445001
माझी उमेदवारी मदन येरावारांना पाडण्यासाठीच, माजी आमदार संदीप बाजोरीयांचा दावा.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून तुतारी चिन्हावरच आपण लढु असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत तिकीट वाटपाआधीच त्यांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार देखील सुरू केला आहे. भाजप आमदार मदन येरावार यांनी मतदारसंघ बकाल करून ठेवला, रस्त्यांची दैना झाली, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून भयमुक्त वातावरण देऊ असे वचन आपण जनतेला देत असल्याचे संदीप बाजोरिया यांनी सांगितले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
करंजी गरड में गन्दा पानी: डास-बीमारी का खतरा; ग्राम पंचायत की लापरवाही
Washim, Maharashtra:वाशीमच्या रिसोड तालुक्यातील करंजी गरड येथे ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे मुख्य रस्त्यावर अनेक महिन्यांपासून घाण पाणी साचले आहे. साचलेल्या पाणीात अळ्यांची उत्पत्ती होऊन डासांचे प्रमाण वाढल्याने संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. या समस्येबाबत वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधी, अस्वच्छता आणि आरोग्याच्या धोक्याचा सामना करावा लागत असून पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.0
0
Report
भंडारा में अवैध मोहफूल साठे पर पुलिस ने छापा, 9 लाख माल जब्त, 5 गिरफ्तार
Bhandara, Maharashtra:भंडारा तालुक्यातील जवाहरनगर पोलिस स्टेशनचे हद्दीत शहापूर परिसरात पोलिसांनी अवैध मोहफूल साठ्यावर धडक कारवाई करत तब्बल ९ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत आरोपी जितेंद्र युवराज थोटे याच्या ताब्यातून ८२ प्लास्टिक चुंगळ्यांमध्ये साठवलेले २,४६० किलो सडवा व मोहफूल जप्त करण्यात आले. याची बाजारमूल्य अंदाजे ६.९२ लाख रुपये आहे. तसेच मोहफूलापासून हातभट्टी दारू निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या २०० मन जळाऊ लाकडाचाही साठा जप्त करण्यात आला. एकूण ९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला, तसेच सूर नदीच्या किनारी अवैध दारू निर्माण करणारे तीन अड्डे उध्वस्त करण्यात आले, व पाच आरोपींना अटक करण्यात आली. मात्र ही कारवाई नागपूर एक्साईजच्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी भंडाऱ्यात येऊन केल्याने, जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला...0
0
Report
शिरूर पुलिस ने घरफोड़ करने वाले पति-पत्नी को गिरफ्तार किया; २४ लाख सोना-चांदी बरामद
Shirur, Maharashtra:शिरूर पोलिसांनी घरफोडीच्या एका मोठ्या गुन्ह्याचा छडा लावत धडाकेबाज कामगिरी केली आहे. शिरूरमधील एका नामांकित व्यावसायिकाच्या घरातून २४ लाख रुपयांचे सोने आणि चांदी चोरून पळालेल्या नोकर पती-पत्नीला पोलिसांनी परजिल्ह्यातून बेड्या ठोकल्या आहेत. शिरूर शहरातील आनंद सोसायटीत राहणारे व्यावसायिक नितीन मुथा यांच्याकडे घरकाम करणाऱ्या विलास खोसडे आणि सारजा खोसडे या पती-पत्नीने मालकाचा विश्वासघात केला. फेब्रुवारी महिन्यात या दोघांनी घरातून ७ किलोहून अधिक चांदी आणि ३६ ग्रॅम सोने लंपास केले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच शिरूर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास चक्र फिरवली. आरोपी त्यांच्या मूळ गावी म्हणजेच नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे असल्याची माहिती मिळताच, शिरूर पोलिसांनी तिथे जात सापळा रचला आणि आरोपींना शिताफीने जेरबंद केले. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीला गेलेला संपूर्ण २४ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे...0
0
Report
Advertisement
वाशीम के काटेपूर्णा नदी के पुल का निर्माण अधूरा; बरसात में आवागमन का खतरा
