यात आला. राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथून भव्य मिरवणूक काढून बाजारपेठेमध्ये सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आलं होतं. या सत्कार समारंभासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. आपल्या विरोध निवडीच श्रेय राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलं आहे. विखे फॅक्टर आपण ऐकत होतो मात्र प्रत्यक्षात पाहायला मिळाला आणि आठ दिवसांत मी आमदार झालो अशा शब्दांत तनपुरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या सोहळ्याला नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रचंड गर्दी करत त्यांचे जंगी स्वागत केले.0
0
Report
रायगढ़ जिला परिषद ने एक क्लिक पर खतों का स्टॉक उपलब्ध कराकर जमाखोरी पर रोक
Chendhare, Maharashtra:खतसाठ्याची माहिती आता एका क्लिकवर. रायगड जिल्हा परिषदेचा उपक्रम. साठेबाजीला आळा, वितरणात पारदर्शकता. खरेप हंगाम तोंडावर असताना खतांसाठी कृषी सेवा केंद्रांवर होणारी गर्दी, उपलब्धतेबाबतची अनिश्चितता आणि कृत्रिम टंचाईच्या तक्रारी यावर रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने प्रभावी उपाय शोधला आहे. जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांमधील खतसाठ्याची माहिती आता शेतकऱ्यांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. कृषी विभागाने तयार केलेल्या विशेष ब्लॉगद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांची माहिती आणि त्या केंद्रांमध्ये उपलब्ध असलेल्या विविध खतांच्या साठ्याचा तपशील शेतकऱ्यांना घरबसल्या पाहता येणार आहे. त्यामुळे एखाद्या खताच्या शोधात अनेक दुकाने फिरण्याची गरज उरणार नाही. याशिवाय साठेबाजी, काळाबाजार आणि कृत्रिम टंचाईला आळा बसणार आहे.0
0
Report
नागपुर-कामठी के महादेव घाट पर नदी डूबकर तीन की मौत, परिवार सदमे में
Nagpur, Maharashtra:कन्हान नदी महादेव घाटावर गेलेल्या दोन कुटुंबांवर काळाने घाला घातला. कामठी जवळील कन्हान नदी काठावरील महादेव घाट येथे पिकनिकसाठी आलेल्या नागपूर आणि कामठी येथील दोन कुटुंबांतील एका ६ वर्षीय चिमुरड्यासह तिघांचा नदीच्या डोहात बुडून अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. ही मन सुन्न करणारी घटना आज रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होती आहे.रोहित महादेव नागदेव वय ३५ वर्षे, रा. कुंभारे कॉलनी, कामठी,गौतम राजकुमार अंबादे वय ३१ वर्षे, रा. इंदिरानगर, जरीपटका, नागपूर,.चैतन्य बबलू अंबादे वय ६ वर्षे, रा. जरीपटका, नागपूर ....मिळालेल्या माहितीनुसार, कामठी येथील ई-रिक्षा चालक रोहित नागदेव हे आपल्या ठरलेल्या नियोजनाप्रमाणे कुटुंबासह महादेव घाटावर पिकनिकसाठी आले होते. त्याच वेळी नागपूरच्या जरीपटका येथील रहिवासी गौतम अंबादे हेदेखील आपल्या कुटुंबातील ३ महिला, ३ मुली आणि ३ पुरुषांसह एकूण १३ जण याच ठिकाणी आले होते.दुपारच्या सुमारास दोन्ही कुटुंबांतील सदस्य स्वयंपाकाच्या तयारीत व्यस्त होते. याच दरम्यान, ६ वर्षीय चिमुरडा चैतन्य अंबादे याचा खेळता खेळता तपाय घसरला आणि तो तेथे नदीच्या डोहात बुडू लागला. चैतन्यला बुडताना पाहून त्याला वाचवण्यासाठी त्याचा काका गौतम अंबादे याने तात्काळ डोहात उडी घेतली. मात्र, गौतमला पोहता येत नसल्याने तोही पाण्यात बुडू लागला. हा गंभीर प्रकार जवळच उभे असलेल्या रोहित नागदेव यांच्या लक्षात आला.दरम्यान रोहित यांनीही त्या दोघांना वाचवण्यासाठी डोहात धाव घेतली, परंतु दुर्दैवाने पोहता येत नसल्याने रोहित सुद्धा त्या खोल पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले.या तिघांना बुडताना पाहून गौतमचे वडील राजकुमार अंबादे वय अंदाजे ५५ हे देखील नदीत उतरले. तेही मानेपर्यंत पाण्यात बुडाले होते, परंतु त्यांनी निकराची झुंज देत कसेतरी हातपाय मारून स्वतःचे प्राण वाचवले आणि ते पाण्याच्या बाहेर आले. पोलिसांनी शोधमोहीम राबवली आणि तिन्ही मृतांचे शव पाण्याबाहेर काढले.0
