icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Oct 2024, 05:25 am

माझी उमेदवारी मदन येरावारांना पाडण्यासाठीच, माजी आमदार संदीप बाजोरीयांचा दावा.

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून तुतारी चिन्हावरच आपण लढु असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत तिकीट वाटपाआधीच त्यांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार देखील सुरू केला आहे. भाजप आमदार मदन येरावार यांनी मतदारसंघ बकाल करून ठेवला, रस्त्यांची दैना झाली, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून भयमुक्त वातावरण देऊ असे वचन आपण जनतेला देत असल्याचे संदीप बाजोरिया यांनी सांगितले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सोलापूर के अस्पतालों में चार बाल माताओं के मामले, डॉक्टरों पर जांच तेज

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - महापालिका रुग्णालयात आणखी आढळल्या चार बालमाता, अल्पवयीन माता असल्याचे समजताच डॉक्टरांनी दिली पोलिसांना माहिती - सोलापुरात बालमाता प्रकरणी चौकशीचा ससेमिरा मागे लागताच सरकारी आणि खाजगी डॉक्टर अलर्ट मोडवर - गुरुवारी व शुक्रवारी मनपाच्या रुग्णालयात आढळल्या तब्बल चार बालमाता - बाल माता असल्याचे लक्षात येताच संबंधित डॉक्टरांनी तात्काळ पोलिसांना दिली माहिती - बालमाता प्रकरणी माहिती लपवल्याप्रकरणी खाजगी आणि सरकारी डॉक्टरांवर होतायत गुन्हे दाखल - महापालिकेकडून 130 प्रसूतीगृहातील प्रत्येक प्रसूती महिलेची फेरतपासणी सुरू
0
0
Report

जालना में खुले में मांस बिक्री पर नगरपालिका की कड़क कार्रवाई

Jalna, Maharashtra:जालना | उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या दुकानांवर महापालيكेचा हातोडा! 24 एप्रिलपासून धडक मोहीम सुरू; नूतन वसाहत, अंबड चौफुली, इंदेवाडी रोडवर कारवाई नियम तोडणाऱ्यांवर दंड आणि गुन्हा दाखल करण्याचा इशारा अँकर | जालना शहरात उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या दुकानदारांविरोधात महानगरपालिकेने कडक भूमिका घेत धडक कारवाई सुरू केली आहे. 24 एप्रिल पासून सुरू झालेल्या या मोहिमेअंतर्गत नूतन वसाहत भागात मोठी कारवाई करण्यात आली. उघड्यावर मांस विक्री करणारी दुकाने जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आली. याशिवाय अंबड चौफुली आणि इंदेवाडी रोड परिसरातही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता लक्षात घेता उघड्यावर चिकन, मटन विक्री करण्यास कायद्याने मनाई असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. महानगरपालिकेच्या वतीने नागरिक तथा विक्रेत्यांना आवाहन करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडासह फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. ही मोहीम पुढील काळातही सातत्याने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.ही कारवाई महानगर पालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख अधिकारी पी.सी. राठोड, सहाय्यक अधिकारी सॅमसंग कसबे यांच्या पथकाने पार पाडली. बाईट : सॅमसन कसबे,अतिक्रमण विभाग प्रमुख, महानगरपालिका जालना
0
0
Report
Advertisement

पैठणी साड़ियों में चेतन धसे का दैवत प्रतिमा वाला नया प्रयोग

Yeola, Maharashtra:अँकर : येवला शहर हे पैठणी साड्यांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. पारंपरिक डिझाईन्स, रंगसंगती आणि नाजूक विणकामासाठी ओळख असलेल्या या कलेत आता आधुनिक कल्पकतेची भर पडताना दिसत आहे. चेतन धसे या कारागिराने पैठणी साडीच्या पदरावर श्रीकृष्ण व श्री स्वामी समर्थ यांच्या जिवंत भासणाऱ्या प्रतिमा विणून एक अनोखा प्रयोग साकारला आहे.ही प्रतिमा विणताना अत्यंत बारकाईने रंगांची निवड, धाग्यांची जुळवाजुळव आणि सूक्ष्म तपशील यावर विशेष मेहनत घेण्यात आली. एका पदरावर दोन वेगवेगळ्या दैवतांच्या प्रतिमा साकारण्याचे हे दुर्मिळ उदाहरण मानले जात आहे.
0
0
Report

