445001
माझी उमेदवारी मदन येरावारांना पाडण्यासाठीच, माजी आमदार संदीप बाजोरीयांचा दावा.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून तुतारी चिन्हावरच आपण लढु असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत तिकीट वाटपाआधीच त्यांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार देखील सुरू केला आहे. भाजप आमदार मदन येरावार यांनी मतदारसंघ बकाल करून ठेवला, रस्त्यांची दैना झाली, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून भयमुक्त वातावरण देऊ असे वचन आपण जनतेला देत असल्याचे संदीप बाजोरिया यांनी सांगितले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
स्वच्छता दूत वामन इंगळे की साइकिल यात्रा से महाराष्ट्र में जागरूकता फैल गई
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:वाशिम जिल्ह्यातील डव्हा येथील स्वच्छता दूत वामन इंगळे यांनी संत-महात्म्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्रभर सायकलद्वारे स्वच्छता यात्रेला सुरुवात केली आहे.विशेष म्हणजे त्यांनी आपल्या सायकलवर छोटेखानी ग्रंथालय उभारले असून गावोगावी फिरत स्वच्छतेचा संदेश देण्याचे काम सुरू केले आहे.ज्या गावात त्यांचा मुक्काम असेल त्या गावात संत गाडगेबाबांच्या विचारांनुसार स्वच्छता अभियान राबवून नागरिक,युवक आणि महिलांना वाचनाची प्रेरणा दिली जात आहे. महापुरुषांच्या विचारांची पुस्तके उपलब्ध करून समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न ते करत आहेत.या यात्रेचा कालावधी निश्चित नसला तरी स्वच्छता आणि वाचन संस्कृतीचा संदेश देत वामन इंगळे महाराष्ट्र भ्रमंती करत असल्याचे त्यांनी सांगितले. बाईट: वामन इंगळे,स्वच्छता दूत0
0
Report
रात के अंधेरे में गैस सिलेंडर वितरण, ब्लैक मार्केटिंग का शक—भंडारा लाखनी
Bhandara, Maharashtra:भंडाऱ्याच्या लाखनीत रात्रीच्या अंधारात गॅस सिलेंडर वाटप..... ब्लॅक मार्केटिंगचा संशय.... हे सिलेंडर अधिकृत नोंदीवर वितरित झाले की अवैधरीत्या, याबाबत मात्र स्पष्टता नाही. रात्रीच्या अंधारात सुरू असलेल्या या कारभारामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. तालुका पुरवठा अधिकाऱ्यांना हा व्हिडिओ पाठवून याबाबत विचारणा केली असताहा प्रकार गंभीर व चुकीचे असल्याचे सांगत वरिष्ठांकडे अहवाल पाठवून कारवाईचे संकेत दिले आहेत.0
0
Report
टाकळी में पेयजल की मांग पर महिलाओं ने ग्राम पंचायत के सामने घागर मोर्चा निकाला
Sangli, Maharashtra:सांगलीच्या मिरज तालुक्यातील टाकळी येथे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला. टाकळी गावात पाणी पुरवठा सुरळीत होत, नसल्याचा आरोप करत संतप्त महिलांनी हातात घागरी घेऊन ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली, यावेळी संतप्त महिलांनी ग्रामविकास अधिकारीांना घेराव घालत धारेवर धरले. दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.0
0
Report
Advertisement
भंडारा में खाद की कीमतें बढ़ीं, किसान फिर आर्थिक संकट में
Bhandara, Maharashtra:*भंडाऱ्यात खतांचे दर कडाळले...खतांच्या दरवढीने जिल्ह्यातील बळीराजा पुन्हा आर्थिक संकटात....* Anchor ;- खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना रासायनिक खतांच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीने भंडारा जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा आर्थिक संकटाच्या खाईत लोटला जाणार आहे.आधीच अवकाळी पाऊस, नापिकी, वाढती मजुरी, बियाणे व कीटकनाशकांच्या महागाईने त्रस्त असलेल्या बळीराजावर आता खत दरवाढीचे नवे ओझे कोसळले असून ग्रामीण भागात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात डीएपी, तसेच पोटॅश यांसारख्या खतांच्या किमतींमध्ये प्रति बॅग ४०० ते ५०० रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.दोन वर्षांपूर्वी १ हजरा शंनबत्त ते १ हजार तिनशे रुपयांत मिळणारी खतांची गोणी आता थेट १ हजार आठशे ते २ हजार तिनशे रुपयांच्या घरात पोहोचल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.विशेष म्हणजे खरीप पेरणीपूर्वी मोठ्या प्रमाणात खत खरेदी करावी लागत असल्याने अनेक शेतकरी सावकारांकडून कर्ज घेण्याच्या तयारीत आहेत.'शेती करावी की पडीत ठेवावी?' असा संतप्त सवाल आता ग्रामीण भागातून उपस्थित केला जात आहे. Byte ;- प्रदीप कुंभलकर , कृषी केंद्र चालक Byte ;- शेतकरी0
0
Report
पंढरपूर एकादशी पर चार लाख भक्त जुटे: दर्शन के लिए छह घंटे की लाइन
