icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Oct 2024, 05:25 am

माझी उमेदवारी मदन येरावारांना पाडण्यासाठीच, माजी आमदार संदीप बाजोरीयांचा दावा.

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून तुतारी चिन्हावरच आपण लढु असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत तिकीट वाटपाआधीच त्यांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार देखील सुरू केला आहे. भाजप आमदार मदन येरावार यांनी मतदारसंघ बकाल करून ठेवला, रस्त्यांची दैना झाली, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून भयमुक्त वातावरण देऊ असे वचन आपण जनतेला देत असल्याचे संदीप बाजोरिया यांनी सांगितले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

0
0
Report

पेट्रोल पंप पर डीज़ल विवाद हिंसक हंगामे में बदला, भारी भीड़ जुटी

Buldhana, Maharashtra:बुलढाणा - सिंदखेडराजा इंधन तुटवड़ के परिणामस्वरूप हिंसा तक पहुँचने वाली घटनाएं सामने आई हैं। पेट्रोल पंप पर डीज़ल लेने के विवाद के कारण एक व्यक्ति को दस से बारह लोग मारपीट कर रहे थे। मलकापूर पांगरा स्थित पेट्रोल पंप की मध्यरात्रि घटना में पेट्रोल डीजल की बिक्री पुलिस के बंदोबस्त के बीच चल रही थी, इसी दौरान कुछ लोगों में विवाद उभर आया जिसमें एक व्यक्ति को आठ से दस लोगों ने बेदम मारहाण कर दी। पुलिस के सामने मारपीट हो रही थी, जबकि अन्य नागरिकों ने भी नाराज़गी व्यक्त की। कुल मिलाकर पेट्रोल डीज़ल की कमी के कारण हिंसा की ओर बढ़ता मामला दिख रहा है।
0
0
Report
Advertisement

लोणार के दैत्यसुदन मंदिर में सूर्यकिरण उत्सव, विष्णु पर सूर्यदेव का अभिषेक

Buldhana, Maharashtra:बुलढाणा - लोणार लोणारमधील दैत्यसुदन मंदिरात सूर्यकिरणोत्सव Anchor - खगोलशास्त्र आणि प्राचीन भारतीय वास्तुकलेचा एक असा अद्भूत चमत्कार सध्या पाहायला मिळतोय, जो पाहून डोळे दिपून जातील... जागतिक कीर्तीच्या लोणार येथील ऐतिहासिक दैत्यसुदन मंदिरात सध्या भव्य 'सूर्यकिरणोत्सव' सुरू आहे. निसर्ग आणि इतिहासाचा एक अनोखा मिलाफ सध्या पर्यटकांना थक्क करतोय. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील प्रसिद्ध दैत्यसुदन मंदिरात दरवर्षी 15 हमे ते 19 मे पर्यंत सकाळी ११ ते १२ या वेळेत थेट सूर्याची किरणे गर्भगृहात प्रवेश करत आहेत. विशेष म्हणजे, ही सूर्यकिरणे थेट भगवान विष्णूच्या मूर्तीवर पडत असून, जणू काही सूर्यदेव स्वतः विष्णू भगवंतांना 'सूर्यकिरणांचा अभिषेक' घालत आहेत, असा विहंगम सोहळा येथे पाहायला मिळतोय. हा अनोखा किरणोत्सव पाहण्यासाठी सध्या लोणारमध्ये भाविक आणि पर्यटकांची प्रचंड गर्दी होत आहे. जर तुम्हीही या परिसरात असाल, तर वास्तुकलेचा हा दैवी चमत्कार पाहायला विसरू नका.
0
0
Report

