Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

माझी उमेदवारी मदन येरावारांना पाडण्यासाठीच, माजी आमदार संदीप बाजोरीयांचा दावा.

Oct 03, 2024 05:25:00
Yavatmal, Maharashtra

यवतमाळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून तुतारी चिन्हावरच आपण लढु असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत तिकीट वाटपाआधीच त्यांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार देखील सुरू केला आहे. भाजप आमदार मदन येरावार यांनी मतदारसंघ बकाल करून ठेवला, रस्त्यांची दैना झाली, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून भयमुक्त वातावरण देऊ असे वचन आपण जनतेला देत असल्याचे संदीप बाजोरिया यांनी सांगितले.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SNSWATI NAIK
Jan 26, 2026 03:17:30
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महानगरपालिकेत महापौर और उपमहापौर निवडी की प्रक्रिया 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे. कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आदेशानुसार 5 फेब्रुवारी रोजी महापौर निवडीसाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली असून या सभेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांची नियुक्ती करण्यात आलेय. याच पाश्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक हे 3 फेब्रुवारी रोजी सर्व नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असून या बैठकीत महापौर पदाचे नाव जाहीर करण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जातेय. विजयी नगरसेवकांच्या जन आशिर्वाद आणि आभार सोहळ्या दरम्यान वनमंत्री गणेश नाईक यांनी यासंदर्भात सुतोवाच दिलेत。
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Jan 26, 2026 03:01:45
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात बाळापुर 69 खेडी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या बांधकामाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.वारी भैरवगड परिसरात सुरू असलेले हे बांधकाम तत्काळ थांबवावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.या संदर्भात शेतकऱ्यांनी तेल्हारा तहसीलदारांना निवेदन सादर केले आहे. 4 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार या प्रकल्पाला स्पष्ट स्थगिती असतानाही नियमबाह्य पद्धतीने काम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.तसेच कोणताही ग्रामपंचायत ठराव अथवा परवानगी न घेता तृतीय पक्ष कंपनीकडून हे बांधकाम करण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.या प्रकल्पामुळे वान धरणावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या सिंचन हक्कांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Jan 26, 2026 02:45:45
Akola, Maharashtra:अकोला शहरात एमआयएमचे माजि खासदार इम्तियाज जलील यांच्या कथित वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना शिंदे गटाच्या वतीने गांधी चौक येथे तीव্র आंदोलन करण्यात आले. मुंब्रा येथे “महाराष्ट्र हिरवा करणार” असे वक्तव्य इम्तियाज जलील यांनी केला आहे.या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान झाल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी जलील यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला जोडे मारून जोरदार निषेध नोंदवला. “इम्तियाज जलील यांच्या सात पिढ्या जरी आल्या तरी महाराष्ट्र हिरवा होणार नाही,” असा घणाघात आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला.दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी इम्तियाज जलील यांना समज देत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या आंदोलनात शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Jan 26, 2026 02:30:40
Akola, Maharashtra:वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने १२ वे राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन रविवारी अकोल्यात थाटात पार पडले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्या प्रा. विजयाताई मारोतकर होत्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी राष्ट्रसंतांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवून त्यांना कृतिशील बनवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. राष्ट्रसंतांचे विचार हे जनसामान्यांच्या भाषेत मांडलेले तत्त्वज्ञान असून विज्ञानवादी दृष्टिकोनातून मानवकल्याणासाठी त्यांनी साहित्यनिर्मिती केल्याचे प्रा. मारोतकर यांनी सांगितले. ग्रामगीतेचा केवळ पारायण न करता तिच्या विचारांनुसार प्रत्यक्ष कृती करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. संमेलनाचे उद्घाटन आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांच्या हस्ते झाले.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 26, 2026 02:30:29
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर  शहरात हवामानाचा लपंडाव सुरू आहे, आज उद्या सकाळी शहरवासीयांना दाट धुक्याचा सामना करावा लागणार आहे, तर मंगळवारी शहरात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.  दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहील.बकिमान तापमान १६ अंश सेल्सियस. तर कमाल तापमान २९ अंश सेल्सियसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. शहराच्या काही भागात हलका पाऊस किंवा रिमझिम पडण्याची शक्यता आहे. या पावसामुळे तापमानात किंचित घट होऊन पारा २८ अंश सेल्सियसपर्यंत खाली येऊ शकतो. मात्र, हा पावसाळी प्रभाव केवळ एक दिवसापुरताच मर्यादित असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून शहर परिसरात किमान तापमानात वाढ होत असून, पुढील दोन ते तीन दिवसांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर किमान तापमान १६ ते १७ अंशावर जाऊन तापमान वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे。