विद्यानगर में मनी एक्सचेंज एजेंट पर लुटेरों ने हमला कर 5.17 लाख लूटे

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मनी एक्स्चेंजचा व्यवसाय करणाऱ्याला डॉलर बदलून देण्याच्या बहाण्याने बोलावून त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. त्यानंतर तीक्ष्ण हत्याराने वार करून ५ लाख १७ हजार रुपये लुटण्यात आले. हा प्रकार छत्रपती संभाजी नगरच्या  विद्यानगर परिसरातील अभिनव संकल्प अपार्टमेंटसमोर घडला. याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात ३ चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी तेजपालसिंग सुंदरसिंग सहानी  हे मनी एक्स्चेंजचे काम करतात. २४ एप्रिल रोजी त्यांना एका अनोळखी व्यक्तीने फोन करून ५,५०० अमेरिकी डॉलर बदलून हवे असल्याचे सांगितले व त्यांना विद्यानगर येथील लोकेशन पाठवले. ठरल्याप्रमाणे सहानी हे ५ लाख १७ हजार रुपयांची रोकड घेऊन त्यांच्या दुचाकीवरून  सांगितलेल्या ठिकाणी पोहोचले. तेथे वाट पाहत थांबले असताना पाठीमागून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींपैकी एकाने त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली, तर दुसऱ्याने त्यांच्या हातावर व पाठीवर तीक्ष्ण हत्याराने वार केले. सहानी यांना दुचाकीवरून खाली ओढून त्यांच्याकडील पैशांची काळसर रंगाची बॅग हिसकावण्यात आली. सहानी यांनी चोरट्यांच्या पाठलागाचा प्रयत्न केला, मात्र थोड्या अंतरावर मोटारसायकलवर थांबलेल्या तिसऱ्या साथीदारासोबत हे दोन्ही आरोपी पैशांची बॅग घेऊन पसार झाले. या झटापटीत सहानी जखमी झाले आहेत.
0
0
Report
Advertisement

ग्राम पंचायत कर्मचारी ने वीडियो बनाकर ब्लैकमेल से दो वर्ष तक अत्याचार किया; अब गिरफ्तार

Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मधील ग्रामपंचायतच्या शिपायाने एका महिलेचा आंघोळीचा व्हिडिओ चित्रीकरण करून त्याद्वारे तिला ब्लॅकमेल करून दोन वर्ष तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे याप्रकरणी नराधम शिपायाला अकलूज पोलिसांनी अटक केली आहे. गिरझनी येथील ग्रामपंचायत चा शिपाई उमेश साठे यांन दोन वर्षापूर्वी एका महिलेचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ चित्रीकरण केला तो सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी तिला दिली यानंतर घाबरलेल्या महिलेचा फायदा घेऊन तब्बल दीड वर्ष या नराधमाने महिलेवर अत्याचार केला. सदर बाब पतीच्या लक्षात आल्यानंतर याबाबत महिने आपल्या पती जवळ परिस्थिती सांगितली यानंतर अकलूज पोलीस स्टेशनमध्ये साठे विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
0
0
Report

नागपूर साइबर थाने में मारपीट-मोबाइल छीन मामला, कर्मचारी लापता, जांच शुरू

Nagpur, Maharashtra:नागपूर पोलीस स्टेशनची माहिती बाहेर कशी गेली.. कारवायांची माहिती पत्रकारांना कशी मिळाली असा आरोप करत नागपुरात एका पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस अधिकाऱ्याने मारहाण करत मोबाईल हिसकावून घेतल्याचे आरोप होत आहे.. नागपूरच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये काल ही घटना घडल्याची माहिती आहे.. पोलीस स्टेशनमध्ये अधिकाऱ्याकडून अपमान झाल्याची, मारहाण झाल्याची तक्रार घेऊन संबंधित पोलीस कर्मचारी अतीवरिष्ठांपर्यंतही गेला.. मात्र आता संबंधित पोलीस कर्मचारी कालपासून बेपत्ता झाला आहे.. प्रफुल्ल ठाकरे असे बेपत्ता झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे... दरम्यान या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहे
0
0
Report

खत विक्रेताओं के लाइसेंस निलंबित, 10 विक्रेताओं को कड़ी चेतावनी

Bhandara, Maharashtra:३६ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित.... १० जणांना मिळाली सक्त ताकीद खरीप हंगामापूर्वी कृषी विभागाची कारवाई १ एप्रिलपासून सुरू झालेल्या या मोहिमेत जिल्ह्यातील १९७ खत विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीत अनेक त्रुटी आढळून आल्याने २१ एप्रिल रोजी ४६ विक्रेत्यांची सुनावणी घेण्यात आली. युरिया, डीएपीसारख्या अनुदानित खतांची ई-पॉस मशीनद्वारे विक्री न करणे, तसेच अन्य तक्रारींत तथ्य आढळल्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संगीता माने यांनी ३६ विक्रेत्यांचे परवाने निलंबित केले, तर १० विक्रेत्यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे.
0
0
Report
Advertisement
0
0
Report

