icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Oct 2024, 05:25 am

माझी उमेदवारी मदन येरावारांना पाडण्यासाठीच, माजी आमदार संदीप बाजोरीयांचा दावा.

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून तुतारी चिन्हावरच आपण लढु असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत तिकीट वाटपाआधीच त्यांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार देखील सुरू केला आहे. भाजप आमदार मदन येरावार यांनी मतदारसंघ बकाल करून ठेवला, रस्त्यांची दैना झाली, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून भयमुक्त वातावरण देऊ असे वचन आपण जनतेला देत असल्याचे संदीप बाजोरिया यांनी सांगितले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

ऑपरेशन टायगर पर बयान के बीच ठाकरे गट के सांसद भाऊसाहेब वाकचौरे की प्रतिक्रिया

Shirdi, Maharashtra:खासदार भाऊसाहेब वाकचौरे ऑन ऑपरेशन टायगर - ऑपरेशन टायगर विषयी मला काही माहीती नाही... मी एकनाथ शिंदे यांना भेटलो नाही , कोणते खासदार भेटले याचीही मला कल्पना नाही... मला या विषयी काही बोलायच नाही... मतदारसंघाच्या कामासाठी मंत्र्यांना भेटलो म्हणजे लगेच पक्ष सोडणार या चर्चा निरर्थक... तुम्ही मला त्या पक्षात ढकलायच्या विचारात आहात का ? माध्यमांना हात जोडतो तुम्ही यावर काही विचारू नका... ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची प्रतिक्रिया... ऑन चंद्रकांत खैरे विधान - चंद्रकांत खैरे माझ्याविषयी काय बोलले हे त्यांनाच विचारा... शिर्डीतील मेळाव्याच्या वेळी मी पार्लमेंटरी कमिटीसोबत पंजाब येथील अभ्यास दौ-यावर होतो... खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची प्रतिक्रिया ...
0
0
Report
Advertisement

कोकण के काजू किसान संकट में: दाम 180-190 से गिरकर 80-90 प्रति किलो

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकणातील काजू उत्पादन संकटात.. १५० रुपयांचा काजू थेट ९० रुपयांवर, बागायतदार हवालदिल!.. अँकर कोकणातील काजू बी उत्पादन शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. हंगामाच्या सुरुवातीला काजू बियाला प्रति किलो १८० ते १९० रुपयांपर्यंत विक्रमी दर मिळाल्याने, यंदा बागायतदारांना चांगल्या नफ्याची आशा होती. मात्र, हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचताच बाजारातील चित्र पूर्णपणे पालटलं आहे.. काजू बियांचे दर कमालीचे घसरले असून ते आता थेट ८० ते ९० रुपये प्रति किलोवर आले आहेत.. एकीकडे उत्पादन खर्च वाढत असताना, दुसरीकडे बाजारभाव निम्म्याने कोसळल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.. हक्काच्या पिकाला कवडीमोल भाव मिळत असल्याने कोकणातील काजू बागायतदारांमध्ये सध्या तीव्र नाराजी आणि चिंतेचं वातावरण पसरलं आहे..
0
0
Report

गोदावरी नदी में नाव डूबने से 40 प्रवासी घायल, बचाव अभियान जारी

Jalna, Maharashtra:जालना ब्रेकिंग चाळीस प्रवासी घेऊन जाणारी बोट गोदावरी नदीत बुडाली जालना जिल्ह्यातल्या गोळेगाव येथील घटना गोळेगावहून पुरुषोत्तमपुरी जातानाची घटना ग्रामस्थांकडून बचाव कार्य सुरु घटनास्थळी डाॅक्टरांचं पथक दाखल अँकर- जालना जिल्ह्यातल्या गोळेगाव येथे चाळीस प्रवासी घेऊन जाणारी बोट गोदावरी नदीत बुडाल्याची घटना घडलीये.. गोळेगाव येथून पुरुषोत्तम पुरीला जाताना ही घटना घडलीये.. वाळु उपसा करणार्या बोटीतून प्रवासी वाहतूक होत होती. यावेळी क्षमतेपेक्षा जास्त लोक या बोटीत बसल्याने बोट गोदावरी नदीत बुडाल्याची माहिती आहे.. यावेळी ग्रामस्थांनी बचावकार्य सुरु केलं असून नागरिकांना पाण्याबाहेर काढलं जात आहे.. दरम्यान याठिकाणी प्रशासनासह डाॅक्टरांचं पथक दाखल झालं असून जखमींवर तातडीने उपचार करण्यात येत आहेत.दरम्यान या घटनेनंतर अजून बचावकार्य सुरु आहे..गोळेगावहुन हे प्रवासी अधिक मासानिमीत पुरुषोत्तमपुरी येथे दर्शनासाठी जात असताना ही घटना घडली आहे.
0
0
Report