Raigad किले पर शराब की बोतलों का ढेर, शिवप्रेमियों ने करीब 50 बोतलें जमा कीं

Chendhare, Maharashtra:किल्ले रायगडावर दारूच्या बाटल्यांचा खच... शिवप्रेमींनी गोळा केल्या ५० हून अधिक बाटल्या... रायगडावरील सुरक्षा यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह... आता किल्ले रायगडासंदर्भात एक धक्कादायक बातमी आहे. किल्ले रायगडावर दारूच्या बाटल्यांचा खच पडलाय. इथं आलेलेल्या शिवप्रेमींनी रायगडावरून जवळपास ५० दारूच्या बाटल्या गोळा केल्या आहेत. रायगडाचे पावित्र्य जपले जात नसून किल्ले रायगडावर येऊन मद्यपान करणाऱ्यांचा शिवप्रेमींनी निषेध केलाय. त्याचा व्हिडिओ आता समोर आलाय. गडावरील सुरक्षा यंत्रणा अपुरी पडत असल्याचं यानिमित्ताने समोर आलंय. येणारे शिवप्रेमी, पर्यटक यांची काटेकोर तपासणी होत नसल्याने मद्य प्रेमींचे फावत असल्याचं बोललं जात आहे.
0
0
Report
Advertisement

कन्नड़ शहर में 70 अत्याधुनिक सीसीटीवी कैमरे, चोरी-रोधी और ट्रैफिक निगरानी के लिए उद्घाटन

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहरात कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. कन्नड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने बसविण्यात आलेल्या ७० अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ, शासकीय कार्यालय परिसर आणि संवेदनशील भागांमध्ये हे कॅमेरे बसविण्यात आले असून त्यांचे नियंत्रण पोलीस स्टेशनमधील कंट्रोल रूममधून करण्यात येणार आहे. या यंत्रणेमुळे शहरावर पोलीस प्रशासनाची अधिक प्रभावी नजर राहणार असून चोरी, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि इतर गुन्हेगारी प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.
0
0
Report

आकोला में गैरेज के सामने दो कारें आग लगने से जलकर राख, कोई मौत नहीं

Akola, Maharashtra:अकोला शहरातील पातूर रोडवरील कमला नगर परिसरात आज पहाटेच्या सुमारास गॅरेजसमोर उभ्या असलेल्या दोन चारचाकी वाहनांना अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दोन्ही वाहने आगीत पूर्णतः जळून खाक झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात उसळत असल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी तत्काळ अग्निशामक दलाला माहिती दिल्यानंतर जवानांनी घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. प्राथमिक माहितीनुसार, ही वाहने गॅरेजसमोर उभी होती. अचानक आग लागल्याने काही क्षणांतच दोन्ही वाहनांनी पेट घेतला. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. शॉर्टसर्किट की अन्य काही कारणामुळे आग लागली याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.
0
0
Report
Advertisement

लातूर में खेलते समय पानी के गड्ढे में दो बच्चों की मौत, परिवार शोकाकुल

Latur, Maharashtra:लातूर शहरातील बोधेनगर परिसरातील घटना... खेळताना पाणी साठवण्याच्या खड्ड्यात पडल्याने दोन चिमुकल्यांचा मृत्यू... दिव्या उबाळे आणि कार्तिक कांबळे या दोन बालकांचा मृत्यू... लातूर शहरात दुर्दैवी घटना...घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली गेली. ही घटना लातूर शहरातील बोधेनगर परिसरात घडली आहे. दिव्या उबाळे व कार्तिक कांबळे अशी मृत मुलांची नावे आहेत. दोघे घराबाहेर खेळत असताना पाणी साठवण्याच्या खड्ड्यात पडले. बराच वेळ मुलं दिसत नसल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता ही घटना उघडकीस आली. स्थानिक नागरिकांनी दोघांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला आहे.
0
0
Report

Hindi headline

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरच्या  जि.प.च्या जिल्ह्यातील २ हजार ८४ शाळांमधील भौतिक सुविधांसह मध्यान्ह भोजन योजनेच्या सुविधांचा तपासणीचा निर्णय जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला त्यानुसार सोमवारपासून त्यांची सुरुवात होत आहे. हा उपक्रम ३० मेपर्यंत चालेल. जि.प.च्या प्रशासनाने शाळांची तपासणीसाठी एकूण १९ मुद्दे काढले आहेत. त्यानुसार शाळेच्या नावापासून ते पायाभूत सुविधा, आर्थिक बाबी, वेतन, उपलब्ध साहित्य, खरेदी प्रक्रिया, शालेय व्यवस्थापन समितीच्या नोंदी, शाळेचे अभिलेखे व रजिस्टर, मध्यान्ह भोजन, ग्रंथालय व प्रयोगशाळा, शासन योजना अंमलबजावणी, शाळेचे आर्थिक मुद्दे, बैंक व्यवहार, पावत्या व खर्च नोंदी, ऑडिटदरम्यान तपासावयाचे अभिलेखे, अनुदान व निधी वापर, खरेदी प्रक्रिया, स्टॉक व मालमत्ता तपासणी, विद्यार्थी संबंधित निधी, वेतन व सेवा बाबी आणि आवश्यक रजिस्टरबाबत तपासणी करण्यात येणार आहे.
0
0
Report

