icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Oct 2024, 05:25 am

माझी उमेदवारी मदन येरावारांना पाडण्यासाठीच, माजी आमदार संदीप बाजोरीयांचा दावा.

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून तुतारी चिन्हावरच आपण लढु असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत तिकीट वाटपाआधीच त्यांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार देखील सुरू केला आहे. भाजप आमदार मदन येरावार यांनी मतदारसंघ बकाल करून ठेवला, रस्त्यांची दैना झाली, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून भयमुक्त वातावरण देऊ असे वचन आपण जनतेला देत असल्याचे संदीप बाजोरिया यांनी सांगितले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

74 गांव एमएमआरडीए झोन में शामिल, अलिबाग-करजत के विकास अधिकार मुंबई को

Chendhare, Maharashtra:रायगड जिल्ह्यातील ७४ गावांचा एमएमआरडीए झोन मध्ये समावेश करण्यात आला. आता अलिबाग तालुक्यातील २२ तर कर्जत तालुक्यातील ५२ गावे एमएमआरडीए क्षेत्रात समाविष्ट झाली असून, परिसर विकासाच्या नियोजनाचे सर्वाधिकार आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्रधिकरणाकडे जाणार आहेत. पण शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबत नाराजी आहे. बांधकामांना मंजुरी देण्यासाठी स्थानिक पातळीवर यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे बांधकाम परवानगी मिळवण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन जोवर स्थानिक पातळीवर एमएमआरडीए ची स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित होत नाही तोवर जिल्हा प्रशासनाकडे बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार कायम ठेवण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्‍यात आली.
0
0
Report

येवला में पानी संकट: मानसून की देरी से 44 गांवों और 70 बस्तियों में टैंकर पानी पहुँचाते रहे

Yeola, Maharashtra:येवला तालुक्यात मान्सूनच्या पावसाने अद्याप दमदार हजेरी लावली नसल्याने उत्तर-पूर्व भागात पाणीटंचाईचं संकट अधिक गडद होताना दिसत आहे. अनेक गावांत नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असून प्रशासनावरही मोठा ताण निर्माण झाला आहे. सध्या येवला तालुक्यात 44 गावे आणि 70 वस्त्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून टँकरची संख्या 11 ने वाढवण्यात आली आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून हा पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र पाऊस आणखी लांबल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
0
0
Report

चांदवड में पानी की पाइपलाइन फटने से हजारों लीटर पानी बर्बाद, आपूर्ति युद्धस्तर पर बहाल

Chandvad, Maharashtra:अँकर-नाशिकच्या चांदवड तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या सोग्रास जवळ चांदवड तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या 44 गाव पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले आहे, रस्त्याचे खोदकाम सुरू असताना ही पाईपलाईन फुटल्याचे सांगितले जात आहे, त्यामुळे पाईपलाईन दुरुस्ती करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे,मात्र ऐन उन्हाळ्याच्या दिवसात पाईप फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली असून,पाईपलाईन फुटल्याने काही काळा साठी पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.
0
0
Report
Advertisement

अहमदाबाद विमान हादसे को एक साल, मैथिली पाटील के परिवार को भी मदद नहीं मिली

Navi Mumbai, Maharashtra:अहमदाबाद विमान हादसे को एक साल, मैथिली पाटील के परिवार को भी मदद नहीं मिली। मैथिली आज आपल्यात नसली तरी तिच्या आठवणी आजही ताज्या तिच्या आठवणीत आईला अश्रू अनावर होत आहेत। तिच्या सोबत असणारी तिची बॅग, तिच्या हातातील घड्याळ, अंगठी तसेच तिची डायरी भगवद गीता अश्या अनेक वस्तू मैथिली अजूनही सोबतच असल्याची जाणीव करुन देत आहेत। अपघाता नंतर एअर इंडिया मार्फत सर्वोतोपरी मदत करण्यात आली असली तरी कोणतीही सरकारी मदत मिळाली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। या अपघाताची कारणे अद्यापही समोर आली नसून अश्या घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी सरकारने काळजी घ्यावी अशी मागणी मैथिलीच्या आईने केली आहे。
0
0
Report