उंबर्डा में जमीन विवाद की मारामारी CCTV में कैद, दो कुटुंब घायल

Kalyan, Maharashtra:कल्याण पश्चिमेतील उंबर्डा परिसरात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी झाली. CCTV फुटेज समोर आल्याने खळबळ. पोलिसांवर गंभीर आरोप! कल्याण पश्चिमेतील उंबर्डा परिसरात राहणाऱ्या संगम लोखंडे आणि रणजीत लोखंडे या दोन कुटुंबांमध्ये जमिनीच्या वादातून हा संघर्ष उफाळून आला. त्यांच्या जागेत बाहेरून आणलेली झाडे टाकल्याबाबत विचारणा केल्यानंतर वाद झाला आणि हाणामारी झाली. रणजीत लोखंडे आणि त्यांच्या नातेवाईकांनी लोखंडी रॉड, स्टंप, लाकडी दांडके आणि चाकूने हल्ला केल्याचा आरोप केला गेला. या हल्ल्यात शकुंतला लोखंडे आणि निरंजन लोखंडे जखमी झाले असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संपूर्ण मारहाणीची घटना CCTV फुटेजमध्ये कैद असल्याच्या दाव्यांनाही महत्त्व दिले गेले, तरी पोलिसांनी एकपक्षीय तक्रार नोंदवल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. आत्मदहनाची धमकी देऊन न्याय न मिळाल्यास मागेल असल्याचा इशारा लोखंडे कुटुंबाने दिला. पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report
Advertisement

यवतमाल में मॉनसूनपूर्व पेरणी शुरू, बारिश के अभाव से किसान चिंतित

Yavatmal, Maharashtra:मृग नक्षत्र लागताच यवतमाळ जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी मॉन्सूनपूर्व धूळ पेरणीची लगबग सुरू केली आहे. जिल्ह्यात अद्याप मान्सूनच्या पावसाने हजेरी लावलेली नाही, मॉन्सूनपूर्व अवकाळी पाऊस काही भागात बरसला, मात्र अद्याप पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. अल निनो च्या प्रभावामुळे यंदा पाऊस उशिरा व खंडित स्वरूपाचा राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शासन व जिल्हा प्रशासनाने देखील शेतकऱ्यांनी पेरण्याची घाई करू नये असे आवाहन केले आहे. मात्र परंपरागत शेती करणाऱ्या काही शेतकऱ्यांनी पेरणीसाठी मृग नक्षत्राचा मुहूर्त साधला आहे. ज्या शेतकऱ्यांचे क्षेत्र मोठे आहे अशा शेतकऱ्यांना पाऊस सुरू होताच पेरणीसाठी अडचणी जातात. वेळेवर मजुरांची उपलब्धता होत नाही, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आतापासूनच सरकी टोबायला सुरुवात केली आहे. ईश्वराची कृपा होईल व निसर्गाची साथ मिळेल अशी अशा या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
0
0
Report

चंद्रपुर में भाजप विजय के शिल्पकार बने बंटी भांगडीया के बैनर तैनात

Chandrapur, Maharashtra:चंद्रपुरात भाजपच्या विजयानंतर आमदार बंटी भांगडीया यांचे विजयाचा शिल्पकार म्हणून लावलेले बॅनर, कुठे किंगमेकर, कुठे धुरंधर तर कुठे जिल्ह्याचे नेतृत्व असा उल्लेख. अँकर: चंद्रपुरात भाजपच्या विजयानंतर आ. बंटी भांगडीया यांचे विजयाचा शिल्पकार म्हणून बॅनर लागले आहेत. यात कुठे किंगमेकर, कुठे धुरंधर तर कुठे जिल्ह्याचे नेतृत्व असा उल्लेख आहे. चंद्रपूर-गडचिरोली- वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद जागेवर नेमकी व्यूहरचना करत आ. भांगडीया यांनी अरुण लाखानी यांचा ऐतिहासिक विजय खेचून आणल्याचा उल्लेख बॅनरवर आहे. शहरातील विविध चौकात लावलेल्या आ. भांगड़ीया यांच्या संदर्भातील बॅनरची चर्चा आहे.
0
0
Report
Advertisement