अँकर लासलगाव के डंपिंग ग्राउंड से बदबू, स्कूल-कॉलेज के आसपास स्वास्थ्य संकट

Yeola, Maharashtra:अँकर लासलगाव येथे गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांना डम्पिंग ग्राउंडच्या दुर्गंधीचा आणि अस्वच्छतेचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, या परिसराच्या अगदी जवळ शाळा आणि महाविद्यालये आहेत. डम्पिंग ग्राउंडवर साचणाऱ्या कचऱ्यामुळे आणि त्यातून सुटणाऱ्या दुर्गंधीमुळे विद्यार्थी, शिक्षक आणि स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात या त्रासाची तीव्रता अधिक वाढते. सध्या सुरू असलेले स्वच्छतेचे काम पाहता, प्रशासनाने यापुढेही या ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचू देऊ नयेत अशी मागणी होत आहे.
0
0
Report

भीषण गर्मी से किसानों के पेड़ सूखने लगे, जलस्तर घटने से नुकसान बढ़ रहा

Yavatmal, Maharashtra:उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे शेतकऱ्यांना शेतातील उपयोगी फळझाडे जगविने कठीण झाले आहे. नवीन फळबागा देखील संकटात सापडल्या आहेत. या हंगामात लागवड झालेली रोपे जळाली असून, काढणीला आलेला आंबा तसेच संत्रावर्गीय पिकांवर काळे डाग पडत आहेत. उन्हाच्या प्रखरतेमुळे उभी झाडे करपू लागली आहे कारण भुजल पातळी देखील कमालीची खालवली आहे. परिणामी विहिरींनी तळ गाठला असून बोरवेल मधील पाणी देखील आटले आहे. त्यामुळे शेतात बांधावर लावण्यात आलेले फळझाडे पाण्याअभावी वाळत आहे. पाणी नसल्याने फळबागधारक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. उन्हाच्या प्रखरतेमुळे ही झाडे जळण्याच्या मार्गावर आहेत.
0
0
Report
Advertisement

हिंदी में headline: हिंगोली में गर्मी से जल संचय कम, 30 छोटे तालाब सूखे की कगार पर

Hingoli, Maharashtra:अँकर - राज्यात उष्णतेची लाट तीव्र होत असून तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. या वाढत्या तापमानाचा थेट परिणाम जलसाठ्यांवर होताना दिसत आहे. हिंगोली जिल्ह्यातील अनेक लघु सिंचन प्रकल्प आणि तलावांनी तळ गाठायला सुरुवात केली असून धरणांतील पाणीसाठ्यातही मोठी घट झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे जिल्ह्यात एकूण 30 छोटे-मोठे लघु सिंचन प्रकल्प असून त्यातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. वाढत्या उन्हामुळे जलसाठ्यांची पातळी झपाट्याने खाली येत आहे. हिंगोली जिल्ह्यात एकूण 30 लघु सिंचन तलाव जोत्याखाली गेलेली पाणी पातळी – 9 तलाव पूर्णत कोरडे पडलेले तलाव-4 0 ते 25 टक्के पाणी साठा – 14 तलाव 26 ते 50 टक्के पाणी साठा – 1 तलाव व्हिओ - पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने ग्रामीण भागात परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे. काही ठिकाणी जिलजीवन मिशनच्या योजनेतून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असला तरी तो अपुरा ठरत आहे. पुढील काही दिवसांत पावसाळा येईपर्यंत परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे कोराड्या पडलेल्या तलावासमोरून याचाच आढावा घेतलाय आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी..
0
0
Report

कल्याण में देश की पहली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी के स्मारक का भूमि-पूजन

Kalyan, Maharashtra:कल्याण शहरात ऐतिहासिक क्षण साक्षीदार ठरला आहे भारतातील पहिल्या महिला डॉक्टर डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या देशातले पहिल्या स्मारकाचा असणार आहे या स्मारकाचे भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. या स्मारकाचे भूमीपूजन संपन्न झाले. या स्मारकासाठी विशेष प्रयत्न करणारे भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. या स्मारकाच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक उपयुक्त सुविधा उपलब्ध होणार आहेत: आधुनिक जिम, विविध कौशल्यांसाठी प्रशिक्षण केंद्र, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ऑडीटोरियम तसेच इतर महिला सक्षमीकरणाच्या सुविधा. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी हे स्मारक एक महत्त्वाचे केंद्र ठरणार असल्याचे आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top