Washim, Maharashtra:पावसाळा जवळ आला असतानाही वाशीमच्या जऊळका येथील काटेपूर्णा नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम अद्याप अपूर्ण आहे. नागपूर–छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील या महत्त्वाच्या मार्गावर वाहनचालकांना सध्या जुन्या व जीर्ण पुलावरूनच प्रवास करावा लागत आहे.पावसाळ्यात नदीला पूर आल्यास वाहतुकीस धोका निर्माण होण्याची शक्यता असून,दररोज हजारो वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गावर सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी नवीन पुलाचे काम पूर्ण करण्याची मागणी नागरिक व वाहनचालकांकडून होत आहे.0
0
Report
वाशिम सहित कई मंडियों में सोयाबीन की भारी आवक, कीमतें 7000 रुपए से ऊपर
Washim, Maharashtra:वाशिमः सोयाबीनची मोठी आवक सुरू आहे. काल कारंजा व वाशीम बाजार समित्यांमध्ये मिळून 13,650 क्विंटल सोयाबीनची आवक नोंदवली गेली. दरात झालेल्या वाढीचा फायदा घेण्यासाठी शेतकरी साठवलेले सोयाबीन विक्रीस आणत आहेत. कारंजा बाजार समितीत 5,150 क्विंटल आवक झाली असून कमाल दर 7,325 रुपये प्रतिक्विंटल मिळाला. तर वाशीम बाजार समितीत 8,500 क्विंटल आवक झाली असून कमाल दर 7,200 रुपये प्रतिक्विंटल होता. रिसोड, मंगरूळपीर, मालेगावसह इतर बाजार समित्यांमध्येही सोयाबीनची जोरदार आवक सुरू असून बहुतेक ठिकाणी 7 हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळत आहेत.0
0
Report
महाराष्ट्र गोवा हाईवे पर हादसों की लहर, मनसे ने आक्रामक प्रदर्शन किया
Chendhare, Maharashtra:मुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची मालिका ज्या जणांच्या मृत्यूनंतर मनसे आक्रमक झाली आहे. महाड ते पोलादपूर दरम्यान हॉटेल्स समोर उभ्या असलेल्या ट्रक वर मनसेने आक्षेप नोंदवलाय. ज्या हॉटेल समोर अपघात झाला त्या हॉटेलचे बॅनर फाडून खुर्च्यांची फेकाफेक केली. मागील १५ दिवसात महामार्गावर उभ्या असलेल्या वाहनाला धडकून दोन अपघात झाले. यात चौघांना आपला जीव गमवावा लागला.0
0
Report
Advertisement
वसई-विरार समेत ग्रामीण क्षेत्रों में सुबह से बारिश, उमस घटी और ठंडक घुली
Vasai-Virar, Maharashtra:वसई-विरार शहरासह ग्रामीण भागात आज पहाटेपासून पावसाने हजेरी लावली. पहाटे सुरू झालेल्या पावसाच्या सरी सकाळी आठ वाजेपर्यंत अधूनमधून कायम असल्याने संपूर्ण परिसरात आल्हाददायक वातावरण निर्माण झाले. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र आजच्या पावसामुळे तापमानात घट झाली असून वातावरणात गारवा पसरला आहे. पावसामुळे रस्त्यांवर आणि परिसरातील झाडाझुडपांवर ताजेपणा दिसून आला. सकाळच्या वेळी कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनाही उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला. ग्रामीण भागातही शेतकरी आणि ग्रामस्थांनी या पावसाचे स्वागत केले. मान्सूनपूर्व पावसाच्या या सरींमुळे हवेतला कोरडेपणा कमी झाला असून आगामी पावसाळ्याची चाहूल लागल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.0
0
Report
Chondi में Ahilya Devi Holkar की 301वीं जयंती, मुख्यमंत्री Fadnavis की मौजूदगी में उत्सव
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त अहिल्यानगरच्या चौंडी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जयंती उत्सव साजरा होत आहे अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव असलेल्या चोंडी येथे मागील काही वर्षांपासून जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक आणि परिसरामध्ये जय्यत तयार केलेली पाहायला मिळते अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारक परिसरातून आढावा घेतला आहे0
0
Report
163 gram panchayats' reservation process kicks off; special Gram Sabha June 12.