Pandharpur, Maharashtra:सध्या पुरुषोत्तम मास सुरू आहे या महिन्यातील आज कमला एकादशी आहे. या एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर मध्ये आज चार लाख भाविक दाखल झालेले आहेत पंढरपूरमध्ये प्रदक्षिणा मार्ग चंद्रभागा वाळवंट मंदिर परिसर 65 एकर दर्शन रांग या ठिकाणी भाविकांची गर्दी झालेली आहे भाविकांच्या दर्शनाला सहा तासांचा कालावधी लागत असून मंदिर समितीने दर्शन रांगेमध्ये भाविकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत0
0
Report
पंढरपुर में एकादशी के बीच बकरी ईद पर ऐतिहासिक निर्णय: कुर्बानी नहीं
Pandharpur, Maharashtra:पुष्ठरपुरात एकादशीचा सोहळा साजरा होत आहे. तसेच आज बकरी देखील असल्याने पंढरपुर मधील मुस्लिम धर्मीय नागरिकांनी बकरी ईद की कुर्बानी न देण्याचा एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पंढरपुरात वारकरी सांप्रदायाला मांस वर्ज्य आहे. त्यामुळेच विठ्ठल भक्त असणाऱ्या मुस्लिम धर्मीय बांधवांनी आजची बकरीत उद्या साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नमाज पठाणासह सर्व धार्मिक कार्यक्रम उद्याच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.0
0
Report
Advertisement
नांदेड में मानसूनपूर्व बरसात से केला बागें भारी नुकसान, किसान आर्थिक संकट
Nanded-Waghala, Maharashtra:नांदेड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासुन वादळी वाऱ्यासह होत असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने फळबागांचे नुकसान होत आहे. काल रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मुदखेड तालुक्यातील केळी बागांचे मोठे नुकसान झाले. या वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा आडव्या पडल्या आहेत. मुदखेड तालुक्यातील इजळी या गावात सर्वाधिक नुकसान झाले आहे. काही दिवसातच ही केळी काढणीला आली होती. परंतु तोंडचा घास काल झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. पंचनामे करून मदतीची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.0
0
Report
भीमाशंकर मंदिर अभी बंद, भक्त 31 मई तक दर्शन के लिए उम्मीद लगाए बैठे
Shirur, Maharashtra:बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या, प्रसिद्ध भीमाशंकर मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आणखी किती वाट पाहावी लागणार? असा प्रश्न आता भाविक विचारत आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून मंदिरात विकास आराखड्याची कामं सुरू असल्यामुळे, हे मंदिर भाविकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आलंय. प्रशासनाने ३१ मे रोजी मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुलं करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, प्रत्यक्ष पाहणी केली असता मंदिराच्या परिसरातील बहुतांश कामं अजूनही अपूर्णच आहेत. त्यामुळे येत्या ३१ मेला मंदिर भाविकांसाठी सुरू होण्याची शक्यता सध्या तरी अत्यंत धूसर दिसतेय. दुसरीकडे, देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या शेकडो भाविकांना दर्शनाशिवाय माघारी जावं लागत असल्यानं, त्यांच्यामध्ये तीव्र नाराजीचा सूर पाहायला मिळतोय.0
0
Report
बच्चू कडू के शिवसेना प्रवेश से रवी राणा गुट में हलचल, भेंडे शामिल
Amravati, Maharashtra:बच्चू कडू यांचा आमदार रवी राणा यांना धक्का; रवी राणा यांचे खंदे समर्थक निलेश भेंडे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश करताच आमदार रवी राणा यांना मोठा धक्का दिला आहे. युवा स्वाभिमान पक्षाचे खंदे समर्थक निलेश भेंडे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. आमदार बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह भेंडे यांचा अचानक प्रवेश झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. निलेश भेंडे हे आमदार रवी राणा यांचे विश्वासू समर्थक मानले जात होते त्यामुळे हा प्रवेश राणा गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. युवा स्वाभिमानमध्ये राहून निलेश भेंडे यांनी अनेक आक्रमक आंदोलने करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. आता त्याच आक्रमक शैलीत बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नव्याने राजकीय ताकद उभी करण्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आगामी स्थानिक राजकारणात या प्रवेशामुळे राणा विरुद्ध बच्चू कडू संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.0
0
Report
Advertisement
खरीप के लिए अनुदानित डीएपी-यूरिया की मांग बढ़ी, खतों का भंडार बढ़ा, तुटवड़ा संभव