मालेगांव ब्रेकिंग: नाबालिग लड़की के गर्भधारण और बच्चा बिक्री मामले में बड़ा मोड़

Nashik, Maharashtra:अल्पवयीन मुलीची प्रसूती व नवजात बाळ विक्री प्रकरणात मोठा ट्विस्ट. संदर्भित अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप असलेला अनिल कोळी आणि मुलीची आई यांना मालेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. हैदराबाद येथून अनिल कोळी व मुलीच्या आईला ताब्यात आणून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात मुलीची आई आणि अनिल कोळी यांच्यात विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही संशयितांना मालेगाव न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अल्पवयीन मुलीला गर्भधारणा झाल्याची घटना धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे घडल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. मुलीची आई आणि आरोपी अनिल कोळी हे दोघेही मूळचे शिरपूर (जि. धुळे) येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. प्रकरणाचा अधिक तपास मालेगाव पोलीस करत आहेत. याआधीच मालेगाव पोलिसांनी डॉ. डांगे यांच्यासह 8 जणांना ताब्यात घेतले आहे.
0
0
Report
Advertisement

कराड के शहापुर के शहीद अर्जुन जाधव का अंतिम संस्कार हजारों श्रद्धांजलि के साथ

Satara, Maharashtra:सातारा : देशसेवेत प्राणांची आहुती देणारे कराड तालुक्यातील शहापूर येथील शहीद वीर जवान अर्जुन राजेंद्र जाधव यांना आज हजारो नागरिकांच्या उपस्थितीत भावपूर्ण अखेरची मानवंदना देण्यात आली. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भारत माता की जय आणि वीर जवान अमर रहे अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये देशासाठी कर्तव्य बजावत असताना झालेल्या भीषण स्फोटात जवान अर्जुन जाधव यांना वीरमरण आले. त्यांच्या शौर्यपूर्ण बलिदानामुळे शहापूर गावासह संपूर्ण सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. अवघ्या काही दिवसांनंतर, १५ जून रोजी सुट्टीवर घरी येऊन आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. मात्र, देशसेवेच्या कर्तव्यात त्यांनी सर्वोच्च बलिदान दिल्याने हे स्वप्न अपूर्णच राहिले. शहीद अर्जुन जाधव यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यांच्या बलिदानाबद्दल उपस्थितांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
0
0
Report

येवला कांदा लिलाव में भाव कम, किसान नाराज़, सरकारी खरीदी केंद्र की मांग तेज

Yeola, Maharashtra: कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे वांदे संपण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र येवला कृषी उत्पन्न बाजार समिती पाहण्यासाठी मिळत आहे. शासकीय कांदा खरेदी केंद्र अद्याप सुरू झालेले नसताना शासकीय कांदा खरेदी केंद्र पेक्षा बाजार समितीतील कांदा लिलावात कमी बाजार भाव मिळत आहे आज सकाळच्या कांदा लिलाव सत्रात 400 वाहनातून शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणला होता या कांद्याला जास्तीतजास्त 1470 रुपये, कमीतकमी 300 रुपये तर सरासरी 1000 ते 1100 रुपये दर मिळत आहे तर दुसरीकडे जिल्ह्यातील शासकीय कांदा खरेदी केंद्रावर 1580 रुपयांचा प्रति क्विंटलला दर मिळतो यामुळे येवला येथे नाफेड, एनसीसीएफ मार्फत शासकीय कांदा खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी...
0
0
Report
Advertisement

पवार गुट के विलय पर चर्चा नहीं, शिंदे ने दिया स्पष्ट बयान

Satara, Maharashtra:सातारा - काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विलीनीकरणाची कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचा वर्धापन दिन कालच झालेला असताना जाणून-बुजून ही चर्चा घडवली जात असल्याचा आरोप देखील शिंदे यांनी केला आहे. आमच्या पक्षाची ध्येयधोरणे कालच ठरलेली असताना कोणीतरी हा विषय करतो याचं आश्चर्य वाटत असल्याचे शशिकांत शिंदे यांनी सांगितला आहे. संजय राऊत यांच्या म्हणण्याप्रमाणे इंडिया आघाडीला एकत्र करण्यासाठी शरद पवारांनी प्रयत्न करावेत. सगळ्यांनी एकत्र येत विरोधकांची फळी निर्माण करण्यासाठी शरद पवारांनी पाऊल उचलायला सुरुवात केली आहेत. विलीनीकरणाबाबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या चर्चा का होतात याबाबत मला आश्चर्य वाटतं. अजित पवारांच्या वेळी देखील आणि आता काँग्रेसच्या वेळी देखील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विलीनीकरणाचीच चर्चा केली जाते या कुठल्याही बातमीत तथ्य नसल्याचं शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केलंय.
0
0
Report