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील मुदत संपलेल्या १६३ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेला आता वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला असून १२ जून रोजी विशेष ग्रामसभेत आरक्षण सोडत काढली जाणार आहे. सन २०२४,२०२५ तसेच २५,६ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा या प्रक्रियेत समावेश करण्यात आला आहे. ८जून रोजी विशेष ग्रामसभेची सूचना प्रसिद्ध होणार असून १९ जूनला प्रारूप आरक्षण जाहीर केले जाईल. त्यानंतर हरकती व सूचनांची प्रक्रिया पार पडणार असून १० जुलै रोजी अंतिम आरक्षण अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्याने गावपातळीवरील राजकीय हालचालींना वेग येण्याची चिन्हे आहेत.0
0
Report
Advertisement
फलटण पुलिस ने संयुक्त कार्रवाई में 4.69 किग्रा गांजे के साथ दो गिरफ्तार
Satara, Maharashtra:साताऱ्यातील फलटणमध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि फलटण शहर पोलिसांची संयुक्त धडक कारवाई केली आहे. दोन संशयितांच्या ताब्यातून तब्बल 4 किलो 69 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. मोटारसायकल आणि दोन मोबाईलसह एकूण 2 लाख 1 हजार 725 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. रावरामोशी पुलाजवळ सापळा रचून ही कारवाई केली आहे. अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा मोठा दणका दिला आहे.0
0
Report
मुंबई-गोवा हाईवे पर डंपर की टक्कर, मोटरसाइकिल सवार दो की मौत
Chendhare, Maharashtra:रायगड ब्रेकिंग मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात... अपघातात दोन जण जागीच ठार..... खारपाडा जवळ रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली घटना.... भरधाव वेगातील डंपरची मोटारसायकल ला धडक.... मोटारसायकल वरील दोघांचा मृत्यू अपघातानंतर संतप्त नागरिकांनी वाहतूक रोखून धरली काहीकाळ महामार्गावर वाहतूक कोंडी.... कल्पेश ठाकूर व अन्य नागरिकांकडून मदतकार्य....0
0
Report
कल्याण डोंबिवली महापालिका के धोकादायक इमारतों के लिए तात्कालिक पुनर्वसन नीति की मांग
Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवली महापालिका अंतर्गत 450 इमारती धोकादायक तर 225 इमारती धोकादायक. कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत 450 हून अधिक धोकादायक इमारती असून त्यापैकी 225 इमारती अती धोकादायक आहेत. या इमारती अधिकृत असतानात महापालिकेकडून इमारतींच्या पुनर्वसनासाठी कोणत्याही प्रकारचे धोरण नसल्याची खंत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रतोप संकेत भोईर यांनी व्यक्त केली आहे. तर धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनासाठी महापालिकेकडून तात्काळ धोरण राबवण्यात मागणी केली आहे. या धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य करणाऱ्या हजारो नागरिकांचा जीव धोक्यात घालून नागरिक राहात आहे दर वर्षी कल्याण डोंबिवली मध्ये पावसाळ्यात इमारती पडून जीव जात आहे. मात्र राज्य सरकार आणि पालिका धोरण राबवत नाही महापालिकेने धोकादायक इमारतींचा धोरण निश्चित करावे अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पक्षप्रतोत संकेश भोईर यांनी के0
0
Report
Advertisement
भीमाशंकर मंदिर 15 जून से दर्शन के लिए खुलेगा, दैनिक 1000 श्रद्धालुओं का प्रवेश