जालना में तीन महीने के वेतन के लिए घंटाघाड़ी चालकोंने किया ठिय्या आंदोलन

Jalna, Maharashtra:जालना : तीन महिन्यांचा पगार थकला,घंटागाडी चालकांनी पुकारला संप अँकर : जालन्यात कचरा वाहतुक करणाऱ्या महापालिकेच्या घंटागाडी चालकांनी संप पुकारला आहे.घंटा गाडी चालकांचा तीन महिन्यांचा पगार रखडला आहे.त्यामुळे घंटागाडी चालकांनी संपाचं हत्यार उपसलं आहे.पगार मिळण्याच्या मागणीसाठी सर्व घंटागाडी चालकांनी शहरातील मस्तगड भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.3 महिन्यांपासून पगारच नसल्यानं घर चालवायचं कसं असा सवाल आंदोलन कर्त्यांनी केलाय.दरम्यान तातडीने पगार न झाल्यास आणखी आंदोलन तीव्र करण्याचा ईशारा देखील आंदोलनकर्त्यांनी दिलाय.दरम्यान या संपामुळे शहरातील स्वच्छतेवर मोठा परीणाम होण्याची शक्यता आहे
0
0
Report

बीड में गोदावरी नदी में भाविकों की नाव पलटी, एक महिला और एक बच्चा लापता

Beed, Maharashtra:बीड: गोदावरीत भाविकांची बोट बुडाली; अतिभारामुळे दुर्घटना, महिला व चिमुकली बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती... ANC - एक धक्कादायक बातमी बीड मधून येतेय... माजलगाव तालुक्यातील प्रसिद्ध पुरुषोत्तमपुरी येथे भाविकांना घेऊन जाणारी बोट गोदावरी नदीच्या पात्रात पलटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बोटीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक भाविक बसवण्यात आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. पुरुषोत्तमपुरी येथील एका मंदिराच्या दर्शनासाठी भाविक बोटीने नदी पार करत होते. गोदावरी पात्राच्या मध्यभागी पोहोचल्यानंतर बोट अचानक असंतुलित होऊन अक्षरशः बुडाली. बोटीत 35 पेक्षा जास्त भाविक प्रवास करत होते. दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील इतर बोट चालकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. वेळीच मदत मिळाल्यामुळे अनेक भाविकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र, या दुर्घटनेत एक महिला आणि एक लहान बाळ बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती असून नागरिक आणि स्थानिक प्रशासनाकडून त्यांचा शोध सुरू आहे. पुरुषोत्तमपुरी येथे दोन मंदिरे असून त्यापैकी एका मंदिरात जाण्यासाठी भाविकांना बोटीचा आधार घ्यावा लागतो. भाविकांच्या म्हणण्यानुसार, काही बोट चालकांकडून वारंवार क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन वाहतूक केली जाते. भाविकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून अतिभाराने प्रवास केल्यामुळेच ही दुर्घटना झाल्याचा आरोप होत आहे. बाईट: महिला भाविक ( बुडालेली महिला ) एकूण दोन बाईट्स आहेत.
0
0
Report

गडचिरोली के अहेरी नगर परिषद के कर संकलन अधिकारी पर हमला, अधिकारी गंभीर घायल

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी नगरपंचायतीच्या कर संकलन अधिकाऱ्यावर हल्ला हल्ल्यात अधिकारी गंभीर जखमी चार जणांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू अँकर:-- गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी नगरपंचायतीच्या कर संकलन अधिकाऱ्यावर आज सकाळी 4 इसमांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात अधिकारी वैभव पांढरे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी माजी जि. प..अध्यक्ष अजय कंकडालवारसह चार जणांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.  अवैध इमारतीच्या मुद्द्यावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मॉर्निंग वॉकला गेले असताना वाद उकरून काढत हल्ला करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. पोलिसांनी तपास प्रक्रिया वेगवान केली आहे.
0
0
Report
Advertisement