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यात खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांचा कल डीएपी आणि युरिया या अनुदानित खतांकडे वाढला आहे. इतर रासायनिक खतांच्या खरेदीकडे दुर्लक्ष होत असल्याने विक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणात खतसाठा पडून आहे. कृषी विभागाने जिल्ह्यात ३ लाख ८४ हजार ४९५ हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन केले असून मान्सूनपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र डीएपी खताची वाढती मागणी लक्षात घेता पुढील काळात तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.0
0
Report
उसमा नाबाद-लातूर-बीड़ में पहला उमेदवारी अर्ज दाखल, महाविकास आघाडी के भीतर हलचल
Dharashiv, Maharashtra:उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. शिवसेनेचे कळंब नगरपालिकेचे गटनेते संजय मुंदडा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीकडून उमेदवाराबाबत चर्चा सुरू असतानाच मुंदडा यांनी अर्ज भरल्याने धाराशिव जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी त्यांनी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार सुरेश धस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न सोडवण्यात अपयश आल्याचा आरोपही केला.0
0
Report
वाशीम के गटर जाम: जनता ने खुद सफाई, वीडियो वायरल, प्रशासन सवालों के घेरे
Washim, Maharashtra:गटार तुंबल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गंधी व घाणीमुळे आरोग्याचा धोका निर्माण झाला असून प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अनेक तक्रारी करूनही कारवाई न झाल्याने संतप्त नागरिकांनी स्वतः गटारात उतरून सफाई केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.0
0
Report
Advertisement
दिव्यांग प्रमाणपत्र सत्यापन में भारी देरी, 103 रिपोर्ट छह माह से लंबित
Washim, Maharashtra:वाशीम जिल्हा परिषदेत दिव्यांग प्रवर्गातून नोकरी व पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेत मोठा विलंब होत असल्याचे समोर आले आहे. १५२ कर्मचाऱ्यांपैकी केवळ १३ जणांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले असून ३६ कर्मचारी तपासणीसाठी गैरहजर राहिले आहेत. तर तब्बल १०३ अहवाल सहा महिन्यांपासून प्रलंबित आहेत. दिव्यांग कल्याण विभागाचे तत्कालीन सचिव तुकाराम मुंढे यांनी ९ ऑक्टोबर २०२५ रोजी सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्र व शारीरिक पडताळणीचे आदेश दिले होते. त्यानुसार अकोला येथील आरोग्यसेवा मंडळामार्फत तपासणी सुरू करण्यात आली. मात्र प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.0
0
Report
नाशिक में हिट एंड रन: चालक फरार, सीसीटीवी से खुला दर्दनाक मामला
Nashik, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील राजूर बहुला परिसरात २४ मे २०२६ रोजी हिट अँड रनची धक्कादायक घटना घडली. सत्तरीच्या घरात असलेल्या तुळसाबाईं अहिलाजी तालखे या रस्ता ओलांडत असताना भरधाव कारने जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत त्या अक्षरशः फुटबॉलप्रमाणे हवेत उडाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार मुंबईहून नाशिकच्या दिशेने येत होती. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावर न थांबता पळ काढल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. गंभीर जखमी अवस्थेत तुळसाबाई यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे, घटनेला तीन दिवस उलटूनही आणि सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असतानाही पोलिसांनी अद्याप अधिकृत तक्रार दाखल केली नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. “वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच गुन्हा दाखल करू,” असे पोलिशांकडून सांगितले जात असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, हिट अँड रन प्रकरणातील आरोपी वाहनचालकाचा शोध घेण्याची मागणी स्थानिकांकडून होत असून, सीसीटीव्हीच्या आधारे तातडीने कारचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे.0
0
Report
यवतमाल की वणी में 50 हजार नकद चोरी: CCTV में चोरों की साज़िश
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी येथे अंगावर घाण टाकून एका व्यक्तीची 50 हजार रुपयांची रोख रक्कम चोरी केल्या गेली आहे. सावज हेरून, सापळा रचत, रोख उडवणाऱ्या या टोळीचा प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे. लालगुडा येथील शंकर धोटे यांनी बँकेतून 50 हजार रुपयांची रोख काढली, ती बॅग दुचाकीच्या हँडलला अडकविली, दरम्यान त्यांचा चोरट्यांनी पाठलाग सुरू केला. रस्त्यात त्यांच्या अंगावर घाण पडली. ती घाण साफ करण्यासाठी बाजूला जाताच एकाने रोख रकमेची पिशवी काढून घेतली, व तिथं निघून गेला, त्याच्यासोबत घाण पडल्याची माहिती देणारा देखील जात असल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे.0
0
Report
Advertisement