Shirur, Maharashtra:बाराजोतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकरला जाणाऱ्या भाविकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी. गेल्या ५ महिन्यांपासून बंद असलेले भीमाशंकार मंदिर येत्या १५ जूनपासून दर्शनासाठी पुन्हा खुले होणार आहे. मंदिरातील भव्य सभामंडप आणि पायरी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आल्यामुळे प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतलाय. मात्र, मंदिरात प्रवेश करण्यासाठी काही कडक नियम लागू करण्यात आले आहेत. ५ जूनपासून मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी सुरू होईल. दररोज केवळ १,००० भाविकांनाच प्रवेश दिला जाईल. १५ ते ३० जून दरम्यान दररोज सकाळी ७ ते ११ या वेळेतच दर्शन घेता येईल. दर्शनासाठी येताना वैध ओळखपत्र (ID Proof) सोबत आणणे अनिवार्य असेल.0
0
Report
हिंगोली के औंड़ा नागनाथ पर अहिल्या देवी जयंती पर दुग्ध अभिषेक
Hingoli, Maharashtra:हिंगोलीच्या औंड़्या नागनाथ येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रात्री बारा वाजता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास दुग्ध अभिषेक घालत अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला,यावेळी मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव सहभागी झाले होते0
0
Report
मराठा नेता जरांगे का आमरण उपोषण खत्म हुआ, सरकार ने समाधान का आश्वासन दिया
Jalna, Maharashtra:जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण पहिल्याच दिवशी सोडवण्यात विखे, लाड यांच्या शिष्टमंडळाला यश उपोषणानंतर जरांगे उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल 3 दिवसांत सर्वच मागण्यांच्या सरकार, अध्यादेश आणि सूचना काढणार-जरांगे सरकारने मागण्याची अंमलबजावणी केली नाही तर पुन्हा मुंबई-जरांगे सातारा गॅझेट लागू करण्यासह मराठा आंदोलकांवरील सर्व केसेस मागे घेण्यासाठी जरांगेंनी दिली सरकारला 1 महिन्यांची मुदत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रणरणत्या उन्ह्यात बसून आमरण उपोषण सुरु केलं होतं. जरांगे यांचं हे उपोषण सोडवण्यात राज्य सरकारच्या राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या शिष्टमंडळाला पहिल्याच दिवशी सोडवण्यात यश आलं आहे. जरांगे यांना ज्यूस पाजून हे उपोषण सोडवण्यात रात्री उशिरा यश आलं. सातारा गॅझेट लागू करण्यासह मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी जरांगे यांनी एक महिन्याची मुदतवाढ सरकारला दिली आहे. तर उर्वरीत सर्वच मागण्यांची सूचना आणि अध्यादेश राज्य सरकार कडून 3 दिवसांत काढण्यात येणार आहे. त्यामुळे जरांगे यांनी अखेर त्यांचं उपोषण मागे घेतलं आहे.दरम्यान उपोषण सोडल्यानंतर जरांगे यांना छत्रपती संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मागण्यांची पूर्तता न झाल्यास मुंबई आंदोलनाचा ईशारा जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे.तर जरांगे यांच्या नेतृत्वाखाली समाजाला न्याय मिळतो अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्यानं मि त्यांचे आभार मानतो असं विखे पाटलांनी म्हटलं आहे. राधाकृष्ण विखे फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण देण्याची भूमिका घेतली होती... या आंदोलनात त्यांनी केलेल्या मागण्याबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली, फडणवीस यांची। आभार मानतो, त्यांनी मराठा समाजाच्याबाबत सतत भूमिका घेतली आहे.... जरांगे यांच्या भूमिकेमुळे समाजाला न्याय मिळतो, जरांगेांनी आपले उपोषण स्थगित करावे ही विनंती करतो...0
0
Report
Advertisement