0
Report
Advertisement
नाशिक विधान परिषद चुनाव: बंडखोरी से महायुती में पेच, आज होगा निर्णायक फैसला
Nashik, Maharashtra:Nashik Breaking नाशिक विधान परिषद निवडणुकीबाबत अपक्ष आणि भाजपच्या बंडखोर उमेदवारीवर आज होणार निर्णायक फैसला गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे रिंगणात उतरल्याने महायुतीत निर्माण झाला पेच भाजप नेते गिरीश महाजन यांनी रविवारी दोन्ही उमेदवारांसोबत केली आहे स्वतंत्र चर्चा गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी मनधरणीचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत महाजन आणि शिवसेना नेते उदय सामंत यांच्यातही चर्चा दोन्ही उमेदवारांनी निर्णयासाठी वेळ मागितल्याची माहिती आज उमेदवारी मागे घेण्याच्या पार्श्वभूमीवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आज पुन्हा सकाळी 11 वाजता उदय सामंत आणि गिरीश महाजन यांच्यात बैठक होणार आहे याच बैठकीनंतर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे त्यामुळे गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे हे काय निर्णय घेतात याकडे लक्ष नाशिकप्रमाणे जळगाव विधान परिषद निवडणुकीतही बंडखोरीमुळे महायुतीची डोकेदुखी वाढली0
0
Report
संगमेश्वर सोनवी पुल: 19 साल की प्रतीक्षा खत्म, एकेरी यातायात शुरू
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकणातील प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे.. मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वरच्या सोनवी पुलाची 19 वर्षाची प्रतीक्षा संपली.. संगमेश्वर सोनवणे नदीवरच्या नवीन पुलाचे काम पूर्णत्वास गेले आहे.. नवीन पुलावरून एकेरी वाहतूक सुरू.. अँकर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील प्रवाशांचे आणि स्थानिक नागरिकांची तब्बल 19 वर्षाची प्रदीर्घ प्रतीक्षा अखेर संपली आहे.. संगमेश्वर बस स्थानकाजवळ सोनवी नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाचे एका बाजूचे काम पूर्ण झाले असून हा पुल आता एकेरी वाहतुकीसाठी अधिकृतपणे खुला करण्यात आला आहे.. गेल्या दीड दशकांहून अधिक काळ रखडलेल्या या कामामुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासातून अखेर सुटका झाली असून परिसरात आनंदाचे वातावरण आहे..0
0
Report
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ने बस स्टेशन की अचानक जाँच में निलंबन के निर्देश दिए
Amravati, Maharashtra:अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाच्या अचानक पाहणीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक संतप्त; दो अधिकाऱ्यांना निलंबनाचे आदेश अमरावती बसस्थानकाची अचानक पाहणी केली. या पाहणीदरम्यान बसस्थानक परिसरात पसरलेली अस्वच्छता, प्रवाशांना होत असलेला त्रास तसेच चालक-वाहकांमधील अव्यवस्था पाहून मंत्री प्रताप सरनाईक संतप्त झाले. परिसरातील ढिसाळ व्यवस्थापनाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत तत्काळ कारवाईचे आदेश दिले. या प्रकरणी विभाग नियंत्रक सचिन डफळे आणि आगार व्यवस्थापक वैशाली भाकरे यांना तात्काळ निलंबित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मंत्र्यांच्या या अचानक कारवाईमुळे परिवहन विभागात एकच खळबळ उडाली असून संबंधित अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान बसस्थानकाची स्वच्छता आणि व्यवस्थापन सुधारण्याबाबतही त्यांनी संबंधितांना कडक सूचना दिल्या आहेत. बाइट-प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री0
0
Report
Advertisement