अंबरनाथ में जीआईपी डैम से टँकर माफियाओं द्वारा पानी चोरी, कड़ी कार्रवाई की मांग

Ambernath, Maharashtra:अंबरनाथमध्ये रेल्वेच्या जीआयपी धरणातूनही टँकर माफियांची पाणीचोरी परवानगी नसतानाही टँकर भरून हजारो रुपयांना विक्री अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत जांभिवली पाडा गावालगत रेल्वेचं जीआयपी धरण आहे. या धरणाला लागून रेल नीरचा प्लँट असून धरणातलं पाणी या प्लँटसाठी वापरलं जातं. मात्र धरणाच्या भिंतीपलीकडे टँकर माफियांनी करामती केल्याचं समोर आलंय. धरणातलं पाणी बाहेर येण्यासाठी या टँकर माफियांनी करामती केल्याची चर्चा आहे. या टँकर माफियांवर तात्काळ कारवाई करून धरणाची गळती थांबवण्याची मागणी यानंतर केली जातेय.
0
0
Report

निफ़ाड के नैताळे में अज्ञात चोरों ने लाखों के सोने की चोरी की

Niphad, Maharashtra:नाशिकच्या निफाड तालुक्यातील नैताळे येथील गाजरवाडी रोडवरील शेतकरी साहेबराव शिवराम तुपलोंढे यांच्या घरी मध्यरात्री पावणेतीन वाजेच्या सुमारास तीन ते चार अज्ञात चोरट्यानी जबरी चोरी केली 1 लाख 44 हजार रुपयाचे सोन्याचे दागिने व 7 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून पोबारा केला वृद्ध शेतकरी साहेबराव चोरांच्या मागे पळाले यांना दगड मारल्याने जखमी झाले आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरणात निर्माण झाले आहे या जबरी चोरीची माहिती निफाड पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरु केले चोरांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे
0
0
Report
Advertisement

सक्षम हत्या के बाद आंचल का घर में रहने का दावा, प्रेम कहानी में मोड़

Nanded-Waghala, Maharashtra:प्रेयसीने मृतदेहाशी लग्नकेल्याने देशभर गाजलेल्या सक्षम - आंचल प्रेमप्रकरणात नवीन वळण आले आहे. सक्षमच्या मृत्युनंतर आपण आजन्म सक्षम बनून त्याच्या घरी राहणार असल्याचे आंचल ने जाहीरपणे सांगितले होते. पण आंचल सक्षमचे घर सोडून नातेवाईकाकडे निघून गेलीये. नांदेड शहरातील ही प्रेम कहाणी आहे. नोव्हेबर 2025 मध्ये सक्षम ताटे या तरुणाचा खूण करण्यात आला होता. Preyसीचा भाऊ, त्याचे साथीदार आणि वडिलांनी गोळ्या घालून आणि दगडाने ठेचून सक्षमचा खूण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मयत सक्षम आणि आंचलचा भाऊ हे मित्र होते. सक्षम आणि आंचलचे प्रेमप्रकरण माहित झाल्यावर आंचल च्या कुटुंबीयांकडून विरोध सुरु झाला होता. पण तरीही दोघांचे प्रेमसंबंध सुरु असल्याने सक्षमची हत्या करण्यात आली. हत्या करणारा आंचलचा भाऊ, त्याचे साथीदार आणि वडील हे गुन्हेगारी पाश्वभूमीचे आहेत. सक्षमवरही काही गुन्हे दाखल होते. सक्षमच्या हत्येच्या दुसऱ्या दिवशी अंतयात्रा निघण्यापूर्वी आंचल त्याच्या घरी पोहोचली आणि तिने टाहो फोडला. सक्षमच्या मृतदेहाला हळद कुंकू लाऊन आंचलला हळद कुंकू लाऊन मृतदेहासोबत लग्न लावन्यात आल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. देशभरात ही बातमी त्यावेळी गाजली होती. सक्षम गया तरी मी आजन्म सक्षम बनून त्याच्या घरीच राहणार असे सर्व माध्यमाना आंचल ने सांगितले होते. पण तीच आंचल सक्षमच्या घरून निघून गेल्याची माहिती आहे. मार्च महिन्यात आंचल तिच्या नातेवाईकांकडे गेल्याची माहिती आहे.
0
0
Report

मानसून पूर्व बरसात से खरीप तैयारी तेज; वाशिम के किसान पेरणी-पूर्व मशागती में व्यस्त

Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसामुळे खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला असून शेतकरी पेरणीपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात पूर्ण करत आहेत. बी-बियाणे व रासायनिक खतांच्या खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे.यंदा जिल्ह्यात ३ लाख ९४ हजार १८० हेक्टर क्षेत्रावर विविध खरीप पिकांच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले असून त्यापैकी ३ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन लागवडीचे उद्दिष्ट आहे.सोयाबीनचे क्षेत्र मोठे असल्याने शेतकऱ्यांनी मान्सूनचा पाऊस सक्रिय झाल्याशिवाय घाई न करता ८० ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. तसेच जिल्ह्यात बी-बियाणे व खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top