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 26, 2026 02:18:27
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Jan 26, 2026 02:17:07
Akola, Maharashtra:७७ वा प्रजासत्ताक दिन, अकोला जिल्हाधिकारी कार्यालय रोषणाईने उजळले,तिरंगी रंगाची मनमोहक सजावट.. देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सर्वत्र ओसंडून वाहत आहे. या राष्ट्रीय सणाचे औचित्य साधून अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालयाची मुख्य इमारत अतिशय आकर्षक आणि देखण्या विद्युत रोषणाईने न्हाऊन निघाली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला संपूर्ण प्रशासकीय परिसर झळाळून निघाला असून, ही रोषणाई अकोलेकरांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.तिरंगी रंगाची उधळण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर करण्यात आलेल्या रोषणाईमध्ये प्रामुख्याने केशरी, पांढरा आणि हिरवा अशा तिरंगी छटांचा वापर करण्यात आला आहे. रात्रीच्या अंधारात लखलखणारे हे तीन रंग पाहून नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना अधिकच प्रबळ होत आहे. इमारतीच्या दर्शनी भागावर करण्यात आलेल्या या प्रकाशयोजनेमुळे परिसराला एक वेगळीच शोभा प्राप्त झाली आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 26, 2026 02:16:45
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ANC - छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेसेना युतीची घोषणा झाली असली, तरी १९ गटांत दोन्ही पक्ष थेट आमनेसामने लढणार आहेत. युतीनंतर पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी काही गटांत दोन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवारांना बी-फॉर्म दिल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. सिल्लोड, सोयगाव, कन्नडसह काही तालुक्यांतील गटांत युती झाली नसून, उर्वरित ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत. २७ जानेवारी रोजी अर्ज परत घेण्याची अंतिम तारीख आहे तो पर्यंत अर्ज मागे घेतले नाहीत तर महायुतीचा खंडोबा होणार असे चित्र आहे... त्यामुळे नेतेमंडीसाठी आजचा दिवस धावपळीचा आहे..
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 26, 2026 02:16:30
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 26, 2026 02:15:18
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मुकुंदवाडी रेलवे स्टेशन परिसर में गोळीबार करने वाले आरोपीं की पुलिस ने क ाड धिंड काढली. छत्रपती संभाजीनगर शहर में मुकुंदवाडी रेलवे स्टेशन परिसर में गंगवार उफालूण आलेल्या प्रकरणातील आरोपींची आज पोलिसांकडून धिंड काढण्यात आली. मोबाइल और एके तरुणीच्या वादातून कुख्यात गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये झालेल्या या संघर्षात थेट गोळीबार करत एकाला मारण्याचा प्रयत्न झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपींनी नागरिकांच्या घरांवर दगडफेक केली, तसेच मध्ये पडणाऱ्या लोकांना जीवेमारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुख्य आरोपी शुभम जाटसह सात जणांना अवघ्या पाच तासांत अटक केली. १९ जानेवारी रोजी घडलेल्या या घटनेतील आरोपींना आज पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी धिंड काढून शहरवासीयांसमोर आणले. कायदा हातात घेणाऱ्यांना कोणतीही माफी नाही, असा कडक संदेश पोलिसांनी या कारवाईतून दिला आहे.
0
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Jan 26, 2026 01:16:04
Palghar, Maharashtra:ANCH - पालघरच्या जव्हार मधील वाळवंडा या अती दुर्गम भागात राहणाऱ्या भिकल्या धिंडा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केल जाणार आहे . आदिवासी समाजातील तारपा या पारंपरिक वाद्य आणि नृत्याला साता समुद्र पार पोहचवणाऱ्या भिकल्या धिंडा यांना या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केल जाणार असून मागील 80 पेक्षाही जास्त वर्षांपासून भिकल्या धिंडा हे तारपा वाद्य वाजवत आहेत . शिक्षण नसलेल्या धिंडा यांना अवघ्या बारा वर्षांपासूनच तारपा नृत्याची आणि वाद्याची आवड निर्माण झाली असून आज 92 वर्षाचे झाल्यानंतर देखील त्यांच्यात तारपा वाद्याची तीच आवड कायम आहे . आतापर्यंत त्यांना शेकडो पुरस्कारांनी sन्मानित केलं गेलं असलं तरीदेखील देशातील सर्वोच्च असलेल्या पद्मश्री या पुरस्कारामुळे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळतोय . तारपा हेच वाद्य आपलं दैवत असून येणाऱ्या पिढ्यांनी ही परंपरा जपली पाहिजे असा आवाहन देखील यावेळी धिंडा यांच्याकडून करण्यात आलं .
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Jan 26, 2026 01:15:46
Solapur, Maharashtra:सोलापूर महानगरपालिकेच्या ऐतिहासिक इंद्रभुवन इमारतीवर 26 जानेवारी निमित्त करण्यात आली आकर्षक विद्युत रोषणाई - महानगरपालिकेवर केलेली आकर्षक विद्युत रोषणाई ड्रोन पायलट नागेश राशीनकर यांच्या कॅमेऱ्यात कैद - 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या इमारतीचे मनमोहक दृश्य ड्रोनच्या नजरेतून खास झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी - स्वातंत्र्य, एकता आणि लोकशाही मूल्यांचे प्रतीक असलेल्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत महानगरपालिकेने शहरवासीयांना दिला एक अविस्मरणीय अनुभव - जवळपास 100 वर्षे जुन्या असलेल्या ऐतिहासिक इंद्रभुवन इमारत तिरंगा रोषणाईत न्हाऊन निघाली
0
comment0
Report
Advertisement
Back to top