गर्मी से जयाकवाड़ी डैम का जलस्तर घटकर 40.80% पर; पानी संकट की आशंका

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणातील साठा उन्हामुळे झपाट्याने घटत आहे. वाढते तापमान, बाष्पीभवन आणि शेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेल्या उपशामुळे धरणाचा साठा ४०.८० टक्क्यांवर आला आहे. १३ एप्रिलला जायकवाडी धरणात ५६.०४ टक्के पाणीसाठा होता. एका महिन्यात १३ मे रोजी तो ४६.१४ टक्क्यांवर आला. १६ मे रोजी सकाळी धरणात केवळ ८८५.८४० दशलक्ष घनमीटर (४०.८%) जिवंत जलसाठा शिल्लक राहिला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने गेल्या २४ तासांत तब्बल १.८७५ दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. शेतीसाठी डाव्या कालव्यातून २ हजार २०० क्युसेसने दररोज पाणी सोडले जात आहे. पाणी संकट निर्माण होऊ नये म्हणून अधिकारी संपूर्ण जलनियोजनावर बारीक लक्ष ठेवून आहेत. कालव्यांमधील पाणी वाटप, बैंक वॉटर सिंचन व आगामी पावसाळ्यापर्यतच्या पाणी वापराचा काटेकोर आढावा घेतला जात आहे.
0
0
Report
Advertisement

आदित्य ठाकरे का नाशिक दौरा: संगठन मजबूती के संकेत

Nashik, Maharashtra:24 मे रोजी आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर अँकर उद्धवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे २४ मे रोजी नाशिक दौऱ्यावर येणार आहे... येणाऱ्या काळात जिल्हा परिषदशिवाय एकही निवडणूक नाही. त्यामुळे पक्ष संघटना वाढविण्यासह नाशिकमध्ये पक्षाची आणखी पडझड होऊ नये यासाठी ठाकरे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना चुचकारण्याचे काम करतील. पक्षाच्या पुनर्बाधणीच्या दृष्टीनेही हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. युवासेना चषक स्पर्धेच्या निमित्ताने ठाकरे शहरात येत असले तरी त्यांच्या दौऱ्याला राजकीय किनार असेल. ते या दौऱ्यात प्रमुख नेते, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. निष्ठावंतांना राजकीय भवितव्य घडविण्याच्या दृष्टीने आदित्य ठाकरे ठोस आश्वासन देतीল, असा अंदाज आहे. नोंदणी अभियान, पक्षाची पुनर्बाधणी, कला, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम ते यावेळी घेणार आहे.....
0
0
Report

अकरावी प्रवेश प्रक्रिया: शून्य फेरी आज से, पात्र सूची 10:30 बजे घोषित

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:अकरावी प्रवेश प्रक्रियेला दहावीच्या निकालानंतर आता वेग आला आहे. आज पासून अकरावी प्रवेशाची 'शून्य फेरी' सुरू होणार आहे. यासाठीची गुणवत्ता यादी सकाळी १०.३० वाजता जाहीर केली जाणार आहे. या शून्य फेरीत अल्पसंख्याक संस्थांच्या ५० टक्के, इनहाऊस कोट्याच्या १० टक्के आणि मॅनेजमेंट कोट्याच्या ५ टक्के जागा भरल्या जाणार आहेत. यादी जाहीर झाल्यानंतर या यादीतील पात्र विद्यार्थ्यांनी १९ मेपर्यंत आपले प्रवेश निश्चित करायचे आहेत, अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर सध्या थांबवलेली संकेतस्थळावरील प्रक्रिया पुन्हा २० मेपासून सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात येईल.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top