सोलापुर में मंत्री के बयान से सियासी घमासान, दर्शन की बहस तेज

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - आता दर्शन घेण्याचे दिवस संपलेले आहेत, मंत्री जयकुमार गोरे यांची खा. धैर्यशील मोहिते यांचे नाव न घेता जोरदार टीका *ऑन पंतप्रधान नरेंद्र मोदी तपपूर्ती* - जनसामान्यांना बळ देणारे , देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प करणारे पंतप्रधान देशाला लाभले आहेत - मोदींच्या भविष्यातील कालखंडासाठी श्री सिद्धरामेश्वर यांना साकड घातलं *ऑन ग्रामपंचायत निवडणुका* - लवकरच ग्रामपंचायतच्या निवडणुका घेतोय - सर्व ग्रामपंचायत यांना लवकरच लोकनियुक्त बॉडी देण्याचा प्रयत्न करू *ऑन धैर्यशील मोहिते पाटील* - ते काय म्हणतात याला मी अन्सरेबल नाही - धैर्यशील मोहिते पाटलांना मला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे की नाही हे मला माहिती नाही - मी सामान्य जनतेचा पोस्टमन आहे... ते पोस्टमन म्हणून घ्यायला मला लाज वाटत नाही - सामान्य जनतेचे प्रश्न समजून घेणार आणि ते सरकार दरबारी घेऊन जाणे ही माझी जबाबदारी आहे - मग ही भूमिका पोस्टमन, आमदार, पालकमंत्री स्वरूपात करेन - सामान्य माणसांचा प्रश्न सोडवत असताना मला पोस्टमनची भूमिका मिळाली तरी यात वाईट वाटायचं कारण नाही *ऑन विधानपरिषद निवडणूक* - आम्हाला तयारी करण्याची खूप काही आवश्यकता नाही... - आमच्याकडे विजयासाठी लागणारे मतदान ऑलरेडी भारतीय जनता पार्टी म्हणून आहे - महायुती म्हणून आम्ही लढतोय आणि तसेच पुढे आलो तर काही शिल्लक राहील असे मला वाटत नाही - तरीदेखील पाचशे पार जाण्याचा आमचा संकल्प आहे *ऑन डीसीसी बँक* - राजेंद्र राऊत यांनी डीसीसी बँकेच्या भ्रष्टाचारा संदर्भात आवाज उठवला म्हणून त्यांना मतदान पडणार नाही असा नरेटीव सेट केला जातोय - भ्रष्टाचारावर आवाज उठवल्यावर मत पडतात की कमी होतात हे एकदा तपासलं पाहिजे - ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांची अडचण आहे... ज्यांनी भ्रष्टाचार केला नाही ते सर्व संचालक व्यवस्थित आहेत.. त्यांना आनंद आहे - त्याच संचालकांची इच्छा होती की चौकशी व्हावी.. ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांच्यावर कारवाई व्हावी - भ्रष्टाचार कुठे झालेला आहे कोणत्या टोकाला झालेला आहे हे तुम्हाला माहिती आहे *ऑन विधान परिषद विजय आकडा* - अबकी बार 500 पार *ऑन मोहिते पाटील* - तुम्ही जे नाव घेताय ते नाव मी कधीच घेत नाही - मी जेव्हापासून पालकमंत्री झालो तेव्हापासून मला केव्हा आवश्यकता भासली नाही... आजही वाटत नाही.. - त्यामुळे ही निवडणूक आम्हाला विचारला असता तर बिनविरोध झाली असती... आमच्याकडे आले असते तर बिनविरोध झाली असती... आमचे दर्शन घेतले असोत - मात्र आता दर्शन घेण्याचे दिवस संपलेले आहेत... - आता स्वतःच अस्तित्व शिल्लक रहावं किंवा आमच्याशिवाय काही घडत नाही हे दाखवण्याचा प्रयत्न आहे हे मोडीत निघेल - आणि ही निवडणूक त्याला उत्तर असेल... बाईट - जयकुमार गोरे ( पालकमंत्री, सोलापूर )
0
0
Report

गोवा के अंबाबाई मंदिर में 1.5 किलो सोने का कलश स्थापित करने की तैयारी

Kolhapur, Maharashtra:करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या मंदिरावर सोन्याचा कळस बसवण्यात येणार आहे. गोव्यातील एका भक्ताने दीड किलो सोन्यात डेऱ्यासह साडेतेरा फुटाचा कळस बनवला आहे. सध्या अधिक मास सुरू आहे, तो संपायला काही दिवस शिल्लक राहिले आहेत, त्यामुळे येत्या शुक्रवारी हा कळस मंदिरावर बसावा यासाठी फक्त प्रयत्न केला जात आहे. गोव्यातील याच भक्ताने अंबाबाईला यापूर्वी सोन्याचा अलंकार देणगी म्हणून दिला होता.. आता हाच भक्त अंबाबाई देवीच्या कळसासाठी दीड किलो वजनाचा सोन्याचा शिखर अर्पण करणार आहे. हा सोन्याचा कळस व डेरा कर्नाटक मधील मेंगलोर इथल्या कारागराने बनविला आहे. आधी कळसाचे तांब्यातील मॉडेल बनवले, हे मूळ कळसावर बसवून माप घेतले गेले. त्यासाठी 200 किलो तांबे वापरण्यात आले. याच तांब्यावर दीड किलो सोन्याचा पत्रा लावण्यात आला आहे. हा कळस बनवण्यासाठी तब्बल दीड महिन्याचा कालावधी लागला. अंबाबाई मंदिर परिसरातून याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top